{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T14:51:43Z", "digest": "sha1:GHK7ZFK4U5YXLR4EY7PX7SD4H72TWNOY", "length": 3635, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सियबोंगा संग्वेनी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-dolphin-found-in-mumbai-sea-special-story-492610", "date_download": "2018-04-20T14:44:01Z", "digest": "sha1:VWIK5JMBOEJNP7C5ZPQWMBICNDCG7D4B", "length": 15885, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या समद्रात डॉल्फिनचं दर्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या समद्रात डॉल्फिनचं दर्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईत एका नवे पाहुणे दाखल झाले आहेत. या नव्या पाहुण्यांचा आधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईतला व्हिडीओ असल्यानं त्यांना भेटण्याची आमचीही उत्सुकता वाढली. त्यामुळे आम्ही या पाहुण्याचा शोध घेतला, आणि त्या पाहुण्यांनाही भेटलो...चला पाहुयात कोण आहेत हे पाहुणे..\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nस्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या समद्रात डॉल्फिनचं दर्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nस्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या समद्रात डॉल्फिनचं दर्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nमुंबईत एका नवे पाहुणे दाखल झाले आहेत. या नव्या पाहुण्यांचा आधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईतला व्हिडीओ असल्यानं त्यांना भेटण्याची आमचीही उत्सुकता वाढली. त्यामुळे आम्ही या पाहुण्याचा शोध घेतला, आणि त्या पाहुण्यांनाही भेटलो...चला पाहुयात कोण आहेत हे पाहुणे..\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: राजस्थान रॉयल्स ने टॉस जीता,पहले गेंदबाजी का फैसला\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_7.html", "date_download": "2018-04-20T14:32:12Z", "digest": "sha1:JQDH5NHZL76EGLPYXS5YF2S77UD2AYWY", "length": 16865, "nlines": 239, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): फिंगर्स क्रॉस्ड ! (India vs West Indies - World Cup 2015)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं. असो.) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळणं म्हणजे ख्रिस गेल नामक घोड्याच्या डोळ्यांवरची झापडं काढून त्याला मोकळं सोडता येण्याची संधी मिळणं.\nख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही दोन अतिज्वलनशील व विस्फोटक रसायनं खेळपट्टीवर आली. मात्र पर्थच्या ह्या खेळपट्टीने तिचा रंग पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केला. त्या रंगात कुठलंही रसायन स्वत:चा रंग दाखवू शकणार नव्हतंच खरं तर शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर स्मिथने जेव्हा प्रहार केला होता, तेव्हा काही वेगळंच वाटलं होतं. पण डुलकी लागून मान एका बाजूला पडल्यावर खाडकन जाग येते तशी खेळपट्टी पुढच्याच चेंडूंवर जागी झाली आणि त्यानंतर चेंडू टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने असा झेपावत होता जसा सूर्याला पाहून बालहनुमान झेपावला असावा. शमी-यादवने पहिली काही षटकं फलंदाजांची सत्वपरीक्षाच पाहिली. त्यात स्मिथ उत्तीर्ण झाला नाहीच. शमीच्या त्या चेंडूवर त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्वत:च त्याच्या बॅटला स्पर्श करून धोनीच्या हाती विसावला. इथून सुरु झालेली पडझड थांबूच शकली नाही. एकानंतर एक फलंदाज बाद होत जाताना मला मात्र 'आज पुन्हा एक एकतर्फी सामना पाहावा लागणार' अशी हुरहूर लागली होती. विंडीजच्या फलंदाजीची बेजबाबदार फटके, सुमार रनिंग बिटवीन द विकेट्स, तंत्राचा सपशेल अभाव अशी सगळी अशोभनीय अंगं काल व्यवस्थितपणे दाखवली गेली. अखेरच्या टप्प्यात 'कोवळा कर्णधार' मदतीस धावून आला म्हणून जरा तरी सन्मानजनक धावसंख्या नोंदवता आली.\nज्या खेळपट्टीवर शमी-यादव-मोहितने फलंदाजांना नाचवलं, तिथे विंडीजची गोलंदाजी काही सोपी जाणार नव्हतीच. जेरोम टेलर, आंद्रे रसेल, केमार रोच ह्यांचे खांदे आणि शमी, यादव, मोहितचे खांदे ह्यांच्यात वडाच्या झाडाचा बुंधा आणि अशोकाच्या झाडाचा बुंधा ह्यांच्याइतका फरक आहे. तर, ऑफ स्टंप बाहेरील जलदगती, उसळती गोलंदाजी आणि धवन-रोहितच्या बॅट्स ह्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. कोहली जसा परवा पत्रकाराला ओळखताना चुकला तसाच हूकसाठी चेंडू निवडताना फसला. रहाणेच्या विकेटने हॉकआय प्रणालीच्या मर्यादा विंडीजच्या फलंदाजीप्रमाणे उघड्या पडल्या. रैना समोर आला की निर्जीव चेंडूसुद्धा स्वत:च आखूड टप्पा घेत असावा, त्याची ही उणीव इतकी सुस्पष्ट झाली आहे. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की त्याच्या कुवतीपेक्षा मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. १३४ वर ६ गडी बाद झाल्यावर फॉर्मात नसलेल्या धोनीवर सर्व मदार होती आणि त्याने संघाची डूबती नैया पार केली.\n१८३ धावांचं लक्ष्य माफक होतं, पण डावाच्या पहिल्या अर्ध्या भागात विंडीज गोलंदाजांनी त्या धावसंख्येत अजून १०० धावा जोडलेल्या असाव्यात असं भासवलं. पण नंतर मात्र स्वैरपणा वाढत गेला.\nभारताने अकरा षटकं राखून लक्ष्य साध्य केलं, तेव्हा निश्चितच विंडीजच्या खेळाडूंना वाटलं असेल की आपण ४५ षटकांत गाशा न गुंडाळता पूर्ण पन्नास षटकं खेळून काढली असती, तर.... तर कदाचित पाकिस्तानसाठी पुढील फेरीचा रस्ता अधिक जास्त कठीण असता आणि स्वत: विंडीजसाठी थोडासा सोपा.\nह्या विजयामुळे भारताचा मात्र पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पण त्याचबरोबरच चांगल्या गोलंदाजीसमोर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना ही फलंदाजी ढेपाळू शकते, हेही समजून आलं. इथून पुढच्या सामन्यांसाठी एकच शुभेच्छा - 'पहिली फलंदाजी मिळो आणि तसे न झाल्यास २०० च्या आतले लक्ष्य असो \nकीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड \nह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015'\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mobile-app-railway-tickets-46008", "date_download": "2018-04-20T14:35:54Z", "digest": "sha1:7T6XLK7F5P2VRM4UQ54JAFHCICZSNDWO", "length": 11740, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mobile app for railway tickets मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची 10 रेल्वे स्थानकांवर सुविधा | eSakal", "raw_content": "\nमोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची 10 रेल्वे स्थानकांवर सुविधा\nगुरुवार, 18 मे 2017\nकॅशलेस मोहिमेंतर्गत सोलापूर विभागातील 10 रेल्वे स्थानकांवर मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मसह सुपरफास्ट रेल्वेच्या तिकिटाचीही खरेदी या ऍपद्वारे करणे शक्‍य आहे.\nसोलापूर - कॅशलेस मोहिमेंतर्गत सोलापूर विभागातील 10 रेल्वे स्थानकांवर मोबाईल ऍपद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मसह सुपरफास्ट रेल्वेच्या तिकिटाचीही खरेदी या ऍपद्वारे करणे शक्‍य आहे.\nसोलापूरसह गुलबर्गा, दौंड, साईनगर, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, वाडी, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड या स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ऍपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट, द्वितीय श्रेणीचे सर्वसाधारण आणि मेल व एक्‍स्प्रेस गाड्यांचे रेल्वे तिकीट खरेदी करणे शक्‍य होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना भारतीय रेल्वे सर्वसाधारण तिकिटाचा ऍप (UTS App-indian Railway Unreserved Ticketing) लॉग इन करावा लागेल. या ऍपचा वापर केल्यावर तिकीट कन्फरमेशन मेसेजवर तीन अंकी कोड येईल. त्यानंतर या 10 रेल्वे स्थानकांवर सुविधा करण्यात आलेल्या एटीव्हीएम मशिनवर मोबाईल तिकीट ऑप्शनचे बटन दाबल्यावर तीन अंकी कोड दाबल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल. या व्यतिरिक्त स्मार्ट कार्डनी ऑटोमॅटिक तिकीट वेडिंग मशिनद्वारे तिकीट काढल्यास पाच टक्के सवलत मिळणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/3-google-analytics", "date_download": "2018-04-20T14:20:50Z", "digest": "sha1:VQEEAGVTWBBFICYL4CKBEU7WNSG33DCK", "length": 8161, "nlines": 25, "source_domain": "isabelny.com", "title": "Google Analytics सेगमेंट - मिमल व्यवहार", "raw_content": "\nGoogle Analytics सेगमेंट - मिमल व्यवहार\nइतरांशी Google Analytics ची चर्चा करताना आपण \"मी टिपा शोधत आहे,\" \"मी Google Analytics कधीही वापरलेले नाही\" आणि इतर तत्सम गोष्टी ऐकल्या असतील. Artem Abgarian, Semaltॅट तज्ज्ञ, आपण आपल्या वेबसाइटवर पुरेशी संख्या अभ्यागत प्राप्त करू इच्छित असल्यास Google Analytics मधील विभागांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.\nGoogle Analytics मध्ये, एक खंड हा एक विशेष प्रकारचा डेटा किंवा तंत्र आहे जो आपल्याला आपल्या रहदारीच्या गुणवत्तेची कल्पना देतो. Google Analytics साइटची एकूण कामगिरी आणि सत्रांबरोबरच वापरकर्त्यांच्या बाउंस दर सुधारण्यासाठी खूप संधी देते. आपल्याला कोणत्या प्रकारच्या पृष्ठांवर किंवा लेखांना अधिक दृश्ये मिळत आहेत आणि आपल्या साइटवर किती ऑर्गेनिक दृश्ये मिळत आहेत याची कल्पना हवी असल्यास, आपण GA विभागांचा वापर करून हे करायला हवे यामुळे आपल्याला आपला डेटा संकुचित करण्यात मदत होईल जेणेकरून आपण पूर्वीपेक्षा अधिक विशिष्ट आणि चांगले-अनुभवी परिणाम मिळवू शकता - crack filling in maryland.\nआपल्याला विभागांची आवश्यकता का आहे\nमला येथे सांगू द्या की आपली वेबसाइट आणि त्याचे डेटा संरक्षित केले जाऊ शकत नाही किंवा विभाजित न करता योग्यरित्या एकत्रित केले जाऊ शकत नाही. हे आपल्याला योग्य निष्कर्ष काढायला मदत करू शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की, सर्व डेटा आणि माहिती एकत्रित केली आहे, त्यामुळे आपल्याला विभाजित करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण आपल्या साइटच्या अभ्यागतांची गुणवत्ता सुनिश्चित करू इच्छित असल्यास, आपण आपल्या Google Analytics आणि तिचा डेटा विभागात विभाजित करणे आणि संबंधित फिल्टर तयार करणे आवश्यक आहे..डेटा इतका गोळा केला जातो की आपण योग्य विभाजन न करता कोणत्याही धोरणांची निर्मिती करू शकत नाही. आपण आपली वेबसाइट आणि उत्पादनांचा ऑनलाइन प्रसार करणे सुरू ठेवू शकता, परंतु आपण कोणतेही विक्री किंवा वापरकर्ता प्रतिबद्धता मिळविणार नाही म्हणून कोणतेही वापर नाही.\nGoogle Analytics मध्ये एक सेगमेंट कसा तयार करायचा\nआपण Google Analytics मध्ये सेगमेंट तयार करू इच्छित असल्यास, आपल्याला प्रथम करण्याची आवश्यकता आहे फिल्टर संपादित करा आणि आपल्या साइटच्या स्वरूपावर आधारित त्यांचे नाव बदलणे. मला येथे सांगू द्या की विभाग संपादित करणे, हटविणे किंवा नाव बदलणे सोपे आहे परंतु आपण प्रत्यक्ष डेटा काढू शकत नाही कारण यामुळे संपूर्णपणे आपल्या वेबसाइटला हानी पोहोचते. आपल्यापैकी बर्याच लोकांसाठी, विभाग तयार करणे कधीही महत्त्वाचे नव्हते, परंतु त्याशिवाय आपण शोध इंजिन्स वरून गुणवत्ता रहदारी मिळविण्याचे आश्वासन देऊ शकत नाही.\nविभागांचे दोन मुख्य प्रकार, सिस्टम खंड आणि सानुकूल विभाग आहेत सिस्टीम विभाग म्हणजे ते Google Analytics मध्ये निश्चित वैशिष्ट्ये आणि पर्याय प्रदान करतात आणि एकदा का ते तयार केले जाऊ शकत नाहीत. तथापि, आपल्या लँडिंग पृष्ठांसह सोशल मीडिया प्रोफाइलसह ते समायोजित केले जाऊ शकतात. सिस्टीम विभाग उपयुक्त आहेत कारण ते मोबाईल अनुकूल आहेत आणि मोबाइल डिव्हाइसेसवरून आपल्याला बरेच दृष्य मिळवू शकतात. सानुकूल सेगमेंट अधिक जटिल आहेत आणि सिस्टम सेगमेंटपेक्षा कमी लोकप्रिय आहेत. ते Google Analytics मध्ये निवडण्यासाठी विविध पर्याय देखील देतात उदाहरणार्थ, आपण आपल्या वेबसाइटवर तीस सेकंदांपेक्षा कमी खर्च करणार्या अभ्यागतांना फिल्टर करणार्या विभाग तयार करू शकता. आपल्या वेब पृष्ठांवर देश-लक्ष्यित दृश्ये प्राप्त करण्यासाठी विभाग तयार करणे देखील शक्य आहे हे सर्व आपल्या साइटच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करेल आणि आपल्या रहदारीच्या गुणवत्तेत संपूर्ण सुधार होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/magazine/march-2016", "date_download": "2018-04-20T14:39:29Z", "digest": "sha1:HAZ25L3H5GBYP22TGUEE2GSS2BSEH3XY", "length": 5389, "nlines": 115, "source_domain": "manashakti.org", "title": "March 2016 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.\nमनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा\nमुखपृष्ठ- जिसको अल्ला न देगा...... \nप्रार्थनातत्वाने- वातावरशुद्धीसाठी वास्तुशामन प्रार्थना\nसंगीतज्ञानाने - सवाई गंधर्व - रामभाऊ कुंदगोळकर\nसदभावनेने - बुराई के बदले दुवाऍ दिए जा\nस्वप्नपूर्तीने - स्वप्नांची फुले उमलण्यासाठी\nसत्कृत्यज्ञानाने- मुले घडवणाऱ्या संस्था\nसतप्रवृत्तीने - प्रामाणिक - सतशील जीवनाचा महामंत्र\nनिसर्गज्ञानाने - निर्भीड लावा पक्षी\nसंस्था उपक्रमाने - अंगणवाडी प्रकल्प\nअवकाशज्ञानाने - विश्वाला काही हेतू आहे का \nविचारममंथनाने - नाकारण्यातला आनंद\nसत्कृत्यपुण्याने - जीवनाची सुंदरता आणि अध्यात्म\nबोधकथेने - धर्म आणि दुर्योधन\nभक्तीज्ञानाने- देव भावाचा भुकेला\nप्रयत्नवादाने - मनाचा शत्रू - शंका\nबुध्दकथाज्ञानाने- गोड बोलण्याला फसू नका\nसंशोधनज्ञानाने- निसर्गाचा अविष्कार - किरणोत्सर\nवनस्पतीशास्त्रने- भूरुंडी एक तण - पिवळा चित्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2011/09/blog-post_26.html", "date_download": "2018-04-20T14:38:40Z", "digest": "sha1:MP3Q4Q4SDDPRPQWWMWLQ4B44BATQP7PM", "length": 11677, "nlines": 130, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: सौंदर्य-२", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nविद्या तुझा सौंदर्य या विषयावरचा ब्लॉग वाचला आणि तेव्हाच माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी मनात येऊन गेल्या.लहान नू.म.वि. शाळेत असताना आमचं स्नेहसंमेलन आलं की तेव्हा मला त्याच्यात आनंद घेण्यापेक्षा मनातून खूप वाईट वाटत असे याची मुख्य कारणे म्हणजे माझी उंची,ज्यामुळे नाचात कायमच मी मागच्या रांगेत ,दुसरं म्हणजे रंग...... समाजाच्या दृष्टीने गो-या गोमट्या, देखण्या यात बसणा-या मुली स्टेजवर पुढे असत. त्यामाने कमी देखण्या मागच्या रांगेत असा जणू नियमच ठरलेला.समाजात अजूनही दीसणं हा कीती महत्वाचा मुद्दा आहे.तेव्हा त्या शाळेच्या वयात या बद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.त्यातून स्वत:च शहाणपण यायला बरीच वर्षे गेली.मी कॉलेजला असताना जेव्हा फोटोग्राफी विषय घेतला तेव्हा काळा रंगातील सौंदर्य म्हणजे कायअनेक काळ्या रंगाच्या असणा-या व्यक्तींचे उत्कृष्ठ फोटो मी जेव्हा पाहीले तसतसा मनातला न्यूनगंड कमी झाला.माझं लग्न करण्याचा जेव्हा आई बाबा विचार करत होते तेव्हा आलेल्या अनेक स्थळांपैकी बहुतेक मुलांच्याकडून आलेल्या फोनवरचे संवादावरुन रंगावरुन नकार हे कारण होते.माणूस एवढा आपल्या बाह्यरुपाला महत्व देतो.याउलट इकडं कौस्तुभकडे सगळे पांढरे फटक गोरे असताना जिथून मला खात्रीने नकार येईल अशी अपेक्षा होती तिथूनच होकार आलेला पाहून मला धक्काच बसला. कारण त्याआधी आलेल्या स्थळांमध्ये आपलं दीसणं कीती महत्वाचे आहे हे अनुभवायला येत होतं.त्याबद्दल कौस्तुभचे खरंच कौतुक.आता आई म्हणून मी जेव्हा स्मृतीला वाढवतं असताना आमच्याकडे इतर माझ्या पुतण्या रंगाने गो-या आहेत त्यामुळे कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.आपलं वागणं,आपल्यातले गुण,आपल्या जवळची हुशारी ,आपल्या आवडी-निवडी अश्या अनेक विषयावर तिच्याशी बोलल्यावर तिचा चेहरा एकदम खुलतो.खरंच लहानपणापासून या गोष्टी आपण कश्या दाखवतो हे फार महत्वाचे वाटते.गोरं म्हणजे सुंदर आणि तसं आपन नसू तर अनेक गोष्टींच्या लेपनाने तो तात्पुरता गोरा रंग मिळवून समाजात मिरवणा-या बायकांकडे बघून खरंच कीव करावीशी वाटते अनेक प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दाखवणे. त्यासाठी पैसा, वेळ, आपली बुद्धी खर्च करणे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे.आपल्या मुलींकडे पाहीले की खरंच बरं वाटत की घराच्या बाहेर पडताना त्यांना पावडर न लावताही बाहेर पडता येतं. स्वत:च्या दिसण्यात त्या एवढ्या गुरफटल्या जात नाहीत.आपलं बोलणं,आपलं हासणं, आपल्यातील छंद,कल्पकता यासारख्या अश्या अनेक गोष्टी म्हणजे खरं सौंदर्य......... याचा अर्थ त्यांना खूप लहान वयात माहीती होतोय.\nLabels: इंद्रधनु -- दीपश्री\nबरोबर आहे.. आपण गोष्ट सांगतांना \"एक खूप सुंदर परी/ राजकन्या होती. सुंदर म्हणजे कशी तर गोरी गोरी पान.. फुलासारखी नाजूक, लांबसडक केस, गुलाबी गाल\" असे वर्णन न करता \" सुंदर म्हणजे कशी तर गोरी गोरी पान.. फुलासारखी नाजूक, लांबसडक केस, गुलाबी गाल\" असे वर्णन न करता \" सुंदर म्हणजे कशी तर मनाने सुंदर.. सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांशी हसून खेळून वागणारी\" असे वर्णन केले तर आपल्या मुलांच्या मनावरचा बाह्यरुपाचा पगडा काढू शकतो शिवाय त्यांना चांगल्या वागणुकीचे धडेही त्यांच्या नकळत देऊ शकतो.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642543.html", "date_download": "2018-04-20T14:36:22Z", "digest": "sha1:3ZQIJIBRPF325BYGQZLTMTXLTDFPXWUS", "length": 3043, "nlines": 66, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - निसर्गरम्य संध्याकाळ", "raw_content": "\nएका निसर्गरम्य अशा संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावं ,\nवाहत राहावा वारा,तो हि मंद आणि नितळ,\nतेवढ्यातच अचानक व्हावा ढगांचा गडगडाट,\nत्या विजेच्या लख्ख प्रकाशामध्ये,\nबाकी सगळीकडे अंधार असावा,\nया अशा निसर्गरम्य संध्याकाळ वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावं.......||१||\nका कोण जाणे कुणाच ठाऊक,\nतू मला आणि मी तुला नजरेनेच बोलावे,\nडोळ्यात माझ्या तू आणि तूच असावे,\nया निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे.....||२||\nतू हळूच आता ओठ उघडावे,\nमी तुझ्या त्या ओठांवर अलगद बोट ठेवावे,\nनको बोलूस तू या क्षणी,\nअसे मी नजरेतून सांगावे,\nअशा या निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे......||३||\nखूप काही बोलायचे आहे तुला,\nहे मी तू न बोलताच ओळखावे,\nपण तरीही तुझ्या या गुलाबी ओठांना मी स्तब्ध करावे,\nया निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे......||४||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/01/set-webpage-as-your-desktop-wallpaper.html", "date_download": "2018-04-20T14:07:38Z", "digest": "sha1:NKPZ652V36H47LNQTFKB75EZDCDK2NB4", "length": 8387, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "वॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच !) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / वॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nवॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nमित्रहो नेटभेटवर आपण वेळोवेळी कामे जलद होण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळ्या टीप्स पाहत असतो. आज आपण एक अशाच प्रकारची परंतु गमतीशीर ट्रीक शिकणार आहोत.\nबर्‍याचदा संगणक चालु केल्याकेल्या पहिल्यांदा ईंटरनेट चालु केला जातो. आज आपण एक अशी युक्ती पाहणार आहोत ज्यामध्ये संगणकाचा वॉलपेपरच इंटरनेटचं काम करतो. अगदी सोपी आणि मजेशीर गोष्ट आहे ही. नाही का\nतुमच्या आवडीच्या कोणत्याही वेबपेजला लाइव्ह वॉलपेपर मध्ये रुपांतरीत करण्याची पद्धती खालीलप्रमाणे -\n१. डेस्कटॉपवर Right Click करुन properties मध्ये जा.\n२. Display Properties ची विंडो उघडेल. त्यामध्ये Desktop या टॅब मध्ये जा.\n३. आता चित्रात दाखवील्याप्रमाणे Customize desktop या बटणावर क्लिक करा.\n४. यामध्ये web चा पर्याय निवडा. येथे My current homepage चा पर्याय निवडा.(बहुदा गुगलच असेल \n५. Ok वर क्लिक करा आणि Display Properties च्या मुख्य विंडोमध्ये apply आणि Ok वर क्लिक करा.\nआता डेस्कटॉप पहा , तुमची आवडती वेबसाईट चक्क वॉलपेपरच्या स्वरुपात अवतरलेली दीसेल.\nजर होमपेजव्यतीरीक्त इतर कोणती वेबसाईट वॉलपेपर म्हणुन वापरायची असेल तर वरील स्टेप ३ नंतर \"New\" चा पर्याय निवडा आणि नविन वेबसाईटची वेबलिंक द्या. अशा प्रकारे कोणतीही वेबसाईट वॉलपेपर म्हणुन ठेवता येईल आणि अगदी वेबब्राउजरमध्ये वाचल्याप्रमाणे वाचता देखील येईल.\nआणखी एक गंमत -\nजर अशा प्रकारे http://www.bing.com/ ही मायक्रोसॉफ्टची सर्च साईट वॉलपेपर म्हणुन ठेवली तर दररोज बदलणारा वॉलपेपर आणि सर्च इंजिन असे दोनही फायदे मिळवता येतात.\nवॉलपेपर म्हणुन ठेवलेल्या वेबसाईटवर वरच्या बाजुला माउस नेल्यावर एक करड्या रंगाचा पट्टा आणि डाव्या बाजुला एक छोटा त्रिकोण दीसतो. त्यावर क्लिक केल्यास विविध पर्याय दीसतील.\nयापैकी मुख्य दोन पर्याय आणि त्यांचा उपयोग खालीलप्रमाणे -\nलाईव्ह वेबपेजला आपल्या संगणकाचा वॉलपेपर बनवुन स्वतःचा वेळ तर वचवाच पण त्यासोबत इतरांना अचंबीतही करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nवॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://eshanyavarta.blogspot.com/2016/04/", "date_download": "2018-04-20T14:18:44Z", "digest": "sha1:VDD37FBP3KETRCMATTGUMGF4JG355RXI", "length": 27742, "nlines": 81, "source_domain": "eshanyavarta.blogspot.com", "title": "Eshanya Varta ईशान्य वार्ता : April 2016", "raw_content": "\nजेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र\nएप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला लेख:\nदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियन’ (डीएसयू)च्या माजी सदस्यांनी सभा बोलावली होती. अफझल गुरू आणि मकबूल भटचा न्यायव्यवस्थेने खून केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्या विरोधात आणि ‘काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या लोकशाही हक्कासाठी चाललेल्या लढय़ाला’ पाठिंबा देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तिला कॅम्पसमधले आणि बाहेरचे बरेच काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते. अफझल गुरूच्या स्मरणार्थ ‘अ कंट्री विदाऊट अ पोस्ट ऑफिस’ हा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला होता. डीएसयू हा कट्टर डाव्या विचाराच्या, माओवादावर विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट आहे. छत्तीसगढमधल्या माओवाद्यांना त्यांचं समर्थन आहे.\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे. डाव्या पक्ष संघटनांनी आता दिशाभूल करण्याची निती अवलंबली आहे. जो मुद्दा आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ माजवायचा ही त्याची नेहमीची चाल आहे. इथेही तेच घडले आहे ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर त्यानी तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढला. डीएसयू चा नेता कन्हय्या कुमार याला अटक झाल्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत वाहिन्यांवर झळकणारा उमर खालीद हा विद्यार्थी नेता फरार झाला. हा उमर खालीद DSU (डोमोक्राटीक स्टूडंट युनियन)चा नेता DSU ही कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाची विद्यार्थी संघटना. याच उमर खालीदचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य हात होता. उमर खालीदचे वडील सैय्यद कासिम इलियास हे सिमी या संघटनेचे प्रमुख नेते होते. विद्यापीठात पोलिस आलेच कसे हा नवा युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय हा नवा युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो देशप्रेमी नागरीकांना छळणारे अनेक प्रश्न या प्रकरणातून पुढे आले आहेत. या घटनेआधी उमर खालीदने काश्मीर आणि खाडी देशात अनेक फोन केले होते अशी माहिती उजेडात येत आहे. देशविरोधी कारवाया आणि माओवाद्यांच्या काश्मीर कनेक्शनचाच हा भाग आहे. आणि स्वतंत्र्य म्हणजे वैराचार नव्हेच. २०१० मध्ये दंतेवाडा इथं लक्षलवादी हल्ल्यात ७५ जवान शहीद झाले होते तेव्हा याच जेएनयु विद्यापीठात विजय दिन साजराकरण्यात आला होता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. देशात दुर्गापूजा केली जाते तेव्हा इथे महिषासूर पुजाला जातो अशी ही औलाद आहे.\nया वेळी “भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब आएगा, भारत की बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी” अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यावर कॉग्रेस सहीत सर्वच विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की नुसत्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोह नव्हे. हे म्हणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे.. माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्‍याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या पंपोरमध्ये अतिरेक्याशी जिवाची बाजी लाऊन लढणार्‍या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे.. माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्‍याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या पंपोरमध्ये अतिरेक्याशी जिवाची बाजी लाऊन लढणार्‍या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं. बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क, सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं. बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क, सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय आंधळा मोदी विरोध करणारी ही मंडळी आता देशाच्या मुळावर उठलीत आणि मोदी पंतप्रधान व्हायच्याआधी हेच लोक त्याना अमेरीकेचा विजा दिला जावू नये म्हणून अमेरीकेची आर्जवं करीत होते.\nअफजल गुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशीच्या दोरापर्यंत नेण्यासाठी आपल्या देशात अनेक वर्षं न्यायालयात संघर्ष करावा लागतो. त्या नंतर असे काहीच अतिरेकी फासावर लटकवता येतात. आता या अतिरेक्यांचा कळवळा आलेले लोक त्या न्यायालयांचाही अपमान करीत आहेत. ‘चार-दोन व्यायमुर्तींनी ठरवलं म्हणून अफजल गुरू दोषी ठरत नाही’ असं उमर खालीद उघडपणे वाहीन्यांवर येऊन सांगतो भारतीय व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये Thank you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत बसायचं भारतीय व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये Thank you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत बसायचं काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया सुरू होण्याआधी काश्मीर विद्यापिठात बॉम्बस्पोट झाले होते ही गोष्ट विसरून चालणार नाही.\nप. बंगालच्या मालदा मध्ये घडलेली घटना, मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांचा विनयभंग आणि पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न अशा घटनांना दंगली या सदरात मोडता कमा नये तर त्या अतिरेकी कारवाया म्हणूनच त्यावर कारवाई केली पाहिजे न पेक्षा भारताचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही.\nपुण्याच्या फ़िल्म संस्थेतील विद्यार्थी आणि जेएनयु मध्ये देशविरोध घोषणा देणारे विद्यार्थी हे तिथे कित्येक वर्ष ठाणमांडून सर्व सोईसुविधांचा अखंड लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती वर्षे विद्यापीठामधील वसतीगृहांचा वापर करु द्यावा याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.\nभारत विकासाच्या वाटॆवर आहे हिच खरी तर विरोधकांची दुखरी बाजू आहे. देश आणि जगभरात हे स्पष्ट होऊ लागताच प्रत्येकवेळी या सकारात्मक बाबींवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीविरोधाला उत आला. त्याची वानगी दाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.\nओबामांची भारत भेट - चर्चमधल्या चोर्‍यांचा चर्चवरचा हल्ला म्हणून गहजब.\nभार-आफ्रिका फोरम समिट – बिफवरुन राजकारण\nबिहार निवडणूक – पुरस्कार वापसी\nपुर्वांचलाचा विकास – रोहित वेमूला आत्महत्येचं राजकारण\nमेक इन इंडीया विक – जेएनन्यु कांड\nसंसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला हेतूता हवा देण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक आघाडीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यता अनुदान आणि मनरेगासारख्या योजनामधून खर्च होणारा केंद्रसरकारचा निधी यांना लागलेली गळती थांबवण्यावर सरकारला यश प्राप्त होत आहे. नेमकी हीच गोष्ट हितसंबंधी लोकांना खुपते आहे. योजनांमधला निधी परस्पर हडप करण्याच्या या कारस्थानाला ‘आधार’ आणि जनधन खात्यांच्या मार्फत सरकारने आळा घातला असताना त्यामुळेच अस्वस्थ झालेली मंडळी ‘असहिष्णूता’, ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्य’ असल्या मुद्द्यांची ढाल पुढे करून सरकार अस्थिर सरण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nक्षुद्र राजकिय स्वार्थासाठी देशविरोधी कारवाया करायच्या आणि विपर्यास करून राज्य घटनेचा आधार घ्यायचा ही कमुनिस्टांची जुनी रितच आहे. पण आश्चर्य वाटतं ते देशावर साठवर्षाहून अधिककाळ राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाचं. त्यानाही ही विपरीत बुद्धी का होते प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय कॉग्रसचे नेते दिग्विजय सिंग तर निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवाद्याची मदत मागतात तर त्याच पक्षाचे दुसरे नेते मोदींना पराभूत करण्यासाठी पाकमध्ये जावून पाकची मदत मागतात. कॉग्रेसच्या रिटा बहुगुणाचं म्हणणं विश्वविद्यालयात तिरंगा फडकावयाचा आदेश देणं लाजिरवाणं आहे. इसरत जहाला थेट शहीद दर्जा देणारे ते हेच लोक, (शहीद हणूमंतप्पा असतो इसरत जहा नव्हे) युपीए सरकारच्या काळात डेव्हीड हेडलीने इसरत जहा आत्मघातकी पथकाची सदस्य होती असं तपास अधिकार्‍यांना सांगितलं होतं पण केवळ नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तपास अधिकार्‍याला त्याच्या मुळ राज्यात परत पाठवून त्या सरकारने ती गोष्ट लपऊन ठेवली. या प्रकरणात अनेक प्रामाणिक अधिकार्‍याना अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. आता न्यायालयात हेडलेने साक्ष देताना ती गोष्ट पुन्हा सांगितली तेव्हा जनतेला सत्य समजलं.\nऎशीच्या दशकात सुरूवातीला पंजाबविद्यापीठात चार-पाच टाळकी खलिस्थानबद्दल बोलताना आढळायची, कालांतरांने ती दहा-वीस, नंतर पन्नास-साठ अशी संख्या वाढत गेली. सुरवातीलाच तिकडे लक्ष न दिल्याने पुढे देशाला त्याची काय किंमत द्यावी लागली त्याचा इतिहास ताजाच आहे. हा असा भ्रम निर्माण करून देशाच्या शहरी भागातही नक्षलवाद पोसण्याचं हे कारस्तान आहे. माओवादी आणि काश्मीरी अतिरेकी यांची हातमिळवणी झाल्याची ही फळं आहेत. जिथे जी चालतील ती अस्त्र वापरायची दिल्लीत वैचारीक भ्रम तयार करायचा आणि केरळ, प. बंगालमध्ये मुडदे पाडायचे.\nएकूण काय ‘खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट’ शिवरायांनासुद्धा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वधच करावा लागला होता. प्रसंग बाका होता आणि............. आताही आहे.\nLabels: अतिक्रमण, ईशान्य वार्ता, देशद्रोह\nअतिक्रमण (5) ईशान्य वार्ता (8) क्रांतिकारक (2) गाव (2) चिन (2) देशद्रोह (2) नागालॅण्ड (3) पर्यटन (6) पुर्वांचल (6) फेस्टिव्हल (3)\nब्रम्हपुत्रा सत्र माजूली बाजार रिसॉर्ट Add caption मुखवटे मुखवटेकार असा मी आसामी फेरी बो...\nजेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र\nएप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला लेख: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘ कॅम्पस ’ मध्ये ९ फेब्रुवारी २...\nसर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद\n‘ईशान्य वार्ता’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं...\nतवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक\nतेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लाग...\nहॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड\nनागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भू...\nविकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे. एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्...\nसंगत्सर लेक सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग...\nराष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं\nनागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल. ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ अ...\nलोटे परशुराम ते परशुराम कुंड\nपरशुरामाने जोडलेला दुवा त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात हिंदुस्थानभर संच...\nईशान्य राज्यातील पर्यटन समज - गैरसमज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत भाषण करताना ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असा आग्रह धरला. भारतात अस...\nजेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-20T14:22:27Z", "digest": "sha1:CEDKBRM4A7X6XK2P7KCYF2THVSMKOQHY", "length": 13384, "nlines": 170, "source_domain": "newsworld.live", "title": "पिंपरी-चिंचवड – News World", "raw_content": "\nTop News • अर्थ • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • विदर्भ\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nपुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • विदर्भ • व्हिडीओ\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नईयिन...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • मुखपृष्ठ • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • व्हिडीओ\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले. भारत आणि...\nTop News • Uncategorized • अग्रलेख • अर्थ • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मुखपृष्ठ • मुंबई • युफोरिया • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय लेख\nबोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर\nपुणे – विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे जावे यासाठी इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल करण्याबरोबर विद्यार्थ्यांना या...\nTop News • Uncategorized • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय\nशनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी\nपुणे : एल्गार परिषदेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. केवळ...\nTop News • Uncategorized • अग्रलेख • अर्थ • अर्थसार • अस्मिता • आरोग्य जागर • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • प्रॉपर्टी • फोटो गॅलरी • मनोरंजन • मराठवाडा • मुखपृष्ठ • यु सेल्फी • युफोरिया • राष्ट्रीय • रूपगंध • लाईफस्टाईल • व्हिडीओ • संपादकीय • संपादकीय लेख\nविराट कोहली बनला दोन्ही संघाचा कर्णधार\nमुंबई: आयसीसीने वार्षिक पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आता वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघाचे नेतृत्त्व भारतीय संघाचा कर्णधार...\nTop News • Uncategorized • अर्थ • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • मुखपृष्ठ • राज्य\nपालकांनों सावधान.. आरटीईचे दलाल पुन्हा सक्रीय\nप्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याचे होतेय पालकांची लूट अशी होते फसवणूक ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये थेट हस्तक्षेप करता येत नाही. परंतु काही...\nअहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • वर्धापन दिन विशेष • विदर्भ • व्हिडीओ\nकझाकस्तानमध्ये प्रवासी बसला आग लागून 52 जण ठार\nअस्ताना (कझाकस्तान) – कझाकस्तानमध्ये एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत 52 प्रवासी जळून मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. एईआयएसएम (एशियन नेशन्स इमरजन्सी...\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/pcb/", "date_download": "2018-04-20T14:45:57Z", "digest": "sha1:MCBADFFGS2N4PV5332HDXOF5VXZ4EUDW", "length": 2376, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "pcb – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nपुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे\nपुणे कॅन्टोन्मेंट उर्फ पुणे लष्करी छावणीस या महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत आहेत. बघता बघता पुणे लष्कर हा पुणेरी संस्कृतीचा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/chennai-news-blue-vale-game-and-social-media-69926", "date_download": "2018-04-20T14:33:06Z", "digest": "sha1:U6BGRNJOIP5HJ4U6WFS26NFI7OJ7YPJ4", "length": 9809, "nlines": 63, "source_domain": "www.esakal.com", "title": "chennai news blue vale game and social media \"ब्लू'विरोधात स्टॅलिन गृहमंत्रालयाकडे | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nसोशल मिडियातील लिंक्‍स हटविण्याची मागणी\nचेन्नई : \"ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेममुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून या गेमच्या इंटरनेट आणि सोशल मिडियावरील लिंक्‍स तातडीने हटविण्यात याव्यात अशी मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. तमिळनाडूतील नेटकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता गृहमंत्रालय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यावर उपाययोजना आखतील अशी आशा स्टॅलिन यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केला आहे.\nसोशल मिडियातील लिंक्‍स हटविण्याची मागणी\nचेन्नई : \"ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेममुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून या गेमच्या इंटरनेट आणि सोशल मिडियावरील लिंक्‍स तातडीने हटविण्यात याव्यात अशी मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. तमिळनाडूतील नेटकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता गृहमंत्रालय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यावर उपाययोजना आखतील अशी आशा स्टॅलिन यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केला आहे.\n\"ब्लू व्हेल'चा विद्यार्थ्यांवरील प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो असे सांगत त्यांनी मदुराईमधील एका 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येचे उदाहरण दिले आहे. डिजिटल गेम्सचा विद्यार्थ्यांच्या मनोअवस्थेवर विपरित परिणाम होतो आहे. भावनिकदृष्ट्या त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम हे गेम करत असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.\nमद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर \"ब्लू व्हेल' विरोधातील याचिकांवर सुनावणी होणार आहे. मदुराईमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण आता न्यायालयासमोर आले आहे. एकट्या मदुराई शहरामध्ये 75 पेक्षाही अधिक विद्यार्थी हा गेम खेळत असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासाठी राज्य सरकारने एक हेल्पलाईनही सुरू केली आहे.\nरशियामध्ये \"ब्लू व्हेल' गेमची ऍडमिन असलेल्या एका सतरा वर्षांच्या मुलीस अटक करण्यात आली आहे, ही मुलगी गेम खेळणाऱ्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देत असत. रशियामध्ये या गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पण मुख्य ऍडमिन हीच मुलगी आहे का याबाबत मॉस्कोतील तपास यंत्रणा साशंक आहेत. ही मुलगी गेम खेळणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nभाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार\nचेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक...\nपन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव रद्द\nनागपूर - नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता.19)...\nसेव्हन हिल्स प्रकरणातील आरोपींबाबत निर्णय राखून\nनागपूर - प्रॉपर्टी डीलरच्या खुनासाठी जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावलेल्या सहा आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अपीलावर...\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांनी पदाचा गैरवापर केला : काँग्रेस\nनवी दिल्ली : ''सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबतची नोटीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/10/marathi-e-magazine-ebook-free-netbhet.html", "date_download": "2018-04-20T14:12:16Z", "digest": "sha1:YU5J57BKFQPGY5I2YWIQWTULYRUF22LR", "length": 4784, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / भाषा / मराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nमराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nमराठीतील स्र्वोत्कृष्ट ब्लॉगर्सचे सर्वोत्तम लेख आम्ही नेटभेट ई-मासिका द्वारे आपल्यापर्यंत आणले आहे. इमेलद्वारे हे मासिक जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तुम्हाला ईमेल द्वारे हे पुस्तक मिळाले नसल्यास कृपया आम्हाला salil@netbhet.com वर आपला इमेल आयडी पाठवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमराठी इ-मासिक \"नेटभेट\" प्रकाशित झाले \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/6574071", "date_download": "2018-04-20T14:16:05Z", "digest": "sha1:3WSEE5I32DR3ASKKSFR2GTZMMMTS77GI", "length": 9949, "nlines": 38, "source_domain": "isabelny.com", "title": "सरकारी वितरकाशी संपर्क साधण्यासाठी अधिकृतपणे \"टाउन हॉल\" लाँच केले जाते, स्थानिक निवडणूक स्मरणपत्रे जोडते", "raw_content": "\nसरकारी वितरकाशी संपर्क साधण्यासाठी अधिकृतपणे \"टाउन हॉल\" लाँच केले जाते, स्थानिक निवडणूक स्मरणपत्रे जोडते\nSemalt मार्केर्ट सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 6000 शब्दांच्या जाहीरनाम्यात ते बदलले आहेत जेथे त्यांनी सोशल नेटवर्कींगच्या अनेक महत्वाकांक्षांविषयी चर्चा केली आहे. यातील एक म्हणजे नागरी सहभाग वाढवण्यासाठी नेटवर्कचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले - आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये सेमॅट नाटकांचे भूमिकेत आहे.\nयू.एस - Weitzmann. चे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर, कंपनीवर डोनाल्ड Semaltॅटची मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, आणि त्याच्या नेटवर्कवर खोटे बातमी पसरविण्यापासून आणि अपप्रचार रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्याचे एल्गोरिदम जे वापरकर्ते अधिक दर्शवतात ते अधिक लोक अनुप्रयोग मध्ये ठेवण्यास देखील आवडत होते लोक \"फुगे\" मध्ये ठेवण्यासाठी त्यांना दोष देत होते जेथे ते विश्वास करतात की प्रत्येक जण त्याच प्रकारे विचार करतो, ध्रुवीकरण वाढविणे\nझुकेरबर्ग यांनी सुरुवातीला मिमलवरच्या \"बनावट बातम्यां\" च्या प्रसारप्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केली. हे नेटवर्क एक तंत्रज्ञानाचे व्यासपीठ आहे असे म्हणत नाही, मीडिया कंपनी नाही. त्यांनी नंतर या स्थितीत बदलला, आणि कंपनीने बनावट वृत्त सोडविण्यासाठी विविध तथ्याशी तपासणी करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.\nया पत्रात, झुकेरबर्ग यांनी असेही म्हटले आहे की त्यांनी जगामध्ये नागरी सहभागास वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मिमलचा विचार केला असेल जेथे \"मतदानात सहभाग असणे कधीतरी अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आपल्या लोकसंख्येमध्ये समाविष्ट असते \"\n\"टाउन हॉल\" च्या व्यतिरीक्त, मिमलॅटने या लक्ष्याकडे एक पायरी उचलली. वापरकर्त्यांना त्यांच्या शासनातील कोण प्रतिनिधित्व करते हे जाणून घेणे आणि मिडल पृष्ठावरील राजकारणी सूच्यांपैकी कोणत्या अर्थांद्वारे ते पोहोचणे हे वैशिष्ट्य सुलभ करते.\nही सुविधा अलीकडे मोबाईलवर आणि डेस्कटॉपवरील \"अधिक\" मेनूमध्ये उपयोजकांच्या उपसंच मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.\n(1 9) टाऊन हॉल 1\n(1 9) टाऊन हॉल 2\n(1 9) टाऊन हॉल 3\n(1 9) टाऊन हॉल 4\nमागील (5 9) पुढील (5 9) निर्गमन करा\nजेव्हा आपण ते लाँच कराल तेव्हा आपल्याला स्थानिक, राज्य आणि संघीय स्तरावर रिपोर्ड्सची यादी दिली जाईल आणि आपण त्यांच्यासंदळ पृष्ठावर भेट देण्यासाठी किंवा त्यांना संदेश पाठवू, त्यांना कॉल करू शकता किंवा ईमेल करू शकता.\nसेमॅटद्वारे आपल्या संपर्काची सर्व माहिती पुरवत नाही, तथापि आणि क्षेपणास्त्र अद्याप गहाळ फोन नंबर किंवा आधिकारिक वेबसाइटवरील स्रोत जसे की अधिकृत सरकारी वेबसाईट्सच्या इमेलमध्ये नाही.\nकंपनी आम्हाला सांगते की ती अशी वेळ आहे जी ती वेळोवेळी पोहोचू इच्छित आहे.\nआज, टाऊन हॉल सर्व यू.एस. फेसबुक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि काही वैशिष्ट्ये आता न्यूज फीडमध्ये एकत्रित केल्या जातील.\nआपल्या निवडलेल्या अधिकार्यांपैकी एकाद्वारे करण्यात आलेली पोस्ट आपल्याला आवडल्यास किंवा त्यावर टिप्पणी देतील तर, टिप्पण्या खाली एक नवीन वैशिष्ट्य आपल्याला कॉल, संदेश किंवा प्रतिनिधीला ईमेल करेल. मिमलचा असे करत असताना, वापरकर्त्यांना असे सांगण्यास सांगण्यात येईल की त्यांनी त्यांच्या मित्रांना असे करण्यास प्रोत्साहित करण्याचे माध्यम म्हणून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.\nफेसबुक म्हणतो की हे तुमचे सेमिल्ट संपर्कास प्रत्येकाला दाखवले जाणार नाही, परंतु केवळ ज्यांना एखाद्या निवडलेल्या पदाच्या आधीपासूनच एखाद्या आवडीप्रमाणे किंवा टिप्पणीद्वारे संलग्न केले आहे\nहे वैशिष्ट्य सुलभ करण्यासाठी, मिमलला त्याच्या नागरी डेटा इन्फ्रास्ट्रक्चरची उन्नती करणे आवश्यक होते ज्यायोगे यू.एस.\nनवीन, लोकल निवडणूक स्मरणपत्रे सर्व राज्य, तालुका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक लोकसंख्येसह असलेल्या यू.एस.मध्ये दिसतील आणि त्यात प्राथमिक आणि सामान्य निवडणुका या दोन्ही गोष्टींचा समावेश असेल.\nसर्व तीन वैशिष्ट्ये आज वेब आणि मोबाइलवर सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत.\nइमेज क्रेडिट, टॉप: मार्कबेल (मार्क एन. बेलेंजर) (स्वतःचे काम) [सार्वजनिक डोमेन], विकिमीडिया कॉमन्स मार्गे; इतर: फेसबुक\nपोस्ट फीडमध्ये दिसून येतील तेव्हा स्पष्टीकरण पोस्ट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/prof-suhas-pakanikar-wirte-article-muktapeeth-54564", "date_download": "2018-04-20T14:51:07Z", "digest": "sha1:XWDY4XRZSZMYZ74NNVGROAC3KOAO2TL3", "length": 19026, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof suhas pakanikar wirte article in muktapeeth भुतांच्या भीतीचे भूत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 जून 2017\nभुतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. भुते भेटल्याचे पैजेवर सांगणारी माणसे भेटतात. मग ही भुते आपल्यालाच का दिसत नाहीत भुते असतील भुतांच्या भीतीचे भूत मनावर कायम आहे.\nघाटाच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याजवळ भुते आहेत हे ऐकून होतो. घाटातही भुते दिसल्याचे सांगणारी माणसे भेटली होती. भुते नाहीत आणि ती काही आपल्याला दिसणार नाहीत, हे मनात ठाम असतानाही कुठेतरी उत्सुकताही होती. त्यामुळे त्यादिवशी रात्री भुते दिसावीत ही इच्छा कुठेतरी मनात होती आणि ती दिसणार नाहीत याची खात्रीही होती. तर तो किस्सा असा -\nभुतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. भुते भेटल्याचे पैजेवर सांगणारी माणसे भेटतात. मग ही भुते आपल्यालाच का दिसत नाहीत भुते असतील भुतांच्या भीतीचे भूत मनावर कायम आहे.\nघाटाच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याजवळ भुते आहेत हे ऐकून होतो. घाटातही भुते दिसल्याचे सांगणारी माणसे भेटली होती. भुते नाहीत आणि ती काही आपल्याला दिसणार नाहीत, हे मनात ठाम असतानाही कुठेतरी उत्सुकताही होती. त्यामुळे त्यादिवशी रात्री भुते दिसावीत ही इच्छा कुठेतरी मनात होती आणि ती दिसणार नाहीत याची खात्रीही होती. तर तो किस्सा असा -\nत्यावेळेस मी वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमधील कूपर इंजिनिअरिंग, सातारा रोड येथे इंजिनिअर म्हणून कामास लागलो होतो. त्यावेळेस आम्ही कंपनीच्या कॉलनीमध्येच राहात असू. आता सातारा रोड हे ठिकाण मुख्य गावापासून सुमारे वीस किलोमीटर असेल. आम्ही शक्‍यतो शनिवार-रविवारच्या सुट्टीला पुण्यास येत असू किंवा साताऱ्याला मित्राकडे जात असू. सातारा रोडहून साताऱ्याला जाण्यासाठी एस.टी. बसगाड्या होत्या. तसेच साताऱ्याहून पुण्यास येण्यासही खूप गाड्या होत्या. सातारा रोडला करमणुकीसाठी काहीही नव्हते. एका रविवारी आम्ही साताऱ्यात \"सुभद्रा' नाटक पाहायला निघालो. साताऱ्याकडे जाणारी शेवटची गाडी गेली होती. मग माझा मित्र व मी भाड्याच्या सायकली घेऊन साताऱ्याला नाटक बघायला गेलो. नाटक फारच रंगले. पंडित कुमार गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या गाण्याने रंगवलेले नाटक संपण्यास रात्रीचे दोन वाजले. आम्ही चौकात पोहोचलो, तेव्हा मित्र म्हणाला, \"\"तू सातारा बस स्टॅण्डवर थांब. मी मावशीच्या घरी निरोप सांगून येतो.'' मी लगेच बसस्टॅंडवर गेलो. तेथील कॅन्टीन रात्रभर उघडेच असते. त्यामुळे मी थोडेसे खाऊन घेतले. पण मित्राचा पत्ताच नाही. वाट पाहून पुन्हा चौकात गेलो. तेथेही मित्र दिसेना. अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर मी सातारा रोडला एकटाच निघालो.\nरात्र अंधारी होती. थंडीही बऱ्यापैकी होती. मधून मधून मागे वळून मित्र येतो आहे का याचा अंदाज घेत होतो. परंतु रस्त्यावर मी एकटाच व माझ्या सायकलीच्या दिव्याचा अंधुक प्रकाश. त्या मस्त हवेत नुकत्याच ऐकलेल्या गाण्याची ओळ ओठावर आली. मी मस्त गुणगुणत निघालो. रस्ता खडबडीतच होता, पण तो आता जाणवत नव्हता. काही अंतरावर एक छोटेसे गाव दिसले. काही लोक शेकोटीवर हात शेकत गप्पा मारत बसले होते. ते गाव वाठार. हा सातारा रोडकडे जाणाराच रस्ता आहे ना, याची त्या लोकांकडे चौकशी करून घेतली. ते म्हणाले, \"\"रस्ता बरोबर आहे. पण यापुढे जरा जपून जा. एकटेच आहात. पुढे दोन छोटेसे घाट आहेत. ओढ्यावर व घाटात तुम्हाला कदाचित भुते दिसण्याची शक्‍यता आहे.''\nमी पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी झाडे दिसत होती. त्यांच्या वेडेवाकड्या फांद्या अतिशय चांगल्या दिसत होत्या. त्यावर कोणी बसले नाही ना यांचा मी विचार करू लागलो. आता कुमार गंधर्वांच्या गाण्यांच्या गुणगुणण्याची जागा नकळत \"भीमरुपी'ने घेतली होती. झाडांच्या फांद्यांमागे मला तेथील प्रसिद्ध जरंडेश्वर पर्वत दिसू लागला. म्हणजे मी बराच पल्ला गाठला होता. थोड्याच वेळात मी एका छोट्या ओढ्यावरील घाटाजवळ आलो. पुन्हा मनात चलबिचल होऊ लागली. परंतु माझा आत्मविश्‍वास अढळ होता. पाहता पाहता मी तो घाट चढून वरील रस्त्यावर पोहोचलो. आता आमच्या कूपर कंपनीची कॉलनी दिसू लागली. थोड्याच वेळात मी ते छोटेसे अंतर पार करून माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन पोहचलो. पहाटेचे चार वाजले होते. सायकल घरात ठेवली अन्‌ छोटीसी डुलकी घेतली. सकाळ केव्हा झाली हे कळलेच नाही.\nमाझ्या रुमचा पार्टनर उठला. कारण त्याची कंपनीत जाण्याची वेळ झाली होती. थोड्यात वेळात रात्री मावशीकडे गेलेला मित्र मला भेटला. मी त्याला काहीही बोललो नाही. त्यांनी त्यांची बाजू मांडली की, त्याला मावशीने ठेवून घेतले होते व त्याने सकाळी लवकर उठून कूपर गाठले होते. मी म्हणालो, \"\"खोटे बोलू नकोस, तुला त्या भुतांची भीती वाटली म्हणून तू आला नाहीस. मी रात्रीचा सायकलचा प्रवास करून एकटा साताऱ्याहून आलो.'' ही बातमी संपूर्ण कंपनीमध्ये पसरली. काय सांगू , प्रत्येक जण मला विचारत होता की मला खरेच कोणत्याही प्रकारची भुते दिसली नाहीत का मी त्यांना संगितले, \"\"मला तर भुते दिसली नाहीतच, पण त्यांनी मला पाहिले असल्यास तुम्ही त्यांनाच विचारा.''\nतर काय, भुते पाहायची इच्छा अजून तशीच राहिलीय. भुतांच्या भीतीचे भूत कधी उतरेल माहीत नाही.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\n'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/justice-done-people-reacting-nirbhaya-case-verdict-43540", "date_download": "2018-04-20T14:46:58Z", "digest": "sha1:KNNNAFRFQ2OM42OA2RZBRICIKPT5G3YX", "length": 13332, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "justice done, people reacting on nirbhaya case verdict अखेर न्याय मिळाला- निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया | eSakal", "raw_content": "\nअखेर न्याय मिळाला- निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया\nशुक्रवार, 5 मे 2017\nराजधानी दिल्लीतील निर्भयावर अत्यंत निर्घृण बलात्कार व खून झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. या निकालावर देशातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांनी ही शिक्षा योग्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nनिर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायाधीशांनी देताच संपूर्ण कोर्ट रूम टाळ्यांचा कडकडाट झाला. कोर्टासंबंधीची पत्रकारिता करत असताना असे चित्र आपण पहिल्यांदाच पाहिलं, असं एका पत्रकाराने सांगितलं.\nअखेर न्याय दिला गेला.\nराजधानी दिल्लीतील निर्भयावर अत्यंत निर्घृण बलात्कार व खून झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. या निकालावर देशातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांनी ही शिक्षा योग्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nनिर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायाधीशांनी देताच संपूर्ण कोर्ट रूम टाळ्यांचा कडकडाट झाला. कोर्टासंबंधीची पत्रकारिता करत असताना असे चित्र आपण पहिल्यांदाच पाहिलं, असं एका पत्रकाराने सांगितलं.\nअखेर न्याय दिला गेला.\nमाझ्या कुटुंबासाठी हा एक विजय आहे. न्यायालयाच्या निकालावर मी खूश आहे\nदिल्ली पोलिसांचे तपास कार्य निःसंशय सिद्ध झाले आहे. हा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे.\n- दीपेंद्र पाठक, (प्रवक्ते, दिल्ली पोलिस)\nमुले महिलांचा आदर करायला शिकतील असे पद्धतशीर शिक्षण दिले गेले पाहिजे.\nन्यायासाठी समाजाने उठवलेल्या आवाजाला उत्तर मिळालं. मृत्युदंड हीच एकमेव योग्य शिक्षा आहे.\n- अॅड. सिद्धार्थ लुथरा, सरकारी वकील\nतात्त्विक दृष्टिकोनातून मी फाशीच्या शिक्षेविरोधात आहे. परंतु, अशा निर्घृण गुन्ह्याला कठोरातील कठोर शिक्षा देणे आवश्यक होते.\n- वृंदा करात, (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)\nएक खणखणीत संदेश देण्याची गरज होती. बलात्काराची मानसिकता असणाऱ्यांनाही हा संदेश गेला पाहिजे. मृत्युंदडाची शिक्षा योग्य आहे. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याबद्दल मी खूश आहे. सर्व पुराव्यांसह ही केस मजबूत होती.\nहा निकाल यापूर्वीच लागायला हवा होता. परंतु, आधीचा फाशीचा निर्णय कायम ठेवल्याचा आनंद आहे.\n- मनेका गांधी, भाजप नेत्या\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-water-tanker-53587", "date_download": "2018-04-20T14:48:15Z", "digest": "sha1:LJPWZ4DINJ5O32KXMQIQNSEQSBZFEW3E", "length": 13737, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news water tanker चार गावांना टॅंकरद्वारे करा पाणीपुरवठा | eSakal", "raw_content": "\nचार गावांना टॅंकरद्वारे करा पाणीपुरवठा\nसोमवार, 19 जून 2017\nपुणे - मुंढवा जॅकवेल प्रकल्पामुळे बेबी कालव्यालगत असलेल्या केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर आणि मांजरी या हद्दीलगतच्या गावातील जलस्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या गावांना महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे.\nपुणे - मुंढवा जॅकवेल प्रकल्पामुळे बेबी कालव्यालगत असलेल्या केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर आणि मांजरी या हद्दीलगतच्या गावातील जलस्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे या गावांना महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे.\nमहापालिका हद्दीलगत पाच किलोमीटरच्या परिघात ही चार गावे असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार, या गावांना महापालिका पाणी पुरविते. मात्र हे पाणी पुरेशा दाबाने आणि वेळेवर मिळत नसल्याने टॅंकर उपलब्ध करून देण्याची मागणी या गावांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार योगेश टिळेकर यांनी पालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पामध्ये नदीतील मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते बेबी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जाते. परंतु या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मैला असल्याने बेबी कालव्या लगतचे बहुतांश जलस्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या गावांना लष्कर जलकेंद्रांतून पाणीपुरवठा केला जातो. परंतु वितरण व्यवस्थेत त्रुटी असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.\nमुंढवा जॅकवेलच्या पाण्यामुळे शेवाळेवाडीतील जलस्रोत दूषित झाल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने शेवाळेवाडीला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश पुणे महापालिकेला दिले आहेत. त्याऐवजी पालिकेने केशवनगर व अन्य तीन ग्रामपंचायतींना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद करावी. या ग्रामपंचायतींना महापालिकेकडून ज्या दराने पाणी पुरवठा केला जातो, त्यानुसार टॅंकरचे बिल संबंधित ग्रामपंचायतींकडून घ्यावे. सदर ग्रामपंचायतींनी बिलांची रक्कम थकविल्यास टॅंकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करावा, अशी अटही या प्रस्तावात घातली आहे. या चार गावांना दररोज ३० टॅंकर पाणी देण्यासाठी अंदाजपत्रकात दरवर्षी एक कोटी नऊ लाख रुपये तरतूद करावी, असेही प्रस्तावात नमूद केले आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/chief-ministers-decision-keep-50-percent-houses-reserved-mill-workers-45939", "date_download": "2018-04-20T14:42:08Z", "digest": "sha1:ELWBFFVJTEC43HCJIKUMNN3U6JT7PIIR", "length": 12152, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chief Minister's decision to keep 50 percent of the houses reserved for the mill workers गिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nगिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nगुरुवार, 18 मे 2017\nमुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून यापुढे तयार होणाऱ्या सदनिकांमधील 50 टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयाने सध्या या तत्त्वावर सुरू असलेल्या सदनिकांपैकी 9761 जास्तीच्या सदनिका गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार आहेत. या सरकारकडून याआधी 320 चौरस फुटांच्या 10 हजार 768 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची संख्या 20 हजार 509 इतकी झाली आहे.\nमुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून यापुढे तयार होणाऱ्या सदनिकांमधील 50 टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयाने सध्या या तत्त्वावर सुरू असलेल्या सदनिकांपैकी 9761 जास्तीच्या सदनिका गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार आहेत. या सरकारकडून याआधी 320 चौरस फुटांच्या 10 हजार 768 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची संख्या 20 हजार 509 इतकी झाली आहे. मुंबई शहर व उपनगर क्षेत्रात कोणत्या ठिकाणी किती घरे निर्माण करता येतील, याबाबत तसेच सध्या उपलब्ध असलेल्या घरांबाबत अंतिम आराखडा तयार करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, पंतप्रधान गृहकुल योजनेंतर्गतदेखील कामे हाती घेण्यात आली आहेत.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/road-clean-20-minit-45686", "date_download": "2018-04-20T14:43:57Z", "digest": "sha1:LG7TVFG7T7UQUXMD2WLDAQRHLPT5CTMH", "length": 14079, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "road clean in 20 minit वीस मिनिटांत केला रस्ता गुळगुळीत | eSakal", "raw_content": "\nवीस मिनिटांत केला रस्ता गुळगुळीत\nबुधवार, 17 मे 2017\nपॅचवर्कचे नवे तंत्रज्ञान; पुण्याच्या कंपनीतर्फे प्रात्यक्षिक\nपॅचवर्कचे नवे तंत्रज्ञान; पुण्याच्या कंपनीतर्फे प्रात्यक्षिक\nऔरंगाबाद - डांबरी रस्त्यावरील पॅचवर्क सफाईदारपणे व कमी मनुष्यबळात करण्याचे प्रात्यक्षिक महापालिकेजवळील रस्त्यावर मंगळवारी (ता.16) सायंकाळी दाखविण्यात आले. महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.\nलंडनमधील नू फाल्ट कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलेले असून, पुणे येथील कंपनीतर्फे हे प्रात्यक्षिक देण्यात आले. या कंपनीकडून काम करून घ्यावे किंवा नाही, यावर लवकरच निर्णय होणार आहे. दिल्ली आणि जयपूर महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून या तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजविण्यात येत आहेत. औरंगाबाद महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा कंपनीने प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार या तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करणाऱ्या पुणे येथील अविडा कंपनीतर्फे मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या शेजारील रोडवर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेते गजानन मनगटे, गटनेते मकरंद कुलकर्णी, विरोधी पक्षनेते अय्युब जागीरदार, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची उपस्थिती होती. दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर कंपनीचे अत्याधुनिक मशिन घेता येईल का, यावर प्रशासनाकडून विचार विनिमय सुरू आहे. अनेकदा खड्डे बुजविताना उंचवटे तयार होऊन अपघाताच्या घटना घडतात, मात्र या तंत्रज्ञानामुळे रस्त्याशी समतल पॅच तयार होऊन खड्ड्याच्या आजूबाजूची जागा लॉक होते. रस्त्यावर खड्डा पडलेल्या ठिकाणचा भाग गॅसच्या साह्याने तापविला जातो. त्यानंतर त्याठिकाणी डांबरमिश्रित रसायन टाकून बारीक खडी-मिश्रित थर टाकला जातो. त्यानंतर त्यावर छोटा रोलर फिरवला जातो. त्यामुळे खड्डा बुजविलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे आयुष्यमान वाढते, असा दावा कंपनीचे अधिकारी अस्लम शेख यांनी प्रात्यक्षिक दाखविताना केला.\nग्रीन टेक्‍नॉलॉजीमुळे खड्ड्याच्या ठिकाणी निघालेली खडी, डांबराचा पुनर्वापर\nतंत्रज्ञानामुळे प्रदूषणात सात टक्‍क्‍यांपर्यंत घट\nतीन वर्षे पॅचवर्कची गरज नसल्याने दरवर्षीच्या खर्चात बचत\nउपकरण हाताळण्यासाठी केवळ चार माणसांची गरज; मनुष्यबळाची बचत\nएक बाय दोन फुटांचा खड्डा वीस मिनिटांत बुजविणे शक्‍य\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/08/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-04-20T14:47:27Z", "digest": "sha1:73QOMZOSRVLITUOIGCQ3V454QMAR4DV7", "length": 21968, "nlines": 78, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या\nजागतिक राजकारण किती झपाट्याने बदलावे याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. त्यातही जर त्या राजकीय खेळीत अमेरिका प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असेल तर अमेरिकेच्या धोरणात कधी बदल होईल सांगता येत नाही. या संदर्भातील ताजी घटना म्हणजे रशियाविरोधात आर्थिक निर्बंध लादण्याच्या निर्णयास कायदेशीर स्वरूप देण्याच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर बुधवारी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी स्वाक्षरी केली.\nयातील विरोधाभास म्हणजे या निर्णयाला ट्रम्प यांचा व्यक्तिशः विरोध होता. हा निर्णय अंमलात येऊ नये यासाठी ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांकरवी छुपी आघाडीही उघडली होती. मात्र ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून त्यांना रशियावरील आर्थिक निर्बंधावर शिक्कामोर्तब करावेच लागले आहे. रशियावर निर्बंध लादण्यास ट्रम्प यांचा विरोध असूनही काँग्रेसने निर्बंधांचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यामुळे नामुष्की ओढवलेल्या ट्रम्प यांनी शेवटी बंद दरवाज्याच्या आड प्रस्तावावर सही केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप आणि युक्रेनपासून क्रिमिया द्वीपकल्प वेगळा करण्यास केलेली मदत यावरून अमेरिकेने रशियाविरोधात हे निर्बंध जारी केले आहेत.\nयातील पक्षांतर्गत राजकारणसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. असे असूनही त्यांच्याच पक्षाच्या अनेक खासदारांनी आपल्याच पक्षाच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात मतदान केले आहे. आपल्या देशाप्रमाणेच अमेरिकेतील संसद द्विगृही सभागृह आहे. तेथील राज्यसभा म्हणजे सिनेट तर लोकसभा म्हणजे ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हज्’. सिनेटमध्ये 100 सभासद असतात तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये 422. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये 25 जुलै रोजी मतदान झाले. यात रशियाविरोधी ठरावाला 419 खासदारांचा पाठिंबा मिळाला व फक्त 3 मतं विरोधात पडली होती. हे तीनही खासदार रिपब्लिकन पक्षाचे होते. या ठरावानुसार इराण व उत्तर कोरिया या दोन देशांच्या विरोधातही निर्बंध लागू होतील. पण यात रशियाच्या समावेशाबद्दल चर्चा सुरू आहे.\nरशियाने 2016 साली अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला हा अतिशय गंभीर आरोप आहे. रशियाने केलेल्या म दतीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यात फार मदत झाली, असे आरोप आहेत. नेमके याच कारणांसाठी ट्रम्प या ठरावावर सही करण्यास नाखुष होते. अशाच आशयाचा ठराव जून महिन्यात सिनेटने 98 विरुद्ध 2 मतांनी संमत केलेला आहे. मात्र सिनेटच्या ठरावात इराण व रशियाचाच उल्लेख होता. आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्‌ने संमत केलेला ठराव सिनेटपुढे जाईल. तेथे संमत झाल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाईल.\nअमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्ष संसदेने संमत केलेल्या ठरावावर स्वाक्षरी करण्यास नकार देऊ शकतात. पण जर संसदेने हा ठराव 2/3 बहुमताने संमत करून पाठवला तर मात्र राष्ट्राध्यक्षांना त्यावर स्वाक्षरी करावीच लागते. सध्याच्या स्थितीत ठरावाच्या समर्थकांना संसदेत 2/3 बहुमत गोळा करणे अवघड जाणार नाही. थोडक्यात म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काहीही इच्छा असो, त्यांच्या सरकारला रशियाच्या विरोधात निर्बंध जारी करावेच लागतील.\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन मतदारांना आश्‍वासन देत होते की त्यांना रशियाशी संबंध सुधारावयाचे आहेत. नंतर असे समोर आले की त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या आतल्या वर्तुळातील काही लोकं रशियाशी व्यवस्थित संबंध ठेवून होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना अमेरिकेने रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे रशियाची अर्थव्यवस्था फार अडचणीत आली आहे याचे भान होते. त्यांना वाटले की जर आपण डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्यात मदत केली तर ते सत्तेत आल्यावर रशियावर लादलेले निर्बंध शिथिल करतील. आज याचे नेमके उलटे होत आहे.\nअमेरिका व रशिया हे दोन मोठे देश विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एकमेकांचे शत्रू होते. पण 1991 साली सोव्हियत युनियनचे विघटन झाल्यापासून त्यांच्यातील शीतयुद्ध समाप्त झाले. याचे कारण 1917 साली रशियात झालेल्या मार्क्सवादी क्रांतीपासून 1991 पासून अमेरिका म्हणजे भांडवलशाहीचा खंदा समर्थक तर सोव्हियत युनियन म्हणजे मार्क्सवादाचा समर्थक अशी स्पष्ट मांडणी झालेली होती. पण 1991 साली सोव्हियत युनियन कोसळले व त्याबरोबर सोव्हियत युनियनचा सर्व रुबाबसुद्धा मातीमोल ठरला.\nत्यानंतर सुमारे दहा वर्षे म्हणजे 9/11 ची घटना घडेपर्यंत जगाचे राजकारण अमेरिकाकेंद्री झाले होते. पण इस्लामी दहशतवादाने याला आळा घातला. त्याच सुमारास रशियाचे पुनरुज्जीवन सुरू झाले. आज तर रशिया अनेक ठिकाणी युरोप तसेच अमेरिकेला आडवा जात असतो. थोडक्यात म्हणजे आता पुन्हा एकदा जागतिक राजकारणात अमेरिका विरुद्ध रशिया असा सामना होईल असे वाटायला लागले आहे. अर्थात यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्धाचे वातावरण निर्माण होईल असे मात्र नाही.\nआता पुन्हा अमेरिकेच्या आणि युरोपच्या राजकारणात ‘रशिया’ हा महत्त्वाचा घटक ठरत आहे. आशिया व पॅसिफिक महासागराच्या राजकारणात अमेरिकेला चीनच्या विस्तारवादाचा सामना करावा लागतो तर आता युरोपात रशिया ही नवी डोकेदुखी ठरत आहे. या राजकारणात एक सर्वस्वी नवा मुद्दा दडलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची मदत घेऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. याचा दुसरा अर्थ असा की, रशिया अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करायला लागला आहे व थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला स्वतःच्या प्रभावाखाली घेत आहेत. याचा अर्थही होतो की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील तेव्हा ते रशियाला मदत होईल असे निर्णय घेतील. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. म्हणूनच जरी डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे असले तरी याच पक्षाच्या अनेक खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांच्या मते रशियाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या हितसंबंधांचा विचार करतील याची शाश्वती नाही.\nवास्तविक पाहता असे आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व नंतर दोनदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या बिल क्लिटंन यांच्यावरही झाले होते. तेव्हा चीनचे नाव चर्चेत होते. चीनला माहिती होते की जर क्लिटंन जर राष्ट्राध्यक्ष झाले तर ते चीनच्या बाजूचे धोरण स्वीकारतील. तेव्हा मात्र एवढा गदारोळ झाला नव्हता. आता मात्र अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्षांना मान्य नसलेला ठराव संमत करून एका प्रकारे त्यांच्यावर अविश्वासच दाखवला आहे.\nएका बाजूने जसे अमेरिकेतील खासदार रशियाच्या विरोधात आहेत त्याचप्रमाणे युरोपियन युनियनचे सभासदसुद्धा रशियाच्या विरोधात आहेत. अमेरिका व रशिया आणि रशिया व युरोपियन युनियन यांच्यातील संबंधातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रशिया व युरोपियन युनियन एकमेकांचे शेजारी आहेत तर अमेरिकेपासून रशिया मैलों दूर आहे. परिणामी युरोपियन युनियनमधील राष्ट्रांना अमेरिकेने रशियाच्या विरोधात कडक धोरण स्वीकारावे असे वाटते.\nरशियाने युक्रेनमध्ये गडबड केल्यापासून युरोपियन युनियनमधील देश फार नाराज आहेत. रशियाने 2014 साली क्रिमिया हा भाग स्वतःच्या ताब्यात घेतला. यामुळे युरोपियन युनियनने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. परिणामी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे. रशिया आता यातून येन-केन प्रकारे सुटण्याची धडपड करत आहे. याचाच एक भाग म्हणून पुतीन यांनी सायबर यंत्रणांच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यात मदत केली. मात्र ज्या प्रकारे पुतीन यांनी अमेरिकेतील निवडणुकीत हस्तक्षेप केला तो प्रकार अनेकांना मनापासून आवडला नाही. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आलेला ठराव दणदणीत बहुमताने पारित झाला.\nडोनाल्ड ट्रम्प यांना इराण व उत्तर कोरिया या दोन देशांवर निर्बंध लादायचेच होते. त्याबद्दल ट्रम्प प्रशासनाला काही फरक पडत नाही. पण यात रशियासुद्धा अडकला. म्हणून ट्रम्प यांची चिडचीड सुरू आहे.\nअमेरिकेतील राज्यघटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्षांना तेथील संसदेने केलेले कायदे पाळावेच लागतात. ते अशा कायद्यावर स्वाक्षरी करण्यास नाकारू शकतात. पण त्यामुळे फार काही साधले असते असे नाही. उलटपक्षी यात गुंताच जास्त झाला असता. आता मात्र ट्रम्प यांना यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल.\nलेखक – अविनाश कोल्हे\n← ‘तीन साल बेमिसाल, पण तरीही’\nकाश्मिर खोऱ्यामध्ये अपप्रचारविरोधी युद्ध जिंकणे जरुरी →\nभारतीय नौदलाच्या मलबार कवायती\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2018-04-20T14:29:23Z", "digest": "sha1:IEH434QLZ6ZETAETP5CKYL7LTVNTPIAE", "length": 5240, "nlines": 104, "source_domain": "newsworld.live", "title": "रूपगंध – News World", "raw_content": "\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या...\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\nहैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून...\n19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत\nमाऊंट मौनगनुई : अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवला आहे. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले...\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\n19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत\nविराट कोहली बनला दोन्ही संघाचा कर्णधार\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ramdas-athawale-mla-bachu-patil-marathi-news-jalgaon-news-maharashtra-news-51604", "date_download": "2018-04-20T14:41:12Z", "digest": "sha1:7LZUD7VO33O4YPB5JTDNCODA4R74DXM7", "length": 13161, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ramdas Athawale mla bachu patil marathi news jalgaon news maharashtra news आमदार कडूंनी अतिरेकी भाषा वापरू नये : रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nआमदार कडूंनी अतिरेकी भाषा वापरू नये : रामदास आठवले\nशुक्रवार, 9 जून 2017\nजळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यासाठी केवळ आंदोलनच नव्हे तर चर्चाही आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शविली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्च पाटील यांनी चर्चा करावी. त्यानंतर 31 ऑक्‍टोबरपूर्वी दोन महिने अगोदरही कर्जमाफी होवू शकते, अशा प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत. आमदार बच्च कडू यांनी अतिरेकी भाषा वापरू नये, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.\nजळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यासाठी केवळ आंदोलनच नव्हे तर चर्चाही आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शविली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्च पाटील यांनी चर्चा करावी. त्यानंतर 31 ऑक्‍टोबरपूर्वी दोन महिने अगोदरही कर्जमाफी होवू शकते, अशा प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत. आमदार बच्च कडू यांनी अतिरेकी भाषा वापरू नये, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.\nएका कार्यक्रमासाठी आठवले जळगावमध्ये आले होते. विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, \"शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यांना कर्जमाफी निश्‍चित मिळाली पाहिजे. मात्र हा प्रश्‍न चर्चेने सोडविला पाहिजे. आपल्या मागण्यासाठी आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मात्र त्यासोबत चर्चाही केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा प्रश्‍न सोडविण्यसाठी चर्चा करण्याची तयारी दर्शविली पाहिजे. त्यांच्यासोबत आंदोलनकांनी व विरोधी पक्षाने चर्चा केली पाहिजे. त्यामुळे हा प्रश्‍न सुटेल. कदाचित 31 ऑकटोबरच्या दोन महिने अगोदरच कर्ज माफी मिळेल.' आमदार बच्चू कडू यांच्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले, \"ते चांगले नेते आहेत. त्यांनी बॉंम्ब फेकण्यासारखी अतिरेकी भाषा करू नये; त्यांनी संयमाने बोलावे.'\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nनिर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे - वैभव नायकवडी\nवाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण...\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nओढा खोलीकरणाचा रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य - खा. सुळे\nभिगवण - मदनवाडी येथील ओढा खोलीकरणाच्या माध्यमातून गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे व गाव दुष्काळमुक्त होण्यास निश्चित...\nअभय पाटील, अनिल बेनकेंकडून भाजपतर्फे अर्ज दाखल\nबेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T14:52:08Z", "digest": "sha1:AWTIX6JRYMCALJFU63TNO2UZRAMXM7KQ", "length": 3450, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॅक अलाबास्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nन्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-kulbhushan-s-friend-on-yesterday-meet-495291", "date_download": "2018-04-20T14:25:31Z", "digest": "sha1:XGSTCKMMYYHX3C57LX6YCWJ4VUVXJE5A", "length": 14392, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीतील पाकच्या दिखाव्यानंतर कुलभूषण यांचे मित्र संतप्त", "raw_content": "\nमुंबई : कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीतील पाकच्या दिखाव्यानंतर कुलभूषण यांचे मित्र संतप्त\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nमुंबई: राज्याच्या तिजोरीतून विनायक मेटेंसाठी 20 लाखाची कार\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nमुंबई : कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीतील पाकच्या दिखाव्यानंतर कुलभूषण यांचे मित्र संतप्त\nमुंबई : कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीतील पाकच्या दिखाव्यानंतर कुलभूषण यांचे मित्र संतप्त\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: राजस्थान रॉयल्स ने टॉस जीता,पहले गेंदबाजी का फैसला\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\nCSK vs RR: बैन के बाद पहली बार एक-दूसरे से भिड़ेगी सीएसके और राजस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/315", "date_download": "2018-04-20T14:31:04Z", "digest": "sha1:LBPGFB2NCL5MIIDUAEIL35H4PFA5ARNI", "length": 13408, "nlines": 168, "source_domain": "www.manogat.com", "title": "चौथा अध्याय | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › गीताई ›\nप्रेषक नरेंद्र गोळे (मंगळ., १९/१०/२००४ - ००:००)\nयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो \nमनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥\nअशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला \nपुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥\nतो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन \nजीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ॥ ३ ॥\nह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन \nतू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥ ४ ॥\nमाझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे \nजाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥ ५ ॥\nअसूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु \nमाझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणू ॥ ६ ॥\nगळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना \nअधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥ ७ ॥\nराखावया जगी संता दुष्टा दूर करावया \nस्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ॥ ८ ॥\nजन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे \nदेह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥ ९ ॥\nनाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय \nझाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ॥ १० ॥\nभजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी \nमाझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ॥ ११ ॥\nजे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते \nमनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥\nनिर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी \nकरूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥ १३ ॥\nकर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज \nमाझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ॥ १४ ॥\nकेली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी \nतैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥ १५ ॥\nनेणती जाणते तेहि काय कर्म अकर्म हे \nतुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥ १६ ॥\nसामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे \nअकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥\nकर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे \nतो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ॥ १८ ॥\nउद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी \nज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥ १९ ॥\nनित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना \nगेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ॥ २० ॥\nसंयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह \nशरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥ २१ ॥\nमिळे ते चि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर \nफळो जळो जया एक करूनि हि न बांधिला ॥ २२ ॥\nज्ञनात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा \nयज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥ २३ ॥\nब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी \nब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ॥ २४ ॥\nदेवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती \nब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती ॥ २५ ॥\nश्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती \nकोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ॥ २६ ॥\nप्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती \nचिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ॥ २७ ॥\nद्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी \nसंयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥ २८ ॥\nहोमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते \nरोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥ २९ ॥\nप्राणांत होमिती प्राण कोणी आहार तोडुनी \nयज्ञ-वेत्ते चि हे सारे यज्ञाने दोष जाळिती ॥ ३० ॥\nयज्ञ-शेषामृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत \nन यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ॥ ३१ ॥\nविशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे \nकर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥ ३२ ॥\nद्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो \nपावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता \nसेवा करूनि ते जाण नम्र-भावे पुसूनिया \nज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥ ३४ ॥\nज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू \nआत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥ ३५ ॥\nजरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि \nतरी ह्या ज्ञान-नौकेने पाप ते तरशील तू ॥ ३६ ॥\nसंपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो \nतसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥ ३७ ॥\nज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी \nयोग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ॥ ३८ ॥\nश्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य-सावध \nज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥ ३९ ॥\nनसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा \nन हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥ ४० ॥\nयोगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले \nजो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥ ४१ ॥\nम्हणूनि अंतरातील अज्ञान-कृत संशय \nतोडुनी ज्ञान-खड़गाने ऊठ तू योग साधुनी ॥ ४२ ॥\n‹ तिसरा अध्याय up पाचवा अध्याय ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T14:51:06Z", "digest": "sha1:4CIIKKKCHHCFJ4NLEOUXQHFWLPOBIHJM", "length": 5178, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरशिया (कोमी प्रजासत्ताक, पर्म क्राय)\nकोमी ही रशिया देशातील कोमी प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. ह्या भाषेच्या प्रमुख दोन बोलीभाषा असून रशियामधील सुमारे २.२ लाख लोक ही भाषा वापरतात. ही भाषा उद्मुर्त भाषेसोबत मिळतीजुळती आहे.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/fire-sultanpur-citibus-depot-seven-burnt-fire-and-seven-bombs-used-fire-extinguishing/amp/", "date_download": "2018-04-20T14:07:35Z", "digest": "sha1:ST53KYV2YFFSWX7JG2GF64MPNTRTD6BA", "length": 6699, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fire at Sultanpur Citibus Depot, seven burnt fire and seven bombs used for fire extinguishing | सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर | Lokmat.com", "raw_content": "\nसोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर\nबुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली.\nआॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि २ : बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. सोमवारी ११ वाजून २७ मिनिटांनी अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांना बुधवार पेठेतून सिटीबस डेपोला आग लागल्याची खबर मिळाली. लागलीच भवानी पेठेतून एक गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. यावेळी चार गाड्यांच्या आतील सीट कव्हर आणि फायबर बॉडी जळत असल्याने आगीच्या ज्वाला खिडकीतून बाहेर पडत होत्या. तातडीने जवानांनी पाण्याचा फवारा मारला मात्र आग आटोक्यात येईनाशी झाली. दरम्यान एकापाठोपाठ अन्य सहा गाड्या धावल्या. चौफेर पाण्याचा फवारा करण्यात आला. काही गाड्यांच्या टायरने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी फोब केमिकलचा वापर करण्यात आल्याचे अग्निशामकचे अधीक्षक केदार आवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलिसांची कुमकही घटनास्थळी दाखल झाली. मनपाचे सहा. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूरसह अधिकाºयांनीही भेट दिली. --------------- कारण समजले नाही - आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले असून, नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.\nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील २३५ गावांचा सहभाग\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nबंधाºयावरील पाणी अडवण्यासाठी आता फायबरची दारे\nदुष्काळाविरुद्ध चळवळीसाठी कामाला लागा, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन\nमोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोलीसांनीच केला महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग, सोलापूर शहरातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/7433", "date_download": "2018-04-20T14:36:49Z", "digest": "sha1:MN2HZUJ2NGISEXB3ZX4JDJY6JEBK3HFE", "length": 4859, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "नवीन ओळी, परिच्छेद, कडवी हे कसे करावे? | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नित्याचे प्रश्न नि त्यांची उत्तरे › लेखन ›\nनवीन ओळी, परिच्छेद, कडवी हे कसे करावे\nप्रेषक प्रशासक (सोम., ०४/०९/२००६ - ००:००)\nएंटर कळ (की) वापरून नवा परिच्छेद करता येतो. शिफ्ट-एंटर अश्या दोन्ही कळी एकदम वापरल्या तर चालू असलेली ओळ खंडित होऊन नवी ओळ सुरू होते.\nह्यातला फरक कविता लिहिताना लक्षात येईल. एकाच कडव्यातल्या निरनिराळ्या ओळी शिफ्ट एंटरने तर दोन वेगवेगळी कडवी एंटरने पाडावी.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रतिसाद प्रे. उन्मेश२५ (गुरु., १५/०७/२०१० - ०६:०९).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/351", "date_download": "2018-04-20T14:37:09Z", "digest": "sha1:OZ752OUOSZXN2FP4XYSUVDRXG5CDT5FX", "length": 5104, "nlines": 99, "source_domain": "www.manogat.com", "title": "सर्वत्र | मनोगत", "raw_content": "\nपाककृती २१ शिट्यांचे लिंबाचे लोणचे\nपाककृती पाव बटाटा पॅटीस\nपाककृती अक्रोड खजुर केक\nपाककृती दालचिनी चिकन विथ युनिक राईस\nपाककृती मिश्र कडधान्य सलाड\nपाककृती अननस-स्ट्रॉबेरी- चॉकलेट सुफले\nपाककृती क्षुधावर्धक पुदिना सरबत (मिंट ज्युलेप)\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-20T14:33:27Z", "digest": "sha1:EKA7BNKPLWEB6OP4CKFD2O5KLSNFV4RO", "length": 8413, "nlines": 88, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "संपादकीय – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nअलिकडील काळात काही निवडक अधिकार्‍यांच्या बदल्या वारंवार होताहेत, असं दिसून आलं आहे. यातून स्वच्छ आणि तडफदार कारभार करणार्‍या अधिकार्‍यांच्या सतत\n21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण)\nप्रथम, मधे, शेवटी आणि कायमच सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा. आणि त्यासोबत, सर्वांना निमंत्रण, सस्नेह. आग्रहाचं आणि माझं वैयक्तिक सुद्धा. ‘21\nजग भारत विशेष लेख संपादकीय\nसंपादकीय : नव्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी व्हिजन आणि नवी दिशा\nदेशाला नेतृत्व देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘राष्ट्रीय’ आणि ‘वैश्विक’ अशी व्हिजन आहे. त्या व्हिजनवर कशाही पद्धतीने शिक्कामोर्तबही झाले आहे असे\nभारत विशेष लेख संपादकीय\n…वॉर इज स्टिल ऑन\nभारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव आता संपुष्टात आला आहे. दोन्ही देशांनी परस्पर संमतीने आपापले सैन्य या\nभारत विशेष लेख संपादकीय\nएक राष्ट्र म्हणून आपल्याला अजून खूप लांबची वाट चालायची आहे. मानवी समाजाचे काही मूलभूत प्रश्नसुद्धा अजून आपल्याला छळतायत. ज्यामध्ये भ्रष्टाचार,\nमहाराष्ट्र विशेष लेख संपादकीय\nसंपादकीय : देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ – भाग 2\nमुख्यमंत्री झाल्या झाल्या लगेच आणि आता काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांनी म्हटले की प्रशासन माझे ऐकत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याने असे म्हणणे\nसंपादकीय : देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ (भाग 1)\nऑक्टोबर 2014 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल येत होते त्यावेळेला मी एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात होतो. खरं म्हणजे मे 2014 मध्ये\nकार्यकर्ता अधिकारी – भाग 1\nजगण्यातच एवढा गढून गेलो होतो की लिहिण्याचं राहूनच गेलं, आत्तापर्यंत तरी. 1 मार्च 1996 अजून कालच्यासारखा किंवा कदाचित कालच्यापेक्षा जास्त\nबॉब डिलन : एक अवलिया\nटाय लावलेला बॉबी आपण कल्पना करू शकत नाही. मनाने तो भटक्या आहे. त्यामुळेच रस्त्यावर वेगाने प्रवास करणे त्याला आवडते. तो\nराज्यघटना सन्मान मूक मोर्चा\nया नव्या भारताच्या जडणघडणीचा मूलभूत आधार आहे, भारताची राज्यघटना. आपण सर्वांनी आपल्या घटनेचं प्राणपणानं संरक्षण, संवर्धन आणि सन्मान केला पाहिजे.\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/7435", "date_download": "2018-04-20T14:42:35Z", "digest": "sha1:CSQI7F67MPNQXAG2AV7TLEKFKJE47UDB", "length": 7596, "nlines": 85, "source_domain": "www.manogat.com", "title": "काही अक्षरे येथे लिहिता येत नाहीत का? | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नित्याचे प्रश्न नि त्यांची उत्तरे › लेखन ›\nकाही अक्षरे येथे लिहिता येत नाहीत का\nप्रेषक प्रशासक (गुरु., ०१/०१/१९७० - २०:००)\nनाही. सर्व मराठी अक्षरे येथे नीट लिहिता येतात. जेथे जेथे मराठी लिहिता येते तेथे तेथे जवळपास कळफलकाचे (कीबोर्ड) चित्र दिसेल. ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आता लगेच टिचकी मारून पाहा) त्याशिवाय नवख्या माणसाच्या हातून नेहमी होणार्‍या टंकलेखनातील चुका येथे देत आहोत त्या एकदा वाचून घ्या:\nझ - 'माझे' हा शब्द 'माज़े' असा उमटतो. z ची कळ वापरल्याने असे होते. कृपया झ साठी jh वापरा.\nण - 'बाण' हा शब्द 'बान' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. कृपया ण साठी N वापरा. त्याप्रमाणेच ट, ठ, ड, ढ, ष, ळ साठी कृपया अनुक्रमे T, Th, D, Dh, Sh, L अशी कॅपिटल अक्षरे वापरा.\nअर्धा र - 'होणार्‍या' हा शब्द 'होणार्या' असा उमटतो. r ची कळ वापरल्याने असे होते. र्‍य (होणार्‍या), र्‍ह (तर्‍हा) साठी कृपया R वापरा.\nअनुस्वार - 'वंदन' हा शब्द 'वन्दन' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. अनुस्वारासाठी कृपया .n (टिंब एन) वापरा.\nऋ - 'कृती' हा शब्द 'क्रुती' असा उमटतो. ru ह्या कळी वापरल्याने तसे होते. कृपया ऋ साठी Ru वापरा.\n'नाटकात' हा शब्द 'नाट्कात' असा उमटतो. ट नंतर a न दाबता k दाबतात त्यामुळे असे होते. ट नंतर a दाबल्याने 'नाटकात' असे उमटेल. शब्दातील शेवटचे सोडून इतर सर्व अक्षरे पूर्ण करण्यासाठी a किंवा इतर कोणता ना कोणता स्वर दाबणे आवश्यक आहे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nकाही मराठी अक्षरे येथे लिहिता येत नाहीत. का प्रे. शुद्ध मराठी (रवि., ३१/१२/२००६ - १७:४०).\nएम्‌एस्‌सी प्रे. अद्वैतुल्लाखान (शुक्र., १२/०१/२००७ - १६:३३).\nशब्दांवर चंद्र कसा काढावा प्रे. बाळा लोटलीकर (शुक्र., ०८/१०/२०१० - ०८:४२).\nशब्दांवर चंद्र कसा काढावा प्रे. प्रभंजन चिटणीस (शनि., ०९/१०/२०१० - १०:४१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि २८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642319", "date_download": "2018-04-20T14:44:15Z", "digest": "sha1:73ILN6SMIBN2PVTNAVSFWD22PXIVPPV4", "length": 1751, "nlines": 36, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥\nकविता ॥ तुम्ही सारे नेटकरी ॥\nगेली रया ती सारी\nनभी गुप्त ते पतंग\nफिरकीची मांजा न दोरी ॥\nआठवतोय का तो चेंडू \nत्या लाल सपाट चिपळ्या\nकुणी दांडू मारे विटीला\nकधी फोडी काच ती चेंडू\nक्षणात लुप्त धोंडू अन बंडू ॥\nकधी भेंड्या त्या गाण्यांच्या\nकधी खेळ तो मण्यांचा\nतर कधी चोर पोलिसांचा ॥\nकधी तारांची ती गाडी\nधावी पोरं ती शेम्बडि\nकधी मारी उंच उडी\nतर कधी खेळती कबड्डी\nखेळ सारे या मातीत\nतुम्हा नाय ठाव त्यांची महती\nतुम्ही सारे नेटकरी ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/78333-best-twitter-tips-between-semi-digital-services", "date_download": "2018-04-20T14:22:44Z", "digest": "sha1:IZRHOPYETONB6VOXGTVGRA7EB7MDKOMK", "length": 8653, "nlines": 26, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt डिजिटल सेवांमधून सर्वोत्कृष्ट ट्विटर टिप्स्", "raw_content": "\nSemalt डिजिटल सेवांमधून सर्वोत्कृष्ट ट्विटर टिप्स्\nट्विटर हा सर्वोत्तम आणि व्यापक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. अधिक अनुयायी, अधिक क्लिक आणि ऑनलाइन सामायिक करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आपल्या सामग्रीवर ट्विटरवर सामायिक करून, आपल्या अनुयायांच्या संख्येवर आधारित, आपण बर्याच दृश्यमानतेबद्दल खात्री बाळगा. ट्विटर बर्याच विपणन संधींचे प्रतिनिधित्व करते आणि सामग्री वितरित, ऑनलाइन लोकांना गुंतवून ठेवण्याची आणि आपल्या ब्रॅन्डची जाहिरात करण्याच्या विविध संधी प्रदान करते. येथे, आर्टम अॅबगॅरियन, Semalt वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापकाने आपल्या ट्विट्स आणि सोशल मिडिया अकाउंट्सचे अधिक मूल्य मिळवण्याच्या काही उत्तम पद्धतींची चर्चा केली - computer repair in sunnyvale.\nआपले ट्वीट वारंवार शेड्यूल करा\nआपण आपल्या पोस्ट आणि प्रतिमा-संबंधित ट्विट्सना चांगल्या वेळेत शेड्युलिंगसाठी लक्ष देणे आवश्यक आहे. आमच्या प्रमुख चुकांपैकी एक म्हणजे आम्ही पोस्ट सामायिक करू नये आणि आमचे Twitter खाते अद्ययावत ठेवू नका. दिवसातील तीन ते चार वेळा गोष्टी सामायिक करणे आणि सामग्री गुंतविणे हे महत्वाचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या ट्वीट्सकडे आकर्षित होतील. असे केल्याने आपण आपल्या Twitter अनुयायांची संख्या वाढविण्याची आणि एक चांगले प्रकारे आपला शब्द पसरविण्यास सक्षम असल्याची हमी देईल. हे अत्यंत शिफारसीय आहे की तुम्ही प्रत्येक तासासाठी शेड्युलिंग केले आहे जेणेकरुन तुमचे अनुयायी रहात राहतील.\nनवीन नवीन सूचीसह एक नवीन मुख्यपृष्ठ तयार करा\nदुसरी एखादी गोष्ट आपण एक किंवा दोन होमपेज तयार करू शकता ज्यामध्ये ब्रँडच्या नवीन सूची आणि गुंतवून ठेवणारी सामग्री आहे. ट्विटर जाहिरातींचा लाभ घ्या आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी टिप्पणी 'बॉक्सवर लक्ष ठेवा. शेवटी आपल्यास ट्विटर ऍक्टिव्हिटी मिळतील आणि इंटरनेटवर आपल्या साइटची दृश्यमानता आणि विश्वासार्हता वाढेल.आपल्या व्याज आणि आपल्या श्रोत्यांच्या गरजेवर आधारित आपले ट्विटर मुख्यपृष्ठ कोणत्याही आकर्षक किंवा विषय असू शकते.\nट्विटरवर सामग्री रीशेअर करा\nजर आपण असे मानले की Twitter वर थोडा वेळ सामग्री सामायिक करणे पुरेसे आहे तर मी तुम्हाला सांगतो की आपण भयंकर चूक केली आहे विविध तंत्रज्ञान तज्ञ आणि डिजिटल विक्रेत्यांचे असे मत आहे की इंटरनेटवर ब्रँडच्या अस्तित्त्वासाठी Twitter आणि Facebook वर सामग्री रीशेअर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, एकदा शेअर केल्यावर आपण सामग्री सामायिक करणे थांबवू नये. त्याऐवजी, आपण आता आनंददायी गोष्टी सामायिक केल्या पाहिजेत आणि वापरकर्ते 'प्रतिबद्धता स्तर संपूर्ण ठेवलेला आहे हे सुनिश्चित करण्यासाठी.\nखालील-अनुयायी गुणोत्तरकडे दुर्लक्ष करा\nआपल्या अनुयायांच्या अनुयायांचा अनुपात करण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, आपल्यास ऑनलाइन किती अनुयायी आहेत हे महत्त्वाचे असले तरीही, आपण कठोर परिश्रम करत रहा आणि नवीन गोष्टी शेअर करणे सुरु ठेवावे. दिवसातील एक किंवा दोनदा आपल्या अनुयायांना खालील-अनुयायी गुणोत्तर न तपासता आपल्या वापरकर्त्यांच्या प्रतिबद्धतेकडे अधिक लक्ष द्या. मला येथे सांगू या की तुमचे सोशल मिडियाची उपस्थिती नक्कीच वाढेल आणि तुमचे ब्रॅन्ड लाइव्ह आपल्या ट्विटर अनुयायांच्या आयुष्यात कायम राहतील.\nशेवटी, आम्ही असे म्हणू इच्छितो की आपल्या ट्विटरवर अनेक कार्यक्रम आणि साधनांचा समावेश आहे जे आपल्या अनुयायांच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करतात. बनावटी खाती फॉलोऑन आणि ब्लॉक करण्यासाठी आपण या साधनांचा वापर करु शकता. आपल्याला मिळणारे अनुयायी सर्व अस्सल व कायदेशीर आहेत हे सुनिश्चित करा जेणेकरुन आपल्या वेबसाइटचे गुणधर्म तसेच आपल्या सोशल मीडियाची उपस्थिती शेवटपर्यंत टिकून राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/07/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-20T14:42:21Z", "digest": "sha1:6EW5JMBNTZUI5Q6Z2OXEKPHGDDV4MT7Z", "length": 22196, "nlines": 80, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "भारतीय नौदलाच्या मलबार कवायती – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nजग भारत विशेष लेख\nभारतीय नौदलाच्या मलबार कवायती\n1991 साली सोव्हियत युनियनचे विघटन झाल्यापासून भारताला आपल्या संरक्षण सिद्धतेविषयी नव्याने विचार करावा लागला. सोव्हियत युनियन होते तेव्हा भारताला या महासत्तेची अनेक पातळ्यांवर मदत होत असे. यात जसे लष्करी सामुग्रीची विक्री होती त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताविरूद्ध आलेल्या ठरावांवर नकाराधिकार वापरण्यापर्यंत मदत होत असे. ही महासत्ता नष्ट झाल्यापासून भारताला अनेक पातळ्यांवर नव्या मित्रांचा शोध घ्यावा लागला.\nया शोधाला आणखी एक आयाम 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून प्राप्त झाला व तो म्हणजे आयियाचा व एकूणच जगाच्या राजकारणात चीनची वाढत जात असलेली महत्त्वाकांक्षा. 1980 च्या दशकांत डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने कात टाकायला सुरुवात केली व सुमारे वीसपंचवीस वर्षे दणदणीत आर्थिक प्रगती करून आता साम्राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नांना लागला आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षेचा ताबडतोब व जास्तीत जास्त त्रास त्याचा महत्त्वाचा शेजारी देश म्हणून भारताला होणे स्वाभाविक आहे. सध्या भूतान, भारत व चीन या त्रिकोणावर असलेल्या डोकलाम भागात भारतीय सैन्य व चीनी सैन्य एकमेकांच्या डोळ्यांना डोळे भिडवून उभे आहे ते उगीच नव्हे. ही झाली भारत-चीन यांच्या सीमेवरील वादाची चर्चा.\nही चर्चा येथेच संपत नाही. गेली काही वर्षे चीनला साम्राज्यासाठी भल्याथोरल्या नौसेनेची गरज भासायला लागली आहे. त्या दृष्टीने चीनने दक्षिण चीन समुद्रात व हिंदी महासागरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनच्या या मनसुब्यांना दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, फिलिपाईन्स व जपानने आव्हान दिले आहे. या संदर्भात अलिकडेच एका आंतरराष्ट्रीय लवादाने फिलीपाईन्सच्या बाजूने निकाल दिला होता. पण चीनने हा निकाल सरळसरळ अमान्य केला. एवढेच नव्हे तर चीनने आपल्या सागरी महत्त्वाकांक्षांना वेसण न घालता जमेस तिकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.\nश्रीलंकेत जेव्हा महिंदा राजपक्ष यांची सत्ता होती तेव्हा तर चीन व श्रीलंका यांची खास मैत्री होती. त्याच काळात चीनची एक अण्वस्त्रधारी पाणबुडी कोलंबो बंदरात येऊन गेली होती. तेव्हा भारताने जोरदार आक्षेप घेतला होता. यथावकाश श्रीलंकेत सत्तांतर झाले व तेथे आता भारताच्या बाजूचे सरकार सत्तेत आहे. थोडक्यात याचा अर्थ असा की आता चीन जमेल तेथे व जमेल तसे भारताला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करत असतो.\nही बदललेली परिस्थिती बघून भारताने जपान व अमेरिकेशी या संदर्भात खास मैत्री करण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिपाक म्हणजे सोमवारपासून अमेरिका, जपान व भारतीय नौदलाच्या संयुक्त कवायती बंगालच्या उपसागरात सुरू झाल्या आहेत. यांना ‘मलबार नाविक कवायती’ असे म्हणतात. अपेक्षेप्रमाणे चीनने या संयुक्त कवायतींना जोरदार हरकत घेतली आहे. या कवायतींत भारताची एकमेव विमानवाहू नौका ‘विक्रमादित्य’ तर आहेच तर अमेरिकेच्या भरपूर विमानवाहू नौका आहेत. शिवाय जपानी नौसेना आहे. परिणामी चीनचा पोटशूळ उठला आहे. अशा कवायतींतून या तिन्ही देशांना चीनच्या हिंदी महासागरातील कारवायांना शह द्यायचा आहे.\nचीनचा हिंदी महासागरातील वाढता धोका भारताअगोदर अमेरिकेने ओळखला होता. म्हणून भारत अमेरिका यांच्या नौदलाच्या संयुक्त कवायती व्हाव्यात अशी अमेरिकेने 1992 साली सूचना केली होती. भारताने बदललेली जागतिक परिस्थिती लक्षात घेता ही सूचना स्वीकारली व त्याच वर्षी प्रथमच अमेरिका भारत यांच्यातील नौदलाने संयुक्त कवायती केल्या. आता सुरू झालेल्या कवायतींचे हे 21 वे वर्ष आहे.\n1998 साल उजाडेपर्यंत अशा तीन कवायती झाल्या. पण 1998 साली भारताने अणुस्फोट केल्यामुळे अमेरिकेने या कवायतींवर बंदी घातली.पण 2001 साली 9/11 चा दणका बसल्यानंतर अमेरिकेने स्वतः पुढाकार घेऊन या कवायती सुरू केल्या. 2007 साली प्रथमच या कवायती हिंदी महासागरात न होता जपानच्या समुद्रात झाल्या. सप्टेंबर 2007 मध्येच याचा पुढचा टप्पा बंगालच्या उपसागरात झाला. यात जपान, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर सहभागी झाले होते. आधी या कवायती अमेरिका भारत यांच्यातील द्विराष्ट्रीय होत्या, सप्टेंबर 2007 पासून त्या बहुराष्ट्रीय झाल्या. या कवायतींच्या विरोधात भारतातील डाव्या पक्षांनी मनमोहनसिंग सरकार कडवट टीका केली होती. त्याच काळी भारत-अमेरिका अणुशक्ती कराराची जोरदार चर्चा सुरू होती.\nसप्टेंबर 2007 मध्ये झालेल्या कवायती प्रथमच बंगालच्या उपसागरात झाल्या होत्या. चीन अगोदरपासून म्यानमार व बांगलादेशच्या मदतीने बंगालच्या उपसागरात वरचष्मा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होता. त्यानंतर मात्र 2008 साली झालेल्या ‘मलबार कवायती’ अरबी समुद्रात झाल्या होत्या. यानंतर झालेल्या मलबार कवायती एक तर अरबी समुद्रात झाल्या किंवा बंगालच्या उपसागरात किंवा जपानच्या समुद्रात झाल्या. आतासुद्धा सुरू असलेल्या कवायती बंगालच्या उपसागरात आहेत.\nमलबार कवायती या मूलतः लष्करी स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्यातील खाचाखोचा समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणांची मूलतत्त्वं समजून घेतली पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताने या ना त्या प्रकारे जागतिक राजकारणात कोणत्याही एका महासत्तेची बाजू घेण्याचे सातत्याने नाकारले. यातूनच 1961 साली पंडित नेहरूंनी इजिप्तचे कर्नल नासेर व युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांच्या मदतीने युगोस्लाव्हियाची राजधानी बेलग्रेड येथे अलिप्त राष्ट्र परिषदेची स्थापना केली. तेव्हा आपली भूमिका अशी होती की अमेरिका व सोव्हियत युनियन या दोन महासत्तांमध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे त्यात भारतासारख्या अनेक नवस्वतंत्र देशांना कोणाच्याच बाजूने सहभाग घ्यायचा नाही. म्हणून आम्ही आमचा वेगळा अलिप्त राष्ट्रांचा गट बनवत आहोत.\nअसे असले तरी राजकारणात कोणतेचे तत्त्व युद्ध रूपात अस्तित्वात नसते याचे भान पंडित नेहरूंना होते. म्हणूनच 1961 साली जरी अलिप्त राष्ट्र परिषद स्थापन झालेली असली तरी जेव्हा ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने भारतावर अचानक आक्रमण केले तेव्हा आपण अलिप्ततावादी धोरण बाजूला ठेवत अमेरिकेची मदत घेतली. अलिप्ततावादी राजकारणात आपण योग्य प्रमाणात व्यवहार ठेवला होता.\nया स्थितीत 1991 सालापासून आमूलाग्र बदल व्हायला लागले. या वर्षी डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे सोव्हियत युनियन एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. यामुळे जगभर अमेरिकेचा व भांडवलदारी व्यवस्थेचा उदोउदो सुरू झाला. तेव्हापासून भारतानेसुद्धा नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. यात अमेरिकेशी खास मैत्री करणे ओघाने आलेच.\nआता जगातील प्रत्येक मोठ्या देशाला अमेरिकेशी मैत्री करावीच लागते. यात चीनसुद्धा मागे नाही. उलटपक्षी असे दाखवून देता येते की या संदर्भात चीनने सर्वांत अगोदर पुढाकार घेतला होता. 1971 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन चीनच्या भेटीवर गेले होते. अर्थात तेव्हाचे जागतिक राजकारणाचे संदर्भ अगदीच वेगळे होते व आज अगदीच वेगळे आहेत. तेव्हा अमेरिका- चीन मैत्रीला रशियायी असलेल्या शत्रूत्वाचा आयाम होता. आज तसे काही नाही.\nअर्थात आज परिस्थिती बरीच बदलली आहे. आताच्या जागतिक राजकारणात अमेरिका व चीन यांच्यात स्पर्धा असते. अर्थात ही स्पर्धा म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया यांच्यात होती तशी मुळीच नाही. पण या दोन देशांत स्पर्धा आहे हे नाकारता येत नाही. म्हणूनच जेव्हा अमेरिका जपान व भारताला पुढे करून ‘मलबार कवायती’सारखे प्रयोग करतो तेव्हा चीनचा जळफळाट होतो.\nतसे पाहिले चीनच्या दृष्टीने भारत काही फार मोठा देश नाही. पण 1998 साली केलेले अणुस्फोट व 2005 साली अमेरिकेशी केलेल्या अणुशक्तिविषयक करारांमुळे भारताचा दबदबा वाढला आहे. याच काळात चीनची दक्षिण चीन समुद्रात व हिंदी महासागरात महत्त्वाकांक्षा वाढली आहे. म्हणून आता अमेरिका, भारत व जपान यांच्या नौसेनेच्या संयुक्त कवायतींना महत्त्व आले आहे. भारताला दक्षिण आशियाच्या राजकारणात तसेच जगाच्या राजकारणात योग्य ते स्थान हवे आहे. दुसरीकडे चीनला एकूण आयियाचे नेतृत्व करावयाचे आहे व यिवाय जागतिक राजकारणावर प्रभाव टाकायचा आहे. यामुळे आशियातील या दोन भीमकाय देशांत ताणतणाव असणे अगदी स्वाभाविक आहे. आज भारत चीनच्या तुलनेत लष्करीदृष्ट्या थोडासा कमकुवत आहे. यामुळे चीनला भारताच्या विरोधात कारवाई करण्याचा मोह होऊ नये म्हणून ‘मलबार कवायती’ महत्त्वाच्या ठरतात. यामुळे हिंदी महासागराच्या राजकारणात भारत एकटा नाही ही बाब समोर येत राहते व त्या त्या प्रमाणात जर चीनच्या मनांत काही उलटसुलट येत असेल तर त्याला लगाम बसू शकतो.\nअशा राजकारणाचा हा खरा फायदा होतो. आधुनिक जागतिक राजकारणात आपल्यावर कोणी हल्ला करू नये यासाठी खटपट करायची असते. मलबार कवायतींचा हा महत्त्वाचा हेतू आहे.\nलेखक – अविनाश कोल्हे\n← संरक्षणसिद्धता मजबूत होतेय\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/user/login?destination=node/26286%2523comment-form", "date_download": "2018-04-20T14:27:38Z", "digest": "sha1:WBKAMN24HJD7HFSQI54R5NKCDCB22KYI", "length": 3654, "nlines": 72, "source_domain": "www.manogat.com", "title": "User account | मनोगत", "raw_content": "\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nतुमचे मनोगत वापरायचे नाव भरावे.\nतुमच्या वापरायच्या नावाच्या जोडीने असलेला परवलीचा शब्द भरावा.\nctrl_t ने कुठेही बदला.\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3.html", "date_download": "2018-04-20T14:54:41Z", "digest": "sha1:CKAG33QMHPQO5ZEGLE2YIKOOWZQ3DSU7", "length": 6441, "nlines": 84, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मनोरुग्ण - Latest News on मनोरुग्ण | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nस्वच्छतेच्या नादात माणुसकीला विसर, मनोरुग्णाला नेलं कच-याच्या ट्रॅक्टरमधून\nस्वच्छतेच्या नादात राहाता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.\nत्याच्या पोटातून निघाली ७२ नाणी, वायसर आणि नटबोल्ट\nपालघर जिल्ह्यतल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क ७२ नाणी आढळून आली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. साडेतीन ते चार तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी कढण्यात आली.\nधक्कादायक : एटीएम सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार\nकोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.\nपुण्यामध्ये एका मनोरुग्णाने लोकांची चांगलीच दमछाक केली. रेल्वे गोदामाच्या छतावर चढून बसलेल्या या मनोरुग्णाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल तसंच रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल साडेतीन तास चालेलेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात यश आलं.\nअमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय..\n'या' फोटोग्राफरला हसण्याआधी फोटो नक्की बघा \nसोनमनंतर श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत\nगेलचा खुलासा, या खेळाडूमुळे खेळतोय ही लीग\nश्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला मिळाली आणखीन एक 'मॉम'\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई\nशतक ठोकल्यानंतर गेलने जाहीरपणे मागितली ही गोष्ट\nशतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन\nबांगलादेशच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाचा जबरदस्त झटका\nFilm Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi-pregnancy.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:25:14Z", "digest": "sha1:BGCY75AF32VAPSXIZ3TKSXPP5QF7E3F2", "length": 12565, "nlines": 139, "source_domain": "marathi-pregnancy.blogspot.com", "title": "प्रेग्नन्सी डायरी: माझी ओळख व माझे प्रेग्नंसीसाठीचे वाचनाचे सोर्सेस प्रेग्नन्सी डायरी", "raw_content": "\nमाझी ओळख व माझे प्रेग्नंसीसाठीचे वाचनाचे सोर्सेस\nतुम्ही हा ब्लॉग वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा वाट पाहात आहात तेव्हा अभिनंदन\nमी हा ब्लॉग सुरू करण्याची बरीच कारणे आहेत.\nसर्वात महत्वाचे म्हणजे मला जेव्हा गरज होती तेव्हा प्रेग्नंसीबद्दल मराठीमधून फारशी माहीती मला मिळाली नाही. तेव्हाच डोक्यात किडा आला की हे मला करता येईल. तसेच प्रेग्नंसीसारखेच ब्लॉगिंग मध्ये सुद्धा बेबी स्टेप्स टाकून पाहता येतील \nआजकालच्या , माझ्या वयाच्या मुली या नक्कीच शांत बसणार्‍य़ा नाहीत.\nजेव्हा आयुष्यातील इतकी मोठी स्टेप उचलायची वेळ येते तेव्हा नक्कीच इन्फर्मेशनच्या या जंजाळात जितकी माहिती मिळेल तितकी त्या(माझ्यासारखीच) गोळा करत असतील.\n मी अनु. माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी. नवरा मनू. (मस्त जुळतं ना यमक \nतर, अनु आणि मनूने ठरवलं होतं की २-३ वर्षं तरी काही बाळाचा विचार करायचा नाही. मोठ्या लोकांनीही साथ दिली व आमचे दोघांचे जॉब्स , करीअर,संसार इत्यादी व्यवस्थित सुरू राहीले. ३ वर्षांनंतर मात्र हा निर्णय जास्त लांबवता येणार नाही हे लक्षात घेऊन मी नोकरी दिली सोडून. व जेव्हढं मिळेल तेव्हढे प्रेग्नन्सीवर वाचू लागले. हो साधा हा ब्लॉग काढताना किती रिसर्च केला मी. बाळासाठी ऑब्वियसली केलाच पाहीजे.\nमाझे सोर्सेस होते मुख्यत्वेकरून :\nगर्भसंस्कार - बालाजी तांबे. ( आईचा आग्रह, अजुन काय\nवंशवेल - मालती कारवारकर.\nइंटरनेटवरील खजिन्यातील काही कण.\nत्यातील गर्भसंस्कार तर अतिशय उत्तम व तितकेच बोजड आहे. फारच संस्कृत आहे त्यात. ते नसेल तर संस्कृतप्रचुर मराठी आहे. त्यामुळे नको वाटते ते. वंशवेलमध्ये आहार कसा असावा या विषयावर बरीच माहीती आहे. मला फार उपयोगी पडले ते आहार ठरवायला. (अजुनही पडते). बाकी इंटरनेटवर तर खजिना आहेच. काही पुस्तकही उत्तम आहेत, ती मी नंतर आणली लायब्ररीतून.\nअसो. तर हे माझे सोर्सेस होते. मला बरीच माहीती मिळाली. त्याचा उपयोग सर्वांनाच व्हावा असे वाटल्यामुळे हा ब्लॉग काढला. इथून पुढे रोज मी अपडेट करत जाईन. सद्ध्या तरी मी फ्लॅशबॅक मोडमध्ये आहे. कारण मी जरी 7 weeks प्रेग्नंट असले तरी ब्लॉगमध्ये मला अगदी सुरवातीपासून सुरवात करायची आहे. लवकरात लवकर ते अपडेट करू शकले तर ऍक्चुअल लाईव्ह फ़िड्स देता येतील \nचलो टाटा, आवजो , ब्बाय, स्याओ,\nअगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही. मी पण खूप अभ्यास केला होता, माझ्या प्रेग्नंसी मध्ये. आता माझे बाळ दिड वर्षाचे आहे आणि मी त्याचा ब्लॉग सुरु केला आहे.\nतुम्ही www.babycenter.in/ या साइटला रजिस्टर करा, सुंदर माहिती आहे तिथे.\nधन्यवाद सोनाली, बेबीसेंटर वेबसाईट सुंदरच आहे. मी ही ती वाचते.\nसोनल, तुम्हाला ही माहीती उपयुक्त वाटली पाहून आनंद झाला. वाचत राहा.\nतुम्ही हा ब्लॉग वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही प्रेग्नंट आहात\n या जन्मात तरी ते शक्य नाही पण उपयुक्त आहे ब्लॉग. पुलेशु\nपुरूषांसाठी नाहीच हो ती कमेंट\nजुळी मुलं न होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे\nएकदा गर्भधारणा झाल्यावर किती दिवसानी दुसरी गर्भधारणा होते (१ महीन्यात, २ महिन्यात का अजुन किती महिन्यात )\nइथे इमेल पत्ता भरा व तुमच्या पत्रपेटीत ही सर्व पोस्ट्स वाचा\nगर्भधारणा कशी होते व गर्भधारणेचे काही Symptoms \nस्त्रीपुरूषांची शरीररचना - Reproductive System.\nमाझी ओळख व माझे प्रेग्नंसीसाठीचे वाचनाचे सोर्सेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://teliindia.com/news.php?newsid=862&title=Sant%20santaji%20maharaj%20jagnade%20Murti%20Dhule", "date_download": "2018-04-20T14:28:39Z", "digest": "sha1:HCUMWKKSRN3UWITMVB6X7UZI35I52N2P", "length": 5629, "nlines": 36, "source_domain": "teliindia.com", "title": "Sant santaji maharaj jagnade Murti Dhule | श्री संत संताजी महाराज जगनाडे मुर्ती कैकाडी मठात स्थापन", "raw_content": "\nश्री संत संताजी महाराज जगनाडे मुर्ती कैकाडी मठात स्थापन\nधुळे, (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी तालुका तेली समाज महासभेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच मठात संत जगनाडे महाराज यांची मुर्ती स्थापन करण्यात आली. धुळे तालुका तेली समाज महासभेतर्फे अध्यक्ष दौलत नामदेव चौधरी यांनी पंढरपुर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती भेट दिली. गेल्या सहा वर्षांपासून तेथील मठाचे व्यवस्थापक ह.भ.प. रामदासबाबा जाधव यांच्याकडे संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्यात आली आहे. या मुर्तीचे लाखो भाविकांना दर्शन होणार आहे.\nकणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न\nपेशवाईत तुकाराम व संताजी विचाराला बंदी.\nया साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nतेली समाज का मंदिर\nश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय\nसाहू तेली समाज के गौरव पृथ्वी साव की कप्तानी में भारत ने जीता विश्व कप\nतेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nAbout TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.\nContact us मदती साठी संपर्क करू शकता\nअभिजित देशमाने, +91 9011376209,\nमोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://teliindia.com/news.php?newsid=887&title=santaji%20jagnade%20maharaj%20Convent%20scholarship%20Buldhana", "date_download": "2018-04-20T14:25:35Z", "digest": "sha1:T2MUT4GAVICBRKIFH3QQ4UWFK3I77MKR", "length": 5777, "nlines": 32, "source_domain": "teliindia.com", "title": "santaji jagnade maharaj Convent scholarship Buldhana | संताजी कॉन्व्हेंट चे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश बुलढाणा", "raw_content": "\nसंताजी कॉन्व्हेंट चे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश बुलढाणा\nबुलढाणा - स्थानिक संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग ५ व वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम सुयश प्राप्त केले आहे . वर्ग ५ मधून १) प्रणव तेजनकर २) कु.प्राची आघाव ३) कु. प्रियंका अंभोरे ४) आनंद गवई ०५) अनुज मोरे ६) देवाशीष देठे व वर्ग ८ मधून १) कु.वेदिका डोंबळे २) शोनक व्यवहारे ३) सौरव तोंडे ४) कु.नम्रता जुनघरे ५) राहुल अंभोरे ६) प्रणव वायाळ ७) वैष्णवी बोडखे ८) स्नेहा राऊत ९) महेश भाकडे १०) गायत्री गायकवाड ११) प्रतीक पवार १२) विधान बारड १३) चंद्रसेन पवार , हे विध्यार्थी पात्र ठरले . यांना मुख्यध्यापिका सौ. मनिषा राजबिंडे, उपमुख्यध्यापक श्री विशाल डोंगरे व सर्व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले . या सर्वांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण वाघमारे व उपाध्यक्ष अँड संतोष राजबिंडे, सचिव संतोष डोंबळे व संचालक मंडळ यांनी सर्वांचे कौतुक केले.\nया साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nतेली समाज का मंदिर\nश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय\nसाहू तेली समाज के गौरव पृथ्वी साव की कप्तानी में भारत ने जीता विश्व कप\nतेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nAbout TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.\nContact us मदती साठी संपर्क करू शकता\nअभिजित देशमाने, +91 9011376209,\nमोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-42042188", "date_download": "2018-04-20T15:17:40Z", "digest": "sha1:ULVMA5SRKXMGJ56OC2JYU6CD2LTNVFQM", "length": 20490, "nlines": 141, "source_domain": "www.bbc.com", "title": "'मॉडेलिंग' करणारे हे आजी-आजोबा बघा! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'मॉडेलिंग' करणारे हे आजी-आजोबा बघा\nप्रमिला कृष्णन बीबीसी तामिळ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nचेहऱ्यावर न लपणाऱ्या सुरकुत्या, सडपातळ बांधा, साधीशीच लुंगी नेसलेली... चेहऱ्यावर हलकं स्मित मात्र कायम आणि पांढऱ्या केसांची स्टाईल अगदी तामिळ फिल्मस्टार रजनीकांतची असते तशी...\n71 वर्षांच्या दिलीबाबूंना म्हणूनच कदाचित मॉडेल म्हणून काम करण्याची ही संधी मिळाली असावी.\nचेन्नईच्या प्रतिष्ठित गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्यांच्या कलाकृतींसाठी मॉडलचं काम दिलं जातं.\nभारतात लष्करी उठाव शक्य आहे का\nशिक्षणासाठी बंड : अंजुमने मोडला बालविवाह\n\"मी कित्येक तास असा स्तब्धपणे आहे त्या पोझिशनमध्ये बसून राहू शकतो. काही वेळानंतर थोडा आराम करतो. मी जेव्हा पुन्हा कामाला बसतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर तेच भाव असतात,\" दिलीबाबू आपल्या कामाच्या स्वरुपाबद्दल बीबीसीला सांगत होते.\nविद्यार्थ्यांना चित्रकला किंवा शिल्पकला शिकण्यासाठी मॉडल्सची आवश्यकता असते. या मॉडल्सकडे पाहून विद्यार्थी हुबेहूब चित्रं रेखाटतात किंवा शिल्पं साकारतात.\n\"ही मुलं माझी चित्रं अगदी हुबेहूब काढतात. माझ्यात आणि त्या चित्रांत तुम्हाला किंचितही फरक दिसणार नाही, \" दिलीबाबू सांगतात.\n\"कधीकधी ही मुलं त्यांच्या कामात इतकी गढून जातात की, त्यांना आजूबाजूचं, वेळेचं भानही राहात नाही. मी बऱ्याचदा त्यांचं काम कधी संपेल याची वाट बघत बसून राहतो,\" दिलीबाबू म्हणतात.\nप्रतिमा मथळा शिल्प पूर्ण होईपर्यंत त्यांना कित्येक तास बसून राहावं लागतं\nएक दोन नाही तर दिलीबाबूंची तब्बल दहा मातीची अपूर्ण शिल्पं मला फाइन आर्ट्स कॉलेजच्या स्टुडिओमध्ये दिसली. एका उंच खुर्चीवर दिलीबाबू स्तब्धपणे बसलेले होते.\nस्टुडिओच्या खिडकीतून उष्ण झळा येत होत्या. त्या वाऱ्यावर दिलीबाबूंचे केस उडत होते, पण ते जागेवरून तसूभर हलले नाहीत. त्या झळांमुळे आपण त्रासलो आहोत असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसले नाहीत.\nमॉडेल म्हणून काम करण्यासाठी दिलीबाबूंना रोजचे 200 रुपये मिळतात. त्यांची शिफ्ट आठ तासांची असते. गेल्या तीन वर्षांपासून ते न चुकता सकाळी ठरलेल्या वेळेत कॉलेजमध्ये येतात आणि संध्याकाळपर्यंत कॉलेजमध्येच असतात.\nहे काम करण्याचं एक कारण आहे असं ते सांगतात. \"गेल्या वर्षी माझ्या पत्नीचं- माहेश्वरी हिचं निधन झालं. ती नसल्यानं मला घर खायला उठतं.\"\n\"माहेश्वरी नाही. त्यामुळे मला घरी थांबावंसंच वाटत नाही. म्हणून मी इथे येतो. ही मुलं माझ्या नातवंडांच्या वयाची आहेत\", ते सांगतात.\nहाजी मस्ताननं गुजराती नेत्यांना शिकवलं जातीचं राजकारण\nहो, मी स्त्रीबीज दान करण्याचा निर्णय घेतला\n\"या मुलांबरोबर माझा वेळ चांगला जातो. इथलं काम आटोपलं की, मी सिटी सेंटर मॉलला जातो. तिथे काम करतो आणि तिथेच झोपतो. सकाळी घरी जाऊन आवरतो आणि पुन्हा इकडे येतो,\" दिलीबाबू सगळा दिनक्रमच सांगतात.\n\"या मुलांचा माझ्यावर खूप जीव आहे. माझा वाढदिवस होता, त्या दिवशी त्यांनी माझ्यासाठी केक आणला आणि मला नवीन कपडे दिले. माझ्या पाया पडून त्यांनी माझे आशीर्वाद घेतले,\" ते भावूक होऊन सांगतात.\n\"माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला वाटतं होतं की तिच्यासोबत माझंही आयुष्य संपायला हवं होतं.\"\n\"मला नैराश्य आलं होतं. पण आता मी जेव्हा कॉलेजमध्ये येतो, तेव्हा इथे ठेवलेली सुंदर चित्रं पाहतो, शिल्पं पाहतो. या कलाकृती पाहून मला जिवंत असल्यासारखं वाटत आहे,\" असं दिलीबाबू म्हणतात.\n मग या सात वस्तू तुमच्यासाठीच बनल्या आहेत\n'गेंड्याची कातडी असेल तर, राजकारणात नेहमी फायदा होतो'\nया कॉलेजमध्ये लक्ष्मी नावाच्या आणखी एक मॉडेल नियमित येतात. त्या गेल्या सहा वर्षांपासून कॉलेजला येत आहेत. त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा अधिक शिल्पांसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे.\nप्रतिमा मथळा लक्ष्मी अम्मा या सर्वांच्या लाडक्या आहेत.\n\"मला कित्येक दिवस वाटत होतं की, म्हातारपणी मी कुरूप दिसते आहे. मी तरुण असताना सुंदर दिसत असे. म्हातारपणात सर्व काही बदलतं. पण मी पहिल्यांदा जेव्हा मॉडेल म्हणून बसले, तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. इथले विद्यार्थी म्हणतात की, मी सुंदर आहे,\" त्या निरागसपणे सांगतात.\nत्या म्हणाल्या, \"आम्हाला जसा चेहरा हवा आहे, अगदी तसाच तुमचा चेहरा आहे, असं ही मुलं मला म्हणतात. त्यांच्यापैकी एकानं मला म्हटलंदेखील की, तुम्ही खूप फार सुंदर दिसता.\"\n\"इतकंच काय... माझ्या सुरकुत्यांमुळे माझ्या चेहऱ्यावर रेखीवपणा आला आहे, असं हे विद्यार्थी म्हणतात. या कलेमुळं मी पुन्हा सुंदर झाले\", असं लक्ष्मी कृतार्थपणे सांगतात.\n'ही मुलं मला डार्लिंग म्हणतात,' असं सांगताना त्या थोड्या लाजतात. \"मुलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यासोबत सेल्फी घेतात. चहा पितात....\" लक्ष्मीअम्मा मुलांबद्दल भरभरून बोलत होत्या.\nपहिल्या महायुद्धातल्या भारतीय सैनिकांवर 100 वर्षांनी फ्रान्समध्ये अंत्यसंस्कार\nजेव्हा मुगाबे 'मोदी जॅकेट' घालायला नकार देतात...\n\"मला या मुलांमध्ये मिसळायला आवडतं. या वयातही मी कुणाच्यातरी उपयोगी पडते आहे, हा विचार करूनच मला आनंद होतो.\n\"या कामाचे फार पैसे मिळत नाहीत, हे खरं. पण जेव्हा ही मुलं पास होऊन बाहेर पडतात आणि माझी चित्रं गॅलरीमध्ये लावतात, ती घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरत नाही,\" असं त्या म्हणतात.\nकामाच्या मध्ये या ज्येष्ठ नागरिकांना अभावानंच वेळ मिळतो. पण मिळतो तेव्हा तो वेळ छान एंजॉय करतात.\nत्यांच्या गप्पा तर धमाल असतात. त्यांची बैठक म्हणजे हास्य-विनोद, किस्से आणि वाफाळलेला चहा असं सगळं असतं.\nप्रतिमा मथळा 'या कामाचे पैसे कमी मिळतात पण यातून समाधान मिळत.'\nजेव्हा 66 वर्षांचे सुब्बुरायन पहिल्यांदा कामावर आले होते, तेव्हा ते थोडे अवघडल्यासारखे दिसत होते. सुब्बुरायन आधी हमाल म्हणून काम करीत असत.\nत्या वेळी उन्हातान्हात हे कष्टाचं काम करावं लागे आणि तशी हात-तोंडाशीच गाठ असायची. नंतर त्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मदतनीस म्हणून नोकरी केली. पण आता ते मॉडेलचं काम करतात.\n\"या कामातून त्यांना खूप पैसे मिळतात असं नाही, पण निदान आता आपण समाधानी आहोत, असं वाटतं\", असं ते म्हणतात.\nकेसरबाईंच्या भैरवीचे सूर पोचले अंतराळात 20 अब्ज किमी दूर\nभरतकाम करणाऱ्या गुजराती गृहिणींचा सवाल : GST नंबर मिळवायचा कसा\n\"मी एका उंच आसनावर बसलो होतो. सर्व जण माझ्याकडे नजर रोखून पाहत होते. काही जण माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या डोळ्यांकडे निरखून बघत होते, तर काही माझे खांदे निरखत होते.\n\"त्यांचं चित्रं जसंजसं पूर्ण होऊ लागलं, तसं माझ्या लक्षात आलं की, हे चित्र काढण्यासाठी किती प्रचंड एखाग्रता आवश्यक आहे,\" ते सांगत होते.\n\"मी वेगवेगळे कला प्रकार आणि चित्रांसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे. ऑइल पेंटिंग, फायबर, टेराकोटा स्कल्पचरसाठी मी मॉडेल होतो\", असं ते आनंदानं सांगतात.\nत्यांच्या या कामाबद्दल मुलंही समाधानी आहेत आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना बाळगतात. \"आमच्यासाठी ही मॉडेल्स खूप महत्त्वाची आहेत. जर कधी ते आजारी असतील किंवा थकल्यासारखे वाटत असतली तर आम्ही त्यांना औषध-पाणी देतो.\"\n\"आमच्या कामासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे लोक गरीब आणि वृद्ध आहेत, पण त्यांच्यातील या सच्चेपणामुळेच आमची कला अस्सल वाटते,\" असं शिल्पकला विभागात शिकणारा विद्यार्थी दामोदरन नमूद करतो.\nपहिल्या महायुद्धात लढण्यासाठी या गावातून गेले होते 52 सैनिक\nदररोज योगासनं करणाऱ्या या 98 वर्षांच्या आजी पाहिल्यात का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nमहाभियोग प्रस्ताव : 'सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nनरोडा पाटिया प्रकरण : नेमकं काय घडलं कोण आहेत माया कोडनानी\nकर्नाटक निवडणूक : बंगळुरूच्या नागरिकांचा स्वतःचा जाहीरनामा\nबिनकामाच्या मीटिंगमधून चालते व्हा उत्पादन वाढवण्याचा नवा फॉर्म्युला\n बीबीसीनं जगाच्या अंताची बातमी दिलेली नाही\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi-pregnancy.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:26:05Z", "digest": "sha1:J7D6QBHM25QAKYLEVNVTCRZC3CU4JF6M", "length": 5540, "nlines": 78, "source_domain": "marathi-pregnancy.blogspot.com", "title": "प्रेग्नन्सी डायरी: पहिल्या तिमाहीत काय खावे? काय काळजी घ्यावी? प्रेग्नन्सी डायरी", "raw_content": "\nपहिल्या तिमाहीत काय खावे\nसर्व नवोदित प्रेग्नंट मातांना हाच प्रश्न असतो.. पहिल्या तिमाहीत काय खावे\nखरं सांगायचे तर, माझ्या डॉक्टरने सांगितले सर्व काही खा. प्रमाणामध्ये खाल्लेले सगळ्याप्रकारचे अन्न चांगलेच आपण काही आवडले म्हणून ऊस मूळासकट खात बसत नाही. चिकन खावे वाटले तर फक्त चिकनच खात नाही. त्यात पोळी, दुसरी व्हेज भाजी, भात, वरण असतेच. त्यामुळे काहीच हरकत नाही.\nमासा खाताना मात्र त्यातले मर्क्युरीचे प्रमाण पाहून घ्यावा. सामन , तिलापिया , श्रिंप , क्रॅब इत्यादी कधीमधी ठिक आहे. बाकीचे हाय मर्क्युरीवाले फिश तर मी कधीच खाल्ले नाहीत. त्यामुळे ती चिंता नव्हती..\nकॉफीबद्दल, पपईबद्दल तर मी आधी लिहिलेच आहे.\nयेथे मी काहीच दिवसांत रेसिपीज देईन. त्यांचा नक्कीच उपयोग होईल..\nअनु अतिशय अप्रतिम ब्लोग आहे ,तुझी लिखाण शैली पण छान आहे.\nतुझ्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा\nतुमचे blogs खूपच informative आणि interesting आहेत. धन्यवाद. पण जानेवारी नंतर पुढे लिखाण का बंद केले\nआम्ही पुढच्या blog ची वाट पाहत आहोत. कृपया लवकर लवकर आम्हाला छान छान माहिती देत राहा.\nइथे इमेल पत्ता भरा व तुमच्या पत्रपेटीत ही सर्व पोस्ट्स वाचा\nपहिल्या तिमाहीत काय खावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/noteban-banking-business-adverse-impact-sbi-52086", "date_download": "2018-04-20T14:41:31Z", "digest": "sha1:6SYS4CHB4YC7YHRJFLSFDZOW244PNB7X", "length": 13649, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Noteban Banking business adverse impact: SBI नोटाबंदीचे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम : एसबीआय | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीचे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम : एसबीआय\nसोमवार, 12 जून 2017\nनवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nविविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता \"एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या परिणामांची मिमांसा केली. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीचा निर्णय यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर एक हजार आणि पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या.\nनवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nविविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता \"एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या परिणामांची मिमांसा केली. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीचा निर्णय यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर एक हजार आणि पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या.\nनोटाबंदीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे सांगताना \"एसबीआय'च्या कारभारालाही या निर्णयाचा फटका बसू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार बॅंकांच्या एकूण ठेवींमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे \"एसबीआय'ला इतर खासगी बॅंका, तसेच गृहकर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्था यांच्याशी मोठी स्पर्धा करावी लागते आहे. या सगळ्याचा परिणाम एसबीआयच्या व्याजदरांवरही दिसू लागला आहे. वाढत्या स्पर्धेचा सामना \"एसबीआय'ला करता आला नाही, तर फायद्यातही मोठी घट होऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nनोटाबंदीनंतर फसवणूक आणि तक्रारींचे निवारण करण्याची प्रकरणे वाढली आहेत. येत्या काळातही अशा प्रकरणांचे आव्हान आहेच. ज्याचा परिणाम बॅंकेचा व्यापार आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. बॅंकिंग क्षेत्रातील तक्रारींमुळे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम जाणवत असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\n'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिका, विराटचे नाव\nजगप्रसिध्द टाइम मॅगझिनने या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, भारतीय...\nपुण्यातील बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक\nचाळीसगाव- सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात बिल्डर व्यवसायात कार्यरत असलेल्या मूळ हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी बिल्डरने प्लॉट्‌सची विक्री करताना...\nउत्तेजक सेवनावर बंधने हवीतच - बॅश\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/failures-in-the-elections-rahul-gandhi-finally-new-inning-in-congress-as-president-276653.html", "date_download": "2018-04-20T14:35:58Z", "digest": "sha1:4OBMUIJWI7TBIOHGYFRE2AFO3XH6MZUJ", "length": 15759, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसमध्ये राहुल पर्वाला सुरुवात, राहुल गांधींच्या कारकिर्दीचा हा आढावा", "raw_content": "\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकाँग्रेसमध्ये राहुल पर्वाला सुरुवात, राहुल गांधींच्या कारकिर्दीचा हा आढावा\nपण खरा प्रश्न हा आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपविरोधात काय रणनीती आखतात. मोदींचा वारू ते रोखू शकतील का, यावर त्यांच्या यश-अपयशाची मोजणी होणार, हे नक्की.\n16 डिसेंबर : काँग्रेसमध्ये तब्बल 19 वर्षांनंतर अखेर अध्यक्षपदी बदल झाले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये आता राहुल पर्वाला सुरुवात झाली आहे.\nस्वतःच्याच पक्षाच्या पंतप्रधानानं काढलेला अध्यादेश फाडून टाकला पाहिजे, असं म्हणणारे नेते म्हणजे राहुल गांधी. राजकारणात आल्यापासून राहुल गांधींनी अनेक वाद ओढावून घेतले. अलीकडेच, परदेशीत असताना ते म्हणाले, घराणेशाहीमुळे पद मिळालेला मी काही एकटा नाही.\n२००४ साली राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले. आपले वडील राजीव गांधींचा मतदारसंघ अमेठीहून त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर २००७ मध्ये ते युथ काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडिया, अर्थात एनएसयुआयचे अध्यक्ष झाले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारही केला. पण त्यांच्याकडे पहिली मोठी जबाबदार आली ती २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची. त्यांनी जोरदार प्रचार केला पण काँग्रेसचा पराभव झालाच.\nमग आली २०१४ची लोकसभा निवडणूक. यावेळी, प्रचाराची जबाबदारी होती राहुल गांधींच्या खांद्यावर. त्यांनी देश पिंजून काढला, पण शेवटी, नरेंद्र मोदींच्या लाटेसमोर काँग्रेसच्या नौकेचा टीकाव लागला नाही. काँग्रेसला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पराभवच झाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी नोटबंदी जाहीर केली. ह्याच्या इतकी चांगली संधी विरोधी पक्षाला शोधून सापडली नसती. पण डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी राहुल परदेशात निघून गेले. अनेकंनी त्यांच्यावर यामुळे टीकाही केली.\nमग २०१७ साली आल्या उत्तर प्रदेश निवडणुका. यावेळी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं युती केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही.\nराहुल गांधींची नवी आक्रमकता दिसू लागली ती गुजरात निवडणुकीच्या प्रचारात. नोटबंदी आणि जीएसटीवरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. भाषणं अधिक अभ्यासू वाटू लागली. मुख्य म्हणजे, राहुल गांधी प्रचारात नियमित दिसू लागले. एका दिवशी ३ ते ४ सभा घेऊ लागले. एक मात्र नक्की, काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता वाढेल. पण खरा प्रश्न हा आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपविरोधात काय रणनीती आखतात. मोदींचा वारू ते रोखू शकतील का, यावर त्यांच्या यश-अपयशाची मोजणी होणार, हे नक्की.\n-सोनिया गांधी 19 वर्षे (सर्वात जास्त काळ)\n- राहुल गांधी नवे अध्यक्ष\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vipsanopenbook.blogspot.com/2009/", "date_download": "2018-04-20T14:09:03Z", "digest": "sha1:KQKGO2QYOOXTPK42Z4KBTOGM3SREZRZE", "length": 17101, "nlines": 250, "source_domain": "vipsanopenbook.blogspot.com", "title": "vipul: 2009", "raw_content": "\nआयुष्याच्या चित्रपटाला रीवाइंड बटन असते तर किती बरे झाले असते.ज्या गोष्टी चुकल्या त्यांचे पुन्हा रीटेक द्यायचे आणि सगळे कसे व्यवस्थित करायचे.\nपुन्हा मागे जाउन तिला सांगायचे मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो.. खरच ह्या गोष्टी तेव्हाच रीयलाइज़्ड झाल्या असत्या तर किती बरे झाले असते.\nपण त्या शिवाय प्रेम म्हणजे काय असते हे ही कळले नसते. मानवी स्वभाव पण त्याला कारणीभूत आहे.\nएखादी गोष्ट नसल्यावर आपल्याला तिचे महत्व कळते.कित्येक दिवस बंद असलेले दार नकळत कोणी उघडतेआणि त्याची जाणीव होते ती व्यक्ती दूर गेल्यावर… खरच अजब, पण सत्य आहे.\nविरह काय असतो आणि आपण खरच कोणावर ईतके प्रेम करतो हे जाणून घेण्यात पण एक वेगळीच नशा असते. किंबहुना आपल्याला माहीत पण नसते आपले हे निष्ठूर मन कोणावर प्रेम करू शकते.कोणीतरी म्हटले आहे प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच होते.पण दोष नक्की कुणाचा वेड्या मनाचा, ज्याला प्रेम ह्यालाच म्हणतात हेच माहीत नव्हते, कि बुद्धीचा,ज्याला आपल्या भावना म्हणजे एक भ्रम आहे. \"प्रेम\" असे काही नसते,असे म्हणून वेड्या मनाला दडपून टाकणारी.\nह्या प्रश्नाचे उत्तर अजुन सुद्धा उनुत्तरित... मनबुद्धीच्या द्वन्द्वामध्ये \"मी\" मात्र राहतो अधांतरी....शेवटी दोष कोणाचाही असो त्रास \"मी“ ला सहन करावा लागतो . भ्रमनिरास झालेल्या बुद्धीला पटते की मन खरे बोलत होते..हेच प्रेम आहे...पण जरी बुद्धीला आणि मनाला पटले तरी दैव थोडी बदलणार आहे. गेलीली वेळ थोडीच येणार आहे... आत्ता \"मी“ ने काय करायचे पुन्हा तेच रीवाइंड बटन वगैरे वगैरे म्हणून स्वतःची समजूत घालायची आणि गपगुमान पडायच.\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय\nआज कालच्याला काय व्हतय कळतच नाय\nनिसतीच कुस बदलत हाय\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय ||\nआन् पोटा-पाणीची सुद नाय\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय ||\nबा बोलला दिवट्याच टाळक ठिकाणावर नाय\nमाय म्हणाली काहीतरी भानगड हाय\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय ||\nचान्दुबा बघून काहीतरी व्हत हाय\nपावसात मन थुई थुई नाचत हाय\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय ||\nआय चान खर सांगू काय\nतिच्या याद बिगर राहवतच नाय\nजळि स्थळी काष्टी पाषाणि तीच ती हाय\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय ||\nतू एक सुंदर चाफेकळी\nतुला पाहता पडते खळी || १ ||\nतू एक सुंदर नाजूक परी\nजीव जडला तुझ्यावरी || २||\nतू एक सुंदर फुलपाखरू\nभोवती तुझ्या मन बावरू ||३||\nतू एक रिमझिम रेशीम धारा\nआसमन्त सजला सारा ||४||\nतू एक सुरेल सुमधुर गाणे\nमनात बहरती प्रीतीचे चांदणे ||५||\nप्रीतीच्या चांदण्यात चल न्हाऊ या\nमनातले गुज बोलु या ||६||\nकाय करू आजकाल कामात नाही ध्यान,\nतिच्या विचाराने होते सिस्टम हॅंग\nकरत आहे देवाकाडे F1-F1,\nआहे ती माझ्यासाठी A1-A1\nतिच्या आठवणीने होते मेमरी full,\nDivide by zero ची नाही मला भीती,\nतिच्यावर माझ्या प्रेमाची गणती infinity\nहोत आहे स्वप्नाचे Design & Planning,\nकरीत आहे तसे जीवनाचे Scheduling\nनाही होत जीवांचे \"समाज\"-casting ,\nप्रेमात सगळे असते type-casting.\nसाथ मला तुझी हवी \nसाथ मला तुझी हवी,\nपाउसात चिंब भिजताना ,\nसाथ मला तुझी हवी,\nआकाशात पांघरलेले चांदणे बघताना,\nसाथ मला तुझी हवी,\nसमुद्रकिनारी स्वप्नातले घरटे बांधताना,\nसाथ मला तुझी हवी,\nबागेतील एका रम्य सायंकाळी मनसोक्त फिरताना,\nसाथ मला तुझी हवी,\nगोठणार्‍या थंडीत प्रेमाची उब घेताना,\nसाथ मला तुझी हवी,\nआयुष्याच्या रंगमंचावर एकेक पदर हळुच पलटताना,\nसाथ मला तुझी हवी,\nसाथ मला तुझी हवी,\nसाथ मला तुझी हवी,\nमज याद तुझी आली\nमोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु\nथरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु\nअनुरागी रसरंगी होवुन ये तु\nनाजुकशी एक परी होवुन ये तु\nरिमझिमता माझ्यावरी होवु दे\nचंदेरी माझ्यावरी लहरु दे\nनाव तुझे माझ्या ओठी येते\nफ़ुल जसे ही खुलताना दरवळते\nइतके मज कळते अधुरा मी इथे\nचांद रात ही बघ निसटुन जाते\nजर देशील साथ मला\nमोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु\nथरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु\nअनुरागी रसरंगी होवुन ये तु\nनाजुकशी एक परी होवुन ये तु\nहे क्षण हळवे एकांताचे\nदाटलेले माझ्या किती भोवताली\nरात्र झाली आहे म ऊ मखमाली\nआज तुला सारे काही सांगावे\nबिलगुनिया तु मज मजला ते ऐकावे\nहोवुन कारंजे उसळे मन माझे\nपाऊल का अजुनही ना तुझे वाजे\nजीव माझ व्याकुळला दे आत हाक मला\nमोहरत्या स्वप्नांना घेवुन ये तु\nथरथरत्या स्पर्शांना घेवुन ये तु\nअनुरागी रसरंगी होवुन ये तु\nनाजुकशी एक परी होवुन ये तु\nस्वप्नात आली एक परी\nस्वप्नात आली एक परी ,\nहोती ती तेजोमय गौरांगीनी\nहोती ती कमलनयनी तेजस्विनी,\nकेस होते तिचे रेशमी ,\nओठ होते तिचे गुलाबी ,\nकरीत होते ते मधुर वाणी\nहसताना पडे गालावर खळी,\nहळूच उमलते एक सुंदर कळी\nस्वप्नात आली एक परी,\nआहे ती माझी प्राणेश्वरी\nभावनाना कवितेचे वळण येते,\nशब्दाना देखील काव्य सुचते,\nआठवणीत एकच ओढ असते,\nतुझ्या सहवासाची निरंतर आस लागते,\nक्षणाणा दिवसाचे महत्व येते,\nतुझ्या एका नजरेसाठी मन सतत सलते ,\nचहूकडे तुझेच रूप दिसते,\nमन मनाचीच समजूत घालते,\nतुझ्या सोन्दर्याचि तुलना होते,\nनक्षत्र फिके वाटू लागते,\nहृदयाने कायम जवळ असते...\nआम्ही पोर आहोत मनाने साफ ,\nनका लावू आम्हाला उगाचाच फास,\nआम्ही पोर नाही इतके वाईट,\nआमची हालत नेहमी असते टाइट ,\nआम्ही पोर टाकतो बोलबच्चन,\nदिलेला शब्द मानतो वचन,\nआम्ही पोर आहोत विश्वासपात्र,\nनका करू आम्हास प्रेमास अपात्र,\nआम्ही पोर नाही कधी अश्रू ढाळत,\nनका म्हणू आम्हाला भावनांचा अर्थ नाही कळत ,\nआम्ही पोर आहोत टवाळ,\nप्रेम करून तर बघा आमच्या सारखे आम्हीच मवाळ...\nप्रेम म्हणजे काय असते\nप्रेम म्हणजे काय असते,\nजात , धर्म , पंथ, भाषा सर्व काही एक असते,\nप्रेम म्हणजे काय असते,\nश्रीमंत , गरीब कोणी नसते , मन फक्त सुंदर असते,\nप्रेम म्हणजे काय असते,\nतुझे-माझे काही नसते , सर्वकाही आपले असते,\nप्रेम म्हणजे काय असते,\nशब्द माझे , भावविश्व मात्र तिचे असते,\nप्रेम म्हणजे काय असते,\nदुख माझे , सुख मात्र तिचे असते ,\nप्रेम म्हणजे काय असते,\nहृदयात मात्र तीच असते ,\nप्रेम म्हणजे काय असते,\nतिच्या आठवणीत मन सतत झुरत असते ,\nप्रेम म्हणजे काय असते,\nदेह दोन ज्योत मात्र एक असते\nस्वप्नात माझ्या येशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nजीवनाची साथ देशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nप्रेमाचे गीत गाशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nहळूवार मिठीत घेशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nरंगात माझ्या रंगशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nनजरेने तुझ्या घायाळ मला करशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nगीत माझे होशील का\nस्वप्नात माझ्या येशील का\nक्षणभर प्रेम करशील का\nच्या मारी काहीतरी ईशेष हाय\nसाथ मला तुझी हवी \nस्वप्नात आली एक परी\nप्रेम म्हणजे काय असते\nस्वप्नात माझ्या येशील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-chalisgaon-ghat-70126", "date_download": "2018-04-20T14:32:29Z", "digest": "sha1:UXDJ4SY6WEX2NPIHV4LRNJV2YVSZRJBK", "length": 11171, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalgaon news chalisgaon ghat चाळीसगाव घाटात दुचाकीधारकांची जीवघेणी कसरत | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव घाटात दुचाकीधारकांची जीवघेणी कसरत\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nधुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ता. २६ आॅगस्ट रोजी झालेल्या प्रचंड पावसाने घाटातील म्हसोबा मंदिराजवळ रस्ता खचला होता. प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश काढले. मात्र तरीही काही चार चाकी व् दुचाकी वाहनांची वाहतूक येथून सुरूच होती.\nकन्नड (जि. औरंगाबाद) : पावसामुळे रस्ता खचल्याने चाळीसगाव घाटतील रस्ता प्रशासनाने बंद केला आहे.मात्र पोलीस व् प्रशासनाला न जुमानता अनेक दुचाकीधारक येथून जीवघेणा प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.\nधुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ता. २६ आॅगस्ट रोजी झालेल्या प्रचंड पावसाने घाटातील म्हसोबा मंदिराजवळ रस्ता खचला होता. प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश काढले. मात्र तरीही काही चार चाकी व् दुचाकी वाहनांची वाहतूक येथून सुरूच होती. पोलिसांनी येथून जाण्यास नकार दिला तरीही त्यांना न जुमानता हे प्रवासी येथून प्रवास करात होते.\nमागील आठवड्यात येथे दुरुस्तीचे काम सुरु झाले. यावेळी कपारीपर्यंत पूर्ण रस्ता खोदण्यात आला. शेवटी शिल्लक राहिला फ़क्त नालीचा कठडा. आता या कठड्या वरूनही दुचाकी वाहनांची जीवघेणी कसरत सुरूच आहे. ही वाहतूक त्वरित बंद करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-20T14:50:40Z", "digest": "sha1:B6OVJD2SGF76KY52J5YHAR374KYSCDB4", "length": 5729, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१० फिफा विश्वचषक अंतिम संघ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१० फिफा विश्वचषक अंतिम संघ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२०१० फिफा विश्वचषक संघ\nब्राझील · घाना · आर्जेन्टिना · पेराग्वे\n१६ संघांची फेरीतुन बाद\nइंग्लंड · दक्षिण कोरिया · मेक्सिको · अमेरिका · स्लोव्हाकिया · चिली · जपान · पोर्तुगाल\nअल्जीरिया · ऑस्ट्रेलिया · कामेरून · कोत द'ईवोआर · डेन्मार्क · फ्रान्स · ग्रीस · होन्डुरास · इटली · उत्तर कोरिया · न्यूझीलंड · नायजेरिया · सर्बिया · स्लोव्हेनिया · दक्षिण आफ्रिका · स्वित्झर्लंड\nफ्रान्स · मेक्सिको · दक्षिण आफ्रिका · उरुग्वे\nअल्जीरिया · इंग्लंड · स्लोव्हेनिया · अमेरिका\nकामेरून · डेन्मार्क · जपान · नेदरलँड्स\nब्राझील · कोत द'ईवोआर · उत्तर कोरिया · पोर्तुगाल\nआर्जेन्टिना · ग्रीस · दक्षिण कोरिया · नायजेरिया\nऑस्ट्रेलिया · जर्मनी · घाना · सर्बिया\nइटली · न्यूझीलंड · पेराग्वे · स्लोव्हाकिया\nचिली · होन्डुरास · स्पेन · स्वित्झर्लंड\nफिफा विश्वचषक अंतिम संघ साचे\n१९३० · १९३४ · १९३८ · १९५० · १९५४ · १९५८ · १९६२ · १९६६ · १९७० · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८६ · १९९० · १९९४ · १९९८ · २००२ · २००६ · २०१०\n२०१० फिफा विश्वचषक साचे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-20T14:28:48Z", "digest": "sha1:ZU4EZD2QPFL4V777GSQMNB4ZK4YAUGMD", "length": 6221, "nlines": 116, "source_domain": "newsworld.live", "title": "आंतरराष्ट्रीय – News World", "raw_content": "\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nसेऊल : कॅनडामध्ये भारत, अमेरिका समवेत 20 देशांचे प्रतिनिधी कोरिया संकटावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने पुन्हा...\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40...\nसायबेरीया : रशियात सध्या थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. इथल्या थंडीने पाणीच नाही तर लोकांच्या पापण्या देखील गोठून गेल्या आहेत. जगातल्या सगळ्यात थंड...\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\nगॅलेक्‍सी रिअॅलिटी सर्कल क्रिकेट स्पर्धा आजपासून\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nचीनने निर्माण केला जगातील सर्वाधिक उंचीचा ’एअर प्यूरीफायर’\nदक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये शतकभरातला भीषण दुष्काळ\nदहशतवादाच्या बिमोडासाठी भारत-इस्त्रायल सज्ज – नेत्यान्याहू\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vpmdahisar.blogspot.com/2008/09/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:16:27Z", "digest": "sha1:G7XD3DJSMXJY5EJ2AXD4R4HTAEGB7IZU", "length": 10722, "nlines": 110, "source_domain": "vpmdahisar.blogspot.com", "title": "VPM's Vidya Mandir Dahisar: प्रास्ताविक", "raw_content": "\nविद्या प्रसारक मंडळाचे विद्यामंदिर, दहिसर\nआमच्या ‘वि.प्र.मं’ ‘च्या संकुलातील इंग्रजी व मराठी माध्यमातील बालोद्यान, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने लेखन संकलन केलेले आमचे 2008-2009 या शैक्षणिक वर्षातील पृथ्वी हे हस्तलिखित जिज्ञासू व निसर्गप्रेमी वाचकांच्या हाती देताना आम्हांस\nमनस्वी आनंद होत आहे.\n‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथ्विव्याम्‌ ’ हे अथर्ववेदातील वचन -याचा अर्थ भूमी माझी माता\nअसून मी त्या पृथ्वीचा पुत्र आहे. साऱ्या सजीवांचेच ती धारण करते, म्हणून तर तिला ‘धरणीमाता’\nम्हणतात. शेतकऱ्यांची काळी आई अगदी जीवापाड प्रेम करतोे तिच्यावर ती काळी आईच त्याच्याजीवनाला जे जे आवश्यक ते ते सारे काही पुरविते. आपले जीवनसुद्धा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे की अगदी जीवापाड प्रेम करतोे तिच्यावर ती काळी आईच त्याच्याजीवनाला जे जे आवश्यक ते ते सारे काही पुरविते. आपले जीवनसुद्धा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे की पर्यायाने ही काळी आईच आपली सर्वांचीच माता आहे. तर बहुमोल संपत्ती (वसु) जिचेजवळ अमाप आहे. ती वसुंधरा व ही संपत्ती बाळगून ती स्वस्थ बसलेली नाही. तर आपल्या अब्जावधी पुत्रांना (सजीवांना) जगविण्यासाठी सुमारे 15 कोटी कि.मी. दूर असलेल्या व सतत प्रचंड आग ओकणाऱ्या सूर्याभोवती चटके सोशीत, ती स्वत:भोवती गिरक्या घेत फेऱ्या घालते आहे. क्षणाची ही गमंत नाही. तिच्या दैनंदिन परिवलनामुळे व वार्षिक परिभ्रमणामुळेच तर दिवस-रात्र आणि ऋतू होतात व त्यामुळेच सृष्टीतील जीवन गतिशील आहे. केवढे जाज्वल्य तिचे पुत्रप्रेम पर्यायाने ही काळी आईच आपली सर्वांचीच माता आहे. तर बहुमोल संपत्ती (वसु) जिचेजवळ अमाप आहे. ती वसुंधरा व ही संपत्ती बाळगून ती स्वस्थ बसलेली नाही. तर आपल्या अब्जावधी पुत्रांना (सजीवांना) जगविण्यासाठी सुमारे 15 कोटी कि.मी. दूर असलेल्या व सतत प्रचंड आग ओकणाऱ्या सूर्याभोवती चटके सोशीत, ती स्वत:भोवती गिरक्या घेत फेऱ्या घालते आहे. क्षणाची ही गमंत नाही. तिच्या दैनंदिन परिवलनामुळे व वार्षिक परिभ्रमणामुळेच तर दिवस-रात्र आणि ऋतू होतात व त्यामुळेच सृष्टीतील जीवन गतिशील आहे. केवढे जाज्वल्य तिचे पुत्रप्रेम किती महान आहे ही धरणीमाय किती महान आहे ही धरणीमाय सदर हस्तलिखिताच्या निमित्त्ताने या मातेला केलेले हे वंदन आहे.\nया हस्तलिखितात पृथ्वीचा प्रत्येक अंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीचा जन्म, पृथ्वीचा प्रचंड आकार, तिच्या पृष्ठभागावरील आवरणे -जीवावरण, जलावरण, वातावरण,\nशीलावरण तसेच मृदा निर्मिती, पृथ्वीच्या पोटातील खनिजसंपत्ती, उर्जासाधने इ. माहिती उपयुक्त आहे. पृथ्वीवरील विविध नैसर्गिक प्रदेश व तेथील भौगोलिक विविधता निसर्गशक्तीचा व निसर्गसौंदर्याचा प्रत्यय आणून देतात. तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्रापर्यंतची तिची अंतरंग\nउलगडून दाखविण्यात आले आहे. तिच्यावरील बाह्य व अंतर्गत घडामोडींचाही यात विचार केला आहे.\nआज आमची धरणीमाय-निसर्गाचे हे अमोल लेणे प्रदूषणग्रस्त झाले आहे. हवेचे,\nपाण्याचे, मातीचे, ध्वनीचे तऱ्हेतऱ्हेच्या प्रदूषणांनी ती रोगग्रस्त झाली आहे. हिरवी-ओली चैतन्यदायी स्वप्ने पाहणारी आमची निलांबरी वसुंधरा उदास-खिन्न झाली आहे कारण तिच्या पुत्रांचे-सजीवांचे जीवन धोक्यात आहे \nपर्यावर्णविषयक जाणीव-जागृती निर्माण करणे व प्रत्येकाने तसे वर्तन करणे हा एक महत्वाचा विचार, एक प्रवृत्ती तसेच कृती हा एक महत्वाचा प्रयत्न या हस्तलिखितातून करण्यात आला आहे.\nआमच्या विद्यार्थ्यांच्या लेखनात शक्य तेथे सांख्यिकी माहिती, आकृत्या, छायाचित्रे, नकाशे इ. समावेश केलेला आहे.\nजय पृथ्वी देवते आई \nतू आमची अन्नपूर्णा सर्वांची \nमुख्याध्यापिका मा. सौ. सुर्वे मॅडम यांनी हस्तलिखितासाठी पृथ्वी या विषयाचा मनस्वी आग्रह धरला व त्या संदर्भात मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले व एका छान विषयाची कल्पना प्रत्यक्षात आकारली \nआमच्या बालोद्यान मराठी विभागाच्या प्रमुख सौ,जोशी मॅडम, प्राथमिक मराठी विभाग प्रमुख सौ.वर्तक मॅडम, प्रा.इंग्रजीच्या विभाग प्रमुख सौ.रॉड्रीग्ज मॅडम, माध्यमिक इंग्रजी विभाग प्रमुख सौ.पिल्ले मॅडम यांचे आम्हाला विशेष सहकार्य मिळाले. यांचे मन:पूर्वक आभार \nबालोद्यानपासून माध्यमिक विभागापर्यंत ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच परिश्रमपूर्वक अभ्यास करून ज्यांनी लेखन व संकलन केले ते आमचे गुणी विद्यार्थी यांचे मन:पूर्वक आभार \nतसेच या हस्तलिखिताची सजावट बांधणी यासाठी आमचे कला-शिक्षक श्री. एन.जी.पाटील सर यांनी अल्पावधीत परिश्रमपूर्वक व मनापासून हे काम पूर्ण केले त्यांनाही\nप्रास्ताविक म्हणून चार शब्द लिहिण्याची संधी मला मा.सौ सुर्वे मॅडम यांनी दिली त्यांचे पुन्हा मन:पूर्वक आभार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/04/blog-post_24.html", "date_download": "2018-04-20T14:23:29Z", "digest": "sha1:BPZZYJLBVGL4XK5RWRVPFU5OWUEJV6Q5", "length": 9943, "nlines": 67, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अरण्यकांड - भाग १", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअरण्यकांड - भाग १\nअत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.\nरामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता तो रामाशी बोलला कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता\nयानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्‍या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.\nखूप दिवसांपासून तुमच्या पुढील लेखांची वाट पाहत होतो.\nपुन्हा लेखमाला सुरू केल्याचं बघून आनंद झाला.\nदुथडी वाहणाऱ्या नद्या या नर्मदा आणि तापी असाव्यात.\nचित्रकूट पासून दंडकाराण्याच्या मार्गावर याच दोन मोठ्या नद्या आहेत.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअरण्यकांड - भाग २\nअरण्यकांड - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/srks-new-film-poster-launched-262524.html", "date_download": "2018-04-20T14:40:35Z", "digest": "sha1:2ACHVM65CKPNEKYENCMPADQUCHJUZRRU", "length": 11442, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जब 'शाहरूख' मेट 'अनुष्का'", "raw_content": "\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nजब 'शाहरूख' मेट 'अनुष्का'\nबॉलिवूडचा बादशाह किंग खानचा नवा सिनेमा 4 आॅगस्टला रिलीज होतोय. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला.\n09 जून : बॉलिवूडचा बादशाह किंग खानचा नवा सिनेमा 4 आॅगस्टला रिलीज होतोय. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला. या सिनेमात नायिकेच्या भूमिकेत आहे अनुष्का शर्मा तर दिग्दर्शक आहे इम्तियाज अली खान. आणि नाव आहे जब हॅरी मेट सेजल.\nअहो नावाचीच तर खरी गोम आहे.या चित्रपटाचे नाव काय ठेवावं यावर बरीच चर्चा रंगलेली.इम्तियाज समोर तो खूप मोठा पेच होता.आधी नाव ठरलं 'द रिंग' .पण नंतर तेही बदललं.मग 'रेहनुमा' आणि 'रौला' या दोन नावांमध्ये बरीच टक्कर झाली .पण शेवटी जे नाव ठरलं ते या साऱ्यांहून एकदम हटके \nयुरोपचं बॅकग्राऊंड असलेलं पोस्टर पाहिलं की रणबीर कपूरच्या 'तमाशा'ची आठवण येते. फिल्मच्या पोस्टरवरची टॅगलाईन म्हणते, 'ज्याला तुम्ही शोधताय ते तुम्हाला शोधतंय.' आता जी प्रेक्षकांची गर्दी हा चित्रपट शोधतोय, ती गर्दी ही त्यांना शोधेल का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T14:53:37Z", "digest": "sha1:3RKXAWOSGBOE2E25YFJIC4FVVXUPTOXB", "length": 4260, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ल्युसी डूलन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nल्युसी रोझ डूलन (११ डिसेंबर, इ.स. १९८७ - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nन्यू झीलँड संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ टिफेन (ना) • २ मेसन (उना) • ३ बेट्स • ४ ब्राउन • ५ बरोझ • ६ डिव्हाइन • ७ डूलन • ८ मॅकग्लाशान (य) • ९ मॅकनील • १० मार्टिन • ११ प्रीस्ट (य) • १२ पुलफोर्ड • १३ सॅटरथ्वाइट • १४ त्सुकिगावा\nन्यू झीलँडच्या महिला क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:31:25Z", "digest": "sha1:II6VSJHA6OQ3NPIPXUKF3W3N2RLWJRDV", "length": 12919, "nlines": 156, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: देव - ३", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\n\" समलिंगी संबंध \" ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक आहे.\nदेव -- क्रमश: -----\nलहानपणी आईचं असं असे की सगळी कर्मकांडं केली पाहिजेत, त्या मानाने बाबांचं जरा कमी होतं. म्हणजे आम्ही कुठल्या मंदिरात गेलो तर बाबा आत आलेच नाहीत, बाहेरच थांबले असं झालेलं आहे. किंवा पुजेतही हे चालेल ते चालेल, ते चालवून घेऊ असं त्यांचं असायचं. पण तेही देवाचं सगळंच करायचे आणि करतात.\nजे काही आणि जितकं काही आमच्या गावाकडे करतात त्यापेक्षा आईचं करणं बरंच कमी आणि सुटसुटीत आहे. पण आहे.\nमाझ्या एका आत्याच्या अंगात यायचं. देव काही असा अंगात येत नाही याबाबत दोघांचंही एकमत होतं. हे काहीतरी ढोंग आहे किंवा मानसिक गरज आहे असंच त्यांनाही वाटायचं. ते जाहीरपणे आत्यांसमोर कधी बोलले नाहीत.\nया आत्याने एकदा अंगात देवी आलेली असताना कुठलातरी एक जप लाखवेळा दोघांना करायला सांगितला, त्याने माझी मावशी/ काकू बरी होणार असं होतं. तो जप दोघांनीही केला. मी विचारलं, \"याने काही मावशी बरी होणार नाही हे माहित असूनही तुम्ही का करताय\nत्यावर आईचं उत्तर होतं, \" देवाचं नाव घेतलेलं काही वाया जात नाही. आणि समजा पोचलं पुण्य मावशीपर्य़ंत , झाली बरी तर हवंच आहे, \"\nआणखी एक असंही होतं की कोणी का असे ना जमण्यातलं काहीतरी मावशीसाठी करायला सांगितलं तर करायचं नाही हे तिला पटण्यातलं नव्हतं.\nआपल्या आईवडिलांची देवाबद्दलची काय मतं आहेत, याचा आपल्या देवाविषयीच्या मतांवर प्रभाव असतो का\nमला वाटतं, निश्चितच असतो. सुरूवातीच्या दिवसांत तरी असतोच असतो. आपण कधीतरी सुटे होऊन विचार करून आपली मतं बनवायला लागलो की परीस्थिती बदलते. माझा भाऊ विश्वास हा तितकाच धार्मिक, अस्तिक राहिलेला आहे, मी मात्र बदलत गेले.\nमिलिन्दबरोबर राहिल्याने बदल सहज होत गेले.\nप्रत्येक घराची काहीतरी रित असते, काही श्रद्धा असतात. देव विषयक काहीतरी भूमिका असते.\nआमच्या घरात देवावर, धर्मावर पूर्णच विश्वास (शिवाय आपण उच्चवर्णीय असल्याचा अभिमान (शिवाय आपण उच्चवर्णीय असल्याचा अभिमान\nआणखी एक आमच्या घराचं वैशिष्ट्य होतं, इथे कुठल्याही विषयावर खुली चर्चा होऊ शकत असे.\nम्हणजे तुमचं ऎकलं जाईल आणि कृती होईलच असं नाही पण बोलण्यावर बंदी नव्हती.\nयाबाबतीत माझे त्यांच्याशी पराकोटीचे वाद होत.\nमला असं वाटतंय वेगळेपण माझ्यात सुरूवातीपासूनच होतं / असावं.\nतिसरीपासून मी शारदा मंदीरमधे जायला लागले, बसने जावं/ यावं लागे. आम्ही सगळी मुलं जाता येता जेव्हढी मंदिरं लागत त्या त्या देवांना हात जोडून नमस्कार करत असू. ( बसमधे उभं असताना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा म्हणजे एक कसरत असे, मजा यायची :) ) सुपारी मारूती, हिंगुलांबिका ठीकच आहे पण मी गांधी भवनातील गांधीच्या पुतळ्याला, बुद्ध आणि आंबेडकरांच्या पुतळ्यालाही नमस्कार करायचे, हे उद्याचे देवच आहेत, म्हणायचे.\nदेवाला नमस्कार का करायचा\nनमस्कार करताना म्हणायचं असायचं ते \" जय बाप्पा, सुखी ठेवा\"\nआपल्याला त्याने सुखी ठेवावं ही इच्छा आणि ते त्याच्या हातात आहे असंही\nया नमस्कार करण्यावरून एक आठवलं.... एक थोडा शहाणा होण्याचा क्षण.\nअगदी लहानपणी आईने की मावशीने कोणी सांगितलं होतं कुणास ठाऊक, आपण मोठ्या माणसांना नमस्कार करतो, ती आशीर्वाद देतात, पण सगळी मोठी माणसं आपलं चांगलंच चिंतत असतील असं नाही, म्हणून अशा मोठ्यांना नमस्कार करताना म्हणायचं \"कृष्णार्पणमस्तू\". म्हणजे नमस्कार कृष्णार्पण केला की बदल्यात त्यांनी जे इच्छिलं असेल ते ही होतं कृष्णार्पण\nLabels: इंद्रधनु -- विद्या\n>> आपण मोठ्या माणसांना नमस्कार करतो, ती आशीर्वाद देतात, पण सगळी मोठी माणसं आपलं चांगलंच चिंतत असतील असं नाही, म्हणून अशा मोठ्यांना नमस्कार करताना म्हणायचं \"कृष्णार्पणमस्तू\". म्हणजे नमस्कार कृष्णार्पण केला की बदल्यात त्यांनी जे इच्छिलं असेल ते ही होतं कृष्णार्पण\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T14:53:08Z", "digest": "sha1:WBFWCDNMBL4UAP64YS5JFQ3HHTI7YLAH", "length": 6214, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण सुलावेसी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७२,७८१ चौ. किमी (२८,१०१ चौ. मैल)\nदक्षिण सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Selatan) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.\nविकिव्हॉयेज वरील दक्षिण सुलावेसी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआचे • उत्तर सुमात्रा • पश्चिम सुमात्रा • बेंकुलू • रियाउ • रियाउ द्वीपसमूह • जांबी • दक्षिण सुमात्रा • लांपुंग • बांका-बेलितुंग द्वीपसमूह\nजकार्ता • पश्चिम जावा • बांतेन • मध्य जावा • योग्यकर्ता • पूर्व जावा\nपश्चिम कालिमांतान • मध्य कालिमांतान • दक्षिण कालिमांतान • पूर्व कालिमांतान • उत्तर कालिमांतान\nबाली • पश्चिम नुसा तेंगारा • पूर्व नुसा तेंगारा\nपश्चिम सुलावेसी • उत्तर सुलावेसी • मध्य सुलावेसी • दक्षिण सुलावेसी • आग्नेय सुलावेसी • गोरोंतालो\nमालुकू • उत्तर मालुकू\nपश्चिम पापुआ • पापुआ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१७ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/knitting-craft/item/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE.html?category_id=40", "date_download": "2018-04-20T14:47:14Z", "digest": "sha1:LOUQ4MIHYOLTJ5WNI23VFH5DZP3DA56V", "length": 4128, "nlines": 91, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम Lokariche Mohak Croshe Vinakam", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nया पुस्तकात लेखिकेने लहान मुलांसाठी लोकरीच्या कपडयांचे, खेळण्यांचे व इतर अनेक वस्तूंचे आकर्षक व नवनवीन प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे मोठयासाठी स्वेटर्स, हातमोजे, मफलर, शाली इ. प्रकारही दिले आहेत. लोकरीने विणलेले बटवे, हेअर बँड, पीन, कुशन, केसांसाठी जाळी, टी कोझी आदी अनेक प्रकारही पुस्तकाच्या वेगळेपणात भर टाकणारे आहे. प्रत्येक वस्तूचे सुस्पष्ट छायाचित्र त्याच्या कृतीजवळच असणे हेही पुस्तकाचे वैशिष्टय होय.\nदोर्‍याची क्रोशे विणकला | Doryache Croshe Vinakala\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/04/blog-post_30.html", "date_download": "2018-04-20T14:38:04Z", "digest": "sha1:FWW4VMMOSUAESGJQFR5JJCEL4X3SRIGC", "length": 8182, "nlines": 125, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: जरा विचार करु या-३", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nजरा विचार करु या-३\nमुळात बाई बाईत फरक हा अनेक गोष्टीत आणि अनेक प्रकारे केला जातो.म्हणजे ती एखादी कामवाली, अडाणी, अशिक्षित, शिकलेली,घर सांभाळणारी अथवा नोकरी करणारी.मुळात त्या बाईशी वागणारी आजूबाजूची मंडळी(त्यात दुसरी स्त्री पण आली) ही तिचा दर्जा......ती मिळवत असलेला पैसा(मग तो चार घरची धुणं-भांडी करुन मिळवलेला असो वा नोकरी करुन)आपल्याला ती स्त्री कीती आणि कशी कामास येते यावर ठरवत असतात.मग त्या स्त्रीचे समोरच्या व्यक्तीशी नाते कोणतेही असो.ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पात्र ठरली तर ती चांगली नाहीतर तिला कोणीही यावे कसेही बोलावे व तिच्याशी कसेही वागावे हे ठरलेले असते. यात तिच्या स्वत:चा असा विचार करणारी व्यक्ती आपल्याला पहायला मिळत नाही.हा फरक समाजात अनेक थरांमध्ये वेगवेगळा आढळतो. म्हणजे काही घरांत जिला मुलगा आहे, जी कमावती आहे, जी घरात आपण म्हणू त्याला मान डोलावते,जी आपल्या तालावर नाचते अश्या स्त्रीया या त्यांच्यामते श्रेष्ठ असतात.याउलट जिला मुली आहेत,जी घर सांभाळते पण पैसे कमावून आणत नाही,इतरांचा विचारांबरोबर स्वत:चा विचार सुद्धा करते,व सगळ्यांसमोर आपले मत मांडते.अश्या स्त्रीयांना मिळणारी वागणूक ही नेहमी वेगळी असते.मला वाटतं की एक स्त्री आयुष्याच्या ज्या प्रवासातून जात असते तिने दुस-या स्त्रीला मग ती कोणत्याही जातीची असो, सुशिक्षित असो, वा कोणत्याही थरातील असो. तिला जाणून घेणे हे इतरांपेक्षा एका स्त्रीला खरतर सोपे जायला हवे. पण समाजात हे चित्र आपल्याला खूप कमी ठीकाणी बघायला मिळते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.\nLabels: इंद्रधनु -- दीपश्री\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nलग्न:-- ठरवणे, करणे, मोडणे, टिकवणे...वगैरे वगैरे\nजरा विचार करु या-३\nजरा विचार करू या - २\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://e-saee.blogspot.com/2009_02_01_archive.html", "date_download": "2018-04-20T14:38:10Z", "digest": "sha1:MP7YNEW3GVYY5YNIZYLRFZYQVUNK3MY7", "length": 6000, "nlines": 53, "source_domain": "e-saee.blogspot.com", "title": "थोडे शङ्ख नि शिम्पले…: February 2009", "raw_content": "थोडे शङ्ख नि शिम्पले…\nबाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबईतला महागाईचा प्रश्न सुटल्यासारखा वाटतो; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो.\nपण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच. जपानमध्ये असताना जरी मला एकदाही भूकंप जाणवला नाही तरी घरी परत गेले असताना मला आणि इतरांना बसलेले भूकंपाचे काही सौम्य धक्के…\nस्थळ: हनुमान मार्ग, विलेपार्ले\nसालाबाद्प्रमाणे ह्याही वर्षी सात वाजता आय. सी. आय. सी. आय. बॅंकेच्या कट्टयावर भेटायचं ठरलं. मी एकटीच मुलुंड नावाच्या परग्रहावरून येणार होते. अशावेळी मर्फीच्या नियमानुसार गाडया हमखास लेट असतात हे लक्षात घेऊन नेहमीपेक्षा चांगला अर्धा तास अगोदर निघाले आणि अगदी सात नाही पण सात पाचला संकेतस्थळी पोचले. बघण्यासारखे इतरही लोक तिथे असल्याने सव्वा सात कसे वाजले ते कळलंच नाही. मग मात्र न राहवून फोन लावला.\nमी: हॅलो…मॅडम आहात कुठे सातला भेटायचं ठरलं होतं सातला भेटायचं ठरलं होतं मी लांब राहून सर्वात आधी पोचली आहे याबद्द्ल तुला काही लाज\nती: थंड घे. दोन मिनिटात निघतेच. तोपर्यंत तू ४९-९९ मधे जाऊन टाईमपास कर.\nह्यावर नॉर्मल माणसं सॉरी म्हणतात पण आमच्या ब्रुटसने मलाच वर एक शामची आई छाप डायलॉग कम टोमणा मारला.\nती: बाळ शाम, शरीराने भारतात आलास तसाच मनानेही येण्याचा प्रयत्न कर हो.\nरिश्ट्र स्केल आईच्या मते १० वगैरे\nआई: काय गं, परिक्षा कशी झाली\nमी: रिझल्ट लागेपर्यंत उत्तम.\nआई: रिझल्ट कधी आहे मग\nमी: ही हा हा हा…..\nजपानी न येणा-या लोकांसाठी तळटीप\nजपानीत महिन्यांना नावे नसतात. जानेवारीला पहिला महिना, फेब्रुवारीला दुसरा महिना असं म्हणतात. त्यामुळे नववा महिना म्हणजे सप्टेंबर ही गोष्ट हुशार वाचकांच्या लक्षात आलीच असेल.\nमराठी न येणा-या लोकांसाठी तळटीप\n ते हा ब्लॉग वाचण्याच्या भानगडीतच पडणार नसल्याने प्रश्न मिटलेला आहे.आणि जर चुकून तुम्ही कुण्या अमराठी भाषिकाला हा किस्सा विनोद म्हणून सांगितलातच तर स्वत:चा पोपट होऊ नये म्हणून तुम्ही यथाशक्ती उकल करालच की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/2018/01/19/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-20T14:22:44Z", "digest": "sha1:ZOS6XZCIZTKWRRXSRLESBLSLTYY2CDW7", "length": 6837, "nlines": 159, "source_domain": "newsworld.live", "title": "उत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी – News World", "raw_content": "\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nसेऊल : कॅनडामध्ये भारत, अमेरिका समवेत 20 देशांचे प्रतिनिधी कोरिया संकटावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा शांततेच्या प्रयत्नांना झटका देण्याची कृती केली. उत्तर कोरियाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट संदेशावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.\nट्रम्प यांचा ट्विट ‘पिसाळलेल्या श्वानाचे भुंकणे’ असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले. ट्रम्प यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये माझ्या टेबलवर किम यांच्यापेक्षा मोठी ‘आण्विक कळ’ असल्याचा दावा केला होता. दक्षिण कोरियात पुढील महिन्यात होणाऱया हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याच्या उत्तर कोरियाच्या निर्णयानंतर तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे पुन्हा तणाव वाढू शकतो. उत्तर कोरियाच्या सामर्थ्याने ट्रम्प घाबरलेले आहेत. ट्रम्प यांच्या वर्तनातून पराभूत मानसिकता दिसून येते, असा दावा तेथील सरकारी वृत्तपत्राने केला आहे.\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREL/MREL048.HTM", "date_download": "2018-04-20T14:51:05Z", "digest": "sha1:Q2NFT354KQI2FV2MC5G6ZQDGJIZSRNB7", "length": 8022, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी | डिस्कोथेकमध्ये = Στη ντισκοτέκ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > ग्रीक > अनुक्रमणिका\nही सीट कोणी घेतली आहे का\nमी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का\nआवाज जरा जास्त आहे.\nपण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत.\nआपण इथे नेहमी येता का\nनाही, हे पहिल्यांदाच आहे.\nमी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही.\nमला तेवढे चांगले नाचता येत नाही.\nमी आपल्याला दाखवतो. / दाखवते.\nआपण कोणाची वाट बघत आहात का\nभाषेवर जनुके परिणाम करतात\nजी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.\nContact book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFA/MRFA004.HTM", "date_download": "2018-04-20T14:50:59Z", "digest": "sha1:SDRJW7V7LV2F3BELY5WHGGVLHFJNBRJC", "length": 6646, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फारशी नवशिक्यांसाठी | कुटुंबीय = ‫خانواده‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फारशी > अनुक्रमणिका\nआम्ही एक कुटुंब आहोत.\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nContact book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTE/MRTE026.HTM", "date_download": "2018-04-20T14:51:02Z", "digest": "sha1:IB5X5G4QAOEBZKSGCNTNUG3DP2OGDEVH", "length": 9216, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी | भेट = సమావేశం |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > तेलगू > अनुक्रमणिका\nतुझी बस चुकली का\nमी अर्धा तास तुझी वाट बघितली.\nतुझ्याकडे मोबाईल फोन नाही का\nपुढच्या वेळी वेळेवर ये.\nपुढच्या वेळी टॅक्सी करून ये.\nपुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये.\nउद्या माझी सुट्टी आहे.\nआपण उद्या भेटायचे का\nमाफ करा, मला उद्या यायला जमणार नाही.\nयेत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का\nकिंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का\nमला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या.\nआपण पिकनिकला जाऊ या का\nआपण समुद्रकिनारी जाऊ या का\nआपण पर्वतावर जाऊ या का\nमी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.\nमी तुला न्यायला घरी येईन.\nमी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.\nपरदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा\nनवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका\nContact book2 मराठी - तेलगू नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/ockhi-cyclone-do-not-believe-rumors-police/amp/", "date_download": "2018-04-20T14:16:09Z", "digest": "sha1:O5RYY4GVDBM4D2XEQQ5A2OJWBB6F3YWB", "length": 3453, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ockhi cyclone : do not believe in rumors - police | ओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस | Lokmat.com", "raw_content": "\nओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस\nओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सी लिंक वाहतुकीसाठी खुला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.\nराष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या मधुरिका पाटकर हिचे सासरी जल्लोषात स्वागत\nभाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत, शाही स्वागताचा प्रवाशांना फटका\nमुंबईत जलवाहिनी फुटल्याने वाहनांचे नुुकसान\nकुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक\nमुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा\nकुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक\nElgar Morcha : भारिपाचा मुंबईत एल्गार मोर्चा, पोलिसांनी नाकारली परवानगी\nमुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा\nMumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको\nगिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/02/blog-post_27.html", "date_download": "2018-04-20T14:40:34Z", "digest": "sha1:3QROC6RMAYTUGABMRG7X5KCVRE4WZ34O", "length": 10507, "nlines": 269, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): तू माझी गर्लफ्रेंड होशील का?", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nतू माझी गर्लफ्रेंड होशील का\n\"जीना मरना साथ साथ\" वाले\nफिल्मी डायलॉग बोलणार नाही\nपण तुझ्याशिवाय मला तर\nमाझा प्रपोज जरा तरी सिरिअसली घेशील का\nसांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का\nसिंगल सीट बाईक चालवणं\nमला जाम बोअर वाटतं\nकधी तरी माझ्या मागे बाईकवर बसशील का \nसांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का\nशाहरुख माझ्या डोक्यात जातो,\nतरी त्याचे पिक्चर बघतोय\nपण हात पुढे केल्यावर, हातात हात देशील का\nसांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का\n\"पगार तीनसौ साठ\" झाला\nतुला ब्लँक कॉल देऊन देऊन\nमला नंबर पाठ झाला\nकधी तरी तूसुद्धा एखादा मिस्ड कॉल देशील का\nसांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का\nतुला \"व्हॅलेन्टाइन डे\"चं मस्त गिफ्ट द्यायचंय\n\"रोज डे\"ला सगळ्यांसमोर रेड रोज द्यायचंय\nतुझ्या चिकण्या फोटोला व्हॉलेटमध्ये ठेवायचंय\nआणि तुझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाला 'तोडायचंय'\nपण एकदा तरी माझ्याकडे बघून जरा हसशील का\nसांग ना गं, तू माझी गर्लफ्रेंड होशील का\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nतांबूस संध्याकाळच्या निवांत वेळी.. (उधारीचं हसू आण...\nतू माझी गर्लफ्रेंड होशील का\nमी खराखुरा 'जगतोय'.. (उधारीचं हसू आणून....)\nइजाजत (१९८७) - चित्रपट कविता\nमला मीच हवा आहे.. (उधारीचं हसू आणून.... )\nकाळवंडलेली संध्याकाळ.. (उधारीचं हसू आणून..)\nआता तर रोजच असते (अधुरी कविता)\nपायांचे छाले.. (उधारीचं हसू आणून....)\nआता मीही कसंही लिहिणार..\nविरघळणाऱ्या सूर्यासोबत.. (उधारीचं हसू आणून....)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-20T14:27:36Z", "digest": "sha1:ECTJ767PL7WBUCHV5WLA2HZVQODBMPW3", "length": 5577, "nlines": 108, "source_domain": "newsworld.live", "title": "पश्चिम महाराष्ट्र – News World", "raw_content": "\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nपुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून...\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले...\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\nहैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून...\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\n19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत\nशनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी\nकझाकस्तानमध्ये प्रवासी बसला आग लागून 52 जण ठार\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/knitting-craft/item/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.html?category_id=40", "date_download": "2018-04-20T14:46:35Z", "digest": "sha1:LBA7OS6X2MG4UKP7FQCXOPAA2233557K", "length": 4169, "nlines": 88, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या Lokariche Aakarshak Prani Va Bahulya", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nमंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/state-governments-decision-to-close-35-mandal-278123.html", "date_download": "2018-04-20T14:38:31Z", "digest": "sha1:PMTTSMVCJPGUKSVLWSLO3JLSARY6FERK", "length": 11375, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तोट्यातील 35 महामंडळं बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय", "raw_content": "\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nतोट्यातील 35 महामंडळं बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय\n'मॅफ्को' महामंडळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून, डबघाईला आलेल्या महामंडळांच्या मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\n26 डिसेंबर : महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख ५५ महामंडळांपैकी जवळपास ३५ महामंडळे ही आर्थिकदृष्ट्या डळमळीत आली असून, ती टप्याटप्प्याने बंद करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.\n'मॅफ्को' महामंडळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून, डबघाईला आलेल्या महामंडळांच्या मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\n२०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅफ्को, मेल्ट्रॉन, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ, भूविकास महामंडळ, महाराष्ट्र विकास महामंडळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता.\n४ कोटींची उलाढाल असलेल्या भूविकास महामंडळाचा ५० कोटी रुपयांचा तोटा नोंदवण्यात आला होता. या महामंडळांची मालमत्ता विकून कर्ज फेडले जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\n'लालबागचा राजा मंडळा'ला ६० लाखांचा दंड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-20T14:50:27Z", "digest": "sha1:3MKBRTEF36KQTAZZJH6E2XHHMKGCJWME", "length": 8637, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केनियन शिलिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआयएसओ ४२१७ कोड KES\nनाणी ५० सेंट १,५,१०,२०,४० शिलिंग\nबँक सेंट्रल बँक ऑफ केनिया\nविनिमय दरः १ २\nशिलिंग हे केनियाचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्जीरियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा केनियन शिलिंगचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/himachal-pradesh/", "date_download": "2018-04-20T14:45:25Z", "digest": "sha1:QMU6UQ4VVZUXL67GTZDWNA6QARMLFG3S", "length": 2501, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "himachal pradesh – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nभारत महाराष्ट्र विशेष लेख\nनिकाल गुजरातचा; इशारा महाराष्ट्रालाही\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वत्रिक चर्चेचा विषय होता. समाज\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T14:50:08Z", "digest": "sha1:ZFKQSS3GJF422U6RZYBOGGHKUZGLLGFP", "length": 4758, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अड्लेने ग्वेडीऊरा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअड्लेने ग्वेडीऊरा(जन्म:१२ नोव्हेंबर १९८५) हा अल्जीरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. तो आपल्या लांब पल्ल्याच्या फटक्यांसाठी ओळखल्या जातो. त्यास त्यामुळे 'रॉकेट फॅक्टरी' या उपनावानेही ओळखले जाते. सन २०११-१२ च्या मोसमात त्याने \"गोल ऑफ द सिझन\" हा किताब पटकवला. तो, दोन क्लबचे पुरस्कार एकाच सिझनमध्ये मिळवणारा प्रथम फुटबॉल खेळाडू समजल्या जातो.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१७ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-websites-satara-news-stray-dogs-69799", "date_download": "2018-04-20T14:29:51Z", "digest": "sha1:O4G4ROUH732CVIRBT2IBKXRAGJFG72ZZ", "length": 11924, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Satara News Stray Dogs कऱ्हाडमध्ये पिसाळलेल्या श्‍वानांचा त्रास | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाडमध्ये पिसाळलेल्या श्‍वानांचा त्रास\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nकऱ्हाड : पिसाळलेल्या श्‍वानाने शहरात चौघांचा चावा घेतला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.\nभाजी मंडई परिसरात आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. श्‍वानाने चावा घेतलेल्या व्यक्तींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nशहरातील मूळ गाव भाग आणि वाढीव हद्दवाढ भागात प्रत्येक गल्लीत किमान 25 कुत्र्यांचा कळप आहे. रात्री उशीरा येणाऱ्यांना या कळपांतील कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. आता दिवसाढवळ्याही या मोकाट कुत्र्यांचा त्रास होताना दिसत आहे.\nकऱ्हाड : पिसाळलेल्या श्‍वानाने शहरात चौघांचा चावा घेतला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.\nभाजी मंडई परिसरात आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. श्‍वानाने चावा घेतलेल्या व्यक्तींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nशहरातील मूळ गाव भाग आणि वाढीव हद्दवाढ भागात प्रत्येक गल्लीत किमान 25 कुत्र्यांचा कळप आहे. रात्री उशीरा येणाऱ्यांना या कळपांतील कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. आता दिवसाढवळ्याही या मोकाट कुत्र्यांचा त्रास होताना दिसत आहे.\n'पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा' अशी मागणी केली जात आहे; मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. 'दक्ष कऱ्हाडकर' या गटाने यासंदर्भातील निवेदन पालिकेला दिले आहे. त्याची दखलही पालिकेने घेतलेली नाही. निर्बिजिकरणासह अन्य उपाय राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\n'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/pidgin-universal-chat-client.html", "date_download": "2018-04-20T14:04:31Z", "digest": "sha1:GYGH6JNBLPVMAMYBTPJJZSJIJAGBDM65", "length": 14022, "nlines": 109, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Pidgin, the universal chat client ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nचॅटिंग म्हणजे हल्ली काही नविन बाब राहिलेली नाही. चॅटिंग हे फक्त आता करमणुकीचे माध्यम न राहता नेहमीच्या वापरातीलच एक मह्त्त्वाचे साधन बनले आहे. आपल्या पैकी बर्‍याच जणांचे Gmail, Yahoo,\nWindows Live (MSN), Myspace किंवा AIM चे ई - मेल आय डी असतात. तसेच काही व्यस्त मंडळींचे एकापेक्षा जास्त आय डी असतात आणि ते सुद्धा प्रामुख्याने Gmail, Yahoo यांसारख्या Domain वर; तर काहींना २४ तास ऑनलाईन रहावे लागते आणि ते सुद्धा सगळ्या ई मेल वर एकाच वेळी.अशा बिकट समयी १ पेक्षा जास्त ई मेल आय डी असलेल्यांची चांगलीच दमछाक होते. कधी Gmail वरुन yahoo वर जावे लागते तर कधी AIM किंवा MSN वर login करावे लागते. समजा एकाच Messenger द्वारे जर हे सगळे शक्य होणार असेल तर म्हणजे तुमचे मेसेज बघणं, चॅटिंग, फाईल ट्रान्स्फर आणखी खूप काही करु शकता फक्त संभाषण (व्हॉइस चॅट) सोडून कारण ती एकच सोय नाही यात तुम्ही आणि ते ही चकटफू.....आहे की नाही मस्त आयडिया \nअशाच प्रकारच्या एका सोफ्टवेअरचे नाव आहे Pidgin. हे सोफ्टवेअर तुम्हाला १ नाही २ नाही तब्बल १६ प्रकारच्या Domain (थोडक्यात म्हणजे १६ प्रकारच्या वेबसाईटवरील ई मेल आयडींना) वर एकाच Login करुन चॅटिंग करणे शक्य करुन देते. म्हणजे जर तुमचे अकाऊंट खाली दिलेल्यापैकी कोणत्याही वेबसाईट वर असेल तर खुशाल एकाच वेळी १ पेक्षा जास्त Login करून चॅटिंग करता येईल.\nPidgin ज्या Domains ना सपोर्ट करते त्याची यादी खालीलप्रमाणे आहे\nशिवाय या व्यतिरिक्तही जर तुमचे अकाऊंट twitter, facebook यांसारख्या इतर काही साईट्स वर असेल आणि इतर काही तुम्हाला महत्त्वाचे वाटतील असे काही plugins (मुख्य सोफ्टवेअरमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारे छोटे सोफ्टवेअर) तरी सुद्धा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हवे त्याप्रमाणे डाऊनलोड करू शकता.\nविविध प्रकारचे plugins पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nPidgin हाताळण्यास आतिशय सोपे आहे.\nPidgin ची २.६.६ ही विंडोज साठीची आधुनिक चकटफू आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nहे सोफ्टवेअर install कसे करावे याची प्रक्रिया आपण आता बघुया. वरील लिंकवर क्लिक केल्यावर. एक\nतुम्ही त्या डाऊनलोड केलेल्या फाईलवर डबल क्लिक करा. आता तुमची मुळ Installation ची प्रक्रिया सुरु होईल ती अनुक्रमे खालील प्रमाणे असेल.\nआता तुमच्या काँप्युटरवर Pidgin ची installation प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपोआपच ते सोफ्टवेअर सुरू होईल.\nआणि तुम्हाला तुमचे वेगवेगळे ई मेल आयडी टाकण्याबद्दलची माहिती देणारी एक विंडो दिसेल. त्यातील Add या बटणावर क्लिक करा.\nआता तुम्हाला जी विंडो दिसेल त्या प्रमाणे तुम्ही तुमच्या ई मेल आयडीचा Domain निवडा.\nआता मला फक्त २ ई मेल आयडी निवडायचे आहे म्हणून मी आधी या यादितून Google Talk निवडले. आणि सर्व आवश्यक माहीती त्याच्यात भरली.\nआता तुम्ही Add या बटणावर क्लिक केले की मी Gmail (Google Mail) ला जोडला जाईन म्हणजे Connect होईन आणि माझी सगळी Gmail ची मंडळी मला ऑनलाईन दिसतील (अर्थात ती त्यावेळी ऑनलईन असली तर).\nआता मला ज्या माझ्या मित्राशी चॅटिंग करायचे त्यच्या नावावर फक्त मी डबल क्लिक केले की एक नविन विंडो उघडेल त्यात तुम्ही चॅटिंग करू शकता हवे तअसे Text किंवा Emotions देखील निवडू शकता.आता मी एकाच वेळी ३ जणांशी चॅटींग करत आहे मला हवे असेल त्याच्या Tab वर क्लिक करून मी त्याच्याशी बोलू शकतो. आणि ते सुद्धा एअकाच खिडकीमध्ये (विंडमध्ये) आता मी माझ्या एका मित्राशी बोलतो आहे. मुख्य chat खिडकीत मी namaskar असे लिहीले आणि Enter दाबले की ते वरच्या खिडकीत दिसते अगदी आपल्या Gtalk किंवा Yahoo Messenger सारखे. तसेच तुम्हाला हव्या तशा आकाराचे अक्षर आणि भावना ( बोलके आणि हावभाव संगणारे चेहरे ऊर्फ Emotions) निवडता येतील.\nआता काही इतर पर्याय बघुया. आता मी माझ्या एका मित्राशी बोलत असताना माझ्या चॅट विंडोच्या Coversation या मेन्यूतून त्याला एक फाइल पाठवण्यासाठी Send File हा पर्याय निवडला. तसेच तिकडे तुम्हाला इतर पर्याय सुद्धा दिसतील जसे की New Insatant Message, Join Chat, Find, View Log, Block, Remove आणखी बरेच पर्याय दिसतील. तुम्ही ते तुमच्या गरजेप्रमाणे वापरू शकता.\nआता मला आणखी एक अकाऊंट द्वारे चॅट करायचे आहे आणि ते म्हणजे yahoo द्वारे. यासाठी मी Buddy List या विंडोतून Accounts या मेन्यूतून Manage Accounts हा पर्याय निवडला.\nतुमच्या समोर एक accounts ची विंडो उघडेल त्यातून Add या बटणावर क्लिक करा.\nआता आपण जसे Gmail चे अकाऊंट Add केले त्याप्रमाणेच Yahoo चे सुद्धा Add करुया.\nआता माझ्या Buddy List मध्ये yahoo वाले माझे मित्र देखील आपोआप Add होतील आणि माझे mails सुद्धा \nआणि मला एकाच वेळी दोन्ही म्हणजे याहू आणि गुगल च्या माझ्या मित्र मंडळींशी चॅट करता येईल.\nअशाच प्रकारे तुम्हाला हवे तेवढे ई मेल आय डी तुम्ही यात Add किंवा Remove करु शकता. आणि एकाच वेळी सगळ्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या accounts मधून ऑफलाईन जाऊ शकता.\nतुम्हाला हे भन्नाट चकटफू सोफ्टवेअर कसे वाटले मला जरूर कळवा.काही प्रतिक्रिया आणि सुचना असल्यास त्याही माझ्या पर्यंत पोहचू द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-20T14:21:13Z", "digest": "sha1:EPT4BWR5EHFUU2GI7A3AQD4KLBY7CMVQ", "length": 13780, "nlines": 170, "source_domain": "newsworld.live", "title": "अहमदनगर – News World", "raw_content": "\nTop News • अर्थ • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • विदर्भ\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nपुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • विदर्भ • व्हिडीओ\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नईयिन...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • मुखपृष्ठ • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • व्हिडीओ\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले. भारत आणि...\nअर्थ • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पुणे • पुणे जिल्हा • प्रॉपर्टी • फिचर • फोटो गॅलरी • मनोरंजन • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • यु सेल्फी • युफोरिया • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • लाईफस्टाईल • विदर्भ\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\nहैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर...\nअहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कायदाविश्व • कोंकण • गंधर्व • पश्चिम महाराष्ट्र • पुणे • पुणे जिल्हा • प्रॉपर्टी • फोटो गॅलरी • मनोरंजन • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • यु सेल्फी • युफोरिया • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • लाईफस्टाईल • वर्धापन दिन विशेष • संपादकीय\n19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत\nमाऊंट मौनगनुई : अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवला आहे. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले. झिम्बाब्वेने...\nTop News • Uncategorized • अग्रलेख • अर्थ • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मुखपृष्ठ • मुंबई • युफोरिया • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय लेख\nबोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर\nपुणे – विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे जावे यासाठी इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल करण्याबरोबर विद्यार्थ्यांना या...\nTop News • Uncategorized • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय\nशनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी\nपुणे : एल्गार परिषदेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. केवळ...\nअहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • वर्धापन दिन विशेष • विदर्भ • व्हिडीओ\nकझाकस्तानमध्ये प्रवासी बसला आग लागून 52 जण ठार\nअस्ताना (कझाकस्तान) – कझाकस्तानमध्ये एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत 52 प्रवासी जळून मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. एईआयएसएम (एशियन नेशन्स इमरजन्सी...\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/2018/01/19/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T14:41:03Z", "digest": "sha1:5LPHS3QM4W7HA2WDK2INN6OR624XGTYZ", "length": 6807, "nlines": 160, "source_domain": "newsworld.live", "title": "शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी – News World", "raw_content": "\nTop News • Uncategorized • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय\nशनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी\nपुणे : एल्गार परिषदेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. केवळ महापालिका आणि शासकीय कार्यक्रमांनाच शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यास परवानगी असेल, असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.\nपुणे महापालिकेने वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घातली असल्याचे जाहीर केले आहे. सध्या अडीच हजार रुपयांमध्ये शनिवारवाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाच म्हणणं आहे.\nबोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर\nविराट कोहली बनला दोन्ही संघाचा कर्णधार\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/pmc/", "date_download": "2018-04-20T14:45:51Z", "digest": "sha1:LWHQPLQHCVODYNTENNOLZPSFAGJS2T5A", "length": 2969, "nlines": 48, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "PMC – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nपुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे\nपुणे कॅन्टोन्मेंट उर्फ पुणे लष्करी छावणीस या महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत आहेत. बघता बघता पुणे लष्कर हा पुणेरी संस्कृतीचा\nमुठा नदी आणि अतिक्रमणे\nपुणे शहरातून वाहणारी मुठा नदी ही केवळ या शहराची जीवनवाहिनी नाही तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता आहे. पुण्यातील आरोग्याच्या वाढत्या\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/word", "date_download": "2018-04-20T14:13:31Z", "digest": "sha1:LPDRGRUJJA5QFH55BK555EGH6JY2RFJP", "length": 11664, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - शांती", "raw_content": "\nहिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐ..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nराशींप्रमाणे रत्‍न आणि जन्मनावाचे आद्याक्षर\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nआकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश..\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी. Performing yagna to the birth sta..\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nविपत्ति दे तीहि हवी विकासा - करुन माता अनुराग राग\nनवीन संन्यास - उत्साहसिंधु थोर\nमयसभा राहिली भरुन - मम दृष्टीला भेसुर दिसते भ...\n - असे का जीवनी अर्थ\nजीवनातील दिव्यता - आयुष्याच्या पथावर\nसंत - भरो विश्वात आनंद\nमदीय त्या नमस्कृती - विशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nवंदन - मी वंदितो पदरजे विनये तया...\nमेघासारखे जीवन - काय करावे मी मेघासम विचरा...\nमित्रांसाठी प्रार्थना - विशुद्ध मत्स्वांत सदैव रा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-chef-santosh-claims-to-makes-smallest-pizza-in-the-world-495714", "date_download": "2018-04-20T14:17:56Z", "digest": "sha1:2QTVRXKNSXJSYFTPZZYN5YGXE6HPVASO", "length": 14893, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जगातील सर्वात छोटा पिझ्झा, पुण्यातील शेफचा प्रयोग", "raw_content": "\nजगातील सर्वात छोटा पिझ्झा, पुण्यातील शेफचा प्रयोग\nपिझ्झा हा पदार्थ इटालियन असला, तरी भारतातही अनेकांच्या जीभेवर पिझ्झाची चव रेंगाळते. गरमागरम पिझ्झाचा सुगंध दरवळायला लागला की, आपसूकच भूक चाळवते. पुण्यात जगातील सर्वात छोट्या आकाराचा पिझ्झा तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे.\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nमुंबई: राज्याच्या तिजोरीतून विनायक मेटेंसाठी 20 लाखाची कार\nनांदेड: काँग्रेसच्या शिबिरात चिंतन कमी आणि झोपाच जास्त\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nजगातील सर्वात छोटा पिझ्झा, पुण्यातील शेफचा प्रयोग\nजगातील सर्वात छोटा पिझ्झा, पुण्यातील शेफचा प्रयोग\nपिझ्झा हा पदार्थ इटालियन असला, तरी भारतातही अनेकांच्या जीभेवर पिझ्झाची चव रेंगाळते. गरमागरम पिझ्झाचा सुगंध दरवळायला लागला की, आपसूकच भूक चाळवते. पुण्यात जगातील सर्वात छोट्या आकाराचा पिझ्झा तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे.\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\nCSK vs RR: बैन के बाद पहली बार एक-दूसरे से भिड़ेगी सीएसके और राजस्थान\nIPL 2018: योग और मसाज के कमाल से गेल ने सीजन-11 में जड़ा पहला शतक\nIPL 2018: गेल के शतक ने किया खेल, सनराइजर्स हैदराबाद को पंजाब ने 15 रन से हराया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/21777", "date_download": "2018-04-20T14:17:08Z", "digest": "sha1:IZZ7EISFKWRXFLDUOS5LM5LD26U3XOJW", "length": 5997, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी | मनोगत", "raw_content": "\nमराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी\nप्रेषक मोगरा फ़ुलला (मंगळ., १२/०४/२०११ - ११:१६)\nआरंभ: ०५/०६/२०११ - सा. ५:३०\nसमाप्ती: ०५/०६/२०११ - रा. ८:३०\n२०११ सालातील एक मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.\nया मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. ज्यांना खरोखरीच मेळाव्याला येण्याची इच्छा आहे व शक्य आहे, अशा इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी कृपया येथे उपलब्ध असलेल्या लिंकवर जाऊन संपूर्ण पोस्ट वाचावी व फॉर्म भरावा.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T14:55:10Z", "digest": "sha1:7ZQ7AZ7YM7IUT4Z2TUFPMMRHNWAKDQ27", "length": 10402, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्क्टिक महासागर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपृथ्वीवरील आर्क्टिक महासागराचे स्थान\nउत्तरध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड हे देश/प्रदेश आहेत. अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते. याचे क्षेत्रफळ सुमारे १,४२,४४,९३६ चौ. किमी इतके आहे. येत्या काही वर्षात आर्क्‍टिक महासागरावरील सर्व बर्फ वितळण्याची शक्‍यता आहे. आधुनिक शोधाप्रमाणे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे या पाण्याखालील भूभागात आहेत. बर्फ वितळत चालल्याने तेल आणि नैसर्गिक वायू यांचे मोठ्या प्रमाणावरचे व्यावसायिक उत्खनन येथे आता शक्य होते आहे. तसेच् उन्हाळ्यातील काही महिने महासागरामधून सागरी वाहतूक शक्‍य झाली आहे.\nस्वीडन, आइसलँड, फिनलंड आणि इतर अशा आठ देशांनी मिळून १९९६ मध्ये एक मंडळ स्थापन केले आणि या सर्व भागावर आपली सत्ता जाहीर केली आहे. परंतु कोणाची सत्ता कोठे याबाबत मात्र विवाद आहेत. या मंडळाचे दुय्यम सदस्यत्वासाठी इतर देश अर्ज करू शकतात. या मार्फत भारतही निरिक्षक म्हणून सामील झाला आहे. निरीक्षक देशांना खनिज तेल उत्खनन आणि आर्क्‍टिक महासागरातील समुद्रमार्गावर सवलती मिळू शकतात. यामुळे हे सदस्यत्व महत्वाचे आहे. भारताशिवाय चीन, सिंगापूर, इटली, जपान आणि दक्षिण कोरिया हे देशही निरीक्षक म्हणून या मंडळात सामील झाले आहेत.\nआफ्रिका उत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nअमेरिका उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन ओशनिया ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nआशिया पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य ध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nयुरोप पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण महासागर अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T14:13:08Z", "digest": "sha1:UZVBOTF4UQU7U3MVCW3LL4E7SSNKALTV", "length": 12243, "nlines": 179, "source_domain": "newsworld.live", "title": "ताज्या बातम्या – News World", "raw_content": "\nCategory - ताज्या बातम्या\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nसेऊल : कॅनडामध्ये भारत, अमेरिका समवेत 20 देशांचे प्रतिनिधी कोरिया संकटावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा...\nTop News • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पुणे • पुणे जिल्हा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nनवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय...\nTop News • ठळक बातमी • ताज्या बातम्या • राज्य • राष्ट्रीय\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\nहैदराबाद : पद्मावत सिनेमाच्या बाबतीत सध्या देशात वाद सुरु आहे. हैदराबादचे लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या वादात उडी घेतली...\nTop News • Uncategorized • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या • मुखपृष्ठ • राज्य\nसायबेरीया : रशियात सध्या थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. इथल्या थंडीने पाणीच नाही तर लोकांच्या पापण्या देखील गोठून गेल्या आहेत. जगातल्या सगळ्यात थंड गावाचं नाव...\nTop News • अर्थ • आंतरराष्ट्रीय • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nगॅलेक्‍सी रिअॅलिटी सर्कल क्रिकेट स्पर्धा आजपासून\nणे – सर्कल ग्रुप आयोजित व गॅलेक्‍सी रिअॅलिटी प्रायोजित दहाव्या गॅलेक्‍सी रिअॅलिटी सर्कल प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शुक्रवार...\nTop News • अर्थ • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • फिचर • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • विदर्भ\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nपुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • विदर्भ • व्हिडीओ\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नईयिन...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • मुखपृष्ठ • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • व्हिडीओ\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले. भारत आणि...\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या • मुखपृष्ठ\nचीनने निर्माण केला जगातील सर्वाधिक उंचीचा ’एअर प्यूरीफायर’\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nदक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये शतकभरातला भीषण दुष्काळ\nकेपटाऊन : जगातले एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारात आता २२ एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा उरला सांगण्यात येत...\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://teliindia.com/news.php?newsid=1001&title=Teli%20samaj", "date_download": "2018-04-20T14:35:06Z", "digest": "sha1:UM3FQVGMXZCQSMEBKBDZ762GX5YOSJUN", "length": 8043, "nlines": 41, "source_domain": "teliindia.com", "title": "Teli samaj | आजही सुरू आहे तेली समाजाचा पारंपारिक तेलघाणा व्यवासाय", "raw_content": "\nआजही सुरू आहे तेली समाजाचा पारंपारिक तेलघाणा व्यवासाय\nगिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.\nविजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.\nपूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे. पारंपारिक लाकडी घान्शाला बैल जुंपून तेल गाळण्याचे काम करतात. विशेष म्हणजे आज तेल गाळण्याच्या आधुनिक गिरणी उपलबद्ध असताना काही हौशी शेतकरी या घाण्यावर तेल काढून घेतात.\nत्याकाळी अनेक भागात तेल घाणे सुरू होते. परंतु बदलत्या तंत्रज्ञाना बराबर या तेल घाण्याची जागा मशिनरींनी घेतली. अनेक घाणे हळूहळू कालबाह्य झाले. परंतु गिरकर यांनी आजोबांपासून सुरू असलेल्या तेलाचा लाकडी घाणा अजुनही सुरू ठेवला आहे. एका बाजुला बैललाला बांधून हा बैल गोल फिरून लाकडी ीां÷यातील असलेले खोबरे दांड्याच्या साह्याने दाबले जाते. या भाडंयाच्या खाली असलेल्या दीद्रा मधून हळू हळू तेल बाहेर पडते या त्याच्या कामाला त्यांना 85 वर्षाची आते नकुबाई गिरकर ही मदत करते. या वयात देखील पळाईने घाण्याच्या भां÷यावर बसून खोबरे भरण्याचे काम त्या करतात.\nतेल काढून घेण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक लोक त्यांच्याकडे येतात. एका दिवसात साधारण 5 लिटर तेल काढले जाते. डिंसेबर ते मे या काळात त्यांचा हा व्यवसाय चालतो. याच व्यवसायावर त्यांचा चरितार्थ चालतो. सात जणांचे हे कुटुंब आसून मुले अन्य शेतीची कामे करतात . या तेलामध्ये कोणतेही मिलावट नसल्याने अतिशय शुद्ध असे खोबरेल तेल. मिळते. याच बरोबर पेंड देखील मिळत असून त्याचा वापर हा गुरांसाठी करता येतो.\nखासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला\nवानिया चेट्टीयार तेली समाज कुलभूषण \"माता कन्नगी देवी\"\nसंताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा\nया साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nतेली समाज का मंदिर\nश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय\nसाहू तेली समाज के गौरव पृथ्वी साव की कप्तानी में भारत ने जीता विश्व कप\nतेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nAbout TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.\nContact us मदती साठी संपर्क करू शकता\nअभिजित देशमाने, +91 9011376209,\nमोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/trace-original-location-of-email-via.html", "date_download": "2018-04-20T14:11:15Z", "digest": "sha1:IZUHZHDBKQWETSGWOXO4A67PCGX4X5OA", "length": 5940, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती कशी मिळवावी याबद्द्ल एका वाचकाने माझ्याकडे विचारणा केली होती. नेटभेटच्या इतर वाचकांच्या माहितीसाठी मी येथे एका लेखाच्या स्वरुपात याचे उत्तर देत आहे.\n१. Gmail मध्ये आलेल्या ईमेलला ओपन करुन डाव्या बाजुला असलेल्या पर्यांयापैकी Show original हा पर्याय निवडा आणि आलेल्या स्क्रीप्ट मध्ये\nRecevied : from हा मजकुर सर्च करा.\n२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे एक IP Address दीसेल. हा IP Address ज्या संगणकावरुन ईमेल पाठविला गेला त्या संगणकाचा असतो.\n३. http://www.ip2location.com/free.asp या साईटवर जाउन सदर IP Address बद्दल अधिक माहिती मिळवता येते.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्‍या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती मिळवा. Reviewed by Salil Chaudhary on 10:31 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://teliindia.com/news.php?newsid=30&title=Yerandel%20Teli%20Samaj%20Gadchiroli%20Zilla%20Karyakarini", "date_download": "2018-04-20T14:14:25Z", "digest": "sha1:KTFWFF42XIIR6WNP2G5HFSXTGIZETWDO", "length": 5873, "nlines": 33, "source_domain": "teliindia.com", "title": "Yerandel Teli Samaj Gadchiroli Zilla Karyakarini | एरंडेल तेली समाज�गडचिरोली �जिल्हा कार्यकारिणी गठित.", "raw_content": "\nएरंडेल तेली समाज�गडचिरोली �जिल्हा कार्यकारिणी गठित.\nगडचिरोली : येथील पटवारी भवनामध्ये आयोजित बैठकीत एरंडेल तेली समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.\nबैठकीच्या अध्यक्षस्थानीनागपूर विभागाचे सचिव विठ्ठलराव निखुले होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. परसराम नागोसे, ताराचंद नागोसे, पं.स. सदस्य सविता कावळे, राजेंद्र भरडकर आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून धुंडेशिवणी येथील भगवान ठाकरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून कवडू समर्थ, चंद्रशेखर मुरतली, सचिव रेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे, सदस्य सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, कृष्णा भरडकर आदींचा समावेश आहे. महिला अध्यक्ष म्हणून लता यांची निनवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून ऐश्वर्या लाकडे, सहसचिव निलू निकुरे, कोषाध्यक्ष अर्चना कोलते, मुख्य संघटक सविता कावळे आदींची निवड करण्यात आली.\nया साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nतेली समाज का मंदिर\nश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय\nसाहू तेली समाज के गौरव पृथ्वी साव की कप्तानी में भारत ने जीता विश्व कप\nतेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nAbout TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.\nContact us मदती साठी संपर्क करू शकता\nअभिजित देशमाने, +91 9011376209,\nमोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://rohanprakashan.com/index.php/knitting-craft/item/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE.html?category_id=40", "date_download": "2018-04-20T14:46:58Z", "digest": "sha1:X3TIVNB6RDEDNOUV7NBJYX5QROS6QKFN", "length": 4430, "nlines": 93, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "आकर्षक विणकाम Aakarshak Lokariche Vinakam", "raw_content": "\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\nआकर्षक विणकाम | Aakarshak Lokariche Vinakam लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार\nलहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. प्रमुख वैशिष्टये : १. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू २. लोभस नाजूक विणी ३. आकर्षक रंगसंगती ४. सोप्या शैलीतील लिखाण ५. जास्तीत जास्त सू्चना ६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र\nदोर्‍याची क्रोशे विणकला | Doryache Croshe Vinakala\nनवीन पुस्तकं / New Releases\nराजकारण-समाजकारण / Social - Political\nउपयुक्त विज्ञान / Useful Science\nव्यक्तिमत्त्व विकास / Self-Help\nमहत्त्वाची पुस्तकं / Best Sellers\n|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-make-poster-against-rane-in-mumbai-270640.html", "date_download": "2018-04-20T14:30:12Z", "digest": "sha1:MF5LLFDBBB5Z5PPC6UAWTNLDJNRQC3OY", "length": 11450, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भर चौकात पोस्टर लावून शिवसैनिकांची राणेंबद्दल असभ्य शेरेबाजी", "raw_content": "\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nभर चौकात पोस्टर लावून शिवसैनिकांची राणेंबद्दल असभ्य शेरेबाजी\nराणे भाजपमध्ये जाणार या शक्यतेनं शिवसैनिक अस्वस्थ झालेत. त्यांनी भर चौकात पोस्टर लावून राणेंबद्दल असभ्य शेरेबाजी केलीय.\nमुंबई, 25 सप्टेंबर : राहिले ते कावळे आणि उडाले ते मावळे या शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीचा पक्षाला विसर पडल्याचं दिसतंय. निमित्त ठरलंय ते नारायण राणेंच्या संभावित भाजप प्रवेशाचं.राणे भाजपमध्ये जाणार या शक्यतेनं शिवसैनिक अस्वस्थ झालेत. त्यांनी भर चौकात पोस्टर लावून राणेंबद्दल असभ्य शेरेबाजी केलीय.\nशिवसेना विरूद्ध नारायण राणे असा वाद आता पुन्हा नव्याने पेटणार असल्याचं दिसतंय. आज शिवसेना मुंबईतल्या वरळी नाक्यावर नारायण राणेंवर टीका करणारं वादग्रस्त आणि तितकंच आक्षेपार्ह असं होर्डिंग लावलंय. या होर्डिंगवरून पुन्हा एकदा राजकीय होर्डिंग वाॅर सुरू होणार असल्याचंही दिसतंय.\nनारायण राणेंबद्दलचा राग शिवसैनिक मिळेल तसा व्यक्त करत असतात. आता नारायण राणे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: narayan ranepostersshivsenaनारायण राणेपोस्टर्सशिवसेना\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\n'लालबागचा राजा मंडळा'ला ६० लाखांचा दंड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/2-soldiers-killed-after-avalanches-hit-batalik-sector-in-ladakh-257760.html", "date_download": "2018-04-20T14:29:53Z", "digest": "sha1:RP2W2NZWEF2N3537JFG43NOJV6QNDZIA", "length": 10861, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद", "raw_content": "\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nजम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद\n07 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात भारताचे 2 जवान शहीद झाले आहेत. याच घटनेत एक जवान बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.\nलडाख इथल्या बटालिक सेक्टरमध्ये काल (गुरूवारी) जोरदार हिमवृष्टी झाली. याच दरम्यान हिमस्खलन झालं आणि बर्फाखाली भारतीय सैन्यातील 5 जवान गाडले गेले. यातील 2 जवनांची गुरूवारी ढिगाऱ्याखालुन सुटका करण्यात यश आलं होतं. शुक्रवारी सकाळी दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एक जवान अजूनही बेपत्ता आहे.\nकाश्मीर खोऱ्यात गुरूवारपासून बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत दोन नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला असून पूरग्रसत भागात मदतीसाठी सैन्याच्या पथकाला पाठवण्यात आलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकोण आहेत माया कोडनानी \nअभी तक \u0003खेलने के लिए\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T14:53:26Z", "digest": "sha1:3PVAWERB6WN5MZW7CNE4CQRU64Q37L7X", "length": 5757, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८१० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे\nवर्षे: ८०७ - ८०८ - ८०९ - ८१० - ८११ - ८१२ - ८१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २० - इमाम बुखारी, हदीथचा संपादक.\nइ.स.च्या ८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/12/access-your-orkut-account-from-facebook.html", "date_download": "2018-04-20T14:09:21Z", "digest": "sha1:Q2KND2B6T6ZYUE6UNFJRZFQFNXNYJJDU", "length": 8106, "nlines": 73, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Access Your Orkut Account from Facebook. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nसोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात फेसबुक, मायस्पेस, ऑर्कुट, ट्वीटर अशा अनेक वेबसाईट्सची भाउगर्दी झाली आहे. फेसबुक जगभरात सर्वाधिक लोकप्रीय असले तरी भारतामध्ये मात्र गुगलच्या ऑर्कुटनेच बाजी मारली आहे. आणि म्हणुनच भारतातील बर्‍याच ऑफीसेस मध्ये \"Orkut\" या साईटवर बंदी आणण्यात आली आहे. अजुनही फेसबुक मात्र फार वापरली गेली नसल्याने भारतातील ऑफीसेसमध्ये या साइटवर बंदी नसावी (असा माझा अंदाज आहे\nनेटभेटच्या बर्‍याच वाचकांनी मला ऑफीसमध्ये बंदी घातलेली असताना ऑर्कुट कसे वापरावे याबद्दल विचारले होते. त्यासाठी मी power.com हा एक पर्याय देखील सुचवला होता. मात्र power.com मध्ये ऑर्कुट अकाउंटवरील फोटो मात्र पाहता येत नाही. आज मी एका अशा फेसबुक अप्लिकेशन बद्दल सांगणार आहे जे वापरुन तुम्हाला फेसबुकमध्येच ऑर्कुट वापरता येइल. (अर्थात यासाठी फेसबुक अकाउंट असणे आवश्यक आहे)\nमाय ऑर्कुट असे नाव असलेले हे फेसबुक अप्लिकेशन बनवीले आहे \"अ‍ॅमेझॉन.कॉम\" मध्ये काम करणार्‍या जीतु मीरचंदानी या भारतीय व्यक्तीने. (या अ‍ॅप्लिकेशनने ऑर्कुटची पार वाट लावली आहे \nआणि या अप्लिकेशनची खास बात म्हणजे येथे तुम्हाला आपले ऑर्कुट युझरनेम आणि पासवर्ड देण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुमच्या ऑर्कुट प्रोफाइलची लिंक दीलीत की झाले. एकदा हे फेसबुक अप्लिकेशन तुम्ही यशस्वीरीत्या चालु केले की मग येथे ऑर्कुटवरील सर्व स्क्रॅप वाचता येतील, नविन स्क्रॅप्स लिहिता येतील आणि ऑर्कुटवरील मित्रमैत्रीणींनी अपलोड केलेले फोटोज देखील पाहता येतील.\nमाय ऑर्कुट अप्लिकेशन कसे वापरावे\n१. पहील्यांदा फेसबुक वर लॉगीन करा. (नसल्यास खाते उघडुन घ्या)\n२. माय ऑर्कुट अ‍ॅपसाठी येथे क्लिक करा.\n३. आता खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे \"Go to application\" वर क्लिक करा.\n४. येथे तुमच्या ऑर्कुट अकाउंटची लिंक चिकटवून (Paste) \"Add\" बटणावर क्लिक करा.\n५. आता फेसबुक मध्येच बिनदीक्कत ऑर्कुटींग चालु करा.\nमाय ऑर्कुट अप्लिकेशन कसे वाटले ते कळवायला विसरु नका.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kalyan-karjat-local-late-by-fifteen-minutes-278038.html", "date_download": "2018-04-20T14:27:40Z", "digest": "sha1:IBYRCWRIPOUC7FOSESBV42WVIZER6NIQ", "length": 11706, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने", "raw_content": "\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने\nफलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n26 डिसेंबर: कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक उशिराने सुरू आहे.\nफलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा बिघाड ठीक झाल्यावर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येईल. गेल्या काही दिवसात लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रसंग वाढले आहेत. हार्बल लाईनवर रूळ तुटल्याने काही दिवसांपूर्वी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर धुक्यामुळे काही दिवस मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. आता तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nत्यामुळे सततच्या या समस्यांवर आता सरकार काय उपाय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nअश्विनींच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या, वडिलांचा आत्मदहनाचा इशारा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/alibaug-news-crime-murder-case-53850", "date_download": "2018-04-20T14:50:15Z", "digest": "sha1:HLQ7BVBC4W3RKYZ3CTCUPYKR37U6KBKE", "length": 13703, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "alibaug news crime murder case एटीएमच्या पावतीवरून लागला खुनाचा छडा | eSakal", "raw_content": "\nएटीएमच्या पावतीवरून लागला खुनाचा छडा\nमंगळवार, 20 जून 2017\nअलिबाग - पुण्यातील धनकवाडी येथील नरेंद्र प्रवीण कुलकर्णी याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करणाऱ्या सहा आरोपींना एटीएम पावतीच्या साह्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या पूर्वनियोजित खुनामागे नेमके कोणते कारण आहे, हे अजून गुलदस्तात आहे; मात्र पैशासाठी अथवा अनैतिक संबंधातून प्रवीणचा खून झाल्याचा संशय पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.\nअलिबाग - पुण्यातील धनकवाडी येथील नरेंद्र प्रवीण कुलकर्णी याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करणाऱ्या सहा आरोपींना एटीएम पावतीच्या साह्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या पूर्वनियोजित खुनामागे नेमके कोणते कारण आहे, हे अजून गुलदस्तात आहे; मात्र पैशासाठी अथवा अनैतिक संबंधातून प्रवीणचा खून झाल्याचा संशय पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.\nपारस्कर म्हणाले, \"\"या प्रकरणातील मुख्य आरोपी हेमंत विचारे (वय 29, रा. मोहननगर, पुणे) याने अन्य पाच जणांच्या मदतीने प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी विचारेसह दत्ता लोखंडे व रोहित गायकवाड या मुख्य आरोपींना खालापूर न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य तीन आरोपींनाही कोठडी मिळण्यासाठी सोमवारी (ता. 19) न्यायालयात हजर करण्यात आले होते.''\nमुख्य आरोपी हेमंत याने 23 डिसेंबर 2016 रोजी नरेंद्र यास ठार मारण्याचा कट रचला. यामध्ये हेमंत याच्यासोबत दत्ता लाला लोखंडे (पुणे), विशाल विवेक कोरडे (ताकई, बौद्धदवाडा, खालापूर), रोहित गायकवाड, विशाल कसबे (पुणे), सचिन भोसले (खोपोली) या आरोपींनी नरेंद्रची मोटारसायकल त्याच्या घरी पार्क केली. तसेच त्याच्याच मोबाईलवरून वर्षभरासाठी लुधियानाला जात असल्याचा मेसेज त्याच्या घरी पाठविला. त्यानंतर नरेंद्रचे दोन्ही मोबाईल बंद करून त्याला जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोली परिसरातील अलाना कंपनीच्या पाठीमागील ओसाड जागेत घेऊन गेले. तेथे नरेंद्र याच्यावर मोठ्या दगड आणि विटांनी मारा करून त्याचा खून केला. पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागू नये, म्हणून त्याच्याजवळील सामान काढून रेल्वे मार्गावर फेकून दिले; मात्र कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ एटीएम पावतीच्या आधारे नरेंद्र याच्या घरच्यांचा शोध घेतला. यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील, खालापूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक व्ही. टी. पांढरपट्टे आदींच्या पथकाला मुख्य आरोपीसह सहा आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याचे पारस्कर यांनी सांगितले.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/himachal-pradesh-jai-ram-thakur-to-take-oath-as-cm-494382", "date_download": "2018-04-20T14:37:48Z", "digest": "sha1:IWSIRWDRM5PUZHKB2EXCLTW4S36USC65", "length": 16186, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "हिमाचल प्रदेश : जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी", "raw_content": "\nहिमाचल प्रदेश : जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी\nशिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.\nआज मुख्यमंत्रीपदासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांची बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. तसंच भाजपचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीवेळी जयराम ठाकूर यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यावरच सर्वांचं एकमत झालं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nहिमाचल प्रदेश : जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी\nहिमाचल प्रदेश : जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी\nशिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.\nआज मुख्यमंत्रीपदासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांची बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. तसंच भाजपचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीवेळी जयराम ठाकूर यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यावरच सर्वांचं एकमत झालं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: राजस्थान रॉयल्स ने टॉस जीता,पहले गेंदबाजी का फैसला\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\nCSK vs RR: बैन के बाद पहली बार एक-दूसरे से भिड़ेगी सीएसके और राजस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/hockey", "date_download": "2018-04-20T14:52:49Z", "digest": "sha1:RGCLG6CCDHNRQW2QKR7VN53WIRHVSWWV", "length": 12354, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "हॉकी | eSakal", "raw_content": "\nअर्धा मिनीट असताना भारताचा विजयी गोल\nगोल्ड कोस्ट - पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सेकंदात स्वीकारलेल्या गोलची जणू भरपाई करताना भारताने इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल केले आणि हॉकीच्या...\nभारतीयांची पाकिस्तानला बरोबरीची ‘भेट’\nगोल्ड कोस्ट - अखेरच्या काही मिनिटांत गोल स्वीकारण्याचे भारतीय हॉकीचे दुखणे पुन्हा उफाळून आले. पहिल्या १९ मिनिटांत दोन गोल केलेल्या भारतास पाकिस्तानच्या...\n‘ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतविण्याची भारताची क्षमता’\nनवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाची सध्याची तयारी लक्षात घेता मनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतविण्याची...\nअझलन शाह हॉकी : भारताला मोठा विजय आवश्‍यक\nइपोह : अननुभवी आणि युवा भारतीय संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याच्या अपेक्षा बाळगून आहे. मात्र, त्यासाठी त्यांना उद्या आयर्लंडविरुद्ध मोठा विजय...\nअर्जेंटिनाकडून भारतीय संघ पराभूत\nइपोह (मलेशिया) - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताला अर्जेंटिनाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात २-३ अशा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेंटिना हा...\nअर्जेंटिनाकडून भारताची निसटती हार\nइपोह (मलेशिया) : अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताला अर्जेंटिनाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 2-3 अशा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेंटिना हा जागतिक...\nमाजी जवानांना खाव्या लागतात शिव्या...\nलष्करात असताना भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमिची सेवा करत असताना...\nपहिल्या विमान प्रवासाचा आनंद\nकोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी...\nभाजपच्या गुगलीने शिवसैनिक संभ्रमात\nमुंबई - सत्तास्थापनेनंतर सतत...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nरोज दोन किलो शिव्या खातो..म्हणूनच मी 'फिट' आहे : पंतप्रधान मोदी\nलंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या...\n.. म्हणून 'सर्जिकल स्ट्राईक'विषयी आधी पाकिस्तानला सांगितले : पंतप्रधान मोदी\nलंडन : 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला.. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारशी...\nतुझ्या मंदिरात बलात्कार झाला तेव्हा कुठे होतास तु\nकठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाने देश पुन्हा एकदा हादरुन गेला. जम्मू कश्मीरमधील...\nसांगली आणि सावरकर - एक अतूट नाते\nसांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून...\nशेजारची रीमा थॅन्क्स म्हणायला आली होती. बरेच दिवस तीच्या मनात नोकरी सोडावी की...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार\nस्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/gavakadchya-batmaya-2/article-256289.html", "date_download": "2018-04-20T14:45:25Z", "digest": "sha1:NQNVARLKFH7WZECWKTNBDP2KYP646BYQ", "length": 9265, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडच्या बातम्या (22 मार्च)", "raw_content": "\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (24 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (20 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (17 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (10 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (09 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (07 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (6 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 3, 2017\nगावाकडच्या बातम्या (03 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 1, 2017\nगावाकडच्या बातम्या (02 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (28 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या February 27, 2017\nगावाकडच्या बातम्या (27 फेब्रुवारी)\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T14:55:08Z", "digest": "sha1:7R7O3T23BXHFTIZIT5R634NH7VGPB5RU", "length": 3432, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्ज गियरी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/water-conservation-satara-45386", "date_download": "2018-04-20T14:45:39Z", "digest": "sha1:IHZ6GKV4SQBYW6IIDIQFTPDG2NGHMEVH", "length": 15726, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water conservation satara जलसंधारणातून पुसला ‘दुष्काळी’ शिक्का | eSakal", "raw_content": "\nजलसंधारणातून पुसला ‘दुष्काळी’ शिक्का\nमंगळवार, 16 मे 2017\nसातारा - दुष्काळात होरपळून निघालेले... २००२-०३ पूर्वी टॅंकर पाचवीला पुजलेला गाव. मात्र, गावात एकजुटीने ‘सुकाळ’ आला... जलसंधारणाची कामे झाली... दोन लाख १५ हजार रोपांनी वृक्षराजी बहरली... आज हेच गाव १५ वर्षांपासून शेजारील गावांसाठी जलदायिनी बनले आहे. रेनवॉटर हार्वेटिंगचा प्रयोग राबवून ‘पाणीच पिकविण्या’चे काम सुरू आहे... हे गाव म्हणजे पाचवीला दुष्काळ पुजलेल्या माण तालुक्‍यातील लोधवडे...\nसातारा - दुष्काळात होरपळून निघालेले... २००२-०३ पूर्वी टॅंकर पाचवीला पुजलेला गाव. मात्र, गावात एकजुटीने ‘सुकाळ’ आला... जलसंधारणाची कामे झाली... दोन लाख १५ हजार रोपांनी वृक्षराजी बहरली... आज हेच गाव १५ वर्षांपासून शेजारील गावांसाठी जलदायिनी बनले आहे. रेनवॉटर हार्वेटिंगचा प्रयोग राबवून ‘पाणीच पिकविण्या’चे काम सुरू आहे... हे गाव म्हणजे पाचवीला दुष्काळ पुजलेल्या माण तालुक्‍यातील लोधवडे...\nराज्य सरकारने राबविलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान लोधवडेने मिळविला. यापूर्वीही अनेक शासकीय योजनांवर मोहर उमठवलेले लोधवडे हे गाव २००२ पूर्वी दुष्काळी गर्तेत अडकले होते. लोकसंग्रह, शासकीय योजनाची अंमलबजावणी आणि गावचे सुपुत्र व कोकणचे आयुक्‍त प्रभाकर देशमुख हे लोधवडेकरांच्या भक्‍कम बाजू ठरल्या. जलसंधारणासाठी एकवटल्यामुळे सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, डीप सीसीटी, साधी सीसीटी, कंपार्टमेंट बंडिंग, लूज होल्डर, माती नालाबांध आदींसह अनेक कामे झाली. या कामांमुळे दुष्काळी गावात डिसेंबरअखेरपर्यंत नऊ किलोमीटरचे ओढा पात्र प्रवाही राहत आहे. कायमस्वरूपी टॅंकरग्रस्त असणारे हे गाव आता जलस्वयंपूर्ण असून, शेजारील तीन गावांसाठी दररोज सात ते आठ टॅंकर पाणी देत आहे. २०१२-१३ च्या दुष्काळातही स्वत:ची तहान स्वत: भागविली.\nनंदनवन पाणलोट विकास कार्यक्रमातून लोधवड्यात ४३२ हेक्‍टरवर जलसंधारणाची कामे झाली. त्यासाठीची २० टक्‍के निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. आजवर गावात दोन लाख ३० हजार रोपे लावली असून, त्यातील सुमारे दोन लाख १५ हजार रोपे जगली आहेत. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य केंद्रातील रोपांना ठिबकद्वारे, तर इतर रोपांना टॅंकरद्वारे पाणी घातले जात आहे. जलसंधारणाबरोबर सांडपाणी पुनर्वापरातही भरारी घेतली आहे. गटाराद्वारे पाणी एकत्र करून ते तळ्यात शुद्ध केले जाते. तीन टप्प्यात शुद्ध केल्यानंतर ते परसबाग, ओढ्यात सोडले जाते. गावात १३० परसबागा आहेत. ग्रामपंचायतीची पाच हजार स्क्‍वेअर फूट इमारती, दोन सार्वजनिक इमारती, मीडिया सेंटर, हनुमान मंदिरावरही रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे.\n‘रिचार्ज शॉफ्ट’चा प्रयोग केले असून, त्याद्वारे पावसाळ्यात ओढ्यातील पाणी शुद्ध करून विहिरींत सोडले जाते. अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र वाढविण्यासाठी बचत गटांमार्फत २५ कुटुंबांना सौरचुलींसाठी प्रत्येकी तीन हजारांचे कर्ज देण्यात आले. शाळा, अंगणवाडी ‘आयएसओ’ ग्रामपंचायतींमध्ये ‘पीओएस’ मशिनद्वारे कॅशलेस व्यवहार केले जातात. ग्रामपंचायतीच्या कामाही ‘झिरो पेंडन्सी’ आहे.\nलोधवड्याची लोकसंख्या दोन हजार ७० असून, त्यात एक हजार ४७ महिला, तर एक हजार २३ पुरुष आहेत. शून्य ते सहा वयोगटात ६० टक्‍के मुलींची संख्या आहे.\nआधारकार्डचे काम १०० टक्‍के पूर्ण आहे. ४१० कुटुंबांपैकी १८९ कुटुंबांनी शोषखड्डे घेतले असून, ते १०० टक्‍के करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामसेवक नरेंद्र जगदाळे यांनी सांगितले.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2013/03/blog-post_10.html", "date_download": "2018-04-20T14:15:23Z", "digest": "sha1:DW6ZZDM3DAUNC36IEG65HR4WSQQ2CCWX", "length": 14243, "nlines": 173, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: जबाबदारी की ओझं", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nएकंदरीत आपली समाज रचना, संस्कृती, परंपरा, रितिरीवाज, रुढी, ह्याचा विचार केला तर एखादी स्त्री म्हणून जगताना तिने अनेक ओझ्यांची जबाबदारी घेतली असते अस म्हणता येईल का \nएकदा क तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात की अनेक गृहितकं तुमच्या बरोबरीनं वैयक्तिकरित्या, कुटूंबाकडून, समजाकडून मान्य केली जातात.\n१. मुलगी म्हणून वावरताना रात्री उशिरापर्यंत बाहेर वावरताना येणारं दडपण\n२. पत्नीच्या, सूनेच्या भूमिकेत घर, कुटूंबातील माणसं, नाती सांभाळण्याची जबाबदारी\n३. आई म्हणून मुलांना, समाजात मान्य होतील असे \"चांगले संस्कार\" देण्याची धडपड\nसर्वसाधारणपणे अनेकजणी वरील तिनही गोष्टींकडे आपली जबाबदारी, आपली कर्तव्य ह्या नजरेतूनच बघतात. हे सगळं काटेकोरपणे पाळलं की आपण सुरक्षित, आदर्श, इतरांकडून स्विकारल्या जाऊ असा समज. मग हे ओझं आहे हा समजत पुसट होण्यापर्यंत त्यांची मानसिकता होते.\nवैयक्तिक विचार करता -\nमी कॉलेजमधे असताना रात्री बाहेर उशिरापर्यंत वावरणं कधी आपणहून स्विकारलं नाही. घरातून कधी बंधन नव्हतं पण तसं वातावरण पण नव्हतं. त्यामुळे त्या वातावरणाची, त्या नियमाची जबाबदारी मी पाळली.\n(माझी बहीण कॉलेजमधे वेगवेगळ्या उपक्रमाच्यानिमित्ताने रात्री उशिरा घरी यायची. त्यामुळे तिला कदाचित ती जबाबदारी न वाटतां ओझं वाटलं असू शकतं)\nलग्न arrange marriage पध्दतीने असल्याने नवीन वातावरणाची काहीच ओळख नव्हती. त्यामुळे सून, पत्नी म्हणून वावरताना सर्वसाधारणपणे समाजाने ठरवून दिलेल्या पध्दतीचा अवलंब केला गेला. मंगळसूत्र घालणे, कुंकू लावणे इ.\nनोकरी करत असलेल्या ठिकाणी पॅन्ट, ओढणीविरहीत ड्रेस घालण्याची मुभा नव्हती. म्हणजे तसं सांगण्यातही आलं होतं. कुंकू लावणं पण होतच. आजूबाजूला कामगार लोकांचा वावर सतत असायचा. त्यांची आम्हा मुलींकडे बघण्याची नजर नेहमीच जाचक वाटायची. तेव्हा का कोण जाणे पण हे मंगळसूत्र, कुंकू घतल्यानं बरं वाटायचं. मग ते ओझं म्हणाव तर त्याचा आधार आम्ही घेत होतो का \nशाळेत असताना कोल्हापूरला सहल गेली होती. माझी पाळी चालू होती. बरोबरच्या मैत्रिणी मला देवळात न येण्याबद्दल सुचवत होत्या. बाईंनीपण मला तसच सांगितलं. मी त्याला विरोध केला. मी ते ऎकलं नाही. ती पण देवीच आहे की मग असं का असा उलट प्रश्न केला. मी देवळात गेले. निर्धास्तपणे वावरले. तेव्हा मी विरोध केला त्याचं आज पण मला खूप समाधान वाटतं.\nजबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही. मला आवडेल ते कपडे मी घालते.मंगळसूत्र व कुंकू ह्याचं सौभाग्य म्हणून बंधन ठेवलं नाही. पुण्यासारख्या शहरात राहते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वावरु शकते. कुटुंबाचं प्रत्येक काम ही आमच्या दोघांची जबाबदारी असते.\nकधीतरी वाटतं की समाजाच्यादृष्टीने असलेली ही बंडखोरी मी माझ्या आधीचा घटनामधे, प्रसंगांमधे, नोकरीत दाखवू शकले असते तर......\nकदाचित मला ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला वेळ लागला असं मी म्हणेन.\nLabels: इंद्रधनु -- वैशाली\n>>तेव्हा मी विरोध केला त्याचं आज पण मला खूप समाधान वाटतं.\n (कोणत्याही कारणानं का होईना, पण) स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी प्रामाणिक न रहाता येणं ह्याची आयुष्यभर खंत जाणवत रहाते; आणि तेच सर्वात जड ओझं होतं आपल्याला.\n>>जबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही.\n हे छानच आहे. त्यामुळे द्विधा टाळत येत असणार.\n>> (कोणत्याही कारणानं का होईना, पण) स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी प्रामाणिक न रहाता येणं ह्याची आयुष्यभर खंत जाणवत रहाते; आणि तेच सर्वात जड ओझं होतं आपल्याला.\nछान लिहिलंस. यावर विचार करायला हवा. म्हणजे \"सर्वात जड\" यावर\n>>एखादी स्त्री म्हणून जगताना तिने अनेक ओझ्यांची जबाबदारी घेतली असते अस म्हणता येईल का\nओझ्यांची जबाबदारी .... interesting :)\nजबाबदारीचं ओझं नाही होत कधी काही जबाबदार्‍या निभावताना आपल्या इच्छा/आकांक्षा बाजूला साराव्या लागतात,तडजोड करावी लागते तेव्हा ते ओझं नाही का वाटत\nजी ओझी वाहावी लागतात, त्याबद्दलची आपली नैतिक भूमिका स्पष्ट असली पाहिजे. तुमचा विचार काय आहे का आहे\nजबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही.\nहे तू विस्ताराने आणि आणखी स्प्ष्ट करून सांगायला हवंस.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nमुलीचं घर -- २\nमोकाट, स्वच्छंद कुमारिकांचे देश चिरायू होवोत\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRVI/MRVI052.HTM", "date_download": "2018-04-20T14:51:44Z", "digest": "sha1:U35ZNLFSYENBKNPLKRM3BZUSM2ZOQR5V", "length": 6933, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - व्हिएतनामी नवशिक्यांसाठी | जलतरण तलावात = Trong bể bơi |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > व्हिएतनामी > अनुक्रमणिका\nआपण जलतरण तलावात जाऊ या का\nतुला पोहावेसे वाटते का\nतुझ्याकडे टॉवेल आहे का\nतुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का\nतुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का\nतुला पोहता येते का\nतुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का\nतुला पाण्यात उडी मारता येते का\nकपडे बदलण्याची खोली कुठे आहे\nपोहोण्याचा चष्मा कुठे आहे\nपाणी खोल आहे का\nपाणी स्वच्छ आहे का\nपाणी गरम आहे का\nमी थंडीने गारठत आहे.\nपाणी खूप थंड आहे.\nआता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते.\nजगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…\nContact book2 मराठी - व्हिएतनामी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2010/05/blog-post_13.html", "date_download": "2018-04-20T14:34:16Z", "digest": "sha1:SELTPLX2OA4QDETP3F4O75BYHR4JDHXB", "length": 13818, "nlines": 144, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nमी बाई आहे याचा मला आनंदच होतो.\nमी बाई आहे याचा मला आनंदच होतो.\nबाईचं आयुष्य अधिक समृद्ध असतं पुरूषाच्या आयुष्यापेक्षा. नैसर्गीकदृष्ट्याही आणि सामाजिकदृष्ट्याही. अधिक सुखाचं असतं असं नाही म्हणत आहे मी, पण समृद्ध नक्कीच असतं.\nबाई ही कायमच कमी दर्जाची समजली गेली आहे. माणसाच्या इतिहासात (HIS-STORY) बाईच्या कामाची कुठे नोंदच केली गेलेली नाही. बायकांनी लावलेला टोपलीचा शोध असो की शेतीचा शोध असो, पुसले गेले. व्यवस्थाच अशी बनवली गेली की फक्त घराबाहेरच्या कामांची नोंद होते. बायकांना वर्षानुवर्ष घरकामालाच जुंपलं गेलं आहे. त्यांना संधीही सहज मिळत नाही. आजचं हे जग मुख्यत्वे पुरूषाच्या कर्तृत्वावर उभं आहे. बायका सहकारी असतील पण नेतृत्व पुरूषांच आहे.\nमला बरं वाटतं मी पुरूष नाही ते. या जगाचं जे वाट्टोळं केलं आहे, तेही पुरूषांनीच ना बहुसंख्य दहशतवादी पुरूष आहेत, बहुसंख्य सैनिक पुरूष आहेत, बहुसंख्य राजकारणी पुरूष आहेत. बलात्कार करणारे तर पुरूषच असतात फक्त.\nमला बाई असण्याचं समाधान वाटतं. त्यात अश्विनी म्हणते तसं निर्मितीची क्षमता हे एक आहे, पण तेच एक नाही.( त्याआधारे बायकांची केली जाणारी वर्गवारी मला मान्य नाही.) समजून घेण्याची क्षमता वगैरे मिलिन्द म्हणतो तसं सामाजिक घडणीने लादलेल्या गोष्टी आहेत. मग माझं बाईपण कशात आहेकेवळ शारिरिक फरकात हो, आदर्श समाजव्यवस्थेत ते तेव्हढ्यातच असेल.पण आजच्या समाजव्यवस्थेत मला ते सारखं लक्षात ठेवावं लागतं.\nमला केवळ एक चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे. आपण समाजात समानतेचं वातावरण आणू शकलो तर तुम्ही बाई असा की पुरूष असा तसा फरक पडणार नाही.\nबाई असण्याचे तोटे हे आहेत, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान तुम्हांला सहजी मिळत नाही, कमवावा लागतो. तुम्हांला कायम आवरून सावरून राहावं लागतं, पावित्र्य जपणे, पुरूषांपासून सांभाळून राहणे या आणखी काही गोष्टी. दुय्यमत्व स्वीकारावे लागते.\nबाई असण्याचे फायदे असे आहेत की, कमावण्याचं, कर्ते असण्याचं दडपण नसतं. अपेक्षांचं दडपण कमी असतं. यादी वाढवता येईल पण ही सगळी कारणे आपल्या आजच्या समाजव्यवस्थेमुळे आहेत.\nस्मिताने लिहीलं आहे तसं प्रत्येकात काही खास स्त्रीचे मानले गेलेले गुण असतात तर काही खास पुरूषाचे मानले गेलेले गुण असतात. (मानले गेलेले यासाठी की तसं च घडवलं जातं.) पण समाजात स्त्रीचे तथाकथित पुरूषी गुण आणि पुरूषाचे तथाकथित स्त्रीत्व प्रगट करणारे गुण जाहीरपणे स्वीकारले जात नाहीत.\nमी तेच तर म्हणते आहे, मला माझ्या गुणावगुणांसह मोकळेपणाने एक माणूस म्हणून जगायचं आहे.\nमी एक बाई आहे, मी वेगळी आहे पुरूषांपेक्षा, माझं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून मला पुरूष व्हायचं नाहीये.\nतथाकथित पुरूषांचं मानलं गेलेलं क्षेत्र निवडायचं, तिथे त्यांच्या नियमांनी खेळून आपला ठसा उमटवून स्वत:ला सिद्ध करायचं. हा मार्ग जुना झाला. जिथे तिथे ’प्रमाण’ पुरूष आहे. हे जगच बदलायला हवं. जरा आमच्या डोळ्यांनी बघायला जगाने शिकायला हवं.\nअश्विनीने लिहिलंय तसं ’नको हे बाईपण’ असं वाटणारे प्रसंग माझ्यावरही आले नाहीत. नको ते पुरूष असं म्हणायला लागावं असे पुरूषही माझ्या वाट्याला आले नाहीत.\nखरं म्हणजे माझ्या जवळच्या वर्तूळातले पुरूष फारच चांगले आहेत. माझ्याशी तरी चांगलेच वागलेले आहेत. बाबा माझ्याशी समानतेने वागले. मिलिन्दच्या डोक्यात समानतेचा तराजू पक्का आहे. तो माझ्याशीच समानतेने वागतो असे नाही तर त्याच्या बहीणींशी, इतर नात्यातल्या, ऑफीसमधल्या स्त्रीयांशी पण समानतेने वागतो, हे मला महत्त्वाचे वाटते.( माझ्याही समोर कोणी अन्यायी पुरूष नाही, ज्याला मी जबाबदार धरू.) माझा राग व्यवस्थेवरच आहे.\nबाईपण श्रेष्ठ की पुरूषपण हे ठरवता येणं अवघड आहे. पण निकाल देणं अनिवार्य असेल तर मी तो बाईच्या बाजूने लावेल.\nमिलिन्दला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणाला निर्विवादपणे स्त्री. कारण विचारल्यावर म्हणाला,” बायकांची स्वत:ला विसरून दुसर्‍याच्या भुमिकेतून विचार करण्याची क्षमता आणि निरनिराळ्या रूपांमधे वेगवेगळ्या नावांनी (वात्सल्य, ....) अमर्याद प्रेम करण्याची शक्ती.\nBy विद्या कुळकर्णी - May 13, 2010\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nमी बाई आहे याचा मला अर्थातच आनंद होतो, समाधान आहे....\nमी बाई आहे याचा मला आनंदच होतो.\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/serena-williams-gives-birth-baby-girl-says-coach-69956", "date_download": "2018-04-20T14:32:46Z", "digest": "sha1:PTGZXDGBZOZJJK2NAMMRDZETYQPASTI6", "length": 11257, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Serena Williams gives birth to baby girl, says coach सेरेना विल्यम्सने दिला मुलीला जन्म | eSakal", "raw_content": "\nसेरेना विल्यम्सने दिला मुलीला जन्म\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nमोराटोग्लू यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिला असून, तिचे अभिनंदन. तुझ्या भावनांबद्दल मी खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचे सेरेनाने म्हटले आहे.\nन्यूयॉर्क : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिल्याची माहिती तिचे प्रशिक्षक पॅट्रीक मोराटोग्लू यांनी दिली.\nमोराटोग्लू यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिला असून, तिचे अभिनंदन. तुझ्या भावनांबद्दल मी खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. सेरेनाचा विवाह रेडीटचा सहसंस्थापक ऍलेक्सिस ओहनियान याच्याशी होणार आहे.\nजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या सेरेनाने 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. सेरेनाने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जानेवारी 2017 मध्ये गर्भवती असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत, सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर तिने अनेकवेळा फोटोशूटही केले होते.\nवक्‍तृत्वकला हे काही फक्‍त निवडणुका जिंकण्यापुरते अस्त्र नसते, हा गुण कारभार करतानाही वापरण्याची परिपक्‍वता नेत्याच्या ठायी असायला हवी. डॉ....\nदेशातील टेबल टेनिस क्षेत्रात क्रांती घडावी - मनिका बात्रा\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीत टेबल टेनिसपटू मनिका बात्राची कामगिरी लक्षवेधक ठरली. आपल्या या कामगिरीने देशातील टेबल...\nमोनॅको - ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएम याने मॅच पॉइंट वाचवत मंगळवारी माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्र रुबलेव याच्यावर ५-७, ७...\nजागतिक टेनिस क्रमवारीत युकी पुन्हा पहिल्या शंभरात\nनवी दिल्ली - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या शंभरात आला आहे. युकी क्रमवारीत २२ स्थानांची...\nप्रवीण भोटकर यांना डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंज मेकर्स पुरस्कार प्रदान\nअकोला : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांना संयुक्त राष्ट्र संघ आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-04-20T14:54:46Z", "digest": "sha1:W2675WMOVVJ4BZSQ7EYC7A2UTN2WAGUJ", "length": 6169, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण ग्याँगसांग प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण ग्याँगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १०,५३१ चौ. किमी (४,०६६ चौ. मैल)\nघनता ३०७ /चौ. किमी (८०० /चौ. मैल)\nयुनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील हेइन्सा बौद्ध विहार\nदक्षिण ग्याँगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्याँगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nदक्षिण कोरियाचे राजकीय विभाग\nउत्तर चुंगचाँग प्रांत • दक्षिण चुंगचाँग प्रांत • गंगवान प्रांत • ग्याँगी प्रांत • उत्तर ग्याँगसांग प्रांत • दक्षिण ग्याँगसांग प्रांत • उत्तर जेओला प्रांत • दक्षिण जेओला प्रांत\nबुसान • दैगू • देजॉन • ग्वांगजू • इंचॉन • उल्सान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१४ रोजी १७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://e-saee.blogspot.com/2009_10_01_archive.html", "date_download": "2018-04-20T14:36:53Z", "digest": "sha1:PZU7N2TNJOZGAL4HSNZJID3MGUW2KODN", "length": 9174, "nlines": 55, "source_domain": "e-saee.blogspot.com", "title": "थोडे शङ्ख नि शिम्पले…: October 2009", "raw_content": "थोडे शङ्ख नि शिम्पले…\n\"कुठलाही पदार्थ जिवंत असता तर त्याने काय बरं सांगितलं असतं\" असा मी ब-याचदा विचार करते. असाच एक मला विलक्षण गूढ वाटणारा पदार्थ म्हणजे तिरामिसु. नुसतं नाव घेतलं तरी तिरामिसुच्या घासाघासात भरलेल्या रुमानीपणाची झलक येते. कारण इटालियनमधे तिरामिसुचा अर्थ होतो “pick-me-up” एखाद्या रंगेल, बेफ़िकीर कलाकाराशी अनेक अफवा जोडल्या जाव्यात तसाच तिरामिसुही अनेक गुलजार कथांचा धनी आहे... काही सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या\nअसं म्हणतात की तिरामिसुचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी लागला. त्यामुळे तिरामिसु म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे येतं ते पहिल्या महायुद्धाच्या वेळचं इटली. चारी दिशांत भरलेली युद्धाची धुमश्चक्री. युद्धावर जायला निघालेल्या एखाद्या अनाम सैनिकाचं घर. कितीही निरोप घेतला तरी कमीच अशी वेळ. एका डोळ्यात विरह आणि दुस-या डोळ्यात त्याच्याविषयीचा प्रचंड अभिमान बाळगून चेह-यावर मंद हास्याचा मुलामा देणारी त्याची ती. इतरांकडून मिळालेले निरोप, आशीर्वाद, प्रार्थनांच्या बरोबरीनेच त्याने जपून ठेवलेली आणखी एक वस्तू. तिने स्वत: केलेलं तिरामिसु त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा त्यात घातलेल्या चीज, केक, अंडं, लिकर ह्या सा-याच गोष्टी त्याला लढायला ताकद देतील आणि सुखरूप परत आणतील अशी तिची वेडी अपेक्षा आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी आणि मग नीरव एकांतात तो ते तिरामिसु खात असताना त्या निर्जीव केकच्या थराथरातून उलगडत जाणारा क्रीमचा नितळपणा...अगदी तिच्या नितळ त्वचेशी स्पर्धा करणारा, किंवा तोंडाभर पसरत जाणारा कॉफीचा किंवा लिकरचा हवाहवासा मादक कडवटपणा...अगदी थेट तिच्यासारखा, त्यातच विरघळलेली चीजची लुसलुशीत आंबट चव...ती सतत त्याच्या जवळ असल्याची आठवण करून देणारी नेहमीच तिरामिसु खाताना हे सगळं प्रेम मला जाणवतं...आणि मग कॅलरी वगैरेचा विचार करायला वेळच मिळत नाही.\nपारंपरिक इटालियन तिरामिसु करताना लिकर, केक, मास्कारपोनी () चीज आणि सॅवॉर्डी () चीज आणि सॅवॉर्डी () बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खानाखजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईल्च्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही) बिस्किटं असं वापरतात. पण एका जपानी खानाखजानामधे मला मिळालेली तिरामिसु स्टाईल्च्या केकची ही फूल-प्रूफ़ रेसिपी...अर्थात ह्या रेसिपीतही मिपावरच्या संजीव कपूर/ तरला दलालांच्या चिमूटभर कल्पकतेची भर पडली तर खरं तिरामिसु होऊ शकेलही\n• २ चहाचे चमचे भरून कॉफी पावडर\n• १०० मि.ली. दूध\n• १२ मारी बिस्किटे\n• २०० मि.ली. क्रीम\n• ५० ग्रॅम बारीक साखर\n• २ चहाचे चमचे व्हिनेगर (पुस्तकात तांदळाचं व्हिनेगर वापरा असं लिहिलेलं आहे. पण मी फ्रुट- व्हिनेगर वापरूनही करते)\n• एका अंडयाचा बलक\n• सजावटीसाठी थोडी कोको पावडर (साखर नसलेली)\n• मारीची ६ बिस्किटं (३ x २) झोपतील असा एक डबा\n• कॉफी पावडर दुधात विरघळवा.\n• मारी बिस्किटं त्या दुधात बुडवून ठेवा. बिस्किटं अखंडच रहातील (त्यांचा लगदा होणार नाही) याची काळजी घ्या. बिस्किटं पुरेशी भिजली की बाजूला काढून ठेवा.\n• एका बाऊलमधे क्रीम घेऊन त्यात साखर फेटून विरघळवून घ्या.\n• मग व्हिनेगर घालून पुन्हा थोडेसे फेटा. व्हिनेगर घातल्याघातल्याच क्रीम घट्ट होत जाईल. जवळजवळ भज्यांच्या पिठापेक्षा किंचित जास्त घट्ट होईल.\n• आता त्यात अंडयाचा बलक घालून पुन्हा नीट फेटून घ्या.\n• आता डब्यात ती कॉफीत भिजवलेली सहा बिस्किटं ३ x २ अशी ठेवा. त्यावर त्या फेटलेल्या क्रीममधलं अर्धं ओता आणि सारखं पसरा. त्यावर पुन्हा उरलेली सहा बिस्किटं लावून उरलेलं क्रीम पसरून घ्या.\n• वरती गाळण्यातून कोको पावडर भुरभुरवा आणि ८-१२ तास फ्रीजमधे थंड करत ठेवा.\n• चांगलं घट्ट झालं की आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा तिची आठवण काढत खा.\n• व्हिनेगरचं प्रमाण पुस्तकात जरी २ चमचे लिहिलं असलं तरी मी पहिल्यांदा केलेला केक मला जरा आंबट वाटला. म्हणून मी आता दीडच चमचा व्हिनेगर घालते. व्हिनेगरप्रमाणेच कॉफी पावडरचं प्रमाणही आवडीनिवडीप्रमाणे कमी-जास्त झालं तरी चालतं.\n• पण क्रीममधे साखर, व्हिनेगर आणि अंडं घालायचा क्रम बदलला तर मात्र पुढे जे काही होईल त्याला केक म्हणता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/category/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T14:25:29Z", "digest": "sha1:GR2QQ4TYWMCRMDSR2XWPQJADMZROUGP3", "length": 10318, "nlines": 155, "source_domain": "newsworld.live", "title": "करिअरनामा – News World", "raw_content": "\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • विदर्भ • व्हिडीओ\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नईयिन...\nTop News • अर्थ • अर्थसार • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पिंपरी-चिंचवड • मुखपृष्ठ • राज्य • राष्ट्रीय • लाईफस्टाईल • व्हिडीओ\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले. भारत आणि...\nअर्थ • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पश्चिम महाराष्ट्र • पुणे • पुणे जिल्हा • प्रॉपर्टी • फिचर • फोटो गॅलरी • मनोरंजन • मराठवाडा • महाराष्ट्र • मुखपृष्ठ • मुंबई • यु सेल्फी • युफोरिया • राज्य • राष्ट्रीय • रूपगंध • लाईफस्टाईल • विदर्भ\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\nहैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर...\nTop News • Uncategorized • अग्रलेख • अर्थ • अर्थसार • अस्मिता • अहमदनगर • आंतरराष्ट्रीय • आरोग्य जागर • उत्तर महाराष्ट्र • करिअरनामा • कोंकण • क्रीडा • ठळक बातमी • ताज्या बातम्या • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • मुखपृष्ठ • मुंबई • युफोरिया • राज्य • विदर्भ • व्हिडीओ • संपादकीय लेख\nबोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर\nपुणे – विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे जावे यासाठी इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल करण्याबरोबर विद्यार्थ्यांना या...\nTop News • Uncategorized • अग्रलेख • अर्थ • अर्थसार • अस्मिता • आरोग्य जागर • करिअरनामा • कायदाविश्व • कोंकण • क्रीडा • गंधर्व • पिंपरी-चिंचवड • पुणे • पुणे जिल्हा • प्रॉपर्टी • फोटो गॅलरी • मनोरंजन • मराठवाडा • मुखपृष्ठ • यु सेल्फी • युफोरिया • राष्ट्रीय • रूपगंध • लाईफस्टाईल • व्हिडीओ • संपादकीय • संपादकीय लेख\nविराट कोहली बनला दोन्ही संघाचा कर्णधार\nमुंबई: आयसीसीने वार्षिक पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आता वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघाचे नेतृत्त्व भारतीय संघाचा कर्णधार...\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:23:15Z", "digest": "sha1:EFEREQ3HNJ2IQFKHSYQS5GMPM4CFGGRM", "length": 11134, "nlines": 63, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अयोध्याकांड - भाग १०", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग १०\nचित्रकूटावर रामलक्ष्मणांना भरताच्या सैन्याची चाहूल लागली तेव्हा रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने झाडावर चढून पाहिले व अयोध्येचे सैन्य असे ओळ्खून, ’हा भरत आला आहे.त्याचा हेतु काय’ असा संशय व्यक्त करून त्याने रामाला सावध केले. रामाने मात्र, ’भरत मला प्रिय आहे, त्याला उगाच कठोर बोलू नको’ असे त्याला बजावले. सैन्य व इतरांना मागे ठेवून भरत एकटाच रामाचा आश्रम शोधत पुढे आला. वनात फिरताना वाट चुकू नये म्हणून लक्ष्मणाने झाडांना खुणेसाठी बांधलेली वस्त्रे त्याला दिसली, त्यांच्या सहाय्याने तो रामाच्या पर्णशालेत पोचला. तेथे त्याला अनेक शस्त्रे व धनुष्ये दिसली.\nराम-भरतभेटीबद्दल आपणाला सविस्तर माहिती आहे. ’तूं वनांत कां आला आहेस’ असे विचारल्यावर भरताने दशरथ मृत्यु पावल्याचे सांगितले. भरताने रामाला अयोध्येला परतून राज्य स्वीकारण्यासाठी परोपरीने विनवले. वसिष्ठानेहि कुलपरंपरा सांगितली मात्र ’मला वनवास व भरताला राज्य या पित्याच्या स्वच्छ आज्ञा आहेत व त्या मी मोडणार नाही, आता पित्याच्या मृत्यूनंतर तर वनवास आटोपल्यावरहि अयोध्येस येण्यास माझे मन घेणार नाही’ असे राम म्हणाला. भरताने ’पित्याची चूक तूं दुरुस्त कर, त्याला अंतकाळीं भ्रम झाला, मी ज्येष्ठ पुत्र नसताना राज्य कसे स्वीकारूं’ असे अनेक युक्तिवाद केल्यावर येथे प्रथमच रामाने, दशरथाने कैकेयीच्या पित्याला विवाहसमयीं दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. ही गोष्ट राम सोडून इतर कोणाला, वसिष्ठालाहि माहीत नव्हती. रामाला कशी माहीत होती’ असे अनेक युक्तिवाद केल्यावर येथे प्रथमच रामाने, दशरथाने कैकेयीच्या पित्याला विवाहसमयीं दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. ही गोष्ट राम सोडून इतर कोणाला, वसिष्ठालाहि माहीत नव्हती. रामाला कशी माहीत होती कधीतरी दशरथाच्या तोंडूनच रामाला ही गोष्ट कळली असली पाहिजे. पण मग सत्यवचनी म्हटला जाणारा राम, पित्याच्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून घेण्यास कसा तयार झाला होता कधीतरी दशरथाच्या तोंडूनच रामाला ही गोष्ट कळली असली पाहिजे. पण मग सत्यवचनी म्हटला जाणारा राम, पित्याच्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून घेण्यास कसा तयार झाला होता त्याने पित्याला विरोध केला नाही वा त्याच्याच वचनाची आठवणही करून दिली नाही. ’माझे मन बदलत नाही व भरत दूर आहे तोवरच तू अभिषेक करून घे, सांभाळून रहा, तुला धोका आहे’ असें दशरथ म्हणाला तेव्हांही रामाने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सत्यवचनी व भरतप्रेमी या रामाच्या लौकिकाशी मुळीच सुसंगत नाही.\nरामाने भरताची समजूत घातली. ’१४ वर्षे संपेपर्यंत मी परत येणार नाही व राज्य तुलाच संभाळावे लागणार आहे, कौसल्या सुमित्रा यांची काळजी घे, कैकेयीलाही शासन करूं नको’ वगैरे उपदेश केला. राम ऐकत नाही असे पाहून ऋषींनी भरताला परत फिरण्यास सांगितले. नाइलाजाने रामाच्या पादुका घेऊन भरत परत निघाला. ’मीहि १४ वर्षे राजधानी बाहेरच राहीन व पादुकांच्या आधारे राज्य सांभाळीन, १४ वर्षे पूर्ण होतांच तुम्ही दिसलां नाहीं तर प्राणत्याग करीन’ असे रामाला म्हणाला.\nया सर्व प्रसंगांत भरताचे थोर मन फारच उठून दिसते. आपल्याला राज्य मिळण्यात मोठा अन्याय झालेला नाही हे दिसल्यावरही त्याने राज्याचा लोभ केला नाही. रामाने भरताला वडील भाऊ या नात्याने उपदेश करणे वगैरे ठीक आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही कीं राम भरतापेक्षां कांही तासांनीच मोठा होता तेव्हां तारतम्य सोडून चालणार नाही. मुळात रामाने पित्याच्या इच्छेप्रमाणे राज्य स्वीकारण्याचे ठरवले होते पण कैकेयीने दशरथाला कोंडींत पकडल्याचे दिसल्यावर त्याने पित्याची सुटका केली व एकदां आपला राज्यावर हक्क नाही हे मान्य केल्यावर मात्र तो ठाम राहिला हे खरे.\nपुढील भागामध्ये अयोध्याकांडाची अखेर गांठावयाची आहे.\nसर्व पोस्ट वाचतो आहे, आपले आभार कसे मानावेत तेच कळत नाहीत. फार मोलाची माहीती मिळत आहे..\nधन्यवाद.. चालु राहुद्या.. अनिकेत\nआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण लिहिलेले कोणालातरी आवडले याचा आनंद मोठा असतो.\nकैकयीच्या पित्याला दिलेले वचन हा भरताने ऐकावे आणि मान्य करावे, म्हणून रामाने केलेला बनाव असू शकतो ते सुद्धा सत्यवचनी ह्या उपाधीला गैर ठरवते हे खरेच \nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग १०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://eshanyavarta.blogspot.com/2015/01/blog-post_28.html", "date_download": "2018-04-20T14:16:10Z", "digest": "sha1:KN53XCQDRWRCOPP2RX55LCI6PLCTAVZU", "length": 6522, "nlines": 80, "source_domain": "eshanyavarta.blogspot.com", "title": "Eshanya Varta ईशान्य वार्ता : ईशान्य वार्ता - फेब्रुवारी २०१५", "raw_content": "\nईशान्य वार्ता - फेब्रुवारी २०१५\nअतिक्रमण (5) ईशान्य वार्ता (8) क्रांतिकारक (2) गाव (2) चिन (2) देशद्रोह (2) नागालॅण्ड (3) पर्यटन (6) पुर्वांचल (6) फेस्टिव्हल (3)\nब्रम्हपुत्रा सत्र माजूली बाजार रिसॉर्ट Add caption मुखवटे मुखवटेकार असा मी आसामी फेरी बो...\nजेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र\nएप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला लेख: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘ कॅम्पस ’ मध्ये ९ फेब्रुवारी २...\nसर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद\n‘ईशान्य वार्ता’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं...\nतवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक\nतेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लाग...\nहॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालॅण्ड\nनागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भू...\nविकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे. एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्...\nसंगत्सर लेक सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग...\nराष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं\nनागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल. ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ अ...\nलोटे परशुराम ते परशुराम कुंड\nपरशुरामाने जोडलेला दुवा त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात हिंदुस्थानभर संच...\nईशान्य राज्यातील पर्यटन समज - गैरसमज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत भाषण करताना ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असा आग्रह धरला. भारतात अस...\nतवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक\nईशान्य वार्ता - फेब्रुवारी २०१५\nलोटे परशुराम ते परशुराम कुंड\nचोकलांगन – एक अस्पर्श गाव\nईशान्य राज्यातील पर्यटन समज - गैरसमज\nराष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं\nचिनी फटाके नकोच नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/cricket", "date_download": "2018-04-20T14:52:36Z", "digest": "sha1:DWTKHDOK53ARLSRDLEGL2DY4TVZHIZAK", "length": 13582, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रिकेट | eSakal", "raw_content": "\nमोहाली - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली.\nधोनी धमाक्‍यास पुणेकर मुकणार पुणे - दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी आयपीएलमध्ये लढत होत आहे. कावेरी...\nपुण्यातील सामन्यांवर पाणी संकट मुंबई - पुण्यात सिंचन विभागामार्फत पवना नदीतून गहुंजे स्टेडियमला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बुधवारी (ता. १८) मुंबई उच्च न्यायालयाने रोखला....\n63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग\nनवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क...\nराणाची अष्टपैलू कामगिरी;नाइट रायडर्सचा विजय\nजयपूर - नितीश राणाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकता नाइट रायडर्सने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर सात गडी राखून पराभूत केले...\nआयपीएलमध्ये कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम\nनवी दिल्ली - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ अपयशी ठरत असला, तरी कर्णधार विराट कोहली नेहमीच्या भरात आहे. मुंबईविरुद्ध मंगळवारी ९२...\nकोलकाता - देशांतर्गत क्रिकेट भक्कम करण्यासाठी ज्युनियर क्रिकेट भक्कम असणे आवश्‍यक असते. सौरभ गांगुलीच्या तांत्रिक समितीने भारतीय क्रिकेटचा हा पाया अधिक...\nमुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या...\nयुवा क्रिकेटपटू ‘बीसीसीआय’च्या रडारवर\nनवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील क्रिकेटपटूंसाठी करारपद्धती निश्‍चित केली असली तरी आता ते एक पाऊल पुढे जाऊन सध्या ‘आयपीएल’मध्ये खेळत...\nमाजी जवानांना खाव्या लागतात शिव्या...\nलष्करात असताना भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमिची सेवा करत असताना...\nपहिल्या विमान प्रवासाचा आनंद\nकोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी...\nभाजपच्या गुगलीने शिवसैनिक संभ्रमात\nमुंबई - सत्तास्थापनेनंतर सतत...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nरोज दोन किलो शिव्या खातो..म्हणूनच मी 'फिट' आहे : पंतप्रधान मोदी\nलंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या...\n.. म्हणून 'सर्जिकल स्ट्राईक'विषयी आधी पाकिस्तानला सांगितले : पंतप्रधान मोदी\nलंडन : 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला.. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारशी...\nतुझ्या मंदिरात बलात्कार झाला तेव्हा कुठे होतास तु\nकठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाने देश पुन्हा एकदा हादरुन गेला. जम्मू कश्मीरमधील...\nसांगली आणि सावरकर - एक अतूट नाते\nसांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून...\nशेजारची रीमा थॅन्क्स म्हणायला आली होती. बरेच दिवस तीच्या मनात नोकरी सोडावी की...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार\nस्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T14:52:30Z", "digest": "sha1:KQJRFO2C3SDDZAH3A3MPISGIVKQN3IUW", "length": 6801, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कण्व घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकण्व घराणे (इ.स.पू. ७३ ते इ.स.पू. २८) याची स्थापना वसुदेव याने इ.स.पू. ७३ मध्ये केली होती.\nशुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जावून तेथे कण्व घराण्याची सत्ता चालू झाली.\nवसुदेव धरून कण्व घराण्यात एकूण चार राजे झाले.\nया चारही राजांनी मिळून फक्त पंचेचाळीस वर्षे राज्य केले.\nइ.स.पू. २८ मध्ये या घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला सातवाहन घराण्यातील एका राजाने ठार मारून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित करून कण्व घराण्याचा शेवट केला.\nसातवाहन वंश · गंग वंश · पाल वंश · नंद वंश · मौखरि वंश · मौर्य वंश · महामेघवाहन वंश · सूर वंश · चालुक्य वंश · वर्धन वंश · कुषाण वंश · गुप्त वंश · शुंग वंश · कण्व वंश · चौहान वंश · गहडवाल वंश · गुर्जर प्रतिहार वंश · पल्लव वंश · राष्ट्रकूट वंश · होयसळ वंश · मोगल वंश · लोदी वंश · सेन वंश · पांड्य वंश · चेर वंश · कदम्ब वंश · यादव वंश · काकतीय वंश · शैलेन्द्र वंश · चोळ वंश · परमार वंश · तुलुव वंश · देवगिरीचे यादव · शिलाहार वंश · वाकाटक वंश · भारशिव वंश · कर्कोटक वंश · उत्पल वंश · लोहार वंश · वर्मन वंश · हिन्दुशाही वंश · सोलंकी वंश · कलचुरी वंश · चंडेल वंश · कण्व वंश · हर्यक वंश · सैयद वंश · पाण्ड्य राजवंश · पुष्यभूति वंश · गुर्जर प्रतिहार वंश · संगम वंश · सालुव वंश · अरविडु वंश· आदिलशाही वंश · खिलजी वंश · गुलाम वंश · तुघलक वंश · निजामशाही वंश · बहामनी राजवंश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २०१५ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/whats-first-priority-of-indian-youth-survey-479866", "date_download": "2018-04-20T14:17:08Z", "digest": "sha1:ERXTEQHGUTUA6IWIVE2DATEWMKEFRFEI", "length": 11721, "nlines": 112, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सर्व्हे : पहिले करिअर, नंतर लग्न आणि शेवटी फॉरेन टूर, आजच्या तरुणाईचा कल", "raw_content": "\nसर्व्हे : पहिले करिअर, नंतर लग्न आणि शेवटी फॉरेन टूर, आजच्या तरुणाईचा कल\nसर्व्हे : पहिले करिअर, नंतर लग्न आणि शेवटी फॉरेन टूर, आजच्या तरुणाईचा कल\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: first priority Indian survey youth करिअर कल तरुणाई फॉरेन टूर लग्न सर्व्हे\nशादी डॉट कॉमनं देशातील तरुणाईशी निगडीत एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आजचे तरुण लग्नापेक्षाही करिअरबाबत फार दक्ष असल्याचं यातून समोर आलं आहे.\nतरुणांना सध्या आपलं करिअर किंवा किंवा नोकरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यानंतर ते लग्नाचा विचार करतात आणि मग तिसऱ्या क्रमांकावर येतं ते स्वत:चं घर खरेदी करणं पसंत करतात.\nत्यानंतर तरुणाई परदेशात शिक्षण किंवा परदेश दौऱ्याचा विचार करतात. या सर्व्हेमध्ये 20 ते 35 वयाचे 7398 भारतीय महिला-पुरुष हे सहभागी झाले होते.\nयावेळी सर्व्हेमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं लग्न करणं आवडेल असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी 19 टक्के तरुणांनी अरेंज्ड मॅरेजला पसंती दिली.\nशादी.कॉमवर अनेक तरुण-तरुणी आपल्या मनाजोगता जोडीदार मिळावा यासाठी नावनोंदणी करतात. त्यांच्यासोबतच हा सर्व्हे करण्यात आला आहे.\nअधिक माहिती: first priority Indian survey youth करिअर कल तरुणाई फॉरेन टूर लग्न सर्व्हे\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nसोन्याच्या जेजुरीत 'यळकोट यळकोट, जय मल्हार'चा गजर\nबाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांचे रांगोळीतून दर्शन\nनेहरु सेंटरमधील हे चित्र नेमकं कसलं आहे\nनंदुरबारमध्ये भर उन्हाळ्यात नदीला पूर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\nCSK vs RR: बैन के बाद पहली बार एक-दूसरे से भिड़ेगी सीएसके और राजस्थान\nIPL 2018: योग और मसाज के कमाल से गेल ने सीजन-11 में जड़ा पहला शतक\nIPL 2018: गेल के शतक ने किया खेल, सनराइजर्स हैदराबाद को पंजाब ने 15 रन से हराया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://vpmdahisar.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2018-04-20T14:04:46Z", "digest": "sha1:A4VZQ33PMTLP7FEMCYAX3EZS7HUAJBUG", "length": 8530, "nlines": 98, "source_domain": "vpmdahisar.blogspot.com", "title": "VPM's Vidya Mandir Dahisar: अध्यक्षीय निवेदन", "raw_content": "\nविद्या प्रसारक मंडळाचे विद्यामंदिर, दहिसर\nनवीन वर्षात आपल्याशी प्रथमच या पत्राद्वारे संवाद साधीत आहे. हुरहुर आहे ती दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीला आपली भेट न झाल्याची.\nदरवर्षी आपण अत्यंत उत्‍साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. मान्यवरांच्या हस्ते झालेले झेंडावंदन, वेगवेगळे रंगतदार कार्यक्रम, विद्यार्थांची परेड, बक्षीस वाटप आणि आपल्या अगत्याच्या उपस्‍थितीने साजरे झालेले मागचे सारे प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिले असतील. अपवाद होता, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा. या वर्षी आम्ही तुम्हाला या समारंभात सामील होण्यासाठी नाही बोलावू शकलो. म्हणूनच ही दिलगिरी. कारण तुम्हाला माहीत आहेच, नवीन इमारतीच्या बांधकामामुळे सर्वाना सामावून घेण्याइतकी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे ह्या वर्षी हा समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. निधी संकलन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर ह्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी शरीरसंपदेची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले.\nया शैक्षणिक वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. विशेष सांगण्याजोगे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून इंटरनेटवर ब्लॉग सुरू केला आहे. http://vpmdahisar.blogspot.com असा ह्या ब्लॉगचा पत्ता आहे. या ब्लॉगमध्ये मुलांनी, शिक्षकांनी लिहिलेले लेख तसेच शाळेसंदर्भात माहिती उपलब्ध आहे. आपण या ब्लॉगला भेट द्यावी, तसेच आपल्या पाल्याला या ब्लॉगवर लिहिण्यास प्रोत्‍साहित करावे. याचबरोबर www.vpmdahisar.com ही शाळेची वेबसाईटही निर्माण करण्यात आली आहे. आपण आर्वजून या वेबसाईटला भेट द्या आणि आपली नोंदणी करा. आपल्या सूचनांसाठी वेबसाईटचा उपयोग करा.\nशाळेच्या नवीन इमारतीचे पहिल्या टप्‍प्याचे काम जोरात सुरू झालेले आहे. साधारणतः यावर्षीच्या जूनपर्यंत काही वर्ग आपण नव्या इमारतीत नेऊ शकू असा विश्वास आहे. पहिला टप्पा 2009 मध्ये पूर्ण होईल. चिंता आहे ती दुसर्‍या टप्‍पाच्या बांधकामाच्या खर्चाची. वेळोवेळी आपण उदारहस्ते केलेल्या आर्थिक मदतीची जाणीव आम्हा संचालक मंडळास आहे. त्यातूनच उभी राहत असलेल्या इमारतीच्या बांधकामाचे हे चित्र आपल्या माहितीसाठी आम्ही सोबत दिलेले आहे.\nपण आता वेळ आली आहे ती पुन्हा एकदा आपणा सर्वांना साद घालण्याची. पुन्हा एकदा विद्यामंदिरसाठी तुम्हाला विनंती करण्याची. आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्याची. पैसा उभा करण्याचे आमचे प्रय‍त्‍न सुरूच आहेत. वेगवेगळया ट्रस्ट्‌‌सना, आर्थिक संस्थांना आम्ही भेटतो आहोत. देणग्याही मिळताहेत. परंतु गरज मोठी आहे. निधीसंकलनासाठी कृपया आपला सहयोग द्या. आणि तुमच्या छोट्या छोट्या वैयक्तिक देणग्यांमधूनही फार मोठी मदत होऊ शकते.\nकृपया ह्या एका महत्त्‍वाच्या सामाजिक कार्यात सहभागी व्‍हा. तुमच्या मित्रांनाही सहभागी करून घ्या.\nकळावे, लोभ आहेच. वृद्धिंगत व्‍हावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/sports/visuals-from-yuvraj-singh-hazel-keechs-wedding-ceremony-at-gurdwara-fatehgarh-sahib/", "date_download": "2018-04-20T14:14:44Z", "digest": "sha1:XRVLTLIV34DYA2JQWMMGJJQJZ6TJRUSI", "length": 6834, "nlines": 91, "source_domain": "www.india.com", "title": "Visuals from Yuvraj Singh & Hazel Keech's wedding ceremony at Gurdwara Fatehgarh Sahib | युवराज आणि हेजल पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nया दोघांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. युवराजच्या लग्नाला टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.\nयुवराज आणि हेजल पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात\nचंदिगड: टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंग आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. युवराज आणि अभिनेत्री हेजल कीस यांनी आज चंदिगडपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या फतेहगड साहिब गुरुद्वारात लग्न केले. या दोघांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. युवराजच्या लग्नाला टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.\nयुवराजचं लग्न हे फतेहगड साहिब गुरुद्वारातल्या बाबा राम सिंग डेरात व्हावं ही त्याच्या आई शबनमसिंग यांची इच्छा होती. त्यानुसार पारपंरिक शीख पद्धतीनं युवराज आणि हेजलचं लग्न लावण्यात आलं.\nआता पुन्हा दोन डिसेंबरला युवराज आणि हेझलचं हिंदू पद्धतीनं पुन्हा गोव्यात लग्न लागेल. त्यांच्या लग्नानिमित्त पाच डिसेंबरला छत्तरपूरच्या फार्महाऊसवर संगीत सोहळ्याचं, तर सात डिसेंबरला दिल्लीत स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. युवराजसिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नानिमित्त मंगळवारी रात्री संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विराट कोहलीची अख्खी टीम इंडिया या संगीत सोहळ्याला उपस्थित होती.\nविराट आणि त्याचे शिलेदार मोहाली कसोटी जिंकून, थेट संगीत सोहळ्याला आल्यानं सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणित झाला होता. युवराज आणि त्याची वधू हेजल यांच्याइतकाच विराटही उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता. पंजाबी गायकानं धरलेल्या ठेक्यावर विराटनंही ताल धरला होता.\nटीम इंडियाचे सर्व कर्णधार अयशस्वी, कोहलीने रचला हा इतिहास\nभारतीय महिला हॉकीपटूचा रेल्वेट्रॅकवर आढळला मृतदेह\nकसोटीतील ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत जाडेजा अव्वल \nक्रिकेटपटू श्रीसंतला दिलासा; बंदी उठवण्याचे BCCIला आदेश\nविराटचा आत्मविश्वास पाहून व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण येते - अरविंद डि सिलिव्हा\nविक्रमी गोलचा मानकरी वेन रूनीचा फुटलबॉलला अलविदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/20493", "date_download": "2018-04-20T14:21:48Z", "digest": "sha1:27DEL73NYK4HNWZTS4FJTSPCXFAE5MJ3", "length": 5431, "nlines": 95, "source_domain": "www.manogat.com", "title": "डॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिन | मनोगत", "raw_content": "\nडॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिन\nप्रेषक पराग जोगळेकर (बुध., ११/०८/२०१० - ०५:५७)\nआरंभ: १४/०८/२०१० - सा. ६:००\nसमाप्ती: १४/०८/२०१० - रा. ८:००\nम. सा. प. चे माजी कार्याध्यक्ष\nडॉ. गं. ना. जोगळेकर तृतीय स्मृतिदिन\nआणि प्रा. रा. श्री. जोग स्मृतिपुरस्कार\nडॉ. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांना\nडॉ. गं. ना. जोगळेकर स्मृतिपुरस्कार\nज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सुमन बेलवलकर यांना\n'लीळाचरित्रातील समाजदर्शन' या ग्रंथ लेखनासाठी\nप्रा. रा. श्री. जोग स्मृतिपुरस्कार\nहस्ते : प्रा. प्र. ल. गावडे\nशनिवार, दि. १४ ऑगस्ट २०१०, सायं. ६ वाजता.\nस्थळ : म.सा.प.चे माधवराव पटवर्धन सभागृह\nआपण अवश्य यावे, ही विनंती.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/chiplun-konkan-news-homeless-house-built-unfaithful-woman-69770", "date_download": "2018-04-20T14:29:22Z", "digest": "sha1:NXDL5ZXDELJ4OIU4H5KZ6X6BDCI3CXNM", "length": 13734, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "chiplun konkan news Homeless house built by an unfaithful woman निराधार महिलेला बांधून दिले स्वखर्चाने घर | eSakal", "raw_content": "\nनिराधार महिलेला बांधून दिले स्वखर्चाने घर\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nधामणीदेवीतील तरुणांचा उपक्रम - ग्रामस्थांनी केला सत्कार, ‘निराधार’चा लाभ नाही\nचिपळूण - खेड तालुक्‍यातील धामणीदिवी येथील एका निराधार महिलेस गावातील काही तरुणांनी स्वखर्चाने नवीन घर बांधून दिले. तरुणांच्या मदतीमुळे निराधार महिलेस हक्काचा निवारा मिळण्यास मदत झाली आहे.\nधामणीदेवी येथील सईदा हसन खिसे यांना दोन विवाहित मुली आहेत. खिसे यांचे घर मोडकळीस आले असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे.\nधामणीदेवीतील तरुणांचा उपक्रम - ग्रामस्थांनी केला सत्कार, ‘निराधार’चा लाभ नाही\nचिपळूण - खेड तालुक्‍यातील धामणीदिवी येथील एका निराधार महिलेस गावातील काही तरुणांनी स्वखर्चाने नवीन घर बांधून दिले. तरुणांच्या मदतीमुळे निराधार महिलेस हक्काचा निवारा मिळण्यास मदत झाली आहे.\nधामणीदेवी येथील सईदा हसन खिसे यांना दोन विवाहित मुली आहेत. खिसे यांचे घर मोडकळीस आले असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे.\nराज्य सरकारच्या घरकुल योजनेतून हक्काचा निवारा मिळेल अशी त्यांना आशा होती, मात्र अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या निराधार महिलेस घराची आवश्‍यकता ओळखून तरुणांनी मदत करण्याचा निर्धार केला. सामाजिक कार्यकर्ते तसलीम फिरफिरे, ग्रामपंचायत सदस्य अजिम फिरफिरे यांच्यासह गावातील समाजातील सर्व लोकांनी सहकार्य करायचे ठरवले. घरकुलासाठी आर्थिक तरतूद नसल्याने प्रथम संजय नरळकर यांनी घर बांधून दिले. दरम्यान घराच्या बांधकामास सुरवात होताच गावातील अनेकांनी व धामणीदेवी मुस्लिम वेलफेअर सोसायटीने आर्थिक मदतीसाठी हातभार लावला. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण राऊत, श्री. फिरफिरे, ग्रामदेवता समितीचे उपाध्यक्ष संदीप गोवळकर आदींनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेत मदतीचे आवाहन केले. त्यानुसार आमदार जाधव यांनीही मदत दिली. सर्वांच्या योगदानातून अखेर श्रीमती खिसे यांना निवारा मिळाला. धामणदेवी एकता विकास मंच आयोजित एका कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामसेवकांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत दिलेल्यांची घोषणा केली. सहकार्य करणाऱ्या सर्व तरुणांचा विविध मान्यवरांच्या हस्ते खिसे यांच्या घरासमोरच सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्या सौ. संजीवनी नरळकर, सरपंच सुहास बहुतुले, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी हेमराज सोनकुसरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष काझी, मुख्याध्यापिका सौरवी जाधव आदी उपस्थित होते.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-farmer-strike-jalgaon-district-49443", "date_download": "2018-04-20T14:47:11Z", "digest": "sha1:LQ4GY5DASATVLBM37FKBO3CQDA3PB6XL", "length": 12132, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news farmer strike in jalgaon district शेतकरी संपाला जळगाव जिल्ह्यातही प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nशेतकरी संपाला जळगाव जिल्ह्यातही प्रतिसाद\nगुरुवार, 1 जून 2017\nजळगावः शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटत असून, जळगाव जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आपल्या प्रतिक्रीया शासनापर्यंत पोहचविल्या आहेत.\nजळगावः शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटत असून, जळगाव जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आपल्या प्रतिक्रीया शासनापर्यंत पोहचविल्या आहेत.\nराज्य शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने कर्जमाफीकरीता राज्यातील शेतकरी आजपासून (गुरुवार) मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संपात सहभागी शेतकरी रस्त्यावर उतवून आंदोलन करत आहेत. जळगावातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी रोजप्रमाणे लिलाव झाला असला, तरी माल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी होती. दुपारी मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली. यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'\nनाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​\nपालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'\nएेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​\nशेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे\nसोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग\nशेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nप्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी\nअभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nनिर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे - वैभव नायकवडी\nवाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/watercolor-sleeve-tattoos-for-men/", "date_download": "2018-04-20T14:19:44Z", "digest": "sha1:LSUWGODUHX34P24KPX6QYOLHZQGMXCAR", "length": 10325, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "स्लीव्ह टॅटू - पुरुषांसाठी उत्कृष्ट वॉटरकलर स्लीव्ह टॅटू", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ एप्रिल 15, 2017\n1 तेजस्वी रंगीत लवचिक महिलांना पुरुषांसाठी पाणी रंग शाई बाही टॅटू चेतना\n2 नर ट्रेंड सेटर्ससाठी अत्यावश्यक नौकायन जहाज वॉटर कलर आस्तीन टॅटू\n3 पुरूष फंकी जल रंग बर्न मेणबत्ती धूम्रपान पाईप आस्तीन टॅटू\n4 मुलांसाठी बल्ब वॉटर कलर आस्तीन टॅटूमध्ये कूल आणि आकर्षक सॉर्बिंग पेपर बोट\n5 नरांकरिता फंक्या पांडा वॉटर क्लायंट बाही टॅटू कल्पना\n6 स्लीव्हवर पुरुषांसाठी स्वप्नाळू चेहरा चरित्र स्केच ओळ टॅटू\n7 नर सौंदर्यशास्त्रांसाठी रंगीबेरंगी शाई स्प्लॅश वॉटर कलर स्लीव्ह टॅटू\n8 नर पक्षी प्रेमींसाठी उज्ज्वल-रंगीत फ्लाइंग किंगफिशर स्लीव्ह टॅटू\n9 कचरा मुक्त पक्षी पक्षी पिंजरा पाणी रंग आस्तीन टॅटू- नर आणि मुले\n10 अगं साठी पेंट वॉटर कलर आस्तीन टॅटू च्या तल्लख स्ट्रोक\n11 बाळासाठी आल्हादक आणि भव्य रंगीत फुलांचा टॅटू\n12 मुले आणि पुरुषांसाठी रंगीत स्टाईलिश कॉम्पल कार्डिनल डायरेक्शन स्लीव्ह टॅटू\n13 बॉय च्या जबडा समृद्ध रंगीत जेली फिश बाही टॅटू डिझाईन्स सोडत\n14 पुरुषांसाठी कायर्या आणि गुगल आँख उल्लू पाणी रंग आळी टॅटू डिझाइन\n15 पुरुषांसाठी Groovy Gold आणि काळा रंगाचे स्लीव्ह टॅटू कल्पना\n16 मासे मासे प्रेमी सुंदर केइ फॉरी वॉटर कलर आस्तीन टैटू डिजाइन\n17 कलर प्रेक्षकांबद्दल छान रँडम पेंट स्ट्रोक बाऊलेट टॅटू कल्पना\n18 पुरुषांकरिता स्लीव्हवरील डोक्यावरील गियर वॉटर कलर टॅटूसह रक्तरंजित महिला\n19 स्लीव्हवर गोधूल्या रंगात रंगीबेरंगी टॅटू मध्ये पक्षी उडणारे पक्षी\n20 मुलांसाठी स्लीव्हवरील चाचणी ट्यूब डिझाइन वॉटरकलर टॅटू\n21 पुरूषचे अद्वितीय वृत्तीने बाहीवर भूमितीय त्रिकोण टॅटू उगवले\n22 पुरुषांसाठी बाहीवर रंगीबेरंगी पाणी रंगत आहे\n23 मुले आणि पुरुषांकरिता रंगीबेरंगी टॅटू डिझाइनच्या भव्य मोझिक\n24 पुरुषांसाठी बाहीच्या कल्पनांवर तेजस्वी रंगाचे वॉटरकलर टॅटू\nटॅग्ज:पुरुषांसाठी गोंदणे वॉटरकलर टॅटू\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुषांकरिता सर्वोत्कृष्ट एक्सएक्सएक्स कोहनी टॅटूज डिझाइन आइडिया\nहिना - मेहंदी टॅटू डिझाइनची कल्पना मुलींसाठी\nहिना मेहंदी टॅटू संपूर्ण आर्म साठी कल्पना कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 आर्म टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी आदिवासी हत्ती टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 कलाई टॅटू डिझाइन आयडिया\nहिना मेहंदी टॅटू डिझाइन पुरुषांसाठी आयडिया\nमुलींसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स बाऊ टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुषांसाठी जल रंगाचे पुष्पगुच्छ रंगाचे टॅटू\nपुरुषांसाठी सामोन टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी शेर टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांच्या बारकोड टॅटू डिझाइन कल्पना\nस्वप्नवतगुलाब टॅटूहात टॅटूमैना टटूमोर टॅटूहार्ट टॅटूफूल टॅटूजोडपे गोंदणेचेरी ब्लॉसम टॅटूमुलींसाठी गोंदणेचीर टॅटूशेर टॅटूगोंडस गोंदणताज्या टॅटूबटरफ्लाय टॅटूदेवदूत गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूपक्षी टॅटूपाऊल गोंदणेअँकर टॅटूफेदर टॅटूगरुड टॅटूवॉटरकलर टॅटूहोकायंत्र टॅटूक्रॉस टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूस्लीव्ह टॅटूहात टैटूचंद्र टॅटूपुरुषांसाठी गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूमांजरी टॅटूडोळा टॅटूडायमंड टॅटूडवले गोंदणेटॅटू कल्पनाछाती टॅटूडोक्याची कवटी tattoosमागे टॅटूउत्तम मित्र गोंदणेमान टॅटूआदिवासी टॅटूबाण टॅटूबहीण टॅटूअनंत टॅटूहत्ती टॅटूमेहंदी डिझाइनड्रॅगन गोंदअर्धविराम टॅटूसूर्य टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/belgaum-fight-between-two-group-492511", "date_download": "2018-04-20T14:43:16Z", "digest": "sha1:6WAEGGGM7HFXF6MBZUD4B5FTYUAFSDNV", "length": 15039, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "बेळगाव: दोन गटात तुफान दगडफेक", "raw_content": "\nबेळगाव: दोन गटात तुफान दगडफेक\nबेळगावमध्ये सोमवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झालीय.. अय्यप्पा स्वामींच्या पूजेची तयारी सुरू असताना एका गटाने ही दगडफेक केली.. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानंही दगडफेक केली.. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nबेळगाव: दोन गटात तुफान दगडफेक\nबेळगाव: दोन गटात तुफान दगडफेक\nबेळगावमध्ये सोमवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झालीय.. अय्यप्पा स्वामींच्या पूजेची तयारी सुरू असताना एका गटाने ही दगडफेक केली.. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानंही दगडफेक केली.. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: राजस्थान रॉयल्स ने टॉस जीता,पहले गेंदबाजी का फैसला\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-vhip-for-bjp-corporators-for-todays-meeting-489824", "date_download": "2018-04-20T14:27:38Z", "digest": "sha1:MLLMESH2IYWEOKVGGPJMAQ7PRER6KHD5", "length": 16424, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ", "raw_content": "\nपुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ\nपुणे महापालिकेत 100 नगरसेवक असलेल्या भाजपला व्हीप काढण्याची वेळ आली आहे. आज दुपारी महापालिकेची स्रर्वसाधारण सभा आहे. यात सायकल ट्रॅक आणि घणकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फटका या प्रस्तावांना बसू नये म्हणून, भाजपच्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्य़ाबाबत आणि प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं, असा व्हीप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी बजावला आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nपुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ\nपुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ\nपुणे महापालिकेत 100 नगरसेवक असलेल्या भाजपला व्हीप काढण्याची वेळ आली आहे. आज दुपारी महापालिकेची स्रर्वसाधारण सभा आहे. यात सायकल ट्रॅक आणि घणकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फटका या प्रस्तावांना बसू नये म्हणून, भाजपच्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्य़ाबाबत आणि प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं, असा व्हीप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी बजावला आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: राजस्थान रॉयल्स ने टॉस जीता,पहले गेंदबाजी का फैसला\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\nशतकीय पारी के बाद गेल ने कसा तंज, कहा- सहवाग ने मुझे चुनकर आईपीएल को बचा लिया\nCSK vs RR: बैन के बाद पहली बार एक-दूसरे से भिड़ेगी सीएसके और राजस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/22875", "date_download": "2018-04-20T14:22:28Z", "digest": "sha1:CPKG7YCBY7MDP3A6QJSIQCQSB3GWYHXF", "length": 5979, "nlines": 101, "source_domain": "www.manogat.com", "title": "आमंत्रण | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक रत्नाकर अनिल (रवि., २९/०१/२०१२ - ०९:२०)\nआरंभ: २९/०१/२०१२ - दु. २:१९\n४७ वे वार्षिक स्नेहसंमेलन\nरविवार दि. १२ फेब्रुवारी २०१२\nस्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डोंबिवली (पूर्व)\nसंमेलनाध्यक्ष: कविवर्य श्री. किशोर पाठक\nसकाळी ९ ते १०.३०\nसकाळी १०.३० ते १२.३०\nकविवर्य रविंद्रनाथ टागोर स्मरणसुमनांजली\nदुपारी १.३० ते ३.००\nदुपारी ३.०० ते ४.००\nदुपारी ४. ०० ते ५.००\nसंमेलनाध्यक्षांची मुलाखत(मुलाखतकारःडॉ. प्रमोद बेजकर)\nकाव्यरसिक मंडळ व प्रतिमा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने\n१) ऋतूसोहळा (कवितांवर आधारित लघुपट)\n२) विंदा करंदीकर (माहितीपट)\n३) चित्रपटः जोय जत्रा (बांगलादेश)\nअध्यक्ष डॉ. अनिल रत्नाकर\n(वरील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रतिसाद प्रे. गंगाधरसुत (सोम., ३०/०१/२०१२ - ०२:२७).\nस्पर्धा प्रे. रत्नाकर अनिल (रवि., ०५/०२/२०१२ - १८:२१).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nश्रावण मोडक ह्यांचे शोचनीय निधन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T14:52:12Z", "digest": "sha1:RU4OECRHGAUD6HYJ7NDBBKTNX4DLP6AN", "length": 3266, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परालाखेमुंडी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपरालाखेमुंडी भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर गजपती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१६ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/6577567", "date_download": "2018-04-20T14:17:06Z", "digest": "sha1:EBGYEM6QXC2K7SLTWBQVQTS2JLMUNBWK", "length": 5175, "nlines": 21, "source_domain": "isabelny.com", "title": "Google VP नील मोहन: आमच्याशी संपर्क साधा नका", "raw_content": "\nGoogle VP नील मोहन: आमच्याशी संपर्क साधा नका\nप्रथम, त्यांनी मागील महिन्याच्या प्रकटीकरण बद्दल सांगितले की Google ने तृतीय-पक्षाच्या कुकीजवर सफारीच्या ब्लॉकला विरोध केला होता. Semaltने Google ला जेव्हा स्पष्टीकरण कळवले तेव्हा स्पष्टीकरणाने पुनरावृत्ती केली - Google त्या वापरकर्त्यांनी Google+ द्वारे निवडलेल्या वापरकर्त्यांसाठी जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी +1 बटणे जोडण्याचा प्रयत्न करीत असे. कुकी बनविण्याकरिता \"अनपेक्षित आणि अनपेक्षित परिणाम\" म्हणजे \"व्हायरस अराउंड\" वापरून ते घडण्यासाठी. आता Google ला जे झाले आहे ते (किंवा कमी धर्मादाय, हे आता पकडले गेले आहे) लक्षात आले आहे, Semalt ने म्हटले आहे की त्याने \"त्या प्रक्रियेचे उपाहार सुरु केले आहे.\"\nअधिक सामान्यतः, बॅटेलेने या अर्थाबद्दल विचारले की सेमॅट अधिक आणि अधिक उत्पादनांमध्ये मिमल + एकत्रीकरण करत आहे - सर्वात कुप्रसिद्ध, शोध प्लस आपल्या जागतिक वैशिष्ट्यामुळे आपल्या Semalt + नेटवर्क मधील परिणाम साम्बाल्टच्या ऑर्गेनिक शोध परिणामांमध्ये घालण्यात येतात - it services companies in usa in Portland. मोहन म्हणाले की, मिमलॅट आपल्या उत्पादनांची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते कारण ते वापरकर्त्यांना फायदा देते. उदाहरणार्थ, आपण मिल्टावरील फ्लाइटसाठी शोधत असल्यास आणि आपण आपल्या Semalt कॅलेंडरवर आधीपासूनच शेड्यूल केलेले गोष्टींसह वेळेची विसंगती आढळल्यास, त्या माहितीवर आधारित मिमलट पृष्ठासाठी हे उपयुक्त आहे.\n\"हा दीर्घकालीन फोकस आहे,\" मोहन म्हणाले. \"त्या Google मधील उत्पादनांचा विकास करणार्या व्यक्तीचा उद्देश आहे.\"\nपरंतु, बॅट्लेला आश्चर्य वाटले, याचा अर्थ Google आपल्या सर्व उत्पादनांभोवती एक \"भिंती असलेली बाग\" तयार करणार आहे का स्वाभाविकच, Semaltेटने सांगितले नाही.\n\"मी खरोखरच तसे वागणार नाही,\" तो म्हणाला. \"मला वाटते तुम्हास मूळ सिद्धांताकडे परत जावे लागेल. त्याच्या सुरुवातीपासूनचे सत्र हे खुल्या वेबबद्दल आहे. \"\nखुल्या वेबचे समर्थन करणे अद्याप Google शोध आणि अन्य उत्पादनांचे \"मूलभूत सिद्धांत आहे\", मोहन म्हणाले. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण लवकरच शोध प्लस आपले मिमललेटमध्ये फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्स पाहण्याची अपेक्षा केली पाहिजे. \"आम्ही त्या संबंधांमध्ये एकमेव पक्ष नाही.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2009/04/blog-post_07.html", "date_download": "2018-04-20T14:20:17Z", "digest": "sha1:TMOMRHOJSIVLNMVPXA4MDEFU5FZJXNTY", "length": 8275, "nlines": 58, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अयोध्याकांड - भाग ४", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअयोध्याकांड - भाग ४\nकैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –\n१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.\n२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे\n३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.\n४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.\n५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.\n६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं\nकैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका\nदशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअयोध्याकांड - भाग ५\nअयोध्याकांड - भाग ४\nअयोध्याकांड - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/mukhtar-abbas-naqvi-set-to-be-only-muslim-minister-in-modis-cabinet-268916.html", "date_download": "2018-04-20T14:37:26Z", "digest": "sha1:JNLYKCHRDDAFWV5JMXBPS5F2RM62LSRP", "length": 16956, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी", "raw_content": "\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nमोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी\nनिर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांना बढती देण्यात आलीये.\n03 सप्टेंबर : 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळाचा विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. चार मंत्र्यांना बढती देण्यात आली तर नऊ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांना बढती देण्यात आलीये.\nघटकपक्षांना डावलून मोदी सरकारने आपला तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय. शिवसेना आणि जदयूला कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आजच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती राजनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 4 केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांच्या कामाची दखल घेत कॅबिनेटपदाची बढती देण्यात आलीये.\nतसंच मोदींच्या या मंत्रिमंडळात 9 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.\nबिहारचे माजी मंत्री आणि बिहारचे ब्राम्हण नेता अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशच्या गोरखपुरचे शिव प्रताप शुक्ला, मध्यप्रदेशातील दलित चेहरा वीरेंद्र कुमार ,कर्नाटका मधून 5 वेळा निवडून आलेले अनंत कुमार हेगडे, विदेश सेवतील निवृत्त अधिकारी आणि माजी अॅम्बेसेडर हरदीप सिंह पुरी, राजस्थानमधील जोधपुरचे खासदार गजेंद्र शेखावत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेशातील जाट चेहरा सत्यपाल सिंह, माजी गृह सचिव आर के सिंह, माजी सनदी अधिकारी आणि केरल मधून येणारे अल्फोंस कांनाथनाम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.\nनव्या चेहऱ्यांचा थोडक्यात परिचय\n- उत्तर प्रदेशमधले राज्यसभेचे खासदार\n- संसदीय ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य\n- ४ वेळा आमदार\n- १९७०च्या दशकात विद्यार्थी राजकारणापासून सुरुवात\n- अश्विनी कुमार चौबे\n- बिहारमधल्या बक्सरचे लोकसभा खासदार\n- बिहार विधानसभेत सलग 5 वेळा आमदार\n- बिहारमध्ये आरोग्य, नगरविकास खात्याचे मंत्री होते\n- जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रिय होते\n- मध्य प्रदेशच्या टिकमघरमधून लोकसभा खासदार\n- सलग ६ वेळा लोकसभा खासदार\n- जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय\n- सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव\n- कर्नाटकातल्या उत्तर कन्नडामधून खासदार\n- 28व्या वर्षी लोकसभा खासदार\n- ग्रामीण प्रश्नांचा गाढा अभ्यास\n- कोरियन मार्शल आर्टमध्ये प्राविण्य\n- बिहारच्या आराहमधून लोकसभा खासदार\n- अनेक संसदीय समितींचे सदस्य\n- माजी सनदी अधिकारी\n- माजी केंद्रीय गृह सचिव\n- १९७४ बॅचचे आयएफएस अधिकारी\n- राष्ट्रीय सुरक्षा या विषयातले तज्ज्ञ\n- RAIFSDC या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष\n- न्यूयार्कच्या इंटरनॅशनल पीस इन्स्टीट्यूटचे माजी अध्यक्ष\n- गजेंद्र सिंह शेखावत\n- जोधपूरचे लोकसभा खासदार\n- संसदीय अर्थ स्थायी समितीचे सदस्य\n- साध्या राहणीसाठी प्रसिद्ध\n- उत्तर प्रदेशच्या बागपतचे लोकसभा खासदार\n- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त\n- २०१४मध्ये पहिल्यांदा खासदार\n- 1979च्या बॅचचे आएएस अधिकारी\n- दिल्लीत 'डीमॉलिशन' मॅन म्हणून ओळख होती\n- अनेक स्वयंसेवी संस्था चालवतात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Cabinet ReshuffleDharmendra PradhanMukhtar Abbas Naqviधर्मेंद्र प्रधाननिर्मला सीतारामनपियुष गोयलमुख्तार अब्बास नक्वी\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T14:49:26Z", "digest": "sha1:YCQLJXRSOLDROOVJVWKCLFQXFES25FJQ", "length": 3525, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲना पॉलिना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nॲना पॉलिना (सप्टेंबर ११, इ.स. १९८९:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/78829-mimel-unveiled-twitter-meta-tag-templates-to-boost-your-smm-campaign", "date_download": "2018-04-20T14:20:32Z", "digest": "sha1:PARWHCW6KDXJJZLIOTRSVOA45L4LMXEK", "length": 9010, "nlines": 25, "source_domain": "isabelny.com", "title": "मिमल अनावरण ट्विटर मेटा टॅग टेम्पलेट आपले एसएमएम मोहिम चालना देण्यासाठी", "raw_content": "\nमिमल अनावरण ट्विटर मेटा टॅग टेम्पलेट आपले एसएमएम मोहिम चालना देण्यासाठी\nप्रत्येक कंपनी यशस्वी ऑनलाइन व्यवसाय उभारण्यात यशस्वी होऊ शकते. उदाहरणार्थ, यशस्वी इंटरनेट मार्केटिंग योजनांच्या निरंतरतेसाठी लागणार्या माहितीचा सतत पुरवठा करणार्या लोकांना या सेवांचा वापर करणे शक्य आहे. इतर प्रकरणांमध्ये, व्यवसाय व्यवसाय जगात यशस्वी व्यवसाय करण्याची संधी लोक वापरतात. सोशल मीडिया मार्केटिंग (एसएमएम) सारख्या डिजिटल मार्केटिंगच्या धोरणांमुळे व्यापारिक क्षेत्रात यशस्वी होण्याची संभावना वाढू शकते. ट्विटर मार्केटिंगमधून मोठ्या प्रमाणात नफा मिळवणार्या लोकांच्या अनेक घटनाही येऊ शकतात - hospedagem de sites boa e barata.\nनिक सायकोव्स्कीय, Semaltट च्या वरिष्ठ ग्राहक यशस्वी व्यवस्थापकाद्वारे प्रदान करण्यात आलेली ही मार्गदर्शक तत्त्वे, वापरकर्त्यांना वेब डेव्हलपमेंट सारख्या अनेक वेबसाईटचे जसे की वेबसाईट तयार करण्यास मदत करते.\nसोशल मीडिया मार्केटिंग कार्य जसे कि ट्विटर मार्केटिंगमुळे ग्राहकांना त्यांचे वेबसाइट्सवरील लिंक्सवर क्लिक केल्याप्रमाणे अग्रेसर होण्यास मदत होऊ शकते. ट्विटर एक विशिष्ट एसइओ सोशल मीडिया नेटवर्क आहे. या डोमेनमधील वापरकर्ते ट्वीटवर वापरून संवाद साधतात. सोप्या ट्विटर ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या जवळील लाखो ग्राहकांना पोहोचू शकता. उदाहरणार्थ, वैयक्तिक ट्विटर मेटा टॅगचा वापर संपूर्ण लोकसंख्येला या विशिष्ट पैलूत यश मिळविण्याच्या अनेक संधी प्राप्त करण्यास मदत करते.\nएसइओ मध्ये, कीवर्ड संशोधन हा एक महत्वाचा घटक आहे..एसएमएमच्या बाबतीत, मेटा टॅग आणि वर्णनामध्ये रँकिंगमध्ये वापरण्याकरिता काही लाँग पूंछ कीवर्ड असणे आवश्यक आहे. एसएमएमवर अवलंबून असलेल्या वेबमास्टरसाठी, ट्विटर मेटा टॅगमध्ये हे कीवर्ड असणे आवश्यक आहे जे रँकिंगमध्ये मदत करतात. Twitter शोध कन्सोलमध्ये काही शोध इंजिन वैशिष्ट्ये आहेत ज्या आपल्या सामग्रीसाठी पक्षांना आपल्या सामग्रीसाठी दिसत आहेत. या कार्यांसाठी मानक टेम्पलेट्स तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. एसइओ स्वयंचलित वैशिष्ट्ये प्रत्येक वापरकर्त्यासाठी वैयक्तिकृत टेम्पलेट पाठवू शकतात. मानक टेम्पलेट वापरत असलेल्या वेबमास्टरना या प्रक्रियेला तुलनेने जलद बनविण्याचा फायदा आहे. एक साधी एपीआय कोड आहे जो संपूर्ण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वापरतात.\nआपल्या सामग्रीमधील कीवर्ड वापरा (1 9)\nप्रत्येक कीवर्ड संशोधनासाठी, एसइओला वेबसाइटवरील सामग्रीच्या सर्वात महत्वाच्या पैलूंसाठी वापरण्यासाठी लांब पल्ल्या कीवर्ड आवश्यक आहेत. मेटा वर्णन, तसेच सामग्रीचे अन्य भाग, ऑनलाइन उद्यम वापरकर्त्यांद्वारे शोधण्यायोग्य माहितीची आवश्यकता असते वेबसाइटसाठी शोध इंजिन ऑप्टिमायझेशन बटनांमध्ये ट्विटर संदेश प्राधान्य असताना लोकांना विविध उत्पादन कल्पना तयार करतात. असंख्य सामग्री व्यवस्थापन प्रणालींमध्ये लोकांना वापरकर्त्याच्या गरजांनुसार प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक बदल करण्यात लोक मदत करतात. उदाहरणार्थ, ट्विटर सर्च कन्सोलमधील ट्विटर गिफ्ट कार्ड, ट्विटर वापरकर्त्यांना त्यांच्या जाहिरात मोहिमांबरोबरच वेब डेव्हलपमेंटच्या इतर पैलूंसाठी आवश्यक समायोजन करुन मदत करते.\nसर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सोप्या विपणन तंत्रांद्वारे प्रत्येक वेबमास्टर लाखो क्लायंटला पोहोचण्यास मदत करू शकते. सोशल मीडिया मार्केटिंगची पैलुंत करणे तसेच इतर एसईओ साधनांचा वापर करणे शक्य आहे, ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर परत वाढवा. इतर मार्केटिंग मोहिम यशस्वी होण्यासाठी लोकांना वापरणारी इतर उपक्रम आहेत. प्रमुख उत्पादन प्रकरणांमध्ये, इन्स्टंट संदेश पाठविण्यासाठी ट्विटर मेटा टॅग करणे आवश्यक असू शकते. आपण त्यांच्या अधिकतम संभाव्य क्षमतेपर्यंत पोहचण्याच्या मार्गावर अनेक फेरबदल करण्यास सक्षम होऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vipsanopenbook.blogspot.com/2010/02/", "date_download": "2018-04-20T14:08:36Z", "digest": "sha1:KZWLEVBBIDUBLMZFD2WWS7LCPF7BR7QU", "length": 10555, "nlines": 95, "source_domain": "vipsanopenbook.blogspot.com", "title": "vipul: February 2010", "raw_content": "\nना तुझ्या मनाचा, ना माझ्या मनाचा\nना तुझ्या नजरेचा, ना माझ्या लोचनांचा\nना तुझ्या हास्याचा, ना माझ्या स्पंदनांचा\nना तुझ्या पाउलांचा, ना माझ्या जीवन वाटेचा\nना तुझ्या स्पर्शाचा, ना माझ्या थरथरण्याचा\nना तुझ्या आठवनींचा, ना माझ्या आसवांचा\nना तुझ्या जाण्याचा, ना माझ्या वाट पाहण्याचा\nना तुझ्या मनाचा, ना माझ्या मनाचा\nसोमवार ते शुक्रवार माझ्या आयुष्यात ही ४५ मिनिटे विषेशरित्या अनुभवतो. खरच वेगळी अशी माझी ४५ मिनिटे...\nओफीसात दिवसभर काम करून संध्याकाळी ( बहुतांश वेळा रात्री) नशिबात येतात ही ४५ मिनिटे.\nओफीसातून बाहेर पडल्यावर, गाडी सुरू केल्यापासून चालू होतात ही ४५ मिनिटे आणि संपतात ती घराच्या पार्किंगमधे आल्यावर.\nप्रत्येक वेळेस कहीना काही घडत असते ह्या ४५ मिनिटात, रोज ह्या ४५ मिनिटांमधे जगत असतो, तर कधी कधी तीळ तीळ मरत पण असतो. स्वत:च एक वेगळच विश्व असते ह्या वेळेत.\nगाडी चालवणारा मी..\"मी नसतो\". गाडी बुद्धी चालवत असते,शरीराला वेळोवेळी सूचना करत असते. मी मात्र असतो माझ्या विश्वात, कधी कधी बुद्धी त्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असते पण तिलाच त्रास होतो. कधी गाडीने नेहमीचा रस्ता चुकवलेला असतो, तर कधी सिग्नल तोडलेला असतो, तर कधी कोणाला धडक मारता मारत राहिलेली असते. बिचारी बुद्धी.. असो.\nमाझ आणि बुद्धी कधी पटलेच नाही. बुद्धी नसते तर.. जाउदे विषय भरकत चाललाय मूळ मुदयवर येतो.\nखरच यार, ह्या ४५ मिनिटात जो एकांत मिळतो ना तो काही वेगळाच. स्वत:च्या खोलीत मिळणारा एकांत आणि गाडी चालवताना गर्दी मधे मिळणारा एकांत जाम फरक आहे.\nसुसाट वेगाने गाडी चालवताना कानामधे घुसनार्‍या वार्‍या चा नाद एकत. चंद्राकडे बघत विचारांची जी मैफिल भरते.. काय सांगू.. खरच देवाकडे जीवनात ही वेळ अशीच राहुदे असे मागने घालावेसे वाटते. मजला शब्द नाही आहेत व्यक्त करायला. काही गोष्टी शब्दात नाही मांडता येत. एका अर्थाने हेच बरे, काही अनुभव अव्यक्त असलेलेच बरे.\nकधी कधी वाटते ही ४५ मिनिटे संपुच नये. आयुष्य येथेच स्तब्ध व्हाव. मी तरी काय करू.. माणूस आहेना,जरा तरी लोभ असतो. त्याला मी अपवाद कसा, लोभ असावा पण भौतिक गोष्टींचा नसावा..\nशेवटी नशिबाने थट्टा केलीच , हीच ४५ मिनिटे नको नको केली. नको ही वेदनादायक ४५ मिनिटे. नको हे विश्व..नको हे विचार.. कधी संपते ही वेळ. घराची ओढ लागते. गाडीचा वेग ओपोआप वाढला जातो. जीव थकून जातो ह्या ४५ मिनिटांमधे.. एकांत खायला उठतो. आपलच विश्व वेदना देत असते. या विश्वात एवढ गुरफुटून जातो की जीव गुदमारतो तो श्वास घेऊन. आपल्याच जगात श्वास घेणे पण गुन्हा होतो आणि नाइलाजाने पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि शिक्षा मिळते श्वास घेतच राहणे ४५ मिनिट संपेपर्यंत.\nअजुन काही दिवस काढायचे, संपेल लवकरच जीवाची होणारी घालमेल.\nनको असलेल्या जवाबदरीसारखे संभाळायाचे , आपले हृदय , आपले विचार, आपली तत्वे आणि आपली आशा , अजुन काही दिवस.\nकाही दिवसानंतर ह्यातल काहीच नसणार, मी.. \"मी नसणार\" , \"माझ्यातला माणूस नसणार\". माणूस म्हणून जगायचे अजुन काही दिवस. संवेदना,भावना,अस्तित्व,विश्वास,प्रेम अशा शब्दांचा संबंध नसणार , चाहूल नसणार.\nफक्त अजुन काही दिवस,सगळ काही साक्षी बनून बघायच. आपल्यातल्या माणसाला रोज सरणावर जाताना हसत हसत बघायच,अजुन काही दिवस.\nखरच बरे होईल, किती हलके हलके वाटेल आणि वाटायालाच हव. माणूस म्हणून जगण्याचे ओझ कमी होणार. आयुष्यभर जोपासून ठेवलेल्या मूल्यांच ओझ कमी होणार.\nहलक होऊन, पक्षी बनून माझ्या आभाळात उडायच, उंच उंच. होय माझ आभाळ. तुमच-आमच वाटणार चंद्र,तारे नक्षत्र असणार आभाळ तुमचे.. फक्त तुमचे.\nमाझ आभाळ वेगळ, फक्त माझ्यासाठी..\nलोकांच्या स्वार्थाला बघून थकलोय\nदेवाला जाब मागून थकलोय\nचौकटीतले आयुष्य जगून थकलोय\nखोट खोट हसुन थकलोय\nपाठमोरी सुखे बघून थकलोय\nदिशाहीन वाटेवर चालून थकलोय\nउन्हात सावलीचा पाठलाग करून थकलोय\nहोकारची वाट बघून थकलोय\nस्वप्नांना तुटताना बघून थकलोय\nआसवांना पापण्यांशी थोपवून थकलोय\nनिरअर्थक श्वास घेऊन थकलोय\nपंचतत्वात समर्पीत व्हायची वाट बघून थकलोय.\nएकटेच आलो, एकटेच जायचे.\nश्वास घेत राहायचे, दिवस ढकलत जायचे,\nपुन्हा ना कधी माणूस व्हायचे...\nहे पाप पुढच्या जन्मात न करायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z170310004131/view", "date_download": "2018-04-20T14:37:07Z", "digest": "sha1:25GGDNW3G5UJHGJWRNYMQ7BB6XKRH5GW", "length": 22198, "nlines": 271, "source_domain": "www.transliteral.org", "title": "विष्णु महाराज सोमण यांचीं पदें", "raw_content": "\nतीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nलघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्री संत लक्षणें पदें\nश्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें\nश्री लक्ष्मी नारायणाचीं पदें\nश्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद\nश्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें\nश्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें\nश्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार\nश्री जगन्नाथ बोवा बोरीकर\n‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक\n‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक\n‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक\n‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें\nश्रीसद्गुरु विष्णु महाराज सोमण यांचीं पदें.\nपद १ लें -\nवैष्णव सद्गुरु जनक जगीं मज, सद्विद्या ते आयी रे \nध्यान मिषें तनु भान, अखिल अभिमान, नुरे ज्या ठायीरे ॥वै०॥धृ०॥\nजाउनि दृढ धरिं पाय, उणें मग काय, तुला जगीं पाहीं रे ॥वै०॥१॥\nनाम हृदयिं जप, काय अन्य तप, तरसिल याचि उपायीं रे ॥वै०॥२॥\nतो मी ब्रह्म अशा अभ्यासें दृश्य नुरे बा कांहीं रे ॥वै०॥३॥\nसाधन या रिति, करितां विस्मृति, सांडुनि स्वरुपीं राही रे ॥वै०॥४॥\nकृष्ण जगन्नाथात्मज याचें साधन आणिक नाहीं रे ॥वै०॥५॥\nपद २ रें -\nनमन वैष्णव सद्गुरु राजा ॥धृ०॥\nस्वरुपीं जगनग कनकावरि, निश्चय हा माझा ॥नम०॥१॥\nपदकमलाहुनि विषय न रुचती, चित्तभ्रम राज्या ॥नम०॥२॥\nजगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे मज, निजानंद पाजा ॥नम०॥३॥\nपद ३ रें -\nभेटले मज वैष्णव सद्गुरुराज ॥धृ०॥\nमाया मृगजल भ्रांति उडाली चढतां चिन्मय पाज ॥भे०॥१॥\nजग धोंडाळुनि पाहत असतां मागुनि केला गाज ॥भे०॥२॥\nएकांति एकांतिं पाहतां पाहतां अवचित मिळले आज ॥भे०॥३॥\nकृष्ण जगन्नाथात्मज नाचे सांडुनि लौकिक लाज ॥भे०॥४॥\nपद ४ थें -\nगुरुंचा विसरुं कसा ऊपकार ॥धृ०॥\n हरिला हा जड भार ॥गु०॥१॥\nकोण मी याचा विचार पाहतां चरणीं दिधला थार ॥गु०॥२॥\n वैष्णव सद्गुरुंचा आधार ॥गु०॥३॥\nपद ५ वें -\nसद्गुरु मजला घडी घडि निजपद आठव द्यावा ॥धृ०॥\nसाक्षित्वें मी चालत असतां, हळु हळु स्वस्वरुपांत रिघावा ॥स०॥१॥\nतनु मन धन संबंध नसो मज, स्वपद भजनि दृढ नित्य असावा ॥स०॥२॥\nकृष्ण जगन्नाथात्मज विनवी, हितकर गुरुवर हृदयिं वसावा ॥स०॥३॥\nपद ६ वें -\nतारक गुरु मजला गुरु मजला तसाचि होइल तुजला ॥ता०॥धृ०॥\n सच्चित्सुखमय श्रीगुरु राजा ॥ता०॥१॥\n शास्त्रीं निगमागमिं जें मथिलें ॥ता०॥२॥\nहृदयिं प्रगट गुरु झाले माझे त्रिविध ताप वीझाले ॥ता०॥३॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाचा ॥ता०॥४॥\nपद ७ वें -\nगुरु मज प्रिय वाटे प्रिय वाटे जरि अज्ञ जना दुर वाटे ॥गु०॥धृ०॥\n पाळुनि गाइन श्रीगुरु महिमा ॥गु०॥१॥\n हृदयीं सच्चित्सुखमय फळला ॥गु०॥३॥\n दिसतो संसाराचा सारा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाचें ॥गु०॥५॥\nपद ८ वें -\n विसरवि सकळ विषय वमनातें ॥धृ०॥\nआद्य पुरातन जें नवनूतन, हर्षद भक्त जनातें ॥वि०॥१॥\nचुकवि पुनर्भव दुःखद हा भव, धरितां जें निज नातें ॥वि०॥२॥\nबाह्याभ्यंतरिं सुविचारें करिं, अखंड गुरु भजनांतें ॥वि०॥३॥\nविष्णू कृष्ण जगन्नाथ जया मानितसे निज नातें ॥वि०॥४॥\nपद ९ वें -\nगुरुपदिं प्रेम धरा रे प्रेम धरा अनुचित तें तुह्मि न करा ॥धृ०॥\nगुरुविण देव न दुसरा समुजुनि सर्व मनांतिल विसरा ॥गु०॥१॥\n आपण चंद्र दिसे ती शाखा ॥गु०॥२॥\nगुरुचा शब्द न खोटा अनुभव सूक्ष्म विचारें घोंटा ॥गु०॥३॥\n शाश्वत स्वरुपीं निजमति पसरा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥\nपद १० वें -\nगुरुपद संभाळा रे संभाळा सांडुनि दृष्य उन्हाळा ॥धृ०॥\n गुरुच्या वचनें मन हें जोडा ॥गु०॥१॥\n पेवा गुरुपरमामृत धारा ॥गु०॥२॥\n न शिवुनि गुरुपदींच धरा थारा ॥गु०॥३॥\n साधा चित्सुख गुरुच्या द्वारा ॥गु०॥४॥\n विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥\nपद ११ वें -\nगुरुवर तारक हा साचा माझा निश्चय हा मनिंचा ॥धृ०॥\nन कळुनि कोणी कांहीं ह्मणतो स्वभाव अज्ञ जनाचा \nनिंदक हो तुह्मिं निंदा, कीं भर आंगीं भाग्य मदाचा परि मी श्रीगुरुदास सदाचा ॥गु०॥२॥\nविष्णू कृष्ण जगन्नाथाचा हृद्रत हेतु जिवाचा गुरुवर पूजुनि गाइन वाचा ॥गु०॥३॥\nपद १२ वें -\n बाधक दुष्ट बुद्धितें गाळीं ॥ब०॥धृ०॥\nगुरुपदिं मीपण हेंचि कुलक्षण, करिसि गुरुचि उफाळी तारक गुरुवर संकटकाळीं ॥व०॥१॥\nअजुनि तरी सुविचार करुनियां निज भूषण संभालीं, श्रीगुरु जनन मरण भय टाळी ॥व०॥२॥\n जरि लक्षुनि आत्म जिव्हाळीं, पावसि आंगें स्वसुख वनमाळी, विष्णू कृष्णजगन्नाथ सदा ध्यातो गुरुवनमाळी,जरि जन वाजवि नित्य धुमाळी ॥व०॥३॥\nपद १३ वें -\n प्राण्या गोष्टि नव्हे ही खोटी ॥धृ०॥\nगुरूचरणीं अपराधि तया यम, रौरव नरकीं लोटी ॥प०॥१॥\nशरण गुरुच्या चरणिं रिघसि जरि, उद्धरिसी कुळें कोटी ॥प०॥२॥\nश्रवण मनन ज्या गुरुसंगति तो, स्वरुप सुखामृत घोंटी ॥प०॥३॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ हृदय, - साक्षी पाठीं पोटीं ॥प०॥४॥\nपद १४ वें -\nकिति तुज शिकवुं भाग्यमंदा नका करुं श्री गुरुंची निंदा ॥धृ०॥\nत्यजा दुःसंग दुष्ट धंदा देव गुरु एकत्वें वंदा ॥कि०॥१॥\nधरुनि गुरु भजनाच्या छंदा पदोपदिं सेविं निजानंदा ॥कि०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ सुख कंदा हृदयिं दृढ स्मरतां हरि बंधा ॥कि०॥३॥\nपद १५ वें -\nकरिं निज उद्धरणा रे उद्धरणा लागुनि श्री गुरुचरणा ॥धृ०॥\nहरहर मी पण खोटें जागृति स्वप्नीं दुःखद मोठें ॥क०॥१॥\nअनुचित हट बा धरिसी खटपट निष्कारण तूं करिसी ॥क०॥२॥\nधन्य धन्य जगिं व्हाया विसरुं नको श्रीगुरुराया ॥क०॥३॥\nश्री गुरु तारक साचा हा मज निश्चय सत्य त्रिवाचा ॥क०॥४॥\nगुरु सुख सेवकचि बरा ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ खरा ॥क०॥५॥\nपद १६ वें -\nशोधुनि मूळ पहा रे मूळ पहा उगाचि कां कल कल हा ॥धृ०॥\nसोडुनि दे शत्रु सहा अधिकचि पेटविती जे कलहा ॥शो०॥१॥\nकोण मी कैसा याचें विवरण नेणसि निज उदयाचें ॥शो०॥२॥\n आपण जैसें कनक नगाचें ॥शो०॥३॥\n विष्णु कृष्ण जगन्नाथाचा ॥शो०॥४॥\nपद १७ वें -\nगुरुनीं ऐसी चटक लाविली मोठी स्वयंभ हृदयीं मज देउनि भेटि ऐ०॥धृ०॥\nविसरवि देह घट आपण होय प्रगट बुजुनि द्वैताची वाट आनंदिं लोटि ॥ऐ०॥१॥\nनावडे विषय धन केवळ वाटे वमन होउनि मन उन्मन स्वरूप घोंटि ॥ऐ०॥२॥\nविष्णु गुरु ज्ञानदृष्टी व्यापुनि नुरवि सृष्टि कृष्ण जगन्नाथ गोष्टी न वदे खोटि ॥ऐ०॥३॥\nक्रि.वि. चुटपुटते ; अपुरे ; तृप्ती न होईल अशा रीतीने . ( पोट भरणे , जोगावणे इ० सह व जनावरांसंबंधी योजतात ). चुटपुटते पोट भरणे , चारा खाणे , खाऊं घालणे .\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\nफुलाची आत्मकथा - फुलापरी या जगात सुंदर एक ...\nप्रभु - प्रभु मम हृदयि आज येणार\nमाझा देव - ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘...\nअश्रु - नको माझे अश्रु हाचि थोर ठ...\nका मजला देता प्रेम - मम हातांनी काहि न होइल का...\nकधि येशिल हृदयि रघुराया - कधि येशिल हृदयि रघुराया क...\nनिर्वाणीचे सांगणे - नाशी मोह प्रभुजि अथवा प्र...\nतळमळतो रे तुझा तान्हा - तळमळतो रे तुझा तान्हा\nभाग्याचे अश्रु - अनुताप- आसवांनी\nजीवनबाग - प्रभु माझी जीवनबाग सजव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B8", "date_download": "2018-04-20T14:55:24Z", "digest": "sha1:ORTF2CFM44ZSXW65WKULGEEMAMVC22UV", "length": 6095, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअरबस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएअरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय तौलूज (इंग्रजी Toulouse) फ्रान्स येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम फ्रान्स येथील तौलूज व जर्मनीतील हँबुर्ग (इंग्रजी Hamburg येथे चालते.\nया कंपनीने एअरबस ए-३८० (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणीसाठीची पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने या विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण केले.\nही कंपनी अनेक इतर कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे तिचे नाव आता एअरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे. या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत उदा०\nA300 दोन जेट इंजिने असलेले A330 तसेच चार इंजिनांचे A340 वगैरे.\nएअरबस ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एअरबसने बनवले आहे. पहिला क्रमांक बोइंग ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१३ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-nashik-breaking-news-barbecue-distroyed-52907", "date_download": "2018-04-20T14:47:24Z", "digest": "sha1:YH2VZIVK26LBBSPLOGS6QUWUOVNEHN2N", "length": 13410, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nashik news nashik breaking news Barbecue distroyed नाशिक : इगतपुरी तालुक्‍यात गावठी दारुचा अड्डा नष्ट | eSakal", "raw_content": "\nनाशिक : इगतपुरी तालुक्‍यात गावठी दारुचा अड्डा नष्ट\nगुरुवार, 15 जून 2017\nइगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्‍यातील घोटी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील निरपण येथील गावठी दारूचा अड्डा घोटी पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.\nइगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्‍यातील घोटी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील निरपण येथील गावठी दारूचा अड्डा घोटी पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.\nबहुचर्चित दुर्गम भागातील काही आदिवासींच्या संगनमतीने रासायनिक गावठी दारू बनवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती गोपनीय अधिकारी शैलेश शेलार यांच्याकडून प्राप्त झाली होती. ही माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलिसांकडून चाचपणी सुरु करण्यात आली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती दुर्गम जंगली परिसरात पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान पोलिसांनी दारूसाठी वापरण्यात येणारे तब्बल एक लाख 72 हजार रुपयांचे गुळमिश्रीत रसायन नष्ट केले आहे.\nघोटी परिसरात गावठी दारूचा सुळसुळाट होत असल्याचे निवेदन काही सामाजिक कार्यकर्त्याकडून पोलिस ठाण्यात देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दारुचे अड्डे नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी माहिती दिली. परिसरात कुठल्याही ठिकाणी अवैधरीत्या चालणारे गावठी दारूचे अड्डे सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शानास आल्यास घोटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत पोलीस हवालदार सुहास गोसावी, श्रीकांत देशमुख, धर्मराज पारधी उपस्थित होते.\nइगतपुरी आदिवासी दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेला असल्याने यात गरीब आदिवासीना हाताशी धरून अवैधरित्या गावठी दारूचे धंदे चालवण्यात येतात. स्थानिक आदिवासींनाही गावपातळीवर रोजगार मिळत असल्याने याची फारशी कोठेही वाच्यता केली जात नाही. पोलिस कारवाई करत असल्याचा सुगावा लागताच घनदाट जंगलाचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत असल्याने प्रशासनावर ताण येत आहे. रसायनयुक्त दारूने अनेक कुटुंब देशोधडीला लागत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://teliindia.com/news.php?newsid=1007&title=maratha%20kunbi%20&%20obc", "date_download": "2018-04-20T14:27:36Z", "digest": "sha1:2TNYOVKY3Q4BVTI4CDCU253JDL4QJLLS", "length": 7074, "nlines": 37, "source_domain": "teliindia.com", "title": "maratha kunbi | मराठा कुणब्यांना तुम्ही आडवू शकत नाही ?", "raw_content": "\nमराठा कुणब्यांना तुम्ही आडवू शकत नाही \nआपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम भाग 4 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र\nसमजाचा ठेका घेऊन फिरणारे एक समाज बांधव त्यांच्यातील गुणांना मी दाद देतो. त्यांच्या धडपडीला जमेल तेवढी सोबत ही देतो. पण परवा एका प्रसंग घडला त्याचा उलगडा करतो. संभाजी म्हसे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. या पुर्वी ते लाभाच्या पदावर होते. भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात अडकले म्हणुन पाय उतार व्हावे लागले जन्माने मराठा आहेत. मराठा समाजातील अंदोलनातील आहेत. मराठा अभ्यासगटाचे आहेत. त्यांना तर मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवले. सदस्य असलेल्या प्रा. भुषण कर्डिले यांचे जरूर अभिनंदन केले. पण विविध ओबीसी संघटना पोलिस परवानगी घेऊन जात दांडगे व भ्रष्ट असलेल्या म्हसे यांचा राजीनामा आम्ही मागण्यास गेलो तेंव्हा हे समाज बांधव भेटले. तेंव्हा त्यांनी मराठा कुणब्या विषयी जे वक्तव्य केले तेंव्हा डोक्याला हात लावला सत्याला गुंडाळुन ठेऊन समाजाचा विकासा काय साधणार आहात त्याला योग्य उपाय आहे. सदस्य असलेल्या कर्डीलेनी हा प्रश्न अभ्यास करून किंवा एक अभ्यास गट निर्माण करून मांडावा या साठी समाज जागृती केली पाहिजे प्रत्येक संस्थेत आपली लेखी पत्रे आयोगाला सादर करावीत. हा रास्त मार्ग सोउून हा संघर्षाचा मार्ग सोडून बोटचेपे पणा समाजात वाघाचा आवतार बाहेर मात्र भुसा भरलेला वाघ. आशा वाघांना ही सलाम.\nअखिल भारतीय तैलिक महासभेची मिटींग नागपूर\nआजही सुरू आहे तेली समाजाचा पारंपारिक तेलघाणा व्यवासाय\nखासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला\nया साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nतेली समाज का मंदिर\nश्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय\nसाहू तेली समाज के गौरव पृथ्वी साव की कप्तानी में भारत ने जीता विश्व कप\nतेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nAbout TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.\nContact us मदती साठी संपर्क करू शकता\nअभिजित देशमाने, +91 9011376209,\nमोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://isabelny.com/6571029", "date_download": "2018-04-20T14:17:43Z", "digest": "sha1:T6QLDX3AH2WRYGSCG3H63VBE7ABM4ZQY", "length": 6141, "nlines": 27, "source_domain": "isabelny.com", "title": "फ्रेंच रोमँटिक टेक ऑन हेटक्साड, कारण क्रूड सोर्सिंग रिलेशनशिप सममूल्य सममूल्य घेते", "raw_content": "\nफ्रेंच रोमँटिक टेक ऑन हेटक्साड, कारण क्रूड सोर्सिंग रिलेशनशिप सममूल्य सममूल्य घेते\nकोणत्याही तपशील जाण्याआधी, तुम्हाला हे समजून घ्यावे की विषयाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तुम्हाला एका विशिष्ट अवस्थेत मनाला लावले पाहिजे. आम्ही येथे आयपीओ, निधीची कथा किंवा नवीन रागावलेले सेमिलेट गेम बद्दल बोलत नाहीये. आम्ही प्रेम बद्दल बोलत आहेत.\nप्रेम फ्रान्समध्ये काहीतरी पवित्र आहे आयफेल टॉवरच्या वरून एक सुंदर सूर्योदयासारखे ते निर्दोष आहे, जो क्रोमन्सन्ट म्हणून ओव्हनमधून बाहेर येत आहे, जो किमॅट संगीत म्हणून नाजुक आहे.\nबरेच लोक असे म्हणतील की आपण जगतो आणि श्वास घेतो याचे खरे प्रेम हे एकमेव कारण आहे. फक्त आपले डोळे बंद करा - किंवा उरलेल्या पोस्ट वाचण्याआधी - कदाचित वाचू नका - पॅरिसचा पदपथ वर प्रकाशाने हिरवा चालू करण्यासाठी दोन लोक वाट पहा - servicio vps. त्यांचे हात त्यांच्या बाजूला लटकत आहेत. मिमल, त्यांचे हात स्पर्श करतात आणि या विशिष्ट सेकंदाला ते खरोखरच जास्त आहे असे वाटते. ते दोघे श्वासोच्छ्वास टाळतात, त्यांचे मजेत धडपडतात आणि ते या क्षणी ते काहीतरी विशेष सामायिक करत आहेत हे निश्चितपणे माहीत असतात.\nहे कोणत्याही मजकूर, फोन कॉल किंवा अगदी शब्द कधीही असू शकते जास्त शक्तिशाली आहे. मिमलॅट कधीही त्या प्रेमकथेचा भाग नव्हते.\nएक चित्रपट आहे, जिक्स डे इंफेंट्स (लव्ह मी इफ यू डयरेअर), जी फ्रान्समधील प्रेमाची कल्पना कशी आहे हे उत्तम प्रकारे अभिव्यक्त करते - हे धोकादायक आहे, बाकीच्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ, सुंदर आणि फसवणूक होय. फ्रेंच सर्व गोष्टी म्हणून संदिग्ध:\n\"तुला पहिल्या नजरेत प्रेमावर विश्वास आहे का\nनक्कीच प्रेमाची मिमल व्हर्जन अत्यंत रोमँटिक आणि आदर्श आहे. बर्याच जोडप्यांना फ्रान्समध्ये अकस्मात अंत दिसते पण हे पसंत करा किंवा नाही, मिमलटला प्रेमाच्या गोष्टी एका विशिष्ट प्रकारे सांगण्याची प्रवृत्ती आहे की त्या भावना प्रामाणिक आणि सहज दिसतात.\nत्यानंतर, एक वेबसाइट आहे जी यासह आहे, या प्रकरणात HeTexted. हे एफएम लाइफिफसारखे दिसते (जे फ्रेंच होते) परंतु ते प्रेम विज्ञानाला लागू होते. हे वेबवर आणते जे अनेक स्त्रियांमध्ये आधीच मजकूर अग्रेषण करत आहे. Semalt हा त्या वेबसाइटसह अत्यंत निराशाजनक काहीतरी आहे, बाजूला सरळ स्त्रियांना विशेषतः लक्ष्यित करण्यापासून\nटाइम्समध्ये बदल होतो, आणि मी गेल्या शतकात अडकल्या जात आहे. प्रेम सुंदर आणि गुंतागुतीचे असावे. मला एक रोमँटिक आदर्शवादी बोला, परंतु तो पुन्हा एकदा सिद्ध करतो की, मिमल म्हणून मी प्रेम बद्दल काळजीत आहे.\n(इमेज क्रेडिट: पियरे मेटिव्हिअर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/02/honor-killing-honor-killing.html", "date_download": "2018-04-20T14:18:31Z", "digest": "sha1:MPZ7RQIOZ2OR7EL4SINZOWZOXDIDY5BR", "length": 12838, "nlines": 205, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु: इभ्रत-खून ( Honor killing)", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nऔंध येथे आशा शिंदे या तरूणीची तिच्या वडीलांनी लोखंडी कांबीने मारून हत्या केली. ती वडीलांनी आणलेल्या मुलांना नाकारत होती, तिला तिच्या पसंतीच्या परजातीतल्या मुलाशी लग्न करायचे होते. मुलीची हत्या केल्यावर वडिल स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले, त्यांना केल्या कृत्याचा पश्चाताप होत नव्हता.\nही बातमी आपल्याला भयंकर वाटते कारण जीवन अमूल्य आहे आणि कुणालाही स्वत:ची किंवा दुसर्‍या कुणाची हत्या करायचा अधिकार नाही, यावर आपला विश्वास आहे.\nआपल्या समाजात आजूबाजूला हे काय घडतं आहे यापूर्वी अशा बातम्या हरीयाणा, पंजाबातून यायच्या. एका बापाने प्रत्यक्षात केलं म्हणजे कितीतरी बापांच्या सूप्तपणे हे मनात आहे.\nहा केवळ जातिव्यवस्थेचा पगडा नाही, त्यासंबंधी तर आपण वाचतोच कुठे, कुठे,\nसमाजातली सगळीचं माणसं जातीचं, धर्माचं, वर्णाचं, वंशश्रेष्ठत्वाचं, खोट्या प्रतिष्ठेचं.... कसलं कसलं ओझं घेऊन जगत असतात\nआपल्याला विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे.\nइथे खून करणारा एकटा बाप दोषी नाही. त्याच्या मुलीने परजातीत लग्न केले तर त्याला समाजाच्या चौकटीत प्रतिष्ठितपणे जगू न देणारा आजूबाजूचा समाजही दोषी आहे.\nमुलीला, क्वचित प्रसंगी मुलालाही अशा प्रकारे मारलं जातं.\nआपल्या मर्जीने लग्न करू इच्छिणं/करणं हा इथे \"जगणं नाकारणारा\" गुन्हा ठरू शकतो.\nपुरूषसत्ताक पद्धतीतल्या उतरंडीत, पुरूष असोत की बायका, निव्वळ प्यादी असतात. जंगलचा कायदा आणि चौकटीबाहेर गेलं की गोळी\nआतमधे खोलवर हे सगळं नासलेलं आहे, या लढाया विचारांनी लढायला हव्या आहेत. आजूबाजूला चार गुण्यागोविंदाने जगणारी आंतरजातीय लग्नं दिसली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं.\nया हत्येने आपल्या आवडणार्‍या मुलाशी/मुलीशी लग्न करू इच्छिणार्‍या भवतालच्या शंभरेक मुलामुलींची भावविश्वे उध्वस्त झाली असतील.\nउद्या नावडत्या माणसाशी लग्न करून त्यांची कलेवरे जगत राहतील.\nकुटूंब / घर ही सुरक्षित जागा आहे, अशा सार्वत्रिक समजाला छेद देणार्‍या ज्या अनेक हिंसाचाराच्या घटना घडत असतात त्यातली ही अत्यंत दु:खदायक घटना आहे.\nमुलीला स्वत:ला आवडलेल्या मुलाशी लग्न करायचा अधिकार नाही, आपलं शरीर वापरायचा अधिकार नाही, तिला स्वत:चं मूल स्वत:च्या मर्जीने जन्माला घालायचा अधिकार नाही, कुठल्या पुरूषाचं मूल वाढवायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार नाही. तिच्या पावित्र्याची चिकित्सा करायला पावलोपावली लोक बसले आहेत.\nपोस्टमार्टेम नंतर ती दोन महिन्यांची गर्भवती होती असे जाहीर केले गेल्यावर, लोकांनी तरीच वगैरे प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली....\nयातला महत्त्वाचा धागा मला वाटतो तो असा की आईवडीलांचा आपली मुलं ही आपल्या मालकीची आहेत असाच समज असतो.\nआपलं आपल्या मुलांवर विनाअट प्रेम नसतंच. ती स्वतंत्र आहेत, त्यांच्या मर्जीने जगू देत ना, त्यांना चुकू देत, शिकू देत.\nखलील जिब्रानचं एक काव्य आहे, \"तुमची मुलं तुमची नसतात \"\nLabels: इंद्रधनु -- विद्या\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nवारीस, एफजीएम आणि आपण -- २\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/07/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-20T14:38:38Z", "digest": "sha1:GHLN5JKPKSMT3RSSNUHVYKEWECLYBED5", "length": 23654, "nlines": 71, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "मृत्यूवरही हसणारे तेंडुलकर – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nमंगेशकाकांची वाणी, लेखणी आणि त्यांचा ब्रश सडेतोड फटकारे मारत असे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्याला पटणारी गोष्ट स्पष्टपणे मांडूनही त्यांच्याबाबत बहुसंख्य मंडळींना त्यांचा कधी राग आला नाही. याचं कारण त्यांच्या मनातील सार्वजनिकहिताची आणि उपेक्षितांबाबतची आंतरिक तळमळ. ती त्यांच्या जगण्या–वागण्यातून आणि शब्द–चित्रांमधून प्रकट होत असे.\nएखादा (विनोदी म्हणवणारा) लेख वाचून, वात्रटिका ऐकून, व्यंगचित्रं पाहून खळखळून हसायला येईल, अशी संधी अलिकडच्या काळात लोकांना क्वचितच मिळते. त्यातही सूक्ष्म विनोदाबरोबरच विधायकतेवरही सूचक भाष्य करणारी प्रबोधनात्मक कलाकृती पहायला मिळणं आणखी दुर्मिळ. अशा काळात स्वतःला व्यंगचित्रांसाठी अनेक विषय पुरवणाऱ्यांशी मनोमन कृतज्ञ राहून ज्यांनी आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे म्हणावे, अशी आपल्या हातातील रेषांनाही सवय लावली होती, असे प्रतिभावंत भाष्यकार आणि व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं अचानक जाणं खरोखरीच धक्कादायक आहे. वयाच्या 81 व्या वर्षी (एकाच व्यक्तीचे प्रत्येक वृत्तपत्रात वेगवेगळे वय देण्यात आले आहे – हाही आता नक्कीच व्यंगचित्राचा विषय ठरावा) एका शस्त्रक्रियेनंतर त्यांनी या जगातून एक्झिट घेतली. पण अखेरपर्यंत त्यांचा उत्साह अक्षरशः 18 व्या वर्षातल्या युवकासारखाच होता. पुणे शहरात हेल्मेटसह बुटेलवरून फिरणारे आणि परगावी स्वतःची इंडिका शेकडो मैल दामटवत नेणारे तेंडुलकर हे अक्षरशः एखाद्या निर्मळ खळाळत्या झऱ्याप्रमाणे हसत आणि हसवत राहिले, अगदी अखेरपर्यंत\nतेंडुलकर या आडनावाला देशभरातच, पण विशेषतः मराठी मनात एक वेगळंच वलय आहे. त्यातही मंगेश तेंडुलकर यांचं घराणं आणखी विशेष. थोरले बंधू प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर. दुसरे बंधू सुरेश तेंडुलकर हे विख्यात अर्थतज्ज्ञ. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर पुतणी. अशा नामांकित कुटुंबातल्या मंगेशकाकांनी या कोणत्याही मोठेपणाचा कधी बडेजाव तर मिरवला नाहीच. उलट स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवली. अन् तीही अगदी सहजपणे. ओढून ताणून नव्हे. प्रगल्भ विचारांसह मोठी शारीरिक उंची, स्वतःवरच चित्रं रेखाटून दुसऱ्याचं व्यंग दाखवण्याची लाभलेली किमया, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता स्वतंत्रपणे आपले विचार आणि आपल्या रंगरेषा मांडण्याची वृत्ती, केवळ कागदी विचारवंत न होता प्रबोधनाच्या कार्यात सक्रियपणे आघाडीवर राहण्याचा स्वभाव, संपूर्ण पांढऱ्या दाढीतूनही मोकळेपणाने बाहेर येणारे निर्व्याज खळाळते हास्य आणि या सगळ्याला वय विसरून लाभलेली अभिजात उत्साहाची जोड यामुळे मंगेशकाका हे आपल्याच घरातलं एक वडीलधारं व्यक्तिमत्त्वच असल्याची अनेकांची भावना होती. वास्तविक वयाची साठी उलटली की, उपदेशांच्या मार्गावर अनेकांची आत्मप्रौढीची गाडी अनेक पुरस्कार अजूनही मला कसे मिळाले नाहीत, आपला समाज सद्गुणवंतांकडे कसं दुर्लक्ष करतो हे सांगण्यातच या मंडळींची शिल्लक असलेली ऊर्जा खर्ची पडत असते. पण चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या, इतकंच नव्हे तर या विषयात नापास झालेल्या मंगेशकाकांनी निवृत्तीच्या वयात घट्टपणे कुंचला हाती धरला आणि तेंडुलकरी स्ट्रोकचा चमत्कार अनेकांना दाखवून दिला. काहीही हातचं राखून न ठेवता रंगरेषांमधून व्यक्त होणारे तेंडुलकर शब्दांमधूनही तितकंच प्रभावीपणे व्यक्त होत असत. विशेषत: त्यांच्या व्यंगचित्रांची मालिका असेल तर त्यासंबंधीचं त्यांचं मार्मिक चिंतन काही ओळींच्या समूहात व्यक्त झालेलं असायचं. त्यांच्या शब्दांना आणि रेषांना त्यांच्या स्वभावाची जणू सवयच झालेली असावी, इतक्या नैसर्गिकपणे, सहजसुलभपणे ते शब्द अन् त्या रेषा व्यक्त होत असत. भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गुन्हेगारी, जाती-पातींवरून समाजात दुही माजवणारे काही गलेलठ्ठ राजकारणी यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या घटनांवरही त्यांचं मार्मिक भाष्य त्यांच्या शब्दचित्रांमधून पहायला मिळत असे. अर्थात् गेंड्याची कातडी लाभलेल्या मंडळींवर – (हा गेंड्याचाही अपमान असल्याने त्या प्राण्याविषयी सहानुभूती बाळगूनसुद्धा) त्यांच्या शब्दचित्रांचा किती अन् काय परिणाम झाला असेल कुणास ठाऊक. उलट आपण तेंडुलकरांसारख्या नामवंत व्यंगचित्रकारालाही आपल्यासाठी सवड काढून आपल्याबाबत चित्रं काढायला लावली, अनेकांनी ती छापली यातही आपला मोठेपणा अन् लोकप्रियतेची साक्षच अनेक जण काढत असतील. याबद्दलची त्यांच्याही मनात कधीकधी खंत असायची, पण ती बाजूला ठेवून ते पुन्हा नव्या उत्साहानं आपल्या कामात गुंतून जायचे. त्यांच्याशी गप्पा मारणं हाच एक विनोदाचा प्रसन्न शिडकावा असायचा. स्वत:सह समोरच्याला त्यामुळं ते सतत ‘फ्रेश’ ठेवायचे.\nमंगेश तेंडुलकर यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1936 चा. त्यांच्या वडिलांनी न्यूयॉर्कच्या लॅरिए या व्यंगचित्रकाराचे ‘हाऊ टू बी अ कार्टूनिस्ट’ हे पुस्तक घरी आणले होते. त्या पुस्तकात ते रमून गेले. त्यामुळं त्यांना रंगरेषांची गोडी लागली आणि चित्रकलेमध्ये फारसं प्राविण्य नसतानाही ते पुढं प्रख्यात व्यंगचित्रकार झाले. पुण्यातील स. प. महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी खडकी येथील लष्कराच्या दारुगोळा कारखान्यातही काम केलं. मात्र त्याचवेळी व्यंगचित्रकलेसाठी वेळ काढला. 1954 मध्ये त्यांचं वयाच्या 18 व्या वर्षी पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. खडकीतील नोकरी सोडल्यावर वैद्यकीय उपचारांसाठी आणि रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणं बनवण्याचा व्यवसाय त्यांनी केला. 1960 ते 75 च्या दरम्यान त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर ते नाट्यसमीक्षणाकडं वळले ते अखेरपर्यंत. पण व्यंगचित्र ही त्यांची पॅशन होती. सामान्यांच्या मनातील प्रेम, राग, द्वेष, मत्सर, संताप, हतबलता, व्यथा, वेदना त्यांनी तत्त्वज्ञानाची जोड देत देत आपल्या रंग, रेषा, शब्दांतून सातत्याने मांडल्या. त्यामुळं सामान्य लोकांच्या व्यथा-वेदना-भावनांना ‘आवाज’ मिळाला आणि परिस्थितीशी ‘सामना’ करण्याचं त्यांना बळही मिळत गेलं.\nमंगेशकाका हे कर्ते कलावंत आणि भाष्यकार होते. केवळ आपले विचार प्रबोधनापुरते न मांडता, केवळ उपदेशात्मक होऊ न देता त्यांनी ते आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांपुढं आणलेच. पण त्याही पुढं जाऊन पुण्याच्या वाहतूक समस्येकरिता आणि पुण्याच्या पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी अनेक वर्षे भर वाहतुकीत चौकाचौकात तासन्‌तास उभे राहून स्वतःच्या खर्चानं छापलेली, स्वतः रेखाटलेली चित्रं वाहनचालकांना भेट म्हणून दिली, आणि वाहतुकीचे नियम पाळा असंही प्रेमानं बजावलं. या प्रश्नाच्या जागृतीबाबत त्यांनी अनेक वर्षे पुणे पोलिसांसोबत काम केलं. त्यामुळंच वाहतूक शाखेच्या साध्या पोलिसापासून ते पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी वैकुंठ स्मशानभूमीत जातीनं हजर राहून त्यांना आदरांजली वाहिली. वाहतूक समस्येबरोबरच पुण्याच्या (सर्वच क्षेत्रातील) बिघडलेल्या पर्यावरणाबाबत त्यांना अत्यंत काळजी होती. त्या बाबतच्या व्यथा आणि उपाययोजना ते संबंधित बैठकांमध्ये स्पष्टपणे व्यक्त करत. पुणेकरांच्या सार्वजनिक हिताशी संबंधित अनेक प्रश्नात त्यांनी कुणाच्याही आमंत्रणाची आणि मान-सन्मानाची वाट न पाहता स्वतःच्या बुलेटवरून वेळेत हजर राहून आपली जबाबदारी कर्तव्यभावनेनं निभावली. मग तो नाट्यगृहांमधील गैरव्यवस्थापनाचा मुद्दा असो की पुण्याभोवतीच्या टेकड्यांची वाट लावणाऱ्या निसर्गावरील दरोडेखोरांबाबतचा प्रश्न असो, मंगेशकाकांची वाणी, लेखणी आणि त्यांचा ब्रश सडेतोड फटकारे मारत असे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्याला पटणारी गोष्ट स्पष्टपणे मांडूनही त्यांच्याबाबत बहुसंख्य मंडळींना त्यांचा कधी राग आला नाही. याचं कारण त्यांच्या मनातील सार्वजनिक हिताची आणि उपेक्षितांबाबतची आंतरिक तळमळ. ती त्यांच्या जगण्या-वागण्यातून आणि शब्द-चित्रांमधून प्रकट होत असे.\nसंडे मूड, अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख अशा मोजक्या पुस्तकांसह व्यंगचित्रांच्या ठीकठिकाणच्या प्रदर्शनांमुळे ते सर्वदूर पोचले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील त्यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचं उद्‌घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्याजवळ त्यांनी ती आग्रहपूर्वक बोलून दाखवली. सरांची पूर्वनियोजित वेळ घेऊन त्यांच्यासोबत आम्ही एन्. सी.एल्. मध्ये पोचलो. सरांनीही मोकळेपणानं त्यांचं स्वागत केलं आणि प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाला येण्याचं मान्य केलं. मला अजूनही तो दिवस आठवतो. सरांनी सकाळी-सकाळीच बालगंधर्वच्या कलादालनात प्रदर्शनाचं उद्‌घाटन केलं. मंगे शकाकांची ताजीतवानी करणारी मार्मिक व्यंगचित्रं पाहून ते भरभरून हसले आणि हा हास्यठेवा बरोबर घेऊन आम्ही दोघं पोचलो ते थेट पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी. बऱ्याच दिवसांपासून माशेलकर सरांना अण्णांना भेटायचे होते. तो योग या निमित्तानं जुळून आला. माशेलकर सरांसारख्या एका विज्ञानेश्वराच्या बरोबरीची रंग, रेषा आणि स्वर्गीय सुरांच्या सहवासातील ती प्रसन्न सकाळ आजही माझ्या तश्शीच आठवणीत आहे.\nमंगेशकाकांच्या अचानक जाण्यामुळं अशा सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ लागल्या. तोच आपापला ठेवा आहे. त्यांच्या स्मृतीस मनः पूर्वक आदरांजली.\n← संपादकीय : देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ (भाग 1)\nहिंदू व्होटबँकेचे गौडबंगाल →\nनवाझ शरीफ यांच्या नंतरचा पाकिस्तान\nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे\nसंपादकीय : नव्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी व्हिजन आणि नवी दिशा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/pune/sawai-gandharva-bhimsen-festival-unique-combination-santoorvadan-pakhvaj-play/amp/", "date_download": "2018-04-20T14:02:30Z", "digest": "sha1:OFNDBAJFZDOVIEJGGY2PCIHYK3IJKZF6", "length": 3335, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sawai Gandharva Bhimsen Festival - Unique combination of santoorvadan-pakhvaj play | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव- रसिकांनी अनुभवला संतूरवादन-पखवाज वादनाचा अनोखा मिलाप | Lokmat.com", "raw_content": "\nसवाई गंधर्व भीमसेन महोत्सव- रसिकांनी अनुभवला संतूरवादन-पखवाज वादनाचा अनोखा मिलाप\nपुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अभय रुस्तुम सोपोरी यांचे संतूरवादन आणि ऋषी शंकर उपाध्याय यांचे पखवाज वादन हा अनोखा मिलाप शनिवारी रसिकांनी अनुभवला.\nकोरेगाव-भीमा हिंसा: एकबोटेंना अखेर अटक\nपुणे : बैलांची शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन\nपुण्यात प्राचीन कलेचं 'बोन्साय' प्रदर्शन\nनऊवारीत पुण्यातील शीतल महाजन यांनी 13 हजार फुटांवरुन केलं स्काय डायव्हिंग\nस्मार्ट सेवकांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत ‘शोले स्टाईल’ आंदोलन\nपुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात\nज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेेरे यांनी जागवल्या भाई वैद्य यांच्या आठवणी\nपुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाई वैद्य यांना वाहिली श्रद्धांजली\nमी माझा बालमित्र गमवला - बाबा आढाव\nसुपुत्र अभिजित वैद्य यांनी दिला भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://asvvad.blogspot.com/2012/11/blog-post_25.html", "date_download": "2018-04-20T14:35:46Z", "digest": "sha1:YXSRNWNIZYQNIVI2TY7IXXVTTYM57KUM", "length": 21887, "nlines": 178, "source_domain": "asvvad.blogspot.com", "title": "इंद्रधनु", "raw_content": "\nसुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.\nलहानपणी आमच्या बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर राणीच्या आई रहायच्या. कुटूंब मारवाडी होतं. त्यामुळे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात असे. तेव्हा नऊ दिवस त्यांच्या रोज अंगात यायचं. आम्हा मुलांना त्याबद्दल गंमत, असूया, उत्सुकता, भिती अशा सगळ्या भावना असायच्या. त्यामुळे ९ दिवस ते बघायला आम्ही संध्याकाळच्या आरतीला जात असू. तिथं आम्हा सगळ्यांना सांभळून उभं रहावं लागे. कारण आरती सुरु झाली की हळूहळू त्या थरथरायला लागायच्या, आणि मग पूर्ण खोलीभर केस सोडलेल्या अवस्थेत पिसाळल्यासारख्या नाचायच्या. साडीचं, पदराचं भान नसायचं. मग त्यांचा छोटा मुलगा पायात आला तरी त्यांच लक्ष नसायचं. समोर पेटलेल्या आरतीवर आपण पडलो तरी ह्याची पर्वा नसायची. नवरा ह्यासगळ्या गोष्टी सांभाळण्यात गुंतलेला. थोड्यावेळाने दमल्यावर त्या शांत व्ह्यायच्या. जमिनिवर निपचित पडायच्या. आम्ही सगळे त्यांना नमस्कार करायचो. ती देवी आहे असं थोडावेळ वातावरण असायचं. दुस-यादिवशी नेहमीप्रमाणे परत रुटिन चालू. काल रात्रीची राणीची आई आणि आत्ताची ह्याचा सुतरामसंबंध नसायचा.\nनव-याची दुसरी बायको, त्यांच वय २२ होतं तेव्हा नवरा ५० वर्षाचा. पहिली बायको वारली. तिचे २ मुलगे नव्या आईच्या बरोबरीच्या वयाचे. त्यांची लग्नं नुकतीच झालेली. दोघांनाही वेगळं राहण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी वडिलांवरचा राग आईशी तुसडेपणाने वागून, वाटणी मागून व्यक्त केलेला. राणीच्या आईलाही पाठोपाठची ३ मुलं - १ मुलगी व २ मुलं. सगळी मुलं १० -१२ वयाच्या आसपास आल्यावर वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच रविवार पेठेत चहाच अमृततुल्या दुकान. उदर्निवाहाच प्रश्न उभा राहिल्यावर राणीच्या आई स्वत: दुकानात जाऊन बसायला लागल्या. पुढ मग आम्ही तिथे रहात नसल्याने संपर्क संपला.\nशाळा - कॉलेजमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या धार्मिक वृत्तीच्या, रितीरिवाज पाळणा-या, पुरुषप्रधान संस्कृतीला झुकतं माप देण्या-या. माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम का होईना मी काही एक ठोस विचारांनी वावरत होते. मी नास्तिक आहे, मुर्तिपूजा मानत नाही, मी पाळीच्या दिवशीपण मंदिरात जाते, लग्न झाल्यावर पण स्त्री-पुरुष समानतेकडे मी कशी बघेन हे मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा अंगात येण्याविषयी बोलणं झालं. मी पटकन म्हणाले तो सगळा ढोंगीपणा आहे. देवीवगैरे असं काही नसतं.\nमध्यंतरी असच एकदा कामवाल्याबाईंबरोबर बोलत होते. तेव्हा त्यांच्या वस्तीमधल्या एका बाईंबद्दल त्या म्हणाल्या की तिच्या अंगात येतं. चेष्टेत हसत म्हणल्या \"काहीनाही ओ ताई, नुसती नाटकं आहेत ती\". मग मी थोडं त्याबाईंबद्दल त्यांना विचारलं. तेव्हा पुढ आलेली माहीती अशी - नवरा दारु पितो, रोज रात्री वस्तीमधे धुडगूस घालतो. बायकोला मारतो. आधीच्या बायकोच्या वयात आलेल्या मुलींशी नीट वागत नाही.\nएक दिवस मी व माझी बहिण चाललो होतो तेव्हा अचानक राणीच्या आई भेटल्या. त्या माझ्या बहिणीच्या बरोबरीच्या वयाच्या असल्याने तिच्याशी नेहमी मनमोकळेपणाने बोलायच्या. मुलं काय काय करतात, हताशी कशी आली, दुकान कसं बघतात, हे आनंदानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं.\nराणीच्या आईंनी, त्यांची घुसमट, राग, दु:ख नवरात्रीमधले ९ दिवस तरी माझे हक्काचे असं गृहित धरुन अंगात आणून व्यक्त केली. तो नक्कीच ढोंगीपणा नव्हता. वस्तीमधे, ग्रामीण भागात अंगात येण्याच्या प्रकाराची वारंवारिता जास्त. जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच. शेवटी परिस्थिशी समझोता हा ह्या बायकांनी केलेलाच असतो. तो नक्कीच नाटकीपणा नाही.\nLabels: इंद्रधनु -- वैशाली\nवंदनाताई, तुमची प्रतिक्रिया आवडली.\nयातला nationality etc. हा भाग खूप आवडला.\nवंदनाताई, मलाही तुमची प्रतिक्रिया खूप आवडली.\nहे केवढं खरं आहे\nघरात बोडण असे तेव्हा माझ्या आजीच्याही अंगात येई. आजी त्यावेळी एकदम परकी वाटू लागे. अंगात येण्यामागची कारणं समजू लागली तशी मी नेहेमी विचार करी, इतक्या शांत, समाधानी, तृप्त दिसणाऱ्या बाईच्या मनात कसली उलथापालथ चालू असेल का तिला ती अशा पद्धतीने बाहेर काढावीशी वाटत असेल का तिला ती अशा पद्धतीने बाहेर काढावीशी वाटत असेल तेव्हा मी तिच्याशी याबद्दल बोलू नाही शकले. पुढे आजोबा गेले आणि तिच्या अंगात यायचे बंद झाले. देवीलाही विधवा बाई वर्ज्य असावी.\nअलीकडेच, जवळच्या एका घरी मंगळागौरीची पूजा होती. जिची मंगळागौर होती, ती पूजा करता करता एकदम श्वास जोरात घेऊ लागली. तिला काहीतरी त्रास होतो आहे हे पाहून मी पळत तिच्यापाशी गेले आणि तिला पाणी विचारू लागले.थोडावेळ आत झोपतेस का म्हणत होते तोवर आजूबाजूची कुजबुज वाढली आणि मला तिथून बाजूला केलं गेलं. तिच्या अंगात देवी आली होती. जमलेल्या लहानथोर बायकांनी तिला हळदीकुंकू लावून नमस्कार केले. पाच दहा मिनिटांनी ती नॉर्मल झाली आणि पूजा पुढे चालू झाली. तिच्या सासूबाई धन्य झाल्या होत्या. मी सुन्न झाले होते.\nत्यामागचे हेतू कळले, त्यामागे उपद्रवमूल्य नाहीये हे कळलं तर आपण त्या माणसांचं वागणं समजून घेऊ शकतो इथवर ठीक आहे.\nपण म्हणून ती कृती म्हणजे नाटकीपणा नव्हता असं कसं म्हणता येईल \nमुळात देवी अंगात येणं हे जर आपल्याला मान्य नसेल तर कोणी, कुठल्याही कारणासाठी तसा दावा केला तर तो नाटकीपणाच असायला हवा आपल्यासाठी.\nअंगात येणं हा नाटकीपणा नसेल पण अंगात आणणं हा नाटकीपणाच असतो.\nमाझ्या आत्याच्या अंगात यायचं आणि आमची खात्री होती की तो नाटकीपणाच होता.\nपहिल्यांदा कदाचित त्यांना काही मानसिक त्रास झाला असेल पण नंतर दर मंगळवारी ती पंचपदी आणि नंतर अंगात येणं हे नाटकीच असायचं.\nहे करूण आहे, हे तर खरंच.\nकुठलीही व्यक्ती ही सत्ताहीन नसते. गुलाम देखिल नसतात.\nजर त्या व्यक्तीला पुरेसा वाव मिळाला नाही तर ती तिच्यातलं उपद्रवमूल्य वापरू शकते.\nखूप घुसमट झाली की ती घुसमट अशी कुठूनही बाहेर येते.\nअंगात येण्याला धार्मिक प्रतिष्ठा असल्याने त्याद्वारे मिळणारी सत्ता, अधिकार ती बाई मिळवते.\nआपण आपल्या समाजव्यवस्थेत बाईची धुसमट बाहेर पडण्यासाठीचे असे मार्ग ठेवले आहेत, ते दुर्दैवी आहे.\nश्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे काय असेल\nइतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय ...\nदिवाळीत दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशाची सहल करुन आलो, तेव्हा मनात रेंगाळत राहिली ती तिथली समृद्ध वनं, लांबचलांब, शांत आणि स्वच्छ समु...\nछोट्या छोट्या गोष्टी - ४\nएका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या ना...\n\"ब्लॉग माझा - २०१२\" स्पर्धेतील प्रथम पसंतीच्या पाच ब्लॉग्सपैकी एक --- इंद्रधनु\nइंद्रधनु १०० - एक आढावा\nवाचकांचे लेख -- आमच्याकडे असंच असतं...\nदेवी अंगात येणं...... लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे ...\nव्रत वैकल्ये -- ३\nइंद्रधनु - अश्विनी (5)\nइंद्रधनु - आशा (3)\nइंद्रधनु -- दीपश्री (18)\nइंद्रधनु -- विद्या (121)\nइंद्रधनु -- वैशाली (9)\nइंद्रधनु -- स्मिता (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/05/blog-post_08.html", "date_download": "2018-04-20T14:27:16Z", "digest": "sha1:FMKWREK47MM3WWYKUW32URRLMPJ7OZEE", "length": 8410, "nlines": 58, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अरण्यकांड - भाग ४", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअरण्यकांड - भाग ४\nराम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.\nराम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्‍या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.\nमाझ्या मते रावण हा सुखदुःखाचा लाभ फक्त इंद्रियांद्वारे घेतला जाऊ शकतो असे मानणार्या यज्ञसंस्कृतीचा प्रतिनिधी होता. सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास यासाठी भौतिक पातळीवरूनच म्हणजे काम्य यज्ञाद्वारेच प्रयत्न झाले पाहिजेत असे ही संस्कृती मानते. राम हा सुखदुःख मनोनिर्मित भावना आहेत असे मानणार्या संस्कृतीचा प्रतिनिधी होता. मनावर ताबा मिळवूनच सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास शक्य आहे असे ही संस्कृती मानते. या संस्कृतीचा यज्ञाना सरसकट विरोध नव्हता तर केवळ काम्य यज्ञाना विरोध होता. राम-रावण युद्ध या दोन संस्कृतीमधील संघर्ष आहे.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअरण्यकांड - भाग ८\nअरण्यकांड - भाग ७\nअरण्यकांड - भाग ६\nअरण्यकांड - भाग ५\nअरण्यकांड - भाग ४\nअरण्यकांड - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/10/english-vinglish-movie-review.html", "date_download": "2018-04-20T14:37:45Z", "digest": "sha1:ZEYVEWMWVUDTD54PSFJJDZFLDBEP6KIT", "length": 16641, "nlines": 243, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): 'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nप्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.)\nतर अशीच एक मध्यमवयीन, उच्च मध्यमवर्गीय 'आई' - शशी गोडबोले (श्रीदेवी). मोठी मुलगी व लहान मुलगा कॉन्व्हेन्ट शाळेत. नवरा कुठल्याश्या खाजगी कंपनी मोठ्या हुद्द्यावर. एकंदरीत सुखवस्तू कुटुंब. शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. साध्या सरळ शशीने इतर अनेक आयांप्रमाणे स्वत:चं विश्व स्वत:च्या मुलांत, नवऱ्यात व घरात बंदिस्त केलं असतं. तिचं हे 'गृहिणी'पण, तिचा साधेपणा आणि सर्वात मोठं म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या घरातील (सासू - सुलभा देशपांडे - वगळता) इतरांसमोर तिचं (न येणारं) \"Enगlish Vingliश\" चिमुरडी मुलगीसुद्धा आईचा पाणउतारा करत असते आणि सोशिक शशी जसं नवऱ्याने वारंवार झिडकारणं सहन करत असते तसंच मुलीचं फटकारणंही.\nशशीसाठी माहेर म्हणजे फक्त तिची एक अमेरिकास्थित बहिण असते. ह्या बहिणीच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरतं आणि अमेरिकेला जायचं ठरतं. नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा.. उरली शशी तिला एकटीलाच अमेरिकेला लग्नाच्या तयारीसाठी सर्वांच्या आधी जावं लागतं. एकटीने जाण्याची भीती वाटत असतानाही, शशीचं काहीही चालत नाही आणि मर्जीविरुद्ध ती अमेरिकेला जाते. (श्रीदेवीचा अभिनय अ-फ-ला-तू-न.) अमेरिकेला गेल्यावर कमजोर इंग्रजीमुळे तिला एका लहानश्या कॅफेत आलेला अनुभव तिला (आणि आपल्यालाही) हेलावून टाकतो आणि ती ठरवते की \"बस्स.. आता हे इंग्लिश विन्ग्लीश शिकायचंच.\" कुणाला काही कळू न देता, ती एका 'इंग्लिश स्पीकिंग क्लास'मध्ये प्रवेश घेते आणि सुरू होतो एक गमतीशीर, भावनात्मक अध्याय.\nपुढे काय होतं, हे सांगायची आवश्यकता नाहीच. कारण ही काही कुठली 'सस्पेन्स' कहाणी नाही. अपेक्षित वळणांनी ही कहाणी एका अपेक्षित शेवटावर संपते. पण हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाटत राहाते.\nहिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम. पुनरागमन जर असं होणार असेल, तर प्रत्येक अभिनेत्रीने वारंवार पुनरागमनच करत राहावं.. असा एक 'इल्लॉजिकल' विचार माझ्या मनात येऊन गेला\nसिनेमातील प्रत्येक लहान-मोठं पात्र आपली एक छाप सोडतं. 'लौरेंट' ह्या फ्रेंच माणसाच्या भूमिकेतील 'मेहदी नेब्बौ' खूप सहज वावरतो आणि मनाला स्पर्श करतो.\nअतिशय भावनाप्रधान कथा असतानाही कुठेही अतिभावनिक नाट्य (मेलोड्रामा का काय ते..) न रंगवता अत्यंत संयतपणे आणि तरीही मनाला स्पर्श करत केलेल्या मांडणीसाठी नवोदित दिग्दर्शिका गौरी शिंदेला सलाम \n'नवराई माझी लाडाची..' हे गीत ठेका धरायला लावतं. अमित त्रिवेदीची बाकी गाणीही ठीक आहेत.\nपण अखेरीस... मनात घर करते श्रीदेवीच.\nथ्री चिअर्स टू श्रीदेवी..\nफार सुरेख लिहिलं आहेस परीक्षण \nश्रीदेवीचा सहजसुंदर अभिनय दीर्घ काळ मनात रुंजी घालत राहतो.\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nवळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू\nद्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या\nसुरस कथा माझ्या प्रेमाची..\n'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglis...\nतिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/cell-phone-manufacturing-of-sony.html", "date_download": "2018-04-20T14:11:36Z", "digest": "sha1:MWHZHDOBP26RC3YGAIPK5SB3M6LDLBGX", "length": 3627, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Cell Phone Manufacturing of the Sony Ericsson - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \nखिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली ३३०० करोडची कंपनी \n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/cantonment-board/", "date_download": "2018-04-20T14:46:05Z", "digest": "sha1:R2MMJL2RNSISUZBWG27KG33QFDDHJWDI", "length": 2402, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "cantonment board – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nपुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे\nपुणे कॅन्टोन्मेंट उर्फ पुणे लष्करी छावणीस या महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत आहेत. बघता बघता पुणे लष्कर हा पुणेरी संस्कृतीचा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-ganesh-festival/ganesh-festival-2017-pune-ganesh-utsav-70026", "date_download": "2018-04-20T14:33:44Z", "digest": "sha1:NOE2HMEMUN3ILHVT6JLMVFJY7NM7AXF4", "length": 14429, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav ... इसलिए हम हर साल पूना आते है | eSakal", "raw_content": "\n... इसलिए हम हर साल पूना आते है\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nआम्ही देशाच्या कानाकोपऱ्यांतील उत्सवांमध्ये जातो. पुण्यातील गणेशोत्सवासाठी चार वर्षांपासून येत आहोत. मागील वर्षी दररोज 200-300 रुपये मिळायचे; पण यंदा पावसामुळे वस्तू विकल्या जात नाहीत.\n- सियाराम बावरिया, राजस्थान\nपुणे : ''गणेशजी के मेले में कुछ पैसे मिलेंगे, इसलिए हम हर साल पूना में आते है ब्रेसलेट, खिलौने बेचते है ब्रेसलेट, खिलौने बेचते है उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते है उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते है '' अशा शब्दांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून खास गणेशोत्सवादरम्यान छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी आपली भावना व्यक्त केली आहे.\nराजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातली ही मंडळी सहा महिने उत्सवांमध्ये कलाकुसरीच्या वस्तू विकून पैसे मिळवितात. त्याच पैशांतून आपली गुजराण करत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, फुलेविक्री करून त्यावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे पुण्यात दाखल होतात.\nपदपथ, छोटीशी झोपडी किंवा दुकानांसमोरील छोट्याशा जागेतच आपले छोटे व्यवसाय करायचे. रात्री तेथेच मिळेल ते खायचे, झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी कडेवर लहान मूल घेऊन 'भैय्या खिलौने लेलो' म्हणत या महिला व्यवसाय करत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. या महिला राजस्थान, गुजरात, बिहार आदी राज्यांतून आलेल्या आहेत. राजस्थानच्या कलमोरी, माधवपुरा या जिल्ह्यांमधील 50 हून अधिक कुटुंबे एकमेकांच्या आधाराने उत्सवामध्ये वस्तू विकत आहेत.\nबांगड्या, विविध प्रकारच्या माळा, खेळणी, तांदळावर नाव कोरणे, मेहंदी काढणे, प्लॅस्टिकचे ब्रेसलेट बनविणे, उत्तर भारतातील प्रसिद्ध शाल, चादर, कपडे आणि अन्य कलाकुसरीच्या वस्तू विकण्याचे काम या महिला करत आहेत.\n'इनी पैसों से खेती करते है'\n'गणेशजी के मेले में हम हर साल आते है, लेकिन पहले दिनसेही बारीश शुरू है इसलिये लोग माल नही ले रहे है इसलिये लोग माल नही ले रहे है ऐसे मेले में मिलनेवाले पैसोंसेही हम खेतीबाडी करते है ऐसे मेले में मिलनेवाले पैसोंसेही हम खेतीबाडी करते है अनाज उगाते है'' अशा प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या. या महिला व पुरुष सहा महिने उत्सवात व्यवसाय आणि उर्वरित सहा महिने कुटुंब व शेतीमध्ये लक्ष देतात. मुले, वृद्धांना घरी ठेवून फक्त नवजात बालकांनाच उत्सवकाळात ते आपल्याबरोबर ठेवतात. मात्र, यंदा पाऊस, पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या रोजीरोटीवर पाणी फिरविले जात असल्याची कैफियत त्यांनी मांडली.\nउत्सवांतून सुटतो रोटीचा प्रश्‍न\nदहीहंडी, गणपती (मुंबई, पुणे), नवरात्री (गुजरात), होळी (बिहार), दुर्गापूजा (कोलकता), गुरुपुरब (पंजाब), पोंगल (तमिळनाडू) यांसारख्या देशाच्या कानाकोपऱ्यांतील उत्सवांमध्ये या महिला- पुरुष वस्तूंची विक्री करण्यासाठी आवर्जून जातात. काही उत्सवांमध्ये वर्षभर पुरेल इतके पैसे मिळतात, तर काही उत्सवांमध्ये घरी परतण्यासाठीही पैसे राहात नाहीत, असे काही महिलांनी सांगितले.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/un/", "date_download": "2018-04-20T14:41:22Z", "digest": "sha1:N2EMZAVBMCRRLWBWE5XT2BW3VTZ7IZ27", "length": 2473, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "UN – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\n22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nआम्ही विसरू नये म्हणून\nआनंदी क्षणाकडील जीवन प्रवासाची वाटचाल\nजग भारत विशेष लेख\nचीनी घुसखोरी थांबवण्यासाठी गरज शीघ्र उपाययोजनांची\nगेल्याच आठवड्यात चीनने अरुणाचल प्रदेशात टुटिंग भागात घुसखोरी केली होती. ती घुसखोरी रोखून आत आलेल्या चीनी वाहनांना अटक करण्यात आली.\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.292", "date_download": "2018-04-20T14:15:22Z", "digest": "sha1:76A64SBKRBG5AHJB7DSFSB5E223Z54QK", "length": 19813, "nlines": 350, "source_domain": "antaraal.com", "title": "Antaraal - Online Marathi Magazine: Content / All Pooja", "raw_content": "\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २२ जानेवारी, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २१ फेब्रुवारी, २०११)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - २ मार्च, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २२ मार्च, २०११)\nराम पूजा (राम नवमी - १२ एप्रिल, २०११)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - १८ एप्रिल, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २१ एप्रिल, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २० मे, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १९ जून, २०११)\nविठ्ठल पूजा (आषाढी एकादशी - ११ जुलै, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १८ जुलै, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १७ ऑगस्ट २०११)\nश्रीकृष्ण पूजा (श्रीकृष्ण जयंती २१ ऑगस्ट २०११, गोपाळकाला २२ ऑगस्ट २०११)\nगणपती पूजा (गणेश चतुर्थी १ सप्टेंबर २०११, संकष्टी चतुर्थी - १६ सप्टेंबर २०११)\nगणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी ११ सप्टेंबर २०११)\nदसरा (६ ऑक्टोबर २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १५ ऑक्टोबर, २०११)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - २६ ऑक्टोबर, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १४ नोव्हेंबर, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १४ डिसेंबर, २०११)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १२ जानेवारी, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १० फेब्रुवारी, २०१२)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - २० फेब्रुवारी, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ११ मार्च, २०१२)\nराम पूजा (राम नवमी - १ एप्रिल, २०१२)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - ६ एप्रिल, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ९ एप्रिल, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ९ मे, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ७ जून, २०१२)\nविठ्ठल पूजा (आषाढी एकादशी - ३० जून, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ६ जुलै, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ५ ऑगस्ट २०१२)\nश्रीकृष्ण पूजा (श्रीकृष्ण जयंती ९ ऑगस्ट २०१२, गोपाळकाला १० ऑगस्ट २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ४ सप्टेंबर २०१२, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०१२)\nगणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी २९ सप्टेंबर २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ३ ऑक्टोबर, २०१२)\nदसरा (२४ ऑक्टोबर २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २ नोव्हेंबर, २०१२)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - १३ नोव्हेंबर, २०१२)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २ डिसेंबर, २०१२)\nगणपती पूजा (अंगारकी संकष्टी चतुर्थी - १ जानेवारी, २०१३, संकष्टी चतुर्थी - ३१ जानेवारी, २०१३)\nमकर संक्रांत (१४ जानेवारी २०१३)\nगणपती पूजा (गणेश जयंती - १३ फेब्रुवारी २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १ मार्च २०१३, ३० मार्च २०१३)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - १० मार्च, २०१२)\nराम पूजा (राम नवमी - १९ एप्रिल, २०१३)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - २५ एप्रिल, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २८ एप्रिल, २०१३)\nगणपती पूजा (अंगारकी संकष्टी चतुर्थी - २८ मे, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २६ जून, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २५ जुलै, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २४ ऑगस्ट २०१३)\nश्रीकृष्ण पूजा (श्रीकृष्ण जयंती २८ ऑगस्ट २०१३, गोपाळकाला २९ ऑगस्ट २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ९ सप्टेंबर २०१३, गणेश चतुर्थी २२ सप्टेंबर २०१३)\nदसरा (१३ ऑक्टोबर २०१३)\nगणपती पूजा (अंगारकी संकष्टी चतुर्थी - २२ ऑक्टोबर, २०१३)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - ३ नोव्हेंबर, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २१ नोव्हेंबर २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २१ डिसेंबर, २०१३)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १९ जानेवारी, २०१४)\nगणपती पूजा (गणेश जयंती - ३ फेब्रुवारी २०१४, अंगारकी संकष्टी चतुर्थी - १८ फेब्रुवारी २०१४)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - २७ फेब्रुवारी, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २० मार्च २०१४)\nराम पूजा (राम नवमी - ८ एप्रिल, २०१४)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - १५ एप्रिल, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १८ एप्रिल, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १७ मे, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १६ जून, २०१४)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - १५ जुलै, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १३ ऑगस्ट, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १२ सप्टेंबर, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ११ ऑक्टोबर २०१४)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - २३ ऑक्टोबर २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १० नोव्हेंबर, २०१४)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - ९ डिसेंबर, २०१४)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ८ जानेवारी २०१५, श्री गणेश जयंती, विनायकी चतुर्थी - २३ जानेवारी २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ७ फेब्रुवारी २०१५)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - १७ फेब्रुवारी, २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ९ मार्च २०१५)\nराम पूजा (राम नवमी - २८ मार्च २०१५)\nमारुती पूजा (हनुमान जयंती : ४ एप्रिल २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ८ एप्रिल २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ७ मे, २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ५ जून, २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ५ जुलै, २०१५)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - ३ ऑगस्ट, २०१५)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - १ सप्टेंबर, २०१५, श्रीगणेश चतुर्थी - १७ सप्टेंबर २०१५)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - १ ऑक्टोबर २०१५, ३० ऑक्टोबर २०१५)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - ११ नोव्हेंबर २०१५)\nगणपती पूजा (संकष्ट चतुर्थी - २९ नोव्हेंबर २०१५)\nगणपती पूजा (संकष्ट चतुर्थी - २८ डिसेंबर २०१५)\nगणपती पूजा (संकष्ट चतुर्थी - २७ जानेवारी २०१६)\nगणपती पूजा (श्रीगणेश जयंती - ११ फेब्रुवारी २०१६, संकष्ट चतुर्थी - २६ फेब्रुवारी २०१६)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - ७ मार्च, २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २७ मार्च २०१६)\nराम पूजा (राम नवमी - १५ एप्रिल २०१६)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - २२ एप्रिल २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २५ एप्रिल २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २५ मे २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २३ जून २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २३ जुलै २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - २१ ऑगस्ट २०१६)\nश्रीकृष्ण पूजा (श्रीकृष्ण जयंती २४ ऑगस्ट २०१६, गोपाळकाला २५ ऑगस्ट २०१६)\nगणपती पूजा (श्रीगणेश चतुर्थी - ५ सप्टेंबर २०१६, संकष्टी चतुर्थी - १९ सप्टेंबर २०१६)\nलक्ष्मी पूजा (लक्ष्मीपूजन - ३० ऑक्टोबर २०१६)\nगणपती पूजा (संकष्ट चतुर्थी - १९ ऑक्टोबर २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १७ नोव्हेंबर २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १६ डिसेंबर २०१६)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १५ जानेवारी २०१७, गणेश जयंती - ३१ जानेवारी २०१७)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - १४ फेब्रुवारी २०१७)\nशंकर पूजा (महाशिवरात्री - २४ फेब्रुवारी २०१७)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १६ मार्च २०१७)\nराम पूजा (राम नवमी - ४ एप्रिल २०१७)\nमारुती पूजा (हनुमान जयंती - ११ एप्रिल २०१७)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १४ एप्रिल २०१७)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १४ मे २०१७)\nगणपती पूजा (अंगारक संकष्टी चतुर्थी - १३ जून २०१७)\nगणपती पूजा (संकष्टी चतुर्थी - १२ जुलै २०१७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/04/blog-post_26.html", "date_download": "2018-04-20T14:23:59Z", "digest": "sha1:2PMWH7HREKIIM7UV6JHAIPBWZLWJKNU3", "length": 9815, "nlines": 62, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अरण्यकांड - भाग २", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअरण्यकांड - भाग २\nरामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.\nरामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.\nमग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्‍हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.\nपंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.\nपंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.\nकॉमेंट चुकून डिलीट झाली. गूगलवर साईन-इन करताना काहीतरी गोंधळ झाला.\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअरण्यकांड - भाग २\nअरण्यकांड - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://newsworld.live/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-20T14:32:37Z", "digest": "sha1:2PZXMSSQGMQPLSQ3TLHWYA5COIA27O6V", "length": 5869, "nlines": 112, "source_domain": "newsworld.live", "title": "अहमदनगर – News World", "raw_content": "\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nपुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून...\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nपुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या...\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nकाहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले...\nहडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nआघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान\nद्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त\nमी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज\n19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत\nबोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर\nशनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी\nकझाकस्तानमध्ये प्रवासी बसला आग लागून 52 जण ठार\nTop News • आंतरराष्ट्रीय • ठळक बातमी • ताज्या बातम्या\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nउत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी\nपाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू\n49 इतर वस्तूंवरील कर कमी\nओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://rvgore.blogspot.com/", "date_download": "2018-04-20T14:19:58Z", "digest": "sha1:FMX7FVNJ2XMWCNP3WSYM7WBQPVHINJVV", "length": 100701, "nlines": 350, "source_domain": "rvgore.blogspot.com", "title": "स्मृति", "raw_content": "\nअमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....\nफूटपाथ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. फूटपाथ म्हणजे मुख्य रस्ताच्या बाजूने काढलेली एक पायवाट की ज्यावरून आपण सुरक्षित चालू शकतो. एकीकडे वाहनांची वर्दळ असते. वाहने कशी जात आहेत यावरून एक नजर टाकता येते. तसेच वाहने चालवणाऱ्यांनाही एक नजर फुटपाथाकडे टाकता येते. असा हा फूटपाथ माझ्या आयुष्यात आला. त्याचा सहवास साधारण सव्वा ते दीड वर्षांचा होता. किती आधार वाटायचा मला याचा \nतब्बल १० वर्षानंतर आम्ही आमचे राहते घर सोडले आणि विनायकच्या नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात आलो. ज्या जागेत आलो ती आम्हाला घ्यावीच लागली. अपार्टमेंटच्या शोधकार्यात चांगला अनुभव आला नाही. शिवाय जे अपार्टमेंट उपलब्ध होते ते मागच्या बाजूला की जिथून फक्त आणि फक्त झाडेच दिसायची. आम्हाला दोघांनाही चालायला खूप आवडते. एके दिवशी विनायक बाहेर फिरायला म्हणून पडला आणि मला येऊन सांगितले की \"आपल्या अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर एक फुटपाथ लागतो तो थेट इंगल्स ग्रोसरी स्टोअर्स पर्यंत पोहोचतो. तू पण फिरून ये एकदा\"\nनवीन शहरी विनायक ऑफीसला जायला लागला पण ऑफीसला जाताना पाऊण तास आणि येताना पाऊण तास वेळ. त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. सकाळी ८ ला निघायचा ते रात्री ७ ला यायचा. दिवसभर मी एकटीच आधी ज्या शहरात आम्ही राहत होतो तेव्हा विनायक दुपारच्या जेवणाला घरी यायचा. त्यामुळे मला थोडीका होईना त्याची सोबत मिळायची व बाकीचा वेळ मी एकेक उद्योग करत रहायचे. दहा वर्षे करत राहिले. रेसिपी लेखन, इतर लेखन, फोटोग्राफी,बदकांना तळ्यावर जाऊन\nब्रेड घालणे, पब्लिक लायबरी मध्ये जाऊन काम करणे, कॉलेजला जाणे. इ. इ. इ. बरेच काही केले. प्रत्येकाला कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो. तेच तेच करण्यातकुठेतरी खूप कंटाळवाणे होऊन जाते आणि नंतर दुसरे काही उद्योग शोधून त्यात मग्न होऊन जातो.\nया फूटपाथने मला दुसरे काही शोधण्यात मदत केली. मी खूप ऋणी आहे या फूटपाथाची यावरून चालताना मला आधार तर वाटायचाच पण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चालताना अनुभव व आनंद मिळाला. चालायला ५० मिनिटे लागायची. या फूटपाथवरून चालत जाऊन इंगल्स मध्ये थोडा वेळ घालवल्यामुळे एकदा नोकरीबद्दलचे विचारले असता मला इथे इंगल्स मध्ये नोकरी लागली. सुरवातीला मी वेळ जाण्याकरता या फूटपाथावरून चालत जायचे आणि यायचे. जाताना, येताना व इंगल्स्मध्ये थोडा वेळ बसून, तिथली स्टार बक्स मधली कॉफी पिऊन यायचे. सर्व मिळून माझा तीन तासांचा वेळ जायचा. छान वाटायचे. सकाळी आवरून १० ला निघायचे ते १ पर्यंत जेवायच्या वेळेला घरी यायचे. डोंगराळ भाग असल्याने रस्त उंचसखल आहेत. कधी चढण तर कधी उतरण. एके ठिकाणी थांबायचे थोडे. सिमंटचे दोन कट्टे आहेत समोरासमोर थोडे उंचीला लहान सहज बसता येण्याजोगे. त्यावर बसून थोडा दम खायचे आणि मग निघायचे.\nजेव्हा मला इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा कामावरून येताना फूटपाथवरून चालत यायचे. कामावरून\nनिघण्याची वेळ ४ होती. निघण्यापूर्वी मी कॉफी आणि थोडेसे काही खाऊन निघायचे. कामाला जाताना जी बॅग होती त्यामध्ये जय्यत तयारी असायची. इथे पाऊस केव्हाही पडतो. कामावर सकाळी जाताना वेदर चॅनलवरचे हवामान पाहायचे. शिवाय हवामानाच्या वेबसाईटवर तासातासाचे हवामान पण नोंदवलेले असते. ते पाहून ४ वाजता नक्की कोणत्या प्रकारचे हवामान आहे हे बघावेच लागायचे. पाऊस असेल तर छत्री आठवणीने न्यावी लागायची. नुसता झिमझिम पाऊस असेल तरी सुद्धा \nथंडीमध्ये कोट, टोपी, मफलर, हातमोजे ठेवायचे. पाणी पिण्याची बाटली, शिवाय थोडीफार कुकीज असायचे. माझे कामावरचे दिवस आठवड्यातून ४ दिवस, त्यातले २ दिवस सोमवार ते शुक्रवार मधले असायचे. प्रत्येक दिवस वेगळा असायचा. कधी झिमझिमणारा पाऊस तर कधी विजा चमकून कोसळणारा. थंडी मध्ये कधी झोंबणारे वारे तर कधी वारे अजिबात नसून\nफक्त गोठवणारी थंडी असायची. कधी खूप ढगाळलेले वातावरण तर कधी उनसावलीचा खेळ उन्हाळ्यात प्रखर उन. या दिवसात कोट छत्रीचे ओझे नसायचे. पण उन्हाचे चटके खूप बसायचे. जसे थंडी मध्ये खूप थंडी लागू नये म्हणून झपाझप चालणे तसेच उन्हाळ्यात चटके\nपाऊले पटापट उचलायला लागायची. जेव्हा ढगाळलेले वातावरण असायचे तेव्हा रमतगमत छान वाटायचे चालायला.\nएक ना अनेक वेगवेगळ्या तऱ्हा. स्नो पडून गेल्यावर व पडत असताना मजा काही वेगळीच. जेव्हा थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याची भर असायची तेव्हा मफलर खूपच उपयोगी पडायचा. चालताना समोरून वारे यायचे ते अडवण्याकरता नाकापाशी मफलर धरायचे.\nLabels: अविस्मरणीय, डेंटनच्या आठवणी, माझे अमेरिकेतील अनुभव\nआमच्या लग्नाला आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्ही आता ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आम्ही दोघांनि एकमेकांना कधीच पाहिले नव्हते, पण आमच्या आईवडिलांनी एकमेकांना पाहिले होते. माझे सासरे आणि आणि माझी आई पूर्वी सख्खे शेजारी होते. सासरे नोकरीनिमित्ताने पुण्यात आले आणि आई लग्न होऊन आली.\nमाझ्या सासूबाईंनी मला मागणी घातली आणि आमचे लग्न झाले. बघण्याचा कार्यक्रम १ जानेवारी १९८४ साली सकाळी ७ वाजता झाला. मी नोकरी करत असल्याने आधी आम्ही गोऱ्यांच्या घरी गेलो. कांदे पोहे कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने झाला. माझ्या सासूबाईंनी मला कांदे पोहे आणून दिले आणि आम्ही दोघे बोलण्याऐवजी त्यांच्या चोघांच्या गप्पाच झाल्या. आम्ही दोघे त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता एकमेकांकडे कटाक्ष टाकत होतो.\nआमचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम जरी १ जानेवारी १९८४ झाला असला तरी लग्न मात्र २६ फेब्रुवारी १९८८ साली झाले. ती एक लई मोठी ईष्टोरी आहे बगा. जशी प्रत्येकाच्या लग्नाची एक वेगळी गोष्ट असते.\nआमचा साखरपुडा झाला आणि आम्ही तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. त्यादिवसानंतर आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. आयायटी पवई वरून विनायक दर शुक्रवारी यायचा आणि आम्ही शनिवार रविवार फिरायचो. फिरण्यापेक्षा आम्ही सिनेमे पहायला जायचो. संगम, मधुमती, बीस साल बाद, मेरा नाम जोकर इ. इ. आधी मी विनायकच्या घरी जायचे. मग तिथे चहा पाणी व्हायचे. सुरवातीला सासूबाई खायला करायच्या. नंतर मीच करायला लागले. सिनेमा पाहून झाल्यावर रिक्शाने विनायक मला आईच्या घरी सोडायला यायचा. आई मात्र होणाऱ्या जावयाला जेवल्याशिवाय सोडायची नाही. अगदी पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर चटणी असे साग्रसंगीत जेवण करायची. पिक्चर पाहिला गेल्यामुळे आमचे दोघांचे बोलणे जास्त व्हायचे नाही. वि ला पिक्चर पाहायची आवड आहे त्यामुळे मी खुश होते.\nलग्नाच्या आधी फिरायला जाताना एकदा माझा वाढदिवस आला. तेव्हा वि ने आपणहून मला आणलेली पहिली आणि शेवटची साडी आणि गजराही आणलेला त्यात भर म्हणजे आम्ही त्यादिवशी मेरा नाम जोकर हा पिक्चर पहायला गेलो होतो. आणि त्या तिकिटाचे पैसे माझ्या बहिणीने दिले होते ती म्हणाली माझ्यातर्फे तुम्हाला भेट ती म्हणाली माझ्यातर्फे तुम्हाला भेट आम्ही तिला आमच्याबरोबर यायचा आग्रह केला तर म्हणाली मी कशाला कबाब में हड्डी\nएकदा पर्वतीवर फिरायला गेलो. तेव्हा आमच्या मध्ये झालेला संवाद\nतुला पोळ्या करायला येतात का\n ( म्हणायला काय हरकत आहे, ) नुसत्या पोळ्या नाहीत तर मला पुरणपोळ्याही करता येतात.\nपण मी रोज पुरणपोळी खाणार नाहीये. तुला साध्या पोळ्या येतात का\nतू रोज किती पोळ्या खातोस\nदुपारी ४ आणि रात्री ४\nम्हणजे चार नि चार ८ आणि माझ्या २ म्हणजे १० , मॅनेजेबल.\nनंतर विचारले तुला डाळ तांदुळाचे भाव माहीती आहेत का\nअसतील काहीतरी, का रे\nअगं आपल्याला १२०० शिष्यवृत्ती मध्ये भागवायचे आहे म्हणून विचारले.\nभागेल की. न भागायला काय झाले.\nतुला वाचनाची आवड आहे का\n\"नाही\" हे उत्तर देऊन एका फटक्यात प्रश्न निकालात काढला. म्हणजे आहे असे उत्तर दिले की मग काय वाचतेस, किती पुस्तके वाचलीस, कोणते लेखक आवडतात, नकोच त्या भागगडी. म्हणजे मला वाचनाची आवड आहे पण ति कथा कादंबऱ्यांपुरतीच.\nगाण्याची आवड आहे का\nहो. खूपच. अनिल बिस्वास माहीती आहे का\nहो रोशन माहीती आहे. म्युझिक डायरेक्टर आहे ना\nमी पण एकदा वि ला विचारले तुला फक्त एकच शर्ट पँट आहे मला तरी कुठे जास्त ड्रेस होते. फिरायला जाताना मी आईच्या साड्या नेसून जायचे आणि ब्लाऊज काळा ठरलेला मला तरी कुठे जास्त ड्रेस होते. फिरायला जाताना मी आईच्या साड्या नेसून जायचे आणि ब्लाऊज काळा ठरलेला त्यामुळे नंतर फिरायला जाताना लगेच त्याचा दुसरा ड्रेस बाहेर आला \nलग्न झाल्यावर संसाराला सुरवात झाली. आमच्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे गाणी. विनायकच्या बॅचलर दिवसातला ट्रांन्झीस्टर आता आमच्या मॅरिड लाईफ मध्ये नांदू लागला. सकाळी सकाळी विनायक सिलोन लावायचा. सिलोनची गाणी ऐकायची म्हणजे ते एक प्रकारचे दिव्यच असते. आधी बरीछ खुडबुड खुडबुड करावी लागते तेव्हा कुठे एखाद दुसरे गाणे ऐकायला मिळते. ते गाणे तो रेडियोपाशी कान देऊन ऐकायचा. म्हणायचा सुंदर गाणे. मला ती गाणी अजिबातच ओळखीची वाटायची नाहीत.\nएकदा एका गाण्याला विचारले मी, कोण गातय. तर वि म्हणाला तलत. म्हणजे तलत महेमुद. ईई मला अजिबात नाही आवडत तो. वि म्हणाला तलत इज तलत पण त्यापेक्षाही सैगल. सैगल आणि तलत किती हळूहळू गातात ते किती हळूहळू गातात ते मला तर किशोर कुमारच आवडतो. किशोरचे गाणे ऐकले की कसा उत्साह संचारतो.\nअशी किती गाणी ऐकलीस तू तलत आणि सैगलची. खूप गाणी आहेत. ती ऐक आधी आणि मग सांग मला. नंतर मी बरीच गाणी ऐकली. आपणहून नाही ऐकली. विनायकने ऐकायला लावली आणि मग हळुहळू मलाही तलतच्या आवाजाची गोडी आवडायला लागली. पण तरीही किशोरकुमारच्या आवाजात जादू आहे ना ती तलतमध्ये नाही. पसंद अपनी अपनी \nमला गाण्याचा ठेका आवडतो आणि विनायकला गाण्यामधली कविता आवडते. म्हणजे आधी त्याचे कान गाण्याच्या कवितेकडे जातात आणि माझे कान ठेक्याकडे मी पण मग गाण्याचे बोल काय आहेत ते नीट ऐकायला लागले. खरचं गाण्याच्या बोलांमध्ये खूप सुंदर सुंदर अर्थ दडलेले असतात हे खरे आहे.\nएकदा विचारले तू व्यायाम नाही करत मी म्हणाले व्यायाम छे, कधीच केला नाही. मग म्हणाला रोज करत जा. सूर्यनमस्कार घाल रोज. बायकांकरिता हा व्यायाम चांगला आहे. कसे घालायचे सूर्यनमस्कार मी सांगतो ना तुला. मग एके दिवशी १२ सूर्यनमस्कार घातले. पहिल्या दिवशी चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी ताप आल्यासारखा वाटला. वि म्हणाला असेच वाटते ताप आल्यासारखे पण तरीही रेटून व्यायाम करायचा. नंतर तुला चांगले परिणाम दिसायला लागतील. आणि खरेच खूपच छान परिणाम दिसायला लागले. चपळपणा (होताच आधी) वाढला. आणि मग मी रोजच्या रोज एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायला लागले. स्टॅमिना वाढला आणि माझे वजनही वाढले. एके दिवशी मग मीच वि ला सूर्यनमस्कार घाल असा सल्ला दिला. अरे, तू घालून बघ, खूपच छान वाटते. हा फक्त जोर बैठकाच घालायचा. त्यालाही ते पटले. आणि त्याच्या व्यायामात नमस्कारांची भर घातली गेली.\nएके दिवशी म्हणाला योगासने येतात का तुला मी म्ह्णाले कधी केली नाहीत पण मला करायला आवडतील. योगासनामध्ये मला सर्वांगसन छानच जमले आणि अजुनही काही पायांची आसने छान जमली की जी विनायकला जमली नव्हती. मी त्याला म्हणाले की तु फक्त जोर बैठका घालतोस त्यामुळे लवचिकता आणि चपळपणा आलेला नाहीये. एके दिवशी मला म्हणाला की तू जोर बैठका घाल. नाही हं जोरबिर नाही मारणार मी. हे काही बायकांचे व्यायाम नाहीत. असे काही नाहीये. मुली जीम मध्ये जातात ना मी म्ह्णाले कधी केली नाहीत पण मला करायला आवडतील. योगासनामध्ये मला सर्वांगसन छानच जमले आणि अजुनही काही पायांची आसने छान जमली की जी विनायकला जमली नव्हती. मी त्याला म्हणाले की तु फक्त जोर बैठका घालतोस त्यामुळे लवचिकता आणि चपळपणा आलेला नाहीये. एके दिवशी मला म्हणाला की तू जोर बैठका घाल. नाही हं जोरबिर नाही मारणार मी. हे काही बायकांचे व्यायाम नाहीत. असे काही नाहीये. मुली जीम मध्ये जातात ना मसल पॉवर येणार कशी मग मसल पॉवर येणार कशी मग मग त्याने मला १२ सूर्यनमस्कारांमध्ये १२ जोर आणि १२ बैठका घाल असा सल्ला दिला. तसे केलेही. माझी हालत खूपच खराब झाली. मला बसता येईना की उठता येईना. खूप जडत्व आले. मग मी पण प्रयोग करून करून एक व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ जोर, ४ बैठका आणि योगासने.\nएकदा साप्ताहिक सकाळमध्ये वाचनात आले की एकसूरी व्यायाम चांगला नाही. आमच्या व्यायामात चालणे ऍड झाले. रोज जेवणानंतर आम्ही दोघं अर्ध्या तासाची फेरी मारायला लागलो. व्यायाम म्हणजे लाख दुखोंकी एक दवा आहे पण अति व्यायाम अजिबात नको. जसजसे वय वाढते तसतसे तरूणपणातला व्यायाम उपयोगी पडतो. नंतर नंतर आठवड्यातून २ ते ३ वेळा व्यायामही पुरेसा होतो. हे अनुभवाचे बोल आहेत.\nआम्ही दोघे खावस असल्याने केलेला पदार्थ अर्धा अर्धा वाटून घेतो. पण तो पदार्थ चवीला चांगला झाला नसेल तर मी उदारपणाचा आव आणून पाहिजे का अजून असे वि ला विचारते आणि बघ मी माझ्या वाटणीतला पदार्थ तुला कसा दिला हे सांगते. मग म्हणतो मी काय तुला आज ओळखतो काय असे वि ला विचारते आणि बघ मी माझ्या वाटणीतला पदार्थ तुला कसा दिला हे सांगते. मग म्हणतो मी काय तुला आज ओळखतो काय आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत. पण काहीकाही मात्र नाहीत. मला लग्ना आधी आयस्क्रीम अजिबात आवडायचे नाही ते आवडायला लागले. मला कच्चे तिखट मीठ पोहे खूप आवडतात. वि ला आवडत नाहीत म्हणून लॅपटॉपवर काही गाणी पाहत होतो आणि माझ्या हातात वाडगा होता कच्च्या पोह्यांचा तेल तिखट मीठ घालून केलेला. मग म्हणाला मला दे थोडे. असे म्हणता म्हणता ह्यानेच जवळजवळ सगळे पोहे खाऊन टाकले. आता का रे पुंगाण्या आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत. पण काहीकाही मात्र नाहीत. मला लग्ना आधी आयस्क्रीम अजिबात आवडायचे नाही ते आवडायला लागले. मला कच्चे तिखट मीठ पोहे खूप आवडतात. वि ला आवडत नाहीत म्हणून लॅपटॉपवर काही गाणी पाहत होतो आणि माझ्या हातात वाडगा होता कच्च्या पोह्यांचा तेल तिखट मीठ घालून केलेला. मग म्हणाला मला दे थोडे. असे म्हणता म्हणता ह्यानेच जवळजवळ सगळे पोहे खाऊन टाकले. आता का रे पुंगाण्या पुंगाण्या हा शब्द बाबांचा आहे. आम्ही लहानपणी नको म्हणत असताना, आम्हाला नाही आवडत हा पदार्थ असे म्हणायचो. खाऊन बघितल्यावर आवडला की मग खायचो तेव्हा बाबा आम्हाला म्हणायचे. आता का गं पुंगाणे.\nप्रयोगशीलता मात्र खूपच आहे वि मध्ये. लग्न झाल्यावर एकदा कॉंफरन्सला बंगलोर ला गेला असताना तेथे रसम भातं, सांबारं खाण्यात आले. आल्यावर म्हणाला खूप हलके हलके वाटते आणि मला पोळ्या अजिबात न करता भात आमटी रोजच्या रोज करायचा असे सांगितले. ४ च दिवसात खूप अशक्तपणा आला. तसेच भाकरीचेही झाले. कितीही म्हणले तरी भाकऱ्या कोरड्याच पडतात. पोळी भाजीला पर्याय नाही. काही दिवसांनी दुपारी फक्त दही साखरच खाण्याचा प्रयोग केला. एक ना दोन हजारो प्रयोग. कोणताही नवीन प्रयोग वि च्या डोक्यात आला की मला धडकीच भरायची. पण आता मलाही कळून चुकले आहे की प्रयोग केल्याशिवाय काय चांगले काय वाईट, कोणते उपयोगी आणि कोणते निरूपयोगी असते ते \nलग्नानंतर माझ्या आवडीच्या भाज्या मी करायचे. त्यात भरली वांगी, कारली, आणि शेपू जास्त प्रमाणात असायचे. सुरवातीला जाम वैतागायचा. मग मी पण त्याला डोस पाजायचे. कारल्याने रक्त शुद्ध होते. भरल्या वांग्याने तोंडाला चव येते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात आमच्या किराणामालात\nसर्वात खप कश्याचा झाला असेल तर तो पोह्यांचा \nप्रयोग करून करून आता आमचा आहारही सेट झाला आहे. पोळी भाजी कोशिंबीर, डाळींची धिरडी, उसळी. भाज्या तर आवडतातच. भाजीशिवाय आमचे पान हालत नाही. अमेरिकेत आल्यावर आयस्क्रीम बादल्याच्या बादल्या खाल्ले. पोटॅटो चिप्स बरेच खाल्ले. चॉकलेटेही बरीच खाल्ली. आता हे पदार्थ आम्ही अजिबात आणत नाही. एक मोठी काट मारली आहे यावर \nएकतिसाव्या वर्षात पदार्पण करतोय. आत्तापर्यंतचा अनुभव गाठीशी असताना भीती कशाची\nया दिवशीच्या निमित्ताने मी फक्त हेच म्हणेन की मित्रमंडळींनो तुमच्या मनात जे जे काही असेल ते ते सर्व तुम्हाला मिळो \nहरीश ऋजुता आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांना ऍशविलच्या विमानतळावर सोडले. हा विमानतळ अगदी गावात येण्याजाण्याच्या रस्त्यावर आहे की जिथे फक्त अमेरिकेतल्या अमेरिकेत जाणारी येणारी विमाने येतात. विनायकचा शाळेतला मित्र अमेरिकेतील आमच्या घरी येईल असे कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यांच्या मुलाकडे ते महिन्याभरासाठी आले आणि योगायोगाने ख्रिसमसची शनिवार रविवार जोडून सुट्टी आल्याने आम्ही घरीच होतो आणि त्यामुळेच त्यांना आमच्याकडे बोलावता आले. आम्ही सर्वांनी मिळून दिलखुलास गप्पा मारल्या. जवळ असलेली ठिकाणे दाखवली. मी जिथे कामाला जाते ते वाण्याचे दुकान दाखवले. :D क्लेम्सन दाखवले. तिथे आम्ही ज्या घरात राहिलो ती घरे दाखवली. ४ दिवसात त्यांना चारही ऋतुंचे दर्शनही झाले. :) घरी थोडी गाणी गायली. सकाळचा वेळ बाहेर फिरणे आणि इथल्या उपहारगृहात जेवण असा कार्यक्रम आणि संध्याकाळ झाली की घरी बसून गप्पाटप्पा होत होत्या. एक दिवस मध्ये गेला असेल की लगेचच मेघना आमच्या घरी आली. आल्यावर आपण कधी आणि कश्या ऑर्कुटवर भेटलो असे आश्चर्यचकीत उद्गार निघाले. :)\nइतके दिवस फक्त फोनवर बोलणाऱ्या आम्ही दोघी प्रत्यक्षात भेटलो. मेघना आमच्या घरी दुपारी आली आणि आम्ही दोघींनी जेवून घेतले. पोळी भाजी आमटी भात असा साधाच स्वयंपाक होता. रात्री मात्र साबुदाणाप्रेमींनी मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले. :D सोबत नारळाच्या चटणीने चवीमध्ये भर घातली. रात्रभर आम्ही दोघींनी गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी विनायक ऑफीसमध्ये गेला. मेघनाने आलं घालून गरम गरम चहा आमच्या दोघींकरता बनवला. चहाची चव कायम लक्षात राहील माझ्या नंतर तिने आणलेला फुलांचा गुच्छ फुलदाणी मध्ये लावला. \"चाय पानी\" हे ऍशविलमधले एक भारतीय उपहारगृह आहे तिथे जायचे आदल्यादिवशीच ठरले होते. मला शोभनाने सांगितले होते की तिथे पाणीपुरी छान मिळते. तेव्हापासून अमेरिकेतली पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करायची असे ठरवले होते. तसे एकदा आम्ही दोघे गेलोही होतो. पण तिथे पार्कींगला जागा न मिळाल्याने वैतागून परत घरी आलो आणि खूप भूक लागलेली असताता घरीच पोळी भाजी बनवली होती. या अनुभवानंतर तिथे अजिबात जायचे नाही असा निश्चय केला होता. पण आशा सुटेना देव भेटेना नंतर तिने आणलेला फुलांचा गुच्छ फुलदाणी मध्ये लावला. \"चाय पानी\" हे ऍशविलमधले एक भारतीय उपहारगृह आहे तिथे जायचे आदल्यादिवशीच ठरले होते. मला शोभनाने सांगितले होते की तिथे पाणीपुरी छान मिळते. तेव्हापासून अमेरिकेतली पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करायची असे ठरवले होते. तसे एकदा आम्ही दोघे गेलोही होतो. पण तिथे पार्कींगला जागा न मिळाल्याने वैतागून परत घरी आलो आणि खूप भूक लागलेली असताता घरीच पोळी भाजी बनवली होती. या अनुभवानंतर तिथे अजिबात जायचे नाही असा निश्चय केला होता. पण आशा सुटेना देव भेटेना आणि शेवटी देव भेटलाच नाही आणि शेवटी देव भेटलाच नाही \nपाणी पुरी एक नंबर आवडती की जी मी भारतात असताना मनसोक्त खाल्ली होती ती इथे आल्यावर मात्र ती कुठेही अजिबात न मिळाल्याने त्याची चव पूर्णतः विसरले होते. आणि आता आज योग आला आहे त्या आनंदात मी होते. मेघना या आधी तिथे जाऊन आली होती आणि तिथे वडा पाव घेतला होता. ती म्हणाली वडापाव तसा बरा होता पण भारतात मिळणाऱ्या वड्यासारखा नव्हता. आणि तिथे जेवायची थाळी मिळते असेही ऐकले होते. तिथे जाऊन मग आम्ही एका फुलझाडांच्या दुकानात जाणार होतो.\nआमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे चायपानी नावाचे उपहारगृह होते. तिथे जायला आम्हाला जवळजवळ १ तास लागला. वेळ बघून ठेवली होती. उपहारगृह ३ ला बंद होणार होते. १२ ला निघालो ते १ ला पोहोचलो. पोहोचलो म्हणजे काय जिपिएसने आम्हाला भिरभिर फिरवले. गल्लीबोळातूनही फिरवले. जिथे डेड एंड आहे तिथेही पोहोचवले. :D ऍशविल मधले क्रेझी ड्राइव्हरही पाहिले. :( भारतासारखे थोड्याश्या जागेतून वाट काढणारे ड्राईव्हर पाहून ते आता आमच्या कारला ठोकतात की काय असे वाटून गेले. ऍशविल डाऊनटाऊनला हे उपहारगृह आहे. तिथले रस्ते अतिअरूंद असल्याने आणि पार्कींगचा भला मोठा प्रश्न असल्याने आम्हाला इथे का आलो आहोत असे होऊन गेले होते.\nआमच्या नशिबाने आम्हाला पब्लिक पार्किंमध्ये एक जागा कशीबशी मिळाली. तिथे घुसलो तेव्हा ३ जागा उपलब्ध असा डिजिटल पाटीवर लिहिले होते आणि आमच्या पुढे २ कार होत्या. मिळाली बाई एकदाची जागा हुश्श केले आम्ही दोघींनी :D आणि इतक्या त्रासानंतर जिथे उपहारगृह होते तिथे अगदी जवळच ही पार्कींगची जागा होती. फूटपाथवरून चालायला लागलो तर ही मरणाची थंडी हुश्श केले आम्ही दोघींनी :D आणि इतक्या त्रासानंतर जिथे उपहारगृह होते तिथे अगदी जवळच ही पार्कींगची जागा होती. फूटपाथवरून चालायला लागलो तर ही मरणाची थंडी आणि चायपानी उपहागृहात पोहोचलो तर तिथे ही रांग आणि चायपानी उपहागृहात पोहोचलो तर तिथे ही रांग अरे बापरे काय प्रकार काय आहे हा तिथे जागा बुक केली तर तासाभराने या सांगितले. म्हणजे आम्ही १ ला पोहोचलो आणि २ ला तिथे बसलो. आणि ३ ला उपहारगृह बंद तिथे जागा बुक केली तर तासाभराने या सांगितले. म्हणजे आम्ही १ ला पोहोचलो आणि २ ला तिथे बसलो. आणि ३ ला उपहारगृह बंद त्याच्या शेजारी असलेल्या एका कॉफी हाऊस मध्ये शिरलो. आणि तिथे २ कॉफी आणि एक तिरामिसू घेतले.\nबिल झाले १८ डॉलर्स. कॉफी एकदम थंडगार आणि आम्हाला जितकी छान मसालेदार असेल अशी वाटली होती तितकी तर ती अजिबातच नव्हती तिरामिसू मात्र छानच होते. मग काय वेळ घालवायला आमचे फोटोसेशन सुरू झाले. तिथले लोक्स बघायला लागले. एकदा हाताची घडी घालून फोटो तर एकदा मि म्हणाले माझ्या कानातल्या बाटल्या येऊ देत गं फोटोमध्ये. :D तर एकदा मेघना म्हणाली प्रकाश नीट येत नाही म्हणून दिव्याखाली फोटो तिरामिसू मात्र छानच होते. मग काय वेळ घालवायला आमचे फोटोसेशन सुरू झाले. तिथले लोक्स बघायला लागले. एकदा हाताची घडी घालून फोटो तर एकदा मि म्हणाले माझ्या कानातल्या बाटल्या येऊ देत गं फोटोमध्ये. :D तर एकदा मेघना म्हणाली प्रकाश नीट येत नाही म्हणून दिव्याखाली फोटो त्रासातून अजून सुटका झाली नव्हती हं आमची त्रासातून अजून सुटका झाली नव्हती हं आमची खरा त्रास तर पुढेच आहे. :D तर आम्हाला त्या उपहारगृहाचा फोन आला ही या लवकर. आम्ही गेलो तर आम्हाला दारासमोर असलेली टेबल आणि खुर्ची होती. गर्दी असल्याने दार सारखे उघडले जात होते आणि आमच्यावर अतिप्रचंड गार वाऱ्याचा लोट येत होता.\nऑर्डर घ्यायला कुणीही फिरकत नव्हते. उपहारगृह तर मजेशीरच होते चिंचोळ्या आकाराचे आम्ही वेटर ला विचारून दुसरीकडे बसलो. पण तिथेही वाऱ्याचा लोट येतच होता. वेटर काही यायला तयार नाही. शेवटी एका बयेला हात दाखवून बोलावले. थाळी घेणार होतो पण सरसोंका साग ही भाजी होती. आम्हाला दोघींनाही ही भाजी आवडत नाही :( म्हणून या भाजीला पर्यायी भाजी मिळू शकेल का आम्ही वेटर ला विचारून दुसरीकडे बसलो. पण तिथेही वाऱ्याचा लोट येतच होता. वेटर काही यायला तयार नाही. शेवटी एका बयेला हात दाखवून बोलावले. थाळी घेणार होतो पण सरसोंका साग ही भाजी होती. आम्हाला दोघींनाही ही भाजी आवडत नाही :( म्हणून या भाजीला पर्यायी भाजी मिळू शकेल का असे विचारले असता तिने थाळीमधला मेन्युच आम्हाला परत वाचून दाखवला असे विचारले असता तिने थाळीमधला मेन्युच आम्हाला परत वाचून दाखवला पाणी पुरी नव्हतीच तिथे. दहीबटाटाशेवपुरी होती ती ऑर्डर केली आणि एक वडा पाव आणायला सांगितले. इतका वेळ लावला आणायला. :( :( आधी शेवबटाटापुरी आणली तर ती इतकी गारढोण होती की ती फ्रीजर मधून काढून दिली होती असे जाणवत होते. :D ७ डॉलर्चच्या शेवबटाटापुरी मध्ये फक्त ५ गारढोण पुऱ्या पाणी पुरी नव्हतीच तिथे. दहीबटाटाशेवपुरी होती ती ऑर्डर केली आणि एक वडा पाव आणायला सांगितले. इतका वेळ लावला आणायला. :( :( आधी शेवबटाटापुरी आणली तर ती इतकी गारढोण होती की ती फ्रीजर मधून काढून दिली होती असे जाणवत होते. :D ७ डॉलर्चच्या शेवबटाटापुरी मध्ये फक्त ५ गारढोण पुऱ्या \nवडापावचा तर पत्ताच नाही इतका गोंधळ त्यांचा गोंधळ पाहता उतप्पाची ऑर्डर दिली. आणि लगेचच उतप्पा हजर कठिण आहे. ती उतप्प्याची ऑर्डर दुसऱ्याचीच असणार. आम्ही त्या बयेला म्हणले पण की उत्तप्याची ऑर्डर आम्ही आत्ताच दिली आहे कठिण आहे. ती उतप्प्याची ऑर्डर दुसऱ्याचीच असणार. आम्ही त्या बयेला म्हणले पण की उत्तप्याची ऑर्डर आम्ही आत्ताच दिली आहे :( बरं ठिक आहे म्हणून आम्ही तो उतप्पा तसाच ठेवू दिला. उतप्पा म्हणजे अरे देवा :( बरं ठिक आहे म्हणून आम्ही तो उतप्पा तसाच ठेवू दिला. उतप्पा म्हणजे अरे देवा गार ढोण, शिवाय कोथिंबीर म्हणजे त्या उत्त्प्यावर जणू काही कोथिंबीरीचे शेत उगवले आहे असे वाटाते इतकी पसरली होती. :D :D उतप्पा कच्चा, चटणी आळणी, सांबार थोडेफार चव आहे असे म्हणायला हरकत नाही असे होते.\nनंतर परत एक उत्तप्पा आणून दिला आणि बऱ्याच वेळानंतर वडा पाव बिनाचवीचे खाऊन समाधान तर अजिबात झाले नव्हते. फक्त पोट भरले होते म्हणून वडा पाव घरी आणून खाल्ला. घरी आल्यावर मात्र ढकलत ढकलत स्वयंपाक केला. झोप येत होती पण झोपावेसे वाटत नव्हते. काही खावेसे वाटत नव्हते. मनः स्ताप झाला होता. पण हा सगळा मूड झोपायच्या आधी बदलून गेला. आम्ही दोघींनीही गाणे रेकॉर्ड करायचे ठरवले होते ते केले आणि मूड छान झाला. कजरा मुहोबतवाला हे गाणे ठरले याचे कारण सूर नवा ध्यास नवा यात एकीने हे गाणे\nदोघींच्या स्वरात म्हणले होते आणि ते ऐकल्यावर हेच गाणे आम्ही दोघींनि म्हणायचे ठरवले. गाण्याची रंगीत तालीम झाली आणि गाणे रेकॉर्ड करताना माझ्याकडून चूक झाली. मोतीयन की माला हे नीट म्हणले गेले नाही. नंतर एकदा गायले तेव्हा मेघनाने परत एकदा रंगीत तालीम केली त्यात झुमका ना हार माँगू च्या ऐवजी झुमका ना प्यार माँगू असे म्हणले. मी ते लक्षात आणून दिल्याने आम्ही दोघी खूप हासलो. नंतर रेकॉर्ड करतानाही परत मेघनाने हार च्या ऐवजी प्यार गायले तेव्हा ते माझ्या लक्षात आले होते पण कसेबसे हासू आवरले. ते हासू कसे आवरले ते माझे मलाच माहीत. :D नंतर रेकॉर्डींग करताना चूक लक्षात आल्यावर परत एकदा गायचे ठरले.\nनंतर परत एकदा माझ्याकडून चाल म्हणण्यात चूक झाली. परत एकदा जोरजोरात हासल्लो. :D :D मी म्हणाले जाउदे. हे झाले आहे ते चांगले आहे आणि मुख्य म्हणजे आपण दोघी कुठे अडखलेलो नाही. हे सर्व रेकॉर्डिंग होईतोवर रात्रीचा १ वाजला. मी म्हणाले चला झोपुया उद्या कामाला जायचे आहे. तरी झोप कुठली यायला. तु जो मेरे सुरमें सुर मिलाले गायले. अजून एक दोन गाणी मेघनाने म्हणली. ती मलाही आवडली. कारण मला जुनी गाणी आवडतात. नवीन गाणीही काही चांगली असतातच पण ऐकत नसल्याने कळत नाही. शनिवारी सकाळी तिने मला इंगल्स ला सोडले आणि ती पुढे शार्लटला तिच्या घरी गेली. काम करत असताना माझ्या मनात\nकजरा मुहोब्बतवाला सारखे घोळत होते. उपहारगृहामधला सावळा गोंधळ मात्र पहिल्यांदाच अनुभवला. भारतीय उपहारगृहाचे मालक अमेरिकन होते. त्यांनी म्हणे बंगलोर ला जाऊन काही भारतीय फास्ट फूड शिकले असे म्हणतात. Rohini Gore\nभेटवस्तुंची देवाण घेवाण : - किती छान वाटते ना :) तर आज आमच्या इंगल्स स्टोअर्स मध्ये सगळ्यांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रींक होते. दोन तीन प्रकारच्या कुकीज, दोन तीन प्रकारची चॉकलेटे, केक, बटाटा चिप्स, इ. इ. होते. तिथे भेटवस्तू पण रॅप करून ठेवल्या होत्या. त्या वस्तू म्हणजे सिक्रेट सांता त्याकरिता आधी आपले नाव यादीत द्यावे लागते. २ वर्षांपूर्वी मला नोव्हेंबर मध्ये नोकरी लागली होती तेव्हा काही माहीती नव्हते. दुसऱ्या वर्षी माहीती झाले होते पण कार्मेन म्हणाली की ती यामध्ये भाग घेत नाही म्हणून मी पण भाग घेतला नव्हता. तर आधी यादीत आपले नाव द्यावे लागते आणि जी भेटवस्तू द्यायची असते ती १० डॉलर्स च्या खाली असता कामा नये. १० डॉलर्स च्या वरती कितीही चालेल. आणि नंतर २ दिवसांनी आपल्याला एक चिठ्ठी उचलायची असते. त्या चिठ्ठीत कोणाला भेटवस्तू तुम्ही देणार आहात त्याचे नाव लिहिलेले असते. पण आपण ज्याच्याकरता भेटवस्तू देणार आहोत ते त्याला कळवून द्यायचे नसते. तर आज काहींना ज्या भेटवस्तू मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.\nविकीला के कडून भेटवस्तू मिळाली ती म्हणजे कानातले आणि काचेची एक बाहूली. खूप छान होती. पिझ्झा बार मध्ये एक मेक्सिको देशातली मुलगी आहे तिला मोठा मेक अप बॉक्स मिळाला. हा बॉक्स तिला बेकरी मध्ये काम करणाऱ्या मुलीकडून मिळाला. मेक अप बॉक्स मिळाल्यावर ती खूपच खुष झाली होती. ती रोज चेहऱ्याला काय काय लावून येते. काजळ, लाली, डोळे वाढवते. पापणीच्या वर रंग लावते. त्या रंगांमध्ये चमचम पण असते. तिला ते खूप छान दिसते. एकीला प्रोड्युस मधल्या मॅजेजर कडून एक उबदार पांघरूण मिळाले. विकीने एकीला पिझ्झाचे गिफ्ट कार्ड दिले. आता ही झाली सिक्रेट सांता देवाण घेवाण. पण ख्रिसमस च्या निमित्ताने काहीजणी एकमेकींना अश्याच काही भेट वस्तू देतात. त्यात असेच काही उपयुक्त वस्तू असतात आणि काही चॉकलेटेही असतात.\nविकीने मला यावर्षी पॉपकार्नची बॅग दिली की जी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यावर पॉपकॉर्न तयार होतात टणटण उड्या मारत. शिवाय दोन तीन प्रकारची चॉकलेटे आणि कोकोआ मिक्स दिले. तर या ज्या भेटवस्तू देतात ना त्या सजलेल्या पिशव्याच जास्त छान असतात मी मागच्याच्या मागच्या वर्षी चॉकलेटे दिले. आणि मागच्या वर्षी लोंबते कानातले दिले. सर्वजणी खूप खुष होत्या. २ वर्षापुर्वीच्या भारतभेटी मध्ये मी तुळशी बागेतून सगळ्यांना कानातले खरेदी केले. सर्वांना आवडले. यावर्षी माझ्या मनात नेकलेस द्यायचे होते पण बाहेर जायला अजिबातच जमले नाही. आता मी पुढील वर्षी छोट्या सजवलेल्या पिशव्यांमधून एक लिपस्टिक, एक नेलपॉलिश व चॉकलेटे देणार आहे.\nविकी व कार्मेन ला मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण काहीतरी देते. एकदा कार्मेनला चॉकलेटे दिली.एकदा कानातले दिले. विकीला एकदा एक कप केक आणि फुगा दिला. आता यावर्षी मी दोघींना भारतातला गुलमोहोर प्रिंट करून आणि तो फ्रेम मध्ये घालून देणार आहे असा विचार आहे. :)\nयावरून मला एक कल्पना सुचली. आपल्याकडे सिक्रेट संक्रांती करता येईल :) तीळगुळाबरोबर भेटवस्तू अर्थात ऑफीस मध्ये. संक्रांतीचे हळदी कुंकू ज्या बायका घरी करतात त्यात ज्या लुटायच्या वस्तू देतात तर काही बायका चिठ्ठ्या ठेवतात आणि मग त्या चिठ्ठीत जी वस्तू येईल ती त्या बाईला मिळते. असे आपल्याकडेही आहेच की \nLabels: माझे अमेरिकेतील अनुभव\nआमची कार महामार्ग ४० वरून खूप जोरात धावत होती. डीसीवरून निघालो होतो. महामार्ग ९५ हा आम्हाला खूप आवडतो. या रस्त्यावर खूप शिस्तीत वाहतूक चालते. निघायला उशीर झाला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे ५ ला निघतानाच अंधार झाला होता. एकापाठोपाठ एक अश्या कार टेकलेल्या होत्या. तरीही कुठेही वाहतुक मुरंबा झाला नाही. सर्वजण ठरवून दिलेल्या वेगानेच जात होते. आमच्या प्रवासाला ५ तास उलटून गेले होते आणि केव्हा एकदा घरी पोहोचत आहोत असे होऊन गेले होते. विल्मिंग्टनला येण्यासाठी महामार्ग ४० घ्यावा लागतो\nआणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते. विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना ) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.\nविल्मिंग्टन शहर जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे समुद्रकिनारे आहेत पण ते इतके काही फेमस नाहीयेत त्यामुळे या शहरी कोणीही येत नाही.\nतर रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. डाव्या बाजूच्या लेनवरून आमची कार जात होती. एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात मला वीज चमकल्यासारखे वाटले. मी म्हणाले पण विनायकला की वीज चमकली. पाऊस येणार की काय पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणायला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यायला एकच गाठ पडली. विनायक म्हणाला \" वीज चमकत नाहीये. मागे बघ. पोलीस आहेत\" मि पण मागे वळून पाहिले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणायला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यायला एकच गाठ पडली. विनायक म्हणाला \" वीज चमकत नाहीये. मागे बघ. पोलीस आहेत\" मि पण मागे वळून पाहिले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले आपले काय चुकले माझ्या डोळ्यासमोर तर मी व वि कारागृहात आहोत असे चित्र तरळले. :D विनायक म्हणाला मला पण माहीती नाहीये काय झाले ते. आणि आता तू पोलिसांच्या समोर बडबड करू नकोस. गप्प रहा. :D तसा तर विनायकचा चेहराही पडला होता. आम्हाला पोलीसांनी पकडले असे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते. विनायकने\nकार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला. मी पण बाहेर येऊका अश्या प्रश्नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले \"नको\" तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काहीतरी बोलत होते. माझ्या चेहऱ्यावर \"काय बोलतायत एवढे अश्या प्रश्नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले \"नको\" तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काहीतरी बोलत होते. माझ्या चेहऱ्यावर \"काय बोलतायत एवढे काहीही झालेले नसूदे\" असे भाव चेहऱ्यावर होते. १ ते २ मिनिटांनी विनायक कार मध्ये येऊन बसला. पोलिसांशी विनायकने हस्तादोंलन केलेले दिसले. आणि माझा जीव भांड्यात पडला.\nपोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले \"काय रे झाले होते \" विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात \" विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला \"तुमचा जीव तुम्हाला प्यारा आहे ना तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला \"तुमचा जीव तुम्हाला प्यारा आहे ना \" मग लक्षात ठेवा. ठरवून दिलेली वेगमर्यादा\nपाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.\nमहामार्गावर जास्तीची लिमिट ७० असते. तुम्ही फार फार तर ८० ने जाऊ शकता. पण १०० च्या\n लक्षात ठेवायला पाहिजे. विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव दुसऱ्या अपघाताच्या कामी आला. अपघाताचा अनुभव कसा, कुठे, कधी आणि त्यासाठी काय काय\nकरावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)\nLabels: माझे अमेरिकेतील अनुभव\nजेव्हा सईचे लग्न ठरले त्या दिवसापासून मी आईशी आणि बहिणीशी फोनवर लग्नाविषयीच गप्पा मारत होते. कोणती साडी कोणत्या वेळेला नेसायची, लग्नाची खरेदी झाली का ,, केळवणे कोणाकडे झाली, इ. इ. ते अगदी मी आईच्या घरी येईपर्यंत. आईच्या घरी आलो आणि एकेक दिवस अगदी लागलेले होते. आईकडे सई आणि रंजना आदल्या दिवशीच आल्या होत्या. घरी गेल्यागेल्या गप्पांबरोबर आलं घातलेला चहा रंजनाने केला आणि त्यानंतर मनसोक्त पोहे खाल्ले रंजनाने केलेले आणि गुडुप झोपी गेलो. विनय विदुला आईकडे कधी येऊन पोहोचले कळले देखिल नाही. उठल्यावर अंघोळी उरकून लगेचच जेवायला बसलो. विनयने रंजनाला लग्नाचे केळवण केले होते त्यात आमची पण हजेरी लागली होती. चविष्ट आणि छान जेवण होते. शेवभाजी,,बटाटेवडे, चिरोटे, सोलकढी, पुलाव, इ. इ. अहेराची देवाणघेवाण झाली. त्यात माझाही नंबर लागला आणि विनयने मला घेतलेले ड्रेस चे कापड खूप आवडून गेले.\nलगेच दुसऱ्या दिवशी माझ्या अहेराची खरेदी केली. मी आईला आणि रंजनाला साड्या घेतल्या. गलानी दुकानात गेल्यावर साड्या बघत होतो. पहिली जरीची साडी दाखवली तीच खरे तर आवडून गेली होती पण अजून काही साड्यांचे प्रकार दाखवता का असे दुकानदाराला सांगितल्यावर त्याने लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यातले वेगवेगळे रंग दाखवले. पिवळा, निळा, लाल, आकाशी, नारिंगी,,, पण आईच्या साड्यांचे अनेक रंग झाले होते. अबोली रंग झाला नव्हता. माझ्या मनात हाच रंग साडीचा घ्यायचा होता. तो नेमका नव्हता. गडद पोपटी रंग आईच्या साडीचा घेतला त्याला जांभळ्या रंगाचे काठ होते. हा रंग झालेला नव्हता. साडी अप्रतिम होती. नंतर लगेच रंजनाची साडी घेतली. डिझाईनर साड्यांचे बरेच प्रकार पाहिले. आणि त्यात एक सुंदर साडी लगेचच आवडून गेली. साडीचा रंग म्हणजे लाल रंगामध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण होते. \"हिच साडी\" मी सई रंजना आणि सुरेशचे एक मत झाले. रंजनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.\nतिसऱ्या दिवशी आमच्या तिघींची केशरचना कशी करायची याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर :D पण तसे काहीही नव्हते त्यामुळे शंकेचे निरसन लगेचच झाले. माझी, रंजनाची व सईची सीमांत पूजनासाठी आणि दुसऱ्या दिवशीचीही केशरचना ठरवली गेली.\n२ नोव्हेंबरला घरचे केळवण झाले. मोजून ४ प्रकारच केले. कारण की लग्नघरातले सदस्य केळवणे खाऊन खाऊन थकली होती. गोड म्हणून मोदक केले. आवडीचे म्हणून बटाटेवडे केले. आणि मिसळ, काकडी, टोमॅटो व कांद्याचे काप. योगायोग छान होता. केळवण्याच्याच दिवशी सईचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री चॉकलेट केक, सईला आम्ही तिघींनी औक्षण केले. फोटोसेशन झाले. एकेक दिवस बिझी बिझी... नंतर एकापाठोपाठ एकेक म्हणजे रंजनाला केळवणाला आलेला अहेर आणि तिने देण्याकरता आणलेला अहेर बघितला. नंतर एके दिवशी घरच्या शुभ कार्याच्या करंज्या केल्या. करंज्या करताना खूपच हासलो. एके दिवशी ग्रहमख आणि नंतर हॉल मध्ये जेवण , बांगड्या आणि मेंदी करता रंजनाचे घर नुसते भरून गेले होते. दुपारपासून ते रात्री १० पर्यंत मेंदी काढणाऱ्या मुली बसल्या होत्या. एकेकीच्या हातावर मेंदी काढली जात होती. बांगड्या भरल्या जात होत्या. प्रत्येकीचे हात हिरव्या बांगड्यांनी छान सजले होते. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी झाली. मी २ ओळीचे गाणे म्हणले. \" मनभावन के घर जाए गौरी घुंघट में शरमाए गौरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना भूलाना\" मी रंजना आणि सईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले.\nया सर्व दिवसांच्या मध्ये एकदा आईच्या मैत्रिणींनी खूप छान केळवण केले. एका ग्रुपने इडली सांबार, गोडाचा शिरा आणि चटणी, एका ग्रूपने ढोकळा, आप्पे, चटणी, चिरोटे आणि नंतर अमूलचे आईसक्रीम. छान डिझाइन च्या पर्सेस दिल्या. मला हे सर्व अनुभवताना खूपच छान वाटत होते. अशी मजा अमेरिकेत नाही. लग्न झाल्यानंतर एके दिवशी मला भेटायला भाग्यश्री आणि सविता आईकडे आल्या आणि आम्ही नैवेद्यम मध्ये जेवायला गेलो. सविताचे ऑफीस आईच्या घराच्या जवळ होते म्हणून हे शक्य झाले. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी जवळ जवळ ३५ वर्षांनी भेटलो. इतकी वर्षे मध्ये गेली असे जरासुद्धा जाणवत नव्हते. त्याच निरागस गप्पा होत्या.\nश्रुती मंगल कार्यालयात जमले सर्वजण. नंतर योगिताने आमच्या तिघींचा मेक अप केला आणि छान केशरचना केली. आमच्या हातात आमच्या मामे बहिणींनी पोहे दिले, पाणी दिले , चहा दिला. सर्वजणी आमच्या तिघींचे कौतुक करत होत्या. बहिणी बहिणींचे प्रेम असेच असते निरागस. आमच्या वहिन्या पण खूप छान आहेत आमच्यात मिक्स होणाऱ्या. एकाच मांडवात मला समस्त नातेवाईक भेटत होते.\nआदल्या दिवशी मुलाकडची मंडळी सोलापूरवरून आली. बस ४० जणांची होती. नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना कार मध्ये बसवून घेऊन आले आणि माझ्या बहिणीने त्यांना औक्षण केले. त्यांच्यासाठी गुलाबफुलांच्या पायघड्या सर्व भाचे कंपनीने मिळून तयार केल्या होत्या. पायघड्यावरून सर्व मुलाकडची मंडळी चालत आली. त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या. स्वागत खूपच छान झाले. सीमांतपूजन झाल्यावर गाण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात वेळेअभावी तो तासाच्या आतच संपवावा लागला. मोजकीच आणि प्रसंगानुरूप गाणी खूप छान गात होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू,, आणि शेवटचे गाणे होते मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना,,, यात सई, सुजीत, नवऱ्या मुलीचे व नवऱ्या मुलाचे आईवडील नाचले. अगदी थोडक्यात पण हा गाण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रम संपल्यावर जेवणे. जेवणात कढी, रस्सा, गोडाचा शिरा, पुरी,इ. इ् होते.\nसईबरोबर आम्ही दोघी बहिणी पण नटलो. सईचा तसा आग्रह होता. आमचे नवरे म्हणालेच \"कोणाचे लग्न आहे तुमचे की सईचे आम्ही दोघीही काही कमी नाही बोलायला. आम्ही म्हणालो सई बरोबर आम्ही पण लग्न करणार आहोत. मी म्हणाले मांडवात जो कोणी चांगला दिसेल त्याला आम्ही माळ घालू. :D :D. \"काय करायचे ते करा\" इति आईचे जावई. लग्नाच्या दिवशी लग्नघटिका जवळ जवळ येत होती. आधी सगळे विधी असल्याने ते शांतपणे बघायला मिळाले. एकीकडे नातेवाईकांबरोबर गप्पाटप्पा होत होत्या. सईची आजी खूपच उत्साही होती. तिच्या मैत्रिणी आल्यावर लगेच त्यांच्या घोळक्यात शिरली. ठरवलेल्या मुहूर्तावर \"शुभमंगल सावधान\" झाले आणि सई सुजीत विवाहबद्ध झाले. फोटोज आणि विडिओज चालूच होते, अगदी आदल्या दिवशी सुरवात झाली ते सई सासरी निघेपर्यंत. आम्ही खूप रडलो. अर्थातच. घरी आल्यावर शांत शांत जाणवत होते. घाईगडबड संपली होती. दुसऱ्या दिवशी रंजना सुरेश सोलापूरला रवाना झाले ते मुलीच्या सासरच्या घरी. तिथे रिसेप्शन आणि पूजा होती.\nसई सासरी गेली तशी माझ्याही बॅगांची आवरा आवर सुरू झाली. आईचे घर मी परत निघाल्याने आणि रंजनाचे घर सई सासरी गेल्याने रिकामे होत होते. मि निघायच्या आधी सई - सुजीतही पुण्यावरून ठाण्यास जायला निघाले ते त्यांच्या घरात जाण्यासाठी. नवीन संसार मांडायला सासुसासरे आले होते. सई सुजीत खुप गोड दिसत होते. आम्ही दोघे डोंबिवलीत आलो खरे पण अगदी आदल्या दिवशी रात्री. दुसऱ्या दिवशी सोसायटीची एक महत्त्वाची मिटींगला हजर रहायचे होते. दिवस उजाडला मात्र वेळ इतका झरझर सरला की विमानतळावर जाण्यासाठी वेळ येऊन ठेपली. आमच्या सोसायटीत शैलाताई - खाडीलकर आणि सुषमा - नेर्लेकर यांना भेटलो. शैलाताईंनी मला त्यांच्या हाताने विणलेली टोपी आणि मफलर दिला भेट म्हणून. दर भेटीत त्या काही ना काही छान भेटवस्तू देतात. सुषमाने मला एअरटाईट डबे दिले. ओलाची टॅक्सी शैलाताईंनी बुक करून दिली. त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही टॅक्सीत बसलो ते विमानतळावर जाण्यासाठी. प्रत्येक भारतभेटीमध्ये एखादी मैत्रिण आणि एखादा नातेवाईक यांना भेटणे होते कारण की मी दर भारतभेटीत जास्तीत जास्त वेळ आईबाबांना देते. त्यामुळे आईबाबांना आणि मला खूप समाधान मिळते. मित्रमंडळींच्या यादीत बऱ्याच जणांना भेटलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण बाकी आहेत. एक विचार घोळतोय. सर्वांना एकत्र मीच बोलावेन.\nलवकरात लवकर जमवायला हवे हे खरेच \nपहिले पाऊल टाकिते मी\nतुझ्यासवे ते विश्वासाने //१//\nतुझ्या नि माझ्या प्रेमाचे //२//\nतिसऱ्या पाऊली सांगते तुज मी\nवागवीन मी सर्वांनाच आदराने//३//\nचवथे पाऊल टाकू दोघे मिळूनी\nपाचव्या पाऊली जागतील आशा\nपूर्ण करूया मनोरे सुखस्वप्नांचे //५//\nसहावे पाऊल असेल तुझे नि माझे\nउजळतील दाही दिशा समाधानाने //६//\nसातव्या पाऊली वचने देऊन\nआपण राहू मैत्र सात जन्मांचे //७//\nवरची सात पाऊले मला आपोआप सुचली ती रुखवतात होती.\nलग्नमय भारतभेटीची कहाणी समाप्त :) :D\nमी अनुभवलेली अमेरिका ...(८)\nमुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बाकीचे किरकोळ काही आणायचे झाल्यास इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.\nआता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा. हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा. तसेच चिरलेला लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.\nमुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले. स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने खाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, मेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव आवडली नाही. आणि भारतीय\nउपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी\nकरण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात\nअन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबातच चांगली नाहीत.\nशिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणिफक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा\nतिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत\nमाझे युट्युब चॅनल, पक्षी, बदके, धबधबा, गाणी, पाऊस, गोष्टी, पाककृती आणि इतर...\nमी, रोहिणी विनायक गोरे... पुण्याची....स्मृतिवर आपले सहर्ष स्वागत\nबाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी (1)\nमनोगत दिवाळी अंक 2007 (1)\nमनोगत दिवाळी अंक २०११ (2)\nमनोगत दिवाळी अंक २०१२ (1)\nमनोगत वरचा पहिला लेख (1)\nमाझे अमेरिकेतील अनुभव (30)\nमाझ्या आईचे लेखन (2)\nमाझ्या आईबाबांचे अनुभव (1)\nमाझ्या बाबांचे लेखन (3)\nलहान मुलांच्या गोष्टी (3)\nवर्तमानपत्रात प्रकाशित झालेले माझे लेखन (2)\nविजेती नेट निबंध स्पर्धा (orkut community) (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/cognizants-50-employees-labor-court-resigns-forcibly-problems-paying-house-installments/", "date_download": "2018-04-20T14:08:22Z", "digest": "sha1:F4BYAGTVDR33GPI6UM23BRPYVX3TZONK", "length": 27781, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cognizant'S 50 Employees In Labor Court, Resigns Forcibly; Problems With Paying House Installments | कॉग्निझंटचे ५० कर्मचारी कामगार न्यायालयात, जबरदस्तीने राजीनामा; घरांचे हप्तेही भरण्यात अडचणी | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nमुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक\nमानवतच्या निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट\nकात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nयवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन\nसावंतवाडी - मनसेचा नाणार प्रकल्पाला विरोधच, स्थानिकांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाणारला भेट देतील, नितीन सरदेसाई यांनी दिली माहिती\nधुळे - कथुआ आणि उन्नावप्रकरणी धुळ्यात आक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग\nकथुआ प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन; गोवंडीतील रेल्वे ट्रॅकवर 40 ते 50 जणांची निदर्शनं\nसोलापूर : खा. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला\n'चेन्नई सुपर किंग्ज'च्या चाहत्यांनी भरलेल्या ट्रेनचे पुण्यात आगमन\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nयवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन\nसावंतवाडी - मनसेचा नाणार प्रकल्पाला विरोधच, स्थानिकांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाणारला भेट देतील, नितीन सरदेसाई यांनी दिली माहिती\nधुळे - कथुआ आणि उन्नावप्रकरणी धुळ्यात आक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग\nकथुआ प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन; गोवंडीतील रेल्वे ट्रॅकवर 40 ते 50 जणांची निदर्शनं\nसोलापूर : खा. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला\n'चेन्नई सुपर किंग्ज'च्या चाहत्यांनी भरलेल्या ट्रेनचे पुण्यात आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nकॉग्निझंटचे ५० कर्मचारी कामगार न्यायालयात, जबरदस्तीने राजीनामा; घरांचे हप्तेही भरण्यात अडचणी\nयेथील हिंजवडी औद्योगिक वसाहतीतील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी कॉग्निझंटने जबरदस्तीने राजीनामे घेतल्यामुळे ५० कामगारांनी कामगार आयुक्तालयात धाव घेतली आहे.\nपुणे : येथील हिंजवडी औद्योगिक वसाहतीतील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी कॉग्निझंटने जबरदस्तीने राजीनामे घेतल्यामुळे ५० कामगारांनी कामगार आयुक्तालयात धाव घेतली आहे. यातील अनेक कर्मचाºयांनी पुण्यात घरे घेतलेली असून, त्यांचे हप्ते आता थकू लागले आहेत.\nकॉग्निझंटचा बंगळुरातील व्यवसाय सेवादाता कंपनी क्यूएससोबत करार आहे. त्याचा फायदा घेऊन कॉग्निझंटने ५० कामगारांना क्यूएसमध्ये जाण्याचे आदेश दिले होते. समाधानकारक कामगिरी नसल्याचा ठपका या कामगारांवर ठेवण्यात आला. क्यूएसमध्ये पाठविताना त्यांना चारच महिन्यांचा सेवाकाल देण्यात आला आहे. याचाच अर्थ चार महिन्यांनंतर हे कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे कर्मचाºयांनी कामगार न्यायालयात धाव घेतली.\nश्रीनिवासन (नाव बदलले आहे) हे हिंजवडीतील कॉग्निझंटमध्ये गेल्या १० वर्षांपासून काम करीत होते. आॅक्टोबरमध्ये त्यांना एचआर अधिकाºयांनी बोलावून घेतले. त्यांना जागेवरच राजीनामा देण्यास सांगण्यात आले. राजीनामा देऊन क्यूएसमध्ये जा अन्यथा कंपनी तुम्हाला काढू टाकील. तसेच कार्यमुक्ती आदेशावर वाईट शेरा लिहिला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. श्रीनिवासन यांनी म्हटले की, माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. मी राजीनामा दिला. मात्र, नवा करार चारच महिन्यांचा आहे. त्यानंतर काय होईल, हे आम्ही सांगू शकत नाही.\nअसाच प्रकार कंपनीने ५० कर्मचाºयांसोबत केला आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या कॉग्निझंटकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कंपनीने अनेकदा असे प्रकार केले आहेत. असे प्रकार कॉग्निझंटमध्येच घडत आहेत, असेही नाही. यापूर्वी जूनमध्ये कॉग्निझंटसह टेक महिंद्रा, विप्रो व व्होडाफोन यासारख्या काही कंपन्यांविरुद्ध कर्मचाºयांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती.\nसूत्रांनी सांगितले की, आता परिस्थिती आणखी बिघडली आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे. सुमारे १० हजार कर्मचाºयांना कामावरून\nकमी केले जात आहे. जगभरात हा आकडा २ लाखांपेक्षा जास्त आहे. कॉग्निझंटसह अनेक कंपन्या नोकरकपातीची प्रक्रिया राबवीत आहेत. एका कर्मचाºयाने सांगितले की, यापूर्वी ते सरळ कामावरून काढून टाकत. आता त्यांनी पद्धत बदलली आहे. आता ते नव्या कंपनीत अपॉइंटमेंट देतात. पुन्हा कंपनीत येऊ नका, आम्हाला गरज लागेल, तेव्हा तुम्हाला बोलावून घेऊ, असे त्यांनी मला सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिटी बँकेच्या नफ्यात वर्षभरातच १.४३ कोटींची घट\nनोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर\nएकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता\nचांगल्या पावसाचे भाकीत; कंपन्या उत्साहामध्ये\nपीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार\nनोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र\n8:00 PM At महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nमानवतच्या निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट\nसातबारा संगणकीकरणाचे जिल्ह्यात ९५.४१ टक्के काम पूर्ण\nमुंबईहून जळगावला पावणेचार तास उशीरा आले विमान\nकात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न\nऔरंगाबाद मनपात केवळ कंत्राटदारांना वेळेत बिले\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\nIPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला\nकॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/balgeet/word", "date_download": "2018-04-20T14:15:41Z", "digest": "sha1:JOWAOFKEX3ZOK4RV3PW37FG7SG3QHIWP", "length": 11078, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - balgeet", "raw_content": "\nशंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.\nबालगीत - सांग मला रे सांग मला आई...\nबालगीत - आई व्हावी मुलगी माझी ,...\nबालगीत - आईसारखे दैवत सा र्‍या ज...\nबालगीत - आणायचा, माझ्या ताईला नवर...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - रुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आला आला पाउस आला बघ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आली बघ गाई गाई शेजारच्या ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आवडती भारी मला माझे आजोबा...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - इवल्या इवल्या वाळूचं , ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - इवल्या इवल्याशा, टिकल्या-...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - उगी उगी गे उगी आभाळ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक कोल्हा , बहु भुकेला ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - उठा उठा चिऊताई सारीक...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक झोका चुके काळजाचा ठो...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एक होता काऊ , तो चिमणी...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - एका तळ्यात होती बदके ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - कर आता गाई गाई तुला...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - कशासाठी पोटासाठी खंडाळ्...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - काडकीच्या टोकावर ताणलाय...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - किलबिल किलबिल प क्षी बो...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nक्रि.वि. नघाबरता , नभिता , निर्धास्तपणे , निर्भयपणे , निश्चिंतपणे , बिनघोर , बिनदिक्कत , बेधडक , बेलाशक .\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nनवीन संन्यास - उत्साहसिंधु थोर\nमयसभा राहिली भरुन - मम दृष्टीला भेसुर दिसते भ...\n - असे का जीवनी अर्थ\nजीवनातील दिव्यता - आयुष्याच्या पथावर\nसंत - भरो विश्वात आनंद\nमदीय त्या नमस्कृती - विशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nवंदन - मी वंदितो पदरजे विनये तया...\nमेघासारखे जीवन - काय करावे मी मेघासम विचरा...\nमित्रांसाठी प्रार्थना - विशुद्ध मत्स्वांत सदैव रा...\nखरा धर्म - खरा तो एकची धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://myramayan.blogspot.com/2010/06/blog-post_14.html", "date_download": "2018-04-20T14:20:46Z", "digest": "sha1:55CXKFWZNVVCILF765YAXGRVTA3AAIKX", "length": 8325, "nlines": 57, "source_domain": "myramayan.blogspot.com", "title": "माझे रामायण: अरण्यकांड - भाग ११", "raw_content": "\nमाझे महाभारतावरील लेखन वाचकांना पसंत पडले असे दिसून आल्यावर मी आता रामायणावरही त्याच पद्धतीने काही लेखन करणार आहे. रामायणाचे माझे वाचनही विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरापुरतेच मर्यादित आहे. ते वाचताना नजरेला आलेल्या काही विसंगति, सर्वसाधारण समजुतीपेक्षा आढळलेला वेगळेपणा यावरच मी लिहिणार आहे.\nअरण्यकांड - भाग ११\nविजयादशमीला रावणवध झाला अशी समजूत आहे. उत्तरभारतात विजयादशमीला रामलीला व रावणवधाची दृश्ये दाखवली जातात. पण खुद्द रामायणातील वर्णनांवरून अशा समजुतीला मुळीच आधार दिसत नाही. हनुमान व सीता यांची भेट मार्गशीर्ष शु. नवमीला झाली असा उल्लेख आहे. त्यानंतर वानरसैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले, आणि युद्ध उभे राहिले. प्रमुख युद्धप्रसंगांच्या भाषांतरकारांनी ज्या तिथि दिल्या आहेत त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ३० पर्यंत कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्व प्रमुख वीरांचा वध होऊन रावण स्वत: युद्धाला आला असे म्हटले आहे. तेथून पुढे रावणवधापर्यंत आश्विन शु. दशमी म्हणजे विजयादशमी खासच उजाडली नव्हती. रावणवध विजयादशमीला नव्हे तर चैत्राच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच झाला असला पाहिजे. रावणवधानंतर राम लगेच अयोध्येला परत गेला. रामाचा वनवास चैत्रांत सुरू झाला होता तेव्हां तो चैत्रांत संपला हे सयुक्तिकच आहे. रावणवध व विजयादशमी यांची सांगड कां घातली जाते याचा मात्र उलगडा होत नाहीं.\n(विजयादशमीला अर्जुनाने शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून कौरवांशी सामना केला अशीहि एक समजूत आहे, तीहि सपशेल चुकीची आहे कारण कौरवांचा विराटावरील हल्ला झाला व अर्जुनाने त्यांचा सामना केला तेव्हां ’हा ग्रीष्म चालू आहे’ असा स्पष्ट उल्लेख भीष्माचे तोंडी आहे\nराम मारीचाला मारून घाईघाईने कुटीकडे परत येत असताना वाटेतच लक्ष्मण भेटला. सीतेला एकटी सोडून आपल्या मदतीला आल्याबद्दल रामाने लक्ष्मणालाच दोष दिला. दोघे कुटीकडे परत आले तर सीता दिसेना. दोघे भयभीत झाले. रामतर वेडापिसाच झाला. त्याच्या शोकाचे व संतापाचे सुंदर वर्णन रामायणात आहे. लक्ष्मणाने त्याला कसेबसे समजावले व दोघांनी सीतेचा शोध सुरू केला. काही वेळाने रावण-जटायु संग्रामस्थळापाशी आले. तेथील रक्तपात पाहून रामाने समजूत करून घेतली कीं सीतेला बहुधा राक्षसांनी खाल्ले. लक्ष्मणाने पुन्हा समजावले कीं येथे दिसणार्‍या खुणांवरून येथे एका वीराचे व एका रथीचे युद्ध झाले आहे. रथ मोडून पडला आहे, गाढवे मरून पडलीं आहेत सारथी मेला आहे व छत्र मोडले आहे. जवळपास शोधल्यावर आसन्नमरण जटायु दिसला. त्याने खेद व्यक्त केला कीं मी रावणाला थोपवूं शकलों नाहीं, तो सीतेला घेऊन गेला. दु:ख बाजूला ठेवून राम-लक्ष्मणांनी जटायूचे दहन केले. रावण सीतेला घेऊन लंकेला गेला एवढे कळले पण लंका कोठे आहे हे रामाला माहीत नव्हते. काय करावे सुचेना.\nकाका, अतिशय सुरेख आणि ओघवते लिखाण\nतत्कालीन विषयांवर वेळोवेळी लिहिण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आपण पहा.\nनाव - आज सुचलेलं\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताप्रमाणेच रामायणावरील लेखनावरहि वाचकांच्या प्रतिक्रिया हव्यातच. प्रतिक्रियांमुळे विचारांना चालना मिळते.\nरामायण - माझ्या टेबलावर\nअरण्यकांड - भाग १२\nअरण्यकांड - भाग ११\nअरण्यकांड - भाग ९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/anandakand/word", "date_download": "2018-04-20T14:17:15Z", "digest": "sha1:ILLYCDYUUSKJQQF6SVSBMTJSN7JRH2CS", "length": 9542, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - anandakand", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग २\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १०\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग ११\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १२\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १३\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १४\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १५\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १६\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १७\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १८\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nरसविद्या - भाग १९\nरसविद्या, मध्यकालीन भारतातील जी आयुर्वेदीक विद्या आहे, त्यातील एक अग्रणी ग्रंथ म्हणजे आनंदकंद.\nविनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.\nदु:ख आनंदरुप - कर्तव्याला करित असता दु:ख...\nविपत्ति दे तीहि हवी विकासा - करुन माता अनुराग राग\nनवीन संन्यास - उत्साहसिंधु थोर\nमयसभा राहिली भरुन - मम दृष्टीला भेसुर दिसते भ...\n - असे का जीवनी अर्थ\nजीवनातील दिव्यता - आयुष्याच्या पथावर\nसंत - भरो विश्वात आनंद\nमदीय त्या नमस्कृती - विशुद्ध भाव अंतरी कृती उद...\nवंदन - मी वंदितो पदरजे विनये तया...\nमेघासारखे जीवन - काय करावे मी मेघासम विचरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/novak-djokovic-parts-his-entire-coaching-team-43564", "date_download": "2018-04-20T14:40:58Z", "digest": "sha1:C5OSRI2SIZLU2BUUF7CQSOXAAPN5DPLL", "length": 13241, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Novak Djokovic parts with his entire coaching team कोचिंग स्टाफला जोकोविचकडून 'ब्रेक' | eSakal", "raw_content": "\nकोचिंग स्टाफला जोकोविचकडून 'ब्रेक'\nशुक्रवार, 5 मे 2017\nध्येय साध्य करण्यासाठी मरियन, गेरहार्ड आणि मिल्जॅन यांनी योगदान दिले. त्यांच्या मैत्री, व्यावसायिकता आणि निष्ठेप्रती मी सदैव कृतज्ञ राहीन. त्याशिवाय मला व्यावसायिक कारकिर्दीत उंची गाठता आली नसती; पण आता आम्हा सर्वांनाच बदल करण्याची गरज जाणवली.\n- नोव्हाक जोकोविच, सर्बियाचा टेनिसपटू\nमाद्रिद : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दीर्घकाळ साथ दिलेला संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलला आहे. या 'शॉक थेरपी'नंतर सरस निकाल नोंदविण्यास प्रेरणा मिळेल, अशी त्याला आशा आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून योग्य व्यक्ती मिळेपर्यंत तो 'टूर'वर एकटा खेळेल.\nजवळपास संपूर्ण कारकिर्दीत मार्गदर्शन केलेले प्रशिक्षक मरियन वाज्दा, फिटनेस प्रशिक्षक गेरहार्ड फिल ग्रित्‌श्‍च, फिजिओथेरपिस्ट मिल्जॅन ऍमानोविच या चौघांना जोकोविचने 'ब्रेक' दिला. ही यशस्वी आणि दीर्घकालीन भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतला असे जोकोविचने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.\nजोकोविचची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याला काही मानहानिकारक पराभव पत्करावे लागले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये जोकोविचने 'सुपर कोच' म्हणून बोरीस बेकर यांच्याबरोबरील करार संपविला. त्याने तीन वर्षे बेकर यांचे मार्गदर्शन घेतले. या कालावधीत त्याला लक्षणीय यश मिळाले.\nजोकोविच यानंतर माद्रिद ओपनमध्ये सहभागी होईल. त्याने सांगितले की, ''माझी कारकीर्द कायम प्रगतिपथावर राहिली आहे. यावेळी मी प्रयोग करीत आहे. वेगळ्या दिशेने पाऊल टाकल्यास काय होते हे मी पाहीन. मला जास्त भक्कम आणि स्वावलंबी बनून पुन्हा उच्च स्थान मिळवायचे आहे. मी लक्ष्य गाठणारा आहे. कोर्टवर विजयाची प्रेरणा देणारा क्षण मला पुन्हा मिळवायचा आहे.''\nजोकोविच 122 आठवडे अव्वल स्थानावर होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने त्याला मागे टाकले. जानेवारीत कतार ओपनमध्ये त्याने मरेवर मात केली होती, पण ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुसऱ्याच फेरीत डेनिस इस्टोमीन याच्याकडून हरला. 117व्या स्थानावरील इस्टोमीनविरुद्धचा पराभव धक्कादायक ठरला. त्यानंतर बेल्जियमचा डेव्हिड गॉफीन याच्याकडून तो मॉंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरला.\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nपाण्यात बुडून दोन शिक्षकांचा परळी तालुक्यात मृत्यू\nसिरसाळा (अंबेजोगाई) - अंघोळीसाठी गेलेल्या दोन शिक्षकांचा कॅनालच्या पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १८) घडली. गुरुवारी त्याचे...\nग्रामविकास मंत्र्यांच्या परळीत शिक्षकांचा 'आक्रोश'\nसोमेश्वरनगर (पुणे) : राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी नव्या बदली धोरणाविरोधात आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जाऊन आव्हान देण्याचे ठरवले...\nविद्यार्थ्यांनी बनविली चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी\nसोलापूर - महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळा व मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार-...\nचुकीची माहिती भरल्यास फौजदारी\nपुणे - जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ही पारदर्शक; तसेच वस्तुस्थिती व नियमाला धरूनच राबवावी. यामध्ये जाणीवपूर्वक चुकीची किंवा वस्तुस्थितीशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/buldhana-news-uddhav-thackeray-talking-about-farmer-and-government-52935", "date_download": "2018-04-20T14:40:44Z", "digest": "sha1:UDXXPRMZOPS4FU4TS3ESCJM42HO3MAWQ", "length": 11437, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news uddhav thackeray talking about farmer and government कर्जमूक्तीसाठी देव सरकारला सूबूध्दी देवो... : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nकर्जमूक्तीसाठी देव सरकारला सूबूध्दी देवो... : उद्धव ठाकरे\nगुरुवार, 15 जून 2017\nशेगाव (बुलढाणा): राज्य सरकारने शेतकरी कर्जमूक्तीसाठी घोषणा केली खरी. पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याची सुबूद्धी देव सरकारला देवो, असे प्रतिपादन शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केले. विदर्भ पंढरी शेगाव येथे शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मेळाव्यात आज (गुरुवार) ते बोलत होते.\nशेगाव (बुलढाणा): राज्य सरकारने शेतकरी कर्जमूक्तीसाठी घोषणा केली खरी. पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याची सुबूद्धी देव सरकारला देवो, असे प्रतिपादन शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केले. विदर्भ पंढरी शेगाव येथे शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मेळाव्यात आज (गुरुवार) ते बोलत होते.\nअकोला येथून शेगाव आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी श्रींच्या मंदीरात जावून समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून कृष्णा कॉटेज येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेहमीच शेतकरी बांधवासोबत होती आहे व पूढेही राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. समृध्दी महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या पाठिशी शिवसेना राहील, असेही ते म्हणाले.\nसरकारवर टिका करताना शेतकर्यांना 'साले' म्हणणाऱयांना शिवसेना रडविणार असल्याचा ईशाराही ठाकरे यांनी जाता-जाता दिला. मेळाव्याला शेतकरी व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nआचारसंहितेमुळे बेळगाव परिवहन मंडळाला अच्छे दिन\nबेळगाव - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यापासुन कर न भरता आणि परिवहन मंडळाच्या नियमाचे उल्लंघन करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे...\nमतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे\nभिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmms.mscescholarshipexam.in/", "date_download": "2018-04-20T14:02:20Z", "digest": "sha1:VEFHMAPOJVRVTKVRINEECXIP5ILIXDW5", "length": 3742, "nlines": 52, "source_domain": "nmms.mscescholarshipexam.in", "title": "National Means cum Merit scholoarship", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे\nराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०१७-१८)\nशाळा लॉग इन सूचना\n(EO/EI) सेकंडरी लॉग इन सूचना\nदि. १८/११/२०१७ पासून कोणतीही शाळा / विद्यार्थी नोंदणी कोणत्याही परिस्थितीत करू शकणार नाही.\nजाहीर प्रकटन - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)२०१७-१८ शाळा नोंदणी करणे व ऑनलाईन विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरण्याबाबत .\nदि. १८/११/२०१७ पासून कोणतीही शाळा / विद्यार्थी नोंदणी कोणत्याही परिस्थितीत करू शकणार नाही.\nNMMS परीक्षा २०१७-१८ अंतिम उत्तरसूची\nप्रसिद्धी पत्रक : NMMS परीक्षा २०१७-१८ अंतिम उत्तरसूची\nप्रसिद्धी पत्रक : NMMS परीक्षा २०१७-१८ ( प्रवेशपत्र )\nजाहीर प्रकटन - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)२०१७-१८ शाळा नोंदणी करणे व ऑनलाईन विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरण्याबाबत .\nयोजनेचे उद्दीष्ट व महत्व\nसकाळी ११.०० ते सायं.५.००\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,\n१७, आंबेडकर मार्ग ,पुणे ४११००१\nदूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६ /६७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9D_%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-04-20T14:49:22Z", "digest": "sha1:XIOYHAY6WKME637MNIVZUBJZXU7RRNN2", "length": 3760, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मर्सिडिज-बेंझ डब्ल्यु२११ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमर्सिडिज-बेंझ डब्ल्यु२११ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. २००३ ते इ.स. २००९ (इराणमध्ये इ.स. २००८ ते जानेवारी इ.स. २०११) पर्यंत उत्पादित केले होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125938462.12/wet/CC-MAIN-20180420135859-20180420155859-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://srisathyasai.in/MarathiHome/Index", "date_download": "2018-04-20T16:09:16Z", "digest": "sha1:TYUSQLQPUWJDLSA22X53HVOWFYQC3GNF", "length": 11334, "nlines": 135, "source_domain": "srisathyasai.in", "title": "Index - SSSSO-MH", "raw_content": "श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र आणि गोवा\nस्वच्छता से दिव्यता तक\nमाता आणि बाळ संगोपन\nआजच साइन अप करा\n“सेवा करणे दिव्य आहे - त्यामुळे जीवन परिपूर्ण होते.”\n“प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात पवित्र असतात.”\n“शिक्षण फक्त जगण्याचे साधन नाही ते जीवन आहे.”\n“शांतता हे आध्यात्मिक साधकाचे भाषण आहे.”\nडॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम\nआरोग्य सेवा म्हणजेच वैद्यकीय काळजी, शिक्षण आणि पोषण आहे. तुम्ही तीनही करत आहात. शिक्षण, पाणी आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून बाबांनी गरीबीविरोधात एक क्षेपणास्त्र सुरू केले आहे.\nमी जगभरातील विविध भागांमध्ये प्रतिष्ठेच्या अनेक रुग्णालयांमध्ये गेलो आहे, परंतु मी श्री भगवान बाबा यांच्या इन्स्टिट्यूटसारखी वैद्यकीय संस्था पाहिली नाही. ही संस्था म्हणजे लोकांना त्याच्या दैवी देणगीचे दुसरे उदाहरण आहे.\nया ठिकाणी अमूर्त वातावरणात विशेष काहीतरी आहे. प्रत्येक शिक्षकाला जाणीव आहे की ही उच्च शिक्षण संस्था देखील उच्च वर्तनाचे आणि उच्च जाणीवेचे ठिकाण आहे.\nश्री सत्य साई एज्यू केअर कार्यक्रम देशाच्या शिक्षणाच्या धोरणांच्या मूलभूत अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे.\nपटियाला घराण्यातील प्रतिष्ठित हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका\nबाबांच्या विस्मयकारक शिकवणींचे पालन करावे. मूलभूतपणे आम्ही थीमप्रमाणे कार्य करतो, जसे की कार्य हीच पूजा आहे , आपले कर्तव्य १००%करा , इतरांवर प्रेम करा, इतरांसाठी त्याग करा , इतरांची अडचण समजून घ्या आणि शक्य असल्यास त्यांना मदत करा.\nडीन आणि अध्यक्ष, शुश्रुषा नागरिक सहकारी रुग्णालय\nबाबांनी एक ज्ञानी भारताचे प्रात्यक्षिक दाखविले ज्यायोगे एक वातावरण तयार केले जाऊ शकते जिथे एक लहान मन ज्ञान शोधू शकते किंवा आजारी व्यक्ती त्याच्या दरवाज्याजवळ आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकते.\nआम्ही हॉस्पिटलला गेलो आणि तेथील अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर थक्क झालो होतो. जे सर्वात गरजूंसाठी वापरलं जातं. आणि दिलेली काळजी कॉर्पोरेट रुग्णालयांपेक्षा जास्त चांगली होती आणि हे सर्व एकही पैसा न घेता.\nप्रख्यात गझल गायक आणि भारतीय फ्यूजन संगीताचे पायोनियर\nमी २००७ मध्ये बाबांची भेट घेतली तेव्हा मी आध्यात्मिक, रचनात्मक आणि शारीरिकरित्या उत्साही झालो. मला संगीताच्या माध्यमातून प्रेम पसरवण्याचा संदेश आला आणि तसे करण्यास बाबांनी मला ऊर्जा दिली. ते मला माझ्या अंगठीमध्ये दररोज दर्शन देतात.\nस्वामींची शिकवण समावेशक आणि विभागीय नसलेली होती. जर तुम्ही हिंदू, कॅथोलिक, सिख, मुस्लिम किंवा अगदी अहिंसावादी असाल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वांची सेवा आणि सर्वांवर प्रेम करावे हीच त्यांची इच्छा होती.\nबाबा शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतील, तरीही माझ्या स्वप्नात मी त्यांच्याशी जोडतो. त्यातून मला सामर्थ्य मिळते. ते नेहमीच माझ्या बरोबर असतील.\nमिस्टर डेव्हिड एफ. मॅक्सम\nयूएसए मधील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी\nशासनाच्या म्हणण्याप्रमाणे, सत्य साईं शाळा ज्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे . मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण जे जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करते, समाजासाठी मौल्यवान मालमत्तेच्या रूपात विद्यार्थ्यांना घडवले जाते.\nटाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष\nमी आजवर पाहिलेली सर्वात प्रभावी आणि अद्वितीय सुविधा . जशी रुग्णाची काळजी आणि उपचार करणे आवश्यक आहे तशीच इथे काळजी घेतली जाते.\nश्री सत्य साई सेवा संघटना\nश्री सत्य साई विद्या वाहिनी\nसाई वन-आमचे मोबाईल अॅप\nकॉपीराइट आणि हायपरलिंकिंग | अटी आणि शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/ias-officer-tukaram-mundhe/", "date_download": "2018-04-20T16:15:39Z", "digest": "sha1:U7KA42W3STZTBNLBB57ZUQL42ITN5WGR", "length": 62993, "nlines": 239, "source_domain": "khaasre.com", "title": "ध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास… 0\nएखादा कर्तबगार अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. अशा वेळी काय होतं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र एक सनदी अधिकारी असा आहे ज्याला हितसंबंधाविषयी काहीही घेणं-देणं नसतं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला. त्यांच्या बदल्यांचे कारण हर प्रामाणिक व धडाडीचे कामच असल्याचे दिसून आले आहे. अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तुकाराम मुंढेे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत खासरेवर…\nबीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला.त्यांचा जन्म 3 जून 1975 ला झाला. त्यांनी आणि त्यांच्या बंधूनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम मुंढे यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम हरिभाऊ मुंढे आहे.मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2001 मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.\nत्यानंतर मे 2005 ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात 20 वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून 10-12 टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण 1-2 टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डाॅक्टरला निलंबित केले होते.\n2009 सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे 2010 ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली.\nपुढे 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर 2012 साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात 143 कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील 282 गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त 150 कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान 50-60 कोटींचे होते. वर्षाला 400 टँकर लागणार्‍या सोलापूरात टँकरची संख्या 30-40 वर आली.\nसोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण 14-15 लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात.त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते.परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या 21 दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी 3 हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी CM सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले.\nनवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.\nसध्या ते पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्ष आहेत. महीन्याला PMPML ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या 9 लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.\nअशा या धडाकेबाज, ध्येयवेडे, प्रामाणिक, बेडर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास सलाम, मुंढे सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा…\n२५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nPrevious Articleचिमुकल्या जीवाला मसणवट्यात घेऊन झोपतो बाप,कारण वाचून तुम्हाला धक्का बसेलNext Articleजिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम…\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-04-20T16:27:42Z", "digest": "sha1:CKDVJOSO2RW5IF54FL2WQ3G3NIMY7SWF", "length": 4944, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर.सी. स्त्रासबुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\n(आर.सी. स्ट्रॉसबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2018-04-20T16:46:24Z", "digest": "sha1:PTBQAIZJNHQ4FG5ZQOERBV3B6E6KPODG", "length": 4885, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे\nवर्षे: पू. १३९ - पू. १३८ - पू. १३७ - पू. १३६ - पू. १३५ - पू. १३४ - पू. १३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १३० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:32:12Z", "digest": "sha1:SLRYXURRZFJ5NXUQFA3XU7SKUQHNE5OD", "length": 3236, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटलीचे राज्यकर्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इटलीचे राज्यकर्ते\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nदुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली\nव्हिक्टर इमॅन्युएल तिसरा, इटली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:27:58Z", "digest": "sha1:I3WVQPCHXNP5THUTZI5QBOHQRO3CSFAG", "length": 4305, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेव्हाडामधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► रीनो‎ (२ प)\n► लास व्हेगस‎ (२ प)\n\"नेव्हाडामधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/humor/page/4/", "date_download": "2018-04-20T16:33:34Z", "digest": "sha1:GX5USJRWW2AFWSCIBK4MO7WYHJFR5LAX", "length": 9940, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Humor Archives - Page 4 of 7 - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nज्या कोर्टात वडील होते चपराशी, मुलगी तिथेच बनणार जज, पण… 1\nवर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या या चार ठिपक्यांचे रहस्य माहिती आहे का\nजेव्हा काम करणारी मुलगी राष्ट्रपतींची लेक आहे हे लोकांना कळते तेव्हा… 0\nया चार भारतीय क्रिकेटपटूंना खावी लागली आहे जेलची हवा, नाव ऐकून थक्क व्हाल… 0\nजाणून घ्या २ कोटी लोकांची हत्या करणाऱ्या क्रूर तैमुरलंग चा इतिहास… 0\nमहिलांसाठी शौचालये बांधणाऱ्या अनुसया सारभाईंचा गुगलकडून डुडलद्वारे सन्मान… 0\nब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल… 0\nताजमहालचा हा दरवाजा उघडायला सरकारसुध्दा घाबरते, जाणुन घ्या या मागील कारण… 0\nमराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो… 0\nभारतीय रेल्वेचे डिझेल इंजिन किती एव्हरेज देते हे वाचून तुम्ही थक्क व्हाल… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-palghar-news-rastaroko-mokhada-90446", "date_download": "2018-04-20T16:43:45Z", "digest": "sha1:VSDH5UJO5KVWKCQPA2R6O6X3BR7LXFG2", "length": 11871, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news palghar news rastaroko in mokhada मोखाड्यात काही काळ रास्तारोको | eSakal", "raw_content": "\nमोखाड्यात काही काळ रास्तारोको\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nमोखाडा : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर त्याचे राज्यभर हिंसक पडसाद उमटले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मोखाड्यात जव्हार फाटा चौफुलीवर आणि खोडाळ्यात शिवाजी चौकात काही काळ भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर, बाजारपेठा सुरळीत सुरू राहील्या आहेत. कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. आज भारीप सह अन्य संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मोखाड्यात भीमसैनिकांनी जव्हार फाटा चौफुलीवर तर खोडाळ्यातील शिवाजी चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करीत कोरेगाव भीमा घटनेचा शांततेत निषेध केला आहे.\nमोखाडा : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर त्याचे राज्यभर हिंसक पडसाद उमटले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मोखाड्यात जव्हार फाटा चौफुलीवर आणि खोडाळ्यात शिवाजी चौकात काही काळ भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर, बाजारपेठा सुरळीत सुरू राहील्या आहेत. कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. आज भारीप सह अन्य संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मोखाड्यात भीमसैनिकांनी जव्हार फाटा चौफुलीवर तर खोडाळ्यातील शिवाजी चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करीत कोरेगाव भीमा घटनेचा शांततेत निषेध केला आहे. या आंदोलना मुळे काही काळ वाहतूक कोंडी ही झाली होती.\nमात्र, आदिवासी भागातील परिस्थितीची जाणीव ठेवीत भीमसैनिकांनी घटनेचा निषेध नोंदवून आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे मोखाड्यातील सर्व बाजारपेठा आणि वाहतूक सुरळीत सुरू राहील्या आहेत.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nभाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार\nचेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rahul-gandhi-on-marathwada-trip-269408.html", "date_download": "2018-04-20T16:34:30Z", "digest": "sha1:ZK6OTKH3INT3MTTYEQIWWI5CXD2EGYDP", "length": 10861, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nराहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर\nआज मराठवाड्यात नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जाऊन ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.\n08 सप्टेंबर: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज मराठवाड्यात नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जाऊन ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.\nआज नऊच्या सुमारास राहुल गांधी नांदेड एअरपोर्टवर पोचतील. नांदेडमध्ये त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा होणार आहे. तिथून परभणीत पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर इथं दुपारी बाराच्या सुमारास शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहे. त्यानंतर परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी दीड वाजता आयोजित जाहीर संघर्ष सभेला ते संबोधित करणार आहेत.\nयाशिवाय जिल्ह्यातील २०० व्यापारी, वकील आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींची ते बैठकही घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त काँगेसकडून शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर, होर्डिंग लावण्यात आले आहेत. तर भव्य असा सभा मंडपही उभारण्यात आलाय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:46:26Z", "digest": "sha1:EZA6P2RF5YLDVVIWZCJCTVAUU73ITPIH", "length": 6219, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुझफ्फरनगर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nहा लेख मुझफ्फरनगर जिल्ह्याविषयी आहे. मुझफ्फरनगर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nमुझफ्फरनगर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र मुझफ्फरनगर येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://adarshgavkari.com/more-info.aspx?newsID=1314", "date_download": "2018-04-20T15:56:14Z", "digest": "sha1:Q6YH2QMVDDB6ENCI7NSASUJGXSNDPYEY", "length": 6290, "nlines": 22, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "Dainik Adarsh Gavkari", "raw_content": "\nराज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित\nदुष्काळ हा मानवनिर्मित आहे. या दुष्काळाची सर्वांत जास्त झळ ही स्त्रियांना पोहोचते. यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. असे मत पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले. ते ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nपरिवर्तनाचा वाटसरू आणि द युनिक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या पुस्तकावर आधारित परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.30 मे रोजी मराठवाडा साहित्य परिषद यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील डॉ.नांदापूरकर सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले होते. या पुस्तकात मराठवाड्यातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळाचा अभ्यास केला आहे. यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून पत्रकार आसाराम लोमटे (परभणी), अभ्यासक आणि कार्यकर्त्या सीमा कुलकर्णी (पुणे) आणि जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे (जालना) आदी उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून जलतज्ज्ञ विजय अण्णा बोराडे (जालना) हे होते. मान्यवरांच्या हस्ते रमेश पाध्ये लिखित ‘दुष्काळाला भिडताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आसाराम लोमटे पुढे म्हणाले की, या पुस्तकात मराठवाड्यातील आणि पश्‍चिम भागातील तीन तीन गावांच्या दुष्काळाची चर्चा यात केली आहे. या दुष्काळामुळे गावाची गाव स्थलांतरित होत आहेत; पण त्याच गावात त्यांना दुसरा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सरकारचे उदासीन धोरण आहे. सरकारचे धोरण हे आणि नेतृत्व हे धोरण असेल तर विकास हा होतोच; पण मराठवाड्यात धोरणाची कटिबद्धता दिसतच नाही. हा विषय संशोधनाचा असून यावर उपाययोजनाही झाल्या पाहिजेत. सीमा कुलकर्णी म्हणाल्या की, या पुस्तकात महिला आणि विशिष्ट जातीच्या महिलांबाबत चर्चा केली असून त्याचा परिणाम कसा होतो याबाबत चर्चा आहे. दलित आणि भटक्या जातीच्या महिलांनाच याचे परिणाम भोगावे लागतात. वास्तव म्हणजे पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ ही एक सामाजिक घटना असून याकडे वेगवेगळ्या समाजातील घटकांवर परिणाम होतात. यासाठी त्यांना निर्वाहभत्ता किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. दुष्काळाचा प्रश्‍न हा मूलतः व्यवस्थापन, प्रशासन आणि नियमन या तीन बाबींवर अवलंबून आहे. सिंचनासाठी अनेक कायदे आहेत; पण ते अमलात आणलेच जात नाही. सर्व मनमानी कारभार चालला आहे. सर्व गाढ झोपेत आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत गोरे यांनी केले, तर आभार कपिल हांडे यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/boyfriend-kills-girlfriend-over-dispute-of-marriage-in-amravati-maharashtra/", "date_download": "2018-04-20T16:39:43Z", "digest": "sha1:PKTXBJBXDDXC4ORJC6ZU3JMC4QYBB4AY", "length": 16109, "nlines": 73, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nलग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू\nअमरावती शहरातील एका युवतीसोबत विवाह केल्याचा दावा करत त्याच युवकाने त्या युवतीचा भरदिवसा रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या घटनेने अमरावती हादरून गेले .मृत तरुणींसह आपला विवाह झाला असल्याचा ह्या युवकाचा दावा आहे. मात्र खुनाचे कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव राहुल बबन भड असे असून तो मुदलियारनगर चा रहिवासी आहे.\nअमरावतीतील साईनगर परिसरात प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (वय २४, रा. छाबडा प्लॉट) ह्या युवतीचा निर्दयीपणाने चाकूने वार करून खून करण्यात आला. राहुलने प्रतीक्षासोबत आपला विवाह झाल्याचा दावा केला होता. परंतु, ती आपल्या घरी येत नसल्याने तिला आपण नांदवायला तयार आहोत, अशी याचिकासुद्धा त्याने न्यायालयात दाखल केली होती मात्र, त्याला अधिकृतरीत्या कुठेही दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, राहुलकडची प्रमाणपत्रे खोटी आहेत असे प्रतिक्षाच्या वडिलांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील, प्रतीक्षाने ऑक्‍टोबर महिन्यात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार करून त्याने सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करून राहुल माझी बदनामी करत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात राहुलविरुद्ध आय. टी. ॲक्‍टनुसार गुन्हासुद्धा दाखल झाला होता, मात्र ठोस काही कारवाई न झाल्याने ह्यात नाहक प्रतिक्षाचा बळी गेला.\nराहुल बांधकाम कंत्राटदार होता, अशी माहिती पुढे येते आहे. मात्र नक्की खरे काय आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. विवाह सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा का सुरू होता हे देखील पोलिसांना आता शोधून काढावे लागेल. काही राजकीय पक्षाच्या मंडळींनी राजापेठ पोलिस ठाण्यावर धाव घेऊन प्रतीक्षाच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणात उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.यामुळे खून झाल्यानंतर तरी राहुलला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. हल्लेखोर राहुलच्या दाव्यात किती दम आहे हे चौकशीअंती निष्पन्न होईलच मात्र एकाएकी अशी वेळ का यावी हे देखील पोलिसांना आता शोधून काढावे लागेल. काही राजकीय पक्षाच्या मंडळींनी राजापेठ पोलिस ठाण्यावर धाव घेऊन प्रतीक्षाच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणात उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.यामुळे खून झाल्यानंतर तरी राहुलला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. हल्लेखोर राहुलच्या दाव्यात किती दम आहे हे चौकशीअंती निष्पन्न होईलच मात्र एकाएकी अशी वेळ का यावी आणि असे होण्यामागची करणे काय आहेत हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.\nप्रतीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून त्या दोघी दुचाकीने परतत होत्या. त्याचवेळी मागून दुचाकी घेऊन राहुल भड आला. राहुलने प्रतीक्षाच्या दुचाकीला धक्का मारून दुचाकी थांबवायला सांगितले. ती दुचाकी थांबवून उभी होती, इतक्यात अचानकपणे राहुलने बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षाच्या गळ्यावर, छातीवर पोटावर वार केले. त्यानंतर राहुल घटनास्थळावरून पसार झाला. प्रतिक्षाची मैत्रीण श्वेताने आरडाओरड केल्यामुळे नागरिकांंनी प्रतीक्षाला गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.\nसूत्रांच्या माहितीनुसार, प्रतीक्षा आणि राहुल यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते.त्यातून दोघांमध्ये कायदेशीर वाद सुरु होते. एप्रिल महिन्यात कौटुंबिक न्यायालयात राहुलने याचिका दाखल करून प्रतीक्षा पत्नी असून ती नांदायला तयार नाही, अशी याचिका दाखल केली होती. मात्र हा दावा व कागदपत्रे खोटी असल्याचे प्रतीक्षाच वडील सांगत आहेत. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. नंतर त्या मागे घेण्यासही ते तयार झाले होते. मात्र ह्या प्रेमप्रकरणाचा असा दुर्दैवी अंत होईल असे कोणालाही वाटले नव्हते.पोलीस राहुल च्या शोधासाठी अकोला, अमरावती शहरात पथके रवाना झाली आहेत.\nसर्वसामान्य कुटुंबातील प्रतीक्षा अभ्यासात हुशार होती. तिने बुद्धिमत्तेच्या जोरावरच ‘एमएससी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र गुरुवारी राहुलने या गुणी तरुणीचे सर्वस्व संपवून टाकले. प्रतिक्षासोबतलग्न करण्याची मागणी घालण्यासाठी मार्च महिन्यात राहुल त्याच्या नातेवाइकांना घेऊन प्रतीक्षाच्या घरी गेला होता. मात्र, त्यावेळी प्रतीक्षाच्या कुटुंबीयांनी राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात राहुलने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून प्रतीक्षा आपली रितसर पत्नी असून तिने नांदण्यासाठी यावे, असा अर्ज दाखल केला होता.पोलिसांनी राहुलच्या एका नातेवाइकाकडून राहुल प्रतीक्षाच्या लग्नाचे प्रमाणपत्र जप्त केले आहे. मात्र ते प्रमाणपत्र कुणी दिले, त्यांचे लग्न कधी झाले. त्यावर असलेला मजकूर नेमका काय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.\nतू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या\nअखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना\nविवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून\nप्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला\nमहिलांकडे एक खाजगी मालमत्ता म्हणून बघण्याची पुरुषसत्ताक मानसिकता जोवर संपत नाही तोवर असे दुर्दैवी हल्ले कमी होणार नाहीत. महिला ह्या सुद्धा माणूस आहेत ही भावना अशा विकृत लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.\n सहमत असाल तर लाईक करा शेअर करा \n← फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला : गोळी झाडून केला स्वतःचाही अंत →\n4 thoughts on “लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू”\nPingback: एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला : गोळी झाडून केला स्वतःचाही अंत – Marathi People\nPingback: ‘ ह्या ‘ कारणावरून मी केला प्रतीक्षाचा खून : आरोपी राहुल भड काय म्हणतो \nPingback: सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील\nPingback: तब्बल सहा राज्यात ‘ ही ‘ कंपनी करणार मोबाईल सेवा बंद : पोर्ट करून घेण्याचा ट्रायचा सल्ला – Marathi\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-20T16:14:51Z", "digest": "sha1:AADDAD22AQO4RAJG6R3FY4XNMLKF7EL5", "length": 12584, "nlines": 120, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पुरुष आरोग्यसेवकांच्या भरतीला मंजुरी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपुरुष आरोग्यसेवकांच्या भरतीला मंजुरी\nपुरुष आरोग्यसेवकांच्या भरतीला मंजुरी\nग्रामीण जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी देशातील 235 जिल्ह्यांमध्ये उपआरोग्य केंद्रांमधून 53 हजार 500 पुरुष आरोग्यसेवकांच्या भरतीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन' माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजनाही मंजूर करण्यात आली आहे.\nभरती केलेले आरोग्यसेवक उपआरोग्य केंद्रांमध्ये दिवस रात्र उपलब्ध असावेत, अशी आखणी केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी प्राथमिक उपचारांसाठी आणि मदतीसाठी ते उपलब्ध असतील. मलेरिया, क्षय, कुष्ठरोग आदी रोगांबाबत ग्रामीण जनतेला माहिती देणे, तसेच रोग्यांना प्राथमिक उपचारासाठी मदत करण्याचे काम ते करू शकतील. त्याचबरोबर गावांमधील पाण्याचे नमुने घेणे, पाण्यात क्‍लोरिन टाकणे, ग्राम स्वच्छता आणि शाळांमधील मुलांच्या आरोग्याची पाहणीही त्यांना करावी लागणार आहे.\nया योजनेसाठी प्रत्येक वर्षी 385 कोटी 52 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या वर्षी 85 टक्‍के, दुसऱ्या वर्षी 75 टक्‍के आणि तिसऱ्या वर्षी 65 टक्‍के रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाईल. उर्वरित रक्‍कम राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे. साथीच्या विविध आजारांची माहिती या आरोग्यसेवकांना व्हावी, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत त्यांना 500 रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे.\nमुलींना मिळणार सॅनिटरी नॅपकिन'\nमासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेविषयी जागृतता वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींना माफक दरात चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन' दिले जाणार आहे. 19 वयोगटापर्यंतच्या मुलींसाठी ही योजना असेल. दारिद्य्ररेषेखालील मुलींना एक रुपयात सहा सॅनिटरी नॅपकिन'चे एक पाकीट मिळेल, तर दारिद्य्ररेषेवरील मुलींना ते पाच रुपयांना मिळणार आहे. यासाठी सरकारने 150 कोटी रुपयांची योजना आखली असून, पहिल्या टप्प्यात देशभरातील 25 टक्‍के ग्रामीण भागात ही योजना राबविली जाईल. ज्यात 150 जिल्ह्यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्राचीही निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दहा ते 19 वयोगटातील दीड कोटी मुलींना होणार असल्याचा अंदाज आहे. ग्रामीण आरोग्यसेविकांमार्फत याविषयीची माहिती गावागावांमध्ये दिली जाईल. सॅनिटरी नॅपकिन' उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविली जाईल. एक पाकिटामागे एक रुपया आरोग्यसेविकांना देण्यात येणार आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F.html", "date_download": "2018-04-20T16:48:07Z", "digest": "sha1:4T2HUNC6ZRURFMQCIQXSCQQOAZRQ466L", "length": 5636, "nlines": 81, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ब्रेकफास्ट - Latest News on ब्रेकफास्ट | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nवजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये खा हे ५ पदार्थ\nवजन कमी करायचे असेल सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाणे गरजेचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता जरुर करा. अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.\nअन् अहिलने सलमान खानचा पुन्हा केला 'मामा'\n'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे ५० दिवसांचे शेड्युल संपवून सलमान खान लंडनमध्ये पोहचला आहे.\nसकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे\nअनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.\n‘ब्रेकफास्ट’ न केल्याने काय होते\nआजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण ‘ब्रेकफास्ट’ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते.\nगेलचा खुलासा, या खेळाडूमुळे खेळतोय ही लीग\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई\nशतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन\nशतक ठोकल्यानंतर गेलने जाहीरपणे मागितली ही गोष्ट\nथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nFilm Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा\nहे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका...\nबायकोला गिफ्ट देण्यासाठी नवऱ्याने मैत्रिणीची केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-04-20T16:09:29Z", "digest": "sha1:6HPJ3ATPMSZWYMM7WNNYXEBBETKUINKW", "length": 6823, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु कोकजे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु कोकजे\nनवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे माजी गव्हर्नर आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष असणार आहेत. गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वोटिंग झाली. कोकजे यांना 131 मतं मिळाली तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली आहेत.\nयाआधी वोटर लिस्टबाबत प्रवीण तोगडिया यांनी गडबड झाल्याचा आरोप केला होता. वोटर लिस्टमध्ये 37 वोटर हे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण वीएचपीचे महासचिव चंपत राय यांनी म्हटलं की, प्रवीण तोगडिया आणि व्हीएचपीचे अध्यक्ष राघव रेड्डी यांना अनेकदा मतदारांची यादी देण्यात आली होती.\nसूत्रांच्या माहितीनुसार राघव रेड्डी आणि प्रवीण तोगडिया गटाकडे कमी मतं होती त्यामुळे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गोंधळ घालून निवडणूक टाळण्याचा विचार होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…. म्हणून डॉक्टरांनी रणबीरला दिला बेड रेस्टचा सल्ला\nNext articleबैलाने मारल्याने कामगार दगावला\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n…हे तर काँग्रेसचं राजकारण – अरूण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/virat-kolhi-and-anushka-sharma-marriage-488806", "date_download": "2018-04-20T16:04:36Z", "digest": "sha1:L76YDLGX252AWOBF5FMJNC6GXCDQJEZ5", "length": 15166, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!", "raw_content": "\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://bhunga.blogspot.com/2009/10/blog-post_14.html", "date_download": "2018-04-20T16:17:14Z", "digest": "sha1:MMJ2FSZVDXMZ64O6DJXK3PIEHTK63ZDQ", "length": 32629, "nlines": 129, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!", "raw_content": "\nबुधवार, १४ ऑक्टोबर, २००९\n... मित्रहो, हे सगळं तुमच्यासाठी घेऊन... येत्या दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा\nहे कार्ड डाऊनलोड करा.\nदिवाळीच्या सणाबद्दल थोडक्यात माहिती:\nवसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)\nवसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.\nधनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)\nधनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू ची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.\nनरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)\nआश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.\nलक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)\nया दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.\nपाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)\nबळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.\nभाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)\nया दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.\nवर्ग: डाऊनलोड, दिवाळी, शुभेच्छा\nभूंगा तुम्हा सगळ्यांना दिपावलीच्या अनंत शुभेच्छा\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी ८:२३ म.पू.\nमाझ्या आजोळी ( आईच्या वडिलांकडे) वसु बारस सगळ्यात जास्त महत्वाचा मानला जायचा. सगळे गडी माणसं जेवायला बोलावले जायचे. त्यांना घुगऱ्या करुन खाऊ घातल्या जायच्या. तसेच पुरण पोळ्या वगैरे सग्ळे प्रकार असायचे. हा दिवस खरंच खुप मोठ्या प्रमाणात सिलेब्रेट केला जायचा.\nनंतर इतर दिवस पण साजरे केले जायचे, पण हा दिवस स्पेशल .. \nआमच्या घरी मात्र लक्ष्मी पुजन , जास्त महत्वाचं मानलं जायचं..\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी ८:२८ म.पू.\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी ११:१४ म.पू.\nदिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी २:०३ म.उ.\nदिवाळीच्या शुभेच्छा...कार्ड खूपच छान आहे. खूप दिवस झाले सांगायचं राहिलं मला आपल्या टेम्प्लेट हेडर मधली चित्रपण खूप आवडतात. या ब्लॉगवर आलं की फ़्रेश वाटतं आणि याचं कारण आपण स्वतः ती काढता म्हणून आहे असं वाटतंय...आमच्यासारखे रेडिमेड टेम्प्लेटवर जगणारे (कारण चित्रकलादेवी पहिल्या पासूनच रुसलीय ना :)) सगळे आपला हेवा करणार यात शंका नाही....\nआणि हो दिवाळीची माहिती पण हाताशी आहे हे बरं आहे. मला वाटतं भाऊबीजेला दक्षिणेला दिवा लावायची पण प्रथा आहे. त्याचा उल्लेख राहिला असावा..पण पोस्ट उत्तम...\n१६ ऑक्टोबर, २००९ रोजी १२:४१ म.पू.\nरोहन चौधरी ... म्हणाले...\nतुम्हा सर्वांना दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ... \n१६ ऑक्टोबर, २००९ रोजी ११:५३ म.पू.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले...\nदिवाळीच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा \n१७ ऑक्टोबर, २००९ रोजी ७:०४ म.उ.\nब्लॉगची गाडी जाऊ द्या की थोडी पुढे... आम्ही मोठ्या आशेने येतो आणि नविन पोस्ट नाही म्हणून हिरमुसले होऊन परत जातो.\n१ नोव्हेंबर, २००९ रोजी ८:४१ म.उ.\n२९ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०१ म.उ.\nदिवाळीच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा \n९ जानेवारी, २०११ रोजी ५:४५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. *तिची व्यथा पण ती ठाम असते त्या गोष्टीलाच आपलं आयुष्य ठरवून हसत हसत जगायचे<*\nदुखांपेक्षा आपलं आयुष्य आपण किती सुखाने जगतो// ...< हेच एका व्यक्तीसाठी गरजेचे असते ...नाही का\nRe: तू जरी नसे माझा\nRe: तू जरी नसे माझा\nRe: तू जरी नसे माझा\nखूप खूप आभार...लोभ राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nashik-aurangabad-solapur-jalgaon-demonetisation-protest-by-all-party-477157", "date_download": "2018-04-20T16:33:43Z", "digest": "sha1:R32GJZW4WUX7RXQIXH7NPFOKRGWMQZDS", "length": 17195, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नोटाबंदी वर्षपूर्ती : राज्यभरातील विविध भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आंदोलन", "raw_content": "\nनोटाबंदी वर्षपूर्ती : राज्यभरातील विविध भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आंदोलन\nमुंबई-पुण्याप्रमाणे सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव इथं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध नोंदवला गेला. तिकडे सोलापुरात काँग्रेसनं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा आंदोलन केलं. तर भाजपनं भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला. जळगावात काँग्रेस पक्षानं श्राद्ध घालून नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. तर औरंगाबादेत काँग्रेसनेच मुंडन करुन नोटाबंदीचा निषेध केला. नाशिकमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रामकुंडावर नोटाबंदीचं श्राद्ध घातलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nनोटाबंदी वर्षपूर्ती : राज्यभरातील विविध भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आंदोलन\nनोटाबंदी वर्षपूर्ती : राज्यभरातील विविध भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आंदोलन\nमुंबई-पुण्याप्रमाणे सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव इथं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध नोंदवला गेला. तिकडे सोलापुरात काँग्रेसनं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा आंदोलन केलं. तर भाजपनं भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला. जळगावात काँग्रेस पक्षानं श्राद्ध घालून नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. तर औरंगाबादेत काँग्रेसनेच मुंडन करुन नोटाबंदीचा निषेध केला. नाशिकमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रामकुंडावर नोटाबंदीचं श्राद्ध घातलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/edit-on-the-various-sessions-of-the-indian-parliament/articleshow/62407472.cms", "date_download": "2018-04-20T16:11:02Z", "digest": "sha1:SJSYM5FNZBDZXLV3U6ZWIV5AOR5X6BH7", "length": 29296, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "edit on the various sessions of the indian parliament | अपुरे कामकाज - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nडॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत संसदेच्या कामकाजाचा प्रचंड वेळ वाया गेला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी विरोधकांनी संसद डोक्यावर घेतली. त्याआधी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही विरोधकांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील आरोपांमुळे संसदीय कामकाजाचे असंख्य तास निषेधात व्यतीत केले होते. मोदी सरकारलाही पहिले वर्ष सुरळीत गेल्यानंतर विरोधकांच्या क्रोधाचा सामना संसदेत वारंवार करावा लागला आहे. सुदैवाने, नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज होऊच द्यायचे नाही, असा टोकाचा आग्रह विरोधकांनी धरला नाही. त्यामुळे, लोकसभेत संसदीय कामकाज सल्लागार समितीने ठरवलेली बरीचशी विधेयके निदान मांडता तरी आली. अर्थात, विरोधकांचे बहुमत असणाऱ्या राज्यसभेत तसे झाले नाही.\nहिवाळी अधिवेशनाचा कालावधी यावेळी आधी झालेल्या निवडणुकांमुळे कमी झाला होता. गुजरातमध्ये निसटता व हिमाचल प्रदेशात खणखणीत विजय सत्ताधारी पक्षाला मिळाल्यामुळे विरोधकांच्या संभाव्य हल्ल्याची धार काहीशी उणावणे, स्वाभाविक होते. तरीही, विरोधकांनी व विशेषतः काँग्रेसने ‘तिहेरी तलाक विरोधी’ विधेयक राज्यसभेत अडवून धरले. हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक या अधिवेशनात मंजूर झाले असते तर मुस्लिम समाजातील पुरोगामी शक्तींना बळ मिळाले असते. मात्र, लोकसभेने अनेक सुधारणा नामंजूर करीत मूळ विधेयक मंजूर केले असले तरी राज्यसभेने ते मंजूर केलेले नाही. पुढचे अधिवेशन हे अर्थसंकल्पी असेल. आता अर्थसंकल्प मांडण्याची तारीख अलीकडे आली असल्यामुळे त्या अधिवेशनात कामकाजाचा बहुतांश वेळ आर्थिक व तदनुषंगिक बाबींवर खर्च होईल. अशावेळी, तिहेरी तलाक विधेयक मागे पडता कामा नये, याची काळजी विरोधकांनाही घ्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरविल्यानंतर या विधेयकाच्या हालचालींना वेग आला होता. आज जे विधेयक संसदेसमोर आहे, तेही पुरोगामी मुस्लिम संघटनांना मान्य नाही. त्यांच्या मते मुस्लिम पुरुषांना असणारा बहुपत्नीकत्वाचा अधिकार आणि तोंडी तलाकची प्रथा यांच्यात संबंध आहे. त्यामुळे, हा अधिकार काढून घेतला नाही तर केवळ तोंडी तलाक संपवून भागणार नाही. काँग्रेसने या विधेयकाचा मसुदा संसदेच्या चिकित्सा समितीकडे पाठवावा, अशी मागणी करून राज्यसभेत ते अडवले.\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक जसे महत्त्वाचे होते, तसेच देशातील मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची तरतूद असणारे विधेयकही महत्त्वाचे होते. हे विधेयकही यावेळी मंजूर होणे अपे​क्षित होते. तेही झाले नाही. हे विधेयक पावसाळी अधिवेशनातही अडकले होते. आज अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींसाठी असणाऱ्या आयोगांना घटनात्मक दर्जा आहे. असा दर्जा मागासवर्ग आयोगाला मात्र नाही. तसा तो देणे आवश्यक आहे. पण हेही विधेयक पुढच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या विषयपत्रिकेवर जाऊन विसावले आहे. तसे पाहिले तर संसदेने या अधिवेशनात २२ विधेयके मंजूर केली. पण त्यातली ही दोन तसेच इतर दोन-तीन वगळता बाकीची सारी ही नेहेमीच्या सरकारी कामकाजाचा भाग असणारी होती. राज्यसभेत आजही विरोधकांचे बहुमत असल्याने काँग्रेससहित सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याशिवाय महत्त्वाची विधेयके पुढे सरकणार नाहीत, हा धडा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा मिळाला.\nया अधिवेशनात नेहेमीचे वातावरण बदलणारा एक प्रसंग आला तो म्हणजे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानात मिळालेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा. परराष्ट्र व संरक्षण या दोन विषयांमध्ये संसदसदस्य बहुधा एकदिलाने वागतात आणि बोलतात, हा अनुभव अनेक दशकांचा आहे. त्याचा सुखद प्रत्यय कुलभूषण यांची आई व पत्नी यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध स्वरा​ज यांनी कडक शब्दांत केला, तेव्हा आला.\nसंख्याशास्त्रीय निकष लावले तर लोकसभेची उत्पादकता या अधिवेशनात ९१.५८ टक्के होती. त्याचवेळी, राज्यसभेची उत्पादकता केवळ ५६.२९ टक्के होती. प्रतिष्ठेचा मानला जाणारा प्रश्नोत्तरांचा तासही राज्यसभेत दोन तृतियांशवेळा वेळापत्रकानुसार पार पडला नाही. आता राज्यसभेतील अंकगणित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकेपर्यंत पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागतील. त्यामुळे, बहुमत कोणाचेही असले तरी विरोधकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या साथीने व सोबतीनेच महत्त्वाचे कामकाज पुढे रेटता येते, हा धडा अडकून पडलेल्या तलाक विधेयकाने दिला आहे. सरकार तो शिकेल तर उर्वरित काळातील अधिवेशने अधिक फलदायी ठरतील.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n6आता गरज दक्ष राहण्याची...\n10बैल गेला नि झोपा केला\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/technology/", "date_download": "2018-04-20T16:27:49Z", "digest": "sha1:GUWUZVCMKBX26KLQCAY2GNOFMVCOCCJH", "length": 9855, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Technology Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nफेसबुक वापरता परंतु फेसबुक विषयी ह्या खासरे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का \nभारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक… 0\n9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर… 0\nजाणून घ्या ATM बद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी… 0\nब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल… 0\nभारतीय रेल्वेचे डिझेल इंजिन किती एव्हरेज देते हे वाचून तुम्ही थक्क व्हाल… 0\nजगातील पहिली रोबोट नागरिक सोफिया , जाणून घ्या काही खास गोष्टी… 0\nजगभरातील whatsapp १ तासाकरीता बंद होते, जाणुन घ्या कारण… 0\nगाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर… 0\nपुणेमधील देवाची आरती करणारा रोबोट भटजी बघितला का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-20T16:15:10Z", "digest": "sha1:GD6QX2V7QW66JCPNMA6PWJE2TEKTU6E3", "length": 8670, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प नैतिक दृष्ट्या अयोग्य… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प नैतिक दृष्ट्या अयोग्य…\nवॉशिंग्टन (अमेरिका) – राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प नैतिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी म्हटले आहे. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प हे मानसिक दृष्ट्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र असल्याच्या सुरुवातीच्या काळात केल्या गेलेल्या आरोपांबाबत बोलत नाही, वा त्यांच्या मनोभ्रमाबाबतही बोलत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ते राष्ट्राधय्क्षपदासाठी अयोग्य आहेत असे मला म्हणायचे नाही, तर ते नैतिक दृष्टीने या पदासाठी अयोग्य आहेत असे मला सांगायचे आहे.\nआपल्या राष्ट्राची जी मूलभूत मूल्ये आहेत, त्यांच्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी आदर दाखावायला पाहिजे. त्या मूल्यांचे पालन केले पाहिजे. या मूल्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे सत्य. आणि राष्ट्राध्यक्ष सत्याबाबत आदर दाखवण्यास, त्याचे पालन करण्यास सक्षम नाहीत. सत्याचे पालन ते करत नाहीत असे जेम्स कोनी यांनी म्हटले आहे. .\nसन 2016 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रचार अभियानात रशियाच्या हस्तक्षेपाबद्दल चाललेल्या तपासाच्या संदर्भात ट्रम्प यांनी जेम्स कोमी यांना मे 2017 मध्ये पदावरून काढून टाकले होते.\nहिलरी क्‍लिंटन परराष्ट्र मंत्री असतानाच्या ई-मेल सर्व्हरच्या संभावित दुरुपयोगाबद्दल एफबीआय पुन्हा एकदा तपास करणार आहे, अशी निवडंणुकीच्या बरोबर 11 दिवस अगोदर जेम्स कोमी यांनी घोषणा केली होती. हेच आपल्या पराभवचे कारण असल्याचे हिलरी क्‍लिंटन यांनी म्हटलेले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंजली दमानियांचे सुपारी घेण्याचे उद्योग – खडसे\nNext articleटीव्हीच्या सेट टॉप बॉक्‍स मध्ये सरकारची घुसखोरी\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\n1 मेपासून पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना अमेरिकेत प्रवेश बंदी \nदक्षिण – उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nडॉक्टरांची कमाल : २० वर्षांपूर्वी गिळलेले लायटर १० मिनिटांत काढले\nनासा शोधणार पराग्रहांवरील जीवन; उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी\nपाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेस गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%8D%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-20T16:01:17Z", "digest": "sha1:HJLW6IX76ZUTRUVTCHISZATJZPHW7UPP", "length": 7595, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील\nमुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.आता त्याची जागा न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ऍडम मिल्ने याने घेतली आहे.पॅट कमिन्सच्या पाठीला फ्रॅक्‍चर झाले नसले, तरी त्याच्या कंबरेत सूज चढली असल्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.\nत्यामुळे कमिन्स संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेला आहे. याचा फटका मुंबईला आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत बसला. आता त्याची जागा मिल्ने याने घेतली. त्यामुळे मुंबईच्या संघासमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मिल्नेच्या रूपाने त्यांना आवश्‍यक असलेल्या जादा वेगवान गोलंदाजाची कमतरता भरून येणार आहे.\nतत्पूर्वी, आयपीएलला प्रारंभ होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना कमिन्सच्या कंबरेला त्रास होऊ लागला होता. तेव्हा सूज चढल्याचेही दिसले होते, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फिजिओ डेव्हिड बॅकली यांनी दिली. कमिन्सची दुखापत आणखी बळावू नये यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी कमिन्सने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप\nNext articleउदित गोगोई, क्रिश पटेल, अनंत मुनी, रोनिन लोटलीकर यांचे विजय\nIPL 2018 : नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nआयपीएलमुळे गेला विद्यार्थ्याचा बळी\nIPL 2018 : पुनरागमनासाठी चेन्नई-राजस्थान उत्सुक\nIPL 2018 : धोनीचा सहभाग अनिश्‍चित\nIPL 2018 : सेहवाग म्हणतो, गेलची निवड करून आयपीएल वाचवले…\nIPL 2018 : गेलच्या झंझावाती शतकाचा युवराजने ‘असा’ व्यक्त केला आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rajesh-vaidya-article-on-teachers-issue/", "date_download": "2018-04-20T16:40:14Z", "digest": "sha1:HV2BVGK2Q2R5NDCM6BJHGZDPG5H2E6VR", "length": 17410, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मोकळे करा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nअशैक्षणिक कामातून शिक्षकांना मोकळे करा\nशिक्षकांची संकल्पना अलीकडे झपाटय़ाने बदलत चालली आहे. शिक्षकाचा अध्यापन व विद्यार्थी सर्वांगीण विकास तसेच गुणवत्ता वाढीस लावण्याचा मूळ हेतूच हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकापाठोपाठ एक निघणारे आदेश, मग ते online portal बाबतचे असो किंवा online बदल्या, विविध दिन शाळांत साजरे करणे असो किंवा विविध अभियाने असो हे सर्व अशैक्षणिक उपक्रम राबवा व त्याचे फोटोसह अहवाल तयार करा. या सर्व बाबींची पूर्तता फक्त आणि फक्त what’s app च्या द्वारा पाठविलेल्या रात्री-अपरात्री संदेश वा परिपत्रक/शासन निर्णयाने होत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची मुजोरीही वाढत आहे. यात भरडला जातोय शिक्षक. यामुळे समस्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक प्रचंड त्रासलेला आहे. एकीकडे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा सुरू ठेवायचा व दुसरीकडे महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी गुणवत्तेचा ध्यास धरायचा हे परस्पर विसंगतीयुक्त आहे. अशाने का विद्यार्थी गुणवत्ता वाढणार आहे प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी अशैक्षणिक कामांचा ससेमिरा थांबवा. शिक्षकांना वर्गात शिकवू द्या. विद्यार्थी वर्गास भयमुक्त शिक्षण देणारा शिक्षक स्वतः मात्र भयग्रस्त झालेला आहे. सातत्याने तणावाखाली वावरत आहे. एसी केबिनमधून बसून महाराष्ट्राचे ध्येयधोरण राबविणाऱ्या सनदी बाबूंच्या अतिआहारी जाऊन महाराष्ट्र प्रगत होणार नाही. प्रत्यक्षात तळागाळातील गाव, खेडी, शहरी भागातील झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी वर्ग यांचा विचार करून ध्येयधोरणे आखली गेली पाहिजे. मनात ती अभियाने व दिन राबवून का विद्यार्थी गुणवत्ता उंचावणार आहे प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी अशैक्षणिक कामांचा ससेमिरा थांबवा. शिक्षकांना वर्गात शिकवू द्या. विद्यार्थी वर्गास भयमुक्त शिक्षण देणारा शिक्षक स्वतः मात्र भयग्रस्त झालेला आहे. सातत्याने तणावाखाली वावरत आहे. एसी केबिनमधून बसून महाराष्ट्राचे ध्येयधोरण राबविणाऱ्या सनदी बाबूंच्या अतिआहारी जाऊन महाराष्ट्र प्रगत होणार नाही. प्रत्यक्षात तळागाळातील गाव, खेडी, शहरी भागातील झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी वर्ग यांचा विचार करून ध्येयधोरणे आखली गेली पाहिजे. मनात ती अभियाने व दिन राबवून का विद्यार्थी गुणवत्ता उंचावणार आहे वेठबिगारासारखे शिक्षकांना वागविण्याची मानसिकता बदला. अमक्या नेत्याचा व मंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शिक्षकांना बळीचा बकरा बनवू नका. प्रसारमाध्यमांनी निव्वळ शासनाची वा शिक्षण विभागाची बाजू न मांडता शिक्षकांची न्याय्य बाजू मांडली पाहिजे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमला टार्गेट केले जातेय, ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल यांचा भाजप, राष्ट्रवादीवर आरोप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंपर्क संवादातील नियम आणि नैतिकता\nनिवृत्तीवेतनाचा तिढा कधी सुटेल\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/interest/subject/agriculture", "date_download": "2018-04-20T16:43:42Z", "digest": "sha1:FBNSRMFAA34IIGC7TSMA6ZVR3MBY4DE3", "length": 15154, "nlines": 403, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन विषय शेती विषयक पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nआमची शेती आमची माती कालची ,आजची ,उद्याची\nवसुधा रिसर्च आणि पब्लिकेशन्स\nढोबळी मिरची लागवड व तंत्रव्यवस्थापन\nडॉ. द . त. भोसले\nडॉ. रामचंद्र निवृत्ती साबळे\nडॉ. डॉ वा .ब .राहुडकर\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/dog-panic/articleshow/62481281.cms", "date_download": "2018-04-20T16:34:59Z", "digest": "sha1:5XPUKTWRABRF42PLNHYXB74QPRQGJ7MU", "length": 20050, "nlines": 235, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dog panic | कुत्र्यांची दहशत - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nनाशिक शहरात अनेक ठिकाणी मोकाट श्वानांची पथके वास्तव्य करीत आहेत. त्याचा पादचारी, वाहन चालक यांना त्रास होतो. तरी संबंधीत विभागाने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा ही विनंती चंद्रशेखर साठे\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसिडको मध्ये चोरांचा धुमाकूळ\n5Divide r मधे माती टाकली जात आहे जुनी कनेरी कटिग कर...\n6सिनेमॅक्स बाहेर कचऱ्याचे साम्राज्य...\n10शालिमारला रिक्षा चालकांचा धुमाकूळ...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3021", "date_download": "2018-04-20T16:41:01Z", "digest": "sha1:Q6NOADWO5ZK5MRBKCZRKLDOLO74BIIIZ", "length": 10963, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन\nदांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन\nपालघर, दि. 29 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. 6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधिश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या बिजभाषणाने सदर परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. सदर परिसंवादाच्या निमित्ताने विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी न्यायमूर्ती अभय ओक यांच्याशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड्. व्ही. ए. गांगल उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी हे भूषविणार आहेत.\nया परिसंवादास पालघर येथील न्यायालयातील ज्येष्ठ वकिल, वेगवेगळया शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nPrevious: लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वांनी अधिकाधिक सक्रिय व्हावे -संजीव जोशी\nNext: आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:11:18Z", "digest": "sha1:Q5GTUOE7FAXMJ335OSMSERA64KTA2Z4F", "length": 10230, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nहैदराबाद: हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी, निकाल दिल्यानंतर काही तासातच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या झटपट राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, त्यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसत आहेत.\nन्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिले. रेड्डी हे दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच, तेही असीमानंद यांच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने, उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली.\nन्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे. टी पी रेड्डीवर 300 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी सत्र न्यायालायने तीन वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टानेही गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अशावेळी टी पी रेड्डीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र टी पी रेड्डीने पुन्हा त्याच कोर्टात जामीनासाठी अर्ज केला, ज्या कोर्टाने तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता.\nटी पी रेड्डीने सत्र न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यावेळी पूर्णवेळ न्यायाधीश दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा कोर्टाचा कार्यभार दोन दिवसांसाठी न्यायाधीश रवींद्र रेड्डींकडे होता. त्यावेळी न्यायाधीश रेड्डींनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्णत: न ऐकता, दोनच दिवसाच्या सुनावणीत टी पी रेड्डीला जामीन दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकारानंतर तक्रारदार कृष्णा रेड्डी यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत, हायकोर्टात तक्रार केली. त्यावेळी हायकोर्टाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. या तक्रारीनंतरच हायकोर्टाचा दक्षता विभाग चौकशी करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवर्षभरात अस्वच्छतेच्या 50 हजार ऑनलाईन तक्रारी\nNext articleसुनील ग्रोवर ‘या’ चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n…हे तर काँग्रेसचं राजकारण – अरूण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-crime-human-trafficking-87887", "date_download": "2018-04-20T16:49:55Z", "digest": "sha1:MCXKEJAHCIQDG4XLNHWEMA553NFHDBVU", "length": 13150, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news crime human trafficking मानवी तस्करीच्या गुन्ह्यात नाशिकमध्ये दलाल | eSakal", "raw_content": "\nमानवी तस्करीच्या गुन्ह्यात नाशिकमध्ये दलाल\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nनाशिक - बांगलादेशी युवतीची विक्री करून तिला वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात दलाली करणाऱ्या दोघांना आज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून मुसळगावला चालणाऱ्या या अड्ड्यावरून आणखी किती युवतींचे व्यवहार झाले हे शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी दलालांवर धाडी टाकायला सुरवात केली आहे.\nबहिणीच्या मुलीला विकणारी पीडित युवतीची मावशी माजिदा शेख अद्यापही फरारीच आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुसळगावला वर्षानुवर्षांपासून वेश्‍याव्यवसायाचा अड्डा चालविणाऱ्या नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे व तिचा मुलगा विशाल गंगावणे, दलाल सोनू देशमुख या तिघांना बुधवारी अटक केली. त्यांच्यासह सात जणांवर पिटा, बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी आज पुन्हा धाडसत्र राबवीत भद्रकालीत दोघांना अटक केली.\nदोघे ताब्यात; २० पर्यंत कोठडी\nया प्रकरणी आसिफ फारूक शेख (वय २६, रा. चौकमंडई) व सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (२१, रा. भीमवाडी, गंजमाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करून तपासासाठी न्यायालयापुढे हजर केले असताना संबंधितांना येत्या २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या पण सिन्नर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे राज्यात बदनाम असलेल्या मुसळगाव येथील कुंटणखान्यात बांगलादेशी युवतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे पुढे आले. दुर्दैव म्हणजे संबंधित युवतीनेच या प्रकरणी पर्दाफाश केल्यानंतर पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात ग्रामीण पोलिसांनी सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी चालविली आहे. मानवी तस्करीच्या घटना महाराष्ट्रात घडत असल्या तरी नाशिक जिल्ह्यात मात्र अशा घटनांची वदंता नाही. मात्र सिन्नरच्या मुसळगाव येथील कुंटणखान्यातील व्यवहाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने नाशिकही या घटनांना अपवाद नसल्याचे पुढे येते आहे.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cow-is-a-future-otherwise-it-is-nothing-say-fadanvis-264115.html", "date_download": "2018-04-20T16:35:30Z", "digest": "sha1:TW4LRLKFSAS36KG5TQXCQ3J4JPV5G7XD", "length": 11174, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गाय आहे तर भविष्य आहे,नाहीतर काही नाही -मुख्यमंत्री", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nगाय आहे तर भविष्य आहे,नाहीतर काही नाही -मुख्यमंत्री\nज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली. ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन कमी झालं, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.\n02 जुलै : 'गाय आहे तर भविष्य आहे, गाय नाही तर काही नाही'...हे उद्गार कुणा गोरक्षकाचे नाहीत तर ते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे..\nमुंबईत जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची मेगा बिझनेस कान्फरन्स आयोजित करण्यात आलीय. या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय. ज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली. ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन कमी झालं, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.\nतसंच गोरक्षा हा धार्मिक विषय नसून ज्या राज्यांमध्ये गायींची संख्या कमी झाली त्या राज्यांमध्ये जमिनी मोठ्या प्रमाणावर नापीक झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच महाराष्ट्रातील पाणी वाचवा मोहिमेला जैन समाजाने मोठी मदत केल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvisगायमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/vivekanand-institute/articleshow/62444226.cms", "date_download": "2018-04-20T16:30:04Z", "digest": "sha1:PG6OYDOCYPCR7TZZBRBG6OC3UTEPQJJV", "length": 24399, "nlines": 244, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vivekanand institute | लेखकांना भेटायचंय? - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nप्रियांका गवळी, एचआर कॉलेज\nवाचन हा तुमचा वीक पॉइंट आहे तुमच्या आवडत्या प्रसिद्ध लेखकांना भेटायचं आहे का तुमच्या आवडत्या प्रसिद्ध लेखकांना भेटायचं आहे का मग विवेकानंद इन्स्टिट्यूटमध्ये १२ आणि १३ जानेवारी या दोन दिवसांत रंगणाऱ्या ‘लिटररी फेस्टिव्हल’ला तुम्ही हजेरी लावायला हवी. वाचक आणि लेखक यांचं नातं अधिक घट्ट करावं या उद्देशानं हा फेस्ट भरवण्यात आला आहे. साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या फेस्टिव्हलचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे.\nविद्यार्थ्यांनी आयोजित केलेला असा हा एकमेव फेस्टिव्हल असल्याचं सांगितलं जातं. फेस्टच्या पहिल्या दिवशी ५ वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या दिवशी सहा वेगवेगळ्या विषयांची चर्चासत्रं पार पडणार आहेत. 'पोअरिंग द हार्ट’ या लेखनविषयक चर्चासत्रात, तरुण वाचकांमध्ये लोकप्रिय असलेले सुदीप नगरकर, धीरज गुप्ता, जगदीप कपूर हे प्रसिद्ध लेखक येणार आहेत. केवळ लेखनविषयकच नव्हे तर ‘कॉर्पोरेट वर्ल्ड’, ‘वंडर वूमन’, ‘मराठी भाषा आणि त्यापलीकडे, एक वाट अस्मितेकडे’ अशी निरनिराळी चर्चासत्रं लिट फेस्टिव्हलमध्ये रंगणार आहेत. फोटोग्राफी आणि मोबाइल फिल्म फेस्टिव्हलचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. मराठी सिनेतारका पल्लवी जोशी, मधुरा वेलणकर या फेस्टला खास हजेरी लावणार आहेत.\n'रिडिस्कव्हरिंग वनसेल्फ :चूझिंग द राईट पाथ' अशी थीम असलेल्या एका कार्यक्रमात जगमोहन भंवर, स्फूर्ती सहारे, सतीश मोध, मृणालिनी पाटील यांसारख्या मोठ्या लेखकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 'रूट्स टू विंग्स' ही दुसरी व्याख्यानमाला देखील १२ तारखेला होईल. भारतातल्या यशस्वी उद्योजकांची माहिती यात मिळेल. अक्षय राठी, घनश्याम ढोलकीया यासारखे मान्यवर यात सहभागी होतील. 'द राईज ऑफ निव्ह इंडिया','म्युझिक टुडे' या विषयांवरही पहिल्या दिवशी व्याख्यानं होतील.\nलिट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी 'मराठी भाषा आणि त्यापलीकडे; एक वाट अस्मितेकडे’ हे मराठी साहित्याशी संबंधित चर्चासत्र पार पडणार आहे. पल्लवी जोशी, मधुरा वेलणकर, गणेश मतकरी हे मान्यवर यात सहभागी होणार असून, ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n8जाणून घ्या आपली संस्कृती...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sanjay-raut-speaks-about-deva-film-277489.html", "date_download": "2018-04-20T16:16:17Z", "digest": "sha1:SJCHE4RP3RYD5HPHOHJISHLFKWRVTFMW", "length": 12343, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी सिनेनिर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखीच-संजय राऊत; 'देवा' वादात शिवसेनेची उडी", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nमराठी सिनेनिर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखीच-संजय राऊत; 'देवा' वादात शिवसेनेची उडी\nआता या वादात शिवसेना आणि नितेश राणेंनीही उडी घेतली आहे. मराठी चित्रपटांना सिनेमा मिळालाच पाहिजे असं म्हटलं आहे\n20डिसेंबर: देवा- टायगर झिंदा हैच्या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. मराठी निर्मात्यांची अवस्थाही फेरीवाल्यांसारखी झाली आहे असं ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे.\nहे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहेत. पण यशराज फिल्म्सचा आक्रमकपणा असा, की बहुतांश स्क्रीन्स 'टायगर जिंदा है'साठी आरक्षित झालेत. यावर काँग्रेस नेते नितेश राणे यांंनीही टीका केली आहे. यामुळे मराठी चित्रपट देवाला चित्रपटगृहच मिळत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये ही समस्या आहेच, पण खुद्द प्लाझा, चित्रा आणि स्टारसिटीमध्येही देवाला शोज मिळत नाहीयेत. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतली होती. देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, अशं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलं होतं .\nआता या वादात शिवसेना आणि नितेश राणेंनीही उडी घेतली आहे. मराठी चित्रपटांना सिनेमा मिळालाच पाहिजे असं म्हटलं आहे तर देवाला मारून कुठलाच टायगर झिंदा राहणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. या आधी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कासव सिनेमालाही एकच थिएटर मिळण्याची नामुष्की आली होती.\nतर या वादात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमही उतरले आहेत\nमहाराष्ट्र मध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही\nमहाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/himachal-to-go-on-polls-today-273885.html", "date_download": "2018-04-20T16:15:58Z", "digest": "sha1:HCFBPP6ISA63C4G4JRZ77XJQECSL3TNB", "length": 11260, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी दुपारी 2 पर्यंत 54 टक्के मतदान", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nहिमाचल प्रदेश विधानसभेसाठी दुपारी 2 पर्यंत 54 टक्के मतदान\nहिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. या सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजप - कॉंग्रेस या निवडणुकीत आमनेसामने आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.\n09 नोव्हेंबर: आज हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणूकीचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. यात दुपारी 2पर्यंत 54.09 टक्के मतदान झालं आहे.\nहिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. या सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होतं आहे.\nभाजप - कॉंग्रेस या निवडणुकीत आमनेसामने आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 62 सद्य आमदारही निवडणूक रिंगणात आहेत. वीरभ्रद्र सिंग आपला करिष्मा कायम राखणार की भाजप कॉँग्रेसला वेसण घालण्यात यशस्वी होणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. 7 हजार 525 मतदान केंद्रांवर मतदान होतं आहे. हिमाचलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. 17 हजार 850 पोलिंसांसाह होमगार्ड आणि निमलष्करी दलाच्याही तुकड्या तैनात आहेत.\nहिमाचलमध्ये आजपर्यंत एकही पक्ष सलग दोनदा सत्तेत आला नाही. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेस आपली सत्ता टिकवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-20T16:25:18Z", "digest": "sha1:E3LCGWI2X7BSFFB4DH7TTTSNSDLLQGJC", "length": 7132, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपाच्या नेत्याला कोसळले रडू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपाच्या नेत्याला कोसळले रडू\nकर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा आणि यादी जाहीर होण्याबरोबरच नाराजीचे सत्रही सुरू झाले आहे. इच्छुकांबरोबर त्यांच्या समर्थकांच्या नाराजीला काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सामोरे जावे लागत आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथे उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाचे नेते शशील नामोशी यांनी माध्यमासमोरच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.\nकलबुर्गीमधून उमेदवारी मिळेल या आशेवर भाजपा नेते शशील नामोशी होते. पण जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा नामोशींना मोठा धक्का बसला. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नामोशींचे नाव वगळण्यात आले.\nदरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्याचा धक्का नामोशींना सहन झाला नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार परिषदेसाठी बोलावले. आपलं म्हणणं माध्यमासमोर मांडत असताना नामोशींच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमक्का मशीद निकालानंतर राहूल कॅंडल मार्च काढणार आहेत का\nNext articleबारामतीतील कालव्यात मृतदेह आढळला\nचिथावणीखोर भाषण : भाजप आमदारावर एफआयआर दाखल\nमहिला पत्रकार काम मिळवण्यासाठी शय्यासोबत करण्यासही तयार होतात\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असिमानंद \nराजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी सेट उभारा\nबाबरी मशीद हवी असेल तर काँग्रेसला मत द्या\nभेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नरेंद्र-देवेंद्र सरकार राहणार कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4311", "date_download": "2018-04-20T16:44:06Z", "digest": "sha1:Q5WFR2SQNLKE5N266P5642P4ZXRVP44M", "length": 14254, "nlines": 106, "source_domain": "rajtantra.com", "title": "उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nउद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nजव्हार दि. १३ : शहरातील बायफ प्रशिक्षण केंद्रात अनुसूचीत जाती/जमाती करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अदिवासी युवक युवतीसाठी दि. २७ मार्च २०१८ ते दि.१३ एप्रिल २०१८. या कालावधीत निवासी १८ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .त्याची आज सांगता झाली. हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आला.\nह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे , बायफचे संदिप काकडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय अधिकारी रेखा संझगिरी , सह्याद्री रिसाँर्टचे विजय वझे , उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरूवात आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा, सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुत्र संचालनाची धुरा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी सांभाळली. या १८ दिवसीय प्रक्षिक्षण कार्यक्रमाबाबत बोलताना प्रशिक्षणार्थी प्रकाश मोर, धीरज झोले, भारत गवारी, सुभाष रड्या, रत्नप्रभा गावित यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .\nप्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना रेखा संझगिरी म्हणाल्या कि,तुम्ही उद्योजक होताना तुम्ही इतरांना ही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणजे सर्वांना रोजगार मिळेल . तर उद्योजक विजय वझे यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्या अंगी जिद्द ,मेहनत व कष्ट करण्याची हिंम्मत असण्याचे गुण अंगी असले पाहिजेत .आदिवासी विकास प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, तुमचे उद्योजकतेचे कुठलेही प्रश्न ,मार्गदर्शन योजनांची माहिती आमच्या कार्यालयात मिळू शकेल .तुम्ही उद्योजक होताना जर एकत्रित गट तयार करून उद्योग केला तर तो अधिक फायदेशीर ठरु शकतो .बायफचे संदिप काकडे म्हणाले कि,शेती व्यवसायासाठी आमची संस्था यशस्वी उपक्रम राबवित आहे .शेती उद्योगासाठी आमचे मोलाचे सहकार्य तुम्हांला मिळू शकते .उद्योजकता प्रशिक्षणार्थींच्या उत्साहाला त्यांनी प्रोत्साहन दिले.\nकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय भामरे यांनी केले .हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी .सतीश भामरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर, बायफचे सुधीर वागळे , संदिप काकडे ,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे , मुंबई चे प्रकल्प अधिकारी सुबोध बायस , सहाय्यक संजय काकड ,अंगद शर्मा व बायफ संस्था व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मोलाचे परिश्रम घेतले .तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nPrevious: बोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nNext: बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/10/11/taj-removal-from-up-governments-tourist-guide/", "date_download": "2018-04-20T16:09:49Z", "digest": "sha1:ZMJZ5I3OT7HH4LZ2S656RCXHSSECD4TO", "length": 34527, "nlines": 88, "source_domain": "rightangles.in", "title": "वाह ताज !!! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nख्रिस्तोफ जेफ्रेलॉ हे फ्रेंच प्राध्यापक भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे निरीक्षण असे आहे कि फॅसिझम चा भारतीय अविष्कार हा त्याच्या युरोपीय भावंडापेक्षा वेगळा आहे . राष्ट्रीय सयंसेवक संघाचे धोरण दीर्घकालीन आहे. त्यांना एक जैविक परिवर्तन घडवून आणायचे आहे. परंतु प्रसंगी बलाचा व दमनशक्तीचा प्रयोग करावा लागला तर तो करण्यास त्यांची हरकत नसेल. आर्थर रोझेंबर्ग या जर्मन विचारवंताने फार महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो की कम्युनिस्टांनी फॅसिझम कसा अमलात येतो हे जोखण्यात एक मोठी चूक केली. ते समजत राहिले की लष्करी व पोलीस दमनशक्तीच्या बळावरच फॅसिझम टिकतो व वाढतो. अर्थात शासनाची दमनशक्ती व शासकीय पाठिंब्याने होणारा हिंसाचार फॅसिझमला दृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. परंतु फॅसिझमसाठी त्याहूनही महत्वाचे पोषणमूल्य असते ते जनमतच्या पाठिंब्याला. म्हणूनच लोकशाहीत अति उजव्या शक्ती जेव्हा सक्रिय होऊन आपल्या राष्ट्रवादी भूमिकेस जनमताचा प्रचंड पाठिंबा मिळवितात तेव्हा फॅसिझमचा धोका सर्वाधिक वाढतो.\nकविवर्य रविन्द्रनाथांनी ताज महालचे वर्णन इतिहासाच्या गालावर ओघळलेला आसू असे केले होते. ताज महाल हे भारतीय इतिहासात अमर प्रेमाचे एक प्रतीक म्हणून चिरस्थायी झाला आहे, भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रतिभावंतांना ताज महालची मोहिनी पडली आहे. जगातील अचंबित करणाऱ्या सात वास्तूंमध्ये ताजची गणना होते. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडविलेली ही वास्तू स्थापत्य शास्त्रातील एक चमत्कार मानली जाते. देश विदेशातील करोडो पर्यटकांसाठी ताज महाल हे आकर्षण राहिले आहे. परंतु हाच ताज आज काही जणांच्या डोळ्यात खुपू लागला आहे.\nएक अत्यंत देखणी ऐतिहासिक वास्तू या पलीकडेही ताजची एक खास ओळख आहे. या सेक्युलर देशाने आपल्या मुघल इतिहासाची ही देखणी आठवण एक अभिमान बिंदू म्हणून आजवर जपली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनास्थळ म्हणून त्याची ओळख जगाला करून दिली आहे.\nभारतातील एका वर्गाला मात्र ताज कायमच एखाद्या रुतलेल्या काट्यासारखा बोचत आला आहे. काही वर्षांपूर्वी पु. ना. ओक या हिंदुत्ववादी इतिहास ‘सांशोधकाने’, ताज महाल हे मुळात हिंदूंचे शिवमंदिर -‘तेजो महाल’ असून ते शहाजहानने बळकावून त्याचे नाव ताज महाल ठेवले असा एक सिद्धांत मांडला\nहोता. हिंदुत्ववादी मंडळींमध्ये या ओककृत मीमांसेची फार वाहवा झाली होती. मुस्लिम हे या देशात उपरे असून या देशाचा भूगोल व इतिहास हा फक्त आणि फक्त हिंदूंचाच असला पाहिजे. मुसलमानांची ओळख ही , आक्रमक, परकीय व अत्याचारी अशीच इतिहासात नोंदली गेली पाहिजे. मुस्लिम संस्कृतीचा एत्तद्देशीय संस्कृतीबरोबर झालेला मिलाप, मुस्लिम संस्कृतीचे या देशाच्या इतिहासातील योगदान साफ पुसून टाकले पाहिजे अशी विचारसरणी असणाऱ्या पक्षाची आज उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात सत्ता आहे. इतिहास घडविता येईल असे कर्तृत्व नसले तरी इतिहास ‘नव्या’ने लिहिण्याची त्यांची क्षमताच नाही तर दुर्दम इच्छादेखील आहे. त्या दृष्टीने सत्तेत आल्यापासून त्यांनी मोहीमच काढलीय. या ‘इतिहास स्वच्छता’ मोहिमेचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या पर्यटक मार्गदर्शक पुस्तिकेतून ताज महालला वगळून टाकलेय.\nएक सुटी घटना म्हणून पाहिल्यास ताजला उत्तर प्रदेश पर्यटकसूची मधून वगळणे हा एक सरकारी मूर्खपणा म्हणून हसण्यावारी नेणं शक्य आहे. उद्या कदाचित महसूल बुडतोय हे लक्ष्यात आल्यावर हेच सरकार ताजला परत सरकारी पर्यटन सूचित सन्मानाने जागा देईलही, परंतु मुळात ताजचं वगळलं जाणं हे एका व्यापक कटाचा भाग आहे. सरकार तिच्या मातृसंस्थेच्या विचारधारेशी सुसंगत अशी देशाच्या ऐकतेस सुरुंग लावणाऱ्या धोरणांची अंमलबाजवणी करण्याच्या कार्यक्रमाचे एकेक पाऊल पुढे टाकतेय. या संदर्भातच या घटने कडे पाहावे लागते. गोरक्षा आंदोलन असो की इतिहासाचे पुनर्लेखन ,\nगेली तीन वर्षे हे सरकार संघाच्या फॅसिस्ट विचारसरणीस मूर्त स्वरूप द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.\nसंघाचा फॅसिस्ट अजेंडा राबविण्याचे काम हे वेगवेगळ्या किमान चार पातळ्यांवर सुरु आहे. अगदी पहिल्या प्राथमिक पातळीवर त्यांनी एक भक्त संप्रदाय उभा करण्याचे काम हाती घेतले. गेली तीन वर्षे संपूर्ण सरकारी प्रयत्न, नरेंद्र मोदी हा एकच नरवीर संपूर्ण सत्ता राबवित आहे अशी प्रतिमा उभी करण्याचा आहे. सरकारी जाहिराती, सरकारने पुरेपूर कब्जात ठेवलेल्या प्रसारमाध्यमांतील बातम्या, वेगवेगळ्या मंत्र्यानी वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी केलेली विधाने, सोशल मीडियावर पक्षाच्या आय टी सेल ने चालवलेला प्रचार, सर्वच पद्धतशीरपणे नरेंद्र मोदी या एका व्यक्तीच्या खऱ्या खोट्या कर्तृत्वाभोवती केंद्रित झालेला दिसतो. प्रधानमंत्र्यांचे अधिकृत वेब संकेतस्थळ उघडून पहा. तिथे एक अधिकृत पी एम ओ ‘अॅप’ आहे जे फक्त १ लक्ष लोकांनी डाउनलोड केलय दुसरे असेच अधिकृत माय\nगव्हर्नमेंट अॅप पाच लाख लोकांनी डाउनलोड केलय. तेच तिसरे एक नमो अॅप आहे, ते मात्र तब्ब्ल पन्नास लाख लोकांनी डाउनलोड केलय. हे आपोआप होत नसत. अस हि नाही कि नमो अॅप या दोन अधिकृत अॅप च्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या फार सरस आहे म्हणून जास्त लोक ते डाउनलोड करतायत.\nहे व्यक्ती केंद्री नमो अॅप, अधिकृत पी एम ओ अॅपच्या तुलनेत पन्नास पट अधिक डाउनलोड होण्याचे एकमेव कारण हे आहे , की बी जे पी ची आय टी सेल त्याच्या आक्रमक प्रचार करतेय. खुद्द प्रधानमंत्री संधी मिळेल तिथे या नमो अॅप चा प्रचार करतात, या अॅप बद्दल भरभरून बोलतात. पहाल त्या सरकारी\nजाहिरातीत, एकच चेहरा दिसतो.कोठल्याही खात्याचे मंत्री आपण सरकार म्हणून काय योजना यशस्वी केल्या सांगण्यापेक्षा सर्व काही प्रधानमंत्रीच करीत आहेत असे सूर आळवताना दिसतात. दूरदर्शन व ऑल इंडिया रेडियो तर सरकारी प्रसारमाध्यमेच असल्यामुळे त्यांना अष्टोप्रहर नरेंद्र मोदी हे नाव झळकत ठेवण्याची जणू सक्तीचं आहे. सर्वशक्तिमान एकमेवाद्वितीय अशा नेत्याची प्रतिमा उभी करणे ही फॅसिस्ट अंमलबजावणीची प्राथमिक पायरी आहे.\nफॅसिस्ट अजेंडयाचा दुसऱ्या क्रमांकाचा कार्यक्रम आहे तो विरोधकांमध्ये भयंकर दहशत आणि तसेच जनतेमध्ये आदरयुक्त भीती निर्माण करणे. विरोधकांचा आवाज दाबून टाकला की जनतेतील असंतोषास वाचा फुटत नाही. सरकार सर्वशक्तिमान आहे आणि कोठल्याही थराला जाऊन ते विरोधकांच्या मुसक्या आवळू शकते अशी जनतेची खात्री पटविली की नवीन विरोधक तयारच होत नाहीत. मग काय वाटेल ते मनमानी प्रयोग करा, नोटबंदी करा, रोकड काढायचे नियम पन्नास वेळा\nबदला, जी एस टी घाईघाई ने अमलात आणा, प्रयोग फसलाय हे दोन महिन्यात कळल्यावर कराचे दर बदलून पहा, काय वाट्टेल ते करा, जनता हैराण होते, परंतु विरोध करावयास धजत नाही. २०१३ साली दाभोलकारांपासून जो विरोधी विचारांना हिंसेने संपवून टाकायचा सिलसिला सुरु झाला , त्यात पुढे पानसरे , कलबुर्गी , गौरी लंकेश असे बळी घेतले,एवढ्या सर्वशक्तिमान सरकारला मारेकरी सापडतच नाहीत याचे कारण स्पष्ट आहे. आताही तामिळ लेखक मुरुगन, दलित विचारवंत कांचा इलाया, “आता\nआदिवासी नाचणार नाहीत ” या आता बंदी घातलेल्या पुस्तकाचे आदिवासी लेखक हंसदा सोवेन्द्र शेखर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतच आहेत.\nवर उल्लेख केलेली नावे ही मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांची आहेत, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा या दडपशाहीचा अनुभव पदोपदी येतोय. पोलीस यंत्रणा, गृहखाते, गुप्तहेर खाते या सगळ्याच गोष्टी ताब्यात असल्यावर, विरोधकांच्या सभा उधळून लावणे, सोशल मीडिया वर घेरून धमक्या देणे, विरोधकांना सभा घेण्यासाठी पोलीस परवानगीच नाकारणे अशा गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात.\nएकीकडे राजकीय विरोधकांचे दमन करताना दुसरीकडे सामान्य जनतेस जरब बसविण्याचा उद्योगही सुरु आहेच. त्यासाठी वेगवेगळे दक्षता गट स्थापन झालेत. हे काही वैधानिक अधिकार असलेल्या कायदेशीर संस्था नाहीत. हे नागरी गट आहेत. गो रक्षक समिती हे त्याचे ठळक उदाहरण. सरकार व गृह खात्याच्या थेट व मूक पाठिंब्या शिवाय असे गट कार्यरत होणे अशक्य आहे, कारण आजवरची\nउदाहरणे पाहता, या गोरक्षकांना सरकारी यंत्रणेने कवच पुरविलेले दिसते. पोलीस एकतर गुन्हेच नोंदवून घेत नाहीत, किंवा प्रसारमाध्यमांनी दडपण आणल्यामुळे गुन्हा नोंदवलाच तर त्या नोंदीत अशा फटी ठेवून देतात की आरोपी पुढे कोर्टात सुटलाच पाहिजे. राजस्थानातील गो रक्षकांच्या हल्ल्यात बळी\nपडलेल्या पेहलू खानचे उदाहरण बोलके आहे. पेहलू खानने मरण्यापूर्वी दिलेली जबानी हा पुरेसा पुरावा असतानासुद्धा पोलिसांनी हल्लेखोरांवर आरोपपत्रच ठेवले नाही. गोरक्षकांच्या हिंसाचारावर आंतराष्ट्रीय समुदायातून प्रतिक्रिया येऊ लागल्यावर अखेर नाईलाजाने प्रधानसेवकानी हिंसक गोरक्षेवर नाराजी व्यक्त केली खरी पण त्यावर विसंबून आता ही गोरक्षकांची दहशत थांबेल या भ्रमात राहू नका. कारण ज्यांचा शब्द संघपरिवारात अखेरचा मानला जातो त्या सरसंघचालकांनी विजयादशमी मेळाव्यात गोरक्षेची भलावण केलेली आहे.\nगोरक्षा समितीनंतर आता स्वच्छता अभियान राबविण्यासाठी काही नागरी संघटना स्थापन झाल्या आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना जाहीरपणे हिणवून त्यांना स्वच्छतेचा ओनामा द्यायच्या नादात या संघटनांची मजल हत्या करण्यापर्यंत गेली आहे. राजस्थानातील प्रतापगढ येथे काही महिला उघड्यावर शौचास बसल्या असता, त्यांना धडा शिकविण्यासाठी नगरपालिकेचे एक पथक त्यांचे फोटो काढायला सरसावले. जफर खान या इसमाने त्यांना विरोध केला. या लोकांनी जफर खान ला मारहाण करून त्याचा जीवच घेतला. अलीकडेच महाराष्ट्रात एका जिल्हाधिकाऱ्याने उघड्यावर शौचास गेल्या म्हणून पकडून काही महिलांचा हारतुरे घालून ‘सत्कार’ केला. स्त्रियांना अपमानित करण्याचा हा अधिकार कुठल्या कायद्याने दिलाय \nया दोन उपक्रमांच्या बरोबरीने, तिसऱ्या पातळीवर अजून एकउपक्रम फॅसिस्ट शक्ती राबवितातयत. तो आहे येथील बहुसंख्यांना म्हणजेच हिंदूंना एक काल्पनिक शत्रू उपलब्ध करून देणे. असा शत्रू ज्याच्यावर बहुसंख्य जनता एकवटून आपला सगळा राग, सगळी भडास काढू शकेल. संघ परिवारातील काही संस्था अगदी खुल्या पद्धतीने हा भावना भडकविण्याचा खेळ खेळत आहेत. वंदे मातरमची सक्ती करून मुसलमानांना आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करावयास लावणे, मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करणे, खोटे आणि बनावट व्हिडियो सोशल मीडियात फैलावून जे एन युतील विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारणे या सर्व कारवाया सरकारी आशीर्वादाने संघपरिवारातील संस्था या\nतिसऱ्या उपक्रमांतर्गत करीत आहेत.\nभाजपाच्या राजकीय व्यवस्थपकाना या उपक्रमातून दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे त्यांच्या विचारसरणीचे येथील विरोधक म्हणजे लिबरल / उदारमतवादी विचारवंताना एकटे पडता येईल. गोळवलकरपुरस्कृत हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात जाणारी सर्वसमावेशक आणि सहिष्णू विचारधाराच त्यायोगे खलास करता येईल. दुसरे उद्दिष्ट्य म्हणजे बहुसंख्य हिंदू जनतेस- पहा, नीट पहा, हे मुसलमान या देशाशी एकनिष्ठ नाहीत, प्रसंगी ते घात करतील- हे पटवून देता येईल. मुसलमान राष्ट्रविरोधी आहेत. का तर आम्ही, म्हणजे संघ, सांगतो त्या राष्ट्रवादाच्या व्याख्येत ते बसत नाहीत.\nराष्ट्रवाद, प्रखर राष्ट्रवाद हा फॅसिझमचा कणा आहे. फॅसिझम हा राष्ट्रवादावर आरूढ होऊनच येत असतो. जगाच्या इतिहासाने हे सिद्ध केलेले आहे. साऱ्या जनतेस राष्ट्रवादाच्या उदात्त ध्येयात गुंडाळून टाकण्यात फॅसिझमचे यश सामावलेले असते. ते साध्य करण्यासाठी देशातील सर्व मतमतांतरे, सांस्कृतिक फरक , बहुविधता, बळजबरीने मिटवून एक जबरजस्तीची एकसामायिकता देशावर लादावी लागते.\nचौथ्या पातळीवर इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे व त्याद्वारे ‘राष्ट्रवादी’ इतिहास क्रमिक अभ्यासक्रमांतून रूढ करण्याचा उपक्रम सुरु आहे. हा तर अगदी पेटंट फॅसिस्ट उद्योग आहे. समाजात अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाठ्यपुस्तकातून, अधिकृत अभ्यासक्रमातून शिकविल्या जाणाऱ्या इतिहासासारखे दुसरे साधन नाही. राजस्थानातील शालेय अभ्यासक्रमात या पुढे फक्त महाराणा प्रतापचा अबकरावरील विजयच शिकविला जाईल. महाराष्ट्रातील क्रमिक पुस्तकांतून मुघल इतिहास गायब झालेलाच आहे. उत्तर प्रदेश सरकार आता शाळांमधून दिनदयाळ उपाध्यायांच्या शिकवणीवर प्रश्नोत्तरांच्या स्पर्धा आयोजित करते. संघ पुरस्कृत ‘शिक्षणतज्ञ् ‘, दीनानाथ बात्रा यांनी तर\nक्रमिक पुस्तकातून रवींद्रनाथ टागोरांचे धडे, कविता काढून टाकण्याचा आग्रह धरला आहे.\nहा सारा प्रयत्न म्हणजे राष्ट्राचा इतिहास हा फक्त हिंदूंचा इतिहास असल्याचे मिथक किशोरवया पासूनच शालेय अभ्यासक्रमातून मुलांवर बिंबविण्याचा प्रकार आहे.उत्तरप्रदेश सरकारच्या पर्यटक सूचीतून ताज महाल वगळणे हा म्हणूनच एकूण फॅसिस्ट उपक्रमांचाच एक भाग आहे.\nख्रिस्तोफ जेफ्रेलॉ हे फ्रेंच प्राध्यापक भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे निरीक्षण असे आहे कि फॅसिझम चा भारतीय अविष्कार हा त्याच्या युरोपीय भावंडापेक्षा वेगळा आहे . राष्ट्रीय सयंसेवक संघाचे धोरण दीर्घकालीन आहे. त्यांना एक जैविक परिवर्तन घडवून आणायचे आहे. परंतु\nप्रसंगी बलाचा व दमनशक्तीचा प्रयोग करावा लागला तर तो करण्यास त्यांची हरकत नसेल. आर्थर रोझेंबर्ग या जर्मन विचारवंताने फार महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो की कम्युनिस्टांनी फॅसिझम कसा अमलात येतो हे जोखण्यात एक मोठी चूक केली. ते समजत राहिले की लष्करी व पोलीस दमनशक्तीच्या बळावरच फॅसिझम टिकतो व वाढतो. अर्थात शासनाची दमनशक्ती व\nशासकीय पाठिंब्याने होणारा हिंसाचार फॅसिझमला दृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. परंतु फॅसिझमसाठी त्याहूनही महत्वाचे पोषणमूल्य असते ते जनमतच्या पाठिंब्याला. म्हणूनच लोकशाहीत अति उजव्या शक्ती जेव्हा सक्रिय होऊन आपल्या राष्ट्रवादी भूमिकेस जनमताचा प्रचंड पाठिंबा मिळवितात तेव्हा फॅसिझमचा धोका सर्वाधिक वाढतो.\nताज महालची ही घटना म्हणूनच आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.द्वेष, दहशत व हिंसा यावर आधारित राष्ट्ररचनेकडे होणारी वाटचाल रोखायची असेल तर या घटनेचा खरा अर्थ संघाच्या व्यापक रणनीतीच्या परिप्रेक्ष्यात जाणून घेतला पाहिजे. संघाचा जन्म झाल्यानंतर तब्बल नव्वद वर्षांनी त्यांच्या\nराजकीय फ्रंट ने प्रत्यक्ष सत्ता २०१४ मध्ये हस्तगत केली आहे. गेल्या तीन वर्षांतील घटना पाहता या देशाची वाटचाल आता फॅसिझमच्या दिशेने संथपणे परंतु निश्चितपणे सुरु झालेली आहे. सर्वसमावेशक अशी विचारधारा हजारो वर्षे जपलेला हा देश आता द्वेषमूलक फॅसिस्ट विचारसरणीच्या कह्यात जातो की त्यावर मात करतो हे आता काळच सांगेल.\nजगभरात उदारमतवादाचा पराभव का होतोय\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\nफारच सुंदर अजन घालणारा लेख आहे. फॅसिझम कङेच आपली वाटचाल सुरू आहे परंतु गरीब जनतेची फसवणूक होतेय हे वाईट आहे. मूठभर लोकांनाच या फॅसिझमचा अथॆ कळतोय काही लोकांना कळतय पण पटटी बांधूनच जगण गोङ वाटतय अशांना. लेख अप्रतिम.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:05:10Z", "digest": "sha1:6G6QWKCEMLPFDIOIOKZYBPSSCJOY2VER", "length": 8097, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप\nनवी दिल्ली – भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीने जागतिक टेनिस मानांकन यादीत पुन्हा एकदा अव्वल शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला असून त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 83वे मानांकन मिळवले आहे. तर महिलांमध्ये अंकिता रैना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 194व्या स्थानी पोहोचली आहे. दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा 19व्या स्थानी आहे.\nयुकी यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये मानांकन यादीत पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये होता. परंतु दुखापतीमुळे काही काळ खेळू न शकल्याचा त्याला मानांकनात तोटा झाला होता.\nपरिणामी तो पहिल्या शंभर खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला होता. मात्र तैपेई चॅलेंजर स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने युकीला मानांकन यादीत 22 स्थानांचा फायदा झाला असून त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. युकीच्या कामगिरीने 2011 नंतर कोणत्याही भारतीयाने मानांकन यादीत मिळवलेले हे सर्वोत्तम स्थान आहे. 2011 मध्ये सोमदेव देववर्मनने 62 वे स्थान मिळवले होते. युकीने 2015 मध्ये पहिल्यांदा पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्याच्या मागे लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणामुळे त्याला या यादीत आणखी मोठी झेप घेता आली नाही.\nत्याचबरोबर भारताच्या रामकुमार रामनाथनला 116 वे मानांकन मिळाले आहे, तर सुमित नागलला दोन स्थानांचा फटका बसला असून तो 215व्या स्थानी घसरला आहे. या दोघांपाठोपाठ भारताचा प्रजनेश गुणेश्‍वरन आणि अर्जुन कढे अनुक्रमे 266 आणि 394 व्या स्थानी आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : गेलचे पुनरागमन हा धोक्‍याचा इशाराच\nNext articleIPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील\nIPL 2018 : नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nआयपीएलमुळे गेला विद्यार्थ्याचा बळी\nIPL 2018 : सेहवाग म्हणतो, गेलची निवड करून आयपीएल वाचवले…\nIPL 2018 : गेलच्या झंझावाती शतकाचा युवराजने ‘असा’ व्यक्त केला आनंद\nIPL 2018 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर विजय\nकेवल किरपेकर, सिद्धार्थ मराठे यांचा उपान्त्य फेरीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/gujarat-verdict-gujarat-election-narendra-modi-challenges-2019-article-dnyaneshwar-bijale", "date_download": "2018-04-20T16:44:28Z", "digest": "sha1:PECQHDBPEOVETVTKWPN3KDY72SRCJD7B", "length": 43477, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gujarat verdict Gujarat election Narendra Modi challenges 2019 article Dnyaneshwar Bijale ...तरीही मोदींसमोर 2019 ची वाट बिकटच! | eSakal", "raw_content": "\n...तरीही मोदींसमोर 2019 ची वाट बिकटच\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्र पक्ष गमावले. नवे मित्र मिळणे दुरापास्त. हिंदी बेल्टमध्ये यश मिळणार असले, तरी जागा वाढणार नाहीत. किनारपट्टीवरील राज्यात शिरकाव करण्याची संधी कमीच. शेतकरी संतप्त, तर व्यापारी अस्वस्थ. वेतनवाढ नसल्याने कामगार नाराज, तर रोजगार नसल्याने तरूण हवालदील. महागाई, वाढत्या कराच्या बोजाला तोंड देताना सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. आश्‍वासने पोकळ असल्याचे त्यांना समजू लागले तरी, सक्षम विरोधक नसल्याने मतदार हतबल आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तरी एकहाती बहुमत मिळण्याची शक्यता अंधूक दिसते आहे.\nगुजरातमध्ये भाजप विजयी झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाणार आहे. त्यांना देशपातळीवर सक्षम स्पर्धक आहे की नाही, हा मुद्दाही गैरलागू ठरणार आहे. प्रादेशिक पातळीवर ठिकठिकाणी लढा देताना अनेक स्थानिक मातब्बर नेतृत्व त्यांच्यावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.\nभाजप हा तसा उत्तर भारतात म्हणजे हिंदी बेल्टमध्ये सक्षम असलेला पक्ष. गेल्या लोकसभा निवडणुकीत या पट्टयामध्ये त्यांना शत प्रतिशत जागा मिळाल्या. तेथे मोदी लाटेची त्सुनामी आली होती. तरीदेखील भाजपला 282 जागा, म्हणजे बहुमताला आवश्‍यक असलेल्या 273 जागांपेक्षा केवळ नऊ जागा जास्त मिळाल्या. त्यांच्या मित्र पक्षांना 54 जागांवर यश मिळाले. 543 पैकी 336 जागा जिंकत एनडीए सत्तेवर विराजमान झाला. ‘273 प्लस़ अशी गर्जना करीत प्रचाराला लागलेल्या भाजपच्या यशात मित्र पक्षांचेही थोडेफार योगदान होते. मात्र एकहाती बहुमत मिळविल्यानंतर भाजप नेतृत्वाने पहिल्या दिवसांपासूनच मित्र पक्षांना वाऱयावर सोडले. त्यांना चांगली मंत्रीपदेही दिली नाहीत.\nभाजप अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली होता, तेव्हा तो राजकीयदृष्टया अन्य पक्षापासून दूर होता. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने प्रमुख प्रादेशिक पक्षांशी युती करीत 1999 मध्ये एनडीए सत्तेत आणली. त्यावेळी भाजपला 182 जागा, तर एनडीएला एकूण 269 जागा मिळाल्या होत्या. बहुमताला कमी पडलेल्या चार जागांसाठी तेलगू देशमच्या 29 खासदारांचा पाठिंबा मिळविला. त्यावेळी महाराष्टात युतीने मिळविलेल्या 28 जागांमध्ये शिवसेनेच्या 15 जागा होत्या. ममता बनर्जी, नितीशकुमार, करूणानिधी, बिजू पटनाईक एनडीएमध्ये होते.\nमोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी पहिला झटका दिला तो शिवसेनेला. विधानसभा निवडणुकीत महाराष्टात युती तुटली. शिवसेनेचे भाजपनंतर एनडीएमध्ये सर्वाधिक 18 खासदार आहेत. राज्यात युती सत्तेवर असली तर लोकसभा निवडणुकीत ते एकत्र असल्याची शक्यता जवळपास नाही. त्यानंतर एनडीएमध्ये सोळा खासदार आहेत तेलगू देशमचे. या पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू भाजप सध्या फारशी किंमत देत नसल्याने अस्वस्थ आहेत. येत्या निवडणुकीत ते समोरासमोर लढतील. उत्तर प्रदेशातील मित्रपक्ष असलेला अपना दल हा थेट विरोधात गेला. मात्र, तेलगू देशम आणि अपना दलचे केंद्रीय मंत्री मात्र भाजपसोबत आहेत. महाराष्टातील स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएतून बाहेर पडली. पंजाबातील चार खासदार असलेला जुना मित्रपत्र अकाली दलाची अवस्था क्षीण झाली असून, भाजपचे त्यांच्याशी फारसे सख्य नाही.\nगेल्या साडेतीन वर्षातील ही स्थिती लक्षात घेतली, तर मित्रपक्षाच्या 54 खासदारांपैकी 35 खासदार आता नाममात्र भाजपसमवेत आहेत, तर दोन पक्षांचे सहा खासदार निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागण्याच्या स्थितीत आहेत. लोकसभेत सध्या सात जागा रिक्त असून, भाजपच्या 277 जागा आहेत. नाना पटोले यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. बिहारमधील मित्र पक्षांच्या नऊ खासदारांसह जेमतेम तेरा खासदार भाजपसोबत आहेत. भाजपच्या नव्या मित्रात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा समावेश आहे. पण, बिहारमध्ये जागा वाटपावरून वाद होणार, हे नक्की. ममता बनर्जीबरोबर मैत्रीचा प्रयत्न केला, पण त्यांनी डाळ शिजू दिली नाही. आंध्र प्रदेशात भाजप वायएसआर काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे. तमिळनाडूतही त्यांच्याशी कोणी मैत्री करण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.\nभाजपने 2014 मध्ये उत्तर भारतात लक्षणीय यश मिळविले. उत्तर प्रदेश आणि महाराष्टात एनजीएला 116 जागा मिळाल्या होत्या. उत्तरप्रदेशात 80 पैकी 73, बिहारमध्ये 40 पैकी 31, गुजरातमध्ये सर्व 26, राजस्थानमध्ये सर्व 25, मध्य प्रदेशात 29 पैकी 27 जागा एनडीएच्या पारड्यात पडल्या. झारखंडमध्ये 14 पैकी 12, छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10, हरियानात दहापैकी सात, पंजाबमध्ये तेरापैकी सहा, आसामनध्ये 14 पैकी सात, जम्मू काश्‍मीरमध्ये सहापैकी चार, दिल्लीत सर्व सात, उत्तराखंडमध्ये सर्व पाच, हिमाचल प्रदेशात सर्व चार जागा एनडीएच्या पारड्यात जमा झाल्या आहेत. या सर्व जागा 284 असून, त्यापैकी एनडीएकडे 244 जागा आहेत. म्हणजे सर्व विरोधकांकडे एकूण 40 जागा, त्यापैकी दोन जागा नितीशकुमार यांच्या पक्षाच्या आहेत. उत्तर भारतातील ही स्थिती लक्षात घेतल्यास, तेथे भाजपने 2019 मध्ये त्यांच्या जागा राखल्या तरी खूप जिंकले म्हणावे लागेल. या ठिकाणी जादा जागा मिळण्याची शक्यताच नाही. त्या उलट विरोधकच त्यांची संख्या लक्षणीय वाढवतील अशी स्थिती सध्या दिसून येत आहे.\nउत्तर भारतात महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. काँग्रेस - समाजवादी आघाडीला पराभूत करून मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ सध्या सत्तारूढ झाले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचे महत्त्वाचे कार्ड असेल ते राम मंदीर. या ध्रुवीकरणाच्या जोरावर ते उत्तर प्रदेशात पुन्हा ताबा मिळवतील. विरोधकांकडे सध्या असलेल्या सात जागांपैकी दोन जागा काँग्रेसच्या गांधी घराण्याकडे, तर पाच जागा समाजवादी यादव परीवाराकडे. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या अमेठी, तर पुण्यात जन्मलेल्या व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी व पुण्यात जन्मलेल्या डिंपल यांच्या कनौज मतदारसंघाकडे भाजपची नजर असेल. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ याच पक्षांकडे 1998-99 पासून आहेत. त्यातच सोनिया गांधी सक्रीय राजकारणातला सहभाग कमी करत असल्याने राहूल गांधी रायबरेलीतून लढू शकतील आणि अमेठीका डंका बेटी प्रियंका ही लोकप्रिय घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रियंका गांधीही मैदानात उतरतील. काँग्रेस समाजवादी आघाडी भाजपच्या काही जागा खेचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला वाढ मिळण्याची शक्यता सुतराम नाही.\nगुजरातमध्ये मोदी यांनी पन्नास सभा घेतल्या. तेवढा प्रचार त्यांना पुढील वेळी करता येणार नाही. येथे काँग्रेसचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेला काही जागा मिळू शकतील. राजस्थानात तर भाजपची स्थिती बिकट झाली आहे. तेथे राज्यातील सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतली, तर लोकसभेला किमान दहा जागा त्यांच्या पारड्यात पडतील. या दोन्ही राज्यातील सर्वच 51 जागा भाजपकडे असल्याने, किमान पंधरा ते वीस जागा मिळविण्यासाठी काँग्रेसने जोर केला, तरी उत्तर भारतातील घडी विस्कटू शकते.\nबिहार हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य. तिथे कायम राजकीय अस्थिरता नांदते. भाजपचे 22 आणि मित्रपक्षाचे नऊ खासदार आहेत. त्यामध्ये रामविलास पासवान यांचे सहा खासदार. नवीन मित्र झालेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाचे दोन खासदार. लोकसभेला एनडीए आघाडीवर, तर विधानसभा निवडणुकीत विरोधक. विधानसभेच्या 2015 च्या निवडणुकीत एनडीए पराभूत झाली. नितीनकुमारांनी त्यानंतर आघाडी बदलली, राज्यात पुन्हा एनडीएची सत्ता. मोदींचे पक्षांतर्गत विरोधक यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, किर्ती आझाद याच राज्यातील. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपालाच एनडीएत वाद रंगणार. एनडीएमध्ये असताना जनता दलाचे 2009 मध्ये वीस खासदार, तर भाजपचे बारा खासदार होते. मोदीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यावर नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले. त्यांच्या पक्षाचे वीसच्या ऐवजी दोनच खासदार निवडून आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्या जागा भाजप व मित्रपक्षांनी जिंकल्या. आता ते पुन्हा एनडीएत आले, मग त्यांचा पक्ष जादा जागा मागणार. भाजप त्या देणार का, हा वादाचा मुद्दा होईल. लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसच्या जागांमध्ये 2009 आणि 2014 मध्ये फरक पडला नाही. त्यांच्याकडे अनुक्रमे चार व सहा जागा कायम राहिल्या. त्यांच्या जोडीला आता शरद यादवही असतील. त्यामुळे, बिहारमध्येही एनडीएच्या जागा वाढणार नाहीत, तर आक्रमक विरोधी पक्षच त्यांच्या काही जागा हिसकावून घेऊ शकेल. बिहारचे पडसाद लगतच्या झारखंडमध्ये उमटतात.\nमध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे भाजपचे आणखी बालेकिल्ले. या पूर्वी एक असलेल्या राज्यात भाजप गेली काही वर्षे सत्तेवर. तेथे भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत. 2014 मध्ये या राज्यातील 40 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला केवळ तीन जागा, तर उर्वरीत 37 जागा भाजपच्या पारड्यात. यंदा छत्तीसगडमध्ये निश्‍चित बदल होतील. काँग्रेसच्या जागा वाढतील. मध्यप्रदेशात मात्र किरकोळ पडझड वगळल्यास मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भाजपचा गड राखतील.\nपंजाबमध्ये भाजप, काँग्रेसच्या प्रत्येकी दोन जागा, तर अकाली दल आणि आपच्या प्रत्येकी चार जागा. या आठ जागांपैकी काँग्रेस किती खेचून घेणार ते पाहावे लागेल. भाजपची गुरुदासपूरची विनोद खन्ना यांची जागा काँग्रेसने पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकली. हरियाना व चंदीगडमध्ये बारापैकी भाजपकडे आठ, तर काँग्रेसकडे एक जागा आहे. या पट्ट्यात भाजपच्या जागा वाढणार नाहीत. लगतच्या जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तीच परिस्थिती. हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजप जिंकणार असले, तरी हिमाचल प्रदेश, दिल्ली व उत्तराखंड येथील सर्व 16 खासदार भाजपचेच आहेत.\nउत्तर भारतात वाढणार किती\nवरील विश्‍लेषण लक्षात घेतल्यास, भाजपला उत्तर भारतात किमान तीस ते चाळीस जागांचा फटका बसेल. म्हणजेच भाजपची घोडदौड या भागात दोनशे ते 210 जागांपर्यंत थांबेल. हे लक्षात घेऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे 2019 साठी भाजपचे लक्ष्य 350 निश्‍चित करताना ईशान्य भारत आणि पूर्व व दक्षिण भारताचा उल्लेख करतात. भाजप निवडून न आलेल्या तेथील 120 जागांवर आत्तापासून तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील आसामसह आठ राज्यात एकूण 25 जागा आहेत. त्यापैकी एनडीएकडे दहा, काँग्रेसकडे आठ, अन्य पक्षांकडे सात जागा आहेत. तेथे स्थानिक आघाड्यांचे अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र, येथे जागांमध्ये फार मोठी उलथापालथ होणार नाही.\nभाजपला गेल्या निवडणुकीत खऱया अर्थाने रोखले ते पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी. पश्‍चिम बंगालमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये एनडीएत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी. बंगालमधील 42 जागांपैकी तृणमुल काँग्रेसने 34 जागा जिंकल्या. काँग्रेसला चार, तर भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. येथे भाजपला फारशी आशा नाही. एखाददुसरी जागा वाढू शकेल. लगतच्या ओरिसामध्ये भाजप काही प्रमाणात जागा वाढवू शकेल. बिजू जनता दल 1999 मध्ये एनडीएमध्ये होते. त्यांनी ओरिसातील 21 पैकी वीस जागा जिंकत भाजपला एका जागेवर रोखले. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था जिंकत तेथे आव्हान उभे केले आहे.\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात एकूण 42 जागा. पुण्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेवटच्या टप्प्यात शिष्टाई यशस्वी करीत तेलगू देशमशी आघाडी केली. या दोन्ही पक्षांनी आंध्र प्रदेशातील 25 पैकी 17 जागा, तेलंगणातील 17 पैकी तीन जागा जिंकल्या. आता आंध्र प्रदेशात तेलगू देशम नाराज असल्याने भाजप तेथील जगन रेड्डी यांचा मुख्य विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाशी संधान जुळवित आहे. त्या पक्षाचे नऊ खासदार आहेत. या दोन्ही राज्यात भाजपची ताकद नाही, तशीच काँग्रेसचीही नाही. त्यातच लोकसभेबरोबर तेथे विधानसभेची निवडणूकही आहे. तेलंगणा राज्यात एनडीए अथवा यूपीएमध्ये सहभागी नसलेल्या तेलंगणा राष्ट समिती (टीआरएस) ची सत्ता आहे. तेलंगणातील 17 पैकी 11 खासदार त्यांचे आहेत. यावेळीही त्यांच्या जागा वाढतील, असा अंदाज आहे.\nपूर्व किनारपट्टीचे शेवटचे राज्य तमिळनाडू. भाजपने या राज्यात नको तेवढा हस्तक्षेप करीत गोंधळ घातला. जयललिता यांच्या नाराजीमुळे अटलबिहारी वाजपेयी यांचे तेरा महिन्याचे सरकार कोसळले. मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सहकारी शशिकला यांनी मुख्यमंत्री पद घेऊ नये, यासाठी भाजपने आटापिटा केला. शशिकला तुरुंगात गेल्यानंतर, अण्णा द्रमुकच्या दोन गटांत वाद लावण्याचा प्रयत्न केला. या पक्षाचे 39 पैकी 37 खासदार, तर एनडीएचे दोन खासदार आहेत. सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी अण्णा द्रमुकचे दोन गट एकत्र झाले. ज्या द्रमुक पक्षातील मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराचा फटका डॉ. मनमोहन सिंह यांच्या केंद्र सरकारला बसला, त्या पक्षाचे प्रमुख करुणानिधी यांना भेटण्यासाठी मोदी नुकतेच तमिळनाडूला गेले होते. येथील लढाई स्थानिक पक्षातच होते. चित्रपट अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन राजकारणात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे राष्टीय पक्ष कोणाशी आघाडी करणार यावरच त्यांची येथील संख्या अवलंबून राहील.\nकेरळमध्ये डावे, काँग्रेसचे आव्हान\nपश्‍चिम किनारपट्टीवरील केरळमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी यांच्यातच चुरस असल्यामुळे त्या राज्यात भाजपला शिरकाव करणे अवघडच आहे. त्यालगतच्या कर्नाटकमध्ये येत्या सहा महिन्यांत विधानसभेसाठी काँग्रेसपुढे भाजपचे आव्हान उभे ठाकणार आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेले हे एकमेव मोठे राज्य. मात्र लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत कर्नाटकातील 28 पैकी 17 जागा भाजपकडे आहेत. काँग्रेसच्या देशभरातील 44 जागांपैकी सर्वांधिक नऊ जागा कर्नाटकातील, तर त्या खालोखाल आठ जागा केरळमधील आहेत. त्यामुळे काँग्रेस दोन्ही राज्यात चांगली लढत देऊ शकेल.\nमहाराष्टातील 48 जागांमध्ये भाजप 23, शिवसेना 18, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक अशा एनडीएच्या 42 जागा, तर काँग्रेसच्या दोन आणि राष्टवादी काँग्रेसच्या चार अशा सहा जागा विरोधी पक्षाकडे आहे. भाजपच्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला, तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी एनडीएची साथ सोडली. महाराष्टातील वाढणाऱया जागांवर मोदी यांची मदार आहे. मात्र, महाराष्टातील राजकीय स्थिती गुंतागुंतीची आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.\nही स्थिती लक्षात घेतल्यास, उत्तर भारतात भाजपच्या कमी होणाऱया जागा किनारपट्टीच्या राज्यांत भरून निघण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याची शक्यता कितपत आहे, याबद्दल भाकित करणे अवघड आहे. ही स्थिती गेल्या वेळच्या स्थितीवरूनच अंदाज केलेली आहे. त्या व्यतिरिक्त महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी या सारख्या विषयांवर मतदारांची देशभरातील प्रतिक्रिया मतदानाच्या वेळी काय असेल, त्यावर निकालाचा कल अवलंबून राहील. गेल्या निवडणुकीत भाजपला 31 टक्के मते मिळाली होती. त्यात एक दोन टक्क्यांनी जरी घट झाली, तरी त्याचा परिणाम होऊन काही जागा गमवाव्या लागतील. 2014 ची मोदी लाट 2019 ला तेवढ्या प्रमाणात निर्माण होणार नाही. गेल्या वेळी ते प्रश्‍न विचारीत होते, आता त्यांनी उत्तरे देणेही अपेक्षित आहे. भाजप गुजरातेत जिंकेलही. मात्र, ज्या गुजरात मॉडेल चा गवगवा करीत मोदी यांनी 2014 मध्ये देशभरात विजयश्री खेचून नेली, त्या मॉडेलच्या विश्‍वासार्हतेला गुजरातच्या निवडणुकीत तडा गेला हे निश्‍चित.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4314", "date_download": "2018-04-20T16:44:41Z", "digest": "sha1:BKULNJJLV7OKIPLYTRF2AGJKZSF2HOTA", "length": 9541, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nबोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nबोईसर दि. १४ : बोईसरमध्ये डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक भागात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेकडो तरुणांचा सहभाग असलेली बाईक रॅली काढण्यात आली. बोईसरमध्ये स्टेशन परिसरातून काढण्यात आलेली हि बाईक रॅली संपूर्ण शहरात फिरून मधुर हॉटेलजवळ बाबासाहेबाना अभिवादन करून रिलीची सांगता झाली. यावेळी सरावली ग्रामपंचयत च्या सरपंच लक्ष्मी चांदे, बोईसर चे पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पी एस आय सुदाम कदम , आदी प्रमुख पाहुण्यांसह आरपीआयचे पालघर जिल्हा कार्यध्यक्ष सचिन लोखंडे ,तालुका अध्यक्ष नरेंद्र कांकले, अमित लोखंडे, जबार सोनकी, प्रमोद विश्वकर्मा ,नासिर अन्सारी उपस्थित होते .\nPrevious: उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nNext: प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0", "date_download": "2018-04-20T16:23:20Z", "digest": "sha1:JE4WG2AVFUVMR2DCUCXQN6SHWEFMK2RE", "length": 6471, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ - विकिबुक्स", "raw_content": "जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृत हरिपाठ ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sipnaengg.ac.in/readers-club/", "date_download": "2018-04-20T16:38:13Z", "digest": "sha1:3HEYY7G5LSI2LUFNDRRHKYYI2JBAWCE3", "length": 5986, "nlines": 134, "source_domain": "www.sipnaengg.ac.in", "title": "Readers Club – Sipna Engineering College Amaravati", "raw_content": "\nसिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.\nअवांतर ज्ञान मिळविण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आपला क्लब असेल.\nअसं एक ठिकाण जिथे तुम्ही स्वतः चे विचार , तुमचे स्वतः चे लिखाण इतरांसमोर मोकळेपणाने मांडू शकता.\nविद्यार्थ्यांचं मनोबल वाढविणे. (विविध ठिकाणी जनसमुदायापुढे त्यांना बोलण्याची संधी निर्माण करून देणे)\nप्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वतंत्र देऊन, नवनवीन मित्र बनवून विविध गोष्टींवर वैचारिक चर्चा करणे.\nकु. दिपाली दामोदर श्री. शुभम बाकल\nदि. 14-03-2018 रोजी क्लब तर्फे “Book Review” हा उपक्रम घेण्यात आला. यात क्लब च्या काही सदस्यांनी, त्यांनी वाचलेल्या आणि त्यांना आवडलेल्या काही पुस्तकां विषयी पुरावलोकन (review) केले आणि खुप सुंदर अश्या पुस्तकां विषयी तेवढ्याच सुंदरतेने त्यांनी शब्दात मांडणी केली. या उपक्रमा मध्ये भाग घेतलेल्या सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत:-\n5. वैष्णवी लाहोटी – सामाजिक समरस्ता\n6. दिपाली दामोदर – मन मै है विश्वास\n7. अनुश्री कुरळकर – मी वनवासी\n10. राधिका धमाले – तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात\nअशा प्रकारे क्लब च्या सदस्यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकां विषयी खुप छान पद्धतीने माहिती सांगितली. त्याच बरोबर काही शिक्षकांनी सुद्धा यात छान सहभाग दाखवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/sex-racket-nashik/", "date_download": "2018-04-20T16:14:56Z", "digest": "sha1:OMRXI4X73SRGTSFR3GAYPUWUIIZYZJZN", "length": 4079, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "sex racket nashik – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nनाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप\nमुंबई पुणे आणि नंतर नाशिक ही झपाट्याने वाढणारी महाराष्ट्रातील शहरे असून गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये देखील नाशिकचे नाव पुढे येऊ लागले आहे . खून, चोऱ्या हे देखील आता जुने झाले मात्र नाशिकमध्ये चक्क मुलींची आणि महिलांची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे . एका बांगलादेशी तरुणीने यासंदर्भात आरोप केले आहेत . इतकेच नव्हे तर पैसे घेऊन मुलींना… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/passport-will-not-be-valid-as-address-proof/articleshow/62478182.cms", "date_download": "2018-04-20T16:31:19Z", "digest": "sha1:A7TMXFTTFLMNECOI4DUIFYK5BXGOL5EQ", "length": 26024, "nlines": 242, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "passport will not be valid as address proof | पत्त्याच्या पुराव्यासाठी ‘पासपोर्ट’ गैरलागू - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nपत्त्याच्या पुराव्यासाठी ‘पासपोर्ट’ गैरलागू\nपासपोर्टचा वापर प्रामुख्याने परदेशप्रवासासाठी होत असला तरी, बऱ्याच पासपोर्टधारकांकडून त्याचा वापर पत्त्याचा पुरावा म्हणून किंवा ओळखीसाठी केला जातो. मात्र, आता पासपोर्टचा वापर परदेशप्रवासासाठीच करता येणार असल्याचा निर्णय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी पासपोर्टवरील शेवटचे पान काढून टाकण्यात येण्याची शक्यता आहे.\nपासपोर्टवरील शेवटच्या पानावर पासपोर्टधारकाचा संपूर्ण पत्ता प्रसिद्ध करण्यात आलेला असतो. बहुतांश पासपोर्टधारकांकडून या महत्वाच्या कागदपत्राचा उपयोग अनेक ठिकाणी पत्त्याच्या पुराव्यासाठी केला जातो. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. त्यामध्ये पासपोर्टच्या शेवटी असणारे पत्त्याचे पान काढून टाकण्याचा विचार करण्यात येत आहे.\nपासपोर्टच्या पहिल्या पानावर संबंधिताचा फोटो आणि अन्य जरूरी सूचनांचा समावेश तसाच राहणार आहे. मात्र, शेवटचे पान भविष्यात काढून टाकण्यात येण्याची शक्यता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या व्हिसा विभागाचे सचिव सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पासपोर्टची संवेदनशील माहिती गुप्त ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. नव्या सीरिजचे पासपोर्ट जारी होईपर्यंत नवे बदल होण्याची शक्यता आहे.\nपासपोर्टवरील पत्त्याची माहिती काढून टाकल्यामुळे संबंधिताची ओळख पटवताना कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कारण, त्यांच्याकडे संबंधिताची माहिती बॅक ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहे. २०१२पासून पासपोर्टवर बारकोड देण्यात येतो. त्यामुळे त्याचे स्कॅनिंग करण्यात येते. बारकोडचे स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सर्व माहिती उपलब्ध होते.\nशेवटचे पान वगळण्याबरोबरच पासपोर्टचा रंग बदलण्याचाही विचार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे करण्यात येण्यात आहे. सध्या पासपोर्ट पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, लाल रंगाचा पासपोर्ट राजकीय व्यक्तींसाठी तर, निळ्या रंगाचा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी वापरला जातो. पासपोर्टचे रंग बदलण्यात येण्याचा विचार असला तरी, जुने पासपोर्ट वैधच राहणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'मागणी वाढल्यामुळं ATMमध्ये खडखडाट'\nVodafone-Idia: विलीनीकरणाचा कर्मचाऱ्यांना फटका\nIndia GDP: विकासदर ७.३ टक्क्यांवर जाणार\nCash Crunch: दोन हजाराच्या नोटा होताहेत गायब\nअर्थमंत्र: बोनस मिळाला तर 'हे' करा\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nम्युच्युअल फंड सल्लागाराची निवड कशी कराल\nसरकारी बँकांचे खासगीकरण नकोच\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्या\n1पत्त्याच्या पुराव्यासाठी ‘पासपोर्ट’ गैरलागू...\n2‘ईटी फॅमिली बिझनेस’ पुरस्कार लवकरच...\n5वॉरन बफे यांची जागा 'हा' भारतीय घेणार\n6जीएसटी, 'रेरा'मुळं मुंबई-पुण्यात घरे स्वस्त...\n7मोबाइल बँकिंगला मालवेअरची बाधा...\n9मुद्रा योजना राज्यात प्रभावी...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T16:13:39Z", "digest": "sha1:3Y26KDRVFL5F32X2BOPKQ2LYEKD4SLTQ", "length": 5751, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गाथा २७०१ ते ३००० - विकिबुक्स", "raw_content": "गाथा २७०१ ते ३०००\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गाथा २७०१ ते ३००० हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गाथा २७०१ ते ३००० येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गाथा २७०१ ते ३००० आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गाथा २७०१ ते ३००० नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गाथा २७०१ ते ३००० लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गाथा २७०१ ते ३००० ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गाथा २७०१ ते ३००० ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2014/06/blog-post_25.html", "date_download": "2018-04-20T16:29:33Z", "digest": "sha1:SU6M7ZABF6M3V5BJAJSFNFYY2NNPEQUH", "length": 10254, "nlines": 239, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : प्रश्नसंच १११ - [भूगोल-सहाय्यक पूर्व परीक्षा-२०१४]", "raw_content": "\nप्रश्नसंच १११ - [भूगोल-सहाय्यक पूर्व परीक्षा-२०१४]\n[प्र.१] भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते\n१] ९७' २५' E\n३] ८२' ५०' E\n४] ९०' २५' E\n१] ९७' २५' E\n[प्र.२] 'लु' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने _ _ _ _ _ _ _ \nअ] गोंदिया i] २६ ऑगस्ट १९८२\nब] वाशीम ii] १६ ऑगस्ट १९८२\nक] गडचिरोली iii] १ मे १९९९\nड] लातूर iv] १ जुलै १९९८\n[प्र.४] गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे\n[प्र.५] खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते\nअ] पंजाब हिमालय i] काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय\nब] आसाम हिमालय ii] सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय\nक] नेपाळ हिमालय iii] सतलज आणि काळी नदीमधील हिमालय\nड] कुमाऊ हिमालय iv] दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालय\n[प्र.७] खालीलपैकी कोणते घटक वयरचनेवर परिणाम करतात\n१] ब, क आणि ड\n४] वरीलपैकी कोणतेही नाही\n४] वरीलपैकी कोणतेही नाही\n[प्र.८] तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे _ _ _ _ _ _ _ _\n[प्र.९] डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MIDC आणि _ _ _ _ _ मध्ये आहे\n[प्र.१०] भारतातील खालील तेलशुद्धीकरण केंद्रांची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा.\n१] अ ब क ड\n२] अ क ब ड\n३] क अ ब ड\n४] ब ड क अ\n२] अ क ब ड\n[प्र.११] खालीलपैकी कोणता मासा गोड्यापाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे\n[प्र.१२] मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात _ _ _ _ _ पेक्षा जास्त आहे\n[प्र.१३] 'एल निनो' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणा-या देशाचा किनारा _ _ _ _ _ आहे\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nप्रश्नसंच ११४ - [अर्थशास्त्र-सहाय्यक पूर्वपरीक्षा ...\nप्रश्नसंच ११३ - [विज्ञान-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४...\nप्रश्नसंच ११२ - [इतिहास-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]...\nप्रश्नसंच १११ - [भूगोल-सहाय्यक पूर्व परीक्षा-२०१४]...\nप्रश्नसंच ११० - [चालू घडामोडी-सहाय्यक पूर्व परीक्ष...\nप्रश्नसंच १०९ - [इतिहास]\nप्रश्नसंच १०८ - [विज्ञान]\nप्रश्नसंच १०७ - [अर्थशास्त्र]\nप्रश्नसंच १०६ - [पंचायत राज]\nप्रश्नसंच १०५ - [राज्यशास्त्र]\nप्रश्नसंच १०४ - [भूगोल]\nप्रश्नसंच १०३ - [इतिहास]\nप्रश्नसंच १०२ - [सामान्यज्ञान]\nप्रश्नसंच १०१ - [भूगोल-PSI Pre 2014]\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/congress-mlas-to-support-nitish-kumar-266096.html", "date_download": "2018-04-20T16:29:08Z", "digest": "sha1:ULWQQO6UXTPSE4EPNX23HPSHKRGZA7P4", "length": 10258, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितीश कुमारांना काँग्रेस आमदारांचा पाठिंबा?", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nनितीश कुमारांना काँग्रेस आमदारांचा पाठिंबा\nभाजप आणि जेडीयूच्या आमदारांची एकूण संख्या 124च आहे त्यामुळे बाकीचे 8 आमदार कुठल्या पक्षाचे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nपाटना,28 जुलै: एकीकडे जेडीयूचे काही नेते नितीश कुमारांच्या निर्णयाचा विरोध करत असतानाच दुसरीकडे नितीश कुमारांना बिहारमधील काँग्रेसचे काही आमदार नितीश कुमारांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्यची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.\nनितीश कुमारांची फ्लोअर टेस्ट आज 11 वाजता बिहार विधानसभेत होणार आहे. नितीश कुमारांना 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना बुधवारी दिलं होतं. भाजप आणि जेडीयूच्या आमदारांची एकूण संख्या 124च आहे त्यामुळे बाकीचे 8 आमदार कुठल्या पक्षाचे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच जेडीयूचे आमदारही बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/category/politics/", "date_download": "2018-04-20T16:00:15Z", "digest": "sha1:NDQH7OMKTRHXPZKGL5KQXMQAD6VL3ZN3", "length": 8119, "nlines": 75, "source_domain": "rightangles.in", "title": "राजकारण | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\nआठ वर्षांच्या गुज्जर समाजातल्या आसीफावर बहुसंख्यांक समाजातील लोकांनी रसना गावच्या देवस्थानामध्ये केलेला निर्घृण सामूहिक बलात्कार आणि खून ही घटना केवळ या गुन्ह्यापुरती मर्यादीत नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात त्यांच्यातील…\nBy तीर्थराज सामंत April 10, 2018\n१९ मार्चच्या सकाळी कर्नाटक भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार श्री येडियुरप्पा उठले, आणि सकाळी सकाळीच त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा लिंगायत समाज कर्नाटकात लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के असल्याचा एक अंदाज…\nBy श्रुति गणपत्ये April 9, 2018\nमागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये झालेला भाजपच्या स्थापना दिवसाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधी पक्षांना उद्देशून वापरलेल्या प्राण्यांच्या विशेषणांवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. साप, मुंगूस, मांजर, कुत्रा,…\nमोदीजी, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका \nBy रावसाहेब गांगुर्डे April 5, 2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही.…\nहे काय खाक लढणार \nBy तीर्थराज सामंत April 3, 2018\nभारताचे माजी अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सध्या मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्र मंच नावाने त्यांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात एक आघाडी उभी केली आहे.…\nउत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकांत समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांच्या युती-आघाडीने फुलपूर (केशव मौर्य, उ.प्र. चे उपमुख्यमंत्री) आणि गोरखपूर (योगी आदित्यनाथ-उ.प्र.चे मुख्यमंत्री आणि माध्यमांचे ‘भावी…\nपश्चिम बंगालमध्ये राम के नाम\nपश्चिम बंगाल ही आक्रमक हिंदुत्ववाद्यांसाठी कधीच सुपिक भूमी नव्हती. त्यामुळेच फार क्वचितच भारताच्या या पूर्वेकडील राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या राम नवमी या सणाच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक दंगलींचे आश्चर्य…\nचीन मधील घटनाबदल कि जागतिक राजकारणातील आमूलाग्र बदल\nचिनी साम्यवादी पक्षाच्या घटनेनुसार त्या पक्षाच्या सरचिटणीसपदी वा अध्यक्षपदी असलेली व्यक्ती देशाची सर्वोच्च सत्ताधीश, म्हणजेअध्यक्ष बनते. ही व्यक्ती पाच वर्षाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त दोन वेळेस अध्यक्षपदावर राहू शकते.…\nसंयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाने काँग्रेसने सलग दहावर्षे कारभार केला. तेव्हा या सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवाराने चोख रणनीती आखली होती. काँग्रेसच्या विरोधात भाजपने संसदेत संघर्ष…\nत्रिपुरा निवडणुक निकाल – गाफील न राहण्याचा इशारा\nBy काॅ.भीमराव बनसोड March 16, 2018\nनुकत्याच इषान्य भारतातील नागालँड, मेघालय व त्रिपुरा या तीन छोटेखानी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व राज्यातून भाजपचा विजय -हजयाल्याचे स्पश्ट -हजयाले आहे. या तीनही राज्यापैकी त्रिपुरातील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/06/CurrentAffairs20June2016.html", "date_download": "2018-04-20T16:32:38Z", "digest": "sha1:CQHAB4SR3YZMSD5LO72PYYPEBGGO4RFC", "length": 17051, "nlines": 178, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २० जून", "raw_content": "\nचालू घडामोडी : २० जून\nहवाई आणि संरक्षण क्षेत्रात १०० टक्के एफडीआय\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने औषधनिर्मिती, हवाई आणि संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला (एफडीआय) मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.\nयाशिवाय विमा, ई- कॉमर्स, पेन्शन, ब्रॉडकास्टिंग आणि सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रातदेखील १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे.\nव्यवसाय सुलभता वाढून देशात अधिक परकीय गुंतवणूक यावी व त्यातून गुंतवणूक, उत्पन्न व रोजगार यात वाढ व्हावी या उद्देशाने ‘एफडीआय’ धोरण आता अधिक उदार व सुगम करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nथेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातली नोव्हेंबरनंतरची ही दुसरी मोठी सुधारणा आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये सरकारने १२ क्षेत्रांमधील एफडीआयच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती.\nसंरक्षण क्षेत्रात ४९ टक्क्यांच्या वर थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे देशाला आधुनिक तंत्रज्ञान मिळू शकेल.\nएफडीआयच्या या गुंतवणुकीसाठी शस्त्र अधिनियम १९५९च्या अंतर्गत छोटे हत्यार आणि अन्य युद्ध सामग्री बनविणाऱ्या उद्योगांनाही हे नियम लागू करण्यात आले आहेत.\nयाआधी संरक्षण क्षेत्रात केवळ अद्ययावत तंत्रज्ञान पुरविण्याच्या अटीवर ४९ टक्के गुंतवणूक र्निबधमुक्त होती. आता ही अट काढून टाकण्यात आली आहे.\nऔषधनिर्मिती क्षेत्रात स्वयंचलित मार्गानेत ७४ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. ७४ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.\nनव्या प्रकल्पांमध्ये मात्र सरकारी मंजुरीशिवाय १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे.\nनागरी विमान वाहतूक क्षेत्रात स्वयंचलित ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूकीस मंजुरी होती. आता केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने ४९ टक्क्यांपुढे १०० टक्के परकीय गुंतवणूक करता येणार आहे.\nविमानतळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ७४ टक्क्यांवरील विदेशी गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती.\nखासगी सुरक्षा सेवेत सरकारच्या मंजुरीनंतर आता ७४ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी असेल. सध्या या क्षेत्रात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे.\nखाद्यपदार्थ व्यापारात सरकारी परवानगीनंतर १०० टक्के गुंतवणूक करता येणार आहे.\nखाद्यपदार्थाची निर्मिती वा प्रक्रिया भारतात झाली असेल तर खाद्यपदार्थाच्या ई-व्यापार क्षेत्रातही सरकारी परवानगीनंतर १०० टक्के एफडीआय मंजूर करण्यात आला आहे.\nमलेशियामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा\n‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीत कौलालंपूर (मलेशिया) येथील ‘भारतीय सांस्कृतिक केंद्र’ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.\nयावेळी उपस्थित असलेल्या ‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. या तीन महिला ‘आझाद हिंद सेने’च्या ‘झाशी राणी रेजिमेन्ट’चा भाग होत्या.\n‘झाशी राणी रेजिमेन्ट’च्या ९० वर्षीय सदस्य मीनाक्षी पेरुमा यांनी कार्यक्रमादरम्यान बंगाली आणि तामीळ भाषेत ‘आझाद हिंद सेने’चे गीतदेखील गायले.\nगेल्या वर्षी मलेशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राचे ‘नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.\nऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती\nजगातील सर्वांत वयस्क स्काई डाइव्हरचा गौरव मिळविल्याच्या तीन वर्षांनंतर १०६ वर्षीय ऐडा जेमान्क्यू ऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती बनली आहे.\nजेमान्क्यूने अ‍ॅलेक्झांडर काप्तारेंकोचा विक्रम मोडला होता. अ‍ॅलेक्झांडर याने २०१४च्या सोची हिवाळी ऑलिम्पिक मशाल रिलेत सहभाग नोंदवला होता. तेव्हा त्यांचे वय १०१ होते.\nजेमान्क्यूने अमेजेनेयाचे शहर मकापात ऑलिम्पिक मशाल हाती घेतली.\nऑलिम्पिक मशालीचा हा प्रवास ९५ दिवसांचा आहे. ही मशाल ब्राझीलच्या ३२५ शहरांतून जाणार आहे.\nमशालीचा प्रवास ५ ऑगस्ट रोजी रियोच्या माराकाना स्टेडियममध्ये संपणार आहे. यादरम्यान जवळपास १२ हजार धावपटू सहभागी होतील.\nमोहमद मोर्सी यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा\nदेशाची गुपिते कतारला पुरवल्याच्या गुन्ह्यासाठी इजिप्तचे पदच्युत इस्लामवादी अध्यक्ष मोहमद मोर्सी यांना स्थानिक न्यायालयाने ४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.\nयाच प्रकरणात ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या सहा सदस्यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयाने कायम केली आणि इतर दोघांना २५ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nमोर्सी यांना याच प्रकरणी १५ वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांच्या कैदेची मुदत ४० वर्षे झाली आहे. हा निकाल अंतिम नसून त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकते.\nलोकशाही मार्गाने निवडून आलेल्या देशाच्या पहिल्या अध्यक्षांना २०१३ साली हटवण्यात आल्यानंतर हिंसाचार करण्याच्या आरोपाखाली मुस्लीम ब्रदरहूडचा सर्वोच्च मार्गदर्शक मोहमद बाडी आणि या प्रतिबंधित संघटनेच्या इतर ३५ सदस्यांना गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० जून\nचालू घडामोडी : २८ व २९ जून\nचालू घडामोडी : २७ जून\nचालू घडामोडी : २६ जून\nचालू घडामोडी : २५ जून\nचालू घडामोडी : २४ जून\nचालू घडामोडी : २३ जून\nचालू घडामोडी : २२ जून\nचालू घडामोडी : २१ जून\nचालू घडामोडी : २० जून\nन्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)\nचालू घडामोडी : १९ जून\nचालू घडामोडी : १८ जून\nचालू घडामोडी : १७ जून\nचालू घडामोडी : १६ जून\nचालू घडामोडी : १५ जून\nचालू घडामोडी : १४ जून\nचालू घडामोडी : १३ जून\nचालू घडामोडी : १२ जून\nचालू घडामोडी : ११ जून\nचालू घडामोडी : १० जून\nचालू घडामोडी : ९ जून\nचालू घडामोडी : ८ जून\nचालू घडामोडी : ७ जून\nचालू घडामोडी : ६ जून\nचालू घडामोडी : ५ जून\nचालू घडामोडी : ४ जून\nमासिक : मे २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : ३ जून\nचालू घडामोडी : २ जून\nचालू घडामोडी : १ जून\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/06/current-affairs-28-jun.html", "date_download": "2018-04-20T16:40:30Z", "digest": "sha1:EIDIXTPZLJOEGM4L74YFIIAMXLZZWH5O", "length": 21734, "nlines": 188, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २८ जून २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २८ जून २०१५\nएमएसएमई क्षेत्रासाठी स्वतंत्र जॉब पोर्टल\nसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने १६ जून रोजी www.eex.dcmsme.gov.in हे जॉब पोर्टल सुरू केले.\nयाचा थेट फायदा देशात सध्या कार्यरत असणाऱ्या, एमएसएमई क्षेत्रातील सव्वा तीन कोटी युनटना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनाही याचा लाभ उठवता येणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.\nडिजिटल इंडिया, स्किल इंडिया व मेक इन इंडिया या तीन योजनांना पाठिंबा देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे हे एक प्रकारे इम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करण्यात आले आहे.\nसध्या हे पोर्टल फक्त कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रासाठी आहे. हळूहळू अन्य एमएसएमई क्षेत्रांचा समावेश यात करण्यात येईल. आगामी काळात या पोर्टलची रचनाही अधिक सुटसुटीत केली जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना या पोर्टलवर आपली माहिती विनाशुल्क नोंदवता येणार आहे.\nलेहमधील ऐतिहासिक हेमिस महोत्सवाला प्रारंभ\nसुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या (लेह) लडाखमधील ऐतिहासिक बौद्ध मठामध्ये हेमिस महोत्सवाला २८ जूनपासून उत्साहात प्रारंभ झाला. देश-परदेशातील शेकडो पर्यटकांनी या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे.\nबौद्ध भिक्खू गुरू पद्मसंभव ऊर्फ गुरू रिनपोचे यांच्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भूतान आणि तिबेटमधील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे श्रेय पद्मसंभव यांनाच दिले जाते. .\nचंद्राच्या गतीवर अवलंबून असणारे तिबेटियन दिनदर्शिकेतील पाचव्या महिन्यात दहा दिवस या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या काळात येथील बौद्ध मठामध्ये धार्मिक पूजाविधी केले जातात.\nया महोत्सवातील नृत्याविष्कारदेखील तंत्र विद्येशी संबंधित आहेत. जागतिक शांती आणि समृद्धतेसाठी हे नृत्याविष्कार महत्त्वपूर्ण मानले जातात.\nश्री श्री रवि शंकर कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित\nअध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर यांना कोलंबियाच्या ‘ओरडेन डी ला डेमोक्रेसिया सिमॉन बोलीवर पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nत्यांना हा पुरस्कार संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये पुनर्वसन कार्य करण्याबद्दल आणि देण्यात आले शांततापूर्ण उद्देश्यांसाठी कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.\nश्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगची १९८१मध्ये स्थापना केली. या संस्थेचा उद्देश लोकांना दैनंदिन अडचणी, सामाजिक समस्या तसेच हिंसेपासून मुक्ती देणे हा आहे.\n१९९७मध्ये त्यांनी मानवी गुण वाढविण्याच्या आणि जीवनाशी संबंधित समस्या दूर करण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वैल्यूज़ (IAHV) या संस्थेची स्थापना केली.\nकोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात १९८०मध्ये झाली. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा करणाऱ्या लोकांना दिला जातो.\nआता तुम्हीच मोजा तुमचा इन्कम टॅक्स\nकरदात्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र अर्थात रिटर्न स्वत:च भरावे यासाठी आयकर विभाग ई-फायलिंगला प्रोत्साहन देत आहे.\nनोकरदारांना त्यांचा इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे, हे त्यांच्या कंपनीकडून कळत असते. परंतु याशिवाय अन्य करदात्यांनाही नेमका किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, हे कळावे यासाठी आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर कॅल्क्युलेटर तयार केला आहे.\nहा ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड प्रोग्रॅम आहे. याचा वापर करून करदात्याला इन्कम टॅक्सचा भरणा किती करावा लागणार आहे हे कळल्याने ३१ ऑगस्ट या कर भरायच्या अंतिम तारखेच्या आत टॅक्स भरणे त्याला शक्य होईल.\nगुंतागुंतीच्या प्रक्रिया याच्या साह्याने करता येणार नाहीत. यासाठी प्रत्यक्ष रिटर्न भरताना त्या अर्जामध्ये इन्कम टॅक्सची मोजणी करावी लागणार आहे.\nआयकर विभागाची वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर हा आयकर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे.\nन्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नी शर्मिला थापर यांनी घरात कामाला असलेल्या नोकराचा छळ केल्यामुळं रवी थापर यांना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.\nवेलिंग्टनमधील उच्चायुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी आचाऱ्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी आपल्याला गुलामाची वागणूक देऊन मारहाण केल्याची तक्रार न्यूझीलंड पोलिसांसमोर केली होती. या प्रकरणाची पोलिसांमध्ये अधिकृत तक्रार करण्यात आली नाही.\nयाबाबतची माहिती मिळताच भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर थापर यांना परत बोलावण्यात आलं आहे.\nरशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन\nरशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांचे वयाच्या ८५व्या वर्षी मॉस्को येथे निधन झाले.\nअमेरिकेकडे जाणारे त्यांचे विमान अ‍ॅटलांटिकवर असताना सर्बियात नाटोच्या बॉम्बहल्ल्यांमुळे वळवण्यात आल्याची घटना १९९९ मध्ये घडली होती.\nते मुरब्बी नेते, वैज्ञानिक होते. त्यांनी बोरिस येल्तसिन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात म्हणजे १९९८-९९ दरम्यान पंतप्रधानपद भूषवले होते. १७ ऑगस्ट १९९८ मध्ये रशिया दिवाळखोरीत असताना ते पंतप्रधान झाले.\nअमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) यानाचा २८ जून रोजी उड्डाणानंतर काही वेळातच स्फोट झाला.\nस्पेसएक्स फाल्कन ९ या अवकाशयानाने फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथील तळावरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. मात्र, काही वेळातच त्याचा स्फोट झाला.\nअवकाश स्थानकावर साहित्य घेऊन जाणारे हे मालवाहू यान असल्याने जीवितहानी झाली नाही. उड्डाणातील त्रुटींमुळेच यानाचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता नासाने व्यक्त केली आहे.\nफाल्कन-९ हे रॉकेट २०८ फूट लांबीचे असून या रॉकेटची १९ वी झेप होती. स्पेस-एक्स ही कंपनी ईलॉन मस्क यांची असून अंतराळ क्षेत्रात उतरल्यानंतर या कंपनीच्या वाट्याला आलेली ही पहिलीच दुर्घटना आहे.\nपाकिस्तानला कर्जाचा ५० कोटी डॉलरचा हप्ता मंजूर\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ५०६.४ दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा हप्ता मंजूर केला आहे. देशाच्या आर्थिक सुधारणा व वाढीसाठी संपुट योजनेचा भाग म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे.\nपाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असून त्यांना या कर्जामुळे लाभ होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.\nपाकिस्तानच्या जानेवारी ते मार्च २०१५ या काळातील आर्थिक स्थितीचा सातव्यांदा आढावा घेतल्यानंतर हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे इस्लामाबादला पुढील आठवडय़ात कर्जाचा आठवा हप्ता दिला जाणार आहे.\nसप्टेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन वर्षांसाठी विस्तृत निधी सुविधा म्हणून ६.६ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर केला होता. नव्या कर्ज हप्त्याला मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेली रक्कम २०१३ पासून ४.१ अब्ज डॉलर्स झाली आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३० जून २०१५\nचालू घडामोडी - २९ जून २०१५\nचालू घडामोडी - २८ जून २०१५\nप्रश्नसंच १५७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ व २७ जून २०१५\nस्मार्ट सिटी, ‘अमृत’ आणि पंतप्रधान आवास योजना\nचालू घडामोडी - २५ जून २०१५\nचालू घडामोडी - २४ जून २०१५\nचालू घडामोडी - २३ जून २०१५\nचालू घडामोडी - २२ जून २०१५\nचालू घडामोडी - २१ जून २०१५\nचालू घडामोडी - २० जून २०१५\nचालू घडामोडी - १८ व १९ जून २०१५\nप्रश्नसंच १५६ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १७ जून २०१५\nचालू घडामोडी - १६ जून २०१५\nप्रश्नसंच १५५ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १५ जून २०१५\nराज्यसेवा मुख्यपरीक्षा महत्वाची घोषणा\nचालू घडामोडी - १४ जून २०१५\nचालू घडामोडी - १३ जून २०१५\nचालू घडामोडी - १२ जून २०१५\nप्रश्नसंच १५४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ जून २०१५\nचालू घडामोडी - १० जून २०१५\nचालू घडामोडी - ९ जून २०१५\nचालू घडामोडी - ८ जून २०१५\nनरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा\nचालू घडामोडी - ७ जून २०१५\nचालू घडामोडी - ६ जून २०१५\nचालू घडामोडी - ५ जून २०१५\nचालू घडामोडी - ४ जून २०१५\nचालू घडामोडी - ३ जून २०१५\nप्रश्नसंच १५३ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ जून २०१५\nचालू घडामोडी - १ जून २०१५\nचालू घडामोडी - ३१ मे २०१५\nचालू घडामोडी - ३० मे २०१५\nचालू घडामोडी - २९ मे २०१५\nचालू घडामोडी - २८ मे २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-news-skp-party-holi-commodity-86892", "date_download": "2018-04-20T16:43:59Z", "digest": "sha1:7NA2SC2KC4IEVZPFMFXJHMYEEOPJZS75", "length": 14391, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola news skp party holi of the commodity अधिवेशनाच्या मुहूर्तावर शेतमालाची होळी... | eSakal", "raw_content": "\nअधिवेशनाच्या मुहूर्तावर शेतमालाची होळी...\nसोमवार, 11 डिसेंबर 2017\nशेतकरी मोठ्या मेहनतीने उन्हा-तान्हात राबून शेती पिकवितो. त्याने पिकविलेल्या मालास मात्र बाजारात कवडीमोल भाव मिळतो. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत असल्यामुळे आम्ही शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शेतमालाची होळी केली.\n- प्रदिप देशमुख, राज्य चिटणीस मंडळ सदस्य, शेकाप\nअकोला: शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली.\nनागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात आगर, उगवा परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता हे आंदोलन करण्यात आल्यामुळे आकोट फैल पोलिसांनी आंदोलकांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले.\nशेतकऱ्यांनी मेहनत करून पिकविलेल्या मालास हमी भाव देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले असले, तरी त्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे त्याचा फायदाशेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. शासकीय खरेदी केंद्रे ही नुसती नावाचीच असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल नाईलाजाने व्यापाऱयांना मिळेल त्या भावात विकावा लागतो. शासनाच्या या धोरणाचा फायदा केवळ मुठभर व्यापाऱयांना होत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे धोरण तारक ठरण्याऐवजी मारकच ठरत आहे. शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाचे मात्र याकडे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप करीत शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदिप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस भाई दिनेश काठोके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात आगर-उगवा परिसरातील शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी बैलगाडीतून सोयाबीन, ज्वारी, ओवा, तिळ, मूग, कापूस, तूर, हरभरा आदी शेतमाल भर रस्त्यावर टाकून तो पेटवून दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. रस्त्यात शेतमालाची होळी केल्याने वाहतुक अवरुद्ध होणार नाही, याची काळजीही आंदोलकांनी यावेळी घेतली.\nअकोला-आकोट मार्गावर आंदोलन सुरु असताना आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना त्यांचे आंदोलन थांबविण्याची विनंती केली. यावेळी पोलिसांनी भाई प्रदिप देशमुख, भाई दिनेश काठोके, श्रीकृष्ण ढगे, संतोष देशमुख, प्रविण कराळे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.\nमच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह\nवणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत....\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/ajit-pawar-on-tur-dal-issue-259181.html", "date_download": "2018-04-20T16:35:13Z", "digest": "sha1:RFSHOEOTRGSCMZX4J4JCGJEP25MJ5VX5", "length": 8619, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'22 तारखेची मर्यादा मागे घ्या'", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n'22 तारखेची मर्यादा मागे घ्या'\n'22 तारखेची मर्यादा मागे घ्या'\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\n'भाजपशी युती करणार नाही'\n'आमचा काही राजकीय उद्देश नाही'\n'लोकशाही व्यवस्थेत आता न्यायासाठी काय करायचं\n'काँग्रेस,कम्युनिस्टांचं पितळ उघडं पडलं'\n'महिला सुरक्षित नाहीत, राज्यातलं गृहखातं काय करतंय\n'पडद्यामागच्या लोकांचं काम समोर येईल'\n'सिनेमातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस केलं'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/auto/grazia-scooter-urban-area/amp/", "date_download": "2018-04-20T16:30:05Z", "digest": "sha1:ZK4G2WFVTDYPIYOEV76ZGNSLJFZ7JMYE", "length": 5302, "nlines": 51, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Grazia scooter for urban area | होंडाची नवी स्कूटर 'ग्राझिआ', शहरी ग्राहकांसाठी तयार केलं खास मॉडेल | Lokmat.com", "raw_content": "\nहोंडाची नवी स्कूटर 'ग्राझिआ', शहरी ग्राहकांसाठी तयार केलं खास मॉडेल\nहोंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.\nअॅक्टिव्हाच्या निर्मात्या होंडा मोटारसायकल स्कूटर इंडिया या कंपनीकडून आता ग्राझिआ ही नवी स्कूटर भारतीय ग्राहकांसाठी सादर होणार आहे.लवकरच तिची नोंदणीही सुरू होणार असून विशेष करून शहरी भागासाठी आरेखित करण्यात आलेले हे देखणे मॉडेल, लोकांना किती आवडेल ते आता पाहायचे आहे.\n१२५ सीसी क्षमतेच्या ताकदीचे इंजिन अॅक्टिव्हाचे असून स्कूटरसाठी असणाऱ्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआला सादर केले जात आहे. दोन हजार रुपये इतक्या रक्कमेवर ग्राझिआची नोंदणी सुरू केली जाणार आहे.\nसध्याच्या अॅक्टिव्हाच्या विविध प्रकारांमध्ये ही आकर्षक ठरू शकेल, अशी अपेक्षा आहे. साहजिकच किंमतीतही फरक असून सुमारे ६५ हजार रुपये इतकी किंमत जाण्याची शक्यता आहे.\n- इंजिन १२४.९ सीसी\n- फॅनकूल्ड एसआय इंजिन\n- ८.५२ बीएचपी कमाल ताकद व ५००० आरपीएम\n- टॉर्क १०.५४ एनएम\n- वेगळी आकर्षक रचना\n- बसण्यासाठी व स्टोरेजसाठी जास्त जागा\n- पुढील चाकासाठी डिस्क ब्रेक\n- मोबाइलसाठी यूएसबी चार्जिंग पर्याय\nप्रमाणपत्रासाठी आता आॅनलाइन अपॉइंटमेंट\nजिल्हा न्यायालय परिसरातून वर्षभरात २० दुचाकी चोरीला\nनाशिक शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच\nवसमत रोडवर टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू\nविनापासिंग वाहन चालकांकडून पाच वर्षांत ३६ लाखांचा दंड वसुल\nहोंडाची ही कार ठरली सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी कार\nहोंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nTata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nसुझकीची 'ही' मोटरसायकल दोन लाखाने झाली स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2018-04-20T16:41:16Z", "digest": "sha1:T5OATFZL2ARLNWWMEYQ2TRMMZB4QKQSU", "length": 3457, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उस्मानिया विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउस्मानिया विद्यापीठ हे हैदराबादमधील विद्यापीठ आहे.\nहैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१७ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/wife-refused-for-sex-man-killed-wife-and-3-month-old-daughter/", "date_download": "2018-04-20T16:35:55Z", "digest": "sha1:QL2BQJ356MPNJL34RQ3UTX6EEJIPNL3K", "length": 16164, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "शारीरिक संबंधास नकार दिल्याने बायको आणि ३ महिन्यांच्या मुलीची क्रूरपणे हत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nशारीरिक संबंधास नकार दिल्याने बायको आणि ३ महिन्यांच्या मुलीची क्रूरपणे हत्या\nशारीरिक संबंधाला नकार दिल्याने गणेश खरात ( वय-३० वर्ष) याने बायकोला कुऱ्हाडीचे वार करून ठार मारले. बायकोच्या शेजारीच गणेशची ३ महिन्यांची मुलगी झोपली होती. आपल्याला अटक झाल्यानंतर या मुलीचं काय होणार या विचाराने वैतागलेल्या गणेशने बायकोपाठोपाठ त्या मुलीलाही कुऱ्हाडीचे वार करत मारून टाकले. दोन हत्या केल्यानंतर गणेश थंड डोक्याने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने पोलिसांना हत्येची माहिती दिली. गणेश आणि त्याची बायको यांना एकूण ३ अपत्ये होती, यातील ३ आणि ५ वर्षांची मुले सासूसोबत झोपली असल्याने बचावली आहेत.\nकोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये ही घटना घडली असून गणेश याने त्याच्या सासूवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये रुक्मिणी गवई या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीतील साईनाथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. गणेशने बायको आणि मुलगी झोपलेली असताना त्यांना ठार मारले असा पोलिसांना संशय आहे. या गुन्हाबद्दल कळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि तपासाला सुरुवात केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयवतमाळ जिल्ह्यातही होता समुद्र, संशोधकांचा दावा\nपुढील…तोपर्यंत परिचारक यांना विधानपरिषदेत पायही ठेवता येणार नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/lifestyle/health/", "date_download": "2018-04-20T16:17:19Z", "digest": "sha1:EELL7DJH2H4VLWGPUJEKA2RSMXVBUR7L", "length": 9739, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Health Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे… 0\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… 0\nनियमित शिळे अन्न खाताय, थांबा होऊ शकतात हे गंभीर आजार… 1\nटोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग… 0\n९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल… 2\nसाखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते, जाणून घ्या कसे… 0\n मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय… 0\nफक्त एक चिमूट सेवन डायबिटीज, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासुन वाचवेल… 0\nफाटलेल्या टाचा करीता अतिशय सोपा घरगुती ईलाज… 0\nदारू पिऊन तात्काळ झोपल्याने होतील हे 9 साईड इफेक्ट… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:04:50Z", "digest": "sha1:FCTEX4AEGW2PSVQA4CUJWTMZHQ734I3Q", "length": 6858, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदेस कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या-पंतप्रधान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंसदेस कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या-पंतप्रधान\nनवी दिल्ली – संसदेला कसे ओलीस ठेवण्यात आले ते लोकांना समजू द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना केले आहे. ऑडियो ब्रिजद्वारे खासदारांशी बोलताना पंतप्रधानांनी असे आवाहन केले आहे. काही राजकीय पक्षांनी संसद ओलीस धरून संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा अर्धा भाग काहीही कामकाज न होता वाया गेला त्या, संदर्भात पंतप्रधान आपल्या खासदांरांशी बोलत होते.\nसन 2014 च्या निवडणुकीत ज्यांना सत्ता मिळू शकली नाही, असे घटक आपला अहंकार आणि निराशेपोटी संसदेचे कामकाज होण्यात अडथळे आणून राष्ट्राची प्रगती रोखू पाहत आहेत; सत्तेच्या लोभापायी ते लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहेत ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन पंतप्रधानांना खासदारांना केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleपाकिस्तानचा थयथयाट: म्हणे, सार्क परिषदेच्या आयोजनात भारताकडून खोडा\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/canceled-membership-former-chairman-bardes-bazar-customer-co-operative-society/", "date_download": "2018-04-20T16:17:59Z", "digest": "sha1:LLKQHMKUJQBVJX6Q7Z3K65W4CCHMESM4", "length": 30163, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Canceled Membership Of The Former Chairman Of The Bardes Bazar Customer Co-Operative Society | बार्देस बाजार ग्राहक सहकारी संस्थेच्या माजी अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nबार्देस बाजार ग्राहक सहकारी संस्थेच्या माजी अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द\nम्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.\nम्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.\nम्हापसा अर्बन को आॅपरेटिव्ह बँकेच्या बँक आॅफ गोवाच्या नंदादीप सभागृहात बोलावण्यात आलेल्या या सभेत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुदास सावळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. संस्थेचे संचालकपद तसेच सदस्यत्व रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संचालक मंडळाने संचालक जयवंत नाईक यांना बजावली होती.\nसंस्थेच्या चेअरमनपदावरून संचालक जयवंत नाईक व संचालक मंडळात वाद निर्माण झाला होता. जयवंत नाईक यांना संचालक मंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने संस्थेच्या भागधारकांची विशेष सभा बोलावून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. दिलेल्या आदेशानुसार ही सभा बोलावण्यात आलेली. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करुन २२ फेब्रुवारीला त्यांना अध्यक्षपदावरुन खाली खेचण्यात आले होते.\nसंस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच १६९ सदस्यांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी पत्रकारांना दिली. सावळ यांनी मांडलेल्या या ठरावाला उपाध्यक्ष डॉ. रवींद्र फोगेरी यांनी अनुमोदन दिले. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात हा ठराव १५७ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आला. सहकार कायद्यानुसार एखाद्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करायचे असल्यास सभेला उपस्थित सदस्यातील एकूण तीन तृतीयांश सदस्यांचे ठरावाला अनुमोदन लाभणे आवश्यक असते. आवश्यकतेपेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा ठरावाला लाभल्याचे सावळ यावेळी पत्रकारांना सांगितले.\nसभेत काही झालेल्या चर्चेवेळी काही सदस्यांनी जयवंत नाईक यांनी संस्थेला दिलेल्या योगदाना अनुसरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली होती. केलेल्या विनंतीला अनुसरुन तशी तयारी सुद्धा दाखवून जयवंत नाईक यांनी संस्थे विरोधात विविध न्यायालयात दाखल केलेले खटले मागे घेण्याची अट त्यांना लागू केली आहे. सभेला उपस्थित जयवंत नाईक यांनी खटले मागे घेण्याची भूमिका दर्शवून आपल्याला पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्यात यावे असे सुचवले. संस्थेचे अध्यक्षपदावर कोणाला नेमावे हा निर्णय संचालक मंडळाचा असल्याने नाईक यांची अट नामंजूर करून ठरावावर शिक्कामोर्तब केले.\nबार्देश बझार ही गोव्यातील सहकार क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था. राज्यभरात त्यांच्या ७ शाखा तसेच १ फार्मसी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. संस्थेने केलेल्या दाव्यानुसार संस्था सहकार क्षेत्रातील पहिला मॉल उभारण्याच्या मार्गावर असून, पुढील महिन्याच त्याचे कामही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गत आर्थिक वर्षात या संस्थेच्या नफ्यात साधारणपणे ३० टक्के वाढही झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प\nनेत्यांची नाराजी घालविण्यासाठी भाजपाची धडपड, डिसोझा यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ बैठका\nनोटाबंदीच्या वर्षपूर्ततेला कॉंग्रेसचा गोव्यात निषेध मोर्चा, काळा दिवस म्हणून साजरा\nसाळगाव येथील नाईट मार्केट प्रस्तावाला विरोध\nगोव्यात टॅक्सीला मीटर सक्तीचा, राज्य सरकारचा आदेश जारी\nगोव्यात कॅसिनोंशी संबंधित 100 कोटींचे ब्लॅक मनी व्यवहार केंद्रीय यंत्रणांना सापडलेत, मुख्यमंत्री पर्रीकर यांची माहिती\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\nकर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दारू पकडण्याचे सत्र\nनैसर्गिक आपत्तीतही खाण अवलंबितांना मिनरल फंडअंतर्गत मदत\nगोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला\nलोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात\nगोव्यात उद्योजक व कॅसिनो मालकांनीही दंड थोपटले\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad-paschim-maharashtra/sangli-news-hari-patil-tung-special-story-89907", "date_download": "2018-04-20T16:48:08Z", "digest": "sha1:EPPTQ2BZLFQGARQANIQIBRW6V76EUHP2", "length": 15455, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Hari patil Tung special story फौजींनी वाढवला सलोखा, केला शिक्षण प्रसार | eSakal", "raw_content": "\nफौजींनी वाढवला सलोखा, केला शिक्षण प्रसार\nसोमवार, 1 जानेवारी 2018\nहरी विष्णू पाटील यांनी तीस वर्षांत नक्षलग्रस्त, दहशतवादाच्या सावलीत असलेल्या भागात देशप्रेमाचे बीज पेरले. त्याला फळही तसेच आले. तरुण सैन्यात सेवा करण्याकडे ओढले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा अनेकदा गौरव झाला.\nतुंग - पेरलं तसं उगवतं, असं म्हणतात. बंदुकीतल्या गोळ्या पेरल्या तर द्वेष उगवतो. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैन्यासाठी शत्रूला रोखण्याबरोबर तेथील जनतेशी सौजन्य व विश्‍वासाने वागणे महत्त्वाचे ठरते. स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गापासून दूर ठेवण्याचे आव्हान असते. येथील हरी विष्णू पाटील यांनी तीस वर्षांत नक्षलग्रस्त, दहशतवादाच्या सावलीत असलेल्या भागात देशप्रेमाचे बीज पेरले. त्याला फळही तसेच आले. तरुण सैन्यात सेवा करण्याकडे ओढले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा अनेकदा गौरव झाला. तुंगचे हरी पाटील त्यामुळेच लाखात एक फौजी ठरतात त्यामुळेच.\nसुभेदार पदावरून निवृत्त झालेले पाटील यांना खेळात रस, अभ्यासाचे वावडे. मल्लखांब, कुस्ती, क्रॉसकंट्रीची आवड. दहावीत तीनवेळा नापास झाले. पण धडपडले. अखेर उत्तीर्ण झाले. लष्करी सेवेचा मार्ग मोकळा झाला. ऑगस्ट १९८७ मध्ये भरती झाले. तोफखाना विभागात नियुक्‍ती झाली. हैद्राबादला प्रशिक्षण आणि पश्‍चिम बंगाल, चीन सीमा, झारखंड, जम्मू काश्‍मीरसह मध्य भारतातील नक्षलवादी क्षेत्रात काम केले. चार अतिरेक्‍यांचा त्यांनी खात्मा केला. सन २००५ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. हवालदार पदावरून नाईक सुभेदार म्हणून पदोन्नती झाली.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये त्यांच्या युनिटने मल्लखांब, लेझीमचे सादरीकरण करून लक्ष वेधले. तत्कालिन मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद, राज्यपाल एस. के. सिंग यांनीही कौतुक केले. तोफखान्यातील कामगिरीमुळे २००८ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सुभेदारपदी बढती मिळाली. सन २०१२ ते २०१५ मध्ये शिवसागर (आसाम) मध्ये नियुक्‍ती मिळाली. १०५ गावांत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. देशप्रमाचे धडे दिले. त्या प्रयत्नांचे फळ म्हणून लोकांच्या सहभागाने पाच अतिरेक्‍यांना जेरबंद करणे शक्‍य झाले. तेथे शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यांनी फिरती शाळा सुरू केली. शिक्षणाचा प्रसार केला. सैन्यदलाचे प्रशिक्षण दिले. नक्षलवादाच्या मार्गावरील तरुणांना मूळ प्रवाहात आणले. वीस मुलांना सैन्यात भरती केले. तीस वर्षांत ४५० मुलांना प्रवाहात आणले.\nफिरती शाळा, वाहतुकीला रस्ता\nचीनच्या सीमेवरील रोचम, छागला हागममध्ये दळणवळण नव्हते. तेथे रस्ते निर्माण करण्यात पाटील यांनी खूप प्रयत्न केले. सहा फुटी रस्ता आठ फुटी केला. वीर मराठा ६७ फिल्ड रेजिमेंट विभागाने ही कामगिरी बजावली. ९९ किलोमीटर रस्ता झाल्याने तेथे पहिली तोफ नेता आली. तेथील गावांत ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू झाला. मुलांना फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्‍सिंग शिकवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्थलसेना प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:41:54Z", "digest": "sha1:2ISJU7WPNVS2PSE6XWDAWX2ROAGB4M5L", "length": 6372, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलाया (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(मलाया या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nमलाया शब्द अनेक अर्थाने वापरला जातो:\nब्रिटिश मलाया (१८वे शतक-१९४६), मलय द्वीपकल्प व आसपासच्या भागातील ब्रिटिशधार्जिणे प्रदेश\nमलय राज्ये, ब्रिटिश मलायातील ब्रिटिशधार्जिणी राज्ये. यात संयुक्त मलय राज्ये व इतर मलय राज्ये असे दोन भाग करतात\nमलय संघराज्य (१९४६-४८) - दुसऱ्या महायुद्धानंतरचे सिंगापूर वगळता ब्रिटिश मलायातील सगळी राज्ये असलेला प्रदेश\nमलय संघराज्य (१९४८-६३) - १९४६-४८च्या मलय संघराज्याचा पुढील अवतार. १९५७मध्ये याला स्वातंत्र्य मिळाले.\nमलाया (चित्रपट), जपान्यांच्या आधिपत्याखालील मलायाबद्दलची १९४९चा चित्रपट\nएचएमएस मलाया, रॉयल नेव्हीची क्वीन एलिझाबेथ प्रकारची युद्धनौका\nऑपरेशन मलाया, स्पेनमधील पोलिस मोहीम\nऑक्साना मलाया, १९८३मध्ये जन्मलेली मुलगी. ही अगदी लहानपणापासून इतर माणसांपासून जंगली कुत्र्यांच्या संगतीतच वाढली होती\nमलाया (वृत्तपत्र), फिलिपाइन्समधील वृत्तपत्र\nमलायन जमात, केरळमधील आदिवासी जमात\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१५ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/nathsashti-festival-to-end-today-after-kalahandi/", "date_download": "2018-04-20T16:42:40Z", "digest": "sha1:7KBSMH7H6GIU5Q6PHL3PC2XDOJ6FTMIM", "length": 19909, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "कालाहंडी फोडून आज होणार नाथषष्ठी यात्रौत्सवाची सांगता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nकालाहंडी फोडून आज होणार नाथषष्ठी यात्रौत्सवाची सांगता\nनाथषष्ठी महोत्सवाचा समारोप कालाहंडी फोडून करण्याची प्रथा पैठण तालुक्यात आहे. ४१९ व्या नाथषष्ठी यात्रौत्सवाची आज सांगता होणार आहे. त्यानुसार संत एकनाथ महाराज समाधी समोर टांगलेली कालाहंडी नाथवंशजांच्या हस्ते फोडली जाणार आहे. आजुबाजुच्या गावांतील भाविक हजारोंच्या संख्येने या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून काल्याचा प्रसाद लुटतात. त्यानंतर या धार्मिक महोत्सवाचा समारोप केला जातो. वारकरी संप्रदायामध्ये काल्याचा प्रसाद व काला-दहिहंडी याला अनन्यसाधारण महत्व आहे.\nकाल्याच्या प्रसादाची हंडी बनवणे, लाकडी शिंक्यावर लाह्या-गुळाच्या लाडवांची सजावट करणे व हे शिंके नाथमंदिरात ऊंचावर लटकवण्याचा मान पैठणच्या कळमकर कुटुंबाकडे आहे. १७० वर्षांपासून हे काम करणाऱ्या कळमळकर कुटुंबाची चौथी पिढी सध्या या कामात व्यस्त आहे. या सोहळ्यानंतर नाथवंशजांकडून मिळणारे ‘श्रीफळा’ चे मानधन कळमळकर कुटुंबीय लाख मोलाचे मानतात\nसुरुवातीचे ‘कामकरी’ आता ‘मानकरी’ बनले\nगेल्या १७० वर्षांपासून कालाहंडीची सर्व जबाबदारी पैठणमधील कळमकर कुटुंबाकडे आहे. तत्कालीन नाथवंशजांनी कळमकरांवा कालाहंडीची जबाबदारी सोपवली होती. काही वर्षांनी कालाहंडी तयार करतानाचे हे ‘कामकरी’ ‘मानकरी’ बनले असे तिसऱ्या पिढीतील बाबासाहेब कळमकर (७७) यांनी दिली. त्यांचे आजोबा बंडेराव कळमकर यांनी नाथवंशजांच्या सुचनेवरुन कालाहंडीची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासून कळमकर कुटुंबीय ‘कालाहंडी बनवणारे मानकरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आता त्यांची चौथी पिढी नाथसेवेचे हे काम करत आहे.\nकालाहंडी टांगण्यासाठी असलेले लाकडी शिंके हे १७० वर्षांपूर्वीचे आहे. ७ कप्पे असलेल्या या शिंक्याला खालच्या बाजूस लोखंडी हुक लावलेले आहेत. त्यात मोठ्या चेंडूच्या आकाराचे ५१ लाह्याचे लाडू अडकवले जातात. व मधोमध कालाहंडीचा प्रसाद असलेले मातीचे भांडे लावले जाते. हि सर्व प्रक्रिया कालाष्टमीच्या दिवशी नाथमंदिरातच दुपारी ३ वाजेपर्यंत पुर्ण केली जाते. त्यासाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजे लाह्याचे लाडू हे मात्र एक दिवस अगोदर ‘सप्तमी’ लाच करावे लागतात.\nचौथी पिढी देखील नाथ सेवेत\nचौथ्या पिढीतील बापुसाहेब कळमकर व त्यांचे चुलत भाऊ गेल्या १० वर्षांपासून हे काम करत आहेत. बापुसाहेब यांनी सांगितले की, नंदकिशोर, अमोल, रामेश्वर, संदीप व नागेश असे आम्ही भावंड नाथसेवा बजावत आहोत. पैठण येथील भोईवाड्यात असलेल्या जमधडे कुटुंबाकडून आम्ही लाह्याचे लाडु बनवून घेतो. ज्वारीच्या या लाह्या गुळाच्या पाकात मिसळून त्याचे लाडू तयार करतात. ते आमच्या नाथगल्लीतील घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी कालाष्टमीला मंदिरात कालाहंडी टांगल्यावरच आम्ही जबाबदारीतून मुक्त होतो. या सेवेच्या बदल्यात नाथवंशज आम्हाला नाथवाड्यावर बोलावून शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करतात. तोच आमचा लाखमोलाचा मोबदला आहे ’ असे बापुसाहेब कळमकर यांनी व्यक्त केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलछिंदमची खुर्ची युवासैनिकांनी फेकली बाहेर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackrey-meets-cm-273430.html", "date_download": "2018-04-20T16:24:08Z", "digest": "sha1:GKKZSODJRAEHQWEKXBUM64MDSQUVNRIX", "length": 11571, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट;डोंबिवलीच्या विकासावर चर्चा", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nराज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट;डोंबिवलीच्या विकासावर चर्चा\nफेरीवाल्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्च होईल अशी चर्चा होती . पण मुळात बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यानुसार डोंबिवलीच्या विकासासंदर्भात त्यांच्यात बैठक झाल्याची.\nमुंबई,02 नोव्हेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आधीच राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं.\nआज दुपारी 12च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर पोचले.त्यानंतर जवळपास एक सव्वा तास त्यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक झाली. गिरीष महाजनही या बैठकीला उपस्थित होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्च होईल अशी चर्चा होती . पण मुळात बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यानुसार डोंबिवलीच्या विकासासंदर्भात त्यांच्यात बैठक झाल्याची. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती. तसंच राज्यात स्टार्ट अप इंडियाची पॉलिसी ठरलेली नाही , तरुण उद्योजकांना संधी मिळालेली नाही , डोंबिवलीत जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवा या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.\nआता या बैठकीतून मुंबईच्या राजकारणाला काही वळण मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/bhima-koregaon-violence-riots-created-by-pro-hindu-organizations-alleged-prakash-ambedkar/articleshow/62491948.cms", "date_download": "2018-04-20T16:34:04Z", "digest": "sha1:4G73NFHGA5P2IGUULOHRIL7PVRNYBKEN", "length": 26771, "nlines": 244, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bhima koregaon violence riots created by pro hindu organizations alleged prakash ambedkar | दंगलींमागे हिंदुत्ववादी संघटना: आंबेडकर - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nदंगलींमागे हिंदुत्ववादी संघटना: आंबेडकर\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nकोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्ववादी संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला. अभिवादन व त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये झालेली जाळपोळ मराठा-दलित समाजाने केली नसून, देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांनी केली असल्याचाही गंभीर आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.\nकोरेगाव भीमा येथील घटनेनंतर तीन जानेवारी रोजी झालेल्या घटनेनंतर प्रथमच अॅड. आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यात ते सिद्धार्थ नगर येथे भेट देणार होते, पण पोलिसांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील नागरिकांची गाऱ्हाणे समजून घेवून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी पुणे, चाकण व शिरूर असे तीन मार्ग आहेत. त्यापैकी पुणे वगळता चाकण व शिरूर मार्गावरून येणाऱ्या भीमसैनिकांना मारहाण केली. तत्पूर्वी गोविंद गायकवाड यांच्या समाधीवरून वाद निर्माण होत होता. त्यावेळी ३९ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना सोडून दिले. पण मारहाण झालेल्या घटनेची पोलिसांनी नोंदही करून घेतली नाही. याविरोधात दोन जानेवारी रोजी गावा-गावातून समाज बाहेर पडला. तीन जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला काहीठिकाणी हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी हे जाणीवपूर्वक केले, असून याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.’\n‘महाराष्ट्र बंद दरम्यान काही कार्यकर्त्यांवर दरोड्याचे व ३०७ कलम लावले. पोलिसांचा हा अाततायीपणा असून, यातून कार्यकर्त्यांची निश्चित सोडवणूक केली जाईल. यासाठी सरकारलाही लक्ष घालावे लागेल. भारतात पाकिस्तानप्रमाणे अंतर्गत यादवी निर्माण होऊ नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनातील वर्चस्ववातून निर्माण होणाऱ्या हफीज सय्यद यांना पायबंद घालवा, अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू, असा इशाराही दिला. देशासमोर आज मोठे संकट असून यातून यादवी होण्याची शक्यता आहे. यातून एक जानेवारीची हिंसकघटना घडली. अशा घटनामध्ये आततायीपणा केला, तर निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता असल्याने नियंत्रित हिंदुत्ववादी संघटना आपला अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.\nकोरगोव भीमा घटनेच्या माध्यमातून आपण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, का, या विषयी बोलताना प्रसार माध्यमांनी तयार केलेले पेपर टायगर माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे, आणि उद्याही राजा राहणार आहे, असे सांगत केंद्रीय समाजीक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता अॅड. आंबेडकर यांनी टोला लगावला.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकोल्हापूर: ६ वर्षांनी विमानाचं टेकऑफ\nचंद्रकांत पाटील पैशांचा पाऊस पाडतात:शिवसेना\nदोन मुलांसह विवाहिता बेपत्ता\nकोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा २० जूनपासून\n1दंगलींमागे हिंदुत्ववादी संघटना: आंबेडकर...\n2माफी मागा अन्यथा दावा...\n3औताडेंनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी...\n4पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळेच अनिकेतचा मृत्यू...\n6अपघात असल्याचे भासवून तरुणाचा खून...\n7शंकरच्या मृत्यूने धनगरवाडा हळहळला...\n8‘अमृत’चे काम २० महिन्यांत संपवा...\n9दरवर्षी १२ हजार जणांचे हकनाक बळी...\n10५० खंडांत सयाजीरावांची गौरवगाथा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=4&catid=5", "date_download": "2018-04-20T16:38:52Z", "digest": "sha1:DCKIL5GV672MOO6CMH5QB2GB4RJ7OT6M", "length": 12331, "nlines": 171, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nrecrutement फ्रांस करुन घेऊ नकोस\nrecrutement फ्रांस करुन घेऊ नकोस\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 2\nDans ce केडरचे, अफाट व्यवहारज्ञान vous proposons डि augmenter पुन्हा एकदा एक PEU सीई réalisme कृपा त्यातूनच सेवा प्रस्ताव भाषेचा FSAirlines आणि IVAO\nफ्रान्स असंतुष्ट युवराज आहे représenté avec स्मरण शाक्तीची अधिक डी 6000 आवर्तनांमध्ये ओ निघून आणि एक l'arrivée डेस अधिक beaux aéroports du जगभरातील\nObtenez डेस जाहिराती qui vous permettrons डी monter इं ग्रेड आणि डि acquérir एक विमानगृह privé avec votre (आपण) .असे दिसून आले (चे) कर्मचारी (चे).\nअफाट व्यवहारज्ञान sommes एक IVAO फ्रान्स अग्रहक्क पुन्हा एकदा certifié mais ले deviendra कृपा एक vous rattacher\nचतुराईचे आवाज आणि एक bientôt\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: jacvial, timmyt\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\n1 वर्ष 3 महिने पूर्वी - 1 वर्ष 3 महिने पूर्वी #24 by rikoooo\nइंग्रजी मंच आहे, आम्ही फक्त इंग्रजी बोलतो. भेट द्या http://www.rikoooo.com/fr/forum/ तेथे फ्रेंच आवृत्ती आणि पोस्ट.\nएरीक - सामान्य प्रशासक - मदत करण्यासाठी नेहमी आनंदी\nअंतिम संपादन: 1 वर्ष 3 महिने पूर्वी rikoooo.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nrecrutement फ्रांस करुन घेऊ नकोस\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.176 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/7-vehicles-burnt-in-pune-273507.html", "date_download": "2018-04-20T16:36:40Z", "digest": "sha1:6WWUAHMOFSWG4BV6WWNCUCZTQKH5JZZS", "length": 10038, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात 6 ते 7 दुचाकी गाड्या जळाल्या", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nपुण्यात 6 ते 7 दुचाकी गाड्या जळाल्या\nकाल रात्री या वाहनांना आग लागली. पण ही आग का लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही\nपुणे, 03 नोव्हेंबर: पुण्यातील टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळ समोरच्या गल्लीत मध्यरात्रीनंतर 6 ते 7 दुचाकी वाहने जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही काळात अशा घटनांचे प्रमाण वाढलंय.\nकाल रात्री या वाहनांना आग लागली. पण ही आग का लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसंच या आगींमागे कोण आहे हे ही कळलं नाही आहे.दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या किंवा आगी लावण्याच्या घटना मात्र पुणे, पिंपरी परिसरात वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पर्वती परिसरात घडली होती.सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यात संशयाचे वातावरण निर्माण होतं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/close-friend/", "date_download": "2018-04-20T16:41:37Z", "digest": "sha1:MWYDPVTWM4PQDM5Q2LFOMH6ZBY63BNK7", "length": 15852, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "माझा मित्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nजवळचा मित्र – जयदीप बगवारकर (माझा नवरा)\nत्याचा पॉझिटिव्ह पॉईण्ट – माझी चिडचिड, काळजी मी त्याला सांगते तेव्हा तो शांतपणे ऐकून घेतो, समजून घेतो.\nनिगेटिव्ह पॉईण्ट – तो पटकन निर्णय घेऊ शकत नाही.\nत्याच्यातली आवडणारी गोष्ट – त्याचा आवाज खूप छान आहे आणि त्याच्या गालाला पडणारी खळी मला खूप आवडते.\nत्याच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट – गिफ्ट बऱयाचदा मीच देते. त्याने मला एकदा पंचमदांची सीडी दिली होती.\nत्याच्याकडून काय शिकलात – शांत कसं राहायचं ते शिकले. तो कोणतंही काम जबाबदारीने करतो.\nएकमेकांसाठी वेळ देता का – हो ठरवून आम्ही भेटतोच.\nत्याची आवडती डिश – सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणी.\nतो डिस्टर्ब असतो तेव्हा – एकमेकांकडे टेन्शन शेअर करतो.\nत्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण – मी त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असतो.\nतू चुकतेस तेव्हा तो काय करतो – मी चुकते तेव्हा अत्यंत शांतपणे तो माझी चूक मला दाखवतो आणि तो चुकतो तेव्हा मी खूप आरडाओरड करून त्याची चूक त्याला दाखवते.\n – घरी किंवा आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना आम्ही गप्पा मारतो.\nभांडण झाल्यावर काय करता – एकमेकांना सॉरी म्हणतो.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो\nत्याचे वर्णन – तो पूर्वीपासूनच खूप शांत आहे. तो खूप छान गातो. आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. तिलाही तो खूप व्यवस्थित सांभाळतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nऑफिसमधली ‘गुटर…गू’ कशी सांभाळाल\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:32:59Z", "digest": "sha1:B22I44LRYHVP7VZH6DQP5WTG4R2U3BLE", "length": 3514, "nlines": 51, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "54.80.123.20 साठी सदस्य-योगदान - विकिबुक्स", "raw_content": "\n54.80.123.20 (चर्चा | रोध नोंदी | अपभारणे | नोंदी | संपादन गाळणी नोंदी) साठी\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\nया मानदंडाशी जुळणारे बदल सापडले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-20T16:12:56Z", "digest": "sha1:VVS4QQ2FVLXRCJM4RUKCIT7CE3D4HJFX", "length": 7543, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उकाडा कायम; पावसाचीही शक्‍यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउकाडा कायम; पावसाचीही शक्‍यता\nराज्यातील विविध शहरातील तापमान पुढील प्रमाणे\nनागपूर-37.6, यवतमाळ 39.0 परभणी: 41.6 सातारा 38.1,सोलापूर 39.3,जळगाव 41.4,कोल्हापूर:36.4, नाशिक 37.7\nराज्यात ठिकठिकाणी हजेरी : मालेगाव सर्वांत हॉट\nपुणे – राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. सोमवारी सकाळपर्यंत मालेगाव येथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nराज्यात सायंकाळी ढगाळ हवामान होत असले तरी दुपारपर्यंत असलेल्या उन्हाच्या चटक्‍यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान 38 अंशांच्या पुढे गेले आहे. मालेगावसह जळगाव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान 40 अंशांवर पोहचले आहे. पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून नैर्ऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दोन दिवस पावसाची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: रस्त्यांचा विस्तार, सक्षम वाहतुकीवर भर देणार\nNext articleन्याय सुनावणीसाठी वातावरण योग्य नाही\nपुणे: प्लॅस्टिक नष्ट करणाऱ्या विषाणूंचा शोध\n“पॅनकार्ड क्‍लब’ छोट्या गुंतवणुकदारांना परतावा\nपुणे: पहिल्या वर्षी 100 शाळांमध्येच ई-लर्निंग\nपुणे: प्लॅस्टिकवरील कारवाईसह नागरिकांचे प्रबोधनही\nपुणे: एफआरपी थकीत पाच कारख्यांना नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:13:16Z", "digest": "sha1:U5EOVQPF2Z572EMSQGUDECP3JUCYQLCL", "length": 7306, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेच्या विद्यार्थ्यांचा गौरव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – माध्यमिक शिक्षा अभियांतर्गत पालिकेच्या दहा शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन कोर्स पूर्ण केले अशा विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. लेंड अ हॅंड व महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव संमारंभ करण्यात आला.\nकरिअर मेळाव्यात उद्योजकही सहभागी झाले होते. उद्योजकांच्या माध्यमातून कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळपास 70 विद्यार्थ्यांनी यावेळी नोकरीकरिता मुलाखती दिल्या. यातील36 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून 32 अधिक विद्यार्थ्याची इंटर्नशिप करण्यासाठी निवड करण्यात आली. या करिअर मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उद्योग जगतात आवश्‍यक असणाऱ्या क्षमता आणि कौशल्यांची माहिती मिळाली. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीमधील आवश्‍यक संवाद कौशल्ये आणि व्यावहारीक कौशल्य प्रत्यक्ष अनुभवता आली. या नोकरी मेळाव्या बरोबरच इयत्ता 10 पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी, तांत्रिक शिक्षणातील उपलब्ध करीअर यांविषयी माहिती देण्यात आली. कौशल्य अभ्यासक्रम आणि त्याचे महत्त्व याबद्दल उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी गौरव सोहळ्यात इंटर्नशिप उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांनी व विद्यार्थ्यांनी आपले इंटर्नशिप करत असतानाचे अनुभव मांडले. यावेळी पालिकेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोल्हापुरात राजा परांजपे महोत्सवाला प्रारंभ\nNext articleछोट्या उद्योगांना खेळत्या भांडवलासाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/other-sports/gujarat-won-toss-winning-note-kolkata/", "date_download": "2018-04-20T16:08:20Z", "digest": "sha1:A7P3U2VLAT52Q6QSX4MXLHCAJZNZSZX3", "length": 27261, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शुक्रवार २० एप्रिल २०१८", "raw_content": "\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nगुजरातनं कोलकातावर मिळवला दणदणीत विजय\n88 वर्षांमध्ये जमलं नाही ते 'या' आठ खेळाडूंनी 'करुन दाखवलं'\nअवघ्या १५व्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण; अनिश भानवालाची 'लक्ष्य'वेधी कामगिरी\nPhoto Gallery : तेजस्विनीची सोनेरी कमाई\nCommonwealth Games 2018 : सुशील कुमारचे सोनेरी यश\nमराठमोळ्या राहुलची राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी\nहीना सिद्धूचा 'सोनेरी' लक्ष्यवेध\nWWF स्टार जॉनी वालियंतचा मृत्यू\nIndia at Commonwealth Games 2018: या दहा खेळाडूंकडून आहेत भारताला सुवर्णपदकाचा अपेक्षा\nपी. व्ही. सिंधू सायना नेहवाल किदम्बी श्रीकांत मेरी कोम\nनेमबाजी विश्वचषकात शहजार रिझवीनं जिंकलं सुवर्णपदक\n22 वर्षानंतर महिला वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले गोल्ड मेडल\nवर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सचा बोलबाला\nपाच भारतीय बॉक्सर एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\nआशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचा गोल्डन पंच\nनागपूरच्या दिव्या देशमुखने 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत जिंकलं सुवर्ण पदक\nविराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड\nविराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे\nपराभवानंतर टीम इंडियावर जोक्सचा पाऊस\nपाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली.\nपराभव बांगलादेशचा, टिंगल पाकिस्तानची\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली\nसोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट\n15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ आणि त्यांची कामगिरी\nआयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते.\nगोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर रोहित शर्मा व कृणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राची अंतिम\nदोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१०च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध लढणार आहे.\nतुम्हाला माहित आहे का दीप्ती शर्मा आणि पूनम राऊतच्या विश्वविक्रमाचं रहस्य\nदीप्ती शर्मानं नेमकी काय जादू केली पूनम राऊतनं क्रिकेटचे सगळेच विक्रम कसे केले आपल्या नावे\nआमलाच्या शतकावर गुजरात पडले भारी\nमोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या सपाट आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\nकुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल'\n, 'हे' चित्रपट नक्की पाहा\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/coloum-rokhthok-by-sanjay-raut-on-current-situation-of-local-media/", "date_download": "2018-04-20T16:43:37Z", "digest": "sha1:VCBNYUMLJMIZRDXR3GTWLKR4RAHQJTR3", "length": 37816, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : ३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nरोखठोक : ३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख\nवृत्तपत्र स्वातंत्र्य ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, पण राज्यकर्त्यांना स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे हवी आहे. ३२४ मराठी वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींच्या यादीवरून सरकारने काढून टाकले आहे आणि इतर ७०० जिल्हा वृत्तपत्रांवर ही कुऱ्हाड चालविण्याची तयारी सुरू आहे. पाच-दहा भांडवलदार वृत्तपत्रांना‘बळ’ देण्यासाठीच हे चालले आहे. ३२४ जिल्हा वृत्तपत्रांचा हा मृत्युलेखच आहे\nआतापर्यंत अनेकांवर मृत्युलेख लिहिण्याचे वृत्तपत्रीय कर्तव्य मी बजावले. पत्रकारितेचा धर्म म्हणून हे काम मी केले. अनेकांना श्रद्धांजली वाहिल्या. अनेकांच्या अंत्ययात्रेतही सामील झालो, पण मृत्युलेख लिहिणे हे सर्वात कठीण. संपादकाचा खरा कस मृत्युलेखावर लागतो. हे मृत्युलेख माणसांवरचे होते, परंतु मी आज किमान ७०० मराठी वृत्तपत्रांवर मृत्युलेख लिहीत आहे. वृत्तपत्रांवर मृत्युलेख लिहिणे म्हणजे स्वतःचाच मृत्युलेख लिहिण्यासारखे आहे. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपली वैयक्तिक मालमत्ता समजून ७०० वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्या सर्व वृत्तपत्रांवरचा हा मृत्युलेख आहे पुन्हा या वृत्तपत्रांना श्रद्धांजली वाहणे हा मृत्युलेखाचा हेतू नाही, तर ही सर्व वृत्तपत्रे पुन्हा जिवंत करण्यासाठी हा मृत्युलेख आहे.\nमहाराष्ट्र शासनाने ८ जानेवारी २०१८ रोजी एक आदेश जारी केला व ३२४ जिल्हा वर्तमानपत्रे व साप्ताहिक यांना सरकारी जाहिरात यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचानक झाला आहे व जिल्हा स्तरांवरील अनेक वृत्तपत्रांना त्याचा फटका बसला आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की, ‘‘बंदीचा आदेश काढावा लागला, कारण ही सर्व वृत्तपत्रे अनियमित किंवा बंद आहेत.’’ माहिती व जनसंपर्क विभागाने ही कुऱहाड चालवली आहे. आधी ३२४ वृत्तपत्रांना सरकारच्या जाहिरात यादीवरून काढले व आता ‘ब’ श्रेणीतील ७०० वृत्तपत्रांवर ‘बंदी’ची कुऱ्हाड चालविण्याची तयारी सुरू आहे.\nहा विषय वृत्तपत्रांच्या मुस्कटदाबीचा आहे काय हे सांगता येणार नाही, पण कोणतीही नोटीस न देता सरकारने ही कारवाई केली हे पहिले व या वृत्तपत्रांना न्यायालयात जाऊनही ‘दाद’ मागता येऊ नये यासाठी अशा वर्तमानपत्रांविरोधात उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केले हे दुसरे. ही मनमानी आहे. ही सर्व वृत्तपत्रे सरकारी जाहिरातींचे आश्रित होती व फार मोठे पत्रकारितेचे दिवे पाजळत होती असे मला म्हणायचे नाही, पण यातील अनेक वृत्तपत्रे ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून काम करीत होती व ग्रामीण भागात त्यांचे अस्तित्व होते. मोठय़ा वृत्तपत्रांनी जिल्हा व तालुका स्तरांवरील आवृत्त्या सुरू केल्या व वृत्तपत्र हा धंदा केला. वार्ताहरांना जाहिरात एजंट केले. त्यामुळे ही सर्व गावपातळीवरील वृत्तपत्रे आधीच शेवटच्या घटका मोजीत होती. त्या सर्व वृत्तपत्रांचे अंत्यसंस्कारच महाराष्ट्रात फडणवीस सरकारने केले हे दुःखद आहे.\nछोटे पत्रकार चोर, मोठे साव\nजिल्हा स्तरावरील अनेक वर्तमानपत्रे व नियतकालिके ही पत्रकारिता कमी व ‘ब्लॅकमेलिंग’चे प्रकार जास्त करतात, असा आरोप नेहमीच केला जातो. मग स्वतःस ‘मोठी’ समजणारी व राज्य स्तरावरील वृत्तपत्रे व त्यांचे मालक हेच काम मोठय़ा पातळीवर करीत आहेत व पुन्हा राज्यकर्त्यांच्या मांडीस मांडी लावून ते बसवले जातात. खाण घोटाळ्यांपासून बँक घोटाळय़ांपर्यंत अडकलेले अनेक लोक आज वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मालक आहेत व त्यांच्याही वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातीचा मलिदा मोठय़ा प्रमाणात मिळत आहे. यातील अनेक मालक व पत्रकार राजकीय पक्षांचे बोट धरून संसद व विधानसभेत पोहोचले. ही सर्व मोठी वृत्तपत्रे आज सत्ताधारी पक्षांना हवी आहेत, पण छोटय़ा वृत्तपत्रांना त्यांना मारायचे आहे. ‘केसरी’, ‘दर्पण’ व ‘सुधारक’ या वर्तमानपत्रांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वृत्तपत्रे व नियतकालिके टिकवून ठेवणे गरजेचे आहे.\n‘आर. एन. आय.’ची दहशत\nजिल्हा वृत्तपत्रांनाही दिल्लीत जाऊन प्रत्येक वर्षी ‘RNI’ कडे म्हणजे -Registration of News paper for India मध्ये जाऊन नोंदणी करावी लागते व ही नोंदणी झाली नाही तर राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत. नोंदणी दाखवा व जाहिरात घ्या. पण नागपूरच्या एका जिल्हा संपादकाने त्यांची व्यथा सांगितली, “RNI च्या दिल्ली कार्यालयात हिंदी भाषिक लोकांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रातून दिल्लीत हेलपाटे मारूनही त्या कार्यालयातील लोक आम्हाला दाद देत नाहीत. हे प्रामुख्याने ‘मराठी’ वृत्तपत्रांच्याच बाबतीत घडताना दिसते. निदान महाराष्ट्र सरकारच्या दिल्लीतील आयुक्तालयाने तरी या कामी आम्हाला मदत करावी.’’ हे वेगळेच दुःख आहे व शेतकरी आत्महत्या करतो तसा लहान वृत्तपत्रांचा मालक, संपादकही उद्या आत्महत्या करील काय अशी भीती मला वाटते. मोठ्या वृत्तपत्रांच्या मालक, संपादकांना ‘खिशात’ ठेवायचे. मग जिल्ह्यातील वर्तमानपत्रांची गरज नाही, हे सरकारी धोरण आहे व ते मारक आहे.\nमुंबईसह महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी ग्रंथालयांना वाळवी लागली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही आक्रोश करणारी व्यासपीठे बनली आहेत. बडोद्यातही तेच झाले. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा दिवस’ एक दिवस साजरा करायचा व त्याचवेळी सातशे जिल्हा मराठी वर्तमानपत्रांचे गळे चिरायचे. टिळक-आगरकरांची ध्येयवादी पत्रकारिता आज राहिलेली नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर ब्रिटिश काळात जे आक्रमण झाले त्या आक्रमणाविरुद्ध मुंबईच्या ‘सत्यमित्र’ पत्राने सवाशे वर्षांपूर्वी एक आरोळी ठोकली होती. ती अशी की, ‘‘वर्तमानपत्र राज्याचे मुख्य खांब आहेत. त्यावर कायदारूपी कुऱ्हाडीचे घाव घालावे आणि ते तोडून टाकावे हे कोणत्या धर्मशास्त्रात लिहिले आहे’’ हा एक मंत्र आहे व हा मंत्र जपणारे अनेक कलमबहाद्दर ‘सत्यमित्र’ आजही जिल्हा व तालुकास्तरावर आहेत. अशा ‘सत्यमित्रां’साठी किती जण पुढे आले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करायला हवा. श्री. फडणवीस हे हुकूमशहा वृत्तीचे नाहीत. प्रश्न समजून घेणारे राज्यकर्ते आहेत. मराठी भाषेचे काम म्हणून त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. ही सर्व वृत्तपत्रे टिकविण्यासाठी सरकारी जाहिरातीचा खर्च वर्षाला दोन कोटीही नाही. जिल्हय़ातील एक वर्तमानपत्र चालते व त्यावर सात-आठ लोकांना रोजगार मिळत असतो. तो सर्व बंद होईल व चार-पाच हजारांचा रोजगार जाईल.\nया वृत्तपत्रांकडून कदाचित समाजप्रबोधनाचे मोठे काम होत नसेल व त्यातील अनेकजण राजकारण्यांच्या ताटाखालची मांजरेही बनली असतील. मात्र तरीही ही वृत्तपत्रे मारू नयेत, या मताचा मी आहे. मोदी सरकारने एप्रिल २०१४ ते २०१७ या काळात जाहिरातबाजीवर २५ हजार कोटींहून जास्त खर्च केले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या जाहिरातींसाठी साधारण १० कोटींचा खुर्दा उडवला गेला. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने वृत्तपत्रे व टी.व्ही. वाहिन्यांवर ‘मी लाभार्थी’ ही बनावट जाहिरात सुरू झाली. सरकारच्या प्रसिद्धीसाठी आतापर्यंत वीसेक कोटी () रुपये खर्च झाले. हे सर्व पैसे भांडवलदारी वृत्तपत्रांना मिळतात व सरकार त्या भांडवलदारांचे गुलाम झाले आहे. सरकारी जाहिरातीचे खरे लाभार्थी बडे भांडवलदार आहेत व जिल्हा वर्तमानपत्रे सरकारी पायरीवर भिकाऱ्यासारखी उभी आहेत. त्या भिकाऱयांनाही पुन्हा चोर म्हणून हिणवले जाते. पायाला गळू झाले आहे असे सांगताच पायच कापून टाकण्याचा हा उद्योग महाराष्ट्र सरकारने केला आहे. मराठी पत्रकार परिषद नावाची एक संस्था आहे. त्यांनी यानिमित्ताने एक माहिती प्रसिद्ध केली. त्यातील शेवटचा उतारा देऊन या मृत्युलेखास पूर्णविराम देतो.\n‘‘सरकारने नुकताच एक फतवा काढला आहे. त्यानुसार राज्यातील ३२४ स्थानिक, जिल्हास्तरीय वर्तमानपत्रांना सरकारच्या जाहिरात यादीवरून काढून टाकण्यात आले आहे. म्हणजे या वृत्तपत्रांना आता सरकारी जाहिराती मिळणार नाहीत. द्वैवार्षिक पडताळणीच्या नावाखाली ही अरेरावी केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडमधील झुंजार नेत्याच्या कार्यक्रमात बोलताना स्थानिक वृत्तपत्रे टिकली पाहिजेत अशीच सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ३२४ वृत्तपत्र-चालकांना रस्त्यावर आणले गेले आहे. आणखी तेवढीच वर्तमानपत्रे जाहिरात यादीवरून उडविली जाणार आहेत. एकाच वेळेस सारी वृत्तपत्रे बाद केली तर बोंबाबोंब होईल म्हणून दोन टप्प्यांत ही कारवाई केली जात आहे. प्रामुख्याने दोन कारणं दिली गेलीत. एक म्हणजे आरएनआयचे प्रमाणपत्र नसणे आणि दुसरे अनियमित प्रकाशन. सरकारचा आग्रह नक्कीच रास्त आहे. मात्र आरएनआय नसलेली वृत्तपत्रे जाहिरात यादीवर आलीच कशी हा मुद्दा आहे. वर्षानुवर्षे ही वृत्तपत्रे जाहिरात यादीवर आहेत आणि अचानक सरकारला जाग आली आणि तुमचे आरएनआय दाखवा असा टाहो सरकारने फोडला ते चुकीचे आहे. काही उदाहरणं देता येतील. ‘लहुतरंग’ नावाचं दैनिक विदर्भातून १९६८ पासून प्रकाशित होतंय. ‘रेखा’ नावाचं एक नियतकालिकही ७५ वर्षांपासून प्रसिद्ध होतंय. ‘सीआयडी’ नावाचं असंच एक नियतकालिक. अशी अनेक आहेत. या नियतकालिकांच्या चालकांच्या पिढ्या बदलल्या. अंक सुरू झाल्यापासून जाहिरात यादीवर असलेल्या या पत्रांना आज अचानक ‘तुमचं आरएनआय दाखवा नाही तर फुटा’ असा हुकूम सोडला जातोय.\nहे धोरण छोटी वर्तमानपत्रे बंद करून सारा मीडिया दहा-वीस भांडवलदारी कंपन्यांच्या हाती देण्याच्या सरकारी धोरणाचा एक भाग दिसतो आहे. एक तर अगदीच फुटकळ जाहिराती सरकार या पत्रांना देते. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, ‘जय महाराष्ट्र’ आणि तत्सम कॅम्पेनच्या जाहिराती असतात त्या केवळ बड्यांनाच दिल्या जातात. ब किंवा क वर्गातील वृत्तपत्रांना अशा जाहिरात दिल्या जात नाहीत. एकीकडे मोठ्या वृत्तपत्रांना त्यांच्या नियमांच्या अधीन राहून जाहिराती द्यायच्या आणि दुसरीकडे छोट्या पत्रांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती बंद करायच्या हे धोरण छोट्या वृत्तपत्रांच्या मुळावर उठणारे आहे. गंमत अशी की, आपण घेत असलेला निर्णय चुकीचा आहे, अन्याय्य आहे याची जाणीव असल्यानेच सरकारने ३२४ वर्तमानपत्रे जाहिरातीतून वगळताच हायकोर्टात कॅव्हेट दाखल करून ठेवले आहे. म्हणजे कोणाला कोर्टात जाता येऊ नये. ज्या वर्तमानपत्रांना जाहिरात यादीवरून वगळले आहे ती अगदीच छोटी पत्रे आहेत. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमासाठी जेवढा सरकार खर्च करते त्याच्या दहा टक्के रक्कमही या पत्रांच्या जाहिरात बिलापोटी दिली जात नसेल. असं असतानाही या जाहिराती बंद करून सरकार कोणती बचत करू पाहात आहे हे समजत नाही. या विरोधात मोठा आक्रोश असल्यानं सरकारनं किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही अशांना तशी संधी द्यावी, अन्यथा मोठी परंपरा असलेली अनेक वृत्तपत्रे काळाच्या पडद्याआड जातील.’’\n३२४ वृत्तपत्रांचा मृत्युलेख लिहून झाला व इतर ७०० वृत्तपत्रांची तिरडी बांधायचे कार्य मंत्रालयात सुरू आहे. धर्मा पाटील मंत्रालयाच्या पायरीवर मरून पडले. तसे या सर्व जिल्हा वृत्तपत्रांचे झाले आहे. मुख्यमंत्र्यांना माझे आवाहन आहे, त्यांनी या मृत्युलेखांची शाई पुसून टाकावी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाहा श्रीदेवींचा हा अखेरचा व्हिडीओ\nपुढीलबॉलिवूडच्या ‘हवाहवाई’ला राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाधव रावते ‘सती’ गेले\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/23-years-old-girl-gang-raped-in-pune-kondhwa-by-auto-rickshaw-driver-his-friends/", "date_download": "2018-04-20T16:35:39Z", "digest": "sha1:3W46Z7ONGFD4FGGLNKADSPJXD5JST63L", "length": 11626, "nlines": 68, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार\nपुण्यातील कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय विवाहित तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर तरुणी ही येरवडा परिसरात आपल्या भावाच्या घरी राहायला होती. मात्र रात्री भावाशी तिचे कडाक्याचे भांडण झाले व तिने परत आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि इथून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडत गेल्या आणि हा प्रकार घडला.\nतिने रिक्षा पकडून आपल्या नवऱ्याच्या घरी जायचा निर्णय घेतला मात्र ती रात्रीच्या वेळी बाहेर पडली आणि तिचा पती राहत होता तिकडे म्हणजे कोथरूडला जायला बाहेर पडली. त्यानंतर तिने आपल्या पतीच्या कोथरूड येथील घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा पकडून ती कोंढव्याच्या ब्रह्मा सनिसिटी सोसायटीच्या परिसरात उतरली होती. इथून तिला दुसरी रिक्षा करावी लागणार होती मात्र तिच्याकडे फोन नव्हता म्हणून तिने तिथल्या एका बिल्डिंग च्या सुरक्षा रक्षकाकडे फोन मागितला मात्र त्याच्या फोन ला बॅटरी कमी असल्याने हा फोन होऊ शकला नाही . सुरक्षा रक्षकाने तिला रिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न केला मात्र तिथून रिक्षा मिळू शकली नाही मग ती सनश्री सोसायटीपर्यंत चालत गेली. तिथे तिला रिक्षा मिळाली आणि तिचा प्रवास सुरु झाला.\nरिक्षा चालकाला तिने कोथरूड ला जायचे असे सांगितले आणि कोथरूडच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकाने महिला एकटी असल्याची खात्री करून घेतली व आपल्या एका मित्राला मार्केटयार्ड ला बोलावून घेतले. तेथून हे दोघेजण तिला घेऊन सिद्धार्थनगर येथे गेले. दरम्यान ही महिला मला सोडून द्या असे सांगत होती मात्र त्यांच्यावर आता भूत सवार झाले होते , त्यांनी तिला धाक दाखवत रिक्षामधून बाहेर पडून दिले नाही . सिद्धार्थनगर येथे आल्यावर रिक्षाचालकांच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला पुढे दुसऱ्या दिवशी देखील तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिला कॅम्प रोड परिसरात सोडायला जात असताना रिक्षाचालकाने त्याच्या आणखी एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. या मित्रानेही रिक्षात महिलेचा विनयभंग केला व मग तिला सोडून दिले. ह्या धक्कादायक प्रकारामुळे कोंढवा परिसरात खळबळ उडाली असून ह्या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन नराधमांना अटक केली आहे तर एक जण फरार असल्याचे समजते .\nह्या घटनेनंतर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था कितपत आहे असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. रात्री अपरात्री महिलांना पुणे मध्ये प्रवास करावाच लागतो मात्र सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .\nनाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप\nपुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता\nकोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना\nपोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी \n3 thoughts on “पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार”\nPingback: पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक – Marathi Peopl\nPingback: फेसबुक फ्रेंड पहिल्या भेटीत अत्याचार करून फरार : महाराष्ट्रातील घटना – Marathi People\nPingback: प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटन\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/pitru/word", "date_download": "2018-04-20T16:41:38Z", "digest": "sha1:5US5J5XY5QIVMQ2AF6DZALQXMF2DC5ZG", "length": 5321, "nlines": 81, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - pitru", "raw_content": "\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nपार्वण श्राद्ध : संपूर्ण\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nपार्वण श्राद्ध : संक्षिप्त\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nपार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.\nना. अलोटगर्दी , खूप गर्दी , चेंगराचेंगरीची गर्दी , बेशिस्त गर्दी .\nपुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%88", "date_download": "2018-04-20T16:35:35Z", "digest": "sha1:P35RXJMBNSCZGUIWWSYCIAZAJ5U2HOYZ", "length": 3462, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कादल कोट्टै - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकादल कोट्टै (तमिळ: காதல் கோட்டை इंग्रजी:Kadhal/Kaathal Kottai)हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे.प्रमूख भूमिकेत अजितकुमार (अभिनेता),देवयानी.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/mumbai-fire-kamala-mill-compound/", "date_download": "2018-04-20T16:37:47Z", "digest": "sha1:ENYYQWTTBYMCQOS3FGRYS4QRQIHRHYLN", "length": 4246, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "mumbai fire kamala mill compound – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘ ह्या ‘ मनसे कार्यकर्त्याचे वेळीच ऐकले असते तर मुंबई आग टाळता आली असती\nलोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झालं. मात्र तब्बल १५ नागरिकांना देखील आपले प्राण यात गमवावे लागले. ह्या बिल्डिंगमध्ये आग लागू नये मम्हणून असलेल्या नियमाचे पालन केले जात नाही, त्यावर कारवाई करावी अशी तक्रार स्थानिक मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/gujarat-opinion-poll-over-elections-485930", "date_download": "2018-04-20T16:12:06Z", "digest": "sha1:RY46JBDSDOBVEWQYVBHUWHRRLQZA2WR4", "length": 16122, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूज आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला फक्त 95 जागा", "raw_content": "\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूज आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला फक्त 95 जागा\nगुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला 95 तर काँग्रेसला 82 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ओपिनियन पोलमधल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भाजप आणि काँग्रेसला समसमान म्हणजे 43 टक्के मतं मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूज आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला फक्त 95 जागा\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूज आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला फक्त 95 जागा\nगुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला 95 तर काँग्रेसला 82 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ओपिनियन पोलमधल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भाजप आणि काँग्रेसला समसमान म्हणजे 43 टक्के मतं मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90490", "date_download": "2018-04-20T16:44:53Z", "digest": "sha1:IM6B7U6CMBO5DZHAR7636O26HROJ2OHN", "length": 12566, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Former Congress minister Madhukar Kimmatkar passes away माजी राज्यमंत्री ऍड. मधुकर किंमतकर यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमाजी राज्यमंत्री ऍड. मधुकर किंमतकर यांचे निधन\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nनागपूर - विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, कॉंग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ऍड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. उद्या गुरुवारी (ता.4) रामटेक मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फुफ्फुसाचा त्रास असल्याने त्यांना धंतोली येथील गेटवेल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली.\nनागपूर - विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, कॉंग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ऍड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. उद्या गुरुवारी (ता.4) रामटेक मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फुफ्फुसाचा त्रास असल्याने त्यांना धंतोली येथील गेटवेल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली.\nऍड. मधुकर किंमतकर यांचा जन्म 10 ऑगस्ट 1932 साली रामटेक येथे झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते नागपूरला आले. एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली सुरू केली. कॉंग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी सुरू केलेल्या मॉडेल मिलच्या कामगाराच्या चळवळीत ते उतरले. येथूनच त्यांची राजकीय कारर्कीद सुरू झाली. 1980 साली कॉंग्रेसने त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीसुद्धा होते. सहा वर्षे विधान परिषदेचेही सदस्य होते. विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते आग्रही होते. राज्य शासनाने त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदीसुद्धा नियुक्ती केली होती. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांचा अभ्यास बघून विदर्भ वैधानिक विकास मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून नियुक्त केले.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4320", "date_download": "2018-04-20T16:44:45Z", "digest": "sha1:IH2XEBWA36D6BVTCVWVM4K2RMWFBCQQI", "length": 16202, "nlines": 109, "source_domain": "rajtantra.com", "title": "बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो…! – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nबाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nवाडा, दि. १५ : बाबासाहेबांचे दीन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी ( दि . १४ ) येथील सिद्धार्थ नगर येथे सिध्दार्थ युवक मंडळाच्या वतीने जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री सवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकार कटिबद्ध असून दीन-दलितांसाठी असणाऱ्या विकासाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.\nयावेळीं वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष ऊर्मिला पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप पवार , नगरपंचायत भाजपा गटनेते मनीष देहरकर, नगरपंचायत स्वछता समिती सभापती रामचंद्र जाधव, नगरसेविका वर्षा गोळे,विशाखा पाटील, रिमा गंधे, अंजनी पाटील, राम भोईर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पटारे, शेकापचे तालुका चिटणीस सचिन मुकणे, चर्मोद्योग सेनेचे भरत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर सायंकाळी संपूर्ण वाडा शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.\nबाबासाहेबांचे विचार सर्वव्यापी – विजय गायकवाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते नव्हते, त्यांनी एकाचवेळी विविध पातळ्यांवर काम करून समाजातील सर्वच घटकांसाठी योगदान दिले आहे. मात्र आज त्यांना एका जातीत अडकवण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात होत आहे. बाबासाहेबांनी या देशातील दलित समाजाबरोबरच स्रिया, कामगार व वंचित समाजासाठी काम केलं.संविधानाच्या माध्यमातून येथील प्रत्येक माणसाला न्याय दिला. या देशाची अर्थनीती, जलनीती ठरविण्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्यातून रिझर्व्ह बॅंकेसारखी संस्था उभी राहिली. हिंदू कोडबिलाद्वारे समस्त स्रीवर्गाला हक्क दिले. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य सर्वव्यापी आहे. परंतु त्यांना बंदिस्त करण्याच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना हाणून पाडण्याची गरज आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.\nसिध्दार्थ नगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी आजची तरुणपीढी वाचन संस्कृतीपासून दुरावली आहे. बाबासाहेबांचे विचार वाचण्याऐवजी त्यांना प्रतिमांमध्ये बंदिस्त करण्यावर अधिक भर दिला जातोय असे म्हणत तरुणांना खूप वाचायला हवे. असे म्हणत मुलींना चांगले शिकवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्याचप्रमाणे फुले- आंबेडकरी विचार अन्य समाजापर्यंत पोहचवायला हवा असेही ते म्हणाले.\nभारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा, कोकण विभाग संघटनमंत्री सतिश धोंड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nPrevious: प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nNext: जव्हारमध्ये आंबेडकर जयंती साजरी\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalani-and-bahrani-family-comes-together-again-ulhasnagar-87108", "date_download": "2018-04-20T16:49:43Z", "digest": "sha1:N743WM7WYXE6S5EN47KSEOLWC4JELUH6", "length": 16899, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalani and bahrani family comes together again at ulhasnagar उल्हासनगरातील कट्टर विरोधक कलानी-बहरानी परिवाराचा पुन्हा घरोबा | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरातील कट्टर विरोधक कलानी-बहरानी परिवाराचा पुन्हा घरोबा\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nउल्हासनगर : अकरा महिन्यापूर्वी पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत टिम ओमी कलानीच्या नावाने रणांगणात उतरणारे आणि भाजपाला महापौर करण्यात मोठा वाटा उचलणारे ओमी कलानी यांनी त्यांच्या टिमच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात कलानी परिवाराचे कट्टर विरोधक पप्पू बहरानी यांचा टिम मध्ये समावेश करून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा निर्माण केला आहे. यासोबतच शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे, विजय निर्मळे, साई पक्षाचे माजी नगरसेवक डॉ. महेश गावडे आदींसह विविध पक्षातील शेकडो तरुण ओमी टिमच्या गळाला लागले आहेत.\nउल्हासनगर : अकरा महिन्यापूर्वी पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत टिम ओमी कलानीच्या नावाने रणांगणात उतरणारे आणि भाजपाला महापौर करण्यात मोठा वाटा उचलणारे ओमी कलानी यांनी त्यांच्या टिमच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्यात कलानी परिवाराचे कट्टर विरोधक पप्पू बहरानी यांचा टिम मध्ये समावेश करून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा निर्माण केला आहे. यासोबतच शिवसेनेच्या माजी महापौर विद्या निर्मळे, विजय निर्मळे, साई पक्षाचे माजी नगरसेवक डॉ. महेश गावडे आदींसह विविध पक्षातील शेकडो तरुण ओमी टिमच्या गळाला लागले आहेत. त्यांना भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. ओमीची ही भावी आमदारकीची खेळी मानली जातआहे.\n1986 साली अडीच-अडीच वर्षांचा करार मोडून पाचही वर्ष नगराध्यक्षपद भूषवणारे पप्पू कलानी यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते गोप बहरानी यांना नगराध्यक्ष पदापासून वंचित ठेवले होते. तेंव्हा पासून कलानी-बहरानी परिवार एकमेकांचे विरोधक झाले होते. पुढे गोप बहरानी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या मुलांनीही कलानी परिवाराशी अबोला ठेवला होता. मात्र पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी बहरानी पुत्र पप्पू बहरानी यांच्याशी हातमिळवणी करून बहरानी यांना टिम ओमी कलानीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून कलानी-बहरानी परिवारात पुन्हा घरोबा घडवून आणला आहे.\nउल्हासनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. महापालिकेत भाजप आणि टिम ओमी कलानी एकत्र सत्तेत आहेत, मात्र दोन्ही बाजूंनी आमदारकीच्या तिकिटासाठी आपणच वरचढ कसे आहोत हे दाखविण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. टिम ओमी कलानीने रविवारी सायंकाळी टाऊन हॉलमध्ये विविध पक्षातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, ओमी कलानी, पंचम कलानी, युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅन्युफॅक्चयुरिंग असोसिएशनचे पितु राजवानी, भाजपचे महासचिव संजय सिंग, नगरसेवक राजेश वधारिया, हरेश जग्यासी, नगरसेविका रेखा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.\nटिम ओमी कलानीची कार्यकारणी -\nटिम ओमी कलानीच्या अध्यक्षपदी ओमी कलानी, कार्यकारी अध्यक्षपदी संतोष पांडे, दर्शनसिंग खेमानी यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आकाश चक्रवर्ती, युवा अध्यक्ष सागर उंटवाल, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पियुष वाघेला, युवा अध्यक्ष रोशन वलेचा, उल्हासनगर युवा अध्यक्ष सुंदर मुदलियार, कार्यकारी अध्यक्ष पंकज त्रिलोकानी, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सनी तेलकर यासह आदी पदांची घोषणा करण्यात आली. त्यांना नेमणूक पत्र श्वेता शालिनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.\nदरम्यान टिम ओमीच्या कार्यक्रमातील हाऊसफुल्ल गर्दीने प्रभावित झालेल्या श्वेता शालिनी यांनी उल्हासनगर शहराची अंबरनाथ, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर अशी तीन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. या तिन्ही विधानसभेवर भाजपाचे कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केला.\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nभाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार\nचेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-2-murders-474536", "date_download": "2018-04-20T16:26:11Z", "digest": "sha1:73KON5F6SLOCVUY4F7ZXRAOBN26ZEE3P", "length": 16217, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या", "raw_content": "\nनागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या\nनागपुरात काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पहली घटना वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात घडली. अजय रामटेके (28 वर्ष) ची अज्ञात आरोपींनी तलवारीने गळा चिरुन हत्या केली.\nतर दूसऱ्या घटनेत जरीपटका पोलिस स्टेशनअंतर्गत बाजारात मंगळवारी मध्यरात्री समीर सलाम शाह (20 वर्ष) हा तरुण मित्रासह बाजारात बसला असताना 3 ते 4 अज्ञात आरोपीनी हल्ला करून जखमी केलं. आज पहाटे रुग्णालयात समीरचा मृत्यू झाला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nनागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या\nनागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या\nनागपुरात काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पहली घटना वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात घडली. अजय रामटेके (28 वर्ष) ची अज्ञात आरोपींनी तलवारीने गळा चिरुन हत्या केली.\nतर दूसऱ्या घटनेत जरीपटका पोलिस स्टेशनअंतर्गत बाजारात मंगळवारी मध्यरात्री समीर सलाम शाह (20 वर्ष) हा तरुण मित्रासह बाजारात बसला असताना 3 ते 4 अज्ञात आरोपीनी हल्ला करून जखमी केलं. आज पहाटे रुग्णालयात समीरचा मृत्यू झाला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=22&paged=2", "date_download": "2018-04-20T16:42:56Z", "digest": "sha1:CA7HUIUKNPHYCUFFD2NSURVNBYTLXYRN", "length": 20164, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "पाठपुरावा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 2", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nप्लास्टिक पिशवी, थर्माकोलचा कुडूसमध्ये मुक्त वापर.\nComments Off on प्लास्टिक पिशवी, थर्माकोलचा कुडूसमध्ये मुक्त वापर.\nप्रतिनिधी कुडूस, दि. ०९: प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट बाळगून राज्य सरकारने या वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात संपूर्ण बंदी केली असतांना कुडूस मध्ये मात्र खुलेआम विक्री व व्यापारी व ग्राहकात देवघेव सुरू आहे. कुडूस येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही पाऊल या प्लास्टिक ...\tRead More »\nवाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली\nComments Off on वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली\nप्रतिनिधी वाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही. प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा निर्णयच नगर ...\tRead More »\nबोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण\nComments Off on बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण\nवार्ताहर बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात ...\tRead More »\nरस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.\nComments Off on रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे येणारी एसटी बस सेवाअचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. जव्हार एसटी डेपोच्या देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या मार्गावरील बसेसमधून लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, ...\tRead More »\nजव्हार : आदिवासी शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.\nComments Off on जव्हार : आदिवासी शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) याच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे या नैराश्यातून हातेरी गावातील त्यांच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जंगली याने मागील वर्षी ठाणे बँक शाखा यांच्या शेतकरी सोसायटी मधून ४२ हजार २०७ रूपये कर्ज घेतला होते. मात्र ...\tRead More »\nवाडा: गाळा कंपनीच्या कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच\nComments Off on वाडा: गाळा कंपनीच्या कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच\nप्रतिनिधी कुडूस, दि. २८: कुठलीही पूर्व सूचना न देता वेतनात अचानक कपात केल्याने संतापलेल्या गाळा कंपनीतील कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशीही कंपनीने दखल न घेतल्याने सुरूच आहे. वाडा तालुक्यातील मुसारने ग्रामपंचायतीच्या हद्दीत गाळा (होराबिगर) नामक कंपनी असून या कंपनीत कॉम्प्रेसर, व्हीलचे पाटे यांचे उत्पादन केले जाते. सुमारे ६०० कामगार या कंपनीत कार्यरत आहेत. याती नऊ ...\tRead More »\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nComments Off on अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत. वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ...\tRead More »\nकोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी\nComments Off on कोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी\nप्रतिनिधी वाडा दि. २७ सद्दस्थितीत तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना कुडूस येथील कोकाकोला या शीतपेय बनविणाऱ्या कंपनी कडून होत असलेल्या पाणी उपश्याने येथील सर्व जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कोकाकोला कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी श्रमजीवीच्या वतीने करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाड्याचे तहसीलदार यांनायांना या सॅन दर्भात निवेदन दिले आहे. दर वर्षी वाडा तालुक्यातील आठ टंचाईग्रस्त गावांना ...\tRead More »\nमस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी\nComments Off on मस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी\nप्रतिनिधी मनोर, दि २५: मुंबई – अहमदाबाद महामार्गालगतच्या मस्तं नाक्यावर असलेल्या आशिष मोबाईल स्टोर नामक मोबाईल स्टोर नामक मोबाईलच्या दुकानात चोरटयांनी चोरी करत पाऊणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवार दि. २४ पहाटे हि घटना घडली असून चोरीचा हा प्रकार सी सी. टी. वी. मध्ये कैद झाली आहे. पहाटे दिड वाजेच्या सुमारास चोरटयांनी मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंगमधील आशिष मोबाईल ...\tRead More »\nजव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी\nComments Off on जव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी\nजव्हार नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधील पारस हॉटेलच्या बाजूला आणि प्रकल्प कार्यालयाच्या पाठीमागच्या गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सोय नव्हती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर रस्ता नसल्याने कोणतेही वाहन जात नव्हते. तसेच येथील नागरिकांना एखादे साहित्य किंवा समान आणायचे झाल्यास हे सामान मुख्य रस्त्यावर उत्तारून डोक्यावर मजुरांकरवी वाहून आणावे लागत असे. तसेच आपली स्व:ताची खाजगी ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vikalpsangam.org/article/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%97-in-marathi/", "date_download": "2018-04-20T16:33:30Z", "digest": "sha1:NZ3BJQGZWBA5FX6HS33ZBMS33HLJURVM", "length": 9403, "nlines": 91, "source_domain": "vikalpsangam.org", "title": "एकमेव मार्ग (in Marathi) | Vikalp Sangam", "raw_content": "\nएकमेव मार्ग (in Marathi)\nBy नीमा पाठक ब्रूम (अनुराधा अर्जुनवाडकर द्वारा अनुवादित) on Jan. 6, 2016 in Politics\nविकल्प संगम साठी लिहिले आहे\nगडचिरोली जिल्ह्यातील ग्राम सभांची एकत्रित सभा १६ डिसेंबर रोजी गिरोला (गडचिरोली जिल्हा) येथे झाली. कृपया सोबत जोडलेले फोटो व सभेचा वृतांत पहा. या सभेची ठळक वैशिष्ट्ये पुढे देत आहे\nसभेत बोलतांना गडचिरोली जिल्हा परीषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनकर पेसा कायद्याच्या तरतुदी सांगतांना. सोबतच मंचावर उपस्थित सर्व तालुक्यातून निवड केलेले सभेचे अध्यक्ष\nग्रामसभांच्या जिल्हास्तरीय सभेला उपस्थित झालेले जिल्ह्यातील विविध पक्ष, संगठना, संस्था यांचे मान्यवर, उपस्थित पत्रकार.\nपेसा व वन अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी शिवाय, व गाव-गणराज्य ग्राम सभा निर्माणाशिवाय मार्ग नाही\nसंपूर्ण भारतातील पेसा व वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी विषयी जिल्ह्यातील ग्राम सभांची ऐतिहासिक सामुहिक सभा.\nग्राम सभा सभासदांना या एकत्र सभेला येण्यापासून रोखण्याकरिता पोलिस प्रशासनाने केलेल्या दडपशाहीचा या सभेत निषेध करण्यात आला.\nपोलिसांच्या दडपशाहीला झुगारून गडचिरोली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील एकूण २९५ ग्राम सभांचे सभासद या सभेला उपस्थित राहिले. ३०० पेक्षा अधिक अन्य ग्राम सभांच्या सभासदांना सभेला येऊच दिले गेले नाही.\nलोकप्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी सभेत सहभागी झाले होते.\nप्रस्तावित व पारित करण्यात आलेले ठराव :\nजिल्ह्यातील ग्राम सभांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांच्या संसाधनांची लूट थांबवण्यासाठी बांबूचे न्यूनतम दर निश्चित करण्यात आले. उपरोक्त दरापेक्षा जास्त दाराची मागणी ग्राम सभा करू शकतात.\nवन अधिकारांवर दावे नोंदवण्यासाठी ग्राम सभांना मदत करण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले आहे. आता प्रशासनाने त्यांच्याकरिता पुढाकार घेऊन त्वरित दावे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी व उपविभागीय वन हक्क समिती व जिल्हा वन हक्क समितीकडे प्रलंबित दावे त्वरित व निर्धारित मुदतीत निकाली काढावेत.\n'महाराष्ट्र ग्राम वन नियम २०१४' रद्द करावेत.\nजिल्ह्यातील सर्व प्रस्तावित लोकविरोधी खाण प्रकल्प रद्द करण्यात यावेत.\nदेशातील आदिवासी लोकांना मूळ निवासी म्हणून मान्यता द्यावी व त्या संदर्भातील संविधानिक तरतूद करण्यात यावी.\nअधिक माहितीसाठी महेश राऊत यांच्याशी ईमेल वरून संपर्क साधावा सभेला उपस्थित जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २९५ ग्रामसभा, व हजारोचा जनसमुदाय. प्रस्तावावर मतदान घेवून ठराव पारित करतानाचे क्षणचित्र.\nलोकांनी घेतलेले, लोकांचे, लोकांसाठीचे निर्णय (in Marathi)\nहमारे गाव में हम ही सरकार (in Hindi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:20:55Z", "digest": "sha1:M7VAVZJV3UH3AIUGQQ2PPHZBVEFGQNQM", "length": 5801, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गीताई अध्याय पाचवा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गीताई अध्याय पाचवा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय पाचवा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गीताई अध्याय पाचवा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गीताई अध्याय पाचवा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय पाचवा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गीताई अध्याय पाचवा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गीताई अध्याय पाचवा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_-_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A8_-_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-20T16:20:36Z", "digest": "sha1:Q6CECU46FFRQADNW3W5EDDZASL64PPPQ", "length": 39494, "nlines": 79, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "शोधयंत्राचा शोध - भाग २ - इतिहास - विकिबुक्स", "raw_content": "शोधयंत्राचा शोध - भाग २ - इतिहास\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nशोधयंत्रांचा इतिहास विश्वजालाशीच निगडीत असल्याने आपण थोडक्यात विश्वजालाचा इतिहास बघूया.\n१९८९ साली स्वित्झर्लंडमधल्या एका अणुशक्तीसंशोधनाच्या प्रयोगशाळेत तिथली माहिती इतरांनाही महाजालावरून सहजपणे उपलब्ध व्हावी ह्या उद्देशातून तिथले एक संशोधक डॉ. टिम बर्नर्स-ली ह्यांनी विश्वजालाचा (वर्ल्ड-वाईड-वेब) शोध लावला. महाजाल (इंटरनेट) आधीच उपलब्ध होते, परंतु त्यावर माहिती वेगवेगळ्या पद्धतीत (प्रोटोकॉल्स) उपलब्ध होती. ह्या सगळ्या पद्धती एकत्रितरीत्या उपलब्ध करून द्याव्यात ह्या उद्देशातून विश्वजालाचा उगम झाला. ह्या शोधात महत्वाची ठरलेली संकल्पना म्हणजे आपण आज सहजरीत्या देतो तो दुवा.\nह्या दुव्यात तीन महत्वाचे भाग असतात. कुठल्या पद्धतीने त्या दुव्याला मिळवायचे (प्रोटोकॉल), कुठून मिळवायचे (महाजाळावरचे कुठले यंत्र), आणि काय मिळवायचे (त्या यंत्रावरील ठिकाण). उदाहरणार्थ, हा दुवा बघा. http://www.manogat.com/user/5238. यातील http म्हणजे ह्या दुव्याला कसे पोहोचायचे ती पद्धती. www.manogat.com हे महाजाळावरील ज्या यंत्रात हा दुवा साठवला आहे, ते यंत्र. आणि /user/5238 हे ढोबळरूपाने त्या यंत्रावरील ठिकाण म्हणायला हरकत नाही. १९९२ च्या सुमारास इतर ठिकाणीही ह्या शोधाचे बरेच उपयोग लक्षात येण्यास सुरुवात झाली. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात मार्क ऍंड्रीसन आणि एरिक बीना ह्या दोन विद्यार्थ्यांनी फावल्या वेळात एक न्याहाळक (ब्राउझर) तयार केला. विश्वजाळावरची माहिती संगणकावर कशी प्रस्तुत करावी याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला नाव दिले \"मोझैक\". ही घटना विश्वजालाच्या इतिहासात इतकी महत्वाची आहे, की इलिनॉयच्या विद्यापीठात ह्या मोझैकच्या स्मृतिपर खालील फलक लावलाय.\nत्याच सुमारास इलिनॉयमधल्याच रॉब मॅककूल हयांनी विश्वजालासाठी सेवादात्याची (सर्वरची) निर्मिती केली. आणि तोही फुकट वाटायला सुरुवात केली.\n१९९२मध्ये मोझैक अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांत लोकप्रिय झाले होते. सिलिकॉन व्हॅलीतल्या सिलिकॉन ग्राफिक्स ह्या संस्थेच्या संस्थापकांना, जिम क्लार्कना, ह्या न्याहाळकाचे अनेक व्यावसायिक फायदे दिसू लागले. त्यांनी ऍंड्रीसन आणि बीनाला इलिनॉयमधल्या अर्बाना-शॅंपेनमधून त्यांच्या कॅलिफोर्नियातल्या माऊंटन-व्ह्यू ह्या गावी नेले, आणि एक नवीन संस्था स्थापन केली. तिचे नाव नेटस्केप. नेटस्केपने त्यांचा न्याहाळक १९९४ मध्ये फुकट वाटायला सुरुवात केली. आणि आज आपल्याला अतिपरिचित असणाऱ्या विश्वजालाचा जन्म झाला. नव्हे ते अशक्त बाळ चांगले गुटगुटीत झाले.\nआधी म्हटल्याप्रमाणे, विश्वजालाचा परिचय अमेरिकेतील (आणि युरोपातीलही) अनेक विद्यापीठांत विद्यार्थ्यांना आधीच झाला होता. सिलिकॉन व्हॅलीतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थी जेरी यॅंग आणि डेव्हिड फायलो, यांनी त्यांना आवडलेल्या दुव्यांचे संकलन सगळ्यांना बघायला मिळावे म्हणून आपल्या वसतीगृहातल्या खोलीतल्या संगणकावर एक संकेतस्थळ उघडले. त्याचे नाव आपल्याला आता परिचित असेलच. ते स्थळ म्हणजे 'याहू'. विश्वजाळातून आपल्याला अर्थप्राप्ती होऊ शकते, हा सूज्ञ विचार करून येथील आद्य गुंतवणूकदारांनी (व्हेंचर कॅपिटलिस्टस) यॅंग आणि फायलो ह्यांच्याशी संधान बांधले. आणि याहू'. विश्वजाळातून आपल्याला अर्थप्राप्ती होऊ शकते, हा सूज्ञ विचार करून येथील आद्य गुंतवणूकदारांनी (व्हेंचर कॅपिटलिस्टस) यॅंग आणि फायलो ह्यांच्याशी संधान बांधले. आणि याहू ही संस्था १९९५ मध्ये जन्माला आली.\nविश्वजालावरील संकेतस्थळांची संख्या जोरात वाढत होती. कधीकधी तर दिवसाला दुप्पट व्हायची ही संख्या. अशा सगळ्या संकेतस्थळांची नोंद कशी करणार ह्यावर फायलोने उपाय काढला. कुणीही नवीन संकेतस्थळ तयार केले, की ह्या संकेतस्थळाचा दुवा याहू ह्यावर फायलोने उपाय काढला. कुणीही नवीन संकेतस्थळ तयार केले, की ह्या संकेतस्थळाचा दुवा याहू मध्ये त्या संकेतस्थळचालकाने टाकावा अशी सोय केली. अशा दुव्यांची संख्या दहा हजारापेक्षाही जास्त झाली. याहू मध्ये त्या संकेतस्थळचालकाने टाकावा अशी सोय केली. अशा दुव्यांची संख्या दहा हजारापेक्षाही जास्त झाली. याहूच्या मुखपृष्ठावर ती मावेना. म्हणून त्यांचे विषयानुसार वर्गीकरण करायला सुरुवात केली. आणि याहूची विश्वजाल-निर्देशिका (वेब-डिरेक्टरी) जन्माला आली. स्वत:च्या संकेतस्थळाची जाहिरात करण्यासाठी याहूच्या मुखपृष्ठावर ती मावेना. म्हणून त्यांचे विषयानुसार वर्गीकरण करायला सुरुवात केली. आणि याहूची विश्वजाल-निर्देशिका (वेब-डिरेक्टरी) जन्माला आली. स्वत:च्या संकेतस्थळाची जाहिरात करण्यासाठी याहूशिवाय इतर पर्याय नव्हता. त्यामुळे प्रत्येक संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळाचा दुवा आणि त्याविषयी माहिती याहूशिवाय इतर पर्याय नव्हता. त्यामुळे प्रत्येक संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळाचा दुवा आणि त्याविषयी माहिती याहूवरील विषयानुरूप ठिकाणात टाकायला लागला.\nचे मुखपृष्ठ पाहिले असेल. पण मला ११ वर्षांपूर्वीचे, मी इलिनॉय विद्यापीठांत शिकत असतानाचे याहू\nआज नवीन कुठली संकेतस्थळे उपलब्ध आहेत हे कळावे, म्हणून मी याहूला रोज भेट देत असे. त्याच वेळी लक्षात आले, की नवीन संकेतस्थळांची घोषणा करताना त्या संकेतस्थळांचे चालक त्यांच्या स्थळांची नोंदणी, जे लोकप्रिय विभाग आहेत, त्यात करायला लागले होते. माहितीला इतके स्वातंत्र्य पहिल्यांदाच मिळालेले होते. त्यामुळे 'सेक्स' ह्या विषयासंबंधी संकेतस्थळे शोधण्यासाठी चिकार गर्दी व्हायची. याहूला रोज भेट देत असे. त्याच वेळी लक्षात आले, की नवीन संकेतस्थळांची घोषणा करताना त्या संकेतस्थळांचे चालक त्यांच्या स्थळांची नोंदणी, जे लोकप्रिय विभाग आहेत, त्यात करायला लागले होते. माहितीला इतके स्वातंत्र्य पहिल्यांदाच मिळालेले होते. त्यामुळे 'सेक्स' ह्या विषयासंबंधी संकेतस्थळे शोधण्यासाठी चिकार गर्दी व्हायची. याहूच्या संस्थापकांनी त्यामुळे हा विभाग वेगळा निर्मिलेला होता. ह्या विषयावर सगळ्यांची नजर आहे हे पाहून अनेकांनी आपले संकेतस्थळ 'सेक्स' ह्या विषयावर आहे असे याहूच्या संस्थापकांनी त्यामुळे हा विभाग वेगळा निर्मिलेला होता. ह्या विषयावर सगळ्यांची नजर आहे हे पाहून अनेकांनी आपले संकेतस्थळ 'सेक्स' ह्या विषयावर आहे असे याहूत नमूद करून प्रेक्षकांना आपल्या स्थळाकडे ओढण्याचा प्रयत्न केलात नमूद करून प्रेक्षकांना आपल्या स्थळाकडे ओढण्याचा प्रयत्न केला. संकेतस्थळांच्या गैरवापराचा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पहिलाच प्रयत्न असावा.\nहे सगळे इतक्या विस्तृतपणे लिहिण्याचे कारण की आजही शोधयंत्रांना गंडवण्याचे असे प्रयत्न वारंवार होत असतात. त्याचा इतिहास ११ वर्षे जुना आहे. जवळपास विश्वजालाच्या उगमाइतकाच जुना. असो. त्यावर उपाय म्हणून याहूने बऱ्याच लोकांची नेमणूक केली. कशासाठीने बऱ्याच लोकांची नेमणूक केली. कशासाठी हे संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळांची ज्या विषयासंबंधित आहेत ही जाहिरात करतात, ते खरेच आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी. त्याकाळी मला याहू हे संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळांची ज्या विषयासंबंधित आहेत ही जाहिरात करतात, ते खरेच आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी. त्याकाळी मला याहूकडून विरोप आलेला आठवतोय. \"तुम्हाला विश्वजालावर भटकायला आवडते काकडून विरोप आलेला आठवतोय. \"तुम्हाला विश्वजालावर भटकायला आवडते का तसे असल्यास आमची आस्थापना(कंपनी) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला त्यासाठी भरपूर पैसेदेखील मिळतील तसे असल्यास आमची आस्थापना(कंपनी) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला त्यासाठी भरपूर पैसेदेखील मिळतील\" असे हे विरोप. मी ते विरोप क्षणाचाही विचार न करता का काढून टाकलेत, याबद्दल अजूनही अधूनमधून खेद करीत असतो. असो. \"कोई गल नही\" असे हे विरोप. मी ते विरोप क्षणाचाही विचार न करता का काढून टाकलेत, याबद्दल अजूनही अधूनमधून खेद करीत असतो. असो. \"कोई गल नही\nमध्ये वर्गीकृत केलेला संकेतस्थळांच्या दुव्यांचा साठा वाढत गेला, तसतसे लोकांना त्यांच्या आवडीच्या विषयांवरील संकेतस्थळ शोधणे कठीण होऊ लागले. म्हणून याहूने एक अगदी मूलभूत स्वरूपाचे शोधयंत्र तयार केले. त्यात तुम्ही तुम्हाला हवा असणारा विषय शब्दरूपात टंकित केला, की याहूने एक अगदी मूलभूत स्वरूपाचे शोधयंत्र तयार केले. त्यात तुम्ही तुम्हाला हवा असणारा विषय शब्दरूपात टंकित केला, की याहूच्या निर्देशिकेत, ते शब्द ज्या संकेतस्थळांच्या दुव्यांत किंवा संकेतस्थळचालकांनी दिलेल्या माहितीत असतील, ते दुवे उत्तरादाखल यायचे. त्यामुळे संकेतस्थळचालक माहितीत लोकप्रिय शब्द मुद्दाम लपवून ठेवायचे. बहुतांश संकेतस्थळे एच-टी-एम-एल ह्या भाषेत असतात. त्या भाषेत लिहिताना शब्द शोधयंत्रांना दिसतील पण वाचकांना दिसणार नाही अशी 'मेटा' माहितीची सोय असते. त्यात हे लोकप्रिय शब्द दडवून ठेवायचे हे लोक. आणि त्यावेळचे हे मठ्ठ शोधयंत्र ह्या 'मेटा' शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवायचे. आणि लोकप्रिय शब्द शोधखिडकीत टंकित केला, की त्या संकेतस्थळाचा दुवा सर्वात वर असायचा.\nआपण जे शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्याला कधीच सापडत नाही. इतर अनावश्यक माहितीच जास्त दिसते, असे वाटून लोकांचा ह्या शोधयंत्रावरचा विश्वास पूर्णपणे उडाला.\nह्याच काळात विश्वजालावर माहिती शोधणे अधिक सोपे पडावे म्हणून अनेक तल्लख मेंदू विविध प्रकारे कार्यरत होते, त्याची माहिती पुढच्या भागात.\n[गृहपाठ: गेल्यावेळचा गृहपाठ केलाय का नसेल तर तो आधी करा. केला असल्यास, जगात सर्वात जास्त शोध घेतला जाणारा शब्द कुठला असेल असे तुम्हाला वाटते नसेल तर तो आधी करा. केला असल्यास, जगात सर्वात जास्त शोध घेतला जाणारा शब्द कुठला असेल असे तुम्हाला वाटते कल्पना नसल्यास गूगल झीटगाईस्ट बघा. झीटगाईस्ट ह्या मूळ जर्मन शब्दाचे स्पेलिंग माहिती नसेल तर तुम्हाला जे स्पेलिंग वाटते ते शोधयंत्रात टंकित करा. त्या स्पेलिंगच्या जवळपासची स्पेलिंग ते शोधयंत्र सुचवते आहे का कल्पना नसल्यास गूगल झीटगाईस्ट बघा. झीटगाईस्ट ह्या मूळ जर्मन शब्दाचे स्पेलिंग माहिती नसेल तर तुम्हाला जे स्पेलिंग वाटते ते शोधयंत्रात टंकित करा. त्या स्पेलिंगच्या जवळपासची स्पेलिंग ते शोधयंत्र सुचवते आहे का नसल्यास, त्या शोधयंत्राला मनसोक्त शिव्या घाला. अर्थात जवळ कुणी नाहीत हे बघून. १९९५ मध्ये सेक्स हा शब्द एखाद्याने एस-ई-के-एस असा टंकित केल्यावर त्याला त्या काळच्या शोधयंत्रांतून एकही उत्तर न मिळाल्यामुळे किती उद्विग्नता आली असेल ह्यावर विचार करा ]\nशोधयंत्राचा शोध - भाग ३ - इतिहास (पुढे चालू)[संपादन]\nआपण गेल्यावेळी बघितले, की याहूने विश्वजाल-निर्देशिका सुरू केल्यावर हजारो संकेतस्थळांनी तिथे नोंदणी केली. संकेतस्थळचालकांनी तिचा गैरवापर सुरू केला. त्यावर उपाय म्हणून याहूने विश्वजाल-निर्देशिका सुरू केल्यावर हजारो संकेतस्थळांनी तिथे नोंदणी केली. संकेतस्थळचालकांनी तिचा गैरवापर सुरू केला. त्यावर उपाय म्हणून याहूच्या संस्थापकांनी खूप लोक नियुक्त करून ती संकेतस्थळे योग्य विभागात टाकण्याची सोय केली.\nपरंतु, संकेतस्थळे जसजशी वाढू लागलीत, तसतशी कुण्या एका संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोंदी ठेवता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. संगणकाधारीत तंत्रज्ञानाची ही जुनीच समस्या होती. ह्याला म्हणतात वाढक्षमता (स्केलेबिलिटी). तुमच्या सेवेची तत्परता तुमच्या सदस्य संख्येनुसार वाढतेय की नाही, हे ठरवण्याचे मुख्य साधन. आणि विश्वजालाचे दोन प्रकारचे सदस्य आहेत. माहिती देणारे, आणि माहिती घेणारे. विश्वजाल ही दाता-याचक संस्कृती आहे. कुणी देतो, तेव्हाच घेणारे उपलब्ध असतात. आणि कुणी घेतो, तेव्हा देणारे उपलब्ध असतात. याहूच्या ह्या दोन्ही प्रकारच्या सदस्यांना निर्देशिका प्रकाराचे न्यूनत्व जाणवायला लागले.\nजेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हाच समस्यांची उकल करणारेही त्या समस्येविषयी उत्सुक होतात. समस्या नसताना ती सोडवणाऱ्यांना मूलभूत संशोधक (बेसिक रीसर्चर्स) अशी संज्ञा मिळते. समस्या आल्यावर किंवा येणार असे वाटल्यास ती सोडवणाऱ्यांना उपयुक्त संशोधक (अप्प्लाईड रीसर्चर्स) अशी संज्ञा मिळते\nविश्वजालाच्या व्याप्तीमुळे आपल्याला हवी असलेली माहिती कशी शोधावी, अशी समस्या निर्माण होण्याआधीच काही संशोधकांनी ह्यावर उपाय शोधून काढला होता. त्यातले मुख्य म्हणजे एम.आय.टी. (मसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ह्या अग्रगण्य तंत्रज्ञान संस्थेतील एक संशोधक, मॅथ्यू ग्रे. १९९३ मध्येच, म्हणजे विश्वजाळ लोकप्रिय होण्याआधीच, त्यावरील माहिती शोधून काढणे नंतर कठीण होईल, ह्या विचारांतून त्यांनी शोधयंत्रासारखे काहीतरी आवश्यक असेल म्हणून एक विश्वजाळ संचारक (वर्ल्ड वाईड वेब क्रॉलर) निर्माण केला. ह्याचे काम काय, तर त्यावेळी ऊर्जितावस्थेत असलेल्या विश्वजाळावर आपसूक संचार करायचा, आणि तिथले दुवे शोधून काढायचे. अशा लाखो दुव्यांचा त्यांनी साठा करून ठेवला होता. तोही कुठल्याही खऱ्याखुऱ्या व्यक्तीला मधे न घुसडता, फक्त संगणकाकरवी.\nह्या वरवर सामान्य दिसणाऱ्या गोष्टीत मलातरी एक अत्यंत महत्वाचे तत्व वापरलेले दिसून येते. ते म्हणजे, कुठल्याही बाबतीत मानवाची गरज भासली, की त्या बाबीची वाढक्षमता (स्केलेबिलिटी) कमी होते. त्याचा थोडा खुलासा करतो. तुम्ही एखादी कंपनी स्थापित केली. समजा की ती कंपनी सर्वसाधारण माणसांकडून पैसे घेणार, आणि ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज म्हणून देणार आहे. (ह्या संस्थेला आपण पतपेढी अथवा बॅंक म्हणतो.) त्याच्यात जितकी जास्त माणसांची मध्यस्थी, तितकी त्या कंपनीची वाढक्षमता कमी असेल. कारण माणसाला असतो एकच मेंदू. आणि दिवसाला दहा-बारा तास काम केल्यावर तो मेंदू थकून जातो. त्याच्याने पुढे काम होत नाही, किंवा जे काम होते त्याचा दर्जा कमी होतो. आणि एकदा नियम ठरवून दिलेले असले, की त्या नियमाच्या चौकटीत राहून सतत तेच करत राहणे मानवी मेंदूला पटत नसावे. कारण त्या चौकटीत राहून सतत काम केल्याने मेंदूची क्षमता, त्याला चालना न मिळाल्यामुळे, हळूहळू कमी होत असते. तेच काम संगणकाला करायला दिले, की मानवी मेंदू स्वत:साठी उपयुक्त अशी प्रतिभाशाली कामे करू शकतो.\nहे तुम्हाला पटो किंवा न पटो. पण माणसाची मध्यस्थी न ठेवता संगणकाकरवी संकेतस्थळांचे वर्गीकरण करावे ही कल्पना १९९३ मध्ये ह्या तत्वज्ञानातूनच उदयास आली.\nडिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन (इंग्रजी आद्याक्षरानुसार, तिचे संक्षिप्त रूप, डेक) ह्या अमेरिकेच्या उत्तर पूर्वेतील मसॅच्युसेट्स राज्यातील कंपनीने १९६०-७० च्या दशकात संगणक निर्मितीतील एका बलाढ्य संस्थेला, आयबीएम ला, त्यांच्याच आखाड्यात हरवले होते. आयबीएम अजस्त्र संगणकांचे (मेनफ्रेम्स) निर्माता. १९५० पासून त्यांची ह्या क्षेत्रात आघाडी होती. संगणक म्हटलं की आयबीएम अशी परिस्थिती होती. त्यामुळे आयबीएम मुजोर झाली होती. डेकने मात्र आयबीएमच्या मुजोरीला आव्हान दिले. आयबीएम पेक्षा कमी किमतीत आणि छोट्या आकाराचे संगणक (पीडीपी, व्हॅक्स ह्या नावाने) बाजारात विकायला सुरुवात केली. लघुसंगणक (मिनिकॉंप्युटर) ह्या संज्ञेखाली विकल्या जाणाऱ्या ह्या संगणकांचा आकार आपल्याला आजच्या मानाने अजस्त्र वाटेल, कारण हे लघुसंगणक आपल्या मोठ्यात मोठ्या शितकपाटाच्या (रेफ्रिजरेटरच्या) दुप्पट आकाराचे होते. पण त्यावेळचे आयबीएमचे संगणक एक पूर्ण मोठी खोली व्यापायचे, त्यापेक्षा हे पीडीपी छोटेच होते.\nह्या लघुसंगणकांच्या यशामुळे डेक ही एक श्रीमंत आणि बलाढ्य संस्था बनली होती. १९७६-७७ मध्ये ऍपल नावाच्या एका संस्थेने ह्या लघुसंगणकांपेक्षाही छोटा असा स्वीय संगणक तयार करेपर्यंत, आणि १९८१ मध्ये आयबीएमने (होय तीच अजस्त्र संगणक निर्माती आयबीएम) त्यांचा स्वीय संगणक लोकप्रिय करेपर्यंत. त्यानंतर डेक देखील आयबीएम सारखेच स्वीय संगणक निर्माण करू लागली. पण तोपर्यंत जमलेल्या मायेतून ह्या संस्थेने अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सिलिकॉन व्हॅलीत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जवळ पालो आल्टो गावात दोन संशोधन केंद्रे उघडली होती. त्यात संगणक विज्ञानातल्या उत्कृष्ट संशोधकांपैकी काहीजण काम करत होते. १९८४-८५ च्या सुमारास आयबीएम स्वीय संगणकांची नक्कल करून अमेरिकेतील दक्षिणेकडील टेक्सास राज्यातील दोन कंपन्यांनी स्वीय संगणक अत्यंत स्वस्तात बनवायला आणि विकायला सुरू केली. त्या संस्था म्हणजे कॉम्पॅक, आणि डेल. त्यामुळे डेकच्या धंद्यावर आणखीच जास्त ताण पडायला लागला. आयबीएम, कॉम्पॅक आणि डेल च्या स्वीय संगणकात सिलिकॉन व्हॅलीतील सॅंटा क्लॅरा येथील इंटेल ह्या कंपनीने बनवलेला मुख्य सूक्ष्मप्रक्रीयक (मायक्रोप्रोसेसर, संगणकाचा मेंदू) वापरला जायचा. म्हणून डेकने त्यांना आव्हान दिले ते त्यांचा स्वत:चा अल्फा नावाचा प्रक्रीयक बनवून. जगातल्या उच्चतम संगणक अभियंत्यांनी बनवलेले यंत्र ते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होते. (ह्या अल्फाच्या मुख्य आरेखकांपैकी - डिझायनर्सपैकी - एक माझे आडनावबंधू डॉ. दिलीप भांडारकरही होते. ते आता इंटेलमध्ये आहेत.)\nहे सगळे शोधयंत्राबद्दलच्या लेखात कशाला सांगताय मला हा प्रश्न समस्त वाचकवर्गाकडून ऐकू येतोय. जरा धीर धरा. संगणकजगतात वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी अशा एकमेकांत गुंतलेल्या असतात.\nतर डेकचा अल्फा हा प्रक्रियक तांत्रिकदृष्ट्या जरी उत्कृष्ट असला, तरी लोकप्रिय स्वीय संगणकात त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. कारण मायक्रोसॉफ्ट विंडोजची घरच्या वापरासाठी स्वस्तात मिळणारी आवृत्ती त्यावर चालत नव्हती. मायक्रोसॉफ्टने सेवादात्यांसाठी जी विंडोज एनटी ही नियंत्रण प्रणाली होती, त्याची एक आवृत्ती अल्फा साठी काढली. पण त्यात असंख्य त्रुटी होत्या. त्यामुळे अल्फा वर आधारीत संगणकांचा खप अत्यंत कमी व्हायला लागला. तेवढ्यात डेकच्या चालकांना ह्या विश्वजाळाच्या ‘खुळाविषयी’ कळले. विश्वजाळाच्या यंत्रणेत अल्फाचा वापर झाला, तर अल्फाचा खप वाढेल, असे त्यांना वाटले. डेकमधल्या सर्व संशोधकांचा त्यावर विचार सुरू झाला. त्यासाठी त्यांच्या बैठकी सुरू झाल्या.\nडेकच्या पालो आल्टो मधल्या संशोधन केंद्रातील पॉल फ्लॅहर्टी यांनी सहज बोलता बोलता म्हटले, की आपला अल्फा प्रक्रियक इंटेल पेक्षा स्मृतिमंजुषा (मेमरी) चांगली हाताळतो. त्यामुळे विश्वजाळावरच्या ज्या कार्यांना जास्त स्मृतीची गरज असते, त्यांत अल्फाचा खूपच उपयोग होईल. आपण अल्फावर याहूसारखे एक शोधयंत्र बनवायला हवे. कंपन्यांमधल्या बैठकी म्हटल्या की अर्धेअधिक सभासद झोपलेले (किंवा डुलक्या घेत) असतात. पण सुदैवाने लुई मोनिए आणि माईक बरोज ह्या बैठकीत जागे होते. त्यांनी पॉलचे म्हणणे मनावर घेतले, आणि डिसेंबर १५, १९९५ ला 'आल्टाव्हिस्टा'चा जन्म झाला.\nआल्टाव्हिस्टा ह्या संस्थेचे शोधयंत्राच्या इतिहासात अग्रणी स्थान आहे. 'आल्टाव्हिस्टे रचिला पाया, गूगल झालासे कळस' असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पुढच्या लेखांत आपण आल्टाव्हिस्टा आणि इंकटुमी ह्या कंपन्यांनी आधुनिक शोधयंत्रांचा पाया कसा रचला ते बघूया.\n[गृहपाठ: आल्टाव्हिस्टा ह्या कंपनीचा विश्वजाळात कुठल्याही शोधयंत्रांवरून शोध घ्या. ही कंपनी डेक पासून वेगळी कधी झाली ती नंतर ओव्हर्चर ह्या संस्थेत विलीन झाली. ओव्हर्चर ह्या संस्थेचा शोध घ्या. ती कंपनी २००३ मध्ये याहू ती नंतर ओव्हर्चर ह्या संस्थेत विलीन झाली. ओव्हर्चर ह्या संस्थेचा शोध घ्या. ती कंपनी २००३ मध्ये याहूत विलीन झाली. अशा जुन्या कंपन्यांची मुखपृष्ठे इंटरनेट आर्काईव्ह ह्या स्थळावर सापडू शकतील. नक्की बघा. डेक ही कंपनी कॉम्पॅक ने विकत घेतली. मग कॉम्पॅक ही कुणी विकत घेतलीत विलीन झाली. अशा जुन्या कंपन्यांची मुखपृष्ठे इंटरनेट आर्काईव्ह ह्या स्थळावर सापडू शकतील. नक्की बघा. डेक ही कंपनी कॉम्पॅक ने विकत घेतली. मग कॉम्पॅक ही कुणी विकत घेतली शोधा, म्हणजे सापडेल. मी ह्या लेखात कुठलेही दुवे दिलेले नाहीत हे लक्षात घ्या. हे जाणूनबुजून केले आहे. मी दुवे देण्या ऐवजी, तुम्ही ते शोधयंत्र वापरून शोधावे ही यामागील भूमिका.]\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१७ रोजी १९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=22&paged=3", "date_download": "2018-04-20T16:42:15Z", "digest": "sha1:M5BVSCK6PI56HLSKV5QSALDJSPIY46KQ", "length": 20954, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "पाठपुरावा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 3", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nशेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका\nComments Off on शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका\nविशेष प्रतिनिधी पालघर, दि. २५ : केंद्र सरकार बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प कोणासाठी राबवतेय. त्या बुलेट ट्रेनमध्ये नेमके बसणार आहे कोण असा सवाल करत पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कथित स्वप्न दाखवणारे हे प्रकल्प एकाच जिल्ह्यातून का नेले जात आहेत. येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून कथित विकास करू पाहणार असतील तर त्याविरोधात आपण संघर्ष करू असा ...\tRead More »\nउद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर\nComments Off on उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे उद्या, २४ मार्च रोजी डहाणू येथे येत असून ते विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. डहाणू औष्णिक विज प्रकल्पातील सभागृहात सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लोकांना उपलब्ध असतील. डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसू्चना रद्द करण्यासाठी अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या उपलब्धतेचा लोकांनी लाभ उठवावा असे आवाहन माजी ...\tRead More »\nबोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nComments Off on बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nबोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे बोईसर व त्या लगतच्या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे ...\tRead More »\nनिकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू\nComments Off on निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू\nप्रतिनिधी वाडा, दि. २०: तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस – चिंचघर- गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे बांधकाम प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. ...\tRead More »\nसूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण\nComments Off on सूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण\nवार्ताहर :, बोईसर दि. २० : आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील सूर्या धरणांमधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी न देता ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न हणून पाडण्यासाठी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने काल, सोमवारपासून पालघर येथील हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आजहा या उपोषणाचा दुसरा दिवस असून विविध संघटना व राजकीय पक्षांनी या ...\tRead More »\n1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला\nComments Off on 1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला\nकेंद्र सरकारच्या 1991 सालच्या डहाणू तालुक्यावर निर्बंध लादणाऱ्या अधिसूचनेबाबत दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर\nमोखाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहास मूलभूत सोयी-सुविधांसह कायम स्वरुपी इमारत मिळणार\nComments Off on मोखाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहास मूलभूत सोयी-सुविधांसह कायम स्वरुपी इमारत मिळणार\nमुंबई, दि. 05 : मोखाडा येथील जव्हार प्रकल्पांतर्गत असलेल्या मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहासाठी एक एकर जागा उपलब्ध झाली असून नविन इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत दिली. मोखाडा येथील मुलींच्या निवासी वसतिगृहाला ...\tRead More »\nमोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात, १३ गांवांमध्ये टंचाईसदृष परिस्थिती मात्र पुरवठा विभागाची हरकत\nComments Off on मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात, १३ गांवांमध्ये टंचाईसदृष परिस्थिती मात्र पुरवठा विभागाची हरकत\nदीपक गायकवाड-मोखाडा-तालुक्यात दरवर्षी माहे जाने – फेब्रूवारी पासुनच पाणी टंचाईला सुरूवात होत असते.चालु वर्षी १३ गांवांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात झालेली असून मौजे करोळ आणि वावळ्याचीवाडी येथे टिपवणं सदृष परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी पाणी टंचाई ग्रस्त गांवांची संख्या नव्वदीच्या घरात होती.या वर्षीही हा आकडा कायम रहाण्याचे चिन्हं आहेत.कारण हंगामी उपाययोजणे व्यतिरिक्त तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवांसाठी हुकमी उपाययोजणा केली जात ...\tRead More »\nप्रदुषणकारी कंपन्यांना नियंत्रण मंडळाचे अभय सुनावणी दरम्यान प्रांतांचे कानावर हात ; तक्रारदार हतबल\nComments Off on प्रदुषणकारी कंपन्यांना नियंत्रण मंडळाचे अभय सुनावणी दरम्यान प्रांतांचे कानावर हात ; तक्रारदार हतबल\nविशेष प्रतिनिधी वाडा, दि.१५: तालुक्यातील अबिटघर गावात औद्योगिक कारखान्यांच्या घातक प्रदुषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी प्रसंगी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल दिल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळ या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देते कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सुनावणी घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर ...\tRead More »\nगोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती\nComments Off on गोधडी शिवणे प्रशिक्षण योजनेद्वारे महिलांसाठी रोजगार निर्मिती\nप्रतिनिधी : जव्हार, दि. 23 : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी गोधडी शिवणे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद व महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असुन आजपासुन जव्हारसह जिल्ह्यातील 5 तालुक्यामंध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत तयार झालेल्या गोधड्या ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=22&paged=4", "date_download": "2018-04-20T16:42:23Z", "digest": "sha1:PPNR5DU5N4BBVORAGXWVY5ZZ6YJC2AWP", "length": 16152, "nlines": 108, "source_domain": "rajtantra.com", "title": "पाठपुरावा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 4", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nपालघर : बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nComments Off on पालघर : बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nपालघर दि. 16 : अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांची 9 महिन्यांपासुन थकीत असलेली बिले तात्काळ अदा करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. विविध बचत गटातील शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. अंगणवाड्यांमधील 6 वर्षांखालील मुलांना स्थानिक बचत गटांकडून खिचडी, उसळ, लापशी व लाडू आदींचा समावेश असलेला पोषण आहार ...\tRead More »\nबोईसर ग्रामपंचायतीच्या देणगी बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार\nComments Off on बोईसर ग्रामपंचायतीच्या देणगी बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार\nप्रतिनिधी पालघर, दि. 14 : तालुक्यातील औद्योगिकीकरणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीने सन 2007 मध्ये पाणीपुरवठा लाइन सुधारणा या नावाने उघडलेले बँक खाते कालांतराने लुप्त झाल्याचे उघडकीस आले असून या अचानकपणे ग्रामपंचायत दफ्तरी व्यवहारातून गायब झालेल्या बँकेच्या खात्यामधून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या बँक खात्याचे ऑडिट झालेले नसून या खात्यातील व्यवहाराच्या नोंदीही कॅशबुकमध्ये ...\tRead More »\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात असंतोष\nComments Off on डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात असंतोष\nडहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर 2017 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आल्याने पूर्ण निवडणूक कार्यक्रमाचा बोजवारा उडला आहे. लोकांना ऑनलाईन प्रक्रीयेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने नगरसेवकपदासाठी एकही अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकला नाही. राजकीय पक्षांनी कसरत करुन उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अनेक पक्षीय उमेदवारांना या गोंधळाचा फटका बसला व ...\tRead More »\nजव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत दिल्या जाणार्‍या नामांकित शाळा प्रवेशासाठी उकळले पैसे, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंदविण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी\nComments Off on जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत दिल्या जाणार्‍या नामांकित शाळा प्रवेशासाठी उकळले पैसे, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंदविण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी\nप्रतिनिधी जव्हार, दि. 05 : आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून नामांकित इंग्रजी शाळांची निवड करून गोरगरिब आदिवासी मुलांना अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. मात्र या शाळा प्रवेशासाठी मुलांच्या पालकांकडून पैशांची वसुली होत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेने केला असुन प्रवेशाच्या नावाखाली ...\tRead More »\nतारापूर एमआयडीसीतील जलवाहिनीला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nComments Off on तारापूर एमआयडीसीतील जलवाहिनीला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nवार्ताहर बोईसर, दि. 26 : तारापूर एमआयडीसीलगतच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला कुंभवली परिसरातील इपका फार्मासिटीकल कारखान्याजवळ गळती लागल्याने या जलवाहिनीत रासायनिक सांडपाणी मिश्रीत होऊन आजूबाजूच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सालवड, पास्थळ, पाम, टेंभी, नवापुर, नांदगाव, आलेवाडी, कोलवडे, कुंभवली आदी एमआयडीसीलगत असलेल्या गावांना एमआयडीसीतर्फेच पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या गावांना जलपुरवठा करणार्‍या सर्वच जलवाहिन्या एमआयडीसीतील कारखान्यांजवळूनच जातात. ...\tRead More »\nबँक व्यवस्थापकाला ग्राहकांचा घेराव सर्व्हर बंद असल्याने व्यवहार ठप्प\nComments Off on बँक व्यवस्थापकाला ग्राहकांचा घेराव सर्व्हर बंद असल्याने व्यवहार ठप्प\nप्रतिनिधी विक्रमगड, दि. २९ : प्रधानमंत्री जन-धन योजनेसाठी शून्य रक्कमेचे खाते उघडण्याचे काम राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे. या योजनेतंर्गत खाते खोलण्यासाठी तसेच पैशाचे व्यवहार करण्याबरोबरच मार्च अखेर असल्याने आयकर विभागाला रक्कम भरण्यासाठी विक्रमगड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बुधवारी ( दि. २९ ) ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र बॅंकेचे सर्व्हर बंद असल्याने दिवसभर कामकाजच ठप्प होते. त्यामुळे ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3036", "date_download": "2018-04-20T16:41:49Z", "digest": "sha1:53D4EO67QHLZ6EIFJSEF77BFHIKCYXHS", "length": 9734, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » संग्राह्य बातम्या » आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nआशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nडहाणू, दि. 30 : आदिवासी प्रग ती मंडळ संचलित कॉ. श्यामराव परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे अध्यक्ष ल. शि. कोम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक समितीचे सचिव कॉ. एल. बी. धनगर, संस्थेचे सचिव कॉ. बी. व्ही. मांगात, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, तलासरीच्या परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, आशागड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितिन वेडगा, मुख्याध्यापिका सौ. शितल भालेराव उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्षभरात विविध कला/क्रिडा स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता दाखविणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देखील कार्यक्रमाचा आनंद लुटला.\nPrevious: दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन\nNext: अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nकुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध\nडहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nपालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.casinophonebill.com/mr/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-04-20T16:47:12Z", "digest": "sha1:52FY4CGL7AFYRE3N2MQF5BWOEWZLLQEH", "length": 27707, "nlines": 220, "source_domain": "www.casinophonebill.com", "title": "एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके - आता शीर्ष बोनस ऑफर खेळू! |", "raw_content": "जागतिक ऑनलाइन आता खेळत ओलांडून खेळाडू सर्वोत्तम रोख खेळ पासून\nफोन कॅसिनो अनुप्रयोग विशेष - अनुप्रयोग मोफत येथे मिळवा\nफोन बिल रिअल पैसे स्लॉट प्ले | एसएमएस बोनस\nफोन कॅसिनो बोनस | सेल क्रेडिट ऑनलाइन | एसएमएस बोनस\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nफोन बिल खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव गुळगुळीत | अप्रतिम बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव | ब्रिटन च्या सर्वोत्तम मोफत प्ले साइट £ €\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nफोन स्लॉट | मोफत क्रेडिट बोनस प्ले | £ 5 + £ 10 + £ 200 ...\nकोणतीही अनामत आवश्यक नाही | स्लॉट फोन बिल करून द्या | जगातील शीर्ष प्रोमो\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | mFortune £ 105 मोफत\nSlotjar.com – लोकप्रिय अप £ 200 अतिरिक्त बोनस नाही ते\nExpressCasino £ $ € 200 मध्ये आपले स्वागत आहे\nशीर्ष 20 फोन बिल कॅसिनो\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nCoinFalls कॅसिनो रोख पॉवरहाऊस | 5+£ € $ 505 मोफत\nऑनलाइन स्लॉट बोनस रिअल पैसे | StrictlySlots.co.uk £ 500 ऑफर\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 350+ खेळ + £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nमोबाइल स्लॉट फोन कॅसिनो | TopSlotSite £ 800 ठेव बोनस\nLucks कॅसिनो £ 200 ठेव बोनस\nमोफत ठेव मोबाइल कॅसिनो बोनस - Slotmatic अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट नाही ठेव बोनस साइट | LiveCasino.ie € 200 बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो पे - Slotmatic ऑनलाईन\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nयूके मोबाइल कॅसिनो स्लॉट - छान ऑनलाइन प्ले करा £ 200 ऑफर\nबिल करून फोन स्लॉट ऑनलाईन - SlotsMobile कॅसिनो मोफत नाही\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल स्लॉट करून द्या | SlotFruity.com £ 5 मोफत ठेव\nस्लॉट फोन बिल करून द्या\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\n£ 5 मोफत मोबाइल कॅसिनो द्या फोन बिल जमा | PocketWin\nश्री स्पिन कॅसिनो – 50 मोफत नाही\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\n£ 20 बोनस स्लॉट कॅसिनो ठेव एसएमएस किंवा बीटी लँडलाईन फोन बिल करून| Ladyluck च्या\nठेव एसएमएस & बीटी फोन बिल लँडलाईन कॅसिनो | मोबाइल गेम्स\nलँडलाईन ऑनलाइन जुगार हाऊस फोन बिल वापरणे | बोनस विशेष\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nजुगार स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | नोंदणी 4 ऊर £ 65 बोनस\nऑनलाइन स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | 650% ठेव बोनस\nKerching बोनस | फोन कॅसिनो स्लॉट द्या £ 10, £ 75 खेळा\nPayforit कॅसिनो मोबाइल फोन बिल जुगार\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ फोन बिलिंग अनुप्रयोग & ठेवी\nव्हीआयपी कॅसिनो मोफत बोनस सौदे | रोख Comp पॉइंट्स\nफोन मधूर स्लॉट Pocket\nSMS सह Blackjack अनुप्रयोग & लँडलाईन ठेव\nफोन बिल अॅप्स द्वारे निर्विकार द्या\nश्री स्पिन कॅसिनो 50 मोफत नाही\nफोन बिल करून ओळखपत्र द्या\nकोणतीही अनामत बोनस | रिअल पैसे चॉईस £ 100 च्या मोफत\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nघर » एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके – आता शीर्ष बोनस ऑफर खेळू\nस्वत: निवडलेल्या करा व्हीआयपी देते येथे\nप्रथम नवीनतम सामग्री मिळवा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर.\nसुंदर फोन बिल स्लॉट निवड\nफोन वेगास - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200\nSlotsLTD.com सर्वोत्तम स्लॉट खेळ चॉईस\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nपृष्ठे & फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम उत्साही खेळ पृष्ठे\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले\nशीर्ष टेबल व्हीआयपी खेळ\nएक्सप्रेस कॅसिनो मिळवा 100% आपले स्वागत आहे ठेव बोनस + £ 5 मोफत\nयूके फोन बिल देयके सह TopSlotSite\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना\nशीर्ष यूके मोफत नाही स्लॉट\nप्रचंड मोबाइल टेबल गेम\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin\nCoinFalls.com मोबाइल रोख खेळ पॉवरहाऊस > होय\nफोन कॅसिनो करून द्या प्रचंड श्रेणी & स्लॉट\n£ 200 Lucks कॅसिनो आंतरराष्ट्रीय अतिरिक्त नाही बोनस\nप्रचंड jackpots सह पाउंड स्लॉट प्ले\nपाउंड स्लॉट - आपले स्वागत आहे 100% £ 200 बोनस अप\nसर्वोत्तम एसएमएस भरणा कॅसिनो यूके\n£ 100 द्या प्ले £ 210 फोन बिल स्लॉट करून\nअप करण्यासाठी £ 100 ठेव सामना\nशीर्ष फोन क्रेडिट jackpot कॅसिनो 2015/16\n£ 5 मोफत + 100% प्रथम ठेव अतिरिक्त मोफत बोनस\nशीर्ष फोन भरणा बिलिंग कॅसिनो\n1 स्लॉट फोन बिल ठेव | £ 200 अतिरिक्त नाही बोनस स्लॉट किलकिले\n2 मोबाइल फोन स्लॉट कॅसिनो | TopSlotSite $ € £ 800 ठेव बोनस पुनरावलोकन\n3 फोन बिल स्लॉट पर्याय द्या | Coinfalls कॅसिनो अनुप्रयोग | £ 505 मोफत\n4 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो | £ 500 ठेव सामना साइट पुनरावलोकन\n5 स्लॉट मधूर | फोन बिल कप्पा स्लॉट कॅसिनो करून द्या पुनरावलोकन\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके बोनस ऑफर\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके ऑनलाईन CasinoPhoneBill.com\nनवीन इंटरनेट तंत्रज्ञान खरोखर एक जागतिक गावात आकार मध्ये या संपूर्ण जगात केले आहे. या क्रांतिकारी प्रगती एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके देखील प्रोत्साहन दिले आणि कॅसिनो तंत्रज्ञान या प्रगती मुख्य समर्थक आहेत. Pragmatically, तंत्रज्ञान क्रांतिकारक शोध नंतर, जुगारांना देखील पाहण्यास सक्षम आहेत एक प्रकारचा जुगाराचा खेळ वितरक राहतात देश खोल्या आत. TopSlotSite गायन छान आहेत लाइव्ह-विक्रेता एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ ऑफर\nThe most popular game available on the world of internet is no other than the fascinating, thrilling, सर्वांत आणि पैसा एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ करत. जमीन-आधारित गायन इमारतींच्या आत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ खेळत प्रेमळ आहेत ज्यांनी एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके नक्की मूळ जमीन-आधारित गायन खेळ आहेत हे मला माहीत करणे आवश्यक आहे. थेट विक्रेता आणि मेगा बोनस TopSlotSite ऑनलाइन कॅसिनो येथे आज खेळायला\nनवीन बोनस मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके\nयेथे CasinoPhoneBill.com शीर्ष कॅसिनो, खेळाडू करण्यास सक्षम आहेत त्यांच्या स्वत: च्या देश खोल्या बसलेला असताना एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळायला. पूर्ण प्रशिक्षण जगाच्या कोणत्याही भागात पासून obtainable आहेत की एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट द्वारे प्रदान केली आहे. म्हणून योग्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी कोणत्याही मार्गदर्शन पुस्तके किंवा संबंधित साहित्य खरेदी करण्याची गरज नाही मुक्त गेमिंग साइट पूर्ण मोड ऑनसाइट प्रशिक्षण प्रदान. खेळाडू नंतर एक विजय धोरण विकसित करण्यास सक्षम आहेत मुक्त गेमिंग सत्र खेळत.\nCasinoPhoneBill.com च्या एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके दिसून येते इतर फायदा आहे काही गायन साइट आहेत हे गुण आकार मोफत बोनस अर्पण, अगदी नामावली किंवा नगद आकार त्यांच्या ऑनलाइन ग्राहकांना. या करताना काहीही धोक्यात आहे म्हणून खरोखर आश्चर्यकारक आहे, खेळाडू ज्याची नक्कल करता येणार पैसे कमविणे फायदे प्राप्त करू शकता.\nखाली आमच्या शीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके चार्ट पहा\nते £ 200 अतिरिक्त नाही डिपॉझिट सामना स्लॉट किलकिले येथे\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत रिअल पैसे CoinFalls स्लॉट बोनस मिळवा\nStrictlySlots.co.uk अप £ 500 ठेव मॅच बोनस आज पुनरावलोकन भेट\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले पुनरावलोकन भेट\n£ 5 ठेव स्लॉट + £ 500 ठेव सामना - Casino.uk.com पुनरावलोकन भेट\nछान प्ले आज बोनस प्ले करा आणि जिंकण्यासाठी £ 200 पर्यंत कमवा\nकाटेकोरपणे रोख - 200% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin पुनरावलोकन भेट\nमेल कॅसिनो £ 5 ठेव बोनस + 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत पुनरावलोकन भेट\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nगोल्डमन कॅसिनो - 100% £ € $ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस सामना पर्यंत पुनरावलोकन भेट\nPlay एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन TopSlotSite.com आणि आपला फोन बिल वापरून द्या\nआणखी एक मोठा खेळत फायदा एक प्रकारचा जुगाराचा खेळ गेमप्लेच्या संबंधित ताण फॅक्टर अगदी अपूर्णांक खेळाडू मध्ये तणाव मुक्त वातावरण मुक्तपणे खेळता सक्षम आहे तेथे आहे हे आहे. आपण खरोखर नंतर गायन जगातील प्रखर खळबळ प्रेम म्हणून तर तुम्ही हे केलेच पाहिजे TopSlotSite.com एक £ 800 स्वागत पॅकेज खेळू\nBonusslot.co.uk उपलब्ध एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके खेळत इतर फायदे आहेत\nएसएमएस एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव कॅसिनो\nफोन एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो बोनस करून द्या\nआपल्या मोबाइल फोन ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ-फिरकी आणि घरी घेऊन\n£ 800 पर्यंत कमवा साइन अप बोनस TopSlotSite.com\nवास्तविक गेमिंग साइट अचूक प्रतिकृती वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे उपलब्ध. ते सहज ते निवड होईल तेव्हा नंतर एक प्रकारचा जुगाराचा खेळ टेबल विजय परिपूर्ण धोरण संच विकसित करू शकता वास्तविक खेळ प्ले भविष्यात त्यांच्या स्वत: च्या पैसा गुंतवणूक. प्ले करा आणि TopSlotSite ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइटवर आज मजा\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके ब्लॉग CasinoPhoneBill.com\nएसएमएस मोबाईल कॅसिनो & स्लॉट फोन बिल ठेव आणि लँडलाईन बिलिंग संबंधित पोस्ट द्या:\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोबाइल बोनस –…\nयूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट बोनस – Play…\nमोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ यूके खेळ साइट –…\nसर्वोत्तम यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट ऑनलाइन –…\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल…\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ यूके मोबाइल साइट – ऑनलाईन…\nसर्वोत्तम ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ यूके – कॅसिनो…\nयूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन साइट – प्ले करा आणि…\nनवीन मोबाइल फोन कॅसिनो साइट | वेगास…\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या: घर\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव प्ले | ब्रिटन च्या सर्वोत्तम साइट मोफत प्ले\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nसर्वोत्कृष्ट कॅसिनो एसएमएस ठेव खेळ शोधत आहात\n श्री फिरकी कॅसिनो साइन-इन करा £££ बोनस नाही ठेव 50 मोफत नाही\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nएसएमएस जुगार | Coinfalls कॅसिनो | £ 500 ठेव बोनस\nसर्वोत्तम फोन कॅसिनो £££\nआमच्याशी संपर्क साधा | Casinophonebill.com\nट्विटर दुवा फोन बिलिंग\nGoogle+ लेखक पृष्ठ फोन बिल कॅसिनो\n£ 5 मोफत PocketWin लॉगिन करा\nफोन स्लॉट करून Pocket मधूर कॅसिनो द्या\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 400+ खेळ & £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nमोबाइल स्लॉट लिमिटेड | फोन बिल आश्चर्यकारक £ 200 बोनस करून द्या\nफोन कॅसिनो करून काटेकोरपणे रोख वेतन @ मोबाइल स्लॉट + £ 200 बोनस\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\nLadylucks - नोंदणी, लॉग-इन, साइन-इन\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nसमय क्षेत्र पुनरावलोकन फिरकी | कॅसिनो फोन बिलिंग\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nसर्वोत्तम संलग्न कार्यक्रम – GlobaliGaming भागीदार – रिअल पैसे कमवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90296", "date_download": "2018-04-20T16:53:50Z", "digest": "sha1:QXGMU25EOFGUDZHTUQP2A3XA2UBTJPVF", "length": 11286, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news sensex stop तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍स स्थिर | eSakal", "raw_content": "\nतिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍स स्थिर\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nमुंबई - जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार स्थिर राहिले. सुरवात तेजीने करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर केवळ ०.४९ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३३ हजार ८१२.२६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६.६५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ४४२.२० अंशांवर बंद झाला.\nमुंबई - जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार स्थिर राहिले. सुरवात तेजीने करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर केवळ ०.४९ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३३ हजार ८१२.२६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६.६५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ४४२.२० अंशांवर बंद झाला.\nगुंतवणूकदरांना तिमाही निकालांची उत्सुकता लागली आहे. आगामी अर्थसंकल्पाबाबत जाणकारांकडून अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये नफावसुली दिसून आली. प्रमुख पायाभूत क्षेत्राच्या वाढीचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आला नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य देत नफावसुली केली. टाटा मोटर्स, एनएमडीसी, व्हिडिओकॉन, डीश टीव्ही, अदानी पॉवर, एनटीपीसी, जैन इरिगेशन आदी शेअर वधारले.\nटीसीएस बनणार भारताची पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी\nमुंबई : भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार...\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-20T16:46:23Z", "digest": "sha1:SHEK7OIKHAWI7J2Y2P5CQZAUWFAG5MJX", "length": 4655, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेटन मॅनिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपेटन विल्यम्स मॅनिंग (मार्च २४, इ.स. १९७६ - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. मॅनिंग नॅशनल फुटबॉल लीगच्या डेन्व्हर ब्रॉन्कोज संघात क्वार्टरबॅक म्हणून खेळतो. हा माजी फुटबॉलपटू आर्ची मॅनिंग ह्याचा मुलगा व न्यू यॉर्क जायंट्स संघाचा क्वार्टरबॅक इलाय मॅनिंग ह्याचा थोरला भाऊ आहे.\nपेटन मॅनिंग अनेक वर्षे इंडियानापोलिस कोल्ट्स संघाचा क्वार्टरबॅक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१६ रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/namsudha/word", "date_download": "2018-04-20T16:34:15Z", "digest": "sha1:Q3KG76TABX57YBRGFZGZ7UY6YHWZUFR2", "length": 7686, "nlines": 100, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - namsudha", "raw_content": "\nनाम सुधा - अध्याय १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय १ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय २ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण १\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण २\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ३\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ४\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nवामन पंडित - नाम सुधा\n’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:36:27Z", "digest": "sha1:BD3OWJ7BEKV52UMG5U4JRUELJPKW66MK", "length": 3150, "nlines": 50, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "\"ज्ञानेश्वरी\" ला जुळलेली पाने - विकिबुक्स", "raw_content": "\n\"ज्ञानेश्वरी\" ला जुळलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ज्ञानेश्वरी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिबुक्स:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुखपृष्ठ स्वागत ‎ (← दुवे | संपादन)\nविकिबुक्स:जुने मुखपृष्ठ १ ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2)", "date_download": "2018-04-20T16:44:18Z", "digest": "sha1:VBA5J7VJDI4WUAUY43QC7JIJ3ZLUW6QH", "length": 9089, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंच (फुटबॉल) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n१ अधिकार आणि कर्तव्य\n५ हे सुद्धा पहा\n६ संदर्भ आणि नोंदी\nपंच खेळाडूंना सामन्यात बंदी घालण्या साठी किंवा शिस्तभंग माहिती देण्यासाठी पिवळे कार्ड व लाल कार्ड सोबत ठेवत आहे.\nपंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत.[१]\nनियमांचा भंग झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;\nबाह्य दखलंदाजी झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;\nएखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास, फुटबॉल मैदानाच्या बाहेर नेई पर्यंत सामना थांबवणे;\nएखादा खेळाडू थोडा जखमी असल्यास, चेंडू मैदानाच्या बाहेर जाई पर्यंत सामना चालू ठेवणे;\nजर एका संघा विरूद्ध नियम भंग झाला असेल व सामना चालू राहिल्याने त्या संघाचा फायदा होणार असेल तर सामना न थांबवता चालू ठेवणे;\nनियम भंग करणार्‍या खेळाडूला शिक्षा करणे;\nसंघ अधिकारी जर नियमांनुसार वागत नसतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर काढणे.\nसामना सहाय्यक पंच व गरज पडल्यास चौथ्या अधिकार्‍याच्या सहाय्याने सुरळीत पार पाडणे;\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/bhau-kadam-biography/", "date_download": "2018-04-20T16:36:28Z", "digest": "sha1:L5DHP6XYVYXWFPTOVNOGEDDXIW5KEFZP", "length": 61737, "nlines": 262, "source_domain": "khaasre.com", "title": "पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा \"भाऊबली\"", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nपान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली” 1\nसध्या भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम हा चेहरा विनोदी मराठी दुनियेत सर्वोच्च ठिकाणी आहे. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये भोळा विविध व्यक्तिरेखा साकारणार भाऊ कदम धमाल उडवुन टाकतो. भाऊ यांना खरी पहिली ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने. मात्र ही लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर भाऊ कदम आला आहे.\nसद्या भाऊ कदमवर समाजातील काही ठेकेदारींनी बहिष्कार टाकला होता कारण त्याने गणपतिची घरी स्थापना केली. भाऊला वाळित टाकणारा समाजाचे ठेकेदार भाऊच्या संघर्षाच्या काळात कुठे होते असो भाऊला त्याची अपेक्षाही नाही. परंतु भाऊच्या विरोधकांनी हा लेख नक्कीच वाचा…\nभाऊ कदमचा जन्म मुंबईत एका कोकणी कुटुंबात झाला त्याचे संपूर्ण बालपन मुंबईतीस बिपीटी क्वार्टर मध्ये गेले.त्यांचे वडील बीपीटीत नोकरी होते.तर आई गृहिणी होती. भालचंद्रला प्रेमाने सर्व भाऊ म्हणत, वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. भाऊ जसा टिव्हीवर व्यक्तिरेखा साकारतोय तसाच लाजाळू व भोळा लहानपणापासून होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.बीपीटी क्वॉटर सोडावे लागले.वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले.\nउदरनिर्वाहासाठी केले कारकुनीचे काम…\nभाऊला अभिनयाची लहानपणापासून आवड होती, सहा महिन्यातून एखादे नाटक मिळत असे. यावर उपाय म्हणून भाऊने एक कोर्स केला. कुटुंबाचे पालणपोषण करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात काही कार्यालयांत कारकुनीचे काम ते निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे, अशी कामे केली.\n500 हून अधिक नाटकांमध्ये अभिनय…\nभाऊचे गुरु विजय निकम यांच्या म्हणण्यावरुन त्यांच्या आईंनी त्यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची परवानगी दिली. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला. ‘कोब्रा 37’ या नावाने कॉलेज आयुष्यात ग्रुप होता. या ग्रुपमध्ये कमलाकर सातपुते आणि किशोर चौघुले हे प्रसिद्ध अभिनेते सहभागी होते. विजय निकम यांच्या ‘एवढाच ना’ या नाटकाद्वारे त्यांना पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला होता. या शॉर्ट टर्म मेमरी लॉस असलेल्या व्यक्तीची भूमिका त्याने या नाटकात वठवली होती.\nपंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ 500 नाटकांमध्ये अभिनय केला. परंतु नाटकात पाहीजे तसे काम मिळत नव्हते व घर चालनेही कठिण होते म्हणून त्याने हे थांबविण्याचा सुध्दा निश्चय केला होतो. परंतु अचानक विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. याच नाटाकतुन भाऊच्या आयष्याला वळण मिळाले व त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘एक डाव भूताचा’, ‘बाजीराव मस्त’ मी या नाटकांमधील त्यांच्या भुमिकेने त्याला प्रसिद्धी व स्तुति मोठ्याप्रमाणात दिली. ‘रानभूल’ हे नाटक रंगभूमीवर सुरु आहे.\nदोनदा नाकारली ‘फू बाई फू’ची ऑफर\nभाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील ब-याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. फु बाई फु या विनोदी मालिकेत त्याने ऑफर दोनदा नाकारली होती. त्याला वाटायचे आपला स्वभाव लाजाळू आहे त्यामुळे हे जमणार नाही. मात्र तिस-यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे तो विजेता होता.\nभाऊ यांनी केला प्रेमविवाह, तीन मुलींचे आहे पप्पा…\nभाऊने प्रेमविवाह केला आहे त्याचा पत्निचे नाव ममता आहे. या दाम्पत्याना तिन मुली आहे. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी ही त्यांच्या मुलींची नावे आहेत.\nपरदेशवारीसाठी बायकोची अंगठी ठेवली गहाण…\nमहेश मांजरेकर यांनी पहिल्या मिक्ता अवॉर्ड सोहळ्यासाठी भाऊ यांना आमंत्रित केले होते. दुबईत हा सोहळा रंगणार होता. विशेष म्हणजे तोपर्यंत भाऊ यांच्याकडे पासपोर्ट नव्हते. शिवाय तिकडे जाण्यासाठी हाती काहीच पैसा नव्हता. तिकिट, खाणेपिणे आयोजकांकडे असणार, हे त्यांना ठाऊक होते. मात्र समजा तिकडे पैशांची गरज पडली तर काय करणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांची अंगठी गहाण ठेवायला दिली. बायकोची अंगठी गहाण ठेवलेल्या पैशातून भाऊ यांनी आपली पहिली परदेशवारी केली होती.\nहिंदीत फेरारी की सवारी याशिवाय मराठी‘टाइमपास’, ‘टाइमपास 2’, ‘सांगतो ऎका’, ‘मिस मॅच’, ‘व्हाया बिहार’, ‘नारबाची वाडी’, ‘कोकणस्थ’, ‘चांदी’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘बाळकडू’ या सिनेमांमध्ये भाऊने अभिनय केला\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nPrevious Articleपत्रकार गौरी लंकेश यांचा शेवटचा संपादकीय..Next Articleफ्लॅट अथवा घर खरेदी करताना हि कागदपत्रे अवश्य तपासा…\nPingback: कचरा उचलून उपजीविका करणारा बॉडी बिल्डर..\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/12/current-affairs-30-december.html", "date_download": "2018-04-20T16:38:39Z", "digest": "sha1:46T45IHTDSUNLFNOTKQSM4NCSPHQSJP3", "length": 15722, "nlines": 169, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१५\nरघुवीर चौधरी यांना ५१वा ज्ञानपीठ पुरस्कार\nभारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ५१वा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.\nवरिष्ठ साहित्य समालोचक नामवर सिंह यांच्या अध्यक्षीतेखीलील समितीने रघुवीर चौधरी यांची निवड केली आहे.\nत्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३८ रोजी गुजरातमध्ये झाला असून त्यांनी कविता, नाटकाशिवाय साहित्यप्रकरात विपूल लेखन केलं आहे. १९७७ साली त्यांच्या ‘उप्रवास कथात्रयी’ यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nचौधरी यांची 'रूद्र महालया' ही कांदबरी ऐतिहासिक गुजराती लिखाणातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते.\nयाशिवाय त्यांना कवितांसाठी कुमार चंद्रक पुरस्कार तसेच उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचा सौहार्द सन्मानदेखील प्राप्त झाला आहे.\n१९८८ मध्ये चौधरी गुजरात विद्यापीठातून हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९९८ ते २००२ या कालावधीत साहित्य अकादमीमध्ये व्यवस्थापकीय कार्यकारिणीमध्येही ते कार्यरत होते.\nचौधरी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २००२ ते २००४ या कालावधीत ते भारतीय चित्रपट महोत्सवात निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत होते.\nहा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे ते चौथे गुजराती साहित्यिक ठरले आहेत. याआधी उमा शंकर (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) या गुजराती साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.\nसरस्वतीची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.\nचीनमध्ये आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक\nआग्नेय चीनच्या शेनझेनमध्ये २९ डिसेंबर रोजी आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.\n'फुतियान हायस्पीड रेल्वे स्टेशन' असे या स्थ्नाकाचे नाव असून ते १ लाख ४७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर विस्तारले आहे.\nहे रेल्वे स्थानक २१ फुटबॉल मैदान इतके मोठे असून यातील तीन भूमिगत मजल्यांमध्ये १,२०० पेक्षा जास्त आसन व्यवस्था आहे. येथे ३००० प्रवाशी एकाच वेळी प्रतिक्षा करु शकतात.\nपहिल्या मजल्यावर मेट्रो आणि लांब पल्ल्याच्या हायस्पीट रेल्वेचे तिकिट मिळतील. येथे मेट्रो रेल्वेची सेवा उपलब्ध आहे.\nदुसऱ्या मजल्यावर स्टेशन हॉल आणि प्रतिक्षालय आहे.\nसर्वात खालच्या मजल्यावर हायस्पीड रेल्वेचे फलाट (प्लॅटफॉर्म) आहेत. येथे हायस्पीड रेल्वे ३५० किमी प्रतितास या गतीने धावेल.\nया प्रकल्पाची सुरुवात २००८मध्ये झाली होती. यास एकूण खर्च ४१ अब्ज रुपये (६२२ मिलियन अमेरिकन डॉलर) आला आहे.\nजगातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. यास 'ग्रँड सेंट्रल' या नावाने ओळखले जाते.\nजीबी मीमामसी यांचे निधन\nसेंटर फॉर डिवेलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT)चे संस्थापक व कार्यकारी संचालक जीबी मीमामसी यांचे २१ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.\nभारतात टेलिकॉम क्रांतीचा पाया रचणाऱ्या जीबी मीमामसी यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.\nस्वतंत्र भारतात मीमामसी यांच्या नेतृत्वाखाली C-DoT ने रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयत्न सुरू ठेवले होते आणि त्यात त्यांना अन्य संशोधन संस्थांपेक्षा जास्त यश मिळाल्याचेही जाणकार सांगतात.\nभारतात पीसीओ सर्वदूर पसरण्यामागे देखील C-Dotचे प्रयत्नच कारणीभूत होते.\nविजय हजारे ट्रॉफी गुजरातला\nयुवा फलंदाज पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी पटकावली.\nया टीमने फायनलमध्ये गौतम गंभीरच्या दिल्ली संघावर मात केली. याच स्पर्धेत २०१०-११ मध्ये गुजरात संघ उपविजेता होता.\nचीनमध्ये पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू\nचीनने २७ डिसेंबरपासून पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू असून या कायद्यान्वये चिनी सेना आता दहशतवाद्यांच्या धरपकडीसाठी परदेशातही रवाना करणे शक्य होईल.\nविविध देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त मोहिमेत चिनी सैनिकही सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच तंत्रज्ञान कंपन्यांना सरकारने मागितलेली माहिती देणे बंधनकारक असेल.\nअमेरिकेने चीनच्या या नव्या कायद्याचा विरोध केला आहे. हा कायदा तिबेटमध्येही लागू होईल. येथे चीनच्या धोरणांविरुद्ध १२० बौद्ध धर्मीयांनी आत्मदहन केले आहे.\nचीनच्या संसदेने या कायद्याला १५९च्या बहुमताने संमती दिली. चिनी सैन्यदल आणि सशस्त्र पोलिस दल दहशतवादविरोधी लढ्यात केंद्रीय सैन्य आयोगाच्या संमतीनंतर सहभागी होऊ शकतील.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २८ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी : २७ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २५ व २६ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २० डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १८ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १६ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १४ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ९ व १० डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ८ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ व ७ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ व ५ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - २ डिसेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ डिसेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90298", "date_download": "2018-04-20T17:01:42Z", "digest": "sha1:3JDFUVOKTCAD46VOPKKXV47VUUVCHMYL", "length": 13689, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news mobile led electricity meter rate increase मोबाईल, एलईडी, वीजमीटर महागले | eSakal", "raw_content": "\nमोबाईल, एलईडी, वीजमीटर महागले\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nनवी दिल्ली - एरवी साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी हे महाग होणार, हे कमी होणार, या गोष्टी ऐकणाऱ्या आपल्यासाठी आता अर्थसंकल्पाच्या पूर्वीच काही गोष्टी महाग झाल्याची बातमी आली आहे. केंद्राने राज्यसभेत आज एका वैधानिक प्रस्तावाद्वारे १० इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. यात खाद्यान्न पदार्थ नसले तरी मोबाईल स्मार्टफोन, एलईडी दिवे व विजेची मीटर यांसारख्या सामान्यांच्या खिशाला थेट भिडणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. सरकारने चौदा डिसेंबरला याबाबतची अधिसूचना काढली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.\nनवी दिल्ली - एरवी साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी हे महाग होणार, हे कमी होणार, या गोष्टी ऐकणाऱ्या आपल्यासाठी आता अर्थसंकल्पाच्या पूर्वीच काही गोष्टी महाग झाल्याची बातमी आली आहे. केंद्राने राज्यसभेत आज एका वैधानिक प्रस्तावाद्वारे १० इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. यात खाद्यान्न पदार्थ नसले तरी मोबाईल स्मार्टफोन, एलईडी दिवे व विजेची मीटर यांसारख्या सामान्यांच्या खिशाला थेट भिडणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. सरकारने चौदा डिसेंबरला याबाबतची अधिसूचना काढली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दुपारी हा प्रस्ताव मांडला. ‘जीएसटी’नंतर राज्यांना महसुलातील अधिकाधिक वाटा द्यावा लागत असल्याने केंद्राने आपल्या महसूल वाढीसाठी हा मार्ग चोखाळल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने या दरवाढीला विरोध केला नाही. मात्र माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे आत्ताच का, असा प्रश्‍न उपस्थित केला. काही सदस्यांनी या अर्थसंकल्पबाह्य दरवाढीवर प्रश्‍नचिन्ह मांडले. एकीकडे डिजिटल इंडियाद्वारे मोबाईल वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखणाऱ्या केंद्र सरकारने नेमके आर्थिक व्यवहार करू शकतील, अशा क्षमतेचे मोबाईलच महाग केल्याच्या विरोधाभासावरही बोट ठेवले जात आहे.\nकेंद्राने ज्या वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविले त्या वस्तू अशा - मायक्रोवेव्ह ओव्हन, पुश बटन असणारे वा नसणारे सर्व स्मार्ट मोबाईल फोन, व्हिडिओ रेकॉर्डर, दूरचित्रवाणी कॅमेरे, डिजिटल कॅमेरे व व्हिडिओ रेकॉर्डर, वीजबचत करणारे लाईट-इमिटिंग डीकोड म्हणजेच एलईडी दिवे, घरगुती वा सार्वजनिक वापरासाठीची विजेची मीटर, विजेच्या वस्तूंचे सुटे भाग.\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\n...म्हणून डॉ. कलामांच्या शाळेतील वीज कापली\nनवी दिल्ली : देशाचे 'मिसाइल मॅन' अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतील वीज...\nमोहोळच्या सर्वांगिण विकासासाठी प्रसत्न करणार - बारसकर\nमोहोळ - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रभागात मोठी विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना येत्या काळात घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी...\nभाजपमधील असुरक्षिततेमुळे अभिनेत्रीचा पक्षाला रामराम\nनवी दिल्ली: उन्नाव व कथुआमधील सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भारतीय जनता पक्षात सुरक्षित नाही, असे कारण देत अभिनेत्री...\nपत्नीसाठी केला त्याने तिच्याच मैत्रिणीचा खून\nतमिळनाडू : चेन्नईतील हुलामीडू भागातील एका इसमाने स्वतःच्या पत्नीला भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीच्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/plot-counting-session-will-on-at-mp-dilip-gandhis-house-at-ahmednagar/", "date_download": "2018-04-20T16:37:42Z", "digest": "sha1:FHQC27POYTXRQGNPQ5UJVAZ2UKBWFXNY", "length": 18120, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "नगरमध्ये गांधी विरूद्ध गांधी, भाजप खासदाराने अतिक्रमण केल्याची तक्रार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nनगरमध्ये गांधी विरूद्ध गांधी, भाजप खासदाराने अतिक्रमण केल्याची तक्रार\nभाजपचे नगरचे खासदार व शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या बंगल्यातील अतिक्रमणाबाबतची प्लॉट मोजणी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांनी खासदार गांधी यांच्यासह या प्रकरणातील तक्रारदार विनोद गांधी आणि महापालिकेच्या बुरुडगाव-केडगाव प्रभाग समितीचे प्रमुख नाना गोसावी यांना उपस्थित राहण्याचे कळवले आहे.\nकोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी या रस्त्यातील अतिक्रमणे महापालिकेने काढली होती; मात्र, या रस्त्यावरील खा. गांधी यांच्या बंगल्याच्या कंपाउंडचे अतिक्रमण काढले गेले नाही, असा दावा तक्रारदार विनोद अमोलकचंद गांधी यांनी केला होता. त्यांनी महापालिकेकडे दाद मागितल्यानंतर संबंधित अतिक्रमणावर कारवाई झाली नसल्याचे सांगून त्यांनी नगरविकास विभागाकडेही तक्रार केली होती. पण तेथेही दाद न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी, खासदार गांधी यांच्या बंगल्याचे कंपाउंड अतिक्रमणात आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याचे मोजमाप करण्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी ही मोजणी केली जाणार आहे.\nउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार नगररचना योजना क्रमांक ३ अंतिम फायनल प्लॉट क्रमांक ६६ मधील अतिक्रमणाबाबत प्लॉटची मोजणी करण्याचे काम मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू करण्यात येणार असून, या वेळी या मोजणीच्या ठिकाणी पुराव्याच्या मूळ व छायांकित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे खासदार गांधी व तक्रारदार विनोद गांधी यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोठी रोडवरील खासदार गांधींचा बंगला पत्नी व दोन भावांच्या नावावर असून दुसऱ्या व्यक्तीकडून ही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा गांधींकडून करण्यात आला आहे. नगररचना विभागाच्या परवानगीने या बंगल्याचे बांधकाम झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकारकुनाची नोकरी देण्यासाठी लाच घेतली, ‘बामु’च्या उपकुलसचिवांना अटक\n बालकामगाराच्या छळवणुकीबद्दल न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/woman-china-rides-through-x-ray-scanner-purse-protect-her-money/", "date_download": "2018-04-20T16:39:22Z", "digest": "sha1:3YMOL6PPZKHCX3UGGSEP72IUHGVRHCVJ", "length": 16460, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘बॅग’वतीसाठी महिला एक्सरे स्कॅनरमध्ये घुसली, घटनेचा व्हिडीओ व्हायरल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n‘बॅग’वतीसाठी महिला एक्सरे स्कॅनरमध्ये घुसली, घटनेचा व्हिडीओ व्हायरल\nमहिला आपल्या फॅशन सेन्सबद्दल फार जागरूक असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. तसेच त्या आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजीही आपुलकीने घेत असल्याचे दिसून येते. परंतु या काळजीपोटी दक्षिण चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एक असा आचरटपणा केला ज्यामुळे ही महिला जगभरातील सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनली आहे. चीनमधील एका रेल्वे स्टेशनवर एक महिला रविवारी आपल्या पर्स सोबतच सुरक्षा तपासणीसाठी लावलेल्या एक्स-रे स्कॅनरमध्ये घुसली. या घटनेचा व्हिडीओ चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nव्हायरलमध्ये झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला एक्स-रे स्कॅनरमधून बाहेर येत असून त्याचदरम्यान मशीनच्या बाजूला आपआपल्या सामानाची वाट पाहत असलेली माणसे त्या महिलेचा हा प्रकार पाहून थक्क होऊन जातात. या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजार लोकांनी पाहिला आहे. महिलेला भीती वाटत होती की, तिच्या पर्समध्ये ठेवलेले पैसे हरवू शकतात म्हणून तिने हा प्रकार केल्याचे समजते आहे.\nया प्रकारानंतर महिला इंटरनेटवर ट्रोल झाली असून तिला नेटकऱ्यांनी ‘विचित्र’ म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. तसेच या मशीनमध्ये वापरण्यात येणारी किरणे ही शरिरासाठी घातक असतात त्यामुळे काहींनी तिला स्वतःच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत असे म्हणत राग व्यक्त केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानचं सौंदर्य वाढतंय, कॉस्मॅटिक व्यवसायात वेगानं वाढ\nपुढीलइंडियन मुजाहिदीनचा बॉम्बमेकर आरिज उर्फ जुनैदला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/image-story-90332", "date_download": "2018-04-20T16:58:00Z", "digest": "sha1:6CB6XU7D57L6BEWS5K7CRA7C4IL7K224", "length": 6956, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepotsav Allahabad दीपोत्सव... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगा यमुनेच्या संगमावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.\nसंक्रांतीपासून येथे माघ मेळ्याला सुरुवात होते.\nअनेक भाविकांनी पौर्णिमेनिमित्त गंगास्नान केले.\nदेशभरातून अनेक भाविक माघ मेळ्यासाठी येथे येतात\nअलाहाबाद - पौष पौर्णिमेनिमित्त गंगा यमुनेच्या संगमावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच अनेक भाविकांनी यावेळी गंगास्नान केले. संक्रांतीपासून येथे माघ मेळ्याला सुरुवात होते.यावळी देशभरातून अनेक भाविक येथे येतात.\nअलाहाबाद - पौष पौर्णिमेनिमित्त गंगा यमुनेच्या संगमावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच अनेक भाविकांनी यावेळी गंगास्नान केले. संक्रांतीपासून येथे माघ मेळ्याला सुरुवात होते.यावळी देशभरातून अनेक भाविक येथे येतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/parashuram/word", "date_download": "2018-04-20T16:41:45Z", "digest": "sha1:ODKOCYLSFTBELP6NJTJFJK3NBIFS2ZBE", "length": 9859, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - parashuram", "raw_content": "\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nपाळणा - जो जो जो जो रे सुखधामा \nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - प्रस्तावना\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय २\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ३\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ४\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ५\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ६\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ७\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ८\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ९\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १०\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय ११\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १२\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १३\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १४\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १५\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १६\nश्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641483.html", "date_download": "2018-04-20T16:43:59Z", "digest": "sha1:JGFZQSOUPWP332KTMXRV7FJP4XII6YSI", "length": 1518, "nlines": 44, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nतू नव्याने हास ना\nतू नव्याने भेट ना\nका कधी नकळत स्पर्श सारे बोलती\nभावनांचे प्रश्न सारे उत्तरांना शोधती\nकाय घडला माझा गुन्हा\nपरतूनी ये तू पुन्हा\nकर ना इशारा तू मला\nलावेन ना जीव मी तुला\nका कधी एकटे स्पंद गाणे गुणगुणते\nकंपनांनचे झंकार सारे रोमरोमात नांदते\nका खेळ हा मांडला असा\nआता कसे सांगू तुला\nसाथ दे ना तू मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=29&paged=2", "date_download": "2018-04-20T16:43:03Z", "digest": "sha1:6JERSVA27AMIBTHYSQDUBOKJ5WWOXTHT", "length": 18721, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "विशेष लेख | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 2", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nविकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध\nComments Off on विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध\nडहाणूच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यात प्राधिकरणाला अपयश विकासही नाही आणि पर्यावरणही नाही भाग 17 वा : विकासाची भाषा म्हणजे पर्यावरणाला विरोध 1991 पासून जर पाहिले तर नोटिफिकेशनचा दोनच बाजूंनी विचार होताना दिसतो. एक तर पर्यावरणवाद; आणि दुसरा विकासाचा आग्रह 1991 पासून जर पाहिले तर नोटिफिकेशनचा दोनच बाजूंनी विचार होताना दिसतो. एक तर पर्यावरणवाद; आणि दुसरा विकासाचा आग्रह मधला मार्गच नाही. विकासाची भाषा करणारा माणूस निष्ठूर आहे. त्याला पर्यावरण नको. त्याला शुद्ध हवा नको. त्याला कॉंक्रिटचे जंगल हवे आहे. ...\tRead More »\nडहाणू शहराचे खेडे करणार का\nComments Off on डहाणू शहराचे खेडे करणार का\nशाळा, रुग्णालये व मुलभुत सुविधा कशा उभारणार कुठे नेऊन ठेवणार आमचे डहाणू कुठे नेऊन ठेवणार आमचे डहाणू भाग 16 वा : डहाणू शहराचे खेडे करणार का भाग 16 वा : डहाणू शहराचे खेडे करणार का डहाणू नगरपालिका क्षेत्राला नव्या विकास नियंत्रण नियमावलीतुन वगळल्यामुळे नेमका कसा विकास अडणार आहे हे पहाण्यासाठी नव्या नियमावलीत काय तरतुदी केल्या आहेत ते पहावे लागेल. डहाणू शहरामध्ये (तालुक्यातही) तळ + 2 मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामास परवानगी नाही. नव्या ...\tRead More »\nComments Off on नेतृत्वाचा अभाव\nप्रणब सेन व माधव राम समित्यांचे अहवाल सादर होऊन 15 वर्षे उलटली तरीही डहाणू तालुक्याच्या समस्या कायम भाग 15 वा: नेतृत्वाचा अभाव केंद्र सरकारला प्रणब सेन यांचा अहवाल प्राप्त होऊन 15 वर्षे पुर्ण झाली. या 15 वर्षांत प्रणब सेन यांच्या निकषांच्या आधारावर डहाणूची पर्यावरण विषयक संवेदनशिलता व 1991 च्या नोटिफिकेशनची आवश्यकता तपासता आली असती. माधव राम समितीने केंद्र सरकारला ...\tRead More »\nडहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली\nComments Off on डहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली\nकेंद्र सरकारचे आणखी एक पाऊल पुढे आढावा घेण्यासाठी मोहन राम समिती गठीत भाग १४ वा : डहाणू नोटिफिकेशनची वैद्यता तपासली या अभ्यासगटाने सर्वप्रथम पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिलतेची व्याख्या ठरवून या व्याख्येमध्ये बसणारे 13 विषय निश्‍चित करण्यात आले. या 13 विषयांची वर्गवारी 3 प्रमुख गटांत करण्यात आली. त्यातील 2 गटांतील 10 विषय मागील भागात पाहीले. त्या पुढील गट व विषय: भौगोलिक वैशिष्ठ्यांवर ...\tRead More »\nComments Off on केंद्राचे स्वागतार्ह्य पाऊल\nपर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्राचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एप्रिल 1999 मध्ये नेमला अभ्यासगट भाग 13 वा: केंद्राचे स्वागतार्ह्य पाऊल पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल क्षेत्राचे संरक्षण व नियमन करण्यासाठी कृती योजना आखायचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ठरवले. त्याआधीच देशात अनेक क्षेत्रे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशिल जाहिर करण्यात आली होती. परंतू असे क्षेत्र जाहिर करताना या प्रक्रियेचा उद्देश, शास्त्रीय आधार स्पष्ट झाले पाहिजेत व प्रक्रियेत पारदर्शकता आली ...\tRead More »\nकन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपदेखील झोपला\nComments Off on कन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपदेखील झोपला\nआतापर्यंत रिजनल प्लॅनसाठी तारीख पे तारीख 31 जूलैपुर्वी प्लॅन मंजूर करण्याचे केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश भाग 12 वा : कन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपदेखील झोपला मुंबई उच्च न्यायालयासमोर (रिट पिटीशन क्र.981/1997) 11 ऑगस्ट 2014 रोजीच्या सुनावणीनंतर 10 ऑक्टोंबर 2014 रोजीच्या सुनावणीला कन्झर्वेशन ऍक्शन ग्रुप या याचिकाकर्त्यांपैकी कोणीही वकील उपस्थित राहीला नाही. डहाणू तालुका एन्वायरोन्मेंट वेलफेअर असोसिएशन तर या याचिकेत उपस्थित राहीली ...\tRead More »\nडहाणूचे पर्यावरण संरक्षण वार्‍यावर\nComments Off on डहाणूचे पर्यावरण संरक्षण वार्‍यावर\nगोंधळात पडलेली सरकारे आणि निष्क्रीय झालेले प्राधिकरण नियमीत बैठका होत नाहीत व किमान डहाणूला भेटी देखील होत नाहीत नियमीत बैठका होत नाहीत व किमान डहाणूला भेटी देखील होत नाहीत भाग 11 वा : डहाणूचे पर्यावरण संरक्षण वार्‍यावर संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक २४ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध): मुंबई उच्च न्यायालयासमोर (रिट पिटीशन क्र.981/1997) 10 ऑक्टोंबर 2014 रोजी यापुर्वीच्या 26 सप्टेंबर 2015 रोजीच्या सुनावणीतील निर्देशाप्रमाणे डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचा ...\tRead More »\nराष्ट्रीय हरीत लवाद का नको\nComments Off on राष्ट्रीय हरीत लवाद का नको\nडहाणूची काळजी: आधी बिट्टू सेहगलना, आता कन्झर्वेशन ऍक्शन ग्रुपला डहाणू तालुका एन्वायरोन्मेंट वेल्फेअर असोसिएशन अचानक झोपली का डहाणू तालुका एन्वायरोन्मेंट वेल्फेअर असोसिएशन अचानक झोपली का भाग 10 वा : राष्ट्रीय हरीत लवाद का नको भाग 10 वा : राष्ट्रीय हरीत लवाद का नको सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑक्टोंबर 1996 रोजीच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारला 19 फेब्रुवारी 1991 (सीआरझेड) व 20 जून 9191 चे डहाणूसाठीचे नोटिफिकेशन यातील तरतुदींना अधिन राहून व निरीने केलेल्या शिफारसी अंतर्भुत करुन रिजनल प्लॅन बनवण्याचे आदेश ...\tRead More »\nडिटीइपीए म्हणजे काय रे भाऊ\nComments Off on डिटीइपीए म्हणजे काय रे भाऊ\n1 वर्ष मुदतीसाठी आलेले प्राधिकरण 19 वर्षे कार्यरत आहे यातील अशासकीय सदस्यदेखील डहाणू बाहेरचाच भाग ९ वा: डिटीइपीए म्हणजे काय रे भाऊ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 डिसेंबर 1996 रोजीच्या (एस.ओ. 884 इ) नोटिफिकेशनद्वारे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 29 चे उपकलम 3 (3) अन्वये स्थापन केलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे (डिटीइपीए) अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती चंद्रशेखर ...\tRead More »\nडहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन\nComments Off on डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन\nपालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, गुजरातमधील उंबरगावसह सेल्वास (केंद्रशासीत प्रदेश) ग्रीनझोनच्या कक्षेत आले होते भाग 8 वा: पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन 19 ऑक्टोंबर 1996 मध्ये निरीने सर्वोच न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात राज्य सरकारने बनवलेला नियोजीत रिजनल प्लॅन हा सीआर झेड व 1991 चे डहाणू नोटिफिकेशनशी सुसंगत नसुन तो या नोटिफिकेशनचा भंग करीत असल्याचे मत नोंदवले. नियोजीत रिजनल प्लॅन हा नोटिफिकेशनमध्ये ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/maan-satara-sufficient-water-special-story-470585", "date_download": "2018-04-20T16:31:43Z", "digest": "sha1:BZ5L3LK7I6B7OVY7RLXHJW7AANWQK5WW", "length": 16257, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : सातारा : दुष्काळी दिवाळीची सवय असणाऱ्या माण तालुक्यात पाणीदार दिवाळी", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : सातारा : दुष्काळी दिवाळीची सवय असणाऱ्या माण तालुक्यात पाणीदार दिवाळी\nसातारा, सांगली आणि सोलापुर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला माण देश नेहमीच दुष्काळासाठी ओळखला जातो. व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी कादंबरीतून माणदेशच्या दुष्काळाची भीषणता सर्वांसमोर मांडली. मात्र आता माण देश बदलतो आहे. जलसंधारणाच महत्त्व पटलेल्या माणदेशाने माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून कायम दुष्काळी प्रदेश ही आपली ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nस्पेशल रिपोर्ट : सातारा : दुष्काळी दिवाळीची सवय असणाऱ्या माण तालुक्यात पाणीदार दिवाळी\nस्पेशल रिपोर्ट : सातारा : दुष्काळी दिवाळीची सवय असणाऱ्या माण तालुक्यात पाणीदार दिवाळी\nसातारा, सांगली आणि सोलापुर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला माण देश नेहमीच दुष्काळासाठी ओळखला जातो. व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी कादंबरीतून माणदेशच्या दुष्काळाची भीषणता सर्वांसमोर मांडली. मात्र आता माण देश बदलतो आहे. जलसंधारणाच महत्त्व पटलेल्या माणदेशाने माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून कायम दुष्काळी प्रदेश ही आपली ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/12/CurrentAffairs31122016.html", "date_download": "2018-04-20T16:29:13Z", "digest": "sha1:NSZE3OENAZZPY5CIGBHVZQELAF7K35GD", "length": 19799, "nlines": 190, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : ३१ डिसेंबर", "raw_content": "\nचालू घडामोडी : ३१ डिसेंबर\nभारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅपचे उद्घाटन\nमोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे आधार क्रमांकावर आधारलेल्या ‘भीम’ नावाच्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर रोजी उद्घाटन केले.\n‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अ‍ॅपचे पूर्ण नाव आहे. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आहे.\nयाद्वारे ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे.\nदोन आठवडय़ांत हे अ‍ॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. तूर्तास अ‍ॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात.\nसध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करते.\nत्यासाठी कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.\n‘भीम’वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही ‘यूपीआय’सक्षम बँकेत खाते हवे.\nवापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे.\nएटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०१७पासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २,५०० रुपयांवरून ४,५०० रूपयांपर्यंत वाढविली आहे.\nपरंतु एका आठवड्यात पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अजूनही ही मर्यादा २४,००० इतकी कायम आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून तसेच बँक खात्यामधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.\nनोटाबंदी करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.\nबँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपली आहे.\nभारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित\nभ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौताला यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीव अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाने आयओएवर निलंबनाची कारवाई केली आहे.\nयाप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देण्यासाठी ‘आयओए’ला शुक्रवापर्यंतची मुदत दिली होती.\nया मुदतीमध्ये ‘आयओए’ने क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nआयओएवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांचे कामकाज करण्याचे अधिकार राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला देण्यात आले आहेत.\nजोपर्यंत ‘आयओए’ आपला निर्णय मागे घेत नाही आणि त्यांच्यावरील निलंबन उठत नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य, सुविधा देण्यात येणार नाही.\n‘आयओए’ची २७ डिसेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत कलमाडी आणि अभयसिंग चौताला यांची आजीव अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.\nयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबर रोजी नरेंद्र बात्रा यांनी आयओएच्या सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.\nआयओएचे अध्यक्ष: एन. रामचंद्रन\nभारताचा सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंध करार\nभारताने ३१ डिसेंबर रोजी सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंधाचा सुधारीत करार केला.\n२०१६ वर्षांच्या सुरुवातीला मॉरिशस व सायप्रसबरोबर भारताने असाच करार केला होता.\nसुधारीत करारान्वये सिंगापूरस्थित गुंतवणूकदारांना भारतातील भांडवली नफ्यावरील कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे सिंगापूरच्या माध्यमातून तयार होणाऱ्या काळ्या पैशाला पायबंद बसेल.\nदशकापासून अस्तित्वात असलेल्या जुन्या करारातील सिंगापूरमधून येणाऱ्या गुंतवणुकींकरिता असलेल्या सर्व कर सवलती आता रद्द होणार आहेत.\nभारतासाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे मॉरिशस व सिंगापूर हे दोन प्रमुख स्रोत आहेत. भारतातील एकूण एफडीआयपैकी या दोन देशांचा हिस्सा निम्म्याहून अधिक आहे.\nसिंगापूरमधून होणाऱ्या गुंतवणुकीवरील नफ्यावर कर लागू करण्याची प्रक्रिया नव्या आर्थिक वर्षांत एप्रिल २०१७ पासून सुरू होणार आहे.\nअरुणाचल प्रदेशातील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ६ आमदारांना निलंबित करत तकाम पारियो यांना मुख्यमंत्री घोषित केले होते.\nत्यानंतर पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.\n६० जागांच्या या विधानसभेत आता भाजपची संख्या ४५ आणि दोन अपक्ष अशी ४७ झाली आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत.\nकाँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत पीपीएचे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील\nअशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले आहे.\nअमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हॅकिंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.\nयाशिवाय रशियाच्या अमेरिकेतील दोन ठिकाणच्या कार्यालयांवर बंदी देखील घालण्यात आली आहे.\nअमेरिकेतील रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांना देशात राहण्यास अयोग्य ठरविण्यात आले असून, मेरिलॅंड आणि न्यूयॉर्कमधील रशियाची दोन कार्यालये बंद करण्याचा आदेशही देण्यात आला आहेत.\nरशियाच्या ‘जीआरयू’ आणि ‘एफएसबी’ या दोन गुप्तचर संस्था आणि या संस्थांना सायबर हल्ल्यांसाठी साहित्याचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.\nचीनमध्ये हस्तीदंत व्यवसायावर बंदी\nहत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंतच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली आहे. २०१७ अखेरपर्यंत हस्तीदंताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे.\nऑक्टोबर २०१६मध्ये नामशेष होणाऱ्या प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला.\nजगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा ७० टक्के सहभाग आहे. यापूर्वी केनिया देशाने एप्रिल २०१६मध्ये १०५ टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३० डिसेंबर\nचालू घडामोडी : २९ डिसेंबर\nचालू घडामोडी : २८ डिसेंबर\nचालू घडामोडी : २७ डिसेंबर\nचालू घडामोडी : २६ डिसेंबर\nस्पर्धापरीक्षा तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच\nचालू घडामोडी : २५ डिसेंबर\nचालू घडामोडी : २४ डिसेंबर\nचालू घडामोडी : २३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २२ डिसेंबर\nपीएसआय परीक्षेसाठीची वयोमर्यादेत वाढ\nचालू घडामोडी : २१ डिसेंबर\nचालू घडामोडी : २० डिसेंबर\nचालू घडामोडी : १९ डिसेंबर\nचालू घडामोडी : १८ डिसेंबर\nमासिक : नोव्हेंबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : १७ डिसेंबर\nचालू घडामोडी : १६ डिसेंबर\nचालू घडामोडी : १५ डिसेंबर\nचालू घडामोडी : १४ डिसेंबर\nचालू घडामोडी : १३ डिसेंबर\nचालू घडामोडी : १२ डिसेंबर\nपोलादी नेत्या जे. जयललिता\nचालू घडामोडी : ११ डिसेंबर\nचालू घडामोडी : १० डिसेंबर\nचालू घडामोडी : ९ डिसेंबर\nचालू घडामोडी : ८ डिसेंबर\nचालू घडामोडी : ७ डिसेंबर\nचालू घडामोडी : ६ डिसेंबर\nचालू घडामोडी : ५ डिसेंबर\nचालू घडामोडी : ४ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २ डिसेंबर\nचालू घडामोडी : १ डिसेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=29&paged=3", "date_download": "2018-04-20T16:42:30Z", "digest": "sha1:2LVK6REZM3RX7E744ALIDJIRHTVRMXAE", "length": 19893, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "विशेष लेख | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 3", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nनिशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका\nComments Off on निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका\nडहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाला जखडून ठेवण्यासाठी डहाणू ग्रीन झोनची मोर्चेबांधणी भाग ७ वा : बुरे दिन सुरु झाले निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका पर्यावरणावादाचा बुरखा पांघरुन डहाणूच्या भल्याची सुपारी घेतलेल्या दलालांनी बीएसइएसच्या डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात विरोध करणे असफल झाल्यानंतर किमान हा प्रकल्प मर्यादेत ठेवण्याच्या व्युहरचनेची आखणी केली. राज्य व केंद्र सरकारांनी ...\tRead More »\nडहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी\nComments Off on डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी\nडहाणुतून रोज 1233 टन चिकु उत्पादित होत होता डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी हे पर्यावरणवादी आहेत की फेकाडे हे पर्यावरणवादी आहेत की फेकाडे भाग 6 वा : खोटी आकडेवारी सादर करुन फसवणुक डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाविरोधातील लढाईचा सर्वोच्च न्यायालयात शेवट झाला असे वाटत असले तरीही पर्यावरणवादी डहाणूची भलतीच चिंता वहात होते. राज्य व केंद्र सरकारची डहाणूचे वाट्टेल तसे 12 वाजवायची ...\tRead More »\nमुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला\nComments Off on मुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला\nमुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला भाग 5 वा : उद्योगबंदीचे 91 नोटिफिकेशन आले आता अवलोकन करता असे लक्षात येते की, राज्य सरकारने येथे थर्मल पॉवर प्रकल्प उभारायला जुलै 1988 मध्ये तत्वत: मान्यता देताना व केंद्र सरकारकडुन मान्यता मिळवतानाच डहाणू तालुक्याच्या उद्योगबंदीची भुमिका स्विकारली होती. त्या अनुषंगाने 24 सप्टेंबर 1988 रोजी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने उद्योग ...\tRead More »\nथर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते\nComments Off on थर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते\nथर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते भाग 4 : न्यायालयीन लढाईविषयी ) डहाणू थर्मल पॉवर प्रोजेक्टला राज्य व केंद्र सरकारांनी परवानगी दिल्यानंतर लगेचच 1989 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात बीएसइएसच्या या प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात बॉम्बे एन्वॉयरोन्मेन्ट ऍक्शन गृप या मुंबईतील गृपने याचिका (क्र. 4550/1989) दाखल केली. पाठोपाठ डहाणू तालुका एन्वॉयरोन्मेन्ट वेल्फेअर असोसिएशन नावाने काही लोकांनी याच विषयाची याचिका ...\tRead More »\nमुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन\nComments Off on मुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन\nमुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन भाग 3 : उद्देश पर्यावरणाचा की घेतलेली सुपारी निभवण्याचा मुंबई महाप्रदेशात विज निर्मीती व वितरण क्षेत्रात 2 कंपन्या कार्यरत होत्या. त्यातील खुद्द मुंबईत टाटा पॉवर ली. तर मुंबई उपनगरात बॉम्बे सबअर्बन इलेक्ट्रीक सप्लाय (बीएसइएस) कं. ली. विज वितरण करीत होते. टाटा पॉवर स्वत:च विज निर्मीती करीत होते. तर बीएसइएस टाटा पॉवर कडुन विज ...\tRead More »\nडहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे\nComments Off on डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे\nडहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे भाग 2 : असे आहे नोटिफिकेशन संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक १४ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध): डहाणू हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील बहुतांशी लोकांना 20 जून 1991 रोजीचे केंद्र सरकारचे नोटिफिकेशन माहीत नाही. त्यापासूनचे फायदे व तोटे देखील माहित नाही. बहुतांश लोकांनी ते कधीही वाचलेले नाही. आता तर ...\tRead More »\nभरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा\nComments Off on भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा\nभरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव भाग 1 : प्रास्ताविक गेल्या काही दिवसांपासून दैनिक राजतंत्रतर्फे डहाणूच्या विकासाच्या मुद्द्यावर काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. विकासाच्या मुद्द्यावर विविध अंगाने चर्चा व्हावी हा या मागचा हेतु होता. दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि ...\tRead More »\nप्रश्‍न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nComments Off on प्रश्‍न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील\nजेव्हा जेव्हा मराठी भाषा दिन जवळ येतो तेव्हा तेव्हा भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न मराठी मानसाच्या मनात उगवतो. मराठीच्या अस्तित्वाच्या काळजीचा हा हँहओव्हर फार काळ टिकून राहत नाही. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाचा भाषिक अस्मितेच्या अंगाने अत्यंत वरवरचा, ढोबळ विचार करणारा पण संख्येने अधिक असलेला एक गट तर तिच्या अस्तित्वाचा, स्वरुपाचा अत्यंत गांर्भियाने चिंतन-मननाच्या अंगाने मूलभूत स्वरुपाचा विचार करणारा दुसरा गट. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाचा ...\tRead More »\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nComments Off on मराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे\nमराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने हा खरे पाहता एका लेखाचा विषय नसून स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकेल याबद्दल शंका नाही. प्रस्तुत विषयाचा पसारा लेखात मांडताना अनेक घटकांचा केवळ नामोल्लेख करून, तर काहांना ओलांडून पुढे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रस्तुत लेखाची ही मर्यादा सुरुवातीलाच मान्य करावी लागेल. अलीकडील काळात भाषिक आस्मता हा त्या त्या भाषिक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय ठरू पाहात ...\tRead More »\nघरच्या भाषेतून का शिकायचे \nComments Off on घरच्या भाषेतून का शिकायचे \nमराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची घटती संख्या हे शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झपाट्याने होते आहे. या शाळानी मराठी माध्यमाच्या शाळांपुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. टाय बूट असणारा गणवेश, जायला यायला स्कूल बस सारख्या सोयी, शाळेत साजरे केले जाणारे विविध दिवस अशा अनेक क्लुप्त्या वापरून या शाळा ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-marathi-play-ulat-sulat/", "date_download": "2018-04-20T16:40:52Z", "digest": "sha1:473M74LVCLMJAZJ6ETSWN6NPANQCHYKJ", "length": 27197, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "संवेदनशीलतेचा गावरान उद्रेक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n‘उलट सुलट’ आजच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भाष्य करणारे वास्तववादी नाटक.\nमराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळ्या पठडीची नाटकं येत राहिली आहेत. या वेगवेगळ्या नाटकांमुळेच मराठी रंगभूमी सक्षम आणि वृद्धिंगत होत राहिली आहे. यात नाटकांच्या विषयाच्या वैविध्याचा खूप मोठा वाटा आहे. मराठी रंगभूमीने नेहमीच सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून विविध विषय नाटकांमधून लोकांसमोर आणलेत. स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्णाजी खाडिलकरांनी ‘किचकवध’ वगैरे नाटकं लिहून पौराणिक संदर्भांच्या मदतीने इंग्रजांच्या विरुद्ध मतं जनमानसात रुजण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ही जणू मराठी रंगभूमीची एक ओळखच झाली. स्वातंत्र्योत्तर काळात सेवादलाच्या पथकातून लिलाधर हेगडे, वसंत बापट वगैरे मंडळींनी ही चळवळ जिवंत ठेवली. याच सेवादलातून आलेल्या दादा कोंडके, निळू फुले यांच्यासारख्या प्रस्थापित नटांनी ती नेटाने पुढे चालवली. समाजाला स्वतःच्या परिस्थितीचं आरस्पानी दर्शन देणं हे व्रतच जणू आपल्या रंगभूमीने स्वीकारलेलं आहे. या व्रताचा भाग म्हणून बहुतेक ‘सुयोग’ या नाटय़संस्थेने सध्या एक नवीन नाटक ‘उलट सुलट’ रंगभूमीवर आणलेलं आहे.\nमहाराष्ट्र हे मुळात कृषिप्रधान राज्य. महाराष्ट्रातील शेतकरी हा खरं तर सर्वात महत्त्वाचा. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांना औद्योगिकीकरणाचं महत्त्व पटू लागलं आणि औद्योगिक महाराष्ट्राचं आपल्या शेतकऱयाकडे दुर्लक्ष होऊ लागलं ही वस्तुस्थिती आपल्याला विसरता येणार नाही. हे दुर्लक्ष जाणूनबुजून केलं होतं की अनावधानाने होत गेलं हा चिकित्सेचा विषय होऊ शकतो पण औद्योगिकीकरणामुळे प्रगत झालेल्या महाराष्ट्र प्रदेशातल्या प्रगत प्रजेला आज आपल्या दुर्लक्षित कृषीबांधवांबाबत वेगळेच प्रश्न पडतात असं चित्र दिसतं. हा वेगळ्या प्रश्नांचा मुद्दा घेऊन ‘उलट सुलट’ हे नाटक आपल्यासमोर उभं राहतं. लेखक किरण माने यांनी एका विशिष्ट अजेंडय़ाअंतर्गत बेतलेलं ‘उलट सुलट’ हे अनेक पातळ्यांवर भिडू शकेल असं प्रोजेक्ट वाटतं. मुळात सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱयांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा वातावरणात अशा आशयाचं नाटक बेतणं आणि त्यात या विषयाशी खूप जवळून निगडीत असलेला आघाडीचा नट मकरंद अनासपुरेला कास्ट करणं यातून हे नाटक करण्याचा मोटिव्ह स्पष्ट होतो. मोटिव्ह स्युत्य आहे, कारण शेतकऱयांचा प्रश्न हा खूपच गहन मुद्दा आहे. नाटक पाहाणारा प्रमुख प्रेक्षक हा शहरी उरलेला असल्यामुळे त्याला या प्रश्नाची गहनता समजवण्याच्या दृष्टीतून हा प्रयत्न फारच चांगला आहे. किरण माने यांनी ‘उलट सुलट’ लिहिताना नाण्याच्या दोन्ही बाजू मांडायचा प्रामाणिक प्रयत्न योजलेला दिसतो. आर्ग्युमेन्टस्ना पॉइंट आणि काऊंटर पॉईन्ट त्यांनी उत्तम उभे करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी स्वतः साकारलेलं क्रिमिनल लॉयरचं पात्र या कामी पुष्कळ मदत करणारं आहे.\n‘उलट सुलट’ हे दोन विचारांचं नाटक दोन व्यक्तिमत्त्वांमधलं नाटक झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या दोन पात्रांमधला विलक्षण संबंध. हा संबंध एका अत्यंत भावनिक घटनेशी जुडल्याने नाटक बघताना सतत आपल्याला त्याची जाणीव राहते. या संबंधामुळे नाटकातला वकिल हा सुरुवातीपासूनच हॅण्डीकॅप झालाय आणि म्हणून मग त्याने मांडलेल्या युक्तिवादाला मर्यादा येतात. एका प्रसंगात मातीने माखलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा उल्लेख आहे. शहरी लोकांना हे अनहायजिनिक वाटतं असं मत मांडलं जातं. आज सुपरमार्केटसदृष वाण्यांच्या दुकानात सोललेले दाणे पिशव्यांमधून मिळतात ते कसे वाईट आणि वकिलाची पत्नी कशी रस्त्यावर बसणाऱया शेतकऱयाकडूनच शेंगा घ्यायची असंही सांगितलं जातं. मुळात इथे तफावत अशी की सोललेले दाणे घेण्यात शहरातील चाकरमानी स्त्रियांचा विचार स्वयंपाकात होणारा कन्व्हिनियन्स आणि वाचणारा वेळ इतका प्राथमिक असतो. शिवाय शहरातल्या रास्त्यावर भुईमुग विकणारे हे महाराष्ट्रातले शेतकरी नसून परप्रांतातील उपरे दलाल असल्याचा सर्वपक्षीय उहापोह सुरू आहे तो वेगळा. तात्पर्य असे की ‘उलट सुलट’ या नाटकात तर्काला भावनिकतेची जोड देण्यात आलेली आहे आणि त्यात तर्क किंचित फसल्यागत झाल्यासारखा वाटतो.\nज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी ‘उलट सुलट’ हे नाटक डिझाईन करताना लेखनातील मुद्दे अधोरेखित करण्याचं काम खूपच उत्तमरित्या केलेलं आहे. विषेशतः काही ठिकाणी स्टेजवर पात्रांना प्रकाशयोजनेच्या मदतीने सेपरेट करून वेगळ्या स्थळात आणि भावविश्वात नेण्याची योजना फारच परिणामकारक आहे. घराच्या प्रांगणात असणारा स्विमिंग पूल आणि तेथिल घटनांचा रंगमंचावरील दृष्याशी जोडलेला संबंध उत्तम आहे. प्रदीप मुळ्ये यांनी आपल्या लौकिकाला साजेसं नेपथ्य करून एक निष्णात क्रिमिनल वकिलाचं घर मूर्तिमंत उभारलं आहे. राहुल रानडे यांचं संगीतही नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावी आहे. भूषण देसाई यांची प्रकाशयोजनाही नीटनेटकी आणि प्रभावी आहे.\nकिरण माने यांचा क्रिमिनल लॉयर खूपच उत्तम झालाय. दिमाखदार, विद्वान आणि सुरुवातीला उद्धट पण उत्तरोत्तर अत्यंत समंजस होत जाणारं हे पात्र किरण माने यांनी यथायोग्य साकारलंय. समीर देशपांडे आणि कृतिका तुळसकर या दोघांनी शहरी लोकांचं अर्कचित्र खूपच प्रभावीपणे सादर केलंय. तन्वी पंडित वकिलाच्या पत्नीच्या भूमिकेत शोभते. भूषण गमरे आणि समीर सोनावणे याचंही काम साजेस आहे. ‘उलट सुलट’ भावतं ते मात्र मुख्य कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यामुळे. विनोदवीर म्हणून प्रस्थापित असलेले अनासपुरे हे संवेदनाशील व्यक्ती आहेत हे त्यांच्या सामाजिक कार्यातून आपल्याला माहीत आहे. पण त्यांच्यातील नट हा केवळ विनोदाचा बादशहा नसून एक अत्यंत संवेदनशील कलावंत आहे याची प्रचिती आपल्याला ‘उलट सुलट’ मधून येते.\nसुयोग आणि ऐश्वर्या थियेटर्स निर्मित ‘उलट सुलट’ हे एका वेगळ्या संवेदनशील विषयावरचं नाटक म्हणून उल्लेखनीय आहे. संदेश भट आणि राजेश पाटील यांचं त्याबद्दल कौतुक करायलाच हवं. अशाच नवनवीन नाटकांची निर्मिती त्यांच्यामार्फत होत राहो ही सदिच्छा.\nनाटक – उलट सुलट\nनिर्मिती – ऐश्वर्या + सुयोग प्रॉडक्शन्स\nनिर्माते – संदेश भट, राजेश पाटील\nसूत्रधार – गोटय़ा सावंत\nलेखक – किरण माने\nनेपथ्य – प्रदीप मुळ्ये\nसंगीत – राहुल रानडे\nदिग्दर्शक – कुमार सोहोनी\nकलाकार – तन्वी पंडित, कृतिका तुळसकर, समीर देशपांडे, भूषण गमरे, समीर सोनावणे, किरण माने आणि मकरंद अनासपुरे\nदर्जा – अडीज स्टार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठमोळ्य़ा डोंबिवलीत फक्त गुजरातींसाठी गृहसंकुल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-20T16:26:09Z", "digest": "sha1:CLOSE3YV5D747W34QAGRPGHMZLHF2CIA", "length": 6157, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅशलेस व्यवहारांत होत आहे वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॅशलेस व्यवहारांत होत आहे वाढ\nनवी दिल्ली – 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने घोषित केलेल्या नोटबंदीला आता बराच काळ लोटला आहे. या काळात कॅशलेस व्यवहारामध्ये 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. हा व्यवहार डेबिट-क्रेडिट कार्डच्या वापरातून झालेला आहे. ही माहिती रिझर्व्ह बॅंकेने सादर केलेल्या अहवालात दिली आहे.\nनोव्हेंबर 2016 मध्ये 67 कोटी 15 लाख इतके कॅशलेस व्यवहार करण्यात आले होते. या आकडेवारीवरून आर्थिक व्यवहार करण्याच्या नागरिकांच्या पारंपरिक सवयीमध्ये दिवसेंदिवस सकारात्मक बदल घडून येत आसल्याचे पाहावयास मिळत आहे. या संपूर्ण आकडेवारीतून असे समजते की लोकांचा कॅशलेश व्यवहार करण्याकडे ओढा वाढत असल्यांचे समजते. यावर अर्थखत्याने समाधान व्यक्त केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकृष्णेच्या अष्टतीर्थांचे पौराणिक महात्म्य\nक्रेडाईकडून पुण्यात बांधकाम कामगारांना प्रशिक्षण\nडाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\nएलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ\nकंपन्यांना महिला संचालक नियुक्‍त करावे लागणार\nरेल्वे आणणार स्वतःचे पेमेंट गेटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-20T16:34:46Z", "digest": "sha1:QF2QUCFIXS2E22PGHBYA4Z2T5LBDZRRI", "length": 4658, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देसाई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदेसाई हे मराठी तसेच अन्य भारतीय भाषिक समाजांत आढळणारे आडनाव आहे. मराठी समाजासोबतच हे आडनाव गुजराती समाजातही आढळते.\nकादंबरी देसाई - मराठी अभिनेत्री.\nनितीन देसाई - मराठी अर्थतज्ज्ञ.\nलोकनेते बाळासाहेब देसाई= माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री महाराष्ट्र\nनितीन चंद्रकांत देसाई - चित्रपट कलादिग्दर्शक.\nप्राची देसाई - हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री.\nमनमोहन देसाई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक.\nमहादेव देसाई - भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\nमोरारजी देसाई - माजी भारतीय पंतप्रधान.\nरणजित देसाई - मराठी कादंबरीकार.\nरमाकांत देसाई - मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nवसंत देसाई - मराठी संगीतकार.\nशांतिनाथ देसाई - कन्नड साहित्यिक.\nमहाराष्ट्र मधील ९६ कुळी मराठा देसाई प्रसिद्ध आहेत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१७ रोजी १६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/03/blog-post_99.html", "date_download": "2018-04-20T16:42:04Z", "digest": "sha1:4XDF46XQTX7XHZVHUHHCYWNXEW7I63JE", "length": 15908, "nlines": 243, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : प्रश्नसंच १५० - चालू घडामोडी", "raw_content": "\nप्रश्नसंच १५० - चालू घडामोडी\n[प्र.१] ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसंदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे\n१] सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - कोर्ट\n२] सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एलिझाबेथ एकादशी\n३] लोकप्रिय चित्रपट - मेरी कोम\n४] सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - क्वीन\n२] सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एलिझाबेथ एकादशी\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -किल्ला\nसर्वोत्कृष्ट बालचित्रपट - एलिझाबेथ एकादशी\n[प्र.२] पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे ‘टायलर प्राईझ’ या वर्षी डॉ. माधव गाडगीळ यांच्यासोबत सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन लुबचेन्को यांनाही जाहीर झाले आहे. डॉ. जेन लुबचेन्को कोणत्या देशाचे नागरिक आहेत\n[प्र.३] दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश कोणत्या राज्य सरकारने नुकतेच काढले आहेत\n[प्र.४] शियापंथीय हौथी संघटना व सरकार यांच्यामधील संघर्षाने जेरीस आलेल्या येमेनमधील राजकीय संकटातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने केले जाणारी राजनैतिक चर्चा कोठे केली जाणार आहे.\n[प्र.५] इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी रूपे प्रीपेड कार्ड सेवा सुरू केली आहे. ही सेवा कोणत्या बँकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आली आहे\n१] युनियन बॅक ऑफ इंडिया\n२] स्टेट बँक ऑफ इंडिया\n३] सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया\n४] रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया\n१] युनियन बॅक ऑफ इंडिया\n[प्र.६] माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबातल ठरविले\n[प्र.७] २१ मार्च २०१५ रोजी अद्भुत शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या सशस्त्र दलामधील कोणत्या जवानाला राष्ट्रपतींनी कीर्ती चक्र प्रदान केले\n२] सुभेदार प्रकाश चांद\n[प्र.८] इंडियन वेल्स ओपन टेनिस २०१५ महिला एकेरी स्पर्धेची विजेती कोण ठरली\n[प्र.९] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.\nअ] इंडियन वेल्स ओपन महिला दुहेरीचे जेतेपद भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी पटकावले आहे.\nब] हा किताब मार्टिना हिंगिसने दुसऱ्यांदा पटकावला असून याआधी तिने १७ वर्षापूर्वी १९९८ मध्ये अ‍ॅना कुर्निकोवा सोबत खेळताना इंडियन वेल्स ओपनचे जेतेपद पटकावले होते.\nक] सानिया मिर्झाने हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी २०११ मध्ये सानिया-कारा ब्लॅक जोडीने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.\n१] फक्त अ आणि क\n३] फक्त ब आणि क\n३] फक्त ब आणि क\nहा किताब मार्टिना हिंगिसने दुसऱ्यांदा पटकावला असून याआधी तिने १६ वर्षापूर्वी १९९९ मध्ये अ‍ॅना कुर्निकोवा सोबत खेळताना इंडियन वेल्स ओपनचे जेतेपद पटकावले होते.\nसानिया मिर्झानेही हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी २०११ मध्ये सानिया-वेसनीना जोडीने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.\n[प्र.१०] योग्य विधाने ओळखा\nअ] केंद्र सरकारने नुकतेच देशातील १७ नव्या मेगा फूड पार्कचे वाटप केले आहे.\nब] यापैकी सात फूड पार्क राज्यांना देण्यात आले आहेत, तर दहा पार्क खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.\nक] महाराष्ट्रात नागपूर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.\nड] आतापर्यंत देशात ४२ मेगा फूड पार्कला मंजुरी देण्यात आली आहे.\n१] फक्त अ, क आणि ड\n२] फक्त ब. क आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\nमहाराष्ट्रात अहमदनगर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nप्रश्नसंच १५० - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ मार्च २०१५\nसोलर इम्पल्स – २\nचालू घडामोडी - २५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र\nप्रश्नसंच १४८ - भूगोल\nचालू घडामोडी - २४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४७ - इंग्रजी व्याकरण\nचालू घडामोडी - २३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४६ - मराठी व्याकरण\nचालू घडामोडी - २२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४५ - इतिहास\nचालू घडामोडी - २१ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १९ व २० मार्च २०१५\nबेटी बचाव बेटी पढाओ अभियान\nचालू घडामोडी - १७ व १८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४३ - सामान्यज्ञान\nचालू घडामोडी - १६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४२ - विज्ञान तंत्रज्ञान\nप्रश्नसंच १४१ - अर्थशास्त्र\nप्रश्नसंच १४० - भूगोल\nचालू घडामोडी - १४ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३९ - इतिहास\nचालू घडामोडी - १२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३८ - पर्यावरण\nप्रश्नसंच १३७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३६ - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - १० मार्च २०१५\nप्रश्नसंच १३५ - अर्थशास्त्र\nचालू घडामोडी - ९ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३४ - राज्यशास्त्र\nचालू घडामोडी - ८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३३ - भूगोल\nचालू घडामोडी - ७ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३२ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - ५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३१ - इतिहास\nचालू घडामोडी - ४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३० - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - ३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२९ - अर्थशास्त्र\nभारताचा आर्थिक पाहणी अहवाल २०१४-१५\nप्रश्नसंच १२८ - राज्यघटना\nचालू घडामोडी - १ व २ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२७ - भूगोल\nचालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१५\nप्रश्नसंच १२६ - इतिहास\nचालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/03/CurrentAffairs20March2016.html", "date_download": "2018-04-20T16:40:50Z", "digest": "sha1:B4MBDKLARMHAFI7LZDKSHHVSRU4XAK4Y", "length": 12836, "nlines": 165, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २० मार्च", "raw_content": "\nचालू घडामोडी : २० मार्च\nआशियाई क्रीडा स्पर्धेत गुरमीतसिंगला सुवर्णपदक\nआशियाई २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत भारताच्या गुरमीतसिंगने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.\n३० वर्षीय गुरमितसिंगने २० किलोमीटर अंतर १ तास २० मिनिटे आणि २९ सेकंदांत चालून पूर्ण केले. त्याने जपानच्या इसामु फुजिसावा (१ तास २० मिनिटे ४९ सेकंद) याला मागे टाकत विजेतेपद पटकावले.\n३४ वर्षांच्या इतिहासात आशियाई अजिंक्यपद तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय धावपटू आहे.\nहकम सिंग यांनी १९७८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत २० किमी रोड रेसमध्ये, तर चंदराम यांनी १९८२ मध्ये याच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.\n२०११ मध्ये याच स्पर्धेत गुरमीतला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कामगिरीत सुधारणा करत २०१२मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली.\n२०१३ आणि २०१४ मध्ये त्याला कांस्यपदक मिळाले. गेल्या वर्षी त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nया विजयासोबतच गुरमितने आपले रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान पक्के केले आहे. नऊ धावपटू आतापर्यंत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, नऊपैकी केवळ तिघांचेच रिओवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.\nप्रणॉयला स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद\nआंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताचा उगवता तारा असलेल्या एचएस प्रणॉयने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.\nप्रणॉयचे हे ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे दुसरे विजेतेपद ठरले. प्रणॉयने २०१४मध्ये इंडोनेशिया ओपन ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.\n१३व्या मानांकित प्रणॉयने ४५ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या मार्क ज्वेबलरला २१-१८, २१-१५ असे नमवले. जागतिक क्रमवारीत प्रणॉय २७व्या, तर मार्क १९व्या स्थानावर आहे.\nगेल्या वर्षी ही स्पर्धा भारताच्या के. श्रीकांतने जिंकली होती. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूने या स्पर्धेत बाजी मारली.\nआशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हिंदुजा बंधू\nब्रिटनमध्ये असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधू पहिल्या क्रमांकावर आहेत. लागोपाठ चौथ्या वर्षी त्यांचा पहिला क्रमांक असून व्यक्तिगत संपत्ती १६.५ अब्ज पौंड आहे.\nयादीची क्रमवारी ठरवताना ब्रिटनमधील आशियायी व्यक्तींचा विचार केला जातो. ही यादी एशियन मीडिया अँड मार्केट यांच्या वतीने प्रसारित केली जाते.\nपोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मित्तल यांची संपत्ती ३.३ अब्ज पौडांनी कमी झाली असून ती ६.४ अब्ज पौंड आहे.\nया वर्षीच्या विश्लेषणानुसार श्रीमंत आशियायी व्यक्तींचे उत्पन्न २०१५ मध्ये ५४.४८ अब्ज पौंड होते ते आता ५५.५४ अब्ज पौंड झाले आहे.\nश्रीप्रकाश लोहिया यांचा तिसरा क्रमांक लागला. त्यांची संपत्ती ३ अब्ज पौंड आहे.\nहरदीप रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र\nभारताचा मल्ल हरदीपने (९८ किलो) कुस्तीच्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक मिळवले. यासह तो रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.\nरिओ ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे तीन कुस्तीपटू पात्र ठरले आहे. यापूर्वी योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव रिओसाठी पात्र ठरले आहेत.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ मार्च\nचालू घडामोडी : ३० मार्च\nचालू घडामोडी : २९ मार्च\nचालू घडामोडी : २८ मार्च\nचालू घडामोडी : २७ मार्च\nचालू घडामोडी : २६ मार्च\nचालू घडामोडी : २५ मार्च\nमासिक : फेब्रुवारी २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : २४ मार्च\nचालू घडामोडी : २३ मार्च\nचालू घडामोडी : २२ मार्च\nचालू घडामोडी : २१ मार्च\nचालू घडामोडी : २० मार्च\nचालू घडामोडी : १९ मार्च\nचालू घडामोडी : १८ मार्च\nचालू घडामोडी : १७ मार्च\nचालू घडामोडी : १६ मार्च\nभारताची आर्थिक पाहणी २०१५-१६\nचालू घडामोडी : १५ मार्च\nचालू घडामोडी : १४ मार्च\nचालू घडामोडी : १३ मार्च\nचालू घडामोडी : १२ मार्च\nचालू घडामोडी : ११ मार्च\nचालू घडामोडी : १० मार्च\nचालू घडामोडी : ९ मार्च\nचालू घडामोडी : ८ मार्च\nचालू घडामोडी : ७ मार्च\nचालू घडामोडी : ६ मार्च\nचालू घडामोडी : ५ मार्च\nचालू घडामोडी : ४ मार्च\nचालू घडामोडी : ३ मार्च\nचालू घडामोडी : २ मार्च\n८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा\nचालू घडामोडी : १ मार्च\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/76-years-old-bike-rider-died-due-to-unmarked-hump-on-road/", "date_download": "2018-04-20T16:41:59Z", "digest": "sha1:ELKO3RLKNA7YWOQGUMIAOUM4O6VCS55X", "length": 16636, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "गतिरोधक न दिसल्यामुळे ७६ वर्षीय बाईकस्वाराचा अपघाती मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nगतिरोधक न दिसल्यामुळे ७६ वर्षीय बाईकस्वाराचा अपघाती मृत्यू\nरस्त्यावरच्या गतिरोधकाची खूण नसल्यामुळे झालेल्या झालेल्या भीषण अपघातात एका ७६ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. नोझेर आगा असं या बाईकस्वाराचं नाव असून ते कावासाकी निन्जा ही स्पोर्ट्स बाईक चालवत होते.\nएका इंग्रजी वृत्तपत्राने या अपघाताचं वृत्त दिलं आहे. आगा हे त्यांच्या बाईकवरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. जुन्या महामार्गावरून वेगाने जात असताना घोडिवलीजवळ रस्त्यावर गतिरोधकाची खूण नसल्यामुळे त्यांची बाईक गतिरोधकावर अडखळली आणि अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वेगाने आदळल्यामुळे आगा बाईकवरून उडाले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. इतक्या जोरात पडल्यामुळे त्यांच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला आणि त्यांनी जागीच प्राण सोडले.\nआगा यांनी सुरक्षेची सर्व काळजी घेतली होती. अपघात झाला तेव्हा त्यांच्या अंगावर बाईक रायडिंगसाठी योग्य असलेली सर्व सामग्री होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य चुकीमुळे हा अपघात घडल्याचं त्यांच्या मुलाचं म्हणणं आहे. ‘आगा हे अत्यंत चांगले बाईकस्वार होते. वयाच्या नवव्या वर्षापासून ते बाईक रायडिंग करत. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन गतिरोधक रंगवला नव्हता आणि तिथे गतिरोधक असल्याचा बोर्डही उभा केलेला नव्हता. त्यामुळे हा अपघात झाला.’ असं त्याचं म्हणणं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहिला प्रवासी पडली, प्रवाशांनी चेन खेचली पण गाडी थांबली नाही\nपुढीलप्रत्येक तूर खरेदी केंद्रावर वेगळा नियम, सरकारच्या हास्यास्पद आदेशाने शेतकरी हतबल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/04/CurrentAffairs26April2016.html", "date_download": "2018-04-20T16:33:55Z", "digest": "sha1:N2CIW56SKZWPWBPI4ZZWWGGMDAKOHVGR", "length": 13487, "nlines": 161, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २६ एप्रिल", "raw_content": "\nचालू घडामोडी : २६ एप्रिल\nएसीबीच्या महासंचालकपदी सतीश माथूर\nआयपीएसच्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.\nतसेच या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले, संजय बर्वे १९८७च्या तुकडीचे अधिकारी आहेत.\n‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते.\nनॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सतीश माथूर यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.\nतसेच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले.\nसीबीआयमध्ये असताना मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभाग होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.\nभारताचा नेमबाज मैराज खानला रौप्यपदक\nभारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.\nमैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर २-१ ने पराभव केला. ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.\nअंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी १६ पैकी १५, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली.\nया स्पर्धेत इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे\nकेंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालानुसार ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.\nमुंबईनंतर लखनौ आणि हैदराबादचा क्रमांक असून दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात दिल्लीला यश मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.\nवाहनांच्या आवाजाशिवाय, जनरेटर, कार्यालयातील यंत्रे, विमाने, औद्योगिक आणि बांधकामाच्या कामातून निर्माण होणारे आवाज आदींच्या आवाजामुळे शहरांमधील ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.\nदिवसा ५५ डेसीबल आणि रात्रीच्या वेळी ४५ डेसीबल एवढ्या आवाजाची मर्यादा ओलांडली तर मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात.\nत्यामध्ये स्वभावातील आक्रमकता, उच्च रक्तदाब, ऐकू कमी येणे, झोपेमध्ये अडथळा आदी प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात.\nसीपीसीबीचा हा अहवाल सरकारला ध्वनी प्रदूषणासंदर्भातील धोरणे निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nचीनचे बंडखोर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा रद्द\nचीनचे बंडखोर उइघूर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा भारताने रद्द केला आहे. इसा यांना दहशतवादी संबोधत चीनने त्यांना व्हिसा देण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदविला होता.\nहिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या मानवाधिकार परिषदेसाठी इसा उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस असल्याचे लक्षात आणून दिल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला.\nव्हिसा रद्द होऊनही त्यांनी भारतात प्रवेश केल्यास त्यांना अटक करून चीनच्या ताब्यात दिले जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.\nउइघूर हा चीनमधील मुस्लिम समुदाय असून, चीन सरकार कायम दडपशाही करत असल्याच्या आरोपामुळे त्यांच्यात कायम संघर्ष सुरू असतो.\nउइघूर हे सांस्कृतिकदृष्ट्या मध्य आशियाच्या अधिक जवळ असून, त्यांच्या भाषेचेही तुर्कीशी साधर्म्य आहे. अनेक उइघूर नेत्यांना चीनने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० एप्रिल\nचालू घडामोडी : २९ एप्रिल\nचालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल\nचालू घडामोडी : २६ एप्रिल\nचालू घडामोडी : २५ एप्रिल\nचालू घडामोडी : २३ व २४ एप्रिल\nचालू घडामोडी : २२ एप्रिल\nचालू घडामोडी : २१ एप्रिल\nचालू घडामोडी : २० एप्रिल\nचालू घडामोडी : १९ एप्रिल\nचालू घडामोडी : १७ व १८ एप्रिल\nचालू घडामोडी : १६ एप्रिल\nचालू घडामोडी : १५ एप्रिल\nचालू घडामोडी : १४ एप्रिल\nचालू घडामोडी : १३ एप्रिल\nचालू घडामोडी : ११ व १२ एप्रिल\nचालू घडामोडी : १० एप्रिल\nचालू घडामोडी : ९ एप्रिल\nचालू घडामोडी : ८ एप्रिल\nचालू घडामोडी : ७ एप्रिल\nचालू घडामोडी : ६ एप्रिल\nचालू घडामोडी : ५ एप्रिल\nचालू घडामोडी : ४ एप्रिल\nचालू घडामोडी : २ व ३ एप्रिल\nचालू घडामोडी : १ एप्रिल\nमासिक : मार्च २०१६ (PDF)\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/lifestyle/", "date_download": "2018-04-20T16:08:28Z", "digest": "sha1:C423OKATMCHBJB34BG7JHPG3ZAZNVSQW", "length": 9637, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Lifestyle Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… 0\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी… 0\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ.. 0\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी 0\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे… 0\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई… 0\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई… 0\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल 0\nसाहसकथा महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारीची 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:43:56Z", "digest": "sha1:O6BDX3FV5NJIXE4Z5R5I3NUJFVA7T3KF", "length": 5473, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पारशी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपारशी हा पारशी धर्मामधील एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरु असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झाले.\nभारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होउन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत.\nजमशेदजी टाटा व टाटा परिवार\nनरिमन पॉईंटसह मुंबईमधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/8-most-poisonous-animal-in-the-world/", "date_download": "2018-04-20T16:10:03Z", "digest": "sha1:H5BGMGZ36AFHFP2LR4ZVZV5UBFD53DCR", "length": 68102, "nlines": 256, "source_domain": "khaasre.com", "title": "हे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी… 0\nआज आपण बघणार आहोत जगातील सर्वात जास्त विषारी जीवांची माहिती. हे जीव आपल्या विषाचा प्रयोग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपला शिकार पकडण्यासाठी करतात. यातील काही जोव दिसायला खूप आकर्षक असतात. काही तर आपल्या आजूबाजूच्या माहोल मध्ये असे रंगलेले असतात की त्यांना ओळखणे सुद्धा अवघड होऊन बनते. जगामध्ये असे अनेक धोकादायक जीव जंतू आहेत जे कोणाचाही जीव घेण्यात खूप माहीर असतात. यातील काही जीव तर आपली पापणी लवुस्तर आपल्या विषाने मृत्यूच्या हवाली करू शकतात. तर काही जीवांमुळे अगोदर आजारी पडून नंतर मृत्यू होऊ शकतो. भारतामध्ये सुद्धा असे बरेच जीव जंतू आहेत जे की खूप धोकादायक आहेत. खासरेवर आज जाणून घेऊया अशाच काही जगातील अत्यंत विषारी जीवांबद्दल.\nकोमोडो ड्रॅगनची जीभ सापाच्या जिभेसारखी फाटलेली असते. त्याचे नख आणि दात खूप तीक्ष्ण आणि जबडा खूपच मजबूत असतो. आपल्या लांब शेपटीच्या माराने सुद्धा ते घायाळ करू शकतात. शल्कानी झाकलेल्या असतात. कोमोडो ड्रॅगन चे वैज्ञानिक नाव वारानस कोमोडीएनिस असे आहे. याला कोमोडो मॉनिटर सुद्धा बोलले जाते. हे एक विशाल पालीच्याप्रजातीचे आहेत जे की इंडोनेशियामधील कोमोडो, रिंका, फ्लोरेस, गिली मोटांग मध्ये भेटतात.\nखरंतर गोगलगाय या विषारी नसतात, पण ही गोष्ट कोण स्नेलला लागू होत नाही. याचे विष दुसऱ्या प्राण्यांना अंध बनवते व नंतर डोळे निघायला लागतात. हा जीव इतका विषारी आहे की याच्या विषाच्या एका थेंबाने 20 प्रौढ पुरुषांचा मृत्यू होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे याच्या विषावर अजून उपाय नाहीये. या विषाचा असर कमी करेल असं कोणतंही औषध उपलब्ध नाहीये आणि अजून दुसरा काही पर्यायही नाहीये. विशेषज्ञ अजून या विषाचा तोड शोधण्यात अपयशी ठरले आहेत.\n3. ब्लू लाईन ऑक्टोपस-\nया ऑक्टोपसचा आकार टेबल टेनिसच्या बॉल सारखा छोटा असतो. दिसायला हा खूपच सुंदर असतो. याला आपण सहजपणे मुठीमध्ये पकडू शकतो पण हे आपल्या जीवासाठी खूप धोकादायक असतात. याचे विष अगोदर आपल्या डोळ्यांना व नंतर श्वसन प्रक्रिया बंद पाडते.\nपाण्यात असणारी ही बॉक्स जेलिफिशला जगातील सर्वात विषारी जिवांपैकी एक मानले जाते. आशिया आणि ऑस्ट्रेलिया मध्ये भेटणारी बॉक्स जेलिफिश या पारदर्शी असतात. यांना पाण्यामध्ये सहजासहजी बघणे कठीण असते. यांच्या विषाने आपले हृदय काम करने बंद करते तर धडकने सुद्धा बंद होते. हे विष तात्काळ हृदयावर हल्ला करते.\nया मकडीला बनाना स्पायडर म्हणतात. या मकडीला लोकं साधी मकडी समजण्याची चूक करू शकतात. बनाना स्पायडर मध्ये सेरोटॉनिन नावाचे विष असते. हर थेट मेंदुवर हल्ला करते. हे विष शरीरात पोहचल्यानंतर मेंदू काम करणे बंद करतो. ज्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.\nमध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा बेडूक आपल्या रंगामुळे शिकाराला आकर्षित करतो. दिसायला हा जितका सुंदर तितकाच घातक आहे. शिकाऱ्यांपासून बचावासाठी याच्या त्वचेमध्ये घातक विष असते. याचे विष मेंदूतील सूचनांचे आदान-प्रदान बंद पाडते. याच्या संपर्कात येणाऱ्या जीवांची वाचण्याची शक्यता खूप कमी असते.\nमध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत हा चमक असणारा विंचू आढळतो. दिसायला हा साधारण असला तरी याचे विष मृत्युचे कारण बनू शकतो. याच्या डंखामुळे खूप जोरात वेदना होणास सुरुवात होते. काही मिनिटांमध्ये दम घोटून गुदमरून तात्काळ मृत्यू होतो.\nऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा हा साप खूप विषारी होता. याच्या विषामध्ये न्यूरॉटॉक्सिन असतात, जे 45 मिनिटात माणसाला मृत्यूच्या हवाली करतात. या विषाचा उपचार सहजासहजी उपलब्ध होतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nसर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nPrevious Articleसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..Next Articleप्रत्येक महिलेला माहित असावे असे अधिकार… नक्की वाचा आणि शेअर करा\nहंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर… 0\nपंढरपूर च्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायानी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले व अशी अख्यायिका आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन या रथामध्ये स्थापन केली …परंतु स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला व परत पंढरपूररात ठेवण्याची आदेश दिला…नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही आजही पंढरपूर च्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभं आहे सोलापूर शहरापासून फक्त 350 कि मी वर हंपी शहर आहे\nकानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु…’\n१५ व्या शतकातील या मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळाला आहे.\nविठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ… पोकळ नसून त्यातून आजही ‘सरगम’चा निनाद\nहे विठ्ठल मंदिर “कर्नाटकाच्या हम्पी या गावात आहे ..अतिशय सुंदर आणि हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.तुंगभद्रेच्या काठावर वसलेल्या कर्नाटकातील हंपीतील विठ्ठल मंदिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे\nविजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतील आहे. मंदिराच्या चाहु बाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्याच जगात पोहोचल्याचा भास होतो.\nमंदिरात एकामागे एक चार पीठ आहेत. रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन. आपली घरात पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन असायचे ते कदाचित याच द्रविडी शैलीचा एक भाग होते. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. या दगडी रथाची चाके फिरून त्यामधून भगवान गरुड विष्णूला वंदन करायला जातात,\nमंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत पाकगृह मंडप, भजनगृह मंडप, पांडुरंग-रखुमाई कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जाई. त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे अजूनही त्या स्तंभांमधून आजही ‘सारेगामापाधानिसा’चा निनाद ऐकू येतो.\nमध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर आहे. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती होती. आज ती तिथे नाही. आता ती मूर्ती महाराष्ट्रातील पंढरपुरात आहे असे तेथील लोकांनी सांगितले. मूर्ती तेथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपलेले आहे. ‘पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती’ या ओवीची प्रचीती आजही त्या महामंडपात येते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने एक छुपा प्रदिक्षणा मार्ग आहे. तो केवळ राज घराण्यातील लोकांसाठी मर्यादित होता.\nकृष्ण देवा रायाच्या वर्षातून एकदा विठ्ठलाची महा पूजा होत असे. त्यावेळी राजा कृष्ण देवारायाची राणी चेन्नम्मा या महामंडपात नृत्य सादर करत असे. त्या वेळेस दूर देशीतून कलाकार आपली कला सादर करण्यास यायचे. महामंडपात चीनी सुमो करताना कोरलेले आढळतात. मंडपाबाहेर पोर्तुगीज, चीनी अशा परदेशी लोकांची शिल्पे आहेत. म्हणजे १५ व्या शतकात सुद्धा इतक्या दूर लोक येत असत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिला फौजींची शिल्पे आहेत, एक महिला वाघाशी लढत आहे तर दुसऱ्यात युद्धात लढणारी स्त्री दिसते. विजयनगरच्या सैन्यात स्त्रियांनाही प्रवेश होता हे पाहून आश्चर्य वाटते.\nमहामंडपाच्या मागील बाजूस देवी लक्ष्मीचे मंदिर आहे. हिंदू पुराणाप्रमाणे माता लक्ष्मी ही भगवान विष्णुंची सहचारणी होती. मंदिर परिसरात कित्येक शीला लेख आढळतात. मंदिरात वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही.आपल्या विठोबासाठी बांधलेले इतके उत्कृष्ट मंदिर पाहून डोळे धन्य होतात. आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलावर कर्नाटकामध्येही पूर्वीपासून असलेली श्रद्धा, भक्ती पाहून डोळे पाणावतात. आणि नकळत ओळी आठवतात ‘कानडाऊ विठ्ठलु.. कर्नाटकु.. तेणे मज लावियाला वेडु\nपोस्ट साभार – माझं पान\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nहावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले… 0\nआपल्याकडील चांगल्या गोष्टींची ओळख आपल्याला कधी कधी परकीयांच्या दृष्टीतुनच होते असे अनेकदा अनुभवायला मिळते. मुंबईच्या डबेवाल्यांबाबत नेमकं हेच आहे. सातासमुद्रापार जाऊन कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांबाबत आपण मात्र दृष्टिहीन झाल्यासारखे दुर्लक्ष केले. रेल्वे आणि बेस्ट सेवा यानंतरची मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी महत्वाची ही व्यवस्था आहे. मुंबई महानगरीची ती एक ओळख आहे. त्यांची दखल घेतली जावी त्यासाठी हा लेखनप्रपंच.\nनोव्हेंबर २००३ मध्ये इंग्लडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्स मुंबई भेटीवर आला होता. त्याने मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल बरेच ऐकले होते. मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सने डबेवाल्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांना काही तिरकस प्रश्न विचारले. एकतर तुम्ही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहात, तरीही व्यवस्थापनाचे हे कौशल्य तुम्ही कुठे शिकलात डब्यांचे Coding, Time Management, Accuracy अशा गोष्टी तुम्ही कुठुन आत्मसात केल्या डब्यांचे Coding, Time Management, Accuracy अशा गोष्टी तुम्ही कुठुन आत्मसात केल्या काळानुसार जसे ग्राहक बदलत जातात तसेच तुमच्यातही नवेनवे डबेवाले लोक येत राहतात, तरी सुद्धा गेली सव्वाशे वर्ष वितरण व्यवस्थेतील ही अचुकता तुम्ही कशी जोपासली आहे काळानुसार जसे ग्राहक बदलत जातात तसेच तुमच्यातही नवेनवे डबेवाले लोक येत राहतात, तरी सुद्धा गेली सव्वाशे वर्ष वितरण व्यवस्थेतील ही अचुकता तुम्ही कशी जोपासली आहे यामागची प्रेरणा नेमकी काय आहे \nडबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सला उत्तर दिले, “आम्ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन जे मावळे लढले, त्याच मावळ्यांचे आम्ही वंशज आहोत. छत्रपती शिवरायांच्या काळातील व्यवस्थापनाची शिस्त आमच्या रक्तातच आली आहे. त्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. त्याकाळी रयतेच्या संरक्षणासाठी आमचे पुर्वज लढले, आज त्याच रयतेच्या पोटात वेळेवर अन्नाचे दोन घास जावेत म्हणुन आम्ही झटत आहोत. आमचे पुर्वज गडकिल्ले, तटाबुरुजांवरती चढायचे, आम्ही मुंबईतल्या इमारतींचे मजले चढतो. घोडे गेले, सायकली-गाड्या आल्या. याच्या माध्यमातुनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होत आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती कायम आमच्या पाठीशी उभी असल्यानेच आम्ही हे करु शकतोय.”\nडबेवाल्यांचे उत्तर ऐकुन प्रिन्स चार्ल्सने त्यांना सॅल्युट केला आणि त्यांच्याबद्दल “So you are Shivaji’s Maratha. You Can never be wrong. I salute you all.” अशा शब्दात गौरवोद्गार काढले. एवढेच नाही तर प्रिन्सने त्यांना स्वतःच्या लग्नासाठी विशेष पाहुणे म्हणुन इंग्लंडला निमंत्रित केले. तेथे त्यांचा जाहीर सत्कार केला. अशा डबेवाल्यांबाबत आपल्याला थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे.\nभारतात ब्रिटिश सत्तेचा अंमल असतानाच्या काळात १८९० मध्ये ब्रिटिश तसेच पारशी कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचवुन त्यातुन आर्थिक प्रपंच उभा करावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने महादु हावजी बच्चे यांनी ही सेवा सुरु केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत ३५ डबेवाले काम करत होते. नंतर त्यांची संख्या वाढत जाऊन आज ५००० झाली आहे. पायजमा, शर्ट, गांधी टोपी आणि डब्यांसाठी चुंबळ असा त्यांचा पोशाख असतो. बहुतेकजण डबेवाले हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ते शरीराने दणकट असल्याने डोक्यावरील जाळीतुन डब्याचा भार घेऊन फिरणे, रेल्वेत चढणे-उतरणे अशी धावपळ त्यांना जमत असते. नवीन डबेवाला भरती करत असताना त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्यांच्या आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागते. दादरच्या रानडे रोड येथे ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’(डबेवाले) यांचे कार्यालय आहे. डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे यांनी “डबेवाला धर्मशाळा” काढली.\nडबेवाल्यांची काम करण्याची पद्धत :\nडबेवाले सर्वप्रथम एका भागातील डबे गोळा करतात. ते डबे ज्या ज्या भागात वितरित करायचे आहेत त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. एकाच भागात वितरित करायचे डबे एकत्रित करुन जलद लोकल रेल्वेने नियोजित जागी पाठवले जातात. डब्यांवर कलर कोडिंग स्वरुपात त्यांचा पत्ता नमुद असतो. ही एक विशिष्ट सांकेतिक ओळख असते, जी फक्त डबेवाल्यांनाच समजते. रेल्वेतुन डबे उतरुन घेतल्यानंतर स्थानिक डबेवाले त्या कोडिंग वरुन ते डबे वितरित करतात. त्यांनतर स्वतःचे भोजन उरकुन रिकामे डबे गोळा करण्याच्या कामाला लागतात आणि शेवटी ते परत घरपोच करतात. कलर कोड मुळे डब्यांची अदलाबदल होत नाही. डबे पोहोच करण्याचा कुठेही पत्ता लिहलेला नसतो. तो डोक्यात ठेवुन डबे पोहोच केले जातात. डबेवाला हा एखाद्या अभियंत्याप्रमाणे त्याचे कार्य करतो आणि डोकं संगणकाप्रमाणे माहिती साठवण्याचे काम करते. कलर कोडिंग पद्धतीने आपल्या कामात त्यांनी यांत्रिकपणा आणला आहे. त्यामुळेच ५००० डबेवाले दररोज २ लाख डबे वितरित करतात. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी करण्यास खुप अवघड गोष्ट आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता अगदी वेळेवर घरचं ताजे जेवण कोणतीही चुक न होता ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास बाळगुन प्रामाणिकपणे ते आपले काम करत असतात.\nएवढी सगळी धावपळ करुन प्रतिदिन २५० ते ३००₹ वेतन घेऊन महिना साधारण ७-८ हजार वेतन मिळवतात.\nडबेवाल्यांचे हे अनोखे नेटवर्क पाहुन अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कुललाही त्यांचे कौशल्य जाणुन घेण्यासाठी इथं यावे लागले. डबेवाल्यांच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. त्याच्यावर अहवाल तयार केला. आता त्या अहवालाच्या विक्रीतुन व्यवस्थापनाची कौशल्ये जगभर पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. परंतु जिथे पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपल्याला डबेवाल्यांच्या असा अहवाल करण्याची दृष्टी कधी आली नाही. दुर्दैव \nडबेवाल्यांच्या या वितरण प्रणालीचा Error Rate म्हणजेच डबा पोहोचवण्याच्या कामात चुक होण्याचे प्रमाण ६० लाख डब्यांमागे फक्त १ इतका नगण्य आहे. या अचुकतेमुळेच फॉर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस “Six Sigma Accuracy” या अत्यंत महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या वर्गात मोटोरोला, जनरल मोटर्स अशा उद्योगांच्या समवेत स्थान दिले आहे.\nस्टॅनफोर्ड व जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्याकडुन तर शुन्य टक्के इंधन, शुन्य टक्के आधुनिक तंत्रज्ञान, शुन्य टक्के वादविवाद, अत्यल्प गुंतवणुक याद्वारे शंभर टक्के परिणाम आणि ग्राहकांना शंभर टक्के समाधान पुरवणारी ही संस्था आहे अशी त्यांना वाहवा मिळाली आहे.\nडबेवाल्यांच्या प्रवासातील काही ठळक गोष्टी :\n● छत्रपती शिवाजी महाराज हे डबेवाल्यांचे प्रेरणास्थान आहेत, तर पंढरीच्या विठोबारायावर, वारकरी संतपरंपरेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.\n● डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित “मुंबईचा डबेवाला” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.\n● डॉ.पवन अग्रवाल यांनी मुंबईच्या डबेवाल्यांवर Ph.D. करुन त्यांच्या जीवनावर आधारित “Teena & Tiffin” या कॉमिक्सची निर्मिती केली.\n● डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे, गंगाराम तळेकर, सुभाष तळेकर व इतरांनी ६० हुन अधिक देशात डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे दिले आहेत.\n● जमाल हिराणी या भारतीयाने लंडन येथे सुरु केलेल्या “Tiffin Beats” उपहारगृहाच्या प्रमोशनसाठी डबेवाल्यांचे नेते गंगाराम तळेकर यांना निमंत्रित केले होते.\n● Rohinton Mistry या इंग्रजी लेखकाने त्याच्या “Such a long journey” नावाच्या पुस्तकात डबेवाल्यांना “घामटलेली डुकरे” असे संबोधले होते. त्याला उत्तर देण्यासाठी गंगाराम तळेकरांनी इंग्रजीतच “The wonder of Dabewala unfolded” हे अप्रतिम पुस्तक लिहुन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि डबेवाले किती ग्रेट आहेत ते दाखवुन दिले.\n● वेगवेगळ्या कार्यक्रमांतुन शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये आणि गरिबांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने डबेवाल्यांनी मोफत “रोटी बँक” सुरु केली आहे.\nडबेवाल्यांच्या कार्याबद्दल सांगण्यासारखे बरेच आहे. अभ्यासाच्या आणि शब्दांच्या मर्यादांमुळे जितके शक्य तितके लिहण्याचा प्रयत्न केला आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला घड्याळाच्या वेळेइतकेच तंतोतंत वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य, अचुकता, वेळेचे गणित आजही कित्येकांच्या कौतुकाचा विषय आहे. तरी सुद्धा आपल्याला आपल्या मुलाबाळांना मिलियन डॉलर सक्सेस स्टोऱ्या सांगत बसतो, मात्र आठवी पास डबेवाल्यांच्या कथा सांगणे आपल्याला कधी महत्वाचे वाटत नाही. हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे. शालेय अभ्यासक्रमात डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य समाविष्ट व्हावे.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nक्रांतीचा धगधगता अंगार क्रांतिसींह नाना पाटील… 0\nसामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.\nक्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.\nनाना सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना नानांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली. तुफानी सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो कि पळो करून सोडले. ब्रिटीश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वे सेवा, पोस्ट सेवा आदी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.\n१९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहित या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच्या मातोश्रींचे निधन झाले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आईचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत. सामान्य जनतेची नानांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटीश सरकार नानांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरीत्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता. सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटीश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता.\nनानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे. सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती.\nसामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रित लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतीसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे असे प्रतीसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादि प्रवृत्तींना नानांच्या प्रतीसरकारचा चांगलाच धाक होता. गरीब शेतकऱ्यांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतीसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतीसरकार हे ‘पत्रीसरकार’ म्हणूनही ओळखले जावू लागले. आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते.\nस्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रतीसिहांच्या कर्तुत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षापूर्वी स्वताच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरदृष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली, तर क्रांतीसिहानी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरवले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्ती नानांना तंतोतंत लागू पडतात.\nत्याकाळी बहुजन समाजाला राजकीय नेतृत्व नव्हते. तत्कालीन कॉंग्रेसचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हातात होते. त्यांना गरीब बहुजन समाज व शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. परिणामी बहुजन समाजाची खूप उपेक्षा होत होती. कॉंग्रेसची घडण ही परंपरागत चातुर्वर्ण वर्गाच्या नावाखाली चालत होती. त्यातून बहुजन समाजाच्या आर्थिक सोयीचे व कामाचे चीज होईल असे दिसत नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधक पुढाऱ्यांनी मिटींग घेतली. या मिटींगमध्ये कॉंग्रेस अंतर्गतच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी गावोगाव सभा-मिटिंग घेवून बहुजन समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. नानांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तुफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होवू लागला. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष हे कॉंग्रेस अंतर्गतच एक संघटन होते. परंतु कॉंग्रेसच्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी ‘महाराष्ट्रात कॉंग्रेस अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष राहू शकत नाही’ असा ठराव पास करून घेतला. त्यांचे विचार व पद्धती न पटल्याने बहुजन समाजातील कार्यकर्ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.\nनाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना समजेल असे होते. भाषांशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.\nआज नानांचे कार्य बहुजन समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाल्याशिवाय त्यांच्या कार्याचे चीज होणार नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती करणे हीच क्रांतीसिहांना खरी आदरांजली ठरेल.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/09/current-affairs-mcqs-168.html", "date_download": "2018-04-20T16:39:16Z", "digest": "sha1:B2WJ3NEV3OBZBYPE4S5FGN5VH3K5FUVG", "length": 11140, "nlines": 202, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : प्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी", "raw_content": "\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\n[प्र.१] सध्या चर्चेत असलेल्या ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत\n३] ए. एस. दुलत\nराजीव डोग्रा १९९२ ते १९९४ या काळात कराचीमध्ये भारताचे वाणिज्यदूत होते. या पुस्तकात भारत पाकिस्तान दरम्यानच्या अनेक वादग्रस्त मुद्यांविषयी भाष्य केल्यामुळे हे पुस्तक चर्चेत आले आहे.\nअधिक माहितीसाठी चालू घडामोडी - २६ व २७ जून वाचा.\n[प्र.२] २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या शहराला देण्यात आले आहे\n[प्र.३] जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर २२ क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचा कितव्या स्थानी आहे\nया अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या २६ लाख आहे.\n[प्र.४] ‘कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे’ नावाने कोणत्या नवीन द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे\n[प्र.५] सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवलीकरणासाठी सरकारने आगामी चार वर्षांत किती कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले\n१] ७० हजार कोटी रुपये\n२] ८० हजार कोटी रुपये\n३] ९० हजार कोटी रुपये\n४] ९९ हजार कोटी रुपये\n१] ७० हजार कोटी रुपये\n[प्र.६] सिंगापूर स्वातंत्र्य दिनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूर येथे झालेल्या राष्ट्रीय दिवस संचलनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते\n[प्र.७] ३ ऑगस्ट २०१५ रोजी 'एनएससीएन' व भारत सरकार यांच्यात एक महत्वपूर्ण शांतता करार झाला. 'एनएससीएन' ही कोणत्या राज्यातील बंडखोर संघटना आहे\n[प्र.८] युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बुरस शिखर कोणत्या भारतीय महिलेने सर केले\n[प्र.९] ‘आरबीआय’च्या ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर झालेल्या मौद्रिक धोरणाला अनुसरून खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा\n१] रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) : ४ टक्के\n२] वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) : २१.५० टक्के\n३] रिव्हर्स रेपो दर : ७.२५ टक्के\n४] बँक रेट : ८.२५ टक्के\n३] रिव्हर्स रेपो दर : ७.२५ टक्के\nरिव्हर्स रेपो दर : ६.२५ टक्के\nरेपो दर : ६.२५ टक्के\n[प्र.१०] केंद्र सरकारतर्फे कोणता दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला गेला\nया दिवशी १९०५मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला गेला.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nचालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ सप्टेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-04-20T16:22:31Z", "digest": "sha1:WFNOTVMNHU4MU3OIXR2R4QVRZOR4BRP7", "length": 17515, "nlines": 142, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "किशोर आरोग्य - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपौगंडावस्थेमधील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे तिसरे महत्त्वाचे कारण आहे. वाढते ताणतणाव, अपेक्षांचे ओझे, नात्यांतील संघर्ष ही सारी कारणे त्यामागे असतात; मात्र अशा मानसिकतेची चिन्हे लक्षात घेऊन त्यावर उपचार करता येऊ शकतात.........\nअठरा वर्षांचा सचिन \"आयसीयू'मध्ये ऍडमिट असल्याचे कळल्यामुळे त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी सारेच हवालदिल झालेले.... सचिन स्कॉलर मुलगा, दहावीला ८५% गुण मिळविलेला... बारावीनंतर इंजिनिअरिंगला जाण्यास उत्सुक असलेला... परंतु प्रवेश परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न\nआपल्या आजूबाजूला अशा अनेक घडताना आपण पाहत असतो, वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो. आपल्याला दिसणाऱ्या या केसेस हिमनगाचे टोक आहेत.\nपौगंडावस्थेमधील आत्महत्यांचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. सन २००५ मध्ये \"युथ रिस्क बिहेवियर सर्वे' या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे, की १७% विद्यार्थ्यांनी मागील एक वर्षामध्ये आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. पौगंडावस्थेमधील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे तिसरे महत्त्वाचे कारण आहे.\nदैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, त्यामुळे येणारी उदासीनता आणि आत्महत्येचा प्रयत्न, हे दुष्टचक्र निर्माण होते. मुलाचा स्वभाव, त्याच्या इच्छाआकांक्षा, आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे, घरामधील वातावरण, मुलांचा एकलकोंडेपणा, समाजामध्ये वाढत चाललेली जीवघेणी स्पर्धा हे सर्व घटक पौगंडावस्थेमधील आत्महत्यांना कारणीभूत आहेत. नोकरी किंवा व्यवसाय करून घर, गाडी, उत्तम जीवनशैली या साऱ्या स्वप्नांमागे धावताना ही पाखरं थकतात अन्‌ कधीतरी निसटत्या क्षणी आपली जीवनयात्रा संपवतात.\nआत्महत्या करणाऱ्या मुलांमध्ये अनेक वेळा उदासीनता, उन्माद, छिन्नमनस्कता, फीट्‌स येणे यांसारखे आजार असू शकतात. परंतु मानसिक आजारांबद्दल आपल्याकडे पुरेशी जागृती नसल्यामुळे यांकडे लक्ष दिले जात नाही. या मुलांचा बुद्‌ध्यंक (खट) नॉर्मल असल्याचे आढळून येते. तरीही ही मुले अभ्यासामध्ये पाठीमागे का पडतात, हा प्रश्‍न पालकांना भेडसावतो आहे. या आत्महत्या टाळता येऊ शकतात; परंतु त्यासाठी पालकांनी पुढील गोष्टी समजावून घ्यायला हव्यात.{mospagebreak} पौगंडावस्थेमधील मुलांमधील वर्तणुकीतील बदल पालकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतले पाहिजेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, अभ्यासावर लक्ष केंद्रित न करू शकणे, कशातच रस नसणे, उदास वाटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. आत्महत्येचा विचार बोलून दाखविणे किंवा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न यांकडे दुर्लक्ष करू नये, कारण \"लांडगा आला रे आला' या गोष्टीप्रमाणे घटनाक्रम घडू शकतो. नंतर दु-ख करण्यात अर्थ नाही. म्हणून वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.\nमानवी मनामधील आनंद-दु-ख, राग, भीती, संशय या सर्व भावना आणि विविध मानसिक आजार हे मेंदूमधील रासायनिक बदलांवर अवलंबून आहेत, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे झालेले बदल पूर्ववत करण्यासाठी औषधोपचार करणे गरजेचे आहे.\nशारीरिक आजाराच्या जशा तपासण्या आहेत, उदा. हिमोग्लोबिन, युरीन, शुगर इ. तशाच तपासण्या मानसिक आजारांतदेखील आहेत. उदा.\nचाइल्ड बिहेविअर चेकलिस्ट: यामध्ये मुलाच्या वागण्यातील दोष लक्षात येतात.\nप्रोजेक्‍टिव्ह टेस्ट: चित्रावरून गोष्ट बनविणे. या तपासणीमधून आपल्याला मुलांच्या अंतरंगात काय चालू आहे याचा ठाव लागू शकतो.\nमिनेसोटा मल्टिफॅसिक पर्सनॅलिटी इन्व्हेन्ट्री (एमएमपीआय) स्वभाव तपासणी - या तपासणीमधून मुलांच्या स्वभावातील गुणदोष लवकर ओळखता येऊन त्यात योग्य ते बदल करण्याचा सल्ला देता येतो. या व अशा तपासण्यांमधून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारांसाठी योग्य ती दिशा मिळते. मानसिक आजारांमधील उपचारांचे पुढील दोन विभाग पडतात - १) औषधोपचार, २) समुपदेशन व सायकोथेरपी.\nऔषधोपचार - मानसिक आजारांमध्ये औषधे घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हल्ली कमीत कमी साइड इफेक्‍टस्‌ असलेली औषधे उपलब्ध आहेत आणि नवनवीन शोधप्रकल्प मार्गी लागले आहेत.\nसमुपदेशन व सायकोथेरपी: मानसिक आजारांसाठी समुपदेशकांची मदत उपयोगी पडू शकते; परंतु सध्या या क्षेत्रामध्ये आवश्‍यक ती पदवी व अनुभव नसलेले लोक कौन्सेलिंग सेन्टर्स उघडत आहेत. तेव्हा रुग्णांनी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.\nकॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी - वागणुकीमध्ये योग्य तो बदल करण्याची पद्धती, शिथिलीकरण उपचार, व्होकेशनल थेरपी अशा विविध उपचारपद्धतींचा अंतर्भाव सायकोथेरपीमध्ये होतो.\nअशा उपचार पद्धतींचा चांगला परिणाम होऊन रुग्ण पूर्ण बरा होतो.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:43:41Z", "digest": "sha1:TD6CN72UBA2PO6RHYIBYBHHFNDQ2MHZK", "length": 4329, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परिभ्रमण काळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपरिभ्रमण काळ म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूला दुसर्‍या वस्तूभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा काळ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/06/current-affairs-25-jun.html", "date_download": "2018-04-20T16:40:24Z", "digest": "sha1:7IKBIK4R5L57G4CKCIZ6OKNSMG7CAIMU", "length": 37293, "nlines": 226, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २५ जून २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २५ जून २०१५\n२५ जून : आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला चाळीस वर्षे पूर्ण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती.\nनंतर आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील राजकारण आणि समाजकारणात पुढील १२ महिन्यांत अनेक घटना घडल्या. एकूणच आणीबाणी लादण्याच्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे अवघा भारत देश ढवळून निघाला. या घटनेमुळे देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली.\nसचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू\nभारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.\n‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे.\nया सर्वेक्षणासाठी २१व्या शतकातील १०० सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.\nया सर्वेक्षणात तब्बल १६००० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २३ टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर १४ टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली.\nतब्बल दहा दिवस सुरु असलेल्या या सर्वेक्षणात २००० सालापासूनच्या कसोटी खेळाडुंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, लिटील मास्टर सचिनने या सगळ्यांवर मात करत अग्रस्थान पटकावले.\nविशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या स्वत: जाहीर केलेल्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर होता. मात्र, सचिनने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस या सर्वेक्षणात काहीसे पिछाडीवर पडल्याची माहिती वेबसाईटकडून देण्यात आली.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.\nनागपूरसह सहा ठिकाणी आयआयएम\nनागपूरसह देशातील सहा ठिकाणी नव्याने इंडियन ‌इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) (भारतीय व्यवस्थापन संस्था) स्थापना करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nविशाखापट्टणम (आंध्र प्रदेश,) बोधगया (बिहार), सिरमौर (हिमाचल प्रदेश), संबळपूर (ओडिशा) आणि अमृतसर (पंजाब) येथे अन्य पाच आयआयएम असतील.\nयेत्या शैक्षणिक वर्षापासूनच या संस्था विविध व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करतील.\nप्रत्येक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून कॅट (कॉमन ऍडमिशन टेस्ट) मार्फत प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाईल. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सात वर्षानंतर प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या ५६० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल.\nदेशात याआधी १३ आयआयएम आहेत.\nनेपाळला भारताची १ अब्ज डॉलरची मदत\nनेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय दाता परिषद २५ जून रोजी पार पडली. या परिषदेत भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन:उभारणीसाठी भारत तब्बल १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.\nआता एक अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार असून, आणखी एक अब्ज डॉलरची मदत पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असून, एकूण मदतीचा आकडा दोन अब्ज डॉलरवर गेला आहे. नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली.\nयाच परिषदेत चीनने ४८.३ कोटी डॉलरची मदत जाहीर केली असून, नेपाळच्या शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, चीन ‘सिल्क रोड फंड’मधून वेळोवेळी मदत करणार असून, पुढील वर्षभरात दीड हजार नेपाळी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांनी जाहीर केले.\nजपाननेही २६ कोटी डॉलरची मदत नेपाळसाठी जाहीर केली आहे. यातून घरे, शाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.\n२५ एप्रिल भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे ९००० लोक मृत्यूमुखी पडले. त्यावेळी झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे नेपाळ मोठ्या संकटात सापडले. पुरातन मंदिरे, वास्तू, सरकारी कार्यलय, हॉस्पिटल यांचेही प्रचंड नुकसान झाले.\nनेपाळच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पण भूकंपामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवल्याने नेपाळला मोठ्या मदतीची गरज असताना भारताने पुढाकार घेतला आहे.\nस्मार्ट सिटी आणि अमृत योजना\nशहरी भारताचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.\n१०० स्मार्ट शहरांचा विकास, अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन (एएमआरयूटी) तसेच पंतप्रधान आवास योजना, ही शहर विकासाची सुसाट इंजिने मानल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.\nया योजनांबद्दल सविस्तर माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.\nरिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी)\nकेंद्र सरकारने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (सेकी) नोंदणी व्यवसायिक कंपनी म्हणून करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता सेकीचे नाव रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी) असे होईल.\nयामुळे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना गती येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.\nसेकी ही सध्या कायद्यांतर्गत सेक्शन-८ प्रकारची कंपनी आहे. या विभागांतर्गत समाजासाठी काम करणाऱ्या कंपन्यांची स्थापना व नोंदणी करता येते. यामुळे अशा कंपनीला व्यवसाय करण्यास तसेच व्यावसायिक लाभ मिळवण्यास पूर्णपणे बंदी आहे.\nअपारंपरिक ऊर्जेसारखे क्षेत्र ही काळाची गरज असल्यामुळे सेकीची नोंदणी बदलून तिला व्यावसायिक कंपनीचा दर्जा देणे आवश्यक होते.\nआता सेकीची नोंदणी कंपनी कायद्याच्या सेक्शन-३ अंतर्गत होणार असल्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या रेकी या कंपनीला स्वत:च्या मालकीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्यातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक स्तरावर विकणे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.\nकॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे सेकी ही कंपनी कंपनी रजिस्ट्रारकडे सेक्शन-३ अंतर्गत नोंदणी करून घेण्यासाठी अर्ज करेल आणि नाव बदलून रेकी हे नवे नाव धारण करेल.\nसेकीला संपूर्णत: व्यावसायिक कंपनी म्हणून वावरताना कोणतीली अडचण येऊ नये, यासाठीच या कॉर्पोरेशनची नोंदणी कंपनी कायदा सेक्शन-३ अंतर्गत नव्याने केली जाणार आहे.\nनवी रेकी ही कंपनी आपले कार्यक्षेत्र सौरऊर्जेपुरतेच मर्यादित ठेवणार नसून त्याखेरीज अन्य अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रांमध्येही ही कंपनी काम करणार आहे. यामध्ये जिओथर्मल, ऑफशोअर विंड, टायडल अशा ऊर्जांचाही समावेश असणार आहे.\nजोकोविच, सेरेनाला अव्वल सीडिंग\nसर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल सीडिंग देण्यात आले आहे.\nही स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या रफाएल नदालला दहावे सीडिंग आहे. नदालने २००८ आणि २०१०मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.\nसीडेड खेळाडूंची यादी (अव्वल दहा)\nपुरुष एकेरी- नोव्हाक जोकोविच (सर्बिया), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मरे (ब्रिटन), स्टॅनिस्लास वॉवरिन्का (स्वित्झर्लंड), निशिकोरी (जपान), बर्डिच (चेक प्रजासत्ताक), रॉनिक (कॅनडा), फेरर (स्पेन), चिलीच (क्रोएशिया), नदाल (स्पेन).\nमहिला एकेरी : सेरेना विल्यम्स (अमेरिका), क्विटोवा (चेक प्रजासत्ताक), हॅलेप (रोमानिया), मारिया शारापोवा (रशिया), कॅरोलिन वॉझ्नियाकी (डेन्मार्क), साफारोवा (चेक प्रजासत्ताक), अॅना इव्हानोविच (सर्बिया), एकतेरिना माकारोवा (रशिया), कार्ला सुआरेझ (स्पेन), अँजेलिक कार्बर (जर्मनी).\nमानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस\nमुंबईतील मालवणी येथे घडलेल्या दारूकांडप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर नोटिसा बजाविल्या आहेत. या दारूकांडात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.\nविषारी दारू प्यायल्याने मालवणी येथे अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली. माध्यमातील वृत्तांमध्ये तथ्य असल्यास हा मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले आहे.\nराज्याचे मुख्य सचिव, अबकारी विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई पोलिसांवर नोटिसा बजाविण्यात आल्या असून, दोन आठवडय़ात वस्तुस्थिती सादर करण्यास सांगितले आहे.\nत्याचप्रमाणे बळींच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे का, त्याची माहितीही आयोगाने संबंधितांकडून मागविली आहे.\nभाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार दिलीपसिंह भुरिया यांचे निधन\nभाजपचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे रतलाम-झाबुआ मतदारसंघातील खासदार दिलीपसिंह भुरिया (वय ७१) यांचे गुडगाव येथे निधन झाले. त्यांना मेंदूत रक्तस्राव झाला तसेच हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.\nत्यांचा जन्म १९ जून १९४४ रोजी झाला व १९७२ मध्ये ते पेटलावद विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.\nझाबुआ मतदारसंघातून ते १९८० मध्ये काँग्रेसकडून निवडून आले व १९८० ते १९९६ असे पाच वेळा ती जागा जिंकली.\nकाँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याशी मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व भाजपात प्रवेश केला. १९९८ मध्ये त्यांना काँग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी पराभूत केले पण २०१४ मध्ये दिलीपसिंह भुरिया परत निवडून आले.\nत्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना काम केले होते.\nशाहीर लीलाधर हेगडेंना बालसाहित्य सन्मान\nसाने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले व उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान यांसारख्या देशभक्तिपर गीतांनी राष्ट्रप्रेम जागवणारे शाहीर लीलाधर हेगडे यांना साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वीर राठोड यांना मराठीसाठीचा अकादमी युवा साहित्य सन्मान जाहीर झाला आहे.\nयेत्या १४ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होईल.\nसाहित्य अकादमीतर्फे यंदा २४ भाषांतील लेखकांना बालसाहित्य, तर २३ भाषांतील ३५ वर्षांखालील लेखकांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.\nबालसाहित्य पुरस्कार मिळालेल्यांमध्ये शाहीर हेगडे यांच्यासह निवेदिता सुब्रह्मण्यम (इंग्रजी), शीरजंग गर्ग (हिंदी) व रामनाथ गावडे (कोकणी) यांचाही समावेश आहे. युवा साहित्य पुरस्कार विजेत्यांमध्ये निशा नाईक यांना कोकणीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nहेगडे यांना बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल साहित्य अकादमी सन्मान मिळाला आहे. आपल्या गीतातंतून राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागविण्याबरोबरच उमलत्या पिढीत सुसंस्कारांची रूजवात व्हावी यासाठी अखंड धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये शाहीर हेगडे अग्रस्थानी आहेत. मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.\nठाणे जिल्ह्यात जन्मलेले शाहीर हेगडे यांनी १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सहभागी झाले. चुनाभट्टीतील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते गेली किमान ४५ वर्षे सांभाळत आहेत.\nत्यांना यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्क व केशव गोरे स्मारक ट्रस्ट आदी संस्थांचे सन्मान मिळाले आहेत.\nईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी)\nकेवळ मालवाहतुकीच्या उद्देशाने बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पासाठी ८१,४५९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली.\nमहाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि राजस्थान ही नऊ राज्ये या प्रकल्पाद्वारे जोडली जाणार आहेत.\nयातील पूर्वेकडील राज्यांमध्ये असलेल्या ‘इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची अंमलबजाणी तीन टप्प्यांत केली जात आहे, तर पश्चिमेकडील राज्यांसाठीच्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची दोन टप्प्यांत अंमलबजावणी केली जात आहे.\nया प्रकल्पाचे सर्व टप्पे २०१७ ते २०१९ दरम्यान पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी ८४ टक्के जमिनीचे संपादन झाले असून, त्यासाठी ६९०० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.\nझहीर अब्बास ‘आयसीसी’चे अध्यक्ष\nपाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला असून अब्बास पुढील एका वर्षासाठी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.\nबांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.\nएहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे झहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी असतील.\nआयसीसीने या बैठकीदरम्यान सर्बिया क्रिकेट फेडरेशनलाही मान्यता दिली.\nआयसीसीचे चेअरमन : एन. श्रीनिवासन\nशैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्बास यांनी १९६९ ते १९८५ या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ७८ कसोटी आणि ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ५०६२ आणि २,५७२ इतक्या धावा केल्या आहेत.\nयाशिवाय त्यांनी १९७५, १९७९ आणि १९८३ या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ते पाकिस्तानी संघाचे कर्णधार होते.\nप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०८ शतके झळकवणारा एकमेव आशियाई खेळाडुचा बहुमानदेखील त्यांच्या नावावर जमा आहे.\nआपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात अब्बास यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची खेळी केली होती.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३० जून २०१५\nचालू घडामोडी - २९ जून २०१५\nचालू घडामोडी - २८ जून २०१५\nप्रश्नसंच १५७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ व २७ जून २०१५\nस्मार्ट सिटी, ‘अमृत’ आणि पंतप्रधान आवास योजना\nचालू घडामोडी - २५ जून २०१५\nचालू घडामोडी - २४ जून २०१५\nचालू घडामोडी - २३ जून २०१५\nचालू घडामोडी - २२ जून २०१५\nचालू घडामोडी - २१ जून २०१५\nचालू घडामोडी - २० जून २०१५\nचालू घडामोडी - १८ व १९ जून २०१५\nप्रश्नसंच १५६ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १७ जून २०१५\nचालू घडामोडी - १६ जून २०१५\nप्रश्नसंच १५५ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १५ जून २०१५\nराज्यसेवा मुख्यपरीक्षा महत्वाची घोषणा\nचालू घडामोडी - १४ जून २०१५\nचालू घडामोडी - १३ जून २०१५\nचालू घडामोडी - १२ जून २०१५\nप्रश्नसंच १५४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ जून २०१५\nचालू घडामोडी - १० जून २०१५\nचालू घडामोडी - ९ जून २०१५\nचालू घडामोडी - ८ जून २०१५\nनरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा\nचालू घडामोडी - ७ जून २०१५\nचालू घडामोडी - ६ जून २०१५\nचालू घडामोडी - ५ जून २०१५\nचालू घडामोडी - ४ जून २०१५\nचालू घडामोडी - ३ जून २०१५\nप्रश्नसंच १५३ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ जून २०१५\nचालू घडामोडी - १ जून २०१५\nचालू घडामोडी - ३१ मे २०१५\nचालू घडामोडी - ३० मे २०१५\nचालू घडामोडी - २९ मे २०१५\nचालू घडामोडी - २८ मे २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/air-pollution-by-burning-organic-waste/articleshow/62481367.cms", "date_download": "2018-04-20T16:40:42Z", "digest": "sha1:J6GSRWHSSNEVVY2H63EYYLA4PVMRDPVI", "length": 20876, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "air pollution by burning organic waste | Air pollution by burning organic waste - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसेनापती बापट रस्त्यावरील शेतकी महामंडळ आणि पासपोर्ट ऑफिसच्या परिसरात सतत झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा जाळला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत असून नागरिकांना त्रास होतो आहे. या चौकात कॉलेज, शाळा, ग्रंथालये, ऑफिस आणि सोसायट्याही आहेत. या सर्व लोकांना त्याचा त्रास होतो. महापालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळ्यास बंदी असतानाही हा प्रकार घडतो आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभुयारी मार्ग की तळीरामांचा अड्डा\nहेच का तुमचे स्वच्छ भारत अभियान \nसी.ओ.इ.पी चे चुकीचे दिशादर्शक\nरस्त्यावर आणि पदपथावर अतिक्रमण\nपारगेनगर येथे अस्ताव्यस्त पार्कींग\nघाटमार्गांवर जुन्या बस नकोत\n2सार्वजनिक पार्किंग यांच्याच मालिकीचीच का....\n3आम्ही तुम्हाला यासाठी निवडून दिले का\n4सुतारवाडी लिंकरोड,मोराच्या पुतळ्याजवळ बसस्टॉप हवा...\n8व्यायामाचे साहित्य व शोभिवंत शिल्पांची दुरवस्था...\n9पी1 पी2 हा नियम लागू असताना अवैध पार्किंग...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathwada-news-agitation-90107", "date_download": "2018-04-20T16:40:48Z", "digest": "sha1:PZIMRFTZKCXHWUJEU4QG5ZLV3U75PCJK", "length": 11054, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada news: agitation भीमा कोरेगाव: जालना शहरातही बंद | eSakal", "raw_content": "\nभीमा कोरेगाव: जालना शहरातही बंद\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nशहरातील व्यापाऱ्यांनी रॅली निघाल्यानंतर आपल्या दुकानाचे शटर खाली केले. याच दरम्यान शहरातील भोकरदन नाक्यावर अज्ञात व्यक्तींकडून बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं शहरात शांतता आहे\nजालना: भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद आज (मंगळवार) जालना शहरात उमटले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शरातील तरुणांनी नूतन वसाहत येथील रॅली काढत शहर बंदची हाक दिली. तर शहरातील भोकरदन नका येथे अज्ञात व्यक्तीने बसवर दगड फेक केली. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nकोरेगाव येथे सोमवारी (ता.1) झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील सुमारे 100 तरुणांनी नूतन वसाहत येथून रॅली काढली. यावेळी शहरातील दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तरुणांनी कोरेगाव येथील घटनेचा निषेध करत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.\nदरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी रॅली निघाल्यानंतर आपल्या दुकानाचे शटर खाली केले. याच दरम्यान शहरातील भोकरदन नाक्यावर अज्ञात व्यक्तींकडून बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं शहरात शांतता आहे.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nवाईन्स शाॅपमध्ये चोरांकडून सफाई कामगाराचा खून\nचिक्कोडी - बोरगाव येथे वाइन्स शाॅपमध्ये काल गुरूवारी (ता. १९) रात्री चोरट्याने दुकान फोडून सफाई कामगाराचा खून केल्याची घटना घडली आहे. सिद्धलिंग (वय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sangli-aniket-s-family-reaction-after-deepak-kesarkar-visit-478158", "date_download": "2018-04-20T16:32:47Z", "digest": "sha1:INXURACQH4OFCPJEC5CRU424XTIESUHP", "length": 18499, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सांगली : दोषींवर कारवाई न झाल्यास अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा", "raw_content": "\nसांगली : दोषींवर कारवाई न झाल्यास अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा\nसांगलीतल्या अनिकेत कोथळेंच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण कुटुंब आत्मदहन करु असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला. पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती. त्यानंतर कोठडीत बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावून टाकली. याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं आहे, त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nसांगली : दोषींवर कारवाई न झाल्यास अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा\nसांगली : दोषींवर कारवाई न झाल्यास अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा\nसांगलीतल्या अनिकेत कोथळेंच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण कुटुंब आत्मदहन करु असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला. पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती. त्यानंतर कोठडीत बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावून टाकली. याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं आहे, त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/omisha-chitfund-cheated-khairnar-police-complaint-in-pune/", "date_download": "2018-04-20T16:16:53Z", "digest": "sha1:57SS6TFC43XBVBGAZABYQ2R4F4Y7D3ZV", "length": 8034, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "चिटफंडच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून ऑफिस बंद संचालक फरार – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nचिटफंडच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून ऑफिस बंद संचालक फरार\nआकर्षक व्याजदर , २ वर्षात दामदुप्पट अशा आमिषाला सर्वसाधारण माणूस सहज बळी पडतो ते चतुर लोकांनी ओळखले आहे. सर्वसाधारण माणूस अशा स्वप्नांना लगेच भुलतो आणि सहज चोर लोकांच्या तावडीत सापडतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.\nपुण्यातील संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे . या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या नऊ संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे .\nराकेश खैरनार ( वय २८ , रा. नाशिक ) यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे . त्यानुसार भारती राजपूत, जुई परदेशी, मानसिंग घोरपडे, दत्तात्रय टकले ,कैलास परब व मतीन शेख, विशाल मराठे,गणेश जामोदे व सागर शिरसाठ यांनी मुंबई नाका परिसरातील वासन आय केअर नजीकच्या माधव पार्क येथे ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी सुरु केली.\nफिर्यादी खैरनार यांनी १ जानेवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१७ अशी दरमहा २५ हजार रुपये रोख व धनादेशाद्वारे कंपनीत गुंतवणूक केली. कंपनीतील गुंतवणूक साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी व्याज तसेच गुंतवणुकीची रक्कम परत मिळावी यासाठी कंपनीकडे संपर्क साधला . सुरुवातीला टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. पुढे जाऊन कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून मुदतीच्या नावावर टोलवाटोलवी करण्यात आली . पुढे मग खैरनार यांनी संचालकांशी संपर्क केला असता लवकरच तुमचे पैसे दिले जातील असे आश्वासन देण्यात आले. मात्र एके दिवशी संचालकांच्या सहित सर्वजण फरार झाले. मग खैरनार यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.\nजास्त व्याजदर किंवा दुप्पट पैसे करून देण्याच्या अमिषाला लोक सहज बळी पडतात हे लक्षात घेऊनच अशा चिटफंडच्या नावाखाली फसवणूक केली जाते . आपण सतर्क राहणे हेच आपल्या हातात आहे .\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← अखेर भात भात करत तिने प्राण सोडला : डिजिटल इंडियाला बोटांचे ठसे आणणार कुठून एकापेक्षा एक सरस असे धम्माल मराठी दिवाळी मेसेजेस : कॉपी करा सेंड करा शेअर करा →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2018-04-20T16:33:54Z", "digest": "sha1:JPZAMV4OJGO235WRMNUXMDYXAFBAG5P3", "length": 3870, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. ४८४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ५ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/09/current-affairs-9-10-september.html", "date_download": "2018-04-20T16:36:18Z", "digest": "sha1:EQTBGCURKMGUCWEIORDX66P2HZVYL24H", "length": 20935, "nlines": 170, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nडॉ. ‌विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार\nविविध क्षेत्रात राहून विदर्भाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यांना दरवर्षी 'नागभूषण पुरस्कार' देऊन सन्मानीत केले जाते. याद्वारे एकप्रकारे विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय लौकिकाचा सन्मान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. ‌विकास आमटे यांना जाहीर झाला आहे.\nराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याद्वारे विदर्भासाठी भरघोस कार्य केलेल्यांचा सन्मान केला जातो.\n१ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारासाठी यंदा कुष्ठरोग्यांसाठी आपले जीवन वेचलेल्या डॉ. विकास आमटे यांची निवड करण्यात आली आहे.\nवडील बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत सेवारत असलेले डॉ. विकास आमटे हे वरोऱ्याच्या महारोगी सेवा समितीचे सचिव आहेत. आतापर्यंत त्यांना संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात आता नागभूषण पुरस्काराची भर पडली आहे.\nआतापर्यंत हा पुरस्कार स्व.आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरेई ससाई, जी. एम. टावरी, स्व.प्राचार्य राम शेवाळकर, डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व.कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, अॅड. व्ही.आर. मनोहर व पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.\nआर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली आहे.\nजी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते\nगुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली\nवूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे\nजी २० समुहात असणाऱ्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील\nत्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला\nसामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला\nराजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील\nअर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया , दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, इंग्लंड, अमेरिका आणि यूरोपीयन युनियन\nआशियात १९९९ मध्ये आलेल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर विविध देशातील अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत जी-२० ची स्थापना झाली.\nजागतिक आर्थिक विकासात सहकार्य या सूत्राने जगातील विकसित विकसनशील असे २० देश एकत्र येऊन बनलेला हा एक मुख्य गट आहे.\nजागतिक सकल उत्पादनाचे (जीडीपी) ८५ टक्के प्रतिनिधित्व करणारा हा जी-२० गट आहे.\nब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी ब्रिटीश सत्तेमध्ये ६३ वर्षे (२३,२२७ दिवस) महाराणी पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असाही विक्रम त्यांनी बनविला आहे.\n९ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.\nसर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली महिला.\nएलिझाबेथ यांचा विवाह समारंभ अधिक काळ चालला.\nसर्वाधिक देशांच्या नाण्यांवर एलिझाबेथ यांची प्रतिमा\nसर्वांत प्राचीन राजघराणे सांभाळणारी महिला.\nराणीपदावर असताना ११६ देशांना २६५ भेटी दिल्या.\nअमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट. व्हाइट हाउसलादेखील भेट.\nविन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.\n‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर\nदक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल ४२५ कोटी रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.\nमुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.\nउद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला २५००० चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे. जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता.\nफोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय\nफोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.\nत्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.\nनारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.\nत्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.\nभारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली\nभारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.\nया स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.\nतमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.\nडीआरडीओच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.\nया विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.\nहैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.\nमंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nचालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ सप्टेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2018-04-20T16:42:09Z", "digest": "sha1:UUEXAPERW2ZX5RPLXOK4VUGUHSNM3DKT", "length": 5375, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे\nवर्षे: १३४१ - १३४२ - १३४३ - १३४४ - १३४५ - १३४६ - १३४७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/naxals-behind-koregaon-bhima/", "date_download": "2018-04-20T16:28:06Z", "digest": "sha1:EQ5J642WW7TQ53ZFNKOZTJXBGO3ESXYI", "length": 5905, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "naxals behind koregaon bhima – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजी काय म्हणतात : पत्रक काढून दिले स्पष्टीकरण\nकोरेगाव भीमा इथल्या हिंसाचारप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर हिंसाचाराचा ठपका ठेवला होता.मात्र ज्याप्रमाणे जिग्नेश व उमरने खुले आम लोकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले होते तसे भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे काही बोलल्याचे किंवा जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे एकही उदाहरण प्रकाश आंबेडकर… Read More »\nकोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागील अदृश्य हात कुणाचे : तपास यंत्रणांचा काय अंदाज\nसूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भीमा कोरेगावच्या झालेल्या प्रकारात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेल्या हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.दलित विरुद्ध दलितेतर हा वाद उफाळून आणून संपूर्ण महाराष्ट्र धुमसत ठेवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता . नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने वृत्त… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/cars-buses-damaged-by-unknown-pimpri-pune/", "date_download": "2018-04-20T16:35:00Z", "digest": "sha1:M2NDD5FEJE4DRCHQPXST7IBIIIBU3CDY", "length": 6516, "nlines": 60, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "काल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकाल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची\nगाड्यांच्या तोडफोडीच्या घटना पुणेकरांना तशा नवीन नाहीत . याआधी देखील रात्री गाड्या जाळण्याचे व काचा फोडण्याचे प्रकार घडले आहेत . काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा देखील समावेश आहे.\nकोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी ह्याच परिसरात दोन गटात वाद झाला होता. या वादातून रात्री वाहनांची तोडफोड करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे ,असे पोलिसांचे म्हणणे आहे .\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. तेव्हा तिथे हा वाद मिटला होता . मात्र, काल रात्री याच वादातून ७ ते ८ तरुणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . या तोडफोडीत दोन बस, आणि छोट्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तोडफोड प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nवैयक्तिक भांडणाचा राग असा दुसऱ्यांच्या गाड्यांवर काढणे कितपत योग्य आहे याचा विचार ह्या व्यक्तींनी केला पाहिजे .\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन : हेलपाटे मारायला लावणारच ‘ ह्या ‘ विषयावर पण एमआयएम ने खेळले जातीयवादी कार्ड →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/police-arrest-2-persons-for-robbery-case-atm-wagholi/", "date_download": "2018-04-20T16:16:32Z", "digest": "sha1:XQZJGLLQOH33VAXY7VDZDKSVUXFCAPKX", "length": 8513, "nlines": 60, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण ? – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण \nवाघोली येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडत असताना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे दोन जणांना रंगेहाथ पकडले मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला . ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लोहगाव ) हा फरार झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, लोणीकंद पोलिसांचे पथक रात्री आव्हाऴवाडी परीसरात गस्त घालत हेाते त्यावेळी साईसत्यम पार्क परिसरातील एटीएमजवळ काहीतरी गडबड असल्याची माहीती कंट्रोल रुमवरुन गस्त पथकाला मिळाली. गस्त पथकाने त्वरीत त्या एटीएमकडे धाव घेतली. यावेळी एटीएमचे शटर बंद आढळून आले . मात्र बंद शटरमध्ये दोन जण एटीएम फोडण्याचा उद्योग सुरु होता तर त्यांचा एक साथीदार बाहेर देखरेख करीत होता. पोलिस आल्याचे पाहून त्याने बाहेरच्या बाहेर धूम ठोकली मात्र जाताना आतील साथीदारांना पोलीस आल्याची खबर दिली .\nपुढे पोलिस शटर जवळच दबा धरुन बसले.आतील दोघांनी पळून जाण्यासाठी शटर उघडे करताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानी मशीनचा काही भाग काढला होता. तर इतर हत्याराच्या द्वारे ते भाग फोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडे छोटया कटावणी, स्क्रुडायव्हर, पक्कड व अन्य साहित्य सापडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तेारडमल, पोलिस कर्मचारी संतेाष कुलथे, अमोल दांडगे, मेघराज जगताप यांनी ही कामगिरी केली. ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यांच्याकडून अजून काही गुन्ह्यांची देखील उकल होऊ शकेल.\nफोडण्याचा प्रयन्त केलेले हे एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. येथे कोणीही सुरक्षारक्षक तैनात केलेला नव्हता ,त्यामुळे पाळत ठेवून हा प्रयत्न करण्यात आला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे . मात्र एटीएमच्या आतील सुरक्षित यंत्रणेमुळे याबाबतची माहीती बॅंकेच्या मुंबई कार्यालयाला कळाली. त्यांनी त्वरीत पुणे पोलिसांच्या कंट्रेाल रुमला कळविली मग लोणीकंद पोलिसांच्या पथकाला ही माहीती मिळाली आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत ह्या भामट्याने अटक केली.\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार आपल्या पाल्यासोबत देखील घडू शकतो अपहरणाचा ‘ असाही ‘ एक प्रयत्न →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/09/current-affairs-4-september.html", "date_download": "2018-04-20T16:39:57Z", "digest": "sha1:B563NUQQHJZVO5SEDPMI65L4FXJKMRXO", "length": 19526, "nlines": 159, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nराष्ट्रीय शेअर बाजाराचा मॉरिशस स्टॉक एक्स्चेंजशी करार\nभांडवलविषयक ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस (एसईएम) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.\nया करारांतर्गत नव्या निर्देशांकाची निर्मिती करण्याविषयी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दोन्ही भांडवल बाजार समन्वयाने यापुढे काम करणार आहेत.\nदोन्ही शेअर बाजार मिळून सिक्युरिटीज मार्केट्स, निर्देशांक निर्मिती आणि भांडवलविषयक नव्या योजना यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण तसेच ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत. अशा प्रयत्नामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध अधिक दृढ होतील.\nएनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ : चित्रा रामकृष्ण\nस्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस\nएसईएम जुलै १९८९पासून कार्यरत आहे. अल्पावधीतच या भांडवल बाजाराने चांगली उलाढाल केली आहे.\nआज एसईएम आफ्रिकेतील महत्त्वाचे स्टॉक एक्स्चेंज आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मॉरिशस शेअर बाजाराला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nबहुचलनी भांडवल उभारणी तसेच आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये ट्रेडिंग यासाठीही हा शेअर बाजार महत्त्वाचा आहे.\nनौदलात महिलांना पूर्ण सेवाकाळ\nलष्कर व हवाई दलापाठोपाठ नौदलातही महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे. यामुळे देशरक्षणाच्या तिन्ही आघाड्यांवर महिलांचे कर्तृत्व झळाळणार आहे.\nनौदलात आत्तापर्यंत महिला अधिकाऱ्यांची कमाल १४ वर्षांसाठीच नियुक्ती होत असे. संरक्षण दलांमध्ये पेन्शनसाठी २० वर्षांच्या सेवाकाळ पूर्ततेची अट असल्याने, महिलांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.\nयाविरोधात नौदलातील १९ महिला अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे दाद मागितली होती. या याचिकेत त्यांनी लष्कर व हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पूर्ण सेवाकाळ नियुक्तीकडे लक्ष वेधले होते व हा भेदाभेद संपवण्याची विनंती केली होती. त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय घेतला.\nसंरक्षण दलांत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा २०१० साली दिल्ली हायकोर्टाकडेच एका याचिकेद्वारे आला होता. त्यावर हायकोर्टाने या दोन्ही दलांमध्ये महिलांना पूर्ण सेवाकाळाचा अधिकार बहाल केला होता. तेव्हापासून लष्कर व हवाई दलात पुरुष-महिला अधिकारी समान स्तरावर आले.\n१९६५च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त नाणे\nभारत पाकिस्तानदरम्यान १९६५ मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ५ रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय नाणे कायदा २०११ नुसार हे नाणे चलनात आणण्यात येईल. याशिवाय सध्या असलेले पाच रुपयांचे नाणेही चलनात असेल.\nनाण्याच्या एका बाजूला तीन सिंह असलेला अशोकस्तंभ आणि इंग्रजी अक्षरात ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला मध्यभागी ‘अमर जवान’चे स्मारक दोन्ही बाजूला ऑलिव्ह वृक्षाची पाने असतील.\nशौर्य आणि बलिदानाचा अर्थ प्रतित करणारे इंग्रजी शब्दही दुसऱ्या बाजूला नाण्याच्या आतील परिघावर लिहिलेली असतील. तसेच ‘अमर जवान’च्या स्मारकाच्या चित्राखाली २०१५ हे वर्षही लिहिलेले असेल. तसेच नाण्यावर ‘१९६५ च्या कारवाईचे सुवर्ण वर्ष’ असे शब्द इंग्रजी भाषेत लिहिलेले असतील.\nउदय प्रकाश साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार\nकन्नड विचारवंत आणि साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता साहित्यिकांनी निषेधाचे हत्यार उपसले आहे. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांनी २०१०-११मध्ये मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत हत्येचा कडाडून निषेध केला आहे.\nउदय प्रकाश यांनी कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संताप व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी पुरस्कार नम्रतापूर्वक आणि संपूर्ण विचारपूर्वक परत करत असल्याचे म्हंटले आहे.\nज्यांच्यामुळे पुरस्कार मिळाला त्या निर्णायक मंडळाचे सदस्य, अशोक वाजपेयी आणि चित्रा मुद्गल यांच्याप्रती त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.\n‘मोहन दास’ या साहित्यकृतीसाठी उदय प्रकाश यांना वर्ष २०१०-११चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.\nगोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे निधन\nगोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे पणजी येथील मणिपाल रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. विल्फ्रेड डिसुझा यांनी तीन वेळा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिली होती.\nआधी दोनवेळा ते काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर 'गोवा राजीव काँग्रेस'च्या रुपाने त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि स्वत:च्या बळावर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.\nप्रथम १८ मे १९९३ ते २ एप्रिल १९९४, नंतर ८ एप्रिल १९९४ ते २३ नोव्हेंबर १९९८ आणि तिसऱ्यांदा २९ जुलै १९९८ ते ८ फेब्रुवारी १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ राहिला.\nबेणोली, कलंगुट आणि साळगाव अशा तीन मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. २००७मधील विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.\nविल्फ्रेड यांना ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या त्यांना दोन फेलोशीप मिळाल्या होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना १९९६ मध्ये माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.\nमर्वान अटापट्टूचा श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा\nगेल्या तीन महिन्यांत पाकिस्तान आणि भारताविरोधातील कसोटी मालिकांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाल्याने, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक मर्वान अटापट्टूने श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्याचा राजीनामा 'श्रीलंका क्रिकेट'चे प्रमुख सिदाथ वेट्टिमुनी यांनी स्वीकारला आहे.\nश्रीलंकेचे तत्कालीन प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांची नियुक्ती इंग्लंडच्या सहायक प्रशिक्षकपदी झाल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी अटापट्टूची निवड सप्टेंबर २०१४मध्ये झाली होती. पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्यापूर्वी २०११पासून फलंदाजी प्रशिक्षक आणि हंगामी प्रशिक्षक प्रमुख म्हणूनही त्याने काही काळ काम केले होते.\nअटापट्टूने श्रीलंकेसाठी खेळताना ९० कसोटी सामन्यांमध्ये आणि २६८ एका दिवसाच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे ५५०२ आणि ८५२९ धावा केल्या आहेत.\nअटापट्टूच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेचा माजी फलंदाज चंडिका हथुरुसिंघेचा विचार मुख्य प्रशिक्षक म्हणून होण्याची शक्यता आहे. हुथुरूसिंघेने बांगलादेशचा प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. हथुरूसिंघेबरोबरच ग्रॅहम फोर्डचाही विचार होण्याची शक्यता आहे.\nफेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर श्रीलंकेच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक चामिंडा वाझ यांनीही राजीनामा दिला होता.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nचालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ सप्टेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-04-20T16:14:15Z", "digest": "sha1:JXUXTTOAXMC7RH73W2XWIRYUBMIGFDOQ", "length": 7456, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकारला न्यायालयाचे आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकारला न्यायालयाचे आदेश\nनवी दिल्ली : लोकपाल नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीतील प्रख्यात विधिज्ज्ञाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले.\nअॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. दरम्यान, लोकपालच्या नियुक्तीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली असून यात प्रख्यात विधिज्ज्ञांची नियुक्तीची प्रक्रिया सुरु असल्याचे वेणुगोपाल यांनी न्या. गोगोई यांच्या खंडपीठासमोर सांगितले. केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, सध्या या संदर्भात कुठलेही आदेश देण्याचा आमचा विचार नाही. मात्र, लोकपालच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी. तसेच या प्रकरणी १५ मे रोजी पुढील सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी\nNext articleमनरेगा, सामाजिक वनीकरणअंतर्गत आता शेतात वृक्षारोपण करता येणार\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n…हे तर काँग्रेसचं राजकारण – अरूण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:30:43Z", "digest": "sha1:LXKAAB4K3S7IGEGN4HUMWIO5G4TMDT67", "length": 3338, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स वॉल्ग्रीन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/virat-kohali-share-his-diet-plan/", "date_download": "2018-04-20T16:02:15Z", "digest": "sha1:XQZNHJKW64HHT4Y3IM6URFF2PK6U4VAG", "length": 27077, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Virat Kohali Share His Diet Plan | 'बटर चिकन नको रे बाबा', फिटनेससाठी असा आहे कोहलीचा डाएट प्लान | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\n'बटर चिकन नको रे बाबा', फिटनेससाठी असा आहे कोहलीचा डाएट प्लान\nटीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे.\nठळक मुद्देटीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो.\nमुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात फिट क्रिकटर्समध्ये विराटचं नाव मोजलं जातं. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो. वेब सिरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन'मध्ये विराट कोहलीने त्याच्या फिटनेस आणि डाएट प्लानबद्दल सांगितलं आहे. फिट राहण्याचा विराटचा मंत्रा त्याने या सिरीजच्या माध्यमातून सांगितला आहे.\nजिममध्ये हार्ड ट्रेनिंगबरोबरच विराट दररोज योग्य डाएट फॉलो करतो. दिवसाच्या सुरूवातीला योग्य नाश्ता केला तर आरोग्यासाठी चांगलं असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. तोच रूल विराटही फॉलो करतो.\nविराटच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश जास्त आहे. तीन अंड्यांचं ऑमलेट (व्हाइट एग), एक अख्खं अंड विराटच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये असतं. तसंच त्याबरोबर पालकाचा पदार्थ, चीजही नाश्त्यात असतं. पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगड ही फळ खाऊन विराट एक कप ग्रीन टी घेतो. सकाळी हेव्ही ब्रेकफास्ट करावा. हेच विराटकडून पाळलं जातं.\nत्यानंतर प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर विराट आपल्या दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन, कुस्करलेले बटाटे, पालकाचा एखादा पदार्थ आणि इतर भाज्या खातो. रात्रीचं जेवण एकदम हलकं असायला हवं, असा सल्ला नेहमीचं डॉक्टरांकडून दिला जातो. विराट त्याच्या रात्रीच्या जेवणात विराट सी-फूड खातो.\nबटर चिकन ही विराट कोहलीची सर्वात आवडती डीश आहे, असं नेहमीच त्याचा प्रत्येक फॅनकडून बोललं जातं. पण विराटने गेल्या ४ वर्षांमध्ये विराटने बटर चिकनला हातही लावलेला नाही. आपल्या फिटनेसकडे लक्ष देत विराट हेल्थी लाईफस्टाईलचे सगळे रूल फॉलो करताना दिसतो आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभारत-न्यूझीलंड निर्णायक लढत आज, धोनीच्या फलंदाजी क्रमावर नजर\nस्वाइन फ्लूचा आणखी एक संशयित रुग्ण आढळला\nयुवा खेळाडूंना संधी द्या, माजी दिग्गज क्रिकेटपटूंकडून धोनी लक्ष्य\nमहेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडवर संतापला एस. श्रीसंत, बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा चर्चेत\n'दुकान बंद, पुढची शिलाई तिरुअनंतपुरममध्ये', विरेंद्र सेहवागच्या 'दर्जी' टोमण्याला रॉस टेलरचे प्रत्युत्तर\nन्यूझीलंडविरोधातील तिस-या टी-20 सामन्याआधीच भारतीय संघासाठी चिंतेची बातमी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nIPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला\nVideo : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स\n...म्हणून गेलकडून सेन्चुरी मुलीला समर्पित\nसामन्याआधी चेन्नई टीमला फटका यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/04/CurrentAffairs27and28April2016.html", "date_download": "2018-04-20T16:33:17Z", "digest": "sha1:S4WYB6QCUXUF26KD5C62WRNLODYWCV2A", "length": 16418, "nlines": 169, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल", "raw_content": "\nचालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल\n‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेला सुरुवात\nयुद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी ‘हार्ट ऑफ एशिया’ ही परिषद २७ एप्रिलपासून सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.\nपाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.\nदहशतवाद आणि मूलतत्त्ववाद या दोन आव्हानांचा सामना करण्याबाबत या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे.\nअफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे.\nअफगाणिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्याबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे करार करण्याबाबतही उपस्थित देशांमध्ये चर्चा होईल.\nअफगाणिस्तानमधील स्थैर्य आणि सुरक्षेसाठी आशियामधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट करावेत, ही भारताची प्रमुख मागणी आहे.\nदहशतवाद्यांना असणारी आर्थिक रसद तोडून त्यांना मिळणारा पाठिंबा थांबविण्याबरोबरच मूलतत्त्ववादी आणि फुटीरतावादी यांच्याविरोधातही कारवाई करण्याबाबत भारत आग्रही आहे.\nअफगाणिस्तानमध्ये संपर्क आणि दळणवळण जाळे विकसित करून आंतरराष्ट्रीय बाजाराशी त्यांना जोडणे, हा परिस्थिती सुधारण्याचा चांगला मार्ग असल्याचेही भारताचे म्हणणे आहे.\n२०११पासून ‘हार्ट ऑफ एशिया’ या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरवात झाली असून, आतापर्यंतच्या सर्व परिषदांमध्ये भारताने ठोस भूमिका मांडली आहे.\nया परिषदेमध्ये अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे.\nतसेच, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, इजिप्त, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीडन, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय युनियनचा परिषदेला पाठिंबा आहे.\nसचिन तेंडुलकर यांची खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला मदत\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. या जिल्ह्यातील तीन गावांना विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.\nबार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील माध्यमिक शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी तेंडुलकर यांनी ४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.\nदक्षिण सोलापूर तालुक्यातील कोन्हाळी गावातील अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी व पथदिव्यांसाठी तेंडुलकर यांनी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.\nकरमाळा तालुक्यातील पोमलवाडी व पसिरातील रस्त्यांच्या कामांसाठी तेंडुलकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.\nई-कॉमर्समध्ये अॅमेझॉन इंडिया दुसऱ्या स्थानी\nई-कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार, अॅमेझॉन इंडिया ही स्नॅपडीलला मागे टाकत सर्वाधिक उत्पादनांची विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.\nपहिल्या क्रमांकावर अद्यापही फ्लिपकार्टचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे परदेशातील अॅमेझॉनचे भारतीय बाजारपेठेत वाढणारे महत्त्व अधोरेखित होत आहे.\nगेल्या महिन्यात माल वितरणाचा विचार केला असता, फ्लिपकार्टची बाजारपेठेत ३७ टक्के हिस्सेदारी होती. तर अॅमेझॉन इंडिया व स्नॅपडीलची हिस्सेदारी अनुक्रमे २४ व १५ टक्के होती.\nगेल्या महिन्यात ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिवसाला ८ ते ९ लाख वस्तूंचे वितरण केले आहे.\nअॅमेझॉनने भारतीय व्यवसायात जानेवारी महिन्यापासून ६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी अॅमेझॉन इंडियाची २५० टक्के दराने वाढ झाली आहे.\nसुदर्शन पटनाईक यांना आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक\nप्रख्यात भारतीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nत्यांनी या स्पर्धेत अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५ फुटांची कलाकृती साकरली होती.\nया यशानंतर रशियातील भारताचे राजदूत पंकज सारन यांनी पटनाईक यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत जगभरातील २० वाळू शिल्पकार सहभागी झाले होते.\nकन्हैया कुमारचा ‘बिहार ते तिहार’ प्रवास\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता पुस्तकरूपाने आपला जीवनप्रवास मांडणार आहे. ‘बिहार ते तिहार’ असे या पुस्तकाचे नाव आहे.\nहैदराबादमधील वेमुला प्रकरणानंतर जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nकन्हैयाची सुटका झाल्यानंतर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तो आपल्या भाषणात जोरदार टीकास्त्र सोडत आहे.\nबिहारमधील एका छोट्या खेड्यातून पुढे आलेल्या या विद्यार्थी नेत्याचा जीवनप्रवास देशातील विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न जुग्गरनॉट प्रकाशन करणार आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० एप्रिल\nचालू घडामोडी : २९ एप्रिल\nचालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल\nचालू घडामोडी : २६ एप्रिल\nचालू घडामोडी : २५ एप्रिल\nचालू घडामोडी : २३ व २४ एप्रिल\nचालू घडामोडी : २२ एप्रिल\nचालू घडामोडी : २१ एप्रिल\nचालू घडामोडी : २० एप्रिल\nचालू घडामोडी : १९ एप्रिल\nचालू घडामोडी : १७ व १८ एप्रिल\nचालू घडामोडी : १६ एप्रिल\nचालू घडामोडी : १५ एप्रिल\nचालू घडामोडी : १४ एप्रिल\nचालू घडामोडी : १३ एप्रिल\nचालू घडामोडी : ११ व १२ एप्रिल\nचालू घडामोडी : १० एप्रिल\nचालू घडामोडी : ९ एप्रिल\nचालू घडामोडी : ८ एप्रिल\nचालू घडामोडी : ७ एप्रिल\nचालू घडामोडी : ६ एप्रिल\nचालू घडामोडी : ५ एप्रिल\nचालू घडामोडी : ४ एप्रिल\nचालू घडामोडी : २ व ३ एप्रिल\nचालू घडामोडी : १ एप्रिल\nमासिक : मार्च २०१६ (PDF)\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_(%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97)", "date_download": "2018-04-20T16:17:55Z", "digest": "sha1:VDUQ3E2FB6L6XTH76ZYEZUJMBTRK4NT6", "length": 6691, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) - विकिबुक्स", "raw_content": "श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग)\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग) ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/leopard-comes-in-mulund/articleshow/62491093.cms", "date_download": "2018-04-20T16:21:34Z", "digest": "sha1:UKBG7XDIRLILNAM45MSDLEOF4VVTNWVE", "length": 27792, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "leopard comes in mulund | सहा तास थरार - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nमुलुंडच्या नानेपाड्यात शिरलेल्या बिबळ्याच्या हल्ल्यात सहा जखमी\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nशाळेत आश्रय घेतलेल्या बिबळ्याच्या आठवणींनी अजूनही अंधेरीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण असताना, हाच थरार शनिवारी सकाळी मुलुंडकरांनी अनुभवला. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातून थेट मुलुंड पूर्व येथील नानेपाडा भागात पोहोचलेल्या या बिबळ्याने आजुबाजूच्या रहिवाशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अखेर एका घरातच तळ ठोकलेल्या या बिबळ्याला सहा तासांच्या मोहिमेनंतर जेरबंद करण्यात आले व त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पिंजऱ्यात झाली.\nनानेपाडा येथे साडेआठच्या सुमारास पोहोचलेला हा मजबूत शरीराचा नर बिबळ्या माणसांच्या गर्दीमुळे गांगरला व समोर येईल, त्याच्यावर हल्ला सुरू केला. सविता खुटे तसेच इतर काही रहिवाशांना जखमी केल्यावर तो मातृछाया इमारतीच्या तळमजल्यावरील गणेश पुजारी यांच्या घरात शिरला. पुजारी यांच्यावरही त्याने हल्ला चढवला. पुजारी यांनी घराबाहेर धाव घेतली, पण मुलगा घरात असल्याचे लक्षात येताच, ते पुन्हा घराकडे वळले. त्याचवेळी मुलानेही घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने बिबळ्याने मुलावर हल्ला केला नाही. तोपर्यंत वन खात्याची टीम नानेपाड्यात पोहोचली. पुजारी यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. सावधगिरी बाळगत या टीमने सर्वप्रथम घराचा दरवाजा बंद केला. खिडकीची काच फोडली आणि भुलीचे इंजेक्शन बिबळ्यावर डागले. २० मिनिटांनंतर बिबळ्या निपचित पडल्याचे लक्षात येताच, कर्मचारी घरात शिरले व त्याला जेरबंद केले.\nबोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातून थेट मुलुंड पूर्व येथील पोहोचलेल्या या बिबळ्याने नानेपाडा भागात सहा तास धुमाकूळ घातला. सकाळी साडेआठच्या सुमारास बिबळ्याची गुरगुर ऐकू आली आणि परिसरात पळापळ सुरू झाली. सकाळी पावणेसातच्या सुमारास आरडाओरडा झाला म्हणून नानेपाड्यातील वास्तू बिल्डिंगमधील सविता खुटे घराबाहेर गेल्या. आजुबाजूला बघत असताना मागून आलेल्या बिबळ्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली. तीक्ष्ण नखे आणि अणकुचीदार दात त्यांच्या शरीरात घुसले. त्यास्थितीतही त्यांनी बिबळ्याला लोटून दिले आणि घरात धाव घेतली. त्यानंतर बिबळ्या दुसऱ्या इमारतीकडे पळाला. सविता यांच्या चेहऱ्याला इजा झाली नाही. पण संपूर्ण पाठीवर बिबळ्याचे दात व नखे लागली आहेत. त्यांच्यासह इतरांना शीव रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर सविता यांना घरी पाठवण्यात आले.\nचार ते पाच वर्षांचा हा अतिशय मजबूत नर बिबळ्या होता. वन विभागाच्या टीमने त्याला पकडण्यासाठी खास प्रकारचा पेहराव केला होता. म्हणजे बिबळ्याने हल्ला केला, तरी शरीरावर जखमा होणार नाही, अशा प्रकारची जाकीट या टीममधील सदस्यांनी घातली होती. वनखात्याच्या या टीममध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विहाराचे अधिक्षक शैलेश देवरे, पशुवैद्यकीय अधिकारी डा. शैलेश पेठे, नामदेव जीरवे, राजा भोईर व वैभव पाटील यांचा समावेश होता. या टीममधील डाक्टर पेठे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या शरीरात मायक्रोचिप टाकलेली नव्हती. सर्वप्रथम वन अधिकाऱ्यांनी त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसवली. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. त्याला सलाईन लावले मग त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली.\nजखमींची नावे : बालाजी कामटे (४०), कृष्ण पिल्ले (४०), सविता खुटे (३०), गणेश पुजारी (४५) व अन्य.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n2‘ओएनजीसी’चे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त; ५ मृत्युमुखी...\n3विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवा गोष्टीरूपात...\n4तब्बल २७०० घरे लॉटरीत...\n5‘सध्या लिहिताना विचार करावा लागतो’...\n6लंडनच्या ‘हाइड पार्क’प्रमाणे व्हावा ‘पार्ले कट्टा’...\n8महापालिका अधिकाऱ्यांनाही आरोपी करा...\n9‘आधार’मुळे मुलांची पालकांशी पुनर्भेट...\n10मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jagdishmore.blogspot.com/", "date_download": "2018-04-20T16:09:40Z", "digest": "sha1:NA2PXTKENS5IBTWZ5LSAGRIHL37FUOWB", "length": 58408, "nlines": 152, "source_domain": "jagdishmore.blogspot.com", "title": "माझं शिवार", "raw_content": "\nपत्रकारितेतून सरकारी नोकरीत आलो. लिहिण्याचं काम नाही बदललं. कामाचा ‘अँगल’ बदलला. अनुभव विश्व विस्तारलं. लिहिण्याच्या कक्षा मात्र आकसल्या. तरीही शक्य ते लिहावं. कटू प्रसंगांतून शिकता यावं. गोड आठवणी वाटता याव्यात. मतं मांडता यावित. भूमिका शोधता याव्यात. स्वत:ला व्यक्त करता यावं… आणि हो शिक्षण, पोटापाण्यासाठी गाव सुटलं. तसं शिवारही तुटलं. आता शब्दांच्या शिवारात राबावं. डोक्यासाठी काही तरी पिकवावं. त्याची आपल्यासारख्या नेटिझन्स मित्रांकडून पडताळणी करून घ्यावी. त्यासाठीच हे ‘माझं शिवारं’\nआनंदमय जीवन प्रवासासाठी फँड्री: समतेची बिकट वाटशोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी पत्रकार मित्रांकडून फीडबॅकलोकशाहीचे खंबीर पालकत्व\nचित्रे: चार्वी जगदीश मोरे\nअक्षय तृतीयमुळे खानदेशातील गावं आज माणसांनी फुलून गेली आहेत. आखाजी नावाच्या या लोकोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे. सर्वत्र लगबग आहे. किलबिलाट सुरू आहे. मुलांना आखाजीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. कॅलेंडरवर आजची तारीख लाल रंगात नाही; पण स्थानिक सुट्टी आहे. शेतावर कुणीही नाही. मालक घरीच आहेत. सालदारालाही सुट्टी आहे. चैत्र संपताना माहेराहून मूळ येण्यासाठी आसुसलेही सून आखजीमुळे आता माहेरवाशीण झाली आहे. वैशाखाचा प्रारंभ तिच्यासाठी आल्हाददायक ठरलाय. दिवाई (दिवाळी)- आखाजी तिच्यासाठी जीव की प्राण. ओसरीतल्या तुळईला झोका बांधलाय. लहानगे झोके घेतायत. प्रत्येक अंगणात निंबाच्या, चिंचेच्या झाडालाही झोके बांधले आहेत.\nमोलाचा सन देखा जी\nबांधला छान झोका जी\nहे झोके बहिणाबाईंच्या अस्सल खान्देशी भाषेतील कवितेचे स्मरण करून देताहेत. झोक्यावरनं माहेरवाशीण आकाशाच्या दिशेनं झेपावतेय. झोक्यावर बसून गाण्यांतून सासरच्या सुख-दुःखानं भरलेलं मन रितं करण्यास ती उत्सुक आहे. झोक्याच्या तालावर सूर उमलू लागले आहेत...\nहाथानी कैरी तथानी कैरी,\nकैरी झोका खाय वं\nकैरी तुटनी खडक फुटना\nझुयझुय पानी वाह वं\nघराघरांतून धुराचे लोट बाहेर पडतायत. आई- आज्जीच्या मनगटातील कलाकुसर अतिशय लोभनीय दिसतेय. हाताचे कोपरे आणि मनगटाच्या साह्याने क्रिकेटच्या मैदनासारखी गोलाकार पुरणपोळी आकार घेतेय. खापरावर खरपूस भाजल्या जाणाऱ्या पुरणपोळ्यांचा खमंग गल्लीभर दरवळतोय. पुरुष मंडळींच्या मनात सुवासानेच मांडे फुटतायत. बाप रसासाठी गावठी, शेंद्य्रा आंब्याच्या साली, कोयी पाण्यातून हातरुमाला सारख्या पिळून काढतोय. रसात पाणीच अधिक होतंय. आमरसात भरपूर साखर टाकलीय. आंबटपणा कमी झालाय. पाण्यात धुतल्याने बेचव झालेल्या कोयीदेखील नातवंडं चवीनं चाखतायत. कुरडया-पापडांचा घाना निघालाय.\nझोक्यावर हिंदोळे घेणाऱ्या पोरीबाळी भूक तहान विसरल्या आहेत. पाय जमिनीला टेकवत नाहीयेत. त्या वाऱ्यावर स्वार झाल्या आहेत. बहिणाबाईच्या ओळी गुणगुणी लागल्या आहेत...\nमाझा झोका माझा झोका\nजिवाची भूक सर जी\nभूक सर भूक सरे\nवाऱ्यानं पोट भरे जी\nबापानं घागर भरण्याची तयारी केली आहे. मूठभर गव्हाच्या आळ्यावर मातीची घागर मांडलीय. स्वयंपाक झालाय.\n“निंब्याले बलावतंस का नाही. तेले अख्खा दिनभी पुरावं नही पुत्ता कुटाले. नाही ते डवरी रायना हूई गावभर” स्वयंपाक खोलीतून आदेश सुटतो.\n चालणारे भो. घागर भरनी से. तुनी माय आराया मार रायनी.” बापानं पत्ते कुटणाऱ्या मुलाला हाळी दिली.\n“हाऊ डाव सरना की लगेच येस मी. तू पुढे व्हय.” निंब्या काही लगेच उठला नाही.\n“ये लवकर” म्हणत बाप उलटपावली घरी परतला.\nघागर भरली. पूजन झालं.\n“भाऊ पयले आगारी टाकी दे” आजी बोलली.\nनैवद्याच्या ताटावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेली नातवंडे मागं सरकली. निखाऱ्यांवर पुरण पोळीचा तुकडा, आमरस, रस्सीभात, कुरडया, पापडाचे तुकडे टाकले. तूप टाकताच घरभर धूर झाला. जळणाऱ्या तुपाच्या दरवळानं पित्रं तृप्त झाल्याचे भाव उमटले.\nउघडं पाड ना राम\nपरकी होईगू ना राम\nहिडीसफिडीस करी ना राम\nकच्ची खाई जाई ना राम\nहां हां हां हां\nहे करून स्वर गल्लीच्या कोपऱ्यावरच्या घरातून येऊ लागले. तिथं ओसरीवर भाऊबंदकी आणि आप्त जमलेयत. डेरगं भरलं जातंय. पाच-सहा महिन्यापूर्वी घरातला बाप परलोकात निघून घेलाय. त्याच्या मरणानंतरची ही पहिलीच आखाजी. सासू पाठोपाठ सुनेचं रडणं कानावर येऊ लागलं. तिच्याही रडण्यात उत्स्फूर्तता जाणवतेय. तिच्या करुण काव्यात उपमा आहेत. प्रतिमा आहेत. रूपके भरली आहेत. डोळे मात्र शुष्क. भावहीन. तीही आता सासूसारखी करून काव्य कलेत निपुण झालीय. तिनं शोक सागरात विहार करण्याची कला अवगत करून घेतलीय. आता ती सासूचा वारसा चालवण्यासाठी सज्ज होतेय.\nओसरीत, निंबाच्या झाडाखाली, मारोतीच्या पारावर, शाळेच्या व्हरांड्यात, जागा मिळेल तिथं सावलीच्या आसरेनं पत्त्यांचे डाव रंगले आहेत. लहानग्यांचा डाव वेगळा आहे. तरुणांचा स्वतंत्र घोळका आहे. अट्टल जुगाऱ्यांचा अड्डा चांगलाच रंगात आलाय. अधून- मधून एखाद दुसरा घरी जाऊन आगारी टाकून येतोय. काही जण कसे तरी दोन घास पोटात ढकल अड्ड्यावर परत येतायत. डाव यज्ञासारखा अखंड तेवत आहे. जुगारात हरणारेच जास्त दिसतायेत. तरणाबांड कपाशीचा सर्व पैसा हरवून बसला आहे. तरीही तो मागं बसून, ‘हा पत्ता खोल, तो पत्ता खोल’, असा फुकटाचा सल्ला देतोय. पावसाळा तोंडावर आलाय. होतं तेही गमावून बसलाय. शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता त्याला आता सतावतेय; पण हरल्यावरही टांग उपर आहे. नागवेपण झाकण्याचा केविलवाणी प्रयत्न करतोय. सावकाराची पायरी चढण्यावाचून समोर पर्याय दिसत नाहीये.\nसूर्य डोक्यावर आला आहे. उन्हं तापली आहेत. शहरातून आलेली दोन-चार नोकरदार मंडळीही विरंगुळा म्हणून पत्ते खेळतायत. ते बेतानंच डाव मांडत आहेत. हात अखडता आहे. करमणूक म्हणून त्यांचा डाव रंगला आहे. पत्त्यांच्या निमित्तानं गावातली आबालवृद्ध ठिकठिकाणी जमली आहेत. नोकरी, रोजगाराच्या निमित्तानं बाहेर असलेले सगळे जण गावी आले आहेत. वर्षे- सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील कटुता बऱ्याच अंशी ओसरली आहे. एखाद दुसरी चुकार व्यक्ती राजकारणांचे डाव टाकीत आहेत; पण तिला कुणी भीक घालत नाही.\nजेवणं आटोपली आहेत. आयाबाया एकमेकींच्या ओट्यावर जमल्या आहेत. सासू-सुनांच्या कहाण्या रंगल्या आहेत. सासरहून आलेल्या मुली कौतुकात न्हाऊन गेल्या आहेत. गावातले ज्येष्ठ तात्या, नाना, दादा, आबा, आप्पांचा गप्पांचा फड रंगात आला आहे. कुणाच्या घरची आखाजीची घागर जास्त पाझरली, कुणाच्या घरची कमी पाझरली, कुणाची पाझरलीच नाही. प्रत्येक जण आपापल्या घागरीचा अनुभव सांगताहेत. घागर जास्त पाझरल्याने यंदा भरपूर पाऊस पडेल. घागर कमी पाझरल्याने कमी; तर मध्यम पाझरल्याने पाऊसही मध्यमच असेल, असा सर्वसाधारण समज आहे. जो तो आपल्या परीनं पावसाचा अंदाज बांधतोय. हवामान शास्त्रज्ञालाही लाजवतील एवढ्या रुबाबात आणि तोऱ्यात सत्तरीतले आजोबा आपला पावसाचा अंदाज सांगतायत.\nपावसाळा जवळ आलाय. बहुतांश जमीन नांगरून तयार आहे. उन्हाने भाजून निघतेय. सालदार निश्‍चित केलायं. त्याचा वर्षभराचा मोबदला ठरविला जातोय. बी-बियाण्यांची चिंता सतावू लागलीय.. ‘दिवाई खावरी आखाजी हावरी’ या म्हणीची प्रचिती येतेय. ‘कुणबी आखाजीले येडा होस आनी दिवाईले शहाना होस,’ निसर्गामुळे या जाणिवेची उणीव कधीच भरून निघताना दिसत नाही. आखाजीला शेतकरी हजार इरादे बाळगतो; पण त्यावर निसर्ग पाणी फिरवतो. ते दिवाळीच्या वेळीच कळतं. पिकपाण्याची सगळ्यांचे बेत अंतिम होताहेत.\nअल्लड वयातल्या मुली गौराईच्या आगमनानं उल्हासित झाल्या आहेत. गावातल्या एका घराच्या भल्या मोठ्या ओसरीवर सर्व जणींनी आपापल्या गौराया आणल्या आहेत. नाचगाणी सुरू आहेत. झिम्मा- फुगड्या खेळतायत. थट्टा, मस्करी, मनोरंजन सुरू आहे. गौराईच्या गाण्यांनी लोकसाहित्याचा जागर होतोय...\nतोडासले लई गया चोर\nगौराईच्या नाचगाण्याचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. पत्ते खेळताना पहाट कशी झाली ते कळलंच नाही. आखाजीचा दुसरा दिवस जरा उशिरानंच उगवला. आखाजीच्या कालच्या गोडधोडनंतर आज घराघरांत कर साजरा करण्याची तयारी सुरू झालीय. उस्मान काकाकडून शेर-पावशेर मटण आणलंय. काबाडकष्टानं थकलेल्या शरीराला आणि मनाला पुन्हा नव्या कष्टासाठी उभारी देण्याकरिता बापानं गुत्त्यावर जाऊन पावशेरभर टाकलीय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाट्याला मटणाची एकएक बोटी आलीय. एका बोटीने आलेला तृप्तीचा ढेकर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवतोय.\nमुलींची गौराई विसर्जनाची लगबग सुरू झालीय. हसत, खेळत, गाणी म्हणत मुलींनी नदीच्या डोहावर जाऊन लाडक्या गौराईला निरोप दिला. नदी पल्याडच्या गावातही हाच कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही काठांवरील मुलींमध्ये ‘धुमश्‍चक्री’ सुरू झालीय. एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय. परस्परांवर दगडगोट्यांचा मारा होतोय. दोन गटातले हे युद्ध बराच काळानंतर शमलं. सर्व जणी आपापल्या घरी परतल्यायत. बघ्यांची गर्दी पांगलीय. आखाजी आता सरलीय\nता. क. : खान्देशातील हा अक्षय तृतीयेचा हा लोकोत्सव आता पार बदलला आहे. गौराई दिसेनाशी झाली आहे. नाजुकसाजुक ते मुळं झोके दिसत नाहीत. बोली भाषेतील गाणी कानावर पडत नाहीत. बोलीवरून थेट आता इंग्रजीपर्यंत झेप घेतली आहे. विरंगुळ्यासाठी पत्त्याचे डाव रंगत नाहीत. जुगाऱ्यांना वर्ष पुरत नाही. प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन आहे. चैत्र आणि वैशाखात रोज सायंकाळी रंगणाऱ्या ‘आयपीएल’च्या सामन्यांमुळे उन्हाळ्यात करमणुकीची सोय झाली आहे. ग्रामपंचायत आणि सोसायाटीच्या निवडणुकांतील कटुता दिवसेंदिवस वाढत आहे. एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. नोकरी किंवा रोजगारानिमित्त बाहेर गेलेली मंडळी ‘बिझी’ असल्यामुळे आखाजीसाठी गावी येत नाही. त्यांच्या मुलाबाळांना उन्हाचे चटकेही सहन होत नाहीत. गावी गेले तर त्यांना अहंकार स्वस्थ बसू देत नाही. सोशल मीडियावरील अक्षय तृतीयेच्या शुभेच्छांमुळे मात्र या लोकोत्सवाला उधाण आलं आहे.\nज्येष्ठ पत्रकार आणि प्रख्यात साहित्यिक अरुण साधू पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे सन 1995 पासून 2001 पर्यंत विभागप्रमुख होते. हा विभाग ‘रानडे इन्स्टिट्यूट’ नावाने परिचित आहे. त्याला पत्रकारितेची शाळा म्हणून प्रचंड उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य साधू सरांनी केले. ते लौकिक अर्थाने शिक्षक नव्हते; पण तरीही पत्रकारांचे लोकप्रिय शिक्षक ठरले...\n“सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यात सायंकाळी ठिकठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना जायचं. दुसऱ्या दिवशी बातमी लिहून आणायची आणि मला दाखवायची,” साधू सरांनी पहिल्याच दिवशी बजावलं.\nमी उत्साहाने सांयकाळी बालगंधर्वला गेलो. सरांकडे दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी लिहून दिली. इतर विद्यार्थ्यांनी दिल्या. सरांनी सर्व बातम्या तपासल्या. प्रत्येकाच्या बातमीवर वेगवेगळे शेरे होते. माझ्या बातमीवर शेरा होता, “थातूरमातूर.”\nफार अस्वस्थ झालो. दुपारनंतर शिंदे अण्णा वर्गात आले, “जगदीश मोरे कोण आहे\nमी सरांच्या केबिनचा अर्ध्या फळ्यांचा दरवाजा भीतभीत उघडला, “सर, बोलावलंत\n“या... बसा.” सर शक्यतोवर सुरवातीला एकेरी बोलत नसत.\n आई- वडील काय करतात पुण्यात कुठं राहता...” सगळी चौकशी केली. मी तपशील सांगितला.\n“ठीक आहे; पण आजच ‘शुद्धलेखन प्रदीप’ घ्या. वारंवार वाचा. व्यवस्थित समजून घ्या. चांगल्या साहित्यिकांची सोप्या भाषेतील पुस्तकं वाचा. जमल्यास कविताही वाचा. बातमी लिहिण्याचा सातत्यानं सराव करा. बातमी लेखन हा पत्रकारितेचा पाया आहे. पहिली पायरी आहे. ही पायरी मजबूत झाली पाहिजे.” सर सांगत होते.\nमी तोपर्यंत ठराविक विचारांचीच मोजकी पुस्तके वाचली होती. विचारांचा प्रसार आणि मारा ऐवढाच या पुस्तकांचा हेतू होता. भाषेची समृद्धी वाढविण्यासाठी वाचनाकडे डोळसपणाने बघण्याचा मला दृष्टिकोन नव्हता. सरांशी झालेल्या पहिल्याच वैयक्तिक भेटीत या उणिवेची जाणीव झाली. भविष्यात नाशिक ‘सकाळ’मध्ये काम करताना संपादक कांबळे साहेबांमुळे बातम्या लिहिण्याचा उत्तम सराव झाला. त्यांनी बातमीचे विविधांगी धडेही दिले. दोघांमुळे ‘न्युज सेन्स’ विकसित होऊ शकला.\nविद्यार्थ्यांनी नेमकेपणाने वाचले पाहिजे, याचे धडेही साधू सर देत असत. तिथेच वाचन लेखनाच्या कक्षा विस्तारायला सुरुवात झाली. मला तेच आज शासकीय नोकरीत आणि जनसंपर्काच्या व्यवहारात उपकारक ठरत आहे. पत्रकारिता शिकताना ‘वार्तांकना’च्या विषयात प्रसिद्धिपत्रके हा घटक होताच. बातमीदार व उपसंपादक म्हणून प्रसिद्धिपत्रकांच्या बातम्या तयार करण्याचा अनुभव होता. जनसंपर्क अधिकारी या नात्याने शासकीय प्रसिद्धिपत्रके तयार करण्याची जबाबदारी आली. ‘न्युज सेन्स’ विचारात घेऊन प्रसिद्धिपत्रके तयार केल्यास कर्तव्याचा कार्यभार साध्य करणे सुलभ होते, हा आत्मविश्वास म्हणजे साधू सरांच्या संस्कारांची फलश्रुती आहे.\nश्री. अरुण साधू यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार आणि प्रख्यात साहित्यिक म्हणून होती. शिक्षक हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू होता. ते लौकिक अर्थाने शिक्षक नव्हतेच; पण तरीही पत्रकारांचे लोकप्रिय शिक्षक ठरले. अनेक जण विविध माध्यमांतून सरांचे साहित्य आणि पत्रकारितेविषयी स्मृती जागवत आहेत. काही जण आपले शिक्षक अर्थात पत्रकारितेच्या प्रारंभीचे गुरू म्हणूनही सरांविषयीच्या आठवणींना उजाळा देत आहेत. कारण साधू सर पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे सन 1995 ते 2001 पर्यंत विभागप्रमुख होते. हा विभाग ‘रानडे इन्स्टिट्यूट’ नावाने परिचित आहे. या रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेची शाळा म्हणून प्रचंड उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य साधू सरांनी केले.\nसाधू सर विभागप्रमुख झाल्यानंतर लगेचच रानडेत संगणक कक्ष सुरू झाला. त्याच दरम्यान मी 1996 मध्ये बीसीजेला प्रवेश घेतला होता. सर एकदा म्हणाले होते, “संगणकाचा वाढता वापर लक्षात घेऊन तुम्ही टायपिंगचा सराव केला पाहिजे.”\nमराठी वृत्तपत्रांत तोपर्यंत बहुतांश बातमीदार बातमीची हस्तलिखित प्रतच देत असत. उपसंपादकही हस्तलिखितांवरच संस्कार करत. टायपिंगबाबत दुसऱ्या एका प्राध्यापकांनी कोटी केली होती, “तुम्हाला पत्रकार व्हायचं की कॉम्प्युटर ऑपरेटर\nइंग्रजी माध्यमातील काही विद्यार्थ्यांचा टायपिंगचा सराव होता. मराठी माध्यमातील जवळपास कुणालाच टायपिंगचा गंध नव्हता. पुढे दै. ‘सकाळ’मध्ये मला पत्रकारितेची संधी मिळाली. तिथं काही कालावधीनंतर स्वत:ची बातमी स्वत: टाईप करणे आणि बातम्यांचे संपादनही संगणकावरच करण्याचे फर्मान आले. नोकरीचा प्रश्न होता. काही दिवसांत टायपिंग शिकलो. साधू सरांची आठवण झाली. खरे तर साधू सरांनी खूप आधी याची जाणीव करून दिली होती. विद्यार्थी दशेत असताना वीस वर्षांपूर्वी संगणक, इंटरनेट, टायपिंग इत्यादींचा अंदाजही नव्हता. गावाकडून थेट पुण्यात गेल्यावर ‘रानडे’त संगणक, इंटरनेट सहज उपलब्ध झाले. आमच्या ग्रंथालयात दोन टाईपरायटर यंत्रेही होती; पण टायपिंगबाबत गांभीर्य नव्हते. आज जवळपास प्रत्येक पत्रकाराला स्वत:चे बातमी लेखन किंवा संपादन संगणकावरच करावे लागते. साधू सरांनी ते आधीच हेरले होते. त्याची जाणीवही आम्हाला करून दिली होती.\nपत्रकारितेत वीस वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा बोलबाला नव्हता. तुरळक अस्तित्व होते. मुद्रित माध्यमांचे वर्चस्व होते. पत्रकारितेचे शिक्षणही मुद्रित माध्यमांवरच केंद्रित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वृत्तपत्र निर्मितीचा सर्वंकष अनुभव मिळावा यासाठी ‘रानडे’त प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अधुनमधुन ‘वृत्तविद्या’ नावाने चार पानांचे प्रायोगित वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात असे. साधू सर रानडेत आल्यानंतर वृत्तविद्या अधूनमधून ऐवजी आठवडाभर सलग प्रसिद्ध करण्याचा प्रयोग सुरु झाला. त्या आठवड्यात लेक्चर्स नसत. प्रत्येक विद्यार्थ्यांला दररोज नवीन जबाबदारी दिली जात असे. उदा. वृत्तांकन, संपादन, अग्रलेख, स्फुट लेखन, छपाई, वितरण इ. दैनिकांच्या कार्यालयाप्रमाणे सकाळी संपादकीय विभागाची बैठक, चार पानांची संभाव्य डमी, बातम्यांचे विषय, अग्रलेखाचा विषय, लेख इ. ठरविले जात असे. पूर्वी वृत्तविद्याची मांडणी बाहेर केली जात होती. संगणक कक्ष सुरू झाल्यावर विभागातच विद्यार्थी स्वत: मांडणी करू लागले. एकूण अंकाच्या निर्मितीवर साधू सरांचे लक्ष असायचे. त्यांच्यासह प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. किरण ठाकूर सर आणि उज्ज्वला बर्वे व पटवर्धन मॅडम हेदेखील मार्गदर्शन करायचे.\nपुण्याबाहेरील आम्ही बहुतांश विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत असू. मी, संजय आवटे, दत्तात्रय गवंडी आणि अभ्युदय रेळेकर आम्ही एके दिवशी भल्या पहाटे वृत्तविद्याचा अंक घेऊन विद्यापीठ कॅम्पसमधील सरांच्या घरी गेलो. साक्षात तिथे प्रख्यात लेखक यू. आर. अनंतमूर्ती होते. सरांनी कौतुकाने आमचा अंक त्यांना दिला. आमची सर्वांची ओळख करून दिली आणि किचनमध्ये गेले. चहा करू लागले. “सर, तुम्ही बसा आम्ही करतो चहा.” सरांना आम्ही विनंती केली.\nसरांनी आम्हाला चहा नाही करू दिला. स्वत: केला. आम्हा सर्वांना दिला. विद्यार्थी दशेतला हा अनुभव तृप्त करणारा होता. सरांकडे खूप मोठ्या माणसांचा वावर असायचा. सर विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी नेहमीच संवाद घडवून आणत असत.\nसाधू सर अनुभवलेल्या माझ्यासारख्यांना ‘साधू सर’ हे शब्दच मुळात जादूई वाटतात. साधू सर क्रमित अभ्यासक्रमापलीडकचे (टेक्स्ट् बूक) धडे देत. त्याचा क्लास म्हणजे पत्रकारितेची खरी शाळा भरत असे. त्यात पत्रकारितेची प्रत्यक्ष अनुभूती मिळे. क्लासमधील सरांचे मुक्तचिंतन आम्हाला समृद्ध करणारे असे. ते अत्यंत संयमी, मुक्तचिंतक आणि तत्वचिंतक शिक्षक होते. ते स्वत:च पत्रकारितेचे विद्यापीठ होते. साहित्य आणि पत्रकारिता जगलेले साधू सर बातमी लेखन शिकवायचे. अलीकडे ठिकठिकाणी पत्रकारिता महाविद्यालये, विभाग आणि संस्था सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी तर कधीच बातमी न लिहिलेले लोक बातमी लेखन शिकवतात. त्यामुळे प्रत्यक्ष साधू सरांनी बातमी लेखन शिकवणे, ही केवढी अभिमानाची गोष्ट\nप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना साधू सर संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख झाले होते. त्याच दरम्यान पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रांचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांची नियुक्ती झाली होती. संबंधित क्षेत्रातील माणसे शिक्षक म्हणून लाभल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावतो. साधू सर तर त्याचे प्रत्यक्ष अद्‌भूत उदाहरण होते.\nश्री. पराग करंदीकर (संपादक, महाराष्ट्र टाईम्स, पुणे), श्री. विक्रांत पाटील (संपादक, जनशक्ती), श्री. दयानंद माने (संपादक, सकाळ, औरंगाबाद), श्री. अनिल घोडवे अशी काही मंडळी आम्हाला सिनियर होती. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळेदेखील त्याचवेळी एमसीजे करत होते. साधू सरांच्या सुरुवातीच्या शिकविण्याबाबत आमचे काही सिनियर सांगायचे, “सर नवीन आले तेंव्हा सरांचे लेक्चर्स कंटाळवाणे वाटायचे. नंतर मात्र सरांना टॅक्ट कळली आणि आम्हालाही त्यांची लेक्चर्स इंटरेस्टिंग वाटू लागली.”\nसाधू सरांच्या शिकविण्यात शब्दांचा उपचार नसायचा. शिकवणे वास्तववादी, व्यवहारिक आणि दिशादर्शक होते. सर बी.सी.जे.ला आम्हाला ‘चालू घडामोडी’ आणि एम. सी. जे. ला ‘ॲडव्हान्स जर्नालिझम’ शिकवत. सरांमुळे आमच्या वर्गात विविध क्षेत्रांतील नामवंत व्याख्यानासाठी किंवा संवाद साधण्यासाठी येत असत. श्री. शरद पवार, श्री. कुमार केतकर, श्री. दया पवार, श्री. एम. जे. अकबर, श्री. विनोद दुआ, श्री. रामदास आठवले, प्रा. सुहास परांजपे, प्रा. राम बापट, श्री. विनय हार्डिकर अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांना पहिल्यांदा ऐकण्याची संधी रानडेत मिळाली होती. केतकर साहेब, बापट सर बऱ्याचदा शिकवायला यायचे.\nसाधू सरांविषयी आम्हा विद्यार्थ्यामध्ये प्रचंड कुतूहल असायचे. ‘रानडे’त खूप गप्पा व्हायच्या. सरांची पत्रकारिता, पुस्तके आणि सिनेमे हे गप्पांचे विषय असायचे. एकदा तर सरांच्या साहित्यावर सरांच्या उपस्थितीतच गप्पाही झाल्या होत्या. विद्यापीठतल्या वसतिगृहातही आमच्या गप्पा होत असत. त्यात इतर विभागांचे विद्यार्थीही सहभागी व्हायचे. मित्र राजाराम कानतोडे गप्पांत आघाडीवर असायचा. गप्पांच्या ओघाने सरांच्या साहित्याचे वाचनही व्हायचे. त्यातून सरांविषयीचे कुतुहल आणखी वाढत गेले. या कादंबरीतील हे पात्र कोणावर असेल ते कोणावर असेल\nडॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरच्या सिनेमाचे 1997-98 मध्ये चित्रिकरण सुरू होते. काही भागांचे चित्रिकरण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत झाले. साधू सरांनी हा सिनेमा लिहिलेला असल्याचे ऐकून चित्रिकरण बघताना अंगावर मुठभर चढल्यासारखे वाटायचे.\nसरांचे लिखाण नियमितपणे सुरू असायचे. सर सांगायचे आणि लेखनिकाने ते लिहून काढायचे, असा सरांचा शिरस्ता असायचा. शुद्धलेखन चांगले असलेल्या विद्यार्थ्याला सर लेखनिकाचे काम देत असत. आमच्या बॅचचा अभय जोशी रात्री दै. ‘लोकसत्ता’मध्ये मुद्रित शोधन करायचा. त्यामुळे त्याचे शुद्धलेखन चांगले होते. त्याने बरेच दिवस सरांकडे लेखनिक म्हणून काम केले होते. इतरही अनेक विद्यार्थींना सरांकडे लेखनिक म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले होते. सर कुठल्याही विद्यार्थ्याला कधीच गृहित धरत नसत. ते विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणून मोबदलाही देत असत.\n‘रानडे’तील शेवटच्या दिवसांत सरांसंदर्भात काही लोकांनी अनाठायी वाद निर्माण केला होता, हे अत्यंत दुर्दैवी होते. बहुजन समाजातील आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांविषयी सरांना अधिक आस्था असायची. माझ्या मते सरांच्या संपर्कात आलेल्या कुणाचाही सरांविषयीचे असले वाद ऐकून नक्कीच वाईट वाटले असले.\nअलीकडेच मित्रवर्य सुनील चव्हाण आणि मी वांद्र्यातील सरांच्या घरी गेलो होतो. मीही याच परिसरात राहत असल्यामुळे यापूर्वीही सरांच्या घरी जाणे झाले होते. तत्पूर्वी पुणे, नाशिक, भुसावळ आणि मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांत सरांची भेट झाली होती. आता मात्र सर फार थकले होते. खोकला थांबत नव्हता. बोलताना त्रास होत असे. सरांना नमस्कार केला. मी सोबत माझ्या मुलीला (चार्वी) आवर्जुन नेले होते. आजारपणांमुळे सरांनी सुरुवातीला ओळखले नाही. मी रानडेतले काही आठवणी सांगू लागलो, “माझ्या बातमी लेखनातील चुका... सर तुम्ही दिलेला थातूरमातूर शेरा... हडपसरहून ये-जा...”\nमाझे बोलणे संपण्यापूर्वीच श्रीमती साधू मॅडम म्हणाल्या, “सर सांगायचे, की, एक मुलगा हडपसरहून सायकलीने येतो... तूच का\nऐकून मला भरून आल्यासारखे झाले.\nविद्यार्थी हा विषय सरांसाठी सर्वव्यापी होता. गावाकडून आलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांबाबत सरांना अधिक आस्था होती. मी हो म्हटल्यावर सरांच्या पटकन लक्षात आले, “तू संजय आवटे, कमलेश वालावलकरच्या बॅचचा ना\n“हो सर,” मी म्हणालो.\nआमची बॅच 1996-97 (बीसीजे) आणि 1997- 98 (एमसीजे) ची. सरांनी संजय आवटे, कमलेश वालावलकर, अभय जोशी, ऐश्वर्या माविनकुर्वे, अनिता, नीशा नांबियार, अभ्युदय रेळेकर, अविनाश थोरात, श्रीकांत धिवरे, दत्तात्रय गवंडी, सुनील पाटील, सैकत दत्ता, सुधाकर आदी, ही आमची बीसीजेची बॅच. ह्रषिकेश देशपांडे, भक्ती चपळगावकर, ज्येष्ठ पत्रकार संजय दिनकर, आयेशा खान, मृणाल सप्रे आदी एमसीजेच्या बॅचचे. सरांनी यातल्या अनेकांची चौकशी केली.\nसरांचे जाणे आम्हा विद्यार्थ्यांसाठीही धक्कादायक होते. सरांचे अंत्यदर्शन घेताना पार्थिवाजवळ गणेश पुराणिक मी आणि अजून दोघे पत्रकार बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती मोहरीरही होत्या. आवंढा गिळत श्रीमती साधू म्हणाल्या, “तूमचे सर गेले.”\nत्यांचे हे उद्‌गार, अस्वस्थतेची भयाण जाणीव करून देणारे होते. डोळे कधी पाणावले ते कळलेही नाही. सरांच्या जाण्याने केवळ साहित्यिक किंवा पत्रकारारच नव्हे तर पत्रकारांचा एक तळमळीचा शिक्षकही हरपला. सरांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी सरांचे बरेच विद्यार्थी उपस्थित होते. यातल्या बहुतांश जणांनी आता पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली आहे. त्यात ओळखितले निलेश खरे, मनोज भोयर, हारिस शेख, गणेश पुराणिक असे अनेक होते. सगळ्यांच्या मनात सरांविषयी खूप आठवणी दाटून आल्या होत्या.\nविचार प्रवाहांप्रमाणेच देशाच्या भौगोलिक रचनेत आणि हवामानात प्रचंड भिन्नता आहे . धार्मिक , भाषिक , जाती आणि प्रांतिकतेतही वैविध्य...\n‘शेती-प्रगती’ मासिकाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख. शेतीचं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांत अधूनमधून कमी-अधिक प्रम...\nफँड्री: समतेची बिकट वाट\nनागराज मंजुळेंचा ‘ फँड्री ’ हा सिनेमा वर्तमान सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर भाष्य करतो. तसाच तो जातीव्यवस्था आणि व्यवस्...\nश्री . बिपिन मयेकर यांचे ‘मी मुंबईकर ’ हे पुस्तक नुकतेच वाचले . जीवनातले ताणतणाव, चिंता, भीती, संघर्ष आदी वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश ट...\nमी जुलै 2011 मध्ये राज्य निवडणूक आयोगात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो. त्याचदरम्यान महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत ...\nशोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी \n‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक यशवंत नाट्यमंदिरात नुकतेच बघितले. एका संवेदनशील विषयाला हात घालणारे ते नाटक आहे. त...\nआर्ची, परश्या, फँड्री आणि माथेरान\n आर्चीला घेऊन ये ” “ आर्चीला नेलंय ” “ परश्या आहे का ” “ नाही. ” “ मग, गोल्डन ईगल आणि झिंगाटला घेऊन ये. ” ...\nनिवडणूक सुधारणांमधील ‘आदर्श आचारसंहिता’ हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल ठरले आहे. ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्...\nग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा नगरपरिषदा आणि महानगरपालिका ते थेट लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुकांसाठी आचारसंहिता असते. राज्य न...\n' शेतकरी ' मासिकाच्या मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झालेला सातारा जिल्ह्यातील ओढाजोड कल्पाबाबतचा माझा लेख. गुळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/nagorao-yevatikar-article-on-copy-in-exam/", "date_download": "2018-04-20T16:34:21Z", "digest": "sha1:76RYMUZAGXGX3OOYCKDJD3B3Y3K5ZQSK", "length": 22181, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉपी म्हणजे एक कलंक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nकॉपी म्हणजे एक कलंक\nकॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे. तोसुद्धा एक गुन्हाच आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कामच असते अभ्यास करणे. तेच काम जर तो यशस्वीपणे पूर्ण केला नाही तर भविष्यात त्याला त्याची फळे भोगावीच लागतात. गेलेली वेळ कधीच पुन्हा परत मिळत नाही. म्हणून वेळेचा सदुपयोग जो करतो तो जीवनात कधीच अयशस्वी होत नाही आणि त्याला कॉपी करण्याचीदेखील गरज भासत नाही. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करत बसण्यात काही अर्थ नाही. आपल्यासोबत शिकलेले मित्र जेव्हा अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आपल्यासमोर येतात त्यावेळी आपल्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात की, मी त्यावेळी शिक्षकांच्या बोलण्याकडे किंवा शिकवण्याकडे लक्ष दिलं नाही अन्यथा मीसुद्धा काहीतरी बनलो असतो. शिक्षकांच्या शिकवण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणारे, वर्गात अनुपस्थित असणारे आणि शिक्षकाने दिलेले कार्य पूर्ण न करणारे विद्यार्थी या कॉपींना बळी पडतात. कॉपी करून एकवेळ या पुस्तकी अभ्यासक्रमातून बाहेर पडाल, पण आयुष्याच्या परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हाल एखादा विद्यार्थी कॉपी करून जर डॉक्टर झाला तर एखादा रुग्ण दगावले, एखादा विद्यार्थी कॉपी करून जर इंजिनीयर बनला तर धरण कोसळून शे दोनशे लोक मरतील, पण एखादा विद्यार्थी जर कॉपी करून शिक्षक झाला तर त्याच्या हाताखालच्या किती पिढय़ा बरबाद होतात याचा कधी विचार केला आहे काय एखादा विद्यार्थी कॉपी करून जर डॉक्टर झाला तर एखादा रुग्ण दगावले, एखादा विद्यार्थी कॉपी करून जर इंजिनीयर बनला तर धरण कोसळून शे दोनशे लोक मरतील, पण एखादा विद्यार्थी जर कॉपी करून शिक्षक झाला तर त्याच्या हाताखालच्या किती पिढय़ा बरबाद होतात याचा कधी विचार केला आहे काय परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, कॉपी करून शिक्षण क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस भरमसाट वाढत आहे. ही पुढील भविष्यासाठी नक्कीच चांगली बाब नाही.\nदहावी व बारावीच्या परीक्षेत फार मोठय़ा प्रमाणावर कॉप्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कारण हे दोन वर्ग आयुष्यातील महत्त्वाचे वळण देणारे वर्ग असतात. पण जास्तीत जास्त मार्क मिळवायचे म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकदेखील गैरमार्गाचा अवलंब करतात. नुकताच बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. याला काय म्हणावे लोकांची नीतिमत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या कॉप्यावर बंदी यावी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न व्हावेत म्हणून नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी २०१० मध्ये नांदेड जिह्यात कॉपीमुक्त परीक्षेचे आयोजन केले. त्यामुळे त्या वर्षी जिह्याचा निकाल सर्वात कमी लागला, पण परीक्षेला लागलेली कीड बाजूला करता आली हे महत्त्वाचे आहे. यामुळे नकलावर अवलंबून न राहता मुले अभ्यास करू लागली. एक परिणाम असा झाला की जो निकाल लागत होता तो पूर्ण सत्य होता. त्यात फुगीरपणा नव्हता. त्याचबरोबर परीक्षेच्या काळात होणारा पूर्ण सावळागोंधळ बंद झाला होता. या परीक्षावर अनेक जणांची पोटे अवलंबून होती. झेरॉक्सवाले, नकला लिहिणारे, पुरवठा करणारे, शाळेत असलेली शिपाई, शिक्षक, संरक्षणासाठी असलेले पोलीस, हॉकर्स एवढेच काय हॉलमध्ये पाणी देणारे वॉटर बॉय यांचीदेखील चलती राहत होती. या काळात शहरातील सर्व धाबे, बीअर बार आणि परमिट रूम हाऊसफुल्ल राहत असे, पण हे सारे बंद झाले या कॉपीमुक्त अभियानामुळे. कॉपी करून भरपूर गुण घेतलेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या यादीत सर्वात खाली असायचा.\nप्रत्येक ठिकाणी कॉपी कामाला येत नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी कॉपी करणे हा योग्य मार्ग नाही. ते एक प्रकारचे बांडगूळ आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने याविषयी गंभीरतेने विचार करून एक वेळा नापास झाले तरी चालेल, पण कॉपी करणार नाही असे ठरविणे आवश्यक आहे. कॉप्यांमुळे अभ्यास केलेल्या मुलांचे खूप नुकसान होते. अपार मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास केलेल्या मुलांना कमी गुण मिळतात आणि कॉप्या केलेली मुलं जास्त गुण मिळतात. अभ्यास करणारादेखील पुढे अभ्यास करीत नाही. पर्यवेक्षक मंडळींनीदेखील जरा कडकपणाची भूमिका घेतली तर या कॉपी प्रकरणाला निश्चितच आळा बसू शकेल असे वाटते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंपर्क संवादातील नियम आणि नैतिकता\nनिवृत्तीवेतनाचा तिढा कधी सुटेल\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/india-supreme-court-judges-democracy-is-in-danger/articleshow/62480389.cms", "date_download": "2018-04-20T16:17:59Z", "digest": "sha1:SQMOIZZ3UBNHYWNJ2ROZZFMPFWIJBGSW", "length": 43061, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india supreme court judges: democracy is in danger | लोकशाही संपुष्टात येईल - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली:\n‘सर्वोच्च न्यायालयात जे घडायला नको, ते बरेच काही घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्य पद्धतीने सुरू नाही. परिस्थिती अशी बनली की आमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला माध्यमांपुढे येणे भाग पडले. न्यायव्यवस्थेला वाचविले नाही, तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल’, असा इशारा सरन्यायाधीशांविरोधात उघड भूमिका घेतलेल्या चार न्यायमूर्तींमार्फत न्या. जे. चेलमेश्वर म्हणाले.\nशुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या चार विविध खंडपीठातील कामकाज तहकूब करून या न्यायमूर्तींनी चेलमेश्वर यांचे तुघलक रोड येथील निवासस्थान गाठले आणि दुपारी बारा वाजता ठरल्यावेळी पत्रकार परिषद सुरू करून सर्वांनाच धक्का दिला. ‘आम्ही सुधारात्मक पावले उचलण्यासाठी सरन्यायाधीशांचे मन वळविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण त्यात आम्ही अपयशी ठरलो. आजही आम्ही एका आवश्यक बाबीसाठी न्या. मिश्रा यांची भेट घेतली. पण त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील हा मोठा दिवस आहे.\nही पत्रकार परिषद एक अभूतपूर्व घटना आहे. या न्यायाधीशांनी आपला आत्मा विकला, असा वीस वर्षांनंतर कोणी आरोप करायला नको म्हणून आम्हाला ही पत्रकार परिषद बोलवावी लागली’, असे न्या. जे. चेलमेश्वर यांनी आपल्या तीन सहकारी न्यायाधीशांसमक्ष नमूद केले. या चारही न्यायाधीशांना माध्यमांपुढे आणखी भाष्य करायचे टाळून त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना लिहिलेल्या पत्राच्या प्रती पत्रकारांना वितरित केल्या.\nमहाराष्ट्रातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित याचिकेची भर पडली. लोया यांच्या मृत्यूविषयी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची सुनावणी कोणत्या न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे करायची यावरून मतभेद झाल्याने शेवटी या चारही न्यायाधीशांना पत्रकार परिषद बोलविण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे समजते. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित याचिकेवरून सरन्यायाधीशांसोबत मतभेद होते का, असे विचारले असता, कुठल्याही एका प्रकरणावर आपण बोलू इच्छित नाही. कोणते प्रकरण कुठल्या न्यायाधीशाकडे सोपवायचे यावरुन मतभेद असल्याचे न्या. चेलमेश्वर यांनी सांगितले. सरन्यायाधीशांना भेटण्यामागे लोया यांच्याशी संबंधित याचिकेचा मुद्दा होता काय, असे प्रश्न विचारले असता न्या. रंजन गोगोई यांनी सहमतीने मान हलविली.\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी घेतलेला पवित्रा शुक्रवारी संपूर्ण देशास हादरा देणारा होता. हे चार न्यायाधीश पत्रकार परिषद घेणार आहेत, हे वृत्त वाऱ्यासारखे राजधानीत पसरले आणि न्या. चेलमेश्वर यांच्या बंगल्याकडे पत्रकारांनी धाव घेतली. पत्रकार परिषदेनंतर राजधानीत अफवांचे पेव फुटले होते. स्वतः सरन्यायाधीश मिश्रा पत्रकार परिषद घेणार, अशी अफवा पसरली होती. अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल हे देखील पत्रकार परिषद घेणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र त्यापैकी काहीही झाले नाही.\n>>सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीकेची थेट तोफ डागली ती सर्वोच्च न्यायालयातील या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी...\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश. एनजेएएस कायदा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना, केवळ न्या. चेलमेश्वर यांनी विरोधी मत नोंदवले होते. त्यांनी मेडिकल कौन्सिल लाचखोरीप्रकरण घटनापीठाकडे सोपवले असताना सरन्यायाधीशांनी याबाबत नवीन पीठ स्थापन केले होते. आयटी कायदा कलम ६६ए रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या पीठातही समावेश. गुवाहाटी, केरळ उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदानंतर सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.\nसर्वोच्च न्यायालयातील चौथ्या क्रमांकाचे न्यायाधीश. १९९९मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. तेथे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही जबाबदारी भूषवली. २०१०मध्ये ते गुवाहाटी व त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. २०१२मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात असताना २७टक्के ओबीसी आरक्षणात अल्पसंख्यांसाठी ४.५टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा आदेश फेटाळणाऱ्या पीठात त्यांचा समावेश होता. ते डिसेंबर २०१८मध्ये निवृत्त होणार आहेत.\nसर्वोच्च न्यायालयातील तिसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश. पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश. त्यानंतर एप्रिल २०१२मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. विद्यमान सरन्यायाधीश मिश्रा यांच्यानंतर न्या. गोगोई हे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. संसदीय, विधिमंडळाच्या निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांची संपत्ती, शिक्षण आणि विरोधातील गुन्हे यांची माहिती जाहीर करण्याचे आदेश देणाऱ्या पीठात समावेश. राजीव गांधी हत्या खटल्यात सीबीआय अधिकाऱ्याची सुनावणी घेणाऱ्या पीठात त्यांचा समावेश होता.\nन्या. जोसेफ यांची सन २०००मध्ये केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोन वेळा त्यांनी केरळ उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. मार्च २०१३मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ते निवृत्त होणार आहेत. तिहेरी तलाक तीन विरुद्ध दोन मतांनी घटनाबाह्य ठरवणाऱ्या पाच सदस्यीय पीठाचे ते सदस्य होते. नोव्हेंबर २०१८मध्ये ते निवृत्त होणार आहेत.\n>>सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना चार न्यायाधीशांनी लिहिलेल्या पत्राचा हा अनुवाद.\nआपल्या नावे हे पत्र लिहिणे गरजेचे आहे, असे अत्यंत उद्वेगाने, सचिंतपणे आम्हाला वाटते. गेल्या काही दिवसांत या (सर्वोच्च) न्यायालयाने दिलेल्या काही निकालांमुळे न्याययंत्रणेच्या कामकाजावर आणि उच्च न्यायालयांच्या स्वायत्ततेवर विपरित परिणाम झाला आहे. मा. सरन्यायाधीशांच्या कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजावरही त्यांचा परिणाम झाला आहे.\n(ब्रिटिशकाळात) कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या सनदी उच्च न्यायालयांची स्थापना झाल्यापासून न्यायालयीन प्रशासनात काही परंपरा, संकेत रूढ झाले आहेत. या परंपरा या (विद्यमान सर्वोच्च) न्यायालयाने अंगीकारल्या आहेत. यातीलच एक प्रथा म्हणजे दैनंदिन कामकाजपत्रिका (रोस्टर) तयार करण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. अनेक खटले, न्यायमूर्ती आणि खंडपीठे असल्यामुळे प्रत्येकाकडे कोणत्या खटल्याची सुनावणी व्हावी, याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी ही व्यवस्था आवश्यक आहे. याचा अर्थ, सरन्यायाधीश इतर न्यायमूर्तींपेक्षा अधिकाराने, कायद्याने वा मानाने वरिष्ठ आहेत, असा नाही. सरन्यायाधीश हा समस्तरीय न्यायमूर्तींमधील प्रथम (फर्स्ट अमंग इक्वल्स) आहे, हेही रूढ तत्त्व आहे. सरन्यायाधीशांनी कामकाजपत्रिका कशी तयार करावी, विशिष्ट खटला चालविण्यासाठी किती सदस्यीय खंडपीठ असावे, त्याची रचना कशी असावी, याचेही नियम आहेत.\nकामकाजपत्रिकेनुसार योग्य संख्या, रचना याआधारे निर्धारित केलेल्या खंडपीठाच्या न्यायदानाच्या अधिकारांवर कोणाही बहुसदस्यीय यंत्रणेने अतिक्रमण करू नये, हे तत्त्वदेखील ओघानेच येते. नियमभंग झाल्यास एकूणच यंत्रणेच्या कारभाराविषयी संशय निर्माण होते. संस्थेच्या सचोटीवरही प्रश्नचिन्ह उभे राहते.\nउपरोल्लेखित दोन नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे खेदाने म्हणावे लागते. मात्र, सरन्यायाधीशांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय ‘आपल्या मर्जीतील खंडपीठां’कडे निवडक खटले परस्पर वर्ग केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांचे दूरगामी परिणाम देश आणि न्यायसंस्था यांच्यावर होत असतात. कितीही किंमत मोजावी लागली, तरी अशा घटनांना विरोध झाला पाहिजे. व्यवस्थेची बदनामी होऊ नये, यासाठी आम्ही अशा घटनांचे तपशील जाहीर करण्याचे टाळत आहोत. मात्र, अशा घटनांमुळे व्यवस्थेच्या प्रतिमेला काहीसा तडा गेला आहे.\n२७ ऑक्टोबर २०१७ रोजी आर. पी. लुथ्रा विरुद्ध भारत सरकार यांच्यातील खटल्याबाबतच्या घडामोडींचा दाखला देता येईल. व्यापक जनहित लक्षात घेता (न्यायालयीन) कार्यपद्धती निश्चित करण्यात आता वेळ दवडू नये, असे सांगणे रास्त वाटते. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड्स असो. विरुद्ध इतर विरुद्ध भारत सरकार (२०१६) या खटल्यात कार्यपद्धती निश्चित करणे हा त्या घटनापीठाचा अधिकार असताना, त्यांच्या कामकाजात दुसरे खंडपीठ हस्तक्षेप कसे करू शकते, हे अनाकलनीय आहे. वरील संदर्भाव्यतिरिक्त, घटनापीठाच्या निर्णयाबाबत पाच न्यायमूर्तींच्या कॉलेजियमने सखोल चर्चेअंती कार्यपद्धती निश्चित करून ती तत्कालीन सरन्यायाधीशांच्या मंजुरीसाठी पाठविली. मार्च २०१७मध्ये ती भारत सरकारकडे पाठविण्यात आली. त्यांच्याकडून उत्तर न आल्याने सरकारची मूकसंमती असल्याचे मानले गेले. त्यामुळे खंडपीठाला कार्यपद्धतीविषयी मतप्रदर्शन करण्याचे वा हा प्रश्न रेंगाळत ठेवण्याचे कारण नव्हते.\nया न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने चार जुलै २०१७ रोजी न्या. सी. एस. कर्नान यांच्याबाबत निकाल दिला. न्यायमूर्तींच्या नियुक्तीप्रक्रियेचा फेरविचार करण्याची आणि महाभियोगाव्यतिरिक्त अन्य व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत दोन न्यायमूर्तींनी त्यात मांडले होते. न्यायमूर्तींनी कार्यपद्धतीविषयी मतप्रदर्शन केले नव्हते. कार्यपद्धतीविषयी आक्षेप असल्यास त्याची चर्चा सरन्यायाधीशांच्या परिषदेत, पूर्णपीठासमोरच व्हावी. महत्त्वाचा विषय घटनापीठासमोरच आला पाहिजे. कॉलेजियममधील इतर न्यायमूर्तींशी किंवा गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींशी सल्लामसलत करूनच यावर तोडगा काढण्याचे बंधन सरन्यायाधीशांवर आहे. २७ ऑक्टोबर २०१७रोजी निकाल दिलेल्या लुथ्रा विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या सुनावणीमुळे उद्भवलेल्या समस्येची आपण योग्य दखल घ्यावी. याच प्रकारे कार्यवाही आवश्यक असलेल्या अन्य निकालांबाबतही आम्ही माहिती देऊ.\n•न्या. जे. चेलमेश्वर •न्या. रंजन गोगोई •न्या. मदन लोकूर •न्या. कुरियन जोसेफ\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nkathua rape: चिमुरडीच्या हत्येने हादरले खोरे\nचीनच्या युद्धनौकांचं भारतानं असं केलं स्वागत\n'मला फक्त १५ मिनिटं बोलू द्या...'\nAadhaar विरोधात गुगलचे कटकारस्थान\nमहिलेसमोरच उबर चालकाचं हस्तमैथुन\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घरावर दगडफेक\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकांत फूट\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\n3उद्यापर्यंत वाद मिटेल: अॅटर्नी जनरल...\n4लोकशाही धोक्यात; काँग्रेसने डागली तोफ...\n5यूपीत हज हाऊस नंतर शौचालयांनाही भगवा रंग...\n6न्यायाधीशांच्या भूकंपानंतर सरकार हादरले...\n7'न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीला धोका'...\n8सामान्य कैद्यासारखी वागणूक; लालू भडकले...\n9इस्रोनं शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला...\n10भारत महासत्ता होण्यास हिंदुत्वाचं राजकारण बाधक...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%81_%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:46:28Z", "digest": "sha1:CULCZDY2BL6JLSURCNXETMBFEEP5LMJE", "length": 5460, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काट्रदु तमिळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकाट्रदु तमिळ(तमिळ शिकलो) (तमिळ: கற்றது தமிழ்; (अर्थ:शिकलो/ले तमिळ) ;\nफिल्मफेअर सर्वोत्तम नवोदीत अभिनेत्री (दक्षिण) - अंजली\nचित्रपट टिकाकार सर्वोत्तम लेखक - Ram[9]\nरिलायंस मोबाईल-विजय पुरस्कार-सर्वोत्तम नवोदीत अभिनेत्री - अंजली\nरिलायंस मोबाईल-विजय पुरस्कार-सर्वोत्तम संपादन - ए.श्रीकर प्रसाद.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/12/MagazineNov2016.html", "date_download": "2018-04-20T16:27:53Z", "digest": "sha1:Z6RGFLWLGFNGV3DJU2KVRPQDMYNI5V6L", "length": 6963, "nlines": 152, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : मासिक : नोव्हेंबर २०१६ (PDF)", "raw_content": "\nमासिक : नोव्हेंबर २०१६ (PDF)\n'नोव्हेंबर २०१६'च्या सर्व चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच राज्यसेवा, PSI, STI, Asst व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील SHARE करा.\nहे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.\nहे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.\n★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३० डिसेंबर\nचालू घडामोडी : २९ डिसेंबर\nचालू घडामोडी : २८ डिसेंबर\nचालू घडामोडी : २७ डिसेंबर\nचालू घडामोडी : २६ डिसेंबर\nस्पर्धापरीक्षा तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच\nचालू घडामोडी : २५ डिसेंबर\nचालू घडामोडी : २४ डिसेंबर\nचालू घडामोडी : २३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २२ डिसेंबर\nपीएसआय परीक्षेसाठीची वयोमर्यादेत वाढ\nचालू घडामोडी : २१ डिसेंबर\nचालू घडामोडी : २० डिसेंबर\nचालू घडामोडी : १९ डिसेंबर\nचालू घडामोडी : १८ डिसेंबर\nमासिक : नोव्हेंबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : १७ डिसेंबर\nचालू घडामोडी : १६ डिसेंबर\nचालू घडामोडी : १५ डिसेंबर\nचालू घडामोडी : १४ डिसेंबर\nचालू घडामोडी : १३ डिसेंबर\nचालू घडामोडी : १२ डिसेंबर\nपोलादी नेत्या जे. जयललिता\nचालू घडामोडी : ११ डिसेंबर\nचालू घडामोडी : १० डिसेंबर\nचालू घडामोडी : ९ डिसेंबर\nचालू घडामोडी : ८ डिसेंबर\nचालू घडामोडी : ७ डिसेंबर\nचालू घडामोडी : ६ डिसेंबर\nचालू घडामोडी : ५ डिसेंबर\nचालू घडामोडी : ४ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २ डिसेंबर\nचालू घडामोडी : १ डिसेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3044", "date_download": "2018-04-20T16:43:33Z", "digest": "sha1:UHFAMOJT7CMDABC53U3WSOEITE5HDMF7", "length": 16738, "nlines": 106, "source_domain": "rajtantra.com", "title": "अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा! | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nअदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nपालघर जिल्हा निर्माण होऊन, केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसून, राज्यात मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसजी विराजमान होऊन आणि पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आपल्या हाती येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 2 वर्षांपेक्षा कमी सत्ताकाळ उरला आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूका येणार आहेत. मोदी लहर आजही टिकून असल्याचे संकेत मिळत असले तरी तुम्हाला तुमच्या कामाच्या जोरावर येत्या निवडणूकीत मते मागता आली तर उत्तमच आहे.\nआपण कामे केली नाहीत असे आम्हाला म्हणायचे नाही. पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे हे कोणी नाकारु शकत नाही. प्रश्‍न इतकाच आहे कि, आपण आदिवासी विकास मंत्री आहात. आणि आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. यामुळे आपल्याकडून लोकांना अधिक अपेक्षा आहेत. त्यातही आपण अखंड ठाणे जिल्ह्याचे ठाणे आणि पालघर असे जिल्हा विभाजन होण्यास कारणीभूत ठरलेल्या, कुपोषण आणि बालमृत्यूमुळे कायम चर्चेत राहीलेल्या जव्हार-मोखाडा सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागाचा समावेश असलेल्या विक्रमगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहात. असे असताना आपण मोखाडा आणि विक्रमगड नगरपंचायती आणि आता जव्हार नगरपालिका व त्याचवेळी वाडा नगरपंचायत गमावता आहात. या पराभवाची आपणाला कारणीमिमांसा करावी लागणार आहे.\nआम्हाला अलिकडेच आपल्या मतदारसंघातील जव्हार तालुक्यातील बोर्‍हाळा गावातील बोरीचा घोडा येथे जाण्याचा योग आला. तेथील यशोगाथा पाहून आमचा उर भरुन आला. आम्ही मनोमन आपल्यावर खूष झालो. असेच काम चालू राहीले तर जव्हार/मोखाड्याचा शास्वत विकास झाल्याशिवाय रहाणार नाही याची आम्हाला मनोमन खात्री पटली. अधिक तपशिलात गेल्यानंतर मात्र या सफलतेमध्ये लाल फितीतल्या योजनांचा सहभाग शुन्य असल्याचे समजले. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ न मिळता बोरीचा घाट विकसीत झाला आहे हे कळले. आणि मग आपल्या विभागाविषयी भ्रमनिरास झाला. विकासाचे हे मॉडेल आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या चौकटीत बसणारे नव्हते. पण लाल फितीतले विकासाचे मॉडेल वापरुन जर प्रश्‍न सुटत नसतील तर यशस्वी झालेले विकासाचे मॉडेल पाहून त्याप्रमाणे योजना तयार करण्याबाबत शासनाला विचार करायला काय हरकत काय\nया आदिवासी पाड्यावर सौर उर्जेवर चालणार्‍या मोटारपंपाद्वारे पाणी पुरवठा होतो. येथे सार्वजनिक नळाला फिल्टर बसविण्यात आलेले आहे. येथील सर्व 36 घरे सामुहीक शेती करतात. सर्वांच्या हाताला काम मिळालेले आहे. यामुळे पोटापाण्यासाठी होणारे स्थलांतर शून्य टक्क्यांवर आले आहे. अर्थातच स्थलांतर होत नसल्यामुळे त्यासोबत उद्भवणार्‍या अनेक समस्यांचे देखील निराकारण झाले आहे. हे सर्व एकाच दिवसात झाले नाही. त्यासाठी या लोकांनी 2 किलोमीटर अंतरावरील नदीतून पाणी आणून ठिबकसिंचन पद्धतीने 150 मिटर उंचीवरील 28 एकर जमिन ओलीताखाली आणली. पाण्याची बचत करुन विकास साधला. आज या गावातून नवी मुंबई असो की दिल्ली, दूरदूरवर भाजीपाला पोचतो. त्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे. यासाठी एकीचे बळ दाखवत या लोकांनी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यातील 10 लाख रुपये 2 वर्षांत फेडले देखील. शासनाचा एकही रुपया अनुदानाशिवाय हे शक्य झाले आहे.\nहे सर्व शक्य झाले त्याचे कारण एकच घडले. प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदाताई पटवर्धन यांच्या दृष्टीक्षेपात हा पाडा आणि त्यांतील लोकांची मेहनत व तळमळ आली. यातून या लोकांची प्रगती झाली. सुनंदाताईंनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या लोकांना योग्य मार्ग दाखवला. सुनंदाताईंच्या मार्गावर चालून बोरीचा घोडा समृद्ध झाला. सरकारने देखील सुनंदाताईंच्या मार्गावरुन जायला काय हरकत आहे असे एखादे विकासाचे मॉडेल स्विकारायला काय हरकत आहे. टेबलवर बसुन तयार केलेल्या मॉडेलपेक्षा खाचखळग्यांतून वणवण करणार्‍यांनी यशस्वी केलेल्या मॉडेलमधून जव्हार मोखाड्याचा विकास साधू शकेल. आणि मग आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघाचे विकासाचे यशस्वी मॉडेल राबवून संपूण आदिवासी भाग समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही.\nPrevious: आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nNext: विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:44:43Z", "digest": "sha1:EPNU45OCJ766LW3NWCU53I2OFEWEVVIZ", "length": 5702, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्फ गोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव आल्फ्रेड रिचर्ड गोवर\nजन्म २९ फेब्रुवारी, १९०८ (1908-02-29)\n७ ऑक्टोबर, २००१ (वय ९३)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद\nक.सा. पदार्पण २५ जुलै १९३६: वि भारत\nशेवटचा क.सा. १७ ऑगस्ट १९४६: वि भारत\nफलंदाजीची सरासरी N/A ९.३६\nसर्वोच्च धावसंख्या २* ४१*\nगोलंदाजीची सरासरी ४४.८७ २३.६३\nएका डावात ५ बळी – ९५\nएका सामन्यात १० बळी – १७\nसर्वोत्तम गोलंदाजी ३/८५ ८/३४\n२१ जुलै, इ.स. २०१२\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९०८ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nइ.स. १९०८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nइ.स. २००१ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू\n२९ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://events.lokmat.com/lmms-awards-2017/", "date_download": "2018-04-20T16:33:53Z", "digest": "sha1:XVNICPG33KB4JXSVMPWCMUWHIAOY7MKB", "length": 13958, "nlines": 25, "source_domain": "events.lokmat.com", "title": "लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७ | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017 Live Updates| Red Carpet Photos & Videos | Lokmat.com", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा सिद्धार्थ मल्होत्रा : मोस्ट स्टायलिश अॅक्टर आलिया भट : मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार सुशांत सिंग राजपूत : मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन काजोल : मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन करण जोहर : मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: काजोलची विंटर सीझन ड्रेसिंग स्टाइल रंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण सिद्धार्थ मल्होत्रा : मोस्ट स्टायलिश अॅक्टर आलिया भट : मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार सुशांत सिंग राजपूत : मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन काजोल : मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन करण जोहर : मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन पंकजा मुंडे : मोस्ट स्टायलिश राजकारणी Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: काजोलची विंटर सीझन ड्रेसिंग स्टाइल रंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला,ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना 'लोकमत स्टाइल अवॉर्ड'मध्ये एकत्र दिसले आलिया -सिद्धार्थ या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला,ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना 'लोकमत स्टाइल अवॉर्ड'मध्ये एकत्र दिसले आलिया -सिद्धार्थ Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: ब्युटी इन ब्लॅक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्काराचे विजेते कोण ठरले ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्ड्सचे मानकरी Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: ब्युटी इन ब्लॅक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्काराचे विजेते कोण ठरले ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्ड्सचे मानकरी अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा स्टायलिश अंदाज सई ताम्हणकर, क्रांति रेडकर, वैशाली सामंतने सांगितले त्यांचे स्टाइल स्टेटमेंट, पहा व्हिडीओ अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा स्टायलिश अंदाज सई ताम्हणकर, क्रांति रेडकर, वैशाली सामंतने सांगितले त्यांचे स्टाइल स्टेटमेंट, पहा व्हिडीओ 'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017' सोहळ्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाज माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज चेतन भगतसोबत सेक्सी राधा गाण्यावर ठुमके लावत आलिया भट्टने सांगितले तिच्या स्टाइलचे सीक्रेट 'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017' सोहळ्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाज माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळ्यात सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज चेतन भगतसोबत सेक्सी राधा गाण्यावर ठुमके लावत आलिया भट्टने सांगितले तिच्या स्टाइलचे सीक्रेट लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब - सिद्धार्थ मल्होत्रा काजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा स्टाईलचा गौरव केला, याबद्दल मी खूप आनंदी आहे - रोहित शेट्टी Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या ‘काजोल’ने आणली बहार लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब - सिद्धार्थ मल्होत्रा काजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा स्टाईलचा गौरव केला, याबद्दल मी खूप आनंदी आहे - रोहित शेट्टी Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या ‘काजोल’ने आणली बहार आईबद्दल बोलताना झाली भावूक आईबद्दल बोलताना झाली भावूक एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : माझी स्टाइल माझ्या विचारात दिसेल : चेतन भगत Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : जॅकी श्रॉफचा षट्कार... एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : माझी स्टाइल माझ्या विचारात दिसेल : चेतन भगत Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : जॅकी श्रॉफचा षट्कार... वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाईल शिकलो... वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाईल शिकलो... माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : केवळ बातम्या देणे हे लोकमतचे काम नाही. - विजय दर्डा माझी स्टाईल कपड्यात किंवा मेकअपमध्ये नाही भेटणार विचारात दिसेल - चेतन भगत वडिलांचं धोतर नेसणं पाहून मी स्टाईल शिकलो, जॅकी श्रॉफने केला लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात उलगडा केवळ बातम्या देणं हे लोकमतचं काम नाही - विजय दर्डा लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 - ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींच्या’ गौरव सोहळ्याला सुरुवात LIVE UPDATE : Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : केवळ बातम्या देणे हे लोकमतचे काम नाही. - विजय दर्डा माझी स्टाईल कपड्यात किंवा मेकअपमध्ये नाही भेटणार विचारात दिसेल - चेतन भगत वडिलांचं धोतर नेसणं पाहून मी स्टाईल शिकलो, जॅकी श्रॉफने केला लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात उलगडा केवळ बातम्या देणं हे लोकमतचं काम नाही - विजय दर्डा लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 - ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींच्या’ गौरव सोहळ्याला सुरुवात LIVE UPDATE : Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017:‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ आज रंगणार गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ रंगणार गौरव सोहळा रेडकार्पेटवर दिसला या अभिनेत्रींचा फॅशनचा जलवा ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017:‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ आज रंगणार गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ रंगणार गौरव सोहळा रेडकार्पेटवर दिसला या अभिनेत्रींचा फॅशनचा जलवा ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश... कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश... ​युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उघड केले गर्लफ्रेंडबाबत रहस्य लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी अजिंक्य रहाणेचा कुल अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी गुलशन ग्रोव्हर यांचा निराळा अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी अमृता खानविलकर दिसला खास अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी सुरांची मलिका शाल्मली खोडलगडे हिचा गॉर्जिअस लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी आरजे मलिष्काचा ग्लॅमसर लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी राधिका आपटेचा बोल्ड लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डवेळी अंदाज-ए- हृतिक रोशन LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : ...अन् राधिकाच्या ‘बम्बईरिया’ सिनेमाचे ट्रेलर झळकले Lokmat Maharastras most stylish personality award : दिसला या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : शाल्मली खोलगडे म्हणाली, मैैं परेशान... परेशान... परेशान सई ताम्हणकरला जायचंय क्रिकेटर अजिंक्य रहाणेसोबत डेटवर LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : सोनम कपूर वडिलांनाच मानतेय ‘स्टाइल आयकॉन’ LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : हृतिक रोशन अन् टायगर श्रॉफने धरला ठेका LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : रेड कार्पेटवर सेलेब्सचा जलवा LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS: सेलिब्रेटींच्या उपस्थित पार पडला सर्वात स्टायलिश अवॉर्ड सोहळा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड LIVE UPDATES: ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान आज होणार महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डने स्टायलिश पर्सनालिटीजचा गौरव Hritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश' रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींचा फॅशनचा जलवा कोणत्या अभिनेत्रीचा जीन्स टाॅपध्येही दिसतो क्लासी लूक ​युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उघड केले गर्लफ्रेंडबाबत रहस्य लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी अजिंक्य रहाणेचा कुल अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी गुलशन ग्रोव्हर यांचा निराळा अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी अमृता खानविलकर दिसला खास अंदाज लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी सुरांची मलिका शाल्मली खोडलगडे हिचा गॉर्जिअस लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी आरजे मलिष्काचा ग्लॅमसर लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी राधिका आपटेचा बोल्ड लूक लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डवेळी अंदाज-ए- हृतिक रोशन LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : ...अन् राधिकाच्या ‘बम्बईरिया’ सिनेमाचे ट्रेलर झळकले Lokmat Maharastras most stylish personality award : दिसला या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : शाल्मली खोलगडे म्हणाली, मैैं परेशान... परेशान... परेशान सई ताम्हणकरला जायचंय क्रिकेटर अजिंक्य रहाणेसोबत डेटवर LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : सोनम कपूर वडिलांनाच मानतेय ‘स्टाइल आयकॉन’ LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : हृतिक रोशन अन् टायगर श्रॉफने धरला ठेका LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : रेड कार्पेटवर सेलेब्सचा जलवा LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS: सेलिब्रेटींच्या उपस्थित पार पडला सर्वात स्टायलिश अवॉर्ड सोहळा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड LIVE UPDATES: ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान आज होणार महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डने स्टायलिश पर्सनालिटीजचा गौरव Hritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश' रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींचा फॅशनचा जलवा कोणत्या अभिनेत्रीचा जीन्स टाॅपध्येही दिसतो क्लासी लूक एक अनोखा हटके सोहळा- गौरव होणार महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा SEE PICS:सोनम कपूर प्रमाणे सोनाक्षी सिन्हा ठरतेय स्टाइल आयकॉन स्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत पिळदार मिशीमुळे मिळाली वेगळी ओळख_सुशांत सिंह तुमचे व्यक्तिमत्त्वच ठरविणार तुमची स्टाईल स्टाइल म्हणजे व्यक्तीमत्त्वाचे प्रेझेंटेशन – संजय जाधव साधेपणा हीच माझी खरी स्टाईल – सुयश टिळक स्टाइल हे एक प्रेझेंटेशन स्वतःची बनवा वेगळी स्टाइल तुमचा कॉन्फिडन्स हीच तुमची स्टाइल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nakshatra.swami/word", "date_download": "2018-04-20T16:31:26Z", "digest": "sha1:GJHFB4JLACN4X6JQYHQCYKFUIGE7FLMA", "length": 7912, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nakshatra swami", "raw_content": "\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार, कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून.\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय पहिला\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय दुसरा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय तिसरा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय चौथा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय पाचवा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय सहावा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय सातवा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - श्रीनक्षत्रस्वामींची आरती\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-20T16:21:46Z", "digest": "sha1:TGF46SZECD2KBDV2BXC5PQBAYN4IVULI", "length": 14664, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वीर मराठा वॉरिअर्सला विजेतेपद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवीर मराठा वॉरिअर्सला विजेतेपद\nएसपीएल स्पर्धा:इलेव्हन ब्लास्टर द्वितीय क्रमांकाचा मानकरी\nसातारा – ठोसेघर, ता.सातारा येथील स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले क्रिडा संकुलनामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या एसपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये वीर मराठा वॉरिअर्सने रू. 61 हजार 111 रूपयांचे पारितोषिक पटकावले तर इलेव्हन ब्लास्टर या संघाने द्वितीय क्रमांकाचे 31 हजार 111 रूपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी पटकावली.\nदि. 13 ते 16 एप्रिल या तीन दिवसामध्ये एसपीएलमध्ये इलेव्हन ब्लास्टर विरूद्ध राजे फायटर, सातारा सिक्‍सर विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स रॉयल्स स्टार विरूद्ध शिवसह्याद्री वॉरिअर्स, मराठा वॉरिअर्स विरूद्ध अनु इलेव्हन, युनायटेड इलेव्हन विरूद्ध सातारा सिक्‍सर, शिवसह्याद्री वॉरिअर्स विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स, इलेव्हन वॉरिअर्स विरूद्ध रॉयल्स स्टार यांच्यात लढती झाल्या. शनिवार दि. 14 एप्रिल रोजी मराठा वॉरिअर्स विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स, शिवसह्याद्री वॉरिअर्स विरूद्ध राजे फायटर, अनु इलेव्हन विरूद्ध सातारा सिक्‍सर, रॉयल्स स्टार विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स, युनायटेड इलेव्हन विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स, इलेव्हन वॉरिअर्स विरूद्ध शिवसह्याद्री वॉरिअर्स, मराठा वॉरिअर्स विरूद्ध सातारा सिक्‍सर, समर्थ पठार वॉरिअर्स विरूद्ध राजे फायटर्स, अनु इलेव्हन विरूद्ध युनायटेड इलेव्हन, आणि इलेव्हन ब्लास्टर विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स. रविवारी दि. 15 रोजी अखेरच्या दिवशी युनायटेड इलेव्हन विरूद्ध मराठा वॉरिअर्स, रॉयल्स स्टार विरूद्ध राजे फायटर्स, वीर मराठा वॉरिअर्स विरूद्ध अनु इलेव्हन,कॉलीफायर्स विरूद्ध ऐलिमिनेटर आणि फायनलमध्ये वीर मराठा विरूद्ध इलेव्हन ब्लास्टर यांच्यात लक्षवेधी लढत झाली.\nफायनलमध्ये अंतीम समान्यामध्ये वीर मराठा वॉरिअर्सने बाजी मारत 61 हजार 111 रूपये आणि ट्रॉफी पटकावली. तर इलेव्हन ब्लास्टरने 31 हजार 111 रूपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व ट्राफी पटकावली. या सामन्यात इलेव्हन ब्लास्टर संघाचा संतोष जांगळे हा मालिकावीर ठरला. तर राजेश मोहिते याने उत्कृष्ठ फलंदाजाचा किताब पटकावला. विनोद जाधव हा उत्कृष्ठ गोलंदाज ठरला. पारितोषिक वितरण समांरभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चव्हाण, ठोसेघरचे उपसरपंच जयराम चव्हाण, बापूशेठ सपकाळ, आबाजी जाधव, ऍड. अरूण जाधव, सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरआप्पा चव्हाण, शशिकांत कणसे, राजू चव्हाण, जयराम चव्हाण, विष्णू पवार, भाजपा तालुका अध्यक्ष अभय पवार, शशि वायकर, बापूशेठ सपकाळ, विशाल भोसले, रघुनाथ चव्हाण, शंकर बेडेकर उपस्थित होते. विजेत्या संघांना प्रकाश चव्हाण, जयराम चव्हाण, आबाजी जाधव यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.\nप्रारंभी संयोजकांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे शिल्ड, शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रकाश बापू चव्हाण आणि ठोसेघरचे उपसरपंच जयराम चव्हाण यांनी प्रथम क्रमांकासाठी विभागून 61 हजार 111 रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. बक्षिस वितरणप्रंसंगी बोलताना प्रकाश चव्हाण म्हणाले, दुर्गम भागातील तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एसपीएल सारखी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी संयोजकांनी आणखी प्रयत्न करावेत या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी होतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पारितोषिक मिळाल्यानंतर वीर मराठा वॉरिअर्स आणि इलेव्हन ब्लास्टर या दोन्ही विजयी संघानी मैदानामध्ये जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली.\nपुढील स्पॉन्सरशिप माझ्याकडून पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ऍड. अरूण जाधव म्हणाले, ठोसेघरसारख्या दुर्गम भागामध्ये येथील तरूणांनी खूप छान मैदान तयार केले आहे. आज दिवसभर क्रिकेटचे सामने पाहत असताना या भागात अत्यंत चांगले खेळाडू असल्याचे स्पष्ट झाले. एसपीएलसारखा उपक्रम राबविणे ही सोपी गोष्ट नाही. याची मला जाणीव असल्याने पुढील वर्षीच्या एसपीएलसाठी मी स्पॉन्सरशिप देणार असल्याची घोषणा जाधव यांनी यावेळी केली. उद्योजक बापूशेठ सपकाळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डोंगरी-दुर्गम भागातील युवकांच्या अंगी नेतृत्व गुणाची क्षमता आहे. हे गेल्या तीन दिवसात झालेल्या सामन्यातून स्पष्ट दिसून आले आहे. याचा आपल्याला मनोमन आनंद वाटत असून पुढील स्पर्धेसाठी लागेल ती सर्वतोपरी मदत तर करीनच त्याचबरोबर स्पॉन्सरशिपची जबाबदारीही घेण्यास मी तयार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअग्निशामक, वाळू लिलावरुन खडाजंगी\nNext articleस्मृती इराणी यांचा पाठलाग करणे ‘त्या’ चार तरुणांना पडले महागात\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nजाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…\nमहिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा\nशिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा वाईचे वैभव ठरेल\nसातारा: फुलांचा बहर पाडतोय दुष्काळाचा विसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/competitive/entrance/psi-pre-exam", "date_download": "2018-04-20T16:22:40Z", "digest": "sha1:AH75DKAVWKCYUOO5O7RO3Q3FLFYTLQEO", "length": 15298, "nlines": 402, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन प्रवेश पी.एस.आय पूर्व परीक्षा पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nदिपक बावीस्कर, दिलीप पाटील\nचालू घडामोडी प्रश्नसंच २०१७ २री आवृत्ती\nलेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी\nPSI पूर्व थोडक्यात तयारी\nस्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/11/CurrentAffairs03112016.html", "date_download": "2018-04-20T16:30:32Z", "digest": "sha1:BXZP6HONAFVWI6D6KY7ZFXLN6YEYPSFJ", "length": 15728, "nlines": 175, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : ३ नोव्हेंबर", "raw_content": "\nचालू घडामोडी : ३ नोव्हेंबर\nजीएसटीबाबत केंद्र व राज्यांमध्ये एकमत\nवस्तू व सेवा विधेयकातील (जीएसटी) कररचनेबाबत केंद्र व राज्य सरकारांमध्ये अखेर एकमत झाले आहे.\n५, १२, १८ आणि २८ टक्के अशी चारस्तरीय कररचना करण्यावर जीएसटी परिषदेने एकमताने शिक्कामोर्तब केले आहे.\nमागील बैठकीमध्ये एकमत न झाल्याने निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. मात्र या वेळी एकमत घडवून आणण्यात अर्थमंत्री जेटली यशस्वी झाले.\nकेंद्राने ६, १२, १८ आणि २६ टक्के अशी चारस्तरीय कररचना सुचविली होती. पण चर्चेअंती ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांवर सहमती करण्यात आली.\nआता या कररचनेस संसदेची संमती घ्यावी लागणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसंदर्भातील दोन विधेयकांना मंजुरी मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.\nग्राहक किंमत निर्देशांकाच्या कक्षेतील पन्नास टक्के वस्तू करमुक्त असतील. त्यात प्रामुख्याने अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असेल.\nकिरकोळ पण लोकांना दररोज लागणाऱ्या आणि व्यापक खपाच्या वस्तूंवर पाच टक्के कर आकारण्यात येईल.\nयानंतरच्या टप्प्यात ‘स्टॅंडर्ड रेट’ म्हणून दोन दरांचा समावेश असेल. १२ व १८ टक्के असे ते दोन दर असतील. यामध्ये वस्तूंबरोबरच सेवांचाही समावेश राहील.\nग्राहक किंमत निर्देशांकाच्या कक्षेतील शून्य व पाच टक्के करातून उरणाऱ्या उर्वरित वस्तूंचा या दोन दरांमध्ये समावेश केला जाणार आहे.\nआलिशान मोटारी, तंबाखू, शीतपेये आदी चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक म्हणजे २८ टक्के कर आकारला जाईल आणि त्याबरोबरच अतिरिक्त सेसही आकारला जाणार आहे.\nकोणत्या वस्तू कोणत्या गटात असतील, याची शिफारस अधिकारी करतील आणि त्याचा अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेईल. त्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसेल.\nया नव्या कर पद्धतीच्या अंमलबजावणीमुळे सुरवातीच्या काळात राज्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई पहिल्या पाच वर्षे केंद्र सरकार देणार आहे.\nअतिरिक्त सेस, तसेच स्वच्छ ऊर्जा सेस आकारणीतून होणाऱ्या मिळकतीतून राज्यांना ही संभाव्य महसुली नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. पाच वर्षांनंतर हे सेस रद्द केले जातील.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय जीएसटी परिषद पार पडली.\nएनडीटीव्ही इंडियावर एक दिवसाची बंदी\nपठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचे नियमबाह्य प्रक्षेपण केल्याप्रकरणी एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्त वाहिनीवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने एक दिवस वाहिनी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.\nएनडीटीव्ही इंडियाने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते १० नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत प्रसारण बंद ठेवावे असा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केला आहे.\nएखाद्या खासगी वाहिनीला अशा प्रकारचा आदेश दिला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.\nपठाणकोट येथे दहशतवादी हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने एअरबेसवर असणाऱ्या हत्यारांची माहिती दिली होती.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गठीत केलेल्या समितीच्या मते, अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.\nतसेच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते, असे या समितीचे म्हणणे आहे.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण देशात लागू\n१ नोव्हेंबरपासून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यामुळे आता संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला आहे.\nया कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४० हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे.\n२०१३मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.\nउपमा विरदी यांना बिझनेस वुमन ऑफ द इअर पुरस्कार\nऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या उपमा विरदी यांनी यंदाच्या 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.\nव्यवसायाने वकील असलेल्या उपमा यांनी छंद म्हणून चहाचा बिझनेस सुरू केला आणि यशाची पताका फडकावली.\nऑस्ट्रेलियासारख्या कॉफीवेड्या देशात लोकांना चहाची तलफ लावण्याची किमया मेलबर्नमध्ये राहणाऱ्या या तरुणीने करून दाखवली आहे.\nउपमाच्या या यशाचा इंडियन ऑस्ट्रेलियन बिझनेस अॅण्ड कम्युनिटी पुरस्कारात 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २६ नोव्हेंबर\nक्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो कालवश\nचालू घडामोडी : २५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २१ नोव्हेंबर\nमासिक : ऑक्टोबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : २० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १६ नोव्हेंबर\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nचालू घडामोडी : १५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ११ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ६ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १ नोव्हेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/literature/literary-collections", "date_download": "2018-04-20T16:43:55Z", "digest": "sha1:CPNVPIMEBBPYEGWHCLN44BSNGVSXTFBQ", "length": 15608, "nlines": 406, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन साहित्य साहित्य संग्रह पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमराठी कादंबरी : समीक्षा\nज्योत्स्ना खरे, मृणालिनी कुलकर्णी\nरॉय किणीकर माणूस आणि साहित्य\nप्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप\nकाही वाङ्मयप्रकार : शोध आणि स्वरूप\nसाहित्यविमर्शक आणि वाड्मयास्वादक व. दि\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/asalgaon-nashik-onion-price-at-its-peak-467289", "date_download": "2018-04-20T16:40:13Z", "digest": "sha1:O2KXS2I2SXAHW2GD7L6SKC3VXMAG6C3W", "length": 17523, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : परतीच्या पावसामुळे लासलगावमधील शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान", "raw_content": "\nनाशिक : परतीच्या पावसामुळे लासलगावमधील शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान\nपरतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं याचा परिणाम कांद्याच्या दरवाढीवर बघायला मिळतोय. लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याचे दर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात हेच दर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल इतके होते. मात्र सोमवारी बाजारपेठ सुरु होताच हे दर थेट प्रतिक्विंटल 2500 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले, तर नाशिकमधील किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो 30 रुपयांवर पोहोचला. दिवाळीच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. हीच संधी साधून घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दरात वाढ केल्याचंही बोललं जातं आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nनाशिक : परतीच्या पावसामुळे लासलगावमधील शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान\nनाशिक : परतीच्या पावसामुळे लासलगावमधील शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान\nपरतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं याचा परिणाम कांद्याच्या दरवाढीवर बघायला मिळतोय. लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याचे दर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात हेच दर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल इतके होते. मात्र सोमवारी बाजारपेठ सुरु होताच हे दर थेट प्रतिक्विंटल 2500 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले, तर नाशिकमधील किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो 30 रुपयांवर पोहोचला. दिवाळीच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. हीच संधी साधून घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दरात वाढ केल्याचंही बोललं जातं आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/famous-pediatrician-dr-parag-dahake-passed-away-age-36-only/", "date_download": "2018-04-20T16:07:23Z", "digest": "sha1:VAY5LMUN53UZHHAT6FUGQ2KN52XFCSFQ", "length": 24096, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Famous Pediatrician Dr. Parag Dahake Passed Away At The Age Of 36 Only | वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग डहाके यांचे निधन | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nवयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग डहाके यांचे निधन\nप्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग डहाके यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते.\nभंडारा - प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग डहाके यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई वडील, भाऊ, असा आप्त परिवार आहे. अविवाहित असलेले डॉ.पराग यांनी आहार पोषण या विषयावर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी येथे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.\nत्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१५ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या परागच्या निधनाने भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे,\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईतील कुपोषित बालकांसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’चा पुढाकार\nरुबी हॉस्पिटलची वैशालीवर उपचार करण्यास टाळाटाळ, यादव कुटुंबाचा आरोप\n...अन्यथा ‘बोगस डॉक्टर’ म्हणून तुरुंगात जाल\nबोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, आयुक्तांचे आदेश : वैद्यकीय अधिकारी वादात\nसर्पमित्रच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉक्टराला निलंबित करण्याचे आदेश\nकल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या कॅल्शीयमच्या गोळ्य़ांत आढळली तार\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nकाँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nरिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/gadkari-lays-foundation-stone-of-mumbai-international-cruise-terminal/videoshow/62479627.cms", "date_download": "2018-04-20T16:09:24Z", "digest": "sha1:I5Q4P4KEWKS7NRYN6KXDVLHFPN7O4753", "length": 6648, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गडकरींनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची पायाभरणी केली | gadkari lays foundation stone of mumbai international cruise terminal - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nगडकरींनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची पायाभरणी केलीJan 13, 2018, 04:31 AM IST\nट्रेनच्या टपावरून प्रवास करणाऱ्याला विजेचा धक्का\nमार्शल आर्ट्स टीचरचे महिलांसमोर अश्लिल चाळे\nमध्य प्रदेशः सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑफिसमध्ये डान्स\nयूपीत १० वीच्या मुलाने केला गर्लफ्रेंडच्या बापाचा खून\n महिलेला विद्युत खांबाला बांधून मारहाण\nअक्षय कुमार-अभिषेक बच्चनची जोडी जमणार\nउन्नावमधील बलात्कार पीडितेच्या वडिलांना मारहाण\nकंगनाने माझा चित्रपट नाकारला नव्हता: माजिदी\nगांधी कुटुंबीयांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, विखे पाटलांनी केली युट्युबविरोधात तक्रार\nओडिशाः आदिवासींच्या 'उडाण पर्वा' सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-goat-farming-konkan-90235", "date_download": "2018-04-20T16:56:18Z", "digest": "sha1:ICCCAZR2YF6LWDK2FIAJISOWA7JBPAPS", "length": 18938, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Goat farming in Konkan कोकणात सोलकर यांचा गच्चीवर शेळीपालनाचा किफायतशीर व्यवसाय | eSakal", "raw_content": "\nकोकणात सोलकर यांचा गच्चीवर शेळीपालनाचा किफायतशीर व्यवसाय\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nरत्नागिरी - कोकणात शेळीपालन मर्यादितच आहे. मात्र, स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणून यात यश मिळविता येते आणि त्यासाठी घराची गच्चीही पुरते हे उद्योजक आसिर सोलकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. कोकणनगरमध्ये गच्चीवरील बंदिस्त शेळीपालन यशस्वी ठरले आहे. आता त्याचा कित्ता उद्योग पाच ते सहा जणांनी गिरवला आहे.\nरत्नागिरी - कोकणात शेळीपालन मर्यादितच आहे. मात्र, स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणून यात यश मिळविता येते आणि त्यासाठी घराची गच्चीही पुरते हे उद्योजक आसिर सोलकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. कोकणनगरमध्ये गच्चीवरील बंदिस्त शेळीपालन यशस्वी ठरले आहे. आता त्याचा कित्ता उद्योग पाच ते सहा जणांनी गिरवला आहे.\nराजस्थान, उत्तर प्रदेश येथील व परदेशी जातीच्या संकरित शेळी, बोकडांची उत्तम देखभाल आणि कोणत्याही जातीच्या शेळ्यांचा संकर सोलकर यशस्वीपणे करतात. त्यासाठी त्यांना डॉ. आनंद लळित यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग झाला. श्री. सोलकर हे मेकॅनिकल ड्राफ्टसमन. मुंबईत दहा वर्षे नोकरी केली. परदेशांत नोकरीची संधी होती. त्याऐवजी ते शेळीपालनाकडे वळले. सुरवातीला त्यांनी शेळीपालनाचे धडे गिरवले.\nशेळीपालन हा उत्तम पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेतीचे उत्पन्न कमी होत असताना या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. गच्चीवरील बंदिस्त शेळीपालनातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कोकणनगरमधील शेळीपालकांना लागणारे मार्गदर्शन मी करतो. अशा प्रकारे मिरकरवाडा येथेही शेळीपालन चालू आहे.\n- डॉ. आनंद लळित\nअपुऱ्या जागेच्या अडचणीवर मात\nअपुऱ्या जागेत राहत्या घरी शेळीपालन करण्यातील अडचणीवर मार्गही नामी काढला. त्यांनी गच्चीवर लोखंडी जाळ्या व शेड बांधली. पाचशे चौरस फुटांच्या जागेत सुरवातीला दोन-चार शेळ्यांपासून सुरवात झाली. या प्राण्यांना वेळेवर पाणी, चार-पाच वेळा खाद्य, पाला, औषधे, लसीकरण, जंतांचे औषध सुरळीतपणे करू लागले. याकरिता कुटुंबीयांचे सहकार्य लाभले. ईदला कुर्बानीसाठी बोकडांना बरीच मागणी असल्याने सोलकर यांनी बोकडही आणले. एका वेळी गच्चीत ३५ व घराच्या आवारात ३५ असे ७० बोकड ते ठेवतात. यामध्ये कोटा, जमनापरी, बारबरी, सिओर बोअर, आफ्रिकन बोअर, सोजा, सिरोही अशा अनेक जातींचे बोकड आहेत.\nगच्चीवरील बंदिस्त शेळीपालन सोलकर एकटे करतात. यासाठीच मर्यादित जागेत ५० वा त्याहून अधिक शेळ्यांची देखभाल करता येईल, अशी रचना गच्चीवर केली. बोकडांना उभे राहण्यासाठी लाकडी रिफा, त्याखाली पत्र्यांची रचना व त्यात शेळ्यांचे मूत्र, लेंड्या पडतात. त्यावर पाणी टाकल्यावर ते गच्चीतून खाली झाडांमध्ये जमा होते. यातून झाडांना उत्तम दर्जाचे खतही होते. त्यांच्याप्रमाणे अन्य चार जणांनी कोकणनगरातच अशी रचना करून घेतली. शेळ्यांना पावसाचा त्रास होऊन आजारपण येऊ शकते. थंडीचाही थोडा त्रास जाणवतो परंतु, उष्णता मानवते. तशी व्यवस्था करावी लागते.\nरत्नागिरी-पावस मार्गावर कोळंबेनजीक सहा गुंठे जागेत नवीन प्रकल्प लवकरच सुरू करणार आहोत. कोणत्याही शेतकऱ्यांना शेळीपालनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत.\nअनेकदा शेळीपालन जमिनीवर केले जाते व शेळ्या चरताना झाडाचा शेंडासुद्धा खातात व झाड वाढत नाही. शेळ्या फिरत्या असल्या तर त्यांचे वजन वाढत नाहीत. त्यावर उपाय म्हणून बंदिस्त शेळीपालन उत्तम पर्याय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. बकऱ्यांचे वजन वाढते, संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो, बकऱ्या एकाच वेळेला माजावर आणता येतात. एकाच वेळी सर्व करड्यांचे संगोपन योग्य प्रकारे करता येते. पीपीआर तीन वर्षांतून एकदा, एचएस वर्षातून दोन वेळा, आंत्रविषार एसएमडी (पायलाग) यांचे लसीकरण करावे. गाभण शेळ्यांना विण्याच्या आधी १५ दिवस टीटीचे इंजेक्‍शन दिल्याने करड्यांना त्रास होत नाही. बोकडांचे वजन वाढण्यासाठी वेगवेगळी संप्रेरके द्यावी, दर तीन महिन्यांनी पोटातील जंतनाशके देण्यात यावी, असा सल्ला डॉ. लळित यांनी दिला.\nमी चार महिन्यांपासून गच्चीवरील शेळीपालन करतोय. सध्या माझ्याकडे कोटा, मालवा, जमनापरी या जातीचे बोकड आहेत. दिवसातून पाच वेळा खाद्य, पाणी, आठवड्यातून एकदा आंघोळ, गुळाचे पाणी नियमितपणे देतो. शेडसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु विक्रीतून हे पैसे नक्कीच वसूल होतील.\nपूरक व्यवसाय म्हणून ५ शेळ्या पाळून सुरवात करता येऊ शकते. पूर्ण व्यावसायिक दृष्टीने करायचे असल्यास २० बकऱ्या व २ बोकड हवेत. त्यांचा वर्षाचा खर्च सुमारे लाखभर रुपये करावा लागतो. मात्र त्याच्या चौपट पैसे मिळू शकतात. इतका हा व्यवसाय किफायतशीर ठरू शकतो. शेळ्यांपासून वर्षातून दोन वेळा प्रजोत्पादन, लेंडी मिळते. त्यातूनही उत्पन्न मिळते. जातीनुसार बोकडांची किंमत ठरते. ५० किलोच्या एका बोकडामागे गावरानला ५००० व कोटा जातीला १२ ते १५ हजार रुपये मिळतात.\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nजुन्नरला 95 दिव्यागांना मोफत साहित्य वाटप\nजुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी...\nभाजपमधील असुरक्षिततेमुळे अभिनेत्रीचा पक्षाला रामराम\nनवी दिल्ली: उन्नाव व कथुआमधील सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भारतीय जनता पक्षात सुरक्षित नाही, असे कारण देत अभिनेत्री...\n‘रामबाण औषध’ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. शंभर टक्के लागू पडेल असे औषध म्हणजे रामबाण औषध. औषध लागू पडणे ही पुढची अवस्था असते, त्यापूर्वी औषधाची रामबाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/success-story-of-kumaran-brothers/", "date_download": "2018-04-20T16:19:29Z", "digest": "sha1:5M4GOENAWEYIPD3WS53LRLDJPVYHJKUX", "length": 54639, "nlines": 244, "source_domain": "khaasre.com", "title": "भारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक…", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nभारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक… 0\nमाणसांमध्ये हिम्मत असेल तर कोणतेही काम करणे जगात कठीण नाही. आपल्या देशात अनेक असे प्रतिभावंत मुलं आहेत जे खूप कमी वयात यशाच्या शिखरावर पोहचून दुसऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत. या मुलांनी सिद्ध केले आहे की प्रतिभाला वयाचे बंधन नसते. आज आपण अशाच दोन भावांच्या यशाची माहिती बघणार आहोत ज्यांचे वय कमी असल्याने त्यांच्या नावावर रजिस्टर नाही झालीये. परंतु त्यांच्या कौशल्यासमोर मोठे मोठे उद्योगपती नतमस्तक होतात. चला तर खासरेवर आज जाणून घेउया या 2 उद्योजक भावांबद्दल.\nकोण आहेत हे दोन भाऊ\nखरंतर लहान भारतीय मुलांना आपण सुटाबुटमध्ये पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात एकच विचार येतो की ते मुलं आपल्या आई-वडिलांसोबत एखाद्या कार्यक्रमात जात असतील किंवा कुठे फिरायला. परंतु हे श्रवण कुमारन आणि संजय कुमारन साठी लागू नाही होत. दोघे भाऊ अवघ्या 12 आणि 10 व्या वर्षीच करोडो रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीचे सीईओ बनले आहेत. चेन्नईमध्ये जन्मलेले श्रवण जेव्हा आठवीच्या वर्गात होते तेव्हाच त्यांनी आपला भाऊ दंजय जो की फक्त 6सहाव्या वर्गात होता, त्याच्यासोबत मिळून बऱ्याच मोबाईल अँपची निर्मीती केली आहे. कुमारन बंधूंना लहानपणीपासुनच कॉम्प्युटर मध्ये खूप रस होता. घरात आणि शाळेत गेल्यानंतर सुद्धा हे दोघे भाऊ कॉम्पुटर लॅबमध्ये कॉम्पुटरला चिटकून असायचे. दोघा भावांना कॉम्प्युटरवर गेम खेळण्याची सुद्धा खूप आवड होती. परंतु इतर मुलांपेक्षा वेगळे असणाऱ्या कुमारन बंधूनी स्वतःचा एक गेम बनवण्याच्या प्लॅन केला. नंतर दोघांनी एक कंपनी त्यासाठी चालू करण्याचे ठरवले, पण त्यांचे वय यासाठी अडचणीचे ठरले. नंतर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावावर गो डायमेंशन नावाची कंपनी स्थापन केली. याच कंपनीच्या नावाने त्यांनी नंतर अँप बनवायला सुरुवात केली.\nश्रवण सांगतो की ‘आम्हाला खेळण्यापेक्षा गेम बनवण्यात जास्त आवड होती. गेम कसे बनतात यामध्ये त्यांना जास्त कुतूहल होते. आपल्या गेम्सच्या आवडीला जपत त्यांनी सुरुवातीला कॅच मी कोप्स नावाचा गेम बनवला. या गेममध्ये एक चोर जेलमधून पळून जातो. 2012 मध्ये प्लेय स्टोर आणि एपल स्टोर ला आल्यानंतर हप्ताभरात या गेम ला 2000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं. सुरुवातीच्या यशाने त्यांना अजुन ताकत दिली आणि त्यांनी नंतर कधीच मागे वळून नाही पाहिले.\nकुमारन भावांची यशाची कहाणी-\nतुम्ही ऐकून हैरान व्हाल की कुमारन भावांना पाहिले अँप लाँच करण्यासाठी जवळपास 125 अँपचे निरीक्षण करावे लागले होते. अँप बनवण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांच्यासमोर मुख्य अडचण होती ती म्हणजे कमी साधनं उपलब्ध असताना अँप कसे डेव्हलप करावे. त्यांना आपला पहिला प्रॉडक्ट लोकांसमोर आणण्यासाठी अनेक महिने लागले होते. आतापर्यंत त्यांनी गो डायमेंशनच्या नावाखाली 10 पेक्षा जास्त अँपची निर्मिती केली आहे, जे की आतापर्यंत जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहेत. आपल्या आईच्या मार्गदर्शनाने त्यांनी अल्फाबेट बोर्ड आणि कलर पैलेट नावाचे 2 शैक्षणिक अँप काढले आहेत. एवढेच माही तर त्यांनी या शैक्षणिक अँपची मार्केटिंग ही स्वतःच केली. त्यांनी विविध मार्केटिंग पर्यायापासून आपल्या अँप ला दूर ठेवले. त्यांना हे अँप अशा स्थितीत पोहचायचे आहे की तिथून त्यांचे अँप लोकांनी पैसे देऊन वापरले पाहिजे.\nकिती कमाई आहे दोन भावांची\nकुमारन भाऊ एखाद्या कंपनीला चालवणारे सर्वात कमी वयाचे डायरेक्टर आहेत. सध्या त्यांचे वय श्रवण 16 आणि संजय 14 वर्षे आहे आणि दोघे भाऊ फिक्की फ्रेम्स 2016 च्या संमेलनाचे सर्वात कमी वय असणारे पैनेलचे सदस्य सुद्धा बनले आहेत. कुमारन बंधूंचे मुख्य इन्कम सोर्स हे त्यांच्या ऍप्स मधील जाहिरातीतून होते. प्रत्येक क्लिक ने त्यांना 0.07 डॉलर ची कमाई होते. त्यांच्या सर्व अँपचा रेव्हेन्यू जोडला तर महिन्याला ते करोडो रुपये कमावतात. एवढेच नाही तर त्यांच्या कंपनीबरोबर चीन, यूएस, आणि भारतीय कंपन्यांनी करार सुद्धा केले आहेत. एवढ्या कमी वयात कमी असलेल्या संसाधनांशिवाय कुमारन भावांनी आपल्या दमावर हे यश मिळवले आहे. ते आता एक मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात.\nकुमारन भावांच्या या यशासाठी खासरेकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…\nमराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nPrevious Article१ रुपयाच्या नोटीविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी नक्की वाचा…Next Articleवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nतीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \n१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.\n२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.\n३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.\n४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.\n५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.\n६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.\n७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.\n८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.\n९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.\n१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.\n११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.\n१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.\n१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.\n१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.\n१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.\n१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.\n१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.\n१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.\n१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.\n२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.\n२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.\nअसा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/unseen-photos-of-first-prime-minister/", "date_download": "2018-04-20T16:26:43Z", "digest": "sha1:XTH4BDYSIHVORZFK3J47AUAYAZTEOEHR", "length": 65329, "nlines": 283, "source_domain": "khaasre.com", "title": "भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे तुम्ही कधीही न पाहिलेले 50 फोटो...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nभारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे तुम्ही कधीही न पाहिलेले 50 फोटो… 1\nपंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या सोबत ते एक सर्वोच्च नेते म्हणून पुढे आले होते.\nपंडित जवाहरलाल नेहरूंना भारतीय बच्चे कंपनी ‘चाचा नेहरू’ या नावाने ओळखत असे.\nपंडित जवाहरलाल नेहरुजींचा जन्म उत्तर प्रदेशातील इलाहाबाद या शहरात झाला होता.\nजवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मीर पंडित होते.त्यामुळे त्यांना ‘पंडित नेहरू’ या नावानेही ओळखले जात असे.\nपंडित नेहरुंना आधुनिक भारताचे एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष शिल्पकार मानले जाते.\nस्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणुन काँग्रेस पक्ष्याकडून निवड झाली होती.\n1950 साली भारताचे संविधान लागू झाल्यानंतर त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकिय सुधारणांना वाव देण्यासाठी अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या.\nनेहरुजींच्या नेतृत्वाखाली काँगेसने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर झालेल्या निवडणूकींमध्ये विजयी रथ चालू ठेवत 1951, 1957 आणि 1962 मध्ये सलग विजय मिळवला.\nत्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये राजकिय संघर्ष आणि 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन च्या युद्धात अयशस्वी होऊनही ते भारतीयांमध्ये कायम लोकप्रिय राहिले.\nभारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो.\nपंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला ब्रिटिश भारतातील इलाहाबाद मध्ये झाला होता.\nपंडितजींचे वडील मोतीलाल नेहरू, एक धनी बॅरिस्टर होते, जे काश्मीर पंडित समुदायातील होते.\nस्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस पंडीत नेहरू दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते.\nपंडित नेहरूंची आई स्वरूपरानी धुस्सु या लाहोरच्या एका प्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण परिवारातून होत्या. त्या मोतीलाल यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.पहिली पत्नी बाळंतपणात मरण पावली होती.\nजवाहरलाल नेहरू तीन भावंडामध्ये सर्वात मोठे होते. त्यांना 2 छोट्या बहिणी होत्या. एक बहीण विजयालक्ष्मी या पुढें संयुक्त राष्ट्र महासभा च्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. तर सर्वात छोटी बहीण कृष्णा हटिसिंग एक सुप्रसिद्ध लेखिका बनल्या.\nजवाहरलाल नेहरू यांनी जगभरातील अनेक सुप्रसिद्ध विश्वविद्यालय मध्ये शिक्षण घेतले होते. त्यांनी आले शालेय शिक्षण हैरो मध्ये तर कॉलेजचे शिक्षण ट्रिनिटी कॉलेज लंडन येथे पूर्ण केले होते. नंतर लॉ डिग्री त्यांनी केम्ब्रिज विश्वविद्यालयातून पूर्ण केली.\nपंडित नेहरूंनी गांधीजींच्या उपदेशाने आपल्या परिवारात पण अनेक बदल स्वीकारले होते. जवाहरलाल आणि मोतीलाल यांनी पाश्चिमात्य कपडे आणि संपत्तीचा त्याग केला होता. ते एक खादी कुर्ता आणि गांधी टोपी घालत असत.\nपंडित नेहरू लहानपणीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले होते. त्यांनी गावा-गावामध्ये फिरल्याने हिंदी भाषा बोलण्यास जमायची.\nसन 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भावी पंतप्रधान निवडण्यासाठी कॉंग्रेस मध्ये मतदान झाले होते. त्यामध्ये सरदार पटेल यांना सर्वाधिक मते मिळाली होती. त्यानंतर आचार्य कृपलानी यांना मते मिळाली होती. परंतू गांधीजींच्या म्हणण्यानुसार या दोघांनी आपले नाव वापस घेतले व जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान बनवण्यात आले.\nपंडित जवाहरलाल नेहरूनी जोसीप बरोज पिंटो आणि अब्दुल गमाल नासिर यांच्या सोबत मिळून आशिया आणि आफ्रिकेतील उपनिवेशिकता संपवण्यासाठी एक चळवळ सुरू केली.\nपंडितजींना पाकिस्तान आणि चीन सोबत मात्र संबध सुधारण्यात यश आले नाही. पाकिस्तान सोबत समझोता करण्यात काश्मीर चा प्रश्न आणि चीन सोबत मित्रता करण्यासाठी सीमावाद आडवा आला. नेहरूंनी चीन कडे मित्रतेचा हाथ पण दिला पण त्यांनी 1962 मध्ये धोका देऊन आक्रमण केले.\nचीन सोबत हार जवाहरलाल नेहरूंसाठी एक मोठा झटका होता. कदाचित हेच त्यांच्या मृत्यूचे कारणही बनले. 27 मे 1964 ला त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यु झाला.\nजवाहरलाल नेहरूंच्या नावाने एक युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, जी आपण JNU या नावाने ओळखतो.\nजवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे पहिले व्यक्ती होते.\nबोलले जाते की चंद्रशेखर आझाद यांनी रुस ला जाण्यासाठी पंडित नेहरूंकडून 1200 रुपये उधार मागितले होते.\nजवाहरलाल नेहरू यांनी 20 वर्षे सुभाषचंद्र बोस यांची जासुसी करायला लावली होती.\nजवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना अंधारात ठेवून काश्मिरसाठी कलम 370 बनवले होते.\nफेब्रुवारी 1950 रोजी पिलानी(राजस्थान) मध्ये पंडितजींच्या स्वागतासाठी भाज्या आणि गाजर-मुळ्यांच प्रवेशद्वार बनवण्याते आले होते.ज्यावर नाराज होत पंडितजींनी तो सर्व भाजीपाला गरिबांना वाटला.\nपंडितजींच्या अंतिम संस्काराला 15 लाख लोक सामील झाले होते.\nनेहरूंना गांधीजींचे राजकिय उत्तराधिकारी मानले जायचे.\nनेहरुंनी 1959 साली तिबेट मधून पळालेल्या दलाई लामा यांना भारतात शरण दिली.\nनेहरूंनी अमेरिका आणि रशिया पासून वेगळा रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले व गट निरपेक्ष देशांचे संघटन निर्माण केले.\nपंडित नेहरूंनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या शेतकरी मोर्चाचे आयोजन केले होते.\n1920-22 मध्ये असहयोग आंदोलनात त्यांना 2 वेळा जेलमध्ये सुद्धा जावे लागले.\n1929 मध्ये नेहरूंना भारतीय राष्ट्रीय संमेलन लाहोर सत्राचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.\nनेहरुजींना 1930-35 च्या दरम्यान सत्याग्रह आंदोलन व काँग्रेसच्या अन्य आंदोलनामुळे जेलमध्ये जावे लागले.\n1935 मध्ये जेलमधून सुटल्यानंतर नेहरुजी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंड ला गेले. नंतर 1936 मध्ये त्यांनी लंडन चा दौरा केला.\nसेवादलाच्या सदस्यांच्या रूपात खाकी पोशाखात पंडित नेहरू.\n1890 च्या दशकामधील नेहरूंच्यापरिवाराचा फोटो.\nजनतेला संबोधित करताना पंडित जवाहरलाल नेहरू.\nसैनिकांसोबत हस्तांदोलन करताना पंडित जवाहरलाल नेहरू.\nएकदा कार्यक्रमात सत्कार स्वीकारल्यानंतर नेहरूजी आणि त्यांची मुलगी इंदिरा गांधी.\nसरदार पटेल व पंडित जवाहरलाल नेहरू..\nहैदराबाद येथील एका मंदिरास भेट दिल्यानंतर पंडित नेहरू आणि त्यांची बहिण.\nनिजोजन आयोगाच्या मिटिंग दरम्यान नेहरूजी\nप्रचंड जन्सामुदायला संबोधित करताना पंडित नेहरू.\nपंडित नेहरू आपल्या पत्नीसोबत\nमहात्मा गांधीजीसोबत एका आंदोलनादरम्यान पंडित नेहरू.\nमहात्मा गांधीजी आणि पंडित नेहरू.\nफोटो आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nजाणून घ्या गांधीजींबद्दल आपणास माहिती नसलेल्या काही अज्ञात गोष्टी\nवाचा: भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nPrevious Articleलय भारी कोल्हापूरचा लय भारी कलाकार…Next Articleरस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल..\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-highway-development-90098", "date_download": "2018-04-20T16:55:36Z", "digest": "sha1:7GDF25UDS5ZNFUURKKEBV363HNUWE4J2", "length": 20204, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news highway development चौपदरीकरणामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार | eSakal", "raw_content": "\nचौपदरीकरणामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nजळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांसाठी पूरक असे वातावरण तयार होईल. माल वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.\nजळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांसाठी पूरक असे वातावरण तयार होईल. माल वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.\nफागणे ते तरसोद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पारोळ्यापासून सुरवात झाली आहे. तरसोद ते चिखली काम सुरू करण्यासाठी कॅम्पची उभारणी सुरू आहे. चौपदरीकरणामुळे उद्योगांना आवश्‍यक असणारी दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयी आहेत. मात्र महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या आहे. महामार्गाच्या चौपदीकरणाने ती दूर होऊन कमी वेळेत अधिक अंतर पार करणे शक्‍य होणार आहे.\nचौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले. दुसरीकडे कामांना सुरवात झाली. त्यामुळे चौपदरीकरणात ज्या जागा मोक्‍याची ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी अनेकांनी जागा घेऊन त्यावर विविध प्रकारच्या हॉटेल्स, बिअरबार, रिसॉर्ट, लान्स, फ्लॅटसाठी जागा घेण्यास सुरवात केली आहे.\nत्यातून भविष्यात अनेक जणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. अनेक भाग असे आहे जिथे केवळ रस्ते नसल्याने त्या भागाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. तो आता चौपदरीकरणामुळे होण्यास मदत होणार आहे.\nचौपदरीकरणामुळे जिल्ह्यात अनेक भागातील एमआयडीसीमध्ये मुंबई, पुणे, परराज्यातील उद्योग येथे येण्यास मदत होणार आहे. मोठे उद्योग आल्याने त्यांना कच्चा माल पुरविणारे उद्योगही निर्माण होतील. यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळतील. उद्योगांची संख्या वाढल्याने खानदेशातील बेरोजगारांचा प्रश्‍न सुटेल. कुशल मनुष्यबळामुळे व्यापारात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.\nपर्यटन क्षेत्रास चांगले दिवस\nजिल्ह्यात मुक्ताईनगरला श्रीक्षेत्र मुक्‍ताई, चांगदेव, पाल (ता. रावेर) येथील थंड हवेचे ठिकाण, अजिंठा लेणी, यावलचे श्री व्यास मंदिर, मनुदेवी, पद्मालय येथील गणपती मंदिर, अमळनेरचे मंगळग्रह मंदिर, गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले उनपदेव, चाळीसगाव येथील पाटणादेवी मंदिर आदी ठिकाणे पर्यटनासाठी उपलब्ध आहेत. चाळीसगावला आता नव्यानेच भास्कराचार्यांची गणित नगरी, के.के.मूस कला दालन साकारण्यात येत आहे. मात्र वाहतूक योग्य चांगले रस्ते नसल्याने इतर जिल्ह्यासह परदेशी पर्यटक हव्या त्या संख्येने पर्यटनासाठी येथे येत नाहीत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे पर्यटन क्षेत्रावर अधिक पर्यटक येतील, परिणामतः पर्यटनाचे हब म्हणून जिल्ह्याचा विकास होईल.\nजळगाव जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे बदल घडून पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरातील शिक्षणाचा दर्जा येथेही देण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाल्याने सामाजिक परिस्थितीही बदलेल. समाजमन मेट्रोसिटीतील नागरिकांप्रमाणे तयार होऊन सामाजिक बदल होण्यास मदत होणार आहे.\nमहामार्गावरून होणारी वाहतूक, त्यातून होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता दररोज कोठेना कोठे अपघात होतोच. यामुळे महामार्गाला समांतर रस्त्यांची गरजच आहे. महामार्गालगतच्या परिसरात विविध ठिकाणी महाविद्यालये, वसतिगृह, कॉलन्या, उपनगरे वसली आहेत.\nविद्यार्थ्यांपासून, नोकरदार, व्यापारीसह सर्वांनाच शहरात येण्यासाठी महामार्ग हा एकच पर्याय आहे. समांतर रस्ते झाल्यास या परिसरातील नागरिक समांतर रस्त्यावर वाहतूक करतील. परिणामी महामार्गावरील वाहतूक कमी होऊन अपघातांची संख्या घटेल.\nसमांतर रस्ते, उड्डाणपुलासाठी ‘मनपा’ देणार जागा - महापौर\nशहरातून गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर रस्ते व उड्डाणपुलासाठी जागा कमी पडल्यास जागा उपलब्ध करून देण्याची हमी महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे समांतर रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र महापौर ललित कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दिले आहे.\nशहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते नाहीत. त्यामुळे दररोज महामार्गावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे समांतर रस्त्यांचे काम तत्काळ करणे गरेजेचे आहे. तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजननिमित्त केंद्रीय मंत्री गडकरी जळगावात आले असता त्यांनी मुख्य चौकात उड्डाणपुलाला देखील मान्यता दिली होती.\nत्यामुळे समांतर रस्ते व उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध आहे. तरी जागेचा अडसर दूर करून जागा उपलब्ध करून देण्याची हमी जळगाव महापालिका घेत असल्याचे पत्र यापूर्वी दिले आहे. समांतर रस्ते व उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी देखील महापौर ललित कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री गडकरींना पत्राद्वारे केली आहे.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/enquiry-of-andhshraddha-nirmulan-samiti-267711.html", "date_download": "2018-04-20T16:18:04Z", "digest": "sha1:LQ6PMELYYPBGRWVEDALDGXCNL5SGNLG7", "length": 12164, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंनिसचं लेखापरीक्षण करा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nअंनिसचं लेखापरीक्षण करा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त\nअंधश्रद्धा निमृलन समितीविरोधात हिंदू जनजागरण समितीनं दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा यांनी न्यासाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.\n20 आॅगस्ट : अंधश्रद्धा निमृलन समितीविरोधात हिंदू जनजागरण समितीनं दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा यांनी न्यासाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.\nन्यासात अनियमितता असून त्याची चौकशी करण्यात यावी असा अर्ज हिंदू जनजागरण समितीनं धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. नरेंद्र दाभोलकर हे हयात असताना त्यांनी या चौकशीला आपण तयार आहोत असं म्हटले होतं तर आत्ताचे विश्वस्त चौकशीला तयार नाहीयत. त्या काळातच दाभोलकरांचा खून झाला आणि हा मुद्दा पुणे पोलीस आणि सीबीआयनं आपल्या चौकशी दरम्यान लक्षात घेतला नाही असा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे.\nकाय आहे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे निष्कर्ष \n१) न्यासानं स्वयंघोषित अंशदानातून सूट घेतलेली असल्याचं आणि अंशदानाची रक्कम भरली नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे\n२) सावंतवाडी इथल्या २३ हजारांची स्थावर मिळकत खरेदी केली पण त्यानंतरच्या हिशोबपत्रांमध्ये सदरची मिळकत नमूद नाही\n३) ग प्र प्रधान यांच्या न्यासाच्या अंनिसमध्ये झालेल्या विलिनीकरणाचा मुद्दा\n४) विनामूल्य वितरणाकरता छापलेल्या पुस्तकांचं मूल्य का निश्चित करण्यात आलं हे स्पष्ट होत नाही\n५) न्यासाच्या राज्यभर शाखा असताना सर्व शाखांची माहिती संकलित करुन एकत्रितपणे हिशोबपत्रे दाखल करणे अनिवार्य असताना ते तसं करण्यात आल्याचं आढळून आलं नाहीये\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/mumbais-life-threatening-99-victims-in-different-accidents-dead-278450.html", "date_download": "2018-04-20T16:17:47Z", "digest": "sha1:EUHZX3PDRIPF6I5LJRWW6NNHBQY6VDYU", "length": 14514, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिवाची मुंबई की जीवघेणी मुंबई ?, गेल्या सहा महिन्यात 99 निष्पाप बळी", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nजिवाची मुंबई की जीवघेणी मुंबई , गेल्या सहा महिन्यात 99 निष्पाप बळी\n. मुंबईकरांना त्यांच्या आयुष्याच्या एका क्षणाचीही खात्री देता येत नाही अशी भीषण अवस्था आहे. घरातून निघालेला मुंबईकर रात्री घरी परतेल की नाही याचीही खात्री देता येत नाही.\n29 डिसेंबर : मुंबई म्हणजे झगमगाट असा लोकांचा समज आहे. पण गेल्या काही दिवसांतल्या दुर्घटना पाहता मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का असा प्रश्न पडतोय.\nमुंबईकराचं आयुष्य मजेदार असल्याचा अख्ख्या जगाचा समज आहे. मुंबईत राहणं म्हणजे जिवाची मुंबई करण्यासारखं...पण हा निव्वळ गैरसमज आहे. मुंबईकरांना त्यांच्या आयुष्याच्या एका क्षणाचीही खात्री देता येत नाही अशी भीषण अवस्था आहे. घरातून निघालेला मुंबईकर रात्री घरी परतेल की नाही याचीही खात्री देता येत नाही. किंवा कामाच्या ठिकाणीही तो सुरक्षित आहे याचीही खात्री देता येत नाही. घरातही त्याला जिवाची खात्री देता येत नाही.\nकमला मिलमधील हॉटेल मोजोजमध्येही काही मुंबईकर गुरूवारी रात्री जेवण्यासाठी आले होते. पण इथलं जेवणं त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं जेवण ठरलं. कमला मिल अग्निकांडात 14 निष्पापांचा बळी गेला.\n18 डिसेंबरच्या पहाटेही अंधेरीतल्या साकिनाक्याजवळच्या भानू फरसाण मार्टला लागलेल्या आगीत 12 कामगारांचा बळी गेला. हे कामगार रात्री थकून भागून झोपी गेले होते. कुणाच्या तरी चुकीमुळं या निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.\n29 सप्टेंबरला कामावर निघालेल्या मुंबईकरांसाठीही हा दिवस नेहमीसारखा नव्हता. पाऊस आल्यानं एलफिन्स्टन स्टेशनच्या रेल्वेपुलावर गर्दीचा लोंढा थांबला होता. काहीच क्षणात चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल 23 मुंबईकरांचा बळी गेला. मुंबईकर जसे घराबाहेर सुरक्षित नाहीत तसे ते घरातही सुरक्षित नाहीत.\n31 ऑगस्टला भेंडी बाजारातली हुसैनी इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. या इमारत दुर्घटनेत तब्बल 33 जणांनी जीव गमावला. साखर झोपेत असलेल्या हुसैनी इमारतीतल्या लोकांना बाहेरही पडता आलं नाही.\n25 जुलैचा दिवसही घाटकोपरच्या सिद्धीसाई इमारतीच्या रहिवाशांसाठी काळ बनून आला होता. इमारतीच्या तळमजल्यावर सुरु असलेल्या रिनोव्हेशनवेळी केलेल्या चुकीच्या कामामुळे अख्खी इमारत भुईसपाट झाली. यात तब्बल 17 निष्पापांचा बळी गेला. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 99 मुंबईकरांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनांमधल्या बळींची संख्या पाहिली तर मुंबईकरांचा जिवाची किंमत राहिली आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतो.\n28 डिसेंबर 2017 -कमला मिल अग्नितांडव\n18 डिसेंबर 2017 -भानू फरसाण मार्ट, साकिनाका\n29 सप्टेंबर 2017 - एलफिन्स्टन रेल्वे पूल चेंगराचेंगरी\n31 ऑगस्ट 2017 -हुसैनी इमारत दुर्घटना, भेंडीबाजार\n25 जुलै 2017 -सिद्धी साई इमारत दुर्घटना, घाटकोपर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: -सिद्धी साई इमारत दुर्घटनाelphinstone stampedekamla mill compoundkamla mills firemumbaiएलफिन्स्टनकमला मिलमुंबईरेल्वे पूल चेंगराचेंगरीहुसैनी इमारत दुर्घटना\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-politics-killing-soldiers-terror-attacks-insult-says-mulayam-singh-yadav", "date_download": "2018-04-20T16:48:21Z", "digest": "sha1:PGORYZG6UJUROGTGCPLVGLMCQPOKRL2M", "length": 11123, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national politics Killing of soldiers in terror attacks an insult says Mulayam Singh Yadav जवानांची हत्या हा त्यांचा अपमान : मुलायमसिंह | eSakal", "raw_content": "\nजवानांची हत्या हा त्यांचा अपमान : मुलायमसिंह\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nपाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, अशी मला माहिती मिळत आहे. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.\nनवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी शहीद जवानांबाबत बुधवारी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''दहशतवादी हल्ल्यात जवानांची हत्या हा त्यांचा अपमान आहे, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी त्यांना मुक्तता दिली पाहिजे''.\nलोकसभेत त्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपले जवान जगात सगळ्यात उत्तम आहेत. मात्र, पाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, असे मला वाटते. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे.\nदरम्यान, लष्करात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार नेपालसिंह यांनी केले होते.\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nओढा खोलीकरणाचा रोटरी क्लबचा उपक्रम स्तुत्य - खा. सुळे\nभिगवण - मदनवाडी येथील ओढा खोलीकरणाच्या माध्यमातून गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे व गाव दुष्काळमुक्त होण्यास निश्चित...\nमतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे\nभिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या...\n'सध्या तरी माझी डायरी फुल्ल...' : अभिनेता राजकुमार राव\nएकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिल्यामुळे निर्मात्यांचा तुझ्यावरील विश्‍वास वाढलाय. एक ठराविक बजेट घेऊन निर्माते तुला साईन करत आहेत. तुला याबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:31:34Z", "digest": "sha1:5LJFTOQFX32FNZQZGPFOPPPFXMYDBQSQ", "length": 4855, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वँकेल इंजिन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे वँकेल या जर्मन शास्त्रज्ञाने तयार केले इंजिन आहे. यामध्ये इंजिनाचे चार ठोके{स्ट्रोक) आतील भागाच्या रचनेमुळे अतिशय कमी घर्षणात पुर्ण होतात. इंजिनाकडून मिळणारी ताकद(पॉवर) ही सलग असते.\nम्युनिक येथील दॉचे संग्रहालयातील वॅकेल चे इंजिन\nThe माझदा आर एक्स ८, ही वॅकेल इंजिन वापरून बनवलेली गाडी\nडायमंड DA20 वँकेल इंजिनासहीत\nचे इंजिन कसे चालते\nवॅकेल चे इंजिन कसे चालते\nइंजिनाने सलग ताकद का व कशी द्यावी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/debris-of-crashed-plane-found-in-mountains-near-jagros/", "date_download": "2018-04-20T16:36:02Z", "digest": "sha1:L5TBW2WFQYMAI6F4USLXFSRWKAMIHIOL", "length": 16022, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "इराणमधील अपघातग्रस्त विमानाचे अवेशष सापडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nइराणमधील अपघातग्रस्त विमानाचे अवेशष सापडले\nअसेमन एअरलाईन्सच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. रविवारी या विमानाचा अपघात होऊन ६६ जण ठार झाल्याचं वृत्त आलं होतं. मात्र, हे विमान जाग्रोस पर्वतराजींमध्ये कोसळल्यामुळे त्याचे अवशेष शोधणं जिकीरीचं होतं. पण, अखेर त्या विमानाचे अवशेष सापडले आहेत.\nएका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जाग्रोस पर्वतराजींमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत होते. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर अवशेषांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी विमानाचे अवशेष आणि प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.\nइराणच्या असेमन एअरलाइन्सचे एटीआर ७२ डबल इंजिन टर्बीप्रॉप जातीचं हे विमान होतं. विमानाने तेहरान विमानतळाहून उड्डाण घेतले आणि ते इराणमधील ७८० किमी अंतरावरील इराणमधील यासूज नामक शहराकडे जाण्यासाठी निघाले होते. मध्य इराणच्या सेमिरोम शहराजवळच्या डेंगराळ प्रांतावरून ते जात असताना दहाव्या मिनिटाला त्याचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. विमानतळवरील रडारवर विमान दिसेनासं झालं होतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउत्तर महाराष्ट्र, संभाजीनगरमध्ये पुन्हा गारपिटीचा इशारा\nपुढीलनितीश कुमारांनी माझ्या बंगल्यात भूत सोडले, लालूंच्या चिरंजीवांचा हास्यापद दावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ruhina-from-muslim-272561.html", "date_download": "2018-04-20T16:21:02Z", "digest": "sha1:M4SFHPDVZ7ACSKSWXGABRV6Q75GFTMBH", "length": 11756, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समाजाच्या सीमा झुगारून रुहिना बनली अन्न आणि पुरवठा निरीक्षक", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nसमाजाच्या सीमा झुगारून रुहिना बनली अन्न आणि पुरवठा निरीक्षक\nरुहिनाने आपल्या घरालाच अभ्यासकेंद्र बनवलं. सर्व मुले मुली तिथे चर्चात्मक अभ्यास करू लागली आणि यशाला गवसणी घातली.\nकुंदन जाधव, अकोला, 23 आॅक्टोबर : समाजाच्या सीमा झुगारून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावातील रुहिना अली आज अन्न आणि पुरवठा विभागात पुरवठा निरिक्षक बनलीय. जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाच्या टप्पा गाठणं कठीण नसतं हे रुहिनाने सिद्ध केलंय.\nलडकियोंको पढके क्या करना है, घरही तो संभालना है, हा मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा जुना शिरस्ता. मात्र समाजाच्या सीमा झुगारून रुहिना अली खान हिने यशाचं शिखर गाठलंय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावातील इंदिरा नगर झोपडपट्टीतले नासिर अली गोपाल टॉकीजजवळ छोटीशी हातगाडी चालवतात. घरात 2 मुली 1 मुलगा. घर चालवण्यासाठी संघर्ष पाचवीला पुजलेला. पण त्यावर मात करत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि आज रुहिना अली अन्न आणि पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक बनलीय.\nअत्यंत कठीण परिस्थिती असूनही रुहिनाने आपलं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. तिच्या संघर्षाला खरी साथ मिळाली ती तिच्या शिक्षकांची ग्रंथालयातील मित्रांची. रुहिनाने आपल्या घरालाच अभ्यासकेंद्र बनवलं. सर्व मुले मुली तिथे चर्चात्मक अभ्यास करू लागली आणि यशाला गवसणी घातली.\nतुलनेनं अधिक सामाजिक दबावाखाली वावरणाऱ्या मुस्लीम मुलीही संधी मिळाल्यास जिद्दीच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकतात, हेच रुहिनानं दाखवून दिलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/rising-pune-supergiant-beat-mumbai-indians-by-seven-wicket-257746.html", "date_download": "2018-04-20T16:21:55Z", "digest": "sha1:AIU2DSMTLR5XYDM3GLOQVR56A6XD6OSH", "length": 10980, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पुणे' 'मुंबई'वर भारी, दिली विजयी सलामी", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n'पुणे' 'मुंबई'वर भारी, दिली विजयी सलामी\nअटीतटीच्या लढतीत पुणे सुपरजायंटने मुंबईला 7 विकेटसने हरवत विजयी सलामी दिली\n06 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या हंगामात पहिल्याच लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट मुंबई इंडियन्सवर भारी ठरलीये. अटीतटीच्या लढतीत पुणे सुपरजायंटने मुंबईला 7 विकेटसने हरवत विजयी सलामी दिलीये.\nमुंबई इंडियन्सने पहिले बॅटिंग करत 184 रन्सचा टप्पा गाठला. विजयासाठी पुणे सुपरजायंटपुढे 185 रन्सचं टार्गेट ठेवलं. अखेरच्या ओव्हरर्समध्ये हार्दिक पांड्याने सिक्सर लगावत मॅचचा चेहराच बदला. पांड्याने 15 बाॅलमध्ये चार सिक्स आणि एक चौकार लगावला. मुंबईकडून सर्वाधिक सर्वाधिक जोस बटलरने 38 रन्स केले तर नितीश राणा 34 आणि पोलार्डने 27 रन्स केले.\n185 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंटला 5.3 ओव्हरमध्ये मयंक अग्रवालच्या रुपाने झटका बसला. 6 रन्सवर मयंक आऊट झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि स्टीवन स्मिथने स्कोअर कार्ड हलता ठेवला. रहाणे 34 बाॅलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकार लगावत 60 रन्स केले. रहाणे आऊट झाल्यानंतर बेन स्टोक्स 21 रन्स आणि धोनीने नाबाद 12 रन्स कर टीमला अखेरच्या ओव्हरसमध्ये विजय मिळवून दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\nबीसीसीआयला आरटीआय अंतर्गत आणा, विधी आयोगाचा केंद्राकडे अहवाल\nIPL 2018 : अखेर मुंबई इंडियन्सचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/tiger-tanaji-jadhav/", "date_download": "2018-04-20T16:03:57Z", "digest": "sha1:23TQE7ONZKNGOPHMGF3YQURP5XJY5XFE", "length": 60974, "nlines": 253, "source_domain": "khaasre.com", "title": "अबब ! वाढदिवसाला ८०,००० लोक एवढा मित्रपरिवार असणारा फक्त टायगरच...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n एवढा मित्रपरिवार असणारा फक्त टायगरच… 1\nत्याला टायगरच्या नावाने सर्व ओळखतात व्यक्तिमत्वहि तसेच वाघाप्रमाणे फक्त व्यक्तिमत्वच नाही तर काम हि तो तसेच समाजपयोगी करतो. ह्याच गोष्टीतून त्याला समाधान मिळते. काल अचानक वाचता वाचता एक पोस्ट बघितली कि तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करण्याकरिता संपूर्ण भारतातून ८०,००० लोक करमाळ्यात आले. मी तर थक्कच झालो कि कोण असेल हा व्यक्ती ज्याचा वाढदिवस साजरा करायला एवढे लोक आणि घेतला शोध तानाजीरावचा आज खासरे वर बघूया तानाजी जाधव यांचे कार्य\nपैलवान तानाजी जाधव करमाळा येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला युवक ते सांगतात कि वडील गाढवावर माती वाहायचे काम करत होते. परंतु लहानपणापासून तालमीत जायचा त्यांना भारी नाद आणि यामुळेच अनेक मित्र जुळत गेले. त्यांचे पूर्वज हि तसेच पैलवान होते त्यामुळे मल्लविद्या हि रक्तातच होती. शिक्षणात काही बस जमला नाही ८ वी नापास, १० वी नापास, १२वी नापास हे सगळ अनेक वेळा होत होत. परंतु शाळेत परत दाखला टाकायचा कारण काय तर नवीन मित्र मिळतात.\nनाहीका भन्नाट म्हणजे मित्र जमविन्याकरिता परत परत शाळेत दाखला टाकणे. परंतु जमवलेले मित्र टिकवणे फार कमी लोकांना जमते त्यामधील एक तानाजी जाधव जेवढे मित्र जमवले ते आजही टिकून आहेत. त्यांचा मोठा भाऊ जालिंदर जाधव याने असाच मित्र परिवार स्थापन केला नाव “टायगर ग्रुप” ग्रुपचा उद्देश छोट्यात छोट्या अडचणीपासून तर मोठ्यात मोठ्या कठीण प्रसंगात मित्रांना मदत करणे.\nत्याच ग्रुपचे काम आज तानाजी भाऊ बघतात. २००८ ला हा ग्रुप स्थापन झाला ४ वर्ष तालुक्यात अनेक मित्र जुळाली काहीतरी मोठ करायचं आणि मित्र जमविण्याची आवड तानाजी सांगतात कि पुण्याला नेहमी जाने येणे असायचे. तर जाता जाता कुठल्या तरी गावात थांबायचं नवीन लोक सोबत संपर्क करायचा आणि जुळवायचे मित्र अनेक आणि महत्वाच म्हणजे त्यांच्या सुखा दुखात सामील होणे. आज पुणे करमाळा रस्त्यावर कुठलीही दुर्घटना घडली तर टायगर ग्रुप तिथे पहिले पोहचतो.\nकधी कुस्तीत कोणावर अन्याय झाला तर तानाजी भाऊ पुढे, नौकरीला तर जवळपास त्यांनी १००० ते १५०० मुले वेगवेगळ्या कंपनीत लावलेली आहे. निव्वळ नौकरीला नाही तर या मित्र परिवारातून अनेक मल्ल, बॉक्सर, नेमबाज खेळाडू तयार झाले आहे. आज टायगर ग्रुप महाराष्ट्रा बाहेर सुध्दा आपले पाय रोवत आहे. कर्नाटक राजस्थान युपी एमपी पंजाब येथील अनेक युवक या मंडळात सामील झाले आहे.\nयेवढा मोठा जनाधार युवक पाठीमागे साहजिकच प्रश्न पडणार राजकारण \nतर आमच्या सोबत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले कि , माझे अनेक मित्र नगरसेवक सरपंच झाले असा कुठलाच पक्ष नाही कि त्यांनी मला बोलावले नाही आणि मोठे पदही देऊ केले परंतु मला राजकारणात रस नाही करायची ती समाजसेवा आणि जमवायचे ते मित्र हीच आपली संपत्ती आहे. तानाजीचे मित्र अनिकेत घुले यांच्या लग्नात तानाजीनि चक्क हेलिकॉप्टरने एंट्री केली.\nमित्र असावा तर असा जिगरबाज आला लग्नाला कसा तर हेलिकॉप्टरने आणि त्या अगोदर २००० गाड्या फक्त स्वागताकरिता हे सर्व लोक भाड्याचे नसून जीवाला जीव देणारे आणि तानाजीच्या एका हाकेवर धावत येणारे मित्र आहेत.\nयाची प्रचीती आली २ नोव्हेंबरला तानाजी भाऊचा वाढदिवस मग चर्चा तर होणारच परंतु एवढी प्रचंड तब्बल ८०,००० लोक करमाळा तालुक्यात जमले यामध्ये संपूर्ण भारतातून लोक आले फक्त वाढदिवस साजरा करायला. तानाजी भाऊ ला कीती आल गिप्ट १३५ तलवारी त्यातील अनेक तलवारी चांदीच्या, शेकडो मोबाईल एका मोबाईल ची कीमंत १५ हजारा पासुन दीड लाखा पर्यत आणि मित्रा कडून एक SUV गाडी भेट, सोने तर विचारू नका.\nसंपुर्ण महाराष्ट्रात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर तसेच पंजाब,कर्नाटक,दिल्ली येथे ही वाढदिवसाचे डिजिटल पोस्टर अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, अंधेरी येथे युवकांना फ्री जिम, शिर्डीला मोफत ट्रॅक सूट वाटप याला म्हणतात वाढदिवस भूतो न भविष्या होणारा.\nखरी संपत्ती हे मित्र आहे हे पैलवान तानाजी भाऊ जाधव यांनी सिद्ध केले आहे. मित्राच्या सहकार्याने माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो हे त्यांना बघून चांगल्या राजकारण्यांना देखील हेवा वाटेल.\nना कोणाचा हात, ना पूर्वजांची संपत्ती, ना शेतीवाडी फक्त स्वतःच्या कष्टाच्या जोरावर जमवलेलं हे सर्व त्यांना खासरे तर्फे सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..\nखासरे तर्फे टायगर ग्रुपला शुभेच्छा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nजाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nPrevious Articleमराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…Next Articleपांढरी दाढी आणि केस झटक्यात काळे करण्यासाठी काही रामबाण उपाय…\nPingback: पैलवान तानाजी जाधव टायगर ग्रुप यांचा विडीओ जीवनपट बघा खासरेवर..\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/09/marathi-kavita_04.html", "date_download": "2018-04-20T16:19:23Z", "digest": "sha1:GQ6XAMHQPAIY7M6TG3YFDPT73255CBI6", "length": 18731, "nlines": 181, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: { Marathi kavita } अंतर्मनाची अपार ताकद", "raw_content": "\n{ Marathi kavita } अंतर्मनाची अपार ताकद\nअंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांतीही घेत नाही. झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूर्वी त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार पूर्ण बरे होऊ शकतात...\nमहत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंतर्मन जी एखादी कल्पना स्वीकारते, तीच अमलात आणते. अंतर्मनाचा हा नियम आहे. त्यास चांगलं आणि वाईट सर्वच सारखं असतं. त्यामुळे या नियमाचा नकारात्मक वापर केला तर तुमचं जीवन अपयश, नैराश्य, दु:ख यानंच भरून जाईल. तुम्हास चांगला, विधायक विचार करण्याची सवय असेल तर तुमचं आरोग्य चांगल राहील, यश हाती येईल, भरभराट होईल.\nमात्र, प्रत्यक्षात बाह्यमन व अंतर्मन अशी दोन मन नाहीत. केवळ एकाच मनाची ती दोन रूपं आहेत. तुमचं बाह्यमन हे केवळ कारण जाणतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तिचा स्वीकार करते. तुम्ही पुस्तकाची निवड करता. घर पसंत करता, जीवन साथीदाराची निवड करता, हे सर्व कार्य बाह्यमनाच्या साह्यानं आपण करतो. सर्व निर्णय आपण बाह्यमनाच्या मदतीनं घेत असतो.\nपरंतु, हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, अन्नपचन, रक्ताभिसरण अशी शरीरातील अनेक महत्त्वाची कायेर् तुमच्या मजीर्वर अवलंबून नसतात. त्यासाठी तुमच्या मनानं निर्णय घ्यायची गरज नसते. ही सर्व कायेर् अंतर्मनाने होतात. तुमच्या अंतर्मनावर जे बिंबवलं जातं, किंवा तुमचं बाह्यमन ज्याच्यावर विश्वास ठेवतंं, त्या सर्वांचा स्वीकार अंतर्मन करतं. ते कसलंही वाद घालत नाही.\nतुमचं अंतर्मन हे जमिनीचे मशागत केलेल्या वाफ्यासारखं असतं. त्याच्यात जे बियाणं पेरलं जातं, मग ते चांगलं असो की वाईट, त्याचा स्वीकार करतं. तुमचे विचार बियाणासारखेच असतात. नकारात्मक, विध्वंसक विचार तुमच्या अंतर्मनात नकारात्मक कार्य करीत असतात. ते बाह्यअनुभवांच्या जोडीनं लगेच किंवा योग्य वेळी प्रतिक्रियांच्या रूपानं बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ तुमच्या बाह्यमनानं, ठरवलं की, एखादी गोष्ट खरी आहे, प्रत्यक्षात ती खोटी असेल, तरीही तुमचं अंतर्मन ती गोष्ट खरीच असल्याचं समजेल आणि त्या दृष्टीनं कार्य करीत राहील.\nमानसोपचारतज्ज्ञ आणि इतर अनेकांनी यासंबंधी प्रयोग केले आहेत. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून हीच एक बाब स्पष्ट झाली आहे. अंतर्मन कधीही निवड करण्याच्या किंवा तुलना करण्याच्या फंदात पडत नाही. बाह्यमनानं केलेली सूचना, मग ती खोटी असली तरी, अंतर्मन त्याचा स्वीकार करतं.\nसंमोहन विद्येद्वारेही हे प्रयोग करण्यात आले आहेत. एखाद्यास संमोहित करून त्यास सांगण्यात आलं की, तू नेपोलियन बोनापार्ट आहे, किंवा मांजर आहे, किंवा कुत्रा आहे. तर संमोहित व्यक्तीच्या अंतर्मनावर ते लगेच बिंबतं, ही व्यक्ती मग तीस सांगितल्याप्रमाणं वागायला लागते. अशा व्यक्तीचं संमोहित झालेलं बाह्यमन, त्यास मिळणारे आदेश अंतर्मनाकडे पाठविते आणि अंतर्मन कसलाही विचार न करता, त्या सूचना, आदेश खरे मानून तशी कृती करायला लागतं.\nबाह्यमनास वस्तुनिष्ठ मन, असंही म्हटलं जातं. कारण ते वास्तवाचं भान राखून, निर्णय घेतं. त्यासाठी शरीरातील पाच ज्ञानेदियांचं साह्य घेण्यात येतं. त्यांच्या साह्यानं बाह्यमन भोवतालच्या परिस्थितीचं निरीक्षण करतं व नंतर निर्णय घेतं. परंतु, जेव्हा बाह्यमन काही कारणास्तव निर्णय घेण्याचं थांबवतं, त्यावेळी अंतर्मन सक्रिय होतं व स्वत: निर्णय घेऊ लागतं. झोपताना किंवा ग्लानी आली असेल, अशावेळी अंतर्मन काम करू लागतं. त्यासाठी त्याला ज्ञानेदियांची गरज भासत नाही. इतरत्र घडणारी घटनाही ते बघू शकतं किंवा ऐकू शकतं. ते तुमच्या शरीरातून बाहेर पडून, दूरवर जाऊन माहितीही गोळा करून आणतं.\nअंतर्मन झोपत नाही किंवा विश्रांतीही घेत नाही. त्यामुळे तुम्ही झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूवीर् त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अद्भुत आणि अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार बरे होऊ शकतात, असं सिद्ध झालं आहे. प्राचीन काळी मंदिरातील अनेक धर्मगुरू आजारी माणसाला औषध देऊन त्यास लगेच झोपायला सांगत. झोपेत देव येऊन तुम्हास बरं करील, असं ते त्याला सांगत. तसं सांगण्यामागचं खरं कारण अंतर्मनाची अपार ताकद हेच होतं\nअनुवाद : जॉन कोलासो\nFw: { Marathi kavita } भैया हलेना भैया चालेना\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } चित्रलेखा\" (५ सप्टेंबर २०११...\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\n{ Marathi kavita } कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi_Katha] कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } प्रियेचे पहिले चुंबन\n{ Marathi kavita } भैया हलेना भैया चालेना\n{ Marathi kavita } संसाराची हि जुगलबंदी\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90501", "date_download": "2018-04-20T16:59:17Z", "digest": "sha1:TQZ46NRJETDDKU73O3VLKYYREGJA74VB", "length": 11782, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news Dattatray Mhaskar death उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांचे डोंबिवलीत निधन | eSakal", "raw_content": "\nउद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांचे डोंबिवलीत निधन\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nठाणे - राज्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय म्हैसकर (वय ७८) यांचे बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुधा, वीरेंद्र व जयेंद्र ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.\nठाणे - राज्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय म्हैसकर (वय ७८) यांचे बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुधा, वीरेंद्र व जयेंद्र ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.\nम्हैसकर यांनी सर्वप्रथम कल्याण-शीळमार्गाची दुरुस्ती केली. त्यानंतर त्यांनी आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) ही कंपनी स्थापन करून ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर बांधण्यात आलेला ‘मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे’ या पहिल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठराविक काळात पूर्ण केले. या यशानंतर बीओटी तत्त्वावरील राष्ट्रीय महामार्गांची अनेक कामे त्यांना मिळाली. या कामांमुळे म्हैसकर यांनी उद्योग जगतात नवीन ओळख निर्माण केली. या कामांसाठी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष सहकार्य केले होते. डोंबिवलीतील डोंबिवली जिमखान्याचे ते संस्थापक सदस्य होते. या जिमखान्याचे नाव उंचावण्यात म्हैसकर यांचा मोठा वाटा होता.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nआचारसंहितेमुळे बेळगाव परिवहन मंडळाला अच्छे दिन\nबेळगाव - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यापासुन कर न भरता आणि परिवहन मंडळाच्या नियमाचे उल्लंघन करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे...\nमतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे\nभिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/toilet-ek-prem-katha-first-day-collection-267116.html", "date_download": "2018-04-20T16:25:50Z", "digest": "sha1:NCD2OQ3UIHXNV6GJTVF54JCCLSEACQOR", "length": 9550, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई\n'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केलीये.\n12 आॅगस्ट : खिलाडी अक्षय कुमारचा सामाजिक विषयावर आधारित 'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केलीये.\nसिनेमाने पहिल्याच दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमावलाय. अलीकडेच रिलीज झालेल्या शाहरुख आणि सलमान खानच्या सिनेमाच्या तुलनेत अक्षयने पहिल्याच दिवशी चांगलीच कमाई केलीये.\nया सिनेमासाठी प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आता हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-protest-over-abrupt-closure-of-tur-dal-259060.html", "date_download": "2018-04-20T16:23:50Z", "digest": "sha1:7DAGLM4DKIGCNF2LTB4HKEG4OVVBTGKH", "length": 11527, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पणन अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला?", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nपणन अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला\n25 एप्रिल : नाफेडनं आतापर्यंत खरेदी केलेली निम्यापेक्षाही जास्त तूर ही व्यापाऱ्यांची असल्याचं आता उघड होतंय. सहकार विभागाचे अधिकारी, नाफेड तसच पणन अधिकारी आणि व्यापारी यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला मारल्याचा आरोप खुद्द शेतकरी करतायत.\nनाफेडनं कधी बारदाण्याच्या नावाखाली तर तांत्रिक कारणं देत तुर खरेदी थांबवली. पैशासाठी अवघडलेल्या शेतकऱ्यांना मग व्यापाऱ्यांशिवाय पर्याय राहीला नाही. व्यापाऱ्यांनी 3 ते साडे तीन हजार रूपये क्विंटलनं शेतकऱ्यांची तूर घेतली आणि तीच तूर नाफेडला पाच हजार रूपये एवढ्या हमी भावानं विकली. त्यामुळेच शेतकऱ्यांची जवळपास 10 लाख टन तूर अजूनही पडून आहे. आताही व्यापारी शेतकऱ्यांच्या तुरीवर डोळा ठेवून असल्याचं दिसतंय.\n22 तारखेपर्यंत आलेली तूर खरेदी करणार असल्याच्या निर्णयाने केंद्राकडून घेण्यात आल्यानं नाफेड केंद्रावरील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आता लवकरात लवकर तूर खरेदी करून शेतकऱ्यांना मोकळं करावं अशी मागनी नाफेड केंद्रावर महिन्याभरापासून ताटकळत असलेले शेतकरी करत आहेत.\nदरम्यान, आज कॅबिनेटमध्ये तुरीचा मुद्दा येण्याची शक्यता आहे. त्याच्यापुर्वी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाष देशमुख यांचीही बैठक होणार आहे. तुरबंदीच्या पर्यायावर विचार केला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/plane-of-airforce-crashed-271450.html", "date_download": "2018-04-20T16:33:08Z", "digest": "sha1:DFPP6NA7ETOVVGOA754WLWODWRIIHNM6", "length": 10805, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nभारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू\nआज सकाळी साडेसहा वाजता हे विमान तवांग भागावरून उडत होतो. या विमानातून सात लोकं प्रवास करत असल्याची माहिती मिळते आहे. त्यातील 5 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे\nतवांग, 06 ऑक्टोबर: भारतीय वायुसेनेचं विमान आज सकाळी अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात कोसळलं आहे. या विमान दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nआज सकाळी साडेसहा वाजता हे विमान तवांग भागावरून उडत होतो. या विमानातून सात लोकं प्रवास करत असल्याची माहिती मिळते आहे. त्यातील 5 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. एयर फोर्सचं एम आय 17 व्ही 15 हे विमान आज मेन्टेनन्स मिशनवर होतं. तवांग भाग हा खडतर पर्वतरांगाचा आणि बर्फवृष्टीचा प्रदेश आहे. यामुळे कधी कधी अंदाज येत नाही. त्यामुळे हे विमानं कोसळलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या घटनेची माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे.\nएम आय 17 व्ही 15 हे विमान मिल्ट्री ट्रान्स्पोर्टसाठी एक सर्वोत्तम विमान ओळखलं जातं.या प्रकारची एकूण तीन विमान भारताला रशियाने दिली होती. यातील उरलेली दोन चांगलं काम करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/shinzo-abe-wins-elections-272520.html", "date_download": "2018-04-20T16:36:20Z", "digest": "sha1:XGMH5FE37STOEDURLA5GNVOSNYOIUIVM", "length": 11056, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जपानच्या निवडणुकीत शिंजो अॅबेंचा दणदणीत विजय", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nजपानच्या निवडणुकीत शिंजो अॅबेंचा दणदणीत विजय\n४६५ जागांपैकी अॅबेंच्या युतीला तब्बल ३१२ जागा मिळाल्या आहेत\nटोकियो, 23 ऑक्टोबर: जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झालाय. ४६५ जागांपैकी अॅबेंच्या युतीला तब्बल ३१२ जागा मिळाल्या आहेत.\nया निवडणुकीत अॅबेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. डिसेंबर २०१२ पासून अॅबे पंतप्रधानपदी विराजमान आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि उत्तर कोरियाला अद्दल घडवणे या दोन मुद्द्यांवर ते पुन्हा निवडून आले आहेत. यावर्षी अॅबेंच्या विरूद्ध युरिको कोईके आपला नवा पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.त्यांना सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे ही निवडणुक अॅबेंसाठी प्रतिष्ठेची झाली होती. पण कोईकेला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत. आणि अॅबेंनी आपले पंतप्रधानपद कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.\nआता या विजयामुळे पूर्व आशियातलं राजकारण आणखी तापणार की काय, अशी भीती जगात निर्माण झालीय.अॅबे आणि आपल्या पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे परराष्ट्र धोरणांमध्येही सातत्य राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\nमुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम\n महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला\nसमुद्राच्या पाण्यात बंगला, भाडं फक्त 33 लाख\nआता फक्त नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची प्रतिक्षा \nसर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकलाच फोन करून माहिती दिली होती -पंतप्रधान\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:43:21Z", "digest": "sha1:K372VR7232ZE5UVHQ7NBIZDNMAA73HQJ", "length": 3293, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कंबोडियातील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"कंबोडियातील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/tiger-jinda-hai/", "date_download": "2018-04-20T16:15:53Z", "digest": "sha1:A2HDBIVM5APJMGVYENMJDN5SIOIVQU4V", "length": 4118, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "tiger jinda hai – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसलमान खान व शिल्पा शेट्टीवर वर ऍट्रिसिटीचा गुन्हा – काय आहे प्रकरण\nसलमान खान व कतरीना कैफ चा टायगर जिंदा है चित्रपट आता शुक्रवारी रिलीज झाला आहे . चित्रपटाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी सलमान खान व शिल्पा शेट्टी हिने केलेल्या वादग्रस्त कमेंट मुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाजच रोष सहन करावा लागतोय. चित्रपटाच्या प्रोमोशनच्या दरम्यान सलमान ने ही वादग्रस्त टिप्पणी वाल्किमी समाजाबद्दल केली होती. त्यामुळे… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:45:54Z", "digest": "sha1:6XFOJUXC2IQWOFBZQXA75KLPCWHMCH6F", "length": 4496, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिवंशराय बच्‍चन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहरिवंशराय बच्‍चन (२७ नोव्हेंबर, इ.स. १९०७P, प्रतापगढ जिल्हा – १८ जानेवारी, इ.स. २००३) हे एक प्रसिद्ध हिन्दी कवी होते. ते प्रसिद्ध हिन्दी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडिल होते. यांचे जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे बाबूपट्टी हा गावात झाला होता.[१]\nशिक्षण: प्रयाग विद्यालयातून M. A. आणि Cambridge विद्यालयातून Ph. D. त्यांनी अमिताभ यांना मन का होतो अच्छा मन का ना होतो जादा अछ्छा हे सांगितले.\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १९०७ मधील जन्म\nइ.स. २००३ मधील मृत्यू\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१८ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rss-reaction-on-statues-destruction/", "date_download": "2018-04-20T16:41:03Z", "digest": "sha1:UF2F5UMGVWBHOV4HWQPNVDIUPHYW62CH", "length": 17968, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुतळ्यांच्या विटबंनेचा संघाकडून निषेध | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nपुतळ्यांच्या विटबंनेचा संघाकडून निषेध\nत्रिपुरा राज्यात लेनिनचा पुतळा तोडल्यानंतर कोलकाता व चैन्नईमध्ये झालेल्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली.\nरा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेची बैठक गुरुवारपासून नागपुरातील रेशिमबागेत सुरू झाली. या बैठकीची पत्रकारांना माहिती देताना वैद्य म्हणाले, ‘त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यानंतर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने तोडला. यानंतर उत्तरप्रदेश, कोलकाता व चेन्नई येथेही काही नेत्यांचे पुतळे तोडण्याच्या घटना घडल्या. या प्रकारे पुतळे तोडणे योग्य नाही. या कृत्यांचे रा. स्व. संघाने कधीही समर्थन केलेले नाही.’ या घटना निंदनीय असल्याचे सांगत मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात रा. स्व. संघाची भूमिका स्पष्ट केली.\nरा. स्व. संघाची अ. भा. प्रतिनिधीसाठी संघ परिवारातील ३५ संघटनांचे दीड हजार प्रतिनिधी नागपुरात येणार आहेत. दर तीन वर्षांनी ही बैठक नागपुरात होते. यात गेल्या तीन वर्षात विविध संघटनांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येतो तसेच पुढील तीन वर्षात करावयाच्या कामाची आखणी केली जाते.\nअमित शहा उपस्थित राहणार\nया बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारी सकाळी सहभागी राहणार आहेत. यासाठी ते शुक्रवारी सकाळी नागपुरात येत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अमित शहा नागपुरात येऊन गेले आहेत. याशिवाय भाजपतर्फे सरचिटणीस राममाधव व रामलाल बैठकीत सहभागी होणार आहेत.\nतीन दिवस चालणाऱ्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत. या बैठकीत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना बदलणार जाणार असल्याची चर्चा आहे. जोशी यांनी प्रकृती चांगली राहत नसल्याने त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या संदर्भात शुक्रवारी चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगून वैद्य यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध\nपुढील‘सावित्रीच्या लेकीं’च्या हाती लोकलचे सारथ्य\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/women-voted-for-alcohol-ban-in-nashik-273613.html", "date_download": "2018-04-20T16:35:52Z", "digest": "sha1:KPX2LY3G437RWYSS7FRSRIQCIXJ5TJSG", "length": 11703, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंदपुरीत दारूबंदीसाठी निवडणूक; 1111 महिलांचा दारूबंदीला कौल", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nचंदपुरीत दारूबंदीसाठी निवडणूक; 1111 महिलांचा दारूबंदीला कौल\nया गावात तब्बल १६ दारूची दुकाने होती. त्यामुळे गावातील तरुण वर्ग दारूच्या आहारी जात होता. हे पाहून महिलांनी याबाबत आवाज उठवला आणि बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवशी सकाळ पासून मतदान केंद्रावर महिलांनी गर्दी केली\nनाशिक, 04 नोव्हेंबर: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदपुरी गावात दारूबंदी करण्यासाठी निवडणुकीत घेण्यात आली. महिलांनी उत्स्फुर्तपणे या निवडणुकीत सहभाग घेऊन झालेल्या १२३७ पैकी ११११ महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान करून बाटली आडवी केली.\nसुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेलले चंदपुरी गाव खंडोबाच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. एका प्रकारे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या या गावात तब्बल १६ दारूची दुकाने होती. त्यामुळे गावातील तरुण वर्ग दारूच्या आहारी जात होता. हे पाहून महिलांनी याबाबत आवाज उठवला आणि बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवशी सकाळ पासून मतदान केंद्रावर महिलांनी गर्दी केली.\nसायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला त्यात दारूबंदीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मद्य सम्राटाशी दोन हात करणाऱ्या नारीशाक्तीचा विजय झाल्याने या गावातील १६ दारू दुकाने कायमस्वरूपी बंद झाली आहेत.\nनिवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बाटली आडवी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच महिलांनी एकच जल्लोष केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_:_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_(%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97)", "date_download": "2018-04-20T16:37:12Z", "digest": "sha1:YTXU325GJS4L6NQYNSNK4P73FQ3F62LS", "length": 6661, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) - विकिबुक्स", "raw_content": "श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग)\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित श्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग) ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T16:42:53Z", "digest": "sha1:TMYRTSDRO3DFNYDRE4AXEFAEGXF2HQGN", "length": 5746, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५७० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे\nवर्षे: १५६७ - १५६८ - १५६९ - १५७० - १५७१ - १५७२ - १५७३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ९ - इव्हान द टेरिबलने नोव्होगोरोदची कत्तल सुरू केली.\nलखुजी जाधव, मराठा वतनदार.\nइ.स.च्या १५७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=201803&paged=3", "date_download": "2018-04-20T16:44:09Z", "digest": "sha1:DLU4VQHKSUKJYP3L3IG7VYAEJ7LA7TCD", "length": 17992, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 3", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nजव्हार: केंगोडी येथे महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न\nComments Off on जव्हार: केंगोडी येथे महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न\nप्रतिनिधी जव्हार २७ : तालुक्यातील सूर्यानगर केंगोडी येथे आज उमेद अभियान अंतर्गत तयार केलेल्या यमुना महिला ग्रामसंघ तील व स्वयंसहाय्यता गटातील महिलानसाठी हिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद पालघर च्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, सारसून गावाच्या सरपंच सुशीला घाटाळ , उपसरपंच प्राजक्ता ओळबा , सारसून च्या ग्रामसेविका , उमेद अभियान ...\tRead More »\nराष्ट्रीय प्रकल्पांसाठी पालघर जिल्ह्यात १ हजार ३३० हेक्टर जमीनीचे संपादन\nComments Off on राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पालघर जिल्ह्यात १ हजार ३३० हेक्टर जमीनीचे संपादन\nप्रतिनिधी बोईसर, दि. २७ : पालघर जिल्ह्यामधून जाणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये रेल्वे चौपदरीकरण, राष्ट्रीय द्रुतगती मार्ग आणि बुलेट ट्रेन ह्या राष्ट्रीय प्रकल्पांचे काम सुरु झाले असून याकामी १ हजार ३३० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. ही जमीन सन २०१३ चा नवीन भूसंपादन कायदा आणि १२ मे २०१५ च्या शासन निर्णयाच्या आधारे खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने होणार ...\tRead More »\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nComments Off on अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत. वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ...\tRead More »\nकोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी\nComments Off on कोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी\nप्रतिनिधी वाडा दि. २७ सद्दस्थितीत तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना कुडूस येथील कोकाकोला या शीतपेय बनविणाऱ्या कंपनी कडून होत असलेल्या पाणी उपश्याने येथील सर्व जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कोकाकोला कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी श्रमजीवीच्या वतीने करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाड्याचे तहसीलदार यांनायांना या सॅन दर्भात निवेदन दिले आहे. दर वर्षी वाडा तालुक्यातील आठ टंचाईग्रस्त गावांना ...\tRead More »\nसुधाकर राऊत यांना मातृशोक\nComments Off on सुधाकर राऊत यांना मातृशोक\nडहाणू दि. २७: येथील श्री साईनाथ सांस्कृतिक मंडळाचे (नरपड) अध्यक्ष सुधाकर भिकाजी राऊत यांच्या मातोश्री सौ. भिमावती यांचे काल (२६ मार्च) सकाळी वाढवण (डहाणू) येथील रहात्या घरी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती भिकाजी, पुत्र बळवंत, प्रभाकर, सुधाकर, सुभाष, भालचंद्र, सुना व नातवंडे असा परिवार आहे. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ...\tRead More »\nडहाणूच्या मुक बधिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश\nComments Off on डहाणूच्या मुक बधिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश\nडहाणू दि. २७: येथील मुक बधिर बाल विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. २३ ते २५ मार्च दरम्यान गोंदीया येथे संपन्न झालेल्या दिव्यांगांसाठीच्या राज्य स्तरीय स्पर्धेत निकिता सुर्वे या विद्यार्थीनीने लांब उडी मध्ये रौप्य पदक, तर मनोज वांगड व विजय सुतार या विद्यार्थ्यांनी पोहण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून २५०० ...\tRead More »\nमस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी\nComments Off on मस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी\nप्रतिनिधी मनोर, दि २५: मुंबई – अहमदाबाद महामार्गालगतच्या मस्तं नाक्यावर असलेल्या आशिष मोबाईल स्टोर नामक मोबाईल स्टोर नामक मोबाईलच्या दुकानात चोरटयांनी चोरी करत पाऊणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवार दि. २४ पहाटे हि घटना घडली असून चोरीचा हा प्रकार सी सी. टी. वी. मध्ये कैद झाली आहे. पहाटे दिड वाजेच्या सुमारास चोरटयांनी मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंगमधील आशिष मोबाईल ...\tRead More »\nवाडा मनोर महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू\nComments Off on वाडा मनोर महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू\nप्रतिनिधी वाडा, दि २५: वाडा – मनोर महामार्गावरील केलीच पाडा हद्दीत शनिवारी रात्री द्ध वाजेच्या सुमारास घडलेल्या एका अपघातात एकजण जागीच ठार तर दुसऱ्याला उपचारासाठी नेट असताना वाटेतच त्याचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे दोन आठवड्यापूर्वी याच ठिकाणी झालेल्या अन्य एका अपघातात विक्रांत चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला होता चनेमन येथे राहावयास असलेले अक्षय गणेश गवा (वय २१) ...\tRead More »\nकाराच्या धडकेत पोलीस जखमी\nComments Off on काराच्या धडकेत पोलीस जखमी\nप्रतिनिधी वाडा, दि २५: वळण घेत असताना समोरून येणाऱ्या कराचा अंदाज न आल्याने घडलेल्या कर व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलवरील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भारती असे सादर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शरद भरती हे रविवारी दुपारच्या सुमारास वाडा कोर्टाच्या समोरून वळण घेत असताना समोरून येणाऱ्या कराची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर पोलीस कर्मचारी शरद खडे व रुग्णमित्र ...\tRead More »\nमुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.\nComments Off on मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.\nप्रतिनिधी कुडूस दि. २५ मुंबईस्थित मुक्तांगण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडूस विभागाती ल अंगणवाडी सेविकांना कला व कौशल्य या विषयी प्रशिक्षण दिले. अंगणवाडी सेविकांनी या वेळी प्रत्यक्ष धडे गिरवल्याने ज्ञान पक्के झाल्याची प्रतिक्रिया लर्निंगस्पेसचे आशिष बिजावर्गी यांनी दिली. मुक्तांगण संस्थेच्या वतीने अंगणवाड्या व प्राथमिक शाळातील भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याची पूर्व माहिती गणेशपुरी येथील लर्निंगस्पेस या संस्थेकडून पुरविली जाते. त्यानुसार आपल्या फंडातून मुक्तांगण ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:26:43Z", "digest": "sha1:H3OMUYQNXYQEQ3LCPFVLJUCPD7GWUW4W", "length": 8303, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन्‌ मंत्रालयाच्या दारात भाजीपाला… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअन्‌ मंत्रालयाच्या दारात भाजीपाला…\nशेतकऱ्यांकडून संताप व्यक्‍त : पोलिसांची उडाली धावपळ\nमुंबई – कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव नाही, त्यातच शेतात जो शेतीमाल पिकला आहे तो विकण्याला मुंबईतही मज्जाव केला जात आहे. त्यामुळे संतापलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी आज धडक देत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला ओतून संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या भाजीफेक आंदोलनामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली.\nमंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वारासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एक भाजीपाल्याचा टेम्पो उभा राहिला. गेटवरील पोलिसांना कळायच्या आत या टेम्पोतील शेतकऱ्यांनी लसूण, हिरवी मिरची, कांदा, मुळा अशी भाजी थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओतून सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली. हा थरार सुमारे 15 मिनिटे सुरू असताना पोलिसांचाही नाइलाज झाला.\nशेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा वारंवार केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. एकीकडे सरकार बाजारभाव मिळत नाही, तर दुसरीकडे शेतातला माल थेट मुंबईत विकायला जागा मिळत नाही, याच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी गावाहून आणलेला शेतीमाल मंत्रालयाच्या दारात फेकून निषेध नोंदवला.\nयावेळी त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच तातडीने मंत्रालय प्रवेशद्वारापुढे स्वच्छताही करण्यात आली. यावेळी पोलीसांनी सात-आठ शेतकऱ्यांना ताब्यात घेत त्यांना मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : जिल्ह्यात आज रॅली, मिरवणुकांचे आयोजन\nNext articleउन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराच्या अटकेचे हायकोर्टाचे आदेश\nफायरब्रॅंड हिंदुत्ववादी नेते तोगडियांचे उपोषण सुरू\nमनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा\nनोटा कोणाच्या घशात घातल्या\nकेंब्रिज ऍनेलिटिकाची होती कॉग्रेसला कॅंपेन ऑफर…\nदेशाच्या अनेक भागात रोकड टंचाई…\nपाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हस्तकास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/entertainment/women-should-not-be-ashamed-anything-vidya-balan/amp/", "date_download": "2018-04-20T16:19:14Z", "digest": "sha1:UQUGGSXX6M5FTSWRC73F77RAKS3HUJRX", "length": 2515, "nlines": 37, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Women should not be ashamed of anything - Vidya Balan | महिलांनी कसलीही लाज बाळगू नये - विद्या बालन | Lokmat.com", "raw_content": "\nमहिलांनी कसलीही लाज बाळगू नये - विद्या बालन\n'तैमूरपासून सांभाळून राहा'; करीना कपूरने दिला अक्षय कुमारला सल्ला\nइरफान खानचे हे 7 यादगार सिनेमे तुम्ही पाहिलेत का\nती 'चांदनी' बनून आली, चमकली अन् 'सदमा' देत रडवून गेली... श्रीदेवींना भावपूर्ण श्रद्धांजली\nसोशल मीडियात ‘कहर’ करणा-या या 4 व्हायरल वंडर्सचं पुढे काय झालं\nMakar Sankranti 2018 : अभिनेत्री मयुरी वाघ सजली हलव्याच्या दागिन्यांनी\nमालवणच्या समुद्र किनारपट्टीवर ‘तारली’चा बंपर धमाका काय ते पाहा हा वीडियो\nऐका अनिल दीक्षित यांचं GST वरचं विडंबन\nसिद्धार्थ मल्होत्रा : मोस्ट स्टायलिश अॅक्टर\nआलिया भट : मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार\nसुशांत सिंग राजपूत : मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/best-sends-to-notice-to-madhavi-juvekar-on-nagin-dance-273939.html", "date_download": "2018-04-20T16:28:00Z", "digest": "sha1:OFHDQERARLM2YI2COVNXUQDKKVZIISEF", "length": 12510, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' भोवणार, बेस्ट प्रशासनाकडून नोटीस", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nमाधवी जुवेकरला 'नागीण डान्स' भोवणार, बेस्ट प्रशासनाकडून नोटीस\nबेस्ट कर्मचारी आणि कॉमेडी अभिनेत्री माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' चांगलाच महागात पडलाय, बेस्ट प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्यात. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आलीय.\nमुंबई, 09 नोव्हेंबर : बेस्ट कर्मचारी आणि कॉमेडी अभिनेत्री माधवी जुवेकरला 'नागीण डान्स' चांगलाच महागात पडलाय, बेस्ट प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्यात. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आलीय. बेस्ट विभागीय अधिकाऱ्याकडून ही नोटीस पाठवण्यात आलंय, या नोटीसीला या कर्मचाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.\nअभिनेत्री माधवी जुवेकर हिचा नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात माधवी ही एका महिलेसोबत 'नागीण डान्स' करताना दिसतेय. 'बेस्ट'च्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. कॉमेडी एक्सप्रेस आणि अनेक नाटकांमध्ये काम केलेली माधवी ही बेस्टची कर्मचारी देखील आहे.\n'बेस्ट'च्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दसऱ्याच्या दिवशी माधवीच्या नागीण डान्सवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी नोटा उधळल्या होत्या. या कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय. एकीकडे पगार वेळेत मिळत नाही अशी तक्रार बेस्ट कर्मचाऱ्यांकडून केली जात असताना नेमका नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या उधळपट्टीवर समाजाच्या सर्वच थरातून तीव्र टीका झाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: madhavi juvekarनागीण डान्सबेस्ट प्रशासनमाधवी जुवेकर\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:31:48Z", "digest": "sha1:JD7IYLMIXNCQUWFMHZKLLZIQAQSSBB7J", "length": 3875, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेड रिजवे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nफ्रेडरिक रिजवे (ऑगस्ट १०, इ.स. १९२३:स्टॉकपोर्ट, चेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून भारताच्या १९५१/५२च्या दौर्‍यावर पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९२३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=201803&paged=4", "date_download": "2018-04-20T16:44:18Z", "digest": "sha1:GJ5MEZ7LSZT3IE4MODHJPLSTQTOMYXCK", "length": 19458, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 4", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nडहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nComments Off on डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nमुंबई विद्यापीठाच्या अधिसभे साठी १० नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक आज 25 मार्च रोजी घेण्यात आली. डहाणूतील नोंदणीकृत 162 पदवीधर मतदारांसाठी एस. आर. करंदीकर महाविद्यालयात निवडणूक केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यन्त निवडणुकीची वेळ होती. संध्याकाळी ५ वाजे पर्यंत 51% मतदान झाल्याची माहिती मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. Share on: WhatsApp\tRead More »\nचिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न\nComments Off on चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न\nडहाणू दि २५: विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी शिक्षण देता यावे याकरिता, विद्यार्थ्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांना शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंगच्या तंत्रज्ञानाचा परिचय करुन देण्यासाठी चिंचणी येथील श्रॉफ महाविद्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात करण्यात आले. भूषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांच्या नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेने चिंचणी तारापूर एज्युकेशन ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील ...\tRead More »\nजव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी\nComments Off on जव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी\nजव्हार नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधील पारस हॉटेलच्या बाजूला आणि प्रकल्प कार्यालयाच्या पाठीमागच्या गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सोय नव्हती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर रस्ता नसल्याने कोणतेही वाहन जात नव्हते. तसेच येथील नागरिकांना एखादे साहित्य किंवा समान आणायचे झाल्यास हे सामान मुख्य रस्त्यावर उत्तारून डोक्यावर मजुरांकरवी वाहून आणावे लागत असे. तसेच आपली स्व:ताची खाजगी ...\tRead More »\nशेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका\nComments Off on शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका\nविशेष प्रतिनिधी पालघर, दि. २५ : केंद्र सरकार बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प कोणासाठी राबवतेय. त्या बुलेट ट्रेनमध्ये नेमके बसणार आहे कोण असा सवाल करत पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कथित स्वप्न दाखवणारे हे प्रकल्प एकाच जिल्ह्यातून का नेले जात आहेत. येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून कथित विकास करू पाहणार असतील तर त्याविरोधात आपण संघर्ष करू असा ...\tRead More »\nअमृता फडणवीस यांचा जव्हार दौरा अस्मिता योजना कार्यशाळेला दिली भेट\nComments Off on अमृता फडणवीस यांचा जव्हार दौरा अस्मिता योजना कार्यशाळेला दिली भेट\nजव्हार – जव्हार येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस काल, गुरुवारी जव्हार तालुक्यातील विविध ठिकाणाचे दौरे करून ग्रामीण भागाचा आढावा घेऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर, मिलींद बोरीकर, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी, पवनीत कौर, हॅप्पी नारी संस्थेचे संस्थापक जितेंद्र निकम, तसेच राजेंद्र पाठक, बेला दास उपस्थीत होते. ...\tRead More »\nशहापुर महामार्गावर भीषण अपघात मोखाड्यातील 3 महिलांचा मृत्यू\nComments Off on शहापुर महामार्गावर भीषण अपघात मोखाड्यातील 3 महिलांचा मृत्यू\nदीपक गायकवाड : मोखाडा, दि. 25 : बस्त्याच्या कार्यक्रमासाठी मोखाड्याहून उल्हासनगरला निघालेल्या चारचाकी वाहनाला लक्झरी बसची धडक बसुन झालेल्या भिषण अपघातात तिन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह अन्य 6 प्रवासी जखमी झाले असुन मृतांमध्ये महिला सरपंचाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) मोखाड्याहून एम.एच. 04/जी.जे. 9264 क्रमांकाच्या बोलेरो जीपमधुन 9 जण बस्त्याच्या कार्यक्रमासाठी भिवंडी-शहापूर महामार्गाने उल्हासनगर येथे निघाले होते. ...\tRead More »\nकर्जमाफी न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत\nComments Off on कर्जमाफी न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : तांत्रिक अडचणी, बाहेरगावी, दुःखद घटना अपघात किंवा अन्य कारणामुळे पात्र असूनही अन्य शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज ऑन लाईन पद्धतीने सादर करता आले नाहीत, अश्या शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्वतः पोर्टलवर ऑन लाईन अर्ज करावेत, ...\tRead More »\nजिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना एन. डी. ए. एल. प्रणालीवर माहिती नोंदविण्यास मुदतवाढ\nComments Off on जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना एन. डी. ए. एल. प्रणालीवर माहिती नोंदविण्यास मुदतवाढ\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : शस्त्र परवानाधारकांची माहिती इलेक्टॉनिक स्वरूपात केंद्रशासनाच्या डेटा बेस फॉर आर्म्स लायसन्स (एन. डी. इ. एल.) या संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी केंद्र शासनाने ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत दिली होती. यादरम्यान पालघर जिल्यातील एकूण १,४७० शस्त्र परवाना धारकांपैकी १०८० शस्त्र परवाना धारकांची माहिती भरण्यात आली असून ३५१ शस्त्र परवानाधारकांची माहिती अद्यापही भरण्यात ...\tRead More »\n२८ मार्च रोजी पालघर येथे ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबीर\nComments Off on २८ मार्च रोजी पालघर येथे ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबीर\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : मुंबईतील भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या वतीने ग्राहकनासाठी २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मार्गदर्शन शिबीर, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना दूध व अन्न पदार्थामध्ये असलेल्या भेसळ, वजन मापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणूकदार कसे बनावे, दूरसंचार सेवा, बांधकाम व्यवसायिकांविरुद्धच्या तक्रारी आदींबाबत ...\tRead More »\nदिव्यांग मतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन\nComments Off on दिव्यांग मतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाच्या सिस्टमॅटिक व्हॉटस एज्युकेशन अँड इलेक्ट्रोलर पार्टीसिपेशन (एसव्हीईईपी) कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हे चर्चासत्र पार पडणार आहे. या चर्चासत्राकरिता दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/14-year-old-innocent-boy-fell-terrace-and-died/", "date_download": "2018-04-20T16:22:46Z", "digest": "sha1:PP4V56PPKCXIC2HN7R5NBARQ6IXEK3J2", "length": 24963, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The 14-Year-Old Innocent Boy Fell On The Terrace And Died | 14 वर्षीय भोळसर मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\n14 वर्षीय भोळसर मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू\n14 वर्षीय भोळसर मुलाचा राहत्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयुरपार्क येथील मारोतीनगर मध्ये घडली .\nठळक मुद्देसकाळी शैलेशने आई वडिलांसोबत दुस-या मजल्यावर बसून चहा घेतला. आवाज ऐकून आई- वडील दोघेही गॅलरीत आले असता शुभम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला.\nऔरंगाबाद : 14 वर्षीय भोळसर मुलाचा राहत्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयुरपार्क येथील मारोतीनगर मध्ये घडली . या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . शैलेश कैलास सोनवणे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे .\nपोलीस आणि नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शैलेशचे वडील हे माजी सैनिक असून ते मयूर पार्क येथे राहतात. शैलेश हा स्वभावाने भोळसर आहे. यासाठी त्याच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. आज सकाळी शैलेशने आई वडिलांसोबत दुस-या मजल्यावर बसून चहा घेतला. त्यानंतर आई वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र झाले. काही वेळाने अचानक काहीतरी खाली कोसळण्याचा आवाज झाला. आवाज ऐकून आई- वडील दोघेही गॅलरीत आले असता शुभम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला.\nसोनवणे यांनी लागलीच शैलेश याला शेजाऱ्यांच्या मदतीने घराजवळील खाजगी रुग्णालयात हलविले. तो गंभीर जखमी असल्याने त्यास त्याला घाटी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्या आधीच शैलेशची प्राणज्योत मालवली. वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद मनपात केवळ कंत्राटदारांना वेळेत बिले\nचाळीशीनंतर बस चालकांना सांधेदुखी, उच्च रक्तदाबाचा त्रास\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nविद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेतील ‘चटोपाध्याय’चे प्रकरण आता नव्या ‘सीईओं’कडे\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:37:51Z", "digest": "sha1:WJKZQGDSAAMLN46D3IEDUT7ZSPSYAN4D", "length": 5831, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गीताई अध्याय सोळावा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गीताई अध्याय सोळावा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय सोळावा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गीताई अध्याय सोळावा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गीताई अध्याय सोळावा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय सोळावा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गीताई अध्याय सोळावा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गीताई अध्याय सोळावा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=201803&paged=5", "date_download": "2018-04-20T16:44:14Z", "digest": "sha1:FOZAUVPFNGLOB7W64YAHUZP4CQQ27EAG", "length": 17584, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 5", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nरविवारी नरपडची साईबाबा यात्रा\nComments Off on रविवारी नरपडची साईबाबा यात्रा\nडहाणूतील नरपडच्या साईबाबा मंदिर येथे सालाबादप्रमाणे श्री रामनवमी निमित्त रविवार, दिनांक 25 मार्च 2018 रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व बंधूभगिनी व साई भक्तांनी श्री साई दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईनाथ संस्कृतीक ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर भिकाजी राऊत यांनी केले आहे. या दिवशी पहाटे 4:30 वाजता काकड आरती, दुपारी 12:39 वाजता रामजन्मउत्सव व आरती, संध्याकाळी 7:30 वाजता साईबाबाची आरती असा कार्यक्रम असल्याचेही राऊत यांनी ...\tRead More »\nरोजगार हमीच्या कामावरून २ गटात मारामारी\nComments Off on रोजगार हमीच्या कामावरून २ गटात मारामारी\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि.२१ तालुक्यातील योगदा ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव येथे रोजगार हमीच्या काम मागणी पत्रात नावे का घेतली नाही याचा जाब विचारल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन रात्रीच्या सुमारास जखमी झालेल्या तब्ब्ल ९ जणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वडापाडा व आसपासच्या परिसरातील शेकडो मजुरांनी वाडा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मंगळवारी (दि. २०) रात्री आठ ...\tRead More »\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत\nComments Off on अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत\nराजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि .21: तालुक्यातील कसा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाणेडे येथे रहावयास असलेल्या पीडित मुलीसोबत ९ फेब्रुवारी रोजी आरोपीने हे कृत्य केले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने पीडितेने यावर मौन बाळगले ...\tRead More »\nपालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nComments Off on पालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि . २१ मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक करून तिच्या कानशिलात लगवणाऱ्या मुजोर प्रवाशाला पालघर पोलीसांनी अटक केली आहे. पालघर एसटी आगाराकडून रात्री ९. ४५ वाजता स्टेशन ते सातपाटी बस सेवा पुरवली जाते. मुंबईहून येणारी लोकशक्ती एक्स्प्रेस ट्रेन अनेकवेळा पालघर स्थानकात उशिरा पोहोचत असल्याने व हि बस सुटल्यानंतर या मार्गावर दुसरी बस फेरी नसल्याने या ...\tRead More »\nवाडा : कुडूस येथे महिला मेळावा संपन्न\nComments Off on वाडा : कुडूस येथे महिला मेळावा संपन्न\nप्रतिनिधी दि. २१ एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत कुडूस येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती धनश्री चौधरी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन झाले. वाडा एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत कुडूस हा दुसरा भाग आहे. या विभागाच्या सभागृहात या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्र्विनी शेळके, उपसभापती नंदकुमार पाटील, ...\tRead More »\nबहिणीचा अंतिम संस्कार करून दिला 10 वी चा पेपर\nComments Off on बहिणीचा अंतिम संस्कार करून दिला 10 वी चा पेपर\nडहाणू तालुक्यातील नरपड येथील अ. ज. म्हात्रे विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मोठ्या बहिणीचे निधन झाल्यानंतरही शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्याने १० वीची परीक्षा दिली आहे. कु.अजय कलंगडा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अजयची मोठी बहीण अंजली हिचे 20 मार्च रोजी रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अजयच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. अजयची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अजय अ. ज.म्हात्रे ...\tRead More »\nउद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर\nComments Off on उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे उद्या, २४ मार्च रोजी डहाणू येथे येत असून ते विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. डहाणू औष्णिक विज प्रकल्पातील सभागृहात सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लोकांना उपलब्ध असतील. डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसू्चना रद्द करण्यासाठी अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या उपलब्धतेचा लोकांनी लाभ उठवावा असे आवाहन माजी ...\tRead More »\nबोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nComments Off on बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nबोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे बोईसर व त्या लगतच्या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे ...\tRead More »\nवावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले\nComments Off on वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले\nप्रतिनिधी वाडा, दि. २१ : येथील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर हवेच्या जोरदार वावटळीत लोखंडी कैचीसह उन्मळून कोसळले गेल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , मात्र ह्या घटनेच्या काही क्षण आधी शाळा सुटण्याच्या सुमारास विद्यार्थी व शिक्षक वर्गाबाहेर पडल्याने बचावले. वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या ...\tRead More »\nरोजगार हमीच्या कामावरून दोन गटात हाणामारी\nComments Off on रोजगार हमीच्या कामावरून दोन गटात हाणामारी\nप्रतिनिधी वाडा, दि. २१ : तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील वडपाडा येथे रोजगार हमीच्या काम मागणी पत्रात आमची नावे का घेतली नाही याचा जाब विचारल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन रात्रीच्या सुमारास जखमी झालेल्या तब्बल नऊ जणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वडपाडा व आसपासच्या परिसरातील शेकडो मजुरांनी वाडा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मंगळ्वारी ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:33:15Z", "digest": "sha1:UV27SLFUNBTADBLLTU6EJHQQKAO2LCVO", "length": 5449, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लियोपोल्ड सेदार सेंघोर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n६ सप्टेंबर १९६० – ३१ डिसेंबर १९८०\n९ ऑक्टोबर, १९०६ (1906-10-09)\nजोल, फ्रेंच पश्चिम आफ्रिका\n२० डिसेंबर, २००१ (वय ९५)\nलियोपोल्ड सेदार सेंघोर (फ्रेंच: Léopold Sédar Senghor; ९ ऑक्टोबर १९०६ - २० डिसेंबर २००१) हा पश्चिम अफ्रिकेतील सेनेगाल देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.\nव्यक्तिचित्र[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१४ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/woman-gives-birth-on-turkish-airlines-flight-258012.html", "date_download": "2018-04-20T16:15:18Z", "digest": "sha1:64R2NNBGDDZM7YNRL3HKQ7HJVKEVRDIK", "length": 8762, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "42 हजार फुटावर विमानात मुलीचा जन्म", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n42 हजार फुटावर विमानात मुलीचा जन्म\n42 हजार फुटावर विमानात मुलीचा जन्म\nअशी वाहतूक कोंडी तुम्ही कधी पाहिलेत का \nअमेरिकेच्या कोलडॅरो जंगलात वणवा,नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं\nदहशतवादी हल्ला झाला तर काय करायचं ब्रिटन पोलिसांचा थेम्समध्ये सराव\nस्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का \nबराक ओबामांच्या कारकिर्दीचा खास आढावा...\nस्थलांतरितांना लाथा मारणाऱ्या कॅमरावुमनला झाली शिक्षा\nफ्लॅशबॅक2016 : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा\nआयसीसनं तब्बल 24 तेल विहिरी पेटवल्या\n'ट्रम्प सरकार'मुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार \nअप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा \nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://shridharjahagirdar.blogspot.com/2016/10/blog-post_11.html", "date_download": "2018-04-20T16:19:28Z", "digest": "sha1:LWR7XNNOYA4LSSYAHZBKPRVV3ENKTQVU", "length": 9165, "nlines": 48, "source_domain": "shridharjahagirdar.blogspot.com", "title": "सहज संवाद", "raw_content": "\nकुठे तरी आपले विचार मांडावे, कुणालातरी मनातले ऐकवावे, कुणीतरी आपल्या विचारांवर टिपण्णी द्यावी, म्हणुन हा अट्टाहास अगदीच काही नाहीतर मनात ओथंबलेले कुठेतरी व्यक्त करावे म्हणुन हा ब्लॉग अगदीच काही नाहीतर मनात ओथंबलेले कुठेतरी व्यक्त करावे म्हणुन हा ब्लॉग आपणही ब्लॉगीश्टांच्या मैफिलीत शामिल झालो, हे समाधान\nबुधवार, ऑक्टोबर ०५, २०१६\nदहा वर्षे झाली, तुमचे पत्र नाही. तसेही तुम्ही पत्र फार लिहीतच नव्हता. फार पूर्वी सणासुदीला, नवीन वर्षाला शुभेच्छा यायच्या, शेवटच्या काही वर्षात तर फक्त माझ्या वाढदिवसाला \"शुभेच्छा\" यायच्या, आडव्या पोस्टकार्डवर टपोऱ्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या शुभेच्छा. शेवटच्या शुभेच्छा आल्या त्यालाही आता दहा वर्षे झाली\nतुमच्या सुंदर अक्षराचे मला लहानपणापासून आकर्षण, तुम्ही कधी टंकलेखन केले नाहीत, अशिलांच्या सर्व कामकाजाचे ड्राफ्ट स्वत:च्या अक्षरात लिहून मग ते टायपिंगला जात. तुम्ही ऑफिस मध्ये नसलात कि तुमची ती अक्षरे पाहायला मला खूप आवडायचे. अक्षर चांगले व्हावे म्हणून तुम्ही लहानपणी जे काही केले ते करायचा मी प्रयत्न केला. खांडेकरांच्या दुकानातून बोरू आणले, टाक आणला आणि शाईच्या दौतीत बुडवून कागदावर लिहायचा प्रयत्न केला. शब्द उतरायच्या आधीच कागदावर शाईचे थेंब पडायचे \nवाचनाचे आणि लिहिण्याचे वेड लागले ते तुमच्यामुळे. लहानपणी रात्री तुमच्या येण्याची वाट पाहत जागा राहायचो ते साहित्य सभेतून तुम्ही गोष्टींची पुस्तके आणायचा म्हणून. केवढ्या गोष्टी वाचल्या त्या वयात - गलीवरची यात्रा, तीन शिलेदार, रॉबिन हूड … शाळेत टिळक जयंती, १५ आगस्ट साठी भाषणाची तयारी तुम्ही करून घ्यायचात. भिंतीला टेकून उभा राहून ती पाठ भाषणे मी तुम्हाला म्हणून दाखवत असे. त्या वयात ते भाषण लिहिणे मला जमायचे नाही, पण तुम्ही लिहून दिलेल्या भाषणांमुळे पुढे हायस्कूल आणि कॉलेजात वादविवाद - परिसंवादाची तयारी करायचे वळण मिळाले.\nनुसत्या अभ्यासावर तुम्ही भर दिला नाहीत म्हणून मनाला आणि बुद्धीला एक सांस्कृतिक वळण मिळाले. नाटकाकडे वळलो आणि त्यासाठी मग रात्री उशिरा परतू लागलो, अगदी परीक्षेच्या दिवसात सुद्धा पण तुम्ही कधी त्यावर बंदी घातली नाहीत. एकदा बोलून दाखवलेत \" ह्या वर्षी परीक्षेचा निकाल निकालात निघाला असता तर ही नाटके बंद म्हणून सांगणार होतो \". इतका विश्वास ठेवलात कि त्याला मोडायचे मन कधी झालेच नाही . मुलींना मोठे करताना हा \"विश्वास ठेवण्याचा\" विचार खूप कामाला आला.\nएम एस्सी करताना पहिल्या पेपरच्या गोंधळामुळे आपला फर्स्ट क्लास जाणार हा हिशेब लावला आणि मी शेवटच्या पेपरच्या दिवशी ड्रॉप घ्यायचा असे ठरवले, तसे तुम्हाला, तुम्ही कोर्टात जायच्या आधी, सांगितले आणि लगेच मेटिनी शोला निघून गेलो - तुम्हाला टाळायचे म्हणून \nतुम्ही एका चकार शब्दाने मला माझ्या निर्णयाबद्दल विचारले नाही. एका वयानंतर मुलांना निर्णय स्वातंत्र्य हवे हा विचार तुम्ही असा मनावर बिंबवलात\nआपल्यात मनमोकळे संवाद असे कधी झालेच नाहीत … मात्र अशा अनेक प्रसंगात तुम्ही मौनाने नेमका संवाद साधलात. पुढे चांगल्या नोकरीच्या शोधात मी हातात आलेल्या किमान तीन नोकऱ्या सोडल्या, दोन वर्षे 'बेरोजगार ' म्हणून अस्वस्थ जगलो मात्र तुम्ही कधी आधार काढून घेतला नाहीत. ह्या साऱ्या काळात तुमचे माझ्यावर बारीक लक्ष मात्र असे. माझ्या वाचनात रसेल, कृष्णमूर्ती, राधाकृष्णन येऊ लागल्यावर तुम्ही विचारलेत \" काय विचार आहे, हिमालय गाठायचाय का\" मी काहीच बोललो नाही …\nमी काहीच बोललो नाही … हे असेच होत राहिले, तुम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत. हा ही बहुतेक तुमचाच वारसा \nद्वारा पोस्ट केलेले श्रीधर जहागिरदार येथे ७:१७ म.पू.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nदादा, दहा वर्षे झाली, तुमचे पत्र नाही. तसेही त...\nसाधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/dalit-people/", "date_download": "2018-04-20T16:36:56Z", "digest": "sha1:67UVV4WW5JIASTIAYZNOOOA7WICRMAXM", "length": 5621, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "dalit people – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमनोहर भिडे मोकाट मात्र महाराष्ट्रभर दलित नेत्यांच्या कार्यालय व घरांवर छापे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण\nपुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि दलित नेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, नागपूर आणि गडचिरोली परिसरात हे छापे टाकण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७… Read More »\nरामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे\nकोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=201803&paged=9", "date_download": "2018-04-20T16:44:23Z", "digest": "sha1:5V5UCRXREDARVB3BG6ET3MJ5FEYP7B2L", "length": 15236, "nlines": 83, "source_domain": "rajtantra.com", "title": "March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 9", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nमनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर\nComments Off on मनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर\nप्रतिनिधी मनोर, ता.05 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसीय मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या हस्ते आज या शिबीराचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना हर्निया, हायड्रोसील यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे शक्य होत नाही. अशा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज, ...\tRead More »\nडहाणू: उभ्या गाडीतून ६ लाख ७३ हजारांची चोरी\nComments Off on डहाणू: उभ्या गाडीतून ६ लाख ७३ हजारांची चोरी\nRAJTANTRA MEDIA डहाणू दि. ५: येथील थर्मल पॉवर रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उभ्या वाहनातून ६ लाख ७३ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक सईद शेख यांच्यासह काही दुकानांतून पोलीसांना सी.सी.टी.व्ही. फूटेज उपलब्ध झाले असून त्यावरून पोलीस अरोपींचा शोध घेत आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कैनाड येथील सुनील रामजी चिपात एमएच ४८ ...\tRead More »\nनॅशनल मेडीकल कमिशन बिलला कडाडून विरोध करा – डॉ. पार्थिव संघवी\nComments Off on नॅशनल मेडीकल कमिशन बिलला कडाडून विरोध करा – डॉ. पार्थिव संघवी\nराजतंत्र मिडीया दि. २५: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नॅशनल मेडीकल कमिशन बिल हे वैद्यकीय क्षेत्राची अपिरिमीत हानी करणारे असून या बिलाला कडाडून विरोध करा व याबाबत जनजागृती करा असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी पार्थिव संघवी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते आयएमए च्या डहाणू शाखेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकीकडे आयुर्वेद आणि ...\tRead More »\n7 व 8 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयात आधार शिबिराचे आयोजन\nComments Off on 7 व 8 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयात आधार शिबिराचे आयोजन\nपालघर जिल्ह्यातील आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मुख्यालयांच्या ठिकाणी तहसिलदार कार्यालयामध्ये आधार नोंदणी व आधार अद्यावतीकरणसाठी दिनांक 07 मार्च, 2018 व दिनांक 08 मार्च, 2018 रोजी आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील नागरीकांची आधार नोंदणी, तसेच यापूर्वी आधार नोंदणी करण्यात आलेल्या नागरीकांना आधार अद्यावतीकरण करणे सुलभ जावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...\tRead More »\nसर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन\nComments Off on सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन\nकार्यक्रम संपल्यानंतर टिम डहाणू तालुका विकास परिषदेचे नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांबरोबर टिपलेले छायाचित्र. छायाचित्रात डावीकडून मयुर पटेल, फय्याझ खान, दिपक कास्ट्या, संजीव जोशी, आनंद बाफना, विवेक करकेरा, संतोष शेट्टी, अमित नहार, मिहीर शहा, भरत राजपूत, विपूल मेहता, विनोद स्वामी, जितेन संघवी, अशोक माळी, धवल पटेल, राजकुमार नागशेट, सुधिर कामत (छायाचित्र टिपले आहे टिमचे सदस्य उमेश पाटील यांनी.) प्रशांत सोनी व सुशिल शहा ...\tRead More »\nपालघरमधील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता\nComments Off on पालघरमधील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता\nप्रतिनिधी बोईसर, दि. २८ : पालघर तालुक्यातील विस्ताराने मोठ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माहीम आणि सरावली ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवला असून खैरेपाडा ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी या महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. माहीम ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत दीपक रामचंद्र करबट यांनी परिवर्तन पॅनलच्या मुकेश करबट यांचा पराभव केला. १७ सदस्यांपैकी १२ ...\tRead More »\nडहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर\nComments Off on डहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर\nअर्थसंकल्पावर नगराध्यक्ष भरत राजपूत यांची छाप पहायला मिळते. भ्रष्ट्राचारमुक्त कारभार करुन दाखवू आणि लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणारा विकास करुन दाखवू असा विश्वास नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी अर्थसंकल्पाविषयी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी अर्थसंकल्पाविषयी बोलण्यास अनुकूलता दाखवली नाही. उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला यांनी याबाबत २ दिवसांनी बोलू असे सांगून टाळले तर आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी थोड्या वेळात फोन करतो असे सांगून कलटी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील ८० कोटींचे बजेट भाजपच्या राज्यात पहिल्याच वर्षी अर्ध्यावर आले. यातून विकासाचा वेग कसा असेल हे लक्षात आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी राजतंत्रकडे व्यक्त केली\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/outstanding-gift-from-twitter-and-forbes-to-anushka-sharma-278306.html", "date_download": "2018-04-20T16:26:38Z", "digest": "sha1:LSCNTSPLCSWWQJIVY555WEFOIRPBVFXA", "length": 12487, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट!", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट\nयंदाचं बहुचर्चित कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या थांबत नाही आहेत. आणि आता तर काय त्यांच्यावर गिफ्ट्सचा पाऊसच पडतोय.\n28 डिसेंबर : यंदाचं बहुचर्चित कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या थांबत नाही आहेत. आणि आता तर काय त्यांच्यावर गिफ्ट्सचा पाऊसच पडतोय. एकीकडे ट्विटरकडून अनुष्काच्या लग्नाच्या ट्विटला 'गोल्डन ट्विट' म्हणून जाहीर करण्यात आलं तर दुसरीकडे फोर्ब्सने 'पेटा पर्सन ऑफ द ईयर' या पुरस्कारानं अनुष्काला सन्मानित करण्यात आलं आहे.\nबॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातल्या विरुष्का या लाडक्या कपलचं लग्न टॉक ऑफ द टाऊन झालं होतं. अनुष्कानं तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन लग्नाचा पहिला फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. अनुष्कानं लग्नाच्या फोटोसह केलेलं हे ट्विट सर्वाधिक वेळा रिट्विट करण्यात आलं. त्यामुळेच हे ट्विट गोल्डन ट्विट ठरलं असल्याचं ट्विटरकडून घोषित करण्यात आलं आहे. एकुणच काय तर विरुष्काच्या लग्नाला ट्विटरकडूनही अनोखं गिफ्ट मिळालंय असंच म्हणावं लागेल.\nविरुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाचा अनुष्काला आणखी एक खुशखबर मिळाली ती फोर्ब्सकडून. फोर्ब्सने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100'च्या यादीत अनुष्काला दुसरं स्थान मिळालं आहे. अनुष्काला 'पेटा पर्सन ऑफ द ईयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अनुष्का शुद्ध शाकाहारी असून तिची प्राण्यांप्रती दयाळू वृत्ती बघूनच तिला या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-on-freedom-fighters/", "date_download": "2018-04-20T16:43:19Z", "digest": "sha1:BHUEV2CU5SP4MXPQCWN2GJGDETU4DSLR", "length": 30255, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "मराठी मने आणि क्रांतीचा वारसा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nमराठी मने आणि क्रांतीचा वारसा\nया महाराष्ट्रभूमीला पूर्वापार स्वातंत्र्याचे वेड आहे. येथील माणसांना गुलामीची चाहूल सर्वप्रथम लागते हा इतिहास आहे. या गुलामी विरोधात लढण्याची ऊर्मी येथेच उत्पन्न होते. मग शेंडी तुटो की फांदी तुटो, मर्द मराठा त्या अन्यायाशी लढतो, शत्रूस मारता मारता मरेतो झुंजतो, पण मागे हटत नाही. ‘प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात, परंतु प्राणाहूनही प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना जेव्हा याच भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा यज्ञ चेतविण्यास, बलिवेदीचा खेळ खेळण्यास तयार होतात. मराठी मनाची हीच विचारधारा आहे.\nमराठी हा शब्दच मुळी क्रांतीला आमंत्रण देणारा आहे.\nमराठी रक्तात सामाजिक बांधिलकी आहे. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी मी स्वार्थ त्याग करायला तयार आहे ही जाणीव महाराष्ट्रभूमीत अधिक जोपासली जाते. याची प्रचीती आपणास हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात अधिकतम जाणवते. हिंदुस्थानचा स्वातत्र्यलढा केवळ १८५७ पासून धरला जातो. काही विद्वान तर १९४२ चा लढा हाच स्वातंत्र्यलढा मानतात नि तसा प्रचार करता करता रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती झाली नि ‘चले जाव’ बोलताच इंग्रज हिंदुस्थान सोडून पळून गेले असा पुरस्कार करतात.\nया महाराष्ट्रभूमीला पूर्वापार स्वातंत्र्याचे वेड आहे. येथील माणसांना गुलामीची चाहूल सर्वप्रथम लागते हा इतिहास आहे. या गुलामी विरोधात लढण्याची ऊर्मी येथेच उत्पन्न होते. जी कार्य प्रवृत्तही येथेच होते. मग शेंडी तुटो की फांदी तुटो, मर्द मराठा त्या गुलामी, अन्याय्य तत्त्वाशी लढतो, शत्रूस मारता मारता मरेतो झुंजतो, पण मागे हटत नाही. या लेखात मी मराठी हा शब्द महाराष्ट्रभूमीत जन्मलेल्या सर्वांसाठी, महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर खेळून राष्ट्रकार्य करणाऱ्या प्रवृत्तीसाठी वापरलेला आहे. हा शब्द जातीवाचक नाही. मराठी मने जशी अन्यायाविरोधात लढताना सशस्त्र लढ्य़ाला कचरत नाहीत तशीच बौद्धिक लढाईतही मराठी क्रांतिकारक मागे राहिलेले नाहीत व नव्हते. यासाठी आपण येथील क्रांतीचा वारसा अभ्यासताना प्रथम ज्ञानेश्वर माऊलीच्या संत परंपरांचा आढावा घेऊ या. ज्ञानेश्वर माऊली विश्वाचं, ज्ञानाचं भांडार जे संस्कृतात होतं ते सर्वसामान्यांना समजावं म्हणून माऊलींनी ते मराठीत आणलं. इतकचं नव्हे तर पहिला मोर्चा काढला तो पांडुरंगाच्या दरबारावर विश्वाचं, ज्ञानाचं भांडार जे संस्कृतात होतं ते सर्वसामान्यांना समजावं म्हणून माऊलींनी ते मराठीत आणलं. इतकचं नव्हे तर पहिला मोर्चा काढला तो पांडुरंगाच्या दरबारावर पंढरपूरकडे\nअवघाची संसार सुखाचा करीन\nआनंदे भरीन तिन्ही लोक\nजाईन गे माये, तया पंढरपूरा \nभेटेन मोहरा आपुली या\nया संपूर्ण विश्वात स्वर्ग-मृत्यू-पाताळात पण सर्वजण सुखी राहावेत. विश्वाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून एक तरुण तपस्वी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत अठरापगड जातींना एकत्र घेऊन सामाजिक संघटन करत करत पदयात्रा, दिंडी घेऊन विठुरायांच्या दरबारात जातो. याला क्रांतीच म्हणावयास हवी. आजही अठरापगड जाती स्वयंशिस्तीने लाखोंच्या संख्येने समाजहित जपाची मागणी करण्यासाठी त्या विठुरायाकडे जातात ही चिरकाल टिकणारी क्रांती करणारे पहिले आहेत ते ज्ञानेश्वर अर्थात ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊलीच्यासह केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र ते पेशावर सामाजिक समरसतेचा, राष्ट्रवादाचा प्रसार करणारे गुरू नामदेव आपणास दिसतात. पंजाबच्या धैर्य, शौर्याच्या इतिहासाची बीजे गुरू नामदेवांनी गुरुनानक देवांच्या माध्यमातून रूजवली आणि या देशाच्या सीमावर्ती वायव्य प्रांतात क्षात्रतेजाचा मराठी बाणा, शीख बंधूंच्या माध्यमातून रूजविणारे संत, महान तपस्वी गुरू नामदेव होते.\nनामदेवांच्या शिकवणुकीतूनच गुरू गोविंदसिंहजींनी\nसकल जगतमें खालसा पंथ जागे\nजगे धर्म हिंदू, तर्क न धूंद बाजे\nहा मंत्र देत मुगल आक्रमकांना सातत्याने वायव्य प्रांतात थोपवून धरले. आजही हजारोंच्या संख्येने राष्ट्रासाठी बलिदानासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी करण्यात शीख बंधूंचा जो वारसा आहे तो गुरू नामदेवांच्या क्रांतिकारी विचारांचा आहे. संतांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर झाले. राजे शहाजी, जिजाऊमाता यांची अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द हा महाराष्ट्र भूमीचा विशेष गुण आहे. आक्रमकांना परतवून लावताना पातशाही स्वतःच्या अंगावर घेत, पातशाहींकडे चाकरी करत असताना एकीकडे आपल्या पुत्राला अन्यायी सत्तेविरोधात लढण्यासाठी बळ देण्याचे बाळकडू देणारी राष्ट्रनीती केवळ शहाजी-जिजाऊ माँसाहेबच यशस्वीपणे अमलात आणू शकतात. ही राजनीती यशाकडे झेपावताना स्वराज्य स्थापन करते हा मराठी क्रांतीचा गुण विशेष या कालखंडात जगद्गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास यांचे कर्तृत्व जाणवते.\nकमी अधिक प्रमाणात स्वातंत्र्यलढ्य़ात मराठी क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती, गनिमी कावा याचाच आधार घेतल्याची उदाहरणे आहेत. कमी ताकद वापरून शत्रूच्या मर्मावर आघात करण्याची उपजतबुद्धी आजही सैन्यदलात वापरताना दिसतात. स्वातंत्र्यलढ्य़ाच्या घटनांचा आढावा घेतला तर मराठी साम्राज्याच्या अस्तापासूनच १८१८ मध्ये पहिला सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला तो लहूजी उस्ताद या पुण्यातील पैलवानाने. नगर जवळील अकोले भागात रामजी भांगरा आणि करिवा यांनी १८१८ नंतर २० वर्षे इंग्रजांना झुंजविले. १८५५ ते १८५९ मध्ये वीर भागोजी नाईक नांदूर-शिंगोटे भागात लढत होता. खान्देशात खाजा नाईक, उत्तर पुणे-नगर भागात राघोजी भांगरे, नर्मदा खोऱ्यात भीमा नायक, गढ मांडल्याचा शंकरशहा, अक्कलकुवा भागातील कुवरसिंह वसावा, गोंडवनात बापूराव शेडमाके, संताळचा भागीरथबाबा या वनवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांविरोधात पहिले सशस्त्र लढ्य़ाचे रणशिंग फुंकले. यातूनच १८५७ चा स्वातंत्र्यलढा उभा राहिला. याचे नेतृत्वही मराठी देशभक्तांकडेच होते. क्रांतिवीर रंगो बापूजी गुप्ते यांनी १८५७च्या लढ्य़ाची बांधणी केली. साताऱ्याच्या छत्रपतींचा यास पाठिंबा होता. लढ्य़ात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे व अनेक मराठी संस्थानिक आघाडीवर होते. १८५७ नंतरचा कालावधी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र लढ्य़ाचा असून यातूनच हुतात्मा चापेकर बंधू जन्मास आले, लोकमान्य टिळक उदयास आले. त्यामुळे हा क्रांतीचा वणवा अखिल हिंदुस्थानभर पसरला.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा सशस्त्र लढा हिंदुस्थानबाहेर नेला. विदेशातून इंग्रजांना आव्हान देण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून अभिनव भारत, गदर, भारतीय रिपब्लिकन आर्मी, अनुशिलन समिती अशा बलाढ्य़ सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना पंजाब, बंगाल, मध्य प्रदेशात उदयास आल्या. याच संघटनांतून पुढे नेताजी सुभाषचंद्रांची आझाद हिंद सेना निर्माण झाली. हिंदुस्थानी सैन्याचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण ही राजनीती सावरकरांनी मांडली व कार्यान्वित केली. पहिला अस्पृश्यता निवारण झालेला रत्नागिरी जिल्हा हा स्वा. सावरकरांमुळे झाला असे इंग्रजांचे अहवाल आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्य़ात मराठी बाण्याच्या त्यागातून एक नवा विचार रूजविला गेला. तो होता स्वतःच घराला आग लावायची, त्या आगीत स्वातंत्र्यसूर्य उगविण्याची प्रतीक्षा करत, सर्वस्वाची आहुती देत शत्रूस मारता मारता मरेतो झुंजायचे.\nहाच विचार प्रत्येक मराठी क्रांतिकारकाने जोपासला. यातूनच मराठी मनाच्या धारणांचे मूल्यमापन करताना एक तत्त्व सिद्ध होते. ‘प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात, परंतु प्राणाहूनही प्रिय असते ती स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना जेव्हा याच भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा यज्ञ चेतविण्यास, बलिवेदीचा खेळ खेळण्यास तयार होतात. मराठी मनाची हीच विचारधारा आहे.\n(लेखक देशभक्तकोशकार तसेच मराठी भाषा विश्व, पुणेचे अध्यक्ष आहेत)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहानायक अमिताभ म्हणतात, ‘इतका अन्याय करु नका’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/union-ministers-from-tdp-submit-resignation-to-pm-modi/", "date_download": "2018-04-20T16:37:19Z", "digest": "sha1:CSIC5FMUMUPCXJIVMZVLZ3Z6H4WVHI5L", "length": 16133, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदींची शिष्टाई निष्फळ; तेलगू देसम मंत्रिमंडळातून बाहेर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nमोदींची शिष्टाई निष्फळ; तेलगू देसम मंत्रिमंडळातून बाहेर\nतेलगू देसमच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी आपला राजीनमा पंतप्रधानांकडे सूपूर्त केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अमान्य केल्यानंतर या मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश तेलगू देसम प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी दिले होते.\nचंद्राबाबू नायडू यांचे मन वळवण्यासाठी गुरुवारी दिवसभर भाजपकडून जोरदार हलचाली सुरु होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्याशी वीस मिनिटे फोनवर बातचित केली. ‘मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय कळवण्यासाठी मी मोदींना फोन केला होता, पण हा फोन मोदींनी घेतला नाही’, असा आरोप नायडूंनी गुरुवारी केला होता. त्यानंतर मोदींनी आज धावपळ करत नायडूंना फोन केला. मोदींनी फोनवरुन नायडूंचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली, पण त्यांचा हा प्रयत्न अखेर अपयशी ठरलाय.\nतेलगू देशम पक्ष आणि भाजपात नेमकं कशावरून बिनसले, वाचा सविस्तर..\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले\nपुढीलराज्याची अर्थव्यवस्था घसरली, आर्थिक अहवालात कबुली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judges-addresses-press-conference/articleshow/62481060.cms", "date_download": "2018-04-20T16:31:57Z", "digest": "sha1:VX4U6G7Y7HMX2EHYSAMAHC2YHV2VRMMT", "length": 27997, "nlines": 240, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "supreme court judges addresses press conference | सर्वोच्च बंडाळी! - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसुनील चावके, नवी दिल्ली:\nसमाजातील अतिसामान्य ते यशोशिखरावरील असामान्य अशा देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ असलेली सर्वोच्च न्यायसंस्था शुक्रवारी आपल्याच न्यायप्रणालीविषयी कैफियत मांडण्यासाठी थेट जनतेच्या दरबारात उभी राहिली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर त्यांच्याच चार सहकारी न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्नचिन्ह लावले. या अभूतपूर्व व अकल्पित घटनाक्रमामुळे सर्वोच्च न्यायालयात धुमसत असलेला संघर्ष उफाळला आहे. चार अव्वल न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्या या ‘सर्वोच्च बंडाळी’मुळे न्यायसंस्थेसोबत देशाचे राजकारणही ढवळून निघाले आहे.\nसर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर, गोगोई, लोकूर आणि जोसेफ हे न्यायमूर्ती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या पाच सदस्यीय कॉलेजियमचे सदस्य आहेत. न्या. मिश्रा निवृत्त झाल्यानंतर न्या. रंजन गोगोई येत्या ऑक्टोबरमध्ये सरन्यायाधीश होणार आहेत. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या, न्यायमूर्तींच्या रिक्त जागा भरणे, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या बदल्या, सर्वोच्च न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे कोणत्या न्यायाधीशांच्या खंडपीठांकडे सोपवायची आदी ‘मेमोरँडम ऑफ प्रोसिजर’शी संबंधित मुद्दे आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्गी लावण्यावरून सरन्यायाधीशांवर हे न्यायमूर्ती नाराज असल्याचे समजते. याविषयी दोन महिन्यांपूर्वी न्या. मिश्रा यांना चारही न्यायमूर्तींनी पत्र लिहिले होते. पण त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवरून निर्माण झालेल्या नाराजीचा हा स्फोट समजला जात आहे.\n>> सर्वोच्च न्यायालयात जे घडायला नको, ते घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्य पद्धतीने सुरू नाही. न्यायव्यवस्थेला वाचविले नाही, तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल... - न्या. जे. चेलमेश्वर\n>>न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणावरून ठिणगी\nसोहराबुद्दीन एन्काऊंटर खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल जनहित याचिका कोणत्या खंडपीठापुढे सोपवायची, यावरून शुक्रवारी संबंधित चारही न्यायमूर्तींचे सरन्यायाधीशांशी मतभेद झाले. नंतर या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने ‘हे गंभीर प्रकरण आहे’, असे मत नोंदवत, महाराष्ट्र सरकारला १५ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश दिला.\n>> न्या. मिश्रा यांच्यावर मनमर्जीचा ‘ठपका’\n‘सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सबळ कारणाशिवाय आपल्या मर्जीतील खंडपीठांकडे निवडक खटले परस्पर वर्ग केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांचे दूरगामी परिणाम देश आणि न्यायसंस्थेवर होत असतात. कितीही किंमत मोजावी लागली, तरी अशा घटनांना विरोध व्हायलाच हवा’, अशा शब्दांत चारही न्यायमूर्तींनी पत्रात त्यांना लक्ष्य केले आहे.\n>> हस्तक्षेप नाही; केंद्राची भूमिका\nया वादानंतर विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तर, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीशांसोबत चर्चा केली. त्यानंतर ‘भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र. या मुद्द्यावर न्यायसंस्था स्वत:च मार्ग काढेल’, असा विश्वास केंद्रीय विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी व्यक्त केला.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nkathua rape: चिमुरडीच्या हत्येने हादरले खोरे\nचीनच्या युद्धनौकांचं भारतानं असं केलं स्वागत\n'मला फक्त १५ मिनिटं बोलू द्या...'\nAadhaar विरोधात गुगलचे कटकारस्थान\nमहिलेसमोरच उबर चालकाचं हस्तमैथुन\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घरावर दगडफेक\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकांत फूट\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\n2अंबानीही आणणार आभासी चलन\n3‘इस्रो’ची सर्वात दीर्घ मोहीम...\n4सरन्यायाधीशांच्या कथित मनमानीमुळे असंतोष...\n5'न्या. लोया यांचा शवविच्छेदन अहवाल सादर करा'...\n6शाळेत वेगवेगळे नकाशे कशासाठी\n9उद्यापर्यंत वाद मिटेल: अॅटर्नी जनरल...\n10लोकशाही धोक्यात; काँग्रेसने डागली तोफ...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/hema-d-sane", "date_download": "2018-04-20T16:39:25Z", "digest": "sha1:CQMXXDHDYJSJAKI4BD2C5HHO3C3ZCK5X", "length": 15738, "nlines": 410, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक हेमा डी साने यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nडॉ. हेमा डी साने\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. हेमा डी साने ची सर्व पुस्तके\nदीपक आर महाजन, डॉ. हेमा डी साने ... आणि अधिक ...\nदेशमुख, दीपक आर महाजन ... आणि अधिक ...\nदीपक आर महाजन, डॉ. हेमा डी साने ... आणि अधिक ...\nडॉ. हेमा डी साने, वीणा अर्गत\nडॉ. हेमा डी साने\nडॉ. हेमा डी साने, डॉ. सविता रहांगडाले ... आणि अधिक ...\nडॉ. हेमा डी साने, डॉ. सविता रहांगडाले\nडॉ. हेमा डी साने, डॉ. सविता रहांगडाले ... आणि अधिक ...\nडॉ. हेमा डी साने, डॉ. सविता रहांगडाले ... आणि अधिक ...\nडॉ. हेमा डी साने\nदीपक आर महाजन, डॉ. हेमा डी साने ... आणि अधिक ...\nदीपक आर महाजन, डॉ. हेमा डी साने ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/08/13/keral-grammar-of-violence/", "date_download": "2018-04-20T16:04:50Z", "digest": "sha1:X2OCUNXPA5UWRF427CK6UDAJZOBTEZXS", "length": 37354, "nlines": 68, "source_domain": "rightangles.in", "title": "केरळ : हिंसेचे व्याकरण | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकेरळ : हिंसेचे व्याकरण\nBy सुभाष थोरात, राजीव देशपांडे August 13, 2017\nआमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र, कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही.\n–सुभाष थोरात, राजीव देशपांडे\nशत प्रतिशत भाजप आणि कॉग्रेसमुक्त भारत ही शहा-मोदींची tagline आहे. त्यासाठी अमित शहांनी देशभर दौरे केले आहेत. सनातन वैदिक संस्कृतीत अश्वमेध यज्ञ करण्याची परंपरा होती. त्यासाठी जो घोडा सोडला जायचा तो ज्या राज्यात अडवला जाईल तेथे युद्ध करून ते राज्य जिंकायचे अशी सर्व राज्ये जिंकून अश्वमेध यज्ञ संपन्न केला जात असे. अमित शहांचे वर्तन आणि दर्पोक्ती तशीच आहे. पण त्यांना माहित आहे कि भारतातील तीन राज्ये अशी आहेत कि तेथे भाजपला भीक घातली जाणार नाही. त्यांच्या केंद्र सरकारातील दहशतीला जुमानले जाणार नाही. उलट कडवा प्रतिकार केला जाईल. ही तीन राज्ये आहेत केरळ, त्रिपुरा आणि प.बंगाल.\nप. बंगालमध्ये आज जरी तृणमूलचे राज्य असले व त्यांचे भाजप बरोबर अंतर्गत साटेलोटे असल्याचे आरोप होत असला तरी भाजप विरोधाची धार त्यांनी बोथट होऊ दिलेली नाही. शिवाय कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची शक्ति तेथे टिकून आहे. त्यामुळे या तीन राज्यात त्यांची डाळ शिजणे अशक्य आहे. पण असे आहे म्हणूनच या तीन राज्यात केंद्रसत्तेच्या जोरावर भाजपच्या विघटनवादी कारवाया सुरु आहेत. मुस्लीम द्वेषाचे राजकारण करून प्रसंगी दंगली घडवून आणून हिंदु मतांची बेगमी करणे हा भाजपचा निवडणूक पटर्न राहिला आहे. त्याला विकासाच्या जुमल्याची फोडणी देत आपले धर्मांध मनसुबे पुढे घेऊन जाणे ही त्यांची रणनीती आहे. प. बंगालमध्ये दंगली घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. याचे कारण तृणमूल कॉंग्रेसला आपण मुस्लिमांचे तारणहार आहोत हे दाखवून द्यायचे आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ जवळ २८ टक्के मुस्लीम लोकसंख्या प.बंगालमध्ये आहे. निवडणुकीत ते महत्वाचे आहे. तृणमूल या खेळात म्हणूनच सामील झालेली आहे. अर्थात ते पुढे त्यांना महागात पडणारच आहे, कारण संघ-भाजपचा हा विषवृक्ष अफवांवर वाढतो. आणि आत्ताच्या काळात अफवा पसरविणे हि एकदम सोपी गोष्ट झालेली आहे.\nत्रिपुरात डाव्यांचे सरकार आहे आणि इतर कोणत्याही राज्यांपेक्षा तेथे खूपच चांगले काम चालू आहे. आदिवासीबहुल असलेले हे राज्य १०० टक्के साक्षर आहे. तेथेही भाजपा आदिवासी-बिगर आदिवासी असा वाद निर्माण करून त्याला खतपाणी घालून विघटनवादी, फुटीरतावादी शक्तींना मदत करीत आहे. पक्षहितासाठी देशहिताचा बळी देण्याची कॉंग्रेसची परंपरा भाजपने तंतोतंत उचलेली आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद्याना कॉग्रेसने पक्षहितासाठी आधी पाठिबा दिला. त्यानंतर काय झाले हे सर्वाना माहित आहे. जम्मू आणि काश्मिर तर अशा पक्षहिती राजकारणाचे विदारक प्रतीक आहे.\nतीन वर्षापूर्वी केंद्रात सत्तेवर आल्यापासून संघ-भाजपचे केरळवर लक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला धडा शिकवायला काही कारण सापडते आहे का याच्या प्रतीक्षेत ते आहेत. केरळमधील राजकीय हिंसेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरून केला जाणारा अपप्रचार तर अनेक वर्षे सुरु आहे. पण केंद्रसत्तेच्या जोरावर त्याची काही तड लागते का असा प्रयत्न संघ-भाजपने सुरु केला आहे. अमित शहांचा दौरा आणि आता नुकताच भारताचे अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी ते जणू संघ-भाजपचे मंत्री असल्याच्या थाटात हत्या झालेल्या एका संघाच्या कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. त्यांना इतकेही तारतम्य नाही कि आपण भाजपचे नेते असलो तरी देशाचे अर्थ आणि संरक्षण मंत्री आहोत आणि या पदावर असताना आपली वागणूक समानतेची असली पाहिजे. संघाचे कार्यकर्ते जसे राजकीय हिंसेचे बळी आहेत तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि कॉंग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते बळी पडलेले आहेत. ही खुनी लढाई थांबावी व शांतता निर्माण व्हावी यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा पण ते न करता आगीत तेल ओतण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अर्थात या सरकारचे पंतप्रधान मुस्लीम टोपी घालण्याचे साधे सौजन्य पाळण्यास तयार नाहीत त्यांच्याकडून ‘सबका साथ, सबका विकास’ कसला होणार उलट या घोषणेच्या आड कामगार, शेतकरी, दलित, मुस्लीम, आदिवासी,स्त्रिया, यांच्या विकासाला खीळ घालणारी धोरणेच ते घेत आहेत.\nराजकीय हिंसा ही केवळ सर्वसाधारण हिंसा नाही. तिची निश्चित अशी राजकीय उद्दिष्ट्ये असतात.जात-वर्ग-धर्म-वंश-प्रांत-राज्य-देशांचे हितसंबंध दडलेले असतात, कधी प्रत्यक्षपणे असतात तर कधी ते अप्रत्यक्षपणे. राजकीय हिंसा या हितसंबधांचे अपत्य असते आणि आजवरच्या मानवी इतिहासाचे परिशीलन केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते कि, ही हिंसा सत्ताधारी वर्ग, शोषक वर्ग कष्टकरी जनतेवर, दलितांवर, आदिवासींवर स्त्रियांवर- शत्रूस्थानी मानलेल्या धार्मिक, वांशिक समूहांवर लादत असतो. अशा हिंसेची परिणीती प्रती हिंसेत होते आणि शोषक वर्गाविरोधात अस्तित्वात आलेली प्रतीहिंसा प्रतिकाराची, स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची स्वतचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी केलेली हिंसा असते आणि त्यामुळेच ती नैतिक असते.\nकेरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला संघ-भाजप हिंसेसाठी जबाबदार धरत आहे. पण कम्युनिस्टांनी हिंसा जर केली असेल तर ती प्रतिकाराची हिंसा आहे. कम्युनिस्टांना नेस्तनाबूत करण्याच्या हेतूनेच संघ-भाजपने (त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता) १९६० पासूनच हिंसेचा आधार घेतलेला आहे. त्यांना अर्थातच मालक वर्गाचा आधार होता, कामगारांचे संप फोडण्यासाठी संघाने हिंसेचा आधार घेतला होता.\nसंघ-भाजपचा विचार करताना नेहमी धार्मिक-सांस्कृतिक अंगाने केला जातो. पण या बुरख्याआड दडलेली ही एक अव्वल दर्ज्याची फासिस्त संघटना आहे. तिचा कारभार अनेक मुखाने चालतो. ज्याचे संचलन संघ करतो. एकचालकानुवर्ती हा तर त्यांच्या संघटनेचा पाया आहे. ती राजकीय तर आहेच पण आर्थिक पातळीवर अत्यंत उजवी अमेरिकन साम्राज्यवादधार्जिणी शक्ति आहे. स्वदेशी जागरण मंच सारख्या स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या संघटना ही धूळफेक आहे. संघ अमेरीकन साम्राज्यवादाचे आशिया खंडातील सर्वात विश्वासू बाळ आहे. त्यांचा समाजवादाला, रशियाला जो विरोध आहे तो या भूमिकेतून आहे. त्यामुळे जे कम्युनिस्टांशी आणि संघाशी संबंधित नाहीत त्यांना हे दोघेही हिंसक वाटतात. हिंसेचे वर्गीय स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही आणि कम्युनिस्ट तर हिंसेसाठी जगभर बदनाम आहेत कारण हिंसेकडे समाजातील अंतर्विरोध, वर्गविरोध, वेगवेगळ्या हितसंबंधांचे टकराव या पार्श्वभूमीवर पहिले जात नाही तर मानवतावादी, वर्गातीत दृष्टीने पहिले जाते. मार्क्सवादाच्या उदयापासूनच भाडवलदारांनी, त्यांच्या विचारवंतानी, प्रसारमाध्यमानी मार्क्सवाद हे हिंसक तत्वज्ञान यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. आजतागायत ती प्रक्रीया सुरूच आहे. त्यामुळे भारतातील गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी या प्रचाराचे बळी आहेत.\nतत्वज्ञान म्हणून तात्विक अर्थाने मार्क्सवादाने हिंसेचा पुरस्कार केलेला नाही. मार्क्सवाद मानवी जीवनातील विकासात हिंसेची वस्तुस्थिती पुढे आणतो. या संदर्भात मार्क्सवादी विचारवत डी. डी. कोसंबी यांनी म्हटले आहे, “हवामान खाते ज्याप्रकारे हवामानाचा अंदाज व्यक्त करून वादळाची शक्यता आहे असे सांगते, ते वादळाचा पुरस्कार करते असे म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे समजातील एकंदर वस्तुस्थितीचा अभ्यास करून हिंसेची शक्यता वर्तवली जाते तेव्हा मार्क्स हिंसेचा पुरस्कार करतो असे म्हणता येत नाही.”\nकोणतीही शासक संस्था सहजासहजी आपले हितसंबंध सोडून देत नाही. उलट ती शोषित जनतेवर कल्पनेपलीकडचे अत्याचार, अन्याय, दडपशाही आणि अमानुष हिंसा लादते. तेव्हा तिचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने करता येत नाही. या संदर्भात आपल्याला आदरणीय नेल्सन मंडेला यांचे उदाहरण उद्बोधक ठरेल. सुरुवातीच्या काळात आफ्रिकन कॉग्रेसमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय वंशाच्या गोऱ्या कम्युनिस्टांबद्दल मंडेला यांना अविश्वास वाटत असे. कम्युनिस्ट हिंसेचा पुरस्कार करतात त्यामुळे व्हिक्स सरकार हिंसेचा आधार घेते असे त्यांना वाटत असे. त्यामुळे शांततेच्या, अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करावे अशी त्यांची धारणा होती. पण लवकरच त्यांना ही धारणा बदलावी लागली आणि ते कम्युनिस्ट बनले. सशस्त्र लढ्याची कमान त्यांच्यावरच सोपविण्यात आली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या संदर्भात सविस्तरपणे लिहिले आहे. ते म्हणतात, “शोषित जनतेच्या हातातील हत्यार हे शोषक वर्गाच्या हत्याराचेच प्रतिबिंब असते. शोषित जनतेने कोणती हत्यारे वापरावीत हे शोषक वर्गच ठरवत असतो.” म्हणजे तो शांततेच्या मार्गाने जाईल तर शोषित जनताही शांततेच्या मार्गानेच जाईल. या संदर्भात रशियन कामगार क्रांतीतील उदाहरण उद्बोधक आहे. रशियन क्रांतीनंतर ब्रिटीश, अमेरिकन वर्तमानपत्रांनी लेनिन, स्टालिन यांची बदनामी करण्याची मोहीम उघडली. दोघे, “मानवी रक्तात बुडवून पाव खातात” इथपर्यंत अपप्रचाराची मजल गेली. हिंसेच्या संदर्भात लेनिन यांना पत्रकारानी प्रश्न विचारला तेव्हा लेनिन यांनी उत्तर दिले, “शांततेच्या मार्गाने क्रांती झाली असती तर ते आम्हाला आवडलेच असते. पण हिंसेची जबाबदारी त्या सज्जनांवर (प्रतीक्रांतीकारकांवर) आहे, त्यांनी क्रांतीच्या विरोधात शस्त्रे उपसली नसती तर आम्हालाही शस्त्रे उपसावी लागली नसती.”\nआमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही. ज्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय गणांचा संघर्ष पाहून बुद्ध मानवी जीवनातील दु;खाचा शोध घेण्यास घर सोडून गेले तो संघर्ष त्यांच्या हयातीत आणि आणि धम्माचा शोध लागल्यानंतरही मिटत नाही आणि आयुष्याच्या अखेरीला बुद्धांना त्याच्यातील रक्तरंजित संघर्ष पाहण्याची वेळ येते. ज्या समाजात शोषण अबाधित आहे त्या समाजात शांतता आणि अहिंसा सत्ताधारी वर्गालाच फायदेशीर ठरते कारण हिंसा केवळ हत्या इतपतच मर्यादित नसते. माणसाचे माणूसपण नष्ट करणाऱ्या सामाजिक परिस्थितीतही ती ओतप्रोत भरलेली असते. मला वाटते तात्विक पातळीवर मार्क्सवादी हिंसेचा मुद्दा या स्वरूपाचा आहे.\nया पार्श्वभूमीवर आपण संघ परिवाराच्या हिंसेकडे पाहूया. हिंदू धर्माला विरोध करताना बाबासाहेबांनी म्हटले आहे, “इतर सर्व धर्मानी गुलामगिरीला विरोध केला आहे. किंबहुना इतर सर्व धर्म गुलामगिरीच्या विरोधात जन्माला आले आहेत, पण हिंदू धर्मच असा आहे ज्याने गुलामगिरीचे समर्थन केलेले आहे.” वेदाना प्रमाण मानणारी सनातन वैदिक संस्कृती जातीव्यवस्थेचे समर्थन करून थांबत नाही तर तिला धर्मशास्त्राचा आधार देते. ब्राम्हणी वर्ण वर्चस्ववाद हा तिचा मूलाधार आहे. संघ-भाजपची विचारधारा हिच आहे. भारतीय संस्कृती संघर्षाचा इतिहास पाहू जाता आपल्या लक्षात येते ते म्हणजे वेद-उपनिषदाना प्रमाण मानणारी जातीव्यवस्था पुरस्कृत संस्कृती म्हणजे सनातन वैदिक संस्कृती आणि या सर्वाना विरोध करणारी संस्कृती म्हणजे अवैदिक संस्कृती. चार्वाकापासून तुकारामापर्यंत, गांधींपासून कलबुर्गीपर्यंत जी हिंसा दिसून येते ती सनातन वैदिक संस्कृतीच्या नावावर जमा आहे. शेवटचा बौद्ध राजा बृहद्र्थ याचा खून करूनच पुष्यमित्र शुंगाने सत्ता हाती घेऊन सनातन वैदिक धर्माची द्वाही फिरविली. पुढे बौद्धांच्या, जैनांच्या, महानुभवांच्या, बसवेश्वरांच्या अनुयायांच्या कत्तलींचा इतिहास याच संस्कृतीच्या नावावर जमा आहे. त्या सनातन वैदिक संस्कृतीचा संघ उघड पुरस्कार करतो. ज्या संस्कृतीचे तत्वज्ञानच हिंसेवर उभे आहे, ती शोषक आहेच.\nअसे असताना केरळमध्ये हिंसेचे खापर मार्क्सवाद्यांवर फोडले जात आहे. गो रक्षकांचा धुमाकूळ अहिंसक आहे काय केरळमध्ये ठोशाला ठोशा मिळाल्यामुळे ते आज कम्युनिस्टांविरूद्ध अपप्रचार करीत आहेत. पण कम्युनिस्टांनी केरळमध्ये अरेला कारे म्हटले नसते तर मुबईतील कम्युनिस्टांसारखे ते इतिहासजमा झाले असते. कृष्णा देसाईंच्या हत्येला योग्य ते उत्तर मिळाले असते तर मुबईतून कम्युनिस्ट हद्दपार झाले नसते. जर राजकीय हिंसेत केरळात कम्युनिस्टही लोकशाही पद्धतीने मातम करत राहिले असते तर आज केरळ भगव्या पताक्यानी सजले असते. हिंसा सुरू केली ती संघाने, त्यांनीच ती संपवली पाहिजे. पण आज केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि सत्तेच्या जोरावर ते कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करून राष्ट्रपती राजवट आणू शकतात. राष्ट्रपती राजवटीचा वापर करून कम्युनिस्टांना ठेचून काढायचे षड्यंत्र रचू शकतात. भाजपला विकली गेलेली प्रचार माध्यमे त्यांनी या कामाला जुंपली आहेत. असे असले तरी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला इशारा देताना जोसेफ स्टालिन यांनी म्हटले होते, “ तुम्हाला युद्धच हवे असेल तर युध्द कसे असते ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ.” आणि पुढचा इतिहास सर्वाना माहित आहेच. जे हिटलरला पुरून उरले त्यांचे आम्ही वारस आहोत. आम्हाला धमकावणे सोडून द्या. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या डाव्या सरकारला जनतेच्या प्रश्नावर काम करू द्या. तुम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेने राजकारण करा हिंसेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण तुम्ही शस्त्र घ्याल तर त्या समोर आम्ही निशस्त्र उभे राहू या भ्रमात राहू नका. नाठाळाच्या माथी काठी कशी मारायची हे तुकाराम बुवा आम्हाला फार पूर्वीच सांगून गेले आहेत.\nसुभाष थोरात, राजीव देशपांडे\nलेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व डाव्या चळवळीचे विचारवंत आहेत.\nअसा ‘नवा भारत’ कोणाला हवा आहे\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/when-will-waiting-period-be-ended-retrieved-course-human-rights-diploma-course/", "date_download": "2018-04-20T16:29:48Z", "digest": "sha1:UX56APHFOUNCAXKP6JUE2JG5GJ3UMAQI", "length": 31764, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "When Will The Waiting Period Be Ended? Retrieved The Course Of The Human Rights Diploma Course | निकालाची प्रतीक्षा संपणार कधी? , मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचे निकाल रखडलेले | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nनिकालाची प्रतीक्षा संपणार कधी , मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचे निकाल रखडलेले\nमुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. हिवाळी परीक्षा सुरू होणार असल्या, तरी आधीच्या सत्राच्या परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.\nमुंबई : मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. हिवाळी परीक्षा सुरू होणार असल्या, तरी आधीच्या सत्राच्या परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाने सर्व ४७७ निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली, पण अजूनही मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाच्या २५ विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही.\nमार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. नवीन पद्धतीत असलेल्या त्रुटींचा आधीच विचार न झाल्याने निकालाला लेटमार्क लागला. उत्तरपत्रिका स्कॅनिंगमध्ये मे महिना लोटल्यामुळे तपासणी करण्यासाठी प्राध्यापकांना उशीर झाला. या सगळ्या गोंधळाचा फटका मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना बसला आहे. या सर्व गोंधळात राज्यशास्त्र विभागातर्फे चालविल्या जाणाºया मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचा निकाल लागायचा राहून गेल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलन करणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.\nगेल्या ५ महिन्यांपासून सुमारे २० ते २५ विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत. मुंबई विद्यापीठाने ‘मानवी हक्क पदविका’ अभ्यासक्रमाचे निकाल रखडून ठेवणे म्हणजे, विद्यार्थ्यांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप छात्रभारतीचे मुंबई विद्यापीठ संघटक रोहित ढाले यांनी केला आहे. विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असून, ९ नोव्हेंबरच्या आंदोलनापासून याची सुरुवात होईल, असेही ढाले यांनी स्पष्ट केले.\n28000 विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर होणे बाकी आहेत. त्याचबरोबर ९० हून अधिक राखीव विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. पण विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.\nकारण, निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. २८ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल बाकी असून येत्या दोन ते तीन दिवसांत हे निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्राध्यापकांची मदत घेण्यात येत असल्याचे या प्रकरणी बोलताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.\nघाटुळे यांनी पुढे सांगितले की, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अद्याप हॉल तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांची ही तक्रार मुंबई विद्यापीठाने मान्य केली नाही. टीवायबीए आणि बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचे वाटप करण्यात आलेले असून संकेतस्थळावर ही हॉलतिकीट उपलब्ध आहेत, अशी माहिती विद्यापीठाने दिली.\nमुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला आहे. विद्यापीठाच्या हिवाळी आणि केटी परीक्षा दोन दिवसांत सुरू होणार असल्या तरी अद्याप सुमारे २८ हजारांहून अधिक पुनर्मूल्यांकनाचे आणि ९० राखीव निकाल जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. पण विद्यापीठाने पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nएटीकेटी परीक्षेचा ताण वाढला\nहजारो विद्यार्थी आजही पुनर्मूल्यांकनाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण वाढला आहे. निकाल हाती नसल्याने एटीकेटीची परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून परीक्षेचा ताण वाढला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश चुकले आहेत, तर आता दुसरीकडे निकाल हातात न आल्याने परीक्षा द्यायच्या की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायम आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिनेट निवडणुकांचा मुहूर्त आता हिवाळी अधिवेशनानंतरच\nपरीक्षा वेळापत्रकात बदल नाही - विद्यापीठ\nसमिती नेमली तरी काम होणार का मुंबई विद्यापीठासमोर आता नवे संकट, समितीवर विद्यार्थी संघटनांची नाराजी\nनिकाल जाहीर न झाल्याने सनद हुकली, विद्यार्थ्याची खंत, निकालाचा गोंधळ सुरूच\nमुंबई विद्यापीठाच्या सीए, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल\nपुन्हा आॅनलाइन अ‍ॅसेसमेंटची अग्निपरीक्षाविद्यापीठाचा मास्टर प्लॅनचा दावा, विद्यार्थ्यांत धाकधूक वाढली\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\nआता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले, उद्धव ठाकरेंचा चिमटा\nदादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, मनपावर हलगर्जीपणाचा आरोप\nगुन्हेगारी, बलात्काराचा देश अशी भारताची प्रतिमा\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rane-press-update-270353.html", "date_download": "2018-04-20T16:27:11Z", "digest": "sha1:NKL3IDI35F2DIMEC5MBVDIPNLIXU52BV", "length": 13238, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार !", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nनारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार \nकाँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे उद्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. पण त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेत आमदार पूत्र नितेश राणेच सहभागी असणार नाहीत.\nसिंधुदुर्ग, 20 सप्टेंबर : काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे उद्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. पण त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेत आमदार पूत्र नितेश राणेच सहभागी असणार नाहीत. थोडक्यात राणेंनी उद्या काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर तांत्रिकदृष्ट्या आमदार म्हणून नितेश राणे या निर्णयाचा भाग असणार नाहीत. स्वतः नितेश राणेंनीच ही माहिती दिलीय. नितेश राणे आजच मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत. उद्या मी पत्रकार परिषदेत शरीराने हजर राहू शकणार नसलो तरी मी मनाने वडीलांसोबतच आहे, असं सांगायलाही नितेश राणे विसरले नाहीत. थोडक्यात काँग्रेसकडून होणारी पक्ष निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी तर राणे पिता पुत्रांनी ही गैरहजेरी खेळी खेळली नाहीना अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nनारायण राणेंच्या उद्याच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेंसोबतच त्यांचे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे देखील अनुपस्थित राहणार आहेत. याचाच सरळ अर्था असा होतो की, राणे कुटुंबीय काँग्रेस सोडणार असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते कोणतेही निलंबनाची कारवाई स्वतःवर ओढवून घेऊ इच्छित नाहीत. कारण कागदोपत्री बंडखोरी केलीतर नितेश राणे आणि कालिदास कोळंबकरांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागून पोटनिवडणूक लढवावी लागेल. कदाचित त्यामुळेच राणे कुटुंबियांनी हा मधला मार्ग अवलंबला असल्याचं बोललं जातंय.\nनारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेला त्यांचे माजी खासदार पूत्र निलेश राणे मात्र आवर्जून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी अडीच वाजता कणकवलीत ही पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस सोडण्याआधी भाजपकडून कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळेच कदाचित राणे कुटुंबियांना हा मध्यममार्ग स्वीकारावा लागत असल्याचं बोललं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bjp entrycongress qiutnarayan raneकाँग्रेसला सोडचिठ्ठीनारायण राणेनितेश राणेनिलेश राणेभाजप प्रवेशमुख्यमंत्री\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-20T16:14:39Z", "digest": "sha1:TFI3JPB3KBDBLG3UXAV6PNUD6HUIFRW6", "length": 2772, "nlines": 52, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "कोणत्याही कंपनीच्या प्राथमिक भाग िवक्री अहवाल - विकिबुक्स", "raw_content": "कोणत्याही कंपनीच्या प्राथमिक भाग िवक्री अहवाल\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nकोणत्याही कंपनीच्या प्राथमिक भाग िवक्रीबाबत अहवाल\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/05/30/devil-called-muslim/", "date_download": "2018-04-20T16:15:06Z", "digest": "sha1:VQTKWT6HDVHMFWJ3UAH5IJOOLSKURHJB", "length": 61350, "nlines": 233, "source_domain": "rightangles.in", "title": "मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nमुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट\nBy राजेंद्र साठे May 30, 2017\nमुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.\nमाझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही. ही शाळा कॉन्वेंट किंवा चर्चद्वारा चालवली जाणारी नव्हती. सीबीएसई अभ्यासक्रमाची होती. ज्यांची बदली देशभर होण्याची शक्यता आहे असे पालक अशा शाळांमध्ये मुलांना घालतात असे ऐकून होतो. पण त्या दहा वर्षांच्या काळात अपवादानेही असा एकाही मुस्लिम नोकरदार या शाळेकडे आलेला दिसला नाही.\nमी राहतो त्या एका सोसायटीत 98 फ्लॅट्स आहेत. अशा एकूण सुमारे सात बिल्डिंग्स आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. म्हणजे सहाशे ते सातशे कुटुंबांचे गाव असावे असा आमचा परिसर आहे. आमच्या सोसायटीमध्ये सर्वभाषिक लोक राहतात. पण यात एकही मुस्लिम कुटुंब नाही. इतर सोसायट्यांमध्येही हीच स्थिती आहे. इथे फ्लॅट विकण्याचे व भाड्याने देण्याचे व्यवहार सतत चालत असतात. पण मुसलमानाला फ्लॅट विकायचा नाही वा मुस्लिम भाडेकरू ठेवायचा नाही हा अलिखित नियम आहे. लोक तसे उघडपणे बोलतात. तसा प्रयत्न कोणी केल्यास सोसायटीचे कारभारी त्याच्यावर या ना त्या मार्गाने दबाव आणतात. तुम्ही एजन्ट बरोबर जागा विकत घेण्यासाठी म्हणून मुंबई च्या उपनगरात फिरलात, तर हा अनुभव हमखास येईल. एखादी सोसायटीचे गुणगान गाताना, ती कशी मोक्याच्या जागी आहे, मार्केट, हायवे, स्टेशन कसे जवळ आहे याच बरोबर – ‘नो एम फॅक्टर’ हा गुण आवर्जून सांगितला जातो. नो एम फॅक्टर म्हणजे इथे कोणीही मुसलमान कुटुंब राहत नाही\nमाझ्या मुलीचे मित्र-मैत्रिणी अशाच सोसायट्यांमधून राहतात. यातले काही जण तर फक्त गुजरात्यांच्या किंवा फक्त जैनांच्या अशा सोसायट्यांमध्ये राहतात. तिची एक मैत्रीण गौड सारस्वत ब्राह्मणांच्या सोसायटीत राहते. तिथे तर या ब्राह्मणांमधील विशिष्ट मठ मानणाऱ्यांनाच प्रवेश आहे अशी बोलवा आहे.\nहे बहुतांश पालक उच्च मध्यमवर्गीय व व्यावसायिक आहेत. त्यांचे विचार हे हिंदुत्ववादाला अनुकूल असावेत असे त्यांच्याशी सहज बोलले तरी लक्षात येते. मुस्लिमांविषयी त्यांची मते काय असतील याचा तर्क करता येऊ शकतो.\nया मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे. आणि अशा व्यक्तिरेखा व त्यांचा परिसर सध्या प्रचलित इंग्रजी साहित्यात आहे असे मला वाटत नाही.\nही मुले इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी टीव्ही मालिका पाहतात. पण त्यातल्या कौटुंबिक मालिकांमध्ये चुकूनसुध्दा मुस्लिम पात्र नसते. ऐतिहासिक मालिकांमध्ये मुस्लिम असतात. पण त्यांचे चित्रण खलनायक म्हणूनच असते. त्याविषयी वेगळे कधी तरी बोलायला हवे.\nही मुले, अर्थातच, हिंदी सिनेमे पाहतात. त्यात त्यांचे आवडते हे रॉमकॉम किंवा हलकेफुलके रोमॅंटिक असतात. बहुतेकदा त्यातील पात्रांना आडनाव नसते. आणि त्यांची नावे सिद, राज, करण अशी असतात. ती हिंदू असावीत अशा रीतीने वागतात.\nया मुलांना सर्वसामान्य मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही साधेसुधे तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ्या बुरख्यातील मुली-महिला आणि मशिदीमधून कानावर पडणारी बांग यातूनच त्यांना मुस्लिमांचे अस्तित्व जाणवत असावे.\nमुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.\nआता या कडेकोट बंदोबस्ताच्या विरुध्द बाजूने होणाऱ्या माऱ्याचे चित्र पाहा.\nवृत्तपत्रे व टीव्हीच्या बातम्या यामध्ये सदैव काश्मीर आणि पाकिस्तानची चर्चा चालू असते. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे हे तर भारतातल्या प्रत्येक मुलाला आपोआप ठाऊक असतेच. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या मुसलमान असण्याचा संबंध ठळक होतो.\nकाश्मिरी लोक मुसलमान आहेत व त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करतात.\nयांच्या जोडीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसिस किंवा तालिबानी दहशतवाद आला आहे.\nया सर्व बातम्या ही मुले बारकाईने वाचता-पाहतात असे नव्हे. त्या त्यांच्यापर्यंत वरवरच पोचत असण्याची शक्यता अधिक. पण त्यामुळेच उलट त्यातील गुंतागुंतीपासून ते लांब असतात. मुसलमान म्हणजे दहशतवाद अशी सोपी समीकरणे रुजायला जमीन तयार होते.\nगेल्या दोन वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. गोहत्या बंद करणे, गोमांसावर बंदी घालणे, धर्मांतराला अटकाव करणे किंवा हिंदूंना पुन्हा धर्मात घेणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे, वंदे मातरम, अयोध्येत राम मंदिर उभारणे, देशात समान नागरी कायदा आणणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, मुस्लिम महिलांना तोंडी तलाकपासून वाचवणे इत्यादी…. अशी विषयांची यादी आहे.\nहे विषय एकामागून एक आवर्ती पध्दतीने पुन्हापुन्हा येत राहतात. मुसलमान नावाच्या एका गटाच्या नाठाळपणामुळे हे विषय उद्भवले आहेत आणि त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असा संदेश त्यामुळे दृढ होतो.\nलहान मुलांच्या कार्टूनमध्ये अडाणी, हेकट आणि जाडा असलेला एक खलनायक असतो. उदाहरणार्थ छोटा भीममध्ये कालिया किंवा डोरेमॉनमधला सुन्यो. प्रत्येक भागात त्याला शिक्षा करणे आवश्यक ठरते. आपल्या देशातले राजकारण ही एक राजकीय महामालिकाच चालू आहे. त्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये कारण बदलत राहते पण खलनायक एकच राहतो – मुसलमान. त्याला कोंडीत पकडून शिक्षा आवश्यक ठरते.\nमुलांपर्यंत यातील सर्वच तपशील पोचत असतील असे नव्हे. किंबहुना ते पोचले नाहीत तरच बरे असतात. कार्टूनच्या पातळीवरच त्यांचे आकलन राहिले तर अधिकच बरे असते.\nएकीकडे मुसलमान नावाच्या माणसाला कधीही पाहिलेले नसावे वा त्याच्याशी कधीही संबंध नसावा…. दुसरीकडे मुसलमान हा मागास, शत्रू, खलनायक इत्यादी सर्व काही असल्याचे येता जाता ऐकायला व पाहायला मिळावे…\nयामुळे ते ऐकणाऱ्या-पाहणाऱ्याचे काय होईल याची कल्पना कोणालाही करता येईल.\nपुण्यातले एक जुने उदाहरण आठवले. 1984-85 च्या आसपास अयोध्येत राममंदिरासाठी विटा जमा करण्याचा उद्योग विश्व हिंदू परिषदेने नुकताच सुरू केला होता.\nपुण्याच्या कॉलेजांमधील तरुण त्यात सामील होऊ लागले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्रास मुसलमानांविरोधात विष ओकले जात असे. पण त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी बहुसंख्यांचे आयुष्य सदाशिव,नारायण, शनिवार पेठेच्या पलिकडे गेले नव्हते. त्यांचा कधी कोणा मुसलमानाशी असा वा तसा संबंध आल्याची शक्यता देखील नव्हती.\nसर परशुरामभाऊ नावाचे प्रसिध्द कॉलेज आहे. त्यात मुस्लिम सोडाच ब्राह्मणेतर मुलेसुध्दा कमी संख्येने होती. ज्या सदाशिवरावभाऊच्या नावाच्या पेठेत ते होते तो निदान पानपतावर गेला होता. पण ही मुले स्वारगेटच्या पलिकडे घोरपडी पेठेत सुध्दा कधी गेली असण्याची शक्यता नव्हती. तरीही मुसलमानांविरुध्द त्यांची मते मात्र अत्यंत ठाम होती.\nविशिष्ट प्रकाराने केल्या गेलेल्या प्रचाराचा हा परिणाम होता. नंतर यांच्यातील काही जण अयोध्येत मशीद पाडायच्या वेळेस चीअरबॉईज म्हणून गेले असे म्हणतात. त्यातूनच पुढे देश पेटला. कायमची जखम झाली.\nसध्या माझ्या डोळ्यापुढे असलेल्या शाळेतील मुलांबाबतीत पुन्हा हे घडते आहे.\nअसेही म्हणता येईल की, मुंबईतील बहुसंख्य मुलांच्या बाबत हे घडत आहे.\nकिंबहुना, महाराष्ट्र आणि देशातील असंख्य शाळां-कॉलेजांमधील मुलांबाबतही बहुधा हे घडते आहे.\nकिंबहुना, शाळेच्या बाहेर असलेल्या बहुसंख्य लोकांबाबतही हेच घडते आहे. अतिशियोक्ती करून बोलायचे तर असेही म्हणता येईल की भारतीय समाजात लैंगिक गोष्टींचे ज्ञान मुलांना जसे सांगोवांगीच्या गोष्टीतून, चोरीछुप्या पध्दतीने वा अतिरंजित स्वरुपात मिळते त्याच आडवळणी आणि विकृत रीतीने मुसलमान या विषयाबाबत बहुसंख्य हिंदूंची माहिती आणि समज घडत जाते. (त्यातून बचावतात ते सुदैवी.)\nकिंबहुना, असेही म्हणता येईल की, मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी असे म्हणणाऱ्या ट्रम्पला उचलून धरणारे सुजाण अमेरिकी आणि बोरीवलीतल्या शाळेतील अजाण मुले यांच्यात काहीच फरक नसतो.\nखैर, अमेरिकेतले तूर्तास बाजूला ठेवू. पण आपल्या देशातील लोकांची समज आपल्याला सुधारून घेता येणे शक्य आहे.\nपूर्ण देशाचेही जाऊद्या. सध्या महाराष्ट्रापुरते बोलू. या राज्यातील चिपळूण, कोल्हापूर, धुळे, परभणी किंवा अमरावती अशा विविध ठिकाणच्या मुस्लिमांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांच्यातल्या तरुण, मुले-मुली, महिला, शेतकरी, कारागीर इत्यादींचे मानस काय आहे, त्यांचा काय शिकण्याकडे अधिक कल आहे याचे दर्शन आज कोणत्याही माध्यमांमधून आज घडत नाही.\nतलाक, मुस्लिम आरक्षण किंवा अयोध्येचा प्रश्न निर्माण झाला की, शहरातील मंडळी पटापट आपापल्या भूमिका घेऊन मोकळे होतात. पण या प्रश्नावर गावागावातील मुस्लिमांचे म्हणणे काय आहे हे पुढे येत नाही.\nगोहत्या बंदीच्या प्रश्नाबाबत मालेगाव किंवा अकोल्यात जाऊन मुस्लिमांसोबतच्या चर्चेचा कार्यक्रम करावा असे आपल्या मराठी वाहिन्यांना वाटत नाही. तशी गरज त्यांना जाणवत नाही.\nउर्दू भाषा, मदरसे इत्यादीबाबत जागोजागची स्थिती काय आहे याबाबत क्वचितच वृत्तांकन होते.\nनवीन आर्थिक धोरण, आयटी क्रांती, भाजपचे सत्तेत येणे यांचा मुस्लिम समाजावर काय परिणाम झाला आहे याबाबत एकही लेख कोणी लिहित नाही वा तशी बातमी टीव्हीवर दिसत नाही.\nआपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. मोदींच्या आगमनानंतर इथल्या मुस्लिमांना प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक न्यूनगंड यावा अशी स्थिती आहे. किंबहुना, भाजपची तशीच इच्छा आहे. या अवस्थेची पुसटशी छायादेखील आपल्या माध्यमांमधील चर्चा किंवा कलाकृती इत्यादींमध्ये दिसत नाही.\nउत्तर प्रदेशातील रोजचे थैमान आणि फुत्कार यामुळे इथल्या मुस्लिम तरुण-तरुणींची स्थिती अत्यंत बिकट होत असली पाहिजे. त्यांच्या दैनंदिन झगड्यांचे प्रतिबिंब आपल्या समाजव्यवहारांमध्ये कुठेच पडताना दिसत नाही. हे बदलण्याची गरज आहे.\nत्यासाठी वर जे जे होत नाही असे म्हटले ते ते करण्याची गरज आहे.\nमाध्यमे, विविध संघटना आणि मुस्लिम तरुण तरुणीं यांनी ते केले पाहिजे. नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे.\nलेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.\nमोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीची तीनवर्षे\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\nजशी दृष्टी तशीच सृष्टी 🙂 खैर, दोष आपका नहीं आपकी नफरतोंसे भरी परवरिश का हैं 🙂 खैर, दोष आपका नहीं आपकी नफरतोंसे भरी परवरिश का हैं \nमुलांचे सोडा, सर तुम्ही व्यक्तीश: प्रयत्न करून पहिला आहे का माझा अनुभव असा आहे की मुख्य प्रवाहात येण्यासाठी मुस्लिम मित्रांनी स्वतः विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत पण तसे होताना दिसत नाही. प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्त्रियांचे सार्वजनिक आयुष्य. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात माझे मित्र कुटुंबा सोबत येतात पण मुस्लिम मित्र बऱ्याचदा एकटाच येतो. याउलट मुस्लिम मित्रा कडे कुटुंबा सोबत गेल्यावर स्त्री पुरुष विभागणी होते हा अनुभव आहे. मोठ्यांची ही गत तर लहानांचा विचारच नको. यामुळे विशेष प्रयत्नांची गरज आहे.\nबरोबर आहे सर तुमच मुसलमान धार्मीक दबावा खालीच जगत असतो हे मान्य परंतु तो सामाजिक नाही अस समजुनका. जर १९९२ आगोदर व त्या नंतर ची सामाजिक परस्थितीतील बदलांचा अभ्यास करा त्यात राजकीय, प्रशासकीय , न्यायालयीन यांच्या भूमिकांचा पन विचार करा . अस्या परिस्थितित अविश्वास व असुरक्षितते च्या भावनेत वाढ होनार की नाही \nमोदी आत्ता आले . ६० वर्षे गांधी , नेहेरू राज्य करीत होते . त्यांनी तर ६० वर्षे हिंदूंचे अपमान करत मुस्लीम तुष्टीकरण केले . मग हा मुसलमान मुख्य प्रवाहा पासून लांब का राहिला मोदी आल्या नंतर फालतू तुष्टीकरण बंद झाले हे साठ्यांच्या पोटात दुखतेय का मोदी आल्या नंतर फालतू तुष्टीकरण बंद झाले हे साठ्यांच्या पोटात दुखतेय का कि पत्रकाराने असेच लीहाहायचे असतेका \nलेख अप्रतिम आहे, ह्या विषयावर अधिक जागृती हवी सर, माझे स्वतःचे 3,4 मित्र आहेत शाळेपासून, पण मला ते कधीच वेगळे वाटले नाहीत. धन्यवाद\nचंद्रकांत पाटील 11 months ago Reply\nमुस्लिम समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती चे यथार्थ चित्रण करून एक उत्कृष्ट वैचारिक लेखन केले बद्दल मनापासून धन्यवाद\nसाठे सर…आपण मानवतावाद आणि विवेकाचा अँगल धरून एका राक्षसाची गोष्ट सांगितली म्हणूनच ती राइटच आहे…हजारो वर्षांपासून आपल्या देशात शुद्र,दानव,राक्षस म्हणून कत्तली चालू आहेत…त्यांच्या कत्तलखान्यात नवीन राक्षसाची भरती झाली आहे इतकंच…कत्तलीच तत्वज्ञान तयार करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही…गरज आहे ती सर्व राक्षकांनी एकत्र येण्याची…\n*हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम वो क़त्ल भी करते है तो चर्चा नहीं होता\nसाठे जी आपन मुस्लिम समाजा बद्दल केलेले लिखाण वास्तवाला धरून आहे. Muslim समाज बद्दल ज्या भ्रामक संकल्पना आज जिवंत आहे त्याचे अतुलनिय वास्तववादी वर्णन आपण केले आहे..इतिहासाचा विपर्यास करुन् सुरवाती पासूनच मुस्लिम सामाजाला खलनायक रूपाने प्रस्तुत करण्याचे काम काही कथित उच्चवर्नियांनी मोठया शिताफिने केले आहे जो पर्यन्त या देशात डॉ बाबा साहेबांच्या संविधानाचे निरपेक्ष न्याय प्रणाली चे अस्तित्व आहे तो पर्यन्त समाजात दुफळी माजवणाऱ्ऱ्यांचे अधिराज्य कधीही येणार नाही जो पर्यन्त या देशात डॉ बाबा साहेबांच्या संविधानाचे निरपेक्ष न्याय प्रणाली चे अस्तित्व आहे तो पर्यन्त समाजात दुफळी माजवणाऱ्ऱ्यांचे अधिराज्य कधीही येणार नाही आपण अतुल्य लेख लिहिल्या बद्दल आपले मनापासून अभिनन्दन आपण अतुल्य लेख लिहिल्या बद्दल आपले मनापासून अभिनन्दन\nएकांगी लेख आहे, काश्मीर मध्ये जेवढे ,मुस्लीम आहेत त्या ठिकाणी सर्व हिंदू ठेऊन पहा, आज काश्मीर अस्थिर दिसला नसता माझ्या वर्गात ३-४ मुस्लीम मित्र होते ते सगळ्यांमध्ये कधीच मिसळत नवते, काय अडचण होती माझ्या वर्गात ३-४ मुस्लीम मित्र होते ते सगळ्यांमध्ये कधीच मिसळत नवते, काय अडचण होती अर्थातच कॉलेज मध्ये कोणी दुजाभाव करण्याचा प्रश्नच नव्हता उलट बाकी लोकं त्यांना सगळ्यांशी बोलायला भाग पडायचे तरीपण ते कधी म्हणावं असं मिसळले नाहीत.\nतुम्ही स्वतः मुसलमानांची मानसिकता अनुभवली आहे का मदरसांमध्ये काय शिकवतात हे पहिले आहे का मदरसांमध्ये काय शिकवतात हे पहिले आहे का मुसलमान बहुल भागात हिंदूंबद्दल काय धोरण असते हे अनुभवले आहे का मुसलमान बहुल भागात हिंदूंबद्दल काय धोरण असते हे अनुभवले आहे का त्याचे कोणतेही प्रतिबिंब या लेखात नाही.\nआपने कौनसे मदरसोंमें दाखिला लिया हैं जनाब कभी व्हिजीट भी किएं हो कभी व्हिजीट भी किएं हो बस सुनी सुनायी बातें और दिल आपके मैलें बस सुनी सुनायी बातें और दिल आपके मैलें जरा अपने दिल के मैल भी साफ करना\nराजेंद्र साठे सर ,\nअत्यंत वास्तववादी लिखाण आपण केले आहे …\nआज जी परस्थिती निर्माण होत आहे ती फक्त मुबंई पुरता मर्यादित न राहता ,छोट्या शहरां पर्यंत पसरू लागली आहे …मुस्लिम एका बाजूला आणि इतर धर्म एका बाजूला पाडण्यासाठी जणू अघोषित पद्धतीने षडयंत्रच सुरू आहे . असे सष्ट दिसत आहे .. देशात असो किंवा जगात कोठेही दहशतवादी कारवाई झाली की .. भारतातल्या मुस्लिमाकडे तुम्ही पण त्या मध्ये सहभागी आहात अश्या नजरेने पाहिले जाते..आणि तसाच दृष्टिकोन मुस्लिमांच्या बाबतीत ठेवण्याचा एक कलमी उद्योग तरूण पिढी मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे…आणि यामधून भारत मध्ये या घटना वाढीस लागत आहेत असे मला वाटते ..पण या सर्व गोष्टींना केवळ कट्टर हिंदुत्ववादीचे जवाबदार नसून मुस्लिम समाजातील नेते , कट्टरपंथीयही तितकेच जवाबदार आहेत .. हे अगदी शंभर टक्के खरे आहे ..\nउत्कृष्ट लेख आहे. अतिशय वास्तववादी मांडणी केली आहे. जे खरे आहे तेच मांडले आहे. एकूणच अतिशय बेजबाबदार विधाने विशेषतः मुस्लिमाबद्दल होत असतात. याचे खरोखर वाईट वाटते. आपला देश सर्वांना एकत्र घेतले नाही तर कधीही प्रगती करणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.\nश्री साठेंचा लेख सुन्दर आहे. मुस्लिम समाजाने संकोच सोडून ‘भारतीय प्रवाहात’ मिसळणे ही काळाची गरज आहे. बरेचदा अनुभवलं आहे, रामकृष्ण आश्रम, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वधर्म परिषद वा परिसंवाद आयोजित करतात. मुस्लिम वक्ता हमखास inveriably सर्वप्रथम बोलण्याचा आग्रह धरतात, व दुसरा वक्ता बोलण्या आधीच, कामांचं निमित्त सांगून, व्यासपीठावरुन पळ काढतात. ह्याचा अर्थ एवढाच की दुस-यांचं कांहीं ऐकणं नकोय् . भारतीय मुस्लीम समाजाने आपलं वर्तुळ विस्तारायला हवं.\nगावोगावी पूर्वीपासून सर्व धर्माचे लोक एकत्र रहात. सगळ्या सणात सामिल होत. यांच्यात फूट कोणी पाडली अर्थातच राजकारण्यांनी. त्यांच्या संकुचित आणि स्वार्थी व्रुत्ती मुळे आज समाज विभागला गेला.\nअप्रतिम लेख है Sir, मै पूरीतरह से सहमत हु की मुस्लिमो की प्रतिमा वास्तव मे कम पर कल्पना में ज्यादा ख़राब कर के रखी है. उन्हें ऐसा बना के रखा है की वह बहुत ही कट्टर होते है, सभी लोगो का द्वेष करते है.\nपर जो कहते है काफिरो को मारो, और जो कहते है मुल्लो को मारो, वो दोनों एक ही हुवै पर अब स्तिथि ऐसी हो गई है की काफिरो को मारो वाला आतंकी है और मुल्लो को मारो कहने वाले देश प्रेमी पर अब स्तिथि ऐसी हो गई है की काफिरो को मारो वाला आतंकी है और मुल्लो को मारो कहने वाले देश प्रेमी पर वास्तव में दोनों इस दुनिया के लिये ख़राब है पर वास्तव में दोनों इस दुनिया के लिये ख़राब है ये में इस लिए कह सकता हु की, मेरी स्कूल की सारी पढ़ाई RSS प्रणीत स्कूल में हुई. में १२ तक संघ की शाखा में जाता रहा. पर संघ के कुछ कार्यक्रमों में जो मुस्लिमो का वर्णन किया जाता था, उसमे, और वास्तव में, वो मुझे कभी वैसे नजर नहीं आए\nमेरा बचपन जिस मोहल्ले में बिता वहां हिन्दुओं के ३, जैन का १ और मुसलमानों के १२ घर थे पर हमें वहा कभी कोई तख़लीफ़ नहीं हुइ यहाँ तक की बाबरी मस्जिद / राम मन्दिर के दंगो में भी हम बड़े आराम से रहे.\nजोपर्यंत धर्माचा (कुठल्याही) ‘पवित्र’ आणि ‘unquestionable’ status काढला जात नाही, तोपर्यंत या समस्या कदापि सुटणार नाहीत. फक्त monotheistic नाही, कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माबरोबर incompatibleचं असतो. प्रत्येकाला तो ज्या धर्मात जन्मला, तो धर्म Greatचं वाटतो.\nLogical thinking आणी humanity यांना, धार्मिक पुस्तकं किंवा ‘so called संस्कृती’ च्या वर preference दिला पाहिजे. धर्माचं obligation किंवा compulsion (स्वतः स्वतःवर लादलेलं सुद्धा) गेलं की, सर्व काही सुरळीत होईल. लहान मुलांवर (आणि मोठयांवरही) धार्मिक संस्कार आणि brain washing करणं बंद केलं पाहिजे. लोकं फक्त style म्हणुन दाढी किंवा शेंडी ठेवतील, तो शुभदिन. किंवा Meditation त्याच्या मानसीक फायद्यांसाठी करावे, उगाचं धर्माचा किंवा कुठल्या देवाचा संबंध त्यात लावु नये.\nथोडक्यात – solution निघणं almost impossible आहे, कारण सर्वचं धर्म उलटे मागे जात आहेत – कुणाला हिंदूराष्ट्र पाहिजे तर कुणाला शरीया.\nप्रमोद मुजुमदार 11 months ago Reply\nआपल्याच भोवतीचं आक्रमक आणि अंगावर येणारं वास्तव\nकधी वाटतं गरज आहे ती कृत्रिम वाटलं तरी मदरशांना मशिदींना भेटी देणं, हिंदूंना घेऊन इफ्तार मधे सामील होणे असे कार्यक्रम सुरू करायला हवेत.\nराजेंद्र साठेंचा लेख उत्तम\nसर तुमच्या लेखाचा आशय खरंच महत्वपूर्ण होता पण सगळीकडेच अशी परिस्थिती आहे असं काही नाही. मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालोय तिथे असे विचार पन आमच्या डोक्यात कधी येत नाहीत, कारण व्यवसायाने खाटीक असलेला युसुफभाई सकाळी 8 वाजता कधी कधी आमच्या हॉलमधील सोफ्यावर चहा पित असतो, आषाढी वारीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या दिंडीला चहा वाटण्याचं कामही त्यांच्यासारखेच अनेक जण करतात आमच्या इथे. रमजान च्या महिन्यात एक दिवस तरी उपवास सोडायच्या वेळेस आमच्या घरातील सर्व जण मशिदीमध्ये जाऊन विविध पदार्थ वाटतात. दिवाळी ला न चुकता मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासाठीही तेवढेच फराळाचे पदार्थ बनवले जातात. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या सर्व रूढी परंपरा मला माहित आहेत अगदी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत.\nआणि मला अभिमान आहे की मी अश्या सोसायटी मध्ये राहतो\n आपने सच्चायी से रूबरू करवाया ..लेकीन क्या करें कुछ लोग आज भी आंखोपे पट्टीयां बांधे हुए हैं I came across a very hostile reply “As Why are you saying keep praying ” कुछ लोग बेववजह भी काफी बार तुफान उठा देते हैं .. दिल के मैले लोग वही पढतें हैं जो वोह पढना चाहते है और फिर उसीको तोड मरोड के पेश करते हैं ‘ people only read or hear what they want to hear. यह संघीयोंकी घिनौनी मानसीकता हैं इस मुल्क के जख्मोंको नासूर करके हि दम लेगी ‘ Pray for our country \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://techbase.kde.org/index.php?title=Welcome_to_KDE_TechBase/mr&diff=78943&oldid=78941", "date_download": "2018-04-20T16:59:27Z", "digest": "sha1:PA63JQ7TEHZZIKZGRX3B6BPDUX6PMHCH", "length": 4713, "nlines": 93, "source_domain": "techbase.kde.org", "title": "Difference between revisions of \"Welcome to KDE TechBase/mr\" - KDE TechBase", "raw_content": "\nसहभागी व्हा केडीई टीम मध्ये व योगदान द्या]]\nसहभागी व्हा केडीई टीम मध्ये व योगदान द्या]]\n:ठिगळाचे योगदान द्या, संपर्कात रहा व समुदायात सहभागी व्हा.\n:ठिगळाचे योगदान द्या, संपर्कात रहा व समुदायात सहभागी व्हा.\n: ''संबंधित :'' [[विशेष:माझी-भाषा/धोरण |\nकेडीई विकास वातावरणाची स्थापना\nशिका कसे केडीई मिळवायचे , घडवायचे व चालवायचे.\nवर्ग पाठ | ई - पुस्तक | ए पी आय प्रलेखन | वारंवार विचारलेले प्रश्न आणि खूप काही .\nप्रकाशन अनुसूची आणि प्रमुख योजना | कोडरुपी योगदान व विकास दिशानिर्देश\nकेडीई तैनाती व्यस्थापन करणाऱ्या तंत्र प्रबंधकासाठी माहिती.\nसहभागी व्हा केडीई टीम मध्ये व योगदान द्या\nठिगळाचे योगदान द्या, संपर्कात रहा व समुदायात सहभागी व्हा.\nकेडीई चे परियोजना धोरण | रक्कम दान करा\nस्वतंत्र सौफ्टवेयर विक्रेत्यांसाठी विकासक माहिती.\nविविध केडीई परिजानांसाठी विकास विकी , कार्य सूची, आदी साठी लागेबांधे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/celebrities/", "date_download": "2018-04-20T16:13:03Z", "digest": "sha1:TJVYWW4U3D3SNWOUIJ4U7BYSTHKKON4W", "length": 9950, "nlines": 101, "source_domain": "khaasre.com", "title": "Celebrities Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nकथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची… 0\n८०० रुपये पगारावर काम करायच्या नीता अंबानी, लग्नासाठी मुकेश समोर होती हि अट..\nभारतातील सर्वात सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वायरल फोटोमागचे सत्य… 1\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत सावली प्रमाणे राहणारी ही महीला कोण\n१९ पेक्षा अधिक एन्काऊंटर करणारे भानुप्रताप बर्गे यांचा चित्तथरारक प्रवास… 0\nहमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी.. 0\nविश्वसुंदरी मानुषी छिल्लर तुम्हाला ह्या ९ गोष्टी माहिती आहे का \nया प्रश्नाचे उत्तर देऊन मानुषी छिल्लर बनली ६वी भारतीय मिस वर्ल्ड… 0\nआजपर्यंत ६२८ जन्मठेप व ३७ आरोपींना फाशी पर्यंत पोहचवणारे वकील उज्वल निकम… 1\nचित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/250-marathi-people-cheats-in-panvel/", "date_download": "2018-04-20T16:43:27Z", "digest": "sha1:CWVBEAGZZIMGTTWID2THEW2AKHSH5ZBW", "length": 16698, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "२५० मराठी माणसांची आठ कोटी रुपयांची फसवणूक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n२५० मराठी माणसांची आठ कोटी रुपयांची फसवणूक\nपनवेलनजीक सुकापूर येथील गृहप्रकल्पासाठी सुमारे २५० ग्राहकांकडून बुकिंग रकमेपोटी चार ते पाच लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतर बिल्डरने ही प्रकल्पाची जागा परस्पर दुसऱ्या बिल्डरला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या २५० ग्राहकांची सुमारे आठ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या विरोधाला डावलून दुसऱ्या बिल्डरने या ठिकाणी टॉवर्स काम सुरू केले आहे.\nशिरीष चव्हाण या बांधकाम व्यावसायिकाने २००९ मध्ये सुकापूर येथील गृहप्रकल्पासाठी सुमारे २५० ग्राहकांकडून बुकिंग रक्कम घेतली होती. मात्र पुढे त्याने गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी ग्राहकांची फसवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून चव्हाण याला अटक केली. त्यावेळी हा भूखंड विकून तुम्हाला तुमचे पैसे परत देतो, असे चव्हाणने सांगितले होते. मात्र त्याने तसे केले नाही. उलट हा भूखंड अग्रवाल बिल्डरला विकून टाकला.\n– सदरप्रकरणी कृष्णा मोरे यांच्यासह अन्य ग्राहकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी अग्रवाल बिल्डरने फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या बिल्डरने हात वर केल्यामुळे सर्व ग्राहक हवालदिल झाले आहेत.\n– एकीकडे बिल्डर ग्राहकांचे पैसे देत नाही आणि दुसरीकडे त्याच्या टॉवर्सचे बांधकाम वेगात सुरू झाले आहे. हे थांबविण्याची मागणी या ग्राहकांनी केली असली तरी त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडेव्हीड वॉर्नर-डी कॉकच्या धक्काबुक्कीचा नवा व्हिडीओ\nपुढीलहॉटेल-बारच्या शटर डाऊनमुळे, पोळीभाजी केंद्र, वडापाव स्टॉल हाऊसफुल्ल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/biggest-loss-real-estate-sector/", "date_download": "2018-04-20T15:55:54Z", "digest": "sha1:MUPT4ZP2UO3T7S3TLQRP4654M3PQSPHC", "length": 28638, "nlines": 370, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Biggest 'Loss' In The Real Estate Sector | नोटाबंदी : रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वात मोठा ‘तोटा’ | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nयवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nयवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन\nAll post in लाइव न्यूज़\nनोटाबंदी : रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वात मोठा ‘तोटा’\nनोटाबंदीने गृहनिर्माण उद्योगाचा कणा मोडला. गृहनिर्माण क्षेत्रातील अनंत अडचणींमुळे सदनिका खरेदी थंडावली. नवे प्रकल्प कागदावर आहेत.\nनोटाबंदीने गृहनिर्माण उद्योगाचा कणा मोडला. गृहनिर्माण क्षेत्रातील अनंत अडचणींमुळे सदनिका खरेदी थंडावली. नवे प्रकल्प कागदावर आहेत. अर्धवट प्रकल्प पूर्ण होत नाहीत. ‘आर्थिक मंदी’मुळे मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील घर खरेदी-विक्री थंडावली. मागील पंचवीस वर्षांत गृहनिर्माण उद्योग भरभराटीस आला. मात्र, मागील पाच वर्षांत त्याला अनंत अडचणींचा सामोरे जावे लागत\nदुसरीकडे ग्राहकांना दिलासा देणारी बाजू म्हणजे महारेरा. यामुळे ग्राहकांना वेळेत सदनिकांचा ताबा मिळणार आहे. मात्र, यासाठी पहिल्यांदा विकासकांच्या म्हणजे प्रकल्पांसमोरील अडचणी सुटणे महत्त्वाचे आहे. समस्या सुटल्या, तर निश्चितच प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि ग्राहकांना वेळेत सदनिकांचा ताबा मिळेल. घरांच्या किमती खालावल्या आहेत. मात्र, तरी ग्राहक घर घेण्यास उत्सुक नाहीत. कारण आजमितीस विचार करता, घरांच्या किमती आणखी खाली येतील, अशी आशा ग्राहकांना आहे. महारेरा, वस्तू आणि सेवा कर आणि नोटाबंदीने बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले चांगलेचे मोडल्याचे चित्र आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील अर्थकारण धिम्या गतीने सुरू आहे.\nगृहनिर्माण तज्ज्ञांच्या मते, नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू या\nशहरांतील घरांची विक्री मंदावली आहे. उर्वरित मेट्रो शहरांतही बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका बसू\nलागला आहे. दरम्यान, म्हाडा प्राधिकरणाने मागील काही वर्षांत सदनिकांची सोडत काढली. मात्र, आता घरांची निर्मिती करण्यासाठी भूखंड शिल्लक नाही. याचा\nपरिणाम म्हाडा सोडतीवर झाला. मागील दोन वर्षांपासून मे महिन्यात होणारी सोडत पुढे ढकलली जात आहे. या वर्षीची सोडत १०\nनोव्हेंबर असून सोडतीसाठी ८१९\nरिअल इस्टेटला गती नाही\nनोटाबंदीनंतर विकासकांनी लोकांकडून रोकड घेण्यास सुरुवात केली. घरांची विक्री अनौपचारिक झाली. आता महारेरा आणि जीएसटी आल्याने, काळ्या पैशाचे व्यवहार कमी झाले आहेत. अजूनही रिअल इस्टेट क्षेत्राला गती मिळाली नाीह.\n- रमेश प्रभू, ज्येष्ठ वास्तुविशारद\nरिअल इस्टेटमधील परिस्थिती जैसे थे आहे. ग्राहक वाढलेला नाही. महारेरा आल्याने या क्षेत्रात काही प्रमाणात का होईना पण सुधारणा होतील, अशी आशा आहे. कारण ग्राहक, विकासक कायद्याच्या चौकटीत आले आहेत.\n- सुरेंद्र मोरे, अध्यक्ष, मुंबई जिल्हा उपनगर को-आॅप. हौ. फेडरेशन लि.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘एनआरआय’द्वारे ‘काळा पैसा’ होतोय पांढरा\nतुमको भूला ना पायेंगे...\nनोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेस-भाजपा आमनेसामने, विरोधक आज पाळणार काळा दिवस\nअच्छे नव्हे, बुरे दिन आले.., सर्वसामान्यांची केंद्रासह राज्य सरकारवर बोचरी टीका\nनोटबंदीच्या धक्क्यातून सावरू लागले आर्थिक व्यवहार\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nउन्हाळ्यात मोटारसायकलवरून फिरा निवांत... एसी हेल्मेटने डोकं राहील कूssल \nप्रेयसीचा लग्नाला नकार... अन् त्याने पाच लाखांच्या नोटा पेटवून दिल्या\nकर्नाटकातील 'या' नेत्याची संपत्ती पाच वर्षांत 589 कोटींनी वाढली\nपरीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार\n दुभती गाय विकून महिलेने सुनेसाठी बांधलं शौचालय\nबिलिंग्स OUT; चेन्नईला चौथा धक्का\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/panditraj.jagannatha/word", "date_download": "2018-04-20T16:42:29Z", "digest": "sha1:ARDETRP5URYUWV57NR6TYPHWMAAUGK7J", "length": 10129, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - panditraj jagannatha", "raw_content": "\nनैमित्तिक पूजा म्हणजे काय\nपंडितराज जगन्नाथ - अंक पहिला\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक पहिला - प्रवेश पहिला\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक पहिला - प्रवेश दुसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nपंडितराज जगन्नाथ - अंक दुसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक दुसरा - प्रवेश पहिला\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक दुसरा - प्रवेश दुसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nपंडितराज जगन्नाथ - अंक तीसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक तीसरा - प्रवेश पहिला\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक तीसरा - प्रवेश दुसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nपंडितराज जगन्नाथ - अंक चवथा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.\nअंक चवथा - प्रवेश पहिला\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nअंक चवथा - प्रवेश दुसरा\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जात..\nस्त्री. वास ; घेतलेला , आलेला वास ; गंध . ( क्रि० काढणें ; घेणें ). हे कुत्रे हुंग काढते . हुंगणें - उक्रि . १ वास घेणें ; आघ्रात करणें . २ गुप्त गोष्ट मसलत इ० चा सुगावा काढणारा ; गुप्तपणें गुन्हे इ० शोधून काढणारा ; हेर ; गुप्तपोलीस .\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/03/blog-post_29.html", "date_download": "2018-04-20T16:42:51Z", "digest": "sha1:BEFHXCGQJLW2HEX6FKAXBVMANKM4GDPA", "length": 21264, "nlines": 206, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २५ मार्च २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २५ मार्च २०१५\n२५ मार्च : व. पु. काळे जन्मदिन\n६२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर\nपुरस्काराचे स्वरूप : सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी\nसर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - कोर्ट (दिग्दर्शन : चैतन्य ताम्हाणे)\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -किल्ला\nसर्वोत्कृष्ट बालचित्रपट - एलिझाबेथ एकादशी\nलोकप्रिय चित्रपट - मेरी कोम (दिग्दर्शन : उमंग कुमार)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता - विजय (कन्नड)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत\nसर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - हैदर\nस्पेशल ज्युरी अवॉर्ड - भाऊराव कराडे\nसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - क्वीन\nउल्लेखनीय चित्रपट - किल्ला आणि भूतनाथ रिटर्न\nसर्वोत्कृष्ट लघुपट - मित्रा (दिग्दर्शन : रवी जाधव)\nसवोत्कृष्ट दिग्दर्शन - श्रीजित मुखर्जी (चौतुसकौम)\nकेंद्र सरकारने देशातील १७ नव्या मेगा फूड पार्कचे वाटप केले आहे. यापैकी ७ फूड पार्क राज्यांना देण्यात आले आहेत, तर १० पार्क खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.\nमहाराष्ट्रात अहमदनगर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.\nमहाराष्ट्र (वर्धा, अहमदनगर), हरियाणा (सोनिपत, पानिपत), पंजाब (लुधियाना, कपूरथळा), मध्य प्रदेश (देवास), बिहार (बक्सर), गुजरात (कच्छ) याशिवाय केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दोन-दोन, तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक फूड पार्क बनणार आहे.\nहजारो रोजगार संधी : प्रत्येक फूड पार्कमध्ये ४० ते ५० युनिट असतील. यात ८० हजार लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना होईल.\n६००० कोटींची गुंतवणूक : फूड पार्क बनवण्यासाठी २०३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील ८५० कोटी रुपये केंद्राकडून मिळतील, तर प्रकल्प उभे करणाऱ्या कंपन्या सुमारे ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.\nनाबार्डचा निधी : देशातील प्रत्येक राज्यात मेगा फूड पार्क उभे करण्यासाठी नाबार्डने दोन हजार कोटी रुपयांचा विशेष निधी राखून ठेवला आहे. या निधीतून पार्कमध्ये आधुनिक सुविधा उभारण्यात येतील.\nआतापर्यंत ४२ मेगा फूड पार्कला मंजुरी : यातील २५ पार्कचे वाटप झाले आहे. इतर १७ वाटप आता झाले. हरिद्वार (उत्तराखंड), चित्तूर (आंध्र प्रदेश), तुमकूर (कर्नाटक) आणि फाजिल्का (पंजाब) येथील फूड पार्क सुरू झाले आहेत.\nफायदे : मेगा फूड पार्कमधून अन्न प्रक्रिया, शेतकरी, रिटेलर्स आणि निर्यातदार यांना विविध सुविधा मिळणार आहेत.\nअन्न प्रक्रिया उद्योगमंत्री - हरसिमरत कौर\nपर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे ‘टायलर प्राईझ’ या वर्षी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाले.\nत्यांच्यासोबत अमेरिकी सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन लुबचेन्को यांनाही हे पारितोषिक जाहीर झाले आहे.\nदोन लाख अमेरिकी डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nइंटरनॅशनल टायलर प्राईझ एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि अमेरिकेच्या साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.\nअमेरिका, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवर्धन आणि शाश्वत धोरणांच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल आणि त्यासाठी नेतृत्व केल्याबद्दल या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nरशियावादी बंडखोरांशी संघर्ष करत असलेल्या युक्रेनच्या सरकारला शस्त्रपुरवठा करण्याच्या निर्णयास अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने भरघोस बहुमताने समर्थन दर्शविले आहे. या संदर्भातील विधेयक लोकप्रतिनिधीगृहामध्ये ३४८/४८ अशा मतांनी संमत करण्यात आले.\nयुक्रेनमधील सरकार व बंडखोरांमधील संघर्षामध्ये ५४०० हून अधिक जण ठार झाले असून, सुमारे १५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. युक्रेनमधील रशियावादी बंडखोरांना शस्त्रे पुरविल्याचा रशियावर आरोप आहे.\nयाशिवाय, पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांच्या बाजूने रशियाचे सैन्यही लढत असल्याचे पाश्‍चिमात्य देशांनी म्हटले आहे. रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.\nराज्यातील दुचाकी चालकांकडे हेल्मेट असले तरच त्यांना पेट्रोल देण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश मध्य प्रदेश सरकारने काढले आहेत. यामुळे दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही.\nशियापंथीय हौथी संघटना व सरकार यांच्यामधील संघर्षाने जेरीस आलेल्या येमेनमधील राजकीय संकटातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने केली जाणारी राजनैतिक चर्चा कतारची राजधानी दोहा येथे केली जाणार आहे.\nयेमेनमधील सरकारने हौथींविरोधात आखाती देशांच्या संघटनेकडे (गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल) लष्करी साहाय्याची मागणी केली होती. या संघटनेमध्ये सौदी अरेबिया, बहारिन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांचा समावेश आहे.\nआयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी युनियन बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने रूपे प्रीपेड कार्ड सेवा सुरू केली आहे. याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले.\nत्यामुळे भारतीय रेल्वे प्रवासी आता रेल्वेची तिकीटे रूपे प्रीपेड कार्डच्या सहय्यानेही आरक्षित करू शकणार आहेत. सुरवातीला केवळ तिकीट आरक्षणापुरती असलेली ही सुविधा नंतर खरेदी आणि रेल्वेतील अन्य सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या देयकांसाठीही वापरता येणार आहे.\nव्हीसा आणि मास्टरकार्डप्रमाणेच “रूपे” ही भारतीय कार्ड पेमेंट सुविधा आहे. ती फक्त भारतातच वापरता येणार आहे. यासाठी ग्राहकाला युनियन बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही.\nही डेबिट कार्ड सेवा केवायसीच्या रूपात प्रथम १० हजार रूपये भरल्यानंतर वापरता येणार आहे. केवायसीची सर्व पूर्तता केल्यानंतर वर्षाला कार्डाची सीमा ५० हजार रूपयांपर्यंत वाढणार आहे.\nया सेवेला १ लाख रूपयांपर्यंत अपघात विमा संरक्षणही आहे आणि महिन्यातून ५ वेळा ही सेवा मोफत वापरता येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी १० रू शुल्क आकारले जाणार आहे.\nमहाराष्ट्रात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे.\nमहाराष्ट्र सरकारने सहा हजार कोटी रुपये मदतीची मागणी केली होती.\nमहापालिका क्षेत्रातील लाखो अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती : कुंटे समिती\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nप्रश्नसंच १५० - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ मार्च २०१५\nसोलर इम्पल्स – २\nचालू घडामोडी - २५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र\nप्रश्नसंच १४८ - भूगोल\nचालू घडामोडी - २४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४७ - इंग्रजी व्याकरण\nचालू घडामोडी - २३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४६ - मराठी व्याकरण\nचालू घडामोडी - २२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४५ - इतिहास\nचालू घडामोडी - २१ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १९ व २० मार्च २०१५\nबेटी बचाव बेटी पढाओ अभियान\nचालू घडामोडी - १७ व १८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४३ - सामान्यज्ञान\nचालू घडामोडी - १६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४२ - विज्ञान तंत्रज्ञान\nप्रश्नसंच १४१ - अर्थशास्त्र\nप्रश्नसंच १४० - भूगोल\nचालू घडामोडी - १४ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३९ - इतिहास\nचालू घडामोडी - १२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३८ - पर्यावरण\nप्रश्नसंच १३७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३६ - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - १० मार्च २०१५\nप्रश्नसंच १३५ - अर्थशास्त्र\nचालू घडामोडी - ९ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३४ - राज्यशास्त्र\nचालू घडामोडी - ८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३३ - भूगोल\nचालू घडामोडी - ७ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३२ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - ५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३१ - इतिहास\nचालू घडामोडी - ४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३० - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - ३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२९ - अर्थशास्त्र\nभारताचा आर्थिक पाहणी अहवाल २०१४-१५\nप्रश्नसंच १२८ - राज्यघटना\nचालू घडामोडी - १ व २ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२७ - भूगोल\nचालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१५\nप्रश्नसंच १२६ - इतिहास\nचालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vardha/knife-attack-young-man-gond-plot-area/", "date_download": "2018-04-20T16:11:56Z", "digest": "sha1:6GZOWDLCCWAXKARBZ6MRUBDYIRU65GKE", "length": 22241, "nlines": 340, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Knife Attack On A Young Man In The Gond Plot Area | गोंड प्लॉट परिसरात युवकावर चाकू हल्ला | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nगोंड प्लॉट परिसरात युवकावर चाकू हल्ला\nमध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून अज्ञात युवकाने चाकू हल्ला करून योगेश पुणेकर याला गंभीर जखमी केले.\nवर्धा : मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून अज्ञात युवकाने चाकू हल्ला करून योगेश पुणेकर याला गंभीर जखमी केले. ही घटना गोंड प्लॉट परिसरात गुरूवारी घडली. योगेश घरात झोपून असताना अज्ञात इसमाने घरात शिरून शरीरावर चाकूने वार केले. ही बाब त्याचे वडील हिरालाल त्यांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम ३२६, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपाणीदार हिवरा गावासाठी सरसावले शेकडो हात\nमुंगसाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने दहेगाव (मु.) झाले तीर्थक्षेत्र\nअत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’\nसेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही\n३३ जोडपी अडकली विवाह बंधनात\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=2961", "date_download": "2018-04-20T16:43:56Z", "digest": "sha1:VX22APTWNCBDZOTQFDOIYWK4WIEJSQR6", "length": 9912, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "कोसबाड : ग्राम बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन समारंभ संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » कोसबाड : ग्राम बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन समारंभ संपन्न\nकोसबाड : ग्राम बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन समारंभ संपन्न\nदि. 24 : नूतन बाल शिक्षण संघ संचलीत म बाल शिक्षा केंद्राचा 72 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी अरुणा एरंडे, महेश कारीया, ज्येष्ठ विधीज्ञ प्रकाश करंदीकर, दिनेश पाटील, संध्या करंदीकर, श्रीराम पटवर्धन, श्याम वाघ, चंद्रेश जोशी, अशोक पाटील आदी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यापक विद्यालयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विविध गौरवास्पद कार्य केल्याबद्दल पुरस्कार मिळाले अशा गुणवंत शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.\nPrevious: सर्वांनी लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही\nNext: मिशन भारतीय संविधान: 19 वे व्याख्यान संपन्न\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/interest/subject/investment-and-taxation", "date_download": "2018-04-20T16:21:20Z", "digest": "sha1:TQYG5KU4UKI3UQRDDWIWPVVMRTRS6V66", "length": 15769, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन विषय गुंतवणूक आणि कर आकारणी पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nडॉ. विनोद के. सिंघानिया\nअशी करा गुंतुवणूक असा वाचवा प्राप्तिकर\nकसे करावे व्यवस्थापत्र इच्छापत्र मृत्युपत्र\nअ‍ॅड वि पु शिंत्रे\nइन्कम टॅक्सविषयी सारे काही\nअसा आहे जीएसटी कायदा - स्वरूप व पूर्वतयारी\nकरोडपती - तुम्हाला श्रीमंती कडे नेणारा सरळ मार्ग\nआराम करा आणि श्रीमंत व्हा\nगुंतवणूक : एक आवश्यक आर्थिक नियोजन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-20T16:13:56Z", "digest": "sha1:4ITICE2F56KX7X66W3PY5E34GRWRTGGK", "length": 8327, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीडीआर प्रकरणी आयेशा श्रॉफ यांची चौकशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसीडीआर प्रकरणी आयेशा श्रॉफ यांची चौकशी\nमुंबई : बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढून त्याची विक्री केल्याच्या प्रकरणात गुरुवारी अभिनेता जॅकी श्रॉफ याची पत्नी आयेशा श्रॉफ यांची ठाणे गुन्हे शाखेने चौकशी केली. चार तासांच्या चौकशीत आयेशाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. या चौकशीत सीडीआर प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असली तरी गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, याच प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एका खासगी गुप्तहेराला अटक केली आहे.\nठाणे गुन्हे शाखा युनिट एकने बेकायदा सीडीआर खरेदी-विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करत आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये खासगी गुप्तहेरांसह पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याचेही नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी बोलावूनही त्याने अद्याप हजेरी लावलेली नाही. अॅड. रिजवान सिद्दिकी याच्या अटकेनंतर याप्रकरणाने नवे वळण घेतले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नामुष्की ओढवल्याने ठाणे पोलिसांना रिजवान यांना मुक्त करावे लागले.\nरिझवान यांच्या चौकशीत अभिनेता जॅकी श्रॉफ याची पत्नी आयेशा श्रॉफ यांचे नाव समोर आले. त्याच अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेने आयेशा यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. गुरुवारी सकाळी ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात आयेशा यांनी हजेरी लावली. पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी केली व जबाब नोंदवला. अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी अभिनेता साहिल खान याचा सीडीआर काढण्यात तिची मदत केल्याचे आयेशा यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअक्कासाहेबांची लाडकी ‘सून’ ‘मराठी बिग बॉस’मध्ये \nNext articleजाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाला खुनाची धमकी\nभिवंडीत शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला\nकुख्यात डॉन तात्या पटेलला अखेर अटक\nदाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nझाड अंगावर पडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\nनुकसानभरपाई वसुल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवा\nमेट्रो 3च्या कामासंदर्भात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/anushka-sharma-post-motion-poster-of-her-next-film-pari/articleshow/62443590.cms", "date_download": "2018-04-20T16:26:33Z", "digest": "sha1:2JU2HIVJRCHAAU2BTVUGVY27DWCEZAGD", "length": 22779, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Pari Movie:anushka sharma post motion poster of her next film pari | अनुष्काचं हे रूप पाहून विराटही घाबरून जाईल! - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nअनुष्काचं हे रूप पाहून विराटही घाबरून जाईल\nइटलीत शाही लग्न, फिनलँडमध्ये मधुचंद्र, दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन आणि नंतर केपटाउनचा दौरा, असा भरगच्च कार्यक्रम आटोपून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता नव्या जोमाने कामाला लागली आहे. अनुष्काने स्वतःचीच निर्मिती असलेल्या 'परी' या सिनेमाचं एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे. त्यातलं तिचं रूप आपल्याला घाबरवणारं आहेच, पण विराट कोहलीही तिचा हा भयंकर अवतार पाहून घाबरून जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.\n'होली विथ परी' असं या व्हिडिओचं शीर्षक आहे. त्यातील अनुष्का आपल्याकडे रोखून बघतेय. आपणही तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो आणि तिचा रक्तबंबाळ चेहरा पाहून हादरतो. या मोशन पोस्टरमध्ये एक रहस्य, थरार आहे. त्यामुळे 'परी'बद्दलची उत्सुकता चांगलीच ताणली गेलीय. येत्या २ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजान्हवीसाठी अर्जुननं वेबसाईटला सुनावलं\nवरुण धवनला भेटण्यासाठी 'ती' घरातून पळून आली\nराधिका आपटेची हॉलिवूडमध्ये एंट्री\n1अनुष्काचं हे रूप पाहून विराटही घाबरून जाईल\n2आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये मल्लिका रस्त्यावर...\n3निरुपा रॉयच्या मुलांमध्ये संपत्तीवरून 'दीवार'...\n4फराह खानच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू\n5ए. आर. रेहमान झाला सिक्कीमचा ब्रँड अॅम्बेसेडर...\n6विरुष्काला पुन्हा करावं लागणार लग्न...\n8'पद्मावत'ला राजस्थानचे दरवाजे बंदच...\n9मला आलियाची माफी मागायची आहे: करण जोहर...\n10'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/arrival-birds-bharatpur-maharashtra-record-19-thousand-birds/amp/", "date_download": "2018-04-20T16:04:33Z", "digest": "sha1:WG7CZCHFRAXU5XAWPAGLJBBK5DN2P6VG", "length": 4540, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The arrival of birds in Bharatpur of Maharashtra; Record of 19 thousand birds | महाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद | Lokmat.com", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद\nनाशिक : वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला चापडगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nअक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा\nगावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी\nपाहा काय आहे सीडीआर प्रकरण \nमुख्यमंत्र्यांचा आवाज काढून टोपी \nमुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत.\nकोल्हापूर- अजय-काजोल अंबाबाईच्या दर्शनाला\nकोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-egg-price-hike-abp-report-478164", "date_download": "2018-04-20T16:44:37Z", "digest": "sha1:2TQND4O6PPRPXUFYEN2733T7PGSPYIN6", "length": 15776, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : घाऊक बाजारात अंड्यांना उच्चांकी दर", "raw_content": "\nपुणे : घाऊक बाजारात अंड्यांना उच्चांकी दर\nजशी थंडी वाढू लागली, तशी बाजारातले अंड्यांचे दरही आता वधारायला सुरुवात झाली. आज पुण्यातल्या घाऊक बाजारात अंड्यांनी उच्चांकी दर गाठला. इथं शंभर अंड्यांची किंमत तब्बल 488 रुपये झाली. म्हणजेच घाऊक बाजारात तब्बल 5 रुपयांना एक अंड. आतापर्यंतचा पुण्यातला हा उच्चांकी दर आहे. घाऊक बाजारात 5 रुपयांना एक अंड मिळत असेल, तर किरकोळ बाजारात याचा दर आणखी वधारणार आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nपुणे : घाऊक बाजारात अंड्यांना उच्चांकी दर\nपुणे : घाऊक बाजारात अंड्यांना उच्चांकी दर\nजशी थंडी वाढू लागली, तशी बाजारातले अंड्यांचे दरही आता वधारायला सुरुवात झाली. आज पुण्यातल्या घाऊक बाजारात अंड्यांनी उच्चांकी दर गाठला. इथं शंभर अंड्यांची किंमत तब्बल 488 रुपये झाली. म्हणजेच घाऊक बाजारात तब्बल 5 रुपयांना एक अंड. आतापर्यंतचा पुण्यातला हा उच्चांकी दर आहे. घाऊक बाजारात 5 रुपयांना एक अंड मिळत असेल, तर किरकोळ बाजारात याचा दर आणखी वधारणार आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90512", "date_download": "2018-04-20T16:54:04Z", "digest": "sha1:7OUVDXDBQ3AREY7FOXKZZDCWYU5KDHYT", "length": 13908, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash पुणे जिल्ह्यात ‘रास्ता रोको’, मोर्चे | eSakal", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यात ‘रास्ता रोको’, मोर्चे\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nदौंड शहर आणि भवानीनगर येथे किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात अन्यत्र शांततेत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे काही किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.\nखेड शिवापूर ‘रास्ता रोको’\nखेड शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावर खेड शिवापूर (ता. हवेली) येथील बंगला चौकात हवेली, भोर, वेल्हे येथील भीम सैनिकांच्या वतीने बुधवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे पुणे- सातारा रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.\nदौंड शहर आणि भवानीनगर येथे किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात अन्यत्र शांततेत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे काही किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.\nखेड शिवापूर ‘रास्ता रोको’\nखेड शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावर खेड शिवापूर (ता. हवेली) येथील बंगला चौकात हवेली, भोर, वेल्हे येथील भीम सैनिकांच्या वतीने बुधवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे पुणे- सातारा रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.\nमंचर : जाळपोळ व दगडफेक करणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच घटनेचा निषेध केला.\nबारामती - शहरात आज कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या मोर्चास अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. एसटीने आपली सेवा बंद ठेवली होती.\nजुन्नरला बंद व ‘रास्ता रोको’\nजुन्नर - जुन्नर येथे आंबेडकरवादी संघटनांनी निषेध मोर्चा काढून नवीन एसटी बस स्थानकासमोर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. व्यापाऱ्यांनी बंद पाळला. शासकीय, निमशासकीय कार्यालये, बॅंका, शाळा, महाविद्यालये यांचे कामकाज सुरू होते. बाजारपेठा बंद होत्या.\nभवानीनगर - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी शांततेत सुरू झालेल्या बंदला बाहेरून आलेल्या आंदोलकांमुळे हिंसक वळण लागले. अकलूज डेपोच्या बसच्या काचा या आंदोलकांनी फोडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, आज सणसर, भवानीनगर, बेलवाडी, जाचकवस्तीसह आदी सर्वच भागांत बंद पाळण्यात आला.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:46:15Z", "digest": "sha1:TKNCHIZPV2LSZHMNPENMLJJ7K63NBUIZ", "length": 4471, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीप्रिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nश्रीप्रिया ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९७०च्या आणि १९८०च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटांतून भूमिका केल्या. यांत २०० तमिळ चित्रपट तसेच तेलुगू, कन्नड आणि मल्याळी भाषेतील ३००पेक्षा अधिक चित्रपटांचा समावेश आहे.\n२ पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण\nपार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/2/", "date_download": "2018-04-20T16:41:34Z", "digest": "sha1:BK4WYS64HBIACNFRB26QYURMVH67OZD5", "length": 18393, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी तयार केले मोबाईल अ‍ॅप\n कर्जत दुर्गम भागातील बंडगरवस्ती शाळेतील मुलांचे शिक्षणाचे अद्ययावत ज्ञान पाहून सर्व पाहुणे चकित झाले. या शाळेच्या मुलांनी स्वत: मोबाईलवर अ‍ॅप्स तयार केलेले...\n‘हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करू नका’ असं सांगणाऱ्या पोस्टरची दहशत\nपंकज तिवारी, ठाणे हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करू नका, हा इसिसचा ग्रुप आहे, असं सांगणाऱ्या एका व्हायरल पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पोस्टर...\nघोडबंदर रोडवर केमिकल वाहून नेणारा ट्रक पलटी\n ठाणे केमिकल वाहून नेणार एक ट्रक ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख गावाजवळ पलटी झाला. यामुळे घोडबंदर रोडवरील एका मार्गाची वाहतूक काही काळासाठी ठप्प...\nकर्जतमधील महाविद्यालयात भविष्य निर्वाह निधीचा ८७ लाखांचा अपहार\n कर्जत कर्जत तालुक्यातील चांदई येथे असलेल्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व ट्रस्टी यांनी संगनमताने भविष्य निर्वाह निधीचा सुमारे ८७ लाख रुपयाचा अपहार...\nमराठमोळी ‘गोल्डन गर्ल’ मधुरिकाचा ठाण्यात सत्कार\n ठाणे राष्ट्रकुल स्पर्धेतील हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघानं सिंगापूरच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. महाराष्ट्रातील मराठमोळी मधुरिका पाटकर-तोरगळकर हिने देखील हिंदुस्थानच्या...\nनाल्यात बुडणाऱ्या तरुणाचे बघ्यांनी केले ‘लाइव्ह शूटिंग’\n कल्याण सोशल मीडियाच्या फॅडने अवघ्या २० वर्षांच्या तरुणाचा बळी घेतल्याची घटना आज कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर घडली. धावत्या लोकलमधून नाल्यात कोसळलेल्या तरुणाचा बुडून जीव...\nबनावट रॉयल्टीच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक, आरोपीला ३ वर्षाची शिक्षा\n न्हावाशेवा बनावट रॉयल्टीच्या (स्वामित्वधन) पावत्या बनवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी उरण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.बी. चव्हाण यांनी सतिश रामचंदर घरत याला ३...\nडोंबिवलीत स्फोटकाच्या २९९ कांड्या जप्त, दोघांना अटक\n कल्याण डोंबिवली जवळील खोणी गावातून दोघा इसमांकडून स्फोटकाच्या कांड्या जप्त करण्यात आल्या. अशोक ताम्हाणे आणि मारुती धुळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची...\nमुंब्रा बायपासची दुरुस्ती उशिराने, वाहन चालकांना २ दिवसांचा दिलासा\n ठाणे मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम २ ते ३ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी यंत्रणेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने हा...\nकल्याण, डोंबिवली स्थानकांची दुरवस्था, रेल्वे प्रवासी काढणार मूक मोर्चा\n डोंबिवली मध्य रेल्वेला महसूल देण्यात आघाडीवर असलेल्या डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा...\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/kopardi-accused-lawyer-threat-on-phone/", "date_download": "2018-04-20T16:41:22Z", "digest": "sha1:X2MRZE5H7CNDBYFSSE7NVQDFLH6LHECO", "length": 9305, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त दै. लोकमत ने दिले आहे . आहेर यांनी युक्तिवाद करताना दोषीच्या कुटुंबाचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ही धमकी मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे दै. लोकमत ने म्हटले आहे. ऍड. आहेर यांनी यासंदर्भात याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे\nदरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावली जाण्याची शक्यता आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.\nमुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष निश्चित करण्यात आला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत . त्यामुळे ह्या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होऊ शकतो.\n२२ नोव्हेंबरलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व आरोपी संतोष भवाळ याचे वकील आपली बाजू मांडतील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.मात्र फाशी कि जन्मठेप कोणत्या शिक्षेची मागणी करणार हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. तर आरोपींच्या वकिलांकडून आरोपीच्या जबाबदाऱ्याचा विचार करून कमी शिक्षा देण्याची मागणी केली जाईल.\nमात्र आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते.कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत. तिसरा आरोपी संतोष गोरख भवाळ (वय 30, रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी) याच्या वतीने उद्या (ता. 22) बाजू मांडण्यात येणार आहे. तसेच सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम शिक्षेवर युक्तीवाद करतील . त्यानंतर दुपारी आरोपीला शिक्षा देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nकोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले : कोपर्डी अपहरण व खून खटला\n छकुलीची आई काय म्हणते : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← लोकांना फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम \nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/all-party-corporators-held-against-nagaradhyaksha-in-yeola/", "date_download": "2018-04-20T16:34:11Z", "digest": "sha1:GG4AV6LWL6BGT5VOOROL25XLM2P4NJ6C", "length": 17005, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "सर्वपक्षीय नगरसेवकांचे धरणे आंदोलन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nसर्वपक्षीय नगरसेवकांचे धरणे आंदोलन\nसत्ताधारी भाजपवर येवला नगरपालिकेत नामुष्कीची वेळ आली. स्वपक्षासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्षांकडून विकासकामे होत नसल्याचा आरोप करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका कार्यलयासमोर ठिय्या देऊन धरणे आंदोलन केले.\nयेवला नगरपालिकेच्या राजे रघुजीबाबा संकुलातील सभागृहामध्ये गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी संतप्त नगरसेवकांनी विकासकामे होत नाहीत, नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी निधी का उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करतात काय असा सवाल गणेश शिंदे व पुष्पा गायकवाड या भाजपच्या नगरसेवकांनी करत घरचा आहेर दिला. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील रस्ताकामांच्या शासकीय अनुदानाच्या प्रस्तावांचे काय झाले याचेही उत्तर नगराध्यक्ष देऊ शकले नाहीत. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपचे गणेश शिंदे, पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला.\nसभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, प्रा. शीतल शिंदे परवीनबानो शेख, तेहसीन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख, नीता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिवसेनेच्या नगरसेवका किरण जावळे यांनी सहभाग घेतला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनगरचे भाजप खासदार दिलीप गांधींवर गुन्हा दाखल\nपुढीलघोटाळेबाजांच्या बंगल्यांमुळे अलिबाग चर्चेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2018-04-20T16:40:01Z", "digest": "sha1:6TQYKMIIOCL4AT3T737GWYYXRYYTHVJV", "length": 5042, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ३० चे - पू. २० चे - पू. १० चे - पू. ० चे - ० चे\nवर्षे: पू. १७ - पू. १६ - पू. १५ - पू. १४ - पू. १३ - पू. १२ - पू. ११\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/marathi-news-citizen-journalism-toilet-girls-lions-club-pune-rajendra-goyal-news", "date_download": "2018-04-20T16:41:20Z", "digest": "sha1:WO7GUJ6IS3AL2OL426TCGP3245B7GORC", "length": 12293, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Citizen Journalism toilet for girls lions club pune Rajendra Goyal news ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी स्वच्छता गृहाची उभारणी | eSakal", "raw_content": "\nग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी स्वच्छता गृहाची उभारणी\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे- 'लायन्स क्लब पुणे' विजयनगर तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन नामदेवराव मोहोळ विद्यालय, खांबोली, ता.मुळशी या ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली.\nया स्वच्छतागृहाचा हस्तांतरण सोहळा गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेडकर यांना हस्तांतरण पत्र सुपूर्द करण्यात आले. माजी प्रांतपाल अरुण शेठ, सचिव सुजाता गोयल, मिताली गुजर उपस्थित होते. अध्यक्ष पूर्णिमा शहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि आज जगामध्ये कानाकोपऱ्यात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट पोहचले आहे पण जीवनातील आवश्यक अत्यंत दैनदिन गरज असलेले मुलींचे स्वच्छता गृह नाही याचा त्रास नक्कीच मुलीना होत असणार या जाणीवेमुळे आम्ही येथे स्वच्छता गृह बांधून देण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छतागृहासाठी रक्कम रु.दीड लाख देणगीद्वारे उभे करण्यात आले. या वेळी बोलताना प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी सांगितले कि लायन्सच्या माध्यमातून आम्ही शेक्षणिक क्षेत्रात जेथे आवश्यक तेथे कार्य करत आहोत. मुलींना शिक्षण देणे हि काळाची गरज आहे. अरुण शेठ यांनी हे आम्ही ग्रामीण भागात उभारलेले 18 वे स्वच्छता गृह असून भविष्य काळात गरज असेल तिथे आम्ही हे बांधून देणार आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोयल यांनी केले.\nमच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह\nवणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत....\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\n'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय...\nभाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार\nचेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक...\n...म्हणून डॉ. कलामांच्या शाळेतील वीज कापली\nनवी दिल्ली : देशाचे 'मिसाइल मॅन' अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतील वीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90515", "date_download": "2018-04-20T16:57:09Z", "digest": "sha1:6C6NXAGNSBK7BVAPSSRICXGQPZN2D7ON", "length": 11613, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash chitranagari goregaon महाराष्ट्र बंद चित्रनगरीत शांतता | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्र बंद चित्रनगरीत शांतता\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nमुंबई - \"महाराष्ट्र बंद'चा फटका गोरेगाव येथील चित्रनगरीतील काही मालिकांच्या चित्रीकरणालाही बसला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या फिल्मसिटीत बुधवारी (ता. 3) शुकशुकाट होता; तसेच मल्टिप्लेक्‍स आणि एकपडदा चित्रपटगृहांतील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले होते.\nमुंबई - \"महाराष्ट्र बंद'चा फटका गोरेगाव येथील चित्रनगरीतील काही मालिकांच्या चित्रीकरणालाही बसला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या फिल्मसिटीत बुधवारी (ता. 3) शुकशुकाट होता; तसेच मल्टिप्लेक्‍स आणि एकपडदा चित्रपटगृहांतील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले होते.\nफिल्मसिटीसह अन्य काही ठिकाणचे चित्रीकरण बंद होते. मालाड-मढ येथील बंगल्यात काही ठिकाणी चित्रीकरण सुरू होते. मात्र, गोरेगाव येथील फिल्मसिटीकडे जाणारे रस्ते आंदोलकांनी अडवल्याने हिंदी आणि मराठी मालिकांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. फिल्मसिटीच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरात सुरक्षारक्षकांव्यतिरिक्त कोणीच फिरकले नाही. शहरातील अनेक चित्रपटगृहांतील मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांच्या शोसह दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणारा \"ढाई अक्षर प्रेम के' या नाटकाचा प्रयोगही रद्द करण्यात आला.\nठाण्यात सगळ्या मालिकांचे चित्रीकरण व्यवस्थित सुरू होते. सकाळी लवकरच कलाकारांनी चित्रीकरणाच्या दिशेने प्रवास केला होता. त्यापूर्वी कोणतेही \"रास्ता रोको' न झाल्यामुळे सर्व कलाकार वेळेवर चित्रीकरणाच्या ठिकाणी पोचले.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/new-zealand-batsman-blasts-a-six-off-the-bowler-s-head/", "date_download": "2018-04-20T16:39:35Z", "digest": "sha1:O2PVHGHMOUZIT6KHNMT2AZA5WKKZBEEI", "length": 16421, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "बॉलरच्या डोक्याला लागला आणि सिक्स गेला ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nबॉलरच्या डोक्याला लागला आणि सिक्स गेला \nन्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत फिलिप ह्यूज प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. या स्पर्धेतील एका सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर जीत रावलने तडाखेबाज शतक ठोकले. त्याने १५३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४९ धावा काढल्या. यावेळी फटकेबाजी करताना त्याने मारलेला एक ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ प्रतिस्पर्धी टीमचा बॉलर अॅण्ड्यू एलिसला डोक्याला चाटून गेला.\nजीत रावलने मारलेल्या या फटक्याचा वेग इतका जबरदस्त होता की डोळ्याचे पाते लवण्याच्या आत चेंडू एलिसच्या डोक्याला धडकून मैदानाच्या बाहेर गेला. या फटक्यानंतर रावलने तातडीने एलिसच्या दिशेने धाव घेत त्याची विचारपूस केली. एलिसनेही उपचारासाठी तातडीने मैदान सोडले. सुदैवाने एलिसला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे तो मैदानावर पुन्हा खेळण्यासाठी परतला.\nऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजेसला २०१४ मधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यात हूक करण्याच्या प्रयत्नात चेंडू लागला होता. त्यावेळी मैदानातच कोसळलेल्या ह्युजेसचा नंतर दुखापतीने मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये बुधवारी घडलेल्या प्रकाराने या चटका लावणाऱ्या प्रसंगाची पुन्हा एकदा आठवण झाली. केवळ आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच अॅण्ड्यू एलिसला यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदरोडेखोरचा म्होरक्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात\nपुढील‘छोट्या मोदीला पळवण्यासाठीच पीएमनी माझ्या मागे लावली सीबीआय’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवॉटसनने लावली राजस्थानची वाट\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90516", "date_download": "2018-04-20T16:54:17Z", "digest": "sha1:XWUNQL5ANMCQELTHHVSWRRSDSQHDYE7D", "length": 13300, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ravi jadhav Censor board संस्कृती रक्षणाच्या नावे प्रतिसेन्सॉर बोर्ड नको - रवी जाधव | eSakal", "raw_content": "\nसंस्कृती रक्षणाच्या नावे प्रतिसेन्सॉर बोर्ड नको - रवी जाधव\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nजे. जे. स्कूल ऑफ आर्टसचा विद्यार्थी असल्यामुळे मी निर्माण करत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्‍लीलता नाही, तर कलात्मकता आहे, याची खात्री बाळगा. न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. \"न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल.\nपुणे - \"\"ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिग्दर्शक-निर्मात्यांनी पूर्ण अभ्यास करून पुराव्यांनिशी, वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे; मात्र \"चित्रपटांमध्ये काय असावे किंवा काय नसावे' हे ठरविण्यासाठी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रतिसेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये,'' असे स्पष्ट मत दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले.\nजागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित \"शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनात जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. वैयक्तिक आयुष्यापासून चित्रपट सृष्टीतील पदार्पण, विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव, त्यात येणारी आव्हाने आणि एकूणच कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन या सगळ्यांशी संबंधित विविध प्रश्नांना उत्तरे देताना जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.\nकोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती करणे ही सोपी गोष्टी नाही. त्या पायरीपर्यंत जात असताना दिग्दर्शक-निर्मात्याला एक प्रकारची प्रगल्भता प्राप्त झालेली असते, असे सांगून जाधव म्हणाले, \"\"माझे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे माझीही वाटचाल असेच काहीसे काम करण्याकडे होती; मात्र स्वतःविषयी विचार करताना मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे, हे लक्षात आले आणि त्यातून मी कला क्षेत्राकडे वळलो. सुरवातीला जाहिरात क्षेत्रात काम करू लागलो. हळूहळू स्क्रिप्ट रायटिंगकडे वळलो. त्या वेळी कामाच्या निमित्ताने बराच काळ परदेशात असताना मला तुटलेपण जाणवायचे. त्या वेळी मी अनेक मराठी पुस्तके बरोबर घेऊन जायचो. त्या वाचनातून मला आपली संस्कृती, कला, साहित्य याविषयी आकर्षण वाटायला लागले.'' \"नटरंग', \"बालक-पालक' या चित्रपटांचे अनुभवही त्यांनी सांगितले.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/president-gets-paid-less-than-top-bureaucrates-274690.html", "date_download": "2018-04-20T16:36:34Z", "digest": "sha1:YISTTUFGH6JN5RWTB5CRB2VPPBPFKPBF", "length": 12121, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपतींना मिळतंय वरिष्ठ नोकरशहांहूनही कमी वेतन", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nराष्ट्रपतींना मिळतंय वरिष्ठ नोकरशहांहूनही कमी वेतन\nसध्या राष्ट्रपतींना दीड लाख तर उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रूपये पगार मिळतो जो अनेक वरिष्ठ नोकरशहांहून कमी आहे.\n20 नोव्हेंबर: राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना अजूनही वरिष्ठ नोकरशहांपेक्षा कमी वेतन मिळतं आहे अशी माहिती समोर आली आहे.सध्या राष्ट्रपतींना दीड लाख तर उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रूपये पगार मिळतो जो अनेक वरिष्ठ नोकरशहांहून कमी आहे.\nराष्ट्रपती हे तिन्ही लष्करी सेवांचे प्रमुख असतात पण प्रत्येक लष्करी सेवेच्या अध्यक्षाहूनही कमी पगार आज राष्ट्रपतींना मिळतो आहे.\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची दोन वर्षांपूर्वी अंमलबजावणी झाल्यानंतर निर्माण झालेली तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कायदा दुरुस्ती अद्याप न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला होता.\nत्यानुसार राष्ट्रपतींचा पगार 5 लाख करण्यात यावा अशी मागणी या प्रस्तावामध्ये केली आहे. तो वर्षभरापूर्वीच कॅबिनेट सचिवालयाकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता,अशी माहिती गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.\n2008 साली राष्ट्रपतींची पगारवाढ झाली होती. तोपर्यंत राष्ट्रपतींना 50,000 रूपयेच पगार मिळत होता. या सोबत आधीच्या राष्ट्रपतींचे पेन्शन वाढवण्याचाही केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.\nतेव्हा आता राष्ट्रपतींची पगारवाढ कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-live-mind-success-92382", "date_download": "2018-04-20T16:51:00Z", "digest": "sha1:W7TWBNTCEYC2FQ6VRG6FEUEMEUGUXYXK", "length": 14002, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news Live Mind success यश मिळविण्यासाठी ठेवा ‘लाइव्ह माइंड’ - डॉ. सय्यद | eSakal", "raw_content": "\nयश मिळविण्यासाठी ठेवा ‘लाइव्ह माइंड’ - डॉ. सय्यद\nरविवार, 14 जानेवारी 2018\nजळगाव - देशात सामाजिक समस्या खूप आहेत. सामाजिक गरजांच्या विश्‍लेषणातून उद्योजकतेच्या संधी सापडत जातात. स्वतःच्या कल्पनांचे डिझाइन तयार करा. त्यांचा अभ्यास करून विविध साधनांच्या सहाय्याने जाहिरात करा. यातूनच नवीन उद्योग जन्माला येतो. ‘डेड माइंड’ऐवजी ‘लाइव्ह माइंड’ ठेवला, तर निश्‍चितच विविध क्षेत्रांत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळविता येईल, असे प्रतिपादन ‘रिलायन्स जिओ’चे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.\nजळगाव - देशात सामाजिक समस्या खूप आहेत. सामाजिक गरजांच्या विश्‍लेषणातून उद्योजकतेच्या संधी सापडत जातात. स्वतःच्या कल्पनांचे डिझाइन तयार करा. त्यांचा अभ्यास करून विविध साधनांच्या सहाय्याने जाहिरात करा. यातूनच नवीन उद्योग जन्माला येतो. ‘डेड माइंड’ऐवजी ‘लाइव्ह माइंड’ ठेवला, तर निश्‍चितच विविध क्षेत्रांत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळविता येईल, असे प्रतिपादन ‘रिलायन्स जिओ’चे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.\nबांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (एसएसबीटी) आयोजित ‘फिस्ट’ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘उद्योजक होण्यासाठी संधी’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. सय्यद म्हणाले, की वाचन, चिंतन व मनन ही विद्यार्जनाची प्रक्रिया आहे. मनन म्हणजे चारही बाजूंनी विचार केल्यानंतर जेव्हा समस्येचे उत्तर मिळेल, तेव्हा तुम्ही उद्योजक बनण्याकडे वाटचाल करतात. यासाठी संधी शोधता आली पाहिजे. त्यासाठी ज्ञान- कौशल्य आपल्याकडे हवे. पारंपरिक आणि गोंधळलेल्या अवस्थेतील तरुण केवळ गोंधळच निर्माण करतात. आभासी, कृत्रिम जगात अडकण्यापेक्षा स्वतःला कोठे करिअर करायचे, हे ठरविले पाहिजे.\n‘टेक्‍निकल ट्रेंड’ हा बदलत राहणारा आहे. कोणतेही तंत्रज्ञान कायमस्वरूपी नाही. दर्जात्मक शिक्षण घेण्याकडे आपला कल असावा. त्यामुळे नवीन स्वदेशी तंत्रज्ञान तरुणांनी बनवावे, त्याबाबतची उदासीनता दूर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.\nअध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. पी. व्ही. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एम. एम. अन्सारी यांनी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी प्रा. एन. एम. काझी, डॉ. एस. ए. ठाकूर, प्रा. व्ही. पी. सांगोरे, प्रा. सुधीर पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, डॉ. पी. जी. दामले, प्रा. मनोज पाटील, प्रा. धनेश पाटील, प्रा. दिनेश पुरी, प्रा. नितीन जगताप, प्रा. मीरा देशपांडे, प्रा. सारिका पवार आदींनी सहकार्य केले.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\n'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/arun-jaitley", "date_download": "2018-04-20T16:23:05Z", "digest": "sha1:2YCSMIPIBRIFJ55FGCVSIJIBP5GKEVYY", "length": 29277, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Arun Jaitley News in Marathi | Arun Jaitley Live Updates in Marathi | अरूण जेटली बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरन्यायाधीशांवर महाभियोग आणण्यावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ... Read More\nArun JaitleyGovernmentBJPcongressSupreme Courtअरूण जेटलीसरकारभाजपाकाँग्रेससर्वोच्च न्यायालय\nअचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोटांच्या तुटवड्यावर जेटलींचं स्पष्टीकरण ... Read More\nराज्यसभा सदस्यत्वाची जेटलींनी घेतली शपथ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले. ... Read More\nArun JaitleyRajya Sabhanewsअरूण जेटलीराज्यसभाबातम्या\nजेटलींवर शस्त्रक्रिया काही दिवसांनी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमूत्रपिंडाच्या आजारामुळे शुक्रवारी अखिल भारतीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सोमवारी डायलेसिस करण्यात आले. ... Read More\nअरुण जेटली सार्वजनिक बैठकांपासून दूर , संसर्ग टाळणे गरजेचे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअर्थमंत्री अरुण जेटली मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ... Read More\nअरुण जेटलींवर होणार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ... Read More\nप्रत्यक्ष कर वसुली १८ टक्क्यांनी वाढली - जेटली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ... Read More\nराज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुम ... Read More\nजेटलींनी केजरीवालांना माफ केलं, मागे घेणार मानहानीचा खटला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. ... Read More\nArvind KejriwalArun Jaitleyअरविंद केजरीवालअरूण जेटली\nExclusive: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग, २०१९ साठी मोदींची मोर्चेबांधणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देऊन, त्यांचे खिसे फुगवून त्यांना खिशात टाकायची खेळी पंतप्रधान मोदी करणार आहेत. ... Read More\nBudget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे ... Read More\nBudget 2018Arun JaitleyBudget Sessionअर्थसंकल्प २०१८अरूण जेटलीअर्थसंकल्पीय अधिवेशन\nBudget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये शेतक-यांना दिलासादायक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ... Read More\nमाजी पंतप्रधान Manmohan Singh यांनी सोडलं टीकास्त्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांसोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची झालेली बैठक मोठ्या वादात सापडली आहे. याप्रकरणी आजी माजी पंतप्रधानांनी एकमेकांवर टीका केल्यावर आता अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे ... Read More\nManmohan SinghArun Jaitleyमनमोहन सिंगअरूण जेटली\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/inspiration/page/2/", "date_download": "2018-04-20T16:35:23Z", "digest": "sha1:5P2KR6NNK4EH245OTOEMVCVHQIAQVF4U", "length": 10245, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Inspiration Archives - Page 2 of 23 - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. 0\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर… 0\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान 0\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… 0\nभारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक… 0\nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास.. 0\n9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर… 0\nपैलवान तानाजी जाधव टायगर ग्रुप यांचा विडीओ जीवनपट बघा खासरेवर.. 0\nया सहा मोठ्या न्यायालयीन लढाया, ज्यांनी उज्वल निकम पोहचले प्रसिध्दीच्या शिखरावर.. 0\nएकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nrusinhakhyan/word", "date_download": "2018-04-20T16:42:49Z", "digest": "sha1:VW2UEGFEYNMPRI6KYGT6UFC7JIVBWKZS", "length": 11211, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nrusinhakhyan", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय १ ला.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय २ रा.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ३ रा.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ४ था.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ५ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ६ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ७ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ८ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ९ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय १० वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/latest-khaas-re/", "date_download": "2018-04-20T16:16:26Z", "digest": "sha1:FSWP4PJSNEE25QLKKUR4RQDREJEXBYOQ", "length": 10007, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Latest Khaas Re Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र 0\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी… 0\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता… 0\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास… 0\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २ 0\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग १ 0\nसाहसकथा महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारीची 0\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… 0\nपैलवान तानाजी जाधव टायगर ग्रुप यांचा विडीओ जीवनपट बघा खासरेवर.. 0\nभारतात मागील १० वर्षात किती आरोपींना फाशी देण्यात आली वाचा आरोपी व त्यांचे गुन्हे 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/firing-on-the-kalvita-in-solapur-265410.html", "date_download": "2018-04-20T16:23:00Z", "digest": "sha1:Z33LSDOFC37LRQLUYH5XDWRTL435U3MM", "length": 10903, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोलापुरात काळविटाच्या कळपावर अज्ञातांचा गोळीबार, एकाचा मृत्यू", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nसोलापुरात काळविटाच्या कळपावर अज्ञातांचा गोळीबार, एकाचा मृत्यू\nमोडनिंब-अरण येथील टोणपे वस्तीवर भरदिवसा गोळ्या घालून एका काळवीटाची शिकार करण्यात आलीय.\nसोलापूर, 18 जुलै : मोडनिंब-अरण येथील टोणपे वस्तीवर भरदिवसा गोळ्या घालून एका काळवीटाची शिकार करण्यात आलीय.\nमंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अरण-भेंड शिवेवर असलेल्या टोणपे वस्तीवर मोठ्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांना तवेरा गाडी पंधरा ते वीस काळवीटांच्या कळपामागे पाठलाग करीत आल्याचे दिसून आलं. त्यातून दोन गोळ्या या कळपातील हरणाच्या दिशेने झाडल्या गेल्या. यामध्ये गोळीबारानंतर एक नर काळविटाचा तडफडत मृत्यू पावलं.\nहा प्रकार भर मनुष्य वस्तीमध्ये घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय. पडसाळी-अरण या परिसरात माळरान असल्याने नेहमी काळवीट-हरिण याठिकाणी चरत असतात.\nदरम्यान, वनपाल लटके यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याचा जबाब घेतलाय. या घटनेतील मृत काळविटाचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-132/", "date_download": "2018-04-20T16:18:39Z", "digest": "sha1:B4FYJ325KMHGEL4YV2GCAR2FUY6JV3RO", "length": 5161, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतात आता प्रवाशी विमान वाहतूक उद्योग विकसित झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. आता सरकार एअर कार्गो क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.\nकेंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleडाळींचे पडते भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेशने सुरू केली खरेदी\nNext articleभविष्यात भारत-पाकचा संयुक्त सैन्याभ्यास \nक्रेडाईकडून पुण्यात बांधकाम कामगारांना प्रशिक्षण\nडाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\nएलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ\nकंपन्यांना महिला संचालक नियुक्‍त करावे लागणार\nरेल्वे आणणार स्वतःचे पेमेंट गेटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://bhunga.blogspot.com/2009/12/blog-post_30.html", "date_download": "2018-04-20T16:16:04Z", "digest": "sha1:64O5GHEJXBKEGHXIJXTIE7WSAXTB5A3T", "length": 20396, "nlines": 117, "source_domain": "bhunga.blogspot.com", "title": "भुंगा!: नव्या वर्षाच्या शुभेच्छा !!", "raw_content": "\nबुधवार, ३० डिसेंबर, २००९\nपुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा..\nतुमच्या कर्तॄत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..\nमागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दु:खाची..\nसदैव वाहो तुमच्या दारी, सरिता ही आंनदाची..\nनवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा \nनविन वर्ष तुम्हाला सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना...\nभुंगाराव, तुम्हालाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n३० डिसेंबर, २००९ रोजी ११:१२ म.उ.\nधन्यवाद.. नविन वर्षाच्या शुभेच्छा - पुन्हा एकदा :)\n३० डिसेंबर, २००९ रोजी ११:३४ म.उ.\nभुंगा, नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा\n३१ डिसेंबर, २००९ रोजी १२:०० म.पू.\nनवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा \n३१ डिसेंबर, २००९ रोजी १:२४ म.पू.\nनविन वर्षाच्या शुभेच्छा :)\n३१ डिसेंबर, २००९ रोजी ९:३७ म.पू.\nतुम्हां सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n३१ डिसेंबर, २००९ रोजी ९:५५ म.पू.\nविक्रम एक शांत वादळ म्हणाले...\nनविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि व भरभराटिचे जावो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना...\n३१ डिसेंबर, २००९ रोजी १०:०७ म.पू.\n तुलाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\n३१ डिसेंबर, २००९ रोजी १०:११ म.पू.\nभुंग्या, तुलाही नविन वर्षाच्या शुभेच्छा.\nग्रिटींग्स मध्ये तुझा तो फुलांआडुन लपुन बघणारा भुंगा टाकला असतास तर...\nनविन वर्षात भुणभुणायला अधीकाअधीक फुलं मिळोत\n३१ डिसेंबर, २००९ रोजी १०:२९ म.पू.\n नविन वर्षाच्या सुगंधित शुभेच्छा\nहो, मनात आलं होत की तो फुलातला भुंगा जोडावा... पण नंतर म्हटलं राहु देत.. फक्त फुलंच ठेवु\n३१ डिसेंबर, २००९ रोजी १०:३४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...\n\"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा\" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.\nमराठी शुभेच्छापत्रे, शुभसंदेश, वॉलपेपर्स\nमराठी ब्लॉगर्स.नेट - मराठी ब्लॉगर्सचे नेटवर्क\nमराठी ब्लॉगर्स.नेटचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक\nखाली तुमचा ई-मेल आय.डी. द्या:\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.\nअजुनही आहेत - मराठी ब्लॉगर्स\nखाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा\nमला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज\nमाझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा. > अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)\nमनुष्याच्या जीवनावश्यक गोष्टी तीनच – अन्न,वस्त्र आणि निवारा. गोष्टी जरी तीनच असल्या तरी त्या मिळवण्यासाठी आयुष्यभर आटापिटा करावं लागतो, वणवण फिरावे लागते. एवढे कष्ट करूनही काही जणांना अन्न आणि वस्त्र एवढ्यावरच समाधान मानावे लागते. काहींना तर ते सुद्धा मिळवितांना त्रास होत असतो. काहीजण इतके नशीबवान असतात की त्यांना फार कष्ट न करताही सर्व गोष्टी मिळत असतात. हा फरक का तुमच्या जन्मकुंडलीवरून तुम्ही किती धन कमवणार आणि किती धनवान होणार तुमच्या जन्मकुंडलीवरून तुम्ही किती धन कमवणार आणि किती धनवान होणार ह्याची शक्यता वर्तवता येते. व्यक्तिच्या सांपत्तिकस्थितीची कल्पना येऊ शकते. चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पैशांची वानवा काय असते त्याची कल्पना येणार नाही. ज्यांना दिवसरात्र काबाडकष्ट करूनही पदरात फारसे काहीच पडत नाही त्यांना ह्या लेखाचा जरूर उपयोग होईल अशी अशा आहे.\nकुंडलीतील धन स्थान म्हणजेच कुटुंब स्थान. आपले कुटुंब हीच आपली धनसंपत्ती आणि ह्या धनसंपत्तीला जपण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे आपले कर्तव्य. आपल्या कुंडलीत ह्या स्थानामध्ये जर\n१) शुभ ग्रह असतील आणि दशा -अंतर्दशाही पूरक असतील तर सांपत्तिक स्थिती चांगली असते.\n२) धनस्थानात शुक्र,चंद्र,बुध असे ग्रह असणे.\n३) धनेश लाभ स्थानात असणे,षष्ठ स्थानात असणे,दशम स्थानात असणे हे शुभ होय.\n४) ज्या व्यक्तींचा धनेश बाराव्या स्थानात असतो त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी ह्या ना त्या कारणाने पैसे खर्च करावेच लागतात आणि शेवटी गाठीला काहीच उरत नाही.\n५) गुरू ह्या ग्रहाची दृष्टी द्वितीय स्थानांवर असणे शुभ.\n६) ह्याच बरोबरीने महादशाही पोषक असेल तर तुम्हांला चांगली सांपत्तिक स्थिती लाभते.\nहे तर झाले कुंडलीच्या योगांबाबत. काहींच्या कुंडलीत तर असे योग असतात की सुरुवातीची काही वर्षे खूप चांगली असतात परंतु नंतर मात्र अचानक काही कारणामुळे परिस्थिती ढासळायला लागते. सांपत्तिक स्थिती टिकवण्यासाठी आज काही सोपे उपाय देत आहे, त्याच्या आपण आवश्य उपयोग करून घ्या.\nपुढील उपाय करून पाहा\n१) श्री सूक्त हे स्तोत्र दररोज संध्याकाळी वास्तुत म्हणावे.\n२) वास्तु नेहेमी स्वच्छ ठेवावी.\n३) घरात टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे नेहेमी बंद असावेत.\n४) तिन्हीसांजेला देवासमोर निरांजन तेवत असावे.\n५) वास्तुत कुठल्याही प्रकारची दुर्गंधी असू नये. त्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आपल्याला आवडत असलेल्या एखाद्या अत्तराचे काही थेंब पाण्यात घालून ते पाणी वास्तूत शिंपडावे.\n६) वास्तुत कापूर अवश्य प्रज्वलित करावा.\n७) वास्तुच्या एखाद्या कोपऱ्यात जडे मीठ काचेच्या वाडग्यात ठेवून द्यावे. १५ दिवसांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे आणि नवीन मीठ ठेवावे.\n८) वास्तुत कलह-वाद करू नयेत.\n९) पुढील मंत्राचा उच्चार संध्याकाळी अकरा वेळेस करावा – ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥\nह्या उपायांचा अंमल श्रद्धेने करावा. बाकी उपाय हे तुमच्या कुंडलीनुसार सुचविता येतील. हे उपाय नक्की अनुभवा आणि मला प्रतिक्रिया जरूर कळवा.\nआपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]\nसंपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभुजबळांच्या ‘खासगी’ उपचारावरून परिषदेत गदारोळ\nपुढीलशिवडीचा किल्ला उजळून निघणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/ovi/word", "date_download": "2018-04-20T16:39:32Z", "digest": "sha1:7SK5E7OGFU3WECEHQMAFW4K2XKYP32AS", "length": 9390, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ovi", "raw_content": "\nओवी गीते : इतर\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह २\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १०\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह ११\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १२\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १३\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १४\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १५\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १६\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १७\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १८\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवीगीते - संग्रह १९\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nलोखंडी सामानाचा साठा, लोखंडी माल\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-246301.html", "date_download": "2018-04-20T16:21:18Z", "digest": "sha1:3SJXPLCXHLWD7P6DOIP77VNRXAB7JMO5", "length": 8212, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हा तर फसवा वचननामा'", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n'हा तर फसवा वचननामा'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jitendra avhadthaneकाँग्रेसजितेंद्र आव्हाडठाणेराष्ट्रवादीवचननामाशिवसेना\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\n'शहरातल्या लोकांनी महाराष्ट्र दिनी गावात श्रमदान करावं'\nपावसाळी अधिवेशन नागपुरात का\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/dog-problem-in-cidco/", "date_download": "2018-04-20T16:23:48Z", "digest": "sha1:HDSVT6NSEATJGLLU7YCAVIML5TUMHC7P", "length": 4245, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "dog problem in cidco – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nनाशिकच्या सिडकोमधील ‘ ह्या ‘ लाल बाटल्यांचे रहस्य नक्की काय \nमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून काही विशेष कारवाई होत नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे देखील प्रयोग करून झाले मात्र त्यालाही महापालिकेला काही मर्यादा येतात . प्राणीमित्र संघटना लगेच ओरड सुरु करतात . मात्र रस्त्यावर बेवारस मारून पडलेले प्राण्यांचे मृतदेह उचलायच्या वेळी हे प्राणीमित्र बघायला सुद्धा येत नाहीत तसेच भटक्या कुत्रांकडून माणसावर हल्ले झाले तरी प्राणीमित्र गप्प बसून… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/unique-and-trendy-fashion-for-women/", "date_download": "2018-04-20T16:42:11Z", "digest": "sha1:HLUDANASFD77NJXQMFRNY5CMAECCP6FZ", "length": 20981, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "हटके आणि ट्रेण्डी फॅशन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nहटके आणि ट्रेण्डी फॅशन\n>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर\nफॅशन ही गोष्ट स्त्रीचे सौंदर्य वाढविण्यात कायमच मदत करत असते. सध्या मॉडर्न जमान्यात टिपिकल न राहता हटके आणि ट्रेण्डी राहण्याकडे तरुणींचा कल दिसून आहे. त्यातही इंडो-वेस्टर्न प्रकारातील टेण्डला पसंती मिळत आहे. आपण कितीही म्हटलं, नवीन ट्रेंडस, फॅशननुसार आपला आऊटफिट ठरतो. फॅशन हे सातत्याने बदलत राहणारे एक चक्र असतं. एक मौसम येऊ घातला की, त्या मौसमासाठी नियोजन आणि त्याकरिता नवनिर्मिती सुरू झालेली असते. जुन्या विविध फॅशन ट्रेण्डमधून प्रेरणा घेऊन नव्या मौसमासाठी आधुनिक फॅशनचे ट्रेण्ड तयार केले जातात. गेल्या दशकांत विविध स्टाइल्समुळे डिझायनर्सना रंग, याबाबतीत प्रयोग करण्याकरिता नवीन प्रेरणा मिळत असते.\nसध्या लोकप्रिय होणाऱ्या अनेक आधुनिक स्टाईल्स आणि डिझाइन्सची प्रेरणा पूर्वीच्या फॅशनमध्येच दडलेली असते हे फार थोडय़ा लोकांनाच माहित असते आणि मॉडर्न डिझायनर्सने आपल्या नव्या ट्रेण्डसाठी पूर्वीच्याच फॅशन ट्रेण्ड वापरल्याची काही उदाहरणे पाहू शकतो.\n१९६०च्या दशकातील विविध स्टाईल्स त्यावेळीइतक्याच आजही लोकप्रिय आहेत. शॉर्ट हेमलीने, ग्राफिक डिझाईन आणि शिफ्ट स्टाईल्स प्रकारचे ड्रेसेस हि त्यावेळची वैशिष्टये हि आजच्या मॉडर्न डिझायनर्ससाठी प्रेरणादायक ठरतात अधिक गडद रंगसंगती आणि प्रिंट व शिफ्ट प्रकारचे ड्रेसेस यांना पसंती मिळू लागली .१९५०च्या दशकात हिट झालेले फुल स्कर्ट प्रकारचे ड्रेसेस आजही लोकप्रिय झालेले आहेत. १९८०च्या दशकात हिट झालेले ब्राइट कलर्स आणि टाइट लेगिंग्ज याबरोबरच पॉवर सूट ही डिझाईन आजही लोकप्रिय आहे.\nही साडी पारंपरिक ड्रेसेसची चौकट मोडून नवा लुक देते. इंडो-वेस्टर्न लूक असणारी ही साडी हिंदुस्थानी परंपरेला साजेशी अशी आहे. नऊवारी लुक असलेली ही मॉडर्न साडी लग्नात, पार्टीजमध्ये पाहायला मिळते. हटके लुकसाठी धोती साडीवर ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप घालता येतो.\nझिरमिळ्यांची फॅशन हे प्रचंड भन्नाट असं प्रकरण आहे. सत्तरच्या दशकातील लेदर जॅकेट्सपुरती मर्यादित असलेली ही फॅशन आता स्कर्ट, स्वेटर्स आणि वेस्टर्न ड्रेस मध्ये देखील पाहायला मिळत आहे.बॅग्ज, टॉप्स, टी-शर्ट्स आणि कानातले यांतही झिरमिळ्या दिसू लागल्या आहेत.\nलाँग अफगाण श्रग्ज अफगाण श्रग्ज म्हणजे लांबीने जास्त असलेलं जॅकेट्स सध्या पाहायला मिळते. प्रिंटेड शॉर्ट श्रग्ज अगदी फ्लोरल प्रिंटपासून ते ऍनिमल प्रिंटपर्यंत अनेक डिझाइन्स या प्रकारच्या श्रग्जमध्ये पाहायला मिळतात. ड्रेसप्रमाणे लांब असलेला, पायापर्यंत येणारा अफगाण श्रग पेन्सील फिटींग पँटवर क्रॉप टॉप वर पहायला मिळतो. सध्या लाँग जॅकेटची फॅशन जबरदस्त लोकप्रिय होताना दिसतेय. जीन्सवर शॉर्ट किंवा गुडघ्यापर्यंतचं जॅकेट बर्यापैकी घातले जातात. घागरा किंवा अनारकलीवर हे जॅकेट शोभून दिसतातच, त्याचबरोबर टाइट जीन्स, पलाझो, वनपीस किंवा ट्राउझर अशा वेस्टर्न आउटफिटवरही पारंपरिक डिझाइन असलेले जॅकेट जास्त छान दिसतात.\nरंगीबेरंगी गोंडा असलेले राजस्थानी कुर्ते आणि टॉप सध्या तरुणींच्या विशेष आवडीचा विषय असलेले दिसतात. साडय़ांप्रमाणेच टॉप्स, कुर्त्यांना गोंडे पाहाला मिळतात. प्लेन टॉप्सवर गोंडे विशेष लक्षवेधक ठरतात. सुती आणि मिक्स कॉटन प्रकारातही हे टॉप उपलब्ध आहेत.\nसध्या आकर्षक डिझाईंन आणि विविध रंगांमध्ये स्कर्ट उपलब्ध आहेत. यामध्ये डेनिम लाँग-शॉर्ट स्कर्ट आणि कॉटन लाँग-शॉर्ट स्कर्ट, फ्रिल्स् कट यांसारख्या स्कर्टस्ला जास्त मागणी दिसून येत आहे. लाँग स्कर्ट, ए-लाईन स्कर्ट, पेन्सिल स्कर्ट यांसारखे प्रकार सध्या पाहायला मिळतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलओठांची काळजी कशी घ्याल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/kovind-mumbai-tour-264876.html", "date_download": "2018-04-20T16:15:36Z", "digest": "sha1:TR4JVYV5DCKUTZOHJKK6WYU4CWAMAHJ2", "length": 11433, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही !", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही \nकोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.\nमुंबई, 12जुलै : भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे येत्या 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर येताहेत पण त्यांच्या कार्यक्रमापत्रिकेत 'मातोश्री भेटी'चा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सेना-भाजपातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेत. कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.\nमुंबईत आल्यावर कोविंद विमानतळावरुन ते थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. त्याचा हा दौरा म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रचाराचा भाग मानला जातोय. दरम्यान, कोविंद यांच्या मुंबई दौऱ्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रपतीपदासाठी मात्र, शिवसेनेनं यापूर्वीच रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केलेला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/jews-who-read-nazi-bhasmasumus-farewell-auctioned-letter-shindler/amp/", "date_download": "2018-04-20T16:12:16Z", "digest": "sha1:VNTEYV6SNDSFWE7GL2Z7HIHOSE3CIU4H", "length": 7708, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Jews who read the Nazi Bhasmasumu's farewell auctioned a letter to Shindler | नाझी भस्मासुराच्या तावडीतून वाचलेल्या ज्यूंनी शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा होणार लिलाव | Lokmat.com", "raw_content": "\nनाझी भस्मासुराच्या तावडीतून वाचलेल्या ज्यूंनी शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा होणार लिलाव\nजर्मन उद्योजक आणि शेकडो ज्यूंना नाझींच्या तावडीतून वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव होणार आहे.\nजेरुसलेम- जर्मन उद्योजक आणि शेकडो ज्यूंना नाझींच्या तावडीतून वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव होणार आहे. ही पत्रे त्याने ज्या ज्यूंना वाचवले त्या लोकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिली होती. 8 डिसेंबर रोजी लॉरेन्स ऑक्शनियर्स हा लिलाव करणार आहे.\nमहायुद्धाच्या काळानंतर ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली 1949 साली अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे पळून गेले. तेथे गेल्यावर पोलंडमध्ये त्याने ज्या ज्यू लोकांना आपल्या कारखान्यात काम करण्याची संधी देऊन वाचवले होते, त्या ज्यूंची त्याला कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे येऊ लागली. शिंडलरने नाझी फौजांना लाच देऊन तसेच हे कामगार लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आवश्यक आहेत असे दाखवून त्यांना वाचवले होते. 1200 ज्यूंचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या औषधांच्या खर्चासाठी एमिली शिंडलरने स्वतःचे दागिने आणि कपडेही विकले होते. त्यांच्या या कामगिरीवर स्टीव्हन स्पिलबर्गने \"शिंडलर्स लिस्ट\" हा चित्रपटही बनवला होता. त्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. 28 एप्रिल 1908 रोजी जन्मलेला ऑस्कर शिंडलर हा जर्मन उद्योजक होता, महायुद्धाच्या काळामध्ये त्याने ज्यूंचे प्राण वाचवले होते. 9 ऑक्टोबर 1974 रोजी त्याचे पश्चिम जर्मनीमध्ये निधन झाले. एमिली शिंडलर यांचा 2001 साली बर्लिनमध्ये वयाच्या 93व्या वर्षी मृत्यू झाला.\n''मी जरी तुला प्रत्यक्षात भेटले नाही तरी तू मला मृत्युच्या तावडीतून वाचवणे हे एखाद्या विशेषाधिकार आणि सन्मानापेक्षा आजिबात कमी नव्हतं, तुला वाढदिवसाच्या आणि आरोग्यदायी आय़ुष्यासाठी शुभेच्छा असा एका पत्रातील मजकूर जेली मेल वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे.\" यावरुन शिंडलरवर हे ज्यू किती प्रेम करत असावेत हे जाणवते. ''माझे मन तुझ्या धाडसी त्यागामुळे हेलावले होते. माझा माणुसकीवरचा विश्वास पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी तू केलेल्या प्रयत्नांबद्दल तुझे आभार'', असेही एका पत्रात लिहिले आहे.\nमोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...\nअ‍ॅडॉल्फ हिटलरचे जन्मघर पाडून नाझींच्या स्मृतीही पुसणार\nसोन्याने भरलेली नाझींची 'ती' ट्रेन पोलंडमध्ये \nमुंबईकर ज्यू बांधवांची 'दिवाळी'\nमहिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला\n'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला\nमोदींच्या परराष्ट्र दौ-यात अचानक बदल, लंडनहून जर्मनीला जाणार, पाकच्या पीएमची भेट नाहीच\nबलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोला\nभारत की बात, सबके साथ: महिलांवर होणारे अत्याचार चिंतेची बाब, परंतु त्यावरून राजकारण करणे योग्य नव्हे- मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mass-copy-in-parbhani-district-caught-be-flying-squad/", "date_download": "2018-04-20T16:35:28Z", "digest": "sha1:T3D2G5QGWGU2GI55HSULUTA7VWIPKMQI", "length": 16998, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "परीक्षेला मोबाईल घेऊन बसलेले शेकडो मुन्नाभाई भरारी पथकाने पकडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nपरीक्षेला मोबाईल घेऊन बसलेले शेकडो मुन्नाभाई भरारी पथकाने पकडले\nपरभणीमधील राणीसावरगाव इथल्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने गुरुवारी धाड टाकली. या धाडीमुळे २५ परिक्षार्थी नकला करताना रंगेहाथ पकडण्यात यश आलं आहे. जि.प.प्रशालेचे विभाजन करून निर्माण झालेले नवीन परीक्षा केंद्र रद्द करण्यासाठी चर्चेत आलेले परीक्षा केंद्र आता कॉपीखोर केंद्र म्हणून चर्चेत आले आहे. नक्कल करणारे सर्वाधिक मुले कागदोपत्री चालणाऱ्या प्रथमेश विद्यालय सिरसम येथील असल्याचं उघड झालं आहे.\nगंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे जि.प. प्रशालेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सुमारे ७०० परिक्षार्थी परीक्षेला बसले असून इंग्रजी विषयाच्या पेपरला गुरूवारी ५९९ परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याची माहिती परीक्षा केंद्र संचालक मुख्याध्यापक रावसाहेब कातकडे यांनी दिली आहे. जेवन्हा भरारी पथकाने परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली तेव्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन, प्रश्नसंच जवळ बाळगल्याचे आढळून आले.\nशिक्षण विभागाच्या पथकाने परीक्षा केंद्राला भेट देऊन तीन तास ठिय्या मांडला होता, या काळात पाच मोबाईल फोनसह सुमारे २५ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विशेष म्हणजे या नक्कल करणाऱ्यांमध्ये एकही विद्यार्थिनीचा समावेश नाही. या कॉपी करणाऱ्या मुलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ती सगळी प्रथमेश विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांना दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये पास होण्याची हमी देण्यात आली होती, पास व्हायचं असल्याने आपल्यापुढे कॉपी करण्याशिवाय पर्याय नव्हता असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईत महिला दिनाचा जल्लोष\nपुढीलराज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/law-&-order", "date_download": "2018-04-20T16:19:27Z", "digest": "sha1:3YVWLOS3WV42SV3634SRSLGXBGZGLZ53", "length": 15745, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "law & order Marathi News, law & order Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nपारगेनगर येथे अस्ताव्यस्त पार्कींग\nमग पार्किंग का करायचे\nगाडी parking ची जागा फूटपात वर\nगोरेगाव(प)येथे अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान\nशेंडापार्क चौकाजवळील पूलाची स्वच्छता करावा\nनिवासी क्षेत्रात गोडाऊन नको\nसरकारी वाहनांचेच बेकायदेशीरपणे पदपथावर पार्किंग\nरेल्वे स्टेशनवर कायदा वाऱ्यावर\nसुरत बलात्काराचा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nगुजरात दंगल: बाबू बजरंगीला जन्मठेप\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2018-04-20T16:45:24Z", "digest": "sha1:GBHD3WERVBBVLUXFJIT4QNRYE5AVBP2Y", "length": 3664, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेलू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसमुद्रसपाटीपासुन उंची १३० फूट (४० मी)\nशेलू हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. शेलू रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०१४ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96/", "date_download": "2018-04-20T16:11:37Z", "digest": "sha1:SGPTC5CXQWRGKDO3ENDCM236F2O3XMGH", "length": 7462, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेल्फी घेण्यास सारा अली खानचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसेल्फी घेण्यास सारा अली खानचा विरोध\nसैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पदार्पणाचा सिनेमा “केदारनाथ’ येण्यापूर्वीपासूनच सारा खूप चर्चेमध्ये आहे. मात्र यावेळी चर्चेत राहण्याचे कारण वेगळेच आहे. तिने तिच्या एका फॅनला सेल्फी घेण्यास विरोध केला आहे. या फॅनने ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत सारावरचा आपला सगळा राग व्यक्‍त केला आहे. “रुबी जैन’ नावाच्या अकाउंट होल्डरने याबाबतची हकिगत लिहीताना म्हटले आहे, की साराची मार्केटमध्ये भेट झाल्यावर सेल्फी घेण्यास साराला सुचवले होते.\nमात्र साराने त्यास साफ नकार दिला. हा विषय तिथेच संपला असता. मात्र या ट्विटला अनेकांनी रिट्विट करायला सुरूवात केली. साराने यापूर्वीही अनेकांना सेल्फी घेण्यास नकार दिला होता. त्याबाबतचे अनुभव अनेकजण ट्विटरवर पोस्ट करायला लागले. “केदारनाथ’ अजून रिलीजपण झालेला नाही, तर सारा एवढा माज करते आहे, असे एकाने कॉमेंटही केले आहे. सारा सध्या “केदारनाथ’च्या अर्धवट राहिलेल्या शुटिंगच्या बरोबर “सिंबा’मध्येही काम करते आहे. “केदारनाथ’मध्ये तिच्या बरोबर सुशांत सिंह राजपूतही असणार आहे. साराचे हे नखरे असेच सुरू राहिले, तर तिचे पहिले सिनेमे रिलीज होण्यापूर्वीच तिला ट्रोल करायला सुरूवात होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफाशीची शिक्षा देण्यात संपूर्ण जगात चीन अव्वल\nNext articleकंगना राहते सोशल मीडियापासून चार हात लांब\nदीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री\nVideo : धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nलवकरच ‘ही’ अभिनेत्री चढणार बोहल्यावर\n‘पानीपत’साठी पुन्हा उभारणार शनिवार वाडा\nVideo : ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा “वंटास”\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/powada/word", "date_download": "2018-04-20T16:40:47Z", "digest": "sha1:NOBWFDGYT2IFWPK43WBGKW2VFLYIGTSS", "length": 6760, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - powada", "raw_content": "\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गण\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - कवन\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - देवास प्रार्थना\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - देहावरील मळा\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - अमृतानुभव\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गीतेवरील\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - चुडा कटाव\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गजगौरीव्रत\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - रामायण\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - चारचंद्र\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सिमंतक मणी\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - अधर ताल\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गणित काव्य\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - संगीतशास्त्र\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सवाल\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सहदेव भाडळी\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - लग्नाविषयीं\nसहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें.\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2018-04-20T16:44:55Z", "digest": "sha1:67ZMPMV6RA7LXBNEFBW6ZWMR3RVPYVAB", "length": 6775, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९७६ मधील जन्म‎ (१ क, ८५ प)\n► इ.स. १९७६ मधील खेळ‎ (१० प)\n► इ.स. १९७६ मधील चित्रपट‎ (२ क, ७ प)\n► इ.स. १९७६ मधील मृत्यू‎ (१ क, २५ प)\n\"इ.स. १९७६\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=2582", "date_download": "2018-04-20T16:43:21Z", "digest": "sha1:BN6HOUY743NN7U3RNRBQMANHBKWI5YV7", "length": 22680, "nlines": 123, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा! भाग १ ; भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना! | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » विशेष लेख » डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा भाग १ ; भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना\nडहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा भाग १ ; भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना\nभाग 1 : -संजीव जोशी\nडहाणू नगरपालिकेच्या निवडणूकीतील वाढीव ना हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील हा महत्वाचा आणि महत्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणावा लागेल. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर डहाणू शहराचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार असून ज्या भागात पुर्वी पाणी पोहोचत नसे अशा वस्त्यांपर्यंत पाणी पोचणार आहे. डहाणूचे तत्कालीन नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्या कार्यकाळात 32 कोटी 85 लक्ष रुपये खर्चाच्या या योजनेच्या कामास मार्च 2014 मध्ये सुरुवात झाली आणि 24 महिन्यात ही योजना पूर्ण होणे अपेक्षीत होते. (मार्च 2016 मध्ये ही योजना पूर्ण होणे आवश्यक असताना त्यानंतर 20 महिने उलटले, तरी योजना अपूर्ण अवस्थेतच आहे.)\nया योजनेबाबत पालघरचे खासदार चिंतामण वणगा आणि डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी 11 जानेवारी 2016 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, डहाणू नगरपरिषदेमध्ये झालेल्या व सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार व भ्रष्ट्राचाराबाबतीत (तत्कालीन) मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची त्वरीत व तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करुन स्वतंत्र विभाग व सक्षम अशा अधिकारी आणि अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत सखोल व कसून चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी केली. दोन्ही तक्रारींतील मजकूर साराखाच आहे.\nयावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अहवाल सादर करावा असा शेरा लिहीला. ही चौकशी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे आली. जिल्हाधिकारी यांनी दिनांक 16 मार्च 2016 रोजीच्या जावक क्र. 57/2016 च्या पत्रान्वये उपविभागीय अधिकारी, डहाणू यांना चौकशीचे आदेश दिले. पुन्हा जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 2 एप्रिल 2016 रोजी जावक क्रमांक 92/16 च्या पत्रान्वये, दिनांक 18 एप्रिल 2016 रोजी जावक क्र. 109/16 च्या पत्रान्वये, दिनांक 15 जून 2016 रोजी जावक क्र. 160/16 अन्वये स्मरणपत्रे दिली.\nउप विभागीय अधिकारी, डहाणू यांनी या चौकशीसाठी दिनांक 6 मे 2016 रोजी वसई विरार महापालिकेचे उपमुख्य लेखापरिक्षक संजय साळी, तलासरी पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी जयमाला सुरवसे, तलासरीचे तहसिलदार विशाल दौडकर, पालघरचे सहाय्यक नगररचनाकार र. आ. पाटील, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे उप अभियंता के. एस. लोखंडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जी. व्ही. दिवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता खैरनार व डहाणू तहसिलदार कार्यालयातील 4 अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाची नियुक्ती केली.\nचौकशी पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर पालघरचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 8 डिसेंबर 2016 रोजी जावक क्रमांक 524/16 अन्वये मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला. या अहवालाला आज वर्ष पुर्ण होत आले तरी कोणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यामुळे ही चौकशी म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढल्यासारखे ठरले आहे. एकीकडे कोणावरही काहीही कारवाई झालेली नसताना मागील 5 वर्षांत नगराध्यक्षपद उपभोगलेले, व ज्यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप ठेवण्यात आले होते असे, मिहीर शहा व रमिला पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांना भाजपाने नुसतेच पोटात घेतले नाही तर ज्यांनी सुरुवाती पासून भाजपची कास धरली अशा निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी झुंजवून आणि मुलाखतींचा फार्स करुन परस्पर डावलले आणि राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांवर तिकीटांची खैरात केली.\nखासदार वणगा आणि आमदार धनारे यांच्या तक्रारींमधील मुख्य मुद्दा होता: राज्य शासन लाखो रुपयांच्या अडचणीत असतांना डहाणू नगरपरिषदेला राज्य शासनाने महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान डहाणू शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत दिलेल्या निधीमध्ये सुरुवातीपासून म्हणजे लोकवर्गणीपासून ते कामाचे अंदाजपत्रकामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्ट्राचार झालेला आहे.\nआज त्यांचे काय म्हणणे आहे\nयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी 20 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वणगा, भाजपचे जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, प्रदेश प्रतिनिधी बाबाजी काठोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील पक्ष कार्यालयात अधिकृतपणे पक्ष प्रवेश करताना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापातून मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रश्‍नोत्तरे पुढीलप्रमाणे होती.\nडहाणू नगरपरिषदेतील कथित भ्रष्ट्राचाराबाबत खासदार वणगा आणि आमदार धनारे यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून चौकशीची मागणी केली होती त्याचे काय झाले\nयावर खासदार वणगा यांनी उत्तर दिले, या प्रश्‍नांची उत्तरे आम्ही निवडणूकीत प्रचार करताना देऊ\nयाचा अर्थ तुम्ही केलेले आरोप राजकीय होते का केवळ दबाव निर्माण करुन अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कारवाईचा धाक दाखवून तुम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक फोडले का केवळ दबाव निर्माण करुन अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कारवाईचा धाक दाखवून तुम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक फोडले का तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्ट्राचारचे आरोप केले त्यांच्यावर तुम्ही भविष्यात कारवाई करणार का\nखासदार वणगा यांचे उत्तर, आम्ही तक्रार वैयक्तीक केली नव्हती. ती नगरपरिषदेच्या विरोधात होती.\nमग सर्व नगरसेवकांनी मिळून भ्रष्ट्रचार केला असेल तर माफ का\nआमदार धनारे यांनी सांगितले चौकशी अजून चालू आहे\nचौकशी पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाले. माझ्याकडे अहवाल आहे.\nआमदार धनारे म्हणाले, वास्तविक चौकशी झाली तर आम्हाला अहवाल दिला गेला पाहीजे होता.\nतुमचे सरकार आहे. तुम्हाला प्रत का नाही मिळाली ते आम्ही कसे सांगू तुम्हाला माझ्याकडची प्रत देऊ का तुम्हाला माझ्याकडची प्रत देऊ का मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅन्टी करप्शनची चौकशी का नाही लावली\nआमदार धनारे म्हणाले, मी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. याबाबत चौकशी करतो.\nकेंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्हाला आयाराम उमेदवार का आयात करावे लागले तुमच्या पक्षातील लोकांना डावलून आयारामांना तिकीटे कशी देत आहात\nयावर पालकमंत्री सवरा आणि खासदार वणगा यांचे असे म्हणणे आहे की, भाजपची हवा आहे. लोकांचा भाजपवर मोठ्या प्रमाणात विश्‍वास निर्माण झाला आहे. यामुळे लोक प्रभावीत होऊन भाजपकडे येत आहेत. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. यावेळी कधी नव्हे इतक्या जवळपास 125 इच्छूकांनी उमेदवारी मागितली. इतिहासात इतकी कधिही मागणी नव्हती. आम्ही निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारांची यादी तयार केली असून ती अंतिम मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेली आहे.\nशासनाने डहाणू नगरपालिकेतील भ्रष्ट्राचार प्रकरणी आपले खासदार वणगा आणि आमदार धनारे यांना चौकशी अहवाल न दिल्यामुळे त्यांना तो वाचायला मिळाला नाही. त्यांना पाठपुरावा करणे शक्य व्हावे आणि लोकांना खासदार व आमदार यांच्याकडे पाठपुरावा करणे शक्य व्हावे यासाठी आम्ही याबाबत भाग 2 मध्ये विश्‍लेषण करीत आहोत. (क्रमश:)\nPrevious: डहाणू: अखेर आज टिम राष्ट्रवादी भाजपात दाखल पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या उपस्थितीत प्रवेश\nNext: डहाणू नगरपालिका निवडणूक 2017 : अजूनही सर्व पक्षांमध्ये उमेदवारीबाबत अनिश्चितता\nबोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nजिल्हाधिकारी डॉ. नारनवरे 3 बळींची जबाबदारी कोण घेणार\nअदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nजिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 5 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-20T16:35:02Z", "digest": "sha1:4OEK357BXI4HBO3OLG3OKN7FTWMNVNJE", "length": 4646, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बनिहाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजम्मू आणि काश्मीर • भारत\nबानिहाल हे काश्मीर रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.\nबानिहाल (उर्दू:بانہال) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील डोडा जिल्ह्यातील एक लहान नगर आहे. हे नगर राष्ट्रीय महामार्ग १ ए वर स्थित आहे.\nकाश्मीरी भाषेत बनिहालचा अर्थ हिमवादळ असा होतो.[१]\n↑ एनसायक्लोपीडिा ब्रिटानिका ऑनलाइन. \"बनिहाल घाट\". (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 4 June 2009 रोजी मिळवली). 2009-06-17 रोजी पाहिले.\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:45:53Z", "digest": "sha1:7OK6Z7SG3AZHNPBLWEICZUJCYQRNRDXL", "length": 4266, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"जर्मन ग्रांप्री\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:46:01Z", "digest": "sha1:2EHGLX7HABER7TKNDZSYQKLYQUCGBDRQ", "length": 4111, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:परिभाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► वैज्ञानिक परिभाषा‎ (१ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/bmc-shiv-sena-got-together-municipal-corporation-old-frienda/", "date_download": "2018-04-20T16:31:29Z", "digest": "sha1:WL4BLTL4N5FHQ6XVHHZBY24JADODQ57J", "length": 26641, "nlines": 346, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bmc-Shiv Sena Got Together In The Municipal Corporation, Old Frienda | महापालिकेत जागा झाला जुना दोस्ताना, भाजपा-शिवसेना एकत्र | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nकर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nमहापालिकेत जागा झाला जुना दोस्ताना, भाजपा-शिवसेना एकत्र\nमहापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यापासून एकदाही न जमलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील जुना दोस्ताना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मात्र अचानक जागा झाला\nपुणे : महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यापासून एकदाही न जमलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील जुना दोस्ताना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मात्र अचानक जागा झाला. जैव विविधता व्यवस्थापन समिती व पालिकेच्या शाळांमध्ये वंदेमातरम्चे गायन या दोन विषयांमध्ये त्यांनी युती केली. काँग्रेसने या प्रकाराची खिल्ली उडवत घ्यायचेच तर उपमहापौरपद तरी घ्यायचे, अशा शब्दांत शिवसेनेला खिजवले.\nमहापालिकेच्या शाळांमध्ये वंदेमातरम् म्हटले जावे, असा प्रस्ताव शिवसेनेच्या प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी दिला होता. स्थायी समितीमधून तो मंजूर होऊन सर्वसाधारण सभेसमोर आला. शुक्रवारी झालेल्या सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी, या विषयाला विरोध नाही; मात्र त्यात ऐच्छिक हा शब्द टाकावा, अशी उपसूचना दिली.\nचेतन तुपे व अरविंद शिंदे यांनी याबाबत आग्रह धरला. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले तसेच भाजपाचे धीरज घाटे वगैरेंनी वंदेमातरम्\nठराव आहे तसाच मंजूर व्हावा, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहात बराच गोंधळ झाला. त्यामुळे मतदान घेण्यात आले.\nत्याआधीच जैवविविधता व्यवस्थापन समितीवर नगरसेवकांमधून नियुक्त करण्याच्या सात सदस्यांचा विषय चर्चेला आला होता. त्यात भाजपाचे चार, राष्ट्रवादीचे दोन व शिवसेना किंवा काँग्रेस यांच्यापैकी एक अशी रचना करण्यात आली. भाजपाच्या चार व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची निवड बिनविरोध झाली, काँग्रेस व शिवसेना यांच्यातून निवड करताना मात्र पेच निर्माण झाला. त्यामुळे यावर मतदान घेण्यात आले.\nशिवसेनेचे अविनाश साळवे यांना भाजपाच्या सदस्यांनी मतदान केले, तर काँग्रेसच्या लता राजगूरू यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदान केले. भाजपाच्या मदतीमुळे साळवे विजयी झाले.\nयाच वेळी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी शिवसेनेला उद्देशून, घ्यायचे तर उपमहापौरपद तरी घ्यायचे, असे म्हटले. भाजपाचे हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, सरस्वती शेंडगे, किरण दगडे-पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप बºहाटे, दीपाली धुमाळ व शिवसेनेचे साळवे हे आता जैवविविधता समितीचे सदस्य म्हणून काम करतील. दरम्यान भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याशी एकदाही जमवून घेतले नव्हते. या दोन विषयांच्या निमित्ताने मात्र त्यांना भाजपाची मदत घ्यावी लागली व भाजपानेही ती लगेचच दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nरिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी सर्वाधिक\nवाघोलीत ११ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू\nनोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक\nरहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nकर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : रहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : रहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-20T16:05:33Z", "digest": "sha1:BOUD5UPYDCTJEAPXLBNZNNLP4OPHKEDO", "length": 6908, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाकीत अवकाळी पावसाचा शिडकावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाकीत अवकाळी पावसाचा शिडकावा\nवाकी – दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज (सोमवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी, शिरोली, भाम संतोषनगर, तसेच चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे, खालुंब्रे, खराबवाडी आदि भागात पावसाच्या जोरदार सरी आल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, आज दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी हलकासा पाऊस पडला. मात्र, हा पाऊस रात्री वाढेल की, काय असा अंदाज बांधून नागरिकांनी शेतात ठेवलेला कांदा झाकून ठेवला. शिरोली परिसरातील वीटभट्ट्या चालकांनी विटा भिजू नये, याकरिता विटा झाकल्या. येथील मार्केटयार्डमध्ये उघड्यावर असलेला कांदा झाकण्यासाठी मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. ऐनवेळी झालेल्या पावसाने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंजली दमानियांचे सुपारी घेण्याचे उद्योग- खडसे\nNext articleरशियन युद्‌धनौका सीरियाकडे रवाना- तिसऱ्या महायुद्‌धाची चाहूल\nपुणे जिल्हा: हक्काचे पाणी देता का कोणी \nकुरकुंभमध्ये मटका, जुगारावर पोलिसांचा छापा\nपुणे जिल्हा: चौथ्या दिवशी मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह\nकळंब येथे आज सामुदायिक विवाह सोहळा\nपुणे जिल्हा: दिवळेत मध्यरात्री दोन बिबट्यांचा धूमाकूळ\nकठुआ प्रकरणी उरुळी कांचनमध्ये मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81._%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-04-20T16:45:03Z", "digest": "sha1:UNAN2ZJFI2KG4LOJG6BSGSS7ANCDT46U", "length": 11628, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यू.आर. राव - विकिपीडिया", "raw_content": "\n(यु. रामचंद्रराव या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत.\nयू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले.\n५ पुरस्कार आणि सन्मान\nअमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.\nपहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा.\nयू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.\nभारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते.\nवॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. (२०१३ मध्ये)\nइंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार\nयुरी गागारिन पुरस्कार, वगैरे.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१८ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shiv-sena-winter-session-86750", "date_download": "2018-04-20T16:49:00Z", "digest": "sha1:5AXPIV5MOFQEVXEMMYC4LV27KC3XP56R", "length": 14955, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shiv sena winter session मुंबईच्या प्रश्‍नांवर शिवसेना आक्रमक! | eSakal", "raw_content": "\nमुंबईच्या प्रश्‍नांवर शिवसेना आक्रमक\nसोमवार, 11 डिसेंबर 2017\nमुंबई - कधीही कोसळतील अशा धोकादायक स्थितीत मुंबई शहरात ३९९ इमारती आहेत. एसआरएची १८०० प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मेट्रोमुळे जमिनीखालील पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, तसेच इतर सुविधा खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यांचे मेट्रोच्या कामामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहेत. मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्‍नांचा दारूगोळा शिवसेनेकडे असून, अधिवेशनात शिवसेना मुंबईच्या प्रश्‍नांवर आक्रमक होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.\nमुंबई - कधीही कोसळतील अशा धोकादायक स्थितीत मुंबई शहरात ३९९ इमारती आहेत. एसआरएची १८०० प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मेट्रोमुळे जमिनीखालील पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, तसेच इतर सुविधा खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यांचे मेट्रोच्या कामामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहेत. मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्‍नांचा दारूगोळा शिवसेनेकडे असून, अधिवेशनात शिवसेना मुंबईच्या प्रश्‍नांवर आक्रमक होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.\nधोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. इमारतींचा पुनर्विकास, समूह विकास करण्याचे घोंगडे भिजत पडले आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या आणि श्रेणी सी १ मध्ये असलेल्या ३९९ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या खासगी, पालिका, म्हाडा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील आहेत. मुंबईत घाटकोपरमध्ये २० ऑगस्टला सिद्धीसाई इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये डॉकयार्ड रोड येथील पालिकेची बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण दगावले. इमारतींच्या संरचनेत बदल केले जात आहेत. इमारतींचे पिलर बेदरकारपणे कापले जात आहेत. पालिकेची यंत्रणा सक्षम असूनही या प्रत्येक दुर्घटनेने यंत्रणेची बेफिकीरी समोर आली आहे.\nमुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. विकास हवा; मात्र तो मुंबईकरांच्या जीवावर उठणारा नको, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने मेट्रोबाबत घेतली आहे. पर्यावरणावर मेट्रोच्या कामाचा मोठा परिणाम होत असून, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील चेंबर जाम झाले आहेत. त्याबाबतच्या उपाययोजनांचा पालिका आणि मेट्रोकडे कोणताही प्लॅन नाही. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांबाबत शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी दिली.\nएसआरएची सुमारे १८०० प्रकरणे पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होत नाही. त्यामुळे रखडलेली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या प्रश्‍नांवर चर्चा घडविण्याची मागणी विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएच्या विषयावर अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्‍यता आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/goa-mumbai-goa-furry-boat-start-from-1-december-476829", "date_download": "2018-04-20T16:00:30Z", "digest": "sha1:K3Y6LPHZS7YUGYPY5XEUJ4LTPJCCCNON", "length": 14958, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गोवा : 1 डिसेंबरपासून मुंबई-गोवा फेरीबोट सुरु होणार", "raw_content": "\nगोवा : 1 डिसेंबरपासून मुंबई-गोवा फेरीबोट सुरु होणार\n1 डिसेंबरपासून गोवा-मुंबई फेरीबोट सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी दिली. त्यामुळे आता समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत तुम्ही मुंबईतून गोवा गाठू शकणार आहात.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nगोवा : 1 डिसेंबरपासून मुंबई-गोवा फेरीबोट सुरु होणार\nगोवा : 1 डिसेंबरपासून मुंबई-गोवा फेरीबोट सुरु होणार\n1 डिसेंबरपासून गोवा-मुंबई फेरीबोट सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी दिली. त्यामुळे आता समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत तुम्ही मुंबईतून गोवा गाठू शकणार आहात.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ajni-to-be-countrys-3rd-all-woman-railway-station-inauguration-on-womens-day/", "date_download": "2018-04-20T16:38:58Z", "digest": "sha1:F5A3UOT6Y3H7FW2FVXNU7WOW6J24ZLNK", "length": 18472, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऐतिहासिक निर्णय! गुरुवारपासून अजनी रेल्वेस्थानकावर ‘महिला’राज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n गुरुवारपासून अजनी रेल्वेस्थानकावर ‘महिला’राज\nमहिला दिनाचे औचीत्य साधून माटुंगा स्टेशनच्या धर्तीवर गुरुवारपासून अजनी रेल्वेस्थानकाचा ताबा महिला कर्मचारी घेणार आहेत. याची रंगीत तालिम बुधवारी रेल्वेस्थानकावर घेण्यात आली. स्टेशन मॅनेजर माधुरी चौधरीसह इतर विभागाच्या प्रमुख महिलांनी अजनी स्टेशनचा ताबा घेतला. प्रत्यक्षात उद्यापासून त्या कामाला सुरूवात करणार आहेत.\nरेल्वे प्रशासनातर्फे महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा, मात्र संपूर्ण रेल्वेस्थानकाचा कार्यभार दीर्घ काळ महिलांकडे सोपवून इतिहासात नवीन अध्याय जोडण्याचा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा प्रयत्न आहे. अजनी स्थानकावर गुरुवारपासून महिला राज राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने २८ मार्चला अजनी स्टेशनवर नियुक्त करण्यात येणारया कर्मचारयांचे नियुक्तीपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. १ मार्चला कर्मचाऱ्यांना या नियुक्त्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार बुधवारी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरीसह चार कमर्शियल क्लर्क, चार तिकीट कलेक्टर, चार लगेज पार्सल पोर्टर (एलपीपी), चार सफाई कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला असा संपूर्ण २८ कर्मचारी महिला कर्मचाऱ्यानी आपापल्या कामाचा पदभार स्विकारला.\nगुरुवारी सकाळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत या स्थानकावर नियुक्त महिला अधिकारी व कर्मचारी समारंभपूर्वक पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी रेल्वेच्या वाणिज्य आणि अभियांत्रीकीच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनला भेट देउन आढावा घेतला. नवनियुक्त स्टेशन मॅनेजर म्हणाल्या की, गेल्या २८ वर्षांपासून हे काम करीत आहोत. आताही पुढील कामासाठी आम्ही तय्यार असल्याची प्रतिक्रीया नोंदविली. गुरुवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याने येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. उद्यापासून महिलांना सन्मानपूर्वक निर्भयतेने पूर्ण स्टेशन सांभाळालयला दिले जाणार आहे. त्यामुळे अचूक नियोजन, सर्वत्र स्वच्छता आणि भ्रष्टाचारमुक्त, शिस्तबद्ध कामे होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हा उपक्रम मुली, तरुणी, युवती, महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसरकारचा ‘कडू’ निर्णय, दारिद्रय रेषेखालील लोकांना ‘साखरबंदी’\nपुढीलशिवसेनेची वचनपूर्ती, महिलांना अत्याधुनिक स्वच्छतागृहाची भेट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/flamingo-birds-in-nhava-sheva/", "date_download": "2018-04-20T16:34:43Z", "digest": "sha1:M5XEJOU6FA5SD3LBMNDGMNDMFAK5WFPD", "length": 20363, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "अखेर पाहुणे आले! ५ महिने उशिराने फ्लेमिंगोंचे आगमन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n ५ महिने उशिराने फ्लेमिंगोंचे आगमन\nहिवाळा सुरू झाला की दरवर्षी हजारोंच्या संख्येने उरणच्या भागात येणारे फ्लेमिंगो (रोहित) यावर्षी तब्बल ५ महिने उशिराने उरणमध्ये दाखल झाले आहेत. साधारणपणे नोहेंबर महिन्याच्या अखेरीस हे पक्षी यावेळेस मार्च महिन्याच्या सुरुवातीला येथे आले आहेत. रंगाचा सण धुम धडाक्यात साजरा होत असताना हे अग्नीपंख येथे उतरले. सध्या हजारोच्या संख्येने उरणच्या पाणजे खाडीजवळ, भारत मुंबई कंटेनर टर्मिनलजवळ या पक्षांचा डेरा आहे.\nउरण जेएनपीटी परिसरात साधारणपणे दोन प्रकारचे फ्लेमिंगो येतात. रोहीत (Greater Flamingo) आणि छोटा रोहित (Lesser Flamingo) अशा इथे येणाऱ्या फ्लेमिंगोच्या जाती आहेत. खाडी किनारी व पाणथळी जागेवर हे पक्षी उतरतात. मोठ्या रोहित पक्षाचे वजन पाच किलो पर्यंत असते, त्याची उंची १२५-१४५ पंख विस्तार १४०-१६५ सेमी पर्यंत असते, याचे खाद्य नील-हरित शेवाळ, लहान मृदुकाय प्राणी हे असते. याचा प्रजनन काळ संप्टेबर-आक्टोबर किंवा फेब्रुवारी ते एप्रिल हा आहे. तर छोट्या रोहित पक्षाचे वजन १.५ ते २ किलोग्रॅम, उंची ८०-९० सेमी, पंख विस्तार ९५ ते १०० सेमी पर्यंत असतो. ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो. यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या अधिक असायची. मात्र या वर्षी आलेल्या पक्षांमध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या अधिक आहे. सध्या एक हजारच्या आसपास या पक्षांची संख्या आहे. या पक्षांमध्ये पिल्लांचे (ज्यूवेनाईल्स) प्रमाण जास्त आहे. मात्र पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी हजारोच्या संख्येने हे पक्षी येथे खाद्य खाण्यासाठी येत असत आणि संध्याकाळी मुलूंड पंपिग स्टेशन जवळ वस्तीसाठी जात असत. यावर्षी मात्र या पक्षांनी येथेच खाडी किनारी आपला डेरा टाकला आहे. जेएनपीटीचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनलच्या बाजूलाच असलेल्या पाणजे खाडीमध्ये हे पक्षी वास्तव्य करून आहेत.\nसैबेरीया, रशिया, युरोप तसेच भारताच्या गुजरात-राज्यस्थान मधिल रण-कच्छमधून हे पक्षी येथे येतात. थंडी सुरू झाली की साधारणपणे नोहेंबर महिन्या पासून हे पक्षी येथे यायला सुरुवात होते. हजारोच्या संख्येने हे पक्षी येथे थांबायचे. फ्लेमिंगो व्यतिरिक्त शॉवेलर डक, हॅरिअर, लॉकेस, नॉब्रबँन, रॅडिश सेल डक, मार्श हॅरिअर, पेंटेड स्टार्क, स्मूनबील, सँड पायपर सह देशी पाण कोंबडे,करकोचे, बगळे, पाणकावळे मोठ्या प्रमाणात येतात. हिवाळा संपला की मार्च महिन्यामध्ये हे पक्षा येथून स्थलांतर करत असतात. मात्र यावर्षी या पक्षांना येथे येण्यासाठी मार्च महिना उजाडावा लागला. त्यामुळे या वर्षी या पक्षांचा येथिल मुक्काम आणखी वाढणार आहे.\nप्लेमिंगोना आवश्यक असणारे खाद्य या ठिकाणी पुरेश्या प्रमाणात मिळत असल्याने ते उरणच्या भागात येतात. यावर्षी त्यांचा प्रजनन काळ लांबल्याने त्यांना येण्यासाठी उशिर झाला आहे. येथे सध्या आलेल्या पक्षांमध्ये लेसर फ्लेमिंगो (छोटा रोहीत) पक्षांची संख्या जास्त आहे. त्यांच्या सोबत त्यांची पिल्ले (ज्यूवेनाईल्स) आहेत. मात्र ही पिल्ले उडण्यास समर्थ होई पर्यंत त्यांना थांबावे लागले त्यामुळे त्यांना येथे यण्यास उशिर झाला असण्याची शक्यता आहे, असे पक्षीप्रेमी निकेतन ठाकूर यांनी म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललैंगिक अत्याचारप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-raigad-news-rasta-roko-strike-90355", "date_download": "2018-04-20T16:47:03Z", "digest": "sha1:XQ22OIRHPOMPIY65W2PABJ5R5NODKBH5", "length": 11410, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news raigad news rasta roko strike रसायनीत कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nरसायनी : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रसायनी परिसरात बुधवारी (ता. 03) कडकडीत बंद होता. परीसरातील भारिप बहुजन महासंघ, युवा भिमसैनिक रायगड, रिपब्लिकन पक्ष आदिनी बंदचे आव्हान केले होते. तसेच रसायनीतील मुख्य रस्त्यावर भिम सैनिकांनी रस्ता रोको केला.\nरसायनी : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रसायनी परिसरात बुधवारी (ता. 03) कडकडीत बंद होता. परीसरातील भारिप बहुजन महासंघ, युवा भिमसैनिक रायगड, रिपब्लिकन पक्ष आदिनी बंदचे आव्हान केले होते. तसेच रसायनीतील मुख्य रस्त्यावर भिम सैनिकांनी रस्ता रोको केला.\nरसायनीचे मुख्यालय मोहोपाडा बाजार पेठेतील सर्व तसेच ठिकानच्या व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली होती. तसेच तीन, सहा आसनी, आणि मालवाहु रिक्षा बंद होत्या. पनवेल, कर्जत, पेण ठिकानी जाणाऱ्या एस टी बस आणि रिक्षा बंद असल्याने मार्गावरून वरील ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच नेहमी वाहनाच्या वर्दळीत आसणारा दांड पेण या रस्त्यावर मोहोपाडा येथे शुकशुकाट दिसत होता.\nरसायनीतील मुख्य दांड पेण रस्त्यावर पराडे कॉर्नर, मोहोपाडा नाका, दांड फाटा येथे भिम सैनिकांनी रस्ता रोको केला. त्यामुळे पराडे कॉर्नर येथे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. रसायनी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/earthquake-satara-sangli-and-ratnagiri/", "date_download": "2018-04-20T16:30:22Z", "digest": "sha1:VZVNYVKBUTCRQ3KQFDERSBOPOHDFD62U", "length": 24866, "nlines": 350, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Earthquake In Satara, Sangli And Ratnagiri | सातारा, सांगली आणि रत्नागिरीत जाणवले भूकंपाचे धक्के | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nसातारा, सांगली आणि रत्नागिरीत जाणवले भूकंपाचे धक्के\nसातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.\nठळक मुद्देसातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्केपहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेभूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती\nसातारा - सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी त्याचा कालावधी जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. भूकंपानंतर काही नागरिक घराबाहेर आले होते.\nकोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले. साता-यातील कराड भागासह कडेगाव तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. रत्नागिरीच्या देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूणच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. पण सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले असल्याची माहिती आहे.\nसौम्य धक्के असल्याने सुदैवाने भूकंपात जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभूकंपाचे धक्के अन् भेदरलेले ग्रामस्थ\nभातसा धरणाखाली भूकंपाचे धक्के \n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nकाँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nरिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका\nरहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nकर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : रहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : रहाणेचा राजस्थानसाठी पहिला षटकार\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fraud-gr-of-government-266430.html", "date_download": "2018-04-20T16:26:06Z", "digest": "sha1:UOCK7OZQ6ZAG243YJ4K6BPNRKKUDXPYU", "length": 10594, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावध राहा-महाराष्ट्र सरकार", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nपीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावध राहा-महाराष्ट्र सरकार\nपण याच मुदतवाढीचा एक बोगस जी.आर आलाय. या बोगस जी.आर.मध्ये ४ ऑगस्ट ही पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याचं नमूद करण्यात आलंय.\n2 ऑगस्ट : पीकविमा मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे. मात्र या मुदतवाढीचा बोगस जी.आर. आल्यानं सरकारची डोकेदुखी अधिक वाढलीय.\nपीकविमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट होती. पण शासनाने अर्ज वाढवण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. पण याच मुदतवाढीचा एक बोगस जी.आर आलाय. या बोगस जी.आर.मध्ये ४ ऑगस्ट ही पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.\nतसंच बोगस जी.आरपासून सावध राहण्याबाबत सरकारने लोकांना आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये योग्य जी.आर.ची कॉपी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याच परिपत्रकावरील माहिती अधिकृत समजावी असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ronald-dino-at-sidhivinayak-mandir-269933.html", "date_download": "2018-04-20T16:37:22Z", "digest": "sha1:QTBWKOAWUSFFERTJAMRLIBTPMXDC5TI4", "length": 12217, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फूटबॉलपटू रोनाल्डिनो, डिक्को सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...अमित ठाकरेही उपस्थित", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nफूटबॉलपटू रोनाल्डिनो, डिक्को सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...अमित ठाकरेही उपस्थित\nसुप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीनो आणि डिक्को यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं. याप्रसंगी अमित ठाकरेही उपस्थित होते. डिक्को यांनी भावना व्यक्त करताना आपल्याला भारत देश आणि या देशाची संस्कृती खूप आवडत असल्याच्या भावना व्यक्त केली. मुंबईतल्या प्रीमियर फुटसाल लीगसाठी रोनाल्डिनो मुंबईत आलेत.\nमुंबई, 15 सप्टेंबर : सुप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीनो आणि डिक्को यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं. याप्रसंगी अमित ठाकरेही उपस्थित होते. डिक्को यांनी भावना व्यक्त करताना आपल्याला भारत देश आणि या देशाची संस्कृती खूप आवडत असल्याच्या भावना व्यक्त केली. मुंबईतल्या प्रीमियर फुटसाल लीगसाठी रोनाल्डिनो मुंबईत आलेत.\nजागतिक फुटबॉल दिवसाच्या निमित्तानं आज मुंबई फुटबॉलमय झाली होती. एकिकडे राज्य सरकारचा उपक्रम तर दुसरीकडे मुंबईत प्रिमियर फुटसाल लिगचं आयोजन. त्यामुळे जागतिक किर्तीचे फुटबॉल खेळाडू ही मुंबईत एकवटले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या फुटबॉल प्रेमींना एक नामी संधी चालून आली ती आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्याची आयती संधी चालून आलीय.\nराज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे सुद्धा फूटबॉलचे मोठे चाहते आहेत. काल या सगळ्या खेळाडूंचं आगमन मुंबईत झालं. तेंव्हाही अमित ठाकरे या सर्वांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. ही तीन दिवसीय स्पर्धा मुंबईच्या वरळीत परिसरातील एनएसआयमध्ये भरणार असून या तीन दिवसीय स्पर्धेसाठी फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/05/27/demonetization/", "date_download": "2018-04-20T16:13:47Z", "digest": "sha1:RS5A4MGBFI53XXTBEN42S2JR7IDGJRNM", "length": 59230, "nlines": 108, "source_domain": "rightangles.in", "title": "नोटबंदीचे जंतर मंतर | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy सुप्रिया सरकार May 27, 2017\nआता कल्याणकारी राज्य चालवायचे तर पैसा तर लागतो, तो गोळा होतो करांमधून. थेट उत्पन्नावरील करास हुलकावणी द्यायचे कायदेशीर मार्ग असल्यामुळे ज्यांनी सर्वाधिक कर दिला पाहिजे ती धनिक मंडळी करांच्या बोजापासून मुक्ती मिळवतात. मग सरकारच्या उत्पन्नात येणारी घट भरून काढायला हक्काने सामान्य जनतेच्या खिशात हात घातला जातो. अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवावरील कर हे अत्यंत प्रतिगामी असतात. कारण कर भरण्याच्या क्षमतेचा त्यात विचार केलेला नसतो. एखादा शेतमजूर मोबाईल सेवेच्या बिलावर जो सर्व्हिस टॅक्स भरतो, तेव्हडाच टॅक्स अनिल अंबानीला भरावा लागतो. गेल्या काही महिन्यातील अर्थमंत्र्यांच्या घोषणा आणि कार्यक्रम पाहाल, तर काळा पैसा निपटण्याचा कार्यक्रम आता डिजीटीकरण कार्यक्रमात बदलला आहे. करदात्यांचा पाया विस्तृत करण्याच्या, अधिकाधिक लोकांना कराच्या जाळ्यात ओढण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अधिकाधिक वस्तू व सेवांवर कर कसा लादता येईल याचा ध्यास सरकारने घेतलेला दिसतो. व्यव्हार डिजिटल झाले की प्रत्येक व्यवहारात, मग तो अगदी दोन रुपयाचा असुदे,सरकारला हात मारून खंडणी वसूल करायची आस आहे.\nकुठलीही चलनातील नोट जरा निरखून पहा. अगदी दहा रुपयाच्या नोटेवर देखील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर ची सही असते. कशासाठी असते नोटेवर एक वचन छापलेले असते, त्याखाली गव्हर्नर सही ठोकतो. “मैं धारक को दस रुपये अदा करने का वचन देता हूं ” तर हे असे वचन असते. वचननाम्यास इंग्रजीत प्रॉमिसरी नोट म्हणतात. या ‘प्रॉमिसरी नोट’ या शब्दावरूनच आपण ‘शंभर ची नोट ‘, ‘पाचशेची नोट’ हे शब्द व्यवहारात वापरतो. प्रॉमिसरी नोट चा अर्थ असा कि ती घेऊन तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर कडे गेलात, तर तिच्या बदल्यात तिच्यावर जो आकडा टाकलेला आहेत तितके बंदे रुपये तुम्हाला देण्याचे प्रॉमिस गव्हर्नर ने दिलेले आहे.\nगेल्या नोव्हेंबर मध्ये सरकारने जी नोटबंदी लादली तिच्यामुळे या रिझर्व्ह बँकांच्या गव्हर्नर ने दिलेल्या ‘प्रॉमिस’ चा भंग झाला की नाही \nएकूण व्यवस्थेमधील ८६ टक्के चलन एका फटक्यात रद्द केले गेले. हा निर्णय सहा जणांच्या एका गुप्त कमिटीने घेतला असे मीडियातून पसरवण्यात आले. कोण आहेत हे सहा जण त्यांची निवड कोणत्या निकषावर केली गेली. स्वतंत्र भारताच्या अर्थकारणामधील कदाचित सर्वात मोठा निर्णय घेताना भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचा त्यात काहीच सहभाग का नव्हता \nवास्तविक रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील हा निर्णय बँकेच्या गव्हर्नर ऐवजी दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी का घोषित केला \nबिमल जलान आणि वाय व्ही रेड्डी या आर बी आय च्या भूतपूर्व गव्हर्नरनी आर बी आय ची स्वायत्तता संपुष्टात आलेली आहे असे आरोप केले. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नोटबंदी च्या निर्णयावर जनतेतून आव्हान का दिले गेले नाही \nआजवर आर बी आय स्वतःच्या नफ्यातील एक मोठा हिस्सा भविष्यातील अनिश्चिततेसाठी तरतूद म्हणून राखून ठेवत आली आहे. गेली तीन वर्षे मात्र या प्रथेस फाटा देऊन रिझर्व्ह बँक आपला सर्व नफा केंद्र सरकारास लाभांश म्हणून देऊ लागली. कोणी घेतला हा निर्णय \nनोटबंदी पश्चात तिचे परिणाम जोखण्यासाठी एक संसदीय कमिटी नेमली गेली खरी, परंतु नोटबंदीचा विषय आता संपलेला आहे, या कमिटीने आता डीजीटीकरणावर आपला अहवाल द्यावा अशी सूचना भाजपच्या निशिकांत दुबे या खासदाराने मांडली. नोटबंदीचा उद्धेश काय होता, तो कितपत सफल झाला, किती जुन्या नोटा परत आल्या, किती काळा पैसा बाहेर आला, नोटबंदीचा एकूण खर्च किती झाला या बद्दल कोणतीही समाधानकारक उत्तरे आर बी आय किंवा नोटबंदीचा निर्णय घेणाऱ्या तथाकथित कमिटीकडून मिळालेली नसताना सत्ताधारी पक्ष हा विषयच झटकून टाकत आहे.\nवास्तविक कोठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले गेलेच पाहिजेत. पण का कोण जाणे भारतीय जनता हे प्रश्न विचारण्याच्या मूड मध्ये दिसत नाही. प्रश्न विचारणाऱ्या एका अल्पमतातील वर्गास टिंगल उडवून गप्प केले जात आहे. ८ नोव्हेंबर च्या रात्री मोदींनी जनतेस नोटबंदीचा निर्णय कळविला. भ्रष्टाचार, काळे धन व त्याद्वारे होणारी करबुडवेगिरी रोखण्यासाठी ही शस्त्रक्रिया आवश्यक होती अशी गोळी मोदींनी दिली. निर्णय अंतिमतः राष्ट्रहिताचा असल्याने जनतेने काही काळ कळ सोसवावी असे भावनिक आवाहन सुद्धा त्यांनी केले. जनतेने मोदींच्या आवाहनास अनुकूल प्रतिसाद दिला.\nअर्थव्यवस्थेस मुळापासून हादरे देणाऱ्या या नोटबंदीचा जमाखर्च जनता मागत नाही याचेही एक कारण आहे. नोटबंदी ही देशासाठी एक अत्यावश्यक शस्त्रक्रिया होती हे जनतेस पटवून देण्यात मोदी कमालीचे यशस्वी ठरले आहेत. नोटबंदी चा उद्धेश सफल झाला आहे, काळा पैसा बाहेर आला आहे आणि आता सर्व आलबेल आहे हे मोदींनी जनतेच्या गळी व्यवस्थित उतरवले आहे. नोटबंदी ही काळेधन बाहेर काढण्यासाठी होती असे आपल्याला सांगितले गेले.\nत्यामुळे आजवर चुकविला गेलेला कर सरकारच्या तिजोरीत जमा व्हायचा होता. तसे झाले की महागाई आटोक्यात यायला वेळ लागणार नाही असंदेखील सांगितलं गेलं. यामळे देशातील भ्रष्टाचारास सुद्धा लगाम बसणार होता.\nखरोखरीच नोटबंदी मुळे हे सगळं स्वप्न वास्तवात येऊ शकते काय की सगळे खायाली पुलाव चे प्रकार आहेत \nनिर्णयाच्या अंमबजावणीत त्रुटी राहिल्या, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला वैगेरे बाबी बाजूला ठेवूयात. मुळात मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून बाद करून काळेधन , भ्रष्टाचार व करचुकवेगिरी वर नियंत्रण मिळवता येईल हे गृहितकच भाबडेपणाचे आहे.\n१९४८ साली जेव्हा १००० व १०००० च्या नोटा रद्द गेल्या, तेव्हा भारतीयांचे सरासरी प्रति माणशी वार्षिक उत्पन्न होते ४०० रुपये. गुणोत्तराच्या भाषेत सांगायचे तर रद्द केलेल्या हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य प्रति माणशी राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडीचपट होते व दहाहजार रुपयाच्या नोटेचे मूल्य पंचवीस पट होते. त्यावेळी चलन रद्द करण्याचा निर्णय समजण्या सारखा होता.\n१९७८ साली जेव्हा हजार, पाच हजार व दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या, तेव्हा प्रतिमाणशी वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न १७२२ रुपये होते. म्हणजे रद्द केलेल्या एक, पाच व दहा हजार च्या नोटांचे प्रतिमाणशी उत्पन्नाशी गुणोत्तर अनुक्रमे ०. ६, ३ व ६ एवढे पडत होते. तेव्हाही अर्थशास्त्रीय दृष्ट्या नोटबंदीचा निर्णय समर्थनीय ठरत होता, कारण प्रचंड संपत्ती थोड्याशा नोटांच्या स्वरूपात दडवून ठेवणे शक्य होते. आणि सामान्य जनतेच्या हातात अगदी थोड्या संख्येने या उच्च्य मूल्याच्या नोटा होत्या. सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारात या नोटा जवळपास नव्हत्याच.\n२०१६ साली काय परिस्थिती होती प्रतिमाणशी राष्ट्रीय उत्पन्न १०२४०८ एवढे होते. पाचशे व हजारचे या उत्पन्नाशी गुणोत्तर पडते ०. ००५ व .०१ . म्हणजे जरी पाचशे व हजार या चलनातील सर्वोच्च दर्शनी मूल्याच्या नोटा असल्या, तरी तांत्रिक दृष्ट्या, अर्थशास्त्राच्या परिभाषेत त्या उच्चं मूल्याच्या नोटा नव्हत्या. त्या सर्वसामान्य व्यवहारातील सर्रास वापरल्या जाणाऱ्या नोटा होत्या. म्हणूनच अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून २०१६ सालची नोटबंदी म्हणजे एक निरर्थक योजना होती.\nकाळेधन व भ्रष्टाचार रोखण्यास त्याने कसलीच मदत होणे शक्य नव्हते.\nपी चिदंबरमनी सांगितल्या प्रमाणे काळे धन हे कोणी आपल्याजवळील नोटा कुठे आणि कशा रचून ठेवलय आहेत यावरून ओळखता येत नाही. ती रक्कम संबंधित व्यक्तीने मिळविली कशी यावर ते धन काळे की पांढरे ते ठरत असते. तम्ही जर तुम्हास प्राप्त झालेले उत्पन्न आयकर खात्याच्या विवरण पत्रात दाखविले व त्यावर निर्धारित कर भरलात, तर तुमचा पैसा सफेद असतो. तेच जर तुम्ही काही बेकायदेशीर व्यवहारतून कमाई केलीत, तर असे उत्पन्न तुम्हाला उघड करता येत नाही, कारण ते आले कुठून यावर प्रश्न उठू शकतात. असे उत्पन्न घोषित केले जात नाही अर्थातच त्यावर करही भरला जात नाही. हे घोषित न केलेले उत्पन्न काळे धन या संज्ञेस पात्र ठरते. अर्थातच कायदेशीर व्यवहारातून मिळालेली रक्कम जरी तुम्ही उत्पन्न म्हणून घोषित केली नाही तर ती रक्कमही काळे धन या सदरातच मोडते. काळया धनाची निर्मिती हा भ्रष्टाचार समजला जातो. परंतु गम्मत अशी, कि खुद्द पैशाला कसला ही रंग नसतो. म्हणजे तुम्ही कसले तरी चुकीचे, भ्रष्ट, बेकायदा धंदे करून मिळवलेली संपत्ती, तुम्ही दुसऱ्याच कुठल्यातरी कायदेशीर मार्गाने मिळवली आहे, असे दाखवून त्यावर निर्धारित कर भरून भ्रष्टाचार करूनही तुम्ही निर्धास्त राहू शकता कारण तुमचे काळे धन तुम्ही सफेद धनात रूपांतरित करून घेतले. हे झाले मनी लॉण्डरिंग.\nपैसा ही स्थिर संकल्पना नाही. पैसा ही एक चल संकल्पना आहे. तो कायम एका धारकाकडून दुसऱ्याकडे वाहता असतो. या वाहण्याच्या ओघात तो कधी पांढऱ्याचा काळा होतो तर कधी काळ्याचा पांढरा होतो. उदाहरणार्थ एखाद्या गँगस्टरने खंडणी उकळून मिळवलेलया पैशापैकी काही नोटा त्याचे कुटुंबीय एखाद्या इस्पितळात उपचारासाठी भरतात आणि त्याची पावती घेतात. इस्पितळ ही रक्कम वैध उत्पन्न म्हणून विवरण पत्रात घोषित करते. काही काळापूर्वी काळा असलेला पैसा आता सफेद होतो. इस्पितळ आपल्या नर्सेसना पगार देते. या नोटांपकी काही नोटा ज्या नर्सकडे पगाराच्या स्वरूपात जातात ती नर्स पगारातील रक्कम बाजूला काढून, साठवून एक दिवस कोणा बांधकाम व्यावसायिकाकडे सदनिका विकत घेण्यासाठी म्हणून ‘वरची रक्कम’ म्हणून भरते. हा बांधकाम व्यावसायिक ही रोकड रक्कम आपल्या उत्पन्नात दाखवीत नाही. झालं, काही काळापूर्वी नर्सकडे असताना सफेद असणारा पैसा आता परत काळा झाला.\nसारांश असा की नोटांच्या स्वरूपात साठवलेला पैसा म्हणजे काळा पैसा अशा धारणेतून कारवाही केली तर तीचा सपशेल बोजवारा उडणे अपरिहार्य आहे.\nतुमच्या हातात, घर, कपाटात नोटा असतील तर त्या तुमच्या आयकर खात्याकडे घोषित केलेल्या उत्पन्नाचा भाग आहेत की त्या तुम्ही कुठल्या लबाडीच्या धंद्यातून कामविलेल्या आणि सरकारपासून लाविलेल्या उत्पन्नाचा भाग आहेत हे सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळेच नोव्हेंबर २०१६ साली झालेली शस्त्रक्रिया ही काळ्या धनावर न होता सरसकट सर्वच धनावर झालेला प्रयोग होता.\nआजच्या तारखेस सरकारने जो नोटविरहित व्यवहाराचा ढिंडोरा पिटला आहे त्यात पूर्णपणे कायदेशीर व्यवहारात कायद्याने मान्य चलन वापरून रोखीत व्यवहार करणे म्हणजे भ्रष्टाचारी व देशद्रोहाचे कृत्य आहे असा माहोल उभा राहिला आहे. आणि त्यात भरडून निघाली आहे ती सामान्य जनता. भ्रष्टाचार व काळे धन यावर कसलाही परिणाम या नोटबंदीने झालेला नाही. मुळात काळे धन रोखायचे तर, ते तयार कसे होते ह्याचा अभ्यास करून इलाज नेमक्या जागेवर केला पाहिजे होता. काळे धन संपविण्यासाठी नोटबंदीची कारवाई म्हणजे त्रास अपेंडिक्स चा आणि ऑपरेशन टॉन्सिलचे असला प्रकार आहे.\nतर काळे धन तयार कसे होते याकडे एक नजर टाकू. जगात १९८ देश आहेत आणि असंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ज्यांचे उद्योग धंदे कैक देशांत पसरले आहेत. या बहुराष्ट्रीय उद्योगांना एकाच उत्पादनासाठी अगर सेवे साठी निरनिराळ्या देशांत परत परत कर भरावे लागू नयेत म्हणून सर्वच देशांनी आपसात करार केले आहेत. या आंतरराष्ट्रीय करारांचा उद्देश हा की, आंतरराष्ट्रीय उद्योग जगतावर त्यांच्या उद्योगाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपामुळे दोन देशांत वेगवेगळी कर आकारणी होऊन त्यांच्यावर करांचा दुप्पट बोजा पडू नये. त्याच बरोबर त्यांना दोन्ही देशातून वेगवेगळ्या कारणासाठी करातून पूर्णपणे सूट मिळून बेसुमार नफेखोरी करता येऊ नये. १९८ देशांत मिळून आजमितीस असे ४००० होऊन अधिक कर सामंजस्य करार अस्तित्वात आहेत. या करारांतून आजवर दुप्पट कर आकारणी यशस्वीरीत्या टाळली गेली आहे. परंतु दोन्ही देशांत करात सूट टाळण्यास मात्र हे करार अपयशी ठरले आहेत.\n१९९२ साली जेव्हा भारताने आपली दारे परराष्ट्रीय उद्योगांसाठी उघडली, तेव्हा देशासमोर परकीय चलनाच भीषण तुटवडा होता . अशा परिस्थितीत आपले हात दगडाखाली असल्यामुळे आपण बहुराष्ट्रीय कंपन्या व पाश्चिमात्यदेशांबरोबर जे करार केले ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पूर्णपणे अनुकूल होतेच असे नाही. आपल्याकडे भरपूर मनुष्यबळ होते परंतु भांडवलाची वानवा होती. जागतिकीकरणाच्या युगातील भांडवलशाही मध्ये भांडवल मुक्तपणे गुंतवणुकीच्या चांगल्या संधी दिसतील त्या दिशेने वाहते, परंतु मनुष्यबळ असे अनिर्बंधपणे वाहू शकत नाही. साहजिकच भांडवलाची गुंतवणूक करणारा देश या खेळात सरस ठरतो.\nबहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सेवा व उत्पादनांवर किती कर आकारणी करायची याचे अधिकार अर्थातच सरकारने स्वतः कडे राखून ठेवले. परंतु त्यात एक अडचण होती. या कंपन्यांच्या अनेक उपकंपन्या असतात आणि त्यातील काही भारताबाहेर असतात. एखादे उत्पादन किंवा सेवा भारतीय बाजारपेठेत परिपूर्ण स्वरूपात आणण्याआधी या कंपन्या त्या उत्पादनातील काही भाग किंवा तो भाग तयार करण्यासाठी आवश्यक काही तांत्रिक सेवा आपल्याच एखाद्या उपकंपनीकडून विकत घेतात. त्यासाठी आपल्याच परदेशस्थ उपकंपनीला भरभक्कम मोबदला अदा करतात. ही उपकंपनी बहुधा अगदी कमी करआकारणी करणाऱ्या देशात असते. हे देश टॅक्स हेवन म्हणून ओळखले जातात. बर ज्या मालासाठी अगर सेवेसाठी मोबदला दिला गेला त्याचे उचित मूल्य ठरवता येणे करनिर्धारण करणाऱ्या सरकारी खात्यास अशक्य असते. या बाबतीत कंपनी सांगेल ती माहिती स्वीकारावी लागते. म्हणजे समजा मोटोरोला या फोन बनविणाऱ्या कंपनीने फोन मधील कॅमेरे आपल्याच एका उपकंपनी कडून मागवले आणि मग भले त्या कॅमेराची खरी किंमत फक्त ५०० रुपये असो, त्याचा मोबदला म्हणून प्रति कँमेरा ५००० रुपये या उपकंपनीस चुकते केले, तर मोटोरोलाचे भारतातील करपात्र उत्पन्न प्रतिफोन ५००० रुपयांनी कमी होते, त्या मुळे कंपनीला तेव्हडा कमी कर भरावा लागतो. त्याच वेळी ज्या उपकंपनीस हे ५००० रुपये प्रतिफोन मिळाले, ती अशा देशात असते ज्यात नावापुरती करआकारणी होते. उपकंपनी मोटोरोलाच्याच मालकीची असल्यामुळे हे पाच हजार रुपये कुठेही कर न भरता मोटोरोलाच्या खिशात बिनबोभाट जातात. येथे मोटोरोला हे नाव निव्वळ उदाहरणार्थ वापरले आहे.\nएखाद्या कंपनीचे स्वतःच्याच उपकंपनी बरोबर होणाऱ्या व्यवहारातील हे घोटाळे रोखू शकतील असे सक्षम कायदे आजघडीस अस्तित्वात नाहीत. कंपन्या वेगवेगळे खर्च कागदावर दाखवून करपात्र उत्पन्नातून सूट मिळवू शकतात. एका वर्षी झालेला तोटा पुढील वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये ओढू शकतात. ना ना कायदेशीर क्लुप्त्या करून करपात्र उत्पन्न कमी दाखविणे या बहुराष्ट्रीय कंपन्यास शक्य असते, ही सारी कसरत एत्तद्देशीय छोट्या उद्योगांसाठी किंवा नोकरदारांसाठी अशक्य असते.\nबहुराष्ट्रीय कंपन्यांचे हे करबुडवायचे उद्योग अनैतिक असले तरी बेकायदेशीर मात्र नसतात. देशातले कायदे कानून तपासून त्यातील पळवाटा शोधून त्या वाटेने बहुराष्ट्रीय कंपन्या आपला नफा सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या देशातील आपल्या उपकंपनीत अलगद पोचवतात. सेफ हेवन समजले जाणारे असे ९१ देश आहेत. तेथील गोपनीयता कायदे त्या देशात आलेल्या उद्योगांच्या किंवा व्यक्तींच्या बँक खात्यातील ठेवि बाबतची माहीती गुप्त राहील याची हमी देतात. त्याच बरोबर तेथील करांचे दर सुध्दा फारच माफक असतात. हे कायद्याचे कवच मिळाल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नेमक्या आर्थिक व्यवहारांचा छडा लावणे भारतासारख्या देशांस दुर्लभ होते.\nगेली काही वर्षे OECD – ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि G २० या जागतिक संघटना सदस्य राष्ट्रात आपसातील माहितीची देवाणघेवाण सुकर व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु प्रत्येक राष्ट्र सार्वभौम असल्याने कोणावरच एका मर्यादेपलीकडे सक्ती करता येत नाही, आग्रह धरता येतो. आंतरराष्ट्रीय कायद्यामधील हे घर्षण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पथ्यावर पडते.\nआयकार खात्याच्या कचाट्यात न सापडता या देशात कमावलेले पैसे दुसऱ्या देशात फिरवण्याचे इतरही चतुर मार्ग आहेतच आणि सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्या करमुक्त नफा कमविण्यासाठी हे मार्ग वापरतातच. समजा भारतातले हापूस आंबे लंडन मध्ये विकणारी एक कंपनी आहे. ही कंपनी १ लाख डझन हापूस आंबे तीन कोटी रुपयात खरेदी करते. लंडन च्या सुपरमार्केट चेन्सना हे एक लाख डझन आंबे सहा कोटी रुपयास विकले जातात. म्हणजे तीन कोटींचा निव्वळ नफा. आता या नफ्यावर भारतात कर भरायचा की इंग्लड मध्ये तर उत्तर आहे कुठेच नाही. लक्झेम्बर्ग नावाचा एक देश आहे, जेथे कॉर्पोरेट नफ्यावर शून्य कर आहे. तर या देशात एक कंपनी उघडली जाते. भारतातून उचललेला तीन कोटींचा हापूस या लक्झेम्बर्ग मधील कंपनीला तीन कोटी रुपयालाच विकला जातो. म्हणजे भारतीय आयकर खात्याला कागदावर दिसणार की या व्यापारात कंपनीला काहीच नफा झालेला नाही. लक्झेम्बर्ग मधील कंपनी हाच तीन कोटींचा हापूस लंडनच्या कंपनीस सहा कोटीला विकणार , म्हणजे तीन कोटींचा नफा झाला लक्झमबर्ग मधील कंपनीला, पण लक्झमबर्ग मध्ये तर काहीच टॅक्स नाही. म्हणजे प्रत्यक्षात आंबे पिकले भारतात, विकले लंडन मध्ये. पण कागदावर ना भारतातील कंपनीस नफा झाला ना लंडन मधील कंपनीस, परंतु याच कंपनीच्या मालकास एक छदाम ही कर ना भरता तीन कोटी रुपयांचा नफा गिळंकृत करता आला.\nबिल गेट्स च्या बिल आणि मेलीसा फाउंडेशन बद्दल ऐकलंच असेल. बहुतेक सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्या सामाजिक जाणिवा च्या देखाव्याखाली ट्रस्ट स्थापन करतातच करतात. टॅक्स हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांत तर धर्मादाय संस्थेचे ट्रस्टी कोण आहेत हे उघड करण्याचे सुद्धा बंधन नसते. त्यांचे गोपनीयतेचे कायदे हे संरक्षण पुरवतात.\n२००९ साली हसन अली नावाच्या पुणे येथील घोड्यांच्या व्यापाऱ्यास आयकर खात्याने धरले होते. २००२ ते २००८ पर्यंत त्याचे अघोषित उत्पन्न एक लाख दहा हजार कोटी असून त्याने सदतीस हजार कोटींचा कर बुडविल्याचा दावा आयकर खात्याने केला होता. आयकर खाते व सक्तवसुली संचानालय, दोघांनीही पुरावे उकरून काढले, असंख्य कागदपत्रांची, कॉम्पुटर नोंदींची छाननी केली, परंतु हसन अलीच्या कंपनीने गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार अशा शिताफीने केलेले होते की शेवटी पुराव्याअभावी आयकर खात्यास हसन अलीवरील थकीत देय कराची रक्कम ३७ हजार कोटी वरून तीन कोटी रुपयावर आणावी लागली.\nआपले उत्पन्न कमी दाखवून किंवा धंद्यात खोट आलेली दाखवून आपले करदायित्व कमी करून घेणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापारांबद्दल आपल्या मनात चीड असते. हे लोकच काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यास जबाबदार आहेत अशी आपली भावना असते. मोदिजींची नोटबंदी अशा लोकांचे कंबरडे मोडेल आणि काळा पैसा आपल्या अर्थव्यवस्थेतून हद्दपार होईल आणि सर्व उत्पन्नावरील कर यापुढे रीतसर सरकारच्या तिजोरीत जमा होईल अशी आपली अटकळ असते.\nही फारच भोळी समजूत आहे. अंधश्रद्धाच म्हणा हवं तर. कारण २००९ साली वोडाफोनने भारतातील एक टेलिकॉम कंपनी विकत घेतली. ही कंपनी होती हच-एस्सार. या हच एस्सारचे शेयर्स भारताबाहेरील एका कंपनी कडून वोडाफोन ने विकत घेतले. ही व्यवस्था अर्थातच भारतीय कर टाळण्यासाठी केली गेली होती. व्यवहार भारत बाहेर झाला असला तरी जी गोष्ट विकली गेली ती तर भारतातील आहे असा दावा करत भारतीय आयकर खात्याने २५०० कोटी रुपये वोडाफोन ला भांडवली नफ्यावरील कर म्हणून भरायला लावले. वोडाफोनने कर भरला आणि केस कोर्टात नेली. सुप्रीम कोर्टाने भारतीय कायद्यातील तरतुदी आणि वोडाफोनने पार पडलेला व्यव्हार तपासून वोडाफोनच्या बाजूने निर्णय दिला. आयकर खात्यास वोडाफोनचे २५०० कोटी रुपये व्याजासहित परत द्यावे लागले. आता सांगा, नोटबंदी आणून मोठ्या करचुकव्याना आळा घालता येणे शक्य आहे काय कारण वरील उदाहरणात दाखविल्याप्रमाणे कर बुडवून संचय केलेली संपत्ती नोटांच्या स्वरूपात नसतेच मुळी.\nनोटबंदीचे अजून एक तिसरे उद्दिष्ट्य त्यावेळी प्रधानमंत्र्यांनी सांगितले होते. ते होते भारतीय अर्थव्यवस्थेत शिरलेल्या नकली नोटा निपटून काढायचे. अर्थशास्त्राच्या काही अभ्यासकानी हे ऐकून कपाळास हात लावला, उरलेले हसून हसून गडाबडा लोळले. हे म्हणजे उंदीर मारण्यासाठी रणगाडा आणण्यासारखे असल्याची उपमा एका अर्थतज्ज्ञ प्राध्यापकाने दिल्याचे स्मरते.\nभारतात वाढती महागाई आहे, व्याजदर सुद्धा चढे आहेत, म्हणजे रोकड रक्कम घरात बाळगली तर त्यावरील व्याज बुडते आणि महागाईमुळे बाळगलेल्या रकमेची क्रयशक्ती सुद्धा घटत जाते. तरीही लोक रोख रक्कम बाळगतात आणि रोकडीने व्यव्हार करतात याला सुद्धा कारण आहे. बँकिंग व्यवहार करण्यास लोक अनुत्सुक आहेत असे नव्हे तर १३५ कोटी लोकसंख्येच्या या खंडप्राय देशात सर्व बँकांच्या मिळून फक्त एक लाख पस्तीस हजार शाखा आहेत. एटीएमची संख्या केवळ दोन लाख आहे आणि जेमतेम पंधरा लाख पॉईंट ऑफ सेल मशीन आहेत. २३ कोटी होऊन अधिक लोक बँकिंग व्यवस्थेपासून पूर्णपणे वंचित आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांपैकी ९० टक्के हून अधिक खाती जवळपास वापरलीच जात नाहीत. अशा परिस्थितीत रोकड रक्कम जी सरकार मान्य चलन आहे ती वापरून आर्थिक व्यवहार पार पाडणे हा सर्वसामान्य भारतीय जनतेची प्राथमिक गरज आहे. रोख रक्कम वापरण्यास मनाई करणे ही त्यांचा मूलभूत हक्कच हिरावून घेण्यासारखे आहे.\nशेती क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १६ टक्के आहे तर एकूण निर्यातीमधील वाटा नऊ टक्के आहे. या क्षेत्रातील असंख्य छोट्या शेतकऱ्यांपर्यंत बँकिंग सुविधा अजून पोचलेली नाही. नोटबंदी केली तेव्हा रब्बीचा हंगाम सुरु होत होता. बियाणे खरेदीसाठी, मजुरी चुकविण्यासाठी ग्रामीण भागात रोकड रकमेची नितांत आवश्यकता होती. नोटबंदीचा जो फटका या रब्बी हंगामाला बसलाय त्याचे दूरगामी परिणाम देशास भोगावे लागणार आहेत.\nनोटबंदीचा खरा तडाखा आर्थिक दुर्बल घटकासच बसला आहे. ही लढाई काळे धनधारकांबरोबरची नव्हतीच. काळ्या धनाचा संचय असलेल्या लोकांनी त्यांचे धन कमिशन देऊन नवीन नोटात बदलले सुद्धा. खरे हाल झाले ते हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे, शेतकऱ्यांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे. त्यांना आपली दिवसाची रोजी बुडवून रांगेत तिष्ठत राहावे लागले. गरीब आणि श्रीमंत या मधील रस्सीखेचीत सरकार श्रीमंतांच्या बाजूने असलेले दिसले .\nगेल्या शंभर वर्षात प्रत्यक्ष करांचे एकूण करातील प्रमाण घटत गेले आहे आणि अप्रत्यक्ष करांचे प्रमाण वाढते राहिले आहे. याचा अर्थ करांचा जास्तीत जास्त बोझा गरिबांच्या खांद्यावर टाकला जातोय. चलनविरहित व्यवहारांसाठी सुध्दा सुरवातीस सवलती देण्यात आल्या परंतु हळूहळू पेटीएम, डेबिट व क्रेडिट कार्डाने केलेला भरणा, नेट बँकिंग यावर कर लावून सामान्यांच्या खिशावर डल्ला मारला जातो आहे. परत या डिजिटल पेमेंट सेवा पुरविणाऱ्या मोजक्या कंपन्यांस, कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या सरकारी जबरदस्तीमुळे प्रचंड नफेखोरी शक्य होणार आहे. ती पण सामान्य जनतेच्या प्रत्येक व्यवहारामध्ये टक्केवारी मिळवून.\nकर आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी अटळ आहेत असे मानले जाते. या पैकी कर फक्त सामान्य जनतेसाठी अटळ ठरतो. कारण धनदांडगे आपल्यावरील कर कायदेशीर पळवाटा काढून कमी करू शकतात किंवा दुसऱ्या आर्थिक घटकांवर ढकलून मोकळे होऊ शकतात. वास्तविक उत्पन्नानुसार वाढत जाणारा आयकर हा न्याय्य समजला जातो. जो जास्त कामवितो त्याने ज्यास्त जबाबदारी उचलावी असा तर्क त्यामागे आहे. भारतात ब्रिटीशानी थेट उत्पन्नावर कर १८६० साली सुरु केला. १८५७ सालच्या बंडाची ती भारतीयांस दिलेली सजा होती. त्या वेळी करांचे दर आजच्या तुलनेत फारच कमी होते. २, ३, ५ टक्के वैगेरे आणि शेतीउत्पन्न सुद्धा करपात्र होते. . कालानुरूप सरकारवरील जनकल्याणाच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्यावर कराचे दर सुद्धा वाढले आणि त्याच बरोबर करातून सवलती आणि सूट देणाऱ्या कायदेशीर तरतुदी सुद्धा रचल्या गेल्या. करप्रणाली आणि कायदे करण्याचे अधिकार, सत्ता कायम या ‘आहे रे’ वर्गाच्या हातात असल्यामुळे,त्यांनी आपली संपत्ती राखली जाण्यासाठी कायद्यात व्यवस्थित पळवाटा ठेवून दिल्या.\nआता कल्याणकारी राज्य चालवायचे तर पैसा तर लागतो, तो गोळा होतो करांमधून. थेट उत्पन्नावरील करास हुलकावणी द्यायचे कायदेशीर मार्ग असल्यामुळे ज्यांनी सर्वाधिक कर दिला पाहिजे ती धनिक मंडळी करांच्या बोजापासून मुक्ती मिळवतात. मग सरकारच्या उत्पन्नात येणारी घट भरून काढायला हक्काने सामान्य जनतेच्या खिशात हात घातला जातो. अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवावरील कर हे अत्यंत प्रतिगामी असतात. कारण कर भरण्याच्या क्षमतेचा त्यात विचार केलेला नसतो. एखादा शेतमजूर मोबाईल सेवेच्या बिलावर जो सर्व्हिस टॅक्स भरतो, तेव्हडाच टॅक्स अनिल अंबानीला भरावा लागतो. गेल्या काही महिन्यातील अर्थमंत्र्यांच्या घोषणा आणि कार्यक्रम पाहाल, तर काळा पैसा निपटण्याचा कार्यक्रम आता डिजीटीकरण कार्यक्रमात बदलला आहे. करदात्यांचा पाया विस्तृत करण्याच्या, अधिकाधिक लोकांना कराच्या जाळ्यात ओढण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अधिकाधिक वस्तू व सेवांवर कर कसा लादता येईल याचा ध्यास सरकारने घेतलेला दिसतो. व्यव्हार डिजिटल झाले की प्रत्येक व्यवहारात, मग तो अगदी दोन रुपयाचा असुदे,सरकारला हात मारून खंडणी वसूल करायची आस आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशाविरोधात नोटबंदीचा कार्यक्रम कितपत नैतिक ठरतो याचा विचार प्रत्येक भारतीयाने करावयास हवा\nसुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे\nहोय हे शक्य आहे\nमुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट\nभारत देश माणसांचा की गायींचा\nखनिज तेलाला पर्याय काय\nसब घोडे बारा टक्के \nसुप्रीया सरकार भारतातील किती उद्योगांना कन्सल्टन्सी देतात त्याहून महत्वाचे किती सामान्य नागरिकांना कन्सल्टन्सी देतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vichitrakar.blogspot.com/", "date_download": "2018-04-20T16:27:15Z", "digest": "sha1:2Y2IAPN42I3DIBWEZYOWZQ3HH4O7WAAB", "length": 4054, "nlines": 65, "source_domain": "vichitrakar.blogspot.com", "title": "Maze Shabd Maze Rang", "raw_content": "\nपहिले अखिल भारतीय कृषि साहित्य संमेलन नुकतेच नासिक मधे पार पडले . त्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ''कृषि रत्न '' स्मरनिकेचे हे मुखपृष्ठ माझ्या अक्षर लेखनसाहित .\nLabels: माझे अक्षरलेखन, मी काढलेली मुखपृष्ठ\nमाझ्या कलाकृतीपैकी हि एक - राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलनात मान्यवरांना दिल गेलेलं हे सन्मान चिन्ह \nLabels: माझी कलाकृती, माझे अक्षरलेखन\nकाही नामांकित संस्थासाठी बनवलेले काही लोगो'ज .......\n\"युवाभारत सामाजिक जन जागृती मोहीम\" ह्या सामाजिक संस्थेसाठी बनवलेला लोगो\nLabels: माझी कलाकृती, माझे अक्षरलेखन\nLabels: माझी कविता, माझे अक्षरलेखन\nमी बनविलेली पोस्टकार्ड पेंटिंग..\nलेखक तुकाराम पाटील (पुणे ) यांच्या \"माणसातली माणसं '' ह्या कादंबरीसाठी मी काढलेले मुखपृष्ठ अन माझे अक्षरलेखन ……\nLabels: माझी कलाकृती, माझे अक्षरलेखन, मी काढलेली मुखपृष्ठ\n\" वारकरी \", पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकासाठी काढलेले हे मुखपृष्ठ अक्षरलेखन ……\nLabels: माझी कलाकृती, माझे अक्षरलेखन, मी काढलेली मुखपृष्ठ\nकाही नामांकित संस्थासाठी बनवलेले काही लोगो'ज ........\nमी बनविलेली पोस्टकार्ड पेंटिंग..\n'' आम्ही असेच ''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-14-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-20T16:16:23Z", "digest": "sha1:SI2DKVILJILHAK5BX6FNDZIRN7IMEX5H", "length": 13111, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कल्याण महामार्गावर 14 महिन्यांत 24 जणांचा बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकल्याण महामार्गावर 14 महिन्यांत 24 जणांचा बळी\nमहामार्ग वा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसऱ्या गाडीचा असो वा कोणीही. तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविणे कौशल्याचे काम आहे. अपघातांची संख्या पाहाता येणाऱ्या काळात चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. 90 टक्‍के चालक हे प्रशिक्षणाविनाच महामार्गावर वाहने चालवून मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहन धारकांचे प्रमाण जास्त आहे.\nवाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांत वाढ\nआळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 29 अपघात\nअणे – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मागील 14 महिन्यांत 24 जणांनी आपला जीव या महामार्गावर अपघातांमध्ये गमावला आहे. तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही. तसेच ठिकठिकाणी गतीरोधक नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.\nनगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) या तीस किलोमीटरच्या अंतरात 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 29 अपघात झाले आहेत. यामध्ये सहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापती शिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी 15 झाले आहेत. यात अकरा पुरुष व चार स्रियांचा समावेश आहे. दोन किरकोळ अपघात झाले असून यात दोन पुरुष जखमी झाले आहेत, अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर कुलकर्णी यांनी दिली.\nअणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडी जवळ रस्त्याला खड्डे पडल्याने 4 अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेज (बांगरवाडी) जवळ अपघात जास्त होतात. कॉलेज जवळ गतिरोधक नाही त्यामुळे वाहणांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या संख्येने होतात. बेल्हे बायपास जवळ धोकादायक वळण आहे. समोरून आलेले वाहन पटकन दिसत नाही. येथे शाळा व कॉलेज जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते. गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूल जवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.\nमोबाईच्या वापराने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आपल्या वाहनांच्या वेगावर मर्यादा असावी. रस्ता सुरक्षा नियमांचे वाहन धारकांना नीट पालन केल्याने अपघातांचे प्रमाण नक्‍कीच कमी होईल.\n– शरद सोनवणे, आमदार, जुन्नर\nवाहन चालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहन उभे करू नये. वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहन चालकाने व प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालवू नये. रस्ते नियम पायदळी तुडवले जात असल्यास कडक कारवाई केली जाईल.\n– मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक\nमहामार्गावर नियमाने गतिरोधक नसतात. मात्र, ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालय महामार्गाच्या जवळ आहे. ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे, शाळा आहे, अशा ठिकाणी गतिरोधक आवश्‍यक आहे. महामार्गावर वळण नसावे, कारण वळणे असल्यास समोरील वाहने दिसत नसल्याने अपघात वाढले. तसेच बायपासला सर्कल हवेत. तरच अपघात कमी होतील. – गणेश चोरे, ग्रामस्थ , बेल्हे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या मुंबईसमोर आज बंगळुरूचे आव्हान\nNext articleसातारा: मेडिकल कॉलेजसाठी आता सर्वपक्षीय पाठपुरावा\nपुणे जिल्हा: हक्काचे पाणी देता का कोणी \nकुरकुंभमध्ये मटका, जुगारावर पोलिसांचा छापा\nपुणे जिल्हा: चौथ्या दिवशी मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह\nकळंब येथे आज सामुदायिक विवाह सोहळा\nपुणे जिल्हा: दिवळेत मध्यरात्री दोन बिबट्यांचा धूमाकूळ\nकठुआ प्रकरणी उरुळी कांचनमध्ये मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-opportunities-and-challenges-maharashtra-civil-services-86935", "date_download": "2018-04-20T16:48:47Z", "digest": "sha1:URDDHG5TUC62LQ42K2OWKXKVWH2GBHXP", "length": 23645, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Opportunities and Challenges of Maharashtra Civil Services महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nदेशात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य ही महाराष्ट्राची ओळख. या राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, आयएसओ अशा प्रकारच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून लाखो तरुण बसतात. पदवीचा अभ्यासक्रम करतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामागे आयुष्यात मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न साकार करण्याची तीव्र इच्छा उमेदवारांना असते. समाजात मिळणारे मान, समाजसेवेची संधी ही कारणे यामागे आहेत.\n​- सुहास कोकाटे, शिवनेरी फाउंडेशन\nपारंपरिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातून करिअर करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे, पालकांचीही तीच इच्छा असते. मात्र या विचारसरणीला छेद देत स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती यांकडे योग्य पर्याय म्हणून आजची पिढी पाहते. राज्यात लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाची तयारी करतात, मात्र खोलवर विचार केल्यास करिअरचे पर्याय निवडताना त्यातील संधी व आव्हाने यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेच दिसते.\nया परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी पहिल्या अथवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतात. मात्र काही विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षे किंवा यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर येणारे दडपण, मित्र, आप्तेष्टांकडून केली जाणारी विचारणा, पुढच्या परीक्षेत नक्की यशस्वी होईल ही आशा आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यांमध्ये विद्यार्थी गुरफटत जातो. ‘शिवनेरी फाउंडेशन’ने राज्यातील अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. यामध्ये अनेक बाबी समोर आल्या. शहरी भागात जाऊन कोचिंग क्‍लासेस लावता येत नाहीत, अभ्यासाची साधने एका जागेवर न मिळाल्याने अनेकविध साहित्य अभ्यासावे लागते, खूप जास्त अभ्यासामुळे ताणही वाढतो. घरबसल्या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकेल असे साहित्य उमेदवारांकडे नसते, हेही हे दिसून आले. त्यातून या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन देऊन अभ्यासाचा आराखडा दिल्यास प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवाक्‍यातील गोष्ट आहे, ही बाब जाणून घेत ‘शिवनेरी फाउंडेशन’ने डिजिटल तंत्र तयार केले असून, ते राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे.\nउमेदवारांना फायदेशीर ठरणाऱ्या या तंत्राची माहिती आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी कमी कालावधीत यशस्वी होणारे विद्यार्थी व माझ्यामध्ये नेमका फरक कोणता आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्‍यक आहे. कोणताही विद्यार्थी अठरा महिन्यांच्या कालावधीत सहजपणे चांगल्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकतो, हे आमचे मत आहे. अर्थात, हे कसे शक्‍य आहे त्यासाठी काय करावे लागेल, हे प्रश्न आपोआप समोर येतील. त्यासाठी काही मुद्दे\nपहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात कसे\nकमी कालावधीत उत्तीर्ण होणारे व अनेक वर्षे अभ्यास करूनही अपयश पदरी पडणारे विद्यार्थी यांच्यात अभ्यासाची नेमकी पद्धत व स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन हा फरक आहे. कमी प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी अभ्यासाच्या पद्धतीतील टप्पे समजावून घेतात, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाचे नेमकेपण समजून घेऊन परीक्षेविषयी सखोल व योग्य माहिती मिळवतात. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, प्रश्न नेमक्‍या कोणत्या पद्धतीने विचारले जात आहेत, मी कोणत्या पद्धतीने वाचन करायचे आहे, कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत, त्यासाठीचे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे लागेल याची माहिती ते घेतात. त्यांना अवांतर वाचन, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन व कात्रणे काढण्याची सवय असते. अभ्यासाची स्वतंत्र शैली म्हणून नियमितपणे गटचर्चा करतात. अभ्यासात नियमितपणा व सातत्य असते. प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण व नेमके वाचन करून ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतोय त्या घटकांची तयारी करतात. संबंधित घटकाच्या बाबतीतील अद्ययावत घटनांवर ते बारकाईने लक्ष देऊन नमूद करून घेतात.\nमित्रांनो, अभ्यासक्रमाचे छोटे-छोटे टप्पे पाडणारे विद्यार्थी उदा. ः अर्थशास्त्रामध्ये सहा घटक असतील, तर आज मी या पैकी कोणत्या घटकाची तयारी करणार आहे याचे नियोजन करतात. दररोज मी काय करणार, हे ठरवून छोटे टप्पे घेतात. ते पूर्ण करतात. त्यातून अभ्यासातही सातत्य राहते व ध्येयाकडील वाटचालीचे अंतर कमी होत जाते.\nयश न मिळण्यामागे अभ्यासाचे निश्‍चित नियोजन नसणे, कोणती परीक्षा द्यायची आहे याबद्दल एकमत नसणे, राज्यसेवेची परीक्षा आली, की त्याचा अभ्यास, फौजदार, विक्रीकर निरीक्षक, सहायकांच्या जाहिराती आल्या, की पुन्हा त्या पदांच्या अभ्यासाला सुरवात अशा पद्धतीने यशही एकमताने मिळत नाही. परीक्षा आली, की १२ ते १५ तास अभ्यासामुळे आपण वर्षानुवर्षे परीक्षा देत राहतो. गाइडचा जास्तीत जास्त वापर करतो. प्रत्येकवेळी मी अभ्यास केला होता, मात्र पेपर अवघड होता, मेरिट जास्त लागले, अशी कारणे योग्य नाहीत. इतर विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना मला अपयश का येते, हे प्रामाणिकपणे तपासून आपण कोठे कमी पडतो याचे ठळक मूल्यमापन करावे आणि टाळण्याची सुरवात करावी.\n‘शिवनेरी फाउंडेशन’ने लाखो विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्यांना घरबसल्या, स्वतःची कामे सांभाळून, अगदी कोचिंग क्‍लासेसप्रमाणे तज्ज्ञांची व्हिडिओ लेक्‍चर्स उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याकडे ‘सीइंग इज बिलिव्हिंग’ अशी इंग्रजी म्हण आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याखेरीज त्याच्यावर विश्‍वास बसत नाही. अलीकडे व्हिज्युअल्स ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सर्व अभ्यासच मुळात कोणीतरी आपल्याला शिकवतो आहे, अशा दृष्टीनेच अभ्यासायचा अशी ही संकल्पना आहे. अपयशावर मात करण्यासाठी प्रेरणा द्यायची हीच ‘शिवनेरी’ची भावना आहे आणि आत्मविश्वासाने उभा राहणारा उमेदवार ही स्पर्धा परीक्षेतील नवी पिढी पाहायची आहे, म्हणूनच हा पत्रप्रपंच\nपुढील विषयासह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच\nअभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईल फोन आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापरता येऊ शकेल. अँड्रॉईड मोबाईल फोन असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते मिळेल. एकाच मोबाईल फोनवर त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध असेल.\nतंत्राची झलक येथेही पाहता येईल...\n‘यू-ट्यूब’वर शिवनेरी ॲकॅडमीचा चॅनेल आहे. शिवनेरी ॲकॅडमीवर (shivneri academy) सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌स ॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.\nनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क - ७३५०००१६१७ (सकाळी १० ते सायंकाळी ६ - रविवार वगळता)\nमच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह\nवणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत....\nटीसीएस बनणार भारताची पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी\nमुंबई : भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार...\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-254351.html", "date_download": "2018-04-20T16:25:36Z", "digest": "sha1:ZDKUKX7AOHZTP2S5ID3Q7LR6B2NF4672", "length": 12169, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सट्टा बाजाराचा सपा-काँग्रेसला कौल, भाजप दुसऱ्या क्रमांकावर", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nसट्टा बाजाराचा सपा-काँग्रेसला कौल, भाजप दुसऱ्या क्रमांकावर\n10 मार्च : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता काही तासांवर येऊ ठेपली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण, दुसरीकडे सट्टा बाजाराने मात्र सपा आणि काँग्रेसला कौल दिलाय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातच्या सट्टा बाजाराने सर्वात जास्त भाव सपा आणि काँग्रेसच्या युतीला लावलाय. मुंबई, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्येही या युतीला जास्त भाव लावलाय.\nसट्टा बाजाराने लावलेल्या भावानुसार सपा आणि काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल. गुजरातच्या सट्टा बाजाराने सपा आणि काँग्रेसला 220 ते 225 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 100-103 जागा मिळतील आणि मायावतींच्या बसपाला 60 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. मध्यप्रदेशमध्ये सट्टा बाजाराने सपा आणि काँग्रेसला 236 जागा, भाजपला 77 ते 80 आणि बसपाला 61 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय.\nतर मुंबईमध्येही सपा आणि काँग्रेसच्या युतीला 270 ते 225 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 95 ते 100 आणि बसपाला 64 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजधानी दिल्लीचा सट्टा बाजारही सपा-काँग्रेस युतीचं सरकार बनले असा अंदाज वर्तवतेय. युतीला 229 ते 233 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 90 ते 94 आणि बसपाला 65 ते 68 जागा मिळतील.\nआता काही तासांत निकाल स्पष्ट होईल आणि जनतेचा फैसला काय असेल याचं खंरखुरं चित्र समोर येईल. तेव्हाच एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील की सट्टा बाजाराचे दावे हे लवकरच कळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: akhilesh yadavarahul gandhiSPअखिलेश यादवउत्तरप्रदेशकाँग्रेसराहुल गांधीसट्टा बाजारसपासमाजवादी पक्ष\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/i-am-happy-with-government-salary-tukaram-mundhe/", "date_download": "2018-04-20T16:17:56Z", "digest": "sha1:DQNHKCQN5DZR6GQYP4TBO6DPNNALTZMI", "length": 8659, "nlines": 60, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "मी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nमी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन\nसरकारकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये मी समाधानी असून बोनसच्या रुपात अतिरिक्त रक्कम स्वीकारत नाही, अधिकारी वर्गाने देखील बोनस घेऊ नये, असे सांगत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनाही बोनस न घेण्याचे आवाहन केले. मी नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना दिवाळीचा बोनस घेतला नव्हता. यावेळी माझ्यासोबत कार्यरत अधिकाऱ्यांनी बोनस नाकारला होता, असे सांगत त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये, असे आवाहन केले. अर्थात यासाठी मी कोणालाही सक्ती नसल्याचेही त्यांनी सांगितले .\nपीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा बोनससंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, कर्मचारी वर्गाला सानुग्रह अनुदान आणि सर्व रक्कम मिळून साधारण ३२ कोटी द्यावे लागणार आहेत. यातील १९ कोटी रक्कम पुणे महापालिका तर १२ कोटी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दिवाळीत पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतील .\nपुणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याला संचलन तूट दिली जाते. यातून दरवर्षी दिवाळी सणाला पीएमपीएमएल प्रशासनास वेतनाच्या ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि बक्षीस म्हणून १२ हजार रुपये दिले जातात. मात्र यंदा मुंढे यांनी आर्थिक तुटीचे कारण देऊन सानुग्रह अनुदान आणि बक्षीस देण्यास नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे कामगारामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती.\nमग कर्मचाऱ्यांनी आज पीएमपीएमएलच्या मुख्य इमारतीबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावर निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला होता. ही परिस्थिती लक्षात मुंढेंनी तातडीने बैठक आयोजित करुन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे महापौर तसेच आयुक्त उपस्थित होते. कामगार वर्गाचा बोनसचा विषय मार्गी लागल्याने कामगारांनी मुख्य इमारती बाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारला पाठवण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज मांडली स्वतः ची ‘ ही ‘ भूमिका अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=2018", "date_download": "2018-04-20T16:43:47Z", "digest": "sha1:WD4UQXVQLHGFHRJ7ZAFXQJBJS53T3AAI", "length": 16393, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nराजतंत्र न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १९: बाल शिक्षणातूनच माणूस घडतो. बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. देशाचे भविष्य घडवायचे असेल तर समृद्ध नागरिक घडवावे लागतील आणि यासाठी बालशिक्षणाचा पाया अधिक मजबूत करावा लागेल. ताराबाई आणि अनुताई यांनी हे ओळखूनच तळागाळापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षण पोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य उभे केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ...\tRead More »\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर दि. १९: पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विसनू सवरा यांनी आज, पालघर जिल्हा मुख्यालयाच्या सर्व इमारतींची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग व कंत्राटदारांना दिले. सवरानसह जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जर, तहसीलदार महेश सागर, सिडको अभियंता देसापांडे व खंडाळकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने ...\tRead More »\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. १९ : आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बॅंकांतर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात येते. हि कर्ज प्रकरणे निकाली काढताना बॅंकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आणा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे निरीक्षक किरण पटवर्धन यांनी केले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी ...\tRead More »\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. १९: पालघर पोलिसांनी काल, बुधवारी विरार व डहाणू तालुक्यातील कसा येथे अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करीत ९ हजार २३६ रुपये किमतीच्या दारूसह या अवैध्य दारू धंद्यात वापरणं यात आलेली ३ लाख रुपये किमतीची कर जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Share on: WhatsApp\tRead More »\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nप्रतिनिधी मनोर, ता. १९ : येथील चिल्हार- अवदानी ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका युनिटमार्फत काल बुधवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर माकपचीच सत्ता असताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायती अंतर्गत 18 पाडे आणि ...\tRead More »\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nप्रतिनिधी: कुडूस दि. १९ :परिसरातील दगडखाणी व कारखानदारी या मुळे जंगलांचा नायनाट झाला असला तरी येथील आदिवासी महिलांनी शासनाच्या फसव्या घोषणावर विश्वासून न बसता तेंदू पानावर आपला स्वयं रोजगार शोधला आहे. कुडूस, केळठण ,लोहोपे, गुंजकाटी या परिसरात काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते. भरपूर वृक्ष, प्राणी व जंगली मेवा यांची वाणवा नव्हती. मात्र काळानुरुप माणूस ...\tRead More »\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nवार्ताहर बोईसर, दि. १९ : तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी दांडी, नवापूर व उच्छेळी येथील खाडीतून समुद्रात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र या कामामुळे मच्छीमार बांधवांच्या बोटींना समुद्रात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तसेच या कामामुळे दोन बोटींना दुर्घटना झाल्याने आज या भागातील मच्छिमार बांधवानी तारापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना व टिमाच्या सचिवांना ...\tRead More »\nजव्हार येथे टेम्पो अपघातात १ ठार\nजव्हार-वाडा-विक्रमगड रोडवरील जुनी जव्हार समज बुधवारी रात्री राजू अंभिरे यांच्या पोल्ट्रीसमोरील वळणावर टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन यात सागर मच्छी (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर कौशिक रायकर व संजय दुबळा हे दोघे गंभीर जखमी झले असून त्यांना अधिक उपचारासाठी सेल्वास येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले आहे Share on: WhatsApp\tRead More »\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपतंगे हे आज सकाळी मोखाडा उपडाकघर येथे तपासणी करण्यासाठी जात असताना कासटवाडी (जव्हार) येथे त्यांच्या मोटारसायकलला राज्य परिवहन मंडळाच्या बसने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले विरारचे डाक निरीक्षक प्रतिक कानडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ठाणे येथे दाखल करण्यात आले ...\tRead More »\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nComments Off on पोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nपालघर, दि. 18 : गांधीनगर झोपडपट्टीजवळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत 8 कीलो 430 ग्रेम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची कींमत सुमारे 80,420 रु. इतकी आहे. पालघर शहराजवळील गांधीनगर झोपडपट्टी जवळील मैदानात एक ईसम गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पालघरचे पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे व पोलिस उप अधिक्षक विश्‍वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-20T16:37:35Z", "digest": "sha1:JMC7UBP3AZFRH7YDWC2HLA3FPDZXRRZZ", "length": 8960, "nlines": 123, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "मसाज विषयी प्रश्नोत्तरे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमसाज करण्यापूर्वी आंघोळ करावी का\nजर ताण पडेल असा व्यायम केला असेल तर मसाज करण्यापूर्वी आंघोळ करणे योग्य आहे.\nमसाज करतांना काय कपडे घालावे\nआपल्याला जसा सोईचा किंवा योग्य वाटेल तो ड्रेस घालावा, काही लोक शॉर्टस चा वापर करतात.\nशरीराच्या कोणत्या भागावर मसाज करावा \nअर्ध्या तासाच्या कालावधीच्या मसाज थेरपिस्ट विचारतात शरीराचे कोणते अवयव जड वाटत आहेत, आणि त्यावर मसाज करतात. (वैयक्तितरीत्या बरेच जण मान, खांदे, पाय, हे अवयव सुचवतात) एक तासाच्या कालावधीच्या मसाज मध्ये मसाज थेरपीस्ट बहूतेक वेळा पाठ, मान, खांदे, पाय, चेहरे, डोके, यांना मसाज करतात.\nमसाज झाल्यावर तेल धुवावे का\nहा प्रत्येकाचा वैयक्तित प्रश्न आहे, पण काही तेल मसाज मुळे शरीरात जिरतात व त्वचा सॉप्ट बनवतात पण काही त्वचा तेलकट बनतात त्या वेळेस स्वच्छ धुवून टाकणे चांगले असते.\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:40:45Z", "digest": "sha1:AWLL2CEOACOVLQ5KVZVG64FBTS2EL4OU", "length": 3351, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बेनिनमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"बेनिनमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/navratri/word", "date_download": "2018-04-20T16:33:54Z", "digest": "sha1:G4XBWG4Q4S7NQT6OGI7WWWI3UDBN2DJY", "length": 12154, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - navratri", "raw_content": "\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\nभोंडल्याची ( हादग्याची ) गाणी - एलमा पैलमा गणेश देवा ...\nभोंडल्याची गाणी - एक लिंबु झेलू बाई , दो...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried ..\nभोंडल्याची गाणी - नणंदा भावजया दोघीजणी \nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - ' तुझ्या ग माहेरच्यांनी...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - अक्कणमाती चिक्कणमाती , ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आला चेंडू , गेला चेंडू ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - सासूबाई सासूबाई मला आल...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण वार बाई \nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - सोन्याचा कंरडा बाई मोत...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आड बाई आडवाणी आडाचं प...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - नणंद भावजया खेळत होत्य...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - ' कोथिंबीरी बाई ग , आत...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - काळी माती मऊ मऊ माती ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आज कोण पाहुणे आले ग ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - दीड दमडीचं तेल आणलं ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - हरीच्या नैवेद्याला केली...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - कृष्ण घालीतो लोळण यशोद...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - कारल्याचा वेल लाव गं ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nभोंडल्याची गाणी - आणा माझ्या सासरचा वैद्...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात, Bhondala is the simple gathering of unmarried..\nन. ( नृत्य ) आलिढस्थान करून हात रेचित करून वक्षःस्थलावर ठेवणे व उंच करून खाली सोडणें . [ सं . ]\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/katrina-doing-pushups-265866.html", "date_download": "2018-04-20T16:28:51Z", "digest": "sha1:VZQO4JXRAN5S3DMD2RLJOT32Y5QZ4OSI", "length": 10367, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कतरिना मारतेय 'पुश अप्स'", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकतरिना मारतेय 'पुश अप्स'\nया व्हिडिओमध्ये कतरिना चक्क हाताचा आधार न घेताही पुशअप्स मारताना दिसते आहे.\n25 जुलै : कतरिना कैफचा 'पुश अप्स' मारतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना चक्क हाताचा आधार न घेताही पुशअप्स मारताना दिसते आहे.\nसध्या कतरिना सलमान खानसोबत टायगर जिंदा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमासाठी कतरिना भरपूर वर्कआऊट करते आहे. या सिनेमाच्या सेटवरती भरपूर थट्टा मस्करीही होत असते. अशाच मस्करीच्यावेळी कतरिनाने हा व्हिडिओ इंस्ट्राग्रामवरती शेअर केला आहे.\nया व्हिडिओमध्ये सुरुवातीला कतरिना दोन्ही हातांवर पुश अप्स मारतेय. पण काही क्षणातच ती वन हॅन्ड पुश अप्स मारताना दिसते. त्यानंतर ती दोन्ही हात पाठीमागे ठेवून हाताचा आधार न घेता पुश अप्स मारताना दिसते. पण यानंतर कळतं की या सगळ्या पुश अप्स कतरिना एका लाकडी प्लँकच्या मदतीने करते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धमाल व्हिडिओ पाहूयात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nफ्रायडे फिव्हर : आज 'या' तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मेजवानी\nसाताऱ्यात 'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयकुमारला दुखापत\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:40:26Z", "digest": "sha1:4M6BKJ7H2DUPNY3Y5TL2Y2XOFO7SHS3B", "length": 4947, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालेश्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर समुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.\nहे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबालेश्वर जिल्ह्यातील शहरे व गावे\nभारताची अग्निबाण प्रक्षेपण स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१७ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88/", "date_download": "2018-04-20T16:35:13Z", "digest": "sha1:ISSUTLRDX457BQIHN5T6WKF2NNPVFRJ2", "length": 5931, "nlines": 58, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "चाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nचाकणमध्ये घडली एक दुर्दैवी घटना\nचाकणमधील शिक्षक वसाहतीत राहणाऱ्या पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्मेहत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. महादेव गोरोबा शिंदे आणि लक्ष्मी महादेव शिंदे अस मयत पती पत्नीचं नाव आहे.\nमयत महादेव गोरोबा शिंदे यांना दोन पत्नी आहेत. त्यातील पहिली पत्नी ही उस्मानाबादमधील चारोळा या मूळ गावी राहते. तर दुसरी पत्नी महादेव यांच्या सोबत चाकणमध्ये राहत होती. पहिल्या पत्नीचा मुलगा विकास हा देखील त्यांच्यासोबत राहात होता. सोमवारी दुपारी विकास जेवणासाठी कामावरून घरी आला. त्याने दरवाजा बराचवेळ ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो पुन्हा कामावर निघून गेला.\nरात्री पुन्हा घरी परतल्यानंतरही दार बंदच होते. त्याने दार ठोठावल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्यानं शेजारी राहणाऱ्या नातेवाईंकाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडल्यानंतर स्वयंपाक घरात पती आणि पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.\n← एवढी लाटणी कशाला, भाजपला ठोकायला : शिवसेना एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/fashion-for-people-over-sixty/", "date_download": "2018-04-20T16:38:52Z", "digest": "sha1:MKHQ7UPKFPAXFJPEMJMZGBL72SMVF4YT", "length": 22446, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजोबांसाठी रुबाबदार पोशाख | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nअनेकदा आजोबांना ‘कॅज्युअल कपडे’ कोणते घ्यायचे हा प्रश्न पडतो. मात्र त्यांच्यासाठी आरामदायी, सहज हालचाल करता येतील असे कपडे बाजारात उपलब्ध असतात. अशा कपड्य़ांची माहिती ज्येष्ठांना नसल्यामुळे असे कपडे विकत घेण्यात अडचण येते. रुबाबदार आणि डौलदार व्यक्तिमत्त्वासाठी नवीन ट्रेंडचे, फॅशनेबल कपडे वापरण्याचीही हौस हवी.\nवय वर्षे ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले आजोबाही कपड्य़ांची स्टाइल, फॅब्रिक, कपड्य़ावरील प्रिंट आणि डिझाइन याबाबत सजग असतात. हलक्याफुलक्या कपड्य़ांच्या माध्यमातून नवनवीन, हल्लीच्या काळातील बदललेल्या नव्या फॅशनचाही आनंद घेऊन आपला ‘लूक’ बदलू शकतात. कारण पोषाखाचा बदलता ट्रेंड हा कोणत्याही वयात आवडीनुसार वापरता येतो. जेणेकरून प्रौढ वयातही देखणं आणि रुबाबदार दिसायला मदत होईल. याकरिता नवीन शैलीचे कपडे निवडावेत.\nनिवृत्तीनंतर घरीच राहात असल्यामुळे फॉर्मल कपड्य़ांची (शर्ट-पॅण्ट) गरज कमी होते. शिवाय वय वाढलेले असल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता किंवा घाम येण्याचे प्रमाणही जास्त असू शकते. अशा वेळी मोकळे कपडे घालण्याची गरज निर्माण होते. महत्त्वाचे म्हणजे या वेळी कार्यालयीन काम फारसे करावे लागत नाही. घरीच असल्यामुळे या कपड्य़ात घरची कामे करणे सोयीचे जातेच शिवाय हल्ली कॅज्युअल कपड्य़ांमध्ये काही पार्टी वेअरही आहेत. जेणेकरून यामध्ये आरामदायीही वाटेल यासाठी कॅज्युअल कपड्य़ांची आवश्यकता असते.\nअशा कपड्य़ांमुळे व्यक्तिमत्त्वाला नेहमीपेक्षा वेगळे सौंदर्य प्राप्त होते. शरीरही रुबाबदार, आकर्षक दिसते. त्यामुळे आपल्या रंगाला शोभतील असे कपडे बाजारात मिळत असतात. यामध्ये लोकर कोट, लहान जॅकेट, विविध प्रकारच्या थ्री-फोर्थ, लांब हाताचे, छोट्य़ा हातांचे जीन्स-टी-शर्ट, बाही असलेले किंवा नसलेले असे वेगवेगळ्य़ा प्रकारचे कपडे जे तारुण्याचा लूक देतात.\nपूर्वी गुलाबी रंगात पुरुषांचे कपडे कधीच दिसायचे नाहीत, पण आता हे चित्र बदललंय. अप टू डेट, स्मार्ट, कॅज्युअल, स्टायलीश अशा वेगवेगळ्य़ा पर्यायांचा विचार ज्येष्ठांच्या कपड्य़ांमध्येही निर्माण झाले आहेत. यामध्ये हल्ली गुलाबी रंगाला उठाव येऊ लागलाय. यामध्ये गडद फिकट छटांमध्ये शर्टस, टी-शर्टस, कुर्ते, झब्बे यांचाही समावेश आहे.\n– पायघोळ किंवा पायांना न चिकटणाऱया वैविध्यपूर्ण फॅब्रिक्स आणि स्टाईलीशच्या पॅण्ट सध्या विकत मिळतात. ज्येष्ठांसाठी सोयीच्या आहेत.\n– अनेक रंग आणि प्रिंटचे टी-शर्ट कॅज्युअल कपडे म्हणून वापरता येतात.\n– पुरुषांमध्ये फॉर्मल सूटप्रमाणेच कॅज्युअल राऊंड नेक किंवा व्ही नेक टी-शर्ट आणि पायात लोफर शूज, स्नीकर शूज घालण्याची पद्धत आहे.\n– कॅज्युअल पेहरावात वॉश्ड डेनिम फॅब्रिक हाही एक पर्याय आहे. वॉश्ड डेनिम म्हणजे आपल्या जीन्स किंवा डेनिम जॅकेटवर एका विशिष्ट प्रकारचे शेडिंग दिसते त्याला वॉश्ड डेनिम म्हणतात.\n– फॉर्मल वेअरमध्ये जसे प्लेड चेक्स, स्ट्रइप्ड फॅब्रिक्स तर कॅझ्युअल वेअरमध्ये हवाईयन प्रिंटेड शर्टस् वेगवेगळय़ा डिझाइनमध्ये मिळतात.\n– काही कपड्य़ांवर कार्टून प्रिंटस्, उठावदार रंगातील ऍब्स्ट्रक्ट प्रिंटस् असतात. आवडीनुसार हा पर्याय वापरू शकता.\n– आपल्या वॉर्डरोबसाठी नेहमीच काळय़ा, लाल आणि निळय़ा रंगाला मागे सारून अल्ट्रा वॉयलेट रंगांचीही निवड करू शकता. सध्या बाजारात पुरुषांच्या कपडय़ांमध्ये अल्ट्रा वॉयलेटचा ट्रेंड आहे.\n– दोन टोन असलेला मॅट फिनिशचा जांभळय़ा रंगाचा शर्ट हा कॅझ्युअल लूकसाठी किंवा कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर पार्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे.\n– कॅज्युअल डेनिम आणि क्रिस्प शर्ट अशा कोणत्याही कपडय़ांसोबत डफल बॅगही चांगली दिसते.\n– जॉगिंगला जाण्याकरिता कॅज्युअल वेशभूषेत नेटेड किंवा विणलेल्या सुताच्या कपडय़ाच्या जॉगिंग पँण्ट परिधान कराव्यात. यामुळेही मोहकपणा येतो.\n– व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी ट्रेंडी रंग, साजेसी झिपर, प्रिंटसचा वापर करा.\n‘माझा मराठीची बोलू कौतुके’ किंवा ‘ने मजसी ने’, ‘मी मराठी’, यांसह पाडगावकरांच्या ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ या काव्यपंक्ती कॅलिग्राफीत टी-शर्टवर उमटल्या तर आजोबाही त्यांच्या मित्रमंडळींमध्ये मिरवू शकतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोकणातील प्रस्तावित रिफायनरी विदर्भात आणा- आशीष देशमुख\nपुढीलकोहलीला आत घेतले म्हणून मला बाहेर काढले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/6sambhajinagar/page/100/", "date_download": "2018-04-20T16:33:26Z", "digest": "sha1:LC3W6NVXF36HCAPCXUCEBPLOW62GWQ7G", "length": 18375, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगर | Saamana (सामना) | पृष्ठ 100", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n४८ तासांत कडाक्याची थंडी\n नागपूर विदर्भ, मराठवाडा यांसारख्या महाराष्ट्रातील काही भागात येत्या ४८ तासांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे संकेत कुलाबा वेधशाळेने दिले आहेत. गुरूवारी रात्री गोंदीयामध्ये...\nरेकॉर्डब्रेक कावड यात्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी केले जिल्हाप्रमुख दानवेंचे अभिनंदन\n संभाजीनगर संभाजीनगरात मागील श्रावण महिन्यात काढण्यात आलेल्या ‘हर-हर महादेव’ कावड यात्रेस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...\nखून झालेल्या तरुणाच्या पित्याची याचिका फेटाळली\n संभाजीनगर खुनी तरुण हा मनोरुग्ण नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश व्हावेत, अशा आशयाची याचिका ज्या तरुणाचा खून झाला त्याच्या पित्याने...\nरामदास स्वामींच्या पादुकांचे शुक्रवारी संभाजीनगरात आगमन\n संभाजीनगर समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने श्रीक्षेत्र सज्जनगड (जि. सातारा, समाधीस्थळ) येथील समर्थ रामदास स्वामी...\nभूखंडमाफिया शेर खानची छावणीत हत्या, ५ पैकी ३ गजाआड\n संभाजीनगर छावणीतील भूखंडमाफीया हुसेन खान अली यार ऊर्फ शेर खानची बुधवारी मध्यरात्री निघृण हत्या केल्याची घटना लक्ष्मी कॉलनीत गुरुवारी पहाटे उघडकीस आली....\nशिवरायांचे आठवावे रूप… शिवरायांचा आठवावा प्रताप\n संभाजीनगर आडगाव (खुर्द) येथे २० ते २८ डिसेंबरदरम्यान शिवचरित्र व्याख्यानमाला झाली. शिवरायांच्या जन्मापूर्वी परकीय शक्तींनी ग्रासलेल्या मुस्लिम पाच शाहींनी भयग्रस्त, लाचार झालेल्या...\n पुणे मुस्लीम समाजातील तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन, शिक्षण मिळावे, त्यातून नोकरीच्या संधी वाढाव्यात आणि गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पुणे पोलिसांनी ‘मिशन...\nवैजापुरात घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे\n वैजापूर तालुक्यातील बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे दहा दिवसांत करणे शक्य नसल्यामुळे अधिकारी-कर्मचारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत. प्रथमच...\nट्रकने धडक देत दुचाकीला फरफटत नेले\n संभाजीनगर रत्नपुरातील महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी पत्नीसोबत निघालेल्या पतीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने समोरून जोराची धडक दिली. जोराच्या धडकेने दुचाकी तब्बल १५ फूट फरफटत...\nजागा दिली नाही तर जेलमध्ये आंदोलन करणार\n नगर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपालाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, ‘करेंगे या मरेंगे’चा नारा देत आता लढाई आरपार, असे सांगून...\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/parle-katta-should-became-like-londons-hyde-park/articleshow/62491430.cms", "date_download": "2018-04-20T16:29:05Z", "digest": "sha1:67Z5UPRQNTUHKNONGQT4YSK3EYXDYTI3", "length": 27220, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'parle katta' should became like london's hyde park | लंडनच्या ‘हाइड पार्क’प्रमाणे व्हावा ‘पार्ले कट्टा’ - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nलंडनच्या ‘हाइड पार्क’प्रमाणे व्हावा ‘पार्ले कट्टा’\nसांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांचे गौरवोद‍्गार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमहाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक-साहित्यिक परंपरा लाभली आहे. त्यात पार्ले कट्ट्यासारखे उपक्रम हे मराठी माणसाची सांस्कृतिक भूक उत्तम भागवतात आणि म्हणूनच त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यामुळे लंडनमध्ये जसा ‘हाइड पार्क’चा उल्लेख होतो तसा महाराष्ट्रात ‘पार्ले कट्ट्या’चा व्हावा, असे गौरवोद‍्गार काढत या कट्ट्यातर्फे यापुढेही उत्तमोत्तम कार्यक्रम होत राहावेत, अशी अपेक्षा सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच व्यक्त केली. पार्ले कट्ट्याच्या दशकपूर्तीनिमित्त विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात झालेल्या आनंद सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.\nउद्योजक दीपक घैसास यांनी यावेळी कट्ट्याच्या संचालिका रत्नप्रभा महाजन व सर्व कट्टेकऱ्यांचे अभिनंदन करून उत्तम-उद्बोधक कार्यक्रमांची समाजाला असलेली गरज अधोरेखित केली. नव्या पिढीतील तरुण-तरुणींनी अशा कार्यक्रमांना हजेरी लावून विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रत्यक्ष ऐकले, भेटले पाहिजे आणि सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष भेटीतून मिळणारी ऊर्जा किती वेगळी असते याचा अनुभव घेतला पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nया सोहळ्यात प्रमुख पाहुणे असलेले सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची मुलाखत चित्रा वाघ व प्रज्ञा काणे यांनी रंगतदार केली. तीनशेहून अधिक चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडणारे सयाजी यांनी चंदेरी दुनियेतील, विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटातील अनुभवांसह ‘सह्याद्री वनराई प्रकल्पा’बद्दलही यावेळी उपस्थितांना रंजक माहिती दिली. ‘पाळण्यापासून सरणापर्यंत आपल्याला लाकूड लागते. जन्मभर कोणतेही झाड निरपेक्ष भावनेने आपल्याला फळे, फुले, सावली व ऑक्सिजन देत राहते. म्हणून अधिकाधिक झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करून आपण सर्वांनीच परतफेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पन्नास एकरावर झाडे लावण्याचा आपला संकल्प असून आतापर्यंत सात जिल्हे हरीत झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nपार्ले कट्टातर्फे गेल्या दहा वर्षांत आयोजित साठहून अधिक नामवंतांच्या मुलाखती व अन्य उपक्रमांचा धावता आढावा घेणारी एक ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. कट्टा सदस्य प्रा. स्वाती वाघ यांनी शब्दबद्ध केलेल्या, सत्यजित कोसंबी यांनी संगीत दिलेल्या आणि सर्व कट्टा सदस्यांनीच गायलेल्या स्फूर्तीगीताचाही त्यात समावेश होता. ही ध्वनिचित्रफीत यू-ट्यूबवरही उपलब्ध आहे.\nया सोहळ्याच्या उत्तरार्धात ‘जागर लोककलेचा’ हा कार्यक्रम झाला. त्यात युवा लोककलावंत योगेश चिकटगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गण, गवळण, बतावणी, पोवाडा, भारूड, लावणी अशा विविधरंगी लोककला सादर केल्या. प्रा. स्वाती वाघ व सत्यजीत कोसंबी यांनी याचे सूत्रसंचालन केले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1लंडनच्या ‘हाइड पार्क’प्रमाणे व्हावा ‘पार्ले कट्टा’...\n2महापालिका अधिकाऱ्यांनाही आरोपी करा...\n3‘आधार’मुळे मुलांची पालकांशी पुनर्भेट...\n4मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक...\n5डोमेस्टिक विमानतळाला आग, जीवितहानी नाही...\n6न्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको...\n7सात जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं...\n8सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: शिवसेना...\n9मुलुंडमध्ये बिबट्याचा हल्ला; सहा जखमी...\n10देशाबाहेर पडल्यावर सीमा नाहीशा होतात...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-04-20T16:44:00Z", "digest": "sha1:EQ44IJTT37HUZHXEVMMHCV2USEEXFNTN", "length": 4846, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३३० चे - पू. ३२० चे - पू. ३१० चे - पू. ३०० चे - पू. २९० चे\nवर्षे: पू. ३२१ - पू. ३२० - पू. ३१९ - पू. ३१८ - पू. ३१७ - पू. ३१६ - पू. ३१५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३१० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-drama-aamhi-ani-aamche-baap/", "date_download": "2018-04-20T16:38:41Z", "digest": "sha1:ZUAZHYW5TMESSCZWYH7CUKN6AV75S3NG", "length": 25474, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमूल्य मोत्यांची ओंजळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n‘आम्ही आणि आमचे बाप’ आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे या दोन बापमाणसांच्या कलाकृतींची लोभसवाणी गुंफण.\nकाही नाटकं ही लेखकांच्या लिखाणावर गाजतात. काही दिग्दर्शकाच्या कौशल्यावर चालतात, तर काही नटनटय़ांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतात. पण एखादीच कलाकृती अशी असते जी केवळ मराठी भाषेवर आणि त्यातील बाप माणसांवर अवलंबून असते. ‘आम्ही आणि आमचे बाप’ ही अशी कलाकृती आहे. हे नाटक नसून ज्यांनी आपल्याला मराठी भाषेतून विलक्षण आनंद दिला त्या थोरामोठय़ांचा ऋणनिर्देश आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही दोन व्यक्तिमत्त्वे प्रत्येक मराठी मनात अशी काही रुजली आहेत, जणू घरातल्या देव्हाऱयातल्या मूर्ती. घराघरातल्या देव्हाऱयातले देव भिन्न असू शकतील, पण मराठी मनाच्या देवघरात या दोघांना पर्याय नाही.\nमुळात आचार्य अत्रे आणि पु.ल. यांची तुलना शक्य नाही. इतरांशी तर नाहीच, पण एकमेकांशीही नाही. दोघांमधलं साम्य इतकंच की दोघं हरहुन्नरी अवलिये. पत्रकारिता, नाटय़लेखन, चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन, संगीताशी सलगी. सामाजिक भान व कार्य आणि जबरदस्त विनोदबुद्धी हे सगळं या दोघांमध्ये समसमान. पण दोघांच्या वैचारिक बैठकीत खूप फरक होता. हा फरक उणे-अधिकचा नाही. पिढी-पिढीतला आहे. या संदर्भात पु.लं.नी एका ठिकाणी एक उल्लेख केलेला सापडतो. पु.लं. लहान होते तेव्हा जोगेश्वरीला त्यांच्या आजोबांच्या- ऋग्वेदींच्या घरी सुट्टीत जायचे. तिथे रात्रीची जेवणं आटोपली की देवळातली घंटा वाजायची. तिथे होणाऱया व्याख्यानाची ती नांदी असायची. एकदा पु.ल. व्याख्यानाला गेले असता दृश्य असं होतं की, एक राजबिंडा वक्ता सुटबूट घालून जमलेल्या लोकांसमोर एका अत्यंत गंभीर विषयावर बोलतोय आणि श्रोतागण मुरकुंडी वळेपर्यंत हसतोय. पु.लं. म्हणतात की, त्या दिवशी मला कळलं की आपण बोलत असताना समोरच्या लोकांवर आपला परिणाम कसा असायला हवा. ते वक्ते होते प्रल्हाद केशव अत्रे. त्यामुळे या दोघांच्यात किमान एका पिढीचा फरक होता.\nआचार्य अत्र्यांचा काळ भाबडय़ा महाराष्ट्राचा काळ होता. शिक्षण तर दूर, साक्षरताही खूप नव्हती. पुरुषोत्तम देशपांडे पु.लं. झाले तेच मुळात महाराष्ट्र शिकून प्रगत होत होता तेव्हा. म्हणूनच दोघांच्या वैचारिक बैठकीत फरक आहे. आमच्या पिढीकरता अत्रे हे कठोर, पण दिलखुलास प्राचार्य आहेत तर पु. लं. हे आमच्याबरोबर कटिंग चहा घेणारे प्रोफेसर आहेत. पण मराठीबाबत आम्हाला जी आपुलकी आणि अभिमान आहे तो या दोघांमुळेच आहे हे निश्चित आणि म्हणूनच आमच्या पिढीतील लौकिकार्थाने त्यांच्या सर्वाधिक जवळ गेलेल्या काही अग्रगण्य रंगकर्मींनी त्यांना ऋणनिर्देश म्हणून ‘आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम सादर करावा हे रास्तच आहे. ‘आम्ही आणि आमचे बाप’च्या लिखाणाबाबत काहीही लिहिणं म्हणजे अत्र्यांच्या भाषेत या बाप लोकांच्या ताजमहालाला आपल्या विटा जोडण्यासारखं आहे. ‘आम्ही आणि आमचे बाप’चा सर्व कॉन्टेन्ट हा या दोघांच्या साहित्यातला आणि कलाविष्कारातला आहे. अतुल परचुरे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि अजित परब यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आहे. पैकी अतुल परचुरे अणि आनंद इंगळे या दोघांनी खुद्द पु.लं. साकारलेत. पुष्करने नवीन संचातल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकातून नाथा कामत केलाय. अजित परब याने असंख्य गायनाच्या मैफलींमधून दोघांशी संबंधित गाण्यांचा अभ्यास केलेला आहे. चौघांनी मिळून एक छानशी मिसळ ‘आम्ही आणि आमचे बाप’च्या निमित्ताने आपल्यासमोर मांडलीये. यात कोटय़ा, संदर्भ, नाटय़प्रवेश, गाणी, गप्पा आणि मुख्य म्हणजे हल्ली लोप पावत चाललेला अभिवाचनाचा समावेश आहे. अतुल आणि आनंद आपल्या लख्ख वाणीने, पुष्कर आपल्या लवचीक अभिनयाने आणि अजित आपल्या मखमली आवाजाने ही मिसळ रुचकर करतात. त्यात अतुलने अत्रेंच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकामधील प्रवेश करताना केलेला भन्नाट मुद्राभिनय म्हणजे पर्वणी आहे. खरं तर या प्रवेशात आनंद खूप बोलतो. पण त्यातही अतुलने जे काही केलंय ते कमाल आहे. आनंदने ‘वाऱयावरची वरात’मधील साक्ष मूर्तिमंत पु.लं.ची आठवण करून देणारी साकारलीये. अजित परब स्वल्पविरामासारखी एकाहून एक छान गीतं सादर करतो. पुष्करने ‘तो मी नव्हेच’मधला नापणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे अत्यंत प्रामाणिकपणे सादर केलाय.\nराजन भिसे यांनी इतक्या विस्तीर्ण स्कोपच्या कार्यक्रमाला अत्यंत कल्पक नेपथ्य पुरवलंय. किंबहुना नेपथ्याने नाटकावर मात न करत त्याला पूरक कसं असावं हे भिसेंच्या कामातून इथे दिसतं. ही मोट बांधणारे आदित्य इंगळे यांनी प्रत्येक प्रस्थापित कलाकाराला योग्य न्याय मिळेल अशी बांधणी केलेली आहे. त्यात सादरीकरणाचा बाज कट्टय़ावरच्या गप्पांचा असल्याने एकमेकांना कोपरखळ्या, कानपिचक्या आणि चिमटेदेखील आहेत. सामान्य प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करता ते सगळं गरजेचंही आहे. आदित्यने ‘दोन दिग्गजांचं कार्य’ हा फोकस ठेवून खूप सुंदर गुंफण केलेली आहे. कुठेही फार वाहवत न जाता ‘आम्ही आणि आमचे बाप’ आचार्य अत्रे आणि पु.लं.ची महती आपल्याला दाखवून देण्यात नक्कीच यशस्वी होतं. आदित्यने केलेली साहित्याची व इतर गोष्टींची निवड ही त्याने केलेल्या विचाराशी मेळ खाणारी आहे. त्याबाबत पुन्हा काहीही बोलणे व्यर्थ ठरेल. इथे समुद्रातून एखादा एक ओंजळ पाणी उचलून आपल्याला दाखवतोय. दुसरा एखादा दुसरी ओंजळ उचलेल. त्यात वेगळं पाणी असेल. पण एकंदरीत ‘आम्ही आणि आमचे बाप’ची ही भरलेली ओंजळ लोभसवाणी आहे यात शंकाच नाही.\nनाटक- आम्ही आणि आमचे बाप\nदर्जा – अडीच स्टार\nनिर्मिती – आदि कल्चर टेनमेंट आणि अष्टविनायक निर्मित\nनिर्माते -मयूर रानडे, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर\nनेपथ्य, वेशभूषा- राजन भिसे\nसंकलन, दिग्दर्शन -आदित्य इंगळे\nकलाकार- अजित परब, पुष्कर श्रोती, अतुल परचुरे, आनंद इंगळे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलएकाच नाटकात दहा भूमिका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/no-bharniyaman-in-diwali-maharashtra/", "date_download": "2018-04-20T16:23:09Z", "digest": "sha1:GYASC5NVQSE4ABOHV6G45547UC353RZW", "length": 7979, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही\nमधले काही दिवस महाराष्ट्र भारनियमनाच्या त्रस्त झाला होता. पाऊस आणि त्यात लाईट नाही अशीच काय ती स्थिती होती. मात्र दिवाळीत भारनियमन होणार नसल्याची ग्वाही ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली.\nमहाराष्ट्रात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळशाची टंचाई होती आणि त्याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले होते , मात्र आत्ता परिस्थिती पुर्णत: नियंत्रणात आली असून दिवाळीत भारनियमन होणार नाही, अशी माहिती राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली.\nएमसीएल आणि एसईसीएल या कंपनीच्या कोळश्याच्या खाणी जिथे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली . रोज 28 रॅक्स कोळस्याची गरज असतांना केवळ 14 ते 15 रॅक्स कोळसा मिळत होता. मात्र आता सर्व नियमित झालेले असून कोळशाचा पुरवठा वाढू लागला आहे. त्यामुळे वीज केंद्रांना आवश्यक असलेल्या 21 दिवसांचा कोळसा साठा करण्यावर भर असून येत्या दिवाळीत भारनियमन होणार नाही असेही ते म्हणाले .\nगेल्या तीन वर्षांपासून राज्यातील भारनियमन बंद आहे आणि पुढेही ते बंदच राहणार आहे. एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक वीजपुरवठा खंडीत झाला तरी लोक भारनियम सुरु असल्याचे समजतात. अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे, यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झाल्यास आधी त्याची तक्रार महावितरणच्या स्थानिक अभियंत्याकडे करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले.\nमात्र तसेही दिवाळीत बहुतांश कंपन्या बंद असतात त्यामुळे दिवाळीत भारनियमन करण्याची वेळ येईल असे वाटत नाही . मात्र दिवाळी नंतर काय परिस्थिती असेल यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: नागपूर महाराष्ट्र Tags: भारनियमन, महाराष्ट्र, महावितरण, विद्युत पुरवठा\n← मी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन गुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/wagholi/", "date_download": "2018-04-20T16:25:48Z", "digest": "sha1:QOK22BNVQ5L4HS6AE6CPGQELMK4V7DEM", "length": 5481, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "wagholi – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण \nवाघोली येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडत असताना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे दोन जणांना रंगेहाथ पकडले मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला . ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लोहगाव ) हा फरार… Read More »\n‘म्हणून ‘ ह्या अकरावीतल्या विद्यार्थ्याने केला शिक्षकावर कोयत्याने हल्ला : वाघोलीतील घटना\nपुण्यात नगर रोड येथील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला . वाडेबोल्हाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी सुनील पोपट भोर हा अकरावीमध्ये… Read More »\nCategory: पुणे महाराष्ट्र Tags: pune, wagholi, पुणे बातम्या, पुणे शहर, पुणेकर\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/medha-soman-special-article-on-womens-day/", "date_download": "2018-04-20T16:42:28Z", "digest": "sha1:ASLQEHWJLYYDAUHHJS4RCFWVQFO6R3C5", "length": 23338, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "सक्षम समर्थ मी! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nस्त्रीशक्ती हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुराणकालातील गार्गी-मैत्रेयींप्रमाणे आजची स्त्री सक्षमपणे उभी आहे. सर्वच बाबतीत सरस ठरून.\nहिंदुस्थानात प्राचीन कालापासून आजपर्यंत स्त्रियांनी हिंदुस्थानी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. केवळ वैयक्तिक कौटुंबिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रव्यापी संघर्ष करीत आदर्श निर्माण केले आहेत.\nवेद उपनिषदकाळात वसिष्ठमुनींच्या पत्नीने अरुंधतीने वसिष्ठमुनी हिंदुस्थान यात्रेला गेल्यावर तपोवनाचा कारभार अत्यंत कष्टाने , जिद्दीने आणि आपल्या स्वकर्तृत्त्वाने सांभाळला. गार्गी ही ब्रह्मवादिनी स्त्री वचक्नु ऋषींची कन्या जनकराजाच्या विद्वत्सभेपुढे तिने याज्ञवल्क्याला निर्भीडपणे प्रश्न विचारले. मनाचे समाधान झाल्यावर उदार मनाने तिने त्यांचे श्रेष्ठत्वही मान्य केले. गार्गीचा आदर्श ठेवणारी मैत्रेयी ही जनकराजाच्या मित्र नावाच्या प्रधानाची कन्या होय. कात्यायनी याज्ञवल्क्यांची पत्नी . मैत्रेयी तपोवनात कात्यायनीला मदत करीत असे. तिने याज्ञवल्क्यांकडून आत्मज्ञान जाणून घेतले.\nत्याकाळातील गार्गी, मैत्रेयी, घोषा, सुलभा , गोधा, विश्ववारा, अपाला वगैरे ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या ऋचा ऋग्वेदात समाविष्ट केलेल्या आहेत.त्याकाळात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अध्ययन करता येत असे. स्त्रियांना मानाचे स्थान देण्यात येत असे. पण उपनिषद काळाच्या अखेरीला ही स्थिती हळूहळू बदलली. विवाह लवकर होऊ लागले. आर्य- अनार्य संघर्षात स्त्रियांचे स्थान दुय्यम झाले. इसवीसन पूर्व २०० च्या सुमारास विवाहाचे वयं १२-१३ वर्षे इतके खाली आले. त्यामुळे अध्ययनाला कमी वेळ मिळू लागला. त्यानंतर बालविवाह, सतीची चाल सुरू झाली. जवळजवळ दोन हजार वर्षांचे तमोयुग होऊन गेले. नंतर हिंदुस्थानी स्त्रियांनी राजकारण, समाजकारण, कला, बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये आपली नाममुद्रा उमटविली आहे. या काळात अनेक स्त्रियांनी पतिनिधनानंतर प्रजाहित रक्षणार्थ प्रशासक म्हणून उत्तम कार्य केले आहे. चौथ्या शतकात वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिने पतिनिधनानंतर वीस वर्षे उत्तम राज्यकारभार केला.सातवाहन वंशाचा सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता बलश्री कर्तबगार स्त्राr होती. तिने महाराष्ट्राला शकांच्या दास्यातून मुक्त केले. सोळाव्या ते अठराव्या शतकात जिजाबाई, येसूबाई, ताराबाई, राधाबाई अशा स्त्रियांनी राजकारणात ठसा उमटवला. अहिल्याबाई होळकर यांनी महान समाजकार्य केले. राणी लक्ष्मीबाई इंग्रजांबरोबर लढली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वकालात कस्तुरबा, अरुणा असफली, सरोजिनी नायडू वगैरे स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत महान योगदान दिले.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणात पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लोकसभेच्या पहिल्या स्त्री सभापती मीराकुमार, पहिल्या स्त्री विरोधीपक्ष नेत्या आणि आताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या नावाची नोंद झाली. समाजकारण, स्त्राrशिक्षण इत्यादी कार्यातही सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनी नवीन उपक्रम सुरू केले. त्यातूनच लक्ष्मीबाई कानिटकर, सुलभा पाणंदीकर, अवंतिकाबाई गोखले, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी स्त्री शिक्षण हेच कार्यक्षेत्र निवडले. समाजसेवाक्षेत्रात गोदावरी परुळेकर, साधनाताई आमटे, डॉ. राणी बंग, डॉ. स्मिता कोल्हे , सिंधुताई सकपाळ यांचे योगदान मोलाचे आहे. साहित्य, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातही अनेक स्त्रियांनी मोलाचे कार्य केलेले आहे.\nगार्गी-मैत्रेयीच्या कालात ऋषिपत्नी किंवा ऋषिकन्या आणि राजघराण्यायातील स्त्रिया यांनाच विकासाची संधी मिळत असे. समाजाच्या सर्व थरातील स्त्रियांना प्रगतीसाठी संधी मिळत नसे. सध्या या आधुनिक काळात समाजाच्या सर्व थरातील स्त्रियांना शिक्षणाची, अर्थार्जनाची, समाजसेवेची, उद्योग व्यवसाय करून प्रगती साधण्याची संधी मिळत आहे. अर्थात हे करीत असतांना आजच्या स्त्रियांसमोर कौटुंबिक जबाबदारी, वाढती असुरक्षितता, प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा, वाढती महागाई अशी आव्हानेही आहेत. परंतु नवीन तंत्रज्ञान, नवीन भौतिक साधने, आधुनिक संपर्क व्यवस्था, प्रवास साधनेही स्त्रियांना उपलब्ध आहेत. प्रगतीसाठी नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. आजच्या गार्गी मैत्रैयीना प्राचीनकाळच्या प्रगत स्त्रियांचा इतिहास लाभलेला आहे. अन्यायाला वाचा फोडून तो दूर करण्याची शक्ती वाढली आहे. मंदिरात पुजली जाणारी देवी आज घराघरात प्रगतीसाठी कार्यमग्न झाली आहे. कर्तव्ये पार पाडतानाच आजच्या गार्गी-मैत्रेयी हक्कांबाबत जागृत झाल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसातवा वेतन आयोग घोषणा झाली; अंमल करा\nपुढीलमुलींचे शिक्षण; प्रगतीचे लक्षण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:42:46Z", "digest": "sha1:IUHCU3RKUG6LITW62COUYEVDCSBWLQTA", "length": 25811, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेगमपेट विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख Hyderabad Airport (disambiguation) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेगमपेट विमानतळ (निःसंदिग्धीकरण).\nआहसंवि: none – आप्रविको: VOHY\n१,७४२ फू / ५३१ मी\n०९/२७ १०,६०० ३,२३१ डांबरी\n२३ मार्च २००८पासून बंद\nबेगमपेट विमानतळ (आहसंवि: -, आप्रविको: VOHY)आंध्र प्रदेशमधील हैदराबाद शहरातील विमानतळ होता.२३ मार्च २००८ला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यावर हा विमानतळ बंद करण्यात आला.या विमानतळाचा सध्या 'आंध्र प्रदेश एव्हीएशन अकादमी' ,'राजीव गांधी एव्हिएशन अकादमी तसेच भारतीय वायुदल बेगमपेट वायुसेना तळ याचा उपयोग करतात. बेगमपेट विमानतळावर पूर्वी दोन टर्मिनल होते.हैदराबाद साठी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत उड्डाणेही या विमानतळाने हाताळलीत.हे भारतातील सहावे व्यस्त विमानतळ होते.एर सहाराची सुमारे १२६ उड्डाणे येथुनच होत असत.\nबेगमपेट विमानतळावर नविन टर्मिनलजवळ १३ विमानांच्या पार्किंगची सुविधा आहे.त्याशिवाय उत्तर दिशेस ५ विमाने रात्री पार्क करता येतात.ही सुविधा ए-३२० आणि बोइंग-७३७ सारख्या मोठ्या विमानास तसेच पुढील तीन वर्षांसाठी पुरेशी आहे. यास पर्याय म्हणुन मार्च २००८ मध्ये हैदराबाद विमानतळ सुरु केल्याने, हैदराबाद या शहरात मध्यावर असलेले हे विमानतळ सध्या हवाईदलाच्या प्रशिक्षणासाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची ने-आण करण्यासाठी वापरला जातो.वाम राजकारणी पार्टीच्या सदस्यांनी नागरी हवाईवाहतूक मंत्रालयास तीव्र निवेदने लिहुन,हे विमानतळ कमी खर्चाच्या नागरी वाहतूकीसाठी, जे या कामासाठी उपयुक्त आहे,वापर पूर्ववत सुरू करण्यास दबाव आणत आहे.त्या मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रणाच्या प्रशिक्षणासाठी हे विमानतळ वापरण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या विमानतळावर मर्यादित स्वरुपात रात्री विमान उतरविण्याची सुविधा होती.थेट विमानसेवा नसल्यामुळे, आंध्र प्रदेशातील फक्त ४०% आंतरराष्ट्रीय उड्डाणेच येथुन जात होती..[१] २००६च्या सुरुवातीस अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे 'एर फोर्स वन' हे विमान त्यांचे हैदराबाद भेटीदरम्यान येथे उतरले होते व उड्डाण भरते झाले.आंतर्‍आष्ट्रीय व देशांतर्गत वाहतूकीसाठी बेगमपेट विमानतळाची क्षमता प्रवाश्यांची वाहतूक वाढल्यामुळे,दरसाली ४५% या दराने वाढल्याचा रिपोर्ट आहे.ही भारतात सर्वाधिक आहे.या विमानतळाने सुमारे २०,००० प्रवासी दर दिवस या दराने तसेच, ३०० विमान चलन, ज्यात १६ आंतरराष्ट्रीय व १० देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे, हाताळली आहेत.या विमानतळाच्या क्षमतेचे दातृत्व सुरूवातीस अपेक्षेपेक्षा बरेच कमी होते, पण मागणीनुसार त्यात वाढ झाली.ही सर्व वाढ बघुन,प्रश्न उभा राहतो कि भारतीय हवाईदल या तळाचा प्रत्यक्ष वापर कितपत करीत आहे व ते भविष्यात खुले कां करण्यात येउ नये. नविन ८ विमानतळ सुरू करण्याबाबत व ते हैदराबादला व इतर विमानतळांशी जोडण्याबाबत,राज्य सरकारला खूप आशा आहे.या विमानतळावरुन शेवटचे उड्डाण हे २२ मार्च २००८ रोजी थाई एरवेजचे बँकॉकला जाणारे आंतरराष्ट्रीय उड्डाण होते.\n२ सर्वसाधारण विमानन(एव्हीऐशन) व प्रशिक्षण\nविमानतळ सुरू असतांना तेथे आलेले एक विमान\nबेगमपेट विमानतळ हे सन १९३० मध्ये हैदराबाद एरो क्लब च्या उद्घाटनाने सुरू झाले.हैदराबाद राज्याचा निझाम यास त्याच्या डेक्कन एरवेझसाठी वापरत असे.ब्रिटिश भारतातील ही एक प्राथमिक विमानसेवा होती.सन १९३७ मध्ये टर्मिनल इमारत तयार झाली.[२] दक्षिण दिशेस नंतर एक नविन इमारत तयार केल्या गेली. नंतर हीच मुख्य इमारत झाली.जुन्या इमारतीस मग 'जुने बेगमपेट विमानतळ' असे संबोधिल्या जाउ लागले.सन २००८ मध्ये झालेल्या भारतातील प्रथम 'हवाई कसरती' १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान येथे झाल्या.\nसर्वसाधारण विमानन(एव्हीऐशन) व प्रशिक्षण[संपादन]\nयेथील वाणिज्यिक सेवा बंद झाल्यावर,ते वायुदल व उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरल्या जाउ लागले.प्रशिक्षणार्थी विमान हे फक्त याच्या दक्षिण दिशेचाच वापर करतात कारण उत्त्रेला असलेला भाग हा वाणिज्यिक सेवांसाठी बंद आहे.\n↑ Begumpet Airport History[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nहैदराबाद विमानतळ, भारतीय विमानतळ प्राधिकरणचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nनविन हैदराबाद विमानतळ(इंग्लिश मजकूर)\nनविन हैदराबाद विमानतळ(इंग्लिश मजकूर)\nहैदराबाद बद्दल संपूर्ण माहिती असलेले संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)\nहैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दलचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)\nविमानतळ माहिती VOHY वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ • रांची: बिर्सा मुंडा विमानतळ\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nहैदराबादमधील वास्तू व इमारती\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/road-stop-rahuri-get-price-sugarcane-3400-rupees/amp/", "date_download": "2018-04-20T16:14:48Z", "digest": "sha1:JNEUC5D3UYV6G6TIAQHYBDIKTPFQU2C5", "length": 5398, "nlines": 36, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Road Stop at Rahuri to get the price of sugarcane @ 3400 rupees | उसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको | Lokmat.com", "raw_content": "\nउसाला ३४०० रुपये दर मिळण्यासाठी राहुरीत रास्ता रोको\nयंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nराहुरी : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३४०० रूपये भाव देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार गणेश तळेकर व पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखाने सुरू झाले असून साखर कारखान्यांनी सर्वाधिक भाव देऊ असे सांगून शेतक-यांची दिशाभूल केली आहे़शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता साखर कारखान्यांनी भाव जाहीर करावा अन्यथा कारखाने बद पाडू, असा इशारा राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला. प्रकाश देठे म्हणाले, ऊस उत्पादनावरील खर्च वाढला असून कमीतकमी भावात ऊस लाटण्याचा कारखानदारीचा उद्योग आहे. शासन व कारखानदाराने बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा देठे यांनी दिला. यावेळी देवेंद्र लांबे, संदीप खुरूद, ज्ञानेश्वर क्षिरसागर, दिनेश वराळे, अरूण डौले, सुनिल इंगळे यांची भाषणे झाली. आंदोलनात सतीश पवार, सचिन म्हसे, भाऊसाहेब गटकळ, विजय तोडमले, संदीप शिरसाट, विजय तोडमल, काका राजदेव, किशोर वराळे आदी उपस्थित होते.\nकाटापेमेंट तोडी जोमात, सभासदांच्या उसाला तुरे\nउसाला एफआरपी दर देणार\nउसाला 3500 रुपये पहिली उचल द्या\nवाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी\nवाळू ठेक्यांच्या निविदेतच घोटाळा\nअहमदनगर शहर बस सेवेची नव्याने निविदा प्रसिध्द करण्याची महापालिकेवर नामुष्की\nनगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड\nमहापालिकेच्या कचरा वाहनावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/lifeline/sandalwood-skin-and-hair-care-and-skin-problems/", "date_download": "2018-04-20T16:15:26Z", "digest": "sha1:AQSOA2B2IYJSPOODD4OPSSQOEAOELMQU", "length": 26894, "nlines": 345, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sandalwood On Skin And Hair Care, And Skin Problems | त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी चंदन, त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nत्वचा आणि केसांच्या काळजीसाठी चंदन, त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय\nआपल्या सुगंधी गुणधमार्मुळे चंदनाच्या झाडाची ओळख प्राचीन काळापासून आहे. या झाडापासून मिळविलेले तेल त्यातल्या समृद्ध, उष्म सुगंधामुळे फार पूर्वीपासून वापरात आहे.\n- अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट\nआपल्या सुगंधी गुणधमार्मुळे चंदनाच्या झाडाची ओळख प्राचीन काळापासून आहे. या झाडापासून मिळविलेले तेल त्यातल्या समृद्ध, उष्म सुगंधामुळे फार पूर्वीपासून वापरात आहे. अनेक घरगुती उपचारांसाठी आणि त्वचेचे दोष दूर करण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. परफ्युम्स, पावडर्स, चेह-याला लावण्याच्या क्रीम्स आणि मास्क यांच्या निर्मितीतील चंदन हा एक प्रमुख घटक आहे. रसायनमुक्त असणारे हे नैसर्गिक उत्पादन त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे.\nचंदनामध्ये अ‍ॅरोमाथेरपीचे गुणधर्म निसर्गत:च आहेत आणि त्यापासून तयार केलेल्या तेलात जिवाणूविरोधी घटक आहेत. हे तेल त्वचेसाठी, तसेच केसांसाठी उपयुक्त आहे. साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.\nमसाजसाठी वापरल्या जाणाºया तेलात चंदनाच्या तेलाचा वापर केला, तर तुमचा तणाव हलका करण्यास त्याचा लाभ होतो. त्यामुळे तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळते. मन आणि शरीराला शांती मिळते. हे तेल एक मॉइश्चरायझर म्हणूनही उपयुक्त ठरते. त्याशिवाय हे तेल तुमच्या त्वचेला जिवाणूविरोधी कवच मिळवून देते. त्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी, आर्द्र, डागरहित आणि सुंदर होते. या तेलाचे काही थेंब आंघोळीच्या गरम पाण्यात टाकले असता, तजेल्याचा अनुभव येतो. तुमच्या आवडत्या बाथ सॉल्टमध्ये ते तेल मिसळावे. त्वचेच्या स्क्रबिंगसाठी ते फायदेशीर ठरते. त्वचा अधिक निरोगी दिसून येते.\nचंदनामुळे तुमच्या केसांचे नुकसान टळते आणि केसांना आतून ओलावा मिळतो. शॅम्पू बार वापरत असाल, तर संपूर्ण केसावर त्याचा बोटांनी थर पसरवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा ही कृती केल्यास तुमचे केस अधिक आकर्षक होतील. त्यांना नवजीवन प्राप्त होईल.\n>साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनेहमीच्या पिकनिक स्पॉटला कंटाळला असाल, तर एकदा भेट द्या या स्वप्नवत ठिकाणांना\nनाकावरून ओळखा समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व\nमहिलांना पुरुषांच्या न आवडणा-या 5 गोष्टी\nजगभरातील शाळांचे 7 सर्वात धोकादायक रस्ते\nसुंदरतेसोबतच मुलींनी या 7 गोष्टींनाही द्यावं प्राधान्य\nहे आहेत सिंगल असण्याचे 6 फायदे\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-04-20T16:43:00Z", "digest": "sha1:6BJCNP7OSZPKDJP5JA7BELVIFPDSCN74", "length": 4136, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे २०९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे २०९० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: २०६० चे २०७० चे २०८० चे २०९० चे २१०० चे २११० चे २१२० चे\nवर्षे: २०९० २०९१ २०९२ २०९३ २०९४\n२०९५ २०९६ २०९७ २०९८ २०९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे २०९० चे दशक\nइ.स.च्या २१ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sakhi/has-weight-increased-if-you-want-reduce-it-you-have-give-some-relief-body/", "date_download": "2018-04-20T16:09:23Z", "digest": "sha1:3J2PB5ICLQFG4KJQF7YCYRT5NDJWNQE2", "length": 31032, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Has The Weight Increased? If You Want To Reduce It, You Have To Give Some Relief To The Body | वजन वाढलंय? ते कमी करायचं, तर शरीराला थोडे कष्ट द्यावेच लागतील | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\n ते कमी करायचं, तर शरीराला थोडे कष्ट द्यावेच लागतील\n ते कमी करायचं, तर शरीराला थोडे कष्ट द्यावेच लागतील. त्यानं हा वजनवाढीचा आजार आटोक्यात येऊ शकतो..\nमेदोरोग किंवा स्थौल्य ही सध्या समाजाला भेडसावरणारी मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस या विकाराचं प्रमाण वाढत आहे. काही व्यक्तींमध्ये जन्मजात ही विकृती पाहायला मिळते. आनुवंशिकता यामध्ये असते; परंतु व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणं, कफवर्धक आहार जास्त घेणं, स्निग्ध आणि मधुर म्हणजे गोड पदार्थांचं अतिसेवन यामुळे मेद वाढण्यास मदत होते. वारंवार खाण्याची सवय असणं, बैठा व्यवसाय यासारख्या कारणांमुळे स्थौल्य पाहायला मिळतं. शरीरातील अंत:स्त्रावी ग्रंथींच्या स्त्रावांच्या असंतुलनामुळे सुद्धा हा विकार झालेला पाहायला मिळतो. उदा. थायरॉईड ग्लॅण्ड, पिट्युटरी ग्लॅण्ड, सुप्रारिनल ग्लॅण्ड, टेस्टेस यासारख्या ग्रंथींच्या विकृतीमध्ये स्थूलता वाढलेली पाहायला मिळते. सध्या हायपोथायरॉईडीजमचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.\nप्रोटीन पावडर, चॉकलेट्स, कॅडबरी, शीतपेय यांचं अतिरेकी सेवन आणि वेफर्स, मॅगी, चायनीज फूड यासारख्या पदार्थांना मिळालेली वा मुद्दाम मिळवून दिलेली प्रतिष्ठा याला कारणीभूत आहे. बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, आंबवून केलेले पदार्थ, चीज, पनीर, बटर यासारख्या पदार्थांचं अतिरेक सेवन आणि हे पदार्थ खाल्ल्यानं मिळणारी विकृत सामाजिक प्रतिष्ठा त्याला कारणीभूत आहे. अतिद्रव पदार्थ सातत्यानं घेऊ नयेत असं आयुर्वेद सांगतो. परंतु समाजात या उलट सर्व घडते आहे. पाणीसुद्धा पचवावं लागतं हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. उशिरा उठण्याची पद्धत आणि रात्री उशिरा जेवण करण्याची पद्धत किंवा अनिवार्यता या दोन्ही सवयीसुद्धा तितक्याच घातक आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून स्थौल्य किंवा मेदोरोग बळावलेला पाहायला मिळतो. शरीराची जाडी वाढायला लागते.\nकाम करण्याची क्षमता कमी होते. थोडी हालचाल केली तरी दम (श्वास) लागतो. अतिस्वेदप्रवृत्ती होते. तहान जास्त लागते. झोप जास्त येते. वारंवार भूक लागते, त्यामुळे व्यक्ती सतत खात राहाते. या सर्वांमुळे पुन्हा वजन वाढतं. शरीराच्या स्नायूंना शिथिलता येते, शरीरास घाम जास्त आल्यामुळे दुर्गंधी येते. प्रामुख्यानं पोट, स्तन, नितंब या भागात मेद जास्त साठल्यामुळे या अवयवांची वाढ होते. अंगाला सूज येते. मैथूनशक्ती कमी होते आणि इच्छासुद्धा कमी होते. शुक्र किंवा वीर्याचा ºहास होतो. अनुत्साह किंवा आळस वाढतो. त्वचा विकार, मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. हे रुग्ण अल्पायुषी असतात.\n‘नि:सुखतं सुखायच’ असं सूत्र आयुर्वेदात आलं आहे. याचा अर्थ उद्याच्या सुखासाठी दु:ख सहन करा म्हणजे वजन कमी होतं. त्यासाठी हे करून पाहता येईल..\n१) सकाळी लवकर उठण्याची सवय, मर्यादित आणि वेळेवर जेवण, रात्री सूर्यास्तानंतर भोजन नाही हा नियम करावा. सतत गरम पाणी प्यावं. भाजके पदार्थ खावेत जेणे करून वजन वाढत नाही.\n२) सतत सुंठ आणि नागरमोथा टाकलेलं पाणी (गरम) प्यायल्यास चांगला फायदा होतो. आहारात ज्वारी, नाचणी, मका यांच्या भाकरीचा वापर करावा.\n३) गहू बंद करावा. गव्हामुळे वजन वाढतं.\n४) मूग, मसूर, कुळीथ यासारख्या कडधान्यांचा वापर करावा.\n५) जुन्या तांदळाच्या कण्यांची पेज किंवा कडधान्यांचं कढणं (सूप) यांचा वापर करावा.\n६) ८-१५ दिवस नुसतं मुगाचं कढणं घेऊन राहिल्यास १५ दिवसांत दोन ते अडीच किलो वजन कमी होतं.\n७) साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिराच्या लाह्या यावर ८-१५ दिवस राहिल्यास चांगला उपयोग होतो.\n८) नुसता उकडलेला दुधी सकाळ-संध्याकाळ २५०-३०० ग्राम उकडून त्यात नुसतं सैंधव मीठ, धने, जिरे, काळीमिरी लावून खाल्ल्यास वजन चांगलं कमी होतं.\n९) नित्य व्यायाम करणं आवश्यक आहे. यामध्ये चालणं, धावणं, पोहणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम यासारख्या व्यायाम प्रकाराचा समावेश व्हावा.\n१०) सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे शरीरातील आवश्यक मेद कमी होऊन लवचिकता वाढते. वरील सर्व लक्षणं कमी होतात. चालण्यामुळे फक्त पायांना व्यायाम होत असल्यामुळे वजनात काही फरक पडत नाही.\n११) स्नानापूर्वी अंगाला तिळाचं तेल लावून स्नान करणं आणि अंघोळीच्या वेळी अंगाला दिवाळीत येणारं उटणं लावून स्नान केल्यानं वजन कमी होतं.\n१२) गाईच्या शेण्या (गोवºया) जाळून त्याची राख अंघोळीच्या वेळी अंगाला चोळल्यास वजन कमी होतं.\n१३) गोमूत्र किंवा गोमूत्र अर्क रोज सकाळी ४-४ चमचे घेतल्यास वजन कमी होतं. आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, त्रिफळादिवटी, पुनर्नवासव, गोमूत्रासव, सूक्ष्म त्रिफळा, मेदोहर गुग्गुळ यासारख्या औषधांचा उपयोग तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावा.\n(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउन्हाळ्यातली शिस्त, त्वचा मऊ मुलायम करणारी\nभर दुपारी गारेगार व्हा\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/aurangabad/congress-protest-against-note-ban/amp/", "date_download": "2018-04-20T16:13:16Z", "digest": "sha1:MXRXHODJDE54WGL27KAEG7LNYKWEFEHW", "length": 3981, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Congress protest against Note Ban | नोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन | Lokmat.com", "raw_content": "\nनोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन\nऔरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीनं नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडण आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. सिल्लोडचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण करत निदर्शनं नोंदवली.\nऔरंगाबाद : एटीएममधून निघाल्या 500 रुपयाच्या फाटक्या व शाई लागलेल्या नोटा\nराष्ट्रवादीने मुंबईत केलं नोटाबंदीचं पहिलं वर्षश्राद्ध\nकाँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध\nनाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध\nसोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध\nऔरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं\nकचरा आणून टाकल्यास तिसगावाच्या संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा\nकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद कांचनवाडीमध्ये नागरिकांचा जोरदार विरोध\nधुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/pandavapratap/word", "date_download": "2018-04-20T16:42:11Z", "digest": "sha1:EJL6SQLENJ3ARL474KL432YKH2KPYOUR", "length": 8727, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - pandavapratap", "raw_content": "\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १ ला\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय २ रा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ३ रा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ४ था\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ५ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ६ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ७ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ८ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ९ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १० वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय ११ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १२ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १३ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १४ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १५ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १६ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १७ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nपांडवप्रताप - अध्याय १८ वा\nपांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://collectorpalghar.in/beaches.php", "date_download": "2018-04-20T16:00:40Z", "digest": "sha1:LE5IKB4KV2VN2REZIBKV3E3243YBWTIY", "length": 5862, "nlines": 39, "source_domain": "collectorpalghar.in", "title": "Collector Office Palghar", "raw_content": "\nकेळवा फोर्ट, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे किल्ला बांधला , सुंदर आणि प्रसन्न केळवा तळ दक्षिणेकडील ओवरनंतर स्थित आहे. किल्ला पालघर तालुक्यात आहे. हा किल्ला त्यांच्या मराठा राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपयोग करून घेतला. किल्ला सभोवताली अधिकाधिक विस्तीर्ण नैसर्गिक दृश्ये असून सुरुच्या झाडांनी किल्ला व्यापलेला आहे .किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, जो भरती आणि ओहोटी च्या वेळी आनंददायक आकर्षक अनुभव प्रदान करतो.\nओहोटीच्या काळात हा उत्तम प्रकारे प्रवेशजोगी आणि दृश्यमान आहे आणि स्थानिक देशातील बोट सुविधा किल्यावर येण्यासाठी उपलब्ध आहे.\nअर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील, अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला 'जलदुर्ग ' किंवा 'जंजिरे अर्नाळा' असे देखील ओळखले जाते. अर्नाळा अशा मुघल, मराठे, पोर्तुगीज, आणि शेवटी पेशवे म्हणून अनेक साम्राज्याचा ताब्यात आलेली . सुलतान महमूद बेगदा मूलतः इ.स. १५१६ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला . तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि महादेव अशा अनेक मंदिरे आहेत. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.\nडहाणू बोर्डी बीच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थित आहे. ते 17 कि.मी. अंतरावर पसरलेला आहे. तसेच ते त्याच्या व्यापक आणि नीटनेटका किनाऱ्यासाठी व अफाट चीकू फळे व गुलाब साठीही प्रसिद्ध आहे . जरी येथे उन्हाळ्यात जोरदार उब असते, पण सभ्य वा-याची झुळूक संपूर्ण समुद्रकाठाला गार करते. झरोष्ट्रियन च्या मक्का झरोष्ट्रियन पवित्र आग घरे जे भव्य मंदिर आहे पर्यटकला अतिशय लोकप्रिय आहे .असे मानले जाते कि ही आग जवळजवळ एक हजार वर्षे पासून तसीच ठेवली गेली आहे. येथे ईराणी आणि पारसी संस्कृती जपून ठेवली आहे या ठिकाणी अधिक विदेशी पर्यटक आकर्षित होतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bollywoods-divas-without-makeup/", "date_download": "2018-04-20T16:42:49Z", "digest": "sha1:WFMJWHN6DPHQZUBWNQQZTQUPV4S3O7ED", "length": 16514, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "अभिनेत्री मेकअपशिवाय कशा दिसतात ते पाहा… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nअभिनेत्री मेकअपशिवाय कशा दिसतात ते पाहा…\nबॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा पडद्यावर अफलातून दिसते खरी. पण प्रत्यक्षात मात्र दिसायला ती तुमच्या आमच्यासारखीच सामान्य आहे.\nचाहत्यांच्या दिलांची क्विन असलेल्या कंगणाच सौंदर्य सर्वांनाच धक्क करतं. मूळ हिमाचल प्रदेशमधील असल्याने ती निसर्गातच सुंदर आहे. कुरळे केस व खट्याळ नजर ही तिची हत्यार. मेकअपमुळे ती अधिकच सुंदर दिसते.\nकतरिना मूळात सुंदर असली तरी मेकअपमुळे तिचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो. उंच व देखण्या कतरिनाला गडद मेकअप करणे आवडत नाही.\nपद्मावत चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची बेगम झालेली अदिती राव हैदरी दिसायला फारच गोड आहे. पण मेकअपमुळे तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव अधिकच स्पष्ट दिसतात.\nबिपाशा तशी आता मोठ्या पडद्यापासून दूर झाली आहे. तरीही तिच्या चाहत्यांची काही कमी नाही. सावळा रंग व टपोऱ्या डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या बिपाशाचा बोल्ड अंदाज आजही अनेकांना वेड लावतो. हलक्या मेकअपलाच तिची अधिक पसंती असते.\n.हिचकी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा नव्याने पदार्पण करणारी राणी दिसायला साधारणच आहे. तिचं घरात मेकअप करणं तिच्या पती आदित्यला व मुलगी आदिराला अजिबात आवडत नाही.\nधकधक गर्ल माधुरी आज मोठ्या पडद्यापासून तशी लांबच आहे. पण आजही तिच्या खळाळत्या हास्यावर व सौंदर्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्यांची कमी नाही. पण आता पन्नाशीत आलेल्या माधुरीला मात्र मेकअपचा आधार घ्यावा लागतोय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानचे युवा शिलेदार कमाल करण्यासाठी सज्ज\nपुढीलश्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%96", "date_download": "2018-04-20T16:41:47Z", "digest": "sha1:JR4KCNSBJCZFRSIU2N6K6SN3GYNWXRWX", "length": 5440, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाघनख - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.\nअफझलखानावर बिचव्याचा हल्ला चढवताना शिवाजीमहाराज\nवाघनखांचा वापर १० नोव्हेंबर, इ.स. १६५९ रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान यास जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते.\nवाघनखांच्या संरचनेचे निरनिराळे नमुने\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१७ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/other-sports/ranji-final-ranji-final/", "date_download": "2018-04-20T16:21:18Z", "digest": "sha1:N33INGZCODKMTXB667RKGKRRFDOFQQ4J", "length": 27255, "nlines": 428, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शुक्रवार २० एप्रिल २०१८", "raw_content": "\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nरणजी अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंनी केली कमाल\n88 वर्षांमध्ये जमलं नाही ते 'या' आठ खेळाडूंनी 'करुन दाखवलं'\nअवघ्या १५व्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण; अनिश भानवालाची 'लक्ष्य'वेधी कामगिरी\nPhoto Gallery : तेजस्विनीची सोनेरी कमाई\nCommonwealth Games 2018 : सुशील कुमारचे सोनेरी यश\nमराठमोळ्या राहुलची राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी\nहीना सिद्धूचा 'सोनेरी' लक्ष्यवेध\nWWF स्टार जॉनी वालियंतचा मृत्यू\nIndia at Commonwealth Games 2018: या दहा खेळाडूंकडून आहेत भारताला सुवर्णपदकाचा अपेक्षा\nपी. व्ही. सिंधू सायना नेहवाल किदम्बी श्रीकांत मेरी कोम\nनेमबाजी विश्वचषकात शहजार रिझवीनं जिंकलं सुवर्णपदक\n22 वर्षानंतर महिला वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले गोल्ड मेडल\nवर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सचा बोलबाला\nपाच भारतीय बॉक्सर एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\nआशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचा गोल्डन पंच\nनागपूरच्या दिव्या देशमुखने 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत जिंकलं सुवर्ण पदक\nविराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड\nविराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे\nपराभवानंतर टीम इंडियावर जोक्सचा पाऊस\nपाकिस्तानने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या पराभवामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली.\nपराभव बांगलादेशचा, टिंगल पाकिस्तानची\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली\nसोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट\n15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ आणि त्यांची कामगिरी\nआयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते.\nगोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर रोहित शर्मा व कृणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राची अंतिम\nदोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१०च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध लढणार आहे.\nतुम्हाला माहित आहे का दीप्ती शर्मा आणि पूनम राऊतच्या विश्वविक्रमाचं रहस्य\nदीप्ती शर्मानं नेमकी काय जादू केली पूनम राऊतनं क्रिकेटचे सगळेच विक्रम कसे केले आपल्या नावे\nआमलाच्या शतकावर गुजरात पडले भारी\nमोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या सपाट आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\nकुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल'\n, 'हे' चित्रपट नक्की पाहा\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/booster-dose-family-politics/", "date_download": "2018-04-20T16:04:08Z", "digest": "sha1:MRUPAN527OHBTUM76CU4CBRSGH56GHO7", "length": 37288, "nlines": 367, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Booster Dose For Family Politics | खानदानी राजकारणाला बूस्टर डोस ! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nखानदानी राजकारणाला बूस्टर डोस \nसातारा : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नेहमीच नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांना संधी दिली गेली आहे. कार्यकर्त्यांचे संघटन करण्याची कुवत आणि धडाडी असलेली अशी अनेक मंडळी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही झळकली आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे यांच्या रुपाने जिल्ह्यात खानदानी राजकारणाला बूस्टर डोस मिळाल्याचे पुढे येते. आता युवकांचे संघटन राष्ट्रवादीच्या पाठिशी ठेवण्याचे मोठे दिव्य तेजस यांना पार पाडावे लागणार आहे.\nराष्ट्रवादी काँगे्रस युवक जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार शशिकांत शिंदेंचे पुत्र तेजस शिंदे यांचे नाव अंतिम झाले आहे. खुद्द अजित पवार यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याने तेजस यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर, किरण साबळे-पाटील, सतीश चव्हाण, राजकुमार पाटील, राजेंद्र लावंगारे, समिंद्रा जाधव, विजयकुमार कुंभार व इतर पदाधिकाºयांच्या उपस्थित तेजस शिंदे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी राष्ट्रवादी भवनात झाली होती.\nआमदार शिंदे यांचे सुपुत्र तेजस यांना युवकचे जिल्हाध्यक्ष करून त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात लाँचिंग करण्याचा ध्यास घेतला होता. त्यानुसार आमदार शिंदे यांच्याशी काहींनी चर्चा करून त्यांची संमती घेतली होती. त्यानंतर ही बाब माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आली. आगामी काळात राजकीय समीकरणे ओळखून तेजस शिंदे यांचीच निवड केली. त्यानुसार युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी तेजस शिंदे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी निश्चित केले.\nआमदार शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या यशात मोठे योगदान आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्याप्रमाणेच आमदार शिंदे यांच्या शब्दाला या पक्षात मोठे वजन आहे. तेजस हे त्यांचे पुत्र आहेत; परंतु जिल्ह्याच्या राजकारणात संधी देत असताना कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्यांचे मत याला आमदार शिंदे यांनी महत्त्व दिले. कार्यकर्त्यांचा रेटा पाहून त्यांनीही पुत्राच्या नावाला अनुमती दिली.\nजिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासावर नजर मारली असता कºहाडच्या माजी खासदार दिवंगत प्रमिलाकाकी चव्हाण यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात संधी मिळाली. काँगे्रस पक्षाच्या माध्यमातून केंद्रात मंत्रीपदासह राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यानंतर त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांना राजकारणात संधी मिळाली. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी पेलले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी तितक्याच ताकदीने राजकारणात स्थिरावली आहे. आमदार मकरंद पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षात मोठे वजन आहे. खासदार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासास ते पात्र ठरले आहेत. भविष्यात त्यांच्याकडे मोठी संधी येण्याची शक्यता आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांना राजकारणात संधी दिली. पाटण तालुक्यातील पाटणकर गटाचे नेतृत्व सध्या सत्यजितसिंह करतात. विधानसभेवर जाण्याची संधी मात्र अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यांचे नेतृत्व पाटण तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.\nवाई तालुक्यातील काँगे्रसचे माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव माजी आमदार मदन भोसले यांनी काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. किसन वीर साखर कारखान्याची सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी साखर उद्योगातच विशेष लक्ष घातले. जावळीचा प्रतापगड कारखाना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने सुरू ठेवला. खंडाळा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून हा कारखानाही सुरू केला आहे.\nमाजी मंत्री व वाई तालुक्याचे नेते दिवंगत मदनअप्पा पिसाळ यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी राजकारणात आली. त्यांच्या सूनबाई अरुणादेवी पिसाळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तर पुत्र शशिकांत पिसाळ यांना कृषी सभापतीपद मिळाले आहे. पिसाळ-पाटील गट वाईच्या राजकारणात एकत्रितपणे वर्षानुवर्षे काम करत आहे. जावळी तालुक्याचे नेते माजी आमदार दिवंगत जी. जी. कदम यांच्यानंतर अमित कदम यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे युवकाध्यक्षपद त्यांना मिळाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले. आता तर त्यांनी राष्ट्रवदाीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना कोणती संधी मिळणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत.\nखटावचे माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांच्या कुटुंबाकडे तालुक्याचे नेतृत्व कायम राहिले. त्यांचे चिरंजीव सुरेंद्र गुदगे यांनी काँगे्रस व आता राष्ट्रवादी असा प्रवास केला. मायणी जिल्हा परिषद गटापुरते त्यांचे नेतृत्व मर्यादित राहिले आहे. भविष्यात मोठ्या संधीची ते वाट पाहत आहेत. सध्या मात्र त्यांच्या घरातच वादळ उठलेले आहे. त्यांचे बंधू सचिन गुदगे हे भाजपमधून गावचे थेट सरपंच झाले आहेत. नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात येतात, त्यात काहीजण यशस्वी होतात तर काही जणांना मर्यादा येतात, असे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले. आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस जिल्ह्याच्या राजकारणात आले आहेत. त्यांच प्रवास कसा होतो, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.\nराज्य पातळीवर नाव कमावण्याची संधी\nनेत्यांचे चिरंजीव ही पहिली पायरी असली तरी संघटन कौशल्य आणि मुत्सद्दीगिरीच्या जोरावर राजकारणात पुढे जाण्याची संधी तेजस शिंदे यांना आहे. त्यांचे वडील आमदार शशिकांत शिंदे यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्यात राजकारणात ठसा उमटविला आहे. तीच संधी तेजस यांच्यापुढे आहे. त्यासाठी वडिलांप्रमाणेच संघर्षाची तयारी त्यांना ठेवावी लागणार आहे.\nसत्तेत नसलेल्या राष्ट्रवादीकडून शिंदेंचा सन्मान\nकेंद्रात व राज्यात सत्तेवर नसलेल्या राष्ट्रवादीला साताºयाचा बालेकिल्ला भक्कम ठेवायचा आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथील स्थानिक राजकारणावर पकड मिळविण्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच योगदानाचा यशोचित सन्मान राष्ट्रवादी पक्षाने केल्याची चर्चा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअंगावर याल तर शिंगावर घेईल; नागपुरात नाना पटोले यांचा भाजपाला इशारा\nनरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद\nसावंतवाडीत विकासकामांसाठी सहकार्य करणार : रेश्मा सावंत\nसिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी\nकन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने\nकन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट\nसातारा :कठडा तोडून वाळूचा ट्रक नदीपात्रात, दहिवडीजवळ अपघात; गायब चालकाचा शोध सुरू\nसातारा : तडीपार आरोपी पिंटू बुधावले पोलिसांच्या जाळ्यात\nसातारा : प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी केला पत्नीचा खून\nसातारा ‘सिव्हिल’च्या अठ्ठावीस रुग्णांना ससूनचा सल्ला\nनऊ वर्षांत सातारा जिल्ह्यामधील १,१८१ शेतकरी कुटुंबीयांना सावरले अपघात विम्याने\nपायासाठी सत्तर हजार घनमीटर मातीची खुदाई -कास धरण\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/raigad-and-ratnagiri-are-in-cyclone-risk/", "date_download": "2018-04-20T16:40:23Z", "digest": "sha1:DCQU4ISLY4MPY2BYBTR346PBRLZVABEV", "length": 16570, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "केंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nकेंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश\nकोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिह्यांचा केंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये समावेश करण्यात आला आहे. या जिह्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये अंडरग्राऊड विद्युत लाइन टाकण्याकरिता राज्य सरकारने २०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. तसेच गावागावात विद्युत मॅनेजर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.\nअलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथे महावितरण कंपनीच्या एल. टी. वायर जीर्ण झाल्याबद्दलचा तारांकित प्रश्न सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एल.टी. वायर बदलण्यासाठी दोन योजनांतून १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा काढण्यात आली असून महिनाभरात कंत्राटदाराने काम सुरू केले नाही तर कंत्राट रद्द केले जाईल, अशी माहिती बावनकूळे यांनी दिली.\nतीन महिन्यांत विभागनिहाय समान पदे भरण्याचा आराखडा\nमहावितरण कंपनीच्या विद्युत केंद्र आणि विभागीय केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अतिरिक्त कर्मचारी असल्यामुळे सर्व विभागात समान कर्मचारी देण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. तीन महिन्यांत या आराखडय़ानुसार समान कर्मचारी नियुक्त केले जातील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोरेगाव-भीमा दंगल सरकार पुरस्कृत, विरोधकांचा विधान परिषदेत आरोप\nपुढीलतलाकसंदर्भात कायदा करताना महिलांच्या मनाचा विचार करावा – प्रा. फौजिया खान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/results-of-gram-panchayt-elections-have-started-coming-272201.html", "date_download": "2018-04-20T16:25:00Z", "digest": "sha1:VAYB7TU3QNRY525NXU7HB62Y56LWYKXP", "length": 12033, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nराज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात\nसोमवारी 3हजार 692ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात आलं होतं. त्याच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली आहे. हळूहळू सर्व ग्राम पंचायतींचे निकाल येत आहेत.\n17 ऑक्टोबर: राज्यभरातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली आहे. सोमवारी 3हजार 692ग्रामपंचायतींसाठी मतदान करण्यात आलं होतं. त्याच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली आहे. हळूहळू सर्व ग्राम पंचायतींचे निकाल येत आहेत.\nसांगलीच्या ग्रामपंचायत निवडणूकीत हरिपूरमध्ये भाजप प्रणित बोन्द्रे गटाचा एकतर्फी विजय झाला आहे. 1 सरपंच अधीक 17 अशा सर्व 18 जागांवर बोन्द्रे गटाचं पॅनल विजयी झालं असून या पॅनलने काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव केला आहे. तर नारायण राणे यांचं समर्थ विकास पॅनल सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात आघाडीवर आहे. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी गडात राणेंच्या विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यात राणेच्या वर्चस्वाला हादरा देत शिवसेना व भाजप आघाडीवर आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू असून विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. मुरबाड येथील 13 पैकी 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादी-शिवसेना युतीने पुरस्कृत पॅनलला मिळाल्या आहेत.संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या ग्राम पंचायतींचे निकाल स्पष्ट होतील.\nदरम्यान पुढच्या महिन्यात भाजप आपल्या सरपंचांचा मेळावा घेणार आहे. आपले खरंच किती सरपंच निवडून आले हे दाखवण्यासाठी भाजप हा मेळावा घेणार असल्याची सगळीकडे चर्चा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dr-punam-satpute-found-dead-in-her-house-278179.html", "date_download": "2018-04-20T16:25:17Z", "digest": "sha1:NBW7O3LZSAP5PUFJ7R6SBTDYHDAUB6VV", "length": 9654, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nस्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला\nही आत्महत्या आहे, की हत्या की नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झालाय, ते अजून कळलं नाहीये.\n27 डिसेंबर : मुंबईत एका महिला डॉक्टरचा मृतदेह त्यांच्या घरातच सापडलाय. अंधेरी चार बंगला इथे ही घटना घडलीय. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा मृत्यू झालाय. पण ही आत्महत्या आहे, की हत्या की नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झालाय, ते अजून कळलं नाहीये.\nघरातून वास येत असल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह कुपर हाॅस्पिटलमध्ये पोस्ट माॅर्टेमसाठी नेलाय. पोलीस पुढचा तपास करतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: deadDr. Punam Satputeडाॅ.पूनम सातपुतेमृत्यू\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/load-shading-increase-in-maharashtra-271454.html", "date_download": "2018-04-20T16:24:26Z", "digest": "sha1:E5YAW6LSJWYFT2XAZ3ZLTINYHQP4WXCW", "length": 15452, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' !", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' \nऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातल्या 6 वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प बंद पडलेत. त्यामुळे मुंबई, उपनगरं आणि ठाण्यात, पुण्यातही वीज भारनियमन सुरू झालंय. राज्यात सध्या शहरांमध्ये सरसकट तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झालंय.\nमुंबई, 6 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातल्या 6 वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प बंद पडलेत. त्यामुळे मुंबई, उपनगरं आणि ठाण्यात, पुण्यातही वीज भारनियमन सुरू झालंय.. राज्यातल्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये दररोज 34 रेक कोळशाची गरज लागते. मात्र, सध्या राज्याला फक्त 22 रेक कोळसा उपलब्ध होतोय. त्याचा वीज निर्मितीवर विपरीत परिणाम झालाय. अशातच ऑक्टोबर हिट वाढू लागल्यानं आणि पाऊसपाणी चांगला झाल्याने शेतीपंपांसाठीही विजेच्या मागणीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे राज्यात भारनियमनात मोठी वाढ झालीय.\nभारनियमनाचा चटका यापूर्वी फक्त ग्रामीण भागालाच बसत होता. पण आता या कृत्रिम वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचं भारनियमन सुरु झालं आहे. ऐन ऑक्टोबर हिटमध्येच नागरिकांना हा भारनियमनाचा शॉक बसतोय. याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. राज्यात सध्या शहरांमध्ये सरसकट तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झालंय. भांडूप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज भारनियमन लागू करण्यात आलं आहे. कालपासूनच हे नवीन भारनियमन लागू झालं आहे.\nवीजनिर्मितीसाठी लागणारा पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. राज्यात 2200 ते 2300 मेगावॉटचे भारनियमन होत असल्यानं, कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आली आहे. भारनियमनाचं संकट वाढत आहे, त्यामुळे दिवाळीवरही भारनियमनाचं सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण कंपनीची धावपळ सुरु आहे.\nराज्यात विजेची मागणी 17500 मेगावॅट असताना प्रत्यक्षात फक्त 16000 मेगावॅट वीज उपलब्ध होतेय. यासह वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं.\nराज्यात सध्या कृषी वीज बिलं थकीत आकडेवारी 20 हजार कोटींच्या घरात आहे. राज्यात 40 लाख कृषी वीज पंप आहेत. या सर्व कारणांमुळे महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ऐन ऑक्टोबर हिटमध्ये भारनियमनाचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.\nसोशल मीडियावरून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या आघाडी सरकारविरोधात केलेल्या भारनियमनाच्या जाहिराती पुन्हा शोधून काढून पोस्ट केल्या जाताहेत. तर काहीजण विकास अंधारात बेपत्ता झाला अशी कॅम्पेन चालवून सरकारविरोधात रोष व्यक्त करताहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: load sheddingMSEBऊर्जामंत्रीदेवेंद्र फडणवीसभारनियमनभारनियमनाचा शॉकमुख्यमंत्री\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/this-man-from-up-was-sold-in-pune-for-1000-held-captive-and-forced-to-beg/articleshow/62439958.cms", "date_download": "2018-04-20T16:10:11Z", "digest": "sha1:SNQPUKCTYZTVS5ZRDBZGTV56SJIAVZAI", "length": 24080, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Human trafficking:this man from up was sold in pune for 1000 held captive and forced to beg | यूपीच्या तरुणाची पुण्यात एक हजाराला विक्री - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nयूपीच्या तरुणाची पुण्यात एक हजाराला विक्री\nउत्तर प्रदेशातील एका तरुणाची पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत विक्री करण्यात आली असून त्याला भीक मागण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nअनूप सिंह असं या तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहे. पाच महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात तो मुंबईत आला आणि मानवी तस्करी करणाऱ्या गँगच्या जाळ्यात सापडला. या गँगने त्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पुण्यातील धुनू काळे नावाच्या महिलेला एक हजार रुपयांना विकलं. त्यानंतर रोज कमीत कमी १५०० रुपयांची कमाई करण्याची तंबी देऊन त्याला ट्रफिक सिग्नलवर भीक मागण्यासाठी जुंपण्यात आलं.\nमंगळवारी ट्रॅफिक सिग्नलवरून जात असताना एनजीओ चालविणाऱ्या योगेश मलखारेला अनूप दिसला. त्याच्यासोबत धुनू काळेही होती. या दोघांकडे पाहून योगेशला संशय आला. त्यामुळे योगेश कारमधून उतरला आणि या दोघांच्या दिशेने चालू लागताच धुनूने तिथून पळ काढला. अनूपनेही या संधीचा फायदा घेत योगेशला सर्व हकीकत सांगितली आणि या दलदलीतून बाहेर काढण्याची विनंती केली.\nदरम्यान, अनूपच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अनूपचा एक हाथ आणि पाय तुटलेला आहे. त्याच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिल्याचे व्रण आहेत. 'सरकारने देशातील भिकाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्यास अशा अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील,' असं योगेश यांनी सांगितलं.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मर्चंटचा मृत्यू\nजगभ्रमंतीसाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली\nवाढदिवशी पाठवले कोंबडीचे मुंडके, कुटुंब हादरले\nया पीडितांना न्याय कधी मिळणार\nसख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार\nमिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर\n‘हॉर्टिकल्चर’च्या निविदा रद्द करा\n1यूपीच्या तरुणाची पुण्यात एक हजाराला विक्री...\n2जिद्दीने उभे राहण्यासाठी ‘तिला’ हवी मदत...\n... ‘खायचे’ काम नाही...\n4'मुख्यमंत्र्यांनी जातीय तेढ निर्माण केली'...\n7क्रीडा गुणांसाठी ‘विभागीय’ अडथळा...\n8पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न...\n10मालधक्का चौकातून चिमुरड्याचे अपहरण...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/competitive/career/education-d-ed", "date_download": "2018-04-20T16:45:57Z", "digest": "sha1:3ZFAQRHASPCYX37GEXJIP6WP6KHUP6TT", "length": 15340, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन करिअर शिक्षण डी एड पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित\nप्रा. अतुल अरुण गायकवाड\nशिक्षणशास्त्र दर्शन नेट सेट पेपर २ व ३\nप्रा. एस. डी. दराडे\nUPSC MPSC जनरल सायन्स\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-20T16:02:57Z", "digest": "sha1:CFRYDHITEO7XE3X5SG6VXTRDE3M44AFY", "length": 7713, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सात महिने आधीच भाजपच्या मंत्र्यांनी साजरी केली गुरुनानक जयंती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसात महिने आधीच भाजपच्या मंत्र्यांनी साजरी केली गुरुनानक जयंती\nनवी दिल्ली : सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण या मंत्र्यांनी जवळपास सात महिने आधीच गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपा प्रवक्ते आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह, वैद्यकिय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन आणि कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांचा समावेश आहे.\nहिंदू दिनदर्शिेकेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूरब म्हणजेच गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २३ नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पण, ट्विट करण्यापूर्वी ही बाब लक्षात न आल्यामुळे त्यांच्यावर सर्वांसमोरच तोंडघशी पडण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळाले. ही बाब लक्षात आल्यानंतर मंत्र्यांनी त्या आशयाचे ट्विच डिलीटही केले. सिद्धार्थ नाथ सिंह यांनी या चुकीचे गांभीर्य लक्षात घेत सर्वांचीच माफी मागितली. माफी मागताना केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या सर्व गोंधळाचे खापर विकीपीडियाच्या माथ्यावर फोडले. ज्यामध्ये त्यांनी यासंबंधीचा एक स्क्रिनशॉटही जोडला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरक्‍ताच्या चाचणीनेही होणार कर्करोगाचे निदान\nNext articleआई मधला शिक्षक जागा पाहिजे-रामथिर्तकर\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n…हे तर काँग्रेसचं राजकारण – अरूण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-marm-junior-court-and-judges-89993", "date_download": "2018-04-20T17:00:34Z", "digest": "sha1:R4A5GTRPYFUKIOA5W3LXVSASIMMQD2FH", "length": 15094, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial marm junior court and judges न्यायाची प्रतीक्षा कुठवर? | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nकनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या हजारो जागा रिक्त असल्याचे वास्तव न्यायपालिकेच्या संदर्भातील आपली धोरणे व दिशा तपासून पाहण्यास सांगणारे आहे. मोठ्या राज्यांसह देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची हजारो पदे रिक्त आहेत. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्येही न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. त्याबद्दल चर्चा तरी होते. कनिष्ठ न्यायपालिकेबाबत तशी चर्चा होत नाही. अडीच कोटींपेक्षा अधिक खटले कनिष्ठ न्यायालयांमध्ये तुंबलेले आहेत, ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली, तर केवळ न्यायदानासाठीच नव्हे, तर लोकशाहीसाठीही हा विषय संवेदनशील ठरतो.\nकनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या हजारो जागा रिक्त असल्याचे वास्तव न्यायपालिकेच्या संदर्भातील आपली धोरणे व दिशा तपासून पाहण्यास सांगणारे आहे. मोठ्या राज्यांसह देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची हजारो पदे रिक्त आहेत. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्येही न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. त्याबद्दल चर्चा तरी होते. कनिष्ठ न्यायपालिकेबाबत तशी चर्चा होत नाही. अडीच कोटींपेक्षा अधिक खटले कनिष्ठ न्यायालयांमध्ये तुंबलेले आहेत, ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली, तर केवळ न्यायदानासाठीच नव्हे, तर लोकशाहीसाठीही हा विषय संवेदनशील ठरतो. न्यायपालिका शासन-प्रशासनाच्या कामाचे मूल्यमापन व या व्यवस्थेत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असते. पण, पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ नसेल तर न्यायदानाची प्रक्रिया बाधित होते. ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड’ असे म्हटले जाते. या अर्थाने न्यायपालिकेचे वर्तमान वास्तव बहुतेक लोकांना न्याय नाकारणारेच आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अडीच कोटींहून अधिक प्रलंबित खटल्यांमध्ये महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेले खटलेही आहेत. विषम सामाजिक व्यवस्थेत न्यायदानाची व्यवस्था एकदम चोख असली पाहिजे. अन्यथा पीडित व्यक्तीचे अधिक शोषण व हाल होतात. आपली न्यायदानाची व्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरची, खर्चिक, तापदायक, विलंबित आहे. रोज कोर्टांमध्ये फक्त प्रतीक्षा करण्यात नागरिकांचा जो वेळ जातो, त्याचा विचार केला तर रोज कोट्यवधी मनुष्यतास वाया जातात. ज्याचे पोट हातावर असते, तो माणूस इतरांचे पाहून आपसूक शहाणा होतो...अन्याय सहन करतो, पण कोर्टात जात नाही. त्याला औपचारिक कोर्टात न जाता दिलासा मिळेल, अशी व्यवस्था नाही. मोफत कायदेशीर सल्ला नावाचे प्रकरण नाममात्र आहे. लोकअदालतींना मिळणारे यशही माफक आहे. त्यामुळे न्यायपालिकेवरील सर्वसामान्यांचा विश्‍वास टिकून राहण्यात अडचणी येतात. एकूणच न्यायदान व्यवस्थेचा आढावा घेण्याची व त्यात वेगाने सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. न्यायाची बूज राखणारी व वेगाने न्यायदान देणारी व्यवस्था नसेल तर लोकशाही अपूर्ण राहते. ती तशीच ठेवायची, की सत्तरीतल्या स्वातंत्र्यानंतर लोकतंत्राला पूर्णत्व प्राप्त करून देण्याच्या दिशेने पावले उचलायची, हे देशाच्या राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/11/Nobel2016.html", "date_download": "2018-04-20T16:37:56Z", "digest": "sha1:4JD6TFEKF6UYPUJSEOETF6V4B7DLEJIW", "length": 6260, "nlines": 146, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : नोबेल पुरस्कार २०१६", "raw_content": "\nही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.\n★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २६ नोव्हेंबर\nक्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो कालवश\nचालू घडामोडी : २५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २१ नोव्हेंबर\nमासिक : ऑक्टोबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : २० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १६ नोव्हेंबर\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nचालू घडामोडी : १५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ११ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ६ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १ नोव्हेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4171", "date_download": "2018-04-20T16:44:30Z", "digest": "sha1:CGTUTRSA5RL4PM4KEKQVPJ6S55MVO6UA", "length": 15816, "nlines": 125, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली\nवाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली\nवाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही. प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा निर्णयच नगर पंचायत प्रशासनाने बासनात गुंडाळला कि काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.\nवाडा शहराची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या, नव्याने विस्तारणारी नगरे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची समस्या गंभीर असून शहराच्या डंपींग ग्राउंडचा प्रश्नही नगर पंचायतीसमोर आ वासून उभा आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे घनकचरा हाताळण्यात अडचणी निर्माण होत असून त्यापासून विविध समस्यात अधिक भर पडत आहे. हा अविघटनशील कचरा उघड्यावर व घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने मानव व प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण होतात. त्यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घनकचरा निर्मूलनासाठी खूपच मदत होणार असल्याने या निर्णयाची काटेकोर व कठोर अमंल बजावणी होणे गरजेचे आहे. परंतु नगर पंचायत प्रशासनाला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसत असून याबाबतीत कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nशासन निर्णयानंतर नगर पंचायत प्रशासनाने वास्तविक जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावयास हवे होते. मात्र प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी शहरातील प्लास्टिक पिशवी बंदी बाबत कार्यवाही होतांना दिसत नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन प्लास्टिक बंदीबाबत इतके उदासीन का असा सवाल निर्माण होत आहे. वाडा शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजारांहून अधिक आहे. येथील बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्याप्रमाणावर होत असतो. हे लक्षात घेऊन नगर पंचांयत प्रशासनाने अधिक गांभीर्याने ह्या समस्येकडे पहायला हवे. मात्र पदाधिकारी व प्रशासनाच्या अनास्थेपायी हा प्लास्टिक बंदीचा निर्णय बासनातच गुंडाळला गेला असल्याचे दिसत आहे.\nशासनाच्या निर्णयानुसार शहरात संपूर्ण प्लास्टिक पिशवी बंद\nकरणारच आहोत. एक -दोन दिवसात आम्ही सर्व बाजारपेठेत\nफिरून व्यापारी व छोटे – मोठ्या दुकानदारांना शासनाच्या\nनिर्णयाबाबतीत सूचना देत आवाहन करणार आहोत. अधिक\nजनजागृतीकरिता काही प्रमाणात कापडी पिशव्यांचेही\nवाटप करणार आहोत. या निर्णयाची कडक अमलबजावणी करु.\n– गीतांजली कोलेकर, नगराध्यक्षा,\nप्लास्टिक बंदी बाबत नगर पंचायत कडून एकदा दवंडी देवून व्यापारी\nव नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत . पुन्हा एकदा दवंडी देवून\nसक्त सूचना देण्यात येतील. त्यानंतर मात्र नगर पंचायतीद्वारे कठोर\nकायदेशीर कारवाई केली जाईल.\n– विठ्ठल गोसावी मुख्याधिकारी,\nमहाराष्ट्र शासनाने घेतलेला प्लास्टिक बंदी बाबतचा निर्णय निश्चितच\nस्वागतार्ह आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे दोन दोन कार्यालयांचा पदभार\nअसल्याने त्यांना निर्णय घेण्यास विलंब होत असावा. वाडा नगर\nपंचायतीच्या सन्माननीय नगराध्यक्षांनी इच्छाशक्ती दाखवत प्लास्टिक\nबंदीबाबत निर्णायक भूमिका घ्यायला हवी.\n– संदीप पवार, नगरसेवक,\nPrevious: गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना राबविणार – उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील\nNext: मनसेच्या प्राची संखे शिवसेनेत\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dnyaneshwar-gawade-article-on-vehicle-issue/", "date_download": "2018-04-20T16:38:25Z", "digest": "sha1:5ZOYQ3QIJYCX4ONUWRLGYI5JFMRFKFKI", "length": 16653, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोटारींची अनिर्वध संख्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nआपला देश परदेशी बनावटीच्या मोटारींची मोठी बाजारपेठ बनली आहे. ह्युंदाई, सुझुकी, टोयाटो, जनरल मोटार्ससारख्या कित्येक कंपन्या दरवर्षी अब्जावधी रुपये (नव्हे डॉलर्स) घेऊन जातात. देशात नवश्रीमंताची संख्या वाढत जाऊन त्यातून गाडीबाजांची संख्या वाढत आहे. एकटय़ा दिल्लीमध्ये वाहनसंख्या एक कोटीच्या आसपास गेली आहे, तर मुंबईसारख्या शहरात चार दिवस सुट्टीचे आले तर मुंबईला जोडणारे सर्व दिशांचे रस्ते मोटारींच्या संख्येने इतके फुगतात की, सुट्टय़ा घालवणारे रस्त्यावरच पस्तावतात. मोटार खरेदीत जसे देशाचे परकीय चलन खर्ची पडते तसेच त्या मोटारींना लागणारे महागडे परकीय चलन इंधनही खर्ची पडते. अशा दुहेरी प्रकारात देशाची व्यापारी तूट वाढत जाते. अशा वेळी क्युबा या देशाची आठवण येते. क्युबावर राजकीय दबाव यावेत म्हणून अमेरिकेने त्यांचे पेट्रोल बंद केले, परंतु त्यामुळे क्युबा नामोहरम झालेला नाही. त्यांनी चीनकडून लाखो सायकली, त्यांचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी राष्ट्राभिमानी असलेल्या त्यांच्या जनतेला मोटारींऐवजी सायकलीचा वापर करण्यास प्रवृत्त केले. त्यातून क्युबामधील नागरिकांचे आरोग्य सुधारले, प्रदूषण संपले, अमेरिकेकडून होणारी क्युबाची लूट थांबली त्यायोगे अमेरिकेपासून देश सुरक्षित राहिला. क्युबाचा हा स्वाभिमान आपल्याकडील आपमतलबी मंडळींनी स्वीकारला तर आपल्या देशाचे कितीतरी चांगले होईल. कोणत्याही देशात मोटारी वाढल्या की धूर व ध्वनिप्रदूषण वाढते. त्यामुळे लाखो लोकांना त्वचारोग, डोळय़ांच्या तक्रारी, क्षयरोग, दमा-अस्थमासारखे श्वसनरोग आदी विकार होऊ शकतात. देशाचे आरोग्य सुधारू शकते. स्वतःपुरते पाहणाऱ्यांना हा विचार पटणारा नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलअशैक्षणिक कामातून शिक्षकांना मोकळे करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंपर्क संवादातील नियम आणि नैतिकता\nनिवृत्तीवेतनाचा तिढा कधी सुटेल\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/series-succeeded-retaining-victory/", "date_download": "2018-04-20T16:08:41Z", "digest": "sha1:VVP745M2TV6Z2YAYUIIZGGOJLV2CVPEY", "length": 31449, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Series Succeeded In Retaining The Victory | मालिका विजयाचा धडाका कायम राखण्यात यशस्वी | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nमालिका विजयाचा धडाका कायम राखण्यात यशस्वी\nविराट सेनेने आपल्या मालिका विजयाचा धडाका कायम राखला. या शानदार मालिका विजयाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचे विश्लेषण केले आहे...\n- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार\nटी२० क्रिकेट इतिहासात न्यू झीलंडविरुद्ध एकदाही जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा रोमांचक पद्धतीने जिंकली. मालिका१-१ अशी बरोबरीत आल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरचा सामना ८ षटकांचा खेळविण्यात आल्यानंतरही टी२० स्पेशालिस्ट असलेल्या बलाढ्य न्यूझीलंडला मात देत भारतीयांनी चमकदार कामगिरी केली. मुख्य म्हणजे यासह विराट सेनेने आपल्या मालिका विजयाचा धडाका कायम राखला. या शानदार मालिका विजयाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचे विश्लेषण केले आहे...\nअजूनही मनीष संघात जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. एक सामना खेळताना त्याने त्याच्या फलंदाजीची क्षमता दाखवली. चपळ क्षेत्ररक्षण.\nअय्यरला तिन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातील एका सामन्यात त्याने चमक पाडली. हा खुलेपणाने खेळणारा गुणवान खेळाडू आहे, पण इतर फलंदाजांमध्ये छाप पाडण्यासाठी त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.\nपहिल्या सामन्यात खूप परिणामकारक ठल्यानंतर अक्षर काहीसा दडपणाखाली जाणवला. फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागेल.'\nकेवळ एक सामना खेळताना एकच षटक गोलंदाजी केली. कारण हा सामना ८ षटकांचा खेळविण्यात आला. कर्णधार संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून कुलदीपला नियमितपणे संघात स्थान देऊ शकतो.\n4.5 / 10 हार्दिक पांड्या\nगेल्या काही महिन्यांमध्ये तुफानी प्रदर्शन केल्यानंतर पांड्या अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. तो फलंदाजी व गोलंदाजीतही फारशी चमक दाखवू शकला नाही, पण त्याला मर्यादित संधीही मिळाली. क्षेत्ररक्षणात छाप पाडली.\nपाटा खेळपट्टीवर कॉलिन मुन्रो आणि कंपनीविरुद्ध सिराज खूप महागडा ठरला. पण त्याने जीव तोडून वेगवान मारा केला. तो भविष्यातील भारताचा वेगवान गोलंदाज आहे.\nकारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असताना नेहराच्या बळींची पाटी कोरी राहिली, पण त्याने शानदार मारा करताना आपले कौशल्य आणि महत्त्व दाखवून दिले.\nप्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजीला आला, पण आवश्यक गतीने धावा करण्यात अपयशी ठरला. त्याचा स्ट्राइक रेट (१४३.५८) कोहली आणि मनीष पांड्ये यांच्यानंतर सरस ठरला. धोनीची जागा मिळवण्याची स्पर्धा आता अधिक तीव्र होत आहे. यष्ट्यांमागे शानदार कामगिरी.\nपहिल्या सामन्यात रोहितने जबरदस्त ८० धावांची खेळी केली. यानंतर त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत, पण त्याच्यामुळे किवी गोलंदाजांवर एक दबाव राहिला; शिवाय त्याने शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शनही केले.\nरोहितप्रमाणेच धवननेही पहिल्या सामन्यात ८० धावांची खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आपली जागा जवळपास नक्की केली आहे. डीपमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केले.\nभुवीला एकदिवसीय मालिकेप्रमाणे छाप पाडण्यात अपयश आले. मुन्रोने केलेल्या तुफानी खेळीपुढे तो खूप महागडाही ठरला. पण हा एक दिवस सोडला तर तो संपूर्ण मालिकेत शानदार खेळला.\nकोहलीने सर्वाधिक धावा काढल्या. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने आक्रमक नेतृत्व करताना किवी आव्हान यशस्वीपणे परतावले. अखेरच्या सामन्यात त्याने ज्या प्रकारे गोलंदाज हाताळले ते अप्रतिम कौशल्य होते.\nचहलनेही चांगल्या नियंत्रणासह अप्रतिम वैविध्य असलेले लेग ब्रेक, गुगली आणि फ्लिपर्स टाकून किवी फलंदाजांना दडपणाखाली आणले. बुमराहप्रमाणेच इकोनॉमी रेट नियंत्रणात राखताना बळी घेत तो घातक ठरला.\nसंपूर्ण मालिका गाजवताना आपली छाप पाडली. जबरदस्त नियंत्रण आणि विविधता या जोरावर त्याने सर्व गोलंदाजांच्या तुलनेत सर्वोत्तम इकोनॉमी रेट राखला. प्रतिकूल परिस्थितीत कोहलीसाठी अत्यंत भरवशाचा खेळाडू ठरला. विशेष करून थरारक झालेल्या अंतिम सामन्यात तो चमकला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nश्रीलंका आजपासून करणार दौ-याची सुरुवात\nकसोटी विजयाचे शतक गाठण्याची भारताला संधी\nचहल, लोकेश राहुल यांना वारंवार संधी मिळावी\nक्रिकेटपटूंच्या डोप चाचणीस नकार - बीसीसीआय; ‘नाडा’ची मागणी फेटाळली\nश्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघातून विश्रांती\nकॅप्टन कोहलीने लॉन्च केला स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nIPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला\nVideo : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स\n...म्हणून गेलकडून सेन्चुरी मुलीला समर्पित\nसामन्याआधी चेन्नई टीमला फटका यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:39:47Z", "digest": "sha1:B5CQ7UV5GIKK3WFK26TAJIQ6LBHCXWI6", "length": 4654, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स टपर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचार्ल्स टपर कॅनडाचा पाचवा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅकडोनाल्ड · मॅकेन्झी · मॅकडोनाल्ड · अॅबॉट · थॉम्पसन · बोवेल · टपर · लॉरिये · बोर्डेन · मीयन · किंग · मीयन · किंग · बेनेट · किंग · सेंट लॉरेंट · डीफेनबेकर · पियरसन · पि त्रुदो · क्लार्क · पि त्रुदो · टर्नर · मुलरोनी · कॅम्पबेल · क्रेटियें · मार्टिन · हार्पर · ज त्रूदो\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/sindhudurga/start-annual-jathasotsav-gods-konkan/", "date_download": "2018-04-20T16:00:23Z", "digest": "sha1:QBT4YLCQVBV4K66CO4LGHXDPUZZJ6OHM", "length": 23063, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Start Of Annual Jathasotsav Of Gods In Konkan | कोकणात देवतांच्या वार्षिक जत्रौत्सवांना प्रारंभ | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nकोकणात देवतांच्या वार्षिक जत्रौत्सवांना प्रारंभ\nजत्रौत्सवानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.\nमातोंड येथील श्री देवी सातेरीची स्वयंभू मूर्ती.\nपालखीत विराजमान झालेली देवीची मूर्ती.\nसातेरीच्या जत्रौत्सवात भाविक दिवसभर निर्जळी उपवास करून रात्री लोटांगण घालतात.\nउपवास करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय असते.\nसांस्कृतिक महाराष्ट्र कोकण सिंधुदुर्ग\nकणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विजयाचा जल्लोष\nसिंधुदुर्ग : आंबोलीजवळ अपघात, सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये टक्कर\nमहाशिवरात्रीनिमित्त कोकणात रंगल्या शिवरथयात्रा\nवेंगुर्ला येथील नवाबाग बीचवर पतंगांची मांदियाळी\nनाताळाच्या सुट्टीत मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी\nWELCOME KONKAN : सिंधुदुर्ग - नववर्षी सेलिब्रेशनला चला थेट कोकणात\nवेंगुर्ला बंदर, बनले सुंदर\nकुडाळ येथे नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा\nकोकणात देवतांच्या वार्षिक जत्रौत्सवांना प्रारंभ\nकणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\nकुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल'\n, 'हे' चित्रपट नक्की पाहा\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:25:05Z", "digest": "sha1:PXZFPL2GGJYLNS2ECMYTKCJNJIXY7KHO", "length": 5516, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "दसरा मेळावा – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: दसरा मेळावा\nसेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच\nआम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र, शिवसेना\nअखेर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ‘ ह्या ‘ ठिकाणी होणार\nपंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी देखील वादातच राहिला आहे . महंतानी पंकजा मुंडे यांची दसरा मेळावा घेण्याची विनंती धुडकावून लावली व नंतर सरकारतर्फे देखील दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यास परवानगी नाकारण्यात आली . त्यामुळे मेळावा होणार किंवा नाही,किंवा झालाच तर कुठे हे हि एक प्रश्नचिन्हच होते . अखेर पंकजा मुंडे यांनी भगवान… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: गोपीनाथगड, दसरा मेळावा, पंकजा मुंडे, सावरगाव\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/saroj-pande-on-rane-bjp-entry-270681.html", "date_download": "2018-04-20T16:16:54Z", "digest": "sha1:HKHWLVLSMAU67CLGY7LU5SFC37XVEZ7Z", "length": 12277, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम !", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम \nनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय.\nनवी दिल्ली, 25 सप्टेंबर : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय. राणे आणि अमित शहांची ही भेट सहज आणि स्वाभाविक आहे, राणेंच्या मुलांबाबतही पक्षाने अजून कुठलाही विचार केलेला नाहीय, भाजप आपल्या तत्वानुसार चालेल, असंही पांडे म्हणाल्या.\nदरम्यान, नारायण राणेंनी देखील दिल्लीला जाण्यापूर्वीच आपण कुडाळमधल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी अमित शहांना भेटत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार भाजप राणेंना प्रवेश देताना त्यांच्या मुलांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत कुठलंही ठोस आश्वासन देऊ इच्छित नाहीये. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही नारायण राणेही भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत भाग असणार नसल्याचं विधान केलंय. तर मुख्यमंत्रीही उद्यापासून विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यामुळे अमित शहा काय भूमिका घेतात त्यावर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPnarayan ranesaroj pandeनारायण राणेभाजप प्रवेशसरोज पांडे\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/11/current-affairs-26-november.html", "date_download": "2018-04-20T16:36:08Z", "digest": "sha1:GKCRD3FOIYNEK57ZL4NM4CU4SSSMAWOM", "length": 12801, "nlines": 151, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\n२६ नोव्हेंबर १९२१ : श्वेतक्रांतींचे जनक व्हर्गीस कुरियन जन्मदिन\n‘पृथ्वी २’ची यशस्वी चाचणी\nअण्वस्त्रधारी ‘पृथ्वी २’ या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चंडीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या संस्थने ही चाचणी घेतली.\nआर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली.\nया मोहिमेमध्ये उपयुक्य सर्व रडार यंत्रणा, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटर आहे, तर ते १००० किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.\nपॉंडिचरीत विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना\nपॉंडिचरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी या योजनेवर ७.६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.\nइयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी मोफत सायकल मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेमुळे २६,२०७ विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळणार आहेत.\nराज्यसभा सदस्य खेकीहो झिमोमी यांचे निधन\nनागा पिपल्स फ्रंटचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य खेकीहो झिमोमी यांचे २६ नोव्हेंबर रोजी एआयआयएमएस रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.\nझिमोमी यांनी नागालॅंड स्टुडंट फेडरेशनमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नागालॅंडमधील ते एक यशस्वी उद्योजक होते.\nते तीन वेळा नागालॅंड विधानसभेचे सदस्य होते. तसेच नागालॅंडमध्ये त्यांनी काही मंत्रिपदेही भूषविली होती.\nम्यानमारसोबत शांतता करार करण्यासाठी त्यांनी अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत म्यानमारला भेट दिली होती.\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे कामकाज त्यांच्या निधनामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.\n२०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष\nजागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) अहवालानुसार, पृथ्वीवरील आतापर्यंतच्या इतिहासात २०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून, एल निनोच्या प्रभावामुळे २०१६ या वर्षीही काहीशी अशीच परिस्थिती जाणवेल, असे अहवालात म्हटले आहे.\nतापमानवाढीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलल्यास सध्याच्या तापमानात ६ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.\nउद्योगक्रांतीच्या कालखंडानंतर जागतिक तापमानामध्ये २ अंशांनी वाढ झाली. हे तापमान २०१० पर्यंत सरासरीपर्यंत आणण्याचे लक्ष्य होते.\nडब्ल्यूएमओच्या मते, २०१५ या वर्षातील भूपृष्ठावरील तापमानवाढ ही उद्योगपूर्व कालखंडानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. तापमानातील हे बदल हे एल निनोच्या प्रभावामुळे आणि मानवनिर्मित तापमानवाढीमुळे झालेले आहेत.\n१९९८ पासून आतापर्यंत जगातील सर्वाधिक दहा उष्ण वर्षे झाली आहेत. त्यापैकी २००५नंतर आतापर्यंत आठ वर्षांचा समावेश पहिल्या दहामध्ये आहे.\nदिल्ली सरकारने उद्देशिका चुकविली\nदिल्ली सरकारने संविधान दिनाच्या निमित्ताने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये संविधानाची उद्देशिका छापली. मात्र त्यात गंभीर चूक करत 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे दोन्ही शब्द वगळून टाकले.\nमाहिती व प्रसारण विभागाच्या संचालकांना यांसदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून ४ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.\nदिल्लीचे मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री : मनीष सिसोदिया\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-254307.html", "date_download": "2018-04-20T16:31:06Z", "digest": "sha1:ZWSBIBZ2TWLK5OO7VPL4KFQUNF5PNKFS", "length": 11312, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चार एजंटवर कारवाई", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nम्हैसाळ गर्भपात प्रकरणी चार एजंटवर कारवाई\n10 मार्च : म्हैशाळ गर्भपात प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. याप्रकरणी आज चार एजंटवर कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन एजंटना अटक केली असून दोघांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.\nयाप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून कोल्हापूर जिल्यातील तेरवाड इथून यासीन तहसीलदार याला तर कर्नाटकमधल्या कागवाड इथून सातगोंडा पाटील या दोन एजंटना अटक केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील शिरढोणमधून संदीप जाधव आणि कागवाडमधून वीरगोंडा गोमटे या दोघांना ताब्यात घेतलं आहे.\nतर यातील एजंट संदीप पाटील यानेच जामदाडे पती-पत्नीला डॉ. खिद्रापुरे यांच्याकडे उपचारासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे.\nदरम्यान, पोलिसांनी काल रात्री उशीरा खिद्रापुरेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.\nयाशिवाय काल या प्रकरणात सांगलीतून सुनील खेडकर आणि विजापूरमधून रमेश देवगीकर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या दोघांनाही न्यायालयानं 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/beed-woman-constable-seeks-nod-for-sex-change-481945", "date_download": "2018-04-20T16:25:18Z", "digest": "sha1:W7MJYVT3N3CPT7BFEY5I5PDPTJSVA7WF", "length": 17735, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "बीड : लिंगबदल करण्याची मागणी करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप", "raw_content": "\nबीड : लिंगबदल करण्याची मागणी करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप\nलिंगबदलीसाठी सुट्टी मागणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबलला लिंग बदलल्यानंतर नोकरीवर पाणी सोडावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि गृह विभागाला सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित घटना ही अगदीच अपवादात्मक असल्यामुळे नियमात तरतूद करून संबंधित महिला कॉन्स्टेबलला सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात विचार करावा असंही त्यांनी सांगितलं.\nमहिला पोलिस कॉन्स्टेबलनं लिंगबदलीसाठी सुट्टीसाठी वरिष्ठांकडे अर्ज केला आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nबीड : लिंगबदल करण्याची मागणी करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप\nबीड : लिंगबदल करण्याची मागणी करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप\nलिंगबदलीसाठी सुट्टी मागणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबलला लिंग बदलल्यानंतर नोकरीवर पाणी सोडावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि गृह विभागाला सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित घटना ही अगदीच अपवादात्मक असल्यामुळे नियमात तरतूद करून संबंधित महिला कॉन्स्टेबलला सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात विचार करावा असंही त्यांनी सांगितलं.\nमहिला पोलिस कॉन्स्टेबलनं लिंगबदलीसाठी सुट्टीसाठी वरिष्ठांकडे अर्ज केला आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/II-II-td4642016.html", "date_download": "2018-04-20T16:43:32Z", "digest": "sha1:GXJUWPRBKBJD4VQ26LTCDUUTTSUKXBDO", "length": 2385, "nlines": 42, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II", "raw_content": "\nकविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II\nकविता II होय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट II\nहोय मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट\nअनेक कलाकृती जन्म घेतात\nकाही सुखासीन तर काही कल्लोळ माजवतात\nकधी उठतो आणि सलाम करतो\nकधी पडतो आतल्या आत\nकाय वाढून ठेवलंय पुढे \nतरी मीच आहे तो अनभिषिक्त सम्राट\nमाझ्या मनाचा , इथे जन्मणाऱ्या प्रत्येक कलाकृतीचा\nमीच धावतो , वावरतो , मीच फेकतो\nमीच घडवतो प्रारब्ध माझे\nमीच प्राक्तनाच्या दरवाज्यावर बसून\nमीच तोडितो नातेबंद सारे\nमीच तो, जो ओळखी पुढचे इशारे\nतरी रंग भरतो रंगमंचात न्यारे\nमीच तो सम्राट तरी अनभिषिक्त सदैव\nमीच तो नीच ठरतो , प्रत्येक कलाकृतीत\nसम्राट असूनही अवहेलना पदरी\nहे या अनभिषिक्त सम्राटाचे दुर्दैव\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-20T16:22:31Z", "digest": "sha1:SBLCYPR7ZRCGG3UA4D2ZX4GVZYZRR363", "length": 7088, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर\nखंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.\nखंडणी प्रकरणी अटक केलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून त्याचा फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही, असे इक्बाल म्हणतो.\nबिल्डरांकडून खंडणी उकळल्याच्या तक्रारीवरून इक्बाल कासकरला तीन साथीदारांसह भायखळा येथून अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे . मात्र अनेक प्रश्नांना इकबाल नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nपोलिसांनी त्याला प्रश्न विचारून महत्त्वाची माहिती मिळवली. दाऊद पाकिस्तानात असून तो कराचीत आहे. दाऊदचे लॅटिन अमेरिकेतील ड्रग माफियांशी कनेक्शन आहे. तसेच दाऊदच्या चार ते पाच ठिकाणांची माहिती इक्बालने चौकशीदरम्यान दिली.\nदाऊदशी संपर्क होतो का, असे विचारले असता ‘गेल्या तीन वर्षात दाऊदने कधीही आपले कुटुंबीय वा एजंटना फोन केलेला नाही. आपला फोन टॅप होईल अशी भीती त्याला आहे,’ असे इक्बालने सांगितले. ठाण्यातील खंडणी वसुली प्रकरणात दाऊदचा काहीही संबंध नाही, असा दावा इक्बालने केला आहे.मात्र इकबाल स्काईप च्या माध्यमातून दाऊदपर्यंत संपर्क व खंडणीचे अपडेट पोहचवत करत होता असे पोलिसांचे म्हणणे आहे.\n पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा \nCategory: महाराष्ट्र Tags: iqbal kasar, marathi, mumbai underworld, दावुद इब्राहीम, मराठी न्यूज, मराठी बातम्या, महाराष्ट्र\n← ‘ह्या ‘ दुर्दैवी घटनेनंतर आली पालिकेला जाग साता-यात विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न.. कोण होता ‘ हा ‘ व्यक्ती \nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFA/MRFA098.HTM", "date_download": "2018-04-20T16:54:53Z", "digest": "sha1:YPNY4GMN6EQ5JBUTD2426QA4WUELV66S", "length": 8894, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फारशी नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ३ = ‫حروف ربط 3‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फारशी > अनुक्रमणिका\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nContact book2 मराठी - फारशी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8,-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF.html", "date_download": "2018-04-20T16:20:27Z", "digest": "sha1:6X22HF7QGXWN7QQKLTOYZYY5A4N3VIUP", "length": 16138, "nlines": 128, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सावधान, मनोरुग्णांची संख्या वाढतेय! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसावधान, मनोरुग्णांची संख्या वाढतेय\nसावधान, मनोरुग्णांची संख्या वाढतेय\nजीवनात ताणतणाव वाढत असल्याने मनोरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शहादा तालुक्‍यातील 16 गावांमध्ये जनार्थ आदिवासी विकास संस्थेतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत 132 मनोरुग्ण आढळून आले. त्यात 45 महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात मानसोपचार विभाग सुरू करण्यात आला आहे.\nताणतणावाच्या प्रक्रिया सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे. त्यातून ग्रामीण भागही सुटलेला नाही. प्रारंभी शहरी भागातील नागरिकांना अधिक तणाव असल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाढलेली बेरोजगारी, महागाई, जीवनातील ताणतणाव, कुटुंबासाठी दिला जाणारा वेळ, वाढलेली जबाबदारी, अनावश्‍यक जीवघेणी स्पर्धा, त्यातून तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम व्यक्ती मनोरुग्ण होते. ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांत अशा मनोरुग्णांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्यांमध्ये 40 ते 70 वर्षे वयोगटांतील व्यक्‍तींची संख्या असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने जनार्थ आदिवासी विकास संस्थेने शहादा तालुक्‍यातील 16 गावांत पाहणी करून प्राथमिक बाबींची चर्चा केली. गावागावात बैठका घेतल्या. त्यातून या गावांमध्ये 132 मनोरुग्ण असल्याचे आढळून आले.\nसंस्थेने शहादा तालुक्‍यातील 16 गावांमध्ये केलेल्या पाहणीत दामळदा येथे 15, कवळीथ- 10, गोगापूर- 4, भोरटेक- 10, चिखली- 6, लक्‍कडकोट- 7, नांदे- 10, कन्साई- 9, तलावडी- 14, इस्लामपूर- 10, सुलवाडा- 10, अमोदा- 4, अंबापूर- 10, गणोर- 10, भूते-आकसपूर- 2, नवलपूर येथे एक मनोरुग्ण आढळला.\nमानसिक आजारावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. त्यानंतर मनोरुग्ण व्यक्‍ती स्थिर होऊन नियमित, सामान्य जीवन जगू शकते. मनोरुग्णांमध्ये बहुतांश व्यक्‍ती 15 ते 45 या गटातील स्त्री- पुरुष आहेत. योग्य औषधोपचारामुळे ते सामान्य होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते गंभीर मानसिक विकार असलेल्या व्यक्‍तींचे प्रमाण एक टक्‍का आहे. उपचाराचा खर्च 300 ते 600 रुपये प्रतिमहा आहे. हा उपचार पूर्ण करणे आवश्‍यक ठरते. गरिबांना औषधोपचार परवडत नाहीत. शासनाकडूनही त्याकडे दुर्लक्ष होते. शारीरिक आजारावरील उपचारासाठी शासनाने गावपातळीपर्यंत पोहोचणारी यंत्रणा उभी केली. परंतु मानसिक उपचारांसाठी जिल्ह्यात सुविधेचा अभाव होता.\nया मनोरुग्णांचा शोध घेऊन जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विविध प्रयत्न केले. त्यात मानसिक आजारी व्यक्‍ती, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्‍ती, कुटुंबातील सदस्य, संपर्कातील व्यक्‍ती, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.\nएकीकडे मनोरुग्णांच्या समुपदेशनासाठी प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे शासकीय पातळीवर उपचारांची सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले. त्यातून धुळे येथील डॉ. जीवन पवार हे मानसोपचारतज्ज्ञ मार्च 2010 पासून महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सेवा देऊ लागले. या महिन्यापासून डॉ. चंद्रकांत जोशी यांची मानसोपचारतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेबारादरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात ते सेवा देतील.\nअन्य रुग्णांनी लाभ घ्यावा\nसंस्थेने पाहणी केलेल्या 16 गावांतील 132 मनोरुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गावागावांत बैठका घेऊन मनोरुग्ण व मानसोपचारांबाबत माहिती दिली जात आहे. काही पोस्टर प्रकाशित करण्यात आले. जिल्ह्याच्या अन्य भागांतही असलेल्या मनोरुग्णांना औषधोपचारासाठी त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हा रुग्णालयात आणावे, असे आवाहन जनार्थ आदिवासी विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा उपलब्ध झाली आहे. त्याचा आपल्या निकटवर्तीय मनोरुग्णांना लाभ द्यावा. आरोग्यासाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्‍ती, संस्था यांनी ही माहिती गावागावांपर्यंत पोहोचवावी.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-245955.html", "date_download": "2018-04-20T16:33:37Z", "digest": "sha1:FTVJBFXCGHLJIB5G3A76EA5KOAFQN26F", "length": 15145, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेशात रेल्वे रुळावरून घसरली, मृतांचा आकडा 39वर", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nआंध्र प्रदेशात रेल्वे रुळावरून घसरली, मृतांचा आकडा 39वर\n22 जानेवारी : आंध्र प्रदेशातील कुनेरू रेल्वे स्थानकाजवळ जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरल्यानं झालेल्या भीषण अपघातात 39 प्रवासी ठार झाले आहेत, तर 60हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य सुरू केलं आहे.\nआंध्रच्या विजयनगरम जिल्ह्यातील कुनेरू स्टेशनजवळ शनिवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडी भुवनेश्वरला निघाली होती. रात्री 11च्या सुमारास कुनेरू स्थानकाजवळ असताना या गाडीच्या इंजिनासह एक माल डबा, दोन जनरल डबे, दोन स्लीपर कोच, एक एसी थ्री कोच आणि दुसऱ्या वर्गाचा एक डबा रुळावरून घसरले. त्यात 32 प्रवासी जागीच ठार झाले.\nसर्व प्रवासी झोपेत असल्यानं नेमकं काय घडतंय, हे समजण्याच्या आतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी झाले असून अनेक लोक डब्याखाली अडकले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. जखमींची संख्या मोठी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदरम्यान, रात्रीच्या अंधारात बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र दिवस होताच बचावकार्याने वेग धरला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विविध ठिकाणांवरून 4 रिलीफ व्हॅन पाठवण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं टि्वट करून सांगितलं. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\nमृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदतीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.\nमोदींच्या राज्यात ८ मोठे रेल्वे अपघात - एकूण ३३९ लोकांचा मृत्यू\n- २० नोव्हेंबर २०१६ मध्ये उत्तर प्रदेशमधील कानपूरजवळ रेल्वे अपघात १५० लोकांचा मृत्यू, तर २०० जण जखमी\n- २५ जुलै २०१६ साली मडुआडीह-इलाहाबाद पॅसेंजर ट्रेनला मिनी स्कूल बसची धडक, ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू...\n- २० मार्च २०१५मध्ये डेहराडूनवरून वाराणसीला जाणारी जनता एक्स्प्रेस रुळावरून घसरली. २५ जणांचा मृत्यू तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी\n५ ऑगस्ट २०१५ साली मध्य प्रदेशात रेल्वे अपघात\nमुंबई-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस आणि पटना- मुंबई जनता एक्स्प्रेस रुळावरून घसरली, ३१ जणांचा मृत्यू\n- मे २०१४ मध्ये रायगड जिल्ह्यात पॅसेंजर रेल्वेचं इंजिन आणि ६ डबे रुळावरून घसरले\n२० जणांचा मृत्यू, १२४ जण जखमी\n- २६ मे २०१४ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखधाम एक्स्प्रेसची मालगाडीला टक्कर, २२ जणांचा मृत्यू\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/blind-couples/articleshow/62359196.cms", "date_download": "2018-04-20T16:38:12Z", "digest": "sha1:RGQTY4ZDVXUD4GQACA36UPZ7MPXBTE7G", "length": 19923, "nlines": 235, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "blind couples | अंध दाम्पत्य - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसीबीएसच्या रस्त्यावर हे दाम्पत्य दिसले. अंध असले तरी ते कॅलेंडर विकून स्वतःचा उदरनिर्वाह चालवितात. याउलट अनेक ठिकाणी काम न करता धडधाकट भीक मागतात. त्यांनी यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. राजेंद्र राजधर\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसिडको मध्ये चोरांचा धुमाकूळ\n2रस्त्यांची दूरवस्था दूर करा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/Printing_Tips", "date_download": "2018-04-20T16:13:19Z", "digest": "sha1:LIMIF2RRJVXVJHZDYUO7WCSPVUQCKNNY", "length": 5431, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "Printing Tips - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: Printing Tips हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:Printing Tips येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः Printing Tips आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा Printing Tips नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:Printing Tips लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित Printing Tips ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित Printing Tips ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nirnay.sindhu/word", "date_download": "2018-04-20T16:43:27Z", "digest": "sha1:D37YQI46AKTT3LLZV75WG3YA7Q2QDJYH", "length": 10287, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nirnay sindhu", "raw_content": "\nनिर्णयसिंधु - प्रथम परिच्छेद\nश्रीमत्पदवाक्यप्रमाणापारावारपारणिमहोपाध्याय श्रीकमलाकरभट्ट विरचित प्रस्तुत ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला ..\nप्रथम परिच्छेद - मंगलारंभ\nप्रस्तुत ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nप्रथम परिच्छेद - काळाचे भेद\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - ऋतु\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - संक्रांतिनिर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मेषादिसंक्रांतींची दानें\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - विष्णुपदादिकांचें स्वरुप\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nप्रथम परिच्छेद - मंगलकार्यांचेठायीं विशेष\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nप्रथम परिच्छेद - चांद्रमास\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मलमासनिर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मलमासांतील कर्में\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मलमासांत वर्ज्य कर्मै\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - बाल्यादि लक्षण\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - मलमाससंबंधी विशेषव्रत\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - तिथिनिर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - एकभक्तव्रताचा निर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - नक्तव्रताचा निर्णय\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nप्रथम परिच्छेद - हरिनक्त\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\nस.क्रि. निश्चय करणे . - मनको .\nकोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/homes-get-cheaper-due-to-note-ban-gst-rera/articleshow/62454473.cms", "date_download": "2018-04-20T16:13:58Z", "digest": "sha1:6BLKGT2LVZUTUZ52GCU5VJMC3FEKM2IQ", "length": 23023, "nlines": 240, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "RERA:homes get cheaper due to note ban gst rera | जीएसटी, 'रेरा'मुळं मुंबई-पुण्यात घरे स्वस्त - Maharashtra Times", "raw_content": "\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nकाँग्रेस महाभियोगाचा राजकीय शस्त्..\nउत्तर प्रदेश : इटाह येथे नऊ वर्षा..\nमहाभियोग प्रस्तावावर डॉ.मनमोहन सि..\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात म..\nजीएसटी, 'रेरा'मुळं मुंबई-पुण्यात घरे स्वस्त\nकेंद्र सरकारनं नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) आणि जीएसटी लागू केल्यामुळं घरांच्या किंमती घटल्या आहेत. 'नाइटफ्रँक इंडिया रिअल इस्टेट'च्या अहवालानुसार, देशातील शहरांमधील घरांच्या किंमती सरासरी तीन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.\nअहवालानुसार, पुण्यात ७ टक्के, तर मुंबईतील घरांच्या किंमती पाच टक्क्यांनी घटल्या आहेत. एनसीआरमधील घरांच्या किंमतींमध्ये सहा वर्षांपासून सातत्यानं घट झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या वर्षीही किंमती दोन टक्क्यांनी घसरल्या होत्या. घरांच्या किंमती घसरण्यामागे मागणी कमी असल्याचं कारण सांगण्यात येतं.\nबेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईतील घरांच्या विक्रीत अनुक्रमे २६, ६ आणि २० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मुंबई आणि पुण्यातील घरांच्या खरेदीत थोडी वाढ झाल्याचं दिसून येतं. अहवालानुसार, महाराष्ट्रात 'रेरा'ची योग्य अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीत अनुक्रमे तीन आणि पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'मागणी वाढल्यामुळं ATMमध्ये खडखडाट'\nVodafone-Idia: विलीनीकरणाचा कर्मचाऱ्यांना फटका\nIndia GDP: विकासदर ७.३ टक्क्यांवर जाणार\nCash Crunch: दोन हजाराच्या नोटा होताहेत गायब\nअर्थमंत्र: बोनस मिळाला तर 'हे' करा\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nम्युच्युअल फंड सल्लागाराची निवड कशी कराल\nसरकारी बँकांचे खासगीकरण नकोच\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्या\n1जीएसटी, 'रेरा'मुळं मुंबई-पुण्यात घरे स्वस्त...\n2मोबाइल बँकिंगला मालवेअरची बाधा...\n4मुद्रा योजना राज्यात प्रभावी...\n8जीएसटी विवरणाला मुदतवाढ नाही...\n9आधारकार्डसाठी आता नवी टू-लेयर सेफ्टी सिस्टीम...\n10एअर इंडियात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला मंजुरी...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-04-20T16:46:21Z", "digest": "sha1:5GZ25AUGQIRIGCFL5RA3UDKQOVZCVIUH", "length": 9705, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमी प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोमीचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना २२ ऑगस्ट १९२१\nक्षेत्रफळ ४,१५,९०० चौ. किमी (१,६०,६०० चौ. मैल)\nघनता २.१७ /चौ. किमी (५.६ /चौ. मैल)\nकोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.\nयेथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/thane-municipal-corporation/videos/", "date_download": "2018-04-20T16:04:53Z", "digest": "sha1:Y5IPX5VME2LLCUHVEDZVMQX2VB6VPL5E", "length": 19521, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Thane Municipal Corporation Videos| Latest Thane Municipal Corporation Videos Online | Popular & Viral Video Clips of ठाणे महानगरपालिका | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-20T16:37:23Z", "digest": "sha1:D4NPJTGMSDQ7WHR76HCDCFY67T7G2YE7", "length": 10560, "nlines": 123, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "व्यावसायिक चिकित्सा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nव्यावसायिक चिकिस्तकाचे कार्य व्यावसायिक उपचार पध्दती व्यावसायिक उपचारपध्दतीचे महत्वाचे कार्य म्हणजे कार्यक्षमतेचा विकास आणि आयुष्यभर त्याची देखभाल करणे, त्यांमुळे स्वत:चे आणि दुसर्‍याचे ध्येय पूर्ण करता येते. समाधानाने जगता येते आणि स्वत:वर तसेच पर्यावरणावर प्रभुत्व मिळविता येते.\nव्यवसाय हा उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. व्यावसायिक उपचारक अशा व्यवसायांवर प्रकाश टाकतात जे लोकांना संपूर्ण, आणि स्वावलंबी बनवितात. रोजच्या जीवनातील व्यवसायात काम किंवा शिक्षण, स्वत:ची काळजी घेणे, खेळणे आणि आरामाचा या सर्वांवर परिणाम यांचा समावेश होतो. रोजच्या कार्यात व्यक्तीची कार्यक्षमता जास्तीतजास्त वाढविणे हा या व्यवसायाचा उद्देश आहे.\nसंपूर्ण जीवनात व्यवसायाचे संतुलन व्यावसायिक उपचारक लोकांबरोबर काम करतात. संपूर्ण व्यक्तींवर उपचार करून, आणि शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय, यांच्या मदतीने व्यावसायिक योग्यता विकसित केली जाऊन त्यात वाढ घडवून आणली जाते. अर्थपूर्ण अशा कार्यांवर आधारित हा उपचार असतो आणि यात ज्या व्यक्तीवर उपचार केले जात आहेत तिची संपूर्ण शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक असणे गरजेचे असते.\nव्यावसायिक उपचार पध्दतीचा कोठे वापर केला जातो.\nव्यावसायिक उपचार अनैक व्यवस्थापनामध्ये दिले जातात.\nरूग्णालये - अंतररूग्ण आणि बाह्यरूग्ण - दोन्हीत\nविशिष्ट जातीची आरोग्य केंद्रे\nअति दुर्बलता असणार्‍या लोकांसाठी घरी उपचार दिले जातात.\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-chandwad-weapon-case-crime-90522", "date_download": "2018-04-20T16:42:49Z", "digest": "sha1:DJWGNGECBWFAVHUHKPXDJQJFG5B7TD4O", "length": 11906, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Chandwad Weapon Case crime चारही आरोपी आज विशेष मोका न्यायालयात | eSakal", "raw_content": "\nचारही आरोपी आज विशेष मोका न्यायालयात\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nनाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात \"मोका'अन्वये सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता.4) संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना उद्या नाशिकच्या विशेष \"मोका' न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेसह उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसही उद्या न्यायालयात येणार आहे.\nनाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात \"मोका'अन्वये सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता.4) संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना उद्या नाशिकच्या विशेष \"मोका' न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेसह उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसही उद्या न्यायालयात येणार आहे.\nचांदवड शस्त्रसाठा प्रकरणातील संशयित बद्रिनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका पाशा (29), नागेश बनसोडे (21, रा. वडाळा), अमीर रफिक शेख, वाजिद अली फैयाज अली (28, रा. शिवडी, मुंबई) यांच्या \"मोका'अंतर्गत पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत आहे. गेल्या 14 डिसेंबर रोजी संशयितांना चांदवडच्या टोल नाक्‍यावर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली होती; तर गेल्या 28 डिसेंबर रोजी त्यांच्यावर \"मोका'अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वेळी संशयितांचा ताबा घेण्यासाठी आलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकला माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे संशयितांचा पुन्हा ताबा घेण्यासाठी ते उद्या न्यायालयाकडे अर्ज करण्याची शक्‍यता आहे; तसेच बांदा (उत्तर प्रदेश) येथील \"न्यू पंजाब मेसर्स' या शस्त्रविक्री दुकानावर दरोडा टाकल्याप्रकरणी बांदा पोलिस संशयितांचा ताबा घेण्यासाठी येण्याची शक्‍यता आहे.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nबलात्कारी, दरोडेखोरांना संचित रजा नाही\nनागपूर - मध्यवर्ती कारागृहातून संचित रजा, अभिवचन रजेवर बाहेर आलेले कैदी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने यापुढे बलात्कार, दरोडा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642331.html", "date_download": "2018-04-20T16:44:26Z", "digest": "sha1:TYTP3OBRTUNBU6OFZSKSIE4Z3IYNIULX", "length": 2139, "nlines": 28, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - तुझी आठवण", "raw_content": "\nराहणे पण कठीण होत आहे तुझ्याशिवाय जगणे पण कठीण होत आहे तुझ्या शिवाय................\nकारण तर कळत नाही , पण दुसऱ्या सोबत पण बोलणे कठीण होत आहे तुझ्या शिवाय...............\nइच्या आहे मनात तुझ्याशी बोलण्याची, इच्या आहे मनात तुला समजून घेण्याची घेण्याची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची वाट पाहत आहो मी त्या दिवसाची......................\nप्रेमाचे उदाहरण तरी काय देऊ साथ समुद्र सांगू कि पक्षाचे प्रेम सांगू .............\nनात्यातील गोडवा प्रेमाने नाही तर मैत्री ने जुळतो आज कालच्या प्रेम युगात मी तुझ्या प्रेमाला घाबरतो.............\nकोणाशी कोणाचे न बोलण्याचे दुःख समजून घे गेलेली वेळ आणि गेलेला वेळ परत येत नसतो हे समजून घे ...........\nएक इच्या मनात थेवून सांगतो कधीही ये पण कायम स्वरूप ये कधीही ये पण कायम स्वरूप ये………….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8.html", "date_download": "2018-04-20T17:03:40Z", "digest": "sha1:QORNKPCEC7B67NFBXDOQJUAHPDEA2VR5", "length": 3842, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "शिवसेनेचा ४६ वा वर्धापन - Latest News on शिवसेनेचा ४६ वा वर्धापन | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nशिवसेनेचा ४६ वा वर्धापन\nशिवसेनेचा ४६ वा वर्धापन\nशिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन\nमराठी माणसाचा आवाज बुलंद करणा-या आणि ज्वलंत हिंदुत्वाची मशाल अखंड तेवत ठेवणा-या शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन दिन आहे. मुंबईतल्या किंग्जसर्कल इथल्या षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.\nगेलचा खुलासा, या खेळाडूमुळे खेळतोय ही लीग\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई\nशतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन\nशतक ठोकल्यानंतर गेलने जाहीरपणे मागितली ही गोष्ट\nथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\nFilm Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा\nहे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका...\nबायकोला गिफ्ट देण्यासाठी नवऱ्याने मैत्रिणीची केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:36:03Z", "digest": "sha1:3PVFOGC4JMVRNH63GM6XAG47TFLYNQEG", "length": 3628, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्फ्रेड लिटलटन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-20T16:36:31Z", "digest": "sha1:KLC26GJ4B2JXRFWVX534PUKKB5XNE2VC", "length": 4480, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय तटरक्षक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्थापना १८ ऑगस्ट १९७८\nभारतीय तटरक्षक दलाची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ करण्यात आली. किनार्र्यापासून १२ सागरी मैलापर्यंतची सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असते.\nभारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक\nसेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://specialfinds.com/mr/", "date_download": "2018-04-20T16:02:46Z", "digest": "sha1:MVYGO5BSN3KFQXKZCS47MEI4FN5Z5T5T", "length": 11227, "nlines": 117, "source_domain": "specialfinds.com", "title": "मुख्य - विशेष शोध", "raw_content": "\nब्रेंडा थॉम्पसन - मालमत्ता विपणन विशेषज्ञ आणि भू संपत्ती ब्रोकर\nविशेष मालमत्ता शोधा काय आहे\nलॉग कॅबिन आणि ग्रामीण सदनिका\nऐतिहासिक घरे आणि कॉटेज\nअद्वितीय आधुनिक / Eclectic होम\nब्रेंडा थॉम्पसन - मालमत्ता विपणन विशेषज्ञ आणि भू संपत्ती ब्रोकर\nविशेष मालमत्ता शोधा काय आहे\nलॉग कॅबिन आणि ग्रामीण सदनिका\nऐतिहासिक घरे आणि कॉटेज\nअद्वितीय आधुनिक / Eclectic होम\nअद्वितीय घर आणि गुणधर्म\nविशेष \"शोधा ...\" - गर्भगृहात उठून दिसणारे गुणधर्म\nआपल्या अद्वितीय मालमत्तेची विक्री करा\nएक अद्वितीय मालमत्ता खरेदी करा\nआमच्या अद्वितीय वैशिष्ट्यीकृत सूची पहा\nउच्च उंची NC विक्रीसाठी घर - आश्चर्यकारक सेटिंग\nएक्सएनएनएक्सएक्स विंडस्िवेट रिज आरडी\nइको - मॉडर्न माउंटन ग्रीन होम\n326 हॉलींग वुल्फ ट्रेल\nऊर्जा शिफ्ट - अनोखा माउंटन इस्टेट\n1192 ससाची त्वचा Rd\nडिझायनर आशेविले लॉग होम\nलेसेस्टर, नॉर्थ कॅरोलिना 28748\nएनसी हाय एलिव्हेशन भूखंड - एक्सएक्सएक्स 'ओगली मीडोज\nलॉट 38 ऑगल मीडोज रु.\nआमचे सर्व अद्वितीय गुणधर्म पहा\nआपले अद्वितीय घर विक्री\nआपल्या मालमत्तेचे वेगळेपण बहुतेक करा. आपल्याकडे अशी कोणतीही जाहिरात आहे की इतर गुणधर्म नाहीत.\nआपले अनोखे घर गर्दीतून बाहेर यावे.\nविशेष \"शोधत आहे ...\" आमचे घर आणि मालमत्ता विभाग शोधा\nविशेष शोध अद्वितीय शैली द्वारे गुणधर्म श्रेणीत शोधा. आपण आपली असामान्य मालमत्ता विक्री करू इच्छित असल्यास ती येथे सूचीबद्ध केली जाईल आणि पूर्णपणे येथे विक्री केली जाणार आहे - किंवा - आपण खरेदी करू इच्छित असल्यास, आपल्याला स्वारस्य असलेल्या मालमत्तेच्या शैलीवर क्लिक करा\nघोडा गुणधर्म आणि शेती\nलॉग कॅबन्स आणि ग्राईली होम्स\nवॉटरफ्रंट व दृश्य गुणधर्म\nआमचे सर्व अद्वितीय गुणधर्म पहा\nआपल्याकडे एखादे अनन्य गृह आहे की आपण आमच्या साईटवर पहायला आवडेल\nआम्ही आपल्यासाठी रेड कार्पेट रोल करू\nमी विशेष \"शोधत आहे ...\" सुरु का\nएक खरीदार म्हणून माझ्या स्वत: च्या अनुभवातून आणि मग एक विक्रेता म्हणून विशेष \"शोधा ...\" ची कल्पना विकसित होते - मी एक रिअल इस्टेट एजंट बनण्याआधी बरेचदा.\nतुमच्याप्रमाणेच मी अनेक अद्वितीय गुणधर्म विकत घेतल्या आहेत. एक खरेदीदार म्हणून, मी पारंपारिक रिअल इस्टेट कंपन्यांबरोबर काम करवून घेण्यात निराश होतोय जे समजत नाहीत की मी एक अनोखी संपत्ती शोधत आहे, म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्थानिक एमएलएसच्या अरुंद बाटल्यांमध्ये स्थिर आणि भौतिक गुणधर्म दाखवले.\nजेव्हा मी माझ्या अनोख्या घरांची विक्री करण्यास तयार झालो, तेव्हा मी शोधले की पारंपारिक कंपन्यांना असामान्य गुणधर्म बाजारात आणण्यासाठी ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव नव्हता. तर, मी माझ्या नवीन वर्षाच्या विपणन कौशल्य घेवून न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या विपणन संचालक पदावर कार्यरत झालो, रिअल इस्टेट उद्योगातील अत्यावश्यक अंतराळ भरण्यासाठी रिअल इस्टेट परवान्यासह आणि वॉयला विशेष \"सापडतो ...\" जन्म झाला विशेष \"सापडतो ...\" जन्म झाला आम्ही अद्वितीय घरे आणि गुणधर्म बाजारात\nआपली अद्वितीय मालमत्ता बाजारपेठ\nआपल्या मालमत्तेची प्रतिमा बदला - विशेष \"शोधा ...\" मदत द्या आम्ही आपले घर जाणून घेऊ - त्याच्या अचूक गुणांचे प्रतिबिंब असलेल्या अचूक शब्दांचा वापर करून त्याबद्दल लिहा. त्यानंतर आपण \"प्रॉपर्टी स्टोरी\" आणि मार्केटिंग मोहिमेची निर्मिती केली जेणेकरुन तुम्हाला लक्षात येईल आणि आपल्यासारख्याच घरासाठी शोधत असलेला परिपूर्ण खरेदीदार शोधता येईल.\nआपल्या विशेष \"शोधा ...\" प्रवास प्रवास सुरु करण्यासाठी आम्हाला एक कॉल द्या:\nकसे एक अद्वितीय घर विक्री\nअसाऊ मकान एशविले एनसी\nआपल्या विशेष \"शोधा ...\" शोधासाठी सरलीकृत करा\nकॉपीराइट सर्व हक्क राखीव © 2016\nटाइप करण्यासाठी प्रारंभ करा आणि शोधण्यासाठी Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/if-we-have-no-contracts-we-cant-play-david-warner-262419.html", "date_download": "2018-04-20T16:19:00Z", "digest": "sha1:DXBMTSNKURXPFANJ3DQVC5JARWHJ2COO", "length": 10973, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर आॅस्ट्रेलियासाठी खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n...तर आॅस्ट्रेलियासाठी खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला\nगेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 30 जूनपूर्वी नवी ऑफर स्वीकारली नाही तर आम्ही खेळाडूंना पैसे देणार नाही असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं म्हटलं होतं.\n07 जून : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उपकर्णधार आणि सलामीचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डावर चांगलाच संतापला आहे. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला कोणता नवा कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर आम्ही ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही असा इशारा वॉर्नरने दिला.\nगेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 30 जूनपूर्वी नवी ऑफर स्वीकारली नाही तर आम्ही खेळाडूंना पैसे देणार नाही असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं म्हटलं होतं. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण टीम संपावर जाईल असा इशारा वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये सुरू झालेला हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ऑस्ट्रेलियाक्रिकेट टीमडेव्हिड वॉर्नर\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\nबीसीसीआयला आरटीआय अंतर्गत आणा, विधी आयोगाचा केंद्राकडे अहवाल\nIPL 2018 : अखेर मुंबई इंडियन्सचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-report-prior-to-kopardi-rape-case-hearing-481132", "date_download": "2018-04-20T16:39:44Z", "digest": "sha1:TVAJOSEZY5ZEM542VRPLU34KZNLPVLC2", "length": 17480, "nlines": 147, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या शिक्षेवर आज युक्तीवाद", "raw_content": "\nअहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या शिक्षेवर आज युक्तीवाद\nबहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांच्या शिक्षेवर आज नगरच्या जिल्हा न्यायालयात युक्तीवाद होणार आहे. या तिघांनाही कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलय.\nबचावपक्षाचे वकील आज दोषींना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली बाजू मांडतील.\nदरम्यान तीनही दोषींना फाशी होणार की जन्मठेप याचा फैसला 22 नोव्हेंबरला होणार आहे.\nशिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आलाय.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nअहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या शिक्षेवर आज युक्तीवाद\nअहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या शिक्षेवर आज युक्तीवाद\nबहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांच्या शिक्षेवर आज नगरच्या जिल्हा न्यायालयात युक्तीवाद होणार आहे. या तिघांनाही कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलय.\nबचावपक्षाचे वकील आज दोषींना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली बाजू मांडतील.\nदरम्यान तीनही दोषींना फाशी होणार की जन्मठेप याचा फैसला 22 नोव्हेंबरला होणार आहे.\nशिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आलाय.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2018-04-20T16:32:29Z", "digest": "sha1:JXPZKVRSQHOO2JCSDEOYLYBOE6OBB5AM", "length": 4983, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे - पू. १०० चे\nवर्षे: पू. १२८ - पू. १२७ - पू. १२६ - पू. १२५ - पू. १२४ - पू. १२३ - पू. १२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १२० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2018-04-20T16:45:51Z", "digest": "sha1:RVT5MSPZNTH6LDUSGBZWAWVUF2SYSW5J", "length": 4731, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७३६ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १७३६ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १७३६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-20T16:01:43Z", "digest": "sha1:ZJQDBVNDPMAK7IIMGZKIBF7BV4OVOVGB", "length": 7687, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला अत्याचाराविरोधात जुन्नरमध्ये मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिला अत्याचाराविरोधात जुन्नरमध्ये मोर्चा\nजुन्नर-काश्‍मीर व उत्तर प्रदेश येथील महिला अत्याचारांविरोधात सोमवारी (दि. 16) जुन्नरला काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. काश्‍मिर कठुआ, उत्तरप्रदेश उन्नाव येथे नुकत्याच झालेल्या महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना तसेच देशात आणि राज्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सातत्याने होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज (दि. 16) सकाळी पूर्व वेस जुन्नर ते तहसील कार्यालय येथे जुन्नर शहर व जुन्नर तालुक्‍यातील विविध सामाजिक संघटनांकडून महिला अत्याचाराच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. तालुक्‍यातील नागरिक या अत्याचाराच्या विरोधात निषेध मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कोणत्याही जातिपातीचा विचार न करता महिला न्यायासाठी एकत्र आल्या असल्याचे उपनगराध्यक्षा अलका फुलपगार यांनी सांगितले.\nया मोर्चात मराठी मुस्लिम अस्मिता अधिकार महाराष्ट्र राज्य, इत्तेहाद ए कौमी मुव्हमेंट, युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, शिवजन्मभूमी युवा फाउंडेशन, जीवनज्योती सेवा फाउंडेशन, हल्लाबोल टीम जुन्नर, हनफिया कादरिया ग्रुप यासह तालुक्‍यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभागी होऊन निषेध नोंदविला असून समस्त जुन्नर तालुक्‍याच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. जुन्नरच्या नायब तहसीलदार आशा दुधे व जुन्नर पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी मोर्चेकऱ्यांच्या वतीने शाळकरी लहान मुलींच्या हस्ते दिलेले निवेदन स्वीकारले असल्याचे रिजवान पटेल यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाठवणीतील धान्यावरील किडींचे व्यवस्थापन (भाग पाच )\nNext articleपशुसंवर्धन एक शेतीपूरक व्यवसाय, विविध योजना (भाग दोन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:09:12Z", "digest": "sha1:BQLV67CQCOGTWZEZCQV6SGR5WZAL4N6S", "length": 7075, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेच्या कारखान्यांना ग्रीनको मूल्यांकन प्राप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेच्या कारखान्यांना ग्रीनको मूल्यांकन प्राप्त\nनवी दिल्ली – पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करणे हे आता भारतीय रेल्वेचे एक प्रतीक झाले आहे. आपल्या हरित उपक्रमाचा अधिक प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वेने जुलै 2016 मध्ये भारतीय उद्योग संघासोबत (सीआयआय) भागीदारी सुरू केली. भारतीय रेल्वेचे उत्पादन कारखाने, कार्यशाळा आणि इतर विभागांमध्ये हरितमार्गाचा अवलंब करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी याच भागीदारी अंतर्गत सीआयआय या विभागांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे.\nसीआयआयची ग्रीनको मूल्यांकन प्रणाली ही जगातील एकमेव मूल्यांकन प्रणाली आहे जी कंपन्यांना त्यांची एकंदर हरित कामगिरी सुधारण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देते. ग्रीनको ऊर्जा क्षमता, नवीकरणीय ऊर्जा, जल संवर्धन, कचरा व्यवस्थापन, स्रोत संवर्धन आदी महत्त्वपूर्ण पर्यावरण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते. आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या 42 उत्पादन कारखाने आणि कार्यशाळांमध्ये ग्रीनको मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘बीग बीं’नी नाना पाटेकरांना दिले होते ‘हे’ खास गिफ्ट\nNext article‘ही’ ब्लॉकबास्टर जोडी ‘टोटल धमाल’ फिल्ममध्ये झळकणार\nक्रेडाईकडून पुण्यात बांधकाम कामगारांना प्रशिक्षण\nडाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\nएलआयसीच्या नफ्यात मोठी वाढ\nकंपन्यांना महिला संचालक नियुक्‍त करावे लागणार\nरेल्वे आणणार स्वतःचे पेमेंट गेटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90346", "date_download": "2018-04-20T16:57:21Z", "digest": "sha1:R7ERKY7IUMNTVEI2BKSNRTBOFNRVNCP4", "length": 10277, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Akola news bandh in Akola कोरेगाव भीमाच्या निषेधार्थ अकोला शहरात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\nकोरेगाव भीमाच्या निषेधार्थ अकोला शहरात कडकडीत बंद\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nशाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. बस सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आली. विविध संघटनांचे युवक रस्त्यावर आल्याने शहरात काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या.\nअकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमसंसह दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद अकोला शहरात सकाळपासूनच दिसून येत आहे.\nशाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. बस सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आली. विविध संघटनांचे युवक रस्त्यावर आल्याने शहरात काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.\nजिल्ह्यात ग्रामीण भागातही बंदचा परिणाम दिसून आला. या बंदमध्ये भारिप-बमसंसह आरपीआय आठवले गट व इतर संघटना सहभागी झाल्या आहेत.\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nउत्तेजक सेवनावर बंधने हवीतच - बॅश\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय...\nशेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा - राजू शेट्टी\nजयसिंगपूर - शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत...\nसिंधुदुर्गात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने बांधणी करणार - शिरीष सावंत\nकणकवली - सिंधुदुर्गात मनसेची नव्याने बांधणी करणार आहोत. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच संघटनेतील रिक्‍तपदांवर नवीन...\nमोदी कॅप्टन, मी बॅट्‌समन - आठवले\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/sangli/last-message-hellenic/", "date_download": "2018-04-20T16:05:41Z", "digest": "sha1:FJQPZEWFUMZ5VHA63X5YY3JS35ZV7N4M", "length": 29264, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Last Message To The Hellenic | जलदूतला अखेरचा निरोप | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nमिरजेतील अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा\nनागेवाडीत पळाली लाकडी बगाडे\nसांगली : 47 लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त\nसांगली शहरासह परिसरावर धुक्याची चादर\nभीमा कोरेगाव प्रकरणी सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मोर्चा\nकुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध\nVIDEO : २१ महिन्यानंतर समीर गायकवाडची कारागृहातून सुटका\nगोकुळ दूध संघाच्या दुधाच्या टँकरमधील दूध रस्त्यावर सोडले\nसांगली - पालिकेसमोर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न\nसांगलीत अट्टल चोरट्यांकडून 50 मोटारसायकली आणि 1 तवेरा जप्त\nVIDEO - बैलगाडी शर्यतीसाठी शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन\nतिरंग्याच्या मध्यभागी काय आहे\nवीर जवान तुझे सलाम\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nअहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nभुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nIPL2018 कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nपुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nपरभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nLMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट\n'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nविदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित\nकोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती\nकोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.\nअक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा\nवर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी सणाचा आनंद लुटला.\nपुण्याचं 'हेरिटेज' कचऱ्याच्या विळख्यात\nपुणे - पुण्याचं नाव घेतलं की शनिवारवाडा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. मात्र पुण्याचं हे वैभव सध्या कचऱ्याच्या विळख्यात असलेलं पाहायला मिळतंय. जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्या सभोवताली पसरलेल्या अस्वच्छतेचा घेतलेला आढावा.\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/rally-district-collectorate", "date_download": "2018-04-20T16:26:30Z", "digest": "sha1:QRKWR55CLZSL727C6XNHSZCVZHM7HEIT", "length": 24451, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Rally On The District Collectorate | जळगाव येथे भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nजळगाव येथे भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nजळगाव, दि. २८ - संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांच्या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने बुधवार, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहरवसीयांचे लक्ष वेधून घेतले.\nसकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.\nया मोर्चात शिवप्रतिष्ठानचे धारकरी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ, हिंदू महासभा यांच्यासह समस्त हिंदूत्ववादी संघटना व जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होेते. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने या मोर्चासाठी पुढाकार घेतला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री आगीचे तांडव\nवातावरणावर ठरतो मुलाचा चिडचिडेपणा\nई-वे बिल सुटसुटीत व व्यापाऱ्यांच्या सोयीचे, जळगावात राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने मार्गदर्शन\nनिधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी\nमहावीरांच्या विज्ञातूनच समस्यांचे निराकरण शक्य, महावीर जयंतीनिमित्त राहुल कपूर यांचे व्याख्यान\nप्लॅस्टिकबंदीपेक्षा जनजागृती करून पुनर्वापर वाढवा, जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनची मागणी\nतापमानवाढीमुळे केळी बागा संकटात, संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड\nसातबारा संगणकीकरणाचे जिल्ह्यात ९५.४१ टक्के काम पूर्ण\nमुंबईहून जळगावला पावणेचार तास उशीरा आले विमान\nतापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव\nजळगावात जि.प. शाळेच्या बेंचेसची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245683.html", "date_download": "2018-04-20T16:36:47Z", "digest": "sha1:NGNATXZQYUPQJKW73DKQPDGKETVX5YGM", "length": 11419, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत युती होण्याची शक्यता धुसर", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nमुंबईत युती होण्याची शक्यता धुसर\n20जानेवारी : मुंबईत युती होईल याची शक्यता धुसर होत चाललीय.भाजपकडे २२७ जागांची यादी जवळपास तयार आहे.तर दुसरीकडे युतीच्या बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका सेनेच्या नेत्यांनी घेतलीय. भाजपचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असं शिवसेना नेते अनिल देसाईंनी स्पष्ट केलं.\nमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनीच युतीवर चर्चा करावी, अशी भूमिका बैठकांना जाणाऱ्या नेत्यांनी घेतलीय.हे नाराजीनाट्य कालपासून सुरूय.आशिष शेलार, किरीट सोमय्यांच्या टीकेनं शिवसेना नाराज आहे. आशीष शेलार आणि किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेत तीव्र नाराजी दोनही नेत्यांनी IBNलोकमतशी एक्झक्लुसिव्ह बातचीत केली होती.\nशेलार आणि सोमय्या युतीच्या चर्चेत खोडा घालत असल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला. अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर उध्दव ठाकरेंना भेटले आणि अशा स्थितीत चर्चा होणार नाही. अशी टीका थांबत नाही तोपर्यंत चर्चा नाही. असंच असेल तर फडणवीसांनी थेट उध्दव ठाकरेंशी चर्चा करावी अशी भूमिका शिवसेनेनं मांडली.\n'सामना'च्या संपादकीयातून भाजपवर टीका केली गेलीय. भाजपनं कवळी सांभाळून राजकारण करावं असं सामनामध्ये लिहिलंय. एकूणच भाजप-शिवसेनामधले संबंध बिघडतच चाललेले दिसतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/india-won-hocky-ashia-cup-272492.html", "date_download": "2018-04-20T16:36:53Z", "digest": "sha1:HDURC5QJOTEZZJGU36T4D7IZBYZ2GTLU", "length": 11960, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियाचा उडवला धुव्वा", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nआशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियाचा उडवला धुव्वा\nआज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.\n22 आॅक्टोबर : भारतीय हॉकी संघाने आशिया कप हाॅकी स्पर्धा जिंकलीय. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.\nआशिया चषक हॉकीतील भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी 2003 साली मलेशियातील क्वालालंपूर येथे आणि 2007 साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपदाला गवसणी घातली होती. तर 2013 साली मलेशियातील इपोह येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण कोरियाकडून पराभूत होऊन भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.\nआज झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. रमणदीप सिंगने तिसऱ्या मिनिटालाच गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 29 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. मध्यांतराला 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाचा खेळ उत्तरार्धात काहीसा मंदावला. त्यातच मलेशियाच्या आघाडीच्या फळीने वारंवार आक्रमणे करून भारताच्या बचावफळीला दबावात आणले. त्यातच 50 व्या मिनिटाला शाहरिल शाबाह याने मलेशियासाठी पहिला गोल करून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. मात्र अखेपर्यंत आपली आघाडी टिकवत भारतीय संघाने विजेतेपदावर नाव कोरले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Asia CupHockyएशिया कपभारतहाॅकी\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\nबीसीसीआयला आरटीआय अंतर्गत आणा, विधी आयोगाचा केंद्राकडे अहवाल\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:46:08Z", "digest": "sha1:BEGU24USDJ7LL7EAQQMATTQ64VHOAMPW", "length": 3870, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्नोल्ड वॉरेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआर्नोल्ड वॉरेन (एप्रिल २, इ.स. १८७५ - सप्टेंबर ३, इ.स. १९५१) हा इंग्लंडकडून २९०५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८७५ मधील जन्म\nइ.स. १९५१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:37:17Z", "digest": "sha1:TOI63CEJQR5KTQ5MP3L2A3XYNR2ONI6U", "length": 5505, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमर अकबर अ‍ॅन्थनी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमोहम्मद रफी, किशोर कुमार\nअमर अकबर ॲन्थनी हा १९७७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे.\nविनोद खन्ना इन्स्पेक्टर अमर खन्ना\nऋषि कपूर अकबर इलाहाबादी / राजू\nअमिताभ बच्चन अँथनी गोन्साल्व्हिस\nनीतू सिंग डॉ. सलमा अली\nनासिर हुसेन कॅथोलिक धर्मगुरू\nकमल कपूर पोलीस सुपरिन्टेंडेंट खन्ना\nसर्वोत्तम अभिनेता - अमिताभ बच्चन\nसर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - लक्ष्मीकांत प्यारेलाल\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अमर अकबर अ‍ॅन्थनी चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९७७ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१७ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/maratha-lite-infontary-part-1/", "date_download": "2018-04-20T16:15:19Z", "digest": "sha1:ZQX7Y73GNN7SKMWRURLAQDZHJNBL2KRD", "length": 57541, "nlines": 265, "source_domain": "khaasre.com", "title": "मराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग १", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग १ 0\nलाईट इन्फण्टरी हा काय प्रकार आहे हेय लक्षात आले कि समजेल मराठा लाईट इन्फण्टरी का आणि काय आहे.\nलाईट इन्फण्टरी म्हणजे आघाडी वरील सैन्याची तुकडी. या तुकडीच कर्तव्य म्हणजे आघाडीला राहून शत्रूला प्रथम अंगावर घेणं. ज्यामुळं शत्रू सैन्याचा आढावा घेणं , शत्रूचा ठाव ठिकाणा शोधणं. छापेमारी करून शत्रूला सळोकी पळो करून सोडणे. सतत छोटे छोटे हल्ले करून शत्रूचा लक्ष दुसरीकडे वेधणे. वेगवान हालचाली करून शत्रूला गोंधळात टाकणे. शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन हल्ला करून शत्रूला आश्चर्यचकित करून सोडणे. एक प्रकारे मागून येणाऱ्या मोठ्या सैन्या साठी सुरक्षित मार्ग तयार करून देणं. मागून येणाऱ्या सैन्याचा जीव या तुकडीच्या हातात असतो.\nलाईट इन्फण्टरीचे सैनिक कधीही एका साचे बंद पद्धतीने हालचाल करत नाहीत. त्याची संख्या कायम सीमित असते जेणेकरून ते शत्रूच्या नजरेत येऊ नयेत. या सैनिकांकडे रसद आणि शस्त्रास्त्र नेहमी सीमित स्वरूपात असतात जेणे करून त्यांना वेगवान हालचाली करता येतील. या तुकडीतील सैनिक काटक चपळ आणि कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास तयार असतो.\nया तुकडी कडे आजून एक महत्वाचा काम असत छापामारीच. कायम छोटे छोटे हल्ले करून शत्रूला बेजार करायचा आणि गुंतवून ठेवायचा. जेणे करून शत्रूला मागून येणाऱ्या सैन्य कडे लक्ष हि देता येऊ नये. ज्यावेळेस मोठ्या सैन्याला तोंड देणे कठीण जाते त्यावेळेस लाईट इन्फण्टरी तोंड न देता पटकन पसार होतं. पण तीच तुकडी वेळ मीळताच पलटवार करून मोठ्या सैन्याची धूळधाण उडवते.\nलाईट इन्फण्टरी मध्ये असणाऱ्या सैनिकांना इंग्लिश मध्ये स्किमिंशेर म्हंटलं जातं.\nअशा पद्धतीच्या सैन्यदलाचा उल्लेख प्रथम आढळतो इस पूर्व ४२३ रोम सैन्या मध्ये. त्याकाळी या तुकडी मध्ये असणाऱ्या स्किमिंशेरला खालच्या दर्जाची वागणूक मिळे. त्याला कारण हि तसेच होते, या सैन्याकडे हत्यार कमी असत बऱ्याचवेळा ते दगडाचा वापर करीत, यामुळे या तुकडी मध्ये गरीब घरातील मुलांची भरती जास्त असे. पण याच स्किमिंशेरला प्लेटो नावाच्या तत्वन्याने त्याचा पुस्तकांमध्ये मनाचा स्थान दिला. आणि त्या नंतर हल्ले करून पसार होणारी (hit and run) पद्धत अवलंबणारे हिरो बनु लागले. आणि तिथून पुढे स्किमिंशेरला ला प्रत्येक लढाई मध्ये मनाचा स्थान मिळू लागल. पुढे रोमन साम्राज्यात अशाप्रकारचे सैनिक एकत्र करून एक वेगळं सैन्य उभारला गेलं ज्याला ऑक्सिलीया म्हंटलं जात. या पथकातील सैन्याकडे फक्त एक ढाल आणि एक तलवार असे.\nअशाच प्रकारे पुढे ग्रीकांनी थोराकीताई (स्किमिंशेरला) नावाच्या सैनिकांच्या तुकड्या उभ्या केल्या. थोराकीताईकडे फक्त एक भाला एक ढाल आणि एक शिरस्त्राण एवढच युद्धाचं साहित्य असे. पण या तुकड्या मजबूत, चपळ आणि काटक आशा होत्या. आणि त्याच जोरावर ग्रीकांनी साम्राज्य उभा केला.\nया पद्धतीचा सर्वात मोठा उपयोग अमेरिकेत गृह युद्धाच्या वेळेला झाला. त्यावेळेस अमेरिकन सैन्याच्या हाती मस्केट नावाची बंदूक अली होती. त्यावेळच्या उपलब्ध हत्यारां पेक्षा या बंदुकीची मारक क्षमता लांबची पाल्याची होती. तेवढीच मस्केट घेऊन अमेरिकन सैन्य छोट्या छोट्या गटात विभागून झाड झुडपात लपून इंग्रजांवर हल्ले करत आणि या हल्ल्याने इंग्रज सैन्य बेजार होऊन माघार घेत.नमूद करण्या सारखी गोष्ट म्हणजे अमेरिकन सैन्य अशा प्रकारचे युद्ध पध्दती मूळ अमेरिकन अर्थात रेड इंडियन लोकांकडून शिकले होते.\nपुढे अशाच पद्धतीच्या सैन्याचा उपयोग नेपोलियन ने केला. नेपोलियनचे स्किमिंशेर आघाडीवर राहून शत्रू सैन्यावर छापा मारून हल्ला करून बेजार करत. आणि मागून येणारं नेपोलियनच मुख्य सैन्य अलगत शत्रू सैन्याला गिळत.\nहा झाला जागतिक इतिहास, आता येऊ मराठ्यांकडे. मराठे तर छापा मारीच्या युद्धात वाकबगार. सटवायने गनिमीकावा मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलाय . आणि सह्याद्रीने खेळता खेळता मराठ्यांना गनिमी काव्यात तज्ञ बनवलंय. मराठे मूळचे गरीब शेती करून पोट भरणारे. खायला पैसे नाहीत शत्रास्त्रला कुठून आला पैसे. याच अडचणी मुळे कि काय, हाती येईल त्याचा मराठे शत्र बनवून उपयोग करत मग ती लाठी काठी असो, दगड गोटे असो, गोफण असो. हाती शत्र आल्यावर तर काय विचारायचं साक्षात वीरश्री पाहत राहत असे. सभोवतालचा पुरे पूर उपयोग करून घेणं मराठे शिकले किंवा सह्याद्रीने त्यांना मारून झोडून शिकवलं. बापाचं तो त्यांचा मारून झोडूनच शिकवणार . मराठ्यांची पोरं खेळ देखील काय खेळायची सूर पारंब्या आट्यापाट्या हुतूतू या खेळातूनच ते शिकत चकवणं, सभोवतालचा वापर करणं, आणि शत्रूच्या हातावर तुरी देऊन पुढे जाणं.\n१८ व्या शतकात फ्रानसीसको बाल्झार नवाच्या चित्रकाराने काढलेलं मराठा योध्याचे चित्र\nमराठे युद्धावर जाताना कधीहीत सरंजाम घेऊन जात नसे. मोजके कपडे, मोजकी हत्यारे, मोजका शिधा, या मुळे मराठ्यांच्या हालचाली जलद आणि लांब पाल्याचा असायचा. वेळ प्रसंगी जे आहे ते टाकून पळ काढता यायचा.\nकाही काही मोहिमेत मराठे घोड दौड करताकरता भोजन करत. मराठ्यांचा हल्ला शत्रूला एवढा चकित कारे की शत्रू मराठ्यांना भूत समजत . याच्या काही ठळक उदाहरण म्हणजे महाराजांचा लाल महालावर हल्ला, सुरतेचा छापा, संताजी धनाजी चे हल्ले, थोरल्या बाजीरावांची चपळ हालचाल करून शत्रूवर हल्ला करणं.\nअशी एक ना अनेक उदाहरणं मराठ्यांच्या इतिहासात उपलब्ध आहेत. त्यामुळं मराठे म्हंटलं कि गनिमीकावा आणि गनिमी कावा म्हंटलं कि मराठे.\nआता लक्षात आला असेल मराठा लाईट इन्फण्टरी का आहे ते . मराठा लाईट इन्फण्टरीचा दैदिप्त्यामान इतिहास पुढील भागात पाहू.\nपोस्ट साभार:- अभिजीत वाघ\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nPrevious Articleफेसबुक वापरता परंतु फेसबुक विषयी ह्या खासरे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का Next Articleमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nतीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \n१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.\n२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.\n३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.\n४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.\n५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.\n६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.\n७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.\n८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.\n९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.\n१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.\n११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.\n१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.\n१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.\n१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.\n१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.\n१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.\n१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.\n१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.\n१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.\n२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.\n२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.\nअसा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/sunny-leone-prank-revenge/", "date_download": "2018-04-20T16:24:45Z", "digest": "sha1:XUFFWNR45DIXSO4GMYZNPRBI6L7SOVHO", "length": 4119, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "sunny leone prank revenge – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला: पहा व्हिडिओ\nबॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या तेरा इंतजार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसापूर्वी सनी लिओनीने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता . त्यात सनी लिओनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे आणि एक सहकारी गुपचूप येऊन सनी च्या अंगावार खोटा साप टाकतो आणि सनी घाबरून पळून जाते असा तो व्हिडिओ होता. सनी… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/inspiration/page/5/", "date_download": "2018-04-20T16:33:08Z", "digest": "sha1:IKQSLFWJLYTSIL6ABATC5YWBT2RAJEGI", "length": 9874, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Inspiration Archives - Page 5 of 23 - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nप्रधानमंत्रि मोदीजींच्या टॉप टेन ब्रेन मधील एकमेव मराठी अधिकारी.. 0\nविश्वसुंदरी मानुषी छिल्लर तुम्हाला ह्या ९ गोष्टी माहिती आहे का \nअब्जावधीची संख्या सहज लिहिणारी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी 0\nलग्न करायच्या आधी ह्या दहा गोष्टी नक्की करा… 1\nएक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट… 0\nया प्रश्नाचे उत्तर देऊन मानुषी छिल्लर बनली ६वी भारतीय मिस वर्ल्ड… 0\nतब्बल ३००० किमीचा रिक्षाने प्रवास करत तो पोहचला लद्दाखपर्यंत… 0\nआजपर्यंत ६२८ जन्मठेप व ३७ आरोपींना फाशी पर्यंत पोहचवणारे वकील उज्वल निकम… 1\nचित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली… 0\nया निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pssmovement.org/marathi/", "date_download": "2018-04-20T16:33:22Z", "digest": "sha1:WBDOQAVEEOEJ77FZYUGY66WFODUHCKKU", "length": 5771, "nlines": 38, "source_domain": "pssmovement.org", "title": "मुख्यपान", "raw_content": "\nआम्ही पिरामिड मास्टर्स आहोत\nप्रश्न विचारा आणि उत्तरे मिळवा\nपत्रीजी ऑनलाईन व्हिडिओ ग्रंथालय\nध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे - डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेकज्ञानाकडे नेते.\nपिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ मूव्हमेंटचे संस्थापक ब्रह्मर्षि पत्रीजी यांनी त्यांच्या जीवनात सुरूवातीला स्वतःला आलेल्या सखोल अनुभवांमधून ध्यानाची खरी शक्‍ति ओळखली आणि १९७९ मध्ये आत्मज्ञान प्राप्त केले. तेव्हापासून जगातील सर्व लोकांना ध्यान व शाकाहार शिकविणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपले जीवन-ध्येय केले. त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे शास्त्रीय व धर्मातीत असून धार्मिक भावनांना आवाहन न करणारा आहे.\nआध्यात्मिक जीवनासाठी शाकाहार अत्यंत आवश्यक आहे. खरे पहाता आध्यात्मिकता आणि शाकाहार हे समानार्थक शब्द आहेत.\nप्रत्येकाने शाकाहारी व्हायला हवे.\nपिरामिड हे सर्वांगिण विकासाचे चिन्ह आहे. पिरामिडला चार बाजू असतात. ते चार जगत दर्शवितात- खनिज जगत, वनस्पति जगत, प्राणी जगत व मानवी जगत. पिरामिडच्या चारही बाजू जेथे एकत्र येतात तिथे ही सर्व एक होतात, हीच आध्यात्मिकता \nपिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ या सर्वांपर्यंत आनापानसति ध्यान, शाकाहार व पिरामिड शक्‍ति पोहोचविणे हे एकमेव ध्येय ठेवून काम करणार्‍या निधर्मी, कोणताही पंथ नसलेल्या, नफा न कमावणार्‍या स्वयंसेवी संस्था आहेत. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ मूव्हमेंट ही नवयुगातील जागतिक आध्यात्मिक क्रांतीचा भाग आहे. हिंसाचाराकडून अहिंसेकडे, मांसाहाराकडून शाकाहाराकडे आंधळ्‍या धार्मिक श्रध्देकडून शास्त्रीय प्रयोगशीलतेकडे व शास्त्रीय तर्काकडे मूढ, तर्कहीन, अजाण ऎहिकतेकडून, सुजाण समजूतदार आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारी ही चळवळ आहे \n कृपया आनापानसति ध्यान, शाकाहार व आध्यात्मिक शास्त्र यांचा संदेश संपूर्ण जगभर पसरवा-पोहोचवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/disadvantages-of-the-devotees/articleshow/62466233.cms", "date_download": "2018-04-20T16:38:23Z", "digest": "sha1:PA5FKPIHO7F5HZ6T3LRXYESBNGEKF6MD", "length": 20433, "nlines": 235, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "disadvantages of the devotees | भाविकांची गैरसोय - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nलक्ष्मण कुंड, गांधी तलाव व रामकुंड तिन्ही ठिकाणी तेलाचा मोठया प्रमाणात तवंग साचला आहे. लक्ष्मण कुंडाच्याबाजूने वाहने धुण्याच्या प्रकारामुळे किंवा डिझेल बोट मुळे हा तवंग आल्याची शक्यता आहे. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. पण, गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक काय करतात\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसिडको मध्ये चोरांचा धुमाकूळ\n4Divide r मधे माती टाकली जात आहे जुनी कनेरी कटिग कर...\n5सिनेमॅक्स बाहेर कचऱ्याचे साम्राज्य...\n9शालिमारला रिक्षा चालकांचा धुमाकूळ...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/dead-body-of-17-year-old-girl-found-in-chakan-pune/", "date_download": "2018-04-20T16:33:10Z", "digest": "sha1:4QZC6XRXMW4UWCBXZ7NT42LTMMF37KYQ", "length": 10563, "nlines": 65, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता\nपुणे जिल्ह्यातील चाकणमधील धामणे येथील एका शेतात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आल्याची चर्चा आहे . तसेच तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nधामणे येथील शेतात 1 डिसेंबरला आईसोबत पीडित मुलगी काम करत होती. सायंकाळी 4 च्या सुमारास ती पाणी आणायला गेली, परंतु ती परत आलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी शोध सुरु केला होता तसेच चाकण पोलिसांत तक्रार देखील नोंदवण्यात आली होती मात्र सोमवारी (१ डिसेंबर) शेताच्या जवळच तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर अत्याचार करून नंतर मारून टाकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे.\nबेलझुरी परिसरातील शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहापासून दोनशे फुटाजवळ रक्ताने माखलेला दगड व रक्ताचे मोठ्या प्रमाणावर डाग आढळले आहेत. फेकून दिलेला मोबाईलही सापडला. मुलगी विवस्त्र अवस्थेत असल्याने पोलिसांनी मुलीवर अतिप्रसंग करून खून केला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\nपीडित मुलगी १ डिसेंबर रोजी आईबरोबर शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी ३ .३० च्या सुमारास पिण्यासाठी पाणी घेऊन येते म्हणून ती शेतातून गेली. सायंकाळी ६ .३० वा आई घरी आल्यावर देखील ती आलेली नव्हती म्हणून भावाने फोन केला असता फोन बंद आला. कुटुंबियांनी रात्री १ वाजेपर्यंत शोध घेतला परंतु ती कोठेच आढळून आली नाही. या नंतर ती गायब असल्याची तक्रार चाकण पोलीस चौकीत करण्यात आली.\nचार दिवसांनी सोमवारी (४ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाऊ प्रशांत हा बरेच दिवस शेतीला पाणी दिले नाही, म्हणून पाणी देण्यासाठी शेतात गेला. पाण्याच्या कॉकजवळ एक मृतदेह त्याला दिसला. पायात असलेला काळा धागा व तेथे असलेले त्या दिवशी घातलेले लाल रंगाच्या ब्लेझर त्याला दिसल्यावर ती बहिणच असल्याची खात्री झाली आणि त्यांनी टाहो फोडला.मग सगळे कुटुंबीय जमले आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली.\nया वेळी मृतदेह ओळखण्याच्या स्थीतीत नव्हता. चेहरा अत्यंत विद्रुप कलेला अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाबाबत तातडीने सुचना केल्या. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. सगळ्या शक्यतांवर पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या ठिकाणी असलेल्या एका कंपनीत परप्रांतिय कामगारांवर संशय व्यक्त करीत मोठा जमाव कंपनीबाहेर जमला होता. मात्र पोलिसांनी लोकांना कायदा हातात घेऊ दिला नाही .\nप्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला\nसेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना\nविवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र कोपर्डीच्या दोषींबद्दल ‘ त्या ‘ निनावी फोनचे रहस्य उलगडले : हे होते कारण →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/clash-over-garbage-dumping-sambhajinagar/", "date_download": "2018-04-20T16:35:20Z", "digest": "sha1:SYCACUJFSLQXTCCKF3I3TQOXR3UTJBXT", "length": 18789, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगरात कचरा पेटला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nसंभाजीनगरातील कचरा प्रश्न बुधवारी अक्षरश: पेटला. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडय़ांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक करत दोन गाड्य़ा पेटवून दिल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्य़ांवरही दगडफेक झाली. संतप्त जमावाने अनेक खासगी वाहनांची तोडफोड केली. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधूरही सोडला, परंतु त्यानंतरही आंदोलक आवरत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दगडफेकीत उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह नऊ पोलीस गंभीर जखमी झाले. १०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\n४० वर्षांपासून नारेगाव येथे असलेला कचरा डेपो हटवा या मागणीसाठी नारेगाववासीयांनी आंदोलन केल्यापासून गेल्या १९ दिवसांपासून शहरातील कचरा शहराबाहेर टाकण्यात आलेला नाही. कचरा आपल्या भागात येऊ नये म्हणून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नारेगावात कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्यानंतर आज महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्याची तयारी केली.\nसंभाजीनगर महापालिकेचे कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली हे बुधवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह मिटमिटा येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या जागेवर पाहणी करण्यासाठी गेले होते. ते पाहताच मिटमिट्य़ातील गावकऱ्यांनी परतीच्या मार्गावर दगड लावून त्यांचे रस्ते बंद करून टाकले. पालिका अधिकाऱ्यांनी त्यावर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी रस्त्यावरचे दगड हटवून पालिका अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्तात शहरात आणले. गावकऱ्यांचा विरोध लक्षात आल्यानंतरही कचऱ्याचे ट्रक पोलीस बंदोबस्तात पडेगाव, मिटमिट्य़ाच्या दिशेने निघाले तेव्हा तेथील नागरिकांचा जमाव हिंसक बनला.\nनगर नाक्यावरून वाहने वळवली\nहिंसक जमावाने केलेल्या तोडफोडीत सुमारे १०० दुचाकींचे आणि पाच ते सहा खासगी चारचाकी गाड्य़ांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती तणाकपूर्ण असून पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर मिटमिट्य़ाकडे जाणारी काहने पोलिसांनी नगर नाक्यावरच रोखून नंतर अन्य मार्गाने कळकिण्यात आली.\nपडेगाव-मिटमिट्य़ातील आंदोलनामुळे शाळेच्या अनेक बसेस जवळपास चार ते पाच तास अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी रस्त्यावरचा विरोध मोडून काढल्यानंतर आता घराघरात शिरून आंदोलकांना पकडून आणणे सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत १०० पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानी यांची सुटका – अशोक चव्हाण\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड जिल्हा देशात प्रथम\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-20T16:21:12Z", "digest": "sha1:FVQVHV2C2G6KMA3VJ76PACAAUAK7RJND", "length": 7504, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्धव ठाकरे ‘त्या’ शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउद्धव ठाकरे ‘त्या’ शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेणार\nमुंबई : शिवसैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 25 एप्रिलला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे अहमदनगरला घटनास्थळी भेट देणार आहेत. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत. अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अनिल राठोड, लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.\nउद्या सोमवारी नगरमधील हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे एसपींना आदेश असल्याचंही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर नगरमधील केडगावला जाणार आहेत.\nतसेच शिवसैनिकांचे अटकसत्र सुरु झाल्यास परवा मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार आणि शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तसे आदेशच शिवसैनिकांना दिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो-कुलदीप सिंह सेंगर\nNext article‘या’ सोशल मीडिया अॅपवर रशियन न्यायालयाने घातली बंदी\nभिवंडीत शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार-रामदास कदम\nबचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\n26/11 दहशतवादी हल्ला ; अबु जुंदालविरुद्धच्या खटल्याला स्थगिती\nआयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारत‍ीयांना आरोग्य सेवा\nऔरंगाबादच्या कचराप्रश्नी उद्धव ठाकरे यांची माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rain-in-mumbai-262231.html", "date_download": "2018-04-20T16:33:45Z", "digest": "sha1:ZZTO3HDXSHPGU7XKHHTT4CRLWPHYG7JL", "length": 11537, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत पावसाच्या सरींची हजेरी", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nमुंबईत पावसाच्या सरींची हजेरी\nबोरिवली ते अंधेरी आणि दादरला,कुर्ल्याला पावसानं झोडपलं. शनिवारी रात्रीसह रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावलीये.\n05 जून : मुंबईत आज पहाटे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी हजेरी लावलीये. बोरिवली ते अंधेरी आणि दादरला,कुर्ल्याला पावसानं झोडपलं. शनिवारी रात्रीसह रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावलीये. बदलत्या हवामानामुळे संध्याकाळाच्या हवेत किंचितसा गारवा आला होता.\nदरम्यान, मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असतानाच उकाडा मात्र कायम होता. मुंबईकर मान्सूनपूर्व पावसासह घामाच्या धारांनी ओलेचिंब होत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतल्या वातावरणात हवामानात बदल होत आहेत. दुपार वगळता सकाळसह संध्याकाळी मुंबईवर ढग दाटून येत आहेत आणि अशाच काहीशा वातावरणामुळे मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी लागत आहे.\nदक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, मानखुर्दसह साकीनाका, मरोळ, अंधेरी, मालाडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मौसमी पावसाची वाटचाल वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामच्या उर्वरित भागात, त्रिपुराच्या व आसामसह मेघालयाच्या बहुतांश भागात झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:29:12Z", "digest": "sha1:PTJQ4ICKS4RGUTKAYW33D424VYBRIVWL", "length": 4760, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. २००५ सालातील कंदहार विमानतळाचा हवाई देखावा.\nआहसंवि: KDH – आप्रविको: OAKN\n३,३३० फू / १,०१५ मी\n०५/२३ १०,४९८ ३,२०० फरसबंदी\nकंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KDH, आप्रविको: OAKN) अफगाणिस्तानच्या कंदहार शहरातील विमानतळ आहे. शहराच्या नैऋत्येस १६ किमी अंतरावर असलेल्या या विमानतळावर २०० लढाऊ विमाने ठेवण्याचीही सोय आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी ०९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/three-properties-of-dawood-ibrahim-auctioned-in-mumbai-478850", "date_download": "2018-04-20T16:37:50Z", "digest": "sha1:XKZHT4JRCV3LGVDGSVTLYOST6FDR7CWU", "length": 16056, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: अखेर दाऊदच्या संपत्तीचा लिलाव", "raw_content": "\nमुंबई: अखेर दाऊदच्या संपत्तीचा लिलाव\nएकूण 9 कोटी रुपयांना दाऊदच्या मुंबईतील 3 संपत्तीची विक्री केली गेलीय. एसयूबीटी बुरहानी ट्रस्टनं दाऊदच्या या तिन्ही संपत्तींची खरेदी केलीय. अफरोज हॉटेल, डांबरवाला इमारतीतल्या 5 खोल्या आणि एका रेस्टॉरंट अशा संपत्तींचा यात समावेश आहे.\nबुरहानी ट्रस्टशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रा भारद्वाज यांनी देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्यासह इतरांची बोली यशस्वी ठरु शकलेली नाही.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nमुंबई: अखेर दाऊदच्या संपत्तीचा लिलाव\nमुंबई: अखेर दाऊदच्या संपत्तीचा लिलाव\nएकूण 9 कोटी रुपयांना दाऊदच्या मुंबईतील 3 संपत्तीची विक्री केली गेलीय. एसयूबीटी बुरहानी ट्रस्टनं दाऊदच्या या तिन्ही संपत्तींची खरेदी केलीय. अफरोज हॉटेल, डांबरवाला इमारतीतल्या 5 खोल्या आणि एका रेस्टॉरंट अशा संपत्तींचा यात समावेश आहे.\nबुरहानी ट्रस्टशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रा भारद्वाज यांनी देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्यासह इतरांची बोली यशस्वी ठरु शकलेली नाही.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/11/current-affairs-24-25-november.html", "date_download": "2018-04-20T16:39:51Z", "digest": "sha1:IEUZP5VMIF5JUAVOMGMQR3CAWYD6R3VQ", "length": 22125, "nlines": 169, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nभारत आणि मलेशिया दरम्यान तीन सामंजस्य करार\nद्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.\nभारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.\nदोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.\nतसेच, भारताचा नीती आयोग आणि मलेशियाच्या परफॉरर्मन्स मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी युनिट (पेमांडू) यांच्यादरम्यान कार्यकुशल व्यवस्थापन क्षेत्रात योजना आणि अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे.\nनिती आयोगाचा पेमांडूशी सहकार्य करार\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट’ (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात सहकार्य करार करण्यात आला.\n‘पेमांडू’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दातोश्री इद्रिस जाला आणि भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव अनिल वाधवा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.\n‘बिग फास्ट रिझल्ट’ पद्धती वापरून प्रामुख्याने तांत्रिक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येणार आहे. ही पद्धत ‘पेमांडू’ने विकसित केली आहे. सरकारी कार्यक्रम, विकासात्मक योजना तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.\nमलेशियाचे पंतप्रधान : मोहंमद नजीब बिन तुन अब्दुल रझाक\nभारत आणि सिंगापूर देशांमध्ये दहा करार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान भारत आणि सिंगापूर देशांमध्ये संरक्षणासह विविध क्षेत्रांशी संबंधित दहा करार करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्या उपस्थितीत हे करार झाले.\nयाच वेळी दोन देशांमधील भागीदारी धोरणात्मक पातळीवर नेल्याची घोषणाही करण्यात आली. दोन देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि राजकीय, संरक्षण, सुरक्षा सहकार्य, अर्थ आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रांमध्ये नवे संबंध निर्माण करण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी केली असून, यामुळे दोन्ही देशांचा विकास होण्यास मदत होणार आहे.\nसंरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच सायबर सुरक्षा, जहाज बांधणी आणि नागरी उड्डाण या क्षेत्रांमध्ये हे दहा करार करण्यात आले.\nसुरक्षा सहकार्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत सायबर सुरक्षेबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, तंत्रज्ञानासाठी संयुक्त संशोधन, सायबर सुरक्षा धोरणाबाबतच्या माहितीचे आदानप्रदान याबाबतीत सहकार्य केले जाणार आहे.\nसिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस आणि नीती आयोगामध्ये झालेल्या योजना सहकार्य करारानुसार शहर नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन याबाबतच्या ज्ञान आणि माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच दोन्ही संस्थांमध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारीही होणार आहे.\nसिंगापूरचे पंतप्रधान : ली सेन लुंग\nभारत आणि सिंगापूर दरम्यान झालेले दहा करार खालीलप्रमाणे...\nभारत आणि सिंगापूरमधील संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेणे.\nसंरक्षण मंत्री पातळीवर चर्चा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव, संयुक्त उत्पादन आणि विकासासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण कंपन्यांमध्ये सहकार्य वाढविणे.\nसुरक्षा सहकार्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सर्ट-इन) आणि सिंगापूर सायबर संस्थेदरम्यान करार.\nभारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यात नागरी उड्डाण सेवेबाबत आणि जयपूर आणि अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनाबाबत करार.\nनीती आयोग आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेसमध्ये योजना सहकार्य करार.\nभारताचा अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग आणि सिंगापूरचा केंद्रीय अंमलपदार्थ विभाग यांच्यामध्ये अंमलीपदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी सामंजस्य करार.\nभारताच्या गाव आणि देश नियोजन संस्था आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यामध्ये नगर नियोजन आणि प्रशासन सहकार्य करार.\nसिंगापूरमधील आशियाई संस्कृती संग्रहालयाला कर्जपुरवठा.\nदोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणि नागरिकांमध्ये थेट संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.\nआफ्रिका खंडातील माली देशानंतर ट्युनिशिया देशात दहशतवाद्यांनी अध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.\nया हल्ल्यानंतर ट्युनिशियात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, ट्युनिस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.\nट्युनिशियाचे अध्यक्ष : बेजी केड इसेबसी\nरशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले\nअनेकदा इशारा देऊनही हवाई हद्दीचा भंग करणारे रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले. मात्र, तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे.\nरशियाच्या ‘एसयू-२४’ प्रकारच्या लढाऊ विमानावर तुर्कस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. त्यानंतर हे विमान कोसळले, असा दावा रशियाने केला आहे. तर ‘एफ-१६ एस’ प्रकारच्या विमानातून रशियाच्या विमानावर हल्ला करण्यात आल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे.\nलढाऊ विमान पाडण्यात आल्यानंतर या विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीने बाहेर उड्या घेतल्या. विमान सीरियातील लटकिया भागात कोसळले. हा भाग सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोन्ही वैमानिकांच्या शोधासाठी मोठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.\nएक लाख कोटींचा 'राईस मिल' घोटाळा\nकोळसा खाण, २-जी प्रमाणेच सुमारे एक लाख कोटींचा ‘राईस मिल’ घोटाळा ‘कोब्रापोस्ट’ने ‘कॅग’च्या हवाल्याने समोर आणला आहे.\nदेशभरातील शेतकऱ्यांकडून सरकार प्रत्येक हंगामात मोठ्या प्रमाणावर कच्चा तांदूळ खरेदी करते. किमान हमीभावाने ही खरेदी केली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी हे धान्य 'राईस मिल्स'कडे पाठवलं जातं.\nमात्र मिलकडून केवळ पक्का तांदूळच सरकारला परत मिळतो. त्याची कणी वा कोंडा सरकारला परत मिळत नाहीत. राज्य सरकारं आणि केंद्राच्या या चुकीच्या धोरणामुळे मिल मालकांनी कणी आणि कोंडा विकून सरकारच्या तिजोरीचे आतापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान केले आहे, असा दावा ‘कोब्रापोस्ट’ने केला आहे.\nगेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत सुमारे १ लाख कोटींचे सरकारचे नुकसान झाले आहे. 'कॅग'च्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे.\nपवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी करण्यास मनाई\nरामायण किंवा कुराण या धर्मग्रथांच्या नावांवर कोणी एक व्यक्ती हक्क सांगू शकत नाही. एखादी वस्तू वा सेवेचा व्यवसाय करायचा असल्यास 'ट्रेडमार्क' म्हणून या नावांचा वापर केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.\nरामायण, कुराण, बायबल, गुरू ग्रंथ साहिब असे अनेक पवित्र तसेच धार्मिक महत्त्व असलेले ग्रंथ आहेत. त्यामुळेच या ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी आपण करू शकत नाही असेल असे न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने सांगितले.\nईश्वर अथवा धर्मग्रंथांचं नाव 'ट्रेडमार्क' म्हणून वापरण्यास परवानगी दिल्यास लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही खंडपीठ म्हणाले.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rajsthan-government-bans-girl-students-from-colleges-from-wearing-jeans-and-t-shirt/", "date_download": "2018-04-20T16:34:00Z", "digest": "sha1:QVQBKPQUQPIGXVDZALGKGJUJRYPS3CGZ", "length": 17244, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "राजस्थानात विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये जीन्स घालण्यावर बंदी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nराजस्थानात विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये जीन्स घालण्यावर बंदी\nदेशभरात महिला दिन जल्लोष साजरा होत असताना राजस्थानाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारने मात्र महिलांच्याच हक्कांवर गदा आणणारा एक आदेश जारी केला आहे. भाजपने राजस्थानातील महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींवर जीन्स आणि टीशर्ट घालण्याची बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये व महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राजस्थानातील १४८ महाविद्यालयांमधील १ लाख ८६ हजार विद्यार्थिनींना या बंदीचा फटका बसणार आहे. येत्या २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षापासून ही बंदी लागू करण्यात येणार आहे.\nराजस्थान सरकारने काढलेल्या नवीन नियमांनुसार विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये फक्त पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून येण्याची सक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाचे पंजाबी ड्रेस घालायचे याचा निर्णय महाविद्यालयाने व विद्यार्थी संघटनांनी एकत्र घेण्यास सरकारने सांगितले आहे. सरकारने जीन्स आणि टीशर्ट व्यतिरिक्तही अन्य प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांवरही बंदी घातली आहे. तसेच ज्या विद्यार्थिनी या नियमांचे उल्लंघन करणार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.\nराजस्थानचे उच्च शिक्षण मंत्री किरण महेश्वरी यांनी या वृत्ताला ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीकडे दुजोरा दिला आहे. ‘महाविद्यालयांमध्ये शिस्त राहावी, वातावरण चांगले राहावे म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे, महेश्वरी यांनी सांगितले आहे. याआधीही दिल्ली विद्यापीठात आणि पंजाबमधील काही कॉलेजांमध्ये विद्यार्थिनींना जीन्स टीशर्ट घालण्यावर बंदी घातलेली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना अश्रू अनावर\nपुढीलकल्याण-डोंबिवलीत खाडी बुजवून चाळी उभारण्याचा गोरखधंदा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:33:47Z", "digest": "sha1:S4WLO5AUPCD3SWHXC6SRGG4CSYDOOCRY", "length": 6110, "nlines": 446, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:महिने - विकिपीडिया", "raw_content": "\n(साचा:ग्रेगरियन महिने या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल २०, इ.स. २०१८\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{महिने|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{महिने|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{महिने|state=autocollapse}}\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१८ रोजी २०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/china-hangs-10-people/", "date_download": "2018-04-20T16:29:05Z", "digest": "sha1:65BINB7M4RP7FPR63LETZIXZOQLQDCOA", "length": 4212, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "china hangs 10 people – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nबापरे .. भर स्टेडियम मध्ये दिली तब्बल १० जणांना फाशीवर लटकवले\nचीनमध्ये हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 10 जणांना फासावर लटकवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात ही घटना घडली. चीनमधील सरकारची मनमानी सत्ता ही आपल्याला चांगलीच परिचयाची आहे . कट्टर इस्लामी देशातले कडक कानून याविषयी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होते मात्र चीनमधील विवादास्पद अशा गोष्टींबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत नाही. कुत्र्याची हत्या करून… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-20T16:38:10Z", "digest": "sha1:DH5LXQA2W2PI3GH4I3EETIRHF7USU4PD", "length": 12996, "nlines": 132, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "गेट बोन फ्रेण्डली - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nयोग्य काळजी घेतली नाही तर, संधीवाताची लक्षणं लहानपणापासूनच जाणवू लागतात.\nहाडांचा ऱ्हास अशीच संधीवाताची शास्त्रीय व्याख्या सांगता येईल. म्हणजेच वयोमानानुसार हाडांचा आकार, वजन आणि सहनशक्ती कमी होणं. हाडांची सहनशक्ती कमी झाल्याने ते कमजोर बनतात, यामुळे त्यांच्यावर थोडाजरी भार पडला तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.\nमेडिकल हिस्ट्री, काही शारीरिक तपासण्या, स्केलटल एक्सरे (हाडांच्या सापळ्याची चाचणी) आणि बोन डेन्सिटी स्कॅन (हाडांचं सर्वसाधारण वजन तपासणं) यांच्या आधारे डॉक्टर संधीवाताचं निदान करतात.\nरजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचं संतुलन बिघडणं, गर्भाशय काढून टाकणं, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची कमतरता, बैठी जीवनशैली, सडपातळ देहयष्टी आणि कमी वजन, अतिरिक्त धुम्रपान, अनुवंशिकता, वैद्यकियदृष्ट्या तंदुरूस्त नसणं जसं, लिव्हरचा विकार, खाण्याची पथ्यं न पाळणं इत्यादी… पुरूषांपेक्षा महिलांमध्ये संधीवात होण्याची शक्यता जास्त असते.\nजसंजसं वय वाढतं तसं, हाडाचा आकार आणि वजनही वाढतं. ही प्रक्रिया योग्यरित्या होत नसेल तर, संधीवात होण्याची शक्यताही वाढते. मुख्यत: महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. वेळेपूवीर्च जन्माला आलेल्या आणि उशीरा यौवनात आलेल्या मुलामुलींनाही भविष्यात संधीवात होतो.\nरजोनिवृत्तीनंतर महिलांना संधीवाताचा त्रास का होतो\nएस्ट्रोजेन हे हाडांना संरक्षण देणारं हामोर्न आहे. मात्र, रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजेन हामोर्नमधील समतोल बिघडल्याने महिलांमधील हाडाचं लवकर घर्षण व्हायला लागतं.\nकॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम ही महत्त्वाची मिनरल्स साठवून ठेवण्यासाठी हाडं 'डेपो' म्हणून काम करतात. हाडांमध्ये जवळजवळ ९९ टक्के कॅल्शियम साठवून ठेवण्याची क्षमता असते.\nतरूण मुली फार कमी प्रमाणात दूध आणि दूग्धजन्य पदार्थाचं सेवन करत असल्याने, त्यांच्यामध्ये हाडं फ्रॅक्चर होण्याचे प्रकार अनेकदा घडतात.\nहाडांचं आरोग्य कायम ठेवायचं असेल तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. याबरोबर वेट्स आणि मसल्स स्ट्रेचिंग होणंही तितकंच महत्त्वाचं.\nयासाठी पहिल्यांदा डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. दूध, दूग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, पालेभाज्या याचबरोबर व्हिटॅमिन डी (सूर्यप्रकाश, दूध, चीज, अंड्याचं बलक), व्हिटॅमिन बी१२ (लिव्हर, चिकन, दूध, सोयाबीन, मसूर) यांचा नियमितपणे आहार घ्यावा.\nडाएटबरोबर व्यायामही हवा. वेट्स ट्रेनिंग एक्ससाइजबरोबर जीममध्येही वर्कआऊट करणं आवश्यक आहे.\nऍरोबिक ऍक्टिव्हीटी म्हणजे वॉकिंग, डान्सिंग, जॉगिंग इत्यादी प्रकारही असावेत.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640708.html", "date_download": "2018-04-20T16:45:06Z", "digest": "sha1:5BRKGV36MDLXXK5JHX667YEXEIQL6XOW", "length": 1697, "nlines": 31, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - प्रेम म्हणजे खरंच काय असतं?", "raw_content": "\nप्रेम म्हणजे खरंच काय असतं\nप्रेम म्हणजे खरंच काय असतं\nप्रेम म्हणजे भावनेचा एक अत्युच्च आविष्कार.\nप्रेम म्हणजे निरागस उत्कटता.\nप्रेम म्हणजे निर्लेप मनाचा आविष्कार.\nप्रेम म्हणजे ‘मी’ चा पूर्ण लोप.\nप्रेम म्हणजे डोळ्यात नकळत आलेलं पाणी.\nप्रेम म्हणजे आकाशाएवढे झालेले विशाल मन.\nप्रेम म्हणजे दोन मनांचा अद्वैत भाव.\nप्रेम म्हणजे निरपेक्ष भावना.\nप्रेम म्हणजे दु:खाने सुखाशी केलेलं साटेलोटे.\nप्रेम म्हणजे आठवणीने झालेलं प्रफुल्लित मन.\nप्रेम म्हणजे वाढलेला देवावरचा विश्वास.\nप्रेम म्हणजे ‘ I am somebody’ ची जाणीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642417", "date_download": "2018-04-20T16:45:03Z", "digest": "sha1:LEZUHUCSFLVOLUMHWBZZJTMFXPP53AF7", "length": 1229, "nlines": 26, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥\nकविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥\nअजून कुणाची आहे का काही बाकी \nएक रुपया असला तरी , सांगा बरं का नक्की\nऋण सारं फेडायचं आहे\nहसतमुखानं वर जायचं आहे\nनको दोष तो कसला\nहसत वर जायचं आहे\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/raja-bhaiya-biography/", "date_download": "2018-04-20T16:09:17Z", "digest": "sha1:HKLMP6Q3P7YLTP7FMU7QK2JURUWGFCGG", "length": 53658, "nlines": 256, "source_domain": "khaasre.com", "title": "वयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का ?", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nभदरी रियासतचे राजकुमार रघुराज प्रताप सिंह “राजा भैया” यांना तुफान सिंह या नावाने सुध्दा ओळखल्या जाते. ३१ मे रोजी त्यांच्या जन्म प्रतापगढ येथील कुंडा येथे झाला. सध्या ते कुंडा येथून आमदार आहेत. मागे २०१२ मध्ये राजा भैया यांनी निवडणुकीच्या अर्जात स्वतःचे वय ३८ वर्ष लिहिले होते. त्यानुसार राजा भैया पहिल्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांचे वय फक्त १९ वर्ष होते या वरून बराच वाद उठला होता. गरीबांचा रॉबिनहूड म्हणून राजा भैयांना ओळखल्या जाते आज खासरेवर बघूया राजा भैया विषयी काही खासरे माहिती…\n२० वर्षा अगोदर उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापगाढ येथील कुंडा येथे जाहीर सभेत घोषणा केली होती कि, गुंडा विहीन कुंडा करौं, ध्वज उठाय दोउ हाथ. कल्याण सिंहाचे राजकारण या घोषणेनंतर धक्के खात राहिले परंतु १९९६ साली ज्या आमदारास कल्याणसिंह यांना संपविण्याची प्रतिज्ञा केली तो आजही लोकात पहिल्या सारखाच लोकप्रिय आहे. आज पर्यंत ५ वेळेस अपक्ष निवडून आलेले आमदार राजाभैया आहेत. राजा भैया यांच्या सुरवातीच्या राजकीय जीवनात त्यांना भेटायचे असेल तर सर्वाना कुंडा येथे जावे लागत होते. त्यांच्या राजवाडा हजारो एक्कर मध्ये बांधलेला आहे आणि त्यामध्ये हत्ती घोडे त्या राजवाड्याची आजही शान वाढवतात. राजा भैया यांचे आजोबा राजा बजरंग बहादुर सिंह हे स्वतंत्र सेनानी होते. पंतनगर कृषि विश्वविद्यालयचे वाईस चान्सलर आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असे अनेक पद त्यांनी उपभोगिले आहे.\nराजा भैया महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. सोबतच त्यांना मातीच्या चुलीवर बनलेला स्वयंपाक रोज द्यावा लागतो. आजही त्यांच्या राजवाड्यात मातीच्या चुलीवर व मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्या जातो. नॉन वेजचे शौकीन आहे राजा भैया जे मातीच्या भांड्यात बनविलेले हवे. राजा भैयाने वयाच्या ६ व्या वर्षी घोडस्वारीस सुरवात केली होती. आजही घोड्यावर ते रोज रपेट मारतात. त्यांच्या २ फासोळ्या घोड्यावरून पडल्यामुळे मोडलेल्या आहेत. राजा भैयाच्या वडिलाने आजपर्यंत एकदाही मतदान केले नाही आहे किंवा राजा भैयाला मतदान करा अशी विनंती देखील केली नाही आहे. तरी देखील राजा भैया स्पष्ट बहुमताने निवडून येतात. राजा भैयांना बुलेट गाडीचा भारी शौक आहे.\nवयाच्या १२व्या वर्षी त्यांना त्यांची पहिले बुलेट मिळाली होती. आणि फिएट गाडी वर ते पहिल्या वेळेस चारचाकी गाडी चालविणे शिकले होते. त्यांच्या राजवाड्यात लैंड रोवर, लैंड क्रूजर, बीएमडब्ल्यू सारख्या अनेख महागड्या गाड्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या बनावटीचे पिस्तुल जमा करण्याचा देखील छंद आहे. राजा भैयांना दोन मुले आणि दोन मुली आहेत जी सध्या शिक्षण घेत आहेत. त्यांच्या राजवाड्या मागे ६०० एकर मोठे असलेल तलाव आहेत. ज्यामध्ये अनेक मगर त्यांनी पोसलेले आहेत. असे सांगण्यात येते कि त्यांच्या विरोधकांना मारून ते या तलावात फेकून देतात.\nआजही राजा भैयाच्या राजवाड्यासमोर दरबार भरतो जिथे ते न्यायदान करतात. रोज सकाळी अनेक महिला पुरुष त्यांच्या राजवाड्या समोर एका लाईनमध्ये उभे असतात राजाभैया त्यांचे भांडण तंटे सोडविण्याचे काम करतात. मागील २० वर्षाच्या काळात राजा भैया आणी त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे सोबत गंभीर खुनाचे गुन्हे सुध्दा आहेत. त्यांच्या वडील विषयी पोलीस रेकॉर्ड मध्ये नोंद आहे कि ते २० लोकांची टोळी चालवत असे उत्तर प्रदेशला अलग देश घोषित करण्या करिता हि टोळी काम करते असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. उदय प्रताप सिंह यांना भेटायचे असल्यास त्यांच्या राजवाड्यापासून दूरवरच गाडी बंद करावी लागते कारण ते पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना गाडीच्या इंजिनचा आवाज त्यांच्या राजवाड्यात सहन होत नाही. स्वतः राजा भैया सुध्दा हा नियम पाळतात आणि स्वतःची गाडी ढकलत राजवाड्यापर्यंत नेतात.\nउदय प्रताप सिंह यांचे शिक्षण ड्युन स्कूल मध्ये झाले आहे जिथे भारतातील राजघराण्यातील लोक मुले शिकतात. त्यांनी राजा भैयाच्या शिक्षणास विरोध केला त्यांच्या मते शिक्षणामुळे मुले भित्रे होतात. परंतु राजा भैयाच्या आईने त्यांना घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ज्या कल्याणसिंहाने राजा भैयांना विरोध केला त्यांच्या मंत्री मंडळात राजा भैयांना स्थान द्यावे लागले. राजा भैया अपक्ष आमदार आहेत. मायावती शासन काळात त्यांच्यावर पोटा कायद्या अंतर्गत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. ज्या काळात ते जेलमध्ये होते त्या काळात एक डझन पेक्षा अधिक अधिकाऱ्याच्या बदल्या या जेलमध्ये करण्यात आल्या परंतु कोणीही ड्युटीवर जॉईन होत नव्हते. समाजवादी पक्षाच्या काळात परत ते मंत्री बनून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाले.\nआजही राजाभैयांना त्यांच्या क्षेत्रातील लोक रॉबिनहूड समजतात त्याची पूजा करतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nतीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nPrevious Articleभारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक…Next Articleएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nतीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \n१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.\n२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.\n३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.\n४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.\n५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.\n६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.\n७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.\n८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.\n९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.\n१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.\n११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.\n१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.\n१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.\n१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.\n१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.\n१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.\n१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.\n१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.\n१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.\n२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.\n२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.\nअसा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/09/current-affairs-7-september.html", "date_download": "2018-04-20T16:36:46Z", "digest": "sha1:WT7JZB775TPOIP6LE5ZSB3O76K6YWATO", "length": 18977, "nlines": 156, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nभारत पाकिस्तान दरम्यान महासंचालक स्तरीय चर्चा\nभारत पाकिस्तान दरम्यान सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालक स्तरीय पाच दिवसांच्या चर्चेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.\nलपून गोळीबार करण्यासह जम्मू- काश्मीरमधील शस्त्रसंधी भंगाच्या घटना, घुसखोरी, कच्छच्या रणमधील अतिक्रमण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे यावेळी भारत उपस्थित करण्याची शक्यता आहे.\nपाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ ८ तारखेला अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करेल आणि ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान सीमा सुरक्षा दलासोबत होणाऱ्या बोलण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अमृतसरहून नवी दिल्लीला येणार आहे.\nभारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक करतील.\nआशियाई नेमबाजी क्रमवारीत नारंग अव्वल\nभारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने ५० मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने ५० मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.\nनारंगने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने ६२६.३ गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत १८५.८ गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.\n३२ वर्षीय नारंगचे आता ९७१ गुण झाले आहेत. चीनच्या शेंगबो झाओने ८९६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पिस्तूल विभागात जितूने १९२९ गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे.\nऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.\nगुरप्रित सिंगने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.\nनोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांची मुंबईला भेट\nबांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६मधील शांतता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबईला भेट दिली.\nयावेळी त्यांनी गरिबी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.\nगरिबी निर्मुलनासाठी बांगलादेशात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी महम्मद युनुस यांनी माहिती दिली. यात विशेष करुन त्यांनी राबविलेला ग्रामीण बँकेचा प्रयोग, सुक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत विवेचन केले.\nते म्हणाले की, जगभरातील बहुतांश गरीब समाज आजही बँकिंग क्षेत्रापासून लांब आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बँकांच्या लाभक्षेत्रात आणले पाहिजे.\nकर्जाची परतफेड ही गरिबांकडून जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. यासाठी प्रस्थापित व्यावसायीक बँकांऐवजी गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.\nभारतात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. महिलांना आणि गरिबांना अधिकाधिक संधी देऊन देशाचे विकासचक्र अधिक गतिमान करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.\nबांगलादेशात ग्रामीण बँक यशस्वी\nबांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के गरीब महिलांचा सहभाग होता. या चळवळीत कर्जाच्या परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के इतके होते.\nया चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबरच आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण बँकेमार्फत सामाजिक उद्योगाची संकल्पनाही राबविण्यात आली. महिलांच्या सहभागातून ही संकल्पनाही यशस्वी झाली.\nदेशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे\nभारतामधील बिबट्यांची प्रथमच गणना करण्यात आली असून देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.\nगेल्या वर्षी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेची पद्धत वापरूनच बिबट्यांची गणनाही करण्यात आली. या पद्धतीनुसार बिबट्यांचे छायाचित्रण, त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा संकलित करण्यात आला आहे.\nव्याघ्रगणनेच्या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव व्ही. झाला यांच्या नेतृत्वाखाली ही गणना करण्यात आली. या गणनेमुळे देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या बिबट्यांची विस्तृत माहिती उपलब्ध झाली आहे.\nशिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत व पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या, सुमारे साडेतीन लाख कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भागाचा अभ्यास या मोहिमेदरम्यान करण्यात आला.\nमेन्सा बुद्धय़ांक चाचणीत भारतीय वंशाच्या मुलीला १६२ गुण\nब्रिटनमध्ये लिडिया सेबास्टियन या भारतीय वंशाच्या मुलीला मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत १६२ गुण मिळाले असून तिने अल्बर्ट आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. ती अवघी बारा वर्षांची आहे.\nलिडियाने कॅटेल ३ बी प्रश्नपत्रिकेतील दीडशे प्रश्न सोडवले व तिला १६२ गुण मिळाले. तिने तिच्या गटात कमाल गुण मिळवले आहेत.\nयात अठरा वर्षांखालील मुलांना जास्तीत जास्त १६२ गुण मिळू शकतात तर प्रौढांना कमाल १६१ गुण मिळू शकतात. हॉकिंग व आईनस्टाईन यांचा बुद्धय़ांत १६० असल्याचे मानले जाते.\nलिडिया ही इतर क्षेत्रातही हुशार आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला व्हायोलिन येते तर वयाच्या सहाव्या महिन्यात ती बोलायला शिकली.\n‘इसिस प्रूफ’ रायफल ‘क्रुसेडर’ची निर्मिती\nअमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे, ती रायफल इसिसच्या दहशतवाद्यांना वापरता येणार नाही, त्यात बायबलमधील भाग व ख्रिश्चन चिन्हे कोरलेली आहेत.\nएआर १५ या रायफलीचे नामकरण ‘क्रुसेडर’ असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस व दुसऱ्या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे.\nस्पाईकस टॅक्टिकल कंपनीच्या मते, मुस्लिम दहशतवादी ही रायफल वापरू शकणार नाहीत कारण त्यांची धर्मावर श्रद्धा असते व या रायफलवर ख्रिश्चन धर्माची चिन्हे आहेत.\nया रायफलला पीस, वॉर व गॉड विल्स इट अशी तीन सेटिंग्ज आहेत. या रायफलची विक्री झाली असून तिची किंमत ९६० ते ३००० डॉलर दरम्यान आहे.\nअमेरिकी शस्त्रास्त्रे जिहादींच्या हातात पडत आहेत अशी भीती व्यक्त होत असल्याने ही रायफल तयार केली आहे. इसिसच्या व्हिडिओत दहशतवादी एम १६ या इराकी सैनिकांकडून हिसकावलेल्या रायफली वापरलेल्या दिसत आहेत तसेत अमेरिकेने तेथे जी शस्त्रास्त्रे टाकली होती ती इसिसकडे आहेत.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nचालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ सप्टेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/goa/", "date_download": "2018-04-20T16:38:54Z", "digest": "sha1:D64RI6CQQUJ6ZNJZQZDNIIF6AFX572NZ", "length": 5358, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "goa – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nगोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी\nसरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आणि योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची सक्ती केलेली आहे . अर्थात ३१ मार्च पर्यंत बहुतांश अशा स्कीम तसेच मोबाईल, बँकिंग, पॉलिसी साठी देखील लिंकिंग गरजेचे राहणार आहे . मात्र आता काही ठिकाणी चक्क पेड सेक्स साठी देखील दलाल आधार कार्डची मागणी करू लागले आहे. मुळातच देहव्यापार हा भारतात कोठेही… Read More »\nगोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात\nगोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ होण्याच्या पाठीमागचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे अप्रतिम असे निसर्ग सौन्दर्य आणि स्वच्छ बीचेस. गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार जाहिरातबाजी करते . मात्र आलेल्या पर्यटकांना योग्य भावात उत्कृष्ट जेवण आणि सुविधा तसेच सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ आहे… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/06/current-affairs-30-jun.html", "date_download": "2018-04-20T16:40:37Z", "digest": "sha1:M32B5QQN5OMIQOYQPUV5FFYCMDAGW4RW", "length": 39525, "nlines": 252, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ३० जून २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ३० जून २०१५\n३० जून हा दिवस एक सेकंदाने मोठा\nया वर्षीचा ३० जून हा दिवस नेहमीपेक्षा एक सेकंदाने मोठा असणार आहे. या दिवशी वेळेमध्ये एका अतिरिक्त सेकंदाची भर घातली जाणार असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सांगितले आहे.\nपृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत असल्याने वेळेचा समतोल राखण्यासाठी साधण्यासाठी लीप सेकंद हा उपाय करण्यात येणार आहे. साधारणतः ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद मोजला जातो.\nएका दिवसामध्ये ८६,४०० सेकंद असतात. प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो.\n‘यूटीसी’ ही आण्विक वेळ आहे. याचा अर्थ, सीसियम या मूलद्रव्याच्या अणूमधील अपेक्षित इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिवर्तनाच्या आधारावर एक सेकंद ही वेळ ठरविली जाते. हे परिवर्तन इतके विश्वसनीय असते की, गेल्या चौदा लाख वर्षांत हे गणित चुकलेले नाही.\nपृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास लागणाऱ्या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. सरासरी ८६,४००.००२ सेकंद इतका एका दिवसाचा कालावधी असतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा वेग कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nसन १८२० पासून पृथ्वीने ८६,४०० सेकंदात परिभ्रमण पूर्ण केले नसल्याचे शास्त्रज्ञांचे गणित आहे. त्यामुळे पापणी लवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वाटणारे हे अधिकचे ०.००२ सेकंद फार वाटत नसले तरी हे दरदिवशी होत असल्याने वर्षभरात तो कालावधी एक सेकंदापर्यंत जातो. त्यामुळेच ३० जून रोजी ही सेकंदाची भर घातली जाणार आहे.\n१९७२ पासून लीप सेकंदाची अंमलबजावणी सुरू झाली ती १९९९ पर्यंत चालू होती. त्यामुळे वर्षांला एक सेकंद वाढत होता. आता लीप सेकंद फारसे नाहीत. यंदाचा लीप सेकंद हा सन २०००पासून केवळ चौथा लीप सेकंद आहे.\nअडचणीतून मार्ग काढण्यासाठी सॉफ्टवेअर कंपन्या सज्ज\nसामान्यत: घड्याळीमध्ये २३:५९:५९ नंतर येत्या दिवशी ००:००:०० वाजतात. मात्र ३० जून रोजी एक सेकंद नव्याने सामील झाल्यानंतर ते २३:५९:५९ नंतर २३:५९:६० होतील आणि पुन्हा एक जुलै रोजी ००:००:०० वाजतील.\nअनेक यंत्रणा एक सेकंदासाठी बंद केल्या जातील. यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे.\nअशाच प्रकारे याआधी २०१२ मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविला गेला तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे.\nफोर्ब्जची सर्वाधिक कमाई केलेल्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध\nफोर्ब्ज मासिकाने २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या जगातील 'टॉप १००' सेलिब्रेटींची यादी (सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५) नुकतीच प्रसिद्ध केली आहे.\nया यादीत अमिताभ, सलमान, अक्षयसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचाही समावेश आहे.\nया वर्षाच्या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर हा अव्वलस्थानी आहे. मेवेदरची कमाई १९ अब्ज रुपये आहे.\nअमिताभ आणि सलमानची कमाई २ अब्ज १३ कोटी रुपये आहे. सलमान, अमिताभ हे संयुक्तपणे ७१ व्या स्थानी आहेत. अक्षय कुमारही कमाईत या दोघांच्या जवळपास आहे. त्याची कमाई २ अब्ज ७ कोटी आहे. या यादीत तो ७६ व्या स्थानी आहे. तर धोनीची कमाई १ अब्ज ९७ कोटी रुपये असून तो ८२ व्या क्रमांकावर आहे.\nविशेष बाब म्हणजे यात शाहरुख खान स्थान पटकावू शकलेला नाही.\nफोर्ब्स यादीत गायिका टेलर स्विफ्ट (८), टेनिसपटू रोजर फेडरर (१६), गायिका बियांसे (२९), किम करदाशियाँ (३३), गोल्फपटू टाइगर वुड्स (३७), अभिनेता टॉम क्रूज (५२), अभिनेता जॉनी डेप (८७) आणि लियोनाडरे डिकैप्रियो (८९) यांचा समावेश आहे.\n‘इसिस’ संबंधित कंपन्यांशी व्यवहारावर भारताची बंदी\nपश्चिम आशियामध्ये दहशतीचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील तेलसाठ्यांच्या व्यापारावर भारताने ३० जून रोजी बंदी घातली.\nतेलसंपन्न इराक, सीरियामधील बहुतांश भूभागावर ताबा मिळविलेल्या ‘इसिस’साठी तेलसाठे हे निधी उभा करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी या संघटनेशी तेलासंदर्भातील व्यवहार करू नये, असा ठराव ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (यूएन) केला होता.\nइसिस : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया\nकट्टर दहशतवादी संघटना असलेल्या ‘इसिस’चा उदय सीरिया आणि इराकमध्ये झाला. कट्टरवाद आणि निर्घृण हत्या करत त्यांनी जगभरातील दहशतवाद्यांना आकर्षित केले आहे.\n‘इसिस’कडे भरतीसाठी असलेल्या तरुणांच्या ओढ्यामुळे पाश्चिमात्य देश चिंताक्रांत झाले आहेत.\nआता ही कट्टरवादी संघटना युरोपमध्येही हातपाय पसरू पाहत असल्याची चिन्हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसली आहेत. ‘इसिस’ची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी, असे आवाहन इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी केले आहे.\nया पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने एक परिपत्रक काढून या व्यापारावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले.\nजयललितांचा पोटनिवडणुकीत ऐतिसाहिक विजय\nतमिळनाडूतील आर.के. नगर पोटनिवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि ‘अण्णा द्रमुक’ सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. जयललिता यांना १ लाख ६० हजार ३४२ मते मिळाली आहेत.\nविक्रमी फरकाने त्यांचा विजय झाला असून सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या विजयामुळे तमिळनाडूमधील विधानसभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे.\nया मतदारसंघातून मुख्य लढत ही जयललिता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सी. महेंद्रन यांच्यात झाली. सी. महेंद्रन यांना अवघी दहा हजार मतेच पडली. जयललिता यांनी महेंद्रन यांचा १ लाख ५० हजार ७२२ मतांनी पराभव केला.\nया पोटनिवडणुकीसाठी ७० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीवर मुख्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जयललिता यांचा विजय निश्चित मानला जात होता.\nतामिळनाडू राज्यपाल : के. रोसय्या\nबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाला आणि आमदारकीला मुकावे लागले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली.\nउच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवित जयललिता यांना निर्दोष ठरविले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.\nत्यानंतर घटनेप्रमाणे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्यांनी आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली.\nभारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला.\n२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या विजेंदरने आयओएस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून क्वीन्स बेरी प्रमोशन्ससोबत बहुवर्षीय व्यावसायिक करार केला. यानुसार तो मिडलवेटमध्ये पहिल्या वर्षी किमान सहा लढती खेळेल.\nहरियाणातील भिवानी गावात जन्मलेला ३९ वर्षांचा विजेंदर यापुढे मॅन्चेस्टर शहरात वास्तव्यास असेल.\nविजेंदरने २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, २००६ च्या आशियाडमध्ये कांस्य, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि २००९च्या विश्व हौशी चॅम्पियनशिप, तसेच २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २००९ साली मिडलवेट गटात तो विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला होता.\nभारत, थायलंडमध्ये विविध क्षेत्राशी संबंधित करार\nभारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर ३० जूनला स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली.\nभारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री तानासाक पातिमप्रगोर्म यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.\nप्रत्यार्पण करारावर २०१३ मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. दस्तऐवजांच्या देवाण-घेवाणीमुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग मिळणार आहे.\n२०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक पातळीवरील फुटबॉल विश्वकप स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे.\nत्यासाठी देशातील सहा शहरांपैकी एक संभाव्य केंद्र म्हणून गोव्याची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा स्पर्धेचे तांत्रिक संचालक जेवियर सिप्पी यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nगोव्याबरोबरच गुवाहाटी, कोची, कोलकता, नवी मुंबई आणि दिल्ली येथील स्पर्धा केंद्रांचा संभाव्य यादीत समावेश आहे.\nस्पर्धेसाठी गोव्यात चार प्रशिक्षण मैदान आणि एका मुख्य मैदानाची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मैदाने फिफाच्या दर्जानुसार तयार केली जातील. यामध्ये बाणावली, वास्को, कुंकळ्ळी आणि उत्तोर्डा यांचा समावेश आहे. या चारही केंद्रांवर प्रत्येकी सहा सामने खेळविण्यात येतील.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी २९ जून रोजी दहा दिवसांच्या दक्षिण भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.\nया दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम\nसिकंदराबाद येथील 'राष्ट्रपती निलयम' येथे ते प्रामुख्याने मुक्कामास असतील.\nएक जुलैला ते तिरुमला येथील श्री तिरुपती देवस्थानास भेट देणार\nतीन जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या 'उनिकी' या नव्या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हैदराबादमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे हा समारंभ होणार आहे.\nबोलारूम येथे असलेल्या 'राष्ट्रपती निलयम'च्या प्रांगणातील नक्षत्र वाटिकेचे मुखर्जी यांच्या हस्ते सहा जुलै रोजी उद्घाटन होईल.\nराष्ट्रपतींचा दक्षिण मुक्काम आठ जुलैला संपणार आहे.\nवारंवार कर्जे घेऊनही आर्थिक बाजू सावरू न शकलेल्या, वित्त पुरवठ्यासाठी बव्हंशी जर्मनीवर अवलंबून राहिलेल्या ग्रीसला आर्थिक दिवाळखोरी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज फेडायचे आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचे पॅकेज नाकारले होते. मात्र, आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.\nग्रीसमधील बँका नागरिकांना पैसे देऊ शकत नसल्याने त्या ६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रीक सरकारला घ्यावा लागला आहे.\nशिल्लक भांडवलावर नियंत्रण ठेवण्याचा अखेरचा प्रयत्न ग्रीस सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे बँका व एटीएम केंद्रे २९ जूनला बंद ठेवण्यात आली होती.\nनागरिकांना केवळ ६० युरो पैसे बँकेतून काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पेन्शनरांनी बँकांबाहेर लांबलचक रांगा लावलेल्या दिसत होत्या.\nअशी बिकट स्थिती असतानाही ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस त्सीप्रास यांनी २९ जून रोजी ग्रीसच्या आर्थिक सुधारणांसाठी अन्य देशांकडून वित्त पुरवठा व्हावा यासाठी सार्वमत घेण्याची घोषणा केली.\nयामुळे युरोपीय संघाचे सामायिक चलन असलेल्या युरोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.\nग्रीसला भारतातून फारशी निर्यात होत नाही. त्यामुळे भारतावर ‘ग्रीस’ संकटाचा फारसा परिणाम होणार नाही.\nग्रीसमधील आर्थिक संकटामुळे भारतात सेन्सेक्स ५३५ अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये १६६ अंशांची घसरण झाली आहे.\nयुरोपातून भारतात झालेली गुंतवणूक परत जाण्याचा धोका असल्यामुळे शेअर बाजारांना आणखी फटका बसू शकेल.\nमॅगीच्या निर्यातीला परवानगी; बंदी कायम\nकेंद्र सरकारने मॅगीमध्ये आरोग्यास हानीकारक घटक असल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मॅगीच्या कोट्यवधींच्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी नेस्ले कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली.\nयावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला परदेशात मॅगीची निर्यात करण्यास परवानगी देत मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे.\nमॅगीच्या निर्यातीला परवानगी दिल्यामुळे नेस्ले कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जुलैला होणार आहे.\nऍडलेडमध्ये पहिली दिवस-रात्र कसोटी\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळविला जाणार आहे.\nन्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यास २७ नोव्हेंबरपासून ऍडलेडच्या मैदानावर सुरवात होणार आहे.\nहा सामना दिवस-रात्र असा प्रकाशझोतात आणि गुलाबी चेंडूसह खेळविला जाणार आहे.\nऍडलेडच्या वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्यास सुरवात असून, तो रात्री साडेनऊपर्यंत खेळविला जावा, असे नियोजन आहे.\nविसूभाऊ बापटांची गिनीज बूकमध्ये नोंद\nगेली ३४ वर्षे विसूभाऊ बापट यांची ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ही काव्यमैफल मराठी रसिकांना मोहिनी घालते आहे. २ हजार ७०८ प्रयोगांचा विक्रम करणाऱ्या या काव्यमैफलीला मराठी रसिकांनी डोक्यावर घेतले आहे.\nसलग पंधरा तास काव्यवाचन करत विसूभाऊ बापट यांनी काव्य वाचनातला नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासाठी १२ जून रोजी त्यांची गिनीज बूकमध्ये नोंद झाली आहे.\nपूर्ण नाव : विश्वनाथ श्रीधर बापट\nमूळगाव : रत्नागिरी | जन्मगाव : सांगली.\nरसिक त्यांना आदराने विसूभाऊ म्हणतात.\n१९८१ला मराठी कवितांची महती पटविणाऱ्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ची संकल्पना विसूभाऊंनी साकारली. २६ जानेवारी १९८१ ला नगर येथे याचा पहिला प्रयोग झाला.\nदहा, शंभर, हजार, दोन हजार अशा अगणित प्रयोगांची वाटचाल करत विसूभाऊ ‘कुटुंब’ घेऊन जग फिरत आहेत.\n‘कुटुंब रंगलय काव्यात’ची भव्यता\nदहा हजारहून अधिक कविता\nएक हजारहून अधिक कवी\nदोन हजार सातशेहून अधिक प्रयोग\nगुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर\nख्यातनाम कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेला भारत-पाकच्या ६० वर्षांच्या संबंधांवर आधारलेला ‘लकीरें’ या कथा व कवितासंग्रहावर आधारलेले नाटक प्रथमच रंगमंचावर अवतरले आहे.\nसलीम आरिफ यांनी दिग्दर्शित केलेली ही नाट्यकृती पाहून खुद्द गुलजारही दंग राहिले.\n‘लकीरें’मधील कवितांना आरिफ यांनी नाट्यसूत्रात बांधून त्याचे रंगमंचावर केलेले सादरीकरण पाहून गुलजार कमालीचे सुखावले.\nइंडोनेशिया हवाईदलाच्या विमानाला अपघात\nइंडोनेशिया हवाईदलाच्या हर्क्युलस सी-१३० या विमानाला मेदान शहरात झालेल्या अपघातात २० सैनिकांसह ४५ जण ठार झाले आहेत.\nइंडोनेशिया हवाई दलाच्या विमानामधून सैनिक प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटातच मेदान शहराजवळ विमानाला अपघात झाला आणि अपघातात २० सैनिकांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nजखमी सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३० जून २०१५\nचालू घडामोडी - २९ जून २०१५\nचालू घडामोडी - २८ जून २०१५\nप्रश्नसंच १५७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ व २७ जून २०१५\nस्मार्ट सिटी, ‘अमृत’ आणि पंतप्रधान आवास योजना\nचालू घडामोडी - २५ जून २०१५\nचालू घडामोडी - २४ जून २०१५\nचालू घडामोडी - २३ जून २०१५\nचालू घडामोडी - २२ जून २०१५\nचालू घडामोडी - २१ जून २०१५\nचालू घडामोडी - २० जून २०१५\nचालू घडामोडी - १८ व १९ जून २०१५\nप्रश्नसंच १५६ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १७ जून २०१५\nचालू घडामोडी - १६ जून २०१५\nप्रश्नसंच १५५ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १५ जून २०१५\nराज्यसेवा मुख्यपरीक्षा महत्वाची घोषणा\nचालू घडामोडी - १४ जून २०१५\nचालू घडामोडी - १३ जून २०१५\nचालू घडामोडी - १२ जून २०१५\nप्रश्नसंच १५४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ जून २०१५\nचालू घडामोडी - १० जून २०१५\nचालू घडामोडी - ९ जून २०१५\nचालू घडामोडी - ८ जून २०१५\nनरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा\nचालू घडामोडी - ७ जून २०१५\nचालू घडामोडी - ६ जून २०१५\nचालू घडामोडी - ५ जून २०१५\nचालू घडामोडी - ४ जून २०१५\nचालू घडामोडी - ३ जून २०१५\nप्रश्नसंच १५३ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ जून २०१५\nचालू घडामोडी - १ जून २०१५\nचालू घडामोडी - ३१ मे २०१५\nचालू घडामोडी - ३० मे २०१५\nचालू घडामोडी - २९ मे २०१५\nचालू घडामोडी - २८ मे २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF.html", "date_download": "2018-04-20T16:35:59Z", "digest": "sha1:TL6JYDN2QKORCNVWVQDIG5RMB2C45DL5", "length": 11209, "nlines": 173, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आदिवासी उपाय - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nवैद्य एम. पी. नानल आयुर्वेद प्रतिष्ठान पुणे यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य विलास नानल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक पथकाने ज्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य, वनस्पती शास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे, खालील अभ्यास जुलै १९९८ मध्ये यशस्वीपणे पूर्ण केला.\nखालील प्रमाणे मुलाखतींच्या चार रचना व कृती केल्या.\nशमन (पुरूष व स्त्री)\nवैदू व इतर वैद्य/डॉक्टर\nआमच्या शोध पथकाने शोध प्रबंधामध्ये नमूद केलेल्या वेळा पत्रकानुसार ठाणे जिल्ह्यातून संपूर्ण माहिती संकलित केली.\n२०० कुटुंब प्रमुख व २५ औषधोपचार करणारे अशा २२५ जणांच्या मुलाखती घेतल्या त्याचे विवरण खालील तक्त्यात दिले आहे.\nमुलाखत कलमपाडा नवनाथ पाटिलपाडा ठाकूरपाडा जांभूळपाडा सुतारपाडा\n१. कुटुंब प्रमुख ३२ ३८ २६ ४९ १५ ३७ २००\n२. वैद्य/डॉक्टर ०३ ०४ ०४ ०७ ०७ -- २५\nएकूण ३५ ४२ ३० ५६ २२ ३७ २२५\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/literature/short-stories", "date_download": "2018-04-20T16:25:14Z", "digest": "sha1:XKPZNNF3SP3JJ3SMR3QH3LQUIEDNFKGT", "length": 15242, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन साहित्य लघु कथा पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nरॉय किणीकर, जोसेफ क्रमगोल्ड\nरेखा इनामदार साने, वंदना बोकील कुलकर्णी\nकाश्मीर एक शापित नंदनवन\nडॉ. श नू पठाण\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://bhagyashreee.blogspot.com/2012/03/", "date_download": "2018-04-20T15:58:20Z", "digest": "sha1:S74JWBYXXAJ5KBNIADGEMEFVHD6Z3ONL", "length": 21904, "nlines": 315, "source_domain": "bhagyashreee.blogspot.com", "title": "माझे विचार...", "raw_content": "\nविचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...\nया ब्लॉगची सदस्यता घ्या\nMarch, 2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\n किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून दिवस कशाला मोजू साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अ‍ॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले..\n एक न्युज तुम्हा वाचकांबरोबर वाटायची आहे..\nमी आई झाले.. :O\nकसलं भारदस्त वाटतंय असं लिहायला\nस्वत:लाच पिल्लू समजणार्‍या मला, आता आई म्हणणारे एक पिल्लू आले आहे\nते साखरेचे पोते अलिकडेच २ महिन्याचे झाले. व मला थोडासा वेळ मिळू लागला. म्हटले काही नाही तर ब्लॉगवर पुनश्च हरि ओम, पुन्हा एकदा करावे.. मी आत्ताच्या घडीला तरी नीलरंगी रंगले आहे. गंमती जमती होत असतात रोज उदा: पूर्वी नील रशियन परिकथेत गोष्ट आहे तसा एकच डोळा बंद करून झोपायचा उदा: पूर्वी नील रशियन परिकथेत गोष्ट आहे तसा एकच डोळा बंद करून झोपायचा\nकिंवा नीलला कपाळाला आठी , डोळे मोठे व चेहर्‍यावर हसू असा धमाल चेहरा करतो येतो करून बघा आठी व डोळे मोठे जमतच नाहीत. हसू तर लांबची गोष्ट\nशीशी करताना तर स्वारी अफाट खुष असते त्यामुळे बाळ व्हायच्या आधी ज्या गोष्टीचे जरा टेन्शनच होते ती एकदम मस्त होऊन गेलीय त्यामुळे बाळ व्हायच्या आधी ज्या गोष्टीचे जरा टेन्शनच होते ती एकदम मस्त होऊन गेलीय हीही.. मी तर आता त्या मोमेंटची वाट पाहात असत…\n४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या :\nगाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्‍याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते)\n५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून\nवाळलेली लाल मिरची कुटून\nकुकींग वाईन (असल्यास.) (माझ्याकडे नव्हती. मी थोडे व्हिनेगर+लिंबूरस घातले) सॉस :\nसोया सॉस ( मी कमी सॉल्ट असलेला आणि अगदी थोडाच वापरला)\nथाई स्वीट चिली सॉस\n१/३ कप व्हेजिटेबल अथवा चिकन स्टॉक.\nचमचाभर मध ( गोड हवं असल्यास अजुन जास्त घेता येईल)\n२ टीस्पून कॉर्न स्टार्च ४ टेबलस्पून पाण्यात मिसळून. (कॉर्न स्टार्च नसल्यास ४ टीस्पून मैदा घ्यावा)\nक्रमवार पाककृती: स्टर फ्राय सॉसः\nसर्वप्रथम कढईमध्ये व्हेज /चिकन स्टॉक , चिली सॉस, सॉय सॉस, थाई चिली सॉस, लिंबाचा रस घालून गरम करत ठेवणे. रेसीपीमध्ये मधही यातच घेण्यास सांगितला होता. परंतू तो गरम करू नये असे वाचले असल्याने मी तो शेवटीच मिक्स केला.\nया वरील मिश्रणाला थोडी उकळी आली की ठेचलेला लसूण व पाण्यात मिक्स केलेल…\nशनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा ही काय नाहीतर ती काय..\n१०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला. अरे पण हे काय जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला. अरे पण हे काय असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही.\nनावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना\nआज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल. आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल. आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे\nमला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्‍याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा ) व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पायाचा सा…\n मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये \nगेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली\nआत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता. तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.झाकीर हुसेनचे संगीत खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता. तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.झाकीर हुसेनचे संगीत झाकीर हुसेन ऍक्टर म्हणूनझाकीर हुसेन ऍक्टर म्हणून एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता.\nव नंतर अगणित वेळा पाहिला. कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व्यसनाने वाट लागलेली…\nसर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ही आमची गुढी प्रचंड उत्सुकता होती, कारण या वेळेच्या भारतवारी मध्ये खास काठी घेऊन आले होते. मागच्या वर्षी केवळ काठीमुळे अडून राहीले होते\nतो पाऊस.. हा पाऊस..\nफार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.\nरस्त्यावर तळी साचली आहेत..\nजस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही\nमाझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining हे स्टेटस पाहीले असेल हे स्टेटस पाहीले असेल \nआता त्यात काय नाचायचे पण होतो आनंद.. लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो\nवाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता.. पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा…\nथाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Tha...\nतो पाऊस.. हा पाऊस..\nटॅग – टॅग ..\nअमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस \nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट\nमराठी Blogs, ब्लॉगविश्व इत्यादी\nVonage World – एक सुवर्णसंधी \nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल .....\nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी १\nअमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..\nअमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे \nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nये जो देस है तेरा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nmerrymoonmary द्वारे थीम इमेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-chinchwad-news-strike-against-koregao-bheema-incident-90372", "date_download": "2018-04-20T17:01:55Z", "digest": "sha1:WPSO5XXXDNFP55YHJU7DWDXW43KT5GVT", "length": 11773, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news chinchwad news strike against koregao bheema incident चिंचवडमध्ये नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने बंद | eSakal", "raw_content": "\nचिंचवडमध्ये नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने बंद\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nवाल्हेकरवाडी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत चिंचवड, वाल्हेकरवाडी व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून संपला पाठींबा दिला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी महापुरुषांच्या नावाने जयघोष केला. यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी दलित बांधवानी जमून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा नागसेन वस्ती बिजलीनगर येथून वाल्हेकरवाडीतील रत्न्संभव बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आला. सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता.\nवाल्हेकरवाडी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत चिंचवड, वाल्हेकरवाडी व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून संपला पाठींबा दिला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी महापुरुषांच्या नावाने जयघोष केला. यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी दलित बांधवानी जमून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा नागसेन वस्ती बिजलीनगर येथून वाल्हेकरवाडीतील रत्न्संभव बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आला. सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:39:34Z", "digest": "sha1:QES2RXIIMYINLTYKKITYFBC34XM7I5UE", "length": 4359, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रँक जॅक फ्लेचर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nफ्रँक जॅक फ्लेचर (एप्रिल २९, इ.स. १८८५ - एप्रिल २५, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईत याने दोस्त राष्ट्रांच्या आरमाराचे नेतृत्त्व केले.\nफ्लेचरचा काका फ्रँक फ्रायडे फ्लेचर हासुद्धा अमेरिकेचा दर्यासारंग होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८८५ मधील जन्म\nइ.स. १९७३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-20T16:39:40Z", "digest": "sha1:M7VZYUXXMP3C6CB4X6F72TKQZWWB3LIW", "length": 5576, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मरे बेनेट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑक्टोबर ६, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/category/literature/", "date_download": "2018-04-20T16:04:03Z", "digest": "sha1:LXHS6T4XKFOXJFELAWJSP4VISMMYKF67", "length": 4447, "nlines": 49, "source_domain": "rightangles.in", "title": "साहित्य | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nब्रेख्त : मार्क्सवादाचा कलात्मक अविष्कार\nगेल्या शतकभरात ‘कला आणि सामाजिक जाणीव’ हा मराठी साहित्य- कला चर्चाविश्वाचा लाडका विषय राहिला आहे. त्यातून लाजेकाजेस्तव म्हणा किंवा अपराधभावनेने म्हणा- मध्यमवर्गीय प्रस्थापित साहित्य-कला समीक्षेला ‘कलेसाठी कला’ अशी…\n“पाऊलखुणा”कारांचे पेशवा गुणगान अभियान\nभीमा-कोरेगाव लढाईतील पेशव्यांच्या गनिमी काव्याला सोनेरी पान म्हणून गोंजारत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा काही संशोधक वीरांचा प्रयास हा वरकरणी कौतुकास्पद वाटला तरी यामागची जातीय मानसिकता लपून राहात नाही.जॉन वायलीच्या बखरवजा…\nअपूर्ण राहिलेली सांस्कृतिक क्रांती\nBy काॅ.भीमराव बनसोड January 5, 2018\nपुन्हा एकदा माझ्या हाती निर्मला स्वामी-गावणेकर यांनी अनुवादित केलेले ‘लाइफ अॅण्ड डेथ इन शांघाय’ हे पुस्तक लागले. ते मी वाचत राहावे असे वाटल्याने सातत्य राखून वाचून काढले. पुन्हा…\nअमेरिकन जनता आपल्याहून सरस का ठरते\n`टू किल अ मॉकिंग बर्ड’ ही हार्पर ली यांची कादंबरी काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे जगातिल सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे. अगदी बायबलपेक्षही याच्या जास्त प्रती प्रकाशित झाल्या आहेत. सुमारे…\nजागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/udayan-maharaj-the-prince/", "date_download": "2018-04-20T16:23:19Z", "digest": "sha1:3QFHFNBKOIMQO256HXUERCMGE3ECQHII", "length": 50924, "nlines": 264, "source_domain": "khaasre.com", "title": "उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA..", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nPrevious Article२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण…Next Articleजि. प. शाळा ते IRS अधिकारी…\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nतीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \n१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.\n२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.\n३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.\n४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.\n५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.\n६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.\n७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.\n८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.\n९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.\n१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.\n११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.\n१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.\n१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.\n१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.\n१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.\n१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.\n१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.\n१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.\n१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.\n२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.\n२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.\nअसा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास.. 1\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास\n‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.\nखाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले..\nलातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या मुंबई पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नांगरे-पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.\nविश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.\nदहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.\nया थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.\nसामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.\nपारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.\nतरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:40:39Z", "digest": "sha1:XLDWNO3XNU63NMI3SLTK3JSG4HEI2OLY", "length": 5013, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इयोन क्रेंगा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइयोन क्रेंगा तथा निका अल लुइ स्टेफान आ पेत्रेई, इयोन तोर्कालाउ किंवा आयोन स्टेफानेस्कु (१ मार्च १८३७ - ३१ डिसेंबर १८८९) हा एक मोल्डाव्हियन व नंतर रोमेनियन लेखक होता. त्याने शाळामास्तर म्हणूनही काम केले.१९व्या शतकातील रोमेनियन साहित्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले व तो त्यासाठी प्रसिद्ध होता.तो त्याच्या 'चाईल्डहूड मेमोरिज' (बालपणाच्या आठवणी) या लेखनासाठी प्रामुख्याने ओळखल्या जातो. यासमवेतच त्याने लघुकथा व इतर लेखनही केले. त्याचे बालसाहित्यात, परिकथा व काल्पनिक कथांमध्येही बरेच योगदान होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८३७ मधील जन्म\nइ.स. १८८९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१७ रोजी १०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/sharad-pawar-may-become-next-prime-minister-praful-patel/", "date_download": "2018-04-20T16:28:37Z", "digest": "sha1:MPLKOQW67MDBDISIFIUFVC2MAQNQHZ4S", "length": 30812, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sharad Pawar May Become The Next Prime Minister - Praful Patel | शरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nशरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल\nसध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.\nकर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.\nकर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसांची चिंतन बैठक सुरू आहे. पक्षाचे ध्येयधोरण आणि आगामी वाटचालीचा ऊहापोह माजी मंत्री पटेल यांनी केला. देशाच्या राजकारणात शरद पवार या नावाचा दबदबा आहे. पंतप्रधानही त्यांच्या शब्दाला मान देतात. मात्र सध्या राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकांकडून सुरू आहेत. अशा लोकांबद्दल पवारसाहेब सौम्य भूमिका घेतात. हा सौम्यपणा सोडून त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, अशी विनंती पटेल यांनी केली.\nकाँग्रेसबरोबर आपले शत्रुत्व नाही; पण सध्या हे संबंध ‘कभी खुशी...कभी गम’ असे आहेत. आपल्याला खुल्या मनाने काम करावे लागेल. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर १२५ ते १४० जागांवर विजय मिळाला असता. विधानसभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात, पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यानुसार कामही झाले पाहिजे, असे खडे बोलही पटेल यांनी सुनावले. सत्ताधारी केवळ योजनांच्या घोषणा करीत आहेत, मात्र त्या कधी पूर्ण होतील, याबाबत कधी\n२०२२ तर कधी २०२४ अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र आता जनतेला खरे काय आणि खोटे काय ते कळले आहे, त्यामुळे देशातील वातावरण बदलत आहे आणि त्यानुसार पक्षाने आपल्या कार्याची दिशा ठरवावी, यासाठी ही चिंतन बैठक असल्याचे पटेल यांनी नमूद केले.\nकर्जत तालुक्यातील खांडपे येथील ‘रॅडिसन ब्लू’मध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\nचिंतन बैठकीत डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरु ण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, सचिन अहीर आदी उपस्थित होते.\nस्थानिक आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे पुष्पगुच्छ व चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले. देशातील दुसरी कृषी क्र ांती शरद पवार यांनी केली. त्यामुळे आता आयातीऐवजी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.\nयामध्ये पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. कधीही निवडणुका येवोत, आम्ही तयार आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीप्रसंगी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सोबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी.\nबैठकीत अर्थतज्ज्ञ सी. ए. अजित जोशी यांनी ‘देशासमोरील आणि राज्यासमोरील आर्थिक आव्हाने आणि त्याचे परिणाम’ या विषयावर व्याख्यान दिले. बैठकीला माजी मंत्री गणेश नाईक, आ. शशिकांत शिंदे, आ.अनिल तटकरे, आ. आनंद परांजपे, संजीव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, मुंबई शहर युवती सेलच्या अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n2019 मध्ये शरद पवार होऊ शकतात पंतप्रधान, देशाच्या राजकारणात आजही पवार नावाचा दबदबा\n‘...तर शरद पवारांबद्दलची विश्वासार्हता कमी होईल’\nपाणी धोरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित पाठपुरावा करणार - शरद पवार\nशोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच विविध क्षेत्रात बाबासाहेबांचे मोलाचे कार्य - शरद पवार\nशरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क\nअंगावरून साप गेला आणि मी मुख्यमंत्री झालो, शरद पवारांनी सांगितली दिलखुलास आठवण\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nकाँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nरिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/arun-jaitley/news/", "date_download": "2018-04-20T16:29:13Z", "digest": "sha1:JLAV34P5U5LJOUYU6MONBJEPC3PAUEGJ", "length": 27283, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Arun Jaitley News| Latest Arun Jaitley News in Marathi | Arun Jaitley Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरन्यायाधीशांवर महाभियोग आणण्यावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ... Read More\nArun JaitleyGovernmentBJPcongressSupreme Courtअरूण जेटलीसरकारभाजपाकाँग्रेससर्वोच्च न्यायालय\nअचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोटांच्या तुटवड्यावर जेटलींचं स्पष्टीकरण ... Read More\nराज्यसभा सदस्यत्वाची जेटलींनी घेतली शपथ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले. ... Read More\nArun JaitleyRajya Sabhanewsअरूण जेटलीराज्यसभाबातम्या\nजेटलींवर शस्त्रक्रिया काही दिवसांनी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमूत्रपिंडाच्या आजारामुळे शुक्रवारी अखिल भारतीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सोमवारी डायलेसिस करण्यात आले. ... Read More\nअरुण जेटली सार्वजनिक बैठकांपासून दूर , संसर्ग टाळणे गरजेचे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअर्थमंत्री अरुण जेटली मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ... Read More\nअरुण जेटलींवर होणार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ... Read More\nप्रत्यक्ष कर वसुली १८ टक्क्यांनी वाढली - जेटली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ... Read More\nराज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुम ... Read More\nजेटलींनी केजरीवालांना माफ केलं, मागे घेणार मानहानीचा खटला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. ... Read More\nArvind KejriwalArun Jaitleyअरविंद केजरीवालअरूण जेटली\nExclusive: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग, २०१९ साठी मोदींची मोर्चेबांधणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देऊन, त्यांचे खिसे फुगवून त्यांना खिशात टाकायची खेळी पंतप्रधान मोदी करणार आहेत. ... Read More\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:19:56Z", "digest": "sha1:D4JFP7T5HKKJGK6I3DZ5ODM55M4RQX3M", "length": 6047, "nlines": 59, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित ज्ञानेश्वरी/अध्याय पांचवा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/non-fiction/autobiography-and-biography/sportsman", "date_download": "2018-04-20T16:43:31Z", "digest": "sha1:LE4I4CEXIPQRWEEASHFS76CHBT755OOK", "length": 14628, "nlines": 381, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन आत्मचरित्र आणि चरित्र खेळाडू पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nसचिनच्या 100 शतकांची कथा\nसोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते\nप्लेइंग इट माय वे\nअनंत मनोहर, वैभव पुरंदरे\nशेर्पा तेनसिंग, श्रीपाद केळकर\nडॉ. श्रीराम गीत, आशिष पेंडसे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/shankar-ann-pujari/", "date_download": "2018-04-20T15:59:47Z", "digest": "sha1:EZLLERYP4X66R6FJDSMOVTQ6WNA7I3AD", "length": 67448, "nlines": 237, "source_domain": "khaasre.com", "title": "कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी शंकरअण्णा पुजारी ! संपत मोरे यांचा रिपोर्ताज", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nदक्षिण महाराष्ट्रातील बलवडीचं कुस्ती मैदान. या मैदानात शेकडो लोक आलेले. आखाड्यात काटा कुस्त्या सुरू होत्या. आखाड्यात एखादी चटकदार कुस्ती झाली की ‘है’ असा सामुदायिक आवाज यायचा. याच वातावरणात माइकवरून एक खणखणीत आवाज आला, ‘अहो, डॉक्टरला सांगावं लागतं, मी डॉक्टर हाय; इंजिनिअरला सांगावं लागतं, मी इंजिनिअर हाय; पण पैलवानाला सांगावं लागत नाही की, मी पैलवान हाय. पैलवान दिसला की, माणसंचं म्हणत्याती हा पैलवान हाय बरं का. म्हणून सांगतो, घरातलं दूध डेअरीला घालू नका. पोराला पाजा. आणि घरात एक तरी पैलवान तयार करा. अहो, कोण इचारतू तुमचा बँक बॅलन्स कोण इचारतू तुमची इस्टेट कोण इचारतू तुमची इस्टेट पण आपलं तालमीत जाणारं पोरगं गावात चालत निघालं तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा पण आपलं तालमीत जाणारं पोरगं गावात चालत निघालं तरी माणसं इचारत्याती हा पोरगा कुणाचा एवढं इचारलं तरी आपलं पैसं फिटलं. अहो, तुम्हाला नसल पैलवान होता आलं, पण तुम्ही पैलवानाचं बाप व्हा’ हे निवेदन थांबलं आणि शांत मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला.\nकाहींनी निवेदकावर खूश होत शिट्या मारल्या. लोकांच्या अंत:करणाला भिडणारं निवेदन करणारे ते निवेदक कोण होते त्यांचं नाव, शंकर पुजारी त्यांचं नाव, शंकर पुजारी त्यांचा हाच खणखणीत आवाज गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या कुस्तीचा आवाज झाला आहे. या आवाजानं शेकडो पैलवानांना प्रोत्साहन दिलं आहे. अनेकांना कुस्तीचं वेड लावलं आहे. मला पैलवान होता आलं नाही; पण माझ्या पोराला पैलवान केलं ते शंकरअण्णाची कॉमेंट्री ऐकूनच, असं सांगणारे पैलवानाचे वडील भेटतात, तेव्हा अण्णांच्या निवेदनकौशल्याचा प्रत्यय येतो. शंकर पुजारींचा आवाज तीन-चार दशकांपासून वाडीवस्तीवरच्या लहान कुस्ती मैदानांपासून ते महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यापर्यंतच्या कुस्ती मैदानात लोकांच्या कानावर पडतो आहे. अभ्यासपूर्ण आणि उत्कंठापूर्ण निवेदनामुळे कुस्तीला आखाड्यात जिवंत करणाऱ्या एका कुस्तीवेड्या अवलियाची ही कथा आहे.शिरोळ तालुक्यातील कोथळी हे शंकर पुजारी यांचं गाव. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या पुजारींना मोठा पैलवान व्हायचं होतं. त्यांच्या वडिलांची तशी इच्छाच होती. म्हणूनच वडिलांनी पुजारींना पैलवानकीसाठी सांगलीला तालमीत पाठवलं. तिथे त्यांचा सराव सुरू झाला. शंकर हळूहळू मल्लविद्या आत्मसात करू लागले. त्यांची खेळातली प्रगती लक्षणीय होती.\nसंपत मोरे यांच्या सोबत शंकर अण्णा पुजारी..\nते कुस्तीतल्या सरावात बरेच पुढे गेले. इतके की, त्यांची एक कुस्ती हरिश्चंद्र बिराजदार यांच्याबरोबर जोडली होती, आणि ती बरोबरीत सोडवली गेली. त्या वेळच्या कुस्तीरसिकांत शंकर पुजारींच्या नावाची उगवता मोठा पैलवान म्हणून चर्चा व्हायला लागली. पण १९७२चा दुष्काळ अनेकांच्या आयुष्याचा काळ ठरला. या दुष्काळाने भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला. पुजारींच्या पैलवान होण्याच्या मार्गातही हा दुष्काळ मोठा अडथळा ठरला. त्यांना कुस्ती सोडून घरी जावे लागले. दुष्काळामुळे कुस्ती सुटली असली, तरी त्यांच्या डोक्यातून कुस्ती काही केल्या जात नव्हती. काय करावं, हे पुजारींना सुचत नव्हतं. त्या वेळी क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवर लागायची… तेव्हा कोथळी गावात रेडिओ पोहोचला होता. गावातील एकमेव रेडिओ हा ग्रामपंचायतीत असायचा. असंच एकदा या रेडिओवरील क्रिकेटची कॉमेंट्री ऐकताना, त्यांच्या मनात विचार चमकून गेला… मरगळलेल्या कुस्तीला अशाच आधुनिक कॉमेंट्रीची जोड दिली तर आणि मग त्यासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. लहानपणापासून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे ग्रंथ वाचलेले. कीर्तन, भारुडे, पोवाडे ऐकलेले. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व आलेलं. क्रिकेटसारखी कुस्तीची कॉमेंट्री करायचा विचार पक्का झाल्यावर पुजारींनी कुस्तीचा इतिहास, कुस्तीवरचे ग्रंथ अभ्यासले. पुराणकाळापासून ते आधुनिक कुस्तीचा इतिहास मुखोद‌्गत केला. खेळणारा पैलवान, त्याची खासियत, त्याचा वस्ताद, त्याच्या वस्तादाचा वस्ताद, त्याचं घराणं, त्याचं गावं, त्या गावाचं वैशिष्ट्य, त्याची कोणत्या डावावर कमांड आहे आदी सर्व बाबींची अचूक माहिती मिळवून शंकर पुजारी यांच्या प्रत्यक्ष कॉमेंट्रीला सुरुवात झाली…\nसुरुवातीलाच सांगलीच्या मैदानात लोकांनी त्यांना कॉमेंट्री ऐकून डोक्यावर घेतले. त्या दिवसापासून ते गावोगावच्या कुस्ती मैदानाला जाऊ लागले. अल्पावधीतच ही कॉमेंट्री कुस्तीशौकिनांना आवडायला लागली. कुस्तीच्या मैदानात जिवंतपणा आला. कुस्तीला आलेली मरगळ दूर झाली आणि तेव्हापासून आजतागायत शंकर पुजारी यांचा आवाज कुस्तीचा स्टार प्रचारक बनला आहे. कुस्तीसाठी उतारवयातही पायाला भिंगरी बांधून त्यांचा प्रवास सुरू आहे. कुस्तीच्या कॉमेंट्रीसाठी एक फोन केला, की पुजारी हजर ते मैदानात हजर झाले की, माईक हातात घेऊन सुरुवात करतात. ‘चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान लोक म्हणत्याती पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतुया. खरं हाय, पण एक गुडघ्यात असतुया तर दुसरा डोक्यात. हे ध्येनात घ्या. पैलवान पेशाची थट्टा करू नका’ असं म्हणतच ते मैदानावर एक नजर टाकतात.\nमैदानात उपस्थित असणाऱ्या मल्लांची नावं, त्यांची कामगिरी सांगायला ते सुरुवात करतात… काहींना आखाड्यात बोलावतात. पुजारींच्या हातात माईक आला, की आखाड्यात शांतता पसरते. कुस्तीशौकीन कानात जीव आणून त्यांची कॉमेंट्री ऐकू लागतात… मैदान जसं जसं भरत जातं, तशी पुजारींच्या आवाजाला धार येते. मोठ्या कुस्त्या लागतात मैदानात रंग भरतो. मध्येच ‘१९७८चे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम मैदानात येताहेत. महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे मैदानात येत आहेत. महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे आलेत.’ असा पुकारा होतो. कुस्तीशौकिनांच्या नजरा या मल्लांचा शोध घेतात. पुजारी मोठ्याने म्हणतात, अप्पा कदम आखाड्यात या. मग अप्पा कदम आखाड्यात आल्यावर पुजारींचा आवाज येतो, ‘अप्पा कदम. १९७८चे महाराष्ट्र केसरी अप्पा कदम जिस नाम में है दम, वह कदम अप्पा कदम’ पुजारींची ही कोटी ऐकल्यावर टाळ्यांच्या गजरात अप्पांचं स्वागत होतं.\nत्यानंतर काही वेळातच पुजारींचा पुकार ऐकायला येतो… ‘याच समयाला भारतमातेच्या कीर्तीमुकुटातील मानाचा तुरा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर येत आहेत; या उत्साही तरुणाचं वय आहे अवघं ८१, ८१ वर्षांचा तरुण, आंधळकर आखाड्यात या’ आणि मग हिंदकेसरी आखाड्यात येतात. प्रसिद्ध हलगीवादक हलगी वाजवतात. जनताजनार्दनाला अभिवादन करत मंद पावलं टाकत आंधळकर चालतात. कुस्ती शौकीन टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात; कुस्त्या सुरू असतात. दरम्यान पुजारींची कॉमेंट्री. पुन्हा आवाज येतो, ‘आला आला गणेश मानुगडे आला. एक कुस्तीवेडा. याच पोरानं कुस्ती ५२ देशांत पोहोचवली. गावोगावच्या बंद तालमी सुरू केल्या. कुस्तीच्या वेडासाठी भटकणारा अवलिया गणेश. त्याचं स्वागत करा.’\nकुस्तीचं मैदान जसं रंगात येतं, तसा पुजारींचा आवाज वाढतो. शाब्दिक कोट्या सुरू होतात. ‘नुस्तं कुस्ती बघायला येऊ नका. घरात एक तरी पैलवान तयार करा. गल्लीगल्लीत रावण वाढलेत. घराघरांत राम तयार करा…’ असं आवाहन ते करतात. ‘महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर आलेत, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आलेत, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आलेत, कौतुक करावं असा कौतुक डाफळे आलाय. अहो, या कुस्तीपंढरीत मल्लांची मांदियाळी आलीय. सर्वांचं स्वागत’\nकॉमेंट्री करताना शंकर पुजारी कुस्तीच्या इतिहासाचा समर्थपणे आढावा घेतात. त्यांना कधी हरिश्चंद्र बिराजदार विरुद्ध सतपालची ऐतिहासिक कुस्ती आठवते, तर कधी मारुती माने विरुद्ध नाथा पारगावकर यांची कुस्ती आठवते. या ऐतिहासिक कुस्तीची माहिती वर्णनात्मक शैलीत दिल्यामुळे मैदानातील वातावरण कुस्तीमय होऊन जाते… आणि पुजारींची लाइव्ह कॉमेंट्री सर्वांनाच वेड लावते. ते फक्त मोठ्या पैलवानांचं कौतुक करत नाहीत, तर अगदी गरिबीतून आलेल्या पैलवानांकडेही त्यांचं लक्ष असतं. ‘अरे तो नाथा पवार कुठं हाय दशरथ-श्रीपती, कर्णवर भावाभावांची जोडी कुठं हाय दशरथ-श्रीपती, कर्णवर भावाभावांची जोडी कुठं हाय\nनाथा पवार नंदीवाले समाजातील शाळकरी मुलगा. खानापूर तालुक्यातील बेणापूर इथे सराव करतो. ढाक या डावावर त्याची कमांड आहे. भविष्यात तो चांगला पैलवान होऊ शकतो. त्याच्यातील गुणवत्ता पुजारींनी हेरली आहे. त्यामुळे ते नाथाने कुस्ती केली, की त्याची माहिती सांगतात. ‘आवं हे नकट्या नाकाचं पोरगं. कुस्तीतला उगवता तारा हाय. एका नंदिवाल्याचं पोर हाय, करा जरा कौतुक त्या पोराचं. गरिबाचं पोरगं हाय.’ पुजारी अण्णांनी असं सांगताच, अनेक शौकीन नाथाला बक्षीस देतात. शंकर पुजारी यांच्या याच मैदानी आवाजाने असे अनेक पैलवान घडले आहेत. घडत आहेत. अनेक गावात तालमी उभ्या राहिल्या आहेत. पुजारींच्या या कामाची दखल घेत, त्यांना सेवाभावी संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. पण महाराष्ट्र सरकारकडून मात्र हा कुस्तीचा चालताबोलता संदर्भग्रंथ आणि स्टारप्रचारक उपेक्षित राहिला आहे. शासकीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्यांना कसलीही खंत वाटत नाही. पुरस्कार मागून कशाला घ्यायचा असं ते उलट विचारतात. ‘जनता जनार्दनाच्या प्रेमाचा पुरस्कार मला मिळाला आहे.’ असंही पुढे ते नमूद करतात.\nआज कुठेही कुस्ती मैदान असलं की शौकीन पहिला प्रश्न विचारतात, ‘कॉमेंट्रीला शंकर पुजारी येणार आहेत काय’ खरं तर हाच त्यांना मिळालेला समाजमान्य पुरस्कार असतो. कुस्तीचं मैदान संपलं की, पैलवानांची पुजारी अण्णांना भेटायला गर्दी होते. शौकीनही येऊन भेटतात. पाया पडतात. त्यांना आपल्या गावी भेटायला या, असं आमंत्रण देतात. त्या गर्दीतही शिवलिंग शिखरेसारखा तरुण त्यांचा हात हातात घेत सांगतो, अण्णा तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्याभोवती माणसांचा गराडा पडलेला असतो. खूप प्रेम करतात लोक त्यांच्यावर. कुस्तीला आधुनिक कॉमेंट्रीची जोड देऊन कुस्तीतली मरगळ दूर केलेले पुजारी अण्णा. पण बायपासची शस्त्रक्रिया झाली असूनही अण्णा घरी बसत नाहीत. आजारपणावर मात करत कुस्तीसाठी मैलोनमैल प्रवास करतात. ते पहाटे घर सोडतात आणि रात्री उशिरा घरी येतात. दिवसभर अनेकांचं कौतुक करतात. नव्या पैलवानांना प्रेरणा देतात. जुन्या पैलवानांचा इतिहास जागवत त्यांचा सन्मान करतात. हमालाचा मुलगा असणाऱ्या हांडे पैलवानासाठी, तर कधी दशरथसाठी कुस्तीशौकिनांना मदतीची हाक देतात. गरीब पैलवानाच्या खुराकासाठी आपल्या निवेदनातून जनता जनार्दनापुढे पदर पसरतात. अण्णा सगळ्यांची काळजी करतात. झाकलं माणिक समोर आणतात. कुस्तीनं त्यांना वेडं केलंय. या वेडापायीच ते राज्यभर दौडत असतात.\nसाभार: संपत मोरे ९४२२७४२९२५ (sampatmore21@gmail.com)\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nकुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nएक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट… - November 19, 2017\nकुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का\nPrevious Articleभारतीय संविधान कधी, कसे आणि कुणी लिहले Next Articleकेळ्याच्या सालीचे असेही फायदे.. वाचल्यावर साल कधीच फेकणार नाही\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nएक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट… - November 19, 2017\nकुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nएक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट… - November 19, 2017\nकुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास.. 1\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास\n‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.\nखाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले..\nलातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या मुंबई पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नांगरे-पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.\nविश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.\nदहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.\nया थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.\nसामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.\nपारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.\nतरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं\nसंपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी\nएक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट… - November 19, 2017\nकुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/11/29-30-november.html", "date_download": "2018-04-20T16:35:27Z", "digest": "sha1:4WK6UCPXQM365AG77BKHH4VQ3IUVRPV2", "length": 14498, "nlines": 159, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nपुढील तीन महिन्यांत देशात सुमारे ३५ ठिकाणी लष्कर भरती मोहीम राबविली जाणार असून, त्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.\nडिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात भरती मोहीम नसली, तरी नवीन वर्षात नागपूर आणि कोल्हापूर येथे भरती होणार आहे. त्यामुळे लष्कर भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्यांना आत्तापासून तयारी करण्यास वाव आहे.\nजानेवारीमध्ये नागपूरला ६ ते २५ तारखेला भरती आहे. नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, बडनेरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती आहे.\n३ फेब्रुवारीला कोल्हापूरला भरती आहे. त्यात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र, गोव्यातील युवकांना प्राधान्य असेल.\nयुरोपिअन युनियन व तुर्कस्तानदरम्यान करार\nपश्चिम आशियामधून मोठ्या संख्येने युरोपकडे येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंदर्भात युरोपिअन युनियन (इयु) व तुर्कस्तानमध्ये करार झाला आहे.\n२८ सदस्यीय इयुच्या प्रतिनिधींनी तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमद दावुतोग्लु यांची भेट घेऊन या करारावर शिकामोर्तब केले.\nया करारान्वये इयुने तुर्कस्तानला ३.२ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले असून त्याबदल्यात या निर्वासितांची सोय तुर्कस्तान करणार आहे.\nतुर्कस्तानमध्ये सध्या सुमारे २० लाखांपेक्षा जास्त निर्वासित राहून जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.\nहवाई दलात फायटर पायलट म्हणून महिलांना सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयापाठोपाठ आता जगातील सर्वात मोठी सीमा सुरक्षा दल म्हणून ओळख असलेल्या ‘बीएसएफ’मध्येही प्रथमच महिलांना अधिकारी म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे.\nपुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील टेकनपूरच्या ‘बीएसएफ’ अॅकॅडमीत महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होणार आहे.\n‘बीएसएफ’च्या स्थापनेला १ डिसेंबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असून, सुवर्णमहोत्सवी वर्षात महिलांना दलात सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक वैद्यकीय आणि कारकुनीसारखी केवळ नोकरी न करता महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्यासाठी संधी दिली जाणार आहे.\n२००८ मध्ये बीएसएफमध्ये ७४५ महिलांना हवालदार (कॉन्स्टेबल) म्हणून भरती करण्यात आले होते. आता मात्र अधिकारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे.\nजपानकडून मेट्रोला साडेपाच हजार कोटी\nजपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी ५४७९ कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.\nदोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला १०६९ कोटी तर अहमदाबाद मेट्रोला ४४१० कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे.\nकाही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे.\nभारत पायाभूत प्रकल्पांना जास्त महत्त्व देत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा प्रमुख भाग असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व हरितगृह वायूंचे प्रमाणही कमी होईल. भारत आर्थिक साधनांसाठी द्विपक्षीय व बहुराष्ट्रीय मदतही घेत आहे.\nफ्युरीला विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद\nवाल्दीमिर क्लित्सच्कोचा अकरा वर्षांचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत काढताना ब्रिटनच्या २७ वर्षीय टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले. २७ वर्षीय फ्युरीने डसेल्डरेफ येथे झालेल्या सामन्यात ११५-११२, ११५-११२ व ११६-१११ अशी बाजी मारली.\nडब्लूबीए, आयबीएफ, आयबीओ आणि डब्लूबीओ अशी जेतेपदे नावावर असलेल्या युक्रेनच्या क्लित्सच्कोचा हा २००४ नंतरचा पहिला पराभव आहे.\nपी. व्ही. सिंधू मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची विजेती\nभारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nसलग तिसऱ्यांदा तिने या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावण्याची किमया साधली आहे. अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव केला.\nयापूर्वी सिंधूने २०१३ व २०१४ साली मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाची कमाई केली होती.\nमकाऊ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद\nजागतिक स्पर्धेत ब्राँझ जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rasta-roko-andolan-in-jalna-by-9-villages/", "date_download": "2018-04-20T16:42:59Z", "digest": "sha1:L56KDNNFIN6A6F3EQKMJDFUJCHUT3B46", "length": 16081, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "रस्त्यसाठी ९ गावांचा रास्ता रोको, जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभारावर संताप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nरस्त्यसाठी ९ गावांचा रास्ता रोको, जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभारावर संताप\nघनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगगाव या १५ किलोमीटर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. या पंधरा किमी रस्त्याचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही भाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कार्यकक्षेत येतो. रस्त्याचा खराब झालेला बहुतांश भाग हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे कळते.\nगुरुवारी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी तीर्थपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीर्थपुरी, मुरमा, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बानेगाव, सौन्दलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव या गावातील सर्वपक्षीय नागरिकांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. मंडळ अधिकारी एस.टी. साळवे, एपीआय अनिल परजने यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्रीकृष्ण बोबडे, नकुल भालेकर, तुषार पवार, गणेश पघळ, सतीश उढाण, टिल्लूपंत उढाण, सुधाकर बोबडे, भीमराव गवते, सतीश बुरांडे, भगवान आरबड हे उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपरभणी मनपा सफाई कामगाराबाबत उदासीन,कर्मचारी संघटनांचा आरोप\nपुढीलमहिला दिन विशेष-खेळ फक्त नोकरी मिळवण्यासाठी खेळू नका \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ongc-helicopter-accident/articleshow/62491060.cms", "date_download": "2018-04-20T16:12:58Z", "digest": "sha1:B6J5HIV5JSBGKOV6PSHLTGVXPSW6AUFT", "length": 25190, "nlines": 251, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ongc helicopter accident | ‘ओएनजीसी’चे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त; ५ मृत्युमुखी - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\n‘ओएनजीसी’चे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त; ५ मृत्युमुखी\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nजुहू विमानतळावरून तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) सात कर्मचाऱ्यांना घेऊन अरबी समुद्रातील तेल केंद्राकडे निघालेले पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी अपघातग्रस्त होऊन पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. डहाणूजवळील समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले असून, पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित दोन कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.\nडॉफिन (व्हीटी पीडब्ल्यूए) हेलिकॉप्टरने सकाळी साडेदहा वाजता गुजरातच्या समुद्रातील ‘ओएनजीसी’च्या तेल केंद्राकडे उड्डाण केले. १० वाजून ५८ मिनिटांनी ते हेलिपॅडवर उतरणे अपेक्षित होते. मात्र उड्डाणानंतर हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर तटरक्षक दलाने शोधकार्य सुरू केले असता, मुंबईपासून ५५ किमी दूर डहाणूजवळ हेलिकॉप्टरचे अवशेष व मृतदेह हाती लागले. पंकज गर्ग, व्ही. के. बाबू, जोश अँथनी, पी. श्रीनिवासन आणि सर्वानन हे पाच जण ‘ओएनजीसी’चे कर्मचारी होते. तर, दोघे पायलट होते. मात्र मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. या दुर्घटनेची हवाई वाहतूक विभागाच्या महासंचालकांनी गंभीर दखल घेतली असून, चौकशीची जबाबदारी एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आली आहे. या घटनेचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nजुहू विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता उड्डाण\nहेलिकॉप्टरमध्ये पाच कर्मचारी व दोन पायलट होते.\nसकाळी ११.४१ वाजता अपघात झाल्याची वार्ता तटरक्षक दलाला समजली.\nदु. १२. १० वाजता तटरक्षक दल घटनास्थळी पोहोचले.\nशोधकार्यानंतर पाचजणांचे मृतदेह सापडले.\n‘ओएनजीसी’च्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला याआधीही अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. २००३ साली झालेल्या दुर्घटनेत २३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. भर समुद्रातील तेल केंद्रावर कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी ‘ओएनजीसी’कडून हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1‘ओएनजीसी’चे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त; ५ मृत्युमुखी...\n2विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवा गोष्टीरूपात...\n3तब्बल २७०० घरे लॉटरीत...\n4‘सध्या लिहिताना विचार करावा लागतो’...\n5लंडनच्या ‘हाइड पार्क’प्रमाणे व्हावा ‘पार्ले कट्टा’...\n7महापालिका अधिकाऱ्यांनाही आरोपी करा...\n8‘आधार’मुळे मुलांची पालकांशी पुनर्भेट...\n9मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक...\n10डोमेस्टिक विमानतळाला आग, जीवितहानी नाही...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/auto/mahindras-kuv-100-nxt-facelift/amp/", "date_download": "2018-04-20T16:06:05Z", "digest": "sha1:LUEF5PJHMO6KKC6337TYHYGZN4OT4WDO", "length": 7602, "nlines": 52, "source_domain": "www.lokmat.com", "title": "mahindras kuv 100 nxt facelift | महिन्द्राच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही केयूव्ही १०० एनएक्सटीचे आगळे फेसलिफ्ट | Lokmat.com", "raw_content": "\nमहिन्द्राच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही केयूव्ही १०० एनएक्सटीचे आगळे फेसलिफ्ट\nमहिन्द्रा आणि महिन्द्राची केयूव्ही ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सगदरातील हॅचबॅक म्हणता येईल. केयूव्ही १०० एनएक्सटी ही केयूव्हीचे फेसलिफ्ट महिन्द्राने सादर केले आहे. पूर्वीपेक्षा वेगळा आकर्षक लूक त्याला आला आहे.\nमहिन्द्राची केयूव्ही १०० ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता पेसलिफ्ट करण्यात आली असून अधिक आगळ्या ढंगात ती सादर करण्यात आली आहे. लांबच्या प्रवासालाही एक चांगली कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ती आरामदायी व आकर्षक ठरावी. नव्या केयूव्हीची लांब २५ मिमिने वाढवल्याने ती आता ३७०० मिमि इतकी झाली आहे. ऑटोगीयरही या कारला देण्यात आले आहेत. तर पुढे मागे फॉक्स स्कीड प्लेट्स देण्यात आल्या असून ग्रीलही अधिक आगळे केले आहे. डिझाईनच्या दृष्टीने केलेले हे बदल नव्या पिढीला पुन्हा आकर्षक वाटावेत, असे करण्यात आले आहेत. तळाला काळ्या रंगाचे क्लॅडिंग देण्यात आले असून हेडलॅम्पला नवा आकार व टेल लॅम्पला क्लीअर लेन्स देण्यात आले आहेचय रुफरेल्स, टेलगेट स्पॉयलर ही च्याची आणखी वेगळी वैशिष्ट्ये वरच्या श्रेणीमध्ये मिळू शकतात. १५ इंच डायमंड कट अलॉयव्हील्स हे केयूव्ही १०० एनएक्सटीचे आणखी वेगळे वैशिष्ट्य ठरावे. २०१६ मध्ये प्रथम बाजारात आलेल्या या केयूव्हीला आता फेसलिफ्ट करून डिझाईन मूळ जरी तेच असले तरी अन्य आकर्षक बदल मात्र करण्यात आले आहेत.\nपाच व सहा आसनांमध्ये ती उपलब्ध केली असून अंतर्गत रंगसंगतीतीही काही ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रे व सर्व ब्लॅक अशा रंगांमध्ये ही अतर्गत सजावटीमधील वैशिष्ट्ये नव्याने दिली आहेत.\nया शिवाय ७ इंचाचा टचस्क्रीन असलेली इन्फोटेनमेंट सिस्टिम असून यात जीपीएस नेव्हिगेशन देण्यात आले आहे. तसेच रिमोट लॉक व अनलॉक पद्धत, टेलगेटला लॉक, पॉवर फोल्डिंग विंग मिरर्स रेअर पार्किंग सेन्सर्स, मल्टिइन्फो डिस्प्ले असून त्यामध्ये तुमच्या गीअर बदलण्याची माहिती, ड्राइव्ह मोड्स कोणता वापरत आहात त्याची माहिती दिसू शकते.\n- १.२ लीटर पेट्रोल इंजिन ८३ एचपी\n- १.२ लीटर डिझेल इंजिन ७८ एचपी.\n- पाच गीयर मॅन्युएल\n- फ्रंट व रेअर बम्परना नवा लूक\n- डायमंड कट अलॉय व्हील्स\n- ड्युएल चेंबर हेडलॅम्प व एलईडी डीआरेलसह\n- डबल बॅरल क्लीअर लेन्स टेल लॅम्प\n- नवी टेल गेट\n- बाजूला असणारे फोल्डेबल आरसे\n- पहिल्यापेक्षा थोडी लांब\nविराट कोहली उबर कंपनीचा भारतातील पहिला ब्रँड अॅम्बेसेडर\nभविष्यात ई-कार होतील स्वस्त\nठाण्यात वर्षभरात १११ इम्पोर्टेड गाड्या; शासकीय तिजोरीत १२७० कोटींचा कर जमा\nभव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018\nपुलांवरील सांधे पार करताना वाहनचालकांनी घ्यावी काळजी\nहोंडाची ही कार ठरली सर्वात जास्त विकली जाणारी दुसरी कार\nहोंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nTata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nसुझकीची 'ही' मोटरसायकल दोन लाखाने झाली स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:23:00Z", "digest": "sha1:SDLF6HJYNZX5IFWSDMK2WCWMJXGNMKNG", "length": 5831, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गीताई अध्याय सतरावा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गीताई अध्याय सतरावा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय सतरावा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गीताई अध्याय सतरावा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गीताई अध्याय सतरावा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय सतरावा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गीताई अध्याय सतरावा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गीताई अध्याय सतरावा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:24:20Z", "digest": "sha1:55DXWVA56HR25YKTYBGFWI4XW2C2LBMR", "length": 5821, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "तुकोबारायांची आरती - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: तुकोबारायांची आरती हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:तुकोबारायांची आरती येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः तुकोबारायांची आरती आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा तुकोबारायांची आरती नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:तुकोबारायांची आरती लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित तुकोबारायांची आरती ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित तुकोबारायांची आरती ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2014/12/blog-post_29.html", "date_download": "2018-04-20T16:42:08Z", "digest": "sha1:DDZE3NCMUBZRKO3BYWTCU52NXABCIXNS", "length": 17418, "nlines": 155, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २७ व २८ डिसेंबर २०१४", "raw_content": "\nचालू घडामोडी - २७ व २८ डिसेंबर २०१४\n· भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवार २८ डिसेंबर रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला धुक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहू शकले नाहीत.\n· झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४२ जागा मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. झारखंडमध्ये प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रघुवर दास यांची मुख्यमंत्रिपदी भाजपकडून निवड करण्यात आली होती.\n· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी त्यांना देण्यात आलेल्या संरक्षणासंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेली माहिती देण्यास मेहसाणा पोलिसांनी नकार दिला आहे.\n· संबंधित चौकशी स्थानिक गुप्तचर खात्याअंतर्गत येत असल्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत येत नाही, असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले आहे.\n· संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार एक वर्षाच्या आत, म्हणजे १ जानेवारी २०१५ पूर्वी १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करणे अनिवार्य आहे.\n· आज जलद संपर्काचे माध्यम बनलेला ईमेल २७ डिसेंबर रोजी ३२ वर्षांचा झाला. मात्र आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन-भारतीयाने जगाला दिलेली देणगी आहे.\n· व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच १९७८ मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम १४ वर्षांचे होते.\n· भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टिचितचा नवा विक्रम नोंदवला. त्याच्या नावावर कसोटी, वन-डे व टी-२० क्रिकेटमध्ये मिळून ४६० डावांमध्ये १३४ यष्टिचित जमा आहेत. ३३ वर्षीय धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला (४८५ डावांमध्ये १३३ यष्टि.) मागे टाकले.\n· रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर मिचेल जॉन्सनला यष्टिचित बाद करून त्याने हा विक्रम नोंदवला.\n· या यादीत श्रीलंकेचाच रोमेश कालुवितरणा (२७० डावांमध्ये १०१ यष्टि.) तिसऱ्या स्थानावर आहे. नयन मोंगिया या यादीत दहाव्या स्थानावर आहे. धोनीने कसोटीत ३८, वन-डेत ८५ आणि टी-२०त ११ फलंदाजांना यष्टिचित केले आहेत.\n· गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे डावखुरा स्पिनर प्रज्ञान ओझावर आयसीसीने बंदी घातली आहे. त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.\n· चेन्नईतील आयसीसीच्या सेंटरमध्ये ओझाच्या शैलीची तपासणी झाली होती, त्यात त्याच्या गोलंदाजीची शैली आयसीसीच्या नियमात बसणारी नसल्याचे स्पष्ट झाले. शैलीत सुधारणा करेपर्यंत ओझा गोलंदाजी करू शकत नाही.\n· एअर एशियाचे इंडोशेनियाहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे क्यु झेड - ८५०१ क्रमांकाच्या ‘एअरबस ३२०-२००’ प्रकारातील विमान अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.\n· विमानात एकूण १६२ प्रवासी असून त्यात १४९ इंडोनेशियन, ३ कोरियन तसेच सिंगापूर, ब्रिटन आणि मलेशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.\n· सोनी पिक्चरच्या ‘द इंटरव्ह्यू’ या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले आहे. कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये हल्ले होण्याच्या भीतीने सोनी पिक्चरने हा चित्रपट मागे घेतला होता.\n· मात्र, ओबामा यांच्या पुढाकाराने हा चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला. पाठोपाठ कोरियातील इंटरनेट सेवा काही काळासाठी विस्कळित झाली होती.\n· अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादाने आणखी खालची पातळी गाठली आहे. कोरियाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची तुलना माकडाशी केली असून, या सर्व कटामागे ओबामाच असल्याचा आरोप केला आहे.\n· अमेरिकेनेच इंटरनेट विस्कळीत केल्याचा आरोप उत्तर कोरियाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाच्या संरक्षण समितीची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर या समितीचा प्रवक्ता म्हणाला, ‘या प्रकरणाच्या पाठीशी ओबामाच आहे. ओबामा सतत अस्वस्थ होत असतात. आणि त्यानंतर विषुववृत्ताच्या जंगलांमधील माकडांसारखे वर्तन करत असतात.’ कोरियाकडून या आधीही ओबामा यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.\n· पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर सद्दाम याला पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे. तर त्याच्या एका साथिदाराला पकडण्यात आले आहे.\n· चीनमधील वेंझोऊ या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे. हा पश्चिमेकडील उत्सव असल्याने तो साजरा करण्यास चीनमध्ये विरोध होऊ लागल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.\n· अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (बुश सीनिअर) यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते ९० वर्षांचे आहेत.\n· सीनिअर बुश यांना मंगळवारी रात्री धाप लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ह्युस्टन मेथडॉलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २७ व २८ डिसेंबर २०१४\nचलन पुरवठा मापनाच्या पद्धती\nचालू घडामोडी - २५ व २६ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २३ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २१ व २२ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १९ व २० डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १८ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १६ व १७ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १४ व १५ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १२ व १३ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १० व ११ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - ८ व ९ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - ६ व ७ डिसेंबर २०१४\n२०१५ - महाराष्ट्राचे डिजिटल वर्ष\nचालू घडामोडी - ४ व ५ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - ३ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - २ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - १ डिसेंबर २०१४\nचालू घडामोडी - ३० नोव्हेंबर २०१४\nचालू घडामोडी - २८ व २९ नोव्हेंबर २०१४\nचालू घडामोडी - २६ व २७ नोव्हेंबर २०१४\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90351", "date_download": "2018-04-20T16:54:43Z", "digest": "sha1:HHYZYGDWZOIUGV7IA73NG4GQPBHYMINK", "length": 10882, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Koregao Bheema Riots Strike कोल्हापूरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकोल्हापूर : भीमाकोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.\nकोल्हापूर :भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.\nकोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असून स्कूलबस आणि स्कूल व्हॅन बंद ठेवण्यात आल्याने बहुतांशी शाळांना अघोषित सुटी मिळाली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरात आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते पायी आणि दुचाकीवरुन कोल्हापूर बंदचे आवाहन करत शहरातून निषेध मोर्चा काढत आहेत.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2018-04-20T16:11:34Z", "digest": "sha1:DN4ULTW3A5DON4M66752FJGNFVGS4OAY", "length": 15877, "nlines": 196, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "दंत सौंदर्यशास्त्र - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nदंतचिकित्साशास्त्र हे मौखिक आरोग्याची काळजी देणारे शास्त्र/व्यवसाय आहे.\nहास्य हे आनंद व हर्षाचं प्रतिक आहे. असे म्हणतात की, अगणित मुळ शब्दांना बोलक करण्याचं सामर्थ्य हास्यात असत आणि हेच हास्य खुलविण्यासाठी खरी मदत झाली ती दंत सौंदर्य शास्त्राची, हास्याचं सौंदर्य दातांच्या मोहकतेवर आणि त्यांच्या चमचमणार्‍या शुभ्रतेवर अवलंबून असतं. दातांच्या नियमित स्वच्छतेमुळे दात सुंदर होतातच शिवाय श्वासही सुगंधित होईल.\nरूट कॅनॉल करून दात वाचविण्याची पध्दत काही अगदीच नविन नाही. आज दात वाचविण्याकडे लोकांचा कल जास्त दिसून येत आहे. अशीच दात वाचविण्याची एक पध्दत म्हणजे रूट कॅनॉल ट्रीटमेंट (नसेचा इलाज) दातांना लागलेली कीड फार जुनी असेल किंवा दात दुखायला लागला असेल म्हणजे कीड दातांच्या तिसर्‍या थरापर्यंत म्हणजे पल्प (नस) पर्यंत पोहचते. अशा परिस्थितीत रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. कीड जेव्ह दाताच्या पल्प (नस) पर्य़ंत पोहचते. तेव्हा तेथील रक्ताची नस बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येते. त्यामुळे संसर्ग होऊन तिथे पू तयार होतो. अशावेळी दातामध्ये असलेली रक्ताची नस काढून टाकतात व त्या जागी गटापची नावाचे औषधी मटेरियल भरतात. त्यानंतर त्यावर कंपोझीटचे आवरण चढवतात त्यामुळे दात वाचतो आणि ही ट्रीटमेंट एका भेटीत अथवा दुसर्‍या भेटीत पूर्ण होते. खर्चही मध्यमवर्गीयांना झेपेल असाच आहे.\nआपण दिवसभर जे काही अन्न खातो पितो, त्याचे सूक्ष्मकण नीट ब्रश न केल्याने निघत नाही त्यामुळे त्याचे थर वाढत जातात. त्यास कॅलक्युलस किंवा टार्टर म्हणतात. ज्या व्यक्ती जर्दा, पानमसला, गुटका यांचे सेवन करतात त्यांच्या दातावर असा थर लवकर जमा होतो. अशावेळी हिरड्यातुन रक्तामिश्रित पू येतो. हिरड्या कमजोर होतात. अशा स्थितीत लक्ष न दिल्यास पायरिया होऊन दात आपोआप हलून पडून जातात. त्यासाठी वर्षातून एकदातरी दात साफ करणं आवश्यक असतं. अल्ट्रासौनिक स्केलरने दातांवरील टार्टरचा थर स्वच्छ होऊन हिरड्या पुन्हा पूर्ववत होतात. दातांना जर काळपट रंग आला असेल तर ब्लिचिंग पध्दतही उपलब्ध आहे. त्यामुळे दांताचा रंग बदलून पांढराशुभ्र होऊ शकतो.\nडेंक्चर वयोवृध्दाना नीट जेवता यावे यासाठी संपूर्ण कवळी (कम्प्लीट डेंक्चर) बनविण्यात येते. ज्या ठिकाणी एक दोन किंवा अधिक दात काढलेले असतील त्या ठिकाणी फिक्स किंवा काढता घालता येणारे दात लावता येतात. फिक्स दात अर्थात सोनं, सफेद मेटल आणि सिरॅमिकपासून तयार केलेले असतात. कोणताही दात काढल्यानंतर त्या ठिकाणी खोटा दात लावणं जिकरीच असतं. अन्यथा आजुबाजूचे दात जागा मुळाल्यामुळे सरकतात व त्यामुळे दातांमध्ये फटी पडून कमजोर होऊ शकतात.\nअनेकवेळा अक्कलदाढ पूर्णत: बाहेर येऊ शकत नाही, हाडातच अडकुन राहते. त्याला कॅम्पॅक्टेड मीलर म्हणतात. अशावेळी एक छोटसं ऑपरेशन करून अक्कलदाढ काढता येते.\nवेड्यावाकड्या दातामुळे चेहर्‍याचे सौंदर्य कमी होतं. कित्येकवेळा बोलायला व अन्न चावायलाही त्रास होतो. तोंड पूर्ण बंद न झाल्याने लाळ गळते. अशा दातावर उपचार करून दात नीट करता येतात. वाकड्या दातांवर तार बांधण्यात येते, एक ते दीड वर्षाच्या कालावधीत दात आत जाऊन एका रांगेत येतात. त्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यातही वृध्दी होते.\nप्रभावी, मधूर हास्याने आपल्याला सगळ्यांची मनं जिंकता येतात. एक आत्मविश्वास निर्माण होतो. परंतू तुमचे दात जर सुंदर नसतील तर निराश होऊ नका. आजच तुमच्या दंतवैद्याकडून आधुनिक उपचाराद्वारे दातांचं सौंदर्य प्राप्त करा.\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nदंत सौंदर्यशास्त्र - डॉ. सदाशिव जावडेकर\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leaders-worry-over-repeated-attacks-on-party-by-own-members/articleshow/62480751.cms", "date_download": "2018-04-20T16:17:12Z", "digest": "sha1:EHJGEVIXC33DFWVMSS2JY4N7R5V6IXM4", "length": 26633, "nlines": 248, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bjp leaders worry over repeated attacks on party by own members | नाराजांच्या वारंवार हल्ल्यांनी भाजप नेते चिंतेत - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nनाराजांच्या वारंवार हल्ल्यांनी भाजप नेते चिंतेत\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:\nराज्यातल्या भाजप सरकारने महापालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या निवडणुकीत चांगले यश मिळविलेले असले तरी बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये विरोधकांपेक्षा स्वकीयांच्याच टीकेचे घाव सरकारला सहन करावे लागत आहेत. नाना पटोले यांच्यानंतर एकनाथ खडसे व आमदार आशीष देशमुख यांच्याकडून सातत्याने सरकारवर टीका होत असून, त्याला प्रत्युत्तर द्यायचे की दुर्लक्ष करायचे या संभ्रमावस्थेत सत्तारुढ भाजप आहे.\nराज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेले तीन वर्षे भाजपचा वारू राज्यात उधळत होता. महापालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या निवडणुकांत राज्यात भाजपने अव्वल स्थान पटकाविले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात बदललेल्या राजकीय वातावरणात विरोधकांपेक्षा सत्तारुढ भाजपचे नेतेच सरकारबद्दल टीकेचा सूर काढत आहेत. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून काढल्यानंतर ते काही काळ गप्प होते. मंत्रिमंडळात आपले राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांना आशा होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, खडसे यांच्यासंदर्भातील प्रकरण हे न्यायप्रविष्ठ आहे, असे सांगितले होते. त्यामुळे खडसे यांची मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचे दरवाजे सद्या तरी बंद झाले आहेत. त्यामुळे खडसे हे ‌विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खडसे यांनी स्तुती केली होती. त्यामुळे खडसे हे राष्ट्रवादीत जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भंडारा-गोंदियाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकी राजीनामा दिला होता. त्या निवडणुकीनंतर पटोले हे काँग्रेसमध्ये जाणार हे ठरलेले होते. मात्र, त्या दरम्यान भाजपवर टीका करण्याची रणनीती काँग्रेसने ठरविली होती.\nपटोले हे सातत्याने भाजपवर टीका करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पटोले यांनी टीका केली. याचबरोबर नागपूरचे भाजपचे आमदार आशीष देशमुख हेही आता उघडपणे पक्षावर तसेच सरकारवर टीका करत आहेत. सातत्याने स्वकीयांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, आता राजकीय वातावरण तापत असून टीका करणाऱ्या स्वकीयांना शिस्तभंगाचा बडगा दाखवायचा विचार पक्षात होत आहे. मात्र, कठोर कारवाई केली तर या नेत्यांच्या टीकेला आणखी धार चढेल की काय, अशी भीती पक्षातील नेत्यांना वाटत आहे.\n>>पुनर्वसन होत नसल्याने एकनाथ खडसे हे ‌विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून आक्रमक.\n>> नागपूरचे आमदार आशीष देशमुख हेही आता उघडपणे पक्ष, सरकारवर टीका करत आहेत.\n>> कठोर कारवाई केल्यास या नेत्यांच्या टीकेला आणखी धार चढण्याची पक्षनेत्यांना भीती.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1नाराजांच्या वारंवार हल्ल्यांनी भाजप नेते चिंतेत...\n2सुप्रिया सुळे लिहिणार ब्लॉग...\n3न्यायव्यवस्थेसाठी आज काळा दिवस : निकम...\n4'शिवरायांच्या अस्थींची डीएनए चाचणी करा'...\n5वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण ऑनलाइन...\n7मकरसंक्रांतीचा दिवस पुढे सरकतोय...\n8टीबी रुग्णशोधासाठी पालिकेची मोहीम...\n9मोबाइलमुळे हरवले मुलांचे शब्द...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-04-20T16:26:55Z", "digest": "sha1:NV46AXHWG253L4JGIQBY5HCBWQEKG643", "length": 4099, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थायलंडचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्वीकार २८ सप्टेंबर १९१७\nथायलंडचा ध्वज २८ सप्टेंबर १९१७ रोजी स्वीकारला गेला.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/heavy-snow-surprises-in-russia-481985", "date_download": "2018-04-20T16:27:49Z", "digest": "sha1:6U2VE3YYWRHCIJZRINFG3QIWHPMEH72K", "length": 16810, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मॉस्को : रशियात बर्फवृष्टीमुळे 1200 गाड्यांचा अपघात, बर्फ हटवण्याचं काम सुरु", "raw_content": "\nमॉस्को : रशियात बर्फवृष्टीमुळे 1200 गाड्यांचा अपघात, बर्फ हटवण्याचं काम सुरु\nरशियातल्या व्लादिवोस्तोक शहरात बर्फवृष्टीमुळे बाराशे गाड्यांचा अपघात झाला. बर्फवृष्टीमुळे व्लादिवोस्तोक शहरातल्या रस्त्यांवर बर्फाची चादर पाहायला मिळाली पण दुसरीकडे शहरातील रस्ते घसरणीचे झाल्यामुळे जवळपास 1200 गाड्यां एकमेकांना धडकल्या. आणि त्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे रशियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शाळांना सुट्टी देण्यात आलीय तर शहरातील रस्त्यांवर ट्रॅफिक झाल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धुपातळीवर सुरु आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nमॉस्को : रशियात बर्फवृष्टीमुळे 1200 गाड्यांचा अपघात, बर्फ हटवण्याचं काम सुरु\nमॉस्को : रशियात बर्फवृष्टीमुळे 1200 गाड्यांचा अपघात, बर्फ हटवण्याचं काम सुरु\nरशियातल्या व्लादिवोस्तोक शहरात बर्फवृष्टीमुळे बाराशे गाड्यांचा अपघात झाला. बर्फवृष्टीमुळे व्लादिवोस्तोक शहरातल्या रस्त्यांवर बर्फाची चादर पाहायला मिळाली पण दुसरीकडे शहरातील रस्ते घसरणीचे झाल्यामुळे जवळपास 1200 गाड्यां एकमेकांना धडकल्या. आणि त्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे रशियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शाळांना सुट्टी देण्यात आलीय तर शहरातील रस्त्यांवर ट्रॅफिक झाल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धुपातळीवर सुरु आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/08/sree-tiche-rup.html", "date_download": "2018-04-20T16:13:58Z", "digest": "sha1:GFT3XZFY37S6ZUOZIYWUYEIKLX44AKQ2", "length": 8280, "nlines": 176, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: Sree Tiche Rup", "raw_content": "\nस्त्री - तिची रूपं\nकाढते चिमटे पोटाला स्वताच्या..\nबाळाचे पोट ती भरत असते...\nती वाढवत असते अशी हि..\n\" आई \" असते...\nकरते त्रास सहन स्वत ती..\nलहानांचा आधार ती बनत असते..\nअशी ती \" ताई \" असते..\nकरते आपल्या कुंकूचे रक्षण..\nत्याच्या सुखासाठी ती झटत असते..\nठेवुनी व्रत वट - पौर्णिमेचे ती..\nत्याच्या आयुष्याची मागणी देवाकडे करत असते..\nअशी ती एक \" अर्धांगिनी \" असते...\nघेते समजुनी आपल्याला ती..\nवेळो वेळी आपलीच काळजी असते..\nअसते सामावलेले गोड हास्य तिचे..\nअशी ती एक \" सखी \" असते...\nखेळवते जी स्वतच्या अंगावर त्यांना..\nसांगुनी गोष्टी त्यांना बाळकडू देत असते..\nदाखवुनी योग्य मार्ग लहानांना त्या..\nप्रेमाचा वर्षाव ती करत असते..\nअशी ती एक \" आजी \" असते..\nविविध रुपात जगत असते..\nकरुनी समर्पित आयुष्य आपल्यासाठी..\nआपुले आयुष्य ती बहारत असते...बहारत असते...\n{ Marathi kavita } तुम्हाला वर्गात पहिलं यायचंय\nRe: { Marathi kavita } उन्हात खूप खूप तापून रस्ता ...\n{ Marathi kavita } एक प्रेमळ विनोदी सत्य…=लव्ह का ...\n{ Marathi kavita } अण्णांचे लग्न झाले असते तर........\n{ Marathi kavita } का वागतात या मुली अशा\n{ Marathi kavita } आजकालच्या ह्या मुली\n{ Marathi kavita } .एका झाडाखाली....दोन मुली\n{ Marathi kavita } सुंदर मुली भाव खातात...\n{ Marathi kavita } आजची पोरं म्हणे प्रेम करतात\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } तु हो म्हणाली असतीस तर\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90354", "date_download": "2018-04-20T16:55:49Z", "digest": "sha1:TQPL23FGK3THVQW5UC3BHPDLAWWRAJ4D", "length": 13992, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Sangli news Sambhaji Bhide poster in Sangli सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरवर दगडफेक | eSakal", "raw_content": "\nसांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरवर दगडफेक\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nमहाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर सांगलीतही आज कडकडीत बंद आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी सांगली पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या जिल्हाभर तैनात करण्यात आले आहेत.\nसांगली : दलित संघटनांनी आज मारुती चौकतील शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचा गडकोट मोहिमेचा फलक हटवा यासाठी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी तणाव निर्णाण झाला होता. पोस्टवर दगडफेक करत कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात होता.\nभीमा कोरेगाव येथील दंगल घडवून आणल्याच्या आरोपावरून भिडे व हिंदू जनजागरण समितीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात ऍट्रासिटी, दंगल माजवणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज सांगलीत भिडे यांच्या पोस्टर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे सकाळपासून येथे तणाव वाढत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यावेळी काही कार्यकर्ते गावभागाच्या दिशेने निघाले होते. किरणराज कांबळे, प्रमोद कुदळे, असिफ बावा यांना रोखत शांततेचे आवाहन केले. त्यानंतर साऱ्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी देत ठिय्या मारला. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने फलक काढण्यासाठी बोलविण्यात आले. त्यावेळी दगडफेक करण्यात आली.\nमहाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर सांगलीतही आज कडकडीत बंद आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी सांगली पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या जिल्हाभर तैनात करण्यात आले आहेत.\nभीमा कोरेगावमधील हिंचाराचानंतर सांगलीतही त्याचे पडसाद काल उमटले. घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आली. रात्री उशीरा विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला आज प्रतिसाद देत, अख्खी सांगली बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील विश्रामबाग चौक, मारुती चौक, झुलेलाल चौक, स्टेशन चौक, गणपती पेठ परिसरातील दुकाने बंद होती. अत्यावश्‍यक सुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. येथील गणपती मंदिर परिसरातही दगडफेकीचे प्रकार घडले. त्यामुळे तणावात आणखीच भर पडत आहे.\nअनुचित प्रकर घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC.html", "date_download": "2018-04-20T16:13:06Z", "digest": "sha1:6H4PTI2OPBD5FWUI77YT346FJGWPXE7U", "length": 18248, "nlines": 183, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "उच्चरक्तदाब - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nउच्च रक्तदाब म्हणजे काय\nजास्त प्रमाणात रक्तदाब वाढणे म्हणजे उच्च रक्तदाब\nप्रौढांमध्ये रक्तदाबाची सहज पातळी किती असते\nNormal किंवा सहज पातळी म्हणजे हृदय स्नायूंच्या आकुंचनासंबंधीची पातळी जी १२० ते १३५ असते आणि हृदय स्नायूंच्या प्रसरणाविषयीची पातळी जी पायाच्या ८० ते ९० मिलीमीटर असते.\nउच्चरक्तदाब किती सामान्य आहे\nसामान्यपणे लोकांमध्ये उच्चरक्तदाब दिसून येतो. वय इत्यादीवर उच्चरक्तदाबाची व्याख्या अवलंबून आहे किंवा त्यात बदल घडू शकतो. लोकसंख्येच्या ५ऽ उच्चरक्तदाब असू शकतो जो १४०/९० च्या वर असतो. साठ वर्षे वयाच्या वर यात ३५ऽ पर्यंत वाढ होते.\nEssential उच्चरक्तदाब म्हणजे काय\nउच्चरक्तदाब याच इतर दुय्यम कारणांशी संबंध येत नाही, जसे अंतर्गत स्त्राव, औषधे किंवा मूत्रपिंडाच्या नलिकांशी संबंधित असलेल्या रक्तदाबाला Essential रक्तदाब म्हणतात.\nउच्चरक्तदाब कसा विभागला जातो\nJoint Nationality Committee (JNC) विभागणीचा उपयोग साधारणपणे उच्चरक्तदाबाची तीव्रता पाहण्यासाठी केला जातो. प्रात्यक्षिकांसाठी याची विभागणी केली जाते. जसे सीमेजवळ, सौम्य, माफक प्रमाणात किंवा तीव्र.\nWhite Coat उच्चरक्तदाब म्हणजे काय\nडॉक्टरांकडे जाण्याच्या भितीमुळे जेव्हा रक्तदाब वाढतो, तेव्हा त्याला White Coat उच्चरक्तदाब म्हणतात. हा पुन्हा पुन्हा वाढू शकतो.\nरक्तदाबाच्या पातळीची तपासणी केली जात असताना कोणती सावधगिरी बाळगावी\nरूग्णाचा रक्तदाब तपासताना चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.\nरूग्णाने ३ ते ५ मिनिटे आरामात खुर्चीवर बसले पाहिजे.\nयोग्य आकाराच्या Cuff वापरला पाहिजे.\nहृदयस्नायूंचे आकुंचन आणि रक्तदाब पाहिला पाहिजे.\n५ मिनिटांच्या अंतराने दोन किंवा जास्त वेळा तपासणी केली पाहिजे.\nउच्चरक्तदाबाचा उपचार करणे महत्वाचे का आहे\nजर उच्चरक्तदाबावर उपचार केला नाही तर पुढील परिणाम होऊ शकतात.\nहृदयरोगाचा झटका येणे किंवा हृदय बंद पडणे.\nरक्तवाहिनीला इजा झाल्याने मेंदूला झालेली दुखापत\nमूत्रपिंडाची क्रिया बिघडू शकते.\nएखादेवळेस रूग्ण लक्षणविरहित असतो.\nघशाचा दाह होण्याची लक्षणे दिसतात किंवा हृदयक्रिया बंद पडते.\nतरीही फक्त अनुवंशिकता हेच उच्चरक्तदाबासाठीचे पुरेसे कारण ठरत नाही, तर वातावरणातील घटक देखील महत्वाचे ठरतात.\nअन्य कोणते घटक महत्वाचे आहेत\nमद्य घेण्याचे जास्त प्रमाण\nमोठ्या प्रमाणात सोडीयम घेणे\nमीठ घेण्याचे प्रमाण कमी केले तरी रक्तदाबावर काही परिणाम झाला नाही\nबर्‍याचशा रूग्णांमध्ये रक्तदाब तेवढा संवेदनशील नसतो, जो सोडियम घेतल्यावर त्याला विरोध करेल.\nउच्च रक्तदाबाचे निदान झाल्यानंतर इतर काही तपासण्या करणे आवश्यक आहे काय जर उच्चरक्तदाब सौम्य असेल आणि आरोग्यासंबंधी हा एकच प्रश्न असेल तर मर्यादित तपासण्या पुरेशा आहेत. पण जर तीव्र स्वरूपाचा रक्तदाब असेल तर जास्त सखोल तपासण्यांची आवश्यकता आहे. मर्यादित तपासण्यांमध्ये कमीत कमी रक्तातील रसायन, रक्तपेशींना आलेख (Hemogram) छातीच्या क्ष-किरण चिकित्सा आणि विद्युतहृदलेख (ECG) इ. तपासण्या केल्या पाहिजेत.\nउच्चरक्तदाबाच्या व्यवस्थापनात कोणती औषधे वापरली जातात\nया औषधांची विस्ताराने विभागली खालीलप्रमाणे\nमूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणारी औषधे - उदा. Hydrochlorothiazide\nअल्फा ब्लॉकर्स - Prazosin\nउच्चरक्तदाबाच्या औषधांचे अनुषंगिक परिणाम कोणते\nउच्चरक्तदाब कमी करण्याच्या सगळ्या औषधांमुळे जर रक्तदाब अतिशय कमी झाला तर रूग्ण चक्कर येणे, शक्तीहीनता जाणवणे इ. तक्रारी करतात. प्रत्येक औषधाचे वेगवेगळे अनुषंगिक परिणाम आहेत.\nबीटा ब्लॉकर्स - हृदयाचे स्पंदन कमी करतो, फुफ्फुसाचे आकुंचन, तीव्र उदासिनता, लैंगिक कार्यात बिघाड होणे, मध्यबिंदूपासून दूर असणार्‍या नलिकांचे रोग, Lipid Abnormalities\nकॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स - डोकेदुखी, Flushing, छातीत धडधडणे, पावलांवर सूज येणे, बध्दकोष्ठता इत्यादी.\nACE Inhibitors - कफ, हायपरकॅनलेमिया, त्वचेवर पुरळ येणे, चव न समजणे\nमूत्रोत्सर्जनात उत्तेजन देणारी औषधे - शरीरातील पाणी कमी होणे, रक्तात साखरेचे प्रमाण वाढणे, Lipild मध्ये वाढ.\nउच्चरक्तदाब कमी करण्यासाठी कोणती औषधे प्रथम वापरावीत\nबरेचसे चिकित्सक रूग्णाची एकूण परिस्थिती पाहून, जसे हृदयाजवळील मज्जातंतूंचे जाळे, मूत्रपिंडाची स्थिती इ. औषधयोजना करतात. बीटा ब्लॉकर्स आणि मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांचा वापर सामान्यपणे सुरूवातीला केला जातो. हे लक्षात ठेवले पाहिजे. ACE Inhibitors पण बर्‍याच वेळा प्रथम औषधोपचार योजन म्हणून वापरले जाते. कोणते औषध वापरायाचे याची निवड करणे साधारणपणे जो रूग्णावर उपचार करतो, त्या चिकित्सकावर अवलंबून असते.\nविद्युत अपघट आणि तरल पदार्थ\nशरीररचना आणि शरीरक्रिया शास्त्र\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97.html", "date_download": "2018-04-20T16:27:25Z", "digest": "sha1:LGJHIYUTXQPEOUEMP6NPDKMN3ULGXSTO", "length": 11485, "nlines": 158, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आयुर्वेदातील हृदयरोग - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nगेल्या दहा वर्षांपासून फाउंडेशन हृदयाच्या वेगवेगळ्या रोगांवर कार्य करीत आहे आणि आयुर्वेदाच्या तत्त्वांवर त्यांचे व्यवस्थापन करीत आहे.\nहृदयरोगाचे तीन मुख्य भाग आहेत\nहृदयस्नायूंमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होणे.\nरक्ताचा तुटवडा पडल्याने होणारा हृदयरोग\nरक्ताचा तुटवडा पडल्याने होणारा जुनाट हृदयरोग\nहे तिन्ही बिघाड एका वर्गात मोडतात त्यास वाटिका हृदयरोग असे म्हणतात. वाटिका हृदयरोगामध्ये अनेक रोगांचा समावेश होतो. हृदयात अतिशय वेदना होणे, सुईने अगर टाचणीने टोचल्यासारख्या वेदना होणे, पिळवटणे, तुटणे इत्यादीचा यात मुख्यत्वे समावेश होतो. इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत मोकळेपणा जाणवणे, धडधडणे अचानक शिथीलता येणे, शुध्द हरपणे इ. चा समावेश होतो. लक्षणांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण वेगवेगळ्या मूळग्रंथामध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाशी जुळते. ही जर रोगाची सुरूवात समजली गेली तर आपल्याला रक्ताचा तुटवडा पडल्याने होणाऱ्या हृदयरोगावर आणि आयुर्वेदाने त्याचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nएच आय व्ही शोध प्रबंध\nएच. आय. व्ही. व आयुर्वेद\nस्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग\nआयुर्वेदिक तत्वांवर आधारलेल्या कस्टर्डचे मूल्यांकन\nदी ऑर्गन क्लोमा - अ फ्रेश ऍथर\nवैद्य विलास नानल आयुर्वेद प्रतिष्ठान\nआयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी\nआयुर्वेदाद्वारे केसांची निगा राखणे\nसौंदर्यासाठी काही आयुर्वेदिक उपचारपध्दती\nवृध्दांचे स्वास्थ्य व आयुर्वेद\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/author/amitpatil/", "date_download": "2018-04-20T16:18:24Z", "digest": "sha1:M4XRPOKS56R2CFGAI7RTO37INEHEYPFC", "length": 10133, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Amit Wankhade Patil, Author at Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. 0\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान 0\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… 0\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \n१ रुपयाच्या नोटीविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी नक्की वाचा… 0\nप्रत्येक महिलेला माहित असावे असे अधिकार… नक्की वाचा आणि शेअर करा 0\nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास.. 0\nभारतात मागील १० वर्षात किती आरोपींना फाशी देण्यात आली वाचा आरोपी व त्यांचे गुन्हे 0\nआयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक 0\nप्रधानमंत्रि मोदीजींच्या टॉप टेन ब्रेन मधील एकमेव मराठी अधिकारी.. 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/review/page/3/", "date_download": "2018-04-20T16:36:42Z", "digest": "sha1:XDYAD7WMXJYSIJJRPMN3LRWIXVMNSN2K", "length": 17702, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "रिव्ह्यू | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nआपला मानूस आपल्या मानसातल्या नात्याची गोष्ट\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे हाऊसफुल्ल कुरबुरी प्रत्येक घरातच होतात. विशेष करून रक्ताच्या नात्यापलीकडची मुलगी जेव्हा सून बनून घरी येते तेव्हा सुरुवातीला सगळं चांगलं असलं तरी कालांतराने सून...\nवेगळय़ा चवीचं सस्पेन्स कॉकटेल\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे खून आणि त्याभोवतीचं रहस्य, मग ते कसं सोडवलं जातं, गुंता नेमका काय असतो, खुनी कोण असता, खून का केले जातात... अशा गोष्टींचा...\nतरुणाईचा प्रयोगशील हुंकार ‘कॅरेक्टर्स प्ले’\n>> क्षितिज झारापकर [email protected] ‘कॅरेक्टर्स प्ले’आजची तरुणाई जेव्हा रंगभूमीवर आपले विविध प्रयोग सादर करत असते तेव्हा मनोरंजन क्षेत्रातील रंगभूमीचे स्थान अधिकाधिक बळकट होत जाते. गेल्या शतकाच्या सत्तर...\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे एखाद्याच्या आयुष्याचा अखंड पटच ज्वलंत असतो. त्याचं कर्तृत्व, त्यानं आयुष्यात केलेला संघर्ष हे सगळंच इतकं प्रेरणादायी असतं की, त्यावर सिनेमा बनवावा असा...\nसरधोपट मांडणीचा तरीही रंजक ‘हॉस्टेल डेज’\n>>रश्मी पाटकर, मुंबई हॉस्टेल आणि तिथल्या आठवणी हा ते आयुष्य जगलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. आपलं कुटुंब, नातेवाईक, जवळचे मित्र यांपलिकडे पाहायला शिकवणारं हॉस्टेल अनेकांना अनेक...\nविक्रम गोखले यांच्या हस्ते ‘अंतरंगी वल्ली’चे प्रकाशन\nसंजीव कोलते यांच्या कथांमधील अस्सल, मजेदार वऱ्हाडी पात्रांमुळे या कथा खुशखुशीत, चटकदार तरीही वाचकाला भावूक करणाऱ्या होतात. शिवाय त्यातून दिसणारा वऱ्हाडी ठसका अप्रतिम... अशा...\nयूट्युबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का\n मुंबई 'यूट्युब'वर आपल्याला हवी असलेली माहिती, गाणी, सिनेमे, कार्यक्रम एका क्लिकवर व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तुम्ही यूट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र...\n>> वैष्णवी कानविंदे-पिंगे कुठच्याही सार्वजनिक ठिकाणी गेलं की तिथे पर्यटकांच्या सोबत दिसतात ते रस्त्याच्या कडेला किंवा जिथे जागा मिळेल तिथे पथारी पसरून बसलेले भिकारी. मग...\nनवे प्रयोग, नवे कलाकार\n>>क्षितीज झारापकर, मुंबई नाटय़ व्यवसायात डिसेंबरचा महिना हंगामी मानला जातो. या हंगामात साधारण दहा ते बारा नवीन नाटकं बाजारात येतात. हा हंगाम इतका महत्त्वाचा...\nधाराशीवमधील पारधी समाजावर आधारलेला ‘पल्याडवासी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. भटक्या समाजासाठी शासन दरबारी, कागदोपत्री अनेक उपक्रम असले तरी या समाजापर्यंत ते पोहोचतच...\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/beed-will-be-model-safe-motherhood-campaign-due-private-doctors/", "date_download": "2018-04-20T16:16:58Z", "digest": "sha1:TRGSPW6ZMEAQ47HAGFA7HGMDJVVTEZCZ", "length": 25303, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beed Will Be 'Model' In Safe Motherhood Campaign Due To Private Doctors' | खाजगी डॉक्टरांच्या दातृत्वामुळे सुरक्षित मातृत्व अभियानात बीड ठरणार ‘मॉडेल’ | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nखाजगी डॉक्टरांच्या दातृत्वामुळे सुरक्षित मातृत्व अभियानात बीड ठरणार ‘मॉडेल’\nस्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे\nबीड : स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक गतिमान करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. गुरुवारी जिल्ह्यातील जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय या १४ अर्बन संस्थांसह ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी करून उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळेस सर्व मातांची तपासणी ही स्त्रीरोगतज्ज्ञांकडून पहिल्यांदाच करण्यात आली. पूर्वी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व इतर डॉक्टर करीत असत; परंतु आतापासून स्त्रीरोगतज्ज्ञच गर्भवतींची तपासणी करीत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हा उपक्रम राबविला जात आहे.\nपहिल्याच दिवशी हा उपक्रम १०० टक्के यशस्वी झाला. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कदम, अतिरक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य डॉ. सतिश हरीदास, डॉ. संजय पाटील आदी डॉक्टर, अधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद मनपात केवळ कंत्राटदारांना वेळेत बिले\nचाळीशीनंतर बस चालकांना सांधेदुखी, उच्च रक्तदाबाचा त्रास\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nविद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थिंनीचा रास्ता रोको\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेतील ‘चटोपाध्याय’चे प्रकरण आता नव्या ‘सीईओं’कडे\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/nagpur-news/", "date_download": "2018-04-20T16:40:07Z", "digest": "sha1:SAQFVVPR7KRR32FYYAE5BBVXKAG5MC4V", "length": 11008, "nlines": 60, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "nagpur news – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसुंदर तरुणीसोबत सेल्फी घेण्यासाठी पबमध्ये चक्क गोळीबार : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची घटना\nतरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ आहे . वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्यासोबत सेल्फी काढून आपण किती सोशल आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र नागपूर मध्ये एका तरुणाने चक्क सुस्वरूप तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून पब मध्ये धुडगूस घालण्याची घटना घडली आहे . मिहीर मिश्रा असे ह्या गुंडांचे नाव असून त्याने नागपूर एमआयडीसी मधील एका पब मध्ये… Read More »\nअल्पवयीन मुलीचे गोड बोलून अपहरण आणि अत्याचार : पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल धरले आरोपी\nनागपूर : बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे . कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ ह्या मुलीशी अत्याचार करण्यात आले. आरोपीत शोएब आणि इब्राहिम यांना अटक करण्यात आली असून अधिक तपस सुरु आहे . पीडित मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असून तिला लिफ्ट देण्याच्या… Read More »\nमुख्यमंत्र्यांच्या एरियात पत्रकाराच्या आईची व मुलीची गळा आवळून हत्या : कायदा सुव्यस्था ढासळली\nमुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायदा सुव्यस्वस्थेचे तीन तेरा झालेले आहेत . कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे . नागपूर येथील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची तसेच लहान मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे . आजवर केवळ पत्रकार हेच गुन्हेगारांकडून टार्गेट केले जात असत , कुटुंबियांना हात न… Read More »\nCategory: नागपूर महाराष्ट्र Tags: nagpur news, गुन्हेगारी, नागपूर, नागपूर न्यूज, नागपूर बातम्या, पत्रकाराची हत्या\nसरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा\nओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नागपूर येथे ते बोलत होते . आजपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सरकारमधून बाहेर पडण्याच्या… Read More »\nधक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त\nनागपूर येथील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण आणि जिवंत जाळून खून केल्या प्रकरणी दुसरा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी ( शुक्रवारी ) छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. नागपूर शहर पोलीसांना रायपूर पोलिसांकडून हे वृत्त कळताच पूर्ण नागपूर शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून… Read More »\nनगरसेवक मंडळीमध्ये दबक्या आवाजात ‘ ही ‘ आहे चर्चा\nराज्य शासनाने मानधन वाढवल्याने खुश झालेल्या नागपूरच्या नगरसेवकांचा उत्साह काही क्षणातच परत मावळला . पक्षाने पार्टी फंड च्या नावाने २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षाच्या निर्णयाला विरोध केला तर भविष्यकालीन परिणाम चांगले होणार नाहीत., ह्या भीतीने सर्व जण गप्प आहेत असे भाजपच्या काही जणांचे म्हणणे आहे . महापालिकेत नगरसेवकाचे मानधन… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/angry-student-attacks-teacher-in-wagholi/", "date_download": "2018-04-20T16:34:46Z", "digest": "sha1:2M2HMQHVMG47YPUIRXNCSIUSQHGLP44I", "length": 7046, "nlines": 59, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "‘म्हणून ‘ ह्या अकरावीतल्या विद्यार्थ्याने केला शिक्षकावर कोयत्याने हल्ला : वाघोलीतील घटना – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘म्हणून ‘ ह्या अकरावीतल्या विद्यार्थ्याने केला शिक्षकावर कोयत्याने हल्ला : वाघोलीतील घटना\nपुण्यात नगर रोड येथील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला . वाडेबोल्हाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी सुनील पोपट भोर हा अकरावीमध्ये शिकत होता . मात्र रोज नवीन वेगवेगळी हेअर स्टाईल आणि हिरोगिरीचे वागणे शिक्षकांना खटकत होते . त्यामुळे दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे या शिक्षकांनी अकरावीत शिकणाऱ्या सुनील भोर या विद्यार्थ्याला खडसावले होते. सुनील भोर हा महाविद्यालयात बेशिस्तपणे वागायचा. डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती.\nतसेच एकदा त्यांनी भर वर्गात सुनीलची खरडपट्टी काढली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जाते.आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत असताना सुनीलने त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले. ह्या दुर्दैवी घटनेत दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे .\nपोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: पुणे महाराष्ट्र Tags: pune, wagholi, पुणे बातम्या, पुणे शहर, पुणेकर\n← गंगापूरच्या हरवलेल्या दोन मुलींचा धक्कादायक प्रवास वडापावचे फॅन असाल तर महानगरपालिका आणू शकते ‘ ह्या’ गोष्टीवर बंदी →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/virat-kohli-daughters-disabled-children-self-made-selfie-video-viral/", "date_download": "2018-04-20T16:12:37Z", "digest": "sha1:2WCB5HX7XOO2REBKI3IQREUT5FDWXG3H", "length": 29566, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Virat Kohli For Daughters For Disabled Children, Self-Made Selfie Video Viral | अपंग मुलांसाठी विराट कोहलीने डावलली सुरक्षा, मनसोक्त गप्पा मारत काढले सेल्फी; व्हिडीओ व्हायरल | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nअपंग मुलांसाठी विराट कोहलीने डावलली सुरक्षा, मनसोक्त गप्पा मारत काढले सेल्फी; व्हिडीओ व्हायरल\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे.\nठळक मुद्देआपल्यासाठी चिअर करणा-या अपंग मुलांसाठी विराट कोहली सुरक्षा डावलत त्यांच्यात पोहोचलाबसमध्ये चढण्याआधी विराट कोहलीने सर्व मुलांना ऑटोग्राफ दिला आणि सोबत सेल्फीही घेतलेआपल्या लाडक्या खेळाडूचा ऑटोग्राफ आणि सेल्फी मिळाल्याने मुलं प्रचंड आनंदात दिसत होती\nनवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे. आपल्यासाठी चिअर करणा-या अपंग मुलांसाठी विराट कोहली सुरक्षा डावलत त्यांच्यात पोहोचला आणि मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्या मुलांना आवरता आला नाही आणि त्यांनी आपला मोबाइल विराटकडे दिला. विराटनेही त्यांची इच्छा पुर्ण करत स्वत: त्यांच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढले. चार ते पाच वेळा त्याच्याकडे सेल्फीसाठी मोबाइल देण्यात आला, मात्र विराटने अजिबात घाई आणि चिडचिड न करता फोटो काढले आणि मुलांची इच्छा पुर्ण केली.\nविराट कोहली त्यावेळी विमातळावरुन बाहेर येत होता. त्यावेळी व्हिलचेअरवर बसलेली मुलं विराट कोहलीसाठी चिअर करु लागली. सुरक्षेच्या कारणास्तव सेलिब्रिटींना जास्त वेळ लोकांमध्ये न राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र 29 वर्षीय विराट कोहलीने मुलांसाठी थोडा वेळ हा नियम बाजूला ठेवला आणि मुलांची भेट घेतली. बसमध्ये चढण्याआधी विराट कोहलीने सर्व मुलांना ऑटोग्राफ दिला आणि सोबत सेल्फीही घेतले. काही मुलांनी यावेळी विराटला आपण काढलेली चित्रं दाखवली. विराटने त्याच्यावर ऑटोग्राफ देत त्यांना ती परत केली. आपल्या लाडक्या खेळाडूचा ऑटोग्राफ आणि सेल्फी मिळाल्याने मुलं प्रचंड आनंदात दिसत होती.\nविमानतळावर विराट कोहली आणि भारतीय संघ असल्याची माहिती मिळताच प्रचंज गर्दी झाली होती. यावेळी चाहत्यांनी कोहलीच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमहत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पराभूत केल्यानंतर भारत आता श्रीलंकेशी भिडणार आहे. 16 नोव्हेंबरला कोलकातामध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या कसोटी मालिकेत एक शानदार रेकॉर्ड करण्याची संधी भारताकडे आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ केल्यास मायदेशात कसोटी विजयाचे शतक साजरे होणार आहे. ही कामगिरी करणारा भारत तिसरा देश ठरेल. इतकेच नव्हे तर विराट कोहली देखील सर्वांत यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुस-या स्थानावर विराजमान होईल.\nभारताचा मायदेशात लंकेकडून आतापर्यंत कसोटीत पराभव झालेला नाही. याआधी १९९३-९४ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केले आहे. यंदा तिन्ही सामने भारताने जिंकल्यास विजयाचे शतक साजरे होईल. आॅस्ट्रेलियाने मायदेशात २३४ आणि इंग्लंडने २१२ सामने जिंकले आहेत.\nभारताने मायदेशात एकूण २६१ कसोटी सामने खेळले. त्यातील ९७ जिंकले. ५२ सामन्यात पराभव झाला. १११ सामने अनिर्णीत राहीले. एक सामना ड्रॉ तर एक टाय झाला. मायदेशात विजय मिळविणा-या देशांमध्ये भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेने ९८ विजय नोंदविले आहेत. त्यांना विजयाचे शतक गाठण्यासाठी पुढच्या वर्षापर्यत प्रतीक्षा करावी लागेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ\nविराट कोहली आणि रवी शास्त्रींमुळे धोनीचा कसोटीला रामराम \nइंग्लंड दौ:यात चांगली कामगिरी करण्यावर भर : विराट कोहली\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nIPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला\nVideo : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स\n...म्हणून गेलकडून सेन्चुरी मुलीला समर्पित\nसामन्याआधी चेन्नई टीमला फटका यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/civic-issues", "date_download": "2018-04-20T16:10:33Z", "digest": "sha1:5AKS23KEXFXBFVBNJMTYPCITGXVJQBH2", "length": 15520, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "civic issues Marathi News, civic issues Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nसोयी सुविधा उपलब्ध कराव्यात\nए टी एम मध्ये खडखडाट\nघाटमार्गांवर जुन्या बस नकोत\nसांड पाण्याची व्यवस्था करावी.\nवाडिया पार्क परिसरात अस्वच्छता\nसातारा रोड - बीआरटी मार्ग\nड्रेनेजचे झाकण तुटले पुणे\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nगुजरात दंगल: बाबू बजरंगीला जन्मठेप\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:45:20Z", "digest": "sha1:WZR7HSA6QM6L46MQKHLIHUJIW2JZYC3K", "length": 12637, "nlines": 300, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलास्का - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअमेरिकेच्या नकाशावर अलास्काचे स्थान\nसर्वात मोठे महानगर अँकरेज\nक्षेत्रफळ अमेरिकेत १वा क्रमांक\n- एकूण १७,१७,८५४ किमी² (६,६३,२६८ मैल²)\n- रुंदी ३,६३९ किमी\n- लांबी २,२८५ किमी\n- % पाणी १३.७७\nलोकसंख्या अमेरिकेत ४७वा क्रमांक\n- एकूण ७,३१,४४९ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ०.४९/किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $६४,३३३\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश (४९वावा क्रमांक)\nअलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉन व ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.\nइ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर अँकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी अँकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.\nअलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायू व मासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.\nयेथील माउंट मॅककिन्ले हा पर्वत उत्तर अमेरिकेमधील सर्वात उंच पर्वत आहे.\nअलास्का राज्य विधान भवन\nअलास्काचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे\nAlaska.gov – अधिकृत संकेतस्थळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/competitive/jobs/talathi", "date_download": "2018-04-20T16:44:37Z", "digest": "sha1:2JEYYPQQ5EMMZTGVJIM2QHHNNXSDN6J6", "length": 15535, "nlines": 406, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन नोकरी तलाठी पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nस्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज\nटॅक्स ऍसिस्टन्ट १५००+ सराव प्रश्नसंच\nसंपूर्ण तलाठी भरती मार्गदर्शक\nतलाठी परीक्षाभिमुख संपूर्ण मार्गदर्शक\nतलाठी विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका संच\nप्रा के के भुतेकर, प्रा सरस्वती नांदडे\nस्पर्धा परीक्षा भारताचा भूगोल\nतलाठी ग्रामसेवक आणि लिपिक प्रश्नसंच\nलिपिक टंकलेखक तलाठी व ग्रामसेवक प्रश्नसंच\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/01/CurrentAffairs29January2016.html", "date_download": "2018-04-20T16:38:05Z", "digest": "sha1:JPQVTM7VM3NL5BA533XD26QRON7IIY5I", "length": 26723, "nlines": 200, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २९ जानेवारी", "raw_content": "\nचालू घडामोडी : २९ जानेवारी\nभारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.\nसानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.\nजेतेपदासह सानिया-मार्टिना जोडीने सलग ३६ लढतीत अपराजित राहण्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या लढती जिंकताना या जोडीने सलग आठ जेतेपदांवर नाव कोरले आहे.\nचालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रॅंडस्लॅम आहे. तर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सानियाचे दुसरे जेतेपद आहे. २००९ म\nध्ये सानियाने महेश भूपतीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले होते.\nसायबर सुरक्षेसंदर्भातील सामंजस्य करारांचा आढावा\nसायबर सुरक्षेबाबत भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सीईआरटी-इन आणि मलेशिया, सिंगापूर आणि जपानमधल्या संबंधित संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.\nया सामंजस्य करारांमुळे भारत आणि संबंधित देश यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भातल्या घटनांचा तपास, अशा घटना रोखणे याबाबत ज्ञान आणि अनुभवांच्या आदान-प्रदानाला चालना मिळून सहकार्य अधिक दृढ व्हायला मदत होईल.\nसायबर सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबतच्या तीन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याचा तपशील याप्रमाणे-\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात २३ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेसंदर्भात सीईआरटी-इन आणि सायबर सिक्युरिटी मलेशिया यांच्यात सामंजस्य करार झाला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात २४ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सीईआरटी-इन आणि सिंगापूर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सायबर सुरक्षा एजन्सी सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार झाला.\nसीईआरटी-इन आणि जपान कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यात ७ डिसेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सामंजस्य करार झाला. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान २२ डिसेंबर २०१५ला पूर्ण झाले.\nगुजरातचे वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक माघारी\nगुजरात विधानसभेने पारित केलेले वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अतिरिक्त माहितीची पूर्तता करण्याची सूचना करत परत पाठवले आहे. राष्ट्रपतींनी हे विधेयक माघारी पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे.\n‘गुजरात कण्ट्रोल ऑफ टेररिझम अ‍ॅण्ड ऑर्गनाइझ्ड क्राइम विधेयक २०१५’ या नावाने हे विधेयक गुजरात विधानसभेत एप्रिल २०१५मध्ये मंजूर करण्यात आले होते.\nहे विधेयक यापूर्वी गुजरात विधानसभेने दोनदा मंजूर करून राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कठोर तरतुदी असल्याने दोन्ही वेळेस तत्कालीन राष्ट्रपतींनी हे विधेयक फेटाळले होते.\nतत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००४मध्ये पहिल्यांदा हे विधेयक परत पाठवले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीदेखील हे विधेयक राज्य सरकारला परत पाठवले होते.\nसंबंधितांचे दूरध्वनी ‘टॅप’ करून न्यायालयात त्याचा वापर पुराव्यादाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्याची वादग्रस्त तरतूद या विधेयकामध्ये आहे.\nतसेच पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात सादर करता येऊ शकेल तसेच आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तपासाचा सध्याचा कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवसांवर वाढविण्याच्या तरतुदीही या विधेयकात आहेत.\nई-तिकिटांचा काळा बाजार बंद होणार\nरेल्वे प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासंदर्भातील नियमांमध्ये रेल्वे खात्याने (आयआरसीटीसी) बदल केले आहेत.\nऑनलाईन तिकिट बुक करताना एका व्यक्तीचे लॉग-इन वापरून एका दिवसात दोनवेळा व एका महिन्यात फक्त सहावेळाच तिकिटे बुक करता येणार आहेत. सध्या एका युजरला महिनाभरात १० तिकिटे बुक करता येतात.\nरेल्वेकडून १५ फेब्रुवारीपासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने काही प्रवाशांना अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे.\nया नव्या नियमानुसार तत्काळ बुकिंगमध्ये एका व्यक्तीला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत फक्त दोन तिकीटे घेता येतील.\nएनसीसी संचालनात महाराष्ट्र तिसरा\nगेल्या २५ वर्षांपैकी १७ वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राला एनसीसी संचालनात यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.\nपंजाब, चंदिगड, हरियाणा हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला पंतप्रधान बॅनरचा तर कर्नाटक, गोवा या संयुक्त संचालनालयाला उपविजेतेपदाचा मान मिळाला आहे.\nदिल्लीतील छावणी भागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व वितरण करण्यात आले.\nविन्सन मॅसिफ सर करणारी पहिली आयपीएस : अपर्णा कुमार\nउत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार हिने अंटार्क्टिकातील सर्वांत उंच शिखर माऊंट विन्सन मॅसिफ सर करुन विक्रम केला आहे. या शिखरावर तिरंगा फडकावणारी ती पहिली प्रशासकीय अधिकारी ठरली आहे.\n५ जानेवारी रोजी वेगवेगळ्या देशातील १० सदस्याच्या टीमसोबत ही मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यात अपर्णाचा समावेश होता. तिने १७ जानेवारी रोजी हा विक्रम आपल्या नावावर केला.\nआता जगभरातील ७ आव्हानात्मक शिखरांपैकी ५ शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोहिमेतही ती सहभागी होणार आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले या शिखरांचाही समावेश यात आहे.\nलखनौच्या पोलिस डेलिकॉम विभागात अर्चना डीआयजी आहे. २००२ च्या बॅचची ती आयपीएस अधिकारी आहे.\nगिर्यारोहणात अनेक विक्रम आपल्या नावावर केल्याने मार्च २०१५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ देऊन अपर्णाला गौरविले होते. प्रजासत्ताक दिनाला तिला स्पेशल डीजीपी रिकमेंडेशन डिस्कही प्रदान करण्यात आली.\nधोनीच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nएका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याप्रकरणी धोनीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला आणि त्याच्यावर बजावण्यात आलेल्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.\nमहेंद्रसिंग धोनीच्या विरोधात ८ जानेवारीला अनंतपूरमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.\nएका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते वाय. श्यामसुंदर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका धोनीवर ठेवण्यात आला.\nभारताच्या महिला क्रिकेट संघाचा विक्रम\nभारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका विजयाचा इतिहास घडवला. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे.\nमेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सने पराभूत केले.\nपावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी १० षटकांत ६६ धावांचे आव्हान होते. भारताच्या सलामी जोडीने हे आव्हान अवघ्या ९.१ षटकांत पूर्ण केले.\nअयोनिका पॉलचा रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित\nराष्ट्रकुल पदकप्राप्त मुंबईकर अयोनिका पॉलने आशियाई ऑलिम्पिक नेमबाजी पात्रता स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदकासह रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.\n२३ वर्षीय आयोनिकाने २०५.९ गुणांची नोंद केली. इराणच्या नारमेह खेदामती हिने सुवर्ण पदक मिळविले. तिचेही २०५.९ गुण झाले. त्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला. त्यामध्ये आयोनिकाने ९.९ गुण नोंदविले, तर खेदामती हिने १०.१ गुणांची नोंद केली.\nरिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती अकरावी भारतीय नेमबाज आहे.\nइडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६\nअमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त करून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका समूहाने त्यांच्या प्रचारासाठी एक राजकीय कृती समिती स्थापन केली आहे.\nआयोगाकडे ‘इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६’ची नोंदणी राजकीय कृती समिती म्हणून करण्यात आली आहे. अमेरिकेचे पुढील अध्यक्ष ट्रम्प हेच व्हावेत यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचा पाठिंबा मिळविण्याचा या गटाचा उद्देश आहे.\nअमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणे, जागतिक पातळीवर अमेरिकेला योग्य पद्धतीने आणणे, दहशतवादाचा नि:पात करणे हे ट्रम्प यांचे कार्यक्रम उत्तम आहेत असे या समूहाला वाटत आहे.\nसेटन हॉल विद्यापीठातील प्राध्यापक ए. डी. अमर हे या समूहाचे अध्यक्ष आहेत, तर न्यूयॉर्कमधील अॅटर्नी आनंद अहुजा हे उपाध्यक्ष आहेत.\nनथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन\n‘नथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन’ असे या पुस्तकाचे नाव असून ते अनुप अशोक सरदेसाई यांनी लिहिले आहे.\nत्याचे प्रकाशन गांधी पुण्यतिथी म्हणजेच ३० जानेवारीला मडगावच्या रवींद्र भवन येथे भाजप नेते दामोदर नाईक यांच्या हस्ते होणार आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ जानेवारी\nचालू घडामोडी : ३० जानेवारी\nचालू घडामोडी : २९ जानेवारी\nचालू घडामोडी : २८ जानेवारी\nचालू घडामोडी : २७ जानेवारी\nचालू घडामोडी : २६ जानेवारी\nचालू घडामोडी : २५ जानेवारी\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचालू घडामोडी : २४ जानेवारी\nचालू घडामोडी : २३ जानेवारी\nचालू घडामोडी : २२ जानेवारी\nचालू घडामोडी : २१ जानेवारी\nचालू घडामोडी : २० जानेवारी\nचालू घडामोडी : १९ जानेवारी\nचालू घडामोडी : १८ जानेवारी\nचालू घडामोडी : १७ जानेवारी\nचालू घडामोडी : १६ जानेवारी\nचालू घडामोडी : १५ जानेवारी\nचालू घडामोडी : १४ जानेवारी\nपंतप्रधान पीक विमा योजना\nचालू घडामोडी : १३ जानेवारी\nचालू घडामोडी : १२ जानेवारी\nचालू घडामोडी : ११ जानेवारी\nचालू घडामोडी : १० जानेवारी\nचालू घडामोडी : ९ जानेवारी\nचालू घडामोडी : ८ जानेवारी\nचालू घडामोडी : ७ जानेवारी\nचालू घडामोडी : ६ जानेवारी\nचालू घडामोडी : ५ जानेवारी\nचालू घडामोडी : ४ जानेवारी\nचालू घडामोडी : ३ जानेवारी\nचालू घडामोडी : २ जानेवारी\nचालू घडामोडी : १ जानेवारी\nचालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/india-south-africa-second-test-form-saturday/articleshow/62464182.cms", "date_download": "2018-04-20T16:30:21Z", "digest": "sha1:BAJB2V5P2EMI4FRI4D66HJBFNBZFZN6S", "length": 29627, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india south africa second test form saturday | ​ सेंच्युरियनवरही ‘कसोटी’ - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या केपटाउन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली होती. या चुकांमधून धडा घेतला नाही, तर अशीच स्थिती सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्टस पार्कच्या स्टेडियममध्येही बघायला मिळणार आहे. कारण येथील खेळपट्टीही चेंडूला अधिक उसळी मिळणारी, अधिक वेगवान असणार आहे.\nया स्टेडियमचे ग्राउंड्समन ब्रायन ब्लॉय म्हणाले, ‘आम्ही सर्वोत्तम खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे तुम्हाला या मैदानात बॅट आणि बॉलमध्ये चांगली लढत बघायला मिळेल. केपटाउन कसोटीत पहिल्या दिवसापासून चेंडूला चांगला स्विंग मिळत होता. मात्र, ही खेळपट्टी त्यापेक्षा सरस असेल, एवढे मात्र निश्चित. गुरुवारपासून पाऊस असण्याचीही शक्यता नाही. त्याचबरोबर ‘ग्रीन टॉप’ करण्याचीही आमची इच्छा नाही. कसोटी पाच दिवस चालेल, अशीच खेळपट्टी आम्ही तयार करणार आहोत.’ ब्लॉय यांनी कसलेल्या ग्राउंड्समनसारखी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, पहिल्या कसोटीतील भारतीय फलंदाजांची झालेली स्थिती पाहता दक्षिण आफ्रिका पुन्हा वेगवान खेळपट्टीचीच मागणी करतील, यात शंकाच नाही. दक्षिण आफ्रिका स्वत: वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यासह मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. मॉर्ने मॉर्केल, कॅगिसो राबाडा आणि व्हेरनॉन फिलँडर या त्रिकुटाने पहिल्या कसोटीत भारतावर वर्चस्व राखले आहे. डेल स्टेन दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका फिरकी गोलंदाज केशव महाराजलाही वगळण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत ख्रिस मॉरिस आणि अँडिले फेहलुक्वायो यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.\nदुसरीकडे, भारतीय संघात ‘ऑल इज वेल’ नाही. भारतातील खेळपट्ट्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या फलंदाजांचे परदेशातील वेगवान खेळपट्ट्यांवर खेळताना फलंदाजीचे तंत्र अपुरे ठरत आहे. त्यामुळे शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांचे किंवा या दोघांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. धवनने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १३ चेंडूंत १६ आणि दुसऱ्या डावात २० चेंडूंत १६ धावा केल्या. रोहित शर्माने ५९ चेंडूंत ११ आणि ३० चेंडूंत १० धावा केल्या आहेत. शिखर धवनला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज येथे अद्याप कसोटीत शतक ठोकता आलेले नाही. तिच स्थिती रोहित शर्माची आहे. वन-डेत तीन द्विशतके नावावर असणाऱ्या रोहितला कसोटीत अद्याप आपला जम बसविता आलेला नाही. त्याला भारताबाहेर एकही शतक ठोकता आलेले नाही. त्याची कसोटीतील तिन्ही शतके ही भारतातीलच आहेत.\nत्यामुळे या दोघांपैकी एकाच्या जागी अजिंक्य रहाणेला स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. अर्थात हा निर्णय संघव्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीला घ्यायचा आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कोहलीने रोहित शर्माची पाठराखण केली होती. रहाणेच्या जागी रोहितची ही निवड ही दोघांचा सध्याच्या फॉर्मनुसार केली असल्याचे कोहलीने सांगितले होते. आता खराब फॉर्मातून जात असलेल्या रहाणेला पुन्हा बाहेर बसून संघात बदल न करण्याचा पवित्रा कोहली घेतो का, याबाबत उत्सुकता आहे. अर्थात, रहाणेची परदेशातील कामगिरी चांगली आहे. ही त्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. २०१३च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने दोन अर्धशतके ठोकली होती. यात एकदा त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्येही शतक ठोकले आहे.\nसेंच्युरियनची खेळपट्टी अधिक वेगवान बनवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय संघातून फिरकी गोलंदाज आर. अश्विनलाही डच्चू मिळू शकतो. पहिल्या कसोटीत अश्विनच्या वाटेला केवळ ८.१ षटके आली. यात त्याने दोन बळी मिळवले. मात्र, त्याच्या जागी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी मिळू शकते. शर्माला परदेशात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने ऑस्ट्रेलियात १० कसोटींत २०, इंग्लंडमध्ये ७ कसोटीत २५, न्यूझीलंडमध्ये ५ कसोटीत २३ आणि दक्षिण आफ्रिकेत ५ कसोटीत १२ बळी मिळवले आहेत. मालिका वाचविण्याचे दडपण भारतावर असल्याने संघात बदल अपेक्षित आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nSachin Tendulkar:...म्हणून सचिन रस्त्यावर उतरला\nSachin: पार्ल्यातील रस्त्यावर सचिनची बॅटिंग\nमहंमद शमीला पोलिसांकडून समन्स\nIPL: मुंबई आज वानखेडेवर बेंगळुरूशी भिडणार\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्तींमध्ये विराट\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\n2महाराष्ट्र संघाचा मुंबईकडून पराभव...\n3अर्जुन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात केली धमाल...\n4'त्या' चुंबनामुळे रुसली रबाडाची गर्लफ्रेंड...\n5धवनऐवजी राहुल; रोहितला अजून एक संधी...\n6महिलाही द. आफ्रिका दौऱ्यावर...\n7मुंबईसाठी गोलंदाजी करायची आहे \n8पठाणवर ‘वाडा’ची टांगती तलवार\n9मुश्ताक अली स्पर्धेचा ढाचा आयपीएलला साजेसा...\n10मुंबईची जेमिमा भारतीय संघात...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2018-04-20T16:45:40Z", "digest": "sha1:H67ZG3W54IBBA2SHOVNGNRMP6LYPGBPU", "length": 4017, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ६५ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. ६५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/08/marathi-kavita_7115.html", "date_download": "2018-04-20T16:25:11Z", "digest": "sha1:KPBU6VW7ZZICENKCXSYB3E4HZ4NHNVXL", "length": 22493, "nlines": 253, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: { Marathi kavita } कशी मुलगी पाहिजे?", "raw_content": "\n{ Marathi kavita } कशी मुलगी पाहिजे\nतसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.\nहा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.\nम्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,\n\"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे.\"\nपण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal\nपोरगी जशी असते - शांत, सोज्वळ (\"सोज्वळ\" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात),\nसगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या\nथोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी,\nई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'\nजवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको\nकॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या\nमावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात\n\"घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण\nझाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे\n~\"मिळेल हो, नक्की मिळेल\" असा आशीर्वाद हमखास मिळतोच\nमित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे\nबदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC\nकिंवा BC शीच करायचं असतं.\n'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न,\nकिंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा\n'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन\nचुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की,\n स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात अरे, त्या फक्‍त सिनेमात असतात.\nखरं आयुष्य खूप वेगळं असतं\nसगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते.\nतिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं.\nमित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात.\nमग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते.\n'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु)\n' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत\nसलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो)\nम्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही\nअप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का\nआम्हाला कशी मुलगी पाहिजे\n1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची\nह्या करता \"हीथ्रो टेस्ट\" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली.\nतर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो,\n तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला\nमुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि\n२) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी\nचालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा\nबुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा\n३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज,\nआणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि\nआकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे\nकाय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या\nबालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे,\nत्याला आम्ही तरी काय करणार\n४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस'\nआणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. \"चंपक / चांदोबा\" आणि\n\"डॉक्टर कोतनीस की अमर कहानी\" हे उत्तर पण चालेल अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात\nनाही तसाच तो जेन ऑस्टेनचा \"मिस्टर डार्सी\" आणि शाहरुखचा \"राहुल\" फक्‍त पुस्तकात किंवा\nसिनेमा विश्वातच सापडतो हो\n५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे\n- तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच\n६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या\nतुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी\n७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला\nयेत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर\nआमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे.\n८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान\n, गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे.\nअधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं\n९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या\nखोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर\nजिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं,\nनाहीतर \"काय ही रद्दी जमा केली आहे\" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही.\n१०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्‍त\n\"हास्य\" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्‍तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+'\nचला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला\nबरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या \"अप्सरा + बायको\" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी\nमाहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल.\nतो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो,\nधागे तोड लाओ चांदनी से नूर के,\nघुंघट ही बना लो रौशनी से नूर के,\nशर्म आ गयी तो आघोष में लो,\nहो सांसों से उलझी रहें मेरी सांसें,\nबोल ना हलके, हलके\nबोल ना हलके, हलके...\n{ Marathi kavita } तुम्हाला वर्गात पहिलं यायचंय\nRe: { Marathi kavita } उन्हात खूप खूप तापून रस्ता ...\n{ Marathi kavita } एक प्रेमळ विनोदी सत्य…=लव्ह का ...\n{ Marathi kavita } अण्णांचे लग्न झाले असते तर........\n{ Marathi kavita } का वागतात या मुली अशा\n{ Marathi kavita } आजकालच्या ह्या मुली\n{ Marathi kavita } .एका झाडाखाली....दोन मुली\n{ Marathi kavita } सुंदर मुली भाव खातात...\n{ Marathi kavita } आजची पोरं म्हणे प्रेम करतात\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } तु हो म्हणाली असतीस तर\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/how-kamla-mill-compound-fire-take-place-278374.html", "date_download": "2018-04-20T16:35:59Z", "digest": "sha1:NQF3SRCIDK2ZFQQEXFY4H2PCUXBKYWET", "length": 10970, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीचं तांडव रात्रभर चाललं होतं. सकाळी 6.23ला आग विझवण्यात यश आलं. पाहू या या आगीचा घटनाक्रम\n29 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीचं तांडव रात्रभर चाललं होतं. सकाळी 6.23ला आग विझवण्यात यश आलं. पाहू या या आगीचा घटनाक्रम\nकमला मिलमधील ट्रेड हाऊस इमारतीतल्या मोजो पबला आग\nअग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोचल्या\nवन अबव्ह या लाऊंजलाही आग लागली\nजखमींना केईएममध्ये केलं दाखल\nना.म.जोशी पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल\nरात्री 2.03 वा.- केईएम रुग्णालयात आणलेल्यांपैकी 14 जण मृत घोषित\nसकाळी 6.23 वा.- आग विझवण्यात यश\nवन अबव्ह हा ओपन एअर रूफटॉप लाऊंज होता. मात्र त्याला पूर्णपणे ताडपत्री आणि बांबू स्ट्रक्चरनं कव्हर केलं होतं. हे स्ट्रक्चर अनधिकृत असल्यानं त्याला महापालिकेनं नोटीसही बजावली होती.येण्याजाण्याकरता एकच रस्ता होता आणि तिथे आग लागल्यानं लोकांना बाहेर जाता आलं नाही. त्यातच तिथे उपस्थित असलेल्यांच्या अंगावर संपूर्ण लाकडी स्ट्रक्चर कोसळलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/marathi-news-entertainment-news-barayan-movie-trailer-esakal-facebook-live-89508", "date_download": "2018-04-20T16:49:29Z", "digest": "sha1:4TURIAEUBK2RRORIHUOK35KGORWHIOJK", "length": 14572, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Entertainment News Barayan Movie Trailer esakal facebook Live परीक्षा..कॉलेज..हॉस्टेल..सगळ्यांचं 'बारायण' | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\nपुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'बारायण'च्या टीमने 'ई सकाळ'शी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.\nपुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'बारायण'च्या टीमने 'ई सकाळ'शी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.\nशिक्षणाचे बाजारीकरण, मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांची अति काळजी, भोंदुगिरी, अशा विविध मुद्द्यांवर अतिशय रंजक आणि खोचक पद्धतीने दिग्दर्शकाने प्रकाश टाकला आहे. बारावीची टक्केवारी खरंच आयुष्य बदलवणारे वळण आहे का पालक इयत्ता आठवी पासूनच बारावीच्या परीक्षेची युद्धपातळीवर तयारी करून घेतात आणि मग घराघरात 'बारायण' सुरु होते. यावर अतिशय खुमासदार शैलीत दिग्दर्शक दिपक पाटील यांनी भाष्य केले आहे.\n'बारायण' मध्ये अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे आणि त्यासोबत अभिनेते नंदू माधव बाबांच्या भूमिकेत, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भूतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा-संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना, संगीतकार पंकज पडघन यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. बऱ्याच वर्षानंतर अलका याग्निक यांचा आवाज मराठी गाण्याला लाभला आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो डिरेक्टर म्हणून काम केलेले आहे.\nफक्त विद्यार्थ्यांनी नव्हे तर पालकांनी देखील आवर्जून बघायला हवा असा ‘बारायण’ हा चित्रपट थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात देखील दाखविला जाणार आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nसम्राज्ञी ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील सम्राज्ञी ग्रुपच्या वतीने नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात 'जात्यावरची ओवी व आयुर्वेद...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/beed-majlagav-ashok-dak-electied-as-a-chairman-of-market-commite/", "date_download": "2018-04-20T16:40:35Z", "digest": "sha1:SH32TI73DADEEJND3J5EPGMTOECX36IH", "length": 16334, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nराज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध\nमहाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदासाठी बीड, धाराशिव मतदारसंघातुन येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची आज बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली आहे.\nराज्य बाजार समिती संघामध्ये येत्या २३ मार्च रोजी एकूण २१ संचालक पदासाठी ही निवडणुक होत आहे. बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून सर्वसाधारण गटातून धाराशिव येथून अच्यूतराव जनार्दन साठे अॅड. प्रकाश नामदेव मोटे हे दोन अर्ज तर बीडमधून माजलगांव बाजार समितीचे सभापती अशोक गोविंदराव डक असे तिन अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोटे व साठे यांनी अर्ज मागे घेतल्याने अशोक डक यांचा एकमेव अर्ज राहिला असल्याने संचालकपदी डक यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nराजकीय दृष्ट्या या संघावर सर्व पक्षीय वर्चस्व आहे. या संघाच्या अध्यक्षपदासाठी अशोक डक यांचे नाव आघाडीवर आहे. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्वादी काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून डक यांनी मोठे योगदान दिले असून त्यावेळी जिल्हा परिषद सत्तांतरामध्ये देखिल त्यांची भूमीका महत्वाची होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी डक यांची जवळीकता असल्याने त्यांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपरीक्षेला मोबाईल घेऊन बसलेले शेकडो मुन्नाभाई भरारी पथकाने पकडले\nपुढीलपुतळ्यांच्या विटबंनेचा संघाकडून निषेध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-cm-fadanvis-uddhav-thackeray-in-kolhapur-482296", "date_download": "2018-04-20T16:03:20Z", "digest": "sha1:GBSLH3F7WZXXEW2L2FUHYCUTCEVNXWIS", "length": 15873, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरी आखाड्यात", "raw_content": "\nकोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरी आखाड्यात\nकोल्हापुरातला आजचा दिवस राजकीय हालचालींनी भरलेला असणार आहे.कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यावेळी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांच्या सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nकोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरी आखाड्यात\nकोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरी आखाड्यात\nकोल्हापुरातला आजचा दिवस राजकीय हालचालींनी भरलेला असणार आहे.कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यावेळी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांच्या सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/murder-by-psyco-killer/", "date_download": "2018-04-20T16:12:50Z", "digest": "sha1:7ZLBXCL33XWEZTOFG3XI6O4MRHXN6RWT", "length": 4099, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "murder by psyco killer – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nअवघ्या दीड तासात केली ६ जणांची लोखंडी रॉडने हत्या : ‘असा ‘ आला पोलिसांच्या जाळ्यात\nरमण राघव चित्रपटामध्ये सायको किलर दाखवला होता . त्याला लोकांच्या हत्या करण्याचे व्यसन होते . तो त्यासाठी लोखंडी रॉड चा वापर करायचा. अशीच काहीशी सत्य घटना हरियाणा यामध्ये घडली आहे. मंगळवारी पहाटे २:३० ते ४ वाजेपर्यंत ह्या नराधमाने तब्बल ६ जणांना मारून टाकले. विशेष म्हणजे हा सैन्यातील निवृत्त जवान असून त्याच्याकडून असे कृत्य घडल्याबद्दल आश्चर्य… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-20T16:13:35Z", "digest": "sha1:5JOT4QE7XS5RVNIE5V3C377C7CYNF4KE", "length": 8442, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युती ही भाजपची मजबुरी नाही; भाजपही स्वबळावर निवडणूक लढवेल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुती ही भाजपची मजबुरी नाही; भाजपही स्वबळावर निवडणूक लढवेल\nसुधीर मुनगंटीवार यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर\nमुंबई – युती ही भाजपची मजबुरी नाही. युतीचा निर्णय भावनेवर आधारीत नाही तर तर्क आणि आकड्यांवर होईल. मात्र, शिवसेना युतीला तयार नसेल तर भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊन सत्ता मिळवेल, असा इशारा देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुनगंटीवार यांच्या इशाऱ्यामुळे युतीमधील धुसफूस कायम असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.\n2014 पासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपने शिवसेनेला सापत्नभावाची वागणूक दिली. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेसोबत युती होणारच असे ठासून सांगितले.\nमात्र, शिवसेना युतीबाबत फारशी गंभीर नाही. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी एका कार्यक्रमात भाजपाने कितीही मुका घेण्याचा प्रयत्न केला तरी युती होणार नाही, शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यापार्श्वभूमिवर आज पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाची भूमिका मांडली. युतीचा निर्णय भावनेवर आधारीत नाही तर तर्क आणि आकड्यांवर होईल. तूर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारताबरोबर चर्चेची प्रक्रिया सुरू व्हावी\nNext articleभामा आसखेडच्या कामाला गती मिळणार\nभिवंडीत शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार-रामदास कदम\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\nचिथावणीखोर भाषण : भाजप आमदारावर एफआयआर दाखल\n…तर भारताला मिळू शकते ऑलम्पिकचे यजमानपद; प्रयत्न सुरू\nबचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/st-strike-police-lathicharge-in-satara/", "date_download": "2018-04-20T16:26:07Z", "digest": "sha1:DO6ENRC5X7Z7PJSVNEJ7PY7YOHLXTWFK", "length": 10773, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "सरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार\nएस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे .\nखाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक व्हावी म्हणून,आंदोलक कर्मचाऱ्यांनी फाटकावर एसटी बसेस आडव्या लावल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्या एस.टी. बसेस हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र या बसेस हलवता येऊ नयेत म्हणून चाकाची हवा सोडण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. शेवटी नाईलाजाने पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.\nत्यामुळे कर्मचारी अजूनच संतप्त झाले . संतप्त कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या. संपादरम्यान खासगी वाहनांची वर्दळ वाढली असली तरी सातारा बसस्थानकात अजून तरी त्यांना आत जाऊ दिल जात नाहीये.\nदरम्यान दर अर्ध्या तासाला सातारा ते पुणे, तसंच दर एक तासाला मुंबई, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती, सातारा विभाग नियंत्रकांनी दिली आहे. परिवहन महामंडळाच्या नियमावलीनुसारच तिकीट दरांचं नियोजन बसस्थानकात केलं जाणार आहे.\nमात्र आता चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते . त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी ह्या विषयावर चर्चा केली असून एसटी कर्मचाऱ्यांचा आज संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nराज्यातील एसटी संपाचा ताण रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणावर आला आहे . एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.संपामुळे एसटी स्थानके ओस पडू लागली आहेत तर रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली आहे.\nदरम्यान प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आपले आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत . जळगावात किर्तनाच्या माध्यमातून सरकारचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न चोपडा बस आगार कर्मचाऱ्यांनी केला. किर्तनाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.तर औरंगाबाद आणि येवल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध केला. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. रोज १०० वेळा मारण्यापेक्षा एकदा वाघ बनून मारू , असेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nह्या संपामुळे कित्येक जणांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही तर कित्येकजन लक्ष्मी पूजनाला देखील आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत. आज संप जरी मिटला तर प्रवासी मात्र आपले झालेले हाल विसरू शकणार नाहीत .\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, एस.टी.संप, दिवाकर रावते, परिवहन मंत्री\n← अजब फतव्याची गजब गोष्ट : टोमॅटोचा धर्म ख्रिश्चन आणि भुकेला पती आपल्या पत्नीला खाऊ शकतो मोबाईल नंबर आधारला लिंक करायचा मेसेज दिवाळीलाच का आला : मग नक्की वाचा →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mu.ac.in/portal/useful-link/election-section/", "date_download": "2018-04-20T16:27:05Z", "digest": "sha1:Q7IKZGVSY2CZOY4W7S752HH6EJAKKWFD", "length": 23817, "nlines": 159, "source_domain": "mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Election Section", "raw_content": "\nमतपत्रिका छाननी आणि मतमोजणी वेळी उमेदवारांसाठी सूचना\nअधिसभा १० नोंदणीकृत पदवीधर जागांसाठी वैध/ अवैध उमेदवारांची यादी\nनामनिर्देशन अर्ज छाननीकरिता प्रतिनिधी नेमणूक करण्याबाबत नमुना\nनामनिर्देशन अर्जाच्या छाननी/ मतमोजणीकरिता महत्वाच्या सूचना\nमहाविद्यालयीन अध्यापकांची अधिसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी\nमहाविद्यालयीन अध्यापकांची विद्यापरिषद निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी\n४ विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रमांच्या समावेशाबाबत\nविद्यापीठाच्या अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकांबाबतचे जाहीर प्रकटन\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये कलम ३० (४), ६२(२), ९९,१०९ (३) व १४६(१) मध्ये सुधारणा अध्यादेशानुसार कार्यवाही करणेबाबत\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(द)(r) नुसार महाविद्यालयीन अध्यापकांमधून अधिसभेच्या १० आणि कलम ३२(३)(छ) (g) नुसार विद्यापरिषदेवर प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी २ अध्यापकांच्या जागांच्या निवडणुकांसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याबाबत परिपत्रक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(द)(r) नुसार मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेवर १० महाविद्यालयीन अध्यापक आणि कलम ३२(३)(छ) (g) नुसार प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे २ महाविद्यालयीन अध्यापक यांच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याबाबत जाहीर प्रकटन\nमतपत्रिका छाननी /मतमोजणीकरिता प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी अर्जाचा नमुना 'क'\nविद्यापीठाच्या अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकांबाबतचे जाहीर प्रकटन\nसूचना – अध्यापक तात्पुरती मतदारयादीवर आक्षेपांकरिता सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरु असल्याबाबत सूचना\nविद्यापीठाच्या अधिसभेवर आणि विद्यापरिषदेवर अध्यापक निवडणुकांबाबतचे प्रकटन\nप्राचार्य, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आणि विभाग प्रमुख या मतदार संघाच्या निवडणुका ७ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे त्याकरिता नामनिर्देशन अर्ज भरावयाचे अंतिम तारीख २१ जानेवारी २०१८ आहे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४० (२) (ग) नुसार विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांच्या गटातून निवडून द्यावयाचे संलग्न महाविद्यालयातील व मान्यताप्राप्त परिसंस्थेतील या निवडणूक सूचनेस जोडलेल्या परिषष्ठ -१ मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक अभ्यासमंडळावर तीन (०३) विभागप्रमुखांची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ण) (o) नुसार प्राचार्यांच्या गटाने त्यांच्या मधून दहा (१०) प्राचार्यांची अधिसभेवरील सदस्य पदाची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (त) (p) नुसार संलग्न महाविद्यालये किंवा परिसंस्था यांच्या व्यवस्थापन प्रतिनिधी गटाने सहा (०६) व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीच अधिसभेवरील सदस्य पदाची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ध) (s) मधील तरतुदीनुसार विद्यापीठ अध्यापकांच्या गटाने त्यांच्यामधून तीन (०३) विद्यापीठ अध्यापकांची अधिसभेवर सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी दि. १७ मी २०१७ रोज महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या सन २०१७ चा एकरूप परिनियम क्रमांक ०१ मधील मुद्दा क्रमांक ०९ नुसार निवडणूक सूचना\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ध) (S) नुसार विद्यापीठ अध्यापकांमधून अधिसभेच्या तीन जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ण) (o) नुसार महाविद्यालयांच्या प्राचार्यांमधून अधिसभेच्या १० जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (त) (P) नुसार संलग्न महाविद्यालये किंवा परिसंस्था यांच्या व्यवस्थापकांमधून अधिसभेच्या सहा जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४० (२) (ग) (C) नुसार संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थाचे विभाग प्रमुखांमधून अधिसभेच्या तीन जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nविद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांबाबतचे प्रकटन\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार ४ विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रमांचा समावेश करण्याबाबत\nनावनोंदणी / मतदार यादी तयार करण्यासाठीची मुदत वाढविण्याबाबत\nनिवडणुकी बाबत वेळोवेळी विद्यापीठाने जाहीर केलेले प्रकटन / विविध परिपत्रिके आपल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्ड वर लावण्याबाबत\nनावनोंदणी / मतदार यादी तयार करण्यासाठीची मुदत वाढविण्याबाबत कोणाचीही मुदतवाढीची मागणी मंजूर करता येणार नाही\nसंचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nसंचालक, नवोपक्रम, नव संशोधन व साहचर्य, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nसंचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nविद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य म्हणून निवडून येण्याच्या नामनिर्देशित करण्याच्या अथवा स्वीकृत करून घेण्याच्या पात्रता शर्ती\nमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , वर्ष १ अंक ३१(५), दिनांक १७ ऑगस्ट,२०१५ चा अधिनियम क्र. म २९ आणि पत्र क्र मवीस -२०१५(११२/१५)/विशि -४,दिनांक २५ऑगस्ट,२०१५ ,२०१५ नुसार विद्यापीठीच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूक दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३६(५) मधील तरतुदीनुसार विविध विषयाच्या अभ्यास मंडळाची संशोधन व मान्यता समिती स्थापन करता आलेली नाही.\nसन २०१५ मध्ये घेण्यात येणा-या विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या व अभ्यास मंडळांच्या निवडणूकांची सुरू करण्यात नावनोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन/ ऑफलाईन) वरिल अधिनियमानुसार तात्काळ थांबविण्यात येत असून दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येणार नाहीत\nसन २०१५ मध्ये घेण्यात येणा-या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील दहा नोंदणीकृत पदवीधर सदस्यांच्या निवडणूकांची सुरू करण्यात नावनोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन/ ऑफलाईन) वरिल अधिनियमानुसार तात्काळ थांबविण्यात येत असून दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येणार नाहीत\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख ३१ ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख १० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख १० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: पदव्युत्तर शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरताना व्याख्या लक्षात घेऊन अर्ज सादर करावेत\nप्राधिकरणाचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा नामनिर्देशित होण्यासाठीच्या पात्रता\nकुलगुरू पदासाठी अर्हता व अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/kolhapur-mahalaxmi-kirnostav-273944.html", "date_download": "2018-04-20T16:23:32Z", "digest": "sha1:2MXFOKIXF3EXE7KHIB4VZ65AULK3M4AJ", "length": 10886, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nकोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ\nकरवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल झाले असून आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि ही किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत गेली\nकोल्हापूर, 09 नोव्हेंबर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल झाले असून आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि ही किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत गेली... त्यामुळे आज पहिल्याच दिवशी भाविकांना हा सुवर्ण क्षण अनुभवता आला.\nवर्षांतून दोन वेळा अंबामातेच्या या मंदिरामध्ये किरणोत्सव पार पडतो. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाईच्या मंदिराला ओळखला जात..पुढचे दोन दिवस अजून हा किरणोत्सव चालणार असून अंबामातेच्या भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kolhapurmahalaxmi kirnostavकोल्हापूर किरणोत्सवमहालक्ष्मी मंदिर किरणोत्सव\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/bdd-chawls-redevelopment-project-258856.html", "date_download": "2018-04-20T16:23:15Z", "digest": "sha1:NDKC2CN4ZTK5AGYGRSVPGV6MRFG2IFNI", "length": 10384, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असा होणार बीडीडींचा पुनर्विकास", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nअसा होणार बीडीडींचा पुनर्विकास\nअसा होणार बीडीडींचा पुनर्विकास\n- पुनर्विकासामध्ये बीडीडीच्या चाळक-यांना 500 फुटांची मोफत सदनिका\n- नायगाव, वरळी, डिलाईल रोड आणि शिवडी परिसरात एकूण 207 बीडीडी चाळी\n- बीडीडीमध्ये सध्या 160 ते 180 चौरस फुटांची घरे\n- पहिल्या टप्प्यात नायगाव, वरळी, डिलाईल रोड इथल्या 194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास\n- नायगावच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी कंपनीकडे\n- पहिल्या टप्प्यात नायगाव, वरळी, डिलाईल रोड इथल्या 194 बीडीडी चाळींचा पुनर्विकास\n- शिवडी परिसरातील बीडीडी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत उभ्या असल्यानं या चाळींबाबत नंतर निर्णय होईल.\n- डिलाईल रोडच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम शापूरजी अँड पालनजी कंपनीकडे\nफोटो गॅलरी 2 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 4 days ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 4 days ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 4 days ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nफोटो गॅलरी 1 week ago\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-shivrajyabhishek-will-fall-rajpath-90008", "date_download": "2018-04-20T16:53:06Z", "digest": "sha1:JB4EXXBJPDWHQFWD3KAFNPG6F7K7YN2U", "length": 13627, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news Shivrajyabhishek will fall on the Rajpath! राजपथावर अवतरणार शिवराज्याभिषेक ! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nनवी दिल्ली: \"युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला आज शिवाजी राजा झाला....' हा गजर या वर्षीच्या 69 व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर दुमदुणार आहे.... यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित देखावा- चित्ररथ सादर होणार आहे. या चित्ररथाच्या निर्मितीसाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक दिल्लीत आले आहे. या वर्षी महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ राजपथावर झळकणार आहेत.\nनवी दिल्ली: \"युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला आज शिवाजी राजा झाला....' हा गजर या वर्षीच्या 69 व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर दुमदुणार आहे.... यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित देखावा- चित्ररथ सादर होणार आहे. या चित्ररथाच्या निर्मितीसाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक दिल्लीत आले आहे. या वर्षी महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ राजपथावर झळकणार आहेत.\nयंदाच्या राज्याच्या चित्ररथावर रायगडावरील जगप्रसिद्ध मेघडंबरीची प्रतिकृती असणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह दहा कलाकार चित्ररथावर असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीतांची धूनही राजपथावर सादर होणार आहे.\nराज्याच्या वतीने दिल्लीतील मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात 1980 मध्ये महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक याच विषयावरील चित्ररथ होता. त्याला प्रथम पारितोषिक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यानंतर 1993 ते 1995 दरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रथम क्रमांकाची हॅट्ट्रिक केली होती. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता.\nया वर्षी देशभरातून एकूण 29 राज्यांनी राजपथावरील चित्ररथांसाठी संरक्षण मंत्रालयाकडे अर्ज केले होते. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील फक्त 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या संचलनासाठी झाली आहे. राज्याची गौरवशाली चित्ररथ परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान देसाई व त्यांच्या पथकासमोर या वर्षी आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A5%A7_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T16:37:32Z", "digest": "sha1:BN6CI7ZAICEZ6PQUSXBWPJKVBRKQQ3RZ", "length": 5631, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गाथा १ ते ३०० - विकिबुक्स", "raw_content": "गाथा १ ते ३००\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गाथा १ ते ३०० हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गाथा १ ते ३०० येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गाथा १ ते ३०० आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गाथा १ ते ३०० नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गाथा १ ते ३०० लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गाथा १ ते ३०० ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गाथा १ ते ३०० ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-20T16:16:19Z", "digest": "sha1:DNHM3QJOT3ATMPO4YHQX25XEFENAR7VB", "length": 13649, "nlines": 127, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "आरोग्य क्षेत्राला आता जादा टक्का! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nआरोग्य क्षेत्राला आता जादा टक्का\nआरोग्य क्षेत्राला आता जादा टक्का\nपंचवार्षिक योजनेत आरोग्य क्षेत्राला एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 1.7 ऐवजी 2.5 टक्के वाटा दिला जावा, अशी शिफारस नियोजन आयोगाच्या सभासद सईदा हमीद यांनी सूरजकुंड येथे गुरुवारी बोलताना केली आहे. हा वाटा मिळाल्यास देशातील आरोग्यसेवा मोठी झेप घेईल व मोठ्या सुधारणा होतील, असे त्या म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने जीडीपीमधील मोठा वाटा दिल्यासच भारतातील आरोग्यसेवा सुधारतील, अशी सूचना करताच हमीद यांनी ही शिफारस पुढे केल्याने तिला महत्त्व आहे.\nभारताने आपल्या जीडीपीमधील मोठा वाटा आरोग्य क्षेत्रासाठी दिल्यासच आरोग्यसेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोचतील, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदविले आहे. \"असोचेम'तर्फे आयोजित अधिवेशनामध्ये बोलताना संघटनेच्या प्रतिनिधी नाता मेनाबेद म्हणाल्या, \"\"आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताला अत्याधुनिक आरोग्यसेवा साधनांची गरज असून, विविध आजारांसंदर्भातील माहिती गोळा करून त्याआधारे धोरण आखण्याची गरज आहे. देश आरोग्यसेवेच्या बाबतीत अत्यंत गरीब असून, शिक्षण व स्त्री समानतेचे प्रश्‍न अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याची गरज आहे. देशातील 65 टक्के जनता आरोग्यसेवांपासून वंचित असून, या बाबतीत 160 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 119वा आहे.''\nयोजना संशोधन केंद्रातील अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक विवेक देवरॉय यांनी स्वातंत्र्यानंतर शासनाने आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसंदर्भात 21 समित्या स्थापन केल्या असून, त्या सर्व अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले आहे. निवडीची संधी व स्पर्धा असल्यास सेवा देणाऱ्याचा दर्जा सुधारतो असे सांगत त्यांनी आरोग्य क्षेत्राच्या खासगीकरणाचे सूतोवाच केले. फार्मास्युटिकल्स विभागाचे सहसचिव देवेंद्र चौधरी यांनी सर्व गोष्टी सरकारवर सोपविणे गैर असल्याचे सांगत ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोचविण्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.\n0.6 ः एक हजार व्यक्तींमागे डॉक्‍टर.\n1.23 ः जगातील प्रमाण\n62 अब्ज ः भारतातील आरोग्याची बाजारपेठ\n47 टक्के ः 3 वर्षांखालील कुपोषित बालकांचे प्रमाण\n17 लाख ः दर वर्षी दगावणारी 1 वर्षाखालील बालके\n12 कोटी ः स्वच्छतागृह नसलेल्या नागरिकांची संख्या\nआरोग्य सेवेसाठी जीडीपीमधील अधिक रक्कम राखून ठेवण्याची शिफारस योग्य आहे. वाढीव पैशामुळे सेवांचा दर्जा नक्कीच सुधारू शकतो. मात्र, हा पैसा खासगी क्षेत्राच्या घशात घालणे अयोग्य आहे. देशातील 20 टक्के सेवा सरकारी असून, 80 टक्के सेवांचे खासगीकरण झाले आहे. सरकारी सेवांचा एकूण दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे व त्याचे वेळी या सेवांचा टक्का 50 टक्‍क्‍यांपर्यंत जाईल, हेही पाहावे. सरकारी सेवांचा दर्जा व किमतींवर सरकारने नियंत्रण आणणेही गरजेचे आहे. तसे न झाल्यास \"आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,' ही स्थिती कायम राहू शकते.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-9/", "date_download": "2018-04-20T16:28:10Z", "digest": "sha1:J74UVJ4VECPKVHDQLGNBWGP4IUIFYJ6C", "length": 7559, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवीन काय वाचाल? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकला आणि राष्ट्रविचार : अदिती जोगळेकर-हर्डीकर\nभारतीय कलेचा इतिहास आणि भारतीय कलेची समीक्षा याकडे कालानुक्रमे पाहिलं असता, “कला समीक्षक’ म्हणून लेखन करणाऱ्या निवेदिता बहुधा पहिल्या भारतीय महिला ठराव्यात. त्यांना चित्रकला, शिल्पकला अत्यंत प्रिय होती. त्यांनी चित्र, शिल्प समीक्षा केवळ आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली नाही.\nनिवेदिता यांनी म्हटले, “आपले राष्ट्रीय आदर्श, कला, संस्कृती, इतिहास, साहित्य अशा अभिमान वाटणाऱ्या गोष्टी आपल्यापाशी असताना आपण आपलं अस्सल ते सोडून इतरांचं अनुकरण करत बसणार भारतानं आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच त्या म्हणत, “टीच इंडिया टु थिंक ट्रुली अबाऊट हरसेल्फ. धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू द एण्डस आय होप फॉर.’ पुढे त्यांनी म्हटलंय, “भारतीय कलेला तिचं गतवैभव परत मिळावं आणि भारतीय कलेचा आधुनिक भारतात जणू पुनर्जन्म व्हा, हे माझं सर्वात लाडकं स्वप्न आहे असं निवेदिता म्हणत.\nयुरोपियन अमलाखाली प्राचीन भारतीय कलेचा विसर पडत चाललेल्या काळात भारतात कलेच्या क्षेत्रात काय बदल व्हायला हवेत याची मांडणी सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण रितीने निवेदितांनी केली. या पुस्तकात अत्यंत दुर्मिळ पेन्टींग, चित्रे इत्यादींचा समावेश आहे. भगिनी निवेदितांनी वर्णन केलेली परिस्थिती आजही फारशी बदललेली नाही, हे मात्र निश्‍चित.\nअदिती जोगळेकर-हर्डीकर, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोबाईल चोरणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीचा कर्मचारी अटकेत\nNext articleभारतीय कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू\n“नाणार’ : होणार की जाणार\nक्रिप्टोकरन्सी जोखमीची गुंतवणूक कशी\nस्त्री अत्याचाराची कारणे आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/megablock-today-on-the-central-harbor-route/articleshow/62491447.cms", "date_download": "2018-04-20T16:32:48Z", "digest": "sha1:WEMMHCOYS6GY7Y4SJWFDOV7XE3PG6HS3", "length": 24664, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "megablock today on the central, harbor route | मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nमध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी स. ११ ते दु. ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५ पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत सकाळी १०.३७ ते दु. ३.५६ कालावधीत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल दिवा आणि परळ स्थानकामध्ये स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यानंतर या पुन्हा अप फास्ट मार्गावर चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा किमान २० मिनिटे उशिराने धावतील.\nसीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन फास्ट/सेमी फास्ट लोकल स. १०.०५ ते दु. ३.२२ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल स. ११ ते सायं. ६ पर्यंत सुमारे १० मिनिटे उशिराने चालतील.\nरत्नागिरी-दादर पॅसेंजर लोकल दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकात थांबविली जाईल. परतीच्या मार्गावरदेखील ही गाडी दादरऐवजी दिवा येथून सुटेल. त्यासाठी दादरहून दु. ३.४० वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल. ही लोकल ठाण्यास दु. ४.०६ आणि दिवा येथे दु. ४.१३ वाजता पोहोचेल.\nसीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर स. ११.४० ते सायं. ४.४० आणि वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत ब्लॉक राहील. डाऊन हार्बर मार्गावर वाशी/बेलापूर/पनवेल ते सीएसएमटी/वडाळा मार्गावरील लोकल स. ११.३४ ते सायं. ४.४७ पर्यंत बंद राहील. वांद्रे/अंधेरी ते सीएसएमटी येथून स. ९.५६ ते सायं. ४.४३ पर्यंत लोकल सेवा खंडीत राहील.\nसीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी लोकल सेवा स. ९.५३ ते दु. ३.२० आणि वांद्रे/अंधेरी ते सीएसएमटी सेवा स. १०.४५ ते सायं. ५.०९ पर्यंत लोक सेवा बंद राहील. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून पनवेल आणि कुर्लासाठी विशेष लोकल सोडण्यात येतील.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक...\n2डोमेस्टिक विमानतळाला आग, जीवितहानी नाही...\n3न्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न नको...\n4सात जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं...\n5सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली: शिवसेना...\n6मुलुंडमध्ये बिबट्याचा हल्ला; सहा जखमी...\n7देशाबाहेर पडल्यावर सीमा नाहीशा होतात...\n8बेकायदा बॅनरना लावा २३ फेब्रुवारीपर्यंत चाप...\n10पत्राचाळ रहिवाशांना अखेर दिलासा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/cricket/these-three-batsmen-celebrated-birthdays-participation-two-indian-batsmen/", "date_download": "2018-04-20T16:24:19Z", "digest": "sha1:EZ4BIZW6VLO3RC32JKL473YARSKQVX3T", "length": 29171, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'These' Three Batsmen Celebrated Birthdays! Participation Of Two Indian Batsmen | 'या' तीन फलंदाजांनी वाढदिवस साजरा केला त्रिशतकाने! दोन भारतीय फलंदाजांचा सहभाग | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\n'या' तीन फलंदाजांनी वाढदिवस साजरा केला त्रिशतकाने दोन भारतीय फलंदाजांचा सहभाग\nक्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट.\nठळक मुद्देक्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ २१२ त्रिशतकं फळ्यावर लागली आहेत आणि फक्त तीनच फलंदाज असे आहेत की ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावले आहे.\nक्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ २१२ त्रिशतकं फळ्यावर लागली आहेत आणि फक्त तीनच फलंदाज असे आहेत की ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावले आहे. या तीन पैकी दोन फलंदाज भारतीय आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब. इंग्लंडचे कॉलिन काऊड्रे आणि भारताचे रमण लांबा व प्रशांत चोप्रा हे ते विशेष त्रिशतकवीर.\nहिमाचल प्रदेशच्या प्रशांत चोप्राने ७ ऑक्टोबर रोजी रणजी सामन्यात धर्मशाला येथे पंजाबविरुद्ध ३३८ धावांची खेळी केल्याने हा विक्रम समोर आला. त्या दिवशी प्रशांतचा २५ वा वाढदिवस होता आणि हिमाचलसाठी पहिला त्रिशतकवीर बनून त्याने तो स्पेशल बनवला.\n२२ वर्षांपूर्वी दिल्लीचा डॅशिंग फलंदाज रमण लांबाने असाच आपला ३५ वा वाढदिवस स्पेशल बनवला होता. रमणची जन्मतारीख २ जानेवारी १९६० आणि २ जानेवारी १९९५ रोजी त्याने दिल्ली येथे हिमाचल विरुद्धच्या रणजी सामन्यात दिल्लीसाठी ३१२ धावांची खेळी केली होती. दुर्देवाने रमण त्यानंतर फारसे वाढदिवस साजरे करू शकला नाही. क्रिकेटच्या मैदानावरच चेंडू लागल्याने १९९८ मध्ये त्याचे निधन झाले.\nभारतात जन्मलेले आणि इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाणारे सर कॉलीन काऊड्रे हे या अतिविशेष पंक्तीतील पहिले फलंदाज. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकांच्या शतकांचा टप्पा पार केला असला तरी २४ डिसेंबर १९६२ रोजी त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड येथे झळकावलेले त्रिशतक अद्वितीय ठरले कारण त्यादिवशी त्यांचा ३० वा वाढदिवस होता. आणि या दिवशी त्यांनी ३०७ धावांची खेळी करत आपला वाढदिवस त्रिशतकाने साजरा केला.\nसर काऊड्रे यांच्या या शतकाबद्दल आणखी एक विशेष बाब ही की यानंतर त्यांनी कित्येक वर्ष ‘एमसीसी ३०७’ या विशेष क्रमांकाची कार चालवली. यामागचे वैशिष्टय असे की त्यांचे नाव होते मायकेल कॉलिन काऊड्रे. या नावाची इंग्रजी आद्याक्षरे घेतली तर ‘एमसीसी’ आणि त्यांची सर्वोच्च खेळी होती ती या ३०७ धावांची. म्हणून ‘एमसीसी ३०७’.\nतर अशा या अतिविशिष्ट फलंदाजांमध्ये आपल्या देशातले दोन फलंदाज आहेत ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतामिळनाडूवर ‘पृथ्वी’चा शतकी हल्ला, चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात झळकावले तिसरे शतक\nझीवाच्या जन्माची बातमी साक्षीनं माहीच्या आधी दिली होती या क्रिकेटरला\n...तर आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीत पुन्हा एकदा मैत्रीची पार्टनरशिप, गळाभेट घेत मारल्या मनसोक्त गप्पा\nकेदार जाधवचं टीम इंडियाला आदरातिथ्य, पुण्यातील घरी खास महाराष्ट्रीय मेजवानी\nकपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nIPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला\nVideo : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स\n...म्हणून गेलकडून सेन्चुरी मुलीला समर्पित\nसामन्याआधी चेन्नई टीमला फटका यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/06/28/why-tribal-presedent/", "date_download": "2018-04-20T16:12:47Z", "digest": "sha1:BCZRRTLMMEYZA3KR5BDTCSZ233CEW3IJ", "length": 26132, "nlines": 65, "source_domain": "rightangles.in", "title": "राष्ट्रापतीपदासाठी आदिवासीच का? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy प्रकाश आंबेडकर June 28, 2017\nरामनाथ कोविद यांचे नाव जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्या नंतरही मी माझी आदिवासी समूहातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी असावी ही भूमीका बदलली नव्हती. रामनाथ कोविद काय किंवा मीराकुमारी काय, दोघांच्याही नावाचे स्वागत दलित समूहांकडून झालेले नाही. प्रतीकात्मक राजकारणालाही दलित समूह कंटाळले आहेत. दलित शोषित बहुजनांच्या सद्यकालीन प्रश्नांवर ह्या दोघांनी काय भूमिका गेल्या काही वर्षात घेतली देशात रोहित वेमूर्ला, उना, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवरील बंदी, दलित बहुजन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती हळूहळू बंद किंवा कमी होत जाणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे, काल्बुर्गीं सारख्या सेक्युलर, रॅशनल विचारवंतांचा खून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गेल्या तीन वर्षात सातत्याने होणारा संकोच ह्या बाबत ह्या दोन्ही उमेदवारांनी काय भूमिका घेतल्या हे माध्यमांनी – ते खरच लोकशाही मत असतील तर पुढे आणले पाहिजे.\n२०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस जिंकणार नाही आणि ६० जागाही मिळणार नाहीत ह्याची माहिती कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मोहन प्रकाश यांना दिली होती. कॉंग्रेस पक्षाची जी वाताहत लोकसभेच्या निवडणुकीत झाली आणि त्यातून जो धक्का लागला त्यातून ते अजूनही बाहेर पडले आहेत असे दिसत नाही. कॉंग्रेस पक्षाला २०१४ पासून जो लकवा लागला लागला आहे तो अजून गेलेला नाही. कॉंग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोघांना पुढाकार घेऊन काही केले पाहिजे असे वाटत नाही किंवा काय करावे हे सुचत नाही. अनेक वर्ष सत्तेतच असल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून विचारमंथन आणि व्यूहरचना करणे त्यांना बहुतेक जमत नसावे. पण त्यांच्या परिस्थितीमुळे आर आर एस आणि भाजपा ह्यांना कोणी पराभूत करू शकत नाही अशी वातावरणनिर्मिती करण्यात आर आर एस आणि भाजपाला यश आले आहे. गेल्या तीन वर्षात अनेक वेळेला आर आर एस आणि भाजपाचा हा फुगा फोडण्याची संधी आली पण त्याचा फायदा कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांना उठवता आली नाही.\nराष्ट्रपतीपदाची निवडणूक हे ह्या पराभूताच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची एक संधी होती. राष्ट्रपतींच्या निवडणुकींच्या संदर्भात भाजपाकडे निर्विवाद बहुमत नाही. एका बाजूला भाजपाशी ज्यांचे संबंध ताणले गेले आहेत, त्या पक्षांशी संवाद वाढवून, असलेले तणाव अधिक ताणणे शक्य होते. निदान प्रयत्न तरी व्हायला हवा होता. उदा. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणावांना खतपाणी घालणे आणि भाजपला अडचणीचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी निवडावा ही चर्चा मी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षाशी दोन तीन महिन्यांपूर्वीच केली होती. चीनच्या भूमिकेमुळे उत्तरपूर्व सीमेवरील राज्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेता आणि त्याच बरोबर आत्तापर्यंत कधीच आदिवासी समाजाच्या व्यक्तीचा विचार राष्ट्रपतीपदासाठी झाला नव्हता ही बाब लक्षात घेऊन, उत्तरपूर्व भागातील किंवा मध्य महाराष्ट्रातील आदिवासी समूहांपैकी योग्य व्यक्तीचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचविण्यात यावे हे ही सुचविले होते. परंतु ह्या दोन्ही मुद्द्यांबाबत चर्चे पलीकडे काही घडले नाही. ‘योग्य व्यक्ती’ म्हणताना राष्ट्रपतीपदासाठी सर्वमान्य अपेक्षांसह ह्या देशाच्या संविधानातील मुलभूत तत्वांच्या मन;पूर्वक आदर व त्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांचा उपयोग करणारी, मानवी हक्क, लोकशाही, देशातील छोट्या मोढ्या समूहांच्या संस्कृतीचा आदर करणारी आणि व्यक्तिस्वातंत्र्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील ह्यासाठी ठाम भूमिका घेणारी व्यक्ती अभिप्रेत आहे.\nआदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी द्यावेत हे सुचविण्यामागे माझी एक भूमिका होती.\nभाजपची आदिवासी भागातील भूमिका कायमच आदिवासींच्या हक्कांच्या विरोधात राहिली आहे. भाजपाने सलवा जुडूम अतिशय घातक यंत्रणा छत्तीसगड मध्ये उभी केली. सलवा जुडूमाला सर्वोच्च न्यायालयाने अवैधानिक जाहीर केल्यावरही सलवा जुडूम संघटनेची गरज नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी आवश्यक आहे हे भूमिका भाजपाने अनेकदा घेतली आहे. सलवा जुडूम म्हणजे आदिवासी तरुणांना शस्त्र देयून आणि प्रशिक्षण देवून सरकारविरुद्ध आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या आपल्याच आदिवासी बांधवाना हुसकावणारी आणि मारणारी शासनाने उभी केलेली यंत्रणा. नागरिकांना शास्त्र देऊन इतर नागरिकांची हिंसा शासनाने करायला लावणे हे केवळ संविधानविरोधीच नाही त्तर मानवातेविरोधीही आहे. सलवा जुडूमवर बंदी घालण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राष्ट्रहिताच्या विरोधात असल्याचे विधान भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी केले होते.\nआज देशाची जवळ जवळ सर्वच खनिज संपत्ती आदिवासी भागात आहे. आदिवासी समाज हा कधीच कोणाच्या आधीन किंवा अंकित झाला नाही. हा समूह कधी ब्रिटीशांच्या आधीन झाला नाही, हरला नाही. त्यामुळे ब्रिटिशांने त्यांना त्यांच्याच भागात अतिक्रमित ठरविले, स्वातंत्र्यानंतरही आदिवासींचे शोषण चालू राहिले. गेल्या काही वर्षात आदिवासीचळवळींमुळे आदिवासी समूहांना त्यांचे घटनात्मक हक्क मिळाले आहेत पण त्याच्याही अंमलबजावणी साठी त्यांना झगडावे लागत आहे. ह्या त्यांच्या लढ्यात आर एस एस किंवा त्याच्या पिल्लावळ संघटना कोठेही नाहीत. किंबहुना आदिवासींच्या त्यांच्या भौगोलिक नैसर्गिक संपत्तीवर हक्क आहे आणि त्या भागातील विकासाचा निर्णय त्यांच्या हातात देणाऱ्या कायद्यांना किंवा घटना दुरुस्तीला भाजपाचा कधीच पाठींबा नव्हता. आता ह्या सर्व खनिज संपत्ती असलेल्या प्रदेशातून आदिवासींना हुसकावून लावणे आणि भाजापधर्जीण्या उद्योजकांच्या हातात ही वनसंपत्ती आणि खनिज संपत्ती देणे ही प्रक्रिया भाजपने सुरु केली आहे. आर एस एस आणि सलग्न संघटना आदिवासी हा शब्द वापरत नाहीत. त्या ऐवजी ते वनवासी हा शब्द वापरतात. आदिवासी हा शब्द वापरला तर ते भारतातील मूळनिवासी ठरतात. हिंदू धर्माच्या चौकटीत त्यांना बसवता येत नाही. आदिवासींचे हिंदुकरण करण्याचा आर एस एसचा जुना अॅजेंडा आहे. त्याला आदिवासी समूहांचा विरोध आहे. बीफ बंदीमुळे ब्राह्मणी हिंदू संकृती आपल्यावर लादली जात आहे आणि आपल्या आहारावरसुद्धा नियंत्रण आणले जाते आहे ह्यामुळे उत्तर्पूर्वेकडील राज्य अस्वस्थ आहेत.\nह्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाची योग्य व्यक्ती राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणली असती तर आपण ह्या देशाचा महत्वाचा घटक मानतो, त्यांना सन्मान देतो, त्यांच्या संकृतीचा आदर करतो आणि ती टिकविण्यासाठी बांधील आहोत , आदिवासींचे घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे जाहीर झाले असते. आदिवासी का वनवासी हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणून आदिवासींच्या ब्राह्मणी हिंदुकारणाच्या मुद्द्याला शह देता आला असता. आदिवासी खासदार आणि आमदार आणि आदिवासी बहुल राज्य यांनाही आदिवासी उमेदवाराच्या विरोधात मतदान करणे कठीण झाल असते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘व्हीप’ नसते, तर मताचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या सतसदविवेक बुद्धीला अनुसरून मतदान करायचे असते. ह्याचा फायदा आदिवासी उमेदवार देऊन घेता आला असता.\nआर आर एस आणि भाजपाने जेंव्हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा सर्वसहमतीने निवडला जावा ही भूमिका घ्यायला सुरवात केली तेंव्हाही काही दिवसांची मुदत द्या नाहीतर आपण राष्ट्रपतीपदासाठीचे विरोधी पक्षांचे उमेदवारांचे नाव पुढे आणू ही चर्चा झाली होती. कॉंग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी कोणतीही कृतीशील हालचाल किंवा व्यूहरचना होत नव्हती आणि डावे पक्ष कॉंग्रेसवर अवलंबून असल्यामुळे ते ही शांत राहिले.\nकॉंग्रेस आणि विरोधकांची ही परिस्थिती लक्षात घेत आर आर एस आणि भाजपाने ह्या देशाचे राजकारण आपणच करू शकतो हे दाखविण्याची संधी सोडली नाही. सर्व सहमतीने उमेदवार निवडण्यासाठी आमच्याकडून नाव निश्चित झाले की आम्ही चर्चा करू असे एकीकडे सांगत, भाजपाने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविद यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.\nराज्यपाल रामनाथ कोविद यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांची चर्चा सुरु झाली. त्यातही आर एस एस आणि भाजपाकडून दलित उमेदवार दिल्या नंतर आपणही दलित उमेदवार दिला पाहिजे ही चर्चा सुरु होणे हे वैचारिक दिवाळखोरीचेच लक्षण आहे. ह्याचाऐवजी व्यूहरचना म्हणून आदिवासी समूहाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती नाही तर डॉ अनिल काकोडकर किंवा डॉ जयंत नारळीकर किंवा त्या तोडीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि सेक्युलर भूमिका असणाऱ्या व्यक्तीचे नाव पुढे आणले असते तरीही विरोधकांना संधी होती. ह्या नावांना शिवसेनेने विरोध केला नसता किंबहुना पाठिंबाच दिला असता आणि नितीशकुमार, ए.आय.डी.एम.के., बिजू जनता दल हे जे आज काहीच व्यूहरचना नसल्याने भाजपकडे गेले त्यांना थांबविणे आणि विरोधकांच्या बाजून वळविणे शक्य झाले असते.\nपरंतु हे न करता त्यांनी माझ्या नावासकट इतर दलित व्यक्तींच्या नावांची चर्चा केली. रामनाथ कोविद यांचे नाव जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्या नंतरही मी माझी आदिवासी समूहातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी असावी ही भूमीका बदलली नव्हती. रामनाथ कोविद काय किंवा मीराकुमारी काय, दोघांच्याही नावाचे स्वागत दलित समूहांकडून झालेले नाही. प्रतीकात्मक राजकारणालाही दलित समूह कंटाळले आहेत. दलित शोषित बहुजनांच्या सद्यकालीन प्रश्नांवर ह्या दोघांनी काय भूमिका गेल्या काही वर्षात घेतली देशात रोहित वेमूर्ला, उना, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवरील बंदी, दलित बहुजन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती हळूहळू बंद किंवा कमी होत जाणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे, काल्बुर्गीं सारख्या सेक्युलर, रॅशनल विचारवंतांचा खून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गेल्या तीन वर्षात सातत्याने होणारा संकोच ह्या बाबत ह्या दोन्ही उमेदवारांनी काय भूमिका घेतल्या हे माध्यमांनी – ते खरच लोकशाही मत असतील तर पुढे आणले पाहिजे.\nह्या सगळ्या घडामोडीतून एकच स्पष्ट झाले की आपण ठाम राजकीय भूमिका घेण्याऐवजी प्रतिक्रियात्मक राजकारणच खेळले गेले. राजकारणामध्ये पुढाकार घेऊन आपल्या विरोधकांना प्रतिक्रिया द्यायला भाग पडायची संधी कॉंग्रेस आणि विरोधकांनी हातातून घालवली. ह्या वरून डाव्यांनी एक लक्षात घ्यायला हवे की कॉग्रेसची लढण्याची इच्छाशक्तीच संपलेली आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते आज चौकशीत अडकलेले आहेत. त्यांना त्यांना स्वतःला वाचविण्यात रस आहे. त्यामुळे त्यांच्या कडून आर एस एस विरोधी आक्रमक भूमिका घेतली जाईल असे दिसत नाही . ह्या पुढचे आर एस एस –भाजपाविरोधी राजकारण हे कॉंग्रेसशिवायाच करावे लागेल ह्याची भाजपा विरोधकांनी स्वीकारायला हवे.\nप्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत\nसंस्कारी गर्भवती – स्त्रियांच्या लैंगिकतेवर मनुवादी पहारा\nसमाजवादी साथी खाती फॅसिझमची माती\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/11/CurrentAffairs09112016.html", "date_download": "2018-04-20T16:30:50Z", "digest": "sha1:M3ZGC32GUWJ5ZWQQSQC26QUDUIT6X6PF", "length": 17952, "nlines": 186, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : ९ नोव्हेंबर", "raw_content": "\nचालू घडामोडी : ९ नोव्हेंबर\nडोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष\nबहुचर्चित अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केली.\nट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला ४५वे अध्यक्ष मिळाले असून ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.\nट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी ते सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील.\nअमेरिकेच्या ६० वर्षाच्या इतिहासातील प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसलेले ते पहिले अनुनभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.\nव्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणाऱ्या ट्रम्प यांना गर्व्हनर, सिनेटर अशा कुठल्याही पदाचा अनुभव नाही.\nअमेरिकेतील ‘इलेक्टोरल कॉलेज’व्यवस्थेनुसार २७ राज्यांमधील २७६ मते जिंकून ट्रम्प यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.\nट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ २१८ मतेच मिळविण्यात यश आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.\nलोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी ४८ टक्के मत मिळवली तर हिलरींना ४७ टक्के मते मिळाली.\nअमेरिकेतील मुस्लिम समुदाय, मेक्सिकन वंशाचे नागरिक व स्त्रिया यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प जास्त चर्चेत राहिले.\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ट्रम्प यांचे विविध देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत निर्णय महत्वपूर्ण ठरतील.\nनिवडून आलेले भारतीय वंशाचे सदस्य\nअमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे.\nकॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये निवड झाली आहे.\nसिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.\nकॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय उमेदवारही ठरल्या आहेत.\n५१ वर्षांच्या हॅरिस यांनी निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या लोरेटा सँचेझ यांना ३४.८ टक्क्यांच्या मताधिक्याने मात दिली.\nहॅरिस यांचा जन्म ओकलॅंड (कॅलिफोर्निया) येथे झाला असून त्यांची माता भारतीय तर पिता जमैकन-अमेरिकन वंशाचे आहेत.\nवॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवडून आल्या आहेत.\nत्या प्रतिनिधी सभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.\nत्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत.\nकनुभाई गांधी यांचे निधन\nमहात्मा गांधींचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे ७ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.\nप्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nतीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते. तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सुरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते.\nमार्च-एप्रिल १९३०च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहादरम्यान गुजरातच्या दांडी गावाच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी हाती घेतलेल्या काठीचे एक टोक धरून पुढे चालणारा मुलगा म्हणून कनु प्रसिद्ध होते.\nपुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून १९६१ साली त्यांनी यंत्र-अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले\nअमेरिकेत ‘मेसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कनु यांनी १९६९मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले.\nनंतर ‘ते नासा (अमेरिकी अंतराळ संस्था) मध्ये संरक्षणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.\nते आणि त्यांची पत्नी शिवलक्ष्मी दिल्लीच्या वृद्धाश्रमात राहत असल्याचे समोर आल्यानंतर कनू गांधी चर्चेत आले होते.\nअँडी मरेला पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद\nजागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.\nतीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मरेने अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-३, ६-७, ६-४ असे पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.\nयंदाच्या मोसमात मरेचे हे आठवे विजेतेपद असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने एकूण १४वे मास्टर्स जेतेपद पटकाविले आहे.\nरिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये त्याने पुरुष एकेरीचे सुवर्ण पटकावून सलग दोनवेळा ऑलिम्पिक सुवर्ण पटकावणारा पहिला टेनिसपटू म्हणून इतिहास रचला आहे.\nप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार बापू घावरे यांचे निधन\nप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे यांचे ७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते.\nराजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.\n‘मोहिनी’ या दिवाळी अंकात त्यांचे सन १९८९मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘प्रभात’मध्ये सुमारे १४ वर्षे त्यांची चित्रे नियमित प्रसिद्ध झाली.\nविविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक चित्रे काढली.\nत्यांच्या व्यंग्यचित्रांची ‘लाफिगं क्लब’ आणि ‘हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nत्यांचे ‘बहुरूपी’ आणि ‘शिमग्याची सोंगं’ हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.\nते मूळचे मुळशी तालुक्यातील बेलावडे गावचे होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २६ नोव्हेंबर\nक्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो कालवश\nचालू घडामोडी : २५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २१ नोव्हेंबर\nमासिक : ऑक्टोबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : २० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १६ नोव्हेंबर\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nचालू घडामोडी : १५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ११ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ६ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १ नोव्हेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:44:05Z", "digest": "sha1:GD5SXVBSY6WA3F5VHU3UJ5PGW7F6YDJP", "length": 4006, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुहू विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजुहू विमानतळ भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळ जुहू येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ १९२८मध्ये बांधला गेला. हा भारतातील सर्वप्रथम सार्वजनिक विमानतळ होता. सध्या छोटी खाजगी विमाने व हेलिकॉप्टर याचा उपयोग करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१४ रोजी २०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/60-year-old-pune-citizen-cheated-by-facebook-friend/", "date_download": "2018-04-20T16:35:52Z", "digest": "sha1:CHEWJTCTNZX4MFXHFIB4Q2DIFPOY4AVY", "length": 10098, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक\nपुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास शब्द.. पण पुणेकरांचे वेगळेपण यामुळे टिकून आहे .अर्थात पुणे हे पेन्शनर लोकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी आता पूर्वीचे पुणे राहीले नाही हा डायलॉग अजून देखील कित्येक ठिकाणी बोलला जातो. पुण्याच्या पेन्शनर लोकांविषयी पू. ल . देशपांडे यांनी बरेच काही सांगितले आहे, त्यामुळे इथे जास्त उल्लेख करणे योग्य वाटत नाही. मात्र अशाच एका चाणाक्ष व चतुर पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.\nही तक्रार नारायण पेठ इथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकाने पोलीस स्टेशनला नोंदवली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सदर जेष्ठ नागरिक हे नारायण पेठ इथे राहणारे आहेत . हे गृहस्थ इंटरनेटचा चांगला वापर करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना फेसबुकवर सुंदर परदेशी तरुणीचा फोटो असलेल्या प्रोफाइलवरून मेरीलीन रजन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ही विनंती मान्य केली . पुढे मेरीलीनशी त्यांचे बोलणे सुरु झाले . चॅटिंग च्या मध्यनामातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात राहत होते. आपला लंडन इथे व्यवसाय असल्याचे मेरिलिन हिने यांना सांगितले होते. दिल्ली इथे कस्टम विभागाने आपला काही माल ताब्यात घेतला आहे तो मला सोडवायचा आहे असे सांगितले व मी सोडवण्यासाठी दिल्ली इथे येणार आहे.\nमी माझ्या व्यवसायानिम्मित पुणे इथे येणार आहे त्यावेळी भेटूयात असे दोघांमध्ये ठरले होते. पुढे तिने तक्रारदारास मी दिल्ली इथे आलेली आहे. मात्र मला पैशाची गरज आहे असे भावनिक मदतीचे आवाहन केले . तक्रारदारांनी आपली ओळख झालीच आहे तर मदत करूयात ह्या हेतूने एक लाख ६४ हजार रुपये तिने सांगितलेल्या व्यक्तीच्या खात्यावर भरले. पैसे भरले गेल्याचे समजताच मेरिलिन नॉट रिचेबल झाली. मग तक्रार दारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nत्यामुळे ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही किंवा ओळखत नाही अशा व्यक्तींना आपल्या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. ही एक पद्धत झाली, मात्र कित्येकदा ब्लॅकमेल करून देखील पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे यापुढील काळात नागरिकांनी जास्त दक्ष राहण्याची गरज आहे.\nपुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार\nपुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता\nकोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना\nपोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← ठाकरे चित्रपटाबद्दल नवीन वाद तयार होतोय : ‘ ही ‘ आहेत वादाची कारणे परत एकदा पाकिस्तानमध्ये घुसून भारताचा सर्जिकल स्ट्राईक : ४ पाकडे यमसदनी →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:19:13Z", "digest": "sha1:W7UUPSUU2TXMMVWDEOJJNH4N6COEP7K5", "length": 4371, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "महाराष्ट्र शिवसेना – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: महाराष्ट्र शिवसेना\nउद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको \nआजच्या दैनिक सामनामधून शिवसेनेने नेहमीप्रमाणे भाजप व मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . उद्धव ठाकरे यांना वांद्र्याचा बॉस म्हटलेलं चालत, राहुल गांधी यांना पप्पू म्हटलेलं चालत तर थापा मारणाऱ्याना फेकू म्हटलेलं का चालू नये असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का एकवेळ घोषित आणीबाणी परवडेल पण अघोषित अशी आणीबाणी आणि मुस्कटदाबी किती… Read More »\nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: उद्धव ठाकरे, महाराष्ट्र शिवसेना, शिवसेना, शिवसेना भाजप वाद, संजय राउत, सामना संपादकीय\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T16:25:40Z", "digest": "sha1:6A2OIWETOT6JZODNXATGBX6NPK3WULRA", "length": 5691, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गाथा ३०१ ते ६०० - विकिबुक्स", "raw_content": "गाथा ३०१ ते ६००\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गाथा ३०१ ते ६०० हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गाथा ३०१ ते ६०० येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गाथा ३०१ ते ६०० आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गाथा ३०१ ते ६०० नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गाथा ३०१ ते ६०० लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गाथा ३०१ ते ६०० ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गाथा ३०१ ते ६०० ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/09/08/silencing-the-dissent/", "date_download": "2018-04-20T16:10:13Z", "digest": "sha1:IVRPMM6XSKF6INM35YU4P7SPYPI6243K", "length": 27965, "nlines": 78, "source_domain": "rightangles.in", "title": "गोली मार भेजेमें, भेजा शोर करता है… | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nगोली मार भेजेमें, भेजा शोर करता है…\nगौरी मांडत असेलेले सगळेच्या सगळे विचार सगळ्यांनाच मान्य होतील असं नाही. पण त्यालाच विचारस्वातंत्र्य म्हणतात. न पटणाऱ्या विचारांचा तुम्ही प्रतिवाद करु शकता. न्यायालयात दाद मागू शकता. पण कट्टरतावादाला विचारस्वातंत्र्याचा हा लोकशाही अवकाश कधीच मान्य नसतो. त्यापेक्षा तोंड झाकून चोरपावलांनी येत गोळ्या घालणं त्यांना अधिक आवडतं किंवा जमतं. तोंड झाकलेल्या नथुरामाने महात्म्यावर गोळ्या झाडल्या. आज नथुरामाचे वारसदार जागोजाग दबा धरुन बसले आहेत. कुजबुजत आहेत. ऐका, ती कुजबुज वाढत आहे. विचार करणारे मेंदू शोधत आहे.\nआणखी एक मेंदू मारला त्यांनी…\nफार बोलत होता, आवाज करत होता, मुख्य म्हणजे विचार करत होता, विचार करणारा मेंदू चालत नाही त्यांना…\n पोलिसांनी तर अजून गुन्हेगाराला शोधलं नाही. मग आरोप कोणावर करता आहात… ऐका, दरडावणारा आवाज ऐका… खरं आहे. गुन्हेगार अद्याप सापडायचे आहेत. गोळी घालणारे मारेकरी उद्या सापडतीलही कदाचित. पण ज्यांनी गोळी घालायचे आदेश दिले, ज्यांनी गोळी घालायला पुरक असे विखारी वातावरण तयार केले ते सापडतीलच असं नाही. गुन्हेगाराचा चेहरा अद्याप स्पष्ट नाही पण त्या चेहऱ्यामागचा विचार स्पष्ट आहे. या एकसाची विचाराला स्वतंत्र विचार करणारे मेंदू चालत नाहीत. त्यामुळेच तर्क असा आहे की ज्यांनी आधीचे तीन मेंदू मारले त्यांनीच हा चौथा मेंदूही मारला असणार.\nतर्क नका करु, पुरावे द्या…परत दरडावतंय कोणीतरी…सांगा त्यांनी की, तर्क हीच विचारांची पहिली पायरी असते. पोलीस पुरावेही विविध तर्कांच्या आधारेच शोधतात. आधुनिक विज्ञानाचा पायाही तर्कावरच उभा आहे. शिवाय थोर भारतीय संस्कृतीत फार फार प्राचीन काळी वादविवादांची परंपरा होती. त्यात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष असे वाद होत. वादे वादे जायते तत्वबोधः असं म्हणत आधी अग्नी की आधी धूर असे वाद घातले जात. पण मध्येच कधीतरी ही वादविवादांची परंपरा खंडित झाली. थेट मुंडकी उडवायंचंच सत्र सुरु झालं. बौद्ध धम्म विस्तारला भारतभूमीत तेव्हा त्याला पायबंद घालण्यासाठी बौद्ध भिख्खूंची मुंडकीच छाटली ना. उघड मुंडकी छाटता येत नसतील तर सदेह वैकुंठाला पाठवायचं. संत तुकारामांना पाठवलं तसं. स्वामी चक्रधरांना नष्ट केलं तसं. आजच्या गोली मार भेजेमें…ची परंपरा इथूनच कुठूनतरी सुर झालेली आहे. विचार करणारा मेंदू चालत नाही या पंरपरेला. तिकडे पार युरोपातही सॉक्रेटिस, गॅलिलिओ असेच मारले गेले. मध्य पूर्वेत तालिबानी ’आम्ही सांगू तोच कायदा’, असा उद्घोष गेली कित्येक वर्षं करतच आहेत. जगभरच्या कट्टरतावादाला स्वतंत्र विचारांचं बीज चालत नाही. ‘भेजेकी सुनेगा तो मरेगा कल्लू’ हे सडकछाप गाणं हेच त्यांचं तत्वज्ञान असतं.\nआधी त्यांनी तीन म्हाताऱ्यांचे मेंदू नष्ट केले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी…सत्तरीतले म्हातारे होते. निवांत गप्पगुमान आपल्या घरी बसायचं. देवदेव करायचं. पारमार्थिक चर्चा करायची. एखाद्या सत्संगाला जात एखाद्या बाबामहाराजाचं भक्त बनायचं. पण यातलं काहीच न करता यातले पहिले दोन म्हातारे गावगन्ना भटकत होते. लोकांशी बोलत होते. त्यांना तर्काच्या आधारे पुरावे गोळा करुन स्वतंत्रपणे विचार करायला सांगत होते. एकजण श्रद्धा-अंधश्रद्धेचा गुंता उलगडत होता. एकजण छत्रपती शिवरायांचं खरं स्वरुप काय ते सांगत होता. तिसरा म्हातारा संशोधन करत होता. पण हे समाजशास्त्रातलं संशोधन तंत्रज्ञानातल्या संशोधनाप्रमाणे अणुबाँम्ब किंवा मोबाईल तयार करत नाही. समाजशास्त्रातलं संशोधन समाजातल्या मान्यतांमध्ये बदल घडवू पाहातं. वेगळा विचार रुजवू पाहतं. पण कट्टरतावादाला वेगळा विचार मान्य नाही. स्वतंत्र विचार करणारा मेंदू मान्य नाही.\nआताचा चौथा ताजा मेंदू बाईचा निघाला. गौरी लंकेश नाव तिचं. बाईच्या जातीने कसं गप्प बसावं, सांगितलेलं ऐकावं, आपल्या मानमर्यादेत रहावं. पण ही बाई पत्रकार. गौरी लंकेश पत्रिके या मासिकाची संपादक. आता पत्रकार स्त्रियाही कमी नाहीत भारतात. गार्गी मैत्रेयीचा वारसा असणाऱ्या भारतात बायकाही वेगवगेळ्या क्षेत्रात काम करत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. व्हावं बाईनेही पत्रकार. पण मग त्यांनी कसं कौटुंबिक घडामोडींची चर्चा करणारी पुरवणी काढावी. समानतेच्या बाष्कळ गप्पा न करता कुटुंबसंस्था अधिक बळकट कशी होईल, आधुनिक पालकत्व कसं असावं, नात्यांमधले विसंवाद कसे कमी करावेत (समाजात विसंवाद असले तरी चालतील), कोणत्या साडीवर कोणते दागिने घालावेत, फॅशनमध्ये भारतीय संस्कृती कशी आणावी, भारतीय पाककला, जगभरची पाककला, हसत-खेळत शिक्षण, करियर का घर यावरची चर्चा असं काहीतरी करत राहावं. तेही परंपरागत संस्कृतीच्या ढाच्याला धक्का न लावता. यातही काही आगाऊ पुढारलेपणा केला असता तर आमच्या भावनांना धक्का का लावता म्हणून चार करवादलेले फोन आले असते, दहा खरमरीत टीका करणारी पत्रं आली असती, तुमच्या वर्तमानपत्रावर, मासिकावर बंदी घालू असं सांगणारं एखादं धमकीवजा पत्रंही आलं असतं. पण थेट डोक्यात गोळी तर कोणी नसती ना घातली.\nपण गौरी लंकेश आपल्या पत्रकारितेच्या पेशाला जागायला निघाली. थेट धर्मनिरपेक्षता वगैरे काही बोलू लागली. जातधर्मवर्चस्ववादाला प्रश्न विचारु लागली. आपल्या वडिलांचा पुरोगामी वारसा स्वीकारत ती वडिलांनी स्थापन केलेल्या ‘लंकेश पत्रिके’ या मासिकात पत्रकारिता करु लागली. वडिलांच्या पश्र्चात मासिकाच्या ध्येयधोरणावरुन भावाशी वाद झाल्यावर तिने स्वतःचं ‘गौरी लंकेश पत्रिके’ हे स्वतंत्र मासिक काढलं. वडिलोपार्जित इस्टेट स्वतःच्या नावावर करुन घ्यायला भावाने ना हरकत प्रमाणपत्राचा कागद पुढे केल्यावर मोठ्या उदात्तभावनेने त्यावर सही करुन भावाला वडिलोपार्जित इस्टेट देणाऱ्या, आम्हाला भावाची माया हवी, संपत्ती नको, असं म्हणणाऱ्या आदर्श बहिणींची या भारतभूमीत बहुसंख्या आहे. आता ‘सहोदरा, सह उदराचा हक्क दे’ असं म्हणत वडिलोपार्जित इस्टेटीसाठी थेट कोर्टात जाणाऱ्या काही नाठाळ भगिनीही आहेत. पण गौरी थोडी आणखी वेगळी होती. तिने पैशांसाठी नाही तर विचारांसाठी भावाशी भांडण केलं. मासिक कोणत्या विचारांच्या आधारे चालवावं यावरुन तिने वाद घातला आणि विचार पटले नाहीत तेव्हा भावापासून, वडिलांच्या मासिकापासून स्वतंत्र होत स्वतःचं वेगळं मासिक काढलं. तिची पत्रकारिता विचारांची होती, विचारांसाठी होती.\nविचारांचं अधिष्ठान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक कणखरपणा देतं. असं कणखर व्यक्तिमत्त्व जसं धमक्यांना बळी पडत नाही तसंच ते प्रेमालाही शरण जात नाही. प्रेमाच्या राज्यातही या व्यक्तिमत्त्वाचा कणा ताठच असतो. गौरीने प्रेम केलं, लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतरही माजी नवऱ्यासोबत असलेलं मित्रत्वचं नातं तिने कायम ठेवलं. दोघांच्या भेटीगाठी सुरु राहिल्या. दोघांचं एकमेकांच्या घरचं जाणंयेणं थाबलं नाही, दोन्ही घरातल्या वडिलधाऱ्यांची विचारपूस करणं थांबलं नाही. हे सुसंस्कृत, समजुतदार वागणं विचारांच्या अधिष्ठानातूनच येतं. गौरीचा विभक्त नवरा पत्रकार चिदानंद राजघट्ट याने गौरीच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘अमेझिंग ग्रेस’ या लेखामध्ये दोघांमधल्या या अनोख्या नात्याची माहिती दिली आहे. या लेखामधून गौरीच्या व्यक्तिमत्तावाची कणखर बाजू अधिक ठळकपणे सामोरी येते. नवरा अमेरिकेत वॉशिंग्टनला पत्रकारिता करायला जाणार म्हटल्यावर इतर अनेक भारतीय स्त्रियांप्रमाणे गौरीही नवऱ्याच्या मागोमाग अमेरिकेत जाऊन सुखासीन आयुष्य जगू शकली असती. अगदी करियरचा विचार करायचा झाला तरी अमेरिकेत जाऊन इंग्रजी भाषेतून जागतिक पत्रकारिता करु शकली असती. पण गौरी नवऱ्याला घटस्फोट देऊन इथेच राहिली. प्रेमाच्या राज्यातही केवळ बायको होऊन राहाणं नाकारलं तिने. कन्नड भाषेत लिहित ती इथल्या मातीतली पत्रकारिता करत राहिली. इथली आव्हानं स्वीकारत राहिली. न पटणाऱ्या गोष्टींविरुद्ध लढत राहिली. स्वतःचा मेंदू वापरत राहिली. कोणत्याही दडपणाखाली न येता विचार करत राहिली. आणि गोळ्यांच्या वर्षावाला बळी पडली. गौरीने अक्कमहादेवीचा, कर्नाटकातल्या १२ व्या शतकातल्या या विद्रोही संत स्त्रीचा कसदार वारसा आपला मानला. अक्कमहादेवी समाजाने लादलेली सर्व बंधनं झुगारत आयुष्यभर विवस्त्र राहून शिवाची भक्ती करत राहिली. भक्तीच्या मार्गात, मुक्तीच्या क्षेत्रात स्त्रीला प्रवेश नाही ही सनातन्यांची आज्ञा तिने झुगारली. गौरीनेही स्त्री-शूद्रांना सर्व अधिकार नाकारणाऱ्या जातीव्यवस्थेचं विश्लेषण करत सनातन्यांना प्रश्न विचारणं सुरु केलं. जातिव्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या बसवेश्वरांचं स्वतंत्र अस्तित्त्व अधोरेखित करत हिंदु धर्म म्हणजे जातीव्यवस्थेची श्रेणीबद्ध उतरंड आहे अशी मांडणी केली. खरं तर बसवेश्वरांपासून ते फुले-आंबेडकर-पेरियार असा वारसा असेलेल्या या देशात जातिव्यवस्थेची याहून अधिक कठोर चिकित्सा झालेली आहे. पण सध्याच्या ‘आमच्या धर्माविरुदध बोलाल तर खबरदार’ अशा वातावरणात चिकित्सेची कोणतीच पायरी, पद्धती मान्य केली जात नाही. कारण चिकित्सा करणारा कोणताच मेंदू त्यांना नको आहे.\nगेली काही वर्ष कट्टरतावादाचा सूर अधिकाधिक कर्कश आणि बेबंद होत असताना इथल्या काही मंडळींना एक भाबडी आशा होती. सत्तर वर्षांच्या म्हाताऱ्या गृहस्थांचे मेंदू संपवले गेले असले तरी बाईच्या वाट्याला कोणी जाणार नाही. स्त्रीदाक्षिण्याची थोर परंपरा आहे ना या मातीची. विविध देवतांना पूजणारा देश आहे हा. गार्गी मैत्रेयीचा वारसा अभिमानाने मिरवला जातो इथे. पण ही आशा भाबडीच होती. मुलींनी शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंवर शेणगोळ्याचा मारा करणारा, त्यांना रोखण्यासाठी गुंडाना पाठवणारा समाजही इथलाच आहे. सावित्रीबाई आज असत्या तर त्यांनाही शेणगोळ्यांऐवजी बंदुकींच्या गोळ्यांनाच बळी पडावं लागलं असतं. स्त्री शिकली तर विचार करेल, विचार केला तर व्यवस्थेला प्रश्न विचारेल. त्यापेक्षा तिला प्रथापरंपरांच्या बेड्यांमध्ये, बुवाबाबांच्या सत्संगामध्ये अडकवणं अधिक सोप्पं आणि अधिक बरं. देवतांना पुजणाऱ्या या देशातच स्त्रीभ्रूणहत्यांचं प्रमाण अधिक आहे ही एकच गोष्ट या समाजातील सनातन्यांची आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या सामान्यांची दुभंग मानसिकता स्पष्ट करायला पुरेशी आहे. अशा स्थितीत म्हाताऱ्या गृहस्थांच्या पाठोपाठ एका स्त्रीचा मेंदू संपविला गेला यात आश्चर्य ते काय काही दिवसांपूर्वीच अरुंधती रॉयना मानवी ढाल म्हणून लष्कराच्या जीपला बांधावी अशी सूचना एका सद्गृहस्थाने केलीच होती. कारण काय तर अरुंधती रॉय यांचे विचार त्यांना मान्य नाहीत. जे जे आपल्याला मान्य नाही ते ते संपवावे, यालाच कट्टरतावाद म्हणतात. कधी धर्माच्या पायावर त्याची मांडणी केली जाते तर कधी राष्ट्रवादाच्या वलयामध्ये त्याला फोफावू दिलं जातं.\nगौरी मांडत असेलेले सगळेच्या सगळे विचार सगळ्यांनाच मान्य होतील असं नाही. पण त्यालाच विचारस्वातंत्र्य म्हणतात. न पटणाऱ्या विचारांचा तुम्ही प्रतिवाद करु शकता. न्यायालयात दाद मागू शकता. पण कट्टरतावादाला विचारस्वातंत्र्याचा हा लोकशाही अवकाश कधीच मान्य नसतो. त्यापेक्षा तोंड झाकून चोरपावलांनी येत गोळ्या घालणं त्यांना अधिक आवडतं किंवा जमतं. तोंड झाकलेल्या नथुरामाने महात्म्यावर गोळ्या झाडल्या. आज नथुरामाचे वारसदार जागोजाग दबा धरुन बसले आहेत. कुजबुजत आहेत. ऐका, ती कुजबुज वाढत आहे. विचार करणारे मेंदू शोधत आहे.\nक्रांती मोर्चाचा आतला आवाज\nभारत देश माणसांचा की गायींचा\nबाई म्हणजे SEX डॉलच \nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\nसंध्या नरे पवार, तुम्ही फार उत्तम व नेमके विवेचन केले आहे.\nनथुरामने तोंड झाकून गोळ्या झाडल्या नाहीत \nविचार करायला लावणारे लिखान — साध्या सोप्या भाषेत मांडलेत .\nलेख खूप छान आहे.\nखूप छान आपला लेख आहे\nसंस्थापक भिमदल सामाजीक संघटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/navanath/word", "date_download": "2018-04-20T16:32:00Z", "digest": "sha1:4B3XQMWZIH4NCG7MWNO5Y3F6O5MZ5HDK", "length": 7692, "nlines": 98, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - navanath", "raw_content": "\nपिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग २\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ३\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ४\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ५\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ६\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ७\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ८\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ९\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १०\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ११\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १२\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nस्त्री. Bot. अल्पमात्र सक्रियता\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A9", "date_download": "2018-04-20T16:42:35Z", "digest": "sha1:NOHBQVO22D4Q4HHVP2CWKN53E2XIG5VA", "length": 5602, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३९३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे - ४१० चे\nवर्षे: ३९० - ३९१ - ३९२ - ३९३ - ३९४ - ३९५ - ३९६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसिमा माओयिंग - चीनची साम्राज्ञी.\nइ.स.च्या ३९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१४ रोजी ०७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/page/2/", "date_download": "2018-04-20T16:28:45Z", "digest": "sha1:WIPRIRTJT5YC7Q445G4K4MWODYA4YA55", "length": 15827, "nlines": 75, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "विदेश – Page 2 – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nवाढदिवसाच्या दिवशीच फोटो काढायच्या नादात तब्बल १५० फूट दरीत कोसळला :पहा व्हिडिओ\nसेल्फी आणि फोटोची क्रेझ कुठे नाहीये . स्मार्टफोन स्वस्त होत असल्याने लोक आजकाल मोबाईल मध्ये जास्तीत जास्त फोटो काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात . जास्तीत जास्त लाईक यावेत आणि लोकांनी आपली दाखल घ्यावी यासाठी निरनिराळे फंडे देखील वापरले जातात . मात्र हा प्रकार कधी कधी अंगलट येऊ शकतो याचा अनुभव तुर्कस्थानातील एका तरुणाला आला… Read More »\nचॅनेलवर बातम्या द्यायला आईसोबत लहान मुलगा आणि अँकर रडू लागली : काय आहे प्रकार \n” मी आहे तुमची अँकर किरण नाज…तुम्ही पाहताय बुलेटिन 7 ते 8, पण आज मी अँकर नाही तर एक आई आहे…” असं म्हणत पाकिस्तानमधील समा वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने एका चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध केलाय.तर दुसऱ्या एका चॅनेलवर ह्या घटनेचे वार्तांकन करत असताना आणिका निसार ह्या अँकरला रडू कोसळले, तिने लगेच ब्रेक घेतल्याचे सांगून… Read More »\nबंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत\nइंटरनेटच्या विश्वात कधी कोण कुठे जाईल नेम नाही. व्यवसायाचे देखील गणित जोवर पैसे हातात येत नाहीत तोवर काय खरे नाही असेच आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत देखील हे असेच लागू होते . एकेकाळी जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ऑर्कुट ही गुगलची सोशल मीडिया वेबसाईट बंद झाली. एक काळ गुगलच्या ऑर्कुटने असा गाजवला होता कि ,काय करतोस हा… Read More »\nबापरे .. भर स्टेडियम मध्ये दिली तब्बल १० जणांना फाशीवर लटकवले\nचीनमध्ये हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 10 जणांना फासावर लटकवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात ही घटना घडली. चीनमधील सरकारची मनमानी सत्ता ही आपल्याला चांगलीच परिचयाची आहे . कट्टर इस्लामी देशातले कडक कानून याविषयी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होते मात्र चीनमधील विवादास्पद अशा गोष्टींबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत नाही. कुत्र्याची हत्या करून… Read More »\nकेळी खाल्ली म्हणून पॉप सिंगर शायमा अहमद अटकेत : काय आहे प्रकरण \nइस्लामिक देशातील अजब गजब कानून याच्याशी आपण परिचित आहोतच . मुळातच जिथं लोकशाही नाही तिथं सर्वसामान्यांच्या मताला आणि विचाराला शून्य किंमत असणार हे जगजाहीर आहे. मात्र यातून बऱ्याच वेळा सेलेब्रिटी लोकांना टार्गेट केले जाते . जर चित्रपट, पॉप अल्बम ग्लोबल व्हावा असा वाटत असेल तर बाकी देशात आपला अल्बम आवडायला हवा यासाठी बरेच कलाकार प्रयत्न… Read More »\n‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर\nगेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल ह्या भडकलेल्या दरामुळे आधीच सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कच्च्या तेलाचे दर अंतरराष्ट्रीय बाजारात जरी कमी झाले असले तरी आपल्याकडे असलेल्या कर प्रणालीमुळे ते कमी होत नाही. जीएसटी च्या टप्प्यात पेट्रोल व डिझेल ला घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र तोवर आपल्याला दणकून पैसे मोजावे लागत आहेत . अर्थात पेट्रोल-डिझेलचे… Read More »\nCategory: देश विदेश Tags: इराण आणि सौदी अरब, पेट्रोल आणि डिझेल, महागाई का वाढू शकते, शिया सुन्नी मुस्लीम वाद\nभारतीय तरुणाचा ९०० स्क्वेअर मैलाचा देश ..स्वतः राजा वडील पंतप्रधान आणि लोकसंख्या दोन\nएका भारतीय तरुणाने स्वतःला एका देशाचा राजा घोषित करत जागेवर कब्जा केला आहे. ह्या भागाचे क्षेत्रफळ ९०० स्क्वेअर मैल असून हा देश इजिप्त आणि सुदानच्या मध्ये निर्मित केला आहे. आता संयुक्त राष्ट्राने याला मान्यता द्यावी असे या तरुणाचे म्हणणे आहे . ह्या तरुणाचे नाव सुयश दीक्षित असे असल्याचे समजते . सुयश हा मूळचा इंन्दोर चा… Read More »\nCategory: Uncategorized देश विदेश Tags: चमत्कारिक बातम्या, भारतीय तरुणाचा स्वतःचा देश, सुयश दिक्षित देश, सुयश दिक्षित माझा देश\nआणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले\nकेआरकेचे ट्विटर अकाउंट बंद झाले आहे .हे सुरु ना केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा केआरकेने दिला आहे . केआरके असो व इतर कोणी असो , सोशल मीडियावर फॉलोअर मिळवणे आणि ते टिकवून ठेवणे यासाठी प्रचंड मेहनत असते. इतके फॉलोअर मिळवून असे झाल्यावर जर आपले अकाउंट बंद झाले तर कोणीही माणूस असेल तरी तो त्या वेबसाईटवर आगपाखड… Read More »\nधर्माच्या नावाखाली क्रूरतेचा कळस : अल्लाहु अकबर करत तब्बल ‘ इतक्या ‘ लोकांचा घेतला जीव\nअमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने देखील याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत येत कामा नये. मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि सगळीकडे एकक गोंधळ मजला .… Read More »\nहोय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला\nपाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/iphone-x-1000-feet-high-and-see-what-happened/amp/", "date_download": "2018-04-20T16:14:29Z", "digest": "sha1:LPXQHYLQPZIQWIFVKYQNY2BOEJ456LEQ", "length": 7176, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPhone X from 1000 feet high and see what happened? | 1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं ? | Lokmat.com", "raw_content": "\n1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं \nमुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात ...\nमुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ unlockriver.com ने आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. यामध्ये 'आयफोन X' स्मार्टफोन जवळजवळ 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आला आहे. unlockriver.com ने अपलोड केलेल्या या 'आयफोन X' च्या व्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नाव दिले आहे. व्हिडिओमध्ये नवीन 'आयफोन X' स्मार्टफोनला एका दोरीने ड्रोनला बांधण्यात आले आहे. त्यानंतर ड्रोन जवळपास 1000 फूट उंचीवर नेऊन स्मार्टफोनला खाली असलेल्या सिमेंटच्या फरशीवर फेकण्यात आले. खाली फरशीवर पडल्यानंतर 'आयफोन X' स्मार्टफोनची मागील बाजू फुटली. मात्र, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का लागला नाही. त्यानंतर या स्मार्टफोनला ऑपरेट करुन पाहिले असता, स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरु होता आणि इतर फीचर्स सुद्धा व्यवस्थित ऑपरेट होत होते.\nदरम्यान, या व्हिडिओच्या होस्टने असा दावा केला आहे, की आयफोन X हा इतर आयफोन स्मार्टफोनच्या तुलनेत मजबूत आहे. जर 1000 फूट उंचीवरुन हा स्मार्टफोन डिस्प्लेच्या बाजूने पडला असता, तरी सुद्धा काही फरक पडला नाही. याशिवाय, EverythingApplePro ची एक ड्रॉप टेस्ट घेण्यात आली होती. याचा पण व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यामध्ये सुद्धा स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काही नुकसान झाले नव्हते. भारतात 'आयफोन X' 64GB व्हेरिअंटची किंमत 64 हजार रूपये आहे, तर 128GB व्हेरिअंटची किंमत 1लाख 2 हजार रुपये आहे.\nमोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा\nपोलीस ठाण्याचा वापर करत चक्क पोलीस निरिक्षकांच्या नावाने लांबविला मोबाईल\nफेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत\nमोबाइल बाळगल्याने, जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात; म्हणून या गावात बंदी\nटेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन\nव्हर्लपूलचे वाय-फाय कनेक्टिव्हिटीयुक्त एयर कंडिशनर्स\nफेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत\nटेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन\nखास भारतीयांसाठी अमेझॉनचे वेब ब्राऊजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/mumbai-gang-rape-as-it-happens/162481", "date_download": "2018-04-20T16:49:54Z", "digest": "sha1:HVGWXEU67VUUT4OQJHWBGBHYLGIN2BFB", "length": 22165, "nlines": 99, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबई गँगरेप : नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी! | 24taas.com", "raw_content": "\nमुंबई गँगरेप : नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी\nमहालक्ष्मी येथे फोटो जर्नलिस्ट तरुणीला बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा नराधमांनी बलात्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती त्या तरणीने दिलेल्या जबानीतून समोर आलीय.\nwww.24taas.com, झी मीडिया, मुंबई\nमहालक्ष्मी येथे फोटो जर्नलिस्ट तरुणीला बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा नराधमांनी बलात्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती त्या तरणीने दिलेल्या जबानीतून समोर आलीय. हा प्रकार घडण्याआधी त्या तरुणींच्या आईचा फोन आला होता, पण नराधमांनी धमकावल्यामुळे त्या मुलीला आपण ठिक आहोत असचं सांगावं लागलं. अतिशय क्रूरपणे त्या नराधमांनी तरुणींच्या शरीराचे लटके तोडल्याचं जबानीतून समोर आलाय. या ‘निर्भया’नं पोलिसांना दिलेला जबाब तिच्याच शब्दांत...\nकाय काय घडलं त्या दिवशी...\nमहालक्ष्मी इथल्या शक्ती मील कम्पाऊंडमध्ये करण्यात आलेला सामूहिक बलात्कार हा माणुसकीला काळीमा फासणाराच... पीडित तरुणीच्या जबाबातून त्या वासनांध राक्षसांचा कृर चेहरा समोर आलाय. या घटनेच्या वेळी तरुणीला तीच्या आईचा फ़ोन आला होता. पण, नराधमांनी बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या मुलीच्या आईने एकदा नव्हे तर दोनदा मोबाइलवर संपर्क साधून सर्व काही ठीक आहे ना अशी विचारपूस केली होती. पण त्या नराधमांच्या धाकापुढे त्या तरुणीचा नाईलाज झाला. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आईला सारे ठिक असल्याचं सांगावं लागलं आणि त्यानंतर त्या नराधमांनी त्या तरुणीच्या शरीराचे लचके तोडले.\nपीडित फ़ोटो जर्नालिस्ट तरुणींने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, तिनं डिप्लोमा इन कम्युनिकेशन कोर्स केल्यानंतर, मे महिन्यात एका इंग्रजी मासिकात इंन्टर्न फोटोग्राफर म्हणून कामाला लागली होती. गुरुवारी दुपारी साधारण एक वाजता ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर पाच वाजेपर्यंत तीनं काम केलं आणि त्यानंतर ऑफिसने दिलेली बातमी करण्यासाठी ती तिच्या सहका-याबरोबर शक्ती मिल कपाउंडमधील पडक्या इमारतींची छायाचित्रे काढण्यासाठी महालक्ष्मी स्थानकाच्या फलाट क्रमांक-१ वरून चालत आत गेली. त्यावेळी या गिरणीतून बाहेर पडणा-या दोन व्यक्तींना आत जायच्या रस्त्याबाबत त्यांनी विचारले असता त्यांनी आत जाण्याचा मार्ग सांगितला. पण त्या तरुणीला काय माहित की त्या दोन तरुणांनी सांगितलेल्या रस्त्यावर गेल्यास आपलं आयुष्य उद्वस्त होणार आहे. हे तेच दोन तरुण होते ज्यांनी या तरुणीवर अमानुष अत्याचार केला. पुढे कम्पाऊंडमध्ये आत गेल्यावर त्या तरुणीने तिच्या मोबाईलवरून तर तिच्या सहका-याने त्याच्याकडील कॅमेऱ्यातून इमारतींची विविध छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. साधारण साडेसहाच्या सुमारास छायाचित्रे काढून झाल्यावर बाजूलाच रस्ता दिसत असल्यामुळे दोघेही तिथूनच बाहेर जाणार, तोच ज्यांनी रस्ता दाखवला होता, ते पुन्हा तेथे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीने हिंदीत सांगितले, ‘हमारे शेठने आपको देखा है, और आपको शेठके पास आना पडेगा.’ त्यावर त्या धाडसी तरुणीने ‘मै तुम्हारे शेठसे बात करती हूँ’ असं सांगितलं. तेव्हा त्यांनी फोनवरुन बातचीत करण्यास नकार दिला. आणि जबारदस्तीने त्या दोघांना शेठकडे घेऊन जाऊ लागले. तितक्यात त्या तरुणींने आपल्या ऑफिसमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव म्हणून की काय ऑफिसचा फ़ोन लागलाच नाही. तोपर्यंत ते सर्व मिलच्या पडक्या भागात आले होते. अचानक त्या फोटो जर्नलिस्ट तरुणीला तिच्या ऑफिसमधील फोटोग्राफर प्रमुखाचा फोन आला, त्या तरुणीने घडत असलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्या ताबडतोब तिथून बाहेर पडा असं त्या दोघांना सांगितलं. पण, त्या पा़च नराधमांना जे करायचा होतं त्यांनी ते केलच. त्या तरुणीला आणि तिच्या बरोबर असलेल्या तिच्या सहकारीला आरोपींपैकी तिसऱ्या व्यक्तीने ‘काही दिवसांपूर्वी येथे मर्डर झाला होता आणि तो तूच केला’, असे सांगत आणखी दोन साथीदारांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यावर त्या तरुणींने आणि तिच्या सहकारीने त्यांना सोडण्यासाठी झटापट करू लागले. पण त्या नराधमांनी त्या दोघांचे काहीच ऐकलं नाही. आणि तरुणीच्या साथीदाराला मारहाण करून पट्टयाने आणि दोरीने बांधून ठेवले. त्यावर त्या दोघांनीही या दोघांकडचा मोबाइल व कॅमेरा ३० हजारपेक्षा जास्त रकमेचा आहे, तो ठेवा आणि आम्हाला सोडा अशी विनंती त्या नराधमांना केली. पण त्याचा काही एक परीणाम त्या पाच नराधमांवर झाला नाही.\nत्यानंतर त्या पाच नराधमांपैकी एक मिशीवाला आणि रस्ता दाखवणाऱ्यांबरोबर नंतर आलेला एक अशा दोघा आरोपींनी त्या तरुणीला एका बाजूला नेले. त्याच वेळीस तरुणीच्या आईचा फोन आला. जणू आपल्या मुलीवर काही तरी संकंट ओढावलय अशी चाहूल त्या आईला लागली असावी, ‘तु कुठे आहेस, ठिक आहेसना, घरी कधी येणा\nमुंबई गँगरेप : तिसऱ्या आरोपीलाही अटक\nव्हॉट्सअॅपचं हे फिचर देणार अफवा पसरवणाऱ्यांना दणका\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी...\nहॉलिवूड सिनेमा 'Puzzle'मध्ये इरफान खान, ट्रेलर र...\nवॉटसनचं शतक, चेन्नईचा स्कोअर २०० पार\nप्रिया वॉरियर देतेय 'फ्री अॅटीट्यूड'\nयोगी आदित्यनाथ फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेले मुख्यमंत्री\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nरॅम्पवर अर्शी खानचे जलवे...\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\nम्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:43:05Z", "digest": "sha1:CXQU4MV7YNIJ3RMOSC67COQDV5VVHK5Q", "length": 4843, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कथासरित्सागर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकथासरित्सागर हा संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय कथाग्रंथ आहे. सोमदेव नावाचा काश्मिरी शैव ब्राह्मण याचा लेखक होता. हा ग्रंथ गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बॄहत्कथा या ग्रंथांतील कथांवर आधारलेला किंवा अनुवादलेला असावा असे मानले जाते. मात्र मूळ बृहत्कथा ग्रंथाची संहिता उपलब्ध नाही; केवळ सोमदेवाने अनुवादलेली संस्कृत भाषेतील कथासरित्सागराची श्लोकबद्ध संहिताच उपलब्ध आहे.[१]\nलेखक सोमदेवाबद्दल फारशी कुठेही माहिती आढळत नाही; त्याच्या वडिलांचे नाव रामदेवभट्ट होते, एवढाच काय तो संदर्भ उपलब्ध आहे. काश्मिराचा राजा अनंतदेव (शासनकाळ : इ.स. १०६३ - इ.स. १०८१) याची पत्नी राणी सूर्यमती हिच्या मनोरंजनासाठी कथासरित्सागर रचण्यात आला.\n↑ नेमाडे, भालचंद्र (२००१). टीकास्वयंवर. साकेत प्रकाशन. पान क्रमांक ३०५. आय.एस.बी.एन. 81-7786-026-7.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/most-beautiful-ias-ips-indian-womens-officers/", "date_download": "2018-04-20T16:29:39Z", "digest": "sha1:7WVQMOY4IYPALEYV3V5ARVC7CLILUDXQ", "length": 63150, "nlines": 267, "source_domain": "khaasre.com", "title": "अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nअभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी… 0\nप्रशासकीय अधिकारी होणे प्रत्येक युवक किंवा युवतीचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायला मेहनतसुध्दा आवश्यक आहे. आपला एक समज असतो कि प्रशासकीय अधिकारी म्हणजे जाड भिंगाचा चष्मा, चेहऱ्यावर राग इत्यादी परंतु खालील काही अधिकारी बघितल्यावर आपला हा गैरसमज दूर होईल. सुंदरते सोबत बुद्धिमत्तेची देन असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकारी खासरे वर बघा…\nपहिल्यांदा पाहिल्यावर ह्या तुम्हाला अभिनेत्री वाटणार पण तसे नाही आहे…\n1- IAS स्मिता सभरवाल\nआयएएस ची परीक्षा २३ व्या वर्षी पास होणाऱ्या स्मिता सभरवाल ह्या वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. स्मिता यांना संपूर्ण भारतात चौथ्या स्थान पटकावून IAS झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती चित्तूर जिल्ह्यामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून झाली होती. आंध्र प्रदेश मध्ये अनेक दिवस काम केल्यानंतर त्या करीमनगर येथे डीएम च्या पदावर सध्या आहे.\n२०१२ साली त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास होऊन मरीन जोसेफ IPS होण्याचा मान मिळविला. दिल्ली येथील नामांकित कॉलेज सेंट स्टिफस कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या अगोदर त्या राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी झाल्या होत्या. जोसेफ त्यांच्या बैच मधील सर्वात कमी वयाच्या आयपीएस अधिकारी आहेत. २०१५ साली त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित युथ समीटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.\n२०१६ साली झालेल्या युपीएससी परीक्षेत सर्वात कमी वयाची अधिकारी तिच्या पहिल्या प्रयत्नात व पहिला नंबर घेऊन पास झालेली टीना डाबी आहेत. टीन यांचा जन्म भोपाल मध्ये झाला त्या ७ वी मध्ये असताना त्यांचे कुटुंब दिल्ली येथे शिफ्ट झाले. कॉन्वेंट ऑफ जिसस & मेरी मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये दिल्ली येथील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये त्यांनी पोलिटिकल सायन्स मध्ये पदवी पूर्ण केली. याच परिक्षेत दुसरा क्रमांक पटकावणारे अमीर उल शफी सोबत त्यांची मागे एंगेजमेंट झाली आहे.\n4- IAS बी चंद्रकला\nयुपी येथील बुलंदशहर येथील जिल्हाधिकारी चंद्रकला सर्वाना परिचित आहे. त्यांचे फोटो सतत सोशल मिडीयावर फिरत असतात. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ साली आंध्र प्रदेश मध्ये झाला. २००८ साली त्यांना युपीएससी परीक्षेत ४०९ वे स्थान मिळवून IAS अधिकारी झाल्या. त्यांनी कोटी वूमन्स कॉलेज हैद्राबाद येथून बीएची पदवी मिळवली आहे. त्यांच्या काटेकोर कामा करिता त्या प्रसिध्द आहेत.\n5- IPS संजुक्ता पाराशर\nआसाम मधील पहिली महिला IPS अधिकारी संजुक्ता ह्या २००६ सालच्या बैचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी त्याची पदवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ कॉलेज मधून पोलिटिकल सायन्स मधून पदवी पूर्ण केली आहे. संजुक्ता ह्या एका गोंडस बाळाच्या आई आहे. २००८ साली त्यांची पहिली पोस्टिंग माकूम मध्ये असिस्टन्ट कमानडेंट म्हणून झाली होती. काही दिवसानंतर त्यांना उदालगिरी येथे बांगलादेशी व बोडो लोकात झालेल्या हिंसाचार नियंत्रित करण्याकरिता त्यांना पाठविण्यात आले. इथे त्यांनी अद्वितीय कामगिरी बजावली होती.\nरीजू बाफना ह्या २०१३ साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत ७७ वे स्थान मिळवून आयएएस अधिकारी झाल्या. त्यांचे पतीसुध्दा आयएएस अधिकारी आहे. मागील वर्षी मानवी अधिकारी कमिशन मधील एका अधिकाऱ्याने त्याचा विनयभंग केल्यामुळे हे नाव चर्चेत आले.\nजोधपुर येथिल रहिवाशी स्तुती २०१२ साली यूपीएससी परीक्षेत तिसरे स्थान त्यांनी पटकविले होते. त्यांच्या ह्या यशा पाठीमागे त्यांच्या परिवाराने अपार मेहनत घेतली. स्तुती यांनी जोधपुर विद्यापीठातून बीएससी व दिल्ली येथे आईआईपीएम मध्ये मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे. ह्या परीक्षे अगोदर त्यांनी बैंक PO परीक्षा सुध्दा पास केली होती व युको बैंकमध्ये काही दिवस नौकरी सुद्धा केली.\nकेरळ येथील रहिवाशी रोशन जेकब यांचा जन्म २५ डिसेम्बर १९७८ साली झाला. त्यांनी २००४ मध्ये युपीएससी परीक्षा पास केली. सध्या त्या उत्तर प्रदेश मध्ये गोंडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.\nमहाराष्ट्र कैडर मधील सिनियर ऑफिसर मीरा चढ्ढा बोरवणकर १९८१ साली आयपीएस अधिकारी झाल्या. त्या लवकरच रिटायर होणार आहेत. सध्या त्या पोलीस शोध व विकास ब्युरोच्या महानिदेशक आहे. या अगोदर महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस आयुक्त बनून त्यांनी इतिहास रचला होता.\nमहाराष्ट्र कैडर की सीनियर ऑफिसर मीरा चड्ढा बोरवांकर 1981 बैच की आईपीएस अधिकारी हैं वो अगले साल रिटायर्ड होंगी वो अगले साल रिटायर्ड होंगी वर्तमान में मीरा पुलिस शोध एवं विकास ब्यूरो की महानिदेशक हैं वर्तमान में मीरा पुलिस शोध एवं विकास ब्यूरो की महानिदेशक हैं इससे पहले महाराष्ट्र की पहली महिला पुलिस आयुक्त बनकर मीरा बोरवांकर ने इतिहास रचा था\nमुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी भरीव कामगिरी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. सद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत.\nसौंदर्या सोबत बुद्धिमत्ता असणाऱ्या ह्या भारत मातेच्या मुलींना खासरे तर्फे सलाम….\nवाचा आयपीएस मोक्षदा पाटील यांचा जीवनपट\nवाचा फक्त ११ रुपये फी घेऊन अनेक अधिकारी घडविणारा शिक्षक\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nPrevious Articleजनरल हरबख्श नसते तर पाकिस्तानमध्ये असते पंजाबNext Articleभारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/magestic-gappaborders-disappear-after-leaving-the-country/articleshow/62479620.cms", "date_download": "2018-04-20T16:11:50Z", "digest": "sha1:QHY4KJN3MNYMNNYFGFTAMHXHOEWWEX7A", "length": 26316, "nlines": 245, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "magestic gappa,borders disappear after leaving the country | देशाबाहेर पडल्यावर सीमा नाहीशा होतात - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nदेशाबाहेर पडल्यावर सीमा नाहीशा होतात\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:\n‘आपण पाकिस्तानकडे पाहतो ते मुस्लिम इतिहासाच्या पार्श्वभूमीवर. त्यांच्याविषयी आपल्या मनात तिरस्कार असतो. मात्र, पाकिस्तानी नागरिक खूप मनापासून पाहुणचार करतात. आपण देश सोडून बाहेर पडलो की या सीमा नाहीशा होतात’, अशी प्रांजळ कबुली ‘भटकंतीच्या दाही दिशा’ या परिसंवादात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी, वीणा वर्ल्डच्या सिग्नेचर हॉलिडेच्या प्रमुख सुनीला पाटील, लेखिका मेधा अलकरी यांनी दिली. मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या आठव्या सत्रामध्ये ते बोलत होते.\n‘पहिल्या प्रवासाच्या वेळी नेमकी काय अपेक्षा असते तेच माहीत नसते, काय होईल हे कळत नसते त्यामुळे हा प्रवास अधिक लक्षात राहतो. नंतर आपण सरावत जातो’, असे सांगत या परिसंवादातील गप्पांना सुरुवात झाली. या गप्पांना मकरंद जोशी यांनी एका सूत्रात गुंफले. या परिसंवादातील सहभागींच्या पहिल्या प्रवासाचा अनुभव ते या देशांमधील संस्कृती, त्यांचा पाहुणचार, स्थानिकांची स्वभाववैशिष्ट्ये असा या परिसंवादाचा प्रवास रंगला.\nमेधा अलकारी यांनी नायजेरिया, अंटार्क्टिका येथील अनुभव आपल्या खुमासदार शैलीमध्ये उपस्थितांसमोर सादर केले. द्वारकानाथ संझगिरी यांनी वेस्ट इंडिजचे वेगळेपण सांगत तेथील निसर्गसौंदर्य पार्लेकरांच्या डोळ्यांसमोर उभे केले. त्यांनी पाकिस्तानी वास्तव्यामध्ये घेतलेले पाहुणचाराचे अनुभव सांगत एक वेगळा पाकिस्तान साकारला. पेशावरमधील वास्तव्यादरम्यान शाहरुख खान, दिलीपकुमार, राजकपूर यांची घरे स्थानिकांनी किती आपुलकीने दाखवली तो अनुभवही संझगिरी यांनी सांगितला.\nसुनीला पाटील यांनी या गप्पांमध्ये, निसर्गाचे सौंदर्य का जपायला हवे हे जाणवण्यासाठी अंटार्क्टिकाचा अनुभव महत्त्वाचा ठरल्याचे रसिकांना सांगितले. अंटार्क्टिकाचे महत्त्व समजावणारे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आलेल्या पर्यटकांमुळे तेथील निसर्गाला धोका पोहोचू नये यासाठी त्यांच्या शूजपासून कपड्यांपर्यंत व्हॅक्युमिंग करतात. तेव्हा निसर्ग नष्ट होऊ नये म्हणून त्यांना किती काळजी आहे, याची जाणीव हाेते, असे त्यांनी सांगितले. या गप्पांमध्ये त्यांनी सध्याची ऑफ बिट डेस्टिनेशन, इंटरनेटसारख्या साधनांमुळे निर्माण होणारा गोंधळ, पर्यटनादरम्यान वेगळ्या अनुभवाची असलेली अपेक्षा असे अनेक कंगोरे उलगडले. तज्ज्ञांनी सांगितलेले विविध किस्से, त्यांची ओघवती शैली, अनुभवांचा खजिना यामुळे हे सत्र अधिक भिडल्याचे उपस्थितांनी या निमित्ताने आवर्जून सांगितले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1देशाबाहेर पडल्यावर सीमा नाहीशा होतात...\n2बेकायदा बॅनरना लावा २३ फेब्रुवारीपर्यंत चाप...\n4पत्राचाळ रहिवाशांना अखेर दिलासा...\n5परवडणाऱ्या घरांसाठी ‘निवारा’चा मेळावा...\n6आचार्य माय-लेकीची मूषकछळातून मुक्तता...\n7अमोल गोळेंवर कथाचौर्याचा आरोप...\n8आरटीई प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर...\n9अवघड विषयांचा सोपा मार्ग...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/11/CurrentAffairs15112016.html", "date_download": "2018-04-20T16:28:52Z", "digest": "sha1:7KTZMYFEDB6TLKVAJKTNAHTLDYK7XQZV", "length": 15540, "nlines": 176, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : १५ नोव्हेंबर", "raw_content": "\nचालू घडामोडी : १५ नोव्हेंबर\nनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड\nज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.\nसावरकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केल्या आहेत.\nरंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलन अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.\n‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा, ‘तुझ आहे तुझपाशी’मधील शाम, ‘सौजन्याची ऐशीतैशी’मधील मंडलेकर, ‘सम्राट सिंह’ मधील विदूषक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.\nइना मिना डिका, कुरुक्षेत्र, जावई माझा भला, गुलाम ए मुस्तफा अशा १००हून अधिक चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. मा.गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.\n‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे.\nपुढील अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता\n८२ वर्षानंतर प्रथमच रेल्वे आणि अर्थसंकल्प असे सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर होणार आहे.\nनव्या वेळापत्रकानुसार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.\nरेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.\nनियोजित बदल आणि त्याचे रेल्वेला फायदे\nस्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला तरी सरकारची व्यापारी आस्थापना म्हणून रेल्वेचे अस्तित्व कायम.\nरेल्वेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित व वित्तीय अधिकारही सध्याप्रमाणेच.\nसध्याची वित्तीय व्यवस्था कायम. सर्वसाधारण कामकाज खर्चासह सर्व महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन हे रेल्वेच्या उत्पन्नातूनच.\nरेल्वेच्या खातेपुस्तकांत केंद्र सरकारचे सुमारे २.२७ लाख कोटी रुपयांचे भांडवल तसेच राहील. मात्र त्यावर यापुढे रेल्वेकडून केंद्राला लाभांश नाही.\nलाभांशापोटी दरवर्षी द्यावी लागणारी सुमारे ९,७०० कोटी रुपयांची रक्कम रेल्वेकडेच राहील.\nइतर खात्यांप्रमाणे रेल्वेलाही केंद्रीय अर्थसंकल्पातून पैसे मिळतील. रेल्वेच्या खर्चाचे विनियोजनही मुख्य विनियोजन विधेयकातच.\nएकत्रित अर्थसंकल्प मांडल्याने रेल्वेला कारभारावर लक्ष केंद्रित करता येईल व सरकारच्या वित्तीय स्थितीचे सर्वंकष चित्र स्पष्ट होईल.\nप्रक्रियात्मक मंजुरीची गरज न राहिल्याने निर्णय झटपट होतील व सुशासनाच्या मोजपट्टीत रेल्वेही येईल.\nअजय राजाध्यक्ष अमेरिकेच्या राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य\nअजय राजाध्यक्ष यांची अलीकडेच अमेरिकेच्या कोषागार विभागाने राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.\nजागतिक बृहत-संशोधन व सल्ला क्षेत्रातील संस्था बार्कलेज कॅपिटलचे राजाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहेत.\nअमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या सल्लामसलतीच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असतो.\nत्यांनी मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए पूर्ण केले आहे.\nआयआयएम कोलकातानंतर त्यांनी अ‍ॅरिझोना येथील अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी मिळविली.\nवयाच्या ३१व्या वर्षी बार्कलेजमध्ये त्यांच्या एमबीएस फ्रँचाइजी व्यवसायाच्या ते व्यवस्थापकीय संचालक या पदावर पोहोचले.\nलुईस हॅमिल्टनला ब्राझिलीयन ग्रां. प्री. स्पर्धेचे विजेतेपद\nमर्सिडीजचा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने ब्राझिलीयन ग्रां. प्री. स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.\nएफ वन रेसमधील एकमेव भारतीय संघ असलेल्या ‘फोर्स वन’च्या रेसर सर्जियो परेरा (मॅक्सिको) आणि निको हल्केनबर्ग (जर्मनी) यांनी अनुक्रमे चौथे व सातवे स्थान मिळविले.\nसध्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आपला संघसहकारी निको रोसबर्गला या शर्यतीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.\nयंदाच्या वर्षातील हॅमिल्टनने नववे जेतेपद पटकावले आहे. यासह त्याने रोसबर्गच्या ९ विजेतेपदांची बरोबरी केली आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २६ नोव्हेंबर\nक्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो कालवश\nचालू घडामोडी : २५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २१ नोव्हेंबर\nमासिक : ऑक्टोबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : २० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १६ नोव्हेंबर\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nचालू घडामोडी : १५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १२ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ११ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १० नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ९ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ८ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ६ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ५ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ४ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : २ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : १ नोव्हेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-20T16:06:36Z", "digest": "sha1:NLTXVFVKYZG7PIV7BSJGTOTKYY3VDUUU", "length": 6702, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘ही’ ब्लॉकबास्टर जोडी ‘टोटल धमाल’ फिल्ममध्ये झळकणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘ही’ ब्लॉकबास्टर जोडी ‘टोटल धमाल’ फिल्ममध्ये झळकणार\nअनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ९० च्या दशकातील ‘ही’ सुपरहिट जोडी तब्बल २० वर्षानंतर पुन्हा पडद्यावर एकत्र झळकणार आहे. इंद्र कुमार यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ या फिल्म माधुरी आणि अनिल एकत्र काम करणार आहेत. या फिल्मचे शूटिंग आजपासून सुरु करण्यात आले आहे.\nएका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना इंद्र कुमार म्हणाले की, ‘बेटा’ फिल्मच्या शूट नंतर साधारण २६ वर्षांनी आम्ही तिघे पुन्हा एकत्र आलो आहोत. या ब्लॉकबास्टर जोडीसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. या फिल्ममध्ये अनिल आणि माधुरी पती- पत्नीची भूमिका साकारणार आहेत. या फिल्मचं एक गाणं शूट करण्यात आलं आहे. या फिल्ममधे अजय देवगण, अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा असणार आहेत\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वेच्या कारखान्यांना ग्रीनको मूल्यांकन प्राप्त\nNext articleआंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीम’ अॅप वापरणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर\nदीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री\nVideo : धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nलवकरच ‘ही’ अभिनेत्री चढणार बोहल्यावर\n‘पानीपत’साठी पुन्हा उभारणार शनिवार वाडा\nVideo : ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा “वंटास”\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/national-film-awards-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%96/", "date_download": "2018-04-20T16:06:56Z", "digest": "sha1:FH5ZNO7OV7ZFZ7HA65CMRL6APRELCCC7", "length": 7382, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "National Film Awards : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nNational Film Awards : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nनवी दिल्ली : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोपरांत जाहीर झाला आहे. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.\nदरम्यान, 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. राजेंद्र जंगलेची ‘चंदेरीनामा’ बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर ‘मृत्यूभोग’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला स्पेशल मेन्शन पुरस्काराचा मान मिळालाय, तर ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘न्यूटन’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटीईटी आणखी चार भाषेत ; प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाला\nNext articleउन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ\nदीपिका, प्रियांका चोप्रानंतर ‘या’ अभिनेत्रीची हॉलिवूडमध्ये एंट्री\nVideo : धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\nलवकरच ‘ही’ अभिनेत्री चढणार बोहल्यावर\n‘पानीपत’साठी पुन्हा उभारणार शनिवार वाडा\nVideo : ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा “वंटास”\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-20T16:25:24Z", "digest": "sha1:O4RGSBNYGWHXE4AZPL7BDV6GPXJCRRIT", "length": 13001, "nlines": 168, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\nखाली, शिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणं दिली आहेत. पण कोणतेही एक लक्षण असलं तर मूल दुर्बल आहे हे निश्‍चित होणार नाही, निरनिराळी लक्षण एकत्र करून येणारा परीणाम हे एकच परिमाण मूल शिकण्यात असमर्थ आहे हे निश्‍चित करता येईल ही यादी ७ वर्षावरील मुलांच्यासाठी तपासून पहावी.\nजे विधान आपल्या मुलाला लागू पडत असेल त्याच्या पुढे ‘आहे / हो’ म्हणा व होकाराला एक मार्क द्या.\nवर्गात आपली जागा मिळवण्यास अडचण येते.\nशारीरिक शिक्षणाच्या तासाला अडचण येते.\nमाणसांचे चित्रं अर्धवट काढणे.\nघरामध्ये कुटुंबपातळीवर वाचण्यात असमर्थता असणे.\nशब्द उलट अर्थी वापरणे, जसे जा च्या ऐवजे ये, उठ च्या ऐवजी बस इत्यादी.\nफार काळ लक्षपूर्वक एखादी कृती करता न येणे.\nखेडवळ किंवा एकापेक्षा अधिक भाषांचा वापर असणे.\nआठवणीने क्रमवार घटना सांगता न येणे.\nमूल किंवा मुलाच्या घरातील कोणीतरी उजव्या किंवा डाव्या हाताचा वापर सारख्याच कुवतीने करणारे असणं.\nवाचलेलं लक्षात ठेवायला अडचण येणे.\nपटकन लक्ष विचलीत होणे.\nकोणत्याही वस्तूच्या किंवा जागेच्या आकारमानाचा अंदाज बरोबर नसणे.\nकागदाची घडी घालता न येणे.\nडोक्याला/ मेंदूला दुखापत झालेली असणे, अधून मधून अपस्माराचे झटके येणे.\nसतत डाव आणि उजव ह्यामध्ये गोंधळणे.\nकाही नवीन शिकण्यासाठी आवश्यक तेवढे लक्ष देण्यास असमर्थ असणे.\nलक्ष केंद्रित करण्याची कुवत कमी असणे.\nशब्द भांडार कमी असणे.\nबघणं आणि करणं ह्यामध्ये एक वाक्यता नसणे.\nशरीराच्या हालचाली अस्वस्थ असणे.\nनेहमीच्या वापरातले शब्द लक्षात ठेवण्याची कुवत कमी असणे.\nअक्षर अतिशय गुंतागुंतीचं आणि वेडवाकडं असणे.\nवस्तू हरवण्याची सततची सवय असणे.\nगणना - आपल्या मुलाला १२० पेक्षा अधिक मार्क असतील तर त्याला व्यावसायिक सल्ल्याची गरज आहे.\nलहान वयामध्ये येणाऱ्या अडचणी - शंभर ठळक खुणा व लक्षणे\nलहान मुले आणि क्रिडाप्रशिक्षण\nअभ्यासातील दुबळेपणा: प्रमुख कारणे\nशिकण्यातील दुर्बलता ओळखण्याची लक्षणयादी\n‘वरचं खाणं’: घन आहार\nनवजात शिशू आणि स्तनपान\nमुलांची भूक आणि आहार\nनवी बाळगुटी : पालकांसाठी\nमुलांची शारीरिक वाढ : वजन आणि उंचीची वाढ\nसुदृढ जीवनशैली : लहान मुलांसाठी\nस्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:17:37Z", "digest": "sha1:NYKONUNMIUPWPQXGJ3MP2XO65QH5N6AY", "length": 5831, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गीताई अध्याय अकरावा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गीताई अध्याय अकरावा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय अकरावा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गीताई अध्याय अकरावा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गीताई अध्याय अकरावा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गीताई अध्याय अकरावा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गीताई अध्याय अकरावा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गीताई अध्याय अकरावा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-mns-party-tweet-over-congress-cst-office-broken-down-484711", "date_download": "2018-04-20T16:42:23Z", "digest": "sha1:DNB4FGGXBH6PIIZMFBSBMCVO5P5PEEZQ", "length": 16038, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : होय, काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं : संदीप देशपांडे", "raw_content": "\nमुंबई : होय, काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं : संदीप देशपांडे\nमुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र हा हल्ला कोणी केला, याबाबत चर्चा सुरु असताना, स्वत: संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nमुंबई : होय, काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं : संदीप देशपांडे\nमुंबई : होय, काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं : संदीप देशपांडे\nमुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र हा हल्ला कोणी केला, याबाबत चर्चा सुरु असताना, स्वत: संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3103", "date_download": "2018-04-20T16:32:38Z", "digest": "sha1:GSR2G2U27PTRHLWCOZOGM2XLU3DA4F3P", "length": 10581, "nlines": 104, "source_domain": "rajtantra.com", "title": "विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव\nविलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव\nवाडा, दि. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धापड येथे कार्यरत असलेले शिक्षक विलास मुकणे यांना राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.\nशिक्षक म्हणून आपल्या सेवेच्या कालावधीत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी चांगले काम करणार्‍या शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाडा पंचायत समितीमार्फत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. नुकत्याच तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुकणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, महिला व बालकल्याण सभापती धनाश्री चौधरी आदी उपस्थित होते.\nमुकणे हे गेली 24 वर्ष शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील कासघर व धापड या शाळांमध्ये त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले आहेत. प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या या कामाची दखल घेऊन पंचायत समितीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला आहे. मुकणेंना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.\nPrevious: अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nNext: जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/01/blog-post_26.html", "date_download": "2018-04-20T16:43:09Z", "digest": "sha1:FC4NT32IB72DYV2OP5YL5VRLTU5M4YJK", "length": 9748, "nlines": 259, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : पद्म पुरस्कार २०१५", "raw_content": "\nविविध क्षेत्रांत अजोड कामगिरीने आपले स्थान मिळवलेल्या विभूतींना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ९ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आले.\nहि सर्व माहिती तसेच उर्वरित ७५ पद्मश्री पुरस्कार यादी PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nपद्म विभूषण पुरस्कार २०१५\nप्रा. मालुर रामास्वामी श्रीनिवासन\nकरीम अल हुसैनी आगा खान (परदेशी नागरिक)\nडॉ. पंडित गोकुलोत्सवजी महाराज\nमाजी कुस्तीगीर श्री सतपाल\nडेव्हिड फ्रॉवले (वामदेव) (परदेशी नागरिक)\nबिल गेट्स (परदेशी नागरिक)\nमेलिंडा गेट्स (परदेशी नागरिक)\nसाईचिरो मिसुमी (परदेशी नागरिक)\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २० जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १९ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १८ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १७ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १६ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १५ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १४ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १३ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १२ जानेवारी २०१५\nचालू धडामोडी - ११ जानेवारी २०१५\nचालू धडामोडी - १० जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ९ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ८ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ७ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ६ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ५ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ४ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ३ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - २ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १ जानेवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/01/CurrentAffairs30January2016.html", "date_download": "2018-04-20T16:39:45Z", "digest": "sha1:XXAB6OWF4UGCAL3ROKL3SXVB636C2B2R", "length": 23556, "nlines": 189, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : ३० जानेवारी", "raw_content": "\nचालू घडामोडी : ३० जानेवारी\nझिका विषाणूला रोखण्यासाठी तांत्रिक गटाची स्थापना\nझिका विषाणूचा परदेशात प्रसार सुरू असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्याचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये यावर देखरेख करण्यासाठी एका तांत्रिक गटाची स्थापना केली आहे. झिका विषाणूचा फैलाव झाल्याच्या स्थितीवर हा गट लक्ष ठेवेल तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी करेल.\nकाही देशात झिका विषाणू फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोग्य मंत्रालयाचे आणि एम्सचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.\nजागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक असून वेगाने पसरत आहे, शिवाय तो भारतासारख्या देशावर परिणाम करू शकतो.\nताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nया विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे.\nप्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते.\nया रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात.\n१९४७मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती. १९६०मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला. काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले.\n२०१४ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडून हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह २३ देशांमध्ये विषाणू पसरला आहे\nया विषाणूमुळे आतापर्यंत ५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.\nया रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.\nअमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\nजागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक\nया समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठक बोलाविली आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.\nमहेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक स्टम्पिंगचा विक्रम\nटीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.\nयाशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक बनला आहे. लंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा याचा १३९ स्टम्पिंगचा विक्रम त्याने मोडित काढला. धोनीने जडेजाच्या चेंडूवर फॉल्कनरला यष्टिचित करीत हा मान मिळविला.\nअमृता शेरगिल यांचा १०३वा जन्मदिन\nअमृता शेरगिल या भारतातील विसाव्या शतकातील प्रसिद्ध महिला चित्रकार होत्या. देशातील कलेवरील बंधने झुगारून स्वतःला भावणारी, समाजाचे वास्तव चित्रण करणारी चित्रे त्यांनी चितारली.\nशेरगिल यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे ३० जानेवारी १९१३ मध्ये झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील उमरावसिंग शेरगिल हे भारतीय तर आई अँटोनी गोट्‌समन ही हंगेरियन होती.\nकलेचे शिक्षण त्यांनी पॅरिसमध्ये घेतले. पूर्व युरोप व दक्षिण आशियाई चित्रकलेचा त्यांच्यावर प्रभाव होता. चित्रकार म्हणून त्यांनी कामाला पॅरिसमधून सुरवात केली. परंपरेला छेद देणारी चित्रे काढण्याकडे त्यांचा कल होता.\nभारतात आल्यानंतर त्यांनी आपले कुटुंब व मित्रपरिवातील सदस्यांची अनेक चित्रे काढली. भारतीय महिलांची चित्रे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या चित्रांमधून महिलांच्या सामाजिक स्थितीचेही दर्शन घडते. यात ‘तीन लडकियॉं’ हे त्यांचे चित्र विशेष गाजले.\nवयाच्या केवळ २९ व्या वर्षी १९४१ मध्ये आजारामुळे त्यांचे निधन झाले. चित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द अल्प ठरली. त्यांनी या काळात १७४ चित्रे काढली. त्यातील ९५ चित्रे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जतन करण्यात आली आहेत.\nशेरगिल यांचे आयुष्य व चित्रकलेतील संस्मरणीय कारकीर्द पाहून त्या भारताच्या ‘फ्रिडा काहोल’ असल्याचे गुगलने म्हटले आहे. फ्रिडा काहोल या मेक्सिकोतील विसाव्या शतकातील महिला चित्रकार होत्या. त्यांची अनेक व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत.\nअँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद\nजागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अँजेलिकचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.\nकेर्बरने अंतिम सामन्यात सेरेनावर ६-४, ३-६, ६-४ अशी मात केली. ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविणारी अँजेलिक कर्बर जर्मनीची दुसरीच खेळाडू ठरली. यापूर्वी स्टेफी ग्राफने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले होते.\nसध्या जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावरील अँजेलिकने या जेतेपदामुळे दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.\nऑस्ट्रेलियन ओपनमधील ७वे आणि एकूण २२वे ग्रॅंड स्लॅम जेतेपद मिळविण्याचे सेरेनाचे लक्ष्य होते. हे विजेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती.\nजनरल के व्ही कृष्णराव यांचे निधन\nनिवृत्त लष्कर प्रमुख जनरल के व्ही कृष्णराव यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.\nजनरल के व्ही कृष्णराव यांची १९८१ साली १४वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारतीय लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार जुलै १९८३ पर्यंत पाहिला. तसेच, ते चिफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षही होते.\nकाश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असतानाच्या काळातच त्यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. तसेच १९७१च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.\nत्यांनी बजावलेल्या अतुलनीय लष्करी सेवेबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवही करण्यात आला होता.\nफेसबुकवर हत्यारांच्या विक्रीस बंदी\nऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोकांनी परस्परांना बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेत नसल्याचे कारण सांगत फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.\nअमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सना आवाहन केले होते, की त्यांनी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हत्यारांच्या व्यवहारांना आळा घालावा.\nयाआधी फेसबुकने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मारिजुआना, बेकायदेशीर ड्रग्ज विकण्यास बंदी घातलीच होती, त्यामध्ये आता हत्यारांची भर पडली आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ जानेवारी\nचालू घडामोडी : ३० जानेवारी\nचालू घडामोडी : २९ जानेवारी\nचालू घडामोडी : २८ जानेवारी\nचालू घडामोडी : २७ जानेवारी\nचालू घडामोडी : २६ जानेवारी\nचालू घडामोडी : २५ जानेवारी\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचालू घडामोडी : २४ जानेवारी\nचालू घडामोडी : २३ जानेवारी\nचालू घडामोडी : २२ जानेवारी\nचालू घडामोडी : २१ जानेवारी\nचालू घडामोडी : २० जानेवारी\nचालू घडामोडी : १९ जानेवारी\nचालू घडामोडी : १८ जानेवारी\nचालू घडामोडी : १७ जानेवारी\nचालू घडामोडी : १६ जानेवारी\nचालू घडामोडी : १५ जानेवारी\nचालू घडामोडी : १४ जानेवारी\nपंतप्रधान पीक विमा योजना\nचालू घडामोडी : १३ जानेवारी\nचालू घडामोडी : १२ जानेवारी\nचालू घडामोडी : ११ जानेवारी\nचालू घडामोडी : १० जानेवारी\nचालू घडामोडी : ९ जानेवारी\nचालू घडामोडी : ८ जानेवारी\nचालू घडामोडी : ७ जानेवारी\nचालू घडामोडी : ६ जानेवारी\nचालू घडामोडी : ५ जानेवारी\nचालू घडामोडी : ४ जानेवारी\nचालू घडामोडी : ३ जानेवारी\nचालू घडामोडी : २ जानेवारी\nचालू घडामोडी : १ जानेवारी\nचालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90166", "date_download": "2018-04-20T16:43:18Z", "digest": "sha1:ZGU2Y3PO2BNB7VYK67OTM4HXHAR6XPUA", "length": 11729, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola news: vidarbha agitation भिमा कोरेगाव घटनेचे वऱ्हाडात पडसाद | eSakal", "raw_content": "\nभिमा कोरेगाव घटनेचे वऱ्हाडात पडसाद\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nअकोला शहरात बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांकडून जठारपेठ चाैकात हॉटेल व्यावसायिकाला मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून युवकांना ताब्यात घेतले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. वाशीम शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आला\nअकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.\nबुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासून भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली. यामध्ये खामगाव तालुक्यात पिंपरी गवळी, मलकापूर, देऊळगाव राजा, बुलडाणा येथे एसटी बसेसच्या काचा फोडल्या. शहरातील काही प्रतिष्ठाण तसेच रुग्णालयाचे नुकसान करण्यात आले, तर काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. बोरगाव मंजू येथेही रास्ता रोको करण्यात आला. अकोट- अंजनगाव मार्गावर बसवर दगडफेक करण्यात आली.\nअकोला शहरात बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांकडून जठारपेठ चाैकात हॉटेल व्यावसायिकाला मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून युवकांना ताब्यात घेतले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. वाशीम शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आला.\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nआचारसंहितेमुळे बेळगाव परिवहन मंडळाला अच्छे दिन\nबेळगाव - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यापासुन कर न भरता आणि परिवहन मंडळाच्या नियमाचे उल्लंघन करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे...\nमतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे\nभिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRES/MRES024.HTM", "date_download": "2018-04-20T16:43:15Z", "digest": "sha1:XYVMMEUZ4DIF5CWG7XYCRVQWY7BFFTRR", "length": 7108, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी | गप्पा ३ = Pequeñas Conversaciones 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्पॅनिश > अनुक्रमणिका\nआपण धूम्रपान करता का\nअगोदर करत होतो. / होते.\nपण आत्ता मी धूम्रपान करत नाही.\nमी सिगारेट ओढली तर चालेल का आपल्याला त्रास होईल का\nमला त्रास नाही होणार. / मला चालेल.\nआपण काही पिणार का\nनाही, शक्य असेल तर एक बीयर चालेल.\nआपण खूप फिरतीवर असता का\nपण आत्ता आम्ही सुट्टीवर आलो आहोत.\nहो, आज खूपच गरमी आहे.\nचला, बाल्कनीत जाऊ या.\nउद्या इथे एक पार्टी आहे.\nहो, आम्हांला पण निमंत्रण आहे.\nप्रत्येक भाषा लोकांमध्ये संभाषण होण्यासाठी वापरली जाते. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण काय विचार करतो आणि आपल्याला कसे वाटते हे व्यक्त करतो. असे करताना आपण भाषेच्या नियमांना पाळत नाही. आपण आपली स्वतःची भाषा, स्थानिक भाषा वापरतो. हे भाषेच्या लिखाणामध्ये पूर्णतः वेगळे आहे. इथे, भाषांचे सर्व नियम तुम्हाला दिसून येतील. लिखाण हे भाषेला खरे अस्तित्व देते. ते भाषेला जिवंत करते. लिखाणाद्वारे, हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान पुढे नेले जाते. म्हणून, कोणत्याही उच्च संकृतीचे लिखाण हा पाया आहे. 5000 वर्षांपूर्वी लिखाणाच्या स्वरूपाचे संशोधन करण्यात आले. ते कीलाकर लिखाण सुमेरियन यांचे होते. ते चिकणमातीच्या शिलेमध्ये कोरलेले होते. पाचरीच्या आकाराचे लिखाण 300 वर्ष वापरले गेले होते. प्राचीन इजिप्शियनची चित्रलिपीदेखील फार वर्ष अस्तित्वात होती. असंख्य शास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास त्यास समर्पित केलेला आहे. चित्रलिपी ही अतिशय बिकट लिहिण्याची भाषा आहे. परंतु, ती भाषा अतिशय सोप्या कारणासाठी शोधली गेली होती. त्या वेळच्या विशाल इजिप्त राज्यामध्ये अनेक रहिवासी होते. दररोजचे जीवन आणि आर्थिक प्रणाली नियोजित करणे आवश्यक होते. कर आणि हिशोब यांचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या करणे आवश्यक होते. यासाठी, प्राचीन इजिप्शियन लोकांनी अक्षराकृती विकासित केली. अक्षरमाला लिखाण हे सुमेरियन यांचे आहे. प्रत्येक लिहिण्याची पद्धत ही जे लोक वापरत होते, त्यांबद्दल बरेच काही सांगून जाते. शिवाय, प्रत्येक देश त्यांच्या लिखाणातून त्यांचे वैशिष्ट्य दाखवतात. दुर्दैवाने, लिहिण्याची कला नष्ट होत चालली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते जवळजवळ अनावश्यक करते. म्हणून: बोलू नका, लिहित राहा\nContact book2 मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%B3", "date_download": "2018-04-20T16:27:39Z", "digest": "sha1:HAYARDQZAAHSUPAFC4FZWJ62OOXOT4BO", "length": 6605, "nlines": 89, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "सगळे लेख - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nविवेचनात्मक विचार कसा करावा\nशोधयंत्राचा शोध - भाग १\nशोधयंत्राचा शोध - भाग २ - इतिहास\nशोधयंत्राचा शोध - भाग ४ -आल्टाव्हिस्टा आणि संचारक\nशोधयंत्राचा शोध - भाग ५ - सूचिकार\nशोधयंत्राचा शोध - भाग ६ - दर्शनी भाग\nशोधयंत्राचा शोध - भाग ७ - पुन्हा इतिहास\nशोधयंत्राचा शोध - भाग ८ - इंकटुमी\nश्री गुरुदेव दत्त करुणा पंचपदी\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्रीमद्‌भगवद्‌गीता (मूळ श्लोक, संदर्भित अन्वयार्थ आणि अर्थ यासह)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : अकरावा अध्याय (विश्वरूपदर्शनयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : आठवा अध्याय (अक्षरब्रह्मयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : चौदावा अध्याय (गुणत्रयविभागयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : तिसरा अध्याय (कर्मयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : तेरावा अध्याय (क्षेत्रक्षत्रज्ञविभागयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : दहावा अध्याय (विभूतियोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : पंधरावा अध्याय (पुरुषोत्तमयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : पहिला अध्याय (अर्जुनविषादयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : पाचवा अध्याय (कर्मसंन्यासयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : बारावा अध्याय (भक्तियोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : सतरावा अध्याय (श्रद्धात्रयविभागयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : सहावा अध्याय (आत्मसंयमयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग)\nश्रीमद्‌भगवद्‌गीता : सोळावा अध्याय (दैवासुरसंपद्विभागयोग)\nसंकल्पनांचा लेखन विस्तार कसा करावा \nसंतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकोबारायांची आरती\nस्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन\nस्त्रीवादी संकल्पना आणि सिध्दांकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:41:36Z", "digest": "sha1:3GC2G2DYTGGOSTDLDVWAKYETXHYCR7AQ", "length": 3146, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अस्तेक सम्राटांची वंशावळी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१३७६ ते १५२५ मधल्या अस्तेक सम्राटांच्या वंशावळीचे चित्र पुढील प्रमाणे दाखविले आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:41:41Z", "digest": "sha1:VUF6MLX7RFIGZGVY5VBWS4VBQWEPBU62", "length": 5496, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उझबेक भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमध्य आशियातील अनेक देश\nuzb (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nउझबेक ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा उझबेकिस्तान ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा उझबेकिस्तान तसेच मध्य आशियामधील सुमारे २.५ कोटी लोकांद्वारे वापरली जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१६ रोजी २३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/madhavi-juvekar-vulgar-video-dance-at-best-dasara-melava/", "date_download": "2018-04-20T16:22:11Z", "digest": "sha1:S3SMVSLFJMGTVOIV46QQDAMACRIQLLES", "length": 10131, "nlines": 63, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "संतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसंतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती\nआपण सेलेब्रिटी असाल तर आपले वैयक्तिक आयुष्य असते हे आम्ही समजू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही . मात्र ज्यावेळी आपण सेलेब्रिटी असता आणि पब्लिक मध्ये वावरत असता त्यावेळी किमान आपले फॅन दुखावले जाणार नाहीत आणि आपली संस्कृती यांचे किमान भान तरी ठेवायला हवे .\nहिंदीत असलेला हिडीस प्रकार आता हळू हळू मराठी सिनेसृष्टीत देखील येऊ लागलाय म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही . पुण्यात देखील काही दिवसापूर्वी मराठी कलाकारांकडून अशीच हिडीस पार्टी सुरु होती, पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करून ती उधळून लावली.असाच काहीसा प्रकार आता माधवी जुवेकर यांच्या बाबतीत घडला आहे.\nआपल्या माहितीसाठी , माधवी जुवेकर ह्या बेस्ट मध्ये नोकरी करतात . त्यांचे इतर सहकारी व बेस्ट अधिका-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे . ह्या व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. नोटा कोणावर उधळतात हे आम्हाला वेगळे सांगायचे गरज नाही. मात्र लोकप्रिय कलाकारांना असे वागणे शोभते का असा सवाल आता लोक विचारत आहेत .तामण मराठी माणसांनी मान खाली घालावी असा हा व्हिडीओ आहे.\nझी मीडियाच्या वृत्तानुसार , बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या कार्यक्रम सुरु होता. बेस्टच्या वडाळा आगारातील हा व्हिडीओ अत्यंत संतापजनक असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री माधवी जुवेकर बेस्टमध्ये कामाला आहेत.दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, असा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. बेस्टचे अधिकारी खुलेआम नोटांची उधळपट्टी करत असल्याचं त्यात दिसतंय. दोन महिलांमधली देखील अति जवळीक ह्या व्हिडीओ मध्ये किळस वाटावी अशी आहे . बेस्टमध्ये कामाला असलेल्या अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीस डान्स करतात आणि बेस्टचे अधिकारी त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे ह्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येतंय.\nआधीच बेस्ट तोट्यात आहे आणि कर्मचा-यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नसताना अधिकारी वर्गाकडे उधळण्याइतपत पैसे आले कुठून हा देखील एक प्रश्न आहे . या हिडीस प्रकाराचा सविस्तर अहवाल बेस्टच्या दक्षता पथकानं बेस्ट प्रशासनाला पाठवून दिलाय. मात्र राजकीय दबावामुळं या प्रकरणावर पांघरूण घातले जात असल्याचं सांगितलं जातंय. बेस्ट डेपोचा डान्स बार करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.\nमात्र उधळलेल्या नोटा खोट्या असल्याचे स्पष्टीकरण माधवी जुवेकर यांनी दिले आहे. मात्र तो वादग्रस्त डान्स आणि एक महिला दुसर्या महिलेच्या तोंडातून नोट ओढून घेते यात फारसे काही आक्षेपार्ह नसून तो डान्स ची थीम म्हणून आम्ही केल. असेही त्या म्हणाल्या.\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: करमणूक महाराष्ट्र Tags: मराठी करमणूक, मराठी सेलेब्रिटी, महाराष्ट्र, महाराष्ट्र वार्ता, माधवी जुवेकर\n← ‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा ‘ त्या ‘ वादग्रस्त व्हिडिओ बद्दल माधवी जुवेकर याचे अखेर स्पष्टीकरण →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://telechargerfilm24.com/mr/category/action/", "date_download": "2018-04-20T16:20:30Z", "digest": "sha1:UMEE6U57CMEXVLMUGEKOMJELW75WTLII", "length": 6083, "nlines": 86, "source_domain": "telechargerfilm24.com", "title": "Action Archives - मोफत चित्रपट डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन एचडी व्हिडिओ गुणवत्ता", "raw_content": "मोफत चित्रपट डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन एचडी व्हिडिओ गुणवत्ता\nया साइट बद्दल - TF24\nMazinger झहीर चित्रपट डाउनलोड चित्रपट ऑनलाइन ऑनलाइन पाहू 2017\nMazinger झहीर चित्रपट डाउनलोड पहा ऑनलाईन पूर्ण  प्रकाशन तारीख : 22 नोव्हेंबर… अधिक वाचा\nअणू सोनेरी चित्रपट डाउनलोड ऑनलाइन ऑनलाइन पाहू 2017 पूर्ण\nअणू सोनेरी चित्रपट डाउनलोड पहा ऑनलाईन पूर्ण  प्रकाशन तारीख : 16 ऑगस्ट… अधिक वाचा\nन्याय लीग पूर्ण प्रवाह vostfr डाउनलोड\nन्याय लीग पूर्ण प्रवाह vostfr डाउनलोड  प्रकाशन तारीख : 15 नोव्हेंबर 2017… अधिक वाचा\nThor Ragnarok पूर्ण चित्रपट डाउनलोड\nThor Ragnarok पूर्ण चित्रपट फ्रेंच डाउनलोड  प्रकाशन तारीख : 25 ऑक्टोबर 2017 … अधिक वाचा\nजंगल चित्रपट डाउनलोड vostfr च्या एसेस 2017\nजंगल एसेस – डाउनलोड चित्रपट  प्रकाशन तारीख : 26… अधिक वाचा\nApes चित्रपट डाउनलोड सर्वाधिकार च्या ग्रह\nApes चित्रपट डाउनलोड सर्वाधिकार च्या ग्रह  प्रकाशन तारीख : 2 ऑगस्ट… अधिक वाचा\nगुलाबी किंवा पांढरी उग्रवासाची फुले येणारी एक औषधी वनस्पती आणि सिटी हजार ग्रह डाउनलोड चित्रपट\nगुलाबी किंवा पांढरी उग्रवासाची फुले येणारी एक औषधी वनस्पती आणि सिटी हजार ग्रह – चित्रपट Telecharger प्रवाह  तारीख… अधिक वाचा\nBaywatch Baywatch पूर्ण फ्रेंच डाउनलोड\nBaywatch Baywatch पूर्ण फ्रेंच डाउनलोड  प्रकाशन तारीख : 21… अधिक वाचा\nTelecharger चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स गेल्या नाइट पूर्ण एचडी\nTelecharger चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स गेल्या नाइट पूर्ण एचडी  प्रकाशन तारीख :… अधिक वाचा\n© 2018 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/artists-will-be-presenting-stylish-presentations-honors-maharashtras-most-stylish-celebrities/", "date_download": "2018-04-20T16:28:01Z", "digest": "sha1:D3APMVHKDDRMV4I7XUWDWD233GPDC2CS", "length": 25653, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Artists Will Be Presenting Stylish Presentations, Honors Maharashtra'S 'Most Stylish Celebrities' | कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’ | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nकलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’\nमहाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या वर्षीपासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.\nमुंबई : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या वर्षीपासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.यंदा या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे.कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. येत्या 14 नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.\nमराठी चित्रपटसृष्टी असो बॉलिवूड किंवा मग टीव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते.या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.गेल्यावर्षी सोनम कपूर,सोनाली बेंद्रे,राधिका आपटे,सई ताम्हणकर,अमृता खानविलकर यासह अनेक सेलिब्रेटींचा खास अंदाज पाहायला मिळाला होता.त्यामुळे यंदाच्या सोहळ्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी कोणत्या अंदाजात रेड कार्पेटवर अवतरणार याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nकाँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nरिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/minister-ramdas-athawale-reaction-on-padmavati-movie-latest-update-482065", "date_download": "2018-04-20T16:34:09Z", "digest": "sha1:2FJYAFZ4O63UXJVBIDNY72VKFCWJDUUT", "length": 17320, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया", "raw_content": "\n‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया\n‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं स्थान आहे. त्यामुळे तिचा जो डान्स दाखवला आहे. तो काढून टाकावा अशी आमची भूमिका आहे. पण तो सिनेमाच प्रदर्शित होऊ नये या मताचा मी नाही.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजित न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.\nगेल्या काही दिवसांपासून पद्मावती सिनेमाबाबत बराच वाद सुरु आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. याच सिनेमाबाबत बोलत असताना रामदास आठवलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.\nकाही नेत्यांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. पण आठवलेंनी या सिनेमाला विरोध केलेला नसून फक्त त्यातील काही भाग वगळण्याची मागणी केली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\n‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया\n‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया\n‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं स्थान आहे. त्यामुळे तिचा जो डान्स दाखवला आहे. तो काढून टाकावा अशी आमची भूमिका आहे. पण तो सिनेमाच प्रदर्शित होऊ नये या मताचा मी नाही.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजित न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.\nगेल्या काही दिवसांपासून पद्मावती सिनेमाबाबत बराच वाद सुरु आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. याच सिनेमाबाबत बोलत असताना रामदास आठवलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.\nकाही नेत्यांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. पण आठवलेंनी या सिनेमाला विरोध केलेला नसून फक्त त्यातील काही भाग वगळण्याची मागणी केली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/review-of-movie-padman/", "date_download": "2018-04-20T16:32:59Z", "digest": "sha1:BKUJRUF5GSLI3LWX35Z5ISY3TBTNVLKW", "length": 28938, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "हलका फुलका तरीही महत्त्वाचा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nहलका फुलका तरीही महत्त्वाचा\nआपल्या समाजात मासिक पाळी हा विषय वर्ज्य, असंस्कृत, जहाल, वाईट… इत्यादी मानला जातो. याबद्दल बोललं तरीही पाप लागू शकतं, पण महिन्याचे पाच दिवस पर्याय नसल्याने त्या स्त्रीने चुपचाप सगळय़ा गोष्टी करायच्या. शहरांमध्ये रहाणाऱयांमध्येही ही गोष्ट पाळली जाते तर खेडेगावातली काय कथा पाळीतल्या रक्तस्रावासाठी वापरण्यात येणारा घाणेरडा कपडा, लाजेपायी बाळगण्यात येणारी अस्वच्छता या सगळय़ा गोष्टी शास्त्राच्या नावाखाली तशाच जपल्या जातात. प्रत्येक महिन्यात अस्वच्छता आणि त्यामुळे शिवाशिव टाळण्यासाठी स्त्रीला बाहेर बसवलं जातं.\nत्यामुळे त्या स्त्रीची पाळी आलीय हे जगाला कळतं आणि दुसऱया बाजूला जिथे स्वच्छता, किंवा रोगराईचा प्रदुर्भाव या गोष्टींबाबत मात्र बोलणंदेखील लाजिरवाणं वाटतं. अतिशय महत्त्वाच्या अशा या शारीरिक बाबीबद्दल अत्यंत विसंगत वागणूक आपल्या देशातल्या बहुतांश भागात राबवली जाते आणि आश्चर्य म्हणजे ती राबवणाऱयाला आणि सहन करणारीलाही त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण याच गोष्टीची जाणीव आपल्याच घरात अरुणाचमल मुरूगंथम या माणसाला झाली. अस्वच्छ कपडय़ामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची आवश्यकता आहे हे त्याला पटलं. पण त्या पॅडच्या अवाजवी किमतीमुळे असंख्य घरांमध्ये दर महिन्याला प्रत्येक स्त्रीच्यामागे एवढे पैसे खर्च करायला कोणीही तयार होणार नाही याचीही जाणीव झाली. मग त्यांनी स्वत:च सॅनिटरी नॅपकीन बनवायचं ठरवलं… आणि या माणसाच्या प्रयत्नांमुळे फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असणारी सॅनिटरी नॅपकीनची स्वच्छता खेडय़ापाडय़ातल्या प्रत्येक स्त्रीला शक्य झाली. केवळ दोन रुपयांमध्ये उत्तम प्रतीचा सॅनिटरी पॅड मिळाल्याने आरोग्याला हातभार लागला. सॅनिटरी पॅड बनवणारा हा माणूस म्हणजेच पॅडमॅन आणि त्याचीच ही गोष्ट. दैनंदिन अत्यावश्यक गोष्टीची कधी कल्पनाही येणार नाही अशा गोष्टीसाठी या माणसाने लढा दिला आणि तो जिंकला. त्यामुळे त्याचं कथानक रसभरीत आहेच पण सिनेमा म्हणून ते ज्या पद्धतीने मांडलंय त्यात ते आणखीनच चुरचुरीत झालंय. या सिनेमातनं एक प्रभावी संदेश तर मिळतोच. पण सिनेमा म्हणून अडीच तासांची करमणूकही पुरेपूर वसूल होते.\nअक्षय कुमार हा सध्याचा सगळय़ात लाडका आणि सिनेमांना सगळय़ात जास्त गर्दी खेचणारा कलाकार आहे हे निर्विवाद. सध्याच्या समस्त अभिनेत्यांमध्ये सर्वात जास्त गर्दी खेचणारा अभिनेता म्हणून त्याची वर्णी सर्वप्रथम लागते आणि त्याच्या सिनेमांमुळे पदरी निराशा पडत नाही हेही तितकंच खरं. ‘पॅडमॅन’ या सिनेमातनं त्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय. त्याने स्वत:साठी आखून घेतलेल्या सिनेमा पॅटर्नमधलाच पॅडमॅन हा देखील आणखी एक सिनेमा आहे. त्यात देशासाठी किंवा समाजासाठीचं कर्तव्य, त्याला सत्यकथेची पार्श्वभूमी आणि त्या गोष्टीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे अक्षय कुमार. पण हा पॅटर्न प्रेक्षकांना आवडतोच आणि अक्षय कुमारने त्याच्या सिनेमांसाठी निवडलेल्या कथांमधलं वैविध्यं पहाता करमणूकही पुरेपूर होते. ‘पॅडमॅन’ हा सिनेमा अक्षय कुमारला आणखी एक पाऊल पुढे घेऊन गेलाय असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही.\nयात नेहमीचा फॉर्म्युला आणि नावीन्य असणारी खरी गोष्ट तर आहेच. पण त्या यशात अधिक झालाय तो लेखक-दिग्दर्शक आर. बाल्की असल्यामुळे. बाल्कीच्या सिनेमांची हाताळणी, त्यातला अलगदपणा आणि त्याच अलगदपणे भक्कम संदेश या सिनेमातनं पुरेपूर उतरलाय. हा सिनेमा सुरू होतो आणि जास्त वळणं न घेता थेटच प्रश्नाला हात घालतो. सिनेमा सुरू झाल्यावर सुरुवातीलाच वाटतं की झालं प्रश्न सुटला. पण नंतर हळूहळू एकेक अडचण समोर येऊ लागते. मानसिकता बदलण्यापासनं, ते अचूक साधन बनवण्यापर्यंत, आर्थिक स्तरावर काम करण्यापासनं ते त्या साधनाची उपयुक्तता ताडून पहाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अडचणींचा डोंगर उभा असतो. मग हा डोंगर पार कसा होतो हे म्हणजे हा सिनेमा आहे.\nया सिनेमाचं यश हे दिग्दर्शकाने टिपलेल्या बारकाव्यांमध्ये, अभिनयामध्ये, त्याच्या पटकथेमध्ये आणि पटकथेवर चढलेल्या संवादी साजामुळे जास्त चमकलंय हे नक्की. समोर गंभीर घटना सुरू असताना त्यावरचा हलका फुलका अंदाज आणि त्याच अंदाजातला सहज संवाद अख्ख्या सिनेमाभर आपल्या चेहऱयावर हास्य राबवतो. अक्षय कुमार हा या सिनेमाचा सुपरहीरो असल्याने त्याने तर खणखणीत व्यक्तिरेखा साकारली आहेच, पण राधिका आपटेंनी साकारलेली गावात रहाणारी अनपढ, साधी प्रेमळ बायको, नवऱयाचं ऐकणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, पण समाजाच्या रुढी आणि परंपरा स्वत:च्या आयुष्यापेक्षा, संसारापेक्षाही जास्त जपणारी. तिच्याकडे संवाद मोजकेच आहेत. पण डोळय़ातनं आणि हावभावातनं सहज सुंदर अभिनय म्हणजे काय हे तिच्याकडे पाहून लगेच पटतं. तिच्या व्यक्तिरेखेत किंचितही बेगडीपणा नाही. पहिल्या भागात पूर्णपणे राधिकाचं अधिराज्य आहे. तर दुसऱया भागात उशिरा सोनम कपूरची एन्ट्री होते आणि नंतरच्या भागात पूर्णपणे तिची छाप पडते. अर्थात अभिनयाच्या पातळीवर राधिका आपटेशी तिची तुलना होऊच शकत नाही. पण तिचा वावर मात्र कमालीचा अल्हाददायक आहे. म्हणजे संपूर्ण रांगडय़ा पटावर तिचा सुसंस्कृत वावर रंगत आणतो. बाकी ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले इत्यादी कलाकार छोटय़ा भूमिकेत असले तरी ठळकपणे लक्षात रहातात ते त्यांच्या सहजतेमुळे. या सिनेमाचं संगीतही छान आहे. या पटाला साजेसं आणि मनात ठसणारं. साधारण पंधरा वर्षांपूर्वीचा काळ तेव्हाचे बारकावे दिग्दर्शकाने नेटकेपणाने उभे केले आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणचं चित्रणही तिथल्या वैशिष्टय़ांनुसार नेमकेपणाने सादर झालंय. आणि हो, बाल्कींच्या समस्त सिनेमांच्या नियमानुसार काही क्षणांसाठी अमिताभ बच्चनच पडद्यावर येणं खूपच सुखावून जातं.\nसिनेमा उत्तम चरित्रपट आहेच पण तितकाच रंजकही आहे यात वादच नाही. मध्यांतरानंतर जशी पॅडमॅनची घरातनं सुरू झालेली मिशन भरारी घेते तसा सिनेमाचा कक्षही रुंदावतो. पण चरित्रपट असल्याने त्यातली अटळ भाषणबाजी मात्र या सिनेमाला टाळता आली नाहीय. जरी ती महत्त्वाची असली तरीही कुठेतरी संकलनाची कात्री आवश्यक होती. मुळात न्यूयॉर्कमधलं दृष्य विहंगम असलं तरी शेवटाकडे ते फारच खेचलंय. ते थोडं आटोक्यात आणता आलं असतं. तसंच या कथानकाला खुलवायला प्रेमाचा त्रिकोण दाखवायची अजिबातच गरज नव्हती. त्या त्रिकोणाशिवायच सिनेमामध्ये खूप जास्त काही होतं. दोन हिरॉईन आणि एक हिरो असला की त्रिकोण तयार झालाच पाहिजे या बॉलीवूड दिग्दर्शकांच्या ठाम विश्वासाला निदान बल्कींनी तरी अपवाद ठरायला हवं होतं. असो.\nपण अशा काही गोष्टी नजरेआड केल्या तर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. आपल्या देशाच्या आरोग्यासाठी झटणाऱया या सुपरमॅनची खरीखुरी गोष्ट जाणून घेण्यासाठी, अक्षय कुमारचा आणखीन एक सुपरहिट सिनेमा अनुभवण्यासाठी आणि एकूणच करमणुकीसाठी पॅडमॅन पुरेपूर वसूल आहे.\nदर्जा : साडे तीन\nनिर्माता : ट्विंकल खन्ना, एसपीई फिल्मस् इंडिया, क्रीअर्ज एन्टरटेन्मेन्ट, केप ऑफ गुड फिल्मस, होप प्रॉडक्शन\nलेखक, दिग्दर्शक : आर. बल्की\nसंगीत : अमित त्रिवेदी\nसंकलन : चंदन अरोरा\nछायांकन : पी. सी. श्रीराम\nकलाकार :अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर, ज्योती सुभाष, मृण्मयी गोडबोले, सुधीर पांडे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकार्यकर्त्यांनो, घराघरात जाऊन भेटवस्तू द्या\nपुढीलनाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/business/", "date_download": "2018-04-20T16:23:40Z", "digest": "sha1:SVMBF5PAWK5AY4FSBGWZVSP3QEHXBIWS", "length": 9902, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Business Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान 0\nभारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक… 0\nएकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास… 0\nआयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक 0\n१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड… 3\nकथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची… 0\nइंजिनिअरची नोकरी सोडून लावली पेरूची बाग, ५०० रुपये किलो विकत आहेत पेरू… 0\nरिलायन्स जिओमधील गलेलठ्ठ पगाराची नौकरी सोडून तिने टाकला रस्त्यावर हातगाडा… 0\nऑटोरिक्षावाला ते हजारो कोटींचा मालक अविनाश भोसले यांचा प्रेरणादायी प्रवास.. 0\nलय भारी कोल्हापूरचा लय भारी कलाकार… 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2018-04-20T16:46:17Z", "digest": "sha1:7OOEL7XFMEERVM4QUJ25F4YAAHSSSZ44", "length": 3145, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मालदीवचे फुटबॉल क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"मालदीवचे फुटबॉल क्लब\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-20T16:40:14Z", "digest": "sha1:5ASXHPTPW2DUPLWDIP345L5BOGHIIC47", "length": 4063, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२५८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२५८ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १२५८ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२५० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१३ रोजी ०५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-20T16:36:11Z", "digest": "sha1:WEDFYJZ6BWXHQLHRARSRWJAZJQLGX3EF", "length": 36752, "nlines": 345, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पालिकेची कारवाई Marathi News, पालिकेची कारवाई Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nवेगाने विकसित होणाऱ्या वसई तालुक्याच्या पूर्व भागात हायवेलगत असलेल्या गावांमध्ये आतापर्यंत बैठ्या चाळींच्या हजारो खोल्या उभ्या राहिल्या आहेत. सलग सुट्टीचा फायदा घेऊन पूर्व भागात बैठ्या चाळींची कामे होत आहेत. पालिकेची कारवाई येथे अधुनमधून होत असली तरी पालिकेच्या मर्यादा उघड पडल्या आहेत.\nसांताक्रूझ येथील वाकोला परिसरात पालिकेच्या कारवाईच्या भीतीने फेरीवाले भाज्या-फळे गटारात लपवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.\nफळभाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई\nसांताक्रूझमधील वाकोला येथील फेरीवाले महापालिकेच्या कारवाईच्या भीतीने फळे आणि भाज्या गटारीत लपवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याची ही फेरीवाल्यांची कृती चव्हाट्यावर आल्यानंतर मुंबई महापालिकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे.\nपार्ल्यातील ‘तो’ पुतळा हटवला\nविलेपार्ले येथील नेहरू रोड आणि मालवीय रोडच्या चौकात बसवण्यात आलेला लक्ष्मीबेन छाडवा यांचा अर्धपुतळा अखेर त्यांच्या नातेवाईकांनीच हटवला आहे. पुतळा बेकायदेशीररित्या बसवल्याची तक्रार पार्लेकरांनी महापालिकेकडे केली होती. पालिकेने ती मान्यही केली.\nकमला मिल आगप्रकरणः पालिकेची कारवाई\nहातगाड्या - फेरीवाल्यांनी व्यापले रंद रस्ते\nरुंद करण्यात आलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची महापालिकेची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहा दिवसांत दोनवेळा पालिकेने रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे पालिकेने केलेली कारवाई तोंडेदखली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nमुंबई आग: पालिकेच्या कारवाईत ३१४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त\nकमला मिल्स कम्पाउंडमधील अग्नितांडवानंतर दुसऱ्याच दिवशी अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज एकूण ३१४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून टाकली. महापालिकेने आज मुंबईतील तब्बल ६२४ हॉटेल्स आणि मॉल्सची पाहणी केली. या पाहणीत पालिकेला ३१४ अनधिकृत बांधकामे आढळल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.\nफेरीवाल्यांविरोधात मनसेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा\nकल्याण-डोंबिवली स्थानक परिसरासह शहरात ठिकठिकाणी ना फेरीवाला क्षेत्राची लक्ष्मणरेखा ठरवण्यात आली नाही. फेरीवाल्यांवरील पालिकेची कारवाई पूर्ण थंडावली आहे. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने शनिवारी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली.\nश्रीराम चौकातील बारवर पालिकेची कारवाई\nउल्हासनगर येथील ७ ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिलांना लपवण्यासाठी बांधण्यात आलेल्या छुप्या खोल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस उपायुक्तांनी पालिका आयुक्तांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते. अखेर उशिरा का होईना पालिकेच्या पथकाने श्रीराम चौकातील तीन बारवर कारवाई केली. त्यामुळे शहरातील इतर बारचालकांमध्ये कारवाईच्या भीतीने धावपळ सुरू झाली आहे.\n​ बेकायदा धार्मिकस्थळासाठी सर्व पक्षांची एकजूट\nविरार पूर्वेकडील जीवदानी चौकातील, रस्त्यावर अडथळा ठरणारे अनधिकृत साईमंदिर वसई-विरार पालिकेने जमीनदोस्त केल्यानंतर आता या मंदिराच्या बाजूने सर्वपक्षांचे कार्यकर्ते एकवटले आहेत. हे खासगी जागेतील मंदिर असल्याने पालिकेची कारवाई चुकीची असल्याचा दावा या पक्षनेत्यांनी केला.\n‘त्या’ झोपड्यांवरील कारवाई सुरूच राहणार\n‘जलवाहिन्यांलगतच्या झोपड्यांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार सुरू आहे. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिकेला कारवाईची ही मोहीम सरसकट थांबवण्याचा आदेश देऊन कोणालाही त्याचा गैरवापर करू देऊ शकत नाही. जर कोणाला आपल्यावरील कारवाई चुकीची व अन्यायकारक वाटत असेल तर त्याने व्यक्तिगतरीत्या न्यायालयात यावे’, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी स्पष्ट नकार दिला.\nसातव्या दिवशीही चालला हातोडा\nशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधातील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची सातव्या दिवशी सुरूच राहिली. मंगळवारी १६ अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली.\nगरीबनगरात आग लावणाऱ्यास अटक\nवांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीवरील कारवाईदरम्यान लागलेल्या आगीचे लोट आता गुन्हेगारी कारवायांपर्यंत पोहोचले आहेत.\nमुंबईकरांच्या घरापर्यंत नियमित वृत्तपत्रे पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी एक खूषखबर आहे.\nपुन्हा कोर्टात येऊ नका\nमहापालिकेकडून गुरुवारी अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण हटवण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच, बाजार वाचवण्यासाठीची शेवटची भंगार बाजार व्यावसायिकांची धडपड अयशस्वी ठरली आहे.\nपाऊस थांबला, कारवाई थंड बस्त्यात\nसततच्या पावसामुळे धास्तावलेल्या महापालिका प्रशासनाने जयभवानीनगरच्या नाल्यावरील बांधकामे पाडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला होता, परंतु तीन दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे आता ही बांधकामे पाडण्याची कारवाई मागे पडल्याचे बोलले जात आहे. शहरातून वाहणाऱ्या सहा प्रमुख नाल्यांवर हजारो बांधकामे अनधिकृतपणे करण्यात आली आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या बांधकामांना पुढीलवर्षीच्या पावसाळ्यापर्यंत अभय मिळेल असे संकेत मिळाले आहेत.\nस्ट्रक्चरल ऑडिट आता ‘ऑनलाइन’\nघाटकोपर आणि भेंडीबाजार येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनांनंतर महापालिकेला इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आठवण झाली आहे. ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसंबंधीची सर्व प्रशासकीय कार्यवाही यापुढे ऑनलाइन केली जाणार असून, पालिकेने त्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. नोटिसांपासून कारवाईपर्यंतची सर्व प्रशासकीय कामे व नागरिकांकडून केलेल्या कामाची पूर्तता आता ऑनलाइन होणार आहे.\nनगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व महसूल प्रशासनाने शहरातील अतिक्रमणावर धडक कारवाईची मोहीम घेतली असून, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. भिगवण रस्त्यावरील बेकायदा दुकाने, एमआयडीसी व पंचायत चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली.\n‘म‌िनरल वॉटर’च्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री\nबाटलीबंद पाण्याच्या नावाखाली कोणतेही पाणी कॅनमध्ये भरून विकण्याचा धंदा वसई तालुक्यात गेले काही वर्षे जोरात सुरू आहे.\nमागील आठवड्यात वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमध्ये भूमिगत जलवाहिनी फुटून दोन लहान भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा जलवाहिनीलगतच्या झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहेच, मात्र कुणी हौस म्हणून जलवाहिनीलगत झोपड्या बांधून राहत नाही, तेथील नागरिकांच्या अपरिहार्य जगण्याचा विचार आपण करणार की नाही\nअडथळा आल्यास आमच्याकडे या\nमुंबईत जलवाहिन्यांलगत वसलेल्या झोपड्यांमधील नागरिकांचे स्थलांतर करून झोपड्या तोडण्याच्या कारवाईत कोणीही अडथळा आणला तर मुंबई महापालिकेने आमच्याकडे यावे, अशी सूचना करत याविषयीची जनहित याचिका प्रलंबितच ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ठरवले.\nअर्शद वारसीच्या बंगल्यावर पालिकेची कारवाई\nअभिनेता अर्शद वारसीच्या वर्सोवा येथील बंगल्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. अर्शद वारसीने या बंगल्यात एका मजल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते, त्यावर पालिकेने ही कारवाई केली.\nब्रीच कँडीजवळ पालिकेची कारवाई\nपालिका उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाईचे दर्शन ठाणेकरांना घडवले होते. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा रुद्रावतारही अनेकांनी पहिला. परंतु, यासाऱ्याचे फलित शून्यच झाले असून ठाणेकरांसाठी ती औटघटकेची मोकळीक ठरली आहे. महिनाभरानंतरही स्टेशन आणि आसपासच्या परिसरातील फेरीवाल्यांची समस्या सुटलेली नाही. उलट फेरीवाले हळूहळू वाढू लागले असून रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या रहिवाशांना आजही अडथळा पार करत जावे लागत आहे.\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि फेरीवाले आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने त्यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसैनिक आणि महानगरपालिकेच्या पथकांनी पुन्हा एकदा फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर फेरीवाल्यांकडून कारवाईचा निषेध केला जात आहे.\n७० हजार झाडांभोवती सिमेंटचे कठडे\nमुंबईतील रस्ते व निवासी इमारतींच्या परिसरात सुमारे ७० हजार झाडांच्याभोवती सिमेंट काँक्रीटचे कठडे असल्याचा अंदाज पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे. झाडांना मारक ठरणारे हे कठडे त्वरित काढून टाकावेत असे आदेश हरित लवादाने दिल्यानंतरही पालिकेची कारवाई धीम्या गतीने सुरू आहे. पालिकेने पर्यावरणवाद्यांचा दावा फेटाळून लावला असला तरी मुंबईत अद्याप ठिकठिकाणी झाडांभोवती सिमेंटचे कठडे कायम असल्याचे आढळून आले आहे.\nमुंबईत मोकळ्या जागा व मैदानांची आधीच प्रचंड टंचाई असताना आणि सिमेंटचे जंगल व प्रदूषणामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेणेही मुश्कील झालेले असताना वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावाप्रमाणे आता शहरातील २२ मैदाने चक्क ‘पे अँड पार्क’साठी राखीव करण्याचा घाट घातला जात आहे.\nप्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई थंडावली\nमहापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर मुंबईत बंदी घातली असली तरी दुकाने, मंडया आणि किरकोळ विक्रेत्यांकडून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या\nवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण झाले असून यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्यांचा त्रास होतोय.\nवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आज, मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. पालिकेची कारवाई थंडावता कामा नये, असे आदेश पालिकेच्या उपायुक्तांनी सोमवारी प्रभाग समित्यांना दिले आहेत.\nसुरत बलात्काराचा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\n‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/word", "date_download": "2018-04-20T16:38:55Z", "digest": "sha1:SEW7OBHPPQP3C3S6ZLL67OREFRLTHYK6", "length": 9597, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - गोविंद", "raw_content": "\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असूनगोविंदकृत पदें २३५ ते २३८ लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/lokpal-extend.html", "date_download": "2018-04-20T17:21:09Z", "digest": "sha1:6V6VFZ6R5MX7LALDLNJWNCGBIEE7RPHW", "length": 3442, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "lokpal extend - Latest News on lokpal extend | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अखेर वाढवण्यात आला आहे. लोकपाल बिलाच्या मंजुरीसाठी हा कालावधी वाढवण्यात आला आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन लांबले आहे.\nगेलचा खुलासा, या खेळाडूमुळे खेळतोय ही लीग\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई\nशतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन\nशतक ठोकल्यानंतर गेलने जाहीरपणे मागितली ही गोष्ट\nथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nFilm Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा\nहे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका...\nबायकोला गिफ्ट देण्यासाठी नवऱ्याने मैत्रिणीची केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-chya-batmya-beed-kolhapur-milk-rate-cut-down-by-mahanand-gokul-farmers-in-trouble-special-story-24-11-2017-482305", "date_download": "2018-04-20T16:48:31Z", "digest": "sha1:FQBOF25AVJOMEMFCBG4TGPIH4HIQ57AX", "length": 15776, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 : बीड, कोल्हापूर : दूध दर कपातीमुळे शेतकरी आणि दूध संघ संतप्त", "raw_content": "\n712 : बीड, कोल्हापूर : दूध दर कपातीमुळे शेतकरी आणि दूध संघ संतप्त\nदुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांनी दुधाच्या दर वाढीची घोषणा तर केली, मात्र त्याची अंमलवजावणी काही झाली नाही. 27 रुपये प्रति लिटर अशी दुधाची किमान आधारभूत किंमत आहे. मात्र महानंद आणि गोकुळ सारख्या दुध संघांनी यात कपात केलीये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं होतंय. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\n712 : बीड, कोल्हापूर : दूध दर कपातीमुळे शेतकरी आणि दूध संघ संतप्त\n712 : बीड, कोल्हापूर : दूध दर कपातीमुळे शेतकरी आणि दूध संघ संतप्त\nदुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांनी दुधाच्या दर वाढीची घोषणा तर केली, मात्र त्याची अंमलवजावणी काही झाली नाही. 27 रुपये प्रति लिटर अशी दुधाची किमान आधारभूत किंमत आहे. मात्र महानंद आणि गोकुळ सारख्या दुध संघांनी यात कपात केलीये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं होतंय. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-loan-on-maharashtra-special-story-472895", "date_download": "2018-04-20T16:12:31Z", "digest": "sha1:ILVP4ECNV65XURAJ75IH7QE2KEZCK7IL", "length": 15476, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 40 हजारांचं कर्ज", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 40 हजारांचं कर्ज\nसबका साथ सबका विकासचा नारा देणाऱ्या भाजप सरकारनं तुमच्या-आमच्या डोक्यावर चांगलाच कर्जाचा डोंगर उभा केलाय...आश्वासन पूर्तीनं झपाटलेल्या फडणवीस सरकारला राज्याच्या तिजोरीची काडीचीही चिंता नाहीये...नेमकं काय घडतंय आपल्या राज्यात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nस्पेशल रिपोर्ट : राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 40 हजारांचं कर्ज\nस्पेशल रिपोर्ट : राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 40 हजारांचं कर्ज\nसबका साथ सबका विकासचा नारा देणाऱ्या भाजप सरकारनं तुमच्या-आमच्या डोक्यावर चांगलाच कर्जाचा डोंगर उभा केलाय...आश्वासन पूर्तीनं झपाटलेल्या फडणवीस सरकारला राज्याच्या तिजोरीची काडीचीही चिंता नाहीये...नेमकं काय घडतंय आपल्या राज्यात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/tobaco-and-liqure-company-target-india/articleshow/62310714.cms", "date_download": "2018-04-20T16:33:46Z", "digest": "sha1:VW3OLF5TADAKPJA2MNSLPVGAYQNCWCXV", "length": 26737, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tobaco and liqure company target india | ​ तंबाखू, दारू कंपन्यांचा मोर्चा भारताकडे - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\n​ तंबाखू, दारू कंपन्यांचा मोर्चा भारताकडे\nम. टा. वृत्तसेवा, वर्धा\nआज युवा व्यसनाच्या आहारी जात आहे. एका अहवालानुसार दारू आणि तंबाखू पाश्चिमात्य देशात हद्दपार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांची शहरे तंबाखूमुक्त झाली आहेत. त्यामुळे तंबाखू आणि दारू कंपन्यांनी आफ्रिका, भारत आणि चीन या देशांकडे मोर्चा वळविला आहे, असा धोका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.\nसाने गुरुजी कथामालेच्या ५१व्या अधिवेशनाचे शनिवारी सेवाग्राम येथील शांती भवनात उद्‍घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक अवधूत म्हमाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, माधवराव वझे, माजी आमदार गंगाधर पटणे, सेवाग्रामच्या सरपंच जोत्स्ना जमलेकर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, प्रमुख कार्यवाह राजेंद्र मुंढे, प्रा. गजानन कोटेवार उपस्थित होते.\nडॉ. अभय बंग म्हणाले, मी घडलो ते साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’च्या वाचनातून. साने गुरुजी कथामाला या प्रेरणा देणाऱ्या आहेत. नई तालीम ही गांधी-विनोबांची जीवनाचा खरा अर्थ शिकविणारी शिक्षण पद्धती आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये कृतीला महत्त्व आहे. माणूस करण्यातून शिकतो. वाचण्यातून तो केवळ पंडित होतो हे नई तालीमचे तत्त्व आहे. आपण नई तालीमचे सूत्र व तत्त्व जोडून साने गुरुजी कथामालेला कृतिमालेची जोड देऊ शकतो का यावरही विचार झाला पाहिजे. जीवन हेच शिक्षण हे विनोबा भावे यांचे ब्रीद साने गुरुजी कथामालेमधून रुजविता येते. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेताना आणि भारतातही वैद्यकीय पदवी घेताना न मिळालेले शिक्षण नई तालीमच्या मेसमधील प्रात्याक्षिकांमधून मिळाले, असेही डॉ. बंग यांनी सांगितले.\nसाने गुरुजी कथामाला नवीन पिढीला घडविण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे, असे अवधूत मम्हाणे यांनी सांगितले. ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी साडेबारा हजार सरकारी ग्रंथालयात साने गुरुजी कथामालाच्या शाखा सुरू करण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक प्रा. गजानन कोटेवार यांनी केले.\nसत्कार आणि पुस्तक प्रकाशनही\nअधिवेशनादरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार गंगाधर पाटणे, डी. के. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक मनीषा कानडे, सुनील पुजारी आणि धोंडीराम रामुळे यांचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मनीषा कानडे यांच्या ‘असे घडलो आम्ही’ तसेच अण्णा जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनात साने गुरुजी चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते.\n‘साने गुरुजींच्या स्वप्नातील भारतीय संस्कृती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ यांनी संतांची आध्यात्मिक भूमिका विशद करून साने गुरुजींच्या स्वप्नातील भारतीय संस्कृती स्पष्ट केली. उस्मानाबाद येथील पन्नालाल सुराणा यांनी विषमतेमुळे समाजातील ऐक्य जोपासले गेले नाही हे भारताचे दुदैव असल्याची खंत व्यक्त केली.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nचिता रचून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या\nयवतमाळच्या शेतकऱ्यांची मोदींविरोधात तक्रार\nचंद्रपूर देशात सर्वात उष्ण, जगात तिसरे\n'विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकावणार'\nअंत्यसंस्काराचा नागपुरी पॅटर्न राज्यभरात\n1​ तंबाखू, दारू कंपन्यांचा मोर्चा भारताकडे...\n2गडकरींच्या ‘ड्रीम सिटी’त ऑटोमीटर डाउन...\n4१४०० इमारतींना आगीचा धोका...\n5महापारेषणने उभारली सात अतिउच्चदाब उपकेंद्रे...\n6दोन हजार सीसीटीव्हींची नजर; थर्टी फर्स्टसाठी चोख बंदोबस्त...\n8​ खेकरा नाल्याला नडली अनास्था...\n9उपराजधानी बनले अवयवदानाचे हब...\n10अमोल कोंडबत्तुनवार यांचा अपघाती मृत्यू...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/kolhapur-news-music-state-theater-competition-92407", "date_download": "2018-04-20T16:50:47Z", "digest": "sha1:QFY5FPZR6T42V2W5IEIERV2ERO4GS4FS", "length": 14616, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Music State Theater Competition संगीत राज्य नाट्य स्पर्धा यंदा कोल्हापुरात? | eSakal", "raw_content": "\nसंगीत राज्य नाट्य स्पर्धा यंदा कोल्हापुरात\nरविवार, 14 जानेवारी 2018\nकोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल होणारे केंद्र अशी ओळख निर्माण झालेल्या येथील केंद्रावर आता संगीत राज्य नाट्य स्पर्धाही रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. मात्र, एक ते 28 फेब्रुवारीअखेर ही स्पर्धा होईल, अशी शक्‍यता आहे.\nकोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल होणारे केंद्र अशी ओळख निर्माण झालेल्या येथील केंद्रावर आता संगीत राज्य नाट्य स्पर्धाही रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. मात्र, एक ते 28 फेब्रुवारीअखेर ही स्पर्धा होईल, अशी शक्‍यता आहे.\nसंगीत राज्य नाट्य स्पर्धेचा आजवरचा इतिहास पहाता गेल्या वर्षी ज्या जिल्ह्यातील नाटक पहिले येईल, त्या जिल्ह्यात पुढील वर्षीची स्पर्धा घेतली जाते. मात्र, तसा कुठेही लिखित नियम नाही. त्यामुळे यंदा हा अलिखित नियम बदलणार का, याकडे रंगकर्मींचे लक्ष लागून राहिले आहे.\nगेल्या वर्षी सांगलीत झालेल्या स्पर्धेत रत्नागिरीरीच्या राधाकृष्ण कलामंचने बाजी मारली होती. त्यामुळे यंदा रत्नागिरीत स्पर्धा होणार, असे सांस्कृतिक कला संचालनालयाचा \"अलिखित' नियम सांगतो. मात्र, यंदा केंद्र कोल्हापुरात हलवण्याची माहिती मिळाल्याने रत्नागिरीतून त्याला विरोध होवू लागला आहे. त्यासाठी आंदोलनही उभे राहिले आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही त्यांनी साकडे घातल्यानंतर रत्नागिरी केंद्राची ग्वाही मिळाली असली तरी अद्यापही चित्र अस्पष्ट आहे. कोल्हापुरात स्पर्धा घ्यायची आणि पहिल्या पाच नाटकांचा महोत्सव रत्नागिरीमध्ये घेण्याचा पर्याय पुढे येवू शकतो.\nहौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रोटेशन पध्दतीने घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतल्यानंतर हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात झाली होती. त्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक वर्षी विविध केंद्रावर होते. याच पध्दतीने राज्य संगीत नाट्य स्पर्धेचा निर्णय कला संचालनालयाने घेतला असला तरी रत्नागिरी हे संगीत नाटकांसाठी शासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे केंद्र आहे. विक्रमी प्रेक्षक संख्या या केंद्रावर असते, अशी रत्नागिरीतील रंगकर्मींची भूमिका आहे.\nकलापूर कोल्हापूरने संगीत नाटकांचा सुवर्णकाळ अनुभवला. मात्र, अलिकडच्या काळात मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंचच्या \"संगीत सौभद्र' या नाटकाने दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटवली. चाळीसहून अधिक बक्षीसे या नाटकाला मिळाली. दोन वर्षापूर्वी संगीत राज्य नाट्य स्पर्धेत \"संगीत स्वयंवर' सादर केले होते. या नाटकाला दुसऱ्या क्रमांकासह विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत 28 नाटकांचा समावेश असून लोहिया मंचची एंट्री नाही.\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nसम्राज्ञी ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील सम्राज्ञी ग्रुपच्या वतीने नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात 'जात्यावरची ओवी व आयुर्वेद...\n'सध्या तरी माझी डायरी फुल्ल...' : अभिनेता राजकुमार राव\nएकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिल्यामुळे निर्मात्यांचा तुझ्यावरील विश्‍वास वाढलाय. एक ठराविक बजेट घेऊन निर्माते तुला साईन करत आहेत. तुला याबद्दल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/agralekh/page/38/", "date_download": "2018-04-20T16:35:00Z", "digest": "sha1:U2JPF452TZ7TZTO32HYY4R6D3YYK56XP", "length": 17454, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्रलेख | Saamana (सामना) | पृष्ठ 38", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n१०५ हुतात्म्यांनो,तुम्ही अपवित्र झालात\nजे लोक कमळाबाईंचा दुपट्टा घालून हुतात्मा स्मारकावर गेले, त्यातील किती लोकांना कमळाबाईंचे महाराष्ट्राचे चार तुकडे पाडण्याचे धोरण मान्य आहे ते त्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर...\nमुंबईतून थैल्या गोळा करून दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करायच्या. त्याच थैलींची हत्यारे करून मुंबईच्या गळय़ाभोवती फास आवळायचा असे जे उद्योग काही मंडळींनी वर्षानुवर्षे आरंभले आहेत...\nसध्या सत्ताधारी मंडळींचे ‘परिवर्तन’ या शब्दावर जरा जास्तच प्रेम जडले आहे. ‘च’वर जोर वगैरे देत त्यांच्या परिवर्तनाच्या बैठका मारणे सुरू आहे. मात्र मुळात आता...\nकोंबडा आमचा, सूर्यही आमचाच\nकेंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा स्वच्छ, पारदर्शक व उत्तम असल्याचे समोर आले. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला...\nदोन तासांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेरो-शायरीचा वापर करून अरुण जेटली यांनी उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोटाबंदीच्या ‘आफ्टरशॉक्स’मुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही भविष्यातील भरभराटीचे स्वप्न दाखवण्याची...\nप्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प…थोडा देशाभिमान उधार मिळेल काय\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आम्ही शंभर गुण देत आहोत. त्यांनी जगाची पर्वा न करता आपल्या देशाची फिकीर केली आहे. आमचे पंतप्रधान लवकरच अमेरिकेत जातील....\n‘ती’ सध्या पुण्यात घाबरते\n‘सायबर सिटी’, ‘आयटी हब’ ही बिरुदे पुण्यासाठी अभिमानाची असली तरी महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या खुनाचे शिंतोडे या बिरुदावर सातत्याने उडत असतील तर त्याचा काय...\nअयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्षे करीत आहेत. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराठ्र यांना धनदांडग्यांच्या घशात घालायचाच आहे व...\nहा जय नावाचा इतिहास आहे\nशिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी,...\nप्रजासत्ताक हिंदुस्थान हे एक प्रखर स्वप्नच होते. त्या स्वप्नासाठी अनेकांनी हसत हसत बलिदान दिले. मात्र त्या बलिदानाचे मोल जणू राजकीय अराजकात नष्ट झाले. हिंदुस्थानची...\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mhada-fb-live", "date_download": "2018-04-20T16:39:51Z", "digest": "sha1:L4HT64ZLE2B2WNRB5ZOAP2ND6YHBBI2R", "length": 13973, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mhada fb live Marathi News, mhada fb live Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nम्हाडा लॉटरीची आज रंगीत तालीम\nम्हाडाच्या लॉटरीची तयारी पूर्ण झाली असून, आज, गुरुवारी रंगीत तालीम होणार आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष लॉटरीच्या दिवशी फेसबुक लाइव्ह व वेबकास्टिंगमुळे अर्जदारांना लॉटरीची प्रक्रिया घरबसल्या पाहायला मिळेल, असे म्हाडातर्फे सांगण्यात आले.\nसुरत बलात्काराचा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\n‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/thane/following-movement-shivsena-action-taken-against-hawkers-shanti-nagar-mira-road-0/", "date_download": "2018-04-20T16:18:17Z", "digest": "sha1:SEI4XRGQP2PT2YAMBDGSJ52VRI3R5SLD", "length": 27452, "nlines": 430, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Following The Movement Of Shivsena, Action Taken Against The Hawkers Of Shanti Nagar Of Mira Road | शिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई\nमीरा रोडच्या शांती नगरमध्ये भरणारा बेकायदा सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविकेसह शिवसैनिकांनी रात्रीपर्यंत उपोषण केले.\nशांतीनगरमधील सेक्टर १, २, ३, ४ व ५ मध्ये आधीच अरुंद रस्ते असताना त्यात फेरीवाले, हातगाडी वाले यांनी रस्ता व फुटपाथवर अतिक्रमण केले आहे.\nशांती नगरच्या या मुख्य रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहन नेण्यास तर सोडाच पण चालणे देखील जिकरीचे बनते.\nसेना नगरसेविका दीप्ती भट यांनी देखील पालिकेकडे सातत्याने सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाले हटवून रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याची मागणी सातत्याने केली होती.\nराजू भोईर, हरिश्चंद्र आमगावकर, निलम ढवण, शर्मिला बगाजी ह्या नगरसेवकांसह माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, उपजिल्हा संघटक स्रेहल सावंत, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, तेजस बागवे आदींसह शिवसैनिकांनी देखील उपोषणात सहभागी झाले होते.\nस्त्रियांनी प्रेरणादायी बनावे, अमृता फडणवीस यांचे आवाहन\nठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी\nअंबरनाथमधील नववर्ष शोभा यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nकल्याणमध्ये स्वागतयात्रेने नववर्षाची सुरुवात\nडोंबिवली स्वच्छता अभियानासाठी कलाशिक्षक उतरले ब्रश आणि रंग घेऊन\nठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात 'होलिकोत्सव'\nभाईंदरमध्ये करवाढी विरोधात काँग्रेस - मनसेचे आंदोलन\nलुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं\nखारफुटी नष्ट केल्या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल\nकरिश्मा आणि बिपाशाने साजरा केला राष्ट्रीय मतदार दिवस\nकल्याणमध्ये विद्यार्थी रमले चित्र-रंगांच्या दुनियेत\nडोंबिवलीत फेरीवाल्यांकडून पुन्हा अतिक्रमणास सुरुवात\nठाण्यात अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्य प्रदर्शन\nउल्हासनगरमध्ये रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई\nठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडव\nमध्य रेल्वे भारतीय रेल्वे\nडोंबिवलीत स्कूल व्हॅनच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमीरा-भाईंदरमध्ये सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प लवकरच होणार सुरू\nमध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला, सुदैवानं जीवितहानी नाही\nमध्य रेल्वे भारतीय रेल्वे डोंबिवली कल्याण\nकॅनव्हासवर साकारले जिवंत प्राणी-पक्षी\nडोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता\nमीरा-भाईंदर पालिकेत आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा\nशिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन\nडेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट\nदेवगंधर्व महोत्सवात संगीताचा त्रिवेणी संगम\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nरणबीर कपूर दीपिका पादुकोण फॅशन\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nआपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क \nसचिन तेंडूलकर विराट कोहली\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\nकुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल'\n, 'हे' चित्रपट नक्की पाहा\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/ias-t-v-anupma/", "date_download": "2018-04-20T16:00:34Z", "digest": "sha1:BWZLPSY5GIEKX4HMN7HSB7TBOI5PVSGD", "length": 56361, "nlines": 244, "source_domain": "khaasre.com", "title": "या निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nया निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची… 0\nभारतात तरूण पिढीतील आयएएस अधिकारी त्यांच्या चांगल्या कामाने वेगळी छाप सोडत आहे. नुकताच केरळ येथील परिवहन मंत्र्यास ९२ करोड रुपयाच्या घोटाळयाकरिता खुर्ची खाली करावी लागली हा घोटाळा उघडकीस आणला आहे अल्लाप्पूझाच्या कलेक्टर टी. वी. अनुपमा यांनी या घोटाळ्याची चौकशी आणि रिपोर्ट अनुपमा यांनीच बनविली होती. चला तर आज खासरे वर बघूया काय होते पूर्ण प्रकरण आणि कोण आहे तो मंत्री..\nअल्लाप्पूझा येथील कलेक्टर अनुपमा यांनी सरकारला घोटाळया संबंधित संपूर्ण अहवाल सोपवला आहे. ज्या मध्ये परिवहन मंत्री थॉमस चांडी यांच्यावर बेकायदेशीर रित्या जमीन हडपून त्यावर रिसोर्ट बनविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या रिपोर्ट विरोधात चांडीने दाखल केलेली याचिका केरळ हायकोर्टाने खारीज केली आहे. थॉमस चांडी हे केरळ एनसीपीचे आमदार आहेत. थॉमस चांडी विजयन कॅबिनेटमधून राजीनामा देणारे आता तिसरे मंत्री आहे. थॉमस चांडी मे २०१६ मध्ये LDF च्या सरकारमध्ये मंत्री झाले होते.\nकोण आहे IAS टी.वी. अनुपमा \nअनुपमा मुळची केरळची आहे. त्यांचा जन्म मल्लापूरम येथील मरान्चेरी या गावी झाला होता. अनुपमा यांनी बिट्स पिलानी येथून इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेली आहे. टी.वी. अनुपमा २०१० सालच्या बैचची IAS अधिकारी आहे संपूर्ण भारतात ४ नंबरची रँक त्यांनी मिळवली होती. अनुपमा यांचे वडील के.के. बालसुब्रम्हण्यम सर्कल पोलीस अधिकारी होते, २००२ साली त्यांचे निधन झाले. आणि अनुपमा यांचे पती क्लिंसटन कोच्चिमध्ये आयटी Entrepreneur आहे. अनुपमा जेव्हा फूड सेफ्टी कमिशनर होती तेव्हा त्यांनी अन्नात होणारी भेसळ याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली होती. १५ महिन्यात ७५० व्यापाऱ्यांवर ६ हजार पेक्षा अधिक नमुने घेऊन केस लावण्यात आल्या होत्या. या नंतर अनुपमा यांची नियुक्ती अल्लाप्पूझा येथील कलेक्टर म्हणून करण्यात आली.\nIAS अनुपमा यांच्या अहवालानुसार, मंत्री चांडी यांनी जमीन बेकायदेशीर हडपली आहे आणि त्यावर रिसोर्ट बांधले आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर जमीन सुरक्षा नियम कार्यवाही करण्यात यावी. मंत्री महोदयांनी भात शेतीस लागून रिसोर्टकडे जाणारा रस्ता बनविला आहे जे बेकायदेशीर आहे. हे प्रकरण उघडकीस येताच मंत्री चांडी यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्याकडे राजीनामा दिला आहे.\nया निडर IAS अधिकाऱ्यास खासरेचा सलाम.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा २५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nPrevious Articleजाणून घ्या ATM बद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी…Next Articleचित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली…\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी. - December 12, 2017\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान - December 5, 2017\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.apg29.nu/attackerna-mot-aktenskapen-del-2-holger-nilsson-8812/mr", "date_download": "2018-04-20T16:36:01Z", "digest": "sha1:ORPUV64WIJ4Y2WWF4E5TZT56CH6UIORO", "length": 20327, "nlines": 154, "source_domain": "www.apg29.nu", "title": "विवाह हल्ले - भाग 2 - आह í | Apg29", "raw_content": "\nविवाह हल्ले - भाग 2 - आह í\nदेव सुरू लग्न करून तो नष्ट देवाच्या शत्रू अनेक मार्ग आहेत, ते थट्टाच करण्यासाठी आहे.\nविवाह आणि स्त्री व पुरुष यांच्यातील घडते की काहीतरी आहे. हे हजारांपेक्षा विविध संस्कृती नैसर्गिक आणि स्पष्ट केले आहे, पण हे तत्त्व निरर्थक फक्त काही वर्षे आहे. या वेळा लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते.\nदेवाने मनुष्याला आणि स्त्री यांच्यातील लग्न दिलेली कारण, या अप्रत्यक्ष एक बदल त्याच्या विरुद्ध नकार आणि बंड म्हणून पाहिले. तो काही परिणाम होईल की काहीतरी, परिणाम अग्रगण्य न एक दैवी नियम बदलू शकत नाही आहे.\nफक्त एक लग्न एक समान-सेक्स संघटना खेळायचा जेथे इतिहासात अपवाद साक्ष दिली आहे. बाबेलच्या Talmud डेटा उपलब्ध आहेत.\nरब्बी Aryeh SPERO या Talmudic ग्रंथ माहिती, \"पूर आधी, लोकांना पुरुष दरम्यान लग्नाला करार लिहायला सुरु\", हे लक्षात येते आहे.\nया आली वेळ नोहाच्या दिवसांत जलप्रलयानंतर आधी अशा प्रकारे होती. मग ते या गोष्टी त्यांना देव स्त्री व पुरुष बहुदा, केंद्रीय निर्माण पहिले संस्थेचे उद्ध्वस्त केले होते.\nहे देव निर्माण होते ते एक हल्ला होता. त्यामुळे खालील प्रमाणे त्या वेळी बायबलमधील साक्ष आहे इतकेच नव्हे तर संपूर्णपणे झाल्यामुळे आहे:\n'सर्व पृथ्वी भ्रष्ट होते, म्हणून देवाने ती भ्रष्ट केली आहे, पाहा, पृथ्वी पाहिले, आणि. \"1 निर्गम. 6:12.\nही नोहाच्या दिवसात होते आणि त्यामुळे या येशूने हे त्याचा परतावा असेल की म्हणते:\n\"पण नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे होईल. लोक पूर दिवस आधी मध्ये वास्तव्य, ते खात, पीत, मिलन आणि, लग्नाला मध्ये देत नोहा तारवात जाईपर्यंत असे होते आणि ते पूर आला होईपर्यंत काहीच माहित आणि त्यांना सर्व दूर धावा - तसे करण्यासाठी पुत्राच्या येत येईल. \"\nमग येशूने त्याला परत येईल तेव्हा नोहा वेळ, वास्तव्य त्या वेळी तुलना करा. तेथे त्या तारखा दरम्यान एक अद्वितीय सारखेपणा आहे आणि तो त्याच-सेक्स संबंध नदनाांक फक्त वेळ आहे की आहे\nकाय काय होत आहे येशूच्या परतावा कोणत्याही वेळी येऊ शकते की एक उत्तम वेळ चिन्हे आहे. या संदर्भात, या जगाचा न्याय आणि तो जतन करू इच्छित ज्यांना पश्चात्ताप करण्याची उच्च वेळ आहे\nदेव निवडले लग्न विसरुन जातील करण्यासाठी आणखी एक मार्ग भागीदार म्हणून जगणे आहे. तो त्याला स्पष्ट असणे महत्वाचे आहे, लग्नाला म्हणून समान नाही.\nया संदर्भात नमूद करणे आवश्यक आहे की अतिरिक्त भागात आहेत. तो आता लिंग ओळख निर्मूलनाच्या प्रयोग करण्यास सुरूवात केली. एक नवीन अभिव्यक्ती \"कोंबडी\", \"तो\" आणि \"ती म्हणाली,\" पुनर्स्थित करेल, जे सुरू करण्यात आली आहे.\nदेवाला माणूस निर्माण केला दोन लिंग या कल्पना आणि या गोंधळून अभिव्यक्ती, स्वीकार नाही:\n\"तेव्हा तो निर्माण देवाचे प्रतिरुप, त्याच्या स्वत: च्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.\" 1 निर्गम. 1:27.\nकाय काय होत आहे अजूनही म्हणून देवाने निर्माण निर्मिती सर्वसामान्य प्रमाण एक विकृती आहे. हे या येत परिणाम न घडू नाही\nआपण देवाच्या क्रम आत्ता संतापलेला आहे, जेथे प्रकाशित करायचे आहे, की आणखी एक क्षेत्र आहे. आम्ही स्पष्ट केले सर्व वेळा म्हणून तो विचार - तो जन्म देणारी स्त्री आहे. हे बदलणे आणि विकृत, ती कदाचित विश्वास शकते जो कोणी आहे, पण या शेवटच्या दिवसांत, ते खरं आहे.\nया वाढत्या सामान्य आहे, जे लिंग बदल माध्यमातून उद्भवते. एक स्त्री एक मनुष्य बनण्यासाठी एक लिंग बदलाचे ऑपरेशन पडत निवडले आहे, आणि ती तो, ती त्याने तिला गर्भाशय टिकून राहतील, मुले ओळखले जाण्याच्या अशा प्रकारे अजूनही सक्षम तेव्हा.\nया प्रकारे, आपण \"मनुष्य\" मुले असू शकतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश लिंग, तयार करा. अनेक \"मनुष्य\" निर्जंतुक नैसर्गिक होईल की नंतर विश्वास. अशा गरज जाहीरपणे एक हाकाटी परिणाम होईल, पण तो नैसर्गिक अनैसर्गिक बदलले जाते तेव्हा होईल.\nआपण या क्षेत्रात आहेत याचा अर्थ असा की देव नेमलेले आहे निर्माण क्रम प्रभावित करते:\nतू गरोदर राहशील तेव्हा मी जास्त आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीन \"स्त्रीला म्हणाला,\". पण वेदना आपण मुलांना देईल. \"1 निर्गम. 3:16.\nआम्ही केवळ ते खाली मोडलेले आणि देव सुरूवाती पासून स्थापन जे आदेश बदलले आहे कसे पाहिले अलिकडच्या वर्षांत आहे. हे आपण तो कायदा काय स्वीकारत नाही की, देवाच्या विरुद्ध बंड म्हणून पाहिले जाऊ शकते. या परिणाम होईल.\nन्याय ते या सारखे काहीतरी होईल की विश्वास ठेवू नका ते होते, नोहाच्या आला. जरी आता आपण ते की कोणीतरी विश्वास ठेवायचा. उशिरा एक मोठे संकट न्याय कृत्ये पृथ्वीवर जा तेव्हा हे प्रकटीकरण वर्णन त्या, किती चुकीचे शोधू होईल. वेळ अभूतपूर्व आहे: मत्तय म्हणतो काय वाचा. 24:21.\nया domstid पूर्ण होईल येशूचे शब्द, उलट स्थिती त्यांचा परमेश्वर देव त्यांच्या निर्माता विरुद्ध त्यांच्या बंड जगातील सील आहेत. कै लोक दु: ख मोडला आहे तेव्हा उशिरा गांभीर्य ओळखायला गेल्या वेळी अनेक तशाच प्रकारे नोहा गांभीर्य, ​​शोधला.\nया doomsayers असल्याचे कोणताही मार्ग आहे लेखन, तो देवाच्या वचनात काय लिहिले आहे ते महत्व फक्त आहे. एक चपटा शिकवणी शेवटच्या दिवसांत व्यक्तिचित्रण आहे. आम्ही आता आहेत.\nपश्चात्ताप आणि कृपा संपते, दिवस आधी, देवाला चालू करण्यासाठी वेळ आहे आणि आपण देवाच्या न एकटे उभे आहेत. देव विचार आणि त्यांच्या अहंता आणि गर्व त्याच्या मर्यादित जगात माणसाला, दूर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. नकार त्या दिवशी कोणीही मूल्य आहे.\nविवाह हल्ले - भाग 1 - आह í\nइस्राएल 70 वळते - आपण इस्राएलला आशीर्वाद\nसंपूर्ण लेख आकाश TV7 वृत्तपत्र आहे.\nख्रिश्चन टीव्ही चॅनेलवर आकाश TV7 गुरुवारी कार्यक्रम मालिका 70 वर्षीय राज्य साजरा केला जातो.\nLars Enarson या मनोरंजक व्हिडिओ घेते हंगेरी संपूर्ण आस्थापना विरुद्ध नाही की प्रार्थना एक संपूर्ण देशात अर्थात परिवर्तन करू शकता\nतेराव्या शुक्रवारी घृणा ग्रस्त ज्यांना आहेत. हे \"paraskavedekatriafobi\" किंवा \"paraskevidekatriafobi\" असे म्हणतात. संख्या तेरा घृणा triskaidekaphobia म्हणतात. \"घृणा\" \"भीती\" याचा अर्थ.\nमाध्यमिक शाळा गृहपाठ आणि चाचण्या वैश्विक\nBoden मध्ये Sture शाळा सर्व विषय सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठ आणि चाचण्या संपत आहे. प्रथम, एक कायमस्वरूपी बंदी ध्येय एप्रिल महिन्यात चाचणी.\nइस्लामी इस्लामिक दहशतवाद बळी चर्च मध्ये क\u0017\nपाच माणसे मारली गेली स्टॉकहोम मध्ये इस्लामिक दहशतवादी हल्ला, वर्धापनदिन, स्वीडिश चर्च मध्ये मुस्लिम imam आणि इस्लामी महमूद Khalfi Koranic वाचा. इमाम दहशतवादी रेट मुस्लिम ब्रदरहुड कनेक्शन आहे.\nआपण झाले 7 एप्रिल काय लक्षात आहे का\nएप्रिल 7 काय झाले ते एक वर्षापूर्वी लक्षात आहे का\nतो नरकात केले जाणार नाही\nएक दिवस, नरक आणि आग अवखळ लेक मध्ये फेकून जतन न केलेले सर्व.\nसोफीया Camnerin देव आणि त्याच देवाची, त्या बाबतीत होते तर का देवाला मुस्लिम पश्चात्ताप दावा नाही, सर्वोत्तम माहीत आहे ते मुस्लिम साक्ष व्यस्त आहेत.\nस्वर्ग TV7 स्वीडन आणले\nएक मूल लग्न जे माहिती - इस्लामीकरण चालू\nबायबल पृथ्वी आहे की शिकवते ... राऊंड\nजेरी विल्यम्स मृत्यू - 75 वर्षे झाले\nसरकार बालविवाह बहूपत्नीकत्व इच्छित\nथेट मंगळवारी संध्याकाळी 20:00: Nenne Lindberg\nNenne थेट आज रात्री मंगळवारी 20:00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-koyana-dam-stronger-86958", "date_download": "2018-04-20T16:43:32Z", "digest": "sha1:DLFJMPWSSD5PABJW6DVTEKKKORQBGSEA", "length": 16230, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Koyana Dam stronger कोयना धरण पन्नास वर्षांत अधिक भक्कम | eSakal", "raw_content": "\nकोयना धरण पन्नास वर्षांत अधिक भक्कम\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nचिपळूण - पन्नास वर्षांपूर्वी कोयनेत भूकंप झाल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समिती नेमली गेली. समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भविष्यात मोठा भूकंप झाला तर त्याचे धक्के सहन करण्यासाठी कोयना धरण सज्ज आहे. असा दावा कोयना धरण व्यवस्थापन विभागाकडून केला जात आहे.\nचिपळूण - पन्नास वर्षांपूर्वी कोयनेत भूकंप झाल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समिती नेमली गेली. समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भविष्यात मोठा भूकंप झाला तर त्याचे धक्के सहन करण्यासाठी कोयना धरण सज्ज आहे. असा दावा कोयना धरण व्यवस्थापन विभागाकडून केला जात आहे.\nकोयना धरणाचे बांधकाम चालू असताना संपूर्ण दक्षिण भारताचा परिसर भूकंपमुक्त म्हणून ओळखला जात होता; परंतु हे ११ डिसेंबर १९६७ ला कोयना येथे झालेल्या ६.८ रिश्‍टर स्केल इतक्‍या तीव्रतेच्या भूकंपाने खोटे ठरविले. या भूकंपामुळे धरणाच्या अनुत्सारित भागांना व अनुषंगिक कामांना नुकसान पोहोचले होते. मात्र, सांडवा भागाचे कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. तरीही सांडव्याचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम पारंपरिक पद्धतीचे असले, तरी दोन पावसाळ्यांमधील उपलब्ध वेळ, मूळ धरण, वीजगृह व इतर बांधकामांची सुरक्षितता, प्रकल्पाच्या सर्व घटकांना कार्यरत ठेवून विशिष्ट वेळेत सर्व काम पूर्ण करण्यात आले.\nसांडवा मजबुतीकरणाच्या कामामध्ये पायाचे खोदकाम करताना धरण व पायथा विद्युतगृह यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. हे खोदकाम नियंत्रित विस्फोटन पद्धतीने झाले. या पद्धतीच्या विस्फोटाचा प्रथम अभ्यास करून नंतर मार्गदर्शक प्रणालीनुसारच काम पूर्ण करण्यात आले. धरण व विद्युतगृह यांना बसणारे प्रत्यक्ष हादरे (प्रवेग) मोजण्यासाठी दोन्ही ठिकाणी ‘मिनिमेट’ नावाची अद्ययावत उपकरणे बसवण्यात आली होती.\nकोयना धरणाच्या संधानकाचे मिश्रण संकल्पन हे आय.आय.टी. मुंबई या संस्थेकडून तयार करण्यात आले. गुणवत्ता चाचण्या घेण्यासाठी कार्यक्षेत्रावरच अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली. विविध शाखांतील ४० अभियंत्यांनी यासाठी अहोरात्र सेवा दिल्या. १०४ कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात आले. त्यामुळे कोयना धरण आता पूर्णपणे भक्कम असल्याचा दावा केला जात आहे.\nकोयनेच्या परिसरात ४ रिश्‍टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर सांडव्यातून काही प्रमाणात गळती वाढते. ती तत्काळ बंद केली जाते. भविष्यात या परिसरात मोठा भूकंप झाला तरी धरणाच्या भिंतीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही; परंतु परिसरात काळजी घ्यावी लागणार आहे.\nटेक्‍निकल असिस्टंट, कोयना धरण व्यवस्थापन विभाग\nकोयना प्रकल्पाच्या उभारणीची बीजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुजलेली आहेत. १९०० मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरण बांधण्याच्या संकल्पनेनेच एच. एफ. बील या इंग्रज अभियंत्याने १९०१ मध्ये सर्वेक्षण केल्याचे आढळते. १९१० साली टाटा वीज कंपनीने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. महाराष्ट्रातील वाढती विजेची मागणी लक्षात घेता १९४५ मध्ये तत्कालीन मुंबई राज्याच्या इलेक्‍ट्रिक ग्रीड डिपार्टमेंटने सर्वेक्षण व नियोजनाचे काम हाती घेतले. पुढे या कामास १९५३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली व १९ जानेवारी १९५४ ला कामाचा प्रारंभ झाला, तर संपूर्ण काम १९६५ मध्ये पूर्ण करण्यात आले.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nनिर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे - वैभव नायकवडी\nवाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bhagyashreee.blogspot.com/2007/01/archives.html", "date_download": "2018-04-20T16:06:15Z", "digest": "sha1:WXXUOKUAVD6UDIDXTWZJWGHWVHTKXYP6", "length": 15755, "nlines": 324, "source_domain": "bhagyashreee.blogspot.com", "title": "Archives", "raw_content": "\nविचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...\nया ब्लॉगची सदस्यता घ्या\nपेन स्केच ( वैशाली )\nपेन स्केच ( बाप-लेक )\n ( लोकसत्ता मधे दखल\nपेंटींग ( वारली - मोर )\nआवडलेले काही - कवितांचा खोखो.\n\"स्वच्छतेच्या बैलाला...\" च्या निमित्ताने..\nएक उनाड पोस्ट... :D\nमाझेही दोन पैसे.. सारेगमप\nमाझी भटकंती - ओहाय (Ojai)\nमी - एक करोडपती\nमी टिपलेली काही फुले\nमाझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )\nये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा\nअमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे \nअमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..\nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी १\nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल .....\nVonage World – एक सुवर्णसंधी \nआपण मराठी लोकं Blogs/कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी\nअमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट\nअमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस \nटॅग – टॅग ..\nतो पाऊस.. हा पाऊस..\nथाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स [Tha...\nविचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nलहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.\nआमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा. माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस( ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे माय गॉड मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). …\nगृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण \nगेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी.\nसचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द) आला आणि आवडेनासे झाले लिखाण.\nनंतर कधीतरी अचानक सुनील सुकथनकरांची कुंडलकर ह्यांच्या लेखनावरची प्रतिक्रिया वाचनात आली. बाकी कशाही पेक्षा 'गृहिणी' ह्या लेखावर जास्त रोख दिसला म्हणून कुंडलकरांचा तो लेख आधी वाचला. पहिल्या वाक्यातच मी थक्क झाले.\nस्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला.\nएखाद्या प्रचंड मोठ्या सॅम्पल साईझबद…\nओपन - आंद्रे अगासी\nपरवा झालं वाचून माझं (आता भयानक पोकळी जाणवत आहे (आता भयानक पोकळी जाणवत आहे\nतीन दिवस अक्षरशः झपाटल्यासारखे वाचले हे पुस्तक. खरोखर अद्भुत पुस्तक, अद्भुत प्रवास पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स पानापानावर सांडलेली आयर्नी, विरोधाभास, कॉण्ट्रॅडीक्शन्स\nबर्याचदा थोरामोठ्यांची पुस्तकं वाचताना, त्यांचे पर्फेक्ट लाईफ, शिक्षण, करीअर ग्राफ पाहून अवाक व्हायला होते पण रिलेट होत नाही. कनेक्शन जाणवत नाही. असं वाटतं, ती थोर माणसं. त्यांना जमलं. आपल्याला कसं जमेल मात्र अगासीबद्दल वाचताना इतक्यांदा आपुलकी वाटली त्याच्याबद्दल, रिलेट झाले, कनेक्ट झाले. त्याचं वाचून मला खरोखर इतकं दहा हत्तीचे बळ मिळाले. जमेल. करूया प्रयत्न. इतका आपल्यासारखा हाडामांसाचा माणूस आहे तो, सर्व भावभावना असलेला. आणि तसाच उतरला आहे पुस्तकात\n____ स्पॉयलर अलर्ट ____ पुस्तक वाचायचे असल्यास खालील भाग वाचू नका ____ अगासीचे कन्फ्युज्ड, रिबेलियस व्यक्तीमत्व, जिंकणं हरणं, त्यामागच्या भावना, नंबर वन होऊन देखील काही न वाटणं, तारू भरकटलेलेच वाटत राहणे, लग्न, प्रेम ह्यात पर्पज न सापडणं, ब्रुक बरोबरचा डिस्कनेक्ट आणि मग आयुष्याला परपज सापडल्यावर, बरोबर तसा कोच सापडल्यावर, स्ट…\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nये जो देस है तेरा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nmerrymoonmary द्वारे थीम इमेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-20T16:36:10Z", "digest": "sha1:VQAO4AVTEVF64UFHOCSVK6WTSDNO6A2Y", "length": 5586, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॅगसन एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(जॅगसन एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजॅगसन एअरलाइन्स भारतातील विमानसेवा कंपनी आहे. हिचे मुख्यालय दिल्लीत असून ही कंपनी भारतात तसेच भूतानमध्ये व नेपाळमध्ये सेवा पुरवते.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:36:17Z", "digest": "sha1:6DWVRDTRVV7LHU5GWI3WGNDTG5C47RPX", "length": 20381, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंत सदाशिव मिराशी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअनंत मिराशी याच्याशी गल्लत करू नका.\nयशवंत सदाशिव मिराशी उर्फ मिराशी बुवा (इ.स. १८८३ - ५ जानेवारी, इ.स. १९६६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत.\nत्यांनी पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम अभिनेते होते व अनेक संगीत नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही केल्या. ते गायनात त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिद्ध होते.\nत्यांच्या शिष्यांमध्ये पं. विनायकबुवा उत्तूरकर, पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर व यशवंतबुवा जोशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.\nत्यांना इ.स. १९६१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १८८३ मधील जन्म\nइ.स. १९६६ मधील मृत्यू\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१४ रोजी १५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vardha/forest-guard-may-suspend-if-desi-liquor-finds-forest/", "date_download": "2018-04-20T16:17:19Z", "digest": "sha1:5OJ23YQTETQT7Y2MVWLTVEN2BK24OJCK", "length": 25926, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Forest Guard May Suspend If Desi Liquor Finds In Forest | वर्धा जिल्ह्यातील जंगलात हातभट्टी आढळल्यास वनरक्षक होणार निलंबित | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nवर्धा जिल्ह्यातील जंगलात हातभट्टी आढळल्यास वनरक्षक होणार निलंबित\nवर्धा जिल्ह्यात जंगलात हातभट्टी दिसल्यास थेट वनरक्षकालाच जबाबदार मानून निलंबनाची कारवाई होणार आहे.\nठळक मुद्देउपवनसंरक्षकांचे आदेशवनरक्षकांची भंबेरी\nवर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी पाट वाहतात, हे सर्वश्रूत आहे. नाले, नदीच्या काठावर, झुडपांत तथा जंगलात गावठी दारूच्या भट्ट्या लागतात. यावर पायबंद घालण्यासाठी आता जंगलात हातभट्टी दिसल्यास थेट वनरक्षकालाच जबाबदार मानून निलंबनाची कारवाई होणार आहे. तत्सम आदेशही उपवनसंरक्षकांनी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्यामुळे वनरक्षकांची भंबेरी उडाली आहे.\nजंगलातील नदी, नाल्याकाठी पाण्याचे कृत्रिम स्त्रोत निर्माण करून हातभट्ट्या लावल्या जातात. यामुळे उपवनसंरक्षक दिगांबर पगार यांनी हा निर्णय घेतला. जिल्ह्यातील एकूण हातभट्ट्यांपैकी ६०-७० टक्के हातभट्ट्या जंगलात धगधगतात. यात सागवृक्षासह इतरही वृक्षांची कत्तल केली जाते. हा गैरप्रकार दिसूनही एकटा वनरक्षक कारवाई करू शकत नव्हता; पण आता थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याने वनसंरक्षकांवर मोठी जबाबदारी आली आहे. क्षेत्र सहायक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनीही दखल घेत हातभट्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस, दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग, गुन्हे शाखा आणि ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची दारूबंदीसाठी काम करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. आता याला वनविभागाची जोड मिळाल्याने अवैध दारूबंदीला यश येईल काय, हा विषय औत्सुक्याचा ठरत आहे.\nयापुढे जंगलात हातभट्टी आढळून आली तर त्याची सर्व जबाबदारी वनरक्षकाची राहील. यात कुचराई केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश प्राप्त झाले आहेत.\n- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसंगमनेरात तेल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी\nनागपुरात तंत्रपूजेने लावला ११ लाखांचा चुना\nअपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल\nमरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय\nछत्तीसगढमधून गोव्याकडे जाणारा स्पिरिटचा टँकर जप्त\nदोन हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत\nपाणीदार हिवरा गावासाठी सरसावले शेकडो हात\nमुंगसाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने दहेगाव (मु.) झाले तीर्थक्षेत्र\nअत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’\nसेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही\n३३ जोडपी अडकली विवाह बंधनात\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7.html", "date_download": "2018-04-20T17:21:19Z", "digest": "sha1:3AMPEE2BEHM2IK4NJVVCKTBDXB7RMSS3", "length": 3776, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "श्रीलंका भारत संबंध - Latest News on श्रीलंका भारत संबंध | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nभारताशी वैर नाही- श्रीलंका\nसंयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये श्रीलंकेविरोधात अमेरिकी प्रस्तावाचं भारताने समर्थन केलं असलं, तरीही भारताशी आमचे संबंध चांगलेच आहेत, असं स्पष्टीकरण श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी. एस पिरीस यांनी दिलं आहे\nगेलचा खुलासा, या खेळाडूमुळे खेळतोय ही लीग\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई\nशतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन\nशतक ठोकल्यानंतर गेलने जाहीरपणे मागितली ही गोष्ट\nथायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ\nरिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल\n200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nFilm Review : 'बियॉन्ड द क्लाउड्स' पाहिलाच पाहिजे असा सिनेमा\nहे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका...\nबायकोला गिफ्ट देण्यासाठी नवऱ्याने मैत्रिणीची केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/washim-snake-found-in-school-479661", "date_download": "2018-04-20T16:39:13Z", "digest": "sha1:IPPKC6D7BIWVVTJJ2ABRSTIC5JPSMN2Q", "length": 16320, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "वाशिम : शाळेत चार फुटी घोणस सापडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण", "raw_content": "\nवाशिम : शाळेत चार फुटी घोणस सापडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण\nवाशिम जिल्ह्यातील पिंपळा गावात बुधवारी शाळेत साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी सर्पमित्र शिवाजी बळी यांनी शिताफिने सापाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. घोणस जातीचा साप अतिविषारी असल्यानं विद्यार्थ्यांना धोका होता. सापाला पकडल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला....सापाबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितल्यानंतर सर्पमित्रानं त्याला जंगलात सोडून दिलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nवाशिम : शाळेत चार फुटी घोणस सापडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण\nवाशिम : शाळेत चार फुटी घोणस सापडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण\nवाशिम जिल्ह्यातील पिंपळा गावात बुधवारी शाळेत साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी सर्पमित्र शिवाजी बळी यांनी शिताफिने सापाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. घोणस जातीचा साप अतिविषारी असल्यानं विद्यार्थ्यांना धोका होता. सापाला पकडल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला....सापाबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितल्यानंतर सर्पमित्रानं त्याला जंगलात सोडून दिलं.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:33:19Z", "digest": "sha1:OSFS5NW36WUHV4XDJKAOSPO623OSE7PK", "length": 5551, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "दशक पहिला - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: दशक पहिला हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:दशक पहिला येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः दशक पहिला आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा दशक पहिला नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:दशक पहिला लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित दशक पहिला ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित दशक पहिला ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-illegal-construction-over-cidco-land-484027", "date_download": "2018-04-20T16:42:56Z", "digest": "sha1:MEAEHGGBPZQTYYV2CJU2T3J55AID2JEF", "length": 17346, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : पामबीचवर विनापरवाना खोदकाम, झाडांची मोठी कत्तल", "raw_content": "\nनवी मुंबई : पामबीचवर विनापरवाना खोदकाम, झाडांची मोठी कत्तल\nनवी मुंबईच्या पामबीचवर एनआरआय कॉम्पेक्सशेजारील विस्तीर्ण जागेवर खोदकाम सुरू करण्यात आलंय. यासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली. सिडकोच्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असल्यास तशी परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी नसताना सदरचा प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विना परवानगी खोदकाम करणे, झाडांची कत्तल करणे आणि खाडीमध्ये भराव टाकून तिवारांची झाडे नष्ट कणाऱ्य़ा भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. पालिकेने विना परवानगी झाडे तोडल्याप्रकरणी मिस्त्री कंन्स्ट्रक्शन कंपनीवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nनवी मुंबई : पामबीचवर विनापरवाना खोदकाम, झाडांची मोठी कत्तल\nनवी मुंबई : पामबीचवर विनापरवाना खोदकाम, झाडांची मोठी कत्तल\nनवी मुंबईच्या पामबीचवर एनआरआय कॉम्पेक्सशेजारील विस्तीर्ण जागेवर खोदकाम सुरू करण्यात आलंय. यासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली. सिडकोच्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असल्यास तशी परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी नसताना सदरचा प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विना परवानगी खोदकाम करणे, झाडांची कत्तल करणे आणि खाडीमध्ये भराव टाकून तिवारांची झाडे नष्ट कणाऱ्य़ा भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. पालिकेने विना परवानगी झाडे तोडल्याप्रकरणी मिस्त्री कंन्स्ट्रक्शन कंपनीवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tourist-people-tired-of-low-quality-food-in-goa-started-to-cook-on-streets/", "date_download": "2018-04-20T16:38:41Z", "digest": "sha1:IZLIDRWL5PTRC5VGFYWFC6UYPYPXG7XK", "length": 13079, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nगोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात\nगोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ होण्याच्या पाठीमागचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे अप्रतिम असे निसर्ग सौन्दर्य आणि स्वच्छ बीचेस. गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार जाहिरातबाजी करते . मात्र आलेल्या पर्यटकांना योग्य भावात उत्कृष्ट जेवण आणि सुविधा तसेच सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ आहे . गोव्यामध्ये अमली पदार्थ, दारू यांची रेलचेल असली तरी चांगले जेवण आणि ते देखील योग्य भावात हे आजही पर्यटकांपुढचे मोठे आव्हान आहे . बाहेर १०० रुपयाच्या डिशेश गोव्यामध्ये ५०० रुपयाच्या पुढे आहेत, शिवाय दर्जा मात्र जेमतेमच , त्यामुळे गोवा फिरायचा तर खिसा चांगलाच जड ठेवून सुद्धा उपाशी राहायची देखील पाळी येऊ शकते .अर्थात सरकार देखील ह्या लुटीत काही प्रमाणात का होईना वाटेकरी असल्याने तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशा प्रकारे पर्यटकांची लूट सुरूच आहे .\nमात्र आता अशा मनमानीला पर्यटक देखील कंटाळले असून किती दिवस तोंड दाबून खिशाची लूट सहन करायची असा प्रश्न आता पर्यटक उपस्थित करू लागले आहेत . त्यामुळे बहुतांश पर्यटक गोव्याला येतानाच घरून मटेरियल घेऊन येतात व जरा आडोसा तसेच फुटपाथवर स्वयंपाक करून आपले पोट भरतात .अर्थात पैसे देऊन देखील नीट अन्न मिळत नसल्याने त्यांनी हा मार्ग शोधला असला तरी त्यामुळे काही प्रमाणात का होईना तेथील पर्यटकांची होणारी लूट स्वकष्टाने कमी झाली आणि आता स्थानिक दर्जाहीन हॉटेल धारकांनी पर्यटकांच्या नावाने बोंबा मारायला सुरु केले आहे. आम्ही नीट योग्य भावात खाऊ घालणार नाही आणि तुम्हाला पण नीट खाऊ देणार नाही ,अशी अडेल भूमिका घेऊन सरकारपुढे प्रदूषण आणि स्वच्छता याचा आडोसा घेत पर्यटकांवर कारवाई केली जावी अशी भूमिका घेतली आहे.\nपणजी व परिसरातील भागांमध्ये फुटपाथवर स्वयंपाक करताना काही पर्यटक आढळले होते. स्थानिक लोक व हॉटेल धारकांनी अशा पर्यटकांना आक्षेप घेतला आहे. देशी पर्यटक आपल्या बसगाड्या व अन्य वाहने रस्त्याच्या बाजूने उभ्या करतात व या फुटपाथवर थेट शेगडी ठेवून स्वयंपाक करतात असे स्थानिकांना आढळून आले होते . वाहने उभी करून वाहनांच्या मागे आडोशाला स्वयंपाक तयार केला जातो. तिथेच जेवण केले जाते.काही स्थानिक लोकांनी अशा पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक दिसतील अशा पद्धतीनेही वाहनांचे फोटो काढून ते फोटो सरकारच्या पर्यटन खात्याला पाठवले आहेत. अर्थात काही पर्यटक पदपथांवर नव्हे तर किनाऱ्यांवर बसून तिथेच स्वयंपाक करत आहेत. गोव्यात येतानाच ते मोठ्या प्रमाणात भांडी व कडधान्य घेऊन येतात आणि तिथेच स्वयंपाक करतात त्यामुळे निसर्गाची हानी होते व समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे परिमाण वाढते असा देखील स्थानिक लोकांचा आरोप आहे .\nपर्यटकांना उघडय़ावर मद्यपान तसेच उघडय़ावर स्वयंपाक करू दिला जाणार नाही, असे दोन महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी होणे अवघड आहे . मुळातच जिथे पाण्याच्या दरात दारू मिळते तिथे हे शक्य तरी आहे का गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये नायजेरियन लोकांचा उपद्रव वाढला आहे . काही हॉटेल देखील ह्या मंडळींनी चालवायला घेतली असून त्याद्वारे अमली पदार्थाची देखील तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे . पोलीस मात्र ह्या लोकांवर कारवाई करण्या ऐवजी येणाऱ्या पर्यटकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असेल तर त्याचा गोवाच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.\nअर्थात आपल्या महाराष्ट्राला देखील गोव्यापेक्षा जास्त असा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र पर्यटन विकासासाठी म्हणावे असे प्रयत्न आजवर झाले नाहीत . कोकणच्या पर्यटनाकडे ध्यान दिले असते जाते कोकणवासीयांना मुंबई,पुणेमध्ये रोजगारासाठी यावे लागले नसते .\nआपल्या कोकणातही अनुभवता येणार गोव्याची मजा : सरकारने केला ‘ हा ‘ मास्टरप्लॅन\nप्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करणाऱ्या ‘ ह्या ‘ महिलेवर जोरदार चप्पलफेक\nसेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/09/current-affairs-5-september.html", "date_download": "2018-04-20T16:40:04Z", "digest": "sha1:ILRE7LR5PN6PHFKBSQLY53NAMGF2EO3J", "length": 28507, "nlines": 214, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\n५ सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन\nभारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस\n‘एक श्रेणी एक वेतन’ योजना लागू\nतब्बल चार दशकांपासून रखडलेली माजी सैनिकांची ‘एक श्रेणी एक वेतन’ ची (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) मागणी मान्य करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.\nसमान पदावर आणि समान काळ काम करणाऱ्या व्यक्तीला समान निवृत्तीवेतन मिळावे. हे वेतन देताना निवृत्तीची तारीख विचारात घेतली जाऊ नये, अशी निवृत्त सैनिकांची मागणी होती.\nगेल्या ४२ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते. मात्र, भाजप सत्तेवर येऊन १५ महिने उलटल्यानंतरही यावर काहीच निर्णय होत नसल्याचं पाहून माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले होते.\nचर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीवर दरवर्षी ८ ते १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.\nअशी लागू होईल योजना...\n१ जुलै २०१४ पासून लागू होणार ‘वन रँक वन पेन्शन’\n२०१३ हे वर्ष या योजनेचे आधार वर्ष (बेस इयर) असेल.\nदर पाच वर्षांनी एक सदस्य समितीद्वारे योजनेचा आढावा घेतला जाईल.\nमाजी सैनिकांना मागील थकीत पेन्शन पुढील दोन वर्षांत चार हप्त्यांमध्ये विभागून देणार.\nशहीद व मृत सैनिकांच्या विधवांना थकबाकीची रक्कम एकरकमी देणार.\nस्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांना ही योजना लागू होणार नाही.\nनिवृत्तीवेतनाच्या पुनर्मुल्यांकनासाठी एक सदस्यीय न्यायालयीन समिती नेमणार.\nसेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या ५० टक्के. (यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्यक)\nविशेष कुटुंब निवृत्तिवेतन (कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास) : अखेरच्या पगाराच्या ६० टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.\nसामान्य कुटुंब निवृत्तिवेतन (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये\nअपंग निवृत्तिवेतन (शंभर टक्के अपंग असल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,१०० रुपये\nउदार कुटुंब निवृत्तिवेतन (अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास) : अखेरच्या पगाराइतके.\nयुद्धजखमी निवृत्तिवेतन (युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास) : शेवटच्या पगाराइतके.\nमाजी सैनिकांचा खालील धोरणांना विरोध\nसरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना लागू होणार नाही.\nतसेच पाच वर्षांनी एक सदस्यीय समिती पेन्शनच्या रकमेत बदल करण्याबाबत विचार करणार आहे.\nपेन्शन आढावा समितीला प्रत्येकवेळी सहा महिन्यांची मुदत देणार आहे.\n१ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी.\nचाळीस टक्के सैनिक सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना ओआरओपी लागू केलीच पाहिजे.\nपेन्शनचा आढावा घेऊन रकमेत बदल करण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी तीन माजी सैनिक, एक कार्यरत सैनिक आणि एक सरकारी प्रतिनिधी अशी पाच जणांची समिती स्थापन करावी.\nपेन्शन आढावा समितीला सहा ऐवजी एकाच महिन्याची मुदत द्यावी.\nकोणत्याही परिस्थितीत ज्युनिअर सैनिकाला सिनिअर सैनिकापेक्षा जास्त पेन्शन देऊ नये.\nसरकारच्या ‘वन रँक वन पेन्शन’ बाबतच्या धोरणात बदल होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे माजी सैनिकांच्या संघटनेने जाहीर केले आहे.\nचौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात\n५ सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झाली.\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’ भरविण्यात येणार आले आहे.\nटोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या संमेलनासाठी प्रा. शेषराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.\nचौथ्या विश्व साहित्य संमेलनाबद्दल...\nअध्यक्ष : प्रा. शेषराव मोरे\nकालावधी : ५ व ६ सप्टेंबर २०१५\nआयोजक : ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ आणि ‘महाराष्ट्र मंडळ’\nउद्घाटक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे\nस्वागताध्यक्ष : खासदार राहुल शेवाळे\nविशेष उपस्थिती : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह\nसावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारीत कार्यक्रम\nनिकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य\nसेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान\n‘मला उमगलेले सावरकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद\nउद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघड्याच्या निनादात, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढली गेली.\nयापूर्वीची विश्व मराठी साहित्य संमेलने\nकॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना\nमोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.\nसेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते. एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.\n‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.\nपाकव्याप्त काश्मिरमध्ये पाच देशांच्या मदतीने प्रकल्प उभारणी\nपाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद शहरातील विकासकामाच्या नावाखाली, पाकिस्तान सरकारने पाच देशांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. या पाच देशांमध्ये चीनबरोबरच दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि तुर्कस्तानचा समावेश आहे.\nकाश्मीर खोऱ्यात २००५मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मुजफ्फराबादचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीसाठी या देशांची मदत घेण्यात आली आहे.\nया शहरामध्ये चीनचे ३००० आणि दक्षिण कोरियाचे ३०० कामगार दाखलही झाले आहेत. या परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत.\nया प्रदेशामध्ये दक्षिण कोरियाने १०० मेगावॉटचे दोन, ८९ मेगावॉटचा एक जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला आहे, तर चीनच्या मदतीने झेलम नदीवर ११०० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे. ९६९ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.\nया परिसरात सौदी अरेबिया विद्यापीठ बांधत असून, हे विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात एका इमारतीत सुरू झाले आहे.\nझुम्पा लाहिरी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवतावादी पदक\nपुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी (National Humanities Medal) निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.\nमानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.\nपहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले आहे.\nझुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्ये एका बंगाली कुटुंबामध्ये झाला आहे.\nया लेखिकेची इंटरप्रिटर ऑफ मालदीवज, द नेमसेक, द लोलॅंड इत्यादी पुस्तके भारतात आणि परदेशात ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.\nत्यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात पुलित्झर पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. तसेच त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट बनवला आहे.\nफिफाच्या क्रमवारीमध्ये भारत १५५व्या स्थानावर\nफिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत १५५व्या स्थानावर पोहोचले आहेत.\nफिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती.\nकोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.\nओडिशातील व्हिलर द्विपला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव\nजनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.\nबीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.\nव्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.\nओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक\nसुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन\nसुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर २०१५ रोजी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं.\nआदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’, ‘देव’ यासरख्या जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५\nचालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५\nप्रश्नसंच १६८ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५\nचालू घडामोडी - १ सप्टेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2018-04-20T16:21:32Z", "digest": "sha1:57W3XURM23RURJSI6GOHJCZHWKYR3ONT", "length": 15765, "nlines": 119, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सतरा वर्षांपासूनची कावीळ आटोक्‍यात...! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसतरा वर्षांपासूनची कावीळ आटोक्‍यात...\nसतरा वर्षांपासूनची कावीळ आटोक्‍यात...\nभारतातील सतराहून अधिक प्रख्यात रुग्णालयांमध्ये सतरा वर्षांहून अधिक काळ रक्तात मुरलेली कावीळ बरी व्हावी यासाठी फिरत असणाऱ्या बिहारमधील चैनपूर या गावातील मनीषकुमार सिंह या पंचवीस वर्षीय तरुणाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शल्यविशारदांनी अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचून काढले. अत्यल्प खर्चामध्ये केलेल्या या शस्त्रक्रियेने या उमद्या तरुणास जीवदान मिळाले असून तो पुन्हा आपल्या गावी परतला आहे.\nपालिका रुग्णालयामध्ये असणाऱ्या दूरवस्थेबाबत अनेकदा टीकेची झोड उठवली जाते, मात्र कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेल्या दिवशी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर विद्यार्थ्यांना मदतीस घेऊन डॉ. संध्या अय्यर, डॉ. उषा घाग यांसारख्या सर्जरी विभागातल्या डॉक्‍टरांनी ही अत्यंत कठीण शस्त्रक्रिया लीलया पार पाडली आणि अवघ्या महिनाभराच्या अवधीत मनीषकुमारला पूर्ववत बरे केले. लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये तीन वर्षांपासून ऍडव्हान्स लेप्रोस्कोपी विभाग सुरू झाला आहे. या विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि किरणांचा वापर करून दुर्बिणीच्या साह्याने अनेक जटील शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र त्याचा पुरेसा प्रचार न झाल्याची खंत डॉ. संध्या अय्यर यांनी \"सकाळ'कडे व्यक्त केली. मनीषकुमारही देशातल्या अनेक खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये फिरून थकला होता. प्रत्येक ठिकाणी रक्तामध्ये मुरलेली ही कावीळ बरी होऊ शकणार नाही, असेच मत तज्ज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केले होते. मात्र शीव रुग्णालयामध्ये त्याच्या रक्तामधील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये असणारा दोष दिसून आला, त्यांच्या गुठळ्या होऊन त्या इतर रक्तपेशींच्याही वाढीस प्रतिबंध करीत असत. हिनोलेटिक ऍनेमिया या प्रकारामध्ये मोडणाऱ्या या व्याधीमध्ये पित्ताशयाच्या पिशवीमध्येही खडे निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्या अन्ननलिका आणि श्‍वसनमार्गामध्येही व्यत्यय येत होता.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करून केलेल्या दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये मनीषच्या पोटावर तीन ठिकाणी छोटे छेद देऊन आतड्यामधील प्लिहा काढून टाकण्यात आली. त्यामुळे रक्तात वाढ होणाऱ्या बीलरुबीन या तंतूपेशींची वाढही आटोक्‍यात आली व रक्तनिर्मिती प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपये मोजावे लागले असते, मात्र शीव रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अवघ्या औषधांचा खर्च घेऊन करण्यात आली. सतरा वर्षांपासून मनीषची नखे व डोळे पिवळ्या रंगाचे दिसत असत, त्याला इतर कुठलाही त्रास होत नसला तरीही मागील वर्षभरापासून त्याच्या पोटात खूप दुखू लागले होते. ही कावीळ असल्याचे निदान झाल्यानंतर त्याने मागील काही वर्षांमध्ये विविध आयुर्वेदिक औषधे घेतली, पण त्याचा कोणताही लाभ झाला नाही. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असले तरीही रुग्णास असलेल्या व्याधीतून पूर्णपणे बरी करण्याची शाश्‍वती देते. मुंबईमध्ये सार्वजनिक रुग्णालयांत केवळ केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयांतच ही सुविधा उपलब्ध आहे. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कर्करोगावरही मात करता येते, असा विश्‍वास शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या अय्यर यांनी व्यक्त केला. मूत्रपिंडाचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर ही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावशाली ठरते, अशीही माहिती त्या देतात. दुर्दैवाने टिळक रुग्णालयामध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, याची सर्वसामान्यांना अद्याप माहिती नसल्यामुळे अन्य कर्करोग केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णांची रीघ लागलेली असते. या व्याधींच्या उपचारांसाठी सर्वसामान्य तसेच गोरगरीब रुग्णांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/books-of-g--n--dandekar-will-reprint/articleshow/62311425.cms", "date_download": "2018-04-20T16:15:49Z", "digest": "sha1:HRT6XXROEAYRTWGPYSLMQEZI7HUCCEDR", "length": 26624, "nlines": 248, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "books of g. n. dandekar will reprint | गोनीदांची ‘शितू’,‘माचीवरला बुधा’ पुन्हा भेटीला - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nगोनीदांची ‘शितू’,‘माचीवरला बुधा’ पुन्हा भेटीला\nपुणे : ‘शितू’, ‘माचीवरला बुधा’, ‘रानभुली’, ‘वाघरू’, ‘मृण्मयी’, ‘मोगरा फुलला’, ‘कादंबरीमय शिवकाल’ अशा एकाहून एक साहित्यकृतीतून रसिकमनात अढळपद मिळवलेले, पन्नासहून अधिक वर्षांच्या देश आणि दुर्गभ्रमंतीवरच्या लेखनातून मराठी ललित साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आणि अष्टपैलू लेखणीमुळे आजच्या पिढीलाही आपले वाटणारे ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या साहित्याचा ठेवा रसिकांच्या भेटीला परत एकदा आला आहे.\nगेली अनेक वर्षे गोनीदांची विविध पुस्तके ‘आऊट ऑफ प्रिंट’ होती. वाचकांकडून या पुस्तकांसाठी सातत्याने विचारणा केली जात होती. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविल्याचे गोनीदांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांनी सांगितले.\n‘बिंदूची कथा’ या गोनीदांनी लिहिलेल्या पहिल्या कादंबरीपासून ‘स्मरणगाथा’, ‘पद्मा’, ‘उडोनी हंस चालला’, ‘दक्षिणवारा’, ‘मावळतीचे गहिरे रंग’, ‘वादळातील दीपस्तंभ’ अशा त्यांच्या अनेक साहित्यकृती मधल्या काही काळात उपलब्ध नव्हत्या. या पुस्तकांच्या जुन्या आवृत्त्याही केव्हाच संपल्याने त्या मिळणे अवघड झाले होते. कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा सर्वप्रकारच्या अष्टपैलू लिखाणासह अभिवाचन, छंद आणि छायाचित्रणातून अप्पांनी दिलेले योगदानही डॉ. वीणा देव यांनी ‘गोनीदांची दुर्गचित्रे’, ‘स्मरणे गोनिदांची’ या स्वतः संपादित केलेल्या ग्रंथांतून रसिकांसमोर आणली. गोनीदांवर त्यांनी लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ तसेच विविध आठवणींची कुपी उलगडणाऱ्या ‘परतोनि पाहे’ या पुस्तकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.\n‘नुकतीच अप्पांची जन्मशताब्दी झाली. त्यांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, याच हेतूने मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून अप्पांची पुस्तके उत्तम दर्जाने पुन्हा उपलब्ध करण्यात आली आहेत. ही पुस्तके पुन्हा उपलब्ध होण्यात डॉ. विजय देव यांचा मोलाचा वाटा आहे. पुस्तके पुनःप्रकाशित करण्यामागे अर्थार्जन हा हेतू नसून, नव्या पिढीसाठी हा ठेवा उपलब्ध व्हावा,’ ही भूमिका असल्याचे डॉ. वीणा देव यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.\nगोनीदांच्या बहुतांश पुस्तकांचे प्रकाशन हे १९५० ते १९८० या दरम्यान झाले आहे. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा प्रकाशित करताना नव्या मुखपृष्ठांसह उपलब्ध केली असून, ती वाचकांना वाचायला सोपी जावीत, यादृष्टीने अक्षरांचा आकारही ठरवण्यात आला आहे, अशी माहितीही देव यांनी दिली. यापुढे गोनीदांची अधिकाधिक पुस्तके रसिकांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. वीणा देव यांनी नमूद केले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मर्चंटचा मृत्यू\nजगभ्रमंतीसाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली\nवाढदिवशी पाठवले कोंबडीचे मुंडके, कुटुंब हादरले\nया पीडितांना न्याय कधी मिळणार\nसख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार\nमिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर\n‘हॉर्टिकल्चर’च्या निविदा रद्द करा\n1गोनीदांची ‘शितू’,‘माचीवरला बुधा’ पुन्हा भेटीला...\n2...म्हणून शरद पवारांना राष्ट्रपती व्हायचं नाही\n3सुशीलकुमार पवारांना म्हणाले 'भावी राष्ट्रपती'...\n6पाठ्यपुस्तके पुन्हा शाळास्तरावर देणार...\n7टँकरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू...\n8प्रदूषित हवेत कीटकांचा वर्षाव...\n9डासांना रोखणार ‘नॅनो कण’...\n10बंडखोरी मोडणाऱ्या प्रशिक्षणावरच भर...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/western-maharastra/ban-on-bokadbali-in-vani-temple-269954.html", "date_download": "2018-04-20T16:31:58Z", "digest": "sha1:WV6OQ3HQCABT2ONU5ERK7XYDWALKSMNM", "length": 11920, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीच्या प्रथेवर अखेर बंदी", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nसप्तश्रृंगी गडावर बोकडबळीच्या प्रथेवर अखेर बंदी\nनाशिक जिल्ह्यातील वणीचा सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा आता बंद होणार आहे. जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे.\nनाशिक, 16 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील वणीचा सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा आता बंद होणार आहे. जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे. गेल्या वर्षी या बोकडबळी वेळी झालेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेतल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. देवी दर्शनासाठी 505 पायऱ्या चढून भाविक गडावर जातात. त्या ठिकाणी नवसाचा बोकड बळी देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे देवस्थान समितीचा सक्रीय सहभाग या बळी परंपरेत असतो.\nगेल्या वर्षी मंदीर सुरक्षारक्षकाच्या रायफलमधून झालेलं मिसफायरमुळे 18 भाविक जखमी झाले होते. तसंच प्रचंड गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनेकांना दुखापतही झाली होती. यामुळे यंदापासून ही प्रथाच मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.\nआदिशक्तीचं रूप मानल्या जाणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीत या गडावर लाखोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी होते. त्यामुळे या बोकळबळीच्या प्रथेमळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केली होती. अखेर नियंत्रण समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Nasikshaptashrungivaniबंदीबोकडबळी प्रथासप्तश्रूंगी मंदिर\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:42:14Z", "digest": "sha1:BVS33JEUXNFXLTGYYEHATW5NAC2FRGF7", "length": 5896, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(रामपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख रामपुर जिल्ह्याविषयी आहे. रामपुर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nरामपुर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र रामपुर येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-dsk-bail-90518", "date_download": "2018-04-20T16:47:55Z", "digest": "sha1:2TLJOM7IORUCVBBE45HOD4CCJX7HDDM3", "length": 11748, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news DSK bail ‘मोफा’अंतर्गत गुन्ह्यात डीसकेंना अटकपूर्व जामीन | eSakal", "raw_content": "\n‘मोफा’अंतर्गत गुन्ह्यात डीसकेंना अटकपूर्व जामीन\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nपुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्‍टनुसार (मोफा) दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला. या आदेशात न्यायालयाने डीएसके यांच्यावर काही अटीही घातल्या आहेत.\nपुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्‍टनुसार (मोफा) दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला. या आदेशात न्यायालयाने डीएसके यांच्यावर काही अटीही घातल्या आहेत.\nया अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी डीएसके यांना हजर राहण्याचा आदेश करण्यासंदर्भात सरकार पक्षाने केलेली मागणी न्यायालयाने अमान्य केली. यापूर्वी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने डीएसके दांपत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी सदनिका ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार डीएसके यांच्याविरुद्ध ‘मोफा’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. डीएसके यांच्यातर्फे ॲड. श्रीकांत शिवदे यांनी अर्जावर बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला होता. न्यायालयाने शिवदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत अटकपूर्व जामीन मंजूर केला.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nशासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील\nऔरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shiv-sena-slams-bjp-at-bhayander/", "date_download": "2018-04-20T16:43:14Z", "digest": "sha1:O6LAYVRR5KJUUSILYX2YGU7WQMCI4J7X", "length": 16253, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेच्या दणक्याने भाजप बॅकफूटवर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nशिवसेनेच्या दणक्याने भाजप बॅकफूटवर\nमीरा-भार्इंदरकरांवर लादण्यात येणारा जिझिया कर रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर गेले आहे. नवीन चार करांपैकी मलनिस्सारण, रस्ते आणि पाणीपुरवठा लाभ कर रद्द करत मालमत्ता आणि पाणीपट्टीत मीरा-भार्इंदर पालिकेने कपात केली आहे. त्यामुळे करदात्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमीरा-भार्इंदर महानगरपालिकेत बहुमताने सत्तेत आल्यापासून भाजपने शहराच्या विकासाकडे चक्क दुर्लक्ष करत मीरा-भार्इंदरकरांवर वेगवेगळे कर लादण्याचा प्रयत्न केला. भाजपने प्रथम मालमत्ता आणि पाणीपट्टी करात भरमसाठ वाढ केली. यानंतर नव्याने मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ते कर आणि घनकचरा शुल्क कर असे चार नवे कर लादले. या करांना आणि करवाढीला बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत मंजुरीसुद्धा दिली आणि आज होणाऱ्या महासभेत बहुमताच्या जोरावर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णयसुद्धा भाजपने घेतला होता.\nभाजपचे गिरा तो भी टांग उपर\nशिवसेना आणि काँग्रेसच्या दणक्याने बॅकफूटवर जावे लागले असले तरी ही करवाढ नागरिकांचे हित बघून आम्ही मागे घेत आहोत, असे आज महापौर डिंपल कपाडिया, उपमहापौर चंद्रकांत वैती आणि स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनीरव मोदीच्या अलिबागमधील फार्म हाऊसवर धाड\nपुढीलडोंबिवलीचा ‘आधार’ पुन्हा कोलमडला, टोकनसाठी लांब रांगा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=21&paged=2", "date_download": "2018-04-20T16:43:15Z", "digest": "sha1:64XLQZZQMNGWC6YYOOD26A2SCWVDRR27", "length": 19888, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "महान्यूज़ | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 2", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nकोसबाड: विकासवाडीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण माच्छी बनला इंग्रजीचा तज्ज्ञ प्रशिक्षक\nComments Off on कोसबाड: विकासवाडीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण माच्छी बनला इंग्रजीचा तज्ज्ञ प्रशिक्षक\nराजतंत्र न्यूज नेटवर्क तलासरी, दि. ८: गिरगाव माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी भाषा विषयाचे तज्ज्ञ शिक्षक लक्ष्मण शंभू माच्छी यांना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनयांतर्गत जिल्हा शिक्षण विभागाकडून उत्कृष्ट चेस ( chess ) प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे चेस तज्ज्ञ ठरल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लक्ष्मण हे डहाणूतील वडकून येथे रहाणारे असून त्यांनी डहाणू तालुक्यातील कोसबाडच्या टेकडीवरील पद्मभूषण ...\tRead More »\nदेशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन – प्रशांत भूषण\nComments Off on देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन – प्रशांत भूषण\nशिरीष कोकीळ/राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू, दि. ८: देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन असून सध्याच्या न्याय व्यवस्थेत सामान्य माणूसास न्याय मिळणे अवघड असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणूतील सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या स्वयंसेवी संस्थेच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी निवृत्त सनदी पोलीस अधिकारी डॉ. के. ...\tRead More »\nबोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण\nComments Off on बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण\nवार्ताहर बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात ...\tRead More »\nरस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.\nComments Off on रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे येणारी एसटी बस सेवाअचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. जव्हार एसटी डेपोच्या देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या मार्गावरील बसेसमधून लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, ...\tRead More »\nसुर्या धरणाच्या पाण्यावरील हक्क सोडल्यास नवे सिंचन प्रकल्प राबवता येतील – जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे\nComments Off on सुर्या धरणाच्या पाण्यावरील हक्क सोडल्यास नवे सिंचन प्रकल्प राबवता येतील – जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे\nराजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर, दि. ४: सुर्या धरणाच्या पाण्यावरील हक्क सोडल्यास नवे पर्यायी सिंचन प्रकल्प राबवता येतील असा प्रस्ताव पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुर्या बचाव आंदोलन कर्त्यांशी बोलताना दिला. आदिवासी भागातील सुर्या प्रकल्पाचे सिंचनासाठी राखीव पाणी मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याच्या शासनाच्या निर्णयास सुर्या बचाव आंदोलन समितीचा विरोध लक्षात घेऊन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी समिती सदस्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. ...\tRead More »\n६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अमित शहांची सभा, पालघर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार\nComments Off on ६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अमित शहांची सभा, पालघर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार\nराजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर, दि. ४: येत्या शुक्रवारी मुंबईतील बांदा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार असून या सभेद्वारे ते पक्षाच्या लाखो सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पालघर जिल्ह्यातून या सभेसाठी जवळपास २५ हजार कार्यकर्ते जाणार अशी अपेक्षा असून त्यातील २० हजार कार्यकर्ते पालघर ग्रामीण जिल्ह्यातून जातील अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर ...\tRead More »\nरासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी\nComments Off on रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी\nवार्ताहर बोईसर, दि. 02 : तारापूर औद्यागिक वसाहतीतून (एमआयडीसी) निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांद्वारे खाडीत सोडले जात असल्याने या रासायनिक सांडपाण्यामुळे पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. तारापूर एमआयडीसीमध्ये हजारो ...\tRead More »\nचिंचणीतून २५ हजारांची दारू जप्त\nComments Off on चिंचणीतून २५ हजारांची दारू जप्त\nतलासरीत १६ लाखांचा गुटखा पकडला\nComments Off on तलासरीत १६ लाखांचा गुटखा पकडला\nराजतंत्र न्युज नेटवर्क दि. २७: तलासरी पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत १६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. गुजरात राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खानविल – उधवा रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून एम. एच. ०४/ ई. वाय. ८९०८ या क्रमांकाचा टेम्पो अडवून झडती घेतली असता त्यात १६ लाख रुपये ...\tRead More »\nस्माईल फाउंडेशन पालघर पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण व बेवारस लोकांना दिला आधार\nComments Off on स्माईल फाउंडेशन पालघर पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण व बेवारस लोकांना दिला आधार\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. २७ मनोरुग्ण व बेवारस लोकांना माणूस म्हणून जगात यावे यासाठी पुणे स्थित स्माईल प्लस शोषलं फाउंडेशन हि संस्था राज्यभरात कार्यरत असुन आज, मंगळवारी या संस्थेने पालघर जिल्ह्यात फिरणारे ७ बेवारस मनोरुग्ण आणि ५ बेवारस महिला व एक लहान मुलीला पालघर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना ठाणे येथील मनोरुग्णालयात रावण करण्यात आले आहे. या ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-04-20T16:33:39Z", "digest": "sha1:W4L52S5QIQ77KPYKREPDHI4Z5RTUC524", "length": 7171, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माउंट अँटेरो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउंची १४,२७६ फूट (४,३५१ मीटर)\nठिकाण शेफी काउंटी, कॉलोराडो, अमेरिका\nमाउंट अँटेरो अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,२७६ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे.\nयूट लोकांच्या युइंटा टोळीचा म्होरक्या असलेल्या चीफ अँटेरोचे नाव या शिखराला देण्यात आले आहे. या पर्वतावर अनेक मौल्यवान खडे व दगड आढळतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमाउंट एल्बर्ट • माउंट मासिव्ह • माउंट हार्वर्ड • ला प्लाटा पीक • ब्लांका पीक • उनकॉम्पाग्रे पीक • क्रेस्टोन पीक • माउंट लिंकन\nकॅसल पीक • ग्रेझ पीक • माउंट अँटेरो • टोरीझ पीक • क्वांडारी पीक • माउंट एव्हान्स • लाँग्स पीक • माउंट विल्सन\nमाउंट शाव्हानो • माउंट प्रिन्सटन • माउंट बेलफोर्ड • क्रेस्टोन नीडल • माउंट येल • माउंट ब्रॉस • किट कार्सन पीक • मरून पीक • टॅबेग्वाश पीक\nमाउंट ऑक्सफर्ड • माउंट स्नेफेल्स • माउंट डेमोक्रॅट • कॅपिटोल पीक • पाइक्स पीक • स्नोमास माउंटन • माउंट इओलस\nविंडम पीक • चॅलेंजर पॉइंट • माउंट कोलंबिया • मिसूरी माउंटन • हम्बोल्ट पीक • माउंट बीयेरश्टाट • सनलाइट पीक\nहँडीस पीक • कुलेब्रा पीक • एलिंगवूड पॉइंट • माउंट लिंडसे • लिटल बेर पीक • माउंट शेर्मान • रेडक्लाउड पीक • पिरॅमिड पीक • विल्सन पीक\nसान लुइस पीक • वेटरहॉर्न पीक • माउंट ऑफ द होली क्रॉस • ह्युरॉन पीक • सनशाइन पीक\nमाउंट मासिव्ह-वायव्य शिखर • एल दियेंते पीक • माउंट एल्बर्ट-दक्षिण शिखर • माउंट मासिव्ह-नैऋत्य शिखर • उत्तर कनन्ड्रम शिखर • नॉर्थ मरून पीक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१४ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=21&paged=3", "date_download": "2018-04-20T16:42:43Z", "digest": "sha1:W4RROY2JMPZH6SIVZYHMHNRYV4XHSBEG", "length": 20838, "nlines": 124, "source_domain": "rajtantra.com", "title": "महान्यूज़ | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 3", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nComments Off on अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत. वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ...\tRead More »\nवावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले\nComments Off on वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले\nप्रतिनिधी वाडा, दि. २१ : येथील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर हवेच्या जोरदार वावटळीत लोखंडी कैचीसह उन्मळून कोसळले गेल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , मात्र ह्या घटनेच्या काही क्षण आधी शाळा सुटण्याच्या सुमारास विद्यार्थी व शिक्षक वर्गाबाहेर पडल्याने बचावले. वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या ...\tRead More »\nनिकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू\nComments Off on निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू\nप्रतिनिधी वाडा, दि. २०: तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस – चिंचघर- गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेने आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे बांधकाम प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. ...\tRead More »\nसूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण\nComments Off on सूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण\nवार्ताहर :, बोईसर दि. २० : आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील सूर्या धरणांमधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी न देता ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न हणून पाडण्यासाठी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने काल, सोमवारपासून पालघर येथील हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आजहा या उपोषणाचा दुसरा दिवस असून विविध संघटना व राजकीय पक्षांनी या ...\tRead More »\nभारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी\nComments Off on भारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी\nराजतंत्र मिडीया जव्हार, दि. १५: प्रत्येक भारतीय नागरीकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था समजणे सोपे होईल. आणि लोकशाही व्यवस्था समजली म्हणजे आपण त्यात सक्रीय होऊ शकतो. त्यातूनच देश सामर्थ्यशाली बनेल असा विश्वास दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जव्हार येथे बोलताना व्यक्त केला. ते जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेठीया फाऊंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी उद्योजकांच्या ...\tRead More »\nकासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू\nComments Off on कासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू\nदि. १४: अलिकडेच तारापूर औद्योगिक क्षेत्रात ६ कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडून ४ जण दगावल्याची घटना ताजी असतानाच डहाणू तालुक्यातील कासा येथे भर बाजारपेठेतील २ मजली इमारतीला आग लागून एक जणाचा मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. ही इमारत प्राथमिक शाळेच्या जवळ असल्याने शाळेला सुट्टी द्यावी लागली. यामुळे पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज पहाटे ३ च्या ...\tRead More »\nसूर्या पाणी बचाव आंदोलन समितीने सर्वेक्षणाचे काम बंद पाडले\nComments Off on सूर्या पाणी बचाव आंदोलन समितीने सर्वेक्षणाचे काम बंद पाडले\nसूर्या प्रकल्पाचे पाणी बाहेर वळविण्यास स्थानिकांच्या असलेल्या विरोधास न जुमानता धरणा नजीक सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले होते. हे कळताच स्थानिक ग्रामस्थांना सूर्या बचाव आंदोलन समितीने बळ देऊन काम बंद पाडले. तेथील सर्व मशिनरी हुसकावून लावण्यात आली. यावेळी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जितेंद्र राऊळ, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, पांडुरंग बेलकर, स्थानिक सरपंच शिवराम काकड, वेती वनहक्क समितीचे प्रकाश हाडळ उपस्थित होते.\tRead More »\nबोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू\nComments Off on बोईसरमधील कंपनीत स्फोट- ३ कामगारांचा मृत्यू\nदुर्घटनाग्रस्त नोव्हाफेन स्पेशालिटीच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्ज कंपनीत आगीत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. १४ जखमींवर उपचार सुरु असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे. असे असले तरी लोकांना या आकडेवारीवर विश्वास नाही. अपघात घडला त्यावेळी कारखान्यात किती कामगार होते व ते सुरक्षितपणे घरी पोचले किंवा नाही, हे तपासल्यानंतरच याबाबत खरे काय ते स्पष्ट होणार आहे.\tRead More »\nभगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे\nComments Off on भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे\nजागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला.\tRead More »\nडहाणू: राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये केएलपीचे बाळासाहेब चव्हाण प्रथम\nComments Off on डहाणू: राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये केएलपीचे बाळासाहेब चव्हाण प्रथम\nRAJTANTRA MEDIA डहाणू दि. ५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) यांच्यातर्फे आयोजित “माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्यस्तरीय निबंधस्पर्धा, सन २०१७-१८” मध्ये डहाणूतील के. एल. पोंदा हायस्कूलचे उप शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. पूणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते बाळासाहेब यांचा ५ हजार रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%82-2/", "date_download": "2018-04-20T16:10:24Z", "digest": "sha1:IN7YWN7CIQSD3VMVZMAMGOPBGGFPGGVH", "length": 6795, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्यांशी तडजोड करु नका : उपराष्ट्रपती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रामाणिकपणा आणि नीतीमूल्यांशी तडजोड करु नका : उपराष्ट्रपती\nनवी दिल्ली : उत्तम चारित्र्य बाळगा, प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्यांशी तडजोड करु नका, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. ते मेघालयमध्ये आयआयएम शिलाँगच्या नवव्या दिक्षांत समारंभात बोलत होते.\nनीतीमूल्यांची पुरती घसरण आणि कायद्यासंबंधीच्या भीतीचा अभाव यामुळे समाजाची वाताहात होते. प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्य जपणे आवश्यक असून कॉर्पोरेट नैतिकतेचे उल्लंघन होता कामा नये, असे राष्ट्रपती म्हणाले.\nसंयम आणि कृतज्ञतेची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्यांची काळजी घेणे, वस्तू वाटून घेण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण केवळ रोजगारासाठी नसून सक्षमीकरणासाठीही आहे. ज्ञानोपसानेची कास सोडू नका, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशातील सद्यपरिस्थिती आर्थिक आणीबाणीचे द्योतक-डेरेक ओब्रायन\nNext articleमोदींनी भारतीय बँकिंग व्यवस्थेचे वाट्टोळे केले – राहुल गांधी\n200 – 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय\nहिरानंदानींने भारताचे नागरिकत्व सोडले\n‘ही’ कंपनी मुलीच्या जन्मानंतर देणार ठराविक रक्कम…\n….तर माझ्या परिवाराला कोणी मारले - कोडनानीच्या सुटकेवर पीडितेचा सवाल\nसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\n…हे तर काँग्रेसचं राजकारण – अरूण जेटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/42-apps-that-steals-your-data-from-mobile-alert-issued-by-central-government/", "date_download": "2018-04-20T16:33:52Z", "digest": "sha1:7XQEITTWJJWRHQFTG7QRHIPEFXVSNYPF", "length": 9293, "nlines": 105, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी\nसाधारण एक आठवड्यापूर्वी गुगलने डाटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला बाहेरचा रस्ता दाखवला होता. चीन आणि पाकिस्तान मधून बरेचसे ऐप आपल्या मोबाईलमधून डेटा चोरी करण्यासाठीच बनवले जातात . त्यामुळे ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट यांसारखे अनेक मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी घालण्यात आली होती. या अॅपचा वापर करून चीनकडून भारतीय जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यात येते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानं सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले.\nआता हेरगीरी करण्यात येणाऱ्या अॅपच्या यादीत आणखी काही अॅपचा समावेश असल्याचे सुरक्षायंत्रेच्या लक्षात आले असून त्यात ४१ मोबाईल अॅप्लिकेशनचा समावेश असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं म्हटलं आहे.ही आहे यादी त्या ४१ ऐपची जे आपल्या मोबाईल मधून महत्वाचा डेटा जसे मोबाईल कॉन्टॅक्टस, फोटो, व्हीडिओ, लोकेशन आणि ब्राउजर चा डेटा चोरी करू शकतात.\nट्रू कॉलर, ( स्वीडन )\nयूसी ब्राऊजर (चीन )\nव्ही चॅट( चीन )\nयुसी न्यूज (चीन )\nव्हिवा व्हिडिओ QU व्हिडिओ\nबैदु ट्रान्सलेट (चीन )\nबैदु मॅप (चीन )\nअर्थात याआधी देखील अशाच स्वरूपाच्या बऱ्याच तक्रारी आली होत्या मात्र, सरकारकडून अधिकृत रित्या काही सांगण्यात आले नव्हते. मात्र आता सरकारने सांगितल्यामुळे तरी किमान लोक असे ऍप् आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार नाहीत अशी अशा करूयात.\nडेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता\n‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात\nआणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत डेट करतोय हा मराठी अभिनेता →\nOne thought on “ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी”\nPingback: गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी – Marathi People\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?cat=21&paged=4", "date_download": "2018-04-20T16:42:38Z", "digest": "sha1:6U2JI5J2SQSFCYPCMKV5J56HJIOVLWKO", "length": 10607, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "महान्यूज़ | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 4", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nखासदार चिंतामण वणगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nComments Off on खासदार चिंतामण वणगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपालघर, दि. 31 : पालघर लोकसभेचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांच्या पार्थिवावर आज मुळगावी कवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वणगा यांचे काल, मंगळवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. वणगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासु खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली ...\tRead More »\nडहाणूत विधी सेवा शिबिर संपन्न 4 हजारपेक्षा अधिक लोकांना लाभ\nComments Off on डहाणूत विधी सेवा शिबिर संपन्न 4 हजारपेक्षा अधिक लोकांना लाभ\nशिरीष कोकीळ डहाणू दि. 30: शासनामार्फत चालवल्या जाणार्‍या विविध योजनांचे एका छताखाली लाभार्थ्यास प्रत्यक्ष व थेट लाभ मिळवून देण्यासाठी गरजु लोकांना योजनेशी जोडणारे शिबीर डहाणू तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (दिल्ली), महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि डहाणू व तलासरी तालुका विधी सेवा समितीमार्फत आज नरेशवाडीच्या के. जे. सोमय्या माध्यमिक ...\tRead More »\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nComments Off on डहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nराजतंत्र मिडीया दि. १८: भरतनाट्यम नृत्यकलेत निपुण असलेल्या सौ. दिप्ती कुणाल माळी यांच्या पुढाकाराने ही नृत्यकला आता डहाणूत रुजत चालली असून येथील नवकलावंतांनी नुकताच मुंबई येथे शानदार प्रयोग सादर केला. मुंबईतील (नेरूळ) आगरी कोळी भवन येथे पार पडलेल्या या प्रयोगामध्ये डॉ. अंजली मस्कारेन्हस, सौ. श्रद्धा राऊत, सौ. प्रियांका शिंदे, कु. मोनिका पाटील, कु. सिद्धी सोरटी, कु. युक्ता डहाणूकर, कु. हेमांक्षी ...\tRead More »\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-20T16:38:17Z", "digest": "sha1:7HERTUVFQCFRGHJNW3PMACFYT3ZGF6Z2", "length": 11754, "nlines": 275, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९४ हिवाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nXVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा ६१, ६ खेळात\nअधिकृत उद्घाटक राजा पाचवा हाराल्ड\n◄◄ १९९२ १९९८ ►►\n१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.\nखालील ६७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हियेत संघ, युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया ह्या तीन कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊन निर्माण झालेल्या देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच स्वतंत्रपणे भाग घेतला.\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना (१०)\nत्रिनिदाद आणि टोबॅगो (२)\nयु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (८)\nह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.\nआल्पाइन स्कीइंग 10 5 5\nबॉबस्ले 2 2 0\nफ्रीस्टाईल स्कीइंग 4 2 2\nस्पीड स्केटिंग 6 3 3\nआइस हॉकी 1 1 0\nनॉर्डिक सामायिक 2 2 0\nशॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग 6 3 3\nफिगर स्केटिंग 4 3* 3*\nक्रॉस कंट्री स्कीइंग 10 5 5\nस्की जंपिंग 3 3 0\nबायॅथलॉन 6 3 3\n१ रशिया ११ ८ ४ २३\n२ नॉर्वे (यजमान) १० ११ ५ २६\n३ जर्मनी ९ ७ ८ २४\n४ इटली ७ ५ ८ २०\n५ अमेरिका ६ ५ २ १३\n६ दक्षिण कोरिया ४ १ १ ६\n७ कॅनडा ३ ६ ४ १३\n८ स्वित्झर्लंड ३ ४ २ ९\n९ ऑस्ट्रिया २ ३ ४ ९\n१० स्वीडन २ १ ० ३\nखेळ • पदक • रा.ऑ.सं. • पदक विजेते • चिन्ह\n१८९६ • १९०० • १९०४ • (१९०६) • १९०८ • १९१२ • १९१६ १ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ • २०२८\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२\nअलीकडील स्पर्धा: तुरीन २००६ • बीजिंग २००८ • व्हँकूव्हर २०१० • लंडन २०१२ • सोत्शी २०१४\n१ पहिल्या महायुद्धामुळे रद्द. २ दुसर्‍या महायुद्धामुळे रद्द.\nइ.स. १९९४ मधील खेळ\nहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०१३ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/author/admin/", "date_download": "2018-04-20T16:14:08Z", "digest": "sha1:WK5IIAUKA62C62LKYAGE3ZWLSKDM6GUS", "length": 11225, "nlines": 55, "source_domain": "rightangles.in", "title": "राईट अँगल्स – Right Angles – Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकेम्ब्रिज अनॅलिटीका व फेसबुक यांनी भारतीय मतदारांच्या ‘डेटा’चा गैरवापर केल्याच्या बातम्या गेले आठवडाभर मीडियातून झळकत आहेत. ठळक बातम्यांची जागा व्यापणारी ही भानगड नेमकी काय आहे याचा मात्र बहुतेकांना नेमका अंदाज नाही. तर भारतातील केम्ब्रिज अनॅलिटीकाच्या नेमक्या उद्योगांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे. केम्ब्रिज अनॅलिटीका या कंपनीची स्थापना २०१३…\nचीनी कम्युनिस्टांच्या पावलावर पाऊल - एक गायब झालेला लेख\nसदर आशयाचा लेख शेखर गुप्तांच्या द प्रिंट या पोर्टलवर तेरा मार्च रोजी प्रसिद्ध झाला होता. तो त्यांनी ट्विट देखील केला होता, पण चोवीस तासांत त्यांना किंवा द प्रिंट ला काही तरी उपरती झाली आणि हा लेख साईट वरून गायब करण्यात आला. मोदींचे राजकारण हे फॅसिझम पेक्षा अधिक चिनी…\nजयासी न कळे “टूजी” चे महिमान तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये\nलोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणे आता जवळपास सुरूच झाले आहे. शेवटचे दीड वर्ष हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या दृष्टीने रसद जमवण्याचेच वर्ष असते. या वर्षात सरकार देखील फारसे लोकांना न आवडणारे निर्णय घेत नाही. तर विरोधक सरकारच्या विरोधात जितके काही हल्ले करता येतील तितके हल्ले तीव्र करतात. गेली निवडणूक म्हणजे…\nयेणारी दोन वर्षे भारतीयांसाठी अतिकठीण असणार आहेत. भाजपाने विकासाचा वादा करीत २०१४ साली सत्ता हस्तगत केली खरी. एकदा सत्ता काबीज केल्यावर विकासाच्या कामाला लागण्यापूर्वी, विकासात अडथळे येऊ नयेत म्हणून की काय त्यांनी सर्वांवरच जबरा वचक बसविला. राजकीय विरोधक, सरकारी कर्मचारी, उद्योगजगत, मीडिया सगळ्यांचीच भादरून टाकली. भाजपा पहिल्यांदाच सत्तेत…\nआगे-आगे देखिए, होता है क्या\nगुजरात निवडणुकीत काय होणार याची देशातील प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीत एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रचार यंत्रणेने सालाबादाप्रमाणे ही गुजरातची निवडणूक नसून हे भारत-पाकिस्तान युद्धच सुरू असल्याचा प्रचार सुरू केला. यात अर्थातच प्रखर देशाभिमानी, राष्ट्रवादी भाजप व परिवारातील सर्वजण हे भारत असून त्यांच्या विरोधातील काँग्रेसपासून ते…\nनाठाळांचे माथी हाणा की काठी \nभारताचे माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती हे पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत. हे वाक्य केवळ चीड आणणारेच नाही तर अत्यंत गंभीर आहे. कारण हे वाक्य भाजपच्या एखाद्या जिल्हाध्यक्ष, वा राज्यातला मंत्री किंवा आमदार खासदाराने म्हटलेलं नाही. संघाच्या एखाद्या प्रचारकाच्या तोंडून आलेलं हे वाक्य…\nसाडेतीन घटनांचा ट्रेलर – पिक्चर अभी बाकी है \nअलिकडच्या काळातील प्रसारमाध्यमांशी संबंधित साडेतीन घटना आपण पाहूयात. सध्या देशात प्रसारमाध्यमे आणि सरकार यांच्यातील सौहार्दाचे संबंध या निमित्ताने तपासण्याचे काम करणे हे सजग लोकशाहीवादी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच असते. आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी प्रसार माध्यमांवर आणलेल्या प्रतिबंधांची चर्चा अजूनही होत असते. तशा प्रकारची कोणतीही बंदी या सरकारने आणली नसल्याचे…\nअमेरिकन जनता आपल्याहून सरस का ठरते\n`टू किल अ मॉकिंग बर्ड’ ही हार्पर ली यांची कादंबरी काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे जगातिल सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे. अगदी बायबलपेक्षही याच्या जास्त प्रती प्रकाशित झाल्या आहेत. सुमारे चार कोटी वगैरे प्रती प्रकाशित झाल्याची अधिकृत आकडेवारीच आहे. अनधिकृतरित्या जगभरातील फूटपाथांवर हे पुस्तक किती विकले गेले असेल याची कोणीही…\nजगभरात उदारमतवादाचा पराभव का होतोय\nपरवेझ हूडभॉय हे अणुशास्त्रज्ञ, गणितज्ञ असून, पाकिस्तानातील फोरमन ख्रिश्चन कॉलेज व कायदे आझम युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. कार्नेजी मेलन, एम आय टी, स्टॅनफर्ड अशा जगातील सर्वोच्च दर्जाच्या विद्यापीठानी त्यांना सन्माननिय व्याख्याता म्हणून वारंवार निमंत्रित केले आहे. फॉरेन पॉलीसि या वृत्तवाहिनीने, जगातील १००…\nन्यायमूर्ती गोखले आणि सर परेश रावल नवहिंदुत्ववादी भारतवर्षाचे लक्ष्मीकांत प्यारेलाल\nगोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे. तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/maharashtra-loan-waiver-banks-to-start-depositing-farm-loan-waiver-benefits-from-today-472243", "date_download": "2018-04-20T16:35:10Z", "digest": "sha1:ELMUXB4I3BWBIQPMFERCIDAICM4WOINL", "length": 15021, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार : सरकार", "raw_content": "\nमुंबई : कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार : सरकार\nकर्जमाफीच्या अजब-गजब गोंधळानंतर अखेर आजपासून साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nमुंबई : कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार : सरकार\nमुंबई : कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार : सरकार\nकर्जमाफीच्या अजब-गजब गोंधळानंतर अखेर आजपासून साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2017/01/CurrentAffairs01012017.html", "date_download": "2018-04-20T16:27:14Z", "digest": "sha1:RI2ADWFQEIDTMZHKTB4D6GTU3AJ7QM3M", "length": 21269, "nlines": 196, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : १ जानेवारी", "raw_content": "\nचालू घडामोडी : १ जानेवारी\nमोदींकडून अनेक नव्या योजनांची घोषणा\nनिश्चलनीकरण आणि वारंवार निर्णयबदलामुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला अनेक नव्या योजनांची घोषणा केली.\n‘सबका साथ़, सबका विकास’ हे प्रचारवाक्य उधृत करत मोदी यांनी वंचित, गरीब, शोषित, महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.\nमोदींनी घोषणा केलेल्या योजना\nप्रधानमंत्री आवास योजनेंगर्तत २०१७मध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी शहरात घरासाठी ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजदारात ४ टक्के तर १२ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरात ३ टक्के सूट देण्यात येईल.\nगावांमध्ये ३३ टक्के जादा घरे बांधण्यात येतील. गावातील घरबांधणी किंवा राहत्या घराचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी २ लाखांच्या कर्जावरील व्याजदारात ३ टक्क्यांची सूट देण्यात येईल.\nसहकारी बॅंकांकडून ज्या शेतकऱ्यांनी कृषीकर्ज घेतले आहे, त्यावरील ६० दिवसांचे व्याज सरकार फेडणार आहे.\nतीन कोटी किसान क्रेडिट कार्ड ही रूपे क्रेडिट कार्डमध्ये रुपांतरित केली जातील.\nलघु व मध्यम उद्योग\nलघुउद्योगांसाठी कॅश क्रेडिट मर्यादा २० टक्क्यांवरुन २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना १ कोटींऐवजी २ कोटींपर्यंत कर्ज देण्यात येईल.\nमाता मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकार गर्भवती महिलांसाठीही देशव्यापी योजनेची सुरुवात करणार आहे.\nसरकार गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूती, पौष्टीक आहारासाठी ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.\nज्येष्ठ नागरिकांच्या साडेसात लाखांच्या दहा वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर आठ टक्के व्याजदर देणार. ही मिळणारी रक्कम प्रत्येक महिन्याला त्यांना मिळू शकते.\nअनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ\n९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.\n९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणारे अनिवासी भारतीय ३० जून २०१७पर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात.\nमात्र ही मुदतवाढ नेपाळ, भूटान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू असणार नाही.\nसध्याच्या नियमानुसार अनिवासी भारतीयांना त्यांच्यासोबत २५ हजार रुपये नेण्याची मुभा आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि नागपूरमधील कार्यालयांमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.\nमहाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर अॅड. रोहित देव\nअॅड. श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nशिवसेना-भाजप युतीच्या काळातील देव हे तिसरे महाअधिवक्ता आहेत. याआधी सुनील मनोहर व श्रीहरी अणे यांनी या पदाचा काही महिन्यातच राजीनामा दिला.\nश्रीहरी अणे यांनी पदावर असताना स्वतंत्र विदर्भ राज्याची उघडपणे मागणी करून राजकीय वर्तुळात वाद निर्माण केला होता.\nश्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाचा प्रभार सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.\nमाजी महाधिवक्ता सुनील मनोहर यांच्याकडे यापूर्वी सहयोगी महाधिवक्ता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.\nमात्र, मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर जून २०१५मध्ये रिक्त झालेल्या सहयोगी महाअधिवक्ता या पदावर देव यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n५१ वर्षांचे देव हे मूळचे नागपूरचे आहेत. नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली.\nअ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ सहायक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.\nविद्यार्थिदशेत काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले. आता बंद पडलेल्या ‘नागपूर टाइम्स’मध्ये त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली.\nदेव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या निकटच्या वर्तुळातील म्हणून ओळखले जातात.\nराज्याच्या विक्रीकर खात्याचे तसेच नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणूनही देव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे.\nदेव गेल्या दोन वर्षांपासून नागपूर येथील खंडपीठात केंद्राचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून काम बघत होते.\nभारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर\nभारतीय कालगणनेत १ जानेवारी २०१७ रोजी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली.\nजागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते.\nपृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले.\nयानंतर १ जानेवारी रोजी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.\nपृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो.\nउपग्रहांचे कार्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही फार महत्त्वाचे असतो. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.\nभारतात आतापर्यंत ३६वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.\nअखिलेश यादव सपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी\nसमाजवादी पक्षाच्या १ जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.\nमुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.\nअखिलेश यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर या बैठकीत अखिलेश यांची बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\nशिवपाल यादव यांना समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर, मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले आहे.\nसमाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nपक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय संमेलन बोलावण्यासाठी ४० टक्के सदस्यांची मंजुरी लागते. अखिलेश यांच्याकडे सध्या ४० टक्क्यांहून अधिक सदस्यांचे समर्थन आहे.\nलखनौ येथील जनेश्वर मिश्र पार्क येथे अखिलेश यादव समर्थकांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले होते.\nरामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहू नये असे आवाहन मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना केले होते.\nमात्र मुलायम यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि नेत्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ जानेवारी\nचालू घडामोडी : ३० जानेवारी\nचालू घडामोडी : २९ जानेवारी\nचालू घडामोडी : २८ जानेवारी\nचालू घडामोडी : २७ जानेवारी\nचालू घडामोडी : २६ जानेवारी\nचालू घडामोडी : २५ जानेवारी\nचालू घडामोडी : २४ जानेवारी\nचालू घडामोडी : २३ जानेवारी\nचालू घडामोडी : २२ जानेवारी\nचालू घडामोडी : २१ जानेवारी\nचालू घडामोडी : २० जानेवारी\nचालू घडामोडी : १९ जानेवारी\nचालू घडामोडी : १८ जानेवारी\nचालू घडामोडी : १७ जानेवारी\nचालू घडामोडी : १६ जानेवारी\nचालू घडामोडी : १५ जानेवारी\nचालू घडामोडी : १४ जानेवारी\nमासिक : डिसेंबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : १३ जानेवारी\nचालू घडामोडी : १२ जानेवारी\nचालू घडामोडी : ११ जानेवारी\nचालू घडामोडी : १० जानेवारी\nचालू घडामोडी : ९ जानेवारी\nचालू घडामोडी : ८ जानेवारी\nचालू घडामोडी : ७ जानेवारी\nचालू घडामोडी : ६ जानेवारी\nचालू घडामोडी : ५ जानेवारी\nचालू घडामोडी : ४ जानेवारी\nचालू घडामोडी : ३ जानेवारी\nचालू घडामोडी : २ जानेवारी\nचालू घडामोडी : १ जानेवारी\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/big-companies-like-jet-airways-reliance-indutries-are-bmc-defaluter-of-property-tax/", "date_download": "2018-04-20T16:37:05Z", "digest": "sha1:OVHNFTQAVRCX34V2LVLSXSXREXIH7PAU", "length": 17251, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "रिलायन्स इंडस्ट्रीज, जेट एअरवेज यांनी थकवला महापालिकेचा मालमत्ता कर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nरिलायन्स इंडस्ट्रीज, जेट एअरवेज यांनी थकवला महापालिकेचा मालमत्ता कर\nमालमत्ता कर थकवल्यामुळे मरोळच्या सेवन हिल्स रुग्णालयाला टाळे ठोकल्यानंतर पालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर थकवणाऱया १०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, जेट एअरवेज अशा मोठय़ा कंपन्या आणि विकासकांसोबतच कॉर्पोरेट कंपन्या, मोठय़ा निवासी सोसायटय़ा आणि क्लब यांचाही थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.\nमालमत्ता कर हा पालिकेचा जकातीनंतरचा दुसरा मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र अनेक कॉर्पोरेट कंपन्या, विकासक, निवासी सोसायटय़ांनी पालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे. तर काही प्रकरणे न्यायालयामध्ये अडकलेली असल्यामुळे अशा प्रकरणातील मालमत्ता करही थकीत आहे. अशा विविध कारणांमुळे पालिकेचा तब्बल १० हजार कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. कोणताही वाद नसलेल्या प्रकणातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी करनिर्धारक विभागाने संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० जणांची यादी पालिकेने तयार केली आहे. यातील अनेकांनी १९९३ पासून थकबाकी भरलेली नाही. महानगरपालिकेने ही थकबाकी आधी वसूल करण्याचे ठरवले आहे असे पालिकेच्या करनिर्धारण विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.\nयांनी थकवला मालमत्ता कर\nहिंदुस्थान कंपोझिट लिमिटेड – २९.९८ कोटी\nभरत डायमंड -२५.५२ कोटी\nलुथारीया लालचंदानी – २१.९७ कोटी\nजेट एअरवेज -१६.५८ कोटी\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड – ११.२३ कोटी\nशापूरजी पालनजी ऍण्ड कं. – १३.६४ कोटी\nसेंटॉर मार्कंटाइल – १३.०६ कोटी\nअशी आहे एकूण थकबाकी\nवादग्रस्त प्रकरणांत अडकलेली थकबाकी – ५०९४ कोटी\nवाद, तंटे नसलेली प्रकरणे – ४८५४ कोटी\nएकूण थकबाकी – ९९४८ कोटी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुजोर रिक्षाचालकची प्रवाशाला बेदम मारहाण, घरावरही केली दगडफेक\nपुढीलराज्याची आर्थिक घडी विस्कटली, राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3116", "date_download": "2018-04-20T16:36:42Z", "digest": "sha1:UH7MWWP2HBFAJIQRLFIVY6MRQNWQQNTS", "length": 10585, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार\nजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार\nपालघर, दि. 04 : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणार्‍यांसाठी देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार पालघरचे जिल्हाधिकारी व उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन 2015-16 या वर्षात या योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था, अधिकारी व पत्रकारांना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असताना जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.\nPrevious: विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव\nNext: डहाणूमध्ये आरएसएस तर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रम संपन्न\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3512", "date_download": "2018-04-20T16:45:03Z", "digest": "sha1:SDXWV4S65F34L2IBFNHFCQCYFNKZO5W6", "length": 14293, "nlines": 105, "source_domain": "rajtantra.com", "title": "कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद\nकॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद\nवाडा, दि. १६ : आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाची संघटनात्मक बांधणी करून बुथनिहाय कमिट्या तयार करण्याच्या उद्देशाने वाडा तालुका कॉंग्रेस पक्षाची बैठक वाड्यात आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीवरिल पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींच्या विरोधात चांगलीच खदखद व्यक्त केली. त्यामुळे वाढलेल्या गोंधळामुळे ही बैठक आवरती घेण्यात आली.\nपालघर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने प्रत्येक तालुक्यात अशाप्रकारच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. वाड्यात शुक्रवारी ( दि. १६ ) तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या डेपोत उभारलेल्या सभामंडपात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष केदार काळे हे होते. तर या बैठकीला प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील, प्रदेश सचिव विजय पाटील हे उपस्थित होते.\nयावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडताना प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे मताधिक्य कमी होत असून पक्षाच्या अवनतीस पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीत कार्यकर्ता मरमर राबतो. मात्र शेवटच्या दिवशी पदाधिकारी विकले जातात असा थेट आरोप कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते राजेश चौधरी यांनी केला. ज्यांचा जनाधार नाही असे लोक पदावर बसविल्यानंतर पक्ष टिकणार कसा असा सवाल चौधरींनी उपस्थित केला. तर हे पदाधिकारी जनतेत कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काय काम करतात याचा जाब त्यांना विचारा असे उपस्थित नेत्यांना त्यांनी सुनावले.\nतर डिसेंबर महिन्यात झालेल्या वाडा नगरपंचायत निवडणुकीत येथील कॉंग्रेसच्या नेत्यांनीच विरोधी पक्षांना मदत केल्याने आपल्यासहित कॉंग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप सर्फराज धांगे ह्या पराभूत उमेदवाराने केला. तर नगरपंचायत निवडणुकीकरिता आलेला पक्षनिधी नेमका गेला कुठे याचीही चौकशी पक्ष नेतृत्वाने करावी अशी मागणी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जिल्हाध्यक्ष काळे यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेऊ असे सांगत याविषयी अधिक चर्चा न वाढवण्याची सूचना केली. त्यावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक नीलेश भोईर यांनी या प्रश्नावर चर्चा व्हायलाच हवी अशी भूमिका घेत कार्यकर्ता निष्ठेने काम करतो, त्यांना पदाची अपेक्षा नाही आणि अशावेळी पदाधिकारी, तालुक्यातील प्रदेश पातळीवरील नेते विकले जात असतील तर कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करायचे कशाला असा सवाल करत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या असे सांगितले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांविरोधात आपली खदखद व्यक्त केली. मात्र त्यानंतर व्यक्तिगत आरोप – प्रत्यारोप होऊन गोंधळ वाढू लागल्याने अखेर जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही बैठक आटोपती घेतली.\nPrevious: प्रदुषणकारी कंपन्यांना नियंत्रण मंडळाचे अभय सुनावणी दरम्यान प्रांतांचे कानावर हात ; तक्रारदार हतबल\nNext: अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला तात्काळ अटक\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/golden-man-pune/", "date_download": "2018-04-20T16:05:15Z", "digest": "sha1:J65TNZQ6G352BS7UVANON4VFRXSQFN7J", "length": 56536, "nlines": 316, "source_domain": "khaasre.com", "title": "जाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nजाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक… 12\nसध्या सोशल मिडीयावर सोनसाखळ्या घातलेल्या युवकाचा फोटो सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. परंतु तो युवक कोण या बाबत अनेक लोकांना कल्पना नाही. काहींना कल्पना आहे परंतु त्याच्या विषयी जास्त माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही खासरेवर माहिती देत आहोत पुण्याचा गोल्डन मॅन सनी वाघचौरे बद्दल…\nसनी वाघचौरे हा पिंपरी चिंचवड पुणे येथील युवक त्याचे आयुष्य एकदम शाही जगत आहे व त्याचे फोटोमध्ये दिसते सुध्दा… सनी गोल्डन ऑडी,गोल्डन बूट. अंगावर गोल्ड असा त्याचा नेहमीचा पेहराव असतो.\nअनेक नेते,अभिनेते सनी सोबत राहतात. सनीने हि कमाई कशी केली असेल त्याबाबत तुम्ही विचार केला का तर पहिले आपण बघूया सनीचा व्यवसाय काय आहे \nसिनेमा बनवायला खर्च खूप येत असतो. त्यामुळे अनेक लोक सिनेमा फायनांस चे काम करतात. सनी सुध्दा हेच काम करतो. सिनेमा जगतात पैसे गुंतविणे हा त्याचा एक व्यवसाय आहे.\nजिला गाझियाबाद, जयंतीभाई कि लव स्टोरी सारख्या मोठ्या हिंदी सिनेमाला सनीने फायनांस केलेले आहे. एक हिंदि सिनेमा बनवायला १०० करोड पर्यंत खर्च येत असतो. आणि हे खर्च उचलायचे काम करतो सनी….\nसिनेस्टार विवेक ओबेराय सोबत कर्मा इंटरप्रायजेस मध्ये तो पार्टनर आहे. हि कंपनी बांधकामाचे काम करते त्यात तो भरपूर पैसा कमवतो. त्यामुळे अनेक वेळेस विवेक व सनी सोबत दिसतो. दोघाचे संबंध अनेक दिवसापासून आहे.\nया अगोदर विवेक व सनीच्या मैत्रीची बातमी पेपरात आली होती आणि दोघाच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु यावर सनीने स्पष्टीकरण दिले होते कि “मला सोने आवडते, परंतु माझ्या आणि विवेकच्या मैत्रीत याचे काही देणेघेणे नाही.”\nसनी हा समाज भान ठेऊन काम करतो. तो महाराष्ट्र हरित सेना समितीचा सदस्य आहे. महाराष्ट्र शाषण व वन विभागाच्या साह्याने हि समिती बनविण्यात आली आहे. आणि या मार्फत सनी वाघचौरे काम करत असतो.\nसनीकडे एवढा पैसा आहे तर खर्चही तसाच होणार. त्याच्या मोबाईलची यादी व किंमत बघितल्यास तुम्ही आवाक होसाल.\nखालील मोबाईल सनीकडे आहे. VERTU हा मोबाईल उच्चभ्रू ग्राहकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनविल्या जातो. मोबाईलची विशेषतः हि कि हा मोबाईल हाताने असेम्बल केला जातो. यामध्ये महागाचे हिरे,खडे वापरण्यात येतात. या मोबाईलची कमीतकमी किंमत ६ लाख ५० हजार पासून सुरु होते.\nसनीकडे आयफोन 6S व आयफोन 7 हे दोनीही मोबाईल आहे. आणि हे दोनीही मोबाईल सोने आणि हिर्यापासून बनविले आहे. असाच मोबाईल नीता अंबानी कडेही आहे. या मोबाईलची कमीत कमी किमत १ लाख ७८ हजार रुपये पासून सुरु होते. त्याचे हे दोन मोबाईल कमीत कमी ५ लाखाचे आहे.\nBlackberry Passport हा मोबाईल त्याच्या कडे आहे. या मोबाईलची किंमत कमीत कमी 83148.00 पासून सुरवात होते.\nसनी हा महागड्या गाड्याच्या शौकीन आहे. त्याची मर्सडिज हि गाडी तर संपूर्ण सोन्याने मढवलेली आहे. आणि संपूर्ण देशाकरिता त्याच्या हि गाडी मागे चर्चेचा विषय झालेली आहे.\nत्याच्या कडे असलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहे. Audi Q7 या गाडीची बेसिक मॉडल ची किंमत ७७,८४,००० रुपये एवढी आहे. ह्या गाडीला त्याने सोन्याने मढविले आहे त्यामुळे या गाडीच्या किंमतीचा आवाका तुम्ही न लावलेला बरा.\nत्याच्या ताफ्यात दुसरी गाडी Audi Q5 हि आहे याच्या बेसिक मॉडल ची किंमत ५७,८३,००० एवढी आहे. त्यानंतर त्याच्या ताफ्यात Audi A4 हि लक्सरी कार आहे त्याची किंमत ४१,५२,००० रुपये आहे.\nBMW Z4 हि गाडी सुध्दा त्याच्या ताफ्यात आहे. या गाडीची किंमत ७९,०५,००० रुपये आहे. अश्या महागड्या अनेक गाड्या त्याच्या ताफ्यात आहे.\nJagaur XF हि गाडीही त्याच्या ताफ्याची शान वाढवत आहे. या गाडीची किंमत ५६,३५,००० रुपये आहे.\nविशेष म्हणजे त्याने त्याच्या गाडीची नंबर प्लेट हि संपूर्ण हिऱ्यापासून बनवलेली आहे.\nसनी गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे. दरवर्षी तो स्वतः तर गणेश मंडळात सामील होतो तसेच दरवर्षी नित्यनेमाने लालबागच्या राजाचे न चुकता दर्शन घेतो. अनेक वर्षापासून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची त्याची हि परंपरा सुरु आहे.\nBollywood मध्येही सनीचे सिनेमा फायनांसमुळे चांगेल संबध आहे. तुम्ही त्याला कधी सलमानच्या कुटुंबासोबत तर कधी कपिल शर्माच्या सो मध्ये बघू शकता. राजकारणामध्येही त्याचे कुटुंब सक्रीय आहे.\nतर हि आहे सनी वाघचौरेची रॉयल लाईफ आहेन खासरे लाईफ कमेंट करा आणि कळवा आपल्या प्रतिक्रिया…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nsaheb ५०००te६००० रुपये महिना भर काम करून मिळतात .तो मिळवणारा म्हणजे सामानय माणूस .पण जे मुळातच गरीब कुटूंबात जन्म घेतो .तो कितीही राबला तरी सनी भाऊ सारखे त्याला राहता येत नाही .कारण जन्म अशा घरात झाला पाहिज़े .जे मुळातच गर्भ श्रीमंत आला पाहिजे\nGood morning सनी सर लक्षमी आणी कुबेर तुमच्यावर खूप च प्रसन्न दिसता ते असेच राहो\nपण तुमच सामाजिक कार्यक्रम तुमच्या योग्यते प्रमाणे झाले नाही म्हणून आपल्या बद्दल पिंपरी चिंचवड मध्ये राहून सुद्धा माहिती नाही\nPingback: जगातील सगळ्यात महागडे ११ मोबाईल...\n वाढदिवसाला ८०,००० लोक एवढा मित्रपरिवार असणारा फक्त टायगरच...\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास.. 1\nविश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास\n‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे.\nखाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले..\nलातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या मुंबई पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नांगरे-पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.\nविश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.\nदहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.\nया थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.\nसामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.\nपारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.\nतरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-20T16:27:00Z", "digest": "sha1:652MOT5LVLHSZFHBQOYWMRIJKEPHKV2I", "length": 8539, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शरद पवार नाणारला भेट देणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशरद पवार नाणारला भेट देणार\nसंघर्ष समितीचे नेत्यांनी घेतली भेट\nमुंबई – नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या संदर्भात केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी सामंजस्य करार केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. या प्रकल्पाला विरोध व्हावा यासाठी नाणारच्या संघर्ष समितीने राजकीय नेत्यांना साकडे घालायला सुरूवात केली आहे. समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या भेटीनंतर समितीचे सदस्य उद्या (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहेत.\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यापूर्वीच नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. कोकणातील जनतेवर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असतानाही ग्रामस्थांना अंधारात ठेवून केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.\nप्रकल्प हाणून पाडण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली आहे. नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पवार यांची “सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पवारांनी येत्या 10 मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगितले. नाणार ग्रामस्थ तसेच शेतकरी, मच्छीमार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रकल्पाच्या संदर्भात आपण भूमिका घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनुसूचित जाती-जमाती कायदा सौम्य होऊ देणार नाही – मोदी\nNext articleअमेरिकेचे सीरियावर हल्ले, फान्स-इंग्लंडचेही सहकार्य\nभिवंडीत शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, मृतदेह पेटवला\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\n“नाणार’ : होणार की जाणार\n…तर भारताला मिळू शकते ऑलम्पिकचे यजमानपद; प्रयत्न सुरू\nकुख्यात डॉन तात्या पटेलला अखेर अटक\nपाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेस गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:17:33Z", "digest": "sha1:HYPGY3UNBPBRVTYPDP2S4RFFILHK6QD2", "length": 25154, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयपीएलचे यश : पैसा की गुणवत्ता? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआयपीएलचे यश : पैसा की गुणवत्ता\nयंदा 12.5 कोटी मिळवून इंग्लडचा बेन स्टोक सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. भारतीय खेळाडूत जयदेव उनाडकट हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला त्याला साडेअकरा कोटी रुपये बोलीवर राजस्थान रॉयल्स्‌ने खरेदी केला. मराठमोळा केदार जाधवही 7 कोटी पेक्षा जास्त रक्‍कम मिळवत चेन्नई सुपर किंग्ज्‌कडे दाखल झाला.\nयंदा युवराज सिंगला केवळ 2 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले तर लसीत मलिंगा आणि टी-20 बादशहा क्रिस गेल यांच्यावर कोणी बोलीच लावली नाही. जगात ‘इमान आणि श्रध्दा’ या दोन-गोष्टी स्पर्धेत विकत घेतल्या जातात व सिद्धही केल्या जातात. या जागतिक खेळाडूंचा भरणा असणाऱ्या स्पर्धेतून गेल्या अकरा वर्षात भारताला एकही दर्जेदार यष्टीरक्षक फलंदाज मिळू नये यातच ही स्पर्धा किती ‘फ्लॉप’ ठरते हे स्पष्ट होते. महेद्रसिंग धोनी याचा पर्याय अद्यापही आपल्याला सापडत नाही हेच या 11 वर्षाच्या आयपीएलचे अपयश आहे. क्रिकेटची चिंता इथे आहेतच कोणाला कारण चौकार-षटकार घडतात, आयटम गर्ल नाचतात त्यात भारतीय अभिनेते व अभिनेत्रीही हातभार लावतात व करमणुकीच्या पातळीवर गेली 11 वर्षे ही ‘सर्कस’ यशस्वी झाल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सिध्द करते इतकेच.\nया स्पर्धेसाठी जी रक्‍कम लिलावादरम्यान बोली लावून खेळाडूला देण्यात येणार असते ती रक्‍कम व प्रत्यक्षात दिली जाणारी रक्‍कम यांत वसिम अक्रम ते आशिष नेहरा इतका मोठा फरक असतो. यंदा बेन स्टोक्‍सला 12.5 कोटी रकमेत खरेदी केले गेले. या करारांचे ढोबळ स्वरूप आता समजून घेवू. स्टोक्‍सला संघाचा प्रत्येक सामन्यात खेळावे लागेल. समजा एका स्पर्धेत एका संघाला 12 सामने मिळणार असतील तर त्या सर्व सामन्यांत स्टोक्‍स ‘प्लेईंग इलेव्हन’ मध्ये हवा. तसेच त्याची कामगिरी हा देखील एक निकष आहे. उपांत्य व अंतिम सामन्यांत त्याची कामगिरी अन्य खेळाडूंपेक्षा सरस हवी. फलंदाजीत प्रमुख धावा आणि गोलंदाजीत ठराविक बळीही मिळायला हवेत. तो जर कर्णधार असेल तर संघाची विजयाची सरासरी 100 टक्के हवी. त्यात सामनावीर वा मालिकेचा मानकरी ठरणे हा देखील एक भाग आहे.\nहे झाले मैदानावरील कामगिरीबाबत. आता संघाच्या प्रत्येक ‘प्रमोशन इव्हेंट’ला कोणत्याही वेळी तो उपलब्ध असावा. मैदानावर व मैदानाबाहेर कोणत्याही वादात त्याचे नाव येता कामा नये. स्पॉट फिक्‍सिंग, बुकी, नाईट पार्टी, डेटींग या पैकी कोणत्याही गोष्टीत त्याचा सहभाग नसावा. खेळाडूंशी, पंचाशी व प्रेक्षकांशी त्याचे वर्तन शिस्तबध्दच असावे. हे आणि असे सगळे अडथळे पार केले तर आयकर, होल्डींग मनी वगैरेंसारखे पोट नियम वापरून स्टोक्‍सला या रकमेच्या अर्धी रक्‍कम तरी मिळेल का याची खात्री नाही. स्टोकला शिस्तभंगाची कार्यवाही म्हणून इंग्लडने ऍशेस मालिके तून वगळले त्याला आयपीएलमध्ये मात्र स्वीकारले गेले म्हणजेच या स्पर्धेला खेळाडूच्या मैदानाबाहेरील वर्तनाशी कोणतेही देणे-घेणे नाही हेच स्पष्ट होते.\nया स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्मा, हरभजनसिंग, युवराज सिंग, आर. अश्‍विन, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, संजु सॅमसन, शेन वॉर्न, जहीर खान, प्रविण तांबे, जॅक कॅलीस, स्मिथ, सनथ जयसुर्या याच खेळाडूंना जितकी बोली लावली गेली ती रक्‍कम दिली गेल्याचे सांगितले जाते. म्हणजेच स्पर्धेतील सर्व संघ मिळून जितके खेळाडू असतील त्यातील केवळ 2-5 टक्‍के खेळाडूंना संपूर्ण रक्‍कम मिळाली बाकीच्यांना ‘आश्‍वासन आणि गाजर’. आयकॉन खेळाडूंना या यादीत धरलेले नाही कारण सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली, राहुल द्रविड या आयकॉन खेळाडूंचा करार व त्याचे निकष वेगळे होते. असो, करार कोटी-कोटी रूपयांचा जरी मिळाला तरी प्रत्यक्षात दिसणारी रक्‍कम अर्थसंकल्पीय त्रुटींसारखी फसवीच असते.\nलोढा समिती काय करणार \nमाजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कारभाराबाबत काही सूचना व शिफारशी केल्या आहेत. लोढा अहवालाला एक प्रकारे केराची टोपलीच मंडळाने दाखवली आहे.\nआयपीएल व अन्य स्पर्धांतील सामन्यांत प्रत्येक षटकांनंतर ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यावरही बंदी देण्याबाबत लोढा यांनी सुचवले आहे. अशा स्थितीत आयपीएल व इतर स्पर्धेतून मिळणारे जाहिरातींचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडण्याची भीती मंडळाला वाटते आहे. जाहिराती बंद झाल्या तर उत्पन्न बुडेल व त्याचा पूर्ण परिणाम स्पर्धांवर, सामन्यांच्या आयोजनावर, थेट प्रक्षेपणावर व निवृत्त खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ‘पेन्शन’वर होईल हे उघड आहे. मुळात आयपीएल जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीची दोन-तीन वर्षे त्याची तुफान लोकप्रियता होती आज मात्र त्याला ओहोटी लागलीये. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग, सट्टेबाजी सर्व उघड झाल्यानंतर तर या स्पर्धेपासून मूळ क्रिकेटचा चाहता दुरावला आहे..\nभारताच्या युवा संघातील (19 वर्षांखालील) खेळाडूंनी आयपीएल खेळावी का खेळू नये याबाबत खूप दिवस चर्चा रंगत आहे. कसोटी, एकदिवसीय क्रिकेटसाठी लागणारी एकाग्रता, फटक्‍यांची निवड व बचाव यासाठी युवावस्थेत आयपीएल घातक ठरू शकते असे अनेक वरिष्ठ खेळाडू सांगतात. पण कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसा हे गणित सध्या खेळाडू, प्रशिक्षक व पालक सोडवतात. आमचा मुलगा अगदी सचिन बनला नाही तरी चालेल पण त्याला आयपीएल खेळायला मिळावी असे पालक म्हणू लागलेत. हीच भारतीय क्रिकेटसाठी धोक्‍याची घंटा आहे. कसोटीसाठी लागणारे भक्‍कम तंत्र हे खेळाडू आयपीएलमुळे गमावून बसतात आणि म्हणूनच एकेकाळी फिरकी समोर दादागिरी करणारे भारतीय फलंदाज आज परदेशी फिरकी गोलंदाजीसमोर ‘पिंगा’ घालताना दिसतात. पृथ्वी शॉ, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शुभमन गील, अभिषेक शर्मा, इशान किशन, ऋषभ पंत, सर्फराज खान, महीपाल लोमरोर, अरमान जाफर हे युवा खेळाडू खरेतर उद्याच्या भारतीय संघाचे ‘बिग फिश’ होवू शकतात मात्र आयपीएलच्या ‘हिट आऊट गेट आऊट’ तत्वामुळे त्यांचे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. पण त्याला कोणीच काही करू शकत नाही. मंडळानेच जर पाऊले ओळखली तर अशा खेळाडूंना आयपीएल बंदी लावता येईल व संघाची भविष्यकालीन तरतूद करता येईल.\nइंग्लिश प्रिमिअर लिग, एनबीए, कौंटी क्रिकेटचा आदर्श घेत आयपीएल सुरू झाले. त्यांनी त्यांचा दर्जा सांभाळालाच नव्हे तर उंचावला पण आपण त्याच्या आहारी जाऊन तंत्रशुद्ध फलंदाजीचा खून करत आहोत. मुली नाचतात काय, समालोचन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात काय, सगळेच अनाकलनीय आहे. क्रिकेट हा खेळ होता एकेकाळी, एकेकाळी तो सज्जनांचाच होता पण आज त्याचा बाजार झालाय. जनावरे किंवा पूर्वी आफ्रिकेतले लोक अमेरिकेत गुलाम म्हणून विकले जायचे इथे क्रिकेटपटू विकले जातात. जो जास्त पैसा देईल त्याच्यावर त्या मोसमापुरती श्रद्धा ठेवायची नाही तर दुसऱ्या वर्षी नवीन घरोबा करायचा व त्याच्या नावाचे कुंकू लावायचे. कली शीरलेले युग म्हणतात ते हेच. यातून क्रिकेटचे, खेळाडूंचे काय भले होणार याचा साधा विचारही करायला कोणाला वेळ नाही.\nआयपीएल स्पर्धेला इंडियन प्रिमिअर लीग म्हणावे का इंडियन पैसा लीग आता या स्पर्धेने इतर देशांच्या संघांनी काय कमावले व आपण काय गमावले हे बघु. याच स्पर्धेतून गुणवत्ता हेरून वेस्ट इंडीज संघाने टी-20 विश्‍वकरंडक जिंकला व गतवैभवाकडे वाटचाल सुरू केली. अन्य संघांनाही या स्पर्धेतून ‘मॅचविनर’ खेळाडू मिळत आहेत पण भारतीय संघाला या स्पर्धेतून गेल्या दहा वर्षात पैसा सोडून बाकी काहीही गवसले नाही ही वस्तुस्थिती आहे. मुळात आयपीएल मधली कामगिरी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी ग्राह्यच धरली जात नाही. आज तरी आपला टी-20 चा संघ पहा, जो संघ एकदिवसीय आणि कसोटीसाठी आहे, त्यातच संगीत खुर्चीचा खेळ ठेवतात, जागा बदलतात व टी-20 संघ तयार होतो. आयपीएलमधून असा एकही खेळाडू नाही की ज्याने भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले आहे व पक्‍के केले आहे. उलट बाकीच्या जवळपास प्रत्येक संघात याच स्पर्धेतून नावारूपाला आलेले खेळाडू स्थान टिकवून आहेत. गेल, सॅम्युअल, सिमन्स वगैरेंना याच स्पर्धेतून विंडीज संघात स्थान मिळाले व त्यांनी टी-20 विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया साधली. बाकीचे देश गुणवत्ता मिळवतायेत आणि आपण फक्‍त पैसा.\nस्टीव स्मिथ, शॉन मार्श, जेम्स फ्लॉकनर (ऑस्ट्रेलिया), जे. पी. डयुमिनी, फाफ टु फ्लेसी, डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), सकीब अल हसन, मशफीहुर रहीम, मशरफी मोर्तझा (बांगला देश), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, तिसेरा परेरा, अँजेलो मॅथुज (श्रीलंका), मार्टीन गुप्टील, ब्रैडन मॅकलम, कोरी अँडरसन, रॉस टेलर (न्यूझीलंड), जो रूट, ऍलक्‍स हेल, जोस बटलर, केवीन पीटरसन (इंग्लंड) या देशांना हे असे मॅचविनर खेळाडू याच स्पर्धेने दिले. भारताकडे यादीच नाही.\nरूद्रप्रताप सिंग, आर. अश्‍विन, रविंद्र जडेजा, जहीर खान किंवा संपूर्ण भारतीय संघाचे अनेक खेळाडू वेगवेगळया संघांकडून खेळतात मात्र हे ‘आयपीएल फाईंड’ नाहीत. ते मुळात रणजी स्पर्धेतून भारतीय संघात निवडले गेले आहेत. आज ही स्पर्धा अकरा वर्षांची झाली मात्र आजही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या स्पर्धेतील कामगिरीची दखल घेवून संघ निवडत नाही. बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या रोहित शर्मा, शिखर धवन व मधल्या फळीत अपयशी ठरत असलेल्या सुरेश रैनाला यंदाच्या स्पर्धेतून पर्याय मिळाला तरच भारताचे ‘मिशन 2019’ यशस्वी होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्जेन्टिनाला दुष्काळाचा फटका; सोयाबीनसाठी अमेरिकेची मागितली मदत\nNext articleडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याचा निषेधार्थ नांदेडात रास्ता रोको\nIPL 2018 : नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय\nआयपीएलमुळे गेला विद्यार्थ्याचा बळी\nIPL 2018 : पुनरागमनासाठी चेन्नई-राजस्थान उत्सुक\nIPL 2018 : धोनीचा सहभाग अनिश्‍चित\nIPL 2018 : सेहवाग म्हणतो, गेलची निवड करून आयपीएल वाचवले…\nIPL 2018 : गेलच्या झंझावाती शतकाचा युवराजने ‘असा’ व्यक्त केला आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2018-04-20T16:40:51Z", "digest": "sha1:VA3BC3GO2EABN3CSJW7UOH5X4N7LYC7N", "length": 5977, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ - विकिपीडिया", "raw_content": "इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा होता. या कायद्यान्वये ब्रिटिश सरकारने कायदेकानून बनवण्यासाठी ६ ते १२ सभासदांची समिती नेमण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला. अन्य गव्हर्नरांनाही त्याच कामासाठी ४ ते ८ सदस्यांची समिती नेमण्याचे अधिकार दिले गेले. हे सर्व सदस्य भारतीय असत. ब्रिटिश सरकारने राज्यकारभारातील भारतीयांचा सहभाग वाढवला. भारतीय मंत्र्यांच्या हाती राज्यकारभार बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोपवण्यात आला. गव्हर्नर जनरल आणि अन्य गव्हर्नरांच्या हाती बरेच अधिकार आणि नकाराधिकार कायम ठेवले. हायकोर्ट अ‍ॅक्टद्वारे न्यायालयाची फेररचना करण्यात येउन मद्रास, कलकत्ता आणि मुंबईत न्यायालये स्थापन झाली.\nब्रिटिश भारताचा घटनात्मक इतिहास\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ · अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ · पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ · चार्टर अ‍ॅक्ट १७९३ · चार्टर अ‍ॅक्ट १८१३ · चार्टर अ‍ॅक्ट १८३३ · चार्टर अ‍ॅक्ट १८५३ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ · मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ · मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ · इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट १९४७\nया कायद्यानुसार प्रांतिय पातळीवर विधानमंडळे स्थापन करण्यात आली...\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१५ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:40:57Z", "digest": "sha1:VG3TTTN2ASMNDHFI3EKE7U2SNUTBJBHA", "length": 4082, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इज्जतनगर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइज्जतनगर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बरैली शहराचा एक भाग आहे. येथे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय, डीझेल लोको शेड तसेच रेल्वे यांत्रिकी कार्यशाळा आहेत. याशिवाय इज्जतनगर मध्ये केन्द्रीय पक्षी संशोधन संस्था, भारतीय पशु संशोधन संस्था आणि हार्टमन कॉलेज या संस्थाही आहेत.\nभारतीय वायुसेनेचा त्रिशूल वायुसेना तळ येथे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१५ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/04/blog-post_89.html", "date_download": "2018-04-20T16:42:30Z", "digest": "sha1:FNKMK7QQVYJ3FXMFI74CCGBDDTNRVMMQ", "length": 23336, "nlines": 182, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २३ एप्रिल २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २३ एप्रिल २०१५\n२३ एप्रिल : जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन (World Book & Copyright Day)\nव्यावसायिक वाद-विवाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या न्यायालयाअंतर्गत ९० दिवसांच्या आत व्यावसायिक वाद-विवादांबाबत निर्णय देण्यात येणार आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने व्यावसायिक न्यायालय (कमर्शियल कोर्ट) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. व्यावसायिक न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत जलद होईल असा विश्वास व्यक्त जात आहे.\nतपास आणि चौकशीस सहकार्य न करण्याऱ्या पक्षावर दंड आणि कारवाई करण्यात येणार आहे. व्यावसायिक न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि कार्यकाळ २ वर्षांचा असेल.\nदेशभरात सध्या १६ हजार ८८४ व्यावसायिक खटले प्रलंबित पडले आहेत.\nदिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदी सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर आयोजित शेतकऱ्यांच्या सभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असतानाच हजारोंच्या जमावादेखत राजस्थानातील गजेंद्रसिंह (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nया प्रकाराचा सखोल तपास करण्याचे निर्देश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना दिले.\nमृत गजेंद्रसिंह राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत तो याच सभेत आत्महत्या करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याने या चिठ्ठीत अखेरीस ‘जय जवान, जय किसान’ असे म्हटले आहे. आपली शेती उद्‌ध्वस्त झाल्याने वडिलांनी आपल्याला घरातून बाहेर काढले. आपल्याला ३ मुले आहेत. आपण बर्बाद झालो आहोत व आपल्याला घरी जाण्याचा उपाय सांगा, असे त्याने त्यात म्हटले आहे.\nकेजरीवाल यांनी गजेंद्रसिंह याच्या कुटुंबीयांना १ कोटीची मदत तेथेच जाहीर केली.\nबलात्कार व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील संशयितांचे वय १६ ते १८ वर्षांच्या दरम्यान असले तरी त्यांच्यावर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणेच खटला भरण्याची व कठोर शिक्षेचीही तरतूद असलेल्या कायदा दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nत्याचप्रमाणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस्‌ कायदा दुरूस्तीलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे कायद्याला मंजुरी मिळाल्यावर गंभीर गुन्हे करणाऱ्या बालगुन्हेगारांवरही भारतीय दंडविधानानुसार खटला चालवता येईल.\nदिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर बालगुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर आणण्याची मागणी पुढे आली होती. महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी या विधेयकातील दुरुस्तीबाबत विशेष आग्रही होत्या. मात्र त्यासाठी सध्याच्या ज्युवेनाईल जस्टीस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन-२०१४) कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक आणावे लागणार होते.\nमोदी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असला तरी यापूर्वी दोनदा हे दुरुस्ती विधेयक मंत्रिमंडळासमोर येऊन माघारी गेले होते. बालहक्कांसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था याच्या विरोधात होत्या. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांनीही बालगुन्हेगार कायद्यातील प्रस्तावित वय बदलाबाबत प्रतिकूल मतप्रदर्शन केले होते.\nदेशात २०१५ या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला. यंदा सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.\nनैर्ऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस ९६ टक्क्यांचीही सरासरी गाठू शकणार नाही.\nविज्ञान व तंत्रज्ञानमंत्री : डॉ. हर्षवर्धन\nफळमाशीच्या प्रादुर्भावामुळे युरोपीय देशांनी आंबा व भाजीपाला आयातीवर गतवर्षी बंदी घातली होती; परंतु यावर्षी अशाप्रकारे परदेशी आंबा निर्यातीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाने कोकणातील पाच जिल्ह्यांसह तेरा जिल्ह्यात ‘मॅंगोनेट’ची अंमलबजावणी केली.\nनिर्यादाराला थेट आंबा बागायतदारांशी ऑनलाइन जोडून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.\nमध्यस्थांना बाजूला काढून रास्त दरात निर्यातदारांना आंबा मिळेल आणि त्याचा थेट फायदा बागायतदारांना होईल, अशी व्यवस्था यातून केली गेली.\nतसेच परदेशात आंबा निर्यातीसाठी नियम पाळावे लागतात. त्याची अंमलबजावणी कशी केली जाते. याची माहिती मॅंगोनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली गेली. त्यासाठी बागायतदारांचे प्रशिक्षणही घेतले होते. त्याचा फायदा या मोसमात दिसून येत आहे.\nआतापर्यंत सुमारे ५५ ते ६० टन आंबा युरोपला निर्यात गेला आहे.\nप्रख्यात गीर अभयारण्यातील सिंहांची गणना दोन ते पाच मेदरम्यान केली जाणार आहे. भारतात दर पाच वर्षांनी सिंहगणना करण्यात येते.\n२२ हजार चौरस किलोमीटर परिसरात ही गणना होईल. २०१० मध्ये झालेल्या गणनेत दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्र होते. तेव्हा तीन जिल्ह्यांत गणना झाली होती; यंदा आठ जिल्ह्यांत होईल.\nआशियाई सिंहांचे देशातील हे एकमेव आश्रयस्थान आहे. अन्नाच्या, म्हणजे भक्ष्याच्या शोधात गीरमधील सिंह किनारपट्टी तसेच सौराष्ट्रातील राखीव जंगलप्रदेशात जात असल्यामुळे गणनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.\n२०१०च्या गणनेत माद्या व छाव्यांसह ४११ सिंहांची नोंद झाली होती.\nवाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा अशी मागणी गुजरातमधील राज्यसभा खासदार परिमल नटवानी यांनी नुकतीच केली आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. १९५२-१९७२ या काळात सिंहच भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. मात्र, वाघांची संख्या वेगाने घटल्यामुळे नंतर केंद्र सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केले.\nरेल्वे मंत्रालयाकडून युटीएस मोबाइल (utsonmobile) तिकिट अॅप अपडेट करण्यात आले आहे. या अॅपद्वारे रेल्वेचे अनारक्षित तिकीट काढणे अगदी सोपे होणार असून रांगांमध्ये उभे राहाण्याच्या त्रास वाचणार आहे.\nज्यामुळे आता अॅपवर तिकीट बूक करून टिसींना केवळ मोबाइलवरील तिकीट दाखवावे लागेल. यामुळे प्रवाशांना पेपरलेस तिकीट सुविधा मिळणार आहे.\nतसेच या अॅपचे वैशिष्ट म्हणजे या अॅपसाठी जीपीएस सिस्टिमचा आधार घेण्यात आला आहे. जेणे करून तिकीट कोणत्या ठिकाणापासून काढले हे आहे हे ट्रॅक करता येईल.\nनांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसला बहुमत मिळाले असून १९ पैकी १२ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.\nतीन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर दोन ठिकाणी भाजप आणि दोन जागा अपक्षांनी पटकावल्या आहेत.\nयुद्धभूमीमध्ये शत्रुराष्ट्राच्या सैनिकांना चारीमुंड्या चित करणाऱ्या तिसऱ्या गोरखा रेजिमेंटमधील पहिली तुकडी दोनशेव्या वर्षात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या तुकडीमध्ये कुमाऊँ आणि गढवाल भागातील सैनिकांचाही मोठ्या प्रमाणावर भरणा आहे.\nसर रॉबर्ट कलकोहान यांनी उत्तरांचलच्या अल्मोडा भागामध्ये २४ एप्रिल १८१५ रोजी स्वतंत्र गोरखा रेजिमेंटची स्थापना केली होती.\nसध्या गोरखा रेजिमेंटकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील आघाडीची धुरा सोपविण्यात आली आहे. याच रेजिमेंटला ‘१/३ गोरखा रायफल्स’ या नावाने ओळखले जाते.\nया रेजिमेंटने आतापर्यंत दोनशेपेक्षाही अधिक पदके आणि पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये अशोक, कीर्ती आणि शौर्यचक्राचा समावेश असून पद्मभूषण हा प्रतिष्ठित नागरी सन्मान देखील या रेजिमेंटच्या वाट्याला आला आहे.\nगोरखा रेजिमेंटप्रमाणेच मद्रास आणि ग्रेनेडियर्स रेजिमेंट (१७५८), पंजाब रेजिमेंट (१७६१), राजपुताना रेजिमेंट (१७७५), राजपूत रेजिमेंट (१७७८), जाट रेजिमेंट (१७९५) आणि कुमाऊँ रेजिमेंट (१८१३) यांनाही प्राचीन, गौरवशाली इतिहास लाभला आहे.\nकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला ब्रिटीश मानक संस्थेकडून (British Standard Institutes) ISO ९००१:२००८ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ एप्रिल २०१५\nभूकंप - नैसर्गिक आपत्ती\nचालू घडामोडी - २६ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - २५ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी : २४ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - २३ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - २२ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - २१ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १८ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १७ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १६ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १५ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १४ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १३ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १२ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ११ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १० एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ९ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ८ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ७ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ६ एप्रिल २०१५\nप्रश्नसंच १५२ - विज्ञान व तंत्रज्ञान\nचालू घडामोडी - ५ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ४ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ३ एप्रिल २०१५\nप्रश्नसंच १५१ - अर्थशास्त्र\nचालू घडामोडी - २ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - १ एप्रिल २०१५\nचालू घडामोडी - ३१ मार्च २०१५\nपंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ पुर...\nचालू घडामोडी - ३० मार्च २०१५\nचालू घडामोडी - २९ मार्च २०१५\nचालू घडामोडी - २८ मार्च २०१५\nअटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान\nचालू घडामोडी - २७ मार्च २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-04-20T16:20:05Z", "digest": "sha1:6MPDUBCIMPQTZCWYG276T6WYBMC6Z7UF", "length": 9642, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“रामप्रहर’ने भागविली पक्ष्यांची तहान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“रामप्रहर’ने भागविली पक्ष्यांची तहान\nआपण निसर्गाचा एक घटक आहोत आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले आध्य कर्तव्य या भावनेतून आम्ही हा उपक्रम केला आहे. तरी वाई शहर व परिसरातील नागरिकांनी आपआपल्या इमारतीचे टेरेसवर, परिासरातील झाडांवर, गॅलरींमध्ये वरील प्रमाणे निसर्गाचा समतोल साधणाऱ्या छोट्या जीवांसाठी पाण्याची सोय करावी. रामप्रहर ग्रुपतर्फे पक्षांसाठी अशी भांडी उपलब्ध करून वाईतील शाळांमधील मुलांना मोफत देणार आहोत, अशी माहिती ग्रुपच्यावतीने देण्यात आली.\nवाई -पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या “रामप्रहर’ ग्रुपने उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन पक्ष्यांसाठी घाटातील झाडांवरच पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. “रामप्रहर’च्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.\nफेब्रुवारीपासून सूर्यनारायण तळपू लागला आहे. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरातही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका पशु पक्ष्यांनाच बसत असतो. अनेकवेळा पाण्याविना पक्ष्यांचा जीवही जातो. तसेच पाण्यासाठी वणवण फिरत असताना त्यांची शिकारही होण्याची शक्‍यता असते. या साऱ्या गोष्टीचा विचार करत “रामप्रहर’ने पक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचे ठरविले. आणि त्या पार्श्‍वभूमीवर “रामप्रहर’ ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पसरणी घाटातील झाडांवर प्लास्टिकची भांडी बांधून त्यामध्ये पाणी ठेवले. या भांड्यामधील पाणी बदलण्याचेही ग्रुपच्यावतीने नियोजन करण्यात आले.\nयामध्ये पसरणी घाटात अनेक ठिकाणी झाडांवर पक्षांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली असून सकाळी व संध्याकाळी घाटात फिरायला येणारे तरूण, महिला, जेष्ठ नागरिक यांनी दररोज भांडयामध्ये पाणी ओतण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या रामप्रहर ग्रुपच्या 16 सदस्यांच्या माध्यमातून 45 झाडांवर पक्षांसाठी भांडी लावण्यात आली आहेत. तरी वाई शहरातील अनेक नागरीक पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी दररोज जात असतात तेव्हा प्रत्येक नागरिकांनी घाटात फिरायला जाताना एक पाण्याची बाटली नेहून ठिकठिकाणी लावलेल्या भांड्यामध्ये ओतून सहकार्य करावे असे अवाहन ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमी 16 एप्रिलपासून बसणार उपोषणाला – प्रवीण तोगडिया\nNext articleजय भीम जयघोषाने शाहुनगरी दुमदुमली\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nजाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…\nमहिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा\nशिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा वाईचे वैभव ठरेल\nसातारा: फुलांचा बहर पाडतोय दुष्काळाचा विसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-rohan-bopanna-tennis-90063", "date_download": "2018-04-20T17:02:21Z", "digest": "sha1:RKLRY5G5Q3ZU36RETNUGXKFIYWHECJ3R", "length": 13563, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news rohan bopanna tennis गतविजेता बोपण्णा ‘पुणेकर’ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nलिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही.\nलिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही.\nहे सारे घडत असताना दुहेरीत या दोघांइतका करिश्‍मा नसलेल्या भारतीयाने तिरंगा फडकावित ठेवला आहे. त्याचे नाव रोहन बोपण्णा. जागतिक क्रमवारीत त्याने टॉप टेनमधील स्थान सातत्याने टिकविले आहे. २०१३ मध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली होती. असा हा बोपण्णा मूळचा कुर्गचा असला तरी त्याचे पुण्याशी नाते आहे. १९९४ ते ९९ दरम्यान तो पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. पुण्यात तो सॅटेलाईट मालिकांत खेळला आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार फ्रान्सचा एदुआर्द रॉजर-वॅसेलीन आहे. त्याने मोसमाच्या प्रारंभी दोन आठवड्यांचे ब्रेक घेणार असल्याचे कळविले. त्यामुळे बोपण्णाला चेन्नईत देशबांधव जीवन नेदून्चेझीयन याच्या साथीत मिळविलेले विजेतेपद राखण्याची संधी मिळाली. ज्या पुण्यात काही काळ राहता आले तेथे नव्या मोसमाचा प्रारंभ करण्यास बोपण्णा आतुर आहे.\nअमेरिकन टेनिस की इंडोनेशियातील आशियाई स्पर्धा, याविषयी निर्णय घ्यावा लागेल, असे सांगताना त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धेला प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले. आपल्याला त्या स्पर्धेत दोन हजार गुण राखायचे आहेत. त्यामुळे ते आवश्‍यक आहे, असे तो म्हणाला.\nजिद्द बळावते - चिलीच\nसरलेल्या मोसमाच्या प्रारंभी रॉजर फेडरर-रॅफेल नदाल यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली होती. त्या वेळी नव्या पिढीतील कोणते तारे चमकतात याची प्रतीक्षा होती, तर मधल्या पिढीतील मरिन चिलीच याच्यासारख्या खेळाडूंकडूनही अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात फेडरर-नदालने चार पैकी दोन-दोन ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे वाटून घेतली. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना कशी प्रेरणा मिळते, या प्रश्नावर चिलीच म्हणतो की, आमची जिद्द वाढते. आणखी कसून सराव करण्याची प्रेरणा मिळते. मी मागील मोसमापेक्षा सरस कामगिरीचे ध्येय ठेवले आहे.\nमच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह\nवणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:23:14Z", "digest": "sha1:VUE2DXLQEDB4AH6CPLWSQQGATSVFCVVM", "length": 7693, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरीत द्यावीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरीत द्यावीत\nफलटण – सन 2017- 2018 या वर्षाच्या गळीत हंगामातील थकीत ऊस बिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. तरी त्वरीत थकीत बील रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nतालुक्‍यातील श्रीराम कारखाना वगळता न्यू फलटण शुगर वर्क्‍स साखरवाडी या कारखान्याने सन 2017-2018 या वर्षाच्या गळीत हंगामातील 15 नोव्हेंबरपासून मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे बिल अद्याप 2650 रुपयांनी दिलेले नाही. हे थकीत ऊस बिल रक्कम शासन नियमानुसार 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच स्वराज ग्रो लिमिटेड शुगर वर्क्‍स या कारखान्याने जानेवारी ते मार्च या कालावधीमधील गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता ठरल्याप्रमाणे अद्याप दिला नाही. तो त्वरित द्यावा. शरयु ग्रो लिमिटेड शुगर वर्क्‍स या साखर कारखान्याने 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 2350 रुपये प्रमाणे काढले आहे. ते 2650 रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. 2350 प्रमाणे होत असलेले बिल शेतकऱ्यांनानी मान्य नाही. वरील मागणीप्रमाणे थकीत रक्कम व फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुको बॅंकेत 621 कोटींचा घोटाळा\nNext articleमहू इथल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन\nपुणे जिल्हा: हक्काचे पाणी देता का कोणी \nकुरकुंभमध्ये मटका, जुगारावर पोलिसांचा छापा\nपुणे जिल्हा: चौथ्या दिवशी मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह\nकळंब येथे आज सामुदायिक विवाह सोहळा\nपुणे जिल्हा: दिवळेत मध्यरात्री दोन बिबट्यांचा धूमाकूळ\nकठुआ प्रकरणी उरुळी कांचनमध्ये मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-minister-pees-on-the-road-274637.html", "date_download": "2018-04-20T16:37:32Z", "digest": "sha1:Z4YD4COBRTKGIFLRIQF7325E3G4R2FV5", "length": 11655, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वच्छ भारत अभियानाला मंत्र्याकडूनच हरताळ; राम शिंदेंची उघड्यावर लघुशंका", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nस्वच्छ भारत अभियानाला मंत्र्याकडूनच हरताळ; राम शिंदेंची उघड्यावर लघुशंका\nमंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.\nबार्शी, 19 ऑक्टोबर: देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या या सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी चक्क सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.त्यामुळे राज्यातील मंत्रीच जर या अभियानाला हरताळ फासत असतील तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.\nराज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव येथील कामाची त्यांनी पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.\nमात्र मंत्रीच असं वागत असतील तर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला तडा बसत असल्याचं जाणकारांचा म्हणणं आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nराजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=2829", "date_download": "2018-04-20T16:43:38Z", "digest": "sha1:W535M24SOPAIQ34KR4YVJ25KLHY7I3EO", "length": 17763, "nlines": 105, "source_domain": "rajtantra.com", "title": "जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत! | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » विशेष लेख » जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत\nजिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत\nडहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल या जबाबदारी सांभाळत आहेत. त्या अननुभवी आहेत. यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात हे खरे आहे. त्यांच्या प्रशासकिय कारकीर्दीतील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्यावर आदिवासी प्रकल्प अधिकारी व उप विभागीय अधिकारी या पदांची जबाबदारी आहे. यामुळे त्यांच्यात अधिकारीपदांची हवा असण्याचे देखील समजू शकतो. त्यातही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांना निवडणूक यंत्रणेची कवचकुंडले प्राप्त झालेली आहेत. ही कवचकुंडले निवडणूका निर्भय आणि तटस्थपणे पार पाडण्यासाठी आहेत यांचे भान मात्र निवडणूक अधिकार्‍यांना असले पाहिजे. हे भान नसेल तर तशी जाणीव देण्याचे काम आपण जिल्हाधिकारी म्हणून केले पाहिजे. मात्र आपण हे कामपणे चोख पार पाडलेले नसल्यामुळे लोकशाहीचे नुकसान झाले आहे.\n1 जून 1992 रोजी 74 व्या घटना दुरुस्तीद्वारे नगरपालिकांना भारतीय राज्यघटनेने घटनात्मक स्थान दिले. त्याला काही दिवसांत 25 वर्षे पुर्ण होत आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होता येते. डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरावयाचे असल्याने लोकांना अडचणी आल्या. डहाणूच्या निवडणूक निर्णय अधिकारी गोयल यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पुरेशी जनजागृती नाही. लोकांना मदतीसाठी केंद्रे देखील सुरु करण्यात आली नाहीत. गोयल यांच्या बाजूला असलेल्या कॉम्प्युटर व प्रिंटर आणि ऑपरेटर या व्यवस्थेला ते मदत केंद्र म्हणत असले तरी तेथे सर्वसामान्य व्यक्तीला प्रवेश नव्हता. ज्या जागेवार माध्यम प्रतिनिधीला प्रवेश नाही त्या ठिकाणी सामान्य लोकांना प्रवेश होता असे मानता येणार नाही. यामुळे ज्यांच्या पाठीशी राजकिय बळ आहे अशा लोकांनाच उमेदवारी अर्ज भरता आले. यामुळे महिला, गरीब, दुर्लक्षीत घटकांतील उमेदवारांचा रस्ता बिकट झाला. अशातही 141 नागरिकांनी उमेदवारी अर्ज भरले.\nउमेदवारी अर्ज भरुन घेताना राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रक क्र. रानिआ/ मनपा 2017/ प्र.क्र. 32/ का. 5 मधील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाले. यामुळे 31 उमेदवारी अर्ज उमेदवारांची सही नाही, सुचकाची सही नाही अशा किरकोळ कारणांनी बाद ठरविण्यात आले. या बाद झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 11 महिला, 7 अनुसूचित जमाती व 3 अनुसूचित जातींचे उमेदवार व इतर मागास प्रवर्गातील 3 उमेदवारांचा समावेश होता. आपणाला याची लाज वाटत असेल किंवा नसेल, आमच्या भावना तिव्र आहेत. आपणा सर्वांनी नीट अभ्यास करुन जबाबदार्‍या पार पाडणे अपेक्षीत होते. आपण स्वत: याबाबत समजून घेतले नाही आणि गोयल यांना देखील समजावले नाही. आता आम्ही सदरील परिपत्रक 28 नोव्हेंबर 2017 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले असले तरी वेळ निघून गेली आहे. छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांमध्ये 2 विद्यमान नगरसेवकांचा समावेश होता. या नगरसेवकांना व न्यायालयात दाद मागणार्‍या अन्य 4 जणांना न्यायालयाने दिलासा दिला असून गोयल यांचे निकाल फिरवले आहेत. जे उर्वरीत लोक न्यायालयात जाऊ शकले नाहीत असे 25 जण निवडणूकीच्या रिंगणाबाहेरच राहीले.\nआम्ही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात लोकांच्या ज्या भावना छापत आहोत, त्याच भावना न्यायालयीन निकालांमध्ये व्यक्त झाल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने निवडणूक अपील क्र. 1/2017 व अन्य 4 प्रकरणी निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कामकाज केले नसल्याचा ठपका ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील रिट पिटीशन क्र. 13475/2017 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या ज्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे अशा निकालाच्या आधारावर नगरसेवक सईद शेख यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याचे निरिक्षण नोंदविले आहे. तपशिलात गेल्यानंतर जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही देखील नगरसेवक सईद शेख यांना दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी उच्च न्यायालयाच्या ज्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे अशा निकालाच्या आधारावर अपात्र ठरविल्याचे समोर येत आहे. तुमच्या या आदेशाला राज्यमंत्र्यांची स्थगिती असताना त्याकडेही दुर्लक्ष करुन गोयल यांनी सईद यांना अपात्र ठरविले. तुम्ही हे सर्व ठरवून केले का तसे असेल तर ते लोकशाहीचा गळा घोटणारे आहे. आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हे कदापी खपवून घेणार नाही.\nPrevious: स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टा्रचारमुक्त कारभारासाठी मी निवडणूक लढवितोय\nNext: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार\nबोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर\nजिल्हाधिकारी डॉ. नारनवरे 3 बळींची जबाबदारी कोण घेणार\nअदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 5 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती\nडहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा भाग १ ; भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-tata-open-tennis-competition-90065", "date_download": "2018-04-20T17:02:34Z", "digest": "sha1:75TYY3ECVKE3FZDYGHQ3BBJAQI34HISB", "length": 16951, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news tata open tennis competition मुडी जोडीदारासह अर्जुनची शिकस्त | eSakal", "raw_content": "\nमुडी जोडीदारासह अर्जुनची शिकस्त\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nबेनॉईट काही चांगले फटके मारत होता. दुसरीकडे कढेचीची फर्स्ट सर्व्ह अत्यंत भक्कम झाली. पहिल्या नऊ-दहा सर्व्हिस आत आल्या. हे निव्वळ अविश्वसनीय वाटले. त्याने प्रारंभी एकही शॉट चुकविला नाही. तो अनुभवात कमी असल्यामुळे त्याला टार्गेट करण्याचे आमचे डावपेच नव्हते. तसे होऊ शकत नाही. त्याचा खेळ चांगला वाटला.\n- रॉबीन हासी, नेदरलॅंड्‌सचा टेनिसपटू\nपुणे - पुण्याच्या अर्जुन कढेने फ्रेंच जोडीदार बेनॉईट पैरे याच्या साथीत टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत प्रयत्नांची शिकस्त केली; पण द्वितीय मानांकित नेदरलॅंड्‌सच्या मॅटवे मिडीलकूप-रॉबीन हासी यांनी अनुभव पणास लावत १-६, ७-५, १०-७ असा विजय खेचून आणला. सलामीच्या दिवशी रामकुमार रामनाथन याने वाईल्ड कार्डच्या संधीचे चीज करीत विजयी सलामी देत रंग भरले.\nम्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या कोर्टवर मुख्य स्पर्धा आजपासून सुरू झाली. पहिला सेट लिलया जिंकल्यानंतर बेनॉईट आपला अनुभव पणास लावत नॉक-आउट पंच मारण्याची अपेक्षा होती; पण सुरवातीला त्याचे काही फटके चुकले. त्यात त्याने रॅकेट कोर्टवर आपटली, परिणामी त्यावरील प्लॅस्टिकचे कव्हर निघाले. ते हाताने काढण्याच्या प्रयत्नात बेनॉईटला लागले, त्यामुळे रक्त आले. यानंतर त्याची एकाग्रता आणखी ढळली. त्याने गुण गमावल्यावर चेंडू बाहेर मारण्याचा प्रकार दोन वेळा केला.\nदुसरीकडे अर्जुन तुलनेने कमी अनुभव असूनही भक्कम खेळ करीत होता. बेसलाइनवरून, तसेच नेटजवळही त्याने परिपक्वता व चपळाई प्रदर्शित करीत पुणेकर टेनिसप्रेमींच्या टाळ्या मिळविल्या. विशेष म्हणजे तो बेनॉईटला प्रोत्साहन देत होता. अमेरिकेत कॉलेज टेनिसमध्ये दुहेरीत खेळण्याचा अनुभव त्याने पणास लावला. बेनॉईटने मात्र एकेरीच्या जोडीला दुहेरीतही मिळालेल्या वाईल्ड कार्डची संधी वाया घालविली. त्याची हुरहूर सर्वांना लागली.\nस्थानिक सहभाग असलेला सामना प्रकाशझोतात खेळविण्यात आला. त्यामुळे टेनिसप्रेमींची गर्दी चांगली होती. पहिल्या सेटमध्ये अर्जुन- बेनॉईटने चौथ्या गेममध्ये मिडीलकूप, तर सहाव्या गेममध्ये रॉबिनची सर्व्हिस भेदली, त्यामुळे पहिला सेट एकाच गेमच्या मोबदल्यात जिंकत अर्जुन- बेनॉईटने आघाडी घेतली.\nदुसऱ्या सेटमध्ये अटीतटीचा खेळ झाला. त्यात १०व्या गेममध्ये दडपण असूनही अर्जुनने सर्व्हिस राखली. १२व्या गेममध्ये मात्र बेनॉईटने सर्व्हिस गमावली. नेदरलॅंड्‌सच्या जोडीने याबरोबरच बरोबरी साधली.\nमॅच टायब्रेकमध्ये बेनॉईटची एकाग्रता ढळली. त्याचा फटका नेटमध्ये गेल्याने अर्जुनच्या सर्व्हिसवरील गुण गेला. पिछाडी कमी केल्यानंतरही बेनॉईटला एकाग्रता साधता आली नाही.\nरामकुमारने रॉबर्टो कार्बालेस बाएना याला ७-६ (७-४), ६-२ असे हरवून विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत राम १४८, तर रॉबर्टो १०६व्या क्रमांकावर आहे. रामने आक्रमक पण नियंत्रित खेळ केला. त्याने शेवटपर्यंत पकड निसटू दिली नाही.\nपुरुष एकेरीत पहिला धक्कादायक निकाल नोंदविण्याचा पराक्रम स्पेनच्या रिकार्डो ओजेडा लारा याने केला. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या रिकार्डोने सहाव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या यिरी वेसेलीचे आव्हान ६-३, ७-६ (७-५) असे परतावून लावले. रिकार्डो १९८व्या क्रमांकावर आहे.\nसातवा मानांकित कझाकिस्तानचा मिखाईल कुकुश्‍कीन आणि आठवा मानांकित फ्रान्सचा पिएर-ह्युजेस हर्बर्ट यांनी आगेकूच केली. हर्बर्टने इटलीच्या मार्को सेच्चीनाटोला ७-६ (७-४), ६-७ (८-६), ६-२ असे हरविले, तर कुकुश्‍कीनने मोल्डोवाच्या राडू अल्बॉटला ६-२, ७-६ (७-४) असे हरविले.\nबालाजी- विष्णूची संधी हुकली\nदुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या एन. श्रीराम बालाजी-विष्णू वर्धन यांना दुहेरीत चुरशीचा सामना गमवावा लागला. आदिल शमास्दीन (कॅनडा)- नील स्कुप्स्की (ब्रिटन) या जोडीने त्यांना ६-३, ७-६ (१०-८), १०-६ असे हरविले.\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-kartaj-kondhava-road-issue-479402", "date_download": "2018-04-20T16:15:11Z", "digest": "sha1:5YEZ5ROVSOLAACZFLP6BRXPRMTPDLK7T", "length": 17570, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप", "raw_content": "\nपुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप\nपुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी 215 कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली.. मात्र रस्त्यासाठी केवळ 40 टक्केच जमीन ताब्यात घेण्यात आल्यानं यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला... रस्त्यासाठी 100 टक्के जागा ताब्यात नसताना निविदा का काढण्यात आली असा प्रश्न विरोधकांनी उभा केलाय... एकूण क्षेत्रफळापैकी 80 टक्के जागा ताब्यात असेल तरच राज्य किंव्हा केंद्र सरकारकड़ून एखाद्या रस्त्याचं काम हाती घेण्यात येतं... मात्र महापालिकेकड़ून अशा प्रकरारच्या कामांसाठी मार्गदर्शक तत्वे नसल्याने हे काम सुरु करावे की नाही याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतलाय...\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nपुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप\nपुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा आक्षेप\nपुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी 215 कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली.. मात्र रस्त्यासाठी केवळ 40 टक्केच जमीन ताब्यात घेण्यात आल्यानं यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला... रस्त्यासाठी 100 टक्के जागा ताब्यात नसताना निविदा का काढण्यात आली असा प्रश्न विरोधकांनी उभा केलाय... एकूण क्षेत्रफळापैकी 80 टक्के जागा ताब्यात असेल तरच राज्य किंव्हा केंद्र सरकारकड़ून एखाद्या रस्त्याचं काम हाती घेण्यात येतं... मात्र महापालिकेकड़ून अशा प्रकरारच्या कामांसाठी मार्गदर्शक तत्वे नसल्याने हे काम सुरु करावे की नाही याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतलाय...\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4641555", "date_download": "2018-04-20T16:42:55Z", "digest": "sha1:QCV34S4V5DGXULSCVNMKRFNNF24WCRXB", "length": 1456, "nlines": 30, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – कविता :: II तुझा निरोप घेताना II\nकविता :: II तुझा निरोप घेताना II\nमनी धैर्य कोठून आले\nमन हिमाच्छादित गोठले होते\nनिव्वळ तुझ्या हातांना प्रतिक्रिया म्हणून\nआठवणींचा भृंग पिंगाया लागला\nक्लेशांचा अरी जोर धराया लागला\nजवळच एका पारावर बसून\nसमस्त आठवणीना एक करून\nमाघारी चालू लागलो Շ\nसिद्धेश्वर विलास पाटणकर Շ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642446", "date_download": "2018-04-20T16:42:59Z", "digest": "sha1:FXBSPCZRJ5MIAI6QR4ZY3LWOTMZQQX7R", "length": 2642, "nlines": 22, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – पुणेरी पाटया\nपुणे आणि पुणेरी पाट्या,,,,,,\nशिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असणारे पुणे,\",oxford of the east\" आणि कल्चरर कैपिटल ऑफ़ महाराष्ट्र,,म्हणून ही ओळखले जाते,पुणे हे भारतातील बेस्ट शहर मानले जाते,सूंदर वातावरण ,मोठ्या औद्योगिक संस्था या सर्वांचा मिलाफ पुण्यात आहे,,,यात सर्वाना आकर्षित करणारी एक मजेशीर गोष्ट म्हणजेच \"पुणेरी पाट्या\"\n* आम्ही आहोत पुणेकर याची एक झलक----आम्ही रसत्यात मुक्काम करत नाही कृपया हॉर्न वाजवु नये,,,\n*पुण्यात एक मजेशीर हिंदी इंग्लिश भाषे ची सरमिसळ पाहायला मिळते,,,\" गाड़ी गेट के सामने लगाओगे,,\nहमारे नाक में दम करोगे,,,\nतो टायर में हवा कम पाओगे,,,,\n*इथे उसाच्या रसाचे भाव,,,,\nपेट्रोल पंपा वरील पाटी,,,,कृपया इथे धूम्रपान करु नये,,तुमचा जीव स्वस्त असेल,,😊😊पन पेट्रोल महाग आहे,\nतर असे आहे पुणे,,,पुणे तिथे काय उने,,,,,थोड़े तिखट ,थोड़े गोड असे,,हे पुणे आहे,,तसाच थोड़ा माज ही आहे,,,,कारण इतक्या भन्नाट शहरात राहतो,,,,म्हणूनच आम्ही म्हणतो,,,,,,,\"डोक्याची मंड़ई झाली तरी चालेल,,,,पन पुण्याची मुम्बई नाही होऊ देणार,,,,,👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/tag/non-bramhinical-feminism/", "date_download": "2018-04-20T15:57:03Z", "digest": "sha1:2LOKEQ3AN6FEJ7RF33C4ARNWA36MPQD6", "length": 1789, "nlines": 27, "source_domain": "rightangles.in", "title": "non bramhinical feminism | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy प्रा. प्रतिमा परदेशी November 14, 2017\nअलीकडे सोशल मीडीयावर व्यक्तिगत शेरेबाजीतून भांडणे व त्या भांडणाला वादाचे स्वरुप देण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. हे ज्या प्रकारचे वाद-विवाद सुरू असतात ते काही प्रमाणात चिंताजनक आहे. शेरेबाजी करणे, टिंगळटवाळी करणे, स्वयंघोषित अभ्यासक, विचारवंत असण्याचा दावा करणे असे प्रकार या माध्यमांवर सातत्याने सुरू असतात. गळ्यात मंगळसूत्र घालू नका,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%8A-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-20T16:11:56Z", "digest": "sha1:KFJZNKNJVWMS3DCKYQKEZ2RO5BTF47OJ", "length": 9514, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नऊ जागा महिलांसाठी राखीव! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनऊ जागा महिलांसाठी राखीव\nवडगाव मावळ : प्रभाग आरक्षण सोडतीच्या वेळी महसूल भवनात नागरिकांनी गर्दी केली होती.\nवडगाव नगरपंचायत : सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत\nवडगाव मावळ (वार्ताहर) – येथील राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाचा प्रभाग व आरक्षण सोडत कार्यक्रम शुक्रवारी (दि. 13) तहसील कार्यालयाच्या महसूल भवन येथे संपन्न झाला.\nप्रभाग आरक्षण सोडत मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. वडगाव नगरपंचायती 17 प्रभाग असून, 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण महिला 5 जागा, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला 3 जागा, सर्वसाधारण 4 जागा, नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण 2 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 1, अनुसूचित जाती महिला 1 व अनुसूचित जमाती सर्वसाधारण 1 अशा एकूण 17 प्रभागातील 17 जागा. या वेळी तहसीलदार रणजीत देसाई, मुख्याधिकारी वैभव आवारे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील, मंडलाधिकारी दत्तात्रय गवारी, संतोष चव्हाण, बजरंग मेकाले आदी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठी लहान मुलाने काढली.\nप्रभाग, लोकसंख्या व आरक्षण पुढीलप्रमाणे\nप्रभाग क्रमांक 1, लोकसंख्या 890 व अनुसूचित जमाती सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 2, लोकसंख्या 801 व सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 3, लोकसंख्या 878 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला ,\nप्रभाग क्रमांक 4, लोकसंख्या 936 व नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 5, लोकसंख्या 972 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,\nप्रभाग क्रमांक 6, लोकसंख्या 821 व सर्वसाधारण महिला ,\nप्रभाग क्रमांक 7, लोकसंख्या 922 व अनुसूचित जाती सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 8, लोकसंख्या 826 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,\nप्रभाग क्रमांक 9, लोकसंख्या 968 व सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 10, लोकसंख्या 888 व सर्वसाधारण महिला ,\nप्रभाग क्रमांक 11, लोकसंख्या 927 व नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,\nप्रभाग क्रमांक 12, लोकसंख्या 860 व सर्वसाधारण ,\nप्रभाग क्रमांक 13, लोकसंख्या 835 व सर्वसाधारण महिला ,\nप्रभाग क्रमांक 14, लोकसंख्या 845 व अनुसूचित जाती महिला ,\nप्रभाग क्रमांक 15, लोकसंख्या 983 व सर्वसाधारण ,\nप्रभाग क्रमांक 16, लोकसंख्या 815 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,\nप्रभाग क्रमांक 17, लोकसंख्या 888 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,\nया वेळी वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत इच्छुक उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. काहींना मनासारखे प्रभाग व आरक्षण पडल्याने आनंद झाला. तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. ज्यांनी निवडणुकीची तयारी केली त्यांनी पत्नीला लढवण्याचा निर्णय घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: महिलांनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे\nNext articleचीन आणि भारताची तुलना करणे अयोग्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathi-news-koregaon-bhima-jalna-mantha-market-90454", "date_download": "2018-04-20T16:58:53Z", "digest": "sha1:ETI6UMLJVMTTIAIBVZGQFCNMIX64TQJY", "length": 10841, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Koregaon Bhima Jalna Mantha Market मंठातील बाजारपेठ पुन्हा सुरळीत | eSakal", "raw_content": "\nमंठातील बाजारपेठ पुन्हा सुरळीत\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nमंठा (जि. जालना) - येथे बुधवार (ता. 3) ला सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहे.\nकोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंठा येथे तिव्र प्रतिसाद उमटले होते. मंगळवार (ता. 2) रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, बाहेर गावचे प्रवासी, छोटे व्यावसायिक, आजारी आदींना बंदचा त्रास झाला.\nमंठा (जि. जालना) - येथे बुधवार (ता. 3) ला सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहे.\nकोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंठा येथे तिव्र प्रतिसाद उमटले होते. मंगळवार (ता. 2) रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, बाहेर गावचे प्रवासी, छोटे व्यावसायिक, आजारी आदींना बंदचा त्रास झाला.\nआंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरीक संभ्रमात होते. सकाळी काही दुकाने व चहाची हाॅटेल उघडले होते, त्यास काही आंबेडकरवादी तरुणांनी विरोध केला. परंतु मंगळवार (ता. 2) रोजी सर्व व्यापारी व नागरीकांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल आज बाजारपेठ दहा वाजल्यापासून सुरळीत सुरु आहे. बसगाड्यांची वाहतूक सुरळीत नसल्याने अनेक प्रवासी खाजगी वाहन व दुचाकी वाहनावर प्रवास करीत आहेत.\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.popularprakashan.com/Marathi/Hindusthani-Sangeet-Paddhati", "date_download": "2018-04-20T16:02:44Z", "digest": "sha1:MNLHOAOLR2MBL7VQLTJCSW47KM6JWA2P", "length": 5760, "nlines": 125, "source_domain": "www.popularprakashan.com", "title": "Popular Prakashan's | Arts | Hindusthani Sangeet Paddhati", "raw_content": "\nतुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Arts » हिंदुस्थानी संगीत पद्धती\nलेखक : पंडित विष्णु नारायण भातखंडे\nपंडित विष्णु नारायण भातखंडे यांनी लिहिलेले भारतीय संगीतावरचे हे पाच खंड. 1914 साली ते मूळ चार खंडांत प्रकाशित झाले होते. प्रभाकर चिंचोरे यांनी त्यांचे संपादन करून त्यांत अनेक उपयुक्त माहितीची भर घालून 1992 साली पाॅप्युलरने ते पाच खंडांत प्रसिद्ध केले. भारतीय संगीताच्या अभ्यासकांकडून या पुस्तकांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. गेली अनेक वर्षं दुर्मीळ झालेल्या हा संच भातखंडे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून 19 सप्टेंबर रोजी प्रकाशित होत आहे.\n\"आपल्या संगीताचा इतिहास सामवेदाच्या वेळच्या संगीतापासून प्रारंभ करून आताच्या विसाव्या शतकापर्यंत पोहचविता आला तर केवढे उपयोगी काम पार पडेल बरे\" या विचारातून भातखंडे यांनी हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांत प्रवास केला. अनेक दुर्मीळ ग्रंथ मिळवून त्यांच्या संहिता स्वतः छापून काढल्या. अनेक संगीतकारांकडून चिजा मिळवल्या. त्या ग्रंथबद्ध करता याव्यात म्हणून नोटेशन पद्धती निर्माण केली. काही चिजा स्वतः लिहिल्या. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रचलित असलेल्या संगीत पद्धतीची शास्त्रीय बैठक पक्की करण्यासाठी 'श्रीमल्लक्षसंगीतम्' हा संस्कृत ग्रंथ आणि त्यावरची मराठी टीका शब्दबद्ध केली. तीच या पाच खंडांत आली आहे.\nपंडित विष्णु नारायण भातखंडे\nपंडित विष्णु नारायण भातखंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://kolaantudya.blogspot.com/2015/01/blog-post.html", "date_download": "2018-04-20T16:32:35Z", "digest": "sha1:QBCKFR3OQG56C3HV2CNBN24BRGSMD3GF", "length": 2231, "nlines": 40, "source_domain": "kolaantudya.blogspot.com", "title": "कोलांटउड्या: सखे आता हे फार जाहले", "raw_content": "\nसखे आता हे फार जाहले\nआज चालणे उन्हात पडले, तुझ्यामुळे\nडोळ्यांपुढे अंधार दाटले, तुझ्यामुळे \nघाम शर्टही भिजवत होते\nतुझे इरादे बुलंद होते\nमँगोला तीन-चार जाहले, तुझ्यामुळे \nआत्याचे तुझ्या घर लांबले, तुझ्यामुळे \nकडेत माझ्या होती वीणा\nबंडू उधळे दाही दिशांना\nविंचवाचे बिर्‍हाड लाजले, तुझ्यामुळे \nघर दिसले नि आली स्फुर्ती\nकुलूप होते, आत्या नव्हती\nसखे आता हे फार जाहले, तुझ्यामुळे \nPosted by अमित दत्तात्रय गुहागरकर\nइथल्या पोस्टी इ-मेलद्वारे प्राप्त करा.\n'प्रेम' नाम है मेरा (6)\nमुक्काम पोष्ट बंडलवाडी (3)\n....आणि हा वायफळाचा मळा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/kolhapur-local-news/bad-road-and-pipelines/articleshow/62436745.cms", "date_download": "2018-04-20T16:24:31Z", "digest": "sha1:D5ZV743KAFELAUO5QRUD3ZENXWQLIXNK", "length": 22393, "nlines": 232, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bad road and pipelines | खराब रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीबाबत अनास्था - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nखराब रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीबाबत अनास्था\nनाना पाटील नगर पहिल्या बस स्टॉप जवळ राजर्षी शाहू हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने केलेली कलाकुसर... सदर रस्ता आधीच खड्डेमय असून पावसाळ्यात चिखलाचा महापूर असतो. या रस्त्यावरून शाळकरी मुलांची आणि भागातील नागरिकांची सतत वर्दळ असते. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिकेला अनेकदा भागातील नागरिकांनी निवेदने दिली आहेत. आसपासचे गल्ली बोळातले रस्ते डांबरीकरण झाले पण हा रस्ता गेले अनेक वर्षांपासून डांबरीकरणापासून वंचित राहिला आहे. त्यातच 5-6 दिवसापूर्वीच या रस्त्यावर मुरूम आणून टाकला आहे. आधीच खड्डे असलेल्या रस्त्यावर अस्ताव्यस्त आणून टाकलेला मुरूम म्हणजे भीक नको पण कुत्रं आवर असेच म्हणावे लागेल. तो मुरूम अशा पद्धतीने पसरलेला आहे की त्यावरून गाड्या चालवणे म्हणजे गाडी घसरून अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यातच दररोज संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास तिथून जाणारी एक पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जाते. हा प्रकार तर इथे नित्याचाच होऊन बसला आहे. तरी महापालिकेने सदर पाईपलाईन आणि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून भागातील नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी\n1खराब रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीबाबत अनास्था...\n2पुन्हा अतिक्रमण-म न पा कर्मचारी शामिल...\n4हिम्मत बहादूर परिसरातील रस्ता खराब...\n8मेन रोड वरील कचरा कुंड्यामुळे ट्राफिक जॅम...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/viral-content-amitabh-bachchan-wrote-funny-poem-on-clothes/articleshow/62393812.cms", "date_download": "2018-04-20T16:29:22Z", "digest": "sha1:LCNZLULOVWOD3775IV2RAT7TUMTR2XWQ", "length": 23509, "nlines": 252, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "amitabh bachchan:viral content amitabh bachchan wrote funny poem on clothes | अमिताभ यांनी कपड्यांवर लिहिली फनी कविता - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nअमिताभ यांनी कपड्यांवर लिहिली फनी कविता\nमुंबई: अमिताभ बच्चन यांचा बॉलिवूडवर जितका प्रभाव आहे तितकाच तो सोशल मीडियावर देखील आहे. त्यांचा अभिनय आणि त्यांच्या गायकीबाबत आपल्याला माहिती आहेच. परंतु, त्यांचा कवीचा अवतार आपण क्वचितच पाहिला असेल. खुद्द बिग बीला देखील आपल्यात कवी बनण्याची शक्यता असल्याचे दिसू लागले आहे.\nअमिताभ यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट केले. ट्विटमध्ये अमिताभ यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता कपड्यांवर आहे. कवितेच्या शेवटी अमिताभ लिहितात, ' कवि बनने की पूरी संभावना हैं'. त्यांची कविता लोकांना अतिशय आवडली. 'कविता तर आपल्या रक्तातच आहे' अशा प्रतिक्रियाही त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.\nकुछ काले कुछ पीले , कुछ हरे रंगीले ;\nकपड़ों की बारात लग गयी , सब के सब ढीले\nआजकल का fashion कुछ ऐसा ही है यारों ;\nपहनों तो लगे जैसे नहा के निकले गीले ~ ab 😀😀\nकवि बनने की पूरी सम्भावना है \nअमिताभ बच्चन यांचे पिता हरिवंशराय बच्चन हे हिंदीचे प्रसिद्ध कवी होते. त्यांची 'मधुशाला' आणि 'अग्निपथ'बाबत माहिती नसेल असे काव्यप्रेमी सापडणे कठीण. हिंदी साहित्याला दिलेल्या योगदानाबाबत १९७६मध्ये त्याना पद्मभूषण देण्यात आला होता.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nआणखी माहिती : कपड्यांवर कविता | अमिताभ यांची फनी कविता | अमिताभ बच्चन | funny poem by amitabh | amitabh bachchan\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजान्हवीसाठी अर्जुननं वेबसाईटला सुनावलं\nवरुण धवनला भेटण्यासाठी 'ती' घरातून पळून आली\nराधिका आपटेची हॉलिवूडमध्ये एंट्री\n1अमिताभ यांनी कपड्यांवर लिहिली फनी कविता...\n2सलमाननं लवकरच बाबा व्हावं: राणी मुखर्जी...\n3तीनशे सिंगल स्क्रीनवर पडदा\n5रजनीकांत उत्तम राजकारणी ठरतील: अक्षय...\n6राखी सावंतवर ५ कोटीच्या अब्रूनुकसानीचा दावा...\n7ऐश्वर्याला 'आई' म्हणणाऱ्या संगीथला होणार अटक\n8'धकधक गर्ल' माधुरीचा सामुराई अवतार......\n9मराठमोळी राधिका ब्रिटीश अभिनेत्यासोबत झळकणार...\n10८ वर्षांच्या लव्हस्टोरीनंतर 'हा' हिरो करणार साखरपुडा...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ncp-leader-faujiya-khan-on-triple-talaq/", "date_download": "2018-04-20T16:40:07Z", "digest": "sha1:FA7W5AAFWCEVZYUYHBICX5KO4SV2W6WB", "length": 16871, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "तलाकसंदर्भात कायदा करताना महिलांच्या मनाचा विचार करावा – प्रा. फौजिया खान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nतलाकसंदर्भात कायदा करताना महिलांच्या मनाचा विचार करावा – प्रा. फौजिया खान\nमुस्लिम महिलांच्या तलाकसंदर्भात कायदा करताना त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुरुवारी हडको येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रा. फौजिया खान शहरात आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या.\nमहिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीच्या घटनांत महाराष्ट्रासह देशात वाढ झाली आहे, अशी टिप्पणी करून प्रा. फौजिया खान म्हणाल्या, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पहिले पाऊल उचलले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलासांठी जागा आरक्षित ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळेच विविध पदांवर महिला कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. वेंâद्रात भाजपाला बहुमत आहे. त्यांनी लोकसभा विधानसभेत महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. बेटी बचाव, बेटी पढाव, अशा नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही, उलट यापूर्वीच्या सरकारने केलेल्या तरतुदीत घट केली आहे, असा आरोप करून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे आणि संविधान बचावबाबत जनजागृतीची मोहीम पक्षाच्या वतीने हाती घेतली जाणार आहे, त्यासंबंधीचा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला, असेही त्या म्हणाल्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकेंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश\nपुढीलकोकणातील प्रस्तावित रिफायनरी विदर्भात आणा- आशीष देशमुख\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:28:44Z", "digest": "sha1:BFUOCEBQBXIEBBDKCS65LMNHRGIZK7G4", "length": 4269, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेड मॉर्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nफ्रेडरिक फ्रेड मॉर्ली (डिसेंबर १६, इ.स. १८५०:सटन-इन-ऍशफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - सप्टेंबर २८, इ.स. १८८४:सटन-इन-ऍशफील्ड) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू होता.\nजलदगती गोलंदाजी करणाऱ्या मॉर्लीने प्रथम-श्रेणी सामन्यांत सरासरी १३.७३ धावा देऊन १,२७४ बळी घेतले.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८५० मधील जन्म\nइ.स. १८८४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/ramdas-athwale/", "date_download": "2018-04-20T16:36:29Z", "digest": "sha1:BPBQZTMU3K2R7PORHKT3PZVOWMKPGOJ4", "length": 5488, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "ramdas athwale – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nरामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे\nकोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात… Read More »\n‘ह्या ‘ गोष्टीसाठी दलित तरुणांना सैन्यात जाण्याचा रामदास आठवले यांचा अजब सल्ला\nक्रिकेटमध्ये आरक्षण असो व स्वतःचे नाव विसरणे असो, नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता पुन्हा असेच एक विचित्र विधान केले आहे .एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले होते . त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले . दलित समाजाच्या मुलांनी सैन्यात जावे ,लष्करात चांगले खायला, प्यायला… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/health-fitness/page/2/", "date_download": "2018-04-20T16:36:10Z", "digest": "sha1:HHOBECPMDO4J7I6XKCJGEWGRC3MOKAIE", "length": 9827, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Health & Fitness Archives - Page 2 of 8 - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nटोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग… 0\n९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल… 2\nसाखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते, जाणून घ्या कसे… 0\n मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय… 0\nधक्कादायक: ७ वर्षाच्या मृत मुलीचे दवाखाण्याचे बिल १६ लाख होते तेव्हा… 0\nफक्त एक चिमूट सेवन डायबिटीज, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासुन वाचवेल… 0\nसॅनेटरी पॅडना योग्य आरोग्यादायी आणि पर्यावरणपूरक पर्याय मेनस्ट्रअल कप… 0\nफाटलेल्या टाचा करीता अतिशय सोपा घरगुती ईलाज… 0\nदारू पिऊन तात्काळ झोपल्याने होतील हे 9 साईड इफेक्ट… 0\nलग्न करायच्या आधी ह्या दहा गोष्टी नक्की करा… 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/nigerian-person-awaiting-cocaine-worth-rs-20-crores-arrested-goa/", "date_download": "2018-04-20T16:10:20Z", "digest": "sha1:LC6P5WJIC3DOPAPGLBHROYAXLRJ2RVEH", "length": 27264, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nigerian Person Awaiting Cocaine Worth Rs 20 Crores Arrested In Goa | 20 कोटी रूपयांच्या कोकेनच्या प्रतिक्षेत असलेल्या नायजेरियन व्यक्तीला गोव्यात अटक | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\n20 कोटी रूपयांच्या कोकेनच्या प्रतिक्षेत असलेल्या नायजेरियन व्यक्तीला गोव्यात अटक\nआंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे.\nठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीशी गोव्याचा संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.\nमडगाव- आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीशी गोव्याचा संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. ब्राझीलहून गोव्यात आणल्या जाणाऱ्या 20 कोटींच्या कोकेनची प्रतिक्षा करणाऱ्या एझायकी या नायजेरियन युवकाला एनसीबीच्या पथकाने उत्तर गोव्यातील मोरजी येथून अटक केली आहे.\nअटक करण्यात आलेल्या नायजेरियन व्यक्तीकडे गोव्यामध्ये राहण्याची कुठलीही कायदेशीर कागदपत्रं नव्हती. सध्या मुंबई एनसीबीच्या ताब्यात दिलेल्या या नायजेरियनकडे कायदेशीर पासपोर्टही नव्हता असं तपासात समोर आलं आहे.\nगेल्या आठवड्याच्या सोमवारी मुंबईच्या एनसीबी विभागाने सा पावलो (ब्राझील) येथून इथोपियन एअरलाईन्स विमानातून आलेल्या युरेना माश्रेना या व्हेनानझुयेलाच्या महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिने बॅगेच्या पोकळीत लपवून आणलेलं 1.84 किलो कोकेन सापडलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत 20 कोटी रुपये होती. या महिलेची चौकशी केली असता, हा अंमलीपदार्थ गोव्यात पोहोचवायचा असल्याची कबुली दिली.\nगोव्यामध्ये डिसेंबर महिन्यात ख्रिसमस सिझन आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे पदार्थ गोव्यात येणार होते. या माहितीवरून एनसीबीने मोरजी येथे एझायकी या नायजेरियन इसमाला अटक केली.\nसध्या या ड्रग रॅकेटमध्ये या एकाच व्यक्तीचा हात आहे की त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत याचाही तपास केला जात आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी 60 लाखांचे एलएसडी व 50 लाखांच्या अॅक्टसी टॅबलेटस् पकडल्या होत्या. युरोपहून आलेला हा अंमलीपदार्थ गोव्यात येणार होता असे त्यावेळी पोलीस तपासात पुढे आलं होतं.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगोव्यात ड्युटीवरील पोलिसांना खासगी कामासाठी फोन वापरण्यास बंदी, पोलीस मुख्यालयातून आदेश\nगोव्यातून नियोजित कोळसा हब विजयदुर्गला हलविण्याच्या गडकरींच्या विधानाचे स्वागत\nबार्देस बाजार ग्राहक सहकारी संस्थेच्या माजी अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द\nशरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम गोव्यात पूर्णपणे ठप्प\nनेत्यांची नाराजी घालविण्यासाठी भाजपाची धडपड, डिसोझा यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ बैठका\nनोटाबंदीच्या वर्षपूर्ततेला कॉंग्रेसचा गोव्यात निषेध मोर्चा, काळा दिवस म्हणून साजरा\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\nकर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दारू पकडण्याचे सत्र\nनैसर्गिक आपत्तीतही खाण अवलंबितांना मिनरल फंडअंतर्गत मदत\nगोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला\nलोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात\nगोव्यात उद्योजक व कॅसिनो मालकांनीही दंड थोपटले\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/08/re-marathi-songs.html", "date_download": "2018-04-20T16:05:43Z", "digest": "sha1:R6BZFR4BAWOUOMKB4PC53EEBZQD57XEJ", "length": 10310, "nlines": 191, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: Re: [Marathi Songs] हरवला आहे.", "raw_content": "\nए. सी. ऑफिस, स्वतंत्र केबीन,\nफटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मिटींग्सच मिटिंग.\nमिटींग्समुळे खूप भेटी राहील्या आहेत,\nसगळ्या मिटींग्स सोडून ज्याला भेटाव.\nअसा लंगोटी यार मात्र हरवला आहे.\nभरपूर पगार, उदंड सेव्हिंग.\nमनसोक्त शोपिंग, सामानाचा ढीगच ढीग.\nसामानाच्या ढीगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत,\nचूक करून ज्याच्या आड़ लपाव,\nअसा आईचा पदर मात्र हरवला आहे,\nदिवसाआड़ पार्टी, कधी पब तर कधी डिस्को,\nधुंद रात्र मस्तीची, प्याल्या प्याल्यातुन झींगच झींग,\nचिअर्सच्या चित्कारातून, खूप आवाज विरून गेले आहेत,\nज्या आवाजाने हृदयाला साद घालावी,\nअसा आरतीचा गजर मात्र हरवला आहे,\nकारच्या वेगात, सायकलची फेरी हरवली आहे,\nहोटेलींगच्या खाण्यात फोडणीची पोळी हरवली आहे,\nतारांकीत क्रुझच्या आरामात, पंढरीची वारी हरवली आहे,\nपिकनीक स्पॉटच्या गर्दीत, मामाचा गाव हरवला आहे,\nबंद दाराच्या अपार्टमेन्टमध्ये, शेजार हरवला आहे,\nडिजे, व्हीजेच्या गोंगाटात, वासुदेवाची मुरली हरवली आहे,\nसाठ फूटी सिमेंटच्या रस्त्यात, वडाची सावली हरवली आहे,\nकॉन्व्हेंटच्या अटटाहासात, बाराखडी हरवली आहे,\nहाय, हेलो, थ्यंक यु मध्ये, साधीभोळी अनौपचारीकता हरवली आहे.\nफायद्या तोट्याच्या गणितात , उत्स्फुर्तता हरवली आहे,\nनीलाजरया रिमिक्स मध्ये, नीरागसता हरवली आहे,\nधकाधकीच्या दिनक्रमात, निवांत गप्पा हरवल्या आहेत,\nचौकोनी कुटुम्बात, नाती हरवली आहेत,\nसिमेंटच्या जंगलात, माती हरवली आहे,\nआम्ही धावणार करीअरच्या मागे, बाकी कशाची खंत नाही,\nकशा कशाचा हिशेब मांडू\nह्या चकचकीत मोडर्न जगण्यात, जिंदगीच हरवली आहे.\n{ Marathi kavita } तुम्हाला वर्गात पहिलं यायचंय\nRe: { Marathi kavita } उन्हात खूप खूप तापून रस्ता ...\n{ Marathi kavita } एक प्रेमळ विनोदी सत्य…=लव्ह का ...\n{ Marathi kavita } अण्णांचे लग्न झाले असते तर........\n{ Marathi kavita } का वागतात या मुली अशा\n{ Marathi kavita } आजकालच्या ह्या मुली\n{ Marathi kavita } .एका झाडाखाली....दोन मुली\n{ Marathi kavita } सुंदर मुली भाव खातात...\n{ Marathi kavita } आजची पोरं म्हणे प्रेम करतात\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } तु हो म्हणाली असतीस तर\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bmc-elections-2017", "date_download": "2018-04-20T16:38:46Z", "digest": "sha1:5ZT7UR7P5EZS2MCWRHUCLSZLQ6YUMUZ7", "length": 39952, "nlines": 348, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bmc elections 2017 Marathi News, bmc elections 2017 Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nनिवडणूक जिंकण्यासाठी 'त्यांनी' जे केले ते मी करणार: राज ठाकरे\nनुकताच लागलेला महापालिका निवडणुकीचा निकाल म्हणजे 'पैसा जिंकला आणि कामे हरली' अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्लेषण करत पैशाने निवडणुका जिंकल्या गेल्याचे दर्शवले आहे. इतक्यावरच न थांबता निवडणुका जिंकण्यासाठी आपणही आता याच मार्गाने जाणार असल्याची भूमिकाही राज ठाकरे यांनी मांडली आहे.\n‘शिवसेना, भाजप हे दुर्योधन व दु:शासन’\nभाजप व शिवसेना हे दुर्योधन व दुःशासन असून, कौरवांप्रमाणे त्यांनी सत्तेसाठी अधर्माचा वापर केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली शिवसेना फक्त राजकारण करीत असल्याचा आरोप विधिमंडळाच्या उभय सभागृहातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आ‌‌णि धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये नाराजी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत महापौर पदासह इतर सर्व समित्यांच्या निवडणुकांमधून काढता पाय घेतल्याने पालिकेतील भाजपच्या अनेक नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.\nसर्वच पालिकांवर उपलोकायुक्त नेमा\nपारदर्शकतेचा मुद्दा मुंबई महापालिकेपुरता मर्यादित नको. मुंबई जशी महाराष्ट्राची राजधानी आहे तशीच नागपूर शहर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे नागपूरसह सर्व महापालिकांना पारदर्शक कारभाराचा निकष लावण्यात यावा.\n‘मुंबईत पारदर्शकतेच्या मुद्यावर जनादेश मिळालेला आहे. इतर पक्षांची मदत घेऊन भाजपने महापौरपद मिळविलेही असते. परंतु, पारदर्शकतेच्या मुद्यावर मिळालेल्या कौलाचा अनादर करता येणार नाही. त्यामुळे मुंबईत महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह कोणत्याही समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढविणार नाही. भाजपचे नगरसेवक हे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील’, अशी घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजकीय वर्तळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सत्तेबाहेर राहूनही महापालिकेत शिवसेनेवर वचक ठे‍वण्याची चतुर खेळी भाजपने खेळली आहे.\nमतदार यादीतला घोळ जबाबदारी कुणाची\nनुकत्याच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बऱ्याचशा निवडणुका आटोपल्या. बातम्यांवरून ध्यानात आले की, एकट्या मुंबईतच सुमारे ११ लाख मतदारांना मत देण्यापासून वंचित ठेवण्यात आले. ९२ लाख मतदारांपैकी एवढ्या मोठ्या संख्येने मतदार मत देण्यापासून दूर राहिले असतील तर ही चिंतेची बाब आहे.\nमनसेला गृहित धरू नका: सरदेसाई\nमुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेपुढे सर्व पर्याय खुले असून मनसेला कुणीही गृहित धरू नये, असे आज मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे जो निर्णय घेईल तो मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या हिताचाच असेल, असेही सरदेसाई यांनी पुढे नमूद केले.\nमतदान २१ला, प्रस्ताव २२ फेब्रुवारीला\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान २१ फेब्रुवारीला असताना २२७ प्रभागात मतमोजणी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव २२ फेब्रुवारीला स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर मांडण्यात आला होता. २४ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव समितीमध्ये मंजूर होण्याआधीच निवडणूक विभागाने मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये केंद्रे उभारून विविध सोयीसुविधा पुरवल्या होत्या.\n​ निवडणुकीच्या तारखेचा घोळ\nमुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता असताना या निवडीच्या तारखेचा घोळ सुरू झाला आहे. ही निवडणूक नऊ मार्चला घेणे अपेक्षित असताना पालिका आयुक्त व चिटणीस विभागाने अचानक सुचविलेल्या बदलामुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधी म्हणजे आठ मार्चला होण्याची शक्यता आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकीत परस्परांवर टोकाची टीका करणारे शिवसेना भाजप हे दोन पक्ष पुन्हा महापालिकेतील सत्तेसाठी एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु या युतीसाठी शिवसेना पुढे येण्यास कचरत असल्याने आता भाजपने शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्यात सुरुवात केली आहे.\nमुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विविध पक्षांतर्फे तब्बल १३१ महिला विजयी झाल्या असून ९६ पुरुष निवडून आले आहेत. पालिकेतील २२७ जागांच्या तुलनेत निवडून आलेल्या महिलांचे प्रमाण ५८ टक्के इतके असून पुरुषांचे प्रमाण ४२ टक्के आहे.\nशिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नव्या महापौरांना भायखळ्याच्या राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात मुक्काम हलवावा लागणार आहे.\n‘भाजप, सेनेला पाठिंबा नाही’\nमुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या‌ निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नऊ नगरसेवकांचा पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत सत्कार करण्यात आला. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेना अथवा भाजपला कधीच पाठिंबा देणार नाही, असे खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईत सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या आशा पल्लव‌ित झाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर भाजपने महापौरपद डोळ्यासमोर ठेवून आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेसमोर न झुकण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.\nनगरसेवकाकडून कोणती कामे अपेक्षित\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांपैकी आठ टक्के नगरसेवक २१ ते ३० वयोगटातील तरुण चेहरे आहेत. त्यामु‍ळे नवीन चेहऱ्यांकडून मतदारांच्या खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.\nभाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत ८४ जागा निवडून आणत क्रमांक एकचा पक्ष बनण्याचा मान मिळवला असला तरी गिरगाव, मुलुंड, गोरेगाव यासारख्या मराठीबहुल विभागात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविताना जोरदार मेहनत घेतली असली तरी काही विभागाप्रमुखांकडून अपेक्षित कामे न झाल्याने शिवसेना नेतृत्वाकडून लवकरच विभागप्रमुखांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे कळते.\nदहा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी या निवडणुकीत काही भाजप मंत्र्यांची कामगिरी सुमार दर्जाची ठरली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ‌अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेरबदल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले असून, त्यावेळी अशा भाजप मंत्र्यांबाबत ‘गंभीर विचार’ केला जाणार आहे.\nमुंबईकरांच्या मूलभूत अपेक्षांचे ओझे\nमुंबई महापालिकेत सत्ता कुणाची, भाजप, शिवसेनेची की अन्य पक्षांच्या मदतीने दोघांपैकी एकाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सत्तेवर येणा‍ऱ्या पक्षाला सव्वा कोटी मुंबईकरांच्या आशा-अपेक्षांचे ओझे खांद्यावर घ्यावे लागणार आहे. मुंबईत रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या विभागांवर तसेच महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावर नव्या सत्ताधा‍ऱ्यांना खास लक्ष द्यावे लागणार आहे.\nनुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मिळालेल्या यशात सेनेच्या आमदारांचा परफॉर्मन्स दणदणीत आहे; तर राज्यात मंत्रिपदे भूषवणारे आमदार ढेपाळले आहेत.\nकाँग्रेससोबत खुशाल जा…मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला\n‘काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून, सत्ता मिळविण्यासाठी भाजप कधीच काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नाही’, असे स्पष्ट करत, ‘ज्यांना कोणाला काँग्रेससोबत जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. आम्ही त्यांना रोखणार नाही’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाव घेता शिवसेनेला लगावला. भाजपबरोबर न जाता आपला महापौर करण्यासाठी प्रयत्नात काँग्रेसची मदत घेण्याच्या तयारीत शिवसेना असल्याची राजकीय चर्चा असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत एकप्रकारे शिवसेनेची कोंडी केली आहे.\nकाँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये: कामत\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्थ पाठिंबा देण्याचे सूचित केलेले असताना, तसेच काँग्रेस नेते नारायण राणे यांनी 'शिवसेना हा काही माझा शत्रू नाही', असं सकारात्मक वक्तव्य केलेलं असताना काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याला ठाम विरोध दर्शवला आहे.\nमुंबई काँग्रेसची सूत्रं भाई जगताप यांच्याकडे\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता मुंबई प्रदेश काँग्रेसची सूत्रं तरुण-तडफदार नेते भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.\nशिवरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी CM रायगडावर\nराज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. रयतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा घेण्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.\nशिवसेनेनं वाचला भाजपच्या अपयशाचाच पाढा\nमहापालिका निवडणुकीआधी भाजपवर रोज टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेनं आता निकालांनंतरही भाजपला टोमणे मारण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. भाजपच्या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे, तेवढी हवा त्यात आहे का, असा खोचक प्रश्न शिवसेनेनं केला आहे.\n'या' पाच कारणांमुळे शिवसेना-काँग्रेस युती शक्य\n... ११४ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार... आणि कशी... कुणासोबत... आणि कशी... कुणासोबत यावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तर्कवितर्क लढवले जात असतानाच, शिवसेना आणि काँग्रेस हातमिळवणी करून सत्ता समीकरण जुळवू शकतात, असाही एक सूर ऐकू येतोय.\n‘ईश्वर चिठ्ठी’ निकाल वादात\nकुंभारवाडा प्रभाग २२०मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शाह यांना समान मते मिळाल्याने महापालिकेने चिठ्ठी उडवून घेतलेला निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रभागात पाच टेंडर व्होट सापडली असून त्या आधारे निवडणुकीचा निकाल लावावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.\n​ सोशल मीडियात युतीचे वॉर\nसत्तेसाठी वाटेल ते करत दोन्ही पक्ष एकत्र येतील, यापासून ते कालपर्यंत काँग्रेसला शिव्या घालणारी सेना काँग्रेसची मदत घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, अशी टपल्या आणि टिचक्या सोशल मीडियातून युतीला मारण्यात आल्या आहेत.\nमुंबई महापालिका निकालात मतदारांनी शिवसेना आणि भाजपच्या पदरात जवळपास सारख्याच जागांचे दान टाकल्यानंतर स्वबळावर लढलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. संख्याबळाच्या लढाईत शुक्रवारी शिवसेनेने दोन नगरसेवकांना गळाला लावत बंडखोर आणि अपक्षांवर जाळे फेकण्यास सुरुवात केली आहे. तर ‘ज्यांनी युती तोडली त्यांच्याकडून प्रस्ताव येऊ द्या,’ असे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे म्हणणे आहे.\n​ बेहरामपाड्यात फडकला भगवा\nबाबरी मशिद पाडल्यानंतर मुंबईत झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत बदनाम झालेल्या वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरातून यंदा चक्क शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला आहे. अर्थात हा उमेदवार शिवसेनेने एमआयएममधून आयात घेतला आहे.\nसुरत बलात्काराचा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\n‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-bhor-8-st-buses-out-for-passenger-s-service-469905", "date_download": "2018-04-20T16:28:18Z", "digest": "sha1:KOTUPXN2HAMQBNMBSQFR35FDPYLWBKKS", "length": 15615, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : भोर एसटी डेपोमधून आठ बस रवाना", "raw_content": "\nपुणे : भोर एसटी डेपोमधून आठ बस रवाना\nएसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nपुणे : भोर एसटी डेपोमधून आठ बस रवाना\nपुणे : भोर एसटी डेपोमधून आठ बस रवाना\nएसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID092.HTM", "date_download": "2018-04-20T16:46:02Z", "digest": "sha1:SJ2YKH3WBDDGBXTAU6PLBGYDLPBHQTJR", "length": 6581, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | आज्ञार्थक २ = Imperatif 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nकधीही बेईमान बनू नकोस\nकधीही खोडकर बनू नकोस\nकधीही असभ्य वागू नकोस\nआपण घरी सुरक्षित परत याल अशी आशा आहे\nबाळे व्याकरण नियम जाणून घेऊ शकतील\nमुले फार त्वरीत वाढतात. आणि ते लवकर आत्मसात देखील करतात. अद्याप त्यावर संशोधन करावयाचे आहे कि मुले किती लवकर आत्मसात करतात. शिकण्याची प्रक्रिया आपोआप घडते. मुलांना ते शिकत असतात तेव्हा लक्षात येत नाही. तरीसुद्धा, दररोज ते अधिक सक्षम असतात. हे देखील भाषेने स्पष्ट होते. बाळे फक्त पहिल्या काही महिन्यांत रडतात. काही महिन्यातच ते लहान शब्द म्हणू शकतात. मग त्या शब्दांतून वाक्ये तयार होतात.. साहजिकच मुले त्यांची मूळ भाषा बोलायला लागतात. दुर्दैवाने, तसं प्रौढांच्या बाबतीत घडत नाही. त्यांना शिकण्यासाठी पुस्तके किंवा इतर साहित्य असणे आवश्यक आहे. केवळ या प्रकारे ते व्याकरण नियम जाणून घेऊ शकतात, उदाहरणार्थ. दुसरीकडे, लहान मुले व्याकरण चार महिन्याचे असतानाच शिकतात. संशोधकांनी जर्मन बाळांना परदेशी व्याकरण नियम शिकवले. असे करण्यासाठी, त्यांनी त्यांना मोठ्याने इटालियन वाक्य ऐकवले. त्या वाक्यांमध्ये काही वाक्यरचना होत्या. बाळांना सुमारे पंधरा मिनीटे योग्य वाक्ये ऐकवली. त्यानंतर, वाक्ये पुन्हा बाळांना ऐकवली. या वेळी मात्र, काही वाक्ये चुकीची होती. बाळे वाक्ये ऐकत असताना, त्यांच्या मेंदूची चाचणी केली. अशा प्रकारे मेंदू वाक्यांना कशी प्रतिक्रिया देतो हे संशोधक ओळखू शकले. आणि बाळांनी वाक्यानुसार विविध स्तरांतल्या प्रक्रिया दर्शविल्या जरी ते नुकतेच शिकले असले तरी, त्यांनी चुका नोंदवल्या होत्या. काही वाक्ये का चुकीचे आहेत हे स्वाभाविकच, बाळांना समजत नाही. ते उच्चारविषयक नमुन्यांच्या दिशेने स्वतःला निर्देशित करतात. पण एक भाषा जाणून घेण्यासाठी पुरेसे आहे - किमान बाळांना साठी तरी ...\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-20T16:19:48Z", "digest": "sha1:NTHACUKVBEVINWYH3HVJP2VXKASHELAJ", "length": 9393, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आळेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआळेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा\nआळेफाटा – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोनवणे यांच्यावर बलात्काराचा महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने जामीन नाकारून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची पुणे येधील येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, याबाबत संबंधित आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सुडबुद्धीने गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आज आळेफाटा ग्रामस्थांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे निवेदन देऊन आग्रह धरला आहे. मात्र, याप्रकरणाची माहिती पोलीस देण्यास टाळाटाळ करीत असून या प्रकरणात दबाव असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.\nआळेफाटा पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जुन्नर तालुक्‍यात आरोग्य क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे वैद्यकीय आधिकारी डॉ. गणेश सोनावणे यांच्यावर सुडबुद्धी आणि कट कारस्थान करून काही लोकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्‍यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तालुक्‍यातील बोगस डॉक्‍टरांच्या विरोधात मोहीम चालु केली होती. त्यात वैद्यकीय अधिकारी गणेश सोनावणे याचा विशेष सहभाग होता. त्यातून बोगस डॉक्‍टरांवर कारवाई झाली होती. याच गोष्टीचा आकस मनात ठेऊन काही लोकांनी डॉ. सोनवणे यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nयावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून पोलिसांनी देखील शहानिशा करून गुन्हे दाखल करावेत. तरच तालुक्‍यातील कायदा सुव्यवस्था सक्षम राहील अन्यथा विश्वास उडेल, असे सांगितले. यावेळी जुन्नर तालुका मेडिकल प्रक्‍टिशनर्स असोसिएशन, व्यापारी असोसिएशन आळेफाटा, रोटरी क्‍लब आळेफाटा मेन, आळे, संतवाडी, वडगाव आनंद, संतवाडी, डिंगोरे, आमले आदी परिसरातील राजकीय व सामाजिक मंडळी या निषेध सभेस उपस्थित होते. यावेळी सर्वांचे निवेदन आळेफाटा पोलिसांच्या वतीने ए.पी.आय मारूती खेडकर यांनी स्वीकारले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : पगार नाही, तर कामही करणार नाही\nNext articleहरित क्षेत्रातील शेतजमिनीवर कर नाही – तुकाराम मुंढे\nपुणे जिल्हा: हक्काचे पाणी देता का कोणी \nकुरकुंभमध्ये मटका, जुगारावर पोलिसांचा छापा\nपुणे जिल्हा: चौथ्या दिवशी मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह\nकळंब येथे आज सामुदायिक विवाह सोहळा\nपुणे जिल्हा: दिवळेत मध्यरात्री दोन बिबट्यांचा धूमाकूळ\nकठुआ प्रकरणी उरुळी कांचनमध्ये मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/lihite-wha-book-for-newcomers/articleshow/62328865.cms", "date_download": "2018-04-20T16:18:44Z", "digest": "sha1:PSQBXOBPOP2JPNS37CTHYDH7Z4QYNHX4", "length": 24611, "nlines": 243, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'lihite wha' book for newcomers | ‘लिहिते व्हा’ पुस्तक नवोदितांसाठी लेखन शिबिर - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\n‘लिहिते व्हा’ पुस्तक नवोदितांसाठी लेखन शिबिर\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमनाची समस्या वाढतच चालली आहे, दिवसेंदिवस संवाद कमी होत चाललाय, मनाचे गॅसचेंबर झाले आहे. त्याचा एखाद्या दिवशी स्फोट होऊन माणूस होरपळणार आहे. अशातच संतोष हुदलीकरांचे ‘लिहिते व्हा’ पुस्तक अभिव्यक्त होण्याचा संदेश घेऊन आले आहे. हे पुस्तक नवलेखकांचे लेखनशिबिरच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.\nगझलकार संतोष हुदलीकर यांच्या ‘लिहिते व्हा’ या पुस्तकाच्या प्रकाशसोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्ह्यातील बारा तरूण साहित्यिकांच्या हस्ते परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा रंगला. दवणे पुढे म्हणाले की, गेलेल्या माणसाला देण्यासाठी चार खांदे सापडतात मात्र जिवंतपणी दु:ख वाटून घेण्यासाठी एक खांदा सापडत नाही अशातच लिहिते होण्याचा संदेश देणे ही प्रेरक बाब आहे.\nयावेळी व्यासपीठावर कवी ऐश्वर्य पाटेकर, संदीप जगताप, विष्णू थोरे, प्रशांत केंदळे, संतोष वाटपाडे, सुधीर कुलकर्णी, गौरी पटवर्धन, स्वप्नील बापट, अनिता जोशी, सत्यजीत पाटील, सोहा हुदलीकर यांची उपस्थिती होती. ऐश्वर्य पाटेकर म्हणाले की, पुस्तकांच्या बळावर पृथ्वी तरलेली आहे. महान माणसांचे विचार पुस्तकातूनच वाचायला मिळतात. सध्या माणूस संस्कार विसरत चालला आहे कारण त्याच्या हातात पुस्तके नाहीत. पुस्तकातून काढता पाय घेऊ नये म्हणजे संस्कार शोधायला दुसरीकडे जावे लागत नाही असेही ते म्हणाले. यावेळी संतोष हुदलीकर यांनी पुस्तकाविषयी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले.\nबारा महिन्यात होणार बारा पुस्तकांचे प्रकाशन\nनाशिकचे प्रख्यात गझलकार संतोष हुदलीकर यांना पुस्तक प्रकाशनाविषयी एक अभिनव कल्पना सुचली असून ते त्यावर प्रत्यक्ष अमलबजावणीही करीत आहेत. नव्या वर्षात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक अशी बारा पुस्तके ते प्रकाशित करणार आहेत. द्वादश प्रकाशन या नावाने हा सोहळा होणार असून परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा रंगणार आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n... जावयाचा सासूवर बलात्कार\nCash Crunch: इथं फक्त २०, ५०च्या नोटांची छपाई\nहद्दीच्या वादामुळे मृतदेह ५ तास रस्त्यावर\nमुंढेंच्या विरोधात भाजपची रणनिती\nआमदार, अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांनी कोंडले\n1‘लिहिते व्हा’ पुस्तक नवोदितांसाठी लेखन शिबिर...\n2जिल्ह्यात साडेबाराशे हेक्टर पिकांना फटका...\n3बनावट शिक्षकांवर कारवाईचा बडगा...\n4आरतीच्या ‘गोल्फ’भोवती ५१ फेऱ्या...\n5जेलच्या कर्मचाऱ्यांनी नाकारले निलंबनपत्र\n6ऑनलाइन दर्शनास भाविकांची पसंती...\n7महापौर शोधणार ‘ब्लॅक स्पॉट’...\n8मैदान चकाचक करून नववर्षाचे अनोखे स्वागत...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-sports-news-cricket-news-india-versus-south-africa-shikhar-dhawan-90462", "date_download": "2018-04-20T16:50:08Z", "digest": "sha1:MLDULFPQ5JD5QQXLDRSQY2TNDQERWE3O", "length": 12281, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sports news Cricket news India versus South Africa Shikhar Dhawan पहिल्या कसोटीसाठी शिखर धवन तंदुरुस्त | eSakal", "raw_content": "\nपहिल्या कसोटीसाठी शिखर धवन तंदुरुस्त\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकेप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले.\nकेप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले.\nदक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यास येत्या शुक्रवारपासून सुरवात होत आहे. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी धवनला दुखापत झाली होती. यातून तो सावरला असून पहिल्या कसोटीच्या संघनिवडीसाठी उपलब्ध असेल. गेल्या दोन दिवसांपासून जडेजाला ताप आला आहे. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. केप टाऊनमधील स्थानिक वैद्यकीय सल्लागारांच्या सल्ल्यानुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने जडेजाला रुग्णालयात दाखल केले आहे. येत्या 48 तासांत तो पूर्ण तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे.\nया दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा एकदिवसीय सामने आणि तीन ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे.\nकसोटी मालिकेसाठी भारताचा संघ :\nविराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रविचंद्रन आश्‍विन, जसप्रित बुमराह, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, हार्दिक पांड्या, पार्थिव पटेल, चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ईशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, उमेश यादव.\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nअपयशी कामगिरीने बांगलादेशाने सहा खेळाडूंचा करार रोखला\nढाका - गेल्या वर्षातील अपयशी कामगिरीनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने सहा क्रिकेटपटूंचा करार रोखण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्याचबरोबर अन्य...\n63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग\nनवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर...\nमोहाली - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही...\nपुण्यातील सामन्यांवर पाणी संकट\nमुंबई - पुण्यात सिंचन विभागामार्फत पवना नदीतून गहुंजे स्टेडियमला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बुधवारी (ता. १८) मुंबई उच्च न्यायालयाने रोखला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/", "date_download": "2018-04-20T16:16:26Z", "digest": "sha1:6DLQ7TECQLC5HOCTGPUBHXRLBBMLOFBG", "length": 13671, "nlines": 168, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "Online Marathi News Paper - Majha Paper", "raw_content": "\nअच्छे दिन : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले\nमनमोहन सिंह यांनी केली नाही महाभियोगाच्या नोटिसवर सही\nसेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार उच्चपदावर पोहचू शकत नाही; भाजप नेता बरळला\nशासकीय खर्चातून विनायक मेटेंसाठी २० लाखांची आलिशान कार\nबलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात\nचेन्नईमधील ह्या मंदिरामध्ये भाविकांसाठी खास प्रसाद\nतलावामध्ये दफन असलेले १०७ वर्षे जुने रहस्य अखेरीस उघड\nदोनशे वर्षांपासून लपवून ठेवलेल्या राणीच्या हृदयाचे रहस्य नेमके काय\nतुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप\nअच्छे दिन : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले\nमनमोहन सिंह यांनी केली नाही महाभियोगाच्या नोटिसवर सही\nवरुणच्या ‘ऑक्टोबर’ने ढापली मराठी चित्रपटाची कथा\nसेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार उच्चपदावर पोहचू शकत नाही; भाजप नेता बरळला\nस्त्री सुरक्षेचे कारण देत अभिनेत्रीचा भाजपला रामराम\nमहाराष्ट्र दिनी आमिर खानचे महाश्रमदान\nशासकीय खर्चातून विनायक मेटेंसाठी २० लाखांची आलिशान कार\nसलमानच्या आगामी चित्रपटात झळकणार सुनील ग्रोवर\nबलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात\nनरोडा पाटिया दंगल प्रकरणी माया कोडनानी दोषमुक्त\nसर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nराज्य सरकारने थकवले १ लाख शेतकऱ्यांचे ७०० कोटी रुपये\nआता श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत\nअर्जुनाच्या हाती बाण आला की दानवाचा वध होणारच : अर्जुन खोतकर\nनरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर सामनाचे टीकास्त्र\n'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विराट, दीपिका व नडेला यांचा समावेश\nनटराजाच्या तांडव नृत्यावरून प्रेरित रॉयल एन्फिल्ड बाईक\nया मंदिरात कैदी, स्मगलर करतात पूजा, वाहतात बेड्या\nवाढदिवस मोठ्याचा, गिफ्ट धाकट्याला\nपुन्हा चर्चा सोनम आणि तिच्या बुटांची\nइनफोकसचा व्हिजन ३ प्रो भारतात लाँच\nप्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व स्वीकारावे- आठवले\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेस आणणार महाभियोग प्रस्ताव \nभारतीय मुलीचे नाव आकाशगंगेतील ग्रहाला मिळणार\nवय वर्षे ९८ अजूनही विद्यार्थी\nधूम्रपान सोडायचेय, ऑनलाईन व्हा\nतुम्ही पाहिला का ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ ट्रेलर \nकठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न\nहर्षवर्धनच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’चा ट्रेलर रिलीज\nयूट्यूबवर नेहाच्या ‘ओ हमसफर’चा धुमाकूळ\nआजपासून सुरू झालेल्या नाशिक-मुंबई व...\nआता फेसबुकवरून करता येणार करा मोबाइ...\n५ पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे क...\nआता श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्या...\nउषा नाडकर्णींना झाली अनिल थत्तेच्या...\nटेलरिंगचे काम करणाऱ्या मुलाला मिळाल...\nवाढदिवस मोठ्याचा, गिफ्ट धाकट्याला...\nअच्छे दिन : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रु...\nदातदुखी कमी करण्यासाठी अवलंबा हे उप...\nशुद्ध सोने कसे ओळखाल\nशासकीय खर्चातून विनायक मेटेंसाठी २०...\nही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का\nहे पहा बिनभांडवली धंदे...\nराज्य सरकारने थकवले १ लाख शेतकऱ्यां...\nशीख महिला यात्रेकरूंचे पाकिस्तानात...\nहिरे व्यापाऱ्यांच्या बारा वर्षांचा...\nचेहर्‍यावरचे काळे डाग कसे घालवावेत...\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/12/CurrentAffairs18122016.html", "date_download": "2018-04-20T16:43:04Z", "digest": "sha1:5IS7POU5KVUJM6PHOECJ4BRHW4XT6TOV", "length": 21083, "nlines": 198, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : १८ डिसेंबर", "raw_content": "\nचालू घडामोडी : १८ डिसेंबर\nज्युनिअर भारत संघ हॉकी विश्वविजेता\nभारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २–१ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.\n१५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता.\nज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा हा अंतिम सामना लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारत आणि बेल्जियम या संघांमध्ये झाला.\n८व्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि २२व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले.\nबिपिन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख\nभारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे.\nसध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील.\nमुळचे उत्तराखंडयेथील बिपिन रावत यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता.\nत्यांनी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए)मधून पदवी मिळवली आहे. त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ किताब प्राप्त झालेला आहे.\n१९७८मध्ये ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती.\nरावत यांना उंचावरील लढायांचा आणि घुसखोरीविरोधी मोहिमांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी चीन व पाकिस्तान सीमेवरील भारतीय तुकड्यांचे नेतृत्व केले आहे.\nरावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्कर प्रमुखपद दिल्याने वाद निर्माण झाला आहे.\n१९७२मध्ये इंदिरा गांधी सरकारने लेफ्टनंट जनरल पी. एस. भगत या ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्याऐवजी सॅम माणेकशॉ यांची नेमणूक केली होती.\nतर, १९८३मध्ये लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्याऐवजी अरुणकुमार वैद्य यांच्यावर लष्करप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.\nबी. एस. धनोआ नवे हवाई दलप्रमुख\nनवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे.\nहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nधानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. कारगिल युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला आहे.\n‘रॉ’च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना\nभारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संघटना रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nते १ जानेवारी २०१७ ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.\nधस्माना हे १९८१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्याचे ‘रॉ’ प्रमुख राजेंद्र खन्ना यांची जागा घेतील.\nते मध्य प्रदेश केडरचे असून केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष सचिव होते. त्यांनी रॉमध्ये २३ वर्षे सेवा बजावली आहे.\nआयबीच्या प्रमुखपदी राजीव जैन\nदेशांतर्गत गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या प्रमुखपदी केंद्र सरकारने राजीव जैन यांची नियुक्ती केली आहे.\nते १ जानेवारी २०१७ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.\nराजीव जैन हे १९८०च्या बॅचचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या ‘आयबी’मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.\n‘आयबी’चे प्रमुख दिनेश्वर शर्मा हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून, त्यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली मुदतवाढ नाकारली आहे.\nहिमाचल प्रदेशमध्ये १०० टक्के आधार नोंदणी\nनवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे.\nहिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ७२,५२,८८० जणांनी आधार नोंदणी केली आहे.\nआधार नोंदणीची २०१५च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील एकूण ६ राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्ये ठरली आहेत.\nहिमाचल प्रदेशमध्ये २४० कायमस्वरुपी आधार नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.\nया केंद्रामध्ये नव्याने आधार नोंदणीसह, पूर्वी नोंदणी केलेल्या आधारमध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.\nशरद पवार यांचा एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा\nलोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.\nलोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.\nतसेच राजकीय व्यक्तींना संघटेनेच्या अध्यक्षपदी राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन कालावधीसाठी पदाधिकारी होता येते.\nशरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.\nया शिफारशींनुसार शरद पवार एमसीएचे अध्यक्षपद भुषविण्यास अपात्र ठरतात. शरद पवारांचे वय ७६ वर्ष असून त्यांनी याआधी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे.\nएमसीएने लोढा समितीच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.\nफ्रान्सिस चेकाचा विजेंदर सिंगकडून पराभव\nभारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा पराभव करत ‘आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट’चे अजिंक्यपद कायम राराखले आहे.\nविजेंदरने याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्या कॅरी होप याचा पराभव करत हा किताब मिळवला होता.\nएकूण १० फेऱ्यांच्या या सामन्यामध्ये विजेंदरने तिसऱ्याच फेरीत चेका याला निर्णायक ठोसा लगावत पराभूत केले.\nसामन्याच्या सुरुवातीस चेका याने आक्रमक खेळ केला. मात्र विजेंदरने आश्वासक खेळ करत चेकाला वेगवान व नेमक्या ठोशांनी जेरीस आणले.\nया सामन्यापूर्वी चेकाकडे ४३ व्यवसायिक सामन्यांचा अनुभव होता. त्यापैकी ३२ सामन्यात त्याने विजय मिळवला होता.\nव्हेनेझुएलाचा नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर\nव्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला असून आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.\nव्हेनेझुएला सरकारने १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्वाधिक मूल्याची शंभर बोलिव्हरची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.\nबँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nसरकारने १०० बोलिव्हरची नोट रद्द करून ५००, २००० आणि २०,००० बोलिव्हरची नवी नोट बाजारात आणली होती. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी फक्त ७२ तासांचा वेळ देण्यात आला होता.\nदेशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता.\nव्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून, सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३० डिसेंबर\nचालू घडामोडी : २९ डिसेंबर\nचालू घडामोडी : २८ डिसेंबर\nचालू घडामोडी : २७ डिसेंबर\nचालू घडामोडी : २६ डिसेंबर\nस्पर्धापरीक्षा तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच\nचालू घडामोडी : २५ डिसेंबर\nचालू घडामोडी : २४ डिसेंबर\nचालू घडामोडी : २३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २२ डिसेंबर\nपीएसआय परीक्षेसाठीची वयोमर्यादेत वाढ\nचालू घडामोडी : २१ डिसेंबर\nचालू घडामोडी : २० डिसेंबर\nचालू घडामोडी : १९ डिसेंबर\nचालू घडामोडी : १८ डिसेंबर\nमासिक : नोव्हेंबर २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : १७ डिसेंबर\nचालू घडामोडी : १६ डिसेंबर\nचालू घडामोडी : १५ डिसेंबर\nचालू घडामोडी : १४ डिसेंबर\nचालू घडामोडी : १३ डिसेंबर\nचालू घडामोडी : १२ डिसेंबर\nपोलादी नेत्या जे. जयललिता\nचालू घडामोडी : ११ डिसेंबर\nचालू घडामोडी : १० डिसेंबर\nचालू घडामोडी : ९ डिसेंबर\nचालू घडामोडी : ८ डिसेंबर\nचालू घडामोडी : ७ डिसेंबर\nचालू घडामोडी : ६ डिसेंबर\nचालू घडामोडी : ५ डिसेंबर\nचालू घडामोडी : ४ डिसेंबर\nचालू घडामोडी : ३ डिसेंबर\nचालू घडामोडी : २ डिसेंबर\nचालू घडामोडी : १ डिसेंबर\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:45:42Z", "digest": "sha1:7RA6M5OCKLQ4E6ATK6LGOI43RNNG3LRJ", "length": 6378, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुइस स्लोतिन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१ डिसेंबर, १९१० (1910-12-01)\n३० मे, १९४६ (वय ३५)\nलॉस अलामोस, न्यू मेक्सिको\nलुइस अलेक्झांडर स्लोतिन (१ डिसेंबर १९१० - ३० मे १९४६) हा कॅनडियन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने दुसऱ्या महायद्धादरम्यान अण्वस्त्र बनविण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या गोपनीय मॅनहॅटन प्रकल्पात सहभाग घेतला होता. अण्वस्त्रामधील विखंडन (fission) रासायनिक क्रिया अखंडित (sustained nuclear reaction) चालू राहण्यासाठी कमीत कमी किती प्लुटोनियम व युरेनियम आवश्यक आहे यावर तो संधोधन करत होता.(त्याला क्रिटिकल मास (critical mass)) म्हणतात.) दुसऱ्या महायुद्ध चालू असतांनासुद्धा त्याचे हे संशोधन लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळेत चालू होते.\n२१ मे १९४६ रोजी स्लोतिनने चुकून विखंडन क्रिया चालू केली व त्यातून एकदम भेदक किरणोत्सार बाहेर पडला. त्याला तडक रुग्णालयात नेण्यात आले मात्र तरीही नऊ दिवसांनंतर ३० मे रोजी किरणोत्सर्गामुळे त्याचे निधन झाले. तो अशा प्रकारच्या अपघाताला बळी ठरणारा दुसरा व्यक्ती आहे.[१]मात्र स्लोतिनच्या प्रासंगावधानामुळे प्रयोगशाळेतील त्याच्या इतर सहकाऱ्यांचे प्राण वाचले. यासाठी अमेरिकेच्या सरकारने त्याचा मरणोत्तर वीर म्हणून गौरव केला. हा अपघात व त्याचा परिणाम यांचे अनेक कल्पित वृतांतामधून नाट्यीकरण करण्यात आले आहे.\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९४६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-04-20T16:24:39Z", "digest": "sha1:BJYRND2FDWEEBLQFWCBCZ4MDC7GZT5WN", "length": 5519, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थिनीचा विनयभंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशुभम सुधीरकुमार दुबे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुबे एका लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. सन 2016 ते 11 एप्रिल 2018 दरम्यान दुबेने तरुणीचा वेळोवेळी पाठलाग केला, तसेच तिला तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी अखेर विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दुबेवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास हाती घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरटीई प्रवेशाची दुसरी फेरी दि. 18 पासून\nNext articleडॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nandurbar/mahavitrans-shahada-subdivision-receives-78-lakh-rupees-first-phase/", "date_download": "2018-04-20T16:11:17Z", "digest": "sha1:CD745TPGJMAYV7BO74JBLEY72HRTJFS3", "length": 27670, "nlines": 340, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mahavitran'S Shahada Subdivision Receives 78 Lakh Rupees In First Phase | महावितरणच्या शहादा उपविभागाकडून पहिल्या टप्प्यात 78 लाखांची वसुली | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nमहावितरणच्या शहादा उपविभागाकडून पहिल्या टप्प्यात 78 लाखांची वसुली\nवीज खंडीत केलेल्या कृषिपंपाची पुन्हा जोडणी\nलोकमत न्यूज नेटवर्कबोरद : महावितरणच्या शहादा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या थकबाकीदार कृषिपंपधारकांकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 78 लाख रुपयांची थकबाकी भरण्यात आली आह़े उर्वरीत रक्कम 15 नोव्हेंबर्पयत भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े त्याच प्रमाणे पहिल्या टप्प्यात थकबाकी भरणा:या सुमारे 800 कृषिपंप धारकांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आह़ेगेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकीदारांवर कारवाईचे हत्यार वापरण्यात येत होत़े वर्षानुवर्षे थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणा:या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत होती़ त्यामुळे याचा परिणाम म्हणून शहादा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या कृषिपंपाचे वीज बिल थकबाकीदारांकडून पहिल्या टप्प्यात भरण्यात आले आह़े त्यामुळे महावितरणकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेशहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव हे चार तालुके येतात़ चारही तालुके मिळून 23 हजार 669 इतकी कृषिपंपाची जोडणी आह़े त्यापैकी शहादा एक मध्ये 28 लाख 61 हजार, शहादा दोन मध्ये 29 लाख 8 हजार, धडगाव 8 लाख, तळोदा 7 लाख, अक्कलकुवा येथे 5 लाख 80 हजार असे एकूण सुमारे 78 लाखांची वसुली करण्यात आली आह़े थकबाकीचा हप्ता भरलेल्या सर्व 800 कृषिपंपांची वीजजोडणी पुन्हा सुरळीत करण्याच्या सुचना संबंधित तालुक्याच्या प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, शेतक:यांचा आता महत्वाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे या हंगामतील गहु, हरभरा, रब्बी ज्वारीची पेरणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आह़े यामुळे शेतीच्या कामांमध्ये वेळोवेळी पाण्याची आवश्यकता भासतच असत़े त्यात, वीज बिलाची थकबाकी असलेल्या शेतक:यांच्या कृषिपंपाची वीज ऐन हंगामात कापण्यात येत असल्याने शेतकरीही बेजार झाले होत़े महावितरणच्या कारवाईच्या बडगा हा शमन्याचे नावच घेत नसल्याने अखेरीस संबंधित थकबाकीदारांनी भरणा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु काही शेतक:यांकडून वीज मंडळाच्या आडमुठेपणामुळे या पेरण्या लांबण्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात येत आह़े कृषिपंप बंद असल्याने पाण्याअभावी केळी, पपई ही पीकेही करपत होती़ त्यामुळे शेतकरी पूर्ण हतलब झाले होत़े रब्बी हंगामावर आता शेतक:यांचे लक्ष केन्द्रीत झाले असतांना वीज वितरण कंपनीने थकित बिलांसाठी तगादा लावला आह़े साहजिकच शेतकरी मेटाकुटीला आला असल्याची व्यथा त्यांच्याकडून मांडण्यात येत आह़े शहादा उपविभागातील सर्वाधिक कृषिपंपधारकाचे वीज बिल थकीत आहेत़ त्यामुळे महावितरणकडून ही मोहिम राबविण्यात आली होती़ अद्यापही काही कृषिपंपधारकांकडून थकबाकी भरण्याबाबत पावले उचलण्यात येत नसल्याने येत्या काही दिवसात महावितरण यावर काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आह़े\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात\nशहादा खरेदी केंद्रात 10 दिवसात 950 क्विंटल हरभरा खरेदी\nनंदुरबार प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे उपद्रवींचे फावले\nबोगस शिक्षक भरती प्रकरणातील सहा जणांना जामीन\nनंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक\nउमर्देखुर्द येथे साखळदंड तोडण्याची परंपरा कायम\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2018-04-20T16:31:41Z", "digest": "sha1:YNA52E3IFFWVH2SEO5SS23WMIENE2GAJ", "length": 4116, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनुजा अय्यर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. २००७ - सद्य\nसंध्या अय्यर ऊर्फ अनुजा अय्यर हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ही मुख्यत्वे तमिळ चित्रपटांत कामे करते.\n२ पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण\nपार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]\n२००७ साली पडद्यावर झळकलेल्या 'सिवी' चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-20T16:22:22Z", "digest": "sha1:N6DVFITJBORCD2OGMSVWI5NG7NBVX5EU", "length": 5906, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भांडगावमधील मसाले कंपनीच्या गोडाऊनला आग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभांडगावमधील मसाले कंपनीच्या गोडाऊनला आग\nयवत- दौंड तालुक्‍यातील भांडगाव गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या प्रवीण मसालेवाले कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.12) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.\nरात्री अचानक या कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याचे निदर्शनास आले. ही लागलेली आग विझविण्यासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचा आणि कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या बंबला पाचारण करण्यात आले होते. लागलेली ही आग अडीच ते तीन तासात आटोक्‍यात आली. गुरुवारी कंपनीला सुट्टी असल्याने या परिसरात कामगार नव्हते. या गोडाऊनमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा साठा होता. या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याचे कारण समजू शकले नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगौणखनिजच्या काळ्या धंद्याला बसणार “हरित’ चाप\nNext articleआस्तिक नास्तिकाचा संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:44:35Z", "digest": "sha1:PDJMN4SO43NFLOZRW7DDT6KOVWQRJ7DV", "length": 3442, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सियेरा लिओनमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"सियेरा लिओनमधील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/four-more-students-radar-pradyumna-murder-case/amp/", "date_download": "2018-04-20T16:18:55Z", "digest": "sha1:55ZO3NL4PVBLWV46MLM2WN4QACRMS6YI", "length": 10021, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Four more students on the radar of the Pradyumna murder case | प्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता | Lokmat.com", "raw_content": "\nप्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता\nप्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे.\nनवी दिल्ली - प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयने तपासाला वेग दिला असून, चार विद्यार्थी त्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान अधिकारी मात्र यासंबंधी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. यामधील एका विद्यार्थ्याची चौकशीही करण्यात आली आहे.\nसीबीआय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयला इतर विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी संशय आहे. त्याच विद्यार्थ्याने मुख्य आरोपीसोबत मिळून शाळेच्या माळी आणि शिक्षकाला प्रद्युम्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली होती. प्रद्युम्न हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याची सलग तिस-या दिवशी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी इतर विद्यार्थ्यांशिवाय रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांना एक चाकू जप्त केला असून, तपासतील मुख्य पुरावा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.\nसीबीआयने सांगितलं आहे की, प्रद्युम्न हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळा प्रशासन आणि आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक पोलिसांसोबत मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते का यादृष्टीनेही सीबीआय तपास सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्नच्या हत्येत सहभागी आरोपीची माहिती आधीच शाळा प्रशासनाला मिळाली होती. जर हे खरं असेल तर येणा-या दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरतील आणि अनेक जण सीबीआयच्या रडारवर असतील. अद्याप कोणालाही याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं सीबीआयने सांगितलं आहे.\nयाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कंडक्टर अशोकची सुटका होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरु असताना अशोकची चौकशी होउ शकते, मात्र त्याच्या जामीनाला सीबीआय विरोध करणार नाहीये. जामीनाला विरोध करण्यासाठी सीबीआयकडे कोणतंही ठोस कारण नसल्याने विरोध करण्याचा प्रश्न येत नाही.\nप्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या सीबीआय तपासानंतर शाळेतीलच 16 वर्षीय विद्यार्थ्याने एका दुकानातून चाकू खरेदी करत प्रद्युम्नची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.\n 8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं होतं.\nप्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी ड्रायव्हरला अडकवल्याचं सीबीआय तपासात उघड\nप्रद्युम्न बरडेचा खुनी निघाला वर्गमित्रच\nपरीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार\n दुभती गाय विकून महिलेने सुनेसाठी बांधलं शौचालय\nचिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला फाशी केंद्र सरकारने उचलली पावले\nदाऊदला झटका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा, दाऊद कुटुंबीयांची याचिका SCने फेटाळली\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pasta-macroni-salad/", "date_download": "2018-04-20T16:32:32Z", "digest": "sha1:VLV2QG2IBENW35F65VG5SGVAXPRNLPFY", "length": 15252, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "बनवा झटपट पास्ता मॅकरोनी सलाड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nबनवा झटपट पास्ता मॅकरोनी सलाड\nजेवणात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर त्याला मॅकरोनी सलाड हे उत्तम पर्याय ठरू शकते. त्यातही रात्रीच्या जेवणात हे सलाड घेणे खुपच फायदेशीर आहे. बाजारात हल्ली विविध आकाराचे मॅकरोनी मिळतात. यामुळे ही डीश खाण्याबरोबरच दिसायलाही आकर्षक असते.\nसाहीत्य... पास्ता मॅकरोनी २ कप, हिरवा वाटाणा दिड कप, उकळलेले गाजर दीड कप, काकडीचे काप एक कप, बदाम, (भाजलेले) पाव कप, कडीपत्ता एक चमचा, दही २०० ग्रॅम\nकृती…एका पॅनमध्ये मॅकरोनी उकळून घ्या. ती शिजल्यावर त्यातील पाणी काढून टाका. दुसऱ्या एका पॅनमध्ये वाटाणा, गाजर शिजवून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये मॅकरोनी घ्या. त्यात बदाम, वाटाणा, गाजर, दही व काकडीचे काप टाका. सर्व पदार्थ चमच्याने हलवून एकत्र करा. नंतर त्यावर चाट मसाला व कडीपत्ता टाका. झटपट पास्ता मॅकरोनी सलाड तयार.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील…तर राज्यात भाजपचा ‘बी’ देखील शिल्लक राहणार नाही\nपुढीलभाजप आमदाराने केले रिलायन्सच्या अधिकाऱ्यांचे अपहरण, शिवसेनेने उठवला आवाज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/derelict-vehicle/articleshow/62481295.cms", "date_download": "2018-04-20T16:36:31Z", "digest": "sha1:52FQ7L3SBO6WFHSX4SW5BL2KYL6IUKHW", "length": 19926, "nlines": 234, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "derelict vehicle | बेवारस गाडी हटवावी - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nठाणे : पूर्वेकडील महर्षि वाल्मिकी मार्गावरील स्वातंत्र्य सैनिक सोसायटी व बिम्स कॉलेजजवळ गेल्या आठ दिवसांपासून बेवारस कार धूळ खात पउभी आहे. ही कार हटवून रस्ता मोकळा करावा. अनिल लिंगायत\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nफुथपाथ वरील व्यायाम ची साधनाची दुरावस्था.\nदिवा स्टेशन बाहेर रिक्षावल्याची मुजोरी.\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/the-tradition-of-eating-chicken-in-konkan-262425.html", "date_download": "2018-04-20T16:20:08Z", "digest": "sha1:M2YG4YKNGBJ4IB6DCFKZWGECQRBNWSNP", "length": 13781, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"...तुजो मिरग मान्य करून घे !\", तळकोकणात कोंबडा अर्पण करून शिजवून खाण्याची परंपरा", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n\"...तुजो मिरग मान्य करून घे \", तळकोकणात कोंबडा अर्पण करून शिजवून खाण्याची परंपरा\n. पीक चांगलं येऊ दे म्हणून मिरगाच्या दिवशी शेताला रखवालीचा कोंबडा अर्पण करून तो शिजवून खाण्याची परंपरा सिंधुदुर्गात आहे. चला तर आमच्यासोबत मिरगाच्या कोंब्याची चव घ्यायला \n07 जून : मान्सून रखडला असला तरी तळकोकणात आजपासून मिरग सुरू झालाय. पीक चांगलं येऊ दे म्हणून मिरगाच्या दिवशी शेताला रखवालीचा कोंबडा अर्पण करून तो शिजवून खाण्याची परंपरा सिंधुदुर्गात आहे. चला तर आमच्यासोबत मिरगाच्या कोंब्याची चव घ्यायला \nनेहमी हिरवं असणारं कोकण मान्सूनपूर्व पावसाने टवटवीत झालंय. वातावरणात छान गारवा आहे. कारण आता मिरग इलो हा म्हणूनच हे शेतकरी गावठी कोंबडा घेऊन निघालेयत आपल्या शेतात. मिरगाच्या दिवशी शेताला रखवालीचा कोंबडा द्यायची ही प्रथा. आता हा रखवालीचा कोंबडा म्हणजे नक्की काय हे ऐका \nकारिवडेचे शेतकरी विष्णू तळवणेकर सांगतात, \"सालाबाद प्रमाणे वर्षाक, ढोरावासराक, मुलाबाळाक, शेतात फिरणाऱ्याक देवाची येक रखवाली हेच्यासाटी कोंबो दितव. कोंबो नी नारळ. अवगतनीक काजळ कून्कू ब्रामनाक पानाचो विडो असा करून सांगणा करतव. तेच्यामुळा सबंद वर्षभर आमका तेची रखवाली मेळता शेत चांगला पिकताम्हनान आमी सालाबादप्रमाने रितीरिवाजाप्रमाने ह्यो कोंबो दितव . असा करून सांगणा करतव. तेच्यामुळा सबंद वर्षभर आमका तेची रखवाली मेळता शेत चांगला पिकताम्हनान आमी सालाबादप्रमाने रितीरिवाजाप्रमाने ह्यो कोंबो दितव .\nमिरग म्हणजे आमचो गावटी मानसाचो राजा आसा कदी लागता तेची वाट बगीत आसतव तरव्याची सुरुवात आमी मिरगापासून करतव तेच्यासाटी आमी कोन्बो दितव रकवाली दितव.\nमिरगाच्या रखवालीचा हा कोंबडा कापायचा तर आहेच पण गाऱ्हाणं झाल्याशिवाय नाही. म्हणूनच कोंबडा कापण्याची तयारी झाली की गाऱ्हाण्याला सुरुवात होते. \"बा देवा मेरेकरा माज्या शेताच्यारकवालदारा .. आज ह्यो तुका नारळ कोंबो ठेवलेलो हा तो मान्य करून घे रानटी डुकर म्हना..गवे म्हना हेंच्यापासून सरक्षण कर... आनी तुजो मिरग यंदा मजेत करून घी रे म्हाराजा..\nगाऱ्हाणं झालं की, मग घरातली चूल पेटते आणि सुरू होते मिरगाचा कोंबडा शिजवण्याची लगबग... मग काय नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं..\nसंध्याकाळ झाली की मिरगाच्या दिवशी प्रत्येक घरात हा वास दरवळू लागतो आणि सांगतो की मिरग सुरू झालाय.\nघरातली पोरंटोरं, मोठी माणसं सगळेच मग या सागुतीवर ताव मारायला बैठक मारून बसतात. रात्र वाढू लागलेली असते. बाहेर पाउस सुरू झालेला असतो आणि अख्खं गाव मिरगाच्या कोंबड्याची चव घेण्यात मशगुल असतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-satej-patil-led-the-protest-against-gokul-milk-483278", "date_download": "2018-04-20T16:29:18Z", "digest": "sha1:X6I72P7EGTUM7TRG5AI6VQLGSVUDCVEP", "length": 15353, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा", "raw_content": "\nकोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा\nगोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा निघाला. शेकडो शेतकरी आपल्या गायी आणि म्हशींना सोबत घेऊन गोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nकोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा\nकोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा\nगोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा निघाला. शेकडो शेतकरी आपल्या गायी आणि म्हशींना सोबत घेऊन गोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-central-government-employee-will-get-25-lakhs-rupees-home-loan-at-8-5-percentage-477747", "date_download": "2018-04-20T16:28:52Z", "digest": "sha1:IVI3VFXP6VWDQSAKGIQLMX7TBBT4V4QL", "length": 16790, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज 8.5 टक्के दराने", "raw_content": "\nनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज 8.5 टक्के दराने\nगृहनिर्माण अग्रीम योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या घरासाठी 8.5 टक्के दरानं 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. यापूर्वी केवळ साडे सात लाखांपर्यंत व्याज सहा ते साडे नऊ टक्के व्याजदरानं मिळत होतं. नगरविकास मंत्रालयाच्या दाव्यानुसार 20 वर्षांसाठी 25 लाखांचं गृहकर्ज देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत केंद्राच्या योजनेमुळे 11 लाखांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे जर एखादे दाम्पत्य केंद्र सरकारचे कर्मचारी असेल तर त्या दोघांनाही या योजनेचा वेगवेगळा फायदा घेता येऊ शकेल.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज 8.5 टक्के दराने\nनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज 8.5 टक्के दराने\nगृहनिर्माण अग्रीम योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या घरासाठी 8.5 टक्के दरानं 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. यापूर्वी केवळ साडे सात लाखांपर्यंत व्याज सहा ते साडे नऊ टक्के व्याजदरानं मिळत होतं. नगरविकास मंत्रालयाच्या दाव्यानुसार 20 वर्षांसाठी 25 लाखांचं गृहकर्ज देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत केंद्राच्या योजनेमुळे 11 लाखांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे जर एखादे दाम्पत्य केंद्र सरकारचे कर्मचारी असेल तर त्या दोघांनाही या योजनेचा वेगवेगळा फायदा घेता येऊ शकेल.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4017", "date_download": "2018-04-20T16:44:26Z", "digest": "sha1:KDWNFEW45Z6P6C6MR76G3U7SB2HDTY5W", "length": 8583, "nlines": 101, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » संग्राह्य बातम्या » डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nडहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nमुंबई विद्यापीठा च्या अधिसभे साठी १० नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक आज 25 मार्च रोजी घेण्यात आली. डहाणूतील नोंदणीकृत 162 पदवीधर मतदारांसाठी एस. आर. करंदीकर महाविद्यालयात निवडणूक केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यन्त निवडणुकीची वेळ होती. संध्याकाळी ५ वाजे पर्यंत 51% मतदान झाल्याची माहिती मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.\nPrevious: चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न\nNext: मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nकुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध\nपालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nत्वरित मदत न दिल्याप्रकरणी बीएआरसीचे फायर ऑफिसरवर गुन्हा\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/09/25/kafkas-leopards/", "date_download": "2018-04-20T16:08:45Z", "digest": "sha1:E24X2VPKYGDA6Y7MNWCEGDXDK2DKDGWB", "length": 25279, "nlines": 72, "source_domain": "rightangles.in", "title": "काफ्काच्या बिबट्यांची गोष्ट | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nजागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. ‘’चुकीचा अर्थ लावणं” हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि आयुष्याचा चुकीचा अर्थ लावणं, आपल्या सामाजिक स्थितीबद्दल चुकीची कल्पना असणं,माणसं आणि घटना यांना जोडणारे चुकीचे रेखांश तयार करणं – अशा अन्वयार्थांच्या घोळात यातली पात्रं सापडलेली आहेत.\nकाही लेखक असे असतात की त्यांच्यानंतर लिहिणाऱ्या कोणत्याही लेखकाला त्यांचा प्रभाव टाळता येत नाही.त्यांची गडद सावली पुढच्या सर्व पिढ्यांवर पसरते.त्यांची घराणी निर्माण होतात.त्यांना उपघराण्याच्या फांद्या फुटतात.त्यातून जमिनीत रुजू पाहणाऱ्या पारंब्या सरसरत बाहेर येतात आणि त्यांचं डेरदार साम्राज्य तयार होतं.फ्रान्त्झ काफ्का हा लेखक असाच विशाल आणि सतत विस्तारशील घराण्याचा मूळ पुरुष.त्यानं आपला कल्पित साहित्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.काफ्कानं आपले लेखक-वंशजच घडवले नाहीत,तर लेखक-पूर्वजही निर्माण केले, अशा आशयाचं होर्खे लुई बोर्खेसचं विधान शंभर टक्के खरं आहे.काफ्का वाचल्यानंतर त्याच्याआधीच्या पिढीतल्या हर्मन मेलविल,निकोलाई गोगोल,दस्तयेवस्की अशा अनेक लेखकांचं साहित्य आपल्याला “काफ्काएस्क’’ वाटायला लागतं.जागतिक साहित्याततल्या समकालीन महत्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे. मोआसिर स्क्लियार(Moacyr Scliar) या ब्राझिलीयन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी “काफ्का अँड लेपर्डस्” ( Kafka and Leopards)ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. स्क्लियार हा गोष्ट सांगण्यात मजा घेणाऱ्या लेखकांपैकी असल्यानं या जेमतेम शंभर पानांच्या कादंबरीची महती कळण्यासाठी तिचं कथासूत्र ठाऊक असणं आवश्यक आहे.\nया कादंबरीच्या (खरंतर दीर्घकथेच्या) कथानकाची सुरुवात १९६५ साली ब्राझीलमध्ये होते.कथानायक पोलीसांच्या ताब्यात असतो.त्याच्याकडे एक जर्मन हस्तलिखित सापडतं.त्याच्याखाली फ्रान्त्झ काफ्का अशी सही असते. तो मजकूर पोर्तुगिजभाषी पोलीसांना कळत नाही.मात्र तो सांकेतिक भाषेत लिहिलेला उठावाचा संदेश असावा अशी शंका त्यांना येते.\nत्यानंतर कादंबरीचं कथानक सुमारे पन्नास वर्षं मागे जातं.नायकाचे काका युक्रेनमधल्या एका गावात रहात असतात.त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीनं गारुड केलेलं आहे.पहिल्या महायुद्धात ट्रॉटस्कीला मदत करुन क्रांतीकारक होण्याची त्यांची इच्छा आहे.मात्र छोट्या गावात अशी संधी कुठून मिळणार तेवढ्यात त्यांचा एक मित्र थेट ट्रॉटस्कीला भेटून परत येतो.त्याच्यावर एक कामगिरी सोपवण्यात आलेली असते.प्राग शहरात जाऊन ट्रॉटस्कीच्या एका हस्तकाला भेटायचं.त्याच्याकडून सांकेतिक भाषेतला संदेश असलेला कागद घ्यायचा.त्यातल्या संदेशाची उकल करायची.त्यात ज्याला ठार करायचं त्या व्यक्तीचं नाव सापडेल.त्या व्यक्तीला शोधून तिचा काटा काढायचा.ही थरारक कामगिरी आपल्याला करायला मिळावी,ही काकांची इच्छा मित्र आजारी पडल्यामुळे पूर्ण होते.मित्र त्यांच्यावर कामगिरी पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवतो.त्याच्याकडून आवश्यक ती सगळी माहिती घेऊन ते प्रागला पोहचतात.मात्र प्रवासात त्यांच्याकडून ही सगळी माहिती हरवते.ज्याच्याकडून सांकेतिक मजकूर मिळायचा त्या माणसाला शोधायचं कसं,ही मोठी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकते. तिथे ज्यूंच्या प्रार्थनास्थळातल्या धर्मप्रमुखाकडून “फ्रान्त्झ काफ्का” हे नाव त्यांच्या कानावर पडतं. ते ऐकल्यावर आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस हाच असावा असं त्यांना वाटायला लागतं. ते काफ्काला शोधून काढतात. काफ्का त्यांना प्रकाशकाचा माणूस समजतो. नुकतीच लिहीलेली एक छोटी कथा तो छापण्यासाठी त्यांच्या हातात देतो. ती कथा जर्मनमध्ये असल्यानं नायकाच्या काकांना ते सांकेतिक हस्तलिखित वाटतं. आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस आणि संदेश सापडल्याचा त्यांना अतोनात आनंद होतो.प्रत्यक्षात तो मजकूर म्हणजे काफ्काची ‘’लेपर्डस् इन द टेंपल ‘’ ही तीन ओळींची कथा असतेः\nबिबटे देवळात घुसले आणि त्यांनी देवापुढे ठेवलेलं पाणी प्यालं. असं पुन्हा पुन्हा घडायला लागलं. अखेर देवळात आल्यावर त्यांच्या हालचाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतील याबद्दल आधीच अंदाज वर्तवणं शक्य झालंआणि त्यांच्या क्रिया हा धर्मविधीचाच एक भाग बनला.\nनायकाचे काका एका जर्मन माणसाच्या मदतीनं या संहितेचं भाषांतर करुन त्यातला ‘’गुप्त संदेश” उलगडण्याचा प्रयत्न करतात. प्रागमध्ये प्राणीसंग्रहालय कुठे आहे बिबटे म्हणजे नेमकं कोण असेल बिबटे म्हणजे नेमकं कोण असेल काफ्काच्या कथेचा अर्थ लावण्याच्या या प्रक्रियेत नायकाचे काका अधिकाधिक चुकीचे अर्थ लावत जातात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घोटाळ्यांची संख्या वाढायला लागते.\n‘’चुकीचा अर्थ लावणं” हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि आयुष्याचा चुकीचा अर्थ लावणं, आपल्या सामाजिक स्थितीबद्दल चुकीची कल्पना असणं,माणसं आणि घटना यांना जोडणारे चुकीचे रेखांश तयार करणं – अशा अन्वयार्थांच्या घोळात यातली पात्रं सापडलेली आहेत.\nस्वतःच्या भौगोलिक प्रदेशाविषयी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या लेखकांनी ब्राझिलियन साहित्याची परंपरा घडली.मचादो द असिस,योर्हे आमादो,जोआओ रोझा,मार्सिओ सूझा – अशा समर्थ लेखकांनी ते ज्या प्रदेशात जगले त्याचे कोपरे आपल्या साहित्यात आत्मीयतेनं व्यक्त केले.मोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत.त्याचे आईवडील त्याच्या जन्मापूर्वी रशियातून ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाले.तिथल्या ज्यू वस्तीत स्क्लियार लहानाचा मोठा झाला.स्वतःच्या ज्यू असण्याची जाणीव त्याच्या मनात कायम प्रखर राहिली.ज्यू असेलेल्या काफ्काच्या साहित्याचे कळत्या वयापासूनच त्याच्यावर खोल संस्कार झाले.अल्पसंख्याक असणं, “बाहेरचा” असणं या जाणीवांचा प्रत्यय त्याला काफ्काच्या साहित्यातून आला आणि काफ्काशी आपोआपच सहानुभाव जुळला.जगण्याचा अजबपणा,व्यवस्थेची अतर्क्यता आणि कोणत्याही प्रकारचा अन्वयार्थ अंतीम न मानणं – या काफ्काच्या साहित्यातल्या केंद्रीय कल्पना स्क्लियारच्याही साहित्यात केंद्रस्थानी आहेत. “काफ्का अँड लेपर्डस्’’ सुद्धा त्याला अपवाद नाही.ही कादंबरी सध्या मोठ्या संख्येनं लिहील्या जात असलेल्या आधुनिकोत्तर मेटाफिक्शनच्या लाटेत विरघळून जात नाही,त्यामागे सबळ कारणं आहेत.अशा कादंबऱ्यांमध्ये संरचनेला अवास्तव महत्व प्राप्त होऊन आशय गौण ठरतो.पात्र केवळ लेखकाच्या संकल्पनांचं वहन करण्यापुरती,स्वतःचं अस्तित्व नसलेली असतात.त्यांना मिती नसतात.ती निष्प्राण यंत्रमानवांप्रमाणे वावरतात.वास्तववादाचा रटाळपणा टाळून कादंबरीत जिवंतपणा आणायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकवेळी एकरेषीय निवेदन,प्रसंगांची शिस्तबद्ध रचना,पात्रनिर्मिती यांचा बळी द्यायची गरज नसते,हे ज्यांना उमजलेलं आहे अशा मोजक्या लेखकांपैकी स्क्लियार आहे.तो मोजक्या शब्दांत पात्रं आणि प्रसंग उभे करतो. ते वाचकाच्या मनावर ठसवून त्याला निवेदनप्रवाहात गुंतवत नेतो.त्याच्यासाठी वाचक म्हणजे जणू त्याचा कादंबरीलेखनातला भागीदारच.म्हणून स्क्लियारला “दाखवण्या’’पेक्षा ‘’सांगणं” अधिक भावतं.वेळ आलीच तर तो तपशीलवार वर्णनही करतो.अशावेळी हे वर्णन थेट आणि परिणामकारक असतं. कादंबरीत नायकाचे काका काफ्काला पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांच्या नजरेतून आपल्याला काफ्का असा दिसतोः\nकाफ्कानं त्यांच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं आणि तो अचानक खोकायला लागला. तो खोकला कोरडा,सौम्य,दाबलेला तरीही सतत येणारा आणि काळजी निर्माण करणारा होता.ते शहारले.त्यांना हा खोकला चांगलाच ठाऊक होता.त्यांची खात्री पटली,की हा टीबी आहे.त्यात टीबीची सगळी लक्षणं स्पष्ट उमटलेली दिसलीः बारीकपणा,अशक्तपणा,गालाच्या हाडांजवळ असलेली लालसर छटा,त्यात भर म्हणून टीबी पेशंटसाठी अत्यंत घातक अशी थंडीही त्या छोट्याशा घरात होती.एका तीव्र दुःखानं त्यांचा अकस्मात ताबा घेतला.काफ्काच्या आईला जाणवलं असतं असं दुःख. तू आजारी आहेस,काफ्का,खूप आजारी. हा खोकला ही काही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. हा टीबी आहे, कल्पित साहित्य नव्हे.\nया परिच्छेदातून जाणवणारा मानवतेचा स्पर्श आज विश्वसाहित्यात दुर्मीळ आहे.\nकाफ्का पात्र म्हणून जरी स्क्लियारच्या कादंबरीत प्रथमच आला असला,तरी त्याच्या साहित्यात यापूर्वीही काफ्काशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यानं विविध प्रकारे केला आहे. ‘’वॉर इन बॉम फिम’’(War in Bom-Fim) या कादंबरीचा नायक आत्महत्या करण्यासाठी उंदराचं वीष पितो.मात्र मरण्याऐवजी त्याचं एका प्रचंड झुरळात रुपांतर होतं. हे सहजच काफ्काच्या “ मेटामॉर्फसिस” ची आठवण करुन देणारं. त्याच्या “सेंटॉर इन द गार्डन”( Centaur in The Garden) या गाजलेल्या कादंबरीचा नायक अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आहे.काफ्काच्या अनेक प्राणी-कथांना केलेला हा कुर्निसात.\nस्क्लियारचं आयुष्याविषयीचं निरीक्षण एका ज्यूच्या नजरेतून केलेलं आहे,मात्र ते केवळ सांप्रदायिक कोनांमध्ये बंदिस्त होत नाही.त्याचं साहित्य तुमच्या-आमच्या जगण्यापेक्षा फार वेगळं नाही.त्याचं लेखक म्हणून मोठेपण यातच असावं.\nलेखक, चित्रपट समीक्षक, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि बरंच काही\nजे एन यु निवडणुका : कम्युनिस्टांनी गड तर राखला. पुढे काय \nबी एच यू आंदोलन : विद्यार्थिनींनी कर्मठांना दिलेली सणसणीत चपराक.\nब्रेख्त : मार्क्सवादाचा कलात्मक अविष्कार\n“पाऊलखुणा”कारांचे पेशवा गुणगान अभियान\nअपूर्ण राहिलेली सांस्कृतिक क्रांती\nआम्हा सर्वसामान्य मराठी वाचकांना अज्ञात असलेल्या या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. हा लेख ‘साहित्य’ या विभागातील आहे, असा टॅग दिसतो. वेबसाइटच्या मास्टहेडखाली राजकीय, सामाजिक, अर्थव्यवस्था, शेतीप्रश्न, व्यंगचित्रे असे विभाग आहेत, त्यात साहित्य या विभागाची भर किमान या लेखासाठी तरी असायला हवी. असे आणखी लेख आले तर वाचकांना संपन्न व्हायची संधी मिळेल.\nराजेश जी – आमचे लेख वाचण्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही “साहित्य” ही लिंक नॅव्हिगेशन मध्ये टाकली आहे. साहित्यावर अजून लेख येण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील. वाचत राहा.\nलेटेस्ट अपडेट्स साठी तुम्ही आम्हाला फेसबुक आणि ट्विटर वरही फॉलो करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/fierce-fire-slum-near-vandal-railway-station-mumbai/amp/", "date_download": "2018-04-20T16:25:52Z", "digest": "sha1:WVVJBOINUOSNPHKBEQ6K6I3BXKVTMIJ4", "length": 2994, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A fierce fire in the slum near Vandal railway station in Mumbai | मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग | Lokmat.com", "raw_content": "\nमुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग\nमुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.\nऔरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग\nनाशिक : कांद्याच्या चाळींना लागली भीषण आग\nपुणे- क्षणार्धात महागडी ऑडी आणि होंडा सिटी जळून खाक\nअमरावतीमध्ये व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग\nठाण्यात बर्निंग कारचा थरार\nकुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक\nElgar Morcha : भारिपाचा मुंबईत एल्गार मोर्चा, पोलिसांनी नाकारली परवानगी\nमुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा\nMumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको\nगिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-how-to-apply-kajal-perfectly-276199.html", "date_download": "2018-04-20T16:14:58Z", "digest": "sha1:QW7CMG3XG74NRF6E23REP2XHNNRSAP6C", "length": 12072, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोळ्यांचं काजळ न पसरण्यासाठी काही खास टिप्स", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nडोळ्यांचं काजळ न पसरण्यासाठी काही खास टिप्स\nआपल्या डोळ्यांचा मेकअप म्हणजे खूपच नाजूक. डोळ्यांचा मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यानेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं आणि त्यात जर आपलं काजळ डोळ्याभोवती पसरलं तर मात्र आपला चेहरा खराब दिसतो.\n6 डिसेंबर : आता कुठे बाहेर जायचं म्हणजे चेहऱ्याचा मेकअप खूपच महत्त्वाचा. त्यातल्या त्यात आपल्या डोळ्यांचा मेकअप म्हणजे खूपच नाजूक. डोळ्यांचा मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यानेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं आणि त्यात जर आपलं काजळ डोळ्याभोवती पसरलं तर मात्र आपला चेहरा खराब दिसतो.\nत्यामुळे डोळ्यांना काजळ लावताना खालील काही खास टिप्स तुमचं काजळ दिवसभर टिकून ठेवायला मदत करतील.\n- मेकअपची सुरुवात करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि मेकअप न पसरण्यास मदत होईल.\n- हे झाल्यावर चेहरा स्वच्छ टोनरने धुऊन घ्या. याने चेहरा तजेलदार होईल. यानंतर चेहऱ्यावर मेकअप करायला सुरुवात करा.\n- चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर डोळ्यांच्या खाली बेबी पावडर लावा आणि नंतर चांगल्या क्वालिटीचं वॉटरप्रूफ काजळ काळजीपूर्वक डोळ्यांना लावा. असं केल्याने डोळ्यांचं काजळ टिकून राहतं.\n- प्रत्येकाच्या डोळ्यांचा आकार लहान-मोठा असतो. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या आकारानुसार काजळ लावा.\n- आधी आयलायनर लावून मग त्यावर काजळ लावलं तरी चालेल. याने काजळ पूर्ण दिवस टिकून राहते आणि डोळ्याभोवती पसरत नाही.\n- अनेकांच्या पापण्यांजवळ तेलकटपणा असतो, त्याने काजळ लवकर पसरते, अशा वेळी कापसाच्या बोळ्याने ते तेल पुसून घ्या.\n- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना मेकअप काढून झोपा. याने उद्याचा मेकअप करण्यासाठी डोळे स्वच्छ राहतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/kolhapur-local-news/speedbreaker-beats-white-stripes/articleshow/62451743.cms", "date_download": "2018-04-20T16:12:11Z", "digest": "sha1:GDMIF2Y2BBQCSQOTZ4346TCL7772SIRQ", "length": 20383, "nlines": 232, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "speedbreaker beats white stripes | स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मरावेत - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nस्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मरावेत\nशिये जाकात नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गावरील स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मरावेत. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी केलेल्या गतीरोधकमुळे दुर्घटना घडतात. सर्वाजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर उपाय करुन रस्ते वाहतुकीत अच्छे दिन आणावेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी\n1स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे मरावेत...\n2प्रभाग क्र:8 मारी गोल्ड अपार्टमेंट लोहीया बिल्डर...\n4खराब रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीबाबत अनास्था...\n5पुन्हा अतिक्रमण-म न पा कर्मचारी शामिल...\n7हिम्मत बहादूर परिसरातील रस्ता खराब...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/durgesh-bokade-commits-sucide-in-raipur-hotel-accused-for-murder-of-rahul-agrekar/", "date_download": "2018-04-20T16:39:31Z", "digest": "sha1:XWT33RWEPWQRKRWQBZTWLSATL6QVSL5P", "length": 10305, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "धक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nधक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त\nनागपूर येथील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण आणि जिवंत जाळून खून केल्या प्रकरणी दुसरा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी ( शुक्रवारी ) छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. नागपूर शहर पोलीसांना रायपूर पोलिसांकडून हे वृत्त कळताच पूर्ण नागपूर शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून अपहरण करून १ कोटीची खंडणी मागितली आणि नंतर त्यांचा जाळून खून करण्यात आला . ह्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी दुर्गेश बोकडेहा फरार होता.\nराहुल आग्रेकर यांची दारोडकर चौकात जैन लॉटरी एजन्सी आहे. ते मोठ्या प्रमाणात विदर्भातील लॉटरी सेंटर्सना लॉटरीचा पुरवठा करत होते . राहुल यांचे अपहरण करणारे दुर्गेश बोकडे व पंकज हारोडे हे एकमेकांशी परिचित होते . मागील आठ वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती, मात्र काही दिवसांपासून तिघांमध्ये पैशाचा वाद सुरु होता त्यातूनच ही हत्या झाली असावी असे बोलले जात आहे.\nदुर्गेश बोकडे याने पंकजच्या मदतीने राहुल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्लॅन केला . मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी ८ च्या सुमारास ते बोलेरो गाडीमधून दारोडकर चौकात आले व राहुल यांना घेऊन तिघेही बाहेर पडले. त्याच दिवशी सकाळी ११. ३० च्या दरम्यान राहुल यांनी पत्नी अर्पिता यांच्या मोबाइलवर राहुल यांनी फोन केला व मी दीड तासात घरी येतो असे सांगितले. नंतर परत दुपारी २ वाजता राहुल यांचे मोठे बंधू जयेश यांच्या मोबाइलवर राहुलच्या मोबाइलवरून फोन आला व आता राहुल जिवंत हवा असेल तर १ कोटी रुपये दे असे धमकावण्यात आले. हा आवाज दुर्गेश ह्याचा होता .\nदरम्यान, बुटीबोरी येथे राहुल यांचा जळालेला मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी लॉटरी सेंटर चालविणाऱ्या आणि राहुल यांचा मित्र असलेल्या दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला होता . प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार होता. मात्र आज सकाळी त्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे रायपूर पोलिसांकडून नागपूर पोलिसांना कळवण्यात आले. दुर्गेश तेथून पळून छत्तीसगडमधील रायपूरला आला. येथे त्याने दोन दिवस कसे बसे काढल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.\nधक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना\nअखेर लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खूनप्रकरणातील एक आरोपी धरला\nकोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना\nसांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार : मूर्तीसमोर आढळला मृतदेह\n पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा \n← गायींची तब्बल ५० वासरे कत्तलखान्यापासून वाचवली : असे धरले गोवंश तस्कर अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=3920", "date_download": "2018-04-20T16:42:08Z", "digest": "sha1:OV5VYPXHM42QRLPT3PDMPEP4XNC3VMZ2", "length": 8987, "nlines": 101, "source_domain": "rajtantra.com", "title": "सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nसेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nप्रतिंनिधी : वाडा, दि. १२: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० वर्षे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात वाडा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना दिल्यानंतर घोषणा दिल्या व थाळीनाद केला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह उपस्थित होते.\nPrevious: डहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला\nNext: कासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF/word", "date_download": "2018-04-20T16:35:25Z", "digest": "sha1:IRQDDXLGAN6EW77HRBZQXQRGRZ4WAGGQ", "length": 8711, "nlines": 108, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रामकवि", "raw_content": "\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-254113.html", "date_download": "2018-04-20T16:29:57Z", "digest": "sha1:653HUOAMARBP4LUSGCBVY3V2SAFMQILJ", "length": 10720, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र\n09 मार्च : विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुंटुबातील वाद चव्हाट्यावर आलेत. राधाकृष्ण विखे हे भाजपच्या हातातलं बाहुल असल्याचा आरोप त्यांचे मोठे बंधू अशोक विखे यांनी केलाय.\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे असा आरोपही त्यांनी केलाय. पुण्यात पत्रकार परिषद घेवून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आरोपांची राळ उठललीय.\nबाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान, स्वतः राधाकृष्ण विखेंनी मात्र, हा घरगुती वाद असल्याचं सांगत सध्यातरी जाहीरपणे प्रतिक्रिया देणं टाळलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressradhakrushna vike patilअशोक विखे पाटीलकाँग्रेसराधाकृष्ण विखे पाटील\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/rahul-bhad-tells-police-that-i-love-her-so-i-killed-her/", "date_download": "2018-04-20T16:40:21Z", "digest": "sha1:DJGRQKZDDYHY7GODJD6RP3B2GMXW42HM", "length": 10753, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "‘ ह्या ‘ कारणावरून मी केला प्रतीक्षाचा खून : आरोपी राहुल भड काय म्हणतो ? – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\n‘ ह्या ‘ कारणावरून मी केला प्रतीक्षाचा खून : आरोपी राहुल भड काय म्हणतो \n१० ऑक्टोबर २०१३ रोजी मी आणि प्रतिक्षाने पुरोहितांच्या साक्षीने आपण परस्परांच्या गळ्यात लग्नाची माळ घातली.आम्ही अधिकृतरीत्या विवाहबद्ध झालो आहोत मात्र तरीही प्रतीक्षा ऐकायला व माझ्यासोबत राहायला तयार नव्हती.माझे तिच्यावर खूप प्रेम होते. पण ती माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ (अमरावती ) पोलिसांना दिली. प्रतीक्षा मेहेत्रे ह्या युवतीला रस्त्यात गाठून सपासप वार करून तिचा खून केल्याचा आरोप राहुल भड ह्या युवकावर आहे. आरोपी राहुलला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nअमरावतीमधील ह्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले होते. दरम्यात राहुल याने प्रतिक्षाशी विवाह केला होता मात्र ती नांदायला येत नव्हती असे राहुलचे म्हणणे आहे. शेवटी त्याने गाठून तिच्यावर (23 नोव्हेंबरला ) चाकूने वार केले व यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतीक्षा मृत्युमुखी पडल्यावर राहुल तिथून पळून गेला व दुचाकी घेऊन दारव्हा इथे गेला. दरम्यान पोलीस मोबाईलवर त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याला गुरुवारी उशिरा रात्री मूर्तिजापुरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने विष घेतलेले होते. जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येसाठी राहुलने मूर्तिजापूरमधील ज्या दुकानातील कीटकनाशक खरेदी केले त्या दुकानमालकाची देखील साक्ष महत्वाची ठरणार आहे.\nमी प्रतीक्षाशी प्रेमविवाह केला असून तिचेदेखील माझ्यावर जीवापाड प्रेम होते. मात्र, तिची आई व मामाच्या भूलथापांना ती बळी पडली व तिने लग्नानंतरही नांदण्यास नकार दिला असे राहुल भड चे म्हणणे आहे. दुसरीकडे, राहुलकडची प्रमाणपत्रे खोटी आहेत असे प्रतिक्षाच्या वडिलांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील, प्रतीक्षाने ऑक्‍टोबर महिन्यात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार करून त्याने सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करून राहुल माझी बदनामी करत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात राहुलविरुद्ध आय. टी. ॲक्‍टनुसार गुन्हासुद्धा दाखल झाला होता, मात्र ठोस काही कारवाई न झाल्याने ह्यात नाहक प्रतिक्षाचा बळी गेला.\nलग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू\nतू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या\nविवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून\nप्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला\nमहिलांकडे एक खाजगी मालमत्ता म्हणून बघण्याची पुरुषसत्ताक मानसिकता जोवर संपत नाही तोवर असे दुर्दैवी हल्ले कमी होणार नाहीत. महिला ह्या सुद्धा माणूस आहेत ही भावना अशा विकृत लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.\n सहमत असाल तर लाईक करा शेअर करा \n← सनी लिओनचा ‘ हा ‘ नवीन सिनेमा फक्त १८ वर्षापेक्षा पुढील व्यक्तींसाठीच ‘ आणि ‘ उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली : आले नेटीझन्सच्या रडारवर →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/chalisgaon/", "date_download": "2018-04-20T16:14:36Z", "digest": "sha1:SEOZJE5UCYS7DP7PVRKOCPXA4A7KKFNM", "length": 4276, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "chalisgaon – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, ‘ त्या ‘ वादग्रस्त व्हिडिओवर गिरीष महाजन यांचे स्पष्टीकरण\nचाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला होता . त्यावेळी गिरीष महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे धावलायचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावर नेटिझन्स कडून मोठ्या प्रमाणात गिरीष महाजन यांच्यावर टीका करण्यात आली होती. अखेर गिरीष महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/08/01/who-wants-this-kind-of-india/", "date_download": "2018-04-20T16:10:57Z", "digest": "sha1:UC2GTNNTCQYBBW2RLAV4FATSMOYMHD2Y", "length": 67946, "nlines": 98, "source_domain": "rightangles.in", "title": "असा 'नवा भारत' कोणाला हवा आहे? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nअसा ‘नवा भारत’ कोणाला हवा आहे\nमेहबुबा मुफ्ती असोत वा नितीश कुमार किंवा मोदी यांच्या साथीला जाऊन बसणारे इतर सर्व नेते हे असं चित्र उभं करीत आहेत की, त्यांच्या आपापल्या राज्याच्या हिताच्या दृष्टीनं किंवा एकूणच देशाच्या विकासासाठी असं पाऊल टाकणं गरजेचं होतं. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात विकासाच्या योजना व कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीत राजकारण आणू नका, असं सांगण्याची राजकीय टूम निघाली आहे. सत्तेसाठीच्या आपल्या संधीसाधू राजकारणाला काही तरी अधिष्ठान देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ही नवी परिभाषा बनवली आहे. वस्तुत: राजकारणाविना विकास होऊच शकत नाही. प्रश्न फक्त असतो की, हे राजकारण कोणासाठी आणि कशासाठी करायचं हाच. हे ठरतं, ते त्या त्या पक्षाच्या वैचारिक चौकटीनुसार आणि काळाच्या ओघात या चौकटीतही निर्माण होत गेलेल्या हितसंबंधांच्या आधारे. जर हितसंबंध वरचढ ठरले, तर भारताच्या बहुसांस्कृतिकतेला पूरक असणारा मूळ विचार मागं पडतो आणि जनहिताला प्राधान्य देणं, हे जे कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेतील कारभाराचं प्रथम उद्दिष्ट असतं, तेच हरवतं. मग समस्यांनी गांजलेली जनता पर्याय शोधू लागते. आपला विचार जनतेच्या मनावर बिंबावा, यासाठी विरोधातील पक्ष व गट प्रयत्न करू लागतात. सत्ताधा-यांनी जोपासलेले हितसंबंध, त्यामुळं झालेला गैरकारभार इत्यादी जनतेच्या मनावर बिंबवून, आपणच ही परिस्थिती कशी बदलू शकतो, ‘सबका साथ’ मिळवून ‘सबका विकास’ कसा घडवू शकतो, हे पटवून द्यायचा आणि त्यातून आपला विचार रूजविण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न हेच ते राजकारण असतं. तेच भारतात २०१४ च्या निमित्तानं घडलं.\nम्हणूनच विकासात राजकारण आणू नका, असं म्हणणं हा केवळ कांगावा असतो. खरं सांगायचं असतं, ते म्हणजे ‘आम्ही सांगतो, तोच खरा विकास आहे, इतरांनी केला, तो गैरकारभार व भ्रष्टाचार होता’. म्हणूनच विकासासाठी राजकारण हवंच. फक्त ते हिंदुत्वाचं हवं की, भारतातील बहुससांस्कृतिकता जोपासणारं, हा खरा प्रश्न आहे.\nजम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती मोदी यांची साथ सोडून देण्याच्या दिशनं पावलं टाकत असतानाच इकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसादद यादव व राहूल गांधी यांना पाठ दाखवून मोदींचा हात धरला आहे.\nकेवळ सत्तेच्या आकांक्षेनं मोदी यांच्या-म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या–रांगेत जाऊन बसल्यास काय होतं, याचा प्रत्यय मेहबुबा मुफ्ती यांना गेलं वर्षभर येत आहे. पण सत्ता ही अशी काही नशा आहे की, त्यापायी आपल्यापुढे कोणती राजकीय खाई आहे, त्याचीही जाणीव भल्या–भल्यांना होत नाही. तीच गत मेहबुबा मुफ्ती यांची झाली आहे आणि तीच नितीश कुमार यांची होणार आहे.\n…कारण काश्मीरमध्ये असू दे वा आता बिहारमध्ये मेहबुबा यांचे वडील मुफ्ती महमद सईद व नितीश कुमारही ‘वाजपेयी-अडवाणी यांचा भाजपा’ कसा होता, या अनुभवावर विसंबून राहत आले आहेत. पण आजचा ‘भाजपा हा वाजपेयी व अडवाणी’ यांचा नाही. तो नरेंद्र मोदी यांचा आहे, तो योगी आदित्यनाथ यांचा आहे..\n…आणि तोच भाजपाचा खरा चेहरा आहे. केवळ स्वबळावर सत्ता मिळविण्याची रणनीती म्हणून वाजपेयी यांना संघानं पुढं केलं होतं. वाजपेयी यांच्याप्रमाणं मवाळ भूमिका घेत एकेकाळचे ‘लोहपुरूष’ लालकृष्ण अडवाणी यांनीही आपली प्रतिमा बदलण्याचा खटाटोप केला. पण तो अंगाशी आला आणि संघानं मग त्यांनाच दूर केलं. आज ते अडगळीत फेकले गेले आहेत.\nमोदी यांचा भाजपा काय करू शकतो, ते मेहबुबा मुफ्ती यांना जाणवू लागलं आहे आणि म्हणून आता त्या जाहीर करू लागल्या आहेत की, काश्मीरचं वेगळेपण संपवण्याचा प्रयत्न झाला, तर तिरंगा खांद्यावर घेणारा नागरिक खो-यात सापडणार नाही. त्या असं म्हणाल्यावर भाजपा त्यांच्यावर तुटून पडला आहे. मेहबुबा यांना हा साक्षात्कार आज आचानक झाला आहे, तो सर्वोच्च न्यायालयात अॅटर्नी जनरल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं.\nहे प्रकरण आहे राज्याघटनेच्या ३५(अ) या कलमाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेचं. ‘वुई द सिटीझन’ या नावाच्या आतापर्यत जिचं नाव कोणीच ऐकलं नव्हतं, अशा एका ‘एनजीओनं’ हे कलम रद्द करावं म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरून या याचिकेतील मुद्यांबद्दल आपलं म्हणणं मांडण्यासाठी जम्मू व काश्मीर आणि केंद्र सरकारांना सर्वोच्च न्यायलयानं नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारनं याचिकेतील युक्तिवाद फेटाळून लावणारं शपथपत्र सादर केलं. मात्र केंद्र सरकारनं असं शपथपत्र सादर केलं नाही. किंबहुना या मुद्यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे, असं अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आणि त्यासाठी नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली.\nत्यामुळं मेहबुबा संतापल्या आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) जम्मू-काश्मीरला लागू करण्यासाठी आपण मोदी सरकारला मदत करूनही इतका विश्वासघात कसा काय केला जाऊ शकतो, असा मुफ्तीबाईंचा अप्रत्यक्ष सवाल आहे. म्हणूनच त्यांनी केंद्राला इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.\nवस्तुत: असं घडणं हे अपरिहार्यच होते. काश्मीरचा प्रश्न सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तेथील लोकसंख्येचं प्रमाण बदलणं हाच आहे, असं संघाचं ठाम मत आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच संरसंघचालक भागवत यांनी तसं उघडपणे सांगितलंही होतं. देशभरातील निवृत्त सैनिकांना खो-यात वसविण्यची योजना अंमलात आणण्याचं आश्वासन भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात होतंच. शिवाय गेल्या काही महिन्यांत वृत्तपत्रांत तशा आशयाचे लेखही छापून आणले गेले आहेत.‘जनमत घडविण्या’च्या संघाच्या डावपेचांना धरूनच हे होत आहे. तरीही सत्तेची झापडं डोळ्यांवर लावल्यानं हा धोका मेहबुबा यांना दिसत नव्हता आणि वस्तू व सेवा कर जम्मू-काश्मीरला लागू करण्याच्या प्रश्नावर भाजपाला त्यांनी मदत केली.\nएकदा हे झाल्यावर ३५ (अ) कलम रद्द करण्याच्या दिशेनं भाजपाची पावलं पडू लागली आहेत; कारण हे कलम रद्द केल्याविना खो-याततील लोकसंख्येचं प्रमाण बदलणं संघाला शक्य होणार नाही.\nराज्यघटनेतील या ३५ (अ) कलमाच्या तिढ्याला खूप मोठी ऐतहिासिक पार्श्वभूमी आहे, त्या तपशिलात फारसं न जाता (कारण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे) इतकंच सांगितलं, तरी पुरे की, महाराजा हरीसिंह यांनी १९२७ साली ‘स्टेट सब्जेक्टस्’ हा कायदा केला. आपल्या संस्थानात देशातील इतर समाजघटकांनी पैशाच्या जोरावर येऊन मालमत्ता घेतली, ते येथेच स्थायिक झाले, तर डोग्रा लोकांच्या वर्चस्वाला धक्का बसेल, ही महाराजा हरीसिंह यांची हा कायदा करण्यामागची भावना होती. पुढं भारत स्वतंत्र झाला. काश्मीर खो-यात पाक घुसखोर व सैन्य आल्यानं महाराजा हरीसिंह यांना आपलं संस्थान भारतात विलीन करणं भाग पडलं. जम्मू—काश्मीरला वेगळा दर्जा देणारं ३७० वं कलम राज्यघटनेत घालण्यात आलं. पण या राज्यात राजकीय उलथापालथ होत राहिली आणि ती संपविण्याचा एक भाग म्हणून १९५३ साली पंडित नेहरू व शेख अब्दुल्ला यांच्यात ‘दिल्ली करार’ झाला. त्यानुसार काश्मीरचं हे वेगळेपण टिकविण्याची खात्री म्हणून ३५ (अ) हे कलम राज्यघटनेत घालण्यात आलं. या कलमातील तरतुदीनुसार ‘राज्याचा नागरिक’ कोण हे ठरविण्याचा अधिकार राज्याच्या विधानसभेला देण्यात आला आहे. राज्यात जमीन जुमला घेणं, राज्यसेवेत नोकरी मिळणं इत्यादी गोष्टी फक्त ‘राज्याच्या नागरिकां’साठीच शक्य आहेत. हे कलम राज्यघटनेत घालताना राष्ट्रपतींचा आदेश काढण्यात आला. त्यासंबंधी संसदेत चर्चा झाली नव्हता व ठरावही केला गेला नाही. आज सहा दशकानंतर या गोष्टी उकरून काढण्यात येत आहेत आणि सत्तेची झापडं लावलेल्या मेहबुबा यांनी तशी संधी भाजपाला दिली आहे.\n…कारण या कलमाच्या वैधतेबद्दल या आधी किमान तीन वेळा सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळ्या खटल्यांत निर्वाळा दिला आहे. हे ३५ (अ) कलम म्हणजे जम्मू—काश्मीरला वेगळा दर्जा देणा-या ३७० व्या कलमाचाच ‘फॉलआऊट’ आहे. या ३७० व्या कलमानुसार चलन व्यवहार, परराष्ट्र धोरण व दळणवळण या तीन विषयापलीकडं इतर कोणत्याही मुद्यांसंबंधीचे कायदे राज्याला लागू करायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार राज्याच्या घटना समितीला होता. ही घटना समिती १९५६ साली बरखास्त झाल्यावर विधानसभेकडं हा अधिकार गेला. विधानसभेनं केलेला ठराव भारताच्या राष्ट्रपतींकडं पाठविल्यावर त्यांनी तसा आदेश काढावा, अशी तरतूद या ३७० व्या कलमात आहे. हे कलम रद्द करायचं असल्यासही हीच प्रक्रिया पार पाडण्याचं बंधन आहे. त्यामुळं ‘दिल्ली करारा’नुसार ३५(अ) हे कलम राज्यघटनेत घालण्याचं ठरविल्यावर त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तसा आदेश काढला. घटना दुरूस्तीची तरतूद असलेले ३६८ वं कलम जम्मू-काश्मीरलाल लागू होत नाही.\nम्हणूनच वस्तू व सेवा कर लागू करताना संसदेनं जी घटना दुरूस्ती केली, तिला इतर राज्यांनी जशी आपापल्या विधानसभांत ठराव करून संमती दिली, तशी ती जम्मू-काश्मीरनं दिली नव्हती. तरीही हा कर राज्याला लागू करतानाच ३७० व्या कलमातील तरतुदीचाच आधार मोदी सरकारनं घेतला आणि राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी आदेश काढल्यावर हा कर राज्याला लागू झाला. तसा ठराव राष्ट्रपतीकडं पाठविण्यासाठी तो राज्याच्या विधानसभेत संमत करवून घेण्यासाठी मेहबुबा यांनी पुढाकार घेतला होता.\nराष्ट्रपतींनी असा आदेश काढल्यावर लगेच पंधरवड्याच्या आतच सर्वोच्च न्यायालयात ३५ (अ) या कलमाबाबत सुनावणीची वेळ आली, तेव्हा केंद्र सरकारनं संदिग्ध पवित्रा घेतला.\nसंघाच्या कुटील डावपेचांची कल्पना आल्यावर आता मेहबुबा आगपाखड करू लागल्या आहेत; कारण भाजपाच्या बरोबर सत्तेत गेल्यानं त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता खो-यात रसातळाला गेली आहे. त्यातच या ३५ (अ) कलमाच्या संवेदनशील प्रकरणात आपाण बोटचेपी भूमिका घेत आहोत, असा संदेश गेल्यास पक्षाची पुरी वाताहत होणं अटळ आहे, हे मेहबुबा जाणून आहेत. उलट राज्याचे कर आकारण्याचे अधिकार मर्यादित करणारा वस्तू व सेवा कर जर काश्मीरलाही लागू होतो, तर त्याचं वेगळेपण काय उरलं, मग ३५ (अ) कलम हवंच कशाला, असा युक्तिवाद भाजपा करीत आहे.\nथोडक्यात मोदी यांच्या साथीला गेल्यावर रांगेतून बाहेर पडतना तोंडघशीच पडायला होतं, याचा अनुभव मेहबुबा यांना येत आहे. पण आज जरी त्या आदळ आपट करीत असल्या, तरी त्यांची सत्ता डळमळीत होऊ लागल्याची आणि त्यांच्या पायाखालचा सत्तेचा गलिचा खेचून घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल या प्रकरणानं पडलं आहे.\nमेहबुबा यांची ही गत होत असतानाच नितीश कुमार यांनी मोदी यांचा हात धरला आहे. त्यामुळं बिगर काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या सत्तेच्या नशेला खातपाणी घालून भारतीय राज्यसंस्थेवरील आपली पकड अधिकाधिक घट्ट करीत नेण्याच्या संघाच्या रणनीतीला कसं येत गेलं आहे, याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं आहे.\nनितीश कुमार यांनी लालूप्रसाद यावद व राहूल गांधी यांची साथ सोडून २४ तासांच्या आत मोदी यांच्या पाठबळावर पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवल्यानं त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे. मात्र नितीश कुमार यांनी असं काय वेगळं केलं आहें अशी ‘आराम—गयाराम’गिरी तर गेली चार दशकं आपल्या देशात चालू आहेच की अशी ‘आराम—गयाराम’गिरी तर गेली चार दशकं आपल्या देशात चालू आहेच की त्यातूनच तर संघ देशाच्या राजकारणाच्या परिघावरून मुख्य प्रवाहात येऊ शकला ना त्यातूनच तर संघ देशाच्या राजकारणाच्या परिघावरून मुख्य प्रवाहात येऊ शकला ना मग नितीश कुमार यांच्यावर एवढं तुटून पडायचं कारणच काय\nखरं तर काहीच नाही.\nआजकालाच्या राजकीय परंपरेला धरूनच ते वागले आहेत. राजकारण ही आता करिअर झाली आहे, ती स्वेच्छेनं स्वीकारलेली बांधिकलकी राहिलेली नाही. त्यामुळं आजकालाच्या आधुनिकोत्तर जगात एका कंपनीत राहणं म्हणजे तुमच्याकडं ‘टॅलेंट’ नसल्यचं लक्षण मानलं जातं, म्हणून एक दोन वर्षे झाली की, एका कंपनीतून दुसरीकडं अशी नोकरदारांची वाटचाल सुरू असते. तेच राजकारणातही होत आहे. करिअर म्हटलं की पैसा व इतर सुखसोई आल्याच ना त्यासाठी सत्ता हाती राहणं आवश्यक असतं. मग ज्याच्याकडून वा ज्याच्या आधारे सत्ता हाती येऊ शकते, त्याच्याशी हातमिळवणी करणं, हा या ‘करिअर’चाच एक भाग असतो. आता अशी करिअर करणा-या इतर क्षेत्रांतील व्यक्तींतही स्वत:चं ‘मार्केटिंग’ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जास्तीत जास्त वरचं पद मिळवण्यासाठी जी ‘ब्रँड व्हॅल्यू’ तयार करावी लागते. तशी नितीश कुमार यांनी ‘बिहारचं हित, राज्याचा विकास’ या जोडीला ‘स्वच्छ प्रतिमा व भ्रष्टाचार विरहित प्रशासन’ या घटकांच्या आधारे आपलं ‘मार्केटिंग’ करून स्वत:ची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढवायचा प्रयत्न गेली १० वर्षे केला आहे. मुफ्ती महमद सईद यांनी नाही का काश्मीर खो-यातील जनतेच्या ‘हिता’चा विचार करून मोदी यांचा हात धरला होता\n…आणि आजही मोदी यांच्याशी हातमिळवणी करून भाजपाच्या साथीनं २४ तासातं ते पुन्हा मुख्यमंत्री बनले, तेव्हाही ‘बिहारच्या हिता’साठीच हे मी सारं करीत आहे; कारण भ्रष्टाचाराचा आरोपाच्या सावटाखाली राज्यकारभार करणं मला कठीण जात होतं’, असा युक्तिवाद त्यांनी केला आहेच की\nअशा परिस्थितीत नितीश कुमार आणि लालूप्रसाद या दोघांच्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपाच्या विरोधत निवडणूक लढवली, त्यांना प्रचंड विजय मिळाला, याचा अर्थ हा जनादेश विकास व धर्मनिरपेक्षता यासाठी होता, म्हणूनच त्यांनी अशी कोलांटउडी मारायला नको होती, हा युक्तिवादही बिनबुडाचा आहे.\n…कारण लालूप्रसाद व राहूल गांधी या दोघांच्या पक्षाशी हातमिळवणी करीपर्यंत नितीश कुमार हे भाजपाचा हात धरून राज्य करीत होतेच ना भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आघाडी आहे, हे कोणाला माहीत नाही भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आघाडी आहे, हे कोणाला माहीत नाही अशा परिस्थितीत केवळ वाजपेयी व अडवाणी याहंच्या हाती भाजपाचं नेतृत्व होतं, म्हणून मी त्यांच्यासोबत होतो आणि आता नरेंद्र मोदी यांच्याकडं पक्षाची सूत्रं गेल्यामुळं मी बाजूला होत आहे’, हा नितीश कुमार यांचा युक्तिवादही अर्थहीन होता.\nवस्तुस्थिती अशी होती की, नितीश कुमार यांचा बिहारमधील जनाधार हा तसा फारसा मोठा नाही. उत्तर भारतातील राजकारण विशेषत: ज्या जातीपातच्या आधारं खेळलं जातं, त्यातील नितीश कुमार याच्या कुर्मी जातीचा वाटा तसा नगण्य आहे. म्हणूनच ‘महादलित’ ही संकल्पना आकारला आणण्याचा खटाटोप नितीशकुमार यांनी केला त्याला जोड दिली, ती मुस्लिमांच्या मतांची. तरीही सत्ता मिळणं शक्य नव्हतं; कारण दुस-या बाजूला प्रबळ यादव समाजगट होता. म्हणून त्यांनी भाजपाच्या मागं असलेल्या उच्चवर्णीय गटांचं पाठबळ मिळविण्यासाठी ‘वाजपेयी-अडवाणी’ यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाशी हातमिळवणी केली.\n‘सुशासन’ आणि ‘विकास’ या मुद्यांवर भर देत त्यांनी आपलं ‘मार्केटिंग’ केलं. लालूप्रसाद—राबडीदेवी यांच्या राज्यात बोकाळलेल्या गुंडगिरीला त्यांनी लगाम घातला. मात्र गुंडगिरी व भ्रष्टाचार संपला नाही. तो संपणंही शक्य नव्हतं. बिहारसारख्या राज्यात नव्हे, तर देशभरात राजकारणातील गुंडगिरी व प्रशासनातील भ्रष्टाचार ही निवडणूक जिंकण्याकरिता पक्षीय यंत्रणा सुरळीत चालविण्यासाठी आवश्यक असलेली वंगणं आहेत. फक्त बिहारमध्ये लालूप्रसाद व राबडीदेवी यांच्या राजवटीत सर्व पक्षीय यंत्रणा या वंगणांनीच लडबडून गेली होती, एवढाच काय तो फरक. अन्यथा लल्लनसिंगसारख्यांना नितीश कुमार यांनी आपल्या पक्षात कसं काय ठेवले असते अंतर्मनाची साद, बिहारचं हित हा निव्वळ ‘मार्केटिंग फंडा’ होता व आजही आहे. म्हणूनच लालूप्रसादांचा हात सोडून भाजपाच्या रांगेत जाऊन बसण्याच्या वेळी नितीश कुमार यांनी हाच मंत्र जपला.\nसांगावयाचा मुद्दा इतकाच की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वाजपेयी व अडवाणी यांना बाजूला सारून मोदी यांच्या हाती भाजपाची सूत्रं सोपवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा नितीश कुमार यांना अचानक गुजरातमधील २००२ सालातील मुस्लिमांचा नरसंहार आठवला. खरं तर गोध्रा घडलं, तेव्हा नितीशकुमार वाजपेयी मंत्रिमंडळात रेल्वमंत्रीच होते. पण त्यांनी तोंडही उघडलं नव्हतं. मात्र भाजपाची सूत्रं मोदी यांच्या हाती जाणार हे नक्की झालं, तेव्हा त्यांना गुजरातेतील नरसंहार आठवला; कारण त्यांनी जी जातीपातीची आघाडी बांधली होती, त्याला मुस्लिांचं पाठबळ मिळणं गरजेचं होतं. मोदी यांच्या हाती पक्षाची सूत्रं आली की, मुस्लिम मतांचा भरवसा उरणार नाही, मग भाजपाला पाठबळ देणा-या उच्चवर्णीयांच्या मतांवर अवलंबून राहावं लागेल, याचीही नितीश कुमार यांना कल्पना होती. आपल्या महत्वाकांक्षेच्या आड येणारं हे समीकरण ठरू शकतं, हे लक्षात आल्यावर नितीश कुमार यांनी मोदी यांना लक्ष्य केलं. भाजपाची साथ सोडली. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा जो झंझावात आला, त्यात नितीश कुमार यांच्या पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. ‘अंतर्मनाची साद’ या ‘मार्केटिंग फंड्या’च्या आधारे स्वत:ची ‘ब्रॅड व्हॅल्यू’ कायम राखण्यासाठी. पक्षातील महादलित गटाचे नेते जीतनराम मांझी यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवलं. पण सूत्रं आपल्या हातीच ठेवली. मांझी यांनी ‘स्वतंत्र’ निर्णय घेण्यचा प्रयत्न केल, तेव्हा नितीश कुमार यांनी त्यांना बाजूला करून स्वत:च्या हातीच सूत्रं घेतली. त्यासाठी ‘मार्केटिंग फंडा’ वापरला, तो ‘बिहारच्या हिता’चा.\nमग २०१५ च्या विधानसभा निवडणुका आल्या. तेव्हा मांझी यांना भाजपानं आपल्या पाठीशी उभं केलं. त्यामुळं जातीपातीचं गणित विस्कटलं जाऊ लागलं. अशावेळी सत्ता टिकवण्यासाठी राज्याच्या राजकारणातील हाडवैरी असलेलया लालूप्रसाद यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली. पुन्हा एकदा जातीपातीच्या गटातटाचं गणित जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली. मांझी यांना भाजपानं आपल्या गोटात ओढल्यामुळं दलित गट बाजूला जाण्यचा जो धोका दिसत होता, त्यावर उतारा हा मोठ्या संख्येनं लालूप्रसाद यांच्या पाठीशी असलेल्या यादव समाजघटकांचा आणि मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा होता.\nहे गणित जुळलं आणि लालूप्रसाद व नितीश कुमार यांच्या पक्षांनी मोदी व भाजपाला धूळ चारली. नितीश कुमार मुख्यमंत्री बनले. पण विधानसभेत जास्त आमदार लालूप्रसाद यांच्या पक्षाचेच होते. त्यामुळं लालूप्रसाद यांच्या दोन मुलांना मंत्रीपद देणं नितीश कुमार यांना भाग पडलं. राजकारणातील हाडवै-याशी हातमिळवणी करताना नितीश कुमार यांनी नुसता बिहारमधील सत्ता मिळविण्यापुरताच विचार केला नव्हता. त्यांना २०१९ चे वेध लागले होते. त्यातच बिहारमध्ये भाजपाला बाजूला सारल्यावर तर बिगर हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनाही २०१९ साठीच्या राजकीय समीकरणात नितीश कुमार यांचं स्थान महत्वाचं आहे, असं वाटू लागलं होतं.\nही गोष्ट आहे, गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतील. मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा केली होती. त्याला नितीश कुमार यांनी प्रत्त्युत्तर दिलं, ते ‘संघमुक्त भारता’चं. संघाचे सरसंघचालक राखीव जागांबाबत बोलतात; कारण त्यांना ही तरतूद रद्दच करवून घ्यायची आहे, असा टीकेचा सूरही नितीश कुमार यांनी जाहीररीत्या लावला होता. एकूणच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपल्या नेतृत्वाला मान्यता मिळावी, अशा रीतीनं नितीश कुमार यांची पावलं पडत होती.\nमात्र नितीश कुमार यांना जशी महत्वाकांक्षा आहे, तशीच ती बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही आहे. पटनाईक आणि ममता बॅनर्जी या दोघांनीही २०१४ च्या मोदी झंझवातात उन्मळून न पडता पश्चिमा बंगाल व ओडिशात आपली सत्ता मिळवली आहे. अरविंद केजरीवाल हे कितीही वावदूक असले, तरी सत्तेच्या बळावर त्यांना काहीच काम करू न देण्याचा विडा मोदी यांनी भाजपाच्या पराभवानंतर उच्चला होता. केजरीवाल यांना कशा रीतीनं त्यांनी नामोहरम केलं, त्याचा प्रत्यय गेल्या तीन वर्षांत आलाच आहे. हेच तंत्र मोदी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात वापरत आहेत. पण त्याही त्यांना पुरून उरत आहेत. मोदी यांनी आता आपलं लक्ष नवीन पटनाईक यांच्याकडं वळवलं आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच मुद्दाम ओडिशात घेण्यात आली. त्याचवेळी दंगही घडवून आणण्यात आला. नंतर पटानईक यांच्या कारभारातील ‘भष्टाचारा’ची प्रकरणं प्रकाशात आणण्याची मोहीम मोदी यांनी हाती घेतली आहे. येथे ‘भाजपा’ असा उल्लेख मुद्दाच केलेला नाही; कारण हे सगळं मोदी-शहा ही दुक्कलच ठरवत असते, ही गोष्ट आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छपणं दिसत आली आहे. साहजिकच अशा परिस्थितीत सर्व बिगर हिंदुत्ववादी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न जेव्हा नितीश कुमार यांनी २०१६ मध्ये सुरू केला, तेव्हा आपण बिहारमध्ये भाजपाला धूळ चारली असली, तरी २०१९ साठीचे नेतृत्व आपल्या हाती येण्यात कशा अडचणी आहेत, याची प्रखर जाणीव इतर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्धेमुळं त्यांना झाली. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा आणि पुढं एक वर्षांनी येणा-या बिहारमधील २०२० च्या विधानसभा अशा दोन निवडणुकीत लालूप्रसाद आपल्याला आडवे येऊ शकतात, हेही नितीश कुमार यांना कळू लागलं होतं. केवळ ‘सत्ता’ हेच एक ध्येय असल्यानं राष्ट्रीय स्तरावर सहजासहजी हाती नेतृत्व न येण्याची शक्यता नितीश कुमार यांना जाणवू लागली होती. भविष्यात सत्ता हातून जऊ शकते, हा धोका ओळखून तो निवारण्यासाठी नितीश कुमार यांची पावलं पडू लागली. त्याची सुरूवातम निश्चलीकरणाला (डिमोनाटायझेशन) पाठिंबा देऊन झाली आणि अखेर गेल्या पंधरवड्यात मोदी यांच्या पाठबळावर नव्यानं मुख्यमंत्री बनण्यात झाली आहे.\nमेहबुबा मुफ्ती असोत वा नितीश कुमार किंवा मोदी यांच्या साथीला जाऊन बसणारे इतर सर्व नेते हे असं चित्र उभं करीत आहेत की, त्यांच्या आपापल्या राज्याच्या हिताच्या दृष्टीनं किंवा एकूणच देशाच्या विकासासाठी असं पाऊल टाकणं गरजेचं होतं. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात विकासाच्या योजना व कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीत राजकारण आणू नका, असं सांगण्याची राजकीय टूम निघाली आहे. सत्तेसाठीच्या आपल्या संधीसाधू राजकारणाला काही तरी अधिष्ठान देण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ही नवी परिभाषा बनवली आहे. वस्तुत: राजकारणाविना विकास होऊच शकत नाही. प्रश्न फक्त असतो की, हे राजकारण कोणासाठी आणि कशासाठी करायचं हाच. हे ठरतं, ते त्या त्या पक्षाच्या वैचारिक चौकटीनुसार आणि काळाच्या ओघात या चौकटीतही निर्माण होत गेलेल्या हितसंबंधांच्या आधारे. जर हितसंबंध वरचढ ठरले, तर भारताच्या बहुसांस्कृतिकतेला पूरक असणारा मूळ विचार मागं पडतो आणि जनहिताला प्राधान्य देणं, हे जे कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेतील कारभाराचं प्रथम उद्दिष्ट असतं, तेच हरवतं. मग समस्यांनी गांजलेली जनता पर्याय शोधू लागते. आपला विचार जनतेच्या मनावर बिंबावा, यासाठी विरोधातील पक्ष व गट प्रयत्न करू लागतात. सत्ताधा-यांनी जोपासलेले हितसंबंध, त्यामुळं झालेला गैरकारभार इत्यादी जनतेच्या मनावर बिंबवून, आपणच ही परिस्थिती कशी बदलू शकतो, ‘सबका साथ’ मिळवून ‘सबका विकास’ कसा घडवू शकतो, हे पटवून द्यायचा आणि त्यातून आपला विचार रूजविण्याचा प्रयत्न करतात..\nहा प्रयत्न हेच ते राजकारण असतं. तेच भारतात २०१४ च्या निमित्तानं घडलं.\nम्हणूनच विकासात राजकारण आणू नका, असं म्हणणं हा केवळ कांगावा असतो. खरं सांगायचं असतं, ते म्हणजे ‘आम्ही सांगतो, तोच खरा विकास आहे, इतरांनी केला, तो गैरकारभार व भ्रष्टाचार होता’. म्हणूनच विकासासाठी राजकारण हवंच. फक्त ते हिंदुत्वाचं हवं की, भारतातील बहुससांस्कृतिकता जोपासणारं, हा खरा प्रश्न आहे.\nसत्तेच्या नशेत मश्गुल असलेल्या मेहबुबा मुफ्ती वा नितीश कुमार यांच्यासारख्या नेत्यांना जसा हा प्रश्न पडत नाही, तसाच तो फक्त आपल्या गोतावळ्याची धन करून घेण्यासाठीच मतदारांनी सत्ता दिली आहे, असा समज करून घेणा-या लालूप्रसाद वा मुलायमसिंह या यादवांनाही पडत नाही आणि जवळ जवळ ६० वर्षे देशाची सत्ता हाती असूनही इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल यांच्या पलीकडं दुसरं नेतृत्व पक्षाच्या पहिल्या फळीतही येऊ न देणा-या काँग्रेसलाही पडत नाही.\nबिगर हिंदुत्ववादी पक्षांच्या या सत्ताकांक्षेचा आणि ती हाती ठेवण्याच्या त्यांच्या अट्टाहासाचा मोठ्या कौशल्यानं वापर करून संघानं आपली पकड आता भारतीय राज्यसंस्थेवर बसवली आहे. त्याच्या आधारेच आता संघ देशातील विचारविश्वावरही वर्चस्व प्रस्थापित करू लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची विक्षण झपाट्यानं होणारी प्रगती आणि जागतिकीकरणाच्या पर्वातील आधुनिकोत्तर जगात असलेल्या भारतातील तरूणवर्गाच्या बदलणा-या आशा-आकांक्षा याची संघाइतकी जाणीव कोणत्याच बिगर हिंदुत्ववादी पक्षाला, संघटनेला वा गटाला नाही. ही मंडळी अजूनही जुन्याच पठडीत पडून आहेत आणि त्यांच्या मनोभूमिकाही जुनाटच राहिल्या आहेत. देशाच्या लोकसंख्येत अर्ध्यापेक्षा जास्त असलेल्या तरूणवर्गाला आता ‘जुनं’ काही नको आहे. त्याला आधुनिक जग खुणावत आहे या जगाची माहिती त्याला क्षणार्धात तंत्रज्ञानाच्या आधारे मिळत आहे. पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, त्यासाठी माहितीचं पृथ्थकरण व विश्लेषण करणं आवश्यक असतं, तसं ते करण्यासाठी विशिष्ट क्षमता मिळवावी लागते, ती मिळविण्याकरिता दर्जेदार शिक्षणाची गरज असते, ही समज या तरूणवर्गाला पुरेशी नाही. तशी ती करून देणारी शिक्षण व्यवस्थाही देशात उभी राहिलेली नाही. त्यामुळं या तरूणवर्गाचा खळखळत्या उत्साहाच्या ऊर्जेला उथळपणाचं स्वरूप येत चाललं आहे. खरं तर हा उत्साह हे प्रचंड मोलाचं भांडवल आहे. त्याला योग्य विधायक वळणं दिलं गेलं, तर स्वातंत्र्यानंतर जसा देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालून बहुसांस्कृतिकतेवर आधारलेली लोकशाही रूजवली गेली, तसंच आज २१ व्या शतकात भारत खूप मोठी भरारी घेऊ शकतो.‘नवा भारत’ उभा राहू शकतो.\nमात्र संघाला ‘नवा भारत’ घडवायचा आहे, तो विद्वेषाचा पाया असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आणि बहुसंख्याकांच्या लोकशाही चौकटीतील. असा हा भारत जर घडवला गेलाच, तर तो कसा असू शकतो\nडॅनियल गोल्डहागत या हार्वर्ड विद्यापीठातील अध्यापकाच्या ‘हिटलर्स विलिंग एक्झिक्युशनर्स: ऑर्डिनगरी जर्मन्स अॅन्ड हॉलोकास्ट’ या पुस्तकातील हा उतारा दिशादर्शक ठरू शकतो. गोल्डहागन म्हणतात की, ‘ज्यू म्हणजे इतरांचा दुष्टावा करणारी समाजाला लागलेली बांडगुळं आहेत. ते सुसंघटित आहेत, म्हणून धोकादायक देशद्रोही आहेत. कोणताही ज्यू प्रामाणिक असला, तरी त्याच्या रक्तातच हा दुष्टावा असतो. त्यामुळं इतर सर्वसाधारण नागरिकांची नैतिकता व संस्कृती नष्ट करण्याकडंच ज्यूंचा कल असतो. त्यांची झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या ही देशाला धोकादायक ठरणारी आहे. ज्यू हे ‘इतर’ आहेत आणि त्यांनी जर्मन संस्कृतीवर आक्रमण केलं आहे, जर्मन युवतींचा ज्यू कौमार्यभंग करतात, असा विचार जर्मन समाजातील चर्चाविश्वात प्रभावी ठरवला जात गेला. तसा तो ठरावा म्हणून विविध प्रकारची प्रतीकं वापली गेली.जर्मन परंपरा व संस्कृतीची भरभराट कशी होत होती आणि ज्यूंमुळं तिला उतरती कळा कशी आली, हे ठसविणारा प्रचार पद्धाशीरपणं केला गेला’.\nहोव्डहागत यांनी केलेलं हे वर्णन हिटलरच्या जर्मनीचं आहे. येथे हिटलरचा नात्झी पक्ष आणि संघाचा भाजपा यांची तुलना करण्याचा अजिबात उद्देश नाही. संघ फासिस्ट आहेच, पण भारतात जर्मनीसारख्या पद्धतीनं फासिझम येण्याची शक्यता नाही. एक तर हिटलरनं जे केलं, त्याला आठ दशकं उलटून गेली आहे. तेव्हाचं जग आता राहिलेली नाही. शिवाय भरत म्हणजे जर्मनी नव्हे. अगदी भौगोलिक, ऐतिहासिक वा सांस्कृतिक किंवा आर्थिक प्रगती अशा सर्व अर्थानंच आपली जर्मनीशी तुलनाही तुलना होऊ शकली नसती आणि आताही तशी ती होणार नाही. ती तशी कोणी करणं हा वेडेपणा आहे.\nमात्र प्रवृत्ती तीच आहे. प्रचाराचा रोखही तसाच आहे. ज्यूंप्रमाणंच संघ मुस्लिमांना लक्ष्य करीत आला आहे आणि त्याच्यामुळं भारताची कशी अवनती झाली, हेही सांगत आला आहे. आता त्याच्या जोडीला हिंदू समाजातही ‘देशद्रोह्यां’चा वेगळा वर्ग तयार केला जात आहे. ज्यूंना कसं वागवलं जात होतं, त्यांच्या विरोधातील प्रचारांच्या सभांना हजारो सर्वसामान्य नागरिक कसा हजेरी लावत होता व भाषणांनी भरावला जात होता, याचं गोल्डहागन यांनी केलेलं वर्णन वाचताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रसार माध्यमांच्या क्षमतेचा व व्यापक प्रभावाचा कौशल्यानं वापर करून मोदी यांची ‘हवा’ कशी तयार केली गेली, याची आठवण झाल्याविना राहत नाही.\nशिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणले जात आहेत. समाजात एक धर्मवादाचं, असहिष्णुतेचं वातावरण तयार केलं जात आहे. गोरक्षकांचा धुमाकूळ हा त्याचाच एक भाग आहे. एक प्रकारची तणावयुक्त शांतता सामाजात आकाराला येत आहे. हेच वास्तव (New Normal) आहे आणि ही परिस्थिती आम्हीच काबूत ठेवू शकतो, असं प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बजावलं जात आहे. राष्ट्र, धर्म, सैन्य अशी सांगड घातली जात आहे. वर उल्लेख केलेल्या तरूणवर्गाच्या खळखळत्या उत्साहाला जो उथळपणा येत चालला आहे, त्यानं हेच वास्तव असल्याच्या प्रचारा प्रभावाखाली या वर्गाला आणणं सहज शक्य होत गेलं आहे.\nदक्षिण आशियाई देशांप्रमाणं विकासाच्या नावाखाली लोकशाहीची नुसती चौकट ठेवून एकाधिकारशाही राबविण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू झाली असल्याची ही सारी चिन्ह आहेत.\nमोदी यांची जी `हवा’ तयार केली गेली आहे आणि ती तशीच राहावी, यासाठी सर्वतोपरी जे प्रयत्न केले जात आहेत. ही ‘हवा’ हे बिगर हिंदुत्वादी पक्ष, संघटना, गट व समाजातील इतर घटक यांच्यापुढचं मोठं आव्हान आहे. पक्षपाती भूमिका घेणचं कटाक्षानं टाळून, सर्वसामान्य भारतीयांच्या श्रद्धांची दखल घेत, त्याच्या विवेकाला साद घालत ‘भारतीयत्वा’चा विचार नव्यानं चर्चाविश्वात रूजवलां गेला, तरच ही हवा विरत जाण्यास प्रारंभ होण्याची शक्ता आहे.\nप्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार अाहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.\nझुकायला सांगितलं, हे तर सरपटायला लागले\nकेरळ : हिंसेचे व्याकरण\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-maharahstra-news-suresh-prabhu-talking-89174", "date_download": "2018-04-20T16:55:09Z", "digest": "sha1:MWDTAPGOHGGI3XAS4HSI5ZB6AWZUCBUV", "length": 13463, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharahstra news suresh prabhu talking समाज बदलण्यासाठी सर्वांनी सांताक्‍लॉज व्हावे! - सुरेश प्रभू | eSakal", "raw_content": "\nसमाज बदलण्यासाठी सर्वांनी सांताक्‍लॉज व्हावे\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nमुंबई - सांताच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. त्याच्या भूमिकेत आपण सर्वांनी शिरायला हवे आणि समाज बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी (ता. 25) येथे केले.\nमुंबई - सांताच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. त्याच्या भूमिकेत आपण सर्वांनी शिरायला हवे आणि समाज बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी (ता. 25) येथे केले.\nव्हीजेटीआयच्या टेक्‍नोव्हान्झा या महोत्सवाचे उद्‌घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. भारताचे जगातील स्थान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची प्रतिमा याबद्दल प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना भारतासमोरील आव्हाने लक्षात घ्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जागतिक लोकसंख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित नैसर्गिक स्रोत या दोन महत्त्वाच्या समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आहेत. या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीनेच उपाय शोधता येऊ शकतात. लोकसंख्येची अफाट वाढ आणि मर्यादित नैसर्गिक स्रोत यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nतंत्रज्ञानाचा योग्य वापर करून या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक विषयांवर नवनवीन उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी नैसर्गिक स्रोत सुयोग्य ठेवल्यास माणसाची जीवनशैलीही चांगली राहील. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी याला प्राधान्य द्या. भारत आर्थिक महासत्तेच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे. 10 वर्षांत भारताची आर्थिकवृद्धी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.\nटॅक्‍नोव्हान्झाची धम्माल गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह, मुंबईच्या डबेवाल्यांवर पीएच.डी. करणारे डॉ. पवन अग्रवाल, नासाचे कन्सल्टंट डॉ. हेन्‍री थ्रूप टॅक्‍नोवान्झाला भेट देतील. हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्रावर पीएच.डी. करणारे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी मंगळवारी (ता. 25) व्याख्यान देतील.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nनिर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे - वैभव नायकवडी\nवाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण...\nमूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला निसर्गातील आनंद\nपावस - येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल गणेशगुळे येथे उत्साहात झाली. यात विद्यार्थ्यांनी धम्माल मज्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/this-anchor-in-pakistan-came-with-her-daughter-in-studio-to-express-her-grief-over-rape-of-a-minor/articleshow/62457480.cms", "date_download": "2018-04-20T16:31:38Z", "digest": "sha1:AT3RBAZATRO45UMQQA5BOJRBRANSJIRG", "length": 24099, "nlines": 238, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "minor raped:this anchor in pakistan came with her daughter in studio to express her grief over rape of a minor | टीव्ही अँकरने 'असा' केला बलात्काराचा निषेध - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nटीव्ही अँकरने 'असा' केला बलात्काराचा निषेध\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ८ वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची घटना बुधवारी समोर आली. या घटनेनंतर तिथे हिंसक आंदोलन सुरू आहे. तर एका न्यूज चॅनेलच्या टीव्ही अँकरने या बलात्काराच्या घटनेचा वेगळ्या प्रकारे निषेध करत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या मुलीला सोबत घेत लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्येची बातमी वाचली.\nकिरण नाज या समा न्यूज चॅनेलच्या अँकर आहेत. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेत मुलीवरील बलात्काराची बातमी वाचली. बातमी वाचताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या. मी किरण नाज नाही तर एक आई आहे, असं म्हणत त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. यासोबतच तिने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. आज एका चिमुकलीचा नाही तर माणुसकीचा गळा दाबला गेला, असं त्या म्हणाल्या.\n८ वर्षाची मुलगी घराजवळ असलेल्या शिकवणीला गेली होती. गेल्या आठवड्यात गुरुवारी ती बेपत्ता झाली. तिचं अपहरण झाल्याचं सांगण्यात आलं. यानंतर एका अज्ञात व्यक्तीसोबत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी शोध मोहीम राबल्यानंतर त्यांना बेपत्ता मुलीचा मृतदेह मंगळवारी कचराकुंडीजवळ आढळून आला. मुलीची हत्या चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले. ते स्वतः या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nअमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा सीरियावर हल्ला\nsyria: सीरियाची रासायनिक शस्त्रे उद्ध्वस्त, ट्रम्प...\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\n1टीव्ही अँकरने 'असा' केला बलात्काराचा निषेध...\n2भारताचा विकासदर सात टक्के राहील...\n3पक्ष्यांच्या प्रजननाला ध्वनिप्रदूषणाचा धोका\n4भारतीयाला दुबईत २१ कोटींचा 'जॅकपॉट'...\n5अमेरिकेकडून ‘व्हिसा’ दिलासा; नियमांचा फेरआढावा घेणार...\n6लष्करप्रमुखांच्या विधानावर चीनचे मौन...\n7अंडरवेअरसाठी बेकहॅमने बांधली ५१ लाखाची खोली...\n8गोल्डन ग्लोबमध्ये अझीझ अन्सारी सर्वोत्कृष्ट...\n9चीन थांबवणार सीमेवरील रस्तेबांधणी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2018-04-20T16:33:23Z", "digest": "sha1:ZEIKEJJOFQAZNNO4T7ALSWRSO64GASFD", "length": 4574, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे - पू. ५४० चे - पू. ५३० चे\nवर्षे: पू. ५५८ - पू. ५५७ - पू. ५५६ - पू. ५५५ - पू. ५५४ - पू. ५५३ - पू. ५५२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५५० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2018-04-20T16:33:31Z", "digest": "sha1:U5WVAV3GEOYNJ27S6P3UOZC2STCZ3WJ3", "length": 4301, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेल्टन, कनेटिकट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nफेअरफिल्ड काउंटीमधील शेल्टनचे स्थान\nशेल्टन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००५च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ३९,५५९ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhavidarbha.com/", "date_download": "2018-04-20T16:15:15Z", "digest": "sha1:PKPOERGMZKB7SDHZ6QL4UJUUQR6AFLV4", "length": 18308, "nlines": 274, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "Majha Vidarbha Latest Marathi News of Nagpur and Vidarbha Crime", "raw_content": "\nनागपूर सावनेर महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, ३ गंभीर…\nअश्विन मुदगल यांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…\nसलमान खानला परदेश प्रवासाची परवानगी…\nअबकी बार विदर्भ की सरकार, भाजपाला विदर्भातून हद्दपार करा…\nवर्धा शहरात संशयास्पद स्थितीत आढळली स्फोटके…\nपाणी फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रदिनी ‘महाश्रम दान’ अभियान…\nअश्विन मुदगल यांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…\nबुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची पावसाची भविष्यवाणी जाहीर…\nयवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४१ डिग्रीच्या वर…\nसंरक्षित क्षेत्रातील वन्य प्राण्यांसाठी ३५० पानवठ्याद्वारे पाणी पुरवठा…\n(प्रतिनिधी):- पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यांचा स्त्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक...\nयवतमाळच्या दोन्ही खून प्रकरणातील आरोपींना अटक…\nचंद्रपुरातील प्रसूती रुग्णालयात गॅॅस गळती झाल्याने माजली खळबळ…\nसोनेगावला समस्यांचा विळखा, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष…\nनागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार : रिता मुळे\nभंडारा मध्यवर्ती कारगृहात कैद्याजवळ सापडला गांजा…\n‘डीबीटी’ योजनेच्या विरोधात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा\nरसूलाबाद येथील एसटी कर्मचाऱ्याच्या घराला भीषण आग…\n(प्रतिनिधी- अजिज शेख):- वर्धा जिल्ह्याच्या रसूलाबाद येथील वार्ड नं. २ मधील रहिवाशी वासुदेवराव लक्ष्मणराव वेळुकार यांच्या घराला आज दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक पणे...\nउज्जवला दिवस निमित्य अंत्योदय लाभार्थ्यांना गॅसचे वाटप…\n(प्रतिनिधी- अजीज शेख):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘प्रत्येक घरामध्ये गॅस’ ही संकल्पना अंत्योदय योजनेनुसार तहसील मांडगांव येथे वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेमध्ये...\nगुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ भव्य मूक मोर्चा…\nविविध सामाजिक संघटना सह सर्वधर्मीय नागरिक झाले सहभागी...(प्रतिनिधी- अजिज शेख):- जम्मू काश्मीर येथील चिमुकलीसह अनेक अत्याचार पीड़ित महिलांना न्याय मिळावा यासाठी आज वर्धा येथे...\n‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आ. सावरकर यांना घेराव\nबेमुदत कामबंद आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर... (प्रतिनिधी- सचिन मुर्तडकर):- राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर गेल्या सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत...\nदारू संबंधात वर्धा पोलिसांची वाॅश-आऊट मोहीम…\n(प्रतिनिधी- अजिज शेख):- वर्धा जिल्ह्यात विशेष पथका मार्फत दारु संबंधाने वाॅश-आऊट मोहीम राबविली जात असून ही मोहीम राबवून ३ लाख ३० हजार ६६० रुपयाचा...\nॲप्रेंटिसशीपसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री यांचे आवाहन…\n(प्रतिनिधी):- राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीपचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nएसटीच्या प्रवाशी तिकीटात होणार दरवाढ\n(प्रतिनिधी):- एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरं जावं लागू शकतं. एसटी महामंडळाला झालेला तोटा हा आता प्रवाश्यांकडून वसूल केला जाणार आहे. तोटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने...\nबलात्कार हा बलात्कारच असतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nलोया मृत्यू प्रकरणाबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय…\nमहाराष्ट्र झाले हागणदारीमुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा…\nदोन लाखावर शेतकऱ्यांना एचव्हीडीएस योजनेतून कनेक्शन देणार : ऊर्जामंत्री\n‘नाणार’चे आंदोलन म्हणजे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’\nभाजप आणि शिवसेनेत चाललायं सासू-सूनेचा खेळ…\nकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १ मे पर्यंत मुदतवाढ…\nप्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती नाही : हायकोर्ट\nआजचे राशिभविष्य २०/०४/२०१८ | Today’s Horoscope\nया महिलादिनी भेट घेऊया चरणगावं च्या सावित्रीची…\nसलमान खानला परदेश प्रवासाची परवानगी…\n२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरलेला अभिनेता सलमान खान याला जोधपुर न्यायालयाने परदेश प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजाराचा दंड सुनावला आहे. यावर न्यायालायाने सलमानला जमीन देखील मंजूर केला होता. परंतु परदेश प्रवासाची अट त्यावेळी...\nटरबूज खाण्याचे नियम जे तुम्हाला माहित नाही..\nटरबूज चुकीच्या पद्धतीने खाने तुम्हाला दवाखान्यामध्ये पोहोचवू शकते.उपाशी पोटी टरबूज खाऊ नये, आणि खायचे झाल्यास टरबूज मिठाशिवाय खाऊ नये. सर्दी असणाऱ्या रुग्णांनी टरबूजाचे सेवन करू नये. अस्थमा, हार्ट, शुगर आणि किडनीच्या रुग्णांनी टरबूजाचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा करू नये. यामध्ये असलेला अॅॅमिनो अॅॅसीड...\nराज्य पोलिस दलातील वरिष्ठांच्या बदल्या लवकरच…\n२०१८ मधील ८ विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेचीही तयारी \nनागपूर अधिवेशन कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना\nवापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती – नाना पटोले\nपिंगट दात पांढरे करायचे आहेत वाचा काही सोप्या टिप्स…\nचेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे सर्वोत्तम उपाय…\nकेस गळत असतील तर काय कराल\nत्वचेवर ग्लो हवाय करा हा उपाय…\nख्रिसमस स्पेशल : द्राक्षाने खुलवा सौंदर्य…\nकोई काम छोटा या बडा नही होता \n‘स्टीफन हाॅकिंग’ यांनी कस केल जग काबीज जाणून घ्या इथे | Stephen Hawking Inspirational Story\n‘कॅरोली टॅकॉस’ ची एक प्रेरणादायी गोष्ट | Karoly Takacs inspirational story\n‘शायर शुभम’ची एक अप्रतिम रचना…\nशिकंजी स्पेशल सिरीज – प्लेन शिकंजी रेसिपी | Shikanji\nशिकंजी स्पेशल – शिकंजी मसाला | Shikanji Masala\nज्वारीच्या भाकरी नंतर आता ‘सोया चंक्सची भाकरी’ आपल्या भेटीला…\nMakarsankranti 2018: अशी बनवा खस्ता गजक घरच्या घरी…\nकरियर : इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्युट…\nनागपूर सावनेर महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, ३ गंभीर…\nसरकारी योजना : काय आहेत सरकारी विभागाच्या आरोग्य सुविधा…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\nआज जागतिक छायाचित्र दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/category/travel-adventure/", "date_download": "2018-04-20T16:19:57Z", "digest": "sha1:EUOTD5NXZOCSPTAHNDCSFKKURD2IE754", "length": 10231, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "Travel & Adventure Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र 0\nसाहसकथा महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारीची 0\n“गडकिल्ले महाराष्ट्राचे” या ग्रंथराजावरचं मान्यवरांचं निरपेक्ष-परखड भाष्य. हा ग्रंथराज का घ्यावा याचा जणू परिपाठच. 0\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी… 0\nशहीद कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी पूर्ण केली त्यांची शेवटची इच्छा… 0\nनवा देश शोधल्याचा भारतीय युवकाचा दावा निघाला खोटा… 0\nरहस्यमय जगन्नाथ पुरी मंदिरा बाबत आपणास हि माहिती आहे का \nतब्बल ३००० किमीचा रिक्षाने प्रवास करत तो पोहचला लद्दाखपर्यंत… 0\nट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील 0\nरस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.. 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/08/current-affairs-31-july.html", "date_download": "2018-04-20T16:41:05Z", "digest": "sha1:74U3IT7BPLS4EB2QAWFRFZPW2IKHPC45", "length": 33466, "nlines": 211, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - ३१ जुलै २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - ३१ जुलै २०१५\nपेटीएम बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सर\n२०१९ पर्यंत भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा टायटल प्रायोजक मिळाला आहे.\nई-कॉमर्स वेबसाईट कंपनी पेटीएम चालविणाऱ्या ‘वन-९७ कम्युनिकेशन्स कंपनी’ला २०३.२८ कोटी रूपयांत बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व मिळाले आहे.\nपुढील चार वर्षांत भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम बीसीआयला २.४२ कोटी रूपये मोजणार आहे. बीसीसीआयचे प्रायोजकत्व पहिल्यांदाच ई-कॉमर्स कंपनीला देण्यात आले आहे.\nपुढील चार वर्षात भारतात जवळपास ८४ सामने खेळले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यापासून पेटीएम आता बीसीसीआयच्या जर्सीवर आपली ब्रॅन्डींग करू शकणार आहे.\nआता नव्या मोसमापासून रणजी करंडक स्पर्धा ‘पेटीएम रणजी करंडक’ म्हणून ओळखली जाईल.\nयापुर्वी मायक्रोमॅक्स या कंपनीकडे बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व होते, ते प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला २.०२ कोटी रूपये मोजायचे. अपुर्ण कागदपत्रांमुळे यावेळी मायक्रोमॅक्स टायटल प्रायोजकत्वावर बोली लावू शकले नाही.\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे दिली आहे.\n‘स्मार्ट सिटीज्’ तयार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे-पिंपरी, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या दहा शहरांची निवड केली आहे.\nस्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेला दहा लाख डॉलर्सचा दंड\nहाँगकाँग सेंट्रल बँकेनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हाँगकाँग येथील शाखेला दहा लाख डॉलरचा (सुमारे ६.२ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादविरोधी आर्थिक नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण दाखवत स्टेट बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.\nहाँगकाँगमध्ये २०१२ साली ‘अँटी मनी लाँडरिंग आणि काऊंटर टेरेरिस्ट फायनान्सिंग लॉ’ (मनी लाँड्रिंगविरोधी कायदा) आल्यानंतर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.\nएप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान स्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेने मनी लाँड्रिंगविरोधी नियम राबविण्यात हलगर्जीपणा केला. विशेषत: बँकेच्या २८ कॉर्पोरेट ग्राहकांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात आली नाही. ग्राहकांच्या सध्याच्या औद्योगिक व्यवहारांवर बँकेचे नियंत्रण नाही. बँकेच्या ग्राहकांमध्ये राजकीयदृष्ट्या भ्रष्ट व्यक्तींचा समावेश आहे की नाही याची शहानिशा करण्यात आलेली नाही, असा ठपका हाँगकाँग पत नियामक प्राधिकरणानं (एचएमए) ठेवला आहे.\nदहा लाख डॉलरच्या दंडाबरोबरच स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश ‘एचएमए’ने स्टेट बँकेला दिले आहेत. बँकेच्या अंतर्गत कारभारावर पुढील काळात कसे नियंत्रण ठेवले जाणार आहे, त्यासाठी बँक काय उपाययोजना करणार, याची माहिती देण्यासही ‘एचएमए’ने बजावले आहे.\nस्टेट बँकेचे हाँगकाँगमध्ये ३५ हून अधिक वर्षांसाठी अस्तित्व आहे.\nदरवर्षी १ रुपयाच्या नव्या नोटा सरकार छापणार\nएक रुपया बाजारमूल्याच्या १५ कोटी नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. १ जानेवारी २०१५पासून दरवर्षी या नोटा छापल्या जातील.\n१ जानेवारीपासून दरवर्षी १ रुपया बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी १५ डिसेंबर २०१४रोजी राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नोटा कॉइनेज अॅक्टमधील तरतुदींनुसार छापण्यात येतील.\nनोटा छपाईचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन १, २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे या नोटा सरकारने छापण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.\nचीनमध्ये विजेवरील बसचा सार्वजनिक वाहतुकीत वापर\nचीनमध्ये दहा सेकंदात पूर्णपणे विद्युतभारित होणारी (चार्जिग) बस तयार करण्यात आली असून ती ३१ जुलैपासून सेवेत दाखल करण्यात आली आहे.\nही बस ११ कि.मी. रस्त्यावर धावते. झेजियांग प्रांतात निंगबो येथे या बससेवेला एकूण २४ थांबे आहेत. येत्या तीन वर्षांत अशा १२०० बसगाड्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. या शहरात विद्युत बसगाड्या निर्मितीचा प्रकल्पही आहे.\nबस थांबलेली असताना किंवा प्रवासी चढत-उतरत असताना विद्युतभारित होते. एका विद्युतभारात ही बस पाच किमी अंतर कापते. तसेच या बसच्या वापरामुळे प्रदूषणदेखील कमी होते.\nझुझाऊ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कंपनीने ही बस तयार केली असून, चीनमधील वेगवान रेल्वे बनवणाऱ्या चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन या संस्थेची ही उपकंपनी आहे.\nया बस उत्पादनाशिवाय याच धर्तीवर इतर विद्युत वाहनांपेक्षा ३० ते ५० टक्के कमी वीज लागणारी इतर वीज वाहने कंपनी एप्रिलपर्यंत तयार करणार आहे.\nया बसचे संधारित्र (कॅपॅसिटर) २० लाख वेळा विद्युतभारित करता येते त्यामुळे त्याचा कार्यकाल १० वर्षांचा आहे. या बससेवेत बस रॅपिड ट्रान्झिट पद्धतीच्या मार्गाचा अवलंब केल्याने ती रहदारीच्या अडथळ्यांशिवाय चालू शकते.\nआयएमएफचे इराकला १.२४ अब्ज डॉलरचे कर्ज\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इराकला १.२४ अब्ज डॉलरच्या कर्जास तात्काळ मंजुरी दिली आहे.\nइसिसची वाढलेली बंडखोरी आणि जागतिक बाजारात कमी झालेल्या तेलाच्या किंमतीमुळे वित्तीय तूट इराकची वित्तीय तूट वाढली आहे. त्यामुळे देशाला अतिरिक्त निधीची गरज असल्याचे सांगितले आहे.\nसरकारच्या अर्थसंकल्पासाठी तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्ट्रक्चरल सुधारणांचा स्वीकार करण्यासाठी आयएमएफ पूर्ण मदत करेल, असे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार इराकी अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी (२०१४-१५) २.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चालू वर्षात अर्थव्यवस्थेत फक्त ०.५ टक्के वाढीची शक्यता आहे.\nआयसीजीएस आरुष नौकेचे जलावतरण\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)तर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या २० जलद गस्त नौकांपैकी (बीवाय ५१७) १७ व्या नौकेचे गुरुवारी कोचीन गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.\nतटरक्षक दुरुस्ती आणि उत्पादन पर्यवेक्षकचे डीआयजी जी. देवानंद यांची पत्नी ज्योती देवानंद यांच्या हस्ते ‘आयसीजीएस आरुष’ या नौकेचे जलावतरण करण्यात आले.\nमंगल सिंग चाम्पियाचा रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित\nकोपनहेगन, डेन्मार्क येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंगल सिंग चाम्पियाने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासह रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित केला आहे.\nरजत चौहानने कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत प्रवेशासह रजत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, महिलांमध्ये लक्ष्मीराणी माझी रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीची लढत खेळणार आहे.\nइंडोको रेमेडिजची महाराष्ट्र व गोव्यात १२५ कोटींची गुंतवणूक\nऔषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या इंडोको रेमेडिजने महाराष्ट्र व गोवा प्रकल्प विस्ताराची योजना आखली असून यासाठी १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.\nकंपनी महाराष्ट्रातील पातळगंगा येथे हरितक्षेत्र एपीआय सुविधा केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील स्टरलाईट ऑप्थॅल्मिक सुविधा केंद्राचाही विस्तार करण्यात येणार आहे.\nशेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासचा ताबा\nदीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासने ताबा मिळविला आहे. हा व्यवहार २००० कोटी रुपयांचा झाला असण्याची शक्यता आहे.\nभारतीय भांडवली बाजारात सल्लागाराच्या भूमिकेचा विस्तार करताना बीएनपी पारिबासने शेअरखानचे सर्व, १०० टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. बीएनपी पारिबासचे युरोपात १७ लाख ग्राहक आहेत.\nबीएनपी पारिबासमध्ये विलीन झाल्यानंतर शेअरखान ही यंत्रणा भारतातील व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत असेल; समभाग तसेच म्युच्युअल फंड, अन्य बचत योजनांची विक्री शेअरखानमार्फत कायम असेल.\n२०००च्या दशकात देशातील पहिली स्वतंत्र दलाल पेढी म्हणून अस्तित्वात आलेल्या शेअरखानचा खाते राखण्यातील ७ टक्के हिस्सा आहे. गेल्या एक तपापासून ही पेढी नफ्यात राहिली आहे. तर बीएनपी पारिबासचे ७५ देशांमध्ये अस्तित्व असून तिच्याअंतर्गत १.८५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.\nएसएसकेआय इन्व्हेस्टर सर्व्हिसेसच्या नावाने शेअरखान १९९५ मध्ये कार्यरत होती.\nइसिसने अपहरण केलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका\nलिबियातील सर्टे या शहरात इसिसचा मोठा प्रभाव असून ३० जुलै रोजी संध्याकाळी येथून चार भारतीय प्राध्यापकांचे इसिसने अपहरण केले होते.\nलिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे.\nयापैकी दोघेजण हैदराबाद, एकजण रायचूर आणि एक प्राध्यापक बेंगुळरूमधील आहे. हे सर्व जण त्रिपोली आणि ट्युनिसमार्गे भारताकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी सर्टे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकनाक्यावरून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले.\nअपहरण करण्यात आलेले चारही प्राध्यापक गेल्या एक वर्षापासून लिबियातील विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून भारतीय नागरिकांना लिबिया सोडण्याची सूचना केली होती.\nदेशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन यांचे निधन\nदेशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन २९ जुलै २०१५ रोजी यांचे चेन्नईमध्ये कर्करोगाने निधन झाले.\nदेशात एड्सचा १९८५च्या दरम्यान वेगाने प्रसार होत असताना डॉ सुनितींनी पुढाकार घेऊन एड्स प्रसाराची कारणं, त्यावरच्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा, आणि भारतात त्याबाबतची जागृती यासाठी आयुष्य वेचले. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे काम साऱ्या जगात वाखाण्यात आले.\nचेन्नईत त्यांनी उभ्या केलेल्या वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेत साडे पाच हजार रुग्णांवर उपचार करण्यात येतात.\nडॉ. सुनिती यांना तीन महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nदक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे निधन\nवर्णभेद प्रकरणातील बंदी उठल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे २८ जुलै रोजी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.\nवर्ण आणि वांशिक भेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांना फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नाही. बंदी उठल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने १९९१ मध्ये जेव्हा भारताचा दौरा केला, तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार ठरले. त्या वेळी ते ४२ वर्षांचे होते.\nक्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. पण त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तीन एकदिवसीय सामन्यांपुरतीच मर्यादित राहिली. त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधीच मिळाली नाही.\nनॉटिंगहॅमशायरचे नेतृत्व करताना त्यांनी संघाला दोन वेळा इंग्लिश कौंटीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी नॉटिंगहॅमशायर संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.\nपॉन्झी योजना म्हणजे काय\nकोणत्याही आर्थिक योजनेतून नागरिकांकडून १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गोळा करणारी योजना सेबीअंतर्गत येते. त्याचप्रमाणे एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ५० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अशी योजना सार्वजनिक योजना म्हणून ओळखली जाते. अशी योजना सेबीअंतर्गत येते.\nअनेक योजनांमध्ये ५०पेक्षा कमी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्याची तर एकूण रक्कम १०० कोटींपेक्षा कमी गोळा केल्याची बतावणी अशी योजना राबवणाऱ्या कंपनीकडून केली जाते. अशा प्रकारे पैसे गोळा करण्यासाठी अपरिवर्तनशील ऋणपत्रे (एनसीडी) किंवा तत्सम आर्थिक उत्पादनांची मदत घेतली जाते.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - ३१ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ३० जुलै २०१५\nचालू घडामोडी - २९ जुलै २०१५\nचालू घडामोडी - २८ जुलै २०१५\nडॉ. अब्दुल कलाम पंचत्वात विलीन\nचालू घडामोडी - २६ व २७ जुलै २०१५\nचालू घडामोडी - २५ जुलै २०१५\nचालू घडामोडी - २४ जुलै २०१५\nचालू घडामोडी - २२ व २३ जुलै २०१५\nप्रश्नसंच १६४ - माहितीची अधिकार, २००५\nचालू घडामोडी - २१ जुलै २०१५\nप्रश्नसंच १६३ - भूगोल\nचालू घडामोडी - १९, २० जुलै २०१५\nचालू घडामोडी - १८ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १७ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १६ जुलै २०१५\nप्रश्नसंच १६२ - भूगोल\nचालू घडामोडी - १५ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १४ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १३ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १२ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ११ जुलै २०१५\nप्रश्नसंच १६१ - भूगोल\nचालू घडामोडी - १० जुलै २०१५\nचालू घडामोडी - ९ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ८ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ७ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ६ जुलै २०१५\nचालू घडामोडी - ५ जुलै २०१५\nप्रश्नसंच १६० - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ४ जुलै २०१५\nप्रश्नसंच १५९ - चालू घडामोडी [सहाय्यक पूर्वपरीक्षा...\nचालू घडामोडी - ३ जुलै २०१५\nचालू घडामोडी - २ जुलै २०१५\nचालू घडामोडी - १ जुलै २०१५\nप्रश्नसंच १५८ - चालू घडामोडी\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=2836", "date_download": "2018-04-20T16:40:10Z", "digest": "sha1:SDAFIHF6JAGBUUNINCG72E5GCLSLBN6Q", "length": 26843, "nlines": 132, "source_domain": "rajtantra.com", "title": "नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nवनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nबोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nपालक मंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची पहाणी\nआर्थिक दृष्ट्या मागास उमेद्वारांना कर्ज देण्यास बॅंकांनी सहकार्य करावे – किरण पटवर्धन यांचे आवाहन\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nविविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » संग्राह्य बातम्या » नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार\nनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार\n2 डिसेंबर रोजी डहाणू तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या पुढाकाराने सर्व पक्षीय नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार एकाच व्यासपिठावर आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे सर्व उमेदवारांना खेळीमेळीच्या वातावरणात आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सोशल मिडीयावरुन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2017 रोजी जावक क्रमांक डनप/5146/2017-18 अन्वये ना हरकत पत्र देखील प्राप्त करण्यात आले होते. तसेच पोलीस यंत्रणेकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2017 रोजी जावक क्रमांक/सभा परवाना/2025/2017 द्वारे परवाना प्राप्त करण्यात आला होता.\nपरवानगी घेताना शासकीय यंत्रणा व निवडणूक यंत्रणा यांना सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणूका पार पडाव्यात यासाठी जनतेशी व उमेदवारांशी संवाद साधावयाचा असल्यास उपलब्धता ठेवण्यात आली होती. या व्यासपिठाचा वापर पोलीस यंत्रणेने उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी जरुर केला. निवडणूक यंत्रणेने या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओचित्रण केले आहे. कार्यक्रम कुठलाही अनुचित प्रकार न होता पार पडला. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा रात्री 10 वाजेपर्यंत असल्याने वेळेत समारोप करण्यात आला. याबाबत कुठल्याही यंत्रणेने काहीही आक्षेप नोंदविलेला नाही.\nतथापी डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज भरणार्‍या 142 अर्जांपैकी 31 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये किरकोळ तांत्रिक कारणांनी बाद झाल्यानंतर यातील 6 उमेदवार दाद मागण्यासाठी न्यायालयात गेले. सर्व 6 जणांच्या बाजूने निकाल लागून निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांचे निर्णय रद्दबातल ठरले व 6 जण पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकले. असे असले तरी उर्वरीत 25 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. यातून निवडणूक आयोगाला 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूका 17 डिसेंबर रोजी पर्यंत पुढे ढकलाव्या लागल्या. दैनिक राजतंत्रने याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात प्रखर भुमिका घेतली. या भुमिकेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा खुलासा करु शकले नाहीत. मात्र दबावतंत्राचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कुठल्याही कायद्याचा आधार नसलेल्या नोटीसांचा सिलसिला चालू केला आहे.\nयातील अभ्यासाचा विषय हा आहे कि, 5 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीले आणि लगेचच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना पत्र लिहीले. जिल्हा माहिती अधिकारी यांनी 7 डिसेंबर रोजी संजीव जोशी यांना पत्र दिले. आणि त्याच दिवशी संजीव जोशींकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यांच्या नोटीसा व त्यावरील दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी दिलेले उत्तर जनता जनार्दनाच्या माहितीसाठी सादर करीत आहोत.\nजिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांचे कार्यालय\nक्र./न. प्रशासन /क-1/टे-1/न.प.सार्व. निवडणूक 2017/कावि-562/17 दि. 5.12.2017\nजिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017\nविषय :- नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने दैनिक राजतंत्र या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांबाबत.\nसंदर्भ :- निवडणूक निर्णय अधिकारी, डहाणू नगरपरिषद यांचेकडील पत्र क्र.165 दि. 05/12/2017.\nमा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-2017/प्र.क्र.13/का-06 दि. 07/11/2017 अन्वये नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका 2017 चा कार्यक्रम पारीत झालेला असुन सदर कार्यक्रमानुसार पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद डहाणू, जव्हार व निवनिर्मित नगरपंचायत वाडा यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेश क्र. न.प्रशासन/क1/टे1/न.प. व न.पं. सार्व. निवडणूक 2017/कावि-502/17 दि. 17.12.2017 नुसार पेड न्यूज समितीचे गठण करण्यात आले असुन सदर समितीच्या सदस्य सचिव पदावर आपली नेमणूक करण्यात आली आहे.\nनिवडणूक निर्णय अधिकारी डहाणू नगरपरिषद यांनी संदर्भिय अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. त्यानुसार दैनिक राजतंत्र या वृत्तपत्रात निवडणूक विषयक विविध बातम्या छापून आल्या आहेत. त्याचसोबत निवडणूक निर्णय अधिकारी डहाणू नगरपरिषद यांचेबाबतही आक्षेपित विधाने व बातम्या छापून आल्या आहेत. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकामी आदर्श आचारसंहिता सुरु असताना निवडणूक निर्णय अधिकारी सारख्या महत्वाच्या अधिकार्‍याच्या बाबतीत दिशाभूल करणारे आरोप लावून व त्याबाबत बातम्या छापून निवडणूक आयोगावर अविश्‍वास दाखविल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. तरी सदर प्रकरणी दैनिक राजतंत्र तसेच अशा आशयाच्या बातम्या छापणार्‍या इतर वृत्तपत्राचे बाबतीत नियमानुसार चौकशी करुन आवश्यक त्या कारवाईचा प्रस्ताव विनाविलंब या कार्यालयास सादर करावा.\nस्थळप्रतीवर मा. जिल्हाधिकारी पालघर\nप्रत. निवडणूक निर्णय अधिकारी, डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2017\nया नोटीसवजा पत्रांना दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी दिलेले उत्तर\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017\nआपले सोबत जोडलेले पत्र ईमेल द्वारे प्राप्त झाले. आपले पत्र मोघम आहे. त्यातून आपणाला नेमके काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही. सोबत आपण जिल्हाधिकारी यांचे पत्र देखील जोडले आहे. त्यातही नेमकेपणा नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांना देखील काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कथित जावक क्रमांक 165 चे दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजीचे पत्र आपण सोबत पाठविलेले नसल्याने त्यांना काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही.\nदैनिक राजतंत्रमध्ये छापून येणार्‍या बातम्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपली बाजू कधी आमच्याकडे कळविलेली नाही. माहिती जनसंपर्क विभागाने देखील कधी कुठलाही खुलासा पाठविलेला नाही. यामुळे आमच्या कुठल्या बातम्या आपणास आक्षेपार्ह्य वाटतात हे समजून येत नाही. पर्यायाने आम्ही याबाबत काही म्हणणे मांडू शकत नाही.\nआपण पेड न्यूज समितीच्या माध्यमातून हे पत्र पाठवीत असलात तरी संपूर्ण पत्रात पेड न्यूजबाबत काहीही भाष्य नाही. आपण कुठल्या कायद्याप्रमाणे व कुठल्या अधिकारात हे नोटीस वजा पत्र पाठविलेले आहे हे पत्रात नमूद नाही. राज्यात आणीबाणी घोषीत झालेली नसल्याने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित आहे व या संविधानिक अधिकारावर आपण आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास संविधानिक पद्धतीने स्वतःचा बचाव करू इतकेच याबाबत म्हणता येईल.\nवस्तुस्थिती अशी आहे कि, डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांनी बेजबाबदार पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवून लोकशाहीचे नुकसान केले आहे. त्यांनी तांत्रिक कारणाने 31 उमेदवारी अर्ज बाद केले आहेत. यातील 6 जणांनी न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर गोयल यांचे निर्णय रद्द करून न्यायालयाने (कृपया पालघर जिल्हा न्यायालयातील निवडणूक याचिका क्रमांक 1 ते 6/2017 चे अवलोकन करावे) सर्व 6 जणांना निवडणूक लढविण्यास पात्र ठरविलेले आहे. पालघर जिल्हा न्यायालयाने 5 निकालांत गोयल या राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रकाच्या प्रतिकूल वागल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. या शिवाय न्यायालयात गोयल यांनी असे म्हणणे मांडले आहे कि, दिनांक 24 नोव्हेंबर 2017 रोजी एकाच दिवसात 138 उमेदवारी अर्ज आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे अर्ज नीट तपासून स्विकारता आले नाही. यामुळे त्यांची अकार्यक्षमता त्यांनी न्यायालयात देखील मान्य केली आहे. त्यांच्या या गोंधळामुळे अन्य 25 उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहिले आहेत. गोयल यांच्या विरोधात सर्वसामान्यांच्यात असंतोष आहे. या असंतोषाची दखल घेऊन कामगिरीत सुधारणा करण्याऐवजी दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचा आरोप केला आहे.\nकृपया मा. जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत सखोल चौकशी करून कांगावा करणार्‍या आंचल गोयल यांच्यावर कारवाई करून निवडणुका पारदर्शी व निर्विवाद पद्धतीने पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात हि विनंती.\nसंपादक : दैनिक राजतंत्र\nया पत्राची प्रत जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला देखील पाठविण्यात आली आहे.\nPrevious: जिल्हाधिकारी नारनवरे, तुम्ही लोकशाहीचे नुकसान केलेत\nNext: आपले डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nकुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध\nडहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न\nपालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nपालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी देणे योग्य ठरेल\nदिवंगत वनगा यांच्या घराण्यातील व्यक्तीला\nदुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला\nपक्षाच्या निष्ठावान आणि उच्चशिक्षित व्यक्तीला\nबाल शिक्षणातूनच माणसाची जडणघडण होते – डॉ. विजया वाड\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nक्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन\nदहीसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न.\nमनोरला बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न.\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अपघात\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-04-20T16:29:25Z", "digest": "sha1:4G4RFRRH5Z3D6RM56QXBDRC2Z3CHXRGP", "length": 4288, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "महागाई का वाढू शकते – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: महागाई का वाढू शकते\n‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर\nगेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल ह्या भडकलेल्या दरामुळे आधीच सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कच्च्या तेलाचे दर अंतरराष्ट्रीय बाजारात जरी कमी झाले असले तरी आपल्याकडे असलेल्या कर प्रणालीमुळे ते कमी होत नाही. जीएसटी च्या टप्प्यात पेट्रोल व डिझेल ला घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र तोवर आपल्याला दणकून पैसे मोजावे लागत आहेत . अर्थात पेट्रोल-डिझेलचे… Read More »\nCategory: देश विदेश Tags: इराण आणि सौदी अरब, पेट्रोल आणि डिझेल, महागाई का वाढू शकते, शिया सुन्नी मुस्लीम वाद\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/when-will-swarajya-ghosh-pada-pada/amp/", "date_download": "2018-04-20T16:24:00Z", "digest": "sha1:ZMH2Z5FICKNDMU3RVO4LOMM5TIVTBLQJ", "length": 20223, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "When will Swarajya Ghosh on Pada Pada ...? | पाड्यापाड्यांवर स्वराज्या घोष...पाड्यात सभा भरणार कधी, सरकारला जाग येणार कधी?.. | Lokmat.com", "raw_content": "\nपाड्यापाड्यांवर स्वराज्या घोष...पाड्यात सभा भरणार कधी, सरकारला जाग येणार कधी\n‘पेसा’ कायद्याने प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले; पण कायदा अंमलात आला, तर त्याचा फायदा मुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. जव्हार तालुक्यातल्या काही गावांनी वयम् चळवळीच्या मदतीने एक निर्णय घेतला. त्यांनी ‘नियमाप्रमाणे’ आपल्या ग्रामसभा स्वतंत्र भरवायला सुरुवात केली, ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवल्या आणि मग प्रशासनाला खडबडून जाग आली..\nस्वराज्य ही माणसाची स्वाभाविक प्रेरणा. म्हणूनच टिळकांनी जन्मसिद्ध अधिकार असा शब्द वापरला. गांधींनी ग्रामस्वराज्य या कल्पनेचा पुरस्कार केला, तोही भारतीय परंपरांमध्ये असलेल्या स्वशासनाच्या रीतींवर आधारित होता. प्रत्येक गोष्टीचे सरकारीकरण किंवा नोकरशाहीकरण ही इंग्रजांनी लादलेली पद्धत. गावातील जमिनींचे सर्व व्यवहार लिहून ठेवण्यासाठी गावाचा एक कुलकर्णी असे. तंटे सोडवण्यासाठी पंच असत. गावाच्या इतरही गरजांसाठी गावाची व्यवस्था होती. सगळे आलबेल होते, असे नाही. प्रत्येक व्यवस्थेत काही मर्यादा काही झुकत्या बाजू असतातच. पण जे काही होते, ते लोकांच्या हातात आणि लोकभाषेत होते. २०व्या शतकाच्या आरंभी आदिम जमातींच्या लोकांच्या जमिनी इतरांनी बळकावल्याचे खटले हाताळणाºया इंग्रज न्यायाधीशांनी लिहून ठेवले आहे, की आमच्याच कायद्याचा गैरवापर आमच्या नाकाखाली होताना आम्ही पाहत आहोत. जमीन कसणारा अडाणी, त्यात ना त्याला कोर्टाची भाषा समजे, ना कायद्याची जाण. त्याला फसवून ज्यांनी कागदपत्रे केली आहेत, अशांच्याच बाजूने कोर्टाचा निकाल जाई. मोठ्या प्रमाणात भिल्ल, कोलता, गोंड यांनी अशा काळात जमिनी गमावल्या. त्यापूर्वी कर्जाचे, गहाणकीचे आणि जमिनीचे इतर व्यवहार गावात देवासमोर तोंडी होत. भाषा सर्वांना समजे. मामला सोपा होता. पण इंग्रजी राज्यात तसे राहिले नाही. जमीन नोंदणी आणि तंट्यांची सोडवणूक हे दोन विषय इंग्रजांनी गावाच्या हातातून काढून घेतले. असेच वनक्षेत्रात वनांमधले जगण्याचे हक्क (तिथली जमीन कसण्याचे, गुरे चारण्याचे, फळे-वस्तू गोळा करण्याचे हक्क) वनकायदा करून काढून घेतले. लहान-सहान गरजा आणि तंटे जे गावातच मिटत ते पोलिसांत-कोर्टात जाऊन रखडू लागले. भारतीय स्वराज्याचा कणा म्हणजे गावांचे स्वराज्य होते. तो कणाच मोडून काढण्याचे काम इंग्रजांनी केले. स्वातंत्र्यानंतर बºयाच काळाने ७३वी घटना दुरुस्ती करून पंचायतराज आणण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला; पण त्यातही अजून ग्रामस्तरावर निधी-अधिकार-अधिकारी (फण्ड्स-फंक्शन्स-फंक्शनरीज) पोहचायचेच आहे. गेल्या वर्षी प्रथमच वित्त आयोगाने अधिक निधी ग्रामपंचायतींना आणि तुलनेने कमी निधी जिल्हा परिषदांना दिला. अशा अर्थाने स्वराज्य अजूनही खालपर्यंत पोहचते आहे. १९९६ साली अनुसूचित क्षेत्राची विशेष गरज ओळखून पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरियाज्) हा कायदा झाला. हाच कायदा आदिवासी स्वशासन कायदा म्हणूनही ओळखला जातो. या कायद्याने गुलामीच्या काळात गेलेले हक्क पुन्हा गावाकडे म्हणजे त्या गावातले सर्व मतदार मिळून बनलेल्या ग्रामसभेकडे देऊ केले. गावातल्या जमिनींचा वापर, जमिनींचे हस्तांतरण, जंगलातील सर्व गौण वनोपज, गौण खनिजे, सर्व छोटे पाणीसाठे - या सर्व संसाधनांचे हक्क पेसा कायद्याने ग्रामसभेकडे दिले. ग्रामपंचायत ही मंत्रिमंडळाप्रमाणे कार्यकारी यंत्रणा आहे व ग्रामसभा ही विधानसभेप्रमाणे निर्णय घेणारी धोरण ठरवणारी रचना आहे. ग्रामसभेच्या निर्णयांची अंमलबजावणी हे ग्रामपंचायतीचे काम आहे. आदिवासी भागात गावे, पाडे विखुरलेली असतात. लोकसंख्येच्या निकषांनुसार एक ग्रामपंचायत करताना या पाड्यांची मोट बांधली जाते. त्यांचे आपापसात काहीच ऋणानुबंध नसतात. अशा वेळी ग्रामपंचायत आपल्या मनाने कारभार करू लागते. भ्रष्टाचारासाठी सोयीची रचना होते. दुर्गम पाडे कायमचे वंचित राहतात. पेसा कायद्याने हे लक्षात घेऊन प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले आहेत. त्या त्या पाड्याची ग्रामसभा आपल्या विकासाचे निर्णय घेईल, शासकीय योजनांचे लाभार्थी निवडील व झालेल्या कामाचे योग्यायोग्य प्रमाणपत्र (युटिलायझेशन प्रमाणपत्र) देईल, अशी तरतूद पेसा कायद्याने करून ठेवली आहे. पण कायदा अमलात आला तर त्याचा फायदा होतो. पेसा कायदा संसदेने १९९६ साली पास केल्यानंतर एक वर्षाच्या आत राज्यांनी आपले नियम करणे अपेक्षित होते. महाराष्टÑाने तेव्हा फक्त ग्रामपंचायत कायद्यात काही जुजबी बदल केले व तेच पुरेसे आहे असे जाहीर केले. २०१४ साली महाराष्टÑाने पेसा कायद्याचे स्वतंत्र नियम बनवले. हे नियम देशात सर्वोत्तम मानले जातात. पण या नियमांच्या अंमलबजावणीत गोंधळाचे राज्य आहे. या नियमांनुसार ज्या पाड्याला स्वतंत्र गाव/ग्रामसभा हवी असेल, त्यांनी निम्म्या मतदारांच्या सहीने तसा ठराव करून उपविभागीय अधिकाºयांकडे द्यायचा असतो. त्या अधिकाºयांनी ९० दिवसात या ठरावाची गावात जाऊन पडताळणी करून आपली शिफारस जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची असते. तसे न झाल्यास जिल्हाधिकाºयांनी स्वत: प्रकरण हाती घेऊन पुढच्या ४५ दिवसात आपल्या मान्यतेसह विभागीय आयुक्तांकडे पाठवायचे असते. त्याही मुदतीत हे झाले नाही तर ते गाव घोषित झाले असे मानण्यात येते. मुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे शासनाला खूप काळजी असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. तीन-चार पाड्यांचा मिळून एक महसूल गाव असतो. त्या महसूल गावांचीच संख्या पेसा गावे म्हणून दाखवून सध्या प्रशासन आपलीच पाठ थोपटून घेत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार मागच्या दोन वर्षांपासून आदिवासी उपयोजनेचा पाच टक्के निधी पेसा क्षेत्रातल्या गावांना थेट वर्ग करण्यात येत आहे. हा निधीदेखील ग्रामसभेच्या ग्रामकोष खात्यात जाणे अपेक्षित आहे. पण गावे घोषितच न केल्यामुळे हे पैसे ग्रामपंचायतीच्याच खात्यात जात आहेत. या परिस्थितीबाबत जव्हार तालुक्यातल्या काही गावांनी वयम् चळवळीच्या मदतीने एक निर्णय घेतला. त्यांनी शासनाकडे आपला ठराव देऊन नियमांमधली मुदत केव्हाच उलटून गेली होती. आता आपले गाव घोषित झाले आहे असे मानण्यात येईल, हे त्यांना माहीत होते. त्यांनी आपल्या ग्रामसभा स्वतंत्र भरवायला सुरुवात केली. या नवनिर्मित ग्रामसभेतल्या लोकांनी वर्गणी काढून लेटरहेड छापली आणि त्यावरच ग्रामपंचायतीला व इतर यंत्रणांना नोटिसा पाठवून आपली ग्रामसभा स्वतंत्र भरवली. या नोटिसांनी प्रशासनाला खडबडून जाग आली. यांना हा अधिकार दिलाच कोणी, असा प्रश्न शासकीय कर्मचारी विचारू लागले. १३ पाड्यांनी अशा ग्रामसभा घेतल्या. हे पाहून इतरही गावे यात सामील होऊ लागली. आपले हक्क १९९६ पासून आहेत, आता ठराव केल्यावरही शासन हे हक्क देत नाही, या गोष्टीचा रोष लोकांमध्ये निर्माण झाला. वयम् चळवळीने हे लक्षात घेऊन लोकशाही पद्धतीने हा रोष प्रकट करण्याचे एक माध्यम म्हणून ग्रामसभा जागरणाचा मेळावा ठरवला. हा कार्यक्रम ग्रामसभा आणि शासनांतील संवादाचा करण्यासाठी मा. पालक मंत्री विष्णू सावरा व शासकीय अधिकारी यांना या कार्यक्रमात आवर्जून बोलावले. जव्हार व मोखाडा तालुक्यातल्या ४२ गावांच्या ग्रामसभा या जागरणात सहभागी झाल्या. या गावांमधले हजारो स्त्री-पुरुष नागरिक सहभागी झाले. प्रचंड मिरवणुकीने लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. भातकापणीच्या कामांची धांदल असताना, गावातले अर्धे पुरुष मजुरीच्या शोधात गाव सोडून गेलेले असताना, मेळाव्यात जाऊन कुठलाही वैयक्तिक लाभ होणार नसताना, घरी कडकी असताना स्वखर्चाने प्रवास करून इतके लोक केवळ ‘पाडोपाडी स्वराज्य’ ही घोषणा देत एकत्र आले. ही गोष्ट सामान्य नाही. वैयक्तिक फायद्यासाठी गर्दी कुठेही जमते, आना फ्री जाना फ्री असले तरीही गर्दी जमते. एखाद्या अस्मितेचा झेंडा धरला तरी गर्दी जमते. इथे यातले काहीच नव्हते. तरीही ज्यांना मुख्य प्रवाहात अडाणी-मागास मानले जाते, असे लोक स्वशासनाच्या हक्कासाठी, कायदेपालनाचा सत्याग्रह करायला एकत्र येतात. अशा वेळी सरकारला जाग येणं भाग आहे. या जागरणातली घोषणा होती - पाड्यात सभा भरणार कधी-आत्ता निगुत ताबडतोब सरकारला जाग येणार कधी - आत्ता निगुत ताबडतोब\n(लेखक वयम् चळवळीचे संघटक व राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत.)\nधक्का, भाऊचा धक्का आणि ससून डॉकला नव्या चैतन्याची चाहूल\nलोकांची ताकद सगळ्याच्या पार हिंमतीने बोलण्याची तयारी फक्त हवी\nप्लॅस्टिकबंदी : महाराष्ट्रात हे शक्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/-maher-bhayegaon-countrys-first-blood-pressure-free-village/articleshow/62491323.cms", "date_download": "2018-04-20T16:22:31Z", "digest": "sha1:BJWZS65D7AETAMHJCTYPWLGOU2P3A65B", "length": 24256, "nlines": 243, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "​ maher bhayegaon country's first blood pressure free village | माहेर-भायेगाव देशातील पहिले रक्तदाबमुक्त गाव - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nमाहेर-भायेगाव देशातील पहिले रक्तदाबमुक्त गाव\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nरक्तदाब निर्मूलन अभियानांतर्गत भायेगाव-माहेर (ता. अंबड) हे खेडे रक्तदाब मुक्त करण्यात डॉ. अजित भागवत व त्यांच्या चार डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. एखादे खेडे संपूर्ण रक्तदाबमुक्त करण्याचे हे देशातील कदाचित पहिलेच उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत यांनी दिली.\nआरोग्यविषयक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदाब निर्मूलन अभियाना अंतर्गत ‘प्रज्ञान फाउंडेशन’ तर्फे डॉ. अजित भागवत व त्याच्या चमूने भायेगाव-माहेर हे खेडे दत्तक घेऊन तेथील २००० ग्रामस्थांची रक्तदाब तपासणी केली. त्यामधे १४० उच्च रक्तदाबाचे रोगी आढळले. ‘सिपला’ कंपनीच्या मदतीने या रुग्णांच्या सहा महिन्यांच्या औषध योजनेची व्यवस्था करण्यात आली. दोन महिन्यांनंतर उच्च रक्तदाब असलेल्या व औषधांवर असलेल्या सर्व रुग्णांची पुनर्तपासणी करण्यात आली. हे गाव रक्तदाब मुक्त करण्यात डॉ. अजित भागवत व त्यांच्या डॉक्टरांना यश आले आहे.\nउपक्रमात सहभागी झालेल्यांचा सत्कार आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते शनिवारी भायेगाव - माहेर या गावात करण्यात आला. या पुढे सरकारच्या मदतीने या रुग्णांना औषध-पुरवठा चालू ठेवण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. याठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आराखडा तयार केला. कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. कंदेवाड आदींची उपस्थिती होती.\n‘एखादे खेडे संपूर्ण रक्तदाबमुक्त करण्याचे हे देशातील कदाचित पहिलेच उदाहरण आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यात व देशात राबवल्यास ह्रदयरोग, किडनी विकार आणि अर्धांगवायू मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटू शकते. हाच उपक्रम इतर खेड्यांमधून राबवू,’ असा मानस डॉ. भागवत यांनी व्यक्त केला.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nदुचाकीचा धक्का लागल्यानं पोलिसाला मारहाण\n‘बीएड’ अभ्यासक्रमाबाबत बदल संभ्रम वाढविणारा\nचेक बाऊन्स; २ वर्षे कारावास\n1माहेर-भायेगाव देशातील पहिले रक्तदाबमुक्त गाव...\n2गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘सुवर्ण’ सन्मान...\n3तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला\n5​ ‘सहकार क्षेत्रात करिअरची मोठ्या प्रमाणावर संधी’...\n6३२ कोटींच्या बिलांची चौकशी...\n7उमरगा येथे ५० लाखांचा अंमली साठा जप्त...\n8‘मिलिंद’च्या वसतिगृहांना ‘राष्ट्रवादी’चे दीड कोटी...\n9आजी-आजोबांचा सत्कार लई भारी\n10महापौर - सभापतींमध्ये ‘पाणीदार’ सामना...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://pareshmhetre.wordpress.com/category/films/", "date_download": "2018-04-20T16:19:41Z", "digest": "sha1:CPM3GPNM64T7XYEWMFBVZUUJ6GPY2J2N", "length": 45416, "nlines": 173, "source_domain": "pareshmhetre.wordpress.com", "title": "Films | Paresh Mhetre's Blog", "raw_content": "\nमोस्टली आपण सगळे कसे सेल्फ सेंट्रीक असतो ना स्वत:चे काम, शिक्षण, करीअर, प्रोमोशन्स, पैसा–अडका, रीलेशनशिप्स–नातलग, सख्खे, जवळचे मित्र–मैत्रीणी वगैरे.. इथवरच. अशा आपोआप तयार झालेल्या चोकटीच्या आत. चोकट पूर्वी म्हणायचे आजकाल याला सर्कल म्हणतात. तर आपण सगळे आपाआपल्या सर्कलच्या आत सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. सुखाच्या व्याख्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या. पण आपल्यातलेच काही जण सेल्फ सेंट्रीकपणा थोडा बाजुला सारून इतरांच्या सर्कलमधे डोकावतात, त्यांच्या सुखादु:खाच्या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करतात. एका सर्कलमधली “गरज” दुसर्‍या सर्कलमधे “चैन“… स्वत:चे काम, शिक्षण, करीअर, प्रोमोशन्स, पैसा–अडका, रीलेशनशिप्स–नातलग, सख्खे, जवळचे मित्र–मैत्रीणी वगैरे.. इथवरच. अशा आपोआप तयार झालेल्या चोकटीच्या आत. चोकट पूर्वी म्हणायचे आजकाल याला सर्कल म्हणतात. तर आपण सगळे आपाआपल्या सर्कलच्या आत सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. सुखाच्या व्याख्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या. पण आपल्यातलेच काही जण सेल्फ सेंट्रीकपणा थोडा बाजुला सारून इतरांच्या सर्कलमधे डोकावतात, त्यांच्या सुखादु:खाच्या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करतात. एका सर्कलमधली “गरज” दुसर्‍या सर्कलमधे “चैन“… काही सर्कल्स मधे बेसिक सुख कधी नव्ह्तेच.. काही सर्कल्स मधे बेसिक सुख कधी नव्ह्तेच.. असे जेव्हा कळते तेव्हा मात्र “समाजिक लेव्ह्ल“वर बदल केले पाहिजेत असे वाटते. जगात समता हवी, विषमता नको.\nअसे बदल केले पाहिजेत हे पूर्वीच्या लोकांनासुद्धा वाटले असेल. त्यांनी आपापल्या परीने काही विचार मांडले. मग सगळ्यांनी सर्कल मोठे करा, सर्कलच ठेवू नका, सगळ्या सर्कल मधे समानता पाहिजेत एक ना अनेक विचारधारा निर्माण झाल्या. आपणही अजाणतेपणी अशा विचारांना फोलो करत असतो तर काही जण एक विचारधारेला घट्ट धरुन “वि हॅव टु चेंज द वर्ल्ड“च्या मागे लागतात. क्रांति–रेव्हेलुशन आणण्यासाठी धडपड करतात. कुणी पूर्ण आयुष्य वेचत या कामात तर कुणी काही वर्ष, तर कुणाला विचार पटतात पण करु काहीच शकत नाही.\nविक्रमचे वडील गांधीवादी असतात. त्याला वाटते की वडीलांच्या विचासरणीमुळे त्याचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्याला मोठ व्हायचे असते. तसा तो होतोही नंतरच्या काळात. अशक्य डील शक्य करु शकणारा असे त्याचे नावही होते राजकारणी आणि बिझनेसमन लोकांमधे.\nसिद्धार्थ वर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असतो. मुळापासुन बदल केले पाहिजेत आणि आपण स्व:त याची जवाबदारी उचलली पाहिजे. तो सोबतच्या मित्रांनाही हे विचार पटवुन देतो. ऐनवेळेस बरेच जण माघार घेतात. पण सिद्धार्थ जेवढे सोबत आहेत त्यांना घेवून चळवळीत उडी घेतो. बिहारमधल्या छोट्या गावात जाउन सुधारणांचे काम चालू करतो. यासाठी त्याचे सर्वस्व देतो. या चळवळीला कधी हिंसात्मक वळण लागल्यामुळे पोलिस सतत त्याच्या मागे लागलेले असतात.\nया दोघांना गिता नावाची मुलगी आवडत असते. गिता विक्रमला चांगला मित्र मानत असते आणि ती सिद्धार्थच्या प्रेमात असते पण त्याच्यासोबत जायला नकार देते कारण तिला परदेशात जाउन शिक्षण घ्यायचे असते. काही वर्षांनंतर आयएएस अधिकार्‍याशी लग्न करते कालांतरने त्याला सोडूनही जाते. ती परत सिद्धार्थला भेटून त्याच्या कामात मदत म्हणून प्रैढ साक्षरता वर्ग चालवते. तिचे आयुष्य मात्र बरेच चित्र–विचित्र वळण घेत जाते.\nतिघांची सुरुवात दिल्लीतल्या कॉलेजपासून होते आणि पिक्चरचा शेवटाला तिघे तीन टोकाला पोहोचतात. खुप रोचक प्रवास आहे या तिघांच्या जीवनाचा या सगळ्यांची कॅरॅक्टर्स हे आपल्याच समाजातील वेगवेगळे सर्कल्स आहेत, कॉलेजातल तारुण्य आहे, कहीतरी करण्याची इच्छाशक्ति आहे, विषमता आहे.\nके के मेननचे काम नेहमी सारखे मनात ठसते. शायनी अहुजा पण परफेक्ट वाटतो. चित्रांगदा सुंदर आहेच आणि तिने कामही बेस्ट केले आहे.\nस्वानंद किरकिरेची गाणी आणि शांतनू मोइत्राचे म्युझिक या सोबतील तोड नाही. बावरा मन माझे सगळ्यात आवडते गाणे आहे.\nआर्टस आणि सिनेमॅटोग्राफी छान आहे हे पूर्वार्धात प्रकर्षाने जाणवते. मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे विक्रम–गिता–सिद्धार्थ यांच्यातील पत्र व्यवहार सुधीर मिश्रांचा “हज़ारों ख्वाहिशें ऐसी” नक्की बघा, खुप वेगळा आहे\nबर्‍याचदा पिक्चरचा शेवट गोड, गुण्यागोविंदाने, happily lived ever afterने केला असेल कि कस बर वाटत. चटका लावणारी शोकांतिका वगैरे असेल तर बरेच दिवस तो शेवट मनात रेंगाळत राहतो. पण जर सांकेतिक/अर्धवट शेवट केला असेल ना तर कळतच नाही काही. कथानक लिहिणार्‍याने आणि डायरेक्टरने ठरवुन असे विचित्र शेवट बनवले की कसेतरीच वाटते. लावा काय अर्थ लावायचा तो आपल्या सोयीने, समजुन घ्या कथेच्या ’फ़्लो’नुसार. डोक्याला शॉट मग मला कुठेतरी वाचुन, कोणाशी तरी बोलुन, ऐकुन curiosity शांत करावी लागते.\nअसाच एक फार प्रचंड आवडता पिक्चर ’सलाम बॉम्बे’. लई वेळा पाहिला. दर वेळेस नवीन वाटतो. दर वेळेस एखादी बारीकसा prop नजरेस पडतो आणि मन खुश होवुन जाते. गोष्टीची सुरुवात होते ती गावाबाहेर असलेल्या अपोलो सर्कशीच्या तंबु उतरवण्याने. सगळे लोक आवरा–आवरी करत असतात. तिथला एक बालकामगार अकरा वर्षाचा मुलगा क्रिश्नाला मालक गावातुन पानमसाला आणायला पाठवतो. तो जाऊन परत येतो तोपर्यंत सर्कशीचा गोतावळा निघुन गेलेला असतो. रेल्वे स्टेशनला जाऊन ’बडे शेहेर’ जाण्यासाठी तिकीट घेतो आणि बॉम्बेला पोहोचतो. चहाच्या टपरीवर कामाला लागतो तेव्हा त्याचे चायपाव. बॉम्बेतले भिकारी, रस्त्यावर–रेल्वे स्टेशनवर राहणारी मुले, वेश्या, वेश्यागृह, वेश्यांची लहान मुले, त्यांचे चार पैसे कमावण्याचे धंदे, ड्रग्ज व्यवसायिक, त्या व्यसनात पुर्ण बुडालेले गरीब लोक, बालसुधारगृह यासगळ्यानी बनलेला आणि त्याच्या भोवतालचा समाजात चायपाव त्याच्या सच्च्या, धोकेबाज मित्रमैत्रिणींसोबत कसा survive करतो. लहान मुलांना कोणत्या निरनिराळ्या tragedy मधुन जावे लागते हे बघण्यासारखे आहे… खिळवुन ठेवतो पिक्चर एकदम.\nदिग्दर्शक मिरा नायरने रस्त्यावर राहणार्‍या मुलांना घेवुन त्यांना प्रशिक्षण देवुन चित्रपटात घेतले. लोकेशन्स म्हणजे मुंबईतले रेल्वे स्टेशन, वेश्यागृह, दफनभुमी, भरपुर रहदारीचे रस्ते, चिल्लररुम, ड्रग्जवाल्याचे सगळे अगदी खरखुरं. सॅंडी सिसिलने एक नंबर फोटोग्राफी केली आहे आणि एका बालकलाकाराला दत्तकसुद्धा घेतले. सुनी तारापोरवाला हिनी मिरा नायरसोबत कथा आणि संवाद लिहिले आहेत.\nलिहिण्याचे कारण एवढच की ड्युयल ओडिओवाली फाइल डाऊनलोड केलेली. एक ट्रॅक नोर्मल पिक्चर दुसर्‍या ट्रॅकमधे पुर्णवेळ मिरा नायर बोलते. कथा कशी लिहली, शुट कुठे आणि कशा परिस्थीत केले. ऐनवेळेस छोट्या कामासाठी crew ला उभे करुन काम करवुन घेतलेले किस्से. फंड्स उभे करणे, लहान मुलांना स्वत:च्याच घरात ठेवुन घ्यावे लागले आणि गणपति उत्सवातले शुटिंग सारखी अवघड काम कसे केले वगैरे हे सर्व डिटेल्स टच करतात. मला कित्येक दिवस चित्रपटाच्या शेवटातुन काय अर्थ काढावा काय बोध घ्यावा कळतच नव्ह्ते. पण मिरा नायरच्या बोलण्यातुन खुप सोप्या आणि सहज रितीने कळाले.\nअ‍ॅवार्ड्स आणि nominations खुप मिळालेत सलाम बॉम्बे ला. चार गोष्टींसाठी नक्की बघा सलाम बॉम्बे ला. चार गोष्टींसाठी नक्की बघा सलाम बॉम्बे मुंबई, मिरा नायर, नाना पाटेकर आणि चित्रपटाचा शेवट\nयश-राज फिल्म्सने बर्‍याच नामवंत नायक, नायिकांना सोबत घेवून चित्रपट बनविले आणि त्यातील बरेच गाजलेसुध्दा. गेल्या चार दशकांमधे यश-राज फिल्म्सने कित्येक नवीन कलाकारांना आपल्या बॅनरमुळे नावारुपास आणले, जे आधीच मोठे स्टार होते, त्यांच्या ’स्टारडम’मधे अजुन भर घातली. बॉलीवुडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान याने पहिल्यांदा यश-राज बरोबर ’एक था टायगर’ या चित्रपटात काम केले आहे. सलमानने गेले काही चित्रपट अक्षरश: स्वत:च्या जीवावर यशस्वी करुन दखवले आहेत, पण यावेळेस मात्र असे काही घडले नाही.\nशेणॉय (गिरीश कर्नाड – मी पहिल्यांदा यांचे काम पाहीले.) हे RAW मधे ऑफिसर असतात आणि त्यांचा आवडता माणुस टायगर (सलमान खान) हा भारताचा गुप्तहेर असतो. देशा-विदेशात कामगिरीसाठी शेणॉय टायगरला पाठवत असतात. निर्णय घेताना बुध्दीचा वापर करावा, हृदयाचा नाही (हे प्रत्येक चित्रपटांत असते) अशी शिकवण शेणॉयनी गुप्तहेरांना दिलेली असते. एके दिवशी शेणॉय टायगरला सांगतात की त्यांनी कामाच्या जवाबदारीमुळे प्रेमाला तिलांजली दिली. त्या काही प्रसंगात कळते कि टायगर एकटा रहात असतो. परदेशात जिथे जिथे कामगिरीवर जाईल तिथे हणामारी करुन शत्रुला जिवानिशी मारुन टाकत असतो. (इथे बाष्कळ अ‍ॅक्शन सीन बघायला मिळतात.) घरी आला कि, त्याच्या आजुबाजुला रहणार्‍या सगळ्या महिला त्याच्यावर लट्टु असतात. (इथे थोडेफार हसायला मिळते.)\nआयर्लंडच्या एका महाविद्यालयात एक निवृत्त भारतीय शास्त्रज्ञ (रोशन सेठ – भारत एक खोज मधले) काम करत असतात. त्यांच्याकडुन क्षेपणास्त्रांची माहिती चोरीला (कि विक्रीला यात मला confusion आहे.) जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर टायगर तिथे जातो. शास्त्रज्ञच्या घरी काम करणार्‍या झोयाशी (कॅटरीना) ओळख झाल्यावर सलमान डायरेक्ट तिच्या प्रेमात पडतो) काम करत असतात. त्यांच्याकडुन क्षेपणास्त्रांची माहिती चोरीला (कि विक्रीला यात मला confusion आहे.) जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर टायगर तिथे जातो. शास्त्रज्ञच्या घरी काम करणार्‍या झोयाशी (कॅटरीना) ओळख झाल्यावर सलमान डायरेक्ट तिच्या प्रेमात पडतो टायगरचा साथीदार गोपी (रणवीर शोरे) त्याला वारंवार कामात लक्ष दे असे सांगत असतो. इथे काही विनोदी प्रसंग आहेत. पण हसायला येता नाही कारण ऑलरेडी हे प्रसंग प्रोमो मधे रीलीज केलेत टायगरचा साथीदार गोपी (रणवीर शोरे) त्याला वारंवार कामात लक्ष दे असे सांगत असतो. इथे काही विनोदी प्रसंग आहेत. पण हसायला येता नाही कारण ऑलरेडी हे प्रसंग प्रोमो मधे रीलीज केलेत (yes #Facepalm) प्रेमात एक-दोन गाणी येउन जातात. एका रोमॅंटीक सीन मधे टायगर झोयाला उल्का दाखवतो (yes #Facepalm) प्रेमात एक-दोन गाणी येउन जातात. एका रोमॅंटीक सीन मधे टायगर झोयाला उल्का दाखवतो (तेही चंद्र दिसत असताना (तेही चंद्र दिसत असताना हा “विनोद” खगोल-अभ्यासकांना नक्की आवडेल 😀 )\nमध्यंतरापर्यंत गोष्ट थोडीतरी चांगली आहे, पण नंतर ’कायच्या काय’ होवुन जाते. झोया पाकीस्तानच्या ISI ची एजंट असते. ती गुप्त संदेश पाठवुन टायगरला इस्तंबुल येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय बैठकीस बोलावुन घेते. तिथे ते एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतात पण समाज आणि RAW, ISI मान्यता देणार नाही म्हणुन कोणालाही न सांगता तिथुन पळुन जातात. मग शेणॉय आणि ISI ची लोक त्यांचा पाठलाग करु लागतात. नायक-नायिकेची जोडी देशाटन करत फिरते आणि सिनेमा संपतो. like ” and they lived happily ever after” (होय, खरच संपतो एकदाचा\nशेवटी शेवटी एका पाठोपाठ एक Action प्रसंग येतात. विनोदाला जेवढे हसु येत नाही तेवढे serious action scence ला हसु येते. काही गोष्टी खुप unrealistic आहेत झोया आणि टायगर प्रत्येकी ४-५ गुडांना/पोलिसांना बेदम मारतात. हणामारी करताना एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर उड्या मारत फिरतात. भारतातल्या गोपीला जसे काही परदेशातले रस्ते माहित असतात म्हणुन तो कार चालवतो. झोयाला विमान उडवता येत असते. टायगरला गोळी लागलेली असताना तो बाईक चालवत उडणारे विमान पकडतो (this one is epic #Fail) चित्रपटातले बरेच प्रसंग, डायलॉग अक्षरश: predictable आहेत. e.g. (डायलॉग – जिंदा या मुर्दा (this one is epic #Fail) चित्रपटातले बरेच प्रसंग, डायलॉग अक्षरश: predictable आहेत. e.g. (डायलॉग – जिंदा या मुर्दा प्रसंग – टायगर झोयाला गोळी मारत नाही, शेणॉय टायगरला हृदयापासुन शुभेच्छा देतात आणि इतर अनेक.)\nशेवट वाईट केला आहे. सलमानची विशेष काहीच जादु नाही. कॅटरीनाची हिंदी जरी त्रास देत नसली तरी अभिनय ठिकठाकच आहे. रणवीर आणि कर्नाड हे मस्त अभिनेते आहेत. गाणी विनाकारण येतात. युरेशीयातील आणि इतर काही ठिकाणी चित्रीकरण झाल्यामुळे लोकेशन्स छान आहेत. (Surprise) सध्द्या सारखे वाजणारे माशाल्ला हे गाणे चित्रपटात नाहीचे. एकुणच कबीर खान दिग्दर्शीत ’एक था टायगर’ जाम बोर आहे. तरी सुध्दा ७५ कोटी खर्च करुन बनविलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३१.२५ कोटी (विकीपेडियाची माहिती) कमावले आहेत\nब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फिल्म बघायला मजा येतेच पण जर तो मूकपट असेल तर.., प्लस तो फ्रेंच लोकांनी बनविला असेल तर, क्या बात हे\nNFAI येथे यावेळेस “ढीगाने” नामांकने कमावलेला आणि पुरस्कार जिंकलेला ’द आर्टिस्ट’ बघायाला मिळाला.\nतसे पाहायला गेलं तर गोष्ट वेगळी आहे; तरीही साधी, सोपी आणि भारतीय सिनेमा बघणार्‍यांना तर लगेच अंदाज लावता येण्यासरखी आहे. शॉर्टमधे सांगायचे तर – गोष्ट आहे एका कलाकराची जो हॉलिवूडमधे मूकपटांत नट म्हणून काम करत असतो. १९३० च्या काळात चित्रपट निर्मितीत होणार्‍या बदलांमुळे त्याची घुसमट होते आणि त्यातून बाहेर पडायाला त्याची प्रेमिका कशी मदत करते हे रंजकपणे, विनोदी अंगाने मांडले आहे.\nसिनेमाची सुरुवातच होते ती ’जॉर्ज व्हॅलेंटाइन’ (Jean Dujardin) प्रमुख भुमिकेत असलेल्या एका मूकपटाच्या स्क्रिनींगने (खरच मजेशीर दृश्ये आहेत). नंतर जॉर्ज एके ठिकाणी फोटोग्राफर लोकांना ’पोज’ देत उभा असतो. तेवढ्यात चाहत्यांच्या गर्दीतून एक तरुणी- ’पेपी मिलर’ (Bérénice Bejo) चुकुन त्याच्या पुढ्यात येते. दुसर्‍या दिवशी एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर त्या दोघांचे फोटो येतात. त्यानंतर पेपी Extras साठी ऑडीशन द्यायला जाते, त्याठिकाणी डांसर म्हणून तिची निवड होते. किनोग्राफ नावाच्या स्टुडीओत जॉर्ज आणि पेपीची भेट होते. जॉर्ज पेपीला काम देण्यासाठी स्टुडीओच्या मालकाला गळ घालतो. पेपीची एक वेगळी ओळख असावी म्हणून जॉर्ज तिच्या गालावर तीळ बनवितो. (ते तीळ ती कायम सांभाळते) पेपी जरी extra असली तरी जॉर्जला तिच्यासोबत असलेल्या scene ला बर्‍याचदा ’रीटेक’ द्यावे लागतात. कदाचित ह्याच काळात त्यांचे सूर जूळतात. पेपीला पुढे चांगली कामे मिळ्तात.\nकाही वर्षांनी कीनोग्राफ स्टुडीओ मूकपटांची निर्मिती बंद करून बोलपट बनविण्यास सुरुवात करतात. जॉर्जला बोलपटांची कल्पना आवडत नाही. तो स्वतंत्रपणे एका मूकपटाची निर्मिती करण्यास सुरुवात करतो. संपूर्ण कमाई त्यात लावतो. पेपी मुख्य भुमिकेत असलेला बोलपट आणि स्वत: मुख्य भुमिकेत असलेला जॉर्जचा मूकपट एकाच दिवशी प्रदर्शीत होतो. अर्थात जॉर्जचा मूकपट चालत नाही. १९२९ ला स्टॉक मार्केट कोसळते आणि जॉर्जचे दिवाळे निघते. त्याची बायको त्याला सोडून जाते. जॉर्ज त्याच्या नोकरासोबत एका छोट्या घरात रहायला जातो.\nजॉर्जच्या वस्तूंचा लिलाव होतो. तो नोकराला कामावरून काढून टाकतो (बघण्यासारखा scene) . पेपीचे बरेच बोलपट गाजतात. जॉर्ज दारू-सिगारेटच्या आहारी जातो. तो पेपीचा एक बोलपट बघतो. तिथे खुप हसतोही. घरी दु:खी, चिडलेल्या अवस्थेत तो त्याच्याजवळ्च्या सर्व फिल्मच्या रीळ जाळतो. आग चांगलीच पेट घेते आणि जॉर्ज धुरामुळे बेशुद्ध पडतो. त्याचा कुत्रा पोलिसाला बोलावतो आणि त्याचा जीव वाचवितो. पेपीला ही बातमी कळाल्यावर ती जॉर्जला स्वता:च्या घरी नेते.\nआता पेपी कीनोग्राफ स्टुडीओच्या मालकाला धमकी देते त्याने जॉर्जला काम द्यावे नाहीतर, तीसुद्धा काम करनार नाही. (विनोदी scene)\nइकडे जॉर्जला कळते की लिलावातील सर्व वस्तू पेपीने विकत घेतल्या.. उद्वीग्न मनस्थितीत तो स्वत:च्या घरी जतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. पेपी तेथे पोहचून त्याला थांबविते. ते दोघे मिळून शूटींगसाठी नाचतात. येथे दोन डायलॉग येतात आणि सिनेमा संपतो.\nअनेक दृश्ये स्मरणात राहतात.\nकुत्र्याच्या अफलातून करमती आहेत. जॉर्जला एक स्वप्न पडते ते खुप भारी दाखवले आहे. एका दृश्यात जॉर्ज दारु पिताना दाखवला आहे, तो कॅमेराचा अ‍ॅंगल भारी आहे. दुसर्‍या एका दृश्यात जॉर्जची प्रोजेक्टरवरची सावली…\n२२FPS असल्यामुळे त्याकाळचा फीलसुद्धा छान येतो.\nखुप पोझिटीव्ह गोष्टी आहेत या सिनेमात.\nहा सिनेमा बर्‍याच गोष्टी “न बोलता” दाखवतो.\nकलाकारचे आयुष्य दाखवतो.. नशीब, चढ-उतार दाखवतो. पाळीव प्राण्याचे माणसावरील प्रेम, नोकराचे मालकारील प्रेम, केलेल्या मदतीची कृतज्ञता ठेववी. सर्वात महत्वाचे शिकवतो – बदलाला सामोरे जावेच लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/06/CurrentAffairs30June2016.html", "date_download": "2018-04-20T16:32:01Z", "digest": "sha1:TNHS5URU66PHZAQ3BXI24ELV73B7JCRC", "length": 16675, "nlines": 175, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : ३० जून", "raw_content": "\nचालू घडामोडी : ३० जून\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर\nसातव्या वेतन आयोगाच्या बहुतांश शिफारशी स्वीकारून देशातील सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांवर केंद्र सरकारने वेतनवर्षांव केला आहे.\nयामुळे सुमारे २३.५ टक्के वेतनवाढ झाली असून सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५८ लाख निवृत्तिवेतनधारकांना १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.\nया वेतनवाढीचा तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पन्नाच्या ०.७ टक्के इतका भार पडणार आहे. या वेतन आयोगासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nवेतन आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १४.२७ टक्के वाढ सुचवली होती.\nसहाव्या वेतन आयोगाने २० टक्के वाढ सुचवली होती. पण सरकारने ती २००८ मध्ये अंमलबजावणी करताना दुप्पट केली होती.\nआता सातव्या आयोगाच्या वेतनवाढीत सर्व भत्ते मिळून २३.५५ टक्के वाढ होत आहे. ७० वर्षांत प्रथमच सर्वात कमी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळाली आहे, असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या १९४ भत्ते लागू आहेत. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी ५१ भत्ते पूर्णपणे रद्द करण्याची व आणखी ३७ प्रकारचे भत्ते इतर भत्त्यांमध्ये मिळविण्याची शिफारस आयोगाने केली होती.\nयाचे दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घेऊन आयोगाच्या शिफारशी तूर्तास लागू न करता त्यावर अधिक सखोल विचार करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समिती चार महिन्यांत अहवाल देईल.\nसमितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू असलेले भत्ते सध्याप्रमाणेच मिळत राहतील. याखेरीज आणखीही दोन समित्या स्थापन करण्याचे मंत्रिमंडळाने ठरविले आहे.\nसरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते.\nवेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून शिफारस अहवाल केंद्राला सादर करते.\nथोडय़ाफार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो व त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.\nपहिला वेतन आयोग १९४६ साली श्रीनिवास वरदचारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झाला.\nया आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १० रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. ती ४५० टक्क्यांची वाढ होती.\nदुसरा वेतन आयोग न्या. जगन्नाथदास यांच्या अध्यक्षतेखाली १९५७ साली नेमला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.\n१९७० साली न्या. रघुवीर दयाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त तिसऱ्या वेतन आयोगाने १९७३ साली सादर केलेल्या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना २५० टक्के वेतनवाढ मिळाली.\n१९८३ साली पी.एन. सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौथ्या वेतन आयोगाने ४ वर्षांत ३ टप्प्यांत आपला अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तब्बल ४०० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.\n१९९४ साली नियुक्त पाचव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. रत्नावेल पांडियन यांनी १९९७ साली सादर केलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना ३५० टक्के वेतनवाढ मिळाली.\nमनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या काळात नियुक्त न्या. बी.एन. श्रीकृष्ण यांच्या सहाव्या आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ४० टक्के वाढ झाली.\nअशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल सादर करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात १४.२७ टक्के वाढ देण्याची शिफारस केली होती.\nटोर्पेडो पाणतीर भारतीय नौदलाकडे सुपूर्त\nसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अधिकृतपणे ‘वरुणास्त्र’ पाणतीर (टोर्पेडो) भारतीय नौदलाकडे सुपूर्त केले.\nजड वजनाच्या पाणबुडीविरोधी पाणतीर नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत डीआरडीओ येथे झालेल्या कार्यक्रमात नौदलाकडे सोपविण्यात आले.\nनौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने (एनएसटीएल) हे पाणतीर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वरुणास्त्राची रचना करण्यात आली आहे.\nभारत डायनामिक्स लिमिटेडने वरुणास्त्राची निर्मिती केली आहे. हे वरुणास्त्र पाणबुडीबरोबरच मोठी जहाजेही उद्ध्वस्त करू शकते.\nवरुणास्त्राच्या निर्मितीत डीआरडीओला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजीनेही मदत केली आहे.\nअलीकडेच बंगालच्या खाडीत वरुणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणादरम्यान वरुणास्त्र समुद्रात शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले.\nलढाऊ विमानानंतर स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीच्या दिशेने देशाची ही एक मोठी कामगिरी आहे. वरुणास्त्र दिल्ली श्रेणी, कोलकाता श्रेणी, कमोर्ता श्रेणी यांसारख्या मोठ्या जहाजांमध्ये बसविले जाईल.\nवरुणास्त्र पाणतीर समुद्राच्या आत पाण्यामध्ये ४० समुद्री मैल प्रतितास वेगाने शत्रूच्या पाणबुडीवर तसेच मोठ्या जहाजांवर हल्ला करून ते उद्‌ध्वस्त करू शकते.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० जून\nचालू घडामोडी : २८ व २९ जून\nचालू घडामोडी : २७ जून\nचालू घडामोडी : २६ जून\nचालू घडामोडी : २५ जून\nचालू घडामोडी : २४ जून\nचालू घडामोडी : २३ जून\nचालू घडामोडी : २२ जून\nचालू घडामोडी : २१ जून\nचालू घडामोडी : २० जून\nन्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)\nचालू घडामोडी : १९ जून\nचालू घडामोडी : १८ जून\nचालू घडामोडी : १७ जून\nचालू घडामोडी : १६ जून\nचालू घडामोडी : १५ जून\nचालू घडामोडी : १४ जून\nचालू घडामोडी : १३ जून\nचालू घडामोडी : १२ जून\nचालू घडामोडी : ११ जून\nचालू घडामोडी : १० जून\nचालू घडामोडी : ९ जून\nचालू घडामोडी : ८ जून\nचालू घडामोडी : ७ जून\nचालू घडामोडी : ६ जून\nचालू घडामोडी : ५ जून\nचालू घडामोडी : ४ जून\nमासिक : मे २०१६ (PDF)\nचालू घडामोडी : ३ जून\nचालू घडामोडी : २ जून\nचालू घडामोडी : १ जून\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-20T16:22:51Z", "digest": "sha1:62VMJSTNKVQTVQNKFCDQGCTAIBBY3SN4", "length": 11178, "nlines": 125, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "अस्थमा - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडॉ. श्री बालाजी तांबे\nयोग्य वेळी योग्य उपचार केले, त्याला योग्य आहाराची जोड दिली, मुलाला वारंवार सर्दी, खोकला होणार नाही याकडे लक्ष दिले आणि प्राणवहस्रोतसाची ताकद वाढवली तर बालदम्यासारखा त्रासदायक विकार आटोक्‍यात आणता येणे शक्‍य आहे...\nश्‍वसनासंबंधी एक सामान्य रोग म्हणजे दमा. तो जेव्हा लहान मुलांमध्ये दिसतो त्याला \"बालदमा' असे म्हणतात काश्‍यपसंहितेत लहान मुलांच्या रोगांसंबंधी वर्णन करताना वेदनाध्याय सांगितला आहे. यात बोलू न शकणाऱ्या लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरून वैद्याने रोगाचे निदान कसे करावे हे समजावलेले आहे. अगदी लहान मुले बोलू शकत नाहीत, तसेच बऱ्याच मुलांना आपल्याला नेमके काय होते आहे, हे सांगता येत नाही. अशा वेळी मुलांच्या हावभावांवरून, लक्षणांवरून वैद्यांना रोगाचे निदान करता यावे यासाठी या अध्यायात अनेक रोगांची माहिती दिलेली आहे. त्यात दम्याचाही अंतर्भाव केलेला आहे.\nबालकाच्या छातीतून गरम श्‍वास निघतो, त्याला श्‍वास घ्यायला व सोडायला त्रास होतो, असे बालदम्याचे लक्षण काश्‍यपसंहितेत सांगितलेले आहे. आयुर्वेदीय विचारसरणीनुसार दमा होतो म्हणजे नेमके काय होते हे खालील सूत्रावरून समजू शकेल,\nप्राण-उदानाची जोडी श्‍वासोच्छ्वासाचे काम करत असते. उरलेल्या तीन वायूंचा म्हणजे समान, व्यान व अपान यांचाही प्रभाव श्‍वासोच्छ्वासावर होत असतोच. वाताची गती जोवर व्यवस्थित आहे तोवर श्‍वसन व्यवस्थित चालू असते पण ती गती कफदोषामुळे अवरुद्ध झाली तर अडलेला वात प्राणवह, उदकवह तसेच अन्नवह स्रोतसांना बिघडवतो व दम्याची उत्पत्ती करतो. थोडक्‍यात दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात. लहान वयात कफाचे आधिक्‍य स्वाभाविक असते, त्याला वाताची जोड मिळाली तर त्यातून \"बालदमा' होऊ शकतो.\nRead more: मुकाबला बालदम्याचा\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245691.html", "date_download": "2018-04-20T16:20:26Z", "digest": "sha1:HHKQL75TXBCFLKLBDAV5DJPN6ZTLXTBN", "length": 14068, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुंडांच्या प्रवेशावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nगुंडांच्या प्रवेशावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका\n20 जानेवारी : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होत असलेल्या गुंडांच्या प्रवेशावरून शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाना साधला आहे. ' गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढवणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झालेत, अशी टीका शिवसेनेने दैनिक 'सामना' या मुखपत्रातून भाजपवर केली आहे. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे' असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे.\nआगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील महापालिका व पचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये पुण्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलारचाही समावेश असून याप्रकरणी बरीच टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी ' सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे.\nसत्ताधाऱ्यांच्या गंगेत डुबक्या मारून स्वत:स पावन करून घेत असतात. उत्तर प्रदेशात तेच सुरु आहे व महाराष्ट्रातही तेच तेच चालले आहे. गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत 'कमल निवासा'त विराजमान झाले. भाजप हा गुंडांचा पक्ष अशी टीका अजित पवारांनी केली. कारण हे सर्व लोक कालपर्यंत राष्ट्रवादीत होते व अजित पवार गुंडांचे आश्रयदाते असल्याची टीका कालचा विरोधी पक्ष करीत होता. अजित पवार आपल्या जागी आहेत. फक्त गुंडांनी आश्रयदाते बदलले आहेत. मनगटावरचे घड्याळ सोडून कमळ घेतले व देवपूजेला लागले. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचे काय असे विचारले जाऊ शकते. कलंकित नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, असे रामदास आठवले यांनाही सांगावे लागले. सत्तेचा तीळगूळ सगळ्यांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे. मित्र म्हणून म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत. शेवटी काय उंचे लोग उंची पसंद\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2018-04-20T16:38:19Z", "digest": "sha1:HYCLUCZ3IM5CN5J4TA5PKOH2FNNTOD72", "length": 5751, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "गाथा १८०१ ते २१०० - विकिबुक्स", "raw_content": "गाथा १८०१ ते २१००\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गाथा १८०१ ते २१०० हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गाथा १८०१ ते २१०० येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गाथा १८०१ ते २१०० आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गाथा १८०१ ते २१०० नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गाथा १८०१ ते २१०० लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित गाथा १८०१ ते २१०० ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गाथा १८०१ ते २१०० ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/mumbai-search-kidnapped-kidnapped-girl-margao-railway-station/", "date_download": "2018-04-20T16:29:31Z", "digest": "sha1:CPWJ2GQR4WATVK7PO6HMMTMRHS7IFK4K", "length": 24611, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Mumbai, For The Search Of A Kidnapped Kidnapped Girl From Margao Railway Station | मडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nमडगाव रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईत\nतीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत.\nमडगाव : गेल्या आठवड्यात मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण केलेल्या तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आल्याचा संशय असून तपासासाठी कोकण रेल्वेचे पोलीस पथक गेला आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस त्या मुलीच्या शोधात आहेत. मात्र अजूनही त्या मुलीचा शोध लागू शकला नाही.\nमागच्या आठवड्यात या बालिकेचे मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून अपहरण करण्यात आले होते. तिच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. त्या बालिकेचे अपहरण करताना संशयिताची छबी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात टिपली होती. पोलिसांनी ती छायाचित्रे राज्यातील पोलीस ठाण्यात पाठवून दिली आहे. संशयित राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय असल्याने तीन पोलीस पथक नेमून या बालिकेचा शोध घेतला जात आहे.\nआपली मुलगी बेपत्ता झाल्यानंतर त्या बालिकेच्या पालकांनी यासंबधी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंसंच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अंर्तगत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. कर्नाटकातील हुबळी येथील हे कुटुंबिय तीन दिवस कोकण रेल्वे स्थानकावर आश्रय घेउन होते. आपल्या मुलांसमवेत ते प्लॅटफॉमवर झोपले असता, एका संशयिताने त्या बालिकेला पळवून नेले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\nकर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दारू पकडण्याचे सत्र\nनैसर्गिक आपत्तीतही खाण अवलंबितांना मिनरल फंडअंतर्गत मदत\nगोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला\nलोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी, अमित शहा 13 मे रोजी गोव्यात\nगोव्यात उद्योजक व कॅसिनो मालकांनीही दंड थोपटले\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/sushil-rathod-write-article-muktapeeth-88167", "date_download": "2018-04-20T16:45:07Z", "digest": "sha1:CVGNMWXZ54EXX4POM34BLTSRI7UGIYY3", "length": 20491, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "sushil rathod write article in muktapeeth स्माईल प्लीज! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nसातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले.\nएका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक वीज गेली. कामच थांबले. माझे लक्ष\nभिंतीवरील माझ्या गुरूदेवांच्या प्रतिमेकडे गेले. मी लक्षपूर्वक पाहात होतो. माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो, कसा घडलो आणि आज कुठे पोचलो आहे, असा जीवनपटच डोळ्यासमोर उलगडत गेला.\nसातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले.\nएका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक वीज गेली. कामच थांबले. माझे लक्ष\nभिंतीवरील माझ्या गुरूदेवांच्या प्रतिमेकडे गेले. मी लक्षपूर्वक पाहात होतो. माझे मन भूतकाळात गेले. मी कोण होतो, कसा घडलो आणि आज कुठे पोचलो आहे, असा जीवनपटच डोळ्यासमोर उलगडत गेला.\nलहानपणी घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडील पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍समध्ये कामाला, प्रसंगी रस्त्यावर बसून मफलरी विकण्याचेही काम त्यांनी केले. हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स स्कूलच्या शिक्षकांमुळे इयत्ता सहावीला असताना स्वावलंबनाचे संस्कार मिळाले. शिक्षकांनी मनावर बिंबवले होते की, कोणावरही अवलंबून न राहता आपण आपल्या पायावर उभे राहावे. मी सहावी उत्तीर्ण झाल्यावर मनाचा निश्‍चय केला की, आपला खर्च आपणच भागवायचा. माझे मित्र सचिन शहा यांचा त्या काळात ध्वनीफितीमध्ये गाणी रेकॉर्डिंग करून देण्याचा व्यवसाय होता. मी त्यांच्याकडे काम करू लागलो. त्यांच्याकडून गाणी ध्वनीफितीमध्ये भरून द्यायला शिकलो. दहावीपर्यंत हे काम केले. त्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लहानमोठी बरीच कामे केली. पण मनात सतत यायचे की, एखाद्या कलेच्या क्षेत्रात आपण असायला हवे, आपल्याला छायाचित्रे घेणे जमेल. म्हणून मी सातारा रस्त्यावरील एका फोटो स्टुडिओत काम करू लागलो.\nमी त्या स्टुडिओत पडेल ती सर्व कामे, अगदी साफसफाईसुद्धा करीत होतो. मालक छायाचित्रे घेत असत, तेव्हा व कृष्णधवल छायाचित्रे \"प्रिंटिंग' करताना मी निरीक्षण करीत असे. जमेल तसे शिकण्याचा प्रयत्न करीत असे. पिंपरीवरून सातारा रस्ता येथील स्टुडिओपर्यंत येण्याजाण्यासाठी बस भाडे 180 रुपये महिना असे. ते पैसे मिळवण्यासाठी अजूनही मी दारोदारी फिरून रेकॉर्डिंगसाठी ध्वनिफिती जमवीत असे. विविध मासिके, पुस्तके वाचून त्यातून छायाचित्रणकलेचे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा असेच एका समारंभात मालक आणि मी छायाचित्रे काढत होतो. माझ्याकडून काहीतरी चूक झाली. मालकाने मला जोरात मारले. मी मंचावरून खाली पडलो, कुठे चुकले हे विचारून परत माझ्या कामाला लागलो. तीन वर्षे मी या स्टुडिओत विनापगारी काम केले. तेथे जमेल तेवढी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या कलेवरच तर मी इथवर पोचलो आहे.\nकाही दिवस मुंबईतही काम केले, पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. माझे गुरू देवाजीमहाराज यांनी माझी पत्नी संगीता हिला सांगितले की, \"\"सुशील को फोटोग्राफीमेही करियर करना चाहिए '' त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परत पुणे गाठले. मनाशी ठरवले की, आता फक्त फोटोग्राफीचं. पुढे मित्र, आईवडील यांच्या सहकार्याने माझा स्वतःचा पहिला 'पेन्टॅक्‍स' कॅमेरा विकत घेतला. अनेकांना जाऊन भेटत असे, काम देण्याची विनंती करीत असे. काही कामानिमित्ताने मी त्या वेळचे खासदार सुरेश कलमाडी व मीरा कलमाडी यांच्या संपर्कात आलो. मीरा कलमाडी यांनी मला खासदार कलमाडी यांचे कार्यक्रम \"कव्हर' करण्याची संधी दिली. त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो. त्यांनी \"पुणे फेस्टिवल'चे काम मला दिले. हा माझ्या आयुष्यातील \"टर्निंग पॉईंट\" ठरला. या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार, राजकीय नेते जवळून पाहता आले. त्यांच्याशी दोन-चार शब्द बोलता आले. अमिताभ बच्चन, हेमामालिनी, लता मंगेशकर, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग, केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा महनीयांची अगदी जवळून म्हणजे तीन फुटांच्या आत छायाचित्रे घेण्याची संधी मिळाली. माझ्या ऑफबीट, हटके फोटोंना पत्रकारितेच्या क्षेत्रात न्याय दिला तो दैनिक \"सकाळ\"ने. \"सकाळ'मध्ये माझ्या नावासह छायाचित्रे प्रसिद्ध झाली. लाखो वाचकांना माझ्या छायाचित्रांनी आनंद दिला.\nमॉरिशियसच्या सांस्कृतिक मंत्री शीला बापू व सुप्रसिद्ध गायिका पिनाझ मसानी या मी काढलेल्या छायाचित्रावर व बातमीवर बेहद खुश झाल्या होत्या. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचा कार्यक्रम रात्री बारा वाजता संपला आणि त्याच रात्री अडीच वाजता त्या कार्यक्रमाची छायाचित्रे मी त्यांच्या हातात ठेवली. त्याकाळी आजच्या सारख्या सुविधा नव्हत्या. साहजिकच ते आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी रात्री अडीच वाजता ज्युसबार उघडायला लावला व मला ज्यूस पाजले. हीच माझ्या कामाची पावती व हीच कमावलेली माझी संपत्ती.\nएवढ्यात वीज आली. प्रकाश पसरला. माझ्या आजवरच्या संघर्षमय अंधारातील जीवनात \"प्रकाश' आला जणू. भानावर येत संगणक सुरू केला आणि टिपलेल्या छायाचित्रांमधे \"जिवंतपणा' आणण्याचे काम करू लागलो.\nए. पी. जे. अब्दुल कलाम\nमच्छिंद्राच्या जंगलात आदिवासींचा सत्याग्रह\nवणी (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्‍यातील वनोजा व मच्छिंद्रा येथील आदिवासीबांधव गेल्या 15 दिवसांपासून मच्छिंद्राच्या जंगलात सत्याग्रहास बसले आहेत....\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97.html", "date_download": "2018-04-20T16:16:38Z", "digest": "sha1:J3QKCOTZSI73COL3CNK7OE2W5O2VUYQL", "length": 12493, "nlines": 123, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "सामान्यांची औषधेही महाग! - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nमहागाईने होरपळून निघणाऱ्या नागरिकांना आता औषधेही महाग झाली आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह दैनंदिन जीवनात सर्रास वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. औषध निर्माण कंपन्यांच्या संघटनेने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nदूध, भाजी, पेट्रोल यांसारख्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या महागाईमुळे सामान्य माणूस पिचून गेला आहे. त्यातच बहुतांश औषधांच्या किमतीही काही महिन्यांपासून वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे भारताला मधुमेहाची \"राजधानी' म्हटले जाते. या आजाराच्या रुग्णाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तरुणांमध्येही मधुमेह असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे भारत ही या आजारावरील औषधांची मोठी बाजारपेठ झाली आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. मधुमेहासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या 10 गोळ्यांची पट्टी काही महिन्यांपूर्वी 28 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत मिळत होती. त्याची सध्या किंमत 30 ते 60 रुपयांपर्यंत झाली आहे.\nउच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणाऱ्या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. यापूर्वी उच्च रक्तदाबाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा गोळ्या 28 ते 72 रुपयांपर्यंत मिळत होत्या. त्यांची किंमत आता 32 रुपये 50 पैसे ते 78 रुपये 50 पैसे झाली आहे.\nपॅरासिटेमॉलच्या पंधरा गोळ्यांची किंमत 15 रुपयांवरून 16 रुपये 80 पैसे झाली आहे. पोटदुखीवरील गोळी 22 वरून 24 रुपये, तर \"पेन किलर' प्रकारातील गोळीची किंमत 29.50 वरून 32 रुपयांपर्यंत वाढली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या एका गोळीची किंमत 60 वरून 80 रुपये, तर दुसऱ्या एका कंपनीच्या गोळ्यांची किंमत 90 वरून शंभर रुपये करण्यात आली आहे.\nऔषधांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. 2008 मध्ये तेथे ऑलिंपिक स्पर्धा होत्या. तेथील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी या कच्च्या मालाचे उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे याच्या किमती वाढल्या होत्या. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने सध्या औषधे महाग झाल्याची चर्चा आहे.\n\"केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'चे महेंद्र पितळिया म्हणाले, औषधांच्या किमती वाढल्याचा ताण औषध विक्रेत्यांवरही पडला आहे. औषधांमधील गुंतवणुकीचा खर्च वाढला आहे.\"\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/solapur-rural-police-project-nanded-police-will-be-keen-success-police-and-self-sufficiency/", "date_download": "2018-04-20T16:15:45Z", "digest": "sha1:I75DBWGKZM4PLNLFCJSGKGIEIJDVSSJL", "length": 31395, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Solapur Rural Police Project, Nanded Police Will Be Keen On The Success Of Police And Self-Sufficiency | सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रकल्पाचे नांदेड पोलिसांनाही कुतूहल, पोलिसांच्या पुढाकाराने हिरजची समाधानी अन् स्वयंपूर्णतेकडे वाटचाल | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूर ग्रामीण पोलिसांच्या प्रकल्पाचे नांदेड पोलिसांनाही कुतूहल, पोलिसांच्या पुढाकाराने हिरजची समाधानी अन् स्वयंपूर्णतेकडे वाटचाल\nग्रामीण जनतेच्या समस्या त्यांच्या पातळीवरून सोडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेली समाधानी व स्वयंपूर्ण खेडेगाव दत्तक योजना हिरज गावाला वेगळे बळ देणारी ठरली आहे.\nठळक मुद्दे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज हे गाव ग्रामीण पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेपोलिसांबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करुन या योजनेची सुरुवात सोलापूर पोलिसांनी राबविलेल्या या प्रकल्पाची नांदेड पोलिसांनी दखल घेतली\nसोलापूर दि ११ : ग्रामीण जनतेच्या समस्या त्यांच्या पातळीवरून सोडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेली समाधानी व स्वयंपूर्ण खेडेगाव दत्तक योजना हिरज गावाला वेगळे बळ देणारी ठरली आहे. भयमुक्त जीवनासोबतच आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला सक्ष्मीकरण, बेरोजगारांसाठी मदत अशा विविध माध्यमातून पोलिसांनी या गावकºयांना चाकोरी बाहेर जाऊन मदत करणे सुरू केल्याने हिरजने समाधानी आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. दरम्यान, सोलापूर पोलिसांनी राबविलेल्या या प्रकल्पाची नांदेड पोलिसांनी दखल घेतली असून प्रकल्पाचा अभ्यास सुरू केला आहे.\nनांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना पत्र पाठविले आहे.\nआदर्श गाव संकल्पनेच्या धर्तीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज हे गाव ग्रामीण पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तक घेतले . येथील पोलीस कल्याण विभागात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम यांच्यावर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी ही जबाबदारी सोपविली. या गावाच्या सर्वांगीण विकासाची योजना राबविण्याच्या नियोजनातूनच समाधानी, स्वयंपूर्ण दत्तक गाव योजनेचा जन्म झाला. सुमारे २ हजार ४०० लोकसंख्या असलेल्या या गावात हिंदू, मुस्लिमांसह मिश्रजातीचे लोक राहतात. या गावाच्या विकासासाठी नेमके काय करता येईल, याचा अभ्यास पोलिसांनी केला. त्यापूर्वी पोलीस आणि जनता यातील अंतर दूर करण्याचे काम त्यांना आधी करावे लागले. पोलिसांबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करुन या योजनेची सुरुवात झाली. आज योजनेच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. देश पातळीवरील पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि संशोधन केंद्राचे चेअरमन पद्मभूषण अनिल काकोडकर, नैसर्गिक शेतीचे शास्त्रज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्यासह आय.आय.टी. दिल्ली आणि आय.सी.ए.आर. दिल्ली या संस्थादेखील मदतीसाठी पुढे आल्या आहेत.\nपालकमंत्री विजय देशमुख तसेच मुख्यमंत्र्यांच्यापर्यत या योजनेची माहिती पोहोचली. त्यांनी योजनेची दखल घेऊन माहिती जाणून घेण्यासाठी नाना कदम यांना मुंबईत निमंत्रित केले आहे. ही योजना मुख्यमंत्र्यांच्या पसंतीस उतरली तर राज्यभर लागू केली जाण्याची शक्यता आहे.\nगेल्या आठवड्यापासून आरोग्य समस्या सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सत्यसाई मेडिकेअर ही सेवा सुरु केली आहे. आजारी रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. शेती गट, महिला बचत गट, स्वच्छता, गावातील प्रार्थना स्थळ स्वच्छ केले आहेत. १४ नोव्हेंबरपासून गरीब आणि होतकरु मुलींना त्यांच्या शालेय शिक्षणासाठी भारत माता बेटी पढाओ दत्तक योजना सुरु करण्यात येत आहे. यासोबतच सॅनेटरी नॅपकीन प्रकल्प, डिजिटल शाळा, आर ओ प्लांट, वापरासाठी गरम पाणी, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण असे उपक्रम या योजनेतून राबविले जाणार आहेत. सामाजिक सलोखा कायम राखत पोलिसांच्या पुढाकाराने शाब्दी ग्रुपच्या माध्यमातून मस्जिद स्वच्छ करण्यात आली तर मुस्लीम बांधवांच्या माध्यमातून गावात स्वच्छता झाली. सर्व मंदिरापुढे लोकसहभागातून बाग फुलविण्यात आली आहे.\nया योजनेच्या पाहणीसाठी आणि आढाव्यासाठी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू नियमित भेट देतात. पाणी फाउंडेशनचे राज्याचे मुख्य बाळासाहेब शिंदे, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन लिमिटेडचे रिजनल मॅनेजर रवींद्र कुमार यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. आठवडाभरात पद्मभूषण विजय भटकर येणार आहेत.\nकोणतेही गाव समाधानी, स्वयंपूर्ण करायचे असेल त्या गावामध्ये नेतृत्व तयार व्हायला हवे. राजकारणविरहीत गावातील नागरिकांची मिळून समावेशक समिती तयार केली जाणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला ८५ लाखांचा दंड\nवीजपुरवठा खंडित झाल्याने सोलापूरातील पाणीपुरवठा विस्कळीत\nसोलापूरातील नव्या ड्रेनेज योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा\nएमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला\nवाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द\nसोलापूरच्या तापमानात वाढ, पारा ४२.२ अंशांवर\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/health/photos/", "date_download": "2018-04-20T16:16:03Z", "digest": "sha1:ATAJNY6V2QXUQVJYDZ3RVDQM3PICPOEX", "length": 22345, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Health Photos| Latest Health Pictures | Popular & Viral Photos of आरोग्य | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदीर्घायुषी व्हायचं असेल तर रोज खा 'हे' फळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n उन्हाळ्यात हे ५ पदार्थ खाणे पडेल महागात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटॉमेटो आइस्क्रीम खाल्लीत का कधी पाहा आइस्क्रीमचे हे भन्नाट प्रकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nड्रग्ससारख्या जीवघेण्या व्यसनातून बाहेर आले हे ५ सेलिब्रिटी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटेन्शन काय को लेने का... बॉलिवूडमधील या ५ सेलिब्रिटींनी काढलाय अवयवांचा विमा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nSummer Skin Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकशासाठी पोटासाठी... 'या' पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/bhagavat/word", "date_download": "2018-04-20T16:35:36Z", "digest": "sha1:MIAJYWZ2JVP3TKR75WXQCW5TI5YRRUAQ", "length": 12123, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bhagavat", "raw_content": "\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - मायेची करणी\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - मायेची करणी\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - मनाचें मनपण\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - गुरुभजनाची गोडी\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - सद‍गुरुला शरण\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - नामदेवांचें उदाहरण\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nआनंदलहरी - गुरुस्वरुपाची अगम्यता\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\n' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - सदगुरुवंदन\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - गुरुमहिमा\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - गुरुदास्याचें महिमान\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - आत्मनिवेदन\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - कथासूत्र\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nचतुःश्लोकी भागवत - ब्रह्मदेवाची कथा\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/raigad", "date_download": "2018-04-20T16:10:38Z", "digest": "sha1:ZJQJ5ZZ55CGBKT3H7GMVJP3O33LSRJH5", "length": 24294, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raigad News | Latest Raigad News in Marathi | Raigad Local News Updates | ताज्या बातम्या रायगड | रायगड समाचार | Raigad Newspaper | Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nवाहन न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू\nअलिबागमधील ५६०० हेक्टर क्षेत्रास मिळणार सिंचनाचे पाणी; देहेनकोनी, मेढेखार खारभूमी योजनांना संजिवनी\nआयओटीएलमधील कामगारांचे काम बंद\nबोडणी घाटातील प्रवास जीवघेणा\nगाढी नदीवरील पूल धोकादायक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष\nपाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nउन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ... Read More\nआजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. ... Read More\nकाजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले. ... Read More\nपर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. ... Read More\nसर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nधर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे. ... Read More\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9B/", "date_download": "2018-04-20T16:22:56Z", "digest": "sha1:BZ3ZCVEKGZIHPMDL5JDWHHU57BF6MJGO", "length": 6873, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: जुगार अड्ड्यावर छापा : 5 जण ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा: जुगार अड्ड्यावर छापा : 5 जण ताब्यात\nकराड – आगाशिवनगर, ता. कराड येथे डोंगराकडेला सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले तर दोनजण तेथून पळून गेले. आज सोमवारी दि. 16 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सहा हजार रुपयांची रोकड व दुचाक्‍या जप्त केल्या आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, आगाशिवनगर येथे डोंगराच्या पायथ्याला तीन पानी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना समजली. त्यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्याठिकाणी धाड मारली असता सुमारे सात जण तीन पानी जुगार खेळताना आढळून आले. पोलीस धाड मारताच तेथील दोघांनी पलायन केले. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, सहा हजार रुपयांची रोकड व दुचाक्‍या पोलिसांनी जप्प्त केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतुर्कीमध्ये इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक\nNext articleसातारा: विनयभंग प्रकरणातील आरोपी अटकेत\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nजाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…\nमहिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा\nशिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा वाईचे वैभव ठरेल\nसातारा: फुलांचा बहर पाडतोय दुष्काळाचा विसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E2%80%8B%E2%80%8B%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E2%80%8B-%E2%80%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-20T16:02:35Z", "digest": "sha1:NEM4AI7DG47NMMI3WZP5GKOOIUUIDESX", "length": 9319, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेड : ‘​​रत्नदीप​’ ​मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजामखेड : ‘​​रत्नदीप​’ ​मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार\nजागतिक होमिओपॅथिक दिन साजरा\nजामखेड : होमिओपॅथिक उपचार पध्दतीचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार आणि जास्तीत जास्त नागरिकांना यांचा फायदा व्हावा यासाठी कर्जत जामखेड तालुक्यातील पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात मोफत होमिओपॅथिक उपचार व सल्ला केंद्र सुरु करणार असल्याचे माहिती रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्करराव मोरे यांनी दिली. रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँण्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या जामखेड होमिओपँथिक मेडिकल कॉलेज मध्ये होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६३ व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्करराव मोरे ,सचिव डॉ. वर्षा मोरे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे ,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी बोलताना मोरे म्हणाले कि, होमिओपॅथी ही प्रभावी उपचार पध्द्ती असून होमिओपॅथिक उपचार पध्द्तीचा ग्रामीण भागात घरोघरी प्रसार आणि प्रचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक होमिओपॅथिक अभ्यासक्रमाच्या कॉलेज चालविणाऱ्या संस्थांनी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असून ते काम विद्यार्थी मिशन म्हणून हाती घेतले पाहिजे. जामखेड -कर्जत तालुक्यातील नागरिकांना होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा फायदा होण्यासाठी आगामी काळात पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात रत्नदीप संस्थेच्या माध्यमातून मोफत सेवा देण्यासाठी होमिओपॅथिक तपासणी व सल्ला केंद्र सुरु करणार असल्याची माहिती डॉ. भास्करराव मोरे यांनी दिली. यावेळी डॉ. वर्षा मोरे, डॉ. सुनील बोराडे, डॉ. युवराज खराडे, अविनाश पुलाटे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गावडे व मयूर पिठोरे यांनी केले तर आभार विकास जाधव यांनी मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; मोठे नुकसान\nNext articleआता सिंगापूरमध्येही…मराठमोळ्या बबनची रसिकांना भुरळ\nअत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मध्ये झाला ‘मुकमोर्चा’\n‘जलयुक्‍त’वरच नवनियुक्‍त जिल्हाधिकारी द्विवेदींचा “फोकस’\nअहमदनगर: राजकीय स्वार्थासाठी जिल्हा विभाजनाचा घाट\nअहमदनगर: मुळा धरणातून 1 मेपासून उन्हाळी आवर्तन\nअहमदनगर: जिल्हा बॅंकेची एकाच दिवशी तीन गावात एटीएम सेवा सुरू\nअहमदनगर: शहरासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-20T16:38:00Z", "digest": "sha1:PMLI5AKUCKHDNA7SRKIUCMBQJM67PWA3", "length": 3039, "nlines": 53, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "मुक्त ग्रंथसंपदा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nमुक्‍त ग्रंथसंपदा हा मुक्त सॉफ्टवेअर च्या तत्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. विकिबुक्स ही एक मुक्त ग्रंथसंपदा आहे जो कोणीही वापरकर्ता संपादित करू शकतो.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी ०५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8", "date_download": "2018-04-20T16:44:14Z", "digest": "sha1:ECVLSABNHQVOLMZB4VMEU543TRU23XKS", "length": 10508, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुळस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुर्‍यासारख्या फुलानां मंजिरी म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.\n२ हिंदू धर्मातील स्थान\n३ तुळस आणि दुर्वा\nमुख्य पान: तुळशी विवाह\nहिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.\nगणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत.\nआयुर्वेदीय ग्रंथ सांगतात - दुर्वा कषाया मधुराश्च शीता पित्ततृषारोचक वान्तिहज्यः ॥, तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत पित्ततृषारोचक वान्तिहज्यः ॥, तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत. म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळ्स ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी.\nदुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही.\nया वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुवेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टोनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुलसीचा रस पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. तुळस उष्णतेच्या त्रासापासुन आराम देते . तुळसीचे बी पाण्यात 2 ते ६ तास पाण्यात भिजवतात . याचे दुध साखरेबरोबर सेवन केल्यास उष्णता कमी होते .मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो\nऔषधी, सुगंधी, बहुगुणी कृष्ण तुळस; ले.: डॉ. दिगंबर मोकाट, अमोल थोरात ; अ‍ॅग्रो वन (७ नोव्हेंबर, इ.स. २०१०) (मराठी मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१८ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:29:58Z", "digest": "sha1:SV4VFYCJVKGEVTIKD423R7TLLXDTMQLP", "length": 3343, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्पॅनिश आफ्रिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► कॅनरी द्वीपसमूह‎ (४ प)\n\"स्पॅनिश आफ्रिका\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nजगातील देशांचे परकीय प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-20T16:08:54Z", "digest": "sha1:O3AWORCA3UE4IP75NGFBBXPEGQGLH6N7", "length": 9476, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिळवणीत ग्राम स्वराज योजनेचा शुभारंभ; दलितवस्तीत 14 मोफत वीजजोडण्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिळवणीत ग्राम स्वराज योजनेचा शुभारंभ; दलितवस्तीत 14 मोफत वीजजोडण्या\nकोल्हापूर – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 80 टक्के पेक्षा जास्त दलितवस्ती असलेल्या गावात ‘ग्राम स्वराज अभियान’ राबविले जात आहे. त्यासाठी राज्यातील 192 गावे निवडण्यात आली असून यात हातकणंगले तालुक्यातील तिळवणीचा समावेश झाला आहे. यानिमित्ताने तिळवणीत महावितरणतर्फे आज (दि.14) दिवसभरात 14 लाभार्थ्यांना मोफत वीजजोडण्या देण्यात आल्या असून, दोन दिवसांत दलितवस्तीचे 100 टक्के ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.\nतिळवणीची लोकसंख्या 3 हजार 605 तर घरांची संख्या 814 आहे. 791 घरांमध्ये वीज केंव्हाच पोहोचली होती. केवळ 23 घरे विजेविना होती. त्यातील 6 कुटुंबे सध्या वास्तव्यास नाहीत. त्यामुळे शिल्लक 17 कुटुंब त्यासाठी पात्र ठरली. या 17 पैकी 14 कुटुंबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी प्रकाशमान करण्यात आले. शिल्लक 3 कुंटुंबांना दोन पोल टाकून येत्या दोन दिवसांत वीज कनेक्शन दिले जाणार आहे या अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ऊर्जा विभागाकडून प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य व उजाला योजना राबविण्यात येत आहेत . उजाला योजनेतून तिळवणीकरांना 50 रुपयांत 9 वॅटचा एलईडी बल्ब तीन वर्षांच्या गॅरंटीसह मिळणार आहे.\nयावेळी महावितरण कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता किशोर परदेशी, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, उपकार्यकारी अभियंता बी.टी. मोहिते, शाखा अभियंता अमर करंडे यांनी तिळवणी येथे जाऊन पहिल्याच दिवशी 14 मोफत वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. यावेळील सरपंच शकुतला रामचंद्र चव्हाण, उपसरपंच सविता दादासो कदम, ग्रामसेवक राहूल माळगे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपैलवान नीलेश कणदूरकरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देणार -चंद्रकांत पाटील\nNext articleमेरी कोम राष्ट्रकुल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या\nसाखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज – शामराव देसाई\nकोल्हापूर : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद\nमहापालिकेच्या राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा महासभेत सत्कार\nसोनतळी परिसर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास शिबीराने फुलला\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-20T16:34:39Z", "digest": "sha1:RFUHU6JKXBQN3FNKIPNXOZESGJGV7JOJ", "length": 8945, "nlines": 80, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "मराठी प्रमाणलेखनाचे संकेत - विकिबुक्स", "raw_content": "\n(शुद्धलेखनाचे नियम पासून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nपुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी प्रमाणलेखनाचे (शुद्धलेखनाचे) संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा\nमराठी प्रमाणलेखनाचे संकेत ह्या विषयावरील ज्ञानकोशीय लेख मराठी विकिपीडियात वाचा.\nआपल्याला माहित आहे का की\nमराठी प्रमाणलेखनाचे संकेत :\nकवीला र्‍हस्व-दीर्घाच्या बाबतीत पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना शुद्धलेखनाचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास तेवढ्यापुरती मोकळीक असते.\nमराठी प्रमाणलेखनाचे (शुद्धलेखनाचे) संकेत सोपे करुन अभ्यासू\nमराठी प्रमाणलेखन संकेतांचे मुख्य उद्देश १) उचारानुसारी लेखनाचा अवलंब अथवा लेखनावरून उच्चारण (उद्देश अंशत:च साध्य होतो, काही वेळा तुमची उच्चारणे वेगळी असू शकतात आणि प्रमाण लेखन वेगळे असू शकते) २) मराठी भाषेच्या स्वरुपास अनुकूल लेखन (मराठी व्याकरणास अनुसारुन लेखन व्हावे हा उद्देश; पण प्रत्यक्षात इंग्रजी आणि संस्कृत व्याकरणांच्या प्रभावाने मराठीचेमूळ स्वरूप बाजूस ठेऊनही आदेशात्मक पद्धतीने लेखनाचा आग्रह धरलेला आढळतो) ३) लेखन पद्धतीत प्रमाणीकरण ४) प्रमाण भाषेची उपलब्धता ( भाषा वैज्ञानिकांचा हेतु व्यवहार आणि विज्ञान विषयक संज्ञांमध्ये प्रमाण भाषेची उपलब्धता असा मर्यादीत असला तरीही विशीष्ट सामाजिक गटांकडून त्यांच्या शब्दांचा वापर तेवढाच प्रमाण बाकी अशुद्ध असा चुकीचा प्रचार बरीच दशके केला गेला आणि बहुजनांच्या मराठीस दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले.\nपद्धती अ) अनुनासिके आणि अनुस्वार आ) ऱ्हस्व-दीर्घ उच्चारणांचे लेखन\nअनुनासिके आणि अनुस्वार विषयक संकेत\nऱ्हस्व दीर्घ विषयक संकेत\nविराम चिन्ह विषयक संकेत :\nआपल्याला माहित आहे का की\nस्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.\nविरामचिन्ह द्यावयाच्या शब्दा नंतर, विरामचिन्ह लगेच द्यावे; आणि पुढील शब्दापुर्वी एक अक्षर मावेल एवढी स्पेस (जागा) रिकामी सोडावी. जसे:\tकैरी, लिंबू, सिताफळ.\n(किंवा इथे विरामचिन्हे संकेतांची पूर्ण यादी पहा)\nपुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी व्यासपिठीय प्रमाण मराठी संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा\nपुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी अभिजन आग्रह मराठी बोली संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा\nसाचा:अभिजन आग्रह मराठी बोली\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१४ रोजी ०४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-marathi-bhasha-divas/", "date_download": "2018-04-20T16:38:03Z", "digest": "sha1:THEVMYMZG7OMPOBWTOXT5EKJ3DH2L7WH", "length": 26015, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : मराठी कशी टिकेल? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nरोखठोक : मराठी कशी टिकेल\n‘मराठी’ टिकावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राची लढाई झाली, पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही ‘मराठी’चा लढा सुरूच आहे. किंबहुना तो जास्तच तीव्र झाला आहे. मराठीचे मारेकरी घरातच आहेत. त्यामुळे बाहेरच्यांना दोष का देता\nमराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांची ‘वार्षिक’ देवाणघेवाण आता संपली असेल. म्हणून या विषयावर थोडे लिहावे असे वाटले. महाराष्ट्र राज्यातच आपल्याला मराठीची लढाई आजही लढावी लागते व महाराष्ट्राचे राज्यकर्ते मनापासून या लढाईत आपल्याला साथ देत नाहीत. त्यामुळे वर्षातून एकदाच शासकीय स्तरांवर मराठी भाषा दिन साजरा करण्याची वेळ आपल्यावर येते. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होतो. यावेळी आदल्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीस राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी राज्यपालांनी इंग्रजीत भाषण केले. पण त्यांच्या भाषणाचा ‘मराठी’ अनुवाद करणारी माणसेच हजर नव्हती व मराठीच्या नावाने तेथे नवा शिमगा सुरू झाला. मराठीचे मारेकरी व शत्रू महाराष्ट्राच्या मंत्रालयात विधिमंडळाच्या दारात आहेत. मग महाराष्ट्र राज्याची लढाई आपण का लढलो, हा प्रश्न पडतो. बडोद्यात अखिल भारतीय मराठी संमेलन याच महिन्यात पार पडले. त्याच गुजरातमध्ये १९५३ साली अहमदाबाद येथे छत्तिसावे साहित्य संमेलन पार पडले होते. वि. द. घाटे यांनी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यावेळी जे विचार मांडले ते आजही महत्त्वाचे वाटतात.\n‘‘आमच्या मराठी भाषेला महाराष्ट्राच्या सर्व प्रकारच्या व सर्व क्षेत्रातल्या सार्वजनिक जीवनात तिचे स्वाभाविक स्थान मिळावे म्हणूनच आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रात मराठीला अग्रपूजा मिळेल. सरकारी कारभारात, न्यायालयात, विद्यापीठात, कायदे मंडळात मराठीचेच राज्य चालेल. साहित्य सकस व्हावयाचे असेल, त्याला तेज चढायचे असेल, त्याचे नाना प्रकारचे पैलू पडायचे असतील तर ते लोकांच्या जीवनातून जन्मास आले पाहिजे, वाढले पाहिजे, उंचावले पाहिजे.’’ वि. द. घाटे यांनी हे विचार मांडले तेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायची होती. म्हणून त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. आता राज्याची स्थापना होऊन सहा दशकांचा काळ लोटत आला आहे, पण घाटे यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत.\nमहाराष्ट्राच्या विधिमंडळात मराठी भाषेचा अनुवादक नव्हता व धनंजय मुंडे हे कानाचे यंत्र वापरीत नसल्यामुळे त्यांना राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद मराठीऐवजी गुजरातीतून ऐकू आला. मराठी भाषेचे हे राजकारण असे सुरू आहे. मुंबईची भाषा ‘हिंदी’ व्हावी म्हणून काही जणांनी आधी पद्धतशीर प्रयत्न केले व मोदी-शहांचे राज्य दिल्लीत आल्यापासून मुंबई- पुण्याची भाषा गुजराती व्हावी असा प्रयत्न राजकीय लाभासाठी ज्यांनी सुरू केला त्या मोहिमेत पुढाकार घेणारे आमचे मराठी लोकच होते. मुंबई महानगरपालिकेत राजकीय लाभ मिळावा म्हणून हे कारस्थान आधी रचले व गुजराती भाषिक भागात फक्त भारतीय जनता पक्षाचेच गुजराती उमेदवार निवडून आले व तसा पद्धतशीर प्रचार करण्यात आला. मुंबईच्या सीमेवरील मीरा-भाईंदर महानगरपालिकेतही हेच भाषिक राजकारण केले गेले व मुख्यमंत्र्यांसह इतर सगळ्यांनी त्यास खतपाणी घातले. कारण मराठीचा पराभव झाला तरी चालेल. पण राजकीय विजय झालाच पाहिजे, या मनोवृत्तीत सगळे जगत आहेत. राज्यकर्ते, आजचे पुढारी हे मराठी भाषेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ‘‘मराठी असे आमुची मायबोली, जरी ती आज राजभाषा नसे…’’ असे माधव ज्युलियन यांनी म्हटले म्हणून महाराष्ट्र सरकारने मराठी ही राजभाषा घोषित केली. राजभाषा वर्ष साजरे केले, परंतु मराठीचा खऱ्या अर्थाने विकास होईल असे काहीच केले नाही. ‘‘डोक्यावर राजमान्यतेचा मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्र घालून मराठी भाषा मंत्रालयाच्या पायरीवर उभी आहे’’ असे समर्थक उद्गार कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी जागतिक मराठी परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात काढले होते. ती स्थिती दुर्दैवाने आजही कायम आहे.\nभाषेचा की माणसाचा विकास\nसरकार वर्षांतून एक दिवस ‘मराठी भाषा दिन’ साजरा करते. पण भाषेचा विकास म्हणजे मराठी माणसाचा विकास असे मानायला राज्यकर्ते तयार नाहीत. पुण्यातील डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात आपलेच मराठी लोक टाळय़ा वाजवीत आहेत. पण गुजराती किंवा व्यापारी समाजाला मेहुल चोक्सी व नीरव मोदी त्यांचा हीरो वाटतो. मराठी भाषा ही कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची, घाम गाळणाऱ्यांची, देशासाठी रक्त सांडणाऱ्यांची, हुतात्म्यांचीच राहिली. तो अभिमान आहेच, पण मुंबईसारख्या शहराच्या आर्थिक नाड्या व संपत्ती मात्र ‘बँक’ लुटणाऱ्यांच्याच हाती राहिली. मराठी माणूस येथे मागे पडला. मराठी ही क्रांतिकारकांची व ज्ञानभाषा झाली. पण व्यापार व प्रशासनाची भाषा होण्यापासून तिला अडवले गेले.\nमुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह आता कोणी धरायचा इंग्रजीबरोबर मातृभाषा हवी व तेच सरकारी धोरण असायला हवे. टी. व्ही. वाहिन्यांमुळे वाचन थांबले. वृत्तपत्रे व पुस्तके आता इंटरनेटवर वाचली जात आहेत. फक्त मोठ्या लोकांचीच मुले ‘कॉन्व्हेन्ट स्कूल’मध्ये जातात असे नाही, तर मध्यमवर्गीय व सामान्य घरांतील मुलांनाही ‘मातृभाषे’पेक्षा कॉन्व्हेन्ट शिक्षणाचे वेड लागले. त्यामुळे मराठी शाळा टिकवण्यासाठी मराठी विद्यार्थी आणायचे कोठून इंग्रजीबरोबर मातृभाषा हवी व तेच सरकारी धोरण असायला हवे. टी. व्ही. वाहिन्यांमुळे वाचन थांबले. वृत्तपत्रे व पुस्तके आता इंटरनेटवर वाचली जात आहेत. फक्त मोठ्या लोकांचीच मुले ‘कॉन्व्हेन्ट स्कूल’मध्ये जातात असे नाही, तर मध्यमवर्गीय व सामान्य घरांतील मुलांनाही ‘मातृभाषे’पेक्षा कॉन्व्हेन्ट शिक्षणाचे वेड लागले. त्यामुळे मराठी शाळा टिकवण्यासाठी मराठी विद्यार्थी आणायचे कोठून हे विष गावपातळीपर्यंत पोहोचले. मोदींचे सरकार ‘बुलेट ट्रेन’चे निर्णय घेते तसे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असा कायदा त्यांनी करावा. तरच भाषा, राष्ट्राभिमान व संस्कृती टिकेल आणि सर्व मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत घालण्याचा फतवा काढावा, तरच सरकारी शाळांचा दर्जा सुधारेल व मराठीसह इतर भाषा टिकून राहतील. म्हणजे ‘मराठी दिवस’ महाराष्ट्रातच साजरा करण्याची वेळ येणार नाही. आधी हे करा आणि मगच जागतिक मराठी दिवस साजरा करा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभविष्य – रविवार ४ ते शनिवार १० मार्च २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/state-legislature-will-conduct-the-monsoon-session-tomorrow-265735.html", "date_download": "2018-04-20T16:24:43Z", "digest": "sha1:SMJPWASCDWHJG2RQWN7LYJAPQMN2FVKS", "length": 10542, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्यापासून पावसाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार ?", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nउद्यापासून पावसाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार \nराज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय\n23 जुलै : राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. कर्जमाफी आणि त्यावरून झालेला गोंधळ यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे तर विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी सरकारनही जोरदार मोर्चेबांधणी केलीय.\nसरकारनं दिलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पेरणी तोंडावर असताना सरकारने कर्जमाफीचा घोळ घातला. बियाण्यांसाठी 10 रुपये अॅडव्हांस देण्याची घोषणा केली मात्र त्याचे आदेश शेवटपर्यंत निघालेच नाहीत. अशा अनेक मुद्यावर विधिमंडळात रणकंदन होण्याची शक्यता आहे.\nकर्जमाफीचा गोंधळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न\nतूर खरेदीचा घोळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान\nसमृद्धी महामार्गासाठीच्या जमिनीचं अधिग्रहण\nमंजुळा शेट्ये हत्या प्रकरण आणि राज्यातली कायदा-सुव्यवस्था\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sharanwebs.com/mr/", "date_download": "2018-04-20T16:15:55Z", "digest": "sha1:D2XBAUWMGJIUHHSJBCXFCJNZJER7OTLH", "length": 9216, "nlines": 90, "source_domain": "sharanwebs.com", "title": "डिजिटल मार्केटिंग एजन्सी | डिजिटल मार्केटिंग सेवा भारत | SharanWebs", "raw_content": "आम्हाला सांगा: + 91-9795899589 लॉग इन\nSharanWebs एक सर्वाधिक मान्यताप्राप्त आहे\nभारतातील डिजिटल मार्केटिंग एजन्सी\nआपल्या व्यवसायास विस्तृत करा\nप्रति क्लिक सेवा क्लिक करा\nसमाधान प्रदान करण्यापूर्वी आमचा कार्यसंघ योग्य विश्लेषण करते\nइष्टतम मार्गाने आघाडी निर्मिती धोरणांबरोबर डिजिटल विपणन सेवा\nआम्ही आमची सेवा वेळोवेळी वितरीत करतो. कोणतीही छुपे किंमत नाही, गुणवत्तेशी तडजोड नाही.\nआपल्यासाठी डिजिटल विपणन सेवा\nSharanWebs आपल्याला यशस्वी व्यवसायाची ऑनलाइन स्थापना करण्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मदत करू शकेल.\nशोध इंजिनांमध्ये उच्च स्थानावर ठेवण्यात आपली मदत करण्यासाठी आमच्या शोध इंजिन ऑप्टिमायझेशन सेवांचा हेतू आहे\nआमच्या एसइओ सेवा Expore\nआम्ही एक संपूर्ण PPC व्यवस्थापन अनुभव प्रदान करतो जे सघन ROI देते.\n- Bing जाहिरात मोहीम\n- फेसबुक जाहिरात मोहीम\nआमच्या पीपीसी सेवा विस्तारित करा\nआमच्याकडे सलगी आणि ऑनलाइन ब्रॅंडिंग देणारं सोशल मीडिया मोहिमांचे कौशल्य आहे ज्यामुळे आपण आपल्या स्पर्धेवर वर्चस्व गाजवू शकाल.\nआमच्या सामाजिक मीडिया सेवा Expore\nइतर डिजिटल मार्केटिंग सेवा\nकोणत्या Google वर #1st ला रँक करण्यास आपल्याला मदत होईल\nतंत्रज्ञानाच्या, प्रकल्प नियोजन आणि गुणवत्ता अंमलबजावणीच्या दृष्टीने वेब डिझाईन आणि विकासातील आमचे कौशल्य अतुलनीय आहे.\nआमच्याकडे आपल्या कॅम्पेनसाठी उच्च दर्जाचे बॅकलिंक्स बनविण्यास प्राविण्य असणारे अधिकृत दुवा बिल्डर्सचे सशक्त नेटवर्क आहे.\nआपली इंटरनेट प्रतिष्ठा व्यवस्थापन सेवा आपली सकारात्मक प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही नकारात्मक टिप्पण्या, आढावा किंवा दुवे सतत काढत किंवा दडपून टाकत असताना मदत करते.\nआमच्या स्थानिक एसईओ मोहिम तुम्हाला स्थानिक शोध श्रेणीत सर्वोच्च पद प्राप्त करू शकतात तसेच वेबसाइटवर लक्ष्यित स्थानिक वाहतूक पाठवू शकतात.\nआम्ही वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइटच्या रँकिंगसाठी विशिष्ट धोरणांचा वापर करतो आणि त्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन वाढविण्यास सक्षम करतो.\nबहुभाषिक सुविधेसह वेबसाइटच्या ऑप्टिमायझेशनद्वारे आम्ही आपल्याला बर्याच ग्राहकांना आकर्षित करण्याची संधीदेखील देऊ शकतो.\nआमची व्हिडिओ एसइओ सेवांचा उद्देश आहे की आपले ऑनलाईन व्हिडिओ बाजारात आणणे व मुद्रित करणे.\nआमच्याकडे आमच्या स्वत: ची सामग्री लेखन टीम आहे ज्यात वेगवेगळ्या उद्योगांच्या अनुदानासाठी विविध शोध आधारित लेखांवर लेखन करण्यासाठी स्वभाव आहे.\nताज्या बातम्या / ब्लॉग\n आम्हाला 24 / 7 वर कॉल करा:\nविशेष ऑफर मिळविण्यासाठी वृत्तपत्र साइन अप करा\nकॉपीराइट © 2018 SharanWebs.Com - सर्व हक्क राखीव\nसेवा अटी | गोपनीयता धोरण | नकाशा\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/panvel-city-will-be-free-plastic-first-municipal-corporation-state/amp/", "date_download": "2018-04-20T15:59:12Z", "digest": "sha1:7QUQJE53IOUFQBJWFZMBJTNZO22MPWMQ", "length": 8799, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Panvel City will be free of plastic, the first municipal corporation in the state | पनवेल शहर होणार प्लास्टिकमुक्त!, राज्यातील पहिली महापालिका | Lokmat.com", "raw_content": "\nपनवेल शहर होणार प्लास्टिकमुक्त, राज्यातील पहिली महापालिका\nपनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ\nपनवेल : पनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ व्यापा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका राज्यातील पहिली प्लास्टिकमुक्त महापालिका असल्याचा दावा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी आयुक्त शिंदे यांच्यासह उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहायक आयुक्त तेजस्वीनी गलांडे उपस्थित होते. शिंदे यांनी पालिका क्षेत्रातील रहिवाशांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रातील दुकानदारांना यासंदर्भात नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. किरकोळ विक्रेते, व्यापारी यांना आवाहन करून त्यांच्यासोबत बैठकाही घेण्यात आल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले. दिवाळीनिमित्त, १८ ते २१ आॅक्टोबर दरम्यान व्यापारी, विक्रे त्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वारंवार सूचना देऊनही प्लास्टिक पिशव्या बाळगणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. सुमारे २३६० किलो प्लास्टिकच्या पिशव्या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत. मॉल्स, डी-मार्टमधील प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी सध्याच्या घडीला मॉल्स, डी-मार्ट या ठिकाणांचा नवीन ग्राहक वर्ग तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे वितरण या ठिकाणांहून केले जात असते. आयुक्त शिंदे यांनी यासंदर्भात संबंधित प्रशासनासोबत बैठका घेऊन त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याच्या सूचना दिल्याने मॉल्समध्ये कागदी पिशव्यांच्या स्वागतहार्य निर्णय घेण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांची पाळेमुळे भिवंडी-उहासनगरात ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूनही, अशा पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. भिवंडी व उल्हासनगरात अशा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचे अनधिकृत कारखाने असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर असल्याने अशा कारखान्यांवर थेट कारवाई करता येत नाही. यासंदर्भात संबंधित आयुक्तांशी संपर्क साधून, अशा कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.\nउन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची ‘टूरटूर’ काश्मीर, गोव्याला अधिक पसंती\nकुंभार समाजासाठी ‘माती कला बोर्ड’\nनिवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचाऱ्यांची सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंद\nमांत्रिकाने केला महिलेवर बलात्कार\nरेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे सहा जण झाले तडीपार\nनवी मुंबई कडून आणखी\nपनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव\nनेरुळमधील बेकायदा इमारतीवर सिडकोची कारवाई\nझोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा घोळ\nपनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख\nभाजपा लोकप्रतिनिधींचे मंत्र्यांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/an-interview-of-lijjat-papad-grihodyog/", "date_download": "2018-04-20T16:39:44Z", "digest": "sha1:QBC3TJ5TH4HG5X3JCHYXXQLE5PCSUG44", "length": 31124, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "महिला सबलीकरणाचा हीरक महोत्सव! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nमहिला सबलीकरणाचा हीरक महोत्सव\n‘कर्रम् कुर्रम् कुर्रम् कर्रम्’ हा मंत्र जपत `लिज्जत’ पापडने एकोणसाठ वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. ७ महिलांनी सुरू केलेला पापड उद्योग ४५,००० महिलांच्या रोजगाराचे साधन बनला आहे. `महिला दिन’ आणि `लिज्जतचे हिरक महोत्सवातील पदार्पण’ ह्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून देणाऱ्या `लिज्जत’ गृहोद्योगाचा आढावा…\nगेल्या सहा दशकांत भारतीयांनी उडदाचा पापड खाल्ला, तो केवळ `लिज्जत’चा ह्या विधानात अजिबात अतिशयोक्ती नाही. `लिज्जत’ने भारतीय थाळीची `लज्जत’ वाढवली आणि सुमारे ४५,००० महिलांना ताठ मानेने जगण्यासाठी `इज्जत’ कमावून दिली. सात गृहिणींनी ८० रुपयांपासून सुरू केलेला पापड उद्योग आज १२०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. येत्या १५ मार्च रोजी, `लिज्जत’ गृहद्योग हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि तो उत्सव `याचि देही’ बघण्याचे भाग्य `त्या’ सात महिलांपैकी केवळ ८० वर्षांच्या जसवंतीबेन पोपट ह्यांना लाभले आहे.\nउजामबेन कुंडालिया , लागुबेन गोकानी, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, बानुबेन तन्ना आणि जसवंतीबेन पोपट ह्या गिरगावात लोहाणा निवास येथे राहणाऱ्या मध्यमवर्गीय गुजराती महिलांनी पापड उद्योगाला सुरुवात केली. दुपारच्या फावल्या वेळेत पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योग सुरू करावा, असे त्यांनी ठरवले. हा उद्योग आपल्या अंगभूत कौशल्यावर आधारित असावा याबाबत त्यांचे एकमत झाले. आपल्या पाकसिद्धीतून टिकाऊ पदार्थाची निर्मिती करायची, असे ठरले. काय बनवायचे तर `पापड\nव्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज होती. त्यांनी गिरगांवमधील एका सामाजिक कार्यकर्ता छगनलाल करमसी पारेख ह्यांची मदत घेतली. त्यांनी महिलांना ८० रुपये दिले. लक्ष्मीभाईदास या उद्योजकाचा बंद पडलेला पापड व्यवसाय त्या महिलांनी आपल्याकडे घेतला. व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. इमारतीच्या गच्चीवर पापडांच्या ४ पाकिटांनी पापड उद्योगाची सुरुवात झाली. लोकांचा प्रतिसाद पाहता, त्यांनी भुलेश्वर येथील व्यापाऱ्याला पापड पुरवण्यास सुरुवात केली. व्यवसायात कितीही तोटा झाला, तरी कोणाकडूनही देणगी घ्यायची नाही, हे ब्रीद त्यांनी पाळले. (ते आजही पाळले जात आहे. लिज्जत संस्थेकडून देणग्या दिल्या जातात, स्वीकारल्या जात नाहीत.)\nसुरुवातीला कोणत्याही वयोगटाच्या मुली यामध्ये सामील होऊ शकत असत. मात्र नंतर १८ वर्षे वयोगटावरीलच मुलींना सामील करून घेतले जाऊ लागले. ३ महिन्यांतच महिलांची संख्या २५ वर गेली. पापड उद्योगाचा उपक्रम संस्थेप्रमाणे आकार घेऊ लागला. स्वाभाविकच त्याचे नामकरण करण्याची गरज निर्माण झाली. घरातील प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीसमान असल्यामुळे `श्री महिला गृहउद्योग’ असे १९६२ साली नामकरण करण्यात आले. मग `लिज्जत’ हे नाव कसे आले तर त्याचीही रंजक कथा आहे. उद्योगाचे `ब्रँडनेम’ सुचवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याकरिता ५ रुपयांचे बक्षीसदेखील ठेवण्यात आले होते. धीरजबेन रुपारेल यांनी ‘लिज्जत’ हे नाव सुचविले होते. गुजरातीत `लिज्जत’ ह्या शब्दाचा अर्थ `चविष्ट तर त्याचीही रंजक कथा आहे. उद्योगाचे `ब्रँडनेम’ सुचवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याकरिता ५ रुपयांचे बक्षीसदेखील ठेवण्यात आले होते. धीरजबेन रुपारेल यांनी ‘लिज्जत’ हे नाव सुचविले होते. गुजरातीत `लिज्जत’ ह्या शब्दाचा अर्थ `चविष्ट’ सर्वांनी एकमुखाने ह्या नामाला पसंती दिली आणि `श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव सर्वतोमुखी गेले. ह्या गृहउद्योगाला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. १९६२-६३ ला संस्थेने १ लाख ८२ हजार रुपयांच्या पापडांची विक्री केली. शेकडो हात संस्थेला जोडले गेले आणि पाहता पाहता शेकडोचे रूपांतर हजारो हातांमध्ये झाले, तर उत्पन्नात लाखाचे रूपांतर कोटींमध्ये झाले.\nछगनलाल पारेख यांच्या विनंतीवरून खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष यू. एन. देवधर यांनी संस्थेला भेट दिली. संस्थेच्या कार्याने देवधर भारावून गेले. `खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाची नोंदणीकृत संस्था’, अशी नवी ओळख त्यांनी श्री महिला गृहउद्योगाला दिली. तसेच ८ लाख रुपयांचे खेळते भांडवलही मिळवून दिले. लिज्जत पापडासोबतच १९७४ साली खाखरा, १९७६ साली मसाला, १९७९ साली गव्हाचे पीठ, बेकरीचे उत्पादने सुरू केली. ७० च्या दशकात माचीस, अगरबत्ती आदी उत्पादने, पण बाजारात आणली होती. मात्र ही उत्पादने तोट्यात गेल्याने बंद करावी लागली. १९८८ साली संस्था साबण उत्पादनात उतरली आणि ‘ससा साबण’ बाजारात आला. त्या वेळी ससा साबणाची वार्षिक विक्री ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. ‘ससा’मुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सबल झाली.\n`आपण सुरू केलेला उद्योग, ही कोणा एकाची मालमत्ता नाही, तर ह्या पापड उद्योगाशी संलग्न असणाऱ्या महिलांचा ह्यावर समान अधिकार असेल’, असे ह्या सात जणींनी सुरुवातीलाच ठरवून टाकले. त्यामुळे आजतागायत संस्थेवर कोणाही एकाचा मालकी हक्क नाही, तर इथे काम करणाऱ्या महिला संस्थेच्या कर्मचारी आणि मालक आहेत. फायदा झाला तरी सगळ्यांचा आणि तोटा झाला, तरी सगळ्यांचा, हे व्यावसायिक गणित तिथे काम करणाऱ्या प्रत्येकीच्या अंगवळणी पडले आहे. म्हणूनच की काय, इथे कामाचा रतीब कोणी टाकत नाहीत, तर आपल्या कामाचा वाटा निवडून स्वखुशीने कामाचे टार्गेट पूर्ण करतात.\nस्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी चालवलेला आणि केवळ महिलाच भागीदार असलेला जगातील हा एकमेव गृहद्योग आहे. इथे बायका आपल्या वेळेनुसार कार्यालयात येतात, वजनावर मळलेले पीठ घेतात, तयार केलेले पापड जमा करतात आणि रोजंदारी घेतात. इथे काम करणाऱ्या महिला दिवसाला ५०० ते ६०० रुपये कमावतात. ह्याचाच अर्थ, त्या घर सांभाळून, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून, रिकामा वेळ सत्कारणी लावून नोकरदार महिलांइतकी कमाई करत आहेत.\nह्या संस्थेत कामाची सुरुवात केलेल्या अनेक महिला संस्थेच्या मोठ्या पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. जसे की, प्रतिभा सावंत ह्यांनी २५ वर्षांपूर्वी लिज्जत समूहाबरोबर घरी बसून पापड लाटण्याच्या कामाला सुरुवात केली. एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे त्या पुढच्या पिढीतल्या महिलांच्या मार्गदर्शक बनल्या आहेत.\nठराविक वेळेत कामाचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर ५ ग्रॅम किंवा १० ग्रॅमचे सोन्याचे नाणे दिले जाते. आजवर अनेक महिलांनी ते मिळवले आहे. आयुष्यभर इमानदारीने काम केलेल्या महिलेला `लिज्जत’ पापडने किमान पाव किलो सोने निश्चितच मिळवून दिले आहे.\nमहिला घरी नेऊन काम करत असल्या, तरी त्यांनी बनवलेल्या पापडांची गुणवत्ता, स्वच्छता तपासून मगच त्यांना कामाचा मोबदला दिला जातो. त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला निरीक्षक नियुक्त केलेल्या आहेत. त्या कोणतीही पूर्वसूचना न देता, सदर महिलेच्या घरी जाऊन तिचे काम तपासतात. अशा छोट्या, परंतु महत्त्वपूर्ण बारकाव्यांकडे लक्ष दिल्यामुळे लिज्जत पापडची गुणवत्ता आणि त्याचे स्थान टिकून आहे. मुंबईसह संपूर्ण देशात या संस्थेच्या ८२ शाखा आणि २७ विभाग कार्यालये आहेत.\nया उद्योगाने असंख्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. लाखो महिला आज स्वयंपूर्ण आहेत. पैकी सुमारे ४५ हजार महिला सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य महिला, सहमालक असल्याने कंपनीचा नफा प्रत्येकीला समान आणि वाढीव वणाईच्या स्वरूपात दिला जातो. आज कंपनीची उलाढाल १२७१ कोटी रुपये असून ४४ कोटी रुपयांची परदेशी निर्यात आहे. हा आकडा अर्थातच वाढत जाणार आहे.\n`लिज्जत’ समूह भारतापुरता मर्यादित राहिला नसून, तो जगभरात पोहोचला आहे. `लिज्जत’ समूहाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ह्या उद्योगात काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रंग, रूप, जातपात, वय, भाषा ह्यावरून पारखले जात नाही, तर कामावरून पारखले जाते. ही समानता निर्माण केल्याबद्दल २००५ मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते `बेस्ट इक्वॅलिटी अवॉर्ड’ देण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी महिला दिनाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते `महिला विकास अवॉर्ड’ देऊन `लिज्जत’ समूहाचा सन्मान करण्यात आला.\nएवढ्या यशस्वी वाटचालीनंतर, अब्जावधी रुपये कमावल्यानंतर माणसांच्या जागी यंत्रांचा वापर करून लिज्जतला `डिजिटल क्रांती’ करता आली असती. मात्र, पैसा कमावणे, हा ह्या उद्योगनिर्मितीचा उद्देश नसल्यामुळे तिथे महिला विकासाला, सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले. हेतू स्वच्छ असल्यामुळे कामातही पारदर्शकता आली आणि उपक्रमाशी लाखो महिला जोडल्या गेल्या. ह्या विस्तारलेल्या वटवृक्षाकडे पाहताना जसवंतीबेन पोपट ह्यांना खऱ्या अर्थाने दररोज `महिला दिन’ साजरा होत असल्याचे जाणवत असेल, ह्यात शंका नाही\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलफोर्ब्सची यादी जाहीर, नीरव मोदीला मोठा झटका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/randhir-kapoor-slams-indian-youth-viewer/articleshow/62480038.cms", "date_download": "2018-04-20T16:37:09Z", "digest": "sha1:NMMM44EID6ZDC7HFVAVFJDYUFGJGVH3D", "length": 25386, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "randhir kapoor slams indian youth viewer | सलमानच्या शर्ट काढण्याला टाळ्या - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसलमानच्या शर्ट काढण्याला टाळ्या\nअभिनेते रणधीर कपूर यांची खंत\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n‘राज कपूर यांच्या काळातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगळी होती. समाजमूल्य अबाधित होते. समाज चांगला होता म्हणून चांगले सिनेमे निघत असतं. आज सगळीच परिस्थिती बदलली आहे. आजचे सिनेमे दुकानदारी करणारे आहेत. कोणी किती कमावले याचीच चर्चा जास्त होते. सलमान आणि करिश्मा कसले कपडे घालतात...सलमान शर्ट काढतो, असल्या प्रकारानांच लोक टाळ्या वाजवतात,’ या खरमरीत शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी नवीन सिनेमे, त्यातील कलाकार आणि सिनेमांच्या चाहत्यांची खरडपट्टी काढली.\n‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्यावरील चित्रपट हे यंदाच्या ‘पिफ’चे वैशिष्ट्य. ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील चित्रपटांची सुरुवात ‘बॉबी’ने शुक्रवारी झाली. त्याआधी झालेल्या कार्यक्रमात कपूर यांनी खडे बोल सुनावले. अभिनेते राजीव कपूर, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम या वेळी उपस्थित होते. मगदूम यांनी जुन्या चित्रपटाचा खास फोटो कपूर यांना भेट दिला.\n‘सामाजिक, आर्थिक परिस्थिती तसेच नात्यांची वीण या सर्वांना एक आयाम होता. जीवनमूल्य वेगळी होती. म्हणून तर आपण आजही जुनी गाणी ऐकतो आणि सिनेमे पाहतो. लोकांप्रमाणे सिनेमे निघत होते. आजचे सिनेमे लक्षात राहत नाहीत, कारण लोकही तसेच आहेत. कलेची तुलना करताच येणार नाही. आज वाक्यांवर सिनेमा काढला जातो. गाडी पंक्चर होते आणि सिनेमा निघतो. पूर्वी विषयांवर निघायचा. सलमान आणि करिश्मा यांच्या ड्रेसला लोक टाळ्या वाजवतात. शर्ट काढण्याचीच चर्चा अधिक होते. ओढणी नव्हती म्हणून बरसात सिनेमाला ए प्रमाणपत्र दिले गेले. आजच्या सिनेमांत कपडेही दिसत नाहीत,’ असे टीकास्त्र कपूर यांनी सोडले.\n‘सतरा वर्षांचा झाल्यासारखे वाटते’\n‘राज कपूर यांचे सर्वच सिनेमे उत्तम आहेत. आवारा, श्री ४२० हे अभिजात सिनेमे आहेत. सर्वच सिनेमांतील गाणी आजही ऐकली जातात. मला बॉबी मास्टर स्ट्रोक वाटतो. हा चित्रपट मी पाहतो, तेव्हा मला सतरा वर्षांचा असल्यासारखे वाटते. बॉबीची गाणी आजही माझ्या ह्रदयात आहेत,’ अशी भावना रणधीर कपूर यांनी व्यक्त केली. आश्चर्याची बाब म्हणजे ‘बॉबी’च्या शोला ऋषी कपूर अनुपस्थित राहिले.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मर्चंटचा मृत्यू\nजगभ्रमंतीसाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली\nवाढदिवशी पाठवले कोंबडीचे मुंडके, कुटुंब हादरले\nया पीडितांना न्याय कधी मिळणार\nसख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार\nमिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर\n‘हॉर्टिकल्चर’च्या निविदा रद्द करा\n1सलमानच्या शर्ट काढण्याला टाळ्या...\n2पहिल्या टप्प्यामध्ये ६,३२४ घरे बांधणार...\n3‘मॉल, मल्टिप्लेक्समध्ये नियमांचे उल्लंघन’...\n4​ मुख्यमंत्री उगारणार ‘छडी’...\n5वाहन चालकांचा दंडाला ठेंगा...\n7पुरंदर विमानतळाला ‘ग्रीन सिग्नल’...\n8‘एग्लार’ परिषदेला नावे बघून परवानगी...\n9वीजमीटरचे रीडिंग चुकल्यास कारवाई...\n10कर्वे रस्त्यावर ‘नो पार्किंग’\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.casinophonebill.com/mr/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F-2017/", "date_download": "2018-04-20T16:54:51Z", "digest": "sha1:BVTIH2BUPJ2LPGSHH74KP4ZUX5WSDDKS", "length": 27078, "nlines": 215, "source_domain": "www.casinophonebill.com", "title": "यूके स्लॉट 2018 खेळ - ऑनलाइन कॅसिनो बोनस प्ले आता! |", "raw_content": "जागतिक ऑनलाइन आता खेळत ओलांडून खेळाडू सर्वोत्तम रोख खेळ पासून\nफोन कॅसिनो अनुप्रयोग विशेष - अनुप्रयोग मोफत येथे मिळवा\nफोन बिल रिअल पैसे स्लॉट प्ले | एसएमएस बोनस\nफोन कॅसिनो बोनस | सेल क्रेडिट ऑनलाइन | एसएमएस बोनस\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nफोन बिल खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव गुळगुळीत | अप्रतिम बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव | ब्रिटन च्या सर्वोत्तम मोफत प्ले साइट £ €\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nफोन स्लॉट | मोफत क्रेडिट बोनस प्ले | £ 5 + £ 10 + £ 200 ...\nकोणतीही अनामत आवश्यक नाही | स्लॉट फोन बिल करून द्या | जगातील शीर्ष प्रोमो\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | mFortune £ 105 मोफत\nSlotjar.com – लोकप्रिय अप £ 200 अतिरिक्त बोनस नाही ते\nExpressCasino £ $ € 200 मध्ये आपले स्वागत आहे\nशीर्ष 20 फोन बिल कॅसिनो\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nCoinFalls कॅसिनो रोख पॉवरहाऊस | 5+£ € $ 505 मोफत\nऑनलाइन स्लॉट बोनस रिअल पैसे | StrictlySlots.co.uk £ 500 ऑफर\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 350+ खेळ + £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nमोबाइल स्लॉट फोन कॅसिनो | TopSlotSite £ 800 ठेव बोनस\nLucks कॅसिनो £ 200 ठेव बोनस\nमोफत ठेव मोबाइल कॅसिनो बोनस - Slotmatic अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट नाही ठेव बोनस साइट | LiveCasino.ie € 200 बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो पे - Slotmatic ऑनलाईन\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nयूके मोबाइल कॅसिनो स्लॉट - छान ऑनलाइन प्ले करा £ 200 ऑफर\nबिल करून फोन स्लॉट ऑनलाईन - SlotsMobile कॅसिनो मोफत नाही\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल स्लॉट करून द्या | SlotFruity.com £ 5 मोफत ठेव\nस्लॉट फोन बिल करून द्या\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\n£ 5 मोफत मोबाइल कॅसिनो द्या फोन बिल जमा | PocketWin\nश्री स्पिन कॅसिनो – 50 मोफत नाही\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\n£ 20 बोनस स्लॉट कॅसिनो ठेव एसएमएस किंवा बीटी लँडलाईन फोन बिल करून| Ladyluck च्या\nठेव एसएमएस & बीटी फोन बिल लँडलाईन कॅसिनो | मोबाइल गेम्स\nलँडलाईन ऑनलाइन जुगार हाऊस फोन बिल वापरणे | बोनस विशेष\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nजुगार स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | नोंदणी 4 ऊर £ 65 बोनस\nऑनलाइन स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | 650% ठेव बोनस\nKerching बोनस | फोन कॅसिनो स्लॉट द्या £ 10, £ 75 खेळा\nPayforit कॅसिनो मोबाइल फोन बिल जुगार\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ फोन बिलिंग अनुप्रयोग & ठेवी\nव्हीआयपी कॅसिनो मोफत बोनस सौदे | रोख Comp पॉइंट्स\nफोन मधूर स्लॉट Pocket\nSMS सह Blackjack अनुप्रयोग & लँडलाईन ठेव\nफोन बिल अॅप्स द्वारे निर्विकार द्या\nश्री स्पिन कॅसिनो 50 मोफत नाही\nफोन बिल करून ओळखपत्र द्या\nकोणतीही अनामत बोनस | रिअल पैसे चॉईस £ 100 च्या मोफत\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nघर » यूके स्लॉट 2018 खेळ – ऑनलाइन कॅसिनो बोनस प्ले आता\nस्वत: निवडलेल्या करा व्हीआयपी देते येथे\nप्रथम नवीनतम सामग्री मिळवा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर.\nसुंदर फोन बिल स्लॉट निवड\nफोन वेगास - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200\nSlotsLTD.com सर्वोत्तम स्लॉट खेळ चॉईस\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nपृष्ठे & फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम उत्साही खेळ पृष्ठे\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले\nशीर्ष टेबल व्हीआयपी खेळ\nएक्सप्रेस कॅसिनो मिळवा 100% आपले स्वागत आहे ठेव बोनस + £ 5 मोफत\nयूके फोन बिल देयके सह TopSlotSite\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना\nशीर्ष यूके मोफत नाही स्लॉट\nप्रचंड मोबाइल टेबल गेम\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin\nCoinFalls.com मोबाइल रोख खेळ पॉवरहाऊस > होय\nफोन कॅसिनो करून द्या प्रचंड श्रेणी & स्लॉट\n£ 200 Lucks कॅसिनो आंतरराष्ट्रीय अतिरिक्त नाही बोनस\nप्रचंड jackpots सह पाउंड स्लॉट प्ले\nपाउंड स्लॉट - आपले स्वागत आहे 100% £ 200 बोनस अप\nसर्वोत्तम एसएमएस भरणा कॅसिनो यूके\n£ 100 द्या प्ले £ 210 फोन बिल स्लॉट करून\nअप करण्यासाठी £ 100 ठेव सामना\nशीर्ष फोन क्रेडिट jackpot कॅसिनो 2015/16\n£ 5 मोफत + 100% प्रथम ठेव अतिरिक्त मोफत बोनस\nशीर्ष फोन भरणा बिलिंग कॅसिनो\n1 स्लॉट फोन बिल ठेव | £ 200 अतिरिक्त नाही बोनस स्लॉट किलकिले\n2 मोबाइल फोन स्लॉट कॅसिनो | TopSlotSite $ € £ 800 ठेव बोनस पुनरावलोकन\n3 फोन बिल स्लॉट पर्याय द्या | Coinfalls कॅसिनो अनुप्रयोग | £ 505 मोफत\n4 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो | £ 500 ठेव सामना साइट पुनरावलोकन\n5 स्लॉट मधूर | फोन बिल कप्पा स्लॉट कॅसिनो करून द्या पुनरावलोकन\nयूके स्लॉट 2018 बोनस ब्रँड नवीन गेम\nनवीन यूके स्लॉट 2018 कॅसिनो साइट खेळ CasinoPhoneBill.com\nऑनलाइन स्लॉट खेळ नवीन आणि प्रगत वैशिष्ट्ये सह लोड TopSlotSite कॅसिनो ऑनलाइन किंवा ऑफलाइन फक्त इतर गायन खेळ व्यतिरिक्त स्लॉट सेट उपलब्ध नाही, पण ते देखील मागे वळून कधी आहे जेथे स्तरावर आपल्या स्लॉट अनुभव वृद्धिंगत. यूके स्लॉट 2018 वाढत आहेत TopSlotSite कॅसिनो ऑनलाइन किंवा ऑफलाइन फक्त इतर गायन खेळ व्यतिरिक्त स्लॉट सेट उपलब्ध नाही, पण ते देखील मागे वळून कधी आहे जेथे स्तरावर आपल्या स्लॉट अनुभव वृद्धिंगत. यूके स्लॉट 2018 वाढत आहेत आपण आणण्यासाठी अशा स्लॉट पूर्ण वाढ झालेला आणि निर्दोष स्लॉट आनंद ऑनलाइन सर्वोत्तम ऑनलाइन स्लॉट आहेत. आज TopSlotSite.com येथे प्ले आणि एक £ 5 + ते £ 800 बोनस वर\nयूके स्लॉट 2018 ऑनलाईन – निम्न पहा:\nहमी jackpots – सर्व सर्वोत्तम ऑनलाइन यूके स्लॉट 2018 एक मोठ्या मानाने हमी jackpot त्यांच्या रक्कम टेबल वैशिष्ट्यीकृत आहेत. गॅरंटीड jackpots मुळात आपण स्पीन तेव्हा आपल्या खिशात पुन्ह की स्लॉट खेळ वैशिष्ट्यीकृत सर्वाधिक बक्षीस आहेत सर्वाधिक सक्रिय वेतन ओळी कोणत्याही विजय मिळवून देणारे संयोजन देवून. हे हमी म्हणतात कारण या jackpot बक्षीस मूल्य निश्चित आहे आणि आपण reels वर आलेले जिंकून कॉम्बो फिरकी एकदा एक 'गॅरन्टीड विजय आहे. या jackpots बक्षीस मूल्य उच्च असल्याने, त्यामुळे हमी jackpot जोरदार प्रेरणा आहे ऑनलाइन स्लॉट प्ले.\nप्रोग्रेसिव्ह jackpots – प्रोग्रेसिव्ह jackpot मी आणखी एक पैलू सर्व सर्वोत्तम ऑनलाइन यूके स्लॉट 2017 अभिमानाने याबद्दल फुशारकी मारा. बहुतेक आमच्या स्लॉट मशीन खेळ मोठा पुरोगामी jackpots वैशिष्ट्य ते वेळ होईपर्यंत वाढत पाळले दाबा आहेत. एकदा आपण अशा jackpot दाबा, आपण त्वरित पैसे एक मोठी रक्कम देण्यात आलेले. हमी jackpots विपरीत, पुरोगामी jackpots मध्ये बक्षीस मूल्य निश्चित नाही. अनेक स्लॉट मशीन खेळ फक्त गंमत म्हणून हुशारीने िनवडा.\nआपल्या बोधवाक्य पैसे कमाविण्यात आहे, तर, नंतर आपण त्या बरोबर यायला हवा आहे कोण TopSlotSite.com सारखे जिंकून मोठा बोनस आणि प्रचंड रोख बक्षिसे ऑफर. नावाप्रमाणेच, बक्षीस मूल्य पोचते आणि खेळ ठेवलेल्या प्रत्येक पण यात वाढते. त्यामुळे, अशा भांडे मूल्य प्रगती jackpots खरोखर खूप उंच जाऊ शकता ते बराच वेळ जिंकली नाहीत तर.\nखाली आमच्या अप्रतिम यूके स्लॉट आहे 2018 साइट बोनस टेबल\nते £ 200 अतिरिक्त नाही डिपॉझिट सामना स्लॉट किलकिले येथे\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत रिअल पैसे CoinFalls स्लॉट बोनस मिळवा\nStrictlySlots.co.uk अप £ 500 ठेव मॅच बोनस आज पुनरावलोकन भेट\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले पुनरावलोकन भेट\n£ 5 ठेव स्लॉट + £ 500 ठेव सामना - Casino.uk.com पुनरावलोकन भेट\nछान प्ले आज बोनस प्ले करा आणि जिंकण्यासाठी £ 200 पर्यंत कमवा\nकाटेकोरपणे रोख - 200% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin पुनरावलोकन भेट\nमेल कॅसिनो £ 5 ठेव बोनस + 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत पुनरावलोकन भेट\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nगोल्डमन कॅसिनो - 100% £ € $ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस सामना पर्यंत पुनरावलोकन भेट\nफोन बिल कॅसिनो आणि पुरोगामी jackpots ऑनलाईन यूके स्लॉट करून द्या 2018\nपरिणाम पुरोगामी jackpot जे सहजगत्या खिशात सापडणे शकता याचा अर्थ असा पूर्णपणे यादृच्छिक आहे. फोन बिल करून वेतन वापरून ठेव पर्याय प्ले. ते ऑनलाइन स्लॉट प्ले करताना लक्षात न घेता ते फिरकी जिंकून combos संख्या आणि हमी बक्षिसे संख्या कोणत्याही वेळी कोणत्याही खेळाडू ते जिंकण्यासाठी. TopSlotSite सुमारे £ 800 बोनस आज प्ले\nबोनस फेर्यांमध्ये – हे नवीन अॅड-ऑन सर्व अधिक मजा स्लॉट वर beefs की यूके स्लॉट खेळ आहे मजा आणि बक्षिसे अतिरिक्त शेअर अतिरिक्त डोस आपण ऑनलाइन स्लॉट प्ले तेव्हा ते देतात की. एक बोनस एक अस्तर करून चालना दिली आहे बोनस प्रतीक निश्चित संच reels वर. यूके येथे स्लॉट वर बोनस वर अधिक पहा\nएकदा चालना, बोनस फेर्यांमध्ये पूर्णपणे एक अतिशय भिन्न जग आपण घेऊ शकता. एक जे स्लॉट भाग आहे, पण तरीही भिन्न आहे द अशा बोनस फेर्यांमध्ये तयार उत्कृष्ट ग्राफिक्स आणि 3D अॅनिमेशन स्लॉट सर्व अधिक आकर्षक खेळ करा.\nत्यामुळे, आपण आपल्या सर्वोत्तम ऑनलाइन आढळले आहेत यूके स्लॉट आतापर्यंत नाही आणि आपण अद्याप नंतर शिकार आहेत सर्वोत्तम आणि नवीन यूके स्लॉट आपल्या शोधाशोध समाप्त तर 2018 आपण सहजपणे त्यांच्या तपशील ऑनलाइन पाहू शकता, जे खेळ. TopSlotSite कॅसिनो पहा आणि आता खेळ\nएसएमएस मोबाईल कॅसिनो & स्लॉट फोन बिल ठेव आणि लँडलाईन बिलिंग संबंधित पोस्ट द्या:\nठेवा प्ले मोफत काय आपण जिंकलात स्लॉट…\nसर्वोत्तम ऑनलाइन स्लॉट | Pocketwin कॅसिनो |…\nमोबाइल स्लॉट द्या फोन क्रेडिट | खिसा…\nफोन बिल ऑनलाईन कॅसिनो द्या | रिअल…\nस्लॉट एसएमएस बिलिंग Moobile खेळ यादी | फुकट\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\nमोफत मनी कॅसिनो | शीर्ष स्लॉट साइट | ऑनलाईन…\nAndroid वर ऑनलाईन खेळ खेळा | jackpot…\nसर्वोत्तम ऑनलाइन कॅसिनो स्लॉट | Pocketwin…\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या: घर\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव प्ले | ब्रिटन च्या सर्वोत्तम साइट मोफत प्ले\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nसर्वोत्कृष्ट कॅसिनो एसएमएस ठेव खेळ शोधत आहात\n श्री फिरकी कॅसिनो साइन-इन करा £££ बोनस नाही ठेव 50 मोफत नाही\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nएसएमएस जुगार | Coinfalls कॅसिनो | £ 500 ठेव बोनस\nसर्वोत्तम फोन कॅसिनो £££\nआमच्याशी संपर्क साधा | Casinophonebill.com\nट्विटर दुवा फोन बिलिंग\nGoogle+ लेखक पृष्ठ फोन बिल कॅसिनो\n£ 5 मोफत PocketWin लॉगिन करा\nफोन स्लॉट करून Pocket मधूर कॅसिनो द्या\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 400+ खेळ & £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nमोबाइल स्लॉट लिमिटेड | फोन बिल आश्चर्यकारक £ 200 बोनस करून द्या\nफोन कॅसिनो करून काटेकोरपणे रोख वेतन @ मोबाइल स्लॉट + £ 200 बोनस\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\nLadylucks - नोंदणी, लॉग-इन, साइन-इन\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nसमय क्षेत्र पुनरावलोकन फिरकी | कॅसिनो फोन बिलिंग\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nसर्वोत्तम संलग्न कार्यक्रम – GlobaliGaming भागीदार – रिअल पैसे कमवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-20T16:10:06Z", "digest": "sha1:3PRSGPBI65K26RTKN7SAYOAJJPKYYUJA", "length": 7667, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीलंका संसद सत्र एका महिन्यासाठी निलंबित – राष्ट्रपतींचा अनपेक्षित निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीलंका संसद सत्र एका महिन्यासाठी निलंबित – राष्ट्रपतींचा अनपेक्षित निर्णय\nकोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील वाढत्या राजकीय संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसिंगे यांनी संसद सत्र एका महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.\nमाजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांच्या नवीन पक्षाने स्थानिक निवडणुकांत दमदार यश मिळवल्यानंतर एसएलएफपी (श्री लंका फ्रीडम पार्टी) आणि यूएनपी (युनायटेड नॅशनल पार्टी) यांच्या यांचे युती सरकार अडचणीत आले होते.\nराजपक्षे याच्या पक्षाच्या यशाकडे सत्ताधारी युतीवरील जनमत संग्रहाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसिंगे यांनी 12 एप्रिल 2018 रोजी रात्री संविधान कलम 70 द्वारे राष्ट्रपतींना मिळालेल्या विशेष अधिकारांच वापर करत संसदेचे चालू अशिवेशन समाप्त करण्याची आणि पुढील अधिवेशन 8 मे पासून सुरू करण्याची घोषणा केली. 19 एप्रिल रोजी संसदेची बैठक होणार होती. पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याची मागणी या मंत्र्यांनी केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाऊली दाभाडे कॉंग्रेसवासी\nNext articleसोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा ट्रोल\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\n1 मेपासून पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना अमेरिकेत प्रवेश बंदी \nदक्षिण – उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nडॉक्टरांची कमाल : २० वर्षांपूर्वी गिळलेले लायटर १० मिनिटांत काढले\nनासा शोधणार पराग्रहांवरील जीवन; उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी\nपाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेस गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-ncp-leader-supriya-sule-demands-to-search-of-army-naik-anil-gondge-s-wife-468963", "date_download": "2018-04-20T16:46:13Z", "digest": "sha1:75DD6Y5XSOU3XDASP256GOKA543TPAZC", "length": 16301, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : जवानाच्या बेपत्ता पत्नीचा शोध घ्या, सुप्रिया सुळेंचं रिजीजू, भामरेंकडे साकडं", "raw_content": "\nमुंबई : जवानाच्या बेपत्ता पत्नीचा शोध घ्या, सुप्रिया सुळेंचं रिजीजू, भामरेंकडे साकडं\nपरभणीचे जवान अनिल गोंडगेंच्या पत्नी स्वप्ना यांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रातील नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ट्वीट करुन या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यावर रिजीजू यांनी याप्रकरणी लक्ष घालू असं उत्तरही दिलं आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nमुंबई : जवानाच्या बेपत्ता पत्नीचा शोध घ्या, सुप्रिया सुळेंचं रिजीजू, भामरेंकडे साकडं\nमुंबई : जवानाच्या बेपत्ता पत्नीचा शोध घ्या, सुप्रिया सुळेंचं रिजीजू, भामरेंकडे साकडं\nपरभणीचे जवान अनिल गोंडगेंच्या पत्नी स्वप्ना यांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रातील नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ट्वीट करुन या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यावर रिजीजू यांनी याप्रकरणी लक्ष घालू असं उत्तरही दिलं आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: वाटसन का शतक,राजस्थान के सामने 205 रनों की मुश्किल चुनौती\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/pune-crime/", "date_download": "2018-04-20T16:25:27Z", "digest": "sha1:OTGWB3QNA7VQJ7MMC37M5J52OFMXOZ6H", "length": 5543, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "pune crime – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nपेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक\nपुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास शब्द.. पण पुणेकरांचे वेगळेपण यामुळे टिकून आहे .अर्थात पुणे हे पेन्शनर लोकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी आता पूर्वीचे पुणे राहीले नाही हा डायलॉग अजून देखील कित्येक ठिकाणी बोलला जातो. पुण्याच्या पेन्शनर लोकांविषयी पू. ल . देशपांडे… Read More »\nसेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना\nसेल्फी स्टिकच्या मदतीने शेजारच्यांच्या बेडरूम मधील खाजगी क्षण रेकॉर्ड करून नंतर त्या क्लिपच्या माध्यमातून महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत ब्लॅक मेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे . विशेष म्हणजे हा आरोपी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मोठ्या हुद्दयावर असल्याचे समजते . हा आरोपी ह्या क्लिप्सच्या माध्यमातून महिलेला ब्लॅकमेल करत होता.… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/ujjwal-nikam-demands-death-sentence-to-kopardi-rape-murder-crime-criminals/", "date_download": "2018-04-20T16:40:57Z", "digest": "sha1:NJ3SUPKFXJ6HUISZ7LQYNBHVIWXSE74S", "length": 10463, "nlines": 64, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम ? – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nकोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम \nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्या तिघांनाही फाशीची शिक्षा मिळावी असा युक्तिवाद आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत. यातही त्यांनी अफजल गुरु व संसदेवरील हल्ल्याचे देखील उदाहरण दिले .\nआपली बाजू मांडताना निकम म्हणाले, ११ ते १३ जुलै २०१६ दरम्यान बलात्कार व हत्येचा कट दोषींनी रचला. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पीडित मुलगी व तिच्या मैत्रीणीला रस्त्यात अडविले. दोषी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला. बलात्काराच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला नेले. दोषी नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे जितेंद्र शिंदे याच्या राक्षसी कृत्याचा आनंद लुटत होते. मात्र त्यांनी जितेंद्र शिंदेला नंतर काम उरकण्याचा सल्ला दिला.\nत्यानंतर ह्या तिन्ही नराधमांनी त्या मुलीवर दोन दिवस पळत ठेवली., पीडित मुलगी १३ जुलैला सायंकाळी ७ वाजता पीडित मुलगी आपल्या आजोबांकडे मसाला आणण्यासाठी गेली होती, परत येत नसताना तिला गाठून तिच्यावर अत्याचार करण्यात आला .\nमुलगी घरी आली नाही म्हणून शोध सुरु केला असता, रस्त्याच्या कडेला तिची सायकल दिसली. शेतातच मुलीचे प्रेत सापडले.तिचे हाथ खांद्यापासून निखळून मोडले होते , वक्षस्थळ व पाठीवर चावे घेण्यात आले होते व गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. दोषींनी नियोजनपूवर्क ही हत्या केली. यात जितेंद्र शिंदेला नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांनी त्याला साथ दिली, असे सांगत निकम यांनी तिघांनाही फाशीची शिक्षाच योग्य राहील, असे सांगितले.\nयुक्तिवाद करत असताना निकम यांनी इंदिरा गांधींची हत्या तसेच संसदेवरील हल्ल्याच्या खटल्याचे दाखले देखील दिले. त्यावेळी इंदिरा गांधीच्या हत्येमध्ये दोन अंगरक्षक सहभागी होते. तिसरा आरोपी तेहरसिंग हा घटनास्थळी नव्हता. मात्र, तो कटात सहभागी असल्याने त्यालादेखील फाशीचीच शिक्षा दिली होती.तसेच संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु हा देखील कटात सहभागी होता म्हणून त्यालाही दोषी ठरवून फाशी दिली होती. त्यामुळे मुख्य दोषी जितेंद्र शिंदे याच्यासह नितीन भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनाही फाशी दिली जावी, अशी मागणी निकम यांनी केली.\nतर संतोष भवाळ याच्या वतीने बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला़ दोषी हा घटनेत सहभागी असल्याचा कोणताही पुरावा न्यायालसमोर नाही़ तसेच ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीस फाशी देण्याइतका पुरावा नसल्यामुळे आरोपीस फाशी देऊ नये, असा युक्तिवाद बाळासाहेब खोपडे यांच्याकडून करण्यात आला.\nकोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले : कोपर्डी अपहरण व खून खटला\n छकुलीची आई काय म्हणते : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: पुणे महाराष्ट्र Tags: kopardi, kopardi case, उज्ज्वल निकम, कोपर्डी प्रकरण, कोपर्डी बातमी\n← कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स : ‘ हे ‘ आहे प्रकरण →\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-doctors-strike-ima-called-doctors-strike-90170", "date_download": "2018-04-20T16:47:28Z", "digest": "sha1:WLPQKYRFSK2WCNFVGRPA43QLTGLBCQJJ", "length": 11200, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national doctors strike IMA called off doctors strike 'आयएमए'च्या आवाहनानंतर डॉक्टरांचा संप अखेर मागे | eSakal", "raw_content": "\n'आयएमए'च्या आवाहनानंतर डॉक्टरांचा संप अखेर मागे\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या सहभागाचा कोणताही विचार यामध्ये करण्यात आलेला नाही, असा आरोप 'आयएमए'ने केला होता.\nनवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालायतील वैद्यकीय सेवा तत्काळ सुरु कराव्यात, असे आवाहन 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने केले. त्यानंतर लगेचच हा संप मागे घेण्यात आला.\nवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या सहभागाचा कोणताही विचार यामध्ये करण्यात आलेला नाही, असा आरोप 'आयएमए'ने केला होता. या विधेयकाला डॉक्टरांनी विरोध करायचे ठरवले. त्यानुसार खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी गेल्या अनेक तासांपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले होते.\nदरम्यान, 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने केलेल्या आवाहन आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.\nयंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम\nअमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या...\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nनगर - श्रीरामपूर येथे लाचप्रकरणी अभियंत्यास दहा वर्षे सक्तमजुरी\nश्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता...\n'कृष्णापुरी'तून पाणी चोरी करणारे पंप जप्त\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता.चाळीसगाव) धरणात गिरणा धरणाचे पाणी टाकून हे धरण आठ टक्के भरण्यात आले. धरणात पाणी टाकण्याचा विषय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/t/books/interest/hobby/fitness", "date_download": "2018-04-20T16:23:40Z", "digest": "sha1:55QXMTBG7QX4UEWDBTEJ52P6U7SQG2XM", "length": 15400, "nlines": 410, "source_domain": "www.cart91.com", "title": "ऑनलाईन छंद तंदुरुस्ती पुस्तके मागवा | स्वस्त दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nकशाला हवा तो चष्मा \nडोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट\nफ्रॉम एक्स एल टु एक्स एस\nवूमन ऍण्ड द वेटलॉस तमाशा\nव्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री\n10 लॉज् ऑफ लर्निंग\nकरीना कपूर, रोशेल पिंटो\nबी के एस अय्यंगार\nसडपातळ व्हा सडपातळ राहा\nलेस स्नोडॉनमॅगी , म्यागी ह्यमप्यारीस\nडॉ. पॉल गालब्रेथ, डॉ. अरूण मांडे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/tag/history/", "date_download": "2018-04-20T16:28:52Z", "digest": "sha1:75PRQIBFKYNWLNQM7QZU5SLVEO6KL5CP", "length": 8999, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "history Archives - Khaas Re", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… 1\nजाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास… 0\nदुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचा अल्पपरिचय… 0\nक्रिकेटमधील काही ऐतिहासिक फोटो व क्षण,प्रत्येक क्रिकेट चाहत्याने बघायलाच हवे 2\nमराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय 1\nकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे\nस्वदेशी आंदोलनातून जन्म झाला जगप्रसिद्ध पारले जी बिस्किटचा 1\nशिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/kolhapur", "date_download": "2018-04-20T16:37:58Z", "digest": "sha1:JBAKE4R3VMKXANLS5XNTZ7B3PYRXVB5U", "length": 24385, "nlines": 333, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kolhapur Marathi News, kolhapur Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nबारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्...\nबलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC\nरेल्वे अपघात वाढले; वर्षभरात ३ हजार मृत्यू...\n‘गुगल’ नकाशे अधिकृत मानता येतील का\n'सुरत'चा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\n'कठुआ'वर व्यंगचित्र; दुर्गा मालठीच्या घराव...\nimpeachment: काँग्रेसमध्ये मतभेद; विरोधकां...\nदुभती गाय विकून सुनेसाठी बांधलं शौचालय\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nमोदींनी महिला अत्याचाराकडे लक्ष द्यावं\nक्युबामध्ये कॅस्ट्रो युगाचा अंत\nPM Modi: बलात्काराच्या घटना हा कलंक- मोदी\nमुंबईचे छायाचित्रकार सिद्दीकींना पुलित्झर\nकुठे गेला सद्दाम हुसेनचा मृतदेह\nट्रेनमध्ये सेक्स, लोकांनी केले व्हिडिओ शूट...\nmodi: 'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान...\nकंपनीला टाळं, १२ हजार कर्मचारी रस्त्यावर\nअन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n१९ कोटी युवा भारतीयांचं बँकेत खातंच नाही\nमुंबई, ठाणे, पुण्यात घरांच्या किंमती घटल्य...\n२०२६च्या युवा ऑलिंपिकसाठी प्रयत्न\nVirat kohli: 'टाइम'च्या १०० प्रभावी व्यक्त...\nमध्य रेल्वे, टाटा विजयी\nरोहित शर्माने दिले लुईसला श्रेय\npanitat: 'पानीपत'साठी उभा राहतोय हुबेहूब शनिवारवाड...\nजुई गडकरीचं पुढचं पाऊल 'बिग बॉस'मध्ये\nमराठी बिग बॉसच्या घरात 'हे' सेलिब्रिटी\n'मराठी बिग बॉस'बद्दल काय म्हणाला महेश\nकपिलचे हाल पाहून रडू कोसळतं: भारती\nसोनम कपूरचं स्वित्झर्लंडमध्ये होणार लग्न\nजाणून घ्या विद्यार्थ्याची क्षमता\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nसहल : घरची, आईची\nआह से आहा तक...\nफेडोरा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nपुण्यातला कलिंगडांचा एक ठेला\nकुठली मुलगी काय म्हणते\nखयच्याच कार्डाक रेंज नाय\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nमहावितरणचा शहरात बुधवारी विजेचा लपंडाव सुरू राहिला. काही भागांत वादळी वारा, पावसाळी पूर्व झाडांच्या तोडणीसाठी राजारामपुरी, शाहूपुरीसह उपनगरातील काही भागांत दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.\nध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी\nकोल्हापूर: ६ वर्षांनी विमानाचं टेकऑफ\nगेली सहा वर्षे बंद असलेली विमानसेवा मंगळवारपासून सुरू झाली. मुंबईहून दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी टेक्ऑफ केलेले विमान कोल्हापूर विमानतळावर दुपारी तीन वाजता उतरले. यानिमित्ताने छत्रपती राजाराम महाराज विमानतळाने पुन्हा लगबग अनुभवली. आजच्या या पहिल्या विशेष विमानाची ५५ मिनिटांची सफर १८ प्रवाशांनी अनुभवली.\nकामगाराशी जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित वालाराम लिच्छुराम जाट (रा. बोली जि. बाडमेर राजस्थान) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nकोल्हापूरच्या विकासाचे उड्डाण आजपासून\nतब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरुन पुन्हा एकदा विमानसेवा सुरु होत आहे. अधिकृत सेवा २२ एप्रिलपासून होणार आहे. तत्पूर्वी विमानसेवेचा आनंद साजरा करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनव संकल्पना आखली आहे.\nपाच कारखान्यांची साखर जप्ती\nचालू गळीत हंगामातील थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील पाच कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस जप्त करुन विक्री करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nकोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा २० जूनपासून\nकोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती ही विमानसेवा २० जून आणि कोल्हापूर बेंगळुरू ही विमानसेवा कोल्हापुरच्या 'छत्रपती राजाराम महाराज' विमानतळावरून जूनअखेर सुरू होत आहे. केंद्र सरकारच्या 'लो कॉस्ट' आणि रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम अंतर्गत 'उडान' योजनेतून पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा २२ एप्रिल पासून सुरु होत आहे.\nचंद्रकांत पाटील पैशांचा पाऊस पाडतात:शिवसेना\nकोल्हापूर, हातकणंगलेलोकसभा शिवसेना लढणारमटा वृत्तसेवा, सांगली 'भाजप जनाधार असलेले इतर पक्षातील तयार नेते विकत घेतो...\nहा तर शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारा चंद्रासूर\n'महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपलेल्या राक्षसाला जागे केले असून, आता तुम्हाला महागात पडेल असे वक्तव्य करून आपण चंद्रासुर असल्याचे दाखवून दिले आहे. या चंद्रासुराने एफआरपी गिळंकृत केली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nबिद्रेंच्या मृतदेहाचा ९ ठिकाणी घेणार शोध\nसहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे पत्र्याच्या पेटीतून मीरा भाईंदरच्या खाडीत फेकल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली आहे. त्यानुसार मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी खाडीतील नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत.\nकोल्हापुरात फक्त ५ रुपयांत चपाती-भाजी\nसंवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने शाहूपुरीतील विद्या प्रबोधिनी येथे पाच रुपयांत चपाती-भाजी देण्याच्या उपक्रमाची सुरुवात शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. हा उपक्रम गरजूंचे पोट भरणारा ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\nकोल्हापूर: १०वीच्या उत्तरपत्रिका झाल्या गहाळ\nतपासणीसाठी आलेल्या दहावीच्या नऊ उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. मोपेडवरून जाताना भवानी मंडप ते साळोखेनगर दरम्यान उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत.\nपर्यटन वाढवणार आडवाटेवरचे कोल्हापूर\n(फोटो आहे)'आडवाटेवरचे कोल्हापूर' वाढवणार जिल्ह्याचे पर्यटनपालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात म टा...\nप्लास्टीक बंदी बाबत जनजागृती आवश्यक\n५१ गावात वॉटर एटीएम\nदूषित पाणीपुरवठा होत असलेल्या जिल्ह्यातील ५१ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहेत. त्या एटीएममधून पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सरकारच्या समाजकल्याण निधीतून निधी मिळाला आहे.\nनोकरीच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक\nमहसूल आणि वन विभागात अधीक्षक या पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र शिवाजी कापसे (रा. कात्यायणी चौक, कळंबा, आणि महावीर चोका कांबळे (रा. उदगाव, ता. शिरोळ) या दोघांवर करवीर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nफांद्या छाटायला हव्यात .\nसुरत बलात्काराचा छडा: तीन आरोपींना राजस्थानातून अटक\nIPL: चेन्नई Vs. राजस्थान मॅचचे लाइव्ह अपडेट्स\nसेहवागने मला घेऊन IPL वाचवली: ख्रिस गेल\nIPL Live स्कोअरकार्ड: चेन्नई वि. राजस्थान\n‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन\n'कठुआ'वर कार्टून; चित्रकाराच्या घरावर दगडफेक\n'मोदी पुन्हा सत्तेवर न आल्यास भारताला नुकसान'\nमाजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचं निधन\nआयपीएल सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nagapanchami/word", "date_download": "2018-04-20T16:32:51Z", "digest": "sha1:VQWGHHUTGQK2S5UQXSWNGT3GMYDO5PQW", "length": 10397, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nagapanchami", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - आखाडमासी एकादशी , नागारपं...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - पंचमी आली बुधवारीं पुस नक...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - दोन तीन बैलांच्या , लागल्...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - चांदीची घागर बाई मोत्यांच...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - घराचा घरधंदा मी करतें ...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - वहिल्या रानाला पाण्याचं ज...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - दिवस कुठं जी मावळला चंद्...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - करड्या करड्या का का कू , ...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - नाच ग घुमा कशी मी नाचू...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - श्रावण हंकारी हंकारी कां...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - गाई चरती जमुना तीरीं तिल...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - हळदकुंकू वहायाला ताज्या ...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - नदीच्या पल्याड ग दामाजी ...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - काळा बैल बांधला बागला वन...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - आला पंचमीचा सण आला पंचमी...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - आली वसाची पंचीम आली वर्स...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - आली धांवत पळत आली अपुल्य...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - तितनं धांवत पळत गेली लाल...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nनागपंचमी - सूर्व्याची कन्या राधिका ...\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/gap-between-two-buildings/articleshow/62302064.cms", "date_download": "2018-04-20T16:35:52Z", "digest": "sha1:X745MIJF6U322JPJZINO7WHX5GBDH5UD", "length": 20138, "nlines": 235, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "gap between two buildings | दोन इमारतीतील अंतर - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nपंचवटी कारंजा येथे अशा प्रकारच्या अनेक इमारती आहेत. दोन इमारतीत नक्की किती अंतर असावे याचा नियम आहे का एखादी दुर्घटना घडली तर तेथे मदत पोहचवता येईल का एखादी दुर्घटना घडली तर तेथे मदत पोहचवता येईल का महापालिका याची जबाबदारी घेऊन अशा इमारतींची तपासणी करणार काआशिष जोशी\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसिडको मध्ये चोरांचा धुमाकूळ\n3मग बोर्डाचा फायदा काय...\n4निदान विचार तरी करा...\n7म्हणे उघड्यावर मांसविक्री बंदी...\n8हा वारसा जपायला हवा...\n10शहरात स्वच्छता मोहीम राबवावी...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/nagorav-yevtekar-artile-on-girl-education/", "date_download": "2018-04-20T16:41:41Z", "digest": "sha1:FAHFIVOQ7E3PLJIN2GGABTQISSJUQFCX", "length": 24996, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुलींचे शिक्षण; प्रगतीचे लक्षण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nमुलींचे शिक्षण; प्रगतीचे लक्षण\nआपल्या देशात महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही. कारण आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. विशेषतः ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण असो की महिलांचे सक्षमीकरण आपल्याकडे परिस्थिती तेवढी चांगली नाही. त्यामुळे याबाबत सरकार आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर कार्य होण्याची गरज आहे. मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे हे समाजाने ओळखायला हवे.\nग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलले जाते. त्यांच्यावरील अन्याय कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्याय महिलांनीच सक्षमरीत्या सामना करून सोडविले पाहिजेत. त्याशिवाय महिलांची प्रगती अशक्य आहे आणि ही शक्ती महिलांमध्ये फक्त शिक्षणामुळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्रोत आहे. शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळते, संजीवनी मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्राबाई फुले यांच्या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. त्यामुळे त्यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडेंच्या वाडय़ात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्त्राr शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते अशी त्यांची धारणा होती. त्यातूनच मग त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. असे महत्त्व सर्व पुरुष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पालक जागरुक नाहीत, असे म्हणण्यापेक्षा मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ही पालकांची भावना अजूनही दूर झालेली नाही. इंग्रजांच्या गुलामीगिरीच्या काळात महिलांनी घराबाहेर जाणे तुच्छ समजले जायचे. ‘चूल आणि मूल’ एवढय़ाच कामासाठी त्या समाजात राबत. घराबाहेर जाणे दूरची गोष्ट. हिंदुस्थान स्वतंत्र झाला त्या वेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्या होती. त्यातल्या त्यात महिलांची निरक्षरता तर देशाच्या प्रगतीत फार मोठा अडसर ठरत आला आहे. त्यामुळे शासन प्रथमपासूनच महिलांच्या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्या विसेक वर्षांपासून शिक्षणाच्या बाबतीत हिंदुस्थानची प्रगती उल्लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा मिळाली. शासनाने मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मुलींचा उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना तसेच लेक वाचवा लेक शिकवा यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करीत होते आणि करीत आहे. त्यांना त्यात काही अंशी यश मिळाले. पण पूर्ण यश मिळालेले नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्या कारणाचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nमुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालकांमध्ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही जेवढे शहरी भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्वतः शिक्षणाच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटत नाही. बरे शिक्षणाचे महत्त्व पटत नाही असे जर म्हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरून थांबवितात. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्याची मुभा दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मुलींना परवानगी दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज प्राथमिक वर्गातील मुलींची संख्या माध्यमिक वर्गात गेल्यावर ५ टक्क्यांपेक्षा कमी होते तर उच्च शिक्षणात त्याहूनही कमी होते. ही गळती मुलींच्या विकासास नक्कीच बाधक ठरत आहे.\nहिंदुस्थानात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. हिंदुस्थानच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्षे आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला. घरातून राजकीय वारसा लाभलेल्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. देशातल्या विविध राज्यांत महिला या मुख्यमंत्री वा इतर महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलीस महासंचालक पदावर किरण बेदींचे नाव ठळक अक्षराने लिहिले गेले. लता मंगेशकर यांना हिंदुस्थानची गानकोकिळा म्हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्लेश्वरी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मिताली राज इत्यादी सर्व महिलांनी आपल्या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध क्षेत्रांत असंख्य महिला आहेत ज्यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्या सर्वांची यादी करीत बसलो तर लांबलचक होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही. कारण आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mhada-will-do-patrawala-chawl-redevelopment/articleshow/62479479.cms", "date_download": "2018-04-20T16:27:10Z", "digest": "sha1:X3YA3R66QCIXXGEZ4PLVCOHGPYXK6TBZ", "length": 25372, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mhada will do patrawala chawl redevelopment | पत्राचाळ रहिवाशांना अखेर दिलासा - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nपत्राचाळ रहिवाशांना अखेर दिलासा\nगोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा विकासकासोबतचा करार रद्द करून संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी म्हाडाने विकासकाला शुक्रवारी अखेर नोटीस पाठवली. अनेक वर्षांपासून रखडवलेला पुनर्विकास, रहिवाशांचे थकवलेले भाडे, म्हाडाच्या हिश्श्याची घरे देण्यास केलेली टाळटाळ केल्याचा ठपका ठेवत विकासकासोबतचा करारच रद्द करण्याचे कठोर पाऊल म्हाडाने उचलले आहे. यामुळे पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nगोरेगाव येथील पत्राचाळीचा प्रकल्प ११ वर्षांपासून रखडला आहे. या चाळीत ६७२ कुटुंबे आहेत. विकासकाने पुनर्विकासाच्या नावाखाली घरे रिकामी केली, मात्र त्यांना अजूनही घरे दिलेली नाहीत. या चाळीत बहुतांश मध्यमवर्गीय मराठी माणसे आहेत. प्रकल्प सुरू झाल्यावर रहिवाशांनी पश्चिम उपनगरांत भाड्याच्या घरात स्थलांतर केले आहे. प्रत्येक रहिवाशाला सरासरी ४० हजार रुपये भाडे देण्याचे विकासकाने मान्य केले होते. परंतु विकासकाने\nरहिवाशांचे दोन ते तीन वर्षांचे जागेचे भाडेही थकवले आहे. रहिवाशांना हक्काची घरे मिळाली नाही आणि भाडेही मिळालेले नाही. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत.\nया चाळीच्या पुनर्विकासातून म्हाडाला तब्बल २ हजार ७०० घरे मिळणार आहेत. विकासकाने मूळ रहिवाशांना घरे दिली नाही व म्हाडालाही घरे दिली नाहीत. मात्र विकासकाने बाजारभावाने घरे विकण्यासाठी ३० मजल्याचे चार ते पाच टॉवर बांधले आहेत. या रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून म्हाडा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत अनेकांकडे असंख्य तक्रारी केल्या होत्या. अखेर शुक्रवारी म्हाडाने विकासकाला नोटीस जारी करून प्रकल्प ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. विकासकासोबतचा करारही म्हाडाने रद्द केला असून विकासकाने विक्रीसाठी बांधलेल्या घरांसह संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. विकासकाला नोटीस पाठवून प्रकल्प ताब्यात घेण्याचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच घटना आहे.\n>>विकासकावर ठेवण्यात आलेले ठपके\n- रहिवाशांना मुदतीत घरे दिली नाहीत\n- रहिवाशांना पर्यायी घरांचे भाडे दिले नाही\n- म्हाडाच्या हिश्श्याची घरे दिली नाहीत\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1पत्राचाळ रहिवाशांना अखेर दिलासा...\n2परवडणाऱ्या घरांसाठी ‘निवारा’चा मेळावा...\n3आचार्य माय-लेकीची मूषकछळातून मुक्तता...\n4अमोल गोळेंवर कथाचौर्याचा आरोप...\n5आरटीई प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर...\n6अवघड विषयांचा सोपा मार्ग...\n8एसी लोकलसाठी प्रवासीवाढ मोहीम...\n9अशोक सावंत यांची हत्या वैयक्तिक वैरातून...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/bajarang.sarode/word", "date_download": "2018-04-20T16:36:15Z", "digest": "sha1:YPJBL25GUUALN7B4QYCGTI3X6YPNC7CQ", "length": 5169, "nlines": 77, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bajarang sarode", "raw_content": "\nआत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत\nबालगीत - आला श्रावण पुन्हा नव्याने...\nपाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल.\nबालगीत - उत्क्रांतीचा आज आम्हांला ...\nमायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्‍ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्‍ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.\nबालगीत - पहा संपला तिमिर सर्व हा ...\nमहापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्‍त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळते.\nवि. आश्रयदाता ; पोशिंदा ; अपंगिता पहा . ज्यासि आपंगिता नाहीं त्यासि धरी जो ह्रदयीं त्यासि धरी जो ह्रदयीं \nना. आश्रयदाता , पोषिंदा , पोसणारा , संभाळणारा .\nना. आश्रयदाता , पोशिंदा , पोसणारा , सांभाळणारा .\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/udayanraje-bhosale-in-satara-265684.html", "date_download": "2018-04-20T16:17:11Z", "digest": "sha1:WCQIV4IVF3444BWRQSICPACVMUJ4ZMFU", "length": 12482, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल,अटक की शरण ?", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nउदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल,अटक की शरण \nउच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहे\n21 जुलै : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांना आता अटक होणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.\nलोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. अटकेच्या कारवाईमुळे उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आज रात्री उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय. पण आता उदयनराजे स्वत: पोलिसांना शरण जातात की त्यांना अटक होते हे पाहण्याचं ठरणार आहे.\nसाताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला.\nत्यानंतर 18 फेब्रुवारीला उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर उदयनराजे आणि सहकाऱ्यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nअभी तक \u0003खेलने के लिए\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/category/featured/", "date_download": "2018-04-20T16:06:28Z", "digest": "sha1:D27UEPTZY3G7S2RPT7PWHE74TDXA2PIS", "length": 7377, "nlines": 75, "source_domain": "rightangles.in", "title": "विशेष | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy वागराज बादरायण April 19, 2018\nकठुआ व उनाव येथील बलात्कार व हिंसाचाराच्या घटनांवरून सध्या मीडिया व सोशल मीडियामध्ये एक वादळ उठले आहे. जम्मू मधील कठुआ मध्ये मुस्लिम बकरवाल समाजातील एका छोट्या मुलीवर देवळात…\nहिंदुत्ववाद्यांचा दहशतवाद आणि कॉंग्रेसचा बोटचेपेपणा\nहेमंत करकरे आज हयात असते तर मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पुरी व्हायला केवळ सात महिने बाकी असताना आज हेमंत करकरे यांची आठवण झाली, ती…\nजम्मूतील कथुआा गावतील बलात्काराच्या घटनेनं देशभर संतापाची व निषेधाची लाट उसळली असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. ‘चित्र उभं राहिलं आहे’, असा शब्दप्रयोग मुद्दामच केला आहे. …कारण ही…\nराजगुरू संघाचे मग नथुराम कोणाचा \nआयुष्यात केलेली चूक कालांतराने लक्षात आल्यावर सज्जन मनुष्य ती कबूल करतो, पश्चाताप करतो आणि लोकही त्याला क्षमा करतात. ही गोष्ट जितकी व्यक्तीला लागू होते तितकीत संघटनेलाही लागू आहे.…\nहुड हुड दबंग दबंग \nसलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर येथील दंडाधिकाऱ्यांनी पाच वर्षांची सजा फर्मावली. तीन वर्षांपेक्षा अधिक सजा झाल्यास आरोपीला न्यायालयात जामीन मिळत नाही. त्यामुळे आता जामीनासाठी सलमान खानला सत्र…\nतुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद\nमध्य प्रदेशमधील भाजप सरकारने चार धार्मिक बाबांना राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. यात कम्प्युटर बाबा, भय्युजी महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज आणि योगेंद्र महंत यांचा समावेश आहे.…\nडॉ भीमराव “रामजी” आंबेडकर\nBy मकरंद सहस्रबुद्धे April 2, 2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापुढे उत्तर प्रदेशात भिमराव रामजी आंबेडकर या नावाने ओळखण्यात येणार आहे. योगी अदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तसा फतवाच जारी केला आहे. बाबासाहेबांच्या वडलांचे रामजी…\nकेम्ब्रिज अनॅलिटीका व फेसबुक यांनी भारतीय मतदारांच्या ‘डेटा’चा गैरवापर केल्याच्या बातम्या गेले आठवडाभर मीडियातून झळकत आहेत. ठळक बातम्यांची जागा व्यापणारी ही भानगड नेमकी काय आहे याचा मात्र बहुतेकांना…\nचीनी कम्युनिस्टांच्या पावलावर पाऊल - एक गायब झालेला लेख\nसदर आशयाचा लेख शेखर गुप्तांच्या द प्रिंट या पोर्टलवर तेरा मार्च रोजी प्रसिद्ध झाला होता. तो त्यांनी ट्विट देखील केला होता, पण चोवीस तासांत त्यांना किंवा द प्रिंट…\nआज्ञा पाळणाऱ्या रोबोंच्या शाळा\nBy श्रुति गणपत्ये March 23, 2018\nभारतामध्ये अलीकडे लहान मुलांसाठी “ग्रेट लिडर्स ” नावाचं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्या जोडीला थेट अॅडाॅल्फ हिटलरला दाखवून जगातल्या महान नेत्यांमध्ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/01/blog-post_29.html", "date_download": "2018-04-20T16:41:49Z", "digest": "sha1:ZMELP6E7DNSC3XTXVPEE5FVEGL2CWJM3", "length": 14240, "nlines": 176, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - १८ जानेवारी २०१५\n· १८ जानेवारी १८४२: महादेव गोविंद रानडे जन्मदिन\n· प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी तेजस हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाइट कॉम्बॅट) विमान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले.\n· एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी पर्रीकर यांच्याकडून या विमानाची कागदपत्रं ताब्यात घेतली.\n· तेजस हे लढाऊ विमान तुलनेने हलके, चपळ आणि योजनाबद्ध हालचाली करणारे लढाऊ विमान असून, हवाई दलाच्या ताफ्यात सध्याच्या मिग-२१ऐवजी आता तेजसचा समावेश होईल.\n· डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्तरीत्या राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची किंमत ३० हजार कोटींच्या आसपास आहे. भारतीय नौदल आणि हवाई दलाला तेजसचा उपयोग होणार आहे.\n· एकूण खर्च : केवळ उत्पादनासाठी ५५ हजार कोटी ( हवाई दल, नौदल आवृत्त्यांसाठी प्रशिक्षण विमान पण कावेरी इंजिन फेल)\n· आता १७ हजार २६९ कोटी खर्च. जेट विमान २२० ते २५० कोटी रुपयांना तर १२० तेजस ३७ हजार ४४० कोटी रुपयांना पडणार.\n· वजन : १२ टन\n· लांबी : १३.२ मीटर\n· उंची : ४.४ मीटर\n· पखांची लांबी : ८.२ मीटर\n· वेग : १,३५० कि.मी. प्रतितास\n· आकाशात भरारी : १५ कि.मी.\n· सर्वाधिक काळ उड्डाण : ४०० कि.मी. (मध्येच इंधन न भरता)\n· ६५ टक्के संपूर्ण स्वदेशी\n· इंजिन व इजेक्शन सीट अमेरिकी बनावटीचे\n· कॅनोपी सीट कॅनडाच्या बनावटीचे\n· आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच माता व अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेच्यावतीने कोल्हापूरात चिरायु योजना सुरू करण्यात आली.\n· इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी पुढील पाच वर्षांत केंद्र सरकार ५०० कोटी रुपये खर्च करणार असून त्यातून ५.४ लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल.\n· त्यापैकी १०० कोटी रुपये यूपीए सरकारने यापूर्वीच दिलेले होते मात्र, ही योजना काही राज्यांपुरतीच मर्यादित होती.\n· या योजनेचा दुसरा टप्पा सर्व राज्यांत लागू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.\n· भारताच्या सानिया मिर्झाने एपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद मिळवले. सानियाचे हे कारकिर्दीतील २३वे जेतेपद आहे.\n· दुहेरीच्या अंतिम फेरीत सानियाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससह खेळताना अमेरिकेच्या अॅबिगेल स्पिअर्स-रॅक्वेल कोप्स जोन्स या जोडीवर ६-३, ६-३ अशी मात केली. ही लढत ६९ मिनिटे चालली.\n· निती आयोगातर्फे २०१५ हे “आंतरराष्ट्रीय मूल्यमापन वर्ष” म्हणून घोषित करण्यात आले आहे.\n· राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना झिम्बाब्वे, कॅनडा, बुरुंडी आणि यूएसए या चार देशांच्या भारतातील नवनियुक्त राष्ट्रदुतांनी आपली अधिकारपत्रे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सादर केली.\n· या राजदूतांची नावे पुढीलप्रमाणे - मॅक्सवेल रंगा (झिम्बाब्वे), नादिर पटेल (कॅनडा), श्रीमती रेजीने काटाबारुम्वे (बुरुंडी) आणि रिचर्ड राहुल वर्मा (यूएसए).\n· १२वी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धा २०१५\n· पुरुष गट :\n· प्रथम - तेजफाए अबेरा (इथिओपिया) (वेळ : २ तास ९ मिनिट ४४ सेकंद)\n· द्वितीय - देरेज देबेले (इथिओपिया) (वेळ : २ तास १० मिनिट २९ सेकंद)\n· तृतीय - ल्युक किबेट (केनिया) (वेळ : २ तास १० मिनिट ५४ सेकंद)\n· महिला गट :\n· प्रथम - दिनकेश मेकाश (इथिओपिया) (वेळ : २ तास २९ मिनिट ५८ सेकंद)\n· द्वितीय - कुमेशी सिचाला (इथिओपिया) (वेळ : २ तास ३० मिनिट ५३ सेकंद)\n· तृतीय - मार्टा मेगारा (इथिओपिया) (वेळ : २ तास ३१ मिनिट ४३ सेकंद)\n· पुरुष गट (भारतीय) :\n· प्रथम - करण सिंह (वेळ : २ तास २१ मिनिट ३४ सेकंद)\n· द्वितीय - अर्जुन प्रधान (वेळ : २ तास २२ मिनिट २१ सेकंद)\n· तृतीय - बहादुरसिंह धोनी (वेळ : २ तास २२ मिनिट ४१ सेकंद)\n· महिला गट (भारतीय) :\n· प्रथम - जैशा ओ. पी (वेळ : २ तास ३७ मिनिट २९ सेकंद)\n· द्वितीय - ललिता बाबर (वेळ : २ तास ३८ मिनिट २१ सेकंद)\n· तृतीय - सुधा सिंग (वेळ : २ तास ४२ मिनिट ११ सेकंद)\n· सगळ्यात छोटा धावपटू: ११ वर्षीय रोहन गोकर्ण हा सहावीत शिकणारा चिमुकला ठरलाय मुंबई मॅरेथॉन ड्रीम रन पूर्ण करणारा सगळ्यात लहान धावपटू. त्याने २ तास १० मिनिटांत ६ किमीचे लक्ष्य गाठले.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २० जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १९ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १८ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १७ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १६ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १५ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १४ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १३ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १२ जानेवारी २०१५\nचालू धडामोडी - ११ जानेवारी २०१५\nचालू धडामोडी - १० जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ९ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ८ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ७ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ६ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ५ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ४ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - ३ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - २ जानेवारी २०१५\nचालू घडामोडी - १ जानेवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/90196", "date_download": "2018-04-20T16:57:35Z", "digest": "sha1:B7H3BG3RC7RTDJ7JM5SATTPIL7U2WUNK", "length": 10651, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news crime सावत्र बाप, मातेकडून मुलीचा देहविक्रय | eSakal", "raw_content": "\nसावत्र बाप, मातेकडून मुलीचा देहविक्रय\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nनाशिक - गंगापूर रोडवरील स्पा सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लावतानाच तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सावत्र बापासह मातेविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुणे पोलिसांकडे पीडित युवतीने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.\nनाशिक - गंगापूर रोडवरील स्पा सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लावतानाच तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सावत्र बापासह मातेविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुणे पोलिसांकडे पीडित युवतीने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.\nपीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ऑक्‍टोबर 2016 मध्ये तिच्या आईने गंगापूर रोडवरील जोए स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लावले. मात्र, त्यानंतर तिची आई व सावत्र बापाने स्पामध्ये येणाऱ्या ग्राहकांशी तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले. पीडित युवतीने नकार दिला असता जबरदस्तीने तिच्याकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेण्यात आला. याप्रकरणी पीडित युवतीने पुणे पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nइचलकरंजीत जबरी चोऱ्या प्रकरणी तिघांना अटक\nइचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहने चोरणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना अटक केली. नागेश हणमंत शिंदे (वय 24,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/when-will-swarajya-ghosh-pada-pada/", "date_download": "2018-04-20T16:26:48Z", "digest": "sha1:Z4P67BLJJEFO47COUGSEYB7GOUEVOGWQ", "length": 39144, "nlines": 348, "source_domain": "www.lokmat.com", "title": "When Will Swarajya Ghosh On Pada Pada ...? | पाड्यापाड्यांवर स्वराज्या घोष...पाड्यात सभा भरणार कधी, सरकारला जाग येणार कधी?.. | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nपाड्यापाड्यांवर स्वराज्या घोष...पाड्यात सभा भरणार कधी, सरकारला जाग येणार कधी\n‘पेसा’ कायद्याने प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले; पण कायदा अंमलात आला, तर त्याचा फायदा मुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. जव्हार तालुक्यातल्या काही गावांनी वयम् चळवळीच्या मदतीने एक निर्णय घेतला. त्यांनी ‘नियमाप्रमाणे’ आपल्या ग्रामसभा स्वतंत्र भरवायला सुरुवात केली, ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवल्या आणि मग प्रशासनाला खडबडून जाग आली..\nस्वराज्य ही माणसाची स्वाभाविक प्रेरणा. म्हणूनच टिळकांनी जन्मसिद्ध अधिकार असा शब्द वापरला. गांधींनी ग्रामस्वराज्य या कल्पनेचा पुरस्कार केला, तोही भारतीय परंपरांमध्ये असलेल्या स्वशासनाच्या रीतींवर आधारित होता. प्रत्येक गोष्टीचे सरकारीकरण किंवा नोकरशाहीकरण ही इंग्रजांनी लादलेली पद्धत. गावातील जमिनींचे सर्व व्यवहार लिहून ठेवण्यासाठी गावाचा एक कुलकर्णी असे. तंटे सोडवण्यासाठी पंच असत. गावाच्या इतरही गरजांसाठी गावाची व्यवस्था होती. सगळे आलबेल होते, असे नाही. प्रत्येक व्यवस्थेत काही मर्यादा काही झुकत्या बाजू असतातच. पण जे काही होते, ते लोकांच्या हातात आणि लोकभाषेत होते. २०व्या शतकाच्या आरंभी आदिम जमातींच्या लोकांच्या जमिनी इतरांनी बळकावल्याचे खटले हाताळणाºया इंग्रज न्यायाधीशांनी लिहून ठेवले आहे, की आमच्याच कायद्याचा गैरवापर आमच्या नाकाखाली होताना आम्ही पाहत आहोत. जमीन कसणारा अडाणी, त्यात ना त्याला कोर्टाची भाषा समजे, ना कायद्याची जाण. त्याला फसवून ज्यांनी कागदपत्रे केली आहेत, अशांच्याच बाजूने कोर्टाचा निकाल जाई. मोठ्या प्रमाणात भिल्ल, कोलता, गोंड यांनी अशा काळात जमिनी गमावल्या. त्यापूर्वी कर्जाचे, गहाणकीचे आणि जमिनीचे इतर व्यवहार गावात देवासमोर तोंडी होत. भाषा सर्वांना समजे. मामला सोपा होता. पण इंग्रजी राज्यात तसे राहिले नाही. जमीन नोंदणी आणि तंट्यांची सोडवणूक हे दोन विषय इंग्रजांनी गावाच्या हातातून काढून घेतले. असेच वनक्षेत्रात वनांमधले जगण्याचे हक्क (तिथली जमीन कसण्याचे, गुरे चारण्याचे, फळे-वस्तू गोळा करण्याचे हक्क) वनकायदा करून काढून घेतले. लहान-सहान गरजा आणि तंटे जे गावातच मिटत ते पोलिसांत-कोर्टात जाऊन रखडू लागले. भारतीय स्वराज्याचा कणा म्हणजे गावांचे स्वराज्य होते. तो कणाच मोडून काढण्याचे काम इंग्रजांनी केले.\nस्वातंत्र्यानंतर बºयाच काळाने ७३वी घटना दुरुस्ती करून पंचायतराज आणण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला; पण त्यातही अजून ग्रामस्तरावर निधी-अधिकार-अधिकारी (फण्ड्स-फंक्शन्स-फंक्शनरीज) पोहचायचेच आहे. गेल्या वर्षी प्रथमच वित्त आयोगाने अधिक निधी ग्रामपंचायतींना आणि तुलनेने कमी निधी जिल्हा परिषदांना दिला. अशा अर्थाने स्वराज्य अजूनही खालपर्यंत पोहचते आहे.\n१९९६ साली अनुसूचित क्षेत्राची विशेष गरज ओळखून पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरियाज्) हा कायदा झाला. हाच कायदा आदिवासी स्वशासन कायदा म्हणूनही ओळखला जातो. या कायद्याने गुलामीच्या काळात गेलेले हक्क पुन्हा गावाकडे म्हणजे त्या गावातले सर्व मतदार मिळून बनलेल्या ग्रामसभेकडे देऊ केले. गावातल्या जमिनींचा वापर, जमिनींचे हस्तांतरण, जंगलातील सर्व गौण वनोपज, गौण खनिजे, सर्व छोटे पाणीसाठे - या सर्व संसाधनांचे हक्क पेसा कायद्याने ग्रामसभेकडे दिले. ग्रामपंचायत ही मंत्रिमंडळाप्रमाणे कार्यकारी यंत्रणा आहे व ग्रामसभा ही विधानसभेप्रमाणे निर्णय घेणारी धोरण ठरवणारी रचना आहे. ग्रामसभेच्या निर्णयांची अंमलबजावणी हे ग्रामपंचायतीचे काम आहे. आदिवासी भागात गावे, पाडे विखुरलेली असतात. लोकसंख्येच्या निकषांनुसार एक ग्रामपंचायत करताना या पाड्यांची मोट बांधली जाते. त्यांचे आपापसात काहीच ऋणानुबंध नसतात. अशा वेळी ग्रामपंचायत आपल्या मनाने कारभार करू लागते. भ्रष्टाचारासाठी सोयीची रचना होते. दुर्गम पाडे कायमचे वंचित राहतात. पेसा कायद्याने हे लक्षात घेऊन प्रत्येक पाड्याला गाव व ग्रामसभेचे अधिकार दिले आहेत. त्या त्या पाड्याची ग्रामसभा आपल्या विकासाचे निर्णय घेईल, शासकीय योजनांचे लाभार्थी निवडील व झालेल्या कामाचे योग्यायोग्य प्रमाणपत्र (युटिलायझेशन प्रमाणपत्र) देईल, अशी तरतूद पेसा कायद्याने करून ठेवली आहे.\nपण कायदा अमलात आला तर त्याचा फायदा होतो. पेसा कायदा संसदेने १९९६ साली पास केल्यानंतर एक वर्षाच्या आत राज्यांनी आपले नियम करणे अपेक्षित होते. महाराष्टÑाने तेव्हा फक्त ग्रामपंचायत कायद्यात काही जुजबी बदल केले व तेच पुरेसे आहे असे जाहीर केले. २०१४ साली महाराष्टÑाने पेसा कायद्याचे स्वतंत्र नियम बनवले. हे नियम देशात सर्वोत्तम मानले जातात. पण या नियमांच्या अंमलबजावणीत गोंधळाचे राज्य आहे. या नियमांनुसार ज्या पाड्याला स्वतंत्र गाव/ग्रामसभा हवी असेल, त्यांनी निम्म्या मतदारांच्या सहीने तसा ठराव करून उपविभागीय अधिकाºयांकडे द्यायचा असतो. त्या अधिकाºयांनी ९० दिवसात या ठरावाची गावात जाऊन पडताळणी करून आपली शिफारस जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची असते. तसे न झाल्यास जिल्हाधिकाºयांनी स्वत: प्रकरण हाती घेऊन पुढच्या ४५ दिवसात आपल्या मान्यतेसह विभागीय आयुक्तांकडे पाठवायचे असते. त्याही मुदतीत हे झाले नाही तर ते गाव घोषित झाले असे मानण्यात येते.\nमुंबईला खेटून असलेल्या आणि कुपोषणाच्या बातम्यांमुळे शासनाला खूप काळजी असलेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप एकही पाडा स्वतंत्र गाव म्हणून घोषित झालेला नाही. तीन-चार पाड्यांचा मिळून एक महसूल गाव असतो. त्या महसूल गावांचीच संख्या पेसा गावे म्हणून दाखवून सध्या प्रशासन आपलीच पाठ थोपटून घेत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार मागच्या दोन वर्षांपासून आदिवासी उपयोजनेचा पाच टक्के निधी पेसा क्षेत्रातल्या गावांना थेट वर्ग करण्यात येत आहे. हा निधीदेखील ग्रामसभेच्या ग्रामकोष खात्यात जाणे अपेक्षित आहे. पण गावे घोषितच न केल्यामुळे हे पैसे ग्रामपंचायतीच्याच खात्यात जात आहेत. या परिस्थितीबाबत जव्हार तालुक्यातल्या काही गावांनी वयम् चळवळीच्या मदतीने एक निर्णय घेतला. त्यांनी शासनाकडे आपला ठराव देऊन नियमांमधली मुदत केव्हाच उलटून गेली होती. आता आपले गाव घोषित झाले आहे असे मानण्यात येईल, हे त्यांना माहीत होते. त्यांनी आपल्या ग्रामसभा स्वतंत्र भरवायला सुरुवात केली. या नवनिर्मित ग्रामसभेतल्या लोकांनी वर्गणी काढून लेटरहेड छापली आणि त्यावरच ग्रामपंचायतीला व इतर यंत्रणांना नोटिसा पाठवून आपली ग्रामसभा स्वतंत्र भरवली. या नोटिसांनी प्रशासनाला खडबडून जाग आली. यांना हा अधिकार दिलाच कोणी, असा प्रश्न शासकीय कर्मचारी विचारू लागले. १३ पाड्यांनी अशा ग्रामसभा घेतल्या. हे पाहून इतरही गावे यात सामील होऊ लागली. आपले हक्क १९९६ पासून आहेत, आता ठराव केल्यावरही शासन हे हक्क देत नाही, या गोष्टीचा रोष लोकांमध्ये निर्माण झाला.\nवयम् चळवळीने हे लक्षात घेऊन लोकशाही पद्धतीने हा रोष प्रकट करण्याचे एक माध्यम म्हणून ग्रामसभा जागरणाचा मेळावा ठरवला. हा कार्यक्रम ग्रामसभा आणि शासनांतील संवादाचा करण्यासाठी मा. पालक मंत्री विष्णू सावरा व शासकीय अधिकारी यांना या कार्यक्रमात आवर्जून बोलावले. जव्हार व मोखाडा तालुक्यातल्या ४२ गावांच्या ग्रामसभा या जागरणात सहभागी झाल्या. या गावांमधले हजारो स्त्री-पुरुष नागरिक सहभागी झाले. प्रचंड मिरवणुकीने लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.\nभातकापणीच्या कामांची धांदल असताना, गावातले अर्धे पुरुष मजुरीच्या शोधात गाव सोडून गेलेले असताना, मेळाव्यात जाऊन कुठलाही वैयक्तिक लाभ होणार नसताना, घरी कडकी असताना स्वखर्चाने प्रवास करून इतके लोक केवळ ‘पाडोपाडी स्वराज्य’ ही घोषणा देत एकत्र आले. ही गोष्ट सामान्य नाही. वैयक्तिक फायद्यासाठी गर्दी कुठेही जमते, आना फ्री जाना फ्री असले तरीही गर्दी जमते. एखाद्या अस्मितेचा झेंडा धरला तरी गर्दी जमते. इथे यातले काहीच नव्हते. तरीही ज्यांना मुख्य प्रवाहात अडाणी-मागास मानले जाते, असे लोक स्वशासनाच्या हक्कासाठी, कायदेपालनाचा सत्याग्रह करायला एकत्र येतात. अशा वेळी सरकारला जाग येणं भाग आहे. या जागरणातली घोषणा होती - पाड्यात सभा भरणार कधी-आत्ता निगुत ताबडतोब सरकारला जाग येणार कधी - आत्ता निगुत ताबडतोब\n(लेखक वयम् चळवळीचे संघटक व राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nता थै...दोन शब्दांमधून निर्माण झालेल्या विश्वाची जादू उलगडताना...\nनगरला झालेय तरी काय\n ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..\nप्लॅस्टिकबंदी : महाराष्ट्रात हे शक्य आहे का\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/landholder-again-start-to-build-unauthorized-chawl-in-kalyan-dombivali/", "date_download": "2018-04-20T16:33:12Z", "digest": "sha1:ENRKHHTSQWJFERZLW63QGPAPEKZZNZXX", "length": 18294, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "कल्याण-डोंबिवलीत खाडी बुजवून चाळी उभारण्याचा गोरखधंदा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nकल्याण-डोंबिवलीत खाडी बुजवून चाळी उभारण्याचा गोरखधंदा\nकल्याण – डोंबिवलीच्या खाडीलगत कांदळवन आणि तिवरांच्या झाडाची कत्तल करून भूमाफियांनी अनधिकृत चाळी उभारण्याचा गोरखधंदा पुन्हा एकदा सुरू केला आहे. पालिका, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि महसूल प्रशासन कारवाईबाबत एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने खाडीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.\nकल्याण-डोंबिवली दरम्यान मोठागाव ते दुर्गाडी असा विस्तीर्ण खाडीकिनारा आहे. मात्र मोठ्य़ा प्रमाणात होत असलेली तिवरांची कत्तल आणि रेती उत्खननामुळे खाडीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. शिवाय खाडीकिनारी अनधिकृत बांधकामेही वाढत होती. डोंबिवली देवीचापाडा खाडीकिनारी कांदळवन व तिवरांच्या झाडाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे राजरोस सुरू आहेत. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तहसील कार्यालयाने दोन वेळा चाळी तोडण्याची कारवाई केली. मात्र तोंडदेखल्या कारवाईचा भूमाफियांवर काहीच परिणाम झाला नाही. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी खाडी बुजवून दोन दिवसांत चाळी उभ्या केल्या जातात. देवीचापाडा येथे तर भूमाफियांनी बेकायदा बांधकाम साहित्याचा साठा केला आहे. तरीही पालिका प्रशासन, महसूल, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड काहीच कारवाई करत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.\nखाडी विकासाला मुहूर्त मिळेना\nभूमाफिया आणि वाळूमाफियांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एप्रिल २०१७ मध्ये कल्याण खाडी येथे धाड टाकली होती. यावेळी क्रेन, बार्ज, बोटी, सक्शन पंप अशी रेती उत्खननाची मोठी साधनसामग्री नष्ट केली. या कारवाईदरम्यान त्यांनी रेतीमाफियांचे कायमचे कंबरडे मोडण्यासाठी महापालिकेस खाडीकिनारा विकसित करण्याची सूचना केली होती. याची दखल घेऊन पालिकेने खाडीकिनारा विकसित करण्याचा निर्णय घेतला. मात्र खाडीकिनारा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचा ना हरकत दाखला मिळणे आवश्यक होते. मात्र खाडीकिनारा विकसित करण्याचे काम रखडल्याने आता पुन्हा वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत. शिवाय चाळमाफियांनी खाडी बुजवून बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराजस्थानात विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये जीन्स घालण्यावर बंदी\nपुढीललाठीमाराच्या निषेधार्थ पडेगाव-मिटमिटामध्ये कडकडीत बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nagoshi/word", "date_download": "2018-04-20T16:37:50Z", "digest": "sha1:METT274RWTNLJPVP7SITI5273LVE3QG5", "length": 7123, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nagoshi", "raw_content": "\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे १ ते ५०\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे ५१ ते १००\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे १०१ ते १५०\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे २५१ ते ३००\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे ३०१ ते ३५०\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे ३५१ ते ४००\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे ४०१ ते ४१५\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nक्रि.वि. ( गो .) केव्हां ; केव्हांशा .\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/dance-floor-ins-school/", "date_download": "2018-04-20T16:12:44Z", "digest": "sha1:ZGJLGB2UEY64KEKTXICFXKAFPVTJSSVL", "length": 23184, "nlines": 249, "source_domain": "khaasre.com", "title": "वर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल 0\nयुट्युबवर सध्या हा विडीओ धुमाकूळ घालत आहे.\nआपल्या येथे टॅलेंटची कमी नाही, पण योग्य ती संधी आणि व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अशा लोकांना कधीच प्रसिद्धी अनुभवता येत नाही. पण सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्याप्ती एवढी आहे, त्यामुळे सामान्यांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आता या व्हिडिओमधल्या दोन विद्यार्थ्यांचंच घ्या ना वर्गात दोघंही नृत्याचा सराव करत आहेत. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ काढून कोणीतरी तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असला तरी पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या नृत्यशैलीचं खूप कौतुक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. युट्युबवर आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nPrevious Articleसाहसकथा महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारीचीNext Articleमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nभारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या… 0\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाला राखी हा शब्द माहित असेल का हे नक्की सांगता येणार नाही. परंतु मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भारतातील गावाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एका सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे व आता त्याच गावातून हिंदू मुस्लीम महिला,मुली डोनाल्ड ट्रम्प यांना १००१ राख्या पाठविणार आहेत. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे या करिता हे पाउल उचललेले आहेत.\nमेवात भागातील मरोरा या गावातील हि घटना. भारत आणि अमेरिका संबंध अधिक चागले व्हावे याकरिता आम्ही हे पाउल उचलले असे सेवाभावी संस्थे कडून सांगण्यात आले.\nसुलभ अंतरराष्ट्रीय सामजिक सेवा संस्था (SISSO) यांचे प्रमुख बिंदेश्वर पाठक यांनी या गावाचे नामकरण Trump Village (ट्रम्पवाडी) केले तेव्हापासून हे गाव अधिक चर्चेत आले.\nदिल्ली पासून १०० किलोमीटर अंतरावर मारोरा हे गाव आहे. गावाचे नामकरण झाल्यानंतर प्रशासनास गडबडून जाग आली व जिल्हा प्रशासनाने हे अनअधिकृत ठरवून गावातील काही बोर्ड काढण्यात आले.\nमरोरा गाव गुरगाव पासून ६०किमी अंतरावर पूर्णा तहसील मध्ये आहे. जवळपास १८०० लोकसंख्येचे गाव..\nस्त्री सबलीकरणाकरिता आम्ही अनेक कार्यक्रम या गावात राबवत आहोत, या संस्थेच्या उपाध्यक्ष मोनिका जैन यांनी सांगितले.\nनरेंद्र मोदि व डोनाल्ड ट्रम्पला गावातील सर्व स्त्रिया मोठा भाऊ मानतात म्हणूनच १००१ राख्या डोनाल्डला व ५०१ राख्या मोदीना त्यांनी पाठविल्या.\n७ ऑगस्टला ह्या राख्या अमेरिकेला व्हाईट हाउस मध्ये पोहचतील त्यासोबत मोदी व ट्रम्प या दोघांना गावात येण्याचे आमंत्रण हि देण्यात आलेले आहे.\nचला आता बघूया या दोन भावाकडून त्यांच्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त काय भेट मिळेल…\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nसनी लिओनि नायक नाही खलनायक हु मै वर नाचली आणि कहर झाला… 0\nसनी लीयोनीच्या वैयक्तित आयुष्या विषयी लोकांना पाहण्यात किंवा वाचण्यात फार उस्तुकता असते तिचे व्यक्तिमत्व आहेच तसे. काही दिवसा अगोदर तिने स्टेजच्य मागे डान्स केला आणि झाला कि धूर…\nअसाच तिच्या या रोमांचकारी आयुष्यातला एक क्षण आपल्याला दाखवायला आणला आहे आम्ही..\n१९९० च्या दशकातील संजय दत्त यांनी हिट केलेले खलनायक चित्रपटातील गीत आता आपल्या समोर घेऊन येत आहे सनी खासरे वर…\nदेसी तडका देणाऱ्या या बेबी डॉल चा हा विडीओ बघा आणि मन प्रसन्न करून घ्या..\nसंजू बाबा हे गाणे बघल्यावर या बेबी डॉल मी सोने दि ला काय प्रतिक्रिया देणार का \nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\nशेतिचा Blue Whale Challenge गेम कसा असतो नक्की वाचा… 1\nशेतीचा ब्ल्यू व्हेल गेम\nजगातील सर्वात मोठा जुगार शेतकरी खेळतो. जर ही शेती ब्लु व्हेल मधे असतीलतर कसे राहीले असते टास्क नक्की वाचा व विचार करा…\n५ एकर शेती कसायची \n२ री Task मोगडणी\n३ री Task वेचणी\n५ वी Task कोळपणी\n७ वी Task पेरणी साठी पैसे मागायला सावकाराची उंबरठे झिजवणे\n१० वी Task पेरणी करिता खत बियाणे घेण्यासाठी दोन दिवस लाईन मध्ये राहणे\n१२ वी Task पावसाची दिवसेंदिवस वाट बघत बसणे\n१५ वी Task एका बैलावर पेरणी करणे\n१६ वी Task घरातल्या बायका पोरांना दोनचार महीने फुकट राबविणे\n१७ वी Task परत पावसाची वाट बघत बसणे\n१८ वी Task पिक विमा भरण्यासाठी उपाशी पोटी दिवस दिवस लाईन मध्ये उभे राहणे\n१९ वी Task रात्री अपरात्री पिकाला पाणी देणे\n२० वी Task रानटी डुकरांचा सामना करणे\n२१ वी Task हाती आलेल्या पिकाची पावसाने केलेली नासधूस बघत बसणे\n२२ वी Task पिक काढणी साठी मजूर शोधने\n२३ वी Task शेतमाल ठेवण्यासाठी बारदाना घेणे\n२४ वी Task शेतमाल बाजारात नेहूण कवडीमोल भावात विकणे\n२५ वी Task बाजारातून हात हालवत परत येणे\n२६ वी Task मुलीच्या लग्नासाठी बैल शेती विकणे\n२७ वी Task मुलांची शिक्षणं बंद करणे\n२८ वी Task सावकारी कर्जासाठी नको ती बोलणी खाणे\n२९ वी Task दिवस दिवस उपाशी राहणे\n३० वी Task आपल्याच शेतात विष पिणे , झाडाला फाशी घेणे\nतेव्हा ही गेम जिंकतो …\nजिंकणार् याला १ लाख रुपये बक्षिस\nतर मग कोण कोण खेळणार ही गेम\nWhatsApp update विचार करायला लावणारी पोस्ट\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र - February 28, 2018\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक… - February 12, 2018\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची… - February 10, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-04-20T16:18:56Z", "digest": "sha1:62P6LIRZANZQNIS7ILGGS7QINVYXIRJV", "length": 6886, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आळे केसरीचा मानकरी ठरला अक्षय पवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआळे केसरीचा मानकरी ठरला अक्षय पवार\nआळेफाटा-आळे (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध देवस्थान संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर यात्रा उत्सव उत्साहात झाला. या यात्रेत आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यामध्ये आळे केसरी मानाची गदा व 10 हजार रूपये रोख बक्षीसाचा बहुमान अहमदनगर येथील अक्षय पवार या मल्लाने पटकावला. अतिशय अनोखा व चांगला प्रयोग यावेळी पै. संजय पाटील भुजबळ, पै. नारसोडे आखाडा विभागाच्या वतीने सर्व मल्लांचं वजन करून त्या-त्या वजनी गटातील कुस्त्या खेळविण्याचे ठरविले. त्यात काही नुरा कुस्त्या करणाऱ्या लबाड मल्लांनी मैदानातून काढता पाय घेतला. खऱ्या अस्सल मल्लांनी खेळ करून दाखविला व कुस्ती शौकिनांनी त्यास भरभरून प्रदिसाद दिला. अतिशय सुरेख असा अस्सल कुस्त्यांचा खेळ पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.\nया प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, आशा बुचके, शिवसेना तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, संगीता वाघ, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, शाम माळी, अशोक सोनवणे, आनंद रासकर, अतुल भांबेरे, भिमाजी गडगे, चंद्रकांत वाव्हळ, कान्हू पाटील कुऱ्हाडे, कुस्ती शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीगिरांसाठी या ठिकाणी चांगले कुस्ती स्टेडिअम उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजामीन नव्हे, जमीन घेऊ\nNext article21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता, 66 पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-20T16:36:14Z", "digest": "sha1:PGRWHHNVGXTMORSMZ5BV4NCXNCMBRWCB", "length": 5521, "nlines": 58, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "दशक चौथा - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: दशक चौथा हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:दशक चौथा येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.\nनेमके काय केले आहे मी काही मदत करू शकतो का मी काही मदत करू शकतो का\nसध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः दशक चौथा आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा दशक चौथा नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:दशक चौथा लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित दशक चौथा ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित दशक चौथा ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.\nजानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ०२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/word", "date_download": "2018-04-20T16:43:41Z", "digest": "sha1:F2O3LSBMN6XVKPSWYCLUO7JZRHFEQ27F", "length": 8791, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - सारावली", "raw_content": "\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\nएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-20T16:36:38Z", "digest": "sha1:6VE44R3LVSYDOOAZYBMWFIZQGJ6T2WSJ", "length": 8159, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धामण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nधामण (english:Common rat snake ; शास्त्रीय नाव:Ptyas mucosus) ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्र आहे परंतु अज्ञानाअभावी अनेकवेळा ती मारली जाते.\nधामणीचा आढळ अशियातील बहुतेक देशांमध्ये आहे. भारतात तसेच भारतीय उपखंडात विपुल प्रमाणात आढळते. तिचे मुख्य वसतीस्थान शेती व जंगले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हमखास आढळून येते भर शहरात देखील बागांमध्ये हीचा वावर दिसून येतो.\nधामीणीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके, मोठे डोळे व जबड्याखालील रेषा. धामण अतिशय लांब असते. सरासरी लांबी ८ ते १० फुट असते व १२ फुटापर्यंत वाढू शकते. धामण ही डोक्यापासून शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते व शेपटी ही अतिशय टोकदार असते. त्वचा ही हलक्या अथवा गडद हिरव्या, पोपटी, गडद करड्या रंगात असते. नागांशी रंगात व अंगावरील पट्यांमध्ये तसेच लांबीमध्ये मान उंचावून पहाण्याच्या सवयीमध्ये बरेच नागाशी साधर्म्य असल्याने बहुतेकदा नाग समजून धामीणीला मारले जाते. धामणीचा वेग हे तिचे वैशिठ्य आहे. अत्यंत वेगाने हालचाल करून भक्ष्य मिळवण्यात धामण पटाईत आहे.\nधामणीचे मुख्य खाद्य उंदीर घुशी व तत्सम कुरतडणारे प्राणी, एक धामण वर्षाला ६० हून अधिक उंदराचा फडशा पाडते त्यामुळे धामण ही शेतकऱ्याची मित्र आहे. महाराष्ट्रात धामणीबद्द्ल माहिती असलेले शेतकरी धामणीचा आदर करतात असे पहाण्यात आले आहे.\nमानवी हस्तक्षेप आणि औद्योगिक प्रदूषणामुळे धामणीला विविध आजार होतात. भारतात अजगर आणि नाग वगळता, धामणीवर सगळ्यात जास्त गोचिडी सापडतात. तसेच अल्बिनो (धवलता) नावाचा जनुकीय आजार ही गुजरात आणि विदर्भातून (अमरावती) नोंदविला गेला आहे. हिंदीत हा साप 'घोडापछाड' किवा 'दरश' नावाने प्रसिद्ध आहे.\nधामीणीची लांब टोकदार शेपूट.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/03/blog-post_37.html", "date_download": "2018-04-20T16:42:34Z", "digest": "sha1:BOT5F7DXLWOD2PIBXCBKRCUEJFTAOCBO", "length": 13194, "nlines": 270, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : प्रश्नसंच १४८ - भूगोल", "raw_content": "\nप्रश्नसंच १४८ - भूगोल\n[प्र.१] कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारे निश्चित होईल\n१] नर्मदेचा त्रिभुज प्रदेश\n[प्र.२] आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपिमुळे प्रभावित आहे. मृदा धुपिखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते\n[प्र.३] उसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रुपांतर होऊ शकते\n[प्र.४] खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुवृत्तीय हवामानात आढळत नाही\n१] येथे हिवाळा नसतो.\n२] दुपारी पाउस पडतो.\n३] वर्षभर सारखेच तापमान असते.\n[प्र.५] मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या ६३ टक्के खनिज तेल तर ८० टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी. ला येथे सर्वप्रथम १९७४ मध्ये तेल सापडले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे\n[प्र.६] आंतरराष्ट्रीय तिथी / वार रेषा म्हणजे काय\n१] जिच्या दोन्ही बाजूंच्या वेळांमध्ये २४ तासांचे अंतर असते.\n२] जेथील वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा २४ तासांनी मागे असते.\n३] जेथील वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा २४ तासांनी पुढे असते.\n४] जिच्यापासून जगातील सर्व देशांसाठी तिथी निर्धारण केले जाते.\n१] जिच्या दोन्ही बाजूंच्या वेळांमध्ये २४ तासांचे अंतर असते.\n[प्र.७] गंगाखेड हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे\n[प्र.८] पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा.\nवरीलपैकी कोणता ‘अग्नीकंकणाचा’ भाग आहे\n२] अ आणि ब\n३] ब, क आणि ड\n[प्र.९] भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण .....\nअ] मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून असणे.\nब] मासे साठविण्याच्या मर्यादित सोई\nक] सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही.\nड] जास्त चांगली बाजारपेठ नाही.\n१] फक्त अ, क आणि ड\n२] फक्त ब. क आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\n[प्र.१०] खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफ़ळानुसार उतरता क्रम लावा.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nप्रश्नसंच १५० - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ मार्च २०१५\nसोलर इम्पल्स – २\nचालू घडामोडी - २५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र\nप्रश्नसंच १४८ - भूगोल\nचालू घडामोडी - २४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४७ - इंग्रजी व्याकरण\nचालू घडामोडी - २३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४६ - मराठी व्याकरण\nचालू घडामोडी - २२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४५ - इतिहास\nचालू घडामोडी - २१ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १९ व २० मार्च २०१५\nबेटी बचाव बेटी पढाओ अभियान\nचालू घडामोडी - १७ व १८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४३ - सामान्यज्ञान\nचालू घडामोडी - १६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४२ - विज्ञान तंत्रज्ञान\nप्रश्नसंच १४१ - अर्थशास्त्र\nप्रश्नसंच १४० - भूगोल\nचालू घडामोडी - १४ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३९ - इतिहास\nचालू घडामोडी - १२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३८ - पर्यावरण\nप्रश्नसंच १३७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३६ - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - १० मार्च २०१५\nप्रश्नसंच १३५ - अर्थशास्त्र\nचालू घडामोडी - ९ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३४ - राज्यशास्त्र\nचालू घडामोडी - ८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३३ - भूगोल\nचालू घडामोडी - ७ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३२ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - ५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३१ - इतिहास\nचालू घडामोडी - ४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३० - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - ३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२९ - अर्थशास्त्र\nभारताचा आर्थिक पाहणी अहवाल २०१४-१५\nप्रश्नसंच १२८ - राज्यघटना\nचालू घडामोडी - १ व २ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२७ - भूगोल\nचालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१५\nप्रश्नसंच १२६ - इतिहास\nचालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-04-20T16:31:54Z", "digest": "sha1:2TMDLS6DN2LV6D6MUGYCR2NAJ5NMGOLG", "length": 13382, "nlines": 124, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "हृदयविकार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nधमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.\nआपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.\nजर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.\nतीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर तिच्यातून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि हृदयाला रक्त अपुरं पडू लागतं.\nया धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो\nहृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला. गेल्या ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत हृदयाविषयीचं वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान हे शवविच्छेदनातून मिळालेलं होतं. कारण जिवंतपणी हृदयाचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आवश्यक ती साधनं त्या काळापर्यंत उपलब्ध नव्हती.\nडॉ. डीन ऑर्निश यांचा कार्यक्रम\nहृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का\nजगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/90-percent-engineers-guilty-in-road-scam/articleshow/62465831.cms", "date_download": "2018-04-20T16:37:35Z", "digest": "sha1:YVS53B35HBTHDY32FDY6BH3WRCETA447", "length": 26639, "nlines": 250, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "90 percent engineers guilty in road scam? | पालिकेचे ९० टक्के इंजिनीअर दोषी? - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nपालिकेचे ९० टक्के इंजिनीअर दोषी\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:\nरस्तेघोटाळ्याच्या ३४ रस्त्यांच्या पहिल्या टप्प्यातील चौकशीत मुंबई महापालिकेच्या सेवेतील ९६ इंजिनीअर दोषी ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या २०० रस्त्यांच्या चौकशीतही सुमारे ८०हून अधिक इंजिनीअर दोषी ठरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ३० जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील घोटाळ्याचा चौकशी अहवाल जाहीर होणार आहे. या अहवालात पाच इंजिनीअरना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे समजते. दोषी इंजिनीअरना पदावनती, वेतनवाढ बंद, रोख रकमेची दंडात्मक कारवाईची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दोन्ही टप्प्यांच्या घोटाळ्यात सुमारे ९० टक्के इंजिनीअर भ्रष्ट असल्याचे लवकरच उघड होणार आहे.\nपालिकेत एकूण २३४ रस्तेकामांत गैरव्यवहार झाला असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३४ रस्त्यांचा चौकशी अहवाल मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला. एकूण ३५२ कोटींच्या रस्तेघोटाळ्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात रस्ते विभागाचे तब्बल १९१ इंजिनीअर दोषी ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील घोटाळ्यात १०० इंजिनीअरची चौकशी करण्यात आली असून, ९६ इंजिनीअर दोषी ठरले, तर दुसऱ्या टप्प्याच्या ९१ इंजिनीअरच्या चौकशीत ८० इंजिनीअर दोषी ठरणार असल्याचे सांगितले जाते. सर्व १९१ इंजिनीअरमधील ८२ इंजिनीअरचा दोन्ही टप्प्यांतील घोटाळ्यात सहभाग आहे.\nएग्झिक्युटिव्ह इंजिनीअर, डेप्युटी चीफ ते ज्युनिअर पदांपर्यंतचे हे इंजिनीअर असून, त्यांना सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या. दोषींचे वर्गीकरण करून गैरव्यवहारानुसार संबंधितांना शिक्षा निश्चित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील २०० रस्तेकामातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. ८२ इंजिनीअरचा दोन्ही टप्प्यांतील घोटाळ्यात सहभाग असल्याने यापूर्वी दोषी ठरणाऱ्यांच्या कारवाईत बदल होऊ शकतात, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nमुंबईतील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो दाखल करून मुंबई महापालिकेला दणका दिला आहे. राज्यभरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या वाईट अवस्थेची नोंद घेत उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारचे लक्ष वेधले. ‘रस्त्यांची देखभाल करून ते सुस्थितीत ठेवणे, ही स्थानिक प्रशासनांची जबाबदारी आहे. मात्र, ते करत नसतील, तर राज्य सरकार असहाय्य नाही, सरकार त्यांच्यावर कारवाई करू शकते, असे मत व्यक्त करत न्यायालयाने पालिकेला चपराक दिली आहे.\n• रस्तेकामानंतर काही काळातच दर्जा घसरला\n• डेब्रिज इतरत्र टाकण्याच्या वाहतुकीत गैरव्यवहार\n• निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरास अटकाव नाही\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nAnand Mahindra: '...मी जल्लाद व्हायला तयार आहे'\nWankhede Molestation: विनयभंग करणारा अटकेत\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nराज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या\n'एल्गार' पुकारणाऱ्यांवर मुंबई, पुण्यात धाडी\nमोदींचा 'मनमोहन' झाला: उद्धव ठाकरे\nनाट्य संमेलन मुंबईत; कीर्ती शिलेदार अध्यक्ष\nदोन विद्यार्थिनींचा लोकल अपघात\n1पालिकेचे ९० टक्के इंजिनीअर दोषी\n2प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देणारी नवशिक्षणाची वारी\n3मुद्रणशैलीतज्ज्ञ मुकुंद गोखले कालवश...\n5कमला मिल आग: आता उरला युग तुली...\n6कोस्टल रोडला सी-लिंकची जोडणी...\n7धोकादायक मांजाची विक्री बाजारात चालूच...\n8म्हाडाच्या सेवाशुल्क वसुलीला वाढता विरोध...\n9हृदयेश फेस्टिव्हलमध्ये दिग्गजांची मांदियाळी...\n10स्कूल व्हॅनवर नजर; थेट तक्रारीसाठी टोलफ्री नंबर...\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-20T16:45:49Z", "digest": "sha1:UBFQ2N2CY65IY3A6N3MIS6ZKJCSW75Y4", "length": 4760, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोल्फिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरोल्फिंग ही एक उपचारपद्धती आहे.\nप्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती\nॲलोपॅथी · शल्यचिकित्सा · होमिओपॅथी ·आयुर्वेद · युनानी · निसर्गोपचार · बाराक्षार पद्धती ·प्राणायाम · योगासन ·ॲक्युपंक्चर · ॲक्युप्रेशर · चुंबकिय उपचार · मेटामॉर्फिक तंत्र ·रेडिऑनिक्स · प्रतिमा तंत्र ·शरीर-मनोवैद्यक ·कायरोप्रॅक्टिक · शारीर तंत्र · मसाज · रोल्फिंग · फेल्डेनक्रेस · ऑस्टिओपॅथी · उर्जावैद्यक · किरणोपचार · ताई ची व ची गाँग · संगीतोपचार · जलोपचार · सायमाथेरपी · आयरिडॉलॉजी · कायनेसिऑलॉजी ·रसायनोपचार · आहारशास्त्र · पूर्णोपचार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2018-04-20T16:46:14Z", "digest": "sha1:XW4IHVDIO35A6G637A3NYXECRMSMPCRD", "length": 10300, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्लिनिकल रिसर्च - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nज्या प्रक्रियेत नवीन औषधांवर संशोधन केले जाते त्या प्रक्रियेस क्लिनिकल रिसर्च असे म्हणतात. या प्रक्रियेत दोन घटक मुख्यत्वे तपासले जातात. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे (औषधांची) काम करण्याची क्षमता. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती करण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारणतः १२ वर्षे असतो आणि त्यासाठी ५०० मिलियन (५०० दशलक्ष म्हणजे ५० कोटी) ते १ बिलियन (१०० कोटी) अमेरिकी डॉलर खर्च येतो.[ संदर्भ हवा ] इतका खर्च येण्याचे कारण यात मानवप्राण्यावर प्रयोग केले जातात. आणि थोडीशी चूकही ज्याच्यावर प्रयोग केला जातो अशा रुग्णाच्या(प्रयुक्त्याच्या) जीवावर बेतू शकते वा त्याच्या आरोग्याची मोठी हानी करू शकते. क्लिनिकल रिसर्चमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जाते.\n१ क्लिनिकल रिसर्चचे विविध टप्पे\n५ चौथा आणि शेवटचा टप्पा\nक्लिनिकल रिसर्चचे विविध टप्पे[संपादन]\nमुख्यत्वे यात ४ टप्पे असतात .\nयात एखाद्या विशिष्ट औषधाचा प्रयोग धडधाकट व्यक्तीवर केला जातो. जे औषध नवे असते, म्हणजे ज्याचा वापर मानवजातीत कोणावरही केला गेलेला नसतो, असेच औषध या प्रयोगात वापरण्यात येते. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची सुरक्षितता बघणे हा असतो. पहिल्या टप्प्याच्या प्रयोगात मोठ्या प्रमाणात धोका असतो. प्रयुक्ताचे काहीही बरेवाईट यात होऊ शकते. याच कारणासाठी या टप्प्यात ९-१० धडधाकट व्यक्तींची निवड केली जाते. म्हणजे जेणेकरून एखादा धोका आलाच तर तो पचवता यावा. रोगी माणसाचे शरीर मुळातच कमजोर झाले असल्याने त्यावर हा प्रयोग करण्यात येत नाही. भारतात या पहिल्या टप्प्याच्या प्रयोगाची परवानगी देण्यात येत नाही. या प्रयोगादरम्यान प्रयुक्ताचे काटेकोर निरीक्षण केले जाते आणि कुठल्याही अपघाताची शक्यता वाटल्यास हा प्रयोग त्वरित थांबवण्यात येतो.\nया टप्प्यात साधारणतः १० ते ३०० व्यक्तींवर प्रयोग केले जातात. प्रयोग ज्यांच्यावर केले जातात ते प्रयुक्त रुग्ण असतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची परिणामकारकता बघणे हा असतो. या टप्प्यातही सुरक्षितता देखील बघितली जाते. इथे औषध परिणामकारक वाटले तर ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचते.\nया टप्प्याला प्री-मार्केटिंग टप्पा असेही म्हणतात. हा टप्प्याचा प्रयोग उचितरीत्या पार पडल्यास आणि सरकारला त्याचे निकाल योग्य वाटल्यास सरकार त्या औषध कंपनीला ते विशिष्ट औषध विकण्याची परवानगी देते. या टप्प्यात प्रयोगासाठी साधारणतः ३०० ते ३००० प्रयुक्त असतात. त्यामुळेच त्या विशिष्ट औषधाचे अनावश्यक परिणामसुद्धा या प्रयोगात नीट कळतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश आधीच्या टप्प्यात मिळालेल्या माहितीवर शिक्कामोर्तब करणे हा असतो. यामध्ये केलेले अभ्यासाचे जवळ जवळ २ ट्रक भरतील इतके कागद तयार होतात. ही कागदपत्रे सरकारला पाठवण्यात येतात.\nचौथा आणि शेवटचा टप्पा[संपादन]\nआज बाजारात मिळणारी सर्व औषधे या टप्प्यातली असतात. या टप्प्यात औषधांवर, व ते ज्या रुग्णांना दिले त्यांवर लक्ष ठेवले जाते. एखादे औषध गडबड तर करीत नाही ना, हे यामध्ये बघितले जाते. आणि जर एखाद्या औषधाने फार मोठी गडबड केलीच तर ते औषध बाजारातून काढून घेतले जाते. भारत सरकारने काही औषधांवर अश्या कारवाया २०१०-२०११मध्ये केल्या होत्या.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१६ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/nasiket/word", "date_download": "2018-04-20T16:34:04Z", "digest": "sha1:ITEP5NOGQEI6H2EULRSD6PPLW6XRSMPX", "length": 9422, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - nasiket", "raw_content": "\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली.\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय २\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ३\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ४\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ५\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ६\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ७\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ८\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ९\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १०\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय ११\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १२\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १३\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १४\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १५\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १६\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १७\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १८\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nनासिकेतोपाख्यान - अध्याय १९\nमहीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .\nजिल्हा निर्वासित प्रबंध अधिकारी\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/virat-kohli-and-anushka-sharma-may-have-to-tie-the-knot-again/articleshow/62424176.cms", "date_download": "2018-04-20T16:32:16Z", "digest": "sha1:DC7NL5WJ7M6BOSDASQBAQPHHKWQYJFK6", "length": 24038, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "virushka wedding:virat kohli and anushka sharma may have to tie the knot again | विरुष्काला पुन्हा करावं लागणार लग्न - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nविरुष्काला पुन्हा करावं लागणार लग्न\nइटलीत शाही विवाह, रमणीय रोममध्ये मधुचंद्र आणि त्यानंतर रिसेप्शनचा 'डबल बार' उडवून देणाऱ्या विरुष्काला पुन्हा एकदा लगीनगाठ बांधावी लागू शकते. लग्नाची कुणाला कानोकान खबर लागू नये म्हणून सगळंच 'गुपचूप गुपचूप' करण्याच्या नादात ते एक महत्त्वाची गोष्टही विसरले आणि त्याच चुकीमुळे विरुष्काला 'शादी नं. २' करावी लागण्याची शक्यता आहे.\nटीम इंडियाचा चमकता तारा विराट कोहली आणि बॉलिवूड तारका अनुष्का शर्मा ही जोडी ११ डिसेंबरला लग्नबंधनात बांधली गेली होती. इटलीतील टस्कनी शहरात त्यांनी 'चुपके चुपके' सात फेरे घेतले होते. भारतीय व्यक्ती जेव्हा विदेशात लग्न करते, तेव्हा तिथल्या विवाह कायद्यानुसार त्याची नोंदणी केली जाते. परंतु, विराट-अनुष्कानं रोममधील भारतीय दूतावासाला आपल्या लग्नाबाबत काहीच कळवलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं लग्न विदेशी विवाह कायदा १९६९ अन्वये झालेलं नाही. स्वाभाविकच, त्यांच्या लग्नाची नोंदणी कशी होणार, हा प्रश्न आहे. आता त्यांना ज्या राज्यात विवाह नोंदणी करायची असेल, तिथल्या नियमानुसार त्यांना पुन्हा एकदा लग्न करावं लागेल, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या एका वकिलाला माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.\nदरम्यान, विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. अनुष्काही त्याच्यासोबत केपटाउनला गेली होती. परंतु, स्वतःची निर्मिती असलेल्या 'परी' या चित्रपटाचं प्रमोशन आणि 'झिरो' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगसाठी ती भारतात परतली आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nजान्हवीसाठी अर्जुननं वेबसाईटला सुनावलं\nवरुण धवनला भेटण्यासाठी 'ती' घरातून पळून आली\nराधिका आपटेची हॉलिवूडमध्ये एंट्री\n1विरुष्काला पुन्हा करावं लागणार लग्न...\n3'पद्मावत'ला राजस्थानचे दरवाजे बंदच...\n4मला आलियाची माफी मागायची आहे: करण जोहर...\n5'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली...\n6नोराचा हा व्हिडिओ ३० लाखवेळा पाहिला गेला...\n7अमिताभ यांनी कपड्यांवर लिहिली फनी कविता...\n8सलमाननं लवकरच बाबा व्हावं: राणी मुखर्जी...\n9तीनशे सिंगल स्क्रीनवर पडदा\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/04/CurrentAffairs25April2016.html", "date_download": "2018-04-20T16:34:13Z", "digest": "sha1:XMOGQDQTN7YVBTICYPWAAE5WMKDWPJZR", "length": 13478, "nlines": 161, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी : २५ एप्रिल", "raw_content": "\nचालू घडामोडी : २५ एप्रिल\nकेंद्रीय पुनर्गुंतवणूक विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. हा विभाग आता 'डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट' अर्थात 'दीपम' म्हणून ओळखला जाईल.\nयंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे चालू आर्थिक वर्षात पुनर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५६ हजार ५०० कोटी रुपये उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.\nएकूण रकमेपैकी ३६००० कोटी रुपये सरकारी कंपन्यांच्या अल्प हिस्साविक्रीतून तर, उर्वरित २०,५०० कोटी रुपये नफ्यात आणि तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीतून उभारण्यात येतील.\nदत्तू भोकनळ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र\nभारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला दत्तू भोकनळ याने रिओ (ब्राझील) ऑलिंपिकसाठी नौकानयन (रोइंग) क्रीडा प्रकारात पात्रता मिळविली आहे.\nकोरिया येथे २०१६ ‘फिसा’ (FISA) आशिया अँड ओसेनिया कॉन्टिनेंटल ऑलिंपिक पात्रता स्पर्धेमध्ये एकेरी पुरुष (सिंगल स्कल) त्याने हे यश मिळविले आहे.\nसैन्यदलात भरती झाल्यानंतर दत्तूने रोइंगचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्याने विविध स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केलेली आहे.\n२०१५मध्ये बीजिंग (चीन) येथे झालेल्या आशियाई नौकानयन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ७:१८:४१ अशी वेळ नोंदवत रौप्य पदकाची कमाई केली होती.\nदत्तू भोकनळ हा पुण्यात द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.\nसंदीप तोमर रिओ ऑलिंपिकसाठी पात्र\nआशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदकावर कब्जा करताना रिओ ऑलिंपिकसाठी पात्रताही मिळविली.\nसंदीप हा ऑलिंपिक कोटा जिंकलेला भारताचा चौथा कुस्तीगीर आहे. संदीपने हा पराक्रम फ्रीस्टाइल प्रकारातील ५७ किलो गटात केला.\nमंगोलियातील उलनबटोर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात पहिले तीन कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरले.\nउपांत्य लढतीत संदीपचा अझरबैझानच्या हसान झादा याच्याकडून पराभव झाला. परंतु ऑलिंपिक कोट्यासाठी झालेल्या लढतीत संदीपने मोल्दोवाच्या अलेक्झांड्रू चिर्तोका याचा १०-० असा सहज पाडाव केला.\nसबसिडीचा त्याग करण्यात महाराष्ट्र अग्रेसर\nघरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाचा (सबसिडी) त्याग करण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला देशात सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला आहे.\nमहाराष्ट्रातील एकूण १६,४२,८१४ नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.\nघरगुती गॅसच्या वापरासाठी नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान देण्यात येते. त्यापोटी केंद्र सरकारला मोठा वित्तीय भार सहन करावा लागतो.\nया अनुदानाची गरज नसलेल्या नागरिकांनी अनुदानाचा त्याग करावा, असे आवाहन करताना देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरात ‘गिव्ह इट अप’ मोहीम राबविली होती.\nदेशात एकूण १४.५४ कोटी नागरिक एलपीजी गॅसधारक आहेत. त्यापैकी १ कोटीहून अधिक नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.\nमहाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश (१२,५३,२४२), दिल्ली (७,२७,३७४), कर्नाटक (६,९७,७१०) आणि तामिळनाडू (६,४७,९८५) याप्रमाणे पहिल्या पाच राज्यांची क्रमवारी आहे.\nराधिका आपटे आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार\nमराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.\nसहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅडली’ या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.\n'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३० एप्रिल\nचालू घडामोडी : २९ एप्रिल\nचालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल\nचालू घडामोडी : २६ एप्रिल\nचालू घडामोडी : २५ एप्रिल\nचालू घडामोडी : २३ व २४ एप्रिल\nचालू घडामोडी : २२ एप्रिल\nचालू घडामोडी : २१ एप्रिल\nचालू घडामोडी : २० एप्रिल\nचालू घडामोडी : १९ एप्रिल\nचालू घडामोडी : १७ व १८ एप्रिल\nचालू घडामोडी : १६ एप्रिल\nचालू घडामोडी : १५ एप्रिल\nचालू घडामोडी : १४ एप्रिल\nचालू घडामोडी : १३ एप्रिल\nचालू घडामोडी : ११ व १२ एप्रिल\nचालू घडामोडी : १० एप्रिल\nचालू घडामोडी : ९ एप्रिल\nचालू घडामोडी : ८ एप्रिल\nचालू घडामोडी : ७ एप्रिल\nचालू घडामोडी : ६ एप्रिल\nचालू घडामोडी : ५ एप्रिल\nचालू घडामोडी : ४ एप्रिल\nचालू घडामोडी : २ व ३ एप्रिल\nचालू घडामोडी : १ एप्रिल\nमासिक : मार्च २०१६ (PDF)\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/03/blog-post_41.html", "date_download": "2018-04-20T16:42:43Z", "digest": "sha1:IKEYXXIH6COH7SEIQ3UAXYU2JSLAMK2O", "length": 15234, "nlines": 250, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : प्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र", "raw_content": "\nप्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र\n[प्र.१] राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येतो\n[प्र.२] खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना नाही\n१] शासनाचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य.\n२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.\n३] सरकार बदलण्यासाठी आंदोलन सुरु करण्याचे स्वातंत्र्य.\n४] घटनेच्या केंद्रीय मूल्यांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य.\n२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.\n[प्र.३] भारतातील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, हे दर्शविणारी वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.\n१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.\n२] भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे.\n३] भारतात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.\n४] भारतात निवडणुकीत पराभूत झालेली पार्टी जनादेश स्वीकार करते.\n१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.\n[प्र.४] भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याविरुद्ध वापरले जाते\n[प्र.५] कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ट कोणते\nअ] मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.\nब] अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.\nक] सामाजिक न्याय प्रस्थापित करणे.\n१] अ आणि ब\n२] अ आणि क\n३] ब आणि क\n[प्र.६] न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे\n१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते.\n२] जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरुध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकते.\n३] न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.\n४] जर एखाद्या नागरिकाच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल, तर तो न्यायालयात जाऊ शकतो.\n१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते.\n[प्र.७] राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात\n१] कलम १३९ अ\n२] कलम १३९ ब\n३] कलम १३९ क\n१] कलम १३९ अ\n[प्र.८] खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या ‘मुलभूत हक्क’ प्रकरणाशी संबंध नाही\n१] केशवानंद वि. केरळ राज्य\n२] गोलकनाथ वि. पंजाब राज्य\n३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष\n३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष\n[प्र.९] आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे, कारण .....\n१] विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किंमत प्राप्त होईल.\n२] विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघून केले जावे.\n३] राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा मिळाव्यात.\n४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.\n४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.\n[प्र.१०] UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारणांसाठी डॉ. अरुण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहे\nअ] उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे.\nब] समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता उमेदवारांमध्ये असावी.\nक] परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी ६ महिन्यांपर्यंत कमी करावा.\nड] विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.\n१] फक्त अ, क आणि ड\n२] फक्त ब. क आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\n३] फक्त अ, ब आणि ड\n(परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी १० महिन्यांपर्यंत कमी करावा.)\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nप्रश्नसंच १५० - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - २६ मार्च २०१५\nसोलर इम्पल्स – २\nचालू घडामोडी - २५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र\nप्रश्नसंच १४८ - भूगोल\nचालू घडामोडी - २४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४७ - इंग्रजी व्याकरण\nचालू घडामोडी - २३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४६ - मराठी व्याकरण\nचालू घडामोडी - २२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४५ - इतिहास\nचालू घडामोडी - २१ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४४ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - १९ व २० मार्च २०१५\nबेटी बचाव बेटी पढाओ अभियान\nचालू घडामोडी - १७ व १८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४३ - सामान्यज्ञान\nचालू घडामोडी - १६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १४२ - विज्ञान तंत्रज्ञान\nप्रश्नसंच १४१ - अर्थशास्त्र\nप्रश्नसंच १४० - भूगोल\nचालू घडामोडी - १४ मार्च २०१५\nचालू घडामोडी - १३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३९ - इतिहास\nचालू घडामोडी - १२ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३८ - पर्यावरण\nप्रश्नसंच १३७ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ११ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३६ - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - १० मार्च २०१५\nप्रश्नसंच १३५ - अर्थशास्त्र\nचालू घडामोडी - ९ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३४ - राज्यशास्त्र\nचालू घडामोडी - ८ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३३ - भूगोल\nचालू घडामोडी - ७ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३२ - चालू घडामोडी\nचालू घडामोडी - ६ मार्च २०१५\nचालू घडामोडी - ५ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३१ - इतिहास\nचालू घडामोडी - ४ मार्च २०१५\nप्रश्नसंच १३० - सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - ३ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२९ - अर्थशास्त्र\nभारताचा आर्थिक पाहणी अहवाल २०१४-१५\nप्रश्नसंच १२८ - राज्यघटना\nचालू घडामोडी - १ व २ मार्च २०१५\nप्रश्नसंच १२७ - भूगोल\nचालू घडामोडी - २८ फेब्रुवारी २०१५\nप्रश्नसंच १२६ - इतिहास\nचालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-metro-maharashtra-bandh-koregaon-bhima-clash-90519", "date_download": "2018-04-20T16:58:39Z", "digest": "sha1:EPTNTUFPA7ENFLF5FW6NIVNSMZ2SQ6SY", "length": 6757, "nlines": 55, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news metro Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash \"मेट्रो'लाही बंदचा फटका | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nमुंबई - महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी मेट्रो रेल्वेही बंद पाडली. त्यामुळे मेट्रोला प्रथमच बंदचा फटका बसला.\nमुंबई - महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी मेट्रो रेल्वेही बंद पाडली. त्यामुळे मेट्रोला प्रथमच बंदचा फटका बसला.\nवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणाऱ्या \"मेट्रो'ची सर्व नैसर्गिक-मानवनिर्मित अडचणींमधून मार्ग काढणारी अशी ख्याती आहे; मात्र तिलाही बंदचा फटका बसला. आंदोलकांनी दुपारी 12.15 च्या सुमारास घाटकोपर स्थानकात जाऊन मेट्रो रोखली. \"मेट्रो'मध्ये प्रवाशांना अडवणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्या अडथळ्यांवरून उड्या मारून आंदोलक आत गेले. तेथे पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांचे फावले. त्यांनी थेट रुळांवरच उडी मारली. त्यानंतर \"मुंबई मेट्रो'ने सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत सेवा बंद केली. एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत सेवा सुरू होती.\nआंदोलक \"मेट्रो'च्या असल्फा स्थानकातील रुळांवरही उतरले होते. त्यामुळे वर्सोव्याकडे जाणारी मेट्रो तेथे जवळपास 10 मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मेट्रो सुरू झाल्यापासून प्रथमच अशा प्रकारे रोखली गेली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मेट्रोची सेवा विस्कळित होती. संध्याकाळी बंद मागे घेतल्यावरच ही सेवा पूर्ववत झाली.\nसत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सिंचन प्रकल्प रखडले : राहुल ढिकले\nसटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास...\nसुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात\nमिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nश्री मुंजोबा महाराज उत्सवाची कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री...\nमराठवाड्याला मिळवून दिले हक्काचे पाणी - मुख्यमंत्री\nनांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cheteshwar-pujara-talking-90259", "date_download": "2018-04-20T16:50:21Z", "digest": "sha1:OJHEJC3T3EV74GJVKLK4OGVT57SSPX4B", "length": 13550, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cheteshwar pujara talking चर्चेपेक्षा सरावावर लक्ष केंद्रित - चेतेश्‍वर पुजारा | eSakal", "raw_content": "\nचर्चेपेक्षा सरावावर लक्ष केंद्रित - चेतेश्‍वर पुजारा\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकेपटाऊन - प्रतिस्पर्धी संघाची ताकद गोलंदाजीत आहे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचे ‘होम वर्क’ करूनच भारतीय संघाचा सध्याचा सराव सुरू आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ चेतेश्‍वर पुजाराने हे मान्य केले. प्रतिस्पर्धी संघ कसा आहे आणि त्यांची ताकद कशी याची चर्चा करण्यापेक्षा आम्ही सरावावर लक्ष केंद्रित केल्याचे पुजाराने सांगितले.\nकेपटाऊन - प्रतिस्पर्धी संघाची ताकद गोलंदाजीत आहे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचे ‘होम वर्क’ करूनच भारतीय संघाचा सध्याचा सराव सुरू आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ चेतेश्‍वर पुजाराने हे मान्य केले. प्रतिस्पर्धी संघ कसा आहे आणि त्यांची ताकद कशी याची चर्चा करण्यापेक्षा आम्ही सरावावर लक्ष केंद्रित केल्याचे पुजाराने सांगितले.\nसराव सामना रद्द करून सरावावर भर देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य काम करत असल्याचे केपटाऊनच्या नितांत सुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावर आल्यावर दिसून आले. सराव सामन्यात समोरच्या संघात मुद्दामहून कमजोर गोलंदाज दिले जातात तसेच खेळपट्टीत जान ठेवली जात नाही. मग सामन्यातून जे पाहिजे ते साध्य होत नाही. म्हणूनच भारतीय संघाने सराव सामना खेळणे टाळून सरावावर भर दिला. दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून संघाने ८-९ सराव सेशन्स केले आहेत. दोन दिवस तर दिवसात दोन वेळा सराव केला गेला.\nपहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सरावाचे आणखी एक सत्र संपल्यावर भारतीय संघाच्या वतीने चेतेश्‍वर पुजाराने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आमची तयारी उत्तम चालू आहे. सरावादरम्यान आखूड टप्प्याचा मारा खेळाची सवय करून घेत आहोत. मला वाटते की चांगल्या खेळपट्टीवर दर्जेदार गोलंदाजांना सामोरे जाताना चेंडू योग्य प्रकारे सोडणे हे सुद्धा फार महत्त्वाचे असते. मी २०११ आणि २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेला आहे. त्या अनुभवाचा फायदा मला नक्‍की होईल.’’\nपहिल्या कसोटी सामन्याची तयारी करताना आम्ही समोरच्या संघात कोण आहे आणि कोण कसे खेळेल याकडे लक्ष देत नसल्याचे सांगून पुजारा म्हणाला, ‘‘आम्हाला काय करायचे आहे कसे खेळायचे आहे आणि योजना अमलात कशा आणायच्या याचा विचार चालू आहे. मला वाटते, की यंदाच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय गोलंदाजीत बरीच ताकद भरलेली आहे. खरे वेगवान गोलंदाज आपल्या संघात आहेत. या वेगवान गोलंदाजांमुळेच या वेळी संघाच्या कामगिरीला वेगळी धार येणार आहे.’\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\n63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग\nनवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर...\nवरुण गांधी उद्या नागपुरात\nनागपूर - भाजपचे खासदार वरुण गांधी येत्या 21 एप्रिलला नागपुरात येत असून, ते युवकांशी संवाद साधणार आहेत....\nकोलकाता - देशांतर्गत क्रिकेट भक्कम करण्यासाठी ज्युनियर क्रिकेट भक्कम असणे आवश्‍यक असते. सौरभ गांगुलीच्या तांत्रिक समितीने भारतीय क्रिकेटचा हा...\nपाणी टंचाई आमच्या पाचवीलाच पुजलेली..\nवाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82.html", "date_download": "2018-04-20T16:30:11Z", "digest": "sha1:JOLIDNLORTEWZR2DDAAJNSHPX4S2QQWP", "length": 10459, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "पुण्यात दृष्टिहीनांचे पहिले कॉलसेंटर सुरू - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nपुण्यात दृष्टिहीनांचे पहिले कॉलसेंटर सुरू\nपुण्यात दृष्टिहीनांचे पहिले कॉलसेंटर सुरू\nपुणे – दृष्टिहीनांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास साह्य करणाऱ्या दि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या टेक्‍निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (टीटीआय) व्होडाफोन सेल्यूलरच्या सहकार्याने कॉलसेंटर सुरू केले आहे. त्याद्वारे 17 दृष्टिहीन तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दृष्टिहीनांमार्फत चालविले जाणारे देशातील हे पहिलेच कॉलसेंटर ठरले आहे.\nव्होडाफोनचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इश्‍मित सिंग यांच्या हस्ते या कॉलसेंटरचे नुकतेच उद्‌घाटन झाले. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन पंड्या व टीटीआयचे अध्यक्ष सुधीर साबळे या वेळी उपस्थित होते.\nटीटीआयच्या वतीने 17 ते 35 वयोगटातील दृष्टिहीन तरुणांना मोफत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची मान्यता असलेले बेसिक संगणक प्रशिक्षणही त्यांना देण्यात येते. त्याखेरीज होम सायन्स, आहार, विमा विपणन, सेल्समनशिप आदींचे प्रशिक्षणही देण्यात येते.\nप्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या होतकरू तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठीही संस्था मदत करते. या वेळी तर संस्थेने त्यांच्यासाठी कॉलसेंटरच्या उभारणीची कल्पनाच प्रत्यक्षात आणली. त्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. होमियार मोबेदजी, व्होडाफोन सेल्यूलरचे उपव्यवस्थापक सचिन रामपुरे आणि विशाल शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shekhar-phadke-will-be-in-the-role-of-vithalpant-kulkarni/", "date_download": "2018-04-20T16:32:05Z", "digest": "sha1:FR2X7SSASUEEZCKLZJP4YAQUG3SKI2PW", "length": 17210, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘तू माझा सांगाती” मालिकेत विठ्ठलपंतांच्या भूमिकेत शेखर फडके | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\n‘तू माझा सांगाती” मालिकेत विठ्ठलपंतांच्या भूमिकेत शेखर फडके\nप्रत्येक कलाकार हा आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मालिकेत किंवा सिनेमात असणारी व्यक्तिरेखा चांगली साकारली जावी यासाठी तो ती भूमिका समरसून जगत असतो. आपली प्रत्येक भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारणारे अभिनेते शेखर फडके आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत ‘विठ्ठलपंत कुलकर्णी’ म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. नेहमीपेक्षा वेगळा लुक आहे, तसेच चरित्र भूमिका या मालिकेत ते साकारत आहे. या मालिकेचे निर्माते आणि मालिका दिग्दर्शक आहेतसंगीत कुलकर्णी.\nअनेक मराठी नाटकांमध्ये, मालिकांमध्ये तसेच सिनेमांमध्ये शेखर फडके यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या मालिकेतही त्यांच्या अभिनयातील वैविध्य आपल्याला पाहायला मिळते आहे. आतापर्यंत त्यांनी विनोदी भूमिका, तसेच कलर्स मराठी वरील ‘सरस्वती’ मालिकेतील ‘भिकूमामा’ हा विनोदी खलनायक साकारला आहे, जो तुम्हा प्रेक्षकांच्या मनाला भावला होता आणि आता तू माझा सांगाती या मालिकेत त्यांचा गंभीर स्वरूपाचा अभिनय पाहायला मिळतोय.\nविठ्ठल हे पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्याच्या मुखी असलेलं नावं. या नावाचा महिमा अशी आहे की नाव उच्चारताच अंगी उत्साह जाणवतो. या विठ्ठलाचे अनेक भक्त होते, ज्यांना आपण संत म्हणून ओळखतो. अशा या संतांची परंपरा सांगणारी कथा, कलर्स मराठीवरील तू माझा सांगाती या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे. शेखर फडके यांनी आपल्या विनोदी शैलीतल्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहे. ते साकारत असलेली ही विठ्ठलपंतांची भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमॉस्किटो कॉईलमुळे तरुणाचा जळून मृत्यू\nपुढीलनागरिकांच्या सतर्कतेमुळे राजधानीचा अपघात टळला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-20T16:41:29Z", "digest": "sha1:XTY74EDUAFKY4S4P3VLDCYKNQ6TGGV42", "length": 3988, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्याँ चेपलेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nज्याँ चेपलेन (४ डिसेंबर, इ.स. १५९५:पॅरिस, फ्रांस - २२ फेब्रुवारी, इ.स. १६७४:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच कवी होता. हा अकॅडेमी फ्रांसेसचा संस्थापक सदस्य होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५९५ मधील जन्म\nइ.स. १६७४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१६ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-5-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-20T16:24:06Z", "digest": "sha1:QHDWVF52ETAPGFW5V33A3YM63TTZU2ZH", "length": 7320, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू\nजोहान्सबर्ग – भारतीय वंशाच्या कुटुंबातील पाच जणांचा दक्षिण आफ्रिकेत पीटरमॅरिझबर्ग येथे लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पाच जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अज्ञात दंगलखोरांनी पेट्रोलबॉम्ब फेकून त्यांच्या घराला आग लावली होती, असे पोलिसांनी सांगितले. अझिझ मानज्रा असे या कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.\nसुमारे 25 वर्षांपूर्वी ते आपल्या कुटुंबियांसमवेत दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले होते. गुरुवारी सकाळी मानज्रा यांच्या जळालेल्या घरामध्ये ते स्वतः, त्यांची पत्नी आणि तीन मुले मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब साधारण पंधरवड्याभरापूर्वीच या घरात रहायला आले होते. हे घर खरेदी करण्यासाठी मानज्रा यांनी आपली आयुष्यभराची सर्व पूंजी खर्च केली होती, असे निकतवर्तीयांनी सांगितले.\nआग लावणाऱ्या समाजकंटकाचा पोलिस शोध घेत आहेत. या संदर्भात पाच जणांच्या हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवीन काय वाचाल\nNext articleचोरीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nराष्ट्रध्वज अवमान प्रकरण; भारताकडून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी\n1 मेपासून पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना अमेरिकेत प्रवेश बंदी \nदक्षिण – उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nडॉक्टरांची कमाल : २० वर्षांपूर्वी गिळलेले लायटर १० मिनिटांत काढले\nनासा शोधणार पराग्रहांवरील जीवन; उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी\nपाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेस गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/drama-training-organisations-and-classes-pune/", "date_download": "2018-04-20T16:28:55Z", "digest": "sha1:6CM3T2REJTPEED33SQGKZ6AD2SK6X3OM", "length": 29269, "nlines": 366, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drama Training Organisations And Classes In Pune | पुण्यातील या नाट्यसंस्था घडवताहेत उद्याचे कलाकार | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nपुण्यातील या नाट्यसंस्था घडवताहेत उद्याचे कलाकार\nअभिनयाच्या आवडीसोबतच त्याचे योग्य प्रशिक्षण असेल तर तो कलाकार सर्वांगाने बहरतो.\nठळक मुद्दे पुण्यात कार्यरत असलेली या थिएटरमध्ये नाट्यकलेविषयी अगदी उत्तम ज्ञान दिलं जातं. मुलाखतीत तुमचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हे पाहिलं जातंतुमच्याकडे जर काही युनिक कल्पना असेल आणि तुम्ही एका योग्य ग्रुपच्या शोधात असाल तर हे वाचा.\nपुणे : अभिनेत्यांना घडवण्यामध्ये नाट्यसंस्थांचा फार मोठा वाटा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नाट्यसंस्था स्थापन झाल्या आहेत. या नाट्यसंस्थांमधून अनेक नाट्यशिबिरंही होतात. पुण्यात अशा अनेक नाट्यसंस्था आहेत. पुण्यातील अशाच काही प्रसिद्ध नाट्यसंस्थाविषयी आज पाहुया.\nमराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिनही भाषांच्या नाटकांसाठी प्रसिद्ध असलेला आसक्त कलामंच पुण्यात फार नाट्यप्रेमींच्या यादीत पहिला आहे. या संस्थेत फक्त अभिनयाचेच बाळकडू पाजलं जातं असं नाही , तर बॅकस्टेजला असलेल्या अनेक कामात इकडे पारंगत केलं जातं. एखाद्या कलाकाराला कोणत्या क्षेत्रात जास्त रस आहे, हे पाहूनच त्यांना उत्तम शिक्षण दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मोफत शिक्षण इकडे दिलं जातं.\nनाट्य कालसंस्कार ही नाट्यसंस्था लहान मुलांना नाटकाविषयी गोडी लावण्यात प्रसिद्ध आहे. जर तुमच्या मुलाच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळण्याकरता एखादी चांगली नाट्यसंस्था मिळावी असं तुम्हाला वाटत असेल नाट्य कलासंस्कार बेस्ट आहे. गेल्या 38 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या नाट्यसंस्थेने अनेक कलाकार तयार केलेत. मुलांना केवळ अभिनयच न शिकवता त्यांना इथे नाट्यलिखाणही शिकवलं जातं. त्यासाठी खास दर रविवारचे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतात.\nगेल्या दहा वर्षांपासून पुण्यात कार्यरत असलेली स्वतंत्र थिएटरमध्ये नाट्यकलेविषयी अगदी उत्तम ज्ञान दिलं जातं. यासाठी खास त्यांची तीन कोर्सेसही आहे. सहा महिने, एक वर्ष किंवा दोन वर्ष अशा कालावधीत तुम्ही इकडे अभिनयाचं शिक्षण घेऊ शकता. या कोर्सेसमधून तुम्ही मेंदू आणि शरिराचा व्यायाम, आवाज प्रशिक्षण, लिखाण आदी विषयही शिकू शकता. त्यांच्या कोर्ससाठी प्रवेश घेताना तुम्हाला आधी एक मुलाखत पार पाडावी लागते. या मुलाखतीत तुमचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हे पाहिलं जातं आणि मगच तुमचा प्रवेश निश्चित केला जातो.\nइंग्रजी नाटकांसाठी प्रसिद्ध असलेला र्‍हॅप्सोडी थिएटरला विशिष्ट नाट्यसंस्थेची ओळख नसली तरी या ग्रुपद्वारे अनेक शाळा आणि महाविद्यालयात नाट्य शिबिरे भरवली जातात. दिपक मोरीज हे या थिएटरचे सर्वेसर्वा असून त्यांनी या थिएटरमार्फत अनेक उपक्रम राबवले आहेत.\nहिना सिद्दीकी यांच्यामार्फत चालणाऱ्या ऑक्रिस्ट्रेटेड क्यू वर्कतर्फे अनेकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केलं जातं. शिवाय अनेक संस्थामध्ये ही या ग्रुपतर्फे शिबिरेही घेतली जातात. तुमच्याकडे जर काही युनिक कल्पना असेल आणि तुम्ही एका योग्य ग्रुपच्या शोधात असाल तर ऑक्रिस्ट्रेटेड क्यू वर्क हा ग्रुप एकदम परफेक्ट आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी\nपांडुरंगाच्या पादुकांना नीरास्नान; पंढरपूरचा दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात\nअर्थकारणात राजकारण नाही : विनय सहस्त्रबुद्धे; नोटाबंदीचे समर्थन\nडीएसकेंचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष\nट्रिपलसीटवरील युवकाला येरवड्यात पोलिसांची मारहाण; कुटुंबीय पोलीस आयुक्तांकडे मागणार दाद\nज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचं निधन\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nरिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी सर्वाधिक\nवाघोलीत ११ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू\nनोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/need-to-keep-up-with-marathi-as-state-language/articleshow/62476894.cms", "date_download": "2018-04-20T16:15:07Z", "digest": "sha1:77HH6NDTY42NKTY354VJCX54KP7SINWZ", "length": 28607, "nlines": 236, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "need to keep up with marathi as state language | राजभाषा मराठीचा दिवा तेवता ठेवा! - Maharashtra Times", "raw_content": "\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला ..\nराजभाषा मराठीचा दिवा तेवता ठेवा\nराजभाषा मराठीचा दिवा तेवता ठेवा\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी नुकतेच मुंबईत आले असताना त्यांना या प्रस्तावाची आठवण करून देण्यात आली. त्यांनीही ​हा प्रस्ताव लवकर मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मराठी भाषा आहे म्हणून महाराष्ट्र या राज्याला अस्तित्व आहे, याचाच विसर पडला आहे. देशातील अन्य भाषक राज्यांनी आपापल्या राज्यांतील भाषेचा साधलेला विकास पाहता महाराष्ट्र राज्याची ‘मराठी भाषेचे राज्य’ म्हणून ओळख पुसून टाकण्याची राज्यातील सर्वच राष्ट्रीय पक्षांची भूमिका असावी, असे मराठीच्या सद्यस्थितीवरून वाटते. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधील भाषाविकासाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तर आपल्या व त्यांच्या प्रयत्नांमधील फरक स्पष्ट जाणवतो.\nकेंद्रीय अधिनियमांचे मराठी अनुवाद, मुद्रण, प्रकाशन, वितरण यासाठी राज्य सरकारने सक्षम यंत्रणा निर्माण करावी, अशी माझी याचिका उच्च न्यायालयात २०१४ मध्ये दाखल झाली. गेल्या वर्षी २० जानेवारीला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांमधील भाषाविकासाची पाहणी करून अहवाल देण्यासाठी समिती नेमली. तीत मी, तेव्हाच्या विधि सहसचिव मंगला ठोंबरे, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव हर्षवर्धन जाधव असे तिघे होते.\nआम्ही या राज्यांचा अभ्यासदौरा केला. या राज्यांनी आपापल्या राजभाषांचा केलेला विकास थक्क करणारा आहे. भाषा जपणे ही आपली जबाबदारीच नव्हे तर कर्तव्यही आहे, हे उमजून या राज्यांनी अनेक उपाय योजले आहेत. इतकेच नाही तर आपापल्या राज्याच्या भाषा विकासासाठी भक्कम आर्थिक तरतूद केली आहे. ही तरतूद म्हणजे गुंतवणूक आहे, याचेहीभान त्यांना आहे. या तीनही राज्यांमध्ये भव्य भाषाभवन आहे. तसेच, भाषा संचालनालयांमध्ये भाषा विकासासाठी संचालक तसेच पुरेसे अधिकारी आणि कर्मचारीही आहेत. माझ्या याचिकेचा जो मूळ मुद्दा होत, त्या केंद्रीय कायद्यांच्या अनुवाद व प्रकाशनासाठी केरळ व तमिळनाडूत तर स्वतंत्र आयोगच आहे. त्या त्या राजभाषांना विकासाची पुरेशी संधी मिळावी, यासाठी ही रा​ज्ये कशी झटतात, याचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आम्ही पाहिले. ते येथे सांगायलाच हवे.\nअनुदानित, विना अनुदान, तसेच इंग्रजी माध्यमासहित कोणत्याही माध्यमाच्या आणि कोणत्याही केंद्रीय अथवा राज्य मंडळाच्या कोणत्याही शाळा असल्या तरी तेथे पहिली ते दहावीपर्यंत त्या त्या राज्याची राजभाषा शिकणे, हे कायद्यानेच अनिवार्य करण्यात आले आहे. थोडक्यात या राज्यांमधला पहिली ते दहावी शिकणारा कोणताही मुलगा अथवा मुलगी ती ती राजभाषा शिकल्याशिवाय पुढच्या इयत्तेत जाऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणत्याही शालान्त परीक्षेला बसता येत नाही. केरळने तर यापुढचे अधिक ठोस पाऊल टाकल्याचे आम्ही पाहिले. तेथे ज्या शाळा पहिली ते दहावी मल्याळम् शिकवणार नाहीत, त्या शाळांची मान्यता थेट काढून घेण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर काय चित्र आहे, याचा समाज व राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.\nमहाराष्ट्रात २०१२ मध्ये जो स्वयं अर्थसहायित अधिनियम करण्यात आला, त्यात नुकतेच २० डिसेंबर २०१७ रोजी काही बदल करण्यात आले. आता कोणत्याही खासगी कंपनीला सरकारी मदतीशिवाय राज्यात कोठेही शाळा काढण्याची अनुमती मिळाली आहे. या साऱ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण दुर्दैवाने, या शाळांमध्ये पहिली ते दहावी ‘मराठी’ हा भाषाविषय म्हणून शिकवण्याची अनिवार्य तरतूद नाही. त्यामुळे, एकीकडे दुसऱ्या एका निर्णयानुसार कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद होत जाणार आणि दुसरीकडे सरकारी मदत न घेणाऱ्या आणि मुळीच मराठी न शिकविणाऱ्या शाळांची संख्या मात्र वाढत जाणार. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार एक मे १९६० रोजी जे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्याची ओळखच पुसून काढणारा हा निर्णय आहे.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nही तर व्यावसायिक दंडेली\nनेपाळचे अघोषित ब्लॅकमेल तंत्र\nशेतकऱ्यांना 'अच्छे दिन' कधी\nAkshaya Tritiya 2018: श्रेय आणि स्मरणाचा उत्सव\nAkshaya Tritiya: हिरा विकत घेताना…\n1राजभाषा मराठीचा दिवा तेवता ठेवा\n2निवडणूक रोखे कितपत यशस्वी होतील\n3घोषणांचा सुकाळ, कृतीचा दुष्काळ\n4आरोग्य व्यवस्थेची अशी हेळसांड का\n5‘फूड प्रोसिंग’ची योजना सुलभ व्हावी...\n6स्वयंसेवी संस्थांची कोंडी कशासाठी\n10‘गुगल’चा मराठी सहज योग\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-20T16:26:23Z", "digest": "sha1:NIKUEINGPMPFBFKSRAHHMZNDX3A6UB6Q", "length": 4243, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स हॅचेट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचार्ल्स हॅचेट (इं Charles Hatchett) (जानेवारी २ १७६५ - मार्च १० १८४७) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी कोलंबियम धातूचा शास्त्रीय अभ्यास केला. पुढे या धातूस हेन्रिक रोझ यांनी नायोबियम असे नाव दिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७६५ मधील जन्म\nइ.स. १८४७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१४ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2018-04-20T16:26:07Z", "digest": "sha1:U5CYVMINIAPWTG4W5JDANSXE457KYLG3", "length": 51616, "nlines": 1048, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९ - विकिपीडिया", "raw_content": "२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n२००९ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - इंग्लंड\nसर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान,श्रीलंका (३१७ धावा)\nसर्वाधिक बळी उमर गुल, पाकिस्तान (१३ बळी)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जून २००९ मध्ये इंग्लंडमधे खेळली गेली. पहिली स्पर्धा इ.स. २००७ मधे दक्षिण आफ्रिका येथे झाली होती. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ भाग घेणार आहेत. अंतिम सामना २१ जुन रोजी लॉर्ड्स येथे खेळण्या आला ज्यात पाकिस्तान विजयी ठरला.\n४.३ नॉक आउट फेरी\n५.१ नॉक आउट फेरी\n१० संदर्भ आणि नोंदी\nऑक्टोबर ३१ इ.स. २००७ रोजी पहिल्या स्पर्धेच्या क्रमवारीनुसार तसेच असोसिएट देशाच्या पात्रता सामन्यांनुसार संघांची घोषणा करण्यात आली. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ ४ गटांत विभागण्यात आले.\nवेस्ट इंडीज(१०) न्यूझीलंड (४)\nकंसामधे २००७ च्या स्पर्धेची क्रमवारी दर्शवते.\nबांगलादेश अ ६ गडी राखून विजयी\nशेरे बांगला राष्ट्रीय मैदान, मीरपूर\nपाकिस्तान क्रिकेट मंडळ संघ\nपाकिस्तान क्रिकेट मंडळ संघ\nनाणेफेक: बांगलादेशने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले.\nपंच: स्टीव बकनोर & मराईस इरास्मुस\nवेस्ट इंडीज won by १४ runs\nपंच: स्टीव बकनोर & मराईस इरास्मुस\nबांगलादेश won by ६४ runs\nनेदरलँड्स won by ४ runs\nन्यूझीलंड won by ५४ runs\nपंच: स्टीव बकनोर & मराईस इरास्मुस\nपंच: स्टीव बकनोर & रॉड टकर\nपंच: अमीष साहेबा & रॉड टकर\nन्यूझीलंड won by ९० runs\nस्कॉटलंड won by १२ runs\nपंच: मराईस इरास्मुस & अमीष साहेबा\nऑस्ट्रेलिया won by ३८ runs\nपंच: नायजेल लाँग & अमीष साहेबा\nपंच: रॉड टकर & मराईस इरास्मुस\nन्यूझीलंड won by ९ runs\nपंच: रॉड टकर & मराईस इरास्मुस\nदक्षिण आफ्रिका won by ५९ runs\nपंच: नायजेल लाँग & अमीष साहेबा\nपंच: मराईस इरास्मुस & रॉड टकर\nपंच: नायजेल लाँग & अमीष साहेबा\nऑस्ट्रेलिया won by ७ wickets\nपंच: नायजेल लाँग & अमीष साहेबा\nदक्षिण आफ्रिका won by ६ wickets\nपंच: बिली बाउडेन & Daryl Harper\nपंच: बिली बाउडेन & Daryl Harper\nपंच: असद रौफ & बिली डॉक्ट्रोव्ह\nब गटात पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडला हरवून हादरवले, पण पुढच्ह्याच सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ४८ धावांनी हरवून आव्हान कायम राखले. त्यामुळे पाक-नेदरलँड्स लढतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. पाकने पावणेदोनशे धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँड्सला आगेकूच करण्यासाठी किमान १५१ धावा करायच्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. नेदरलँड्सचा ९३ धावांतच खुर्दा उडाला आणि ब गटातुन इंग्लंड आणि पाकिस्तान पुढिल फेरीसाठी पात्र ठरले.\nक गटात दोनही सामने गमवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला साखळीतच गारद व्हावे लागले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान या सलामीच्या जोडीच्या तुफानी फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज अक्षरशः होरपळून निघाले. श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १५ धावांनी विजय मिळविला आणि क गटात अव्वल स्थान पटकावले.\nड गटात अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी स्कॉटलंडचा पराभव करत पुढिल फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामधिल सामना फारच चुरशिचा झाला. शेवटच्या चेंडुपर्यंत उत्कंठा वाढवणारया सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडचा १ धावेने निसटता परभव केला.\nभारत (१) A१ २ २ ० ० +१.२२७ ४\nआयर्लंड (९) A२ २ १ १ ० -०.१६२ २\nबांगलादेश (८) २ ० २ ० -०.९६६ ०\nगौतम गंभीर ५० (४८)\nनईम इस्लाम २/३२ (३ षटके)\nजुनैद सिद्दिकी ४१ (२२)\nप्रग्यान ओझा ४/२१ (४ षटके)\nभारत २५ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: बिली बाउडेन आणि सायमन टॉफेल\nमशरफे मोर्तझा ३३* (१६)\nट्रेंट जॉन्स्टन ३/२० (४ षटके)\nनायल ओ'ब्रायन ४० (२५)\nमशरफे मोर्तझा २/३० (४ षटके)\nआयर्लंड ६ गडी राखून विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: नायजेल लाँग आणि सायमन टॉफेल\nअँड्रू व्हाईट २९ (२५)\nझहिर खान ४/१९ (३ षटके)\nरोहित शर्मा ५२* (४५)\nरीगन वेस्ट १/२३ (४ षटके)\nभारत ८ गडी राखुन विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: इयान गोल्ड (ENG) & नायजेल लाँग (ENG)\nपावसामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला.\nइंग्लंड २ २ १ १ ० +१.१७५\nपाकिस्तान २ २ १ १ ० +०.३८७\nनेदरलँड्स २ २ १ १ ० -१.५९९\nलुक राईट ७१ (४९)\nरॉयन टेन डोशेटे २/३५ (४ षटके)\nटॉम डी ग्रूथ ४९ (३०)\nजेम्स अँडरसन ३/२३ (४ षटके)\nनेदरलँड्स ४ गडी राखून विजयी\nपंच: अशोका डी सिल्वा आणि स्टीव डेव्हिस\nसामनावीर: टॉम डी ग्रूथ\nकेविन पीटरसन ५८ (३८)\nसईद अजमल २/२३ (४ षटके)\nयुनिस खान ४६* (३१)\nस्टुअर्ट ब्रॉड ३/१७ (३ षटके)\nइंग्लंड ४८ धावांनी विजयी\nपंच: रंजन मदुगले आणि बिली डॉक्ट्रोव्ह\nकामरान अक्मल ४१ (३०)\nपिटर सीलार २/३६ (४ षटके)\nअलेक्सी केरवेझी २१ (२९)\nशहीद आफ्रिदी ४/११ (४ षटके)\nपाकिस्तान ८२ धावांनी विजयी\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह आणि अमीष साहेबा\nश्रीलंका (६) C२ २ २ ० ० +०.६२६ ४\nवेस्ट इंडीज (११) C१ २ १ १ ० +०.७१५ २\nऑस्ट्रेलिया (३) २ ० २ ० -१.३३१ ०\nडेव्हिड वॉर्नर ६३ (५३)\nड्वेन ब्राव्हो २/३१ (४ षटके)\nक्रिस गेल ८८ (५०)\nमिचेल जॉन्सन २/३६ (३.५ षटके)\nवेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी\nपंच: अलिम दर आणि असद रौफ\nमिचेल जॉन्सन २८* (१३)\nअजंता मेंडिस ३/२० (४ षटके)\nकुमार संघकारा ५५* (४२)\nब्रेट ली २/३९ (४ षटके)\nश्रीलंका ६ गडी राखून विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: बिली बाउडेन (न्यू) & इयान गोल्ड (इं)\nऑस्ट्रेलिया चे आव्हान संपुष्टात\nलेंडल सिमन्स ४/१९ (३ षटके)\nअजंता मेंडिस २/२५ (४ षटके)\nश्रीलंका won by १५ runs\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: बिली बाउडेन (न्यू) and सायमन टॉफेल (ऑ)\nवेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचे ठरवले.\nदक्षिण आफ्रिका (५) D२ २ २ ० ० +३.२७५ ४\nन्यूझीलंड (४) D१ २ १ १ ० +०.३०९ २\nस्कॉटलंड (१२) २ ० २ ० -५.२८१ ०\nकाईल कोएट्झर ३३ (१५)\nइयान बटलर ३/१९ (२ षटके)\nजेसी रायडर ३१ (१२)\nरॅन वॉटसन १/४ (१ षटके)\nन्यूझीलंड ७ गडी राखून विजयी\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह आणि डॅरिल हार्पर\nए.बी. डी व्हिलियर्स ७९* (३४)\nमजीद हक २/२५ (४ षटके)\nकाईल कोएट्झर ४२ (३२)\nअल्बी मॉर्केल २/१५ (१.४ षटके)\nदक्षिण आफ्रिका १३० धावांनी विजयी\nपंच: असद रौफ आणि अमीष साहेबा\nसामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स\nग्रेम स्मिथ ३३ (३५)\nइयान बटलर २/१३ (४ षटके)\nब्रेंडन मॅककुलम ५७ (५४)\nरोलॉफ व्हान डेर मर्व २/१४ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका १ धावेनी विजयी\nलॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन\nपंच: असद रौफ (पा) & डॅरिल हार्पर (ऑ)\nसामनावीर: रोलॉफ व्हान डेर मर्व\nदक्षिण आफ्रिका ३ ३ ० ० ६ +०.७८७\nवेस्ट इंडीज ३ २ १ ० ४ +०.०६३\nइंग्लंड ३ १ २ ० २ -०.४१४\nभारत ३ ० ३ ० ० -०.४६६\nओवैस शाह ३८ (३३)\nवेन पार्नेल ३/१४ (३.५ षटके)\nजॅक कॅलिस ५७ (४९)\nस्टूअर्ट ब्रॉड १/१४ (३ षटके)\nदक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: स्टीव डेव्हिस आणि टोनी हिल\nयुवराज सिंग ६७ (४३)\nड्वेन ब्राव्हो ४/३८ (४ षटके)\nड्वेन ब्राव्हो ६६ (३६)\nइरफान पठाण १/९ (२ षटके)\nवेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी\nपंच: अलिम दर आणि रुडी कर्टझन\nहर्षेल गिब्ज ५५ (३५)\nजेरॉम टेलर ३/३० (४ षटके)\nलेंडल सिमन्स ७७ (५०)\nवेन पार्नेल ४/१३ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका २० धावांनी विजयी\nपंच: रंजन मदुगल्ले आणि मार्क बेन्सन\nयुसुफ पठाण ३३ (१७)\nग्रेम स्वान २/२८ (४ षटके)\nहरभजन सिंग ३/३० (४ षटके)\nइंग्लंड ३ धावांनी विजयी\nपंच: स्टीव डेव्हिस आणि अशोका डी सिल्वा\nरवी बोपारा ५५ (४७)\nड्वेन ब्राव्हो २/३० (४ षटके)\nरामनरेश सरवण १९ (९)\nआदिल रशिद १/११ (१ षटक)\nवेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी (डकवर्थ लूईस पद्धत)\nपंच: रुडी कोर्ट्झेन आणि अलिम दर\nअब्राहम डी'विलियर्स ६३ (५१)\nसुरेश रैना १/६ (१ षटक)\nरोहित शर्मा २९ (२८)\nजॉन बोथा ३/१६ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका १२ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: इयान गोल्ड आणि बिली बाउडेन\nसामनावीर: अब्राहम डी व्हिलियर्स\nश्रीलंका ३ ३ ० ० ६ +१.२६७\nपाकिस्तान ३ २ १ ० ४ +१.१८५\nन्यूझीलंड ३ १ २ ० २ -०.२३२\nआयर्लंड ३ ० ३ ० ० -२.१८३\nएरन रेडमंड ६३ (३०)\nडब्ल्यू.के. मॅककलेन २/३३ (४ षटके)\nअँड्रे बोथा २८ (१७)\nनॅथन मॅकलम ३/१५ (३ षटके)\nन्यूझीलंडचा ८३ धावांनी विजय\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: अशोका डी सिल्वा आणि मरायस इरॅस्मस\nतिलकरत्ने दिलशान ४६ (३९)\nशाहिद आफ्रिदी २/२३ (४ षटके)\nयुनिस खान ५० (३७)\nलसिथ मलिंगा ३/१७ (४ षटके)\nश्रीलंका १९ धावांनी विजयी\nपंच: रुडी कोर्ट्झन आणि मार्क बेन्सन\nस्कॉट स्टायरिस २२ (२९)\nअब्दुल रझाक २/१७ (३.३ षटके)\nशाहझैब हसन खान ३५ (२८)\nडॅनियेल व्हेट्टोरी २/२० (४ षटके)\nपाकिस्तान ६ गडी राखून विजयी\nपंच: रंजन मदुगल्ले आणि रुडी कोर्ट्झन\nसामनावीर: शाहझैब हसन खान\nमहेला जयवर्धने ७८ (५३)\nॲलेक्स कुसॅक ४/१८ (३ षटके)\nलसिथ मलिंगा २/१९ (४ षटके)\nश्रीलंका ९ धावांनी विजयी\nपंच: टोनी हिल आणि मरायस इरॅस्मस\nकामरान अकमल ५७ (५१)\nविल्यम मॅककलेन २/२६ (४ षटके)\nविल्यम पोर्टरफिल्ड ४० (३६)\nसईद अजमल ४/१९ (४ षटके)\nपाकिस्तान ३९ धावांनी विजयी\nपंच: रुडी कोर्ट्झन आणि रॉड टकर\nतिलकरत्ने दिलशान ४८ (३७)\nडॅनियेल व्हेट्टोरी २/३२ (४ षटके)\nमार्टीन गुप्टिल ४३ (३४)\nअजंता मेंडिस ३/९ (३ षटके)\nश्रीलंका ४८ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: सायमन टॉफेल आणि स्टीव डेव्हिस\nउपांत्य सामने अंतिम सामना\n१८ जून - ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\n२१ जून - लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन\n१९ जून - ओव्हल मैदान, लंडन\nशाहिद आफ्रिदी ५१ (३४)\nजेपी ड्यूमिनी १/१४ (२ षटके)\nजॅक कॅलिस ६४ (५४)\nशाहिद आफ्रिदी २/१६ (४ षटके)\nपाकिस्तान ७ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: बिली बाउडेन आणि स्टीव डेव्हिस\nपाकिस्तान अंतिम फेरीत दाखल.\nतिलकरत्ने दिलशान ९६ (५७)\nड्वेन ब्रावो २/३२(३ षटके)\nअँजेलो मॅथ्युज ३/१६ (४ षटके)\nश्रीलंका ५७ धावांनी विजयी\nपंच: अलिम दर आणि रुडी कोर्ट्झेन\nश्रीलंका अंतिम फेरीत दाखल.\nकुमार संघकारा ६४ (५२)\nअब्दुल रझाक ३/२० (३ षटके)\nशाहिद आफ्रिदी ५४ (४०)\nसनथ जयसूर्या १/८, (२ षटके)\nपाकिस्तान ८ गडी राखून विजयी\nलॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन\nपंच: डॅरेल हार्पर आणि सायमन टॉफेल\nमुख्य पान: महिला २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९\nउपांत्य सामने अंतिम सामना\n१८ जून - ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\n२१ जून - लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन\n१९ जून - ओव्हल क्रिकेट मैदान, लंडन\nअमिता शर्मा २/२१ (४ षटके)\nसियान रक २/१८ (४ षटके)\nन्यूझीलंड ५२ धावांनी विजयी\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nपंच: असद रौफ आणि मार्क बेन्सन\nलॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन\nमुख्य पान: २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९ - विक्रम\nसर्व सामने खालील ३ मैदानांवर खेळवले जातील:\nट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम\nमुख्य पान: २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९ - सामना अधिकारी\nऑस्ट्रेलिया — फॉक्स स्पोर्ट्स (live)\nपॅसिफिक आयलंड — Fiji TV\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी · महिला\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी · महिला\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी · महिला\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी · महिला\nपुरूष: पात्रता · संघ · विक्रम · सामना अधिकारी · महिला\nपुरस्कार · प्रकार · यजमान · पात्रता · विक्रम · संघ · चषक\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • भारत वि पाकिस्तान (रद्द) • वेस्ट ईंडीझ वि न्यू झीलँड • श्रीलंका वि बांगलादेश • झिम्बाब्वे वि बांगलादेश • बांगलादेश त्रिकोणी • भारत वि श्रीलंका\nभारत वि श्रीलंका • इंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे\nइंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nभारत वि न्यू झीलँड • वेस्ट ईंडीझ वि बांगलादेश • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • श्रीलंका त्रिकोणी\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • आय.सी.सी. टी२० चषक, २००९ • ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भारत • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे • पाकिस्तान वि श्रीलंका\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • पाकिस्तान वि श्रीलंका • न्यू झीलँड वि श्रीलंका • बांगलादेश वि झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • न्यू झीलँड वि श्रीलंका • श्रीलंका त्रिकोणी मालिका\nऑस्ट्रेलिया वि भारत • झिम्बाब्वे वि बांगलादेश\nझिम्बाब्वे वि बांगलादेश • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nइंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • वेस्ट ईंडीझ वि ऑस्ट्रिलिया • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा\nइ.स. २००९ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/11/current-affairs-27-28-november.html", "date_download": "2018-04-20T16:38:53Z", "digest": "sha1:5WXUEOUD7CV5ST2QQMFCWNK3CICS4XTJ", "length": 13299, "nlines": 155, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\n२८ नोव्हेंबर १८९० : महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी\nभारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-१ या क्षेपणास्त्राची अब्दुल कलाम आयलंड, बालासोर (ओडिशा) येथे यशस्वी चाचणी घेतली. मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मधील ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने ते विकसित केले आहे. यासाठी संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इम्रातमधील संशोधन केंद्र व हैदराबादेतील भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संस्थांनीही मदत केली होती.\nया क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यामुळे या क्षेपणास्त्राला आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेणे शक्य होते.\nप्रकार : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे\nक्षमता : ७०० किलोमीटर\nइंधन : घनरूपातील इंधनाचा वापर (सिंगल स्टेज क्षेपणास्त्र)\nवजन : १२ टन\nलांबी : १५ मीटर\nअण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता : एक टन\nफ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली आहे.\nदुकाने, रेस्टॉरंट, सार्वजनिक इमारती व ठिकाणे या ठिकाणी महिलांना बुरखा घालून फिरता येणार नाही. ही बंदी तोडल्यास सुमारे साडेसहा लाख रुपये दंड करण्यात येणार आहे.\nस्वित्झर्लंडमध्ये सुमारे ४० हजार मुस्लिम महिला आहेत.\nफ्रान्समध्ये यापूर्वीच बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.\nइस्राईलने भारतासमवेतच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केलेल्या बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने शत्रू म्हणून एका छोट्या ड्रोनवर हल्ला केला.\nइस्राईलच्या नौसेनेच्या जहाजावरून सोडण्यात आलेले बराक-८ क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधले आणि शंभर टक्के यश मिळवले.\nबराक-८ हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप मानले जाते. हे क्षेपणास्त्र विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.\nभारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ); तसेच इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय), इस्रायलचे शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकास व्यवस्थापन, एल्टा सिस्टिम्स आणि इतर कंपन्यांनी संयुक्तपणे बराक-८ हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.\nइस्रायलच्या समुद्रातील तेलसाठ्यांचे संरक्षण करण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.\n'बराक-८' क्षेपणास्त्र यंत्रणेमधील आधुनिक यंत्रणेमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा वेध घेता येणे शक्य होणार आहे. दिवस, रात्र, तसेच वेगवेगळ्या हवामान स्थितीमध्ये हे क्षेपणास्त्र काम करू शकेल.\nओ. पी. शर्मा निलंबित\nदिल्ली विधानसभेतील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार अलका लांबा यांना उद्देशून अशोभनीय भाषेचा वापर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ओ. पी. शर्मा यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.\nदिल्ली विधानसभा अध्यक्ष : राम निवास गोयल\n'एचएसबीसी' भारतातील व्यवसाय बंद करणार\nआंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीची बँक असलेल्या हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन अर्थात एचएसबीसी बँकेने भारतातील खासगी (वैयक्तिक) बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेल्या काही वर्षात एसएसबीसीने जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष २०१० पासून जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल दीड लाखांची घट केली आहे.\nभारतातील व्यवसाय बंद करणारी एचएसबीसी दुसरी परदेशी बॅंक आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडनेसुद्धा (आरबीएस) भारतातील आपला बँकिंग व्यवसाय बंद केला होता.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/s-d-ruikar", "date_download": "2018-04-20T16:28:54Z", "digest": "sha1:6OTAIPTJSHPWYNMH7XOS3BS2FSMX6COT", "length": 14026, "nlines": 363, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक एस डी रुईकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nडॉ. एस डी रुईकर\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. एस डी रुईकर ची सर्व पुस्तके\nमौसमी व्ही. मुनोत , पी व्ही भट ... आणि अधिक ...\nमौसमी व्ही. मुनोत , डॉ. एस डी रुईकर\nमौसमी व्ही. मुनोत , डॉ. एस डी रुईकर\nपी व्ही भट, आर सी जैसवाल ... आणि अधिक ...\nडॉ. एस डी रुईकर, आर ए लबडे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/chembur-mumbai-man-climbed-a-tower-to-protest-482191", "date_download": "2018-04-20T16:07:07Z", "digest": "sha1:JHNIPISUXHLJZCYW2Z4WA4J6NY7JXIT3", "length": 14978, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुंडांच्या त्रासाला कंटाळून 67 वर्षीय वृद्ध थेट विजेच्या टॉवरवरच चढून बसले!", "raw_content": "\nगुंडांच्या त्रासाला कंटाळून 67 वर्षीय वृद्ध थेट विजेच्या टॉवरवरच चढून बसले\nस्थानिक गुंडांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एक इसम थेट हायटेन्शन विजेच्या टॉवरवर चढल्याची घटना मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : कागदापासून बनवा आकर्षक फोटोफ्रेम\nघे भरारी : स्टाईलबाजी : उन्हाळ्यासाठी कॉटन ड्रेसचा उत्तम पर्याय\nघे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nकोण आहेत टाइम्स मासिकातील प्रभावशाली व्यक्ती\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे शरीराला फायदे\nगुंडांच्या त्रासाला कंटाळून 67 वर्षीय वृद्ध थेट विजेच्या टॉवरवरच चढून बसले\nगुंडांच्या त्रासाला कंटाळून 67 वर्षीय वृद्ध थेट विजेच्या टॉवरवरच चढून बसले\nस्थानिक गुंडांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एक इसम थेट हायटेन्शन विजेच्या टॉवरवर चढल्याची घटना मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली आहे.\nनवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव\nविशेष चर्चा : नाशिकवर 'जिझिया' कर\nमुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल\nनवी दिल्ली : दाऊद इब्राहिमची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला\nनवी दिल्ली : सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याविरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव\nगुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष\nबातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\nIPL 2018: चेन्नई सुपरकिंग्स के खिलाफ राजस्थान रॉयल्स की क्या है डबल टेंशन \nइंग्लैंड बोर्ड लाया क्रिकेट का नया फॉरमेट, साल 2020 में होगा '100 बॉल चैलेंज'\nCSK vs RR: रैना-धोनी पवेलियन लौटे, वाटसन की तूफानी पारी\nबीसीसीआई ने अपनाया कड़ा रुख, खत्म हो सकती है रेलवे की अंडर 19 की टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/alpesh-thakur-on-modi/", "date_download": "2018-04-20T16:20:52Z", "digest": "sha1:XY5XH4BGHGE5IBBTJUIGI6OZZCLT334S", "length": 4008, "nlines": 45, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "alpesh thakur on modi – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का : ‘ हे ‘ आहे उत्तर\nअल्पेश ठाकूर यांनी मोदींना मशरूम खाऊन मोदी गोरे झालेत असे म्हटले आणि मशरूम बद्दल लोकांचे कुतूहल वाढले . पण अल्पेश ठाकूर यांचा हा युक्तिवाद किंवा माहिती खरी आहे का की हा एक चुनावी जुमला आहे . अल्पेश ठाकूर म्हणाले होते , गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे… Read More »\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://khaasre.com/success-story-of-bvgs-hanmantrao-gaikwad/", "date_download": "2018-04-20T16:31:22Z", "digest": "sha1:OUSPT7F254WWBQ5YDETXJWOZM6OKJCP3", "length": 69141, "nlines": 247, "source_domain": "khaasre.com", "title": "१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड...", "raw_content": "\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nबघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…\nहा विडीओ बघितल्यावर रस्त्यावर फळ खरेदी करताना शंभर वेळेस विचार कराल…\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…\nहे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…\nपैलवानाचे अमृत थंडाई घरी बनवायची कृती खास पैलवानातर्फे.. नक्की वाचा\n“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.\nविराट अनुष्काच्या लग्नाबद्दल खासरे गोष्टी ज्या तुम्हाला माहित करून घ्यायला आवडेल…\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nएका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…\nवयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का \nसासवड पुणे ते मुंबई मायानगरी डॉ. निलेश साबळेयांचा प्रेरणादायक प्रवास..\nजेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र\nअराकनीला देवतांनी दिलेल्या या शापातून झाला कोळ्यांचा जन्म, वाचा गोष्ट कोळ्याच्या जन्माची…\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nकसा बनवला जातो अफु वाचा फायदे व तोटे…\nशिवाजी महाराज आणि पहिल्या छपाई यंत्राचा इतिहास…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\nनगरसेवकाने मुलीला हेलिकॉप्टरने पाठवले सासरी, बघा कोण आहे हा नगरसेवक…\nलेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी\n जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमहिला पोलिसने केला असा डान्स की…. (पाहा व्हिडिओ)\nवर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल\nपुरुषाचं शरीर असलेल्या डॅनियल ला येते मासिक पाळी, वाचा द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी…\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..\nदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू मृत्यूपूर्वी लिहले हे शब्द वाचाच\nया महिलेमुळे बंद झाला केरळ मधील महिलांच्या स्तनावरील कर..\nशिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग २\n१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड… 3\n“मी ध्रुवावर जायचं पक्क केलं होतं. कसं कधी माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित” हे शब्द आहे स्वकर्तुत्वाने एका गरीब कुटुंबातून येऊन १००० कोटींच्या कंपनीचे मालक बनलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व BVG ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांचे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींना प्रेरणास्रोत मानणाऱ्या हणमंतराव गायकवाड यांचा आज पर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. हणमंतराव भारताच्या विकासाचा आदर्श चेहरा बनले आहेत. सर्व थरातील लहानमोठ्या लोकांमध्ये वावरणारे हणमंतराव गायकवाड यांचे राजकिय व्यक्ति, अध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत. लोकांचा विचार करत गेलं की अपोआप पैसा मिळतो. कोणाचं वाईट चिंतायच नाही, कोणाला फॉलो करायचं नाही, कोणाशी स्पर्धा करायची नाही हा मूलमंत्र घेऊन हणमंतराव आजपर्यंत यशस्वी वाटचाल करत आले आहेत. कौतुक करावं तेवढं कमीच आहे आहे, या माणसाचं” हे शब्द आहे स्वकर्तुत्वाने एका गरीब कुटुंबातून येऊन १००० कोटींच्या कंपनीचे मालक बनलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व BVG ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांचे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींना प्रेरणास्रोत मानणाऱ्या हणमंतराव गायकवाड यांचा आज पर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. हणमंतराव भारताच्या विकासाचा आदर्श चेहरा बनले आहेत. सर्व थरातील लहानमोठ्या लोकांमध्ये वावरणारे हणमंतराव गायकवाड यांचे राजकिय व्यक्ति, अध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत. लोकांचा विचार करत गेलं की अपोआप पैसा मिळतो. कोणाचं वाईट चिंतायच नाही, कोणाला फॉलो करायचं नाही, कोणाशी स्पर्धा करायची नाही हा मूलमंत्र घेऊन हणमंतराव आजपर्यंत यशस्वी वाटचाल करत आले आहेत. कौतुक करावं तेवढं कमीच आहे आहे, या माणसाचं संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान, सुप्रीम कोर्ट अशा सर्वचं ठिकाणी त्यांची ‘माणसं’ काम करतात, असे साताऱ्याचे सुपुत्र BVG चे हणमंतराव गायकवाड यांची प्रेरणादायी कहाणी आज आपण बघणार आहोत खासरेवर-\nहणमंतरावांचा जन्म आणि शिक्षण-\nहणमंतरावांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी झाला. अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क म्हणून नोकरी करायचे. आई-वडील भाऊ असे छोटे कुटुंब एका १०×१० च्या भाड्याच्या खोलीत राहायचे. अत्यंत हलाखीचे जीवन ते जगायचे. त्यांच्या राहत्या खोलीत अक्षरशः लाईट सुद्धा नसायची. हणमंतरावांना लहानपणापासून अभसाची प्रचंड आवड होती. गणितासारख्या अवघड विषयात ते पैकीच्या पैकी गुण मिळवत असत. पुढे त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी साताऱ्याला जायचं ठरवलं. चौथीमध्ये असताना त्यांना राज्यसरकारची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीमूळे त्यांचा आत्मविश्वास बळावला. एकट्या वडिलांच्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. घरच्या नाजूक परिस्थितीमुळे त्यांनी लहनपणीपासूनच खूप संघर्ष केला. त्यांनी अगदी रेल्वे स्टेशनवर आंबे विकण्यापासून ते अनेक कामं केली आहेत. वडिलांनी पुढे त्यांना शिक्षणासाठी पुण्याला आणलं. वडीलांना जिल्हा परिषदमध्ये नोकरी मिळाली. आईला सुद्धा शिक्षकेची नोकरी मिळाली. त्यातच त्यांच्या वडिलांना आजारांनी ग्रासले. हणमंतरावांच पुढील शिक्षण मॉडर्न हायस्कुलला झालं. त्यांना दहावीत चांगले मार्क्स मिळाले. पुढे त्यांनी गव्हरमेन्ट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा ला प्रवेश घेतला. याच काळात त्यांचे वडील गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते. त्यांना इंजिनिअर बनायचं होतं. व्हीआयटी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व आपले शिक्षण पूर्ण केले.\nकसा सुरू झाला बिव्हिजीचा प्रवास-\nवडील वारल्यानंतर त्यांना थोडीशी विरक्ती आली. वडील गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की काही तरी वेगळं, इतरांसाठी करायचं. त्यांनी ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बिव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूर लोकांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणे, सॉस जॅमच्या बाटल्या विकणे, घरे रंगवून देणे अशी कामं हणमंतरावांनी सुरू केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी हे सर्व कामे सुरू केली होती. तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडे सिव्हीलची कामं होती. त्यांचं शिक्षण त्यावेळी इलेक्ट्रिकलचे चालू होते आणि ते काम होतं सिव्हिल- काँक्रिटचा रस्ता करण्याचं. हणमंतरावाना त्यावेळी घर बांधण्याचा थोडा अनुभव होता. त्यांनी ते काम ७ दिवसाचं काम पाचच दिवसात पूर्ण करून दिले. मजुरांचा तुटवडा जाणवत होता म्हणून त्यांनी जास्त पैसे देऊन मजूर ठेवले. त्याच दरम्यान जडत पाऊस झाला व तो रस्ता वाहून गेला. त्यांच्याकडून रास्ता लेव्हल न करण्याची चूक झालीये हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यावेळी मजूर त्यांच्या मदतीला धावून आले व तो रस्ता पुन्हा बनवला. आणि नंतर त्यांना पैसे मिळाले. १९९४ मध्ये त्यांना बिटेकची पदवी मिळाली. टेल्को मध्ये ७ हजार महिन्याची नोकरी त्यांना मिळाली. तिथे नोकरी करत असताना त्यांची घरं रंगवून द्यायची कामं सुरूच होती.\nदरम्यान त्यांच्या गावाकडील मुलं कामाच्या आशेने त्यांच्याकडे येत होती. पण ते नोकरी करत असल्याने त्यांना कामाचे कंत्राट घेण्यास अडथळे येत होते. मग त्यांनी भारत विकास प्रतिष्ठान द्वारे कामं घेण्यास सुरुवात केली. १९९७ मध्ये त्यांनी प्रतिष्ठान तर्फे एक हाऊसकिपिंगच काम घेतलं. इंडीका गाडीचा प्रकल्प त्या दरम्यान उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम त्यांच्या भारत विकास प्रतिष्ठानने घेतले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. त्यांना यामध्ये उमेश माने या मित्राची साथ मिळाली. कंत्राट मिळवणे हे त्यांचे काम असायचे तर ते करून घेणे उमेश यांची जबाबदारी असायची. त्यांच्या प्रतिष्ठानची पहिल्या वर्षाची उलाढाल ८ लाख होतीपुढच्याच वर्षी ती ५६ लाखावर पोहचली. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे त्यांच्या भारत विकास प्रतिष्ठानला खूप प्रसिध्दी मिळत गेली. पुढे त्यांना चेन्नई हैदराबाद अशा इतर शहरामध्ये कामं मिळाली. रेल्वे स्थानक, विमानतळ, रुग्णालयाच्या स्वच्छतेचे कामं त्यांनी घेतली.\n१९९७ मध्ये पाहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला जर संसदेचे काम मिळाले तर बिव्हीजी चे नाव वाढतच गेलं. त्यांना संसदेच्या ग्रंथालायच कंत्राट मिळालं. त्यांच्या कामावर खुश होऊन पुढे त्यांना लोकसभा आणि राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. पण बाहेरचा परिसर स्वच्छ पाहून त्यांना सभापतींनी आत परवानगी दिली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतल्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी बिव्हीजीची सेवा मिळू लागली. आज एकट्या दिल्लीत बिव्हीजीचे नऊ हजार कर्मचारी काम करतात. ऑगस्ट २०१६ मध्येकंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या होती ६५ हजार. भारत विकास ग्रुपने आता परदेशातही विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. भारत विकास ग्रुप देशातील २० राज्यांमध्ये ८०० हुन अधिक ठिकाणी आपली सेवा प्रदान करत आहे. टाटा समूह, हिंदुस्तान लिव्हर, फॉक्सवॅगन सारख्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा ते हाऊसकिपिंग ची सेवा देतात. लँडस्केप गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलर पार्क, एलईडी लायटिंग, सोलर पंप, प्लॅस्टिकपासून इंधन, फूड पार्क आशा अनेक क्षेत्रात बिव्हीजी सध्या जम बसवत आहे. बिव्हीजीने नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन सोबत भागीदारी केली आहे. त्याद्वारे त्यांनी विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनामध्ये प्रवेश केला आहे.\nहणमंतराव गायकवाड यांना सामाजिक कार्याची सुद्धा प्रचंड आवड आहे. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना २०११ मध्ये लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा अवार्ड मिळाला. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा रश्मी बन्सल यांच्या कनेक्ट द डॉट्स या पुस्तकात सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. १ जुलै २०१६ ला त्यांना एबीपी माझा कडून एबीपी माझा सन्मान पुरस्कार मिळाला. त्यांच्या बिव्हीजी ग्रुपकडून महाराष्ट्रात आतापर्यंत ७५० अंबुलन्स दिल्या आहेत. १७००० डिलिव्हरी त्यांच्या अंबुलन्स मध्ये झाल्या आहेत. मध्यप्रदेश पोलिसांना २५० वाहने, आंध्रप्रदेश सरकारला ५०० गाड्या त्यांनी दिल्या आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nआईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nPrevious Articleबाळासाहेबांना आदेश देणारा विदर्भाचा शेर भाऊ जाबुवंतराव धोटे…Next Articleदुष्काळात ३० एकर ऊस मोडून जनावरासाठी छावणी देणारे कोते गुरुजी…\nPingback: आयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक\nPingback: एकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास..\nयशामागचे कारण, जिद्द, चिकाटी व श्रम.\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0\n२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.\nभारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.\nभारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.\n१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का \nआपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.\nजम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.\nकाश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.\nसात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.\nकारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.\nकॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.\nजखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.\nकारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन \nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n नाम ही काफी है \nमला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…\nसहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…\nगोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..\nउदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..\nसातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..\nआजच्या युगात कसले महाराज नि कसले काय असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का\nमाझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात\nरात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..\nअपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .\nअजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..\nअसंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..\nत्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…\nमहाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0\nजि. प. शाळा ते IRS अधिकारी\nश्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)\nभारतीय महसूल सेवा, नागपूर.\n“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.\nसाधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर\nह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब\nनानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.\nत्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.\nआई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.\n“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस… - December 12, 2017\nहा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत… - December 1, 2017\nकमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक… - December 1, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/raj-thakare-patrakar-parishad-mumbai/", "date_download": "2018-04-20T16:27:27Z", "digest": "sha1:6WZJM4336IGJJB3GC3ISDV3MKOXBCX4K", "length": 9580, "nlines": 61, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nआता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार\nमुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी मला फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा करणारे राजकारण मी करत नाही, आता हातावर नव्हे गालावर टाळी देणार शिवाय फोडाफोडीसाठी ३० कोटी रुपये कुठून आणले असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला आहे.\nशिवसेनेने गलिच्छ आणि खालच्या पातळीवर राजकारण केले असून यामुळे राज्यातील जनतेमध्ये राग आहे. चूक लक्षात आल्याने शिवसेनेने आता आम्हीच आमचे नगरसेवक तिकडे पाठवल्याची अफवा पसरवली. मात्र आम्ही आमचे नगरसेवक शिवसेनेत पाठवलेले नाहीत. आम्हाला पाठवायचे असते तर सगळेच्या सगळे सात नगरसेवक तिकडे पाठवले असते. या अफवांमध्ये काहीतरी तथ्य नाही, नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यामागे आमचा बिलकुल हात नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले .\nशिवसेनेला मराठी माणसाशी काहीही घेणेदेणे नाही. फोडाफोडीचे राजकारण करुन शिवसेनेने निवडून दिलेल्या मराठी माणसाचा विश्वासघात केला.शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले. म्हणजेच हा व्यवहार सुमारे ३० कोटींचा आहे. मग एवढे पैसे सेनेकडे कुठून आले ,असाही आरोप त्यांनी शिवसेनेवर केला.\nमला यापूर्वीच ह्या नगरसेवकांविषयी कुणकुण लागली होती,मग मी स्वतःच त्यांची बैठक घेतली, त्यावेळी सर्वानी मला पक्षात राहण्याची ग्वाही दिली होती . ज्यांनी स्वतःला बाजारात ५कोटी रुपयांना विकायला ठेवले, त्यांच्यावर काय बोलणार शिवसेना सोडून बाकी पक्ष काय करतात तो वेगळा विषय आहे, पण मला शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती. माझ्या मते राजकारण हे उमदं असायला पाहिजे.अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवरील नाराजी व्यक्त केली.\nभविष्यात सेनेला टाळी देणार का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेने एकदा आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही मदत केली असती. आता यापुढे हातावर नव्हे तर गालावर टाळी देणार असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला दिला. मी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पक्षस्थापन करण्याचा विचार केला नव्हता. मी ज्यावेळी पक्षस्थापन केला तेव्हा शिवसेनेसह इतरही काही राजकीय पक्षांमधील नेते मनसे मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते, मात्र मी त्यांना प्रवेश दिला नव्हता, असेही राज ठाकरे म्हणाले .\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \nCategory: महाराष्ट्र मुंबई Tags: manse, shivsena, उद्धव ठाकरे, नगरसेवक, मनसे, राज ठाकरे\n← नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून..राणे यांच्यावर हल्लाबोल पुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण \nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/latur/bikesharas-dile-side-bus-collapsed-under-bridge-two-killed/", "date_download": "2018-04-20T15:58:26Z", "digest": "sha1:B3OFHG6EKHTIDKFTSVQFMHV4GBSBSXXX", "length": 23487, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bikesharas Dile Side: Bus Collapsed Under Bridge, Two Killed | बाईकस्वारास दिली साईड : बस कोसळली पुलाखाली, दोन ठार | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nबाईकस्वारास दिली साईड : बस कोसळली पुलाखाली, दोन ठार\nऔराद कडून उदगीरकडे येणारी कर्नाटक आगाराची बस (क्र. केए. 38 एफ 538) शेल्हाळजवळ पुलावरून खाली कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत.\nठळक मुद्दे बाईक येताच त्याला साईड देण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली ५ फुट खोल खड्ड्यात कोसळली.\nउदगीर ( लातूर ), दि. १५ : औराद कडून उदगीरकडे येणारी कर्नाटक आगाराची बस (क्र. केए. 38 एफ 538) शेल्हाळजवळ पुलावरून खाली कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत.\nया बाबत प्रत्यक्षदर्शिंच्या माहिती नुसार, सकाळी शेल्हाळजवळ बस समोरून बाईक येताच त्याला साईड देण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली ५ फुट खोल खड्ड्यात कोसळली. खाली कोसळताच बस ने पलटी घेतली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत. मृतात १९ वर्षीय ममता रमेश सगर (रा. मुर्की ता.औराद जि. बिदर) या तरुणीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी मदत कार्य सुरु करत जखमींना बाहेर काढले. जखमींवर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVIDEO- पाण्यासाठी काहीही; बांधावरच होते श्रमदानाला येणाऱ्याची मोफत दाढी अन् कटिंग\nनिलंग्यात कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nउदगिरात शिक्षकाने शाळेतच केली आत्महत्या\nअखेर ' त्या ' शेतकऱ्याच्या हरभऱ्याची झाली विक्री; कृषी राज्यमंत्र्यानी दिल्या सूचना\nलातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस\nमुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर; बदलाव लागली तारीख\nबिलिंग्स OUT; चेन्नईला चौथा धक्का\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i141125061234/view", "date_download": "2018-04-20T16:44:08Z", "digest": "sha1:7P5UHYGOJX4DF3B6II6YB4ZGXD2ZWZEA", "length": 9698, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "साधन मुक्तावलि", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|\nसंप्रात आणि असंप्रात समाधी\nद्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - प्रात:स्मरण\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - प्रात:स्मरण\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - पंचरत्न स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - रामलक्ष्मणाष्टक\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - तत्वमसि स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - अभ्यास\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - मनोलय\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - सहज समाधि\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - संप्रात आणि असंप्रात समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - उत्थान लक्षणें\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - मुक्तस्थिति\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - कौपीनपंचक\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - गुरुआज्ञा\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - जनस्वभाव\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - रामदासी अभंगसुधा\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - श्रीसमर्थस्तवराज\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - देवभक्त प्रणयकलह\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - श्रीसंकर्षण स्तोत्र\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nसाधन मुक्तावलि - वनमाला\n’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nजीवनार्पण - जीवनसुमना मदीय देवा\nहृदयाचे बोल - मला तुझ्यावीण कुणी कुणी न...\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nप्रार्थना - माझ्या ओठावरि थरथरे प्रार...\n - उदास झालो त्या दिवशी\nसोन्याचा दिवस - जन्ममरणांची\nआशा - संपोनीया निशा\nतुला देतो मी जमिन ही लिहून - जीवनाच्या ओसाड वाळवंटी\nसुखामृत - कळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://bhagyashreee.blogspot.com/2007/09/", "date_download": "2018-04-20T16:07:00Z", "digest": "sha1:AZ6FDSJCG6F2HXNJRPZCHHUBALHRS6F3", "length": 5836, "nlines": 191, "source_domain": "bhagyashreee.blogspot.com", "title": "माझे विचार...", "raw_content": "\nविचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न...\nया ब्लॉगची सदस्यता घ्या\nSeptember, 2007 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nआज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे... :)\nदुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी वा…\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nये जो देस है तेरा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nmerrymoonmary द्वारे थीम इमेज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/marathi-news-celebrities-posted-good-wishes-virat-and-anushka-trough-twitter-87063", "date_download": "2018-04-20T16:44:12Z", "digest": "sha1:CCCJ6AURQWXTN5Z7EHPO5R5F47FDMTZ2", "length": 11703, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news celebrities posted good wishes to virat and anushka trough twitter विरानुष्कावर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव! | eSakal", "raw_content": "\nविरानुष्कावर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव\nमंगळवार, 12 डिसेंबर 2017\nट्विटरवर सध्या #virushkaKiShadi हा ट्रेंड सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे विराट व अनुष्काने विवाहबद्ध झाल्याची माहिती व लग्नाचे फोटो सर्वप्रथम ट्विटरवरूनच शेअर केले.\nआपल्या सर्वांची आवडती जोडी विराट-अनुष्का काल आनंदात आणि थाटामाटात लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवस गाजली, अखेरीस हे 'स्टार कपल' काल इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले व सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. या खास जोडीसाठी इटलीमधील मिलान येथे विशेष लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दोघेही पारंपारिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होते. यानंतर मुंबई व दिल्लीमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हितचिंतकांनी ट्विटरवरून दोघांना अनेक शुभेच्छा दिल्या. विराटचे मित्र व भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, तसेच अनुष्काच्या बॉलिवूडमधील मित्रमंडळींनी दोघांना लग्नासाठी व त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हि. व्हि. एस्. लक्ष्मण, रविंद्र जडेजा, आलिया भट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.\nट्विटरवर सध्या #virushkaKiShadi हा ट्रेंड सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे विराट व अनुष्काने विवाहबद्ध झाल्याची माहिती व लग्नाचे फोटो सर्वप्रथम ट्विटरवरूनच शेअर केले.\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nचंदगड तालुक्यात देवरवाडी येथे ट्रकच्या धडकेत दोघेजण ठार\nचंदगड - देवरवाडी (ता. चंदगड) येथे ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले. जोतिबा पवार (वय 42) व चाळोबा रेंबुळकर (40,...\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nविवाहबंधनात अडकण्यापूर्वी त्या दोघांनीही केले श्रमदान\nउंडवडी (पुणे) : स्थळ : सोनवडी सुपे (ता. बारामती) हद्दीतील यशवंत लॉन्स कार्यालय... वेळ : सकाळी साडे दहाची.. लग्नासाठी नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/shiv-sena-corporator-sangamner-municipal-corporation-arrested-abusing-doctors/", "date_download": "2018-04-20T16:24:37Z", "digest": "sha1:5SRVPQ4JDRUDNTTBHACIJ7ZNSWTM35S3", "length": 25822, "nlines": 349, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena Corporator Of Sangamner Municipal Corporation Arrested For Abusing Doctors | डॉक्टरांना शिवीगाळ करणा-या संगमनेर पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाला अटक | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nIPL 2018 : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nAll post in लाइव न्यूज़\nडॉक्टरांना शिवीगाळ करणा-या संगमनेर पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाला अटक\nशिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंगमनेर : शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.\nनगरसेवक घोरपडे व त्याचा मित्र झावरे हे दोघे गुरूवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाला घेवून घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचा-यांना डॉक्टर कुठे आहेत अशी विचारणा केल्यानंतर कर्मचा-यांनी लगेचच डॉ. संदिप कचेरीया यांना याबाबत भमण्रध्वनीवरुन कल्पना दिली.\nडॉक्टर रूग्णालयात येण्याअगोदर काही काळ घोरपडे व झावरे यांनी तेथे उपस्थित असणा-यांना सरकारी कर्मचा-यांना शिवीगाळ व धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. कचेरीया हे तेथे तात्काळ उपस्थित झाले त्यानंतर त्यांनी जखमी रूग्णावर उपचार केले. घोरपडे व त्याचा मित्र झावरे या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी रूग्णालयातील कर्मचारी दादा लल्लु साबळे यांनी दिलेल्या फिर्यादवरून घोरपडे व झावरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशिवसेना नगरसेवक गायकवाडला अटक\nलाच घेताना शिवसेना नगरसेविकेला अटक\nश्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे\nगुन्हा रद्द होण्यासाठी शिवसेनेची खंडपीठात धाव\nमैत्रेय ग्रुपकडून २३ कोटींची फसवणूक : अध्यक्ष, संचालकांविरोधात गुन्हा\nसाईनगरीत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात एकावन्न जोडपी विवाहबद्ध\nलाच घेणाऱ्या अभियंत्यास सक्तमजुरीसह ८५ लाखांचा दंड\nवाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिका-याने मागितली खंडणी\nचेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : चेन्नईचे राजस्थानपुढे 205 धावांचे आव्हान\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/kulbhushan-jadhavs-mother-told-his-son-to-tell-truth-about-pak-278261.html", "date_download": "2018-04-20T16:32:31Z", "digest": "sha1:BZ2XXSQXJSETWD2IL2XT73FUERMDBJOX", "length": 12192, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हे खरं आहे आणि तेच तू सांग', कुलभूषणना आईनं खडसावलं", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \n'हे खरं आहे आणि तेच तू सांग', कुलभूषणना आईनं खडसावलं\nआईशी बोलत असताना कुलभूषण पाकिस्ताननं केलेल्या आरोपांचा पाढा वाचू लागले. तेव्हा त्यांच्या आईनं त्याला खडसावलं.\n28 डिसेंबर : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव आणि त्याच्या कुटुबींयाच्या भेटीत काय काय घडलं, याची माहिती आता बाहेर येतेय. आईशी बोलत असताना कुलभूषण पाकिस्ताननं केलेल्या आरोपांचा पाढा वाचू लागले. तेव्हा त्यांच्या आईनं त्याला खडसावलं. 'तू हे सगळं का बोलतोयस. तू इराणमध्ये व्यवसाय करत होतास आण तिथेच तुझं अपहरण झालं. हे खरं आहे आणि तेच तू सांग.' असं त्यांच्या आईनं त्यांना खडसावलं. यामुळे, या दोघांचं संभाषण रेकॉर्ड करून ते जगासमोर आणायचा पाकचा कुटील डाव फसला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं या बातमीचा खुलासा केला आहे.\nपाहूयात कुलभूषणच्या आईनं नेमकं काय म्हटलंय\n'पण तू हे सगळं का बोलतोयस व्यवसाय करण्यासाठी तू इराणमध्ये होतास आणि तिथेच तुझं अपहरण झालं. तू खरं काय ते सागितलंच पाहिजेस.'\nया भेटीत कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना पाकिस्ताननं अतिशय वाईट वागणूक दिली आहे. याच मुद्द्यावर आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लोकसभेत सविस्तर उत्तर देणार आहेत. तशी घोषणा त्यांनी काल सभागृहात केली होती. संसदेत काल कुलभूषण यांच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूलचे मंत्री आक्रमक झाले होते. कुलभूषणची आई आणि पत्नीला अपमानास्पद वागणूक देणं, पत्नीला मंगळसूत्र काढायला लावणं, आईला मराठीत बोलू न देणं. या सगळ्यावर भारतानं कडक आक्षेप घेतला आहे. या सगळ्यावर आता सुषमा काय भाष्य करतील, याकडेच सगळ्यांच लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/pankaja-munde-savargaon-dasara-melava-271095.html", "date_download": "2018-04-20T16:34:23Z", "digest": "sha1:2I4YRNFWI2ZHDUB3QLOIV5WB4NL3362G", "length": 18363, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत", "raw_content": "\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nसावरगावात आम्हाला भगवानबाबा दिसताय, पंकजा मुंडेंकडून नव्या भगवानगडाचे संकेत\nनागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबई उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते , माझं काय चुकलं , माझं काय चुकलं , असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारलाय.\n30 सप्टेंबर : नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबई उद्धव ठाकरेंचा मेळावा होता, पण इथं गोरगरिबांचा मेळावा होत असताना पंकजा मुंडेंलाच का बंदी असते , माझं काय चुकलं , माझं काय चुकलं , असा थेट सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विचारलाय. तसंच आम्हाला आता सावरगावात भगवानबाबा दिसताय असं सांगत नवा भगवानगड स्थापनेचं संकेतही दिले.\nभगवानगडावर राजकीय पक्षांच्य मेळाव्यांना विरोधामुळे याही वर्षी पंकजा मुडे विरुद्ध भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा वाद चांगला गाजला. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे अखेर भगवानबाबाच्या जन्मभूमीत सावरगावात पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा साजरा केला. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होती.\nभाषणाच्या सुरुवातील पंकजा मुंडे यांनी चक्रव्युहमध्ये अडकलेल्या अर्जुनाचं उदाहरण दिलं. मी स्वत:ला प्रश्न विचारतेय की माझं काय चुकलं , हा दसरा मेळावा कुणासाठी आहे , हा दसरा मेळावा कुणासाठी आहे , मी राज्यभरात अनेक देवस्थानांच्या कार्यक्रमाला जाते, शिवनेरीला शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पण मला कुठेच बंदी नसते. पण फक्त भगवानगडावर मला बंदी असते. मला कोणताही वाद नको होता, माझ्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून भगवानबाबांच्या जन्मभूमीत मेळावा घेतला.\n'आता तुमचे पाण्यात ठेवलेले देव काढा'\nमहाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती करते, तुमचे पाण्यात ठेवलेले देव काढा, पंकजा मुंडे कुणाच्या घरात डाका टाकायला जात नाही. पंकजा मुंडे स्वत :च्या नावासाठी काम करत नाही. पंकजा मुंडे जनतेसाठी काम करते असंही पंकजांनी ठणकावून सांगितलं.\nमला विमानतळावर आडवलं. मागच्या वेळीही अडवलं आणि याही वर्षी अडवलं. हजारो माणसं आली इथं आली ती कुणासाठी आली ती फक्त मुंडे साहेबांच्या नावाने आली. विचारांचं सोनं लुटण्यासाठी हे लोकं येत असतात. नागपुरात संघाचा दसरा मेळावा होतो, मुंबईत उद्धव ठाकरेंचा मेळावा होतो, आणि इथं गरिबांचा मेळावा होतो नेमका त्यालाच का विरोध असा सवाल पंकजा मुंडेंनी विचारला.\nभगवानगडावर महंत नामदेवशास्त्रींची मागील वर्षी डिसेंबरमध्ये भेट घेतली होती तेव्हा ते गादीवर बसलले होते. त्यांच्या पाया पडून त्याचा निरोप घेतला होता. त्यावेळी त्यांनी काळजी घ्या असा सल्ला दिला होता. पण आज मला भगवानगडावर येऊ दिलं नाही. त्याचं उत्तर मला मिळालं. कर्मभूमीनं नाकारलं तरी भगवानबाबांच्या जन्मभूमीनं आम्हाला बोलावलं. भगवानगडावर दर्शन झालं नाही पण जन्मभूमीत आम्हाला भगवानबाबा आता आम्हाला सावरगावात दिसताय. या मेळाव्यातून आम्ही सावरगावात आता भगवानबाबा दिसताय हा निर्णय आम्ही जनमानसातून घेतला अशी जनता कुणासोबत आहे हे एकदा पाहुन घ्या, पंकजा मुंडेच जनतेसोबत आहे. ज्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर भेटला तर मी त्याचा हात धरून पुढे करेल आणि मी मागे होईल अशी भावनिक सादही घातला.\n'त्यांच्या विचारांच्या धक्का लावू नका'\nमहंत म्हणाले होते, गडाचा श्वास मोकळा झाला. गडावर आज अडीच हजार पोलीस आहेत, तुमच्या केसांना धक्का लावण्याची आमची मानसिकता नाही, पण त्यांच्या विचारांच्या धक्का लावू नका अशा सल्ला वजा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला.\nवाद असता तर मिटवला असता, भेद असता तर मिटवला असता पण वाद आमच्यात नाही भेद आमच्यात नाही. रात्रीतून निर्णय घेऊन पंकजाला अयोग्य ठरवताय. आज एवढी गर्दी जमलीये. ती पंकजा मुंडेला अयोग्य ठरवण्यासाठी आहे का असा सवाल पंकजांनी उपस्थिती केला.\nमक्केत सैतानाला दगड मारतात तसंच मी भगवानबाबाच्या मूर्तीबरोबर इथं तसं करणार, त्यामुळे ज्याला तुम्ही पापाचं प्रतिक म्हणून दगड माराल असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.\nमुंडेंसाहेबांचं नाव मी का नाही घ्यायचं \nमी मुंडे साहेबांचं नाव का घ्यायचं नाही ते तर माझे वडील आहेत, इतर लोक ते नाव घेतात मग मी का नाही ते तर माझे वडील आहेत, इतर लोक ते नाव घेतात मग मी का नाही असा सवालही त्यांनी थेट विचारला. तसंच मी भगवानबाबाच्या जन्मभूमीचा विकास करीन. भगवान बाबांची मोठी मूर्ती उभारणार अशी घोषणाही पंकजा मुंडेंनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #भगवानगडदसरामेळावाpankaja mundeपंकजा मुंडेभगवानगड\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\nसंतापजनक, अल्पवयीन मुलांकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nकसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/lokdhara/articleshow/62479043.cms", "date_download": "2018-04-20T16:37:00Z", "digest": "sha1:2HDBCPBE55QDDOU33OMJDTYQ5TOKU7A4", "length": 30123, "nlines": 242, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "lokdhara | लोकसंस्कृतीचा आदिम नाद - Maharashtra Times", "raw_content": "\nतिरुवनंतपुरम: लष्करभरतीसाठी खडतर ..\nलुधियानात आगीमुळे गव्हाच्या पिकाच..\nउत्तर प्रदेश : उपचारांअभावी बालका..\n२००२ गुजरात दंगल: बळींच्या नातेवा..\nजपानमधील ज्वालामुखी २५० वर्षांनंत..\nकानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, आई भवानी, आसरा, खंडोबा, आढीजागरण, म्हसोबा, रोकडोबा, वीरदेव हे लोकदेव गावाच्या आजूबाजूला पाहत होतो. त्यांचे उत्सव पाहत होतो. उग्र उपासना पद्धत अनुभवत होतो. गोंधळी, मरिआई, वासुदेव, रायरंग, नंदीबैलवाले, टिंगरीवाले, नाव ओळखणारे, नाथबोवा, गारुडी, डोंबारी यांच्या कला-नकला, आवाज, गाणे, वाद्य ऐकून नकळत एक स्वतंत्र दृष्टी तयार होत होती.\nलोकपरंपरेतून लोकसंस्कृती उदयास येत असते. लोकश्रद्धेच्या सेतूंवरून मार्गक्रमणा करीत ग्रामीण लोक आपले आयुष्य व्यतीत करीत असतात. हा समग्र पट म्हणजे लोकधारा.\nगावांत सर्व जाती-जमातींचे लोक परंपरेने गुण्यागोविंदाने राहत आणि मामधरमच्या (नामधारी) नात्यागोत्याने एकमेकांशी बांधील असत. गावात कोणी आदिवासी असो, की परंपरेने चुकीच्या लोकसमजुतीने नाकारलेले लोक. गावाबाहेर वस्ती करणारा कोणीही माणूस आपल्या आईला काकू म्हणत असे व आपण एखाद्या आदिवासी स्त्रीला मावशी म्हणायचो. सगळ्यांच्या रीतिरिवाजांशी समरसून आपले बालपण अनुभवांनी समृद्ध होत गेले.\nआमच्या घराच्या बाजूलाच उतार उतरून गेलं, की कान्हेरी नदी वाहायची, तेव्हा ती बाराही महिने एका धारेने का होईना वाहायची. माझ्या अनेक मित्रांबरोबर मी नदीवर अंघोळीला जात असे. केव्हा बंधाऱ्यात, केव्हा टाकळीत, केव्हा पाटात, केव्हा चुहेलीत, तर पूर येऊन गेल्यावर नदीतच आम्ही अंघोळ करत असू. अनायासे काही लोक मासे व खेकडे कसे पकडतात याचंही अवलोकन करता येत होतं.\nभोवरा, गोट्यागोट्या, टीपाटिपी, कबड्डी, चिलापाटी, लपालपी, घोडाघोडी, हत्तीची सोंड, विटी-दांडू, डीबडीब, कोयीकोयी, आंधळी कोशिंबीर, गो-गो रानी, खोपा खोपी, आळे आळे, आळीसुळी, सरगोंडी, चकरी असे अनेक खेळ आम्ही दाराशीच खेळत असू. दारासमोर मराठी शाळा व तिचं विस्तृत पटांगण होतं. त्याला लागूनच मारुतीचा पार होता. अशा प्रचंड जागेचा पुरेपूर उपयोग आम्ही मुलं खेळासाठी करीत होतो.\nआमच्या गावाला भोवाडा हा लोकोत्सव सलग तीन रात्री चालत असे. दिवसा अजिबात झोप न घेता मी सलग तीन रात्री जागून संपूर्ण भोवाडा पाहत असे. खंडोबाचा आढीजागरणाचा कार्यक्रम असाच रात्रभर चालायचा. आढीजागरणासारखीच आखाजींची गाणी, झोक्यावरची गाणी, लग्नातली गाणी आदी सर्वप्रकारची लोकगीतं तोंडीपाठ असत. आषाढी अमावास्येला गावातील पद्मनाभ स्वामी समाधीत एक लळित होत असे. जेवणखावन विसरून मी तो कार्यक्रम पूर्ण पाहायचो. मन हरखून जायचं. सर्व लोककलांची अस्सलता त्या बालवयातही लक्षात येत होती. हे विश्व वेगळे आहे, आदिम आहे आणि आपण त्यात संमोहीत होऊन आकर्षिले जात आहोत, याची जाण तेव्हाही असे.\nडोंगऱ्यादेवाचा उत्सव असो, चिरा बसविण्याचा कार्यक्रम असो, धोंड्या होऊन पाणी मागण्याचा कार्यक्रम असो, आखाजीचा बार असो, भिलांचा तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो, लग्नाचा नाच असो, होळीचा शिमगा असो, कुठे भजन असो वा कीर्तन, राजकीय प्रचाराची सभा असो वा कलापथक, गावातील भारुडांचा कार्यक्रम असो की तमाशा, स्वाध्याय असो की सर्कस अशा सर्व गावसभा, गाव कार्यक्रम वा आदिवासी लोकोत्सव असो दिवसभर तहान-भूक विसरून भावनिकदृष्ट्या त्यात सामील असायचो. मी भिलाटीतल्या व गावातल्या सर्व कार्यक्रमांचा पहिला प्रेक्षक.\nआमचं घर गावाच्या वरच्या म्हणजे पश्चिम दिशेला होतं. जिथे कान्हेरी नदीचा उतार लागत असे. उताराच्या ढेंगड्यांवर आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भिलाटी वसलेली होती. भिलाटीत कोणताही कार्यक्रम असला, की आम्हाला तो आल्हाद ऐकू यायचा आणि असा आवाज ऐकू येण्याचा उशीर मी लगेच भिलाटीत हजर व्हायचो. तेथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना माझी हजेरी असायची. भिलाटीत लग्न असो, डोंगऱ्या देवाचा उत्सव, थाळीवरची कथा, लग्नातील ढोलावरचे नाच व पावरी गीते, भिलाटीतील रात्रभर चालणारी होळी, खंजिरी, तुणतुणे, सांबळ, ढोल, पावरी या वाद्यांच्या सान्निध्यात अशीच रात्र रात्र जागून नाच-वाद्य पाहत-ऐकत असे. गावात डोंबाऱ्यांचा खेळ आला, की ते कलाकार भिलाटीत मुक्कामाला उतरत आणि दुसर्‍या दिवशी त्यांचा पहिला खेळही भिलाटीतच होत असे.\nमार्गशीर्ष महिन्यात डोंगऱ्या देवाचा उत्सव दर वर्षी भिलाटीत पंधरा दिवस चालायचा. तो कार्यक्रम मला खूप भयंकर वाटायचा. त्यांचे नाच, गाणे, देवभक्‍त, वारं, त्यांचा अवतार, त्यांची शिस्त, वाद्य, आदिम आरोळ्या, हुंकार, धवळीशेवर, टापऱ्या, तोंडाने वाजायच्या पुरक्या, ठेक्याने वाजवायच्या टाळ्या, या सर्वांनी मी जागीच हरखून जायचो. गावखळी बसवायची पद्धत, थोम गाडायची पद्धत, त्यांचे आचार, पथ्य, वेश अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे माझं ध्यान असायचं. या आचरण पद्धतीतील नवे शब्द व्यवहारात ऐकायला मिळायचे नाहीत. या सर्व गूढ वाटणाऱ्या गोष्टींमुळे मी त्यांच्याकडे कसा ओढला गेलो हे मलाही कळलं नाही.\nलेखक भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत.\nमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nही तर व्यावसायिक दंडेली\nनेपाळचे अघोषित ब्लॅकमेल तंत्र\nशेतकऱ्यांना 'अच्छे दिन' कधी\nAkshaya Tritiya 2018: श्रेय आणि स्मरणाचा उत्सव\nAkshaya Tritiya: हिरा विकत घेताना…\n2राजभाषा मराठीचा दिवा तेवता ठेवा\n3निवडणूक रोखे कितपत यशस्वी होतील\n4घोषणांचा सुकाळ, कृतीचा दुष्काळ\n5आरोग्य व्यवस्थेची अशी हेळसांड का\n6‘फूड प्रोसिंग’ची योजना सुलभ व्हावी...\n7स्वयंसेवी संस्थांची कोंडी कशासाठी\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-04-20T16:30:50Z", "digest": "sha1:T44A3EAD3SRM7H3WFQCE3VHS4UTDRKD3", "length": 5587, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉलिन मॅकडोनाल्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nमे ४, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:46:27Z", "digest": "sha1:TDAPH4VE2XPJURA3Z45MKN5V3FKDTZ5B", "length": 3467, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:धारित्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-20T16:31:05Z", "digest": "sha1:NLCH2TVXGDFMR6K3GY5IA6CSLP7ITB5Z", "length": 22601, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुलोचना चव्हाण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n[ चित्र हवे ]\nसुलोचना चव्हाण - माहेरच्या सुलोचना कदम (जन्म : मुंबई, १७ मार्च १९३३) या एक मराठी गायिका आहेत.. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता \"श्रीकृष्ण बाळमेळा\". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली.\nश्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते \"कृष्ण सुदामा\". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत \"सी. रामचंद्र\" (त्यांची द्वंद्वगीते - \"जो बिगड गयी वो किस्मत हूँ / नजर से नजर लड गयी, जिगर में छूरी गड गयी, हाय राम). पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या \"भोजपुरी रामायण\" गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.\n२ सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार\nवत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली \"सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची\" ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या \"हीच माझी लक्ष्मी\" या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते \"मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी...\" . आचार्य अत्रे यांनीच त्यांना \"लावणीसम्राज्ञी\" असा किताब दिला.\nसुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास \"कलगीतुरा\" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव \"एस. चव्हाण\" होते. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच \"रंगल्या रात्री अशा\" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि \"नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची\" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खर्‍या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. \"मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणांइतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. \"पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे\" असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.\nसुलोचना चव्हाण यांना १९६५ साली \"मल्हारी मार्तंड\" या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.\nसुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी:\n१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची\n२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं\n३. पाडाला पिकलाय आंबा\n४. फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा\n५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा\n६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा\n७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का\n८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष\n९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याचं\n१०. मल्हारी देव मल्हारी\n११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी\n१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा\n१३. गोरा चंद्र डागला\n१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना\n१५. पावना पुण्याचा आलाय गं\n१६. रात्र श्रावणी आज राजसा पाउस पडतोय भारी, पाखरू पिरतीचं लाजुन बसलंय उरी\n१७. आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला\n१८. दर रात सुखाची नवसाची, मज झोपच येते दिवसाची\n१९. हिरीला इंजिन बसवा\n२०. कुठवर पाहू वाट सख्याची, माथ्यावर चंद्र की गं ढळला, अन् येण्याच वखत की गं टळला\n२१. दाटु लागली उरात चोळी कुठवर आता जपायचं, औंदा लगीन करायचं\n२२. अगं कारभारनी, करतो मनधरनी (सोबत जयवंत कुलकर्णी)\n२३. करी दिवसाची रात माझी\n२४. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं\n२५. जागी हो जानकी\n२६. बाई मी मुलखाची लाजरी\n२७. राजसा घ्या गोविंद विडा\n२८. लई लई लबाड दिसतोय ग\n२९. घ्यावा नुसताच बघुन मुखडा\n३०. बाळा माझ्या कर अंगाई\n३१. श्रीहरी गीत तुझे गाते\nसुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार\nसंगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा \"लता मंगेशकर\" पुरस्कार\nचिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार (१७-१-२०१५)\nसुलोचना चव्हाण यांनी ’माझं गाणं....माझं जगणं’ या नावाचे आत्मवरित्र लिहिले आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१५ रोजी ००:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/11/21/opaque-transperency/", "date_download": "2018-04-20T15:59:36Z", "digest": "sha1:GOQ2HDHFYGPUYEYGSNWTBEGKE3IRKYJW", "length": 25894, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "अपारदर्शक पारदर्शकता | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nफडणवीस सरकारचा कारभार पारदर्शकतेचा सातत्याने गवगवा करीत असला तरी हे सरकार अत्यंत अपारदर्शक पध्दतीने चालते.\nया सरकारच्या कारभाराचा पंचनामा सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने `घोटाळेबाज’ अशी पुस्तिका काढून केला. या पुस्तिकेत ज्यांच्या नावानिशी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांनी अथवा ते ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारने, त्या आरोपांचा इन्कार केलेला नाही. शिवसेनेच्या नावाने आगपाखड केल्यानंतर शिवसेनेने आपला त्या पुस्तिकेशी संबंध नसल्याचे साळसूदपणे जाहीर करून टाकले. या घोटाळेबाज मंत्र्यांच्या किंवा राज्यमंत्रांच्या यादीत काही नावे आलीच नाहीत. परंतु त्यांच्या नावाची राज्यात चर्चा व्हायला हवी. आपल्या स्वतःच्या राजकारणाला सोयीचे असलेले आणि सोयीचे नसलेले, अशी वर्गवारी करून गैरसोयीचे असलेल्याच्या भ्रष्टाचाराची चर्चा आपल्याला धार्जिण्या असलेल्या वृत्तप्रतिनिधींच्या मार्फत घडवून आणायची अशी साधी सोपी आणि सरळ व्यूहरचना करून गेल्या तीन वर्षांचा कारभार चालविण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरलेले आहेत.\nआपण जे काही करतो ते लोकांच्या दृष्टोत्पत्तीस येऊ नये, परंतु जे लोकांच्या समोर यावे असे वाटते ते मात्र आपल्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून विविध माध्यमांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी सुलभपणे पार पाडले आहे, असे आपण बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येते. एकनाथ खडसे हे त्यासाठी एक उदाहरण ठरावे. त्यांच्या जमीन खरेदीचे प्रकरण स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवून घेणाऱ्या दमानिया या महिलेच्या हाती कागदपत्रांसह येते आणि त्या देखील त्या कागदपत्रांचा वापर एखाद्या सराईत राजकारण्याच्या पध्दतीने करून खडसे यांना उघडे पाडतात. यावर मुख्यमंत्री त्यांना क्लीनचिटही देऊन टाकतात. या सर्व प्रकरणाचा अर्थ एकच काढता येतो, तो म्हणजे खडसे त्यांना मंत्रिमंडळात नको होते. त्यांना काढणे अन्यथा अवघड होते. त्यासाठी कमालीची गुप्तता पाळून त्यांच्या कथित जमीन खरेदीचे प्रकरण बाहेर काढण्याची खेळी केली गेली. ही राजकीय खेळी स्वतः मुख्यमंत्र्यांचीच होती, असे खाजगीत मंत्रालयातील लोक सांगतात. एबीपी माझा ही वृत्तवाहिनी त्यांच्या तीन वर्षाच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी ज्यांना बोलावते त्यात दमानिया बाईंचाही समावेश असतो आणि त्या तावातावाने आम्ही एवढी प्रकरणे काढतो आणि त्यावर तुम्ही काहीच करत नाही, असे त्यांच्या समोरच सांगतात याचा अर्थ आपला आणि दमानीया बाई या स्वतंत्र बाण्याच्या आहेत, हे दाखविणे एवढाच असतो, हे न कळण्या इतका महाराष्ट्राचा प्रेक्षक दूधखुळा नाही. त्यावर दमानिया बाईंना मुख्यमंत्री निक्षून सांगतात की तुम्ही तुमचे काम करतच रहा. आम्हाला राजकारणात काही मर्यादा असतात. त्यामुळे आम्हाला जे करायचे तेच आम्ही करू. यावर दमानिया बाई गोड हसतात. ही चॅनेलवरची गंमत हे मुख्यमंत्री ज्या पध्दतीने जमवून आणतात, त्याला दाद दिली पाहिजे. ही तीन वर्षातील त्यांची कमाईच आहे.\nकोणत्याही कामाच्या बाबतीत पराकोटीची गुप्तता पाळण्याचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अशी गुप्तता कोणकोणत्या बाबतीत पाळली हे पहाणे मनोरंजक आहे. पातंजली फूडस्‌चा बोलबाला गेल्या काही वर्षांतील असला या पातंजलीला २०१४ पासून उर्जितावस्था प्राप्त झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या पातंजली म्हणजे त्यांच्या भाषेत ‘पतांजली’ उद्योगाला आपल्या राज्यात नाममात्र भाड्याने जमीन देण्याचा व्यवहार आजपर्यंत गुप्ततेच्या धूसर आवरणाखाली आच्छादलेला आहे. याबद्दल काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या. परंतु त्याचा फार बोभाटा झाला नाही. त्याचा बोभाटा होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात काम करणारे, तात्पुरत्या करारावर घेतलेले लोक चोख काम करत होते. पातंजली हे देशाची महान सेवा करत असल्याचे कदाचित फडणवीसांचे म्हणणे असावे. प्रश्न असा आहे की फक्त पातंजलीलाच नाममात्र किंमतीत राज्याच्या मालकीची जमीन का दिली जाते त्या जमिनीसाठी निविदा का काढल्या गेल्या नाहीत त्या जमिनीसाठी निविदा का काढल्या गेल्या नाहीत आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचविण्य़ासाठी गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयत्न करणाऱ्या आयुर्वेद रसशाळा, आयुर्वेद अर्कशाळा, डाबर किंवा धूतपापेश्वर या आयुर्वेदाला किंवा आयुर्वेदिक उत्पादनांना वाहून घेतलेल्या कंपन्यांनी सरकारचे काय घोडे मारलेले आहे, की ज्याच्यामुळे त्यांना असा सरकारी कृपेचा मलिदा दिला गेला नाही आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचविण्य़ासाठी गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयत्न करणाऱ्या आयुर्वेद रसशाळा, आयुर्वेद अर्कशाळा, डाबर किंवा धूतपापेश्वर या आयुर्वेदाला किंवा आयुर्वेदिक उत्पादनांना वाहून घेतलेल्या कंपन्यांनी सरकारचे काय घोडे मारलेले आहे, की ज्याच्यामुळे त्यांना असा सरकारी कृपेचा मलिदा दिला गेला नाही होय. हो, या कंपन्यांचे संचालक किंवा मालक बायकांचा पंजाबी ड्रेस घालून पळून गेले नव्हते. किंवा त्यांनी जाहीरपणे भाजपाच्या भंपक नेत्यांचा उदोउदो केला नाही. आणि ते भगव्या छाट्या घालून संन्यासी असल्याचा आवही आणत नाहीत.\nफडणवीस सरकारचा समृध्दी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची चर्चा भाजपाच्या कुजबुज प्रचारकांनी राज्यात घडवून आणायला सुरुवात केली. तेव्हा या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम सुरु झालेले नव्हते. लोकांना या समृध्दी महामार्गाची अलाइनमेंट माहीत नव्हती, परंतु मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा रस्ता कसा आणि कुठून जाणार आहे याची साद्यंत माहिती होती. त्यापैकी काही अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे तपशील षट्कर्णी होण्याच्या आत त्या भागात आपले दलाल नेमून जमिनी खरेदी केल्या. याचे ‘लाभार्थी’ कोण हे सरकारने जाहीर करायला हवे. या बाबतीत सरकाने अद्याप तरी पारदर्शक व्यवहार केलेला नाही. सर्व काही अपारदर्शकच चाललेले आहे. आदिवासींच्या मालकीच्या जमिनी हस्तांतरित करण्यासाठी राज्यात निर्बंध होते, तेही या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची सुरुवात केली जाण्याच्या आधी शिथिल केले गेले. त्याची माहिती ज्यांना होती त्यांनी हातोहात जमिनी खरेदी केल्या. राधेश्याम मोपलवार प्रकरण त्यानंतर उघडकीस आले. अर्थात त्यांना या प्रकरणात कसे आणि का गुंतवले हे कालांतराने बाहेर येईलच. त्यांच्या पेक्षाही मोठे मासे या प्रकरणात आहेत, त्यांची नावे अद्याप बाहेर आलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याच्या नावाची या संदर्भात चर्चा आहे. त्याची चौकशी करून ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे सरकारला दाखवून द्यावे लागेल.\nतूरडाळ घोटाळ्याची तर चित्तरकथाच आहे. तूर जास्त पिकली हा अपघातच होता, असे काही सरकारने जाहीर केलेले नाही. शेतकरी जेव्हा लागवड करतात तेव्हाच सरकारदफ्तरी पीकनोंद केली जाते. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे हे माहीत असते. त्यासाठी संपूर्ण राज्याची महसूल यंत्रणा काम करीत असते. या नोंदीनुसार शेतमालाच्या खेरदीची यंत्रणा उभी करावी लागते. हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. परंतु याच वर्षी तुरीचे तेरा का वाजले व्यापारीलोक तूर खरेदी करतील अशी सुविधा कुणी आणि का केली व्यापारीलोक तूर खरेदी करतील अशी सुविधा कुणी आणि का केली तूर आयात केली जाणार जाणार आहे, अशी आवयी कुणी उठवली तूर आयात केली जाणार जाणार आहे, अशी आवयी कुणी उठवली व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली तूर सरकारने खरेदी करण्याचा घाट का घातला आणि शेतकरी का चिडले, याची वास्तवात चौकशी केली जाण्याची गरज होती. परंतु हे सर्व प्रकरण विस्मृतीत कसे जाईल याची खबरदारी घेण्यात सरकार मग्न राहिले. आता या प्रकरणात सरकारला ५०० कोटी रुपयांची झळ लागणार, अशा बातम्या प्रसृत केल्या जात आहेत. हा रडीचा खेळ झाला. सरकारने जबाबदारी घेतल्यानंतर त्यात नुकसान झाले तर ती जबाबदारी सरकारचीच असते. आमचे नुकसान झाले, असा आक्रोश सरकारने करायचा नसतो. कारण सरकारची मालाचा साठा करून ठेवण्याची क्षमता असते. ती शेतकऱ्यांची नसते. म्हणून तर आधारभूत किंमत देऊन सरकारने माल खरेदी करण्याचा पायंडा सरकारने पाडला. त्याला छेद देण्याचा कारभार या सरकारने केला.\nमहाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड, जर्मनी, जपान, इस्राएल, द.कोरिया, चीन, रशिया, सिंगापूर आणि अमेरिका या देशांचे गेल्या तीन वर्षात दौरे केले. ते अमेरिकेला निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर जायला निघालेल्या प्रवीण परदेशी या सनदी अधिकाऱ्याचा व्हिसा घरी राहिल्याने विमान उशीरा सुटल्यामुळे तो दौरा गाजला. लोकांची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या गदारोळाचा तपशील आठवत नाही. परंतु त्यावेळी त्या बातम्या देणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. तिचे काय झाले त्या बातम्या खऱ्या की खोट्या त्या बातम्या खऱ्या की खोट्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा तपशील बाहेर आलेला नाही. त्यातून खरोखरी किती गुंतवणूक आली हे जाणून घेण्याचा महाराष्ट्रातील जनतेला हक्क आहे. परंतु या बाबतचा मोघम तपशील जाहीर करून सरकानने मौन पाळले. ते अमेरिकेचा दौरा करून आले. त्या दौऱ्यात त्यांनी काही करार केले. त्याचा तपशील महाराष्ट्रातील जनतेला आजपर्यंत कळलेला नाही. त्यामागे काय धोरण आहे हेही कळण्याचा मार्ग नाही. तिथे त्यांनी ओरॅकल, ह्युलेट पॅकार्ड, गूगल यासारख्या कंपन्यांना भेटी दिल्या होत्या. परंतु त्याचे फलित काय, हे कधीच लोकांपर्यंत पोहोचले नाही. कोरियाच्या दौऱ्यात त्यांनी समृध्दी महामार्गासाठी आर्थिक साह्य मिळणार असे जाहीर केले, त्याचे काय झाले हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. कदाचित ते पैसे थेट महाराष्ट्राला न मिळता, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार असतील. ते कधी मिळणार हे सांगता येणार नाही. टेस्ला या कंपनीशी करार करण्याची पूर्ण तयारी केली गेली होती, असे सांगण्यात येते. परंतु तो प्रकल्प आता चीन मध्ये गेला. म्हणजे मुख्यमंत्र्यांची ती भेट ही वाया गेली. रशिया किंवा सिंगापूरच्या दौऱ्यात हाती काहीच लागले नाही असे आता सांगितले जाते.\nगेली तीन वर्षे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गोपनीयतेच्या धुक्यात लपले आहे. तसे ते पूर्वी कधीही नव्हते. अगदी पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही ते एवढे लोकांपासून दूर नव्हते. शासकीय सेवेत नसलेले, नागपूरपासून मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले अनेक लोक आता तिथे वावरतात. त्यांच्या भाषेत बदल झालेला आहे. ते कायम कुजबुजत्या स्वरातच बोलतात. राज्य एक नवी अपारदर्शकता अनुभवते आहे. ज्यांचा सरकारच्या कामाशी थेट संबंध येत नाही, त्यांना काही फरक पडत नाही. परंतु ज्यांना सरकार कसे चालते हे माहीत आहे त्यांना हे सारे नवे आहे.\nगुप्तता पाळायची असे एकदा शास्त्यांनीच ठरवले की मग प्रजा काही करू शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रश्न विचारले जाणे आपोआपच थांबते. कारण प्रश्न कशावर उभे करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. मुबईहून पुण्याला १५ मिनीटात पोहोचण्यासाठी व्हॅक्युम ट्युब आणण्याचा सामंजस्य करार या सरकारने केल्याचे जाहीर केले. परंतु हे तंत्रज्ञान यापूर्वी कोणी, कधी आणि कुठे वापरले याचा तपशील जाहीर केला गेलेला नाही. मग कोणी असे म्हटले की हे केवळ गाजर आहे तर त्यात वावगे ते काय गोपनीयतेच्या आवरणात स्वतःला लपविल्यानंतर अशी गाजराची शेती करणे सोपे असते. केंद्रात तर ती फोफावलेलीच आहे. इथेही ती जोरावर आहे.\nलेखक ज्येष्ठ पत्रकार असून लोकसत्ता दैनिकात चीफ रिपोर्टर म्हणून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे.\nगुजरात डायरीज – भाग ४\nगुजरात डायरीज – भाग ५\nकथुआ बलात्कार: धार्मिक दुहीचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/maharashtra/learning-be-meaningful-quality/", "date_download": "2018-04-20T16:02:38Z", "digest": "sha1:ONHI4XKA55B4TEY42C5RR5XJENA3NIPO", "length": 43593, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Learning To Be Meaningful, Quality ... | शिक्षण अर्थपूर्ण, दर्जेदार होण्यासाठी... | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २० एप्रिल २०१८\nनागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nनवदांपत्याच्या सहजीवनाची सुरुवात श्रमदानातून : पानी फाउंडेशन उपक्रमात सहभाग\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबईतील नालेसफाईबाबत सावध रहा, आशिष शेलारांचा महापालिकेला इशारा\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nदक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग\n'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र\n​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू उत्तर हवे असेल तर वाचा बातमी\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\n'या' अटीवर संजय दत्तने माधुरी दीक्षितसोबत कलंकमध्ये काम करण्यास दिला होकार\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nसियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nIPL 2018 : शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nउन्नाव बलात्कार प्रकरण: आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याची कोठडी सात दिवसांनी वाढवली\nलंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट\nनागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक\nबुलडाणा - दहा हजाराची लाच स्वीकारताना वनपाल रंगेहात, बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nIPL 2018 : राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला\nयवतमाळ : लग्न वरातीत नाचताना हृदयघाताने विवाहित तरुणाचा मृत्यू, धनंजय पुंडलिक नक्षणे (३२) रा. पाटणबोरी असे मृताचे नाव\nमुंब्रा - पनवेल मार्गावर धानसर गावाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको\nजळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस आजपासून पुन्हा प्रारंभ\nनागपूर - पाटणसावंगीजवळ कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर कार पुलावर आदळल्याने चालकाचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू\nजळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग\nअहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट\nनवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन\nकोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार\nAll post in लाइव न्यूज़\nशिक्षण अर्थपूर्ण, दर्जेदार होण्यासाठी...\nप्रासंगिक : नुकतेच पाटणा विद्यापीठातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक सर्वोत्तम वीस विद्यापीठांसाठी एक हजार कोटींचे अनुदान घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे जगातील पहिल्या १०० विद्यापीठांत आपल्या १२५ कोटी जनसंख्येच्या अतिभव्य देशातील एकाही विद्यापीठाचा नंबर लागत नाही. तेव्हा जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी निदान २० विद्यापीठांनी शर्यतीत उतरावे या उद्दिष्टाने पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. मुळात अनुदानाने, पैशाने विद्यापीठांचा दर्जा सुधारेल हे गृहितक चुकीचे आहे.\n- डॉ. विजय पांढरीपांडे\nसरकारी विद्यापीठांपेक्षा खाजगी विद्यापीठांकडे बरीच गंगाजळी जमा झालेली असते; पण ती विद्यापीठेदेखील या स्पर्धेत दिसत नाहीत. स्वातंत्र्य मिळून आता सात दशकं होताहेत. या काळात विद्यापीठांची, आयआयटी, एनआयटीज, आयआयएम्स अशा सर्व शिक्षण संस्थांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली. ती एवढी वाढली की, आता प्रत्येक राज्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेज बंद होण्याची वेळ आली. हजारो जागा दरवर्षी रिकाम्या राहताहेत. अनेक कॉलेजेसमध्ये सक्षम अनुभवी प्राध्यापक नाहीत. मूलभूत प्रयोग शाळांच्या अद्ययावत सुविधा नाहीत. नियमित प्राचार्यदेखील नाहीत. अशी परिस्थिती असताना शिक्षणाचा दर्जा सुधारेल तरी कसा काही वर्षांपूर्वी सर्व रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेसचे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी असे बारसे करून अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. या बहुतेक कॉलेजेसमध्ये (टीईक्यूआयपी) म्हणजे टेक्निकल एज्युकेशन क्वॉलिटी इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट या जागितक बँकेच्या प्रकल्पांतर्गत एकूण पाच-पाच वर्षांच्या तीन फेजेसमध्ये भरपूर अतिरिक्त ग्रँटस् मिळालेत; पण त्यांचा अभ्यासक्रमाचा, संशोधनाचा, पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा सुधारला का काही वर्षांपूर्वी सर्व रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेसचे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी असे बारसे करून अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. या बहुतेक कॉलेजेसमध्ये (टीईक्यूआयपी) म्हणजे टेक्निकल एज्युकेशन क्वॉलिटी इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट या जागितक बँकेच्या प्रकल्पांतर्गत एकूण पाच-पाच वर्षांच्या तीन फेजेसमध्ये भरपूर अतिरिक्त ग्रँटस् मिळालेत; पण त्यांचा अभ्यासक्रमाचा, संशोधनाचा, पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा सुधारला का मुळीच नाही. नवनवीन इक्विपमेंटस्ची खरेदी झाली. संगणकांची संख्या वाढली. प्रत्येक प्राध्यापकाच्या टेबलवर त्यांचे स्वत:चे लॅपटॉप आले. लेझर प्रिंटर्स आलेत. वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढली, पण या वाढलेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे जागतिक दर्जाचे कोणते संशोधन झाले मुळीच नाही. नवनवीन इक्विपमेंटस्ची खरेदी झाली. संगणकांची संख्या वाढली. प्रत्येक प्राध्यापकाच्या टेबलवर त्यांचे स्वत:चे लॅपटॉप आले. लेझर प्रिंटर्स आलेत. वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढली, पण या वाढलेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे जागतिक दर्जाचे कोणते संशोधन झाले जे संशोधन प्रसिद्ध झाले त्याची तरी किती दखल घेतली जे संशोधन प्रसिद्ध झाले त्याची तरी किती दखल घेतली याचे कुणी अकॅडमिक आॅडिट केलेय का याचे कुणी अकॅडमिक आॅडिट केलेय का याचा कुणी कुणाला जाब विचारलाय का\nआरईसी जाऊन एनआयटी ही नवी पाटी बदलली फक्त. बोर्ड आॅफ गव्हर्नन्सच्या नावाखाली काही निवडक, योग्यता नसलेल्या लोकांची ‘चेअरमन’ म्हणून किंवा बोर्डाचे ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून सोय झाली. अनेक प्राध्यापकांची बाहेर शोधनिबंध वाचण्याच्या निमित्ताने परदेशवारी झाली; पण या सर्वांचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला त्यांच्या गुणवत्तेत, आकलन क्षमतेत, संशोधनाच्या, प्रबंधाच्या दर्जात किती वाढ झाली त्यांच्या गुणवत्तेत, आकलन क्षमतेत, संशोधनाच्या, प्रबंधाच्या दर्जात किती वाढ झाली प्लेसमेंट, एम्प्लॉयबिलिटी किती प्रमाणात वाढली प्लेसमेंट, एम्प्लॉयबिलिटी किती प्रमाणात वाढली हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो\nआजकाल विद्यापीठात फक्त शिकविले जाते, अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या निकालात भरपूर घोळ घातला जातो. उशिरा निकाल लावून, चुकीचे निकाल लावून विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते; पण या सर्व प्रक्रियेतून विद्यार्थ्याला काय मिळते त्याची बौद्धिक आकलन क्षमता वाढते का त्याची बौद्धिक आकलन क्षमता वाढते का त्याच्या स्वतंत्र निर्णयप्रक्रियेत सुधारणा होते का त्याच्या स्वतंत्र निर्णयप्रक्रियेत सुधारणा होते का त्याच्या आवडीचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य असते का त्याच्या आवडीचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य असते का विषयांच्या निवडीचे, त्यात हवे तेव्हा क्षमतेप्रमाणे, आवडी-निवडीप्रमाणे बदल करण्याचे विद्यापीठाकडून स्वातंत्र्य असते का विषयांच्या निवडीचे, त्यात हवे तेव्हा क्षमतेप्रमाणे, आवडी-निवडीप्रमाणे बदल करण्याचे विद्यापीठाकडून स्वातंत्र्य असते का अनेक विद्यापीठांत सो कॉल्ड चॉइस बेसड् क्रेडिट ग्रेडिंग सिस्टिम सुरू झालीय खरी, पण ती नावापुरतीच... एका शाखेच्या विद्यार्थ्याला दुस-या शाखेचे तर सोडा, पण प्राध्यापकांच्या अभावामुळे स्वत:च्या विभागातील ‘इलेक्टिव्ह’ निवडण्याचेसुद्धा स्वातंत्र्य नसते अनेक विद्यापीठांत सो कॉल्ड चॉइस बेसड् क्रेडिट ग्रेडिंग सिस्टिम सुरू झालीय खरी, पण ती नावापुरतीच... एका शाखेच्या विद्यार्थ्याला दुस-या शाखेचे तर सोडा, पण प्राध्यापकांच्या अभावामुळे स्वत:च्या विभागातील ‘इलेक्टिव्ह’ निवडण्याचेसुद्धा स्वातंत्र्य नसते म्हणजे कागदोपत्री विषय भरपूर... पण शिकवण्यासाठी योग्य दर्जाचे, क्षमतेचे प्राध्यापक नसल्याने ‘आम्ही शिकवू तेच अन् तसेच शिका’ ही हुकूमशाही. विद्यार्थ्याला ‘हवे ते, हवे तसे, हवे तेथे, हवे तेव्हा’ शिकण्याचे स्वातंत्र्य मात्र नसते. आधुनिक शिक्षणप्रणालीची खरी गरज ही आहे.\nविद्यापीठातील राजकारण अन् सरकारी यंत्रणेचा उच्च शिक्षण संस्थांच्या परिसरातील नको तितका हस्तक्षेप हे देखील विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा खालावण्याचे एक प्रमुख कारण आहे. विद्यापीठाची सो कॉल्ड स्वायत्तता (आॅटोनॉमी) ही फक्त नावालाच, कागदांपुरतीच. प्रत्यक्षात कुलगुरू, डायरेक्टर त्यांच्या नियुक्तीपासून, तर विविध प्राधिकरणावरील सभासदांच्या मान्यवरांच्या नियुक्तीपर्यंत जातीच्या, पक्षाच्या, धर्माच्या आधारावर भरपूर राजकारण खेळले जाते. महाराष्ट्रातील विद्यापीठात नवा कायदा आलाय खरा; पण तो अमलात आणताना होणारा अक्षम्य विलंब. अधिसभांच्या अन् विविध प्राधिकरणांच्या निवडणुका... यासंबंधीच्या बातम्या वाचल्या, तर या नगरपालिकांच्या, विधानसभेच्या निवडणुका आहेत की काय, अशी शंका येते. एकमेकांवर चिखलफेक करण्याचे, एकमेकांचे पाय ओढण्याचे, पैशाच्या जोरावर एका विशिष्ट गटाचे वर्चस्व गाजविण्याचे तेच गलिच्छ राजकारण... अशा विद्यापीठांना सरकारने १०० करोड दिलेत तरी काय सुधारणा होणार गुणवत्तेशी बांधिलकी नाही, दर्जासंबंधी आग्रह नाही दूरदृष्टी, सक्षम, कणखर, शिस्तीचे, प्रबळ बुद्धीचे नेतृत्व नाही. सुधारणा होणार कशाच्या भरवशावर\nगेल्या दोन वर्षांत जेएनयू, युनि. आॅफ हैदराबाद, बी.एच.यू. आय.आय.टी. दिल्ली, उस्मानिया विद्यापीठ अशा निवडक घटना जरी साक्षेपाने बघितल्या तरी राजकारण अन् विद्यापीठ यांचा ‘अन्योनान्य संबंध’ सहज लक्षात येईल. खरं पाहिलं तर प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या, कर्मचा-यांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी नीतिनियम, कायदे असतात. निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी प्राधिकरणेदेखील असतातच. मग राज्याचा, केंद्राचा अन् आता तर न्यायालयांचा देखील हस्तक्षेप कशासाठी कँपसमध्ये राजकारणी पुढा-यांच्या भेटीगाठी, उपरणे घालून झेंडे घेऊन आंदोलने कशासाठी स्वातंत्र्य दिले तर विद्यार्थ्यांच्या अन् संबंधित कर्मचा-यांच्या मदतीने, सर्वांना विश्वासात घेऊन, चर्चेद्वारे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची क्षमता विद्यापीठ प्रशासनातच असते. असायला हवी. अर्थात त्यासाठी खंबीर सक्षम, बौद्धिक, प्रामाणिक, कणखर (अन् हवे तेव्हा लवचिक) नेतृत्वदेखील हवे. तेथेच माशी शिंकते\nखाजगीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल हा समजदेखील भ्रामक ठरलाय. काही मोजक्या खाजगी संस्थांनी तसे प्रयत्न केलेदेखील; पण ही उदाहरणे अपवादात्मक, बहुतेकांनी पिढ्यान्पिढ्यांची सोय करून ठेवली. या खाजगी (इंजिनिअरिंग, मेडिकल) संस्थांच्या माध्यमातून कारण या बहुतेक संस्था या ना त्या प्रकारे राजकारणी पुढा-यांच्याच हातात आहेत- हे कटू सत्य विसरता येत नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी पुढाºयाला आपली पोळी कशी भाजायची हे पक्के ठाऊक असते. त्यामुळे सोयी-सवलती नसल्या, सक्षम प्राध्यापकांची संख्या नसली, पटावर विद्यार्थीसंख्या (प्रत्यक्षात कागदोपत्री नव्हे कारण या बहुतेक संस्था या ना त्या प्रकारे राजकारणी पुढा-यांच्याच हातात आहेत- हे कटू सत्य विसरता येत नाहीत. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी पुढाºयाला आपली पोळी कशी भाजायची हे पक्के ठाऊक असते. त्यामुळे सोयी-सवलती नसल्या, सक्षम प्राध्यापकांची संख्या नसली, पटावर विद्यार्थीसंख्या (प्रत्यक्षात कागदोपत्री नव्हे) नसली तरी मान्यता मिळते. परीक्षा घेतल्या जातात. कॉप्या केल्या जातात. जर उत्तरपत्रिका गहाळ होतात... कुलगुरू सक्तीच्या रजेवर जातात. विद्यार्थ्यांची आंदोलने होतात.. विधानसभेत, लोकसभेत चर्चा होतात..पण तरीही विद्यार्थी पास होतात. त्यांना पदव्या मिळतात. डॉक्टरेटस् मिळतात. एवढेच नव्हे, तर ‘आॅनररी डॉक्टरेट’च्या खिरापतीदेखील वाटल्या जातात.\nविद्यापीठांचे सुवर्ण महोत्सव, महोत्सव दिमाखात साजरे केले जातात... आता तर काही विद्यापीठे लग्नाच्या सोहळ्यासारखे थाटात साहित्य संमेलनेदेखील आयोजित करतात स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, एमआयटी, आॅक्सफोर्ड, केम्ब्रिज अशा विद्यापीठांशी स्पर्धा करायची असेल, तर आपण प्रगतीच्या परिणामांची भाषा बदलायला हवी. संख्या वाढल्याने प्रगती होत नाही. गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. करोडो रुपयांचे अनुदान दिल्याने प्रगती होणार नाही. त्यासाठी विद्यापीठांना स्वातंत्र्य द्यावे लागेल; पण त्या स्वातंत्र्याबरोबरच त्यांची जबाबदारीदेखील फिक्स करावी लागेल. त्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी अन् अकाऊंटबिलिटीचे काय स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, एमआयटी, आॅक्सफोर्ड, केम्ब्रिज अशा विद्यापीठांशी स्पर्धा करायची असेल, तर आपण प्रगतीच्या परिणामांची भाषा बदलायला हवी. संख्या वाढल्याने प्रगती होत नाही. गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. करोडो रुपयांचे अनुदान दिल्याने प्रगती होणार नाही. त्यासाठी विद्यापीठांना स्वातंत्र्य द्यावे लागेल; पण त्या स्वातंत्र्याबरोबरच त्यांची जबाबदारीदेखील फिक्स करावी लागेल. त्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी अन् अकाऊंटबिलिटीचे काय कुलगुरूंसाठी, डायरेक्टर्ससाठी, प्राध्यापकांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षाचे ‘लक्ष्य’ ठरलेले असावे. ते लक्ष्य अन् त्या जबाबदाºया पूर्ण झाल्या नाहीत, तर रिवॉर्डस्बरोबर ‘पनिशमेंटची पगार कपातीची’देखील सोय हवी. परदेशातील विद्यापीठांत कुणीही प्राध्यापक पर्मनंट नसतो. त्याने केलेले संशोधन, त्याच्या प्रयोगशाळेला त्याच्यामुळे मिळालेले बाहेरचे अतिरिक्त अनुदान, त्याने शिकविलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा, त्याच्या मार्गदर्शनाखाली निर्मित संशोधन प्रबंधांचा दर्जा, त्याने शिक्षण पद्धतीत केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग अन् या सर्वांमुळे विद्यापीठाला, समाजाला झालेला फायदा... या संपूर्ण गोळाबेरजेवर प्राध्यापकांचे प्रमोशन ठरते. आपल्याकडे काम केले काय, न केले काय, शिकविले काय, न शिकवले काय तरी ‘प्रमोशन’ हा जन्मसिद्ध अधिकार समजला जातो.\nसुधारणाच करायच्या तर त्यासाठी सखोल विचारमंथन हवे. बाहेरच्यांची कॉपी करून चालणार नाही. आपल्या भविष्याच्या गरजा आपणच ठरविल्या पाहिजेत. जे जपान, अमेरिकेत चालते, ते येथे चालणार नाही. आपले शैक्षणिक आराखडे हे आपल्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गरजांनुसार आखायला हवेत. शिक्षणाने चारित्र्यसंपन्न झाले पाहिजे. स्वतंत्र निर्णय घेण्याचे भान यायला पाहिजे. सामाजिक गरजा पारखता, अभ्यासता आल्या पाहिजेत. तरच आपले शिक्षण ‘अर्थ’पूर्ण होईल.\n(लेखक माजी कुलगुरू आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nखासगी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना येणार सोन्याचा भाव\nसर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार\nअमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे\nसाडे तीन कोटींच्या प्रकल्पासाठी २१ कोटींचा चुराडाच; ‘ई-लर्निंग’ वादाच्या भोवर्‍यात\nविनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांसाठी मुख्याध्यापकांचे ‘आत्मक्लेश’\nअशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे ; व्ही. जी. पोवार\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nकाँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी\nविरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री\nरिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका\nशेन वॉटसनचे धडाकेबाज शतक\nभारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापुरात धडक मोर्चा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nभारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान\n'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक\nइमारतींचे हे चक्रावून सोडणारे स्ट्रक्चर पाहून व्हाल थक्क \n'ही' आहेत 'दहा हजारी' पर्यटनस्थळं\nप्रिया प्रकाशचं नवं फोटोशूट चर्चेत, फोटो सोशल मीडियात व्हायरल\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमोहालीच्या मैदानात गेल बरसला\nजीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण\nनगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप\nमुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nआता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ\nLMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार\nअचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nगोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात\n कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय \nशेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक\nKarnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार\nCSK vs RR, IPL 2018 LIVE : सुरेश रैना OUT, चेन्नईला दुसरा धक्का\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा, काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव\nIPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग\nशिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर\nशिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-strike-kalyan-90463", "date_download": "2018-04-20T16:41:52Z", "digest": "sha1:HIY5E7Z65BAMHNALVCTGFOSF4PAGYQFB", "length": 15336, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalyan news strike in kalyan कल्याणमध्ये भीमसैनिकांचे चक्का जाम आंदोलन | eSakal", "raw_content": "\nकल्याणमध्ये भीमसैनिकांचे चक्का जाम आंदोलन\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nकल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.\nकल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.\nकल्याण पूर्व सहित कल्याण पश्चिम मधील दुकानदार, व्यापारी, हॉटेल, शाळा, कॉलेज बंद राहिल्याने सकाळ पासून रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. सकाळी साडेनऊ पासून कल्याण पूर्व मधील भिमसैनिकांनी रस्त्यावर उतरत वाहतूक, दुकान बंद करत धडक मोर्चा काढला. चिंचपाडा, काटेमानवली नाका, सिद्धार्थ नगर व्हाया स्कायवाक वरून दिपक हॉटेल आणि शिवाजी चौकात नंतर पत्रिपुल मार्गे पुन्हा कल्याण पूर्वेला जाऊन चक्का जाम आंदोलन केले.\nमोर्चा आंदोलन करण्याऐवजी भिमसैनिकांनी शहरातील दिपक हॉटेल, शिवाजी चौक, वलीपीर रोड, पत्रीपूल, चक्कीनाका, वालधुनी पूल, परिसरात उतरत 4 तासाहून अधिक काळ रस्ता रोखून धरला होता. यामुळे सर्व सामान्य वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.\nकल्याणातील कल्याण-आग्रा रोड, कल्याण-मुरबाड-नगर, कल्याण- भिवंडी-नाशिक महामार्गावरील रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. एपीएमसी मार्केट पत्रीपूल नजीक एसटीच्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. तर केडीएमटी बसची तोडफोड कल्याण नाक्यावर झाली होती. कल्याण रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या व कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक रोखून धरले तर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. कल्याण शिवसेना मध्यवर्ती शाखेवर संतप्त जमावाने दगड फेक करीत शाखेच्या बोर्डची तोडफोड केली.\nफोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या नागरीकांना चोप\nपौर्णिमा चौक परिसरात अचानक चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर ते चित्रीकरण करणाऱ्या वाहन चालकांना आंदोलनकर्त्यांनी चांगलाच चोप दिला त्यामुळे काही तणावाचे वातावरण होते यामुळे अनेकांच्या मोबाईल फोडल्याने चांगलेच नुकसान झाले.\nकल्याण शिवसेना मध्यवर्ती शाखेवर संतप्त जमावाने दगड फेक करीत शाखेच्या बोर्डची तोडफोड केली, या घटनेचा निषेध शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी केला असून आरोपीना त्वरित अटक न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने समाचार घेईल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.\nदुकान, कार्यालय, शाळा, कॉलेज बंद असले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या या चक्का जाम आंदोलनामुळे सर्व सामान्य नागरीकांना चांगलाच मनस्ताप करावा लागला तर एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्येच उतरून पायी चालत जाऊन प्रवास करावा लागला तर पत्रिपुल जवळील काही काळ रेल रोको आंदोलन केल्याने प्रवाशांना पायी चालत जावे लागले .\nविहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू\nअमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nभाजपने जनतेला लॉलीपॉप देण्याचे काम केले : रामदास कदम\nऔरंगाबाद : भाजपने साडेतीन वर्षांत राज्य व देशातील जनतेला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. 2014 मधील...\nजलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला\nनाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने...\nनाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना\nनाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-20T16:39:04Z", "digest": "sha1:GIPCKVZT4ST7KK5PQYARGFDKBENUGOLR", "length": 4056, "nlines": 61, "source_domain": "mr.wikibooks.org", "title": "विकिबुक्स चर्चा:चावडी - विकिबुक्स", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nजुनी चर्चा चावडी या पानावरून स्थानांतरीत\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स' मुखपृष्ठ/धूळपाटी & 'विकिबुक्स' nominations for adminships[संपादन]\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स' मुखपृष्ठ/धूळपाटीमध्ये सुधारण्यात मदत हवी आहे.\nमराठी भाषेतील 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination\n'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationयेथे चालू आहे.\nनविन पुस्तक लिहावयास कशी सुरुवात करता येइल\nनविन पुस्तक लिहावयास कशी सुरुवात करता येइल इथे कुठेहि त्याबद्दल माहिती दिलेली नाही. Siddharthsk ०९:००, ९ June २००७ (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१४ रोजी ०८:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2015/11/current-affairs-23-november.html", "date_download": "2018-04-20T16:39:38Z", "digest": "sha1:VADIJOMMJUXXXUWA2BNT637IEUOF72CJ", "length": 12868, "nlines": 156, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : चालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५", "raw_content": "\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nकायद्याने लग्न संपुष्टात आले नसले, किंवा घटस्फोट झाला असला तरीही महिला त्यांचे 'स्त्रीधन' पती अथवा सासरच्या मंडळींकडून घेऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.\nविवाहापूर्वी, विवाहावेळी किंवा बाळाच्या जन्मावेळी महिलेला दिली जाणारी जंगम किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे 'स्त्रीधन' आहे. कायद्याने विभक्त झाली नसली तरी किंवा तिचा घटस्फोट झाला असला तरी कोणतीही महिला यासाठी खटला दाखल करू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ मधील महिला सरंक्षणाच्या कलम १२ नुसार तिला तो अधिकार आहे.\nपती किंवा त्यांच्या कुटुंबियांना ही संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या 'स्त्रीधना'ची हानी झाल्यास त्या दिवसापासून त्यांच्यावर नियमित गुन्ह्याची नोंद होऊ शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले.\nदिल्लीमध्ये 'कार फ्री डे'\nजगातील प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर असल्याने राजधानीतील प्रदूषण कमी करण्यासाठी २२ जानेवारी २०१६ हा दिवस 'कार फ्री डे' करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला आहे.\nया दिवशी सरकारी कार्यालयात कोणीही कार आणणार नाही. तर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यादिवशी सायकलचा वापर करायचा आहे.\nजोकोविच 'एटीपी वर्ल्ड टूर'चा चौथ्यांदा विजेता\nजागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा ६-३, ६-४ असा पराभव केला.\nएटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे. यापूर्वी पीट सॅम्प्रस आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे. मात्र, यांनी सलग विजेतेपदे मिळविलेली नाहीत.\nजोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे. त्याने या वर्षात खेळलेल्या ८८ सामन्यांपैकी ८२ सामन्यांत विजय मिळविलेला आहे.\nविजय मल्या विलफुल डिफॉल्टर\nभारतीय स्टेट बँकेने विजय मल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि तिची मूळ कंपनी असलेल्या युनायटेड ब्रिवरीज यांना ‘हेतुपुरस्सर कर्जबुडवे’ (विलफुल डिफॉल्टर) घोषित केले आहे.\nविजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने भारतीय स्टेट बँकेसहित अन्य १६ बँकांचे सुमारे ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून मूळ कर्ज २०१०मध्ये घेतले आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँकेचे थकित कर्ज १ हजार ६०० कोटी रुपये आहे.\nकिंगफिशर एअरलाइन्सकडून थकित असलेली कर्जे\nभारतीय स्टेट बँक १६०० कोटी रु.\nपंजाब नॅशनल बँक ८०० कोटी रु.\nआयडीबीआय बँक ८०० कोटी रु.\nबँक ऑफ इंडिया ६५० कोटी रु.\nबँक ऑफ बडोदा ५५० कोटी रु.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया ४१० कोटी रु.\nयुको बँक ३२० कोटी रु.\nकॉर्पोरेशन बँक ३१० कोटी रु.\nस्टेट बँक ऑफ म्हैसूर १५० कोटी रु.\nइंडियन ओ‍व्हरसीज बँक १४० कोटी रु.\nफेडरल बँक ९० कोटी रु.\nपंजाब अँड सिंध बँक ६० कोटी रु.\nअॅक्सिस बँक ५० कोटी रु.\nबँक ऑफ बडोदामध्ये 'घोटाळा'\nसार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सहा हजारहून अधिक कोटींचा 'हवाला घोटाळा' झाल्याचे उघडकीस आले आहे.\nकाही उद्योजकांनी बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून फेरीवाले, रिक्षावाले व मजुरांच्या नावे बनावट खाती उघडून हा घोटाळा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत हाँगकाँग, दुबईसारख्या ठिकाणी ६ हजार कोटींहून अधिक पैसे बेकायदेशीररित्या पाठवण्यात आले आहेत.\nकेंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा व सक्तवसुली संचलनालयातर्फे या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी - २९ व ३० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २४ व २५ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १७ व १८ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५\nचालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2018-04-20T16:41:23Z", "digest": "sha1:WN4AI35QKKZMTJNCA3OT5UJHQKQSESUO", "length": 6818, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९६४ मधील जन्म‎ (५३ प)\n► इ.स. १९६४ मधील निर्मिती‎ (१ प)\n► इ.स. १९६४ मधील खेळ‎ (५ प)\n► इ.स. १९६४ मधील मृत्यू‎ (२७ प)\n\"इ.स. १९६४\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-04-20T16:04:06Z", "digest": "sha1:QYLLSJ5TJ73LKNMGPALHEUKBEAGRW4QA", "length": 10208, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त\nमायणी : कोणतेही साहित्य खरेदी केल्यानंतर संबंधित व्यापारी, दुकानदाराने दिलेल्या प्लास्किट पिशवीतच ते घेऊन जाण्याची सवय ग्राहकांना लागली आहे. मात्र, आता प्लास्टिक बंदीमुळे खरेदी केलेले साहित्य पिशवीत न दिल्यास ग्राहक ते साहित्य पुन्हा माघारी करत असल्याने व्यापारी वर्गाला प्लास्टिक बंदीचा चांगलाचा फटका बसला आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीला पर्याय शोधण्यासाठी किरकोळ व्यापारी प्रयत्न करत आहेत. परंतु, पर्याय स्वस्त नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.\nकिरकोळ व्यापाऱ्यांकडे खरेदीला येणारा ग्राहक दहा-वीस रुपयांचा माल खरेदी करतो. या दहा वीस रुपयांच्या मालापाठीमागे दुकानदाराला एक किंवा दोन रुपये निव्वळ नफा मिळत असतो. या नफ्यामध्ये त्यांचे दुकान भाडे, गाळाभाडे, बॅंकेचे व्याज व इतर खर्चाचा ताळेबंद त्या दुकानदाराला बसवावा लागतो. प्लास्टिक पिशवीचा पंन्नास ते शंभर नगाचा पुडा साईजनुसार आठ ते पंधरा रुपयांपर्यंत मिळत असे त्यामुळे एक प्लास्टिक पिशवी पंधरा ते पंचवीस पैसापर्यंत दुकानदाराला मिळत होती. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा खरेदी केलेला मालास पिशवी देताना दुकानदाराला काही वाटत नव्हते.\nमात्र, प्लॅस्टिक पिशवी बंदीमुळे व्यापाऱ्यांकडून येणारा माल चढ्या भावाने मिळत आहे. त्यामुळे किरकोळ दहा वीस रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कॅरिबॅग देणे परवडत नाही. तसेच पूर्वीसारखी प्लास्टिक पिशवी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा बिस्किट पुडा किंव्हा इतर माल घेणाऱ्या ग्राहकाला पिशवी नाही म्हणण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. मात्र, ग्राहक अजूनही प्लॅस्टिक पिशवी बंदीच्या मानसिक स्थितीत नसल्याने तो पिशवी मिळविण्यासाठी अहो पाहुण्यांकडे जायचं आहे, दवाखान्यात पेशंट आहे, बिस्किट पुडा हातात घेऊन जाऊ का अशी अनेक कारणे पुढे घेऊन खरेदी केलेला माल तेथेच ठेवून निघून जात आहेत.\nप्लॅस्टिक पिशवीवर पर्यायी कापडी पिशवी व इतर विघटन होणाऱ्या कागदापासून बनवलेले पिशवी असे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे दर किरकोळ दुकानदारांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. त्यामुळे या पिशव्या दहा वीस रुपयांच्या मालासाठी देणे दुकानदारांना परवडत नाही. त्यामुळे सहाजिकच दुकानदारांचा नाईलाज होत आहे. ग्राहकाला प्लॅस्टिक पिशवी देण्यावाचून दुसरा पर्यायही दुकानदारांसमोर राहत नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदीचे सध्यातरी तीनतेरा वाजलेले दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यातील वाढत्या गुन्हेगारीत पीडीपी-भाजपा दोन्ही पक्ष भागीदार -तसादुक मुफ्ती\nNext articleटीकेच्या भडीमारानंतर भाजपचे “एक पाऊल मागे’\nमांढरदेव खून प्रकरण : संसारात अडथळा ठरत असल्यानेच बानुचा काटा\nजाणून घेऊयात नॉस्ट्रडेमस विषयी…\nमहिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा\nशिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा वाईचे वैभव ठरेल\nसातारा: फुलांचा बहर पाडतोय दुष्काळाचा विसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/in-raigad-women-is-not-secure-said-by-police/", "date_download": "2018-04-20T16:39:57Z", "digest": "sha1:27ENIUTCDMYZQTFVZPVP3GLKAX5SK3SA", "length": 16696, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "रायगडात महिला असुरक्षित, पोलिसांनीच जाहीर केला अहवाल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nरायगडात महिला असुरक्षित, पोलिसांनीच जाहीर केला अहवाल\nऔद्योगिकीकरणामुळे रायगडात एकीकडे विकासाचा डंका वाजत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारी वाढल्याचे पोलिसांनीच जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. परप्रांतातून रायगडात आश्रयाला येणारे नागरिकांचे आणि कामगारांचे लोंढे यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे महिलांवरील अत्याचारही वाढल्याचा पोलिसांचाच अहवाल असून गस्ती पथक, दामिनी पथक करतेय काय, असा सवाल विचारला जात आहे.\nमहिलांवरील अत्याचार वाढले असले तरी पोलिसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई आणि गस्तीचे वाढवलेले प्रमाण यामुळे खून, दरोडय़ात मात्र काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.\n२ हजार ७५८ गंभीर गुह्यांची नोंद – ३७ हत्या, १० दरोडे, ६३ जबरी चोऱया\n२ हजार ५५१ गंभीर गुन्हे – १६ हत्या, ९ दरोडे, ३८ जबरी चोऱया\n– रायगड जिह्यात वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे.\n– चोऱ्या, घरफोड्य़ा, खून, दरोडे या गुह्यांची आकडेवारी वाढली. याचबरोबर महिलाही असुरक्षित असल्याचे पोलिसांनीच जाहीर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.\n– २०१६ मध्ये वर्षभरात रायगडात बलात्काराच्या ५७ घटना घडल्या आहेत. १११ महिलांचे विनयभंग झाले तर ८३ महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनेची नोंद झाली आहे.\n– २०१७ च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटना वाढल्या असून ११९ महिलांचा विनयभंग तर ९७ महिलांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदिल्ली डेअरडेविल्सच्या कर्णधारपदी गौतम गंभीर\nपुढील८५ व्या वर्षी ‘त्या’ करताहेत चित्रपट सृष्टीत पदार्पण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nसरकारच्या भातखरेदी केंद्रांमुळे रायगडातील शेतकरी कर्जबाजारी\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/navanatha/word", "date_download": "2018-04-20T16:37:02Z", "digest": "sha1:DRH3D3O5HYO34BXJGTAUEYBMP4V3AO24", "length": 8761, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - navanatha", "raw_content": "\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \nनाम महिमा - भज ले क्यूँ न राधे क...\nभगवन्नामकी महिमा अपरंपार है, नामोच्चारसे जीवनके पाप नष्ट हो जाते है \nनाम महिमा - सीताराम सीताराम सीताराम ब...\nभगवन्नामकी महिमा अपरंपार है, नामोच्चारसे जीवनके पाप नष्ट हो जाते है \nनवनाथांची आरती - जय जय नवनाथांचा \nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - प्रस्तावना\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय २\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ३\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ४\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ५\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ६\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ७\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ८\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ९\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १०\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ११\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १२\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १३\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १४\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nश्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय १५\nश्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.\nनिस्सार , निस्सारण इ० पहा .\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\nमृत्युमित्र - अद्याप पातकाने\nकाय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले...\n - असे माझा मित्र हो लहान\nलहानपणची आठवण - होतो मी लहान आनंदाने मनी ...\nसंक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-20T16:07:56Z", "digest": "sha1:WV2LUYH6ZMH5K42Y3OG7PY6RDVPNUTGM", "length": 10572, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘आत्महत्या करणार नाही, तर लढणार’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘आत्महत्या करणार नाही, तर लढणार’\nपुणे – शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये “आत्महत्या करणार नाही, तर लढणार’ हे अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना राबविणार आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरू होणार आहे. तर उस्मानाबाद येथे सांगता होणार आहे. दि. 1 ते 9 मेदरम्यान हे अभियान होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.\nपिकांना मिळणारा भाव, उत्पादन खर्च, जीएसटी, नोटबंदीचा परिणाम, पेट्रोल आणि खत औषधींचे वाढलेले दर यांचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. उत्पादन खर्च वाढला असून तुलनेने पिकांना मिळणारी किंमत नगण्य आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यातून तो निराश होवून आत्महत्याचा पर्याय स्वीकारत आहे. त्याला रोखण्यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 1 मे रोजी शिंदखेडा जि. धुळे येथील विखरण येथून हे अभियान सुरू होणार असून धर्मा पाटलांचा मुलगाही या अभियानात सहभागी होणार आहे.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि शेतीमालाला दीडपट हमी भाव मिळावा, यासाठी संघटनेने दोन विधेयक तयार केले आहे. ते संसदेने मंजूर करावे, यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदन देण्यात येणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. दरम्यान, सांगली, कोल्हापूर भागतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे आठ दिवसांत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.\n‘सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’\nभाजपचे उपोषण म्हणजे “सौ चुहें खा कर बिल्ली चली हज’ असा प्रकार आहे. विरोधकांनी अधिवेशन चालू दिले नये, असा आरोप करत भाजप नेते उपोषणाला बसले. मात्र, अधिवेशनाचे कामकाज पहिल्यांदा कोणी रोखले त्यानंतर पुन्हा अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी कोणी कोणाला भाग पाडले त्यानंतर पुन्हा अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी कोणी कोणाला भाग पाडले याचा मी साक्षीदार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न समोर येवू द्यायचे नाहीत, म्हणून अधिवेशन चालू दिले नाही. एकीकडे पंतप्रधानांच्या नावाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे नेते उपोषण करत आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.\nस्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रकाश पोफळे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्ते पदी योगेश पांडे आणि अनिल पवार यांनी नेमणूक करण्यात आली. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजन यांचे लेझीम नृत्य\nNext articleदौंडमध्ये फोफावला बाटलीबंद पाणी व्यवसाय\nपुणे: प्लॅस्टिक नष्ट करणाऱ्या विषाणूंचा शोध\n“पॅनकार्ड क्‍लब’ छोट्या गुंतवणुकदारांना परतावा\nपुणे: पहिल्या वर्षी 100 शाळांमध्येच ई-लर्निंग\nपुणे: प्लॅस्टिकवरील कारवाईसह नागरिकांचे प्रबोधनही\nपुणे: एफआरपी थकीत पाच कारख्यांना नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pmc-ngo-90504", "date_download": "2018-04-20T16:58:26Z", "digest": "sha1:HMWOBR7VE5XKOP7ACAZCZH3LA3LVUGLT", "length": 14844, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news PMC NGO ‘दिवस-रात्र निवारा’चा आज निर्णय | eSakal", "raw_content": "\n‘दिवस-रात्र निवारा’चा आज निर्णय\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nपुणे - शहरातील रस्त्यांवर दहा हजार मुले राहत असल्याचे सर्वेक्षण एका स्वयंसेवी संस्थेने केले असून, त्यांच्यासाठी ‘दिवस-रात्र निवारा’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापालिका त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे त्याला अनुदान मिळणार असून, खासगी उद्योग समूहही त्यासाठी सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीतून (सीएसआर) हातभार लावणार आहे. स्थायी समितीमध्ये गुरुवारी या प्रस्तावावर निर्णय होणार आहे.\nपुणे - शहरातील रस्त्यांवर दहा हजार मुले राहत असल्याचे सर्वेक्षण एका स्वयंसेवी संस्थेने केले असून, त्यांच्यासाठी ‘दिवस-रात्र निवारा’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापालिका त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे त्याला अनुदान मिळणार असून, खासगी उद्योग समूहही त्यासाठी सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीतून (सीएसआर) हातभार लावणार आहे. स्थायी समितीमध्ये गुरुवारी या प्रस्तावावर निर्णय होणार आहे.\nहैदराबादमधील ‘रेन्बो’ या स्वयंसेवी संस्थेने शहरात गेल्या वर्षी सर्वेक्षण केले. त्यात शहरातील रस्त्यांवर १८ वर्षांच्या आतील १० हजार ४२७ मुले राहत असल्याचे दिसून आले. भीक मागण्यासाठी तसेच फुगे व खेळणी विकण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, असे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. या मुलांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरू करावा, असा प्रस्ताव संस्थेने महापालिकेला दिला. त्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या २० शाळांत हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद आहे. त्याचा वापर करून २० ठिकाणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विशेष निधीतून आणि ‘सीएसआर’मधून हा प्रकल्प चालविला जाईल, असे प्रस्तावात म्हटले आहे. महापालिका प्रशासन हा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आग्रही आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दिवस-रात्र निवारा केंद्रात आणून त्यांना पालिकेच्या शाळेत शिक्षण देऊन त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. स्थायी समितीने मंजुरी दिली, तर महापालिका आणि संबंधित संस्थेचा पाच वर्षांसाठी करार होणार आहे.\nरस्त्यावरील मुलांचे दिवस-रात्र निवारा केंद्रात संगोपन करण्यासाठी पुण्यात भरपूर संस्था उपलब्ध आहेत. तरीही हैदराबादमधील संस्था कशासाठी पुण्यात दहा हजार मुले रस्त्यावर राहतात का पुण्यात दहा हजार मुले रस्त्यावर राहतात का ‘रेन्बो’कडून विविध शहरांत सुमारे तीन हजार मुलांचे संगोपन केले जाते. पुण्यात १० हजार मुलांचे ते संगोपन करू शकतील का ‘रेन्बो’कडून विविध शहरांत सुमारे तीन हजार मुलांचे संगोपन केले जाते. पुण्यात १० हजार मुलांचे ते संगोपन करू शकतील का केंद्र व राज्य सरकारचे अनुदान, ‘सीएसआर’चा निधी असताना महापालिकेचा निधी कशासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान, ‘सीएसआर’चा निधी असताना महापालिकेचा निधी कशासाठी आदी विविध आक्षेप या संस्थेवर घेतले जात आहेत. त्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते आदी विविध आक्षेप या संस्थेवर घेतले जात आहेत. त्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे महापालिकेच्या प्रशासकीय तसेच काही स्वयंसेवी संस्थांचे लक्ष लागले आहे.\nएमआयएमपुढे सत्ताधारी भाजप झुकले ; महापालिका सभा, विषयांचा बदलला प्राधान्यक्रम\nसोलापूर : सभेपूर्वी निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच विषय चर्चेला घेऊन त्यानुसारच कामकाज चालले पाहिजे हे सभाशास्त्र आहे. मात्र एमआयएमच्या...\nमालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी\nमालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन...\nरायगड - दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील सुरुंगाच्या स्फोटामुळे उन्हेरे, पिलोसरी गावातील अनेक घरांच्या...\nचार वर्षानंतर पुन्हा तीच जागा हडपण्याचा प्रयत्न\nबेळगाव - चार वर्षांपूर्वी अतिक्रमीत शेड हटवून महापालिकेची 30 गुंठे जागा ताब्यात घेतली असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी बेकायदा शेड उभारून राहणाऱ्या...\nअभय पाटील, अनिल बेनकेंकडून भाजपतर्फे अर्ज दाखल\nबेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/b.r.tambe/word", "date_download": "2018-04-20T16:36:36Z", "digest": "sha1:KVVTHAVP3YFNSY4CFSJDACW4XV5RNGCK", "length": 8179, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - b r tambe", "raw_content": "\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \nसमग्र कविता - संग्रह १\nकुस्करूं नका हीं सुमने \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nडोळे हे जुलमि गडे \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nठावा न सुखाचा वारा\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nआशा, शब्द आणि दर्शन\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nगुळापुरणाच्या याच्या पुढे पोळ्या शब्‍दाचा अध्याहार समजावा. गुळाच्या पुरणाच्या पोळ्या करणें म्‍हणजे मनोराज्‍यात गोड गोड सुखस्‍वप्नांची रेलचेल करणें असा अर्थ. ‘त्‍याने पाहिजे तशा गुळपुराणाच्या आपल्‍या जागी केल्‍या, पण अखेर दहा रुपयांच्या नोकरीवर राहण्याचे कबूल करावे लागले.’\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/person-blackmails-couple-after-recording-private-moments-in-pune-cyber-crime/", "date_download": "2018-04-20T16:17:15Z", "digest": "sha1:7OCHZTYZPVPQ5ZSGLNRR7G6JBVV6ENED", "length": 12295, "nlines": 72, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nसेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना\nसेल्फी स्टिकच्या मदतीने शेजारच्यांच्या बेडरूम मधील खाजगी क्षण रेकॉर्ड करून नंतर त्या क्लिपच्या माध्यमातून महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत ब्लॅक मेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे . विशेष म्हणजे हा आरोपी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मोठ्या हुद्दयावर असल्याचे समजते . हा आरोपी ह्या क्लिप्सच्या माध्यमातून महिलेला ब्लॅकमेल करत होता.\nपुणे मिररनेच्या वृत्तानुसार, २४ नोव्हेंबरला पीडित जोडप्याने हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शेजारी कुंदन आष्टे विरोधात तक्रार दाखल केली. त्यांचा आरोप आहे कि कुंदनने फोन कॅमेरा आणि सेल्फी स्टीकच्या मदतीने बेडरूममधील खाजगी क्षण रेकॉर्ड केले आणि नंतर ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. पीडित जोडपे एकांतात असताना त्यांना बेडरूमच्या जवळ काहीतरी हालचाल दिसली आणि त्यांनी कुंदनला रंगेहाथ पकडले. पकडले गेल्यानंतर कुंदनने गुन्हा कबुल केला आणि असे आपण गेल्या ३ महिन्यापासून करत असल्याचे देखील मान्य केले.\nपोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कुंदन आष्टेने महिलेला तिची क्लिप पाठवली आणि ब्लॅकमेल करत त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. आष्टे ने धमकी दिली की, तिने तसे केले नाही तर तो ती क्लिप सोशल मीडियात अपलोड करेल. याबाबत तिने पतीला सांगितले आणि कुंदनविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कुंदन आष्टे च्या विरोधात तक्रार नोंदवली असून तो झालेल्या घटनेच्या दिवसापासून फरार आहे.\nहिंजेवाडी पोलीस स्टेशनचे इंचार्ज रंगनाथ उंडे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात हे दोघे बेडरूममध्ये होते आणि तेव्हाच त्यांना खिडकीबाहेर काहीतरी विचित्र दिसले. ते खिडकीजवळ गेले असता त्यांना कुंदन फोन सेल्फी स्टीकवर लावून रेकॉर्ड करत असल्याचे दिसले. त्यानंतर सोसायटीच्या इतर सदस्यांना सोबत घेऊन तक्रारदारांनी कुंदनला याबाबत जाब विचारला तर त्याने तो गेल्या तीन महिन्यांपासून हे करत असल्याचं मान्य केलं.ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत हा तरुण संबंधित महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी करत होता.मात्र जोडप्याने धाडस दाखवले आणि त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.\nमोबाईल आणि इंटरनेट पॅक स्वस्त होत असले तर त्यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे . चांगला इंटरनेट स्पीड आणि अश्शील वेबसाईट मुळे सहज उपलब्ध होणाऱ्या नको त्या गोष्टी , यातून हे प्रमाण वाढत आहे हे सत्य देखील नाकारून चालणार नाही.\nलग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू\nतू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या\nविवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून\n पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा \n← नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू : ‘ ह्या ‘ नेत्याचे धक्कादायक विधान मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले →\n7 thoughts on “सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना”\nPingback: पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता – Marathi People\nPingback: पुण्यातील हिंजवडी परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू :व्हॉट्सअॅपचा माध्यमातून चालतो व्यवसा\nPingback: अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना – Marathi People\nPingback: मित्राच्या मोबाईलमध्ये सापडली ‘ तसली ‘ क्लिप ..पुढे ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु : महाराष्ट्रातील घ\nPingback: नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना – Marathi People\nPingback: अखेर पुण्यातली लेडी डॉन आरती मिसाळ धरली : ‘ ह्या ‘ धंद्याने झाली होती कोट्याधीश – Marathi People\nPingback: प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही – Marathi People\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-04-20T16:46:11Z", "digest": "sha1:VDVH7ALM22TRCGYF6SJ7MNPJCUAL4JKX", "length": 3212, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शुभा तोळे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nशुभा तोळे ह्या भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन करतात.\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते\nइ.स. १९६७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१५ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathipeople.co.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-20T16:32:30Z", "digest": "sha1:Q3XXYHB73D7KXF34ACQSS4LLBNRBYFFO", "length": 5871, "nlines": 48, "source_domain": "marathipeople.co.in", "title": "नाशिक न्यूज – Marathi People", "raw_content": "\nआपला हक्काचा मराठी माणूस\nTag Archives: नाशिक न्यूज\nतिबेटियन मार्केटच्या स्फोटानंतर नाशिक महापालिका आक्रमक : घेतला ‘ हा ‘ निर्णय\nतिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेला नियम व अटी याबद्दल जाग आली आहे .शनिवारी झालेल्या स्फोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसले, तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका जागरूक राहणार आहे. तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास… Read More »\nCategory: नाशिक महाराष्ट्र Tags: nashik, तिबेटियन मार्केट, तिबेटियन मार्केट ब्लास्ट, नाशिक, नाशिक न्यूज\nनाशिकचे ‘ हे ‘ व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर\nरोखीत व्यवहार करून त्याच्या नोंदी न ठेवणारे बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, कोचिंग क्लासेस आदी घटक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे चिन्हे आहेत. देशात हळूहळू प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्राप्तिकर संकलनाद्वारे सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात देशात उर्वरित महाराष्ट्र विभाग हा द्वितीयस्थानी आहे.नाशिक विभागात कर संकलन चांगले असले तरी परतावा द्यावा लागण्याचे प्रमाणही अधिक… Read More »\nCategory: महाराष्ट्र Tags: marathi, nashik, nashik news, नाशिक, नाशिक न्यूज, नाशिककर, मराठी न्यूज\nप्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना\nमोदी हिंदुस्थानात मौनी बाबा पण परदेशी भूमीवर ते बोलके: मोदी यांचा मनमोहन झालाय\n‘ हा ‘ पोपट बोलता करण्याचे नगर पोलिसांपुढे आव्हान : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण\nनगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\nबाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dahisars-district-level-kabaddi-competition/", "date_download": "2018-04-20T16:37:57Z", "digest": "sha1:XOLWLSW2NOMFTKAHV3OVV2L3BOQMBPY4", "length": 16666, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "दहिसरमध्ये घुमणार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा दम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा पाठपुरावा : उरण, पनवेल तालुक्यातील खारबंधिस्तीची कामे सुरू\nडहाणूत ‘उघड्य़ावर’ बसणारे गाव ढकलले हगणदारीमुक्त महाराष्ट्रात\n१३ वर्षांत पाणी योजनेचे तीनतेरा; कोट्य़वधी रुपये खर्चूनही विहिरी कोरड्य़ा\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nभविष्यातील ‘कठुआ’ टाळण्यासाठी कायद्यात होणार कडक बदल\n….म्हणून मनमोहन सिंग यांची महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाही\nकिरण बाला झाली अमना बीबी सासरे म्हणाले, ‘हा ‘आयएसआय’चा कट’\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nचाळीस वर्षानंतर ‘या’ देशातील नागरिकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली\nयाक… जगप्रसिद्ध ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये जनावरांची विष्ठा\n‘हेतू’ साध्य करण्यासाठी सणकी हुकूमशहाकडून बायको आणि बहिणीचा वापर\nअग्निसुरक्षा : गरज आणि उपाय\n– सिनेमा / नाटक\nगोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘के सेरा सेरा’ ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nकरण जोहरचा मेणाचा पुतळा\n‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट\nकेसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी\nजन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nकडक उन्हाळ्यातील एक वरदान ‘कलिंगड’\nरेड वाईन पिण्याचा ‘हा’ फायदा माहिती आहे\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\n मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत\nमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील हरवलेली उत्तरे, दिल्ली व महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर\nदहिसरमध्ये घुमणार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा दम\nशिवसेना शाखा क्रमांक २च्या वतीने आणि श्री साईबालाजी मित्र मंडळाच्या सहकार्याने येत्या शुक्रवारपासून मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन ग्राऊंड, विद्यामंदीर शाळेसमोर, दहीसर (पूर्व) येथे खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेचे उद्घाटन विभागप्रमुख विलास पोतनीस व ज्येष्ठ सिनेनट अरुण नलावडे यांच्या उपस्थित पार पडेल. तसेच शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण सोहळा रंगेल.\nउपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठे योगदान लाभले आहे. विधानसभा संघटक कर्णा अमीन, महिला उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख अतुल तावडे, शाखासंघटक शर्मिला पाटील, कार्यालय प्रमुख विनोद जाधव, महेश वेंगुर्लेकर, बाबू यर्रा, पंढरी कडू, दिनेश वाकोडे हे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.\nया स्पर्धेला पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुळकर, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, आमदार प्रकाश सुर्वे, प्रकाश कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेविका सुजाता पाटेकर,तेजस्विनी घोसाळकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद, संजय घाडी, हर्षल कारकर आणि अभिषेक घोसाळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, शरद पवारांची सडेतोड भूमिका\nपुढीलकर्जबुडव्यांना खडी फोडायला पाठवा,तरच बँका टिकतील\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवॉटसनने लावली राजस्थानची वाट\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nघोष ट्रॉफी :एम.आय.जी., शिवाजी पार्क जिमखाना उपांत्यपूर्व फेरीत\nमोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र\nमहिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात\nविराट म्हणतो मी ‘या’ खेळाडूसारखी फटकेबाजी करु शकत नाही\nमुख्यमंत्र्यांच्या भाषणात मोदींचा ‘व्यत्यय’\nनांदेडमध्ये अपघातात बाप-लेकाचा मृत्यू\nशिवसैनिकांवरील बोगस गुन्हे मागे घ्या\nअमित शहा बोलले ते सिद्धरमय्यांनी ऐकलेच नाही\nफोटो स्टोरी : टी-२० चा बॉस ख्रिस गेलची आयपीएलमधील सहा शतके\nतीन वर्षांनंतर जुन्या संघाची नवी लढाई\nनेते ऐकत नसल्याने भाजप कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा\nनाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार\nमुलांशी बोलू नका, छोटे कपडे घालू नका – शालेय पुस्तकातून मुलींना...\nशतक ठोकल्यानंतर गेल करणार ‘ही’च्या बरोबर पार्टी\nशिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-20T16:11:53Z", "digest": "sha1:MAHNRUIITE7UYRT46REHHZD7L26TSQG5", "length": 9932, "nlines": 118, "source_domain": "www.marathi.aarogya.com", "title": "युवा डॉक्टरांनी 'टेक्नोसॅव्ही' व्हावे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nयुवा डॉक्टरांनी 'टेक्नोसॅव्ही' व्हावे\nयुवा डॉक्टरांनी 'टेक्नोसॅव्ही' व्हावे\nडॉ. अरुण जामकर यांची अपेक्षा म. टा. प्रतिनिधी पुणे\nनव्या तंत्रज्ञानाची, तंत्रज्ञानाच्या वापराची माहिती युवा डॉक्टरना होणे गरजेचे आहे. त्यासाठी विशिष्ट विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर्स, व्यावसायिक आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी नुकतेच व्यक्त केले.\nयुरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, एस हॉस्पिटल आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातफेर् आयोजित 'एंडोयुरोलॉजी २०१२' या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जामकर बोलत होते. सोसायटीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर, माजी अध्यक्ष डॉ. जगदीश कुलकणीर्, डॉ. ब्रेडो आणि डॉ. शिवदेव बापट या वेळी उपस्थित होते.\n' लॅप्रोस्कोपी व युरोलॉजीसह विशेष अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव आहे. असे संशोधन ही काळाची गरज आहे. 'सब स्पेशालिटी' अभ्यासक्रमांची गरज लक्षात घेता विद्यापीठातफेर् नवीन अभ्यासक्रम सुरूकरण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे,' असे डॉ. जामकर यांनी सांगितले.\nकिडनीचे विकार, लॅप्रोस्कोपी, प्रोस्टेटवरील ऑपरेशनचे व्यवस्थापन यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. एस हॉस्पिटलमध्ये झालेल्या काही गुंतागुंतीच्या ऑपरेशन्सचे थेट प्रक्षेपणही या वेळी करण्यात आले.\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/entertainment/priya-prakash-varrier-valentine-day-plan/413013", "date_download": "2018-04-20T17:29:24Z", "digest": "sha1:Z7RTCCYDBVR4IJQG75Q6QOXIWMPJQ43V", "length": 18173, "nlines": 113, "source_domain": "zeenews.india.com", "title": "हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन | priya-prakash-varrier valentine day plan", "raw_content": "\nहा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन\nव्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.\nमुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.\nएव्हाना सर्व तरुणांच्या डिपी, स्टेटसमध्ये 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी प्रिया आणि तिचा व्हिडिओ दिसू लागलायं.\nसनी लियॉनीला टाकलं मागे\nगुगल सर्च ट्रेंडमध्ये प्रियाने सनी लियॉनी, कॅटरिना, आलिया, दिपिका यांनाही मागे टाकले आहे. यावरून तिच्या क्रेझचा अंदाज आपण लावू शकतो. या प्रियाचा 'व्हॅलेंटाईन' कसा असणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. प्रियाने या प्रश्नांना उत्तरही दिले आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nकोण आहे प्रिया वॉरिअर\nप्रिया अवघी १८ वर्षांची असून केरळमधील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.\nओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम सिनेमातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप याच गाण्यातील आहे.\n'हिंदुस्थान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या 'व्हॅलेंटाईन डे' बद्दल सुरू असलेल्या गॉसीप्सचा खुलासा केलाय.\nअजून तरी कोणी तसा 'स्पेशल वन' नसल्याचे तिने सांगितले. व्हॅलेंटाईनच्या दिवशी ती आपल्या कामात व्यस्त असणार असल्याचेही ती म्हणाली.\nअभ्यास आणि अभिनय या दोन गोष्टी सध्या माझ्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे तिने सांगितले आहे.\nत्यामूळे 'व्हॅलेंटाईन डे' च्या चर्चांना पूर्णविराम मिळालायं.\nप्रियाला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाने नक्कीच आनंद झाला असेल. मात्र तिच्या कुटुंबियांना चांगलाच मनस्ताप होतो आहे. प्रियाने चाहत्यांच्या प्रेमावर आनंदही व्यक्त केलाय.\nकाय म्हणाली प्रियाची आई\nthenewsminute.com या वेबसाईटसोबत बोलताना प्रियाची आई प्रीथा यांनी चिंता व्यक्त केलीये. प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तिला होस्टेलवर पाठवण्यात आल्याचे तिच्या आईने सांगितले.\n असा प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या की, एका रात्रीत प्रियाला मिळालेली लोकप्रीयता बघून मी घाबरले. दिग्दर्शकाने सिनेमाच्या रिलीजपूर्वी प्रियाला कुठलीही मुलाखत न देण्याचे बजावले आहे. सिनेमाचे काहीच सीन्स शूट झाले आहेत.\nत्याआधीच प्रिया इतकी लोकप्रिय झालेली पाहून मी तिला होस्टेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.\nइंटरनेटवर चर्चेत असलेली प्रिया प्रकाश वॉरियर एका दिवसात प्रसिद्ध झाली आहे. १८ वर्षांची प्रिया वॉरियर एका मल्याळी सिनेमाची अभिनेत्री आहे. 'Oru Adaar Love' असं या सिनेमाचं नाव आहे.\n‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ\nशेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्गचं असं जुळलं\nमुंबईच्या पंकजने चित्रातून साकारलाय केरळचा 'पुरम महोत्...\nव्हॉट्सअॅपचं हे फिचर देणार अफवा पसरवणाऱ्यांना दणका\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी...\nहॉलिवूड सिनेमा 'Puzzle'मध्ये इरफान खान, ट्रेलर र...\nवॉटसनचं शतक, चेन्नईचा स्कोअर २०० पार\nप्रिया वॉरियर देतेय 'फ्री अॅटीट्यूड'\nयोगी आदित्यनाथ फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेले मुख्यमंत्री\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nरॅम्पवर अर्शी खानचे जलवे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/ambala-ram-rahims-hearing-in-two-murder-cases-269996.html", "date_download": "2018-04-20T16:28:16Z", "digest": "sha1:UGY6I25QQ6KPYFM4ZWK44HPFB3G5GPM2", "length": 11179, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन हत्याप्रकरणातही राम रहीमला होणार शिक्षा, ड्रायव्हर साक्ष देण्यासाठी आला पुढे", "raw_content": "\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nअंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला\nडिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे\nशहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची निर्घृण हत्या\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nकरण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका\n1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\n'गेल'च्या तडाख्याने हैदाराबादची धूळधाण, पंजाबचा दणदणीत विजय\n'गेल' नावाचं वादळ, यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक \nचंद्रपूरच्या रोहितची अंडर 19 टीममध्ये निवड\nकोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nदोन हत्याप्रकरणातही राम रहीमला होणार शिक्षा, ड्रायव्हर साक्ष देण्यासाठी आला पुढे\nडेरा सच्चा सौदाचा व्यवस्थापक रंजीत आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खट्टा सिंह यांनी साक्ष देण्यासाठी याचिका दाखल केलीये.\n16 सप्टेंबर : साध्वी लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अडचणीत आणखी भऱ पडणार आहे. दोन हत्याच्या प्रकरणात त्याचा ड्रायव्हर खट्टा सिंह साक्ष देण्यासाठी पुढे आलाय.\nपंचकुला सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचा व्यवस्थापक रंजीत आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खट्टा सिंह यांनी साक्ष देण्यासाठी याचिका दाखल केलीये.\nविशेष म्हणजे याच प्रकरणात 2012 मध्ये खट्टा सिंहने साक्ष देण्यास नकार दिला होता. त्यावेळी राम रहीमच्या गटाकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आपण साक्ष देऊ शकलो नाही असा खुलासा सिंह यांनी केला. आता राम रहीम तुरुंगात गेलाय. त्यामुळे साक्ष देण्यास तयार असल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. सीबीआय कोर्टाने आता या प्रकरणी 22 सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CBIGurmeet Ram Rahimगुरुमीत राम रहीमराम रहीम\n;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही\nन्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग-अरूण जेटलींचं खुलं पत्र\nभाजप नेत्याने लाज सोडली, महिला पत्रकारांविरोधात केलं संतापजनक वक्तव्य\n मग 'हे' नियम लक्षात ठेवा\nकर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा\nचिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी, कायद्यात होणार दुरुस्ती\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nक्युबात कॅस्ट्रो युगाचा अस्त, मॅगेल डियाझ कनेल नवे अध्यक्ष\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n' हा महाभियोग दुर्दैवी'\n'ही डेमोक्रसी चुकीचीच आहे'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mpsctopperss.blogspot.in/2016/01/PadmaAwards2016.html", "date_download": "2018-04-20T16:36:36Z", "digest": "sha1:BVUL7EH2HXESXUX7KFWOOVJRUQL3KH4A", "length": 11506, "nlines": 183, "source_domain": "mpsctopperss.blogspot.in", "title": "MPSC TOPPERS : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : पद्म पुरस्कार २०१६", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे.\nयावर्षी ११२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये १० पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.\nपुरस्कार विजेत्यांमधे १९ महिलांचा समावेश आहे, तर ४ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.\nउल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातून यंदा १६ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात एक पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि दहा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.\nक्र. नाव क्षेत्र राज्य\n१ सुश्री यामिनी कृष्णमूर्ति कला-शास्त्रीय नृत्य दिल्ली\n२ श्री रजनीकांत कला-सिनेमा तामिळनाडू\n३ श्रीमती गिरिजा देवी कला-शास्त्रीय गायन पश्चिम बंगाल\n४ श्री रामोजी राव साहित्य व पत्रकारिता आंध्र प्रदेश\n५ डॉ विश्वनाथन शांता मेडिसिन-ऑनकोलॉजी तामिळनाडू\n६ श्री श्री रविशंकर इतर-अध्यात्म कर्नाटक\n७ श्री जगमोहन समाज सेवा दिल्ली\n८ डॉ वासुदेव कलकुंते आत्रे विज्ञान कर्नाटक\n९ श्री अविनाश दीक्षित (विदेशी) साहित्य व शिक्षण अमेरिका\n१० स्वर्गीय श्री धीरूभाई अंबानी (मरणोत्तर) व्यापार व उद्योग महाराष्ट्र\nक्र. नाव क्षेत्र राज्य\n१ श्री अनुपम खेर कला-सिनेमा महाराष्ट्र\n२ श्री उदित नारायण झा कला-पार्श्व गायन महाराष्ट्र\n३ श्री राम वी सुतार कला-मूर्तिकला उत्तर प्रदेश\n४ श्री हिसनाम कन्हाईलाल कला-थियेटर मणिपुर\n५ श्री विनोद राय सिविल सेवा केरळ\n६ डॉ यार्लगद्द लक्ष्मी प्रसाद साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश\n७ प्रोफेसर एन एस रामानुज ततआचार्य साहित्य व शिक्षण महाराष्ट्र\n८ डॉ बरजिंदर सिंह हमदर्द साहित्य व पत्रकारिता पंजाब\n९ प्रोफेसर डी नागेश्वर रेड्डी मेडिसिन-गैस्ट्रोइंट्रोलाजी तेलंगणा\n१० स्वामी तेजोमायानंद इतर-अध्यात्म महाराष्ट्र\n११ श्री हाफिज कंट्रैक्टर इतर-कृषि महाराष्ट्र\n१२ श्री रवीन्द्र चंद्र भार्गव समाज सेवा उत्तर प्रदेश\n१३ डॉ वेंकट रामाराव अल्ला विज्ञान व इंजीनियरिंग आंध्र प्रदेश\n१४ साइना नेहवाल खेल-बैडमिंटन तेलंगणा\n१५ सानिया मिर्जा खेल-टेनिस तेलंगणा\n१६ इंदु जैन व्यापार व उद्योग दिल्ली\n१७ स्वर्गीय स्वामी दयानंद सरस्वती (मरणोत्तर) इतर-अध्यात्म उत्तराखंड\n१८ श्री रॉबर्ट ब्लैकविल (विदेशी) समाज सेवा अमेरिका\n१९ श्री पलोनजी शपूरजी मिस्त्री (एनआरआय/पीआयओ) व्यापार व उद्योग आयरलँड\nपद्मश्री पुरस्कार विजेत्यांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nभारतीय डाक बँक लिमिटेड (१०५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nभारतीय डाक बँक सहाय्यक व्यवस्थापक (६५० जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (५१३४ जागा)\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक : ७ नोव्हेंबर\nचालू घडामोडी : ३१ जानेवारी\nचालू घडामोडी : ३० जानेवारी\nचालू घडामोडी : २९ जानेवारी\nचालू घडामोडी : २८ जानेवारी\nचालू घडामोडी : २७ जानेवारी\nचालू घडामोडी : २६ जानेवारी\nचालू घडामोडी : २५ जानेवारी\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचालू घडामोडी : २४ जानेवारी\nचालू घडामोडी : २३ जानेवारी\nचालू घडामोडी : २२ जानेवारी\nचालू घडामोडी : २१ जानेवारी\nचालू घडामोडी : २० जानेवारी\nचालू घडामोडी : १९ जानेवारी\nचालू घडामोडी : १८ जानेवारी\nचालू घडामोडी : १७ जानेवारी\nचालू घडामोडी : १६ जानेवारी\nचालू घडामोडी : १५ जानेवारी\nचालू घडामोडी : १४ जानेवारी\nपंतप्रधान पीक विमा योजना\nचालू घडामोडी : १३ जानेवारी\nचालू घडामोडी : १२ जानेवारी\nचालू घडामोडी : ११ जानेवारी\nचालू घडामोडी : १० जानेवारी\nचालू घडामोडी : ९ जानेवारी\nचालू घडामोडी : ८ जानेवारी\nचालू घडामोडी : ७ जानेवारी\nचालू घडामोडी : ६ जानेवारी\nचालू घडामोडी : ५ जानेवारी\nचालू घडामोडी : ४ जानेवारी\nचालू घडामोडी : ३ जानेवारी\nचालू घडामोडी : २ जानेवारी\nचालू घडामोडी : १ जानेवारी\nचालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१५\nनोबेल पुरस्कार २०१६ (PDF)\nस्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत\nप्रश्नसंच ३३ - [मराठी व्याकरण]\nचालू घडामोडी : १ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125944479.27/wet/CC-MAIN-20180420155332-20180420175332-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}