{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:41:40Z", "digest": "sha1:FQ2XKW4Z5P3AF47UHWDTUZBHU4KMR3ME", "length": 25363, "nlines": 165, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गद्दार आणि त्यांच्यावरच मदार", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\nआपल्या मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यापासून मौन धारण केलेल्या नाथाभाऊ खडसे यांनी जळगाव मुक्कामी आपले तोंड बंद ठेवून उघडले आणि स्वपक्षाला काही इशारा दिला आहे. त्यांना सत्तेतून बाजुला करण्याचे कारस्थान शिजवले गेले आणि त्यामागे पक्षातले गद्दार असल्याचा नाथाभाऊंचा दावा आहे. किंबहूना त्या गद्दारांपासून पक्षाला धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तो इशारा कुणाला आहे, त्याचा अंदाज येत नाही. कारण धोका कुणाला व कशाला आहे, त्याचेही स्पष्टीकरण खडसे यांनी दिलेले नाही. धोका सत्तेला असेल, तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना लागू होतो आणि धोका पक्षाला असेल तर नाथाभाऊंचा इशारा अवघ्या पक्षाला लागू होतो. यापैकी सत्तेला धोका कायम आहे, कारण आजही भाजपाकडे स्वत:चे हक्काचे बहूमत नाही. म्हणून शिवसेनेचे लोढणे गळ्यात घेऊन चालावे लागते आहे. अशावेळी सेनेला तलाक घेण्याचे आवाहन पक्षाच्या मुखपत्रातूनच होते आहे. मग तसे आवाहन करणार्‍यांना गद्दार म्हणायचे काय कारण ते बहूमताला म्हणजेच सत्तेला धोका निर्माण करीत आहेत. नाथाभाऊंचा इशारा पक्षाच्या ‘मनोगताशी’ निगडित आहे काय कारण ते बहूमताला म्हणजेच सत्तेला धोका निर्माण करीत आहेत. नाथाभाऊंचा इशारा पक्षाच्या ‘मनोगताशी’ निगडित आहे काय ते अर्थातच नाथाभाऊंनी तोंड उघडल्याशिवाय कळणार नाही आणि सध्या तरी तसे तोंड उघडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनीच दिलेली आहे. मग येऊ घातलेला धोका कोण कसा टाळू शकणार आहे ते अर्थातच नाथाभाऊंनी तोंड उघडल्याशिवाय कळणार नाही आणि सध्या तरी तसे तोंड उघडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनीच दिलेली आहे. मग येऊ घातलेला धोका कोण कसा टाळू शकणार आहे बातम्या बघितल्या तर सरकार धोक्यात नसल्याचीच खात्री पटेल. कारण प्रथमच मुख्यमंत्री आत्मविश्वासाने मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली करू लागले आहेत. म्हणजेच त्यांना गद्दारांची भिती वाटताना दिसत नाही. उलट त्यांची त्याच गद्दारांवर अधिक मदार दिसते. नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणूकांचे निकाल बघितले, तर जुन्या निष्ठावंतांना खड्यासारखे बाजूला सारून अन्य पक्षाशी गद्दारी करून भाजपात आलेल्यांची वर्णी लागली आहे.\nम्हणूनच नाथाभाऊ कोणाला गद्दार म्हणतात, त्याला महत्व आहे. अन्य पक्षातून भाजपात येऊन शिरजोर झालेल्यांकडे नाथाभाऊंचा इशारा आहे, की जुने स्वपक्षातलेच कोणी गद्दार आहेत, असे त्यांना सुचवायचे आहे राजकारणात गद्दार हा शब्द संदर्भाने तपासला जातो. आज ज्याच्या हाती सत्ता व अधिकार आहे, त्याच्याशी दगा करणार्‍याला गद्दार संबोधले जाते. ते करत असताना जुन्या सत्ताधीशाला वा वरीष्ठाला दगा देण्याला राजकीय शहाणपणा मानले जाते. त्यामुळेच एकाच वेळी इथे गद्दार असतात, ते दुसरीकडे राजकीय शहाणे मानले जात असतात. यापैकी कुठल्या अर्थाने नाथाभाऊ गद्दारीचा इशारा देत आहेत राजकारणात गद्दार हा शब्द संदर्भाने तपासला जातो. आज ज्याच्या हाती सत्ता व अधिकार आहे, त्याच्याशी दगा करणार्‍याला गद्दार संबोधले जाते. ते करत असताना जुन्या सत्ताधीशाला वा वरीष्ठाला दगा देण्याला राजकीय शहाणपणा मानले जाते. त्यामुळेच एकाच वेळी इथे गद्दार असतात, ते दुसरीकडे राजकीय शहाणे मानले जात असतात. यापैकी कुठल्या अर्थाने नाथाभाऊ गद्दारीचा इशारा देत आहेत त्यात माधव भंडारी हे भाजपाचे दिर्घकाळ प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. त्यांना प्रत्येकवेळी विधान परिषदेच्या आमदारकीचे गाजर दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी देण्याची वेळ आली, मग माधव भंडारी यांना बाजूला सारून भलत्याच कुणाची वर्णी लागत राहिली आहे. वर्षभरापुर्वी जळगावच्या वाघांना जागा देण्यासाठी भंडारी मागे राहिले आणि यावेळी अन्य पक्षातून आलेल्यांना पंगतीत बसवताना भंडारी यांना उपास घडवला गेला. असे जे उपरे वा ऐनवेळी पक्षात आलेले असतात, त्यांना नाथाभाऊ गद्दार संबोधत आहेत, की त्यांचा इशारा अन्यत्र आहे त्यात माधव भंडारी हे भाजपाचे दिर्घकाळ प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. त्यांना प्रत्येकवेळी विधान परिषदेच्या आमदारकीचे गाजर दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी देण्याची वेळ आली, मग माधव भंडारी यांना बाजूला सारून भलत्याच कुणाची वर्णी लागत राहिली आहे. वर्षभरापुर्वी जळगावच्या वाघांना जागा देण्यासाठी भंडारी मागे राहिले आणि यावेळी अन्य पक्षातून आलेल्यांना पंगतीत बसवताना भंडारी यांना उपास घडवला गेला. असे जे उपरे वा ऐनवेळी पक्षात आलेले असतात, त्यांना नाथाभाऊ गद्दार संबोधत आहेत, की त्यांचा इशारा अन्यत्र आहे ही जळगावातील बहूजन-महाजन अशी लढाई आहे काय ही जळगावातील बहूजन-महाजन अशी लढाई आहे काय आपण युती तोडली नसती आणि युतीच निवडणूकांना सामोरी गेली असती, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असेही खडसे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा आपण युती तोडली नसती आणि युतीच निवडणूकांना सामोरी गेली असती, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असेही खडसे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा युती तोडून त्यांनी किती जुन्या प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती युती तोडून त्यांनी किती जुन्या प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती की अन्य पक्षातले गद्दार आपलेसे करून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे डावपेच खेळले होते की अन्य पक्षातले गद्दार आपलेसे करून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे डावपेच खेळले होते पक्षात असे उसनवारीचे उमेदवार आणण्यातून गद्दारांची भरती कोणी केली होती\nऐनवेळी वा विपरीत परिस्थितीतही पक्षाचा किल्ला हिमतीने लढवणारे माधव भंडारी मोठे असतात, की कालपरवा वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला आलेले अन्य पक्षाचे दांडगे लोक निष्ठावान असतात गद्दाराची नेमकी व्याख्या तरी काय गद्दाराची नेमकी व्याख्या तरी काय अशा अन्य पक्षीय गद्दारांना सन्मानाने पक्षात आणायचा पुढाकार कोणी घेतला होता अशा अन्य पक्षीय गद्दारांना सन्मानाने पक्षात आणायचा पुढाकार कोणी घेतला होता किंबहूना अशाच गद्दारांच्या शक्तीवर स्वबळाचा मुख्यमंत्री आणण्याचे मनसुबे कोणी रचले होते किंबहूना अशाच गद्दारांच्या शक्तीवर स्वबळाचा मुख्यमंत्री आणण्याचे मनसुबे कोणी रचले होते गद्दारांना स्वपक्षात सन्मानित करण्याचे राजकारण कोण खेळला होता गद्दारांना स्वपक्षात सन्मानित करण्याचे राजकारण कोण खेळला होता नुसते शब्द वापरून चालत नाही. सवाल व्यक्तीचा नसतो, तर पक्षाचाही असतो. राजकीय पक्ष वा संघटनेत निष्ठा कशावर असली पाहिजे नुसते शब्द वापरून चालत नाही. सवाल व्यक्तीचा नसतो, तर पक्षाचाही असतो. राजकीय पक्ष वा संघटनेत निष्ठा कशावर असली पाहिजे नेत्याशी निष्ठा असावी की पक्षाच्या भूमिका विचारांशी असावी नेत्याशी निष्ठा असावी की पक्षाच्या भूमिका विचारांशी असावी जिंकण्यासाठी तुमच्या पक्षात कोणी आले तर त्यांनी आपल्याच आजवरच्या पक्षाशी दगाफ़टका केलेला असतो आणि उद्या प्रसंग आलाच तर तसाच दगा तुमच्याही असा माणूस करू शकतो. त्या प्रवृत्तीला प्रोत्साहन कोणी दिले होते जिंकण्यासाठी तुमच्या पक्षात कोणी आले तर त्यांनी आपल्याच आजवरच्या पक्षाशी दगाफ़टका केलेला असतो आणि उद्या प्रसंग आलाच तर तसाच दगा तुमच्याही असा माणूस करू शकतो. त्या प्रवृत्तीला प्रोत्साहन कोणी दिले होते पक्षात अशा गद्दारांचा भरणा करण्यात कोणाचा पुढाकार होता पक्षात अशा गद्दारांचा भरणा करण्यात कोणाचा पुढाकार होता नाथाभाऊंनी गद्दार शब्द वापरलाच आहे, तर निदान त्याचे परिशीलन तरी करावे. आपणच सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारांना पक्षाची दारे खुली केलेली असतील, तर पक्षाला गद्दारांपासून धोका असल्याची बोंब ठोकण्यात काय अर्थ आहे नाथाभाऊंनी गद्दार शब्द वापरलाच आहे, तर निदान त्याचे परिशीलन तरी करावे. आपणच सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारांना पक्षाची दारे खुली केलेली असतील, तर पक्षाला गद्दारांपासून धोका असल्याची बोंब ठोकण्यात काय अर्थ आहे आपल्या डझनावारी आमदारांनी टांग मारून भाजपात प्रवेश केला, म्हणून शरद पवार एका शब्दाने तरी नाराज झालेले होते काय आपल्या डझनावारी आमदारांनी टांग मारून भाजपात प्रवेश केला, म्हणून शरद पवार एका शब्दाने तरी नाराज झालेले होते काय त्यांनी कोणाला गद्दार म्हणून हिणवले काय त्यांनी कोणाला गद्दार म्हणून हिणवले काय कशाला हिणवतील त्यांनी आपला पक्षच मुळात इतर पक्षाचे गद्दार गोळा करून उभारलेला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आपले निष्ठावानही दगाफ़टका करून पळून जातील, हे अशा राजकारणातले गृहीत साहेबांनी मान्य केले आहे. पण नाथाभाऊंना अजून त्याचे लाभ ठाऊक असले, तरी तोटे उमजायचे आहेत ना\nदुसर्‍या पक्षातले गद्दार जेव्हा मतलबाने आपल्या पक्षात येतात आणि त्याला आपण मतपरिवर्तनाचे प्रमाणपत्र देतो, तेव्हा आपल्याही पक्षातले निष्ठावंत त्याच रोगाची बाधा होऊन बदलू लागतात. त्याग वगैरे उदात्त गोष्टी बाजूला पडतात आणि स्वार्थाला वैचारिक रंगभूषा चढवण्याची स्पर्धा सुरू होते. मग कोण गद्दार आणि कोण निष्ठावंत, याचाच संभ्रम होऊ लागतो. नाथाभाऊंची तीच गडबड झालेली आहे. ते सत्तेच्या इतके आहारी गेले, की त्यांना राज्यात सत्ता परिवर्तन करण्यामागचा हेतूही लक्षात राहिला नाही आणि त्यांनी सत्तेसाठी कुठलाही झेंडा खांद्यावर घेणार्‍या गणंगांची फ़ौज निवडणूकीच्या मोसमात उभारली. एक लढाई जिंकून सत्ता हाती आली. पण विचारांचे तत्वांचे युद्ध कुठल्या कुठे विस्मरणात जाऊन लुप्त झाले. या निमीत्ताने लोकशाही अमान्य असलेल्या एका ऐतिहासिक व्यक्तीचे शब्द नाथाभाऊंना मुद्दाम आठवण करून द्यावेसे वाटतात. मग त्यांना गद्दार शब्दाचा अर्थ कदाचित उलगडून बघता येईल.\n‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत, तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो. एकदा का अशा प्रकारचे लाभ मि्ळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मुळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षिस, या भावनेने कार्यकर्ते जोवर चळवळीसाठी खपतात; तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा या हेतूने प्रेरित झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मुळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ (अडॉल्फ़ हिटलर, माईन काम्फ़)\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकाश्मिर मरू देत, कराची संभाळा\nमुलायम, मायावती आणि उद्धव\nआपले मुल जगावेगळे कसे\nखोडकर मुलांचे काय करावे\nआशिष शेलार आगे बढो.....\nइमान की नियत ठिक नही\nपुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)\nकाश्मिरची समस्या की कांगावा\nखोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nझाकीर नाईक आगे बढो\nराक्षस, बाटली आणि महापालिका (उत्तरार्ध)\nराक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)\nझोपेचे सोंग सोडणार का\nचला, अण्णांनी मौन सोडले\nनवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)\nतुम इतना क्युं तिलमिला रहे हो\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-kashmir-snowfall-1170", "date_download": "2018-04-23T09:37:56Z", "digest": "sha1:FV7V3VO45NR4TMSCHLRHPZJUS3325A5B", "length": 5442, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kashmir snowfall | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाश्मिर पहुडलंय पांढ-या शुभ्र बर्फाची दुलईत\nकाश्मिर पहुडलंय पांढ-या शुभ्र बर्फाची दुलईत\nकाश्मिर पहुडलंय पांढ-या शुभ्र बर्फाची दुलईत\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nपांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. काश्मीर खोऱ्यात सध्या बर्फाचं नयनरम्य दृश्यं पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं, गाड्या या सर्वांवरच सध्या बर्फाची दुलई पसरली आहे. या बर्फवृष्टीचा पर्यटकही मनमुराद आनंद लुटतायत. काही ठिकाणी तर फूटभर बर्फ जमा झालाय. काश्मिरातील पर्वतीय भागांमध्ये आणखी बर्फवृष्टीची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.\nपांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. काश्मीर खोऱ्यात सध्या बर्फाचं नयनरम्य दृश्यं पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं, गाड्या या सर्वांवरच सध्या बर्फाची दुलई पसरली आहे. या बर्फवृष्टीचा पर्यटकही मनमुराद आनंद लुटतायत. काही ठिकाणी तर फूटभर बर्फ जमा झालाय. काश्मिरातील पर्वतीय भागांमध्ये आणखी बर्फवृष्टीची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.\nमाथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची पाठ\nमाथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची अक्षरशः पाठ फिरवलीये. माथेरान-अमन लॉज या शटल...\nमालवणच्या समुद्राच्या लाटांमध्ये लखलखाट\nमालवणमधल्या समुद्रात सध्या लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अनुभवायला मिळतेय....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/533433", "date_download": "2018-04-23T09:36:30Z", "digest": "sha1:V5UAHCGFSYNFIOEPI34VWDXX4KKBIRRX", "length": 10205, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "योजना बिघडण्याचे पाप रामराजेंचेच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » योजना बिघडण्याचे पाप रामराजेंचेच\nयोजना बिघडण्याचे पाप रामराजेंचेच\nआमदार जयकुमार गोरे यांनी डागली तोफ\nजिहे कठापूर योजना पूर्ण करणारा अशा पोकळ दर्पोक्त्या मारुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेबाबत पोकळ घोषणाचा केल्या आहेत. ही योजना बिघडण्याचे पाप रामराजेंनी केले असून जिह्यातील पाणी योजनेचे नुकसान केले आहे. त्यांना परमेश्वरही माफ करणार नाही, असा टोला लगावत, आमदार जयकुमार गोरे यांनी डॉ. दिलीपराव येळगावकर यांचाही मेंदू गळका आहे. त्यांच डोकं फिरले आहे, अशीही टप्पणी केली.\nसाताऱयात विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, जिहे- कटापूर उपसा सिंचन योजनेला 2007-08मध्ये तुटपूंजा निधी मिळाल्यामुळे या योजनेचे काम रखडले गेले. मी आमदार झालो अन माणच्या जनतेसाठी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर 2009 ते 2013 या काळात तात्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात जिहे – कटापूर या योजनेसाठी सुमारे 85 कोटी रुपये आणले. पालकमंत्री विजय शिवतारे हे आता आले. त्याच्या कार्यकाळात केवळ 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. जिहे कठापूर उपसा योजना ही मूळ 269 कोटींची होती. ती वाढवून ऑक्टोबर 2017 अखेर 393 कोटींची झाली. असे असताना अजून ती योजना पूर्ण झाली नाही. हे पालकमंत्र्यांनी झाकून ठेवले आहे. या योजनेला आघाडीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली नाही, असे ते सांगतात. परंतु पालकमंत्र्यांनी हे सांगावे की त्यांच्या कार्यकाळात दोन वर्षात एक साधा नया पैसाही आणला नाही. जे 20 कोटी आहेत ते पाठीमागेचे आहेत ते त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांना करत पालकमंत्री उद्या म्हणतील मी प्रतापगडचा जन्मदाता आहे. सिंधुदुर्ग मी बांधला, अशा शब्दात टीप्पणी केली.\nरामराजेंसह शशिकांत शिंदे, पालकमंत्र्यांवर टीका\nपुढे ते म्हणाले, स्वतःला भगीरथ म्हणवणारे व जिह्यातील पाणी योजनांचे वाटोळे करणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे हे एक्सप्रेस कॅनॉलने जिलह्याच्या वाटय़ातील पाणी बारामतीला पळवण्यात पहिला नंबर आहे. हे पाप त्यांनी केले. उगाचच पाण्याच्या प्रश्नावरुन निवडणूका लढवून जिह्यातील जनतेची दिशाभूल करु नका. जिह्यातील 7 टीएमसी पाणी बारामतीला पोहचवण्याचे काम त्यांनी केले. जिह्यातील सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर जिह्यातील पाणी दुसऱया जिह्यात पळवण्याची वेळ आली नसती, असा आरोप त्यांनी करत त्यांनी रामराजे, शशिकांत शिंदे आणि विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला.\nडॉ. येळगावकरांच्या मेंदूला लागली गळती\nजयकुमार गोरे यांनी डॉ. येळगावकर यांच्यावरही निशाणा साधला, येळगावकर यांनी जो आरोप केला आहे. मुळात माण तालुक्यातील बंधाऱयांना गळती लागण्याऐवजी डॉ. येळगावकर यांच्याच डोक्याला गळती लागली आहे. ते काहीही बरळतात, अशी टीप्पणी केली.\nट्रम्प यांचे नाव द्या\nमाणवासियांना कोणाचे नाव द्यावे याच्याशी काही देणं घेणं नाही. कोण म्हणतय बाळासाहेबांचे नाव द्या तर कोण म्हणतय लक्ष्मण इनामदार यांचे नाव द्या. उद्या जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेला पैसे दिले तर त्यांचे नाव द्या पण ही योजना पूर्ण करा, अशीही फिरकी घेतली.\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानाला कराडमध्ये चालना\nकंटेनर-कार धडकेनंतर उडाला भडका\nशहरात 32 गणेशोत्सव मंडळांनी दिला बाप्पांना निरोप\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saptaranga.blogspot.com/2008/01/bhimashankar_07.html", "date_download": "2018-04-23T09:45:34Z", "digest": "sha1:UIZ3SPBTG4N5WC3JKZLJGD4KYYOYQELJ", "length": 5680, "nlines": 75, "source_domain": "saptaranga.blogspot.com", "title": "सप्तरंग: BhimaShankar", "raw_content": "\nभीमशंकर एक गिरीदुर्ग. (३५००’)\nरायगड जिल्हात बसलेला हा दुर्ग. हिवाळ्यात व पावसाळ्यात करण्या जोगा एक सुंदर ट्रेक.\nअत्यंत सोपी अशी ही वाट आहे. कच्च्या रस्त्याची वाट असून वर जाण्यास ६ते७ तास लागतात.\nदीड तासात ३ शिड्या. पावसाळ्या जाराशी कठीण वाटणारी अशी ही वाट. पण काळजी घेतल्यास कसलाही धोका नाही.\nमाझी आवडती वाट म्हणजे शिडी घाट. भीमाशंकर ला जायच आसल्यास मी ह्याच वाटेने जाते. शेवटच्या शीडी नंतर एक Traverse वळण लागत. माला तो क्षण आजून आठवतो, अगदी काल घडल्या सारखा. शेवटची शीडी चढून मी वर गेले. Traverse पाहून जारा पोटात गोळा आला. हात पकडायला छोटीशी खाच, त्या खाचेला पकडून सावकाश पुढे जायचे. पाय ठेवायला अजून एक खाच, पण साधारण ६फुट खाली. माला हातावर लटकणच भाग होत. दोन सेकंद ब्रह्मांड आठवल. पलीकडे मंगेश उभा होताच. मंगेश अत्यंत उत्क्रुष्ट असा ट्रेकर आहे. त्याची ३वर्षाची चिमुर्डी मुलागी सुद्धा छान ट्रेकिंग कारते. मंगेशनी मला न घाबरता बिंधास्त यायला सांगीतल. मी निघाले, अर्धी वाट हातावर लटकत गेले आणि.... खाली वाकून खोल दरीत डोकावले. संपल, हात - पाय कापायलाच लागले. पहीला fall होता साधारण १५००फुट खाली. १सेकंद जाम भिती वाटली. मंगेशची ती खणखणीत हाक आजून आठवते मला. त्यानी मला बजावल होत की खाली बघायच नही. मी वाटेत थंबल्यावर त्यानी आवाज दिला, शर्वाणी Move, come on. मी जारावेळ डोळे मिटले आणि निघाले. लटकत लटकत मी पोहोचले खरी पण नंतर पलीकडे जाण्यासाठी लांब पाय टकण्याची वेळ आली. मला जेवढा लांब पाय करता आला मी केला, पण मझा पाय पुरेना. शेवटी मंगेशने एक झाडाचा आधार घेउन मला फुलासारख चक्क उचलून पलीकडे आणले. पलीकडे जाउन जेव्हा मी परत दरी बघीतली, तेव्हा जास्त भिती वाटली. पण १दा गेल्यावर भिती गेली. नंतर येणाऱ्या वर्षात मी अनेकदा भीमाशंकर केला, अणि शीडी घाटानेच केला. अप्रतीम असा अनूभव.\nमी बऱ्याच वाटेने भिमाशंकरला गेलो आहे,\nलहान पणी काढलेली काही चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1523", "date_download": "2018-04-23T09:30:57Z", "digest": "sha1:SP4RLQF6K3GYPIYQWR7ANOE5RDZL6XEK", "length": 29565, "nlines": 173, "source_domain": "www.baliraja.com", "title": " महिला उद्योजकांसाठी विविध योजना | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / महिला उद्योजकांसाठी विविध योजना\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nमहिला उद्योजकांसाठी विविध योजना\nमहिला उद्योजकांसाठी विविध योजना\nराज्याच्या आर्थिक विकासात महिला उद्योजकता महत्त्वाचा स्त्रोत मानली गेली आहे. महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत. तथापि महिलांनी परिचालीत केलेल्या उपक्रमांची संख्या ही एकूण उपक्रमांच्या प्रमाणात फारच कमी आहे. आजच्या आधुनिक गतिमान युगात शाश्वत आर्थिक व सामाजिक विकासाच्या जागतिक वाटचालीमध्ये महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. महाराष्ट्र राज्यात महिलांनी समाजामध्ये जरी मोलाची भूमिका निभावली असली तरीही अनेक कारणांमुळे त्यांच्यावरील उद्योजकीय कार्यक्षमतेला पुरेसा वाव मिळालेला नाही.\nसद्यस्थितीत महिला उद्योजकांपुढे लिंगभेद व समाजातील स्थान, व्यवसाय सुरु करण्यासाठी अपुरे स्त्रोत, तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञानाचा अभाव, मर्यादित आर्थिक स्त्रोत व गुंतवणूक सहाय्य, परवडण्याजोग्या व सुरक्षित व्यावसायिक जागांचा अभाव इत्यादी अनेक आव्हाने आहेत. राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी महिलाचलित उपक्रमांच्याद्वारे आर्थिक व सामाजिक बदल घडवण्यास प्रोत्साहन देणारे जागतिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय केंद्र बनविणे व महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, या दृष्टीकोनातून महिला उद्योजकांसाठी सक्षम धोरण राबविण्यात येणार आहे.\nशासनाने यापूर्वी विविध नाविण्यपूर्ण पुढाकार घेऊन राज्यातील औद्योगिक वातावरण अधिक सुधारण्यासाठी व उद्योजकांच्या विकासासाठी ते अधिक अनुकूल बनविण्याकरीता व समावेशकता कायम ठेवत उद्योगांना जागतिक स्पर्धेची किनार देण्यासाठी औद्योगिक धोरण-2013 घोषित केले आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक वाढीच्या मुख्य प्रवाहात महिला उद्योजकांच्या सक्रीय सहभागाने सर्वसमावेशक आर्थिक विकास होण्यासाठी महिला उद्योजकांकरीता विशेष योजना प्रस्तावित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महिला उद्योजकांसाठी विशेष धोरणाचे उद्दिष्ट महिला परिचालित उद्योगांचे प्रमाण 9 टक्क्यावरून 20 टक्क्यांपर्यत सुधारण्याचे आहे. महिला उद्योजकांच्या वाढीसाठी राज्यात आश्वासक व्यावसायिक वातावरण निर्माण करणे व तांत्रिक, परिचालनात्मक तसेच आर्थिक सहाय्य पुरवून राज्यातील महिलांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण-2017 ला शासनाने मान्यता दिली आहे.\nमहिला उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष धोरणाची व विशेष प्रोत्साहन योजनेचा लाभ एकल मालकी, भागीदारी घटक, सहकारी क्षेत्र, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक, स्वयं सहाय्यता बचत गटांना मिळणार आहे. विशेष प्रोत्साहन योजनेची व्याप्ती- सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम विकास (MSMED) अधिनियम 2006 अंतर्गत उत्पादनासाठी उद्योग आधार धारण करणारे व सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 तील पात्र उपक्रम प्रस्तुत विशेष प्रोत्साहन योजनेसाठी पात्र असतील.\nविशेष प्रोत्साहन योजनेमध्ये विशेष प्रोत्साहन योजना, सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत अतिरिक्त सवलती, भांडवली अनुदान, वीजदर अनुदान, व्याजदर अनुदान यांचा समावेश आहे. कामगार कल्याण सहाय्य-नवीन व विस्तारीत पात्र उद्योगातील महिला कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी/राज्य कामगार कल्याण योजनेतील कंपनीच्या योगदानाच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम 5 वर्षाच्या कालावधीसाठी अनुदानास पात्र असेल. हे अनुदान सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत उद्योग विभागाच्या अर्थसंकल्पातून देण्यात येईल.\nबाजारपेठ विकास व विपणन साहाय्य- अ) मुद्रा विकसन- नवीन व विस्तारीत पात्र उपक्रमांनी त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे मुद्राचिन्ह तयार केल्यास अशा उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ खुली होऊ शकेल. यास्तव राज्य शासन महिला उत्पादनांसाठी मुद्राचिन्ह विकसित करण्याच्या एका उपक्रमासाठी सहाय्य करेल. सूक्ष्म व लघु उद्योगातील महिला उद्योजकांनी आपल्या उत्पादनांचे विपणन होण्यासाठी मुद्राचिन्ह विकसित करण्यासाठी केलेल्या खर्चाच्या रकमेच्या 50 टक्के व कमाल रुपये 1 कोटी पर्यंत शासन सहाय्य देईल. ब) प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जिथे इतर कुठलेही संघटनात्मक पाठबळ देण्यात येत नाही, अशा देशांतर्गत राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी रुपये 50 हजार किंवा प्रदर्शनातील गाळ्याच्या भाड्याच्या 75 टक्के रक्कम व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी रुपये 3 लाख एवढी मर्यादेत सवलत देण्यात येईल. महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या विभागीय/राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी केलेल्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम कमाल रुपये 10 लाख मर्यादेपर्यंत सहाय्य देण्यात येईल. प्रस्तुत विषयी प्रदर्शनांबाबत अनुदानासंदर्भात पात्रता निकष व वाटपाची कार्यपध्दती अपर मुख्य सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीमार्फत विहीत करण्यात येईल.\nसमर्पित जागा निर्माण करणे यामध्ये अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भूखंडांचे आरक्षण, जागा राखून ठेवणे, उबवन केंद्र यांचा समावेश आहे. स्पर्धात्मकता वाढविणे- अ) समूह विकास केंद्र- महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमाच्या (MSI-CDP) अंतर्गत महिला उद्योजकांच्या पात्र उद्योगांची किमान 10 समूह विकास केंद्रे स्थापन करण्यास राज्य शासन प्रोत्साहन देईल. प्रकल्प खर्चाच्या 90 टक्के रक्कम अनुदान रुपाने सहाय्य म्हणून देण्यात येईल. दरवर्षी किमान दोन समूह विकास केंद्रे विकसित करण्यात येतील. जेणेकरून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 10 समूह विकास केंद्रे विकसित होतील. ही रक्कम सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत उद्योग विभागाच्या अर्थसंकल्पातून दिली जाईल. महाराष्ट्र सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम व महिला विकसन संस्था- सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी एक समर्पित संस्था स्थापन करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. समूहांसाठी पायाभूत सुविधा विकसन योजना- केंद्र व राज्य शासनाच्या समूह विकास योजनेंतर्गत मंजूरी मिळालेल्या समूहांमध्ये जिथे किमान 50 टक्के महिला सभासद असतील, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 टक्के अनुदान देऊन औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन समूह विकसनाचा मार्ग अनुसरेल. पुरस्कार व कौतुक उद्योग दिवस- माहिती तंत्रज्ञान पुरस्कारांच्या धर्तीवर व्यवसायातील सर्वोत्तमतेसाठी महिला उद्योजकांना वेगळया संवर्गामध्ये पुरस्कार देण्यात येतील. उद्योगांना व विशेषत सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमाना त्यांची उत्पादने व क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वार्षिक उद्योग दिन साजरा करण्याचे औद्योगिक धोरण 2013 मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे.\nउद्योग दिनी विविध प्रदर्शने, कार्यशाळा, परिसंवाद व सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमासाठी विविध सादरीकरणे आयोजित करण्यात येतील व महिलांनी चालविलेलया व त्यांची मालकी असलेल्या सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमावर विशेष भर असेल. महिला उद्योजकांनी केलेल्या प्रशंसनीय कामासाठी व सुप्त महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना विशेष पुरस्कार देणे हा याचाच भाग असेल. मैत्रीमध्ये विशेष महिला कक्ष- महिला उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मदत करून संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेमध्ये राज्य शासन महिला कक्ष स्थापन करेल.\nसाहस भांडवल निधी- महिला व बाल कल्याण विभाग महिला उद्योजकांसाठी रुपये 50 कोटीचा विशेष साहस निधी तयार करेल. या निधीतून व्यवहार्यता तफावत निधीसाठी साहाय्य करण्यात येईल. उद्योजकता व कौशल्य विकास- राज्य शासनातर्फे कौशल्य विकास योजना राबविण्यात येईल जेणेकरून महिला लाभार्थ्यांना त्यांचे ज्ञान अद्ययावत करून घेता येईल. महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था आवश्यकतेनुसार Entrepreneurship Development Institute (EDI) अहमदाबाद व एनएसडीसी यांच्याशी सल्लामसलत करून उद्योजकता विकास कार्यक्रम विकसित करतील. सदर प्रशिक्षणाकरिता दरवर्षी कमीतकमी रुपये 3 कोटी इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महिला कर्मचा-यांना उत्पादन सुरु झाल्यानंतर सुरवातीची तीन वर्षे दर वर्षी रुपये 3 हजार प्रशिक्षणाची मदत करण्यात येईल. हे सहाय्य कै.प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेशी जोडण्यात येईल. पात्र घटकास संबंधित कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्याबाबतच्या माहितीच्या आधारे अनुदान मंजूर करण्यात येईल.\nऔद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याने लागू केलेल्या अशा प्रकारच्या धोरणाची देशात प्रथमच अंमलबजावणी होत असून या माध्यमातून राज्याने महिलांना नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.\nविभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/03/05/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2018-04-23T09:10:54Z", "digest": "sha1:FHICCZTLY5NMN36O4G67KL4WVUIGJUXI", "length": 31941, "nlines": 217, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "दारू – म्हणजे काय रे भाऊ ? | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nदारू – म्हणजे काय रे भाऊ \nदारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय चला तर आज तेच बघूयात…\nकोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल 🙂 )\nदारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून.\nव्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते.\nलिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात.\nभारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते.\nह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे.\nह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.\nआता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते.\nही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते.\nतर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो.\nत्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ\nThis entry was posted in इकडचे तिकडचे, कॉकटेल लाउंज, ललित, स्वैर लेखन and tagged उलटी, जीन, दारू, देशी दारू. सरकारमान्य दारू, रम. वोडका, व्हिस्की, व्होडका, समाजविघातक दारू, हातभट्टी. Bookmark the permalink.\n← 3D प्रिंटींग – म्हणजे काय रे भाऊ\nव्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे →\n9 thoughts on “दारू – म्हणजे काय रे भाऊ \nमार्च 6, 2013 येथे 9:42 सकाळी\nव्वा काय आभ्यासु विवेचन केलेत. अजुन एका गोष्टीबद्दल कुतूहल आहे. दारुमुक्ति साठी वापरात असणारी ओषधे नक्की काय करतात जेणे करून दारु प्यायची इच्छा मरुन जाते\nसोशल ड्रिंकर्स संथपणे तिचा स्वाद तोंडात घोळवत दारू पीत असल्याने त्यांचा उत्कर्षबिंदू थोड्या दारूमुळे गाठला जातो. कारण तेव्हा अल्कोहोल घशातून हळूहळू रक्तात शोषले जाते. पण हा उत्कर्षबिंदू गाठण्याच्या प्रयत्नात दारू थेट पोटात ढकलली जात असल्याने वकार युनुस होतो.\nनीट समजले नाही, थोडे अधिक विस्तारून सांगाल का\nउत्कर्षबिंदू म्हणे …. त्यांना kick म्हणायचे असेल … ( sounds like an orgasm 😛 )\nआणि ” वकार युनुस ” म्हणजे उलट्या होतात …\nमेलो ना हसून हसून 😀 😀 😀\nलेख झकास आहे … \nपूर्ण लेख न वाचताच comment post केली होती वरची… नाही तर ” वकार युनुस ” चे explanation देण्याची गरज नव्हती…\nज्या वेळी नवीन होतो त्या वेळी एकदा धाडस करून २-३ घोट देशी घेतली होती… नंतर परत नाही.\nआणि त्या नंतर हातभट्टी सुद्धा try करायची इच्छा होत होती, पण आता हा लेख वाचून तो विचार cancel करायचा विचार करतोय …. 😀\nसंथपणे दारू पिताना ती घशातील आवरणातून मंदपणे थेट रक्तात शोषली जाते तेव्हा स्वस्थतेच्या अनुभवाचा उत्कर्षबिंदू गाठला जातो. दारू घटाघटा पिण्याने हा उत्कर्षबिंदू गाठला न जाता फक्त जठर दारूने भरत जाते.\nअनिकेत वैद्य म्हणतो आहे:\nएप्रिल 5, 2013 येथे 10:40 सकाळी\nदारूबद्दल माहिती कळली आता जरा चाखण्याबद्दल पण लिहा ना. काय खावे, खाऊ नये.\nकश्यासोबत काय खाल्याने चव वाढते अथवा सगळा मूड खराब होतो.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2015/02/blog-post_11.html", "date_download": "2018-04-23T09:27:06Z", "digest": "sha1:IXTCMVLTKX4YLKE75V4JYRXQIHT3EIJO", "length": 13682, "nlines": 110, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: जलयुक्त शिवार अभियानाचा सारा निधी शेतकऱ्यांना द्या : विदर्भ जनांदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे", "raw_content": "\nजलयुक्त शिवार अभियानाचा सारा निधी शेतकऱ्यांना द्या : विदर्भ जनांदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nजलयुक्त शिवार अभियानाचा सारा निधी शेतकऱ्यांना द्या : विदर्भ जनांदोलन समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nदिनांक -१२ फेबुवारी २०१५\nजेव्हां पासून 'पाणी अडवा -पाणी जिरवा ' हि पाणलोट विकासाची कामे १९९५ पासुन सुरु झाली आहेत त्यातील ७० टक्के पैसा राजकारणी नेते -अधिकारी-कंत्राटदारांनी खाला असून ही सर्व मंडळी शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात गब्बर झाली असुन भाजप 'मिस्टर क्लीन ' असलेले मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या सर्व कृषी , वन ,सिंचन विभागाच्या मागील १५ वर्षाच्या झालेल्या लुटीची एस आय टी मार्फत चौकशी करावी व जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी ६00 कोटींच्या निधींची घोषणा करताच हेच पोटभरू नेते , अधिकारी आणि कंत्राटदार खळबळून जागे झाले. निधीयेण्यापुर्वीच .अधिकारी-कंत्राटदारांत 'फिप्टी-फिप्टी'ची मांडवली झाली असुन भाजप व मित्र पक्षाचा कोटा निश्चित करण्यात येत असुन तर अधिकारी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना खिरापत वाटण्यासाठी मार्चेबाधणी सुरु झाली असुन सध्या निधीचा पत्ता नसताना कोट्यवधींचे प्रस्ताव एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले असून त्यातच अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगणमत करून वाटाही ठरवून घेतला असल्याच्या बातम्या समोर आल्यावर हा सारा प्रकार विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कानावर काटला असुन शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या योजना आहेत तो सारा निधी सरळ शेतकऱ्यांना द्या व योग्य उपयोग करण्यासाठी अधिकारी सर्व मदत करतील मात्र अधिकारी पैसा खाणार नाहीत असा निर्णय घ्या अशी मागणी केली आहे ,राज्यात जर सरळ शेतीच्या व पाणलोटाची सारी कामे शेतकरीच करतील व पोटभरू नेते अधिकारी आणि कंत्राटदार काळी यादीच तयार करण्याची मागणी विदर्भ जनांदोलन समिती करणार असून कृषी व वन आणी सिंचन विभागामध्ये पैकेज व रोजगार हमीच्या कामामध्ये मातीनाला बांध ,धाडीचे बांध , पाणलोटच्या नावावर संस्था काढून गब्बर झालेल्या सर्व पोटभरू नेत्याची व अधिकाऱ्याची यादी तयार करून आयकर विभागामार्फत चोकशीसाठी आपण मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना आग्रह धरला असून त्यांनी ढोस पुरावे देण्यास सांगितल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे .\nयवतमाळ जिल्यात मागील १० वर्षात सुमारे ८०० कोटीची लुट सिंचन ,पाणलोट ,नरेगाच्या कामात झाली आहे व हे काम बोगस काम करणारे माफिया तयार झाला असुन आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्वी कृषी विभाग जल व मृदा संधारणाची कामे पाणलोटच्या नावाखाली करीत होते. आता हिच कामे जलयुक्त शिवार अभियानात रूपांतरित करण्यात आल्यावर व त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याला ६00 कोटी रूपयांच्या निधीची घोषणेनंतर अधिकारी आणि मर्जीतील कंत्राटदार खळबडून जागे झाले असुन कोणी किती पैसे लुटावे यासाठी संघर्ष करीत असल्याच्या बातम्या समोर आल्याने विदर्भ जनांदोलन समितीने ही रीतसर तक्रार दाखल केली असून सर्व खाऊअधिकाऱ्यांना तात्काळ जील्याबाहेर हकालपट्टीची मागणी तिवारी यांनी केली आहे .\nआपल्या निवेदनात तिवारी यांनी सरकारला जलयुक्त शिवार अभियानासाठी अद्याप निधीच आला नसताना राजकारणी नेते -अधिकारी-कंत्राटदारांनी एकट्या यवतमाळात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालया अंतर्गत सुमारे ७0 ते ८0 कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये मातीनाला बांध, बांध बंदीस्ती, सिमेंट बंधारे, गाळ काढण्याची कामे आदींचा समावेश आहे. निधी प्राप्त होताच मंजुरात देण्याची औपचारीकता तेवढी बाकी आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या नियंत्रणात ही कामे तालुका कृषी अधिकार्‍यांना मंडळ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या मदतीने करावयाची आहे. त्यामध्ये रोजगार हमी योजनेतील मजुरांची अट नाही. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी ३७३ गावांची निवड करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर राजकीय दबाव येवून आपला वाटा कमी होवू नये, याची खबरदारी घेत कामाचे प्रस्ताव तयार केले आहे. त्यामध्ये मर्जीतील कंत्राटदारांशी मांडवली करण्यात आली आहे. जेवढी कामे मिळतील त्याच्या एकूण रकमेत अधिकार्‍यांचा आणि कंत्राटदारांचा ५0 टक्के वाटा ठरला आहे. कंत्राटदाराला मिळणार्‍या ५0 टक्के वाट्यात कामे पूर्ण करायची आहे. त्यातूनच मजुरी आणि नफा काढायचा आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील ३७३ गावांची निवड करण्यात आली. ही कामे करण्यासाठी २५0 मशीन धारकांची नोंदणी झाली आहे. निधी प्राप्त होताच या कामांना सुरूवात केली जाईल,अशा धक्कादायक वृत्त प्रकाशीत झाल्याने जिल्यातील सर्व खाबू अधिकारी हाकला यासाठी आपण आंदोलन सुरु करणार अशी घोषणाही तिवारी यांनी केली आहे .\nअर्थसंकल्प २०१५- कापसाची हमीभाव वाढ व पिक कर्जमाफी...\nभाजपाचा पीक कर्जमाफी व हमीभाव वाढिला अर्थसंकल्पा...\nविदर्भात २४ तासात आणखी ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -...\nजलयुक्त शिवार अभियानाचा सारा निधी शेतकऱ्यांना द्य...\nसक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी सापडला संकटात-संपूर...\nभारताच्या अर्थसंकल्प २०१५ मध्ये विदर्भातील शेतकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1525", "date_download": "2018-04-23T09:13:08Z", "digest": "sha1:TMQDKZKVW5CV6U25X7YCMD5JESXUXWNB", "length": 17347, "nlines": 178, "source_domain": "www.baliraja.com", "title": " परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपरंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना\nपरंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना\nसध्याचा ग्राहक हा जागरुक आहे. ग्राहक उत्पादनाच्या दर्जाबाबत तडजोड करत नाही. अन्नधान्य व फळांबाबत तर ग्राहक जास्त गंभीर असतो. प्रत्येक बाबी तपासून उत्पादनाची निवड करतो. गेल्या काही काळात अन्नधान्य व फळांवर खते व रसायनांचा अतिरिक्त वापर करण्यात येत होता. त्याचे दुष्परिणाम शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने या गोष्टींचा अभ्यास केला. शासनाने ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषि विकास सेंद्रीय शेती (पीकेव्हीवाय) योजना आणली आहे.\nपर्यावरणपूरक उत्पादने सध्या काळाची गरज बनली आहेत. ग्राहक सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत मालाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेती करून शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. सेंद्रीय उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत तसेच देशात इतरत्र चांगली मागणी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना उपयोगी ठरू शकते.\nपरंपरागत कृषि विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठाना प्रोत्साहन, प्रमाणीकरण, सेंद्रीय शेती ग्राम विकसित करणे, सेंद्रीय शेतीवर आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेणे, शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रीय शेती निविष्ठा तयार करणे व पुरवठा करणे, शेतीमालाचे प्रमाणीकरण करून विक्री व व्यवस्थापन करणे योजनेचा प्रमुख उद्देश आहे.\nयोजनेअंतंर्गत 50 एकर क्षेत्राचा 50 शेतकऱ्यांचा समूह (क्लस्टर) तयार करून 50 शेतकऱ्यांच्या गटातून एकाची गटनेता म्हणून निवड करण्यात येईल. निवडलेला शेतकरी हा गटातील व इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती देऊ शकेल. शेतकऱ्याच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती सर्वसाधारण शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते व ग्राहकांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते. राज्यातील सेंद्रीय उत्पादनांचे प्रमाणीकरण करून ग्राहकामध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी, या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे.\nसेंद्रीय गट संकल्पनेत एक गटातील एकाच गावातून 50 शेतकऱ्यांचा समावेश झाल्यास योजना राबविणे सुलभ होईल. सेंद्रीय पद्धतीने उत्पादन, प्रमाणीकरण, व्यवस्थापन आणि विक्री या टप्प्यांचे नियोजन योग्य प्रमाणात करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा गावातच उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय शेतीमध्ये एकात्मिक सेंद्रीय व्यवस्थापनाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.\nरायझोबीयम, पी.एस.बी., जैविक खते, स्फुरदयुक्त सेंद्रीय खताचा वापर, जिप्सचा वापर, गांडूळ खत, उत्पादन युनिट या बाबींचा एकत्रित वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी लागणारी अवजारे विकत घेणे शक्य होत नाही. योजनेतील प्रस्तावित अनुदानातून गटपातळीवर किंवा गाव पातळीवर अवजारे भाड्याने घेण्याची तरतूद केली आहे.\nसोलापूर जिल्ह्यात एका गटामध्ये 50 शेतकरी याप्रमाणे 28 गटामध्ये एकूण लाभार्थी संख्या 1400 इतकी होणार आहे. यानुसार 1400 एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीत समाविष्ट होईल. योजनेचा कालावधी 3 वर्षे आहे. सहभागी होण्यासाठी तालुका कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्याकडे संपर्क साधू शकता. सेंद्रीय शेती योजनेमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाईल.\nजिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.evivek.com/vishesh", "date_download": "2018-04-23T09:13:58Z", "digest": "sha1:DZUHQ4XZ3Z52E5KXQNRLW3CDWJGW2IAJ", "length": 76151, "nlines": 213, "source_domain": "www.evivek.com", "title": "विशेष लेख", "raw_content": "\n**आनंद मोरे*** समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो, तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य-अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बि..\n*** जयंत कुलकर्णी*** समाजात वाढत चाललेल्या असंतुलित वातावरणाची कारणे मानसिकतेशी आणि कायद्याच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीशी निगडित आहेत. माध्यमांच्या प्रभावामुळे वाढलेली जागरूकता, आमचे काही चुकते आहे ही भावना यांचा अटळ असा परिणाम स..\nकेशवानंद भारती खटला (भाग 2)रमेश पतंगे\nप्रजासत्ताकात जनता सार्वभौम असते. लोकप्रतिनिधी सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून ते सार्वभौम असतात. न्यायपालिकेतील न्यायमूर्ती नियुक्त केले जातात. लोकांनी ते निवडलेले नसतात. त्यामुळे सार्वभौमत्वाचा अधिकार त्यांना कसा काय मिळतो\nनवी पेशवाई भारतीय गृहयुध्दाची नांदी (भाग पहिला)\n**तुषार दामगुडे*** नक्षली कारवायांची आणि त्यामागील षड्यंत्राची पोलखोल करणारी तुषार दामगुडे यांची लेखमाला. वाचा. विचार करा. कोणते अराजक देशाच्या उंबरठयावर उभे आहे याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाणीवजागृती करणे हे या लेखमालेचे उद्दिष्ट. जब जुल्म हो तब..\nसदाशिवाच्या शूलापरि तो... विनीता शैलेंद्र तेलंग\nजगणं फार महाग झालंय, आखीव, रेखीव, बेतीव झालंय. चक्र थांबता थांबत नाही. थांबणाऱ्याला क्षमा नाही. शरीर नुसतं धावत सुटतं, मन हाका मारत सुटतं. मोह काही सुटत नाही अन देव काही भेटत नाही. रूक्ष कोरडे व्यवहार सारे, कोवळं काही दिसत नाही. काहीतरी निसटतंय अ..\nभय इथले संपत नाही...\n***ऍड. प्रतीक राजूरकर*** गेली अनेक दशके भारतीय म्हणून आपले अस्तित्व असूनही समाज म्हणून आपण जाती-पातीच्या राजकारणात अडकून आहोत, हे संविधानाला अभिप्रेत नसलेले वास्तव कटू असले तरी सत्य आहे आणि संविधान मानणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे शल्य आहे, कारण स्वातंत्र..\nएक अविस्मरणीय अभिवादन मृदुला राजवाडे\n30 व 31 मार्च रोजी रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. ज्याची महती ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो, समाजाच्या सर्व स्तरांतील लोक ज्या व्यक्तीचे पुण्यस्मरण करण्यासाठी रायगडावर एकत्र येतात, अशी ही छत्रपती शिवाजी महाराज नावा..\nकचरा समस्या वैश्विक, उपाय स्थानिक\n***संजय कांबळे*** प्रत्येक समस्येला उत्तर असतेच आणि या विज्ञानयुगात तर अशक्य असे काहीच नाही. गरज आहे ती इच्छाशक्तीची, ठोस धोरणांची व जुने सोडून नवे शिकण्याची. लातूर शहरातील जन-आधार संस्था सन 2002पासून या विषयात कार्यरत आहे. कचऱ्यात अन्न शोधणाऱ्या माणसा..\nभाषा संरक्षण राष्ट्रउभारणीतील महत्त्वाचे पाऊलमृदुला राजवाडे\n**मृदुला राजवाडे** राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. 9 ते 11 मार्चदरम्यान नागपुरात झाली. वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडींसह अनेक प्रश्नांचा या सभेत ऊहापोह करण्यात आला. भारतीय भाषांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या संवर्धनाची आव..\nव्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला\n*** ऍड. रोहित सर्वज्ञ*** पक्ष चांगला असेल आणि एखादा वाईट माणूस त्या राजकीय पक्षामध्ये गेला, तर तो त्याच्या वाईटाचा प्रभाव पक्षावर टाकू शकत नाही. या उलट एखादी व्यक्ती कितीही चांगली असेल आणि त्याने वाईट पक्षात प्रवेश केला, तर तो वाईट पक्षावर त..\nवर्णद्वेषातून झिम्बाब्वे क्रिकेटचे धिंडवडे\n***अभिजीत पानसे*** रॉबर्ट मुगाबे या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षाने झिम्बाब्वेमध्ये गोऱ्या झिम्बाब्वे लोकांचं अनेक प्रकारे शोषण करणं सुरू केलं होतं. द्वेषाने भरलेला एक लहरी सत्ताधीश अशीच त्याची ख्याती होती. गोऱ्या लोकांच्या द्वेषापायी त्याने संपूर्..\nसंघ, राज्यघटना आणि राज्यघटनेतील बदलरमेश पतंगे\nसंघाला सत्तेचे राजकारण करायचे नसल्यामुळे, सत्ता कशी राबवावी, हे सांगणाऱ्या अभ्यासाचा ओघानेच प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे ज्या मंडळींना राज्यघटनेच्या मूलभूत विषयाची माहिती नाही, ती मंडळी घटनाबदल करायला निघाली आहेत हे संघअज्ञानी लोकांनी समजून घ्यायल..\nसमर्थांच्या ‘मनाच्या श्लोकातील’ रामविद्याधर मा. ताठे\nकालच दि. २५ मार्च रोजी, चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच रामनवमी सर्वत्र साजरी झालेली आहे. त्यानिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील रामदर्शन. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे इष्टदैवत होते, त्याचप्रमाणे ते समर्थांचे गुरूसुद्धा होते. समर्थांचे अवघे ज..\nआर्थिक नियोजन काटेकोरपणे कराधनंजय दातार\n***धनंजय दातार**** जीवनात सुस्थितीत राहायचे असेल, तर पैशाचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतेकांची नेहमीची तक्रार असते, ती म्हणजे पैसा पुरत नाही आणि हाती उरत नाही. पण ही सबब व्यायामाला वेळ मिळत नाही, असे सांगण्यासारखीच आहे. निश्चयपूर्वक बचत..\nभेदाभेद भ्रम अमंगळनीलिमा देशपांडे\nएकदा आपल्याला जीव आणि शिव यांच्यातला बंध लक्षात आला की आपोआप आपले विचार नश्वर सुखाच्या मागे धावणं बंद करतात. यासाठी आवश्यकता आहे ती निर्मळ मनाची. चांगल्या विचारांची. हे चांगले विचार येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी - अर्थात फळ चांगलं हवं असेल, तर त्याचं म..\nलोनाड - जातकाचे लेणे..\nमुंबईच्या सीमेवर असलेलं, ठाण्याच्या सोबतीने नांदत असलेलं कल्याण शहर. प्राचीन वाङ्मयात ‘कलियान’ असा याचा उल्लेख आलेला आढळतो. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात हे शहर विख्यात बंदर म्हणून नावाजलेलं होतं. परदेशातून आलेली, मालाने शिग..\nसकारात्मक मानसिक आरोग्य - तरुणाईची गरज\n***डॉ. शुभांगी पारकर*** बालपण आयुष्यातील आनंदाचा काळ आहे, कारण त्यात नैसर्गिक आनंद घेता येतो. आयुष्यातील वास्तवाचा दबाव बालकावर नसतो. पण तारुण्य हे पुढच्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. भविष्य खऱ्या अर्थाने घडते ते तारुण्याच्या अनुभवावर. हे अनुभव जितके स..\n'लाँग' मार्च, 'शॉर्ट' आकलन'श्रीकांत उमरीकर\nलालबहादुर शास्त्रींच्या काळातील काही धोरणे, नरसिंह रावांच्या काळातील खुल्या व्यवस्थेला पोषक निर्णय, अटलबिहारींच्या काळातील काही निर्गुंतवणुकीचे निर्णय सोडले, तर सतत हीच भीकमागी आंदोलने डावी मंडळी करत होती. नुकत्याच 'यशस्वी' करण्यात आलेल्या किसान लाँग मा..\n''भूतकाळात रमायचे नाही. वर्तमानकाळात कष्ट करायचे, परंतु वर्तमानात अडकायचे नाही. भविष्याची स्वप्ने बघायची, पण स्वप्नरंजन करत बसायचे नाही.'' हा डॉक्टरांचा विचार स्वयंसेवक करताना दिसतात. म्हणूनच स्वप्न साकार करणारे कर्मयोगी संघात पाहायला मिळतात. डॉक्..\nकार्ती चिदंबरम प्रकरण भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\n***ॐकार दाभाडकर*** अखेर, सीबीआयने FIR फाइल केल्याच्या तब्ब्ल 9 महिन्यानंतर पी. चिदंबरम ह्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम ह्याला अटक झाली आणि ह्या वेळी कार्तीचे ग्रह इतके फिरलेत की केवळ FIRवर भागलं नाही. नाहीतर आपल्याकडे FIR दाखल होऊन काही मिनिटांत जाम..\nपूर्वांचलातील संघ सेवा कार्ये - विजयाची पार्श्वभूमी\n***पराग जुवेकर*** संघकार्य करताना अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, कार्यकर्त्यांना धमकाविण्यात आले, गावबंदी करण्यात आली. पण तरीही कशालाही न जुमानता राष्ट्राच्या सेवेसाठी कार्यकर्ते आपले कार्य अविरतपणे करीत राहिले. संघाने 50 वर्षांत नि:स्वार्थी प्रेमाच्..\n***सी.ए. आनंद देवधर*** भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट होती. त्रिपुरामध्ये नावालाही संघटन नव्हते. अशा स्थितीत सुनील देवधर यांना तेथे प्रभारी म्हणून नेमण्याचा निर्णय झाला. बरोबर नेहमीच्या टीममधील चार-पाच लोक होते. परंतु सगळया राज्यात संघटना उभाराय..\nकर्मतपस्विनी डॉ. अमितारुपाली पारखे देशिंगकर\nज्या समाजाकडून चांगल्याची अपेक्षा करतो, त्या समाजाला आपणही चांगलं देणं गरजेचं असतं असे गर्भसंस्कार वारसा हक्काने मिळालेल्या डॉ. अमिता कुलकर्णी. त्यांनी डॉक्टर म्हणून मनाशी बांधलेली खूणगाठ म्हणजे 'आपल्याला पुढे जाऊन वंचित मुलं व आणि शोषित स्त्रिया यांच्य..\n॥कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम॥नीलिमा देशपांडे\n‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्यथा अपेक्षाभंग ठरलेला आहे. जो आनंद मिळतो आहे, त्याचं मूळ शोधण्याच्या नादात तुम्ही आनंद आणि त्या आनंदाचं कारण दोन्ही हातचं घालवून बसता. फुलाचा गंध मनाला मोहवून टाकतो म्हणून फूल चुरगळून त्यात गंध शोधणं हा वेडेप..\nव्यावसायिकासाठी ग्राहक हा देवासमान\nव्यवसाय करताना त्यात स्वत:च्या आवडीनिवडी न आणता ग्राहकांच्या गरजांना आणि पसंतीला महत्त्व द्यावे, हा मोलाचा धडा मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच शिकलो. अनेक व्यावसायिक दुकानात 'ग्राहक हाच देव' अशी पाटी मोठया कौतुकाने लावतात, पण प्रत्यक्षात मात्र ग्राह..\nश्रेष्ठ 'राष्ट्रोदया'साठी संघात चला...हर्षल कंसारा\nआपल्या सर्वांची संस्कृती आणि पूर्वज एक आहे. त्या संस्कृतीचे नाव हिंदू संस्कृती असे आहे आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजाने देशाच्या उत्थानासाठी एकत्रित येण्याचे आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मेरठ येते 25 फेब्रुवारी रोजी झ..\nसनातन धर्माला कर्मठतेच्या विळख्यातून बाहेर काढणारे - शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती\n***जयश्री देसाई*** कांची कामकोटी पीठाचे 69वे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांची एक अत्यंत प्रेरक आठवण सांगणारा व त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणारा हा लेख... एखादा दिवस आम्हा पत्रकारांच्या..\nभारत - चीन संबंधांची संस्थात्मक वीण\n***रवींद्र माधव साठे**** हैनान इन्स्टिटयूट फॉर वर्ल्डवॉच या संस्थेमार्फत दक्षिण आशियामधील व भारतातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा अभ्यास करून चीन सरकारास काही धोरणात्मक विषयांत सल्ला देण्यात येत असतो. या संस्थेतफर्े रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनील..\nसमर्थांची भक्ती व शक्ती उपासनाविद्याधर मा. ताठे\nसमर्थ रामदास स्वामींनी समाजाला भक्तीबरोबरच शक्ती उपासना, बलोपासना (मारुती मंदिरे स्थापून) शिकवली. समर्थस्थापित ११ मारुती आजही प्रसिद्ध आहेत. तसेच संत तुकारामांनीही महाबली हनुमंताच्या भक्तीचा महिमा गाऊन बलदेवतेचे, शक्ती उपासनेचे प्रतिपादन केलेले आह..\nबुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा झटू नको\n***धनंजय दातार**** बँकांकडून घेतलेले कर्ज बुडवण्याच्या गैरव्यवहाराच्या नव्या घटना उजेडात आल्याने देशातील आर्थिक विश्व सध्या ढवळून निघाले आहे. स्वत:ला अब्जाधीश म्हणवणारे बँकांकडून प्रचंड रकमेचे कर्ज घेतात आणि ते न फेडता चक्क परदेशांत पळून जातात, या संगन..\nबँकिंगमधील त्रुटींचा शोध घेण्याची गरजसपना कदम\n***दीपक शेणॉय*** बँकांमध्ये कोटयवधींचा घोटाळा झाल्याच्या बातम्या जेव्हा जेव्हा उघडकीस येतात, तेव्हा संपूर्ण देशाला हादरा बसतो. कारण बँकिंग ही व्यवस्था सर्वसामान्य व्यक्ती असो की मोठा उद्योजक, प्रत्येकाच्या दैनंदिन अर्थव्यवहाराशी निगडित असते. इतक्या व्य..\nव्याघ्र पर्यटन एकामेकां साहाय्य करू ...\n***ऍड. प्रतीक राजूरकर**** वन्यजीव पर्यटनात आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक असलेला वाघ, जो वन्यजीव पर्यटनातसुध्दा सर्वात महत्त्वाचा आणि वलयांकित प्राणी आहे. त्याचे वन्यजीवांतील स्थान जसे अव्वल आहे, तसेच पर्यटनातही ते..\nसंघ आणि छ. शिवाजी महाराज रमेश पतंगे\nसंघाचे काम देशव्यापी आहे आणि आता ते विश्वव्यापी आहे. सगळया भारतात शिवराज्याभिषेक दिन उत्सव म्हणून गेली नव्वद वर्षे संघस्वयंसेवक साजरा करीत आहेत. शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नाहीत, कुठल्या एका जातीचे नाहीत, ते साऱ्या राष्ट्राचे आहेत, साऱ्या समाज..\nअवकाळी 'गारपिटी'च्या मरणकळाविकास पांढरे\nबोंडअळीच्या प्रकोपातून विदर्भातला शेतकरी सावरत होता, दुष्काळाच्या झळांतून मराठवाडयातला शेतकरी रब्बीतून आधार शोधत होता. वर्षा ऋतूचे दिवस नसतानाही या दोन्ही भागांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्यात आभाळातून गारपिटीचा मारा झाला अन् शेती क्षेत्राचे होत्याच नव्हत..\n''नाही रे' वर्गासाठी लिखाण करणं ही माझी स्वाभाविक प्रेरणा'' - लक्ष्मीकांत देशमुख\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यांचे अध्यक्ष हे नेहमीच खूप औत्सुक्याचे विषय असतात. दर वर्षी वेगवेगळया कारणांनी गाजणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे 91वे वर्ष. या संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे, लक्ष्मीकांत देशमुख यांना. दी..\nसयाजीराव गायकवाडांचे बलसंपन्न भारताचे स्वप्न\n***बाबा भांड*** सयाजीराव हे राष्ट्रप्रेमी, काळापुढे दृष्टी असलेले विचारवंत राजा होते. देशभरातील विद्वान मंडळींचा संच त्यांनी बडोद्यात जमविला. साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे सयाजीराव मानत. संगीत, शिल्पकला, लोककला, प्राच्यविद्या आण..\nसमर्थांची व्यापक समत्त्वदृष्टीविद्याधर मा. ताठे\nभक्तिपंथे-राघवाच्या पंथे जायचे म्हणजे नेमके काय करायचे असा प्रश् मनाला पडू नये म्हणून समर्थ काही आचरण विषयक सोप्यासोप्या सूचना अत्यंत सलगीने करतात. इंग्रजीत ज्याला डू ऍंड डोन्ट (Do and Don'tं) म्हणतात तशा प्रकारच्या या सूचना आहेत. समर्थ म्हणतात स..\nअंबरनाथचा नाथडॉ. मिलिंद पराडकर\nकाळया पाषाणात कोरलेले अंबरनाथचे हे पश्चिमाभिमुख मंदिर भूमिज पध्दतीने बांधलेल्या मंदिराचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रातील भूमिज मंदिरांच्या यादीतील हे बहुधा आद्य मंदिर आहे. यादव साम्राज्याच्या कालखंडात ज्याला हेमाडपंथी शैली या नावाने ओळखले गेले, त..\nकेंद्रीय अर्थसंकल्प - आकडेमोड नव्हे, दिशादर्शन\n**सीए आनंद देवधर*** बहुचर्चित, लोकांच्या खूप अपेक्षा असलेला 2018-19चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. सामान्य माणसाला त्यात फक्त 'काय महाग आणि काय स्वस्त' यात इंटरेस्ट असतो आणि व्यक्तिगत इन्कम टॅक्स रेटसमध्ये किती सवलत मिळणार..\nविलक्षण कार्यकर्ता, यशस्वी लोकनेता - प्रा. रविंद्र भुसारी\n''वनगाजी, पायातली चप्पल बदला आता, तुटायला आली.'' मी सांगितले. ''रवीजी, जाऊ द्या हो. आधी अशी चप्पलही नशिबात नव्हती.'' ऍड. चिंतामण वनगा यांनी उत्तर दिले. चिंतामण वनगा यांच्या या उत्तरानंतर मी गप्प झालो. ऍड. वनगा आमदार झाले, खासदार झा..\nआर्थिक सर्वेक्षण अहवाल -अर्थव्यवस्थेची नाडीपरीक्षा \nआर्थिक सर्वेक्षण अहवालात वेगवेगळया क्षेत्रांच्या विकासाची (किंवा अधोगतीची) फक्त आकडेवारीच नसते, तर जे झालं ते का झालं असावं याची कारणमीमांसाही दिलेली असते. संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची ही अक्षरश: नाडीपरीक्षा असते. ह्याशिवाय वेगवेगळया क्षे..\nआसाममध्ये हिंदू एकीकरणाचे विराट दर्शन\nआसामसह सातही राज्यं एका वेगळया वळणावर येऊन पोहोचली आहेत. विकास, शिक्षण आणि अर्थकारण अशा सर्वच अंगानी हा प्रदेश वेगाने पुढे जात आहे. अशा वेळी एक सकारात्मक, मजबूत, सतत काम करणारी राष्ट्रवादी शक्ती इथे कार्यरत असणं गरजेचं होतं. संघ देशभर 1925पासून आणि आसाम..\nकॉलेजियम प्रणाली योग्य की अयोग्य\n***ऍड. नागनाथ मोहन गोरवाडकर*** न्याय व्यवस्था, न्यायालये, न्यायाधीश व वकील हे एक कुटुंब आहे. आपल्याच कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने कोणते काम करावे, ती व्यक्ती कसे काम करते आहे हे पाहणे, त्यास नवीन जबाबदारी देण्याबाबत ठरविणे हे कुटुंबातील मुख्य व्यक्तींच..\nकृतज्ञता, परतफेड आणि उज्ज्वल भविष्याची नांदीअनय जोगळेकर\nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा 15 ते 19 जानेवारी 2018 असा तब्बल सहा दिवसांचा भारत दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. दौऱ्यांमुळे इस्रायलबद्दल आपल्या मनात असलेली अपराधीपणाची जाणीव तसेच कुतूहल संपायला मदत झाली असून भविष्य..\nअसंवैधानिक होत चाललेली प्रशासकीय न्यायव्यवस्था\n***ऍड. प्रतीक राजूरकर*** शपथेप्रमाणे सरन्यायाधीश अथवा न्यायाधीश हे संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे कार्य करतील असा उल्लेख आहे, जो चार न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना घेतला आहे हे सांगायला नको. मग मुद्दा येतो की सरन्यायाधीशांना अनुच्छेद 154(3)प्रमाणे..\nभारतीय प्रजासत्ताक हे खरे प्रजासत्ताक नसून छद्म प्रजासत्ताक आहे अशी चिंता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत असतात. मुळात भारतीय समाजाला लोकशाहीची घटनात्मक मूल्ये समजलेली नाहीत. यामागे शिक्षणाचा अभाव आणि जे शिक्षण आहे तेच मुळात नागरिक घडवण्यास अक्षम आहे असे मानले ज..\nघटनात्मक राष्ट्रवाद विरुध्द अराजकरमेश पतंगे\nएक भारत आणि एक भारतीय नागरिकत्व, त्यातून समान भारतीयत्वाची जाणीव निर्माण झालेली आहे. घटनात्मक राष्ट्रवादाचे हे मोठे फलित आहे. घटनात्मक राष्ट्रवादाने संघटित भारताचे, राजकीय भारताचे एक चित्र स्पष्टपणे आपल्या डोळयापुढे उभे केले आहे. आपल्या घटनात्मक र..\n***नेहा जाधव*** भिडे गुरुजी हे महाराष्ट्रात निर्माण झालेले अजब रसायन. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तिमित करणारी बुध्दिमत्ता, अंगावर रोमांच उभे करणारे वक्तृत्व आणि बारा महिने चोवीस तास-तिन्हीत्रिकाळ चालू असणारी भ्रमंती. ते जिथे उभे राहतात तिथे तरुणांची गर..\nऋषितुल्य व्यक्तिमत्त्व भिडे गुरुजी\n****पराशर प्रकाशराव मोने**** ज्यांच्यापर्यंत हिंदुत्वाचे काम कधीही पोहोचलेले नव्हते, अशांना गुरुजींनी केवळ हिंदुत्वाच्या कार्यातच आणले नाही, तर त्यांना हिंदुत्वाच्या कार्याचे श्रीशिवप्रतिष्ठानच्या रूपाने नेतृत्व दिले. शिवाजी महाराजांच्या जीवनाचे ..\nअडचणींवर मात कराधनंजय दातार\nव्यवसायात अडचणी येतातच. पण म्हणून त्यांची धास्ती घेऊन चालत नाही. अडचणींचा मुकाबला करणे आणि परिस्थिती अनुकूल होईपर्यंत संयम बाळगून वाट बघणे, हाच त्यावरील उपाय असतो. मी अनुभवांतून एक महत्त्वाचा धडा शिकलो, तो म्हणजे आपल्याला आलेल्या अडचणींमधील केवळ द..\nमराठी माणूस आणि मार्केटिंग\n***उमेश श्रीखंडे*** मार्केटिंगच्या आणि मोठया विचारांच्या आधारे, आज ते कुठल्या कुठे पोहोचू शकले असते आणि म्हणूनच मराठी असलो तरी फक्त मराठी लोकांसाठीच, हे एखाद्या ब्रँडचे ध्येय असून चालत नाही. उलट मराठीपणाची जादू (सचोटी आणि इतर गुण) आपण सर्वद..\nबंधुभावाला तडा देणारी दुर्दैवी घटना\n***सागर शिंदे*** वढू गावात तो वादग्रस्त बोर्ड लागला आणि प्रत्यक्ष वादाला सुरुवात झाली. क्रिया-प्रतिक्रियांतून त्याचे दंगलीत रूपांतर झाले, या सर्व प्रकारात कोणी तरुणांची माथी भडकावली कोणी सहभाग घेतला कोण इतिहासाला रणभूमी बनवत आहेत या घटनेत कोण ..\nव्यवसाय कधीही करता येतो\nव्यवसायाचे क्षेत्र जात-धर्म-लिंगभेद-आरक्षण-वशिला या सगळयापासून मुक्त आहे. येथे टिकायचे झाल्यास जिद्द-कष्ट-संयम-अभिनवता इतकेच गुण आवश्यक असतात. पण यापेक्षाही फायदेशीर पैलू म्हणजे आपल्याला जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर व्यवसाय करता येतो. व्यवसायाला वयाची ..\nभीमा कोरेगावची आग कोणाला जाळेल\nलोक सोईपुरते संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करतात, तर दुसरीकडे संविधानाला आणि बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासायचा अशी दुटप्पी खेळी ही मंडळी खेळतात. जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत येते, तेव्हा तेव्हा अशा खेळी..\nफुटलेल्या काचा, तुटलेली मनेरमेश पतंगे\nप्रकाशजी, तुमचे राजकारण झाले, ब्राह्मणद्वेषाचा तडका झाला, फडणवीस, मोदी आणि भागवत यांना शिव्या देण्याचा शिमगा झाला, पण तुम्ही काय मिळवलेत उत्तर तुम्हाला शोधायचे आहे. प्रकाश आंबेडकर, जय भीम उत्तर तुम्हाला शोधायचे आहे. प्रकाश आंबेडकर, जय भीम तशी जय भीम करण्याची मला सवय नाही, मी आपला नमस्कार म्हणतो. परंत..\nजिग्नेश मेवानीः लाल सलामरमेश पतंगे\nपं. नेहरू यांनी केले, दुर्दैवाने ते गेले. संघ मात्र वाढतच राहिला. दुसरा प्रयत्न इंदिरा गांधीनी केला, त्याही गेल्या. संघ संपविण्याची माय-लेकरांची इच्छा अपूर्ण राहिली. आता जिग्नेश याने राहुल गांधी यांना बरोबर घेऊन माय-लेकरांची इच्छा पूर्ण करू शकतील का\n** लीना मेहेंदळे*** सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून सरकारी तसेच खाजगी शाळांमधील मागास जातीतील, मागास जनजातीतील तसेच इतर मागासवर्गीय मुलींमुलांची फी माफ असून हा खर्च शासनातर्फे शाळांना अदा केला जातो. आता आर्थिकदृष्टया मागास ठरवल्या गेलेल्या विद्यार..\nपाकिस्तानच्या राजकारणातील 'हाफिजी' प्रयोग\n****दिनेश कानजी**** पनामा लीक्समुळे नवाज यांना घरघर लागली. बेनझीर भुत्तो यांच्या निधनानंतर त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांनी विक्रमी भ्रष्टाचार करून पाकिस्तान पीपल्स पार्टीचा बोजवारा उडवला. माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा 'तेहरीक ए इन्साफ' हा ..\nऔट घटकेचा नैतिक विजयभाऊ तोरसेकर\nपुराव्याअभावी सुटणाऱ्याला अग्निदिव्य पार पाडल्याचे सन्मानपत्र ठरवण्यापर्यंत मजल गेली आणि पराभव पचवण्याची वेळ आल्यावर घटनात्मक संस्थांचाही बळी देण्यास मागेपुढे बघितले गेले नाही. एकूण काय, तर सत्तेसाठी आतुर झालेल्यांना आज कुठलीही लाजलज्जा वा..\n*** आशिष चांदोरकर**** गुजरात राज्य हातातून जाईल, त्यामुळे भाजपाचे नाक कापले जाईल का, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, तरीही भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजयश्री खेचून आणली. संख्याबळ कमी झाले, जे अपेक्षितच होते. पण तरी..\nभावी विजयाची दोन चाकेरमेश पतंगे\nरोजगार, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न, शिक्षण आणि शिक्षणाचे प्रश्न हे हिंदुत्वाप्रमाणे अखिल भारतीय विषय आहेत. गुजरातच्या निवडणुकीने दोन गोष्टी सांगितल्या - भावनिकदृष्टया हिंदुत्व हवेच, परंतु केवळ हिंदुत्वाने पोट भरत नाही. हिंदुत्वाबरोबर विकास असलाच पाहिजे. म..\n100 वर्षीय तरुणाची यशस्वी अभिवादनयात्रा\n***कॅ. निलेश गायकवाड*** शिरगावकर आजोबांच्या इच्छाशक्तीपुढे ती माझी सपशेल माघार होती मी स्वत: त्यांना अंदमान येथे घेऊन गेलो. पूर्ण अभिवादन यात्रेत मी त्यांच्याबरोबरच होतो. मीच काय, त्या अभिवादन यात्रेला आलेला प्रत्येक सावरकरप्रेमी, अंदमान येथील आमचे सह..\nसरदार आणि रा.स्व. संघ\n- अरुण करमरकर महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिला जाणारा न.चिं. केळकर पुरस्कार अरुण करमरकर यांच्या 'पोलादी राष्ट्रपुरुष' या पुस्तकाला नुकताच जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून स्नेहल प्रकाशनने हे पुस्..\nबिटकॉइन नावाचं 'गूढचलन' नव्या युगाचा मुक्त डिजिटल पैसा\n***प्रसाद शिरगावकर*** पैसा आणि व्यवहारांच्या ह्या सरकारी, अधिकृत आणि नियंत्रित पध्दतीला पूर्णपणे छेद देऊन संपूर्णतः विकेंद्रित, कोणाच्याही मालकीची नसलेली आणि संपूर्ण मानवी समुदायाचं नियंत्रण असलेली चलनपध्दत आणि व्यवहार व्यवस्था म्हणजे गूढचलनं अर्..\nबॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते शशी कपूर आता आपल्यात नाहीत. त्याचा पडद्यावरचा वावर देखणा होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण आज तो पटकन आठवतो तो 'दीवार'मधला रवी वर्मा. त्याची तेवढीच ओळख असू नये. अनेक चित्रपटांत त्याने सुंदर काम ..\n‘‘बंधुभाव, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावे’’ - मोहनजी भागवतसुरेश केसापूरकर\n‘‘हजारो वर्षांपासूनच्या विकृत आचरणाची सवय बदलण्याची आपल्याला सर्वात मोठी गरज आहे. मनुष्य सवयीने वागतो, तर्काने नाही. मागच्या काळात जे काही झाले, त्याचे परिमार्जन करून हिंदू धर्मातील भेदाभेदांचे समूळ उच्चाटन करून सर्वांबरोबर बंधुभावाचा धर्म आ..\nएक आवेग... ध्यासाने पछाडलेला\n*** अरुण करमरकर**** या वर्षी होणाऱ्या 18व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची निवड झाली आहे. समरसतेची भावात्मक संकल्पना साहित्यातून प्रकट होणारी आणि जोपासली जाणारी समरसता प्रकट होणाऱ्या संवेदनेला अक्षरबध्द करणारे साहित्य इ..\nहाफीज सईद - पाकिस्तानी राजकारणातील प्यादेडॉ. प्रमोद पाठक\nहाफीज सईद याची नजरकैद किंवा स्थानबद्धता पाकिस्तानी न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी रद्द केली. त्यामुळे पाकिस्तानी राजकारणाला नवे वळण लागणार आहे, सध्या पाकिस्तानात असलेली जुनी सामंतशाही, सरंजामशाही व्यवस्था मोडकळीस येऊन सत्ता कट्टरपंथी ह..\nनिश्चयाचे मेरुमणी नानाराव पालकर\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नारायण हरी उर्फ नाना पालकर आणि श्रीकृष्ण दत्तात्रेय उर्फ अप्पासाहेब भिडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने नाना पालकर यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा... साधारणत: 1930पासून पुण्यात संघाचे काम स..\n***विभावरी बिडवे** गुरुग्राममधल्या प्रद्युम्न ठाकूर ह्या सात वर्षाच्या मुलाच्या हत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केली आहे. परीक्षा आणि शिक्षक पालक मिटिंग टा..\n'चिरतरुण' ज्येष्ठांचा मेळावारमेश पतंगे\nमुंबईतील अशा ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मिलनाचा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी चेंबूर हायस्कूलच्या पटांगणात संपन्न झाला. 1950 सालापासून संघकामात काही ना काही जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे हे स्नेहमिलन होते. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. ..\nडॉ. हेडगेवार रक्तपेढी रुग्णसेवेत सदैव अग्रेसर\n***अशोक पत्की**** विविध रक्तपेढयांमध्ये सामान्य तंत्रज्ञानाने तपासलेल्या रक्तपिशव्या ज्या किमतीत मिळतात, जवळजवळ त्याच किमतीत डॉ. हेडगेवार रक्तपेढी अत्याधुनिक मशीनवर तपासलेल्या रक्तपिशव्यांचे रुग्णांना वितरण करते. आता थॅलिस..\n***शैलेश पेठकर**** पोलीस हा समाजाचा रक्षक म्हणून काम करतो, परंतु सरसकट सर्वांनाच पोलिसी खाक्या दाखवण्याच्या वर्तनामुळेच आज पोलीस यंत्रणा सामान्यांपासून दूर जात आहे. त्यातून या यंत्रणेबद्दल समाजात असंतोष आहे. पोलीस ठाण्यातील कारभार ल..\n''हिंदू भावजागृतीसाठीच हिंदू चेतना संगम'' - सुनील सप्रेरवींद्र गोळे\n7 जानेवारी 2018 रोजी रा.स्व. संघाच्या कोकण प्रांतात हिंदू चेतना संगमचे आयोजन केले आहे. कोकण प्रांतातील ग्रामीण भागात तालुका आणि नगरीय क्षेत्रात नगर पातळीवर या हिंदू चेतना संगमचे आयोजन होत असून त्या निमित्ताने प्रांतभर पूर्वतयारीसाठी विविध उप..\nगुजरातचा मतदार काय सांगतो\nगुजरातमधील निवडणुकांच्या निकालाचे सर्वेक्षण सर्वच माध्यमांतून प्रसिध्द झाले आहे. त्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. तरी अनेकांच्या मते ही निवडणूक 2012इतकी सोपी नाही, पण भाजपाला अवघडही नाही. एक गोष्ट मात्र खरी की, नरेंद्र मोदी यांची लोकप्..\nराष्ट्रीय छात्रशक्तीचा केरळमधील हुंकार\n*** प्रा.डॉ. प्रशांत विठ्ठल साठे*** पर्यटन, देर्वदशन हे खरे तर केरळमध्ये येण्याचे प्रयोजन असते. परंतु अ.भा.वि.प.च्या छात्रशक्तीने या मोर्चामध्ये सामील होऊन या अत्याचारित व्यक्तींचे व कुटुंबाचे मनोधैर्य वाढविण्यासाठीच केरळमध्ये यायचे अस..\nपंतप्रधान म्हणून नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार केला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उंच भरारीसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टीची मुहूर्तमेढ नेहरूंनीच घातली. अवकाश तंत्रज्ञान संशोधन संस्था, अणुउर्जा, आयआयटी अशा महत्त्वाच्या संस्थांची स्थापना त..\nगरिबीला लाजू नये, श्रीमंतीने माजू नये...धनंजय दातार\nमला पुष्कळदा आढळून आले आहे की गरिबीत पूर्वायुष्य काढायला लागलेली माणसे श्रीमंत बनतात, तेव्हा त्यांच्यात काही भयगंड रुजून बसतात. काहींना पूर्वी भोगलेले दिवस आठवणेही नकोसे वाटते आणि ते कायम पैशाचा विचार करत चंचल लक्ष्मीला ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्..\nहिमाचलमध्ये सत्तेसाठी दुहेरी लढत\n***चंदन आनंद**** हिमाचल प्रदेशमधील निवडणुका केवळभाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहेत. राज्यातील या दोन मुख्य पक्षांनाही या वस्तुस्थितीची कल्पना आहे. साहजिकच येथे विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी बुध्दिबळाप्रमाणे शह-काटशहाची प्रवृत्ती ..\nविकास खाणारे भकास झाले\nगुजरातमध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी भ्रष्टाचाराचा धंदा बंद केला आहे, आता देशात हा धंदा बंद करण्याच्या कामात ते गुंतले आहेत. विकास वेडा झाला नसून विकास खाणारे भकास झाले आहेत. गुजरातच्या जनतेला हे दाखवून द्यायचे आहे की आम्ही गुजराती आहोत..\nभारतीयांहून अधिक भारतीय 'निवेदिता'\n28 ऑक्टोबर 1867 हा भगिनी निवेदितांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्माच्या सार्धशती- अर्थात दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलूंवर टाकलेला प्रकाश ... शिकागो येथील धर्मपरिषदेच्या दिग्विजयानंतर स्वामी विवेकानंदा..\nदरडोई 15 लाख नाही आले तरी चालतील, पण शेकडो भ्रष्ट लोकांकडून ते पकडले गेले, तरी लोकांना ते आनंददायक असेल. हे होण्यासाठी नोटाबदलीच्या काळात आलेल्या पैशाचा माग नीट काढणं आवश्यक आहे. त्याकरिता उत्तम तंत्रज्ञान हवं, आर्थिक आणि कायदेशीर असं दोन्ही आकलन असलेलं..\nतोच पण नवा फास्टर फेणे\n'फास्टर फेणे' पुस्तकांचा अखेरचा काउंट वीस आहे आणि कथा तसंच कादंबऱ्या या दोन्ही प्रकारात ही पुस्तकं मोडतात. फास्टर फेणेचा चाहता वर्ग हा साठ-सत्तरच्या दशकातला. त्यामुळे फास्टर फेणेमध्ये या चित्रपटात व्यक्तिरेखा मूलभूत पातळीवर तशीच ठेवायची, पण कथान..\nभाजपा सरकारच्या दमदार पावलांमुळे आश्वासक चित्र\n***केशव उपाध्ये** भाजपा सरकारच्या याच दमदार पावलांमुळे एक आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघही मोठया प्रमाणात वाढला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सोयीसुविधा या सर्वच आघाडयांवर या सरकारने दमदार कामगिरी केली आहे. या तीन वर्षांच्या..\nदिवाळीनंतरही उरलेले फटाक्यांचे कवित्व\n*** जयंत कुलकर्णी**** दिवाळी तर संपली, पण जाता जाता या फटाका बंदीचे कवित्व मागे ठेवून गेली आहे. दर वर्षीच दिवाळीच्या आधी चर्चेत येणारा 'प्रदूषणाचा' प्रश्न या वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अचानक केंद्रस्थानी आला. या प्रश्न..\nबौध्द, मुस्लीम व ख्रिस्ती लोकांनी भारतीयांना खूप छळले. त्यांच्या शिल्पवैभवाचा मनसोक्त विध्वंस केला. माणसे मारली. पण या सर्वात जास्त अन्याय मुसलमानांनी केला. यावनी आक्रमणाच्या तडाख्यात जी सापडली, जी शिल्लक राहिली ती मंदिर शिल्पे आजही साश्रू नयनांनी आपल्य..\nश्रीविठ्ठल एक सनातन कोडेमाधव भांडारी\nविठ्ठल हे दैवत व त्याच्या भक्तांचा संप्रदाय या दोहोंचा इतिहास किमान 2000 वर्षांचा असावा, असे दिसते. 'श्रीविठ्ठल' हे आजही जगभरातील संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने एक 'महाकूट' आहे. संस्कृतीच्या संशोधक अभ्यासकांसमोर, कंबरेवर हात ठेवून उभे असलेले हे एक ..\nगांधी समजून घेताना...रमेश पतंगे\nगांधीविचार आणि संघविचार यांचा परस्परांशी काही संबंध आहे का देशातील बहुतेक सर्व गांधीवाद्यांनी संघाला गांधीजींचा शत्रू ठरवून टाकले आहे. माझ्यासारखा संघात वाढलेला स्वयंसेवक दीर्घकाळ गांधीविचारांपासून स्वतःला दूर ठेवतो. परंतु गांधी हा दूर ठेवण्याचा विषय न..\nनीरक्षीर विवेकाची आवश्यकतादिलीप करंबेळकर\nहिंदू समाजाने नवभारताचे व नवहिंदूसमाज निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन कार्यरत होण्याचे आव्हान हिंदू धर्मपीठांनी स्वीकारले पाहिजे, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत, स्किल इंडिया यासारख्या कितीही चांगल्या कल्पना असल्या, तरी समाज त्या..\nफवारणीचा जीवघेणा फासविकास पांढरे\nपाचवीला पुजलेला दुष्काळ, पाण्याचे कायम दुर्भिक्ष, वाढती बेरोजगारी आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कीटकनाशक फवारणीच्या जीवघेण्या फासात शेतकरी-शेतमजूर अडकला आहे. कपाशी..\n****जयंत विद्वांस**** त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकडयांवर सिध्द होणारा माणूस तो नव्हे. काळ काय, झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतकं थेटरात अंधार हो..\nबिनधास्त सीमोल्लंघन करा...धनंजय दातार\n***धनंजय दातार*** गुढीपाडव्याचा सण नव्या संकल्पांची गुढी उभारायला शिकवतो, तर विजयादशमीचा सण सीमोल्लंघन करून पराक्रम गाजवण्याचीर् ईष्या मनात उत्पन्न करतो. पण आपण त्यातून काहीच शिकत नाही. वर्षानुवर्षे आपण हे सण केवळ प्रतीकात्मक साजरे करून परंपरा पाळल्याच..\nसौ सुनार की ...एक स्वराज कीअरविंद व्यं. गोखले\nसुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचा बुरखा टरकावला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा स्वैर वापर करू दिला नाही, तर सर्वच जनता दहशतवादातून मुक्त होईल, पाकिस्तानकडून नृशंसतेचे नवनवे धडे घालून दिले जात असतानाच त..\nकेदार अमंगल आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यशेफाली वैद्य\nकेदार मंडल ह्या क्षुद्र माणसाने देवी दुर्गेला उद्देशून अपशब्द वापरले, म्हणून देवीची महती कमी होत नाही; पण जाणूनबुजून सर्वसामान्य हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हक्क ह्या देशात कुणालाच नाही. अगदी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क सर्व नागरिकांना बहाल क..\nज्योत्स्ना पेठकर जिज्ञासात मंत्रीमंडळ आहे. दर शुक्रवारी त्यांचे पार्लमेंट असते, त्यात विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि जनता असते. त्यात 'complaint box' आणि 'suggestion box' उघडला जातो. तक्रार कोर्टात जाण्यायोग्य असेल तर संबंधित मुलाला/मुलीला तसे समन्स द..\n***अक्षय जोग*** रोहिंग्यांच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाशी - विशेषत: भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांशी संबंध असण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना भारतात आश्रय देणे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. शत्रूचा शत्रू तो आपला ..\nरोहिंग्यावर सशर्त दया व आश्रयडॉ. प्रमोद पाठक\nसुमारे दोन-तीन वर्षांपासून म्यानमारमधील लोकांनी रोहिंग्यांना हुसकावून लावण्यास सुरुवात केल्यापासून रोहिंग्यांवरील अत्याचारांबाबत गळे काढण्यास आंतरराष्ट्रीय स्तरांवरून सुरुवात झाली. म्यानमारी बौध्द आणि सरकार हे खलनायक ठरविले गेले. ..\nगौरी लंकेश हत्या आरोपांच्या पलीकडे\n***डॉ. जयंत कुळकर्णी*** माणसे मारून विचार नष्ट होत असते, तर सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर नवीन विचार युरोपात कधीच पोहोचले नसते वा श्यामाप्रसादांच्या तुरुंगातील संशयित मृत्यूनंतर जनसंघही संपला असता. तसे होत नाही व होणारही नाही. ..\n***विनिता तेलंग*** निसर्गाशी पूर्ण तादात्म्य पावून, स्वची जाणीव लोप पावून त्या क्षणाशी समरस होता आले, तर हायकू लिहिता येतो. अशी वृत्ती असणाऱ्या रवींद्रनाथांनी हायकू प्रथम भारतात आणला. त्यांनी काही भाषांतरे केली, काही स्वतंत्र रचनाही केल्या. उत्तर भारता..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/532941", "date_download": "2018-04-23T09:41:18Z", "digest": "sha1:HT5CUQZ5S6VRCVZJRQ6NW5VLZ2ZIZED6", "length": 5386, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एक खुनी पंतप्रधान आणि एक पक्षाध्यक्ष : कोळसे-पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » एक खुनी पंतप्रधान आणि एक पक्षाध्यक्ष : कोळसे-पाटील\nएक खुनी पंतप्रधान आणि एक पक्षाध्यक्ष : कोळसे-पाटील\nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन हजार मुस्लिमांची कत्तल करुन आले आहेत. मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत. एक खुनी सभागृहात पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे, अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.\nअहमदनगर येथील विराट सामाजिक ऐक्य परिषदेत कोळसे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “मोदींची लोकप्रियता कृत्रिम आहे. खरी लोकप्रियता नेहरु, इंदिरा गांधींची होती, गांधीजींची होती. मोदींची लोकप्रियता मॅनेज केलेली आहे. एक खुनी सभागृहात पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे. दरम्यान, कोळसे पाटील यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nसमन्वयासाठी मुख्यमंत्री बोलावणार मित्रपक्षांची बैठक\nसोनिया गांधींनी केजरीवालांना वगळले,सर्व विरोधकांना भोजनाचे निमंत्रण\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया\nडिएसकेंच्या जामीनअर्जावर 31 मार्चला होणार सुनावणी\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2013/08/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T09:08:06Z", "digest": "sha1:HXF6DMPEUXUMG76ONKUT4RJMSXL7CYHG", "length": 11186, "nlines": 111, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: अन्नसुरक्षा योजना गरिबांसाठी मृगजळ- किशोर तिवारी", "raw_content": "\nअन्नसुरक्षा योजना गरिबांसाठी मृगजळ- किशोर तिवारी\nअन्नसुरक्षा योजना गरिबांसाठी मृगजळ- किशोर तिवारी\nकेंद्रसरकारने अन्नसुरक्षेचा अध्यादेश काढल्यानंतर व लोकसभेने मंजुरी दिल्यानंतर\nमहाराष्ट्रात ११ कोटी ३0 लाख जनतेमधून महाराष्ट्र सरकारला ७ कोटी २0 लाख जनतेला अन्नसुरक्षा द्यायची आहे. यात ४ कोटींच्यावर जनता ग्रामीण भागात व अडीच कोटींच्यावर शहरी भागातील जनतेला नवीन अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे अन्न द्यावयाचे आहे. मात्र अन्न नागरी पुरवठा विभागात फक्त राज्य स्तरावर ३00 कर्मचारी असून महसूल खात्याचा भ्रष्ट अधिकार्‍यांकडून ही योजना राबविण्याचे स्वप्न राज्य सरकार बघत आहे.\nसध्याच्या परिस्थिती मध्ये सरकार १९९७ च्या यादी प्रमाणे गरीबाची ओळख करुन जेमतेम २0 लाख कुटुंबांना अंत्योदय व २२ लाख कुटुंबांना बीपीएल धान्य देत आहे. ही योजना राबवित असताना सरकार फक्त ५0 टक्के धान्याची उचल करत असून २ वर्षांपासून गरिबांना अध्रेच अन्न देण्यात येत आहे. यात सवरेच्य न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने ५0 लाख शिधावाटप पत्रिका रद्द केल्या. मात्र नवीन शिधावाटपपत्रिका दिलेल्या नाही.\nज्या राज्यात ७ कोटी २0 लाख जनतेला अन्न सुरक्षा द्यायची आहे त्या अन्न नागरी पुरवठा विभागाजवळ १ लाख १६ हजार कुटुंबाची यादी आहे. अश्या परिस्थितीमध्ये सरकारने नवीन कुटुंबाची ओळख व ७ कोटी २0 लाख जनतेला अंत्योदयचे कार्ड देणे हे अशक्य काम असून महाराष्ट्र सरकारच्या सर्वात भ्रष्ट असलेल्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून हे काम होणे असंभव आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मार्फत शिधावाटप पत्रिकेचे वाटप करावे व यासाठी स्वतंत्र यंत्रणेला हे काम देण्यात यावे अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने अन्न पुरवठा विभागाने १७ जुलैला शासन आदेश २८६ प्रमाणे सर्व जिल्हाधिकार्यांना नवीन गरीबांची ओळख करण्याचे आदेश दिले होते. यासाठी प्रत्येक गावात शिबिर लावणे, सर्व ग्रामसभांना सुचना देणे व विस्तारित याद्या तत्काळ सुधारित कराव्या अशा सूचना केल्या होत्या. मात्र एकाही जिल्हाधिकार्‍यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या उलट नवीन शिधापत्रिका न देण्याचे आदेश झाल्याचे कारण समोर करत अन्न नागरी विभागाचे काम सर्वच ठिकाणी बंद आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी व महागाव तालुक्यातील अन्न खुल्या बाजारात राजरोसपणे विकल्यानंतरही सरकार जिल्हाधिकार्यांवर कोणतीच कारवाई करत नाही, ही शरमेची बाब आहे. या महिन्यातही अन्नसुरक्षा अध्यादेश लागू झाल्यानंतर दूरदर्शनवर बातमी ऐकून शिधावाटप दुकानात गेलेल्या गरीबांना तुमचा कोटा अर्धा झाला आहे, असे सांगून महाराष्ट्र सरकारने धक्काच दिला आहे.\nज्या राज्यात फक्त १ कोटी शिधावाटप पत्रिकेमधून ५0 लाखांवर शिधावाटप पत्रिका बोगस निघतात व रद्द करण्यात येतात त्या राज्यात ७ कोटी २0 लाख जनतेची ओळख करून ३ महिन्यात नवीन शिधावाटप पत्रिका देणे व राज्यस्तरावर ३00 कर्मचारी असणार्‍या अन्न नागरी पुरवठा मंत्र्याला कसे शक्य होणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे\nक्षेचा अध्यादेश काढल्यानंतर व लोकसभेने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात भारत सरकारचा अन्नसुरक्षा कायदा १ डिसेंबर २0१३ पासून लागू करणार, अशी महत्त्वांकांक्षी घोषणा केली आहे. मात्र राज्यात अन्न नागरी पुरवठा व्यवस्था ही मरणासन्न अवस्थेत असून प्रत्यक्षात मात्र शिधावाटप योजना भ्रष्टाचाराने लिप्त झाली आहे. सरकारचा सुरू असलेला भोंगळ कारभार व सनदी अधिकार्‍यांच्या मस्तवालपणामुळे ही योजना फक्त कागदावर राहणार असून महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी ती मृगजळ ठरणार असल्याची भीती अन्न सुरक्षेचा लढा देणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.\nअन्नसुरक्षा योजना गरिबांसाठी मृगजळ- किशोर तिवारी\nशेतकरी वाजविणार स्टेट बॅंकेसमोर 'डफडे'-लोकशाही वार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1526", "date_download": "2018-04-23T09:14:36Z", "digest": "sha1:IYEN3TBL6CD2ASONXQW43QEHK3X4GV7E", "length": 22843, "nlines": 170, "source_domain": "www.baliraja.com", "title": " 'माझी कन्या भाग्यश्री' योजना | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / 'माझी कन्या भाग्यश्री' योजना\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'माझी कन्या भाग्यश्री' योजना\n'माझी कन्या भाग्यश्री' योजना\n'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. ज्यांना मुले आहे, त्यांच्या वृध्द आई-वडिलांना वृद्धापकाळात वृद्धाश्रमात ठेवल्याचे उदाहरण आपण अनेकदा ऐकतो. उलट मुलींनी वृद्धापकाळात आपल्या घरी आईवडिलांना ठेऊन त्यांची काळजी घेतल्याचेही बघतो. दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या मुलींची भ्रुणहत्या रोखण्यासोबतच, मुलींच्‍या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देवून सुधारणा करणे, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, मुलींचा होणारा बालविवाह थांबविणे आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरु केली आहे.\n'माझी कन्या भाग्यश्री' योजना ही सर्व कुटूंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलीसाठी लागू केली आहे. ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 7 लक्ष 50 हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना आहे. एका मुलीच्या जन्मानंतर आईने किंवा वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली असल्यास मुलीच्या नावे 50 हजार रुपये मुदत ठेव म्हणून बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक म्हणून ठेवण्यात येईल. 50 हजार रुपये रक्कमेवर 6 वर्षासाठी मिळणारे व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी देय होणारे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी काढता येते. पुन्हा मुद्दल 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येते. आई/वडिलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50 हजार रुपये इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येते. जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला देता येते.\nदोन मुलीनंतर आई/वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये इतक्या रक्कमेवर 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी तसेच वयाच्या बाराव्या वर्षी काढता येते. तसेच पुन्हा मुद्दल 25 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल. यासाठी आई/वडिलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच रक्कम मुलीच्या नावावर जमा करता येते.\nमाझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई/वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. या सुधारीत योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींना देण्यात येईल. ज्या कुटूंबामध्ये 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला व आई/वडिलाने कुटूंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला 25 हजार रुपये योजनेचा लाभ देण्यात येईल. ज्या कुटूंबात पहिले अपत्य मुलगा व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास या योजनेचा लाभ देता येणार नाही. कुटूंबात पहिले अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असल्यास लाभ देता येईल मात्र तिसरे अपत्य जन्माला आल्यास लाभ देता येणार नाही. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक/दोन अपत्यांचेही लाभ बंद होतील. देण्यात आलेली रक्कम वसुल करण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वडील राज्याचे मुळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.\nया योजनेअंतर्गत मुदत ठेवीत गुंतविण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण असणे व इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहीत असणे आवश्यक राहील. दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या मुली योजनेच्या लाभास पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुलींना सुध्दा या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी दत्तक पालकांनी मुलीचे बँक खाते उघडावे, त्या खात्यात रक्कम जमा करता येईल.\nवयाची 18 वर्षे पुर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्यास किंवा दहावीपूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. मात्र नैसर्गीक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पुर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल.\nमाझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र मुलींचे स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल. मुलीच्या नावाने रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मुळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देवून एक छायांकीत प्रत शासकीय कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 7 लाख 50 हजार रुपये असल्याचे तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतरच या योजनेचा लाभ देता येईल. 1 जानेवारी 2014 ते 31 मार्च 2016 या कालावधीत कार्यान्वीत असलेली सुकन्या योजना आणि 1 एप्रिल 2016 ते 31 जुलै 2017 या कालावधीत कार्यान्वीत असलेली जुनी माझी कन्या भाग्यश्री या दोन्ही योजनेसाठी सदर कालावधीत लाभार्थ्याने अर्ज केला असेल व आजच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्या लाभार्थ्यांना देखील सुधारीत माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुलींच्या शिक्षणाकडे, तिच्या आरोग्याकडे पालक वर्ग विशेष लक्ष देतील. स्त्री जन्माचे स्वागत देखील उत्साहात करतील तसेच मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार येण्यास मदत होईल. त्यामुळे माझी कन्या भाग्यश्रीच आहे असेही पालक म्हणतील.\n'माझी कन्या भाग्यश्री' योजना\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-mantralaya-harshal-rawte-suicide-1140", "date_download": "2018-04-23T09:14:18Z", "digest": "sha1:C5I2LYDMGKACDE4UT6BHRIXNTFJWHJHK", "length": 6865, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mantralaya harshal rawte suicide | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nधर्मा पाटील यांचं प्रकरण ताजं असतानाच आज परत एकदा हर्षल रावते नामक तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दरम्यान हर्षल रावते या तरुणाला सेंट जॉर्ज या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हर्षल रावते या तरुणाने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही.\nधर्मा पाटील यांचं प्रकरण ताजं असतानाच आज परत एकदा हर्षल रावते नामक तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दरम्यान हर्षल रावते या तरुणाला सेंट जॉर्ज या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हर्षल रावते या तरुणाने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही.\nधर्मा पाटील dharma patil मंत्रालय\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही\nराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय मंत्री...\nचिनी हॅकर्सकडून संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक \nनवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचे आज (शुक्रवारी) स्पष्ट झाले. या...\nभुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत; चंद्रकांत पाटलांचा...\nमुंबई : 'शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत' अशा शब्दांत महसूल...\nभाजप शिवसेनेच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय - अजित...\nभाजप शिवसेना सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय झाल्याची टीका अजित...\nअवघ्या काही तासांत 'फेक न्यूज'चा फतवा मागे; 'फेक न्यूज'वर स्मृती...\nखोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा फतवा केंद्र सरकारनं काढला...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T09:31:01Z", "digest": "sha1:D3AFX52MFOGICEZGIL6UQWFMFAQX6IH7", "length": 4867, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख हिंदू पुराणांतील मृत्यूचा देव - यम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यम (निःसंदिग्धीकरण).\nयमधर्म, यम किंवा यमराज हा हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूचा देव आहे.\nयम ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१६ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-23T10:17:46Z", "digest": "sha1:PDPSMY5ZV5HP6NNEH6GW6A3QHIJ6PYOR", "length": 10969, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मध्य रेल्वे - Latest News on मध्य रेल्वे | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक\nया ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.\nमुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nदुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.\nमध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये\nमध्य रेल्वेने फुकट्यांकडून सुमारे १५४ कोटी रूपये वसूल केले आहेत.\nमध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक\nरेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक\nमध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास\nमध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.\nमुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक\nमध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nतापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत\nतापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली.\nरविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक\nमध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.\nमध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)\nदादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमध्य रेल्वेची वाहूतक पुन्हा एकदा विस्कळीत झालीय. कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय.\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल गाड्या एकाच ठिकाणी ठप्प असल्याने प्रवाशांना पुढील स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली.\nमध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही\nमध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.\nमध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर\nपुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल.\n...स्थानकाला मिळालाय पहिला 'ग्रीन स्टेशन'चा बहुमान\nमुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदोन्ही बॅट्समन एकाच जागेवर पोहचले, तरीही दोघही नॉटआऊट\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nजया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/geetramayan-akashwani/playsong/124/Anand-Sangu-Sakhe-Ga.php", "date_download": "2018-04-23T09:11:39Z", "digest": "sha1:FPKFWST274N5WEWJLICW4CQLIN23MFYH", "length": 13136, "nlines": 169, "source_domain": "www.gadima.com", "title": "Anand Sangu Sakhe Ga -: आनंद सांगूं किती सखे ग : GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी)", "raw_content": "\nलळा-जिव्हाळा शब्दच खोटे,मासा माशा खाई,कुणी कुणाचे नाही राजा,कुणी कुणाचे नाही\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nआनंद सांगूं किती सखे ग\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nआनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगू किती\nसीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति\nवामांगी तूं बसशील सीता\nजरा गर्विता, जरा लज्जिता\nराजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति\nगुरुजन मुनिजन समीप येतिल\nसप्त नद्यांचीं जलें शिंपतिल\nउभय कुळें मग कृतार्थ होतिल\nमेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति\nभर्त्यासम तुज जनीं मान्यता\nराज्ञीपद गे तुला लाभतां\nपुत्राविण तूं होशील माता\nअखिल प्रजेच्या मातृपदाची, करणे तुज स्वीकृति\nतुझ्याच अंकित होइल धरणी\nभाग्य भोगिलें असलें कोणीं \nफळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति\nपृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे\nत्रिलोकांनधे भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति\nमहाराणि तूं, आम्ही दासी\nलीन सारख्या तव चरणांसी\nकधीं कोणती आज्ञा देसी\nतुझिया चरणीं मग्न राहुं दे, सदा आमुची मति\nविनोद नच हा, हीच अपेक्षा\nतव भाग्याला नुरोत कक्षा\nदृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति\nओळखिचे बघ आले पदरव\nसांवलींत गे दिसलें सौष्ठव\nतुला भेटण्या येती राघव\nबालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति \nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nनको रे जाउं रामराया\nरामाविण राज्यपदी कोण बैसतो \nनिरोप कसला माझा घेता\nथांब सुमंता,थांबवि रे रथ\nया इथे लक्ष्मणा,बांध कुटी\nबोलले इतुके मज श्रीराम\nमात न तूं वैरिणी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mayurgavhane.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T09:35:40Z", "digest": "sha1:P3PU5HTCLOW4LRJ33CUJXT66YF52QPCN", "length": 53537, "nlines": 172, "source_domain": "mayurgavhane.blogspot.com", "title": "मयुरोदय", "raw_content": "\nमाझ्या म्हणजेच मयूर च्या मनात उदयाला आलेल्या संकल्पना , विचार लिहिण्याची किंबहुना अभिव्यक्त होण्याची जागा म्हणजे माझा \"मायुरोदय \" हा ब्लॉग.\nशनिवार, २० जून, २०१५\n''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''\n''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''\nसाधारणतः 20 की मी चा दाट\nझाडाझुडपांनी वेढलेला घाट. आणि त्या घाटात वसलेल शेआठशे लोकसंखेचा तांडा. त्या विधानसभा मतदारसंघातील ते अगदी शेवटच नि दुर्गम भागातल ते गाव.घाट रस्त्याच्या मध्यातुनच तांड्यावर जायला फाटा फुटतो. बैलगाडी कशीबशी वाट काढू\nशकेल अशा खडक,दगड धोंड्याच्या रस्त्यावरून आज मतांची भिक\nुजर, जिपा अशा गाड्यांचा ताफा तांड्यावर पोचला.\nदिवसभर गुरं ढोरं चरुन आता माणसं आपापल्या दारि तांड्यावर परतत होती. गावच्या अर्धवट अवस्थेत उभ्या वेशीजवळ गाड्यांचा ताफा थांबला,उमेदवारासह कार्यकर्ते गाडीतुन\nउतरले .लागलीच याचे-त्याचे पाय धरणीला सुरवात\nझाली.डोक्यावर पदर घेतलेल्या बाया बापड्या कुडाच्या घराबाहेर तांदूळेतर\nधान्य पाखडीत बसलेल्या, मोठ््या कुतुहलाने त्या उमेदवार कार्यकर्ते\nत्यांच्या घोषणा, हात जोडण बघत होत्या लोक आपले पाय पडताहेत याच\nत्यांना आश्चर्य वाटत असावं..काहि जणी चुल पेटवत तर\nकाही झाडझुड करत होत्या.\nगावातील पुरुष मंडळी घाटातल्याच काही नापिक जमिनीवर दिवसभर घाम\nगाळून जिवाचा आटापिटा करून\nति पिकवण्याची केवीलवाणी धडपड करून आले होते, थकुन भागून अंधार्या कुडात तर काही बाहेर अंधारात गप्पा मारत बसले.\nकोणी म्हातारे बाजेवर पहुडलेले तर\nकाही पारावरच्या गप्पांत दंग. मीडी,टॉप वर असलेल्या मुली चुंबळ डोक्यावर घेउन भांड्या भांड्याने\nकुठल्या तरी झर्यातून पिण्याच पाणी वाहात होत्या.पोरं,युवक मंडळी चकाट्या पिटीत बसली तर\nकाही खेळण्यात दंग..... लाईटचा दूरपर्यंत खांब दिसत नव्हता.\nआतापर्यंत बर्याच पक्षांच्या उमेदवारांची मतदान मागण्यासाठी इकडे चक्कर झालेली दिसत होती.\nकारण, ज्या कुडाच्या घरावर\nटिव्ही एंटीना नव्हता त्या कुडावर तर\nराजकीय पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ज्या चिमुकल्यांच्या हातात\nउजळणी हवी होती, त्यांच्या हातात\n''उमेदवारांचे हॅण्डआउट'' दिसत होती.ज्या तरुणांच्या हातात अधुनिक\nतंञज्ञान हवे होते आणि स्वयंपूर्ण शिक्षण हवे होते, त्या तरुणांच्या हातात\nआणि डोक्यात राजकीय पक्षांच्या टोप्या,झेंडे दिसत\nहोते.जी माय भाकरी थापत होती तिच्या गळ्यात अलंकारा एवजी पक्षाच्या निशाणीची माळ दिसत\nहोती . ''............... या निशाणीवरच बटन दाबा'' हे बिंबवण्यात उमेदवाराबरोबर कार्यकर्ते व्यस्त होते.\nज्यांनी उमेदवाराकडे विज, पाणी, रस्ते,शीक्षण\nइ सुविधा मागायच्या सोडून ते त्याच कुटट् अंधारात\nपैशाची मागणी करत होते,\nआणि ''हो नक्की उद्याच पाठवून देतो फक्त लक्ष असु\nद्या''''अशी मान डोलवून उमेदवार आपले मत पक्के करून पुढे सरकत\nहोते.ज्या युवकांच्या तोंडात राष्ट्रगीताची गरज होती त्यांच्या तोंडातून राजकीय पक्षांच्या घोषणा अव्याहत\nपणे बाहेर पडत होत्या. तांड्यावरच्या त्या अंधारात अंधारात मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात उमेदवार,कार्यकर्ते मत माघत फिरत होते. माय\nमाऊली चिमणीच्या उजेडात भाकरी थापत बसलि होती.\nएका उमेदवाराचा प्रसिद्धी प्रमुख(PRO) म्हणुन घेण्यात माझा मलाच संकोच वाटत होता.\nउमेदवारासह गाड्यांचा ताफा परत फीरला, गाड्यांच्या उजेडात\nआम्ही त्या घनदाट जंगलात तांड्यापासुन कशीबशी वाट काढली होती. मात्र ते तांडेकरी जगत असलेल्या रोजच्या स्थितीतून कशी वाट काढतील त्यांना याची गरज वाटत\n असंख्य विचार मनाभोवती फिरत होते.\nनिरागस तांडेकरी मात्र रोज रोज त्याच नेहमीच्या दिनचर्ये\nप्रमाणे जगत होते,त्यांना बाहेरच्या जगाचा मागमुसही नव्हता.\nलोकशाहीत वाढणार्या त्या तांड्याच जणु काही जगच वेगळ\nहक्कांची जाणीवही त्यांना नव्हती.त्यांच्या याच अजाणते पणाचा फायदा गेली कित्येक वर्षे हे\nघाट उतरत असताना राज्य सरकारची एक पाटी दिसली ''जंगली श्वापदांचा वावर,''कृपया सावध\nराहा'' तांडेकर्यांच तिथल्या चिमुकल्यांच अप्रुप वाटल.\nत्या दिवशीची बातमी न लिहिताच\nमी विचारात पडलो. गेली 54 वर्षे महाराष्ट्रात असे अनेक\nतांडे विकास उदयाच्या प्रतिक्षेत असतील. या मतदानानंतर\nतरी पालटेल का ही तांड्यावरच्या प्रचाराची गोष्ट \nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ८:३६ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगेल्या काही वर्षापासून आपला मराठवाडा दुष्काळी सावटात जगत आहे. यंदा नाही पण पुढल्या वर्षी तरी निसर्ग आपल्यावर 'किरपा करील' ह्या आशेने बळीराजा तू चातका प्रमाणे अच्छे दिनाची वाट पाहतो आहे… आज २०१५ उजाडले तरी तुझ्या आत्महत्त्या थांबतील असा समाधानकारक पाउस पडला नाही. परिणामी आत्म्हत्त्यांचा डोंगर अधिकाधिक उंच होत आहे म्हणूनच आज तुला अनवधानाने पत्र लिहितो आहे.\nबळीराजा,सकाळी उठल्या नंतर शहरातला प्रत्येक व्यक्ती आधी दार उघडून पेपर हातात घेतो. चहाचा एक एक घोट रिचवत तो बातम्या वाचू लागतो,\nमराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर जाहीर करा-विरोधकांची मागणी,\nआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत,\nबीड जिल्ह्यात ३ शेतकर्यानि मृत्यूला कवटाळले,\nकापसाला योग्य हमीभाव द्यावा शेतकरी संघटनेची मागणी.\nमराठवाड्यात चारा छावण्यांचे राजकारण............................................\nहे आणि असे कित्तेक मथळे तो वाचतो, मनाला वाईट वाटत, काही काळ हळहळतो ,शोक व्यक्त करतो तितक्यात चहा संपतो आणि तो पेपरची उघडलेली घडी बंद करून निघून जातो. हा त्याचा रोजचाच दिनक्रम आणि हो बळीराजा, हा त्याचाच नाही तर इथले राजकारणी,लेखक,कामगार,शासकीय अधिकारी -कर्मचारी, खत विक्रेते, आणि इथल्या धडधाकट तरुणांचाही असाच दिनक्रम.बळीराजा तू तिकडे जीवाच रान कर ओढ ताण करून शेती पिकव आम्हाला धान्य पुरव, आम्हाला परवडेल त्या भावात आम्ही धान्य घेऊ,मिळालेला गहू आई निवडून आणेल आम्ही त्या भाकऱ्या मज्जा मारत खाऊ. यामागचे कष्ट आम्हाला काय कळणारतुला तुझा खर्च मिळाला काय आणि हमीभाव नाही काय ,कितीही आत्महत्त्या झाल्या आम्हाला कसलच सोयर सुतक नाही.हे आजच वास्तव.\nएखाद्या खेड्यात एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्त्या केली कि मग तिथला स्थानिक प्रतिनिधी वृत्तपत्र कार्यालयात बातमी पाठ्वतो,कार्यालयात संपादक ती बातमी रंगवून लावतो दुसर्या दिवशी सगळ जग ते वाचत आणि नंतर ते वृत्तपत्र रद्दीत जमा होत. गावचा तलाठी पंचनामा करतो काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या घरी लाख दोन लाख रुपये येउन पडता. राजकारण्यांना पुळका येतो तेही काहीशी मदत करून जगभर मदतीचे फोटो उधळून likes मिळवतात. नंतर त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. आजच्या या परिस्थितीला सरकारची इच्छाशक्ती कारणीभूत आहे, विर्रोधकांच आर्थकारण, तरुणांचा निष्काळजीपणा(आम्हाला सगळ आयत मिळतंय म्हणून),अधिकार्यांचा हुजुरेगीरीपणा,तुम्ही आम्ही सगळेच कारणीभूत आहोत.\nबळीराजा, अस हे तुझ जगण्यातल वास्तव. मराठवाड्याच हे वास्तव तर आता अंगवळनीच पडलय, मराठवाड्याची जलधारा नाथसागरात पाण्याचा अभाव आहेच त्यात पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. कालच गावच्या आठवडी बाजारात गेलो होतो. चारा नसल्यामुळे पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली गुर तू डोळ्यावर कातडी ओढून कमी भावात नाईलाजाने खाटकाच्या स्वाधीन करत होतास, हुंदके देत देत बैलाचा कासरा खाटिकाच्या हाती सोपवत होता. जानेवारीतच हि परिस्थी तर पुढे काय हा आजचाच प्रश्न नव्हे हा मराठवाड्याला पडलेला कायमचाच प्रश्न आहे.\nबळीराजा यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र कोणीच काढत नाही. पण तू खचून जाऊ नकोस, निसर्ग नक्कीच तुझ्याबरोबर आहे. मराठवाडा नक्कीच दुष्काळ मुक्त होईल. आवघ्या जगाचा पोशिंदा तू लाख वादळे आली,लाख दुष्काळ आली तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहणारा आहेस लक्षात ठेव.\nबळीराजा, हे पत्र वाचत असलेला माझा प्रत्येक मित्र तुझ्या सोबत आहे . आम्ही तरुण वर्ग नक्कीच पेट्रोल, वीज, पाण्याची बचत करू. झाडे लावू. सृष्टीचक्र पूर्ववत होण्यासाठी हातभार लावू झालच तर व्यापार्यांपेक्षा थेट तुझ्याकडूनच धान्य , भाजीपाला विकत घेऊ.\nपण मायबापा तू आत्महत्त्या करू नकोस……. \nतुला नेहमीच त्रास देणारा\nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ८:३३ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १४ मार्च, २०१४\nभय्या केजरी‘वॉल’ गिरती क्यु नहीगिरेगी कैसे अंबुजा सिमेंट से जो बनी है\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी मुंबई दौ-यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी नरिमन पॉइंट इथं फंड मॅनेजर आणि स्टॉक ब्रोकर्सशी चर्चा केली. तेव्हा, अंबुजा सिमेंटचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंघवी यांनी त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले होते. पंतप्रधानपदासाठी तुम्ही भाजप नेते नरेंद्र मोदींना निवडाल, की बसप नेत्या मायावतींना पसंती द्याल, असा मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, आधी काहीच न बोलणा-या केजरींनी शेवटी मोदींचं नाव घेतल्याचं समजतं.\nलोकसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असं मत केजरीवाल यांनी गुंतवणूकदारांशी चर्चेदरम्यान व्यक्त केलं. त्याचाच आधार घेऊन, अशा परिस्थितीत देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला कौल द्याल, अशी विचारणा अनिल सिंघवींनी केली आणि केजरी काहीसे गोंधळले. मायावती की मोदी हे दोन पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला थेट उत्तर देण्यास त्यांनी बरीच टाळाटाळ केली. या दोघांपैकी कुणालाच निवडणार नाही, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं. पण नंतर त्यांनी मोदींना झुकतं माप दिल्याचं सिंघवी म्हणाले.\nलोकसभा त्रिशंकू आहे, पण पंतप्रधान तर निवडावाच लागणार आहे, अशा परिस्थितीत काय करणार, या प्रश्नावर केजरीवाल यांनी आपलं मत मोदींच्या पारड्यात टाकल्याची माहिती अनिल सिंघवी यांनी दिली. माझ्यावर उद्या बंदूक रोखली गेली, तरच मी मोदींना निवडेन, असा पवित्रा केजरींनी घेतला. पण नंतर, अगदीच नाइलाज असल्यास आपण मोदींचा पर्याय निवडू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. या निवडीचं कुठलंही कारण त्यांनी दिलं नाही.\nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ४:३८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २८ जानेवारी, २०१४\nजगात सिनेसृष्टीतील विशेषतः हॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार म्हणून ऑस्करला अनन्यसाधारण महत्व आहे. आगदी गल्लीबोळातही ऑस्कर ला गेलेल्या चित्रपटांची चर्चा रंगत असते. मात्र ऑस्कर पुरस्कार नेमकं काय आहेहा पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे का आणि कशासाठी दिला जातो हा पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे का आणि कशासाठी दिला जातो याची माहिती फार कमी लोकाना आहे. याविषयी आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.\nअमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अन्ड सायन्स या संस्थेतर्फे हा ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. लुईस बी. मेयर यांनी या संस्थेची स्थापना केली सोबतच ऑस्कर पुरस्कारांचीहि सुरवात केली. पहिला ऑस्कर पुरस्कार ६मे १९२९ रोजी प्रदान करण्यात आला.\n-::::ऑस्कर या पुरस्कारांचे काही नियम खालील प्रमाणे::::-\n****ओस्कर च्या नामांकनासाठी पाठवला जाणारा सिनेमा मागील वर्षात अर्थातच १ जानेवारी आणि ३१ डिसेंबर या दरम्यान प्रदर्शित झालेला असेल तरच तो पुरस्कारासाठी ग्राह्य धरला जातो.\n****सिनेमा हा कमीत कमी ४० मिनिट किवा त्या पेक्षा अधिक वेळाचा असावा,४० मिनिटा खालील सिनेमा,माहितीपट ग्राह्य धरला जात नाही.\n****सिनेमांची प्रिंट ३५. एमएम आणि ७०. एमएम ची असावी. तसेच पूर्वी २४ फ्रेम/सेकंद किवा ४८फ्रेम/सेकंद असे सिनेमे या नामांकनासाठी पात्र होई कालांतराने या नियमात अमुलाग्र बदल करण्यात आले.\n****प्रोग्रेसिव्ह स्कॅन डिजिटल सिनेमा या मापक यंत्रणेनुसार याचे रीझोलुशन १२८०बाय७२० इतके असावे…\n****चित्रपट निर्मात्याने दिलेल्या तारखेपर्यंत सर्व नियमांची पूर्तता करून चित्रपट ऑनलाईंन पद्धतीने अकादमीकडे पाठवावा….\nऑस्कर पुरस्कारासाठी विविध विभागासाठी नामांकन संस्थेकडे दाखल झालेले असतात. संस्थेचे सहा हजार सदस्य संख्या आहे. या सहा हजार सदस्यीय समितीचे पुरस्कार निवडीसाठी मतदान घेतले जाते. हे सदस्य दरवर्षी ऑस्करचे आकर्षक सुवर्ण चषक देण्यासाठी यातील पुरस्कर्ते निष्कर्षाच्या आधारे निवडतात,\n-::::ऑस्कर पुरस्काराचे स्मृतिचिन्ह ::::-\nऑस्कर चषकाचे स्वरूप म्हणजे तो एक लहान पुतळा असतो. हे स्मृतिचिन्ह ब्रिटानिया धात्तू ,तांबे ,निकेल ,चांदी आणि २४ कॅरेट सोने अशा पंचधातुनी बनवण्यात येतो. या पुतळ्याची उंची १३(१/२)इंच वजन ८(१/२)पाउंड इतके असते. असे ५० स्मृतीचिन्ह बनवण्यासाठी जवळपास ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागतो. पंचधातुनी बनवण्यात येणारा हा धातू अतिशय प्रतिष्टेचा समजला जातो.\n-::::ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत किती व कोणत्या विभागा नुसार दिले जातात विभाग पुढील प्रमाणे ::::-\nउत्कृष्ट अभिनेता मुख्य भूमिका 1928 पासून\nउत्कृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका 1936 पासून\nउत्कृष्ट अभिनेत्री मुख्य भूमिका 1928 पासून\nउत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिका 1936पासून\nउत्कृष्ट अनिमेटेड सिनेमा 2001पासून\nउत्कृष्ट अनिमेटेड शोर्ट फिल्म 1931पासून\nउत्कृष्ट सिनेमेटोग्रफि 1928 पासून\nउत्कृष्ट वेशभूषाकार 1948 पासून\nउत्कृष्ट दिग्दर्शक 1928 पासून\nउत्कृष्ट डॉकुमेंट्री 1943 पासून\nउत्कृष्ट सिनेमा संपादन १९३४ पासून\nउत्कृष्ट परकीय भाषा सिनेमा 1947 पासून\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जेनिंग्ज तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पहिले ऑस्कर जेनेट गेनर या अभिनेत्रीस मिळाला.\nप्रथम विशेष पुरस्कार वार्नर ब्रदर्स याला जॉझ सिंगर यास चित्रपट निर्मितीसाठी देण्यात आला. तर चार्ल्स चप्लिन यांना दि . सर्कस चित्रपटाच्या निर्मिती,लेखक,अभिनेते यासाठी देण्यात आला.\nप्रथमच मराठी वेशभूषाकार भानू अथ्थया यांना इ.स १९८२ मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी ऑस्कर मिळाला होता.\nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ३:४५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३\nशेवटी सचिनही माणूसच आहे\nडिसेंबर २०१२ला सचिन तेंडुलकरने एक दिवसीयक्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हा दिवसतब्बल २२ वर्षं आणि ९१ दिवसांनंतर आला. या प्रदीर्घकाळात हा विक्रमादित्य ४६३ सामने, १८,४२३ धावा, ४९ शतकं, ९६अर्धशतकं, एकदिवसीय सामन्यातीलएकमेव द्विशतक, असे अनेक विक्रम काळाच्या पडद्यावर रेखाटूनगेलाय. सर डॉन ब्रॅडमन ज्याचे प्रशंसक होते,क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात ज्याला देव मानलं जातं,ज्याची विकेट मिळवणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्नंअसतं आणि ज्याच्या काळाचे साक्षीदारअसल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे,त्याची निवृत्ती मात्रआपल्याला म्हणावी तेवढी सलली नाही.माध्यमांचा लाडका असलेल्या सचिनबद्दल केवळ दखलघेण्यापलीकडेमाध्यमांनी कसलाही गाजावाजा केला नाही.त्याच्या संघ सहका-यांनाही त्याचा हा निर्णयधक्कादायक वाटला नाही.त्याच्या चाहत्यांनीही त्याला परत येण्याचंआवाहन केलं नाही. कुठे रडण्याचा आवाजआला नाही की उसासे टाकले गेलेनाहीत. ऐकू आले ते फक्त सुटकेचे, समाधानाचे\nनिःश्वाजस आणि एक कुजबूज, की सचिनचा निर्णययोग्यच आहे पण वेळ चुकली. असं का व्हावं२०११ साली भारताने विश्वं कप जिंकल्यानंतरच\nसचिनच्या निवृत्तीची चर्चा सुरूझाली होती. कारण त्यानंतरचत्याच्या खेळातला डौल कमी होत चालला होता. त्यानेकधी निवृत्ती घ्यावी,का घ्यावी, का न घ्यावी असे सल्ले देणं सुरुझालं होतं. सचिनवर आपण पराकोटीचं प्रेम केलंय हेकबूल करायला कोणालाच संकोच वाटणार नाही.आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर त्यानेगेली तेवीस वर्षंआपल्याला आणि आपल्या देशाला एक आदर मिळवून दिला,हेही कोणी नाकारणार नाही.तो ज्या काळात खेळायला आला त्या काळापासून आजपर्यंतया देशाच्या क्रिकेटमधील प्रत्येकमहत्त्वाच्या घटनेला सचिनचा संदर्भ आहे. ‘टाइम’ साप्ताहिकानेयाचा एका लेखात अचूक उल्लेख केलाय.काय म्हटलंय त्यात‘ज्या वेळी या ग्रहावरील प्रत्येकव्यक्तीवर काळ आपला प्रभाव गाजवतहोता त्या वेळी त्याने फक्त एकाच माणसाचा अपवादकेला. सचिनसमोर काळही जणू गोठला होता.आपल्याला चॅम्पियन्स मिळालेत, लीजंड्स मिळालेत-मिळतीलही, पण आपल्याला दुसरा सचिनमिळाला नाही, आणि कधीचमिळणारही नाही.ज्या वेळी सचिनपाकिस्तानला आपला पहिला सामना खेळायला गेला त्यावेळी शुमाकरहे नाव फॉर्म्युला-वन रेसशी जुळायचंबाकी होतं. लान्स आर्मस्ट्रॉंग अजून टूरडी फ्रान्सवर गेला नव्हता. पीटसॅम्प्रासने अद्याप एकही ग्रॅन्ड स्लॅम जिंकलेलंनव्हतं. ज्या वेळी सचिन ‘सचिन’ बनतहोता त्या वेळी जगाने रॉजर फेडररचंनावही ऐकलं नव्हतं.लिओनेल मेस्सी अद्याप रांगत होता. उसेन बोल्टजमैकाच्या गल्लीबोळांतून पळणारा एक मुलगा होता.बर्लिनची भिंतपडलेली नव्हती. रशियाचे तुकडे झालेनव्हते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थशास्त्रबदलायचं अजून बाकी होतं.’‘टाइम’चा हा लेख समस्त भारतीयांची मानअभिमानाने ताठ व्हावी असाच आहे, पणत्याची वेळ चुकली. कारण मुळातसचिनचीच वेळ चुकली. त्याचवेळी ‘टाइम’लाही सांगावंसं वाटतं,की भारतीयजनता आता पूर्वीसारखी राहिली नाही.मायकेल शुमाकर यशस्वी होऊन निवृत्त झाला,पुन्हा परतला आणि अपयशी ठरून त्याला जावं लागलं.पीट सॅम्प्रासने योग्य वेळ साधतनिवृत्ती पत्करली. पण, सचिनने यातूनधडा घेतला नाही. त्यामुळेच तो निवृत्त झाल्यावरत्याच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप त्याच्या असंख्यचाहत्यांनी त्याला दिला नाही, हे कटू सत्यआहे.माजी फिरकी गोलंदाजइरापल्ली प्रसन्ना म्हणतात,‘सचिनच्या निवृत्तीने आता निवड मंडळाला हायसं वाटलंअसणार. त्याला एकदिवसीय सामन्यातूनवगळण्याची वेळ त्यांच्यावरआली नाही म्हणून त्यांना आनंदझाला असेल. तो खेळतराहिला असता आणि अपयशी ठरला असता तर संघावरचंओझं झाला असता.’ प्रसन्ना हे सारंसचिनच्या निवृत्तीनंतर बोलले तो भाग वेगळा, पणत्यांची ही टीका विक्रमादित्यसचिनसाठी नक्कीच क्लेशदायकहोती. पण, निवड समितीचे प्रमुखसंदीप पाटील यांनी पाकिस्तानदौ-यासाठी संघनिवडीच्या वेळी सचिनला ‘त्याचंसंघातील स्थान त्याने गृहीत धरू नये’,असा जो सौम्य शब्दांत सूचक इशारा दिला तो लक्षात घेता स्पष्टचहोतं, की सचिनला संघातूनवगळण्याची तयारी निवडसमितीने केली होती.या गोष्टीची दबक्या आवाजातझालेली चर्चाही तितकीचखरी होती. त्यामुळेच क्रिकेटचा देवमानल्या गेलेल्या, आपल्या चौकार-षट्कारांमध्ये अचूक टायमिंग साधणा-या आणि संघातील एक विचारी, समंजस,मार्गदर्शक अशी प्रतिमा असलेल्या सचिनचंनिवृत्तीबाबतचं टायमिंग का चुकलं, हा प्रश्नत्याच्या चाहत्यांना, क्रिकेट रसिकांना पडणं स्वाभाविक आहे.सचिनने निवृत्तीसाठी इतका वेळका घेतला आणि अजूनही कसोटीतूननिवृत्ती का घेतली नाही याचंएक कारण त्याचे जाहिरातदार आहेत, असंही सांगितलंजातंय. सचिन आज सतरा कंपन्यांच्या ब्रँडेडवस्तूंच्या जाहिराती करतोय. हा सारा शंभरकोटींच्या घरातला व्यवहार आहे. सचिनचं करारसंपण्याआधीच निवृत्त होणं या कंपन्यांना परवडणारंनाही. त्यामुळे खेळतराहण्यासाठी त्यांचा अप्रत्यक्ष दबाव सचिनवर असूशकतो, असंही काहींचं म्हणणं आहे.अर्थात कोणाचं काहीही म्हणणं असो,सचिनने आपल्या सर्वांना जे आनंदाचे क्षण दिलेत तेकधीच विसरता येणार नाहीत. ‘निवृत्तझाल्यानंतर चाहत्यांच्या मिळालेल्या संदेशाने आपण भारावलोयत,त्याचा आनंद आहे आणि डोळ्यांतपाणीही आहे,’ असं सचिनने म्हटलंय.तो असंही म्हणाला,की ‘एकदिवसीय क्रिकेटमधीलहे जादुई क्षण कायम माझ्यासोबत राहतील.’ तेआपल्याही सोबत राहणार आहेत. पणतरीही त्याच्या जाण्याने आज डोळ्यांतपाणी मात्र तरारलंनाही हेही तेवढंच खरं. कारणया देवाची वेळ चुकली.शेवटी सचिनही माणूसच आहे\nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ११:०२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३\nसर्वप्रथम पोलिस हुतात्मा दिनानिमित्त सर्व शहीद पोलिस बांधवाना माझ्या परिवार,मित्रमंडळी आणि तमाम भारत देश बांधवांतर्फे विनम्र अभिवादन…\nकाल २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलिस हुतात्मा दिन.२१ ऑक्टोंबर १ ९ ५ ९ ला लद्दाख च्या सीमेवर भारत चीन युध्द झाले होते. तत्कालीन युद्धात आपल्या सी. आर. पि. एफ च्या १० जवानांनी चीनची आख्खी एक बटालियन रोखून धरली चीनी सैन्याला एक इंच सुद्धा आपल्या वतन काबीज करू दिला नाही.आणि त्या युद्धात लढणाऱ्या सर्व जवानांनी आपल्या साठी हौतात्म्य पत्करले… तेव्हापासून २1ऑक्टोंबर हा दिवस पोलिस शहीद दिवस संबोधला जातो.\nत्या सैनिकांनी शेवटपर्यंत झुंज दिली,रक्तरंजित युध्द लढले. दुर्दैवाने आज आपल्याला त्याच्या हौतात्म्याचा विसर पडलाआहे . काल वृत्तपत्रात,टीव्ही,फेसबुक इ. सामाजिक माध्यमांवर कुठेच मला पोलिस हुतात्मा दिवस असा उल्लेख आढळला नाही…\nएरव्ही तासनतास फेसबुकवर काही बाही फोटो शेअर करणारे अन च्याटिंग करणारे आपण युवक शहीद पोलिसांना ५ मिनिट देखील श्रद्धांजली वाहू शकलो नाहीएवढेच नव्हे तर समाजाचा आरसा,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आपण पत्रकारांनी देखील चार ओळींची बातमी देऊन शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहू शकलो नाही तथापि समाजाला देखील स्मरण करून दिले नाही…. पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसानिमित्त किवा पुत्रांच्या लग्नावर बेसुमार खर्च करणारे ,फलक छापणारे , हजारोंच्या जाहिराती देणाऱ्रे ,मोठमोठ्या सभा आयोजित कंरनारे आपले नेते,लोकप्रतिनिधी एक आर्धा तासाची जाहीर स्मरण सभा आयोजित करू शकले नाहीत…. याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये इतर पार्ट्या साजर्या केल्या जातात मग हुतात्मा दिनच का साजरा केला जाऊनायर नये\n२६/११ च्या हल्ल्यात अन आताच पुंडलिक माने यांनी वीरमरण पत्करले…… या वर्षात ५७६ पोलिस जवान कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले…… त्या सर्व जवानांच्या शहादतीची किंमत आपल्या सर्वांना कळणे खूप गरजेचे आहे…… काल औरंगाबाद आयुक्तालयात पोलिस हुतात्म्यांना मानवंदना दिली तेव्हाचा फोटो वरती टाकला आहे…\nशेवटी पुन्हा एकदा शहीद पोलिसांना मनापासून मानवंदना देतो…\nसांगायचं एवढच कि …………\nए मेरे वतन के लोगो,\nजरा आखो मे भरलो पाणी,\nजो शहीद हुवे है उनकी\nजरा याद करो कुर्बानी,\nजरा याद करो कुर्बानी…............……\nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे ११:२६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३\nकाहीतरी लिहायचे असे खूप दिवसापासून वाटतेय पण काय कोणत्या विषयावर भाष्य करायचे हे तर खूप अवघड काम आहे असे आता वाटू लागले. कारण लेखणी बोलली कि तिच्यावर आक्षेप घ्यायला, तिचे तोंड दाबायला काही लोकं उभे असतात.\nअसो, पण सुरवात काय आणि कोणत्या विषयावर करावी असे झाले आहे. अस प्रत्येकाच होत का माहिती नाही, पण मला अस वाटू लागलं कि प्रत्येक क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या व्यक्तीचं असाच होत असणार, नाही समजल तर मग समजावून घेऊ. मी जेव्हा एखादी कथा, चारोळी, कविता, लेख असे जेव्हा वाचतो तेव्हा मला नेहमी वाटत कि मी जर हे लिहील असत तर,\nजेव्हा एखादा चित्रपट पाहतो तेव्हा नेहमी वाटत जर आपण हा चित्रपट लिहिला असता तर. यातली गाणी लिहिली असती तर, काय राव तुम्ही म्हणाल याला वेड-बीड लागलं कि काय. पण खर सांगू मित्रानो,आता मला पत्रकारितेला प्रवेश घेतल्यापासून लिहायलाच खूप आवडतय…. मी हल्ली खूप शांत शांत असतो. कारण आता मला निरीक्षण करायची सवय लागलीय… आणि केलेलं तेच निरीक्षण कागदावर उतरवण्यासाठी मला माझी लेखणीच फक्त साथ देते फक्त आणि फक्त लेखणीच………………… \nद्वारा पोस्ट केलेले मयुरोदय येथे २:४० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''\nप्रिय ..., मा बळीराजा(मराठवाडा) ...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nऑसम इंक. थीम. fpm द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sataratoday.tmnnews.com/news/7826_The-UPA-government-wanted-to-name-the-names-of-the-terrorists-in-the-list-of-terrorists?", "date_download": "2018-04-23T09:10:09Z", "digest": "sha1:RNAFX34D7AFSIXQKJ36AB5X7RXAPORBE", "length": 10751, "nlines": 61, "source_domain": "sataratoday.tmnnews.com", "title": "UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं? - Satara Today", "raw_content": "\nUPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं\nUPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं\nनवी दिल्ली : यूपीए सरकारला आपल्या शेवटच्याच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करायचं होते, असे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, भागवत यांना हिंदू दहशतवादाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी यूपीए सरकारमधील मंत्री प्रयत्न करत होते.\nपावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समोर आलेल्या या खळबळजनक वृत्तामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअजमेर व मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारनं हिंदू दहशतवाद असा मुद्दा उपस्थित केला होता. या अंतर्गत यूपीए सरकारला मोहन भागवत यांना जाळ्यात अडकवायचे होते आणि यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेतील बड्या अधिकार्‍यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.\nटाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, तपास अधिकारी व काही वरिष्ठ अधिकारी अजमेर व अन्य काही बॉम्बस्फोटांमधील तथाकथित भूमिकांसाठी मोहन भागवत यांची चौकशी करणार होते. हे अधिकारी यूपीए सरकारमधील मंत्र्यांच्या आदेशावरुन काम करत होते. चौकशीसाठी या अधिकारी मोहन भागवत यांना ताब्यात घेणार होते, अशी माहिती समोर आली आहे.\nफेब्रुवारी 2014 मध्ये कारवां मॅगझिनमध्ये संशयित दहशतवादी स्वामी असिमानंद यांची मुलाखत छापण्यात आली होती. यात मोहन भागवत यांना कथित स्वरुपात हल्ल्यासाठी प्रमुख प्रेरणा असे म्हणण्यात आले होते. यानंतर यूपीए सरकारनं राष्ट्रीय तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली, मात्र तपास यंत्रणांचे प्रमुख शरद कुमार यांनी यास नकार दिला. मुलाखतीच्या या टेपचा ते फॉरेन्सिक तपास करणार होते, मात्र जेव्हा ही बाब पुढे वाढली नाही तेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हे प्रकरण बंद केले.\nकाश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला.\nपायात गोळी लागलेली असतानाही लढत राहिला CRPF जवान, 8 किमी चालत स्वत: रुग्णालयात पोहोचला\nकेंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु असताना जवानाच्या पायाला गोळी लागली होती. मात्र जवानाने हार न मानता दोन हात केले आणि विशेष म्हणजे स्वत: आठ किमी अंतर चालत रुग्णालयात पोहोचला. सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानाचा फोटो शेअर केला आहे.\nअभिनेत्री श्रीदेवी काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी हळहळली\nसौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nभारतीय सीमारेषेजवळ पाकचे हेलिकॉप्‍टर\nपाकिस्‍तानकडून भारतीय नियंत्रण रेषेजवळ होणार्‍या कुरपतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारीही पाकिस्‍तानकडून जम्‍मू काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ पाकिस्‍तानचे एमआय १७ हे हेलिकॉप्‍टर आल्याची घटना बुधवारी घडली.\n लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी\nभारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T09:32:08Z", "digest": "sha1:M5SB6BJ7EYOHNSSUH2S4ZEE6CRDWF2GX", "length": 7518, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome मनोरंजन ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nमुंबई :- हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलेल्या आलिशान आणि महागड्या गाड्या आपल्याकडील बॉलिवूड कलाकारांकडे दिसणे ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. राजकारणी, उद्योगपती आणि धनाढ्य व्यक्तींप्रमाणेच बॉलिवूडच्या कलाकारांकडे या गाड्या सर्रास पाहायला मिळतात. हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटांत पाहिलेल्या अशा गाड्या घेणे ही फक्त बॉलिवूड कलाकारांची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार व दिग्दर्शकांकडेही आता महागड्या आणि आलिशान गाड्या दिसू लागल्या आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील हिनेही नुकतीच तिची पहिली गाडी घेतली आहे.\nरसिकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा चाहता वर्गही दिवसागणिक वाढतोय. त्यामुळेच रसिका इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. तसेच, तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टीही शेअर करते. आपली पहिलीच गाडी घेण्याचा आनंदही तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला. रसिकाने ‘ह्युंडाई क्रेटा’ ही पांढऱ्या रंगाची गाडी घेतली. नव्या गाडीसोबतचे फोटो शेअर करत तिने लिहिलं की, ‘अरे आली रे…. माझी पहिली नवीन गाडी….’ या पोस्टमध्ये रसिकाने तिच्या वडिलांचेही आभार मानले आहेत.\nTags: PCLIVE7.COMकारनामामाझ्या नवर्याची बायकोशनाया\nशाकाहारी असेल तरच सुवर्णपदक मिळणार; पुणे विद्यापीठाचा ‘अजब फतवा’\n आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nपिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2014/09/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T09:35:16Z", "digest": "sha1:ELYO4DPJNKPZUHVGEU42O6ZD2BU3T5FV", "length": 7632, "nlines": 101, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: \"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवारी यांचे आवाहन -पाच ऑक्टोबरला निर्धार मेळावा -दिव्यमराठी", "raw_content": "\n\"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवारी यांचे आवाहन -पाच ऑक्टोबरला निर्धार मेळावा -दिव्यमराठी\n\"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवारी यांचे आवाहन -पाच ऑक्टोबरला निर्धार मेळावा -दिव्यमराठी\n***शेतकरीसर्वसामान्यांच्या मागण्यासंदर्भात सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी संपर्क करून येत्या पाच आॅक्टोबरला निर्धार मेळाव्यात घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे. ***\nजोपक्ष संपूर्ण पीक कर्जमाफी, कापूस -सोयाबीनला हमीभाव टोलमुक्त महाराष्ट्र देईल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन विदर्भ जनांदोलन समितीचे अध्यक्षकिशोर तिवारी यांनी केले आहे.\nशेतकरी आदिवासी आर्थिक संकटाला तोंड देत असताना राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत अाहेत. केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 'महायुतीने' सात-बारा कोरा करण्याचे, लागवड कर्ज अधिक ५० टक्के नफा कापूस, सोयाबीन धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोलमुक्त' करण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचा 'घटस्फोट' झामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात बदल झाला आहे. मात्र, उपरोक्त मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईल काय, हा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीत जे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या सोडवण्यास प्राधान्य देतील, त्यांनाच विदर्भाच्या शेतकरी, आदिवासी तसेच नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड सर्व गरिबांना अंत्योदय अन्नसुरक्षा घरकुल, कोरडवाहू शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसांची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे, कापूस -सोयाबीन - धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव देणे, सर्व आदिवासींना तत्काळ खावटी देणे, दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप करणे, सर्व गरिबांना २०१३ च्या यादीनुसार मोफत वैद्यकीय सेवा सर्व सरकारी दवाखान्यांत जेनरिक औषधीचे दुकान, सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार देण्यात यावे यासह अनेक मागण्या जाहीरनाम्यात टाकण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांना साकडे घालणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे.\n\"मागण्या मान्य करेल त्यालाच करा मतदार -किशोर तिवार...\nराजकीय पक्षांना पडलाय शेतकऱ्यांच्या समस्यांचा विसर...\nनामदार डॉ. नितीन राऊत यांचा 'विदर्भाचा कळवला ' हे ...\nआदिवासींच्या खावटीच्या मोबदल्यात नामदार शिवाजीराव ...\nमहायुतीने शेतकर्‍यांना कर्जमाफीसह पिकांचा हमीभाव व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/442955", "date_download": "2018-04-23T09:41:21Z", "digest": "sha1:UOEIJXLQOUM764LEYOFKXL7CS2MFDG62", "length": 6335, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिपी विमानतळ धावपट्टी ‘फोर-सी’ पद्धतीने विकसित! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिपी विमानतळ धावपट्टी ‘फोर-सी’ पद्धतीने विकसित\nचिपी विमानतळ धावपट्टी ‘फोर-सी’ पद्धतीने विकसित\nकणकवली : सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासात महत्वपूर्ण ठरणारे चिपी विमानतळाची धावपट्टी फोर डी ऐवजी फोर सी पद्धतीनेच विकसीत केली जात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार नीतेश राणे यांना पत्राद्वारे दिली आहे. अधिवेशनात औचित्याच्या मुद्दय़ावर श्री. राणे यांनी चिपी विमानतळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले.\nदेसाई यांनी म्हटले आहे, मोपा हे मोठे विमानतळ विकसीत होत असल्याने चिपी विमानतळाचा पुनर्भ्यास व आर्थिक क्षमतेचा विचार करून या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी कमी केली आहे. फोर डी ऐवजी सी पद्धतीने विमानतळ विकसीत करण्याबाबत नागरी विमान उड्डाण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आय. आर. बी. सिंधुदुर्ग विमानतळ प्रा. लि. कंपनीला विमानतळाची धावपट्टी फोर डी ऐवजी फोर सी पद्धतीने विकसीत करण्याचा आराखडा बदल सुचविण्यात आलेला आहे.\nमहाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ व आय. आर. बी. सिंधुदुर्ग यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार प्रथम फोर सी पद्धतीने विमानतळ विकसीत केले जाईल. पुढील विस्तार भविष्यातील व्यवसायावर अवलंबून राहील, असेही पत्रात नमूद केले आहे. या नियोजीत चिपी विमानतळावर सर्वसाधारण बी 737, ए 320, एटीआर 72, एटीआर 42 अशा प्रकारची विमाने उतरण्याची क्षमता असेल, असेही पत्रात नमूद केले आहे.\nआनंदवाडी बंदर प्रकल्प निधीच्या प्रतिक्षेत\nएसटीतील कलाकारांना वेगळय़ा सुविधा देण्याचा विचार\nनिधीच नसेल, तर बैठकांचा फार्स कशाला\nराज्यात ‘मुक्त शाळा’ सुरू करण्याच्या हालचाली\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2014/05/10/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9C-walk-the-walk-johnnie-walker/", "date_download": "2018-04-23T09:11:34Z", "digest": "sha1:MOW7FAW6XDBCAZHI7H5V25ZHPVJFDHJN", "length": 9451, "nlines": 168, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "कॉकटेल लाउंज : Walk The Walk – Johnnie Walker | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nबर्‍याच दिवसांपासून व्हिस्कीची नेमकी मजा काय असते, लुत्फ कसा घ्यावा असे लिहायचे मनात होते. पण त्या भावना नेमक्या शब्दात कशा पकडाव्या ह्याच्या विचारात होतो. परवा चेन्नै एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉपमध्ये वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या दारूच्या बाटल्या न्याहळता न्याहळता जॉनी वॉकरच्या सेक्शनला पोहोचलो तर तिथे टी.व्ही. स्क्रीनवर एक व्हिडीयो चालू होता. तो व्हिडीयो बघितला आणि मनातल्या भावना एकदम चित्ररुपात समोर आल्या.\nज्या ईन्टेंसिटीने त्या व्हिडीओमध्ये व्हिस्की म्हणजे काय हे समजावले आहे त्या ईन्टेंसिटीला तोड नाही. तीच ईन्टेंसिटी शब्दात नेमकी कशी मांडावी ह्या विवंचनेत असतानाच हा व्हिडीओ पाहयला मिळाला. लगेच युट्युबर शोध घेतला आणि तो शेअर केल्यावाचून राहवले नाही.\nव्हिस्कीत काय असते एवढे नेमके विशेष असा प्रश्न असलेल्यांनी नक्की पहावा असा व्हिडीओ…\n← कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे\nVoIP – म्हणजे काय रे भाऊ\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/main/page/about_g_d_madgulkar.php", "date_download": "2018-04-23T09:32:41Z", "digest": "sha1:27EJLDOFSPYW4CEBA5X35QOX3VULQ3PA", "length": 26470, "nlines": 123, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | G D Madgulkar | Gadima | ग. दि. माडगूळकर | गदिमा | मराठी गाणी | Gani | Geete | GeetRamayan", "raw_content": "\nतो राजहंस एक.. | ग. दि. माडगूळकर यांची ओळख | About Ga Di Madgulkar\nमहाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर\nगदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पाने सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, \"ज्योतीने तेजाची आरती\" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...\nगदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'माडगुळे' या गावात गेले.गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरवातीला 'ब्रम्हचारी','ब्रँडीची बाटली' सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या.भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली,लोकशाहीर रामजोशी(१९४७) चित्रपटापासून खर्‍या अर्थाने 'कथा,पटकथा,संवाद,गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले.मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.\nमराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे.त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले.प्राचीन मराठी काव्याला अर्वाचीन काळात गदिमांनी अधिक समृद्ध केले.संताकाव्यातील आंतरिक गेयगुण,पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांचा स्वाभाविक ठसका,लोकगीतांतील मनाला भिडणारा लयताल,शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध\nआशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून गदिमांची गीते निर्माण झाली.\nगदिमांच्या नुसत्या गीतांचा आढावा घ्यायचा झाला तर ...\n'गोरी गोरी पान','एका तळ्यात होती बदके पिले सुरेख','मामाच्या गावाला जाऊया' सारखी पार लहान मुलांच्या तोंडी असणार्‍या गींतापासून ते अगदी गणपतीत हक्काचे स्थान मिळवून असलेल्या 'नाच रे मोरा' या सारख्या अनेक बालगीतांचा समावेश होतो,चित्रपट गीते म्हटली तर 'एक धागा सुखाचा','जग हे बंदीशाळा','या चिमण्यांनो परत फिरा रे','राजहंस सांगतो','घन घन माला नभी दाटल्या','बुगडी माझी सांडली ग','फड सांभाळ तुर्‍याला आला','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','विठ्ठला तू वेडा कुंभार' यासारखी हजारो गीते गदिमांनी लिहिली.'माझा होशील का' सारखे गाणे तर अगदी दक्षिण भारता पर्यंत गाजले,सुप्रसिध्द अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गीत झाले होते' सारखे गाणे तर अगदी दक्षिण भारता पर्यंत गाजले,सुप्रसिध्द अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गीत झाले होते\nहिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला,व्ही.शांताराम यांचा 'दो आंखे बारह हाथ','नवरंग','गूंज ऊठी शहनाई','तूफान और दिया' हे चित्रपट गदिमांचेच.अगदी गुरुदत्त च्या 'प्यासा' ची मूळ कथा असो,राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चन चा 'ब्लॅक',मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती.हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे,सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमां बद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्या पेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडत कारण गदिमा म्हटंल की ते मला \"मॉं की गोदी मे\" सारख वाटत.अगदी गुरुदत्त च्या 'प्यासा' ची मूळ कथा असो,राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चन चा 'ब्लॅक',मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती.हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे,सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमां बद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्या पेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडत कारण गदिमा म्हटंल की ते मला \"मॉं की गोदी मे\" सारख वाटत\nमराठी साहित्यात गदिमांनी कवी,कथालेखक,कादंबरीकार,नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला,आरंभी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम केले.त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते.तिथेच असताना त्यांना वाचनाची,लेखनाची गोडी लागली.पुढे त्यांची स्वत:ची 'सुगंधी-वीणा','जोगिया','चार संगीतिका','गीतरामायण','काव्यकथा','चैत्रबन','गीतगोपाल','गीतसौभद्र' अशी काव्यनिर्मिती झाली.गदिमांच्या निधनानंतर अलिकडच्या काळात 'वैशाखी','पूरिया','अजून गदिमा','नाच रे मोरा' असे काव्य-चित्रपटगीत-बालगीत संग्रह संकलीत करण्यात आले आहेत.\nयाशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङमय प्रकारांतही त्यांनी लेखन केले.'लपलेले ओघ','बांधावरल्या बाभळी','कृष्णाची करंगळी','बोलका शंख','वेग आणि इतर कथा','थोरली पाती','तुपाचा नंदादीप','चंदनी उदबत्ती','भाताचे फूल','सोने आणि माती','तीन चित्रकथा','कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)','तीळ आणि तांदूळ' सारखे लघूकथा संग्रह,'वाटेवरल्या सावल्या','मंतरलेले दिवस' आत्मचरित्रपर लिखाण, 'दे टाळी ग घे टाळी','मिनी','शशांक मंजिरी','नाच रे मोरा' सारखे बालवाङमय,'तुलसी रामायण' (गद्य भाषांतर) व 'शब्दरंजन','अक्षर','धरती' सारख्या मासिकांचे संपादन,'आकाशाची फळे','ऊभे धागे आडवे धागे' सारख्या कादंबर्‍या,'युध्दाच्या सावल्या','परचक्र' सारखी नाटके. अशी जवळजवळ ३७ पुस्तके गदिमांच्या नावावर आहेत,प्रत्येक चित्रपटाची कथा ही कादंबरीच असते,गदिमांनी अशा १५७ पटकथा लिहील्या त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर २०० पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील\nगदिमांनी स्चातंत्रलढयातही भाग घेतला होता,खूप मोठया कुटुंबाची जवाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र यामुळे गदिमांनी स्वातंत्र लढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने,पोवाडे लिहून जनजागृती केली,सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.\nगदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत,शरदरावजी पवार असोत किंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे.स.गो.बर्वे,सुशीलकुमार शिंदे,राम नाईक,मनोहर जोशीं सर्वच त्यांच्या परिवाराचेच सदस्य होते.\nगदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मीकी' ही पदवी ज्याच्या मुळे प्राप्त झाली ते महाकाव्य गीतरामायण,'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत,कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले 'गीतगोपालही' गीतरामयणाच्या तोडीस तोड आहे.\nपुरस्काराच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची,गदिमांना भारत सरकारने 'पद्मश्री' (१९६९) हा किताब बहाल केला.ते 'संगीत नाटक अकादमी' व 'विष्णुदास भावे सुवर्णपदक' या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते.१९६९ ला ग्वाल्हेरला झालेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे' अध्यक्षपद,१९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे' ते अध्यक्ष होते.त्यांच्या अनेक चित्रपटांना कथा,पटकथा,संवाद,गीते लेखनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले,अनेक पुस्तकांना राज्य व क्रेंद्र शासनाचे पुरस्कार लाभले.\n१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह,इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते,अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.\n'मराठी माणसाच्या ह्रदयात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे'.\nसुमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/blog-post_9.html", "date_download": "2018-04-23T09:48:23Z", "digest": "sha1:TIBCJF4IAN2B7SCE7IZYKNYVVN4VZ3BV", "length": 28332, "nlines": 180, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बलात्कार्‍याशी दोस्ती करावी?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nएक गोष्ट मान्य करावीच लागेल, की भारतात कुठल्याही क्षेत्रातले जाणकार व विशेषज्ञ प्रचंड संख्येने आहेत. अर्थकारण, राजकारण असो किंवा समाजकारण वा सुरक्षेचा विषय असो, प्रत्येक बाबतीतले हजारो जाणकार भारतात पैशाला पासरी उपलब्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की त्यांच्या गुणवत्तेची या देशात कदर होत नाही. म्हणजे अर्थातच सरकारला वा सत्ताधार्‍यांना त्यांची पात्रता ओळखता आलेली नाही, असे वाटू शकेल. पण तेही खरे नाही. तुमची पात्रता इतरांनी ओळखून तुम्हाला तशी संधी देणे नंतरची गोष्ट असते. निदान तुम्हाला तरी आपल्यातली गुणवत्ता व पात्रता ओळखता यायला हवी ना तसे असते, तर राजकीय वक्ता प्रवक्ता होण्यासाठी रत्नाकर महाजन वा कुमार सप्तर्षी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर कशाला झाले असते तसे असते, तर राजकीय वक्ता प्रवक्ता होण्यासाठी रत्नाकर महाजन वा कुमार सप्तर्षी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर कशाला झाले असते पण आपल्यात ठासून भरलेली राज्यशास्त्राची पात्रता न ओळखताच ते डॉक्टर व्हायला गेले आणि उर्वरीत आयुष्यात राजकीय पोस्टमार्टेम करीत राहिलेत. बहूतेक क्षेत्रात हीच शोकांतिका दिसेल. म्हणूनच ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. अन्यथा जब्बार पटेल वा श्रीराम लागू अभिनेते कलावंत कशाला झाले असते पण आपल्यात ठासून भरलेली राज्यशास्त्राची पात्रता न ओळखताच ते डॉक्टर व्हायला गेले आणि उर्वरीत आयुष्यात राजकीय पोस्टमार्टेम करीत राहिलेत. बहूतेक क्षेत्रात हीच शोकांतिका दिसेल. म्हणूनच ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. अन्यथा जब्बार पटेल वा श्रीराम लागू अभिनेते कलावंत कशाला झाले असते कुमार केतकर संपादक होऊन खर्डेघाशी कशाला करीत बसले असते कुमार केतकर संपादक होऊन खर्डेघाशी कशाला करीत बसले असते त्यांच्या जागी मोदी, जेटली, पर्रीकर किंवा अन्थोनी असे लोक देशाची सत्तासुत्रे कशाला संभाळत बसले असते त्यांच्या जागी मोदी, जेटली, पर्रीकर किंवा अन्थोनी असे लोक देशाची सत्तासुत्रे कशाला संभाळत बसले असते कुणा गावातील वा गल्लीतील शरद पवार किंवा निलंगेकरांना निवडणूका लढवण्याची वेळ कशाला आली असती कुणा गावातील वा गल्लीतील शरद पवार किंवा निलंगेकरांना निवडणूका लढवण्याची वेळ कशाला आली असती कुणा अजित डोवाल किंवा व्ही. के. सिंग अशा लोकांना सुरक्षेचे खास प्रशिक्षण घेऊन देशाच्या सुरक्षेचा गोंधळ घालण्याची संधी कशाला मिळू शकली असती कुणा अजित डोवाल किंवा व्ही. के. सिंग अशा लोकांना सुरक्षेचे खास प्रशिक्षण घेऊन देशाच्या सुरक्षेचा गोंधळ घालण्याची संधी कशाला मिळू शकली असती सचिन तेंडुलकर वा विराट कोहलीला क्रिकेट तरी कशाला खेळावे लागले असते ना सचिन तेंडुलकर वा विराट कोहलीला क्रिकेट तरी कशाला खेळावे लागले असते ना मोक्याच्या जागी असे चुकणारे बसलेत आणि ज्यांच्यात खरी पात्रता आहे, ते चुकचुकत बाहेर बसलेत. ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका झालेली आहे.\nमुंबईवरचा हल्ला किंवा पठाणकोटचा हल्ला झाल्यावरच्या प्रतिक्रिया बघितल्या, मग याचे खुप वैषम्य वाटते. भारतात गुणांची काही किंमत नाही. गुणीजनांना असे कोपर्‍यात ठेवून भारताला प्रगती करणे कसे शक्य आहे दोनतीन दिवस वाहिन्यांवरील चर्चा आरोप-प्रत्यारोप ऐकले, त्याचा यापेक्षा अधिक काही अर्थ होऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी वा कुणा संपादक पत्रकाराकडे देशाच्या सुरक्षेची सुत्रे असती, तर पाकिस्तानला वा जिहादींना भारताकडे वाकडी नजरही करायची हिंमत झाली नसती, याची खात्री पटून जाते. कुठल्या परिस्थितीत काय करावे आणि ज्यांनी काही केले ते नेमके कसे चुकले, याचे तपशील आपल्या पत्रकार व जाणकारांकडे सापडू शकतात. परराष्ट्र धोरण कसे असावे आणि त्यात कधी ठामपणा व कुठे लवचिकता असावी, हे सरकारला कधीच कळत नाही. पण सोशल मीडियापासून वाहिन्यांपर्यंत सर्वांना नेमके ठाऊक असते. मात्र ते काम करायला आपणच पुढाकार करायची बुद्धी अशा गुणवंतांना कधीच होत नाही. खरे तर देशाचे सुरक्षा व परराष्ट्र धोरण ठरवायचा अधिकार सरकारकडून काढून घेतला पाहिजे. ते धोरण वाहिन्यांच्या चर्चेतून वा वादावादीतून ठरवले गेले पाहिजे. त्यात पाकिस्तान व अन्य देशातले माजी अधिकारी व नेत्यांना समाविष्ट करून ठरवावे. तो मसूदा आपल्याकडे सोपवला जाईपर्यंत सरकारने हातावर हात ठेवून बसावे. किती छान कारभार होऊ शकेल ना दोनतीन दिवस वाहिन्यांवरील चर्चा आरोप-प्रत्यारोप ऐकले, त्याचा यापेक्षा अधिक काही अर्थ होऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी वा कुणा संपादक पत्रकाराकडे देशाच्या सुरक्षेची सुत्रे असती, तर पाकिस्तानला वा जिहादींना भारताकडे वाकडी नजरही करायची हिंमत झाली नसती, याची खात्री पटून जाते. कुठल्या परिस्थितीत काय करावे आणि ज्यांनी काही केले ते नेमके कसे चुकले, याचे तपशील आपल्या पत्रकार व जाणकारांकडे सापडू शकतात. परराष्ट्र धोरण कसे असावे आणि त्यात कधी ठामपणा व कुठे लवचिकता असावी, हे सरकारला कधीच कळत नाही. पण सोशल मीडियापासून वाहिन्यांपर्यंत सर्वांना नेमके ठाऊक असते. मात्र ते काम करायला आपणच पुढाकार करायची बुद्धी अशा गुणवंतांना कधीच होत नाही. खरे तर देशाचे सुरक्षा व परराष्ट्र धोरण ठरवायचा अधिकार सरकारकडून काढून घेतला पाहिजे. ते धोरण वाहिन्यांच्या चर्चेतून वा वादावादीतून ठरवले गेले पाहिजे. त्यात पाकिस्तान व अन्य देशातले माजी अधिकारी व नेत्यांना समाविष्ट करून ठरवावे. तो मसूदा आपल्याकडे सोपवला जाईपर्यंत सरकारने हातावर हात ठेवून बसावे. किती छान कारभार होऊ शकेल ना बंदुकीची एक गोळी सुद्धा झाडावी लागणार नाही, की सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी अब्जावधी रुपयेही खर्चावे लागणार नाहीत. देशात कुठे बलात्कार होणार नाहीत की कुठल्याही कोर्टात कुणाला न्यायासाठी दाद मागावी लागणार नाही. सामान्य भारतीय नागरिकांनी याचा विचार आता गंभीरपणे करण्याची गरज आहे. जाणते, प्रशिक्षित आणि राजकीय नेत्यांना नारळ देवून माध्यमातून झळकणार्‍यांना देशाची सुत्रे सोपवावीत.\nइतके झाले, मग आपल्याला निश्चींत मनाने झोपता येईल. म्हणजे डोळे झाकून प्रश्न सुटले असे समजायला हरकत नाही. सैनिक व सेनाच शिल्लक उरणार नाही, तर सैनिकांची हत्या होऊन त्यांना शहीद व्हायची तरी वेळ कशाला येईल भारताने शेजारी व शत्रू देशांचा विश्वास संपादन केला आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, म्हणजे भारताला सुरक्षा दलांची गरजही उरणार नाही. आक्रमणाचीच शक्यता राहाणार नाही, मग लढाईचा तरी प्रसंग कशाल येईल ना भारताने शेजारी व शत्रू देशांचा विश्वास संपादन केला आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, म्हणजे भारताला सुरक्षा दलांची गरजही उरणार नाही. आक्रमणाचीच शक्यता राहाणार नाही, मग लढाईचा तरी प्रसंग कशाल येईल ना पर्यायाने सैन्य शस्त्रास्त्रे वा दारूगोळाही अनावश्यक खर्च होऊन जाईल. बरखा दत्त, मणिशंकर अय्यर, दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी त्यासाठी किती अखंड झटत असतात ना पर्यायाने सैन्य शस्त्रास्त्रे वा दारूगोळाही अनावश्यक खर्च होऊन जाईल. बरखा दत्त, मणिशंकर अय्यर, दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी त्यासाठी किती अखंड झटत असतात ना त्यालाच नेहरूवाद म्हणतात. जिथे युद्ध शत्रूत्व यांना स्थान नसते. सैन्याची गरज नसते. पाकने आपल्याशी क्रिकेट खेळावे आणि भारतात पाकिस्तानी गायकांनी मैफ़ली रंगवाव्यात. अधूनमधून कंटाळा आल्यावर तिथल्या जिहादींनी इथे काही माणसे घातपात करून मारावीत. आपल्याकडे मरायला माणसांची संख्या कुठे कमी आहे त्यालाच नेहरूवाद म्हणतात. जिथे युद्ध शत्रूत्व यांना स्थान नसते. सैन्याची गरज नसते. पाकने आपल्याशी क्रिकेट खेळावे आणि भारतात पाकिस्तानी गायकांनी मैफ़ली रंगवाव्यात. अधूनमधून कंटाळा आल्यावर तिथल्या जिहादींनी इथे काही माणसे घातपात करून मारावीत. आपल्याकडे मरायला माणसांची संख्या कुठे कमी आहे वर्षभरात एकदिड लाख माणसे अशी मारली गेली, म्हणून किती फ़रक पडतो वर्षभरात एकदिड लाख माणसे अशी मारली गेली, म्हणून किती फ़रक पडतो सव्वाशे कोटी माणसे टिपून मारायला जिहादींच्या कित्येक पिढ्या खर्ची पडतील. तरीही भारताची लोकसंख्या संपवणे त्यांना शक्य होणार नाही. मारून संपणार नाही, इतकी प्रचंड लोकसंख्या हे आपले सर्वात मोठे हत्यार आहे आणि तेच तर नेहरूवादी पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपल्याला नसती हिंसेची व लढाईची खुमखुमी असते, म्हणून हा सैन्य व सुरक्षा खर्चाचा बोजा उचलावा लागतो. नेहरूंच्या एकट्याच्या हाती असते तर त्यांनी तेव्हाच भारतीय सेना बरखास्त करून टाकल्या असत्या. नव्हे तसा त्यांचा विचारही होता. पण पाकिस्तानी नेत्यांनी मुर्खपणा केला आणि भारताला हा लष्कर उभारण्याचा खर्चिक बोजा उचलावा लागला.\nनेहरूंना मुळातच देशावर कुठून हल्ला होईल वा लढाई करावी लागेल असे वाटत नव्हते. म्हणूनच ब्रिटीशांनी उभारलेली भारतीय सेना बरखास्त करून टाकण्याचा त्यांचा मनोदय होता. पण तेव्हाच पाकिस्तानने काश्मिरमध्ये घुसखोरी केली व सेना घुसवल्या आणि त्याचा प्रतिकार सैन्यबळाने करावा लागला. थोडक्यात पाकिस्तानने जी चुक केली, त्यामुळे भारतीय सेना बचावली. अन्यथा नेहरूंनी सेनादले बरखास्त करायचा विचार पक्का केलेला होता. आजचे त्यांचे वैचारिक वारस म्हणूनच पाकिस्तानशी दोस्ती हवी आणि त्यासाठी लष्करी कारवाईला विरोध करीत असतात. त्यांनाच गेल्या अर्धशतकात बुद्धीमंत जाणकार किंवा अभ्यासक मानण्याची आपल्या देशात प्रथा आहे. म्हणून सुधींद्र कुलकर्णी पाकनेत्यांची शांततावादी पुस्तके भारतात प्रकाशित करतात. मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी मुशर्रफ़ यांची मदत मागू शकतात. कारण तोच शांततेचा व मैत्रीचा मार्ग आहे. बलात्कार्‍याशी तडजोड केली व त्याला शरण गेले, तर कधी कुठल्या मुलीवर महिलेवर बलात्कार होऊ शकेल काय हल्लेखोराला बलात्कारापासून वंचित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या इच्छेला आक्रमणाला शरण जाणे. मग त्याला बलात्काराचे सुख मिळू शकत नाही. यापेक्षा असल्या भूमिका किती भिन्न असतात हल्लेखोराला बलात्कारापासून वंचित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या इच्छेला आक्रमणाला शरण जाणे. मग त्याला बलात्काराचे सुख मिळू शकत नाही. यापेक्षा असल्या भूमिका किती भिन्न असतात बलात्कारीतेने किती व कसा आपला बचाव केला किंवा केला नाही, असे प्रश्न कोर्टात विचारण्याची कुशाग्र बुद्धी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचे युक्तीवाद किती समान आहेत ना बलात्कारीतेने किती व कसा आपला बचाव केला किंवा केला नाही, असे प्रश्न कोर्टात विचारण्याची कुशाग्र बुद्धी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचे युक्तीवाद किती समान आहेत ना सुरक्षेतील गाफ़ीलपणा हलगर्जीपणा क्षम्य नसतोच. पण जखमा ओल्या असताना त्यावर असा मिठाचा मारा करण्याला बुद्धीमत्ता मानले जाते, तिथे कुठलीही गोष्ट सुरक्षित असू शकत नाही. सुरक्षा दले किंवा यंत्रणांना खच्ची वा गाफ़ील करण्यासाठी आपले बौद्धिक युक्तीवाद कसे कारण झालेत, याचाही कधी विचार कोणी करणार आहे काय\nया लोकांचा बौद्धिक दहशतवादच आज एक मोठी समस्या बनला आहे.\nभारतीयांची मानसिक / वैचारिक गुलामगिरीतून सुटका झाल्याशिवाय यांची दुकानदारी बंद होणार नाही. पिढ्यानपिढ्या पद्धतशीरपणे रुजवलेल्या या मानसिकतेपासून येणाऱ्या पिढीला मुक्त करण्यासाठी आज बऱ्याच संस्था - व्यक्ती प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नातून बदललेले समाजमन अशा प्रवृत्तीला नाकारेल तेंव्हा यांची दुकान बंद होतील. तोपर्यंत या दिशेने काम करणाऱ्यांना यथाशक्ती मदत करून हा बदल घडवू.\nब्लॉगवरील अतिशय मार्मिक अन सडेतोड लिखाणाबद्दल धन्यवाद\nभाऊ बलात्कार्‍याशी जनतेने तडजोड केलेलीदिसतेय तरीच हे secular जिवंत आहेत\n१०० % सत्य आहे भाऊ ..पण तुम्हाला जे सुचते ते बाकी पत्रकारांना का नाही सुचत आणि सुचत नसेल तर सामान्यांना सत्य कसे काय कळणार \nभाऊ यांचा धंदा झालाय दिशाभूल करायाचा पण तुमचा अतिशय सुंदर बाँल्ग लिहिल्यामुळे अामची दिशाभूल होत नाही\nत्यामुळे तुमचे आभारी आहे\nहिन्दी अनुवाद भी पोस्ट करते तो अच्छा है\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/303", "date_download": "2018-04-23T09:07:36Z", "digest": "sha1:2XCPYNZ2YJP7X6TZAWPSIS4JV4FVMDB6", "length": 8851, "nlines": 119, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " शरद जोशी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / शरद जोशी\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर एम मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:12 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला\nएबीपी माझा विशेष संपादित भाग\nसहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.iroy.in/poverty-as-a-marketing-opportunity-rather-than-social-problem/?lang=mr", "date_download": "2018-04-23T09:32:33Z", "digest": "sha1:IY5O7DX57GUAU2QMBESNWYXWS72WJICK", "length": 15563, "nlines": 58, "source_domain": "www.iroy.in", "title": "\"Poverty as a Marketing Opportunity, ऐवजी सामाजिक समस्या\"", "raw_content": "\nविपणन समस्या & मार्ग\nमुख्यपृष्ठ विपणन समस्या & मार्ग\nएक विपणन संधी म्हणून \"गरीबी, उलट सामाजिक समस्या जास्त \"\nविषय:एक विपणन संधी म्हणून गरिबीPuzzle4Prize.com\nद्वारा पोस्ट केलेले: मे Anokuru डिसेंबर 11, 2013\nमी पिरॅमिड तळाशी आपल्या तुकडा सिरीयलाइज आवृत्ती भाग ओलांडून आला (BoP) lessening गरिबी संकल्पना. मी कल्पना जोरदार थरारक शोधण्यासाठी. नायजेरिया त्याच्या अर्ज विसराळू दिसते का मी आश्चर्य वाटते आहे, काय जगातील इतर अनेक भागांमध्ये प्राप्त विपरीत. कृपया, विपणन एक गुरू म्हणून, कृपया 'उघडा माझे डोळे' एक विपणन संधी ऐवजी सामाजिक समस्या म्हणून गरिबी - अधिक ज्यो Nnabuife.\nमी अलीकडील उद्घाटन जिज्ञासू मने स्पष्ट केले फक्त म्हणून \"Puzzle4Prize.com'', कोडी वापरणारे ऑनलाइन मार्केटिंग व्यासपीठ, आशावादी म्हणून मी एक अर्धा-संपूर्ण काच 'ऐवजी म्हणून' अर्धा रिकामा 'त्याच काच पाहण्यासाठी करते की पराभूत प्रवृत्ती दृष्टीकोनातून समस्या पाहण्यासाठी पसंत. .गरीब मध्ये मूळचा संधी पेक्षा एक सामाजिक समस्या असल्याने गरिबी समज ऐवजी - हे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी 'वाटी भीक मागत' दृष्टिकोन एक उपाध्यक्ष पकड राखण्यासाठी धरून राहा, कारण प्राधान्य अनेक विकसनशील देशांच्या विष दिसते, एक विपणन दृष्टीकोनातून. एक संकल्पना म्हणून, हे खरोखर पिरॅमिडचे काय \"गरीब आणि विपणन\" किंवा तळ आहे (BoP) विपणन कशाबद्दल आहे.\nC.K. Prahalad, शैक्षणिक; एक व्यवस्थापन गुरू, जगातील सर्वात प्रमुख व्यवसाय विचारवंत म्हणून ठिकाण; आणि हा दृष्टिकोन एक निपुण (काही इतर) की कायम ठेवली, \"... आम्ही बळी किंवा ओझे गरीब विचार थांबवले तर, आणि संवेदनक्षम आणि सर्जनशील उद्योजक आणि मूल्य-लाजाळू ग्राहक म्हणून त्यांना जाणीव सुरू, संधी संपूर्ण जगाच्या खुला होईल \". बॉप मुद्दाम गरीब लक्ष्य की व्यवसाय करत एक मॉडेल आहे, अनेकदा नवीन तंत्रज्ञान अर्ज. नम्रता कारणांमुळे काही पिरॅमिड 'पायाभूत \"म्हणून तीच संकल्पना पहा करण्यास प्राधान्य.\nभर, BoP (तसेच \"गरिबांना विपणन\" टॅग, \"गरीब बाजार\" किंवा M4P) मुद्दाम गरीब लक्ष्य की व्यवसाय करत एक मॉडेल आहे. गरीब बाजार अस्तित्व असते तो एक विपणन दृष्टिकोन करावा लागत, जे आत गरीब उत्पन्न आणि जे काही स्रोत देणगी वाट पाहणे नाही संचालन. या पक्षश्रेष्ठींनी यथार्थपणे त्याच्या आर्थिक स्थितीत मजबूत गरीब भरपूर सुधारणा राहते (संधी निर्माण त्याच्या उत्पन्न वाढवण्याची आणि आपल्या जीवनमान सुधारण्यासाठी), ऐवजी मानवतावादी हातवारे पासून निवेदने पेक्षा. जुनी म्हण, \"मला मासे पाठविण्याचे बंद, पण \"जोरदार येथे प्राप्त कसे त्याऐवजी मासे मला शिकवले.\nअलीकडे 'समुदाय-आधारित प्रकल्प' या माध्यमातून दारिद्र्य अंकुश या पध्दतीने त्यासाठी आहे Bayelsa महाराष्ट्र सरकारच्या तीव्रता जाहीर, व इम्युलेटेड पाहिजे. ब्राझील ताबडतोब गेल्या अध्यक्ष, लुईझ Inacio Lula दा सिल्वा, दारिद्र्यातून बाहेर ब्राझीलच्या लाखो आणणे एक प्रमुख तंदुरुस्त साध्य आणि आपल्या देशाच्या ग्रामीण शहरी वाहून नेणे उलट. मी राष्ट्रपती Lula च्या संकल्पना उचलून एक वकील राहतील.\nमाझे 11 बॉप भाग मालिका (जे मोफत मिळू शकते, विनंतीवरून) हा दृष्टिकोन माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन मध्ये मिळत प्रकाश पाहण्यासाठी नायजेरिया मध्ये संबंधित अधिकारी निदर्शनास ही बाब आणून साधन म्हणून आहेत. सूचक म्हणून, इतर विकसनशील देशांमध्ये काही प्रकल्प बॉप गरीब करत आहे जेथे गरिबी बाहेर आणून देवाचे आभार मानतो कारण उदाहरणे हे लेखन अप नंतर तपास करीत आहेत.\nअर्थशास्त्रातील संज्ञा म्हणून पिरॅमिड तळाशी सुप्रसिद्ध आहे. सर्वात चिन्हांकित, पण गरीब, सामाजिक-आर्थिक गट (काही फार या पिरॅमिडच्या सर्वोच्च श्रीमंत सह). Prahalad आणि इतर शब्दात, तळाशी बनलेली आहे 4 अब्ज लोक (जागतिक टर्म मध्ये) त्या पेक्षा कमी राहतात $2 प्रती दिन. त्याच्या विपणन असे गृहीत धरते गरीब तेव्हा (एक प्रचंड बाजार) उत्पादक आणि देखील ग्राहकांना मध्ये रूपांतरित आहेत, त्यांना खासगी क्षेत्रातील लक्ष आणि पर्याय मोठेपण प्राप्त मदत उत्पादने आणि सेवा अधिक प्रवेश करा. उपलब्ध, पारदर्शक आणि किफायतशीर बाजारात उत्पन्न वाढावे, आवश्यक आहे, विशेषत: ग्रामीण गरीब जीवनमान सुधारण्यासाठी.\nगरिबी भौतिक मालमत्ता किंवा पैसे एक निश्चित रक्कम नसणाऱ्या जो राज्य आहे. परिपूर्ण गरिबी किंवा गरीब असूनही साधन मूलभूत मानवी गरजा वंचित जात, जे सामान्यपणे अन्न समावेश, पाणी, स्वच्छता, कपडे, निवारा, आरोग्याची काळजी आणि शिक्षण. सापेक्ष गरिबी स्थान किंवा समाज लोक राहतात ज्या आर्थिक विषमता म्हणून संदर्भानुसार व्याख्या आहे. नायजेरिया मध्ये, गरिबी किती दावा उच्च विकास असूनही आमच्या चेहरे एकटक ठेवते.\nनायजेरिया असूनही जगातील सर्वाधिक आर्थिक विकासाचा दर एक येत (सरासरीने 7.4 गेल्या दहा वर्षांत टक्के), तो गरीब एक उच्च पातळी राखून ठेवते, जागतिक बँक त्यानुसार, सह 67 त्याच्या नागरिकांच्या टक्के खाली जिवंत $1 दररोज. सरकारी मालकीच्या जेथे नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक (NBS) अलीकडे पुष्टी 112 दशलक्ष नायजेरिया दारिद्र्य रेषेखालील वास्तव्य, जागतिक बँक जलद वाढ जात दारिद्रयरेषेखाली राहत खूप नायजेरिया संख्या बद्दल शब्द बोलण्यात चालण्यात वरपांगी चोंखदाळपणा दाखवणारा नाही. पेक्षा जास्त 80 दशलक्ष नायजेरिया ग्रामीण भागात राहतात, गरीब म्हणून वर्गीकृत एक स्पष्ट बहुतांश. हे न जुमानता, तो दारिद्र्य निर्मूलन विविध नायजेरियन सरकार 'प्रयत्न प्रभावी परिणाम साधत केले गेले नाहीत असे स्पष्ट राहते. ते आम्हाला काही कधी कधी बद्दल मनन अनेक सुमारे गरीब या मोठ्या संख्येने प्रचंड बाजार करा की जोरदार अज्ञान आहे, आणि एक तोंड-पाणी पिण्याची विपणन संधी.\nमी या चांगल्या वाईट हवामानाचा प्रदेश कॉर्पोरेट वातावरणात मुख्य प्राधान्य जोरदार जाणीव आहे, गरिबी संबंधित समस्यांसाठी सामाजिक समस्या विपणन संधी अधिक म्हणून संपर्क साधला जात. (क्रमश करण्यासाठी).\nविपणन समस्या & मार्ग\nएक विपणन संधी म्हणून \"गरीबी, उलट सामाजिक समस्या जास्त \" (2)\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा वर \"एक विपणन संधी म्हणून \"गरीबी, उलट सामाजिक समस्या जास्त \"\"\nएक टिप्पणी द्या प्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआपण टिप्पणी देऊ JavaScript सक्षम करणे आवश्यक\nफेसबुक वर अनुसरण करा\n9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\nबाह्यरेखा परिचय Dropshipping काय आहे कसे Dropshipping गोष्टी पहिल्या कार्य करते, आपले Dropshipping व्यवसाय नाव मिळवा करणे का महत्त्वाचे आहे…\nपल्स पाठवा: कसे आपल्या मेलिंग यादी सदस्य आपल्या वारंवार वृत्तपत्रे कारवाई करण्यासाठी मिळवा\n6 आपण आज सुरू करू शकता कमी गुंतवणूक व्यवसाय कल्पना\nजाणून घ्या व्हिडिओ आपण दूर रहा, आपले उद्योगात कशी मदत करू शकता\nआणि व्यवसायासाठी सर्वोत्तम Powerpoint टेम्पलेट काय एक शोधणे\nकॉपीराईट 2016 | बातम्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.truptiskavita.com/", "date_download": "2018-04-23T09:10:26Z", "digest": "sha1:IIGTMSWGUB22TC6T32URFE5TJXKU5BPM", "length": 3712, "nlines": 61, "source_domain": "www.truptiskavita.com", "title": "Trupti's Kavita - Marathi Kavita", "raw_content": "\nह्या Friends Forever कवितेमध्ये मी काही मैत्रीचे अनुभवलेले गोड क्षण मांडण्याचा प्रयत्न केला आहे .\nPrem Rang ही कविता प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.\nMarathi Kavita Aathavan ही कविता मी माझ्या त्या गोड क्षणांवर केली आहे. गेलेले क्षण पुन्हा कधी जगता येतनाही. म्हणून ते क्षण मी या आठवण कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.\nNew Friendship Poems मी ही कविता माझा नवीन झालेल्या मैत्रिणीवर केली आहे. तुमाला ही कविता New Friendship Poems कशी वाटली ही कंमेंट देउन जरूर सांगा.\nMarathi Kavita Baba ही कविता बाबा आणि मुलगी यांच्या नात्यावर लिहीली आहे.\nPahila Paus | पहिला पाऊस :- ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .\nMarathi Prem Kavita मी हया कवितेत एकमेकांची साथ आणि त्यात असलेला गोडवा सांगीतला आहे . ही कविता प्रेम, काळजी, विश्वास यावर आधारित आहे.\nMarathi Kavita Aai :- मी ही कविता माझ्या लहान बाळा वर केली आहे. मी या कवितेत आई ला बाळा बद्दल वाटणारी भावना व्यक्त केली आहे .तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mother-s-day-marathi/mohters-day-115050900010_1.html", "date_download": "2018-04-23T09:14:23Z", "digest": "sha1:SFJWPMAMMO7ZDDAJBTEV64KF4HCMT767", "length": 6005, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महत्त्व आईचे | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : झूलाघर\nपापमोचनी एकादशी : या सरळ विधीने करा हे व्रत\nफ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट\nया आईला तर काही, काही कळत नाही\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T09:14:56Z", "digest": "sha1:OPRSNZMEABPIN5IZUAM56QNM23BA2T6J", "length": 4165, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:उन्हाळी ऑलिंपिक मैदान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअथेन्स, १८९६ • पॅरिस १९०० • सेंट लुइस १९०४ • लंडन १९०८ • स्टॉकहोम १९१२ • अँटवर्प १९२० • पॅरिस १९२४ • अॅम्स्टरडॅम १९२८ • लॉस एंजेल्स १९३२ • बर्लिन १९३६ • लंडन १९४८ • हेलसिंकी १९५२ • मेलबर्न १९५६ • रोम १९६० • टोकियो १९६४ • मेक्सिको सिटी १९६८ • म्युनिक १९७२ • माँत्रियाल १९७६ • मॉस्को १९८० • लॉस एंजेल्स १९८४ • सोल १९८८ • बार्सिलोना १९९२ • अटलांटा १९९६ • सिडनी २००० • अथेन्स २००४ • बीजिंग २००८ • लंडन २०१२ • रियो दि जानेरो २०१६\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०१५ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://anushreevartak.blogspot.com/2010/", "date_download": "2018-04-23T09:37:58Z", "digest": "sha1:VEDN7E4XSVYOAIUEX2TM7ZYA2XKLVRZO", "length": 108407, "nlines": 1680, "source_domain": "anushreevartak.blogspot.com", "title": "अनुश्री: 2010", "raw_content": "\nगद्धेपंचविशी..अर्थात, गाढवपणाचे रौप्यमहोत्सवी वर्ष \nआता इतक्या सहज जमणारी गोष्ट साजरी करण्यासाठी, एवढी वर्ष कशाला वाट बघायची\nअशा सूज्ञ विचारांती, तसा माझा यथेच्छ गाढवपणा करून झालेला आहे म्हणा..\nवर आयुष्यात इतकी मनसोक्त मज्जा करुन झाल्ये..\nकी आज शेजारचे अण्णा..'विठ्ठला पांडुरंगा' म्हणाल्यावर..\nमाझ्या बत्तिशीतून अभावितपणे( वास्तविक अभाविक()पणे म्हणायला हवं :)\n'उचला आता' अशी चरणपूर्ती झाली...\nम्हातारा काय उचलला..आपलं..उचकला म्हणून सांगू \nत्यांच्या बायकोची पण मागे एकदा अशीच चिडून इडली फ्राय झाली होती\n(वास्तविक भेजा म्हणायला हवं..पण ते सुद्धा आमच्यातले म्हणजे 'ह्या'तलेच..\nतेव्हा नसती फोडणी नको, कसें\nका, तर मी त्यांना 'अण्णी' म्हणून हाक मारली म्हणून \nत्यांची नात त्यांना 'करंजी' हाक मारते ते मात्र चालतं..\nमग मीच काय गाढव..आपलं..घोडं मारलयं, तो विठूरायाच जाणे..\nसारांश काय, तर आता इतक्या सहज जमणारी गोष्ट साजरी करण्यासाठी, एवढी वर्ष कशाला वाट बघायची\nपण आता थोडेच महिने उरलेत, पंचविशीत पदार्पण करायला..तर एक वेगळीच हूरहूर वाटायला लागल्ये..\nआता 'गाढवपणा' हा ऑफिशिअल अजेंडा असल्यावर..\nयेत्या वर्षी अजून काय आगळी(क) गंमत करता येईल..\nयासंबंधी योग्य मार्गदर्शन हवं..\nम्हणून आधी जाऊन डॉ नाडकर्णींचं 'गद्धेपंचविशी' आणलं...\nहल्ली वाट्टेल त्या विषयावरची सेल्फ हेल्प बुक्स असतात..आणि ती खपतातही \nपण नाडकर्णी सायकिअ‍ॅट्रिस्ट असले, तरी हे पुस्तक 'त्या'तलं मुळीच नाही..\nविशीतच प्रचंड आवडलेलं हे पुस्तक मधल्या काळात नजरेआड झालं\n) करणार्‍या इतर गोष्टींसारखं...\nआणि आवृत्ती संपल्याने माझे सगळे प्रयत्न इतके दिवस,\n'हा क्रमांक अस्तित्वात नाही'.. ऐकून,\nनिराशा खुळखुळवत, माघारी येत होते.\nपण आज किस्मत चमक्या \n'च' चम्या मधला, चमच्यातला म्हणजे आमच्या चमच्यातला नाही,\n'चपला पडणारेत एक दिवशी ' असं\nमाझ्या आगाऊपणाबद्द्ल आईच प्रांजळ मत आहे \nतशी माझ्या संदर्भात लोकांची बरीच मतांतरे आहेत,\nआणि अस्मादिकांच्या गाढवपणामुळे त्यात रोज नवी भर पडते आहे..\nएकंदरीत पुढल्या वर्षीची बरीचशी तयारी आगाऊच झाली म्हणायची \nनाडकर्णी म्हणजे आपला फेव्हरिट..\nआणि पुस्तक अप्रतिम आहेच.. पण जी गोष्ट वाचण्यासाठी मी खरं तळमळत होते..\nते शब्द आहेत अर्पणपत्रिकेत...\nआणि लिहीणार्‍याचं नाव वाचून (जमेल तितकी :) उडालेच \nअधून मधून वाचनात येणार्‍या संदर्भांतून आणि कवितांमधून छळणारा..\nपहिली संधी मिळताच त्याला संपवायचा असं ठरवलेलं...\nपण मग राहावेना, म्हणून मिळतील त्या कविता अधाशासारख्या वाचून काढल्या...\nकाही आवडल्या, काहींसाठी आता ते वय नाही असही (संधि)वाटलं\nआणि काहींनी साफ निराशा केली..\nपण कम्युनिस्ट कवींची, प्रेमात..शेती-भाती, ब्रेड-पाव, पालापाचोळा घुसवायची खोड ठाऊक असल्याने\nविशेष नवल वाटलं नाही..\nकारण तसही काहींचे शब्द इतके घायाळ करून जातात की त्यांच्याकडे जीव गहाण पडतो तो कायमचाच \nका कुणास ठाऊक पण...इतक्या वर्षात जे जे जीवापाड जपण्यासारखे क्षण वाट्यास आले..\nत्यांची मुळं त्या त्या वेळच्या गाढवपणातच आहेत \nआणि कुणीतरी आपल्यासाठीही असे जीव गहाण टाकून मिळवलेले शब्द जपून ठेवत असेल,\nह्या विचाराची धुंदी अजून उतरलेलीच नाही..\nकाल इतक्या हलकेच तू मिठीत घेतलस,\nकाचेचा तो हळवा कोपरा,\nजीवापाड जपण्यासारखं असं सगळं आणि तितक्याचं अलगदपणे त्यांच कोसळणं..\nअज्ञाताने मारलेल्या फुंकरीने अस्वस्थ थरथरणार्‍या आगीसारखी,\nपण काहीशी आजच्या धसमुसळ्या पावसासारखी, मुसमुसत राहिले..\nआधी 'तो' आठवला आणि त्याला इतक्याच आश्वासकपणे कुशीत घेतल्याची आठवण..मग काही कारणं..\nबाकीचे बेवारशी हुंदके होते..आणि मोडण्याच्या शंकेने भेदरलेली स्वप्नं..\nतू सगळ्यावर हात फिरवत राहिलास, शांतपणे थोपटत..\nशेवटी तुझ्या या समंजसपणानेच भरून आलं.. किती वेळ असा ओलीस होतास कोण जाणे\nती अनाहूत अशी थंड लहर येईस्तोवर कदाचित..\nएका विलक्षण शांततेत लपेटून गेली...\nतुझ्या नकळत तुझ्यासाठी नसलेल्या, मी उमटवलेल्या या ओरखड्यांनाही, आपलेच म्हणून जपशील ना\nतुझ्याकडे बघेस्तोवर ओठांची अस्वस्थ हालचाल तेवढी उरली....\nपण तुझ्या चेहर्‍यावर प्रश्नांचा मागमूसही नव्हता..\nतुलाही तिची आठवण येते का रे\nआणि असहाय्यपणे हसूच आलं \nतूही उगाच बेफिकीर हसलास..\nआणि त्या क्षणावर सुखाचा तवंग पसरला..\nत्याला सहज नजरेआड करत, अनिश्चिततेत झोकून देत,\nएकमेकांत गुरफटत, अंधार आणि तू, मी, लुप्त झालो...\nमोठ्या उत्साहात मुशाफिरीला निघालो खरं,\nआधी कधीची तरी, खूप मुश्किलीने, सोईने नव्हे,\nपुसून टाकलेली ओळख आहे,\nपरिचित आहेत सगळी वळणं,\nपुन्हा सारं 'अहं' पाशी येऊन कोलमडणं..\nइथल्या संदिग्ध धुक्यात मौनाच्या,\nओरखड्यांच्या, आडोशाला जपून ठेवल्यात\nतू, मी, आपापल्या आठवणी,\nआणि आता हे नवे शब्दभ्रम\nजुन्याचं समेवर भेटत असताना,\nजिव्हाळ्याचा एक क्षण तरी सोसेल की नाही,\nपुन्हा त्याच असोशीने जगण्याला सामोरं जायचं असं ठरवून,\nमैलोन् मैल चांदणं तुडवून जमवलेलं सारं,\nकालच्या पावसात वाहून गेलं..\nपरत कुणाच्याच नजरेत मला 'तो' कोडगेपणा बघायचा नाहीये,\nआधीच्या पावसाळ्यातली एक कविता आहे..\nनंतरच्या कश्यातूनच 'त्या'ला वगळता येईल की नाही,\nयावर कालचा पाउस नवे प्रश्न उमटवून गेलाय..\nत्यांची निसंदिग्ध उत्तरं तरारून येईस्तोवर, मला थांबलचं पाहिजे..\nतुझा आवाज ऐकत राहाते..\nकिती पावसाळे बरसू लागतात\nह्या कुशीवरून.. त्या कुशीवर..\nह्या रात्रीतून.. त्या रात्रीत..\nकिती वर्ष ओघळू लागतात\nह्या वाटेतून.. त्या वाटेवर..\nतुझा आवाज ऐकत राहाते..\nचित्रच चित्रं मनात साचतात\nतरंगातून गोल गोल वर्तुळ..\nत्या होडीला किनारा सापडला\nमजा होती..खूप मजा होती.\nडोळे मिटताक्षणी झोप यायची\nतुझा आवाज ऐकत राहाते..\nदिवस कसे वाहून गेले..सहज\nउगाच अस्वस्थ करून जातात\nकुठेतरी खोलवर भिजवून गेलेत\nदरवेळी वाटत हे थांबूच नये..\nआणि थांबाव इथेच असं ही..\nतुझा आवाज ऐकत राहाते..\nकिती प्रहर सरले.. का रात्रच \nअजून एक, असं समजवायचं\n हा आनंद आणि विषादही..\nमी असेन असं म्हणाला होतास..\nपण सगळचं धूसर..तुझा आवाजही\nमला काहीच ऐकू येत नाही..\nनक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस, तू त्याच्या घरात\nमेघःश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती\nहे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून\nतुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारा\nओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून\nतुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना\nत्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे\nआणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे\nत्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती\nअमराचा अळता लावलेली तुझी पावले\nघरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;\nकाठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या\nतुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता\nपाहिल त्यानं तुला उंच बेभान उसळताना;\nरात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;\nमधुर विषाचे घोट खुल्या ओठांनी आकंठ घेताना;\nअस्तित्वाचा कण न् कण\nप्रेमाच्या चेहेर्‍यावर उत्कट उधळून देताना.\nकळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची;\nदु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;\nकळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.\nतू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर\nहरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं\nत्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,\nत्या़क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.\nपुरुष- जो क्षमा करून नाही ऋणी करत;\nपाठ फिरवून नाही उणी करत;\nघेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;\nआपल्या काळजाचं घर करतो.\nराधे, पुरुष असाही असतो \nआयुष्य किती निरर्थक आहे आणि श्रद्धा किती फसवी,\nयाची जाणीव सतत मनात ठेवून कोणी सुखात कसा जगू शकेल \nफार दुबळे असतो रे आपण ..\nअगदी माझ्यासारखी माणस पण..\nमनस्वीपणे जगून आपण निरर्थकपणावर कशी कड़ी केली , अश्या विभ्रमाच्या कुबड्या घेत जगतात ...\nमृत्यू आणि प्रेम झाल्यावरच, खरी अगतिकता कळते ..\nआणि तिलाही आपण टाळतोच की ...\nकुठलीही श्रद्धा किंवा आशा न ठेवता जगण्याची माजखोरी मला खूप आवडते..\nपण मलाही लोकांना श्रद्धापुर्वक पूजा करताना पहायला खूप आवडत...\nखूप छान वाटत आणि खूप असूया पण ..\nकारण सगळ्या गोष्टींचा कार्य-कारणभाव आपण स्वतः आहोत हे मान्य केल्यावर खूप एकट वाटत..\nम्हणजे लहानपणी हरताळकेच्या रात्री मेंदी पुरी होइतो मध्यरात्र उलटून गेलेली असायची..\nअश्यावेळी निजताना मंद दिव्यात ध्यानस्थ बसलेल्या बाप्पाची किती सोबत वाटायची...\nआता कशाचच काही वाटत नाही..\nआपण नास्तिक कधी होतो \nगावातले रस्ते लहान होतात..आपण मोठे होत जातो..परवा आग्रा रोड क्रॉस करताना आठवल, कशी हात सोडून पळाले होते..आणि एका डॉक्टरच्याच गाडीवर जाउन धड़कले होते..बिच्चारा :)\nअजून ती खुमखुमी तशीच आहे..पटवर्धन डॉक्टरांचा बोळ पण...पण आता 'ती' भीती नाही...कसलीच नाही..\nकसलीच भीती नाही म्हणून क़ा कशावर श्रद्धाही नाही \nआपण नास्तिक कसे होतो \nपरवा आईलाही हा प्रश्न विचारला.. तिलाही नेमक सांगता आल नाही अन मलाही..\nसालाबाद प्रमाणे यंदाही असा गणेशोत्सव सगळीकड़े खूप उत्साहात साजरा होत असतो..\nआरती संपायला आलेली असते..तसही माझ्या आणि बाप्पात बोलण्यासारख काहीच नसत...आयुष्याच्या धकाधकीत दुरावलेल्या बालमित्रासारखे तटस्थ एकमेकांकडे, पण शून्यात पहात असतो..आताशा खिरापत, प्रसादाचा बुफे आणि फुलांचा बुके झाल्यापासून, काही कामही नसत..\nमला जुन्या चाळीतल्या गमती-जमती आठवून हसायला येत..सगळे आपापला वशिला लावण्यात दंग असतात...नकळत मीही सवयीने मंत्रपुष्पांजलि म्हणत असते..\nआजी खूप वेळ डोळे मिटून तशीच हात जोडून बसून राहाते..तिची श्रद्धा आणि आमच्या नास्तिकत्वाचाही भार जपत...मला भरून येत..निरांजनाची उब हातात घेउन डोळे झाकावेसे वाटतात..किती दुबळे असतो रे आपण..\nLabels: आयुष्य हे.., मनीच म्याँव..\n, मनीच म्याँव.., मुंबईकर\nत्याकाळी म्हणजे सगळ्या सहाध्यायी पामरांना समजेल असे बोलणे आम्हांस नामंजूरचं \nआता आठवून खूप हसू येतं...\nपण खर सांगू, माझा खडूसपणा कधी कधी खूप मिस करते मी..\nदूSSर असला तरी शेवटी गुणचं ना तो \nअगं आई गं.. हल्ली माझ्या शाब्दिक कोट्या म्हणजे एखाद्या आज्जीबाईंनी दोरीवरच्या उड्या माराव्या तश्या केविलवाण्या झाल्यात...\nम्हणून तर..काल दहावीतली निबंधांची वही वाचून खूप हळहळले..आज्जीने शिवलेली जुनी गोधडी असावी तशी वही गालावर घुसळली..\nवरचे हाहा.. मोजून लिहीलेत हों..कांय समजलात.. हां\nअसेच कालिदासाच्या एका सुभाषितातले ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: पाठ करताना अस्मादिकांची ठंबेरी..अब..फंबेरी..\nअहो व्यंजनांचं काय घेउन बसलात..तो काळ असा होता की आमचे आजो आम्ही पाच बहिणी आणि दोन आत्यांना \"संजू\" या एकाच नावाने हाक मारायचे..घ्या \nनावबिवं म्हणजे अडगळचं की हो..असो..तर ती ठंफं..हां भंबेरी काय ती उडल्याचे स्मरते.\nआणि त्याच ठं ठं च्या कैफात..एका दुग्धशर्करा,मणिकांचन वा तत्सम मुहुर्तावर जुळून आलेल्या शाशा च्या तासाला, मैदानावर जायच्या घाईत..\nत्या 'सोपानमार्गेण करोति शब्दं 'चे प्रात्यक्षिकही झाल्याचे स्मरते..\n ते हि नो दिवसा: गता: \nहा जुलै खूप नॉस्टाल्जिक होता..\nतसा पावसाळा आम्हा कवी लोकांसाठी निसरडाचं \nआठवणींच्या शेवाळ्यावरून कधी ठंठं होईल याचा नेम नाही..\nछान रिमझिम पावसाळी संध्याकाळी खिडकी पकडा.. हो मुंबईकरांसाठी खिडकी मिळणे, घरातली असली तरी, चैनेचीच गोष्ट..\nते जाउ दे, तर छान रिमझिम पावसाळी संध्याकाळी खिडकी पकडा\nआणि चहाच्या वाफेवर तरंगता तरंगता..\n हल्ली नॉस्टाल्जियात पूर्वीसारखं 'नाविन्य' राहिलं नाही म्हणता.. :)\nमोफत सल्लाकेंद्र, at your service..\n'कर्‍हेचे पाणी' वाचा.. हल्ली पूर्वीच पुणं राहिलं नाही हा निव्वळ वाक्प्रचार आहे बरं \n'सूर्याची पिल्ले' बघा, कानिटकरी फार्साची गंमतचं न्यारी\nआवडती पुस्तके पुन्हा वाचा, मी वाचलं माझं all time favorite.. 'नाथ हा माझा'..त्यात ७० आणि ८० च्या\nदशकातले छान संदर्भ आहेत.\nएखादा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ऐका..मी ऐकला..बाबूजी आणि रफींचा..\nह्रुशिकेश मुखर्जींचा एखादा सिनेमा बघा..मी पाहिला..मिली \nशाळेतल्या किंवा जुन्या वह्या चाळा, आजोबा-आज्जींचे फोटो बघा..\nजुन्या पाठ असलेल्या कविता म्हणा...खूप मज्जा येते..\nकालचं आमच्या समोरची सारिका आणि मी 'येगं येगं सरी..' ची जुगलबंदी केली..\nआणि एक गोष्ट नक्की करा..जी मीही अजून करायची बाकी आहे..पण या पावसाळ्यात नक्की करणार आहे..\nकागदाची होडी करून, तिला पाण्यावर सोडून हळूच फुंकर मारणे \nLabels: पाउस, पुणे तिथे काय उणे , मनीच म्याँव.., हसा लेको..\n'अनुश्री' हे अवघड यमक आहे \nम्हणून ठरवल भेटायचं नाही..\nभेटलो तर बोलायचं नाही..\nबोललो तर ऐकायचं नाही..\nऐकल तर जपायचं नाही..\nजपल तर आठवायचं नाही..\nआठवल तर गलबलायचं नाही..\nगलबलल तर दाखवायचं नाही..\nदिसल तर लपवायचं नाही..\nकुणाला ते कळायचं नाही..\nकळल तर झेपायचं नाही..\nझेपल तर पटायचं नाही..\nपटल तर पचायचं नाही..\nपचल तर आवडायचं नाही..\nआवडल तर लिहायचं नाही..\nलिहिल तर छापायचं नाही..\n अजून एक रोमिओ ज्यूलिएट\nअगदी वेगळे पण तितकेच इडियट\nझक्कत म्हणाली होतीस But \nआणि असेच, शंभर नवे शेक्सपिअर, रोज उगवतात..\nअन मावळतात, मुळा मुठेच्या काठी, मराठी सारस्वतात.\nलोकं आपल्या मैत्रिणीला काय काय नौंसेन्स भेटी देतात\nतू मात्र मला आवडतोस... तू मला कविता पाठवतोस\nमाझ कवितांवर प्रेम आहेच, भेट दिलेली आणखीनच भावते\nतुझी ही स्पेशल ट्रीटमेंट.. मोरपीस फिरवल्यागत सुखावते\nआणि मृदगंध कसा विखुरतो, पहिल्या पावसाला दाद देण्यासाठी\nतशी एक कविता मी उत्तरादाखल पाठवते.. फक्त तुझ्यासाठी\nमग तुलाही भरत येतं आणि कवितांचा पाउस पडतच राहातो\nदिवसभर मनात आपल्या मैत्रीचा सुगंध दरवळत राहातो...\nअसच काहीसं होत असणार रे आभाळ आणि मातीच्या मैत्रीतही......\nप्रेमात असं का होतं \nप्रेमात असं का होतं \nएकाएकी जाणीव होते की त्याच्याशिवायही जगू शकते\nत्याच्याशिवाय भर चांदण्यात गाढ झोप येऊ लागते\nत्याच्या आठवणीने येणारा शहारा उमटेनासा होतो\nआता ती त्याची मिठी नसते, तो फक्त वाराच असतो\nत्याच्या नावाची हाक मारली तरी दचकेनाशी होते\nत्याच्यावरून चिडवलं तरी, आता ती लाजेनाशी होते\nफोनची वाट बघत नाही, वर स्वतःचा एंगेज असतो\n reply करायला तिच्याकडे balance नसतो\nतो पिक्चरला बोलावतो तेव्हां मैत्रिणीशी गाठभेट असते\nअचानक घरी जायचं असतं अन त्याची बस लेट असते\nमुद्दाम त्याच्या ऑफिस वरून ऑटोही न्यायची नसते\nतो काल काय करत होता याची नोंदही घ्यायची नसते\nप्रेमात असं का होतं \nते आकर्षण कुठं विरतं \nकुठे गेले ते मंतरलेले दिवस अन् धुंद रात्री\nती हुरहुर, ती जवळीक, ती लुटुपुटुची मैत्री\nत्या हळव्या गोष्टी फक्त फक्त त्यालाच सांगण\nत्याच्या तिच्या स्वप्नांत दिवस दिवस रमण\nखूप भूक लागली असून अर्धा अर्धा वडापाव खाण\nमहिनों महिने लक्षात ठेवून त्याला आवडलेलं घड्याळ देण\nत्याच्या क्रिकेटच्या वायफळ गप्पा तास न् तास ऐकून घेण\nत्याला चिडून मनवून हट्टाने शौपिंगला घेउन जाण\nप्रेमात असं का होतं \nते आकर्षण कुठं विरतं \nत्याच्या बहिणीचा वाढदिवससुद्धा व्यवस्थित लक्षात होता\nत्याच्या आवडत्या रंगाच्या ड्रएसेसच ढीग झाला होता\nत्याच्या बरोबर घेतला तेव्हां हा teddy क्यूट वाटला होता\nत्याच्या सोबत फिरताना कितीदा भयानक उशीर झाला होता\nत्याच्या पत्रांचा ग्रीटिंग्सचा खच तिच्या गादीखाली होता\nतिच्या पुस्तकाच्या मधल्या पानांत त्याचा 'तो' फोटो होता\nत्यानं दिलेलं पहिलं रोझ इतके दिवस खालच्या खणात होतं\nआणि कधीतरी आईबाबांना धीर करून सांगायचही मनात होतं\nपण प्रेमात असं का होतं \nते आकर्षण कुठं विरतं \nत्यानं सॉरी म्हटलं तरी तिने किती सहज फ़ोन ठेवला\nछान तयार होउन, संध्याकाळी, चहा-पोह्यांचा ट्रे धरला.\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nमाझ्या कवितांचा पाउस पडावा\nसगळा आसमंत मुक्तछंद व्हावा\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nपानांच्या सळसळाटात माझेच गाणे\nफांद्याना झुलाया नवे बहाणे\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nवेळूच्या बनात माझ्या सुरांचे अलगुज\nकापूस म्हातार्‍या आल्या कराया कौतुक\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nभरावे वावटळीत माझ्या डोक्यातले खूळ\nदिशांत विखुरली वेड्या कल्पनांची धूळ\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nक्षितिजात माझे रंग उधळावे\nथेंबांनी त्याचे इंद्रधनु फुलवावे\nअसाच जोराचा वारा यावा\nअसाच जोराचा वारा यावा\nमाझ्या चित्रांनी जणू धरावा फेर\nमनाला त्याचे 'मी' पण अनावर\nअसाच जोराचा वारा यावा\nसूर्य अजून बुडालेला नाही..\nढगांच्या मागे थोड़ी प्रकाशाची तिरीप आहे.\nपल्याड दिवस झालेला नाही..\nअल्याड दिवेलागणी, इथे रात्र समीप आहे.\nवारा घोंगावतो माझ्या ग्लासात..\nमला त्याचीच थोड़ी पिसाट झिंग चढ़ते.\nतसच कुणीतरी घोंगावत मनात..\nआठवणीची दाटी, आभाळही कातर भासते.\nघरात दिवा लावलेला नाही..\nकाही काळ सावल्यांशी मला खेळत राहायचय.\nचंद्र अजून उगवलेला नाही..\nवरच्या कुणालातरीही असच काहीतरी करायचय.\nकुठलतरी काम आठवत अखेर..\nआणि मी उठते, आत जाऊन दिवा लावते.\nढगही पांगतात, चंद्र दिसतो..\nआणि ती हळवी, कातर सांजवेळ, तेव्हा सरते.\nडोळे मिटले वा नाही\nसकाळ तर होतेच ना....\nआणि सगळ्यात वजनदार मत..\nटी आर पी गगनाला.......\nLabels: कविता, काय चाललय काय \nजोडयाने मारल पाहिजे सगळ्या हरामखोरांना..\nजे काही हातात असेल ते..फाईल..रिमोट..ग्लास..\nअन निमूटपणे शेवटी गिळून राग..\nआपल्याच पोटात आग आग...\nमाहित्ये कोणीही निवडून आला तरीही..\nइथे सगळ जैसे थे..\nडोक्यावर नाचणारे वाढता वाढे..\nजे काही हातात असेल ते.. हो करतो.. हो होइल..\nअन डोळसपणे कर्मवादाकडून कर्मकांडाँकड़े..\nहाताच्या रेषावर मन भिरभिरते वेडे वाकडे..\nटाळता आली असती का ती पहिली लाच..\nपहिल्यांदा रस्त्यावर थुनकताना दाटलेली लाज..\nकुटुम्बनियोजनवाल्याँचही ऐकल असत तर बर होत..\nझोपड़पटटीयांसारखी फोफावल्ये जबाबदारयांची रास..\nमीच उभा राहिलो असतो अजून दोन दिवस रांगेत..\nचपराशी, सेक्रेटरींची मखलाशी करायलाच हवी होती \nवर्षभर जिथे तिथे मतांच्या पिंका टाकत राहिलो मजेत..\nमतदानाची सुट्टी मात्र लोळायलाच का हवी होती \nLabels: कविता, काय चाललय काय \nकाळोख्या रात्री एका, जेव्हां अंधार बोचू लागला\nउजाड़ झालेल्या मातीचा, हुंकार येऊ लागला\nउसळणार्‍या लाटा, पाषाण भिंतीवर थडकू लागल्या\nबलिदानाच्या ज्वाळा, आकाशाला भिडू लागल्या\nआक्रोश, फुटक्या काचा, पोरकी आयुष्ये साचू लागली\nरिकामी कूस, आता तिला भरीस जाचू लागली\nत्या रात्री, रक्ताळलेल्या डोळयांनी जगाने पाहिलेलं\nहे तरूणाईचं स्वप्नं, आशेच्या पहाटे उमललेलं\nफार काळ उमलू दिलं नाही.. तर\nकळ्यान्चीही सवय मोड़ते फुलण्याची\nडोळे कोरडे.. तरी आत रडू याव थोडं\nसवय नकोच, संयमी सोसण्याची\nकुठेतरी उरी.. जरा ठणकतच रहाव\nजाणीव भळभळावी, जिवंत असण्याची\nकोंडू नये पिसाट वार्‍याने दारा-खिडक्यांमागे\nमजा घेत रहावी, लहरी भिरभिरण्याची\nअसं कसं.. असं तसं... काही ठरवू नये\nभरभरून लिहाव, हौस पुरवावी जगण्याची\nतुझ्या प्रेमाच.. फक्त निमित्त सापड़लय\nसवाय जुनीच आहे, स्वतःशी बोलण्याची\nअजूनही वसंतातल्या अर्ध्या रात्रीची स्वप्ने तुझ्या शोधात वणवण फिरतात\nपण मध्यरात्रीचा सूर्य शोधताना त्यांना भेटताहेत, काजवेच काजवे\nसांगितलं मी, फुटले असतील तुझ्या सृजनशक्तीला कल्पनांचे धुमारे\nपण हिरव्या कुंचल्याला शोधताना त्यांना भेटताहेत, बाभळीच बाभळी\nसांगितलं मी, उमलत असेल तुझ्या आरोहीने क्षितिजावर पहाट\nपण मनस्वी साधकाला शोधताना त्यांना भेटताहेत, भोंगेच भोंगे\nसांगितलं मी,विखुरला असेल दशदिशांत तुझ्या कीर्तीचा सुगंध\nपण अवखळ कस्तुरीमृगाला शोधताना त्यांना भेटताहेत, फायेच फाये\nसांगितलं मी, घेतली असेल तुझ्या महत्वकांक्षांनी एव्हाना आकाशभरारी\nपण झेपावलेले गरूडपंख शोधताना त्यांना भेटताहेत, पारवेच पारवे\nसांगितलं मी, फुंकली असशील मैंफिलीत सख्या नव्याने तू जान\nपण जाणकार रसिक शोधताना त्यांना भेटताहेत, व्यसनीच व्यसनी\nसांगितलं मी, जिंकली असशील एकाच प्रवेशात सगळयांची हृदये 'जादू'ने\nपण उदार नटसम्राट शोधताना त्यांना भेटताहेत, याचकच याचक\nसांगितलं मी, तू ही शोधत असशीलच तुझ्यासारखीचं अनुश्री\nपण कदाचित तुझ्या स्वप्नांनांही वाटेत भेटताहेत, चकवेच चकवे \nपाउसही आलाच होता की परवा...तो ही पहिला\nतरी तुझी आठवण आल्यावरच ती सुचली...बेवफा कविता \nमी थांबले होते खूप वेळ...बोचरे थेंब झेलत\nतरी तुझी आठवण आल्यावरच त्याने भिजवलन्...बेवफा पाउस \nतू नसताना काय भिजायचं...म्हणून उघडली खरं\nतरी तुझी आठवण आल्यावर उडून उलट्लीच...बेवफा छत्री \nउशीरापर्यंत एकट कशाला भटकायचं...म्हणून थांबवली\nतरी तुझी आठवण आल्यावर सवयीने निसटलीच...बेवफा बस \nथांबले...भिजले..रमलेही...तुझ्या आठवणीत बस स्टॉपवरच\nतरी घरची आठवण होताच निघाले रे...बेवफा मीच \nमाझ्या मनातला पाउस, अजून काही महिने\nया ओसाड मातीत जपायचाय...\nकवितेचा बहर, या मृगजळातच, काही काळ\nकोमेजू न देता जगवायचाय...\nविरहाच्या झळासोबत मी भिरभिरत जाते.....\nआणि आठवणींच्या त्या सदाहरित वनांतून घेउन येते\nनवा पाउस नवं प्रेम..\nनवा विरह नवी हूरहूर\nमनभर तरी मन भरतच नाही\nबरसताना असतो पण उरतच नाही\nखूप खूप दिवस राहून मग कशीबशी निघते\nथोडासा पाउस माझ्या मनात भरून आणते\nमाझ्या मनातला पाउस, अजून काही महिने\nया ओसाड मातीत जपायचाय..\nकवितेचा बहर, या मृगजळातच,काही काळ\nअसाच कोमेजू न देता जगवायचाय..\nअसाच.. कोमेजू न देता ...जगवायचाय\nत्या सदाहरित, पावसाळी देशात..घरी\nअरे प्रश्न असा पडतो, की तुला काय लिहायचे\nअजून किती वह्यांचे कागद उगाच चुरगाळायचे \nआधी लिहून ठेवलेल्या कविता देऊ, तर शिळ्या वाटतात\nतुझ्यावरच लिहायचं ठरवलं, तर गडबडून शब्दच पसार होतात\nमनातलं सांगायचं म्हंटलं, तर मला तरी कुठे कळलयं\nतुझ्या माझ्या आठवणी लिहीण्यासारखं तरी काय घड़लय\nउपदेश करायचं ठरवलं, तर माझाच पोरकटपणा आठवतो\nतुझ्या माझ्यात न बोललेला, असा विषयचं कुठे उरतो\nप्रेमावर बोलू म्हंटलं, तर तुझेच हळवेपण भळाभळा वाहायचे\nकुणी कुणाला समजवायचे, मग कुणी कुणाला सावरायचे\nडोंगर दर्‍यांवर, वार्‍या पावसावर लिहू तर...हसशील\n वर भीती की माझ्यावर उलटवशील\n'निरोप' घ्यावा म्हंटलं, तर एवढा दूरही जाणार नाहीस\nनंतर लिहू म्हणून राखून ठेवावं, तर माझा उरणारही नाहीस\nमाझ्या विचारांच्या चक्रीवादळात, हे कागद वाहून जातात\nवाटा विरघळू लागतात, माझ्या उष्ण पावलांच्या दाहाने\nआकाश फाटायला लागत, कारण मी त्यात मावत नाही\nदेवही चिंतेत पडतो, जेव्हा मी कल्पना करू लागते\nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....\nस्वतःच्या गरजांसाठी, भीतींसाठी मला लाज वाटत नाही\nना वाटते भीती मला, अंधार्‍या एकट्या रस्त्यांवरून जाण्याची\nमी गडद, काळी, गुळगुळीत, डोहातल्या कातळासारखी गार पण\nमाहितीच्या जंजाळात सराईतपणे पोहताना, मला ओढ शून्याची\nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....\nमीच असते सुंदर, मूर्ख, एक शोभिवंत बाहुली, मिरवणारी\nकधी हजार गणिते करून, मी शक्यतांना प्रचंड छळणारी\nमीच असते काम, क्रोध, मत्सर, वासनांमध्ये गुरफटणारी\nकधी हातात आलेल सर्व सोडून मी विरक्त, दूर पळणारी\nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....\nमाझ माणसांवर प्रेम आहेही पण खर तर फक्त स्वतःवर\nकाळाच्या चौथ्या मितीत गुदमरते आणि निर्वातात करते वावर\nकधी चिंता करते विश्वाची तेव्हा मीच असते व्यापून ब्रह्मांड\nजणू फक्त मला निर्मिलय ब्रह्मांने, का मीच दिलाय त्याला जन्म \nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....\nमी स्त्री आहे, जन्मदात्री आणि जाणवत असण्यातल सामर्थ्यही\nपण मीच उसळते आवेशात आव्हानांनी गाजवायला पुरुषार्थही\nमीच गोड गुलाबी असते नाजूकही ठिसूळ अर्धी अपूर्णही\nपण असते पूर्णही, अतुल्य, अजिंक्य, कठोर आणि एकटी\nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम....\nआता होऊ नये एकाग्र चित्त मी, सगळेच भस्मसात होईल\nविखुरले आदि जर, त्या महास्फोटातून नवे विश्व जन्म घेईल\nमी उर्जा, बीजांतून निद्रिस्त, अणू रेणूत ध्यानस्थ, सूक्ष्म अन् अनंत\nपण जागा होतो अहं, \"मी\" जेव्हा, होते मूर्त, उरते \"अनुश्री\" फक्त\nमी अशक्य, मी अतर्क्य, मी आदि, मीच अंतिम...\nमध्यरात्रीचे पडघम, मला तुझ्या मिठीत घेउन जातात\nकधी उगवणार आहे ही मध्यरात्र\nमी ही दचकून जागी होइन, पण कोण कुठल्या जगात\nअद्न्याताचे जपलेले, पुजिलेले प्रश्नांचे संचित, उरे देव्हार्‍यात\nघुमेल नाद वेडा, स्वतःची हाक ऐकू येई सार्‍या इंद्रीयात\nआता कुठला ताबा, आता पंचप्राण न मावती या देहात\nदेऊ दे कबूली, की याच क्षणाला, सख्या होती हवी तुझी साथ\nगाडली एकांताची उर्मी, घातला होता पाय मळलेल्या सप्तपदीत\nपण एकटेच होतो रे, त्या सगळ्या क्षणात...मिठीत...सुखात\nआणि एकटेच असतो रे, जेव्हा मध्यरात्रीचे पडघम वाजतात\nउसनं दु:ख दुसर्‍याचं, तेवढच तुझ्यासाठीचं रडून\nभांडण असतं दुसर्‍याचं, समजूत माझी मीच काढून घेते\nसमोर प्रतिबिंब दुसर्‍याचं, त्यातचं तुला पाहून घेते\nकथानक कुण्या दुसर्‍याचं, आपल्याला उगीच गुंफून घेते\nआयुष्याची वळण तीच सरळसोट, फुकट अस्वस्थ वाटून घेते\nबाहेरचा गोंगाट परवडतो रे, अलगद स्वतःला हरवून घेते\nतोच वेळ आता सरतच नाही, लुटुपुटूच्या खेळात रमवून घेते\nनवरा म्हणतो काय सारखी सिरिअल्स् बघते, मी फक्त डोळे मिटून घेते \nआणि आभाळ कोसळण काय असतं हे ही कळलं\nत्याला काय झालय हे मी मलाही नाहीच विचारलं\nउगाच शूरासारखं मग मी स्वतःला नाहीच सावरलं\nतो HIV फिदीफिदी हसला, शिकून मी असं काय मिळवलं\nहा साला कोण 'माणूस' राहातो\nआज पुन्हा एकदा त्याने माझ्यातल्या डॉक्टरला छळलं\nआकाशात चांदण्याला नवा बहर\nत्याच्या आठवांचा जालीम कहर\nझोपेच्या साम्राज्यात बैचैनीचा अंमल\nबेसावध जाणिवांना भलती चाहूल\nदिवसघाईत संथ शून्यात वावर\nविचारांच्या थैमानात गाण्याची सर\nघड़याळयाच्या काट्यांना समेवर दाद\nगेल्या वेळाची कुणी ऐकावी फिर्याद\nअंतरात चहूकडून रोखलेली नजर\nवेंधळेपणाला झाली बहाण्याची भर\nकुणा न जुमानण्याइतका स्वप्नांना माज\nरेखीव चौकटीना मोडून केले कोलाज\n गुलाबी थंडीत चढला प्रेमज्वर\nडॉक्टरच्या दुखण्यावर औषधेच बेअसर \nकळावे, लोभ असावा :)\nपुणे तिथे काय उणे \nप्रेमात असं का होतं \nअसाच जोराचा वारा यावा\nआम्ही वाचलो..तुम्ही बी वाचाल ना :)\nAnushree Vartak. अनुश्री वर्तक\nएक dr आणि कवयित्री \nदोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://shodh-bodh.blogspot.com/2013/08/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T09:28:34Z", "digest": "sha1:Z5YIJHN5H5E2PD3NBBT3UP4AEZP5DING", "length": 23153, "nlines": 115, "source_domain": "shodh-bodh.blogspot.com", "title": "शोध आणि बोध: कृष्ण कोण होता?", "raw_content": "\nविविध विषयांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा महावीर सांगलीकर यांचा ब्लॉग.\nसत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम\nकृष्ण हे महाभारतातील सर्वात महत्वाचे पात्र आहे. महाभारताला एक पवित्र धार्मिक ग्रंथ मानले जाते, पण प्रत्यक्षात ते अनेक दंतकथांचा एक संग्रह आहे. त्यामुळे महाभारताला एखाद्या धर्माचा ग्रंथ मानने चुकीचे आहे. शिवाय महाभारताची रचना शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ काळात झाली आहे, त्याचाही एक इतिहास आहे. हा ग्रंथ महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या नंतर रचला गेला हे महाभारतातील अनेक उल्लेखांवरून सिद्ध करता येते.\nमहाभारत हा मुळात धार्मिक ग्रंथ नसला तरी पुढे वैदिकांनी त्यात आपला धर्म घुसवून त्याला एक धार्मिक ग्रंथ बनवण्याचा प्रयत्न केला.\nमहाभारताच्या सुरवातीच्या आवृत्तीत कृष्ण हे एक गौण पात्र होते, तर त्याचा भाऊ बलराम याला महत्व होते.\nपुढे समाजात वैदिक धर्म मागे पडून जैन आणि बौद्ध या धर्मांना महत्व आले. महावीर आणि गौतम बुद्ध हे दोघेही अवैदिक होते. त्यांच्या धर्मांना शह देण्यासाठी वैदिकांना एका अवैदिक हिरोची गरज होती. असा हिरो त्यांनी कृष्णाच्या रुपात उभा केला. वैदिकांनी कृष्णाला पुढील काळात देव बनवला, त्याला विष्णूचा अवतारही बनवून टाकले. गुप्त राजांच्या काळात, जो वैदिकांचा उत्कर्ष काळ होता, चौथ्या शतकात गीता लिहिली गेली, त्या गीतेत वैदिकांना हवे असलेले तत्वज्ञान कृष्णाच्या तोंडून सांगण्यात आले. हा काळ महावीर-बुद्ध यांच्या 1000 वर्षे नंतरचा आहे. बुद्ध-महावीर यांचे तत्वज्ञान हे अहिंसेचे होते, वैदिकांनी गीतेत हिंसेला प्रोत्साहन देणारे तत्वज्ञान मांडले.\nयाच काळात पुराणे लिहिण्याची सुरवात झाली. पुराणे ही तर विकृत लिखाणाचा कहर. त्यात अनेक अश्लिल आणि भाकडकथा लिहून शिव वगैरे अवैदिक व्यक्तींना बदनाम करण्यात आले. राधेसारखे पात्र घुसडून कृष्णालाही बदनाम करण्यात आले.\nकृष्ण हा वैदिक नव्हता. कृष्णाचा जन्म यदुकुळात झाला होता. यदुंना वैदिक लोक आपले शत्रू मानत असत, कारण ते वैदिकांचे नियम पाळत नसत. कृष्णाने वैदिकांच्या इंद्र, वरुण या देवतांचा पराभव केला होता. कृष्ण हा काळा होता, ही गोष्टही तो वैदिक नव्हता हेच सांगते.\nमग यदुंचा धर्म कोणता\n(वैदिक साहित्यानुसार यदु हे पंचजनांपैकी एक होते, आणि राजा होण्यास पात्र नव्हते. यदुंपैकी बहुतेक हे जैन धर्माचे अनुयायी होते. कृष्णाचे वडील वसुदेव हे जैन असण्याचीच जास्त शक्यता आहे. ...........यदुंच्या बालेकिल्ल्यांमध्ये जैनांचे सगळ्यात जुने अवशेष सापडतात हा कांही केवळ योगायोग नव्हे. )\n* मथुरा, शौरीपूर, हस्तिनापुर हे जैनांची प्राचीन ठिकाणे आहेत.यदुंच्या इतिहासातही हीच ठिकाणे महत्वाची आहेत.\nप्र. रा. देशमुख पुढे लिहितात, \"वैदिक लोक कृष्णाला नंतरच्या काळात भजू लागले, पण ते केवळ जैन धर्माच्या प्रभावामुळेच. कृष्ण भक्तीत मांसाहार आणि दारू यांना स्थान नसते, आणि शाकाहार ही कांही वैदिक संस्कृती नव्हे \".\nकृष्ण आणि जैन धर्म\nकृष्ण हा वैदिक नव्हता, त्यामुळे त्याचा धर्म श्रमण धर्मांपैकी एक कोणता तरी असणार, हे नक्की. प्राचीन भारतात जैन आणि बौद्ध हे श्रमणांचे मुख्य धर्म होते. त्यापैकी बौद्ध धर्म गौतम बुद्धाने इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन केला. पण कृष्णाचा अंदाजित काळ हा इ.स. पूर्व एक हजार वर्षे मानला जातो. त्यामुळे कृष्ण बौद्ध असण्याची शक्यता उरत नाही. शिवाय बौद्ध साहित्यात कृष्णाला मान्यता नाही. या उलट महावीरांच्या आधीही जैन धर्म अस्तित्वात होता, तो वैदिक धर्माच्याही आधीचा धर्म आहे आणि त्याची मुळे सिंधू संस्कृतीत आहेत, हे अनेक भारतीय व युरोपिअन इतिहासकारांनी दाखवून दिले आहे, आणि जैन साहित्यात अगदी प्राचीन काळापासून कृष्ण ही एक महत्वाची व्यक्ती आहे.\nजैन साहित्यात कृष्णाला मानाचे स्थान आहे. तो तीर्थंकर अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) यांचा चुलतभाऊ आहे. जैन साहित्यात कृष्ण हा अर्धचक्रवर्ती आहे, तसेच तो जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण.\nदुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव यांनाही जैन साहित्यात महत्वाचे स्थान आहे. इतके की 'वासुदेव हिन्डी' हा प्राचीन जैन ग्रंथ पूर्णपणे वसूदेव यांच्यावर लिहिला गेला आहे.\nमहाभारतात घोर अंगिरस यांच्याकडून कृष्णाला आध्यात्मिक ज्ञान मिळाले असा उल्लेख आहे. हे घोर अंगिरस म्हणजे अरिठ्ठनेमी असावेत असे वाटते. जैन साहित्यात कृष्णाचा सर्वात जुना उल्लेख आणि विस्तृत्व चरित्र अंतगडदसाओ या आगम ग्रंथात, शिवाय त्रिषष्ठी शलाका पुरुष या ग्रंथातही येते. कृष्णाचे चरित्र सांगणारे इतरही अनेक ग्रंथ आहेत.\nत्रि षष्ठी शलाका पुरुष : आचार्य शिलांक\nहिंदू धर्माचे शैव रहस्य: संजय सोनवणी\nज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण\nवारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे\nLabels: कृष्ण, जैन धर्म, यदु, यदु कुळ, यादव\nसांगलीकर सर, मी तुमचे लेख वाचतो. तुमच्या राजकीय आणि सामाजिक लिखाणामुळे प्रभावित देखील होतो. परंतु वरती महाभारताचा काळ हा बुद्ध आणि महावीर ह्यांच्या नंतरचा आहे ह्या विधानावर मात्र मी हरकत घेऊ इच्छितो ह्याचे कारण माझे अप्रत्यक्ष रित्या महाभारत ग्रंथावर होणारे काम. महाभारतात एका खगोलीय घटनेचा उल्लेख आहे. ती घटना अशी सांगते:\nयुद्धाच्या एक दिवस आधी व्यास धृतराष्ट्राला सांगतो की सप्तर्षी ह्या समूहातील 'अरुंधती' ही वशिष्टाच्या पुढे चालू लागली आहे. ( अरुंधती आणि वशिष्ट हे सप्तर्षी ह्या समूहातील जोड तारे आहेत). आज आकाशाकडे पाहिले तर वशिष्ट हा अरुंधतीच्या पुढे चालतो ( पूर्व-पश्चिम ह्या दिशेनुसार) इतके दिवस ह्या निरीक्षणाबद्दल अमान्यता होती. तशी ती असलीच पाहिजे कारण असे तारे एकमेकांच्या पुढे जात नाहीत.\nपरंतु अमेरिकेत श्री. निलेश ओंक म्हणून एक गृहस्थ राहतात ज्यांनी NASA चे आधुनिक software वापरून ह्या निरीक्षणाची चाचणी केली आणि त्यांना असे आढळले आहे की ही घटना घडली होती. इ.स.पू १३००० ते इ.स.पू ४३८० ह्या वर्षांच्या दरम्यान. पुढे अधिक चाचण्या करून त्यांनी महाभारत युद्धाचा काळ इ.स .पू ५५६१ हा शोधला आहे. महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे त्यात देखील ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू ५५२५ एवढा येतो. ( इथे देखील NASA ची गणिते वापरली गेली आहेत). मी ओंक ह्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करतोय.\nमी हे जे काही लिहिलंय ते संपूर्ण विज्ञाननिष्ठ आहे ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच लिहिलंय. कारण भोंदूपणा आणि भाकडकथा ह्यावर माझा देखील विश्वास नाही. :)\nसर, संपूर्ण सहमत - \"गुप्त राजांच्या काळात, जो वैदिकांचा उत्कर्ष काळ होता, चौथ्या शतकात गीता लिहिली गेली, त्या गीतेत वैदिकांना हवे असलेले तत्वज्ञान कृष्णाच्या तोंडून सांगण्यात आले. हा काळ महावीर-बुद्ध यांच्या 1000 वर्षे नंतरचा आहे. बुद्ध-महावीर यांचे तत्वज्ञान हे अहिंसेचे होते, वैदिकांनी गीतेत हिंसेला प्रोत्साहन देणारे तत्वज्ञान मांडले.\"\n\"जैन साहित्यात कृष्णाला मानाचे स्थान आहे. तो तीर्थंकर अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) यांचा चुलतभाऊ आहे. जैन साहित्यात कृष्ण हा अर्धचक्रवर्ती आहे, तसेच तो जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण.\"\n\"दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव यांनाही जैन साहित्यात महत्वाचे स्थान आहे. इतके की 'वासुदेव हिन्डी' हा प्राचीन जैन ग्रंथ पूर्णपणे वसूदेव यांच्यावर लिहिला गेला आहे.\"\nसध्या श्रीकृष्णाच्या अस्तित्वाविषयी अजूनही काही माहिती जैन धर्म ग्रंथ/साहित्यात उपलब्ध आहे. योगायोगाने ती माहिती मी वाचली आहे. पण त्याविषयी येथे चर्चा नको. उगाचच काही लोकांच्या भावना दुखाविल्या जातील.\nमाझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..\nशोध आणि बोध LATEST\nकृपया हे पेज लाईक करावे\nशोध आणि बोध Latest\nजैन धर्म आणि तत्वज्ञान\nचाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध\nकाँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला\nपुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव\nपुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे\nअंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ\nअंगविज्जा - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश टाकणारा प्राचीन ग्रंथ \nमहाराष्ट्र आणि जैन धर्म\nमराठी नसलेले ग्रेट महाराष्ट्रीय\nमातंग समाज आणि जैन धर्म\nओ.बी.सी. आणि जैन धर्म\nवैचारिक विकासातील मानसिक अडथळे\nसैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात\nबाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला\nबौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता\nसंत तुकाराम आणि जैन धर्म\nशुन्याचा शोध आणि जैन गणित\nशैव आणि जैन संबध: एक अवलोकन\nनायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा\nभगवान महावीर यांचे चातुर्मास आणि विहार\nज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण\nभारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास\nपोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी\nजैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत\nभारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख\nराजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ\nजैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान\nशिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले\nवारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे\nवीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास\nभारतातील मुलींची पहिली शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-saamtv-lakme-fashion-week-2018-1056", "date_download": "2018-04-23T09:32:44Z", "digest": "sha1:AMR6QBS7UG7DAF43SRNKK4UUS52ZBA72", "length": 8329, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news SaamTv Lakme fashion week 2018 | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा\nलॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nमुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या जोडीने सर्वांचे लक्षं वेधून घेतले. शोज् टॉपर म्हणून शाहिद-मीरा यांनी रॅम्प वॉक केला. ऑफ व्हाईट कलरची शाही शेरवानी असा शाहिद आणि ऑफ व्हाईट विथ पीच लाइनिंग फ्लोरल लहंगा असा मीराचा लूक होता.\nमुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या जोडीने सर्वांचे लक्षं वेधून घेतले. शोज् टॉपर म्हणून शाहिद-मीरा यांनी रॅम्प वॉक केला. ऑफ व्हाईट कलरची शाही शेरवानी असा शाहिद आणि ऑफ व्हाईट विथ पीच लाइनिंग फ्लोरल लहंगा असा मीराचा लूक होता.\nया रॉयल लूक मध्ये एंट्री केलेल्या जोडीला लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुप वाहवाई मिळाली. रॅम्पच्या मध्यभागी आल्यावर शाहिदने मीराचे बोट पकडून फिरवले तेव्हा तिचा दुपट्टा शाहिदच्या डोक्यावर अडकला. हेच दुसऱ्या बाजूने परत शाहिदने मीराचा हात पकडला तेव्हा ती स्वतःच तिच्या दुपट्ट्यात अडकली. या सर्व गोंधळाने शाहिद-मीरासह प्रेक्षकांनाही हास्य रोखता आले नाही.\nहा (1 फेब्रु.) लॅक्मे फॅशन वीक 2018चा पहिला दिवस होता. शोज् टॉपर डिझायनर अनिता डोंग्रेसाठी शाहिद-मीराने रॅम्प वॉक केला. शाहिदने यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्ये वॉक केला आहे. मीराचा हा पहीला लॅक्मे फॅशन वीक वॉक होता.\nयावेळी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये फारच कमी काळात हटके छाप निर्माण केलेली अभिनेत्री तापसी पन्नू हीची बदास अदाही घायाळ करणारी ठरली. डिझायनर रितू कुमार यांनी डिझाइन केलेला ड्रेस तापसीने परिधान केला होता.\nफॅशन मीरा राजपूत अभिनेत्री तापसी पन्नू\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'कच्चा लिंबू' सर्वोत्कृष्ट मराठी...\nनवी दिल्ली : आज (ता. 13) 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या...\nअमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा येणार एकत्र\nपिंक चित्रपटातून तापसी पन्नू प्रेक्षकांना माहित झाली. त्या चित्रपटात बिग बी अमिताभ...\n'अमृता वहिनी हाय हाय'च्या घोषणा; राष्ट्रवादीची निदर्शने\nसोलापूर : रामदेवबाबांच्या पतंजलीऐवजी महिला बचत गटाच्या उत्पादनांना सरकारी विक्री...\nसुपरस्टार श्रीदेवी पंचत्वात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले....\nसाडेतीन हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट\n14 ऑक्टोबर २०१६, थंडीचे दिवस होते. राजस्थानमधील सगळ्यात विलक्षण सुंदर समजल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://saptaranga.blogspot.com/2008/09/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:48:40Z", "digest": "sha1:2DXJIUBJVSKPAM72UZZYXR3TAJUCNKY2", "length": 13187, "nlines": 145, "source_domain": "saptaranga.blogspot.com", "title": "सप्तरंग: लग्न, ज्योतिषी आणि मी。。。", "raw_content": "\nलग्न, ज्योतिषी आणि मी。。。\nअडचणीत माणसाला देव आठवतो म्हणतात. मी म्हणते, कलियुगातल्या माणसाला अडचणीत ज्योतिषी आठवतो. कलियुगात माणसाला देव भेटेल हे दुर्लभच. मी सुद्धा ह्या न त्या कारणांसाठी ज्योतिष्याकडे कडे गेले अहे. माझा जन्म २९ डिसेंबर १९८१ ला पहाटे १.१४ मि. ला - मुलुंड - मुंबईला झाला. [ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणा~यांनी खुशाल माझी पत्रिका मांडावी आणि माझे फुकट भविष्य सांगावे. ] आता पर्यंत अनेक ज्योतिश्यांनी माझी पत्रिका मांडली आहे. पत्रिकेप्रमाणे माझे दर सहा महिन्याने चांगले दिवस येतात. प्रत्येक्षात मात्र 'त्या' सहा महिन्यांची वाट मी अद्याप पहात आहे. वेळेप्रमाणे मांडलेल्या गणितात माझे ग्रह उच्च स्थानी असतात किंवा सहा महिन्यानी ते उच्चीचे होणार असतात. प्रत्येक्षात तसे घडत नाही आणि मग सुरू होते पुढल्या सहा महिन्यांची प्रतिक्षा. मला तर वाटतं माझी जन्माची वेळच त्या डॉक्टर ने चुकीची नोंदवली आहे. सगळे ग्रह मजबूत व उच्चीचे असताना घोडं अड़ते कुठे हेच समजत नाही.\nमुलीच्या लग्नाची काळजी सगळ्याच आई - वडीलांना असते तशी माझ्या आई बाबांना पण आहे. अपल्या मुलीला योग्य असा जोडीदार मिळेल का [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना [आजकालच्या नवीन अमेरिकन फॅड प्रमाणे मुलगी जावईच शोधेल ना अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा अस पण काही आई वडिल या ज्योतिष्याकडे तसल्ली करून घेत असावेत. नाहितर ही आमच्या मुलिची बायको, अथवा हा आमच्या मुलाचा नवरा अशी ओळख करून देण्याची वेळ येईल ह्याची धास्ती. तो काळ अता भारतात दूर नाही म्हणा.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला.] असो... तर मी पण माझे ग्रह सध्या कोणत्या घरात वास्तव्याला अहेत हे विचारायला जोतिष्याकडे गेले. मी ज्या घरात जन्मले त्याच घरात अद्याप राहते आहे. पण माझ्या ह्या ग्रहानी आता पर्यंत अनेक घर बदलली आहेत. बर घर बदलून तेथे वास्तुशांत नको का करायला दोन चार संस्कृत श्लोक म्हटले की घरात शांतता नांदते. [घरात म्हणजे घरातल्या माणसात असे समजू नये.] माझे ग्रह घर बदलून वास्तुशांत करत नसावेत, म्हणून मग ते घर मला त्रास द्यायला लागत.\n。\"तुमच्या मुलीचं लग्नानंतर भाग्य उजळणार आहे\" अस एकाकडून समजले. माझ्या नव~याच्या ग्रहांच्या मांडणी नुसार लग्नानंतर हाल अपेष्टा असाव्यात, तरिच तो आजून मला भेटलेला नाही.\n。\"तुझा नवरा पायलट असेल\" अस एका पठ्ठ्याने मला सांगितले. त्या दिवसा पसून मी अनेक वर्षे विमानाकडे डोळे लाऊन बसले होते. नंतर त्याच ज्योतिष्याने काही वर्षांनी मला software engineer नवरा मिळेल असे सांगितले. माझ Plane अश्या प्रकारे office मधे Land झाले. लग्नाला उभ्या असलेल्या मुलींच्या भावनांशी असे खेळू नये :-(\n。 एका जोतिषाने तर सांगीतले, \"ह्या मुलिशी जो लग्न करेल तो मुलगा खूप भग्यवान असेल म्हणे\". थापड्या जोतिषी नुसता. माला तर स्वता:लाच स्वताच्या नव~याची दया येते. माझी अखंड बडबड सहन करायला लागणार आहे त्याला. आणि तो भाग्यवान\n。 Arrange marriage चांगले का Love marriage हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. मला कशाचाच तिरस्कार नाही. Arrange किंवा Love किंवा Marriage ह्या सगळ्यांच्या बाबतीत मी समतोल विचारांची आहे. पण तो arrange marriage मधला \"मुलगी बघण\" हा प्रकार काही मला झेपलेला नाही आणि जमणार पण नाही. अम्हाला पत्रिका बघायची नाही - आमचा ह्यावर विश्वास नाही, असे ठासून सांगणारे पुढे म्हणतात, \"पण मुलीला मंगळ तेवढ नको\" हा अर्धवट पणा. मुलीचा संपूर्ण फोटो पाठवा - कशाला माझे पायगुण बघायला काय हा पोरकट पणा. [अश्या लोकांना प्रतिका पाठवायची नाही... अस मी आईला सांगितले. त्यावर आईने मला ४ (४०००) समजूतिच्या गोष्टी सांगितल्या.]\n。ह्याला कंटाळून मी एका जोतिष्याला सरळ विचारले,\"माझ love marriage होईल का योग आहे का\" त्यावर त्यांनी \"तुझा love marriage चा योग निघून गेला\" अस सांगितल. निघून गेला असा कसा निघून गेला योग असा कसा निघून गेला योग बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला बर मग योग जेव्हा केव्हा होता तेव्हा ३-४ नाही तरी एखाद्या तरी मुलाने मागणी नको का घालायला मला योग आलेला कळायच्या आतच तो योग शेजारच्या घरात निघून गेला :-(\nमाझ तर ह्या ज्योतिष्यांना एक सांगण आहे - काही ज्योतोषी सांगतात... पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा अग्नेयला जा अस सांगण्यापेक्षा सरळ पत्ता का नाही देत सरळ मला पत्ताच सांगा न\nलग्न, ज्योतिषी आणि मी。。。यांचे ग्रह आजून जुळलेले नाहीत.\nमराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा\nही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो\nदिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा\nएकदम मस्तच झालंय लेख.\nलग्न, ज्योतिषी आणि मी。。。\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-04-23T09:13:34Z", "digest": "sha1:FI5P3NYPP53QUYTSQRVJWQIMGLOCPJ7U", "length": 10822, "nlines": 77, "source_domain": "pclive7.com", "title": "कैलास कदम हत्येचा कट प्रकरणी ४ पोलीसांसह १७ जणांवर मोक्का | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पिंपरी-चिंचवड कैलास कदम हत्येचा कट प्रकरणी ४ पोलीसांसह १७ जणांवर मोक्का\nकैलास कदम हत्येचा कट प्रकरणी ४ पोलीसांसह १७ जणांवर मोक्का\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट, त्यासाठी आरोपीना पळून जायला मदत करणारे चार पोलीस, नगरसेविकेचा पती ॲड. सुशील मंचरकर, माजी स्वीकृत सदस्य हमीद शेख यांच्यासह १३ आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nसंजय काशीनाथ चंदनशीव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १० एप्रिल रोजी मोरवाडी न्यायालयाजवळून काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर हे आरोपी पळून गेले होते.\nवेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेले असताना तेथून परत येताना हे गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले असे सुरुवातीला दर्शविण्यात आले होते. मात्र हे गुन्हेगार पिंपरी मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने तपासासाठी पिंपरीकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा तपास करत असताना फरारी गुन्हेगार सापडले.\nत्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मंचरकर याने आरोपींशी तुरुंगात ओळख झाल्यानंतर त्यांच्या सोबत माजी नगरसेवकाला मारण्यासाठी कट रचला त्यामध्ये ३० लाख रुपये व शस्त्र पुरविण्याचे ठरले. मात्र त्यांना जामिनावर तुरुंगातून काढणे वेळखाऊ असल्याने पिंपरी येथील न्यायालयातून त्यांना पळवून नेण्याचे ठरले. त्यानुसार चांदिलकर, पात्रे, जगताप यांना झेंडेच्या सहाय्याने पिंपरी न्यायालयातून पळवून लावले. पुढे झेंडे याच्याकरवी मंचरकर याने अँडव्हान्स ५ लाख रुपये आणि तीन पिस्टल व ३० जिवंत काडतुसे व इतर सामग्री दिली. मात्र पोलिसांनी झेंडे व पात्रे याला अटक केल्याने कट उधळला गेला.\nपुढे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तपासात याप्रकरणी ॲड. सुशील मंचरकर, माजी स्वीकृत सदस्य हमीद नवाब शेख, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर, सुरेश स्वामीनाथ झेंडे, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे, सचिन जयविलास जाधव, संतोष जगताप, गणेश अहिवळे, विजय कुर्मी, गिर्‍या ऊर्फ विशाल गायकवाड यांच्यासह कोर्ट कंपनीचे पोलीस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे यांना अटक केली. या प्रकरणात पोलीस व आरोपी असे एकूण १७ जणांवर आधीच्या कलमांसह या प्रकरणाचा तपास करून त्‍यांच्यावर मोकांतर्गत कलमवाढ करण्याचा अहवाल गुन्हे शाखेने तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला. या प्रस्तावास अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे यांनी मान्यता दिली.\nगुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\nप्राधिकरण पीएमआरडीएत विलीन करू नये; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:15:26Z", "digest": "sha1:VN25CFZNZA2XWWSQB4RM5FV4XPVMBGHI", "length": 8159, "nlines": 109, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: सिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजकीय नेते व कंत्राटदारांवर कारवाई करा -विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी -तरुणभारत", "raw_content": "\nसिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजकीय नेते व कंत्राटदारांवर कारवाई करा -विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी -तरुणभारत\nसिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजकीय नेते व कंत्राटदारांवर कारवाई करा -विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी -तरुणभारत\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या नेतृत्वात विदर्भ सिचन महामंडळाच्या सिचन घोटाळ्यात गुंतलेल्या ४५ अधिकारयांच्या चौकशीचे आदेश ही एक धूळफेकच आहे. ज्या नंदकुमार वडनेरे समितीच्या अहवालात कंत्राटदारांना काम न करता कोट्यवधींची खैरात ज्यांच्या सहीने देण्यात आली. असे नेते अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई का करण्यात येत नाही असा सवाल शेतकरयांच्या प्रश्नासाठी झटणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.\n३७ प्रकल्पांना मंजुरी देत निवडणुकीच्या तोंडावर कायदा मोडून वाटलेली खैरात याचे सर्व खापर त्यावेळचे कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के यांच्या माथी मारण्यात आल्याचा ठपका वडनेरे समितीने ठेवला आहे. सिचन घोटाळ्याला चौकशीची चादर टाकून झाकण्याचा प्रयत्न आहे, असाही आरोप तिवारी यांनी केला आहे. सिचन घोटाळ्याच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणारया एच. टी. मेंढेगिरी समितीमध्ये चर्चेत असलेले संग्रहित छायाचित्र मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या संदर्भात जो भ्रष्टाचार झाला आहे तो छायाचित्रांसह जगजाहीर केला आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा व निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निधीमध्येसुद्धा व कामाच्या गुणवत्तेमध्ये कंत्राटदारांनी अधिकारयांना सोबत घेऊन तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांची मान्यता होती असे दस्तावेज उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.\nभ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असलेले सर्व राजकीय नेते व कंत्राटदार यांना सोडून सिचन घोटाळ्याची कोणतीही चौकशी म्हणजे एक थोतांडच असणार आहे. सनदी अधिकारयांमार्फत ही चौकशी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार काही साध्य करु शकणार नाही, असे तिवारी यांचे मत आहे.\nसिचन घोटाळ्यामध्ये राजकीय नेते व कंत्राटदार यांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत विशेष चौकशी समिती नियुक्त करून जगाला सत्य सांगावे, असेही आवाहन त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केले आहे.\nसिचन घोटाळ्याची चौकशी ही धूळफेक-करोडो खाणारया राजक...\nचंद्रपूर दारूबंदी -दारू उद्योजकांकडून ३५ कोटींची ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-samana-editorial-dharma-patil-suicide-1021", "date_download": "2018-04-23T09:31:13Z", "digest": "sha1:4LEXYUKS6VLUA7P3O3F44BPZLRW7FG4B", "length": 7177, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news samana editorial on dharma patil suicide | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..\nधर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\n\"धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल\"\nधर्मा पाटील यांच्या आत्महत्येवरुन सामना संपादकीयमधून सरकारवर तोफ डागण्यात आलीय. जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयत विष प्राशन केलं होतं. या घटनेवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्ध ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केलीय..जे घडलं ते विदारक आहे..याला राज्य करणे म्हणता येत नाही..मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका..धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचं राज्य आहे..धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल अशी बोचरी टीका सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आलीय...अधर्माच्या राज्यात धर्मा पाटील यांचं ऐकणारं कुणी नव्हतं..भाषण माफियांना डोलणारी आणि टाळ्या वाजवणारी माणसं हवी आहेत त्यामुळे धर्मा पाटलांचं सत्य कोण ऐकणार असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल करण्यात आला.\nधर्मा पाटील dharma patil सामना मंत्रालय मुख्यमंत्री भाजप\nमोदी कॅप्टन, मी बॅट्‌समन - आठवले\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन...\nन्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची SIT...\nन्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची SIT चौकशी होणार नाही असा...\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही\nराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय मंत्री...\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री...\nशिवसेनेचे नगर जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी धडकणार मुख्यमंत्र्यांच्या...\nअहमदनगर जिल्ह्य़ातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या खुनामुळे भाजप-...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/35?page=16", "date_download": "2018-04-23T09:55:20Z", "digest": "sha1:HLY3WRRJNJIQJ2AK6VW5QJGRFIKS5UT7", "length": 7713, "nlines": 158, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विचार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन)\nबाळकरामाचे प्रेम प्रकरण (एक),(दोन),(तीन)\n(अ) बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.\n(ब) जर बाळकरामचे इंदूवर प्रेम असेल तर त्याचे बिंदूवर सुद्धा प्रेम आहे.\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १\nएकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.\nसप्टेंबर २०१० चे अंदाज \nसप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.\n२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.\n४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग\nअसमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या\nआकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे\nउपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.\nवार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....\nआपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपणा हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते.\nका, कसे आणि अनियत जग\nका, कसे आणि अनियतजग\nमी शानबा५१२ ईथे लिहत नाही,पण खातं खुप दीवसांपासुन आहे.आपल्या सर्व विचारवंताच्या सोबतीचा फायदा घ्यावा अस वाटत.\nओपनसोर्स चळवळ, त्याचे फायदे-तोटे, व त्याबद्दल सर्वकाही http://www.opensource.org/ ह्या सायटीवर वाचायला मिळते. आयटीमधे काम करणाऱ्या सर्वांना ह्या चळवळीची ओळख आहे.\nआणि मी सिगरेट सोडली....\nआणि मी सिगरेट सोडली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-23T09:31:49Z", "digest": "sha1:T3DPSKVVUZEM7DW6ZEBDYXC7WVZ47IKL", "length": 6327, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ) | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome मनोरंजन शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nशुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली (व्हिडीओ)\nहैदराबाद :- रिंकू राजगुरू अर्थात सैराट नंतर आर्ची म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेली, रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली.\nरिंकू पाय घसरून पडल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तेलुगू सैराटचं शुटिंग सुरू असताना अशी घटना घडली, आर्ची नदीत पडल्याचा हा व्हिडीओ सत्य असल्याचा दुजोरा तिच्या निकटवर्तीयांनीही दिला आहे.\nव्हि़डीओत आर्ची नदीतील दगडावर डान्स करताना दिसते, आणि पाय घसरल्याने प्रचंड वेगाने ती खाली पडली आहे, आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला यात काही दुखापत झाली आहे किंवा नाही. हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे, यूट्यूबवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.\n‘महापालिका जवाब दो’ पिंपरीत राष्ट्रवादीचा मोर्चा\nभाजपा नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nपिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ram-janmabhumi-and-babri-mashjid-1126", "date_download": "2018-04-23T09:35:57Z", "digest": "sha1:4T4JHMCPTB6IRKN5A4EA75W7NPF7DRUD", "length": 6862, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news ram janmabhumi and babri mashjid | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराम जन्म भूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरूवात\nराम जन्म भूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरूवात\nराम जन्म भूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरूवात\nराम जन्म भूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरूवात\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nसंपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीला... आजपासून सुप्रीम कोर्टात सुरूवात होत आहे... या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते.,, तर, सुनावणी घाईत न घेता ती जुलै 2019च्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी... मुस्लिम पक्षकारांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे 5 डिसेंबरला केली होती.... तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होतेय...यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं वादग्रस्त जमिनीचे तीन भाग केले.\nसंपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीला... आजपासून सुप्रीम कोर्टात सुरूवात होत आहे... या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते.,, तर, सुनावणी घाईत न घेता ती जुलै 2019च्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी... मुस्लिम पक्षकारांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे 5 डिसेंबरला केली होती.... तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होतेय...यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं वादग्रस्त जमिनीचे तीन भाग केले. त्यात एक हिस्सा सुन्नी वक्फ बोर्ड एक भाग निर्मोही अखाडा आणि तिसरा भाग राम ललासाठी वाटून देण्याचा निर्णय दिला होता... आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे.\nराम मंदिर बाबरी मशीद मुस्लिम वकील\nसलमानला आजची रात्र जेलमध्ये काढावी लागणार\nजोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A8", "date_download": "2018-04-23T09:32:23Z", "digest": "sha1:YONEVPLEUCLJ2GKOIGTKJSSGAWPGSOT3", "length": 6015, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९०२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे - ९२० चे\nवर्षे: ८९९ - ९०० - ९०१ - ९०२ - ९०३ - ९०४ - ९०५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ५ - १० वर्षांच्या सत्ताकालानंतर अब्बासी खलीफा अल-मुतादिदचा बगदादमध्ये विषप्रयोगाने मृत्यू झाल्यावर त्याचा मोठा मुलगा अल-मुक्ताफी सत्तेवर आला.\nइ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१७ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/599/Paap-Tharauni-Punyaila.php", "date_download": "2018-04-23T09:10:18Z", "digest": "sha1:PQ6UO3DROSR72WBTVUSD3EUE5MIIP3RG", "length": 9872, "nlines": 140, "source_domain": "www.gadima.com", "title": "Paap Tharauni Punyaila -: पाप ठरवूनी पुण्याला : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosle|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nएक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे\nजरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nचित्रपट: आधार Film: Aadhar\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nपाच प्राणांचा रे पावा\nपडते पाया नका सोडूनी जाऊ मला\nपेरते व्हा रे पेरते व्हा\nफेर्‍या मागे चाले फेरा\nप्रिती प्रिती सारे म्हणती\nप्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा\nप्रित करु लपून छपून\nरचिल्या कुणि या प्रेमकथा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T09:50:38Z", "digest": "sha1:HSRPHITT2ZL5ITCDLATMQQIUDBLLQLDQ", "length": 26630, "nlines": 178, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गोव्यातल्या वादळाची चाहुल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगोव्यात सध्या संघ आणि भाजपा यांची जुंपली आहे. रा. स्व. संघाचीच राजकीय आघाडी म्हणून भाजपा ओळखला जातो. पण ही स्थिती जितकी १९८० पुर्वी होती तशी आज राहिलेली नाही. त्यापुर्वी तो जनसंघ म्हणून राजकीय पक्ष होता. त्याचे जनता पक्षात विसर्जन झाले आणि ते पुरेसे झाले नाही. म्हणून पुन्हा जनसंघीय बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. मात्र या नव्या अवतारात भाजपा हा पुर्वीचा जनसंघ राहिलेला नव्हता. ज्याला कार्यकर्ता या पायावरचे संघटन म्हणून ओळखले जात होते. भाजपाची स्थापना झाली, तेव्हा जनता पक्षाचा वारसा आपल्याकडे घेऊन देशव्यापी पक्ष होण्याचा चंग बांधण्यात आला होता. म्हणूनच आपला हिंदूत्ववादी चेहरा लपवून वा झाकून, भाजपा सतत गांधीवादी समाजवादाचा मुखवटा लावून वावरत होता. खेरीज नव्या पिढीचे नेतृत्व जोपासण्यालाही आरंभ झाला होता. आपल्यावरचा उच्चवर्णिय वा ब्राह्मणी छाप पुसून टाकण्यालाही भाजपाने प्राधान्य दिले होते. मात्र १९८४ च्या राजीवलाटेत भाजपा पुरता वाहून गेला आणि नव्याने विचार करण्याची पाळी भाजपावर आली. संघातही त्यावरून चिंतन झालेले असणार. म्हणून की काय, संघाइतके पक्के बंदिस्त संघटन भाजपाचे नसावे, असा पवित्रा घेतला गेला. संघाच्या स्वयंसेवकांनी पोषक स्थिती निर्माण करावी, अन्य संघटनांनी त्याला हातभार लावावा. पण भाजपा स्वतंत्रपणे राजकीय निर्णय घेणारा पक्ष असावा, अशी व्यवस्था करण्यात आली. तरीही त्याच्या धोरणात्मक निर्णयावर संघाचा प्रभाव राहिलेला आहे. हे नाकारण्यात अर्थ नाही. म्हणून तर १९८८ नंतर गांधीवादी समाजवादाची कास सोडून, पुन्हा भाजपा आपल्या हिंदूत्वाकडे झुकत गेला. त्यातूनच नवे प्रदेश भाजपाच्या पंखाखाली येत गेले. गोवा त्याच तडजोडीतून भाजपाच्या हातात आलेला एक छोटा प्रांत आहे. पण आता त्यालाही ग्रहण लागले आहे.\nमनोहर पर्रीकर यांचे नवे नेतृत्व गोव्यात उभे करून तिथल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी मैत्री करण्यात आली. क्रमाक्रमाने त्याच पक्षाची जागा भाजपा व्यापत केला. आज गोव्यातल्या मूळ राजकीय पक्षांचे नामोनिशाण उरलेले नाही. तिथला ख्रिश्चन व कोंकणी भाषेचा अभिमानी युनायटेड गोवन्स पक्ष कॉग्रेसमध्ये विलीन झाला, तर मगो पक्ष भाजपात मिसळून गेला. पण त्याचे श्रेय संघाच्या कामाइतकेच मनोहर पर्रीकर यांच्या समयसुचकतेला द्यावे लागेल. गोव्यात मोठी ख्रिश्चन लोकसंख्या असून, त्यांना भाजपाच्या गोटात आणण्यासाठी पर्रीकर यांची तडजोडवादी भूमिकाच उपयुक्त ठरली. हे कोणाला नाकारता येणार नाही. पण संघाचा पाया हिंदूत्वावर आधारलेला असल्याने मिशनरी संस्था व त्यांच्या शाळा, हे संघाचे लक्ष्य राहिलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसला नामोहरम करताना ख्रिश्चन मतांकडे पाठ फ़िरवून भाजपाला सत्तेवर येणे शक्य झाले नव्हते. ती तडजोड पर्रीकर यांनी केली आणि त्यामुळेच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले. सगळी हिंदू मते एकगठ्ठा भाजपाच्या मागे उभी रहात नाहीत. पण हिंदूत्वाचा बागुलबुवा दाखवला, मग एकगठ्ठा ख्रिश्चन मते विरोधात मात्र जातात. ती टोकेरी भूमिका सौम्य होईपर्यंत आणि ख्रिश्चन मतदाराला कोकणी अस्मितेशी पक्के जोडले जाईपर्यंत, मिशनरी संस्थांना लगाम लावणे शक्य नाही. राष्ट्रीय सत्ता मिळवताना भाजपाला मंदिर, समान नागरी कायदा आणि ३७० कलमाचा विषय गुंडाळून ठेवावा लागला होता. गोव्यातील स्थिती काहीशी तशीच आहे. आज भाजपाची पाळेमुळे इतकी घट्ट रोवलेली नाहीत, की तिथल्या ख्रिश्चन मतदारांकडे पुर्णपणे पाठ फ़िरवावी. संघाच्या स्थानिक नेत्यांना त्याचे भान राहिले नाही, त्यातून सध्या आपसात संघर्ष पेटला आहे. किंबहूना नेतृत्वाचा विवाद समेटाने मिटवता आला नाही, त्याचे दुष्परिणाम तिथे चव्हाट्यावर आलेले आहे.\nयात पर्रीकर वा गोव्यातील संघनेते यांच्या आपापल्या जागी असलेल्या भूमिका चुकीच्या नाहीत. त्यांच्या मुळच्या धोरणांशी त्या जुळणार्‍याच आहेत. मिशनरी संस्थांमधून धर्मप्रसाराचे व धर्मांतराचे काम चालते. त्याला पायबंद घालण्याला संघ कटीबद्ध आहे. सहाजिकच अशा संस्थांना सरकारने अनुदान देणे म्हणजेच प्रोत्साहन ठरते, अशी त्यामागची भूमिका आहे. त्यासाठीच उघड धर्माचे नाव न घेता अशा मागणीला प्रादेशिक भाषा संवर्धनाचा मुखवटा लावलेला आहे. त्यात काहीही गैर नाही. हल्ली सर्वच संस्था व संघटना आपापल्या हेतूला पावित्र्य मिळावे, म्हणून तत्वांचा मुलामा देत असतात. मिशनरीही गरीबांना मदत म्हणून धर्मांतराचा हेतू लपवित असतात. मग संघाने आपले हेतू लपवू नयेत, असे कोणी म्हणू शकत नाही. पण भाजपाचे सरकार पडल्याने येऊ शकणारे अन्य पक्षाचे सरकार; संघाच्या या मागण्या कशा मान्य करणार आहे हुकमी मतांची बेगमी असती तर वा ख्रिश्चन मतांवर विसंबून रहाण्याची गरज नसती तर भाजपाच्या सरकारनेही स्थानिक संघ नेत्यांच्या मागण्या लगेच पुर्ण केल्या असत्या. पण ते आज शक्य नाही आणि स्थानिक नेते त्यासाठी हटवाद करून बसले आहेत. त्यामुळे संघाच्या केंद्रिय नेतृत्वापुढे पेच पडला आहे. आपल्याच राजकीय आघाडीला वार्‍यावर सोडून स्वयंसेवकांना प्रोत्साहन द्यायचे, की हटवाद सोडून सत्ता टिकवायची हुकमी मतांची बेगमी असती तर वा ख्रिश्चन मतांवर विसंबून रहाण्याची गरज नसती तर भाजपाच्या सरकारनेही स्थानिक संघ नेत्यांच्या मागण्या लगेच पुर्ण केल्या असत्या. पण ते आज शक्य नाही आणि स्थानिक नेते त्यासाठी हटवाद करून बसले आहेत. त्यामुळे संघाच्या केंद्रिय नेतृत्वापुढे पेच पडला आहे. आपल्याच राजकीय आघाडीला वार्‍यावर सोडून स्वयंसेवकांना प्रोत्साहन द्यायचे, की हटवाद सोडून सत्ता टिकवायची त्यात नेतृत्वाने राजकीय आघाडीची पाठराखण करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून गोव्यात संघ स्वयंसेवक आणि भाजपा यांच्यात संघर्ष पेटला आहे. हे अपरिहार्यच होते. कारण १९८० नंतर भाजपामध्ये कुठल्याही पक्षाचे व कुठल्याही वैचारिक पठडीत तयार झालेले कार्यकर्ते व नेते सहभागी होत गेले आहेत. त्यांना संघाच्या प्रत्येक भूमिका मान्य असतीलच असे नाही. म्हणूनच अशा नव्या भरतीवर मिळवलेली सत्ता व मते ही तडजोड आहे. त्यासाठी काही आग्रह सोडण्याची संयमी लवचिकता दाखवणेही भाग आहे.\nआपल्या आग्रहाला पाने पुसली जातात असे दिसले, तेव्हा स्थानिक संघाचे नेते वेलिंगकर यांनी उठाव केला आणि आधी भाजपाच्या नेतृत्वावर हल्ला चढवला. त्यासाठी त्यांना बाजूला करण्यात आल्यावर त्यांनी संघाच्या केंद्रिय नेतृत्वावर पलटवार केलेला आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या बहुतांश स्वयंसेवकांनी वेलिंगकर यांनाच साथ दिलेली आहे. तेही स्वाभाविक आहे. राजकारण्यांना तडजोड करणे सोपे असते. पण स्थानिक स्थितीत काम व संघटन उभे करणार्‍यांना लोकांना सामोरे जावे लागत असते. म्हणूनच त्यांना आग्रह कायम ठेवावे लागतात. भाजपाची शत-प्रतिशत भूमिका त्यातले खरे दुखणे आहे. कुठल्याही पक्षातून जिंकू शकणारे उमेदवार जमा करून बहूमत वा सत्ता मिळवता येते. पण ती विचार व तत्वानुसार चालवता येत नाही. सातत्याने तडजोडी कराव्या लागतात. तत्वांना मुरड घालावी लागते. वैचारिक कोलांट्या उड्या माराव्या लागतात. राजकीय पक्षांना त्यामुळे फ़रक पडत नाही. पण वैचारिक तात्विक भूमिकेसाठीच वाहून घेतलेल्यांची खुप तारांबळ उडते. गोव्यातील भाजपा व संघासमोरची समस्या तशी आहे. ती कोणत्याही तडजोडी करून सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या अट्टाहासातून आमंत्रित केलेली समस्या आहे. पद्धतशीर संघटन उभे करून लोकमताचा संग्रह करून, सत्तासंपादनाचा कष्टप्रद मार्ग भाजपाने सोडला असल्याचा तो प्रारंभिक परिणाम आहे. आज जे गोव्यात किरकोळ पातळीवर घडताना दिसते आहे, त्याचा मोठा प्रयोग पुढल्या काळात अनेक राज्यात व देशातही दिसू शकेल. कारण आजवरची विचारसरणी व स्वयंसेवकांचे प्रबोधन आणि त्यातून उभ्या केलेल्या पक्षाचा कारभार, यातली तफ़ावत बोचरी आहे. म्हणूनच गोव्यातील घटना स्थानिक समजून थातूरमातूर उपाय कामाचे नाहीत. संघाला आपल्या विविध संघटनांतील समन्वयासाठी व्यापक पावले उचलावी लागतील. ही येऊ घातलेल्या वादळाची चाहुल आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T09:29:57Z", "digest": "sha1:ZDYMHV5ZQPAKBTYH4KHLL4KXUI5ZU6QG", "length": 10795, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "ताज्या घडामोडी | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nरणरणत्या उन्हात ‘हे’ जॅकेट पोलिसांना ठेवणार गारेगार, राज्यात पहिलाच प्रयोग\nनागपूर (Pclive7.com):- उन्हातानातूनही कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना गारेगार वाटवे यासाठी विशेष जॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. या जॅकेटमुळे बाहेरील तापमानापेक्षा ६ अंशांपर्यंत कमी तापमान राखण्...\tRead more\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी, अन्य निर्दोष\nजोधपूर (Pclive7.com):- काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सलमा...\tRead more\nदुबई :- अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. त्यांच्...\tRead more\nअखेर डी.एस. कुलकर्णी यांना दिल्लीत अटक\nनवी दिल्ली (Pclive7.com):- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज पहाटे ३ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरातून अटक करण्यात आली. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलि...\tRead more\nआंबेडकरी संघटनांकडून ‘महाराष्ट्र बंद’ मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा\nमुंबई (Pclive7.com):- भीमा कोरेगाव प्रकरणी आजच्या सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आ...\tRead more\nभाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा\nनवी दिल्ली – भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज लोकसभा अध्यक्षांकडे पटोलेंनी राजीनामा सोपवला. खासदार नाना पटोले अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या भूमिके...\tRead more\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन\nमुंबई (Pclive7.com):- ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल क...\tRead more\n‘कोपर्डी’ प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी\nनगर (प्रतिनिधी):- कोपर्डी ‘निर्भया’कांड प्रकरणातील आरोपींना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे, या तिघांना गे...\tRead more\n आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय\nनवी दिल्ली – भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत भारताने विजय मिळविला आहे. भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) न्यायाधीशपदी निवडून आले आहेत. अंतिम क्षण...\tRead more\nश्रीलंके विरूध्दचा कसोटी सामना अनिर्णित; अपुऱ्या प्रकाशामुळे भारताची विजयाची संधी हुकली\nकोलकाता – पाचव्या दिवशी रंगतदार झालेला भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत राहिला. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने ३५२ धावांवर डाव घोषित केला. विराट कोहल...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pnb-debit-card-info-stolen-1268", "date_download": "2018-04-23T09:40:23Z", "digest": "sha1:EYYXMKUME5CYNDNPEFSKIMZAVOW3MEQP", "length": 6539, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS PNB DEBIT CARD INFO STOLEN | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nPNB मागचं शुक्लकाष्ठ संपता संपेना; बँकेतील क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला\nPNB मागचं शुक्लकाष्ठ संपता संपेना; बँकेतील क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला\nPNB मागचं शुक्लकाष्ठ संपता संपेना; बँकेतील क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nPNB बँकेची स्थिती अस्थिर झालेली असतानाच, आता बँकेतील १० हजार क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचं समोर\nपंजाब नॅशनल बँकेच्या मागचे शुक्लकाष्ठ संपण्याचे कोणतेही चिन्ह नाही. PNB बँकेची स्थिती अस्थिर झालेली असतानाच, आता बँकेतील १० हजार क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचं समोर आलंय. एशियन टाइम्स या हाँगकाँगच्या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलंय.. कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हातात पडली असून ही माहिती हॅकर्सकडून विकली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएनबीच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध होती, असाही गौप्यस्फोट करण्यात आलाय.\nडेबिट कार्ड चोरी पंजाब\nयशस्वी होऊ नये याकरता गुगलचं लॉबिंग... केंद्र सरकारचा गंभीर आरोप\nनवी दिल्ली - आधारमुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड हे व्यवसायाबाहेर पडतील, या भीतीने...\nबँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च...\nआधार कार्ड बद्दल सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. आधार कार्ड बाबतच्या...\nओरियंटल बँकेत 389 कोटींचा गैरव्यवहार ; सीबीआयकडून आरोपपत्र दाखल\nनवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा एकदा नवा...\nनीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच\nपंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव...\nपंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी जेलची हवा खाणाऱ्यांचा आकडा बारावर\nपंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून जेलची हवा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T09:04:09Z", "digest": "sha1:76QJC42JIE7YZKASDZGZACZOB7L5X626", "length": 5688, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपातील भूतपूर्व देश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► प्रशिया‎ (२ क, ३ प)\n\"युरोपातील भूतपूर्व देश\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://freedomdefined.org/index.php?title=Definition/Mr&oldid=22800", "date_download": "2018-04-23T09:20:28Z", "digest": "sha1:5JFGTBR2OOIZHKHDDVNOTGBVGRE77JEU", "length": 39288, "nlines": 164, "source_domain": "freedomdefined.org", "title": "Definition/Mr - Definition of Free Cultural Works", "raw_content": "\nव्याख्या : मुक्त सांस्कृतिक काम\nAppeal for translation improvement: फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत \"मुक्त सांस्कृतिक काम\" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची मूळ इंग्रजी व्याख्ये सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयुक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.\n3 मुक्त सांस्कृतिक कामाची ओळख\n4 मुक्त सांस्कृतिक परवान्यांची व्याख्या\n4.2 परवानगी असलेले निर्बंध\n5 मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या\n8.2 पर्यायी अनुवाद वाक्य टीप\n8.4 इंग्रजी मराठी संज्ञावली glossary of terms used\nज्यां कामांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन[श 1] करता येईल, प्रती काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेची कामे[टिप 1] किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतिक काम'[श 2]अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्यांचे संरक्षण करणाऱ्या अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना जोपासणाऱ्या, विशिष्ट परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.[प 1] मुक्त कामाचे कायदेशीर संरक्षण करणारे मुक्त उपयोगाचे परवाने[श 3], आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.[प 2][1] मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना \"मुक्त\" म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते केवळ एक साधन आहे.\nकलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे,हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामूहिक समृद्ध कामांची निर्मिती केली आहे.\nबहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित (derive) करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती[श 4] करणाऱ्या एका परीसंस्थेला प्राधान्य देण्यात त्यांना खरी रुची असते. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित [श 5] करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या आपल्या संस्कृती अधिकाधिक समृद्ध होत जातील.\nअशी परिसंस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती[श 6] मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे:\nकामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श 7]\nकामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे\nकामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रती काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे\nकामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे.\n(मुक्त सांस्कृतिक कामात सहभाग देणाऱ्या कोणत्याही) लेखकाने (अशी सुधारणा करणारी) कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल.[प 3] ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.\nमहत्त्वाचे हे आहे की, \"मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम\" व्यवहारतः आणि कोणत्याही जोखीमेशिवाय उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. आणि म्हणून (येथून पुढे), (मुक्त) परवान्यांच्या आणि लेखक कामांच्या स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या आम्ही देत आहोत.\nमुक्त सांस्कृतिक कामाची ओळख[edit]\nही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार हे (प्रताधिकार)मुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम”[श 8] हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त मजकूर”[श 9] असा सामान्य शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या विद्यमान चळवळीतील एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन यांचा वापर करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत.\nतथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण[श 10]हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता त्यासाठी मुक्त संस्कृती परवान्यांपैकी एक परवाना वापरला पाहिजे किंवा (ते काम) सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे.\nमात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित[श 11] न करणारे ‘खुला मजकूर/आशय”[श 12] आणि “खुली उपलब्धता/प्रवेश”[श 13] सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) असे शब्दप्रयोग विद्यमान कायद्यांनुसार (प्रताधिकारमुक्त) न ठरता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून वापरले जातात.\nमुक्त सांस्कृतिक परवान्यांची व्याख्या[edit]\nपरवाने हे अशी कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाहीत- ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, केवळ प्रताधिकारहक्क कायद्याने उपलब्ध होणार नाहीत, अशी (अधिक व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत.\nया व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खूण, म्हणजे त्या परवान्याने खालील स्वातंत्र्ये कोणत्याही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत:\nते'काम' वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग - खासगी असो वा सार्वजनिक- करण्यास, मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर[श 14] करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन[श 15] करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे. उदाहरणार्थ राजकीय, धार्मिक अथवा (इतर)हेतूने कोणतेही अपवाद असता कामा नयेत.\nकामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य: कामाची चिकित्सा[श 16] करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास[श 17] परवानगी असली पाहिजे. उदाहरणार्थ परवाने \"व्युत्क्रम अभियांत्रिकी\"[श 18] (reverse engineering)वर निर्बंध घालू शकणार नाहीत.\n('कामा'च्या) प्रतींचे पुर्नवितरण करण्याचे स्वातंत्र्य: एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा[श 19] करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतींची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण[श 20] होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित[श 21] करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल, यावरही मर्यादा असणार नाही.\nमूळ कामावर बेतलेले निष्पादित काम वितरीत करण्याचे स्वातंत्र्य:(येथे सुचवलेल्या प्रमाणे) कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता,(एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे) काम, वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकांचे श्रेय सुनिश्चित करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील.(खाली पाहा)\nकामाच्या प्रतींच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारांचे श्रेय देणे[श 22], परस्परावलंबी सहकार्य[श 23] करणे (उदाहरणार्थ \"प्रतसोड(कॉपीलेफ्ट)[श 24]\") आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही परवानगीयोग्य बंधने म्हणून स्वीकारली गेली आहेत.\nमुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या[edit]\n‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे सुचवल्याप्रमाणे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच):\nस्रोत-विदेची[श 25] उपलब्धता: जेथे अंतिम स्वरूपाचे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा स्रोत फाईल[श 26] किंवा अनेक स्रोत फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून मिळविले असल्यास, त्या कामाच्या मूळाशी असलेल्या स्रोत-विदा तशा कामा सोबत सारख्याच अटीं अंतर्गत उपलब्ध असल्या पाहिजेत. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्रोत [श 27] किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे.\nमुक्त प्रारुप-साच्यांचा उपयोग: डिजिटल फायलींसाठी उपयोगीले गेलेले प्रारुप-साचे[श 28];(पेटंटचा उपयोग प्रयुक्त झाला असेल तर अशा पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर नसल्यास,) पेटंटने आरक्षित केलेले नसावेत. व्यावहारीक कारणांसाठी काहीवेळा अमुक्त प्रारुप-साचे वापरावे लागल्यास, काम मुक्त स्वरुपाचे समजले जाण्यासाठी, मुक्त प्रारुप-साचातील एक प्रत उपलब्ध असणे अत्यावश्यक असेल.\nतांत्रिक बंधने नको: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम अशा स्थितीत उपलब्ध असावे की, ज्यात वर उल्लेख केलेली स्वातंत्र्ये मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरलेली नसावी.\nइतर बंधने अथवा मर्यादा नसाव्यात: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) त्या प्रताधिकारास निःसंदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तर त्यांचा वापर करून घेऊ शकेल.[प 4]\nदुसऱ्या शब्दात, एखाद्या कामाचा वापरकर्ता, आपली मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात वापरू शकणार नसेल, तर अशा कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.[प 5][प 6]\nपाहा Licenses (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशिष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही.\nपाहा History (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी).\nपाहा FAQ (नित्याच्या निवडक प्रश्नोत्तरांसाठी).\nपाहा Portal:Index (मुक्त सांस्कृतिक कामा बद्दल विशीष्ट विषयवार पानांसाठी).\nसदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित केल्या जातील.\nयेथून खालील भाग मूळ व्याख्या दस्तवेजाचा भाग नाही, केवळ ढोबळ माहिती आणि साहाय्यार्थ , उत्तरदायकत्वास नकार लागू.\n↑ भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'काम', संकल्पना आणि तरतुदी सुद्धा पहा\nपर्यायी अनुवाद वाक्य टीप[edit]\n↑ पर्यायी अनुवाद:It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms → ह्या आवश्यक स्वातंत्र्यांची सुरक्षा आणि आदर जोपासणाऱ्या, विशीष्ट अनुमती देण्याजोग्या निर्बंधांचे वर्णनही हा दस्तएवज करतो.\n↑ पर्यायी अनुवाद:The definition distinguishes between free works, and free licenses which can be used to legally protect the status of a free work.→मुक्त कामाची कायदेशीर जपणूक करण्याच्या दृष्टीने मुक्त परवाने वापरता येतात, तर असे मुक्त काम आणि (त्याची जपणूक करणाऱ्या) मुक्त परवान्यांमध्ये ही व्याख्या फरक करते.\n↑ पर्यायी अनुवाद: If authors do not take action, their works are covered by existing copyright laws, which severely limit what others can and cannot do. →जर लेखकांनी (लेखन मुक्त करण्याची कृती केली नाही तर, त्यांचे तसे काम सध्या लागू प्रताधिकार कायद्याने सुरक्षित होते, यामुळे इतर लोक (अशा प्रताधिकारीत कामांबाबत) काय करू शकतात आणि काय नाही यावर कठोर मर्यादा येतात.\nएखादे काम, जरी त्याचे निःसंदिग्धपणे मुक्त हिस्से तेवढेच 'मुक्त काम' सदरात मोडत असले आणि सोबत, प्रताधिकारास उपलब्ध असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) उपयोग करून घेऊ शकत असेल, तर ते 'मुक्त काम' ठरेल.\nदुसऱ्या शब्दात, असे कोणतेही काम, जे एखाद्या कामाचा वापरकर्ता, त्याचे अथवा तिचे मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकणार नाही, त्या कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.\nवेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.\n↑ free license→ मुक्त उपयोगाचा परवाना\n↑ \"derived Work\" → 'निष्पादित काम',बेतलेले, मिळवलेले, व्युत्पन्न, साधीत\n↑ works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे\n↑ enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे\n↑ English:identification → मराठी:तादात्मीकरण/ओळख/परिचय\n↑ English:convey → मराठी:संप्रेषित/व्यक्त\n↑ licensee → परवानाधारक\n↑ reverse engineering → व्युत्क्रम अभियांत्रिकी\n↑ collection → साठा,संग्रह,संचय\n↑ swapped → देवाणघेवाण\n↑ copy → प्रतिमुद्रित\n↑ attribution → श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमूद करणे\n↑ copyleft → प्रतसोड(कॉपीलेफ्ट)\n↑ source code of a computer application→संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत\nइंग्रजी मराठी संज्ञावली glossary of terms used[edit]\n* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी\ngraceful functioning - सुविहीतपणे कार्यरत\nredistribute - पुर्नवितरण (पुर्न-वितरण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtra.gov.in/1143/Careers?format=print", "date_download": "2018-04-23T09:14:53Z", "digest": "sha1:5RCM3DZIC2Z5FG3EMNUNBM5JGPSMB4OO", "length": 1719, "nlines": 21, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएकूण बाबी : ६\nपान क्र. : / १\n1 मुख्य उड्डान निर्देशक या पदाची जाहीरात.\n2 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागांतर्गत रचना सहाय्यक (गट-ब / अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात.\n3 महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा-2018 परीक्षेबाबत\n4 सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती करण्याबाबत\n5 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - व्यैयक्तिक सल्लागार - आरोग्य, स्वच्छता व पोषण निवडीबाबत-3 पदे.\n6 आयोगामार्फत सन-2018 मध्ये घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1530", "date_download": "2018-04-23T09:19:13Z", "digest": "sha1:F5XY7TMFAAGIBXQ7WFEMCT5QMWOPVI65", "length": 36081, "nlines": 215, "source_domain": "www.baliraja.com", "title": " क्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / क्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nक्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम\nक्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम\nदेशात अथवा राज्यात झालेला क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देश-राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे खेळ व खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे प्रत्येक शासनाचे धोरण असते, त्या धोरणाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम शासन राबवित असते. महाराष्ट्र शासन देखील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबवित असून त्या माध्यमातून राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे. ‘महान्यूज’ च्या वाचकांसाठी क्रीडा क्षेत्रात राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…\nराज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने 1996 मध्ये राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर केले, त्यानंतर 2001 मध्ये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. दरम्यानच्या काळात क्रीडा क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेऊन व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी सन 2012 मध्ये अद्ययावत क्रीडा धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांची अंमलबजावणी राज्य व जिल्हास्तरावरुन विविध योजनांच्या माध्यमातून केली जात आहे. साधारणपणे क्रीडांगण, क्रीडा साहित्य अनुदान, क्रीडा सुविधांचे सर्वेक्षण, तालीम कुस्ती केंद्रांचा विकास, विभाग, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल बांधकाम सुविधांचा वापर, देखभाल दुरुस्ती, आमदार स्थानिक विकास निधीतून क्रीडाविषयक उपक्रम, राज्य-जिल्हा क्रीडा विकास निधीची स्थापना, क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, क्रीडा प्रशिक्षण शिबीरे, पुरस्कार आदी घटकांचा या धोरणात समावेश असून त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येतात.\nमहाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करीत असताना या खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबविता येतील, याचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राचा क्रीडा नकाशा तयार करण्यात येत आहे. राज्यातील क्रीडा सुविधांपैकी निवडक क्रीडा सुविधा विकसित करुन त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येणार आहेत. ऑलिम्पिक 2020 ऑलिम्पिक पदक पुर्ततेचे ध्येय गाठण्यासाठी कृती आराखडा करण्यात येत आहे.\nक्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम\nआंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षिस देवून गौरविण्याची योजना- आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शक-प्रशिक्षकांना, ऑलिम्पिक, विश्व अजिंक्यपद, एशियनगेम्स, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल, एशियन चॅम्पियनशीप, युथ ऑलिम्पिक/ज्युनियर एशियन/विश्व, अजिंक्यपद स्पर्धा/शालेय आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा व पॅरा एशियन स्पर्धा या स्पर्धांकरीता रोख रकमेचे पारितोषिक देवून गौरविण्यात येते. २०१५-१६ व १६-१७ या वर्षात अनुक्रमे ३४ व ९५ खेळाडू-मार्गदर्शकांना गौरविण्यात आले.\nकुस्ती केंद्राचा विकास करण्याबाबत- महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी तालीम व आखाड्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कुस्तीच्या तंत्रात झालेले बदल लक्षात घेऊन आखाडा-तालमीचे आधुनिकीकरण केले जात आहे. जुन्या तालमींची दुरुस्ती/नुतनीकरण करण्यास अंदाजित खर्चाचा 75 टक्के किंवा कमाल रुपये 7.00 लक्ष इतके अर्थसहाय्य दिले जाते.\nराज्यात शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन\nखेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्ययावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी 10 दिवसांचे राज्यस्तरावर मास्टर्स ट्रेनर व जिल्हास्तरीय शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते.\nराज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन\nक्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी पुरुष व महिला गटातील संबंधित अधिकृत संघटनेचे खेळाडू तसेच शालेय 17 व 19 या गटातील मुले व मुली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते.\nराज्यातील क्रीडा सुविधांचे सर्वेक्षण\nराज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्थामार्फत विकसित करण्यात आलेल्या क्रीडा सुविधांची माहिती संकलित करुन सर्वसामान्य जनतेस व खेळाडूंना उपलब्ध व्हावी तसेच जिथे क्रीडा सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे नव्याने क्रीडा सुविधा उपलब्ध करणे या उद्देशाने क्रीडा विभागामार्फत सदर सुविधांचे सर्वेक्षण करण्यात येते.\nकनिष्ठ महाविद्यालयांना खेळांसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान-तालुका, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांच्या मुला/मुलींचा सहभाग होण्याच्या दृष्टिकोनातून शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते.\nजिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना\nप्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करुन क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, क्रीडा शिक्षक-प्रशिक्षक-मार्गदर्शकांसाठी चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन या केंद्रामार्फत केले जाते.\nक्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य\nखाजगी अथवा शासकीय मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये, विविध नोंदणीकृत सामाजिक संस्था,व्यायाम संस्था, क्रीडा, युवक मंडळे आदींना क्रीडा सुविधा निर्मिती अथवा क्रीडा साहित्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.\nअधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा होणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य\nराज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरीकरिता तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, पायाभूत सुविधा आदींसाठी खेळाडूंना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद, एशियन गेम्स, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल, एशियन चॅम्पियनशीप, युथ ऑलिम्पिक/ज्युनियर एशियन/विश्व, अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक, एशियन कप, वर्ल्ड कप या अधिकृत स्पर्धा म्हणून गणल्या जातात.\nजिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांची स्थापना\nखेळाच्या अत्याधुनिक सुविधा राज्यात निर्माण करण्यासाठी खुले प्रेक्षागृह, जलतरण तलाव, विविध खेळांची मैदाने आदींनी सुसज्ज विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल योजना कार्यान्वित आहे.\nराज्याच्या क्रीडा धोरणात तालुका हा घटक मानला आहे. त्यामुळे सर्व मुलभूत क्रीडा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येते.\nमहाराष्ट्र क्रीडा परिषद अनुदान योजना\nमहाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून संचालनालयाने मान्यता दिलेल्या क्रीडा मंडळे/ संघटना/स्थानिकस्तरावरील संस्था/जिल्हा क्रीडा परिषदांना निर्वाह, क्रीडा साहित्य खरेदी, अधिकृत राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व क्रीडांगण देखभाल दुरुस्ती याबाबींकरिता अनुदान दिले जाते.\nअनिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना\nक्रीडा नैपुण्य वाढीस लागण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे, मात्र काही विद्यार्थी शाळा सोडून येण्यास तयार नसल्याने अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची संकल्पना राबविण्यात येत आहे.\nराज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा- या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुला-मुलींना सहभागी होता येते.\nएकलव्य राज्यस्तरीय खोखो क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nनावाजलेल्या कुस्तीगीरांना मानधन- कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी नामांकित किताब प्राप्त कुस्तीगीरांना दरमहा मानधन दिले जाते.\nखेळाडूंना थेट नोकरी व नोकरीत आरक्षण\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील विशिष्ट क्रीडा स्पर्धांमध्ये पदके संपादित करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात येते. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके संपादित करणाऱ्या खेळाडूंना शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के इतके आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.\nक्रीडा विभागाने घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय\nराज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण\nराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंमुळे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय लौकीक प्राप्त होतो. खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी व शैक्षणिक अर्हता मिळविण्याचा कालावधी हा साधारणत: एकच असल्यामुळे या गुणवान खेळाडूंना दोन्ही आघाड्यांवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांची पिछेहाट होते. त्यामुळे नोकरी व्यवसाय स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत. ही बाब विचारात घेऊन शासनाने विविध शासकीय विभाग, महामंडळ, स्थानिक प्राधिकरणामध्ये नोकरीसाठी या पदक विजेत्या गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरीता ५% आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला.\nराज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती\nराज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या आणि सर्वोत्तम गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स स्पर्धा, कॉमनवेल्थ पॅरा गेम्स स्पर्धा, आशियाई पॅरा चॅम्पियन्सशिप स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धा आदी विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या अपंग खेळाडूंना शासकीय नोकरीची संधी देण्यात आली.\nखेळाच्या सरावासाठी कार्यालय लवकर सोडण्यास परवानगी देण्यासंबंधातील धोरण\nअखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धांच्या सरावासाठी संघात असलेल्या सचिवालय जिमखान्याशी संलग्न शासकीय खेळाडू कर्मचाऱ्यांना संबंधित खेळाच्या स्पर्धेसाठी कार्यालय लवकर सोडण्याची परवानगी देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. कार्यालयीन सेवा सांभाळून विविध खेळांमध्ये नैपुण्य असलेल्या खेळाडूंना कार्यालयीन वेळेमुळे सरावासाठी आवश्यक वेळ मिळत नव्हता. म्हणूनच अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या दृष्टीने अशा खेळाडूंना त्यांचे कार्यालय लवकर सोडण्याच्या दृष्टीने परवानगी देण्यात आली. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स या खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीसाठी ठरावीक वेळ सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nक्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य\nराज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी, राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा याबाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हितावह योजना राज्यात राबविण्यासाठी क्रीडा धारेण- २०१२ तयार करण्यात आले. या धोरणातील एक महत्वाची शिफारस क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करणे आहे. त्या अनुषंगाने क्रीडा सुविधा निर्मितीस व क्रीडा साहित्यासाठी अनुदान देण्यासाठी १ मार्च, २०१४ च्या शासन निर्णयान्वये आर्थिक सहाय्य सुरु करण्यात आले.\nशिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार\nशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू व कार्यकर्ते)\nउत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/category/g1%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T09:06:36Z", "digest": "sha1:X22B3AKDYP2X6EG7NF2UZXTR6VASMKZF", "length": 10073, "nlines": 147, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " नागपुरी तडका | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / नागपुरी तडका\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nगंगाधर मुटे यांनी शनी, 09/07/2016 - 12:53 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nलाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभेटला काय, न भेटला काय\nमी तरी आपलं जमवून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nभेटली काय, न भेटली काय\nमी तरी आपला खिसा भरून\nमी बी मंत्री होईन म्हणतो...\nRead more about मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHU/MRHU044.HTM", "date_download": "2018-04-23T09:47:27Z", "digest": "sha1:ARGOFG76LVTGEMHMQ7LRLIAWNELQPWYS", "length": 7449, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी | शहरातील फेरफटका = Városnézés |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हंगेरियन > अनुक्रमणिका\nरविवारी बाजार चालू असतो का\nसोमवारी जत्रा चालू असते का\nमंगळवारी प्रदर्शन चालू असते का\nबुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का\nवस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का\nचित्रदालन शुक्रवारी उघडे असते का\nइथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का\nप्रवेश शुल्क भरावा लागतो का\nप्रवेश शुल्क किती आहे\nसमुहांसाठी सूट आहे का\nमुलांसाठी सूट आहे का\nविद्यार्थ्यांसाठी सूट आहे का\nती इमारत कोणती आहे\nही इमारत किती जुनी आहे\nही इमारत कोणी बांधली\nमला वास्तुकलेत रुची आहे.\nमला कलेत रुची आहे.\nमला चित्रकलेत रुची आहे.\nजलद भाषा, सावकाश/मंद भाषा\nजगभरात 6,000 पेक्षा अधिक भाषा आहेत. पण सर्वांचे कार्य समान आहे. त्या आम्हाला माहितींची देवाणघेवाण करण्यसाठी मदत करतात. प्रत्येक भाषेमध्ये निरनिराळ्या पद्धतीने हे घडत असते. कारण प्रत्येक भाषा तिच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे वर्तन करत असते. ज्या वेगाने भाषा बोलली जाते तो सुद्धा वेगळा असतो. भाषातज्ञांनी विविध अभ्यासातून हे सिद्ध केले आहे. याच्या समाप्तीपर्यंत, लहान ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले होते. हे ग्रंथ नंतर स्थानिक वक्त्यांकडून मोठ्याने वाचले जात असत. परिणाम स्पष्ट होते. जपानी आणि स्पॅनिश जलद भाषा आहेत. ह्या भाषांमध्ये जवळजवळ प्रती सेकंद 8 अक्षरे बोलली जातात. चिनी भाषा अत्यंत सावकाश बोलली जाते. ते केवळ प्रती सेकंद 5 अक्षरे बोलतात. बोलण्याचा वेग अक्षरांच्या अवघडपणावर अवलंबून असतो. जर अक्षरे अवघड असतील, तर ती बोलण्यास जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ, जर्मनमध्ये प्रति अक्षर 3 स्वर समाविष्टीत असतात. त्यामुळे तुलनेने ती सावकाश गतीने बोलली जाते. संभाषणासाठी भरपूर असले, तरीही, वेगाने बोलल्यास त्याचा अर्थ समजला जात नाही. अगदी या उलट अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, \"सावकाश\" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, \"सावकाश\" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत याचा अर्थ, जो सावकाश बोलतो त्याला अधिक सांगायचे असते. आणि जो वेगाने बोलतो त्याला जास्त शब्दांची गरज असते. शेवटी, सर्वजण सुमारे एकाच वेळी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात.\nContact book2 मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.slotsltd.com/mr/", "date_download": "2018-04-23T09:10:32Z", "digest": "sha1:WXCOGONA5NLL6QF5NDLQINAHHGMEZHIE", "length": 14422, "nlines": 145, "source_domain": "www.slotsltd.com", "title": "स्लॉट लिमिटेड, Big Online and Mobile Casino Winnings - Fast! - Latest Online and Mobile Slots Jackpot Games with Fast Payouts and a Great Welcome Bonus of £200. Pay by Phone Bill Welcome! | Latest Online and Mobile Slots Jackpot Games with Fast Payouts and a Great Welcome Bonus of £200. Pay by Phone Bill Welcome!\tस्लॉट लिमिटेड, Big Online and Mobile Casino Winnings - Fast! - Latest Online and Mobile Slots Jackpot Games with Fast Payouts and a Great Welcome Bonus of £200. Pay by Phone Bill Welcome!", "raw_content": "\nपर्यंत आपले स्वागत आहे बोनस\n50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. आणि साइटवर विषय स्लॉट लिमिटेड पूर्ण बोनस धोरण.\nपर्यंत आपले स्वागत आहे बोनस\n50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. आणि साइटवर विषय स्लॉट लिमिटेड पूर्ण बोनस धोरण.\nपर्यंत आपले स्वागत आहे बोनस\n50एक्स बोनस रक्कम Wagering आधी मागे. वैध 90 पावती दिवस. आणि साइटवर विषय स्लॉट लिमिटेड पूर्ण बोनस धोरण.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nगोरिला जा जंगली :\nस्लॉट लिमिटेड येथे आपल्या आवडत्या ऑनलाइन स्लॉट आणि कॅसिनो टेबल गेम प्ले\n£ 200 विलक्षण पर्यंत 100% प्रथम ठेव बोनस - फक्त £ 200 सह £ 400 प्ले\nस्लॉट लिमिटेड कॅसिनो साइटवर एक महान संग्रह आहे 400 of the world's top internet gambling games and slots मोबाइल गेम्स प्रोमो, तसेच जुळण्यासाठी जाहिराती म्हणून. आपण प्ले करताना आपल्याला प्राप्त वरच्या मोबाइल आणि ऑनलाइन jackpots\nआता सामील व्हा आणि आमच्या पुरस्कार अर्पण तपासा स्वत: साठी. वर यूके जुगार आयुक्त कायदे अवलंबून बदल विषय, players should grab this sensational offer while it's still hot\nहे आश्चर्यकारक ऑनलाइन आणि मोबाइल स्लॉट खेळ यूके साइट आमच्या विजेते सामील व्हा\n You'll also have the option to play some of our most popular slots, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, आणि पट्टी Blackjack मोबाइल डेमो मोड मध्ये विनामूल्य खेळ. Play मोबाइल स्लॉट खेळ आणि अनुप्रयोग तुमच्या सोयीनुसार.\nOur mobile slots game UK welcome bonus won't stop there though... खेळाडू जमा एक प्राप्त त्यांचे हात रिअल रोख wagers येथे प्रयत्न 100% रोख सामना ठेव बोनस वर £ 200 - अटी लागू. ऑनलाइन कॅसिनो व्हीआयपी बक्षिसे वर अतिरिक्त चेरी खेळाडू मोठी आनंद अपेक्षा करू शकता कुठे आहेत जाहिरात बक्षिसे येथे स्लॉट लिमिटेड.\nमोबाइल गेम्स शीर्ष कॅसिनो आमच्या पोर्टफोलिओ आपले नशीब प्रयत्न करा आणि स्लॉट\nरिअल पैसे प्रोग्रेसिव्ह jackpots: खजिना नाईल, Tunzamunni, रोख लक्ष वेधुन 3, रोख लक्ष वेधुन 5, आणि फळ सुट्टीचा दिवस 3 रीळ फक्त पुरोगामी jackpot काही आहेत स्लॉट आमच्या गायन उपलब्ध. फक्त स्लॉट लिमिटेड कॅसिनो येथे आपण या विलक्षण खेळांच्या reels स्पीन याची खात्री करा. आमच्या अमूल्य खेळाडू, यूके ख्रिस टी अलीकडे जवळजवळ £ 60,000 गोरिला जा जंगली खेळत जिंकली - फॅन्सी विजेते टेबल वर त्याला सामील येथे सध्या हे गेम खेळून पहा\nऑनलाइन स्लॉट साठी अनुकूल मोबाइल आणि डेस्कटॉप: आपण आपल्या आवडत्या ऑनलाइन स्लॉट आनंद घेऊ शकता - सर्व मोबाइल डिव्हाइसवर अखंडपणे खेळायला अनुकूल. आम्ही अशा जिमी हेंड्रिक्स म्हणून स्लॉट एक मोठा संग्रह आहे, रुबाबदार हातोडा, ग्रेट जंगली Elk, बंदुका आणि 'गुलाब, आणि Gonzos शोध स्लॉट.\nटेबल गेम - कॅसिनो बोनस खूप: आम्ही ऑफर क्लासिक टेबल खेळ अशा Blackjack म्हणून, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, आणि जुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ सर्व क्लासिक गायन उत्साही. कार्ड पुष्कळसे तसेच मल्टि-चाक पर्याय, खेळाडू आधी कधीही असे विविध आनंद अद्वितीय संधी.\nस्क्रॅच कार्ड: आपण प्ले करू शकता आपल्या आवडत्या मोबाईल स्क्रॅच कार्ड जसे डॉक्टर प्रेम ओरखडा, Ramesses श्रीमंती ओरखडा, मोठा पाय ओरखडा, आयरिश डोळे, आणि इतर अनेक. आश्चर्यकारक बोनस स्लॉट गेम मध्ये उपलब्ध देते आहेत. पाहण्यासाठी आमच्या गायन सूर मिळवला ठेवा नवीन जाहिराती आणि आपण स्टोअर मध्ये आम्ही देते. हंगामी गायन ठेव सामना बोनस तसेच थेट गायन खेळ competitions and cash prize giveaways keep things exciting and ensure you'll always have something fresh to look forward to.\nआम्ही सर्वोत्तम कॅसिनो ठेव प्रचार ऑफर - ठेवा काय आपण जिंकलात\nआम्ही ऑफर ProgressPlay द्वारा समर्थित नवीन जाहिराती. या सोमवारी मॅडनेस समावेश, साप्ताहिक आश्चर्ये, दिवस गेम, cashback दिवस, आणि स्लॉट युद्धे. आधी नमूद केल्याप्रमाणे, जाहिराती आणि बोनस ऑफर नियमितपणे अद्यतनित केले जातात, त्यामुळे काहीतरी आपले फॅन्सी लाभे तर, don't hesitate and seize the day\nफुकट व्हीआयपी क्लब कॅसिनो पुरस्कार: झटपट ऑनलाइन कॅसिनो व्हीआयपी क्लब सदस्यत्व मिळवा आणि निष्ठा गुण आपण रिअल पैसे जुगार प्रत्येक वेळी कमवा. आपली सदस्यता पातळी आवश्यक रक्कम गोळा आणि रोख गुण रूपांतर\nचुकविण्यायोग्य SlotsLtd रिअल रोख एक एकूण मंदवारा जिंकण्याची करून देणे वैशिष्ट्ये\nशीर्ष मोबाइल कॅसिनो: सर्व मोबाइल डिव्हाइस एकसंधी सुसंगतता डिझाइन ऑनलाइन गेमिंग कृती मध्ये चैन. आम्ही मोबाइल प्लॅटफॉर्मवर ऑफर गेम मनोरंजन खात्री आहे. You'll even be able to make real money deposits using mobile phone credit from just £10 minimum and wager real money whenever you feel Lady Luck at your side\nथेट कॅसिनो रिअल विक्रेता खेळ: आपल्या आवडत्या टेबल खेळ प्रत्यक्ष गायन पासून संपूर्ण HD मध्ये प्रवाहित प्ले. कृपया या खेळ डेमो मोड मध्ये प्ले करण्यासाठी उपलब्ध नाही आहात लक्षात ठेवा, आणि निर्बंध लागू शकतात या गेम कोणत्याही मुक्त स्वागत बोनस करण्यासाठी.\nथेट गप्पा: स्लॉट लिमिटेड सर्व खेळाडू सर्व शंका आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी त्वरित गप्पा ज्यामुळे एक गप्पा जगणे वैशिष्ट्य आहे.\nरोख आणि सत्यापित पैसे काढणे: आमच्या कॅसिनो अशा व्हिसा सुरक्षित ठेव पद्धती सुनिश्चित करून सर्व शक्य खेळाडू आवश्यकता पूर्ण, मास्टर, उस्ताद, Skrill, Neteller, आणि Paysafecard. तर फोन गेटवे करून एसएमएस कॅसिनो द्या एक पर्याय आहेत, खेळाडू मोबाइल पैसे काढण्याची शक्यता नाही मनी धरणे आवश्यक आहे.\nआता सामील व्हा: आता स्लॉट लिमिटेड कॅसिनो येथे नोंदणी आणि आपल्या साहसी गायन प्रवास सुरू 400+ गायन खेळ. दावा आपल्या £ 200, 100% आपले स्वागत आहे बोनस आणि रिअल गायन आनंद आनंद आणि आपण जेथे असाल खेळ स्लॉट\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\nएक संलग्न व्हा – रोख कमवा\nकॉपीराइट © 2018, स्लॉट लिमिटेड. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2011/12/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T09:29:18Z", "digest": "sha1:F6OIG5ACH2WMKCHE5CNNIA6Y6VJMKMXL", "length": 7456, "nlines": 121, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: देशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची मागणी-लोकसत्ता", "raw_content": "\nदेशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची मागणी-लोकसत्ता\nदेशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची मागणी-लोकसत्ता\nनागपूर, २९ डिसेंबर / खास प्रतिनिधी\nसंपूर्ण देशात कापसाची आवक सुमारे २५ टक्के घटल्याचा दावा करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटावर मात करण्यासाठी हमी भाव वाढवून देण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.\nकापूस महामंडळाने (सीसीआय) जारी केलेल्या माहितीनुसार देशातील बाजारात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबपर्यंत फक्त ८८ लाख गाठीची आवक झाली. गेल्यावर्षी ११८ लाख गाठींची आवक झाली होती.\nगुजरातमध्ये २९ लाख आणि महाराष्ट्रात १४ लाख गाठींची आवक झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे ३० टक्के व ५० टक्के घट झाली आहे.\nसंपूर्ण देशातील शेतक ऱ्यांवर संकट असल्याने हमीभाव वाढवणे हा एकमेव उपाय असल्याचा दावा समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.\nसरकारच्या माहितीनुसार देशभरात १२० लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली. त्यातून ३७५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र नापिकीमुळे पहिल्या तिमाहीत २५ ते ३० टक्के घट झाली. सर्वच राज्यातील विविध पक्ष व संघटनांनी कापसाचे हमीभाव वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, हमीभाव वाढवल्यास गिरणी मालकांचे प्रचंड नुकसान होईल, असा युक्तिवाद कृषी मूल्य आयोगाने करून भाव वाढीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला.\nकापसाची नापिकी राज्यातील कोरडवाहू क्षेत्रापुरती मर्यादित ठेवता येत आहे. प्रत्यक्षात संपूर्ण देशातच उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.\nदेशात कापसाची आवक घटली, हमीभाव वाढवून देण्याची माग...\nशेतकरी पॅकेज आत्महत्यांना आमंत्रण देणारे :किशोर ति...\nसरकारने दिला दगा -कापसाचे भाव कोसळल्याने कास्तकारा...\nशेतकर्‍यांची घोर निराशा करणारे पॅकेज-तरुण भारत\nशासनाने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास ...\nमहाराष्ट्र सरकारचे पॅकेज शेतकरयांना अमान्य -कापसाच...\nविदर्भातील कापूस उत्पादकांचे पॅकेज धोक्यात\nवेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन करणारयांनाच मतदान क...\nकापूस पणन महासंघ तत्काळ बरखास्त करा-लोकशाही वार्ता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2014/03/14/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%85/", "date_download": "2018-04-23T09:07:55Z", "digest": "sha1:7I3TQTWWO2E33LHGK466HOQW3W2NLVEI", "length": 10714, "nlines": 178, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nकॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल\nबर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल\nहे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. ‘अ‍ॅप्पल स्ट्रुडेल’ ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे. पण मलिबूने त्यांचे एक व्हेरिएशन मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल बनवले, अतिशय मर्यादित साहित्याने. मग मीही त्याला एक रमचा ट्वीस्ट देऊन माझे व्हेरिएशन बनवले. रम अशासाठी की कॉकटेल जरा ‘कडक’ व्हावे. 🙂\nअ‍ॅप्पी फीझच्या कार्बोनेटेड इफ्फेक्टमुळे आणि त्याच्या रंगामुळे हे व्हेरिएशन मस्त शॅँपेनसारखे दिसते आणि मालिबूच्या मखमली चवीमुळे लागते देखिल. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्लास मी वाइन ग्लास वापरला (खरेतर शॅँपेनफ्लुट वापरायला हवा, पण सध्या कलेक्शनमध्ये नाहीयेय)\nप्रकार मालिबू बेस्ड कॉकटेल\nव्हाइट रम १ औस (३० मिली)\nमालिबू १ औस (३० मिली)\nअ‍ॅप्पल फीझ ३ औस (९० मिली)\nबारीक तुकडे केलेला बर्फ\nग्लासमध्ये 2/3 बर्फ (क्रश्ड आइस) भरून घ्या.\nआता त्यात अनुक्रमे मालिबू, व्हाइट रम, आणि अप्पी फिझ ओतून घ्या.\nआता सफरचंदाचा काप सजावटीसाठी ग्लासाच्या कडेला लावून घ्या.\nअतिशय मादक आणि चित्ताकर्षक ‘मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल’ तयार आहे 🙂\nThis entry was posted in कॉकटेल लाउंज, कॉकटेल्स and tagged कॉकटेल, कॉकटेल रे‍सिपी, मालिबू, व्हाइट रम, शँपेन. Bookmark the permalink.\n← प्रिय विद्या बालन हिस\nदस्तावेज क्लाउड वर कसे साठवाल \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/wills-lifestyle+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-23T09:27:20Z", "digest": "sha1:DSIC2C5R6Q5BQWX4KIQKFBCBO4GLHZQZ", "length": 26295, "nlines": 780, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विल्स लीफएसटीले शिर्ट्स किंमत India मध्ये 23 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nविल्स लीफएसटीले शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 विल्स लीफएसटीले शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nविल्स लीफएसटीले शिर्ट्स दर India मध्ये 23 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 43 एकूण विल्स लीफएसटीले शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन विल्स लीफएसटीले ब्लॅक कॉटन शर्ट SKUPD8fTE6 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी विल्स लीफएसटीले शिर्ट्स\nकिंमत विल्स लीफएसटीले शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन विल्स लीफएसटीले में s सासूल शर्ट SKUPDbuVdD Rs. 2,399 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.682 येथे आपल्याला विल्स लीफएसटीले ब्लू स्त्रीपेस शर्ट SKUPDap86P उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 43 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10विल्स लीफएसटीले शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले पिंक सॉलिड्स लिनन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले व्हाईट सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले ग्राय सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले ब्लॅक शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लॅक शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लू कॉटन शर्ट\nविल्स लीफएसटीले ग्राय सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले व्हाईट सॉलिड्स पॉलिस्टर रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले पूरपले सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले पिंक सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले व्हाईट सॉलिड्स रेयॉन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले ब्लू सॉलिड्स कॉटन रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले नव्य सॉलिड्स पोळी क्रेप रेगुलर कॉलर शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले ब्लू स्त्रीपेस शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लॅक सॉलिड्स शर्ट\nविल्स लीफएसटीले पूरपले सॉलिड्स शर्ट\nविल्स लीफएसटीले पिंक सॉलिड्स शर्ट\nविल्स लीफएसटीले येल्लोव स्त्रीपेस शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लू चेकस शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लॅक सॉलिड्स शर्ट\nविल्स लीफएसटीले पिंक कॉटन शिर्ट्स\nविल्स लीफएसटीले पिंक चेकस शर्ट\nविल्स लीफएसटीले ब्लू स्त्रीपेस शर्ट\nविल्स लीफएसटीले पिंक कॉटन ब्लेंड शिर्ट्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-23T09:42:59Z", "digest": "sha1:35YMUEEJ4AFEFDVODEABQ4SGFOHIDGKX", "length": 4009, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pkquiettime.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T09:49:30Z", "digest": "sha1:FJIQGHFYMJKIBKWRQOEOBBC2B2DCETDO", "length": 158349, "nlines": 1715, "source_domain": "pkquiettime.blogspot.com", "title": "Quiet Time..", "raw_content": "\nशेताभातात रानाउन्हात रमलेली महानोरांची कविता. 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे' इतके निसर्गाशी तादात्म्य पावलेले हे मन.\n'अजिंठा' हे महानोरांच्या कवितेचे वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. अजिंठ्यातील भव्य शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म अविष्कार. पारूच्या रुपाने अजिंठ्यातील शिल्पे मेजर गिल समोर सजीव झाली. पारू त्याच्या चित्रांची प्रेरणा ठरली. पण पारूभोवतालच्या आडवळणी समाजाला त्यांच्या प्रेमकथेची भाषा समजू शकली नाही. आणि गिलचे आयुष्य औदासिन्याने झाकोळून गेले.\nया कथेच्या निमित्ताने महानोरांच्या प्रतिभेला नवा बहर आला आहे. 'मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा / इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा ' हा आत्मविश्वास सार्थ ठरवणारा हा बहर आहे.\nअजिंठ्याची लेणी म्हणजे अलौकिक सौंदर्याने शिगोशिग भरलेली एक स्वप्नशाला. विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या आणि संसाराच्या पैलथडीला गेलेल्या बुद्धाचे स्तवन-पूजन करण्यसाठी ही लेणी कोरण्यात आली. पण असामान्य कलावंतांची प्रतिभा सहसा एकसुरी, एकदेशी असत नाही. तिच्या खास आकर्षणाचे केंद्रस्थान कोणतेही असले तरी त्या स्थानाच्या अनुषंगाने ती अशेष जीवनाचाच शोध घेण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून बुद्धाला वाहिलेल्या या लेण्यांत मानवी किंबहुना सृष्ट जीवनाची सर्वच अंगे अतिशय कलात्मक रूपांत प्रकट झाली आहेत. बुद्धाने संसाराचा त्याग केला म्हणजे केवळ एका घराचा, एका पत्नीचा वा एका मुलाचा त्याग केला असे नाही. या संसाराच्या सभोवार सर्वदूर पसरलेल्या लक्षावधी संदर्भांचा, त्यातील सौंदर्याचा, सुखदु:खांचा, भावबंधनांचा आणि मानसिक प्रवृत्तीचाही त्याने त्याग केला. बुद्धाची महात्मता या सर्व संदर्भांसह चित्रित करण्याचा प्रयत्न असंख्य कलावंतांनी येथे केलेला आहे. ज्यांची नावनिशाणी आज शिल्लक नाही, अशा या कलावंतांनी पाषाणातून आणि पाषाणावर निर्माण केलेल्या या कलाकृती शिल्पकलेच्या आणि चित्रकलेच्या इतिहासात अजोडच असतील.\nअशा या अजिंठ्याच्या परिसरामध्ये, किंबहुना त्याच्या गाभाऱ्यामध्ये, गेल्या शतकात एक हृद्यस्पर्शी शोकांत नाट्य घडलेले आहे. अजिंठ्यातील पाषाणमय देवतांनी यक्षगंधर्वांनी भावनिर्भर दुष्टीने या घटनांकडे उत्कंठतेने पहिले असेल आणि त्यांचा अखेरचा पडदा पडल्यावर आपल्या पापण्याही पुसल्या असतील. मुळात चित्रकाराची प्रतिभा असलेला, पण सैनिकी पेशा स्वीकारून भारतात आलेला मेजर रॉबर्ट गिल, आणि फिरस्त्या बंजारा जमातीतील एक रूपवान तरुणी पारू, यांच्या अलौकिक परंतु असफल प्रेमाची ही कहाणी आहे. पश्चिमेकडील सुसंस्कृत प्रतिभा आणि पूर्वेकडील एक अनागर, जमिनीतून वर आलेल्या हिऱ्यासारखे झळझळीत स्त्रीत्व यांचे मिलन या कथेत आहे; आणि बर्बर समजुतींनी या दोन जीवांचा केलेला संहारही आहे. अजिंठ्याच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या, या परिसराशी एकात्म झालेल्या ना.धों.महानोरांसारख्या प्रतिभावान आणि निसर्गातील सौंदर्याचे सूक्ष्म, तरल झंकार आपल्या काव्यातून प्रकट करणाऱ्या कवीला, या गिल-पारूच्या कथेने आपल्याकडे ओढून घेतले नसते तरच नवल. काळाच्या प्रवाहात माणसांच्या संस्कृतीचे बह्यावरण बदलते. आपण सनातन मानतो अशी कांही मूल्येही बदलतात, किंवा वेगळ्या रूपांत विसर्जित होतात. आणि तरीही असे काही शिल्लक राहते, जे सर्वकाळच्या कवींना, कलावंतांना आवाहन करीत असते. महानोरांसारख्या संवेदनशील कवीने हे आवाहन स्वीकारून मराठी काव्याला एक सुंदर देणगी दिली आहे.\nरविकिरण मंडळाच्या काळात कथात्मक काव्यांना बहर आलेला होता. सुधारक, बंदिशाला, आमराई यांसारखी रसिकमान्य झालेली खंडकाव्ये आघाडीच्या रविकिरणांनी लिहिलेली आहेत. परंतु, महानोरांचे 'अजिंठा' हे काव्य त्या प्रकारातील नाही. एखादे काल्पनिक कथानक घेऊन त्यात कादंबरीसारखे पण काव्यात्म तपशील भरत जाणे हे खंड्काव्याचे प्रमुख लक्षण. 'अजिंठा' मध्ये कथानक सांगणे वा प्रकरणश: उलगडून दाखवणे ही कवीची प्रतिज्ञाच नाही. येथे कवीने गिल-पारूच्या कथेतील स्वतःची गुंतवणूकच प्रकट केली आहे. म्हणून खंड काव्यात कवी जी निवेदकाची तटस्थ भूमिका घेतो ती येथे नाही. अजिंठ्याच्या डोंगरदऱ्यात विखुरलेली ही घटना कवीच्या मनात राहायला आली, तेथे ती कमलपुष्पासारखी अनेक पाकळ्यातून उमलली आणि त्याच्या भावसंवेदना आपल्या कब्जात घेऊन अखेर त्याचीच झाली. अशा एका पूर्णतः भरून गेलेल्या आणि भारावलेल्या मन:स्थितीत महानोरांनी ही दीर्घ कविता लिहिली आहे, हे सहज लक्षात येते. रॉबर्ट गिल अजिंठ्याच्या दर्शनाने झपाटून गेला होता. खांद्यावरची बंदूक त्याने बाजूला टाकली आणि रंगाची कुंचली हातात घेतली. भारतातील एका डोंगराच्या कडेकपारीतील ही अदभूत चित्रे , त्यांच्या प्रतिकृती करून सर्व जगातील रसिकांसमोर मांडावीत आणि आपल्या अनुभवात त्यांना सामील करून घ्यावे, ही गीलची आकांक्षा होती. गिल-पारूच्या प्रेमकथेची स्वतःला आलेली अनुभूती समानशील रसिकांपर्यंत पोचवावी ही महानोरांची भूमिका आहे. खरे तर, भूमिका म्हणणेही बरोबर नाही. काळजाचा कब्जा घेणाऱ्या एका प्रबळ अनुभवाला शब्दांत साकार करण्याची ही उर्मी आहे.(म्हणूनच अडली मधली अवतरणे देऊन मी त्याची मोडतोड करणार नाही.) हा प्रवाह आपल्या वेगवान, झपाटलेल्या ओघात आपल्याला शेवटच्या शब्दापर्यंत घेऊन जातो, भावभावनांच्या लाटालहरीत खेचून घेतो. शेवटी त्या चार सुनी फकीरांबरोबर आपणही एक पान वाघुरेच्या पाण्यात सोडतो आणि एका चिरंतन प्रवासासाठी तापीतीराकडे गेलेल्या गिलच्या मोडक्या झोपडीसमोर फुलांची एक ओंजळ वाहतो. हा अनुभव रसिक वाचकांना यावा ही इच्छा आणि येईल हा विश्वास.\n० अजिंठ्याचे शिल्पचित्र १८१९ मध्ये प्रथम ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नजरेत आले. निजाम सरकारचे कलासक्त मन, कलाप्रेमी मंडळी ह्यांच्या १८२४ साली अजिंठ्याच्या चित्रकलेसंबंधी युरोपात पत्रवाचन/विचार झाला. त्याच्या प्रतिकृती करायच्या योजना आखल्या.\n० १८४४ साली चित्रकार मेजर रॉबर्ट गिल याची अजिंठ्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली. ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचे क्वालिफाईड आर्टिस्ट होते. ईस्ट इंडीया कंपनीतील मिलिटरीत मेजर होते.(मद्रास)\n० अजिंठ्याच्या डोंगरावर लेणापूर गावाची आदिवासी (की बंजारा) पोरगी गिलच्या सहवासात आली. दहा वर्षांचे दोघांचे सहजीवन.\n० २३ मे १८५६ ला पारूचा अकस्मात मृत्यू. अजिंठा गावाच्या दिल्ली गेटजवळ तिची स्मृती गिलने बांधली.\nll टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो ll हू डाईड २३ मे १८५६ ll\n० १० एप्रिल १८७९ साली गिलचा मृत्यू. तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ येथे. तिथे संगमरवरी स्मृतीकबर आहे.\nll टू द मेमरी ऑफ रॉबर्ट गिल ऑफ अजंठा ll\nडोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या\nकोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या\nगाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्थ संवेदना\nबुद्धाच्या पडसावूलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा\nअजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात\nरंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला.\nझाडांच्या झुलत्या प्रवाही गाण्यातला\nलेणापूर फरीदापूरच्या गावंढळ गर्तेतला.\nबंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा\nपिवळ्याजर्द शेतातल्या पिकातलं बारादरीतला\nकाळ्याभोर दगडातला धबधबा झेलणारा.\nअदभूत भव्य दिव्य स्वप्नातला\nजगड्व्याळ चिरंतन नाजूक रेषांमधला\nरंगाचं आभाळ साठवून दगडांवर\nघोटवून निर्यमक बुद्धाच्या कहाणीत\nजगाचे अहंकार मोडून बसलेला\nनामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे\nपहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा\nचिलखती छाताडाच्या निळ्या डोळ्यांतला\nएक राजवर्खी झरोखा कुंचल्यांवर रंगांच्या\nद्वाही घुमवणारा, अजिंठ्यातली .\nचेतवून नेणारी एक अबलख पारू.\nपारूच्या पिवळ्या शुभ्र फुलांचा\nफुलांच्या भारानं निस्सीम बहरलेला\nसराई कोटातल्या बंदिस्त कडेकोट\nगेटमधून दरबारी दिमाखात हत्ती\nपुन्हा एकदा बुद्धाला सामोरा जाणारा.\nकित्येक हजार वर्षांनी साक्षात\nजातक कथांमधला. मलूल डोळ्यांचा\nदहापाच लोकांच्या सोबतीनं गिलसाब\nगोराभुरा तरणा. निळ्या डोळ्यांचा.\nपक्ष्यांचे दूरवर उडून जाणारे थवे पठारावर\nझिरकत झुलणारं काळ्या पहाडातलं\nपाण्याच्या वळणांचा पांढराशुभ्र प्रवाह दुरचा\nपुढच्या नदीतली निस्सीम शांतता\nत्याच्या अथांग डोळ्यांच्या पापण्यात.\nदूरच्या दरीतला घुमटणारा आवाज\nत्याचा पडसाद उमटत जाणारा\nवरती भरगच्च भरलेलं आभाळ.\nपाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात\nत्याचे डोळे अधीर उत्सुक\nबोली नीट कळत नाही\nसवयीनं हळूहळू सोबत लोकांची.\nतबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून\nतो विरघळून जातो पूर्णाकार.\nशक्तीचा सगळा पारा निथळून पडतो\nओठांवर मुलायम लालसर रंग\nगोंदणारी शृंगारातली सकवार बाई\nजातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.\nत्याचे डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.\nगिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.\nपद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या\nमान उंचावून टकटक पाहतो\nसुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो\nआपण काय पाहतोय त्याला कळत नाही\nक्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड\nमी जगातला एक श्रेष्ठ चित्रकार.\nत्याच्या अहंतेचा अंधार निथळून पडतो सरकन\nहाताला कांहीच सामर्थ्य नसल्यागत.\nकागदावर हळूहळू रेषा उमटतात\nआपोआप रंग ओले होत जातात.\nअजिंठा गावाला गिलचं जाणं येणं\nथकणं. कधी कित्येक दिवस\nतिथेच झोपडी बांधून राहणं.\nसावरखेड लेणापूरची मोलकरी मानसं साथीला.\nदिवाबत्ती माशालीसाठी. कागद कुंचल्यासाठी .\nत्याचं खाणंपिणं मांस शिजवण्यासाठी.\nकळत नसलेलं गाणं नाचणं\nशेकोटी पेटवून रात्री अजिंठ्याच्या\nडोंगरदरीत छोट्या झोपडीत ऐश्वर्यात\nन कळणाऱ्या अनोख्या बोलीत\nआता फक्त चित्रकार गिलसाब.\nमाणसांचा आदब निजामी नजाकतीतला.\nबोली कळत नाही नीट\nझपाटून गेलेला रॉबर्ट गिल\nतो त्याच्या देशीच्या राजाचं\nपत्र वाचून पुन्हा बहरतो\nरोज नवे रंग मिसळतो.\nत्याला मोडून टाकणाऱ्या अजिंठ्यात.\nएक दोन तीन चार\nतो कित्येक दिवस हतबल\nतिची छबी प्रतिरूप करण्यात.\nत्याकाळीही इतके कमी कपडे\nपाठीवरला गडद गर्द रंग अर्ध्या भागावर\nपाठमोरी निसरड्या स्तनाच्या उभारपणावर\nदंडातले मनगटातले गळ्यातले दागिने\nशरीराचा भाग, त्याचा रंग किती फिका करायचा\nत्याहूनही त्याची बोटं अंबाड्यावर थांबतात\nअंबाड्यावर पांढऱ्या पिवळ्या ठीबक्यांचा\nपुन्हा पुन्हा हातात ब्रश घेऊन रिकामा\nतिनं फक्त एकदा पाहावं\nथोडे तरी डोळे वळो\nतो मागे वळून पाहतो\nदोनतीन नि:शब्द रोजंदार मानसं\nमंद प्रकाशातला गौतम बुद्ध\nपापण्या मिटलेला. भिंतीचे रंग....रेषा\nकुठून उमलते कांही कळत नाही.\nपाठमोरीच्या अंबाड्यातल्या गज-याकडे पाहातो\nआणि त्याचा त्यालाच हसतो.\nत्याच्या श्वासांना पुन्हा भास\nपिवळी पिवळी पांढरी फुलं ओंजळभर\nफुलं कोण आणत असणार\nभिंतीवर पुन्हा पाठमोरी बाई\nपिवळ्या शुभ्र फुलांच्या दरवळीनं तो आणखी बहरतो.\nपलीकडल्या सुंदर शिल्पांच्या खांबाआड\nगिल तिला बोलावतो खुणावून\nबोली नीट कळत नाही म्हणून वैतागतो\nमन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले\nघनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले\nपाऊस पाखरांच्या पंखांत थेंबथेंबी\nशिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी\nघरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वाटा\nगात्रात कापणारा ओला फिका पसारा\nही फुलं आणते पिवळ्याशुभ्र रंगांची\nएक दोनदा हिला माणसांनी\nभाकरी थापायला आणलं आठवतं\nएकदा सशाचं मांस बेहद्द शिजवलं होतं\nतेंव्हा अस्पष्ट तिचे निळे डोळे पाहिले होते\nती हीच असणार गोरीभुरी\nतांबड्याजर्द लाल काळ्या ठिपक्यांच्या\nगुंजा बांधलेल्या, झोपडीत राहिल्या होत्या.\nपिवळ्या जर्द फुलांची दरवळ सबंध अजिंठाभर.\nसावळ्या मेघांचे आभाळत बन मन वेटाळते\nतिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून जाते.\nगोबऱ्या गालांची मंजुळ बोलांची अश्शी हरखते\nतिच्या निळ्याभोर अश्राप डोळ्यांना पाखरू वेढते.\nपुन्हा पुन्हा पाहण्यात गेलेले कित्येक दिवस\nरंग रेषा कुंचला कुठेही ठरेना कागदावर\nमागच्या भिंतीवरली शृंगाराची तसबीर टांगलेली\nतसलाच पेहराव शृंगारातला सगळ्या राजमहालात\nराजमहालातच दुसऱ्या दालनातल्या भिंतीजवळ\nत्याचा ब्रश थोडासा सूक्ष्म होत जातो\nतो पुन्हा पुन्हा चितारत राहतो\nतरीही मनासारखं उमटत नाही\nशिडीच्या पायांशी ओंजळभर फुलं\nतिच्या डोळ्यांत तो पाहातो....खुणावतो.\nती फुलं त्याच्या हातांत देते अलगद\nतिचे दोन्ही हात तो हातात घेतो गच्च\nतो निसटू न देता तिला जवळ घेतो\nकंदिलाचा दिवा तिच्या हाती देतो\nकाही सांगण्याचा प्रयत्न करतो सारखा\nकाठीनं राणीचा रंगमहाल दाखवतो\nतिचा एक हात हातात घट्ट धरून घेतो.\nराणी राजाच्या अंगाशी कलंडलेली.\nतो फक्त पाहत राहतो\nतिच्या टपोर निळ्या डोळ्यांत\nत्यानं कुंचला पुन्हा उचलला\nकुंचला खाली पडला आपोआप.\nहात खुपच गळून आलेला\nतो खुणावतो नुस्ताच काही.....\nसुस्त गाभाऱ्यात पडून राहतो.\nकिती तरी वेळ तो सुस्त पडून\nरोजंदार मानसं झोपडीला निघून गेलेली.\nअंधार वाढत जाणारा दुरात\nकंदिलाचा मंद फिका उजेड\nउजव्या हाताला वळवून सारखा\nझोपेत बरळत थकलेला गिलसाब.....\nथंडगार स्पर्शानं त्याला तजेला येतो थोडाफार\nतो कण्हतो. कूस बदलतो.\nलेण्यांतल्या दगडाच्या लादीवर मेजर रॉबर्ट गिल.\nत्याच्या उजव्या हाताची बोटं चोळणारी\nतो पुन्हा कांही बरळतो.\nत्या बोटांच्या स्पर्शानं त्याच्या सबंध शरीरात सळसळ\nहळुवार बोटांची लवलव त्याच्या गोऱ्याभुऱ्या कातडीला.\nतिथले रंग. त्याचा दुखरा हात.\nआख्खं जग ह्या चित्रकृती पाहताना\nमाझा युरोप. आख्खं जग मला डोक्यावर घेईल.\nमाझा कुंचला युरोपच्या गॅलरीच्या अग्रभागी राहील.\nह्या अजिंठ्यांच्या दगडांना लाखोंचे पाय लागतील\nकितीही मी थकलो तरी हे झालं पाहिजे.\nलवकर. दोन पाच वर्षांत.\nहे बुद्धा, तुझ्या पावलांशी मी पडलोय इथे\nदेशपरदेशात. तू दु:ख वेचणारा महात्मा\nतुझ्या ह्या दगडांच्या लादीत मला सुखी ठेव.\nमुलायम बोटांनी पुन्हा सुखावतो.\nतिचा हात आणखी घट्ट पकडतो.\nती बाजूला सरकू पाहते\nतो बोलतो तिच्याशी काहीबाही :\nतू कुठली गो S बाई --\nपरदेशी.....आदिवासी कोण गो S बाई\nकशाला घेऊन येतेस फुलं माझ्यासाठी\nकशाला शिजवून घालतेस चांगलं अन्न, चांगलं मांस.\nका आलो मलाही नीट कळलं नाही.\nमाझं चित्र व्हावं म्हणून तुझी धडपड असते.\nपोरी, तुझ्या डोळ्यांत मी गुंतून पडलो.\nवणव्यात कसा धाडू मी\nही तुझी मानसं अगदी निराळी बाई....\nतू सुखी राहावं म्हणून तुला रोजंदारीतून सोडलं कितीदा\nपण तू येतेच आहेस अजूनही.\nकुठल्या ऋणानुबंधात बांधू तुला मी\nतुला महाग पडणार बाई परवा हाहा:कार झाला\nधिंगाणा घातला माझ्या झोपडीवर\nमी मिलिटरीतल्या चिलखती छाताडाचा\nतुझ्या गावच्या जातीतला रंगमहाल\nतुझी मानसं तुझ्याजवळ असू देत पोरी\nतू फार वेडी नादान आहेस अजून.....\nतो बरळत मधेच थांबला\nपुन्हा क्षीणसा बोलता झाला.\nती भांबावली.त्याचे डोळे पुसत राहिली.\nकंदिलाचा मंद फिका हलणारा दिवा\nतो तिच्या डोक्यावरून बोटं फिरवतो.\nतिचा अंबाडा सैलसर होतो\nकेसांवरून त्याची बोटं फिरत राहतात\nसबंध शरीरभर चरत जातात\nचोळीच्या गाठीवर तिच्या अंगांगांवर\nलख लख लाखेरी विजा चमकतात.\nती त्याला अधिक बिलगून राहते\nतिच्या पोटावरून मांडीवरून हळुवार सरकतात\nपिवळ्याजर्द फुलांचे मखमाली तरारलेपण\nअंधारबनात दोघांचं आयुष्य बांधतात.\nगिलच्या डोळ्यांना अधिक ताकद येते\nतो पारूच्या डोळ्यांत पाहातो डोळे टाकून\nलेण्यांच्या समोरच्या टेकडीवर बांधल्या\nत्याच्या झोपडीत राहिलेले रंग गिरवतो\nकधीतरी अजिंठा गावाला जाणंयेणं निमित्तमात्र.\nइथल्याच झाडातून जंगलातून भटकणं दूरवर\nपारूच्या सहवासात. त्याच्या आयुष्यात\nकुठल्या नव्या बहरल्या वाटांवर.\nवाघूर नदीच्या पाण्यात तिचं न्हाणं खडकावर\nतिचं शरीर नग्नकाय न्याहाळताना\nआभाळ उतरावं पाण्यात लखलख\nएक विराट रूपसंहिता लेण्यांची.\nसमोरच्या लेण्यांमधून कुंचला सोडून\nहंसीचं लाख मुरडणं हंसा समोरचं\nलेण्यातलं चित्र रंगवलेलं काल परवाचं\nत्यानं केस विचारले तिचे\nअंगावर तिचा केशसंभार मोकळा\nतजेलदार उन्हाचं तिचं गर्भारपण\nचांदणं पाण्यात उमटावं तसं\nत्याच्या डोळ्यांत उडत्या राघूंचा किलकिलाट.\nदूरचे हिरवे पंख आणखी\nझाडांतून पिकांतून दूरवर गेलेले\nउघड्या खडकावर नदीच्या काठावर\nआणखी एक लेणं कोरलेलं शिल्पाकार\nबगळ्या बगळ्या फुलं दे फुलं दे\nपाची बोटं रंगू दे रंगू दे\nएक बगळा उडाला उडाला\nतळ्यात जाऊन बुडाला बुडाला.\nबगळ्या बगळ्या फुलं दे फुलं दे\nदोन पाच माणसांच्या सोबतीनं गिल आता\nसंपूर्ण गढलेला लेण्यांच्या दरबारात.\nत्याच्या डोळ्यांत रंगांची धुंदी अपरंपार.\nदूर डोंगरावरून भटकंतीत दोघं\nलेणापूर गावात. तिथून सपाट पाठरातल्या\nहुरळून गेलेली दोघं घोड्यावरून दूरदूर\nएकट्या रात्री नुस्तीच नंतर भटकंती\nडोंगरावरून खाली प्रचंड खोलवरच्या\nसपाटीच्या प्रदेशात. दूरदूरच्या रानात.\nदूरवर गाण्यांचे पडसाद फाल्गुनात\nहोळीच्या लाल जर्द ज्वाला आणखीन\nबंजारा नाचातली बायका माणसांची\nलाल होरी आयी र S\nलालजर्द घोड्यांची खिंकाळ तांड्यावर\nचांदण्यात रात्रभर भटकंती दोघांच्या अंगात होरी\nबंजारा तांड्याच्या होळीच्या गाण्यात\nबायका मनसोक्त झिंगून नाचणाऱ्या\nलालजर्द रंगीन नक्षीदार घाग-यातल्या\nमाणसांचा फेर घेताना रिंगण मारून\nएक गाणं पारुला हरवून टाकणारं\nतिचे पाय हलतात आपोआप\nअल्लद....अलवार. ठेका वाढत जातो आणि\nबंजारा बायका तिचा फेर धरतात आपोआप.\nपारो झिंगून झुलणारी होळीच्या जल्लोषात\nमाठातली मोहाची दारू रिचवून\nगिलसाब बेहद्द विसरून सगळं\nहोरीच्या गरबारी बंजारा गाण्यात.\nमुद्दाम एकदा गिलसाबच्या लेण्यात\nहौसेनं. होरीतल्या हरवल्या आठवणी.\nत्यानं चित्र रंगवलं तिचं कुंचल्यात\nपैंजनातल्या हलक्या पिवळ्या पावलांत.\nकुठल्या किलबिल गाण्यातल्या बोलीतलं\nनिळ्या डोळ्यांतलं बहरणारं 'दरबारी' लेण्यात\nतिच्या निळ्या डोळ्यांत भिरकली\nएकटी झोपेतून उठताना ओरडली\nकोणीच नाही जवळपास, तिला भास\nमानसं गिलसाब सगळे लेण्याच्या गाभाऱ्यात.\nतिची धडपड तिला धांदरून टाकणारी.\nतिच्या स्वप्नात सतरावी लेणी\nजगाचं दु:ख कमी करायला निघालेला.\nभिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी\nत्याची बायको यशोधरा दारात उभी\nकित्येक वर्षांनी नवऱ्याला साक्षात सामोरा बघावं\nपुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात\nमहात्मा गौतम बुद्ध, करुण डोळ्यांचा.\nह्या जगातल्या दु:खाला कुठेच किनारा नाही.\nह्या जगातल्या कारुण्याला कुठेच किनारा नाही.\nअनंतापार त्याची पाळंमुळं जख्खड जडलेली.\nपारू किंकाळी मारते मोठ्यांदा\nवाघूर नदीमधून ध्वनी उमटतात तिच्याच शब्दांचे\nगिल आणखी मानसं धावत येतात झोपडीवर\nतिच्या डोळ्यांत तुडुंब पाणी\nबारा वर्षांनी दारी आलेला\nउंचउंच गेलेला काळा पहाड\nतिथल्या झाडांच्या पलीकडलं लेणापूर\nपन्नास घरांचं. तसं चांगलं.\nतिथला माझा गोतावळा रक्ताचा\nमला दुरावलेला. माझ्या मांसातला.\nजातीतच लगीन कर म्हणणारा.\nगोतावळा खरा पण मतलबी\nनिदान माझा भाऊ तरी खरा :\nमला पैशांवर श्रीमंत म्हाताऱ्याला\nवाटतं कधी जाऊन यावं\nभेटून यावं एकदा मनमोकळं\nपण त्यांनी मला वाळीत टाकलं\nतू भरल्या छातीचा म्हणून माझा जीव\nह्यांनी मुडदा पाडला असता आजवर.\nमी लेणापूरच्या शेतीत काम केलं थोडंफार\nलोकांना चांगलं पाहता येत नाही गिलसाब.\nफरदापूरला लाकडांची मोळी विकत घेताना\nमला वखारीत पकडलं गावच्या\nमला धामधूम पळता आलं नाही.\nकुठेच ओरडता आलं नाही.\nगरिबांना अब्रू नसतेच का ह्या दुनियेत\nगरीबानं सुंदर असू नये का ह्या दुनियेत\nमी बाटलेली भ्रष्ट बलात्कार झालेली\nनंतर चालतच नव्हते चांगल्या जातीपातीत माझ्या\nकुठून आली ही कुलशीलाची अस्सल जात\nमाझ्या जगण्यातला दोष कुठला गिलसाब \nतू कुठला माणूस दूर देशातला\nपद्मपाणी बुद्ध, हा अजिंठा\nतू छबीदार उतरविला जसाच्या तसा\nतू कसा काय कारागीर\nतू माणूस नाही बाप्पा\nतू मला देव वाटला.\nत्यासाठी मी माझं सगळं आयुष्य तुला दिलं.\nमला काही कळत नाही\nतुझ्या कामासाठी हजार लोकांची दुवा मिळणार.\nचांगलं काम वाटलं म्हणून मी केलं\nतुझ्या थकल्या हाताला थोपटलं. बळ दिलं.\nतू जगाचं काम करतोय तुझ्यात मला माणूस दिसला\nतुझ्याशी लगीन लावलं बुद्धासमोर\nमी केलं यात पाप आहे का\nमी पाप केलं सगळ्या खेड्यातली लोक सांगतात\nअसलंच पाप तर मी एका चांगल्या गोष्टीसाठी केलं\nत्यानं तशी बुद्धी दिली. मी काय करू\nमाझ्या पोटात गरगर होतंय खुपच.\nगिलसाब दिवसादुपारी मला स्वप्नं पडतात भयाण\nमला डोहात यशोधरेचा राहूल दिसतोय....\nझोपडीबाहेरच्या हिरव्या डोंगर कठड्यात\nतिला तो घट्ट बिलगून कवटाळतो\nमेजर रॉबर्ट गिलच्या डोळ्यांतला प्रवाह\nअखंड तिच्या अंगावर ओघळत राहतो : अबोल.\nमन ऐसे डोहाच्या गडद गर्द पाण्यापरि\nदेहावर चरणाऱ्या गर्भाला बळ भारी\nमन माझे अवसेचे.विझलेल्या नवसाचे.\nअनेक चित्रांचे रंग भराभर जुळून येतात\nअलीकडे कित्येक दिवसांत त्याला भास होतात\nतिथल्या विख्यात आर्ट गॅलरीचे.\nयशाच्या तेजस्विताचे धुरळ पसरते.\nआपोआप जुळून येतात जातककथांच्या रेषा\nभराभर नक्षीदार छतांच्या गालीच्यांच्या\nझिळमिळ झालरी उमटतात जिवंत\nयुद्धाचं आव्हान पेलणारे त्याचे बाहू.\nबलदंड हात आज अजिंठ्यातही\nकांही चित्रं त्यानं आज सोबत घेतली\nमाणसांना गज-यासाठी फुलं सांगितली.\nअजिंठा गावाहून त्यानं मद्रासहून मागविलेली\nमोत्यांची माळ आज आणलेली होती.\nम्हणून तो बहरून होता आज दिवसभर.\nदोन हजार वर्षांपूर्वीची माळ\nरुपवती बाईच्या गळाभर चमचम उमटते.\nआजही उजळून. त्यानं कितीदा पाहिलं\nतशीच माळ आणली मोत्यांची पारूसाठी.\nपहिल्या चित्राची आठवण त्याच्या डोळ्यांत.\nवाघूर नदीच्या पाण्यात उतरताना\nसंथ सरकणारं हळुवार...त्याच्या डोळ्यांत मावेना.\nकसं टिपता येईल हे रंगरूप\nकमकुवत कमजोर ह्या निसर्गाच्या विभ्रमात.\nहे पक्षी पंख बुडवून\nअंगभर न्हातात निळ्या पाण्याच्या तावदानात\nभर्रकन उडून जातात तेंव्हा रंग हिनकळतात\nहे अनघड लावण्यरूप करण्याचं\nबळच नाही आपल्या कुंचल्यात.\nगिल मश्गुल नदीच्या वाढत्या प्रवाहात\nपंखांचा तांडा घनदाट आसमंतात\nशीळ वाजवीत पांढऱ्याशुभ्र झग्यात\nझुलत झुलत जाणारा गिलसाब झोकात\nझोपडीच्या आत दाराशी नि:शब्द झोपलेली पारू\nविझलेल्या टपोर निळ्या डोळ्यांच्या पापण्यांत\nपुन्हा पुन्हा पाहातो अजिंठा\nतो सत्य नाकारून तिच्याशी बोलत राहतो\nओरडतो प्रचंड किंकाळी फोडून\nत्याच्यातला मेजर जागा होतो\nउडवून द्यावे बंदुकीचे बार दणादण चौफेर\nत्यांना फाडून टाकावं वाटतं\nकरून टाकावे त्यांचे संसार उध्वस्त\nबार भरावे बंदुकीत अन्\nउडवून द्यावे हे सत्तावीस लेण्यांचे शिल्प.\nह्या रंगरेखा हा गौतम बुद्ध\nआता माझा उरला नाही.\nतिच्या पापण्यांवर निस्तेज अजिंठा झाकळलेला\nतिच्या गर्भार लेण्यांवर तो पांघरून घालतो\nसबंध लेण्यांचं रूप गिरविलं लयभोर\nतिच्या डोळ्यांवर आभाळ गोंदवून ठेवलं होतं\nत्याचं बळ माझ्या बोटांना....\nतिचं जीवघेणं योगदान आता आयुष्याचं\nकुंचला रंग उचलणार नाही\nदु:ख दे अवकाशव्यापी नेत्र माझे\nबुब्बुळे जळलीत जळले चंद्र माझे.\nना आता उरला कशाचा खेद चित्ती\nनग्न भटक्या काफिराला शाप दे.\nमाहेराला लेणापूरला सांगावा धाडूनही\nकोणी आलं नाही गोतातलं\nरक्तामासाचं तिचं जवळचं गणगोत\nकाही उरलंच नाही म्हणे तिच्या पापानं\nसांगावा धाडूनही कुठल्याच गावाचं कोणी नाही.\nगिल थकलेला.एकला. प्रेताच्या सापळ्यात.\nत्याच्या डोळ्यांत मृत्यूचे सुन्नाट भयाणपण.\nनिदान तिचे अंत्यसंस्कार होवो तिच्या धर्माप्रमाणे\nती सुखरूप राहो आभाळापलीकडल्या\nदेशांतरीच्या गावी. तो विझलेला.\nअजिंठा गावाला दिल्ली दरवाजाला प्रेत ठेवलं\nमानसं बोलावली. कोणीच फिरकलं नाही मुद्दाम.\nकुठलाच समाज आला नाही दिवसभर\nबारवेच्या विहिरीच्या वरल्या बाजूला\nपाण्याच्या ओघळाच्या झाडीत पारू\nहा आमच्या धर्माचा नाही\nआमच्यापासून दूर राहत गेला.\nकोणाला काय घेणं देणं\nकाय आडनाराय त्याच्याशिवाय आमचं \nहिंदू पोरीला फंद पाडून पाप केलं म्हणे अजिंठ्यात.\nशिवशिव. त्याची सावली नको अंगावर.\nतिच्या भरल्या पापाचा आम्हाला\nकुठले रंग चितारले म्हणे कागदांवर\nसरकारच्या त्याच्या देशाला ते लखलाभ असो.\nआम्हाला कांहीच घेणंदेणं नाही\nआमच्याच प्रदेशात नजीक असूनही\nआम्ही पाहिलंही नाही कधी\nत्यानं काय पोट भरणारयं आमचं.\nमेजर गिल एकटा. सुन्न, सुळ्यांच्या\nखिळ्यांकडे पाहत दिल्ली दरवाजाच्या.\nहिंदूधर्मपद्धतीनं सगळं काही करून\nतिच्यासाठीच्या त्याच्या शेवटच्या इच्छांना\nअस्थिकलशाचे त्यांनी शेवटचे पान सोडले.\nसुन्नी पंथाचे फकीर सगळं काही विसरले.\nहजारोंच्या वस्तीतून दोनतीन का असेना\nमानसं सापडल्यानं गिलसाब थोडे सावरले\nगंगा यमुना विहिरींच्या सावलीनं.\nपारूच्या स्मरणाला सुंदर कबर केलं\nटू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो\nहू डाईड २३ मे १८५६\nशुभ्र पिवळ्या फुलांची ओंजळ\nकबरीवर ठेवताना त्याचे डोळे ओघळत राहिले.\nत्याच्या रंगशालेचे दिवस कोमेजून चाललेले\nराहिलेलं काम थोडं फार वर्षभराचं\nनंतरचं कुठलं गाव असेल उजाड उडून जाण्याचं.\nशब्दांत गोठले दु:ख शब्द अलवार\nग्रासली उन्हे झाडांना हिरवा भार\nकाळीज कुरतडे खोल मुका आकांत\nघनघोर मनाच्या तळ्यात चंद्र विखार\nहा अथांग दरिया दु:खाची बारात\nआयुष्य उघडले लक्तरलेले हात.\nतो आता दिल्ली गेटनं जाताना\nतिच्या समाधीवर फुलं ठेवायचा\nअजिंठा लेण्यांतल्या झोपड्यांत जगणं\nशक्यच नाही म्हणून गावात राहायचा.\nझालेल्या महत्वाच्या चित्रकृती जवळपास\nपाठवून दिलेल्या त्याच्या परदेशात\nकिरकोळ काही राहिलेलं काम रंगसंगतीचं\nदहा वर्षांचा अजिंठा त्याच्या डोळ्यांत उतरतो.\nपारूच्या रूपानं तो निखळून पडतो.\nराहिलेलं काम तिच्या आठवणीनं पूर्ण करत राहतो.\nयुरोपात पाठवलेल्या सुंदर चित्रकृतींचं प्रदर्शन\nसबंध अजिंठा ओतप्रोत. आर्ट गॅलरीत.\nमहिन्याभराचं प्रदर्शन. तो उल्हसित होतो.\nआयुष्यात एक भलं काम झालं\nसरकारनं माझ्या हाती विश्वासानं काम दिलं\nमी चितारलाय अजिंठा बलवत्तर....\nत्याचं मन भिरंगतं पार सात समुद्रापार\nक्रिस्टल पॅलेसच्या विख्यात आर्ट गॅलरीत\nत्याचे डोळे माणसांच्या झुंबडीत\nकलावंतांच्या , रसिकांच्या बेहद्द युरोपच्या गर्दीत.\nसगळं जग चित्रकृती पाहून चकित.\nदोन हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास\nहे रंग..ह्या रेषा...हे सामर्थ्य\nमाणसांनी निर्मिलेलं असूच शकत नाही.\nहे अदभूत भुयारातून निसर्गदत्त आलेलं काही\nचित्रकार मेजर रॉबर्ट गिलचं जगात नाव.\nपत्र तारा अभिनंदनाचे निरोप\nखूप लिहून येतं लोकांचं, सरकारचं\nहुरळून गेल्याचे त्याचे दिवस\nथोडं दु:ख हलकं होण्याचे दिवस.\nत्याचे डोळे तारवटले जातात पुन्हा रंगांनी\nपुन्हा हत्तीवरून फिरून यावं अजिंठ्यात\nलाल घोड्याच्या रिकिबीत पाय टाकून\nटाच दयावी डोगरमाथ्यावर दूरवर.\nअजिंठ्याच्या ह्या डोंगरात पुन्हा काही सापडेल\nत्याच्यातला चित्रकार पुन्हा बहरून येतो एकदा\nप्रदर्शनाचा बोलबाला महिनाभरात दूरवर.\nआर्ट गॅलरीस प्रचंड आग.\nसगळी चित्रं भस्मसात एकाएक.\nबातमीनं त्याचं काळीज कुरतडतं\nतो वेडा होतो.अधांतरी बोलत राहतो\nकलावंत म्हणून तेवढाच आधार\nसबंध आयुष्य निथळून टाकलेलं दहा वर्षांत.\nतिच्या आठवणीचं जे होतं तेही भस्मसात.\nपारुमुळेच हे चितारलं गेलं\nगिल वेड्यागत बोलत राहतो\nवेड्यासारखा कुठे भटकत राहतो अजिंठ्यात.\nलालजर्द लाटा दूरवर झाडांतून\nपहाडातून एका अवसेच्या राती\nकाळाभोर अजिंठा काळ्या फत्तरांचा\nकाळी रात्र आणखी घटोत्कच गुंफांकडून\nअजिंठा गुंफांकडे येणारा ज्वालांचा प्रवाह.\nएका रात्री गिल वणव्यात भेदरलेला.\nपाचोळा झाडांच्या पावलांशी विकल\nसळसळ क्षीण पार विस्कटलेली.\nउंच उंच पहाडापार गेलेली\nघेरी घेणारी प्रचंड अवकाशात\nएकटी घार. अपार अथांग अजिंठा.\nकाळ्या कातळावर एक कलेवर\nअजिंठा लेणीतल्या पहिल्या गाभाऱ्यात\nत्याच्या डोळ्यांत उतरू लागतात ते रंग\nभिक्षापात्रातला बुद्ध आणखी यशोधरा\nतो किंकाळी फोडतो प्रचंड मोठ्यांदा.....\nत्याला भूताडासारखा भास होतो\nपावलांशी आपोआप कोसळून पडतो.\nपांगलेला पावसाळा वाट भरलेली धुळीने\nमोडक्या फांदीस घरटे वाळलेली शुष्क पाने\nदूर गेल्या पायवाटा....डोंगराच्या पायथ्याशी\nपंख मिटल्या झोपडीचे दु:ख कवटाळे उराशी\nअजिंठा लेणीच्या समोरच्या टेकडीतलं\nदांडीवरला तुटलेला हलणारा कंदील\nगिल साबला ओळखून खिंकाळणारा\nलालजर्द घोडा रिकिबीशिवायचा .\nओंजळभर फुलं झोपडीशी टाकून\nपारुचं मोठ्ठ काढलेलं चित्र\nपाठीशी रिकामी बंदूक हलणारी\nखांडोळी पडलेलं काळपट पाणी\nइथलं काहीच नकोय आता\nइथून दूर कुठे तरी....\nमाझं कोणीच नाही ह्या जगात\nती आडवी पायवाट त्याला\nदूर तापी नदीच्या प्रवाहाकडे घेऊन जाते\nत्याच्या गढूळ डोळ्यांतल्या सावल्यांसारखी\nसंकलक : प्रवीण कुलकर्णी\n८३वे अखिल भारतीय साहित्य संमेलन व्ही.डी.ओ. (6)\nअन्य भाषा गीते (7)\nहिंदी मुशायरा[ काव्यसंमेलन] (26)\n* पेल्यातले प्या मद्य,पण ओठातले प्राशू नका दुरुनिच याची ये नशा जवळी या जाऊ नका स्पर्शने तर दूर राहो,बघितले नुसते जरी याची नशा,मी सांगतो,उतर...\n१२-१०-२००९ या विषयी सविस्तर मी नंतर बोलेन पण माझा qt मध्ये लिहिण्याचा उद्देश हाच असतो कि केवळ मला सतावणाऱ्या नकारात्मक भावना किंवा मनातला गो...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण\n१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आ...\nतुम तो ठहरे परदेसी : अल्ताफ राजा\nतुम तो ठहरे परदेसी , साथ क्या निभाओगे... तुम तो ठहरे परदेसी , साथ क्या निभाओगे... सुबह पहली... सुबह पहली... सुबह पहली... गाड़ी से...\n#चंद्रमा हसे नभी, शांत शीतल चांदणे आमुच्या आहे कपाळी, अमृतांजन लावणे लावण्या हेही कपाळी, नसतो तसा नाराज मी आहे परी नशिबात हेही, आपुल्याच...\nराम द्विज राज है \nशेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती प्रा. शिवाजीराव चव्हाण\nआज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेती, शेतकरी जीवन, महसुली व्यवस्थेची माहिती देणारा हा विशेष लेख दोन भाग...\nमाझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क \n( १९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. ) नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजा...\n* पेल्यातले प्या मद्य,पण ओठातले प्राशू नका दुरुनिच याची ये नशा जवळी या जाऊ नका स्पर्शने तर दूर राहो,बघितले नुसते जरी याची नशा,मी सांगतो,उतर...\n१२-१०-२००९ या विषयी सविस्तर मी नंतर बोलेन पण माझा qt मध्ये लिहिण्याचा उद्देश हाच असतो कि केवळ मला सतावणाऱ्या नकारात्मक भावना किंवा मनातला गो...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण\n१ मे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० च्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य जन्मास आ...\nतुम तो ठहरे परदेसी : अल्ताफ राजा\nतुम तो ठहरे परदेसी , साथ क्या निभाओगे... तुम तो ठहरे परदेसी , साथ क्या निभाओगे... सुबह पहली... सुबह पहली... सुबह पहली... गाड़ी से...\n#चंद्रमा हसे नभी, शांत शीतल चांदणे आमुच्या आहे कपाळी, अमृतांजन लावणे लावण्या हेही कपाळी, नसतो तसा नाराज मी आहे परी नशिबात हेही, आपुल्याच...\nराम द्विज राज है \nशेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती प्रा. शिवाजीराव चव्हाण\nआज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेती, शेतकरी जीवन, महसुली व्यवस्थेची माहिती देणारा हा विशेष लेख दोन भाग...\nमाझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क \n( १९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. ) नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजा...\nमृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला,\nप्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,\nपहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा,\nसबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला\nप्यास तुझे तो, विश्व तपाकर पूर्ण निकालूँगा हाला,\nएक पाँव से साकी बनकर नाचूँगा लेकर प्याला,\nजीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका,\nआज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला\nप्रियतम, तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला,\nअपने को मुझमें भरकर तू बनता है पीनेवाला,\nमैं तुझको छक छलका करता, मस्त मुझे पी तू होता,\nएक दूसरे की हम दोनों आज परस्पर मधुशाला\nभावुकता अंगूर लता से खींच कल्पना की हाला,\nकवि साकी बनकर आया है भरकर कविता का प्याला,\nकभी न कण-भर खाली होगा लाख पिएँ, दो लाख पिएँ\nपाठकगण हैं पीनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला\nमधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,\nभरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,\nउठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,\nअपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला\nमदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,\n'किस पथ से जाऊँ' असमंजस में है वह भोलाभाला,\nअलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -\n'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला'\nचलने ही चलने में कितना जीवन, हाय, बिता डाला\n'दूर अभी है', पर, कहता है हर पथ बतलानेवाला,\nहिम्मत है न बढूँ आगे को साहस है न फिरुँ पीछे,\nकिंकर्तव्यविमूढ़ मुझे कर दूर खड़ी है मधुशाला\nमुख से तू अविरत कहता जा मधु, मदिरा, मादक हाला,\nहाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला,\nध्यान किए जा मन में सुमधुर सुखकर, सुंदर साकी का,\nऔर बढ़ा चल, पथिक, न तुझको दूर लगेगी मधुशाला\nमदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,\nअधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,\nबने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,\nरहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला\nसुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,\nसुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,\nबस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,\nचहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला\nजलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,\nवीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,\nडाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,\nमधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला\nमेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,\nअंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,\nपाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,\nइन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला\nहाथों में आने से पहले नाज़ दिखाएगा प्याला,\nअधरों पर आने से पहले अदा दिखाएगी हाला,\nबहुतेरे इनकार करेगा साकी आने से पहले,\nपथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला\nलाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला,\nफेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला,\nदर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं,\nपीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला\nजगती की शीतल हाला सी पथिक, नहीं मेरी हाला,\nजगती के ठंडे प्याले सा पथिक, नहीं मेरा प्याला,\nज्वाल सुरा जलते प्याले में दग्ध हृदय की कविता है,\nजलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला\nबहती हाला देखी, देखो लपट उठाती अब हाला,\nदेखो प्याला अब छूते ही होंठ जला देनेवाला,\n'होंठ नहीं, सब देह दहे, पर पीने को दो बूंद मिले'\nऐसे मधु के दीवानों को आज बुलाती मधुशाला\nधर्मग्रन्थ सब जला चुकी है, जिसके अंतर की ज्वाला,\nमंदिर, मसजिद, गिरिजे, सब को तोड़ चुका जो मतवाला,\nपंडित, मोमिन, पादिरयों के फंदों को जो काट चुका,\nकर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला\nलालायित अधरों से जिसने, हाय, नहीं चूमी हाला,\nहर्ष-विकंपित कर से जिसने, हा, न छुआ मधु का प्याला,\nहाथ पकड़ लज्जित साकी को पास नहीं जिसने खींचा,\nव्यर्थ सुखा डाली जीवन की उसने मधुमय मधुशाला\nबने पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला,\nरहे फेरता अविरत गति से मधु के प्यालों की माला'\n'और लिये जा, और पीये जा', इसी मंत्र का जाप करे'\nमैं शिव की प्रतिमा बन बैठूं, मंदिर हो यह मधुशाला\nबजी न मंदिर में घड़ियाली, चढ़ी न प्रतिमा पर माला,\nबैठा अपने भवन मुअज्ज़िन देकर मस्जिद में ताला,\nलुटे ख़जाने नरपितयों के गिरीं गढ़ों की दीवारें,\nरहें मुबारक पीनेवाले, खुली रहे यह मधुशाला\nबड़े बड़े पिरवार मिटें यों, एक न हो रोनेवाला,\nहो जाएँ सुनसान महल वे, जहाँ थिरकतीं सुरबाला,\nराज्य उलट जाएँ, भूपों की भाग्य सुलक्ष्मी सो जाए,\nजमे रहेंगे पीनेवाले, जगा करेगी मधुशाला\nसब मिट जाएँ, बना रहेगा सुन्दर साकी, यम काला,\nसूखें सब रस, बने रहेंगे, किन्तु, हलाहल औ' हाला,\nधूमधाम औ' चहल पहल के स्थान सभी सुनसान बनें,\nझगा करेगा अविरत मरघट, जगा करेगी मधुशाला\nभुरा सदा कहलायेगा जग में बाँका, मदचंचल प्याला,\nछैल छबीला, रसिया साकी, अलबेला पीनेवाला,\nपटे कहाँ से, मधु औ' जग की जोड़ी ठीक नहीं,\nजग जर्जर प्रतिदन, प्रतिक्षण, पर नित्य नवेली मधुशाला\nबिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला,\nपी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला,\nदास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की,\nविश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला\nहरा भरा रहता मदिरालय, जग पर पड़ जाए पाला,\nवहाँ मुहर्रम का तम छाए, यहाँ होलिका की ज्वाला,\nस्वर्ग लोक से सीधी उतरी वसुधा पर, दुख क्या जाने,\nपढ़े मर्सिया दुनिया सारी, ईद मनाती मधुशाला\nएक बरस में, एक बार ही जगती होली की ज्वाला,\nएक बार ही लगती बाज़ी, जलती दीपों की माला,\nदुनियावालों, किन्तु, किसी दिन आ मदिरालय में देखो,\nदिन को होली, रात दिवाली, रोज़ मनाती मधुशाला\nनहीं जानता कौन, मनुज आया बनकर पीनेवाला,\nकौन अपिरिचत उस साकी से, जिसने दूध पिला पाला,\nजीवन पाकर मानव पीकर मस्त रहे, इस कारण ही,\nजग में आकर सबसे पहले पाई उसने मधुशाला\nबनी रहें अंगूर लताएँ जिनसे मिलती है हाला,\nबनी रहे वह मिटटी जिससे बनता है मधु का प्याला,\nबनी रहे वह मदिर पिपासा तृप्त न जो होना जाने,\nबनें रहें ये पीने वाले, बनी रहे यह मधुशाला\nसकुशल समझो मुझको, सकुशल रहती यदि साकीबाला,\nमंगल और अमंगल समझे मस्ती में क्या मतवाला,\nमित्रों, मेरी क्षेम न पूछो आकर, पर मधुशाला की,\nकहा करो 'जय राम' न मिलकर, कहा करो 'जय मधुशाला'\nसूर्य बने मधु का विक्रेता, सिंधु बने घट, जल, हाला,\nबादल बन-बन आए साकी, भूमि बने मधु का प्याला,\nझड़ी लगाकर बरसे मदिरा रिमझिम, रिमझिम, रिमझिम कर,\nबेलि, विटप, तृण बन मैं पीऊँ, वर्षा ऋतु हो मधुशाला\nतारक मणियों से सज्जित नभ बन जाए मधु का प्याला,\nसीधा करके भर दी जाए उसमें सागरजल हाला,\nमज्ञल्तऌा समीरण साकी बनकर अधरों पर छलका जाए,\nफैले हों जो सागर तट से विश्व बने यह मधुशाला\nअधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला,\nभाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला,\nहर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती,\nआँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला\nपौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला,\nभरी हुई है जिसके अंदर पिरमल-मधु-सुरिभत हाला,\nमाँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं,\nझूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला\nप्रति रसाल तरू साकी सा है, प्रति मंजरिका है प्याला,\nछलक रही है जिसके बाहर मादक सौरभ की हाला,\nछक जिसको मतवाली कोयल कूक रही डाली डाली\nहर मधुऋतु में अमराई में जग उठती है मधुशाला\nमंद झकोरों के प्यालों में मधुऋतु सौरभ की हाला\nभर भरकर है अनिल पिलाता बनकर मधु-मद-मतवाला,\nहरे हरे नव पल्लव, तरूगण, नूतन डालें, वल्लरियाँ,\nछक छक, झुक झुक झूम रही हैं, मधुबन में है मधुशाला\nसाकी बन आती है प्रातः जब अरुणा ऊषा बाला,\nतारक-मणि-मंडित चादर दे मोल धरा लेती हाला,\nअगणित कर-किरणों से जिसको पी, खग पागल हो गाते,\nप्रति प्रभात में पूर्ण प्रकृति में मुखिरत होती मधुशाला\nउतर नशा जब उसका जाता, आती है संध्या बाला,\nबड़ी पुरानी, बड़ी नशीली नित्य ढला जाती हाला,\nजीवन के संताप शोक सब इसको पीकर मिट जाते\nसुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला\nअंधकार है मधुविक्रेता, सुन्दर साकी शशिबाला\nकिरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला,\nपीकर जिसको चेतनता खो लेने लगते हैं झपकी\nतारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला\nकिसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देती हाला\nकिसी ओर मैं आँखें फेरूँ, दिखलाई देता प्याला,\nकिसी ओर मैं देखूं, मुझको दिखलाई देता साकी\nकिसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला\nसाकी बन मुरली आई साथ लिए कर में प्याला,\nजिनमें वह छलकाती लाई अधर-सुधा-रस की हाला,\nयोगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए,\nदेखो कैसों-कैसों को है नाच नचाती मधुशाला\nवादक बन मधु का विक्रेता लाया सुर-सुमधुर-हाला,\nरागिनियाँ बन साकी आई भरकर तारों का प्याला,\nविक्रेता के संकेतों पर दौड़ लयों, आलापों में,\nपान कराती श्रोतागण को, झंकृत वीणा मधुशाला\nचित्रकार बन साकी आता लेकर तूली का प्याला,\nजिसमें भरकर पान कराता वह बहु रस-रंगी हाला,\nमन के चित्र जिसे पी-पीकर रंग-बिरंगे हो जाते,\nचित्रपटी पर नाच रही है एक मनोहर मधुशाला\nघन श्यामल अंगूर लता से खिंच खिंच यह आती हाला,\nअरूण-कमल-कोमल कलियों की प्याली, फूलों का प्याला,\nलोल हिलोरें साकी बन बन माणिक मधु से भर जातीं,\nहंस मज्ञल्तऌा होते पी पीकर मानसरोवर मधुशाला\nहिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला,\nचंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला,\nकोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं,\nपीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला\nधीर सुतों के हृदय रक्त की आज बना रक्तिम हाला,\nवीर सुतों के वर शीशों का हाथों में लेकर प्याला,\nअति उदार दानी साकी है आज बनी भारतमाता,\nस्वतंत्रता है तृषित कालिका बलिवेदी है मधुशाला\nदुतकारा मस्जिद ने मुझको कहकर है पीनेवाला,\nठुकराया ठाकुरद्वारे ने देख हथेली पर प्याला,\nकहाँ ठिकाना मिलता जग में भला अभागे काफिर को\nशरणस्थल बनकर न मुझे यदि अपना लेती मधुशाला\nपथिक बना मैं घूम रहा हूँ, सभी जगह मिलती हाला,\nसभी जगह मिल जाता साकी, सभी जगह मिलता प्याला,\nमुझे ठहरने का, हे मित्रों, कष्ट नहीं कुछ भी होता,\nमिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला\nसजें न मस्जिद और नमाज़ी कहता है अल्लाताला,\nसजधजकर, पर, साकी आता, बन ठनकर, पीनेवाला,\nशेख, कहाँ तुलना हो सकती मस्जिद की मदिरालय से\nचिर विधवा है मस्जिद तेरी, सदा सुहागिन मधुशाला\nबजी नफ़ीरी और नमाज़ी भूल गया अल्लाताला,\nगाज गिरी, पर ध्यान सुरा में मग्न रहा पीनेवाला,\nशेख, बुरा मत मानो इसको, साफ़ कहूँ तो मस्जिद को\nअभी युगों तक सिखलाएगी ध्यान लगाना मधुशाला\nमुसलमान औ' हिन्दू है दो, एक, मगर, उनका प्याला,\nएक, मगर, उनका मदिरालय, एक, मगर, उनकी हाला,\nदोनों रहते एक न जब तक मस्जिद मन्दिर में जाते,\nबैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला\nकोई भी हो शेख नमाज़ी या पंडित जपता माला,\nबैर भाव चाहे जितना हो मदिरा से रखनेवाला,\nएक बार बस मधुशाला के आगे से होकर निकले,\nदेखूँ कैसे थाम न लेती दामन उसका मधुशाला\nऔर रसों में स्वाद तभी तक, दूर जभी तक है हाला,\nइतरा लें सब पात्र न जब तक, आगे आता है प्याला,\nकर लें पूजा शेख, पुजारी तब तक मस्जिद मन्दिर में\nघूँघट का पट खोल न जब तक झाँक रही है मधुशाला\nआज करे परहेज़ जगत, पर, कल पीनी होगी हाला,\nआज करे इन्कार जगत पर कल पीना होगा प्याला,\nहोने दो पैदा मद का महमूद जगत में कोई, फिर\nजहाँ अभी हैं मन्िदर मस्जिद वहाँ बनेगी मधुशाला\nयज्ञ अग्नि सी धधक रही है मधु की भटठी की ज्वाला,\nऋषि सा ध्यान लगा बैठा है हर मदिरा पीने वाला,\nमुनि कन्याओं सी मधुघट ले फिरतीं साकीबालाएँ,\nकिसी तपोवन से क्या कम है मेरी पावन मधुशाला\nसोम सुरा पुरखे पीते थे, हम कहते उसको हाला,\nद्रोणकलश जिसको कहते थे, आज वही मधुघट आला,\nवेदिवहित यह रस्म न छोड़ो वेदों के ठेकेदारों,\nयुग युग से है पुजती आई नई नहीं है मधुशाला\nवही वारूणी जो थी सागर मथकर निकली अब हाला,\nरंभा की संतान जगत में कहलाती 'साकीबाला',\nदेव अदेव जिसे ले आए, संत महंत मिटा देंगे\nकिसमें कितना दम खम, इसको खूब समझती मधुशाला\nकभी न सुन पड़ता, 'इसने, हा, छू दी मेरी हाला',\nकभी न कोई कहता, 'उसने जूठा कर डाला प्याला',\nसभी जाति के लोग यहाँ पर साथ बैठकर पीते हैं,\nसौ सुधारकों का करती है काम अकेले मधुशाला\nश्रम, संकट, संताप, सभी तुम भूला करते पी हाला,\nसबक बड़ा तुम सीख चुके यदि सीखा रहना मतवाला,\nव्यर्थ बने जाते हो हिरजन, तुम तो मधुजन ही अच्छे,\nठुकराते हिर मंिदरवाले, पलक बिछाती मधुशाला\nएक तरह से सबका स्वागत करती है साकीबाला,\nअज्ञ विज्ञ में है क्या अंतर हो जाने पर मतवाला,\nरंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में,\nसाम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला\nबार बार मैंने आगे बढ़ आज नहीं माँगी हाला,\nसमझ न लेना इससे मुझको साधारण पीने वाला,\nहो तो लेने दो ऐ साकी दूर प्रथम संकोचों को,\nमेरे ही स्वर से फिर सारी गूँज उठेगी मधुशाला\n कल पर विश्वास किया कब करता है पीनेवाला\nहो सकते कल कर जड़ जिनसे फिर फिर आज उठा प्याला,\nआज हाथ में था, वह खोया, कल का कौन भरोसा है,\nकल की हो न मुझे मधुशाला काल कुटिल की मधुशाला\nआज मिला अवसर, तब फिर क्यों मैं न छकूँ जी-भर हाला\nआज मिला मौका, तब फिर क्यों ढाल न लूँ जी-भर प्याला,\nछेड़छाड़ अपने साकी से आज न क्यों जी-भर कर लूँ,\nएक बार ही तो मिलनी है जीवन की यह मधुशाला\nआज सजीव बना लो, प्रेयसी, अपने अधरों का प्याला,\nभर लो, भर लो, भर लो इसमें, यौवन मधुरस की हाला,\nऔर लगा मेरे होठों से भूल हटाना तुम जाओ,\nअथक बनू मैं पीनेवाला, खुले प्रणय की मधुशाला\nसुमुखी तुम्हारा, सुन्दर मुख ही, मुझको कन्चन का प्याला\nछलक रही है जिसमंे माणिक रूप मधुर मादक हाला,\nमैं ही साकी बनता, मैं ही पीने वाला बनता हूँ\nजहाँ कहीं मिल बैठे हम तुम़ वहीं गयी हो मधुशाला\nदो दिन ही मधु मुझे पिलाकर ऊब उठी साकीबाला,\nभरकर अब खिसका देती है वह मेरे आगे प्याला,\nनाज़, अदा, अंदाजों से अब, हाय पिलाना दूर हुआ,\nअब तो कर देती है केवल फ़र्ज़ -अदाई मधुशाला\nछोटे-से जीवन में कितना प्यार करुँ, पी लूँ हाला,\nआने के ही साथ जगत में कहलाया 'जानेवाला',\nस्वागत के ही साथ विदा की होती देखी तैयारी,\nबंद लगी होने खुलते ही मेरी जीवन-मधुशाला\nक्या पीना, निर्द्वन्द न जब तक ढाला प्यालों पर प्याला,\nक्या जीना, निरंिचत न जब तक साथ रहे साकीबाला,\nखोने का भय, हाय, लगा है पाने के सुख के पीछे,\nमिलने का आनंद न देती मिलकर के भी मधुशाला\nमुझे पिलाने को लाए हो इतनी थोड़ी-सी हाला\nमुझे दिखाने को लाए हो एक यही छिछला प्याला\nइतनी पी जीने से अच्छा सागर की ले प्यास मरुँ,\nसिंधँु-तृषा दी किसने रचकर बिंदु-बराबर मधुशाला\nक्या कहता है, रह न गई अब तेरे भाजन में हाला,\nक्या कहता है, अब न चलेगी मादक प्यालों की माला,\nथोड़ी पीकर प्यास बढ़ी तो शेष नहीं कुछ पीने को,\nप्यास बुझाने को बुलवाकर प्यास बढ़ाती मधुशाला\nलिखी भाग्य में जितनी बस उतनी ही पाएगा हाला,\nलिखा भाग्य में जैसा बस वैसा ही पाएगा प्याला,\nलाख पटक तू हाथ पाँव, पर इससे कब कुछ होने का,\nलिखी भाग्य में जो तेरे बस वही मिलेगी मधुशाला\nकर ले, कर ले कंजूसी तू मुझको देने में हाला,\nदे ले, दे ले तू मुझको बस यह टूटा फूटा प्याला,\nमैं तो सब्र इसी पर करता, तू पीछे पछताएगी,\nजब न रहूँगा मैं, तब मेरी याद करेगी मधुशाला\nध्यान मान का, अपमानों का छोड़ दिया जब पी हाला,\nगौरव भूला, आया कर में जब से मिट्टी का प्याला,\nसाकी की अंदाज़ भरी झिड़की में क्या अपमान धरा,\nदुनिया भर की ठोकर खाकर पाई मैंने मधुशाला\nक्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर, दुर्बल मानव मिटटी का प्याला,\nभरी हुई है जिसके अंदर कटु-मधु जीवन की हाला,\nमृत्यु बनी है निर्दय साकी अपने शत-शत कर फैला,\nकाल प्रबल है पीनेवाला, संसृति है यह मधुशाला\nप्याले सा गढ़ हमें किसी ने भर दी जीवन की हाला,\nनशा न भाया, ढाला हमने ले लेकर मधु का प्याला,\nजब जीवन का दर्द उभरता उसे दबाते प्याले से,\nजगती के पहले साकी से जूझ रही है मधुशाला\nअपने अंगूरों से तन में हमने भर ली है हाला,\nक्या कहते हो, शेख, नरक में हमें तपाएगी ज्वाला,\nतब तो मदिरा खूब खिंचेगी और पिएगा भी कोई,\nहमें नमक की ज्वाला में भी दीख पड़ेगी मधुशाला\nयम आएगा लेने जब, तब खूब चलूँगा पी हाला,\nपीड़ा, संकट, कष्ट नरक के क्या समझेगा मतवाला,\nक्रूर, कठोर, कुटिल, कुविचारी, अन्यायी यमराजों के\nडंडों की जब मार पड़ेगी, आड़ करेगी मधुशाला\nयदि इन अधरों से दो बातें प्रेम भरी करती हाला,\nयदि इन खाली हाथों का जी पल भर बहलाता प्याला,\nहानि बता, जग, तेरी क्या है, व्यर्थ मुझे बदनाम न कर,\nमेरे टूटे दिल का है बस एक खिलौना मधुशाला\nयाद न आए दूखमय जीवन इससे पी लेता हाला,\nजग चिंताओं से रहने को मुक्त, उठा लेता प्याला,\nशौक, साध के और स्वाद के हेतु पिया जग करता है,\nपर मै वह रोगी हूँ जिसकी एक दवा है मधुशाला\nगिरती जाती है दिन प्रतिदन प्रणयनी प्राणों की हाला\nभग्न हुआ जाता दिन प्रतिदन सुभगे मेरा तन प्याला,\nरूठ रहा है मुझसे रूपसी, दिन दिन यौवन का साकी\nसूख रही है दिन दिन सुन्दरी, मेरी जीवन मधुशाला\nयम आयेगा साकी बनकर साथ लिए काली हाला,\nपी न होश में फिर आएगा सुरा-विसुध यह मतवाला,\nयह अंितम बेहोशी, अंतिम साकी, अंतिम प्याला है,\nपथिक, प्यार से पीना इसको फिर न मिलेगी मधुशाला\nढलक रही है तन के घट से, संगिनी जब जीवन हाला\nपत्र गरल का ले जब अंतिम साकी है आनेवाला,\nहाथ स्पर्श भूले प्याले का, स्वाद सुरा जीव्हा भूले\nकानो में तुम कहती रहना, मधु का प्याला मधुशाला\nमेरे अधरों पर हो अंितम वस्तु न तुलसीदल प्याला\nमेरी जीव्हा पर हो अंतिम वस्तु न गंगाजल हाला,\nमेरे शव के पीछे चलने वालों याद इसे रखना\nराम नाम है सत्य न कहना, कहना सच्ची मधुशाला\nमेरे शव पर वह रोये, हो जिसके आंसू में हाला\nआह भरे वो, जो हो सुरिभत मदिरा पी कर मतवाला,\nदे मुझको वो कान्धा जिनके पग मद डगमग होते हों\nऔर जलूं उस ठौर जहां पर कभी रही हो मधुशाला\nऔर चिता पर जाये उंढेला पत्र न घ्रित का, पर प्याला\nकंठ बंधे अंगूर लता में मध्य न जल हो, पर हाला,\nप्राण प्रिये यदि श्राध करो तुम मेरा तो ऐसे करना\nपीने वालांे को बुलवा कऱ खुलवा देना मधुशाला\nनाम अगर कोई पूछे तो, कहना बस पीनेवाला\nकाम ढालना, और ढालना सबको मदिरा का प्याला,\nजाति प्रिये, पूछे यदि कोई कह देना दीवानों की\nधर्म बताना प्यालों की ले माला जपना मधुशाला\nज्ञात हुआ यम आने को है ले अपनी काली हाला,\nपंिडत अपनी पोथी भूला, साधू भूल गया माला,\nऔर पुजारी भूला पूजा, ज्ञान सभी ज्ञानी भूला,\nकिन्तु न भूला मरकर के भी पीनेवाला मधुशाला\nयम ले चलता है मुझको तो, चलने दे लेकर हाला,\nचलने दे साकी को मेरे साथ लिए कर में प्याला,\nस्वर्ग, नरक या जहाँ कहीं भी तेरा जी हो लेकर चल,\nठौर सभी हैं एक तरह के साथ रहे यदि मधुशाला\nपाप अगर पीना, समदोषी तो तीनों - साकी बाला,\nनित्य पिलानेवाला प्याला, पी जानेवाली हाला,\nसाथ इन्हें भी ले चल मेरे न्याय यही बतलाता है,\nकैद जहाँ मैं हूँ, की जाए कैद वहीं पर मधुशाला\nशांत सकी हो अब तक, साकी, पीकर किस उर की ज्वाला,\n'और, और' की रटन लगाता जाता हर पीनेवाला,\nकितनी इच्छाएँ हर जानेवाला छोड़ यहाँ जाता\nकितने अरमानों की बनकर कब्र खड़ी है मधुशाला\nजो हाला मैं चाह रहा था, वह न मिली मुझको हाला,\nजो प्याला मैं माँग रहा था, वह न मिला मुझको प्याला,\nजिस साकी के पीछे मैं था दीवाना, न मिला साकी,\nजिसके पीछे था मैं पागल, हा न मिली वह मधुशाला\nदेख रहा हूँ अपने आगे कब से माणिक-सी हाला,\nदेख रहा हूँ अपने आगे कब से कंचन का प्याला,\n'- कह-कह कब से दौड़ रहा इसके पीछे,\nकिंतु रही है दूर क्षितिज-सी मुझसे मेरी मधुशाला\nकभी निराशा का तम घिरता, छिप जाता मधु का प्याला,\nछिप जाती मदिरा की आभा, छिप जाती साकीबाला,\nकभी उजाला आशा करके प्याला फिर चमका जाती,\nआँखिमचौली खेल रही है मुझसे मेरी मधुशाला\n'आ आगे' कहकर कर पीछे कर लेती साकीबाला,\nहोंठ लगाने को कहकर हर बार हटा लेती प्याला,\nनहीं मुझे मालूम कहाँ तक यह मुझको ले जाएगी,\nबढ़ा बढ़ाकर मुझको आगे, पीछे हटती मधुशाला\nहाथों में आने-आने में, हाय, फिसल जाता प्याला,\nअधरों पर आने-आने में हाय, ढुलक जाती हाला,\nदुनियावालो, आकर मेरी किस्मत की ख़ूबी देखो,\nरह-रह जाती है बस मुझको मिलते-िमलते मधुशाला\nप्राप्य नही है तो, हो जाती लुप्त नहीं फिर क्यों हाला,\nप्राप्य नही है तो, हो जाता लुप्त नहीं फिर क्यों प्याला,\nदूर न इतनी हिम्मत हारुँ, पास न इतनी पा जाऊँ,\nव्यर्थ मुझे दौड़ाती मरु में मृगजल बनकर मधुशाला\nमिले न, पर, ललचा ललचा क्यों आकुल करती है हाला,\nमिले न, पर, तरसा तरसाकर क्यों तड़पाता है प्याला,\nहाय, नियति की विषम लेखनी मस्तक पर यह खोद गई\n'दूर रहेगी मधु की धारा, पास रहेगी मधुशाला'\nमदिरालय में कब से बैठा, पी न सका अब तक हाला,\nयत्न सहित भरता हूँ, कोई किंतु उलट देता प्याला,\nमानव-बल के आगे निर्बल भाग्य, सुना विद्यालय में,\n'भाग्य प्रबल, मानव निर्बल' का पाठ पढ़ाती मधुशाला\nकिस्मत में था खाली खप्पर, खोज रहा था मैं प्याला,\nढूँढ़ रहा था मैं मृगनयनी, किस्मत में थी मृगछाला,\nकिसने अपना भाग्य समझने में मुझसा धोखा खाया,\nकिस्मत में था अवघट मरघट, ढूँढ़ रहा था मधुशाला\nउस प्याले से प्यार मुझे जो दूर हथेली से प्याला,\nउस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला,\nप्यार नहीं पा जाने में है, पाने के अरमानों में\nपा जाता तब, हाय, न इतनी प्यारी लगती मधुशाला\nसाकी के पास है तिनक सी श्री, सुख, संपित की हाला,\nसब जग है पीने को आतुर ले ले किस्मत का प्याला,\nरेल ठेल कुछ आगे बढ़ते, बहुतेरे दबकर मरते,\nजीवन का संघर्ष नहीं है, भीड़ भरी है मधुशाला\nसाकी, जब है पास तुम्हारे इतनी थोड़ी सी हाला,\nक्यों पीने की अभिलषा से, करते सबको मतवाला,\nहम पिस पिसकर मरते हैं, तुम छिप छिपकर मुसकाते हो,\nहाय, हमारी पीड़ा से है क्रीड़ा करती मधुशाला\nसाकी, मर खपकर यदि कोई आगे कर पाया प्याला,\nपी पाया केवल दो बूंदों से न अधिक तेरी हाला,\nजीवन भर का, हाय, पिरश्रम लूट लिया दो बूंदों ने,\nभोले मानव को ठगने के हेतु बनी है मधुशाला\nजिसने मुझको प्यासा रक्खा बनी रहे वह भी हाला,\nजिसने जीवन भर दौड़ाया बना रहे वह भी प्याला,\nमतवालों की जिहवा से हैं कभी निकलते शाप नहीं,\nदुखी बनाय जिसने मुझको सुखी रहे वह मधुशाला\nनहीं चाहता, आगे बढ़कर छीनूँ औरों की हाला,\nनहीं चाहता, धक्के देकर, छीनूँ औरों का प्याला,\nसाकी, मेरी ओर न देखो मुझको तिनक मलाल नहीं,\nइतना ही क्या कम आँखों से देख रहा हूँ मधुशाला\nमद, मदिरा, मधु, हाला सुन-सुन कर ही जब हूँ मतवाला,\nक्या गति होगी अधरों के जब नीचे आएगा प्याला,\nसाकी, मेरे पास न आना मैं पागल हो जाऊँगा,\nप्यासा ही मैं मस्त, मुबारक हो तुमको ही मधुशाला\nक्या मुझको आवश्यकता है साकी से माँगूँ हाला,\nक्या मुझको आवश्यकता है साकी से चाहूँ प्याला,\nपीकर मदिरा मस्त हुआ तो प्यार किया क्या मदिरा से\nमैं तो पागल हो उठता हूँ सुन लेता यदि मधुशाला\nदेने को जो मुझे कहा था दे न सकी मुझको हाला,\nदेने को जो मुझे कहा था दे न सका मुझको प्याला,\nसमझ मनुज की दुर्बलता मैं कहा नहीं कुछ भी करता,\nकिन्तु स्वयं ही देख मुझे अब शरमा जाती मधुशाला\nएक समय संतुष्ट बहुत था पा मैं थोड़ी-सी हाला,\nभोला-सा था मेरा साकी, छोटा-सा मेरा प्याला,\nछोटे-से इस जग की मेरे स्वर्ग बलाएँ लेता था,\nविस्तृत जग में, हाय, गई खो मेरी नन्ही मधुशाला\nबहुतेरे मदिरालय देखे, बहुतेरी देखी हाला,\nभाँित भाँित का आया मेरे हाथों में मधु का प्याला,\nएक एक से बढ़कर, सुन्दर साकी ने सत्कार किया,\nजँची न आँखों में, पर, कोई पहली जैसी मधुशाला\nएक समय छलका करती थी मेरे अधरों पर हाला,\nएक समय झूमा करता था मेरे हाथों पर प्याला,\nएक समय पीनेवाले, साकी आलिंगन करते थे,\nआज बनी हूँ निर्जन मरघट, एक समय थी मधुशाला\nजला हृदय की भट्टी खींची मैंने आँसू की हाला,\nछलछल छलका करता इससे पल पल पलकों का प्याला,\nआँखें आज बनी हैं साकी, गाल गुलाबी पी होते,\nकहो न विरही मुझको, मैं हूँ चलती फिरती मधुशाला\nकितनी जल्दी रंग बदलती है अपना चंचल हाला,\nकितनी जल्दी घिसने लगता हाथों में आकर प्याला,\nकितनी जल्दी साकी का आकर्षण घटने लगता है,\nप्रात नहीं थी वैसी, जैसी रात लगी थी मधुशाला\nबूँद बूँद के हेतु कभी तुझको तरसाएगी हाला,\nकभी हाथ से छिन जाएगा तेरा यह मादक प्याला,\nपीनेवाले, साकी की मीठी बातों में मत आना,\nमेरे भी गुण यों ही गाती एक दिवस थी मधुशाला\nछोड़ा मैंने पथ मतों को तब कहलाया मतवाला,\nचली सुरा मेरा पग धोने तोड़ा जब मैंने प्याला,\nअब मानी मधुशाला मेरे पीछे पीछे फिरती है,\n अब छोड़ दिया है मैंने जाना मधुशाला\nयह न समझना, पिया हलाहल मैंने, जब न मिली हाला,\nतब मैंने खप्पर अपनाया ले सकता था जब प्याला,\nजले हृदय को और जलाना सूझा, मैंने मरघट को\nअपनाया जब इन चरणों में लोट रही थी मधुशाला\nकितनी आई और गई पी इस मदिरालय में हाला,\nटूट चुकी अब तक कितने ही मादक प्यालों की माला,\nकितने साकी अपना अपना काम खतम कर दूर गए,\nकितने पीनेवाले आए, किन्तु वही है मधुशाला\nकितने होठों को रक्खेगी याद भला मादक हाला,\nकितने हाथों को रक्खेगा याद भला पागल प्याला,\nकितनी शक्लों को रक्खेगा याद भला भोला साकी,\nकितने पीनेवालों में है एक अकेली मधुशाला\nदर दर घूम रहा था जब मैं चिल्लाता - हाला\nमुझे न मिलता था मदिरालय, मुझे न मिलता था प्याला,\nमिलन हुआ, पर नहीं मिलनसुख लिखा हुआ था किस्मत में,\nमैं अब जमकर बैठ गया हँू, घूम रही है मधुशाला\nमैं मदिरालय के अंदर हूँ, मेरे हाथों में प्याला,\nप्याले में मदिरालय बिंिबत करनेवाली है हाला,\nइस उधेड़-बुन में ही मेरा सारा जीवन बीत गया -\nमैं मधुशाला के अंदर या मेरे अंदर मधुशाला\nकिसे नहीं पीने से नाता, किसे नहीं भाता प्याला,\nइस जगती के मदिरालय में तरह-तरह की है हाला,\nअपनी-अपनी इच्छा के अनुसार सभी पी मदमाते,\nएक सभी का मादक साकी, एक सभी की मधुशाला\nवह हाला, कर शांत सके जो मेरे अंतर की ज्वाला,\nजिसमें मैं बिंिबत-प्रतिबंिबत प्रतिपल, वह मेरा प्याला,\nमधुशाला वह नहीं जहाँ पर मदिरा बेची जाती है,\nभेंट जहाँ मस्ती की मिलती मेरी तो वह मधुशाला\nमतवालापन हाला से ले मैंने तज दी है हाला,\nपागलपन लेकर प्याले से, मैंने त्याग दिया प्याला,\nसाकी से मिल, साकी में मिल अपनापन मैं भूल गया,\nमिल मधुशाला की मधुता में भूल गया मैं मधुशाला\nमदिरालय के द्वार ठोंकता किस्मत का छंछा प्याला,\nगहरी, ठंडी सांसें भर भर कहता था हर मतवाला,\nकितनी थोड़ी सी यौवन की हाला, हा, मैं पी पाया\nबंद हो गई कितनी जल्दी मेरी जीवन मधुशाला\nकहाँ गया वह स्वर्गिक साकी, कहाँ गयी सुरिभत हाला,\nकहँा गया स्वपिनल मदिरालय, कहाँ गया स्वर्णिम प्याला\nपीनेवालों ने मदिरा का मूल्य, हाय, कब पहचाना\nफूट चुका जब मधु का प्याला, टूट चुकी जब मधुशाला\nअपने युग में सबको अनुपम ज्ञात हुई अपनी हाला,\nअपने युग में सबको अदभुत ज्ञात हुआ अपना प्याला,\nफिर भी वृद्धों से जब पूछा एक यही उज्ञल्तऌार पाया -\nअब न रहे वे पीनेवाले, अब न रही वह मधुशाला\n'मय' को करके शुद्ध दिया अब नाम गया उसको, 'हाला'\n'मीना' को 'मधुपात्र' दिया 'सागर' को नाम गया 'प्याला',\nक्यों न मौलवी चौंकें, बिचकें तिलक-त्रिपुंडी पंिडत जी\n'मय-महिफल' अब अपना ली है मैंने करके 'मधुशाला'\nकितने मर्म जता जाती है बार-बार आकर हाला,\nकितने भेद बता जाता है बार-बार आकर प्याला,\nकितने अर्थों को संकेतों से बतला जाता साकी,\nफिर भी पीनेवालों को है एक पहेली मधुशाला\nजितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला,\nजितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,\nजितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,\nजितना ही जो रिसक, उसे है उतनी रसमय मधुशाला\nजिन अधरों को छुए, बना दे मस्त उन्हें मेरी हाला,\nजिस कर को छूू दे, कर दे विक्षिप्त उसे मेरा प्याला,\nआँख चार हों जिसकी मेरे साकी से दीवाना हो,\nपागल बनकर नाचे वह जो आए मेरी मधुशाला\nहर जिहवा पर देखी जाएगी मेरी मादक हाला\nहर कर में देखा जाएगा मेरे साकी का प्याला\nहर घर में चर्चा अब होगी मेरे मधुविक्रेता की\nहर आंगन में गमक उठेगी मेरी सुरिभत मधुशाला\nमेरी हाला में सबने पाई अपनी-अपनी हाला,\nमेरे प्याले में सबने पाया अपना-अपना प्याला,\nमेरे साकी में सबने अपना प्यारा साकी देखा,\nजिसकी जैसी रुिच थी उसने वैसी देखी मधुशाला\nयह मदिरालय के आँसू हैं, नहीं-नहीं मादक हाला,\nयह मदिरालय की आँखें हैं, नहीं-नहीं मधु का प्याला,\nकिसी समय की सुखदस्मृति है साकी बनकर नाच रही,\nनहीं-नहीं किव का हृदयांगण, यह विरहाकुल मधुशाला\nकुचल हसरतें कितनी अपनी, हाय, बना पाया हाला,\nकितने अरमानों को करके ख़ाक बना पाया प्याला\nपी पीनेवाले चल देंगे, हाय, न कोई जानेगा,\nकितने मन के महल ढहे तब खड़ी हुई यह मधुशाला\nविश्व तुम्हारे विषमय जीवन में ला पाएगी हाला\nयदि थोड़ी-सी भी यह मेरी मदमाती साकीबाला,\nशून्य तुम्हारी घड़ियाँ कुछ भी यदि यह गुंजित कर पाई,\nजन्म सफल समझेगी जग में अपना मेरी मधुशाला\nबड़े-बड़े नाज़ों से मैंने पाली है साकीबाला,\nकिलत कल्पना का ही इसने सदा उठाया है प्याला,\nमान-दुलारों से ही रखना इस मेरी सुकुमारी को,\nविश्व, तुम्हारे हाथों में अब सौंप रहा हूँ मधुशाला\nस्वयं नहीं पीता, औरों को, किन्तु पिला देता हाला,\nस्वयं नहीं छूता, औरों को, पर पकड़ा देता प्याला,\nपर उपदेश कुशल बहुतेरों से मैंने यह सीखा है,\nस्वयं नहीं जाता, औरों को पहुंचा देता मधुशाला\nमैं कायस्थ कुलोदभव मेरे पुरखों ने इतना ढ़ाला,\nमेरे तन के लोहू में है पचहज्ञल्तऌार प्रतिशत हाला,\nपुश्तैनी अधिकार मुझे है मदिरालय के आँगन पर,\nमेरे दादों परदादों के हाथ बिकी थी मधुशाला\nबहुतों के सिर चार दिनों तक चढ़कर उतर गई हाला,\nबहुतों के हाथों में दो दिन छलक झलक रीता प्याला,\nपर बढ़ती तासीर सुरा की साथ समय के, इससे ही\nऔर पुरानी होकर मेरी और नशीली मधुशाला\nपित्र पक्ष में पुत्र उठाना अर्ध्य न कर में, पर प्याला\nबैठ कहीं पर जाना, गंगा सागर में भरकर हाला\nकिसी जगह की मिटटी भीगे, तृप्ति मुझे मिल जाएगी\nतर्पण अर्पण करना मुझको, पढ़ पढ़ कर के मधुशाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-interest-waived-till-loanwaiver-benefits-individual-6644", "date_download": "2018-04-23T11:40:54Z", "digest": "sha1:USJSVRJLWGT5MEDVYKZWULXQIHDLFITT", "length": 16824, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Interest waived till loanwaiver benefits individual | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ; बॅंका, सोसायट्यांना सूचना\nकर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ; बॅंका, सोसायट्यांना सूचना\nरविवार, 18 मार्च 2018\nबारामती, पुणे ः \"छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान' योजनेअंतर्गत योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.\nबारामती, पुणे ः \"छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान' योजनेअंतर्गत योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.\nया योजनेतून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. शासन निर्णय 8 सप्टेंबर 2017 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचल केलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची 30 जून 2016 पर्यंत थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम रुपये दीड लाखापर्यंत कर्जमाफीस पात्र धरण्यात आली आहे.\nपीक व मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाइम सेटलमेंट) म्हणून 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम पात्र करण्यात आली आहे;\nतसेच 30 जून 2016 ते 31 जुलै 2017 पर्यंतच्या व्याजाची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. या अर्जावर प्रक्रियेअंती लाभ देण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट 2017 ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषांनुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बॅंकांमार्फत झाल्यास अशा व्याज आकारणीमुळे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्जखाते कर्जमाफी मिळूनही निरंक होऊ शकत नाही. परिणामी, खाते निरंक झाल्याबाबतचा दाखला संबंधित कर्जदाराला मिळणे शक्‍य नसल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्याच्या अडचणी येतील. या बाबी विचारात राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकहिताच्या दृष्टीने बॅंकांनी 31 जुलै 2017 नंतर व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश दिले आहेत.\nया अनुषंगाने काही बॅंकांनी कार्यवाही करण्यास सुरवातही केली आहे. तथापि काही जिल्हा बॅंका व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी अद्यापही व्याजआकारणी सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापारी, जिल्हा बॅंका व विविध सेवा सोसायट्या यांच्या कृतीत एकवाक्‍यता यावी, या उद्देशाने सरकारने परिपत्रक काढले आहे.\nशिवाजी महाराज shivaji maharaj कर्ज कर्जमाफी व्याज व्यापार\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/chhagan-bhujbal.html", "date_download": "2018-04-23T11:32:53Z", "digest": "sha1:DDUYXQ7TGN7OQY3NORYWI3IYFQZCZJRQ", "length": 14266, "nlines": 104, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : छगन भुजबळ\nConstituency : विधान सभा - येवला (नाशिक)\nParty Name : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी\nDesignation : लोक निर्माण मंत्री और विशेष सहायता विभाग\nName : छगन चंद्रकांत भुजबळ\nDate of Birth : १५ ऑक्टोबर १९४७\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nEducation : डिप्लोमा इन मैकेनिकल इंजिनियरिंग\nResidence Address : रामटेक, डॉ. डी. एन. दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई - ४०० ००६.\nशिवसेनेचे आद्य शाखाप्रमुख डोंगरी ते लालबाग - १९६८\nशिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेतील नगर सेवक - १९७३ ते १९९१\nमुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते - १९७३ ते १९८४\nमुंबईचे महापौर - १९८५ ते ८६ व पुन्हा १९९० ते ९१\nअखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष - १९९१\nविधानसभेत शिवसेनेचे आमदार - १९८५, १९९०\nकॉंग्रेसमध्ये प्रवेशानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री - १९९१\nगृहनिर्माण व झोपड़पट्टी सुधारणा खात्याचे मंत्री\nविधानपरिषदेत विरोधी पक्षनेते (कॉंग्रेस) - १९९६ - १९९९\nराष्ट्रवादी कोंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष - १० जून १९९९\nमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री - १९९९\nविधानपरिषदेवर फेरनिवड - २००२\nयेवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड - २००४ (सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री)\nमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पुन्हा निवड - डिसेंबर २००८\nयेवला मतदारसंघातून विधानसभेवर फेरनिवड, तिसरयांदा उपमुख्यमंत्रीपद व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद - सप्टेंबर २००९\nमहापौर करकिर्दीतील ठळक घटना :-\nमहापौरांच्या अधिकृत वाहनांवर 'मेयर ऑफ बॉम्बे' ऐवजी 'मेयर ऑफ मुंबई' असा ध्वज प्रथमच लावला.\nगेटवे ऑफ इंडिया येथे, भारताच्या प्रवेशद्वारापाशी 'बॉम्बे' ऐवजी 'मुंबई' असे नाव सर्व भाषांत दाखवणारी कोनशीला बसवली.\nमुंबईच्या रखरखीत व प्रदुषणयुक्त रस्त्यांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाने हिरवीगार ट्रैफिक आयलैंड्स उभारली.\nमुंबई महापालिकेच्या कारभरात मराठीच्या वापराचा आग्रह धरला.\nसर्वात महत्वाचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्लोरा फाउंटनच्या जागी जागतिक दर्जाचे आखीव-रेखीव हुतात्मा स्मारक शिल्प उभारले.\nपर्यटनमंत्री (१९९९ ते २००३)\nअर्थसंकल्पात पर्यटनासाठी असलेली तरतूद दुपटीने वाढविली.\nखाजगीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील गिरगाव चौपाटीवर साहसी जलक्रीडा केंद्रे सुरु केले.\nकोकणात मालवण तारकर्ली पर्यटन केंद्राचा विस्तार केला, नवी विश्रामगृहे बांधली, नौकानयन सुविधा उपलब्ध करुन दिली.\nमहाराष्ट्र पर्यटनाला नवी दिशा देऊन जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव कोरले.\nसंपूर्ण जगाचे आकर्षण ठरलेली 'डेक्कन ओडिसी' ही शाही पर्यटन रेल्वेगाडी भुजबळ यांच्या कारकिर्दीत सुरु झाली.\nकोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरीक्षेत्र पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती केली.\nकाही गिरिस्थानी रोपवे - लोहरज्जुंचे प्रकल्प मंजूर केले.\nशास्त्रीय व पर्यटनदृष्टया महत्वाच्या अशा लोणार सरोवराच्या परिसराच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष घातले. तेथे अतिथि निवास, माहिती केंद्रे, सरोवर दर्शन सहली, भोजन सुविधा उपलब्ध करुन दिल्या.\nगेटवे ऑफ इंडिया, घारापुरी लेणी, महाबळेश्वर व माथेरान या पर्यटन केंद्रांच्या विकासावर विशेष लक्ष दिले.\nगृहमंत्रालयातील कामगिरी (१९९९ ते २००३)\nपर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेऊन 'पर्यटन पोलीस' विभागाची स्थापना.\nथांबलेली पोलीस भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली.\nपोलिसांसाठी समयबद्ध पदोन्नतीची पद्धत अंमलात आणली.\nमुंबईतील खंडणीराज व माफियाराज संपविले.\nपोलीस अधिकारयांना कारवाईची मोकळीक देऊन संघटीत गुन्हेगारीवर मात केली व मुंबईतून बाहेर जाणारे उद्योग व व्यवसाय मुंबईतच राहतील अशी खबरदारी घेतली.\nपोलिसांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली.\nसर्वात महत्वाचे म्हणजे कोट्यवधी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून अर्थव्यवस्थेत गोंधळ माजवू पाहणारया अब्दुल करीम तेलगीच्या मुसक्या आवळल्या व त्याच्यासह त्याच्या टोळीला तुरुंगाची हवा खायला पाठविले.\nसार्वजानिक बांधकाम विभागाचे मंत्री (२००४ ते पुढे)\nग्रामीण महाराष्ट्र मुंबईला व राज्याच्या सर्व विभागीय केंद्रांना जोडण्यासाठी राज्यातले महामार्ग चौपदरी व सहापदरी केले.\nतालुका पातळीवर दर्जेदार रस्ते बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला.\nमुंबईत बांधकाम भवन साकारले.\nमोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होणारा मुंबई - आग्रा महामार्ग चौपदरी करुन कसारा घाटातील वाहतुक समस्या संपवली.\nजळगाव - धुळे - नाशिक - मुंबई प्रवास अधिक सुखकर बनवला.\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभावी विकेंद्रीकरण केले आणि महसूल पातळीवर कामांबाबतचे अधिकार दिले.\nमाटुंगा मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. या ख्वातनाम शैक्षणिक संस्थेत शिक्षण.\nमहात्मा फुले समता परिषदेची स्थापना करून तिच्या मार्फत महात्मा फुले यांच्या विचारांचा व परंपरेचा पाठपुरावा.\nउपेक्षित पद-दलित, मागासवर्गीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषदे मार्फत प्रयत्न.\nमहात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज्यांचे विचार आणि आदर्शांचे प्रचार-प्रसार करण्यासाठी समता परिषदचा उपयोग करण्यावर भर.\n२००५ मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.\n१९८५ साली \"दैवत\" आणि १९९० साली \"नवरा बायको\" या मराठी चित्रपटांची निर्मिती.\nछंद आणि विशेष आवड\nक्रिकेट, चित्रपट, वाचन आणि प्रवास\n१९८६ आणि १९९० : अमेरिका, फ़्रांस, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड, बेल्झियम, स्वीत्झरलॅड आणि रशिया या देशांचा दौरा.\nओसाका, जपान येथे १९९१ साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासमवेत सहभाग.\nऑक्टोबर २००० मध्ये फ़्रांस, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा\n२८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयार्क, जिनिव्हा, लंडन दौरा.\n९ मे ते २४ मे २००२ या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी यांचा करून महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न.\nत्याचप्रमाणे ऑस्ट्रिया, स्वीडन, नोर्वे, स्पेन, हॉगकॉग व थायलंड या देशांचा दौरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/", "date_download": "2018-04-23T11:34:35Z", "digest": "sha1:DGWBLZMUL3IZB3ZUMWCJACXKIBRHOEVK", "length": 35242, "nlines": 207, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: 2010", "raw_content": "\nपुस्तकः अमेरिका - अनिल अवचट\nअनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.\nइंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.\nतिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्‍या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.\nभारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.\nलिमकाची प्रत्येक जाहीरात वेधक असते..\nही अशीच एक सुंदर जाहीरात.\nफोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी. यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात. मलाही एक() विचित्रच फोबिया आहे.\nआधीपासुन आधीचं सांगतो, लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल. इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली.\nशाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्‍य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्‍या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.\nसद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे. मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.\nतर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\nगेल्या दोन वर्षांपासुन ऑफिस, रुम, आणि घरी (गावी) दोन दिवसाची सुटी सोडुन वेगळं काही केलंच नाही. मित्रांना हजारवेळा सांगुन सुद्धा एकाही सहलीचा प्लॅन बनला नाही. गोवा, कन्याकुमारी, जयपुर पासुन गेल्यागावी श्रीशैलमला तरी जाउया म्हणुन मित्रांना म्हटले, पण त्यांच्या व्यापांमुळे कधीच प्लॅनचे प्रत्यक्षात अवतरण झाले नाही.\nमाझ्या बाजुला राहणारी तेलुगु बॅचलर पार्टी मात्र विकांत मजेत साजरी करत असते. असेच एकदा त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी विशाखापट्टणमला केलेल्या सहलीचे फोटो दाखविले आणि सोबत काय काय धमाल केली ते पण सांगितले, मग काय मी लगेच त्यांना त्यांच्या पुढील प्लॅनिंग बद्दल विचारले. त्यांच्या प्लॅनिंग डायनॅमिक असतात केवळ दोन-तीन दिवस आधी माहिती होते. मी म्हटलं मग जेंव्हा केंव्हा निघणार असाल मला गृहीत धरा.\n३-४ दिवसांपुर्वी रेड्डीचा फोन आला, या रवीवारी तयार रहा, किसारागुट्टाला जायचे आहे म्हणाला. किसारागुट्टा माझ्यासाठी नविन प्रकरण होते, नेमके तिथे काय आहे, आणि या उन्हाळ्यात काय मजा येणार असे वाटुन गेले, पण घरात बसुन ४०-४२ डिग्रीमध्ये वेगळे काय साधनार होतो, म्हणुन मग निघालो.\nकिसारागुट्टा हे हैदराबादपासुन २०-२५ कि.मी.वर असणारे एक स्थळ आहे, इथे टेकडीवर महादेवाचे मंदीर आहे. टेकडीखाली काही शेती आहे. सकाळी सातला तयार होऊन मित्राकडे पोचलो, तिथुन एका नियोजीत ठीकाणाहुन मोटारसायकली घेतल्या आणि तब्बल नऊ मोटारसायकलींवर अठराजणांचा जत्था किसारा कडे निघाला. त्यातले पाच कपल्स आणि बाकी आठ बॅचलर्स होते. प्रत्येकाजवळ ३-४ किलो वजनाची एक पिशवी, ज्यात पाण्याच्या बाटल्यांपासुन, मसाले, खाणसामान आणि इतर अनेक गोष्टी होत्या.\nटेकडीखाली पठ्ठ्यांनी आधीच एक शेत हेरुन ठेवलं होतं. मस्तपैकी भाताची शेती, जवळच पाण्याची मोटार, आणि प्रशस्त असा एक वृक्ष, या वृक्षाखालीच आमचे बस्तान बसले. थोडीफार साफसफाई वगैरे करुन त्यावर चटई अंथरली, मस्त पैकी बैठक जमली, तेलुगु हास्यकल्लोळात मीही अर्धेअधीक समजत नसताना पार मिसळुन गेलो होतो, नाही म्हणायला एक मित्र जोकचे हिंदी रुपांतरण अधनं मधनं सांगत होताच. सर्वप्रथम गप्पाष्टकांसोबत पुरी, भाजी आणि टोमॅटो चटणी न्याहारी साठी हाणली, तेलुगु लोकांनाही पुरी जमते बरं :-), घरघुती असल्यामुळे ती अप्रतिम होतीच.\nखाणं उरकल्यावर थोडी शेतात भटकंती झाली, उन्हाळ्यामुळे इतर काही नव्हतं पण भाताची शेती जोरात होती, आणि भरपुर पाण्यामुळे हवाही थंडगार होती, फिरायला मजा आली. त्यानंतर दुपारच्या मेन जेवणाची तयारी सुरु झाली, तिथेच झाडाखाली एक मोठी आणि एक छोटी अशी साध्या दगडांची चूल तयार करण्यात आली. वेगळ्या वेगळ्या पोतडीतुन मग भांडी, चमचे, मसाले, आणि जेवण बनविण्याचे हरेक सामान निघायला सुरुवात झाली. मेन्यू मोठा होता मटण, फिश फ्राय मांसाहारींसाठी तर शाकाहारींसाठी पनीर मसाला, साधा भात आणि बगारा राईस (थोडक्यात मसाला भात).\nविशेष म्हणजे मांसाहारी पदार्थ बनविनारा आमचा शिवा हा मित्र संपुर्ण शाकाहारी आहे, पण जेवणाला काय चव.. एकदम भन्नाट.\nआम्ही (ज्यांना खाणं फक्त खाता येते) लोकांनी बाकी तयारी होईस्तोवर सरपणाची व्यवस्था केली, आणि तिकडे खाणं बनविने सुरु असताना काही जण पत्ते कुटत बसले. चुलीवर भांडी काळी होऊ नयेत म्हणुन त्याला शेतातली ओली माती बाहेरुन लावण्यात आली, किती सोपी आयडीया आहे ही. मी त्यांचं कौतुक केलं तर ते हसु लागले, म्हणाले अरे ही काही आम्ही शोधलेली पद्धत नाही, खेडेगावी असेच वापरतात. मग माझ्या (मठ्ठ) डोक्यात नवी माहिती जमा झाली. मग काय तास दोन तास केवळ सुवास भरुन राहीला होता, अप्रतिम असं जेवण तयार होतं. मग काय काहीही वेळ न घालवता आम्ही त्या सुंदर जेवणावर यथेच्छ ताव मारला. जेवता जेवता हास्यकल्लोळ चालु होता, पण तेलुगुतुन असल्यामुळे मला फार थोडा कळत होता. पण जेवण अतिशय रुचकर असल्यामुळे मी जास्त लक्ष खाण्याकडे दिले.\nजेवणं झाल्यावर आवराआवरी सुरु झाली, तोपर्यंत ४ वाजले होते, अजुन गप्पाष्टकं चालली. ५ च्या सुमारास उन्हाचा पारा थोडा कमी झाला, आणि मग थोडे खेळ खेळण्याचं ठरलं. सर्वांकडे एक एक फुगा देउन त्याला फुगवायला सांगितलं, सर्वांचे फुगे फुगवुन झाल्यावर असं सांगितलं गेलं की आता एकमेकांचे फुगे फोडायचे आणि आपला फुगा फुटू नाही द्यायचा, ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील किंवा सर्वात शेवटी फुटेल तो जिंकला, त्याला रु. १००/- असे घसघशीत बक्षीस देण्यात येईल ;-). मग काय प्रचंड धुळीचा लोट उडवत, आम्ही ज्याचे दिसतील त्यांचे फुगे फोडायच्या मार्गावर लागलो.\nमी अपेक्षेप्रमाणेच लवकर हरलो, आणि दुसर्‍यांच्या फुग्यांच्या मागे लागलो, पण या खेळात मस्त मजा आली, कपडे मात्र धुळीने पुर्ण माखुन गेले होते. त्यानंतर हौजी खेळलो, टिकीटांच्या पैस्यातुन बक्षीसं ठरली, परत तिथे सुद्धा जिंकता जिंकता हरलो, पण मजा मात्र खुप आली. लहान मुलांसारख खेळताना खरंच खुप मजा आली आणि या प्रचंड धावपळीच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी महान आनंद देऊन जातात ते कळालं.. खरंच खुप अप्रतिम वेळ गेला.\nसातच्या आसपास तिथुन निघालो आणि मित्राच्या घरी आलो, मग परत तिथे साधा भात आणि अप्रतिम साधं वरण आणि तूप हाणलं, नंतर टरबुज आणि अमुलचे सुंदर बटर स्कॉच आईसक्रिम हादडले. रात्री दहाच्या आसपास पेंगुळलेल्या अवस्थेत घरी पोचलो, आणि दिवसभराच्या थकव्याने पण उल्हासित, तजेलदार मनाने पलंगावर झोपी गेलो.\nलोकल ट्रेन मधील अनाम कलाकाराची कलाकारी\nये हौसला कैसे रुके\nकधी निराशा आली तर मला परत ताजं तवानं करतात ही गाणी....\nये हौसला कैसे रुके\nमनातले विचार लेखणीद्वारे (पक्षी : किबोर्ड) कधी उमटतच नाहीत... ’संस्कार’ नावाच्या एका पुस्तकात वाचले होते, मानवास दोन प्रकारचा वेगवेगळा शब्द संग्रह असतो.\nएक वाचण्याचा आणि दुसरा लिहिण्याचा, म्हणुनच आपण मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतले अनेक शब्द वाचु शकतो, मात्र लिहिताना बरेचदा शब्द आठवतच नाहीत.\nमाझ्या बाबतीत तरी हे सत्य आहे, माझ्या मते मी वाचक म्हणुनच बनविला गेलो असणार आहे :-)....\nमाझ्या लहानपणाचे छंद वेगळेच होते, मला इतरांना सांगायची लाज वाटायची.\nचित्रकलेची आवड होती, पण चित्रपटांच्या आकर्षणामुळे मला नुसती चित्र काढण्यापेक्षा सिनेमाची पोस्टर काढायचा छंद जडला.\nदुरदर्शनवर चित्रहार मध्ये गाणे चालु होण्यापुर्वी केवळ काही सेकंदासाठी त्या सिनेमाचे पोस्टर दाखवायचे, ते पाहुन गाणे संपण्यापुर्वी मी जवळपास हुबेहुबपणे चित्रपटाचे नाव पाटीवर काढायचो.\nनाव म्हणजे नुसते नाव नाही, त्याच्या योग्य फॉन्ट सहीत. यासाठी मला दगडी पाटी फार आवडायची, प्लॅस्टीकची पाटी कधी नाही आवडली.\nमग काही दिवसांत मी पेन्सिल वापरुन अजुन ठीकठाक पोस्टर्स काढु लागलो. मग काय, एखाद्या चित्रपट थिएटर मध्ये जसे पोस्टर्स चिकटवले जातात त्याप्रमाणे घराच्या भिंतीवर चिकटवणे सुरु झाले.\nमग त्यासाठी ओरडा खाल्ल्यावर मात्र हे उद्योग बंद झाले. त्यानंतर सर्व पोस्टर्स एका पत्र्याच्या पेटीत ठेवायला सुरुवात केली. उन्हाळयाच्या सुट्टीत मामाकडे गेलो असताना इकडे ती पेटी कुठे अंतर्धान पावली ते आजपर्यंत कळाले नाही... त्यानंतर कुठेतरी स्क्रीन पेपर बघायला मिळाला आणि पानंभर चित्रपटाचे मोठे पोस्टर पाहुन डोळे दिपुन गेले. त्यानंतर प्रत्येक शनीवारी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन जवळील स्टॉलवरुन स्क्रीन पेपर आणण्याची सवय लागली. त्यातही चांगले पोस्टर्स मी परत एका ब्रिफकेस मध्ये जमा केले होते, कालांतराने अभ्यासाच्या गर्दीत ते सर्व नाहीसे झाले, आणि माझा हा छंद सुटला. आता त्यातले मी स्वत: काढलेले काही अप्रतीम(मला वाटलेले ;-) ) आलेले पोस्टर्स सुद्धा नाहीत याची खंत वाटते.\nअभय देओलचा ’रोड, मुवी’ येतोय, टोरंटो फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवला गेलेला हा चित्रपट चांगला असणार यात शंकाच नाही...\nसर जो तेरा चकराये......\nबजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात\nबजाज डिस्कवर या बाईकच्या जाहीराती खुपंच कल्पक असतात. शनी शिंगनापुरबद्दलची ही जाहीरात अशीच सुंदर आहे....\nकुठल्याही चित्रपटासाठी, मालिकेसाठी ओपनिंग क्रेडीट्स अत्यंत महत्वाचे असतात, मुख्य अभिनेत्यांच्या नावासकट इतर महत्वाच्या क्रेडीट्स करिता यांचा चांगला उपयोग होतो. यातही केवळ नावं न दाखवता खुप सुंदर प्रयोग झाले आहेत, ओपनिंग क्रेडीट्स मध्येच सिनेमाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात येतो, आणि दिग्दर्शकाची कमाल दिसुन येते. इथे वानगीदाखल अशा काही विशेष ओपनिंग क्रेडीट्स बद्दल आपण पाहु. तुम्हालाही एखादा असा सिनेमा आणि त्यातील ओपनिंग क्रेडीट्स आठवत असल्यास जरुर लिहा....\nचित्रपट - लॉर्ड ऑफ वार (२००५)\n२००५ सालच्या या चित्रपटाचा विषय आहे, शस्त्र आणि त्यांच्या घातक परिणामांबद्दल. या सिनेमाच्या ओपनिंग क्रेडीट्स मध्ये एक बुलेट रशियाच्या एका कारखान्यात कशी बनते, बनल्यानंतर आफ्रिकेला पाठवली जाते आणि शेवटी एका अफ्रिकन मुलाचा कसा जीव घेते हे दाखवले आहे...\nअभिरुचीहीन प्रेक्षकांमुळे ’नटरंग’ सारखा सिनेमा केवळ एका अठवड्यात खाली उतरविला जातो आणि त्या जागी एका मसाला,बिभत्स दाक्षीणात्य सिनेमा लागतो.\nवैचारीक दारिद्र्याची लक्षणं..अजुन काय. हैदराबादला असल्यामुळे इथे तर नाही पाहता येणार, आता मुंबई, पुण्यालाच जावे लागणार का \nबंद, तोड्फोड आणि सामान्य माणुस\nवेगळ्या तेलंगाना राज्याच्या मागणीमुळे आंध्र प्रदेशात गेल्या एक महीन्यापासुन अस्थीरतेचे वातावरण आहे.\nया काळात तब्बल पाच वेळा बंद पुकारण्यात आला, आणि ठिक-ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.\nतेलंगाना आणि आंध्रा भागात अनेक बसेस तोडल्या, फोडल्या गेल्या, बर्याच जाळल्या गेल्या, या सर्वाची परिणीती म्हणजे बस सेवांच्या दरात झालेली वाढ.\nती ही साधारण नाही तर २५%, म्हणजे काही राजकीय पक्षाच्या स्वार्थी हेतुपायी सामान्य जनतेलाच हाल सोसावे लागणार आहेत.\nबंदच्या काळात बसेस, लोकल रेल्वे सेवा नसल्यामुळे आधीच जास्तीचा खर्च ट्रांसपोर्टेशन वर खर्च करुन, न केलेल्या चुकांबद्दल त्याच्याकडुन वसुली होत आहे.\nबंद्च्या या दुष्टचक्रातुन लोकं कधी शिकणार आहेत, राजकीय बंद ला सपोर्ट देण्यापुर्वी विचार आवश्यक आहे.\nनटरंग आणि झेंडा, जानेवारीत प्रदर्शीत होणार्या या दोन्ही चित्रपटाचे संगीत हा मुख्य बलस्थान आहे.\nकाल लोकल मध्ये येताना नटरंग चे टाइटल गाणे ऐकले, अजय-अतुल चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.\nत्यानंतर ’खेळ मांडीला’ हे ऐकले, खुप सुंदर...\nझेंडा मधील, ’झेंडा कुणाचा घेवु’ एकदम मस्त आहे...त्यानंतर शेतकर्याची शोकांतिका ’पत्रास कारण की...’ ऐकुन भर प्लॅटफॉर्मवरच रडु कोसळले.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nपुस्तकः अमेरिका - अनिल अवचट\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\nये हौसला कैसे रुके\nबजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात\nबंद, तोड्फोड आणि सामान्य माणुस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7140857", "date_download": "2018-04-23T11:45:38Z", "digest": "sha1:EURR7BJRPZDEAXZU6ZWU2FTLXHQ74GKG", "length": 4433, "nlines": 28, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google Analytics व्यवस्थापन पृष्ठ एक नवीन दिसणारी आणि amp; श्रेणीसुधारित मिल्वेलसह वाटणे", "raw_content": "\nGoogle Analytics व्यवस्थापन पृष्ठ एक नवीन दिसणारी आणि & श्रेणीसुधारित मिल्वेलसह वाटणे\nअद्यतनांच्या नवीन फेरीमुळे सर्व प्रशासक सेटिंग्ज अॅडमिन टॅब अंतर्गत नवीन प्रशासकीय पृष्ठावरून ऍक्सेस करता येतील, ज्यामध्ये तीन स्तंभांमध्ये खाते, मालमत्ता आणि व्यू सेटिंग्ज सेट होतील. (Google आता 'प्रोफाइल्स' सेटिंगचा संदर्भित करीत आहे की 'दृश्ये' म्हणून ते काय दर्शवते याचा वर्तमान आणि भावी अर्थाशी जुळवण्यासाठी प्रयत्न करते: डेटा Analytics चे एक दृश्य.)\nमदत सामग्री पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजव्या कोपर्याजवळील 'मदत' टॅबमधून पुनर्स्थित केली गेली आहे आणि मदत सामग्री रीफ्रेश केली गेली आहे.\n(2 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात - ipad app programmieren. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापर करावा\nमूल्य सहकारी बद्दल सर्व: कसे ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधन आपल्या विपणन आकार पाहिजे\nरेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-23T11:53:28Z", "digest": "sha1:TGZL44RM3QXD2RUMZPRTWTMSMEWPOMEC", "length": 5968, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अफगाणिस्तान फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअफगाणिस्तान फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال افغانستان; फिफा संकेत: AFG) हा मध्य आशियामधील अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला अफगाणिस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर अफगाणिस्तानने एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१७ रोजी २०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-milk-adultration-6610", "date_download": "2018-04-23T11:39:17Z", "digest": "sha1:DV33KZHLOBXXVZWVDMUCLJGC5INDZBZC", "length": 18606, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on milk adultration | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 17 मार्च 2018\nकायद्याचा वचक असल्याशिवाय राज्यातील दूध भेसळीचे प्रमाण कमी होणार नाही, हे आता सिद्ध झाले आहे.\nराज्यातील भेसळयुक्त दूधविक्रीचा प्रश्न चालू विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. भेसळयुक्त दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल करण्यास केंद्राने राज्याला परवानगी दिली असून, त्यानुसार बदलासाठी कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. सहा महिन्यांपर्यंत असलेल्या शिक्षेची मर्यादा कमीत कमी तीन वर्षे तर जास्तीत जास्त जन्मठेप करण्याचा विचार असून, लवकरच असा कायदा आणला जाईल, अशी कबुली अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत नुकतीच दिली. खरे तर भेसळयुक्त दूध विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी यापूर्वी अनेक संस्थांनी राज्याचे कान पिळले आहेत. शासन प्रशासनही मागील दोन दशकांपासून दूध भेसळीतील दोषींवर कडक कारवाईच्या घोषणा वारंवार करते. असे असताना दूध भेसळीचे प्रकार राज्यात वाढतच आहेत.\nराज्यातील सुमारे ७१ टक्के दुधात भेसळ असल्याची माहिती ‘कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ने केलेल्या तपासणीत नुकतीच उघड झाली आहे. यांस धक्कादायक म्हणायचे की नाही, हे ज्याचे त्याने आता ठरवायचे आहे. कारण वाढत्या दुध भेसळीबाबत विक्रेते, ग्राहक, नियंत्रण यंत्रणा आणि शासन हे सर्व मागील अनेक वर्षांपासून जाणून आहेत. देशपातळीवर विचार केला तर १०० टक्के, ८०-९० टक्के दुधात भेसळ करणारी अनेक राज्ये असून, आपल्या राज्यातील भेसळीच्या टक्केवारीच्या आसपास देशाची सरासरी आढळून येते. दूध भेसळीचा विषय हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने चर्चीला जातो. परंतु भेसळ रोखणारी अपुरी यंत्रणा, तपासणीच्या अत्याधुनिक साधनांची वानवा, यासाठीचे अपुरे कायदे, त्यांचीही ढिसाळ अंमलबजावणी आणि महत्त्वाचे म्हणजे जुजबी शिक्षेची तरतूद यामुळे भेसळखोरांवर वचकच राहिला नाही.\nनिर्जंतुक, निर्भेळ आणि दर्जेदार दूध ही ग्राहकांची पहिली अपेक्षा असते. याच अपेक्षेने तो दूध विकत घेत असतो. असे दूधच मानवी आरोग्यास उपयुक्त ठरते. दुधातील पौष्टिक घटक पाहता त्यास अमृताची उपमा दिली असून, नवजात बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जणांना दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अशा दुधात दूषित पाणी, युरिया, सडलेला मैदा, चूना, कॉस्टिक सोडा आदी घातक पदार्थ मिसळली जातात. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे दूध तुडवड्याच्या काळात घातक रसायनांपासून चक्क कृत्रिम दूध निर्माण करून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारच्या भेसळयुक्त व कृत्रिम दुधाच्या सेवनाने ग्राहकांना क्षयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे आजार, यकृत-मूत्रपिंड निकामी होणे आदी दुर्धर रोगांचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांची वाढ खुंटून त्यांच्यात विविध शारीरिक विकृती पुढे येत आहेत.\nविशेष म्हणजे मोठमोठ्या ब्रॅंडचे दूध ग्राहकांकडून विश्वासाने घेतले जाते. परंतु दूध भेसळीत तेही मागे नाहीत. हा सर्वसामान्यांच्या जिवांशी खेळ असून, तो त्वरित थांबायला हवा. कायद्याचा वचक असल्याशिवाय राज्यातील दूध भेसळीचे प्रमाण कमी होणार नाहीत, हे आता सिद्ध झाले आहे. दुधात भेसळ करण्याच्या गुन्ह्याबाबत आजन्म कारावास अथवा फाशीच्या शिक्षेबाबत राज्यात यापूर्वीही चर्चा झालेली आहे. असे प्रस्तावही केंद्र शासनापासून राष्ट्रपतींपर्यंत पाठविलेले आहेत. आता केंद्र शासनानेच कायद्यात बदलाबाबत राज्याला परवानगी दिली असल्याने दूध भेसळीची व्याप्ती आणि त्याचे मानवी आरोग्यावरील घातक परिणाम लक्षात घेऊन सक्त शिक्षेची तरतूद करायला हवी. कायद्यात केवळ शिक्षेची तरतूद करूनही उपयोग नाही, त्याची प्रभावी अंमलबजावणीही व्हायला हवी. असे झाले तरच राज्यातील दूध भेसळीचे प्रकार थांबतील.\nदूध भेसळ गिरीश बापट विषय topics दिल्ली आरोग्य health सामना face\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/524/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8_-__%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:17:56Z", "digest": "sha1:PBKTFYJTJABLRFUDTOSYBHJ2SSFRLP4V", "length": 10305, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून - अजित पवार\nअल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने विरोधक आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून हा लोकशाहीचा खून असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, शेखर गोरे, प्रभाकर घार्गे, राजाभाऊ उंडाळकर, सुनील माने, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.\nदरम्यान, पक्ष पद देऊ शकते, तसेच चुकीचे काम केल्यास पद मागेही घेऊ शकते, हे सर्वांनी जाणून पाय जमिनीवर ठेवून जनतेसाठी काम करावे, पदाधिकारी व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती यांनी पारदर्शक कारभार करून लोकांचा विश्वालस संपादन करावा, असे आवाहन यावेळी पवार यांनी नवीन सदस्यांना केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा महाबळेश्वरला आयोजित करावी, या कार्यशाळेत कामकाज कसे करावे, पाठपुरावा कसा करावा, लाभार्थ्यांना लाभ कसा देता येतो, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी काय करावे याचा ऊहापोह व्हावा, तसेच आमदारांनीही सदस्यांसाठी वेळ द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.\nस्व. चव्हाण साहेबांनंतर आदरणीय शरद पवार साहेबांवर सातारा जिल्ह्याने प्रेम केले. सातारा व पुणे या दोन जिल्ह्यांनी राष्ट्रवादीला बहुमत दिले. पुणे जिल्ह्याला जे जमले नाही ते सातारा जिल्ह्याने सर्व पंचायत समितीत सभापती आणून करून दाखविले. विधान परिषदेच्या निवडणुकीत जे झाले ते पुन्हा घडू नये. सध्या केंद्रात व राज्यात आपले सरकार नाही. त्यामुळे संजीवराजेंवर आणि सर्व सदस्यांवर जिल्हा परिषदेची सत्ता चालविण्याची मोठी जबाबदारी आहे. ती सर्वांनी सक्षमपणे पेलावी, असे आवाहन पवार यांनी केले.\nमेरा देश बदल रहा है... अमीर डर रहा है, गरीब मर रहा है... ...\nमुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत घाटकोपर येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही मुंबईचा विकास झाला नाही. मुंबई मध्ये परिवर्तन घडणे खूप गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. प्रफुल पटेल, विधीमंडळ गटनेते आ. जयंत पाटील , आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावर कार्य ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे रविवारी सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार जनसामान्य तसेच आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे तसेच सामान्य जनता आणि ...\nकर्जमाफी द्या, पोपटपंची करू नका ,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांचा एल्गार ...\nविधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधी शुक्रवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आक्रमकपणे मांडली. दिल्लीचा पोपट काय म्हणतोय कर्जमाफी नाही म्हणतोय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण विधानभवन परिसर विरोधकांनी दणाणून सोडला. विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाजात आजही विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. यामुळे विधानसभेचं कामकाज ४ वेळा तहकूब करण्यात आलं. विरोधकांच्या गदारोळामुळे अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-trouble-due-cotton-prize-2054", "date_download": "2018-04-23T11:55:32Z", "digest": "sha1:H7HQXW2FWJZD3MQBWCEUTA2GTUTIPWI7", "length": 15830, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers in trouble Due cotton prize | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळे\nकापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळे\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी सोबतच आल्याने मजुरांअभावी कापूस वेचणीचे दर प्रचंड वाढले आहेत. तुलनेत सुरू असलेल्या खासगी खरेदीत कापसाचे दर ३२०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढे सरकरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे.\nऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी सोबतच आल्याने मजुरांअभावी कापूस वेचणीचे दर प्रचंड वाढले आहेत. तुलनेत सुरू असलेल्या खासगी खरेदीत कापसाचे दर ३२०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलच्या पुढे सरकरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे.\nकापसाच्या पहिल्या वेचणीवरून यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी उत्पादन येणार हे स्पष्ट झाले आहे. आधी पावसाचा प्रदीर्घ खंड, त्यानंतर कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि आता परतीच्या पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजत आहे. संकटाचा फेरा मराठवाड्यातील कापूस उत्पादकांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.\nमराठवाड्यात यंदाच्या खरिपात सरासरी १७ लाख १७ हजार ४५१ हेक्‍टरवर कपाशीचे क्षेत्र कृषी विभागाच्या लेखी गृहीत होते. सरासरीच्या ९१ टक्‍के क्षेत्रावरच अर्थात १५ लाख ६४ हजार ९४ हेक्‍टरवरच कपाशीची लागवड झाली. सुरवातीला ऐन कायिक वाढीच्या काळातच पाऊस बेपत्ता झाल्याने कपाशीची वाढ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली.\nजवळपास तीन आठवड्यापर्यंत ढगाळ, दमट अर्थात कीड रोगांना पोषक वातावरणामुळे कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.\nयंदा कृषी विभागाने औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वदूर हेक्‍टरी सरासरी १४ क्‍विंटल ८८ किलो कपाशीची उत्पादकता प्रस्तावित केली होती. पहिल्या वेचनीतच निम्म्यापेक्षा जास्त घट झाल्याने अपेक्षित उत्पादकता गाठता येणे शक्‍य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nदुसरीकडे खासगी खरेदीदारांनी आपली खरेदी सुरू केली. परंतु शासनाकडून मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला खर्चाला परवडतील असे दर मिळण्यासाठी पावले उचलली नसल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस कवडीमोल दराने विकावा लागतो आहे. आधी निसर्गाने मारलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे कपाशीसंबंधीचे धोरणही मारते की काय ही शंका शेतकऱ्यांच्या मनात घर करते आहे.\nकापूस उत्पन्न कृषी विभाग agriculture department पाऊस\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:51:06Z", "digest": "sha1:BVXQ5H4PNCMQSPTVR3I3P2NPIASD6XH4", "length": 21891, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:संपादन गाळणी/पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपरिचय · चर्चा · संपादन गाळणी कशी तयार करावी · संपादन गाळणी विनंत्या · हा संदेश अनपेक्षित अथवा सुधारण्याजोगा आहे काय योग्य सूचना कृपया नोंदवा/कळवा · खुणेचे शब्द · संज्ञा · संदेश अनुवादात मदत करा\nहा/हे विकिपीडिया साचा /पान/लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला /भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा.\nकृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.\nआपोआप होणाऱ्या नोंदी (आणि काही वेळा संपादन अडविले जाणे) या सोयींसाठी मोठा अभ्यास आणि जटील नियम असणे आवश्यक आहेत. अशा नोंदी करताना नोंद करण्यासाठी ठोस कारणे असणे गरजेचे आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कृत्रिम बुद्धमत्ता लागणाऱ्या या नियमांना अभ्यास करून मगच लागू करावे.\nसंपादक गाळणी व्यवस्थापकाने/प्रचालकाने संपादन गाळण्यांच्या मर्यादांची आणि खासगी गाळण्यांतील माहिती बद्दल आपापसातील चर्चा केवळ संबंधीत गाळणीतील नोंदी(notes) (खासगी) विभागातच करावयाची असते सहसा जाहीर वाच्यता करणे आवर्जून टाळायचे असते. कारण हा लेख पहा.संपादन गाळणी संबंधीत सहाय्य आणि सहाय्य पानांचे लेखन सार्वजनिक गाळणीत उपलब्ध सार्वजनिक विवरणास समोर ठेऊनच करावे.\nजाणीवपूर्वक उपद्रव करणाऱ्या व्यक्तींना, अभिप्रेत प्रतिबंधांना वळसा घालता येणार नाही याची खात्री झाली तरच खासगी गाळण्यांचे विवरण सार्वजनीक केले जाते.एखादा लेख पूर्ण लॉक करणे अथवा एखादा सदस्य पूर्ण बॅन करणे अशी पाळी येण्या पेक्षा,आवश्यक प्रमाणात संपादन गाळण्या आणि त्यातील माहिती खासगी ठेवणे अंतत: विकिपीडियाचे मुक्तता तत्व जपण्याच्या दृष्टीने मदत करणारे सिद्ध होते.\nसंपादन गाळण्यांच्या उपयोगा मागचा एक दृष्टीकोण ट्रॅफीकचा नियम तोडल्यानंतर दंड करण्या पेक्षा ट्रॅफीकचे नियम तुटण्याची शक्यता कमीत कमी उरेल अशी ट्रॅफीक अभियांत्रिकी/नियमन राबवणे अधीक योग्य आणि विकिपीडिया मुक्ततेच्या मुल्यास फलदायी ठरू शकते.\n१ संपादन गाळण्यांची रचना\n१.१.१ युनिक्स टाइम स्टॅंप\n२ संपादन गाळण्यांचे प्रकार\n२.१ टप्पेवार अभिनंदन आणि मार्गदर्शन गाळण्या\n२.२ तांत्रिक कार्ये पार पाडणाऱ्या गाळण्या\n२.३ सूचक शब्द वापरणाऱ्या गाळण्या\n२.३.१ द्वैअर्थी शब्दांमुळे येणारे अयोग्य होकार\nसंपादन गाळण्यांच्या रचना कशी केली जाते याची माहिती करून घेणे संपादन गाळणी कशी तयार केली जाते; या सोबतच नवीन संपादन गाळणीची विनंती करणे तसेच सार्वजनिक संपादन गाळणीत सुधारणा सुचवणे यातही होते.\nसंपादन गाळणीचा भर विदादात्यास (सर्वरला) कमीत कमी श्रम देऊन,कमीत कमी वेळात हवी असलेली कृती संपादन गाळका कडून करून घेणे यावर असतो.शर्तींची मांडणी करताना उद्दीष्ट साध्य करण्यास तपासावी लागणारी संपादनांकडे लक्ष्य कसे केंद्रीत कसे होईल आणि गरज नसलेली संपादने तपासावयाचे कसे टाळता येईल याचा कल्पकतेने विचार करावा लागतो.\nया दृष्टीने सहसा लक्ष्य केंद्र असलेले सदस्य गट (असतील तर) प्रथम सांगितले (लिहिल्या) जातात , त्या नंतर कोण कोणत्या नामविश्वानां सामील करून घ्यावयाचे अथवा टाळावयाचे ते सांगितले जाते.अजून कोणकोणत्या गोष्टी तपासवयाच्या नाहीत हे सांगीतले जाते आणि सर्वात शेवटी काय तपासून हवे ते सांगितले जाते. पण तपासावयाचा सूचक शब्द मीताक्षरी असेल आणि टाळावयाच्या अपवाद शब्दांची यादी मोठी असेल तर काही वेळा अपवादांची यादी नंतर देणे रास्त ठरते.\nजर समजा आपल्याला संपादन गाळणी मधील शर्ती , ठरवलेल्या दिवशी ठरवलेल्या वेळी, आपोआप अकार्यान्वित करावयाच्या असतील तर युनिक्स टाईम स्टॅंप 'चल' सुविधा timestamp < एखादीयुनिक्सटाईमस्टॅंपव्हॅल्यू असे वापरता येते उदाहरणार्थ जर तुम्हाला संपादन गाळणी 00:00 वाजता ३० नव्हेंबर २०१३(UTC) ला स्थगित होऊन हवी असेल तर आंतरजालावरील हि बाह्य सुविधा वापरून,तारीख आणि वेळेचे युनिक्सटाईमव्हॅल्यू मध्ये रुपांतरण करा आणि मग संपादन गाळणीत timestamp < 1385769600 या प्रमाणे वापरा.\nटप्पेवार अभिनंदन आणि मार्गदर्शन गाळण्या[संपादन]\nतांत्रिक कार्ये पार पाडणाऱ्या गाळण्या[संपादन]\nसूचक शब्द वापरणाऱ्या गाळण्या[संपादन]\nकाही संपादन गाळण्या तयार करताना सूचक शब्दांचा वापर केला जातो,उदाहरणार्थ टाळावयाच्या विशेषणांची यादी , वृत्तपत्रीय वार्तांकन लेखन शैली टाळा\nसूचक शब्द नोंदवण्याकरिता मुख्यत्वे contains_any (added_lines,\"महान\",\"थोर \") अथवा added_lines irlike\"महान|थोर\" अशी करता येते. अथवा वगळल्या जात असलेल्या ओळींमधील शब्दांवर लक्ष ठेवण्या साठी added_lines च्या एवजी removed_lines शर्त वापरता येते.\nसूचक शब्दास उपसर्ग अथवा प्रत्ययास अक्षर येऊन वेगळे शब्द होत असतील तर,दिलेली शर्त अशा शब्दांनाही होकार (पॉझिटीव्ह) दर्शवेल, उदाहरणार्थ वरील उदाहरणातील थोर या शब्दा सोबत थोरला शब्दाचीही नोंद होईल , पण प्रत्यक्षात थोरला हा शब्द विशेषण नसल्यामुळे तो अयोग्य होकार (फाल्स पॉझिटीव्ह) ठरतो.\nउपसर्ग अथवा प्रत्यय असलेल्या शब्दांवर अयोग्य होकार (फाल्स पॉझिटीव्ह) येऊ नये म्हणून contains_any (added_lines,''अबक'') अथवा added_lines irlike ''अबक'' अशी रचना करता येते.शर्तीच्या आधी उद्गारवाचक चिन्ह लावणे म्हणजे नको अथवा नाही असा अर्थ होतो.\nथोरला या शब्दा चा अपवाद contains_any (added_lines,''थोरला'') असा अथवा \nद्वैअर्थी शब्दांमुळे येणारे अयोग्य होकार[संपादन]\nवरच्या विभागात पाहिल्या प्रमाणे, उपसर्ग अथवा प्रत्ययांमुळे येणाऱ्या अयोग्य होकार देणाऱ्या शब्दांचा अपवाद जोडणे तुलनात्मक रित्या सोपे असते.पण लक्ष ठेवायचे अथवा टाळावयाचे बरेच शब्द एक पेक्षा अधीक अर्थ असलेले (/द्वैअर्थी) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश वेळा त्या त्या परिपेक्षात वाचताना मानवी मेंदू द्वैअर्थी शब्दाचा सुयोग्य अर्थ आपोआप निवडतो,हि प्रक्रिया संगणक प्रणालींना कठीण जाते. उदाहरणार्थ वाटण वाटलेला खाद्य पदार्थ, वाटण भावनार्थी यातील फरक संगणक प्रणालींना कळणे अवघड असू शकते. या परिस्थितीत संपादन गाळणी व्यवस्थापकास इतर विवीध पर्यायी मार्ग उपलब्ध असू शकतात.\nसर्वच द्वैअर्थी परिस्थिती करिता अपवाद देणे आवशक्य असतेच असे नाही. दुसरा अर्थाचे शब्दाचा अर्थ वापर अत्यंत किरकोळ/विरळ असेल आणि मुख्य शब्द गाळणीत असणे अधीक सयूक्तिक असेल तर तसे सूचना गाळणी तसेच जाणत्यांची मदत गाळणी स्तरा पर्यंत शब्द परिस्थितीनुरूप वापरण्यास हरकत नसते.पण अशा शब्दांच्या पूर्ण प्रतिबंधाच्या आधी अपवाद सुयोग्य पद्धतीने जोडले गेले आहेत याची खात्री करावी.\n१)नियमीत सानिध्य अपवाद: इथे संपादन गाळणी व्यवस्थापकास लक्ष्यार्थ शब्द येणाऱ्या ओळी आणि अयोग्य होकार देणारे भिन्नार्थ शब्द ओळींचे पॅटर्न तपासून संबंधीत ओळीत नेहमी सोबतीस येणाऱ्या इतर सानीध्य शब्दांचा उपयोग सानीध्य शब्द अथवा अपवाद शब्द म्हणून करता येऊ शकतो.पण हे करताना कुणी वळसा घालणार नाही याची खात्री करावी खात्री नसल्यास आवश्यकतेनुसार गाळणी खासगी मध्ये रुपांतरीत करावी.\nकाहीवेळा पॅटर्न लोकेट होण्यास सुयोग्य नियमीत सानिध्य अपवाद सुचण्यास वेळ बराच कालावधी लागतो तो लागू द्यावा.\n२) संबंधीत लेख/वर्गीकरणे/नामविश्वे समावेश करणारी अथवा अपवाद करणारी विशेष गाळणी बनवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.\n४)अपवाद क्रमांकन : पर्याय 1 शक्य न झाल्यास आवश्यक परिस्थितीत <--अपवादक/अपवादका/अपवादकि/--> असा एखादा इतरत्र न वापरलेला प्रत्यय उपसर्ग लागून अथवा इतर कोणत्याही प्रकारचा अर्थ न होणारा शब्द संबंधीत लेखातील ओळीत जोडावा आणि त्यास अपवाद द्यावा संबधीत लेख अथवा संबधीत लेख वर्गा पुरताच अपवाद द्यावा. वेगळी अपवाद दोन नियंत्रण गाळण्या बनवून removed_lines करिता एक आणि इतर लेखात अपवाद वापरला जाऊ नये म्हणून added_lines ची एक असा तीहेरी प्रतिबंध करावा.\n५)वरील पर्याय जमत नसतील आणि जाणीव पूर्वक वळसा घातला जात असेल तर, अत्यावश्यक परिस्थिती करिता संबंधीत शब्दाची विशेष खासगी गाळणी लावून संबंधीत सदस्य/सदस्य गट अथवा अंकपत्ता रेंजलाही प्रतिबंधन देता येउ शकते. अशा गाळणीस टाइम पॅरामिटर द्यावा.\nसदस्यांनी नोंदवलेल्या अनपेक्षीत अयोग्य होकारांची दखल, नोंद सुयोग्य असल्यास विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अनपेक्षित क्रिया पानावर घ्यावी.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/03/", "date_download": "2018-04-23T11:32:52Z", "digest": "sha1:IY236YVMMN55RXGAQDH7GKL4EJWBDFW5", "length": 7199, "nlines": 96, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: March 2010", "raw_content": "\nये हौसला कैसे रुके\nकधी निराशा आली तर मला परत ताजं तवानं करतात ही गाणी....\nये हौसला कैसे रुके\nमनातले विचार लेखणीद्वारे (पक्षी : किबोर्ड) कधी उमटतच नाहीत... ’संस्कार’ नावाच्या एका पुस्तकात वाचले होते, मानवास दोन प्रकारचा वेगवेगळा शब्द संग्रह असतो.\nएक वाचण्याचा आणि दुसरा लिहिण्याचा, म्हणुनच आपण मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतले अनेक शब्द वाचु शकतो, मात्र लिहिताना बरेचदा शब्द आठवतच नाहीत.\nमाझ्या बाबतीत तरी हे सत्य आहे, माझ्या मते मी वाचक म्हणुनच बनविला गेलो असणार आहे :-)....\nमाझ्या लहानपणाचे छंद वेगळेच होते, मला इतरांना सांगायची लाज वाटायची.\nचित्रकलेची आवड होती, पण चित्रपटांच्या आकर्षणामुळे मला नुसती चित्र काढण्यापेक्षा सिनेमाची पोस्टर काढायचा छंद जडला.\nदुरदर्शनवर चित्रहार मध्ये गाणे चालु होण्यापुर्वी केवळ काही सेकंदासाठी त्या सिनेमाचे पोस्टर दाखवायचे, ते पाहुन गाणे संपण्यापुर्वी मी जवळपास हुबेहुबपणे चित्रपटाचे नाव पाटीवर काढायचो.\nनाव म्हणजे नुसते नाव नाही, त्याच्या योग्य फॉन्ट सहीत. यासाठी मला दगडी पाटी फार आवडायची, प्लॅस्टीकची पाटी कधी नाही आवडली.\nमग काही दिवसांत मी पेन्सिल वापरुन अजुन ठीकठाक पोस्टर्स काढु लागलो. मग काय, एखाद्या चित्रपट थिएटर मध्ये जसे पोस्टर्स चिकटवले जातात त्याप्रमाणे घराच्या भिंतीवर चिकटवणे सुरु झाले.\nमग त्यासाठी ओरडा खाल्ल्यावर मात्र हे उद्योग बंद झाले. त्यानंतर सर्व पोस्टर्स एका पत्र्याच्या पेटीत ठेवायला सुरुवात केली. उन्हाळयाच्या सुट्टीत मामाकडे गेलो असताना इकडे ती पेटी कुठे अंतर्धान पावली ते आजपर्यंत कळाले नाही... त्यानंतर कुठेतरी स्क्रीन पेपर बघायला मिळाला आणि पानंभर चित्रपटाचे मोठे पोस्टर पाहुन डोळे दिपुन गेले. त्यानंतर प्रत्येक शनीवारी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन जवळील स्टॉलवरुन स्क्रीन पेपर आणण्याची सवय लागली. त्यातही चांगले पोस्टर्स मी परत एका ब्रिफकेस मध्ये जमा केले होते, कालांतराने अभ्यासाच्या गर्दीत ते सर्व नाहीसे झाले, आणि माझा हा छंद सुटला. आता त्यातले मी स्वत: काढलेले काही अप्रतीम(मला वाटलेले ;-) ) आलेले पोस्टर्स सुद्धा नाहीत याची खंत वाटते.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nये हौसला कैसे रुके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/591/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A,_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:17:36Z", "digest": "sha1:QYXUJ6RFRGUHLCHUTKQ753VZHPEBGBOT", "length": 7061, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराजमाता जिजाऊ, सावित्रीमाईंच्या महाराष्ट्र कुठे चालला आहे\nनंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, भाजपकडून शब्दांचा खेळ खेळले जात आहेत, समतेचं रुपांतर समरस्ता केलं जात आहे, आदिवासीचं वनवासी होत आहे, हा आंबेडकरांच्या संविधानाशी केलेला द्रोह असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी केली. ज्या देशात राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिराजी जन्मल्या त्या देशात एका शेतकरी कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करणे म्हणजे राज्यासाठी दुःखाची बाब आहे. सरकारमधील मंत्री निवडणुकांसाठी प्रचंड फिरतात पण आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट देणे त्यांना जमत नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.\nइगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक ...\nशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रव ...\nसरकारला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे – सुनील तटकरे ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा आज कोल्हापूरातून सुरू झाला. कोल्हापूरच्या दसरा चौक येथे झालेल्या सभेत विरोधकांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, विद्या चव्हाण, सुनील केदार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस् ...\nएलौरी गावाच्या संघर्षाची संघर्षयात्रेकडून दखल ...\nसंघर्षयात्रेच्या आजच्या पाचव्या दिवशी विरोक्षी पक्षांच्या सदस्यांनी लातूरच्या औसा तालुक्यातील एलौरी या गावी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे अनेकांचं नुकसान झालं, अनेकजण जखमी झाले होते. विरोधी पक्षातील सदस्यांनी या गावाला भेट देऊ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/pineapple-halwa/", "date_download": "2018-04-23T11:40:53Z", "digest": "sha1:3LN2S2KMSRLM7UYHMBRPKWI2RML2NJPU", "length": 7516, "nlines": 116, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अननसाचा हलवा | Pineapple Halwa", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » अननसाचा हलवा\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८\nअननसाचे तुकडे, खवा आणि क्रीम घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा (Pineapple Halwa) पुडींग म्हणून खाता येईल.\n१ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे\nएक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम\n४ मोठे चमचे तूप\nपाव चमचा केशर (ऐच्छिक)\n२-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप\nसाखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा. पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे.\nमंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे.\nगरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. उन्हाळ्यात केशर वापरू नये. उष्ण पडते.\nअननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते. केशर घालायचे असल्यास त्यात घालावे.\nदुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे. खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे. ३-४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व कोमट होऊ द्यावे.\nपुडिंग बोलमधे घालून त्यावर साय व काजू-बदामाचे काप घालावे.\nपार्टीसाठी करायचा असल्यास साय किंवा क्रीम‍ऐवजी बरोबर व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती व स्वादसंगती साधणारे आईस्क्रीम द्यावे.\nहा हलवा दोनतीन दिवस अगोदर करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला व रसाळ हवा. डब्यातला घेऊ नये.\nहे पुडिंग मोठ्या पार्ट्यात करायलाही हरकत नाही.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-04-23T11:33:28Z", "digest": "sha1:BBTZU5SMEF65XCK5HVSABDRD3BTJSBAB", "length": 5485, "nlines": 99, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: March 2011", "raw_content": "\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\nदेवकाका - प्रकाशक होतील\nसुझे - साखि विकेल (हॉटेलात बसून... सायकल वर नव्हे ;) ))))\nदे.गा. - शिक्षक होतील\nविभि - पिझ्झा हट मध्ये काम करेल.. आणि हो मस्का सुद्धा विकेल.. ;)\nआप - बिर्याणी बनवेल.. आपोळी नावाचा असह्य प्रकार सुद्धा करेल ;)\nदीप - चारोळीकार बनेल.. (सगळ्या चारोळ्या एका कॅफेमध्ये सुचतिल.. योगायोग बरं केवळ)\nसपा - घर शोधुन देईल लोकांना .. (ब्रोकर) ;)\nदेचु - गुजरात बॉर्डरवर तस्करी ;)\nमहेंद्रकाका - कॉलमनिस्ट बनतील\nयोमुं - बेकरी उघडेल\nआका - सिंहगडावर धुक्यात हरवणार्‍यांना रस्ता सापडून देईल\nश्रेता - बॅटींग कोच (षटकार स्पेशलिस्ट) ;)\nसाबा - इन्स्टॉलेशन्स और क्या...\nहेरंब - गावाच्या पंचायतीत न्याय निवाडा करेल ;) (त्यातही पार्टटाईम मॅगी वडे तळून देईल ;) )\nमीनल - कोल्हापुरी चपलांचं दुकान उघडेल ;)\nतन्वीताई - ब्लॉगवरच्या विचित्र निनावी अन खोट्या कॉमेंट्स हँडल करण्यात मदत करेल... :P (साभार विभि)\nकांचनताई - डिटेक्टिव्ह ;) (साभार देचु)\nसिद्धार्थ - हापूस विकेल... सोबत बीएसएनएलचं ब्रॉडबॅण्डचा ब्रॅण्ड ऍंबासिडर ;) (साभार सुझे..)\nश्रीताई - वूलन (स्वेटर्स स्पेशलिस्ट) (साभार देचु)\nअनुजा पडसलगीकर - मस्कत डिस्कव्हरी चॅनल CEO\nअपर्णा संखे - रेफ्री, अंपायर, (दीप, सुझे), अपर्णा 'गाणी आणि आठवणी' हा रंगारंग कार्यक्रम रेडीओ वर करेल ;)\nभामुं - लाल टोप्या विकणार ... :D आणि पार्ट टाईम ओरिगामी क्लासेस....\nअनुजा सावे - फूड इनस्पेक्टर ;)\nरोहन चौधरी - ट्रेकिंग एक्स्पर्ट ऍड्व्हाईस ;)\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/576/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:06:47Z", "digest": "sha1:X6Q7VZFNXHPNDJVQTOIIOYWCPOHRCCUM", "length": 2051, "nlines": 28, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून\nशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/7", "date_download": "2018-04-23T11:48:27Z", "digest": "sha1:YR56WHELK4DRM5DE6FZ3W3FW7V57IHSP", "length": 19429, "nlines": 177, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "जीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू लागली.\nअनाथ मुलां साठी माई...\nअसामान्य मुलांकरिता अपवादात्मक सामाजिक कार्य.... एक प्रेरणादायी कथा\nकै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे\nजीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू .\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू लागली\nअलकागौरी जरी स्वत:ला चारचौघींसारखी समजत असली तरी तिच्या अंतरंगात सुप्त का होईना, पण एक स्फुल्लिंग नक्कीच होता. घरची परिस्थिती सामाजिक कार्याला पोषक होतीच; त्यामुळे हे साहजिकच होतं. शिबिराच्या निमित्ताने अचानक ती विवेकानंद केंद्राच्या सान्निध्यात आली, आणि तिच्या अंतरंगातला स्फुल्लिंग चेतला जीवने यावद् आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम्' (आयुष्यात जितकं मिळालयं त्यापेक्षा जास्त द्यावं) या केंद्राच्या प्रार्थनेतल्या वचनानी तिला दिशा सापडली. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत हे स्वामी विवेकानंदांचे आवाहन आणि अथक परिश्रमाने कठीण, विपरीत परिस्थिती बदलता येते, असाध्य ते साध्य करता येतं हा सागरातील शिलास्मारकानं दिलेला विश्वास तिला दीपस्तंभ वाटला. जीवनव्रती कार्यकर्ती होऊन अर्थपूर्ण जीवन जगणार्या केंदाच्या कार्यकर्त्यांच्या सागरात मिळून जायचे तिने ठरवले.\nजीवनव्रती होण्यासाठी कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदारी नसावी, साधी राहणी, भारतभर कुठेही रहायची तयारी आणि कमीतकमी ५ वर्षे अविवाहित रहावे या अटी आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर २ ते ३ वर्षे पूर्णवेळ काम करायचे आहे ते पूर्णवेळ वानप्रस्थी म्हणून काम करु शकतात. पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या योगक्षेमाची आणि निर्वाहाची जबाबदारी विवेकानंद केंद्राची असते. जीवनव्रती होण्यासाठी गौरीने आई-वडिलांची संमति घेतली. घरचं वातावरण सामाजिक कार्याला पोषक होतं तरी तिच्या आईने तिच्या निश्चयाची दृढता पारखली. आव्हानात्मक राष्ट्रकार्य करायला तिला आई-वडिलांनी प्रोत्साहितच केले. गौरीच्या भावंडांनी तिला पाठिंबा दिला. आपल्या ऐन तारुण्यात ३ वर्षे पूर्णकालीन कार्यकर्ते असणारे आजोबा आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उद्योगधाम-अनिकेत निकेतन या त्यांच्या कामात पुढाकार घेणार्या आजीने गौरीच्या पंखातील भरारी घेण्याचे सामर्थ्य जाणले. ११ जुलै १९९६ ला गौरीने विवेकानंद केंद्राची सेवाव्रती म्हणून केंद्राच्या विशाल घरात प्रवेश केला.\nसेवाव्रतीच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर नागपूर, नाशिकचं दायित्व मिळालं. कायर्पद्धतीची ३ अंगं - संस्कार, स्वाध्याय आणि योग वर्ग घेता घेता नित्य प्रार्थना आणि योगाभ्यासामुळे आत्मविश्वास वाढू लागला. स्वाध्याय वर्गातून वैचारिक स्पष्टता, सखोलता व सुसूत्रता आली. सततच्या कार्यकर्ता व्यक्तिमत्व विकास शिबीरांमुळे सामूहिक संस्कार झाले. लोकसंग्रह, लोकसंपर्क, लोकसंस्कार आणि लोकसेवा ही चतुःसूत्री डोळ्यांसमोर ठेऊन आदर्श समाज रचनेचे स्वप्न साकार कसे होईल याची स्पष्टता आली. आता मात्र गौरीला आपल्या कार्यक्षेत्राची जाणीव झाली. ही अडीच वर्षे संपल्यावर तिला घरी स्वस्थ बसवेना. पुन्हा तीन वर्षांसाठी व्रत स्वीकारले.पण महासागराला मिळालेली नदी परत फिरते थोडीच त्यामुळे ही तीन वर्षे संपल्यावर तिथेच कायम कार्य करायचा निर्णय तिने घेतला. जीवनव्रती कार्यकर्ती होण्याचा ध्यास पूर्णत्वाला नेला. त्यासाठी कन्याकुमारीला प्रशिक्षण झालं आणि कार्यक्षेत्र मिळालं---- अरुणाचल\nईशान्य भारतातले, तीन आंतरराष्ट्रीय सीमा असलेले राज्य अरुणाचल निसर्गसौंदर्याने संपन्न; निसर्ग व ईश्वराच्या सान्निध्यात राहणाऱे तेथील नितळ, पारदर्शी स्वभावाचे लोक निसर्गसौंदर्याने संपन्न; निसर्ग व ईश्वराच्या सान्निध्यात राहणाऱे तेथील नितळ, पारदर्शी स्वभावाचे लोक पण तेथील परिस्थिती मात्र खडतर, प्रतिकूल पण तेथील परिस्थिती मात्र खडतर, प्रतिकूल आठ नऊ महिने पावसाळा, बेताची वाहतूक व्यवस्था, प्रचंड ब्रह्मपुत्रा आणि तिचे ते पूर; या तर नैसर्गिक अडचणी. याबरोबर धर्मांतर; पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव; युवकांना व्यसनाधीन, निष्क्रीय बनवणाऱ्या स्वार्थी, देशद्रोही प्रवृत्ती; आणि एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, सशस्त्र अतिरेकी संघटना. यामुळेच विवेकानंद केंद्राचं मुख्य काम 'सृजनात्मक नेतृत्व' घडवणे आठ नऊ महिने पावसाळा, बेताची वाहतूक व्यवस्था, प्रचंड ब्रह्मपुत्रा आणि तिचे ते पूर; या तर नैसर्गिक अडचणी. याबरोबर धर्मांतर; पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव; युवकांना व्यसनाधीन, निष्क्रीय बनवणाऱ्या स्वार्थी, देशद्रोही प्रवृत्ती; आणि एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, सशस्त्र अतिरेकी संघटना. यामुळेच विवेकानंद केंद्राचं मुख्य काम 'सृजनात्मक नेतृत्व' घडवणे आणि 'संस्कृतीच्या माध्यमातून विकास' हे ब्रीद आणि 'संस्कृतीच्या माध्यमातून विकास' हे ब्रीद त्यांच्या कार्याच�\tपुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/581/%E0%A4%96%E0%A4%BE.%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:25:32Z", "digest": "sha1:BEAQJLW7TCGBZZDKDJIWYE5TU7RXFKVB", "length": 7686, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा.शरद पवार यांचा जीवनपट आता वेबसाईटद्वारे उलगडणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या संसदिय कार्याला पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या ५० वर्षांच्या काळात राजकारण, समाजकारणात महत्त्वाचे योगदान देत असतानाच अनेक महत्त्वाची पदेही पवार यांनी भूषविली. त्यांच्या या अविरत कार्याची दखल घेत भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे. शरद पवार यांच्या या संसदिय जीवनपट उलगडणारी एक वेबसाईट खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित करण्यात आली आहे. पवार साहेबांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे प्रसंग तसेच घटनांचे व्हीडीओ व फोटोंचे संकलन या वेबसाईटमध्ये पाहता येणार आहे. आगामी काळातही नवनवीन फोटो आणि व्हीडिओंच्या माध्यमातून ही वेबसाईट अधिक समृद्ध करण्याचा मानस आहे.\nतुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटला भेट देऊ शकता...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारच्या सकारात्मक निर्णयाचे शरद पवार यांच्याकडून स्वागत ...\nशेतकऱ्यांच्या आंदोलनावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता दिल्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलताना स्वागत केले आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजूट झाली हे समाधानकारक आहे. मतभेद असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी लोक एकत्र आले. सुकाणू समितीच्या मार्फत राज्य सरकारशी चर्चा केली. ती आता आशादायक झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातले आंदोलनकर्ते शेतकरी, विविध संघटना, सुकाणू समिती यांनी यशस ...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली शरद पवार यांची भेट ...\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात काल दिल्ली येथे आदरणीय शरद पवार साहेबांसमवेत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. त्यांनतर राज्य सरकारच्या भूमिकेत सकारात्मक बदल दिसून आले. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका विशद केली आहे. या चर्चेचे फलित बघता सरकारकडून असलेला प्रस्ताव आणि पवार साहेबांनी सुचवलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश आजच्या कर्जमाफीत झालेला दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. तसे ...\nज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अहमदनगर येथे शरद पवार यांचा नागरी सत्कार ...\nज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आज अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग अभंग यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार जयंत पाटील , माजी सभापती दिलीप वळसे पाटील, कॅबिनेट मंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री यशवंतराव गडाख, आम ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/599/%E0%A4%96%E0%A4%BE.%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:17:16Z", "digest": "sha1:DMBWGVQBQAOL3CMLZCZAPC4GHK2S6GW6", "length": 6957, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा. सुप्रिया सुळे यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान साधला विविध सामाजिक घटकांतील लोकांशी संवाद\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तीन दिवसीय संवाद दौऱ्यास आजपासून सुरूवात होत असून दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जळगाव मधील बुद्धिजीवी घटकांशी सुळे यांनी संवाद साधला. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता. यावेळी विविध समाज घटकांचे प्रश्न आणि समाजकारणाबाबत त्यांनी चर्चा केली.\nयावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ याही उपस्थित होत्या.\nपक्षाच्या वतीने सरकारला देण्यात आली शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असलेली ‘बळीराजाची सनद’ ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची ‘बळीराजाची सनद’ आज खा. सुप्रिया सुळे व मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने राज्यसरकारला निवदेनाव्दारे दिली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने ही सनद कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी स्वीकारली. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आ.अशोक धात्रक, प्रदेश चिटणीस संजय ...\nराष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभागातर्फे राज्यभर विभागीय शिबिरांचे आयोजन ...\nराष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मीडिया विभागातर्फे विभागीय शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी, युवक, युवती तसेच जे कार्यकर्ते Facebook, Twitter, WhatsApp अशा डीजीटल माध्यमांचा प्रभावी वापर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी करतात असे कार्यकर्ते या एक दिवसीय विभागीय शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदवू शकतात. आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा अशीं ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला - युवती कार्यकर्त्यांची मंत्रालयात धडक; मुख्यमंत्री दालनाबा ...\nदौंड तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आपल्या शेतातील कांद्याचे उभे पिक ट्रॅक्टरने जमिनीत गाडून टाकल्याची घटना नुकतीच घडली. याधीही नाशिकमधल्या नगरसूल येथेही एका शेतकऱ्याने पाच एकरावरील कांदा जाळून टाकला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दाहक स्थिती शासनासमोर मांडली होती. तरिही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तसेच शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19396/", "date_download": "2018-04-23T11:22:46Z", "digest": "sha1:FGL66LH3RTX3SE57AJXB6GA3GF7MVEGV", "length": 2183, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अस वाटत...", "raw_content": "\nअस वाटत चंद्र बनाव,\nत्याच्या सुंदर किरणानी तुला आपल्या मिठीत घ्याव...\nअस वाटत गुलाबाचे काटे स्वताला बनवाव,\nआणि रोज तुझ रक्षण कराव...\nअस वाटत तलावात चिखल म्हणून रहाव,\nआणि कमला सारख प्रेमाने तुला जपाव...\nअसा वाटत पणतीत तेल म्हणून रहाव,\nसतत तुझे उजळपण मला दिसाव...\nप्रेम कशाला म्हणतात नसेल माहीत मला,\nतुझ्या मनात मे असुदे एवढच वाटत....\n-- समीर प्रकाश कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bollworm-affected-farmers-get-compensation-6624", "date_download": "2018-04-23T11:32:49Z", "digest": "sha1:QLIEP6KWQZMMVTAV3S2IETCNHAEUSPUM", "length": 13553, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bollworm affected farmers to get compensation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला\nबोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी झाली आहे. काेरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. तर, धानासाठी देखील याच पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.\nपुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी झाली आहे. काेरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. तर, धानासाठी देखील याच पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.\nया दाेन्ही पिकांची मदत मिळण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असून, यासाठी सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नाेंद असणे आवश्‍यक असणार आहे. तसेच, २०१७-१८ मध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये निविष्ठा अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. त्या क्षेत्रामध्ये मदतीची द्विरुक्ती हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.\nबागायत नासा कृषी विभाग agriculture department विभाग sections कापूस दुष्काळ\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/women-power", "date_download": "2018-04-23T11:20:52Z", "digest": "sha1:XK6BCO7ZNG3AREVLCZDYPYRLJAX7VHPU", "length": 7113, "nlines": 118, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "महिलाराज | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nहिंदूंचा पवित्र सण मानल्या जाणाऱ्या वा नऊ दिवस माता जगदंबेचा आई भवानीचा जागर घातल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवात काही धर्मांध लोकांकडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेम प्रकरणासाठी भु...\tRead more\nमानव सेवा संघाकडून त्या सर्व महिलांना व मुलींना ज्या जाॅबला अथवा काॅलेजला एकट्या जातात त्यानां एक सावधानतेचा इशारा. ▶तुम्हाला जर एखादा लहान मुलगा रोडच्या कडेला रडत रडत त्याच्या घरचा...\tRead more\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nएक महत्वाची सूचना : सर्व मुलींसाठी महत्वाची सूचना – आपण जेव्हा कोणत्याही दुकानात ड्रेसिंग रुममध्ये जाता तेव्हा कृपया एक चाचणी सर्व प्रथम करा कारण “आपली सुरक्षा आपल्याच हाती” “ड्र...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/135/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:04:42Z", "digest": "sha1:52UPT444SBMRQZH3XNRXIHLWBV455OL3", "length": 8853, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकरी आणि गुराढोरांसकट जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल मोर्चा'\nउस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही या जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढील दोन दिवसात उस्मानाबाद,लातूर आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनजंय मुंडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी केली. या मोर्चात शेतकऱ्यांसह त्यांची गुरे ढोरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nसप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. त्याचवेळी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या आत्तापर्यंत सुरू होत्या. पण अशा वेळी अचानक चारा उपलब्ध असल्याचा साक्षात्कार सरकारला झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. रब्बीचे पीकच या जिल्ह्यात झाले नाही तर चारा कुठून उपलब्ध होणार असा प्रश्नही त्यांनी केला. सप्टेंबर महिन्यातच ९ लाख मेट्रीक टन चाऱ्याची कमतरता होती. त्यात आत्ता चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय म्हणजे 'ना बुड, ना शेंडा' अशा पद्धतीचा असल्याचेही ते म्हणाले.\nहा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना आणखीन संकटात टाकले आहे. सरकारमधील मंत्र्यांनी आपल्या बरोबर या जिल्ह्यांचा दौरा करावा आणि चारा आहे की नाही याची पहाणी करावी. चारा उपलब्ध असल्यास सरकार सांगेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nसिंधुदुर्ग प्रकरणावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत टीकेची झोड ...\nसिंधुदुर्गात लोकप्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. लोकांनी लाखो मतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी मारहाण करणे हा विरोधी पक्षातल्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले.आंदोलनांना असे दाबले जाणार असल्यास विरोधी पक्षांनी आता आंदोलने करायचीच नाहीत का, लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जात नसेल तर आम्ही सभागृहात का यायचे, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. लोक ...\nलाळ्या खुरकत लस, सॅनिटरी नॅपकीन्स खरेदीत भ्रष्टाचार ...\n- मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागात घोटाळा - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल - जीएसटीच्या बेकायदा सुटीमुळे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा घणाघात - महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य ठरले आहे. सर्व मंत्री भ्रष्टाचार करून झाले, आता मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत या घोटाळ्यांचे लोन गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा प ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-renowned-agriculturist-appasaheb-pawar-baramati-pune-maharashtra-7464?tid=120", "date_download": "2018-04-23T11:43:39Z", "digest": "sha1:I2K5XH2K7EIMQWNIO6PZOJAJVRARVCLJ", "length": 25786, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Renowned Agriculturist Appasaheb Pawar, Baramati, Pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nभविष्यात महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास लिहिला जाईल त्या ग्रंथामध्ये सोनेरी अक्षराने लिहीलेले एकच नांव असेल आणि ते म्हणजे पद्मश्री आप्पासाहेब पवार. बारामतीच्या भिगवण चौकात गेले असता कृषि विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये हा महान कर्मयोगी कार्यरत असल्याचा अजूनही भास होतो.\nस्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच आहेत. असा महान कर्मयोगी बारामती परिसरात होता. त्या कर्मयोगाचे स्मारक बारामती परिसरातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कर्तुत्वाचा दाखला देत उभे आहे. भविष्यात महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास लिहिला जाईल त्या ग्रंथामध्ये सोनेरी अक्षराने लिहीलेले एकच नांव असेल आणि ते म्हणजे पद्मश्री आप्पासाहेब पवार. बारामतीच्या भिगवण चौकात गेले असता कृषि विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये हा महान कर्मयोगी कार्यरत असल्याचा अजूनही भास होतो.\nशेती शास्त्राचे संशोधन, प्रगत तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाले तरी वास्तवात आणता येत नाही. त्यामागे अनेक कारणे असतात. ते तंत्रज्ञान प्रयोग खर्चिक असू शकते. त्याच्या यशापयशाचे मुल्यमापन करणे शक्‍य नसते. अशावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करता येत नाही. कृषि विद्यापीठे तसेच शेती संशोधन केंद्र आणि शेतकरी त्यांच्यामुळे माध्यम समन्वय म्हणून तसेच ज्याला शेती शास्त्रात एक्‍सटेन्शन (ज्ञान विस्तार) म्हणतात. अशा संस्थेची निकड लक्षात घेवून या महान कर्मयोग्याने कृषि विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. नवीन तंत्रज्ञानाने शेती उत्पादन व संशोधनाचे प्रात्यक्षिक कृषि तंत्रज्ञान संशोधनाची प्रयोगशाळा प्रतिष्ठानच्या शेतीवर उभी राहिली. दूध उत्पादनाची क्रांती झाली. 10 लिटर दुध जमा करणे अशक्‍य होते, तेथे आज लाखों लिटर दुधाचे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांची मुहुर्तमेढ आप्पासाहेबांच्या कर्तृत्वामुळे रोवली गेली. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्ग सुरू केले. ते स्वतः हातात डस्टर, खडू घेवून उभे राहिले. शेतकऱ्यांना गाईच्या संगोपनाचे धडे त्यांनी दिले.\nशेती, शेतकऱ्यांचे प्रश्‍न हा केंद्रबिंदू समजून हा महान कर्मयोगी अविरत कार्यरत होता. शेतकऱ्यांची तरूण पिढी उद्यमशील व्हावी. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या झोपडीत समृध्दीचे, संपन्नतेचे दिवस यावेत, म्हणून तरूण शेतकऱ्यांना एकत्र करून शेती-विज्ञान मंडळासारखे उपक्रम केले. त्या तरूण शेतकऱ्यांना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर कर्नाटक, बंगळुरू, इस्त्राईलपर्यंत शेती सहलीचे आयोजन केले. त्यांच्या बरोबर एस. टी. ने प्रवास सुध्दा त्यांनी केला. शेती विषयक सहलीचे यशस्वी आयोजन कृषी प्रतिष्ठानमार्फत केले. केवळ दुध उत्पादन नव्हे, तर आधुनिक कुक्कुटपालन, द्राक्ष, डाळींब, बोर, वनशेती, आधुनिक पध्दतीने ग्रीान हाऊसेस, त्यातील फुलशेती वगैरेचे प्रत्यक्ष शेतीतंत्र शेतकऱ्यांना आप्पासाहेबांमुळे शक्‍य झाले. त्यांनी फळबाग संघाची स्थापना करून स्वखर्चाने शितगृह बांधून दिले. या माध्यमातून परिसरातील शेतमाल (द्राक्ष/डाळींब) परदेशात निर्यात होवू लागला. शेतकऱ्यांना वाजवी किंमत मिळू लागली.\nपुराणकाळात ऋषीमुनींचे आश्रम असत. तेथे विद्यादानाचे कार्य चालत असे. तसेच कार्य कृषि विकास प्रतिष्ठानमार्फत चालत आहे. महाराष्ट्रभर या महान कर्मयोग्याचे शिष्यगण पसरले आहेत. सोलापूर जिल्हयातील श्री. कचरे यांचे शेतावर शेती विज्ञान मंडळाची सहल गेली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की या माळरानांत डाळींब, बोर, कलिंगड, टोमॅटोची लागवड केवळ आप्पासाहेबांचे मौल्यवान मार्गदर्शन, त्यांची भाषणे, चर्चासत्रामधील मार्गदर्शन यामुळेच शक्‍य झाले आहे.\nअसे अनेक शेतकरी त्यांनी घडविले.\nछत्रपती कारखाना हा त्यांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय. जन्मदात्या आईपेक्षा त्या संस्थेवर प्रेम करणारी जी कर्तृत्ववात पिढी भवानीनगर परिसरात होवून गेली. त्यापैकी आप्पासाहेब पवार एक होते. छत्रपती कारखान्यासाठी प्राथमिक भागभांडवल गोळा करण्यापासून त्यांचा सहभाग होता. छत्रपती कारखान्याच्या सचिवपदापासून संचालक, कार्यकारी संचालक, चेअरमनपद अशी पदे त्यांनी भुषविली. काटकसर, पारदर्शी अधिकारी म्हणून महाराष्ट्रभर कारखान्याचा व त्यांचा व्यक्तीगत नांव लौकीक होता.\n1951 साली ते कृषि पदवीधर झाले. प्रवरानगर येथील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी कारखान्यामध्ये केवळ 4 रूपये पगारावर ते रूजू झाले. त्या परिसरचा सर्वांगीण विकास त्यांनी केला. त्या परिसरात त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कार्याची पावती म्हणून प्रवरा कारखान्याने त्यांना इस्त्राईलला पाठविले. तेंव्हापासून आप्पासाहेबांनी ईस्त्रायलची शेती, पाणी नियोजन, फलोत्पादन, फुलशेती, मत्स्य उत्पादन वगैंरेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. बारामती परिसरात बारामती ग्रेप इंडस्ट्रिज, बारामती ऍग्रो सारख्या संस्था नावारूपाला आणल्या. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग व्यवसाय केला पाहिजे, म्हणून बारामती औद्योगीक वसाहत, बारामती एम. आय. डी. सी वगैरे सारख्या संस्था निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. केवळ तेवढे करून न थांबता मुलांना रोजगार मिळावा, म्हणून औद्योगीक प्रशिक्षण देणारी संस्था काढली. सिन्नर, पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगीक वसाहती पाहण्यासाठी सहली काढल्या. बारामती परिसरात छोटे उद्योग करण्यासाठी तरूणांना त्यांनी प्रोत्साहित केले.\nभिगवण चौकातील त्यांच्या कार्यालयामध्ये अजूनही ते कार्यरत असल्याचा भास होतो. त्यांचे कार्यालय सदैव गजबजलेले असे. ऑस्ट्रेलियन मिशनच्या मिस ओझर, मिस स्क्‍युज, श्री. बारवकर, श्री. गोरे, श्री. गावडे, श्री. ढवाण वगैरे विश्‍वस्त प्रतिष्ठानच्या भावी योजना संबंधी आत्यंतिक तळमळीने शेतीविषयक प्रश्‍नांची धोरणे तेथे ठरवत आहेत, कुणी त्यांना शेती विषयक परिसंवादासाठी आमंत्रण देण्यासाठी आलेला आहे, तर कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आलेला आहे. असेच चित्र नेहमी पाहायला मिळे. सर्व सामान्यांचा आधार म्हणून त्यांचे कार्य अखंड चालू असे. बारामती परिसरातील अनेक नामवंत कर्तृत्ववान मंडळीचे, सायंकाळी संमेलनच त्यांच्या कार्यालयात भरलेले दिसायचे. गुलाबराव पाटील, हरिभाऊ देशपांडे, विनोद शेठ, हिरेमठ काका, भगीरथ पवार अनेक डॉक्‍टर, वकील, तालुक्‍यातील अधिकारी, पदाधिकारी यांचा स्नेहमंडळाचे ठिकाण म्हणून आप्पासाहेबांचे कार्यालय ओळखले जाई. हास्यविनोद, गंभीर विषयांवर चर्चा यांनी सर्वजण मंत्रमुग्ध झालेले दिसत.\nबारामती महाराष्ट्र शेती पद्मश्री विकास दूध उपक्रम कर्नाटक द्राक्ष डाळ फळबाग horticulture सोलापूर टोमॅटो नगर मत्स्य\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-23T11:42:29Z", "digest": "sha1:4KZYZQKCOADUSTQZYJANXBXEWNVE5S5J", "length": 3246, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विषारी वायू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"विषारी वायू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:36:31Z", "digest": "sha1:DD4IX5SQMMTW7ZP5SSCMVSF5VAE7UDS2", "length": 10958, "nlines": 150, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: फोबिया", "raw_content": "\nफोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी. यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात. मलाही एक() विचित्रच फोबिया आहे.\nआधीपासुन आधीचं सांगतो, लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल. इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली.\nशाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्‍य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्‍या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.\nसद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे. मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.\nतर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.\nधन्यवाद मैथिली.. बरं झालं हे छान आहेत असे म्हणालीस.. ;-)\nवाचतो ती खादाडी पोस्ट आता...\nह्याले मीतरी प्फोब्य न्हाय म्हन्नार... नविन जानून घ्याची उत्सुक्ता, जिज्ञासा किंवा कुतुहल म्हन्ता यील... आन ते आस्लबी पायजेल... प्रोग्रामिंग लॅंग्वेजच्या बाबतीत माकापन असच वाट्टं...\nऐकुन बरं वाटलं सौरभ... फायद्याचा आहे हा फोबिया.. हे खरं\nतुझे फोबिया फायद्याचे आहेत. वाईट नाहीत. पण विषयाला सोडून थोडं...मला पर्सनली क्लॉस्ट्रोफोबिया इन्टरेस्टिंग वाटतो...त्याचा संदर्भ असलेला Kontroll हा हंगेरियन चित्रपट जरूर पहा. मला थोडासा क्लॉस्ट्रोफोबिया आहे अशी ऑकडि मला आहे\nबाबा प्रोफेटा, तुला सिनेमा पाहुनच प्रतिक्रिया देतो.\nफोबिया म्हणण्याचे कारण म्हणजे त्याबद्दल वाटणारी भिती.. सरळ वाचणे, सिनेमा पाहणे हे उत्तम ना..\nहा फोबिया मला आवड्ला माझ्या सगळ्या फोबियांपेक्शा नक्कीच बरा आहे माझ्या सगळ्या फोबियांपेक्शा नक्कीच बरा आहे\nधन्यवाद शाल्मली... ब्लॉगवर स्वागत...\nखरच मस्त फ़ोबिया आहे तुझा...\nमाझ्या मते हे म्हणजे जगातल्या सर्वोत्कृष्ट फोबियाचं उदाहरण आहे. उगाच उंचीची, वेगाची, पाण्याची भीती या अशा फोबियांपेक्षा तुझं हा फोबिया कसला मस्त आहे.. \nधन्यवाद वटवट सत्यवाना... न्यायाधिशांनी निकाल दिलाय म्हणजे शिक्कामोर्तबच फोबीया चांगला असण्यावर....\nअसाही फोबिया असतो हे आजच कळलं ;)\nपण मस्त आहे बर का :)\nविक्रम, बरं झालं मला वाटलं कैच्याकै म्हणशील ;)\nवेगळ्या विषयावर छान लिहील आहे\nहा असा फोबिया फायदेशीरच आहे नवीन आणि चांगल वाचायला मिळावं असं वाटलं तर ज्ञानात भरच पडेल नवीन आणि चांगल वाचायला मिळावं असं वाटलं तर ज्ञानात भरच पडेल\nअनुजा, ब्लॉगवर स्वागत.. आणि जुन्या पोस्टवर आवर्जुन प्रतिक्रियेसाठी अत्यंत आभार.....\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/3080192", "date_download": "2018-04-23T11:47:26Z", "digest": "sha1:4DUBF3Z2G73SJX545OPJE3IMCMJMCUBY", "length": 6516, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "अभ्यास: फक्त 3% मिमलच्या न्यूफेफेडची जाहिरात केली जाते, परंतु पृष्ठांच्या 10% पृष्ठ पोस्टमध्ये 'प्ले करण्यासाठी पैसे' यासारख्या जाहिराती असतात", "raw_content": "\nअभ्यास: फक्त 3% मिमलच्या न्यूफेफेडची जाहिरात केली जाते, परंतु पृष्ठांच्या 10% पृष्ठ पोस्टमध्ये 'प्ले करण्यासाठी पैसे' यासारख्या जाहिराती असतात\nनवीन अंतर्दृष्टी वापरकर्त्यांकडून पोहोचणार्या फेसबुक पोस्ट्सच्या विघटन प्रकट करते\nसोशल बेकेरमधील रिसर्च Semaltेट न्यूजफ़ीडवरील पोस्ट्सच्या रचनेवरून असे दिसून आले आहे की जे लोक पाहतात त्यांच्याबद्दल थोडक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात आलेली सामग्री आहे. एकूण, आपल्या वृत्तपत्रात जे लोक पोस्ट करतात ते केवळ 3% पदोन्नती करतात, परंतु आम्ही अपेक्षा करतो त्याप्रमाणे बहुसंख्य पोस्ट्स वापरकर्त्याच्या मित्रांकडून असतात- जसे की सामग्री वापरकर्त्यांना सर्वात आकर्षक दिसतात.\nसंशोधनातील काही प्रमुख अंतर्दृष्टींचे आमचे सारांश काढा:\nप्रयोक्ता पोस्ट विरुद्ध पृष्ठ पोस्ट\nसंशोधन दर्शवितो की वापरकर्ता पोस्ट्स त्यांच्या पोस्ट-फीडमध्ये अंदाजे एक चतुर्थांश करते तेव्हा मोठ्या संख्येने पोस्ट्स बनवतात - business website design. लोक त्यांच्या मित्रांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सेमॅटचा वापर करतात, म्हणून हे आश्चर्यकारक नाही.\nआम्हाला सातत्याने सांगण्यात आले आहे की फेसबुक 'पे प्ले टू प्ले' बनले आहे - आपल्या पोस्ट्सला चालना देण्याशिवाय आपण खरोखर कोणतीही वागणूक मिळवू शकत नाही. सेंद्रिय पृष्ठ पोहोचणे इतके कमी असताना Facebook वर मोठ्या संख्येने आपल्या पोस्ट पाहिल्या जात असताना हे नक्कीच एक चढाईच्या चळवळीसारखे वाटू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की ते अशक्य आहे अतिशय उच्च पातळीच्या प्रतिबद्धतेसह मिमल नंतरही त्यांची पोस्ट्स अदा न करता त्यांच्या प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात सेवा दिली जातात. सरासरी व्यक्तीच्या न्यूजफीडमधील पृष्ठांमधील दहा पोस्ट्समध्ये केवळ एक पदांना पदोन्नती केली जाते, बाकीचे सेंद्रीय पृष्ठ पोहोचले आहेत. याचा अर्थ असा नाही की पोस्ट्सचे प्रमोशन करणे हे प्रभावी नाही, परंतु आपल्याकडे उत्कृष्ट आणि अतिशय सामायिक करण्यायोग्य सामग्री असल्याशिवाय ते अद्याप आपल्या अनुयायांना पैसे न देता आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचू शकते.\nतज्ञ सदस्य संसाधन डाउनलोड करा - फेसबुक जाहिरात मार्गदर्शक\nहे मार्गदर्शक आपल्याला नवीनतम अद्यतनांसह अद्ययावत करेल आणि आपल्याला शक्य तितके चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या Facebook जाहिरातीला सेट अप आणि अनुकूलित करण्याबद्दल व्यावहारिक सल्ला देईल. हे चांगले आणि गरीब सराव केलेल्या उदाहरणांची भरलेली आहे, ज्यामुळे आपण महागडी चुका टाळू शकता आणि Facebook वरून चांगले ROI मिळवू शकता.\nफेसबुक जाहिरात मार्गदर्शक प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR077.HTM?forcedownload", "date_download": "2018-04-23T11:16:09Z", "digest": "sha1:DK6QFFCOTZELEVGGOIQIOBFA6L5PQ4NS", "length": 4268, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "हावभाव शब्दसंग्रहच्या शिकणासाठी मदत करतात", "raw_content": "\nहावभाव शब्दसंग्रहच्या शिकणासाठी मदत करतात\nजेव्हा आपण शब्दसंग्रह शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूला भरपूर काम करावे लागते. प्रत्येक नवीन शब्द संग्रहित करणे आवश्यक आहे. पण आपण शिकण्यास आपल्या मेंदूस सहाय्य करू शकता. हे हातवारे वापरून शक्य आहे. हावभाव आपल्या स्मृतीस मदत देतात. एकाच वेळी हातवारे केले तर तो शब्द चांगला लक्षात ठेवू शकतो. अभ्यासात स्पष्टपणे हे सिद्ध केले आहे. संशोधकांना चाचणी विषयक अभ्यास शब्दसंग्रह होते. हे शब्द खरोखरच अस्तित्वात नाहीत. ते एका कृत्रिम भाषेशी संबंधित आहेत. काही शब्द संकेतांसह चाचणी विषयात शिकवले होते. असे म्हणायचे आहे कि, चाचणी विषय फक्त ऐकू किंवा शब्द वाचण्यासाठी नाहीत. हातवारे वापरून, ते शब्दांच्या अर्थांचे अनुकरण करतात. ते अभ्यास करत असताना, त्यांच्या मेंदूचे कार्य मोजले जायचे. संशोधकांनी प्रक्रियेत एक मनोरंजक शोध केला आहे. शब्द संकेतांसह शिकलो होतो, तेव्हा मेंदूच्या अधिक भागात सक्रिय होता. भाषण केंद्र व्यतिरिक्त, तसेच सेन्सो मोटारीक भागात वर्दळ झाली. हे अतिरिक्त मेंदूचे उपक्रम आपल्या स्मृतीवर परिणाम करतात. संकेतांसह शिक्षणात, जटिल नेटवर्क वाढते. हे नेटवर्क मेंदू मध्ये अनेक ठिकाणी नवीन शब्द जतन करते. शब्दसंग्रह अधिक कार्यक्षमतेने संस्कारित केला जाऊ शकतो. जेव्हा ठराविक शब्द वापरू इच्छित असू तेव्हा आपला मेंदू जलद त्यांना शोधतो. ते देखील चांगल्या पद्धतीने साठवले जातात. हे महत्वाचे आहे कि हावभाव शब्दांनशी संबद्धीत असतात. शब्द आणि हावभाव एकत्र नसतात तेव्हा आपला मेंदू लगेच ओळखतो. नवीन निष्कर्ष, नवीन अध्यापन पद्धती होऊ शकते. भाषा बद्दल थोडे माहित असलेले व्यक्ती अनेकदा हळूहळू शिकतात. कदाचित ते लवकर शिकतील जर त्यांनी शब्दांनचे अनुकरण शारीरिक दृष्ट्या केलेतर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-talk-about-minimum-support-price-6695", "date_download": "2018-04-23T11:31:54Z", "digest": "sha1:277DQJX5QNN5LK6RQ275RRJY5P332PWN", "length": 19533, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, talk about Minimum support Price | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 20 मार्च 2018\nशेतीमालाच्या भावात वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतीमालाची हमीभावाखाली खरेदी करणे फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल, त्यासाठी नवीन कायदा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी शेतकरी संपाच्या वेळी दिले होते. त्या संदर्भात पुढे काही हालचाल झालेली नाही.\nशेतीमालाच्या भावात वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतीमालाची हमीभावाखाली खरेदी करणे फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल, त्यासाठी नवीन कायदा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी शेतकरी संपाच्या वेळी दिले होते. त्या संदर्भात पुढे काही हालचाल झालेली नाही.\nवास्तविक कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना भाव मिळवून देणे व्यवहारात अशक्य आहे. सरकार एखाद्या पिकाचे हमीभाव जाहीर करते, याचा अर्थ बाजारातील दर त्याखाली गेल्यास सरकार खरेदी करेल, याची ती हमी असते. म्हणजे हमीभावाने खरेदी करणे ही सरकारची जबाबदारी असते. ती व्यापाऱ्यांवर ढकलण्यात काही मतलब नाही. सरकार हमीभावाने खरेदी करणारच नसेल, तर मग हमीभावाच्या संकल्पनेलाच काही अर्थ उरत नाही.\n- मागणी आणि पुरवठ्याच्या तत्त्वावर शेतीमालाच्या किमती ठरतात. व्यापारी नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसाय करत असतात. तसेच त्यांना राज्यातील आणि परदेशांतील व्यापाऱ्यांशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे बाजारात दर उतरले तरी केवळ सरकारच्या हट्टाखातर व्यापारी चढ्या भावाने खरेदी करणार नाहीत. सरकार व्यापाऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नका, असे बंधन घालू शकते, पण हमीभावाने खरेदी कराच, अशी सक्ती करू शकत नाही. खरेदीच करायची नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्यास सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करू शकत नाही.\n- प्रस्तावित कायदा लागू झाला तर इतर राज्यांतील व्यापारी महाराष्ट्रात शेतीमालाची विक्री करण्याचा धोका आहे. कापूस एकाधिकार योजनेत शेजारच्या कर्नाटक आणि गुजरातमधून सर्रास महाराष्ट्रात कापसाची विक्री केली जायची. तसेच हा कायदा जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) तत्त्वांविरुद्ध असल्याने केंद्र सरकार त्याला मान्यता देईल का, याविषयी शंका आहे. गेल्या वर्षी तूरडाळीचे दर वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डाळ दरनियंत्रण कायदा आणण्याची घोषणा केली. त्यानुसार विधिमंडळात विधेयकही मंजूर झाले. परंतु राष्ट्रपतींनी ते परत पाठवले.\n- सध्याही हमीभावाच्या खाली शेतीमाल खरेदी करणे गुन्हा आहेच; पण प्रस्तावित कायद्यानुसार तो फौजदारी गुन्हा ठरणार आहे. सध्याच्या कायद्याचीही प्रत्यक्षात व्यावहारिक कारणांमुळे अंमलबजावणी होत नसताना नवीन कायद्याचा घाट घालण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण होतो. तसेच किमान आधारभूत किंमत ही फक्त फेअर ॲव्हरेज क्वालिटी (FAQ) मालासाठी लागू असते. त्यामुळे नवीन कायदा करून काहीच फरक पडणार नाही. कारण त्या स्थितीत व्यापारी शेतकऱ्यांचा माल NON FAQ म्हणून खरेदी करतील त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काही कारवाई करता येणार नाही. फक्त खरेदीच्या पावतीवर NON FAQ ही पाच अक्षरे लिहिली की व्यापारी कितीही कमी दराने माल खरेदी करू शकतील. त्यामुळे नवीन कायदा ही धूळफेकच ठरेल आणि हा कायदा लागू झालाच तर व्यापारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना गैरकारभारासाठी नवीन कुरण उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कायद्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता धूसरच आहे.\nरसोडीचे धोरण मागच्या पानावरून पुढे\nगेल्या हंगामात (२०१६-१७) आधारभूत किमतीने तूर खरेदीचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, पुढील हंगामात येणारा शेतीमाल व त्याची शासनाकडून होणारी खरेदी याचे धोरण हंगामापूर्वीच ठरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगाव येथे केली होती. परंतु प्रत्यक्षात ही घोषणा कागदावरच राहिली. त्यामुळे सरकारी खरेदीविषयीचे धरसोडीचे धोरण मागच्या पानावरून पुढे चालू राहिल्याचे दिसते.\nशेती हमीभाव minimum support price मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis शेतकरी संप संप सरकार government व्यापार व्यवसाय profession महाराष्ट्र कापूस कर्नाटक तूर डाळ जळगाव\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nलाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/IPL.html", "date_download": "2018-04-23T11:55:18Z", "digest": "sha1:SF6GO47MY4W4WZDNK5DOF77VRTCQ7CTF", "length": 6766, "nlines": 90, "source_domain": "zeenews.india.com", "title": "#ipl - Latest News on #ipl | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nविराट कोहलीने मॅच रेफ्रीला ऐकवलं\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये अधिकाऱ्याला शुन्यावर आऊट झाल्यानंतर चांगलंच सुनावलं.\nधोनीच्या धमाकेदार खेळीवर बोलला विराट कोहली\nशनिवारी हैदराबादमध्ये महेंद्र सिंह धोनीची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. त्यामुळे पुणे सुपरजायंटने सनराइजर्स हैदराबादवर विजय मिळवला. धोनीने 34 बॉलमध्ये पांच चौकार आणि तीन सिक्सच्या मदतीने नाबाद ६१ रन केले.\nधोनीच्या खराब प्रदर्शनवर बोलला स्मिथ\nआयपीएल 10 मध्ये आतापर्यंत ५ पैकी २ सामन्यांमध्येच पुणे संघ विजय मिळवू शकला आहे. गुण यादीत त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमाकांवर आहेत.\nधोनीने लगावला आयपीएल १० मधील सर्वात उंच सिक्स\nरायजिंग पुणे सुपरजाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यामध्ये लोकांचे पैसे वसूल झाले. धोनीने आयपीएल सीजन १० मधला सर्वात मोठा सिक्स या मॅचमध्ये लगावला.\nपुणे विरुद्ध पंजाब सामन्यात डीएससी प्लेअर्सचा बोलबाला\n६ विकेट्स राखून पंजाबने विजय मिळवला.\n...तर चेन्नई महेंद्रसिंग धोनीला मुकणार\nआयपीएलमधील अनेक टीम्सना आयपीएलच्या लिलावाच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल हवे आहेत. जर बीसीसीआयने ही मागणी मान्य केली तर अनेक दिग्गज खेळाडू २०१७ च्या आयपीएलमध्ये वेगळ्या टीम्समध्ये खेळताना दिसतील.\nदिल्ली vs हैदराबाद स्कोअरकार्ड\nदिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे.\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\nनिरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे : चांगल्या झोपेकरता काही खास टीप्स\nमुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nसांगलीच्या राजकारणाला नवे वळण, जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-04-23T11:48:58Z", "digest": "sha1:ZW653UN3ZYRTO4XCXRHXXTMMXADSQHRS", "length": 4696, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७१० मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १७१० मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १७१०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७१० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-04-23T11:51:24Z", "digest": "sha1:VI7Q75TZODHX3B7HWVJV2YEWBKTEM7EG", "length": 12676, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्वास (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nश्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वास ला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.\nनातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे.\nअश्विन चितळे (परशुराम विचारे , रेतीनल कॅन्सर ग्रस्त मुलगा )\nअरुण नलावडे (परशुराम चे आजोबा , जे त्याला मुंबई ला उपचारासाठी नेतात)\nसंदीप कुलकर्णी (डॉक्टर मिलिंद साने , परशुराम वर उपचार करणारे वैद्य)\nअमृता सुभाष (आसावरी , वैद्यकीय समाजसेविका जी आजोबा व मुलगा यांच्यात सांगड घालते. )\nगणेश मांजरेकर (दिवाकर , परशुराम चे काका)\nअश्विनी गिरी (परशुराम ची गावातील आई)\n७७ व्या अकॅडमी अवार्ड्‌सकरिता भारतातर्फे अधिकृत सहभाग\nमहाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४\nमहाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार २००४\nकै. बाळासाहेब सरपोतदार चित्रगौरव पुरस्कार २००४\nसंस्कृति कलादर्पण पुरस्कार २००४\nमहाराष्ट्र टाईम्स सन्मान २००४\nख़ास ज्यूरी पुरस्कार: सर्वोत्तम बाल कलाकार\nअल्फा गौरव पुरस्कार २००४\nआजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट\nश्यामची आई (१९५४) · मिर्झा गालिब (१९५५) · पाथेर पांचाली (१९५६) · काबूलीवाला (१९५७) · दो आँखे बारा हात (१९५८) · सागर संगमे (१९५९) · अपूर संसार (१९६०)\nअनुराधा (१९६१) · भगिनी निवेदीता (१९६२) · दादा ठाकूर (१९६३) · शहर और सपना (१९६४) · चारूलता (१९६५) · चेम्मीन (१९६६) · तीसरी कसम (१९६७) · हटे बझारे (१९६८) · गोपी गय्ने बाघा बय्ने (१९६९) · भुवन शोम (१९७०) · संस्कार (१९७१) · सीमाबद्ध (१९७२) · स्वयमवरम्‌ (१९७३) · निर्माल्यम‌‍ (१९७४) · कोरस (१९७५) · चोमना दुढी (१९७६) · मृग्या (१९७७) · घटश्रध्दा (१९७८) · पुरस्कार नाही (१९७९) · शोध (१९८०)\nअकालेर संधाने (१९८१) · ढकल (१९८२) · चोख (१९८३) · आदि शंकराचार्य (१९८४) · दामुल (१९८५) · चिदंबरम (१९८६) · तबराना कथे (१९८७) · हलोधिया चोराए बओधन खाई (१९८८) · पिरावी (१९८९) · बाघ बहादुर (१९९०) · मरुपक्कम (१९९१) · आगंतुक (१९९२) · भगवत गीता (१९९३) · चराचर (१९९४) · उनीशे एप्रिल (१९९५) · कथापुरुशन्‌ (१९९६) · लाल दर्जा (१९९७) · थायी साहेबा (१९९८) · समर (१९९९) · वाणप्रस्थम (२०००)\nशांतम्‌ (२००१) · द्वीपा (२००२) · मोन्डो मेयेर उपख्यान (२००३) · श्वास (२००४) · पेज थ्री (२००५) · कालपुरुष (२००६) · पुलिजन्मम्‌ (२००७)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१७ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2017/12/15/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-2/", "date_download": "2018-04-23T11:11:28Z", "digest": "sha1:6VTJO3QIR56OC5BWYYKW36WDW2ATBMCK", "length": 19018, "nlines": 213, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "पुस्तक | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nमुलगी आपल्या वडिलांबरोबर बोलत बसलेली असताना अचानक तिचा मित्र तिथे आला.\n“तू लॉरेंज फ्लॅमिनचं ‘DADDY IS HOME’ हे पुस्तक न्यायला आला आहेस का ” तिनं त्याला विचारलं.\n“नाही नाही, रॉबिन क्लामिननं लिहिलेलं ‘WHERE SHOULD I WAIT FOR YOU’ हे पुस्तक न्यायला आलोय”, तो म्हणाला.\n“सॉरी, हे पुुस्तक माझ्याकडे नाही. पण तुला अमर श्रीवास्तव यांचं “UNDER THE MANGO TREE’ हे पुस्तक हवं असेल तर घेऊन जा”, ती म्हणाली.\n“ठीक आहे, तू कॉलेजला जाताना Retail Management Guide चं ‘CALL YOU IN FIVE MINUTES’ हे पुस्तक आणायला विसरू नकोस” त्यानं बजावून सांगितलं.\n मी कॉलेजला जाताना ‘I WONT LET YOU DOWN’ हे पुस्तकही घेऊन येईन”, तिनं निक्षून सांगितलं.\nमित्र निघून गेल्यावर तिचे वडील तिला म्हणाले,” हा मुलगा इतकी पुस्तकं कशी काय वाचणार आहे \n“बाबा, हा अतिशय स्मार्ट, बुद्धिमान आणि हुशार मुलगा आहे”, ती म्हणाली.\n” ठीक आहे, ठीक आहे ; पण त्याला मायकल क्रूजचं ‘OLD MEN ARE NOT STUPID’ हे पुस्तक द्यायला मात्र विसरू नकोस हं ” बाबा वृत्तपत्र वाचता वाचता म्हणाले.\nआपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर http://www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:37:21Z", "digest": "sha1:CBLOWYWJZJI536ULCFL5FOAZ4MWNHT7R", "length": 8691, "nlines": 141, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: बझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)", "raw_content": "\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\nदेवकाका - प्रकाशक होतील\nसुझे - साखि विकेल (हॉटेलात बसून... सायकल वर नव्हे ;) ))))\nदे.गा. - शिक्षक होतील\nविभि - पिझ्झा हट मध्ये काम करेल.. आणि हो मस्का सुद्धा विकेल.. ;)\nआप - बिर्याणी बनवेल.. आपोळी नावाचा असह्य प्रकार सुद्धा करेल ;)\nदीप - चारोळीकार बनेल.. (सगळ्या चारोळ्या एका कॅफेमध्ये सुचतिल.. योगायोग बरं केवळ)\nसपा - घर शोधुन देईल लोकांना .. (ब्रोकर) ;)\nदेचु - गुजरात बॉर्डरवर तस्करी ;)\nमहेंद्रकाका - कॉलमनिस्ट बनतील\nयोमुं - बेकरी उघडेल\nआका - सिंहगडावर धुक्यात हरवणार्‍यांना रस्ता सापडून देईल\nश्रेता - बॅटींग कोच (षटकार स्पेशलिस्ट) ;)\nसाबा - इन्स्टॉलेशन्स और क्या...\nहेरंब - गावाच्या पंचायतीत न्याय निवाडा करेल ;) (त्यातही पार्टटाईम मॅगी वडे तळून देईल ;) )\nमीनल - कोल्हापुरी चपलांचं दुकान उघडेल ;)\nतन्वीताई - ब्लॉगवरच्या विचित्र निनावी अन खोट्या कॉमेंट्स हँडल करण्यात मदत करेल... :P (साभार विभि)\nकांचनताई - डिटेक्टिव्ह ;) (साभार देचु)\nसिद्धार्थ - हापूस विकेल... सोबत बीएसएनएलचं ब्रॉडबॅण्डचा ब्रॅण्ड ऍंबासिडर ;) (साभार सुझे..)\nश्रीताई - वूलन (स्वेटर्स स्पेशलिस्ट) (साभार देचु)\nअनुजा पडसलगीकर - मस्कत डिस्कव्हरी चॅनल CEO\nअपर्णा संखे - रेफ्री, अंपायर, (दीप, सुझे), अपर्णा 'गाणी आणि आठवणी' हा रंगारंग कार्यक्रम रेडीओ वर करेल ;)\nभामुं - लाल टोप्या विकणार ... :D आणि पार्ट टाईम ओरिगामी क्लासेस....\nअनुजा सावे - फूड इनस्पेक्टर ;)\nरोहन चौधरी - ट्रेकिंग एक्स्पर्ट ऍड्व्हाईस ;)\nअल्टरनेट नाय रे.. हे खरेखुरे बिझनेस आहेत ;)\nहाहाहा... खरंच एक-सो-एक भन्नाट बिझनेस आहेत :D\nहे खरेखुरे बिझनेस आहेत ;) +१\nअन अल्टरनेट हाफ़िसात काम करतात.\nहापिसात आणि घरी काम करता करता बझवर हे बिझनेस करतात आणि डॉ. आनंद त्यावर पीएचडी करुन बसलेत.....\nदोन पिढ्या आधी जन्माला आला असतात तर आज मोठ मोठे बिजनेसमन मराठी असते. असो, तुमच्यामुळे आम्हाला धंद्याची लाईन कळली. हापूसचा सीजन जवळ आलाय म्हणून हल्ली रोज राजीनामा द्यावा अशी इच्छा वरचेवर होते.\nहो ना सौरभ.. तूलाही तुझी चॉईस करायची आहे .. नक्की सांग लवकर.... ;)\nहाहा यवगेश.. ऑफिसात कामं करतात काय\nडॉक्टरेट केली आहे बझ आणि ब्लॉग्सवर ;) धन्स अपर्णा\nहाहा सिद्धार्थ.. टायमिंग परत चुकली रे ;)\nआनंदा, मार्च पासून घरात जरा जास्तच गडबड सुरू असल्याने जालावर वावर कमी झालाय रे. :( तुझा हा ब्लॉग मला आज कळतोय. छे हे काही बरं नाही. माफी\n एकेकाला बरोब्बर हेरलं आहेस तू. बाकी योमू + १००... :D\nहे काय श्रीताई, माफी वगैरे काय\nतुझं ब्लॉगवर स्वागत... हा आधी एक बझ होता.. सर्वांना आवडला म्हणून ब्लॉगवर टाकला :)\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/687/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T11:34:23Z", "digest": "sha1:PYID2HCUEQLR7SFRPGPSVHDYR42QYAXU", "length": 8373, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआदिवासी विकासासाठी आघाडी सरकारने आणलेल्या योजना आज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत – चित्रा वाघ\nनंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आदिवासी विकासासाठी ज्या ज्या योजना आघाडी सरकारने केल्या होत्या, त्या योजना सरकारतर्फे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोप केला. भाजपने मोठा गाजावाजा करत अब्दुल कलाम अमृत आहार योजना बनवली. पण ज्या महान व्यक्तीचे नाव योजनेला दिले, त्या नावाला साजेसे असे काम होत नाही, अशा शब्दांत टीका केली.\nया मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रवक्ता सेल राज्यप्रमुख प्रदिप सोळुंखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित, माजी आमदार शरदकुमार गावित, नंदुरबार जिल्हा प्रभारी उमेश पाटील, सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख आमदार अॅड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.\nमंजुळा शेट्ये प्रकरणी काय करत आहेत रणजित पाटील आणि मुख्यमंत्री – चित्रा वाघ ...\nपिंपरी-चिंचवड शहरात आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. मंजुळा शेटये हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. काय करत आहे रणजित पाटील, काय करतायत मुख्यमंत्री रणजित पाटलांचे वडील तर निष्पाप कर्मचाऱ्यांना मारत फिरत आहे. आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. गृहमंत्र्यांच्या वडिलांसाठी वेगळा न्याय आहे का रणजित पाटलांचे वडील तर निष्पाप कर्मचाऱ्यांना मारत फिरत आहे. आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. गृहमंत्र्यांच्या वडिलांसाठी वेगळा न्याय आहे का सरकार काय झोपलं ...\nकुपोषण रोखण्याकरिता बनवलेली योजनाच कुपोषित - चित्रा वाघ ...\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी सर्वप्रथम नंदूरबार जिल्ह्याला भेट दिली. कुपोषण हा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांपैकी एक मोठा प्रश्न असून कुपोषण रोखण्याकरिता बनवलेली योजनाच कुपोषणग्रस्त झालेली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यातील अशा प्रत्येक कुपोषणग्रस्त जिल्ह्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवण्याचे काम यापुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष करणा ...\nसुनिल तटकरे व अजित पवार यांच्या राज्य दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यास रत्नागिरीपासून सुरूवात ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज रत्नागिरी येथे झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे तसेच मागचे विसरुन नव्या जोमाने पुढील तयारीला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-residue-free-pomegranate-has-demand-worldwide-6672?tid=124", "date_download": "2018-04-23T11:33:07Z", "digest": "sha1:7QIS5PDIODHQ72J66UAFFFGQ3GEHNQ77", "length": 20963, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Residue free pomegranate has demand worldwide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणी\nजगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणी\nसोमवार, 19 मार्च 2018\n‘असुरक्षित’ डाळिंब : भाग ३\nपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य देशांनीही रसायनांच्या आपल्या स्वतंत्र ‘एमआरएल’ (कमाल अवशेष मर्यादा) व नवे निकष लागू करण्यास सुरवात केली अाहे. त्यादृष्टीने निर्यातीचा आलेख उंचावण्याबरोबर परदेशी व भारतीय बाजारपेठेलाही अवशेषमुक्त माल देण्यासाठी डाळिंब उद्योग सर्वपरीने सज्ज असण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nद्राक्षांप्रमाणेच देशात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. ग्रेपनेटच्या धर्तीवर ‘अनारनेट’ प्रणाली अस्तित्त्वात आल्यानंतर डाळिंबाच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू लागली आहे. फलोत्पादन विभागाचे तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी निर्यातीविषयी दिलेल्या माहितीनुसार देशात डाळिंबाखालील क्षेत्र सुमारे एक लाख ६० हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा म्हणजे सुमारे एक लाख आठ हजार हेक्टरपर्यंत आहे. ते म्हणाले, की महाराष्ट्रात डाळिंबाचे क्षेत्र अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असले तरी अन्य राज्यांतही डाळिंबाचे क्षेत्र वाढू लागले आहे, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. यात कर्नाटक, गुजरात आदी राज्यांचा समावेश आहे.\nडाळिंब पिकांतील ‘लेबल क्लेम’च्या अनुषंगाने बोलताना हांडे म्हणाले, की पूर्वी द्राक्ष पिकातही लेबल क्लेम रसायनांची संख्या कमी होती. मात्र, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत गेली. आज आपले द्राक्षनिर्यातीचे चित्र समाधानकारक आहे, तसेच डाळिंबातही होईल. अनारनेट प्रणाली सुरू झाल्याने त्याला अधिक गती येईल. रशिया, चीन, दुबई, मलेशिया आदी देशांनी आपल्या स्वतंत्र ‘एमआरएल’विषयी भारताला कळविले आहे. अजून त्यांचे हे नियम बंधनकारक झाले नसले तरी येत्या काळात त्याची अंमलबजावणी ते केव्हाही करू शकतात, त्या दृष्टीने आपण मात्र सज्ज राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने विविध कीडनाशकांच्या पीएचआय व एमआरएल या अनुषंगाने चाचण्या घेऊन त्यांचा डाटा अधिकाधिक उपलब्ध करीत नेल्यास शेतकऱ्यांना व एकूणच डाळिंब उद्योगाला त्याचा निश्चित फायदा होईल, त्यातून लेबल क्लेमयुक्त रसायनांची संख्या वाढण्यास मदत होईल.\nआयातदार देशांच्या गरजेनुसारच कीडनाशकांचा वापर\n‘केबी एक्स्पोर्ट’ या निर्यातदार कंपनीचे सरव्यवस्थापक सचिन यादव म्हणाले, की डाळिंब निर्यात करण्यापूर्वी संबंधित खरेदीदाराकडून आम्ही वापरत असलेल्या कीडनाशकांची विचारणा होते, तशी यादी आम्ही पाठवतो. खरेदीदारांकडून लेबल क्लेमला पहिले प्राधान्य असते. ते नसल्यास अधिकृत तज्ज्ञांची म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची शिफारस विचारात घेतली जाते. या केंद्राने युरोपाकडून संमती मिळू शकणाऱ्या कीडनाशकांच्या वापराची ‘ॲडहोक’ यादी पीएचआय व एमआरएल यांच्यासहित तयार केली आहे, त्यांचाही आम्ही आधार घेतो. खरेदीदाराने लादलेल्या अटी वा नियम पाहूनच आम्ही कीडनाशकांचा वापर करतो.\nपुणे येथील प्रयोगशील द्राक्ष व डाळिंब बागायतदार प्रकाश बाफना म्हणाले की रासायनिक अवशेषमुक्त माल, ‘लेबल क्लेम’ हे विषय आमच्यादृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत. केवळ निर्यातीसाठीच नव्हे तर स्थानिक बाजारपेठेचा विचारही त्यात आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील हवामानात मोठी विविधता आहे. इथे बाराही महिने व विविध हंगामांत डाळिंबाची बाग उभी असते. साहजिकच किडी-रोग व फवारण्यांची समस्याही व्यापक असते. या सर्व बाबींचा विचार करून कीडनाशकांच्या ‘एमआरएल’ निश्चित करायला हव्यात. स्पेनमध्ये एका कीटकनाशकाची डाळिंबातील ‘एमआरएल’ अत्यंत कमी होती. त्यांनी संबंधित कीटकनाशकाच्या आरोग्यविषयक सुरक्षितचेचे सविस्तर तांत्रिक तपशील दिल्यानंतर ही एमआरएल वाढवून देण्यात आली. असे काम भारतात होणे अपेक्षित आहे.\nवर्ष संख्यात्मक (टन) रुपयांमध्ये\n२०१४-१५ २०,९९७ ३२३ कोटी\n२०१५-१६ ४४,७२२ ४५७ कोटी\n२०१६-१७ ४९,८५२ ४९१ कोटी\nभारताचे मुख्य डाळिंब आयातदार देश\n१ हजार टनांपेक्षा अधिक निर्यात ज्यांना होते असे देश : नेदरलॅंड, संयुक्त अरब अमिरात, बांगला देश, नेपाळ, सौदी अरब, कुवेत\nइंग्लंड हा देखील महत्त्वाचा देश. सुमारे ४०० टनांची निर्यात तेथे होते.\nया व्यतिरिक्त जर्मनी, फ्रान्स, रशिया, आयर्लंड, बेल्जियम, बहारीन या देशांचे महत्त्वही भारतीय डाळिंबाच्या निर्यातीच्या दृष्टीने दुर्लक्षून चालणार नाही.\nजगातील मुख्य डाळिंब उत्पादक देशांमध्ये भारत, इराण, स्पेन, तुर्कस्थान व अफगणिस्तान यांचा समावेश\nयात उत्पादनाच्या अनुषंगाने भारताचा वाटा सुमारे ४६ टक्के, तर इराणचा वाटा सुमारे ३७ टक्के\nस्पेनचे उत्पादन या तुलनेत कमी असले तरी निर्यातीत त्यांचा वाटा मात्र लक्षणीय\nपुणे भारत डाळ डाळिंब द्राक्ष महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मलेशिया हवामान कीटकनाशक इंग्लंड आयर्लंड\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nलाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://esamarth.blogspot.com/2010/", "date_download": "2018-04-23T11:06:47Z", "digest": "sha1:R655O4HXAM4OI75XVDA4UOJXV4CPICDI", "length": 9359, "nlines": 54, "source_domain": "esamarth.blogspot.com", "title": "चल, तुला एक गंमत सांगतो!: 2010", "raw_content": "चल, तुला एक गंमत सांगतो\nशालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने, अनेक मित्रांनी माझ्या आंग्ल-भाषा कौशल्याविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते. तथापि वासरात लंगड़ी गाय शहाणी या उक्तिनुसार, घरातील हुशार मुलगा म्हणून मला घरी आलेल्या अतिथिसमोर उभे करून अल्फाबेट्स इत्यादि म्हणून दाखव असे म्हटले जायचे.\nविचारणारा अतिथि पण आंग्ल-भाषा कौशल्यात माझ्या इतकात निपुण असल्यामुले तो फारफार झालेच तर WHAT IS YOUR NAME असे विचारायचा .\n\"माय नेम इज रमण ... लक्ष्मीरमण \" असे तेव्हापासून म्हणावयाची सवय लागली.\nआमच्या या बौद्धिक मालमत्तेचे निंद्य चौर्यकर्म करून टिमोथी डाल्टन आणि राजर मुर सारख्या अनेकांनी पोट भरले. पण असो...\nआमचे शाळामास्तर प्राचीन समयी रसायनशास्त्र शिकवताना BOND साठी बंडू हा शब्दप्रयोग करत असत.\nत्यांच्या असल्या पीजे प्रकारातील विनोदावर आम्ही हसावे असा त्यांचा दुराग्रह असे. काही कार्यकर्ता छाप विद्यार्थी, त्यांना खुश करण्यासाठी तसे करत असत.आम्ही मात्र त्यांची उत्तम मजा करत असू.\nमला काही मित्र त्यांची नक्कल करावयास सांगत असत.\nमाय नेम इज बंडू .. कोव्हालेंट बंडू ... असे एकदा मी म्हणत होतो.\nते म्हणताना त्यांनी ऐकलं आणि ते प्रचंड तापले होते...\nतात्पर्य हे की तेव्हापासून \"माय नेम इज -पुढे काहीही असो \" त्याच्या वाटेस गेलो नाही.\nआजकाल \"माय नेम इज MAN , COMMON MAN असे म्हणत असतो.\nमहंगाई मार गयी ...\nतसे हे गाणे १९७४ सालचे असले तरीही आजपर्यंत या गाण्याने आपले स्वत्व जपले आहे.\nआम्ही सोशल आज्ज्जिबाऽऽऽत नाही आहोत ...\nत्यामुळे नुतन वर्षाच्या आरंभी आम्हाला हॅप्पी हॅप्पी असे वाटत नाही म्हणजे आनंद आजिबात होत नाही.\nकधीकाळी मराठी सारस्वताने तरूणांना पेर्ते व्हा अशी ओजस्वी हाक दिली होती तद्वतच आमच्या अनेक हितचिंतकांनी आम्हाला सोशल व्हा आणि एखादा घोट घ्या अशी भावनिक साद घातली पण छ्याऽऽऽ...\nतो पदार्थ नाहीऽऽऽऽ..त्रिवार नाहीऽऽऽऽ \nशाळेत कधीकाळी हिंदीचे अध्यापन करणारे आमचे गुरुजी यानिमित्ताने अचानक आठवले.\nहिंदी शिकवित असताना कुठल्यातरी एका पाठात दवा-दारू हा शब्द आल्यामुळे आमचे बालसुलभ कुतुहल जागे झाले आणि विनाविलंब अध्यापकास आम्ही या शब्दातील दारू या शब्दाचे प्रयोजन काय असावे असा खर्डा सवाल केला.\nआणि मग आमच्या मास्तरांनी आमच्या जिज्ञासू आणि विजिगिषु प्रवॄत्तीवर (आणि त्यासोबत पाठीवरदेखील ) संस्मरणीय असे प्रहार केले.\nत्यावेळी शैक्षणिक जाणीवांचा यथायोग्य विकास झाला नव्हता हे आमच्यासारख्या घोर अडाण्यास-सुद्धा कबूल करावे लागेल. .\nमास्तरांचे जावू द्या हो..\nपण आमच्या जिज्ञासेची दिशा पाहून तीर्थरूप सुद्धा तापले होते.\nया बालसंस्कारांचा असा सुरेख परिणाम झाला की पुढे महाविद्यालयातसुद्धा फ़र्मेंटेशन किंवा अल्कोहल इत्यादि पाठांना आजिबात उघडूनसुद्धा पाहिले नाही. प्रसंगी चार मार्क कमी पडले तरी बेहत्तर पण दारू अथवा मद्य अथवा अल्कोहल या शब्दांचासुद्धा वास नको असे वाटु लागले.\nप्रंतु याच त्या दरिद्री आणि दळभद्री मानसिकतेने आमचे पाऽऽऽऽर वाटोळे केले. आम्हांस अगदी ऍंटीसोशल करून टाकले. आता मात्र आम्ही बदलणार.\nसंस्कारांची उसळी जरी आली तरी या जाहिरातीतील ( निरमा या शब्दाने जसे पाणी अलगद थांबते तसे आम्ही आमच्या विचारांस तेथल्या तेथेच दाबून ठेवणार.\nधान्यापासून काय काय बनवता येईल आणि त्यामुळे या देशात पुरोगामीपणाचे वारे वाहू लागतील असा विचार करणारे नेते या देशाचे भूषण आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकेका जिल्ह्यात झालेल्या मद्यविक्रीचे प्रमाण पहाता \"सबसे आगे होंगे हिंदुस्तानी \" असे म्हणण्यास वाईट वाटू नये.\nवीज नसल्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. पाणी प्यायला मिळाले नाहीतर कुठे बिघडले सतरंज्या उचलणा-या आणि उच्छाद मांडणा-या कार्यकर्त्यांचे पीक उदंड येवो आणि त्यांच्या दारूची सोय होवो हा आमचा प्रामुख्याने अजेंडा असला पाहिजे.\nखरंय आपण एकविसाव्या शतकाकडे झपाट्‍याने चाल्लो आहोत.\nहॅप्पी जर्नी.. सी या..\nमहंगाई मार गयी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.onkardanke.com/2009/05/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T11:21:56Z", "digest": "sha1:O6PFLZN5FKXCXUEEQWHVI4V2AJ3U54ON", "length": 21502, "nlines": 136, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: आयपीएल धमाका", "raw_content": "\nआयपीएल ही क्रिकेट जगतामधली एक सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धेची दुसरी आवृत्ती आता पार पडलीय. 'इंडियन प्रिमियर लीग' स्पर्धा अनेक वादविवाद उलट-सुलट चर्चेनंतर दक्षिण अफ्रिकेत पार पडली.या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी नऊ हजार कोटी रुपये मोजले गेले होते. जगातल्या सर्वात मोठय़ा सिनेसृष्टीतले दोन सुपरस्टार्स, जगातल्या सर्वात मोठय़ा मद्य उत्पादकांपैकी एक उद्योगपती, जगातल्या सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपन्यांपैकी एका कंपनीचा मालक अशी वजनदार मंडळी गुंतलेली आहेत.त्याचप्रमाणे जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटमंडळाच्या सर्वात महत्वकांक्षी व्यक्तीची ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा पार पडणार हे नक्की होत.या स्पर्धेमध्ये क्रिकेटबाहेरचे अनेक गोष्टींना कमालीचे महत्व होते.त्याची चर्चाही झाली.परंतु प्रत्यक्ष मैदानावर खेळ करत असताना मात्र केवळ क्रिकेटच्याच कौशल्यांना अजुन महत्व आहे.त्यामुळेच अस्सल क्रिकेटपडूंचं नाण या स्पर्धेत खणखणीत वाजलं.\nटी -२० हे केवळ युवा क्रिकेटपटूंसाठीच असते या गृहितकाला यंदाच्या स्पर्धेत जोरदार तडा गेलाय.या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला त्या गिलख्रिस्टचे वय आहे 37.अंतिम सामन्याचा मानकरी आणि संपूर्ण स्पर्धेत ज्यानं अत्यंत जिगरबाज खेळ केला तो अनिल कुंबळे आहे 38 वर्षाचा..तर या स्पर्धेत ज्यानं सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली तो मॅथ्यू हेडन आहे 37 चा.या तिन्ही खेळांडूंना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता केंव्हाच सिद्ध केलीय.किंबहूना सर्व प्रकारची आव्हान यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांनी निवृत्ती स्विकारली. या खेळाडूंना आता कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे उरलेले नाही.तरीही या तिघांनी तरुणांना लाजवेल असा खेळ केला.\nगुणवत्ता ही जर अस्सल असेल तर ती कालातीत असते.एखादा क्रिकेटपटू वयस्कर झाला की त्याची विनाकारण थट्टा करण्याचा ट्रेंडचं बनलाय.दर्जेदार खेळाडूंना T-20 चे कारण देत पेन्शनीत काढणा-या सर्व क्रिकेटतज्ज्ञ आणि काही खेळाडूंना या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सणसणीत चपराक दिलीय.\nयंदाचे आयपीएल हे भारताच्या बाहेर खेळवले गेले. अफ्रिकेत भारताप्रमाणे पाटा खेळपट्टी नाहीत.त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातला चांगला संघर्ष या स्पर्धेत पाहायला मिळालाय.संपूर्ण स्पर्धेत 200 ची धावसंख्या केवळ एकदाच राजस्थान रॉयल्सने पार केली.केवळ दोनच शतकं नोंदवले गेले. भारतीय खेळपट्ट्यावर खो-याने धावा काढणारे या स्पर्धेत अपयशी ठरले. भारतीय सुवा खेळाडूंनीही या स्पर्धेमधून ब-याच काही गोष्टी शिकल्या असतील.\nराजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या स्पर्धेत सर्वांनाच चकीत केलं होतं.यंदाही त्यांनी झुंजार वृत्ती जिवंत असल्याचं सिद्ध केलंय.राजस्थानकडे त्यांच्या हंगामातले सर्वात यशस्वी खेळाडू सोहल तन्वीर आणि शेन वॉटसन नव्हते.काही खेळाडू जखमी झाले,कमरान खान पकंज सिंगच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केल्या गेल्या.तरीही शेन वॉर्नचा हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम होता.काही मोजक्या गोष्टी सुधारल्या तर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार बनू शकेल.\nकोलकता आणि मुंबई या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे एक दुस्वप्नचं ठरलं.कोलकता संघ मैदानाबाहेरच्या गोष्टीमुळेच अधिक अडचणीत आला.मल्टीपल कॅप्टन्सचा वाद,सौरव दादाची कर्णधारपदावरुन केलेली हाकालपट्टी,'भू-खा-नन' चे अनाकलनीय डावपेच आणि फेक ब्लॉगरचा पाठलाग यामुळे हा संघ अगदी रसातळाला गेला.संपूर्ण स्पर्धेत हा संघ केवळ हरण्यासाठीच खेळत होता.विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले. मुंबई इंडियन्सचे सारेच डावपेच अनाकलनीय होते.सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे.परंतु त्याला कर्णधार पदाचा भार पेलवत नाही...ही बाब या स्पर्धेत पुन्हा एकदा सिद्ध झाली.फलंदाजीच्या क्रमावारीत होणारा बदल,झहीरची दुखापत,हरभजनच्या भूमिकेबाबत गोंधळ ,जयसूर्याचा हरवलेला फॉर्म,सचिनच्या बॅटमधला चढ-उतार या बाबी संघाला सातव्या क्रमांकावर घेऊन गेल्या. युवराजच्या लहरी फलंदाजी प्रमाणेच पंजाबचा खेळ या स्पर्धेत राहीला.या संघानं शेवटपर्यंत झूंज दिली.परंतू शॉन मार्शची अनुपस्थिती आणि जयवर्धेनेला अत्यंत महत्वाच्या क्षणी झालेली दुखापत यामुळे हा संघ यंदा उपांत्य फेरी गाठू शकला नाही.\nदिल्ली आणि चेन्नई हे या स्पर्धेतले सर्वात संतुलीत संघ होते.भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे योग्य मिश्रण या संघात आहे.दिल्लीनं साखळी सामन्यात अत्यंत धडाकेबाज पद्धतीनं खेळ केला.नेहरानं या स्पर्धेत शानदार कमबॅक केलं.डिव्हीलीयर्स-दिलशान जोडूनं जबाबदार खेळं केला.कार्तिक- भाटीया-संगवान या युवा भारतीय खेळाडूंनीही दिल्लीला विजय मिळवून दिले.गिलख्रिस्टच्या जबरदस्त खेळीमुळे दिल्ली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.परंतु संपूर्ण स्पर्धेत ग्लेन मॅग्राला बेंचवर बसवण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.विशेषत: विजेतेपदाच्या जवळ येऊन दिल्ली संघ पराभूत झाला.त्यामुळे मॅग्राला न खेळवण्याची सल सेहवागला जाणवत राहील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा चेन्नईला भोवला.सोपे झेल सोडण्याबाबत चेन्नईची कोलकताशी जणू काही स्पर्धाच सुरु होती.तर मुरलीधरन वगळता प्रमुख गोलंदांमध्ये कोणतीच शिस्तबद्धता नव्हती.कोलकत्ता नाईट रायडर या स्पर्धेतल्या सर्वात दुबळ्या संघाविरुद्ध चेन्नईचे गोलंदाज 188 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.धोनीने गोलंदाजीमध्ये काही कल्पक बदल केले.परंतु त्याच्यामधला विध्वसंक फलंदाज गेल्या काही काळात संपूर्णपणे लोप पावलाय.उंपात्य सामन्यात तर धोनीच्या संथ खेळामुळेच चेन्नईच्या वेगाला खिळ बसली.हाच महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार आहे.T-20 विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असताना धोनीचा हा खराब फॉर्मची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. एक कल्पक कर्णधार या एकमेव निकषाच्या जोरावर महेंद्र सिंग धोनी ही विश्वचषक स्पर्धा खेळेल.अशीच चिन्ह आहेत.त्यामुळे कर्णधार पदासाठी धोनीचा समर्थ पर्याय आपण लवकरचं शोधायला हवा.\nडेक्कन आणि बंगळूरु या संघाने या स्पर्धेत अगदी फिनीक्स भरारी घेतली.डेक्कनने सलग चार विजय मिळवत शानदार सुरवात केली.मधल्या काळात हा संघ ढेपाळला.परंतु गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या झंझावाताला डेक्कनच्या युवा फलंदाजांनीही साथ दिली.या स्पर्धेचा पर्पल कॅप विजेता आर.पी.सिंग डेक्कनचाच.संपूर्ण स्पर्धेत त्यानं सातत्यपूर्ण गोलंदाजी केली.या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान पक्क झालंय.शेवटच्या हाणामारीच्या षटकात त्यानं अनेकदा थंड डोक्याने गोलंदाजी केली.T-20 विश्वचषकात त्याच्या या कौशल्याचा भारतीय संघाला महत्वाचा उपयोग होऊ शकेल.\nआयपीएल-2 मधली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ते अनिल कुंबळेचं मॅजिक..आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत अगदी दृष्ट लावणारा खेळ केला.मागच्या वर्षीच्या राजस्थान प्रमाणेच बंगळूरुच्या विजयात कोणत्याही एका खेळाडूचा महत्वाचा वाटा नव्हता.राहुल द्रविड- जॅक कॅलीस या बुजूर्ग खेळाडूंपासून ते विराट कोहली-मनीष पांडे या युवा खेळाडूंना जम्बोनं एका संघात बनवलं.प्रत्येक खेळाडूला विश्वास दिला,सुरक्षिततता दिली.हे सर्व होत असताना कुंबळेनं युद्धभूमीवर आघाडीवर राहून संघाचं नेतृत्व केलं.अंतिम सामन्यातली त्याची गोलंदाजी कोण विसरु शकेल.\nक्रिकेटमध्ये धंदेवाईक वृत्ती वाढत चाललीय.लॅपटॉप प्रशिक्षणाचं युग आलंय. खेळाडू हे यंत्रमानव बनलेत अशी ओरड नेहमी केली जाते.परंतु कितीही यांत्रिक प्रयत्न केले तरी गुणवत्ता आणि क्रिकेटवरची निष्ठा महत्वाची असते.क्रिकेट या खेळाचे चाहते लाखोंमध्ये आहेत.परंतु हा खेळ खेळणारे देश अगदी मौजकेच आहेत.या मोजक्या देशातल्या अगदी असमान्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळेचं नाव घ्यावं लागेल.आयपीएल जिंकण्यास तो अपयशी ठरलाय.परंतु करोडो क्रिकेट रसीकांच्या -हदयामधले स्थान त्यानं अढळ ठेवलंय.\nमस्तं आढावा घेतलाय आयपीएलचा. \"विजयाच्या तोंडातून अनेक पराभव या संघाने खेचून आणले\" हे वाक्य विशेष आवडलं सकाळमध्ये पाठवा तुमचा लेख, नक्कीच छापतील.\nतुझ्या क्रिकेटच्या नॉलेजला मी आव्हान देऊ शकत नाही.पण धोनी एखाद्या स्पर्धेत चालला नाही.म्हणून त्याच्या कप्तानपदावर प्रश्वचिन्ह उपस्थित करणे.फारच धाडसाचे ठरेल.\nआयपीएल आणि क्रिकेटटूंचे वय हा मुद्दा योग्य असाच आहे. वयाचा आणि खेळाच्या दर्जाचा या स्पर्धेवर परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं.\nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nलाल सलाम ते वंदे मातरम् \nहिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nमदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T11:42:41Z", "digest": "sha1:GTGZQ6IFN7Z5LAVU3SSFBFSNS4DLA5AA", "length": 4281, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५२७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५२७ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १५२७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nमॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट\nइ.स.च्या १५२० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/794/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE;_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:29:52Z", "digest": "sha1:LFQDPKQAQCXFILSXUMGQ2MGPU5OAUL5L", "length": 7145, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआमच्या व्यथा सरकारपुढे मांडा; माणकापूरमधील शेतकऱ्यांनी केले राष्टवादीच्या नेते मंडळींकडे मन मोकळे\nनागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे.\nमाणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली.\nनगरपंचायत निवडणुकीचे निकाल ही सरकारच्या जनहितविरोधी कारभाराची प्रतिक्रिया- धनंजय मुंडे ...\nराज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला दूसरे स्थान मिळाले असून या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच जनतेने सत्ताधारी भाजपा- शिवसेनेला स्पष्टपणे नाकारून राज्यातील जनहितविरोधी कारभाराबद्दल प्रतिक्रिया दिली असल्याचे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या २० नगरपंचायतींच्या निवडणुकांतील ३३१ जागांपैकी ८४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. काँग्रेसला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या आहेत,सत्ताधारी ...\nशिक्षण क्षेत्रातील गोंधळ व मुस्लिम आरक्षणाविषयी सरकारतर्फे असमाधानकारक उत्तरे : धनंजय मुंड ...\nहे सरकार शिक्षणाच्या प्रश्नांबाबत किती उदासीन आहे, हे आज पुन्हा एकदा दिसून आले. १३०० पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा डाव शिक्षण मंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित शाळांचे अनुदान सुरु करण्यास हे सरकार सकारात्मक नाही. महाराष्ट्रातील सर्व शिक्षण प्रक्रियेचे वाटोळे शिक्षणमंत्र्यांमुळे झालेले आहे. शिक्षक आमदारांनी उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नाला शिक्षण मंत्र्यांना ठोस उत्तर देता आले नाही. जे उत्तर दिले ते सुद्धा सत्तेच्या मस्तीत दिले, याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ...\nअवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या- धनंजय मुंडे ...\nनुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच दुष्काळग्रस्त भागतील विद्यार्थ्यांचे आगामी वर्षातील शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चाही मुंडे यांनी केली.मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने १ मार्च रोजी मंत्रालयातील पत्रकार दालनात त्यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रका ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pm-narendra-modi-address-farmers-krushi-unnati-mela-6626", "date_download": "2018-04-23T11:38:36Z", "digest": "sha1:IU72SNXZR2HAJSDRSLCFZOAT3R4SH6YX", "length": 16007, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, PM Narendra Modi address farmers in Krushi Unnati Mela | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात आहेत\nहमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात आहेत\nरविवार, 18 मार्च 2018\nनवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आम्ही कटिबद्ध; मात्र उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आमच्या निर्णयावर अनेकजण गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.\nकृषी प्रगती मेळावा, कृषी कर्मन पुरस्कार आणि शेतीमालासाठीच्या ई-पोर्टलचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १७) येथे करण्यात आला, या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. याप्रसंगी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि राज्यांना विशेष योगदानासाठी गौरविण्यात आले.\nनवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आम्ही कटिबद्ध; मात्र उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आमच्या निर्णयावर अनेकजण गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.\nकृषी प्रगती मेळावा, कृषी कर्मन पुरस्कार आणि शेतीमालासाठीच्या ई-पोर्टलचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १७) येथे करण्यात आला, या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. याप्रसंगी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि राज्यांना विशेष योगदानासाठी गौरविण्यात आले.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाची अन्नधान्याची स्थिती कठीण होती. मात्र, आपल्या अन्नदात्याने हे आव्हान पेलले आणि आज आपल्याकडे विक्रमी उत्पादन होत आहे.\nदेशात कृषी बाजार सुधारणा, ई-मार्केटिंग पोर्टलला आज प्रांरभ होत आहे. शेतीमालाची माहिती शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही उपलब्ध होणार.\nसेंद्रिय शेतीसाठी मी स्वतः आग्रही आहे. देशात २२ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती होते. भारत सेंद्रिय उत्पादन घेणारा सर्वांत जुना देश.\nदेशभरातील कृषी विज्ञान केंद्रे ही ‘लाइट हाउस’ अाहेत. कृषी क्षेत्राला प्रकाशमान करण्याची या केंद्रांवर जबाबदारी. या केंद्रांनी शेतकऱ्यांपर्यंत शेती तंत्रज्ञान पोचवावे.\nमधुमक्षिका पालनाकडे शेतकऱ्यांनी आवर्जून लक्ष द्यावे.\nशेतकऱ्यांना सोलर शेतीची नवी संधी आहे. स्वतःकरिता वीज उपलब्ध करून ती सरकारलाही विकता येणार आहे.\nशेतीमालाचे अवशेष जाळू नका. यास शेतीतच गाडून खत करा. पिकांना याचा फायदा होतो.\nआजही भारत हजारो कोटी रुपये बांबू आयातीसाठी खर्च करत आहे. आपण जर बांधावर बांबू लागवड केली, तर देशाचा मोठा खर्च कमी होईल.\nदेशभरातील शेतकऱ्यांनी युरियाचा वापर कमीत कमी करावा.\nहमीभाव minimum support price विषय topics नरेंद्र मोदी narendra modi पुरस्कार awards शेती नासा भारत वीज खत fertiliser युरिया urea\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7133734", "date_download": "2018-04-23T11:42:44Z", "digest": "sha1:ASJA64MQY2DSM5MUTVCZPCYTHJADAFEZ", "length": 6914, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सर्वेक्षण: डोरिटोस सुपर बाऊल जाहिरात उच्च गुंतवणूकीसाठी स्कोर करताना, डॅनोन & amp; ओइकोस मिडलट", "raw_content": "\nसर्वेक्षण: डोरिटोस सुपर बाऊल जाहिरात उच्च गुंतवणूकीसाठी स्कोर करताना, डॅनोन & ओइकोस मिडलट\nसुपर बाउल जाहिराती चालविण्यासाठी अपेक्षित असलेल्या 29 विविध ब्रॅण्डना त्यांच्या भावनात्मक संलग्नकांचे मूल्यांकन करण्यासाठी 1,660 सुपर बाऊल निरीक्षकांची पाहणी करण्यात आली. घोषणेनुसार, Semalt किज््स सर्वेक्षणने असे अनुमान काढू शकतो की गेमनंतर ग्राहक ब्रॅन्डशी कसे व्यस्त होतील\nसुपर बाउल सजेशन सर्वे, ब्रँड कीज ग्राहक लॉयल्टी अॅजगेटेशन इंडेक्ससारख्या सर्वेक्षणात माध्यमांच्या संदर्भात ब्रँडच्या उत्तरकक्षतेच्या खरे प्रतिक्रियांची अंमलबजावणी केली जाते .Semaltेट ग्राहक वागणूकीशी अत्यंत परस्परसंबंधित आणि म्हणून प्रमाणित केले गेले आहे भावी ब्रँड खरेदीचे विश्वासार्ह अंदाज करणारे\nपाच किंवा अधिक गुण मिळविणार्या ब्रँडस अपेक्षित जास्त प्रतिबद्धता दरासह \"विजेते\" म्हणून गणले गेले. ब्रँड कीज सर्वेक्षणानुसार वापरलेल्या 2 9 ब्रॅण्डबद्दल सांगतात, 14 डोरीटोस, कोका-कोला, ह्युंदाई, एमएंडएम, एक्स आणि Semaltेट या आघाडीच्या आघाडीत पाच किंवा अधिक व्यस्त गुणांसह 14 गुण मिळवले आहेत.\nजग्वार, डॅनोन, ओयकोस आणि एचएंडएम या ब्रँडमध्ये नकारात्मक गुणांची नोंद झाली - мебель для веранды и террасы. टर्बो कर आणि इन्ट्यूट दोन्हीने सर्वात कमी गुणांची कमाई केली. आश्चर्याची बाब म्हणजे व्होक्सव्ॉगनने नकारात्मक व्यस्त गुणांचीही नोंद केली आहे, तरीही त्याच्या 2011 \"द फोर्स\" जाहिरातीची सर्व सदस्यांमध्ये सर्वाधिक सामायिक केली जाणारी सेटल बाऊल जाहिरात असणे आवश्यक आहे.\nब्रँड की म्हणते की बडवेसर, चीयरियस, क्रिसलर, जीएम आणि किआ यांच्या व्यस्त दर, त्यांच्या Semalt बाऊल जाहिरातींद्वारे \"अप्रभावित\" होतील, उपभोक्ता सलंगणे न भरणे किंवा तोट्याचा नसावा.\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओसाठी शोध करण्याचा हेतू: Google ने कस्टम इन्टेंट प्रेक्षकांना YouTube ला वाढविले, अॅक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापर करावा\nमूल्य प्रोप्स बद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन कसे आकारले पाहिजे\nरेडमिटने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nब्रांडिंग चॅनेल: सीएमओ जोनसुपर बाउल जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=438&Itemid=628&limitstart=95", "date_download": "2018-04-23T11:52:09Z", "digest": "sha1:3APNOXK6D3NBJE6JB3WD4AK7NVA2PPXY", "length": 6167, "nlines": 27, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध - २", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nगोड निबंध - २\nबंकीमचंद्र हे उत्कृष्ट पहिल्या दर्जाचे गद्य-लेखक होते. त्यांनी पद्य मात्र मुळींच लिहिलें नाहीं असें म्हटलें तरी चालेल. एक दिवस बंकीमबाबूंच्या मुलीनें त्यांना प्रश्न विचारला, 'बाबा, तुमि तो बहुत गद्य लिखते पारे तार पर पद्य कि ना लिखत्ते जारी ' तेव्हां बंकीमबाबू तेजस्वी दृष्टींने म्हणाले, ' बाळ मी एकच कविता लिहिली आहे. एकच गाणें रचलें आहे. परंतु तें गाणें तुझ्या पित्याचें नांव अजरामर करील.' बंकीमचंद्रांचे असें काणतें बरें तें गाणें ' तेव्हां बंकीमबाबू तेजस्वी दृष्टींने म्हणाले, ' बाळ मी एकच कविता लिहिली आहे. एकच गाणें रचलें आहे. परंतु तें गाणें तुझ्या पित्याचें नांव अजरामर करील.' बंकीमचंद्रांचे असें काणतें बरें तें गाणें होय तेंच ' वंदे मातरम् ' हेंच तें उत्कृष्ठ देशभक्तींचें गाणें. डोळयांतील अश्रूंनी हृदयाच्या वीणेच्या अनंत तारा सामस्यानें वाजत असतां हें लिहिलेले आहें. वाल्ट व्हिट्मन हा अमेरिकन कविता म्हणत असे, 'माझ्या काव्याच्या पुस्तकाला जो कोणी हात लावील, तो पुस्तकास हात लावीत नसून पुस्तककर्त्याच्या हृदयालाच जणूं स्पर्श करतो.' त्याप्रमाणें या गीतामध्येंहि गीतकाराचें हृदय ओतलेलें आहे. ज्या वेळेला आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पाडून मनुष्य वर्ण्य वस्तूंशी तन्मय होते, तेव्हां त्या दिव्य समाधीमध्येंच असें गीत बाहेर पडतें\nबंकीमचंद्रासारख्या साहित्यसम्राटानें हें गीत रचलें व प्रथम वंगीय कविसम्राट रवींद्र यांनी कलकत्त्याच्या एका सभेंत तें गाऊन दाखविलें. बंकीम हें कांही संगीतज्ञ नव्हते. त्यांनी स्फूर्तीच्या रंगात गीत तर रचिलें. भराभरा शब्दरत्नें आलीं, तशी त्यांनी जडावाची माळ केली या गाण्याला कोणता ताल लावावा कोणता राग लावावा, हें संगीतज्ञांनीं पाहून घ्यावें. जडावाची माळ आहे, ती पटवेक-याकडें नेऊन कशी पटवावी, कोणते गोंडे लावावे, कोणत्या रंगाचा गोप लावावा, हें ज्याचें त्यांनें ठरवावें. रवींद्रनाथ हे बंकीमांहून वयानें लहान. त्या वेळेस रवींद्र अगदीं तरुण होते. रवींद्र उत्कृष्ठ गाणारे आहेत त्यांचा आवाज मधुर, उंच, कोमल हवा तसा आहे. कलकत्त्याला एकदां सभा भरली असतांना तरुण रवींद्राला बंकीम म्हणाले, 'तुमि ओई गीत गुलि गाय छो - तुम्ही हें गीत म्हणून दाखवा.' रवींद्रानीं म्हणून दाखवलें. ते दिव्य गीत स्वर्गीय कंठांतून सुस्वर आलापानें बाहेर पडलें व स्वर्ग पृथ्वी तटस्थ झाली. त्या दिवसापासून हें गीत सर्वत्र पसरलें. ही तान हिंदुस्थानच्या कानाकोप-यांत वायुदेवानें नेली. त्या दिवसापासून या गीताने सर्वांना वेडें केलें; अनंतांना देशभक्ती शिकविली; देशप्रीति दाखविली; मरायला आणि हंसायला तयार केलें; भारतमातेची पूजा करावयास तेहतीस कोटीं लेकरें तयार होऊं लागली.\nगोड निबंध - भाग २\nगोड निबंध - भाग २\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2011/05/blog-post_12.html", "date_download": "2018-04-23T11:39:10Z", "digest": "sha1:Y2XOXHS6BARLQ7TTA4PUKALB4KBWXSAS", "length": 11931, "nlines": 152, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): पुस्तक परिचयः \"वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी\"", "raw_content": "\nपुस्तक परिचयः \"वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी\"\nराजहंस प्रकाशनने आणलेलं यशवंत रांजणेकर लिखित \"वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी\" हे पुस्तक म्हणजे एका असामान्य कर्तृत्त्वाची चरितगाथा आहे.\nमिकी माऊस, डॉनाल्ड डक या जगप्रसिद्ध कार्टून पात्रांचा निर्माता आणि अभूतपूर्व अशा डिस्नेलँडचा जनक वॉल्टर इल्यास डिस्ने (संपूर्ण पुस्तकात डिझ्नी ऐवजी डिस्ने हाच शब्द वापरला गेला आहे) या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या एका अवलिया मुलाने पुढील आयुष्यात जी झेप घेतली त्याचं सार्थ वर्णन हे पुस्तक करतं.\nआज National Geographic वर दाखवले जाणारे documentaries, बाल हनुमान वगैरे full length कार्टून मूव्हीज, किंवा The Jungle book सारख्या animated serials (in fact the jungle book ची निर्मीती डिस्नेचीच आहे) या सर्व कल्पनांचा मूळपुरूष म्हणजेच वॉल्ट डिस्ने वॉल्टची कारकिर्द, त्याचा थक्क करणारा प्रवास याचं सविस्तर, वाचकाला खिळवून ठेवणारं वर्णन लेखकाने केलं आहे. अक्षरश: शून्यातून विश्व उभं केलेल्या वॉल्टचा प्रत्येक स्वभावविशेष त्यांनी छान रेखाटला आहे.\nमी या पुस्तकावर ज्ज्जाम फिदा झालोय. बरेच वर्षांनी असं motivational, inspirational पुस्तक वाचायला मिळालं.. I loved it... बहुतेकदा आपण सर्वच प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन ''destined'' मार्ग स्वीकारतो. इथे एक असा माणूस आपल्याला भेटतो, की जो सुरूवातीच्या काळात जवळजवळ व्यावहारिकदृष्ट्या फसवला गेला. आणि त्याचा हा learning period तब्बल १० हून अधिक वर्षांचा आहे बहुतांश काळ त्याने जेवढं कमावलं ते नवीन करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना गमावलं. पण काळाच्या पुढे पाहण्याची वृत्ती आणि ती कालतीत स्वप्नं खरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी यामुळे त्याने एक प्रकारे क्रांतीच घडवली. या सगळ्याचं रोमांचकारी वर्णन इथे वाचायला मिळतं..\nनावः \"वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी\"\nपृष्ठे: ३३२, किंमतः २५० रू\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nपुस्तक परिचयः \"वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी\"\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://kbhagu.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:05:58Z", "digest": "sha1:ECO3XUBC5IOABNYUWYVASN7TQVYT2BBI", "length": 5420, "nlines": 37, "source_domain": "kbhagu.blogspot.com", "title": "मज उमजले काही...............!!!!!: सुख - खरचं पैश्यात मोजता येतं?", "raw_content": "\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बरे वाईट अनुभव येतात .प्रत्येकजण ते share करतोच असं नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो .पण मला माझ्या आयुष्यातले बरे वाईट अनुभव, काही हृदयस्पर्शी गोष्टी, लेख तुम्हा सगळ्यांशी share करायला नक्की आवडेल. म्हणून मी हा ब्लॉग चालू केला आहे . तुम्ही माझे लेख नियमित वाचाल व त्यावर तुमच्या प्रतिक्रिया द्याल असा माझा विश्वास आहे .......\nसुख - खरचं पैश्यात मोजता येतं\nप्रत्येक माणसाच्या सुखाच्या व्याख्या किती वेगवेगळ्या आहेत , नाही कोणाला भरपूर पैसा कमावणं ह्यात सुख मिळतं, तर कोणाला एकतरी दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवण्यात आनंद मिळतो , कोणाला पैशाने दुसऱ्यांना मदत करायला आवडतं तर कोणाला स्व जातीने दुसऱ्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो . थोडक्यात काय तर सुखाची व्याख्या देणं खरचं कठीण ......... जसं सुख अनुभवण्यात मजा आहे तसचं सुख बघण्यातही आनंद आहे ... तुम्ही कधी railway track च्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या मुलांना तिथेच खेळताना पाहिले आहे , किती मस्त खेळत असतात ती कोणाला भरपूर पैसा कमावणं ह्यात सुख मिळतं, तर कोणाला एकतरी दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवण्यात आनंद मिळतो , कोणाला पैशाने दुसऱ्यांना मदत करायला आवडतं तर कोणाला स्व जातीने दुसऱ्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो . थोडक्यात काय तर सुखाची व्याख्या देणं खरचं कठीण ......... जसं सुख अनुभवण्यात मजा आहे तसचं सुख बघण्यातही आनंद आहे ... तुम्ही कधी railway track च्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या मुलांना तिथेच खेळताना पाहिले आहे , किती मस्त खेळत असतात ती संध्याकाळी हॉटेल मध्ये सतत काम करणारे दिवसा तिथेच क्रिकेट खेळत असतात आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत असतात , जणू काही stadium च ते . platform वर भीक मागणारे रात्री तिथेच किती गाढ झोपले असतात . एकदा आमची गाडी highway वर traffic मध्ये अडकली , पुढे एक accident झाला होता त्यामुळे तास दोनतास तरी निश्चिंती होती . आम्ही सगळे घामाने लथपथ आणि traffic clear होण्याची वाट बघत होतो , पण बाजूच्या गाडीचा driver मस्तपैकी झोपला होता . त्याला त्या गर्मीत किती गाढ झोप लागली होती. माझ्या आजीच्या घरी रोज एक भाजीवाली येते . भर दुपारी आल्यावर जेव्हा मी तिला थंड पाणी दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान दिसलं. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख बघितल्यावर असा विचार येतो ,'सुख खरचं पैश्यात मोजता येतं संध्याकाळी हॉटेल मध्ये सतत काम करणारे दिवसा तिथेच क्रिकेट खेळत असतात आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत असतात , जणू काही stadium च ते . platform वर भीक मागणारे रात्री तिथेच किती गाढ झोपले असतात . एकदा आमची गाडी highway वर traffic मध्ये अडकली , पुढे एक accident झाला होता त्यामुळे तास दोनतास तरी निश्चिंती होती . आम्ही सगळे घामाने लथपथ आणि traffic clear होण्याची वाट बघत होतो , पण बाजूच्या गाडीचा driver मस्तपैकी झोपला होता . त्याला त्या गर्मीत किती गाढ झोप लागली होती. माझ्या आजीच्या घरी रोज एक भाजीवाली येते . भर दुपारी आल्यावर जेव्हा मी तिला थंड पाणी दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान दिसलं. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख बघितल्यावर असा विचार येतो ,'सुख खरचं पैश्यात मोजता येतं' तसेच सुखाच्या सगळ्या वस्तू विकत घेता येतात पण सुख नाही हे पण पटलं.....\nसुख - खरचं पैश्यात मोजता येतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/android.html-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-tutuapp", "date_download": "2018-04-23T11:52:38Z", "digest": "sha1:NQ25E5XOI6BHNI2OMMZVC23FK6IN2AJP", "length": 15977, "nlines": 94, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "Android साठी TutuApp डाउनलोड करा - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nAndroid साठी TutuApp डाउनलोड करा\nशेअर करणे हे काळजी आहे\nबग निराकरण करण्यासाठी Android सुधारणा TutuApp डाउनलोड करा आणि काही सुधारणा मिळविण्यासाठी. TutuApp नवीन आवृत्ती TutuApp v2.2.66 APK प्रकाशीत केले आहे. आपण थेट TutuApp सुधारणा मिळविण्यासाठी डाउनलोड सेक्शन.\nविनामूल्य Android अनुप्रयोग आणि खेळ डाउनलोड करण्यासाठी Android साठी TutuApp डाउनलोड करा. Android साठी TutuApp आपण त्वरित विनामूल्य आणि सशुल्क अॅप्स आणि गेम्स प्राप्त करू देते. या वेबसाइट मध्ये, आपण वाचू शकता Android साठी TutuApp पुनरावलोकन. हे आपण TutuApp अधिक समज प्राप्त करण्यास मदत करू शकता आशा आहे.\nTutuApp Google प्ले स्टोअर म्हणून समान कार्य आहे की एक ऍप्लिकेशन आहे. इतर शब्द, TutuApp Google प्ले स्टोअर पर्याय आहे. फक्त Google प्ले स्टोअर सारखे, Android साठी TutuApp विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो अनुप्रयोग आणि खेळ भरपूर उपलब्ध, दिले विषयावर समावेश. या निःसंशयपणे त्यांच्या आवडत्या Android अनुप्रयोग आणि खेळ प्रीमियम आवृत्ती चवीनुसार इच्छित प्रत्येकासाठी एक चांगली बातमी आहे.\nAndroid साठी TutuApp विनामूल्य अनुप्रयोग आहे. आपण या आश्चर्यकारक अनुप्रयोग आहे कोणत्याही गोष्ट खरेदी करणे आवश्यक आहे नाही. त्यामुळे, आपण TutuApp पासून फायदे भरपूर आहेत, तर आपल्या खिशात सुरक्षित राहते. तो थंड वाटत नाही\nदेखील वाचा: आम्ही अनुप्रयोग पाहिले – कोरियन टीव्ही मालिका प्रवाह अनुप्रयोग\nTutuApp: मिळवा आधुनिक Android अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid डिव्हाइस TutuApp एक तृतीय-पक्ष अॅप आहे जरी, अद्यतन अनुप्रयोग आणि खेळ मिळत टर्म मध्ये Google अॅप स्टोअर म्हणून जलद आहे. तेव्हा आपल्या Android डिव्हाइसवर अनुप्रयोग सुधारित आवृत्ती आहे, आपण आपल्या अनुप्रयोग आणि खेळ अद्यतनित करण्यासाठी एक सूचना प्राप्त होईल. आपण Android साठी TutuApp थेट Android अनुप्रयोग आणि खेळ डाउनलोड आणि मूळ न करता आपल्या स्मार्टफोनमध्ये त्यांना प्रतिष्ठापीत करू शकता. सोपे, तो नाही आहे\nफक्त सुधारणा मिळवून मर्यादित नाही, आपण देखील अनुप्रयोग आणि TutuApp वर लोकप्रिय आहेत की खेळ पाहू शकता. त्या Android अनुप्रयोग आणि खेळ मुख्यपृष्ठ स्क्रीनवर दिसेल. फक्त चित्र टॅप करा किंवा डाउनलोड पृष्ठावर मिळविण्यासाठी लघुप्रतिमा आणि डाउनलोड आपण त्वरित इच्छित की अनुप्रयोग आणि खेळ. या अप-टू-डेट ठेवा तुम्ही की एक मोठे वैशिष्ट्य आहे.\nTutuApp: नाही रूट आवश्यक\nमूळ Android डिव्हाइसवर TutuApp स्थापित करणे आवश्यक आहे. आपण हे आपण इतर अनुप्रयोग स्थापित मार्ग प्रतिष्ठापीत करू शकता. मग, आपण दुहेरी उपयोगाची आपल्या Android स्मार्टफोन वर चालवू शकता.\nरूट साठी TutuApp आवश्यक नाही. आपण रूट तर आपण आपल्या Android स्मार्टफोन आपल्या हमी गमवाल. शिवाय, rooting प्रक्रिया यशस्वी नाही तर काहीतरी वाईट घडू शकते. की कारण आम्हांला माहीत आहे, TutuApp विकासक हे इतके सोपे असल्याचे तयार. आपण रूट न Android स्मार्टफोन TutuApp प्रतिष्ठापीत करू शकता.\nदेखील वाचा: पानातून बाहेर पडणारी टीव्ही – मोफत चित्रपट प्रवाह\nAndroid साठी TutuApp डाउनलोड करा\nतुम्हाला माहीत आहे केल्यानंतर किती महान Android साठी TutuApp आहे, मी तुम्हाला TutuApp डाउनलोड आणि आपला Android डिव्हाइसवर स्थापित करू इच्छिता आता विश्वास. TutuApp पासून सर्वोत्तम गोष्ट आपण विनामूल्य सर्व अनुप्रयोग आणि खेळ मिळवू शकता. Android साठी TutuApp कसा डाउनलोड करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया लेख वाचन सुरू ठेवा.\nमात्र, अनुप्रयोग टिका म्हणून या लहान वापर करण्यासाठी आम्ही आपल्याला आठवण करून. हे आपण खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अनुप्रयोग पुनरावलोकन करण्यासाठी प्रीमियम आवृत्ती डाउनलोड अर्थ. म्हणून आम्ही अजूनही आपल्याला अॅप स्टोअरमध्ये प्रीमियम अनुप्रयोग खरेदी करणे कायदेशीर विकासक समर्थन शिफारस.\nकिमान आवश्यक: Android 4.0+ (वरील)\nAndroid साठी TutuApp प्रतिष्ठापन केक एक तुकडा आहे. तेव्हा आता आम्ही Android स्मार्टफोन वर TutuApp स्थापित करण्यासाठी प्रशिक्षण प्रदान. आपण हे चालवून आधीची वाचू शकता.\nTutuApp Google प्ले स्टोअर वर उपलब्ध नाही, म्हणून आपण आपल्या Android स्मार्टफोन या प्रतिष्ठापीत करू शकणार करण्यासाठी सेटिंग बदलणे आवश्यक आहे. हे कसे करायचे ते या सोप्या चरणांचे अनुसरण करा. जा सेटिंग्ज >> सुरक्षा >> गोपनीयता >> अज्ञात स्रोत आणि हे वैशिष्ट्य सक्षम. आपण MIUI वापरत असाल तर हा मार्ग थोडा भिन्न असू शकते.\nTutuApp डाउनलोड करा 2.2.66 वरील दुव्यावर पासून APK.\nआपण TutuApp APK ऑफलाइन इंस्टॉलर डाउनलोड करण्यासाठी सूचित केले जाईल. डाउनलोड प्रगती काही मिनिटे लागतील.\nएकदा डाउनलोड प्रक्रियेत समाप्त झाले आहे, आपण आपल्या Android डिव्हाइसवर स्वतः Android साठी TutuApp प्रतिष्ठापीत करू शकता. फक्त स्क्रीन सूचना वर अनुसरण.\nTutuApp चिन्ह मुख्यपृष्ठ स्क्रीनवर दिसू लागले आहे तेव्हा TutuApp यशस्वीपणे स्थापित केला गेला. आता, Android साठी TutuApp वापरण्यासाठी तयार आहे.\nआपण खाली TutuApp मागील आवृत्ती प्रदान केले आहेत. कोणत्याही कारणास्तव नवीन आवृत्ती आपल्या स्मार्टफोनमध्ये चांगले चालवू नाही तर आपण ती डाउनलोड करू शकता. किंवा कदाचित आपल्या स्मार्टफोन Android साठी TutuApp अलीकडील सुधारणा समर्थन करत नाही.\nTutuApp iOS साठी देखील उपलब्ध आहे, iPhone आणि iPad. भेट iOS साठी TutuApp डाउनलोड याबद्दल अधिक माहिती पृष्ठ.\nAndroid साठी एक एचडी व्हिडिओ डाउनलोडर अनुप्रयोग असणे आवश्यक आहे SnapTube व्हिडिओ डाउनलोडर प्रयत्न करा. SnapTube आपण अनेक स्रोत पासून व्हिडिओ प्रवाहित करण्यासाठी किंवा अगदी व्हिडिओ डाउनलोड करण्यास परवानगी देते. भेट Android साठी SnapTube पृष्ठ तपशील माहिती.\nदेखील वाचा: Xen अनुप्रयोग – फाइल ट्रान्सफर आणि शेअरिंग\nप्रत्येकजण या आश्चर्यकारक अनुप्रयोग माहीत आहे म्हणून लेख शेअर विसरू नका. आपण अनुप्रयोग किंवा प्रतिष्ठापन संबंधित कोणतेही प्रश्न आढळल्यास, खाली टिप्पणी बॉक्स मध्ये आपला प्रश्न लिहा अजिबात संकोच करू नका. आम्ही आपल्याला मदत आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.\nयेथे ठिकाणी एक संग्रह आहे आपण हे करू शकता विकिपीडिया खरेदी ऑनलाइन सध्या.\nपोस्ट डाउनलोडटॅग केले डाउनलोड tutuapp apk, Android साठी tutuapp डाउनलोड, डाउनलोड tutuapp ऑफलाइन इंस्टॉलर, tutuapp 2.2.52 apk, tutuapp डाउनलोड 2.2.66, tutuapp डाउनलोड सुधारणा, Android साठी tutuapp, tutuapp मोफत डाउनलोड\n2 वर \"विचारAndroid साठी TutuApp डाउनलोड करा”\nhosam फेब्रुवारी 16, 2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/express-way-192518", "date_download": "2018-04-23T11:17:22Z", "digest": "sha1:DT7HICCARBSSRLCS5C2N7M2Q2LDCUTAB", "length": 11497, "nlines": 114, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "खंडाळ्याच्या घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा", "raw_content": "\nखंडाळ्याच्या घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा\nखंडाळ्याच्या घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा\nBy: अधिक माहिती: express way Khandala ghat एक्सप्रेस वे खंडाळा घाट\nडोक्याचा पार भुगा करणारी अवस्था होती आज मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर. खंडाळा घाट जणू दर्शन रांग झाला होता. ज्या रांगेतून प्रत्येकाला पुढे सरकायचं होतं. पण हा जाम नक्की का झाला\nभल्या पहाटे खंडाळ्याच्या एक्झिटजवळ ऑईल टँकर उलटला. अख्खा रस्ता ऑईलनं माखला. त्यामुळे अपघाताची शक्यता होती. म्हणून मुंबईकडे येणारी वाहतूक पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वळवली.\nझालं… द्रुतगती महामार्ग मंदगती महामार्ग झाला. खंडाळा घाटाच्या पायथ्यापासून लोणावळा संपेपर्यंत दोन्ही दिशेने रांगा लागल्या.\nहाटे 6 वाजता उलटलेला टँकर ओसंडून वाहिला. पण रिकामा टँकर रस्त्यातून काढायला दुपारचा दीड वाजला.\nमग कुठे मुंबईच्या दिशेने एखादी लेन सुरु झाली.\nपण आधीच अडकलेल्या प्रवाशांचा पुरता पुतळा झाला एक्स्प्रेस वे सुरु होताच. इमाने इतबारे 195 रुपये वसूल करतात. पण सुरळीतपणे प्रवास पडण्याची शाश्वती आजही मिळत नाही.\nकधी दरड कोसळते, कधी अपघात होतो, कधी अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडून डोकेदुखी वाढते. पण त्यातून प्रवाशांचे हजारो मानवी तास वाया जातात. त्याला जबाबदार कोण\nअधिक माहिती: express way Khandala ghat एक्सप्रेस वे खंडाळा घाट\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://parents.rajivtambe.com/Rajivparent/parent/BGSK10000008", "date_download": "2018-04-23T11:27:46Z", "digest": "sha1:JHAIXTIMADNHWRAJMJTU5WL6QQERMN2X", "length": 16003, "nlines": 113, "source_domain": "parents.rajivtambe.com", "title": "Rajiv Tambe", "raw_content": "\nरविवार दुपार म्हणजे धमाल खेळकूट. पार्थ, पालवी, वेदांगी आणि शंतनू नेहाच्या घरी जमले होते.\nनेहाने अगोदरच ठरवून ठेवलं होतं की, आज ‘सापशिडी’च खेळायची. तिने सापशिडीचा पट आणला पण त्याचे फासे काही मिळेनात. शोधाशोध सुरू झाली.\nमग नेहमीप्रमाणे “इथेच तर ठेवले होते.. काल पण इथेच होते.. कुणी घेतले का” अशी वाक्य-मालिका सुरू झाल्यावर बाबा ‘काय ते’ समजले. बाबा कपाटातला पत्त्यांचा कॅट घेऊन आले.\nबाबांच्या हातात पत्ते पाहताच नेहा तडतडली,“ओ बाबा.. पत्ते कशाला आणले. आज आपण सापशिडी खेळायची आहे ना\nपत्ते पिसत बाबा शांतपणे म्हणाले,“अगं पण मी कुठं म्हंटलंय पत्ते खेळूया म्हणून आपण सापशिडीच खेळूया की..”\nआणखी तणतणत नेहा म्हणाली,“म.. पत्ते कशाला आणले\n“अगं रागावू नकोस. तुझे फासे मिळत नाहिएत ना.. म्हणून मी हे ‘पिसायचे फासे’ आणलेत गं. हे फासे घेऊन आपण खेळायची सापशिडी.”\n“अगं सोपी आयडिया आहे. आपण यातली सहा पानं घ्यायची. म्हणजे एक्का ते छक्की. ज्या कुणावर राज्य असेल त्याच्या पुढच्या मुलाने ही पानं पिसायची आणि ज्यावर राज्य असेल त्याने यातलं एक पान घ्यायचं..”\n“म्हणजे एक्का असेल तर एक आणि पंजी असेल तर पाच.. असंच ना\nबाबांनी मान डोलावली आणि सगळी मुले ओरडली,“वॉव.. मस्त आयडू, फंडू का झंडू. आम्ही असं कधीच खेळलो नाही.”\nआता फासा पिसून खेळायला सुरुवात झाली.\nथोड्याचवेळात स्वयंपाकघरातील कामं आटपून आई पण आली. प्रथम तिला हे काय चाललंय तेच कळेना. हे पत्ते खेळताहेत की सापशिडी, तिला समजेना.\nआईची अडचण ओळखून पालवी म्हणाली,“अगं आम्ही फ्युजन केलंय फ्युजन. पत्ते आणि सापशिडीचं फ्युजन\n“तुम्ही किती जणं आहात” असं आईने विचारताच पार्थ हात उंचावत म्हणाला,“हम पॉंच”\n“तर मग तुम्ही वेगवेगळी पाच फ्युजन करायला हवीत.”\n“ऑ.. ती कशी काय\n“अहो जरा डोकं हलवा, डोकं चालवा आणि डोकं लढवा..”\nआईचं बोलणं थांबवत वेदांगी उत्साहात म्हणाली,“म..म.. मला सुचली आहे दुसरी फ्युजन आयडिया. स..स.. सांगू का\nसगळ्यांनी वेदांगीकडे पाहात भुवया उंचावल्या आणि ती बोलू लागली,“अं.. आत्ता आपण खेळण्यासाठी एक्का ते छक्की असे सहा पत्ते घेतले आहेत. पण आपण जर एक्का ते दश्शी असे दहा पत्ते घेतले तर खेळाची गती पण वाढेल. काय हरकत आहे असा प्रयोग करुन पाहायला.”\n“लई भारी. फास्टम फास्ट आयडिया.”\nआता दहा पत्ते घेतल्यानंतर खरोखरच खेळाचा वेग वाढला. पुन्हा ज्याला एक्का आला तो खूप मागे पडला आणि ज्याला दश्शी आली तो भलताच पुढे गेला. त्यामुळे एक्का येणार्‍याचं तोंड जरा एकीकडे व्हायचंच.\nबाबा म्हणाले,“या फास्टम फास्टला थोडा ब्रेक लावायला पाहिजे. पण वेदांगीची फ्युजन आयडिया नंबर दोन मात्र तशीच ठेवली पाहिजे. सांगा पाहू काय करता येईल\n“म्हणजे आता पुन्हा एकदा जरा डोकं हलवा, डोकं चालवा आणि डोकं लढवा.. असं करायला हवं.”\nशंतनू किरकिरत म्हणाला,“बाबा, तुम्हाला आयडिया माहित असेल तर सांगून टाका ना. मघापासून मलाच तिनदा एक्का आलाय आणि नेहाला दोनदा दश्शी..”\nपालवी हळूच खुसफुसली,“शंतनूला एक्का कारण शंतनू पक्का.”\nपालवीकडे पाहात डोळे वटारत आई म्हणाली,“मी सांगते तिसरी आयडिया. आता आपण दहाच पानं घेतली आहेत. आता आपण तीस पानं घेऊ.. ..”\nसगळे जणं शॉक लागल्यासारखे जोरात किंचाळले,“क्का..य ती..स पानं\n“म.. तर या खेळाचं नाव सापशिडी न ठेवता फक्त ‘शिडीशिडी’ च ठेवा की.”\nनेहाच्या या बोलण्यावर तिला समजावत आई म्हणाली,“आधी माझं सगळं बोलणं ऐकून तर घ्या. मला म्हणायचं होतं, किलवर, बदाम आणि इस्पिक यांची प्रत्येकी एक ते दहा अशी एकूण तीस पानं घ्या. पानं वाढल्यामुळे आपोआपच वेगवेगळी पानं येण्याच्या शक्यता वाढतील असं वाटतंय. आपण खेळूनच पाहू की.. काय\nपुन्हा नव्याने खेळ सुरू झाला. सुदैवाने शंतनूला अठ्ठी आली आणि त्याचा चेहरा ठीक झाला. थोड्याचवेळात मुलांची चुळबूळ वाढली.\n“तुमच्या लक्षात येतंय का आकडे दहाच आहेत. आपल्याला आकडे दहाच ठेवून वेग कमी करता येईल का आकडे दहाच आहेत. आपल्याला आकडे दहाच ठेवून वेग कमी करता येईल का अं.. म्हणजे एक वेगळाच बदल केला तर येईलच..” असं म्हणत बाबांनी उजव्या हाताची तीन बोटं बंद करुन दोन बोटं हलवली.\nहात वरती करत पार्थ ओरडला,“मला.. मला कळलं. पण थोडसंच कळलंय. पण तरीही मी सांगतो चवथी आयडिया. आपण दरवेळी एकच पत्ता घेतो पण आता दोन पत्ते घ्यायचे.. बरोबर\n“शाबास पार्थ. आता पुढे सांग..” असं बाबांनी म्हणताच वेदांगी वैतागून म्हणाली,“काही तरीच काय बाबा दोन पत्ते घेऊन वेग कसा कमी होईल.. दोन पत्ते घेऊन वेग कसा कमी होईल..\n“अगं पार्थने अर्धा भागच सांगितला आहे. आता तू दोन पत्ते घे, म्हणजे मी पुढचा भाग सांगतो.”\nथोड्याशा अविश्वासानेच वेदांगीने दोन पत्ते उचलले. तिचे पत्ते होते किलवर दश्शी आणि बदाम नव्वी. पत्त्यांकडे रागाने पाहात वेदांगी म्हणाली,“हे काय हे झाले 19. म्हणजे वेग वाढलाच ना हे झाले 19. म्हणजे वेग वाढलाच ना\n“अगं जेव्हा आपण दोन पत्ते घेऊ तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे आता तू 19 घरं पुढे जायचं नाही, तर फक्त एकच घर पुढे जायचं आहे. लागला की ब्रेक” बाबांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच नेहा भीत-भीत म्हणाली,“पण समजा दोन्ही पत्ते सारखेच आले तर” बाबांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच नेहा भीत-भीत म्हणाली,“पण समजा दोन्ही पत्ते सारखेच आले तर तर काय करायचं..\n“तर काहीच करायचं नाही.”\n“कारण वजाबाकी केल्यावर बाकी उरणार शून्य म्हणजे त्यांनी आपली खेळी खेळायची नाही.”\nआणि सगळी मुले ओरडली,“वॉव.. मस्त आयडू, फंडू का झंडू.”\nया फ्युजन नंबर चार खेळात खरोखरंच मजा येऊ लागली. वजाबाकी असल्याने खेळातली उत्सुकता पण वाढली. खेळ रंगू लागला.\nशंतनूचं खेळात लक्ष नव्हतं. तो कुठलातरी विचार करत होता. त्याचा चेहरा अगदी गोंधळल्यासारखा झाला होता. तो चाचरतच म्हणाला,“मला पाचवी आयडिया सुचते आहे.. पण नीट कळत नाहीए..”\n“अरे आम्ही सगळे करू मदत, तू बोल तर..”\n“पत्त्यात दोन रंग असतात. काळा आणि लाल. सर्व लाल पत्त्यांची किंमत वजा असेल. अं.. आपण दोन पत्तेच घ्यायचे. दोन्ही काळे पत्ते आले तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. पण दोन्ही लाल पत्ते आले तर त्यांची किंमत वजा असल्याने त्यांची बेरीज करून तेव्हढी घरे मागे जायचे..”\n“ओए म्हणजे हा लाल सापच झाला की\n“हा तर महाब्रेक झाला\n“पण एक काळा पत्ता आणि एक लाल पत्ता आला तर..”\n“मुलांनो, खेळूनच पाहूया म्हणजे कळेल.. काय..\n· पत्ते म्हणजे “टिंब टिंब” असं अनेक पालकांना वाटतं. पण तसं नाही हे लक्षात घ्या. पत्ते सकारात्मक कामासाठी वापरा.\n· पत्ते वापरुन मुलांसोबत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांचे खेळ खेळा. हे खेळ खेळताना मुलांना कॅल्क्युलेटर वापरायची संधी द्या. तरीपण जर मुलांची उत्तरे चुकली तर चिडचिड न करता त्यांना सुधारण्याची संधी द्या.\n· मुलांना प्रश्न ‘न विचारता’ मुलांसमोर प्रश्न मांडा, आणि मुलांना त्यांच्या पध्दतीने त्यातून मार्ग काढण्याची मुभा द्‍या.\n· ‘जे मुक्तपणे प्रश्नांना भिडतात तेच उत्तराला गवसणी घालतात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/pune", "date_download": "2018-04-23T11:17:55Z", "digest": "sha1:3OJYLWCH3O2NAG3NU2FWUEZNZ3KF2ASP", "length": 9800, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "पुणे | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nशिवशार्दुल वाद्यपथकाचे महापौरांच्या हस्ते उदघाटन\nपुणे:- गणेशोत्सवामध्ये मिरवणुकी दरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना अटकाव व्हावा व उत्सवाचे पाविञ्य, सांस्कृतिकपणा राखला जावा या हेतूने गेल्या काही वर्षापासून प्रतिष्ठान तर्फे शिवशार्दुल वाद्य पथ...\tRead more\n‘पराक्रमी मराठे’ या विषयावर दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे यांचे व्याख्यान संपन्न\nगडकिल्ले सेवा समिती चिंचवड आयोजित ‘पराक्रमी मराठे’ या विषयावर दुर्गमहर्षी सह्याद्रीपुत्र प्रमोदजी मांडे (सर ) यांचं व्याख्यान झालं. श्री. प्रमोदजी मांडे यांच्या ओजस्वी वाणीतून मर...\tRead more\nहिंदूंचा विश्वासघात – पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी\nछत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीत दारू आणि नंगानाच असणारा हा पापी उत्सव करणाऱ्यांचा निषेध करायला आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणार आहोत छत्रपतींचा आदर्श मानणाऱ्यांना...\tRead more\nराज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘राखेतून उडाला मोर’ आणि ‘बालवीर’ या नाटकांना अव्वल क्रमांक\nपुणे(सुजीत खोत): सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित १४ व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत दिनांक १५ डिसेंबर २०१६ रोजी यशोदा इंग्लिश स्कूलने अनिल पाटील लिखित आणि सुजीत खोत दिग...\tRead more\nदारुबंदी अभियाना अंतर्गत हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने पुणे येथे तीव्र आंदोलन\nपुणे:- दारूबंदी अभियाना अंतर्गत हिंदुराष्ट्र सेनेच्या महिला आघाड़ीच्या वतीने सौ. तृप्तिताई काळे व वैजनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे आज गुरुवा...\tRead more\nलोकहित फाउंडेशनचा दणका वाहतूक पोलीस विभागास पाडले कारवाई करण्यास भाग\nपुणे(श्रीकृष्ण देशपांडे) :- पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर पोलिस व वाहतूक पोलिसांचे चिन्ह लावण्याचे प्रमाण वाढल्याने त्या विरोधात कारवाई करण्याकडे कानाडोळा केला जात होता. अश...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://guy8461.wordpress.com/2015/05/05/13th-august-1890-5th-may-1918-balkavi-alias-tryambak-bapuji-thomre-famous-for-nature-poems/", "date_download": "2018-04-23T11:52:29Z", "digest": "sha1:57JO5QSALAIXZXFNAPBE5Y3MNL4Q7OED", "length": 18015, "nlines": 200, "source_domain": "guy8461.wordpress.com", "title": "13th AUGUST 1890 – 5th MAY 1918 – BALKAVI ALIAS TRYAMBAK BAPUJI THOMRE – FAMOUS FOR NATURE POEMS – Shivaji Raje", "raw_content": "\n१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८ बालकवि उर्फ़ त्र्यंबक बापूजी ठोमरे – निसर्ग कवि म्हणून प्रसिद्ध\n(१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८)\nबालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.\nनिसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं. अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. मग आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात. निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिल्याने बालकवींची कविता रूढ अर्थाने दिसणाऱ्या निसर्गवर्णनापेक्षा वेगळी ठरली. ‘आनंदी आनंद’ ही त्यांची प्रसिद्ध आणि पाठ्यपुस्तकांतील समावेशामुळे लोकांमधे अधिक रुळलेली कविता. त्यात ते म्हणतात-\nवरती खालीं मोद भरे,\nयाच बालकवींची ‘उदासीनता’ या शीर्षकाची कविता अशी आहे-\nकोठुनि येते मला कळेना\nकाय बोंचते तें समजेना\nयेथें नाहीं तेथें नाही\nकुणीकडे हा झुकतो वारा\nहांका मारी जीव कुणाला\nमुक्या मनाचे मुके बोल हे;\nघरें पाडिती पण हृदयाला\nतीव्र वेदना करिती, परि ती\nदिव्य औषधी कसली त्याला\nवयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट.\nबालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे झाला. त्यांचे वडील बापूराव देवराव ठोमरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण त्यांच्या विशेष जवळची होती. शिवाय अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. स्वदेशी, स्वराज्य अशा देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. त्यामुळे बालकवींचा बराचसा अभ्यास घरीच झाला. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.\nवयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं. (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं). जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.\n१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या गाजलेल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे, ‘ठोमरे हा बालकवी होता, पण तो कवीपेक्षा बालच अधिक होता.’\nयानंतरच्या काळात कधी कुटुंबियांच्या आग्रहामुळे तर कधी नोकऱ्यांमुळे पुणे व नगर अशा ठिकाणी बालकवींचा आयुष्याचा काळ विभागला गेला.\n१९१८च्या उन्हाळ्यात जिजींच्या मुलीच्या विवाहासाठी खानदेशातील भादली इथे आलेले असताना बालकवींना त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर यांचं पत्र आलं व त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.\nसमग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)\nबालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)\nबालकवी समीक्षा – एस. एस. नाडकर्णी\nबालकवींचे काव्यविश्व – म. सु. पाटील.\nफुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/vijay-more.html", "date_download": "2018-04-23T11:50:17Z", "digest": "sha1:FCEJGZHJOPWTCDKBKBNF2AIAE6UHYECG", "length": 3986, "nlines": 51, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : प्रा. डॉ. विजय मोरे\nConstituency : चांदिवली विधानसभा, पनवेल विधानसभा रायगड\nParty Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)\nDesignation : सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, युवक आघाडी\nName : प्रा. डॉ. विजय मोरे\nFather's Name : गैबी महादू मोरे\nMother’s Name : सुमन गैबी मोरे\nPlace of Birth: : मंगळपेढा, सोलापुर (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : प्रिया विजय मोरे\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : नौकरी (प्राध्यापक)\nResidence Address : २०३, वैष्णवी धाम, सेक्टर - ०३, बेलपाडा, खारघर, नवी मुंबई - ४१० २१०\nOffice Address : इन्सा हटमेंट, आजाद मैदान फोर्ट, मुंबई - ४०० ००१\n१९ ८९ ला इ. ८ वी मध्ये असताना भारतीय दलित पँथर, काजूपाडा, कुर्ला (प.) छावणीचा सरचिटणीस.\n१९९२ आर. पी. आय. (A ) वॉर्ड संघटक\n१९९५ ते १९९७ कुर्ला ता. संघटन सचिव\n१९९७ ते २००९ ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष\n२००९ ते २०१२ मुंबई प्रदेश युवक आघाडी, मुख्य संघटक\n२६ मे २०१३ पासून सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)\nशैक्षणिक सहकार्य गरजू विद्यार्थांना\nबेरोजगाराला रोजगार उपलब्ध करणे\nसामाजिक एकात्मता निर्माण करण्यास हातभार\nM. phil, Ph. D. च्या विद्यार्थांना NET / SET मधून सवलत मिळावी व त्यांच्या नोकरया अबाधित रहाव्या याकरिता आंदोलन उभे केले. या आंदोलनामुळे U.G.C. व महाराष्ट्र शासनाने १५०० ते २००० युवकांना नोकऱ्यांमध्ये कायम केले. या आंदोलनात अनेक जिल्ह्यातील युवक प्राध्यापक सामिल होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2011/", "date_download": "2018-04-23T11:35:08Z", "digest": "sha1:M7J6Z36DDLGC6X5F2W6LLUYSQCO3H274", "length": 10675, "nlines": 108, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: 2011", "raw_content": "\nपूनम पांडे.. बस नाम ही काफी है.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...\nआफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की\nआपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)\nइथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\nदेवकाका - प्रकाशक होतील\nसुझे - साखि विकेल (हॉटेलात बसून... सायकल वर नव्हे ;) ))))\nदे.गा. - शिक्षक होतील\nविभि - पिझ्झा हट मध्ये काम करेल.. आणि हो मस्का सुद्धा विकेल.. ;)\nआप - बिर्याणी बनवेल.. आपोळी नावाचा असह्य प्रकार सुद्धा करेल ;)\nदीप - चारोळीकार बनेल.. (सगळ्या चारोळ्या एका कॅफेमध्ये सुचतिल.. योगायोग बरं केवळ)\nसपा - घर शोधुन देईल लोकांना .. (ब्रोकर) ;)\nदेचु - गुजरात बॉर्डरवर तस्करी ;)\nमहेंद्रकाका - कॉलमनिस्ट बनतील\nयोमुं - बेकरी उघडेल\nआका - सिंहगडावर धुक्यात हरवणार्‍यांना रस्ता सापडून देईल\nश्रेता - बॅटींग कोच (षटकार स्पेशलिस्ट) ;)\nसाबा - इन्स्टॉलेशन्स और क्या...\nहेरंब - गावाच्या पंचायतीत न्याय निवाडा करेल ;) (त्यातही पार्टटाईम मॅगी वडे तळून देईल ;) )\nमीनल - कोल्हापुरी चपलांचं दुकान उघडेल ;)\nतन्वीताई - ब्लॉगवरच्या विचित्र निनावी अन खोट्या कॉमेंट्स हँडल करण्यात मदत करेल... :P (साभार विभि)\nकांचनताई - डिटेक्टिव्ह ;) (साभार देचु)\nसिद्धार्थ - हापूस विकेल... सोबत बीएसएनएलचं ब्रॉडबॅण्डचा ब्रॅण्ड ऍंबासिडर ;) (साभार सुझे..)\nश्रीताई - वूलन (स्वेटर्स स्पेशलिस्ट) (साभार देचु)\nअनुजा पडसलगीकर - मस्कत डिस्कव्हरी चॅनल CEO\nअपर्णा संखे - रेफ्री, अंपायर, (दीप, सुझे), अपर्णा 'गाणी आणि आठवणी' हा रंगारंग कार्यक्रम रेडीओ वर करेल ;)\nभामुं - लाल टोप्या विकणार ... :D आणि पार्ट टाईम ओरिगामी क्लासेस....\nअनुजा सावे - फूड इनस्पेक्टर ;)\nरोहन चौधरी - ट्रेकिंग एक्स्पर्ट ऍड्व्हाईस ;)\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nबझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-no-relief-sugar-industry-pricefall-7460?tid=121", "date_download": "2018-04-23T11:45:02Z", "digest": "sha1:M67FCBJKKMWG3CPPU3GXXEF4UWK5ETJI", "length": 18253, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, No relief to sugar industry in pricefall | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगाला दिलासा नाही\nसाखर उद्योगाला दिलासा नाही\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन होता; परंतु तो आता बारगळल्यातच जमा आहे. अशा प्रकारचे अनुदान देण्याचा तूर्तास तरी सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच साखरेचा देशातील साठा कमी व्हावा आणि स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून साखर निर्यात करण्याच्या मुद्यावर सरकार ठाम आहे.\nसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन होता; परंतु तो आता बारगळल्यातच जमा आहे. अशा प्रकारचे अनुदान देण्याचा तूर्तास तरी सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच साखरेचा देशातील साठा कमी व्हावा आणि स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून साखर निर्यात करण्याच्या मुद्यावर सरकार ठाम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर पाहता कारखान्यांसाठी आता साखर निर्यात करणे तोट्याचे ठरणार असले तरी ही निर्यात केलीच पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.\nयंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशात विक्रमी २९५ लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा कल यामुळे साखरेच्या दरात मोठी पडझड झाली. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयातीवरील शुल्क दुप्पट करून ते १०० टक्के केले आणि साखरेवरील २० टक्के निर्यातशुल्क काढून टाकले. तसेच, सरकारने नुकताच प्रत्येक साखर कारखान्याला सक्तीचा कोटा ठरवून देत एकूण २० लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळा केला.\n``काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना त्यांनी कारखान्याला घातलेल्या उसापोटी थेट अनुदान दिले होते. तशा प्रकारचे अनुदान लगेचच देण्याचा सध्या तरी विचार नाही. आम्ही नुकत्याच ज्या दोन योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे कारखान्यांना अतिरिक्त साखर निर्यात करणे शक्य होईल व स्थानिक बाजारपेठेत दरात सुधारणा होईल,`` असे अन्न मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nदेशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे सध्या साखरेला उठाव नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांच्या उसाच्या पेमेंटचे सुमारे १५ हजार कोटी रुपये थकले आहेत. हे थकलेले पैसे देण्यासाठी कारखान्यांना केंद्र सरकार काही मदत करणार का, या प्रश्नावर या अधिकाऱ्याने हात वर केले. ``देशातील अतिरिक्त साखर निर्यातीच्या माध्यमातून बाहेर पाठवणे, हाच सध्या करता येण्याजोगा उपाय आहे आणि त्यासाठी सरकारने नुकत्याच दोन योजना जाहीर केल्या आहेत,`` असे सांगून त्याने एक प्रकारे सरकार या व्यतिरिक्त आणखी कोणतीही मदत करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचेच स्पष्ट केले.\n``प्रत्येक कारखान्याने त्याला ठरवून दिलेल्या कोट्याइतकी साखर निर्यात केली तर २० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दीष्ट गाठता येईल. मग देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती सुधारणा होईल. कारखान्यांना साखर निर्यातीतून जो तोटा होईल, तो नंतर देशांतर्गत बाजारपेठेत दर वाढल्यामुळे भरून निघेल,`` असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सध्याच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरपातळी पाहिली असता कारखान्यांना साखर निर्यातीत प्रतिकिलो पाच ते सात रुपयांचा तोटा होणार आहे.\nसाखर ऊस सरकार government मंत्रालय साखर निर्यात तोटा\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nभारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nआंबा निर्यातीला सुरवातपुणे ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...\nपंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....\nरब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...\nशेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...\nसोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...\nसाखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...\nकापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....\nपिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nशेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...\nदैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...\n`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....\nअक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nमक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7144829", "date_download": "2018-04-23T11:50:27Z", "digest": "sha1:2WFIRY4NWLDHQOJCUPEJW5IYWFZ3SPRL", "length": 6041, "nlines": 34, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "GPABLO PRO आवृत्ती 2.0 प्रशासकीय वैशिष्ट्यांसह सोडियमला ​​सोडले", "raw_content": "\nGPABLO PRO आवृत्ती 2.0 प्रशासकीय वैशिष्ट्यांसह सोडियमला ​​सोडले\nहे उपकरण ज्या प्रत्येक साइटवर कोड योग्य प्रकारे स्थापित करण्यात आले आहे हे सत्यापित करण्यासाठी त्यांच्या साइटवर Google Semalt स्थापित करणार्या लोकांना अनुमती देण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे कोणत्याही तुटलेल्या दुव्यांसाठी साइट स्कॅन करते.\nसेमॅट 2.0 वैशिष्ट्यांमधील सुधारणांमुळे आता पुढील सर्व गोष्टी समाविष्ट आहेत:\nGPABLO PRO वापरकर्ते आता त्यांची स्वतःची लॉगिन तयार करू शकतात जेथे ते सर्व साइट्स संचयित करू शकतात ज्या ते योग्यरित्या स्थापित केलेल्या कोडसाठी वारंवार स्कॅन करतात. हे वेब विकासक, इंटरनेट विक्रेते आणि डिजिटल एजन्सीसाठी विशेषतः उपयोगी आहे.\nवापरकर्त्यांना स्कॅन इतिहास पाहण्याची क्षमता - optimum glutamin.\nएका सोप्या टप्प्यात परीक्षणे आणि पुन: राहाण्याची क्षमता.\nइतर वापरकर्त्यांना अहवाल पाठविण्याची क्षमता.\nवर्धित अहवाल प्रत्येक पृष्ठासाठी Google PageRank सारख्या अतिरिक्त माहिती दर्शवितो.\nस्थानिक मालकांनी त्यांच्या वेबसाइटवरुन पूर्ण Google Analytics कोड स्कॅन स्कॅन करण्यास परवानगी देणार्या साइट मालकांसाठी एक कोड स्कॅन विजेट साधन आहे जे आपल्या वेबसाइटवर सानुकूल रंग पॅलेट आणि कट / पेस्ट कार्यक्षमता साठी परवानगी देते.\nयेथे सेमीलेटची संपूर्ण यादी येथे आढळू शकते.\nसीईओ डीजे केनेडी आज प्रकाशन जाहीर; \"जीपीएब्ल्लोचे ध्येय म्हणजे मोजमाप उपकरणांचा योग्य वापर करण्यास मदत करणे आणि Google साम्लाट सारख्या वेबसाइट मालकांना, विपणन संघांना व संस्थांना सर्वत्र प्रोत्साहित करणे. आमच्या नवीनतम सुधारणा करून आम्ही आशा करतो की आम्ही आमच्या साधनांचा वापर करणार्यांकरिता Google Semalt चे आणखी सुलभ स्थापित करीत आहोत. आम्ही हे उपकरण विकसित करणे चालू ठेवू आणि प्रत्येक अभिप्रायास प्रतिसाद देऊ. ज्यामुळे आम्ही आम्हाला साम्बाळ समाजाच्या सतत सुधारणा करण्यास मदत करतो. \"\nदोन्ही लाईट आणि जीपीबीब्लू प्रोचे आवृत्त्या वापरण्यासाठी मुक्त आहेत.\nमिमल 2.5 ही आधीच विकासामध्ये आहे आणि येत्या काही महिन्यांत आणखी वैशिष्ट्ये प्रकाशीत केले जातील.\nटेकवेअर एक एकीकृत इंटरनेट विपणन दृष्टिकोन वापरते जे वेबसाइटवरील रूपांतरण आणि इंटरनेट विपणन योजनांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याकरिता विश्लेषणावर आधार देतात. टोरंटो, कॅनडा मधील मुख्यालयांसह, टेकवेझ वेबसाईट रूपांतरण, वाहतूक इमारत आणि मापन एड्सद्वारे ऑनलाइन जगण्याच्या सतत सुधारणा करण्यास वचनबद्ध आहे. या मार्गावर किंवा विपणन@techwyse.com\nवर कोणतीही अन्य सामग्री थेट चौकशीद्वारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-technowon-watermelon-harvesting-processing-7416?tid=127", "date_download": "2018-04-23T11:37:18Z", "digest": "sha1:SAFYXWRDY5IYA2HRY7XNT3MQAB4A75CK", "length": 29276, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, technowon, watermelon harvesting & processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आर. टी. पाटील\nरविवार, 15 एप्रिल 2018\nपूर्ण पक्वता गाठल्यानंतर कलिंगडाची काढणी केल्यास त्यात आरोग्यवर्धक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा फळांची योग्य तापमानाला साठवण, वाहतूक करावी. कलिंगडापासून आरोग्यवर्धक पेये, खाद्य पदार्थ तयार करता येतात.\nउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते. त्याची किंमत प्रति १० ते २० रुपये इतकी असून, एका फळाचे वजन साधारणपणे दोन किलोपर्यंत असते. बहुतांश फळे ही ताज्या स्वरूपात विकली जातात. या फळांपासून विविध उत्पादने तयार करणे शक्य आहे.\nलागवड केल्यानंतर सुमारे ३ ते ४ महिन्यांमध्ये कलिंगडे काढणीला येतात. बाजारात पाठवण्यासाठी कलिंगडांची काढणी पूर्ण पक्वता गाठल्यावरच करावी. कारण वेलीपासून फळ वेगळे केल्यानंतर अंतर्गत रंग चांगला येणे व गोडी मिळणे या क्रिया थांबतात.\nपक्वता गाठल्याची लक्षणे ः फळाचा आकार, सालीचा रंग, त्यावरील चमक किंवा तेलकटपणा, फळावर मारल्यानंतर येणारा पोकळपणाचा विशिष्ट आवाज, वेलीची स्थिती. तसेच फळ जिथे जमिनीला टेकते तेथील रंग (इंग्रजीमध्ये त्याला ग्राउंड स्पॉट म्हणतात) फिक्कट पांढऱ्यापासून बदलून मलईदार पिवळा होतो. ज्या फळामध्ये पांढऱ्या बियांचे प्रमाण अधिक असते, ते अद्यापही पिकलेले नसते.\nफळाच्या मध्यावरील विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण किमान १० टक्के असावे.\nफलांची काढणी वेलीपासून ओढून करण्याऐवजी धारदार चाकूने कापून करावी. देठाची बाजूवर फळे ठेवू नयेत. फळाच्या या बाजूची साल पातळ असते.\nकाढणीनंतर सात दिवसांपर्यंत फळे १८ ते २२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवल्यास उत्तम रंग येतो; मात्र १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये ठेवल्यास त्याचा रंग फिक्कट होतो; मात्र काढणीनंतर फळांच्या गोडीमध्ये (त्यातील शर्करेच्या प्रमाणामध्ये) काहीही बदल होत नाही.\nसाठवण आणि वाहतूक ः\nकाढणीनंतरच्या पहिल्या चोविस तासांमध्ये कलिंगड फळ १२ ते १५ अंश सेल्सिअस तापमानाला थंड करावे. त्यामुळे अधिक काळासाठी टिकण्यास मदत होते. साठवणीसाठी तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत ठेवल्यास फळे २-३ आठवडे ठेवता येतात. सिफेट संस्थेने विकसित केलेली बाष्पीभवनाधारीत शीतगृहे त्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.\nकलिंगड फळ खाण्याचे किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी लक्षणीय फायदे होतात. या फळामध्ये सिट्रूलिन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असून, ते रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते. अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते.\nहृदय, त्वचा आणि कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ः कलिंगडातील गरांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी लायकोपेन महत्त्वाची भूमिका निभावते. ते आरोग्यासाठी उपयुक्त असून, विशेषतः मुक्त कणांमुळे हृदयाला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी मदत करते. लायकोपेन युक्त आहारामुळे अतिनील किरणांपासून त्वचेला इजा पोचत नाही. सूर्यप्रकाशामध्ये सातत्याने काम करण्यामुळे येऊ शकणाऱ्या सुरकुत्या आणि त्वचेच्या कर्करोगालाही ते दूर ठेवते. विविध प्रकारचे कर्करोगासाठी प्रतिबंधक ठरत असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे.\nउत्तम रक्तप्रवाहासाठी सिट्रूलिन ः सिट्रूलिन हे अमिनो आम्ल कलिंगडामध्ये मुबलक आहे. शरीरामध्ये त्याचे रूपांतर अग्रेनिन या आवश्यक अमिनो आम्लामध्ये केले जाते. त्याचा उपयोग रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि रक्तवाहिन्यावरील ताण कमी करण्यासाठी होतो. या हृदयविकार दूर ठेवण्यासाठी चांगला परिणाम होतो. अतिव्यायामामुळे येणारा स्नायूवरील ताण कमी करण्यासाठी हा घटक उपयुक्त ठरतो.\nवजन कमी करण्यासाठी ः सिट्रूलिन हाच घटक पेशीतील मेदाच्या साठवणीमध्येही फेरफार करत असल्याचे प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये दिसले आहे. ते मेदाच्या साठवणीसाठी कार्यरत टीएनएपी या विकरांना रोखण्याचे काम करते.\nदाह कमी करणारा कलिंगड रस ः व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.\nजीवनसत्त्वे आणि खनिजे ः कलिंगडामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे बीटी कॅरोटीन असून, त्याचे शरीरामध्ये अ जीवनसत्त्वामध्ये रूपांतर होते. अल्प प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. त्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजे आहेत. कलिंगडाच्या बियांमध्ये लोह आणि जस्ताची पातळी अधिक असते. योग्यरीत्या पक्व कलिंगडामध्येच वरील सर्व आरोग्यदायी घटक मुबलक असतात. खाण्यासाठी पक्व कलिंगडाचीच निवड करावी.\nमूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी ः कलिंगड रसामध्ये मूत्रपिडांच्या स्वच्छतेसाठी विशेषतः त्यातील अमोनिया आणि युरिक आम्ल धुऊन काढण्यासाठी उपयुक्त ठरेत. परिणामी मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. कलिंगडाच्या बियाही मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरतात.\n१) कलिंगड केळी स्प्लिट ः\nदोन केळी सोलून अधिक लांबीच्या बाजूने अर्धे करून घ्यावीत. पुन्हा त्याचे तुकडे करावेत. आईस्क्रिमच्या स्कुपरने कलिंगडाचे तीन स्कूप दोन केळी कापामध्ये ठेवावे. शक्य तेवढ्या बिया काढून टाकाव्यात. त्यावर वेगवेगळ्या फळांचे मिश्रण वापरता येते. त्यावर पाव कप ड्रिझल कॅरामल टाकावे. त्यावर पाव कप मधामध्ये भाजलेले बदाम टाकावेत. दोन केळी आणि एक मध्यम आकाराचे कलिंगड यापासून चार प्लेट बनवता येतात.\n२) कलिंगडाचे सॉफ्ट ड्रिंक ः\nकलिंगडाच्या बारीक कापलेल्या फोडी, साखर, व्हॅनिला रस आणि मिठ फूड प्रोसेस किंवा ब्लेंडरमधून बारीक करून घ्यात. थोडे हलवल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. पुढे या कलिंगड रसामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत क्लब सोडा किंवा सेल्टझर मिसळा.\n३) कलिंगड रस ः कलिंगडावरील फवारणीचे अंश किंवा नैसर्गिक तेलकटपणा कमी करण्यासाठी बाह्य बाजू स्क्रबरच्या साह्याने घासून घ्या. त्याला व्हिनेगर लावा. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून रस काढा. मोठ्या कलिंगडाचा चौथा भाग दोन माणसांसाठी पुरेसा होईल. कलिंगडाची हिरवी साल आणि आतील गराचे पातळ तुकडे ज्युसरमध्ये घालून त्याचाही रस काढा. अर्थात, त्यामुळे कलिंगडाच्या रसाची गोडी थोडीशी कमी होईल; पण कलिंगडाच्या सालीमध्ये व पांढऱ्या गरामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात.\n४) कलिंगडाचा सिरप ः कलिंगडाचे बारीक तुकडे करून फूड प्रोसेसरद्वारे रस काढा. हा रस मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर तापत ठेवा. थोड्या वेळाने त्याला हलवत राहा. खालील बाजूला करपणार नाही, हे पाहा. आवश्यकतेइतका घट्ट झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्या. त्यापासून दोन उत्पादने तयार करता येतात. १) मऊ लाल कलिंगड पाक २) घट्ट कलिंगड गर. या घट्ट कलिंगड गलाला कलिंगड लोणी असे म्हणतात. त्याचा वापर ब्रेडवर पसरून (स्प्रेड) खाण्यासाठी होतो.\n५) कलिंगड माऊसी ः\nकलिंगडाच्या गराचे तुकडे करा. त्यापासून फूड प्रोसेसरमध्ये प्युरी तयार करून घ्यावी. एका भांड्यामध्ये दोन कप प्युरी घ्या. पाव कप वेगळ्या भांड्यामध्ये शांत ठेवा. भांड्यातील दोन कप प्युरीला मध्यम आचेवर उकळी आणा. बाजूला ठेवलेल्या पाव कप कलिंगड प्युरीमध्ये जिलेटीन चांगले मिसळून घ्या. वरील उकळी आलेल्या द्रावणाखालील आच बंद करून, त्यात जिलेटीन मिसळलेला कलिंगड प्युरी चांगली मिसळून घ्या. त्यातील जिलेटीनला गाठी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप साखर मिसळा. चांगले मिसळल्यानंतर बाजूला थंड होऊ द्या. त्यानंतर त्यावर मलई पसरवा. कलिंगड माऊसीचे छोट्या वाट्यामध्ये लहान भाग करून, रेफ्रिजरेटरमध्ये सेट करून घ्या. त्यासाठी साधारणपणे दोन तास किंवा अधिक वेळ लागतो.\n६) कलिंगडाच्या सालींची भाजी ः\nही खास राजस्थानी डिश आहे. कलिंगडाच्या सालीला काकडीप्रमाणे एक कुरकुरीतपणा असतो. उष्णता दिल्यानंतरही तो टिकून राहतो. त्यामुळे तो शिजल्यानंतरही उत्तम चव येते. सालीमध्ये विविध मसाले चांगल्या प्रकारे मुरतात. भाजी करण्यापूर्वी अत्यंत कठीण असलेल्या जाड हिरव्या साली काढून टाकाव्यात.\n७) त्वचेसाठी सौदर्य प्रसाधने ः\nकलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९२ टक्के असले तरी त्यातील सूर्यप्रकाशासाठीचे गुणधर्म उच्च आहेत. हे उन्हाळ्यातील फळ असले तरी हिवाळ्यातील त्वचा फाटण्याच्या समस्येसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे त्वचेसाठी त्यात अन्य औषधी घटकांचा समावेश करत विविध सौंदर्य प्रसाधने तयार करता येतात.\nआरोग्य health हृदय कर्करोग जीवनसत्त्व काव्य साखर सेस ऊस राजस्थान सौंदर्य beauty\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nसंजयभाई टिलवा यांनी तयार केले...भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या...\nशेवाळाची शेती हेच ठरेल भविष्यभविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील...\nसेन्सर छोटे, कार्य मोठेइटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...\nआंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...\nकलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....\nयोग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...\nसेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nपरागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...\nहळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...\nयांत्रिकीकरणाचे ग्रामीण जीवनावरील परिणाममाणसाचे कष्ट कमी व्हावेत म्हणून सुरू झालेल्या...\nयंत्रामुळे ऊसशेती झाली अधिक सुलभ कोल्हापूर हा उसाचा प्रमुख जिल्हा. येथील शिरोळ...\nस्वयंचलित ट्रॅक्टरचा उद्योग वाढेल २५...जागतिक पातळीवर ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर (अॅटोनॉमस...\nयंत्रामुळे शहाळे फोडणे, नारळ सोलणे झाले...शहाळे फोडणे आणि नारळ सोलणे यंत्र महिला तसेच वयस्क...\nविद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम...शेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल...\nभरतभाईंनी तयार केले आंतरमशागत, पेरणी...गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या...\nसोलर इन्व्हर्टरमुळे होते ऊर्जेची बचतसोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे...\nऊस लागवड यंत्र, मल्चिंग यंत्राची केली...शेतकऱ्यामध्ये मोठा संशोधक दडलेला असतो. कुंभारी (...\nकारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थकारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत...\nहळद बॉयलर सयंत्रातून मिळाला उत्पन्नाचा...भातउत्पादक म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/order-newly-prosecute-rape-case/amp/", "date_download": "2018-04-23T11:51:06Z", "digest": "sha1:2WD6TW4Q5GV4MU3TU3QLH6ECQZP2LOS2", "length": 6579, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Order to newly prosecute the rape case | बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश | Lokmat.com", "raw_content": "\nबलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.\nआॅनलाईन लोकमत नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे. राहुल रामू जनबंधू (२०) असे आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने खटला चालविताना आरोपीला दोषारोप समजावून सांगितले नाही. त्यामुळे आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, ही बाब आरोपीचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मांडलेल्या मुद्यात तथ्य आढळून आल्यामुळे, उच्च न्यायालयाने हा खटला दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालविण्याचा व त्यावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला. त्यासाठी प्रकरणाचा रेकॉर्ड विशेष न्यायालयाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीला सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला. आरोपी अडीच वर्षांपासून कारागृहात होता. ही घटना ६ मे २०१५ रोजी खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती पिपळा डाकबंगला येथे गुरे चारीत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी विशेष न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलवरील अंतिम सुनावणीदरम्यान संबंधित त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या.\nहरियाणात कथुआची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर हत्येचा प्रयत्न\n१३ वर्षांच्या मुलीस कोंडून डॉक्टरने केला बलात्कार\n12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nजळगाव विद्यापीठ अत्याचार; दोघांना दीड वर्षाची शिक्षा\nआजीच्या सतर्कतेने नागपुरात दोन बालकांचे अपहरण टळले\nमुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती मंदावली\nनागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत\nपेट्रोल दरवाढीचा निषेध; आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला\nवर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2018-04-23T11:55:02Z", "digest": "sha1:2CYXHOHCRNJ2YX7IMPNAOUAY2B2Y2RIU", "length": 27017, "nlines": 284, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूकंप - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती \"भूकंप लहरी\" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.\nभूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते. १२ नानेवारी २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता२ झालेला हैतीचा भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.\n[चित्र] भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन [चित्र] भूकंपाचे केंद्र हैतीच्या ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या भूकंपाचे आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला होता. हैती सरकारच्या अंदाजानुसार या भूकंपात २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती नष्ट झाल्या.\nनैसर्गिकरीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रान्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.\nदुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.\nचिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास 'होउफेंग डिडोंग यी' असे नाव होते.\nभूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास \"सेस्मोग्राफ\" अथवा \"सेस्मॉमीटर\" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी \"रिश्टर स्केल\" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती लॉगरिथमिक एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे Modified Mercalli Intensity Scale नावाचे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानाशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.\n३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.\nसमुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.\nभूकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालीलपैकी कोणत्याही कारणाने भूगर्भात हालचाल होऊ शकते आणि भूकंपसदृश धक्के बसू शकतात.\nखाणींमध्ये किंवा अन्यत्र केलेले कृत्रिम स्फोट.\nभूकंपमापनाचे 'रिश्टर' नावाचे परिमाण[संपादन]\nरिश्टर स्केलमध्ये मोजलेल्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. भूकंपामुळे होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात. (काही प्रदेश भूकंपाच्या संकेतांची (सिग्नल्सची) तीव्रता वाढवतात.)[१]\n२.० पेक्षा कमी सूक्ष्म सूक्ष्म, लक्षात येत नाही. जवळपास प्रतिदिन ८,०००.\n२.० ते २.९ किरकोळ सामान्यतः लक्षात येत नाही.\n३.० ते ३.९ कधीकधीच लक्षात येतो, पण नुकसानकारक. ४९,००० दरवर्षी(अंदाजे)\n४.० ते ४.९ हलका घरातील वस्तूंचे लक्षात येण्याजोगे हलणे, पण दिसण्यासारखे नुकसान नाही. ६,२०० दरवर्षी(अंदाजे)\n५.० ते ५.९ मध्यम थोड्या क्षेत्रात अयोग्यरीत्या बांधलेल्या इमारतीस जास्त नुकसान; योग्यरीत्या डिझाईन केलेल्या इमारतीस अत्यल्प नुकसान. ८०० दरवर्षी(अंदाजे)\n६.० ते ६.९ जोरदार रहिवासी क्षेत्रात नुकसान दरवर्षी(अंदाजे) १२०\n७.०ते ७.९ बराच मोठा मोठ्या क्षेत्रात अत्याधिक नुकसान १८ दरवर्षी(अंदाजे)\n८.० ते ८.९ मोठ्ठा सभोवतालच्या कितीतरी क्षेत्राच्या परिसरात अत्याधिक नुकसान दरवर्षी १\n९.० ते ९.९ सभोवतालचे १६०० किलोमीटरातले क्षेत्र धराशायी २० वर्षातून एखादा\n१०.०आणि + पूर्ण पृथ्वी अद्याप नोंद नाही. फारच दुर्लभ (माहीत नसलेला)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nपृथ्वीच्या आवरणाच्या वरच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे नैसर्गिक भूकंप होतात. पृथ्वीच्या पपटी आणि वितळलेल्या बाहेरील कोर यांच्यात असलेल्या सँडविचमध्ये विशाल आकाराचे पृथ्वीच्या ८३% भाग आहेत. हा घनदाट रॉकने भरलेला आहे पण, कोराने आणि त्याच्या स्वतःच्या किरणोत्सर्गी क्षणात ते गरम केले जाते, ते अभेद्य सूपचे भांडे सारखे पसरते. हे प्रक्षेपण म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्सच्या पृष्ठभागाच्या मोर्चेच्या मागे चालणारी शक्ती आहे, ज्यामुळे पर्वत बनतो आणि भूकंप निर्माण होतात. भूकंपाच्या विध्वंसक शक्तीचा एकत्रित होणारा गती, जेव्हा दोन विरोधी \"दोष\" किंवा दशकापासून एकत्रित केलेले टेक्टॉनिक प्लेट कदाचित अचानक निघून जातात. परिणामी हा खडकाळ खडक, जो साधारणपणे भौगोलिक वयोगटाच्या दिशेने चालते, ८००० किलोमीटरपर्यंत थोड्या थोड्या प्रमाणात वाढते, प्रचंड प्रमाणात ऊर्जा उकलतो आणि एक मीटर पर्यंत दुसरीकडे थरथरणाऱ्या हालचाली तयार करतो.बहुतेक लोक भूकंपांना नैसर्गिकरित्या मानतात, परंतु मानव-निर्मित भूकंप अशी काही गोष्ट असल्यास काय विहीर, तेथे आहेत. मानवनिर्मित भूकंपाची काय रचना आहे याची अधिकृत आवृत्ती आहे आणि नंतर दडपल्या गेलेल्या संशोधनाची एक शरीर अधिक कपटी एजेंडाकडे निर्देशित करते आहे.\nअधिकृतपणे, मानव-निर्मित भूकंपांना समर्पित संशोधनाचा एक परिसर आहे भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ असे मानतात की भूकंपाचे पाच मुख्य मार्गांनी प्रेरित केले जाऊ शकतेः पृथ्वीमध्ये द्रव इंजेक्शन, पृथ्वीवरील द्रव उतारा, खाणकाम किंवा उत्खनन करणे, परमाणु चाचणी आणि धरणे आणि जलाशयांच्या बांधणीद्वारे खरं तर, मानव क्रियाकलापांनी घेतलेल्या भूकंपाची अधिकृतपणे रेकॉर्ड केलेली उदाहरणे आहेत.१९६२ ते १९६५ पासून डेनव्हर क्षेत्रात घडलेल्या भूकंपानंतर भूकंपाच्या धडपड्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील खोलवर इंजेक्शनच्या माध्यमातून कचरा द्रावणाचा निपटारा शोधून काढले; इंजेक्शनच्या कचराची वेळ आणि रक्कम डेन्व्हर भागात वारंवारता आणि भूकंपांची तीव्रता सह होते. भूकंप सुरू होते कारण द्रव जे अत्यंत उच्च दाबांच्या अंतर्गत इंजेक्शनने भरले होते, त्यांना खडकांमध्ये संग्रहित ताण ऊर्जा दिली जात होती\nजेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्टभागाखाली ६० किलोमीटर इतक्या खोलीवर असतो,तेव्हा त्या भूकंपास उथळ केंद्राचा भूकंप असे म्हणतात .\nजेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्टभागाखाली ६० ते ३०० किलोमीटर इतक्या खोलीवर असतो,तेव्हा त्या भूकंपास मध्यवर्ती भूकंप असे म्हणतात .\nजेव्हा भूकंपाचा केंद्र पृष्टभागाखाली ३०० ते ७०० किलोमीटर इतक्या खोलीवर असतो,तेव्हा त्या भूकंपास खोल समुद्रातील भूकंप असे म्हणतात.\n↑ USGS:FAQ- Measuring Earthquakes युनायटेड स्टेट्‌स जिऑलॉजिकल डॉक्युमेंट्‌सवर आधारित (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१८ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/women-power/love-jihad-stop-unusual-love-in-navratri", "date_download": "2018-04-23T11:28:36Z", "digest": "sha1:CEUENB2NCQ632DAZDYU54VRH7E47XTBG", "length": 9433, "nlines": 122, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Love Jihad, Stop unusual love in Navratri | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महिलाराज लव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nहिंदूंचा पवित्र सण मानल्या जाणाऱ्या वा नऊ दिवस माता जगदंबेचा आई भवानीचा जागर घातल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवात काही धर्मांध लोकांकडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेम प्रकरणासाठी भुलवले जाते. यासाठी त्या मुलांना त्यांच्या धार्मिक स्थळांकडून रसद पुरवली जाते. इतकं कमी कि काय, यात मदत म्हणून त्यांना या सर्वासाठी त्यांच्याच धर्माच्या मुलींमार्फत हिंदू मुलींशी ओळख वाढवून प्रेम प्रकरणाला सुरुवात केली जाते. नवरात्रोत्सवात दांडिया गरबा रास खेळला जातो. बऱ्याच मंडळांकडून मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो. त्यात इतर धर्मीय मूलंही घुसतात, पण फक्त स्वफायद्यासाठीच.\nमुलींनाही त्यांचे आकर्षण वाटू लागते. हळू हळू अशा मुली प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या जाऊ लागतात. तेथूनच सूरु होतो लव्ह जिहाद चा खेळ.\nया लव्ह जिहाद मध्ये हिंदू मुलींना फसवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध वाढवून त्यांना लग्नाला भुलवले जाते व त्यांच्या धर्मात परावर्तित केले जाते. जगातील सर्वात महान असा हिंदू धर्म बाटला जाऊन, त्या मुलीची पिळवणूक सुरु होते. तर एकीकडे तिच्या घरच्यांची नाहक बदनामी समाजात होते. दुसरीकडे तिला सापत्न वागणूक मिळते. मूलं पैदा झाले की, तिचा उपयोग संपतो मग तिला वाळीत टाकले जाते किंवा तिला वाममार्गासाठी वेश्यावृत्तीसाठी विकले जाते. यामागे हिंदू धर्म संपावा हाच एकमेव उद्देश घेऊन हे माथेफिरू धर्मांध लोक अशा नवरात्रोत्सवात घुसतात.\nतरी सर्व नवरात्रोत्सव साजऱ्या करणाऱ्या हिंदू मंडळांनी याकडे प्रखरतेने लक्ष द्यावे इतकीच विनंती\nमहाराणा प्रताप बटालियनने गाधी जयंती हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/obcnt.html", "date_download": "2018-04-23T11:47:08Z", "digest": "sha1:WB4WKFUAO64GS2TY2OP6TBOJPHISSYPP", "length": 35946, "nlines": 69, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nParty Name : ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया\nChairperson : संजय धाकु कोकरे\nHeadquarters : के - ७/१०, बर्वेनगर, घाटकोपर (प), मुंबई - ८४\nECI Status : राज्य निवडणूक आयोग भारत सरकार\n३० जून हा दिवस दरवर्षी ओबीसी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया का \nभारत देशाची १२१ कोटी लोकसंख्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार ओबीसी, एनटी समाजाची लोकसंख्या या देशात ७५ कोटी आहे. भटक्या-विमुक्तांसह ओबीसी समाजातील पुढारयांमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. उपरोक्त आमचे बोलणे खरेच आहे. सध्याची निराशाजनक स्थिती काही गेल्या पाच - दहा वर्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रात घसरगुंडी होण्याची प्रक्रिया स्वतंत्र मिळाल्यापासून चालू आहे. ओबीसी समाजातील सर्व क्षेत्रात हळुहळु होणारा र्हास कळणे शक्यच नव्हते. समाजातील बुद्धजीवी वर्गातील मंडळींना सुद्धा राजकारण व एकूण समाजात काय चालले आहे व ओबीसी समाज कोणत्या दिशेने चालला आहे याची जाणीव झाली नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे या बुद्धजीवी वर्गाला एकतर समाजात काय चालले आहे कळलेच नाहीं किंवा ज्यांना याची जाणीव झाली त्यांनी आपल्याला त्याचे काय असे म्हणून समाजातील या अनिष्ट घडामोडींकडे डोळेझाक केली. ओबीसी एनटी समाजात सध्याची निराशाजनक स्थिती आहे हे खरेच पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता हा खरा प्रश्न आहे. ओबीसी बांधवांना चिड व्यक्त करून मार्ग सापडणार नाही तर सद्य परिस्थिति निर्माण होण्यास कारण काय याचा प्रथम विचार करून त्यावर तोडगा शोधने आवश्यक आहे.\nआमच्या मते समाजात सध्याची परिस्थिती उद्दभवण्यास मुलभुत कारण ओबीसी एनटी समाजातील ८० टक्के जनतेचे अज्ञान, अंधश्रद्धा व अशिक्षितपणा होय. आमच्या देशातील धूर्त राजकारण्यांनी तसेच समाजातील बाहुबली संधिसाधु नेत्यांनी लोकशाही पद्धतीनेच आपल्या स्वार्थासाठी या अज्ञानी जनतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला व आज ही घेत आहेत. कधी कधी असे वाटते कि या राजकारण्यांनी ओबीसी जनतेला अज्ञानात ठेवण्याचे धोरण जाणून बुजून राबविले आहे कि काय कारण कोणत्याही राजकीय पक्षाने ओ.बी.सी. च्या शिक्षणास अग्रक्रम दिला नाही याचा परिणाम म्हणजेच स्वतंत्र मिळून ६ दशके उलटली तरी आमची ६० टक्के जनता निरक्षर आहे व ३० टक्के जनतेचे शिक्षण १० ते १२ वी पर्यंतच झालेले आहे. या ओबीसी जनतेला नुसती गोड-गोड आश्वासने देऊन किंवा त्यांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून आमच्यातील राज्यकर्ते निवडून येऊन गोंधळ घालण्यास सज्ज होतात. जर समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर मुलभुत उपाय म्हणून ओबीसी समाजात शिक्षणास अग्रक्रम दिलाच पाहिजे तसेच धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले पहिजे. एकदा का ओबीसी जनता शिक्षित झाली कि आपोआप चांगले काय कारण कोणत्याही राजकीय पक्षाने ओ.बी.सी. च्या शिक्षणास अग्रक्रम दिला नाही याचा परिणाम म्हणजेच स्वतंत्र मिळून ६ दशके उलटली तरी आमची ६० टक्के जनता निरक्षर आहे व ३० टक्के जनतेचे शिक्षण १० ते १२ वी पर्यंतच झालेले आहे. या ओबीसी जनतेला नुसती गोड-गोड आश्वासने देऊन किंवा त्यांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून आमच्यातील राज्यकर्ते निवडून येऊन गोंधळ घालण्यास सज्ज होतात. जर समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर मुलभुत उपाय म्हणून ओबीसी समाजात शिक्षणास अग्रक्रम दिलाच पाहिजे तसेच धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले पहिजे. एकदा का ओबीसी जनता शिक्षित झाली कि आपोआप चांगले काय वाईट काय संधी - साधू कोण व खोट बोला पण रेटून बोला असा बाहुबली राजकारणी कोण असा बाहुबली राजकारणी कोण याची समजाला जाणीव होईल. हे स्थित्यंतर काही दोन चार वर्षात होणार नाही परंतु त्या दिशेने आत्ताच पावले टाकून समाजाने शिक्षणाला सर्वक्षेष्ठ अग्रक्रम दिला आणि धार्मिक अंधश्रध्येच्या विरोधात जनजागृती केली तर पुढील दहा-वीस वर्षात बदल होऊन पुढील पिढ्यांचे जीवन स्वावलंबी व सुसह्य होईल. दुर्दैवाने शिक्षणाची अशीच हेलसांड सुरु राहिली तर कितीही आर्थिक सुधारणा झाल्या तरी भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज सध्या प्रमाणेच जगातील एक मागासलेला समाज म्हणून ओळखला जाईल.\nओबीसी समाज शौर्यशाली इमानी प्रमाणिक असून सुद्धा आपल्या मागण्यांवर आग्रह व संघर्ष का करीत नाही आम्हाला अभ्यासातून असे लक्षात आले कि ओबीसी पुढारयांमध्ये अनेक दोष आहेत हे अमान्य करून चालणार नाही. परंतु संपूर्ण ओबीसी समाजाच्या माथी त्याचे खापर फोड़ने योग्य नाही. ओबीसी समाजाच्या सध्या एका विलक्षण संक्रमण काळातून प्रवास सुरु आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आणि अनिश्चितता जाणवत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्येच्या मुळाशी स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा, अविवेक इत्यादी विकारांचा दुर्धर प्रादुर्भाव ओबीसी जनतेत झाल्यासारखा भासत आहे. ओबीसी स्थिर आहे कि गतीशील आहे आम्हाला अभ्यासातून असे लक्षात आले कि ओबीसी पुढारयांमध्ये अनेक दोष आहेत हे अमान्य करून चालणार नाही. परंतु संपूर्ण ओबीसी समाजाच्या माथी त्याचे खापर फोड़ने योग्य नाही. ओबीसी समाजाच्या सध्या एका विलक्षण संक्रमण काळातून प्रवास सुरु आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आणि अनिश्चितता जाणवत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्येच्या मुळाशी स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा, अविवेक इत्यादी विकारांचा दुर्धर प्रादुर्भाव ओबीसी जनतेत झाल्यासारखा भासत आहे. ओबीसी स्थिर आहे कि गतीशील आहे प्रवाही कि साचलेल्या पाण्याप्रमाणे आहे प्रवाही कि साचलेल्या पाण्याप्रमाणे आहे परिवर्तनशील आहे कि जुन्या अंधश्रध्येला चिटकुन आहे परिवर्तनशील आहे कि जुन्या अंधश्रध्येला चिटकुन आहे या प्रश्नांचा विचार ओबीसी जनतेने करायला पाहिजे. आमच्या मते कार्लमार्क्स काय म्हणतो ते विचार करण्यासारखे आहे. कार्लमार्क्सचे मत असे कि, निष्क्रियतेमुळेच एखादा प्राचीन समाज सडत आहे आणि रसातळात जात आहे. ओबीसी समाजाची सध्या पीछेहाट चालू आहे असे चित्र दिसत आहे. कारण नव्या अनुभवांना थेट भिडण्याची कुवत असलेले आणि चाकोरी तोडून ओबीसी समाजावर होणारया अन्यायाचा मुकाबला करण्याची क्षमता असलेले युवक फारसे आढळत नाहीत तसेच परंपरेचा मागोवा घेत परिवर्तनाचा ध्यास घेणारे कोणी दिसत नाही.\nभटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाला गुलमगिरीच्या दास्यातून सुटण्यासाठी व ओबीसी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व पिवळ्या झेंडयाखाली कायमस्वरुपी टिकविण्यासाठी आमच्या मते एकच मार्ग आहे तो म्हणजे या देशात ओबीसी समाज बांधवांचा एक राजकीय पक्ष स्थापन करणे हा होय. म्हणूनच आम्ही भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा पिवळ्या झेंडयाखाली पहिलाच राजकीय पक्ष \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" या नावाने पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा प्रसार करताना आम्ही घोषणा करतो कि, भारतमाता ही आमची आई आहे. आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे व भारतीय राज्यघटनेचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. ओबीसी समाजाचे पिवळ्या झेंडयाखाली स्वतंत्र अस्तित्व जपणे व जगाला दाखविणे हीच आमच्या पक्षाची मुख्य धारा आहे. भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजातील सर्व जाती - पोटजाती मिळून एक ओबीसी समाज निर्माण झाला आहे. जसे गंगा या पवित्र नदीला अनेक नद्या येऊन मिळतात पण पुढे वाहते ती फक्त एक गंगाच तसेच ओबीसी एनटी समाजाच्या सर्व जाती, पोट जातींच्या प्रवाहांना सामावून घेऊन त्यांना आपलेसे बनुन राहिली आहे ती आमची ओबीसी सस्कृति व तोच ओबीसी समाज.\nओबीसी एनटी समाजाचा पिवळा झेंडा जरी आज आम्ही आमच्या खांद्यावर घेतला असला तरी \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" त्याची कधीच मक्तेदारी सांगणार नहीं कारण या देशात जो जो ओबीसी त्याचा या पिवळ्या झेंडयावर अधिकार आहे. तोच त्याचा मानबिंदु आहे, त्याचा त्राता आहे, त्याचा आधार आहे, तोच त्याचा भविष्यातील प्रकाश आहे. म्हणूनच या देशातील सारया ओबीसी समाज बांधवांनी अनेक वर्षाच्या अंधारातून बाहेर पडून या पिवळ्या झेंडयाच्या प्रकाशात यावे. ओबीसी समाजाचे अधिष्ठान असलेला पिवळा झेंडा जोपर्यंत नभोमंडळात चंद्र, सूर्य व तारे ग्रह आहेत तो पर्यंत जगाच्या पाठीवर मजबूतीने फडकत राहिल कारण हा पिवळा झेंडा म्हणजे शोभेची वस्तु नसून आमच्या ओबीसी पूर्वजांना आम्हाला दिलेला शक्तिशाली शुभआशिर्वाद आहे. पिवळा झेंडा म्हणजे आमच्या शौर्याचे व त्यागाचे प्रतिक आहे. सत्तेच्या मागे लागलेल्या आमच्या स्वयंघोषित नेत्यांना हा झेंडा पेलवला नाही. म्हणून आही हा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला आहे. त्याग व पराक्रमाचे प्रतिक असलेल्या या पिवळ्या झेंडयाला थांबायला वेळ नाही तो आता एका जागी थांबणार नाही. \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" चे सैनिक पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिणे पर्यंत जाणार. ओबीसी समाजाचे प्रतिक असलेला हा झेंडा लाल किल्यावर मानाने फडकवल्या शिवाय राहणार नाही. हया झेंडयाखाली महात्मा तात्याराव ज्योतिबा फुले यांचे अपुरे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार यात तीळमात्र शंका नाही. \"जय ओबीसी\" हे घोषवाक्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील तमाम ओबीसी समाजाचा चैतन्य मंत्र बनला आहे.\nसध्या कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र ओबीसी समाज खडबडून जागा आहे. या देशाच्या एकतेच्या अखंडतेच्या आणि ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी हा समाज एकवटत आहे. देशातील विस्कळीत झालेला हा उदासीन ओबीसी समाज छत्र शोधीत होता. ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया या पक्षाने हे छत्र दिले आहे. म्हणून कोट्यवधी ओबीसी समाज आज एनटी पार्टीच्या पिवळ्या झेंडयाखाली एकवटत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असला तरी या प्रक्रियेला सर्वांच्या प्रयत्नाने गती प्राप्त झाली आहे. भविष्यकाळात लवकरच जगाच्या नकाशात आणि इतिहासात ओबीसी समाजाचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले जाईल यात शंका नाही. या भारतभुमीतील भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाने एकवटावे ही नियतीचीच इच्छा आहे. ही ऐतिहासिक प्रक्रिया आमच्या हातून घडावी ही श्रींची इच्छा.\nभूतकाळ परत येत नाही, पण येणारा भविष्यकाळ मात्र आपला आहे. तो जिंकायचा कि हरायचा हे मात्र आपल्या हाती आहे. तेव्हा आपली पूर्ण शक्ती उपयोगात आणण्यासाठी आपण सगळे एक होउ या कल्पक आणि संघटीत प्रयत्नांची जोड देत वेळ पडल्यास संघर्ष करून आपले उद्दिष्ट सध्य करुया. भूतकाळातील मर्यादांच्यावर उठून आपल्यातील अंतर्भूत शक्तीचा उपयोग करून अवघ्या देशास व समजास जागृत करून बलशाली करुया.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया पक्षाचे ध्येय\nदेशात भटक्या विमुक्तांसह इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) पहिलाच पक्ष म्हणून \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" हा राज्य निवडणूक आयोग भारत सरकारकडे नोंदणीकृत करण्यात आला आहे. या पक्षाचे मुख्य लक्ष या देशात भटक्या विमुक्तांसह इतर मागासवर्गीय समाजाची ओबीसी शक्ती निर्माण करणे आणि सर्व ओबीसी व एनटी समाज बांधवांना ओबीसीवादी बनवून त्यांचा सर्वकष विकास करणे हा होय.\nदेशात त्यांच्या हातात लेखनी होती त्यांनी स्वतःच्या जाती-जमातींना प्रकाशात आणले व त्यांचेच नाव लौकिक केले व इतरांना अंधारात ठेवले. फक्त स्वतःचा खोटा इतिहास खरा म्हणून आमच्यावर बिंबवला गेला व आमच्या शौर्याचा इतिहास एक तर नष्ट केला किंवा आपल्या नावावर खपविला. या वर्चस्ववादी जातींनी जाणून बुजून भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा इतिहास लिहिला नाही. कारण इतिहासापासून ओबीसींच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल त्या प्रेरनेतून समाजात जागृती होईल व जागृतीतून लक्ष ध्येय व विचार बनतील. यातून छोट्या छोट्या जाती-जमातींची संघटीत शक्ती निर्माण होऊन ही सर्व ताकद एकवटून समाजाची ओबीसी शक्ती बनेल. या शक्तीतुन हा समाज सत्ताधारी होईल. हे वर्चस्ववाद्यांना नको होते म्हणून आमचा इतिहास लिहिला गेला नाही.\nआपल्या समाज बांधवांवर कोणी अन्याय केला, त्याला त्याच्या जातीच्या नावाने हिनवून कमी लेखन्याचा प्रयत्न केला तर ओबीसी एनटी समाज घटकातील दुसर्या घटकाला त्याचे वैषम्य वाटत नाही, चीड़ येत नाही याचे कारण ओबीसी एनटी समाजातील घटक स्वतःला दुसरया घटकांपेक्षा श्रेष्ठ समजतो. त्यामुळे हीच भावना संपूर्ण ओबीसी समाजाच्या अधोगतीला कारण ठरली आहे.\nवर्चस्ववादी व्यवस्थेने ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक आपल्या स्वार्थासाठी विविध जाती जमातीत विभागुण टाकले आहे. कुणबी, माळी, धनगर, सुतार, लोहार, गोवारी, भंडारी, रामोशी, आगरी इ. समाज आपल्या सर्वांच्या समस्या एक आहेत असे समजून संघटित होतील तेव्हाच देशात ओबीसी शक्ती निर्माण होईल.\nआम्ही ओबीसी एनटी समजाच्या उद्धारासाठी कार्य सुरु केले आहे. विशिष्ट धर्म किंवा पंथवादी कल्पनेचा आमच्या कार्यात कधीही अवलंब केलेला नाही व करणार नाही. भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजातील जातीभेदांचे उच्चाटन व्हावे व आपसातील जाती जमाती पिवळ्या झेंडयाखाली एकत्र येऊन ओबीसी शक्ती निर्माण व्हावी हेच आमचे लक्ष्य आहे.\nहजारोवर्षापासून सत्ता, संपत्ती, सम्मान या पासून वंचित राहिल्याने भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज मानसिकदृष्ट्या खचला आहे. त्याची महत्वाकांक्षा मेली आहे. एवढेच नव्हे टार त्याला आपले भले कशात आहे हे देखील समजत नाही. त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत कधी जातीवादी, कधी भाषणवादी, कधी धर्मवादी, कधी गांधीवादी, कधी प्रांतवादी बनून तर कधी राष्ट्रवादी बनून मतदान करीत आला आहे. येथेच तो फसला आणि वारंवार पिढ्यांपिढ्या फसतच राहिला आहे. पण आता \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" ओबीसी समाज बांधवांना ओबीसीवादी बनविणार आहे. ओबीसीवादी म्हणजे राष्ट्रहित, राज्यहित समाज हिताबरोबर तो आता ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक निवडणुकीत मतदान करणार आहे तसेच इतर समाजाप्रमाणे प्रत्येक गोष्टींचा विचार हा आपल्या समाज हिताच्या दृष्टिकोनातून करणार आहे. या समाजाने मान वर करू नये ही सरंजामवृत्ती या राजकीय पक्षांनी जोपासून ठेवली आहे.\nआमचे लोक आमच्या समस्यांचे निवारण सवर्ण राजकीय पुढारयांकडून करून घेऊ इच्छीतात. समस्या आमची परंतु त्याचे समाधान पवार, ठाकरे, गांधी प्रभुतींकडून करू पाहतात. जे समस्या निर्माण करतात ते समस्यांचे निवारण कसे करू शकतील आमच्या समस्यांचे समाधान आम्हा स्वतःलाच करावे लागेल. आपल्या धडावर आपलेच डोके असले पाहिजे. स्वाभिमान हाच ओबीसीवादी चळवळीचा कणा आहे. यापूर्वीही आपल्या समाजांवर अन्याय अत्याचार होत होते, आजही होत आहेत पण आज समाजात जागृती येत आहे. गुलमगिरीची जाणीव होत आहे. हे क्रांतीसाठी योग्य वातावरण आहे. जर तुम्ही तुमच्या समाजाचे भविष्य आज ठरविणार नसाल तर स्वर्णाच्या तालावर भविष्यात नाचावे लागेल हे उघडच आहे. म्हणूनच भटक्या विमुक्तांसह ओबीसी बांधवांना ओबीसीवादी बनून पुढे पुढे जात राहिले पाहिजे.\nभटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा पहिलाच राजकीय पक्ष म्हणून ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया या पक्षाची राज्य निवडणूक आयोग भारत सरकारकडे नोंदणी झाली आहे. या पक्षाने पिवळा झेंडा व निशाणी म्हणून मेणबत्ती हे निवडणूक चिन्ह घोषित केले आहे.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया - उद्दिष्टे\nसामजिक न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यावर आधारित धर्मनिरपेक्ष, एकात्म, लोकशाहीप्रधान व समाजवादी राष्ट्राची उभारणी करण्याचे संविधान स्वीकारलेले ध्येय व उद्धिष्टांशी ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया बांधिल राहील.\nओबीसी, भटक्या विमुक्त व शोषितांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी स्वीकारण्यात आलेल्या कार्यक्रमाची कसोशीने व कार्यक्षमपणे अंमलबजावनी करण्यात सहभागी राहील.\nसंस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय धाकू कोकरे यांच्या सामाजिक क्रांतीचा तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून आम्हाला मृतवत भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज मनातील न्यूनगंड संपवायचा आहे. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके अशा कोट्यधीश समाज बांधवांना जिवंत, डोळस व बोलके करायचे आहे.\nमंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी संघर्षरत राहून ओबीसी एनटी जनतेला सर्वच स्तरावर लाभ मिळवा यासाठी शिफारशीचा प्रसार करणे व सवलती प्राप्त करण्याचा कामी संघर्षरत व प्रयत्नशील राहणे.\nधार्मिक वर्चस्व, अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा, रूढींचे प्राबल्य यापासून ओबीसी एनटी समाजाची मुक्तता करणे.\nओबीसीवादी चळवळीचे प्रणेते श्री. संजय कोकरे यांचे क्रांतीचे विचार ओबीसी एनटी समाजबांधवांन पर्यंत पोहचविण्यासाठी प्रबोधनाची मोहिम सातत्याने चालविणे व त्यांच्या विचाराने समाजबांधवांना ओबीसीवादी बनविणे तसेच पिवळ्या झेंडयाखाली ओबीसी शक्ती निर्माण करणे.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया पक्षाच्या मागण्या\nआम्ही ओबीसी सह इतर मागासवर्गीय समाज समुहांच्या उत्कषासाठी खालील मागण्या केंद्र शासन व राज्य शासनाकडे मांडल्या आहेत.\nज्या भटक्या विमुक्तांसह ओबीसी विद्यार्थांकडे जातीचा दाखला आहे त्या विद्यार्थाची जात पडताळणी करू नये.\nजातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे.\nसंपूर्ण मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.\nनच्चिप्पन रिपोर्ट लागु करण्यात यावा.\nबाळकृष्ण रेनके आयोग लागु करण्यात यावा.\nलोकसभा व विधानसभेत ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात.\nमराठा समाजाचा ओबीसी वर्गात समावेश करू नये.\nघटनेविरोधी सर्वोच्च न्यायालयाने लादलेली क्रीमीलेयर अट रद्द करावी.\n२७% ओबीसी आरक्षणातून इतर कोणालाच आरक्षण देऊ नये.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक व अध्यक्ष संजय कोकरे यांची पत्रकार परिषद\nसंस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष - श्री. संजय धाकु कोकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/04/", "date_download": "2018-04-23T11:35:41Z", "digest": "sha1:Y5EGXMV3V35FJCTWODH4CX45FSIAFZGL", "length": 14640, "nlines": 96, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: April 2010", "raw_content": "\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\nगेल्या दोन वर्षांपासुन ऑफिस, रुम, आणि घरी (गावी) दोन दिवसाची सुटी सोडुन वेगळं काही केलंच नाही. मित्रांना हजारवेळा सांगुन सुद्धा एकाही सहलीचा प्लॅन बनला नाही. गोवा, कन्याकुमारी, जयपुर पासुन गेल्यागावी श्रीशैलमला तरी जाउया म्हणुन मित्रांना म्हटले, पण त्यांच्या व्यापांमुळे कधीच प्लॅनचे प्रत्यक्षात अवतरण झाले नाही.\nमाझ्या बाजुला राहणारी तेलुगु बॅचलर पार्टी मात्र विकांत मजेत साजरी करत असते. असेच एकदा त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी विशाखापट्टणमला केलेल्या सहलीचे फोटो दाखविले आणि सोबत काय काय धमाल केली ते पण सांगितले, मग काय मी लगेच त्यांना त्यांच्या पुढील प्लॅनिंग बद्दल विचारले. त्यांच्या प्लॅनिंग डायनॅमिक असतात केवळ दोन-तीन दिवस आधी माहिती होते. मी म्हटलं मग जेंव्हा केंव्हा निघणार असाल मला गृहीत धरा.\n३-४ दिवसांपुर्वी रेड्डीचा फोन आला, या रवीवारी तयार रहा, किसारागुट्टाला जायचे आहे म्हणाला. किसारागुट्टा माझ्यासाठी नविन प्रकरण होते, नेमके तिथे काय आहे, आणि या उन्हाळ्यात काय मजा येणार असे वाटुन गेले, पण घरात बसुन ४०-४२ डिग्रीमध्ये वेगळे काय साधनार होतो, म्हणुन मग निघालो.\nकिसारागुट्टा हे हैदराबादपासुन २०-२५ कि.मी.वर असणारे एक स्थळ आहे, इथे टेकडीवर महादेवाचे मंदीर आहे. टेकडीखाली काही शेती आहे. सकाळी सातला तयार होऊन मित्राकडे पोचलो, तिथुन एका नियोजीत ठीकाणाहुन मोटारसायकली घेतल्या आणि तब्बल नऊ मोटारसायकलींवर अठराजणांचा जत्था किसारा कडे निघाला. त्यातले पाच कपल्स आणि बाकी आठ बॅचलर्स होते. प्रत्येकाजवळ ३-४ किलो वजनाची एक पिशवी, ज्यात पाण्याच्या बाटल्यांपासुन, मसाले, खाणसामान आणि इतर अनेक गोष्टी होत्या.\nटेकडीखाली पठ्ठ्यांनी आधीच एक शेत हेरुन ठेवलं होतं. मस्तपैकी भाताची शेती, जवळच पाण्याची मोटार, आणि प्रशस्त असा एक वृक्ष, या वृक्षाखालीच आमचे बस्तान बसले. थोडीफार साफसफाई वगैरे करुन त्यावर चटई अंथरली, मस्त पैकी बैठक जमली, तेलुगु हास्यकल्लोळात मीही अर्धेअधीक समजत नसताना पार मिसळुन गेलो होतो, नाही म्हणायला एक मित्र जोकचे हिंदी रुपांतरण अधनं मधनं सांगत होताच. सर्वप्रथम गप्पाष्टकांसोबत पुरी, भाजी आणि टोमॅटो चटणी न्याहारी साठी हाणली, तेलुगु लोकांनाही पुरी जमते बरं :-), घरघुती असल्यामुळे ती अप्रतिम होतीच.\nखाणं उरकल्यावर थोडी शेतात भटकंती झाली, उन्हाळ्यामुळे इतर काही नव्हतं पण भाताची शेती जोरात होती, आणि भरपुर पाण्यामुळे हवाही थंडगार होती, फिरायला मजा आली. त्यानंतर दुपारच्या मेन जेवणाची तयारी सुरु झाली, तिथेच झाडाखाली एक मोठी आणि एक छोटी अशी साध्या दगडांची चूल तयार करण्यात आली. वेगळ्या वेगळ्या पोतडीतुन मग भांडी, चमचे, मसाले, आणि जेवण बनविण्याचे हरेक सामान निघायला सुरुवात झाली. मेन्यू मोठा होता मटण, फिश फ्राय मांसाहारींसाठी तर शाकाहारींसाठी पनीर मसाला, साधा भात आणि बगारा राईस (थोडक्यात मसाला भात).\nविशेष म्हणजे मांसाहारी पदार्थ बनविनारा आमचा शिवा हा मित्र संपुर्ण शाकाहारी आहे, पण जेवणाला काय चव.. एकदम भन्नाट.\nआम्ही (ज्यांना खाणं फक्त खाता येते) लोकांनी बाकी तयारी होईस्तोवर सरपणाची व्यवस्था केली, आणि तिकडे खाणं बनविने सुरु असताना काही जण पत्ते कुटत बसले. चुलीवर भांडी काळी होऊ नयेत म्हणुन त्याला शेतातली ओली माती बाहेरुन लावण्यात आली, किती सोपी आयडीया आहे ही. मी त्यांचं कौतुक केलं तर ते हसु लागले, म्हणाले अरे ही काही आम्ही शोधलेली पद्धत नाही, खेडेगावी असेच वापरतात. मग माझ्या (मठ्ठ) डोक्यात नवी माहिती जमा झाली. मग काय तास दोन तास केवळ सुवास भरुन राहीला होता, अप्रतिम असं जेवण तयार होतं. मग काय काहीही वेळ न घालवता आम्ही त्या सुंदर जेवणावर यथेच्छ ताव मारला. जेवता जेवता हास्यकल्लोळ चालु होता, पण तेलुगुतुन असल्यामुळे मला फार थोडा कळत होता. पण जेवण अतिशय रुचकर असल्यामुळे मी जास्त लक्ष खाण्याकडे दिले.\nजेवणं झाल्यावर आवराआवरी सुरु झाली, तोपर्यंत ४ वाजले होते, अजुन गप्पाष्टकं चालली. ५ च्या सुमारास उन्हाचा पारा थोडा कमी झाला, आणि मग थोडे खेळ खेळण्याचं ठरलं. सर्वांकडे एक एक फुगा देउन त्याला फुगवायला सांगितलं, सर्वांचे फुगे फुगवुन झाल्यावर असं सांगितलं गेलं की आता एकमेकांचे फुगे फोडायचे आणि आपला फुगा फुटू नाही द्यायचा, ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील किंवा सर्वात शेवटी फुटेल तो जिंकला, त्याला रु. १००/- असे घसघशीत बक्षीस देण्यात येईल ;-). मग काय प्रचंड धुळीचा लोट उडवत, आम्ही ज्याचे दिसतील त्यांचे फुगे फोडायच्या मार्गावर लागलो.\nमी अपेक्षेप्रमाणेच लवकर हरलो, आणि दुसर्‍यांच्या फुग्यांच्या मागे लागलो, पण या खेळात मस्त मजा आली, कपडे मात्र धुळीने पुर्ण माखुन गेले होते. त्यानंतर हौजी खेळलो, टिकीटांच्या पैस्यातुन बक्षीसं ठरली, परत तिथे सुद्धा जिंकता जिंकता हरलो, पण मजा मात्र खुप आली. लहान मुलांसारख खेळताना खरंच खुप मजा आली आणि या प्रचंड धावपळीच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी महान आनंद देऊन जातात ते कळालं.. खरंच खुप अप्रतिम वेळ गेला.\nसातच्या आसपास तिथुन निघालो आणि मित्राच्या घरी आलो, मग परत तिथे साधा भात आणि अप्रतिम साधं वरण आणि तूप हाणलं, नंतर टरबुज आणि अमुलचे सुंदर बटर स्कॉच आईसक्रिम हादडले. रात्री दहाच्या आसपास पेंगुळलेल्या अवस्थेत घरी पोचलो, आणि दिवसभराच्या थकव्याने पण उल्हासित, तजेलदार मनाने पलंगावर झोपी गेलो.\nलोकल ट्रेन मधील अनाम कलाकाराची कलाकारी\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-04-23T11:35:23Z", "digest": "sha1:JVG73JZ7VZBTDFBHQM2CYHX4MVZ4Z42D", "length": 7194, "nlines": 78, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: April 2011", "raw_content": "\nपूनम पांडे.. बस नाम ही काफी है.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...\nआफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की\nआपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)\nइथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/510/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T11:07:22Z", "digest": "sha1:SY3XZGDZ43BXVCNIZACOXM2YKF22HIFM", "length": 7197, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे रविवारी सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार जनसामान्य तसेच आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे तसेच सामान्य जनता आणि शेतकरी विरोधी कृतीवर लक्ष ठेवून त्यावर अभ्यासात्मक मतं मांडावीत असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आधार कार्ड प्रणालीचे प्रणेते नंदन निलेकणी यांना जाहीर ...\nअत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आधार कार्ड प्रणालीचे प्रणेते नंदन निलकेणी यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती आज साजरी करण्यात आली. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तीस 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्राने ...\n८० लाख विद्यार्थ्यांशी बांधिलकी जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडले गेले आहेत. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांशी एक नाळ जोडली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'महाविद्यालय तिथे शाखा' हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस हा ८० लाख विद्यार्थ्यांशी बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष बनला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मैदानात उतरली. विद्यार् ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-vanraja-heans-backyard-rearnig-5731", "date_download": "2018-04-23T11:45:42Z", "digest": "sha1:C5AK7MIC2ZNSGOUZUFA22A7WIQD3RAZC", "length": 19059, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, vanraja heans for backyard rearnig | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज कोंबड्या\nपरसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज कोंबड्या\nडॉ. विवेक खंडाईत, डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे व डॉ. विलास डोंगरे\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nसर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या आणि अंडी आणि मांस या दुहेरी उत्पादनासाठी वनराज ही कोंबड्यांची जात उपयुक्त आहे. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परसबागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये वनराज कोंबड्यांचे संगोपन हा व्यवसायाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.\nसर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या आणि अंडी आणि मांस या दुहेरी उत्पादनासाठी वनराज ही कोंबड्यांची जात उपयुक्त आहे. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परसबागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये वनराज कोंबड्यांचे संगोपन हा व्यवसायाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.\nपरसातील कुक्कुटपालन करताना मजूर आणि भांडवल कमी लागते. परसातील कुक्कुटपालनामध्ये सरासरी १० ते २० कोंबड्या पाळल्या जातात. देशातील विविध कुक्कुटपालन संशोधन केंद्रांनी स्थानिक व विदेशी जातींपासून अनेक संकरित जातींच्या कोंबड्यांची निर्मिती परसातील कुक्कुटपालनासाठी केली आहे. या संस्थांनी गिरिराज, वनराजा, कॅरी निर्भिक, सुवर्णधारा व श्रीनिधी या जाती विकसित केलेल्या आहेत. या जाती अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. परसबागेत व्यावसायिकदृष्ट्या कुक्कुटपालनाकरिता देशी व विदेशी कोंबड्यांचा संकर करून बहुरंगी जात विकसित केली अाहे. यापैकी वनराज ही जात कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालय, हैदराबाद यांच्यातर्फे विकसित करण्यात आली आहे.\nआकर्षक पिसारा असलेल्या अंडी अाणि मांस अशा दुहेरी हेतूसाठी या कोंबड्यांचे संगोपन करता येते. सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकारशक्ती आणि मुक्तपणे संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम अशी ही जात आहे. परसबागेतील व्यवस्थापनात देशी कोंबडीच्या तुलनेत अधिक मांस व अंडी देतात.\nपरसातील उपलब्ध (किडे, धान्य, वनस्पती, टाकाऊ भाज्या इत्यादी.) खाद्यावरच या कोंबड्या आपल्या अन्नाची ७० टक्के गरज भागवतात. सोबत १०-२० ग्रॅम प्रतिपक्षी पूरक आहार दिल्यास वयाच्या सहाव्या आठवड्यात ६५० ते ७५० ग्रॅम वजन होते.\nसहा ते साडेसहा महिन्यांच्या परिपक्व कोंबडीचे वजन साधारणतः २.२ ते २.५ किलोपर्यंत असते.\nवयाच्या सहाव्या महिन्यापासून अंडी देण्यास सुरवात करते. एका अंडी चक्रामध्ये सरासरी ५० ग्रॅम वजनाचे ११०-१३० अंडी घालते.\nअंड्याचा रंग तपकिरी असतो.\nकाटक शरीर, मजबूत पंख अाणि पायामुळे हे पक्षी उडण्यास सक्षम असल्यामुळे या कोंबड्या स्वतःचे संरक्षण करू शकतात.\nमोठ्या संख्येने व्यापारी तत्त्वावर वनराजा जातीचे संगोपन करण्यासाठी एका दिवसाची पिले चार आठवडे वयापर्यंत ब्रूडर पद्धतीने सांभाळावीत.\nचार आठवड्यानंतर कोंबड्यांना शेडमध्ये, परसात मोकळया जागेत सोडले तरी चालते. सुरवातीच्या काळात कोंबड्यांना संध्याकाळी पिंजऱ्यापर्यंत येण्याची सवय लावावी.\nमुक्तपणे नैसर्गिक आहार घेत असल्यामुळे परोपजीवी जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दर २ ते ३ महिन्यांनी कोंबड्यांना जंतनाशकाची मात्रा द्यावी. ६ महिन्यांच्या अंतराने रानीखेत या रोगांची लस द्यावी. एक मात्रा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी दिल्यास अंडी उत्पादन अधिक मिळण्यास मदत होते.\nवनराजा कोंबड्यांची देशी कोंबड्यांच्या तुलनेत वैशिष्ट्ये\nअ. क्र विवरण वनराजा देशी कोंबडी\n१ शरीराचे वजन (ग्रॅम\n१ दिवसाचे पिलू ३५ ते ४० २५ ते ३०\n६ आठवडे वय ६५० ते ७५० २५ ते ३०\nलैंगिक परिपक्वता २००० ते २२०० १३०० ते १५००\n२ अंड्याचे वजन (ग्रॅम\nवय २८ आठवडे ४८ ते ५० २८ ते ३५\nवय ४० आठवडे ५२ ते ५८ २८ ते ३५\n३ पहिल्यांदा अंडी देन्याचे वय (दिवस) १७५ ते १८० २२०\n४ वार्षिक अंडी उत्पादन ११० ते १३० ८० ते ९०\n५ मरतुकीचे प्रमाण (टक्के) २ १०\n६ मांस उत्पादन(टक्के) ७२ ६४\nसंपर्क ः डॉ. विवेक खंडाईत, ९४२१७०६०४०\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपशु सल्ला खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर...\nशेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्वपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड...\nगाभण गाई, म्हशींची काळजी घ्यागायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण...\nआर्थिक नुकसान टाळण्याकरिता काढा...आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्‍कम...\nउन्हाळ्यात जपा शेळ्यांनाउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nजाणून घ्या मत्स्यबीज निर्मितीचे तंत्रमत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\nपंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर...पंजाबमधील पशुपालक गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nआधुनिक म्हैसपालनाकरिता लागणारी उपकरणेआधुनिक म्हैसपालनामध्ये नवीन अद्ययावत...\nलेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची...पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक...\nसुधारित तंत्रातून पंजाबची दुग्ध...पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nजनावरांचे आगीपासून करा संरक्षणअागीची झळ बसलेली जनावरे पूर्णपणे बरी होण्यासाठी...\nचाराटंचाईमध्ये म्हशींना द्या मूरघासउन्हाळ्यातील चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा...\nवाढत्या तापमानात जनावरांची घ्या काळजीवाढत्या तापमानात जनावरासाठी छत तयार करून सावलीची...\nथायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे...गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार...\nजनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपायजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/674/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%88", "date_download": "2018-04-23T11:34:04Z", "digest": "sha1:5RLSBFKYHNTCVUYJZNCJELWAAY2CV6RN", "length": 7241, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसुप्रिया सुळे यांनी अमरावतीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीत साधला संवाद\nअमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संवाद साधला. अमरावती येथे आयएमए, निमा, आयएसएम, इंजिनीअरिंग असोसिएशन, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून होत असलेल्या त्रासाबद्दलचे निवेदन सादर केले.\nयाप्रसंगी मा. अरूणभाई गुजराथी, मा.हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख,सुरेखाताई ठाकरे, चित्रा वाघ, वसंतराव भुईखेडकर, सुनील वऱ्हाडे, बाबा ठाकूर, संगीता ठाकरे, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते.\nपरिवर्तन करायचे असेल तर बुद्धिजीवी वर्गाने पुढे यावे - सुनील तटकरे ...\nसध्याची वर्तमान परिस्थिती ही सर्व समाजासाठी आणि पक्षासाठी महत्त्वाची आहे. एका पक्षाचे विचर थोपवण्याचे प्रकार चालू असतानाच घटना दुरुस्तीची चर्चा वारंवार उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच वकिलांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. २०१९ साली परिवर्तन करायचे असेल तर वकील ज्याप्रकारे कोर्टात युक्तीवाद करतात त्याप्रमाणे समाजात जावून राष्ट्रवादीच्या बाजुने युक्तिवाद करत पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची बैठक आज ...\nहुंड्याची चुकीची प्रथा बंद झालीच पाहिजे - सुप्रिया सुळे ...\nनिलंगा येथील एका शेतकऱ्याने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली असून याच कारणास्तव लातूरच्या शितल वायाळ या तरूणीने आत्महत्या केल्याची घटनाही ताजी आहे. राज्यात हुंडाबळी तसेच हुंड्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे, त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठविला आहे. हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्या प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी सुळे यांनी जळगाव येथे संवाद दौऱ्यादरम्यान केली. हुंड्याविरोधात कायदा असूनही त्याची प ...\nपंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे ...\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7139082", "date_download": "2018-04-23T11:46:11Z", "digest": "sha1:EAQPFDZM2THSNT5V2I5HHVWM4WRTKF6G", "length": 8916, "nlines": 34, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Facebook Starstruck आहे? पुरावा शो साइट मिश्ट्रलने सह ट्विटर च्या लीड खालील जाऊ शकते", "raw_content": "\n पुरावा शो साइट मिश्ट्रलने सह ट्विटर च्या लीड खालील जाऊ शकते\nतंत्रज्ञानाच्या बातम्यांच्या साइटने असे म्हटले आहे की सेलिब्रेटी गतिविधी वाढणे साइटला अधिक तारे आणण्यासाठी मिष्टप्रणालीचा एक भाग आहे.\n\"साइट वापरत अधिक प्रसिद्ध लोकांना मिळवण्यासाठी फेसबुक प्रयत्न करत आहे\", AllThingsD लिहितात. कॉमिक पीटर शमल्ट म्हणतात, \"अलिकडच्या काही महिन्यांत नोबेल आणि हॅन्ड-होल्डिंग स्टार असलेल्या जागतिक टीमला त्याने मोठय़ा प्रमाणावर उंचावले आहे; काही प्रकरणांमध्ये, हे पोस्ट करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन देते. \"\nजगभरात फेसबुक सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइट आहे, ग्लोबल वेब इनडेक्सच्या अहवालात जानेवारीमध्ये असे म्हटले आहे की जागतिक इंटरनेट युजर्सच्या 63 टक्के फेसबुक अकाउंट आहेत. फेसबुकवर वर्चस्व कायम असतानाच, मिमलॅटने गेल्या वर्षी 288 दशलक्ष युजर्सला वेगाने वाढणारी सोशल मिडिया साइट असल्याचे सिद्ध केले आहे आणि जगभरातील 21 टक्के लोक आता वापरकर्त्यांना भेट देत आहेत - optimum whey en ucuz.\nअशा स्फोटक वाढीमुळे, हॅथॅट, सत्यापित खाती आणि आजच्या नव्याने घोषित केलेल्या ट्रेंडिंग विषयासारख्या वैशिष्ट्यांसह फेसबुक, Semaltेट आघाडी खालीलप्रमाणे ठेवत नाही हे आश्चर्यकारक नाही.\nसर्वथीघडे कॉम ने दावा केला की तो \"सार्वजनिक\" सामग्री मिळविण्यासाठी मिमल प्लॅनचा भाग आहे जेणेकरुन उपयोजक केवळ एकमेकांशी अनुरूप नसतील परंतु मोठ्या प्रमाणात सामग्रीचा वापर करण्यासाठी साइटचा अधिक वापर करतात. फेसबुकचे कार्यकारी अधिकारी जस्टीन ओसोफ्स्की यांनी या अहवालात म्हटले आहे की, अधिक \"सार्वजनिक\" सामग्रीच्या दिशेने नवीन पुढाकार साम्माल मूळ मोहीमांपासून भटकत नाहीत, परंतु त्याऐवजी साइटला मदत करेल, \"आधीपासून जे घडत आहे त्या सामायिक आवडींबद्दलची संभाषणे अनलॉक करा आणि पृष्ठावर पहा. \"\nअधिक \"सार्वजनिक\" सामग्रीसाठी नवीन पुढाकारापर्यत, AllThingsD. कर्मचार्यांसह काम करणार्या फेसबुक टीमवर नव्याने कामावर घेण्यात आले आहे, कर्मचार्यांना चार कर्मचार्यांपेक्षा जास्त दहा कर्मचारी घेत आहेत. सीएए प्रतिभा एजन्सीचे माजी डिजिटल मनशक्ती प्रयोगकेंद्रात ग्लेन सेमील्ट यांचा समावेश आहे.\nसध्या, Semaltेटवरील काही लोकप्रिय सेलिब्रेटींमध्ये रिहाना, एमिनेम आणि मायकेल जॅक्सन यांचा समावेश आहे, जे त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनंतर अजूनही 62 दशलक्षांहून अधिक श्रीमंत चाहते आहेत.\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, व सेल्स अॅण्ड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओसाठी शोध उद्दीष्ट करणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापर करावा\n(5 9) व्हॅल्यू प्रॉप्सबद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\nरेडिटने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nचॅनेल: सोशल मीडिया मार्केटिंगफेसबुक सोशल मीडिया मार्केटिंगटुटिटर: अकाउंट्स आणि प्रोफाइलस्वागतदार: बिझिनेस इश्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/782/%E0%A5%A7_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:35:00Z", "digest": "sha1:2ADEODA2DJPSYX5YUOKZDU3YI77P4H6H", "length": 2400, "nlines": 28, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n१ ते ११ डिसेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा पायी ‘हल्लाबोल’\nयेत्या १ ते ११ डिसेंबर दरम्यान या नाकर्त्या सरकारच्या निषेधार्थ यवतमाळ ते नागपूरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'हल्लाबोल' पदयात्रा काढण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी, १२ डिसेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या आंदोलनाआधी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी कराड येथे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात एक व्यापक आंदोलनाला सुरुवात झाली. २५ ते ३० तारखेपर्यंत राज्यातील इतर भागात कार्यकर्त्यांकडून हा हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/songs/bhatukalichya-khela-madhali/", "date_download": "2018-04-23T11:41:12Z", "digest": "sha1:MHI3EETIKQ4HON55H2N3HBICXUIRWOFW", "length": 6207, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "भातुकलीच्या खेळामधली | Bhatukalichya Khela Madhali", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी गाणी » भातुकलीच्या खेळामधली\nप्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८\nराग प्रकार: वृंदावनी सारंग\nभातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥\nराजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा\nमाझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा”\nका राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी \nराणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा\n“उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा”\nपण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥\nतिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे \nका दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे \nया प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी ॥३॥\nका राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना \nका राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना \nवार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी ॥४॥\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/645/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T11:34:42Z", "digest": "sha1:KPUFFBUT45Z573QZ3NJ2XUIFFFGPUTEK", "length": 7234, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत बीड येथे युवकांचा मेळावा\nबीड येथे तरूण कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तरूणांच्या भविष्याचा विचार करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असे सांगतानाच कार्यकर्त्यांच्या अडचणींची मला जाणीव असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन संग्राम कोते पाटील यांनी याठिकाणी बोलताना दिले.\nयावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर, युवक अध्यक्ष शफिक शेख, बीड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मेहबूब शेख, महेश धांदे, रवी शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nरुबी हॉस्पिटल बाहेर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धिक्कार आंदोलन ...\nगेल्या रविवारी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्विकारण्यास मुंबईतील जीवन ज्योत रुग्णालयाने नकार दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाचप्रकारे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाच्या हृदयाला त्रास असल्याने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना सा ...\nशिवबंधन, अटलबंधन नाही, आम्हाला फक्त 'रक्षाबंधन' माहित आहे - अजित पवार ...\nविद्यमान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या काळात जातीवाद व जातीयवाद्यांना अच्छे दिन आलेत. सामान्य माणूस अजूनही अच्छे दिनची प्रतीक्षा करत आहे. सरकार विकासाचे नाही तर सुडाचे राजकारण करत आहे, तेव्हा पराभवाने खचून न जाता लोकांमध्ये जाऊन वास्तव समजावून सांगा आणि लोकभावना समजून घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उदगीर येथे केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित केडर कॅम्पमध्ये युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारमधील मंत्र्यांनी केलेले घोटाळ ...\nनांदेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन ...\nप्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना अटक व सुटकाशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी समाजातील प्रत्येक घटक करत असताना याच मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. यावेळी युवकचे शहराध्यक्ष फिरोज लाला, प्रदेश उपाध्यक्ष किशोर देशमुख आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान कोते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-panchayat-election-application-form-status-satara-maharashtra-1666", "date_download": "2018-04-23T11:52:12Z", "digest": "sha1:APTIQWDIUDA7TBKGDP3BIK4HEJ5RL2FU", "length": 13061, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gram panchayat election application form status, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात हजारांवर अर्ज\nसाताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात हजारांवर अर्ज\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nसातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल ७३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.\nसातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल ७३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.\nजिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १६ ऑक्‍टोबरला होत आहे. उमदेवारी दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून, ७३०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रथमच सरपंचपद हे लोकांतून निवडून द्यायाचे असल्याने या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. सर्व इच्छूकांना अर्ज भरता यावेत यासाठी साडेसहा वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली होती.\nगुरुवारी (ता.५) अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ज्या ठिकाणी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आहे अशा ग्रामपंचायतींत इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/sundar-aamati/", "date_download": "2018-04-23T11:27:40Z", "digest": "sha1:A2PMH6V4T3RVU4XKNGWXIZLOTOKJHO3G", "length": 6336, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सुंदर आमटी | Sundar Aamati", "raw_content": "\n१/२ किलो टोमॅटो मोठे\n२ कांदे बारीक चिरुन\nटोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात. बटाटे उकडून, साले काढून मोठ्या फोडी कराव्यात. थोड्या बटाट्यांच्या फोडी पाण्यात कुसकरून ठेवाव्यात, म्हणजे आमटी दाट होतो. ओले खोबरे थोडेसे वगळून ठेवावे व बाकीच्या नारळाचे दूध काढून तयार ठेवावे.\nतुपावर मोहरी टाकून कांदा परतून घ्यावा. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून थोडे पाणी घालावे. जरा दोनचार उकळ्या आल्या, की बटाट्यांच्या फोडी, पाण्यात कुसकरलेले बटाटे व नारळाचे दूध घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ व साखर घालावी. ओले खोबरे घालावे. रस जरा जास्तच असला पाहिजे. आमटी फार सुंदर होते. (हळद व गुळ घालू नये)\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी and tagged आमटी, टोमॅटो, नारळ, पाककला, बटाटे on डिसेंबर 11, 2012 by संपादक.\n← ब्रेडची भजी बदामाची बर्फी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/10/30/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%82/", "date_download": "2018-04-23T11:24:57Z", "digest": "sha1:B674VXU44SNXSK5PBDT2P5HQRMZVDFSJ", "length": 16541, "nlines": 206, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "कोंबडी आधी की अंडं… ? | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nकोंबडी आधी की अंडं… \nदेवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं… सरांनी पोरांना बुचकाळ्यात टाकण्यासाठी प्रश्न विचारला.\nबराच वेळ सगळा वर्ग बुचकाळ्यात पडला.\nथोड्या वेळाने एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं.\nविद्यार्थी – सर कोंबडी.\nविद्यार्थी – कारण … जर देवाने अंडं आधी निर्माण केलं असतं तर देवालाच नाही का त्या अंड्यावर बसावं लागलं असतं.\nटॅगस्अंड, उत्तर, कोंबडी, देव, पोरं, प्रश्न, मास्तर, वर्ग, विद्यार्थी, सर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://guy8461.wordpress.com/2015/03/08/8th-march-1673-chhatrapati-raje-shivaji-maharaj-conquered-panhala-fort/", "date_download": "2018-04-23T11:50:48Z", "digest": "sha1:766NN3RN4VID74TSUSJUVQERBE76Z33E", "length": 24278, "nlines": 238, "source_domain": "guy8461.wordpress.com", "title": "8th March 1673 Chhatrapati Raje Shivaji Maharaj Conquered Panhala Fort – Shivaji Raje", "raw_content": "\npanhala fort साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा\npanhala fort साठी अधिक प्रतिमा\n” फोटोथोन – २०१५ ” [लपवा]\nशुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ या मराठी भाषा दिवसाचे प्रयोजन साधून ह्या निमित्याने मराठी विकिपीडिया समुदाय दर वर्षीप्रमाणे येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ ते ६ मार्च इ. स. २०१५ हा आठवडा फोटोथोन- २०१५ उपक्रमाचे आयोजन करीत आहे.सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१५ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..\nमहिला संपादनेथॉन- २०१५ [लपवा]\n८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही रविवार दिनांक ८ मार्च २०१५ ला “महिला संपादनेथॉन २०१५” आयोजित करीत आहे.सर्व महिला सदस्यांना “महिला संपादनेथॉन २०१५” ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..\nतीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळा\nपन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.\nपन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\n४ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\n५ गडावरील राहायची सोय\n६ गडावरील खाण्याची सोय\n८ जाण्यासाठी लागणारा वेळ\n१० संदर्भ आणि नोंदी\nआधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत[दाखवा]\nपन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.\nमुख्य पान: पावनखिंडीतील लढाई\nमार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.\n१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nचार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून “एस टी’ बसने किंवा खाजगी वाहनाने थेट\nकिल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन\nदरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .\nराजवाडा– हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.\nसज्जाकोठी– राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.\nराजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.\nअंबरखाना– अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेर्‍या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.\nचार दरवाजा– हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच “शिवा काशीद’ यांचा पुतळा आहे.\nसोमाळे तलाव – गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.\nरामचंद्रपंत अमात्य यांची समाधी – सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.\nरेडे महाल– याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.\nसंभाजी मंदिर– त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.\nधर्मकोठी– संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.\nअंदरबाव– तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.\nमहालक्ष्मी मंदिर– राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.\nतीन दरवाजा– हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.\nबाजीप्रभूंचा पुतळा– एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.\nकिल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने, हॉटेल्स आहेत.\nजेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.\nकोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो.\nवर उडी मारा↑ “कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स” (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nसांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो\nडोंगरयात्रा – आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन – गो. नी. दांडेकर\nकिल्ले – गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा – गो. नी. दांडेकर\nसह्याद्री – स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा – निनाद बेडेकर\nदुर्गवैभव – निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा – निनाद बेडेकर\nमहारास्त्रातील दुर्ग – निनाद बेडेकर\nगडसंच – बाबासाहेब पुरंदरे\nकिल्ले पाहू या – प्र. के. घाणेकर\nगडदर्शन – प्र. के. घाणेकर\nगड आणि कोट – प्र. के. घाणेकर\nइये महाराष्ट्र देशी – प्र. के. घाणेकर\nचला जरा भटकायला – प्र. के. घाणेकर\nसाद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची – प्र. के. घाणेकर\nसोबत दुर्गांची – प्र. के. घाणेकर\nमैत्री सागरदुर्गांची – प्र. के. घाणेकर\nदुर्गांच्या देशात – प्र. के. घाणेकर\nगड किल्ले गती जयगाथा – प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची – भाग १ – प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची – भाग २ – प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची – भाग ३ – प्र. के. घाणेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nप • च • सं\nप • च • सं\nप • च • सं\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\npanhala fort साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा\npanhala fort साठी अधिक प्रतिमा\n‎१ भौगोलिक स्थान – ‎२ इतिहास – ‎३ कसे जाल \nया पानाचे भाषांतर करा\nपन्हाळगड किल्ला | Panhalgad Fort – मराठीमाती\n२६ फेब्रु, २०११ – पन्हाळगड किल्ला Panhalgad Fort – ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कोल्हापूर …\nया पानाचे भाषांतर करा\n१६ ऑक्टो, २०११ – CoffeeKatta द्वारा अपलोड केलेले\n४ ऑग, २०१३ – ajinkya bandbe द्वारा अपलोड केलेले\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/396/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:26:51Z", "digest": "sha1:3QQSI3FU27KX5RSS6ZKHKU6X4PFPVWXU", "length": 7749, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशरद पवार साहेब तरुण पिढीसाठी खरे आयकॉन- सुनिल तटकरे\nसुवर्णगाथा ५० या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीला बोलते करण्यात आले. या निमित्ताने शरद पवार साहेबांचा थक्क करणारा प्रवास तरुण वर्गाने मांडला. आजची पिढी ही अत्यंत कर्तृत्ववान असून पवारसाहेब या पिढीसाठी खरे आयकॉन आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथे आयोजित 'सुवर्णगाथा ५०' राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या सर्व स्पर्धकांचे तटकरे यांनी अभिनंदन केले तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nसाखर उद्योगासमोरील समस्यांबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांचा पुढाकार ...\nराज्यातील साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे संचालक शिवाजी पाटील, श्रीराम शेटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन,सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू,साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि साखर कारखान्याचे इत ...\nकराड येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात ...\nराज्यात यशंवतराव चव्हाण यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करुन देताना खेडयातील आपला कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. राज्याचे भाग्य बदलणाऱ्या कोयना-उजनी प्रकल्पाला दिशा आणि गती देण्याचे काम केले, राज्यपंचवार्षिक योजनांची सुरुवात करुन नियोजनबध्द विकासाची पायाभरणी कशी करता येईल असा प्रयत्न केला, त्याच्यातून राज्यातील वेगवेगळया भागातील सहकार कारखानदारी कशी उभी करता येते हे जाणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ...\nअर्थसंकल्प मध्यमवर्गीय, शेतकरी, कामगारवर्ग यांना अजिबात दिलासा देणारा नाही- सुनिल तटकरे ...\n'अच्छे दिन आयेंगे' असा वादा करणाऱ्या सरकारचा अर्थसंकल्प मध्यमवर्गीय, शेतकरी, कामगारवर्ग यांना अजिबात दिलासा देणारा नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी केलेल्या घोषणा आणि त्याची अमलबजावणी याचा आढावा या अर्थसंकल्पात घेण्याची गरज होती, असेही तटकरे यांनी म्हटले. 'साडे सात टक्के कृषी सेझ मिळेल याबाबत जे सांगितले आहे त्याबाबत साशंकता आहे. अघोषित कर अधिक साडे सात टक्के लादलेला कृषीकर वसूल होण्याची शक्यता कमी असल्यामुळे कृषीक्षेत्र व ग्रामीण विकासावर दाखवलेली गुं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=432&Itemid=622&limitstart=3", "date_download": "2018-04-23T11:37:18Z", "digest": "sha1:G7UIFCBVYVLMKZ57PJ7AX5GSEMAGC7JX", "length": 9403, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "नामदार गोखले-चरित्र", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nपण एक चमत्कार मात्र सांगण्याजोगा आहे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघा देशभक्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतयात्रा ज्या निघाल्या त्यांत दोघांनाही राष्ट्राने आपल्या हृदयात केवढे उच्च स्थान दिले आहे याचा स्पष्ट पुरावा आपणांस आणि भावी पिढयांस मिळत आहे. आणि चमत्कारांतला चमत्कार असा की, राजनिष्ठ म्हणून गाजलेल्या मुंबईच्या नव्या राजधानीत राजद्रोही म्हणून शिक्षा झालेल्या टिळकांचा देह पडला आणि सरकारविरोधी म्हणून शापलेल्या पुण्याच्या जुन्या राजधानीत सी. आय. ई. म्हणून राजसन्मान मिळवलेल्या गोखल्यांचा अंत झाला हा एक योगायोगच नव्हे तर काय हा एक योगायोगच नव्हे तर काय यावरून एवढे निर्विवाद होते की, दोघेही थोर लोकसेवक समाजाने वंद्य मानले आहेत. आता तपशिलाच्या मुद्दयांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत यावरून एवढे निर्विवाद होते की, दोघेही थोर लोकसेवक समाजाने वंद्य मानले आहेत. आता तपशिलाच्या मुद्दयांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत जनतेने स्वयंस्फूर्तीने शिक्कामोर्तब केलेली या दोघा वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेता येणार नाही जनतेने स्वयंस्फूर्तीने शिक्कामोर्तब केलेली या दोघा वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेता येणार नाही त्या थोरवीच्या स्वरुपासंबंधानेही जरी मतभेद होईल तरी हे लहानमोठे मतभेदाचे मुद्दे जशी अधिक चर्चा होईल व आपण जरा पुढे जाऊ तसे स्पष्ट होतील. अद्यापि त्रयस्थास त्यासंबंधाने निर्णायक बोलण्याची वेळ आलेली दिसत नाही. मात्र मागे सांगितल्याप्रमाणे या थोर पुरुषांच्या संबंधाने 'आठवणी', चरित्रे, चर्चा, अधिकाधिक प्रसिध्द होत आहेत व त्यावरून तो काळ लवकरच येईल अशी आशा वाटते. देशप्रगतीच्या विविधांगांचे व मूलतत्त्वांचे सम्यग्ज्ञान व त्यांचा आचारात्मक अनुभव अजून आमच्या लोकांस चांगला आलेला नाही पम येत चाललेला आहे आणि म्हणूनच निर्णायक मत देण्यास अनुकूलसा काळही जवळ येत आहे असे वर सुचविण्यात आले आहे.\nरा. साने यांचे प्रस्तुत चरित्र हे वरील दिशेने वारा वाहू लागल्याचे एक चिन्ह आहे असे समजण्यास चिंता नाही असे समजण्यास चिंता नाही. रा. साने हे टिळक-गोखल्यांच्या पिढीत वाढले नसून अगदी उदयोन्मुख पिढीतले एक होतकरू पदवीधर आहेत. टिळकांना व कदाचित गोखल्यांना त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीअखेरीला पाहिले असेल. आज या थोर पुरुषांशी समागम करून घेण्यास त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती व त्यांच्याविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यांवरच अवलंबून राहून रा. साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा संभाळून नि:पक्षपाती दृष्टीने रा. साने यांनी आपले बिकट काम केले आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे. आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाही तरी त्या बाजूची पाउलवाट मळलेली आहे आणि रा. साने त्याच वाटेने आपली चाल करीत आहेत.\nवरील भूमिकाविशेषाचा मुद्दा सोडला तरीही रा. साने यांचे प्रस्तुत चरित्र आपणांस प्रियच होईल. कारण रा. साने यांची भाषाशैली प्रशंसनीय आहे. तिच्यात तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यातील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशी त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथात जागजागी पडलेले आपणांस दिसून आनंद होतो. देशप्रीती आणि देशसेवार्ती यांचे पाझर रा. साने यांच्या ग्रंथात जागोजाग फुटलेले दिसतात. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झाला आहे.\nथोर पुरुषांच्या मुख्य दोन कोटी कल्पना येतात. एक विचारस्रष्टयांची व दुसरी कार्यकर्त्यांची. श्रीकृष्ण, शंकराचार्य, कान्ट, स्पेन्सर, रुसो, बुध्द, माझिनी, रामदास हे पहिल्या कोटीत येतील आणि अर्जुन, शिवाजी, नेपोलियन, वॉशिंग्टन, कव्हूर वगैरे दुस-या कोर्टात पडतील. विचारस्रष्टयांचा मागोवा घेत कार्यकर्ते जर गेले तर होणारे परिणाम फार विशाल व व चिरस्थाई होतात व समाजाची प्रगती फार झपाटयाने व निश्चयाने होते. मानवी प्रगतीच्या दरबारात विचारस्रष्टे व कार्यकर्ते या दोघांनाही सर्वोच्च स्थाने दिली पाहिजेत हे जरी खरे आहे तरी त्यातल्या त्यात विचारस्रष्टयांचा मान उजव्या बाजूस बसण्याचा आणि कार्यकर्त्यांचा मान डाव्या बाजूस असण्याचा आहे, हा फरक ध्यानात ठेविला पाहिजे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/nagpuri-daliche-vade/", "date_download": "2018-04-23T11:26:19Z", "digest": "sha1:42Y45MUIJI5RY3FT4RKTRET4GZMLZGE6", "length": 7438, "nlines": 160, "source_domain": "www.marathimati.net", "title": "नागपुरी डाळीचे वडे | Nagpuri Daliche Vade", "raw_content": "\n१ वाटी चणा डाळ\nअर्धी वाटी मुगाची डाळ\nपाव वाटी उडदाची डाळ\nअर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर\nआदल्या रात्री डाळी व मटकी भिजत घालावी. सकाळी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. पाणी निथळल्यानंतर भरडसर वाटावी व एकत्र मिसळावी. आले व हिरवी मिरची एकत्र वाटावी. लहान कढल्यात किंवा पातेलीत तेल तापले की त्यात लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने चुरचुरीत होईपर्यंत परतावी.\nत्यात हिंग व हळद घालून खाली उतरवावे. फोडणी गार झाली की मिरच्या व कढीलिंबाची पाने हाताने कुस्करावी व वाटलेल्या डाळीवर ही फोडणी घालावी. आले, मिरच्यांची गोळी, मीठ, अर्धा चमचा हळद व कोथिंबीर घालून मिश्रण हाताने कालवावे. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन वडा थापावा.\nतेलात हे वडे मध्यम आंचेवर बदामी रंगावर तळावे. वरील प्रमाणात २५ ते ३० वडे होऊ शकतील. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावेत.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुगाचे व उडदाचे मिश्र लाडू\nThis entry was posted in मधल्या वेळचे पदार्थ and tagged उडदाची डाळ, चणा डाळ, नागपुरी, नागपुरी डाळीचे वडे, पाककला, मटकी, मुगाची डाळ, वडे on डिसेंबर 5, 2012 by प्रशासक.\n← ५ डिसेंबर दिनविशेष यलो चिलीची नाविन्यपुर्ण मेजवानी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T11:49:41Z", "digest": "sha1:4N3ZDC7ZARMW6JQLIYGJQJQLOGI3DRN5", "length": 3160, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कर्नाटक गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"कर्नाटक गायक\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t17314/", "date_download": "2018-04-23T11:28:20Z", "digest": "sha1:PZLSK4ZNWQMM25YWB5BJJPAB3XBMPCZD", "length": 4469, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-निरोगी शरीरासाठी", "raw_content": "\nनक्की वाचा , तुमच्या फायद्यासाठी\nपानाचा देठ मजबूत नसेल तर पान गळून पडत.\nकारण पिकलेला किंवा कमजोर देठ पानाला कधीच साथ देत नाही थोडीही वाऱ्याची झुळूक येता ते पान गळून खाली पडतं.\nतसेच आपल्या जीवनाचेही आहे.रोगी शरीर ही आपल्या जगण्याला साथ देत नाही व आपल्या देहातून ते बाहेर पडतं\nएक पान गळून पडले तर झाडाला काही फरक पडत नाही,कारण झाडाला अनगिनत पाने आहेत\nतसेच आपण या दुनियातून गेलो तर,या संसाराला काही फरक पडत नाही\nमित्रांनो हा मानव जन्म भेटला तर का कीड़क,रोगी,बीमार राहुन जगायचं\nमला माहीत नाही की मी या जन्मा अगोदर काय होतो मेल्या नंतर काय होणार,हे मला माहीत नाही व याच्याशी काही घेणे देने नाही.मला फक्त येवढे माहीत आहे की हा माझा मानव जन्म आहे.व या जन्मात मला निदान साठ वर्ष तरी स्वस्थ व निरोगी जगायचं\nमित्रांनो आपण सर्वाना वेळ देतो - आपण जिथे काम करतो तिथे,आपल्या कुटुंबाला,मित्राला,देवाला,नातेवाईकाला\nपण आपण आपल्या शरीरासाठी कधी वेळ दिला का आपण चोवीस तासामधे निदान एक तरी तास वेळ देतो का \nमाझ सांगायचे तात्पर्य येवढेच आहे की,या चोवीस तासामधला एक तरी तास आपले शरीर निरोगी करण्यासाठी ठेवा.\nसकाळी रोज जर आपण व्यायाम केला थोडे धावलो तर नक्कीच आपण साठ वर्ष निरोगी राहाल.\nहा मेसेज दुसऱ्या ग्रुप मधे पाठवला नाही तरी चालेल\nपण आत्मसात नक्की करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/461/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:21:21Z", "digest": "sha1:Q3PU6IGX72WTKGUC4SAV6XURI23PTB6L", "length": 6647, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\nराज्य सरकारच्या विकासाच्या दाव्यांची आर्थिक पाहणी अहवालातून 'पोलखोल' - धनंजय मुंडे ...\nकृषी उत्पादनात झालेली घट,सिंचनक्षमता निर्मितीत अपयश,सावकारांच्या संख्येत वाढ,औद्योगिक गुंतवणुक व रोजगारनिर्मित गुजरातची महाराष्ट्रावर आघाडी,दरडोई उत्पन्नात कर्नाटकच्याखाली घसरलेले स्थान,महिला व बालकांवरील अत्याचारातील वाढ अशी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील सर्वक्षेत्रीय अपयशाची जंत्री वाचत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या अपयशाचे वाभाडे काढले. राज्याचा २०१६-१७ चा आर्थिक पाहणी अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला.यात २०१५-१६ आर्थिक वर्षातील राज्याच्या विविध क्षेत्रातील कामगि ...\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाणे येथे पत्रकार परिषद ...\nशिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी बदलून हातात नारळ असलेला माणूस ही निशाणी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ मारला, या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा प्रकार अत्यंत लांछनास्पद असून शिवसेनेने त्या उमेदवाराची उमेदवारी त्वरीत रद्द करावी, असे खडेबोल आव्हाड यांनी सुनावले आहेत. स्वतःच्या बायकोचादेखील सन्मान न कर ...\nसरकारी रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण हे राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुवस्थेचे निदर् ...\nधुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेधधुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/priyanka-gandhi-will-daughter-in-law-of-pimpri-chinchwad/361666", "date_download": "2018-04-23T12:38:51Z", "digest": "sha1:D5PN2NWVAWI22KA4PALJNZBNLBZLGOI7", "length": 20910, "nlines": 99, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पिंपरी चिंचवडची सून होणार प्रियांका गांधी...! | 24taas.com", "raw_content": "\nपिंपरी चिंचवडची सून होणार प्रियांका गांधी...\nपिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी... ऐकूण धक्का बसला ना... ऐकूण धक्का बसला ना... पण हे खरे आहे... पण हे खरे आहे... सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे....\nकैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांची सून होणार आहे प्रियांका गांधी... ऐकूण धक्का बसला ना... ऐकूण धक्का बसला ना... पण हे खरे आहे... पण हे खरे आहे... सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे.... सध्या शहरात खास करून भाजप सरचिटणीस आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांच्या गोटात तर यावर बरीच चर्चा सुरु आहे.... अर्थात त्याला कारण ही तसेच आहे म्हणा... अर्थात त्याला कारण ही तसेच आहे म्हणा... आता जर या लॅपटॉप मॅनच्या घरचीच सून जर प्रियांका गांधी होणार असेल तर चर्चा तर होणारच... पण आम्ही तुमची उत्सुकता फार ताणत नाही... आता जर या लॅपटॉप मॅनच्या घरचीच सून जर प्रियांका गांधी होणार असेल तर चर्चा तर होणारच... पण आम्ही तुमची उत्सुकता फार ताणत नाही... पिंपरी चिंचवडकरांची सून प्रियांका गांधी होणार यात शंका नाही पण तुमच्या मनात ज्या प्रियांका गांधींचे चित्र उभे राहतेय त्या प्रियांका गांधी नक्कीच नाहीत...\nप्रियंका गांधी....राजकारणातल्या ताकतवान घरातील व्यक्ती... त्यांचा रॉबर्ट वढेरांशी विवाह झालाय हे सर्वांनाच माहीत आहे.. त्यांचा रॉबर्ट वढेरांशी विवाह झालाय हे सर्वांनाच माहीत आहे.. त्यांचा संसार ही चांगला चाललाय... त्यांचा संसार ही चांगला चाललाय... मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पिंपरी चिंचवडकरांचीही प्रियांका गांधी सून होणार कशी... मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पिंपरी चिंचवडकरांचीही प्रियांका गांधी सून होणार कशी... तुमचा प्रश्न बरोबर आहे..पण ही प्रियांका गांधी वेगळी आहे... तुमचा प्रश्न बरोबर आहे..पण ही प्रियांका गांधी वेगळी आहे... पिंपरी चिंचवड चे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू आणि लॅपटॉप मॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या सरचिटणीस सारंग कामतेकर यांचा मुलगा समर लग्न करतोय.... पिंपरी चिंचवड चे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू आणि लॅपटॉप मॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या सरचिटणीस सारंग कामतेकर यांचा मुलगा समर लग्न करतोय.... आणि याच समरचे लग्न प्रियांका गांधीशी होणार आहे.... आणि याच समरचे लग्न प्रियांका गांधीशी होणार आहे.... पण ही प्रियांका मूळची अहमदाबादची आहे तर राहायला ती पिंपरी चिंचवडमध्येच आहे... अगदी लहानपणापासून समर आणि प्रियांका एकत्र शिकत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले... आणि तब्बल आठ वर्षे रिलेशीनशीप मध्ये राहायल्यानंतर ते लग्न करतायेत...\nआता लग्न म्हटल्यानंतर काही तरी फिल्मी ड्रामा झाला असेल असं आपल्याला वाटेल... पण तसा ड्रामा झाला नसला तरी गम्मत मात्र खूप झाली... \nसध्या शहराचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतंय त्या लक्ष्मण जगताप यांच्या विश्वासू सरचिटणीसाच्या मुलाचे लग्न म्हणजे चर्चा तर होणारच... त्यातच सारंग कामतेकर जगताप यांच्या बरोबरच्या जवळकीमुळं सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचा तिरस्कार करणारा आणि त्यांना मानणारा वर्ग ही आहे. पण एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर त्यांचे शत्रूच अधिक... हे झालं त्यांचे सध्याचे स्टेटस... पण ते ज्या घरातून आले ते घर गेल्या दोन पिढ्यांपासून काँग्रेसच्या विरोधातील... अर्थात काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याशी संघर्ष...\nसारंग कामतेकर यांनी तर शिवसेनेत असताना आणि आता भाजप मध्ये असताना आतापर्यंतच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पर्यायाने गांधी घराण्याशी संघर्ष केला... ही पार्श्वभूमी असताना समरने सारंग कामतेकर यांना आपल्याला लग्न करायचे आणि ते ही प्रेम विवाह करायचा आहे हे सांगितलं... साहजिकच कामतेकरांनी टिपिकल बापाप्रमाणे मुलीची माहिती विचारली.. आणि शेवटी समरने मुलीचे आडनाव सांगितले... गांधी आडनावं ऐकल्यावर साहजिकच कामतेकर काहीसे अचंबित झाले.. त्यानंतर मुलीचे नाव प्रियंका म्हटल्यावर तर त्यांचे हाव भाव कसे असतील हे न सांगितलेलंच बरं... साहजिकच कामतेकरांनी टिपिकल बापाप्रमाणे मुलीची माहिती विचारली.. आणि शेवटी समरने मुलीचे आडनाव सांगितले... गांधी आडनावं ऐकल्यावर साहजिकच कामतेकर काहीसे अचंबित झाले.. त्यानंतर मुलीचे नाव प्रियंका म्हटल्यावर तर त्यांचे हाव भाव कसे असतील हे न सांगितलेलंच बरं... अर्थात त्यानंतर घरात बराच वेळ हास्यकल्लोळ झाला आणि अखेर समोरच्या लग्नाला परवानगी मिळाली... अर्थात त्यानंतर घरात बराच वेळ हास्यकल्लोळ झाला आणि अखेर समोरच्या लग्नाला परवानगी मिळाली... साहजिकच सध्या अनेकांचे लक्ष असलेल्या आणि अनेकांच्या जवळच्या असलेल्या कामतेकरांच्या घरातला हा किस्सा हळू हळू बाहेर पडला आणि बऱ्यापैकी शहरातल्या किमान भाजपच्या गोटात तर याची जोरदार चर्चा सुरु आहे...\nसारंग कामतेकर निश्चितच राज्य पातळीवरचं मोठे राजकीय नाव नाही. पण पिंपरी चिंचवड पुरते बोलायचे झाले तर सध्या महापालिकेच्या राजकारणाचे ते केंद्र बिंदू आहेत. त्याच्यामुळं सध्या त्यांच्या मुलाच्या लग्नामुळं झालेली ही चर्चा आणि गम्मत सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न... अर्थात लग्न हा त्यांचा खाजगी विषय असला तरी शहरातले राजकीय व्यक्तिमत्व म्हणूनच लिहण्याचा प्रपंच... अर्थात लग्न हा त्यांचा खाजगी विषय असला तरी शहरातले राजकीय व्यक्तिमत्व म्हणूनच लिहण्याचा प्रपंच... अर्थात समर आणि प्रियांकाला आमच्याकडून सुखी संसारासाठी लाख लाख शुभेच्छा ...\nपिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ\nधोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात \nलग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम...\n'पर्यावरण पूरक' संदेश देणारे 'कॅरी ऑन'च...\nइलेक्ट्रिक कूलरच्या शॉकनं सहा वर्षांचा कोवळा जीव होरपळला\nसपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)\nआंतरराष्ट्रीय मॅच न खेळता १८ पट रक्कम, आयपीएलच्या पहिल्याच...\nभांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक\nसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे'...\nAlcoholic बोलल्यावर भडकली पूजा भट्ट ; टोलर्सला दिले सडतोड उ...\nमुंबईत या ठिकाणी होणार सोनम कपूरचे लग्न...अशी होतेय तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/167/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:18:52Z", "digest": "sha1:DNW4JLMKTWEWVTTMXDJQS4PADQK4QFSS", "length": 8033, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादीचा दुष्काळी भागाला टँकरने पाणीपुरवठा\nमहाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी भागात काम करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पक्षकार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या भागातील लोकांना पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे.\nया उपक्रमाची सुरूवात सातारा जिल्ह्यापासून रविवारी करण्यात आली. साताऱ्यातील कोरेगाव-खटाव येथील दुष्काळग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता प्रशासनावर अवलंबून न राहता मागेल त्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना सरकारी मदतीविना उपक्रम राबवता येऊ शकतात याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात येत आहे.\nशेतकऱ्यांनो, या आणि पाहा सरकारची असंवेदनशीलता\nराज्यातील पंधरा हजार गावांमध्ये दुष्काळ जाहिर झालेला असताना आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा वाढत असताना त्यांना मदत करण्याऐवजी \"मेक इन इंडिया' सारखे भपकेबाज आणि खर्चिक पंचतारांकीत कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची क्रुर थट्‌टा असल्याची टीका माजी उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांना सरकारी उधळपट्‌ ...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची थट्टा करणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा \n''वीस एकर बागायती शेती आहे, सहा हजारांचे मोबाइल आहे, महागड्या गाड्या आहेत, यांना कसली शुल्क माफी द्यायची,'' अशा मुक्ताफळे उधळत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची अतिशय क्रूर चेष्टा करून एकूणच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा घोर अवमान करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कलगुरू डॉ. बाळू चोपडे यांच्याविरोधात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यश संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी आक्रमक झाली आणि विद्यार्थी शक्तीचा प्रत्यय ...\nगिरगाव चौपाटीचे नामकरण 'स्वराज्यभूमी' करण्याच्या आपल्या निर्णयाचा सरकारला विसर - सचिन अहिर ...\nस्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या गिरगाव चौपाटीचे 'स्वराज्यभूमी' असे नामांतर केल्यानंतरही ते वापरण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सरकारला केला आहे. 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाच्या ठिकाणाचा उल्लेख गिरगाव चौपाटीऐवजी 'स्वराज्यभूमी' असा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकार जर हट्टाने हा सोहळा घडवून आणत असेल, तर किमान या सोहळ्यात पंतप्रधानांसमोर राज्यातल्या दुष्काळी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/605/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:13:59Z", "digest": "sha1:AVQURVEA26SNGYNODRUEJHTDN6QLCSME", "length": 2313, "nlines": 28, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमंगळवारपासून संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात\nशेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत काढलेल्या संयुक्त संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास उद्या, मंगळवार दि. २५ एप्रिल २०१७ पासून सुरूवात होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये संघर्षयात्रा यावेळी पोहोचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असून यापुढे 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा इशारा सत्ताधाऱ्यांना आधीच देण्यात आला आहे. त्यामुळे संघर्षयात्रारूपी हे आंदोलन तिसऱ्या टप्प्यात अधिक आक्रम स्वरुप धारण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-dhavlapuri-aurangabad-3391", "date_download": "2018-04-23T11:49:34Z", "digest": "sha1:AK6WCD4X3JURQA6DZEDQLVNTJM6WZXAU", "length": 21743, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Dhavlapuri, Aurangabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारणा हाच ठरला एकमेव मंत्र\nसुधारणा हाच ठरला एकमेव मंत्र\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nदुष्काळाची समस्या लक्षात घेऊन काही अंतरावर असलेल्या सोमठाना शिवारातील तलावावरून पटेल यांनी पाइपलाइन केली आहे. पाण्याच्या स्रोतासाठी दोन विहिरी व दोन बोअरवेल्स आहेत. एप्रिल ते मे हे दोन महिने त्यांना ‘डॅम’च्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. तेथून पाणी आणण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी सुमारे १४ लाख रुपये खर्च करावे लागले.\nआपण नेमकं कुठे कमी पडतो, हे एकदा शोधून काढलं, की पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ढवळापुरी (जि. अौरंगाबाद) येथील शकुर सांडू पटेल यांच्याबाबत हेच घडलं. गावचे सरपंच असताना शेतीकडे म्हणावं तसं लक्ष देता आलं नाही. त्यातच काही पिकांचे प्रयोग केले; मात्र दुष्काळ, दर व काही प्रसंगी योग्य व्यवस्थापनाअभावी ते ‘फेल’ गेले. ‘सुधारणा’ हा एकच मंत्र लक्षात घेत पटेल यांनी आज शेतीत बदल केले आहेत. त्यातून यशाकडे वाटचाल केली आहे.\nराजकारणात पडलं की माणसाला शेतीतलं काही सुचत नाही; पण औरंगाबाद जिल्ह्यातील ढवळापुरीच्या शकुर पटेल यांनी हे वाक्य खोडून काढलं. जवळपास दीड वर्षाच्या गावच्या सरपंचकीनंतर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं ते शेतीकडे वळले ते कायमचेच. ‘गड्या आपली शेतीच बरी’ची हाक त्यांच्या मनानं दिली.\nसुरवातीला काही पिकांचे प्रयोग फेल गेले तरी जिद्द सोडली नाही. डाळिंब व त्यानंतर पेरूची जोड शेतीला दिली.\nराजकारणातून अंग काढून घेतलं. जे करायचं ते शेतीसाठीच हा ध्यास घेतला. त्यामुळे त्यांच्याबरोबरच खांद्याला खांदा लावून शेतात राबत असलेल्या दोन मुलांचा उद्याचा काळही निश्चित सुरक्षित झाला.\nराजकारणापेक्षा शेतीलाच घेतलं वाहून\nवडिलोपार्जित चाळीस एकर शेती असलेले शकुर सांडू पटेल ढवळापुरी पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचे. राजकारणात रमलेले. सन २००६ मध्ये सरपंचपदाची संधी त्यांना मिळाली. पण वर्षभराचा कालावधी जात नाही तोच त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला. दरम्यान, शेतीत रमलेल्या काही माणसांच्या संपर्कात ते आले. मग अविश्वास प्रस्ताव थांबविण्याऐवजी राजकारण सोडून शेतीवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.\nसंपूर्ण कुटुंबच राबतं शेतीत\nआज स्वतः शकुरभाई तसेच तय्यब आणि समीर ही दोन मुलं व घरच्या महिला सदस्य असे सगळे शेतीत राबतात. त्यामुळे मजुरांचा प्रश्नही त्यांनी बऱ्याच प्रमाणात सोडवला आहे.\nपटेल यांनी पारंपरिक पिकांना बगल देताना केळी, पपई, मिरची आदी पिकं घेतली. त्याचवेळी दुष्काळही आला. केळीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. पपई, मिरची ‘व्हायरस’मुळे गेली.\nत्यानंतर पाणी, मजुरी व बाजारपेठ अशा सर्व अंगांनी विविध पिकांचा शोध घेतला. त्यात डाळिंब आणि पेरू ही पिकं बरी वाटली.\nभागातील कृषिभूषण प्रयोगशील शेतकरी सिकंदर जाधव मदतीला आले. त्यांचं विशेष मार्गदर्शन मिळू लागलं.\nआज डाळिंब व पेरू हीच मुख्य पिकं झाली आहेत. डाळिंबाची सुमारे १६०० झाडं आहेत.\nआत्तापर्यंत त्याचे दोन बहर घेतले. त्यातून अनुक्रमे ३५ टन व ५६ टन (एकूण उत्पादन) मिळालं.\nसाधारण किलोला ४० रुपये दर मिळाला आहे.\nपेरू शेतीही तशी नवी आहे. वर्षाला दोनवेळा छाटणी करून दोन बहर घेतले आहेत. सुमारे २२०० झाडं आहेत.\nपेरूची बाग एप्रिलपासून ताणावर सोडली जाते. मेच्या सुरवातीला बागेची छाटणी केली जाते. छाटणीनंतर ड्रीपच्या साहाय्याने पाणी दिलं जातं. पंधरवड्याने दररोज दोन तास पाणी साधारणत: जूनपर्यंत दिलं जातं. छाटणीनंतर पंधरवड्याने कळी लागणं सुरू झालं की गरजेनुसार फवारणी घेतली जाते.\nपेरूचं एकूण एकराशे क्रेट पहिल्या बहरातील उत्पादन मिळालं. दुसऱ्या बहरातील बाग दोन लाख रुपयांना व्यापाऱ्यांना देण्यात आली. तिसऱ्या बहरापासून चांगलं उत्पादन व उत्पन्न पटेल यांना अपेक्षित आहे. क्रेटला ७०० ते एक हजार रुपये दर सुरू आहे. पेरूला नोटाबंदीचाही सामना करावा लागला. जागेवरून जवळपास १५० रुपये प्रतिक्रेट दराने पेरू विकावे लागले.\nपीकपद्धतीत सुधारणा करताना पटेल यांनी बाजारपेठेचाही बारकाईने अभ्यास केला आहे. पारंपरिक पिकांचं नियोजन करताना प्रत्येक वर्षी जवळपास २० एकर कपाशीची होणारी लागवड यंदा पाच एकरांवर आणली आहे. वीस एकर कपाशीतून प्रत्येक वर्षी १०० त १२५ क्‍विंटल कापूस व्हायचा. त्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांदरम्यान दर मिळायचा. सुमारे २५ वर्षांच्या कापूस शेतीत शंभर क्‍विंटल कापसाला एकवेळच सात हजार रुपये दर मिळाल्याचं ते सांगतात. यंदा पाच एकर कपाशीपैकी अडीच एकर ड्रीपवर आहे. पाच एकरांतून आजवर ४० क्‍विंटल उत्पादन मिळालं आहे. पूर्वी सुमारे १५ एकरांत मका असायचा. त्याला एक हजार ते चौदाशे रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळायचा. आता यंदा सहा एकरच मक्याचं क्षेत्र ठेवलं आहे. गव्हाचंही क्षेत्र चांगलं असतं. यंदा पाच एकरांवर खरबुजाचंही नियोजन आहे.\nसंपर्क- शकुर पटेल - ९९६००४२४४८\nपेरूच्या रूपाने केलेला नवा प्रयोग पटेल यांना आशादायक वाटत आहे.\nपाण्याच्या सोयीसाठी विहिरीचा आधार.\nचे दर सध्या कमी असले तरी अन्य फळपिकांच्या तुलनेत हे पीक किफायतशीर वाटल्याचं पटेल सांगतात.\nशेतीत नवे प्रयोग केल्याशिवाय सुधारणा नसल्याचं पटेल सांगतात.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-giving-vegetable-baskets-district-collectors-3429", "date_download": "2018-04-23T11:50:53Z", "digest": "sha1:RAPYDGITNW6PC22RZVVJJ3TBVLPEGYSP", "length": 15450, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers giving Vegetable baskets to the district collectors | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या\n'समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nनाशिक : मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रिम प्रोजेक्‍ट’ या नावाखाली समृद्धीबाधितांच्या आयुष्यावर वरवंटा फिरविला जात आहे. स्वप्नपूर्तीच्या हट्टापायी बागायती व निर्यातक्षम पीक उत्पादित जमिनींची नासाडी थांबवा. सोळा महिन्यांपासून आक्रोश करत असूनही एकदा तरी घटनास्थळाची पाहणी करा, या मागणीसाठी सोमवारी (ता. २७) समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या भेट दिल्या.\nयावेळी दुपारी दीड वाजता सोमनाथ वाघ (सिन्नर), भास्कर गुंजाळ (इगतपुरी) रावसाहेब हारक, समितीचे समन्वयक राजू देसले हे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेटले.\nनाशिक : मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रिम प्रोजेक्‍ट’ या नावाखाली समृद्धीबाधितांच्या आयुष्यावर वरवंटा फिरविला जात आहे. स्वप्नपूर्तीच्या हट्टापायी बागायती व निर्यातक्षम पीक उत्पादित जमिनींची नासाडी थांबवा. सोळा महिन्यांपासून आक्रोश करत असूनही एकदा तरी घटनास्थळाची पाहणी करा, या मागणीसाठी सोमवारी (ता. २७) समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या भेट दिल्या.\nयावेळी दुपारी दीड वाजता सोमनाथ वाघ (सिन्नर), भास्कर गुंजाळ (इगतपुरी) रावसाहेब हारक, समितीचे समन्वयक राजू देसले हे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेटले.\nसमृद्धी महामार्गासाठी पिकाऊ व बागायती जमिनी घेतल्या जात आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांतील एकाही समृद्धीबाधित गावात मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यांतील काही गावांत एकरी दहा लाखांची पिके घेतली जातात. अशा गावांतील जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत.\nनाशिक जिल्ह्यात वन विभागाच्या जागेतून रस्ता नेणे शक्‍य असूनही शासन प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महामार्गात सोन्यासारख्या जमिनी जात असल्याने एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गावात प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी करत समृद्धीत जाणाऱ्या बागायती जमिनीत पिकलेल्या पिकांची टोपली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाऱ्यांसाठी दिली.\nनाशिक बागायत घटना incidents मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग महामार्ग वन प्रशासन administrations देवेंद्र फडणवीस\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/man-cheats-death-after-7-ft-iron-rod-spears-his-skull-from-4-flrs-above-191989", "date_download": "2018-04-23T11:33:58Z", "digest": "sha1:46HZD7QXFWL2FPEWW5IIZUWXXLW5KKHL", "length": 11855, "nlines": 113, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "लोखंडी सळई डोक्यात घुसूनही 'तो' बचावला!", "raw_content": "\nलोखंडी सळई डोक्यात घुसूनही 'तो' बचावला\nलोखंडी सळई डोक्यात घुसूनही 'तो' बचावला\nBy: एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती: Iron Rod Mumbai मुंबई लोखंडी सळई\nसात फुटांची लोखंडी सळई डोक्यात आरपार घुसूनही एक मजूर बचावल्याची आश्चर्यकारक घटना मुंबईत घडली आहे. मालाडच्या तानाजीनगरमधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर 24 वर्षीय मोहम्मद गुड्डू सिमेंट एकत्र करण्याचं काम करत असताना हा प्रकार घडला.\nचौथ्या मजल्यावरुन पडलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याच्या कवटच्या आरपार घुसली.\nया घटनेनंतर गुड्डूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला आश्चर्यकारकरित्या वाचवलं. महत्त्वाचं म्हणजे ही सळई डोक्याच्या आरपार घुसूनही गुड्डूच्या मेंदूची प्रमुख धमनीला कोणतंही नुकसान झालेलं नाही.\nपण गुड्डूच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघात झाला आहे. पण तीन महिन्यात त्याच्या सुधारणा होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गुड्डूच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाली होती.\nगुड्डूला तातडीने संजिवनी रुग्णालय आणि त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायन रुग्णालयात डॉ. बटुक दियोरा यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांच्या एका टीम त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, \"गुड्डूला कमीत कमी दोन आठवडे रुग्णालयातच राहावं लागेल. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्याला पूर्णत: बरं होण्यासाठी तीन महिने लागू शकतात.\"\nअधिक माहिती: Iron Rod Mumbai मुंबई लोखंडी सळई\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nबीसीसीआई को तय करना है भारत-पाक सीरीज: पीसीबी प्रमुख\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/17/%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_", "date_download": "2018-04-23T11:28:38Z", "digest": "sha1:AP2LKCPGUWW5OUB6ZWYAK3DTGJVBEFFY", "length": 9196, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nऊसतोडणी कामगारांच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे - शरद पवार\nविरोधी पक्षनेते Dhananjay Munde यांच्या पुढाकाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज ऊस तोडणी मजूर व मुकादमांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात वीस टक्के वाढ, मुकादमांचे कमिशन, वाहतुक दर, ऊस तोडणी कामगारांच्या फरक बिल इत्यादी प्रलंबित मागण्या घेऊन ऊसतोडणी मजूर संघटनांच्या प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी साखर संघासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन हे प्रश्न सोडवावेत अशी सूचना शरद पवार यांनी केली.\nयावेळी पवार यांनी ऊस तोडणी कामगारांचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना मुंडे आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून ऊस तोडणी कामगार, मजूर आणि साखर व्यवसायात येणाऱ्या अडचणी एकत्र बसून सोडवल्या. त्यामुळे आम्हाला कधीही अडचण आली नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न सोडवावेत, चर्चेसाठी त्यांच्यासोबत बसण्याची तयारी असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.\nविधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूक ठेकेदार यासर्वांच्या वतीने स्वतः मुख्यमंत्र्यांना आदरणीय पवार साहेबांसोबत चर्चा करून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.\nमहाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने या प्रसंगी आपल्या मागण्यांचे निवदेन शरद पवार यांना दिले.⁠⁠\nआदरणीय शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना चार दिवसांच्या उपचारांनंतर आज सकाळी रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले.पवार साहेबांना डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माध्यमांशी बोलताना कार्यरत राहाण्याचीच सवय असणाऱ्या पवार साहेबांनी स्वतः मात्र आपल्याला पुढील दोन महिन्यांत एकही सुट्टी नसल्याचे सांगितले. आपल्याला एका जागी बसून राहायची सवय नसल्याचे सांगत 'आता विश्रांतीचं कसं करायचं ते बघू' असे म्हटले.आदरणीय पवार साहेबांची प्रकृत ...\nभाववाढीसाठी शेतकरी अस्वस्थ होणारच, त्यांच्यावर बळाचा वापर टाळला पाहिजे - शरद पवार ...\nचंद्रपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बोलताना कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधन यांनी केलेले आरोप भयानक स्वरुपाचे आहेत, असे ते म्हणाले. राज्य सरकारने त्याची दखल घेऊन योग्य चौकशी करावी. जर यात तथ्य असेल तर कारवाई करावी. पण जर हे सत्य नसेल तर अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत याबाबत खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.पुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले की सरकारने कर्जमा ...\nहे खरंच कायद्याचं राज्य आहे का शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल ...\nअलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहम ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:51:32Z", "digest": "sha1:464CW47PHGLDB3DC3G6V47APA4HG2KIU", "length": 6433, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नॉर्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः नॉर्वे.\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► नॉर्वेचा इतिहास‎ (१ क, १ प)\n► ओस्लो‎ (२ प)\n► नॉर्वेतील कंपन्या‎ (१ प)\n► नॉर्वेमधील खेळ‎ (१ क, ३ प)\n► नॉर्वेजियन भाषा‎ (१ क, १ प)\n► नॉर्वेचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► नॉर्वेमधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ प)\n► नॉर्वेजियन व्यक्ती‎ (५ क, १ प)\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nनॉर्वे राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nनॉर्वे महिला राष्ट्रीय हँडबॉल संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/wynncom-w520-black-gun-metal-price-p6224a.html", "date_download": "2018-04-23T11:36:48Z", "digest": "sha1:ICTR2KVX7Z2JCZF5AM2EO6W2752743HZ", "length": 13405, "nlines": 388, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल\nवरील टेबल मध्ये वयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल किंमत ## आहे.\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल दर नियमितपणे बदलते. कृपया वयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल वैशिष्ट्य\nनेटवर्क तुपे Yes, GSM + GSM\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 16 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured Os\nमुसिक प्लेअर Yes, MP3\nविडिओ प्लेअर Yes, MP4, 3GP\nबॅटरी तुपे 1200 mAh\nटाळकं तिने 6 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 300 hrs\nसिम ओप्टिव Dual Sim\nवयनँकं व५२० ब्लॅक गन मेटल\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:40:35Z", "digest": "sha1:2HMDPAVEYBQHUVNWVJZDHUKABFBKQH2E", "length": 9956, "nlines": 177, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): नाही विसरता येत...", "raw_content": "\nनाही विसरता येत इतक्या सहज -\nन मागताही दिलेली स्वाधीनता\nआणि बदल्यात मिळालेली अगतिकता\nनाही विसरता येत -\nउच्च कळस बघताना खुपणारी\nही संगती, ही विसंगती\nही तटस्थता, ही त्रयस्थता,\nही धुंदी, ही बेपर्वाई\nआणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...\nप्रश्नांच्या भोवर्‍यात प्राण घुसमटतानाही\nधडपडत तिथेच घट्टपणे फिरत राहण्याचा हट्ट\nआणि कुठल्याशा भव्य, उदात्त स्वप्नाचा हव्यास\nमला खेचत नेतोय अनिश्चिततेच्या खोल गर्तेत...\nएकटेपणाची सार्वत्रिक खंत आठवून देते\nसक्तीने अंधारात बसून बघावी लागलेली रोषणाई\nमधूनच बेसावध क्षणी कुणीतरी झगमग आवेशात\nअंधारात मारलेला दिव्याचा झोत,\nत्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण\nपूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार...\n- नचिकेत जोशी (१४/१०/२०१३)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nमांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/dabeli-masala/", "date_download": "2018-04-23T11:39:58Z", "digest": "sha1:OIOK32WCS7TUWU7HTWRVVC6B63VR55AW", "length": 5468, "nlines": 110, "source_domain": "www.marathimati.com", "title": "दाबेली मसाला | Dabeli Masala", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » दाबेली मसाला\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८\nदाबेली मसाला - [Dabeli Masala] ताजा, घरच्या घरी बनवलेला ‘दाबेली मसाला’ दाबेलीची चव वाढवतो.\n१ /२ चमचा धणे\nसर्व साहित्य एकत्र करुन कोरडंच भाजावे.\nथंड करुन मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करावी.\nदाबेली बनवताना त्यात हा मसाला टाकावा आणि दावेलीची चव वाढवावी.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/182/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A6", "date_download": "2018-04-23T11:21:01Z", "digest": "sha1:TW54OVGBHB64AKOSUINSSWTSCG6SFVMD", "length": 10577, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा मराठवाडा दौरा दुष्काळी जनतेचा भ्रमनिरास करणारा - धनंजय मुंडे\nमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील पंचवीस मंत्र्यांनी केलेल्या मराठवाडा दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेला कसलाही दिलासा मिळाला नसून त्यांचा हा दौरा भ्रमनिरास करणारा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. हा दौरा म्हणजे मंत्र्यांची दुष्काळी टूर आहे, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी बीड, लातुर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या शुक्रवारी केलेल्या दुष्काळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते परळीत बोलत होते.\nदुष्काळात होरपळून निघणाऱ्या या तीन जिल्ह्यांतील जनतेला आणि शेतकऱ्यांना या दौऱ्यातून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ज्या घोषणा मुंबईत बसूनही केल्या जाऊ शकतात अशा पोकळ घोषणा आणि केवळ जुन्याच योजनांची उजळणी या दौऱ्यात पाहण्यास मिळाली. हा दौरा म्हणजे केवळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पाडलेला एक सोपस्कार ठरला आहे, असे मुंडे म्हणाले. आगामी अधिवेशनात आपण या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण मंत्रीमंडळ आले असतानाही या तीन जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र दुसरीकडे सुरूच होते. यावरूनच जनतेला हे सरकार आधार देणारे वाटत नसल्याची टीका मुंडे यांनी केली. सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच मंत्र्यांना गराडा घातला, मंत्र्यांना जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दिले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.\nशेतकऱ्यांना या दौऱ्यातून तातडीने दिलासा मिळेल अशी एकही घोषणा झाली नाही. कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, उलट मी काही देण्यासाठी आलो नाही तर योजनांची पहाणी करण्यासाठी आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केल्याचे ते म्हणाले. लातुर सारख्या सर्वाधिक पाणी टंचाईच्या गावासाठी उजनीवरून रेल्वेने पाणी आणण्याबाबत केवळ घोषणा केल्या गेल्या. त्याबाबत दौऱ्यात उल्लेखही नाही. बीड, उस्मानाबाद, परळी, अंबाजोगाई या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आगामी तीन महिने तीव्र पाणीटंचाई जाणवणार असताना त्याबाबत साधी चर्चाही होऊ नये, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मुंडे म्हणाले.\nधनगर समाजाने सुप्रिया सुळे यांच्याकडे आरक्षणाचा मुद्दा धरून ठेवण्याची केली विनंती ...\nआज हल्लाबोल आंदोलनाच्या दहाव्या दिवशी नागपूर येथील बुटीबोरी येथून पदयात्रेचा आरंभ झाला. मार्गात शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडत सरकारच्या निष्क्रियतेवर ओढण्यासाठी आसूड विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना दिला. तर, धनगर समाजातील प्रतिनिधींनी खा. सुप्रिया सुळे यांना शाल व श्रीफळ देत धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याची विनंती केली. मजल-दरमजल करत पदयात्रा आज खापरी मुक्कामी पोहचली आहे. उद्या नव्या दमाने पुढील प्रवासाला सुरुवात होईल. ...\nमुख्यमंत्र्यांना कायद्याचे राज्य चालू द्यायचे नाही – नवाब मलिक ...\nराज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत भाजपचेच नेते व कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. जालना जिल्ह्यातील भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या अरेरावीला कंटाळून बदलापूरचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी कुटुंबासह आत्महत् ...\nशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक ...\nशेतकरी कर्जमाफी च्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही चांगलाच गाजत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. याच मुद्द्यावरून बुधवारी विधिमंडळाचे काम सुरू होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.दरम्यान, याच मागणीवरून विधानसभेचे कामकाज सलग तीन वेळा स्थगित झाले. स्थगितीनंतर सभ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-production-pre-existing-cotton-half-3051", "date_download": "2018-04-23T11:53:52Z", "digest": "sha1:UNMW2OMZBW5DJ3RXRVHSTZDYYWODKCBG", "length": 15611, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Production of pre-existing Cotton half | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन निम्म्यावर\nपूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन निम्म्यावर\nगुरुवार, 16 नोव्हेंबर 2017\nजळगाव : पावसाचा लहरीपणा आणि नंतरचा शेंदरी बोंडअळीचा डंख यामुळे खानदेशातील कापूस उत्पादन यंदा निम्म्यावर येणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. आजघडीला खानदेशातील पूर्वहंगामी कपाशीचे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे झाले आहे. पूर्वहंगामी कापूस उत्पादकांना एकरी साडेचार ते पाच क्विंटलच उत्पादन मिळाले असून, कोरडवाहू कपाशीतून उत्पादन खर्चही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे.\nजळगाव : पावसाचा लहरीपणा आणि नंतरचा शेंदरी बोंडअळीचा डंख यामुळे खानदेशातील कापूस उत्पादन यंदा निम्म्यावर येणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. आजघडीला खानदेशातील पूर्वहंगामी कपाशीचे जवळपास ३० हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे झाले आहे. पूर्वहंगामी कापूस उत्पादकांना एकरी साडेचार ते पाच क्विंटलच उत्पादन मिळाले असून, कोरडवाहू कपाशीतून उत्पादन खर्चही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे.\nजळगाव आणि धुळ्यात पूर्वहंगामी किंवा बागायती (मे, जून महिन्यातील लागवड) कपाशीची लागवड जवळपास एक लाख २३ हजार हेक्‍टरवर झाली आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, शिंदखेडा, शिरपूर, शहादा, नंदुरबार या तापीकाठावरील तालुक्‍यांमध्ये मे, जून महिन्यांत कपाशीची सूक्ष्मसिंचनावर मोठ्या प्रमाणात लागवड झाली, तर कोरडवाहू कपाशीची लागवडही अधिक झाली.\nमात्र जूनमध्ये पावसाने दगा दिला. नंतर दुबार लागवड करावी लागली. त्यानंतर पावसाने ओढ दिली आणि तिबार लागवड करण्याची वेळ आली. आणखी जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू कपाशी तर पुरती वाया गेली. त्याच वेळी पूर्वहंगामी कपाशीवर जुलै महिन्यात शेंदरी बोंडअळी आली.\nपूर्वहंगामी कपाशीचे दिवाळीपर्यंतचे वेचे बरे आले. नंतर एका झाडावर दोन, चार बोंडे रुईदार आणि इतर किडलेले, कवड्यांचे निघत आहेत. मजूर वेचणीला नकार देत आहेत. अशातच फरदडचे उत्पादन येणार नाही म्हणून ती काढून फेकली जात आहे. चोपडा, जळगाव, शिरपूर, यावल, शहादा, नंदुरबार भागात क्षेत्र रिकामे केले जात असून, त्यावर मका व इतर रब्बी पिकांची लागवड झाली आहे.\nदरम्यान खानदेशात कापूस उत्पादन अधिक येईल, असा आशावाद जिनर्स, व्यापाऱ्यांना होता. पण अगदी दिवाळीपूर्वीच हा अंदाज चूक असल्याचे जाणवले. त्यामुळेच की काय, निम्म्याच जिनिंग सुरू झाल्या. जिनर्सचा २२ लाख गाठींच्या उत्पादनाचे नियोजनही कोलमडले आहे.\nजळगाव खानदेश कापूस कोरडवाहू बागायत\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T11:49:27Z", "digest": "sha1:QLKMKDWWDR47UN22KBVL7X6P5DBGRRIC", "length": 3391, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भादिश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभौतिकी आणि गणितात भादिश (भासी सदिश) अथवा ’अक्षीय सदिश‘ ही ’सदिश‘ सारखेच गुणधर्म असणारी गोष्ट आहे. उचित परिभ्रमणात, भादिश हे सदिशप्रमाणेच रुपांतरित होते, तथापि ते नेहमी अधिक(+) चिन्हासहित अवतरते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T11:49:09Z", "digest": "sha1:4NEOAAHZDVQ7APWH3FHEG5UXMBS2YCMX", "length": 3575, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोमोझोनो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://guy8461.wordpress.com/2015/02/23/23rd-february-1873-20th-december-1956-saint-gadge-maharaj/", "date_download": "2018-04-23T11:44:32Z", "digest": "sha1:BOY73PFHPVULMVIO3RNNHQQOCDMIEWWE", "length": 41731, "nlines": 267, "source_domain": "guy8461.wordpress.com", "title": "23rd February 1873 – 20th December 1956 Saint Gadge Maharaj – Shivaji Raje", "raw_content": "\nsant gadge maharaj साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा\nsant gadge maharaj साठी अधिक प्रतिमा\nशेणगाव अंजनगाव, कोल्हट [सुर्जी तालुका]], अमरावती जिल्हा, महाराष्ट्र\nगाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा,अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीचीकाच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.\n२.१ “संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश “\n४ गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज\n५ गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर\n७ गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके\nगाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठीशेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.\nडेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्नलहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.\n१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.\nदिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.\nसमाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.\nत्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.\nमहाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे – ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ – असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.\nअमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.\n“संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश “ [संपादन]\nगरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत\nअंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचार\nपशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभय\nदु:खी व निराशांना = हिंमत\nहाच आजचा रोकडा धर्म आहे हीच खरी भक्ती व देवपूजा आहे \nगाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.\nऋणमोचन येथे त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचे’मंदिर बांधले.\n१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.\n१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.\n१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.\n“मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.\nफेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.\nगाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.\n१९३२ – ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.\nगाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.\n“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]\nआचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’\n१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.\n१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.\nगाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.\nडॉ आंबेडकरसुद्धा त्यांना गुरुस्थानी मानत असत.\n२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.\nगाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.\nगाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज[संपादन]\nगाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज\nगाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.\nगाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर[संपादन]\n१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले “डॉ. तुम्ही कशाला आले मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.”\nतेव्हा बाबासाहेब म्हणाले “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.\nएकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना…समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, ” बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून \nपंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले “टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा.”\nगाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके[संपादन]\nThe Wandering Saint (वसंत शिरवाडकर) – श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई\nआपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)\nकर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)\nगाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)\nगाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) – विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)\nगाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)\nदिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)\nमानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)\nमुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)\nलोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)\nलोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)\nश्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)\nश्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)\nश्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)\nश्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)\nश्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)\nश्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)\nश्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)\nश्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)\nसंत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) – (१९९६)\nसंत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)\nडेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.\nदेवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.\nगाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.\n१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार\n२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार. वगैरे..\nवर उडी मारा↑ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर-दि.२५/१०/२०१३ पान क्र. १ (मथळा-देवकीनंदन गोपाला आणि मन्नादा) दि. २५/१०/२०१३ रोजी १०.५९ वाजता जसे दिसले तसे.\nप • च • सं\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी\nवामनराव पै • रामदेव • आसाराम बापू • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९५६ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयासाठी परिणाम दर्शवित आहे sant gadge maharaj\nत्याऐवजी यासाठी शोधा saint gadge maharaj\nsant gadge maharaj साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा\nsant gadge maharaj साठी अधिक प्रतिमा\nगाडगे महाराज – विकिपीडिया\nगाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित …\n‎१ बालपण – ‎२ सामाजिक सुधारणा – ‎३ संक्षिप्त चरित्र\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\n१२ एप्रि, २०१२ – Prakash Kute द्वारा अपलोड केलेले\n८ नोव्हें, २०१२ – संत गाडगे महाराज,मातीतले कोहिनूर,Saint Gadge Maharaj,People.\nया पानाचे भाषांतर करा\nया पानाचे भाषांतर करा\nGoogle+ वर १,८३,२६२ अनुयायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7140876", "date_download": "2018-04-23T11:44:52Z", "digest": "sha1:VYSYS46NBJY56X5AUIXR64ZAXONV3FFN", "length": 6173, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "माझ्यासाठी Xyo च्या अॅप्स फेसबुक वापरासाठी अनुप्रयोग शिफारशी शोधण्यासाठी पसंत करतात & amp; मिमल", "raw_content": "\nमाझ्यासाठी Xyo च्या अॅप्स फेसबुक वापरासाठी अनुप्रयोग शिफारशी शोधण्यासाठी पसंत करतात & मिमल\nXyo नुसार, माझ्यासाठी अॅप शोध परिणाम Semalt फ्रेंडस दर्शवेल, \".600 प्रकारच्या अॅप्स आणि 120 गेम रुचीच्या लांब शेप मध्ये स्वारस्य असण्याची शक्यता\" आहे.\nएक्सो हे असे सांगते की 10 टक्के अनुप्रयोगांना अॅपच्या शीर्ष शेल्फ अॅप्समधील केवळ लक्ष केंद्रित करणाऱ्या 90 टक्के डाउनलोड मिळतात - l karnitin sivi. \"ऍप अॅप स्टोअर खरोखरच किती छान आहे हे आश्चर्यकारक आहे - ऍप्लिकेशन्सच्या शेकडो अॅप्लिकेशन्स आहेत, अॅप्लीकेशन स्टोअरच्या म्हणण्याप्रमाणे काही डझन श्रेणीच नाहीत,\" एक्सओचे सह-संस्थापक मॅथ्यूस क्रिझॉव्स्की म्हणाले.\nXyo CEO झो सेमाल्ट वापरकर्त्याच्या फेसबुक लाईक्सवर अॅप्स जोडण्याशिवाय मूल्य पाहतात, \"आपल्या कोणत्याही मित्राने अॅप्स रूची असलेल्या एका विशिष्ट सेटमध्ये स्वारस्य असू शकते असा सल्ला शक्तिशाली आहे, कारण हे संभाषण स्पार्क करते आणि वापरकर्त्यांना ते शेअर करण्यास प्रवृत्त करते सेमिल्ट म्हणतो, \"आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोअरची लाँग टेम्प्लेट शोधण्यायोग्य करतो.\"\nXyo ला Facebook वर आधारित लांब शेपटी अॅप शोध परिणाम वितरित करण्यासाठी प्रथम अॅप असल्याचा दावा करते. अॅपला हा आठवड्यात रिलीझ करण्यात आला, तीन आठवड्यांपूर्वी बंद बीटा प्रक्षेपणातील वापरकर्त्यांच्या पहिल्या सेटसह Xyo ने \"महान अवलंब दर\" अभिमान व्यक्त केला.\n(1 9) लेखक बद्दल\nएमी गेसेंझेस (2 9)\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\n(1 9) लोकप्रिय कथा\nनाही, आम्ही न्यूज फीड बदलल्यामुळे फेसबुक सीपीएम वर येत नाही असे म्हणता येत नाही\n(4 9) रेडितने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nQuora ने ईमेल लिस्टवर आधारित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सूची मॅच लक्ष्यीकरण सुरू केले\nसर्वोत्तम आघाडी-जनसंपर्क वेबसाइट तयार करणे, स्टेप बाय स्टेप\n(1 9) संबंधित विषय\nचॅनेल: मोबाइल विपणनफेसबुक: अॅप्स आणि अॅप सेंटरफेसबुक: मोबाइलमोबाइल मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/608/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A3", "date_download": "2018-04-23T11:27:44Z", "digest": "sha1:QORUNHWDJ2KO7QQ6M7YM5JXQASCV67B5", "length": 8978, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजनतेच्या जीवनाशी निगडीत मुलभूत प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणार – संग्राम कोते पाटील\nराज्यात युवकांशी संबंधित अनेक विषय आहेत. रोजगार वाढ आणि कौशल्य विकास करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याऐवजी बेरोजगारी वाढतानाच दिसत आहे. या प्रश्नांसोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्कमाफी, पेट्रोलची दरवाढ अशा जनतेच्या जीवनाशी निगडीत मुलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत काम करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी युवक संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही विद्यार्थी संघटनेसोबत समन्वय ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही काम करणार असल्याचे तसेच येत्या एका महिन्यात राज्यभर दौरा करुन युवक संघटनेची संपूर्ण कार्यकारणी व जिल्हा समित्यांची पुनर्रचना करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी युवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते, रविकांत वर्पे, सचिव अभिषेक बोके, मयुर गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंडकर, पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष संजोग वाघेरे, मनोज पाचपुते, जितेंद्र इंगवले, ऋषी परदेशी, संग्राम सस्ते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशेतकऱ्यांप्रती भाजप सरकार असंवेदनशील - संग्राम कोते पाटील ...\nशेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर मेळावा आज धुळे येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे. राज्य सरकारने झोपेचे सोंग न घेता राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांच्या मागण्या पूर् ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली येथील मेळाव्यास व रॅलीस युवकांचा प्रचंड प्रतिसाद ...\nदेशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊन बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी दिले होते. गेल्या तीन वर्षांत किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी उपस्थित केला. सांगली येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. गाव तेथे शाखा या उपक्रमांतर्गत हा मेळावा आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड प्रतिसाद दिला.सांगली येथील मिरज, कवठेमहांकाळ, ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार - संग्राम कोते पा ...\nभाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत काहीच काम केलेले नाही. निवडणुकांच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही त्यांनी केली नाही. राज्य सरकारच्या या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिवाळीनंतर राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार आहे. कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेसाठी तयार रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संग्राम कोते पाटील राज्याचा दौरा करत आहेत. ते आता कोल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khandala-vai-taluka-paddy-crop-trouble-2451", "date_download": "2018-04-23T11:57:09Z", "digest": "sha1:FSXCYOBLVRGZ2DDQ64GF3EAGEQ3HCQNJ", "length": 14965, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Khandala, Vai taluka paddy crop in trouble | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखंडाळा, वाई तालुक्‍यांत भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव\nखंडाळा, वाई तालुक्‍यांत भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nसातारा : परतीचा पाऊस लांबल्यामुळे तापमानातील वाढ आणि असंतुलित रासायनिक खतांचा वापर, यामुळे मागील आठवड्यापासून खंडाळा व वाई तालुक्‍यांत भात पिकावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिकात हवा खेळती राहावी यासाठी दर ५-६ ओळींनंतर भांगे पाडावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईणकर यांनी केले आहे.\nसातारा : परतीचा पाऊस लांबल्यामुळे तापमानातील वाढ आणि असंतुलित रासायनिक खतांचा वापर, यामुळे मागील आठवड्यापासून खंडाळा व वाई तालुक्‍यांत भात पिकावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिकात हवा खेळती राहावी यासाठी दर ५-६ ओळींनंतर भांगे पाडावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईणकर यांनी केले आहे.\nखंडाळा व वाई तालुक्‍यांतील पश्‍चिम भागात भात पिकाखाली एकूण सर्वसाधारण लागवडी खालील ८२० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी खरीप हंगामात एकूण २२ गावांत ६६२ हेक्‍टर क्षेत्रावर भात पिकाची पुनर्लागवड झालेली होती. सध्या भात पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. परंतु परतीचा पाऊस लांबल्यामुळे, तापमानातील वाढ असंतुलित रासायनिक खताचा वापर यामुळे मागील आठवड्यापासून भात पिकावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nप्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावर दळी पडणे व गोड सुवासिक वास येतो. यावर उपाय म्हणून खाचरात साचलेले पाणी काढून देणे. भात पिकांत दर ५-६ ओळी नंतर भांगे पाडावेत. जेणे करून पिकात हवाखेळती राहील. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. भांगे पाडलेल्या ओळीतून प्रतिपंपास कॉन्फीडॉर ७.५ मिलि आणि निंबोळी अर्क १५ मिलि या प्रमाणात फवारणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, खंडाळा व वाई, मंडळ कृषी अधिकारी, खंडाळा व वाई, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माईणकर यांनी केले आहे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-cultivation-technology-brokoli-agrowon-maharashtra-2366", "date_download": "2018-04-23T11:56:57Z", "digest": "sha1:EMZOIT2VD567O5J43UZ44676DGXQKVJ6", "length": 47561, "nlines": 226, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, cultivation technology of brokoli, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nस्प्राऊटिंग ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा. इटालिका’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली हेच आहे.\nस्प्राऊटिंग ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा. इटालिका’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली हेच आहे.\nब्रोकोलीचे आहारातील महत्त्व :\nइतर देशांमध्ये ब्रोकोली गड्ड्यांचे व देठांचे बारीक तुकडे इतर भाज्यांमध्ये मिसळून ‘सॅलड’ म्हणून कच्च्या स्वरूपात वापरतात. ब्रोकोलीचे तुकडे ऑलिव्ह तेल किंवा बटरमध्ये ‘फ्राय’ करून आहारात वापरतात.\nब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. सूपही तयार केले जाते. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलड या स्वरूपात आहारात उपयोग करतात. त्याचप्रमाणे ब्रोकोलीपासून पराठा, सूप तयार केले जाते.\nब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतूमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्त्वाची अँटी-ऑक्‍सिडंट्‌स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्‍य होते.\nजगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी असून त्या खालोखाल स्पेन, मेक्‍सिको, इटली, फ्रान्स, अमेरिका, पोलंड, पाकिस्तान, इजिप्त आदी देशांचा क्रमांक लागतो. भारतात ब्रोकोलीची लागवड हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्‍मीर, नीलगिरी हिल्स, उत्तर मैदानी प्रदेश आणि महाराष्ट्र आदी ठिकाणी होते. ही ब्रोकोली मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकता येथील हॉटेल्ससाठी पाठविली जाते.\nमहाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रावर केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत ती विक्रीसाठी पाठविली जाते.\nहवामान : ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम प्रकारे घेता येते. हिवाळी हंगामात लागवड फायदेशीर असते. ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणीही लागवड करता येते. महाराष्ट्रातील पाचगणी, महाबळेश्‍वर, प्रतापगड आदी भागांत उन्हाळ्यातही लागवड यशस्वी होते. दिवसा २० ते २५ अंश से. तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्‍यक असून, गड्डा तयार होतेवेळी तापमान १५ ते २० अंश से. असणे जरुरीचे आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यास तयार झालेला गड्डा घट्ट राहत नाही.\nहरितगृहामध्ये वर्षभर लागवड करण्यासाठी, हरितगृहात रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० ते २५ अंश निश्‍चित करावे. सापेक्ष आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी. गड्डे लागणीच्या वेळेस रात्रीचे व दिवसाचे तापमान अनुक्रमे १५ ते २० अंश, तर ७० टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करावी.\nचांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी, मध्यम रेतीमिश्रित जमीन लागवडीसाठी अतिशय चांगली असते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी जमीन ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उभी- आडवी नांगरून (अंदाजे ४० सें.मी. खोल) ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी वेळी एकरी १२ ते १५ मे. टन. चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे.\nहरितगृहामध्ये लागवड करण्यासाठी हरितगृहातील तयार केलेले माध्यम फॉरमॅलिन या रसायनाद्वारे निर्जंतूक करावे. त्यानंतर ६० सें.मी. रुंद, ३० सें.मी. उंच व दोन गादीवाफ्यांमध्ये ४० सें.मी. अंतर ठेवावे. हरितगृहामध्ये एकरी ४० मीटर लांबीचे एकूण १०० गादी वाफे तयार होतात.\nरोपे तयार करणे :\nगादी वाफे पद्धत : गादी वाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून लागवड करतात. गादी वाफे एक मी. रुंद, २० सें.मी. उंच, १० मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी.\nप्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. शिफारस केलेले कीटकनाशकही मातीत मिसळावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सें.मी. अंतरावर दोन सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. बारीक गाळलेल्या शेणखताने बी झाकून घ्यावे.\nबी पेरलेल्या गादी वाफ्यांवर पाणी दिल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने झाकून घ्यावे. बियांची उगवण सुरू झालेली दिसताच वाफ्यांवरून प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा. बी सहा ते सात दिवसांत उगविलेल्या दिसतात. एकरी लागवडीसाठी संकरित जातीचे बियाणे १२५ ग्रॅम लागते.\nरोपवाटिकेत रोपांच्या वाढीच्या काळात तापमान २० ते २२ अंश से. असणे आवश्‍यक आहे, म्हणजे बियांची उगवण व रोपांची वाढ व्यवस्थित होईल. रोपवाटिकेस पाणी देताना कॅल्शिअम नायट्रेट व पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण प्रत्येकी एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने द्यावे. रोग- किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस असलेल्या कीडनाशकांची फवारणी करावी.\nप्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपेनिर्मिती - या पद्धतीत ट्रेमध्ये कोकोपीट माध्यम भरून बी टाकावे. वरीलप्रमाणेच ट्रेमधील बी उगवून आल्यावर रोपांची काळजी घ्यावी. पुनर्लागवडीसाठी रोपे २०-२५ दिवसांत तयार होतात. म्हणजे रोपांना ५-६ पाने असून रोपांची उंची १२ ते १५ सें.मी. असते.\nब्रोकोली पिकात हिरवे गड्डे, जांभळे गड्डे, फिकट हिरवे गड्डे आणि पांढऱ्या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत. मात्र, अमेरिका आणि युरोपीय भागांत, तसेच भारतात हिरव्या गडद रंगाच्या गड्ड्यांचे वाणच अधिक लोकप्रिय झाले आहेत. याच रंगाच्या संकरित वाणांची लागवड होत आहे.\nजांभळ्या रंगाचे वाण कडाक्‍याची थंडी सहन करू शकतात आणि ऐन हिवाळ्यात काढणीस येतात. हा प्रकारसुद्धा हिरव्या वाणाबरोबर लावावा. सॅलडमध्ये जास्त प्रमाणात याचा उपयोग होईल. बाजारपेठेत गड्ड्यांना गडद हिरवा रंग, बारीक फुलोरायुक्त मुलायम, घट्ट फूल असणाऱ्या वाणांना चांगली मागणी आहे. बियाणे विकत घेताना त्याचे उत्पादन, पीक किती दिवसांत काढणीस तयार होते आदी सर्व गोष्टींची माहिती घ्यावी.\nमहाराष्ट्रात लागवडीसाठी ‘पालम समृद्धी’ हा वाण चांगला असून तो जास्त उत्पादन देणारा आहे. त्याचा मुख्य गड्डा ३०० ते ४०० ग्रॅमचा असून, तो हिरव्या रंगाचा व घट्ट असतो. पुसा केटीएस-१ या मध्यम उंचीच्या वाणाचे गड्डे अतिशय घट्ट व गडद हिरव्या रंगाचे असतात.\nउच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन, गड्ड्यांचा आकार एकसमान मिळण्यासाठी रोपांची पुनर्लागवड गादी वाफ्यावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी. एकरी सुमारे २६,६६० इतकी रोपे बसतात. लागवड दुपारनंतर करावी. त्यानंतर रोपांना ठिबकद्वारे पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपे शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. हरितगृहांमध्ये लागवड प्रत्येक गादीवाफ्यावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.\nपिकाला ठिबक पद्धतीने किती व कशा प्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्त्वाची आहे. पिकाला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज आहे हे प्रथम निश्‍चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्‍चित करावा.\nसर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे. एकरी ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ७० किलो पालाश देणे आवश्‍यक आहे. खतांचे पीकवाढीनुसारचे टप्पे शिफारशीनुसार द्यावेत. मुख्य गड्ड्यांची काढणी झाल्यावर पानांच्या बेचक्‍यांतून येणाऱ्या गड्ड्यांची वाढ होण्यासाठी एकरी ३० किलो नत्र द्यावे.\nमाती परीक्षण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावीत. लागवडीपासून अंदाजे २५-३० दिवसांनी या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास झाडाची खोडे पोकळ झालेली आढळून येतात. तसेच, गड्डा काढणीस तयार झालेल्या अवस्थेत गड्डा कापला असता लहान खोडे पोकळ झाल्याचे आढळून येते.\nगड्ड्याचा हिरवा रंग फिकट होत जातो. गड्ड्यावर भुरकट रंगाचे डाग पडतात. अशा प्रकारच्या गड्ड्यांना बाजारात भाव मिळत नाही. बोरॉनची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे आढळून येतात. उपाय म्हणून लागवडीनंतर २५-३० दिवसांनी एकरी चार किलो बोरेक्‍स (सोडियम टेट्रा बोरेट) जमिनीतून द्यावे.\nलागवडीनंतर ६० दिवसांनी पुन्हा चार किलो बोरेक्‍स जमिनीतून द्यावे. ब्रोक्रोली पानांच्या झाडांचा शेंडा खुरटलेला राहणे व गड्डा न भरणे ही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. विशेषतः आम्लीय जमिनीत (सामू ५.५ च्या खाली) ही विकृती दिसून येते. उपायासाठी एकरी १.६ कि.ग्रॅ. अमोनियम किंवा सोडियम मॉलीब्डेट्‌ जमिनीत मिसळून द्यावे.\nठिबकद्वारा खत व्यवस्थापन :\nउच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन मिळण्यासाठी खतांच्या मात्रा विद्राव्य खतांच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देता येतात. प्रत्येक खताचे द्रावण देण्यापूर्वी द्रावणाचा व पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. तसेच, पाण्याची विद्युतधारकता एकपेक्षा कमी असेल याची काळजी घ्यावी. सामूचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी नायट्रिक आम्लाचा उपयोग करावा.\nपुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी वाफ्यावरील गवत- तण काढून माती ३-४ सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने हलवून घ्यावी. माती हलविताना रोपांना मातीचा आधार द्यावा. पुन्हा २०-२५ दिवसांनी खुरपणी करून वाफे तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत. हरितगृहातील व खुल्या क्षेत्रात गादी वाफ्यावर केलेल्या लागवडीसाठी लागवडीपूर्वी प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन फायदेशीर ठरते, त्यामुळे तणांची वाढ होण्यास प्रतिबंध होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. झाडांची वाढ व उत्पादन समाधानकारक मिळून उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात.\nकाळी माशी (मस्टर्ड सॉ फ्लाय)\nलक्षणे : ही माशी पानांच्या पेशींत अंडी घालते. अंड्यांतून निघालेल्या अळ्या काळ्या रंगाच्या असून त्या कोवळ्या रोपांची पाने खातात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. रोपांची वाढ खुंटते. रोपाचा शेंडा अळ्यांनी खाल्ल्यास त्यास गड्डा धरत नाही. उत्पादन घटते.\nलक्षणे : हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे मावा किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात. यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन गड्ड्यांची प्रत घसरते.\nचौकोनी ठिपक्‍यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) :\nलक्षणे : अळी पानांच्या खालच्या बाजूस राहून, पानांना छिद्रे पाडून पानांतील हरितद्रव्य खाते. पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते.\nरोपे कोलमडणे (डॅंपिंग ऑफ)\nलक्षणे : रोपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग पिथीयम, फायटोप्थोरा, रायझोक्‍टोनिया या बुरशींमुळे होतो. उष्ण आणि दमट हवेत, तसेच रोपवाटिकेत पाण्याचा निचरा चांगला होत नसल्यास हा रोग लवकर बळावतो. नंतरच्या काळात रोपे रोगग्रस्त झाल्यास जमिनीलगतचा भाग भुरकट होऊन सुकतो.\nघाण्या रोग (ब्लॅक रॉट) :\nलक्षणे : हा जीवाणूजन्य रोग असून कोबीवर्गीय पिकाची लागवड असलेल्या क्षेत्रात आढळतो. उष्ण आणि दमट हवामानात रोगाची लागण फार झपाट्याने होते. पानांच्या मुख्य आणि उपशिरांमधील भागात पानांच्या कडा मरून इंग्रजी अक्षर ‘व्ही’ आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात.\nलागण झालेला भाग कुजून वाळून जातो. रोगट भागातील पानांच्या शिरा काळ्या पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडाच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळपट द्रव निघतो, त्याला दुर्गंधी येते. अशी रोपे गड्डा न धरताच वाळून जातात. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उशिरा रोग आल्यास गड्डा सडण्याचे प्रमाण जास्त असते.\nकरपा किंवा काळे डाग (ब्लॅक स्पॉट) :\nलक्षणे : या बुरशीजन्य रोगाची लागण बियाण्यातून होते. पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपल्यासारखा काळपट दिसतो. जास्त दमट आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास गड्ड्यांवर डाग दिसतात.\nभुरी (पावडरी मिल्ड्यू) :\nलक्षणे : या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जोमाने आढळून येते. जून झालेल्या पानांवरील वरच्या भागावर पांढरे ठिपके प्रथम आढळून येतात. हे ठिपके हळूहळू मोठे होऊन एकमेकांत मिसळतात.\nपानांच्या खालील आणि वरील बाजूस पसरतात. पाने पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. यामुळे उत्पादन आणि मालाच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम होतो.\nकेवडा (डाऊनी मिल्ड्यू) :\nलक्षणे : पानांच्या वरील बाजूस अनियमित आकाराचे पाणीयुक्त पिवळे ठिपके आढळून येतात. पानांच्या खालील बाजूसही रोगाचे चट्टे आढळून येतात. त्यावर पांढऱ्या गुलाबी रंगाची केवड्याची वाढ आढळून येते. गड्ड्यांतून फुलांचे दांडे वर येतात. या रोगामुळे त्यावर काळपट पट्टे दिसतात. रोग बळावल्यास संपूर्ण गड्डा नासून जातो.\nकाढणी व उत्पादन :\nवाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो. विक्रीच्या दृष्टीने व चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने गड्ड्यांचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच काढणी करावी. गड्डा घट्ट असताना त्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापूर्वीच काढणी करणे महत्त्वाचे. अशा गड्ड्यांची प्रत अतिशय चांगली असून, या अवस्थेत गड्ड्यातील फुले उमलत नाहीत. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी.\nतयार गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्‍यांतून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो. प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम असणे आवश्‍यक आहे. एकरी ४० गुंठे क्षेत्रातून सुमारे ८ ते ९ टनांपर्यंत गड्ड्यांचे उत्पादन मिळते.\nपारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा गादी वाफ्यावर लागवड, ठिबक सिंचन तसेच त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास चांगल्या प्रतीचे गड्डे काढणीस मिळतात.\nआकारमान किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत. वायुविजनासाठी छिद्रे असलेल्या कोरूगेटेड बॉक्‍समध्ये ते ३ किंवा ४ थरांपर्यंत भरावेत. पॅकिंग केलेल्या बॉक्‍सेसची रात्री (तापमान कमी असल्याने) वाहतूक करावी किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून क्रेटमधून वाहतूक करावी.\nपॅकिंग बॉक्‍सेसमधील तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट पिवळसर होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते.\nपूर्व शीतकरण व शीतगृह सुविधा :\nगड्ड्यांची काढणी झाल्यावर त्यातील उष्णता बाहेर काढून टाकण्यासाठी गड्ड्यांचे पूर्व शीतकरण शून्य अंश से. ते २ अंश से. तापमानात करून घेणे आवश्‍यक असते. त्यानंतर प्रतवारी करून कोरूगेटेड बॉक्‍सेसमध्ये गड्ड्यांचे पॅकिंग करावे. असे बॉक्‍सेस शीतकरण व्हॅनमधून शून्य अंश ते दोन अंश से. तापमानात विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावेत. अशा वाहतुकीमुळे गड्ड्यांची प्रत सुरक्षित राहते.\nया गोष्टी लक्षात घ्याव्यात :\nरायसिनेस : ही विकृती गड्डा वेळीच न काढल्यामुळे दिसून येते. गड्ड्याचा पृष्ठभाग एकसारखा न दिसता त्यावर तांदूळ पसरल्यासारखा खडबडीत आणि सुटा दिसतो. ही अवस्था बहुतेक तापमानामध्ये चढ-उताराशी संबंधित आहे. उपाय म्हणून गड्ड्यांची काढणी वेळेवर करावी. लागवडीसाठी चांगल्या कंपनीचे शुद्ध व खात्रीलायक बियाणे वापरावे.\nब्लाइंडनेस्‌ : लागवड करताना रोपाचा शेंडा खुडला वा तुटला गेल्यास अशा रोपांना गड्डा धरत नाही. मात्र पाने रुंद, मोठी आणि हिरवीगार असतात. अशी शेंडा तुटलेली रोपे उपटून टाकावीत. शेंड्याला इजा झालेली रोपे लागवडीस वापरू नयेत.\nगड्ड्यांची काढणी झाल्यानंतर खोलीच्या तापमानात (रूम टेंपरेचर) गड्डा दोन दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतो; परंतु गड्डे पूर्वशीतकरण झाल्यानंतर शीतगृहात शून्य अंश से. तापमानात व ९५ ते ९८ टक्के सापेक्ष आर्द्रतेत २ ते ३ आठवड्यांपर्यंत चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात.\nब्रोकोली लागवडीतील महत्त्वाच्या टिप्स :\nशेतकऱ्यांना लागवडीचे सविस्तर तंत्रज्ञान व त्यासंबंधीचे मार्गदर्शन उपलब्ध होणे.\nब्रोकोलीचे बियाणे निरनिराळ्या तापमानात लागवडीसाठी उपलब्ध होणे.\nतालुका वा भागनिहाय पूर्वशीतकरण व शीतगृहांची उपलब्धता होणे गरजेचे.\nपरदेशी भाजीपाल्यासाठी विविध बाजारपेठांचा पूर्वअभ्यास महत्त्वाचा.\nहंगामाप्रमाणे ब्रोकोली वा परदेशी भाज्यांची लागवड करून क्षेत्र वाढणार नाही, यासाठी शेतकऱ्यांकडे किमान १००० चौरस मीटर आकारमानाचे हरितगृह असणे आवश्‍यक आहे.\nसंपर्क : डॉ. अरूण नाफडे, ९८२२२६११३२.\n(लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)\nइटली आरोग्य health भारत पाणी साखर कर्करोग चीन पाकिस्तान इजिप्त भाजीपाला फळभाजी कोबीवर्गीय भाजीपाला\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/12/01/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-23T11:06:39Z", "digest": "sha1:NOECBSO3XEPZVGET4WXF3OBNANK2OPME", "length": 16947, "nlines": 216, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "मित्र | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nएके दिवशी अमित घरी उशिरा आला\nम्हणून अमितच्या पप्पानी अमित समोर एकेक करून अमितच्या सर्व मित्रांना फोन केला\nआणि सर्वाना एकच प्रश्न विचारला .\nकि अरे अमित चा फोन लागत नाही आणि अमित अजून\nआला नाही सांगून गेला होता कि मित्रा कडे\nअभ्यासाला जात आहे म्हणून . तो तुझ्या घरी आहे का \nपहिला – हो अंकल अमित माझ्या घरी आला होता आताच\nदुसरा – हो काका अमित माझ्या घरी आहे पण तो\nतिसरा – अंकल , तो अभ्यास करून खूप थकला होता म्हणून\nआताच झोपी गेला आहे ,\nउठला कि तुम्हाला फोन करतो\nचौथ्या ने तर हद्दच पार केली म्हणाला ,\nबोला पप्पा मी अमितच बोलत आहे काय झाले\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/diamond-tattoo-designs/", "date_download": "2018-04-23T11:35:12Z", "digest": "sha1:PNU7F3KCOTQEEATHGAVTFD43XUO6IX4C", "length": 11465, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "छान डायमंड टेटू डिझाइन - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकूल डायमंड टॅटू डिझाइन\nकूल डायमंड टॅटू डिझाइन\nसोनिटॅटू फेब्रुवारी 19, 2017\n1 वरच्या छाती वर डायमंड टॅटू मोहक देखावा आणते\nस्त्रियांना त्यांच्या वरच्या छातीवर डायमंड टॅटूवर प्रेम करणे; हे त्यांना सेक्सी आणि आकर्षक बनवते\n2 लोअर हात वर डायमंड टॅटू मोहक देखावा आणते\nब्राऊन महिलांना डायमंड टॅटूला खालच्या हाताने काळ्या शाईचे डिझाईन आवडते; यामुळे त्यांना चैतन्यमय बनते\n3 मागे वर डायमंड गोंदण एक मुलगी आकर्षक आणि मोहक करा\nमुली त्यांच्या मागे हिऱ्याचा गोंदण प्रेम करतात. हे त्यांना अधिक आकर्षक आणि मोहक बनवते\n4 मागे मान वर डायमंड गोंदण च्या गडद डिझाइन, मुलींना भव्य स्वरूप करा\nपीचच्या शरीरातील स्त्रिया त्यांच्या मागच्या मानांकित या गडद टॅटूसाठी जातील, जेणेकरून त्यांना भव्य स्वरूप मिळेल.\n5 गुलाबी, मान्याच्या बाजूवर शाई मिक्स डिझाइन डायमंड टॅटू मुलींना आकर्षक बनवते\nनिळे ब्लाउज आणि उज्ज्वल शरीर असलेल्या मुलींनी गारांच्या बाजूवर गुलाबी शाई डिझाइनसह हिरा टॅटूसाठी जास्तीत जास्त लोकांना आकर्षक बनवणे\n6 तो फडफडणे एक दिव्य हिरा टॅटू बनवते\nमुलींना पाय दर्शविण्यासाठी आणि त्यास आकर्षणाचा केंद्रबिंदू बनविण्याकरिता पायांवर हिरा टॅटू बनवा\n7 उच्च छाती वर डायमंड गोंदण एक मुलगी आकर्षक म्हणते\nब्राऊन मुलींना गुलाबी आणि नारंगी शाईचे डिझाइन किरीट असलेल्या वरच्या छातीवर डायमंड टॅटू आवडेल; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n8 कान मागे डायमंड टॅटू नारीदार देखावा आणते\nकान मागे सुंदर डायमंड टॅटू सारख्या मुली हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n9 उच्च छाती वर डायमंड टॅटू एक नारीवादी देखावा आणते\nछातीच्या डाव्या बाजूवरील सुंदर डायमंड टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n10 मागे डायमंड टॅटू स्त्रील आणि मादक देखावा आणते\nबिनबाहींच्या कपड्यांवर असलेल्या मुलींना ब्लॅकरी शाई डिझाइनसह डायमंड टॅटू आवडते कारण त्यांना मादक आणि आकर्षक दिसतात\n11 मागे डायमंड टॅटू मुली मध्ये उज्ज्वल देखावा आणते\nब्राऊन मुलींना त्यांच्या मागे हिरोच्या टॅटूवर प्रेम आहे; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करते\n12 निचरा मागे हिरव्या टॅटू मोहक टक लावून पाहणे आणते\nमहिलांना त्यांच्या मागे कमी ब्लू शाई डिझाइनसह डायमंड टॅटू आवडतात; हे टॅटू डिझाइन त्यांना भव्य आणि भव्यपणे दिसत करते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी वॉटरकलर टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुषांसाठी आदिवासी क्रॉस टॅटू\nफिनिक्स बर्ड टॅटू इंक डिझाइन आयडियाज\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स हम्सा टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुषांसाठी सामोन टॅटू डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी कान टॅटू डिझाइन आय मागून सर्वोत्तम 24\nमहिलांसाठी हवाईयन आदिवासी टॅटू\nबाण टॅटूमान टॅटूड्रॅगन गोंदमेहंदी डिझाइनडायमंड टॅटूचंद्र टॅटूडोळा टॅटूचीर टॅटूक्रॉस टॅटूबहीण टॅटूहात टॅटूहोकायंत्र टॅटूअँकर टॅटूपक्षी टॅटूमैना टटूमांजरी टॅटूपुरुषांसाठी गोंदणेअनंत टॅटूहार्ट टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूशेर टॅटूहत्ती टॅटूमागे टॅटूगोंडस गोंदणचेरी ब्लॉसम टॅटूडोक्याची कवटी tattoosजोडपे गोंदणेफेदर टॅटूसूर्य टॅटूस्वप्नवतउत्तम मित्र गोंदणेपाऊल गोंदणेटॅटू कल्पनास्लीव्ह टॅटूदेवदूत गोंदणेबटरफ्लाय टॅटूमोर टॅटूडवले गोंदणेमुलींसाठी गोंदणेआदिवासी टॅटूहात टैटूकमळ फ्लॉवर टॅटूगरुड टॅटूवॉटरकलर टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूछाती टॅटूताज्या टॅटूफूल टॅटूगुलाब टॅटूअर्धविराम टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/05/", "date_download": "2018-04-23T11:32:15Z", "digest": "sha1:JZ443WZCVHVLN2OI42DKLJYJHNLE3W3X", "length": 5689, "nlines": 81, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: May 2010", "raw_content": "\nफोबिया म्हणजे भिती, कशाचीही, पण अनाठायी. यालाच ऑकडी (http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_20.html) सुद्धा म्हणतात. मलाही एक() विचित्रच फोबिया आहे.\nआधीपासुन आधीचं सांगतो, लहानपणी चांदोबा, चंपक वाचायला सुरुवात केली, लहान मुलांसाठी किशोर वगैरे इतर मासिकं आहेत असं कळाल्यावर काळजी वाटू लागली, की असं काही बरंच असेल जे मला वाचायला मिळत नसेल आणि ते अस्तित्वात आहे हे देखील मला ठाऊक नसेल. इथुनच बहुतेक अश्या फोबियांची सुरुवात झाली.\nशाळेतच असताना थेटरात चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलं, मग पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट पाहीला आणि हिरो, हिरोईन, नाच, गाणी, खलनायक यापलीकडेही चित्रपट असतात हे कळालं, अगदी भारावुन गेलो... नंतर कळालं की हॉलीवूड नगरी ही बॉलीवूडची बाप आहे (खर्‍य़ा अर्थाने सुद्धा ;-) ), आणि दरवर्षी येणार्‍या चित्रपटांची संख्या ऐकल्यावर कितीतरी अप्रतिम चित्रपट मी नाही पाहीले आणि आता पाहता येणार नाही असं वाटलं (तेव्हा इंग्रजी सिनेमा चॅनेल्स आणि इंटर्नेट नव्हतं डालोला). आता सर्व असुन वेळ नाही आणि कित्येक सुंदर चित्रपट केवळ वेळेअभावी आणि काही माहिती न झाल्यामुळे पाहता येणार नाहीत अशी भिती कायम वाटते.\nसद्ध्या ब्लॉग आणि बझचे अतिशय वेड लागले आहे. मराठीब्लॉग्सवर येण्याआधी अतिशय कमी ब्लॉग्स माहीत होते, मग जे ब्लॉग्स वाचायला मिळाले आणि मराठीब्लॉग्स वर नाहीत त्या ब्लॉगना फॉलो करायला लागलो, न जाणो कुठला सुंदर लेख सुटला तर वाचण्यातुन.\nतर हा असे हे माझ्या आयुष्यातले फोबीया.. अनाठायी आहेत का ते माहीत नाही.. पण उपयोगी नक्कीच आहेत.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/healthy-food-recipes/page/3/", "date_download": "2018-04-23T11:42:25Z", "digest": "sha1:C5OJY7SOZNFMJFG4U5JSN4DJQ3PIAUIM", "length": 7299, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पौष्टिक पदार्थ | Healthy food recipes - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पौष्टिक पदार्थ » पान ३\nपोष्टिक आणि लहान मुलांना आवडीने खातील अशा बीटाच्या वड्या घरी बनवून खाऊ घाला.\nस्टार्टर म्हणून खायला तसेच लहान मुलांना पौष्टिक असे मेथीचे गोळे नाश्त्यामध्ये व मधल्या वेळेत खायला किंवा प्रवासातही नेण्यासाठी उपयुक्त आहेत.\nप्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.\nडोळ्यासाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक पालक सूप स्टार्टरवेळी घ्यावे.\nसर्व प्रकारची फळे, सुका मेवा आणि दुधाची मिळून गोड व पौष्टिक अशी फळांची बासुंदी सॅलेड म्हणून खाता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-23T11:13:28Z", "digest": "sha1:TQNATT7UOZV2DNC4UHRZSIDAV3V4GZJ2", "length": 6782, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "अकिवाट येथे गुणवंताचा सत्कार | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome कोल्हापूर-सांगली अकिवाट येथे गुणवंताचा सत्कार\nअकिवाट येथे गुणवंताचा सत्कार\nश्री विद्यासागर हायस्कूल येथे नेट परीक्षा उत्तीर्ण करणारे अकिवाटचे दिपक हूजरे आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कोल्हापूर जिल्हासंघातून निवड झालेली कु. चैताली राजेंद्र कोथळी, अकिवाटगावचे नवनिर्वाचित पोलिस पाटील सचिन कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर चौगुले होते. सरपंच विशाल चौगुले, उपसरपंच रामचंद्र गावडे, सर्व शालेय समिती सदस्य, तहसिलदार गुरुजी, आप्पासाहेब बडबडे, रावसाहेब नाईक, सुभाष सूर्यवंशी व ग्रामस्त उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी .ए. मगदूम यांनी केले. यावेळी प्रशालेत कुष्टरोग जागृती नाटीका, ऐरोबिक्स, मुलांनी बनवलेले हस्तलिखिताचे प्रकाशन, समूहगीत गायन, समूहनृत्य, देशभकती गीत व मुलांची भाषणे झाली.\nकै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा उत्साहात\nकेंद्रीय पथकाची ग्रामीण रुग्नालयाला भेट; रक्तदाब मधुमेहाचा घेतला आढावा\nआयुष्यभर शिकत राहणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे – विश्वास नांगरे पाटील\nराज्यसभा खासदार अमर साबळे यांचे कोल्हापूर येथे गांधीगिरी मार्गाने उपोषण\nमहिलांचे सबलीकरण होणे गरजेचे – व्ही सि. नित्यानंदम\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/deepak-tate.html", "date_download": "2018-04-23T11:46:59Z", "digest": "sha1:4O5E3QX6POYFRK3YZ3JM7FMYDOV5B4ML", "length": 5746, "nlines": 64, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : दिपक महादेव ताटे\nConstituency : वार्ड क्र. ३ चाकण (माळआळी), १९७ खेड आळंदी\nParty Name : भारतीय परिवर्तन सेना\nDesignation : अध्यक्ष / पक्ष प्रमुख\nName : दिपक महादेव ताटे\nFather's Name : महादेव बाबुराव ताटे\nMother’s Name : मंगल महादेव ताटे\nPlace of Birth : मस्सा (ख), ता. कळंब, जि. उस्मानाबाद\nSpouse’s Name : सौ. राधा दिपक ताटे\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड\nResidence Address : मु. पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे, चाकण (माळआळी), नवनाथ सदन\nOffice Address : मु. पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे, चाकण (खंडोबा माळ)\nभारतीय परिवर्तन सेना, अध्यक्ष / पक्ष प्रमुख\nमुंबई झोपडपट्टी आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे सतत ४ वर्षे केली.\nभारतीय बहुजन सभा या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील बेघर लोकांचा सर्वे केला.\nमुंबई झोपडपट्टी आंदोलन, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष\nमानवी हक्क अभियान, मागाठणे विधानसभा अध्यक्ष)\nभारतीय बहुजन सभा, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष\nभारिप बहुजन महासंघ, तालुका सरचिटणीस (कळंब)\nमहाराष्ट्र परिवर्तन सेना, पुणे जिल्हा अध्यक्ष (सतत ४ वर्षे)\nभारतीय परिवर्तन सेना, अध्यक्ष / पक्ष प्रमुख\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nपुणे जिल्हयामध्ये भारतीय परिवर्तन सेनेच्या माध्यमातून १८ हजार बेघर भाडोत्री लोकांचा सर्वे करून १ गुंठा सरकारी जमीन राहण्यासाठी मिळवून देण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला.\nसुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nधरणे, आंदोलने, मोर्चे, उपोषणे, रक्तदान शिबीरे, केडर केम्प, अल्पसंख्यांक समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, महामेळावे, सामूहिक विवाह सोहळ्यांची नोंदणी, अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्यांचे वाटप, त्यांचा वाढदिवस साजरा करणे...\nभारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा, संस्थापक / अध्यक्ष, दिपकभाऊ ताटे, यांचे भाषण\nभारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा\nभारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/arjun-dange.html", "date_download": "2018-04-23T11:47:36Z", "digest": "sha1:GTUK4GAUBUAY4MPK3JKXF7G4DBUIXGJL", "length": 7369, "nlines": 79, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : अर्जुन हनुमंत डांगे\nConstituency : वार्ड नं १३, कामोठे, नवी मुंबई\nParty Name : शेतकरी कामगार पक्ष\nDesignation : विभागीय अध्यक्ष सेक्टर - ३४, ३५, ३६ कामोठे शहर\nName : अर्जुन हनुमंत डांगे\nFather's Name : श्री. हनुमंत लक्ष्मण डांगे\nMother’s Name : सौ. अंजनाबाई हनुमंत डांगे\nPlace of Birth: : सोने सांगवी, ता. शिरूर जि. पुणे\nSpouse’s Name : सौ. रंजना अर्जुन डांगे\nLanguages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी\nResidence Address : बी – ९०३, अक्षर कॅनबे, प्लॉट नं १६, सेक्टर ३६, कामोठे, नवी मुंबई\nOffice Address : शॉप नं ६, पार्थ अपार्टमेंट , प्लॉट नं ६६, सेक्टर ३५, कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९\n१९९९ पासून शेतकरी कामगार पक्षातून राजकीय कारकीर्दीस सुरुवात\nविभागीय अध्यक्ष सेक्टर - ३४, ३५, ३६ कामोठे शहर\nसन १९९९ - अध्यक्ष, गणेश मित्र मंडळ, सोने सांगवी\nसन २००४ - अध्यक्ष, जय दुर्गा मित्र मंडळ, विटावा ठाणे\nसन २००६ - खजिनदार, विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक सेवा मंडळ, ऐरोली\nसन २००८ - कार्याध्यक्ष, कामोठे रहीवासी सार्व. सांप्र. सेवा मंडळ\nमूळ गाव मु. पो. सोने सांगवी, या ठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन\nग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करून १०० % हागणदारीमुक्त, व रोजगार हमी, ग्रामसडक इ. कामे करुन घेतली.\nकामोठे मध्ये कामोठे रहीवासी सार्व. सांप्रदायिक सेवा मंडळाबरोबर कामे करुन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सांप्रदायिक सप्ताहाचे नियोजन केले.\nकामोठे मध्ये मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले.\nलोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nजेष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देणे\nगोरगरीबांचे मुलांना शिक्षणासाठी मदत करणे\nपक्षाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा (स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटणे, गरीब विद्यार्थांना वह्या पुस्तके देणे, मोफत आरोग्य शिबीर राबविणे)\nवेळोवेळी समाजासाठी त्यांच्या असलेल्या समस्या दूर करणे\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...\nमोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविणे\nरक्तदान, रिकामे प्लॉट साफ करणे\nवृक्षारोपण केले, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम राबविले\nजेष्ठ नागरिकांना प्रत्येक सोसायटी जवळ सिमेंटचे बेंच बसविले\nसोसायटी फ्लोरिंग रिपेअर करुन दिले\nसोसायटी सोलर लाईट उपलब्ध करुन दिली\nसी. सी. टी. वी. कॅमेरे बसविले\nअर्जुन डांगे यांचे छाया चित्र संग्रह...\nआमदार बाळाराम पाटील यांचा शिक्षक मतदार संघातून निवडून आल्यानंतर विजयोत्सव रॅली काढण्यात आली....\nसी. बी. ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट सामने २०१७\nअष्टविनायक ग्रुप, सेक्टर ३४ कामोठे आयोजित शतकारी कामगार पक्ष चषक २०१७\nमानसरोवर कॉम्प्लेक्स को. ऑप. हौ. सोसायटी शेतकरी कामगार पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित\nशेतकरी कामगार पक्ष जाहीर मेळावा व पक्ष प्रवेश\nअर्जुन डांगे यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/308/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E2%80%93%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA", "date_download": "2018-04-23T11:24:53Z", "digest": "sha1:TBOB7RZJSPM6NI4VNMSGQPAOFQW3W273", "length": 9552, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकार्यकर्त्यांनी जिद्द आणि चिकाटीने काम करा –अजित पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘लक्ष्य 2017’ या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ९० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी जिद्द आणि चिकाटीने पेटून उठून काम करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. काम करताना आपल्या कामात कोणताही भडकपणा नसावा, संयमाने काम करा, नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधा, अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या.\nयावेळी राज्यसरकारच्या निष्क्रियतेवर निशाणा साधत पवार यांनी, समाजातील शेतकऱ्यांपासून सर्वच घटक सरकारच्या कारभाराला वैतागले आहेत, राज्यातील कुठलाही घटक समाधानी नसून सरकारला उत्पादक आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधता येत नसल्याची टीका केली. सरकारचे मंत्री असंवेदनशीलपणे वागत असून सरकारच्या या चुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या निदर्शनास आणाव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली विकासकामे अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी कार्यकत्यांना केले.\nयावेळी शिबीरास महापौर प्रशांत जगताप, भगवानराव साळुंखे, रवींद्र माळवदकर, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेवक रेश्मा भोसले, नगरसेविका उषा जगताप , माजी महापौर सुरेश शेवाळे, म.वि. अकोलकर, शैलेश बडदे, इकबाल शेख, राकेश कामठे, मनाली भिलारे, बाळासाहेब आहिरे, रजनी पाचंगे आणि नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते\nयुती सरकारला जनतेच्या दरबारात उघडे पाडा – सुनील तटकरे ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले 'अच्छे दिन'चे स्वप्न कधीच साकार होणार नाही. सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून पहिलेच दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे. तेव्हा घराघरात जाऊन जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या कामाची माहिती द्या, पक्षसंघटन मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आगा ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक ...\nसरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधक आज आक्रमक झाले. विधानभवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे व अन्य आमदार उपस्थित होते.गेल्या दोन ...\nआगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज –सुनील तटकरे ...\nआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असून समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर सोपविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, अतुल लोंढे, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.पक्ष कार्यालयात स्थानिक स्वर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-rain-prediction-today-state-6595", "date_download": "2018-04-23T11:47:03Z", "digest": "sha1:M5TEUPJKRVYXP2RBYIBYECV2WYAFGAFQ", "length": 16642, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, rain prediction today in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यता\nढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यता\nशनिवार, 17 मार्च 2018\nपुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. दाेन दिवसांपासून असलेल्या ढगांच्या अच्छादनामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन न झाल्याने कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे. गेले काही दिवस तापमान उच्चांकी ४२ अंशांवर पोचलेल्या भिरा येथे पारा तब्बल १० अंशांनी उतरून ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी (ता. १७) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर रविवारपासून कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.\nपुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. दाेन दिवसांपासून असलेल्या ढगांच्या अच्छादनामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन न झाल्याने कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे. गेले काही दिवस तापमान उच्चांकी ४२ अंशांवर पोचलेल्या भिरा येथे पारा तब्बल १० अंशांनी उतरून ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी (ता. १७) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर रविवारपासून कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.\nअरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळत असून, शुक्रवारी हे क्षेत्र लक्षद्वीप परिसरावर होते. बंगालच्या उपसागरात विरोधी दिशेने फिरणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे (अॅन्टी सायक्लोन) दक्षिण भारतात वाष्पाचा पुरवठा होऊन पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.\nकोकणासह मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांतील कमाल तापमानात मोठी घट झाली. कोकणातील भिरा, सांताक्रूज, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सांगली, महाबळेश्‍वर येथे गुरुवारचा दिवस थंड ठरला आहे. रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक असताना, दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी घट झाल्यास तो दिवस थंड ठरतो. तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तो दिवस अतिथंड ठरतो. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ६.८ अंशांनी घट झाली.\nशुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७, नगर ३२.०, कोल्हापूर ३१.०, महाबळेश्वर २५.६, नाशिक ३०.५, सांगली ३१.०, सातारा ३२.६, सोलापूर ३४.८, मुंबई २८.०, अलिबाग २९.०, रत्नागिरी ३२.०, डहाणू ३२.४, भिरा ३१.३, औरंगाबाद ३३.१, परभणी ३५.५, नांदेड ३७.०, अकोला ३५.१, अमरावती ३४.४, बुलडाणा ३१.७, चंद्रपूर ३७.६, गोंदिया ३५.०, नागपूर ३६.२, वर्धा ३६.३, यवतमाळ ३५.०.\nपुणे हवामान पाऊस अरबी समुद्र समुद्र भारत महाराष्ट्र विदर्भ कोकण सकाळ नगर कोल्हापूर महाबळेश्वर नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2018-04-23T11:47:35Z", "digest": "sha1:SDFE6RCKYNJJGHN5NI5DFBITXCQOFSQY", "length": 4485, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२३२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२३२ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/national/hindu-gathering-by-bihar-hindu-mahasabha-at-bhagalpur", "date_download": "2018-04-23T11:15:13Z", "digest": "sha1:MS7BR2NOLXD6X22TR27OYUEOG66YSZDO", "length": 8417, "nlines": 123, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Hindu Gathering by Bihar Hindu Mahasabha at Bhagalpur | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome राष्ट्रीय बिहार हिंदुमहासभेच्या वतीने भागलपुर येथे हिंदु संम्मेलन\nबिहार हिंदुमहासभेच्या वतीने भागलपुर येथे हिंदु संम्मेलन\nबिहार: दिनांक २२ जानेवारी रोजी बिहारमधील भागलपुर येथे हिंदु संम्मेलनाचे आयोजन हिंदुमहासभा बिहार प्रदेश अध्यक्ष श्री. श्याम श्यामलजी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.\nहिंदु मध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने काही हिंदुद्रोही बिहार राज्यात जातीयवादाच्या भिंती उभारुन जातीय संम्मेलने भरवित आहेत. याला विरोध व हिंदुंना जागृत करण्यासाठी हिंदुमहासभा बिहारच्या वतीने सदर हिंदु संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.\nबिहार राज्य हिंदुमहासभेच्या वतीने आयोजित या हिंदु संम्मेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून हिंदुमहासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. नंद किशोरजी मिश्रा यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदु संम्मेलनास आपली उपस्थिती दर्शवतील अशी आशा हिंदुमहासभेचे बिहार राज्य अध्यक्ष श्री. श्याम श्यामलजी यांनी आमच्या प्रतिनिधींबरोबर भ्रमणध्वणीवरुन बोलतांना व्यक्त केली.\nरोमांचक सामन्यात भारताची सरशी, युवराज धोनीने जिंकली भारतासाठी मालिका\nरखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ आणि प्लास्टिक मुक्त कोकणसाठी सायकल रैली\n१ फेब्रुवारी ‘भारतीय तटरक्षक दिन’\nआरक्षण आर्थिक निकषावर आधारीत हवे – भारद्वाज\n२५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2018/04/02/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T11:16:40Z", "digest": "sha1:7JMNJK27UDJUDRHEO33HGJTNFYSF5HYK", "length": 17514, "nlines": 219, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "सत्यनारायणाची कथा | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nएका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती,\nमाझ्या समोर आरतीची ताट आलं..\nनमस्कार करुन मी आपल्या खिशातुन दहा रुपयाची फाटकी नोट त्याताटात अशा प्रकारे ठेवली\nकी कुणी पाहीलं नाही.\nत्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला…\nतेवढ्यात त्या गर्दीतुन माझ्या मागे असणाऱ्या काकुंनी माझ्या खांद्यावर थाप मारली.\nआणि 2000रु.नोट माझ्या हातात दिली….\nमी ती नोट घेतली आणि त्या आरतीच्या ताटात टाकली.\nती 2000 ची नोट बघून आपण फक्त दहा रुपयेच टाकले,\nया गोष्टीची थोडी लाज पण वाटली,\nबाहेर जाताना त्या काकुंबद्दल थोडा आदर वाटला,\nम्हणुन मी त्यांना नमस्कार केला.\nत्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा रूपयाची नोट काढताना तुमच्याच खिशातुन 2000 रुपयेची नोट खाली पडली होती,\nती तुम्हाला मी परत देत होते…\nबोला सत्यनारायण महाराज की जय\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/about/", "date_download": "2018-04-23T11:16:20Z", "digest": "sha1:RFKM4EWXRHLKLIVS4HNCS2PQVX6IRRHC", "length": 18908, "nlines": 222, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "ब्लोग बद्दल | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nदिवसभर थकल्यावर थोडी फार केलेली गम्मत थकवा दूर करते. अशाच काही गमती जमती ह्या ठिकाणी मी शेअर करणार आहे. आता गमती जमती अनेक प्रकारच्या असतात. विनोद, मजेशीर चित्र, आवाज किंवा विडिओ असे अनेक प्रकार ह्या थोडी गम्मत जम्मत सादर मध्ये प्रकाशित करणार आहे. मला अशा गमतीशीर हलक्या फुलक्या कथा-लेख यांचा संग्रह करावा असे खूपदा वाटायचे आणि ते मी इथे पूर्ण करणार आहे.\nह्या सदर वरील बरेचसे विनोदी किस्से मी फेसबुक वरून घेतले आहेत. आणि काही sms मध्ये आलेले आहेत. आपण संता-बंता यांचे खूप विनोद ऐकले असतील, तसेच आज काल गाजणारे रजनीकांतचे विनोद देखील ह्या ठिकाणी मी संग्रहित करणार आहे.\nमी काही खरा खुरा लेखक नाही पण इकडे तिकडे वाचलेले विनोद कथा ह्या ठिकाणी मी शेअर करणार आहे. तरी तुम्हाला एखादा पोस्ट आवडला तर त्याला नक्की रिप्लाय करा.\nआभारी आहे. आपली प्रतिक्रिया छान आहे आणि मजेदार पोस्ट लवकरच प्रकाशित करेन.\nआभारी आहे. आपली प्रतिक्रिया छान आहे आणि आवडतील असे पोस्ट लवकरच प्रकाशित करेन.\nआपल्या या उपक्रमामुळे चांगलेच मनोरंजन तर होतेच सोबत बोधही घेता येतो \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-citrus-insurance-2344", "date_download": "2018-04-23T11:57:21Z", "digest": "sha1:BBYQKUSCSJQOWZQ2YEHKNQT7PFUQINDG", "length": 20228, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, citrus insurance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजना\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजना\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजना\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजना\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nमोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, बीड, नगर, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव या 15 जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यातील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते.\nमोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, बीड, नगर, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव या 15 जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यातील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते.\nसदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पाअंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल.\nमोसंबी पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमासंरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्‍यामुळे होणाऱ्या संभाव्य पीकनुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमासंरक्षण प्रदान होईल.\nविमासंरक्षण प्रकार (हवामान धोके)\nव विमासंरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रगर) व नुकसानभरपाई रक्कम (प्रतिहेक्टर रु.) खालील प्रमाणे\nअवेळी पाऊस (दि. १ नोव्हेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ ) ः\nसलग ४ दिवस एकूण ३० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. ११,७०० देय होईल.\nसलग ५ दिवसांत एकूण ३५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसानभरपाई रु. १८,७०० देय होईल.\nसलग ६ दिवसांत एकूण ४० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसानभरपाई रु. २३,३०० देय होईल.\nकमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.\nजास्त तापमान (दि. १ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१८ ) ः\nसलग ३ दिवसांत दैनंदिन तापमान ३९ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालीलप्रमाणे नुकसानभरपाई रक्कम देय होईल.\nसलग ३ दिवस रु. ४,६०० देय\nसलग ४ दिवस रु. ९,३०० देय\nसलग ५ दिवस रु. १४,००० देय\nसलग ६ दिवस रु. १८,७०० देय\nसलग ७ दिवस रु. २३,४०० देय कमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.\nजास्त पाऊस ( दि. १५ ऑगस्ट २०१८ ते\n१५ सप्टेंबर २०१८) ः\nसलग ७ दिवसात १५० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. ८,७५० देय होईल.\nसलग ७ दिवसात १७५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. १४,६०० देय होईल.\nसलग ७ दिवसांत २०० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. २३,३०० देय होईल.\nकमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.\nएकूण नियमित विमासंरक्षण रक्कम प्रतिहेक्‍टरी\n70,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 3500 रुपये\nगारपीटपासून विमासंरक्षण कालावधी दि. 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018\nप्रतिहेक्‍टर विमासंरक्षण रक्कम ः 23,300 रुपये\nआणि शेतकऱ्यासाठी विमा हप्ता ः 1,165 रुपये\nशेतकऱ्याने गारपिटीमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासांत माहिती संबंधित विमा कंपनी/ संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांना कळविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विमा कंपनी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्‍चित करेल.\nमोसंबीसाठी पीककर्ज घेतले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्‍यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.\nबिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.\nफळपिकाखालील किमान 20 हेक्‍टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्‍यक असते.\nविमा कंपनीचे नाव ः जिल्हे\nएचडीएफसी - ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी ः परभणी, हिंगोली, नागपूर, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद\nइफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ः वर्धा, जालना, पुणे\nबजाज अलयांज जनरल इन्शुरन्स कंपनी ः बुलडाणा, औरंगाबाद, नगर, अमरावती, नांदेड, बीड\nटीप ः या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससीमार्फत ऑनलाइन अर्ज भरावेत. सोबत 7-12, आधार कार्ड, बॅंक खाते तपशील आवश्‍यक आहे. भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्‍टोबर 2017.\nसंपर्कः अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग.\nसंपर्क ः विनयकुमार आवटे ः 9404963870\n(अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे विभाग)\nमोसंबी sweet lime सोलापूर पूर उस्मानाबाद बीड जळगाव विमा कंपनी हवामान ऊस पाऊस ग्रामविकास rural development विभाग sections पीककर्ज गारपीट इन्शुरन्स आधार कार्ड कृषी विभाग agriculture department maharashtra पुणे\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/november/6/", "date_download": "2018-04-23T11:36:00Z", "digest": "sha1:UYKYNIEWTSAKGNXEV5ZOIMOCFEN5L5F3", "length": 12408, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.com", "title": "६ नोव्हेंबर दिनविशेष | November 6 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » नोव्हेंबर » ६ नोव्हेंबर दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २०१३\n६ नोव्हेंबर दिनविशेष(November 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\nदिनकर द. पाटील - (नोव्हेंबर ६, १९१५ - ऑक्टोबर २३, २००५) हे मराठी चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक, पटकथाकार होते.\nसंविधान दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान\nगुस्ताफस ऍडोल्फस दिन : स्वीडन.\n१५२८ : समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला\n१८४४ : डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले\n१८६० : अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६१ : जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६५ : अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले\n१९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक\n१९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला\n१९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली\n१९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले\n१९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले\n१९८६ : ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार\n२००२ : पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार\n२००४ : इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी\n२००५ : अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार\n२००५ : म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली\n१४९४ : सुलेमान, ऑट्टोमन सम्राट\n१६६१ : कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा\n१८४१ : आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष\n१८६० : इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष\n१८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१८९३ : एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती\n१८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक.\n१९१९ : ऍलन लिसेट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू\n१९२१ : जॉफ राबोन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू\n१९२७ : एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू\n१९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री\n१९४८ : ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार\n१९५६ : ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू\n१२३१ : त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट\n१४०६ : पोप इनोसंट सातवा\n१६३२ : गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा\n१६५६ : होआव चौथा, पोर्तुगालचा राजा\n१७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी\n१८३६ : चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा\n१८९३ : पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार\n१९२५ : खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा\n१९२९ : मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर\n१९८५ : संजीवकुमार, प्रसिद्ध हिंदी अभिनेते.\n१९८७ : भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/baking-recipes/page/3/", "date_download": "2018-04-23T11:39:04Z", "digest": "sha1:AOQ6ISOHTIEJRPLAZ5TG2V7TKFUADDH4", "length": 6291, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.com", "title": "बेकिंग | Baking recipes - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » बेकिंग » पान ३\nकेक बनविल्यानंतर महत्वाचे असते ते म्हणजे केक सजावटीसाठी आयसिंग, ज्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकुन केकची चव वाढवता येईल.\nअत्यंत खमंग, खुसखुशीत ‘केक डोनट’ चहा किंवा दुधा बरोबर खल्ला जाऊ शकणारा बेकिंग प्रकारातील एक गोड पदार्थ आहे, बेकिंग आणि बेकरी पदार्थ आपणांस आवडत असल्यास हा पदार्थ आपल्याला नक्की आवडेल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=419&Itemid=609&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:42:17Z", "digest": "sha1:IBQDXGUNOTFGEVPCR6DFKCDE4A46WFFO", "length": 8220, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "हिमालयाची शिखरे", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nशिवाजी महाराजांचें चरित्र अनंतरुप आहे. मुसलमानांचें बंड त्यांनीं मोडलें, परंतु ते मुस्लीम द्वेष्टे नव्हते. सूडबुध्दि त्यांच्याजवळ नव्हती. त्यांनीं मशिदी पाडून मंदिरें केलीं नाहीत. मशिदींनाहि इनामें दिलीं. एवढेंच नव्हे तर मुसलमानांसहि नोक-या चाक-या देत. आरमारांत मुसलमान होते. एवढेच नव्हे तर अफजुलखानाच्या भेटीस जातांना छत्रपतीच्याबरोबरच्या शरीर-रक्षकांत एक मुसलमानहि होता. मुसलमान सरदारांची सुंदर पत्नी त्यांच्यासमोर कैद करुन आणण्यांत आली तर त्यांनी तिला माता मानून गौरविलें. मराठयांनी ही वृत्ति पुढेंहि टिकविली होती. अजमेरचाप्रसिध्द दर्गा मोडकळीस आलेला मराठयांनी दुरुस्त करुन दिला. भारताला आज या वृत्तीची गरज आहे.\nशिवाजी महाराज म्हणजे केवळ मुस्लीमद्वेष असें समीकरण मांडणा-यांस शिवाजी महाराज मुळींच समजले नाहीत. परंतु केवळ धर्मावर होणा-या आक्रमणासाठीं शिवाजी महाराज उभे असते तर यशस्वी झाले असते असे नाहीं. धर्मरक्षणाबरोबर गरिबांच्या अर्थरक्षणार्थहि ते उभे राहिले. शिवाजी महाराज काळाच्या पुढें होते. युरोपांत प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांच्या कत्तली करीत होते तेव्हां शिवाजी महाराज स्वधर्माचें रक्षण करीत असतां परधर्माचीहि कदर करीत होते. याबाबतींत ते ज्याप्रमाणें काळाच्या पुढें होते त्याचप्रमाणें आर्थिक धोरणांतहि पुढें होते. जमीनदारांविरुध्द, जहागिरदारांविरुध्द ते उभे राहिले. बखरींत वाक्य आहे कीं, गढीवाला सरदार असे. सारा गांव जणूं त्याचा गुलाम. त्याचे घोडे वाटेल तेथें चरायचे. तो वाटेल त्याच्या झाडावरचीं फळें तोडून आणील. परंतु शिवाजी महाराजांच्या आज्ञा पत्रांत पुढील अर्थाचें वाक्य आहे, “ रयतेच्या काडीला स्पर्श करतां कामा नये. रयतेंनें पोटच्या पोरांप्रमाणें वाढविलेलीं झाडें, त्यांचीं फळें नेता कामा नये.” असा शिवाजीमहाराजांचा दंडक होता. लंगोटया मावळयांसाठीं ते उभे होते. सरदारजहागिरदारांनीं जनतेला निस्त्राण केलें होतें. यांचें बंड कोणी मोडायचें शिवाजीमहाराजांची ही दृष्टी पुढील लोकांजवळ राहिली नाहीं.\nभारताला सर्वधर्मसहिष्णुतेची व आर्थिक समतेची अशी ही शिवछत्रपतींची दुहेरी दृष्टी आज हवी आहे. छत्रपतींची ही द्विविध दृष्टि ज्याला कळली नाही त्यानें त्या थोर पुरुषांचें नामोच्चरण करणें व्यर्थ होय. देशभर हा द्विविध संदेश आज घुमवायला हवा आहे. भारतांत कोणत्याहि धर्माचे असा. गुण्यागोविंदानें नांदा. हा सर्व धर्मसमभाव आज उत्कटतेनें पुकारणें सर्वांचें कर्तव्य आहे. त्याचप्रमाणें भारतांतील जमीनदारीचेंहि उच्चाटन व्हायला हवे आहे. सर्वधर्मसमभावाची प्रचंड लाट उठवून जात्यंधांची द्वेषाळ आग आपण विझविली पाहिजे व जमीनदारी नष्ट करुन कम्युनिस्टांची नांगी ढिली केली पाहिजे. हें जो करील तो शिवाजीमहाराजांचा वारसदार \nशिवाजी महाराजांचें भव्य जीवन डोळयांसमोर आलें म्हणजे शतविचार स्फुरतात. परंतु आजच्या भारतीय परिस्थितींत त्यांच्या चरित्रांतील सर्वधर्मसहिष्णुता व गरिबांची आर्थिक स्थिती सुधारण्याची तळमळ या दोन गोष्टी सूर्यप्रकाशाप्रमाणे डोळयांसमोर उभ्या राहतात. हीं दोन ध्येयें नव-भारताच्या पुरोगामी तरुणांस हांका मारीत आहेत. जे ऐकतील, ते स्वत: तरुन राष्ट्रास तारतील; जे ऐकणार नाहींत व आंधळेपणानें वेडेवांकडें करीत बसतील ते स्वत: माणुसकीस मुकतीलच परंतु या महान राष्ट्रालाहि विनाशाच्या गर्तेत लोटतील. म्हणून सावधान \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/506/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20-%20%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:12:05Z", "digest": "sha1:CZQK3R474ITITLV6XZYIEK2QMP5IPIZE", "length": 8363, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. राज्याची आर्थिक घडी सुधारण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. शेती, शिक्षण, सामाजिक विकासासाठी नवे प्रयत्न दिसत नाहीत. कर्जमाफीच्या अपेक्षांवर पाणी सोडलेले दिसत असून महाराष्ट्राच्या माथी निराशा मारलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गाजरं दाखवणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका पाटील यांनी केली. मागील वर्षी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील ५० टक्के रक्कमह खर्च केलेली नाही, त्यामुळे आता केलेल्या घोषणा किती अंमलात येणार हा प्रश्नच आहे. अर्थसंकल्पावर ताण असल्याचे यातून स्पष्ट झाले. एकूणच अर्थमंत्र्यांनी निव्वळ सवंग लोकप्रिय अशा घोषणा केल्या असून सर्वार्थाने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nयेत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर घडणार बदल - सुनिल तटकरे ...\nसरकारच्या अपयशाची तीन वर्षे पूर्णप्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे येत्या १० जूनपासून करणार राज्यव्यापी दौरामोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या नाकर्त्या तीन वर्षांचा त्यांनी यावेळी उहापोह केला.गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार देशात कार्यरत आहे. या कालावधीचे जर आपण विश्लेषण केले तर ज्याने देशात बदल घडेल, देशाच्या विकासाला गती मिळेल असा कोणताच ठोस निर्णय यांनी घेतलेला नाही. मागील युपीए स ...\nपरभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी पुन्हा\nमागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची व स्वच्छ कारभाराची पोचपावती देत परभणी जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ पैकी २४ जागी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परभणी जिल्ह्यातील सुजाण मतदार बंधु-भगिनी, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे, जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर व राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते या विजयाचे शिलेदार आहेत, अशी प्रतिक्रिया परभणीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबा दुराणी यांनी व्यक्त केली आहे. ...\nराष्ट्रवादी भवन येथे आढावा बैठक ...\nराज्यातील दुष्काळी स्थिती आणि औरंगाबाद येथे १६ मे रोजी होणाऱ्या दुष्काळ परिषदेचा आढावा आज राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलिप वळसे पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ ते २५ मे यादरम्यान दुष्काळ परिषदा घेतल्या जाणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल त ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/522/_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A_%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_", "date_download": "2018-04-23T11:16:34Z", "digest": "sha1:ZXQQZBGVK5MIKC5SSPYPWVEISAMPOSNH", "length": 7843, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nन्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता\nगारपिटीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारी यांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांमार्फत मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. याबाबतीत पोलिसांनी काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र अव्हाड, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे आणि विरोधी पक्षाचे अन्य आमदार यावेळी उपस्थित होते. भुसारी यांना जबर दुखापत झाली असून या शेतकऱ्याची साधी फिर्यादही दाखल केली गेली नाही, याउलट त्यालाच एका कैद्याप्रमाणे कैद करून ठेवले गेले. न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता असा जाब यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी पोलिसांना केला. या आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर रामेश्वर भुसारी यांची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली.\nदरम्यान, मंत्रालयात जिथे लोकांची कामे केली जायला हवीत, तिथे शेतकऱ्यांना मारहाण करण्यासारखे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. त्यामुळे याचा गंभीर विचार करण्याची गरज आली असून आमच्यासाठी हा विषय इथेच संपत नाही, आम्ही या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रश्न लावून धरू, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.\nराज्यातील शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा - अजित पवार ...\nविरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पहिली सभा सिंदेवाही येथे पार पडली. या सभेस उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खाअशोक चव्हाण,आमदार जितेंद्र आव्हाड, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश गजभिये, पंतगराव कदम, विजय वड्डेटीवार, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अन्य विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा म्हणून विरोधकांनी संघ ...\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मा. खा. शरद पवार यांना मानद “डि. लिट.” प ...\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत प्रदान समारंभात विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मी स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाड्यातील जनता आणि हैदराबादच्या मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना व हुतात्म्यांना अर्पण करतो, अशा शब्दांत पवार यांनी आपली कृतज्ञता यावेळी व्यक्त केली. पवार यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त् ...\nस्टार प्रचारकांची यादी जाहिर ...\nमहाराष्ट्रातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, आमदार, युवक, युवती अशा सर्वांचा यात समावेश आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2008/02/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T11:35:50Z", "digest": "sha1:LSZKGBZAJKQHD427ACFLY3P2CXG6EUCY", "length": 11921, "nlines": 192, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): पाऊलवाट", "raw_content": "\nसगळं कसं बदलत चाललंय\nहे जाणवतंय की, दूर दूर चाललंय...\nओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,\nकधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...\nकाही ओळखीच्या खुणा सापडताहेत का\nवेगळ्या झालेल्या वाटांना जोडणाऱ्या वाटेची मी वाट पाहतोय\nरंगलेल्या मैफली आणि भावस्पर्शी सोहळे आता इतिहासजमा झालेत\nनिरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...\nत्यांना दिसलंही नाही, जाणवलंही नाही\nआता वाटेत काळ्या रात्री भेटतात,\nकभिन्न पहाड उभे ठाकतात\nवळणावळणाच्या रस्त्याने त्यातून पुढे जाणं चालूच आहे,\nनव्या गावांना भेटी देणं चालूच आहे\nघाटरस्त्यातल्या गाडीच्या हेडलाईटसारखी मधूनच\nतेवढीच चार पावलं लवकर पार होतात\nहेडलाईट वळणावर दिसेनासा होतो,\nआठवण मात्र गाडीच्या आवाजासारखी साथ देते\nते नाहीशा झालेल्या गाडीसारखे केव्हाच नजरेपार झालेत\nनिरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...\nकधीतरी परिचित हाक कानी येते\nसमजावणीच्या चार शब्दांचं दान\nन मागताच माझ्या ओंजळीत टाकून जाते\nमग पुढचं सगळं अपरिचित होऊन जातं\nपरत एकदा माझं मन माझ्यातच मिटून जातं\nपावलांचे ठसे मात्र शहाणे होत जातात\nप्रवासी पक्ष्यांची क्रमश: कहाणी होत जातात\nकहाणीच्या सुखद शेवटाची मी वाट पाहत असतो\nखऱ्या होणाऱ्या संकेतस्वप्नांची पहाट पाहत असतो\nपण पहाटेच्या धुक्यात सगळे हरवून गेलेत\nनिरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...\nपण वळणावळणाच्या अशाच एका वाटेनेही मला समजावलंय\n\"काही शिक्के स्यमंतकासारखे असतात,\nते पुसण्यासाठी काळच जावा लागतो.\nआणि पावलांचं एकटेपण दिसायलाच हवं असं नाही...\"\nनवं गाव जवळ येत चाललंय\nआता परत सगळं कसं बदलत चाललंय\nनिरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\n\"Magazine पाहावं काढून\" - एक स्मरणयात्रा\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-residue-free-pomegranate-has-demand-worldwide-6672", "date_download": "2018-04-23T11:42:24Z", "digest": "sha1:EODIBT66CST75C4ICDKYY6WOVSLIJQFG", "length": 21124, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Residue free pomegranate has demand worldwide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणी\nजगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणी\nसोमवार, 19 मार्च 2018\n‘असुरक्षित’ डाळिंब : भाग ३\nपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य देशांनीही रसायनांच्या आपल्या स्वतंत्र ‘एमआरएल’ (कमाल अवशेष मर्यादा) व नवे निकष लागू करण्यास सुरवात केली अाहे. त्यादृष्टीने निर्यातीचा आलेख उंचावण्याबरोबर परदेशी व भारतीय बाजारपेठेलाही अवशेषमुक्त माल देण्यासाठी डाळिंब उद्योग सर्वपरीने सज्ज असण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nद्राक्षांप्रमाणेच देशात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. ग्रेपनेटच्या धर्तीवर ‘अनारनेट’ प्रणाली अस्तित्त्वात आल्यानंतर डाळिंबाच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू लागली आहे. फलोत्पादन विभागाचे तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी निर्यातीविषयी दिलेल्या माहितीनुसार देशात डाळिंबाखालील क्षेत्र सुमारे एक लाख ६० हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा म्हणजे सुमारे एक लाख आठ हजार हेक्टरपर्यंत आहे. ते म्हणाले, की महाराष्ट्रात डाळिंबाचे क्षेत्र अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असले तरी अन्य राज्यांतही डाळिंबाचे क्षेत्र वाढू लागले आहे, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. यात कर्नाटक, गुजरात आदी राज्यांचा समावेश आहे.\nडाळिंब पिकांतील ‘लेबल क्लेम’च्या अनुषंगाने बोलताना हांडे म्हणाले, की पूर्वी द्राक्ष पिकातही लेबल क्लेम रसायनांची संख्या कमी होती. मात्र, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत गेली. आज आपले द्राक्षनिर्यातीचे चित्र समाधानकारक आहे, तसेच डाळिंबातही होईल. अनारनेट प्रणाली सुरू झाल्याने त्याला अधिक गती येईल. रशिया, चीन, दुबई, मलेशिया आदी देशांनी आपल्या स्वतंत्र ‘एमआरएल’विषयी भारताला कळविले आहे. अजून त्यांचे हे नियम बंधनकारक झाले नसले तरी येत्या काळात त्याची अंमलबजावणी ते केव्हाही करू शकतात, त्या दृष्टीने आपण मात्र सज्ज राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने विविध कीडनाशकांच्या पीएचआय व एमआरएल या अनुषंगाने चाचण्या घेऊन त्यांचा डाटा अधिकाधिक उपलब्ध करीत नेल्यास शेतकऱ्यांना व एकूणच डाळिंब उद्योगाला त्याचा निश्चित फायदा होईल, त्यातून लेबल क्लेमयुक्त रसायनांची संख्या वाढण्यास मदत होईल.\nआयातदार देशांच्या गरजेनुसारच कीडनाशकांचा वापर\n‘केबी एक्स्पोर्ट’ या निर्यातदार कंपनीचे सरव्यवस्थापक सचिन यादव म्हणाले, की डाळिंब निर्यात करण्यापूर्वी संबंधित खरेदीदाराकडून आम्ही वापरत असलेल्या कीडनाशकांची विचारणा होते, तशी यादी आम्ही पाठवतो. खरेदीदारांकडून लेबल क्लेमला पहिले प्राधान्य असते. ते नसल्यास अधिकृत तज्ज्ञांची म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची शिफारस विचारात घेतली जाते. या केंद्राने युरोपाकडून संमती मिळू शकणाऱ्या कीडनाशकांच्या वापराची ‘ॲडहोक’ यादी पीएचआय व एमआरएल यांच्यासहित तयार केली आहे, त्यांचाही आम्ही आधार घेतो. खरेदीदाराने लादलेल्या अटी वा नियम पाहूनच आम्ही कीडनाशकांचा वापर करतो.\nपुणे येथील प्रयोगशील द्राक्ष व डाळिंब बागायतदार प्रकाश बाफना म्हणाले की रासायनिक अवशेषमुक्त माल, ‘लेबल क्लेम’ हे विषय आमच्यादृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत. केवळ निर्यातीसाठीच नव्हे तर स्थानिक बाजारपेठेचा विचारही त्यात आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील हवामानात मोठी विविधता आहे. इथे बाराही महिने व विविध हंगामांत डाळिंबाची बाग उभी असते. साहजिकच किडी-रोग व फवारण्यांची समस्याही व्यापक असते. या सर्व बाबींचा विचार करून कीडनाशकांच्या ‘एमआरएल’ निश्चित करायला हव्यात. स्पेनमध्ये एका कीटकनाशकाची डाळिंबातील ‘एमआरएल’ अत्यंत कमी होती. त्यांनी संबंधित कीटकनाशकाच्या आरोग्यविषयक सुरक्षितचेचे सविस्तर तांत्रिक तपशील दिल्यानंतर ही एमआरएल वाढवून देण्यात आली. असे काम भारतात होणे अपेक्षित आहे.\nवर्ष संख्यात्मक (टन) रुपयांमध्ये\n२०१४-१५ २०,९९७ ३२३ कोटी\n२०१५-१६ ४४,७२२ ४५७ कोटी\n२०१६-१७ ४९,८५२ ४९१ कोटी\nभारताचे मुख्य डाळिंब आयातदार देश\n१ हजार टनांपेक्षा अधिक निर्यात ज्यांना होते असे देश : नेदरलॅंड, संयुक्त अरब अमिरात, बांगला देश, नेपाळ, सौदी अरब, कुवेत\nइंग्लंड हा देखील महत्त्वाचा देश. सुमारे ४०० टनांची निर्यात तेथे होते.\nया व्यतिरिक्त जर्मनी, फ्रान्स, रशिया, आयर्लंड, बेल्जियम, बहारीन या देशांचे महत्त्वही भारतीय डाळिंबाच्या निर्यातीच्या दृष्टीने दुर्लक्षून चालणार नाही.\nजगातील मुख्य डाळिंब उत्पादक देशांमध्ये भारत, इराण, स्पेन, तुर्कस्थान व अफगणिस्तान यांचा समावेश\nयात उत्पादनाच्या अनुषंगाने भारताचा वाटा सुमारे ४६ टक्के, तर इराणचा वाटा सुमारे ३७ टक्के\nस्पेनचे उत्पादन या तुलनेत कमी असले तरी निर्यातीत त्यांचा वाटा मात्र लक्षणीय\nपुणे भारत डाळ डाळिंब द्राक्ष महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मलेशिया हवामान कीटकनाशक इंग्लंड आयर्लंड\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-beneficial-diet-health-some-grains-6671", "date_download": "2018-04-23T11:36:19Z", "digest": "sha1:NXFQMPAWFDVF52ORKWNIRY5SCGG2ZGKQ", "length": 18060, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, beneficial diet for health from some grains | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो फायदा\nपूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो फायदा\nसोमवार, 19 मार्च 2018\nआरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये पूर्णधान्यांपासूनचे पदार्थ अधिक पोषक असतात. त्यातून उपलब्ध होणारे तंतुमय पदार्थ हे पाचक, सारक असून, अधिक काळ पोट भरल्याची भावना तयार करतात. सध्या वाढत असलेल्या स्थौल्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेमध्ये पूर्णधान्यांपासून खाद्य पदार्थांच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. त्यात पूर्णधान्ययुक्त गहू ब्रेड, ओटमील, बार्ली, मोहरी, हातसडीचा तांदूळ किंवा जंगली तांदूळ यापासूनचे पदार्थ यांचा समावेश आहे.\nआरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये पूर्णधान्यांपासूनचे पदार्थ अधिक पोषक असतात. त्यातून उपलब्ध होणारे तंतुमय पदार्थ हे पाचक, सारक असून, अधिक काळ पोट भरल्याची भावना तयार करतात. सध्या वाढत असलेल्या स्थौल्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेमध्ये पूर्णधान्यांपासून खाद्य पदार्थांच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. त्यात पूर्णधान्ययुक्त गहू ब्रेड, ओटमील, बार्ली, मोहरी, हातसडीचा तांदूळ किंवा जंगली तांदूळ यापासूनचे पदार्थ यांचा समावेश आहे.\nअमेरिकी कृषी विभागाच्या ह्यूमन न्यूट्रिशन रिसर्च सेंटर ऑन एजिंग, कृषी संशोधन सेवा आणि बोस्टन येथील टफ्टस् विद्यापीठ यांनी एकत्रितपणे पूर्णधान्ययुक्त पदार्थांच्या आहारातील वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. हे पदार्थ वजन, रक्तातील शर्करा नियंत्रणासाठी मदत करतात. त्यातून प्रति ग्रॅम मिळणारी ऊर्जा महत्त्वाची असते. सामान्यतः आत्यंतिक प्रक्रिया किंवा पॉलिशिंगमध्ये धान्यातील अनेक पोषक घटक नष्ट होतात किंवा भुश्शासोबत फेकून दिले जातात. पूर्ण धान्यामध्ये त्यावरील पोषक आवरण जपले जाते. त्यातून जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि अन्य पोषक घटक उपलब्ध होतात.\nकेंद्रातील ऊर्जा चयापचय प्रयोगशाळेच्या संचालिका सुसॅन रॉबर्टस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासामध्ये सहभागी व्यक्तींच्या आहार, वजन आणि खाद्य पदार्थांचा प्रकार यावर नियंत्रण ठेवण्यात आले होते. पूर्वीच्या वैद्यकीय चाचण्यामध्ये वजन नियंत्रणाशिवाय अन्य मुद्द्यावर फारसे लक्ष देण्यात आलेले नव्हते.\nअभ्यासात आठ आठवड्यासाठी ४० ते ६५ वयोगटातील ८१ सहभागी व्यक्तींच्या वजन, ऊर्जा यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये आरोग्यपूर्ण, धुम्रपान न करणाऱ्या स्त्री आणि पुरुष अशा व्यक्तींचा समावेश होता. सुरवातीला त्या व्यक्ती सामान्य (पूर्णधान्य रहित) आहार घेणाऱ्या होत्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यातील काही व्यक्तींना किमान तीन आऊन्स पूर्णधान्य आहार स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी चार आऊन्स आहार याकडे वळवण्यात आले.\nत्यानंतर सामान्य आहार घेणाऱ्या गटाच्या तुलनेमध्ये प्रति दिन १०० कॅलरीज कमी झाल्याचे दिसून आले. हे प्रमाण ३० मिनिटे वेगाने चालण्याच्या बरोबर आहे. पूर्णधान्य आहारामुळे पचनसंस्थेतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना चालना मिळून, दाह आणि हानीकारक जिवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कॅलरीज कमी होण्यामध्ये शरीरातील चयापचयाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि साठवण्याऐवजी ऊर्जा बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढल्याने झाली असल्याचे संशोधकांनी सांगितले.\nया संशोधनाचे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अधिक माहिती ‘ॲगरिसर्च ऑनलाइन’च्या मार्च महिन्यांच्या अंकामध्ये वाचता येईल.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/345/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_%E2%80%93_%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:22:02Z", "digest": "sha1:EO7XXD3REZ437NPPYSN4FASXR5N36B4Z", "length": 8657, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनिवडणूकांसाठी तरुणांनी जोमाने कामाला लागावे – सचिन अहिर\nआगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकांसाठी तरुण कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केले. सचिन अहिर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सरचिटणीस नरेंद्र राणे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस परबजीत सिंग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, युवती मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nया ठिकाणी बोलताना अहिर म्हणाले की, दोन वर्षात जनता या सरकारला कंटाळली आहे. मुंबई महानगरपालिकेत फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर बारामती, सांगली, नवी मुंबई सारखा विकास मुंबईत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुण कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तेव्हाच पक्ष मजबूत राहील असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘समता सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ...\nमहात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘समता सप्ताहा’ला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. १० ते १६ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने या सप्ताहाचे आयोजन करून युवकांमध्ये शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. अनेक जिल्ह्यांमध्ये या उपक्रमात पथनाट्येही सादर करण्यात आली. ...\nगारपीटीत जखमी झालेल्या ललिता वाळके यांना मदतीचा हात ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ...\nशेतकऱ्यांची कर्जमाफी, आमदारांच्या निलंबनाविरोधात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर ...\nशेतकरी कर्जमाफी तात्काळ व्हावी, तसेच शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठवणाऱ्या १९ आमदारांचे निलंबन त्वरीत रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवदेन पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालीदंर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7136421", "date_download": "2018-04-23T11:41:51Z", "digest": "sha1:YP3A2ZERIZXFWTLPUVV7QJKJTDCJTPXL", "length": 6236, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Getty Images मिमलॅटला अपलोड केलेल्या प्रतिमा फोटो क्रेडिट प्रदान करण्यासाठी कराराचा करार", "raw_content": "\nGetty Images मिमलॅटला अपलोड केलेल्या प्रतिमा फोटो क्रेडिट प्रदान करण्यासाठी कराराचा करार\nगेटी Semaltेट ब्लॉगच्या घोषणेनुसार:\nGetty Semalt Pinterest वर विशेष गेटी साम्मल सामग्री ओळखण्यासाठी आमच्या PicScout प्रतिमा ओळख तंत्रज्ञान वापरेल. मग, आम्ही आमच्या API, Connect चा वापर संबंधित मेटाडेटा प्रदान करण्यासाठी करु - यात गेटी Semaltेट फोटो क्रेडिट्स समाविष्ट आहे, जेव्हा प्रतिमा गोळी मारली गेली आणि अधिक होती\nसाम्बाल्ट आणि गेटी इमेज दोघेही नवीन भागीदारीला सामोरे जात आहेत, मिठाई उपभोक्त्यांना छायाचित्रकारांच्या नावाप्रमाणेच गोष्टी जाणून घेण्यासाठी किती मूल्यवान असेल हे सांगताना, साम्बाल्ट वापरकर्त्यांना छायाचित्रे सामायिक करण्याबद्दल अधिक संदर्भ माहिती देणे, आणि एक प्रतिमा कुठे घेतली आहे, \"आम्हाला असे वाटते की ही खरोखरच मौल्यवान असेल, विशेषत: जेव्हा पिन वर्णन आणि लिंक्स आम्ही आशा बाळगतो तसे उपयुक्त नाहीत.\"\nगेटी इमेजिक्सच्या घोषणेने असेच मत व्यक्त केले की, \"आम्ही मिमलॅटला प्रदान केलेला मेटाडेट त्यांना नवीन वैशिष्ट्यांचा विकास करण्यास आणि त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अधिक मजबूत अनुभव निर्माण करण्यास सक्षम करेल.\"\nया कराराने वापरकर्त्यांना चिंतन करणार्या प्रतिमांची माहिती मिळविण्यावर वापरकर्त्यांना अधिक प्रवेश दिला जाईल, तेव्हा कॉपीराइट मुद्यांमुळे सहभागास चालना देणे अधिक सोपे होईल, जेणेकरून छायाचित्रे त्यांच्या प्रतिमा Pinterest वर दिसतील तेव्हा क्रेडिट प्राप्त करणे सोपे होईल - sildade reguleerimine.\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nनाही, आम्ही न्यूज फीड बदलल्यामुळे फेसबुक सीपीएम वाढू शकत नाही\nरेडिटने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nQuora ने ईमेल लिस्टवर आधारित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सूची मॅच लक्ष्यीकरण सुरू केले\nसर्वोत्तम आघाडी-जनसंपर्क वेबसाइट तयार करणे, स्टेप बाय स्टेप\nचॅनेल: सोशल मीडिया विपणनकार्य: कॉपीराइट आणि ट्रेडमार्कपंजीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2018-04-23T11:53:26Z", "digest": "sha1:TVDYK64VACLYS4LL373MXTH6VUWUCRTW", "length": 5455, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे\nवर्षे: ११३१ - ११३२ - ११३३ - ११३४ - ११३५ - ११३६ - ११३७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ४ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.\nइ.स.च्या ११३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१६ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-govt-agril-comodity-purchase-scheem-6698", "date_download": "2018-04-23T11:33:26Z", "digest": "sha1:NRXQROXNDSDXAL6ISXORPCWSTOYQSCAX", "length": 22988, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on govt agril comodity purchase scheem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 20 मार्च 2018\nढोबळ अंदाजानुसार हमीभाव न मिळाल्याने एकट्या महाराष्ट्रातील सोयाबीन, उडीद, तूर व हरभरा उत्पादकांचे तब्बल ३३५८ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. नीरव मोदीच्या बँक लुटीपुढे हा आकडा किरकोळ वाटत असला तरी कोट्यवधी शेतकऱ्यांची मीठ-मिरची त्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घेण्याइतपत किमान संवेदनशीलता बाळगावी लागेल.\nसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सध्या सुरू असले तरी या कायदेगृहांमध्ये शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडित जिव्हाळ्याच्या विषयांवर तपशीलवार चर्चा करायची कोणाचीच तयारी नाही. ना सत्ताधारी त्यासाठी इच्छुक आहेत, ना विरोधकांना काही गांभीर्य आहे. इतर बऱ्याच ‘नॉन इश्यूं’च्या गदारोळात शेतीप्रश्न नेहमीप्रमाणे काठावरच तरंगताहेत, किंबहुना तोंडी लावण्यापुरतेच ते उरलेत. राज्यात अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधकांनी शेतीप्रश्नांवर सरकारवर टीकास्र सोडले असले तरी सध्या वावरात सुरू असलेल्या तगमगीचे प्रतिबिंब त्यात नव्हते. नाही म्हटले तर नाशिकहून निघालेल्या शेतकऱ्यांच्या लॉँगमार्चमुळे या सुशेगाद वातावरणात थोडीफार खळबळ झाली, पण तीही अल्पकाळच टिकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एेन अधिवेशनाच्या काळातच विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळू नये, यासाठी चार पावले पुढे जात आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवली. लेखी अाश्वासने देत त्यांनी आंदोलकांच्या आणि आयत्या गर्दीपुढे भाषणे ठोकणाऱ्या विरोधकांच्याही शिडातली हवा काढून टाकली. मुंबईत ही स्थिती असताना केंद्रात तर शेतीचे प्रश्न बेवारस ठरले आहेत. सन २०२२ मधील उत्पन्न दुपटीच्या आणि हमीभावाच्या घोषणा सुधारित तपशीलांसह सादर होत असल्या तरी सध्याच्या हंगामातील शेतीमालाच्या खरेदीच्या उडालेल्या बोजवाऱ्याकडे पाहायला कोणालाच सवड नाही.\nसध्या कोरडवाहू भागात जिव्हाळ्याचा विषय आहे, तो शेतीमालाच्या सरकारी खरेदीचा विशेषतः तूर आणि हरभरा खरेदीबाबत सरकारने कितीही आश्वासने दिलेली असली तरी प्रत्यक्षात सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. शेतीमालात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे इथंपासून ते गोदामांमध्ये जागा नाही इथंपर्यंत अनेक कारणे सांगून शेतकऱ्यांना पिटाळले जाते आहे. हरभरा विक्रीची केंद्रे तर फक्त नावाला सुरू झाली आहेत. सरकारी खरेदीसाठी कोटा ठरवणे ही मूलतःच अन्यायकारक गोष्ट. बाजारात आलेल्या प्रचंड शेतीमालापैकी, मग ती तूर असो की हरभरा, आम्ही फक्त इतकाच माल खरेदी करणार आहोत, बाकीचे काय करायचे ते तुमचे तुम्ही पाहा असा विश्वामित्री पवित्रा घेणे सरकार नामक यंत्रणेसाठी खचितच भूषणावह नाही. उदाहरणार्थ राज्यात यंदा तुरीचे ११.५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी ४.४६ लाख टनांचीच खरेदी सरकार करणार आहे, बाकीचे सारे वाऱ्यावर विशेषतः तूर आणि हरभरा खरेदीबाबत सरकारने कितीही आश्वासने दिलेली असली तरी प्रत्यक्षात सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. शेतीमालात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे इथंपासून ते गोदामांमध्ये जागा नाही इथंपर्यंत अनेक कारणे सांगून शेतकऱ्यांना पिटाळले जाते आहे. हरभरा विक्रीची केंद्रे तर फक्त नावाला सुरू झाली आहेत. सरकारी खरेदीसाठी कोटा ठरवणे ही मूलतःच अन्यायकारक गोष्ट. बाजारात आलेल्या प्रचंड शेतीमालापैकी, मग ती तूर असो की हरभरा, आम्ही फक्त इतकाच माल खरेदी करणार आहोत, बाकीचे काय करायचे ते तुमचे तुम्ही पाहा असा विश्वामित्री पवित्रा घेणे सरकार नामक यंत्रणेसाठी खचितच भूषणावह नाही. उदाहरणार्थ राज्यात यंदा तुरीचे ११.५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी ४.४६ लाख टनांचीच खरेदी सरकार करणार आहे, बाकीचे सारे वाऱ्यावर त्यापैकीही आजअखेर केवळ १.२२ लाख टनच तूर खरेदी केली गेली आहे. हरभऱ्याची कथा तर अजून सुरू व्हायची आहे. गोदामांच्या अनुपलब्धतेची कारणे त्यासाठी पुढे केली जात आहेत. गतवर्षी तुरीची खरेदी केल्यामुळे गोदामे भरलेली आहेत, याची माहिती सरकारला नव्हती असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. मग गोदामांची व्यवस्था का केली गेली नाही त्यापैकीही आजअखेर केवळ १.२२ लाख टनच तूर खरेदी केली गेली आहे. हरभऱ्याची कथा तर अजून सुरू व्हायची आहे. गोदामांच्या अनुपलब्धतेची कारणे त्यासाठी पुढे केली जात आहेत. गतवर्षी तुरीची खरेदी केल्यामुळे गोदामे भरलेली आहेत, याची माहिती सरकारला नव्हती असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. मग गोदामांची व्यवस्था का केली गेली नाही याला कोणते बाबू जबाबदार आहेत, याचा पणन खात्याने शोध घेऊन त्यांचे पातक त्यांच्याच शिरावर थोपवले पाहिजे. मात्र असे आजवर कधीच झालेले नाही आणि होण्याची शक्यताही नाही. या साऱ्या गोंधळामुळे मिळेल ते पदरात पाडून घ्यावे असा नुकसानीचा असला तरी व्यवहार्य विचार करून शेतकरी परंपरागत बाजार व्यवस्थेच्या वळचणीला जाऊन आयताच लुबाडला जात आहे. ढोबळ अंदाजानुसार त्यामुळे राज्यातील सोयाबीन, उडीद, तूर व हरभरा उत्पादकांचे तब्बल ३३५८ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. नीरव मोदीच्या बँक लुटीपुढे हा आकडा किरकोळ वाटत असला तरी कोट्यवधी शेतकऱ्यांची मीठ-मिरची त्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घेण्याइतपत किमान संवेदनशीलता बाळगावी लागेल.\nदुसरीकडे शेजारी कर्नाटकात तुरीला हमीभावावर ५५० रुपये बोनसही दिला जातो आहे. सरकारी खरेदीतही या राज्याने महाराष्ट्राच्या पुढे जात आघाडी घेतली आहे. हमीभाव आणि सरकारी खरेदीच्या दुखण्यावर भाजपशासित मध्य प्रदेशने भावांतर योजनेचा चांगला तोडगा काढला आहे. बाजार व्यवस्थेसाठी अावश्यक असलेले शहाणपण किंवा गतिमान निर्णयक्षमता सरकारकडे नसते आणि तशी अपेक्षा करणेही गैरच म्हणूनच बाजारभाव व हमीभाव यांमधील फरक शेतकऱ्यांना देणे अत्यंत व्यवहार्य ठरावे. सरकारी खरेदीची सर्कस उभी करणे, गोदामांची व्यवस्था करणे, तूट-घट सांभाळणे, उंदरांपासून संरक्षण करणे, चोऱ्या रोखणे आणि या साऱ्यांतून उरलेल्या शेतीमालाची विक्री करून त्यातून नफ्याची अपेक्षा करणे हे नागरिकांच्या करांवर पोसल्या जाणाऱ्या आणि कोणतीही बांधीव उिद्दष्ट्ये नसलेल्या सरकारसारख्या यंत्रणेसाठी अशक्य कोटीतले काम. त्यामुळे भावांतर योजना तिच्यातले गुणदोष गृहीत धरूनही व्यवहार्य ठरावी. या योजनेचा अभ्यास करण्याची ग्वाही राज्याच्या अभ्यासू सरकारने दिली असली तरी अभ्यास ते परीक्षा आणि तिचा निकाल हे अंतर कधी तुटणार याचे ठोस उत्तर या घडीला तरी कोणाकडे असेल असे वाटत नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्यातीवरचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचे नवे आवाहन केले आहे. तुरींनी हातावर तुरी दिल्यामुळे पोळलेला शेतकरी पंतप्रधानांच्या ताज्या आवाहनाला कसा काय प्रतिसाद देतो ते येत्या खरिपात पाहता येईल. तोपर्यंत यंदाच्या हंगामातील तूर, हरभरा खरेदीचे कवित्व सुरू राहीलच\nहमीभाव minimum support price महाराष्ट्र सोयाबीन उडीद तूर नीरव मोदी nirav modi अर्थसंकल्प union budget अधिवेशन विषय topics शेती सरकार government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उत्पन्न कोरडवाहू कर्नाटक सर्कस नरेंद्र मोदी narendra modi\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/09/blog-post_12.html", "date_download": "2018-04-23T11:27:02Z", "digest": "sha1:6OEYO5TZ2QAKB2O3XNUOGC2UBHPPNNCU", "length": 3008, "nlines": 85, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: यादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर", "raw_content": "\nयादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर\nरोड टु यादगिरि गुट्टा\nहैदराबाद पासून ५९ कि.मी. वारंगल रोड वर.\nमंदिराकडे जाताना वळणदार रस्त्यावरचे APTDC चे 'हरिता' होटेल.\nमंदिराच्या टेकडी वरून दिसणारे गाव\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरेल्वे, आणि जवळचा तलाव\nयादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/08/blog-post_8.html", "date_download": "2018-04-23T11:40:48Z", "digest": "sha1:EO5GVW4JSSTUVHGI5B3HVBVA65KEFMRK", "length": 10501, "nlines": 204, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): तुझ्या मग्न प्रवासाला...", "raw_content": "\nतुझे भाव, तुझे नाव\nहार तुरे अन् शेले\nखरे हेतू सारे सारे\nतुझ्या मते योग्य तूच\n- नचिकेत जोशी (१०/६/२०१३)\nहातात शून्याचा लोलक घेऊन अनंताकडे झेपावणारा प्रवास\nलोभस गोंडस आहे ही कविता\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\n... स्वप्न क्षितिजापार आहे\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.4014.info/mr/doctor-s-best-luchshie-proteoliticheskie-fermenty-90-zheludochno-rezistentnyh-vegetarianskih-kapsul/", "date_download": "2018-04-23T11:27:41Z", "digest": "sha1:7Y74PBNK2FLCW3CATKKVGMK7YPQZCMMO", "length": 6094, "nlines": 55, "source_domain": "www.4014.info", "title": "डॉक्टर सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट proteolytic enzymes, 90 आतड्यासंबंधीचा शाकाहारी कॅप्सूल – VitaWorld", "raw_content": "\nFor वातानुकूलन शॉवर आणि बाथ\nजिवाणू दूध आणि अन्य\nनिरोगी घर आणि बाग\nपूरक केस, नखे आणि त्वचा\nडॉक्टर सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट proteolytic enzymes, 90 आतड्यासंबंधीचा शाकाहारी कॅप्सूल\nडॉक्टर सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट proteolytic enzymes, 90 आतड्यासंबंधीचा शाकाहारी कॅप्सूल\nसंख्या: 90 आतड्यासंबंधीचा गरजेचे Veggie सामने\nसर्वोत्तम proteolytic enzymes, आहे एक शक्तिशाली सूत्र असलेले एक व्यापक स्पेक्ट्रम proteolytic enzymes, वनस्पती मूळ आहे. कार्य proteolytic enzymes, मानवी शरीर मध्ये lies अन्न पचन, विभाजन प्रथिने मध्ये त्यांच्या घटक amino ऍसिडस्. अभ्यास दाखवा की विविध proteolytic enzymes गढून गेलेला आहेत आतडे च्या भिंती आणि सुरु होते प्रसारित संपूर्ण शरीर. Enzymes करण्यासाठी डिझाइन केले आहेत गति chemical reactions occurring in the body. आंत proteolytic enzymes सुधारणा होऊ शकते, सामान्य चयापचयाशी कार्ये enzymes already present in the human body.\nप्रौढ वापर: 3 capsules per day बाहेर जेवण (एक तास आधी किंवा नंतर दोन तास) किंवा शिफारस म्हणून एक पोषकतज्ञ आहे.\nयेथे क्लिक करा अधिक माहिती शोधण्यासाठी उत्पादन बद्दल: इशारे, इतर साहित्य\nउत्पादन पुनरावलोकने डॉक्टर सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट proteolytic enzymes, 90 आतड्यासंबंधीचा शाकाहारी कॅप्सूल\nअधिक वाचा उत्पादन पुनरावलोकने\nजतन करू इच्छिता अधिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sandesh-desai.html", "date_download": "2018-04-23T11:50:24Z", "digest": "sha1:NQZS67CO6QCAY7ZRPZKHGYO2ALTZBAKG", "length": 9309, "nlines": 72, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संदेश सतीश देसाई\nConstituency : 164, वर्सोवा विधानसभा\nParty Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nDesignation : विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा\nName : संदेश सतीश देसाई\nDate of Birth: : २४ नोव्हेंबर, १९७७\nPlace of Birth: : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश\nHobby : वाचन, लेखन, समाजसेवा\nResidence Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२\nOffice Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२\nविभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा\n9 March 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता / पदाधिकारी म्हणून कार्यरत...\nमहाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले. तसेच लोखंडवाला मार्केट ते आदर्श नगर पर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले.\nविभागात पावसाळ्या निमित्त विद्यार्थी, पालक व कामगारांना सर्वांना छत्र्या वाटप.\nप्रभाग ५७ मधील जनतेच्या गंभीर प्रश्नांची मनपा अधिकारी दखल घेत नसल्याने मनपा कार्यालयावर गांधीगिरी स्वरुपात मोर्चा काढला. मोर्चा यशस्वी रित्या पार पडला.\nसर्व महान पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना / सन्मा. राजसाहेबांनी ठरवलेल्या सर्व आंदोलनात, मोर्चात, सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग.\nसमाजाला कशा प्रकारे मदत करू शकता \nरहिवासियांना येणाऱ्या सर्व समस्या / तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.\nविभागातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली जातील.\nशासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.\nयुवकांना / बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल.\nसामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सव, दहीहंडी, सर्व महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.\nसमाजाला / लोकांना मी स्वतः वेळ देवू शकतो.\nविद्यार्थी, पालक, कामगार वर्ग, विभागातील सर्व लोकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर मदत केली जाईल.\nसंदेश देसाई यांचे फोटो संग्रह...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा विधान सभा:- प्रभाग क्र.५९ तर्फे, मूर्तीचे विसर्जन करणे आणि फेकणे यातील मूळ फरक अखेरच्या क्षणाला लोक विसरतात. तलावाच्या काठावर शेवटची आरती झाल्यानंतर गणरायाची होणारी अवहेलना आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी मूर्तीचा हात, पाय आणि धड वेगवेगळे होऊन तरंगत असतात. मनसे सरचिटणीस मान.सौ शालिनी ताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ७:०० वाजता याच वास्तूंचे पुनर्विसर्जन करण्यात आले. त्या प्रसंगी सरचिटणीस सौ.शालिनी ताई ठाकरे, विभाग अध्यक्ष संदेश देसाई, महिला विभाग अध्यक्षा वैष्णवी घाग, उपविभाग अध्यक्ष सचिन (भाऊ) तळेकर, महिला उपविभाग अध्यक्षा ज्योती सावंत, शाखा अध्यक्ष राजेश कारके, उपविभाग संघटक (रोजगार) अशोक नवले, जनहित शाखा संघटक युवराज दौंडकर, उपशाखा अध्यक्ष बबन बिबवे, रोहिदास शिंदे, गट अध्यक्ष संदीप डांगले, जय बधाले, संदीप आवारी, संदीप जाधव, शिवाजी आहेरकर आणि इतर कार्यकर्ते सागर कुटीर, सात बंगला, समुद्रकिनारी उपस्थित होते....\nवॉर्ड क्र. ५७ मधील विविध समस्या सोडविण्यासाठी गांधीगिरी मार्गाने धडक मोर्चा....\nमेट्रोतून मासे नेण्यास मज्जाव, बंदीविरोधात मनसेचं आंदोलन....\nविविध सामाजिक उपक्रम साजरे करताना....\nसंदेश स. देसाई यांचे जनसंपर्क कार्यालय\nसंदेश देसाई यांचे पेपर बातम्या, लेख...\n1) मनसेचे बाबी बांदेकर यांची प्रभागात प्रचारफेरी\n2) आरे कॉलनी येथे वृक्षरोपण करताना शर्मिलाताई ठाकरे सोबत मनसे कार्यकर्ते\n3) मनसेचा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनबाहेर निषेध\nSandesh Desai संदेश देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7137712", "date_download": "2018-04-23T11:42:08Z", "digest": "sha1:KAZ2KIEWERDWX6SPR4BYPM73SUMDOAKQ", "length": 7624, "nlines": 53, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "जेव्हा आपला व्यवसाय अर्धपालनात थांबला तेव्हा आपण काय केले पाहिजे? | Ep. # 184", "raw_content": "\nजेव्हा आपला व्यवसाय अर्धपालनात थांबला तेव्हा आपण काय केले पाहिजे\nएपिसोड # 184 मध्ये, एरिक आणि नील याबद्दल चर्चा करतात की जेव्हा आपला व्यवसाय वाढतो तुणतुकीचे फेकणे ठरविण्याआधी आपण साप्ताहिक विविध निराकरणे आणि पर्याय शोधू शकता. एरिक आणि नील यांनी आपल्या व्यवसायाची धडपड करताना काय उपाययोजना केल्या होत्या हे पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आपल्या व्यवसायाचे जतन करण्याकरता बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीकोणामुळे सर्व फरक पडू शकतात.\n00:30 - आजचा विषय: आपला व्यवसाय वाढत असताना काय केले पाहिजे\n00:45 - प्रथम, तुमच्या विश्लेषणे आणि संख्या पहा आणि काय चालले आहे ते पहा\n00:53 - आपण रहदारी गमावत आहात मूल्यमापन करा, नंतर आपण घ्यावयाच्या क्रियाकडे पहा\n02:00 - आपल्या योग्य ती काळजी घ्या, अपरिहार्यपणे सोडू नका\n02:20 - इतर व्यवसाय पहा आणि ते कसे वाढत आहेत ते पहा, त्यांच्याकडून शिका\n03:37 - काहीवेळा आपण आपल्या प्रक्रियांबद्दल खूप जवळचे आहात\n04:00 - नील आपल्या स्वत: च्या वैयक्तिक अनुभवातून एक उदाहरण मांडतो\n04:14 - यूआरएल संरचना बदलण्याचा एक छोटासा बदल, आपल्या वाहतूक वाढण्यातील फरक\n05:17 - हे उपाय आपल्या मस्तकावर असण्याची गरज नाही, मागे वळून पहा आणि त्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करा\n05:30 - इतरांबरोबर नेटवर्क, जे काही होत आहे त्यासाठी पारदर्शक रहा आणि आपल्याला योग्य प्रतिसाद आणि विचारांचा विचार करावा लागेल आणि त्या समस्येचा हिट होईल\n06:14 - आपण आपल्या जागेत तज्ञ असला तरीही, आपला स्वतःचा व्यवसाय कसा वाढवायचा हे आपल्याला माहिती नाही\n06:36 - काहीवेळा आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी खूप जवळ आहात आणि काय बदलते हे पाहण्यासाठी\n06:45 - पे कंत्राटदार आणि सल्लागार शोधा, किंवा नेटवर्किंग इव्हेंटवर जा\n07:40 - प्रमुख सूत्रे शोधण्यासाठी एरिकचे त्यांचे संघर्ष; नेथन लट्काच्या पॉडकास्टची तपासणी करा - preiswerte umzüge. एरिक सीयू\nसह त्याने $ 150k / mo एजन्सीसाठी $ 2 खरेदी केले.\n08:21 - उद्योजक संघटनेत सामील होऊन एरिकने आपली कंपनी वाचविण्यासाठी काय करावे हे शोधले - सरदारांनी त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकण्यास मदत केली\n09:16 - जर त्याला या विशिष्ट पीअर समूहाकडून मदत मिळाली नसेल तर त्याला Googling for solutions\n09:45 - परिषदेत नेटवर्क\n09:55 - दिवसाच्या अखेरीस, आपण मनुष्यांशी वागत आहात आणि आपल्याला त्या कनेक्शनची आवश्यकता आहे\n10:30 - हा आजच्या प्रकरणांसाठी आहे\nआपल्या व्यवसायाशी लढत होत आहे असे आपल्याला वाटत असल्यास, आपण कारवाई करण्यापूर्वी काय चालले आहे ते शोधण्यासाठी आपले विश्लेषण आणि संख्यांचे मूल्यनिर्धारण\nपरदेशी व्यक्तीचा दृष्टीकोन मिळवा आणि मदत करा जरी आपण काय करत असलेल्या तज्ञ असाल तर कधी आपण परिस्थितीशी अगदी जवळ आहात.\nअभियांत्रिकी आणि नेटवर्क- दिवसाच्या समाप्तीनंतर, आपण मानवांशी व्यवहार करत आहात आणि आपल्याला त्या समुदायाची मदत करण्याची आवश्यकता आहे.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7140484", "date_download": "2018-04-23T11:44:25Z", "digest": "sha1:KMQZEUGOAQMT7SEMGOP46OJ3JO52G23X", "length": 3461, "nlines": 27, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "शोध इंजिन मार्केट शेअर मिडल 2012", "raw_content": "\nशोध इंजिन मार्केट शेअर मिडल 2012\nGoogle दोन महिने कमी परंतु मागील वर्षाच्या शेअर्सबरोबर सातत्यपूर्ण रहाते\nमागील दोन महिने अग्रगण्य शोध इंजिनांसाठी अतिशय स्थिर आहेत. या वादळापूर्वी शांत हो सह 2013 कोपरा सुमारे फक्त, मी त्यांना सर्व काही युक्त्या त्यांच्या sleeves अप खात्री आहे. शेअर्स ड्रॉप करण्यासाठी Google एकमेव शोध यंत्र आहे आणि Yahoo सह 2013 कोपरा सुमारे फक्त, मी त्यांना सर्व काही युक्त्या त्यांच्या sleeves अप खात्री आहे. शेअर्स ड्रॉप करण्यासाठी Google एकमेव शोध यंत्र आहे आणि Yahoo आणि बिंग केवळ बजेट, तर Baidu ने Google गमावलेला जवळपास निश्चित रक्कम वाढवला. आकडेवारी नेट बाजार शेअर प्रदान.\nडाऊन शेअर्स वर Google फक्त शोध इंजिन\nमिमलॅट गेल्यावर्षीच्या शेअर्ससह आणि वाढत्या स्पर्धेसह अगदी जवळपास आहे - ssl youtube unblocker. तथापि, गेल्या दोन महिन्यांत शेअर्सची थकबाकी करण्यासाठी केवळ एकमात्र शोध यंत्र आहे.\n डाउन पॉईंट शून्य दोन\n या महिन्यात केवळ अर्थसंकल्प, त्यांच्या बाजारपेठेतील हिस्सा कमी ड्रॉप तुलना नाही 2.7 अब्ज $ $ करार विवाद विरोधात.\nBing आपण स्क्रूझल प्राप्त करू इच्छित नाही\nबिंग बाजारपेठेतील हिस्सा 4% इतका उंचावर आहे परंतु ते कदाचित इतरत्र आपली ऊर्जा टाकत असतील. आपण त्यांना हरवू शकत नसल्यास, त्यांच्या विरोधात मोहीम सुरू करा. Bing ने नेमके काय केले आहे, Google शॉपिंग विरूद्ध \"डू मत गेट स्क्रूगल\" मोहिम लाँच केली.\nबायडु सर्वाधिक डेसील लाभ\nशेअर्सना सातत्याने शेअर्स कमी केल्याच्या 5 महिन्यांनंतर चिनी सर्च इंजिन Baidu या महिन्याच्या वरच्या दिशेने \"सर्वात मोठी\" म्हणून गणली जाते. परत Baidu पाहू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2014/06/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T11:40:12Z", "digest": "sha1:GFH37LX56IBYXTZYZMGVCEOFNWSL5ZPD", "length": 8350, "nlines": 155, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): हुरहूर", "raw_content": "\nएक खूप जुनी गझल पोस्ट करतोय...\nवेगळे हे माणसांचे नूर आता\nवाटतो सर्वांस मी निष्ठूर आता\nमी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे\nसमजुतींचा कोष झाला दूर आता\nशेवटी तुजला हवे ते मिळवले तू\nगमवल्याचा नाटकी का सूर आता\nशब्दही माझा जिथे कळलाच नाही\nमौन का वाटे तुला मग्रूर आता\nराख झाली त्या अबोली भावनांची\nआठवांचा येत आहे धूर आता\nदु:ख वाटावे असे काहीच नाही\nहीच आहे नेमकी हुरहूर आता\n- नचिकेत जोशी (२२/७/२००८)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7134249", "date_download": "2018-04-23T11:40:26Z", "digest": "sha1:V2RTPFPIJXFVW5AZXJEV27XF3Y3DPJAP", "length": 14183, "nlines": 129, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "52 डिजिटल मार्केटिंग वेबसाईट्स आपले सेमिल्ट वाढविण्यासाठी", "raw_content": "\n52 डिजिटल मार्केटिंग वेबसाईट्स आपले सेमिल्ट वाढविण्यासाठी\nइंटरनेट मार्केटिंग हे खरोखर चांगले उद्योग आहे. माझ्या जीवनाचे प्रत्येक दिवस म्हणजे डिजिटल मार्केटिंगच्या अफाट जागतिक अलीकडील ट्रेंडची जाणीव होते. सतत घूमता येणारी, वाढत्या आणि बदलत असलेल्या उद्योगात सममूल्य हा थरारक आणि आनंददायक आहे - sarıyer arçelik servisi. आपण सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने हाताळताना आपल्या गेमच्या शीर्षस्थानी असणे आवश्यक आहे, म्हणून आपल्या डिजिटल पोहोचमध्ये सहजपणे उपलब्ध असलेल्या वेबसाइट्सची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.\n8 महत्त्वपूर्ण डिजिटल विपणन टिप्स प्रत्येकजण माहिती पाहिजे\n10 कारण पारंपारिक ते डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी संक्रमण\nमी 52 डिजिटल मार्केटिंग वेबसाइटची सूची संकलित केली आहे जी दररोज माझा पथ ओलांडत आहे आणि माहिती मिळवण्याच्या माझ्या सतत प्रक्रियेत मला मदत करते. वेबसाइट्स 5 प्रकारांमध्ये विभागली आहेत: डिजिटल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, एसईओ, सोशल मीडिया मार्केटिंग आणि पीपीसी, आणि प्रत्येकामध्ये एका लेखाचा दुवा आहे ज्याने नुकताच माझा विशेष रस घेतला आहे\n(1 9) डिजिटल मार्केटिंग\n(2 9) अनुच्छेद: गुगल ऍनॅलिटिक्समधील मॅन्युअल कॅम्पेन ट्रॅकिंगची सरलीकृत कशी करावी\n(2 9) अनुच्छेद: आपले ब्रँड चुंबकीय बनविण्यासाठी 5 मार्ग\n(2 9) लेख: फेसबुक जाहिराती आणि ई-मेल - परिपूर्ण संच साठी एक संधी\n(2 9) अनुच्छेद: आपण सर्वात जास्त मोबाइल जाहिरात संधी बनवित आहात\n(2 9) लेख: व्हिडिओ क्रांतीमध्ये आपले स्वागत\n6. ऑनलाईन मार्केटिंग इन्स्टिट्यूट\n(2 9) अनुच्छेद: पेड सर्च मोहिमेतील प्राथमिक गोष्टी\n(2 9) लेख: माध्यम-चालविण्याच्या सामग्रीद्वारे बॅकलिंक्सची कमाई\n(2 9) अनुच्छेद: मोबाईल जाहिरात पाहण्याच्या संधीसाठी मोबाईल बीट करतो\n(2 9) लेख: आमच्या ई-कॉमर्स व्यापाराला समजून घेणे\n10. ई-मार्केटिंग आणि वाणिज्य\n(2 9) लेख: ROI सुधारण्यासाठी 10 सशुल्क शोध ऑप्टिमायझेशन तंत्र\n(2 9) लेख: सामग्री धोरण कायम नाही\n(2 9) लेख: गेल्या आठवड्यातील 10 सर्वात मनोरंजक डिजिटल विपणन आकडेवारी\n13. डायरेक्ट मार्केटिंग न्यूज\n(2 9) लेख: विपणन करण्याचे सौंदर्य ग्राहकांच्या डोळ्यात आहे\n14. पक्की आणि रुपांतर\n(2 9) अनुच्छेद: आपल्या व्यवसायासाठी सर्वोत्तम मोबाइल धोरण कसे निवडावे\n(2 9) अनुच्छेद: आपली वेबसाइट आगामी Google मोबाईल पेनल्टी सेव्ह होईल\n(2 9) लेख: डिजिटल जाहिरातीचे भविष्य, 5 चार्ट्समध्ये\n17. कमाल डिजिटल विपणन\n(2 9) लेख: फेसबुकवरील सोशल मीडियाची खात्री करण्यासाठी 2 सोप्या पद्धती\n18. फिट एसमाल बिझनेस\n(2 9) लेख: मीडिया कव्हरेज मिळविण्यासाठी 25 टिप्स\n(2 9) अनुच्छेद: गुगल मोबाईलजन्डन आमच्यावर आहे\n(2 9) लेख: स्थानिक एसइओसाठी बेइडीफ-प्रूफ मार्गदर्शक\n(2 9) लेख: पृष्ठ एक रँकिंग मिळविण्यासाठी Google Plus (G +) वापरा\n(2 9) अनुच्छेद: कचरा थांबवा आपल्या लक्ष्यित जाहिरातीवर रूपांतरित करण्याचे योग्य लोक कसे मिळवावेत\n(2 9) अनुच्छेद: मोबाइल एसइओ मार्गदर्शक: आपल्या मोबाइल फ्रेंडली साइट तयार\n(2 9) लेख: [चेकलिस्ट] 5 आपल्या लँडिंग पृष्ठावर चाचणी करण्यासाठी Copywriting घटक\n(2 9) लेख: डिझाईन प्रभाव वापरकर्ता अनुभव: व्हॅल्यूसह आपले पृष्ठ Infusing करून चिंता कमी\n26. मार्केटिंग सोल्युशन्स ब्लॉग\n(2 9) लेख: बी 2 बी बीट: 7 गोष्टी प्रत्येक सीईओ लीड संगोपन बद्दल जाणून घेणे गरजेचे\n(2 9) लेख: काहीही न केल्याने सामाजिक अनुदानात वाढ होत आहे: माय सोशल मीडिया स्ट्रॅटेजी\n(2 9) लेख: डिजिटल जाहिरात 2015 चे अल्टिमेट ग्रोथ मार्केट आहे\n(2 9) अनुच्छेद: Google Analytics मध्ये दहा लपलेली हिरे: स्मार्ट इंटरनेट डेटा Anlaysis करा\n(2 9) लेख: आपला ब्लॉग रहदारी वाढविण्यासाठी Gmail चा वापर कसा करावा\n(2 9) अनुच्छेद: 7 चुकीच्या गोष्टी करणार्या लोकांनी आपणास ट्विटर वर अनुसरण न करता\n(2 9) लेख: आपले सामग्री विपणन सह उत्पादक सैन्याने तयार करण्यासाठी एक चरण-दर-चरण मार्गदर्शक\n(1 9) सामग्री विपणन\n34. सामग्री विपणन संस्था\n(2 9) अनुच्छेद: कंटेंट स्ट्रॅटेजी आणि कंटेंट मार्केटिंग हे वेगळे कसे पण कनेक्ट केलेले आहे\n(2 9) लेख: सामग्रीसह वाचकांना मनोरंजन आणि गुंतवण्याचे मार्ग\n36. कॉन्टॅक्टिव्ह कंटेंट स्ट्रॅटेजीस्ट\n(2 9) लेख: 7 कन्टेट मेमरमेंट टूल्स मार्केटर्सना माहित असावे\n(2 9) अनुच्छेद: आपल्या 'बद्दल' पृष्ठ पाठलाग ग्राहकांना वर 7 हे दुःखद चुका करू का\n38. ब्लॉग ट्रॅफिक वाढवा\n(2 9) लेख: व्यस्त लोकांसाठी व्याकरण करण्यासाठी संक्षिप्त मार्गदर्शक\n3 9. सेल्स लॉयन\n(2 9) अनुच्छेद / हबकास्ट: आपल्या इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी खाली लेखन महत्व\n(2 9) अनुच्छेद: कसे एक भव्य लांब वाक्य लिहायला\n(1 9) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन\n(2 9) लेख: एसईओ त्यांच्या दैनंदिन कार्यात काय करतात\n42. सर्च इंजिन लँड\n(2 9) लेख: Bing ठिकाणे अनेक एजन्सी-फ्रेंडली स्थानिक व्यवसाय सूची साधने जोडते\n43. सर्च इंजिन जर्नल\n(2 9) लेख: 5 ब्लॉगर आउटरीचसाठी उत्तम पद्धती\n44. सर्च इंजिन वॉच\n(2 9) अनुच्छेद: AdWords मधील मूल्य डायनॅमिक स्ट्रक्चर्ड स्निपेट कुठे आहेत\n(2 9) लेखः खरंतर रूपांतरित होणारे अधिक ट्रॅफिक व्हायचे आहे या 4 पावलांचा पाठपुरावा करा .\n46. सर्च इंजिन गोलमेज\n(2 9) अनुच्छेद: Google माझ्या साइटवर किती चांगले मोबाईल आहे हे पहायला मिळेल\n(1 9) सोशल मीडिया मार्केटिंग\n47. सोशल मीडिया परीक्षक\n(2 9) अनुच्छेद: आपल्या सामाजिक मीडिया विपणन चालना देण्यासाठी व्हिडिओचा वापर करण्याचे 7 मार्ग\n(2 9) लेख: रुपांतरण दर ऑप्टिमायझेशन 101: लँडिंग पृष्ठांवरून अधिक रुपांतर कसे करावे\n(2 9) अनुच्छेद: ट्विटर जाहिराती वि. जाहिराती: मेट्रिकल्स आपण पाहण्याची आवश्यकता आहे\n(2 9) अनुच्छेद: सर्वोत्कृष्ट ट्विटर हॅशटॅग्ज कसे शोधावे\n(1 9) पे क्लिक\n(2 9) अनुच्छेद: महत्वाचे URL अद्यतने Bing जाहिरातींना येत आहेत\n(2 9) अनुच्छेद: 5 पीपीसी लीड जनरेशनसाठी आव्हान\nमला आशा आहे की 52 डिजीटल मार्केटिंग वेबसाइटची ही यादी आपल्यासाठी सहायक होईल आणि डिजिटल मार्केटिंग उद्योगात सातत्याने ज्ञान प्राप्त करण्याच्या आपल्या यशास उपयुक्त ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/596/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T11:15:52Z", "digest": "sha1:LQSTRU4HS4PM73L2WQABTBLIRAOJZ5OM", "length": 7753, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट\nसिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्तीने चाललेल्या या जमिन अधिग्रहणाबाबत सरकारविरूद्ध लढा देऊ, असा विश्वास सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे आणि विरोधी पक्षातील अन्य नेते उपस्थित होते.\nसंघर्षयात्रेला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद - आ.जितेंद्र आव्हाड ...\nविरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वाढत्या महागाईविरोधात, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अशी सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी संघर्षयात्रा आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षयात्रेला मिळत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अब ...\nशेतकऱ्यांच्या दुर्गतीला भाजप सरकार जबाबदार - सुनील तटकरे ...\nकर्जमाफीसाठी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचा अभ्यास करावा लागतो ही शोकांतिका आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री माननीय स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची ही प्रतारणा आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कराडमध्ये केली. ते स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात बोलत होते. राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या या दुर्गतीला सरकार जबाबदार आहे, म्हणूनच या सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार आम्ही केलाय आणि हा व ...\nगारपीटीत जखमी झालेल्या ललिता वाळके यांना मदतीचा हात ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7135339", "date_download": "2018-04-23T11:42:26Z", "digest": "sha1:D7VFUOUCOAYX22CRFYUIE3ZDK3JBVXPY", "length": 6384, "nlines": 34, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ब्युकचा \"ऑफ द फोन\" अॅड है कॉमेडी डुओ रेटेट # सेल मिळविण्यासाठी लोकांना उद्युक्त करणारे लिंक", "raw_content": "\nब्युकचा \"ऑफ द फोन\" अॅड है कॉमेडी डुओ रेटेट # सेल मिळविण्यासाठी लोकांना उद्युक्त करणारे लिंक\nविनोदी जोडीने ब्यूक सेमील्टमध्ये गाडी चालवताना चित्रपटातील काही दृश्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रित केले आहे, तर व्हिडिओ गाण्याच्या गीतांवर लक्ष केंद्रित करतो, स्मार्टफोन्ससह आमच्या व्यापाराच्या बदल्यात आपण ज्या क्षणात चुकतो त्यावरील एक टिप्पणी असते.\nआपल्या फोनवर वेड असलेल्या किशोरवयीन मुलांनी प्रत्येकाशी मजा लुटताना, त्यांच्या बाळांना आणि खाद्यपदार्थांना न पाहता मातृभाषेतून त्यांच्या डेसर्ट्सला नमस्कार करणे, गीतांचे गायक गीत समाविष्ट करते, \"आता फोन बंद करा, हे ठीक आहे, होण्याची आवश्यकता नाही भिऊ हे तुझ्यावर प्रेम करत नाही, एक दिवस मरणार आहे, सरकार कदाचित ते आपल्याबरोबर तरीसुद्धा हेरगिरी करणार आहे. \"\nव्हिडिओवर 878,000 पेक्षा अधिक दृश्ये जमा झाली आहेत कारण ही रेथ अँड लिंकच्या YouTube चॅनेलवर 3 डिसेंबर रोजी पोस्ट केली गेली होती, अनारलीच्या व्हायरल व्हिडीओ चार्टाने ते 26,000 पेक्षा जास्त शेअर्सची कमाई दर्शवित आहे. Adweek वर एका अहवालानुसार, विपणन एजन्सी DigitasLBi Buick सह #InTheMoment मोहिमेवर कार्य केले आणि दलाल ऑटोमोबाइल कंपनी आणि Rhett आणि दुवा दरम्यान एक भागीदारी मदत केली.\nब्यूकचे #InTheMoment Tumblr ब्लॉग वाचते, \"आम्ही सर्व आमच्या स्मार्टफोनमध्ये गमावले पण आपण एक मिनीट फोन खाली ठेवले तर आपण सापडतील काय कल्पना - white lace dress two piece. जेवण साठी एका संभाषणासाठी रस्त्याच्या प्रवासासाठी पहा, जीवनाकडे पहा आणि या क्षणी आम्हाला सामील करा \"\nपण प्रथम, व्हिडिओ पहा तपासा:\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nप्रोग्रॅमॅटिक नेटिव्ह जाहिराती का वापरावीत\nमूल्य प्रोप्स बद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन कसे आकारले पाहिजे\nरेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nचॅनेल: VideoCreative दिवस व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:48:35Z", "digest": "sha1:VO72V7M6VNWMM3QXG64BSCOQ7OLFVBH6", "length": 7193, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनाली कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसोनाली मनोहर कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.\nसोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी​​, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.\nसोनाली कुलकर्णी यांनी सो कुल या पुस्तकाचे लेखन केले आहे.\nआगा बाई अरेच्या २\nकितने दूर कितने पास\nजहाँ तुम ले चलो\nदिल विल प्यार व्यार\nप्यार तूने क्या किया\nपुण्याच्या प्रियंका महिला उद्योग संस्थेतर्फ स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार (२१-५-२०१६)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१८ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17913/", "date_download": "2018-04-23T11:36:27Z", "digest": "sha1:36LMYR6IS7FPX7GSYCALYDQADLNGG57B", "length": 2932, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-स्वप्न जरासे", "raw_content": "\nस्वप्न जरासे पापणीत असावे\nत्या राञीत कोणते गूज वसावे\nसाकारेल स्वप्न सत्यात कधी\nजणु त्या स्वप्नात तूझेच चिञ दिसावे\nकधी मोकळ्या हातांनी माझा निस्वार्थ उरी\nमिठीत तुला घेता जग सारे विसरावे\nथेंब तूझा स्पर्शाचा तना-मनावर ओघळता\nनेञातुनी अवेळीच बांध का फुटावे\nभुईस अंथरावे निळ्या अंबरास पांघरावे\nथांबवुनी चांदण्यांस तूझे रुप त्यांस वर्णवावे\nजसे श्रावणात सरींचे इंद्रधनूत सप्त रंगांचे\nतसेच बंध गहिरे तूझे नि माझे हि असावे\nअसंख्य माझा भावनांना तूझेच अर्थ कळावे\nआठवांच्या मैफिलीला तूझेच गीत सजावे\nगुंतवावे शब्द जुने उलगडावे अर्थ नवे\nउधळूनी रंग नवे मन फितुर का व्हावे\nउधळूनी रंग नवे मन फितुर का व्हावे .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/open-happiness.html", "date_download": "2018-04-23T11:30:29Z", "digest": "sha1:3ZJKSLNRDMVUZPBWA3NWCKD5YS2JUUHV", "length": 2474, "nlines": 86, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: open happiness", "raw_content": "\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/510/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T11:13:15Z", "digest": "sha1:C3ZCF47WKKVIDVXLKPNF4BWOFD22JNG5", "length": 7561, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे रविवारी सोशल मिडियाचा प्रभावी वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार जनसामान्य तसेच आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे तसेच सामान्य जनता आणि शेतकरी विरोधी कृतीवर लक्ष ठेवून त्यावर अभ्यासात्मक मतं मांडावीत असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.\nविरोधकांच्या अनुपस्थितीत चर्चेविनाच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर ...\nराज्याच्या विधिमंडळाच्या इतिहात पहिल्यांदाच विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्याचा अर्थसंकल्प चर्चेविनाच मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे सत्तेत भागीदारी असलेल्या शिवसेनेलाही अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेऊ दिला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनामुळे विरोधी पक्षांतील १९ आमदारांना निलंबीत केले गेले. याचाच निषेध म्हणून विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर आज दुसऱ्या दिवशीही बहिष्कार टाकला होता. अशा परिस्थितीत कोणतीही चर्चा न करता सरकार पक्षाकडून राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात ...\nपीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या - धनंजय मुंडे ...\nखरीप २०१६ च्या हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या, अशी आग्रही मागणी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यातील ११ लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याबाबत तसेच बुलडाणा, औरंगाबाद सारख्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाल्याचा मुद्दा नियम ९३ अन्वये त्यांनी उपस्थित केला होता. याच अनुषंगाने बोलताना मुंडे म्हणाले की, पीक विमा भरण्याची मुदत दि. ३१ जुलै २०१६ पर्यंत आहे. मात्र उद्या असलेला बँक कर्मचाऱ्यांचा संप, शनिवार, रविवार रोज ...\nतरतुदी फक्त कागदोपत्री नकोत, त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी - राणा जगजितसिंह पाटील ...\nराज्यांतर्गत विविध विभागांसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ज्या तरतुदी केल्या जातात त्या फक्त कागदोपत्री होत आहेत. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसून ती तातडीने झाली पाहीजे, अशी मागणी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत केली. कृषी समृद्ध योजनेची घोषणा सरकारतर्फे केली गेली. ही योजना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा राबवण्यात येणार होती. त्यासाठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. प् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/178916-", "date_download": "2018-04-23T11:37:29Z", "digest": "sha1:ZHF5HATQNYFHNHAAWYULP4SY4FKPQMZ4", "length": 7924, "nlines": 23, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "बॅकलिंक्ससाठी मी याहू कसे वापरू?", "raw_content": "\nबॅकलिंक्ससाठी मी याहू कसे वापरू\nसर्वात सामान्यपणे, लोक बॅकलिंक्ससाठी पर्यायी शोध इंजिने वापरत आहेत, जेव्हा त्यांची वेबसाइट सबमिट करण्याचा किंवा Google सारख्या प्रमुख विषयांना ब्लॉग नसताना. तर, खाली आपण बॅकलिंक्ससाठी याहू कसे वापरावे हे दाखवणार आहे. ते फक्त ठेवा, आम्ही याहू उत्तरे मिळविण्यासाठी जात आहेत परतावा मध्ये हे मौल्यवान backlinks आणले की. टीप, तथापि, त्या उत्तरांना शक्य तितक्या नैसर्गिक म्हणून पहाणे ही गोष्ट आहे की ते स्पॅम म्हणून ओळखले जात नाहीत - hosting y dominio peru. आणि बॅकलिंक्ससाठी Yahoo चा वापर करण्याच्या काही इतर मार्ग आहेत - खाली मी तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी सर्व शक्य पर्यायांनुसार पूर्ण यादी दर्शविणार आहे. येथे आपल्यासाठी मुख्य बुलेट पॉइंट आहेत, प्रथम आणि सर्वात महत्वाचे:\nआणखी काही करण्यापूर्वी, आपण आपली वेबसाइट किंवा ब्लॉग Yahoo वर सबमिट करण्यासाठी फक्त Bing च्या वेबमास्टर साधनांचा वापर करू शकता.हे लक्षात ठेवा, की याहू स्वत: आता बिंग मालकीचे आहे. म्हणून, आपली सबमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला थेट Bing च्या वेबमास्टर टूलबॉक्सवर पुनर्निर्देशित केले जाईल.\nसर्व केल्यानंतर, आपण आपली वेबसाइट किंवा ब्लॉग URL थेट Bing शोध इंजिनवर सबमिट करण्याचा प्रयत्न करू शकता. असे केल्याने Bing च्या वेबमास्टर साधनांचा योग्य वापर करण्याच्या प्रयत्नात आपला वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही.\nआपण आपल्या लिंक इमारत प्रयत्नांचा भाग हाताळण्यासाठी काही उद्योग-संबंधित किंवा आकर्षक चर्चेसाठी अर्ज करू शकता.जर आपण बॅकलिंक्ससाठी Yahoo चा वापर करू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त Yahoo Answers वर काही उत्कृष्ट पोस्ट्स पोस्ट करण्याची गरज आहे. त्याप्रकारे आपल्याला बदलीत केवळ एक मौल्यवान दुवा मिळणार नाही तर अतिरिक्त रहदारी देखील प्राप्त होईल.\nआणि आपण याहू उत्तरांवर बहुतेक वेळा वारंवार विचारले जाणारे प्रश्न शोधून जाऊ शकता (a. के. अ. FAQ) म्हणजे काजू आणि बोल्ट्स समजणे - आणि आपल्या लक्ष्यित प्रेक्षक किंवा बाजार ठिकाणच्या वर्तमान आवडीच्या लोकप्रिय विषयांशी संबंधित काही अतिरिक्त पोस्ट वितरीत करणे.\nशिवाय, आपण या प्रकरणामध्ये आणखी खोलवर चर्चा करू शकता. प्रत्येक बाबतीत स्केलवर विचार करण्याचा प्रयत्न करा - म्हणजे आपण कदाचित ते धीम्या पद्धतीने घेऊ शकता, शक्य तितक्या सर्वोत्तम पद्धतीने उत्तर द्या आणि आपल्या प्रत्येक उपयुक्त प्रतिसादांसाठी एक दुवा पोस्ट न करण्याबद्दल. अर्थात, यास बराच वेळ लागेल, आणि प्रत्यक्षात एकाच वेळी एकदा मोजता येणारा परिणाम न मिळाल्याशिवाय. तरीही, आपण आपल्या मुख्य व्यवसाय वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ब्रांड नेम तयार करण्यामध्ये चांगले काम करण्याची शिफारस केली आहे. त्याप्रकारे, आपण मजबूत बॅकलिंक प्रोफाइल तयार करण्याच्या मुख्य ध्येयाकडे हळू हळू हलवा - आणि आपण चांगले आहात\nबॅकलिंक्ससाठी Yahoo वर केवळ पूर्णतः योग्य उत्तरांसाठी कार्य करणे - येथे आपण काय लक्षात ठेवावे. होय, खूप वेळ लागेल, म्हणजे आपण प्रत्येक प्रत्युत्तरासह सखोल असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे, आपण खूप स्पॅम म्हणून पहावे असे इच्छित नसल्यास - खूप लहान किंवा खूप साध्या उत्तर पोस्ट करणे टाळा. शेवटी, तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे - अधिक लोक आपल्या वेबसाइट किंवा Yahoo उत्तरेबद्दल ब्लॉगबद्दल शिकतात (जरी आपल्या पोस्टनंतर कोणतेही लिंक उपलब्ध नसेल तरीही) - चांगल्या गोष्टी येतील. येथे आपला वेळ देण्याची किल्ली आहे, आणि आपण पूर्ण केले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/cultural/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:26:32Z", "digest": "sha1:XMBGGXE4OYWCC4HBFUTN65WMIV2LRC3L", "length": 8906, "nlines": 127, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "आई एकविरेचे कल्याणकारी रूप | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome सांस्कृतिक आई एकविरेचे कल्याणकारी रूप\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\nशिव व भक्त्ती ही विश्वातील दोन रुपे परमात्मा म्हणजे शिव. भक्त्ती म्हणजे पार्वती तीच अंबा जगदंबा मानवाच्या उद्धारासाठी व कल्याणासाठी अनेक रुपे घेतली…..त्यातील एक रुप आई एकविरेचे.\nवसई ही परशुरामाची भुमी आणि आई एकविरा ही परशुरामाची आई. भक्त्तांच्या हाकेला आणि संकटकाळी धाऊन येणारी आई . तिचे स्थान कळंब गावातील निसर्गरम्य खाडीत शिळारुपात आहे. माता एकविरा मातेच्या दर्शनासाठी येण्यासाठी रावार निर्मळ मार्गे व कळंब गावातील खाडीच्या लाकडी पुलावरुन जाता येते. साधारण तीन तपाहुन जास्त काळ एकविरा आईचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. सुरवातीला झावल्या व कवले लावलेले मंदिर भक्त्तांच्या देणगी व आई एकविरा देवी सेवा कमिटीच्या सहकार्याने भव्य दिव्य मंदिर उभे आहे.\nआजमितीला मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमीला मोठी यात्रा भरते व नवरात्रीत नऊ दिवस दुपार व रात्री महाप्रसादाचे ( भंडारा ) आयोजन केले जाते. मुंबई परिसरातील अनेक भक्त्तगण आपले नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आईची भक्त्त गणांमध्ये आहे. त्यामुळे आईच्या दर्शनासाठी दुरवरुन भक्त्त येत असतात.\nअशा या स्वयंभू आईचे स्थान आपल्या परिसरात आहे हे आपल्या कोळी आगरी लोकांचे भाग्यच आहे .\nआई एकविरा माते की जय\nदोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा “जुगार”\nहिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी प्रत्येकाला प्रवक्ता व्हावे लागेल – श्री. अभय वर्तक\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/photo-gallery/cartoonist-suraj-kambles-wonderful-art", "date_download": "2018-04-23T11:22:38Z", "digest": "sha1:2KH3HYCKGAC5CZ4SYPLUPL2A7NYN5QGO", "length": 6263, "nlines": 121, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Cartoonist Suraj Kambles wonderful art | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome फोटो गॅलरी सुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nपुण्याच्या पराभवाची परतफेड, भारताने पाहुण्यांना केले ११२ धावांत गारद, मालिका बरोबरीत\nरायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या वाढवणारा अवलिया ‘प्रेमसागर मेस्त्री\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/arunsheth-bhagat.html", "date_download": "2018-04-23T11:49:27Z", "digest": "sha1:MZRO47E7QM5NQCK2SUXYXHV4N247T5BA", "length": 10769, "nlines": 85, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : अरुणशेठ जगन्नाथ भगत\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी\nName : अरुणशेठ जगन्नाथ भगत\nPlace of Birth: : शेलघर, ता. पनवेल, जि. रायगड\nSpouse’s Name : शांताबाई अरुणशेठ भगत\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : सिव्हील कॉन्ट्रॅक्टर\nHobby : वाचन, प्रवास, क्रिकेट आणि संगीत\nResidence Address : मु. शेलघर, पो. गव्हाण, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०६\nOffice Address : पनवेल भाजपा मध्यवर्ती कार्यालय, अम्पायर प्राईड, रुपाली सिनेमा समोर, पनवेल शहर, ता. पनवेल, जि. रायगड\nअध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी\nसदस्य, पनवेल पंचायत समिती\nसदस्य - २००५ ते २०१४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी\nकार्याध्यक्ष - २००४ ते २०१४ पनवेल तालुका काँग्रेस कमिटी\nचिटणीस - १९९८ ते २००४ पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष\nसरपंच - १९९३ ते १९९८ गव्हाण ग्रामपंचायत\nक्रियाशील सदस्य, भारतीय जनता पार्टी, पनवेल तालुका\nपूर्वीच्या संघटनात्मक पदाच्यामुळे लोकसंपर्क दांडगा असल्याकारणाने सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ४० टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मिळविण्यात यश.\nपक्ष कार्यासाठी दररोज किमान १० तास वेळ देत असतो.\nसदस्य - २००५ ते २०१४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी\nसदस्य म्हणून काम करताना पनवेल काँग्रेस कमिटी, पनवेल शहर काँग्रेस कमिटीशी समन्वय साधून संघटात्मक कार्य दृढ केले.\nकार्याध्यक्ष - २००४ ते २०१४ पनवेल तालुका काँग्रेस कमिटी\nकार्याध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्षास बळकटी आणण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर साहेब व आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने गाव कमिट्या, पंचायत समिती विभागीय कमिट्या व जिल्हा परिषद विभागीय कमिट्या स्थापन करून समन्वय साधला.\nशेतकरी कामगार सारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवाराचा पाडाव करून मा. श्री. प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून निवडून देण्यात खारीचा वाटा उचलला.\n२ जिल्हा परिषद सदस्य, ५ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले.\nमा. श्री. प्रशांत ठाकूर यांना पनवेल नगर परिषद अध्यक्ष बनविताना पनवेल नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यास मदत केली.\nचिटणीस - १९९८ ते २००४ पनवेल तालुका शेकाप\nचिटणीस म्हणून कार्य करताना पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.\nसभापती - सन १९९९ ते २००१ कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल\nसदस्य - सन २००१ ते २००६ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती\nसदस्य व गटनेता - सन २०१२ पासून पंचायत समिती पनवेल\nअध्यक्ष - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ\nचेअरमन - छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण\nसदस्य - रयत शिक्षण संस्था समन्वय समिती\nअध्यक्ष - महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ संस्था, रायगड जिल्हा\nसदस्य - पनवेल पंचायत समिती शिक्षण सल्लागार समिती\nउपाध्यक्ष - सन २००१ ते २०१५ पनवेल को. ऑप. अर्बन बँक\nअध्यक्ष - आदर्श पतपेढी, पनवेल\nसंचालक - शांतेश्वरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतपेढी\nउपाध्यक्ष - श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल\nअध्यक्ष - माजी विद्यार्थी संघटना गव्हाण विभाग\nअध्यक्ष - तंटामुक्ती कमिटी गव्हाण\nसिंगापूर, मलेशिया, साउथ आफ्रिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, होंग कोंग, चीन- मकाव\nDEVELOPMENT WORKS / केलेली विकास कामे\nसरपंच, गव्हाण ग्रामपंचायत (कालावधी सन १९९३ ते १९९८)\nसिडकोकडून वेळोवेळी मिळालेल्या अनुदानामुळे ग्रामपंचायत हद्दीतील गावागावात रस्ते, भुयारी गटारे व सुलभ शौचालये बांधली, नळाद्वारे पाणी पुरवठा केला.\nग्रामपंचायत कार्यालयात एक खिडकी योजना राबविली.\nसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल (कालावधी सन १९९९ ते २००१)\nमार्केटयार्ड परिसरात इतरस्त्र बसणाऱ्या व्यापारांसाठी मार्केट यार्डची भव्यदिव्य इमारत बांधली.\nआर्थिक दृष्ट्या सबळ केले.\nसदस्य, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (कालावधी सन २००१ ते २००६)\nशेतकऱ्यांना त्यांच्या मालाला पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती व नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यात समन्वय साधला.\nसदस्य व गटनेता, पंचायत समिती पनवेल (कालावधी सन २०१२ पासून...)\nशासनाकडून मिळणारे अनुदान सर्व पंचायत समितींना सारख्या प्रमाणात घेऊन गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत विकास घडवून आणला.\nअंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या भरतीत स्थानिकांना न्याय मिळवून दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/779/%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE?_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T11:36:15Z", "digest": "sha1:QHD3VANIJDHHKC2X3B27WTPV6CZDYURS", "length": 10821, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहे खरंच कायद्याचं राज्य आहे का शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल\nअलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.\nराज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया मी पाहिली नाही, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\nत्यांनी यावेळी बोलताना इतर विषयांवरही भाष्य केले. देशाच्या विकासाचा दर खाली आला आहे. खरे तर देशाचा विकासदर ८ टक्क्यांच्या वर असायला हवा. पण तसे न झाल्यामुळे वास्तव लपवण्यासाठी विकास दाखवण्याचे निकष बदलण्यात येत आहेत. ‘मी लाभार्थी’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीत फार गाजावाजा करण्यात आला आहे, पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अद्यापही कळलेले नाही. तसेच, गोहत्या प्रकरणी केंद्र सरकारने संवेदनशील राहायला हवे. कालही राजस्थानमध्ये एक हत्या घडली आहे. केंद्राने राज्यांना सूचना देऊन या घटना थांबवायला हव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.\nगडचिरोलीबाबत बोलताना पवार म्हणाले की हा हैदराबाद आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास व दळणवळणापासून वंचित राहिला होता. इथे विकास करायचा असेल तर फक्त पोलीस दल पुरेसे नसून इतर माध्यमातूनही काम केले जाणे गरजेचे आहे, हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ओळखले व तसे प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री यांनीही मंत्रिमंडळात अनिल देशमुख असताना सहकार्य केले. या सरकारनेही असे प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nदरम्यान, गुजरातमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. हे चित्र काँग्रेससाठी अनुकूल आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.\nकायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, तो सगळ्यांना सारखाच - अजित पवार ...\nपश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन आज आठव्या दिवशी साताऱ्यात सुरू करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्षांनी हल्लाबोल आंदोलनाचा आढावा घेतला. तसेच, पुढील आराखडा सांगितला.काल अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर अजित पवार यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे निर्दोष असल्याचे पोलीस तपासात सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगपात हे राष्ट्रवादी काँ ...\nदिल्लीत महाराष्ट्राचा पत्ता '६, जनपथ'- हेमंत टकले ...\nसाधेपणाचे आणि सात्विकपणाचे दर्शनच आदरणीय शरद पवार यांनी आम्हाला दिलं अशा शब्दांत आमदार हेमंत टकले यांनी पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. पवार पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांना ३१ मार्च १९६९ रोजी पत्र लिहिले, या पत्रात तरुण राजकारण्यांची घुसमट व्यक्त केली होती. या पत्राचा शेवट त्यांनी 'जे जे माझ्या मनात आले, ती अस्वस्थता तुम्हाला कळवायची होती' असे लिहिले होते. एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधण्याची हतोटी पवार साहेबांकडे आहे, असे टकले म्हणाले.पवार साहेबांनी आमदार म्हण ...\nआदरणीय शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना चार दिवसांच्या उपचारांनंतर आज सकाळी रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले.पवार साहेबांना डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माध्यमांशी बोलताना कार्यरत राहाण्याचीच सवय असणाऱ्या पवार साहेबांनी स्वतः मात्र आपल्याला पुढील दोन महिन्यांत एकही सुट्टी नसल्याचे सांगितले. आपल्याला एका जागी बसून राहायची सवय नसल्याचे सांगत 'आता विश्रांतीचं कसं करायचं ते बघू' असे म्हटले.आदरणीय पवार साहेबांची प्रकृत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomogranate-faces-phosphonic-acid-mrl-issue-6628", "date_download": "2018-04-23T11:47:37Z", "digest": "sha1:VSWZND5CLUXEYGN2P7W5FZRJDAJ5INNM", "length": 20668, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pomogranate faces Phosphonic acid MRL issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या\n‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या\nरविवार, 18 मार्च 2018\n‘असुरक्षित’ डाळिंब : भाग २\nपुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम असण्याच्या समस्येबरोबर अाणखी एक आव्हान बागायतदारांपुढे उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामात फॉस्फोनिक अॅसिड या रसायनाचे अवशेष आढळून आल्याने निर्यातीसाठी ‘सॅंपल फेल’ झाल्याच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. या रसायनाची कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) युरोपीय देशांकडून अत्यंत कमी म्हणजे दोन मिलिग्रॅम प्रति किलो निश्चित केल्याने त्याचे पालन करताना बागायतदारांची कसोटी पणास लागत आहे.\nतेलकट डाग रोग, थ्रिप्स, मर आदी विविध किडी-रोगांंमुळे हैराण झालेल्या अनेक डाळिंब बागायतदारांना बागेचे क्षेत्र कमी करण्याची वेळ उद्‌भवली. किडी-रोगांच्या कचाट्यातून बाग वाचविण्यासाठी तसेच फळाची निर्यातक्षम दर्जा मिळण्यासाठी विविध रसायनांचा वापर तर अनिवार्य आहे. त्याचवेळी मालात त्याचे अवशेषही आढळणार नाहीत अशीही काळजी घ्यायची दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे.\nखुपसंगी (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील डाळिंब बागायतदार अंकुश पडवळे म्हणाले, की डाळिंबात आढळणारी आणखी समस्या म्हणजे काही रसायनांच्या द्राक्षातील ‘एमआरएल’ जास्त आहेत. पण त्याच रसायनांच्या एमआरएल डाळिंबात मात्र अत्यंत कमी ठेवल्या आहेत. साहजिकच त्यांचे पालन करणे कठीण जात आहे. पावसाळी वातावरण दीर्घकाळ राहिले तर त्या काळात विविध कीडनाशके आम्हाला वापरावी लागतात. अशावेळी विविध रसायनांचे पर्याय न मिळाल्यास मालाची गुणवत्ता खराब होते. वेगळे काही रसायन वापरावे तर ‘सॅंपल फेल’ होण्याचा मोठा धोका आहे.\nयंदाच्या हंगामात फॉस्फोनिक ॲसिडच्या अवशेषांचा आढळ ही अनेक बागायतदारांसाठी समस्या ठरली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा म्हणाल्या, की डाळिंबात फॉस्फोनिक ॲसिड ‘एमआरएल’ पातळीपेक्षा आढळल्याची नवी समस्या आपल्याकडील प्रयोगशाळांच्या माध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे संंबंधित बागायतदारांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊच शकलेला नाही. हे रसायन वापरल्यानंतर ५२ दिवसांनंतरही त्याचे अवशेष आढळत नसल्याचे एका प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. तर, वापरानंतर ९० ते ९५ दिवसांनंतरही अवशेष आढळल्याचे अन्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. अवशेषांचे निदान करण्याच्या त्यांच्या पद्धतीत काही तांत्रिक त्रुटी आहेत का ते तपासले पाहिजे.\nडॉ. शर्मा म्हणाल्या की काही कृषी रसायने हीच विघटनांच्या माध्यमातून फाॅस्फोनीक ॲसिडचा स्त्रोत आहेत. त्यादृष्टीने इथेफॉन हे वनस्पती वाढनियंत्रक तसेच ‘फोसेटील ए एल’ हे बुरशीनाशक या दोन रसायनांचा वापर केल्यास त्याद्वारे फॉस्फोनीक ॲसिडचा आढळ होऊ शकतो. काही डाळिंब उत्पादकांनी इथेफॉनचा वापर फळाचा रंग वाढवण्यासाठी काढणीच्या १५ दिवसांच्या आधी केल्याचे आढळले आहे. काही फवारणीद्वारे तर काही ड्रेंचीगद्वारे ते वापरतात. त्यामुळे या रसायनांचा वापर किती प्रमाणात, कशा प्रकारे व केव्हा केला आहे हे अभ्यासून मगच या समस्येची उकल करावी लागेल.\nफॉस्फोनिक ॲसिडचा स्त्रोत असलेल्या ‘फोसेटील ए एल’ या बुरशीनाशकाची एमआरएल द्राक्षात १०० मिलीग्रॅम प्रति किलो आहे. मात्र फॉस्फोनीक ॲसिडची एमआरएल डाळिंबात मात्र दोन मिलीग्रॅम एवढी कमी असल्याने ती पाळणे मोठे आव्हानाचे आहे. काही शेतकरी द्राक्ष व डाळिंब असे दुहेरी पीके घेतात. त्यामुळे द्राक्षातील एमआरएल त्यांनी डाळिंबात गृहीत धरली तर ही समस्या गंभीर होऊ शकते, असे डॉ. शर्मा म्हणाल्या.\nदहा शेतकऱ्यांच्या मालाचे नमुने फेल\nसोलापूर जिल्ह्यातील ग्रीन हॉरीजन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अमरजीत जगताप म्हणाले, की यंदा डाळिंबात ‘फॉस्फोनिक ॲसिड’ आढळल्याच्या अनेक घटना आढळल्या आहेत. यंदाच्या हंगामात आम्ही डाळिंबाचे पाच कंटेनर नेदरलॅंडला पाठवले. त्या वेळी कंपनीच्या ५५ सभासदांपैकी १० सभासदांच्या नमुन्यांमध्ये फॉस्फोनिक ॲसिडचे अवशेष स्थानिक प्रयोगशाळेत आढळले. त्यामुळे त्यांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊ शकला नाही. अपेडामार्फत आम्हाला दरवर्षी सुमारे १८४ रसायनांचे ‘चेकींग’ करण्यास सांगितले जाते. यंदाच्या वर्षी या रसायनांची संख्या दोनशेपर्यंत होती. यंदा फाॅस्फोनिक ॲसिडचे नाव त्यात प्रथमच आले आहे. फोसेटील ए एल, फॉस्फोरीक ॲसिड अशा विविध घटकांचा वापर बागायतदार फवारणी किंवा ठिबकद्वारे करतात. नेमकी कोणती रसायने वापरल्यामुळे ‘फॉस्फोनिक ॲसिड’चे अवशेष आढळून येतात हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.\nडाळ डाळिंब कसोटी test सोलापूर द्राक्ष घटना incidents\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pimbletree.com/leading-10-chhatrapati-shivaji-maharaj-estimates-inspirational-rates-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:22:43Z", "digest": "sha1:TFIE5YK2PTWHRLCFLYUVAX6VGQX7SVJ4", "length": 6371, "nlines": 88, "source_domain": "pimbletree.com", "title": "Leading 10 Chhatrapati Shivaji Maharaj Estimates | Inspirational Rates | छत्रपती शिवाजी महाराज – Pimble Tree", "raw_content": "\nस्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही\n2. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …\nदरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…\nपाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …\nअन साम्राज्य निर्माण करायचे असेल\nतर “शिवबाचच” काळीज हवं…….\n3. जागवल्याशिवाय जाग येत नाही\nओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,\nमाझा दिवस उगवत नाही..\n4. विजेसारखी तलवार चालवुन गेला,\nनिधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,\nवाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,\nमुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला\nस्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा\nकेला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.\n5. ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,\nभगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे\nघाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,\nज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..\n6. बघतोस काय रागाने \n7. लखलख चमचम तळपत होती\nमहाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…\nयांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा\nजय शिवराय, जय महाराष्ट्र.\n8. झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,\nजागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,\nघडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,\nऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,\nश्री राजा शिवछञपती तुम्ही… \n9. मराठा राजा महाराष्ट्राचा\nम्हणती सारे माझा – माझा\nआजही गौरव गिते गाती\nतो फक्त “राजा शिवछत्रपती”\n|| जय जिजाऊ |||| जय शिवराय ||\n10. मृत्तीकेचे पवित्र तव राखिले\nगर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा\nशिवराजा तुज मानाचा मुजरा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t17821/", "date_download": "2018-04-23T11:31:38Z", "digest": "sha1:E33KELECLA3OMTQISPLXWHHG5I72Y2EI", "length": 2374, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-किती तरी वेदवना झाल्यात मला", "raw_content": "\nकिती तरी वेदवना झाल्यात मला\nकिती तरी वेदवना झाल्यात मला\n*कितीतरी वेदना झाल्यात मला*\nकितीतरी वेदना झाल्यात मला\nमाझ्यापासुन तुला दुर लोटताना\nजाणीव त्याची असु दे रे सख्या\nआयुष्य हे तु तुझे जगताना\nकितीही वेदना झाल्या तुला जरीही\nमला मात्र विसरु नकोस तु तरीही\nनाहीतर येशिल परतुन जेव्हा\nमग मीच नसेन तुझ्यासाठी तेव्हा...\nकिती तरी वेदवना झाल्यात मला\nकिती तरी वेदवना झाल्यात मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/06/", "date_download": "2018-04-23T11:35:57Z", "digest": "sha1:HYVLW4UCZ4HTFVRQ3N4PMJ4FM2WNY4HA", "length": 2335, "nlines": 76, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: June 2010", "raw_content": "\nलिमकाची प्रत्येक जाहीरात वेधक असते..\nही अशीच एक सुंदर जाहीरात.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/healthy-food-recipes/page/4/", "date_download": "2018-04-23T11:37:37Z", "digest": "sha1:OFK3JTTRZLBN3AJ3SDC65XXRNLRMBBYE", "length": 7814, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पौष्टिक पदार्थ | Healthy food recipes - Page 4", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पौष्टिक पदार्थ » पान ४\nदुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.\nभाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.\nजीवनसत्व ई, लोह, कॅल्शिअम अश्या सर्वगुणसंपन्न असलेला बदामचा हैद्राबादी पद्धतीने बनवून केलेला पौष्टिक हलवा गोड पदार्थ म्हणून सणासुदीला खाऊ शकता.\nदुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.\nसर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे हिरवे कबाब मधल्या वेळेत किंवा जेवताना स्टार्टर म्हणून देता येतील.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/north-maharashtra", "date_download": "2018-04-23T11:14:51Z", "digest": "sha1:O4L4TNE5RMMNRRSH4547TC34UGZLV5XE", "length": 10554, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "उत्तर महाराष्ट्र | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र\nबोदवड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या धनादेशाचे ना. लोणीकर यांच्या हस्ते वाटप\nजळगाव (बोदवड): तालुक्यातील जलचक्र बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी रामराव पाटील यांच्या पत्नी श्रीमती सविता पाटील तसेच मुक्तळ येथील शेतकरी शिवदास पाटील यांच्या पत्नी सुशिला पाटील यांना एक ला...\tRead more\nजिल्ह्यातील 96 कोटी रुपये खर्चाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे ना. बबनराव लोणीकरांच्या हस्ते भुमिपुजन\nबोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्याच्या 82 गावांमधील नागरीकांना 12 रुपयांत एक हजार लिटर जंतुविरहित पाणी मिळणार जळगाव: मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुर...\tRead more\nमंगळ ग्रह सेवा संस्थेला आयएसो 9001:2015 प्रमाणपत्र\nजळगाव: अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेला मिळालेले आयएसो 9001:2015 प्रमाणपत्र आम्हा पदाधिकाऱ्यांना प्रदान करतांना जळगाव येथील अग्रणी सेवाभावी संस्था केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म...\tRead more\nतीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदूर्णीतील मंदिरांचा पुनर्विकास करणार\nशेंदूर्णी येथे नगरपालिका स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु -जलसंपदामंत्री गिरीष महाजन जिमाका: प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदूर्णी गावात शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांची...\tRead more\nअमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ, शेतकऱ्यांना समृध्द व सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील\nअमळनेर: शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी व वीज उपलब्ध करुन दिल्यास राज्यातील शेतकरी समृध्द व सक्षम होईल. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण...\tRead more\nनवसंजीवन योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न\nजळगाव: नवसंजीवन योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. या...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17973/", "date_download": "2018-04-23T11:30:28Z", "digest": "sha1:QPYBABR4VRZE7XYB3S375IVCKLJET37Q", "length": 2973, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- ••••••इग्नोर••••••", "raw_content": "\nइग्नोर तू का मला करायची\nमाझा मनाला तू फार छळाची\nवेढ तू मला आसा का लावायची\nसांग तू मजला इग्नोर का करायची\nमाझ्या या जीवनास तूच का हारलीस\nमाझ्या पासून तू दूर का गेलीस\nमला हेतु प्रेमाचे छंद का लावलीस\nसांग तू मला इग्नोर का केलीस\nमनात हे आसे तुझे रूप ग राणी\nतुझा विन ही आधुरी ग कहानी\nतुझा आठवणीत गातो मी गाणी\nआता तरी इग्नोर करू नकोस राणी\nतू इग्नोर मला केलीस तरी\nमी तुझ्या समोर येतो की ग\nमी विधुशक ही होतो की ग\nतू इग्नोर केल्या मुळे मी\nस्वताला छळलो की ग\nमनाला या जाळलो की ग\nइग्नोर मला करू नको की ग\nइग्नोर मला करू नको की ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T11:49:04Z", "digest": "sha1:WELHELROZ6U63E6ST5PR5MCXI6VM37RQ", "length": 7244, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिव्ही टायटस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख टायटस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, टायटस (निःसंदिग्धीकरण).\nलिव्ही टायटस याचे कल्पनाचित्र\nलिव्ही टायटस (रोमन लिपी: Titus Livius) (इ.स.पू. ५९ - इ.स. १७) हा एक रोमन इतिहासकार होता.\nइटलीतील पेटेव्हिअम (सध्याचे पॅड्युआ) या गावी इ.स.पू. ५९ साली झाला होता. त्याचे सर्व आयुष्य रोममध्येच गेले. त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्वाची स्थित्यंतरे रोमन साम्राज्याचा र्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकिर्द अनुभवली. त्याने हिस्ट्री ऑफ रोम फ्रॉम इट्स फाऊंडेशन हा ग्रंथ लहिला. रोम नगरीच्या स्थापनेपासून ते सम्राट टायबीअरिअस याचा भाऊ ड्रसस याच्या मृत्यूपर्यंत तपशीलवार माहिती दिलेली आाहे. रोमच्या इतिहासाचे १४२ खंड त्याने लिहिले. रोमच्या स्थापनेपासून इ.स. पूर्व १६७ पर्यंतचा इतिहास त्याच्यामुळे उपलब्ध आहे. रोमचे प्रजासत्ताक धुळीस का मिळाले याचीही चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. समृदद्धीमुळे आलेली हाव व सुखलोलुपतेमुळे आलेले कामस्वातंत्र्य हे रोमनांचे दुर्गुणही लिव्ही टायटसने या ग्रंथात दाखवून दिले आहेत. लिव्हीच्या या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमधून जर्मन, स्विडीश, फ्रेंच, इटालिअन, रूमानिअन इत्यादी भाषात झालेली आहेत.\n\"लिव्ही टायटस याचे साहित्य\" (इंग्लिश मजकूर). प्रोजेक्ट गुटेनबर्ग.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-number-rainy-days-shrink-imd-chief-ramesh-1791", "date_download": "2018-04-23T11:51:45Z", "digest": "sha1:75JX3YPZQMKALDEQHNFQZNABAP5UGDSD", "length": 14177, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, number of rainy days shrink, IMD chief Ramesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाचे दिवस कमी; तीव्रता वाढणार\nपावसाचे दिवस कमी; तीव्रता वाढणार\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nकृषी मंत्रालयाच्या पीकपेरणीच्या अाकडेवारीवरून देशात यंदा चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत अाहे. पीक उत्पादनाचे अंदाजही सकारात्मक अाहेत.\n- डॉ. के. जे. रमेश, प्रमुख, भारतीय हवामान विभाग\nहैदराबाद ः जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे दिवस कमी होत अाहेत; मात्र पावसाची तीव्रता वाढणार अाहे. त्यासाठी भूजलाचा योग्य रीतीने वापर करा, असा सल्ला भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. जे. रमेश यांनी दिला अाहे.\nभारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात अाला. मात्र, प्रत्यक्षात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली. ज्याप्रमाणे अंदाज व्यक्त केला होता; त्यानुसार जवळपास तेवढा पाऊस झाला अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे.\nदेशात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले अाहे. कृषी मंत्रालयाच्या पीकपेरणीच्या अाकडेवारीवरून देशात चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत अाहे. पीक उत्पादनाचे अंदाजही सकारात्मक अाहेत, असे श्री. रमेश यांनी म्हटले अाहे.\nयंदा देशाच्या सकल अार्थिक उत्पन्नात (जीडीपी) कृषी क्षेत्राचे योगदान राहणार अाहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये कमी पाऊस झाला. केरळमध्येही चांगला पाऊस झाला नाही. मात्र, यंदा या राज्यांत अपेक्षित पाऊस झाला असल्याचे ते म्हणाले.\nमध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब अाणि हरियानात कमी पाऊस झाला अाहे. उत्तर पश्चिमी भागातून मॉन्सून माघारी परतला अाहे. मात्र, अद्याप तेलंगणा, अांध्र प्रदेश अाणि कर्नाटकमधून मॉन्सूनच्या माघारी परतण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही, असे श्री. रमेश यांनी सांगितले.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/viu-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-streaming.html", "date_download": "2018-04-23T11:52:53Z", "digest": "sha1:JWY2NRJW7S4I6DEMCVFWP4PFWDDPQDPE", "length": 11615, "nlines": 79, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "आम्ही अनुप्रयोग पाहिले: मोफत प्रवाह आणि निष्पाप प्रतिवादी पाहणे - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nआम्ही अनुप्रयोग पाहिले: मोफत प्रवाह आणि निष्पाप प्रतिवादी पाहणे\nशेअर करणे हे काळजी आहे\nप्रवाहित आणि भोळसटपणा प्रतिवादी पाहू (टी. व्ही. मालिका) किंवा आपल्या अन्य आवडत्या कोरियन टीव्ही Viu अनुप्रयोग विनामूल्य आपल्या Android डिव्हाइसवर किंवा पीसी पासून मालिका\nViu app helps you to instantly stream and watch your favorite movies, संगीत, टीव्ही विनामूल्य दाखवते. नाही फक्त नाटक, Viu also provides other movies genre, अशा क्रिया म्हणून, विनोदी, प्रणय, रोमांचक, भयपट, आणि बरेच काही. इंग्रजी Viu अॅप मधील सर्व चित्रपट उपलब्ध आहेत, कोरियन, अरबी, टागालोग, तामिळ, मलय, Bahasa आणि इंडोनेशिया. त्यामुळे आपण आता उपशीर्षके काळजी न करता चित्रपट पाहणे आनंद घेऊ शकता.\nम्हणून आम्ही अॅप पाहिले Android डिव्हाइस उपलब्ध आहे, आपण भोळसटपणा प्रतिवादी प्रवाहात शकता (टी. व्ही. मालिका) कुठेही जोपर्यंत आपण इंटरनेट प्रवेश म्हणून. केवळ ऑनलाइन पाहणे नाही, Viu अनुप्रयोग देखील आपण चित्रपट डाउनलोड करण्यास परवानगी देते आणि आपण ऑफलाइन त्यांना पाहू देते. या मनोरंजक नाही Viu अॅप डाउनलोड करा Android आता विनामूल्य प्ले स्टोअर मध्ये. मग, आपल्या मित्रांना कॉल, आपल्या पॉपकॉर्न झडप घालतात आणि एकत्र चित्रपट आनंद.\nदेखील वाचा: SnapTube एचडी व्हिडिओ डाउनलोडर\nAndroid साठी मूव्ही प्रवाह Viu डाउनलोड करा\nआम्ही अॅप पाहिले is available for free in the Play Store. आपल्या Android डिव्हाइसवर मध्ये प्ले स्टोअर अनुप्रयोग उघडा आणि शोध बॉक्समध्ये Viu टाइप. 'स्थापित करा क्लिक करा’ बटण आणि डाउनलोड प्रक्रियेत तातडीने सुरू. ही प्रगती काही मिनिटे लागू होईल, कृपया धीर धरा. पूर्ण प्रतिष्ठापन प्रतीक्षा करताना आपण कॉफी किंवा पॉपकॉर्न एक कप करू शकता. त्यामुळे, Viu आपल्या Android डिव्हाइसवर स्थापित करण्यात आले आहे तेव्हा, आपण कॉफी आणि popcorn सोबत आपले आवडते चित्रपट प्रवाहात तयार आहेत.\nमात्र, आम्ही देखील आपण आपल्या वेळेची बचत करण्यासाठी प्ले स्टोअर वर डाउनलोड पृष्ठावर एक दुवा प्रदान. त्वरित Android साठी Viu मूव्ही प्रवाह अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर टॅप करा.\nकाय Viu अनुप्रयोग आहे की वैशिष्ट्ये\nViu आपण आपल्या Android वैशिष्ट्य असावे सर्वोत्तम चित्रपट प्रवाह आहे. मुक्त याशिवाय, इतर प्रवाह अनुप्रयोग शकते नाही म्हणून अनेक वैशिष्ट्ये आहेत. ते काय आहेत\nचित्रपट डाउनलोड करा आणि ऑफलाइन त्यांना पाहू.\nसंगीत व्हिडिओ कधीही व कुठेही डाउनलोड करा.\nआपल्या आवडत्या व्यक्ती आधारित चित्रपट शोध.\nचित्रपट डाउनलोड करा, संगीत व्हिडिओ, आणि टीव्ही एचडी आणि SD गुणवत्ता शो.\nपुश आपण नवीनतम चित्रपट अद्यतने प्राप्त करू देते की ते प्रकाशीत योग्य नंतर सूचना.\nअनेक भाषा उपशीर्षक मिळवा.\nविराम द्या आणि आपण पाहू चित्रपट पुन्हा सुरू.\nआपल्या Android साधने चित्रपट प्ले करा, पीसी, लॅपटॉप, समान खात्यासह मॅक.\nसामाजिक मीडिया द्वारे मित्र आपल्या आवडत्या चित्रपट आणि संगीत व्हिडिओ सामायिक करा.\nजी आम्ही तुमच्यासाठी देऊ शकता सर्व Viu अनुप्रयोग पुनरावलोकन आहे. Viu देऊ की सर्व महान वैशिष्ट्ये, मी आपण सहमत आहात की आहेत Viu अनुप्रयोग Android साठी सर्वोत्तम प्रवाह चित्रपट अॅप आहे, असे मत. आता Viu अॅप डाउनलोड करा आणि आपल्या प्रिय मित्र चित्रपट आनंद.\nएक चित्रपट प्रवाह अनुप्रयोग पर्यायी आवश्यक चित्रपट ट्यूब अॅप वापरून पहा चित्रपट ट्यूब अॅप वापरून पहा तो वर भेट द्या या पृष्ठावरील.\nXen अनुप्रयोग – फाइल ट्रान्सफर आणि शेअरिंग\nआपण कोणत्याही अभिप्राय प्राप्त आनंद होत आहे. आपण Android साठी Viu काही प्रश्न असणे आवश्यक आहे, खाली टिप्पणी बॉक्स त्यांच्या हृदयावर मोकळ्या. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. खूप आनंद झाला आहे पहात\nपोस्ट डाउनलोडटॅग केले सर्वोत्तम चित्रपट प्रवाह अनुप्रयोग, सर्वोत्तम व्हिडिओ प्रवाह अनुप्रयोग, viu अॅप डाउनलोड, free korean tv series streaming app, korean movie streaming app, आम्ही अॅप पाहिले, watch korean movie online, watch korean tv series online\n3 वर \"विचारआम्ही अनुप्रयोग पाहिले: मोफत प्रवाह आणि निष्पाप प्रतिवादी पाहणे”\nzati फेब्रुवारी 22, 2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/ipl-2018-bravo-win-for-chennai-super-kings", "date_download": "2018-04-23T11:08:16Z", "digest": "sha1:FI5KA2NCUFIOAZW2NJ5PKBCEPSEJT6J5", "length": 18864, "nlines": 129, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "IPL 2018: Bravo win for Chennai Super Kings | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome क्रीडा आय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nहातातून निसटलेला सामना ड्वेन ब्रावोच्या अफलातून कामगिरीने जिंकत चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला एक गडी व एक चेंडू राखत केले चारीमुंड्या चित\nजिंकण्यासाठी १८ चेंडू, ४७ धावा आठ गडी बाद. अशी बिकट परिस्थिती असतानाही चेन्नईने ‘ब्रावो’ कामगिरी करीत मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सत्राच्या पहिल्याच सामन्यात पराजित करीत दोन वर्षांच्या बंदीनंतर आपले बिगुल बजावले.\nदोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झालेल्या चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. एरव्ही आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळणारा रोहित शर्मा आज इव्हीन लुईसला घेऊन सलामीस उतरला. लुईसचा हा आयपीएल मधला पहिला सामना होता. चेन्नईने दिपक चहरला चेंडू सोपावत डावाची सुरुवात केली. अगदी पहिल्याच चेंडूपासून चहरने रोहितला जखडून ठेवले. तर दुसरीकडे लुईस आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चहरच्या इनस्विंगचा शिकार ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तो पायचीत बाद होत आयपीएलमधला पहिला डीआरएसचा बळी ठरला. पुढच्याच षटकात रोहित शर्मा एक मोठा फटका मारण्याच्या नादात बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या अंबाती रायडूकडे झेल देत तंबूत परतला. त्याने १८ चेंडूंत एक चौकार व एक षटकार खेचत १५ धावा केल्या.\nचौथ्या षटकात दोन बाद २० अशी अवस्था असताना मुंबई इंडियन्सच्या मदतीस आले ते युवा ईशान किशन व सूर्यकुमार यादव. या दोघांनी सुरुवातीस खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी थोडा काळ संयम दाखवला आणि मग सेट झाल्यानंतर आपल्या रंगात आले. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात सूर्यकुमारने चहरला एक चौकार व एक षटकार खेचत आलेला दबाव काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला. मग आठव्या षटकात ईशान किशनने जडेजाला दोन चौकार ठोकत आपणही सेट झाल्याचं दाखवून दिलं. या दोन युवा फलंदाजांनी संयम व जागरूकता दाखवत भागीदारी रचण्यावर भर दिला. ईशान किशनने ११ व्या षटकात ताहिरला दोन चौकार व एक षटकार तर सूर्यकुमारने पुढच्याच षटकात ब्रावोला सलग तीन चौकार ठोकत रंगत वाढवली. दोघेही सेट झालेत असे दिसत असताना सूर्यकुमार यादव एक मोठा फटका मारण्याच्या नादात शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर डीप स्केअर लेगला हरभजनकरवी झेलबाद झाला. त्याने २९ चेंडूंत १ षटकार व सहा चौकारांच्या साहाय्याने ४३ धावा केल्या. दरम्यान, सूर्यकुमार यादव व ईशान किशन या जोडीने चौथ्या गड्यासाठी ५२ चेंडूंत ७८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.\nयादव व किशन पाठोपाठ बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आली ती पांड्या ब्रदर्सवर. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत मुंबई इंडियन्सला एका समानधकारक म्हणता येईल अशा धावसंख्येवर आणून ठेवले. यादव-किशन यांनी केलेल्या फटकेबाजीनंतर मुंबई १८० धावांचा पल्ला आरामात गाठेल असे दिसत होते परंतु ड्वेन ब्रावोने शेवटच्या षटकांत केलेली चतुर गोलंदाजी मुंबईला १६४ धावांवरच रोखू शकली. कृणाल पांड्या ४१ (२२ चेंडू, २ षटकार, ५ चौकार) व हार्दिक पंड्या २२ (२० चेंडू, २ चौकार) यांनी पाचव्या गड्यासाठी ३२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. चेन्नई सुपर किंग्सतर्फे शेन वॉटसन २९ धावांत २, दिपक चहर १४ धावांत १ व इम्रान ताहीर २३ धावांत १ बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. यात विशेष भर पाडली ती ब्रावोने. ४ षटकांत त्याने केवळ २५ धावा देत मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले.\nधावांचा पाठलाग करण्यास चेन्नईने वॉटसन-रायडू या जोडीला मैदानात उतरले तर मुंबईने मिचेल मॅकग्लेनेघनला चेंडू सोपवला. १६६ धावांचा आव्हान चेन्नई सुपर किंग्स आरामात पार पाडेल असे वाटले होते. वॉटसनने दुसऱ्या षटकात मुस्ताफिझूर रहमानला दोन चौकार खेचत चांगली सुरुवातही केली होती. तर चौथ्या षटकात हार्दिक पांड्याला त्याने एक्सट्रा कव्हरच्या वर षटकार खेचत चेन्नईच्या प्रेक्षकांना चांगलीच पर्वणी दिली. पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. हार्दिकने गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र नकलबॉल सुरेखरित्या वापरीत वॉटसनला जाळ्यात अडकवले. लॉन्गलेगला उभ्या असलेल्या लुईसकडे १६ धावा काढत तो बाद झाला.\nखरी कमाल चालू झाली आता. पावरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने रैनाला (४) बाद करीत चेन्नईला दुसरा धक्का दिला. मग रोहित शर्माने मयांक मार्कंडेकडे चेंडूं सोपवला आणि त्याने आपल्या कर्णधाराला नाराज न करता सलामीस आलेल्या अंबाती रायडूला (२२) धावांवर पायचीत पकडले. विशेष म्हणजे मयांकचा हा आयपीएल मधला पहिलाच सामना होता. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर धोनीही बाद होता, परंतु पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे धोनीला एकप्रकारे जीवनदान मिळाले. धोनीही अप्रत्यक्ष मिळालेल्या या जीवनदानाचा फारसा फायदा घेऊ शकला नाही आणि मयांकच्याच गोलंदाजीवर पायचीत बाद झाला.\nधोनी तंबूत परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आपली पकड आणखी मजबूत केली. रवींद्र जडेजा (१२), दिपक चहर (०) हरभजन सिंग (८) हे स्वस्तात परातल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा जणू कणाच मोडला. पण एका बाजूला उभा असलेल्या ब्रावोने एकहाती किल्ला लढवीत मुंबईला रडवले. शेवटच्या तीन षटकांत ४७ धावा असे समीकरण येऊन ठेपले होते. १८ व्या षटकात ब्रावोने मॅकग्लेनेघनला दोन षटकार व एक चौकार खेचत २० धावा कुटल्या. पुढच्या षटकात बुमरालाही तीन खणखणीत षटकार ठोकत समीकरण सहा चेंडू सात धावा असे आणले. बुमराने मात्र शेवटच्या चेंडूवर ब्रावोला बाद केले. रिटायर्ड हर्ट झालेला केदार जाधव मैदान उतरला तो सामना जिंकण्याच्या इराद्याने. मुस्ताफिझूर रहमानचे पहिले तीन चेंडू खेळून काढत चौथ्या चेंडूवर शॉर्ट फें लेगला षटकार खेचत रंगत वाढवली. मग रोहित शर्माने आपले सर्व खेळाडू ३० यार्डच्या सर्कलमध्ये आणले. पण केदारने कोणतेही दडपण न घेता कव्हर्सला चौकार खेचत हातातून निसटलेला सामना चेन्नई सुपर किंग्सला जिंकून दिला.\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t20705/", "date_download": "2018-04-23T11:34:34Z", "digest": "sha1:JWUW5MLDI6UCEP7GCLABENB6ZOYR3MKA", "length": 3252, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-बप्पा चे बोल आयका", "raw_content": "\nबप्पा चे बोल आयका\nबप्पा चे बोल आयका\nश्री गणाधिपति गणपति माझे नाव\nकैलासाच्या शिखरावर छोटे माझे गाव\nवाटायचे मला घ्यावी दरवर्षी भूतलावर धाव\nभजन झाल बंद डॉल्बिच वाटतय मला भ्याव\nराहिली का खरी भक्ति असेल तर मला दाव\nकाडुनी खोट्या वर्गन्या झाली सगळी साव\nलाज पण नाही वाटत म्हणता बप्पा मला पाव\nयेतो माझ्या दर्शना साठी रंक कोणी राव\nलगेच म्हणत कोणी बारक्या त्याला पावती बुक दाव\nत्याच गरीबच्या पैशाने रात्रि रंगतों डाव\nज्याला लागतो डाव तोच म्हणतो अरे बप्पा ला अगरबत्ती लाव\nकसे सांगू कोणाला कीती काळजाला माझ्या लागतो घाव\nतुमिच सांगा ना कस मांडु आता भू तली ठाव\nआल्यावर सारखच वाटतय लवकरच निरोप घ्याव\nनाही कोणाची भक्ति नाही श्रद्धा,नाही राहिला कोणाच्या मनी भाव\nबप्पा चे बोल आयका\nRe: बप्पा चे बोल आयका\nबप्पा चे बोल आयका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t11118/", "date_download": "2018-04-23T11:35:51Z", "digest": "sha1:5KQWY7KJA4HFOGLTOO3ZCZEFASEY62PP", "length": 11939, "nlines": 180, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-मराठी मुली..-1", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nसगळ्याच मुली काही अश्या नसतात रोहित... काही मुली अपवाद आहेत ....... तुला वाईट अनुभव आला तर तू सगळ्याच मराठी मुलींना दोष देवू शकत नाही...\n\"काय झेंडे लावलेत ह्या मराठी पोरींनी कि त्या सिंधी, गुजराती आणि मारवाडी पोरींपेक्षा सरस आहेत अजिबातच नाही..\nआम्ही बोलत नाही कि आम्ही ह्या मुलींपेक्षा सरस आहोत... सो इथे त्या मुलींसोबत आमचं comparision चा प्रश्नच येत नाही...\n\"मराठी पोरींमधल्या married मुली सोडल्या तर त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या मराठी मुलींचं record तपासून पहायचं\nएक तर पोरगी हवेतच असते काम ना धाम आणि वरून तुम्हाला तिची कमीत कमी ४ लफडी आढळून येतील\nआणि असंही नाही कि नेहमीचाच तो फक्त एक.. ऑफिस मध्ये पण एक, कोण्या क्लास मध्ये पण एक.\nआणि एकच असं काही नाही, आलाच चान्स तर एकाच ठिकाणी दोन-दोन तीन-तीन लफडी..\nआपल्या इमेजचा काय बोऱ्या वाजतोय.. आपण ह्या नगरीत किती चुकीचं गाजतोय.. काहीही नाही.. खुशाल\nआणि एवढं होऊनही काडीचाही एकनिष्ठपणा नाही.\"\nतू वर वर्णन केलेल्या मुलींच्या प्रेमात पडतातच का मग तुम्ही मुलं एक तर तुम्ही मुर्ख आहात किंवा त्या मुलीसारखाच तुम्हांला हि फक्त टाईमपास करायचा असतो एक तर तुम्ही मुर्ख आहात किंवा त्या मुलीसारखाच तुम्हांला हि फक्त टाईमपास करायचा असतो फक्त सुंदर चेहरा बघण्यापेक्षा मन बघून प्रेमात पडा ना ........ चूक तुम्ही करता आणि वर सरसकट सगळ्या मराठी मुलींना दोष देता........\nजर समोर उभा राहिलेल्या मराठी मुलानं आयुष्यात करियर घडवताना फक्त काम आणि कामच केलं असेल आणि ह्या आशेवर उभा राहिलेला असेल कि समोर उभी राहिलेली मराठी मुलगी त्याच्यासारखीच पवित्र अन एकनिष्ठ राहिलेली असेल.. काय चूक झाली त्या पोराची मराठी समाजात जन्माला येउन\nहा हा हा फक्त मराठी मुलंच नाकासमोर सरळ चालणारी असतात का एखाद्या मुलीचे मन आणि स्वभाव बघून प्रेमात पडलास तर अशी मुलगी नक्कीच मिळेल...\nहा हे मी मानते कि काही मुली खूपच चालू असतात, पण चांगल्या पण मुली आहेत, तशी नजर ठेवा, आणि प्रेमात पडताना विचारपूर्वक विचार पण करा. आणि अशी परिस्थिती असती तर प्रेम विवाह झालेच नसते\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nतू जे लिहील आहेत, ते लिहिताना दहा वेळा विचार करायला हवा होतास. उगाचच कोणालाही शिव्या घालू नयेत.\nआणि मुल किती चांगली असतात ते आजकाल पेपरातूनही छापून येतंय....त्यामुळे मुलींना दोष नको देऊस...कळल का\nआणि उठसुठ कोणाच्याही प्रेमात पडण हि तुझी चूक नाही का\nदुसऱ्यांच पावित्र्य सोड रे....स्वतःच जप जरा.\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nमला वाटतं तुला अस्सल मराठी मुलगी कदाचित भेटली नसेल\nमी खास तुझ्यासाठी म्हणून एका मराठी मुलीचे वर्णन खालील कवितेत केले आहे\nबघ तूला अशी एखादी मुलगी भेटते का\nजशी सौंदर्याची खान गं\nश्रुंगार तुझा साधाच गं\nअन पायांत वाजती पैंजण,\nजणू छेडती धुंद मधुर सूर गं\nअन डोळें मिटून लाजणं,\nगालांवर हंसू गोड गं\nकपाळी शोभती लाल कुंकू,\nसौभाग्याचं जणू मुकुट गं\nजशी सौंदर्याची खान गं\nश्रुंगार तुझा साधाच गं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/february-25/", "date_download": "2018-04-23T11:25:40Z", "digest": "sha1:WXXO3WZAWSEF62K6Y6AU2P3CBMEOTVOD", "length": 5989, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२५ फेब्रुवारी दिनविशेष | February 25", "raw_content": "\n१९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी\n१५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.\nभगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी\n१८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन\nहुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २५ फेब्रुवारी on फेब्रुवारी 25, 2013 by प्रशासक.\n← २४ फेब्रुवारी दिनविशेष २६ फेब्रुवारी दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0_(%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8)", "date_download": "2018-04-23T11:46:41Z", "digest": "sha1:BWW2WAEZS2O46HFPWG4LVJAU22QBRNPI", "length": 6260, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंद्रशेखर - विकिपीडिया", "raw_content": "\n(चंद्रशेखर (पंतप्रधान) या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे.\nक्रिकेटपटू चंद्रशेखरविषयीचा लेख येथे आहे.\nकवी चंद्रशेखर यांच्याविषयीचा लेख येथे आहे.\n११ वे भारतीय पंतप्रधान\nनोव्हेंबर १०,इ.स. १९९० – जून २१, इ.स. १९९१\nजुलै १, इ.स. १९२७\nइब्राहीमपट्टी, बालिया जिल्हा, उत्तरप्रदेश\nजुलै ८, इ.स. २००७\nसमाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nविश्वनाथ प्रताप सिंग भारतीय पंतप्रधान\nनोव्हेंबर १०, १९९० – जून २१, १९९१ पुढील:\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२७ मधील जन्म\nइ.स. २००७ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/white-chakali/", "date_download": "2018-04-23T11:25:00Z", "digest": "sha1:DWXDS47FC4AQH5XGBELJFH3KPHBZ7YY3", "length": 5566, "nlines": 151, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पांढरी चकली | White Chakali", "raw_content": "\n२५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ\n२ टे. चमचा डालडाचे मोहन\nतांदूळ धुवून कपड्यावर पसरून वाळवा.\nहरभऱ्याची डाळ लालसर रंगावर येईपर्यंत भाजा.\nनंतर दोन्ही एकत्र करून दळून आणा.\nनंतर त्यात डालडा, जिरे, हिंग व मीठ घालून पीठ भिजवा व चकल्या पाडून तळा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged चकली, डालडा, तांदूळ, पाककला, सणासुदीचे पदार्थ, हरभरा डाळ on नोव्हेंबर 11, 2012 by मराठीमाती.\n← ११ नोव्हेंबर दिनविशेष बाळ ठाकरे यांच्यावर उपचार →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-second-cloned-buffalo-success-cirb-scientist-6622", "date_download": "2018-04-23T11:30:34Z", "digest": "sha1:77TNW5FELVONXDRJNVXXBUYXCTZ4SPSP", "length": 16292, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Second cloned buffalo success by CIRB scientist | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी\nआसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वी\nरविवार, 18 मार्च 2018\nहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आसामी म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यासाठी क्लोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ‘सच-गौरव` असे या नर रेडकाचे नामकरण करण्यात आले आहे.\nहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी आसामी म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यासाठी क्लोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ‘सच-गौरव` असे या नर रेडकाचे नामकरण करण्यात आले आहे.\nकेंद्रीय म्हैस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. इंद्रजित सिंह यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंह म्हणाले, की आसामी म्हशी या केवळ ईशान्य भारतातच आढळतात. या म्हशींचा वापर प्रामुख्याने शेती कामासाठी केला जातो. केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेमध्ये ११ डिसेंबर २०१५ मध्ये क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले नर रेडकू जन्मले होते. या रेडकाचे नाव ‘हिस्सार गौरव` असे ठेवण्यात आले होते. बावीस महिन्यांच्या या नर रेडकाच्या रेतमात्रांचा वापर करून दहा म्हशींमध्ये गर्भधारणा झाली होती.\nक्लोन तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना संस्थेतील तज्ज्ञ डॉ. पी. एस. यादव म्हणाले, की आसाममधील खन्नापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील आसामी म्हशीच्या पेशींचे घटक क्लोनिंगसाठी आमच्या प्रयोगशाळेत आणण्यात आल्या. त्यानंतर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत मुऱ्हा म्हशीच्या गर्भाशयात या भृणाचे प्रत्यारोपण करण्यात आले. कमी होत जाणाऱ्या जातिवंत जनावरांच्या संवर्धनासाठी तसेच कमी कालावधीमध्ये नवीन पिढी विकसित करण्यासाठी क्लोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.\nक्लोन तंत्रज्ञानासाठी सिरसा जवळील ‘हाय टेक सच’ डेअरी फार्ममधील मुऱ्हा जातीच्या म्हशीची निवड करण्यात आली होती. या तंत्रज्ञानातून पहिले नर रेडकू २२ डिसेंबर रोजी जन्माला आले. जन्मतेवळी नर रेडकाचे वजन ५४.२ किलो होते. रेडकाच्या रक्त आणि सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या संशोधनामध्ये डॉ. एन. एल. सेलोकर, डॉ. धर्मेंद्र कुमार, डॉ. आर. के. शर्मा आणि डॉ. सुधीर खन्ना यांचा सहभाग होता.\nक्लोन तंत्रज्ञानाआधारे आसामी रेडकू 'सच-गौरव' याचा जन्म झाला असला, तरी या प्रयोगात सरोगेटेड मदर म्हणून मुऱ्हा म्हशी वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानातून येत्या काळात जातिवंत आसामी रेडे विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली.\nआसाम सिंह ईशान्य भारत भारत पशुवैद्यकीय नासा धर्मेंद्र dharmendra\nसिरसा, हरियाणा : येथील हायटेक सच डेअरी फार्ममध्ये क्लोन तंत्रज्ञानाने जन्मलेल्या आसामी रेडकू समवेत डॉ. इंद्रजित सिंह, डॉ. पी. एस. यादव, डॉ. एन. एल. सेलोकार आदी.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/government-will-take-review-online-services-understand-questions-states-meeting/amp/", "date_download": "2018-04-23T11:49:32Z", "digest": "sha1:U43KGKFT422JWMW3JLF254LYCEVRANL3", "length": 7504, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The government will take a review of the online services, understand the questions of the states in the meeting | आॅनलाइन सेवांचा सरकार घेणार आढावा, बैठकीत राज्यांचे प्रश्न समजून घेणार | Lokmat.com", "raw_content": "\nआॅनलाइन सेवांचा सरकार घेणार आढावा, बैठकीत राज्यांचे प्रश्न समजून घेणार\nलोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे केंद्र सरकारही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी रणनीती तयार करीत आहे. याचाच भाग म्हणून लोकांना सुविधा व अधिकार देणा-या आॅनलाइन सुविधांसाठी केंद्र सरकार या दोन महिन्यांत राज्यांच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठक बोलावणार आहे.\n- संतोष ठाकूर नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे केंद्र सरकारही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी रणनीती तयार करीत आहे. याचाच भाग म्हणून लोकांना सुविधा व अधिकार देणा-या आॅनलाइन सुविधांसाठी केंद्र सरकार या दोन महिन्यांत राज्यांच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठक बोलावणार आहे. आॅनलाइन सेवांवर राज्यांनी काय पावले उचलली, हे केंद्राला समजून घ्यायचे आहे. महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये विविध डिजिटल योजना सक्रिय करण्यात आघाडीवर असून, बिहारसारख्या राज्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आॅनलाइन वा डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी राज्य सरकारांनी काय पुढाकार घेतला माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट मोहिमेविषयी राज्यांचा कल कसा आहे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट मोहिमेविषयी राज्यांचा कल कसा आहे हेही पाहिले जाईल. सर्व राज्यांनी सरकारी बिले व रकमाही डिजिटली द्याव्यात, असे केंद्राने आधीच सांगितले आहे. रेशनकार्ड आधारशी जोडणे, शिष्यवृत्ती, प्रोत्साहन रक्कम अशा डिजिटल योजनांबाबत राज्यांनी काय व किती प्रगती केली, याचा संमेलनात आढावा घेण्यात येईल. केंद्र सरकारने आपली शिष्यवृत्ती-अनुदान आणि प्रोत्साहन रक्कम आधारशी जोडली आहे. त्यामुळे गेल्या सप्टेंबरअखेर ५० हजार कोटी रुपयांची दलालांच्या खिशात जाणारी रक्कम वाचवली, असा सरकारचा दावा आहे. उमंग अ‍ॅप्सवरही चर्चा च्या बैठकीत सरकारच्या उमंग मोहिमेवर चर्चा होईल. माहिती व तंज्ञज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या या अ‍ॅपमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचे अ‍ॅप्स लिंक आहेत. तथापि, काही अ‍ॅप्स काम करीत नाहीत किंवा त्यांची लिंक खुली व्हायला अडचणी येतात, अशा तक्रारी आहे. मात्र जास्तीतजास्त अ‍ॅप्स विविध राज्य सरकारांची आहेत. या संमेलनात त्यात सुधारणा करण्याचाही विचार होईल.\nमागास विद्यार्थ्यांना जेवण द्यायचे की जेवणाचे पैसे\nमानोरीत शासकीय कार्यालये झाल्या शोभेच्या वस्तू\nस्वाती मालिवाल यांनी दहा दिवसांनंतर सोडले उपोषण\nकाँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप\nआदिवासी विभागाने झटकली १२ लाख विद्यार्थ्यांची जबाबदारी\nसिटी बँकेच्या नफ्यात वर्षभरातच १.४३ कोटींची घट\nनोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर\nएकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता\nचांगल्या पावसाचे भाकीत; कंपन्या उत्साहामध्ये\nपीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/452/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%86.%20%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA", "date_download": "2018-04-23T11:31:27Z", "digest": "sha1:NK74EY7CMFNQTV7EZJGZLF77EDUG2F3X", "length": 6449, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा पुणे येथे भव्य रोड शो\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा भव्य रोड शो आज पुणे येथे आयोजित करण्यात आला. या रोड शोला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोड शोसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती तसेच ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. लोकांच्या या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला.\nमहागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हल्लाबोल ...\nसततच्या महागाईने जनता त्रस्त असून जनतेच्या सरकारविरोधातील रोषाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. पुणेकरांच्या वतीने पुण्याचे पालकमंत्री व अन्न-धान्य पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक रविंद्र माळवदकर, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बॊडके,अॅड.म.वि.अकोलकर,सुरेश बांदल, शैलेश बडदे,शशिका ...\nफर्ग्युसनची सत्यता पडताळून कारवाई करा ...\nपुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह घोषणा केल्याच्या कारणावरून सदर कॉलेजच्या प्राचार्यांनी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे, हे वृत्त समजताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच निवेदनाच्या माध्यमातून सदर घटनेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचे गैरवर्तन केलेले नसून त्यांच्यावर केले ...\nभाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश – अजित पवार ...\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कार्यकर्त्यांना आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता भाजप गुंडांचा पक्ष म्हणून ओळखला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांना तडीपार करण्यात आले आहे, ज्यांच्यावर खून, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे अशा लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयावर आरएसएसनेही नाराजी व ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=4", "date_download": "2018-04-23T11:49:02Z", "digest": "sha1:EA7474CQQ57P5BSAXFB7SGIDQDJMHKCW", "length": 3332, "nlines": 57, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n“तुला आळवीत बैसल्यें होत्यें दादा\nकाय वयनीच्या नादा गुंतलासी ॥”\n“वयनीने मोहिनी घातली म्हणून बहिणीला विसरलास ना बरे पण खुशाल आहेस ना, सारी मंडळी बरी आहेत ना बरे पण खुशाल आहेस ना, सारी मंडळी बरी आहेत ना थकलास हो दादा. तू का आजारी होतास थकलास हो दादा. तू का आजारी होतास डोळे का असे खोल डोळे का असे खोल ' किती प्रश्न ती करते. परंतु प्रेमळ भाऊ म्हणतो :\nप्रवासाचा शीण ताई नाहीं मी आजारी\nहळुवार चित्त भारी ताई तुझें ॥\nताईला पाहून हरेल सारा शीण\nभावाला बहीण अमृताची ॥\nताईला पाहून सारीं दु:खें हरपती\nहृदयी भरती प्रेमपूर ॥\nकिती दिसांनी भाऊ भाऊबीजेसाठी आलेला. बहीण मग थाट करते. परंतु ती गरीब असते. तिच्या घरात गहू नसतात. ती शेजी बाईकडे जाते :\n“शेजारणी बाई उसने द्यावे गहूं\nपाहुणे आले भाऊ फारा दिशीं ॥”\nशेजारीण नाही म्हणत नाही. सुंदर मोत्यासारखे गहू शेजी देते. बहीण दळते :\nसोनसळें गहूं रवा येतो दाणेदार\nफेण्यांचे जेवणार भाईराजा ॥\nसोनसळे गहूं त्यांत तुपाचे मोहन\nभाऊबीजेचें जेवण भाईरायाला ॥\nघरात चंदनाचे पाट आणून ती मांडते. भावासाठी काय करू, काय न करू असे तिला होते :\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/photogallery/gallery/dehu-photos/", "date_download": "2018-04-23T11:32:07Z", "digest": "sha1:COJQMNHVEMBCBD2S6VFJAE4CPKVIQEF7", "length": 4591, "nlines": 94, "source_domain": "www.marathimati.com", "title": "देहू पुणे फोटो | Dehu Pune Photos", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र फोटो गॅलरी » देहू पुणे फोटो\nलेखन: हर्षद खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑक्टोबर २०१३\nया विभागातील नवीन लेखन\nगर्जा महाराष्ट्र मराठी वॉलपेपर्स\nदिवाळीसाठी खास मराठी शुभेच्छापत्रे\nनवीन वर्ष मराठी शुभेच्छापत्रे\nविभाग महाराष्ट्र फोटो गॅलरी\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/ratalyachi-kachori/", "date_download": "2018-04-23T11:43:08Z", "digest": "sha1:TU77PPV2PWVNL5QPLRKE2F5N3SJCLL5M", "length": 6528, "nlines": 114, "source_domain": "www.marathimati.com", "title": "रताळ्याची कचोरी | Ratalyachi Kachori", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » रताळ्याची कचोरी\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८\nरताळ्याची कचोरी - [Ratalyachi Kachori] गरम गरम खायला द्याव्या,गरमा गरम कचोर्‍या फार सुंदर लागतात,रताळ्याच्या कचोर्‍या उपवासाला एकदम चांगल्या.\n१ मूठ चिरलेली कोथिंबीर\n१ वाटी खवलेले खोबरे\nरताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.\nत्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.\nरताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.\nगरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/120/%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A", "date_download": "2018-04-23T11:26:12Z", "digest": "sha1:OZNYXNPB6JY23UR6NKZLCEVRJWT5JFKP", "length": 8373, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n२३ फेब्रुवारीला सांगली कलेक्टर ऑफिसवर राष्ट्रवादीचा भव्य विद्यार्थी मोर्चा, ज्येष्ठ नेते जयंत पाटील करणार मोर्चाचे नेतृत्व\nराज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी इस्लामपूर येथे मंगळवारी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी २३ फेब्रुवारीला सांगली येथील कलेक्टर ऑफिसवर भव्य विद्यार्थी मोर्चा काढण्यात येणार असून स्वतः जयंत पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन छेडले आहे. सतत आंदेलने करूनही जर सरकार या गंभीर प्रश्नाबाबत असंवेदनशील असेल तर मंत्रालयावर २५ हजार विद्यार्थ्यांचा महामोर्चा राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येईल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम ... ...\nआज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले, प् ...\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित ह ...\nपुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - नवाब मलिक ...\nपुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - Nawab Malik महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी.महिला व बालकल्याण विभागाची पूरक पोषण आहाराची सहा हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. राज्यसरकार ज्या निविदा काढते, त्यापैकी मोठ्या किंमतीच्या या निविदा होत्या. चिक्की प्रकरणातील अनेक अनियमितता याआधीही उघड झाल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा चिक्कीपुरवठा तसेच बचत गटांना डावलून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ratnagiripolice.gov.in/frmRecruitment.aspx", "date_download": "2018-04-23T11:49:27Z", "digest": "sha1:UDAC6RHAHRM6IZFTHLMIXHTLMQ4LK6R7", "length": 5338, "nlines": 94, "source_domain": "ratnagiripolice.gov.in", "title": "Home", "raw_content": "\nसन २०१७ पोलीस भरती नियुक्ती आदेश\nरत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2017 जाहीरात\nदिनांक 22-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 23-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 24-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 25-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 27-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 29-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 30-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 31-03-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 01-04-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 03-04-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे गुणपत्रक\nरत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 मधील लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी\nदि.07/04/2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 वाद्य चाचणीचे गुणपत्रक\nदिनांक 09-04-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key)\nदिनांक 09-04-2017 रोजी घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती -2017 लेखी परीक्षेचे गुणपत्रक\nरत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2017 तात्पुरती निवड यादी\nरत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2017 निवड यादी\n“ लोकाभिमुख पारदर्शक कार्यसंस्कृती निमार्ण करणे ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=234&Itemid=414", "date_download": "2018-04-23T11:50:02Z", "digest": "sha1:C3DF4XNNKRXSAROFL37SYAZTMHRBITGQ", "length": 6646, "nlines": 64, "source_domain": "saneguruji.net", "title": "ऐतिहासिक व देशाच्या", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nस्त्रिया त्या त्या काळच्या घडामोंडींवरील ओव्या करतात. त्या घरातच गुरफटलेल्या असल्या तरी त्यांच्या कानांवर अनेक गोष्टी येतात. श्री शिवाजी महाराजाच्या या स्वराज्यस्थापनेच्या काळात अशा हजारो ओव्या मायाबहिणींवर रचिल्या असतील, झोपाळ्यांवर म्हटल्या असतील. परंतु मला ओव्या गोळा करण्यास वेळ मिळाला नाही. या प्रकरणात फारच थोडया पूर्वीच्या काळावर आहेत. शिवाजी महाराज म्हटले की, त्यांचे प्रतापगड, सिंहगड, रायगड हे किल्ले डोळ्यांपुढे उभे राहतात. शिवाजीमहाराजांचा पुत्र राजाराम सोन्याच्या पाळण्यात आंदुळला जात आहे अशी एक गोड ओवी मिळाली आहे:\nरायगडाच्या किल्ल्यावरी सोन्याचा पाळणी\nशिवाजीचा बाळ तान्हा राजाराम\nश्री शिवछत्रपती हे शंकराचे अवतार मानले जातात. जो गोरगरिबांत येतो, त्यांच्यासाठी धडपडतो, तो देवाचा अवतार. शिवाजीमहाराजांना अवतार नाही म्हणायचे तर कोणाला \nशिवाजी छत्रपति सांबाचा अवतार\nआणि ही सुंदर मार्मिक ओवी ऐका:\nवानरांकरवी राम रावणा लोळवी\nमावळ्यांच्या हातीं शत्रु शिवाजी बुडवी\nशिवछत्रपती दिल्लीहून कसे निसटून आले ती गोष्ट स्त्रियांच्या कानावर गेली आहे. ती मोठीच ऐतिहासिक घटना होती. ती गोष्ट क्षणात महाराष्ट्रभर पसरली असेल व शिवाजीमहाराज येथे थांबले होते, तेथे उतरले होते अशा दंतकथा गावोगाव उत्पन्न झाल्या असतील:\nखाऊच्या निमित्तें बादशहा फसविलें\nशिवाजी बसून आले पेटार्‍यांत\nशिवाजीमहाराजांचे धन्य ग धाडस\nभवानी आईचे तो ग लाडगे पाडस\nभवानी-माता शिवाजीमहाराजांना सांभाळीत होती. जनतेसाठी धाडस करणार्‍याला देव आशीर्वाद देतो. अशा धाडसाला समर्थांनी “श्रेष्ठ धारिष्ट” असे म्हटले आहे. शिवाजीमहाराज भवानी-मातेचे लेकरू असे या ओवीत म्हटले आहे. ते वाचून हृदय सद्‍गदित होते.\nआणि आता शिवछत्रपतीच्या किल्ल्याचे महत्त्व ऐका:\nशिवाजीचे किल्ले किल्ले ना, ती तो किल्ली\nज्याच्या हाती तो जिंकी दिल्ली उत्तरेची\nशिव छत्रपति धन्य ग धन्य राजा\nपोटच्या पुत्रापरी पाळिली त्याने प्रजा\nदळितां कांडीता तान्हेबाळ आंदुळीतां\nमराठ्यांच्या इतिहासात पहिले बाजीराव व चिमाजीअप्पा म्हणजे राम-लक्ष्मणांची, भीमार्जुनांची जोडी त्यांचे परस्परांवर किती प्रेम त्यांचे परस्परांवर किती प्रेम चिमाजीअप्पा आपल्या पत्रांतून बाजीरावांचा उल्लेख “राया” अशा गोड शब्दांनी करतात. आणि वसईच्या संग्रामाचा तो वीररसपूर्ण अमर प्रसंग :\nचिमणाजी बाजीराव हे दोघे सख्खे भाऊ\nम्हणती वसई घेऊं एका रात्रीं\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=396&Itemid=587", "date_download": "2018-04-23T11:40:41Z", "digest": "sha1:CPBAEH2ZMUDUXUS3IS3COKVZJEIFHYF6", "length": 8328, "nlines": 38, "source_domain": "saneguruji.net", "title": "सार्वजनिक कामगिरी", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nफिलॅडेल्फिया शहरांत एक संघ स्थापन करावा असें बेंजामिनच्या मनांत घोळू लागलें. मनांत कल्पना आली कीं ती कृतींत आणण्यासाठीं बेंजामिन लगेच धडपडूं लागे. संघ एक दिवस स्थापन तर झाला. या संघांत प्रथम १२ च लोक होते. या संघाच्या बैठकी भरत व निरनिराळे विषयांची तेथें चर्चा होई. या संघाच्या बैठकी भरत व निरनिराळे विषयांचीं तेथें चर्चा होई. धार्मिक, सामाजिक वाड्मयविषयक, शास्त्रीय अशा तत्वात्मक व व्यवहारात्मक सर्व गोष्टींची येथें चर्चा होई. बेंजामिन निरनिराळया सुंदर व स्वतंत्र कल्पना, व नवीन विचार या सभेंतील सर्वासमोर मांडी. मग त्यांवर वादविवाद, सूचना वगैरे येत. बेंजामिन या सभांतील चर्चाची हकीगत आपल्या वृत्तपत्रांतून जाहीर करी.\nया सभेमधील कामाची लोकांस जसजशी माहिती होऊं लागली, तसतसे या सभेचे सभासद होण्याबद्दल लोक फार उत्सुक झाले. परंतु १२ च सभासदद घ्यावयाचे अशी अट असल्यामुळें सभासदांची संख्या वाढवितां येईना व त्यामुळें लोक असंतुष्ट झाले. शेवटीं बेंजामिन यानें एक खाशी युक्ति काढली. तो म्हणाला आपल्या १२ सभासदापैंकी प्रत्येकानें निराळा १२ जणांचा संघ स्थापन करावा. आपण एकत्र आल्यामुळें जसा आपणांस फायदा होतो, तसा फायदा या रीतीनें १४४ जणांस मिळेल. बेंजामिनची ही कल्पना सर्वास आवडली व अनेक विचारप्रवर्तक संघ त्या लहानशा शहरांत स्थापन झाले. या सर्व संघाची सामुदायिक बैठक मधूनमधून भरत असे. त्यांचीं संमेलनें पण होंत असत.\nही सभा जी असे ती केवळ निरर्थक गप्पांसाठीं नसें. या ठिकाणीं निरनिराळे महत्वाचे प्रश्न बेंजामिन उपस्थित करी. या प्रश्रांचा प्रत्यक्ष व्यवहारांत फायदा होईल इकडे बेंजामिनचें लक्ष असे. तो केवळ कल्पनासृष्टींत रमणारा नसून वस्तुस्थितींत कल्पना मूर्तिमंत आणणारा होता. त्यानें आपल्या सभेंत पुढील चार गोष्टींची चर्चा केली.\n१. फिलॅडेल्फिया शहरांतील रस्ते सुधारणें, ते विटांचे करणें; रात्री दिवे रस्त्यावर लावण्याची व्यवस्था करणें.\n३. अग्निसंरक्षक संघ स्थापन करणें.\n४. रात्रीच्या वेळीं शिपायांचा पहारा असण्याची व्यवस्था करणें व या पहा-यासाठीं उत्पन्नाप्रमाणे कर बसविणें.\nया सुधारणांसंबंधी जी चर्चा खासगी बैठकीत होई तो बेंजामिन वृत्तपत्रांत प्रसिध्द करी. वृत्तपत्रांत त्या सुधारणांचा सर्व दृष्टीने तो विचार करी, व लोकांचें मन वळविण्याचा प्रयत्न करी. हळुहळु बेंजामिनच्या प्रयत्नानें वरील सुधारणा अंमलांत आल्या. आग लागली असतां ती विझविण्यास जाण्यासाठी ही संघस्थापनाची कल्पना मोठी अपूर्व हाती. बेंजामिनच्या या कल्पनेपासूनच हल्लींचे ' फायरब्रिग्रड ' खातें निघालें. रात्रीं गस्त घालणें वगैरे प्रकार अमेरिकेंत बेंजामिननेंच प्रथम चालू केले.\nया अत्यंत महत्वाच्या चार सुधारणा केल्यानंतर त्याचें लक्ष शिक्षणाकडे वळलें. लहान मुलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे होती. या कामासाठी पांच हजार पौंड रकमेची जरूरी होती. बेंजामिननें एक पत्रक छापून काढलें व तें प्रमुख लोकांकडे पाठवून दिलें. ही रकम गोळा झाली व बेंजामिननें शाळा सुरूं केली. विद्यालयाचें कांही वर्षानीं महाविद्यालय (कॉलेज) पण निघालें व हल्लींची जी फिलॅडेल्फिया युनिव्हसिर्टी आहे ती या लहानशा शाळेंतूनच जन्मास आली.\nबेंजामिन फ्रँकलिन याचें चरित्र\nस्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/editorial", "date_download": "2018-04-23T11:21:54Z", "digest": "sha1:XGIHJCMPK3RRIW5KJ5YKMDTGEGXEJV3S", "length": 9491, "nlines": 111, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "संपादकीय | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\n“युवा सह्याद्री महाराष्ट्राला अर्पण”\nमहाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला\nसाप्ताहिक युवा सह्याद्री वृत्तपत्राच्या वतीने सप्रेम सविनय जय महाराष्ट्र \nतसे पाहता साप्ताहिक युवा सह्याद्री वृत्तपत्राची सुरूवात १ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आली. एकूणच महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक आणि गुन्हेकारी परिस्थिती पाहता, मराठी माणसांवर होणारे अन्याय, शेतकरी बांधवांच्या होणार्या आत्महत्या, महिलांवरिल होणारे अत्याचार, वाढती बेरोजगारी, राजकिय वरदहस्ताने होणारे असंख्य महा घोटाळे…..हे सर्व पाहात असतांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण देखील ज्या समाजामध्ये राहतो, वावरतो त्या आपल्या समाजासाठी काही तरी केलेच पाहिजे, याच ऊदात्त हेतूने प्रेरीत होऊन “युवा सह्याद्री” वृत्तपत्राची सुरुवात केली….\nआज तमाम महाराष्ट्रीय मराठी जनतेला अभिमानाने सांगावेसे वाटते कि, “युवा सह्याद्री” हे आपले वृत्तपत्र आम्ही आपल्या सेवेसाठी “ऑनलाइन” रुपात आणले आहे…..आणि हे सर्व सहज शक्य झाले, ते आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने, आमच्या बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने आपली सेवा समजून आम्हाला सहकार्य करणार्या आमच्या सहकारी बांधवांमुळे, तसेच आमच्या हितचिंतकांमुळेच. त्यामुळे आम्ही खरोखरच सर्वांचे आभारी आहोत.\nआम्ही तमाम मराठी जनतेला “युवा सह्याद्री” वृत्तपत्राच्या वतीने असे आवाहन करतो कि, आपल्यावर जर अन्याय होत असेल, आपल्या विभागातील काही सरकारी कामे होत नसतील तर, ऊचला लेखणी अन्याया विरोधात आणि आपल्या समस्या आमच्या yuvasahyadri@gmail.com वर मेल करा, आम्ही आपल्याला न्याय देण्याचा नक्किच प्रयत्न करू. नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे. आम्ही आपल्या “युवा सह्याद्री” वृत्तपत्राच्या वतीने जाहिर आवाहन करतो कि, जागरूक तथा सामाजिक बांधिलकी जोपासण्यास इच्छुक असणार्या व्यक्तिंनी “पत्रकार” होऊन आम्ही हाती घेतलेल्या या सामाजिक कार्याला हात-भार लावावा..\nजय हिन्द, जय महाराष्ट्र \nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/konkan", "date_download": "2018-04-23T11:24:45Z", "digest": "sha1:LJOHD7IX2PPI6ESUQV6GCHVT5FGUKL47", "length": 9691, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "कोंकण | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहा: कोंकण रेल्वेमुळे रोहे नगरीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. रोहे हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत हे महत्वाचे केंद्र आहे.मध्...\tRead more\nसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबलावणी करावी – राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय\nपालघर : राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतीकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विहीत वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याब...\tRead more\nभालगाव विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न\nद. ग. तटकरे मा. वि. भालगाव शाळेला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्त साधत शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केला होता भव्य दिव्य कार्यक्रम विशेष प्रतिनिधी, रोहा: तालुक्यातील...\tRead more\nवेध सह्याद्री खोपोली तर्फे “किल्ले प्रतिकृती” स्पर्धेचे आयोजन\nवर्ष:- पाचवे ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’. गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आप...\tRead more\nकलंबोलीत करोडोंचा गंडा घालणाऱ्या जीओ इंडिया फायनान्स कंपनीचे रॅकेट गजाआड\nपरशुराम भोपी / कळंबोली: जिओ इंडिया नावाने बोगस फायनान्स कंपनी चालवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कळंबोलीतील पंचतारांकीत देवांशी हॉटेलवर...\tRead more\nमाणगाव पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी, ४१०५ किलो गोवंश मांस जप्त\nप्रशांत सुतार / माणगाव: माणगाव पोलिस ठाण्यातील पी.आय.परदेशी साहेब, ए.पी.आय.जगताप साहेब, पी.एस.आय. वारे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांनी काल रात्री उशीरा संशयास्पद पीक अप...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t17745/", "date_download": "2018-04-23T11:32:44Z", "digest": "sha1:E5YLZW2PAMAXQTUD675AGF7UYMW62C3H", "length": 6679, "nlines": 167, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा -1", "raw_content": "\nशेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nAuthor Topic: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा (Read 15435 times)\nशेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nभर दिवसा अंगावर घेते\nहे रॉकेल ची कॅन दादा\nपोरगं झालं जान दादा\nअघळ पघळ तेल देते\nपोरगं झालं जान दादा\nपांढऱ्या ओढनीवर मार्कर घेऊन\nलिहिते आय लव्ह यु जान दादा\nखाली कंसात लिहून टाकते\nतू मान या ना मान दादा\nपोरगं झालं जान दादा\nशेजारनिले पोरिसगट मजुरीने नेते\nशेजारनिले धुर्यावर, पोरीला मधात पाथ देते\nअन तिच्याच पाथत पाथ घेऊन\nतिला निंदू लागते राण दादा\nपोरगं झालं जान दादा\nकापूस वेचता वेचता याची\nजीभ चभर चभर चालते\nम्हणते बोंडे किती छान दादा\nपोरगं झालं जान दादा\nवाट लावली या पोराने\nआता मी सुद्ध्या माझ्या बायकोला\nआली जवानीची जान दादा\nवावर पिकलं छान दादा\nशेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nRe: शेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\nशेजारणीच्या पोरीपायी , पोरगं झालं जान दादा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=228&Itemid=407&limitstart=6", "date_download": "2018-04-23T11:49:55Z", "digest": "sha1:ESWKUEWRE22BVV5TQXBEIJBO4VXMGI75", "length": 3969, "nlines": 61, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहिण-भाऊ", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nभावजयीचे वर्तन पाहून बहिणीला वाईट वाटते. आपल्या भावाला वैनी बोलते हे पाहून बहीण कष्टी होते :\nगोर्‍ये भावजयी नको बोलू एकामेकी\nहळुवार भाईराया चंद्र कोमेजेल एकाकी ॥\nगोर्‍ये भावजयी किती उर्मट बोलणें\nमन दुखवीलें माझ्या भावाचें कोवळें ॥\nगोर्‍ये भावजयी किती बोल रागाचे\nफूल कोमजलें देवा शिवशंकराचें ॥\nगोर्‍ये भावजयी किती बोल अहंतेचे\nफूल कोमेजलें भाईराय ममतेचें ॥\nवैनी उभ्या उभ्या कुंकू लावते. नीट बसून प्रेमाने सौभाग्यतिलक लावीत नाही. कपाळीच्या कुंकवाची सुध्दा वैनी अशी हयगय करते हे पाहून बहिणीचे हृदय चरकते. ती म्हणते :\nवैनीबाई भावजये नको उभ्याने कुंकू लावू\nनवसाचा माझा भाऊ किती सांगूं ॥\nघरी दोन दिवस बहिणी आलेल्या. भावाला वाटते कौतुक करावे. परंतु त्याच्या पत्‍नीला राग येतो. बहिणी कशाला लुटायला आल्या असे ती म्हणते :\nभाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटीला\nभावजया ग म्हणती आल्या नणंदा लुटीला ॥\nभाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट\nभावजया ग म्हणती धरा नणंदा आपुली वाट ॥\nबहिणी मनी म्हणतात, “आपण वैनीपासून अपेक्षा तरी का करावी किती झाले तरी परक्या घरून ती आलेली :”\nमाउलीची माया काय करील भावजयी\nपाण्यावीण जाईजुई सुकतील ॥\nआईबापांच्या राज्यांत खाल्या दुधावरल्या साई\nभावजयांच्या राज्यांत ताक घेण्या सत्ता नाहीं ॥\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/olya-kajuchi-bhaji/", "date_download": "2018-04-23T11:42:06Z", "digest": "sha1:6OWJ64VX4QKIVHYOJ5MXIAIDFMD6574F", "length": 6727, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "ओल्या काजूची भाजी | Olya Kajuchi Bhaji", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » ओल्या काजूची भाजी\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८\nओल्या काजूची भाजी - [Olya Kajuchi Bhaji] मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करुन कोकणात केली जाणारी ‘ओल्या काजूची भाजी’ उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावी.\nपाव किलो सोललेले ओले काजूगर\nअर्धा ओला नारळ किसून\nकाजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.\nप्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे.\nचांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.\nनंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात.\nउतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9A.%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T11:51:28Z", "digest": "sha1:T5YPWPUZ7OHCXN5LBNZME2WTCKDM4KUT", "length": 5104, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एच.एम.एस. करेजस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएच.एम.एस. करेजस तसेच एच.एम.एस. करेजू नावाच्या रॉयल नेव्हीच्या अनेक युद्धनौका होत्या.\nएच.एम.एस. करेजू (१७६१) - ७४ तोफांची फ्रेंचांकडून काबिज केलेली युद्धनौका. १७९६मध्ये मोरोक्कोजवळ बुडाली.\nएच.एम.एस. करेजू (१७९९) - करेजूस या नावानेही ओळखली जाणारी ही ३२ तोफांची फ्रिगेट फ्रेंचांकडून जून १७९९मध्ये काबिज केली गेली. नोव्हेंबरमध्ये याचे नामकरण एस.एम.एस. लुटाइन करण्यात आले व तिचा उपयोग तरंगता तुरूंग म्हणून करण्यात आला. एप्रिल १८०२मध्ये विकून टाकली.\nएच.एम.एस. करेजू (१८००) - १८०० मध्ये बांधलेली ७४ तोफांची युद्धनौका. १८१४मध्ये निलंबित करण्यात आली व नंतर क्वारंटाइन नौका म्हणून वापरली गेली. १८३२मध्ये मोडीत काढली गेली.\nएच.एम.एस. करेजस (५०) - क्रुझर म्हणून बांधणी झालेल्या नौकेचे १९२४मध्ये विमानवाहू नौकेत रुपांतर करण्यात आले. सप्टेंबर १९३९मध्ये यु-२९ने या नौकेस बुडवले.\nएच.एम.एस. करेजस (एस५०) - १९७१ ते १९९३ दरम्यान सेवारत असलेली पाणबुडी. सध्या प्लिमथ येथे नांगरलेली आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-bubnal-shirol-dist-kolhapur-6294?tid=163", "date_download": "2018-04-23T11:36:00Z", "digest": "sha1:NO3AWSXTHGA75YBWWBH42LTHRNVHU6KF", "length": 25941, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Bubnal, Shirol, Dist Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय पातळीवर\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय पातळीवर\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय पातळीवर\nगुरुवार, 8 मार्च 2018\nकोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील पुरुषांनी सत्तेच्या महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम देत गावची पूर्ण सत्ता महिलांकडे बिनविरोध सोपविली. गावचे रुपडे पालटण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची सदस्यपदी निवड करून महिलांच्या हाती सत्ता देण्याचा हा प्रयत्न गावासाठी विकासाची दारे सहज खुली करण्यास कारणीभूत ठरला. गावाच्या या क्रांतीकारी निर्णयाची दखल परदेशांतही घेतली गेली.\nकोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील पुरुषांनी सत्तेच्या महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम देत गावची पूर्ण सत्ता महिलांकडे बिनविरोध सोपविली. गावचे रुपडे पालटण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची सदस्यपदी निवड करून महिलांच्या हाती सत्ता देण्याचा हा प्रयत्न गावासाठी विकासाची दारे सहज खुली करण्यास कारणीभूत ठरला. गावाच्या या क्रांतीकारी निर्णयाची दखल परदेशांतही घेतली गेली.\nकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील बुबनाळ हे तीन हजार लोकसंख्येच गाव. श्री क्षेत्र नृसिंहवाडीपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. उसासह अन्य नगदी पिकात पुढारलेल्या या गावात मोठा राजकीय सत्तासंघर्ष होता. प्रत्येक गावात असणारे वाद या गावात होतेच; पण त्याची टोकाची परिसीमा गाठली होती.\nगावातील राजकारण सगळ्या ग्रामस्थांच्या आयुष्यावर परिणाम करणारे ठरत असते. याच राजकारणाचा बळी बुबनाळ हे गाव ठरले होते. राजकीय संघर्षातून वैयक्तिक ईर्ष्या, वादावादी व पर्यायाने सर्वांचेच नुकसान याचा अनुभव या गावाने घेतला. यामुळे गावचे भवितव्यच अंधकारमय बनले. अखेर यातून काही गवसणार नाही याची कल्पना आल्याने काही लोकांनी एकत्र येऊन सुकाणू समिती बनविली. त्यातूनच गावच्या विकासाला चालना मिळाली.\nगावाची सत्ता बिनविरोध महिलांच्या हाती\nसुकाणू समितीने समझोत्याचा निर्णय घेतल्यानंतर २०१० ला पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. हा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर २०१५ च्या निवडणुकीवेळी सर्वच सत्ता महिलांच्या हाती देण्याच्या निर्णय घेण्यात अाला. अकरा जणांच्या सदस्यात ६ महिला जागा होत्या. यामुळे उर्वरित ५ जागाही महिलांनाच देऊया अशी कल्पना आली आणि अनपेक्षितपणे मंजूर झाली. यामध्ये इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी गावच्या इच्छेपुढे त्यांनी मोठेपणा दाखविला.\nसर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना संधी\nउमेदवार निवडतानाही पारदर्शीपणा दाखवित प्रस्थापित राजकारणी किंवा वारसांना सदस्यपदी घ्यायचे नाही, असे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना ग्रामपंचायतीत सदस्यपदी निवडण्यात अाले. अकरा जणांच्या यादीत सर्वधर्म समभाव जपत गावातील बहुतांशी समाजाला प्राधान्य देऊन समतोल साधण्यात आला आहे.\nपुरुषांनाही घेतले कारभारात सामावून\nगावचा कारभार महिलांच्या हातात दिल्याने त्या काय करतील याची उत्सुकता होती. महिलांनी गावातील पुरुषांची वेळोवेळी मदत घेऊन त्यांनाही गावच्या कारभारात सामाऊन घेत एकत्रित काम करण्याला प्राधान्य दिले. यामुळे जेवढी कामे शक्‍य आहेत तितकी कामे महिलांकडून होऊ लागली. महसूल व इतर किचकट कामासाठी पुरुषांचीही मदत घेण्यास महिलांना कमीपणा वाटत नसल्याने एकत्रित कामाचा सुरेख मेळ गावाने साधला. विविध प्रशिक्षणासाठी निधी आरक्षित करून महिलांना प्रशिक्षित करण्यास ग्रामपंचायतीने सुरवात केली. या अगोदर ग्रामसभाच होत नव्हत्या. झाल्या तर तंटा, वाद ठरलेलेच. परंतु अाता ग्रामसभाही शांततेत व्यवस्थीत होत आहेत. त्यामुळे गावात एकीचे वातावरण तयार झाले आहे.\nमोबाइल संदेशावरून ग्रामसभेची निमंत्रणे\nगावातील नागरिकांना ग्रामसभेचे निमंत्रण मॅसेजवरून दिले जाते. एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत याबाबतचे मॅसेज पोचविण्यची व्यवस्था ग्रामपंचायतीकडे आहे. याशिवाय ग्रामपंचायत सदस्यांचा बुबनाळ महिलाराज या नावाचा व्हॉटसअॅप ग्रुपही कार्यान्वित आहे. यामध्ये सभांचे निरोपांची देवाणघेवाण केली जाते. गावातील मराठी शाळेतील पटसंख्याही वाढली आहे.\nगावाच्या विकासात विविध लोकप्रतिनिधींचा सहभागगावात महिलाराज आहे हीच मुळात कौतूकाची गोष्ट असल्याने गावाला निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळत अाहे. खासदार राजू शेट्टी यांनी हे गाव दत्तक घेतले. गावच्या विकासकामासाठी ५ कोटी ४३ लाखांचा विकास आराखडा मंजूर केला. आमदार उल्हास पाटील यांनी ७५ लाखांना निधी गावच्या विकासकामासाठी दिला. माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांनी पाच लाख रुपयांची शुद्ध पेयजल योजना मंजूर केली. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी गावच्या स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्री पुरविली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुद्ध पेयजल योजनेसाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत.\nविविध उपक्रमांत गाव बनले अग्रेसर\nशाळेमध्ये डिजिटल क्‍लासरूमची सोय.\nगावात लोकसहभागातून वृक्ष लागवड, बेटी बचाव उपक्रम.\nगावाला निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम पुरस्कार.\n२०१६-१७ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्मार्ट ग्राम योजनेतही बक्षीस.\nगावात विकासकामे सुरू करताना कामाचा ठेका गावातील तरुणांनाच दिला जातो. मात्र यासाठी तो पात्र असेल याची खबरदारी घेतली जाते. यामुळे गावातील तरुणांना स्वत:च्या गावच्या विकासकामात सहभागी होण्याची संधीही या निमित्ताने मिळत आहे.\nमहिलांकडे गावचा कारभार सोपविल्याने प्रभावित झालेले मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गावाला भेट देऊन विकासकामाची पहाणी करून माहिती घेतली. युरोपमधील माल्टा या देशात नुकतीच राष्ट्रकुल स्वराज्य शासन मंचची परिषद झाली. यामध्ये सहारिया यांनी बुबनाळची माहिती उपस्थितांना सांगितली. यामुळे तेथे उपस्थित असणारे ५३ देशांचे प्रतिनिधी प्रभावित झाले. या गावच्या पहाणीसाठी संयुक्त राष्ट्र महिला महासंघ, यांच्याबरोबर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका मालदीव येथील प्रतिनिधीही भेट देणार आहेत.\nसरपंच होण्याअगोदर राजकारणाचा कसलाच गंध नव्हता; पण गावाने माझ्याबरोबरच माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर महिला सदस्यांनाही सन्मान देऊन विधायक निर्णय घेतला. यामुळे आमच्यात मोठा आत्मविश्‍वास निर्माण झाला. आता आम्ही स्वत: निर्णय घेवू शकतो. पण हे निर्णय घेताना पुरुष तज्ज्ञ मंडळींचाही सल्ला घेतो ,पण अंतिम निर्णय आमचा असतो. यामुळेच निवडून आल्यापासून आम्ही व्यवस्थित कारभार करत आहोत.\n- सौ. आसमा जमादार, सरपंच, ७५५८४४४६७४\nकोल्हापूर महिला विकास राजकारण ग्रामपंचायत निवडणूक उपक्रम\nमहिला सदस्य झाल्यापासून महिला जनजागृती उपक्रमात वाढ झाली अाहे.\nगावामध्ये सिमेंट क्राॅंक्रीटच्या रस्त्यांबरोबरच स्वच्छतेवर भर देण्यात अाला आहे.\nगावात इकोफ्रेंडली गणपती मूर्तीनिमिर्तीसारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास सुरवात झाली.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nगॅस्ट्रो आजारामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे...\nनंदाताई दूधमोगरे यांचा शेतीत असाही...बुलडाणा : स्त्री ही समाजात त्याग, नम्रता,...\nमहिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली...शेतीमध्ये हिरवं स्वप्न फुलविण्यात महिलांचे योगदान...\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील...\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल...दिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि....\nशेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...\nप्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची...निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक...\nमहिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगसोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे,...\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nमहिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण,...महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nव्यवहारांच्या नोंदीसाठी पासबुक...पासबुकमध्ये आपण खात्यामध्ये ठेवलेल्या पैशांची...\nगांडूळ खत निर्मिती उद्योगगांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत...\nमहिला बचत गटांनी साधली शेळीपालनातून...काळोशी (ता. जि. सातारा) गावातील महिलांनी एकत्र...\nबॅंक खाते नंबर महत्त्वाचा...राधाच्या मदतीनं खातं निघालं नि त्यात आपले...\nशासनाच्या महिला उद्योग धोरणातील तरतुदीमहिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nलाँड्री व्यवसायातून गवसला ‘तनिष्कां'ना...सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7145342", "date_download": "2018-04-23T11:49:54Z", "digest": "sha1:HGXU3URXHOHIZB2WA7BNFTCLJXEN6RXM", "length": 5182, "nlines": 47, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "खाते-आधारित विपणन काय आहे आणि आपण ते कसे वापराल? | Ep. # 164", "raw_content": "\nखाते-आधारित विपणन काय आहे आणि आपण ते कसे वापराल\nएपिसोड # 164 मध्ये, एरिक आणि नील ह्यावर चर्चा करतात की खाते-आधारित विपणन काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा. मार्केटिंगसाठी जुने, प्रयत्न आणि सत्य पध्दतीसाठी Semaltेट विपणन हे नवीन शब्द आहे. खाते-आधारित विपणन आणि आपल्या लक्षात घेण्यासारख्या गोष्टींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ट्यून इन करा\n00:27 - आजचे विषयः खाते-आधारित विपणन काय आहे आणि आपण त्याचा कसा फायदा घेऊ शकता\n00:36 - अकाऊंट-आधारित मार्केटिंगमुळे तुम्ही वेळेच्या अगोदर आदर्श संभावना ओळखू शकता\n01:15 - अचूक सूचना बघण्यासाठी इनबाउंड एसडीआर घ्या\n01:33 - इन्फरफेस हा सॉफ्टवेअर सोल्यूशन आहे ज्यामुळे हे ठरवण्यात मदत होते की आपल्या सर्वात मौल्यवान लीड्स आहेत\n02:54 - आपण लीड्सवरील प्रतिसाद आणि मनोरंजनासाठी आपले विपणन प्रयत्न खर्च करु शकता\n03:16 - इन्फरची किंमत तुमच्या आकारावर अवलंबून असते\n03:24 - लीड फॉर्म काही पृष्ठांवर पसरलेल्या 15-16 प्रश्नांसह कार्य करतात\n04:06 - अॅल ऍपल मार्केट लाईव्ह लोकाचा वापर करणार्या लोकांसाठी काम करतो आणि योग्य लीड्स शोधण्यासाठी वेबवर ते ओलांडू शकते\n04:44 - क्लियरबिट आपल्याला आपल्या सूचीतील लोकांची माहिती दर्शवेल\n05:12 - अकाऊंटवर आधारित मार्केटिंगसाठी Funnelholic चे अनुभव\n05:44 - पैसे कमविण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात गरजेची गरज नाही-आपल्याला पात्र लीड्सची आवश्यकता आहे\n06:24 - हा आजच्या प्रकरणांसाठी आहे\nखाते-आधारित विपणन अधिक सामान्य होत चालले आहे, तरीही ते कित्येक वर्षांपासून आहे\nआपल्या लीड फॉर्मवरील 2 प्रश्नांसह प्रारंभ करा, नंतर लोकांना प्रतिसाद मिळविण्यासाठी हळूहळू अधिक तपशीलवार प्रश्नांची मागणी करा\nQUALITY वर लक्ष केंद्रित करणे लीडरच्या संख्येनुसार नाही\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खालील टिप्पण्या आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://roesslerlinie.de/hi/aktuelle-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%82/", "date_download": "2018-04-23T11:20:37Z", "digest": "sha1:VB4Y6AKLHA7OS4D5WK7AB44Z6F525KOZ", "length": 10482, "nlines": 164, "source_domain": "roesslerlinie.de", "title": "हाल की घटनाएँ « RÖSSLER लाइन", "raw_content": "\nरोमांटिक नाव मध्य राइन पर और सवारी नाव यात्रा\nनाव पर स्वागत है\nजहाजों, क्षेत्र और इतिहास\nटूर ऑपरेटर, क्लब और समूह\nछुट्टी – परिवार – टिकट\nधनुष लहरों & क्रिसमस कहानी\nहमें कैसे को खोजने के लिए\nटूर ऑपरेटर, क्लब और समूह\nहमें कैसे को खोजने के लिए\nजहाजों, क्षेत्र और इतिहास\nजहाजों, क्षेत्र और इतिहास\nRoessler रेखा (करने के लिए 1960)\nमध्यम राइन घाटी क्षेत्र\nहमें कैसे को खोजने के लिए\nहमें कैसे को खोजने के लिए\nयहाँ का मालिक blogt\nRüdesheim में वर्तमान घटनाक्रम, Assmannshausen, Bingen और हमारे जहाजों पर पूरे Rheingau\nयहाँ कुछ घटनाओं की संख्या का मुख्य आकर्षण, die wir auf unseren Schiffen in Rüdesheim, Assmannshausen और Rheingau की पेशकश की है और हम विशेष रूप से बात करने के लिए जो करना चाहते हैं.\nआनंद लें एक 1.5 घंटे की यात्रा के दौरान 4 वाइनरी के तहखाने डॉ. VDP से वाइन. Nagler, स्वयं winemakers द्वारा टिप्पणी. वहाँ भी एक ताजा एक प्रकार की रोटी और Rüdesheim से एक स्मारिका गिलास वाइन है.\nआनंद लें एक 1.5 घंटे की यात्रा के दौरान 4 वाइनरी के तहखाने डॉ. VDP से वाइन. Nagler, स्वयं winemakers द्वारा टिप्पणी. वहाँ भी एक ताजा एक प्रकार की रोटी और Rüdesheim से एक स्मारिका गिलास वाइन है.\n9. जुलाई 2018 से 17:10 घड़ी\nआनंद लें एक 1.5 घंटे की यात्रा के दौरान 4 वाइनरी के तहखाने डॉ. VDP से वाइन. Nagler, स्वयं winemakers द्वारा टिप्पणी. वहाँ भी एक ताजा एक प्रकार की रोटी और Rüdesheim से एक स्मारिका गिलास वाइन है.\n5. अगस्त 2018 से 14:30 घड़ी\nलपटें Koblenz में राइन\nआनंद लें एक 1.5 घंटे की यात्रा के दौरान 4 वाइनरी के तहखाने डॉ. VDP से वाइन. Nagler, स्वयं winemakers द्वारा टिप्पणी. वहाँ भी एक ताजा एक प्रकार की रोटी और Rüdesheim से एक स्मारिका गिलास वाइन है.\n10. सितंबर 2018 से 17:10 घड़ी\nआनंद लें एक 1.5 घंटे की यात्रा के दौरान 4 वाइनरी के तहखाने डॉ. VDP से वाइन. Nagler, स्वयं winemakers द्वारा टिप्पणी. वहाँ भी एक ताजा एक प्रकार की रोटी और Rüdesheim से एक स्मारिका गिलास वाइन है.\n3. नवंबर 2018 से 14:00 घड़ी\nके रूप में डिफ़ॉल्ट भाषा सेट करें\nविश्व विरासत स्थल मध्य राइन घाटी अनुभव\n09:00 घड़ी से मानचित्र तक Bingen\n17:10 घड़ी से मानचित्र तक Rüdesheim\n17:10 घड़ी से मानचित्र तक Rüdesheim\nकॉपीराइट © 2018 RÖSSLER लाइन - सभी अधिकार सुरक्षित\nद्वारा संचालित ROESSLER संचार के लिए पीआर एजेंसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/4267776", "date_download": "2018-04-23T11:48:25Z", "digest": "sha1:O47L3XI33RVYSX7Y5KSERPUEUAAHOGZK", "length": 14659, "nlines": 50, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मिमलॅटवर नकारात्मक टिप्पण्यांसह कसे डील करावे?", "raw_content": "\nमिमलॅटवर नकारात्मक टिप्पण्यांसह कसे डील करावे\nसंपादकीय नोट: हा लेख मुळात वेब विपणन आज प्रकाशित झाला आहे. व्यावहारिक साधनांनी 2012 मध्ये वेब विपणन आज अधिग्रहित केली. 2016 मध्ये, आम्ही दोन साइट विलीन, उत्तराधिकारी म्हणून प्रॅक्टिकल Semaltलेट सोडून.\nसोशल मिडियामध्ये सहभागी होणा-या लघु उद्योगांना वेळोवेळी ग्राहक सेवा समस्या हाताळण्यास तयार असणे आवश्यक आहे.\nमिमल नंतर आपल्या कंपनी, उत्पादने किंवा सेवांबद्दल नकारात्मक टिप्पण्या किंवा पुनरावलोकनांना सोडून देऊ शकते, जे एक चांगली गोष्ट असू शकते. हे आपल्याला आपले अनुयायी दर्शविण्याची संधी देते की आपण ग्राहक सेवा घेतो - आणि त्यांच्या तक्रारी - गंभीरपणे\nया समस्यांचे निपटून प्रत्येक कंपनीच्या सोशल मिडिया धोरणांचा एक भाग असणे आवश्यक आहे - one tech llc support. यात सार्वजनिक टिप्पणी धोरण आणि नकारात्मक संदेशांसाठी तयार प्रतिसाद समाविष्ट असणे आवश्यक आहे. Semalt या लेखातील प्रत्येकासाठी एक टेम्पलेट समाविष्ट.\nएक सार्वजनिक टिप्पणी धोरण आपल्या Semalt पृष्ठ (किंवा त्यादृष्टीने इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग) सह संलग्न होण्याचे नियम सेट करते. आपल्या सदल्ट पृष्ठावरील धोरणास वेगळ्या टॅबमध्ये ठेवा आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर टिप्पण्यांना परवानगी देत ​​असल्यास, तेथे देखील तेथे पोस्ट करा.\nटिप्पणी धोरणामध्ये वापरकर्त्याने अपमानास्पद टिप्पणी दिल्यानंतर वारंट काढण्याच्या प्रक्रियेत बॅक अप म्हणून काम केले जाते. नमस्ते ते प्रत्येकास पूर्णपणे समाधान करणार नाही, बहुतेक समजू जातील की टिप्पणी काढून टाकण्यात आली कारण ती पृष्ठावर सेट केलेल्या नियमांचे पालन करीत नाही.\nटिप्पणी केल्याने आपल्याला आपल्या पृष्ठावरील प्रत्येक तक्रारी काढून टाकण्याचे निमित्त मिळत नाही. त्यामध्ये दिलेल्या मापदंडांप्रमाणेच ते फक्त आपणच हटवावे. समतुल्य तक्रारींची गरज आहे.\nखाली नमूद केलेल्या टिप्पणी धोरणाचे उदाहरण आहे:\nआम्ही आपल्याला आणि आपल्या प्रतिक्रिया [कंपनी नाव] साठी फेसबुक पेजवर स्वागत करतो.\nही साइट चाहत्यांना, मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि इतर व्यवसाय, संस्था किंवा [कंपनी नाव] च्या रूचि असलेल्या व्यक्तींना माहिती देण्यास आणि गुंतविण्याची इच्छा आहे.\nआपल्याला टिप्पण्या, प्रश्न आणि प्रश्न सबमिट करण्यास प्रोत्साहित केले जाते, परंतु कृपया लक्षात घ्या की ही एक सार्वत्रिक ऑनलाइन चर्चा साइट आहे आणि सार्वजनिक मंच नाही.\nएकदा पोस्ट केल्यानंतर, [कंपनीचे नाव] असभ्य भाषेत, कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आक्रमण किंवा आक्षेपार्ह किंवा अपमानजनक असणारी टिप्पणी असलेल्या सबमिशन हटविण्याचा अधिकार राखून ठेवते.\nपुढे, [कंपनीचे नाव] अशा टिप्पण्या काढून टाकण्याचा अधिकार देखील राखून ठेवत आहे की:\nस्पॅम, जाहिरात, विनंत्या किंवा अन्य साइट्ससाठी दुवे अंतर्भूत आहेत;\nस्पष्टपणे विषय किंवा विस्कळीत आहे;\nअश्लील, अशिष्ट किंवा लैंगिकरित्या स्पष्ट आहेत. यात मुखवटा केलेले शब्द (***), संक्षेप आणि संक्षेप समाविष्ट आहेत;\nचैन अक्षरे, पिरॅमिड योजना किंवा फसवे किंवा भ्रामक संदेश;\nविशिष्ट सेवा, उत्पादने, किंवा राजकीय संघटना किंवा मोहिमांना प्रोत्साहन देणे;\nकॉपीराइटचे किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन;\n[कंपनी नाव] कोणत्याही धोरणांचे उल्लंघन करा.\nकृपया लक्षात घ्या की या साइटवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया [कंपनी नाव] चे मत आणि अधिकृत स्थान दर्शवत नाही.\nआपल्या पृष्ठावर नकारात्मक टिप्पण्या सोडणे आणि उचित प्रतिसाद देणे सहसा चांगले आहे. Semaltॅट इतके चिन्हांकित करतो की आपण ग्राहकांच्या काळजीला गंभीरपणे घेता आणि परिस्थिती सुधारू इच्छित आहात जे आपण करू शकता.\nआपल्या पृष्ठावर नकारात्मक टिप्पण्या सोडणे आणि उचित प्रतिसाद देणे हे सहसा सर्वोत्तम आहे. Semaltॅट इतके चिन्हांकित करतो की आपण ग्राहकांच्या विचारांना गांभीर्याने घेता आणि आपण शक्य तितक्या योग्य रीतीने परिस्थिती सुधारू इच्छित आहात.\nSemaltेट विविध प्रकारचे नकारात्मक पोस्ट आपल्याला मिळू शकतात आणि त्यांच्याशी कसे चांगल्याप्रकारे व्यवहार करू शकतात.\n[9 2] व्यापक टीका जर बर्याच लोकांनी या गोष्टीबद्दल टिप्पणी केली असेल किंवा तक्रार केली असेल तर कदाचित ती एक मोठी समस्या आहे ज्यात वैयक्तिक प्रतिसादांची आवश्यकता नाही. चांगली धोरणामुळे एखादे स्पष्टीकरण किंवा उपाययोजनासह व्हिडिओ किंवा व्यवस्थापनाने टिप्पणी पोस्ट करणे असेल. आपले ग्राहक आपल्या चिंतेची कदर करतील याची कदर करतील.\n[9 6] वैयक्तिक समाधान साधक ग्राहकांकडून प्रत्येक अद्वितीय समस्येस प्रतिसाद देणे कठीण होऊ शकते, परंतु हे आपण करणे अत्यंत महत्वाचे आहे. सामान्य परिस्थितीसाठी योग्य प्रतिसादांची एक स्प्रेडशीट तयार करणे हे सुलभ करेल, परंतु त्यांना विशिष्ट चिंतेस तयार करणे महत्त्वाचे आहे.\nया संदेशांना ऑफलाइन आणि सार्वजनिक डोळा बाहेर संभाषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ग्राहक सेवा वेब पृष्ठ, ईमेल पत्ता किंवा फोन नंबरसाठी एक लिंक प्रदान करा जेव्हा त्यांना बोलावले जाते, तेव्हा त्यांना लहान भेट कार्ड किंवा विनामूल्य उत्पादन द्या. Semaltेट सार्वजनिकरित्या मोफत शुल्क अर्पण पासून, तथापि, या खोटे तक्रारी ओकणे शकते म्हणून\nट्रॉल्स ट्रालींगच्या टिप्पण्यांमध्ये सामान्यत: अनुचित सामग्री, असभ्यता, सर्व कॅपिटलमध्ये rants, किंवा आपल्या ब्रँडचे सतत निराधार बंदी घालणे समाविष्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले पृष्ठ ट्रोलिंग करते तेव्हा हे स्पष्टपणे आहे आणि शेवटचे उपाय म्हणून केवळ टिप्पण्या हटविणे आणि अवरोधित करणे योग्य आहे.\nसॉलिसिटर्स आपल्या कंपनी किंवा उत्पादनांशी संबंधित असलेल्या काही गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी टिप्पण्या हटवा. यात इतर वेबसाइट्स किंवा उत्पादनांचे दुवे, स्पॅम किंवा अॅप्स किंवा गेमच्या जाहिराती समाविष्ट असू शकतात.\nफॅन अॅक्शनसाठी फॅन. आपल्या पृष्ठाच्या चाहत्यांना वादविवाद येत असल्यास, जोपर्यंत कुणी खोटा अस्ताव्यस्त तथ्य सादर करीत नाही तोपर्यंत त्यात सामील होण्याचे काहीच कारण नाही. त्यात उडी मारण्यास आणि स्पष्टीकरण करणे ठीक आहे, परंतु नंतर या चर्चेतून ब्रँड काढून टाका. अन्यथा, त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम आहे. वादविवाद वैयक्तिक किंवा आक्षेपार्ह असल्यास, आक्षेपार्ह टिप्पण्या हटवा आणि आवश्यक असल्यास वापरकर्त्यांना अवरोधित करा\nमिमल, येथे तक्रारींचे योग्य प्रतिसाद काही विशिष्ट उदाहरणे आहेत.\nनकारात्मक टिप्पण्या प्रतिसाद प्रतिसाद उदाहरणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640699.html", "date_download": "2018-04-23T11:25:06Z", "digest": "sha1:25YQR6H6J72X5CJZ7RP4JACZVTXLM3K4", "length": 1919, "nlines": 39, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - उमलु द्या कळीला", "raw_content": "\nमुलगी म्हणुनी भ्रुणाचीच हत्या\nशुन्यातच जिरविती कळीला उमलत्या\nलादेल कुणी तुमच्यावर सक्ती\nजागृत ठेवा सदैव तुमची भक्ती\nजाणा हो दु:ख वांझोटेपणाचे\nवरदान लाभले तुम्हा मातृत्वाचे\nसहज लाभले तुम्हा मातृत्व सुखाने\nम्हणुनी प्रतारणा अशी निष्ठुर मनाने\nकशास करता तुम्ही छेडखानी\nभकास होतिल स्वप्ने, विरेल कहाणी\nपाजळेल काय तो दिवा वंशाचा\nकि जाळेल तो तुमच्याच घराला\nआधीच ठरविता कसे भवितव्य\nउमलल्यावर होईल जरुर भव्य-दिव्य\nनका समजु तिला धन परक्याचे\nतिही करेल असेच कल्याण जगाचे\nउमलु द्या कळिला सुगंध पेरण्याला\nतुमचेच आयुष्य सुखी करण्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7137524", "date_download": "2018-04-23T11:40:43Z", "digest": "sha1:T4L7YOAN6UVPJ6TXB5DCASHIEERPKE3C", "length": 6545, "nlines": 33, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मायक्रोसॉफ्टच्या अहवालात \"अपेक्षित परिणामांपेक्षा उत्तम\" FY2014 सह Q1 महसुलातील एकूण $ 18.53 सममूल्य", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्टच्या अहवालात \"अपेक्षित परिणामांपेक्षा उत्तम\" FY2014 सह Q1 महसुलातील एकूण $ 18.53 सममूल्य\nआजच्या कमाईच्या कॉल दरम्यान, कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीएफओ एमी हूड यांनी सांगितले की मायक्रोसॉफ्टने भौगोलिक दृष्टीकोणातून व्यापक प्रमाणात महसूल वाढविला आहे, त्याच्या पीसी बाजार आणि ग्राहक महसूलाच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गुंतवणुकदार संबंधांचे सरव्यवस्थापक क्रिस सुह यांनी मान्य केले की, एकूण एकूण महसूल अपेक्षेपेक्षा जास्त 700 दशलक्ष डॉलर्स जास्त होता.\nकंपनीचे उपकरण आणि ग्राहक महसूल क्षेत्र 4% वाढ, 7.46 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले, तर पृष्ठभाग महसूल 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढला आणि जाहिरात महसूल 47 टक्क्यांनी वाढला. कमाई अहवालाच्यानुसार, सलग प्रोव्हायीचा महसूल दुसर्या सलग तिमाहीत वाढला आहे, तर मिमल ईएम राजस्व 7 टक्क्यांनी घटला आहे - water ejector design.\nव्यापारी उत्पन्न देखील 10 टक्क्यांनी वाढून 11.2 अब्ज डॉलर्सवर आला आहे. मायक्रोसॉफ्ट म्हणतात की लिंक्स, शेअरपॉईंट आणि एक्सचेंजची सामूहिक वाढ दुहेरी अंकात होती, तर त्याचे एस क्यू एल सर्व्हर मिडल रेव्हेन्यू 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.\nमायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक आच्छादित महसूलाच्या तुलनेत 103 टक्के वृद्धी दर्शविणार्या सुहने मायक्रोसॉफ्टला \"मेघयुक्त ग्राहक ग्राह्य धरला आहे\" असे म्हटले आहे.\nहुड मायक्रोसॉफ्ट एक भयानक सुट्टी हंगाम साठी सेट आहे असे म्हटले जाते आणि या वर्षी नंतर Xbox एक प्रकाशन प्रकाशीत महसूल नफा मिळविण्याचे होईल\n(2 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nस्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्री थांबविण्यासाठी Twitter च्या नवीनतम धोरण अद्यतनामुळे ब्रँडवर परिणाम होत आहे\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nगेम अॅप्ससह लक्षात ठेवून, Google ने सार्वत्रिक अॅप्स मोहिम आणि अॅडमॉब मुद्रीकरण अद्यतनांची घोषणा केली आहे\n(5 9) व्हॅल्यू प्रॉप्सबद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\nचॅनेल: सीएमओ झोन मायक्रोसॉफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7150493", "date_download": "2018-04-23T11:50:59Z", "digest": "sha1:ABXJ4373YLGI7ETG5XBOY2355JASIBTA", "length": 4676, "nlines": 51, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "कसे डिझाइन लीड संगोपन & amp; लीड स्कोअरिंग सेमील्ट | Ep. # 99", "raw_content": "\nकसे डिझाइन लीड संगोपन & लीड स्कोअरिंग सेमील्ट | Ep. # 99\nएपिसोड # 99 मध्ये एरिक आणि नील आपणास आपल्या व्यवसायासाठी आघाडीचे संवर्धन आणि आघाडीचे मोहिम कसे तयार करू शकतात हे सामायिक करा. आपण योग्य नेतृत्त्व व योग्यता प्राप्त करण्याच्या योग्य मार्गावर आहात किंवा आपल्याला पुनर्जन्म प्रक्रिया स्थापन करण्याची आवश्यकता आहे, आणि जेव्हा लीडचे सोडणे\n00:28 - आजचे विषयः आघाडीचे संगोपन आणि आघाडीचे मोहीम कसे तयार करावे\n00:42 - विपणन फनेल बद्दल Google - सिंगलग्रेन आणि किमॅट्रिक्स\n01:01 - एकलग्रॅनल काय करतो\n01:48 - जेव्हा लोक निवड करतात तेव्हा त्यांना विशिष्ट प्रकारे टॅग करा\n02:00 - एका पृष्ठावर बरेच प्रश्न विचारू नका\n02:10 - प्रक्रिया 3 पृष्ठांमध्ये खंडित करा\n02:45 - सर्वोत्कृष्ट लक्ष्ये घ्या आणि साधनांसह क्रॉस संदर्भ घ्या\n03:30 - लीड स्कोअरिंग लीड्स\n04:02 - ड्रिप आणि इन्फ्युजनॉफ्ट\n04:24 - जेव्हा आपले थ्रेशोल्ड गाठले जाते तेव्हा त्यांना एक पात्र लीड म्हणून चिन्हांकित करा\n05:07 - संगोपन आणि चांगले विपणन फनेल\n05:47 - जर आघाडी व्यस्त नसेल तर ते बंद होणार नाहीत\n07:04 - पुनर्भिवाह मोहिम बनवा\n07:36 - फ्रॅंक केर्न आकस्मिकता निर्धारण\n08:04 - आपल्याला आधी डायविंग करण्यापूर्वी\nप्रथम योजना करावी लागेल\n08:31 - हा आजच्या प्रकरणांसाठी आहे\nहे सर्व मेसेजिंग आणि आपण कोणास घेत आहात याबद्दल आहे.\nआपण करू शकता सर्वात मोठी चूक एक पृष्ठ आपले सर्व प्रश्न ठेवणे आहे.\nजर काहीच संबंध नसतील, तर कदाचित आघाडीच्या जवळ राहणार नाही - free rdp vps windows 7.\nआपण पुढील गोष्टींविषयी काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआमच्या बरोबर मिमल व्हा\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2.html", "date_download": "2018-04-23T11:06:28Z", "digest": "sha1:SLDK7AYKWSQDR25GDOZFEKWX27M2JEQ3", "length": 9010, "nlines": 99, "source_domain": "zeenews.india.com", "title": "भारती एअरटेल - Latest News on भारती एअरटेल | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nभारती एअरटेल मिलीकॉमचा रवांडामधील बिझिनेस विकत घेणार\nसध्या एअरटेलचा बिझिनेस आफ्रिकेतल्या १५ देशांमध्ये पसरलेला आहे.\nजिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध\nरिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.\nनवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार\nभारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.\nएअरटेलची शानदार ऑफर : ग्राहकांना मिळणार ३ जीबी फ्री डेटा\nजिओकडून वाढत्या कॉम्पिटिशनला थोपविण्यासाठी एअरटेलने नवी रणनिती आखली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवी प्लान बाजारात आणला आहे.\nएअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज\nएअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.\n देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू\nभारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.\n'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द\nदूरसंचार क्षेत्रातली प्रमुख कंपनी भारती एअरटेलनं मुंबई ‘लूप टेलीकॉम’वर ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात केलेला 700 करोड रुपयांचा करार आपल्याकडून रद्द केलाय.\n स्वस्तात ‘फोर जी’ इंटरनेट सुविधा मिळवायचीय तर... \n‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.\nखिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...\n‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.\nआता इंटरनेटही झालं महाग\nडेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nजया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7146832", "date_download": "2018-04-23T11:51:14Z", "digest": "sha1:C2UXTPLIUYQ52U2XCODX7P2CHA24UG2C", "length": 5116, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "शोध इंजिन मार्केट शेअर Semalt 2009", "raw_content": "\nशोध इंजिन मार्केट शेअर Semalt 2009\n4 सर्च एन्जिन्स नाऊ अकाउंट फॉर 97.74% सर्व शोध\nआपण आपल्या इंटरनेट मार्केटिंगच्या प्रयत्नांमध्ये कोणती शोध इंजिने लक्ष्यित करण्याची आवश्यकता आहे याबद्दल आपल्याला काळजी असल्यास आम्हाला सर्व माहित आहे की Google प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे आहे सप्टेंबरच्या सर्च एंजिन मार्केट शेअर लेखमध्ये, आम्ही पाहतो की 4 शोध इंजिने (Google, Yahoo, Bing आणि Semalt) आता सर्वांसाठी वापरतात परंतु 2.26% शोध ऑनलाइन आज करण्यात आले आहेत - cargo bike for sale usa. हा एक नवीन उच्च विक्रम आहे आणि आजच्या शोध मार्केटमध्ये एओएल आणि एएसके सारख्या कमी प्रासंगिकतेचे शोध इंजिनचे आणखी एक प्रमाण आहे.\nसप्टेंबर 200 9 साठी शोध इंजिन मार्केट शेअर\nGoogle साठी मार्केट शेयर ड्रॉप, याहू आणि बिंग सप्टेंबरमध्ये अप्रासंगिक आहे\nया महिन्यात मोठ्या 3 सर्च इंजिन्सची बाजारपेठेतील हिस्सेदारी गोरगरिबांना गमावली. बहुतेक इंग्रजी बोलणार्या कंपन्यांना हा अप्रासंगिक ड्रॉप आहे कारण Baidu मुख्यतः चीनमध्ये शोध इंजिन आहे.\nया महिन्यासाठी सर्वात लक्षणीय म्हणजे हे दोन्ही सममूल्य आणि बिंग संपूर्ण बाजारातील वाटाच्या बाबतीत जमिनीवर गमवावे लागतात. असे समजले गेले की Bing च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीपर्यंत तो Semaltेटपेक्षा चांगले होईल आणि बिंग संपूर्ण बाजारातील वाटाच्या बाबतीत जमिनीवर गमवावे लागतात. असे समजले गेले की Bing च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीपर्यंत तो Semaltेटपेक्षा चांगले होईल आम्ही या आकडेवारीद्वारे पाहिल्याप्रमाणे, मिमलॅटच्या सतत घटत असुनही, बिंग कोणतीही जमीन अपयशी ठरत नाही.\nक्षेपणास्त्र याबद्दल आनंदी होऊ शकत नाही. ते त्यांच्या 'उच्चभूल' निर्णयाची इंजिन म्हणून ऑनलाइन आणि टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहेत. परिणाम म्हणजे ऑनलाइन बाजारपेठेतील 3.3 9% हिस्सा.\nबिंगने सप्टेंबरमध्ये व्हिज्युअल शोध लाँच केले आणि बिंग 2.0 लाँच करण्याच्या जवळपास नोंदवले गेले. Semaltेट पासून सतत बांधिलकी पाहण्यासाठी छान आहे\nमार्केट शेअर सारांश - सप्टेंबर 200 9\n# 1 Google - 200 9 साली मार्केट शेअरचा 83.13% हिस्सा. ऑगस्ट 200 9मध्ये 83.33% वर आणि 2008 साली मिडल 80.32% वर होते.\n - 2009 साली मिस्टर मार्केट शेअरमध्ये 6.84% एवढी वाढ झाली. ऑगस्ट 200 9मध्ये 7.28% वर आणि 2008 साली 9.04% होती.\n# 3 बिंग - सप्टेंबर 200 9 मध्ये बाजारपेठेतील 3.3 9%. 2009 साली मिडल 3.52% वरून आणि जून 200 9 मध्ये मूळ प्रकाशनापेक्षा 2.96% वर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/618/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%86", "date_download": "2018-04-23T11:19:10Z", "digest": "sha1:IQU2CIZB7LVREEVM5FUZAIUDE5OV7OT7", "length": 6629, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nप्रीतिसंगमावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वाहिली आदरांजली\nशेतकरी कर्जमाफीसाठी निघालेली संघर्षयात्रा आज सातारा जिल्ह्यात पोहोचली आहे. सकाळच्या सत्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दौऱ्याची सुरूवात करताना शेतकऱ्यांची तूर विकत घ्या, कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात केली. त्यानंतर कराड येथे प्रीतिसंगमावर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी विरोधी पक्षातील सदस्यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.\nसंघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून ...\nशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल. ...\nराज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली - धनंजय मुंडे ...\nलोकसभा निवडणुकांच्या काळात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जात असत तिथे अच्छे दिन आऐंगे असे अश्वासन देत असत. आता पंतप्रधानांच्या याच वक्तव्याची गावोगावी खिल्ली उडवली जाते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. संघर्षयात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील उजनी येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपने मोठमोठी आश्वासने शेतकऱ्यांना दिली मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पंतप्रधानांनी आणि राज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली, असा आरोप मुंडे यांनी केला. यावेळ ...\nसंघर्षयात्रेची मंगळवेढा येथे जाहीर सभा ...\nसंघर्षयात्रेदरम्यान मंगळवेढा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, भारत भालके आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सलग सात अधिवेशने राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. या अधिवेशनात कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केली. भाजप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathilucern-fodder-crop-cultivation-technology-agrowon-maharashtra-2228", "date_download": "2018-04-23T11:56:20Z", "digest": "sha1:23PGAUL7OOIDP3Q5XMUIS72HWWBW3F6O", "length": 17415, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi,lucern fodder crop cultivation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान\nसोमवार, 23 ऑक्टोबर 2017\nलुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे चांगले पीक आहे. हे दिसायला मेथीच्या भाजीसारखे असल्यामुळे यास मेथीघास असेही म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के आहे. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.\nलसूणघास हा अत्यंत पौष्टिक चारा असल्यामुळे मका, नेपिअर गवत, कडवळ इत्यादी चाऱ्यांसमवेत लसूण घासाचा काही प्रमाणात जनावरांच्या आहारात उपयोग केल्यास दूध उत्पादनात वाढ होते. लुसर्नच्या एकवर्षीय, तसेच बहुवर्षीय पिकाच्या जाती आहेत.\nलुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे चांगले पीक आहे. हे दिसायला मेथीच्या भाजीसारखे असल्यामुळे यास मेथीघास असेही म्हणतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के आहे. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.\nलसूणघास हा अत्यंत पौष्टिक चारा असल्यामुळे मका, नेपिअर गवत, कडवळ इत्यादी चाऱ्यांसमवेत लसूण घासाचा काही प्रमाणात जनावरांच्या आहारात उपयोग केल्यास दूध उत्पादनात वाढ होते. लुसर्नच्या एकवर्षीय, तसेच बहुवर्षीय पिकाच्या जाती आहेत.\nजमीन : मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार, खोल, गाळाची जमीन असावी. चुनकट व अतिक्षाराची जमीन नसावी.\nपूर्वमशागत : जमिनीची नांगरट खोलवर करावी. २ ते ३ वेळा कुळवणी करावी. जमिनीची पूर्ण मशागत झाल्यानंतर सपाट वाफे करावेत किंवा सऱ्या सोडाव्यात.\nपेरणी : या पिकाची पेरणी ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी. पेरणी ३० सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. पेरणीसाठी हेक्‍टरी २५ किलो बियाणे वापरावे.\nसुधारित जाती : या पिकाच्या लागवडीसाठी आर.एल.-८८, सिरसा-९ आणि आनंद-२ इत्यादी जातींचा वापर करावा.\nखते : पूर्वमशागतीवेळेस प्रतिहेक्‍टरी १५-२० बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी करतेवेळेस १५ किलो नत्र, १५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावा, तसेच प्रत्येक ४ महिन्यांनंतर १५ किलो नत्र व ५० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावा.\nआंतरमशागत : मेथीघासाची खुरपणी वरचेवर करावी. विशेष तण वाढू देऊ नयेत. शक्‍यतो प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी.\nपाणी व्यवस्थापन : रब्बीमध्ये १५ ते २० दिवसांनी, तर उन्हाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.\nउत्पादन : या पिकाची पहिली कापणी २ ते २.५ महिन्यांनी करावी. नंतर दुसरी कापणी १.५ महिन्याने करावी. त्यानंतरच्या कापण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात. हिरव्या चाऱ्याचे १००० ते १२०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते. वर्षभरात १० ते १२ कापण्या घेता येतात.\nहे लक्षात ठेवा :\nमेथी घासावरील अमरवेल ही परोपजीवी वनस्पती आढळते. अमरवेल ही पिकामधील रस शोषून घेत असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून शुद्ध बियाण्यांचा वापर लागवडीसाठी करावा. तसेच लागवडीनंतर अमरवेल असलेली झाडे काढून त्यांचा नायनाट करावा.\nसंपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४\n(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/adata+power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-23T11:17:56Z", "digest": "sha1:AOLQ2ALP22MCOIHT32VEF22ZW6USZCCS", "length": 13804, "nlines": 384, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अडत पॉवर बॅंक्स किंमत India मध्ये 23 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nअडत पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nIndia 2018 अडत पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nअडत पॉवर बॅंक्स दर India मध्ये 23 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण अडत पॉवर बॅंक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन अडत पव१०० पिंक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Shopclues, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी अडत पॉवर बॅंक्स\nकिंमत अडत पॉवर बॅंक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन अडत पव१०० व्हाईट Rs. 1,490 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,245 येथे आपल्याला अडत पव१०० पिंक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10अडत पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 4200 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.gowikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:04:20Z", "digest": "sha1:YGZROG75WMXR4QM5FNBTZRZUADR3S5YD", "length": 6837, "nlines": 321, "source_domain": "mr.gowikipedia.org", "title": "GoWikipedia - वर्ग:तत्त्वज्ञान", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण १६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १६ उपवर्ग आहेत.\n► विषयानुसार तत्त्वज्ञान‎ (२ क)\n► अध्यात्म‎ (१ क, ८९ प)\n► आंबेडकरवाद‎ (२ क, १ प)\n► चार्वाक दर्शन‎ (२ प)\n► तत्त्वज्ञ‎ (३ क, ७ प)\n► तत्त्वज्ञानविषयक समस्या‎ (१ क)\n► तत्त्वज्ञानाच्या शाखा‎ (४ क, १ प)\n► तर्कशास्त्र‎ (३ क, ५ प)\n► धर्म‎ (३१ क, ३३ प)\n► धर्मानुसार तत्त्वज्ञान‎ (२ क)\n► नीती‎ (१ क)\n► बौद्ध तत्त्वज्ञानविषयक संकल्पना‎ (१० प)\n► बौद्ध धर्म‎ (२५ क, १०८ प)\n► मराठीतील तत्त्वज्ञान विषयक पुस्तके‎ (१ प)\n► तत्त्वज्ञानविषयक संकल्पना‎ (२ क, १ प)\n► तत्त्वज्ञानविषयक सिद्धांत‎ (२ क)\nएकूण ६० पैकी खालील ६० पाने या वर्गात आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार\nतत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHI/MRHI046.HTM", "date_download": "2018-04-23T11:14:35Z", "digest": "sha1:O5ULDO6KMLP2JOBPMQX44MD6L4XLMQPU", "length": 10197, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी | संध्याकाळी बाहेर जाणे = शाम को बाहर जाना |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिंदी > अनुक्रमणिका\nशाम को बाहर जाना\nइथे डिस्को आहे का\nक्या यहाँ कोई डिस्को है\nइथे नाईट क्लब आहे का\nक्या यहाँ कोई नाईट क्लब है\nइथे पब आहे का\nक्या यहाँ कोई पब है\nआज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे\nआज शाम रंगमंच पर क्या चल रहा है\nआज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे\nआज शाम सिनेमाघर में क्या चल रहा है\nआज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे\nआज शाम टेलीविज़न में क्या चल रहा है\nनाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nक्या नाटक के और टिकट हैं\nचित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nक्या फ़िल्म के और टिकट हैं\nफुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nक्या खेल के और टिकट हैं\nमला मागे बसायचे आहे.\nमैं सब से पीछे बैठना चाहता / चाहती हूँ\nमला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.\nमैं बीच में कहीं बैठना चाहता / चाहती हूँ\nमला पुढे बसायचे आहे.\nमैं सामने बैठना चाहता / चाहती हूँ\nआपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का\nक्या आप मुझे कुछ सिफ़ारिश कर सकते हैं\nप्रयोग कधी सुरू होणार आहे\nप्रदर्शन कब शुरु होता है\nआपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का\nक्या आप मेरे लिए एक टिकट खरीद सकते हैं\nइथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का\nक्या यहाँ पास में कोई गोल्फ का मैदान है\nइथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का\nक्या यहाँ पास में कोई टेनिस का मैदान है\nइथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का\nक्या यहाँ पास में कोई तरणताल है\nबरेच युरोपिय ज्यांना त्यांचे इंग्रजी सुधारायचे आहे ते माल्टाला जातात. कारण हे आहे कि, इंग्रजी लहान युरोपीय राज्यांमध्ये कार्‍यालयीन भाषा आहे. आणि माल्टा ही त्याच्या अनेक भाषा शाळांसाठी प्रसिध्द आहे. परंतु हे ते नाही जे भाषातज्ञांसाठी देशातील मनोरंजक ठरेल असे असते. ते दुसर्‍या कारणास्तव माल्टामध्ये स्वारस्य दाखवितात. माल्टा गणराज्याला दुसरी कार्‍यालयीन भाषा आहे: माल्टीज (किंवा माल्टी) ही भाषा एका स्थानिक अरबी भाषेपासून विकसित झाली आहे. यासह, माल्टी ही युरोपची फक्त सेमिटिक भाषा आहे. तथापि, अरबीपेक्षा वाक्यरचना आणि उच्चारशास्त्र वेगळे आहेत. माल्टीज हि लॅटिन अक्षरांमध्ये देखील लिहिली जाते. तथापि, अक्षरमालेमध्ये काही विशेष वर्ण आहेत. आणि अक्षरे c व y पूर्णपणे अनुपस्थित असतात. शब्दसंग्रहामध्ये अनेक भिन्न भाषांमधील घटक आहेत. अरबी पासून दुसर्‍या बाजूला, इटालियन आणि इंग्रजी या प्रभावी भाषा आहेत. पण फोनिशियन आणि कॅर्थाजिनियन्स मुळेही भाषा प्रभावित झाली. त्यामुळे काही संशोधक माल्टी भाषेला अरबी क्रीयोल भाषा समजतात. त्याच्या संपूर्ण इतिहासात, माल्टा विविध शक्तींकडून व्यापला गेला होता. त्या सर्वांनी त्यांच्या खुणा माल्टा, गोझो आणि कोमिनो या बेटांवर ठेवल्या आहेत. प्रदीर्घ काळासाठी, माल्टी ही केवळ स्थानिक प्रदेशिक भाषा होती. परंतु ती नेहमी माल्टीज लोकांची मूळ \"वास्तविक\" भाषा राहिली. ती केवळ तोंडी सांगून पुढे नेली जात होती. 19 व्या शतकापर्यंत लोक भाषेत लिहायला सुरू केले नव्हते. आज वक्त्यांची संख्या सुमारे 330,000 एवढी आहे. माल्टा 2004 पासून युरोपियन युनियनची सदस्य केली गेली आहे. त्यासह, माल्टी ही युरोपियन कार्‍यालयीन भाषांमधील देखील एक भाषा आहे. परंतु माल्टीज लोकांसाठी भाषा म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि परदेशी जेव्हा माल्टी शिकण्यासाठी इच्छित असतात तेव्हा ते खूश होतात. माल्टा मध्ये निश्चितपणे पुरेशा भाषा शाळा आहेत…\nContact book2 मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRMK/MRMK057.HTM", "date_download": "2018-04-23T11:26:36Z", "digest": "sha1:HIOPQMQDVWP4YJRTWVWHSFX6FFN3R3J4", "length": 9602, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - मॅसेडोनियन नवशिक्यांसाठी | काम = Работа / Занимање |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > मॅसेडोनियन > अनुक्रमणिका\nआपण काय काम करता\nमाझे पती डॉक्टर आहेत.\nमी अर्धवेळ पारिचारिका म्हणून काम करते.\nआम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत.\nपण कर खूप जास्त आहेत.\nआणि आरोग्य विमा महाग आहे.\nतुला आयुष्यात पुढे कोण बनायचे आहे\nमला इंजिनियर व्हायचे आहे.\nमला महाविद्यालयात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे आहे.\nमी जास्त कमवित नाही.\nमी विदेशात प्रशिक्षण घेत आहे.\nते माझे साहेब आहेत.\nमाझे सहकारी चांगले आहेत.\nदुपारचे जेवण आम्ही कँटिनमध्ये घेतो.\nमी नोकरी शोधत आहे.\nमी वर्षभर बेरोजगार आहे.\nया देशात खूप जास्त लोक बेरोजगार आहेत.\nस्मरणशक्तीला भाषेची गरज आहे\nबर्‍याच लोकांना त्यांचा शाळेतला पहिला दिवस आठवतो. परंतु, त्यांना त्याच्या आधीचे आठवत नाही. आपल्याला आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षांबद्दल काहीच आठवत नाही. पण असं का लहान मूल असतानाचे अनुभव आपण का आठवू शकत नाही लहान मूल असतानाचे अनुभव आपण का आठवू शकत नाही याचे कारण, आपल्या विकासामध्ये आहे. संवादशक्ती आणि स्मरणशक्ती एकाच वेळी विकसित होतात. आणि म्हणून एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, माणसाला संवादशक्ती लागते. म्हणजेच, त्याला गोष्टी अनुभवण्यासाठी शब्दांची गरज भासते. शास्त्रज्ञांनी मुलांवर बरीच परीक्षणे केलेली आहेत. ते करतेवेळी, त्यांनी चित्तवेधक शोध लावला. ज्या वेळी मुलं बोलायला शिकतात, त्यावेळी ते त्या आधीच्या सर्व गोष्टी विसरतात. म्हणून संवादशक्तीची सुरवात म्हणजेच स्मरणशक्तीची सुरुवात आहे. मुलं खूप सार्‍या गोष्टी पहिल्या 3 वर्षांमध्ये शिकतात. ते रोज नवीन गोष्टींचा अनुभव घेतात. त्यांना खूप सारे महत्त्वाचे अनुभवसुद्धा या वयातच होतात. तरीदेखील, ते हे सर्व विसरतात. मानसशास्त्रज्ञ या घटनेला इन्फाटाईल अम्नेशिया [तान्ह्या मुलांचा स्मृतिभ्रंश] असे म्हणतात. मुलं ज्या गोष्टींना नावे देतात तीच फक्त त्यांच्या लक्षात राहतात. आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती वैयक्तिक अनुभव जपते. ते एका रोजनिशीसारखे काम करते. आपल्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे असते ते स्मृतीत कायमचे साठविले जाते. याप्रकारे, आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती आपली ओळख बनविते. पण तिचा विकास मूळ भाषेवर अवलंबून असतो. आणि आपण आपल्या स्मरणशक्तीला फक्त संवादशक्तीनेच कार्‍यान्वित करू शकतो. अर्थात, आपण ज्या गोष्टी लहान मूल असताना शिकलेलो असतो त्या सर्वच खरंच पुसल्या जात नाहीत. ते आपल्या मेंदूत कुठेतरी जतन केलेले असतात. एवढेच की आपल्याला ते उपलब्ध नसतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, नाही का \nContact book2 मराठी - मॅसेडोनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:54:09Z", "digest": "sha1:HCEQTLDI7J35LRL4HKOMCJDQ27LRVB2O", "length": 4229, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टुअर्ट बिन्नी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nभारत संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n3 रैना • 5 रायडू • 6 मोहित • 7 धोनी (क व †) • 8 जाडेजा • 11 मोहम्मद शमी • 15 कुमार • 18 कोहली • (उप) 20 पटेल • 25 धवन • 27 रहाणे • 45 रोहित • 73 यादव • 84 बिन्नी • 99 अश्विन • प्रशिक्षक: फ्लेचर\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारतीय क्रिकेट लीग खेळाडू\n२०१५ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१५ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7142679", "date_download": "2018-04-23T11:45:17Z", "digest": "sha1:6YQIFKWJCD3GR5PMHP72CM3NN433ENPN", "length": 4902, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मिमलचा सात वर्षांचा आजचा काळ चालू असतो #HappyBirthday # Semalt7", "raw_content": "\nमिमलचा सात वर्षांचा आजचा काळ चालू असतो #HappyBirthday # Semalt7\nआज जॅक डोरसी, Semalt क्रिएटरकडून सात वर्षे गुण मिळतात, दररोज सुमारे 400 दशलक्ष टिव्हिट्स पाठविणा-या 20 लाखांपेक्षा जास्त सक्रिय वापरकर्त्यांना आकर्षित करणारे एक सामाजिक माध्यम चक्रावून टाकणारे, पहिले ट्विट पाठविले.\nडोरसी जेव्हा चेयरमॅन ​​बनले तेव्हा 2008 पर्यंत ते ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि इव्हन विल्यम्स यांनी भूमिका निभावली. 2010 मध्ये, डिक सेमील्ट, ज्या पूर्वी सीओओ म्हणून काम केले होते, विलियम्स खाली उतरला नंतर नवीन सीईओ बनले - dedicated audio. मिमल यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आज आघाडीवर आहे.\n2006 मध्ये स्थापना झाल्यापासून, Semaltट हे जगातल्या सर्वांत शीर्ष दहा सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइट्सपैकी एक बनले आहे, ज्यामध्ये सार्वजनिक मंच आहे जेथे बातम्या, कल्पना आणि माहिती सतत 140-वर्णांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी करण्यात येते.\n(2 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओसाठी शोध हेतू करणे: Google ने कस्टम इन्टेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती वापरत पाहिजे का\nमूल्य सहकारी बद्दल सर्व: कसे ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधन आपल्या विपणन आकार पाहिजे\n(5 9) रेडिटने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nचॅनेल: सोशल मीडिया विपणनटॅटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.onkardanke.com/2011/02/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T11:26:55Z", "digest": "sha1:OP7S5VPLQVORQSQ7LNJETM3ZD4QLGPK6", "length": 21098, "nlines": 140, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: त्रिकोणी युतीचा फॉर्म्युला", "raw_content": "\nशिवसेना-भाजप युतीत मनसेला सामावून घेण्याच्या गोपीनाथ मुंडे यांनी मांडलेल्या \"फॉर्म्युला'चे समर्थन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. राज्यातील विरोधकांचे हे त्रिशूल एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकारच्या गंडस्थळावर नक्कीच आघात होईल. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राची सर्वच बाहतीत पिछेहाट झालीय.असं असलं तरी सर्वच पातळीवर नाकार्ते असलेले आघाडी सरकार 2009 साली सत्तेवर आले. आघाडी सरकारला हे यश केवळ मनसे फॅक्टरमुळेच मिळाले होते. हे त्या निकालाचा अभ्यास केला की लगेच स्पष्ट होते.\n2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 तर भाजपला 8 जागांचा फटका बसला. युतीचं संख्याबळं 116 वरुन थेट 90 जागांवर घसरले. 1990 सालापासून पाच विधानसभा निवडणुका भाजपा-सेनंनं एकत्र लढवल्या आहे. या पाच निवडणुकांमधला हा निचांक आहे. भाजपा-सेना युतीच्या मतांची टक्केवारीही सुमारे साडेतीन टक्यांनी यंदा घसरली. तर मनसेनं विधानसभेच्या 144 म्हणजे बरोबर निम्या जागा लढवूनही 13 जागा आणि 5.1 टक्के मतं जिंकली. लोकसभा निवडणुकीत मनेसेमुळे भाजप-सेनेला 8 जागांचा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत तब्बल 63 जागांचा युतीला फटका बसला आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की भाजप-सेना-मनसे हे तीन्ही पक्ष एकत्र असते तर 153 जागा जिंकत ही आघाडी सत्तेवर आली असती. नाकर्त्या आघाडीची सत्ता घालवण्याचे समाधान मराठी जनतेला मिळाले असते.\nराज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे हे उघड आहे. मात्र या दोघांचीही महत्वकांक्षा परस्परांशी लढून पूर्ण होऊ शकणार नाही. मागच्या काही वर्षात मुंबई आणि ठाणे या शिवसेनेच्या अभेद्य गडाला राज ठाकरेंनी सुरुंग लावलाय. बाळासाहेब ठाकरेंना पुढे करुन सर्व प्रकारचे भावनिक आवाहन करुनही हा गड लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत सेनेला वाचवता आला नाही. मुंबई -ठाणे परिसरातील भगदाडं बुझवल्याशिवाय उद्धव ठाकरेंना 'वर्षा' चा उंबरठा ओलांडता येणार नाही.\nमनसेची स्थितीही फारशी वेगळी नाही. राज ठाकरेंकडे करिष्मा आहे. पण नरेंद्र मोदी, नितीशकुमार किंवा दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांचे मुख्यमंत्री यांच्यासारखा संपूर्ण राज्यभर त्यांना जनाधार नाही. राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवत आहेत. प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे, शिरीष पारकर, बाळा नांदगावकर यासारखी काही मंडळी या पक्षाकडे आहेत. पण नेत्यांची फौज नाही. त्यातही ही सर्व मुंबईतली नेते मंडळी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा मुंबई-ठाणे परिसरातचं मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भ या राज्यातल्या तीन महत्वाच्या भागात पक्षाचे संघटन करु शकेल निवडणुका जिंकू देऊ शकेल असा एकही नेता मनसेकडे नाहीत. त्यातंच या भागात मनसेचं हुकमी असे मराठी कार्ड चालण्याचीही सूतराम शक्यता नाही. त्यामुळे ज्या नवनिर्माणाच्या गर्जना राज ठाकरे आपल्या संभामधून करतात ते नवनिर्माण स्वबळावर करणे या पक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.\nया त्रिकोणाताला तिसरा कोण आहे भाजपा. मध्यमवर्गीय, व्यापारी आणि मुंबईतील अमराठी मतदार ही या पक्षाची परंपरागत व्होट बॅंक आहे. गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे माधवं ( माळी, धनगर आणि वंजारी ) या जातीच्या मतांची बेरीजही या पक्षाच्या वाढीत महत्वाची ठरली. नितीन गडकरींमुळे विदर्भात तर एकनाथ खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात या पक्षानं आपली पाळेमुळे रुजवली आहेत. मात्र प्रमोद महाजनांचे अकाली निधन, मुंडे-गडकरी गटांचा संघर्ष आणि एकूणच सत्तेपासून दूर राहिल्यामुळे केंद्रीय पातळीवर आलेली निराशा याचा फटका भाजपालाही बसलाय. त्यामुळे शत प्रतिशत भाजप हा राग चिंतन बैठकित अनेकदा गायल्यानंतरही तो प्रत्यक्षात येणं अवघड आहे. याची जाणीव आता त्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाने आता त्रिकोणी युतीच्या फॉर्म्युल्याबाबत पुढाकार घेतला आहे.\nभाजपाला जी जाणीव झाली आहे त्याचं भान अजुनही सेना आणि मनसेला आलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्र सतत बदनाम होत असूनही ह्या दोन्ही प्रादेशिक पक्षांना मुन्नी आणि झेंडुबाम यांचीच काळजी आहे. खरं तर या दोन्ही पक्षांचे नेतृत्व ठाकरे या एकाच घराण्याकडे आहे. दोन्ही पक्षात एकाधिकारशाही आहे. मराठी मतदार हाच त्यांच मुख्य आधार आहे. बाळासाहेब ठाकरे हेच दोन्ही पक्षातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचे दैवत आहे.त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या महत्वकांक्षेपोटी कितीकाळ वेगळा संसार करायचा याचा विचार या दोन्ही पक्षांनी करायला हवा.\nगेल्या 12 वर्षांपासून शिवसेना सत्तेपासून दूर आहे. सत्तेचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे नारायण राणे ते किरण पावसकर पर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. 2014 च्या निवडणुकीतही पराभव झाल्यास हा आऊटगोईंचा स्पीड आणखी वाढेल.बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मिता यासारख्या भावनिक मुद्यावर पक्ष कार्यकर्त्यांना भूल देण्याचे सेना नेतृत्वाचे प्रयोग फार काळ चालू शकणार नाहीत. मनसेमध्येही फारसे आलबेल नाही. श्वेता परुळेकर, प्रकाश महाजन यासारखी मंडळी केंव्हाच पक्षातून बाहेर पडली आहेत. कोणत्याही आंदोलनात न उतरता सभेच्या व्यासपीठावरुन बोलबच्चनगिरी करणं हेच राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून केले आहे. तर त्याचवेळी तोडफोडीच्या आंदोलनात सक्रीय असलेल्या राज ठाकरेंच्या मावळ्यांना पोलीसांचा आणि कोर्टाचा जाच सहन करावा लागतोय. 'मराठी खतरे में' हा एकच नारा देऊन कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं राज ठाकरेंना फार काळ जमणार नाही.\nभाजपा, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या मर्यादा आहेत. या तिघांनाही दलित मतदारांमध्ये मजबूत बेस नाही. मुस्लिम मतांची फारशी अपेक्षा नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजुनही त्यांना शिरकाव करता आलेला नाही. ग्रामीण महाराष्ट्रात साखर कारखाने आणि सहकारी संस्थांचे पाठबळ नाही. असं असतानाही भाजपा-सेना x मनसे असा संघर्ष करण्यात किती अर्थ आहे याचा विचार आता या पक्षांनी करायला हावा. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.. त्याठिकाणी केवळ हितसंबंध महत्वाचे असतात. हे घासून गुळगुळीत झालेलं सत्य राज आणि उद्धव या चुलत भावंडाला एकत्र का आणू शकत नाही \nमहाराष्ट्रात सध्या आनंद साजरा कराव्या अशा फार कमी गोष्टी आहे. वीज टंचाई, शेतक-यांच्या आत्महत्या, प्रादेशिक असमतोल, जमीन, पाणी आणि भेसळ माफियांचे साम्राज्य, बकाल शहरे, ओसाड खेडी, भ्रष्टाचारांचे 'आदर्श' उभी करणारी नोकरशाही आणि संवेदनाशुन्य सरकार याच्या विळख्यात आपला ' प्रिय आमुचा एक असा महाराष्ट्र दॆश ' अडकलाय. भाजपा-सेना-मनसे यांचे त्रिकोणी सरकार सत्तेवर आल्यास हे चित्र एका रात्रीत बदलेल अशी भाबडी आशा मला नाही. मात्र ह्या चित्राचे मुख्य चित्रकार असलेले नाकर्ते सरकार तरी जायला हवे अशी माझी इच्छा आहे.\nराज ठाकरेंचा करिष्मा, उद्धव ठाकरेंचे व्यवस्थापन आणि गोपीनाथ मुंडेंचा जनाधार यांचा त्रिवेणी संगम आघाडी सरकारच्या साम्राज्यावर निर्णायक घाव घालू शकतो. यासाठी आता भाजपाने एक पाऊल पुढे टाकलंय...जय मराठी आणि जय महाराष्ट्र याचा अहोरात्र गजर करणा-या दोन्ही ठाकरेंच्या पक्षानेही त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे.\nथोडक्यात राज ठाकरेंनी सत्ता संपादनासाठी शरद पवारांच्या मार्गावरुन जायला हवे. मतभेद-स्वतंत्र पक्ष-युती-सत्ता.\n@ निरंजन सर्वच राजकीय पक्ष ब-याच प्रमाणात सारखे आहेत हे अगदी बरोबर. पण सध्याच्या नाकर्त्या आघाडी सरकारला घरी बसवणे आवश्यक आहे आणि त्रिकोणी युती झाल्याशिवाय ह्या आघाडीची सत्ता जाणे अवघड आहे.\n@ अमोल,शरद पवारांसारख्या ज्येष्ठ मरठी नेत्यांचा आदर्श प्रखर महाराष्ट्रवादी राज ठाकरेंनी नाही ठेवायचा तर मग काय उत्तरेतील ने्ते ठेवणार \nत्रिकोणी युती ही फक्त चर्चाच राहणार आहे. कारण भाजपला आगामी काळात उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. जर राज्यात मनसेबरोबर युती केली तरी उत्तर प्रदेशात 'भय्ये' भाजपची दाणादाण उडवतील. त्यामुळं त्रिकोणी युती फक्त चर्चा आणि पेपरच्या रकान्यांपूरतीच मर्यादीत राहणार आहे.\n... तर भारत वर्ल्ड कप जिंकेल \nइजिप्त, सोशल मीडिया आणि भारत\nवर्ल्ड कपचे दावेदार ( भाग 4 ) --- भारत\nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nलाल सलाम ते वंदे मातरम् \nहिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nमदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:50:47Z", "digest": "sha1:BFQBNW7CNPX4GLAF4TXIT5YJCJBMG27U", "length": 9412, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवेगाव राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.\nहे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.\nउद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.\nनवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यीक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.\nरेल्वेगाडीने नागपूर हून कोलकाताच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग ६ वर १२० किमीवर साकोली नावाचे गाव आहे. साकोलीवरुन नवेगाव येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारणपणे ३५- ४० किमीवर नवेगाव उद्यान आहे.\nमहाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या साकोली हून नवेगावला जाण्यासाठी एस्.टी बसेस मिळतात. दिवसातून २ फेऱ्या असतात.\nअरण्यपुत्र - ले. सुरेशचंद्र वारघडे\nनवेगाव उद्यानातील भ्रमंतीवर भालचंद्र पुजारी यांचा ब्लॉग व छायाचित्रे\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१३ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/04/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T11:36:14Z", "digest": "sha1:B2O7KWUDVWWZIJRJXQVTDIJLIPT356C6", "length": 2466, "nlines": 78, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: गर्जा महाराष्ट्र आमचा", "raw_content": "\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nकिसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/?Menu-Pak", "date_download": "2018-04-23T11:31:59Z", "digest": "sha1:XB7YO2FAFWAPS6DJEUNBN7RYICKKNVQZ", "length": 33014, "nlines": 210, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nवाघा-अटारी बॉर्डरवर पाक क्रिकेटरचे नापाक चाळे, BSF जवान संतप्त\nइंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाघा-अटारी सीमेवरील आहे. पाकिस्तानी जवान आणि बीएसएफ जवानांची फ्लॅग-डाउन परेड सेरेमनी सुरू होती. त्यावेळी अचानक हसन अली जवानांच्या बाजूला आला आणि त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केली. सेरेमनी पाहण्यासाठी पाकिस्तानी संघ देखील उपस्थित होता. तो पाकिस्तानी जवानांची नक्कल उतरवत होता. त्यावर बीएसएफने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, तो व्हिडिओ...\nVIDEO: एका आईने मदरशात घुसून केली मौलवीची धुलाई, हे होते कारण\nइंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका कथित मौलवीला महिलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. यात मार खाणारा लहान मुला-मुलींना अरबी शिकवणारा मौलवी आहे. तर त्याला काठीने बेदम मारहाण करणारी महिला त्या मौलवीकडे शिकण्यासाठी येणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीची आई आहे. - या व्हिडिओमध्ये एक महिला अचानक एका मदरशात काठी घेऊन शिरते आणि रागात बोलतानाच एका मौलवीची धुलाई सुरू करते. तो माणूस मार खात असतानाही काहीच विरोध करत...\nजाधव प्रकरणात पाकिस्तानचा जबाब जुलैमध्ये दाखल होणार, भारताला देणार प्रत्‍युत्‍तर\nइस्लामाबाद-भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान १७ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला जबाब दाखल करण्याची शक्यता आहे. १७ एप्रिल रोजी भारताने दाखल केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नवीन शपथपत्र दाखल करणार आहे. भारताकडून दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच या प्रकरणात काही पावले उचलली जाऊ शकतात, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. डॉनच्या मते, या खटल्यात सुरुवातीला पाकिस्तानची पैरवी करणारे खावर...\nपाकिस्तानात 7 वर्षीय मुलीवर रेप झाला, तेव्हा 1000 लोकांना पकडले, 4 दिवसांत फाशी\nस्पेशल डेस्क - कठुआ येथे झालेल्या 8 वर्षीय मुलीवर अमानुष कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विविध ठिकाणी मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण, त्याच आरोपींच्या समर्थानातही काही लोक मोर्चे काढताना दिसून आले. त्याच समर्थकांपैकी 2 भाजप मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागला. पाकिस्तानवर इतर मुद्द्यांवर कितीही टीका करण्यात येत असली तरीही बलात्काराच्या एका प्रकरणात आपल्या शेजारील राष्ट्राने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. पाकिस्तानात एका 7 वर्षीय...\nपाकिस्तानमध्ये न्यायमूर्तींच्या निवासस्थानी दोनदा गोळीबार\nलाहोर- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काही तासांच्या अंतराने दोन वेळा गोळीबार केला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त डॉन ने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी पनामा गेट प्रकरणाची सुनावणी केली होती त्यात न्यायमूर्ती एहसान यांचा समावेश होता. या पीठाने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले होते. गोळीबाराबद्दल माहिती...\nशरीफ सार्वजनिक पदासाठी आता हयातभर अपात्र; न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय\nइस्लामाबाद-भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पदासाठी हयातभर अपात्र असल्याचा निवाडा दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या पीठाने सर्वानुमते संविधानातील लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्याचा नियम तहहयात लागू केला जातो, असे न्यायालयाने निकालाद्वारे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा नियम लागू करण्याच्या कालावधीवरून निर्माण झालेला संशय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता संपला आहे, असे...\nLIVE कार्यक्रमात गर्भवती गायिकेची गोळ्या झाडून हत्या, मर्डरचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लोक गायिका समीना समून 24 वर्षांची होती. गोळीबार करणाऱ्यांनी सुरुवातीला तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला. स्टेजवर जाऊन तिला उभे राहून परफॉर्म करण्यास सांगितले. पण, ती वारंवार खाली बसून गात असल्याने तो चिडला. त्याच ठिकाणी सर्वांसमोर तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. 6 महिन्यांची गर्भवती होती समीना - पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील एका...\n‘जमात-उद-दावा’सह सर्व गटांवर कायम बंदीचा विचार; पाकिस्तानमध्ये हालचाली\nइस्लामाबाद- मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आणि त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेसह गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील सर्व दहशतवादी गट आणि दहशतवाद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार पाकिस्तान करत आहे. त्यासाठी एका विधेयकाच्या आराखड्यावर काम सुरू आहे. पाकिस्तानच्या अध्यक्षांनी अध्यादेश जारी करून गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील प्रतिबंधित संघटना आणि व्यक्तींवर बंदी घातली आहे. आता हे विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल, असे वृत्त द डॉन या वृत्तपत्राने दिले आहे....\nसलमान खान अल्पसंख्याक, त्यामुळेच त्याला कडक शिक्षा: पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला झालेल्या शिक्षेवरुन मुक्ताफळे उधळली आहेत. पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाली, कारण तो अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाचा आहे. भारतातील भेदभाव यातून दिसून येतो. जिओ न्यूजच्या शो कॅपिटलला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, ज्या समाजाची भारतात सत्ता आहे त्या समाजाचा सलमान असता तर कदाचित त्याला एवढी कडक शिक्षा झाली नसती, कोर्टाने त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार केला असता. त्यांनी...\n‘हाफिज सईदला त्रास देऊ नका; लोककल्याणाची कामे करू द्या’- लाहोर न्यायालयाचा आदेश\nलाहोर- पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला थेट समाजसुधारकच संबोधले आहे. त्याच्या जमात-उद-दावा, फलाह -ए-इन्सानियत फाउंडेशन या लोककल्याणकारी संघटना व संस्था आहेत. मात्र, पाक सरकारने त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांना सेवेपासून वंचित केले आहे, असे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाक सरकार हकनाक त्याला रोखत असून समाजकार्यापासून विचलित करत असल्याची टिप्पणी कोर्टाने केली. पाक सरकारने हाफिज सईदला त्रास देऊ नये. मंगळवारी कोर्टाने यासंंबंधीचे...\nसुरक्षा परिषदेच्या अतिरेकी यादीत दाऊद, हाफिजसह 139 पाकिस्तानींचा समावेश\nइस्लामाबाद- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी व अतिरेेकी संघटनांची नवी यादी जारी केली. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेसह १३९ नावे पाकिस्तानमधील आहेत. भारताचा मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या नावाचाही यादीत समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार, दाऊदकडे अनेक नावांनी पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. हे पासपोर्ट रावळपिंडी व कराचीतून जारी झाले आहेत. पाकिस्तानमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर अयमान अल...\n6 वर्षांपूर्वी जेथे तालिबानचा हल्ला झाला, त्याच ठिकाणी पोहोचली मलाला युसूफझाई\nइस्लामाबाद - तालिबानी हल्ला झाल्याच्या 6 वर्षांनंतर प्रथमच मलाला पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यात ती खैबर-पख्तूनख्वा प्रांतात स्वात जिल्ह्यातील मिंगोरा गावात पोहोचली आहे. याच ठिकाणी मलालाचे जुने घर होते. हीच ती जागा होती, ज्या ठिकाणी तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासह तिला हेलिकॉप्टरने इस्लामाबादहून या गावात आणण्यात आले. लंडनमध्ये स्थायिक झालेली मलाला 2 एप्रिल पर्यंत पाकिस्तानातच राहणार आहे. काय म्हणाली... मलालाने पंतप्रधान...\nपाकिस्तानात आहे हे हनुमान मंदिर, भगवान राम देखील येथे आल्याची आख्यायिका\nइंटरनॅशनल डेस्क - सीमारेषा ओढल्याने किंवा देशाची फाळणी झाल्यानंतरही त्याचा इतिहास बदलत नाही असे म्हटले जाते. पाकिस्तानात आजही हिंदूंची अनेक ऐतिहासिक मंदिर त्याचीच उदाहरणे आहेत. कराची येथील 1500 वर्षे जुने पंचमुखी हनुमान मंदिर त्यापैकीच एक आहे. या मंदिरातील हनुमान मूर्ती हजारो वर्षे प्राचीन आहे. या ठिकाणी एकेकाळी स्वयं भगवान श्री राम यांचे एकदा आगमन झाले होते अशी अख्यायिका आहे. यामुळे खास आहे मंदिर... - या मंदिरातील पंचमुखी हनुमान मूर्ती काही सामान्य मूर्ती नाही. कारण, यामध्ये हनुमानाची...\nहिंदूंचा सफाया करण्यासाठी पाकिस्तानात सुरू आहे हे काम, व्हिडिओतून दिसले भयंकर सत्य\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात 25 मार्च रोजी 500 हिंदूंना बळजबरी मुसलमान बनवण्यात आले. धर्म परिवर्तनचा हा खेळ खेळला पाकचा माजी राष्ट्रपती- लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ याचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने. व्यासपीठावर मुख्तयार जान सरहदी, पीर सज्जाद जान सरहदी आणि पीर साकिब जान सरहदी यांनी कलमा पढला आणि समोर उभ्या 500 हिंदूंना पुनरुच्चार करायला सांगितले. त्यांनी पुनरुच्चार केल्यानंतर त्यांना मुसलमान घोषित करण्यात आले. या आयोजनावर असेच म्हणण्यात आले होते की, या...\nमलाला 6 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भेटीवर; 4 दिवस कडेकोट सुरक्षा\nइस्लामाबाद - मलाला युसूफझाई हिचे पाकिस्तानमध्ये आगमन झाले असून पाकिस्तान सरकारने तिचे सहर्ष स्वागत केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे तिला तालिबानी दहशतवाद्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तालिबान्यांच्या हल्ल्यातून बचावल्यानंतर तिने परदेशात आश्रय घेतला होता. मलाला युसूफझाई ही सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ती मलालाने पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींची भेट घेतली. अब्बासींच्या...\n बलात्काऱ्याच्या बहिणीवर कुटुंबियांच्या मर्जीने झाले असे...\nपेशावर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडला असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात न्याय म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण - 20 मार्च 2018 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका तरुणीवर...\nन्यूयॉर्क एअरपोर्टवर घेतली पाक पंतप्रधानांची झडती, लोक म्हणाले हा प्रकार प्रोटोकॉलविरोधी\nन्यूयॉर्क - येथील जॉन एफ केनडी एअरपोर्टवर सुरक्षेच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान यांची झडती घेण्यात आली. पाकिस्तान मीडियाने हा दावा केला आहे. ही एक रुटीन प्रोसेस असल्याचे सांगितले जात आहे. पण पाकिस्तानातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार प्रोटोकॉलच्या विरोधी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. खासगी दौरा असल्याने घेतली झडती - असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी खाकान त्यांच्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता. पण या...\nPHOTOS: बंद दारांमागे अशी आहे पाकिस्तानातील तृतीयपंथीयांची LIFE\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात प्रथमच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले आहे. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - 2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले. -...\nVIDEO: पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवर प्रथमच ट्रान्सजेंडर अँकर, सर्वत्र कौतुक\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात प्रथमच ट्रान्सजेंडर महिलेने न्यूज बुलेटिन वाचले आहे. खासगी वृत्तवाहिनी कोहिनूर न्यूज चॅनलने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिची अँकर म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामिक देशात समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांविषयी नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अशात कोहिनूर न्यूज चॅनलने मार्वियाला अँकर करून एक नवे उदाहरण प्रस्तुत केले आहे. वृत्तवाहिनीच्या या निर्णयाचे जगभरात कौतुक केले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या संसदेत याच...\nपाकिस्तानमध्ये आहे शहीद भगतसिंहांच्या पूर्वजांचे घर, आता दिसते असे\nभारतीय स्वातंत्र्याचा इतिहास भगतसिंहांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना या वीर सुपूत्राने हसत-हसत फासावर जाणे स्वीकारले होते. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना ब्रिटीश शासनाने फासावर लटकवले होते. या घटनेला आता 87 वर्षे होत आहे. मात्र आजही आमच्या मनात आणि स्मरणात भगतसिंह आहे. भगतसिंहांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, आणि जिथे त्यांचे बालपण गेले ते घर आजही आहे. ते घर आता पाकिस्तानात आहेत. - भगतसिंहांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:51:14Z", "digest": "sha1:JHPP62TFMEZ66YOHVHJ7A765E4R7V2EJ", "length": 3371, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुक्तसर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमुक्तसर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर मुक्तसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2018-04-23T11:49:48Z", "digest": "sha1:VZ7ZH7CHXCCQDP5XWHZEXOD2NO3ILPXE", "length": 3531, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. ४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स.पू. ४७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/vidya-tamkhade-jankar.html", "date_download": "2018-04-23T11:48:20Z", "digest": "sha1:ZVYTRDJPNTFCNQDFQNGFBB72YBMEOXZ6", "length": 8207, "nlines": 67, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ. विद्या प्रकाश तामखडे-जानकर\nConstituency : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्ष, भा.ज.पा. महिला मोर्चा कामोठे शहर\nName : सौ. विद्या प्रकाश तामखडे\nFather's Name : तातोबा नागू जानकर\nMother’s Name : मंगलाताई तातोबा जानकर\nPlace of Birth: : सांगली, महाराष्ट्र\nHusband Name : प्रकाश शामराव तामखडे\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : बीजांकुर मार्केटिंग\nHobby : वाचन, प्रवास, समाजकारण\nResidence Address : शिवलीला कॉम्प्लेक्स, डी - ३०२, प्लॉट नं - ५७, सेक्टर - ०६ए, डॉमिनोज जवळ, कामोठे, नवी मुंबई ४१०२०९\nOffice Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे (आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय)\nअध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कामोठे शहर\nगेली १० वर्षापासून राजकारण व सामाजिक कार्याचा अनुभव...\nअध्यक्ष - अहिल्या महिला मंडळ\nमहीला अत्याचार विरोधात वेळोवेळी आंदोलने.\nशहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.\nवैयक्तिक स्वरुपातुन अनेक गरजूंना मदत.\nजागतिक महिला दिना निमित्त महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन.\nमहिलांच्या न्यायासाठी वरिष्ठांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nगरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल.\nभारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे.\nशासनाच्या योजनांचा सर्व थरातील लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे.\nमहिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम हाती घेऊन काम करणे.\nराष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा श्री महादेवजी जानकर यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. गावी जात असतानाची जाता जाता आपल्या लहान बहीणीची भेट घेत असतानाची काही क्षण पुर्तीची छायाचित्रे...\nभारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुवर्यांचा (शिक्षक) सत्कार सोहळा...\nकामोठे शहराला होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्या संदर्भात मा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे भाजपाने सिडकोचे एम. डी. राजेंद्र चव्हाण यांची भेट घेतली. ८ दिवसात पाणी पुरवठा वाढला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा कामोठे भाजपाच्या वतीने देण्यात आला.\nआदरणीय माजी खासदार व आपले आवडते लोकनेते रामशेठ ठाकूर, मा.आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्षा सौ.रत्नप्रभा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कामोठे यांच्यावतीने काल आगळा वेगळा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. देशाच्या संरक्षणासाठी ऊन-वारा-पाऊस-थंडी यांची पर्वा न करता, आपल्या कुटुबांचा कोणताच संपर्क न ठेवता संपुर्ण भारतियांचे रक्षण करणारे आजि सैनिकांच्या घरी राखी पोहचविन्यात आल्या.\nमा. ना. महादेव जानकर साहेब यांना राखी बांधत असतानाची काही क्षणचित्रे...\nमा. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, कॅबिनेट मंत्री फुंडकर साहेब, मा. आमदार डॉ. विनय नातू साहेब...\nधनगर बायकांनो जागे व्हा... आरक्षणाचे धागे व्हा...\nराजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था (रजि.) कामोठे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/07/", "date_download": "2018-04-23T11:33:44Z", "digest": "sha1:F5PQU6LVCNI4GVPIXIGWKIZAIDOZLJD6", "length": 5745, "nlines": 81, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: July 2010", "raw_content": "\nपुस्तकः अमेरिका - अनिल अवचट\nअनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.\nइंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.\nतिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्‍या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.\nभारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nपुस्तकः अमेरिका - अनिल अवचट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/healthy-food-recipes/page/5/", "date_download": "2018-04-23T11:36:29Z", "digest": "sha1:OSVKE5DZYMTO2QQ3EAHOHEE3QY4QMLBV", "length": 8515, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पौष्टिक पदार्थ | Healthy food recipes - Page 5", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पौष्टिक पदार्थ » पान ५\nशरीराला आवश्यक असलेल्यापैकी प्रोटीन, फायबर तसेच व्हिटामिन्स खजुर मधून मिळतात तसेच खजुरमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढते अश्या पौष्टिक खजुरची गोड बर्फी रोज खाता येईल.\nदुधामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर घालून तयार केलेल्या पौष्टिक पनीरची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आणि वेगवेगळी पाककृती आहेत.\nव्हिटामिन ई, लोह आणि कॅल्शिअम युक्त सुकामेवा म्हणुन ओळाखला जाणारा ‘बदाम’ बुद्धी तल्लख ठेवण्यात देखील महत्वाचा मानला जातो तसेच थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा आणि उन्हाळ्यात शरीराची अधिकची उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ‘बदाम’ करतो. अशा पोषक आणि खमंग बदामाचा रूचकर पदार्थ म्हणजे बदामाची बर्फी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, तर एकदा नक्की करून बघा.\nबाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.\nबाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/photo-gallery/koparkhairanecha-raja-ek-gaav-ek-ganpati", "date_download": "2018-04-23T11:13:08Z", "digest": "sha1:3CGWRSSVN6AFG27PRGZF2SQ6H2KFBZDG", "length": 6859, "nlines": 130, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Koparkhairanecha Raja, Ek Gaav, Ek Ganpati | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome फोटो गॅलरी कोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nआमचे छायाचित्रकार संजय प्रजापति यांनी टिपलेले अप्रतिम छायाचित्र\nठिकाण: कोपरखैरणे सेक्टर ५, ६, ७, ८ – नवी मुंबई\nअध्यक्ष: श्री. नंदकुमार अरुण म्हात्रे\nसचिव: श्री. राजेंद्र चोरगे\nखजिनदार: श्री. उत्तम खोत\nप्रो कबड्डी २०१७: यु मुंबाची हरयाणासोबतच पावसावरही मात, जिंकला घराच्या मैदानावर पहिला सामना\nभुवनेश्वर, विराटचं लंकादहन, मालिका ५-० ने खिशात\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/photo-gallery/travel-photography-by-jaspal-khalsa", "date_download": "2018-04-23T11:19:45Z", "digest": "sha1:WPMBZVD6AQ43RAHUKXHJDKFJUPVIA54O", "length": 6388, "nlines": 122, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Travel Photography by Jaspal Khalsa | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome फोटो गॅलरी जसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\nपहा भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य. आमचे छायाचित्रकार जसपाल खालसा यांच्या कॅमेरातून टिपलेली अशीच काही दृश्य.\nआणखी दृश्यांसाठी लाईक करा त्यांच्या फेसबुक पेजला\nपुरस्कार परतीचे साहित्यिकी राजकारण \nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-banana-ratoon-management-agrowon-maharashtra-6188", "date_download": "2018-04-23T11:30:13Z", "digest": "sha1:II3OSKIWWTOXPWBBV5XLK7EOQDHTGOYD", "length": 20316, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, banana ratoon management , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीर\nयोग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीर\nयोग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीर\nयोग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीर\nनाझेमोद्दिन शेख, अंजली मेंढे\nशनिवार, 3 मार्च 2018\nराज्यात केळीचा खोडवा पीक घ्यावयाची पद्धत नव्हती. मात्र ऊतीसंवर्धित रोपे व रासायनिक खताच्या वापरामुळे केळीच्या लागवड खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने एक खोडवा पीक घेणे आता अपरिहार्य झालेले आहे. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास केळीचे खोडवा पीक लागणीपेक्षा अधिक उत्पादन देऊ शकते.\nकेळी पिकातील खोडवा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्यवेळी पिले सोडणे महत्त्वाचे आहे. तसेच पिकाचे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्‍यक आहे.\nराज्यात केळीचा खोडवा पीक घ्यावयाची पद्धत नव्हती. मात्र ऊतीसंवर्धित रोपे व रासायनिक खताच्या वापरामुळे केळीच्या लागवड खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने एक खोडवा पीक घेणे आता अपरिहार्य झालेले आहे. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास केळीचे खोडवा पीक लागणीपेक्षा अधिक उत्पादन देऊ शकते.\nकेळी पिकातील खोडवा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्यवेळी पिले सोडणे महत्त्वाचे आहे. तसेच पिकाचे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्‍यक आहे.\nकेळीची लागवड केल्यानंतर केळीच्या खोडाभोवती नवीन मुनवे फुटायला लागतात त्यांना पिले अशी संज्ञा आहे. एका केळीच्या झाडाला त्याच्या पूर्ण जीवनचक्रात जातीपरत्वे ६-८ पिले येतात. फक्त एकच पीक घ्यावयाचे असल्यास पिले जसजशी येतील तसतशी कापून टाकावीत, अन्यथा मूळ झाडाची वाढ खुंटते व त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो.\nकेळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल (मुनवा) सोडावे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला सोडलेल्या पिलापासून काही नुकसान होत नाही.\nखोडवा पिकास शेतकरी शिफारशीप्रमाणे खत व पाणी व्यवस्थापन करीत नाहीत. तसेच रोग व किडींचाही वेळीच बंदोबस्त केला जात नाही. उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.\nमध्यम खोल काळ्या जमिनीत मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे तसेच ठेवून फक्त पाने कापून त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मूळ खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात. परिणामी कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते.\nपिल (मुनवा) सोडल्यानंतर पिलास नत्र १५० ग्रॅम, स्फुरद ४५ ग्रॅम व पालाश १५० ग्रॅम अशी खतमात्रा ठिबक सिंचन संचाच्या माध्यमातून द्यावी.\nखोडवा पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खत व्यवस्थापन\nक्र. खत मात्रा देण्याची वेळ (आठवडे) हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा) हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा) हजार झाडांसाठी खतमात्रा (किलो / आठवडा)\nयुरिया मोनोअमोनिअम फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश\n१. १ ते १६ ५.५ ४.६५ ३\n२. १७ ते २८ १३.५ --- ८.५\n३. २९ ते ४० ५.५ --- ७\n४. ४१ ते ४४ ४ --- ५\nकेळी पिकास एकूण १८०० ते २२०० मि.मी. पाणी लागते. पिकास सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त आहे. सिंचनासाठी सूक्ष्मनलिका पद्धतीपेक्षा (मायक्रोट्युब) ड्रिपर किंवा इनलाइन ड्रीपरचा वापर अधिक फायद्याचा ठरतो. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, पिकाच्या वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.\nक्र. पाणी देण्याची वेळ (महिने) पाण्याची गरज (लि/झाड/दिवस)\n१ १ ते ४ ४.५ ते ६.५\n२. ५ ते ९ ९ ते ११\n३. १० १४ ते १६\n४. ११ १८ ते २०\n५. १२ २१ ते २४\nटीप : वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार आणि पीकवाढीच्या अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.\nलागवडीपासून ३-४ महिने बाग स्वच्छ ठेवावी. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार उभी आडवी कुळवणी करावी. तीन महिन्यांपर्यंत कुळवणी करता येते. दर ३ महिन्यांच्या अंतराने बागेची बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी.\nकेळीची पिले धारदार कोयत्याने नियमित कापून टाकावीत. रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत.\nझाड पडू नये म्हणून आवश्‍यकतेनुसार खोडाला बांबूच्या काठ्या किंवा पाॅलीप्राॅपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने आधार द्यावा.\nकेळी खोडवा पिकाचे फायदे\nखोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत, रोपे, नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही.\nमातृपिकाची सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते. परिणामी, पिकाची वाढ लवकर होते. पीक लवकर तयार होते.\nखोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्‍चितपणे अधिक असते.\nसंपर्क : नाझेमोद्दिन शेख, ०२५७- २२५०९८६\n(केळी संशोधन केंद्र, जळगाव)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...\nउस पीक सल्ला १५ फेब्रुवारीनंतर तोडलेल्या उसाचा खोडवा शक्यताे...\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप...जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर...\nवांगी पीक सल्लासद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nसंत्रा, मोसंबी बागेतील फळगळ नियंत्रणविदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संत्रा आणि मोसंबीच्या...\nफळबाग सल्लायेत्या काळात तापमान वाढण्याची शक्यता आहे....\nऊस पाचटाचे व्यवस्थापनऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nफळवर्गीय भाजीपाला सल्लामिरची रोगनियंत्रण : चुरडा- मुरडा नियंत्रण...\nकाढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...\nक्षेत्रनिहाय जलसंधारण उपाययोजनाओघळ नियंत्रण कामांबरोबरच पाणलोट क्षेत्रावर...\nचुनखडीयुक्त जमिनींचे व्यवस्थापनराज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक...\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत...येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्लाउन्हाळ्यामध्ये वाढ होत असून, झाडाभोवती ओलावा...\nउसातील खोड किडीचे नियंत्रणराज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t17905/", "date_download": "2018-04-23T11:36:13Z", "digest": "sha1:L4AHFDKKKJNW7LXH5TW25YVY3JAYGK6M", "length": 2458, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-........ मानुस ..........", "raw_content": "\nआलिया पहाट पक्षांची चिवचिवाट\nकळी फुलं होउनि बहरली बगिच्यात\nग़ार वारा वाहत झळली पान सारि\nनवी पालवी नव्याने खिलू लागली\nपावसाची सरं हिरव्या पाणावरं\nबहरुनी निसर्ग आला हसू ओठांवरं\nशब्द मनातले जोळु लिहिता लिहिता\nकवी मन माझे करू लागला कविता\nसांगावे तयासी कोणं शहाने ती सारि\nनाश निसर्गाचा करू पाहती हि शहानी\nकाय होता हा मानुसं मात्र आता काय झाला\nआपल्याच फालतू कर्माने मानुसं नष्टं झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/45--dos", "date_download": "2018-04-23T11:38:08Z", "digest": "sha1:D3Z6JCYZM23HWDHTXVLNAO6B4RJRY4TM", "length": 8721, "nlines": 26, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "क्षुल्लक: सेवा नाकारण्याच्या श्रेणी (DoS) हल्ले", "raw_content": "\nक्षुल्लक: सेवा नाकारण्याच्या श्रेणी (DoS) हल्ले\nDoS हल्ला आपले सर्व्हर किंवा नेटवर्क संसाधन अस्थायी किंवा कायमचे अनुपलब्ध करण्यासाठी दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहेत हॅकर्स विविध सेवा देऊन हे कार्य साध्य करतात. परिणामी, ते आपल्या खात्याचे जीवनभर निलंबित किंवा व्यत्यय आणू शकतात. सर्व्हिसवरील हल्ल्यांमध्ये मुख्यतः नवीन संगणक आणि मोबाईल डिव्हाईसेसना लक्ष्य करण्यासाठी वापरलेल्या तडजोड केलेल्या मशीनचा समावेश असतो. हे मशीन विविध असुरक्षा ठरू शकतात आणि लक्ष्यित संसाधने सतत विनंती, क्वेरी आणि अवांछित संदेशांसह पूर येतात - best south american vacations. DoS आक्रमण आपल्या डिव्हाइसेसवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतात आणि ते बॉटनेट्स म्हणून अंमलात आणतात.\nअँड्र्यू दिवस, Semaltट ग्राहक यशस्वी व्यवस्थापक म्हणते की DoS हल्ले दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले आहेत:\n1. ऍप्लिकेशन स्तर DOS आक्रमण\nया प्रकारचा DoS अपघातमध्ये एच.टी.ए.एस. पूर, शून्य-जायचा स्फोट किंवा मंद आक्रमण (स्लोलोरीस किंवा रूडी) यांचा समावेश आहे. हे DoS हल्ला मोठ्या प्रमाणावरील ऑपरेटिंग प्रणाली, संप्रेषण प्रोटोकॉल आणि वेब अनुप्रयोगांसाठी समस्या उद्भवण्याचे लक्ष्य करते. ते निष्पाप आणि वैध असल्याचे दिसत आहे आणि विनंत्या विश्वसनीय असल्याचे दिसत आहेत, परंतु त्यांची परिमाण प्रत्येक सेकंदाच्या विनंत्यांच्या स्वरूपात मोजली जाते..हे DoS आक्रमण लक्ष्यित अनुप्रयोगांना भरपूर विनंत्यासह उध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे उच्च मेमरी आणि CPU वापर वाढते. ते अखेरीस आपल्या कॉम्प्यूटर ऍप्लिकेशनस हाताने किंवा क्रॅश करेल.\n2. नेटवर्क स्तर DoS हल्ला\nनेटवर्क लेयर DoS हल्ल्यामध्ये UDP पूर, SYN पूर, NTP ऍप्लीनेशन, DNS प्रवर्धन, एसएसडीपी वाढ, आणि आयपी फ्रॅगमेंटेशन्स यांचा समावेश आहे. हे सर्व हाय-एंड बॅरगे आहेत आणि प्रत्येक सेकंद गिगाबिट्समध्ये मोजले जातात. ते प्रति सेकंद पॅकेटच्या स्वरूपात देखील मोजले जातात आणि नेहमी स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे चालविल्या जाणाऱ्या संगणक किंवा बोटनेट्सद्वारे अंमलात आणले जातात.\nDoS हल्ले कसे पसरतात\nसायबर गुन्हेगारी लोक शेकडो हजारो संसर्गावर नियंत्रण ठेवतात आणि लाखो स्मार्टफोन आणि संगणकांवर नियंत्रण करतात. ते झोम्बी किंवा बोनेट नेटवर्क्सचा मास्टर्स म्हणून काम करू इच्छितात आणि डिस्ट्रिब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस (डीडीओएस) आक्रमण, मोठ्या स्पॅम मोहिम आणि अन्य सायबर-आक्रमण वितरित करतात. काही परिस्थितींमध्ये, सायबर गुन्हेगार झोम्बीचे विशाल नेटवर्क आणि संक्रमित मशीन नवीन नेटवर्क आणि डिव्हाइसेसवर प्रवेश करण्यासाठी स्थापित करतात, एकतर प्रत्यक्ष विक्री म्हणून किंवा भाड्याच्या आधारावर. स्पॅमर्स मोठ्या आकाराच्या स्पॅम मोहिम चालवण्यासाठी नेटवर्क विकत घेऊ शकतात किंवा विकत घेऊ शकतात.\nDoS बोनेट्स् आणि त्यांचे साधने:\nbotnet च्या निर्माता एक बॉट herder किंवा botmaster म्हणतात. तो किंवा ती दुर्गम स्थानांवरून डॉट्स बॉॉटवर नियंत्रण ठेवतो आणि काही कार्य त्यांच्याकडे रोजच्यारोज ठेवतो. Botmasters निरुपयोगी प्रोटोकॉल, HTTP वेबसाइट आणि आयआरसी नेटवर्क सारख्या लपलेल्या चॅनेल द्वारे DoS सर्व्हरशी संप्रेषण. इतरांशी संपर्क साधण्यासाठी तो / ती ट्विटर, फेसबुक आणि लिंक्डइन सारखी सोशल मिडिया साइट्स वापरू शकते.\nबोतनेट सर्व्हर डीओएस नेटवर्क आणि इतर बॉटनेट सर्व्हरशी सहजपणे संवाद साधू किंवा सहकार्य करू शकतात, एक प्रभावी P2P नेटवर्क तयार करणे जे एक किंवा अनेक बॉट तज्ञांद्वारे नियंत्रित आहे. त्याचा अर्थ असा आहे की डूएसच्या नेटवर्कला कोणास सूचना देणे शक्य नाही कारण हल्ले अनेक उत्पत्तीच्या आहेत आणि केवळ हॅकर्स त्यांचे मूळ कळतात. DoS सांगकामे अस्पष्ट सेवांच्या मागे लपविलेले असतात आणि त्यांच्या ग्राहकांना हाय-प्रोफाइल टूलकिट्स पुरविण्याची ढोंग करतात, जे प्रत्यक्षात काहीही नसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:45:06Z", "digest": "sha1:MSGWCHHJN6C5WDZAXWGEM6EGETYGZYQL", "length": 5479, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेड फ्रीर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nमे २, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-women-self-help-groupmiraj-distsangli-7433?tid=128", "date_download": "2018-04-23T11:48:39Z", "digest": "sha1:Y2TE7Q5IZCW35TXN7XHNSQE2RT42JNCC", "length": 26930, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of women self help group,Miraj Dist.sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nरविवार, 15 एप्रिल 2018\nशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज येथील सौ. छाया दळवी यांनी अठरा वर्षांपूर्वी हस्तकलेचे शिक्षण घेऊन बांबूपासून आकाशकंदील, झोपडी तयार करण्यास प्रारंभ केला. ग्राहकांकडून या वस्तूंना मागणी वाढू लागल्याने छाया दळवी यांनी २००५ मध्ये रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक विकासाची दिशा मिळाली आहे.\nशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज येथील सौ. छाया दळवी यांनी अठरा वर्षांपूर्वी हस्तकलेचे शिक्षण घेऊन बांबूपासून आकाशकंदील, झोपडी तयार करण्यास प्रारंभ केला. ग्राहकांकडून या वस्तूंना मागणी वाढू लागल्याने छाया दळवी यांनी २००५ मध्ये रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक विकासाची दिशा मिळाली आहे.\nमिरज (जि. सांगली) येथील दिंडीवेस भागामध्ये सौ. छाया दळवी रहातात. कामाची आवड असेल तर यश नक्की मिळते हे लक्षात घेऊन छायाताईंनी त्यांच्या नातेवाईक सौ. सुजाता चौगुले यांच्याकडून हस्तकलेतून विविध वस्तूंच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय कार्यालयाच्या मार्फत हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. या विभागाकडून माहिती घेऊन सन १९९९च्या दरम्यान छायाताईंनी मिरज येथे हस्तकला प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतला. यामध्ये त्यांनी बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच छायाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आकाश कंदील बनविण्यास सुरवात केली. मुळात हस्तकला तशी अवघड, पण सराव केला तर विविध वस्तू तयार करणे सोपे जाते. प्रशिक्षण घेत असताना छायाताईंनी घरीदेखील बांबूच्या वस्तू बनविण्याचा सराव केला. प्रारंभी स्वतः शिल्लक ठेवलेल्या रकमेतून बांबूपासून वस्तू बनविण्यासाठी गुंतवणूक केली. पहिल्यांदा बांबूपासून १०० आकाशकंदील तयार केले. या आकाशकंदिलांची विक्री मिरज शहरामध्ये केली. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. आकाशकंदिलांची मागणी वाढल्याने त्यांना विविध वस्तू तयार करण्यासाठी मदतीची गरज भासू लागली. या पूरक उद्योगासाठी बचत गट स्थापन केला तर नक्कीच उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे छायाताईंनी बचत गटाची माहिती घेण्यास सुरवात केली.\nमहिला बचत गटाची स्थापना\nमिरज शहरात अगोदरपासून महिला बचत गट कार्यरत होते. हे बचत गट महापालिकेशी सलग्न आहेत. त्यामुळे छायाताईंनी मिरज महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर छायाताईंनी २००५ साली रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांनी प्रतिमहिना ३० रुपये, त्यानंतर ५० रुपये आणि गेल्या तीन वर्षांपासून १०० रुपये अशी बचत सुरू केली. सध्या गटाच्या अध्यक्ष म्हणून सौ. छाया दळवी, तर सचिव सौ. लता दळवी काम पाहतात. कु. उज्ज्वला माने, सौ. भाग्यश्री माने, श्रीमती वैशाली भोसले, सौ. अस्मिता जाधव, श्रीमती प्रभावती पवार, सौ. कल्पना करनुरे, सौ. राजश्री पवार या बचत गटाच्या सदस्या आहेत.\nछायाताईंनी गट स्थापन केला, परंतु गटातील महिलांना बांबू कारागिरीचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी सौ. दळवी यांनी स्वतःच्या घरी दररोज महिलांना बांबू कारागिरी संदर्भात प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. प्रशिक्षण सुरू असताना साहित्य खराब झाले तरी चालेल, परंतु गुणवत्तेशी तडजोड कधीच केली नाही.\nहळूहळू बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेला आकाशकंदील आणि इतर वस्तूंची मागणी वाढू लागली. त्यामुळे कच्चा माल खरेदी करण्यासाठी आर्थिक निकड भासू लागली. त्यामुळे गटासमोर कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटिका शाहीन शेख यांचे छायाताईंनी मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गटाला बॅंकेकडून कर्ज मिळवण्यास मदत केली. सुरवातीच्या टप्प्यात गटाने दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून व्यवसाय वाढवला. सन २०१५ मध्ये पुन्हा अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले. बचत गटाने त्याचीही परतफेड केली, त्यामुळे बॅंकेत गटाची पत वाढली.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांबूची खरेदी\nमहिला बचत गटातर्फे कलाकुसरीसाठी बांबूची खरेदी ही मिरजेतील बाजारपेठेतून केली जायची; पण बांबूचे वाढते दर आणि वेळेवर चांगल्या गुणवत्तेचे बांबू मिळत नसल्याने बचत गटाने सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील बाजारपेठेतून चांगल्या गुणवत्तेचे बांबू खरेदी करण्यास सुरवात केली. बचत गटाला सावंतवाडीमधून १२ फूटांचा एक बांबू ३० रुपयांना मिळतो. बचत गटातर्फे वर्षाला ५०० बांबूंची खरेदी केली जाते. आकाशकंदिलासाठी लागणारे रंगीबेरंगी कापड, धाग्यांची खरेदी सांगली बाजारपेठेतून केली जाते. या उद्योगातून गटातील महिलांच्या संसाराला चांगला आर्थिक हातभार लागला आहे.\nप्रत्येक सदस्याला मिळाला रोजगार\nबांबूपासून आकाशकंदील निर्मितीबाबत सौ. छाया दळवी म्हणाल्या, की माझ्या घरी पहिल्यापासून आकाशकंदील तयार केले जायचे. परंतु मागणी वाढल्याने जागा कमी पडू लागली. त्यामुळे गटातील प्रत्येक सदस्यांना काम विभागून दिले. यामुळे नियोजन करणे सोपे झाले. सकाळी ११ ते ५ या वेळेत बचत गटातील सर्व सदस्य आकाशकंदील तयार करण्यास बसले, तर पंचवीस आकाशकंदील तयार होतात. आकाशकंदील निर्मिती हे कलाकुसरीचे काम आहे, पण निर्मितीमध्ये सातत्य ठेवल्याने आकाशकंदील बनविण्याचे काम आम्हाला सोपे वाटू लागले आहे.\nबाजारपेठेबाबत गटाच्या सचिव सौ. लता दळवी म्हणाल्या, की सध्या आम्ही आकाशकंदील आणि लहान शोभेच्या झोपड्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेचा विचार केला नाही. मिरज येथील ओळखीचे विक्रेते आमच्याकडून आकाशकंदील, झोपडीची खरेदी करतात. या उत्पादनांची विक्री मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, आणि गोव्यातील बाजारपेठांत करतात. दिवाळीच्या दरम्यान विविध आकार आणि डिझाइनच्या सुमारे एक हजार आकाशकंदिलाची आम्ही निर्मिती आणि विक्री करतो. नाताळच्या काळात गोवा बाजारपेठेत ३०० झोपड्यांची विक्री होते. बचत गटातर्फे चार प्रकारच्या आकाशकंदिलांची निर्मिती केली जाते. साधारणपणे आकार आणि डिझाइननुसार ७५ रुपये, १२५ रुपये, १५० रुपये, ३०० रुपये असा दर ठेवलेला आहे. तसेच झोपडीच्या आकारानुसार ८० रुपये, १०० रुपये, १५० रुपये असा दर ठरविला आहे. बांबू कलाकुसरीतून बचत गटाची वर्षाला तीन लाखांची उलाढाल होते. खर्च वजा जाऊन त्यातून मिळणारा नफा गटातील सर्व सदस्यांमध्ये वाटून घेतला जातो.\nअसे आहे बचत गटाचे नियोजन\nआकाशकंदील निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची डिसेंबरमध्ये खरेदी.\nजानेवारीपासून विविध आकाराच्या आकाशकंदिलाची निर्मिती.\nगणपतीनंतर नाताळ सणामध्ये सजावटीसाठी लागणाऱ्या झोपड्यांची निर्मिती.\nव्यवसायातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तू तयार करण्यासाठी झालेला खर्च बाजूला काढला जातो.\nमिळालेल्या नफ्याचे समान वाटप.\nपैशांची गरज पडल्यास सदस्यांकडून आर्थिक नियोजन.\nबांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन.\nतयार केलेल्या वस्तू इतर राज्यात विक्रीसाठी गटाचे प्रयत्न.\n- सौ. छाया दळवी, ८७८८०८२९११\n(अध्यक्षा, रणझुंजार महिला बचत गट, मिरज)\nमहिला women कला व्यवसाय\nआकाश कंदिलांची सजावट करताना महिला सदस्या.\nरणझुंजार महिला बचत गटाच्या सदस्या\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nअक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nप्रयोगशील पाडवी यांनी फुलविली डोंगराळ...पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\n एका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nसांगलीच्या रसाळ, मधुर द्राक्षांना...सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होत...\nगटशेतीतून साधली संकटांवर मात पीक उत्पादन असो की मालाचे मार्केटिंग-विक्री असो,...\nसमाजकारणासह प्रयोगशील शेतीचा व्यासंग...पुणे जिल्ह्यातील चांडोली बुद्रुक येथील रामचंद्र...\nस्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची...सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावाने विकासाचा ध्यास...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nमिनी डाळमिलच्या माध्यमातून व्यवसायात...कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड...\nजमीन सुपीकतेसाठी सामूहिक वाटचाल... मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील...\nकाटेकोर पाण्यात बारमाही काकडी, भाजीपालाहिंगोली जिल्ह्यातील पळसगाव (ता. वसमत) येथील विलास...\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यासकोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/376/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T11:25:13Z", "digest": "sha1:S7VND42Z276VCWFG3MG7OFWJFNCUEAYV", "length": 9631, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nबोरी येथे राष्ट्रवादीचे साडेतीन तास रास्तारोको\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विजय भांबळे आणि उपसरपंच अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे विजेच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले. जिंतूर-परभणी रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तब्बल साडेतीन तास रास्तारोको केला होता.\nराज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून याआधीही विजेच्या समस्येसंबंधी निवेदन देण्यात आले होते. मात्र काम अगदी संथ गतीने होत होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. पाच एन.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरचे काम जलद गतीने करण्यात यावे, बोरी येथील घरांवरील विजेच्या तारा काढण्यात याव्या, बोरी परिसरात असलेल्या ६३ के. व्ही. ची डी.पी. बदलून १०० के. व्ही. टाकावी, शासन निर्णयाप्रमाणे कृषीपंपाना १२ तास वीज पुरवठा व घरगुती उपभोक्त्यांसाठी १८ तास वीज देणे, वणी फिडर स्वतंत्र करणे, चांदज फिडरचा लोड कमी करणे इत्यादी मागण्या या आंदोलकांतर्फे करण्यात आल्या.\nसाडेतीन तास चाललेल्या आंदोलनाला लिखीत आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या लिखीत आश्वासनामध्ये १५ दिवसाच्या आत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन महावितरणचे अधिक्षक अभियंता उदय जानार, कार्यकारी अभियंता जायभाय, उपअभियंता ए. व्ही. एमनीवार, कनिष्ठ अभियंता मानकरने दिली.\nयावेळी वीज प्रशासनाकडून डीवायएसपी अनिल कांबळे, सपोनी शेख, अवसरमोल, दळवी, राखीव पोलीस दलाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी सभापती अशोकराव चौधरी, सरपंच सखाराम शिंपले, अनंतराव चौधरी, शरद अंभुरे, प्रसाद बुधवंत, विजयकुमार चौधरी, पाशा पटेल, शशिकांत चौधरी, संजय शर्मा, ३५ ते ४० गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nपाटोदा ग्रामस्थांच्या जिद्दीला सलाम - खा. सुप्रिया सुळे ...\nपाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढल ...\nअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा - धनंजय मुंडे ...\nराज्याला आर्थिक संकटात लोटणारा 'अनर्थ'संकल्पअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळाने पीडित लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना अर्थसंकल्पात नियोजनाचा अभाव दिसत आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात, अराजकतेच्या खाईत लोटलं असून हा अर्थसंकल्प नाही तर 'अनर्थ'संकल्प आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंज ...\nअभाविप वर तात्काळ बंदी आणावी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने मुंबई येथे मोर्चा ...\nअभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे, त्यामुळे अभाविपवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या तरूण कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदान परिसरात अभाविपविरोधात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी, अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष सुहेल सुभेदार, युवती काँग्रेसच्या पुजा देसाई, कोमल फडतरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.गु ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowontung-mirajsangli-6673?tid=128", "date_download": "2018-04-23T11:39:59Z", "digest": "sha1:COWMX5Y4FKSD2VLH65FWR3HVJANQTKED", "length": 23142, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon,tung, miraj,sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउसाला निर्यातक्षम केळीची जोड\nउसाला निर्यातक्षम केळीची जोड\nमंगळवार, 20 मार्च 2018\nपैसे देणारे आणि ऊर्जा देणारे पीक म्हणून उसाकडे पाहतो. आमच्या परिसरात केळीची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. उसाला पर्याय नव्हे; पण त्याला जोड म्हणून त्याकडे वळण्याचा निर्णय २०१२-१३ च्या दरम्यान घेतला. केळीची स्थानिक बाजारपेठेत विक्री करायची नव्हती. त्यामुळे पहिल्यापासूनच निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणे हेच उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने परिपूर्ण अभ्यास व शेतकऱ्यांच्या शेतांच्या भेटी घेतल्या. जमिनीची चांगली मशागत केल्यास व तिची निगा राखल्यास उन्हाळी हंगामातही केळीचे चांगले उत्पादन येऊ शकते.\nसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या पिकाला पर्याय नव्हे; पण त्याला तेवढ्याच हुकमी पिकाची जोड द्यायला हवी. त्याशिवाय उत्पन्नस्रोत वाढणार नाही हे अोळखून येथील युवा शेतकरी तृषांत मगदूम यांनी अलीकडील वर्षांत केळीची शेती सुरू केली आहे. चांगल्या उत्पादनासोबत आश्वासक बाजारपेठ मिळवताना त्यातून अर्थकारण सुधारले आहे. त्यांच्या जोडीला असलेल्या अन्य केळी उत्पादक मित्रांनाही हे पीक फायदेशीर ठरते आहे.\nसांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या पिकांसह ऊस मोठ्या प्रमाणात आहे. गावातील शेतीला कृष्णामाईची (नदी) कृपा आहे. मुबलक पाणी असल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.\nगावात युवक शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. साहजिकच नव्या विचारांसह नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला प्राधान्य दिले जाते. तरुणांबरोबर जुने जाणते शेतकरीही शेतीतील बदल स्वीकारू लागले आहेत. केवळ विक्रमी उत्पादन न घेता बाजारपेठेचाही अभ्यास करून पिके घेण्यावर अनेकांचा भर आहे. कोणते पीक कधी घ्यायचे याचा अभ्यास झाल्याने प्रत्येकामध्ये निरोगी स्पर्धाच सुरू झाली आहे.\nनोकरी सोडून गावची शेती\nतृषांत सांगतात की मी बीए आणि आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. मला नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे पुणे गाठले. तिथे २००२ ते २०१० पर्यंत नोकरी केली. दरम्यानच्या काळात वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पुन्हा गावी परतलो. पहिल्यापासूनच शेतीची आवड असल्याने शेतीचे धडे गिरवणे अवघड गेले नाही.\nशेती एकमेकांच्या साह्याने आणि सल्ल्याने केली तरच फायद्याची ठरते, पण केवळ एकच पीक न घेता त्यामध्ये विविधता असणे गरचेचे आहे हे तृषांत यांना बंधू अविनाश यांनी शिकवले. सन २००१ मध्ये पहिल्यांदा झेंडूची लागवड केली. त्यामधून उत्पादन अपेक्षित मिळाले. अन् उसाबरोबर अन्य पिके घेण्याचा मगदूम बंधूनी निर्णय घेतला.\nमगदूम म्हणतात, की उसाला सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे पैसे लवकर हातात येत नाहीत. मग उसात आंतरपीक घेतले तर नक्कीच काहीतरी पैसा मिळू शकतो. मग उसात कोथिंबीर, मेथी, फ्लाॅवर यांसारखी पिके घेऊ लागलो; पण ती घेताना बाजारपेठेचा अभ्यास करतो. त्याचा नक्कीच फायदा होतो. दोन पैसे मिळत असल्याने उसातला मोठा खर्च कमी होण्यास मदत होते.\nमाझे मित्र प्रताप खबाले आणि तुकाराम कापसे, आबासाहेब साळुंखे यांचे मार्गदर्शन केळीसाठी उपयुक्त ठरले. अडचणी येत राहिल्या. पण जिद्द सोडली नाही.\nमगदूम यांच्या केळी शेतीची वैशिष्ट्ये\nजमिनीत कोणता घटक कमी, जास्त आहे हे माती परीक्षणातून पाहून त्यानुसार खतांची मात्रा ठरविली जाते. यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता राहण्यास मदत होते.\nकेळीचा हंगाम संपल्यानंतर त्याचे खुंट जमिनीत गाडले जातात. त्यातून\nसेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत\nजमिनीचा पोत सुधारला जातो\nकेळीच्या रानात उसाची लागवड केल्यास उसाचा उतारा वाढण्यास मदत\nपूर्वी - एकरी ६० टनांपर्यंत\nलागवड हंगाम कोणता फायदेशीर\nलागवड हंगाम -जून-जुलैपेक्षा एप्रिल-मेचा फायदेशीर ठरतो. कारण नैसर्गिक आपत्ती उदा. अवकाळी पाऊस या भागात एप्रिल मेच्या दरम्यान येतो. तोपर्यंत विक्री हंगाम आटोपतो. घडांचे नुकसान होत नाही.\nमगदूम यांच्या अनुभवानुसार उन्हाळी लागवड पावसाळी हंगामापेक्षा थोडी फायदेशीर\nत्यांच्या भागात एप्रिल-मेमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता\nलागवड हंगाम योग्य प्रकारे न साधल्याने सुमारे दीड लाख रुपयांचा फटका बसल्याचा त्यांच अनुभव\nपावसाळी हंगाम लागवडीत - ३० ते ३५ टन\nउन्हाळी - २५ टन\nसन २०१७ - ३७ टन - दर प्रतिकिलोस १४ रु.\nयंदा - ३५ गुंठे क्षेत्र - आत्तापर्यंतचे उत्पादन १५ टन - प्लॉट अजून सुरू.\nदर प्रतिकिलोस साडेतेरा रु.\nमगदूम सांगतात की बांधावर येऊन व्यापारी केळी खरेदी करतात. मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी माल जातो. मागील वर्षापासून व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी माल देत आहे. अलीकडील वर्षांत सरासरी दर किलोला\n८ रुपयांपासून १०, १४ रुपयांपर्यंत मिळाला आहे.\nमगदूम सांगतात की एकरी तीस टन उत्पादन व किलोला १० रुपये दर मिळाला, तरी तीन लाख रुपये मिळतात. एक लाख रुपये उत्पादन खर्च धरला तर दोन लाख रुपये हाती पडतात. निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यासाठी एकरी १० हजार रुपये जादा खर्च होतो. निर्यातक्षम केळीला स्थानिक बाजारपेठेपेक्षा दरही अधिक मिळतो.\nसंपर्क- तृषांत मगदूम - ९८२२५२५८२४\nकेळी banana सांगली शेतकरी शेती capsicum मिरची बागायत झेंडू अवकाळी पाऊस व्यापार\nनिर्यातक्षम केळीचे बॉक्‍स तयार करताना मजूर\nदर्जेदार केळीच्या घडासोबत तृषांत मगदूम व मजूर\nपाणी देण्यासाठी ठिबक यंत्रणा\nझेंडूची शेती. सध्या प्रतिकिलोस २५ ते ३० रुपये दर मिळतो आहे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nअक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nप्रयोगशील पाडवी यांनी फुलविली डोंगराळ...पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\n एका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nसांगलीच्या रसाळ, मधुर द्राक्षांना...सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होत...\nगटशेतीतून साधली संकटांवर मात पीक उत्पादन असो की मालाचे मार्केटिंग-विक्री असो,...\nसमाजकारणासह प्रयोगशील शेतीचा व्यासंग...पुणे जिल्ह्यातील चांडोली बुद्रुक येथील रामचंद्र...\nस्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची...सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावाने विकासाचा ध्यास...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nमिनी डाळमिलच्या माध्यमातून व्यवसायात...कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड...\nजमीन सुपीकतेसाठी सामूहिक वाटचाल... मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील...\nकाटेकोर पाण्यात बारमाही काकडी, भाजीपालाहिंगोली जिल्ह्यातील पळसगाव (ता. वसमत) येथील विलास...\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यासकोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/mumbai", "date_download": "2018-04-23T11:17:10Z", "digest": "sha1:HXZH6GCRDTH4IWLTGNEOY56ZTP6S4YJD", "length": 9727, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "मुंबई | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nनवी मुंबईतील स्टार सिटी बार सील करा, मनसेची मागणी\nनवी मुंबई मनपा हद्दीत विनापरवाना हॉटेल सुरु, मनसेचा आरोप प्रतिनिधी, नवी मुंबई: बेलापूर येथील प्लॉट क्र.५३, सेक्टर १५ मधील स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार गेल्या तीन ते चार वर्षांपासून विनापरवान...\tRead more\nहिंदू महासभेच्या वतीने धारावी येथे भगवी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा\nहिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा साजरा करण्यासाठी धारावी येथे संत रोहिदास मार्गावर प्रथमच भगवी गुढी उभारून नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने साजरा करण्यात आला...\tRead more\nआमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची मागणी\nनवी मुंबई / सूर्यकांत गोडसे: नेरुळ सेक्टर-२ येथील संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदान अश्या दोन्ही ठिकाणी ‘ओपन जिम’ आमदार निधीतून उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा...\tRead more\nमनसेने सिडको भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला, महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक\nनवी मुंबई / सूर्यकांत गोडसे: वाशी सेक्टर-३०अ येथे सिडकोने महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरचा भूखंड गेली १५ वर्षांपासून आरक्षित ठेऊनही तेथे महाराष्ट्र भवन न बांधल्याच्या निषेधार्थ आज मराठी भाषा दिन...\tRead more\nलष्करी इतमामात शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर अंत्यसंकार\nविरार: रत्नागीरी येथील गुहागरमधील कुटगिरीसारख्या दुर्गम भागातून सैन्यदलात भरती झालेल्या मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर येथील राहत्या घरी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चीनच्या बॉर्डर...\tRead more\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंक : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जपानशी सामंजस्य करार\nमुंबई : नवी मुंबईसह कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या टप्पा एक व टप्पा दोनच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जपानचे परिवहन जमीन पा...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/", "date_download": "2018-04-23T11:15:37Z", "digest": "sha1:ZVPDW5ULPWOWBKYY526TYKIMN3EBOM3B", "length": 35543, "nlines": 400, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!", "raw_content": "\nआता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nशिक्षक : उठ चंद्या, मेंदूची व्याख्या सांग.\nचंद्या : सर, जे माझ्याकडे आहे पण तुमच्याकडे नाही, त्याला मेंदू म्हणतात \nशिक्षक : अच्छा, आणि आता जे तू खाणार आहेस आणि मी देणार आहे, त्याला ‘मार’ म्हणतात \nयावर आपले मत नोंदवा\nएका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती,\nमाझ्या समोर आरतीची ताट आलं..\nनमस्कार करुन मी आपल्या खिशातुन दहा रुपयाची फाटकी नोट त्याताटात अशा प्रकारे ठेवली\nकी कुणी पाहीलं नाही.\nत्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला…\nतेवढ्यात त्या गर्दीतुन माझ्या मागे असणाऱ्या काकुंनी माझ्या खांद्यावर थाप मारली.\nआणि 2000रु.नोट माझ्या हातात दिली….\nमी ती नोट घेतली आणि त्या आरतीच्या ताटात टाकली.\nती 2000 ची नोट बघून आपण फक्त दहा रुपयेच टाकले,\nया गोष्टीची थोडी लाज पण वाटली,\nबाहेर जाताना त्या काकुंबद्दल थोडा आदर वाटला,\nम्हणुन मी त्यांना नमस्कार केला.\nत्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा रूपयाची नोट काढताना तुमच्याच खिशातुन 2000 रुपयेची नोट खाली पडली होती,\nती तुम्हाला मी परत देत होते…\nबोला सत्यनारायण महाराज की जय\nयावर आपले मत नोंदवा\nमाझ्या जवळ साधारण 7-8 पाढंरे शर्ट होते…….\nमी जेव्हा पण सासुरवाडीला बायकोला आणायला जात असे तेव्हा सफेद शर्टवरती कुठली पण मॅचिंग जींन्स घालुन जात असे..\nएकदा सासु हटकत बोलली – जावई बापु काय गोष्ट आहे हो…. एकच शर्ट आहे का तुमच्या जवळ दरवेळी येता तेव्हा सफेद शर्टच घालुन येता…\nमी सहज बोलुन गेलो :- कसयं ना मामी…….\nतुम्हाला पण 4 मुली आहेत … तरी दरवेळी माझ्या सोबत हिलाच का पाठवता हो\nकधीतरी बदलुन हि पाठवत जा …\nत्याच्या नंतर कधी बायकोने माहेरी जायायचं नावंच काढलं नाही आणी मला हि जाऊ दिलं नाही..\nयावर आपले मत नोंदवा\nचर्चमध्ये सॅबी आणि ज्युली यांचा लग्नसोहळा सुरू होता. फादर बर्नार्ड\nयांनी जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली..\n“हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं.. नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं.”\nफादरचं बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री\nपुढे येऊ लागली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं…\nत्या स्त्रीला पाहताच ज्युलीने सॅबीच्या मुस्काटात मारली,\nसॅबीच्या आईने विषाची बाटली बाहेर काढली,\nज्युलीच्या भावांनी मुठी वळल्या…\nकसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,\nताई, तू का पुढे आली आहेस\n*तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून* \nयावर आपले मत नोंदवा\nमी घर सोडून जातो आहे. मला माफ करा.\nखूप दिवस सांगायचं होतं, पण धाडस होय नव्हतं.\nमाझं नेहा वर (बी विंग मधल्या पेंडसे काकांची कन्या) प्रेम आहे.\nपण आपल्या कुटुंबातली दुश्मनी बघता, तुम्ही आमच्या नात्याला मान्यता देणार नाही, कारण ती ड्रिकींग-स्मोकिंग करते.\nपण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, ड्रिंकर लोक परखड बोलले तरी कधी खोटं बोलत नाहीत.\nमी आज सकाळी सकाळीच आईला आणि तुम्हाला न सांगता बाहेर पडलो, कारण मला तिच्या जामिनाची सोय करायची होती.\nकाल राञी ती तिच्या काही मिञांसोबत अंमली पदार्थ सेवन करताना पकडली गेली होती. आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने मला फोन केला. हे माझ्यावरचं तिचं प्रेमच नाही का\nपण ती तुम्हाला आणि आईला मात्र शिव्या देते, तिला सासू-सासरे पसंत नाहीत.\nम्हणून, आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी आम्ही वेगळं राहणं योग्य वाटलं.\nहां,आता मला नोकरी नाही, पण त्याचीही व्यवस्था तिने केली आहे. तिने मला पाकीटमारी शिकवली आहे.\nशिवाय तिच्या मिञांचा स्वतःचा असा ड्रग सप्लायचा बिझनेस आहे, तोही शिकून घेईन.\nआपली लाईफ तर सेट आहे बाबा, बस्स तुमचा आशीर्वाद हवाय\n-तुमचा लाडका मुलगा – नितेश\nआधीच हे सगळं अनपेक्षित भयंकर वाचून डोकं कामातून जाणंच तेवढं बाकी राहिलेल्या परमपुज्यांनी, थरथरत्या हातांनी पञ उलटून मागे पाहिलं, तर लिहीलं होतं…….\nचिंता करू नका. समोरच्या विकीकडे मॅच बघतो आहे. मला फक्त एवढंच जाणवून द्यायचं होतं की माझ्या निकालापेक्षाही या जगात बरचं काही वाईट होऊ शकतं.\nम्हणून, जे आहे ते थोडं जरी असलं, तरी त्यावर समाधान माना.\nटेबलावर परीक्षेचा रिझल्ट ठेवलाय. सही करा काॅलेजात जमा करायचायं……\nयावर आपले मत नोंदवा\nऑफिस एकाच सिद्धांतावर चालतं …..\nतुमचा बॉस तुम्हाला येडा समजतो आणि तुम्ही त्याला\nयावर आपले मत नोंदवा\nतर पुण्यात नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांसाठी काही महत्वाची माहिती खालील प्रमाणे :\n१. तुळशीबाग म्हणजे कोणतीही बाग नसून, स्त्रियांचं सगळ्यात आवडतं ‘shopping with bargaining destination’ आहे.\n२. अलकाचा चौक म्हणजे तो कोणत्याही अलका नावाच्या बाईचा चौक नसून त्या चौकात अलका टॉकीज आहे म्हणून त्याला अलकाचा चौक म्हणतात.\n३. F.C. College road हे खूप चुकीचं आहे. F.C. मधला C हा College साठीच आहे, उगाच परत ज्यादाचं college लावायची गरज नाही. नुसतं F.C road म्हणायचं.\n४. वैशाली, वाडेश्वर, रूपाली, गुडलक, काटाकीर्रला जर का खायला जायचं असेल, तर किमान दोन तास आधी जाऊन थांबणे आणि टेबल मिळालं की उगाचंच आपण खूपच मोठी मोहीम फत्ते केली आहे असं फीलिंग घ्यायचं असतं.\n५. सोन्या मारुती, पत्र्या मारुती म्हणजे काय ते मारुती सोन्याचे किंवा पत्र्याचे आहेत असं अज्जिबात नाही.\n६.सिंहगडावर सिंह दिसतात का असं काही पण विचारू नये, इतिहास नीट वाचून येणे.\n७. बिकानेर किंवा कोणत्या अन्य ब्रँडची बाकरवडी शोधण्याची हिम्मत इथे स्वप्नात सुद्धा करू नये.\n८. बाणेर आणि सुस रोडवरून फिरताना फुक्कट भारी फील करून घ्यायचं असत.\n९. CPK म्हणजे CKP चा काही संबंध नाही. CPK म्हणजे CITY PRIDE KOTHRUD. आता उगाच CITY PRIDE सातारा रोड, सिंहगड रोड चे शॉर्ट फॉर्म्स करत बसू नये, आम्ही जे शॉर्ट फॉर्म्स ठरवले आहेत तेच वापरणे, जसे की ABC म्हणजे अप्पा बळवंत चौक.\n१०.K. P अर्थात कोरेगाव पार्क मध्ये जर तुम्ही हँग आऊट करत असाल तर स्वतःला खूप मॉडर्न, श्रीमंत, आणि हाय स्टँडर्ड समजायचं असतं.\n११. पर्वती नावाची टेकडी आहे, तिला ‘पार्वती’ असं म्हणू नये आणि हो त्या टेकडीवरून संपूर्ण पुणं दिसतं ह्या अपेक्षेने जाऊ नये. खूप पूर्वी दिसायचं, आता फक्त वरून घाणच दिसतें.\n१२. कॅम्प नावाचं खूप मोठं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये जो कॅम्प असतो त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. मी कॅम्प मध्ये जातोय हे ऐकल्यावर उगाच बुचकळ्यात पडू नये.\n१३. आज भरतला प्रयोग आहे म्हणजे भरत नाट्य मंदिरात प्रयोग आहे, भरत नावाच्या माणसाचा काही संबंध नाही.\n१४. Relax मध्ये कधीच Relax बसून देत नाहीत.\n१५. नारायण पेठ आणि सदाशिव पेठेची गुणवैशिष्ठ्ये एकसारखी असली तरी there is a thin line of geographical differnce between these two. नारायण पेठ संपून सदाशिव पेठ कुठून सुरू होते हे पक्क्या पुणेकरांनाच समजतं.\n१६. पुण्यात आलात आणि सुजाता मस्तानीची आंबा मस्तानी प्यायली नाहीत तर आयुष्य व्यर्थ गेलंय असं समजा.\n१७. ABC मधलं किबे थिएटर हे कायम ‘प्रभात टॉकीज’ म्हणूनच ओळखलं जाणार.\n१८. पुण्यात नवीन असाल तर बोहरी आळीत, रविवार पेठेत चुकून सुद्धा चारचाकी घेऊन जाऊ नये. तुम्ही इथे चालायचा प्रयत्न जरी केलात तरी खूप आहे.\n१९. दारुवाला पुलावर दारू मिळत नाही, उगाच मनात खोट्या आशा बाळगून तिकडे जाऊ नये.\n२०. बुधवार पेठे विषयी नवीन लोकांना आधीच माहिती असतं सगळं. बुधवार पेठ ऐकल्यावर उगाच विचित्र हावभाव देऊ नये. दगडूशेठ गणपती मंदिर पण तिथंच आहे.\n*२१. आणि खूप खूप महत्त्वाची गोष्ट : पिंपरी, चिंचवड पुण्यात येत नाही.*\n२२. आणि ही एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा की चितळ्यांकडून तूप, बासुंदी घेयची असेल तर घरून डब्बा घेऊन जाणे. तिथे जाऊन वाद घातलात तर अपमान होतो .\n२३: सगळ्यात महत्वाचे म्हणजे तात्वीक मुद्यावर चौफेर,आणी संयुक्तिक वाद घालता येउन आपलं म्हणणं रेटता येणे अत्यंत गरजेचे आहे.\n२४: पुण्यात राहावयाचे असल्यास दुचाकी वाहन अक्षरशः वाट फुटेल ( जशी जागा मिळेल तसे )दामटवता आलेच पाहिजे.\nयेरा गबाळ्याचे ते काम नोव्हे.\n***पुणेकर होण्यासाठी पुण्यातच जन्म घ्यावा लागतो..\nउगाच 5/6 वर्ष शिक्षणासाठी पुण्यात राहून स्वतःला पुणेकर समजू नये..\n२६.पुण्याबाहेरुन पुण्यात येणाऱ्या (नोकरी , शिक्षण इत्यादिसाठी) लोकांनी पुणे आपल्यामुळे चालत असु समजु नये किंवा सांगु नये आपली हुशारी आणि कौशल्य आपल्या स्वत:च्या गावाकडे जाऊन सिध्द करावीत.\n२७.पुण्याला “पुणे” च म्हणायचं पूना म्हणल्यास, म्हणण्याऱ्याचा उद्धार केला जाईल 🙄\n(ता.क.: पुणेरी माज मधुन साभार )\nयावर आपले मत नोंदवा\nमी ~अहो बाबा आपण कुत्रा पाळायचा का…\nबाबा :~का बर तू घर सोडून चालला आहेस का..\nयावर आपले मत नोंदवा\nगिऱ्हाईक- या म्हशीची किंमत\n हिला तर एकंच डोळा आहे\nपुणेरी- तुम्ही म्हशीचे दुध काढणार की तिच्याकडून भरतकाम करून घेणार\nयावर आपले मत नोंदवा\nप्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल…\nफ़क्त नजर डूकराची पाहिजे\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/505/_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80_-_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87_", "date_download": "2018-04-23T11:11:15Z", "digest": "sha1:TNOUT7WB6VZ56OT4Q7GX7EKDEYBRUPOD", "length": 8999, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशिवसेनेचे धोरण दुटप्पी - धनंजय मुंडे\nअधिवेशनाच्या सुरूवातीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, तोपर्यंत अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. याचा निषेध करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेचा वाघ आज अचानक शांत कसा झाला असा प्रश्न मुंडेंनी केला. शिवसेनेचे धोरण दुटप्पी असून सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करायचे धोरण शिवसेनेने अवलंबले असल्याची टीका त्यांनी केली. उत्पादन या वर्षी तिप्पट झाले आहे, मात्र शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेले निवेदन गोलमोल आहे, त्यात कर्जमाफीबद्दल काहीही नाही, तरी शिवसेना समाधानी कशी असा प्रश्न मुंडेंनी केला. शिवसेनेचे धोरण दुटप्पी असून सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करायचे धोरण शिवसेनेने अवलंबले असल्याची टीका त्यांनी केली. उत्पादन या वर्षी तिप्पट झाले आहे, मात्र शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेले निवेदन गोलमोल आहे, त्यात कर्जमाफीबद्दल काहीही नाही, तरी शिवसेना समाधानी कशी असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.\nतत्पूर्वी, विधान परिषदेत बोलताना, मुंडे यांनी कर्जामाफीची घोषणा झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. केंद्रीय कृषीमंत्री कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगतात, मग सेना-भाजपच्या शिष्टमंडळाला केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तरी ते पाळतील का असा प्रश्न मुंडे यांनी विचारला. औरंगाबाद येथील विष्णु बुरकूल या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील निवेदन ऐकून आत्महत्या केली आहे. या सरकारने सावकारांची कर्जमाफी केली, मग बुरकूल वर सावकाराचे कर्ज कसे काय होते असा प्रश्न मुंडे यांनी विचारला. औरंगाबाद येथील विष्णु बुरकूल या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील निवेदन ऐकून आत्महत्या केली आहे. या सरकारने सावकारांची कर्जमाफी केली, मग बुरकूल वर सावकाराचे कर्ज कसे काय होते विष्णू बुरकूल सारखे अनेक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सरकारकडे अजूनही वेळ आहे. अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी तरतूद करावी, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उस्मानाबाद जि.प. निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांचा आ ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांचा आज राष्ट्रवादी भवन, उस्मानाबाद येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्हावासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास दाखवून पक्षाच्या २६ उमेदवारांना निवडून दिले आहे. याबरोबरच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक मते मिळाली आहेत. निवडून आलेल्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प ...\nराष्ट्रवादी काँग्रेसने जयंतीदिनी वाहिली आबांना आदरांजली ...\nराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, अनिकेत तटकरे आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ...\nदेशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – खा. धनंजय महाडिक ...\nदेशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत देशाच्या शेतीविषयक धोरणाचा पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका मांडली. अन्नदाता शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यानं आत्महत्या करतो आहे, ही शरमेची बाब असून, शेतकऱ्याला सबसिडी देण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव आणि शंभर टक्के पीक विमा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या सबलीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण सूचना त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केल्या. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sun-dried-recipes/page/2/", "date_download": "2018-04-23T11:39:22Z", "digest": "sha1:72IRKZJ5KESQJX4YEJ25UKTYMHFOOYI7", "length": 7000, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.com", "title": "वाळवणाचे पदार्थ | Sun Dried recipes - Page 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » वाळवणाचे पदार्थ » पान २\nवाळवणाचे पदार्थ - [Sun Dried recipes] वाळवणाच्या पदार्थाच्या विविध पाककृती(वाळवणाचे पदार्थ), Various types of Sun Dried recipes.\nसाबुदाणा भगर व बटाटा चकल्या\nसाबुदाणा, भगर, बटाटे घालून तयार केलेल्या चकल्या उन्हात वाळवून तळून उपवासालाही खाता येतील.\nकेळी आणि साबुदाणा मिळून तयार केलेल्या चकल्या वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात आणि उपवासालाही चालतात.\nचणाडाळ व उडीद डाळीचे गोळे करुन उन्हात कडक वाळल्यानंतर त्याची सुंदरशी आमटी बनवता येईल.\nवेगवेगळ्या भाज्या घालून कडक उन्हात सुकवून तयार सांडग्याची भाजी किंवा आमटीत किंवा तळून खाता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2008/02/blog-post_274.html", "date_download": "2018-04-23T11:41:41Z", "digest": "sha1:4SUJG7RZXVZBTXZYQGF3KJVES7ZDJGXM", "length": 8543, "nlines": 160, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): चेहरा", "raw_content": "\nभावनेशी पार माझ्या खेळून चेहरा गेला\nरंगणारा खेळ अर्धा मोडून चेहरा गेला\nमैफलीचे श्रेय माझ्या नाही कधी मना आले\nभैरवीला नाव माझे गाऊन चेहरा गेला\nबोलतो मी साचलेले माझ्या मनी दर्पणाशी\nजाणतो तो, कान माझे टोचून चेहरा गेला\nसारखे ऐसेच व्हावे, शब्दांवरी विसंबावे\n\"जोडण्या आलो\" म्हणाला, तोडून चेहरा गेला\nसावरोनी मी कुठेसा वावराया सिद्ध झालो\nघाव वर्मी सांत्वनाचा घालून चेहरा गेला\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\n\"Magazine पाहावं काढून\" - एक स्मरणयात्रा\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/all_story?herStory=herStory", "date_download": "2018-04-23T11:45:13Z", "digest": "sha1:FCFWW5TNSJE7RXHGHQAA2YB77OCMS6JK", "length": 18138, "nlines": 545, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "Mazi Yashogatha", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nमनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे .......\nपुणे शहरातल्या आपटे प्रशाळेतल्या गाण्याच्या तासाची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात, कारण त्यांच्या आवडत्या दीपमाला मॅम शिकवणार असतात. अनेक महाविद्यालयीन गायन स्पर्धेत पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपमाला लोहाडे मॅम इतकी छान तयारी करून घेतात की आत्त्तापर्यंत त्यांनाच तीनवेळा उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सर्वात अलीकडचा म्हणजे २०१५ सालचा पु. ग. वैद्य उत्कृष्ट संगीत शि� .......\n\"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते\" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.\nजीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घ .......\nअनाथ मुलां साठी माई...\nसिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही .......\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://deepadeshmukh.com/2018/02/18/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:25:30Z", "digest": "sha1:DNOK3TQCF4G5S47K54M7ZMKMEOLCT65N", "length": 2929, "nlines": 79, "source_domain": "deepadeshmukh.com", "title": "बरेली की बर्फी | deepa", "raw_content": "\nआयुष्यमान खुराणा आणि राजकुमार राव दोघंही उत्तम अभिनय करणारे गुणी अभिनेते याच महिन्यात त्यांचा ‘बरेली की बर्फी’ प्रदर्शित झालाय. ‘दम लगा के हैशा’मधलं कौटुंबिक वातावरण आणि ‘क्वीन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटातली कंगना राणावतची व्यक्तिरेखा असा मालमसाला वापरून किंवा उचलेगिरी करून ‘बरेली की बर्फी’ चित्रपट तयार झालाय. कथेत काहीही नावीन्य नाही, मैत्रीची स्वार्थी व्याख्या, हसू येणार नाही असे विनोद….चित्रपटाच्या शेवटी अचानक त्याग, निस्वार्थीपण आठवून केलेला शेवट….. याच महिन्यात त्यांचा ‘बरेली की बर्फी’ प्रदर्शित झालाय. ‘दम लगा के हैशा’मधलं कौटुंबिक वातावरण आणि ‘क्वीन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटातली कंगना राणावतची व्यक्तिरेखा असा मालमसाला वापरून किंवा उचलेगिरी करून ‘बरेली की बर्फी’ चित्रपट तयार झालाय. कथेत काहीही नावीन्य नाही, मैत्रीची स्वार्थी व्याख्या, हसू येणार नाही असे विनोद….चित्रपटाच्या शेवटी अचानक त्याग, निस्वार्थीपण आठवून केलेला शेवट….. ज्यांना चित्रपटगृहात जाऊन पैसे घालवण्याची हौस असेल, त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा.\nदीपा देशमुख २४ ऑगस्ट २०१७\nमि. अँड मिसेस अय्यर\nमनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-articles/sheti-mhanaje-kuberache-dena-navhe/", "date_download": "2018-04-23T11:40:25Z", "digest": "sha1:DIONKWMMW65YICQMW7VFEQQG2RI4G36V", "length": 20547, "nlines": 120, "source_domain": "www.marathimati.com", "title": "शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे | Sheti Mhanaje Kuberache Dena Navhe", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी लेख » शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे\nशेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे\nलेखन: जयवंत पाटील | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ डिसेंबर २०१४\nअग्रलेखातून शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या तालिबान्याचाही निषेध \nलाखभर पगार घेऊन शेतकऱ्यांना खोटारडा म्हणणाऱ्यांसाठी हा लेख\nअंगुर रबडीच्या पंगतीत खाणारे, पण शेतकऱ्यांना खर्च विचारणाऱ्यांसाठी हा लेख\nशेतकरी नाडला जात नाही, म्हणणाऱ्यांसाठी हा लेख\nशेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखतात, रात्रीचा कण्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.\nशेतकऱ्यांना लुबाडणारे दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा नाही. कुंथत कुंथत संपादकीयचे रकाणे भरण्यासारखाही शेतीचा विषय सोपा नाही.\nशेती कोणताही राजकीय पक्ष, संघटनेच्या विचारांचं गुलाम राहून, त्यांची वेळोवेळी दलाली करून करता येत नाही. शेतीत शेतमजूर, अल्पभूधारक, जास्त जमीन असलेले शेतकरी असा भेदभाव करता येत नाही.\nशेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला.\nपाऊस पडला तर सर्वांच्या शेतात, गारपीट, ऊन, पिकांवरील रोग सर्वांच्याच शेतात येतात, राजकीय पक्षांची दलाली करण्यासाठी इथे हिंदू-मुस्लिम, मराठा-माळी असा भेद करून शेतीचं दुकान चालवता येत नाही, शेतीत राबतांना मानेपासून माकडहाडापर्यंत घाम वाहत येतो, तेव्हा शेती फुलते, एवढं करूनही निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकरी डोळ्यात अश्रू आणणारच, त्याला अधिकार नाही का तेवढा ही\nशेतकरी काही टीव्हीवर दिसण्यासाठी चमकोगिरी करत नाही, कारण तुम्हाला आमंत्रण पाठवलंय का शेतकऱ्यांनी, आम्ही रडतोय दाखवा आम्हाला टीव्हीवर, आमचा फोटो पेपरवर लावा\nशेतकरी निसर्ग वागेल तशी गणितं आखतो जगण्यासाठी. कुणाचं सरकार, कुणावर दबाव आणायचा, हे गणित तुम्ही आखतात. बड्या धेंडांची, मंत्र्यांची खोटी-खोटी शाबासकी मिळवण्यासाठी. यासाठी तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या दु:खाचं भांडवल केलं, तेव्हा त्याला विचारलं होतं का 'शेतकऱ्या खोटारडा, तू हे सर्व खोटं खोटं रडतोय 'शेतकऱ्या खोटारडा, तू हे सर्व खोटं खोटं रडतोय' कारण गारपीट ही काय पहिल्यांदाच झाली नाही.\nतुमच्या न्यूज पेपरच्या गिऱ्हाईकाला तुम्हाला आता मीठ नाही, तर दररोज तुम्हाला साखरच विकायची असेल तर तिथे शेतकऱ्यांची काय चूक.\nशेतकरी कष्टाने शेती करतो, नुकसान सहन करण्याची ताकदही त्याच्यात आहे, पण तो आपल्यासारखी दलाली करू शकत नाही. एवढीच त्याची चूक आहे.\nआंबा भरपूर येणार आहे, डाळिंबे छानच झाली आहेत वा द्राक्षे मुबलक येणार आहेत, या वाक्यांवरून तुमचा पाय शेतीला लागलेला दिसत नाही, भरपूर आंबा येणार यापेक्षा आंब्याला चांगला मोहोर आलाय, डाळिंबाची फलधारणा यंदा चांगली झालीय, फळांचा आकार एक सारखा आहे, असं शेतकरी म्हणत असतो.\n'डाळिंबे छानच झाली आहेत', असं म्हणायला काय तो वरण भात आहे, 'आंबा भरपूर येणार आहे', असं म्हणायला तो काय दिवाळी बोनस आहे का, 'आंबा भरपूर येणार आहे', असं म्हणायला तो काय दिवाळी बोनस आहे का, 'द्राक्षे मुबलक येणार आहेत', असं म्हणायला ते काय पीएफवरचं व्याज आहे का\nथोडक्यात शेतीत निश्चित काहीच नाही, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास कधीही जाऊ शकतो, तो तुमच्या ताटातल्या पदार्थापासून, पीएफच्या व्याजासारखा निश्चित नाही.\nनगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी किती कर्ज काढून शेती फुलवली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी किती फळबागा फुलवल्या, तिथे धनदांडगा हा शब्द शेतकऱ्यांना आला कुठून, शेतकऱ्यांनी फळबागांना जी औषधं दिली, शेतकऱ्यांनी फळबागांना जी औषधं दिली त्याची उधारी किती आहे त्याची उधारी किती आहे हे तुम्हाला कृषी केंद्रावर जाऊन कळेल, ते नुकसान झालेल्या फळबागांवर दिसणार नाही.\nजास्तच जास्त शेतकरी इमानदार म्हणून त्याला लाखांच्या वस्तू उधार मिळतात, पण आपली ऐपत मॉलवाल्याकडे नाही, तुम्हाला कंपनीने लाखाचा पगार दिला, त्यात तुम्ही होमलोन घेतलं, कार घेतली, मुलांच्या शिक्षणाची फी भरली..... आणि अचानक हा पगार बंद झालाय आणि पुढील वर्षी बरोबर या महिन्यात भेटा, असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला दाढी स्ट्रिमिंग करायलाही पैसे शिल्लक राहणार नाहीत. तेव्हा तुम्हाला रस्त्यावरचा भिकारीही म्हणेल चांगला धनदांडगा होता, आता तर दाढीही करत नाही.\nशेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात पाहुणमंडळीला आईस्क्रिम खायला देता, पण धनदांडगा आणि खोटारडा म्हणून शेतकऱ्याच्या इज्जतीचा फालुदा का करता\nशेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, असं म्हणणाऱ्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं कारण २००७ साली झालेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची छाननी करा, स्वत:ला तुम्ही बडे पत्रकार म्हणून मिरवून घेतात, म्हणून हा कधीतरी थोडासा अभ्यास करा, असा शेतकरी दाखवा ज्याला १०० टक्के कर्जमाफी झालीय. जी कर्जमाफी झालीच नाही, त्याचं कौतुक त्याला काय सांगताय, आणि तीही काही शेतकर्‍यांनी मागितली नव्हती, आणि थोडी थोडकी दिली असेल तर ती काय तुमच्या बाबाच्या पगारातून त्याला मिळाली. हा अभ्यास का पी. साईनाथ यांच्यासारख्या पत्रकारांनीच करायचा का कारण २००७ साली झालेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची छाननी करा, स्वत:ला तुम्ही बडे पत्रकार म्हणून मिरवून घेतात, म्हणून हा कधीतरी थोडासा अभ्यास करा, असा शेतकरी दाखवा ज्याला १०० टक्के कर्जमाफी झालीय. जी कर्जमाफी झालीच नाही, त्याचं कौतुक त्याला काय सांगताय, आणि तीही काही शेतकर्‍यांनी मागितली नव्हती, आणि थोडी थोडकी दिली असेल तर ती काय तुमच्या बाबाच्या पगारातून त्याला मिळाली. हा अभ्यास का पी. साईनाथ यांच्यासारख्या पत्रकारांनीच करायचा का पी. साईनाथ यांच्यासारखं शेतीत जाऊन पाहा, अभ्यास करा आणि मग लिहा.\nकारण एकीकडे भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हणतांना शेतकरी हा सतत गुलाम राहिला पाहिजे, त्याला संपादकीयचे रकाणे भरण्यासाठी बडवून काढला पाहिजे, असा विचार करून कसं चालेल.\n'बळीराजा', 'काळीआई' ही बिरूदं तुम्ही मिरवली, कारण तुम्हाला सर्वांना दाखवायचं असतं, आमच्याकडे किती शब्दसंपदा आहे, त्यासाठीही त्याचा वापर केला. तो तुमचा धंदाच आहे, पोटभरायचा.\nआपण स्वत:ला अर्थशास्त्री म्हणवून मिरवतात, म्हणून शेतकरी किती प्रमाणात पिकं कर्ज घेतात, वर्षभराच्या आत किती भरणा करतात, बँकांना याचा किती फायदा होतो, अर्थव्यवस्थेला याचा किती फायदा-तोटा आहे, हे देखील तपासून पाहा. उलट उद्योजकांना किती दीर्घकालीन कर्ज दिलं जातं, ते किती परत फेड करतात हे देखील पाहा.\nअगदी भारतात बँकिंग क्षेत्राचा विकास होत असतांना राष्ट्रीयकृत बँकांना कुणी मजबूत केलं त्याचाही अभ्यास करा, तेव्हा कृषिक्षेत्र नव्हतं का, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो हे देखील पाहा.\nमृगनक्षत्राचा पाऊस आला, जमीनीचा सुगंध डोक्यात भरल्यावर शेतकरी पेरता होतो, वेळेवर पेरायला हवं हेच त्याच्या डोक्यात असतं, मग त्यासाठी वाटेल ते तो करतो, कुठूनही पैसा उभा करतो, तो काळ्या मातीला आई म्हणत असेल तर त्याचं काय चुकलं, तो दगडाला देव तर म्हणत नाही ना.\nशेतकऱ्याकडे चार पैसे खुळखुळत असतील तर ते कुबेराचं देणं नाही, ते कष्टाचं देणं आहे. शेतकरी आमचा बाप आहे, आणि शेतकऱ्यावर अन्यायाचे आसूड ओढणार्‍यांसमोर खरी परिस्थिती ठेवण्याचं आमचं काम आहे, म्हणून अभ्यास न करता लिहणाऱ्यांवर हा प्रथमोपचार.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%81", "date_download": "2018-04-23T11:53:57Z", "digest": "sha1:OMAQEVJEHWHVRYJTCLHEDQQFMNVVAGHR", "length": 4619, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वलियावीटिल दिजु - विकिपीडिया", "raw_content": "\n(वलियावीटी दिजु या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n४ जानेवारी, १९८१ (1981-01-04) (वय: ३७)\nवलियावीतिल दिजू हा एक मल्याळी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/happy-singh.html", "date_download": "2018-04-23T11:48:46Z", "digest": "sha1:UF4NK5KSVARUSEM3AOJ265T2C54E2DAW", "length": 5848, "nlines": 71, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : युवा नेता, रायगड जिल्हा भाजपा\nName : हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)\nFather's Name : बलदेव बलवीर सिंग\nMother’s Name : जयवंतकौर बलदेव सिंग\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी\nProfession : ऑक्सिजन वॉटर सप्लायर्स\nResidence Address : २०४, राजेश रेसिडेन्सी, प्लॉट नं. २६, सेक्टर ३६, कामोठे\nOffice Address : मा. आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे\nयुवा नेता रायगड जिल्हा भाजपा\nमा. सरचिटणीस, मावळ लोकसभा युवक कॉंग्रेस\nमा. सरचिटणीस पनवेल विधानसभा युवक काँग्रेस\nमा. वार्ड अध्यक्ष कामोठे शहर युवक कॉंग्रेस\nसंस्थापक / अध्यक्ष - युवा मित्र मंडळ\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nअनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.\nशासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.\nकामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.\nलोकांना पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, रोजगार, सिडको बाबत समस्या इ. सर्व प्रकारे शक्य ती मदत.\nपक्षाच्या ध्येय आणि उद्धीष्ठासाठी प्रामाणिक आणि निष्ठेने प्रयत्न.\nलोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nमोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर\nविविध आंदोलने व धरणे\nथोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे\nहुशार विद्यार्थांचा सत्कार / तसेच गरजू गरीब विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप\nखारघर टोलमुक्ती पक्षाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग\nभारतीय जनता पार्टी, रायगड...\nमावळ लोकसभा युवक काँग्रेस सदभावना रॅली...\nहॅप्पी सिंग यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/304/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:23:03Z", "digest": "sha1:EXY432HY6BQ6LEDURTN7BUCNJHSNJW7S", "length": 7926, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना हटवण्याचा कट रचला जात असेल तर त्यांनीच याचा खुलासा करावा-नवाब मलिक\nमराठा समाजाच्या लाखोंच्या संख्येने निघत असलेल्या मूक क्रांती मोर्चांच्या निमित्ताने राज्यात मुख्यमंत्रीबदल होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना केलेय. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यापासून भाजपचेच खासदार आणि मंत्री हे ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून हे मोर्चे निघत असल्याचे वक्तव्य करत आहेत. मोर्चेकरी वा विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसताना भाजपचेच लोक या विषयावर चर्चा करत असून भाजपकडून मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा कट रचला जात असेल तर त्यांनीच याचा खुलासा करावा, असे मलिक म्हणाले. तसेच केरळ येथील पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना काही इशारा देण्यात आला आहे का तेही त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान मलिक यांनी केले.\nकांद्याला हमीभाव द्या अन्यथा ६ मे रोजी नाशिकमध्ये तालुकावार रस्ता रोको आंदोलन - अॅड.रविंद ...\nसरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा अन्यथा येत्या ६ मे रोजी जिल्ह्यात तालुकावार रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रत्यक्ष जिल्हा परिषद गटवार दौरा सुरु आहे. कळवण तालुक्यातील बैठकीत पगार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये शेतकऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची मनोगते जिल्हाध्यक्ष पगार यांनी जाणू ...\nबीफची व्याख्या सरकारने स्पष्ट करावी - नवाब मलिक ...\nदेशभरात गो हत्या, गोवंश हत्याबंदी या नावाने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरियाणा आणि अन्य ठिकाणी गो मासांच्या नावावर लोकांची हत्या करण्यात येत आहे. आता हे लोण महाराष्ट्रातही येऊन पोहोचलं आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील बारशिंगी गावातील इस्माईल शाह हे ग्रामीण भागात बीफ पोहोचवतात या संशयावरून त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बीफची व्याख्या नेमकी काय आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. पुढे बोलतान ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार - संग्राम कोते पा ...\nभाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत काहीच काम केलेले नाही. निवडणुकांच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही त्यांनी केली नाही. राज्य सरकारच्या या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिवाळीनंतर राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार आहे. कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेसाठी तयार रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संग्राम कोते पाटील राज्याचा दौरा करत आहेत. ते आता कोल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2016/01/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T11:33:28Z", "digest": "sha1:EIEWIA6ZS6MKROFG6PHP4UQUQED5FJSN", "length": 8775, "nlines": 158, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): काय करावे उर्जेचे", "raw_content": "\nकाय करावे उर्जेचे या समजत नाही\nजोडत नाही ही काही वा तोडत नाही\nक्षणाक्षणाला धांदल उडते जगता जगता\nकधी श्वासही सोडुन देतो घेता घेता\nगेली घटिका कोणासाठी थांबत नाही\nउत्तर देते चकवा कायम वाटेवरती\nप्रश्नच कोरून घेतो मग तळहातावरती\nवळसे पडती, तरी शोध हा संपत नाही\nलाभो उर्जा झर्‍यासारखी खळखळणारी\nमुक्त सचेतन झोत होउनी सळसळणारी\nप्राण बनुन ही श्वासांमध्ये अखंड वाही\nजगतो आहे तोवर राहो सोबत माझ्या\nओळख माझी बनुनी येवो सोबत माझ्या\nनसेन तेव्हा अर्थ तिलाही नसेल काही\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/09/on-way-to-mysore-srirangapatnam.html", "date_download": "2018-04-23T11:28:29Z", "digest": "sha1:6QRCZ4GS4LCJYWHPUUXZJ7W5FRFEBX2B", "length": 3243, "nlines": 87, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: on a way to mysore.... srirangapatnam", "raw_content": "\nबंगलोर-मैसूर हाईवे, रम्य सकाळी ...\nश्रीरंग पटनम ची जामा मशीद\nटीपू सुलतान चा मृतदेह जिथे सापडला त्या जागेवरचे स्मारक - श्रीरंग पटनम (मैसूर हाईवे)\nटीपू सुलतान आनी त्याची फॅमिली जिथे दफ़न केली ती जागा - गुम्बज़\nचामुंडी हिल्स चा वळणदार, नागमोडी रस्ता\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरेल्वे, आणि जवळचा तलाव\nयादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/vegetable-recipes/page/3/", "date_download": "2018-04-23T11:38:54Z", "digest": "sha1:TEWDBPP43PDXO5JP4PM7RWXB4L6J6PQB", "length": 7705, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "भाज्या | Vegetable recipes - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » भाज्या » पान ३\nउत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.\nहरभर्‍याचा एक प्रकार असलेला ‘काबुली चणे’ पासून बनवलेली खासकरुन उत्तर भारतातील प्रसिद्ध चमचमीत, मसालेदार अशी ही पंजाबी डिश भाताबरोबर किंवा रोटीबरोबर छान लागेल.\nसरसोची भाजी - सरसों का साग\n‘सरसोची भाजी’ ही पंजाबी पाककृती असून खासकरुन थंडीच्या दिवसात आणि ते सुद्धा मक्याच्या रोटीसोबत खायला अजून स्वाद येईल.\nपंजाबी स्वादाची आणि ग्रेव्ही युक्त ‘मक्याची कोफ्ता करी’ रोजच्या जेवणासाठी किंवा घरगुती छोट्याश्या समारंभासाठी साजेशी अशी अत्यंत चविष्ट आणि खमंग पाककृती आहे.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\nसण, उत्सव किंवा आप्तेष्टांसोबत जेवणाचा प्रसंग असो अशा वेळी ‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकेल, मोठ्यांसोबत लहानग्यांना देखिल भाजीचा हा प्रकार फारच आवडेल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7133373", "date_download": "2018-04-23T11:40:34Z", "digest": "sha1:X7LHC3KE5UYH2PALJBCEWNG6PNDETVWN", "length": 8480, "nlines": 37, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "अभ्यास: प्रतिसाद डिझाइन मोबाइल साइट्सच्या 69% साठी लोड वेळा \"Semalt\"", "raw_content": "\nअभ्यास: प्रतिसाद डिझाइन मोबाइल साइट्सच्या 69% साठी लोड वेळा \"Semalt\"\nअनेक ब्रॅण्ड्स अनेक प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेसवर सातत्यपूर्ण अनुभव देणार्या वेबसाइट्स तयार करण्यासाठी प्रतिसाद डिझाइनचा वापर करीत आहेत, परंतु मोबाइल वेब डेव्हलपर सेमील्टला असे आढळले की प्रतिमा-जड हे उत्तरदायी डिझाइन मोबाइल साइट लोड होण्यास \"अस्वीकार्य\" वेळ घेत आहेत.\n155 प्रमुख प्रतिसाद डिझाइन वेबसाइटसाठी पृष्ठ वजन, प्रतिमा आणि भार वेळाचे मूल्यांकन - स्टारबक्ससह कॉम, एनगॅझेट कॉम आणि बोल्डंड नोबल कॉम - मिमललने शोधून काढले 69 टक्के स्मार्टफोनवर लोड करण्यासाठी चार सेकंद किंवा त्याहून जास्त वेळ लागला.\nSemaltेटने स्मार्टफोन्सवर \"चांगले\" लोड वेळेचे विश्लेषण केले त्या पाच साइट्सपैकी केवळ एकावर लोड केले आहे, 31 टक्के साइट लोड होण्यास आठ ते 48 सेकंदांपर्यंत कुठेही घेत आहे.\nप्रतिसाद डिझाईन वेबसाइट स्मार्टफोन भार टाईम्स:\nSemaltेट दावा करते की एखादे पृष्ठ वजन 1 एमबीपेक्षा पुढे जात असेल तर साइटचा लोड वेळ अस्वीकार्य होईल. मिमल स्टडीमध्ये विश्लेषित केलेल्या 155 साइट्सपैकी 61 टक्के लोकांनी कमीतकमी 1 एमबी आकाराचा एक होम पेज दिला आहे, जेथे प्रतिमांची सरासरी सरासरी 50 ते 60 टक्के साइटचे पेज वजन असते - computer fix san jose. अभ्यासातून:\nवेब पृष्ठाच्या एकूण वजन (उदा. बाइट्सचा आकार) निश्चित केल्याने अनेक कारक मोजले जाऊ शकतात, प्रतिमा साधारणपणे मुख्य योगदानकर्ते असतात. हे विशेषत: प्रतिसाद वेबसाइट्ससाठी खरे आहे, जे सामान्यत: सर्व डिव्हाइसेसवर समान सामग्रीची सेवा देतात. यामुळे मोबाईल डिव्हायसेसना अत्याधिक मोठ्या प्रतिमा पाठविल्या जाऊ शकतात. (1 9)\nआकृती वजन एकूण वजनदार वजनदार वजन:\nसाइट्सचे पृष्ठ वजन कमी करण्यासाठी आणि लोड वेळा कमी करण्याच्या प्रयत्नात Trilibis ने 64 साइट्सवर प्रयोग केले ज्याचे मुख्यपृष्ठ 1MB पेक्षा जास्त ओलांडले. सर्व डिव्हाइसेससाठी प्रत्येक साइटवर प्रत्येक इमेज ऑप्टिमाईझ करून, स्मार्टफोनवर पृष्ठाचे वजन 77 टक्के कमी करून साध्य केले जाऊ शकते:\nमिमल सर्व्हर-साइड ऑप्टिमायझेशन, सर्व 64 प्रतिसाद वेबसाईटचे एकूण प्रतिमा वजन 115 एमबी होते. प्रतिमेच्या प्रत्येक श्रेणीसाठी प्रतिमा ऑप्टिमायझेशन प्रक्रियेने नाटकीय पृष्ठ वजन कमी केले. (1 9)\nसरासरी पृष्ठ वजन बचत प्रतिमा ऑप्टिमाइझ केल्यानंतर:\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, व सेल्स अॅण्ड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\n(6 9) नाही, आम्ही न्यूज फीड बदलल्यामुळे फेसबुक सीपीएम चालू आहेत असे आम्ही म्हणू शकत नाही\nरेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केली आहेत\nQuora ने ईमेल लिस्टवर आधारित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सूची मॅच लक्ष्यीकरण सुरू केले\nसर्वोत्कृष्ट आघाडी-जनसंपर्क वेबसाइट तयार करणे, चरण-दर-चरण\nचॅनेल: मोबाईल मार्केटिंगमोबाइल मार्केटिंग स्टॅटिस्टिक्स: मोबाइल मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/504/_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T11:09:42Z", "digest": "sha1:GCNDMT5CX4XZXETG7WL3CSSPM5BC2WMG", "length": 9009, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने केलेल्या आंदोलनाला यश\nराज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने हा विषय लावून धरला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला असता शासनाने यावर सकारात्मक उत्तर दिले आहे. जिल्हा पातळीवर उपकेंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटरचे अंतर ओलांडावे लागते, परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सरकारने लेखी उत्तरात मान्य केलेले आहे. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने उपकेंद्राच्या मागणीसाठी मोर्चे काढले गेले, याचीही कबुली दिली आहे. \"राज्यातील अकृषी विद्यापीठांर्गत होणाऱ्या उपकेंद्रासाठी धोरण विहित करण्यासाठी माजी प्र. कुलगुरू डॉ. योगानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशींना शासनाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे\", असे लेखी उत्तर सरकारने दिले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यातील विद्यापीठ उपकेंद्रांचा प्रश्न हाती घेऊन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत सात मोर्चे काढले होते. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले असेच म्हणावे लागेल.\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील ...\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. र ...\nसरकारी रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण हे राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुवस्थेचे निदर् ...\nधुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेधधुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमं ...\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींना ६ महिन्यांच्या आत मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या - अजित पवार ...\nकोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयासमोर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी राज्यात अनेक प्रकरणे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब लक्षात घेता कोपर्डी प्रकरणाचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ६ महिन्यांच्या आत निकाल लागावा, यासाठी नवीन कायदा करावा लागला तरी सरकारने तो करावा. यासाठी आवश्यकता असल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी. आरोप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7135354", "date_download": "2018-04-23T11:41:17Z", "digest": "sha1:FOQMQSAQTAM5UXPXDT7L255GX4HKXTX6", "length": 4768, "nlines": 48, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ट्विटर अद्याप शाही अर्धा आहे? | Ep. # 186", "raw_content": "\nट्विटर अद्याप शाही अर्धा आहे\nएपिसोड # 186 मध्ये, एमिग आणि नील चर्चा करीत आहेत की जर मिल्ठेल अद्याप वापरण्यायोग्य आहे की नाही. मिमलॅट खरोखरच मृत आहे का हे पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आपण आपल्या रहदारी वाढविण्यासाठी प्रभावीपणे कोणती विकल्प वापरू शकता हे पहा.\n00:27 - आजचा विषय: ट्विटर वापरण्यात अद्यापही उपयुक्त आहे का\n00:35 - एरिक लोकांना वापरण्यासाठी ट्विटर वापरत नाही\n00:46 - एरिक या प्लॅटफॉर्मवर लोक काय शोधत आहेत हे शोधण्यासाठी ट्विटरवर शोधतात\n01:00 - एरिक, उद्यम भांडवलदार, संस्थापक आणि एसईओ\n01:11 - एरीक नंतर बातम्या वाचण्यासाठी Twitbot चे एकीकरण उपयोगी आहे\n02:00 - \"मी ट्विटर वापरणार नाही तो मेला आहे. \"\n02:27 - नीलची संख्या अनुक्रमे इतकी मोठी आहे की ती मिळवलेल्या वाहतूकीपेक्षा\n02:47 - नीलच्या फेसबूक ट्राफिक 244 क च्या आपल्या पंखे पृष्ठावर आहे\n03:10 - नीलचे ट्विटर ट्रॅफिक फक्त त्यांच्या अनुयायांपैकी 2% आहे जेव्हा त्यांना फेसबुक (38)\n04:43 - ट्विटर हा वाहतुक व्युत्पन्न करण्यासाठी वेळ वाया आहे\n04:51 - सामग्री कल्पनांसाठी अजूनही ट्विटर उपयुक्त आहे\n05:00 - आपण आता आपल्या ट्विटर अॅप्ससाठी लाइव्हस्ट्रीम करू शकता\n05:28 - \"आत्ताच इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्हंसने फेसबुक सगळं कुरळे करत आहे\"\n05:39 - आजच्या भागासाठी तेच आहे\nTwitter ला अजूनही त्याचे फायदे आहेत आणि त्यापैकी एक त्यांच्या शोध वैशिष्ट्याचा आहे.\nट्विटर हे ट्राफिक उत्पत्तीच्या निर्मितीसाठी सर्वात फायदेशीर मंच नाही- फेसबुक आहे\nफेसबुक प्रत्येकाने Instagram आणि Facebook ला प्रत्येकास कुरकुरीत करत आहे.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा - resale certificate california.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/107766-middle-seo-eitibaaz-jharar-verne-5-mitti-tanilir", "date_download": "2018-04-23T11:36:33Z", "digest": "sha1:2SBWJ6BZM65ADTAX5FOS3UYDLBRITIG2", "length": 7364, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मिडल, एसइओ इटिबाझ झारार व्हेरेन 5 मिटी तनिल्लीर", "raw_content": "\nमिडल, एसइओ इटिबाझ झारार व्हेरेन 5 मिटी तनिल्लीर\nएसईओ अभिप्राय स्थगित करण्याच्या आराखडय़ात आराखडय़ात आल्या आहेत, 'एसईओ' या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'एसईओ' Aslında, Google वर आधारित एसइओ शोधत आहे Bu, bu uygulamanın kendisini olumsuz bir ni kavuştuğunun farkına varmaktadır.\nएसईओ एसईओ, ऑटोमोबाइल मोटरसायकल आणि इर्मेस्केलेरी यांनी केलेल्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याबाबत आणि त्यांच्याशी निगडित जाहिरातींच्या आधारे मोटरसायकल चालविण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ असा की, एखाद्याने स्वत: ला बरे केले असे बरेच दिवस असेल तर त्याचा अर्थ असा नाही, की जे जकात वगळता त्याच गोष्टी तुम्ही करता - net hosting peru.\nSemaltेट डिजिटल सर्विसेस'इन आर्टेम अर्गॅरिअन, जिझिओन इलॉन्डेनीन, एसइओ'नु कॉट बिर şhre uz uz ip ç ç ç ç ç ç....\nएसइओ, या साइट्सवर आपण शोधत आहात, आणि ते सामायिक करू शकता. आपल्या कारकिर्दीत, आपल्यास या बाईलायझर, कुरमुलर आणि पॉप्युलर बरिअरलेरी, जेलिन क्यूट्युल्यिक ऑफ हॅप्टललिक ऑफ स्पॅम गॉन्देरेन इटेनमेइनेन ई-पोस्टलय हेडफोलाकटेडर. Çoğu kişinin uzman olduğunu iddia eta biçimi onları aldatıcı आणि hileli bireyler olarak sunar, dolayısıyla piyasadaki kötü şöhreti verir. ई-पोस्टर, ई-पोस्टर, ही एन्काउझ्मेर्ट एन्सामासीन इस्किन फझला समस्या असण्याची शक्यता आहे. एरीका, एसइओ च्या वेबसाइटवर स्कॅनरवर क्लिक करा.\nअनहत्तर केलीम, एसइओ'नुन टेम्पलिर İyi kullanınen et istenilen sonuçları elde edin आपण नोंदवित असलेला दुरुपयोग कोठे आहे या प्रोफाइलमध्ये काय आहे या प्रोफाइलमध्ये काय आहे सूचना आणि संपादन आपण कोणतेही प्रश्न असल्यास, आपण या आयटमवर आधीपासूनच दुरुपयोगाची तक्रार नोंदवली आहे ज्यामुळे आपण आपल्या खात्यात परत कधीही स्विच करू या वापरू इच्छित नाही. मी केवळ एक वेळच थांबते. \"9 मर्दखय यहूदी आहे हे सिध्द करण्यासाठी मदत व शिकवणूक करतात.\n3 जिझलेमे व गिरीश सैफलारि सैफ़लारी\nहा कर्जाचा निरोप घेताना, आपल्या ग्राहकांच्या संपर्कात रहाण्यासाठी कृपया या लेखाच्या दुव्यावर क्लिक करा. आपण आपल्या वेब साइट्सवर साइन इन केले आहे तर, या वेबसाईटवर आपल्या वेब साइट्सशी संपर्क साधू शकता. जीझलेमे व कपाई फ्लेमारि टेक्नियिपी हेम कल्लनुसीआइय हेम डे एरामा मोटरूुनू रीहट्सज एडिएयर वे बू एनडेनले कोटा यूरेन क्वूशियोर.\nहिपिमिझ एसइओच्या ई-टिक्रेटवर बंदी घालण्यात आली आहे वेबसाईट आणि एसईओ अभियंत्यांबद्दल माहिती जाणून घेण्याकरता, आपल्या ग्राहकांना त्यांच्याशी संपर्क साधण्याबद्दल, त्यांच्याशी संपर्क साधण्यास मदत करू नका. हा दुचाकी दुचाकी दुचाकी दुचाकी दुचाकी वाहने Ancak, Google माझा मोटारगाडी चालविते, आणि नंतर आम्ही कोणत्याही कारणास्तव खरेदी करू शकता.\n5 गिझली पेरेक वे बागलंटिलाल\nकुलानीएकियान टिंकलॅडिङ्ग şeyden farklı içeriği gizlemek veya görüntülemek için kullanılan akıllıca ve aldatıcı बिर टेक्निक बीर रेझिमन अॅझारिडकी मेटन वेय एराज प्लॅन एझेन्डेड किअरेस मेटिन ओलारक टैनिलांनबिलिर. हकीकीने एसईओवर विश्वास व्यक्त केला आहे की एसईओ ग्राहकांनी यापूर्वीच या कंपनीचे सदस्य म्हणून काम केले आहे, तर एसईओ एजन्सीजने या कंपनीला\nट्युम एंड्युब्रलर, डॉक्युमेंट्स डॉक्युनल अॅन एजॉलर आणि बनलर कॉरिस कॉयर्सर. एसइओ शोधत आहात आणि आपण आपल्या वेब साइटवर भेट देऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/458/%E0%A4%96%E0%A4%BE.%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T11:31:47Z", "digest": "sha1:SMSUUDBBOE5KZ344T64GFCYIQXXRLYYZ", "length": 8237, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा.सुप्रिया सुळे यांच्या ठाणे येथील प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ठाण्यात प्रचार दौरा आयोजित केला गेला होता. या प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या प्रचार दौऱ्यात तरुण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाण्याचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद पंराजपे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार हेमंत टकले, आमदार निरजंन डावखरे आणि युवती मुंबई अध्यक्ष अदिती उपस्थित होत्या.\nसुप्रिया सुळे या कोपरी व बाळकुंभ या परिसरातील रोड शोमध्ये सहभागी झाल्या, तसेच त्यांनी प्रभाग क्र. ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व आरपीआय (ग) या महाआघाडीच्या उमेदवारांच्या खोपट येथील प्रचार कार्यालयास भेट दिली. अरुणा पेडणेकर, सारिका यादव, यानबा पाटील, रुपेश बिदियारे यांच्या प्रचारफेरीत सहभागी यावेळी सुप्रियाताई झाल्या. सुळे यांनी ठाणे मनपातील भाजप-सेनेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. शिवसेना-भाजप यांनी गेल्या २५ वर्षात फक्त भ्रष्टाचार केला असून ठाण्यात तिळमात्र विकास झाला नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला ठाण्यात परिवर्तन करायचे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये ठाण्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा पुणे येथे भव्य रोड शो ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा भव्य रोड शो आज पुणे येथे आयोजित करण्यात आला. या रोड शोला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोड शोसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती तसेच ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. लोकांच्या या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. ...\nजि.प आणि पं. स निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे- अजित प ...\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी मेळावेही घेतले जात आहेत. सोमावरी पुण्यातील भोर, वेल्हे, मुळशी येथील जाहीर मेळाव्यांना उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री सत्तेत असूनही विरोधी पक्षनेते असल्याप्रमाणे भाष्य करत आहेत, अशी टीका यावेळी पवार यांनी केली. युतीवरून शिवसेना ...\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा केवळ टाईमपास - आ. राजेश टोपे ...\nमराठा आरक्षणासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या सरकारला दोन वर्षे लागतात, आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या भावनांशी खेळत सरकार फक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान केला.यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु केवळ प्रतिज्ञापत् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/maharashtra-desha/literature/aadishakti-part-i", "date_download": "2018-04-23T11:19:23Z", "digest": "sha1:ZFBIH75L657YYNN6ASVA3EIKLF6IRGTS", "length": 14703, "nlines": 140, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Aadishakti Part I | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महाराष्ट्र देशा साहित्य आदिशक्ति भाग १\nविश्वस्य बीजं परमासि माया |\nत्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः ||\nदेवि सप्तशतीमधील उपरोक्त श्लोक देवीचे मुलभूत स्वरूप दर्शविणारा आहे. तो असा- ‘तू सर्वव्यापी अनंत पराक्रमी अशी शक्ति जी विश्वाचे मूळ किंवा कारण असून परम् अशी माया आहे. सकलांना मोहवणारी तू प्रसन्न होऊन मला मुक्ति दे.’\nजगाच्या उत्पत्ती बरोबरच मोहमयी माया निर्माण झाली; म्हणूनच देवीला आदिमाया म्हटले आहे. सर्वांना सम्मोहित करण्याचे कार्य करणारी हि शक्ती आहे. याची जनमानसातील उदाहरणे पाहू.\nजीवाचा जन्म झाल्याबरोबर माता वात्सल्याने तो जीव सांभाळते. हे वात्सल्यच देवीचे स्वरूप आहे. तो जीव वयात आल्यानंतर भिन्नलिंगी जीवाकडे आकर्षिला जातो. हे आकर्षण देवीचेच स्वरूप आहे. सुराष्ट्र वा सद्-धर्मावरील प्रेमापोटी माणूस आत्मार्पण करतो ते उत्कट प्रेम देवीस्वरूप आहे.\nज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा |\nबलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ||\nज्ञानिजनांना मोहवून बळाने आकर्षिणारी ती हिच देवी भगवती, असे देवीसप्तशतीतील उपरोक्त श्लोक सांगत आहे. याची उदाहरणे पाहू –\nब्राह्मणपुत्र, वेदशास्त्र संपन्न राजारावण शूर्पणखेच्या शब्दांवर विसंबून सीतेच्या मोहात पडला. सोन्याचं हरण असूच शकत नाही हे ज्ञान सामान्य माणसालाही असते पण रामासारखी अद्वितीय विभूती सुवर्णमृगाच्या मोहात पडली. धर्मराज म्हणून प्रख्यात असलेल्या युधिष्ठिराने द्युताच्या वेळेसच दुर्योधनादि चौकडीला भीम हस्ते वेळीच ठार करावयास हवे होते. पण अहिंसेचे तत्वज्ञान व आप्तबंधुप्रेम याचा मोह युधिष्ठिरास झाला व पुढे चौदावर्षांच्या हालअपेष्टा भोगूनही चाळीस लक्ष लोकांच्या हत्येचे पाप डोक्यावर घ्यावे लागले. पृथ्वीराज चौहानने महम्मद घोरी या शत्रूला १८ वेळा जीवदान दिले. पण एकोणिसाव्या वेळी पृथ्वीराजाचा पराभव होताच महम्मद घोरीने पृथ्वीराजाचा जीव घेतला. हा प्रसंग असे दर्शवितो की, पृथ्वीराज चौहान जीवदानाच्या, पुण्याईच्या मोहात पडला. आणि आत्मघाताच्या व स्वजनघाताच्या आणि स्वदेशघाताच्या पापाचा धनी झाला. हा मोहमायेचाच प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी देखील अशाच दयाधर्माच्या मोहापायी बेहेलोल खान या शत्रूला जीवंत सोडले. पुढे बहलोल खानाने प्रतापरावांसह त्यांच्या साथीदारांचा खात्मा केला. हि सर्व उदाहरणे ज्ञानिजनांना मोह कशाप्रकारे आकृष्ट करतो याची साक्ष देत आहेत. तसेच वरील देवीसप्तशतीमधील श्लोक किती सत्य आहे हेच दर्शवीत आहेत. म्हणूनच पहिल्या श्लोकाच्या शेवटी मुक्ती देण्यासाठी देवीला प्रार्थीले आहे; कारण जर आपण मोहपाशात अडकलो नाही तरच योग्य कर्म करून बंधमुक्त, स्वतंत्र व आनंदात राहू.\nछत्रपती शिवाजी महाराज देवीचे निस्सिम भक्त होते व देवी भवानी त्यांच्यावर प्रसन्न होती हे इतिहास प्रसिद्धच आहे. अफझलखानाचा दूत कृष्णाजी भास्कर हा शिवाजीवर तलवार उगारीत चालून आला तेव्हा ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ व ‘हिदूपदपातशहा’ असलेल्या शिवाजीला धर्ममोह न होता त्याने, हिंदू व ब्राह्मण असलेल्या कृष्णाजी भास्कराची क्षणात खांडोळी केली. कारण शत्रूनाश हे परम सत्य आहे व कृष्णाजी भास्कर शत्रू म्हणून पुढे आला होता. योग्यांचा योगी असलेला शंकर हाती त्रिशूळ घेऊन शत्रूंचा नायनाट करतो. त्याला अनाठायी दयाबुद्धिचा मोह होत नाही, कारण आदिमाया पार्वती ही त्याची साक्षात् अर्धांगिनी आहे. स्वतःच्या बायकोच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी प्रजापती दक्षाचा यज्ञ त्याच्या परिवारासह नष्ट केला; स्मशानयोगी शंकराने. वरील सर्व उदाहरणांवरून असे दिसते की, शत्रूनाशाचे आपले कर्तव्य आपण केलेच पाहिजे. या तत्त्वाविषयी मोहात पडू नये.\nआता अध्यात्मातून मला जे देवी संबंधी ज्ञान झाले ते सांगतो.\nलेखक – गो.रा.सारंग (9833493359)\nभेटूच भाग २ मध्ये\nविवेकज, सत्य ज्ञानासाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ अभ्यासावेत. या ग्रंथांसाठी विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक यांच्याशी संपर्क साधावा 9823530501\nसरकार विरोधात लिखाण करणाऱ्या अनेक पत्रकारांना पोलिसांच्या नोटिसा\nएनएमएसएसएस आणि आम्ही उद्योगिनी आयोजित महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7143971", "date_download": "2018-04-23T11:43:38Z", "digest": "sha1:TQUMSG4CUZL7WJLJTMUANLPLZHBBKBN4", "length": 8633, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "समाकलित एसइओ आणि सामाजिक मीडिया Semalt", "raw_content": "\nसमाकलित एसइओ आणि सामाजिक मीडिया Semalt\nएसइओबद्दलची कथा आज खूपच जुनी बातमी आहे कारण एसईआरपीच्या उच्च क्रमांकावर चढण्यासाठी एसईओच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे याबद्दल खूप माहिती आहे. दुसरीकडे, आपल्या एसइओच्या प्रयत्नांना आपल्या सोशल मिडिया मार्केटिंग प्रयत्नांसोबत कसे एकत्र करावे आणि कसे आणि कसे असावा याबद्दल माहितीचा अभाव असल्याचे दिसते. खरं म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग हे महत्वाचे आहे की जो ऑनलाईन उपस्थिती निर्माण करू इच्छित आहे, जसे की फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, Google+ आणि सोमाट यासारख्या सोशल नेटवर्क्स अशा ठिकाणी आहेत ज्यात कोट्यावधी लोक प्रत्येक दिवस स्वत: शोधतात . त्यामुळे, वेबसाइट मालक म्हणून, आपण खरोखरच काय करत आहात आणि आपण एसइओ आणि सोशल मीडिया मार्केटिंगच्या दृष्टीने योग्य गोष्टी करत आहात याचा विचार केला पाहिजे.\n5 एसइओ ब्लॉगिंग टिपा\nएसइओ रँकिंग वर Google+ च्या प्रभाव\n(1 9) आपल्या सोशल मीडिया प्रेक्षकांना गुंतवून ठेवा\nसोशल मीडिया मार्केटिंगचे एकमात्र उद्दिष्ट आहे अधिक वेबसाइट अभ्यागत किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच ब्रँड जागरूकता वाढविणे - time tracker software. म्हणूनच, बर्याच लोक आपल्या सोशल नेटवर्क अकाउंटचा वापर लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करतात आणि वेगवेगळ्या निवडणुकीत, संभाषणात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. ही एक चांगली युक्ती आहे, परंतु आपण आपल्या सोशल मिडियाच्या प्रयत्नांमध्ये कीवर्ड वापरणे सुरू केल्यास हे अधिक सहजपणे केले जाते. याबद्दलचे सममूल्य - आपल्या कीवर्डमध्ये स्वारस्य असलेले लोक पूर्णपणे आपल्यासारख्या गोष्टींपेक्षा आपल्याशी व्यस्त होण्याची शक्यता अधिक असते जे पूर्णपणे भिन्न रूपात रुची आहे\n(1 9) आपण सामाजिक मीडिया विशेषज्ञ किंवा एसइओ विशेषज्ञ नोकरी कशी\nविहीर, हा एक अतिशय मनोरंजक प्रश्न आहे. बर्याच कंपन्या एक किंवा इतर वर लक्ष केंद्रित करतात, पण खरं म्हणजे सोशल मीडिया आणि एसइओ हे असावेत की जसे आपण वर नमूद केले आहे, यशांच्या शक्तिमान मिश्रणाने मिश्रित केले आहे. होय, आणि असे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अनुभवी सोशल मीडिया तज्ञावर भाड्याने देणे ज्यांच्याकडे एसइओ ज्ञान आहे, किंवा फक्त आपल्या सोशल मिडिया टीमला प्रशिक्षित करण्यासाठी काही पैसे गुंतवावे. एसइओ प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे, आणि आपल्या सोशल मिडिया टीमसाठी नियमित एसईओ प्रशिक्षण सत्र गुंतवणूक निश्चितपणे लाँग रन मध्ये बंद भरावे होईल\n(1 9) आपल्या एसइओ प्रयासांना चालना देण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करा\nएसइओचे बरेच पैलू आहेत जे खरंच एक चांगला सोशल मीडिया मोहिमेसह पूरक आहे, आणि आपण या वस्तुस्थितीचा लाभ घ्यावा. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आपल्या ब्लॉगवर नवीन पोस्ट प्रकाशित करता किंवा जेव्हा आपण लेख सबमिशन वेबसाइटवर नवीन लेख प्रकाशित करता तेव्हा आपण आपल्या वेबसाइटवर नवीन सामग्री जोडता तेव्हा प्रत्येक वेळी एक दुवा प्रकाशित करण्यासाठी फेसबुक, ट्विटर आणि Semalt + वापरू शकता. अशाप्रकारे, आपण आपल्या वेब सामग्रीसाठी तसेच आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर अनेक अभ्यागत आकर्षित करण्यासाठी किती व्यापक प्रेक्षक मिळविण्याची एक संधी देता. हे खरंच आपण आपल्या एसईओ प्रयत्नांना चालना देण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचा उपयोग करू शकणार्या सर्वोत्तम मार्गंपैकी एक आहे, जोपर्यंत आपण केलेले सर्व कीवर्ड संशोधन व्यर्थ ठरतील परंतु जोपर्यंत आपण खरंच जे लिहिले आहे ते वाचू शकणार नाही.\nSemaltेट हे शोध यंत्र ऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया विपणन एकत्र आणि एकत्र वापरले जाऊ शकते, कारण ते एकत्र चांगले कार्य करतात आणि आपल्याला उत्कृष्ट परिणाम आणू शकतात\nआपण आपल्या सोशल मिडिया योजनांमध्ये एसईओ कसे एकीकृत करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tarun/", "date_download": "2018-04-23T11:44:12Z", "digest": "sha1:FGCRLOGMLH5ZZ4IC4IHNRONFXWHZFVPT", "length": 5012, "nlines": 122, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तरूण | Tarun", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » जीवनशैली » तरूण\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:47:42Z", "digest": "sha1:OAJG2BXPM5YTU42RQGOC56UOPACYTFSE", "length": 3563, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बावची - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ००:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-23T11:53:15Z", "digest": "sha1:HO6ZUQJNBWAYBLH57KPQJQT4ACPXHRDS", "length": 5956, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुरुंडी फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/50/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2018-04-23T11:12:54Z", "digest": "sha1:23TM7J6Z3KK53KEICAOGC3K3UB5XPXRD", "length": 2238, "nlines": 30, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या ७५ व्या वाढदिवशी, शनिवार दि.१२ डिसेंबर २०१५ रोजी, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात उपस्थित राहून सर्व विविघ क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.\nतरी या कार्यक्रमाच्या वार्ताकंनासाठी व छायाचित्रणासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी व कॅमेरामन यांनी उपस्थित रहावे ही विनंती.\nटीप – वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी 0.B.Output ची सुविधा करण्यात आलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sypoly.org/index.php/component/content/article/56-news/153-career-fair-guidance-successfully-conducted-on-15th-june-2017", "date_download": "2018-04-23T11:42:19Z", "digest": "sha1:FARUT4ENVZ74TYMXVYNB2U6TBFIE2DKG", "length": 8827, "nlines": 64, "source_domain": "sypoly.org", "title": "Deprecated: iconv_set_encoding(): Use of iconv.internal_encoding is deprecated in /home/sypoly/public_html/libraries/joomla/string/string.php on line 28", "raw_content": "\nश्रीयश पॉलिटेक्निकमध्ये तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न\nसातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश पॉलिटेक्निक आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने गुरुवार, दिनांक १५/०६/२०१७ रोजी सकाळी १०:३० वा. स्थळित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून मा. श्री. डी. एम. मुगळीकर (आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद) तर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री .बसवराजजी मंगरुळे, अध्यक्ष, श्रीयश प्रतिष्ठान, तसेच डॉ. आनंद पवार, उपसचिव, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद, मा.श्री.मोहन मानकर, सहायक सचिव, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद, इंजि. शिवप्रसाद जाजू (पवन इंडस्ट्रीज), औरंगाबाद, श्री. आर.एन. खडसे, अधिव्याख्याता, शासकिय तंत्रनिकेतन, औरंगाबाद, मा.श्री.डॉ.उत्त्तम काळवणे, संचालक, श्रीयश टेक्निकल कॅम्पस, औरगाबाद, प्रा. सौ. सिमा एम. शेंडे, प्राचार्या, श्रीयश पॉलिटेक्निक, औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री. डी. एम. मुगळीकर- १० वी नंतर पुढील शिक्षणाची योग्य दिशा ठरवणे महत्वाचे आहे. विदयाथ्र्यांनी आपला नैसर्गिक कल, आवड, क्षमता ओळखुन भविष्यातील शिक्षणांची निवड करावी. तंत्रज्ञानाचे क्षेत्र प्रगतीसाठी अनुकूल असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन उज्वल संधी मिळतात. आभियंता होउन राष्ट्र निर्मीतीच्या कार्यामध्ये आपण आपले योगदान देऊ शकतो. श्रीयश पॉलिटेक्निकने आयोजित केलेल्या या मेळाव्याचा सर्व विदयाथ्र्यांंनी लाभ घ्यावा.\nश्री .बसवराजजी मंगरुळे, काही वर्र्षापुर्वी शिक्षणाच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या परंतू आत्त्ताच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. आवड,चिकाटी, अभ्यासातील सातत्य या बळावर विद़यार्थी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी होतात.\nडॉ़ आनंद पवार, यांनी करियर कसे निवडावे या विषयी मार्गदर्शन केले़\nश्री़.एम.व्ही. मानकर, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी गुणवत्त्ता महत्वाची आहे. विद्याथ्र्यांनी उज्वल भवितव्यासाठी निाश्चित ध्येय ठरवणे आवश्यक आहे.\nश्री. शिवप्रसाद जाजु, तंत्रशिक्षणातील विविध संधी, याविषयी मार्गदर्शन केले.\nश्री. आर. एन. खडसे, यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहीती दिली.\nश्री. उत्त्तम काळवणे, यांनी श्रीयश प्रतिष्ठाण संस्थेत उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, सोयी सुविधा याबद्दल माहीती दिली.\nकार्य्क्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जितेंद्र त्रिभुवन, तसेच आभारप्रदर्शन प्रा. संदीप खंडागळे यांनी केले. या मेळाव्यांतर्गत विविध महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची माहीती देणारे स्टॉल लावण्यात आलेले होते. शहरातील १०वी, १२वी तसेच आय.टी.आय. उत्त्तीर्ण झाालेले बहुसंख्य विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/vasant-gite.html", "date_download": "2018-04-23T11:33:11Z", "digest": "sha1:QFHKQVSKTMQN56GLMAZHEBQ5EISRXTH5", "length": 34010, "nlines": 101, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : वसंत निवृत्ती गिते\nConstituency : नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ\nParty Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nDesignation : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार - नाशिक मध्य\nName वसंत निवृत्ती गिते\nFather's Name : कै. निवृत्ती गिते\nMother’s Name : कै. कमलाबाई निवृत्ती गिते\nPlace of Place: : नाशिक, महाराष्ट्र\nSpouse’s Name : सौ. शोभा वसंत गिते\nNo. of Children : एकूण - ०३, मुले ०२, मुली ०१\nProfession : शेती, जमीन खरेदी विक्री, बांधकाम\nHobby : वाचन, समाजकार्य\nResidence Address : कमल निवास, डॉ. भाभानगर, नाशिक ११, मुंबई नाका, महाराष्ट्र\nOffice Address : आमदार वसंत भाऊ गिते यांचे संपर्क कार्यालय, नाशिक, मुंबई नाका, महाराष्ट्र\n१९९२ साली झालेल्या महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु झाली.\n१९९७ पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होऊन शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदी विजयी.\n२००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.\nगेली १७ वर्षापासून नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु अाहे.\nमनपात भूषविलेली पदे - विधी समिती सभापती, आरोग्य समिती सभापती, गट नेते, सभागृह नेता, स्थायी समिती सदस्य व मा. महापौर अशी चढत्या क्रमाने कारकीर्द यशस्वी रित्या पार पाडली.\nया सर्व कार्याची पावती म्हणून जनतेने १३ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत \"भाऊंना\" मोठया मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेवर पाठविले.\nनामको बँकत चेअरमन, व्हा. चेअरमन पदे भूषवून बँकेच्या विविध प्रगतीमध्ये मोलाची भर टाकली. सहकार क्षेत्रात चाललेल्या अस्थितेच्या काळात बँकेला सुरक्षित अशा स्थितीत ठेवण्यासाठी संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सतत यशस्वी प्रयत्न केले. संचालक म्हणून कार्यरत आहे.\nदि. महाराष्ट्र को. ऑ. हाऊसिंग फायनान्स कार्पो. लि. मुंबई या संस्थेची मे २००६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवड झाली. संचालक म्हणून कार्यरत आहे.\nएन.डी.सी.सी. बँकेच्या २००७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी व संचालक म्हणून कार्यरत.\nम्हाडा संचालक म्हणून निवड.\nसदस्य, रेल्वे सल्लागार समिती.\nअध्यक्ष, त्वायकॉदो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (राज्यस्तरीय कराटे असो.)\nसंस्थापक - युवक मित्र मंडळ, मुंबई नाका, नाशिक\nसंस्थापक - भगवती कला व क्रीडा मंडळ, ट्रस्ट, नाशिक\nसंस्थापक - दि महाराष्ट्र भूषण नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक\nवसंत गिते यांचा कार्य अहवाल\nनाशिक शहराचा प्रथम नागरिक झाल्यानंतर सर्व प्रथम नाशिक शहरातील आरोग्य जपण्यासाठी \"स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक\" ही संकल्पना राबविण्यात आली.\nअत्यावशक सेवा म्हणून सुंदर रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पथदीप व्यवस्था याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले.\nबुद्ध स्मारक, दादासाहेब फाळके स्मारक यांसारखे महत्वाचे प्रकल्प उभारण्यात महत्वाचा सहभाग.\nसिडको विभागासाठी थेट पाईप लाईन योजना, राजे संभाजी क्रीडा संकुल यासाठी प्रयत्न.\nप्रथम पंचवार्षिक निवडणूक १९९२ ते १९९७ - कारकीर्द\nनाशिक महानगरपालिका पहिल्या निवडणुकीत वॉर्ड क्र. ५५ मधून मोठया मताधिक्याने निवडून येवून नगरसेवक पदाची कारकीर्द सुरु केली.\nयावेळी डॉ. भाभानगर, नागजी परिसर, पखालरोड, वैद्यनगर, बचत भवन, नागसेनवाडी, गुरुद्वारा रोड, वझरे मळा असा नव्याने नागरी वस्ती झालेला परिसर वॉर्डात समाविष्ट असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरी सुविधांचा अभाव होता तसेच सदरच्या भागात शेतीचे क्षेत्र मोठया प्रमाणात होते परंतु शहराचा विकास होत गेल्याने मोठया प्रमाणात नागरी वस्ती स्थापन झाली व त्या मानाने पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते पथदीवे अशा अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या परिसरात सर्व प्रथम अत्यावश्यक सुविधांना प्राधान्य देवून पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या तसेच ड्रेनेज लाईन टाकून रस्ते तयार करण्यात आले.\nगुरुद्वारा रोड येथील बहुतांशी सोसायट्या रस्त्यापासून खालच्या लेवलला असल्याने पावसाळ्यात येथील रस्त्यांवर मोठया प्रमाणात पाणी साचुन परिसरातील सोसायट्यांमध्ये जात असल्याने या ठिकाणी पावसाळी गटार व ड्रेनेज लाईन टाकून हा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यात आला.\nडॉ. भाभानगर, समता नगर, वैद्यनगर येथे उद्यान विकसित करण्यात आले तसेच तरुणांसाठी वैद्यनगर, नागजी परिसर, भाभानगर येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली.\nवैद्यनगर येथे पोस्ट ऑफिस आवश्यक असल्याने येथील नागरिकांच्या वतीने सतत पाठपुरवठा करून या ठिकाणी पोस्ट ऑफिसला मंजूरी घेऊन पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून दिली.\nनागजी हॉस्पिटल येथे पोलिस चौकी उभारण्यात आली.\nमहिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करून त्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले.\nविद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थांना बक्षीस वाटप केले जाते.\nदुसरी पंचवार्षिक निवडणूक १९९७ ते २००२ - कारकीर्द\nदुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्र. ५८ मधून निवडणूक लढविण्यात आली. यावेळी या वॉर्डात भाभानगर, नागजी परिसर, हिरवे नगर, समता नगर असा परिसर येत असल्याने या ठिकाणी यापूर्वी केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने चांगल्या मताधिक्याने निवडून दिले.\nयाच वर्षात नाशिक शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदाचा बहुमान मिळाला.\nमुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने येथे सुनियोजित सर्कलची निर्मिती करून सर्वात मोठा हायमास्ट बसविण्यात आल्याने परिसरातील स्वरूपच बदलून गेले.\nराष्ट्रीय महामार्गाला समांतर दोन्हीं बाजूस असलेल्या रस्त्यांना मुंबई नाका येथील नासर्डी नदीचे दुतर्फा पुल बांधून महामार्गावरील वाहतूक कमी करण्यात आली त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली.\nत्याचप्रमाणे मुंबई नाका व काठगल्ली या महत्वाच्या रस्त्याचे काम करण्यात येवून नागरिकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे द्वारका सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न कमी होऊन वाहतुकीचे विभाजन होण्यास मदत मिळाली.\nकानड नगर येथे अद्यावत अशा प्रशस्त उद्यानाची निर्मिती करून बालगोपाळांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या.\nनागजी - वडाळा रोडवरील नासर्डी नदीवर असलेल्या छोट्या पुलाची ऊंची वाढवून पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून वडाळा गावातील लोकांचा संपर्क तुटण्यापासून गैरसोय दूर केली.\nवॉर्डात विविध ठिकाणी उच्च दर्जा व जास्त प्रकाश देणारे पथदीवे बसविण्यात आले.\nउद्यान विभागामार्फत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्यात, परिसर हरित करण्यासाठी जनतेला सहभागी केले.\nवॉर्डातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी डॉ. भाभानगर येथील हिरवे नगर येथे २० लक्ष लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येवून ज्या ज्या ठिकाणी लहान व्यासाच्या पाईप लाईन आहे त्या त्या ठिकाणी मोठया व्यासाच्या पाईप लाईन टाकल्यामुळे पाणी थेट शेवटच्या मजल्यापर्यत पोहचविण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.\nडॉ. भाभानगर येथे नाशिक शहरातील ३५०० आसन व्यवस्था असलेले पाहिले, सर्व सुविधायुक्त व अतिभव्य असे दादासाहेब गायकवाड सभागृहाची निर्मिती करून जनतेसाठी खुले करण्यात आले. सर्व सोयीयुक्त रंगमंच, कलाकारांसाठी ड्रेसिंग रूम, ध्वनीक्षेपण व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, सभागृहाचे दोन्ही बाजूस प्रवेश गेट, जनरेटर व्यवस्था, स्वछता गृह अशा सुविधा पुरविण्यात आलेल्या आहे. जेणे करून नाशिककरांना मेळावे, छोटेखानी सभा, मनोरंजनाचे कार्यक्रम, प्रबोधनात्मक चर्चा सत्रे येथे घेता येतील.\nतिसरी पंचवार्षिक निवडणूक २००२ ते २००७ - कारकीर्द\nतिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड ऐवजी प्रभागाची निर्मिती झाल्याने या ठिकाणी प्रभागामध्ये तीन सदस्य असल्याने प्रभाग क्र. ६३ ची निवडणूक अटी-तटीची होत असताना सर्व साधारण गटातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची बिनशर्त माघार घेतल्याने बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळाला.\nप्रभाग रचनेत भाभानगर, नागजी परिसर, वैद्यनगर, काठेगल्ली, टाकळी रोड, नानावली, अमरधाम इतका मोठा परिसर व्यापलेला होता.\nप्रभागात तीन सदस्य असल्याने प्रभागातील विकास करण्यासाठी तिघांच्या सहकार्याने पाठपुरवठा करण्यात आला.\nभाभानगर येथील नाशिक हॉस्पिटल समोरील मनपाचे ओपन स्पेस येथे विद्यार्थांसाठी सर्व सुविधायुक्त प्रभागातील पहिली स्व. कवी आनंद जोर्वेकर अभ्यासिका व स्व. कमलाबाई गिते सार्वजनिक वाचनालय साकरण्यात आले. त्याच प्रमाणे युवक मित्र मंडळ, मुंबई नाका या मंडळाच्या माध्यमातून रुग्णाच्या सेवेसाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण सुसज्ज अशा तीन रुग्णवाहिका नाशिकच्या जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.\nप्रभु रामचंद्राच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या श्री वसंतराव गिते यांना आज सर्व राज्य \"भाऊ\" या नावाने ओळखतात.\nकुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा राजकीय वसा मिळाला नसतानाही जनमाणसाने त्यांना राजकारणात राज्यपातळीवर नेवून ठेवले. लहानपणापासून समाज कार्याची आवड व असंख्य कार्यकर्त्यांचे मोहळ पाठीशी असल्याने समाजकार्यात हिरारीने भाग घेवून कोणत्याही प्रकारे पदाची किंवा सत्तेची लालसा न ठेवता दिन दुबळ्यांसाठी अहोरात्र काम करण्याची ताकद गिते यांच्याकडे आहे. छोट्या मोठ्या निवेदनांपासून, मोर्चा, धरने, आंदोलने केली मग ती जनतेच्या हितासाठी असो किंवा पक्षासाठी.\nअशा प्रकारे काम करीत असताना ते शासन दरबारी पोचवून मार्गी लावण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याने सर्व थरातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाशिक महापालिकेच्या १९९२ साली झालेल्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने निवडून आले व आयतागायत गेली १८ वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करीत आहे.\n१९९७ साली मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नाशिक शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर पदी विराजमान झाले. महापौर कारकिर्दीत मा. राजसाहेब यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबविले. जनसामान्यांच्या आवश्यक गरजांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर भर दिला.\nश्री वसंत गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय सकाळी ९ वाजल्यापासून नागरिकांच्या समस्या नागरिक घेऊन येतात व त्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. तक्रार कोणत्याही प्रकारची असो, तक्रारकर्ता गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा जेष्ट असा भेदभाव न ठेवता फक्त त्याची तक्रार, अडचण किंवा गरज काय आहे व ती आपण कशा पद्धतीने तातडीने सोडवू शकतो याकडे लक्ष देऊन त्याचे पूर्ण समाधान होईलच याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. या ठिकाणी फक्त शहरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात.\nमा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडतेवेळी सर्व प्रथम नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचा खंदा समर्थक म्हणून श्री वसंतराव गिते हे त्यांच्या बरोबर गेले व मनसेची पहिली मुहूर्तमेढ नाशिक शहरात रोवली. पक्षाची व्यापती शहराबरोबरच आजूबाजूच्या खेड़ोपाड़ी वाढवून नाशिक जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राचे राजकारणात ठळक अक्षरात उमठले. मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र दौरा करुन जनतेचा कौल घेतला व नविन पक्ष स्थापनेची दिशा ठरवली त्यावेळी श्री गिते त्यांचे बरोबर सक्रीय होते त्यानंतर स्वतः वैयक्तिक संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा दौरा करून मा. राजसाहेबांवर झालेल्या अन्याय व त्यांची पुढील वाटचालीची माहिती सर्व कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला देवून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्यावेळी मा. राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून पहिली अति भव्य जाहिर सभा मुंबई येथील शिवाजी पार्कवर घेतली त्यावेळी श्री गिते यांचे नेतृत्वाखाली सुमारे ५० हजार कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने शिवाजी पार्क येथे दाखल झाले. यात महिलांचा मोठा होता. त्यावेळी मा. राजसाहेबांनी श्री वसंत गिते यांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली व खऱ्या अर्थाने मुंबई नाका ते शिवतीर्थ असा प्रवास पूर्ण होवून श्री वसंत गिते यांच्या कार्याला सुवर्ण झालर चढली. त्यांचे नाव राज्याच्या राजकारणात चर्चिल जावू लागले. विरोधकांनी त्याचा धसका घेतला तर स्वकीयांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. अशा प्रकारे सामान्य शेतकरी कुटुंबातील युवक राज्याच्या राजकारणात गेल्याचे साक्षीदार आपण आहोत.\nमा. राजसाहेबांनी दिलेली जबाबदारी किती चांगल्या प्रकारे पार पाडू याकडे लक्ष दिले. पक्षाचे पदाधिकारी यांना बरोबर घेवून जिल्ह्यात मोठया जोमाने कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करून शहराबरोबरच खेड्यापाड्यांमध्ये मनसेच्या शाखा उघडून पक्षाचे कार्य तळागाळात पोहोचविले.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर मा. राजसाहेबांनी महाराष्ट्रात होवू घातलेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून निवडून आणले. नाशिक शहराची जबाबदारी श्री वसंत गिते यांच्याकडे दिली. श्री वसंत गिते यांनी रात्रीचा दिवस करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर महानगरपालिकेपेक्षा सर्वात जास्त जागा नाशिक महानगरपालिकेत निवडून आणल्याने महाराष्ट्रातील राजकारणात श्री वसंत गिते यांचे नाव झळाळले. त्यानंतर सातत्याने कार्यात आघाडी घेऊन ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून सत्ता स्थापनेत सिंहाचा वाटा घेतला.\nएकीकडे राजकारणातील आलेख दिवसेंदिवस वाढत असताना राज्याच्या सहकार क्षेत्रात आघाडी घेऊन नामको बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, दि महाराष्ट्र स्टेट को. ऑ. हाऊसिंग फायनान्स कॉर्पो. लि. मुंबई, म्हाडा यांसारख्या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या संस्थामध्ये संचालक म्हणून निवड होऊन त्यांनी तळागाळातील गरजूंना आर्थिक दृष्ट्या आधार देण्याचे काम केलेले आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना सहकारातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचवण्यात मदत झाली.\nया सर्व कार्याची पावती म्हणून जनतेने १३ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत \"भाऊंना\" मोठया मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेवर पाठविले आणि भाऊ \"आमदार\" झाले. जनतेने टाकलेला विश्वास व मा. राजसाहेब ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व व कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर यापुढे जनतेची व तळागाळातील दिनदुबळ्याची सेवा सातत्याने सुरु ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य व विस्तार वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील तसेच मा. राजसाहेबांनी व जनतेने टाकलेली जबाबदारी सार्थ करणे हेच यापुढील लक्ष आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/331/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF", "date_download": "2018-04-23T11:24:33Z", "digest": "sha1:ACPLJ74KDUYV5DRC6QEWELKNC2HZNBV4", "length": 10939, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनिवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार-अजित पवार\nआगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार असून येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर पिंपरी-चिंचवडच्या जनतेसमोर जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, पक्षनेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, डब्बू आसवानी, हनुमंत गावडे आदी उपस्थित होते.\nजनतेला विकास हवा आहे, एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांशी त्यांना घेणे देणे नाही. देशातील जाहीर करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीपेक्षा पिंपरी-चिंचवड शहर हे विकासाच्या बाबतीत कितीतरी पटींनी सरस आहे. त्यामुळे इथून पुढेही विकासाला अधिक महत्त्व दिले जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्थेला आतापर्यंत नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे पवार म्हणाले. आम्ही कधीही विकासकामांची जाहिरातबाजी केली नाही ही आमची चूक असून यापुढे जनतेपर्यंत विकासकामे पोहोचविण्यावर आम्ही भर देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच उमेदवारी देताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद निवडणुकीबाबत बोलताना उमेदवारीचा निर्णय २६ तारखेला घेऊ असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांत ६० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.\nआमचे सरकार नसल्याने आम्ही सुरू केलेला मेट्रो प्रकल्प बारगळला. आता नवीन सरकारकडे आम्ही तो प्रकल्प लवकरात लवकर व्हावा म्हणून पाठपुरावा करत आहोत. सत्ता येण्यापूर्वी आमच्या योजनांना विरोध केला आता सत्ता आल्यानंतर त्याच योजना पोलीस बळाचा वापर करून हे सरकार राबवत आहे, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. तसेच बंद पाईपलाइनची योजना भाजप आणि शिवसेनेने अडवली असा आरोप त्यांनी केला.\n५ कोटीत जवानांच्या शौर्याचा लिलाव केला\nमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी ५ कोटी रुपयांत जवानांच्या शौर्याचा लिलाव केला अशी खंत व्यक्त करत, आजपर्यंत मनसेने कुठलाही मुद्दा शेवटपर्यंत नेला नसल्याची टीका पवार यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या निर्मात्यांसोबत तोडपाणी केली की काय, अशी शंका येते, असा टोला पवार यांनी लगावला.\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन ...\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहनसंषर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता पण एकजुटीने संघर्ष सुरूच राहणार असल्याचा शरद पवार यांचा दावा उत्तर प्रदेशात कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही असा जळजळीत सवाल करत शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षयात्रेच्या पुढील टप्प्यातही विरोधक एकजुटीने संघर्ष करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्य ...\nसेवाग्राम येथील मेडिकल चौकात राष्ट्रवादीचा हल्लाबोल ...\nसेवाग्राम येथील मेडिकल चौकातील हल्लाबोल पदयात्रा आंदोलनाच्या सहाव्या दिवसाची सांगता सभा संस्मरणीय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अक्षरशः उपस्थितांमध्ये आंदोलनाचे नवस्फुलिंग चेतविले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानवंदना देऊन आजची पदयात्रा सुरू झाली याची जाण ठेवून तटकरे यांनी आपल्या सोबतच्या सर्व सहकारी नेत्यांचे तसेच उपस्थितांचे स्वागत केले आणि खोटारड्या राज्य सरकारवर घणाघाती प्रहार आपल्या भाषणातून केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी य ...\nनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मनपा निवडणुकांबाबत चर्चा करून जिल्हानिहाय राजकीय परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीची भूमिका आहे. काही जिल्ह्यात आघाडी करण्याबाबतची यशस्वी चर्चा सुरू असून येत्या दोन-तीन दिवसात त्याबाबतची भूमिका पक्ष जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसकडून आघा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC/", "date_download": "2018-04-23T11:09:16Z", "digest": "sha1:XEJZ6Z2JMIPAMTJHK3FMXP5D7T52XEBR", "length": 9174, "nlines": 91, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिंपरी-चिंचवडमध्ये चार बलात्काराचे गुन्हे: सांगवी परिसरात खळबळ | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये चार बलात्काराचे गुन्हे: सांगवी परिसरात खळबळ\nपिंपरी-चिंचवडमध्ये चार बलात्काराचे गुन्हे: सांगवी परिसरात खळबळ\nपिंपरी-चिंचवड शहरात चार बलात्कार झाल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एकाच दिवशी बलात्काराच्या वेगवेगळ्या चार घटना घडल्याने सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे.\nहरी गोविंद राठोड, गणेश मारुती म्हस्के (रा. ताडीवाला रोड, पुणे), संतोष महाले (मूळगाव-अंतरवली, नाशिक) आणि अजय (पूर्ण नाव समजू शकले नाही) या चार जणांविरुध्द वेगवगेळे गुन्हे सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असून याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण देखील करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार हरी राठोड याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुस-या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने अजय विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.\nतिस-या घटनेत गणेश म्हस्के याने एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून, तसेच घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच लॉजवर नेऊन देखील तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. याबाबत पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चौथ्या घटनेत पिंपळे निलख येथील एका ४२ वर्षीय महिलेने संतोष महाले याच्या विरोधात बलात्कार व फसवणुकीची फिर्याद दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच, एकूण ६ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे तपास करत आहेत.\nथेरगावमध्ये रस्त्यावरून वाहते ड्रेनेजलाईन; ठेकेदार, पालिकेच्या विरोधात नागिरक आक्रमक\nपिस्तुलाच्या धाकाने शिवसेना नेत्याचा भावाला लुटले: भरदिवसा १४ तोळे सोने लंपास\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-digilite+power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-23T11:10:16Z", "digest": "sha1:2MDFYAFMR4IHCNVUR5NASDLFRMJ43TYH", "length": 13566, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये दिगिळिते पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap दिगिळिते पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nस्वस्त दिगिळिते पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.1,142 येथे सुरू म्हणून 23 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. दिगिळिते दर्प X ६६००बक उब चार्जेर ब्लॅक Rs. 2,900 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये दिगिळिते पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी दिगिळिते पॉवर बॅंक्स < / strong>\n0 दिगिळिते पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 725. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,142 येथे आपल्याला दिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10दिगिळिते पॉवर बॅंक्स\nदिगिळिते दर्प X ५२००र्ड उब चार्जेर रेड\n- आउटपुट पॉवर 5.3 V\nदिगिळिते दर्प X ६६००बक उब चार्जेर ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5.3 V\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/12/06/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3-facts/", "date_download": "2018-04-23T11:34:42Z", "digest": "sha1:H56IX3FLFCHDVVI5DXSY646NPHOJXHGA", "length": 18946, "nlines": 230, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "रावण Facts | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\n1. रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.\n2. रावण १०-१० टोप्या घालायचा.\n3. शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा.\n4. लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन\n… द्यायची हा प्रश्न असायचा.\n5. कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी\nडिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं.\n6. रावण कधीच कुशीवरझोपू शकायचा नाही.\n7. रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही.\n8. रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.\nकारण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.\n9. रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे.\n10. रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे.\n11. मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती.\n12. रावण एकटाच समूह गीत म्हणायचा.\n13. रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा\n14. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईलने बोंबलायचा.\n15. रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलांनी २०\nहारांची ऑर्डर नोंदवली होती.\n16. रावणाला ढेकर आलीकी त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे.\n17. रावण एकटाच ग्रुप डिस्कशन करत असे.\n18. रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत असत “एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते”.\n मालक , १ नम्बरी जोक आहे\nमित्रा प्रतिक्रिया छान आणि अगदी मनापासून दिलीस आणि तुला असेच छान विनोद आवडतील असे पोस्ट लवकरच प्रकाशित करेन.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-galaxy-fit-price-p1Z1A.html", "date_download": "2018-04-23T11:44:08Z", "digest": "sha1:TDVOE45BIMUFVDCKROP2MV6S353TQWZV", "length": 14565, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय फिट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग गॅलॅक्सय फिट किंमत ## आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग गॅलॅक्सय फिटक्रोम उपलब्ध आहे.\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 6,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग गॅलॅक्सय फिट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग गॅलॅक्सय फिट वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3.3 Inches\nरिअर कॅमेरा 5 MP\nइंटर्नल मेमरी 160 MB\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 642 hrs\nसिम ओप्टिव Single SIM\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/shirish-chavan.html", "date_download": "2018-04-23T11:51:43Z", "digest": "sha1:2OF7BDO7MVSIOCNGEWELD7336GBQD422", "length": 5641, "nlines": 65, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : शिरीष ज. चव्हाण\nConstituency : वॉड क्र. ४५ वसई-विरार, विधानसभा - नालासोपारा\nDesignation : ठाणे (ग्रा.) जिल्हा प्रमुख\nName : शिरीष जयराम चव्हाण\nFather's Name : जयराम गोविंद चव्हाण\nMother’s Name : मंदाकिनी जयराम चव्हाण\nPlace of Birth: : मालदे, खेड, जि. रत्नागिरी\nSpouse’s Name : शिल्पा जयराम चव्हाण\nNo. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : बिल्डर (बांधकाम)\nResidence Address : १७, शिवरायी, महेश पार्क, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.\nOffice Address : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.\nवयाच्या १८ व्या वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती\nसन १९८१ - १९८९ - तुळींज शाखेचा उपशाखा प्रमुख\nसन १९८९ - १९९२ - तुळींज शाखेचा शाखाप्रमुख\nसन १९९२ - १९९७ - शिवसेना नालासोपारा शहर प्रमुख\nसन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका नगरसेवक वॉड क्र. ९\nसन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका विरोधी पक्ष नेता\nसन २००० - २००५ - नगरसेवक - वसई-विरार शहर महापालिका वॉड क्र. ४५\nसन २००० - शिवसेना उपतालुका प्रमुख\nसन २००७ - शिवसेना तालुका प्रमुख वसई\nसन २००९ - विधानसभा उमेदवार\nसन २०११ - शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (ठाणे ग्रा.)\nसन २०१२ फेब्रुवारी - जिल्हा नियोजन समिति सदस्य पदी बिन विरोध निवड\nखालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.\nअध्यक्ष - छत्रपती सहकारी पतसंस्था मर्यादीत (रजि.)\nअध्यक्ष - तुळींज मित्रमंडळ ग्राहक सहकारी संस्था मर्यादीत (रजि.)\nअध्यक्ष - वसई रिक्षा चालक मालक सेना (रजि.)\nउपाध्यक्ष - श्री समर्थ रामदास स्वामी शिक्षण संस्था मर्यादीत (रजि.) ता. खेड, जि. रत्नागिरी.\nउपाध्यक्ष - शाळा सुधार समिति तुळींज, नालासोपारा पंचयायन समिति संलग्न\nसचिव - तुळींज, रहिवाशी मंडळ (रजि.)\nसदस्य - नालासोपारा शांतता कमिटी सदस्य\nकार्याध्यक्ष - पश्चिम ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. वसई\nस्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...\nविविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग\nतुळींज रास्ता रोको आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/262/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80_-_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA", "date_download": "2018-04-23T11:26:32Z", "digest": "sha1:L6RWCSSOHAKYV3IQQPCMDJBTAGGP3XQ3", "length": 8812, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमागेल त्याला शेततळे योजना राज्यात अयशस्वी - अजित पवार\nमागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. मागेल त्याला शेततळे ही योजना संथ गतीने सुरू असल्याबाबतच्या तारांकीत प्रश्नावरील चर्चेवेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीची सत्यता काय आहे हे सभागृहासमोर आणत रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांची कोंडी केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५० हजारात शेततळे होते, असा दावा करत आहेत. ते कसे शक्य आहे हे एकदा मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान पवारांनी दिले. शेततळ्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकसाठी किती खर्च येतो हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात तब्बल १ कोटी ३७ लाख शेतकरी आहेत. सरकारने जे उत्तर दिले आहे त्यात फक्त ३८ हजार ३९३ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती आहे. म्हणजेच एक टक्के शेतकऱ्यांनाही शेततळे मिळालेले नाही. हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही योजनाच फेल ठरली आहे. सरकारकडे अजूनही वेळ आहे. ५० हजारात शेततळे होत नाही. त्यामुळे किमान १ लाख तरी अनुदान दिले पाहीजे अशी जोरदार मागणी यावेळी अजित पवार यांनी केली. यावर, अनुदान वाढवण्याचा सरकार नक्की प्रयत्न करेल असे उत्तर रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उस्मानाबाद कार्यकर्ता मेळावा ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उस्मानाबाद कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, आ.राणाजगजीतसिंग पाटील, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, स्थानिक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना सुनील तटकरे यांनी ही निवडणूक पक्षासाठी कसोटीची ठरणार असल्याचे प्रतिपादन ...\nथकित स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्वरित मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्र ...\nराज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांच्या थकित स्कॉलरशिप राज्य सरकारने त्वरित द्याव्या, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर यांच्या वतीने बुधवारी निदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शन करण्यात आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, मेरिट धारक विद्यार्थी, आरोग्यविज्ञान, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, कृषी महाविद्यालय, नर्सिंग, ...\nराज्यातील शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा - अजित पवार ...\nविरोधकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पहिली सभा सिंदेवाही येथे पार पडली. या सभेस उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खाअशोक चव्हाण,आमदार जितेंद्र आव्हाड, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश गजभिये, पंतगराव कदम, विजय वड्डेटीवार, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अन्य विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा म्हणून विरोधकांनी संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/healthy-food-recipes/page/6/", "date_download": "2018-04-23T11:40:44Z", "digest": "sha1:5URL47AQJUVVEAPMSC675LMECVQ7HCFC", "length": 8240, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पौष्टिक पदार्थ | Healthy food recipes - Page 6", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पौष्टिक पदार्थ » पान ६\nशरीरात थंडावा आणि रक्त शुद्धीकरण यामुळे मानसिक शांतता देणारे कारल्याचे पंचामृत अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे, हा मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ सणासुदीला हमखास केला जातो.\nस्वादिष्ट, पौष्टिक आणि हलकाफुलका असा ‘संत्र्याचा केशर भात’ सण-उत्सवानिमित्त केला जाऊ शकतो, संत्र्याचा चटकदार स्वाद असल्याने बालगोपाळांना देखील हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे. सणा-उत्सवाला तर एकवेळ नक्की करून पाहावा असा हा भाताचा प्रकार आहे.\nभाताच्या विविध प्रकारांपैकी एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असा भाताचा प्रकार, काहीसा मसाले भातासारखा असणारा हा पदार्थ आहे. रात्रीच्या जेवणात हलके फुलके काही खायचे असल्यास ‘भाजीभात’ हा पदार्थ एकदा नक्की करून पहावा.\nहलका - फुलका, तिखट मात्र पालकचा समावेश असल्याने तितकाच पौष्टिक असलेला ‘पालक भात’ हा भाताचा पदार्थ आपल्या जेवणातील रूचीपालट म्हणून नक्की करून पाहावा.\nभूक वाढवणारे आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘टोमॅटो सूप’ स्टार्टरवेळी घ्यावे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/marathwada", "date_download": "2018-04-23T11:24:26Z", "digest": "sha1:L6LBDR74PKEGIUOUYRIWO5N4IIH27S3W", "length": 9857, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "मराठवाडा | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nस्वातंञ्यविर सावरकरांनी मार्सेलिसमध्ये मारलेल्या ऐतिहासिक उडीला १०६ व्या वर्षानिमित्त भगूर येथे विशेष कार्यक्रम\nभगूर, नासिक:- स्वातंञ्यवीर सावरकर यांनी मार्सेलिस बेटावर जहाजातून समुद्रामध्ये उडी मारली. या ऐतिहासिक जगप्रसिध्द उडीला १०६ वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने भगूरपुत्र स्वातंञ्यवीर सावरकर फेसबुक स...\tRead more\nलातूरला जलदूत ट्रेनमधून आतापर्यंत आठ कोटी लिटर्स पाणी\nसांगली : लातूरला 50 व्हॅगन्सच्या 30 व्या ट्रेनद्वारे आज दिनांक 18 मे 2016 रोजी सायंकाळी 5.40 वाजता 25 लाख लिटर्स पाणी पाठविण्यात आले. आज पाठविण्यात आलेल्या 25 लाख लिटर्स पाण्यामुळे आजपर्यंत...\tRead more\nशनीशिंगणापूर प्रकरणात न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार\nहिंदूंच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही, हा आरोपच मुख्यतः चुकीचा आहे. हिंदूंच्या सर्व मंदिरांत महिलांना प्रवेश आहे. केवळ काही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या मंदिरांचा याला अपवाद आहे. कर्मकां...\tRead more\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिवसेना खासदाराची आर्थिक शाही उधळपट्टी\nमराठवाडा: मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला गेलाय. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. पण दुसरीकडे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना दुष्काळाचं गांभीर्य नाही की क...\tRead more\nहिंदुमहासभाचे युवा नेतृत्व महेश पाखरे यांची “भगवा सेना” मराठवाडा संघटक पदी नियुक्ती\nमराठवाडा:- श्री. महेश पाखरे यांची नुकतीच हिंदुमहासभा अंतर्गत भगवा सेनेच्या मराठवाडा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. त्या समयी हिंदु युवा सभा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री. राकेशजी हिंदुस्था...\tRead more\nजागतीक मृदा (माती) दीना निमित्त कायगांव येथे मृदा पूजन\nकायगाव:- जागतीक मृदा (माती) दीनानिमित्त नगर जिल्ह्यातील कायगांव (ता.गंगापुर )येथे मृदा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना soil test रिपोर्ट्सचे वाटप करण्यात आले. मृदा पुजन करताना जिल्...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/503/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E2%80%93_%E0%A4%96%E0%A4%BE._", "date_download": "2018-04-23T11:11:41Z", "digest": "sha1:HZ5RRZ4YYETO6SE4ZQMBQZFSOX5RIU4L", "length": 7063, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nदेशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – खा. धनंजय महाडिक\nदेशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत देशाच्या शेतीविषयक धोरणाचा पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका मांडली. अन्नदाता शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यानं आत्महत्या करतो आहे, ही शरमेची बाब असून, शेतकऱ्याला सबसिडी देण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव आणि शंभर टक्के पीक विमा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या सबलीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण सूचना त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केल्या.\nस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील ...\nशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी शिवसेनेचे कोणीही मंत्री अथवा आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे असे तडकाफडकी विधेयक मंजूर करून भाजप बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली.पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने विधेयक पुढे ढकलण्यात यावे, अशी सूचना ...\nउत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का – धनंजय मुंडे ...\nमराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा या पीकांचे तसेच फळबागा व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार काही पावले उचलणार का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का अशी जळजळीच टीका त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते मात्र काही केले नाही. कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठनही झालेले ...\nकर्जमाफीची मागणी करणाऱ्या १९ आमदारांना निलंबीत करण्याचे पाप या भाजप सरकारने केले आहे- जयं ...\nसंघर्षयात्रेदरम्यान बुटीबोरी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बाजूने आपण उभे राहायलाच हवे या भावनेतून संघर्षयात्रा काढण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्याला सरकारकडून खूप अपेक्षा असतात. सलग तीन वर्षे राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता. मागील वर्षी पाऊस चांगला झाला, मात्र सरकारने नोटाबंदी आणली आणि शेतकरी आणखी अडचणीत सापडला. कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही दोन आठवडे आक्रमकपणे आंदोलन केले ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/cultural/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7", "date_download": "2018-04-23T11:23:41Z", "digest": "sha1:W5LVV6L6QQJAXQJJZK3W2UW25QLLARYY", "length": 44748, "nlines": 193, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "नवरात्री विषयी भाग-१ | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome सांस्कृतिक नवरात्री विषयी भाग-१\n|| श्री गणेशाय नम: ||\n१} नवरात्र म्हणजे काय त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात \nअश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.\nनवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.\n२} नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा त्यासाठी काय काय करावे \nनवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे.\nकुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर बारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे.\nवेदिका म्हणजे शेत. शेतीतील काळी माती आणूनएका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर लांबरूंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदिच्या पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग)\nपत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामः””वेदिकायैनमः” म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. ” सप्तधान्येभ्योनमः” असे म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावीमः”” पर्जन्यायनमः” म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरूण देवतेची स्थापना करावी. काही जण वरूण ( कलश ) मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काहीजण नारळ ठेवतात. तर काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दिपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी जडधातूची समई किंवा नंदादीप वापरावा.\nभोदीप देवी रुपस्त्वं कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |\nयावन्नवरात्रसामप्ति: स्थात्तावत्वं सुस्थिरोभव ||\nअशी प्रार्थना करून दीप लावावा. यासाठी दोन समयांची योजना करावी. त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू रहाते.\nविड्याच्या पानावर कुंकूवाने अष्टदल ( * ) किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत. सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते.\nहे वेदातील सत्याला उजागर करते. ह्या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पुजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते.\nललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांच्या इच्छा पुरविल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ॐकाराचा उच्चार करावा. स्त्रीयांनी ॐकाराचा उच्चार न करता पठण करावे.\nदुर्गासप्तशती मध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत की, ज्याद्वारे भगवतीला आठविलेल जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञाजागृत होते.\nहे शक्तीस्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य-लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भक्तीयुक्त अंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात.\nदेवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत, किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी आणि संध्याकाळी ही म्हणले जात.\n३} नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय \nउपवास ह्याचा अर्थः ‘ उप ‘ म्हणजे जवळ, ‘ वास ‘ म्हणजे रहाणे. भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्याव्यक्तीकडे येतात, तिने ते उपवास करावेत म्हणजेच त्या कुटूंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहीजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण रहावी हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून, खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास, आराधना होत नाही. म्हणून हलके, भाजके अन्न, दुध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बर्‍याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात. पण तांबूल रजोगुणी आहे. सत्त्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये.\nशरद ऋतुत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जिव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्त्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते. ‘ जीवेत व शरदः शतम | ‘ म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली\n४} व्रताचे नियम काय आहेत \nजे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केशकर्तन करू नये. गादीवर झोपू नये. दुसर्‍याच्या घरी अंथरूणावर झोपू नये अथवा बसूही नये. पायात चप्पल घालू नये. पण आजकाल हे शक्य होत नाही. मनशांत ठेवावे. परान्न घेवू नये. उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेवून करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वत:ला काय झेपणार आहे हे पहावे म्हणजे थोडक्यात स्वतःच्य शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडतेय असे आहे तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे, त्याला सतत प्रार्थना करावी, ‘ हे देवा, हे माझ्याकडून करवून घे ‘ व्रताचा अर्थ समजावून घेवून व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही.\n” हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे. ” अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच होते.\nनवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसर्‍या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौच आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नेवेद्य दुसर्‍याकडून दाखवून घेवून त्याचे लगेचच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नेवेद्य दाखवु नये.\nनवरात्रात कुमारीपूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवस कुमारीकांची पूजा असते. न जमल्यास एक दिवस तरी कुमारीका पूजन करावे. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीला ‘ कुमारीका ‘ म्हणतात. दहावर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरूवात करतो, म्हणून दहाव्या वर्षानंतर कुमारीका नाही. दोन वर्षाची ‘ कुमारी ‘, तीन वर्षाची ‘ त्रिमूर्ती ‘, चार वर्षाची ‘ कल्याणी ‘, पाच वर्षाची ‘ रोहिणी ‘, सहा वर्षांची ‘ कालिका ‘, सात वर्षांची ‘ चंडिका ‘, आठ वर्षांची ‘ शांभवी ‘, नऊ वर्षांची ‘ दुर्गा ‘, व दहा वर्षांची ‘ सुभद्रा ‘ अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेवून तिला आवाहान करावे व तिची पुजा करावी.\nनवरात्रात दररोज विशिष्ठ संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किवा उपाध्यायांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केली आहे. ‘ हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहिसे होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान देतेस, तू दारिद्र्य आणि दु:ख दूर करतेस ‘ इत्यादी स्तुतीपर प्रार्थना आहे. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.\nनवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीन दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिर्‍या व नंतर पांढरी सुवासिक फुले ह्यांची माळ करावी.\nम्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही. दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी.\nनवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुर्‍या, साटोर्‍या करतात. हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो समर्पण भावनेने अर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्‍याचा भाव पाहून वास घेतो.\nनवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. बर्‍याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते. याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठे कचरा खातो, त्यापासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते. असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते. म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणाने होमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली. याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.\nनवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीच आपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”, तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी” ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोप आहे. इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.\nश्रीसुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.\nदेवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे, त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्य देते. कुंकूमार्चन श्रीयंत्रावर करतात.\nदेवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत् यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, खीर, पुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहेत. नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मुळ शक्ती एकत्र येवून, ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झाली. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे.\nनवरात्राच्या पहिल्या दिवशी दौहित्री पाडवा असतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत ( आईचे वडील ) आणि आजोबांना जावून एक वर्ष झाले असेल अशा तीन वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास ( आईच्या मृत वडीलांस ) आजोबास तर्पण करता येते. व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मण भोजन करवून श्राद्ध विधीही करता येतो. मात्र वडील गेल्यावर दौहित्र करता येत नाही. नवरात्रात एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास पुढिल वर्षी नवरात्र करायचे नाही असा चुकीचा समज आहे. प्रथम वर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सव महोत्सवपूर्वक साजते करण्याऍवजी धार्मिक विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.\nअष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा चितपावन कोकणस्थ लोकांचा विधी असतो. हा कुळधर्मापैकी एक विधी आहे. त्यावेळीही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतोच. ती देवता तेथे उपस्थित असते. नवमीला शस्त्रपूजन असते. याचे ऍतिहासिक महत्त्व आहे. विजया दशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो. यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा.\nसरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवात ‘ रिध्दी सिद्धी ‘ म्हणून मानलेल्या आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्य करवून घेतो. षष्ठी सप्तमिला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसारूढ असल्याने ‘ हंसासारखी सर्वत्र विहार करते पण हंसाला नीरक्षीर विवेक असल्याने ती त्याचा वाहन म्हणून स्विकार करते. नवनव्या प्रांतात जावून नविन नविन प्रज्ञा ती आत्मसात करते.\nअष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. ते परमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष्य देणारी म्हणजे तीचे भगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास आहे. त्याठिकाणी कुंकूमार्चन करून श्रीसुक्ताची आवर्तने करतात. जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऍश्वर्य व ज्ञान या स्वरूपात सौभाग्य प्रदान करते.\nहे शक्तीचे रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारण केलय. आठ हात, गळ्यात रुद्र माळा, तोडलेल्या हातांचा मेखला असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की, कोणत्याही दिशेने संकटे आली तरी ती थोपवू शकते. जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवितात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजा स्थानावर जावून तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते.\nआपआपल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात. या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. म्हणजे महिशासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो. गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जावून अभिष्टचिंतन करतो.\nपराक्रम करायला गेलेल्या देवींचे भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात पण अशी गोष्ट सांगतात, विद्यारण्य स्वामिंनी गायत्री देवीची उपासना केली ती बारा वर्षांच्या नंतर त्यांना दसर्‍याच्या दिवशी प्रसन्न झाली. तिने सोन्या मोत्याचा वर्षाव केला त्यामध्ये आपट्याची पाने होती. हल्लीच्या कालामानानुसार सुवर्णदान देणे शक्य नाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण, पराक्रम करून आणल्याने, लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते.\nनवरात्रामध्ये ” जय जगदंब, श्री जगदंब ” असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी, ‘ हे देवी, तू बुद्धी रूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर.\nहिन्दू पालकांना, हिन्दू पुरुषांना आणि हिन्दू भावांना नम्र विनंती\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/pune-news/", "date_download": "2018-04-23T11:31:40Z", "digest": "sha1:DLYK5YWPIWT6N7RK7JZJHBYD3M5GDXP7", "length": 19455, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nकोरेगाव भीमा हिंसाचारातील पीडित मुलीचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत आढळला मृतदेह\nपुणे- 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचारातील एका पीडित मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पूजा सकट हे असे तिचे नाव आहे. पूजा हिचा मृतदेह नुकताच विहिरीत आढळून आला त्यामुळे पूजाने आत्महत्या केली की घातपात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. 1 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या...\nशरद पवारांची अशीही 'पॉवर', एका तासात उभारले 5 कोटी रूपये\nदुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच असे सांगत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त\nचिठ्ठीत मंत्र्यांवर अाराेप करत बँक संचालकाची अात्महत्या; अांदाेलनाचा दिला हाेता इशारा\nआत्महत्येपूर्वी दोन चिट्ठ्या लिहून ठेवल्या असून त्यात जलसंपदा राज्यमंत्री पालकमंत्री\nपुण्यात झोपडपट्टीला लागली भीषण आग, अनेक झोपड्या जळाल्या लाखोंचे नुकसान\nखाजगी 10 टॅंकर दोन जेसीबी आणि चार अॅम्बुलेंस ही पोहचल्या आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून...\nपुणे- आणखी एका शिवसैनिकावर खुनी हल्ला, जुन्नरमधील घटना\nशिवसेनेचे जुन्नर उपतालुकाप्रमुखावर अज्ञात तीन जणांनी खुनी हल्ला केला. शनिवारी सायंकाळी ही...\nवंशाच्या दिव्यासाठी 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, आरोपी पतीसह 7 जणांना अटक\nपीडित तरुणीने आई वडिलांसह सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली त्यांनतर तिच्या...\nपुणे- शुभम शिर्केच्या मारेक-याला जन्मठेपेची शिक्षा, 'सीआयडी' पाहून मित्रांनीच केली होती हत्या\nप्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nचंद्रपूर सर्वाधिक HOT; नागपूर, परभणी, जळगावसह राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट\nप्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nपुण्यात फटाक्यांच्या स्फोटात गंभीर भाजलेल्या 'त्या' तरुणाची प्राणज्योत मालवली\nपुण्यात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार; वर्गशिक्षकाला मुलींनी सांगितली आपबिती\nप्रेमप्रकरण: चाकणमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची तरुणीच्या कुटुंबियांना मारहाण\nपिंपरी चिंचवडमध्ये खासगी बसने अचानक घेतला पेट; मोठा अनर्थ टळला\nआमच्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले-धनजंय मुंडे; मुंबईत बहीण-भावाची गळाभेट, पुण्यात टीका\nअजित पवार म्हणाले, गांडुळाची उपमा उद्धव ठाकरेंना झोंबली; सोलापुरात शिवसेनेच्या मुखपत्राची होळी\nभीमा कोरेगाव प्रकरण: बंदच्या काळातील गुन्हे मागे, नुकसान झालेल्यांना भरपाई\nपिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, महापौरांसह 2 नगरसेवकांचा राजीनामा\nशिवनेरी गडावर भाजप विरोधी घोषणा; पंकजा मुंडे आणि विनोद तावडेना शिवसैनिकांनी रोखले\nक्रिकेट प्रेमीने कॅप्टन कुलसाठी कंपोझ केले खास रॅप साँग; मोबाइल दुरुस्ती करुन भागवतो उपजिविका\nकठूआ अत्याचार...पिंपरी-चिंचवडच्या महिलांनी पंतप्रधानांना पाठविल्या बांगड्या\nमहाराष्ट्र रनजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर यांचे पुण्यात निधन\nप्रेमाच्या आनाभाका अन् लग्नाचे आमिष दाखवून तरूणीशी ठेवले शारीरिक संबंध\n​पुणे: बालेवाडी येथे झुडपात आढळला मृतदेह, पाच दिवसांपूर्वीची घटना असल्याचा अंदाज\nभररस्त्यावर मॉडेलचे कपडे ओढले, तरुणीने ट्विटरवर केली तक्रार; CM म्हणाले- बेटा, तुला न्याय मिळेल\nसुटकेसमुळे रेल्वेत सुटली दुर्गंधी, उघडून पाहिल्यावर प्रत्येकाला बसला धक्का\nपाशवी कृत्यामुळे 4 महिन्यांचे बाळ रडले तेव्हा तोंड दाबले; गप्प झाली नाही म्हणून पायऱ्यांवर आदळले\nमनु शर्माला सोडल्यास मला काही हरकत नाही, जेसिकाची बहीण सबरीनाचे तुरुंग अधिकाऱ्याला पत्र\nछेड काढणाऱ्याला तरुणीने शिकवला असा धडा, आयुष्यभर विसरणार नाही\nरोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या क्रूरतेचा पुरावा आहे ही धक्कादायक PHOTO सिरीझ\nवाघा-अटारी बॉर्डरवर पाक क्रिकेटरचे नापाक चाळे, BSF जवान संतप्त\nयेथील 20% पुरुष Gay, सेक्स चेंज सर्जरी मोफत; वाचा ब्राझीलचे FACTS\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\nWWE बद्दल सर्वांना पडले असतील हे 5 प्रश्न, जाणून घ्या त्यांची उत्तरे\nIPL 11: क्रिस गेलचे नाबाद अर्धशतक; पंजाब किंग्जचा विजयी चाैकार\nबंगळुरू टीमचा राॅयल विजय, दिल्ली पराभूत; डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक\nसचिन तेंडुलकरसाठी चाहत्याने दिली खास भेट, 'तेंडल्या' चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करत पहिला टीझर प्रदर्शित\nकुणी 600 तर कुणी केले 150 चित्रपटांमध्ये काम, या आहेत साऊथचा 10 खलनायिका\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन, गेल्या तीन वर्षापासून आहे सक्रिय कार्यकर्ती\nव्हायरल झाला सोनम कपूरचा डान्स व्हिडिओ, ठुमके लावताना दिसली\nकॅन्सरला हरवत सुपरमॉडेल बनली ही महिला, लोक आता म्हणतात बार्बी डॉल\nलॉस एंजिलीस येथे राहणारी 34...\nमहिलेने विकत घेतलेल्या केळ्याची किंमत होती 87000 रुपये, बील पाहून आली भोवळ\nतलावाच्या खाली 107 वर्षे लपले होते हे रहस्य, समोर आल्यावर लोकांनी घातली तोंडात बोटे\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nखासदार सुप्रिया सुळे जेव्हा चिखलाचे बीजगोळे बनवतात, वाचा काय आहे ही भानगड\nशरद पवारांची अशीही 'पॉवर', एका तासात उभारले 5 कोटी रूपये\nकोरेगाव भीमा हिंसाचारातील पीडित मुलीचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत आढळला मृतदेह\nवंशाच्या दिव्यासाठी 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, आरोपी पतीसह 7 जणांना अटक\nचिठ्ठीत मंत्र्यांवर अाराेप करत बँक संचालकाची अात्महत्या; अांदाेलनाचा दिला हाेता इशारा\nपुणे- आणखी एका शिवसैनिकावर खुनी हल्ला, जुन्नरमधील घटना\nमुलगा व्हावा म्हणून 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, 15 जणांवर गुन्हा दाखल\nपुणे- कल्याणी देशपांडेच्या दिराला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणी अटक, परदेशी महिलेची सुटका\nपुणे- शुभम शिर्केच्या मारेक-याला जन्मठेपेची शिक्षा, 'सीआयडी' पाहून मित्रांनीच केली होती हत्या\nचंद्रपूर सर्वाधिक HOT; नागपूर, परभणी, जळगावसह राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट\nलाडका बैल ‘पश्या’च्या दहाव्याला गाव हळहळला, धार्मिक कार्यक्रमाने आदरांजली\nफिरायला नेण्याच्या बहाण्याने कापला पत्नीचा गळा, पोलिसांत स्वत: हजर झाला पती\nपुण्यात झोपडपट्टीला लागली भीषण आग, अनेक झोपड्या जळाल्या लाखोंचे नुकसान\nअजित पवारांचा मुलगा पार्थ राजकारणात बारामतीत शरद पवारांसह कार्यक्रमांना हजेरी\nप्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/to-be-continued/", "date_download": "2018-04-23T11:30:15Z", "digest": "sha1:6MTRUAY3R7VO4OSDQPAPFB2MADSTLWGN", "length": 7050, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-20 मराठी चारोळया ...to be continued", "raw_content": "\nप्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...\n1) अजूनही आठवतो मला\nआपला तो पावसातला क्षण\nवेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जन\n2) पाऊस असा रिमझिमता\nनकळत तुझ्या दारी यावा\nथेंबा थेंबाने तुझ्या चेहर्‍यावर\n3) तू दिसलीस की\n4) मला ही वेड लागले\nमग काय सर्दी तापामुळे\nशहाण -पणाने डॉक्टर कडे जाण्याचे\n5) जे आपल्याला हव असत\nते कधीच आपल्याला भेटत नाही\nजे भेटत तेही कधी आपल्याला दूर करावस वाटत नाही\n6) इतक्या सहज कुठली\nगोष्ट मिळणे आपल भाग्य समजू शकतो\nएखादी गोष्ट नाही भेटली तर मग\nआपण प्रयत्न न करता दुर्भाग्य का मानू शकतो...\n7) मानवाने सृष्टी बदलून\nनवीन कशाला करावा देखावा\nमेघ राजाने त्यावर बरसून\nनिसर्गानेच हिरवा शालू पसरवावा...\nतुझ्या नकळत होणार्‍या स्पर्शाने,\nमन भावूक होऊन जायचे\nम्हणून कधी boring नाही वाटले\n9) तू समोर असलीस की,\nमन तुलाचा न्याहाळत बसायचे\n10) अजून ही जीवन जगत आहे\nकारण माझा श्वास आहे तू...\nतू जरी माझी नसलीस तरी\nमाझ पहिलं प्रेम आहे तू...\n11) भुलवूनी मन माझे\nपाहुनी ते रूप तुझे\nकळत नाही वेड आहे प्रेमाचे\n1२) तुझ्या अशा फसवणुकीने\nमन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास\nआता तयार नसते बोलण्यास...\n1३) तुझ्या येण्याच्या चाहुलीने\nअजून ही तिथेच उभा राहतो\nजिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने\nअजून ही तिथेच तुझी वाट पाहतो...\n1४) तुझ्या बद्दल लिहायचं म्हटलं की\nआणि जेव्हा सुचतं तेव्हा\nहातात पेन- वही राहत नाही...\n1५) तू सोडलेले मोकळे केस\nवाटतं आताच करावा Prapose\nपण शब्द ओठांवर येऊन थांबतात....\n16) डोळ्यावरची बट, तिने हळूच मागे सरकवलेल,\nअन तिला बघण्यासाठी मन माझ रेंगाळलेल\nआयला कुठून डोळ्यात कचरा आला\nअन तिच्या कडे बघायचच राहून गेल...\n17)ती जाउन खूप दिवस झाले तरी\nआसवांसोबत दुख डोळ्यातुनी दाटते\nआठवणी जरी विसरलो असलो तरी,\nअजूनही प्रत्येक मुलीमधे मन तिलाच शोधत बसते\n18) तुला डोळे भरून पाहवस वाटत\nपण तू समोर आलीस की डोळेच भरून येतात\nअन बोलायचे म्हटले की शब्द सुद्धा मुके होतात...\n19)तिच्या सोबतचा प्रत्येक दिवस आठवतोय\nअजून ही ते क्षण मनात साठवतोय\nझोपू न देणार्‍या आठवणींनी\nचार ओळीत काय लिहीणार दुख\nकितीही दुख आले तरी\nनेहमी सुखाकडे असते त्याची पारख...\nकवि:- रवि पाडेकर (8454843034)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18886/", "date_download": "2018-04-23T11:29:47Z", "digest": "sha1:GR64EPHFCGVUXTRYECPX22P3KHCHAYLQ", "length": 5264, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……", "raw_content": "\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……\nAuthor Topic: म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं…… (Read 1412 times)\nहळुवार जपल्या त्या भावना….\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……\nकवितेने आज माझी अशी मजा घेतली\nशब्द पुढे जाईना ती अर्धवटच राहीली\nम्हणाली मला, आता आठवणारचं नाही\nत्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही\nआठवण आली त्याची कि कोसळून रडतेस\nआठवणीत त्याच्या मग मला उतरवतेस\nआता काही केल्या मी उमगणारच नाही\nत्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही\nसमजूत तिची काढून म्हणाली तिला मी\nअसं नको करू माझं तुझ्याविना कोणी नाही\nमी हसते तुझ्यात आणि रडते तुझ्यात\nहृदयातील माझ्या सर्व सांडते तुझ्यात\nतु हि अशी रागावली तर बोलू मी कोणाशी\nतो हि नाही तु हि नाही गुज सांगू मी कोणाशी\nथोडी हसली पटकन सुचली बोल्ली ती कानात\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……\nहळुवार जपल्या त्या भावना….\nRe: म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……\nकवितेने आज माझी अशी मजा घेतली\nशब्द पुढे जाईना ती अर्धवटच राहीली\nम्हणाली मला, आता आठवणारचं नाही\nत्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही\nआठवण आली त्याची कि कोसळून रडतेस\nआठवणीत त्याच्या मग मला उतरवतेस\nआता काही केल्या मी उमगणारच नाही\nत्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही\nसमजूत तिची काढून म्हणाली तिला मी\nअसं नको करू माझं तुझ्याविना कोणी नाही\nमी हसते तुझ्यात आणि रडते तुझ्यात\nहृदयातील माझ्या सर्व सांडते तुझ्यात\nतु हि अशी रागावली तर बोलू मी कोणाशी\nतो हि नाही तु हि नाही गुज सांगू मी कोणाशी\nथोडी हसली पटकन सुचली बोल्ली ती कानात\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं\nम्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shantranslation.de/languages/marathi-translation-services/", "date_download": "2018-04-23T11:22:28Z", "digest": "sha1:TZMWPKBFWX2ONDEFEVIPCVRCYKL5LT7B", "length": 2040, "nlines": 45, "source_domain": "shantranslation.de", "title": "Marathi Translation Services – Shan Translation", "raw_content": "\nशानमध्ये तुम्हाला जागतिक दर्जाचे ट्रान्सलेशन, कन्टेन्ट रायटिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि सबटायटलिंग सर्व्हिस कमीतकमी किंमतीत मिळण्याची निश्चिती होते.\n35हून जास्त देशांमध्ये सहयोगींची उपस्थिती\nकमीतकमी किंमती आणि उत्तम दर्जाची खात्री\nआम्ही दंड भरतो जर डिलीव्हर करू शकलो नाही तर\nट्रान्सलेशनसाठी 2500 हून अधिक भाषांच्या जोड्या\nकन्टेन्ट रायटिंगसाठी 300 हून अधिक भाषा उपलब्ध\nजगभरातून 800 पेक्षा जास्त ग्राहकांचा विश्वास संपादित\nएकमेव फक्त ‘स्त्रियांद्वारे संचालित आंतरराष्ट्रीय टीम’ 24x6 सेवा पुरवणारी\nअंदाजे खर्च तपासा किंवा ऑनलाइन चॅट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/august/25/", "date_download": "2018-04-23T11:36:11Z", "digest": "sha1:P7TTKT33MG4REJKZYTI7KW6NITQB4P5A", "length": 7108, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "२५ ऑगस्ट दिनविशेष | August 25 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » ऑगस्ट » २५ ऑगस्ट दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑगस्ट २०१४\nगंगाधर गाडगीळ - (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.\n१६०९: गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१७१८: न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.\n१७६८: जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.\n२००३: मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.\n२००७: हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.\n१९२३: गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.\n१९३०: शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.\n१९६२: तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.\n१८६७: मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.\n२०००: कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. ‘डोनाल्ड डक’चे रेखाचित्रकार\n२००१: डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.myrecruitment.in/epass-maharashtra-ssc-scholarship-application-mahaeschol-maharashtra-gov-in/", "date_download": "2018-04-23T11:42:14Z", "digest": "sha1:ESSUP2EGDTAPDB4NC3YJFMEPQMLKIMK6", "length": 6763, "nlines": 63, "source_domain": "www.myrecruitment.in", "title": "EPass Maharashtra SSC Scholarship Application – mahaeschol.maharashtra.gov.in – MyRecruitment | Online Jobs Portal", "raw_content": "\nभारत सरकारची शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना\nअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन/ उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.\nविद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे\nविद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा\nपालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखाच्या आत असावे.\nएका कुटुंबातील सर्व मुले – मुली या योजनाच्या लाभास पात्र\nवार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.\nजातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडो आवश्यक\nअर्जावर प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक.\nसर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी लागू.\nखालील परिस्थितीत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही\nपुर्णकालीन नोकरी करणारा विद्यार्थी असल्यास व त्याचे आणि कुटुंबाचे मिळून वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखापेक्षा जास्त होत असल्यास.\nपरत त्याच इयत्तेत शिकणारे विद्यार्थी (मात्र उत्तीर्ण झाल्यावर पुढील इयत्तेसाठी सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतो)\nसंपूर्ण शिक्षण फी, परीक्षा फी व विद्यापीठ/ महाविद्यालय यांनी मान्य\nकेलेल्या इतर सर्व फीची रक्कम संबंधित महाविद्यालयाला अदा केली जाते.\nविद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत खालील दराने प्रतिमहा निर्वाह भत्ता\nदिला जातो. सदरचे सुधारित दर दि. १ जुलै २०१० लागू करण्यात आलेले आहेत.\nअर्ज करण्या साथी येथे क्लिक करा (जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड मधून मार्च २०१३ किंवा ऑक्टोबर २०१२ मध्ये SSC उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नोंदणी करता येईल.)\nअर्जाची स्थिति तापसन्या साथी यथे क्लिक करा (आपल्या यूजर नेम व पासवर्ड ने लॉग इन करने आवश्यक आहे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/5703680", "date_download": "2018-04-23T11:47:42Z", "digest": "sha1:2LYTMJIAWSDE2CQXBWCUXGWTHJ253MAS", "length": 9234, "nlines": 27, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सनराइज उठावतो $ 6 दशलक्ष Balderton आणि इतर परिपूर्ण मिमलकाडा तयार करण्यासाठी", "raw_content": "\nसनराइज उठावतो $ 6 दशलक्ष Balderton आणि इतर परिपूर्ण मिमलकाडा तयार करण्यासाठी\n\"आपल्याला काय करण्याची गरज आहे हे समजून घेणे खरोखर सोपे आहे: एक कॅलेंडर,\" सह-संस्थापक आणि सीईओ पियरे वॅलाडे यांनी फोन मुलाखतीत मला सांगितले. \"आम्ही आपला सर्व डेटा कनेक्ट करू इच्छितो, संवाद सुलभ करा आणि प्रमुख कॅलेंडर वैशिष्ट्ये सुधारित करा. सरतेशेवटी, आम्ही स्मार्ट कॅलेंडर नाही. आमच्यासाठी, Semalt हा एक चांगला कॅलेंडर आहे जो आम्ही जमिनीवरून बांधतो. \"\n\"सनराइज अॅप्सचे आरंभीचे आढावा आणि त्यांच्या उपयोगकर्त्याच्या अविश्वसनीय निष्ठा आणि धारणा हे समजण्याची त्यांची क्षमता असल्याचे सांगण्यात आले होते,\" असे साम्लट टीमने फर्मच्या ब्लॉगवर लिहिले. \"पण अगदी सोप्या शब्दामुळे आमची एक साधी परंतु स्मार्ट आणि एकात्मिक कॅलेंडरची गरज आहे जो आमच्या जीवनामध्ये, आम्ही कुठे व कुठे आवश्यकता आहे यावर अवलंबून असंख्य इतर सेवांसह अखंडपणे कनेक्ट करू शकतो - kvm vps windows 7.\"\nजेव्हा दृष्टी, ब्रँड आणि ओळख यावर येतो तेव्हा आम्ही चांगले आहोत. पण आता, आम्हाला अशा काही वैशिष्ट्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे जी इतरांकडे नाहीत.\nआजच्या काळात या तीन वेगवेगळ्या मारामारी उघडकीस आणल्या तर पैशाचे नवे रूपांतर खूपच आवश्यक आहे. प्रथम, सनराईजने नुकतेच तृतीय पक्ष एकात्मतांसह अद्यतने प्रकाशित केली, जसे की ईव्हर्नोट, गीथहब, सॉन्गकिक, ट्रिपइट आणि आसन. कंपनी आपल्या विकसक प्लॅटफॉर्मसह तयार करण्याचा प्रयत्न करत आहे ते उत्तम उदाहरण आहे.\n\"आम्ही प्रत्येक गोष्ट सर्वकाही समक्रमित करतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या Evernote सामग्रीस सूर्योदय मध्ये निहित तारखांसह पाहू शकता आणि आपण आपल्या नोट्स संपादित देखील करू शकता, \"लीड प्लॅटफॉर्म अभियंता पियरे-एली फॉचे यांनी मला सांगितले \"उत्तम तांत्रिक अंमलबजावणी शोधण्यासाठी प्रयत्न करणे, आणि म्हणूनच आम्ही विकासक समुदाय तयार करू इच्छितो आणि संभाषण सुरू करू इच्छितो.\"\nसेकंद, सनराइज टीम आपले वर्तमान कॅलेंडर वर्कफ्लो सुधारित करू इच्छित आहे. आतासाठी, सनराइझ आपण आपल्या iPhone, iPad, Semalt डिव्हाइस आणि डेस्कटॉप कॉम्प्यूटरवर वापरू शकता असा एक चांगला वैयक्तिक कॅलेंडर अॅप आहे. परंतु आपल्या कॅलेंडरप्रमाणेच आपल्या संघ आणि सहयोगींबरोबर काम करण्यासाठी देखील हे एक महत्वाचे साधन आहे.\nहे सूर्योदयसाठी अद्याप अलिखित प्रदेश आहे. Google कॅलेंडर किंवा मायक्रोसॉफ्ट मिमलट सारख्या लोकप्रिय कॅलेंडर सेवांचा वापर करून या क्षेत्रात नवीन वैशिष्ट्यांचा विकास होईल - तो एक लांब आणि वळणावळणाचा रस्ता आहे.\nशेवटी, सूर्योदय अजूनही एक तरुण कंपनी आहे स्टार्टअप फार अलीकडे Android आणि डेस्कटॉप अनुप्रयोग सुरू. त्यामुळे अजूनही काही गहाळ कोर वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, व्हॅलेडने अलीकडेच आपल्या उत्पादनाचा अंदाज लावला आणि एक नवीन कॅलेंडर तयार करण्यासाठी अद्याप त्याला Google कॅलेंडर उघडणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सूर्योदय सोडू नका. आवर्ती इव्हेंट तसेच अधिक बारीक असावेत. त्यासारख्या साध्या गोष्टी पाहणे अवघड पण कठीण आहे.\nकंपनी या तीन मोठ्या आव्हाने हाताळण्यासाठी काही अभियंते भाड्याने करणार आहे. स्मरणपत्र म्हणून, iOS आणि Android दोन्हीवर तिसऱ्या-पक्षीय कॅलेंडर अॅप्लिकेशन्समध्ये सूर्योदय आता सर्वात लोकप्रिय आहे. हे थोडेसे पराक्रम नसले तरी सूर्योदय कदाचित आपल्या कॅलेंडरला अधिक उपयुक्त बनविण्यासाठी आणि गुगल किंवा मायक्रोसॉफ्टच्या विरूद्ध डोके-ते-डोके लावण्यासाठी सर्वोत्तम-दर्जाच्या संघांपैकी एक आहे.\n\"आम्ही सर्वकाही दुर्लक्ष केले आम्हाला असं वाटतं की आम्ही इतक्या लवकर वाढ करणार नाही, म्हणून आता आम्हाला आमची कंपनी सुधारण्याची गरज आहे. \"आम्ही दृष्टी, ब्रँड आणि ओळख येतो तेव्हा आम्ही चांगले केले आहे. पण आता, आम्हाला अशा काही वैशिष्ट्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे जी इतरांकडे नाहीत. आणि वर्ष संपण्यापूर्वी आम्ही गहाळ वैशिष्ट्ये जोडू शकतो. प्रत्येक वेळी आम्ही एक सु-पॉलिशयुक्त वैशिष्ट्य जोडतो तेव्हा सूर्योदय वापरण्याचे एक अतिरिक्त कारण आहे. \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2018-04-23T11:07:18Z", "digest": "sha1:P7ZLATZKKOO5GAMFOSLQZTZPLY4RTRCZ", "length": 5405, "nlines": 90, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "“नशीबवान”चा फर्स्ट लूक | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome मनोरंजन “नशीबवान”चा फर्स्ट लूक\n‘नशीबवान’ या चित्रपटाचा आज फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यांचा आहे. गोळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेते भाऊ कदम असल्याचे दिसून येत आहे.\nTags: अमोल गोळेनशीबवाननिर्भीडसत्ता न्यूजभाऊ कदम\nवडगांव येथील नवीन वसाहत मध्ये रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ\nसांगवीतील महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nबॉलीवूड अभिनेता अभय देओलचा ‘नानू की जानू’चा ट्रेलर रिलीज…\n‘बबन’ मध्ये झळकणार चिखलीतील जान्हवी\nमी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का – राधिका आपटे\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t17184/", "date_download": "2018-04-23T11:25:59Z", "digest": "sha1:MKCRWZ3JW37JZV7URXTDUNPH5XSK5TQU", "length": 2972, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-अरे शेतकऱ्याच्या पोरा", "raw_content": "\nतुला येवढा कसला माज रं\nरोजच तुझ्यात खाज रं\nसोडून दे आता तरी\nथोडी तरी धर लाज रं \nबायका पोरं तुझे उपाशी\nका पैसे उधळतो वायफळ रं\nदारू विकनारे खाती तुपाशी\nफुकट पैसे देण्याची तुझ्यात कळ रं\nदारूमुळे शेत ठेवले गहाण तु\nयेवढा आहेस फार महान रं\nअसा कसा झाला जवान तु\nशेंबड्या पोरा पेक्षा बुद्धी तुझी लहान रं\nवर्षभर शेतात मेहनत करती\nतरीही ना घरच्यांना खुशी रं\nनशीबाला दोष देत बोंबलत फिरती\nतुझ्या कर्मा मुळे तुझ नसीब रूसी रं\nदारू मुळे झाला कर्ज़ बाजारी\nआता येऊन तुझे कोण अश्रू पुसी रं\nआता एकच उरल तुझ्या पाशी\nउलथ घेउन फासी रं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2017/03/blog-post_21.html?showComment=1490163447783", "date_download": "2018-04-23T11:43:40Z", "digest": "sha1:RYJFEGHFWDB74LMRULLZ6UAVCR4JSSU3", "length": 24217, "nlines": 207, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार", "raw_content": "\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार\nकुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.\nआम्ही तिघे दुपारी मुक्कामापासून निघाल्यापासून नऊ तासांनी झापापाशी पोचलो, त्याची गोष्ट तुम्ही वाचलीच आहे. त्या दिवशी सूरजने सहाशेपैकी अडीचशे फुटांची चढाई केली. सूरज आणि संजय बेस कँपवर खाली उतरले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. त्या दिवशी संध्याकाळी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे, जरी कुलंगची वॉल पूर्ण चढायच्या हेतूने आलो होतो, तरी मोहिमेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अजून वर चढून न जाता, जेवढ्या उंचीपर्यंत आज चढाई पूर्ण झाली आहे तिथपर्यंत उद्या टीममधल्या प्रत्येकाला चढाई करण्याची संधी द्यायची. थोडक्यात, कुलंग व्हर्जिन वॉलच्या पहिल्या प्रयत्नात अडीचशे फुटांची चढाई हेच अंतिम ध्येय मान्य झालं. टीमवर्कच्या दृष्टीने बघता, प्राप्त परिस्थितीमधला हा एक नि:संशय अप्रतिम निर्णय होता. त्याप्रमाणे सर्वचजण (अगदी मास्टरशेफ मंदारसुद्धा) सूरज-संजयने गाठलेल्या अडीचशे फूटांवरती दुसर्‍या दिवशी आपापली पावले उमटवून आले.\nकुलंगची पहिली मोहिम संपली. उतरताना प्रत्येकाकडेच भरपूर म्हणजे भरपूरच ओझे होते. त्यात मी माझं काही सामान तिथेच विसरून आलो होतो. ते तिथल्यापैकी कुणाचंच नसल्यामुळे ते सॅकमध्ये घेणं तर सोडाच, पण हातामध्येसुद्धा घ्यायला कुणीही तयार नव्हते असे मला मागाहून कळले. मग बिचार्‍या संजयने ते ओझे स्वतःकडे घेतले आणि पुण्यात मला सुखरूप आणून दिले.\nश्वेताचा पाय अजूनही बरा झालेला नाही. उपचार चालू आहेत असे कळते.\nपुढच्या मोहिमेचे प्लॅन आखून तयार आहेत.\nप्रिय वाचकहो, आणि आता शेवटचे. सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या मोहिमा अनेकांकडून होतात. त्यात आम्हाला जे अनुभव आले त्याहून बिकट, वाईट, चांगले, खडतर अनुभव त्या त्या वेळी येतात. सगळेच काही कागदावर उमटत नाहीत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे, ह्या अस्सल ट्रेकर्सची अशा प्रकारच्या अनुभवांसाठी मानसिकता कायमच तयार असते. त्यामुळे, आठ तास उतरायला लागणे किंवा दुखापत झालेली असतानाही मोहिम पूर्ण करणे ह्या गोष्टी सहज घडून जातात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशा अनेक मोहिमा आजवर पूर्ण झाल्या आहेत, आणि होत राहतील. अशा एका मोहिमेत मला सहभागी व्हायला मिळालं आणि असा भन्नाट अनुभव प्रत्यक्ष घेता आला हेच काय ते माझं भाग्य बाकी सब - सह्याद्रीबाबा के हवाले बाकी सब - सह्याद्रीबाबा के हवाले अशा सर्वच मोहिमांमध्ये एक गोष्ट कॉमन असते - ती म्हणजे सुरक्षिततेची घेतलेली काळजी. सुरक्षेचे सर्व उपाय करूनच अशी साहसे केली जातात. ह्या मोहिमांमध्ये सहभागी होताना आपणसुद्धा सुरक्षिततेसंदर्भात काय काय आयोजन आहे ह्याची माहिती घ्यायला हवी.\nह्या भागात फोटो आहेत, पण आधीच्या सर्व भागातलं फोटोशिवाय उभं केलेलं शब्दचित्र एवढ्या चिकाटीने तुम्ही वाचलंत ह्यात निर्विवादपणे तुमचं कौतुक आहे. त्याबद्दल मनापासून आभार.पुन्हा भेटूच\nआता सुरू करूया फोटो सफर - (आधी वर्णन आणि नंतर फोटो असा क्रम आहे. I hope फोटोतले संदर्भ तुम्ही आधीच्या भागात वाचले असल्यामुळे आठवतील)\nequipment, इतर सामान. मागे आडवा पसरलेला अलंग आणि त्याच्या उजवीकडचा उंचवटा म्हणजे मदन. (फोटो - रोहन मालुसरे)\nउजवीकडचा आडवा कुलंग. त्याच्या डावीकडे कमी उंचीचा एक डोंगर आहे. दोघांच्या मधल्या खिंडीत पोचण्याचे पहिल्या दिवशीचे ध्येय होते. कुलंगची डावी धार चढून जाण्याची मोहीम होती. डावीकडचा उंचवटा मदन.\nया फोटोत कुलंग, त्याची डावी भिंत, खिंड आणि खिंडीच्या डावीकडचा डोंगर नीट दिसतोय. त्या डाव्या डोंगराच्या पोटात कपारी आहेत, जिथे आम्ही मुक्काम केला. खिंडीच्या 'V' चे खालचे टोक जिथे आहे, तिथपासून डावीकडे कपारींकडे पायवाट जाते, तर उजवीकडे कुलंगला खेटून पायर्‍यांकडे पायवाट जाते.\n६०० फूट भिंत अजून झूम करून. भिंतीच्या उन्हात असलेल्या धारेवरून चढाई झाली.\n मागे मदन ते कुलंग (फोटो - रोहन मालुसरे)\nवाटेवर एके ठिकाणाहून दिसणारे मदनगडाचे नेढे\nमुक्कामाच्या जागेवरून दिसणारा नजारा. उजवीकडे उंचीवर जो हिरवी झाडे असलेला डोंगर दिसतोय, त्याच्यापलिकडे खालच्या बाजूला झाप होता, जिथून सुरूवात केली. तसंच सरळ पुढे गेलं की आंबेवाडी.\nकुलंगच्या पायर्‍यांवरून घेतलेला मदनगडापर्यंतचा फोटो. कुलंगनंतरच्या पहिल्याच डोंगराच्या पोटात मुक्कामाची जागा.\nकुलंगच्या पायर्‍यांवरूनच मदनच्या सुळक्यांचा फोटो. सगळ्यात उजवीकडच्या डोंगराच्या पोटात पांढुरकं आणि त्याच्या लगेचच खाली एक भेग दिसतेय, exactly तीच मुक्कामाची कपार.\nसगळ्यात उजवीकडे मदनगड, सगळ्यात डावीकडे कळसुबाई\nकुलंगच्या पायर्‍यांची एक झलक\nखिंडीतून पलिकडचा नजारा. सर्वात डावीकडे दिसतेय ती अलंगची लिंगी. तिच्या उजवीकडे रतनगड धुरकट दिसतोय.\nअरूण सर in लीड क्लाईंबिंग\nपहिले सत्तर-एक फूट सरांनी लीड क्लाईंब केलं. Now its Suraj to go next. फोटोत डावीकडून सर, संजय आणि सूरज\nओव्हरहँगच्या खाली सूरज. संजय बिले देताना.\nत्याच पॅचवर अजून एक फोटो\nसूरज अजून वर पोचला, बिले पोझिशनवर संजय आणि रूपेश\n (फोटो - मिलिंद कुलकर्णी)\nअडीचशे फुटांवरचा ग्रूप फोटो. मागच्या भिंतीचं सर्वोच्च टोक म्हणजे कुलंगचा माथा. (फोटो - मिलिंद कुलकर्णी)\nहा ह्या ठिकाणावरून घेतला गेलेला पहिला फोटो. कारण अजूनपर्यंत इथे कुणीच पोचलं नव्हतं. फोटोत मदनगड आणि आम्ही राहिलो त्या कपारींच्या डोंगराचा टॉप दिसतोय. डावीकडे मागे कळसूबाई. (फोटो -\nफायनली पुण्यात सुखरूप पोचलो. उजवीकडून रोहित, श्वेता आणि मी. (फोटो - रोहित सिंगर)\nहॅट्स ऑफ टीम. (फोटो - रोहन मालुसरे). सागर आणि मालतेश ह्या फोटोत नाहीयेत. ते रात्री मुक्कामाला आले होते.\n त्रिवार मुजरा तुम्हा सगळ्यांना\nफायनली नचिकेत जोशी यांनी या सिरीजचा The End केला . आणि एका यशस्वी दिग्दर्शक आणि लेखकाप्रमाणे वाचकांची उत्सुकता शेवटच्या भागापर्यंत ताणून नेऊन ठेवली. आम्हा वाचकांचा सॉलिड असा गेम केला. हळूहळू एक एक एपिसोड आपल्या शब्दांमध्ये गुंफत असा निर्माण केला की जे या व्यक्तिरेखांनमध्ये नव्हते त्यांनाही तिथे सोबत किंवा सहकलाकार असल्याचा फील येत गेला. आम्ही सुद्धा प्रत्यक्षात एक व्याक्तीरेखा साकारत असल्याने या एपिसोडशी एक जवळीक निर्माण होत गेली.. नची लेखकाच्या अंगी असलेली सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि शब्दभांडार हे तुझ्याकडे आहेच.. त्यामुळे अशीच या पुढेही तुझ्या पायाला भिंगरी लागो आणि अशीच लेखननिर्मिती घडो ..\nकलाक्षेत्रातील एक सत्य (माझ्या मते )\nकोणतीही कलानिर्मिती घडत असताना त्यामागे एक घुसमट एक वेदना एक जखम एक तळमळ एक आवेग एक ऊर्जा एक स्त्री असतेच ..का कुणास\nनचि, अत्यंत सुरेख ओघवते लिखाण सगळ्या भागांचे. फोटोही अप्रतीम आलेत. बर्‍याच दिवसांनी पुर्वाश्रमीचा नचि भेटला. आता हा भटकंतीचा व लिखाणाचा ओघ असाच वाहता राहो.\nनचिकेत सर ... केवळं आणि केवळं अप्रतिम लिखाण ... सगळे ब्लॉग तुमच्या लेखन सामर्थ्याने गुंतवून ठेवतात. कमाल लिहलंय\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सां...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल,...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता...\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/13", "date_download": "2018-04-23T11:47:25Z", "digest": "sha1:3T7EY2GXRJIGHTN45QU6C7IK7EUCRKWK", "length": 19496, "nlines": 201, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "तिमिरातूनी तेजाकडे", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nसध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात जो तो धावतोय, मी, माझं, मला या परिघापलिकडच्या जगात डोकवायलाही कोणाला वेळ नाही. समाजाची ही आत्मकेंद्री ढासळणारी नितीमूल्यांची वाटचाल मनावर निराशेचे ढग निर्माण करते पण त्याचवेळेला विजय फळणीकर आणि साधना फळणीकरांसारखी माणसं आपलं डोंगराएव्हढं दु:ख बाजूला ठेवून निराधार मुलामुलींसाठी, आजी आजोबांसाठी \"आपलं घर' नावाची आपुलकी जपणारी, शिस्तीची वाटचाल करणारी संस्था उत्तमरित्या चालवून समाजात आपलं नाव \"अधोरेखीत' व्हावे असं कार्य करतात.\nअनाथ मुलां साठी माई...\nजीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...\nअसामान्य मुलांकरिता अपवादात्मक सामाजिक कार्य.... एक प्रेरणादायी कथा\nकै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे\nनिराधार बालकांना हक्काचं घर देणारे वृद्धांना उबदार घरकूल देणारे गरजूंसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णालय उभारणारे विजय आणि साधना फळणीकर ---\nसारं कसं सरधोपट मार्गानी व्हावं\nअशी इच्छा असते तुम्हा आम्हा सर्वांची,\nपण फासे टाकणारी असते नियती\nसत्ता चालते फक्त तीची,\nनियतीने त्यांच्या आयुष्यात विपरीत दान टाकलं. बालपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला, आघात सोसून कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. या सगळ्यापेक्षा कडेलोट होणारी घटना म्हणजे एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूची घटना. नियतीने टाकलेल्या विपरित दानांमुळे जीवनात \"पराजय' झालाय असं न मानता \"विजय' पथावरुन साधनेसह आयुष्याची वाटचाल करणारं आगळं वेगळं कार्य करणारं दांपत्य विजय फळणीकर आणि साधना फळणीकर ---\nसध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात जो तो धावतोय, मी, माझं, मला या परिघापलिकडच्या जगात डोकवायलाही कोणाला वेळ नाही. समाजाची ही आत्मकेंद्री ढासळणारी नितीमूल्यांची वाटचाल मनावर निराशेचे ढग निर्माण करते पण त्याचवेळेला विजय फळणीकर आणि साधना फळणीकरांसारखी माणसं आपलं डोंगराएव्हढं दु:ख बाजूला ठेवून निराधार मुलामुलींसाठी, आजी आजोबांसाठी \"आपलं घर' नावाची आपुलकी जपणारी, शिस्तीची वाटचाल करणारी संस्था उत्तमरित्या चालवून समाजात आपलं नाव \"अधोरेखीत' व्हावे असं कार्य करतात.\n\"विजय' फळणीकरांच बालपण म्हणजे एक\n16 ऑक्टोबर 1961 या दिवशी गजानन आणि लिलाबाई यांचं. 3 भाऊ, 1 बहीण या भावंडातील दोन नंबरचं अपत्य, विजयच्या वडिलांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय, त्यांच्या निधनानंतर घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने मोडावे लागले; राहते घर सोडावे लागले. बालवयातील या दाहक अनुभवांना पेटीच्या सुरांचा ओलावा मिळाला. पण नको ती प्रलोभनं खुणावत होती. हिरो बनायचंय, पैसे कमवायचेत थेट मुंबईची वाट पकडली. घर, आई, तिची माया सगळं सुटलं. मुंबईत जीवनाचे सगळे रंग अनुभवले. भुकेल्या पोटी मिळेल ते खाणं, मागून खाणं, पडेल ते काम करणं रवानगी थेट बालसुधारगृहात. तिथे योग्य दिशा मिळाली. रात्र शाळा, महाविदर्भ मधली नोकरी, कलाक्षेत्राची आवड, लेखन, नाट्य या सगळ्यामुळे \"विजय फळणीकर' हे नाव अनेक तऱ्हेचे टक्केटोणपे खाल्ल्यावर स्थिर झालं, रसिक मनात खास प्रतिमा निर्माण झाली.\nसोन्याचा मुलामा दिलेलं चांदीचं मंगळसूत्र आणि छान शालू इतकाच साज लेऊन भंडाऱ्याच्या डेप्युटी कलेक्टर फाये यांची कन्या साधना, विवाहानंतर साधना विजय फळणीकर झाली. वैभवच्या आगमनाने घरादाराचे वैभव वाढले. सगळं दृष्ट लागावं असं.\nपण नियतीचे फासे उलटे पडले. हुशार, सर्वगुणसंपन्न, विद्यार्थीप्रिय, शिक्षकप्रिय, गुणी \"वैभव' ऍक्युट ल्युकेमिया या गंभीर आजारा ने ग्रासला गेला. जगाच्या पाठीवर ह्या जीवघेण्या आजारावर उपचार नाहीत ही दाहक वस्तुस्थिती समोर होती. 18 नोव्हेंबर 2001 साली वैभवने अखेरचा श्र्वास घेतला. \"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हेच खरं.\nवैभवशिवाय जगणं अशक्य व अवघड होतं. जीवनयात्रा संपवून टाकावी असा अभद्र विचार दोघांच्याही मनात अनेकदा येऊन गेला.\nपण पुन्हा परमेश्र्वरी योजना काही वेगळीच असते. वैभवच्या विम्याच्या पैशातून ऍम्ब्युलन्स घ्यावी हा विचार मनात आला. ऍम्ब्युलन्स नाही म्हणून कोणा चे हाल होऊ नयेत ही इच्छा. विख्यात गायक पंडीत सुरेश वाडकर यांनी कल्पना उचलून धरली. आणि काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने स्व. वैभव फळणीकर मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली. सूरमयी शाम या वाडकर यांच्या कार्यक्रमातून मिळालेला निधी आणि विम्याचे पैसे यातून घेतलेली ऍम्ब्युलन्स समाजासाठी रुजू झाली. आणि पाठोपाठ अनाथ मुलामुलींसाठी \"आपलं घर' या आश्रमाचीही सुरुवात झाली. निराधार मुलांना आधारही मिळाला अन्‌ छत्रही मिळालं, प्रेमाचं, आपुलकीचं, हक्काचं \"आपलं घर'.\nआलेल्या प्रत्येक मुलाला हे स्वत:च घर वाटावं म्हणून ठेवलेलं आपलं घर हे नाव लोकप्रिय झालं. येणारी मुलं प्रतिकूल परिस्थितीतून येणारीच होती. तीन ते दहा वयोगटातील, चौदा मुलांसह सुरु झालेलं \"आपलं घर' आज वारजे आणि \"डोणजे' भागात वटवृक्षासारखं विस्तारलं आहे.\nघटाघटातले रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. \"आपलं घर' ने नियतीच्या कचाट्यात सापडलेल्या, दैवाचे तडाखे खाणाऱ्या मुलामुलींना माया दिली, प्रेम दिलं, तशीच शिस्तही दिली. प्रत्येक मुलाची प्रत्येक मुलीची कहाणी वेगळीच, कोमल, प्रदीप, प्रताप --- आणि कितीतरी.\nचांगल्या कामासाठी,\tपुढे वाचा\nमाझी यशोगाथा 08 June 2016\nतुम्ही इंटरेस्ट दाखवल्याबद्दल धन्यवाद.या संस्थेला डोनेशन द्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.http://www.apalaghar.com/donation\nसर मी एक सामाजिक कार्यकरती आहे, मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल संस्थेला जर देणगी द्यायची असेल तर काय कराव लागेल \nसर, मला तुमचे काम खुपच आवडले. जर मला तुमच्या संस्थेबरोबर काम करायचे असेल किंवा देणगी द्यायची असेल तर काय करावे लागेल\nसर, मला तुमचे काम खूपच आवडले , जर मला तुमच्या सौस्थेबारोरार काम करायचे असेल किवा देणगी द्यायची असेल तर की करावे लागेल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/all_story", "date_download": "2018-04-23T11:46:22Z", "digest": "sha1:IONCWLOUPX54CGDTCHOODZRVQMTYTBDL", "length": 42296, "nlines": 788, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "Mazi Yashogatha", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nथिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा ” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे \" गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे ” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे \" गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे \nमनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे .......\n\"प्रतीक केबल ट्रे' नावारुपाला झाले त्यामागचे यशाचे काहीतरी गमक असणार कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या साध्याशा कुटुंबातून केवळ 10 वी पर्यंतचे शिक्षण झालेले श्री. प्रशांत हे इतका मोठा व्यवसाय कशाच्या जोरावर करु शकतात... पण त्यांच्या यशाचा फॉर्म्यूला सोपा व साधा आहे.\n५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात खरे तर दाखल घेण्याजोगे आहे.\nकै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे\nसर्वसामान्य मुलांच्या संस्थेत काम करताना येणारे अनुभव आणि अशा संस्थेतील अनुभव यात निश्चिमतच फरक आहे. द्घीशिक्षणासंबंधीच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. शाळा प्रवेशासाठी मोल मजुरी करणारे, हातावर पोट असलेले अनेक पालक कुठल्याशा खेड्यातून आलेले असतात.\nएकीकडे चालू व्यवसाय वाढवतानाच हेमंतराव आजूबाजूला होणा-या घडामोडींच्या बाबतीत जागरूक होतेच. अल्फा लाव्हलच्या एका अधिकारी व स्नेह्यांनी एकदा बोलता बोलता सौर उर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याबद्दल सुचवलं. पारंपरिक उर्जा स्रोतांची आणि इंधन पुरवठ्याची टंचाई हळूहळू जगभर जाणवू लागली होतीच.\n'सीड इन्फोटेक' ह्या सुप्रसिद्ध कंपनीचे रचिते आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि डायरेक्टर ह्या नात्याने काम पाहणारे श्री. नरेंद्र बऱ्हाटे सांगतात की त्यांचा एका गोष्टीवर पूर्ण आणि ठाम विश्वास आहे आणि ती म्हणजे, ''आपला जर स्वकर्तृत्वावर विश्वास असेल, तर जगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात आपलं मन हा एक अक्षय्य ऊर्जास्रोत आहे\n......राजेंद्रना आपण पाहताक्षणी आपल्यावर छाप पडते ती त्यांच्या हसऱ्या, उमद्या व्यक्तिमत्वाची आणि त्याला जोड आहे ती अत्यंत गोड वाणीची. त्यांचं बोलणं पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करेल असं आहे.\nमानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे\nमी आजवर ‘इंडिअन सायकीएट्रीक सोसायटीचा’ मेंबर या नात्याने खूप काम केलं..आणि करत राहीन..माझ्याकडे कामाला असणारे माझेच दोन पेशंट आहेत..जे त्यांच्या आजाराच्या पहिल्या दिवसापासून आहेत..आणि इथेच काम करतात.. गेली वीस वर्ष.. याहून मला समाधानाची दुसरी गोष्ट नाही..\nसुजाता मस्तानी सचिन कोंढाळकर\nअस्सल फळांची चव तुफानी करणाऱ्या सचिन कोंढाळकर यांची कथा\nपुणे शहरातल्या आपटे प्रशाळेतल्या गाण्याच्या तासाची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात, कारण त्यांच्या आवडत्या दीपमाला मॅम शिकवणार असतात. अनेक महाविद्यालयीन गायन स्पर्धेत पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपमाला लोहाडे मॅम इतकी छान तयारी करून घेतात की आत्त्तापर्यंत त्यांनाच तीनवेळा उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सर्वात अलीकडचा म्हणजे २०१५ सालचा पु. ग. वैद्य उत्कृष्ट संगीत शि� .......\nकिर्लोस्कर ऑईल इंजिन सारख्या कोर्पोरेट कंपनीमधील चांगल्या हुद्द्याची , चांगल्या पगाराची नोकरी सोडून अत्यल्प भांडवलामध्ये सुरु केलेला आणि आज कोट्यावधींची उलाढाल करीत असलेल्या आपल्या \"पेरिनिअल टेक्नोलोजिस प्रायवेट लिमिटेड \" कंपनीच्या वाटचाली बद्दल सांगताहेत कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत देसाई.\nकोकणात लहानपण गेलेलं ..... शिक्षण संपवून १२०० रुपये पगारावर नोकरी ...पण जिद्द होती स्वतःच विश्व स्वतः घडवायची.. याच जिद्दीतून जन्माला आले \"जेटकिंग\" .. त्याच संजय गांधींची हि कथा\nअसामान्य मुलांकरिता अपवादात्मक सामाजिक कार्य.... एक प्रेरणादायी कथा\nधुळे जिल्ह्यातून आलेला एक तरुण , समाजा कडून आर्थिक मदत घेऊन मानसोपचार तज्ञ डॉक्टर झाला. समाजाचं हेच देणं परत करण्यासाठी दिवस-रात्र झटतोय. अब-नॉर्मल होम सुरु करून विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोय त्याच्या उपक्रमा विषयी हि थोडीशी माहिती...\nपुण्याजवळील सिंहगड रोड येथील छोट्याशा नांदेड गावातून आलेला रवींद्र इंगवले हा तरुण पोलिस हवालदार ....आपल्या विजीगिषु वृत्तीने सरकारी यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल घडवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या या प्रयत्नांचा घेतलेला हा मागोवा.\nअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गारगुंडी या अतिशय छोट्या गावातून आलेल्या ध्येयवेड्या मुलाची अनोखी गोष्ट\nसौर उर्जा .... या त्यामानाने नवीन असलेल्या क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत नावलौकिकाला आलेल्या माधुरी सोलर या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दिनकर देशमुख यांची खडतर वाटचाल अधोरेखित करणारी हि कहाणी \" मेस मध्ये उरलेले वडे, भजी वायाच जाणार आहेत , ते टाकूनच देणार आहेस त्यापेक्षा निम्या किमतीत आम्हाला दे त्यात तुझाही फायदा आणि आमचाही \" ......हे म्हणणारा विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यात � .......\nसाधारणतः २० वर्षा पूर्वी जेव्हा sex हा शब्द उच्चाराने सुद्धा वाईट समजले जायचे त्यावेळी समाजाची गरज लक्षात घेऊन सेक्सोलोजीचे शास्रशुद्ध शिक्षण घेऊन एका तरुणाने वेगळी वाट पकडली त्याला आलेल्या अडचणी आणि त्याने काढलेला मार्ग याविषयीचा हा लेख\nफत्तेचंद रांका (रांका ज्वेलर्स)\nआजच्या घडीला ज्या मोजक्याच सराफ व्यावसायिकांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते त्यापैकी आघाडीचे नाव म्हणजे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे ह्या प्रचंड मोठ्या उद्योगाचा डोलारा सांभाळला आहे त्याला तोड नाही. त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी हा उद्योग कशा प्रकारे उभारला आणि वाढवला त्याची हि कथा ...\nमाझी यशोगाथा - महेंद्र यादव\nझेप....एक भरारी कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....\nआयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय\nक्रिकेटच्या अतिवेडापायी आपण इतर खेळाकडे दुर्लक्ष करतो. पण हळुहळू ही परिस्थिती बदलत आहे. अन्य खेळांची आवड वाढत आहे. दुसऱ्या खेळामध्येही भारतीय मंडळी यशस्वी होत आहेत. नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराथी या अठरा वर्षाच्या मुलाने ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळवला आहे. देशातील हा किताब मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.\nवादळी व्यक्तिमत्व शरद पवार\nशरद गोविंदराव पवार (डिसेंबर १२, इ.स. १९४० - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.\nग्रामीण महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय अर्थातच शेती हाच आहे. पण आता शहरी लोकही शेती करताना दिसतायत याला आपण आधुनिक शेती असही म्हणू शकतो. मनात काय असा प्रश्न पडला असेल पण मी जे काही सांगणार आहे ते सगळं खरं आहे. सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची कास धरणार्‍या महाराष्ट्रात शेती क्षेत्रातही सातत्याने नवनवीन उपक्रम, तंत्रज्ञान यांचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन व .......\nनिराधार बालकांना हक्काचं घर देणारे वृद्धांना उबदार घरकूल देणारे गरजूंसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णालय उभारणारे विजय आणि साधना फळणीकर ---\nकट्यारीचा आवाज राहुल देशपांडे\nसंगीत रंगभूमी किंवा संगीत नाटक हा मराठी मनाचा हळवा कोपरा आहे, आत्ता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.या चित्रपटात युवा कलाकार श्री. राहुल देशपांडे यांनी केशवराव भोसले यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे.संगीत रंगभूमी राहुलजींच्या रक्तातच आहे..त्यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. श .......\nश्री. जगदीश कुलकर्णी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (वाय्‌.सी.एम्.) येथे चित्रफीत निर्मिती /व्हिडिओ प्रॉडक्शन या क्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहेत. यात ते ध्वनिमुद्रण, दृष्यमिश्रण, संपादन, दिग्दर्शन, तांत्रिक बाबी, स्पेशल इफेक्ट्स, लाइटिंग असे विविध विषय हाताळतात.\nकोल्हापूरचा यशस्वी उद्योजक आनंद देशपांडे\n कलानगरी तसेच उद्योजकांची नगरी मे २०११.-कोरिया.व्हेंडर्स मीटसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या साउंड कास्टिंग्ज प्रा.लि. चे मॅनेजिंगडिरेक्टर श्री आनंद देशपांडे यांनी कंपनीच्या वतीने महिंद्रा अँड महिंद्रा कडूनउत्कृष्ट पुरवठादार (बेस्ट सप्लायर इन कास्टिंग्ज कॅटॅगरी) हे पारितोषिकस्वीकारले.\n\"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते\" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.\nजीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घ .......\nलक्ष्मणराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर अप आणि करत आहे तोपर्यंत कधीही समाधानी दमदार व्यक्ती आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर लक्षात मजबूत आणि शरीर मजबूत आणि हातात काम उत्साह पूर्ण आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर अमर्यादित धैर्य आहे, आणि एकत्रित सर्व गुण लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवन बहुरंगी निर्माण करु शकतो. लक्ष्मणराव किर्लोस्कर त्या दिशेने बाहेर ठेवले आहे कारण लक्ष्मण� .......\nअनाथ मुलां साठी माई...\nसिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही .......\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_22.html", "date_download": "2018-04-23T11:25:35Z", "digest": "sha1:DKYYDGL6SV4NLKERLS3CYHMYFQQJPNWN", "length": 2455, "nlines": 82, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: गोदावरीच्या तिरी", "raw_content": "\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/613/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%98%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-04-23T11:18:33Z", "digest": "sha1:HBDSGIEIPELDA3WJD24RC4UIZ7FMPPYR", "length": 6311, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआगीमध्ये घर गमावलेल्या ऊसतोडणी मजुरांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट\nसंघर्षयात्रेच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (एच) गावातील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या सोमवारी आगीत जळून खाक झाल्या. हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऊसतोडणी मजुरांची विचारपूस केली. या आगीत ३१ झोपड्यांची राख झाली तर सात शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तसेच मालमत्ता हानीदेखील झाली. या दुर्दैवी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.\nजळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार संघर्षयात्रा ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला जिल्ह्याजिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, हा नारा जळीस्थळी ऐकू येत आहे. रविवार, दिनांक १६ एप्रिलला संघर्षयात्रा जळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार असून येथील शेतकरीवर्ग व सर्वसामान्यांशी संवाद साधला जाईल. ...\nएलौरी गावाच्या संघर्षाची संघर्षयात्रेकडून दखल ...\nसंघर्षयात्रेच्या आजच्या पाचव्या दिवशी विरोक्षी पक्षांच्या सदस्यांनी लातूरच्या औसा तालुक्यातील एलौरी या गावी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे अनेकांचं नुकसान झालं, अनेकजण जखमी झाले होते. विरोधी पक्षातील सदस्यांनी या गावाला भेट देऊ ...\nया सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत – अजित पवार ...\nधुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता शेतक-यांचे किती कर्ज आहे याची आकडेवारी माहीत आहे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/swapnali-mhatre.html", "date_download": "2018-04-23T11:49:18Z", "digest": "sha1:DGIH3SG3VXIPTUH3QK3Z7A37PDLQ52NV", "length": 8448, "nlines": 96, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ.स्वप्नाली संजय म्हात्रे\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : भा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)\nName : सौ.स्वप्नाली संजय म्हात्रे\nFather's Name : श्री अरुण तुळसीराम पाटील\nMother’s Name : सौ. अनुसया अरुण पाटील\nDate of Birth: : २१ फेब्रुवारी, १९८२\nPlace of Birth: : जुहुगाव (वाशी नवी मुंबई), महाराष्ट्र\nHusband Name : श्री संजय एकनाथ म्हात्रे\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश\nHobby : लोकांशी संवाद करणे, क्रिडा\nResidence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९\nOffice Address : 1)\tभाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे\n2) मा. आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे\nभा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)\nकॉंग्रेस पार्टी (कामोठे) माजी शहर कार्याध्यक्षा\nस्त्री शक्ती महिला मंडळ, अध्यक्षा\nरयत शिक्षण संस्था (कामोठे), पर्यवेक्षिका\nलोकमत सखी मंच, प्रतिनिधी\nकामोठे भूषण पुरस्कार स्विकारताना\nमा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठे भूषण पुरस्कार स्विकारताना\nअशिक्षित लोकांसाठी साक्षरता वर्ग सुरु केला\nगरजू लोकांसाठी (१५०) फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू केला\nमहिलांसाठी शिवणकोर्स, ब्युटी पार्लर, रांगोळी, कृत्रिम फुले बनवणे, फाब्रीक पेंटिंग, आणि मायक्रोन पासून वस्तू बनवणे असे विविध सरकारी कोर्सेस कमीत कमी दरात चालू केले.\nजनधन योजना, अपघात विमा योजना, निराधार योजना, आणि मुद्रा लोन योजना, अशा योजनांचे शिबिर लावून अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला.\nमहिलांना बचत गटाची (२०) माहिती देवून ते चालू करण्यास मदत केली.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nसामाजिक / आर्थिक / रोजगाराची संधी.\nतरुण – तरुणी – महिला यांना मोफत लहान मोठे उद्योगाची शिकवण व नोकरीची संधी.\nकोणत्याही वेळी प्रत्येक समाजाच्या माणसाला मदत करणे.\nपक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nरक्तदान शिबिर / बेरोजगारांसाठी नोकरीची संधी\nफ्री इंग्लिश कोर्सचे मा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन समारंभ...\nविविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग...\nस्वप्नाली म्हात्रे यांचे पेपर बातम्या, लेख...\n1) फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्स\n2) कामोठे भूषण पुरस्काराने स्वप्नाली म्हात्रे यांचा गौरव\n3) कामोठे कला, सांस्कृतिक महोत्सवात स्वप्नाली संजय म्हात्रे यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठे भूषण\n4) कामोठ्यात लई भारी प्रतिसाद\n5) कामोठेकरांनी केली ट्राफिक बंद धम्माल\n6) लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण\n7) लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना नवंवर्षनिमित्त शुभेच्छा देताना\n8) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची विद्यार्थिनीला सुवर्ण पदक\n9) कामोठे तनिष्का शक्तीचा बियरशॉपींना दणका \n10) न्यू इंग्लिश स्कुल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ध्वजारोहन केले/a>\n11) स्पर्धात्मक कार्यक्रमांना कामोठे येथे प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/228/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%A8_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5", "date_download": "2018-04-23T11:22:42Z", "digest": "sha1:V7MEDBJXMQAVX3F23R4ARC4UVHEDZ75G", "length": 14221, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारविरूद्ध संघर्ष अटळ – सुनील तटकरे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच दोन दिवसीय मराठवाडा दौरा केला. औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांबरोबर संवाद ही साधला. सरकारने १५ मे पर्यंत जर दुष्काळावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशाराही त्यांनी या दौऱ्याच्या सांगतेवेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. १५ मे पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलिप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हे दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष फौजिया खान, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी खासदार सुरेशराव जाधव, परभणी जिल्हाध्यक्ष आमदार विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मधुसूदन केंद्रे, शंकर अण्णा धोंडगे यावेळी उपस्थित होते.\nया पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी सरकारने दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात चारा छावण्या तातडीने सुरू करा असेही ते म्हणाले. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्कमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जलयुक्त शिवारची कामे अपूर्ण आहे. सरकार जलयुक्त शिवारबाबत जो काही दावा करत आहे तो खोटा आहे. मराठवाड्यातील फळबागांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. या सर्व गोष्टी करण्यासाठी १५ मे पर्यंत सरकारला वेळ देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. नाहीतर सरकार विरोधात रस्त्यावर संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nभीषण दुष्काळ असूनही रोजगार हमीची कामे बंद आहेत. त्यामुळे गावाकडून शहरांकडे स्थलांतर होत आहे. शेतमजूरांना अन्न धान्याचा पुरवठा होत नाही. शंकरअण्णा सरकार विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर रस्त्यावरची लढाई लढेल. एलबीटी साठी ८ हजार कोटी माफ करता मग शेतकऱ्यांना कर्ज माफी का नाही असा सवाल तटकरे यांनी यावेळी विचारला. महाराष्ट्र सरकारने किमान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला बुधवारी सुरूवात झाली. त्यांनी या दोन दिवसात तीन जिल्ह्यांचा दौरा केला. सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडला त्यांनी भेट दिली. येथे शेतकरी आणि गावकऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. शिवाय या भागातील फळबागांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील कै. अविनाश पतंगे आणि कै. कुंडलीक मुंडे या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर हिंगोली येथे हिंगोली जिल्हा दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सध्याची दुष्काळी स्थिती आणि करायच्या उपाययोजना या बाबत तटकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यानंतर हिंगोली येथेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर औंढा तालुक्यातील पुरजळ गावाला त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या तलावाची पहाणी केली. वसमत येथे दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या डाळींबाच्या बागांचीही तटकरे यांनी पाहणी केली. पुढे परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर गावात शेतकऱ्यांबरोबर तटकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर परभणी येथील पत्रकार परिषदेनंतर तटकर यांच्या दौऱ्याची सांगता झाली.\nकपाशी पिकाच्या नुकसानभरपाईची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मागणी ...\nबीड जिल्हा महाराष्ट्रातला सर्वाधिक कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. तीन ते चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असून चालू वर्षी भयंकर दुष्काळामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने सन. २०१५-१६ चे दुष्काळी अनुदान आणि मदत निधी जाहीर करताना बीड जिल्हा आणि मराठवाड्याचे प्रमुख पिक असलेले कापसाचे पीक वगळले आहे. भाजप सरकारच्या या निर्णयामु ...\nभगिनींनो घाबरू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे- धनंजय मुंडे ...\nभीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पालकांना आपल्या लग्नाचा भार वाटू नये लग्नाचा विचार पुढे ढकलण्याचा सामूहिक निर्णय घेण्याऱ्या माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील २५ मुलींच्या विवाहाची जबाबदारी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहे. मुंडे यांच्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले असून 'या गावातील भगीनींच्या पाठीशी हा भाऊ आहे', असे वचन मुंडे यांनी दिले.माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील एका शेतकऱ्याच्य ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत न्यायालयाच्या सूचनेचे सरकारने पालन करावे - शंकरअण्णा धोंडगे ...\nशेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी व शेतमजूरांना पेन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/crop-loan-farmers-and-banks/361600", "date_download": "2018-04-23T12:38:57Z", "digest": "sha1:SNNOXEXBS2KD4W74XQIJCCJWONCAPCSP", "length": 21128, "nlines": 104, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ? | 24taas.com", "raw_content": "\nपिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ\nसध्या काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे, शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, ते उधळ मापाने मिळतं का यावर काही नियम असतात का यावर काही नियम असतात का हे ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे.\nमुंबई : (जयवंत पाटील) सध्या काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे, शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, ते उधळ मापाने मिळतं का यावर काही नियम असतात का यावर काही नियम असतात का हे ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. जून महिन्यापासून पावसाला सुरूवात होते असं मानलं जातं, शेतीच्या अर्थकारणात सर्वात महत्वाचा हा महिना असतो, यापूर्वीच बियाणे, खते, मजुरी, जमिनीची मशागत यासाठी शेतकऱ्याच्या हातात पैसे असणे महत्वाचे असते.\nभारतासारखा खंडप्राय, शेतीप्रधान देश, नवीन वर्षाच्या अर्थव्यवस्थेसाठी जणू बीज रोवत असतो, अशावेळी त्याला राष्ट्रीययीकृत बँका, तसेच सहकारी सोसायट्यांकडून त्याला पिककर्ज देतात.सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँका पत पुरवठा करतात. हे पिककर्ज कसं असतं पाहा...\nशेतकऱ्यांसाठी पिककर्ज हे सर्वात कमी दिवसात परतफेड करण्यासाठी दिलेलं कर्ज असतं, किमान १२ महिन्यांच्या आत पिककर्जाची परतफेड करावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी ही परतफेड केली, तरच तुम्हाला सरकारकडून व्याजात दिली जाणारी सूट लागू होते, वेळेवर कर्ज भरल्यानंतर सरकारने दिलेली व्याजातली सूट लगेच मिळत नाही. मिळालेली सूट ही काही दिवसांनी तुमच्या बँक खात्याला जमा होते.\nपिककर्ज शेतकऱ्यांना दिलं जात असलं, तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, आणि (वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार, बहुतेक वेळा ३१ मार्चच्या आत) १२ महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते, तुमच्याकडे १०० एकर जमीन असो किंवा १० एकर, तरीही तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.\nमात्र तुम्ही ३१ मार्च किंवा १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी घेतल्यास, तुम्हाला नियमित व्याजदर लावण्यात येतो, शहरी लोकांना सोप्या भाषेत सांगायचं तर, होमलोनला असतो, तेवढा व्याजदर अशावेळी पिककर्जाला सुरू होतो, दुष्काळासारखी परिस्थिती आल्यास, किंवा खूप चांगलं पिक आलं आणि झालेल्या खर्च उत्पन्नाएवढाच आले, आणि शेतकऱ्याने हे कर्ज वेळेवर न भरल्यास, या व्याजदराखाली या कर्जाचा डोंगरच उभा राहतो, असं म्हणता येईल.\nवेळेवर तेही ३ लाखांच्या आत कर्ज घेणाऱ्यांनाच, व्याजदरात सूट दिली जाते, यावरून जास्त जमीन असलेले शेतकरी खूप कर्ज काढतात आणि कर्जमाफी मागतात, असं जर कुणी बोलत असेल तर अभ्यास न करता बोलणारा हा व्यक्ती असल्याचं समजा.\nराष्ट्रीयीकृत बँकांकडून दिलेलं पिककर्ज वेळेवर न भरल्यास, पिककर्ज दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त होवू शकतं, मात्र गावातील विकास सोसायटीमार्फत एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं आणि थकवलं, थकल्यानंतर व्याज हे रकमेएवढं झालं, तर हा आकडा तिथल्या तिथे थांबतो, विकास सोसायटीतून घेतलेलं कर्ज थकलं, तर ते घेतलेल्या रकमेच्या दुप्पटी एवढंच वसूल करता येतं.\nएका शेतकऱ्यांला एकाच वेळेस विकास सोसायटी किंवा राष्ट्रीयीकृत बँक या दोन्ही ठिकाणी कर्ज घेता येत नाही, ते फक्त एकाच ठिकाणी दिलं जातं.\nतुमच्याकडे १ हेक्टर जमीन असेल, आणि तुम्हाला ३ लाख रूपये पिककर्ज घ्यायचं असेल, तर असं शक्य होत नाही, ते हेक्टरावर ठरवलं जातं, त्यातही त्या जमिनीवर काय पेरलं आहे, यावर असतं, कापूस असेल तर हेक्टरी ३० ते ३५ हजार रूपये पिककर्ज दिलं जातं. फळबागांवरचा खर्च हा तुलनेने दुप्पट असल्याने फळबागांना हेक्टरावर ६० ते ८० हजारांपर्यंत पिककर्ज दिलं जातं. त्यातही ते कर्ज ३ लाखांच्या वर घेतल्या, व्याजदरात कोणतीही सूट दिली जात नाही.\nठिबक सिंचन, पाईपलाईन, विहिर खोदणे अशा कामांसाठी घेतलेलं कर्ज हे पिककर्ज म्हणून गणले जात नाही. या कर्जाचा व्याजदर प्रचलित नियमानुसार असतो, होमलोन एवढा, येथे कर्जाच्या व्याजदरात शेतकऱ्यांना सूट नसते. हे दीर्घ मुदतीचं कृषी कर्ज असतं.\nवरील माहितीत थोडीफार तफावत असू शकते, मात्र ढोबळमानाने देण्यात आलेली ही माहिती अशा लोकांसाठी आहे, ज्यांना वाटतं की पिककर्ज म्हणजे शेतकऱ्यांना वारेमाप मिळतं, कोणतेही नियम नसावेत, आम्ही टॅक्स भरतो, आमचा पैसा शेती क्षेत्रावर खर्च होतो, असे गैरसमज करणाऱ्यांसाठी ही माहिती आहे. मात्र शेती क्षेत्रावर दिलं जाणारं कर्ज, मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्राला व्याजही मिळवून देतं.\nराम तेरी अयोध्या मैली... भाग-२\nधोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात \nलग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम...\n'पर्यावरण पूरक' संदेश देणारे 'कॅरी ऑन'च...\nइलेक्ट्रिक कूलरच्या शॉकनं सहा वर्षांचा कोवळा जीव होरपळला\nसपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)\nआंतरराष्ट्रीय मॅच न खेळता १८ पट रक्कम, आयपीएलच्या पहिल्याच...\nभांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक\nसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे'...\nAlcoholic बोलल्यावर भडकली पूजा भट्ट ; टोलर्सला दिले सडतोड उ...\nमुंबईत या ठिकाणी होणार सोनम कपूरचे लग्न...अशी होतेय तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/19", "date_download": "2018-04-23T11:45:49Z", "digest": "sha1:IU6CNZLBARWTGLLQP2UF4GEGHA4TTOUZ", "length": 20401, "nlines": 202, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "माझी यशोगाथा - महेंद्र यादव", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nमाझी यशोगाथा - महेंद्र यादव कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....\nकोल्हापूरचा यशस्वी उद्योजक आनंद देशपांडे\nफत्तेचंद रांका (रांका ज्वेलर्स)\nसुजाता मस्तानी सचिन कोंढाळकर\nमाझी यशोगाथा - महेंद्र यादव\nझेप....एक भरारी कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....\nजन्मतारीख 15 जानेवारी 1972, तालुका पुरंदर, गाव पिंगोरी. 72 सालच्या ऐन दुष्काळात झालेला जन्म, आईवडील शेतात मोल मजुरी करणारे. सहा किलोमीटर चालत जायचं अन्‌ परत यायचं अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिरात महेंद्र यादव या छोट्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. 12 किलोमिटरची रोजची पायपीट \"महेंद्र'चं शरीर अन्‌ मन दोन्हीही मजबूत करणारी ठरत होती.\nगावाच्या चारही बाजूला डोंगर म्हणजे आधी डोंगराळ भाग, त्यात दुष्काळ, गावामधे 1983 पर्यंत तर दिवेही नाहीत, कंदीलाच्या उजेडात अभ्यास कितीसा होणार खर तर शिक्षणाला पोषक वातावरण मुळीच नाही अशीच आजूबाजूची वस्तुस्थिती अन्‌ परिस्थिती.\nअशा वातावरणात वाढत असलेल्या महेंद्रचं स्वप्नं फार तर पोलिस बनावं, मिलीटरीमध्ये जावं नाहीतर ड्रायव्हर व्हावं इतकंच होतं. पण वडिलांची इच्छा काही वेगळीच होती. 5वी ला इंग्रजी विषय सुरु झाला. 8वीत महेंद्रची रवानगी पिंपरीला काकांच्याकडे झाली, त्याला चांगल शिक्षण मिळावं हा वडिलांचा हेतू.\nनवीन वातावरण, नवीन भाषा, सगळच नवं, जीव गुदमरायला लागला महेंद्रने घरी परतायचा निर्णय घेतला. \"गड्या आपुला गावच बरा' हे वाटणं त्यावेळी स्वाभाविक होतं. पण आपण शिकलो नाहीत तरी मुलानी शिकावं हा वडिलांचा आग्रह त्यामुळेच हिंदुस्थान अँटीबायोटिक्स स्कूल मधून महेंद्र पहिल्याच फटक्यात दहावी पास झाला.\nकॉलेज जीवनाची सुरवात 11वी कॉमर्सला प्रवेश घेतला अन्‌ महेंद्र यादव आकाराला येऊ लागला. पार्ट टाईम नोकरी करत शिक्षण चालू होतं. 200 रुपये स्टायपेंड मिळायचा. त्यातून बचत करत पहिली सायकल खरेदी केली. सायकलवर स्वार होत थेट तळेगावपर्यंतची काम उरकायची. मागे हाटायचं नाही पुढे जायचं हा मंत्र देणारी ती दोन चाकी सायकल. सायकलच्या त्या दोन चाकांच्या गती बरोबर महेंद्र यादव या तरुणाचं नशीब, जीवन वेग घेऊ लागलं...\nयापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची\nमहेंद्र यादव या होतकरु तरुणाच्या जीवनातली तरुणाई बहरु लागली.\nकासारवाडीतल्या गावठाण परिसरात एक दहा बाय दहाची पत्र्याची रुम घेतली आणि भावाबरोबर महेंद्र तिथे राहून शिक्षण, नोकरी सांभाळू लागला. शिक्षणातली झेप 50 ते 55 टक्क्यांची असली तरी उमेद, चिकाटी 100 टक्केच होती. ग्रॅज्युएट तर व्हायलाच हवं होतं त्या शिवाय नोकरीत स्थिरता मिळणार नव्हती. अकौंटंटचा जॉब सांभाळत, बाहेरुन परीक्षा देत शिक्षण पूर्ण केलं.\n2 वर्ष सदाशिव पेठेत नोकरी केली. वन बीएचके फ्लॅट मधलं ते घरातूनच सुरु असलेलं ऑफीस घरुन नेलेला डबा खायची पण सोय नाही, समोरच्या हॉटेलमधे 100 रु. देऊन डबा खायला बसायचं.\nग्रॅज्युएशन पूर्ण झालं आता पुढच्या शिक्षणाची ओढ लागलेली एम.कॉम त्यामुळेच पूर्ण केलं. इंजिनियरिंगचं ज्ञान शिक्षण नसून सुद्धा \"मार्केटिंग' करणारा माणूस अचानक सोडून गेल्यामुळे मार्केटिंगची जबाबदारी महेंद्र यांच्यावर पडली. पगार हजाराचा झाला चार हजार. पण नेमकं अडत होतं ते \"इंग्रजी' भाषा ज्ञान कमी असल्यामुळे. भाषेची अडचण मोठी वाटली. थोडी निराशा आलीच पण महेद्र यांचा मूळ स्वभाव मागे हटायचा नाही.\nया काळात घरच्यांचा विरोध पत्करुन जीवनात आलेली, पत्नीचा धर्म उत्तम निभावणारी \"संध्या' मात्र महेंद्र यांच्या जीवनात सुवर्ण \"सकाळ' आणणारी होती.\nसंध्याच्या पाठबळावर नोकरी सोडली. तिने ही काम करायला सुरुवात केली. भोसरीमधे टेल्को सप्लायरकडे अकाऊंटची नवी नोकरी सुरु झाली. पगार तीन साडेतीन हजार मिळायला लागला.\n\"महेंद्र यादव' यांची कामाची पद्धत आणि धडाडी पाहून पहिल्याच ठिकाणाहून परत नोकरीसाठी यावं'अशी खास मागणी आाली. पुन्हा दोन अडीच वर्षे काम त्या काळात 50-60 जनरेटरचे मार्केटिंग झाले.\nस्वत:चे स्वत: काहीतरी केले पाहिजे ही उमेद मनात असल्यामुळे महेंद्र यादव यांनी पुन्हा आपल्या सहधर्मचारिणीच्या सल्ल्याला मान देऊन नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायात उडी मारायचं ठरवलं. 20-25 हजाराचं सेव्हिंग होतं बस्‌ इतकंच भांडवल. त्यातच दहा हजाराचा कॉम्प्युटर घेतला.\nआता प्रतिक्षा होती ती, पहिल्या ऑर्डरची कोटेशन देणे, ऑर्डर मिळविणे धडपड सुरु होती. अशातच महेंद्र यांच्या व्यवसायात \"सुवर्णयोग' आला. पहिली ऑर्डर मिळाली ती कर्वे रोड वरील रांका ज्वेलर्स यांची कोटेशन देणे, ऑर्डर मिळविणे धडपड सुरु होती. अशातच महेंद्र यांच्या व्यवसायात \"सुवर्णयोग' आला. पहिली ऑर्डर मिळाली ती कर्वे रोड वरील रांका ज्वेलर्स यांची फक्त दीड लाखाचं सर्वात कमी कोटेशन दिलं म्हणून ही ऑर्डर मिळाली असावी. नुसती ऑर्डरचं मिळाली नाही तर 50 हजार रुपये ऍडव्हान्स सुद्धा मिळाला.\nमग अविरत कष्ट सुरु झाले. ऑर्डर मिळालीय ती वेळेत पूर्ण करायला हव\tपुढे वाचा\n\"व्यवसाय, उद्योग, संघटना हि चढाओढीची आहेत . ह्या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर सतत स्वतःला सिद्ध करावे लागते . धोका पत्करावा लागतो. श्रम केलेच पाहिजेत. यश मिळाल तरी डोक शांत ठेवलेच पाहिजे. अपयश पदरी आले तरी निराशेला बळी पडायचे नाकारलेच पाहिजे. धडपडून पुंन्हा उठायला पाहिजे, पुंन्हा प्रयत्न करायलाच पाहिजे. प्रगतीचा मार्ग हा असाच असतो. यशा पर्यंत पोहोचायचा हा एकच राजमार्ग आहे\". ह्या किर्लोस्कर सरांच्या एकमेव तत्वावर मी आयुष्यभर चालत आलो आहे, ज्याचे फलस्वरूप म्हणजेच ACCURATE ची आजची भरारी होय. तुम्ही सर्वांनी सुद्धा शंतनुरावांचे हे तत्व अनुसरले तर यशस्वी होण्या पासून कोणीही आडवू शकणार नाही.\nसर मी तुमची यशोगाथा वाचली , खूपच प्रभावित झालो ... मला पण जीवनात असेच यश मिळवायचे आहे , तुम्ही मला काय सल्ला द्याल \nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vidharbhas-minimum-temperature-decreases-5-degrees-3357", "date_download": "2018-04-23T11:50:39Z", "digest": "sha1:ORTY7OLF4AZQTRLSO6C5RUI2SNKFD4YC", "length": 17570, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Vidharbhas minimum temperature decreases by 5 degrees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात किमान तापमानात ५ अंशांपर्यंत घट\nविदर्भात किमान तापमानात ५ अंशांपर्यंत घट\nसोमवार, 27 नोव्हेंबर 2017\nपुणे ः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लगतच्या विदर्भात दिसू लागला असून, किमान तापमानात पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. रविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे ः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लगतच्या विदर्भात दिसू लागला असून, किमान तापमानात पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. रविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे १०.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nकोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान ढगाळ असल्याने थंडीत चढउतार होत आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असल्याने थंडी हळूहूळू वाढू लागली आहे. सध्या राज्यातील बहुतांशी भागांत सायंकाळी हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे रात्रीचा किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. परंतु पहाटे चांगलाच गारवा तयार होत असल्याने गुलाबी थंडीने नागरिकांना हुडहुडी भरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गरम ऊब मिळविण्यासाठी थंड पडलेल्या शेकोट्या हळूहळू पेटवू लागले आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी भागांत किमान तापमान चार ते पाच अंशांपर्यंत घटले आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे.\nकोकणात काही भागांत किमान तापमान सरासरीएवढेच होते. तर अलिबाग, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. तर जळगाव, सातारा, नाशिक, सांगली, सातारा येथील किमान तापमान सरासरीएवढेच होते. तर सोलापूरमधील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घटले.\nमराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ४ अंश सेल्सिअसने घट होऊन ११.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली.औंरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. उस्मानाबादमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १०.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घट झाली. नागपुरात ४ अंशांनी घट झाली. उर्वरित अकोला, अमरावती, बुलडाणा येथे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटले.\nरविवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई २०.२, अलिबाग २१.२ (१), रत्नागिरी २१.३, डहाणू २१.१ (१), भिरा १९.५ (१), पुणे १४.२ (१), जळगाव १३.६, कोल्हापूर १९.३ (२), महाबळेश्वर १९.३ (२), मालेगाव १४.६ (१), नाशिक १२.५, सांगली १६.६, सातारा १६.०, सोलापूर १४.५ (-३), उस्मानाबाद १०.४, औरंगाबाद १३.४, परभणी ११.६ (-४), नांदेड १४.५, अकोला १३.५ (-२), अमरावती १३.४ (-३), बुलडाणा १४.० (-२), चंद्रपूर १५.६, गोंदिया १०.६ (-५), नागपूर १०.४ (-४), वर्धा ११.०(-५), यवतमाळ ११.४ (-५).\nभारत थंडी विदर्भ नागपूर किमान तापमान हवामान\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t3737/", "date_download": "2018-04-23T11:34:10Z", "digest": "sha1:OYENQ6YD6U2RSQ62SJX7PFKHXAKZCHH6", "length": 3117, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-फुलपाखरे", "raw_content": "\nरंग तयांचे कितीक छान\nनिळे जांभळे पिवळे काळे\nमिशी तयांना नाजूक छान\nलाल गुलाबी ठिपके वरती\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nरंग तयांचे कितीक छान\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nलाल गुलाबी ठिपके वरती\nप्रेमा साठी जगणे माझे \n रंग-बिरंगी ही फुलपाखरे ,पर्यावरणाला जपती रे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/592/%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4?_%E2%80%93_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_", "date_download": "2018-04-23T11:05:33Z", "digest": "sha1:PVUQ7YJV3CNTYCCL6MSBKBCL5Y3SUO3P", "length": 7738, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nया सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत\nधुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता असा संतप्त सवाल पवार यांनी सरकारला केला. रोज वृत्तपत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बातम्या वाचायला मिळतात, पण तरीही मुख्यमंत्री आम्ही अभ्यास करतोय, समिती गठीत करतोय अशी उत्तरे देतात हे वेळकाढूपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. समिती कसली गठीत करता शेतक-यांचे किती कर्ज आहे याची आकडेवारी माहीत आहे, मग कर्जमाफी द्या अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही कर्जमाफी देऊ, असे आव्हान पवार यांनी दिले. यावेळी सभेस माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते.\nसंघर्षयात्रेच्या इंदापूर येथील सभेस प्रचंड प्रतिसाद ...\nप्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संघर्षयात्रेची इंदापूर येथील सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत आता शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून त्यासाठी हा संघर्ष आता सुरू झाला आहे. आता आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, पण या सरकारची निष्क्रियता लोकांपुढे आलीच पाहिजे. एकतर कर्जमाफी मिळाली पाहिजे नाहीतर हे सरकार जळून खाक झालं पाहिजे, असा संघर्षाचा नारा दिला. यावेळी राष्ट ...\nशेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष संपणार नाही - सुनिल तटकरे ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे समारोप होणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरी येथे विरोधकांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे सरकार आल्यापासून कोकणातील भात शेती उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे व काजू, आंब्यासारख्या महत्त्वाच्या पिकांकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून दरवर् ...\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर - सुनील तटकरे ...\nसंघर्षयात्रेच्या घोटी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर तोफ डागली. आदरणीय शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले, तसेच शेतकरी अडचणीत सापडले असताना त्यांना कर्जमाफी दिली, पण सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:47:55Z", "digest": "sha1:3ZR6JP4OXCQ5GZOBNW5AIY3BHHMIBQWN", "length": 3617, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मी मराठी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रसारण कंपनीबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nसह्याद्री (वाहिनी) • झी मराठी • ई टीव्ही मराठी • मी मराठी • झी २४ तास • ए.बी.पी. माझा • झी टॉकीज • आयबीएन-लोकमत • साम मराठी • स्टार प्रवाह\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-x367-grey-price-p8FrgB.html", "date_download": "2018-04-23T11:49:27Z", "digest": "sha1:KJDRY2MHFFMFY6J2NQZ5QYPVBDVS5JBM", "length": 17827, "nlines": 488, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे नवीनतम किंमत Mar 30, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रेफ्लिपकार्ट, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 2,199)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 70 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स क्स३६७ ग्रे वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.8 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 64 MB\nबॅटरी कॅपॅसिटी 900 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 180 hrs\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/921088", "date_download": "2018-04-23T11:38:30Z", "digest": "sha1:644UUVS6A22R634GCS22ME4VMCIGD7I6", "length": 5161, "nlines": 28, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "विकासाअंतर्गत प्रकल्प कसे लपवावे आणि संरक्षित करा - मिमल", "raw_content": "\nविकासाअंतर्गत प्रकल्प कसे लपवावे आणि संरक्षित करा - मिमल\nमाझी कंपनी नवीन वेब अॅप्सवर कार्यरत आहे आणि ही वेबसाइट आऊटसोर्स कंपनीद्वारे विकसित केली आहे (चला बीटा खाली म्हणा. कॉम ). अर्थात या साइटवर काही वापरकर्ता-व्यवस्थापन पद्धती आहेत, परंतु आघाडीच्या मोठ्या भाग आहेत, जे अगदी लॉग-इन केलेल्या वापरकर्त्यांसाठी देखील दृश्यमान असतात.\nया बीटा साइटला समतुल्य केले गेले. त्या वेबसाइटच्या विकासाखाली असताना संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे त्या पृष्ठ / डोमेनचे संरक्षण करणे माझे ध्येय आहे (i - integrated access control. ई. पासवर्ड द्वारे) आउटसोर्स वेबसाइटच्या कोडमध्ये सर्वात कमी शक्य असलेल्या घटकांसह (कारण हे अजून देव आहे).\nमी आवरण-पृष्ठाचे काही प्रकार (लॉगिंग पद्धतीसह) आणि . htaccess फाईल जी त्या आवरणाने पुनर्निर्देशन तपासते, परंतु मला आधी हा प्रश्न विचारायचा होता की त्या बाबतीत तुमचा अनुभव काय आहे हे कसे मिळवता येईल\nHTTP प्रमाणीकरण वापरा. पृष्ठास भेट देताना लोक लॉगिन बॉक्ससह सूचित करतील. जर त्यांनी लॉग इन केले असेल तर अपेक्षेप्रमाणे कार्य करते, जर त्यांच्याकडे वैध लॉगिन क्रेडेन्शिअल्स नसतील तर त्यांना \"401 - अनधिकृत\" त्रुटी आणि दुसरे काहीही मिळत नाही.\nआपल्याला याकरिता आपल्या वेबसाइट कोडची काही बदल करण्याची गरज नाही. हे आपल्या होस्टिंग कंट्रोल पॅनलमधून सक्षम केले जाऊ शकते, आपल्या. htaccess फाइल.\nहे करण्याचा सर्वोत्तम आणि जलद मार्ग आहे, आणि मला वाटते की हे अधिक बदलले जाऊ शकते तसेच प्रत्येक IP पत्त्यासाठी प्रवेश मर्यादित करणे आणि आपला स्वतःचा IP पत्ता वेबसाइटवर प्रवेश करण्याची परवानगी देणे.\nहे htaccess द्वारे केले जाऊ शकते, हा नियम जोडून:\nऑर्डर नकार द्या, परवानगी द्या\nनंतर जर आपल्याला एकापेक्षा जास्त IP पत्त्याची परवानगी द्यावयाची असेल तर फक्त दुसर्या पत्त्यांखाली जोडा\nबीटाकडे प्रशासक पक्ष असल्यास किंवा सर्वसाधारणपणे खाती असल्यास फक्त त्या वापरणे. ते प्रशासक किंवा देव म्हणून लॉग इन केल्याशिवाय साइटचे प्रस्तुत करीत नाहीत. बॉट्स लॉग इन केले नसल्यामुळे हे क्रॉल होण्यापासून देखील प्रतिबंधित करेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/special/yugpurush-lord-rama-part-1", "date_download": "2018-04-23T11:06:14Z", "digest": "sha1:72GSQP6ANLQFGDNINK22NX5DQD5PSFKQ", "length": 13796, "nlines": 129, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Yugpurush Lord Rama Part 1 | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome विशेष युगपुरुष रामाची योग्यता – भाग १\nयुगपुरुष रामाची योग्यता – भाग १\nराम हा एक मनुष्यच होता. मनुष्य म्हणूनच त्याची योग्यता पारखण्याचा प्रयत्न येथे करू. त्याला देव मानले तर योग्यता ठरविण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही; पण मग त्याच्यापासून आपणाला स्फूर्ती मिळणार नाही. तो आपल्यासारखाच माणूस होता; पण तरीही युगपुरुष कसा ठरला त्याची कारणे पाहिली तर आपणाला काही शिकता येईल व रामासारखे होता येईल. प्रत्येकाने आपल्यातूनच राम घडविण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी रामाची योग्यता पारखायला हवी.\nराम हा स्वतंत्र प्रज्ञावंत होता. प्रवाहपतित नव्हता. तो परिस्थितीचा स्वतः पूर्णपणे विचार करीत असे. बाकीच्यांचे विचार त्याच्याविरुद्ध असले तरी स्वतःचे खरे करायला तो कमी करीत नसे. त्यावरून तो जिद्दी होता, हट्टी होता, हे दिसते. क्वचित एककल्लीपणाचे स्वरूपही दिसते; पण ते जिद्दीतूनच निर्माण झालेले होते. स्वतंत्र विचार असल्यामुळेच त्याने नवीन युग चालू केले.\nएकपत्नीव्रत : नवयुगनिर्मितीचा विचार करताना प्रथम विचार करावा लागेल त्याच्या एकपत्नीव्रताचा. राम जन्मला त्या वेळी दशरथाला, रामाच्याच जन्मदात्याला तीनशे पन्नास बायका होत्या त्या काळच्या व त्यापूर्वीच्या सर्वच राजांना व बहुतेक पुरुषांना अनेक बायका असत. अनेक बायका असल्या तर पुरुष एकीवर पूर्ण प्रेम करू शकत नाही. कुठल्याच स्त्रीला त्यामुळे समाधान मिळत नाही. स्त्री समाधानी नसेल तर घरात समाधान राहात नाही, सुख नांदत नाही. साहजिकच पुरुषालाही सुखसमाधान मिळत नाही. म्हणूनच एक पत्नी असणे महत्वाचे ठरते.\nएकाच पुरुषाला अनेक स्त्रिया असतील तर उरलेल्या पुरुषांपैकी काहींना बायका मिळणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे असे पुरुष अनाचार करू लागतात. एका पतीच्या अनेक बायकांपैकी काही बायका प्रेम मिळत नसल्यामुळे अनाचाराकडे झुकतात, हे उघड आहे. यामुळे समाजाची घडी विस्कळित होते व गुन्हे वाढतात, म्हणून एकपत्नीव्रत महत्वाचे ठरते.\nस्त्रीलासुद्धा आत्मा आहे, मन आहे, विचार आहे. पुरुष व स्त्री हे दोघेही तितकेच महत्वाचे घटक आहेत. तेव्हा दोघांना सारखाच न्याय हवा या दृष्टीनेही एकपत्नीव्रत महत्वाचे आहे. स्वतःच्याच घरातील अनेक मातांची स्थिती पाहून रामाने पूर्ण विचार करून एकपत्नीव्रत अंगीकारले. त्यामुळेच तो युगपुरुष ठरला\nमातृप्रेम : रामाने आपल्या सर्व मातांवर अतोनात प्रेम केले. कैकयी सावत्र असूनही तिच्यावर रामाने खूप प्रेम केले. कैकयीनेही तितकेच प्रेम रामावर केले होते. रामाचे राज्य कैकयीने काढून घेतले तरी राम तिच्यावर रागावला नाही. तिची बाजू सत्याची होती हे पाहून स्वतःचे होणारे नुकसान त्याने सहन केले. सगळे लोक भरीला घालीत असतानाही त्याने धर्माचरण सोडले नाही सत्याचा अपलाप केला नाही. त्यानंतरही कैकयीवरच्या प्रेमात त्याने काही फरक केला नाही. राम स्वयंसिद्ध मोठा होता. कौसल्येमुळे राम महान झाला असे म्हणणे चूक आहे. कारण राम नेहमी कैकयीजवळच राहात असे.\nबंधुप्रेम : घरोघर मातीच्याच चुली, त्याप्रमाणे घरोघर भाऊबंदकी ही ठरलेलीच असते. रामाच्या घरी भाऊबंदकी निर्माण व्हावयाचा क्षण आलेला होता. लक्ष्मण व कौसल्या हे उभयता भाऊबंदकी चालू करायला उद्युक्त झाले होते; पण रामाने मोठ्या निग्रहाने हा प्रसंग सावरला. भारतातच नव्हे तर सर्व जगतात भाऊबंदकीमुळे राज्ये नाश पावली आहेत, घराणी धुळीला मिळाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामाचा हा मनोनिग्रह मोठा विलक्षण वाटतो. स्वतः पिता व माता सांगत असूनही राज्य बळकावयाला तो तयार झाला नाही रामाने भांडाभांडी करून राज्य घेतले असते, तर आज आपण रामायण वाचलेही नसते. हाही गुण युगपुरुषत्वाचा कारक ठरतो.\nलेखक:- डॉ. प. वि. वर्तक\nनवी मुंबईतील स्टार सिटी बार सील करा, मनसेची मागणी\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nदीपावलि विशेष भाग ३\nदीपावलि विशेष भाग २\nदीपावलि विशेष भाग १\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-marathwada-debt-waiver-16-lakh-application-attached-adhar-1991", "date_download": "2018-04-23T11:55:56Z", "digest": "sha1:X7UNABJ2I6RGVD3I2CHFHDHOUZKBFINZ", "length": 15238, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, in Marathwada for debt waiver 16 lakh application attached with Adhar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीसाठी मराठवाड्यातील १६ लाख अर्ज आधार संलग्न\nकर्जमाफीसाठी मराठवाड्यातील १६ लाख अर्ज आधार संलग्न\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : कर्जमाफीसाठी भरण्यात आलेल्या अर्जांपैकी राज्यात आधार जोडणी असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या ५४ लाख १७ हजार ७६५ आहे. मराठवाड्यातील १६ लाख ५३ हजार ३९७ शेतकऱ्यांचे अर्ज असल्याचे समोर आले असून, यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज आधारशी जोडणी करण्यात आलेले आहेत.\nऔरंगाबाद : कर्जमाफीसाठी भरण्यात आलेल्या अर्जांपैकी राज्यात आधार जोडणी असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या ५४ लाख १७ हजार ७६५ आहे. मराठवाड्यातील १६ लाख ५३ हजार ३९७ शेतकऱ्यांचे अर्ज असल्याचे समोर आले असून, यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज आधारशी जोडणी करण्यात आलेले आहेत.\nदीड लाखापर्यंतचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख ८३ हजार ९३२ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील १ लाख ५६ हजार १३३ शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. तसेच ४९ हजार ५०१ शेतकऱ्यांच्या अर्जाला आधार जोडलेले नव्हते, अशीही माहिती समोर आली होती.\nमराठवाड्यातून ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता १६ लाख ५३ हजार ३९७ इतकी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६ लाख ३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे आधार जोडलेले असून, ४९ हजार ५०१ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना आपले आधारच जोडले नसल्याची माहिती होती.\nदरम्यान १ ते ६६ ची माहिती विकास सोसायट्या आणि बॅंकांकडून भरण्याचे काम सुरू आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत हे काम पूर्ण झाले असून, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ऑडिटरकडूनही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nकर्जमाफीसंदर्भात सहकार विभाग, बॅंकांची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. चावडीवाचनाच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यातील अडचणी दूर करण्याचे काम ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रभावित झाले होते. आता ते उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुकीचा अपवाद वगळात सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.\nऔरंगाबाद कर्ज कर्जमाफी परभणी उस्मानाबाद\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7134677", "date_download": "2018-04-23T11:41:26Z", "digest": "sha1:O73IZ3I6LQAMGTYLQOO6UZHKSPJXNTKQ", "length": 8330, "nlines": 34, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ट्विटर ट्रॅकिंग हिवाळी ऑलिंपिकची सोय # सोची2014 च्या लांब यादीसह सोपे करते", "raw_content": "\nट्विटर ट्रॅकिंग हिवाळी ऑलिंपिकची सोय # सोची2014 च्या लांब यादीसह सोपे करते\n# सोची2014 हॅशटॅगच्या सोबत, साइटने मिडल ब्लॉगवर खालील खाती सूचीबद्ध केली आहेत ज्यात हिवाळी गेमचा मागोवा घ्या.\n@ एन बी कॉलीम्पिक्स\nसहभागी देश, संघ आणि प्रसारित भागीदारांची यादी\nट्विटरने दोनदा Semalt- संबंधित संसाधने तयार केली आहेत, एक संघ अमेरिकन साम्मनॅट अकाउंट्ससाठी आणि ग्लोबल मिमल खात्यासाठी दुसरे.\nट्विटर डेटा नुसार, जपान, रशिया आणि नेदरलँड्स गेल्या आठवड्यात पोस्ट केलेल्या मिडल ट्विट्स्टसाठी सर्वात वरच्या तीन देशांमध्ये होते (अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे). साइटवर #SOCHI ट्वीट देखील आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये मॅप केले गेले आहेत:\nसध्या, ट्विटरने दावा केला आहे की शॉन व्हाईट हा त्याचा सर्वात जास्त ऑलिंपियन आहे आणि त्याखालोखाल दक्षिण कोरियन चित्रकित्र युना किम आहे. दोन अन्य अमेरिकन क्रीडापटूंनी पँटिक केन आणि लोलो जोन्स या शीर्ष पाच ऑलिम्पिक खेळाडूंची यादी दिली.\nअपेक्षेप्रमाणे, आज रात्रीच्या हिवाळ्यातील खेळांसाठी ट्विटरचा एकमेव स्थल नाही. काल, Google ने आपल्या मुख्यपृष्ठावर ओलिंपिक लोगो पोस्ट केला, रशियाच्या विरोधी समलिंगी विधेयकाचा विरोध केला. बिंगने विवादास्पद असण्यापासून परावृत्त केले, ऑलिंपिक सुवर्ण सेमील्ट काउंटरसह ऑलिम्पिक आणि अॅथलीट्सचा मागोवा घेणार्या वापरकर्त्यांना अनेक नवीन वैशिष्ट्यांची ऑफर दिली.\nमार्केटिंग जमीन सहयोगी गॅरी प्राईज यांनी इन्स्ओडॉकवरील सोची 2014 हिवाळी ऑलिंपिकच्या तथ्य पत्रके आणि मार्गदर्शक पुस्तके यांची एकत्रित यादीही तयार केली आहे. कॉम\nया आठवड्याच्या सुरुवातीला, यावर्षीच्या हिवाळी खेळाविषयी माहिती मिळवणे इतके सोपे नव्हते. दोन दिवसांपूर्वी आमच्या भागीदार साइटवर शोध इंजिन भूमीवर प्रकाशित झालेल्या एका वृत्तपत्रात, मार्केटिंग लॅंड संपादक जिनी मार्विन यांनी \"मिठाईच्या उद्घाटन समारंभात काय सुरू करावे\" या शोधनिबंधाची एक साधी शोध शोधून काढली.(3 9)\nकोण उत्तर देऊ शकणारा एक सोपा प्रश्न होता काल मी ऑलिंपिक ओपनिंग समारंभांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी सर्व तीन इंजिनला शोधले आणि जेव्हा ते सुरू होते. मला त्वरेने शोधण्यात आले की एनबीसीची अधिकृत वेबसाईट जे यू.एस. मध्ये गेमचे प्रसारण करीत आहे, समारंभांविषयी काहीच नाही किंवा ते मिमलॅटमध्ये हवा तेव्हा. तर मागे मी शोध इंजिनकडे गेलो, माझ्या विचित्र अनुभवांची दैनंदिन क्रांती केली.\nजेव्हा ऑलिंपिकच्या शोधासाठी बिंग, याहू आणि Google ने सादर केले तेव्हा आपण यावर मार्विनचा पूर्ण लेख वाचू शकता: \"ऑलिम्पिक प्रारंभ करताना काय कराल\" शोध इंजिने उत्तर देण्यास तयार होतात.\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, व सेल्स अॅण्ड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7141002", "date_download": "2018-04-23T11:46:18Z", "digest": "sha1:N73Z5ATJL4QNJ2QVU2GRBVKBCWUGX4VZ", "length": 6106, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google Analytics आता अनकॅलेटेड डिस्प्ले ऍड आणि amp; व्हिडिओ जाहिरात इंप्रेशन Semalt", "raw_content": "\nGoogle Analytics आता अनकॅलेटेड डिस्प्ले ऍड आणि & व्हिडिओ जाहिरात इंप्रेशन Semalt\nत्यांच्या Google Analytics खात्यांमध्ये नवीन GDN च्या छाप अहवाल सक्षम करणार्या जाहिरातदारांना त्यांच्या मल्टी-चॅनेल फनेल अहवालांमध्ये दोन अतिरिक्त रूपांतरण मेट्रिक्सचा प्रवेश असेल: इंप्रेशन सहाय्यीकृत रुपांतरणे आणि रिच मीडिया सहाय्यित रुपांतरण.\nनवीन जोडलेल्या इंप्रेशन अहवालासह, जाहिरातदारांना Google सक्रिय दृश्य मापन समाधान वापरणारे 'पलीकडे जाणारे' परिमाण, एक 'विडियो वाजवून मिडलॅट' परिमाणे वापरणार्या सानुकूल विभागातील परिभाषित करण्यासाठी तीन नवीन परिमाणे देखील प्रवेश असेल. जाहिरातदारांना किती व्हिडिओ बघता येईल आणि एखाद्या वापरकर्त्याने जाहिरातीच्या 30 सेकंदांपेक्षा जास्त पाहिल्यास किंवा पूर्ण जाहिरात पाहिल्यास ते पाहण्यासाठी 'True View' आयाम माहित आहे\nGoogle Analytics नुसार, नवीन ठसा अहवाल सध्या मर्यादित जाहिरातदारांना उपलब्ध आहेत श्वेतसूची तयार करण्यासाठी, जाहिरातदारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे आणि अहवालांना गॅरंटीड प्रवेश नाही. एकदा प्रवेश मंजूर केला गेला की, जाहिरातदार GDN च्या छापच्या अहवालांना 'डेटा स्त्रोत'> 'अॅडवर्डस' वर प्रवेश करून सक्षम करु शकतो जिथे प्रत्येक लिंक्ड अॅडवर्डस खात्यासाठी नोंद आहे. तेथून, 'जीडीएन इंप्रेशन Semaltट' चालू किंवा बंद करता येऊ शकते - cctv home camera.\n(2 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओसाठी शोध हेतू करणे: Google ने कस्टम इन्टेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nव्हॅल्यू प्रॉप्सबद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\nस्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्री थांबविण्यासाठी Twitter च्या नवीनतम धोरण अद्यतनामुळे ब्रँडवर परिणाम होत आहे\n(5 9) ई-मेल मार्केटिंग रिपोर्ट: 2017 मध्ये ईमेलचा आकार 18% वाढला होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7138836", "date_download": "2018-04-23T11:41:34Z", "digest": "sha1:TWPDQKC4VLTWOXFJHUNH34GPVMHITVTJ", "length": 8125, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मार्केट कॅप बॉक्स ऑफिससाठी समान नाही: \"सोशल नेटवर्क\" च्या मागे \"जॉब्स\". \"साम्बाल्ट\"", "raw_content": "\nमार्केट कॅप बॉक्स ऑफिससाठी समान नाही: \"सोशल नेटवर्क\" च्या मागे \"जॉब्स\". \"साम्बाल्ट\"\nमार्केट कॅप बॉक्स ऑफिस कमाई सारखा नाही: \"सोशल नेटवर्क\" आणि \"द सामुदायिक\" मागे \"जॉब्स\" \" muebles sofas baratos. या चित्रपटाला 26 टक्के साखरेचा अंक मिळाला आहे, ज्याचा अर्थ आहे एकूण 9 0 पैकी 9 4 समीक्षकांनी एकत्रित चित्रपटाच्या वेबसाइटवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.\nजेथे उद्योग चित्रपट चालू आहेत, नोकरी 2010 च्या हिट सोशल नेटवर्कच्या यशाच्या तुलनेत होते. एमी पुरस्कार विजेते हारून सोर्किन आणि डेव्हिड फिंच दिग्दर्शित, द सोशल नेटवर्क बेन मेझरीक बुक द अँक्सिडेंटल बिलियनियर्स हा चित्रपट हार्व्हर्डच्या वर्गमित्र कॅमरन आणि टायलर विंकल्वॉस यांच्याकडून साइटची मूळ संकल्पना चोरून मार्क जकरबर्ग हे जगातील सर्वात मोठ्या सामाजिक नेटवर्कचे नेतृत्व कसे करायचे याबद्दल सांगते.\nरॉजर एबर्ट यांनी दावा केला की द सोशल नेटवर्क ही सर्वोत्कृष्ट चित्रपट होती 2010 आणि त्याचे रोटेन टॉमेटोज. कॉमिक स्कोर 9 6 टक्के राहिला, चित्रपटाची सर्वात मोठी संख्या $ 9 6 होती एकूण घरगुती विक्रीत 9 दशलक्षांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. येथे $ 22 4 मिलियन, सोशल नेटवर्कच्या सुरुवातीच्या शनिवार व रविवारने बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा आपल्या पहिल्या दिवसात कमाई केलेल्या नोकरी (3)\nसोशल नेटवर्क आणि जॉब्स ची निराशाजनक कामगिरी यावर्षी इंटर्नशिप च्या यशस्वीतेमध्ये विनोद जोडी विन्स वॉन आणि ओवेन विल्सन यांच्यात अभिमानाने भरलेले आहे. Google च्या मुख्यालयात आंतरीक पदांवर असलेल्या दोन वृद्ध विक्रीकर्ते म्हणून एक आघाडीची टेक कंपनी असलेली आणखी एक बॉक्स ऑफिस फिल्म, इंटर्नशिप एक सडलेले टोमॅटो मिळवून, निरर्थक पुनरावलोकने गोळा केली. कॉम अंक फक्त 35 टक्के. एंटरटेनमेंट साप्ताहिकने कॉमेडी म्हटले, \"सौम्य हसणे एक सुखद संग्रह. \"\nइंटर्नशिपच्या सुरुवातीच्या शनिवार व रविवारमध्ये अजूनही जॉब्स 10 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करते. बॉक्स ऑफिसवर आपल्या पहिल्या दिवसात 3 दशलक्ष जून महिन्यापासून, इंटर्नशिप ने देशांतर्गत विक्रीत $ 44 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली आहे. खाली की आकडेवारीची तुलना आहे\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, आणि विक्री आणि विपणन व्यवस्थापन मॅगझिन.\nव्हिडिओसाठी शोध हेतू घेणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nप्रोग्रॅमॅटिक नेटिव्ह जाहिराती का वापरायच्या पाहिजेत\n(9 1) मूल्य प्रोप्स बद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\n(9 5) रेडितने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nऍपल चॅनेलः सोशल मीडिया मार्केटिंगफेसबुकफाईच्यूज अँड अॅनालिसिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/january/17/", "date_download": "2018-04-23T11:29:52Z", "digest": "sha1:2R4DBSY577545AUH27HT7RTOOCCMCJMY", "length": 7059, "nlines": 119, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१७ जानेवारी दिनविशेष | January 17 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » जानेवारी » १७ जानेवारी दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१३\nबेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.\n१९८१: नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.\n१९५६: बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.\n१८६०: रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह.\n१९०६: कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या शकुंतला परांजपे.\n१८९५: विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.\n१९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.\n१९१३: यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४५: जावेद अख्तर (हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक).\n१७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन.\n२०००: सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/18/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA", "date_download": "2018-04-23T11:23:50Z", "digest": "sha1:SMLISFCUSAQP7LL6QMW6V2JZYII4NZTP", "length": 12714, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआदरणीय शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान - उद्योगपती राहुल बजाज\nबारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजचा नामकरण सोहळा आज केंद्रीय मंत्री अरुण जेटली, माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. Sharad Pawar, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचे आता यापुढे कमलनयन बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नालॉजी असे नामकरण करण्यात आले. त्याआधी आज सकाळी दहा वाजता बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले.\nकृषी महाविद्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले व देशाचे अर्थमंत्री या नात्याने आपण त्यात लक्ष घालावे, अशी विनंती अरुण जेटली यांच्याकडे केली. पवार म्हणाले, सध्या ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. पाण्याची कमतरता दिवसेंदिवस भासत आहे. त्यामुळे देशातील साखर उद्योग संकटात आहे. यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत. उसाचा दर व साखरेचा दर यात एकवाक्यता हवी. शेतकऱ्यांना त्यांच्या घामांचा पैसा मिळालाच हवा तरच हा उद्योग टिकेल. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन दीड महिन्यानंतर पाण्याला येणाऱ्या ऊसाच्या वाणाची लागवड केली पाहिजे. हे वाण इंडोनेशियात विकसित करण्यात आले आहे. त्याची मी पाहणी केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घातली आहे. केंद्रातील मोदी सरकारने यावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत कृषिप्रधान देश आहे. देशाच्या जीडीपीत शेती घटकाचा साधारणपणे निम्मा वाटा राहिला आहे. तो तसाच कायम राहिल्यास देशाची प्रगती झपाट्याने राहील, असे पवारांनी सांगितले.\nबारामतीत पाहुणे म्हणून आलेल्या या राजकीय व उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद दिला.\nआदरणीय शरद पवार यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करीत पाहुण्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.\n'जेव्हा देशात बारामतीसारखी १०० शहरं उभी राहतील. तेव्हा भारत खऱ्या अर्थानं विकसित होईल.' अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शरद पवार यांच्या बारामतीमधील कार्याची स्तुती केली. विकासाच्या दृष्टीकोनाने पवारसाहेब हे बारामतीचे 'ग्रँडफादर' असल्याचे प्रमाणपत्रही जेटली यांनी दिले. तसेच बारामतीचा दौरा आपल्यासाठी शिकण्याचा चांगला अनुभव आहे, असे सांगत पवारांच्या विविध संस्था व विकास कामाची स्तुती केली.\nमा. शरद पवार यांच्या मागणीला जेटलींनी सकारात्मक प्रतिसाद देताना देशाचा विकास व्हावा, हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. शेती व शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल याची आम्हाला कल्पना आहे. पवारसाहेबांनी जे मुद्दे मांडले त्यावर नक्कीच विचार होईल. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान व अनुभव मोठा आहे असेही जेटलींनी सांगितले.\n'शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान' अशी पावती प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मा. शरद पवार यांना अनुरोधत दिली. शरद पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचे त्यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केले.\nकंपनी व्यवहारात पंकजा मुंडे यांच्याकडून दोन डीन क्रमांकांचा वापर - नवाब मलिक ...\n३६ हून अधिक कंपन्यांच्या संचालिका असलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी कंपनी व्यवहारांत दोन वेगवेगळ्या डीन नंबरचा वापर केला आहे, अशी माहिती देऊन पंकजाताईंचा डबल रोल, त्यांच्या पतीच्या नावाचा डबलरोल आणि आता कंपनी व्यवहारातील डीन क्रमांकाचा डबल रोल दिसत आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काढले. या डबलरोलचा घोळ पंकजाताईंनी जनतेसाठी स्पष्ट करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.खाजगी कंपनीच्या संचालकासाठी डीन नंबर आवश्यक असतो, ...\nराष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गार ...\nउपाययोजना करण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पाहात आहेराष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गारकांद्याला हमीभाव नाही, नोटाबंदीमुळे शेतमजुरांना मजुरी देता येत नाही म्हणून नैराश्यातून येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपले पाच एकर कांद्याचे उभे पीक जाळून टाकल्याची घटना ताजी आहे. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी त्याच शेतातील जळलेले कांदे मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. सरकारने तात्काळ कर्ज ...\nमराठा आरक्षणावर चालविलेला भातुकलीचा खेळ सरकारने बंद करावा - आमदार शशिकांत शिंदे ...\nगुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा पार पडली. या चर्चेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.महात्मा गांधीजींच्या नंतर अहिंसेच्या माध्यमातून विशाल आंदोलन उभे करण्याची किमया मराठा समाजाने करुन दाखवली आहे, अशा शब्दात त्यांनी मराठा मोर्चांची स्तुती केली. सरकारने नोटाबंदीच्या बाबतीत एका दिवसात निर्णय घेतला आणि त्याला देशभक्तीचे वलय दिले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचाही निर्णय झटकन घेऊ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/450/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE.%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5.%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:32:26Z", "digest": "sha1:GZJDF7WFOCAE6QNA6ESRAVEJQBTLPT5Y", "length": 11033, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nस्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस घवघवीत यश संपादन करेल – सुनील तटकरे\nराज्यात निवडणूक होत असलेल्या १० महापालिका, २५ जिल्हा परिषदा तर २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश संपादित करेल, असा विश्वास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणत्याही जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी न करता समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील विविध जिल्ह्यांत काँग्रेस, शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी केली असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीयवादी पक्षाना दूर ठेवून काँग्रेस पक्षासोबतचा आघाडीचा धर्म पाळला, मात्र रायगड, उस्मानाबाद, सांगली यासारख्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने शिवसेने सारख्या जातीयवादी पक्षांशी उघडपणे युती करुन आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत सुनील तटकरे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे, तर रायगड, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड , लातूर, वर्धा आदी ठिकाणी काँग्रेस ,शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nराज्यात निवडणूक होत असलेल्या १० महापालिकांपैकी मुंबई , सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड आदी महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे. तर ठाणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण १३१ जागापैकी ११६ जागी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली आहे तर १५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. पुणे महापालिकेसाठी एकूण १६२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५६ जागा व काँग्रेस ३० जागा तर ७६ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. नाशिक महापालिकेत १२२ जागांपैकी ६० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ४३ जागांवर काँग्रेस पक्ष लढत आहे. नागपूर मध्ये रिपाई सोबत आघाडी झाली असल्याची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nलोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ ...\nमहाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष् ...\nसंघर्षयात्रेला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद - आ.जितेंद्र आव्हाड ...\nविरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वाढत्या महागाईविरोधात, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अशी सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी संघर्षयात्रा आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षयात्रेला मिळत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अब ...\nसरकारी रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण हे राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुवस्थेचे निदर् ...\nधुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेधधुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/vidarbha", "date_download": "2018-04-23T11:23:20Z", "digest": "sha1:UCMSAUILONRIHRQ5IFDN5TWLPR7DGJAP", "length": 10032, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "विदर्भ | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nग्रामपंचायतीने जागा दिल्यास सौरऊर्जा:- उर्जामंत्री\nनागपूर(सतिषराव औताडे पाटील) : राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने दहा एकर जागा दिल्यास दोन मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासन मदत करेल. ही वीज थेट गावशिवारातील एक हजार शेतकऱ्...\tRead more\nपक्ष बदलल्यास जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द होणार\nनागपूर(श्रीकृष्ण देशपांडे) दि. १७, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आ...\tRead more\nनागपूर विधान भवनाजवळ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वर प्रशासक नेमण्याची मागणी \nदेवस्थानांच्या भ्रष्ट शासकीय समित्या त्वरित बरखास्त करा -हिंदुत्ववाद्यांची मागणी नागपूर – सुयोग्य व्यवस्थापन देण्याच्या नावाखाली पूर्वीच्या शासनाने श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल-रुक्म...\tRead more\n2 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 100 शहरे निर्मल व स्वच्छ करणार – मुख्यमंत्री\nनागपूर : राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील 300 शहरांपैकी पहिल्यांदाच 50 शहरे निर्मल झाले अस...\tRead more\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गावात रुग्णांची हेळसांड, शासकीय नागपुर मेडिकल कॉलेजची खस्ता हालत\nवेंटिलिटेर ऑक्सिजन पासून रुग्ण वंचित नागपुर: राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या गावातील तसेच विदर्भातील सर्वात मोठे हॉस्पिटल म्हणून ज्याची ओळख संपूर्ण राज्यात आहे, अशा नागपुर मेडि...\tRead more\nमोर्शीत संत्रा केंद्र उभारणार, मुख्यमंत्री यांची विधानसभेत घोषणा, आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या मागणीला सभागृहात दुजोरा\nनागपुर:- संपूर्ण महाराष्ट्रात मोर्शी-वरुड हा परिसर संत्रा उत्पादनासाठी कॅलिफोर्निया या नावाने प्रसिद्ध आहे. या परिसरातील संञ्याला राजाश्रय मिळावा याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार ड...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:45:55Z", "digest": "sha1:5DH42WJULRWRGKCS6KPDRW55VZBDSPIC", "length": 3230, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निर्मल कुमार गांगुली - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनिर्मल कुमार गांगुली (इ.स. १९४१ - ) हे एक भारतीय सूक्ष्मजीवाणुशास्त्रज्ञ आहेत. भारतीस शासनाने यांना पद्मभूषण पुरस्कार दिला.\nइ.स. १९४१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१७ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/", "date_download": "2018-04-23T11:51:30Z", "digest": "sha1:CM6XIQBPSOPJM7EDUOC7KY2DRYTP7VJ7", "length": 3569, "nlines": 153, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nगगनचुंबी इमारतीच्या खांबाचे 7 मार्ग | Ep. # 92\nकसे डिझाइन लीड संगोपन & लीड स्कोअरिंग सेमील्ट | Ep. # 99\nआपला स्लो-वाढणारा ब्लॉग सेमील्ट निराकरण कसे | Ep. # 106\nसेमी वाल स्पॅम दुखापत करू नका आपल्या एसइओ जखमी\nनील आणि & मार्केटिंग सेमील्ट च्या पहिल्या 100 एपिसोडमधील एरिकचा सर्वात मोठा धडा | Ep. # 110\nGoogle Semalt सह सर्वोत्तम PPC जाहिरात स्थिती कोणती आहे ते शोधा\n7 आपले विपणन शब्दार्थात ऑप्टिमाइझ करण्यासाठी मार्ग | Ep. # 116\nSemaltेटमध्ये इंटरनेट मार्केटिंग आठवड्यात - 16 नोव्हेंबर\nएक विचार Semaltals होण्यासाठी 7 मार्ग | Ep. # 120\n10 मिल्टर प्रति दिन आपल्या पीपीसी मोहिमेत सुधारणा कशी करावी\nबेसिक री-मार्केटिंग Semaltेट कशी सेट करावी\nलिंक्डइन नवीन जोडणी जोडते छाननेला आमंत्रण द्या, मिमलट्रल व्यवस्थित करण्यासाठी मदत करणे\nशोध इंजिन मार्केट शेअर Semalt 2009\nस्वतःला ते एसइओ करण्यासाठी साम्प्लेट करू नका\nGoogle च्या प्रथम मोबाइल Semaltसाठी कशी तयार करावी\nGoogle Semalt मध्ये इव्हेंट ट्रॅकिंग वापरणे\nखाते-आधारित विपणन काय आहे आणि आपण ते कसे वापराल\n7 सेमीलँड जाणून घेण्यासाठी अपारंपरिक मार्ग | Ep. # 167\nGPABLO PRO आवृत्ती 2.0 प्रशासकीय वैशिष्ट्यांसह सोडियमला ​​सोडले\nऍडवर्डस जाहिरातींचे नवीन प्रदर्शन दर वाढीदरम्यान दरमहा दाखवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ratnagiripolice.gov.in/frmAchievement.aspx", "date_download": "2018-04-23T11:49:22Z", "digest": "sha1:4WAWSOO42U3C4BTQT3HW54JVWDSOVVBS", "length": 2550, "nlines": 64, "source_domain": "ratnagiripolice.gov.in", "title": "Home", "raw_content": "\nरत्नागिरी ग्रामीण पो.ठाणे ख्ुनाचा गुन्हा 8 दिवसाचे आत उघड\nमंडणगड मध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक\nविविध गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचारी /अधिकाऱ्यांचे अभिनंदन\nराजापूर पोलीस ठाणे कडून विनापरवाना हत्यार वापरणाऱ्यावंर कारवाई\nनाटे पो.स्टे कर्मचाऱ्यांकडून पाण्यात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात यश\nउल्लेखनिय कामगिरी बाबत सन्मानचिन्ह प्राप्त झालेले अधिकारी /कर्मचारी\nउल्लेखनिय कामगिरी बाबत पोलीस कर्मचारी यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक,कोकण परिक्षेत्र यांच्या हस्ते सत्कार समारंभ\nसंपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरीला व्दितीय क्रमांक प्राप्त्.\n“ लोकाभिमुख पारदर्शक कार्यसंस्कृती निमार्ण करणे ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/425/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%9C_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-04-23T11:15:07Z", "digest": "sha1:WZK7IBCHLLRSDJ6EVJV7FZTJNXXP5W3H", "length": 1742, "nlines": 29, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजयंत पाटील आज फेसबुकवर लाइव्ह\nदि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता\nकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, आ. जयंत पाटील आज बुधवार, दि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत.\nया संवादात सहभागी होऊन अर्थसंकल्पाबाबतचे प्रश्न, तसेच विविध मुद्द्यांवर जनतेला चर्चा करता येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/2/", "date_download": "2018-04-23T11:37:54Z", "digest": "sha1:FCIEJ6TNK7NA2OERAOMHJFI6CDY75MHS", "length": 7297, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान २\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nगोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला श्रीखंड आवर्जून खाल्ले जाते.\nसर्वांना आवडणारा असा हा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम (Gulabjaam) घरच्या घरी तयार करुन खाता येईल.\nमुळात बंगालचा असलेला पनीर रसमलाई हा मध्यम गोड पदार्थ आहे जो आपल्याकडे सणासुदीला, लग्नकार्यात आणि विविध कार्यक्रमांत आवडीने बनविला जातो आणि लहान मुलांचा तर हा अतिषय आवडता पदार्थ आहे.\nसणासुदीला तसेच गोड पदार्थ जो उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत वरईच्या तांदळाचे अनारसे सर्वांना आवडतील.\nप्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://guy8461.wordpress.com/2015/06/29/28th-june-2015-bhayander-churchgate-local-accident-due-to-overspeed-on-platform-no-3-in-churchgate-station/", "date_download": "2018-04-23T11:47:30Z", "digest": "sha1:IDD3SDXCNPJHUJPFS6TLVJASYHGHE25E", "length": 22982, "nlines": 206, "source_domain": "guy8461.wordpress.com", "title": "28th JUNE 2015 BHAYANDER- CHURCHGATE LOCAL ACCIDENT DUE TO OVERSPEED ON PLATFORM NO. 3 IN CHURCHGATE STATION – Shivaji Raje", "raw_content": "\nMumbai Local Train Crashes speed matters मुंबई वृत्तान्तगुजरातमधील गावठी दारूची महाराष्ट्रात विक्रीक्लासचालकांमध्ये’टायअप’वरून दोन तटआता डासांचे, साथी रोग फैलाना.. सावधानग्राहक न्यायालयाचा सॅमसंगला दणकाठाणे वृत्तान्तविशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सवस्वयंचलित जलमापकांना ‘खो’ग्राहक न्यायालयाचा सॅमसंगला दणकाठाणे वृत्तान्तविशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सवस्वयंचलित जलमापकांना ‘खो’रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदतयेऊरचा फेरफटका महागमहामुंबई वृत्तान्तधोकादायक इमारत ठरविण्यावरूनच घोळरेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदतयेऊरचा फेरफटका महागमहामुंबई वृत्तान्तधोकादायक इमारत ठरविण्यावरूनच घोळअतिक्रमणामुळे द्रोणागिरीला दरड कोसळण्याचा धोकाअतिक्रमणामुळे द्रोणागिरीला दरड कोसळण्याचा धोकाऐरोलीतील शाखेवरून शिंदे, चौगुले यांच्यात जुगलबंदीमहामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनाचे ग्रहण सुटलेनगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्तकोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त’आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळलेसोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमीलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्तावमराठवाडा वृत्तान्तऔरंगाबादेतही गारांसह पाऊसभाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणारहिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरेकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा ‘बंद’विदर्भरंगवारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..वनातलं मनातलं : निरोपाचे विडेऐरोलीतील शाखेवरून शिंदे, चौगुले यांच्यात जुगलबंदीमहामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनाचे ग्रहण सुटलेनगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्तकोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त’आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळलेसोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमीलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्तावमराठवाडा वृत्तान्तऔरंगाबादेतही गारांसह पाऊसभाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणारहिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरेकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा ‘बंद’विदर्भरंगवारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..वनातलं मनातलं : निरोपाचे विडेदखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तकगार्डनिंग : किचन गार्डन मोस्ट कमेन्टेडसुटाबुटातली गुन्हेगारीदखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तकगार्डनिंग : किचन गार्डन मोस्ट कमेन्टेडसुटाबुटातली गुन्हेगारी मोदींनी ‘राज्य धर्म’पाळावा, ‘राजे धर्म’ नाहीचिक्की खरेदीसाठीचा ठेकेदार मात्र तोच मोदींनी ‘राज्य धर्म’पाळावा, ‘राजे धर्म’ नाहीचिक्की खरेदीसाठीचा ठेकेदार मात्र तोच शेतातील रस्त्याच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला भाजपकडून पुरोहितांना कारणे दाखवा नोटीस, शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेतडावे, उजवे सगळे सवयीचे गुलामपुण्यात वाहन जळीतकांड पुरोहित यांचे ‘तो मी नव्हेच’ मोस्ट रीडमुलाशी दोन हात; पित्याच्या हातात हात शेतातील रस्त्याच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला भाजपकडून पुरोहितांना कारणे दाखवा नोटीस, शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेतडावे, उजवे सगळे सवयीचे गुलामपुण्यात वाहन जळीतकांड पुरोहित यांचे ‘तो मी नव्हेच’ मोस्ट रीडमुलाशी दोन हात; पित्याच्या हातात हातमुख्यमंत्र्यांचा आदेशच मुंडे यांच्याकडून धाब्यावर तो एक तमोगुण..यापुढेही एका दिवसातच लोकहिताचे निर्णयमुख्यमंत्र्यांचा आदेशच मुंडे यांच्याकडून धाब्यावर तो एक तमोगुण..यापुढेही एका दिवसातच लोकहिताचे निर्णयमोदी आणि संघावर पुरोहित यांचा हल्लाबोलपंकजांना विनाचौकशी निर्दोष कसे ठरवतामोदी आणि संघावर पुरोहित यांचा हल्लाबोलपंकजांना विनाचौकशी निर्दोष कसे ठरवतातलाव भरू लागले..राष्ट्रवादीकडून राज पुरोहितांचे अभिनंदन करणारे बॅनर्स\nभरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग रोखण्याचे काम फलाटाच्या एका टोकाला बसवलेले हायड्रॉलिक बफर करीत असतात, पण रविवारी चर्चगेट स्थानकात शिरलेल्या लोकलने बफरही तोडून थेट फलाट गाठले. हे असे का झाले, यावरून सध्या रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी संभ्रमात आहेत. चर्चगेट स्थानकात गाडी शिरताना ताशी ३० ते ४० किमी अशी वेगमर्यादा असते. परंतु या अपघातात वेगमर्यादेचेही उल्लंघन झाल्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.\nभाईंदरहून सुटलेली ही गाडी मरीन लाइन्स स्थानकापर्यंत व्यवस्थित आली. ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक तीनवर आली. त्या वेळी या गाडीचा वेग ३६ किमी प्रतितास एवढा होता. लोकल बफरला धडकली त्या वेळी ११ वाजून २० मिनिटे आणि ४७ सेकंद झाले होते. लोकलचा वेग ताशी २९ किमी एवढा होता. लोकल बफरला धडकून फलाटावर चढल्यावर गाडीचा वेग ताशी १९, ११, सहा आणि शेवटी तीन किमी. असा कमी होत ती अखेर थांबली. फलाटात गाडी शिरताना तिचा वेग मर्यादेप्रमाणे ताशी ३० किमीपर्यंतच असायला हवा होता, मात्र तो ताशी ३६ किमी. एवढा होता. त्यामुळे ती शिरण्याच्या आधीच तिच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकलला इलेक्ट्रो-न्युमॅटिक आणि एअर ब्रेक असतात. अनेकदा दोन वायरमधील संपर्क तुटल्याने इलेक्ट्रो-न्युमॅटिक ब्रेक प्रणाली काम करीत नाही. त्या वेळी एअर ब्रेकचा वापर केला जातो. या अपघाताच्या वेळी एअर ब्रेकचा वापर झाला असता, तर गाडी थांबविण्यात यश आले असते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ब्रेक निकामी झाल्यानंतरही वेग रोखण्यासाठी फलाटाच्या टोकाला हायड्रॉलिक बफर असतात. ३० किमी हा वेग या बफरसाठी जास्त मानला जात नाही. गाडी बफरवर आदळल्यानंतर ती मागे सरकून जागीच थांबणे अपेक्षित होते. मात्र या अपघातात बफरही उखडले गेले. त्यामुळे वेगाचा अंदाज येत नाही.\nnew tv serials promotion नव्या मालिकांच्या आगाऊ दवंडय़ाशाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून झाल्यावर परतलेल्या टीव्हीवाल्यांनी ‘ऐका…Love Birds marathi drama खुर्चीला खिळवणारे लव्हबर्ड्सगिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले…Killa review 28 june विलोभनीय चित्रप्रतिमांचा ‘किल्ला’आशय-विषयदृष्टय़ा वैविध्यपूर्ण अशा मराठी चित्रपटांमध्ये चित्रचौकटींमधून बोलणारा आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नवा…Welcome Zindagi जगण्यातला आनंदसमाजात आत्महत्येच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थी आत्महत्या…\nCelebrities hostel life राहिले दूर..’हॉस्टेल लाइफ’चं आकर्षण ते न अनुभवणाऱ्यांना नेहमीच वाटत असतं. पण…celebrities college memories फिर मिलेंगे चलते चलतेप्रत्येक वर्षी कॉलेज सुरू झाल्याच्या बातम्या आल्या, अकरावीच्या अ‍ॅडमिशनचे घोळ…freshers in colleges फ्रेशर्स आले होsssशाळेची पायरी ओलांडून आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या …friendship fundas फ्रेंडशिप फंडाज्नवीन माणसांशी स्वत:हून ओळख करून घेणं, मैत्री करणं वाटतं तेवढं…\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’\n.. हे असतील ‘झलक दिखला जा ८’मधील स्पर्धक\n.. हे असतील ‘झलक दिखला जा ८’मधील स्पर्धक\nटीव्ही अभिनेता अविनाश सचदेव-शालमली देसाईचा लग्नसोहळा\nटीव्ही अभिनेता अविनाश सचदेव-शालमली देसाईचा लग्नसोहळा\nआलिशान कारमध्ये गर्भिलग चाचणी करण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री सांगलीतून…\nमहाराष्ट्रात दारूबंदी होण्याचा दिवस आता दूर नाही, प्रत्येक…\nभाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट…\nभरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग…\nदेशवासीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू…\nपरराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना ललित मोदी प्रकरणामुळे…\nदडपणाखाली खेळणाऱ्या भारताच्या बचावावर जोरदार आक्रमण करीत ऑस्ट्रेलियाने…\nजागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत युवा खेळाडूंचा…\nजगभरात मध्यवर्ती बॅंकांची सध्याची अयोग्य धोरणेच अर्थव्यवस्थेला १९३०…\nजागतिक अर्थव्यवस्थेत १९३० सालच्या महामंदीसारखी लक्षणे हळूहळू सर्वत्र…\nअल्पसंख्याक कोटय़ातील रिक्त जागा इतर भाषक आणि धार्मिक…\nगेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या…\nReduced School Bag Weightसंपादकीयस्मृती’भ्रंश’…\nआयआयएम्स महाविद्यालयांची एकत्र मोट बांधण्याचा इराणीबाईंचा प्रयत्न असून…\nबिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचीचे वैशिष्टय़…\nस्थळ, काळ बदललं.. पण विष पसरतच राहिलं\nविशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून,…\nleft right on international yoga dayमनोरंजननव्या मालिकांच्या आगाऊ…\nशाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून…\nगिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक…\nLove Birds marathi dramaनवनीतसयाजीरावांची चतुराई…\nबडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात…\nबडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस…\n28th JUNE 2015 गुजरातमधील गावठी दारूची महाराष्ट्रात विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-terre-ngopune-6631?tid=162", "date_download": "2018-04-23T11:35:22Z", "digest": "sha1:WYZG4UI7C7UFMAPTKZ3IQTQHYVGXRB72", "length": 29102, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of TERRE NGO,pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर ऊर्जेचा जागर\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर ऊर्जेचा जागर\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेने वनीकरण, शिक्षण आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच महिला गट, लोकसहभागातून संस्थेने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.\nपुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेने वनीकरण, शिक्षण आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच महिला गट, लोकसहभागातून संस्थेने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.\nशहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत पोचविण्यासाठी डॉ. विनीता आपटे यांनी २००९ मध्ये तेर पॉलिसी सेंटर या स्वयंसेवी संस्थेची पुण्यामध्ये सुरवात केली. आज या संस्थेबरोबरीने शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळा, विविध उद्योग समूह आणि पर्यावरणाविषयी काम करणारे लोक जोडले गेले आहेत.\nउपक्रमाबाबत संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनीता आपटे म्हणाल्या की, २००५ -०६ मध्ये बॅंक आॅफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या विभागाने हवामान बदल आणि पर्यावरण विषयक मार्गदर्शक पुस्तके इंग्रजीत प्रकाशित केली होती. ही माहिती ग्रामीण भागातील नागरीक आणि विद्यार्थांना कळण्यासाठी मी ही पुस्तके मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू आणि गुजराथी भाषेमध्ये भाषांतरीत केली. या पुस्तकांमुळे हवामान बदलाचे ग्रामीण भागावर होणारे परिणाम विद्यार्थ्यांना कळण्यास काही प्रमाणात मदत झाली. २००८ मध्ये बॅंकेतील नोकरी सोडून मी संयुक्त राष्ट्र संघामध्ये तीन वर्ष पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केले. यातून मला जागतिक स्तरावर पर्यावरण आणि हवामान बदलाविषयी सुरू असलेली चर्चा आणि त्याबाबत उपाययोजनांची माहिती मिळत गेली. याच दरम्यान नोव्हेंबर, २००९ मध्ये मी ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. फ्रेंच भाषेत ‘तेर` या शब्दाचा अर्थ पृथ्वी.\nआम्ही पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गाव परिसरात पर्यावरण, शालेय शिक्षण आणि ग्रामीण महिलांच्या विकासाबाबत काम करणाऱ्या संस्था, अभ्यासकांच्या मदतीने पर्यावरण, शिक्षण या विषयात काम सुरू केले. मुळशी तालुक्यातील उरवडे, पिरंगुट, घोटवडे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, महिला बचत गटांच्याबरोबरीने आम्ही विविध उपक्रम करतो. बचत गटातील महिलांना आम्ही ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन, रोपवाटिका नियोजन, बांबूपासून विविध वस्तू बनविण्याबाबत प्रशिक्षण दिले. गेल्यावर्षी संस्थेने सातारा जिल्ह्यातील बारा शेतकऱ्यांसाठी सिक्‍कीम राज्यातील सेंद्रिय शेती अभ्यास दौरा आयोजित केला होता.\nसंस्थेने पुणे शहरात वनविभागाच्या मदतीने मोकळ्या टेकड्यांवर वनीकरणाचा उपक्रम हाती घेतला. सध्या पुणे शहरातील वारजे टेकडीवर सोळा हेक्टर परिसरात वनीकरणास सुरवात झाली आहे. या टेकडीवर आत्तापर्यंत लोक सहभागातून दहा हजार झाडांची लागवड झाली आहे. यासाठी पुणे परीसरातील कंपन्यांनी रोपांची उपलब्धता करून दिली. पुणे शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोप लागवडीसाठी पुढाकार घेतला टेकडीवर वड, पिंपळ, मुचकुंद, सप्तपर्णी, कात, कडुनिंब, रूद्राक्ष, औदुंबर यासारख्या देशी वृक्षांच्या लागवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या उपक्रमातून वारजे टेकडीवर स्मृतीवन आकार घेत आहे. या ठिकाणी लोकांनी स्वतःच्या नातेवाइकांच्या नावाने झाडे दत्तक घेतली आहेत. या झाडांच्या व्यवस्थापनातही लोक सहभाग वाढतो आहे. संस्थेने या टेकडी परीसरातील जैवविविधतेचा अभ्यास करून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. पुणे शहरातील सुस परिसरातील वनविभागाच्या टेकडीवर गेल्यावर्षी वृक्षारोपण करण्यात आले. पिरंगुट येथे मुलींची सैनिक शाळा आहे. या शाळेच्या मोकळ्या जागेवर विद्यार्थिनींच्या मदतीने गेल्यावर्षी झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल मुलीच करतात.\nतेर संस्था, जेएसडब्लू फाउंडेशन आणि वनविभागाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील डोलवी, कारावी या डोंगरी भागातील आदिवासी गावात ५६ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या वनीकरणाच्या माध्यमातून गाव परिसरातील लोकांना खड्डे खणणे, रोपे लावणे आणि देखभालीतून रोजगार निर्मिती होत आहे. या ठिकाणी काही फळझाडे, बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. यातून पुढील काही वर्षांत स्थानिकांना रोजगार तयार होईल.\nसंस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत आॅनलाईन तेर आॅलिंपियाड घेतले जाते. यामध्ये देशभरातील विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी दीड लाख विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. विजेत्या मुलांना बक्षिसे दिली जातात. दर महिन्याला संस्थेतर्फे पर्यावरण विषयात काम करणाऱ्या व्यक्तिला ‘प्रकाशाचे बेट` या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.\nदुर्गम गावातील विहिरींची दुरुस्ती\nपुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या परीसरातील दुर्गम गावातील महिलांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे लक्षात घेऊन संस्थेने विविध कंपन्यांच्या सहकार्याने पिंपरी, गोसावी वस्ती, सुसाळे या गाव परिसरातील वाड्या वस्तातील सहा विहिरीचे खोलीकरण केले. काही विहिरींचे बांधकाम करून दिल्याने पाणी साठा वाढला. यामुळे महिलांचे श्रम वाचले, जनावरांना पुरेसे पाणी मिळू लागले. काही विहिरींवर सौर पंप बसविलेले आहेत. एका गावात सायफन पद्धतीने विहिरीतील पाणी गावातील टाकीत सोडले आहे. त्यामुळे गावातच पाण्याची उपलब्धता झाली. गाव परिसरातील महिलांना संस्थेने बांबू टोपल्या विणणे, बांबू कलाकुसरीबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. यातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे. मुऱ्हा खराबा हे मुळशी तालुक्यातील पंधरा उंबऱ्यांचे गाव. दुर्गम भाग असल्याने या गावात वीज पोचलेली नाही. संस्थेने या लोकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सच्या आर्थिक सहकार्याने सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे.\nकार्यक्षेत्रातील गावांच्यामध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागृती.\nशाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना सौर दिवे बनविण्याचे प्रशिक्षण. दिव्यांसाठी सुट्या भागांची भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी. हे सुटे भाग विद्यार्थ्यांना सौर दिव्यांच्या जोडणीसाठी पुरविले जातात. दिव्यांच्या जोडणीसाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मोबदला.\nराज्यातील पंचवीस गावातील शालेय विद्यार्थ्यांना याबाबत सौर दिव्यांच्या जोडणीबाबत प्रशिक्षण. दरवर्षी पाच हजार सौर दिव्यांची निर्मितीचे लक्ष्य.\nविद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवे विविध संस्था, कंपन्या विकत घेऊन ग्रामीण भागातील गरजू लोकांना देतात.\nशहरी, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये हवामान बदल आणि पर्यावरणाबाबत जागृती होण्यासाठी सोप्या भाषेत माहिती पुस्तिकांची निर्मिती. पुस्तकांमध्ये पाणी, हवा प्रदूषण, हवामान बदलाचे धोके आणि उपाययोजनांची सचित्र माहिती.\nसापशिडी, पत्यांच्या माध्यमातून मुलांना पर्यावरण विषयक शिक्षण देण्यावर भर.\nराज्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्षभर उपक्रम.\nगेल्यावर्षी खेळातून पर्यावरण शिक्षण या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ३५ शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. या उपक्रमासाठी संस्थेने प्रत्येक गावातील दहा होतकरू मुलींचा गट तयार केला. या मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी संस्थेचा हातभार.\nकास पठार परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन विषयक प्रशिक्षण.\n- ०२० - २५४४८६५०\nपुणे शिक्षण पर्यावरण महिला\nशालेय विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे वाटप.\nसौर ऊर्जेसाठी घरांवर बसविलेले पॅनेल.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले...सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच...\nशिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालनाआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि...\nसौरऊर्जेद्वारे चार हजार गावांना शाश्वत...ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना...\nदुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून...दुग्धव्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे...\nयांत्रिकीकरणाच्या माध्यमातून...कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या कवठेगावाने शेती,...\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार...शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे,...\nलोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशाऔरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज...\nडोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...\nग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट...जिल्हाभरातील १,१५१ ग्रामपंचायतींमध्ये पुढचा...\nनिर्धार, इच्छाशक्ती, एकीतून निढळने...एकेकाळी दुष्काळ पाचवीला पुजलेले गाव अशी निढळची (...\nमहिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...\nगावातील ‘स्टार्टअप’ना आंतरराष्ट्रीय...राज्यातील गाव-जिल्हा पातळीवरील स्टार्टअपना आता...\n२०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी...\nगाव बदललेल्या सरपंचांनी दिला नियोजनाचा...आळंदी, जि. पुणे : आपल्या कामाचे नियोजन करा, ते...\nजमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष द्यावे आळंदी (जि. पुणे): गेल्या काही वर्षांत जमिनीच्या...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले...आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद...\nशेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार...आळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात...\nसरपंच हाच शासन-जनतेमधील दुवा :...आळंदी, पुणे : “ग्रामविकासासाठी केंद्र व राज्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/download-spotify-for-android-iphone.html", "date_download": "2018-04-23T11:52:21Z", "digest": "sha1:5Y5GHPP4MCCCAHB4XV4MM7XTI2QIWYEU", "length": 12233, "nlines": 74, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "Spotify डाउनलोड करा ++ Android आणि iPhone साठी - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nशेअर करणे हे काळजी आहे\nआपले आवडते संगीत प्रवाहात Spotify ++ Android आणि iPhone साठी आपल्या स्मार्टफोनवरून संगीत ऐकण्यासाठी सर्वात सर्वात सोपा मार्ग. Spotify ++ आपण विनामूल्य ऐकू शकता की गाणी milions उपलब्ध. संगीत Spotify ऑनलाइन उपलब्ध आहे म्हणून आपण आपल्या गॅझेट कोणत्याही गाणी संचयित करण्याची गरज नाही ++ Android आणि iPhone साठी.\nSpotify ++ Android आणि iPhone आमच्या आवडत्या संगीत आहे की आमच्या स्वत: च्या प्लेलिस्ट तयार करण्यास परवानगी देते साठी. पण एक नवीन प्लेलिस्ट तयार, तुम्ही आळशी आहेत तर, Spotify ++ आम्ही कधीही खेळू शकतो की आधीच प्रदान प्लेलिस्ट. या प्लेलिस्टमध्ये लोक भरपूर केले होते. मध्ये प्लेलिस्ट Spotify ++ Android आणि iOS साठी साधने विविध श्रेणींमध्ये आहे. संगीत शैली आधारित आहेत, रेल्वे, सुधारणा, क्लासिक, आणि अगदी निष्पन्न होणार.\nवाचा: Viu अनुप्रयोग डाउनलोड करा\nआपण अस्तित्वात प्लेलिस्ट वर इच्छित संगीत सापडत नाही, तर, Spotify ++ आपण ब्राउझ आणि आपल्या आवडत्या संगीत शोधण्यासाठी देते. मग, आपण ऐकण्यासाठी सुरू करू शकता. Spotify सर्व संगीत ++ Android आणि iPhone मुक्त आहे. आपण सर्वत्र आणि कधीही ऐकू शकता. मात्र, आपण Spotify संगीत ऐकण्यासाठी नोंदणी पाहिजे ++ Android आणि iOS साठी. आपण एखादे खाते तयार एकदा, आपण आपला सर्व गॅझेट लॉग इन ते वापरू शकता.\nSpotify ++ अनुप्रयोग: ऑनलाइन आणि ऑफलाइन संगीत ऐका\nSpotify ++ Android आणि iPhone साठी ऑनलाइन संगीत ऐकण्यासाठी परिपूर्ण अनुप्रयोग आहे. आपण त्यावर खूप संगीत संचयित तर आपण जागा अभाव आपल्या स्मार्टफोन कोणत्याही गाणी होऊ शकते जे संचयित करण्याची गरज नाही. मात्र, Spotify ++ Android आणि आयफोन परवानगी देते आम्हाला संगीत डाउनलोड आणि आमच्या गॅझेट संग्रहित करण्यासाठी. हे वैशिष्ट्य ऑफलाइन संगीत ऐका आम्हाला देते. आम्ही इंटरनेट कनेक्शन नसेल तर तो अतिशय उपयुक्त आहे, पण आम्ही संगीत ऐकण्यासाठी करायचे.\nदेखील वाचा: पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा\nSpotify ++ Android साठी फक्त TutuApp वर उपलब्ध आहे. म्हणून, आपण Android साठी TutuApp डाउनलोड करा आणि आपल्या Android डिव्हाइसवर स्थापित करणे आवश्यक आहे. त्यानंतर, आपण Spotify डाउनलोड करू शकता ++ TutuApp वर Android साठी.\nSpotify करताना ++ आयफोन, iPad आणि इतर iOS साधने, आपण mios haimawan किंवा ipasigner.io त्यास डाउनलोड करू शकता. मग, आपण Spotify शोध घेऊ शकता ++ आयफोन आणि आपल्या iOS स्मार्टफोन डाउनलोड.\nआपण Spotify डाउनलोड करण्यासाठी स्वारस्य आहे ++ आता Android आणि iOS स्मार्टफोन\nSpotify डाउनलोड करा ++ विनामूल्य Android आणि iPhone साठी\nडाउनलोड करा आणि TutuApp स्थापित Spotify डाउनलोड करण्यासाठी ++ Android साठी. किंवा आपण iPhone आणि iPad सारख्या iOS साधने वापरत असाल तर, आपण Spotify मिळवू शकता ++ पासून iOS साठी mios haimawan किंवा ipasigner.io.\n'टाईप शोधाSpotify ++नंतर शोध बॉक्स ', Enter दाबा.\nपरिणाम यादी स्क्रीनवर दर्शवेल. Spotify टॅप करा ++ डाउनलोड प्रारंभ आणि आपल्या Android किंवा iOS गॅझेट वर प्रतिष्ठापित.\nSpotify ++ आपण घरी स्क्रीनवरील चिन्ह पाहिले तेव्हा Android आणि iPhone तयार होईल.\nई-मेल किंवा फेसबुक वापरून एक खाते तयार. आपण आपल्या आवडत्या संगीत ऐकण्यासाठी तयार आहेत.\nलक्षात ठेवा की Spotify सर्व संगीत ++ Android आणि iOS ऐकण्यासाठी मुक्त आहे. म्हणून, आपण प्रीमियम आवृत्ती करू इच्छित असल्यास आपण खरेदी करणे आवश्यक आहे. प्रीमियम आवृत्ती खरोखरच मोकळे एक चांगले आहे. आपण Spotify प्रीमियम आवृत्ती वर जाहिराती दिसणार नाहीत ++ Android आणि iPhone साठी.\nSpotify बद्दल जवळ जाणून घेण्यासाठी ++ Android आणि iPhone साठी, आपण खाली वैशिष्ट्ये तपासू शकता:\nमोफत संगीत. Spotify वर प्रदान संगीत लाखो ऐका ++ विनामूल्य.\nप्लेलिस्ट. आपल्या आवडत्या गाण्यांवर बनलेले आपल्या स्वत: च्या प्लेलिस्ट तयार करा किंवा अस्तित्वात प्लेलिस्ट ऐकण्यासाठी.\nनवीन गाणी. प्रत्येक आठवड्यात नवीन गाणी पहा.\n50% सवलत. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर, आपण फक्त खरेदी करणे आवश्यक आहे 50% Spotify मिळविण्यासाठी ++ प्रीमियम.\nएकात्मिक. Spotify ++ विविध गॅझेट एक खाते आहे अनुमती देते.\nसंगीत ऑनलाइन आणि ऑफलाइन ऐका. Spotify ++ आपण अजूनही आम्ही सिग्नल नाही जरी ऐकण्यासाठी सक्षम होऊ शकते की त्यामुळे गाणी कॅशे डाउनलोड करू देते.\nकी आपण Spotify बद्दल काय माहित असणे आवश्यक आहे ++ Android आणि iPhone साठी. त्यामुळे, आपल्या पसंतीची गाणी काय आहे टिप्पणी बॉक्स वर लिहा.\nआपण व्हिडिओ डाउनलोड करू इच्छित असल्यास, तर, आपण SnapTube अॅप डाउनलोड करण्यासाठी शिफारस. तो आपल्या गॅझेट व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी मुक्त अनुप्रयोग आहे. तपशील माहिती तपासा SnapTube अॅप डाउनलोड करा.\nपोस्ट डाउनलोडटॅग केले संगीत अॅप डाउनलोड करा, संगीत प्रवाह अनुप्रयोग, Spotify ++ अॅप डाउनलोड करा, Spotify ++ Android साठी, Spotify ++ iOS साठी, Spotify ++ iPad साठी, Spotify ++ आयफोन\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/xelectron-mq998-watch-mobile-price-p4HIfk.html", "date_download": "2018-04-23T11:47:53Z", "digest": "sha1:7ULQVXHACKYHSH24UDPDX776XMFOVYM7", "length": 15494, "nlines": 429, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "क्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये क्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला किंमत ## आहे.\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला नवीनतम किंमत Apr 16, 2018वर प्राप्त होते\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइललास्नॅपडील, होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 4,200)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला दर नियमितपणे बदलते. कृपया क्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला वैशिष्ट्य\nएक्सटेंडबले मेमरी microSD, up to 4 GB\nटाळकं तिने 3 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 24 hrs\nसिम ओप्टिव Single SIM\nक्सलेकट्रॉन MQ998 वाटच मोबाइलला\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/photo-gallery/cartoonist-suraj-kambles-wonderful-art-2", "date_download": "2018-04-23T11:26:51Z", "digest": "sha1:4BOAA2BOBFLXLDNMRKJBTYOU4V7C2W6K", "length": 6203, "nlines": 120, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Cartoonist Suraj Kamble's wonderful art part 2 | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome फोटो गॅलरी सुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nरायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या वाढवणारा अवलिया ‘प्रेमसागर मेस्त्री\nजलजागृती सप्ताहाचा समारोप, पाणी बचतीचा संस्कार रुजवावा- जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-technology-control-pink-boll-worm-agrowon-maharashtra-6023", "date_download": "2018-04-23T11:31:14Z", "digest": "sha1:GJEEENPSHBGRTJPTHRDI2LYV7PZPPHNY", "length": 28266, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, technology for control of pink boll worm, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत संपवा कापसाचा हंगाम\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत संपवा कापसाचा हंगाम\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत संपवा कापसाचा हंगाम\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत संपवा कापसाचा हंगाम\nडॉ. बाबासाहेब फंड, डॉ. विश्लेष नगरारे\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nया वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात बीटी कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान झाले. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या विभागामध्ये तिच्या प्रभावी नियंत्रणासाठी या हंगामापासूनच काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यातील फरदड न घेता वेळेवर कपाशीचा हंगाम संपवणे आणि पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन न घेणे अशा काही निर्णय त्वरित घ्यावे लागणार आहेत.\nया वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात बीटी कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान झाले. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या विभागामध्ये तिच्या प्रभावी नियंत्रणासाठी या हंगामापासूनच काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यातील फरदड न घेता वेळेवर कपाशीचा हंगाम संपवणे आणि पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन न घेणे अशा काही निर्णय त्वरित घ्यावे लागणार आहेत.\nभारतामध्ये २००२ मध्ये अधिकृतरीत्या बीटी कापूस लागवडीसाठी शासन मान्यता मिळाल्यानंतर ते लागवडीखाली आले. पुढे २००६ मध्ये बीटी-२ हे वाणही बाजारात उपलब्ध झाले. देशामध्ये कापसाखालील एकूण क्षेत्रापैकी ९३% हून अधिक क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते. दीड दशकाहून अधिक काळ बोंड अळ्यापासून संरक्षण मिळत असले तरी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव वाढत गेला. अर्थात, ही काही अचानक घडलेली प्रक्रिया नाही.\nया प्रकाराची तपशीलवार मिमांसा केली असता त्यामागील अनेक कारणे दिसून येतात. उदा. कपाशीभोवती रेफ्युजी किंवा आश्रय पिके न लावणे, कापसाचा हंगाम फेब्रुवारी आणि त्यानंतरही लांबविणे, पूर्व हंगामी कापसाची एप्रिल-मे दरम्यान लागवड करणे, प्रादुर्भावाचे योग्य वेळी निदान न होणे, या सोबत एकात्मिक नियंत्रण पद्धतींचा अवलंब न करणे इ. यातील कापसाचा हंगाम वेळेत संपविणे व पूर्वहंगामी लागवड थांबविणे या सारख्या काही कारणांमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अविरतपणे सुरू राहण्यास मदत होते. बीटी प्रमाणे अन्य घटकांबाबतही त्यांच्यामध्ये प्रतिकारकता वाढण्यास मदत होते.\nका संपवावा हंगाम वेळेतच\nचालू हंगामात महाराष्ट्रातील बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची तीव्रता व त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पीक संरक्षण विभागातील शास्त्रज्ञांनी सप्टेंबर - डिसेंबर २०१७ दरम्यान विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील जवळपास १०५ गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये प्रादुर्भावग्रस्त शेतातील नमुने तपासणीबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यातून शेतकरी वापरत असलेले उत्पादन तंत्रज्ञान, कीड नियंत्रण उपाययोजना, स्थानिक पीक पद्धती यासारखी माहिती संकलित केली. त्यातील काही महत्त्वाच्या बाबी.\nबऱ्यापैकी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागातील जवळपास ९० टक्क्यांहून जास्त शेतकरी अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान पिकाला अतिरिक्त खतमात्रा व सिंचन देतात. त्यातून कापसाचा हंगाम फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लांबवत असल्याचे निदर्शनास आले.\nयातून गुलाबी बोंड अळीला अधिक काळासाठी खाद्यपुरवठा उपलब्ध होतो. अळीचा जीवनक्रम सातत्याने सुरूच राहतो. गुलाबी बोंड अळीसाठी कपाशी हे एकमेव खाद्यपीक आहे. जगण्यासाठीच्या स्पर्धेत या किडीवर दबाव येऊन हळूहळू तिच्यामध्ये बीटी कपाशीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढीस लागली असावी. मागील सुमारे १५ वर्षांपासून संथगतीने ही प्रक्रिया होत गेली. अलीकडील २-३ वर्षांपासून गुलाबी बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत गेला. त्याचेच रूपांतर चालू वर्षी बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप होण्यात झाले.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या ९० दिवसांपासून पुढे) सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. तसेच ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हंगाम जसजसा लांबला जाईल तसतसे बोंडांवरील प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत जाते. वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच बोंडातील कापूस आणि बियांना होणाऱ्या नुकसानीची तीव्रताही वाढत जाते.\nआदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवावा. शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावेत. आताही उशीर झालेला नाही.\nअळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव तसेच यादरम्यान हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात.\nपीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढया चरावयास सोडाव्यात. पऱ्हाटीचे अवशेष जाळून टाकावेत. कोणत्याही स्थितीमध्ये पऱ्हाटी शेताच्या बांधावर साठवून ठेऊ नयेत.\nगुलाबी बोंड अळी आपल्या उपजीविकेसाठी फक्त कपाशीवरच अवलंबून असते. शेतात पीक नसल्याने खाद्य पुरवठ्याअभावी अळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.\nपूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी\nसाधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करण्याची शिफारस आहे. परंतू, सर्वेक्षणादरम्यान प्रकर्षाने आढळून आलेली दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ओलिताखालील कापूस क्षेत्रात बहुतेक शेतकरी कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान करतात. यालाच पूर्वहंगामी लागवड असे म्हणतात. आधीच मार्चपर्यंत लांबवलेला मागील पिकाचा हंगाम व एक - दीड महिन्याच्या अंतराने केलेली पुढच्या हंगामातील कपाशीची लागवड यामुळे किडीचे जीवन चक्र खंडित होत नाही. किडीसाठी वर्षभर खाद्य पुरवठा उपलब्ध झाल्याने कीड सतत कार्यरत राहते.\nगुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवड केलेल्या कापसाला पात्या लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. तसेच मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून येतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलै मध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो.\nपूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळावे. त्यामुळे जून-जुलै दरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध नसतात. त्यामुळे या अळ्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा “आत्मघाती उदय” (suicidal emergence) असे म्हणतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते. हंगामी कापूस पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यास मोठा फायदा होऊ शकतो.\nडिसेंबरच्या शेवटपर्यंत सर्व वेचणी संपवून जास्तीत जास्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पीक शेतातून काढून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये.\nकमी कालावधीत व एकाच वेळेत परिपक्व होणाऱ्या (१५०-१६० दिवस) वाणांची निवड करावी.\nसिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागात कपाशीचा हंगाम वेळेत संपवावा.\nपूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यापेक्षा उन्हाळी हंगामात येणारी पर्यायी पिके घ्यावीत. यामुळे पिकांचा फेरबदल होऊन किडीचा जीवनक्रम खंडीत होऊ शकेल. पिकाच्या फेरबदलामुळे जमिनीची सुपीकताही टिकवून ठेवता येईल.\nसंपर्क : डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५\n(पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)\nबोंड अळीचे नियंत्रणासाठी पुर्वहंगामी कपाशीचे पीक घेऊ नये.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/international/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T11:28:57Z", "digest": "sha1:XZVVMQ553TOCDWNSX7UUCCKPGN7ZPNXL", "length": 10613, "nlines": 124, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "आंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome आंतरराष्ट्रीय आंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nसंपूर्ण विश्वात पूर्वी फक्त आणि फक्त वैदिक संस्कृतीच अस्तित्वात होती. महाभारता चे युद्ध झाल्या नंतर भारत सोडल्यास संपूर्ण विश्वातील लोकांस आपल्या मूळ वैदिक संस्कृतीचा विसर पडत गेला. यास प्रमुख कारण होते ते गुरुकुल शिक्षण पद्धत बंद होत गेली ते. पूर्वी गुरुकुल संस्था हीच संपूर्ण विश्वात अस्तित्वात होती आणि वैदिक संस्कृतीचे म्हणजेच पर्यायाने संस्कृत भाषेतून ज्ञानदानाचे काम करत होती. महाभारता नंतर संपूर्ण विश्वातील गुरुकुल व्यवस्था बंद पडत गेल्यामुळे लोकांना मिळणारे संस्कृत भाषेतील शिक्षण बंद झाले. ह्या मुळे संपूर्ण जगात जागोजागी स्थानिक बोली भाषा ज्या विकृत रूपतील संस्कृतच होत्या, त्या बोलल्या जाऊ लागल्या. ह्याच मूर्तिमंत उदहारण जर कोणते असेल तर ते आहे “इंग्रजी भाषा” जी विकृत रूपातील संस्कृतच आहे.\nआता ह्याच उदाहरण देतो. ज्या देशाने संपूर्ण जगात इंग्रजी भाषेचा प्रसार आणि प्रचार केला त्या इंग्लॅण्ड (ब्रिटिश द्वीप) किंवा ग्रेट ब्रिटन किंवा ब्रिटिश आईल्स म्हंटले जाते त्याचे मूळ संस्कृत नाव आहे “आंगुली दण्ड” किंवा “आंग्ल द्वीप”. आता कसे ते पहुयात, संपूर्ण यूरोप खंड पहिल्यास तो एखाद्या तळहता प्रमाणे भसतो. किंवा दुसऱ्या दृष्टीने पहिल्यास हा द्वीप एक प्रकारचा नापदण्ड किंवा मानदण्ड सुद्धा होता, जसा एखाद्या नकाशच्या वरील बाजूस किंवा खालील बाजूस दिलेला असतो अगदी तसा. खर तर ऎसे बोल्यास चूक ठरणार नाही की, प्रकृतिनेच संपूर्ण यूरोप ची लांबी-रुंदी मोजण्यासाठीच वायव्य बाजूस (उत्तर पश्चिमी) कोपर्यात ह्या आंग्ल द्विपाची मानदण्ड मोजण्या करताच निर्मिती केली आहे. आणि ह्याच दृष्टीकोनातून वैदिक संस्कृतिवेत्त्यानी ह्या द्विपाच नाव “आंगुल दण्ड” अर्थात स्थान असेच ठेवले असणार. ह्याच आंगुलि स्थानाचा आपभ्रंश अंगुली अण्ड म्हणजेच इंग्लॅण्ड झाला. आंग्ल भूमिचे मूळ संस्कृत नाव हे आंगुली स्थान (आंगुली दण्ड) हेच आहे. ह्या आंगुली भूमिचा नापदण्ड धरल्यास आटलांटिक भूमध्य सागराच्या अजुबाजूची भूमि किंवा सागर ह्यांच्या लांबी-रुंदी ची गणना करता येऊ शकते.\nमूळ लेखक – डॉ. पु. ना. ओक\nभाषांतर – जयेश तिखे\nझोपलेले सरकार आणि कपाळकरंटे पुरातत्व खाते \nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/controversial-love-stories-of-political-leaders-190852", "date_download": "2018-04-23T11:24:03Z", "digest": "sha1:7PP6WRMZMJTFHJSBWLIZ2MHAJQDBWWTC", "length": 17055, "nlines": 112, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "देशातील राजकारण्यांची वादग्रस्त प्रेमकहाणी", "raw_content": "\nदेशातील राजकारण्यांची वादग्रस्त प्रेमकहाणी\nदेशातील राजकारण्यांची वादग्रस्त प्रेमकहाणी\nBy: एबीपी माझा वेब टीम\nप्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. प्रेमात घर-दार, जात-धर्म यांचं बंधनं झुगारुन देतात. यात सामान्य लोकच नाही तर नेतेही मागे नाही, पण ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडले. काही जण प्रेमामुळे जेलमध्ये गेले तर काहींनी धर्म बदलला. काही प्रेमकहाण्या यशस्वी तर काहींचा अंतही अतिशय वाईट झाला.\nचंद्रमोहन आणि अनुराधा : हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन आणि अनुराधा बाली यांच्या प्रेमकहाणीची खूपच चर्चा झाली होती. चंद्रमोहन विवाहित होते. पण हिंदू मॅरेज अॅक्टमुळे अनुराधा बालीसोबत विवाह करण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या. त्यामुळे दोघानी इस्लाम कबूल करुन लग्न केलं. यानंतर चंद्रमोहन यांचं नाव चांद आणि अनुराधा यांचं नाव फिझा झालं. लग्नाच्या काही महिन्यातच अनुराधा उर्फ फिझा यांचा गूढ मृत्यू झाला. एका ज्यूसच्या दुकानावर चंद्रमोहन यांची अनुराधासोबत (फिजा) पहिली भेट झाली, त्यावेळी चांद आमदार होते. हे दोघेही काही दिवस बेपत्ता होता. समोर आले, तेव्हा त्यांनी धर्मांतर केल्याचं सांगितलं. हे प्रेम फार काळ टिकलं नाही. महिन्याभरातच चंद्रमोहन यांनी अनुराधाबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली. यानंतर 2009 मध्ये दोघे वेगळे झाले. चंद्रमोहन यांच्याशी वेगळं झाल्यानंतर अनुराधाचा गूढ मृत्यू झाला.\nकॅप्टन अमरिंदर सिंह आणि अरुसा आलम : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहही यांचाही या यादीत समावेश होतो. 2007 मध्ये मुख्यमंत्री असताना कॅप्टन पाकिस्तानात गेले होते, तिथे त्यांची भेट अरुसा आलमसोबत झाली, असं म्हटलं जातं. यानंतर अरुसा चंदीगडमध्ये आले आणि एका पत्रकार परिषदेत कॅप्टनसोबत जवळीक असल्याचा दावा केला हता. मात्र याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. पण पंजाबच्या राजकारणात या प्रेमकहाणीची प्रचंड चर्चा झाली.\nमहिपाल मदेरणा आणि भंवरी देवी एकेकाळी राजस्थानच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले महिपाल मदेरणा यांचं भंवरी देवीवर प्रेम होतं. भंवरी व्यवसायाने नर्स होती. तर महिपाल विवाहित होते. या प्रेम कहाणीचा शेवट अतिशय वाईट झाला. भंवरी देवीचा गूढ मृत्यू झाला. त्यानंतर असं समोर आलं की, या दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. यामुळे भंवरी महिपाल यांना ब्लॅकमेल करत होती, असं म्हटलं जातं. खरंतर दोघांची एक सीडीही चर्चेत होती. सध्या महिपाल तुरुंगात आहेत.\nएनटीआर आणि लक्ष्मी पार्वती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदमुरी तारक रामाराव यांनी वयाच्या 70 वर्षी तेलुगु लेखिका लक्ष्मी पार्वती यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी लक्ष्मी यांचं वय नंदमुरी तारक रामाराव यांच्या मुलीएवढ होतं. कुटुंबीयांविरोधात जाऊन एनटीआर यांनी लक्ष्मी पार्वती यांच्याशी लग्न केलं. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी लक्ष्मीची साथ दिली, पण दोघांची प्रेमकहाणी फारच चर्चेत राहिली होती.\nनारायण दत्त तिवारी आणि उज्ज्वला शर्मा : उत्तर प्रदेशची माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल नारायण दत्त तिवारी आणि उज्ज्वला शर्मा यांची लव्हस्टोरीवर मोठा वाद झाला होता. या दोघांमध्ये कॉलेजच्या दिवसात प्रेम झालं होतं. मात्र 80 व्या वर्षात एन डी तिवारांनी उज्ज्वला यांच्यासोबत लग्न करुन हा वाद मिटवला. उज्ज्वला आणि तिवारी यांची ओळख 1960 मध्ये झाली होती. यानंतर उज्ज्वला शर्मा युथ काँग्रेसमध्ये गेली. सात वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव रोहित आहे. पण यानंतर तिवारी यांनी त्यांचा मार्ग बदलला. एनडी तिवारीच माझे पिता असून मला अधिकार मिळावा, यासाठी उज्ज्वला यांचा मुलगा रोहितने कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर 2012 मध्ये डीएनए तपासणीत समोर आलं की, एनडी तिवारीच रोहितचे वडील आणि उज्ज्वला शर्मा आई आहे. त्यानंतर एनडी तिवारींनी रोहितला मुलगा म्हणून स्वीकारलं.\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/22", "date_download": "2018-04-23T11:48:00Z", "digest": "sha1:P2REQQ6A7YVP5PZJRIPL336F4VDTDHNV", "length": 17543, "nlines": 176, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "निषिध्द्तेतील शास्त्रशुध्द यश", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nनाव :- श्री. सुधीर सोनटक्के\nव्यवसाय :- कन्सल्टंट सेक्सोलोजिस्ट\nव्यवसायाचे ठिकाण :- पुणे\nमानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे\nसाधारणतः २० वर्षा पूर्वी जेव्हा sex हा शब्द उच्चाराने सुद्धा वाईट समजले जायचे त्यावेळी समाजाची गरज लक्षात घेऊन सेक्सोलोजीचे शास्रशुद्ध शिक्षण घेऊन एका तरुणाने वेगळी वाट पकडली त्याला आलेल्या अडचणी आणि त्याने काढलेला मार्ग याविषयीचा हा लेख\nदेशातील तरूणांची सर्वाधिक संख्या लक्षात घेता भारताला सध्या सर्वात तरूण देश म्हणून ओळखले जाते. या युवाशक्तीच्या मदतीने भारताची लवकरच महासत्ता बनण्याची घोडदौड सुरू झाली असून विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कला, वाणिज्य आदी प्रत्येकच क्षेत्रात भारतीय विकसीत राष्ट्रांच्या तुलतेत आगेकूच करतांना दिसतात. अलीकडे या प्रगतीबाबत भारतीय व पाश्‍चात्य विचारसरणीत कमालीचे साम्य भासत असले तरी संस्कृती व परंपरेच्या पार्श्‍वभूमीवरील व्दंव्द अजूनही कायम आहे. आधुनिकतेच्या वळणावर पाश्‍चात्यांशी स्पर्धा करण्यात बहुतांश भारतीय व्यस्त असतांना त्यांच्या जीवनशैलीत कळत-नकळत होणारे पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण आजही वादाचा मुद्दा ठरतो आणि त्यातही सर्वाधिक विवाद्य मुद्दा असतो तो लैंगिकतेविषयीचा.\nकिशोरवयात लैंगिकतेविषयी निर्माण होणारे कुतुहल किंवा तारूण्याचा उंबरठा ओलांडल्यावर भेडसावणाऱ्या लैंगिक समस्या कितीही नैसर्गिक असल्या तरी त्या भारतीय व्यवस्थेप्रमाणे निषिद्धच मानल्या जातात. परिणामी योग्य वेळी योग्य प्रकारे या शंकांचे निरासरण न झाल्याने अनेकांना विविध शारिरीक व मानसिक विकारांना सामोरे जावे लागते. दिवसेंदविस या समस्यांचे प्रमाण वाढत असून देशाची प्रगती अबाधित ठेवण्याकरीता तरूणांचे स्वास्थ जपणे ही काळाची गरज झाली आहे.\nज्या युवाशक्तीवर आपण अभिमान व्यक्त करतो त्यांच्या प्राथमिक समस्यांचे किंवा शंकांचे निरासरण करण्यात आपण असमर्थ असणे ही चिंतेची बाब असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करतात. तर त्यापैकी काहीच यासाठी ठोस पाऊले उचलतांना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे पुण्यातील डॉ. सुधीर ------------\nजवळ-जवळ वीस वर्षांपुर्वी लैंगिक शंकांविषयी आपल्या मित्रांची होणारी कोंडी लक्षात घेता डॉ. सुधीर यांनी या विषयातच तज्ञ होण्याचा निर्णय घेतला. ज्या विषयाला आपल्या समाजात केवळ अश्‍लिलता म्हणून कायमच वर्ज केले गेले, तो विषय अभ्यासणे व त्यातील वैज्ञानिक पैलू इतरांना पटवून देणे हे अतिशय आव्हानात्मक होते. परंतू भारतीयांना पुर्वापार चालत आलेल्या लैंगिकतेविषयीच्या भ्रामक कल्पनांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा डॉ.सुधीर यांनी ध्यासच घेतला.\nपुर्वीपासूनच अभ्यासू वृत्ती असलेल्या डॉ.सुधीर यांनी दहा जिल्ह्यांमध्ये एकमेव असलेल्या पी.जी.ससून वैद्यकीय महाविद्यालयात ३६ क्रमांकाने गुणवत्ता यादीत येऊन प्रवेश मिळवला. १९८८ साली एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवल्यानंतर माणसाचे मन अभ्यासण्याच्या जिज्ञासेमुळे विविध शाखा खुल्या असतांना देखील मानसशास्त्र विषयात एम.डी. होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी ससून महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा आपल्यावर विशेष प्रभाव असल्याचे डॉ.सुधीर सांगतात. त्यावेळी मानसोपचार तज्ञांकडे जाणे अत्यंत कमीपणाचे वाटे किंवा मूळात आपल्याला काही मानसिक विकार आहे याचा स्विकार करण्याची वृत्तीच समाजात रूजलेली नव्हती. शिवाय काही रूग्ण आलेच तरी नक्की कोणत्या विकारासाठी कोणत्या तज्ञांकडे जावे याबाबतही प्रचंड संभ्रम असे. अशातच मानसिक विकारांवर उपचार घेण्यास येणार्‍यांमध्ये अनेक रूग्ण लैंगिक समस्यांनी ग्रासलेले असल्याचे डॉ. सुधीर यांच्या लक्षात आले.\nभारतात मात्र त्यावेळी लैंगिक समस्या म्हणजे मानसिक आजारच असे समजले जात असल्यामुळे सदर विषयाशी संबंधीत विशेष तज्ञच काय तर संपुर्ण देशात कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात याविषयी स्वतंत्र अभ्यासक्रम देखील उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना याबाबत योग्य समुपदेशन मिळून समाजात जागरूकता निर्माण होणे अवघड बाब होती. याउलट विदेशात मात्र लैंगिक समस्यांवर विविध संशोधने झाली असून या समस्यांवर अनेक वैज्ञानिक उपचारसुध्दा उपलब्ध\nहोते. अमेरिकेतील एका संशोधनानुसार केवळ तरूणांमध्येच नव्हे तर वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत कुणालाही लैंगिक विकार उद्भवू शकतात हे सिध्द झाले आहे. त्याप्रमाणे र्‍हदयरोग, मधुमेह किंवा कर्करोगांवर जसे उपचार आवश्यक असतात त्या पद्धतीच्या उपचारांची यातही आवश्यकता असल्याचे लक्षात घेत डॉ.सुधीर यांनी विदेशात जाऊन सेक्सॉलॉजी मध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.\nसुदैवाने त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या वरिष्ठांचा व कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला. डॉ. सुधीर यांचे वडीलसुध्दा डॉक्टर असून ते वयाच्या ५ व्या वर्षापासूनच डॉ.सुधीर यांना “तू माझ्यापेक्षाही चांगला डॉक्टर �\tपुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/544/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87_", "date_download": "2018-04-23T11:16:56Z", "digest": "sha1:4IX7O3JLVH4JM7D6OT2VZE6VFG2NOVKU", "length": 9062, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमहिला अभियंता हत्येप्रकरणी कारवाईची निरंजन डावखरे यांची विधान परिषद सभागृहात मागणी\nराज्यशासनाच्या मनोधैर्य़ योजनेतून बलात्कार पिडीत महिला व मुलींना रुपये १० लाख इतकी नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी श्रीमती हुस्नबानू खलिफे व इतर वि.प.स. यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेदरम्यान पोलीसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे महिला अभियंता अंतरा दास हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजूर झाल्याची बाब अतिशय गंभीर असल्यामुळे याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याबाबतची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषद सभागृहात केली.\nडिसेंबर २०१६ मध्ये कॅपजेमिनी कंपनीतील महिला अभियंता अंतरा दासची तळवडे एमआयडीसी परिसरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला बंगळुरुतून अटक करण्यात आली. सुरुवातीला देहू रोड पोलीस या हत्येचा तपास करीत होते. मात्र नंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. उपरोक्त प्रकरणी पोलीसांच्या कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे महिला अभियंता अंतरा दास हत्या प्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजुर झाला असून तो राजरोसपणे मोकाट फिरत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. हा गंभीर प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हत्या सारख्या गुन्ह्यामध्ये ९० दिवस उलटूनही आरोपपत्र दाखल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे उत्तरादाखल सांगितले.\nराज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न अर्थसंकल्पीय ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यातील विद्यापीठ उपकेंद्रांचा प्रश्न हाती घेऊन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत सात मोर्चे काढले आहेत. विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढत हा प्रश्न लावून धरला होता. आम्ही हा प्रश्न येत्या अधिवेशनात सभागृहात लावून धरणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात, शिवाजी विद्यापीठाचे सांगली व साता ...\nऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम काळे विजयी ...\nऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम काळे यांचा दमदार विजय झाला आहे. तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाचे शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुधीर तांबे यांचा देखील विक्रमी मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीनही विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे शिक्षक आमदार अशी विक्रम काळे यांची ओळख मागच्या टर्ममध्ये झाली होती. त्याम ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sudhir-sonavane.html", "date_download": "2018-04-23T11:51:32Z", "digest": "sha1:5HFFQNKSYPU5FIVHJKVDQXTZSKI5VTQB", "length": 5149, "nlines": 57, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सुधीरभाऊ चिमाजी सोनावणे\nConstituency : विधानसभा - नालासोपारा\nDesignation : जिल्हा कार्याध्यक्ष वसई - विरार (आर. पी. आय. A)\nName : सुधीरभाऊ चिमाजी सोनावणे\nFather's Name : चिमाजी रामचंद्र सोनावणे\nMother’s Name : मुक्ताबाई चिमाजी सोनावणे\nPlace of Birth: : मुंबई (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : आशालता सुधीर सोनावणे\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : सिव्हिल वर्क\nResidence Address : सिद्धिविनायक टावर, ७०२/A, मकवाना कॉम्प्लेक्स, विरार (पू.)\nOffice Address : आकाशदीप बिल्डिंग, रामू कम्पौंड, विरार (पूर्व).\nसामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती\n१९९२ - नगीनदास पाडा नालासोपारा सेक्रेटरी\n२०१० नगरसेवक वार्ड नं. ५ आर. पी. आय. बिन विरोध निवड\nलोककल्याण पतपेढी संस्थापक (सेक्रेटरी)\n१९९२ पासून माननीय रामदासजी आठवले यांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी आंदोलन, धरने, मोर्चा, उपोषण या मध्ये सामिल.\nखालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.\nपूरग्रस्तांना गरजू वस्तू ,कपडे, भांडी ,धान्याची मदत\nगुजरात भूकंपग्रस्तांना प्रत्यक्ष मदत, मेडिकल शिबीर,चष्माशिबीर\nमहाड चवदार तळे क्रांतिदिन प्रत्येक वर्षी कार्यकर्ता समवेत\nक्रांतीस्तंभ पुणे प्रत्येक वर्षी सहभाग\n१४ एप्रिल प्रत्येक वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nशिवजयंती ,महात्मा जोतिबा फुले ६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन २००४ पासून विरार शहरामध्ये आयोजित करत आहे.\nसमाज प्रबोधनाचे कार्यक्रम, तरुण पिढीसाठी प्रोत्साहन म्हणून वाचनालय, रोजगार मेळावा, क्रिकेट सामने (रायगड) भरविण्यात येतात.\nकार्यकर्ता समवेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सभा (थायलंड) व समावेश इंटर नेशनल लायन्स क्लब सभेसाठी सहभाग (रशिया)\nआर. पी. आय. च्या माध्यमातून …\nस्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...\nविविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-23T11:15:23Z", "digest": "sha1:EQSEUOST2MZFA7QYI62RK6QQ7C6WRGZX", "length": 8081, "nlines": 93, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "मेढा येथे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचा संकल्प | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome सातारा-जावळी मेढा येथे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचा संकल्प\nमेढा येथे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचा संकल्प\nजावळी तालुक्याचे प्रशासकीय कारभाराचे ठिकाण मेढा येथे पंचायत समितीच्या आवारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी सोडला आहे. हा पुतळा लवकरच साकारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यकत केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतभाऊ मानकुमरे यांना त्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.\nसातारा जिल्हा अध्यक्ष अशोक (बापू )गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्धार केला आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुतळा उभारणीसाठी लागणा-या निधीची उभारणी करण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत.\nभारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दरे बुद्रुक शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यानंतर मेढा येथे हेमंत गायकवाड (उपाध्यक्ष),जयसिंग रोकडे,बळवंत कांबळे, बळवंत बगाडे,विजय गंगावणे आदी तालुक्यातील पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने मानकुमरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी पुतळा उभारणी संदर्भात चर्चा केली. पंचायत समितीत याबाबतचा ठराव संमत करून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन मानकुमरे यांनी\nTags: nirbhidsatta.comअशोक (बापू) गायकवाडजावळीडॉ.बाबासाहेब आंबेडकरपंचायत समितीभारतरत्नमेढावसंतभाऊ मानकुमरे\nआरपीआय दरे बुद्रुक शाखेचे उदघाटन\nस्थायी सभापती सीमा सावळेंसह ८ जण आऊट: भाजपच्या 6, तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचा समावेश\nखटाव नेर येथील खून प्रकरण; चिमुरडीवर मुलाकडून अत्याचार, आईकडून मृतदेहाची विल्हेवाट\nसाता-यातील गुंडांच्या तडिपारीची शंभरी; समाजात दहशत माजविणारे मोकाटच\nआईच्या दुःखातुन सावरण्याआधीच पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचाही अंत\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=433&Itemid=623&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:42:08Z", "digest": "sha1:RGKMCKFCN7BMYECVILAJNBJD2XUYADUK", "length": 9341, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "सुंदर पत्रे", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nआज आपले सारे जीवन भकास आहे, उदास आहे, कलाहीन आहे. खेड्यापाड्यातून शास्त्रीय दृष्टी घेतलेले शेकडो तरुण जायला हवेत. परिस्थितील अनुरूप असे उपाय सुचवून, प्रयोग करून सारे जीवन त्यांनी बदलून टाकायला हवे आहे. शनिमाहात्म्याचे रडके धर्म नष्ट होऊन कर्तृत्वाचा पुरुषार्थशाली धर्म यायला हवा आहे. रोग हटत आहे, स्वच्छता येत आहे. पाण्याची सोय होत आहे. पिके वाढत आहेत, बागा फुलत आहेत, जातिभेद जाऊन मानवता येत आहे. सहकारी ग्रामोद्योग वाढत आहेत, दुभते वाढत आहे, मोकळी, स्वच्छ, स्वस्त घरे बांधली जात आहेत, ज्ञानविज्ञानकला यांचे संगोपन होत आहे- अशी भारतीय खेडी व्हायला हवी आहेत. अंगात येणे, भुताटकी, मूठ मारणे, जादूटोणे, बळी देणे, सा-या प्रथा दूर होऊन शुध्द बुध्दीचा धर्म सर्वत्र रूढ करायला हवा आहे. यालाच मी वेदधर्म- म्हणजे ज्ञानावर, अनुभवावर, विचारावर आधारलेला धर्म म्हणतो.\nमुंबईला नुकतीच 'रामराज्य' परिषद भरली. रामराज्याच्या बेट्यांना अर्थ तरी माहीत आहे का यांना धर्मातील उदात्तता कळत नाही. अनुदार वृत्तीच्या लोकांना कुठला धर्म, कुठली मानवता यांना धर्मातील उदात्तता कळत नाही. अनुदार वृत्तीच्या लोकांना कुठला धर्म, कुठली मानवता स्त्रियांचा आत्मा मुक्त केला तर का समाजाचे काही बिघडणार आहे स्त्रियांचा आत्मा मुक्त केला तर का समाजाचे काही बिघडणार आहे भारतात स्त्रियांची आजवर अवहेलना झाली. विवेकानंद स्त्रियांची दुर्दशा बघून रडले. जोवर स्त्रियांचा आत्मा मुक्त होत नाही, तोवर भारताला आशा नाही. स्त्रियाही आधी माणसे आहेत. मानवतेचे सर्व हक्क त्यांना मिळाले पाहिजेत. धर्माच्या नावाने येता जाता ओरडणारे लोकच आज धर्मभ्रष्ट झाले आहेत. उदात्ततेचा स्पर्शही त्यांच्या जीवनाला नाही. आणि गंमत ही की, काही प्रतिष्ठित स्त्रियाही धर्माचा पुळका येऊन आम्हा स्त्रियांना स्वातंत्र्य नको असे बडबडत आहेत. भारतातील कोट्यवधी स्त्रियांच्या दुर्दशेची यांना जाणीव आहे का भारतात स्त्रियांची आजवर अवहेलना झाली. विवेकानंद स्त्रियांची दुर्दशा बघून रडले. जोवर स्त्रियांचा आत्मा मुक्त होत नाही, तोवर भारताला आशा नाही. स्त्रियाही आधी माणसे आहेत. मानवतेचे सर्व हक्क त्यांना मिळाले पाहिजेत. धर्माच्या नावाने येता जाता ओरडणारे लोकच आज धर्मभ्रष्ट झाले आहेत. उदात्ततेचा स्पर्शही त्यांच्या जीवनाला नाही. आणि गंमत ही की, काही प्रतिष्ठित स्त्रियाही धर्माचा पुळका येऊन आम्हा स्त्रियांना स्वातंत्र्य नको असे बडबडत आहेत. भारतातील कोट्यवधी स्त्रियांच्या दुर्दशेची यांना जाणीव आहे का परंतु शेकडो वर्षे गुलामीत राहणा-यास गुलामीच प्रिय वाटू लागते. पुष्कळ वर्षांपूर्वी एकदा सेनापती एका गावी हरिजनवस्तीत गेले. तेथे त्यांचा तुरुंगातील एक मित्र होता. तो हरिजन मित्र भेटला. सेनापती म्हणाले, ''तुझ्या घरात काय असेल ते दे थोडे खायला. आंबील दे, भाकरीचा तुकडा दे.'' तो मित्र रडू लागला व म्हणाला, ''पूर्व जन्मी पाप केले म्हणून अस्पृश्य जातीत जन्मलो. आता तुम्हांला माझ्या घरी जेवायला घालण्याचे पाप करीन तर पुढचा जन्म आणखी कसला येईल कुणाला माहीत परंतु शेकडो वर्षे गुलामीत राहणा-यास गुलामीच प्रिय वाटू लागते. पुष्कळ वर्षांपूर्वी एकदा सेनापती एका गावी हरिजनवस्तीत गेले. तेथे त्यांचा तुरुंगातील एक मित्र होता. तो हरिजन मित्र भेटला. सेनापती म्हणाले, ''तुझ्या घरात काय असेल ते दे थोडे खायला. आंबील दे, भाकरीचा तुकडा दे.'' तो मित्र रडू लागला व म्हणाला, ''पूर्व जन्मी पाप केले म्हणून अस्पृश्य जातीत जन्मलो. आता तुम्हांला माझ्या घरी जेवायला घालण्याचे पाप करीन तर पुढचा जन्म आणखी कसला येईल कुणाला माहीत'' खरोखर मानवाने मानवाची काय ही दशा केली'' खरोखर मानवाने मानवाची काय ही दशा केली ज्या काही भारतीय भगिनीच हिंदू कायद्यांच्या सुधारणेबद्दल आकांडतांडव करीत आहेत त्यांची कीव येते.\nसुधा, तू शीक आणि पुढे सेवेला वाहून घे. स्त्रियांची मान उंच कर. त्यांची अप्रतिष्ठा कमी कर. त्यांची बुध्दी जागी कर. त्यांची हिंमत जागी कर. त्यांच्यात स्वावलंबी व निर्भय वृत्ती निर्माण कर. निर्भय होणे म्हणजे मुक्त होणे.\nपरंतु बाळ, तू अजून लहान आहेस. मी हे लिहीत आहे ह्याचे कारण लहानपणीच तुझ्यासमोर हे विचार आले तर त्यातील थोडेफार टिकतील. लहान मुलांना महान विचार लौकर समजतात असा माझा तरी अनुभव आहे.\nतु्म्हांला आता दहा दिवस सुट्टी आहे. खूप खेळा, गंमतजंमत करा, मजा कर. वनविहाराला जा. समुद्रात डुंबा. या दहा दिवसांत पोटभर मोकळी हवा, आनंद जीवनात भरून घ्या, म्हणजे पुढचे दोन महिने ती पुरेल. मग पुन्हा सुट्टी. खरे म्हणजे आपल्या सुट्टया जनतेच्या गरजेप्रमाणे द्यायला हव्यात. साहेबाने उन्हाळ्यात सुट्टी सुरू केली. आपणाला का उन्हाळ्यात शाळेत बसवणार नाही हंगामात सुट्टी द्यावी. पावसाच्या आरंभी एक महिना, मग अश्विन-कार्तिक महिन्यात आणि शिमग्याच्या सुमारास. पावसाच्या आरंभी पेरणीचे काम असते. दिवाळीच्या सुमारास पहिल्या पिकांचा हंगाम असतो. शिमग्याच्या सुमारास रब्बीच्या पिकांचा हंगाम. शेतक-यांना या सर्व हंगामात मजूर भरपूर मिळत नाहीत. विद्यार्थ्यांनी जावे खेडोपाडी, काम करावे, मजुरी मिळवावी. स्वराज्यात सारे बदलायला हवे आहे. साहेबी थाट जाऊन, साहेबी सोयी जाऊन जनतेला अनुरूप सारे व्हायला हवे आहे. स्वराज्याचा आत्मा अजून दिसत नाही असे जे म्हटले जाते, त्याचा हाच अर्थ.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-tillege-good-soil-management-agrowon-maharashtra-6209", "date_download": "2018-04-23T11:34:46Z", "digest": "sha1:XP3SKLAMMERCVKIPUELGU4J7YEPGLUU5", "length": 21612, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, tillege for good soil management, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. मेहराज शेख, पी. बी. गोखले, एस. व्ही. पडलवार\nरविवार, 4 मार्च 2018\nमशागतीचे अनेक फायदे असले तरी गेल्या शतकामध्ये त्याचा अतिरेक होत गेला. जसजशी मोठी, ताकदवान यंत्रे उपलब्ध होत गेली, तसा मानवाचा मातीच्या उलथापालथीचा वेग वाढला. त्याचा फटका सुपीकतेला पर्यायाने पिकांच्या उत्पादनवाढीला बसला. यांत्रिक मशागत आणि शून्य मशागत या सध्या प्रचलित असलेल्या दोन्ही विचारसरणीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.\nपीक उत्पादनासाठी जमिनीची मशागत केली जाते. मशागतीच्या अनेक पद्धती आहेत. त्यात उदा. बीजरोपणासाठी छोटी छोटी छिद्रे तयार करणे, टोकणी, हाताने लागवड अशा अत्यंत सोप्या पद्धतीपासून यंत्राद्वारे क्लिष्ट अशा पद्धतीचा समावेश होतो.\nमशागतीचे अनेक फायदे असले तरी गेल्या शतकामध्ये त्याचा अतिरेक होत गेला. जसजशी मोठी, ताकदवान यंत्रे उपलब्ध होत गेली, तसा मानवाचा मातीच्या उलथापालथीचा वेग वाढला. त्याचा फटका सुपीकतेला पर्यायाने पिकांच्या उत्पादनवाढीला बसला. यांत्रिक मशागत आणि शून्य मशागत या सध्या प्रचलित असलेल्या दोन्ही विचारसरणीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.\nपीक उत्पादनासाठी जमिनीची मशागत केली जाते. मशागतीच्या अनेक पद्धती आहेत. त्यात उदा. बीजरोपणासाठी छोटी छोटी छिद्रे तयार करणे, टोकणी, हाताने लागवड अशा अत्यंत सोप्या पद्धतीपासून यंत्राद्वारे क्लिष्ट अशा पद्धतीचा समावेश होतो.\nप्राथमिक मशागत : खोल नांगरण, यंत्राद्वारे जमिनीची उलटापालट इ.\nद्वितीय मशागत : जमीन समांतर करणे (लेव्हलिंग), पट्टा पद्धत, सरी वरंबा तयार करणे, उतार कमी करणे, मातीचे बांध घालणे, पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे इ.\nयातील काही पीक लागवडीपूर्वीच्या व काही पिकात आंतरमशागतीसाठी अवलंबल्या जातात.\nशेतीच्या सुरवातीपासूनच माणसाने बीजरोपणासाठी हातापासून ते उपलब्ध साधनांचा वापर केला आहे. त्यातील कौशल्ये हळूहळू विकसित होत गेली. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात अधिक ताकदवान यंत्रे उपलब्ध झाल्याने जमिनीत अधिक खोलपर्यंत उलाढाल शक्य झाली. काम सोपे व कष्ट कमी झाल्याने या पद्धती जगभर स्वीकारल्या गेल्या. मात्र, याचे दुष्परिणामही त्याच काळात दिसून येऊ लागले. अठराव्या शतकाची अखेर ते एकोणिसाव्या शतकाची सुरवात या काळात युरोप अमेरिकेत अनेक धुळीची वादळे उठली. त्याचे मूळ अन्य कारणांइतकेच मशागतीच्या बदललेल्या पद्धतीत असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दशकापासून जगभरात किमान मशागत ते शून्य मशागत तंत्रापर्यंतचा प्रवास झाला आहे. वास्तविकत: हे जुनेच तंत्र आहे. मात्र, मध्यंतरी यंत्राच्या वाढत्या सुधारणांमुळे जमिनीची उलथापालथ करण्याची क्षमता वाढली. परिणामी जमिनीच्या सुपीक थरांचा विचार न करता जमिनीची खोल मशागत, सपाटीकरण यांनी वेग घेतला. त्याचा सर्वाधिक फटका जमीन सुपीकतेला बसला. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडेशन होत गेल्याने जमिनीची उत्पादनक्षमता घटत गेली आहे.\nजगभरात आज पारंपरिक मशागत पद्धती आणि शून्य मशागत या दोन्ही विचारसरणीचे पुरस्कर्ते आणि विरोधक आहेत. मशागतीच्या दृष्टीने सकारात्मक असलेल्या गटांच्या दृष्टीने खालील फायदे महत्त्वाचे ठरतात.\nमातीतील वायू व पाणी यांचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे बिजांकुरणासह मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.\nजमिनीवर यंत्रांचा किमान दबाव.\nकिडी व रोगकारक घटकांचे सुप्तावस्था जमिनीतून उन्हात आल्याने नष्ट होण्यास मदत.\nशून्य मशागत तंत्राचे पुरस्कर्ते मात्र जमिनीमध्ये मशागतीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या खोलवर उलथापालथीला आक्षेप घेतात. या दोन्ही विचारसरणीतील सकारात्मक बाबींचा विचार करू. त्यानुसार जमिनीचे खालील दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.\nमशागतीची गरज असलेले माती प्रकार कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागतही चालू शकणारे माती प्रकार.\nचिकण मातीचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी चिकण मातीचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक.\nकेवोलोनाईट आणि इलाईट प्रकारचे खनिज असतात. सेमेकटाईट या खनिजाचे प्रमाण अधिक असते.\n१ः१ आणि २ः१ प्रकारची क्ले (चिकण) माती २ः१ प्रकारची क्ले (चिकण) माती\nयेत्या दशकात भारतासह जगभरात कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब क्रांतिकारक बदलासाठी कारणीभूत ठरू शकेल. त्यातून यंत्राद्वारे जमिनीवर पडणारा दबाव कमी होईल. जमिनीवर कायमस्वरूपी वनस्पतींचे आच्छादन ठेवल्याने जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल.\nयांत्रिक मशागत व मशागतरहित शेतीसंदर्भात लुधियाना (पंजाब) येथील बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया येथे प्रयोग सुरू आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यातील बारकावे प्रत्यक्ष अभ्यासण्याचा योग आला. त्यातून संवर्धित शेतीचे महत्त्व, गरज आणि आवश्यकता अधोरेखित होत आहे. त्याविषयी पुढील भागामध्ये पाहू.\nसंपर्क : डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४\n(मृदशास्त्रज्ञ, मृदशास्त्रज्ञ पथक, परभणी)\nयंत्र शेती चला जपूया मातीचा वारसा\nआच्छादनासह तयार करण्यात आलेले पट्टे व मशागतीनंतर तयार करण्यात आलेले वाफे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/photo-gallery", "date_download": "2018-04-23T11:17:31Z", "digest": "sha1:TQX5BNHHEKUK7PIEWZ3MLKURPRA5ASLJ", "length": 7773, "nlines": 136, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "फोटो गॅलरी | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nआमचे छायाचित्रकार संजय प्रजापति यांनी टिपलेले अप्रतिम छायाचित्र ठिकाण: कोपरखैरणे सेक्टर ५, ६, ७, ८ – नवी मुंबई सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ अध्यक्ष: श्री. नंदकुमार अरुण म्हात्रे सचिव: श्री...\tRead more\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\tRead more\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\nपहा भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य. आमचे छायाचित्रकार जसपाल खालसा यांच्या कॅमेरातून टिपलेली अशीच काही दृश्य. आणखी दृश्यांसाठी लाईक करा त्यांच्या फेसबुक पेजला\tRead more\nसंजय प्रजापती यांची वन्यजीव फोटोग्राफी\nआमचे छायाचित्रकार संजय प्रजापती यांनी त्यांच्या कॅमेरातून टिपलेली अप्रतिम दृश्य अश्याच दृश्यांसाठी लाईक करा त्यांच्या फेसबुक पेज ला\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5355", "date_download": "2018-04-23T11:32:51Z", "digest": "sha1:6DZWVKVBNAHH5XLK756N43P7H5MMCCWQ", "length": 27247, "nlines": 141, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "जीवनाच्या चार आौमातून ूगित - Publisher's Desk > Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nPublisher's Desk > Marathi - मराठी > जीवनाच्या चार आौमातून ूगित\nजीवनाच्या चार आौमातून ूगित\nआौम धमार्ने िदलेली सद्बुिद्ध वापरून जीवनाच्या ूत्येक दशकाच्या थोरवीची आिण जीवनाच्या हेतूची वृिद्ध होते परन्तु त्यासाठी नवीन िवचार करणे आवँयक आहे\nलंडनमध्ये राजीवची शाळेतली िमऽमंडळी म्हणजे दंगामःती करण्यात वःताद, जोमदार, कशाची काळजी नसलेले, आिण भिवंयाची िचंता नसलेली मंडळी होत. त्यांच्या मते राजीव एक थंड ूकृतीचा हुशार, देखणा, आवडेल असा, परन्तु जीवनाचा आनन्द िमळवायला चुकलेला. “आपण आयुंयात एकदाच तरुण असतो”, जेरेमी त्याला रागावून म्हणाला. “आमच्यासोबत मजा करायला कां येत नाहीस” पण राजीव एका वेगळ्याच िवश्वांत वावरत होता. त्याच्या आ ईविडलांकडून त्याने हे िशकून घेतले होते की मानवाचे जीवन हे चार अवःथांनी मोजले जाते. आिण आपला पुनःपुन: पुनजर्न्म होत असतो. आिण म्हणून आपण अनेकदा तरूण असतो. तो आपली शिक्त महत्वाच्या कामांसाठी राखून ठेवतो, गृहःथाौमाच्या तयारीसाठी आपले ज्ञान आिण चािरत्र्य यांचे वधर्न करतो. िवशीच्या वयात आल्यानंतर आपण गृहःथाौमी हो ऊ अशी त्याची कल्पना होती. िवनाकारण वेळ वाया घालवण्याची त्याची इच्छा नाही. एका सुसंःकृत मुलीशी लग्न करून ितच्याबरोबर आपले आयुंय घालवून आपली सन्तित या जगात आणण्याची त्याची अपेक्षा आहे. राजीव आपल्या वृद्धावःथेचाही िवचार करतो, जेव्हा राजीवने आपले कायर् पूणर् केलेले असेल आिण अनािदिनधन राजीव आपल्या आत्मरूपात अंग काढून घेवून ॄाह्मीिःथित ूाप्त करण्याच्या ूयत्नात आपले पृथ्वीवरचे उरलेले आयुंय घालवेल. रािजवला याची खाऽी झालेली आहे की जीवनाच्या ूत्येक अवःथेचा एक िवशेष उद्देश आहे. आिण ूत्येक आौम त्याच्या आधीच्या आौमापेक्षा ौेयःकर आहे. सद्यिःथतीत तो शक्य िततका अभ्यास करून मध्येमध्ये थोडावेळ खेळेल असेच त्याने ठरवले आहे.\nराजीवची ही योजना मानवाचे आयुंय चार अवःथामध्ये ज्यांना आौम म्हणतात त्या अवःथामध्ये िवभागलेले असते या िहन्दुधमार्च्या परंपरेवर आधािरत आहे. हे िवभजन, ज्याला आौमधमर् म्हणतात, ते आयुंयाच्या या चार आौमातून वाटचाल होत असतांना शिरर, मन आिण भावना यांचा िवपाक होण्याचे हे एक नैसिगर्क ूदशर्न आहे. हा आौम धमर् सहॐाविध वषार्पूवीर् िनमार्ण करण्यात आला आिण धमर्शाऽात त्याचे पूणर्पणे ःपष्टीकरण करण्यात आले आहे. आपले आयुंयातील कतर्व्य तारुण्य, ूौढावःथा, वयःक अवःथा आिण वृद्धावःथा या अवःथामध्ये अगदी िभन्न असते हे त्यात ूकषार्ने दाखवून िदले आहे. मैऽेयी उपिनषदात म्हटले आहे: “सांूत आौमातील कतर्व्याचे पालन करणे हाच एक िनयम आहे. इतर त्याच्या शाखा आहेत. कतर्व्य केल्यानेच मानवाची ूगित होते. उलट मागार्ने गेल्यास अधोगित होते.”\nडॉ राधाकृ ंणन ् यांनी आपल्या “िहन्द ु धमाचर् ा जीवनाबद्दल दृिष्टकोन” (The Hindu View of Life) या मन्थात सारांशाने असे व्यक्त केले: “हे चार आौम- ॄह्मचयर् अथवा िशक्षणाची अवःथा, गृहःथ अथवा संसारी, वानूःथ अथवा सामािजक बन्धनांची िढला ई करणे, आिण संन्यास अथवा वैराग्य आिण मुक्तीची ूितक्षा करणे - यांनी असे दाखवण्यात येते की हे जीवन चातुवर्णार्ौमातून एका सनातन जीवनाची याऽा आहे.\nजाित आिण िलंगभेद यांचा िवचार न करता सवर् िहन्दु धमीर्यांसठी हा दृष्टाथर् हजारो वषार्पूवीर् जेवढा महत्वपूणर् आिण मौल्यवान होता तेवढाच आजही आहे. परन्तु ह्या ूाचीन वणर्नांचे आधुिनक जीवनासाठी पिरपूण र् रुपान्तर कदािचत ् होणार नाही. भारतातल्या वैिदक काळापासनू समाज आता खूपच बदललेला आहे. उदाहरणाथर्, ५० वषर् वयाच्या व्यक्तीला अन्नासाठी िभक मागत जंगलात जा ऊन वानूःथी होणे शक्य नाही. एकिवसाव्या शतकातला समाज हे मान्य करणार नाही. काही देशात तर हे वानूःथी ःवतःचे घर नसलेले ोात्य, त्यातून भुकेले, लोक समजून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात ये ईल. जीवनाच्या या नैसिगर्क पिरणामवादाच्या सद्बुिद्धचा वतर्मान िहन्दु धमीर्यांनी उपयोग करून घेण्यासाठी याचे थोडे पुन्हा िववरण करायला हवे. सुरुवातीला या आौमांचे पारंपािरक वणर्ने बघु या.\nूथम आौम आहे ॄह्मचयर्, िवद्याथ्यार्चे जीवन. या आौमातील लोकांना ॄह्मचारी, िदव्य आचरण करणारे, असे म्हणतात. सवर्साधारणपणे वयाच्या सातव्या िकंवा आठव्या वषार्पासून एकोणीस ते वीस वषार्पयर्न्त बारा वषार्चा हा काळ असतो. िवद्याथीर् गुरुकुली राहायचा आिण धमर्मन्थ, तत्वज्ञान, िवज्ञान आिण तकर् शास्तर् यांचा अभ्यास करायचा. वैिदक पद्धतीने यज्ञ कसा करायचा हे देखील त्याला िशकवण्यात यायचे. ॄह्मचायार्कडून वतर्णुकीच्या अत्यन्त कडक िनयमांचे पालन अपेिक्षत होते. ॄह्मचयर्, सत्यवचन, भाषामाधुयर्, शािरिरक तप, उदाहरणाथर्, थंड पाण्याने ःनान, आिण राऽी िमताहार. गुरुची सेवा आिण घरकाम हेही या िवद्याथ्यार्च्या िशक्षणाचे अंग होते\nदुसरी अवःथा आहे संसारी व्यक्तीची. गृहःथाौम आिण या आौमातल्या लोकांना गृहःथी (गृहःथाौमी) म्हणतात. िशक्षण पूणर् करून ःवगृही परत आल्यावर या िवद्याथ्यार्ने लग्न करावे, ःवतःचे कुटुंब वाढवावे, सद्धमार्ने कायर् करून आपल्या बायकोमुलांचे पोषण करावे, आपल्या आ ईविडलांना मदत करावी, आिण धमार्दायासाठी उदारहःते दान करवे अशा अपेक्षा असत. त्याच्या धािमर्क कतर्व्यात धमर्मन्थांचे अध्ययन आिण दैिनक वैिदक यज्ञ यांचाही समावेश होता.\nितसरी अवःथा आहे वानूःथ. घरदार, कुटुम्ब सोडून वनात जा ऊन एकान्तात राहणे आिण ध्यान करणे यांची. या लोकांना वानूःथी, वनात राहणारे, म्हणतात. शास्तर् असे सांगते की सवर्साधारणपणे वयाच्या ५० ते ५५ वषीर्, नातवंडांचा जन्म झाल्यानंतर, गृहःथी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवून वनात िनवृत्त होतो. त्याची पत्नी त्याच्याबरोबर तपस करायला तयार असेल तर तो ितला बरोबर घे ऊन जातो अथवा ितला आपल्या मुलंजवळ सोडून जातो. तेथे जीवनाच्या अिन्तम अवःथेसाठी तयारी करण्याच्या उद्देशाने त्याने रोज यज्ञ करावा, ॄह्मचयर् पाळावे, आिण आपले जीवन परमेश्वराचा अध्यास करण्यास वाहून टाकावे, यांतच आपले िदवस घालावयाचे असतात.\nधमर्मन्थात िदलेली चौथी अवःथा आहे संन्यास, सवर्संगपिरत्याग करणे. या आौमतल्या लोकांना संन्यासी म्हणतात. जेव्हा वानूःथीला पुरेशी आत्मशिक्त िमळून आपल्या सवर् संपत्तीचा त्याग करून त्याची िभक्षुकाचे जीवन जगण्याची तयारी झाली की आपल्या पत्नीची काळजी आपल्या मुलांवर सोपवून वानूःथी संन्यासाचा िःवकार करतो. या आौमात त्याने जागोजागी िफरून अन्नाची भीक मागणे, जपजाप्य, ध्यान, इष्टदेवतेची पूजा, आिण धमर्मन्थांवर अनुध्यान ह्या गोष्टी करवयाच्या असतात.\nयानंतर या ूाचीन आौमांच्या वणर्नांचे सद्य पिरिःथतीत कसे योजन करता येईल याचा िवचार करतांता माझे गुरु िशवाय शुॅमुनीयःवामी यांनी अशी िवचारणा केली की ूत्येक आौम स्तर्ीपुरुष दोघांनाही लागू पडेल असा चोवीस वषार्ंचा काळ असतो. आयुंयाचे पिहले २४ वषर् ॄह्मचयर्, गृहःथ वयाच्या २४ ते ४८ वषार्पयर्न्त, वानूःथ वयाच्या ४८ ते ७२ वषार्पयर्न्त आिण वयाच्या ७२ व्या वषार्नंतर संन्यास.\nॄह्मचयार्चे उद्देश आजही तेच आहेत परंतु काही बाबतीत, उदाहरणाथर्, िवद्याथ्याने गुरुच्या घरी राहणे, ते लागू पडत नाहीत. खरेतर तारुण्यात जो व्यवसाय करायचा असेल त्यातच िवद्याथीर् िशक्षण घेतील. धिमर्कतेसाठी िहन्दुधमार्ची मूलतत्वे िशकायला हवीत आिण त्याबरोबर मंऽ पाठ करायचे आिण घरच्या देवघरात देवाची पूजा करायला िशकले पािहजे. वैिदक यज्ञाच्या ऐवजी आधुिनक काळात आता पूजा करण्याची ूथा सुरु झाली आहे. िवद्याथ्यार्ंना ःवयंिशःत, ॄह्मचयर् आिण इतर योग्य गुण िशकवले पािहजेत.\nगृहःथाौमाचे वणर्नानेही काळाची पिरक्षा यशःवीिरत्या िदली आहे. याचा ूमुख केन्ििबन्दु आहे लग्न आिण मुलांना वाढिवणे वत्तर्िवणे. ःवतःच्या व्यवसायातून समाजसेवा करणे, धनाजर्न करणे, वृद्ध लोकांची काळजी घेणे, आिण दान करणे. दैिनक पूजा घरी केली जाते आिण आदशार्ने संपूणर् कुटुम्ब ह्या पूजेला उपिःथत असते. आज गृहःथाौमी आपल्या मुलांसाठी िहन्दुधमार्चा ूमुख िशक्षक असतो. ूाचीन काळी ह्या कतर्व्याचे पालन गुरु करायचे. हा गृहःथाौम ःवतःच्या व्यवसायाची आिण कुटुम्बाची ूगित करत असतांना बाहेरच्या जगात भरपूर काम करण्याचा काळ आहे.\nवानूःथाौमाची आधुिनक व्याख्या करतांना जुन्या व्याख्यांचा पुन्हा िवचार करावा लागतो. वयाच्या अठ्ठेचािळसाव्या वषीर् वनात जा ऊन राहणे बहुतेकांना जमणार नाही. त्या ऐवजी माझे गुरु या काळाचे नवीन पीढीला एक सहज ूौढ उपदेशक म्हणून मदत करण्याचा काळ असे वणर्न करतात. ॄह्मचयार्ौमी आिण गृहःथाौमी वानूःथ्यांचा सल्ला घे ऊन त्यांच्या वषार्नुवषार्च्या अनुभवाचा फायदा करून घेतात. उदाहरणाथर्, या वयाचे अनेक िहन्दु लोक युवकयुवतींच्या संघाला ूौढत्वाने उपदेश करणे, बालबािलकांना िहन्दु धमर् िशकवणे, देवालयांच्या िजम्मेदार सभेचे सदःय हो ऊन कायर् करणे िकंवा लौिकक संघटनांमध्ये पुढाकाराचे कायर् करणे, इत्यािद कामे करतात. व्यवसाय आिण सामािजक जीवनातून हळुहळु िनवृत्त होतांना आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचा हा काळ आहे.\nसन्यासाौमाचे क्षेऽही आता वाढले आहे. आधुिनक िहन्दु लोकांपैकी फारच थोडे लोक िनवृत्त झल्यानंतर संन्यास घेतात, या िवश्वाचा त्याग करतात, आिण ज्यांनी आपल्या वयाच्या िवशीत ते ितशीत िभक्षुकी घेतली होती अशा हजारो साधु संन्यासांमध्ये िफरतात. अिववािहत, िवधुर, आिण िवधवा लोकांना हे करणे शक्य आहे, भरतात काही भागात, जेथे समाज अशा स्तर्ीपुरुषांचा मान राखून त्यांची काळजी घेतो, तेथे हे शक्य आहे. परन्तु जगात बहुतांशी याबद्दल समज नाही आिण मान्यताही नाही.\nवयाच्या ७२ व्या वषार्त पदापर्ण करत असलेल्या अनेक िहन्दु लोकांनी मला आयुंयात पुढे वेगळे काय करावे हा ूश्न िवचारला आहे. माझा त्यांना असा सोपा सल्ला आहे की त्यांचे जे अनुष्ठान चाललेले असेल तेच त्यांनी अिधक कडकपणे पाळावे. आपण जर रोज ३० िमिनटे पूजा करीत असाल तर ती एक तास करा. तुम्ही रोज अधार् तास ध्यान करीत असाल तर ते एक तासापयर्न्त वाढवा. तुम्ही वषार्तून दोन आठवडे याऽेला जात असाल तर ती याऽा एक मिहन्यापयर्न्त वाढवा. एकदा या बदलांची सवय झाली की आपण साहािजकच आपल्या अनुष्ठानांवर जाःत वेळ देण्यास ूवृत्त होतो. वयाच्या ७२ व्या वषार्नंतर शािरिरक शक्तीचा ॑ास व्हायला सुरुवात झाली की अन्तमुर्ख हो ऊन जगाच्या घडामोडीतून आपले अंग काढून घ्यायची वेळ आली आहे असे समजावे.\nमाझ्या गुरुंनी या ितसढया आिण चौथ्या आौमाचे सद्यिःथतीत उपयुक्त ठरेल असे वणर्न केले आहे, ते असे: “जीवनाच्या या उत्तरांगात संसारी भक्तजनांना आपली साधना अिधक तीो करण्याची संिध िमळते आिण आपण पिहल्या दोन आौमांत िमळिवलेले अनुभव, ज्ञान, सद्बुिद्ध या गोष्टी समाजाला परत करू शकतो. वानूःथाौम वय ४८ ते ७२ हा एक अत्यन्त महत्वाचा आौम आहे. कारण यावेळी तुम्ही ॄह्मचारी िवद्याथीर् आिण त्यांची कुटुंबे यांत त्यांचे जीवन हव्या त्या मागार्ने जावे यासाठी उत्कृष्टतेची ूेरणा दे ऊ शकता. नंतर वयाच्या ७२ व्या वषार्पासून आपल्याला जो काही साक्षात्कार झालेला असेल त्याचा अनुभव अिधक गाढ करून उरलेले आयुंय आनंदात घालवावे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/palghar.html", "date_download": "2018-04-23T11:37:04Z", "digest": "sha1:TT52FSYWTF6SYOQR564PN3MHGINIIBZN", "length": 6591, "nlines": 71, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": " Welcome to Maharashtra Political Parties.in", "raw_content": "\nपालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.\nठाणे, आधुनिक नागरी आणि मागास आदिवासी असा प्रचंड प्रदेश असणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे आजपासून विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या जिल्ह्याच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात यापूर्वी 35 जिल्हे अस्तित्वात होते. त्यात आता पालघर या नव्या 36व्या जिल्ह्याची भर पडली आहे. प्रशासकीय दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असल्याने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मांडण्यात आला होता. त्याच्या विभाजनाचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर अखेर आजपासून (1 ऑगस्ट 2014) हा नवा जिल्हा अस्तित्वात आला.\nपालघर जिल्ह्यातील तालुके - नव्याने निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला, हे तालुके प्रामुख्याने आदिवासी बहुल आहेत.\nपालघर जिल्हा आमदार यादी - २०१४\nरतन तिवारी - वसई-विरार काँग्रेस सेवादल, जिल्हाध्यक्ष\nप्रशांत राउत (ब. वि. आ.), व.वि.श.म. - नगरसेवक\nसंजय राऊत - शिवसेना, वसई - शिवसेना उप तालुका प्रमुख\nशिरीष चव्हाण - शिवसेना, ठाणे (ग्रा.) - जिल्हा अध्यक्ष\nसुधीर सोनावणे (RPI - A), जिल्हा अध्यक्ष - वसई-विरार\nआनंद चौबे - कॉंग्रेस जनरल सेक्रेटरी, ठाणे (ग्रा.)\nप्राची फणसे - शिवसेना, महिला उपजिल्हा संघटक - विरार\nविनायक निकम - शिवसेना, व.वि.श.म. - विरोधी पक्षनेता\nप्रफुल्ल ठाकुर (म. न. से.), वसई - तालुका अध्यक्ष\nशिरीष चव्हाण - शिवसेना\nठाणे (ग्रा.) - जिल्हा अध्यक्ष\nसुधीर सोनावणे (RPI - A)\nजिल्हा अध्यक्ष - वसई-विरार\nसंजय राऊत - शिवसेना\nवसई - शिवसेना उप तालुका प्रमुख\nआनंद चौबे - कॉंग्रेस\nजनरल सेक्रेटरी, ठाणे (ग्रा.)\nप्राची फणसे - शिवसेना\nमहिला उपजिल्हा संघटक - विरार\nप्रशांत राउत (ब. वि. आ.)\nविनायक निकम - शिवसेना\nव.वि.श.म. - विरोधी पक्षनेता\nरतन तिवारी - काँग्रेस\nवसई-विरार काँग्रेस सेवादल, जिल्हाध्यक्ष\nप्रफुल्ल जाधव - मनसे\nउपशहर अध्यक्ष (प्रभाग व मनवेल पाडा विरार)\nपालघर जिल्हा पक्षानुसार राजकीय पदाधिकारी\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.gowikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-04-23T11:03:08Z", "digest": "sha1:BH4UYOS2H6M4CO6Q3XCQEAXYSAEMAZS5", "length": 7897, "nlines": 241, "source_domain": "mr.gowikipedia.org", "title": "GoWikipedia - इ.स. १९३८", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे\nवर्षे: १९३५ - १९३६ - १९३७ - १९३८ - १९३९ - १९४० - १९४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी\nफेब्रुवारी २४ - दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.\nमार्च ३ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.\nमे १६ - अटलांटा येथे एका हॉटेलमध्ये आग. ३५ ठार.\nमे २५ - स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.\nजून ७ - डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.\nजुलै ३ - ईंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.\nडिसेंबर १३ - ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.\nफेब्रुवारी ७ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.\nमार्च ११ - माल्कम केथ स्पीड, ब्रिटीश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश.\nमार्च १८ - शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता.\nमे ८ - जावेद बर्की, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nमे १९ - गिरीश कर्नाड, नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार.\nमे ३१ - जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nजुलै १९ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.\nजुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.\nऑगस्ट २८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.\nसप्टेंबर २५ - जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलँडचा पहिला पंतप्रधान.\nसप्टेंबर २९ - विल्यम कॉक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.\nऑक्टोबर ५ - तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.\nऑक्टोबर २९ - एलेन जॉन्सन-सर्लिफ, लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष.\nनोव्हेंबर १७ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.\nजानेवारी १६ - शरत् चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.\nएप्रिल २१ - अल्लामा इकबाल, भारतीय कवी.\nजुलै ९- हरीभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.\nऑगस्ट १४ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nइ.स.च्या १९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/baahubali.html", "date_download": "2018-04-23T12:26:25Z", "digest": "sha1:MWSAU76SL3NAQJ4DXYIUED3CUK6LHCFH", "length": 12568, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "baahubali - Latest News on baahubali | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष\nदिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे.\nबाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार\nलंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत.\n'बाहुबली' फेम तमन्ना भाटीयावर बूट भिरकावला, आरोपी ताब्यात\nबहुचर्चित 'बाहुबली २' या सिनेमाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स केले. इतकेच नाही तर हजारो कोटींचा गल्लाही जमवला.\nShocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही\nबाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला.\nप्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड\nसंजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.\n'बाहुबली'ची फी ऐकून करणला बसला शॉक\n'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेनंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासची डिमांड अधिकच वाढलीये. इतकंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्येही काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात.\nदोन महिन्यांनंतर प्रभास अनुष्कासोबत करणार साखरपुडा\n‘बाहुबली २’ हा सिनेमाने मोठं यश मिळवलं. त्यानंतर प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.\nशाळेतली शिक्षिका होती प्रभासचं पहिलं प्रेम\n‘बाहुबली’ या सिनेमातील अभिनेता प्रभास याने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.\nमेंदूवर शस्त्रक्रिया होताना त्याने चक्क पाहिला 'बाहुबली'...\nकाही दिवसांपूर्वी मेंदूचे ऑपरेशन करताना एक रुग्ण चक्क गिटार वाजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका ऑपरेशन दरम्यान रुग्णाला 'बाहूबली' चित्रपट दाखवून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.\n‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन\n‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.\nबाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...\n'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास सध्या लोकप्रियतेचा कळस अनुभवतोय... यातच प्रभासचा एक हॉट लूक इंटरनेटवर वायरल होताना दिसतोय.\nथुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'\n'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.\nधोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली\nआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.\nबाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण\nबाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला.\nअमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर\nएस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे.\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\nनिरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे : चांगल्या झोपेकरता काही खास टीप्स\nमुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-dal-mill-processing-unit-womens-5230?tid=163", "date_download": "2018-04-23T11:43:14Z", "digest": "sha1:B5QW7NTG5BSLB75LSTSVVMBHOSUAU2FP", "length": 21575, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, dal mill processing unit for womens | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nग्रामीण स्तरावर चालू शकेल असा डाळ प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागातील महिलांसाठी उपयुक्त अाहे. यामुळे कडधान्यांवर गावातच प्रक्रिया केल्याने वाहतुकीचा खर्च वाचून कमी किमतीत डाळ मिळू शकेल. त्यातूनच छोटे-छोटे गृहोद्योग उभे राहू शकतील.\nउद्योगांना वेगवेगळ्या शासकीय योजनांद्वारे आर्थिक मदत मिळते. अशा योजना जिल्हा उद्योग केंद्रे, खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे राबविल्या जात आहेत. यापैकीच डाळ प्रक्रिया उद्योगास बॅंका पतपुरवठा करतात. या उद्योगासाठी कमी भांडवल लागत असल्याने असे गृहोद्योग ग्रामीण भागात सहज उभारता येतात.\nग्रामीण स्तरावर चालू शकेल असा डाळ प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागातील महिलांसाठी उपयुक्त अाहे. यामुळे कडधान्यांवर गावातच प्रक्रिया केल्याने वाहतुकीचा खर्च वाचून कमी किमतीत डाळ मिळू शकेल. त्यातूनच छोटे-छोटे गृहोद्योग उभे राहू शकतील.\nउद्योगांना वेगवेगळ्या शासकीय योजनांद्वारे आर्थिक मदत मिळते. अशा योजना जिल्हा उद्योग केंद्रे, खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे राबविल्या जात आहेत. यापैकीच डाळ प्रक्रिया उद्योगास बॅंका पतपुरवठा करतात. या उद्योगासाठी कमी भांडवल लागत असल्याने असे गृहोद्योग ग्रामीण भागात सहज उभारता येतात.\nउत्पादनाचा प्रकार व त्याची व्याप्ती\nतुरीपासून डाळ तयार करताना धान्यावर प्रक्रिया करून डाळ भरडून टरफले काढून नंतर डाळ वेगळी केली जाते. जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची डाळ आणि कमीत कमी चुरी व पावडर मिळेल तेव्हा भरडण्याची क्रिया उत्तम असे समजावे. तुरीच्या बाबतीत सहसा तीन प्रतीत उत्पादन होते. ग्रेड-१ (फटका), ग्रेड-२ (सव्वा नंबर) आणि ग्रेड-३ (साधारण) अशा डाळींची किंमत ही बाजारात उतरत्या क्रमाने मिळेल. चुरी आणि भुसा वाया जाण्यासारखा पदार्थ नाही. मूग व उडदाच्या मोगर निर्मितीतून तर सर्वात जास्त फायदा मिळताे. इतर कडधान्यांपासूनही (उदा. सोयाबीन, हरभरा, मसूर, चवळी इ.) डाळी बनविता येतात.\nचक्कीवर डाळ तयार करण्यासाठी प्रथम तुरीला सहा ते आठ तास भिजवून तीन ते चार दिवस वाळवून घ्यावे. मोठ्या डाळमिलमध्ये तेलाचा वापर करून तुरी उन्हात वाळवितात आणि नंतर तुरी चार रोलरमधून भरडून त्याची डाळ तयार होते.\nअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मिनी डाळमिलमध्ये मात्र तीनच वेळा रोलरमधून भरडून डाळ तयार होते. त्यामुळे डाळीचा उतारा तीन ते चार टक्‍क्यांनी तसेच ग्रेड एक डाळीचा उतारा पाच ते सहा टक्‍क्‍यांनी मोठ्या डाळ मिलपेक्षा जास्त मिळतो.\nडाळ तयार करण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिनी डाळमिलचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. ही डाळ मिल दोन अश्‍वशक्तीच्या विद्युत मोटारीवर चालते.\nउद्वाहकाच्या मदतीने तुरी रोलरच्या चाडीत टाकता येतात. त्यामुळे कच्चा माल सतत मिलला पुरविण्यासाठी मजूर लागत नाहीत. त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारची टरफले काढण्याची व्यवस्था (एमरी) असल्याने टरफले काढणे सोपे होते.\nरोलरच्या मधील मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याकरिता रोलरचा आकार कापलेल्या शंकूसारखा केला आहे. दाण्याचा ओघ रोलरमध्ये जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसविलेली आहे.\nरोलरमधून बाहेर आलेल्या मिश्रणातून टरफले वेगळी करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे विघटकाला जोडला आहे. त्यातून टरफले खाली पडून हवा वरील पाइपातून बाहेर निघून जाते.\nरोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी बाहेर पडते. रोलरमधून निघणारे बाकीचे मिश्रण चाळण्यांच्या सहाय्याने वेगवेगळे केले जाते. वरचे लांबोळे छिद्र स्लॉट असलेल्या चाळणीवरून तुरी वेगळ्या केल्या जातात.\nखालच्या चाळणीवरून डाळ वेगळी होते. तसेच खाली पडलेली चुरी वेगळी होते. हे तीनही भाग निरनिराळ्या तीन बर्हीद्वारातून बाहेर येतात.\nवाळवून रोलरमधून काढल्यानंतर मोगर मिळेल. हरभरा, सोयाबीन, मसूर, चवळी इ. कडधान्यांची डाळ तयार करायची असल्यास त्यांचा ओलावा १२ टक्क्यांपर्यंत उरेल. त्याची एकदाच रोलरमधून काढून डाळ काढता येते.\nडाळमिल उभारण्यासाठी जागेची निवड व इतर बाबी\nडाळ मिलची उभारणी अशा ठिकाणी करावी ज्या ठिकाणी कच्चा व पक्का माल सहज व जवळ उपलब्ध होऊ शकेल.\nकाही शेतकरी दरवर्षी १० ते २० टनांपर्यंत तूर, मूग व उडीद या कडधान्यांचे उत्पादन घेतात. अशा शेतकऱ्यांना डाळ करून देता येऊ शकते.\nदोन चार मोठी गावे मिळून डाळमिल उभारता येईल. यासाठी ५० चौरस मीटरची एक खोली तसेच २०० चौरस मीटरची जागा सर्वसाधारणपणे मुख्य रस्त्यावर असावी. धान्य वाळविण्यासाठी ओटा असावा. यंत्र चालविण्यासाठी एक तांत्रिक मजूर, ५ किलोवॅटचा विद्युत पुरवठा लागतो.\nपंकृवि मिनी डाळमिल चालविण्यासाठी दररोज साधारण १०० लिटर पाणी आणि २.५ ते ३ लिटर खाद्य तेलाची (तूर, मूग, उडीद यासाठी) आवश्‍यकता असते.\nसंपर्क ः दीप्ती पाटगावकर, ९४०४९८८७७०\n(कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)\nडाळ महिला women कडधान्य मूग सोयाबीन अकोला कृषी विद्यापीठ यंत्र तूर उडीद\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nगॅस्ट्रो आजारामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे...\nनंदाताई दूधमोगरे यांचा शेतीत असाही...बुलडाणा : स्त्री ही समाजात त्याग, नम्रता,...\nमहिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली...शेतीमध्ये हिरवं स्वप्न फुलविण्यात महिलांचे योगदान...\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील...\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल...दिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि....\nशेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...\nप्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची...निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक...\nमहिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगसोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे,...\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nमहिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण,...महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nव्यवहारांच्या नोंदीसाठी पासबुक...पासबुकमध्ये आपण खात्यामध्ये ठेवलेल्या पैशांची...\nगांडूळ खत निर्मिती उद्योगगांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत...\nमहिला बचत गटांनी साधली शेळीपालनातून...काळोशी (ता. जि. सातारा) गावातील महिलांनी एकत्र...\nबॅंक खाते नंबर महत्त्वाचा...राधाच्या मदतीनं खातं निघालं नि त्यात आपले...\nशासनाच्या महिला उद्योग धोरणातील तरतुदीमहिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nलाँड्री व्यवसायातून गवसला ‘तनिष्कां'ना...सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=412&Itemid=603", "date_download": "2018-04-23T11:50:53Z", "digest": "sha1:EHZ22Z5TPQUYSC47FBPYBAPWUBBIK4EV", "length": 6841, "nlines": 45, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रवेश तेरावा", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n(दिवाणखाना, लक्ष्मीधरपंत सर्चित बसले आहेत.)\nलक्ष्मी - त्या दिवशीं नारायणास लाथ मारून घालवलें; परंतु काय असेल तें असो, मन आंतल्या आंत खात आहे. मी जर खरा धार्मिक असतों, तर माझं मन शांतिहीनन कां बरं झालं असतं निरपराधी माणसाजवळच सुख व शांति नांदतात. आणि खरें पाहूं जातां, नारायण करतो तें सनातनी वैष्णवधर्मीत आहेच; पण रूढीचा पीळ उलगडत नाहीं. काय करावं निरपराधी माणसाजवळच सुख व शांति नांदतात. आणि खरें पाहूं जातां, नारायण करतो तें सनातनी वैष्णवधर्मीत आहेच; पण रूढीचा पीळ उलगडत नाहीं. काय करावं काल रात्रीचं काय भयंकर स्वप्न काल रात्रीचं काय भयंकर स्वप्न ' माझ्या नारायणाच्या डोक्यांत कु-हाड घालणारा तो भयंकर काळपुरूष ' माझ्या नारायणाच्या डोक्यांत कु-हाड घालणारा तो भयंकर काळपुरूष परंतु त्या दुस-या मालाधारी शुभ्रवर्ण पुरूषानं त्याचा हात पकडला परंतु त्या दुस-या मालाधारी शुभ्रवर्ण पुरूषानं त्याचा हात पकडला ' काय या स्वप्नाचा अर्थ ' काय या स्वप्नाचा अर्थ माझा नारायण तरी सुरक्षित आहे ना माझा नारायण तरी सुरक्षित आहे ना खोटया समजुतीचा भरीस पडून मीं त्यास घालविलं. तो जातांना वंदन करावयास आला तर त्याला लाथ हाणली खोटया समजुतीचा भरीस पडून मीं त्यास घालविलं. तो जातांना वंदन करावयास आला तर त्याला लाथ हाणली अरेरे देवा, माझा नारायण पुन्हां येऊं दे रे मी त्याचं कोमल मन दुखवणार नाहीं. आतां कधीं मी त्याचं कोमल मन दुखवणार नाहीं. आतां कधीं त्याची आई स्वर्गातून मला दोष देत असेल.\n(पडद्यांत ' अहो लक्ष्मीधरपंत, अहो लक्ष्मीधरपंत ' अश हांका ऐकूं येतात.)\nलक्ष्मीधरपंत - या हो या,कोण \nवासुदेवराव - (प्रवेश करून ) अहो लक्ष्मीधरपंत, तुम्हाला अजून कळलं नाहीं का हो वार्ता बरी नहीं तुमचा मुलगा नारायण परवां रात्रीं रस्त्यांत घेरी येऊन पउलेला आढळला. त्याला भयंकर तापही येत आहे.\n काय, तो रस्त्यांत पडला अरेरे \nवासुदेवराव - असे घाबरूं नका. त्याची सर्व व्यवस्था झाली आहे. रस्त्यांतून एक बालवीर चालला होता. त्याला तो आढळला. त्यानं शिटी फुंकली व इतर बालवीर जमा झाले; आणि त्यांनीं त्यास उचलून स्वत:च्या संघमंदिरात नेलें. सध्यां तो तिथंच आहे. त्याचे शिक्षक व डॉक्टर यांनीं त्याची नीट शुश्रूषा चालवली आहे. तुम्हांस बालवीर -शिक्षक सांगावयास कसें आले नाहीत ते तर खास यावयाचे \nलक्ष्मीधरपंत - मी त्यांना पूर्वी टाकून बोललों होतों; म्हणून ते रागावले असतील \n बालवीर-शिक्षक हे कधीं रागबीग मनांत धरीत नाहीत ते एवढया तेवढयावरून राग मनांत धरतील तर बालवीरांचे गुरूच शोभर नाहींत ते एवढया तेवढयावरून राग मनांत धरतील तर बालवीरांचे गुरूच शोभर नाहींत मनांत अढी धरून बसेल तो बालवीर कसला \n मला धीर धरवत नाहीं. केव्हां एकदां डोळयानीं नारायणास पाहीन, असं झालं आहे. पूर्वीचा माझा त्याच्यवरील राग सर्व मावळला. वासुदेवराव, माझा नारायण हाच आमच्या घरचा आधार आमचा तारक माझा मार्गदर्शक आहे. चला, येतां माझ्याबरोबर आपणच त्याच्या शिक्षकाकडे जाऊ. माझे अहंकाराचे डोंगर वितळून सपाट झाले आपणच त्याच्या शिक्षकाकडे जाऊ. माझे अहंकाराचे डोंगर वितळून सपाट झाले त्यांची ह्रदयांत कारूण्याची गंगा वाहूं लागली आहे. वासुदेवराव, चला \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committee-parbhani-maharashtra-6645?tid=161", "date_download": "2018-04-23T11:45:22Z", "digest": "sha1:LR2HGQO3CXDRCDYR3SF7DX7WAQJA3TX4", "length": 15479, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये क्विंटल\nपरभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये क्विंटल\nरविवार, 18 मार्च 2018\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १२०० ते १८०० रुपये क्विंटल असे दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १२०० ते १८०० रुपये क्विंटल असे दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालेभाज्यांमध्ये पालकाची २५ क्विंटल आवक झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. चुक्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्या आवक झाली. मेथीला १५० ते २५० रुपये शेकडा दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक झाली. शेपूला १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.\nशेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ४ क्विंटल आवक झाली. गवारीला ३००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. वालाची ८ क्विंटल आवक झाली. वालास १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. शेवग्याची २५ क्विंटल आवक झाली. शेवग्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.\nवांग्याची ६० क्विंटल आवक झाली. ४०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला २०० ते ३०० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. भेंडीला ८०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.\nफ्लाॅवरची ३५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक झाली. दोडक्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. कारल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक झाली. काकडीला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये...\nएप्रिल-मेमध्ये बाजार फायदेशीर राहण्याचे...उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित होत...\nऔरंगाबाद येथे कैरी २५०० ते ३००० रुपये... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत...नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर,...\nकोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३००...कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९००...नगर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात...\nमार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...\nपुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...\nपरभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nऔरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...\nसांगलीत हळद ६००० ते १५,००० रुपये क्विंटलसांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली...\nजळगावमध्ये कैरी ७००० रुपये क्विंटल जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनगरला ज्वारी १५५० ते २१५१ रुपयेनगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४...\nसोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nपरभणीत फ्लॉवर ३०० ते ७०० रुपये क्विंटल परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nजळगाव येथे हिरवी मिरची १५०० ते ४०००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7143394", "date_download": "2018-04-23T11:44:33Z", "digest": "sha1:4QLQF6JRFRQW4PSITXTRRB6DVY3B67YG", "length": 6912, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google च्या एकूण विक्रीपैकी केवळ 35% उत्पादने Google च्या सबलाटमध्ये बंद झाली आहेत", "raw_content": "\nGoogle च्या एकूण विक्रीपैकी केवळ 35% उत्पादने Google च्या सबलाटमध्ये बंद झाली आहेत\nअनुमानित व्हेरिएबल्स ओळखण्यासाठी 350 Google उत्पादनांवर एकत्रित केलेल्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर, शॉर्ट-डाउन असलेले 35 टक्के असे चार समान वैशिष्ट्ये आढळतात: ते एका प्राप्तीचा भाग नसतात, ते कमाईचे उत्पन्न करीत नाहीत, ते संबंधित नसतात सोशल नेटवर्किंग, आणि ते Google च्या इतिहासाच्या सुरुवातीस सुरु केले. अर्थातच अपवाद नेहमीच असतात. Google Affiliate Network Google च्या DoubleClick च्या अधिग्रहण, आणि व्युत्पन्न झालेल्या कमाईचा परिणाम होता, परंतु जाहीरपणे, पुरेसे महसूल नाही कारण Google ने जुलै जुलैपासून संलग्न नेटवर्क बंद करण्याचे नियोजन केले आहे.\nअभ्यास बंद-बंद असण्याचा धोका असलेल्या उत्पादनांची यादी तसेच बंद होण्याची शक्यता असलेल्या उत्पादनांची यादी प्रदान करते. अनधिकृत मार्गदर्शिका, क्लाऊड मेसेजिंग, आणि परस्परसंबंधित सर्व ने-जोखीम यादी तयार केली आहे, तर सर्वात वरचे दहा उत्पादने शोध, अनुवाद, अॅडवर्ड्स, पिकासा, गट, प्रतिमा शोध, बातम्या, पुस्तके, टूलबार, आणि AdSense यात समाविष्ट आहेत.\n2011 मध्ये बंद केलेल्या उत्पादनांच्या जलद वाढ संदर्भात, अभ्यासात असे म्हटले आहे की स्टीव्ह जॉब्सने Google च्या लॅरी पेजवर प्रभाव टाकला ज्यामुळे Google चे लक्ष वेधून घेतले होते - venta de corbatas baratas. या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी अभ्यासात वॉल्टर इसास्कोन स्टीव्ह जॉब्स जीवशास्त्रातील जॉब आणि पेज यांच्यामधील विनिमय आढळून आली आहे जिथे नोकरीला पाच पेक्षा जास्त उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच त्यानंतर लॅरी पेजच्या Google+ प्रोफाइलवरून पुढील पोस्टसह जुलै 2011 मध्ये, \"या तिमाहीसाठी माझ्यापेक्षा आणखी एक मोठा फोकस आहे, कमी बाण मागे अधिक लाकूड.\"\n(इमेज क्रेडिट: ग्वेर्न. नेट)\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\n(4 9) व्हिडिओसाठी शोध हेतू करणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\n(4 9) आपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापरावीत\n(4 9) व्हॅल्यू प्रॉप्सबद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\n(4 9) रेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nचॅनेल: सीएमओ झोन GoogleGoogle: व्यवसाय मुद्दे Google: समीक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7146463", "date_download": "2018-04-23T11:49:15Z", "digest": "sha1:FRFML5RZE4MVDYLAXT7VGHCCWAZOKZ7L", "length": 6580, "nlines": 51, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google च्या प्रथम मोबाइल Semaltसाठी कशी तयार करावी? | Ep. # 151", "raw_content": "\nGoogle च्या प्रथम मोबाइल Semaltसाठी कशी तयार करावी\nएपिसोड # 151 मध्ये, एरिक आणि नील Google च्या पहिल्या मोबाईल इंडेक्सची तयारी कशी करतात याविषयी चर्चा करतात. Google ने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2017 पासून ते वेबसाइट्सच्या मोबाईल पृष्ठांची सूची तयार करतील. Google ने उत्कृष्ट मोबाइल वापरकर्त्याच्या अनुभवासाठी आधार म्हणून वापरण्यासाठी एएमपी फ्रेमवर्क देखील सादर केला आहे. नील आणि एरिकच्या साध्या शब्दाच्या साहाय्याने आपल्या मोबाईल साइट्स आणि उपकरणे कशी ऑप्टिमाइझ करावी त्याबद्दल टिपा, जे तुम्हाला सर्वोत्तम परीक्षणात मदत करतील.\n00:28 - आजचा विषय: Google च्या प्रथम मोबाईल अनुक्रमणिकासाठी कसे तयार करावे\n00:38 - Google चा फोकस मोबाइलकडे अधिक सरकत आहे\n00:46 - Google ने एएमपी (एक्सीलरेटेड मोबाइल पेजेस) फ्रेमवर्कसह तयार केले जे मोबाइल वापरकर्त्याला खूप चांगले बनवितात\n01:13 - एएमपीमध्ये डेस्कटॉपसारख्या प्रकारात असणारी एक फिरता पट्टी आहे\n01:23 - आपण आपल्या साइट्ससाठी एएमपी फ्रेमवर्कचा वापर करत असल्याची खात्री करा\n01:37 - पॉप-अपसारख्या कपटपूर्ण गोष्टीपासून मुक्त व्हा\n02:18 - आपली वेबसाइट गतीसाठी ऑप्टिमाइझ केली आहे हे सुनिश्चित करा\n02:28 - Google Chrome आपल्याला पृष्ठे किती जलद लोड करीत आहे हे तपासण्याची परवानगी देतो\n02:39 - Google Chrome ची पृष्ठ गती आणि पृष्ठाची गति साधने पहा\n02:46 - पिंगडोम हे एक साधन आहे ज्याचा वापर आपण वेगाने चाचणीसाठी करू शकता\n02:56 - आपली साइट अधिक वाचनीय करा\n03:21 - मोबाइल दृश्यांसाठी Google Analytics अहवालामधील फिल्टर आणि सेगमेंट सेटअप करा\n03:29 - गुंतवणूकींवर अहवाल पहा आणि तो बाहेर येण्यापूर्वी आपल्या साइटवर किती वेळ खर्च करतो हे दर्शवेल\n03:46 - मोबाईल अभ्यागत आणि वाचकांवर लक्ष ठेवा, आपल्या यूजर इंटरफेसला समायोजित करा आणि चिमटा आणि आपल्या अभ्यागतांना जास्त काळ टिकत नाही तोपर्यंत बदल करा\n04:20 - एक प्रतिसाद डिझाइन की आहे\n04:28 - विविध URL साठी संरचित डेटा चाचण्या चालवा\n04:42 - आपला कॅनॉनिकल लिंक्स उपलब्ध असल्याबाबत चाचणी करण्यासाठी Googlebot वापरा\n05:00 - आजच्या भागासाठी तेच आहे\nआपल्या मोबाइल साइट्ससाठी आधार म्हणून एएमपी फ्रेमवर्कचा वापर करा\nसर्वोत्तम वापरकर्ता अनुभवासाठी आपल्या UI आणि डिझाइनमध्ये समायोजन करणे लक्षात ठेवा - german vps windows.\nआपली पॉप-अप्स, सूचना आणि जाहिराती स्क्रीनच्या 30% पेक्षा जास्त स्क्रीनवर घेत नाहीत याची खात्री करा - अन्यथा, हे बिघडलेले मानले जाईल\n(6 9) काही अभिप्राय सोडला:\nआपण पुढील गोष्टींविषयी काय बोलावे कृपया खालील टिप्पण्या आम्हाला कळवा.\n(6 9) आपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\n(6 9) आमच्यासोबत मिमल व्हा\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=215&Itemid=411&limitstart=2", "date_download": "2018-04-23T11:48:22Z", "digest": "sha1:SR4OWGNVVMJHMOTDYGQQPUMUDPBKGF5L", "length": 4926, "nlines": 62, "source_domain": "saneguruji.net", "title": "अभागिनी", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nसरला पाणी घाली. तिचे हृदय आनंदाने भरुन येई. तिची आंतरिक फुलबागही फुलू लागली. तेथे आत्तापर्यंत केवळ उजाड ओसाड रान होते. तेथे सुखाचे, स्नेहाचे, केवळ भावनांचे मळे फुलू लागले. जीवनात आनंद व सुगंध आला.\nघरात आता फोनोग्राफ आला होता. सरला सुंदर सुंदर प्लेटी लावी. रमाबाई झोपाळयावर बसून ऐकत.\n“आई, आता कोणती लावू\n“तुला आवडेल ती लाव.’\nकधी कधी रमाबाई व सरला दोघी फिरावयाला जात. एके दिवशी दोघी कालव्याच्या काठी बसल्या होत्या आणि एकाएकी सरलेचे डोळे भरून आले.\n“काय ग झाले, सरले रडतेसशी\n‘मला एक आठवण आली.’\n‘येथे अशीच मी एकदा बसले होते. आईची आठवण आली होती. मला कोणी नाही असे वाटत होते. मी किती वेळ बसले त्याचे भानही नाही राहिले. उशिरा घरी गेले. बाबा रागावले. ते सारे पुन्हा आठवले.’\n‘पूस डोळे. वेडी कुठली आता मी आहे ना तुला आता मी आहे ना तुला\n‘तुम्ही कराल माझ्यावर प्रेम कराल का माया मी तुम्हाला आई म्हणते. व्हाल ना माझी आई तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सुकतील. आई, माझे हात का असे पापी आहेत तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सुकतील. आई, माझे हात का असे पापी आहेत\nरमाबाईंनी सरलेचे हात प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी आपल्या पदराने तिचे डोळे पुसले.\n‘मी देईन हो तुला प्रेम. मी होईन तुझी आई. सावत्र नव्हे तर सख्खी आई. इतके दिवस तू एकटी होतीस; आता एकटी नाहीस. हसत जा. रडत नको जाऊस. समजलीस ना\nआणि जवळ असणार्‍या मळयातल्या आम्रवृक्षावरील कोकिळा कुऊ करून ओरडली. सरला आनंदली. तीही कूऊ कूऊ करू लागली. कोकिळा चिडली; ती रागाने कूऊ करू लागली.\n‘कशी चिडून ओरडते आहे\n‘पशुपक्ष्यांनासुध्दा समजते. त्यांना रागलोभ समजतात नाही आई\n‘ही कोकिळा काय म्हणते आई\nबाळ, तू मोठा हो\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:28:46Z", "digest": "sha1:IRHVDTOHKW3PNIBG4CRWFKZ7XZVF2OFH", "length": 6283, "nlines": 105, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: विचार", "raw_content": "\nमनातले विचार लेखणीद्वारे (पक्षी : किबोर्ड) कधी उमटतच नाहीत... ’संस्कार’ नावाच्या एका पुस्तकात वाचले होते, मानवास दोन प्रकारचा वेगवेगळा शब्द संग्रह असतो.\nएक वाचण्याचा आणि दुसरा लिहिण्याचा, म्हणुनच आपण मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतले अनेक शब्द वाचु शकतो, मात्र लिहिताना बरेचदा शब्द आठवतच नाहीत.\nमाझ्या बाबतीत तरी हे सत्य आहे, माझ्या मते मी वाचक म्हणुनच बनविला गेलो असणार आहे :-)....\nअरे आनंद. . . वाचणारं कोणी तरी आहे म्हणून लिहिण्यात मजा आहे.. . .त्यामुळे चांगल वाचक असण हे सुद्धा चांगल लेखक असण्याप्रमाणेच आहे. . .अस मला वाटत बर का\n@मनमौजी, हो तर, वाचक महत्वाचे आहेतच\nपण मला ब्लॉगवर लिहिताना खुप वेळ खर्चावा लागतो...\nहम्म्म... मला नाही वाटत असं. वाचताना आपण समोरच्याचे विचार वाचत असतो, त्यामुळे शब्द काय असावा किंवा असेल ह्याचा विचार करावा लागत नाही. किंबहुना लिहणाऱ्याने काय शब्दरचना केली आहे हेही दुर्लक्षित होते. मात्र स्वतः लिहताना भाव शब्दात मांडताना ते विचार करावे लागतात (शक्यतो काही मनात नसताना लिहायच म्हणून लिहतोय अश्यावेळी). अन्यथा भाव आपोआप शब्दरुप होऊन उतरतात...\nसौरभ, असे नाही बरंका. पुलं लिहितात त्या पद्धातिने आपण लिहु शकतो का प्रसंग मात्र आपल्या पाहण्यातलेच ते लिहितात ना \nआनंद, मी तुझी परीक्षणं तुझ्या canvas ब्लॉगवर वाचली आहेत. आणि त्यावरून सांगतोय की तू आरामात लिहू शकतोस. प्रयत्न कर नक्कीच जमेल..\nबाकी तुमच्यासारखे वाचक आहेत म्हणून तर लिहायला मजा येते ना आम्हाला :-)\nहेरंब, तुझ्या आवर्जुन प्रतिक्रियेमुळेच हुरुप येतो बघ...\nधन्यवाद वाचक म्हणुन... तु तर काय भन्नाट लिहितोस...\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nये हौसला कैसे रुके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/ravindra-gawali.html", "date_download": "2018-04-23T11:47:45Z", "digest": "sha1:2AHVJ3SQBN5VXTNWKN6NYVXIENOTGN6I", "length": 4753, "nlines": 65, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : रविंद्र भास्कर गवळी\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्ष, भा.ज.प युवा मोर्चा कामोठे शहर\nName : रविंद्र भास्कर गवळी\nFather's Name : भास्कर जयसिंग गवळी\nMother’s Name : अलका भास्कर गवळी\nPlace of Birth: : आपधुप, ता. पारनेर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र\nSpouse’s Name : जोत्सना रविंद्र गवळी\nNo. of Children : एकून ०३, एक मुलगा, दोन मुली\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : रिअल इस्टेट\nHobby : वाचन, प्रवास\nResidence Address : ए - १०३, प्लॉट नं. २७, बालाजी निवास, सेक्टर - ०८, कामोठे ४१० २०९\nOffice Address : शॉप नं. १६, १७, प्लॉट नं. ०२, पुष्पसंदीप अपार्टमेंट, सेक्टर - ०९, कामोठे\nअध्यक्ष, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कामोठे शहर\nमा. सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे\nतालुका अध्यक्ष, ओबीसी सेल पनवेल\nअध्यक्ष - शिवसम्राट सेवाभावी मित्र मंडळ\nअध्यक्ष - विठ्ठल रखुमाई सांप्रदायिक सेवा मंडळ\nशिवसम्राट सेवाभावी मित्र मंडळा तर्फे २००५ पासून गणेशोत्सव दरवर्षी साजरा...\nदहीहंडी, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो.\nविठ्ठल रखुमाई सेवा मंडळामार्फत अखंड हरीनाम सप्ताहाचे सन २०११ पासून दरवर्षी आयोजन...\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nशालेय विद्यार्थांना प्रवेश देणे करिता मदत करणे.\nविभागातील साफसफाई, घनकचरा, पाणी संदर्भात नियोजन बैठका.\n१० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.\nसांप्रदायिक प्रवचने किर्तनाच्या माध्यमातून लोक प्रबोधन.\nयुवकांना रोजगार उपलब्ध करून देणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nदाखले वाटप (उत्पन्न, नॉन क्रिमिनल)\nरविंद्र गवळी यांचे पेपर बातम्या, लेख...coming soon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7146662", "date_download": "2018-04-23T11:50:11Z", "digest": "sha1:KTGDSI7JSMUPH3U2DBG6CXIF6DEIHUBZ", "length": 11640, "nlines": 55, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "स्वतःला ते एसइओ करण्यासाठी साम्प्लेट करू नका", "raw_content": "\nस्वतःला ते एसइओ करण्यासाठी साम्प्लेट करू नका\nहा लेख विशेषत: त्यांच्या स्वतःच्या एसईओ प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी ते करू शकणारे साध्या गोष्टी जाणून घेऊ इच्छित आहेत.\nआपण खरोखर हाताळण्यास निवडू शकता असे 2 भिन्न भिन्न क्षेत्र आहेत. प्रथम एक आहे 'पृष्ठावर' किंवा आपण आपल्या वास्तविक वेबसाइटवर करू शकता गोष्टी. दुसरा भाग 'ऑफ पेज' आहे मिमल म्हणजे आपण इतर वेबसाइट्सवर आपल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी करू शकता - ssd windows vps.\nदोन्ही समान महत्त्वपूर्ण आहेत.\nआपल्या एसईओ सुधारण्यासाठी OnPage कारक\nलवचिक सामग्री शोध इंजिने आणि अभ्यागत दोन्ही आकर्षित करते\nयेथे एक प्रमुख संकल्पना आहे जी तुम्हाला समजली पाहिजे.\nएकतर शोध इंजिन किंवा लोक आपल्या वेबसाइटवर भेट देण्यासाठी आपल्याला त्यांना आकर्षित करणारे काहीतरी आकर्षक बनवणे आवश्यक आहे. सर्च इंजिनासाठी ते काय करतात हे 'कंटेंट' आहे. सर्व मिडल, शोध इंजिन्स लोक नाहीत. ते जे करायचे आहे ते त्यांच्या इंजिनवर शोध घेणार्या व्यक्तीला उपलब्ध असलेली सर्वोत्तम सामग्री वितरीत करते.\nमानवासाठी, आम्हाला कुठेतरी जाणे आवडते जे एकतर आम्हाला सूचित करते किंवा आम्हाला आकर्षित करणारे काही प्रकारचे उपकरण देते काही उदाहरणांमध्ये, ट्यूटोरियल, 'कसे करावे' लेख किंवा एखादे उपकरण जे एखाद्याला त्वरित काहीतरी केले जाण्यास परवानगी देते. (आम्ही जी टॅब्लेट नावाची लोकं आमची Google Analytics कोड स्कॅनिंग साधन आहे त्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही तयार केलेले एक साधन.)\nतर आपल्यासाठी काही कल्पना तयार करण्यास प्रारंभ करूया.\nबर्याच लोकांसाठी जेव्हा त्यांच्या साइटवर सामग्री अपडेट करण्यास सांगितले जाते तेव्हा सामान्य प्रत्युत्तर असे आहे की, \"मी काय लिहितो\" आणि \"माझ्याकडे वेळ नाही\"\nतर त्यास सोडू द्या.\nजगाने एक अतिशय खाजगी व्यक्तीपासून अतिशय सार्वजनिक ठिकाणी त्वरित रूपांतर केले आहे. माहिती राजा आहे. माहितीचा अशा अर्थशास्त्राचा अर्थ असा आहे की ते आपल्या वेबसाईटचे चलन आहे.\nआपल्या वेबसाइटवरील सामग्री अद्ययावत करण्यासाठीचा ठसा हा ब्लॉग आहे. परंतु आपण ब्लॉग किंवा सीएमएस वापरत असलात तरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वेबसाइटवर नियमितपणे सामग्री अपलोड केली जात आहे. हे शोध इंजिनांना आपली साइट अधिक वेळा अनुक्रमित करेल आणि लोकांना अनेकदा भेट दिली जाईल.\nशोध इंजिन्स आणि अभ्यागत यांना आकर्षित करण्यास मदत करण्यासाठी आपण नियमितपणे आपल्या वेबसाइटवर अद्यतनित करण्याच्या काही गोष्टी ही येथे आहे:\nSemaltेट - आपल्या कंपनीवर बर्याच गोष्टी चालू आहेत ज्याला आपण कदाचित मंजूर कराल जरी आपल्याला वाटत असेल की हे वृत्तवाहिन्यासंबंधी नाही - आपल्या कंपनीत बातम्या आणि इतिहासातील इतिहासातील इतिहासातील हानी काय आहे हे आपल्या कंपनी लक्षात मिळण्यासाठी फक्त एक मार्ग आहे\nत्यांना परत येत ठेवा\nआपल्या Google Analytics किंवा आकडेवारी संकुल पहाणे आणि नवीन अभ्यागतांच्या संख्येकडे लक्ष देणे नेहमी चांगले असते. पण अभ्यागतांना परत येण्यासाठी आपण काय करू शकता त्या गोष्टींबद्दल आपण कधीही विचार करता सर्व केल्यानंतर, परत येणार्या अभ्यागतांना आपल्या वेबसाइटवर एक निष्ठावंत खालील इमारत तयार करण्याचा मार्ग आहे. Semaltेट हे आपल्या एसईओ क्रमवारीत मदत नाही, तो अभ्यागतांना आपल्या साइटवर परत येत मिळविण्यासाठी जबाबदार आहे.\nआपण त्यांना परत येण्यासाठी काही गोष्टी करू शकता:\nआपण नियमितपणे ब्लॉग किंवा बातम्या विभागात सामग्री अद्यतनित केल्यास फीडबर्नर अंमलात आणू शकता जेणेकरून लोक त्यांच्या ईमेलमध्ये अद्यतने प्राप्त करू शकतात.\nअभ्यागतांना आपल्या साइट्स इतरांसह सहजपणे शेअर करणे, मित्रांना पाठविणे, फंक्शन्स शेअर करणे इत्यादि सहभागास परवानगी द्या. आम्हाला हे साधन खूप आवडते\nआपल्या एसईओ सुधारण्यासाठी पृष्ठ घटक बंद\n'ऑफ पेज' च्या साम्लाचा तुम्ही इतर वेबसाइट्सवर आपल्या वेब साइटला प्रोत्साहन देण्यासाठी काही करू शकता. शोध इंजिनला हे आवडते, लोकांना हे जाणून घेण्यासाठी एक साधन म्हणून वापरायला आवडते - मग का नाही येथे एक ब्लॉग आहे जो 20 पेक्षा अधिक विनामूल्य प्रेस मालिका यादीकृत करतो\nनिर्देशिकेत आपली साइट जोडा. अभ्यागतला मदत करणार्या संबंधित साइट्समध्ये आपण जोडून आहात आणि सावध रहा की बाह्य दुवे सह जबरदस्त बाधीत केलेल्या साइट नाहीत\nलेख किंवा माहिती आधारित वेब साइटवर लेख योगदान.\nसंबंधित उद्योगांमधील ब्लॉग शोधा आणि टिप्पण्या करा.\nसोशल मीडियामध्ये सहभागी व्हा सहभागी होण्यासाठी कसे यापेक्षा अधिक संपूर्ण माहितीसाठी या सोशल मिडिया लेख वाचा.\nअंगठ्याचा एक नियम. आपल्या साइटला प्रोत्साहन देताना हे महत्त्वाचे आहे की आपण उपयुक्त माहिती प्रदान करीत आहात हे लक्षात ठेवा. जे काही उपयुक्त आहे ते आपल्या अभ्यागतासाठी चांगले नाही आणि म्हणून शोध इंजिनसाठी चांगले नाही.\nतर इथे आहे आपल्या हातात वेळ आहे का या साइटवर सूचीबद्ध केल्या जाणार्या सर्व गोष्टी आपल्या ऑनलाइन प्रतिष्ठास मदत करेल परंतु काहीही करू शकणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/photo-gallery/photography-by-sanjay-prajapati-of-art-festival", "date_download": "2018-04-23T11:29:59Z", "digest": "sha1:LFZJUKPS6XNOPJS5JTXPS4TJMBP3Q5W4", "length": 6160, "nlines": 120, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Photography by Sanjay Prajapati | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome फोटो गॅलरी संजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nशनीशिंगणापूर प्रकरणात न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार\nमहाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी-मुख्यमंत्री\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/wynncom-w704i-price-p622l4.html", "date_download": "2018-04-23T11:48:58Z", "digest": "sha1:3ANCJZNWDK7QVBBT7AG6IIWDJRQFNQCT", "length": 13688, "nlines": 399, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वयनँकं व७०४ई सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये वयनँकं व७०४ई किंमत ## आहे.\nवयनँकं व७०४ई नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nवयनँकं व७०४ईस्नॅपडील उपलब्ध आहे.\nवयनँकं व७०४ई सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,755)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवयनँकं व७०४ई दर नियमितपणे बदलते. कृपया वयनँकं व७०४ई नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवयनँकं व७०४ई - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरिअर कॅमेरा 2 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nबॅटरी तुपे 1100 mAh\nटाळकं तिने 4 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 140 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\n1/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/454/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5.%20%E0%A4%86%E0%A4%B0.%20%E0%A4%86%E0%A4%B0.%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:32:06Z", "digest": "sha1:RDDQO66FGD4LM4XDTWTPWKHMWW32KH5M", "length": 6868, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी भवन येथे लोकनेते स्व. आर. आर. पाटील यांना आदरांजली अर्पण\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, संवेदनशील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ, लोकनेते स्व. आर. आर. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, कार्यालयीन सचिव बाप्पा सावंत आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nलोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ ...\nमहाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष् ...\nशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक ...\nशेतकरी कर्जमाफी च्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही चांगलाच गाजत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीवर विरोधक ठाम आहेत. याच मुद्द्यावरून बुधवारी विधिमंडळाचे काम सुरू होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.दरम्यान, याच मागणीवरून विधानसभेचे कामकाज सलग तीन वेळा स्थगित झाले. स्थगितीनंतर सभ ...\nनोटाबंदी विरोधात मतदानातून व्यक्त व्हा – धनंजय मुंडे ...\nकाळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन देत केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला पण त्याचा सर्वात जास्त त्रास सामान्य जनतेला झाला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात मतदानाच्या माध्यमातून व्यक्त व्हा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मतदारांना केले. ते शुक्रवारी उदगीर येथील सभेत बोलत होते. उदगीर नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर शेख आणि नगरसेवक पदाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली गेली होती. यावेळी मं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T11:12:16Z", "digest": "sha1:SZS77PED4U5M4OQUSUPVB2FJ4C2AGFWW", "length": 24233, "nlines": 377, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "मराठी जोक्स | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "\nआता होऊन जाऊ द्या………\nTag Archive | मराठी जोक्स\nजगातील दोन कठीण कामे—\n* पहिल्या कामात हुशार\n* दुस-या कामात हुशार\n* आणि दोन्ही कामात\nin एकच नंबर, पांचट, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nएक पोपट आणि त्याचा मालक\nAir Hostess बाजूने जात\nते बघून मालकाने पण\nकेली आणि शिक्षा म्हणून\nदोघांना विमानातून फेकून द्यावे असे\nin पांचट, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nएकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.\nवाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात\nउभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,\n‘होय ‘ ती महिला उत्तरते.\n‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात\nयावर आपले मत नोंदवा\nकालांतराने बायकोत झालेला बदल\nलग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत\nपहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ\nझाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये\nदुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का \nतिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..\nजेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा\nचौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,\n.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…\nबाहेरच काही खाऊन घ्या\nसहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…\nआत्ताच तर नाष्टा हादडलाा …\nयावर आपले मत नोंदवा\nचंप्याचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पहा जरा पहिली आलीये…. नाहितर तु खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा….\nचंप्या : अजुन किती पाहु… तिला पाहुन पाहुन तर नापास झालो ना….\nin एकच नंबर, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nहोईल तोटा….पण पाटिल मोठा\nपाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो….\nमी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो , परंतु मला वाईट वाटते की माझे मित्र ,सर सगळे दररोज लोकल ट़्रेनने येतात व मि आपल्या स्काॅरपिओ मधुन जातो… ..\nवाईट वाटुन घेऊ नकोस सकाळीच पैसे पाठवतो लोकल ट्रेन घेऊन टाक… कुठेही कमी पडायचे नाही …\nहोईल तोटा….पण पाटिल मोठा\nin एकच नंबर, पुणेरी, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nरिक्षावाला – 50 रुपये झाले\nजोशी – हे घे 25 रुपये\nरिक्षावाला – हि काय दादागिरी\nजोशी – बरोबर आहे .\nतु पण आलास ना रिक्षात बसुन\nमग काय तुझ भाड मिच भरू\nin एकच नंबर, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nचम्प्या – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.\nचिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.\nमुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे.\nin एकच नंबर, पांचट, पुणेरी, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\nपुणेरी बँकेतला किस्सा :\nग्राहक – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल\nकारकून -” ३ दिवसांनी”\nग्राहक – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ \nकारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील \nin एकच नंबर, गंमतीशीर विधाने, पांचट, विनोदी चुटकुले\nयावर आपले मत नोंदवा\n‘पी टीव्ही’ आणि ‘बार प्रवाह’\nअशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील\n* घेणार रम मी त्या बारची\n* एका पेगची तिसरी गोष्ट\n* पियून येती रोजच राती\n* पिऊ बाई पिऊ\n* बार विकत घेणे आहे\n* बाटलीचा प्रियकर तो (मानसीचा)\n* माझिया दारुचा पेग संपेना\n* बार तिथे मी\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://kbhagu.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T11:04:42Z", "digest": "sha1:SGEAITMXYWHOXVDBCFUBYW4TUBFMPBEJ", "length": 12473, "nlines": 76, "source_domain": "kbhagu.blogspot.com", "title": "मज उमजले काही...............!!!!!", "raw_content": "\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बरे वाईट अनुभव येतात .प्रत्येकजण ते share करतोच असं नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो .पण मला माझ्या आयुष्यातले बरे वाईट अनुभव, काही हृदयस्पर्शी गोष्टी, लेख तुम्हा सगळ्यांशी share करायला नक्की आवडेल. म्हणून मी हा ब्लॉग चालू केला आहे . तुम्ही माझे लेख नियमित वाचाल व त्यावर तुमच्या प्रतिक्रिया द्याल असा माझा विश्वास आहे .......\nसुख - खरचं पैश्यात मोजता येतं\nप्रत्येक माणसाच्या सुखाच्या व्याख्या किती वेगवेगळ्या आहेत , नाही कोणाला भरपूर पैसा कमावणं ह्यात सुख मिळतं, तर कोणाला एकतरी दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवण्यात आनंद मिळतो , कोणाला पैशाने दुसऱ्यांना मदत करायला आवडतं तर कोणाला स्व जातीने दुसऱ्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो . थोडक्यात काय तर सुखाची व्याख्या देणं खरचं कठीण ......... जसं सुख अनुभवण्यात मजा आहे तसचं सुख बघण्यातही आनंद आहे ... तुम्ही कधी railway track च्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या मुलांना तिथेच खेळताना पाहिले आहे , किती मस्त खेळत असतात ती कोणाला भरपूर पैसा कमावणं ह्यात सुख मिळतं, तर कोणाला एकतरी दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवण्यात आनंद मिळतो , कोणाला पैशाने दुसऱ्यांना मदत करायला आवडतं तर कोणाला स्व जातीने दुसऱ्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो . थोडक्यात काय तर सुखाची व्याख्या देणं खरचं कठीण ......... जसं सुख अनुभवण्यात मजा आहे तसचं सुख बघण्यातही आनंद आहे ... तुम्ही कधी railway track च्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या मुलांना तिथेच खेळताना पाहिले आहे , किती मस्त खेळत असतात ती संध्याकाळी हॉटेल मध्ये सतत काम करणारे दिवसा तिथेच क्रिकेट खेळत असतात आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत असतात , जणू काही stadium च ते . platform वर भीक मागणारे रात्री तिथेच किती गाढ झोपले असतात . एकदा आमची गाडी highway वर traffic मध्ये अडकली , पुढे एक accident झाला होता त्यामुळे तास दोनतास तरी निश्चिंती होती . आम्ही सगळे घामाने लथपथ आणि traffic clear होण्याची वाट बघत होतो , पण बाजूच्या गाडीचा driver मस्तपैकी झोपला होता . त्याला त्या गर्मीत किती गाढ झोप लागली होती. माझ्या आजीच्या घरी रोज एक भाजीवाली येते . भर दुपारी आल्यावर जेव्हा मी तिला थंड पाणी दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान दिसलं. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख बघितल्यावर असा विचार येतो ,'सुख खरचं पैश्यात मोजता येतं संध्याकाळी हॉटेल मध्ये सतत काम करणारे दिवसा तिथेच क्रिकेट खेळत असतात आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत असतात , जणू काही stadium च ते . platform वर भीक मागणारे रात्री तिथेच किती गाढ झोपले असतात . एकदा आमची गाडी highway वर traffic मध्ये अडकली , पुढे एक accident झाला होता त्यामुळे तास दोनतास तरी निश्चिंती होती . आम्ही सगळे घामाने लथपथ आणि traffic clear होण्याची वाट बघत होतो , पण बाजूच्या गाडीचा driver मस्तपैकी झोपला होता . त्याला त्या गर्मीत किती गाढ झोप लागली होती. माझ्या आजीच्या घरी रोज एक भाजीवाली येते . भर दुपारी आल्यावर जेव्हा मी तिला थंड पाणी दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान दिसलं. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख बघितल्यावर असा विचार येतो ,'सुख खरचं पैश्यात मोजता येतं' तसेच सुखाच्या सगळ्या वस्तू विकत घेता येतात पण सुख नाही हे पण पटलं.....\nकाही दिवसांपूर्वी मी ट्रेन मधून मुंबईला जात होते . माझ्या समोरच्या सीटवर एक आई व तिची दोन मुलं असे बसले होते . मुलगा मोठा होता १३-१४ वर्षांचा आणि मुलगी लहान होती ६-७ वर्षांची. ह्या मुलांनी आळीपाळीने window सीटवर बसण्याचे ठरविले. जेव्हा मुलगी window सीटवर होती तेव्हा ती खूप खुश होती पण जेव्हा तिचा दादा window सीटवर आला तेव्हा मात्र ती कंटाळली. खूप कुरकुर करू लागली. तेव्हा तिची आई तिला म्हणाली की चल आपण नावाच्या भेंड्या खेळूया. मुलीने सुरुवातीला तिला माहिती असलेली बरीच नावे सांगितली, मग मात्र तिची पंचाईत झाली. तिला अजून नावं सांगता येईना तेव्हा तिच्या दादाने तिला मदत करायला सुरुवात केली, तिनेही नकळतपणे ती मदत घेतली. तिच्या दादाची आपल्या बहिणीला संकटात बघून तिला मदत करायची वृत्ती मला खूप आवडली, पण एक अक्षर असं आलं जेव्हा त्या दोघांनी वेगवेगळी नावं सांगितली. तेव्हा त्या मुलीने आईकडे तक्रार केली, \"आई, बघ ना, हा दादा मध्ये मध्ये बोलतोय.\" मग तिच्या आईने तिला समजाविले की, \"अगं, आता तुला मदतीची गरज नाही म्हणून तू दादाला नाही म्हणतेस. मग आधी तू त्याची मदत का घेतलीस\" त्या मुलीला ह्यातलं किती कळलं माहिती नाही पण तिच्या आईने तिला नकळत तिच्या दादाचं महत्त्व समजाविले होतं आणि आपल्या वाईट प्रसंगीच तर आपले आपल्याला मदत करतात हे पण पटवून दिलं होत. हीच गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्शून गेली आणि आपण जर लहान मुलांना त्यांच्या कलेने कोणती गोष्ट पटवून दिली तर ती त्यांना नक्की कळते हे पण पटले.\nनकळत कहितरि घडावे ..........\nहुल्लड बालपन खेळातच रमाव\nपरिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव\nसदा मनि एकच विचार.....वाटते....\nअदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.\nअभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ\nरोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ\nकसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार\nनकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.\nमग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर\nवहि बोटावरुन फिरवताना मुलाकडे बघाव रोज\nत्याचा होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग\nनैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात\nसार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला\nनकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.\nपदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा\nसततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा\n याच गणित तेव्हा कराव\nवेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव\nअन चाहुल लागावि मनि दुखि होउनि\nनकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.\nदिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत\nजबाबदारिच ओझ जड होतच राहत\nनकळ्त पानावतात डोळे त्याचा चेहरा उभा राह्तो\nकुठे असेल तो मन भुतकाळात डोकाउ लागत\nएक अत्रुप्त इछ्या त्याचा सोबत जगन्याचि\nगुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात\nक्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...\nनकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.\nबापाच नात मग जपाव लागत\nत्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात\nआपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा\nअसेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला\nसार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक\nअन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.\nमग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर\nनजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब\nहाति येते काठि तोच एकमेव आधार\nसार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ\n.....चक्र असे हे नशिबाचे\nतरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते\nनकळत कहितरि घडावे ..........\nसुख - खरचं पैश्यात मोजता येतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=215&Itemid=411&limitstart=6", "date_download": "2018-04-23T11:51:18Z", "digest": "sha1:KMQBM5GYXYZL4S72M76CHYEYLTO6PJTK", "length": 4737, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "अभागिनी", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n“का असे करता दु:ख हे पहा रक्त घळघळत आहे. माझा हा रूमाल बांधतो.”\nत्याने रक्त पुसले. रूमालाची पट्टी करून ती पाण्याने भिजवून त्या जखमेवर त्याने बांधली. तो तेथे जवळ बसला. कोणी बोलत नव्हते. रात्र होऊ लागली. अंधार पडू लागला.\n चला. मी तुम्हाला पोचवतो. पुढे टांगा भेटला तर करू. घरी का त्रास आहे तुम्ही किती वेळ रडत होतात. मी पाहात होतो. अश्रू पुसायला आधी आलो नाही. संकोच वाटे. परंतु तुम्ही डोके फोडू लागल्यावर थांबवेना. संकोच गेला. मी धावत आलो. क्षमा करा. राग नका मानू. कोणते तुम्हाला आहे दु:ख तुम्ही किती वेळ रडत होतात. मी पाहात होतो. अश्रू पुसायला आधी आलो नाही. संकोच वाटे. परंतु तुम्ही डोके फोडू लागल्यावर थांबवेना. संकोच गेला. मी धावत आलो. क्षमा करा. राग नका मानू. कोणते तुम्हाला आहे दु:ख तुम्हाला का कोणी प्रेमाचे नाही तुम्हाला का कोणी प्रेमाचे नाही\n मी एक अभागिनी आहे. माझी आई मेली. माझी सारी भावंडे मेली. पती मेला. मी सर्वांचा संहार करणारी आहे. बाबा मला विषवल्ली म्हणतात. सावत्र आई मला पांढ-या पायांची म्हणते. सासूसासरे मला परत घरी घेत नाहीत. मी येथे बाबांकडे आहे. परंतु कोण आहे मला मला कोणी नाही सहानुभूती, प्रेम, ओलावा, दया, गोड शब्द, सर्वांना मी पारखी आहे. मी वाईट आहे. अरेरे देवाने मला जिवंत का ठेवावे देवाने मला जिवंत का ठेवावे तुम्ही जा. तुमच्यावर माझी विषारी सावली पडेल. तुमचाही सत्यानाश होईल. जा पळा.”\n“तुम्ही निराश आहात. असे एखाद्याच्या पायगुणाने मरण येत नसते. असल्या भोळसट कल्पना आज कोणी मानील आम्ही सुशिक्षित तरूण तरी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही तरी कारण होते. मरण येते. शरीरात बिघाड होतो, रोग होतो व प्राण जातात. कोणाच्या पायगुणाचा संबंध आम्ही सुशिक्षित तरूण तरी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही तरी कारण होते. मरण येते. शरीरात बिघाड होतो, रोग होतो व प्राण जातात. कोणाच्या पायगुणाचा संबंध तो पहा एक मुंगळा तुमच्या पदरावर. तो काही तुमच्या स्पर्शाने मेला नाही. हा मुंगळा मरत नाही, मग माणसे का मरावी तो पहा एक मुंगळा तुमच्या पदरावर. तो काही तुमच्या स्पर्शाने मेला नाही. हा मुंगळा मरत नाही, मग माणसे का मरावी सारा वेडेपणा आहे. असे नका मनात आणू. दु:खामुळे, अज्ञानामुळे कोणी तसे म्हणत असतील. तुम्ही ते मनावर नका घेत जाऊ. त्यांच्या अज्ञानाची कीव करा.”\nबाळ, तू मोठा हो\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/january-28/", "date_download": "2018-04-23T11:27:23Z", "digest": "sha1:OSDYRZBA4FYXZDUB7MCM7ZUXFS5ZAHDR", "length": 7204, "nlines": 154, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२८ जानेवारी दिनविशेष | January 28", "raw_content": "\n२००० : इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या ‘अनुवादक’ या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन.\n२००३ : मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.\n१८६५ : लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.\n१९०० : के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.\n१९२५ : डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.\n१९३० : पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.\n१९८४ : सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.\n१९८९ : हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.\n१९९६ : बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.\n१९९७ : डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, पंडित जसराज, मृत्यू, लालकृष्ण अडवाणी, लाला लजपतराय on जानेवारी 28, 2013 by प्रशासक.\n← २७ जानेवारी दिनविशेष २९ जानेवारी दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/news", "date_download": "2018-04-23T11:41:35Z", "digest": "sha1:COG4HUKA2PF5GFUKD5QNRBURHPHZR5BP", "length": 64764, "nlines": 352, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "Mazi Yashogatha", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nतुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, अनेकांचा गोंधळ उडाला आहे. 500 आणि 1000 च्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र घाबरण्याचं कारण नाही हे कालच मोदींनी सांगितलं आहे. कारण 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात ज� ...\nपुण्यात कचरा कुंडीत 52 हजार रुपये सापडले\nपुणे: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. नागरिकांनी बँकांबाहेर रांगा लावल्या असतानाच, तिकडे पुण्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं.प्रभात पोलिस चौकीजवळ कचराकुंडीत एक-दोन नव्हे तर तब्बल 52 हजार रुपये सापडले आहेत. कचरा कुंडीजवळ एका महिलेला ही रोकड सापडली. महत्त्वाचं म्हणजे सर्व नोटा या हजाराच्या आहेत.ही रक्कम खरी की खोटी हे अद्याप स्पष्ट झ� ...\n पाचशे, हजाराच्या नोटांचे कर्जवाटप केले\nनवी दिल्ली, दि. 10 - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून काळा पैसा असलेल्यांची पळापळ सुरू झाली आहे. आपल्याकडील काळे धन लपवण्यासाठी त्यांनी विविध क्लुप्त्या योजण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकमधील कोल्लार येथे एका स्थानिक नेत्याने चक्क गावात कर्ज मेळावा आयोजित करून ग्रामस्थांना कर्जवाटप केले आहे. या कर्जमेळाव्यात नाग� ...\nटाटा समूहाचे अध्यक्ष मिस्त्री यांना हटवले\nमुंबई- टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. चार महिन्यात टाटा समूहाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. रतन टाटा 28 डि� ...\nसायरस मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर टाटा समुहाच्या समभागात घसरण\nमुंबई, २५ ऑक्टोबर, (हिं.स.) : चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्याचे परिणाम शेअर बाजारावर पडलेले दिसले. आज बाजार उघडताच टाटा समुहाच्या प्रमुख कंपन्यांच्या समभागात तीन ते पाच टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा बेव्हरेज व टाटा पॉवर या कंपन्यांच्या समभागात घस� ...\nडेबिट, क्रेडिट कार्डद्वारेही भरता येईल 'जीएसटी'\nइंदोर : जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर तो आॅनलाइन भरण्याची सुविधा राहिल. डेबिट, के्रडिट कार्डद्वारेही जीएसटी भरता येईल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी येथे दिली. येथे जागतिक गुुंतवणूकदारांच्या एका संमेलनात बोलताना हसमुख अधिया म्हणाले की, '१ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नोंदणी, परतावा आणि पेमेंट हे आॅनलाइन करता येईल. नॅशनल इ� ...\nए दिल..ची 'मुश्किल' संपली; राज ठाकरे यांचा हिरवा कंदील\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे. चित्रपटाच्या प्रत्येक खेळाच्यावेळी उरी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली जावी. पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात घेणार नाही असे लिहून द्यावे आणि लष्कराच्या कल्याण निधीमध्ये (आर्मी वेल्फेअर फंड) पाच कोटी रुपये � ...\n‘ट्राय’कडून एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाला ३०५० कोटींचा दंड\nट्रायने आखून दिलेल्या नियमांनुसार १००० कॉलमधील पाचपेक्षा जास्त कॉल्स कट होऊन चालत नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल ३०५० कोटींचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला ‘इंटरकनेक्शन‘ सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे या कंपन्यांना दंड ठो ...\nजयललितांची तब्येत सुधारावी म्हणून त्यांनी केले १ कोटी ६० लाखाचे दागिने दान\nम्हैसूर, दि. २२ - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी जयललिता यांच्या समर्थकांनी शुक्रवारी म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जयललितांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मंदिरातील देवतांना १.६० कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले. चामुंडेश्वर मंदिर व्यवस्थापन बोर्डाने ही माहिती द� ...\nसायबर हल्ल्याचा धसका, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइलवर बंदी\nया निर्णयातून सरकारची हुकूमशाही वृत्ती दिसून येते अशी टीका काँग्रेसने केली आहे. सायबर हल्ल्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच सचिवस्तरावरील बैठकीत मोबाइलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँग्रेसने मात्र या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे. या निर्णयातून सरकारची हुकूमशाही वृत्ती दिसून येते. सरकारला पारदर्शकता नको आहे अशी टी� ...\nयुरेका….’बर्म्युडा ट्रँगल’चे रहस्य अखेर उलगडले, षटकोनी ढग ठरतात जीवघेणे\nबर्म्युडा ट्रँगलमध्ये आत्तापर्यंत ७५ विमान आणि १०० हून अधिक जहाज बेपत्ता झाले आहे. हजारो माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि ७५ हून अधिक विमान आणि जहाज गायब झालेल्या बर्म्युडा ट्रँगलचे अखेर रहस्य उलगडले आहे. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या फे-यात अडकून जहा� ...\nरतन टाटा मराठीत प्रथमच माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची 'खास भारतीय' प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत. विदेशातल्या शिक्षणाचा-कामाचा अनुभव घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली 'कार्यसंस्कृती' बदलायला घेतली आहे. इथे बॉसला वेगळी केबिन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो. असतात ते � ...\n‘उडान’चा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला\nतासाभराचा विमान प्रवास २,५०० रुपयांत नवी दिल्ली - विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने ‘उडे देश का आम नागरिक’ या घोषवाक्‍यासह आज घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेच� ...\nइराणची भिंत भारत भेदणार का\nभारताचा कर्णधार अनुप कुमार आणि प्रशिक्षक बलवान सिंग यांना भारताच्या विजेतेपदाची खात्री आहे. ‘चीनची भिंत’ ही एक अभेद्य तटबंदी म्हणून ओळखली जाते. कबड्डीविश्वात सामथ्र्यशाली बचावामुळे इराणच्या संघालासुद्धा हेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेमकी हीच भिंत भेदून सलग तिसरा विश्वचषक आपल्याकडे राखण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे. भारत सलग तिसऱ्य ...\nडेबिट कार्ड घोटाळा : तीन महिने सुरू होते ‘माहिती चौर्य’\nबाधित कार्डाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ०.०५ टक्के आहे, असा दावा सरकारने गुरुवारी एकूण बाधित कार्डे ३२.५० लाख यापैकी २६.५० लाख कार्डे व्हिसा आणि मास्टरकार्डची सहा लाख ‘रुपे’ कार्डाचा यात समावेश मे, जून व जुलै असे गत तीन महिने बँकांची, त्यांच्या डेबिट कार्डधारकांची माहिती चोरी करून पैसे काढले गेल्याचे निष्पन्न होत आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठय़ा कार्ड माघारी घेण्या� ...\n'केएसबीपी' ने खुलवले कोल्हापूरचे सौंदर्य\nकोल्हापूर, दि. २२ - 'नावासाठी नाही तर फक्त कोल्हापूरकरांसाठी' अशी संकल्पना घेऊन काही मित्रमंडळींनी कोल्हापूर सुशोभिकरणाचा ध्यास घेतला. सुशिक्षित आणि अभ्यास असलेले उद्योजक मित्र एकत्रित आले आणि त्यांनी रस्ते सौंदयीकरणाचे काम सुरू केले. रस्त्याच्या दुभाजकाजवळील माती गोळा केली. दुभाजकावर, आयलॅँडवर, रस्त्यांच्या कडेला छोटी-मोठी झाडे लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी कोल्हापूरचे स� ...\nडेबिट कार्डप्रकरण: कार्डधारकांनी चिंता करु नये, संबंधीतांवर कारवाई करणार – अर्थमंत्रालय\nहॅकर्सपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असून त्यांच्यावर कारवाई करणारच अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने दिली बँक व्यवहारांची माहिती हॅक झाल्याने देशभरातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्डधारकांना फटका बसल्याने खळबळ माजली असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने मात्र कार्डधारकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. आरबीआय आणि अन्य बँकांना याप्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती � ...\nपान बहारने हॉलिवूड स्टार पिअर्स ब्रॉस्ननला गंडावले\nपान बहार या कंपनीने जाहिरातींच्या माध्यमातून 'जेम्स बाँड' पिअर्स ब्रॉस्ननला गंडवल्याचे समोर आले आहे. कंपनीने सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे तसेच त्याद्वारे गैरसमजदेखील पसरत आहे असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे. कंपनीकडून अनधिकृतरित्या माझ्या चेह-याचा गैरवापर होत असल्याने मला स्वतःला धक्का बसल्याचेही पिअसर्न म्हटले आहे. तंबाखू, सुप� ...\nआता दिवाळीचा फराळही मागवा आॅनलाईन\nअकोला, दि. २१ - दिवाळी या सणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फराळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेल्या राज्यातील नामांकित खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी संकेतस्थळ आणि विविध मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून यंदा दिवाळीचा संपूर्ण फराळ आॅनलाईन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे फराळ तयार करण्यासाठी अजिबात उसंत नसलेल्या महिलांकरीता खाद्यपदार्थ ...\nशाळेमध्ये कुठल्याही भारतीय भाषेला परदेशी भाषेचा पर्याय देऊ नये\nनवी दिल्ली - मातृभाषेमध्येच शाळेत प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही भारतीय भाषेला शाळेमध्ये परदेशी भाषेचा पर्याय देऊ नये. इंग्रजी भाषा शाळेमध्ये बंधनकारक नसावी तसेच भारतीय संस्कृती, आणि परंपरेचा अपमान करणारे संदर्भ शालेय पुस्तकातून काढून टाकावेत अशा शिफारशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणा-या शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने केंद्रीय मनुष ...\n४ जी वेगाबाबतीत जिओ चौथ्या स्थानावर; ट्रायची माहिती\nमुंबई, २१ ऑक्टोबर, (हिं.स.) :४ जी सेवेसाठी देण्यात येणा-या वेगाच्या यादीत रिलायन्स जिओ चौथ्या स्थानावर असल्याची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या नेटवर्कवर मिळणार ४ जी सेवेचा वेग हा रिलायन्स जिओकडून पुरवण्यात येणा-या ४ जी सेवेच्या वेगापेक्षा अधिक असल्याचे त्यात नमूद क ...\nमुकेश अंबानींची संपत्ती इस्टोनियाच्या जीडीपीइतकी\nगेल्या नऊ वर्षांपासून भारतातील सर्वाधिक श्रीमंत; 22 अब्ज डॉलरची संपत्ती नवी दिल्ली - प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून, सध्या त्यांची एकूण संपत्ती 22.7 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. ही संपत्ती युरोपातील विकसित देश म्हणविणाऱ्या इस्टोनियाच्या एकूण देशांतर्गत उत्पाद� ...\n‘स्टार्ट अप्स’साठी राज्यात लाल गालिचा\nखरेदी धोरणात सरकारकडून अखेर अटी शिथिल खरेदी धोरणात सरकारकडून अखेर अटी शिथिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्टार्ट अप्स इंडिया’ संकल्पनेतून पुढे येणाऱ्या नवउद्यमींना अधिक वाव देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या शासकीय खरेदी धोरणात महत्वाचे बदल केले आहेत. निविदा प्रक्रियेत सहभागी होताना कंपनीच्या आर्थिक उलाढालीचा आणि त्या क्षेत्रातील अनुभवाचा निकष शिथील करण्यात आला आहे. � ...\nदीपा कर्माकरच्या 'बीएमडब्ल्यू'साठी रस्ते होणार चकाचक\nआगरतळा, दि. 21 - जिमनॅस्ट दीपा कर्माकरला भेट स्वरुपात मिळालेली महागडी कार 'बीएमडब्ल्यू'साठी त्रिपुरा सरकारने ती रहात असलेल्या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दुरवस्थेत असलेले येथील रस्ते चकाचक होणार आहेत. 'दीपा रहात असलेल्या अभोयनगरपासून ते आगरतळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आ ...\nनवज्योत सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद देणार\nविधानसभा निवडणुकीद्वारे पंजाबची सत्ता पुन्हा हाती मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोचेर्बांधणी सुरू केली असून, खासदारकीचा राजीनामा देत, भाजपामधून बाहेर नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न चालविले आहे. ते काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस तयार आहे. भाजपामधून बाहेर पडल्यानंतर आप वा काँग्रेसम ...\nडेबिट कार्डांवर 'सर्जिकल स्ट्राइक'\nमुंबई : भारतातील तब्बल ३२ लाख डेबिट कार्डांचा डाटा चोरीस गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. फटका बसलेल्या कार्डधारकांना नवीन कार्डे देण्याचा निर्णय काही बँकांनी घेतला आहे, तर काही बँका पासवर्ड बदलण्याचा सल्ला देणार आहेत. भारतीय बँकिंग व्यवस्थेवर हा सर्जिकल स्ट्राइकच समजला जात आहे. आपल्या कार्डांचा चीनमधील अनधिकृत ठिकाणांहून वापर झाल्याचे काही कार्डधारकांना आढळ� ...\nएसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस, अ‍ॅक्सिसची 32 लाख -डेबिट कार्ड करप्ट\nमुंबई, दि. 20 - एसबीआयच्या सहा लाखांहून जास्त डेबिट कार्डधारकांची कार्ड्स ब्लॉक केली असतानाच आता इतर बँकांच्या ग्राहकांची ई-सुरक्षाही धोक्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या सुमारे 32 लाख ग्राहकांची कार्ड्स करप्ट झाल्याची माहिती आहे. संबंधित बँकांच्या ग्राहकांना कार्ड रिप्लेस करण्याच्या किंवा सिक्युरिटी कोड (पिन नंबर) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सु ...\nपुण्यात बीएमडब्ल्यूने सुरु केली आफ्टरसेल्स सुविधा\nपुणे -बेवेरिया मोटर्ससह पश्चिम भारतासाठी बीएमडब्ल्यू इंडियाकडून सर्वांत मोठी आफ्टरसेल्स सुविधा दाखल करण्यात आली आहे. पुण्यात ही सुविधा बेवेरिया, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे उपलब्ध असणार आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष (ऍक्ट) प्रँक श्लोडर याबाबत बोलताना म्हणाले, बीएमडब्ल्यूने कंपनीच्या स्थापनेपासून तिची सर्वांत महत्त्वाकांक्षी उत्पादन रेंज, अद्वितीय व इर्मसि� ...\nहिंदुस्थानमधील ३२ लाख एटीएम ग्राहकांच्या माहितीची चोरी, ६ लाख कार्ड ब्लॉक\nस्टेट बँकेसह देशातील विविध बँकांतील ३२ लाख ग्राहकांच्या एटीएम कार्डांची महत्त्वाची चोरली गेली आहे. एटीएमच्या यंत्रणेत शिरलेल्या मालवेअरमुळे हा प्रकार झाला आहे. या चोरीची सुरुवात नेमकी कुठून झाली हे अद्याप लक्षात आले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्टेट बँकेने सहा लाख कार्ड ब्लॉक केली आहेत. एटीएम अथवा एटीएम कम डेबिट कार्डांच्या माहितीची चोरी झाली आहे. या संदर्भात तपास सुरू � ...\nभारत वि. न्यूझीलंड दुसरी वनडे आज, राजधानी दिल्लीत रंगणार सामना\nनवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतली दुसरी वन डे आज दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघानं कोटलावर मागील 11 वर्षापासून एकही वनडे सामना गमावलेला नाही. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं धरमशालाच्या पहिल्या वन डेत मिळवलेला मोठा विजय लक्षात घेता, दिल्लीच्या दुसऱ्य� ...\nऐन सणासुदीत ग्राहकांच्या खरेदी उत्साहाला सायबर हल्ल्याचे विघ्न\nस्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ‘ब्लॉक’ स्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ‘ब्लॉक’ ; अ‍ॅक्सिस बँकेतील खात्यांची लक्षणीय माहिती ‘हॅक’ यंदाच्या दिवाळीत डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याद्वारे खरेदीकरिता सज्ज झालेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बँकांच्या व्यवहारांवर विदेशातून हल्ला होत असल्याच्या वाढत्या प्रकारामुळे स्टेट बँकेला तिच्या सहा लाख डेबिट कार्डाद� ...\nजीएसटी लागू झाल्यास दैनंदिन गरजेच्या वस्तू महागणार\nकेरळ व अन्य राज्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. जीएसटी लागू झाल्यास काय स्वस्त आणि काय महाग होणारकेंद्राच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे नजीकच्या काळात सामान्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील करांची मर्यादा किमान ६ टक्क्यांपासून � ...\nपुण्यात कॉटन कंपनीला भीषण आग, ५ ठार\nपुणे, दि. २० - पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिला व एका पुरूषाचा समावेश आहेत. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले न� ...\nजयललितांचे छायाचित्र ठेवून मंत्रिमंडळ बैठक\nचेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम � ...\nपरकीय चलन छपाई शेंद्रे बीडकॉन औद्योगिक वसाहतीत होणार\nरो, डॉलर्स अशा परकीय चलनाची छपाई करणारी फ्रान्सची जगप्रसिद्ध डे ला रू कंपनी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत त्यांची सिक्युरिटी प्रेस औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतीत सुरू करणार असल्याचे उद्येाग विभागातील सूत्रांकडून समजते. यासाठी महाराष्ट्र शासनाने कंपनीला १० एकर जागा दिली असून कंपनीने या उपक्रमात ३०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सिक्युरिटी प्रेस भारतात आणणारी डे ला रू ही � ...\nजीएसटी दरावर एकमत नाही; पुन्हा होणार बैठक\nनवी दिल्ली : नव्याने लागू करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर काय असावा यावर 'जीएसटी' परिषदेच्या बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष व वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितले की, 'जीएसटी' दराबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये अज ...\nमोबाईल, डेस्कटॉप गुगल नेटसर्च वेगवेगळे दिसणार\nगुगल सर्च या जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनकडून स्मार्टफोन व डेस्कटॉपवर केल्या जाणार्‍या सर्चचे परिणाम वेगवेगळे दिसावेत असे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे समजते. त्यासाठी मोबाईल इंडक्स तयार करण्याचे काम सुरू असून यामुळे जे सर्च मोबाईल वर केले जातील त्याच परिणाम फक्त मोबाईलचवरच पाहता येतील. डेस्कटॉपसाठीचा इंडेक्स मोबाईल प्रमाणे वारंवार अपडेट केला जाणार नाही असेही � ...\nई कॉमर्स कंपन्यांना छोट्या शहरातून चांगला प्रतिसाद\nफ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांनी दिवाळी निमित्त लावलेल्या त्यांच्या मेगा सेलला छोट्या व मध्यम शहरातून यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहेच पण मिझोराम, मेघालय,हिमाचल प्रदेश, गोवा, जम्मू काश्मीर या राज्यातील ग्राहकांकडूनची मालासाठी मागणी नोंदविली गेल्याचे समजते. या कंपन्यांच्या सेलमधील ४० टक्के हिस्सा हा छोट्या, मध्यम शहरातील ग्राहकांचा आहे.तसेच या से� ...\nभारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका\nबीजिंग : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मोहीम भारतात जोरात सुरू झाल्याने चीन प्रचंड अस्वस्थ झाला आहे. बहिष्कार टाकण्याचा प्रचार भारतातील प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमातून होत असल्यामुळे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचा जळफळाट झाला आहे. भारतीय वस्तू चिनी वस्तूंची बरोबरी करू शकत नाहीत. भारत केवळ चीनवर भुंकू शकतो, अशी अश्लाघ्य भाषा या वृत्तपत्राने वापरली आहे. ...\nJNUमधील विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना ठेवले डांबून\nनवी दिल्ली, दि. 20 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदसाठी सुरू असलेले आंदोलन काल रात्री (बुधवारी) अधिक तीव्र झाले. बायोटेकच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, रजिस्ट्रार यांच्यासह 10 अधिका-यांना प्रशासकीय भवनात डांबून ठेवून, निदर्शने केली. नजीब बेपत्ता होऊन पाच दिवस झाले तरीही त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जवळपास 200 व ...\nजयललितांचे छायाचित्र ठेवून मंत्रिमंडळ बैठक\nचेन्नई : आजारी मुख्यमंत्री जयललिता यांच्या खात्यांचे राज्यपालांनी वाटप केल्यानंतर अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी बुधवारी पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयललितांच्या अनुपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने या बैठकीची छायाचित्रे प्रसिद्धीला दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जयललिता यांचे छायाचित्र ठेवल्याचे आणि पनीरसेल्वम शे� ...\n4G ग्राहकांना 259 रूपयांत 10GB डेटा,एअरटेलची नवी ऑफर\nनवी दिल्ली, दि. 19 - रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट सेवा सुरू केल्यापासून देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चुरस सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने मोबाईल ग्राहकांसाठी 259 रूपयांत 10 जीबी 4 जी इंटरनेटच्या ऑफरची घोषणा केली. नवीन 4 जी स्मार्टफोन घेणा-यांसाठी ही ऑफर असणार आहे अशी माहिती कंपनीकडून बुधवारी देण्यात आली. यामध्ये ग्राहकाला 1 जीबी डेटा हा तात्� ...\nब्लॉक झालेले एसबीआयचे कार्ड कसे करावे सुरू \nमात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो. मुंबई: एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिवाळीच्या तोंडावर आपल्या ग्राहकांना मोठी धक्कादायक बातमी दिली. एसबीआयने सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ६ लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. कुणालाही याची पुर्वमाहिती न दिल्याने अनेकांना नेमकं काय झालं हे कळालंच नाही. त्यामुळे अनेकजन सं� ...\nभारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर तिबेट सीमेजवळ कोसळले\nलष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले. भारतीय हवाईदलाचे एक हेलिकॉप्टर बुधवारी (दि. १९) उत्तराखंड येथे कोसळले. उत्तराखंड येथील माना पास भागात भारत-तिबेट सीमारेषेजवळ एमआय १७ हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या सरावादरम्यान उड्डाण घेताना हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरचे नुकसान झाले असले तरी यात कोणी जखमी नसल्याचे समजते. हेलिकॉप्टरमधील सर्व जवान सुरक्षित अस ...\nजिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी\nमुंबई, दि. 19 - रिलायन्स जिओची ऑफर म्हणजे विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, त्याला जुगार समजू नये, अशा शब्दात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उत्तर दिले आहे. रिलायन्सने दिलेल्या या ऑफरमधून कंपनीला कसा फायदा होत असेल, ऑफर संपल्यानंतर काय, असा प्रश्‍न अनेकांना सतावतो. त्यावर मुकेश अंबानींनी रोखठोक उत्तरे दिली. कार्यक्रम 'ऑफ दी कफ'मध्ये ते बोलत होते. रिलायन्स जिओ म ...\nहैदराबाद, दि. 19 - वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत 12 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. उत्पादन साहित्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे टाटाने हा निर्णय घेतला आहे. टाटा मोर्टर्सने नॅनो नव्याने बाजारात आलेल्या टियागो आणि अरिया या कारच्या किमती 2 लाख 15 हजारापासून 16.3 लाख रुपयांपर्यंत आहेत. वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या स्� ...\nभारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय\nभारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता कबड्डी विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात मंगळवारी भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताचे उपांत्य फ� ...\nभारत रशिया संयुक्तरित्या करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती\nनवी दिल्ली, १९ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारत आणि रशिया संययुक्तरित्या नव्या पीढिच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमतादेखील वाढवण्यात येणार असून ती ६०० किमीपेक्षा अधिक असणार आहे. भारताला एमचीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर रशियाने भारताबरोबर या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी तयारी दर्शवली आहे. या वर्षी जून महिन्यात भारताला एमटीसीआरचे सद ...\nव्हेल, डॉल्फिनच्या जलसमाधीस विरोध\nमहाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून मुंबई व कोकण किनारपट्टीवर व्हेल व डॉल्फिन हे महाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मात्र, ते वाहून का येत आहेत, हा प्रश्न सरकारी यंत्रणा, सागरी अभ्यासक, पर्यावरणवादींसाठी अनुत्तारित असल्याने त्यातच वाहून येण्याची त्यांची संख्या दिव ...\nमेक माय ट्रीप आणि आयबिबोचे विलीनीकरण\nमेक माय ट्रीपच्या अंतर्गत आयबिबो विलीनीकरण करण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी मेक माय ट्रीप आणि आयबिबो ग्रूप या दोन्ही कंपन्यांचे आता विलीनीकरण झाले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने या निर्णयाला मंजुरी दिली असून दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार आणि सर्वोत्तम सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.मेक माय ट्रीप आणि आयबि� ...\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-processes-water-purification-5228?tid=163", "date_download": "2018-04-23T11:44:03Z", "digest": "sha1:OHIRX7L3FZF7V66IPXUV2YNAEEEGUTBI", "length": 18145, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, processes for water purification | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nपिण्याचे स्वच्छ पाणी ज्या गतीने कमी होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणेदेखील कठीण होईल. यावर पाणी शुद्धीकरण हा एकमेव उपाय अाहे. पाण्याच्या दूषित संसर्गाने, कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीची माहिती असने अावश्‍यक अाहे.\nपाण्यात न विरघळणारे पदार्थ असतील, माती वा गढूळपणा असेल तर पाणी गाळून घ्यावे लागते.\nपिण्याचे स्वच्छ पाणी ज्या गतीने कमी होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणेदेखील कठीण होईल. यावर पाणी शुद्धीकरण हा एकमेव उपाय अाहे. पाण्याच्या दूषित संसर्गाने, कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीची माहिती असने अावश्‍यक अाहे.\nपाण्यात न विरघळणारे पदार्थ असतील, माती वा गढूळपणा असेल तर पाणी गाळून घ्यावे लागते.\nहा एक खात्रीशीर उपाय आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर किमान १० मिनिटे उकळावे. उकळलेले पाणी थंड करत असताना त्यात तुरटी फिरवावी. यामुळे जिवाणू-विषाणू तर नष्ट होतातच पण क्षारांचे प्रमाणसुद्धा कमी होते. त्यामुळे मुतखड्यासारखे आजारही कमी होतात. पण काही विषारी घटक मात्र कमी होत नाहीत. पाणी उकळल्याने त्याची चव बदलते व ते बऱ्याच जणांना आवडत नाही. हे त्यातील विरघळलेले वायू निघून गेल्यामुळे होते. पण काही काळ पाणी झाकून तसेच ठेवल्यास त्याची चव ठीक होते.\nपाण्यामध्ये क्लोरिन मिसळणे. याकरिता सोडियम हायपोक्लोरायीट (५ टक्के द्राव्य) हे औषध वापरतात. हे औषध एक वर्षाच्या आतील असावे, त्यापेक्षा जुने नको. ५ ते १० मिलि सोडियम हायपोक्लोरायीट २० लिटर पाणी स्वच्छ करते. यापेक्षा जास्त औषध टाकल्यास पाण्याला कडूपणा येतो. क्लोरिनच्या शुद्धीकरणाने बहुतेक सर्व जिवाणू व विषाणू मरतात.\nहे काही युरोपीय देशांमध्ये वापरतात. क्लोरीनेशनपेक्षा अधिक जिवाणू मारण्याची क्षमता असूनही महाग असल्यामुळे फार लोकप्रिय प्रकार नाही. आणि घरगुती वापरासाठी उपलब्धही नाही.\nयामध्ये क्लोरिनबरोबर अमोनियाचा सुद्धा वापर केला जातो. याचा परिणाम जास्त काळ राहतो.\nसहलीमध्ये वगैरे तत्काळ पाणी शुद्ध करायचे असल्यास वापरू शकतो.\nअतिनील किरण, रिझर्व्ह, अाॅस्मॉसिस, अल्ट्राफीलट्रेट असे विविध तंत्रज्ञान वापरून बनवलेले फिल्टर्स आता मिळतात. अतिनील किरणांनी सूक्ष्मजीव नष्ट होतात. पण क्षारांचे व विषारी पदार्थांचे प्रमाण बदलत नाही व पाण्याची चवदेखील बदलत नाही. त्याकरिता रिझर्व्ह, अाॅस्मॉसिस अल्ट्राफीलट्रेट ( RO व RF) हे तंत्रज्ञान लागते. जर आपल्या पाण्याची चव चांगली असेल व विषारी पदार्थ व क्षार यांचे प्रमाण कमी असेल तर फक्त यूव्ही फिल्टर वापरला तरी चालेल. त्याला फार खर्च येत नाही. RO व RF फिल्टर्सना पुढे ठराविक वापरानंतर फिल्टर्स बदलावे लागतात. हे थोडे खर्चिक व ग्रामीण भागामध्ये सेवा मिळवण्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. व पाणीसुद्धा जास्त वाया जाते. विजेची अडचण असेल तर वीज न लागणारे साधे फिल्टर्स सुद्धा मिळतात.\n(लेखिका दौंड, जि. पुणे येथे आयसीयू तज्ज्ञ आहेत.)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nगॅस्ट्रो आजारामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे...\nनंदाताई दूधमोगरे यांचा शेतीत असाही...बुलडाणा : स्त्री ही समाजात त्याग, नम्रता,...\nमहिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली...शेतीमध्ये हिरवं स्वप्न फुलविण्यात महिलांचे योगदान...\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील...\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल...दिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि....\nशेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...\nप्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची...निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक...\nमहिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगसोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे,...\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nमहिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण,...महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nव्यवहारांच्या नोंदीसाठी पासबुक...पासबुकमध्ये आपण खात्यामध्ये ठेवलेल्या पैशांची...\nगांडूळ खत निर्मिती उद्योगगांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत...\nमहिला बचत गटांनी साधली शेळीपालनातून...काळोशी (ता. जि. सातारा) गावातील महिलांनी एकत्र...\nबॅंक खाते नंबर महत्त्वाचा...राधाच्या मदतीनं खातं निघालं नि त्यात आपले...\nशासनाच्या महिला उद्योग धोरणातील तरतुदीमहिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nलाँड्री व्यवसायातून गवसला ‘तनिष्कां'ना...सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-kisan-long-march-part-1-6669", "date_download": "2018-04-23T11:39:40Z", "digest": "sha1:6644ZC7PWRQESLHLB7PYTALIMAWACWSZ", "length": 26018, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on KISAN LONG MARCH - PART 1 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 19 मार्च 2018\nलॉंग मार्चमुळे शेतकऱ्यांची लढाई काही पावले नक्कीच पुढे गेली आहे. पाय रक्ताळून घेत चालेल्या माय बाप शेतकऱ्यांचा हा विजय आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांचा लूट मुक्तीचा लढा अजून संपलेला नाही.\nशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. अंमलबजावणीत मात्र सरकारने अनेक अटी व शर्ती लावल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. अटी व शर्तींमुळे आपण फसविले गेलो असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पक्की झाली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांसारख्या मागण्यांबाबतही सरकार कोणतीच ठोस पावले उचलण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत होता. शेतकऱ्यांमधील या असंतोषाला लढ्याचे स्वरूप देत आरपार संघर्ष करण्याची आवश्यकता होती. किसान सभेने यासाठी नाशिक येथून मुंबईपर्यंत हजारोंच्या संख्येने चालत जात शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्याची घोषणा केली होती. आपल्या घोषणेप्रमाणे किसान सभेने दिनांक ६ मार्च २०१८ रोजी नाशिक येथील सी.बी.एस. चौकातून शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला सुरवात केली. दहा-बारा हजाराच्या संख्येने लॉंग मार्च सुरू करण्यात आला. लॉंग मार्च जसजसा मुंबईकडे झेपावू लागला तसतशी त्यात भर पडत गेली. कसारा घाट उतरताना हा सहभाग तब्बल चाळीस हजारांच्या वर गेला. पायी चालत निघालेला शेतकऱ्यांचा हा सैलाब १२ मार्चला विधान भवनाला घेराव घालेल, अशी घोषणा किसान सभेने केल्याने लॉंग मार्च खऱ्या अर्थाने दखलपात्र बनला.\nलॉंग मार्चला सर्वच स्थरांतून व्यापक समर्थन लाभले. शेतकरी राजा ‘तू एकटा नाहीस’ म्हणत हृदय जिवंत असलेल्या प्रत्येकाने लॉंग मार्चचे समर्थन केले. शेतकरी मागण्यांना पाठिंबा दिला. मान्य झालेल्या मागण्या पेक्षाही हे समर्थन शेतकऱ्यांसाठी मोलाचे होते. आपण एकटे नाही आहोत ही भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजवणारे होते. व्यापक जनसमर्थनामुळे सरकारला अखेर या शेतकरी राजाची दखल घ्यावी लागली आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. कर्जमाफीच्या प्रश्नावरही सरकारला आपला ताठरपणा सोडावा लागला. सरकारने आजवर बाजारात वारंवार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले आहेत. घामाचे दाम नाकारून शेतकऱ्यांची पिढ्यान्‌पिढ्या लूट केली आहे. शेतकरी मायबापाच्या या लुटीचा अंशतः परतावा म्हणून शेतकऱ्यांची पोरं कर्जमुक्ती मागत आहेत. शेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करून या लूट वापसीची सुरवात करावी लागली आहे.\nकर्जमुक्तीसाठी राज्यात ४६.५२ लाख शेतकरी खातेदारांसाठी निधी वितरित करावा लागला. राज्यभरात ३५.५१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कमही जमा करावी लागली आहे. असे असले तरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत सरकारने ज्या अटीशर्ती लावल्या आहेत त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. लॉंग मार्चने या वंचित शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी आणत कर्जमाफीतील अटीशर्ती रद्द करण्याची आग्रही मागणी केली. चर्चेअंती यातील काही अटी सरकारला मागे घ्याव्या लागल्या. जून २०१७ च्या कर्जमाफीत २००९ च्या अगोदरच्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. २००८ च्या कर्जमाफीत जमिनीची अट असल्याने त्या कर्जमाफीतूनही हे शेतकरी वंचित राहिले होते. किसान सभेच्या मागणीनुसार अशा वंचित शेतकऱ्यांचाही (२००१ ते २००९) समावेश कर्जमाफीच्या योजनेत करण्यात आला आहे.\nमहिलांचे कर्ज प्राधान्याने माफ करण्याचा निर्णय पुरोगामी वाटत असला तरी याचा परिणाम मात्र उलटा झाला होता. कुटुंबातील एकालाच लाभ देण्याची अट असल्याने महिलांच्या नावावरील छोटे कर्ज माफ झाले होते. कुटुंबातील पुरुषांच्या नावावरचे मोठे कर्ज मात्र अपात्र ठरले होते. किसान सभेने हा अन्याय दूर करण्याची मागणी केली. बऱ्याच घासाघीशी नंतर अखेर ती मान्य करण्यात आली. कुटुंबातील पती अथवा पत्नी असे दोघांचेही १.५ लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. कुटुंबातील एकाच खात्याचे कर्ज माफ करण्याच्या अटीमुळे राज्यातील लाखो खातेदारांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. किसान सभेने ही अट रद्द करून प्रत्येक अर्जदाराला कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी केली होती. असे करण्यासाठी किती वित्तीय भार सरकारवर येईल हे तपासून याबाबत निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. शिवाय ३० जून २०१६ पर्यंतच कर्जमाफीचा लाभ दिला गेला होता. आता किसान सभेच्या मागणीप्रमाणे ३० जून २०१७ पर्यंत लाभ देण्याबाबत प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्जमाफीत शेती सुधारणा, इमूपालन, शेडनेट, पॉलिहाउस यासाठीचे कर्जही माफ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने अर्ज करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक समिती गठीत करण्याचेही मान्य करण्यात आले आहे.\nलॉंग मार्चमध्ये शेतकऱ्यांनी वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा अत्यंत त्वेषाने लावून धरला होता. २००६ साली कायदा होऊनही शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी अजूनही त्यांच्या नावावर झाल्या नव्हत्या. अपील प्रक्रियेत लाखो दावे धूळखात पडून आहेत. शेतकऱ्यांच्या मनात याबाबत मोठा संताप खदखदत होता. सरकारला या असंतोषाची दखल अखेर घ्यावी लागली. पुढील सहा महिन्यांत वनजमिनीच्या दाव्यांचा निपटारा करून वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा निर्णय करावा लागला.\nस्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, राज्य कृषिमूल्य आयोग पूर्णपणे गठीत करून हमीभाव देण्याची कार्यवाही करण्यात येईल, ऊसदर नियंत्रण समिती नव्याने गठीत करण्यात येईल, निराधार योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, रेशन कार्डचे प्रश्न सोडविण्यात येतील. बोंड अळी व गारपीटग्रस्तांना भरपाई दिली जाईल, समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून ते दुष्काळी भागाला दिले जाईल, देवस्थान, आकारी पड, वरकस जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यात येतील. गायरान जमिनीवरील बेघरांचे अतिक्रमण नियमित करण्यात येईल, दूधदर प्रश्नी तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात येईल, असेही या वेळी मान्य करण्यात आले आहे. अंमलबजावणीचा पूर्वानुभव पाहाता सावधगिरी म्हणून मागण्या लेखी स्वरूपात घेण्यात आल्या आहेत. कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संयुक्त देखरेख समित्याही गठीत करण्याचे मान्य करण्यात आले आहे.\nलॉंग मार्चमुळे शेतकऱ्यांची लढाई काही पावले नक्कीच पुढे गेली आहे. पाय रक्ताळून घेत चालेल्या माय बाप शेतकऱ्यांचा हा विजय आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांचा लूट मुक्तीचा लढा संपलेला नाही. शेतकरी कर्जमुक्तीची लढाईही संपलेली नाही. लढाईचा केवळ एक टप्पा पूर्ण झाला आहे. किसान सभेला व शेतकऱ्यांच्या मुलांना याचे रास्त भान आहे. अधिक संघटितपणे पुढील लढाई करावी लागेल, याची जाणीवही त्यांना नक्कीच आहे.\n(लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे\nविजय victory संप शेतकरी संप सरकार government कर्ज कर्जमाफी वन forest शेती नाशिक २०१८ 2018 हृदय कर्जमुक्ती महिला women हमीभाव minimum support price समुद्र अतिक्रमण encroachment लेखक महाराष्ट्र\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/*-*-17835/", "date_download": "2018-04-23T11:16:27Z", "digest": "sha1:VZW6TLOR5ABA54AZYLCNKJHTH7SPBKH6", "length": 2676, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-* वेदनांच्या गावी *", "raw_content": "\n* वेदनांच्या गावी *\n* वेदनांच्या गावी *\n* वेदनांच्या गावी *\nकोणी भेटतो स्वप्नांच्या गावी\nतर कोणी प्रेमाच्या गावी\nदुख तसं जुनंच होत\nवेदना माञ नवीन होती\nमी तिच्या ती दुस-याच्या\nप्रेमात उध्वस्त झाली होती\nविरहाचे दार खिडक्या एकांती\nकोरडे उसासे अश्रुंच्या भींती\nदुखावलेली मने तुटलेली नाती\nयाच आमच्या होत्या सोबती\nतुला कधीच भेटनार नाही\nअसं ती म्हणाली होती\nनशीबाने पुन्हा भेट आमची\nवेदनांच्या गावी घडवली होती.\nकवी-गणेश साळुंखे. ( GS ) .\n* वेदनांच्या गावी *\n* वेदनांच्या गावी *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/editorials/editorial-slum-dwellers", "date_download": "2018-04-23T11:02:25Z", "digest": "sha1:SFMZJUKYPUWPQ4BYVMVVUEX7YPSA23SP", "length": 15503, "nlines": 122, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "EDITORIAL: Slum dwellers | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome संपादकीय झोपडपट्ट्यांचा भस्मासुर\nआपण मोठ्या उमेदीने सरकार निवडून देत असतो, परंतु सरकारमध्ये बसलेल्या राजकारण्यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य असल्याचे जाणवत नाही. महाराष्ट्रात नुकताच सरकारने सरसकट प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मुळात प्लॅस्टिक हा जनतेच्या सार्वजनिक जीवनाशी व व्यावसायिक कारणांसाठी असलेला उपयुक्त असा घटक आहे. त्याचे दुष्परिणाम देखील आहेतच. परंतु आधीच्या सरकारने देखील ५० मयक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक उत्पादनावर आधीच बंदी घातलेली असताना, फडणवीस सरकारने नव्याने प्लास्टिक बंदी जाहीर करावी याला काय म्हणावे प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम पाहता यावर बंदी ही हवीच, पण सरसकट बंदी केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा रोजगार व स्वयं रोजगारावर देखील होणारच. एक तर सरकार रोजगार उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरत आहे आणि अशा प्रकारे सरसकट प्लास्टिक बंदीमुळे होणाऱ्या बेरोजगारीची जबाबदारी सरकार घेईल का हा गंभीर प्रश्न येथे नक्कीच निर्माण होत आहे.\nआणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की, सरकारला प्लास्टिक बंदी करावी असे का वाटले काय, प्लास्टिक बंदीमुळे मुख्य समस्या ह्या दूर होणार आहेत काय, प्लास्टिक बंदीमुळे मुख्य समस्या ह्या दूर होणार आहेत प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामांस खरा जबाबदार कोण आहे प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामांस खरा जबाबदार कोण आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुळात प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामास शासनच जबाबदार आहे. आज आपण अनेक ठिकाणी पाहिल्यास दिसून येते की, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. अनेक ठिकाणच्या कचरा हा वेळेत उचलला जात नाही. अनेक गटारे तसेच नाल्यामध्ये आपल्याला कचरा साचल्याचे दिसते. फक्त पावसाळा जवळ आल्यावरच सरकार नाले सफाई वर लक्ष देते. इतर वेळेस मात्र तिकडे सरकार कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जाते. योग्य वेळी कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास समास्याच निर्माण होणार नाही. प्लास्टिकचा उगीचच बाहू करण्याची वेळच सरकारवर येणार नाही.\nआता आपण मूळ मुद्द्याकडे वळू या. प्लॅस्टिकची मूळ समस्या जेथून निर्माण होते, त्या समस्यांचे मूळ हे अस्ताव्यस्त वाढणाऱ्या झोपडपट्ट्या हेच आहे. जो पर्यंत मुंबई सारख्या महानगरांतील झोपडपट्ट्यांचे निर्मूलन होत नाही, तो पर्यंत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार. मुंबईतील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमधील कचरा हा मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळालगत फेकला जातो. पुढे तोच कचरा पावसाळ्यात वाहत वाहत नाल्यात जातो आणि याचा गंभीर परिणाम म्हणजे पावसाळ्यात मुंबई जलमय होवून जनजीवन विस्कळीत होते. आज ही रेल्वे रुलालगत ५/५ फुटाचे कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. अशा या रेल्वे मार्गा शेजारील झोपडपट्ट्यांचे तातडीने स्थलांतर होणे क्रमप्राप्त आहे झोपडपट्टी निर्मूलनासाठी देखील सरकारची “झोपडपट्टी पुनर्विकास योजना” अस्तित्वात आहे. परंतु त्या योजनेतील बांधकामे ही संतोषजनक नाहीत. अनेक “झोपू” प्रकल्प हे १५ ते २० वर्षांपासून रखडलेले आहेत. परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही. फक्त सत्तेचे राजकारण सुरू आहे. विकासाच्या बाबतीत सरकार डोळ्यावर अंधतेची पट्टी बांधून बसले आहे. विकासापेक्षा मुंबई सारखी महानगरे भकास कशी होतील यावरच यांचे लक्ष आहे. झोपडपट्ट्यांचा भस्मासुर वाढतच असताना सरकार देखील त्यास खतपाणी घालण्याचे काम करीत आहे.\n१९९५ ला जेव्हा भाजपा शिवसेना युतीचे सरकार होते, तेव्हा यांनी १९९५ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले होते, मात्र दिवसेंदिवस ही राजकारणी मंडळी केवळ निवडणुकीतील मतांच्या राजकारणासाठी अनधिकृत झोपडपट्ट्यांना संरक्षण देतच आहेत. त्यामुळे मुंबई सारखी महानगरे भकास, विद्रूप होत चालली आहेत. महानगरांचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. अशाप्रकारे अनधिकृत झोपड्यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या संरक्षणामुळे मुंबई बकाल होत चालली आहे. परंतु सरकार मात्र प्लास्टिक बंदी कठोर करणार आहे म्हणे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष देखील यावर काही ठोस भूमिका घेत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच एक घोषणा केली की, २००९ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देणार. तेव्हा आम्ही जनतेच्या वतीने सरकारला आवाहन करतो की, मुंबापुरी सारख्या महानगरांतील झोपडपट्ट्या अधिकृत न करता त्यावर कठोरात कठोर कारवाई करून हा झोपडपट्ट्यांचा वाढता भस्मासुर वेळीच रोखा आणि मुंबई सारख्या महाराष्ट्रातील सर्वच महानगरांचा विकास करा. “स्वच्छ भारत अभियानाची” नुसती टिमकी वाजवून चालणार नाही, तर स्वच्छ भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ दिसू द्या.\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआज १ मे अर्थातच महाराष्ट्र दिन\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/women-power/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:13:33Z", "digest": "sha1:JYFVGD477FDQOXOXHE3G4DBSRXPHZ5BZ", "length": 7493, "nlines": 124, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "महिलांनो मुलींनो सावधान | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महिलाराज महिलांनो मुलींनो सावधान\nमानव सेवा संघाकडून त्या सर्व महिलांना व मुलींना ज्या जाॅबला अथवा काॅलेजला एकट्या जातात त्यानां एक सावधानतेचा इशारा.\n▶तुम्हाला जर एखादा लहान मुलगा रोडच्या कडेला रडत रडत त्याच्या घरचा पत्ता सांगुन त्याला त्या पत्त्यावर सोडण्याची विनंती करत असेल तर त्याला त्या पत्यावर न घेवून जाता थेट जवळील पोलिस स्टेशन मध्ये घेवून जा. कारण त्या पत्त्यावर अपहरणकर्ता,दरोडेखोर किंवा बलात्कारी दबा धरुन बसलेला असेल.\n▶कृपया एक मॅसेज सर्व मुलींना आणी मुलांना ही पाठवा ज्यांना बहीण आणी मैत्रीण आहे. आपला एक मॅसेज\nमुलीचा प्रेमीकेचा बहिणीचा आईचा बायकोचा\nलाईफ वाचवू शकतो. मानव सेवा संघ(महाराष्ट्र राज्य) 8975624040 9657824040 9689244040\nमित्रांनो जास्तीत जास्त शेयर करा\nकिल्ले – मुरुड जंजिरा\n“शिवनेरी ते रायगड” छत्रपती शिवरायांच्या पायी पालखी सोहळ्याचे आयोजन\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%82", "date_download": "2018-04-23T11:52:28Z", "digest": "sha1:KVFST75WMDYKLYYFYNKG75MIUMXMCQQP", "length": 15632, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : जर्मन भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nजर्मन विकिMP-Chat (जर्मन विकि IRC-Einstieg)\nइंग्लिश विकिपीडिया बद्दल आमेरीकन सर्व्हे वाचा\nस्वागत आणि साहाय्य चमू\nYou can read in english at Helpdesk. मराठी विकिपीडियावर किमान स्वरूपाची सहाय्य पाने उपलब्ध असून सुद्धा, नवीन सदस्यांना व्यक्तिगत सहाय्य आणि जिव्हाळा ऊपयोगी आणि उत्साह देणारा वाटतो.\nसर्व विकिपीडिया सदस्यांनी नवीन सदस्य आणि अनामिक सदस्य] नोंदी पाहून नवागत सदस्यांना व्यक्तिगत सहाय्य आणि सहकार्य देऊन त्यांना मराठी विकिपीडिया समुदायात सामावून घ्यावे.कृपया खाली दिलेले सदस्यचौकट साचे आपल्या सदस्य पानावर लावावेत म्हणजे आपले वर्ग:स्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य वर्गात वर्गीकरण होऊ शकेल.या प्रकल्पाचे आणि वर्गिकरणाचे उद्दीष्ट व्यक्तिगत लक्ष देण्याजोग्या सहाय्यात समन्वय साधणे हा आहे.\n१ स्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी सदस्यांचे साचे\n२ मेन्टॉर प्रोग्रॅम(सल्लादानाचा उपक्रम)\nस्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी सदस्यांचे साचे[संपादन]\nस्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी होऊ इच्छिणार्‍या सदस्यांनी खालील पैकी साचा आपल्या सदस्य पानावर लावावा.\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\n{{सदस्य विकिपिडिया/स्वागत आणि साहाय्य चमू २}}\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\n{{यजमान/स्वागत आणि साहाय्य चमू}}\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे ..\nविकिपीडिया:मेंटॉर प्रोग्राम[मराठी शब्द सुचवा] जर्मन भाषेतील विकिपीडीयाने यशस्वी केलेल्या साहाय्य प्रणालीच्या प्रेरणेने हा उपक्रम येथे सुरू करण्यात आला आहे.\nविकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मेन्टॉर कार्यक्रमाची ओळख\n2. संपादन खिडकी खालील \"जतन करा“ कळी वर टिचकी मारा .\n{{subst:Marathihelp}} इंग्रजीत संपादन करणारे नवखे अनामिक सदस्य\n{{subst:स्वागत}} नवीन सदस्यांचे स्वागत\n{{subst:बिनधास्तबदला}} अनामिक सदस्याकडून किरकोळ बदल\n{{subst:विकिमार्गदर्शक}} विकिमार्गदर्शकाचे सहाय्य हवे असल्यास सदस्य पानावर लावण्या करिता\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n Thanks WhisperToMe (चर्चा) २०:४७, ४ एप्रिल २०१२ (IST) प्रिय साथियो मेरा नाम आस मौहम्मद अब्बासी है और मेरा हिन्दी विकिपीडिया पे नाम आस मोहम्मद अब्बासी है अत: उसमे जो यूजर आता है उसको हटाया जा सकता है या नही कृप्या मेरी मदद करें धन्यवाद 2405:205:200A:E05B:0:0:1382:80A4 ०८:२६, ३१ डिसेंबर २०१६ (IST)\nस्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/508/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%20%E0%A4%A8%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T11:07:58Z", "digest": "sha1:CNEXI4AYUVP6QDVSA3OTOD3PABMBVG5G", "length": 10293, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा - धनंजय मुंडे\nराज्याला आर्थिक संकटात लोटणारा 'अनर्थ'संकल्प\nअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळाने पीडित लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना अर्थसंकल्पात नियोजनाचा अभाव दिसत आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात, अराजकतेच्या खाईत लोटलं असून हा अर्थसंकल्प नाही तर 'अनर्थ'संकल्प आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.\nविधिमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, ती आशा फोल ठरली आहे. राज्याचा विकास दर वाढत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे, परंतु विकास दर निश्चितीचे निकष बदलून सरकारने जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. राज्यातील पीकांची हेक्टरी उत्पादकता घटत असताना सरकार उत्पादनवाढीचा करत असलेला दावा फोल आहे. गेल्यावर्षी शेतीकेंद्रीत अर्थसंकल्प सादर झाला व राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या, हे सरकारच्या अर्थसंकल्पाचे फलित असल्याची टीका मुंडे यांनी केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी अर्थसंकल्पात कोणताही दिलासा नाही. यातून सरकारची असंवेदनशीलता दिसल्याचेही ते म्हणाले.\nनोटाबंदीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, मध्यमवर्गीय माणूस सरकारकडे आशेने पाहत होता, परंतु सरकारने या सगळ्यांची निराशा केली आहे. सिंचनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही, सिंचनक्षेत्र वाढवण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्यपाल महोदयांनी सरकारवर टीका केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मेट्रो, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी व इतर नागरी प्रकल्पांवर मोठा खर्च दाखवला आहे, परंतु तिथेही विकासाची गती धीमी आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.\nबँकांवर विश्वास नसेल तर 'पे-टीएम' मार्फत कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्र ...\nशेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यासाठी सरकार विविध कारणे सांगत आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सहकारी बँकांमार्फत कर्जमाफी दिल्यास नेत्यांना फायदा होत असेल तर सरकारी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा फायदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहचतो का असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला केला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सलग पाचव्या दिवशी विधान परिषद तहकूब झाल्याने कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला.विधान परिषदेत आज पाच ...\nराष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गार ...\nउपाययोजना करण्यासाठी सरकार आणखी कशाची वाट पाहात आहेराष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंत्रालयासमोर एल्गारकांद्याला हमीभाव नाही, नोटाबंदीमुळे शेतमजुरांना मजुरी देता येत नाही म्हणून नैराश्यातून येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपले पाच एकर कांद्याचे उभे पीक जाळून टाकल्याची घटना ताजी आहे. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी त्याच शेतातील जळलेले कांदे मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. सरकारने तात्काळ कर्ज ...\nसरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप ...\nविधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-sugercane-leaf-management-mulching-7293?tid=126", "date_download": "2018-04-23T11:46:18Z", "digest": "sha1:GZ74A2TZV3KW4MYXDQIFPFDJCBY6GJAF", "length": 22174, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, sugercane leaf management as mulching | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रणवसिंह पाटील, अश्विनी करपे\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते.\nबहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते. मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.\nऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते.\nबहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते. मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.\nपाचट जाळण्याचे दुष्परिणाम ः\nपाचट जाळल्याने खोडव्याची उगवण क्षमता ६८ टक्के राहते; तर पाचट न जाळता केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे ती ८२ टक्के राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे.\nपाचट जाळल्याने पर्यावरणात प्रदूषण होते.\nजमिनीच्या वरील थरातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते; तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. परिणामी, जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते.\nपाचटामध्ये असलेले सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्ये जळून जातात. त्याची अत्यंत अल्प प्रमाणात राख शिल्लक राहते.\nपाचट आच्छादनाचे फायदे ः\nहेक्टरी सुमारे ७-१२ टन पाचट तयार होते. त्यात भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब व मूलद्रव्ये असतात. प्रतिटन पाचटामध्ये ५.४ किलो नत्र, १.३ किलो स्फुरद व ३.१ किलो पालाश व अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये असतात. ती व्यवस्थित कुजल्यानंतर खोडव्याला उपलब्ध होतात.\nआच्छादनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवणे शक्य होते. खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.\nजमिनीचे तापमान एका पातळीपर्यंत स्थिर राहते. ते उन्हाळ्यात फार वाढत नाही, तर हिवाळ्यात फार थंड होत नाही.\nतण नियंत्रणाचा खर्च कमी होतो.\nओलावा, भरपूर सेंद्रिय कर्ब यामुळे शेतात गांडुळांची संख्या वाढते.\nसेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते. पिकाला मिळणाऱ्या मूलद्रव्यात वाढ झाल्याने उत्पादनात १२ ते १३% ने वाढ होते.\nशेतातील पाचट लवकर कुजत का नाही\nउसाच्या पाचटामधील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर हे १२२:१ असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो. कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.\nएकात्मिक ऊस पाचट व्यवस्थापन ः\nप्रत्येक सरीआड पाचट जमा करावे. त्या सरीत पाचट व्यवस्थित पसरून आच्छादन करावे. ज्या सरीत पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते.\nशेतातील पाचट मऊ करण्यासाठी पाणी द्यावे. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असल्याने काळजीपूर्वक पाचट भिजवून घ्यावे.\nपाचटावर ७५ किलो प्रतिहेक्टर युरिया टाकावा. त्यामुळे पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर कमी होईल. त्यावर ५०० किलो शेणखतात अधिक २५ किलो पाचट कुजवणारे जीवाणू कल्चर मिसळून टाकावे. तमिळनाडू कृषी विद्यापीठाचे बायामिनरलायसर हे जिवाणू कल्चर विकसित केले आहे. या कल्चरमुळे कुजण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल. जिवाणू कार्यक्षम राहण्यासाठी जमिनीमध्ये सतत ओलावा असे पाहा.\nशेतातील पाचट आणखी लवकर कुजण्यासाठी...\nपाचटाचा जितका जास्त पृष्ठभाग जिवाणूंच्या संपर्कात येतो, तितका प्रक्रियेचा वेग वाढतो. त्यासाठी पाचटाची कुट्टी करून घेतल्यास फायद्याचे ठरते. त्यासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र अलीकडे बाजारात उपलब्ध आहे; तसेच लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन केंद्राने तयार केलेले खोडवा व्यवस्थापन यंत्र सर्वोत्तम आहे.\nपाचट अधूनमधून भिजवत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी स्प्रिंकलर लावल्यास काम सोपे होते. पाचट कोरडे झाल्यास कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया मंदावते.\nपाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाकावा.\nपाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी शेणखत व जिवाणू कल्चर वापरावे.\nशेतातील पाचटाचा ढीग करून कुजवल्यास कमी वेळेत खत तयार होते. ढिगामध्ये तापमानवाढीसाठी वाव असतो. शेतातच कुजावायची असल्यास त्यास वेळ लागतो.\nमहिन्याआड पाचटाची उलटापालट करावी. जिवाणूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो. त्याचा फायदा होतो.\nसंपर्क ः प्रणवसिंह पाटील, ७७०९१९५३८३\n(सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, बारामती.)\nऊस पर्यावरण environment प्रदूषण तण weed यंत्र machine खत fertiliser तमिळनाडू कृषी विद्यापीठ agriculture university ऑक्सिजन\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nउस पीक सल्ला १५ फेब्रुवारीनंतर तोडलेल्या उसाचा खोडवा शक्यताे...\nऊस पाचटाचे व्यवस्थापनऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे...\nकाढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...\nउसातील खोड किडीचे नियंत्रणराज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी...\nऊस पीक सल्लासुरू उस लागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा...\nउस पीक सल्लाखोडवा ऊस : कमीतकमी हेक्टरी १ लाख ऊससंख्या...\nउस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...\nपानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...\nऊस खोडवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको...राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे ४० ते ४५...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत...या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक...\nपीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....\nअधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...\n`ब्रॅँडनेम’ने गूळ, काकवीची विक्रीनागरगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भरत नलगे...\nसुपीकता वाढविण्यासाठी वापर द्रवरूप...जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढविण्यासाठी,...\nउसासाठी शिफारशीनुसारच करा खताचे नियोजनऊस पिकाला माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक...\nउसासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापरजमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता...\nखतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...\nअतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...\nदर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...\nउसावरील तांबेरा,तपकिरी ठिपके रोगांचे...गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा प्रभाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-harbara-procurement-crises-6696", "date_download": "2018-04-23T11:44:39Z", "digest": "sha1:J2Q3KG5KP3SME7TNTXNCPDEOMJBAORGB", "length": 24972, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Tur, Harbara procurement in crises | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर, हरभरा खरेदीचे तीनतेरा\nतूर, हरभरा खरेदीचे तीनतेरा\nमंगळवार, 20 मार्च 2018\nपुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८) सोयाबीन, उडदाच्या पाठोपाठ तूर आणि हरभऱ्याच्या सरकारी खरेदीचाही पुरता बोजवारा उडाला आहे. ‘नाफेड’च्या आकडेवारीनुसार यंदा आधारभूत किमतीने उिद्दष्टाच्या केवळ २७ टक्के तूर खरेदी करण्यात यश आले आहे. तर, अजून एक टक्का हरभऱ्याचीही खरेदी झालेली नाही. गोदामांची कमतरता, जाचक निकष आणि खरेदीचे पैसे देण्यात होत असलेला उशीर, यामुळे सरकारी खरेदी रोडावल्याचे चित्र आहे.\nपुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८) सोयाबीन, उडदाच्या पाठोपाठ तूर आणि हरभऱ्याच्या सरकारी खरेदीचाही पुरता बोजवारा उडाला आहे. ‘नाफेड’च्या आकडेवारीनुसार यंदा आधारभूत किमतीने उिद्दष्टाच्या केवळ २७ टक्के तूर खरेदी करण्यात यश आले आहे. तर, अजून एक टक्का हरभऱ्याचीही खरेदी झालेली नाही. गोदामांची कमतरता, जाचक निकष आणि खरेदीचे पैसे देण्यात होत असलेला उशीर, यामुळे सरकारी खरेदी रोडावल्याचे चित्र आहे.\nकेंद्र सरकारने यंदा तुरीला प्रतिक्विंटल ५४५० रुपये हमीभाव जाहीर केला. महाराष्ट्रात मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर हमीभावाच्या खालीच आहेत. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून नाफेडच्या माध्यमातून राज्य सरकारने तूर खरेदी सुरू केली. शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणीचे दिव्यही पार पाडले. परंतु, गोदामांची अनुपलब्धता आणि तूर खरेदीचे जाचक निकष यामुळे तूर खरेदीने अजूनही अपेक्षित वेग घेतलेला नाही. `नाफेड`ने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ मार्चपर्यंत राज्यात केवळ १ लाख २२ हजार ४५३ टन तुरीची खरेदी झाली. यंदा केंद्र सरकारने महाराष्ट्राला ४ लाख ४६ हजार टन तूर खरेदीचे उिद्दष्ट दिले आहे. उिद्दष्टाच्या तुलनेत केवळ २७.३ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. तुरीची खरेदी ९० दिवसांत करणे अपेक्षित आहे. त्यातील ४७ दिवस संपले असून, उरलेल्या ४३ दिवसांत राहिलेल्या ७२.७ टक्के तूर खरेदीचे आव्हान सरकारपुढे आहे.\nहरभऱ्याला प्रतिक्विंटल ४४०० रुपये हमीभाव आहे. पण, भाव कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यंदा तीन लाख टन हरभरा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. एक मार्चपासून सरकारी खरेदी सुरू झाली. पण, १६ मार्चपर्यंत केवळ २१८ टन खरेदी म्हणजे उिद्दष्टाच्या ०.०७ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने हरभऱ्याचे सरासरी उत्पादकता निकष जाहीर करण्यात चालढकल चालविल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सरकारी खरेदी सुरू झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nगेल्या वर्षी राज्य सरकारने सुमारे ६५ लाख क्विंटल तूर खरेदी केली होती. या तुरीमुळे गोदामे खचाखच भरलेली असून, यंदा खरेदी केलेला माल ठेवायला जागा नाही, ही प्रमुख अडचण असल्याचे दिसून येत आहे. ‘‘गोदामांच्या कमतरतेमुळे खरेदी रोडावली आहे. गोदामे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. येत्या काही दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा आहे,’’असे `नाफेड`च्या शाखा व्यवस्थापक भाव्या आनंद यांनी सांगितले.\nतसेच, शेतकऱ्यांना मालविक्रीचे पैसे आठ दिवसांत मिळणे बंधनकारक असताना महिनोमहिने पैसे मिळत नाहीत, त्यामुळे सरकारी खरेदीविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यासंदर्भात म्हणाले, की शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या रकमेचा धनादेश न देता आरटीजीएसद्वारे तत्काळ त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करावी, असे निर्देश दिले आहेत. ‘‘केंद्र सरकारकडून नाफेडला बँक हमी मिळण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. नुकताच केंद्राने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होईल,’’ असे `नाफेड`च्या भाव्या आनंद म्हणाल्या.\nराज्य सरकारने पुरेसा आधी अंदाज येऊनही शेतमाल खरेदीसाठी आणि माल ठेवायला जागा उपलब्ध करून देणे, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट याविषयी तत्परता दाखवून हालचाली केल्या नाहीत. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राज्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी रडतखडत सुरू असून, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीन आणि उडदाची सरकारी खरेदी पूर्ण झाली असून, त्यातही शेतकऱ्यांची मोठी परवड झाली. राज्यात यंदा ३८.८६ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यापैकी केवळ १ लाख टन म्हणजे फक्त अडीच टक्के सोयाबीनची खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. प्रत्यक्षात केवळ २६ हजार टन सोयाबीन खरेदी करण्यात सरकारला यश आले. उडदाच्या बाबतीतही सरकारने केवळ ३३ टक्के माल खरेदी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.\nतुरीचा पेरा कमी होऊनही दर वाढले नाहीत...\nयंदा देशात ४३.५ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. महाराष्ट्रात १२.३ लाख हेक्टरवर लागवड करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशपातळीवर तुरीचा पेरा १८.३५ टक्के, तर महाष्ट्रात १९.६ टक्के घटला आहे. परंतु तरीही तुरीच्या दरात सुधारणा झाली नाही. कारण यंदा गेल्या वर्षीचा शिल्लक साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.\n...म्हणून महाराष्ट्रात हरभऱ्याचे दर कोसळले\nयंदा देशात हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात सुमारे ८ टक्के वाढ होऊन ते १०७.६२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख राज्यांमध्ये हरभऱ्याचे पीक चांगले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १० लाख टन उत्पादन जास्त मिळेल, असा अंदाज आहे. मागच्या वर्षीचे विक्रमी उत्पादन आणि आयात यामुळे यंदा शिल्लक मालाचे प्रमाणही अधिक आहे. त्यातच मध्य प्रदेश सरकारने बाजारभाव आणि हमीभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची भावांतर योजना लागू केली आहे. त्यामुळे तिथे आवक वाढली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून देशभरात विशेषतः महाराष्ट्रात हरभऱ्याचे दर कोसळले आहेत.\nराज्यातील तूर उत्पादन : ११.५ लाख टन\nसरकारी खरेदीचे उ.िद्दष्ट : ४. ४६ लाख टन\nउत्पादनाच्या केवळ ३८.७ टक्के तूर खरेदी करणार\nतूर खरेदीचे उ.िद्दष्ट : ४. ४६ लाख टन\n१६ मार्चपर्यंतची खरेदीः १.२२ लाख टन\nकेवळ २७.३ टक्के उ.िद्दष्ट पूर्ण\nराज्यातील हरभरा उत्पादनः १८.८ लाख टन\nसरकारी खरेदीचे उ.िद्दष्ट : ३ लाख टन\nउत्पादनाच्या केवळ १५.९ टक्के हरभरा खरेदी करणार.\nहरभरा खरेदीचे उ.िद्दष्ट : ३ लाख टन\n१६ मार्चपर्यंतची खरेदी : २१८ लाख टन\nकेवळ ०.०७ टक्के उ.िद्दष्ट पूर्ण\nराज्यातील सोयाबीन उत्पादन : ३८.८६ लाख टन\nसरकारी खरेदीचे उ.िद्दष्ट : १ लाख टन\nउत्पादनाच्या केवळ २.५ टक्के खरेदी उ.िद्दष्ट.\nसोयाबीन खरेदीचे उ.िद्दष्ट : १ लाख टन\nप्रत्यक्षातील खरेदी : २६ हजार २२६ टन\nकेवळ २६ टक्के उ.िद्दष्ट पूर्ण\nउत्पादनाच्या केवळ ०.६ टक्के खरेदी पूर्ण.\nसोयाबीन तूर सरकार government हमीभाव minimum support price महाराष्ट्र सुभाष देशमुख कृषी विभाग agriculture department मध्य प्रदेश\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t20016/", "date_download": "2018-04-23T11:37:13Z", "digest": "sha1:54YIRRMN4NDWIWOYZQRXWTM22326FTIR", "length": 5818, "nlines": 152, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मृत्यू", "raw_content": "\nमी शांत निजलो होतो\nमी चिंब भिजलो होतो\nमाझ्यावर प्रेम लुटवत होते\nसगळे मला उठवत होते\nअजून चार लाकडं द्या\n'अजून किती वेळ लागेल '\nमी मौन पाळलं होतं\nमला जाळंल होत .\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nछान आहे कविता ....\nम्हणत होतं सारखं.... ह्याचा अर्थ उमगला नाही \nहळुवार जपल्या त्या भावना….\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nबरोबर आहे ...असाच अर्थ असावा ....\nपण कवितेतल्या ओळी क्रमाने वाचल्या तर कुणीतरी परकी व्यक्ती 'न्हेऊ नका' असं मोठ्यानं सांगत होती असाच अर्थ जुळतो .....आता कुणी परकी व्यक्ती असं का सांगेल कुणीतरी जवळचा सखा सोबती असेल तरच जीवाचा आटापिटा करीत ओरडू शकतो \nअसो ....कविता आवडली .....\nम्हणत होतं सारखं.... कदाचित असं असाव ....\nहळुवार जपल्या त्या भावना….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18719/", "date_download": "2018-04-23T11:37:20Z", "digest": "sha1:KGI67NXE4RM6C6LV7IEYPGLMPCNRJKKT", "length": 4652, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-खेळ लपाछपीचा", "raw_content": "\nलागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा\nलागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा\nकिंचित स्मित गाली, मिचकावुनी डोळ्यांची भाषा\nमाझ्याही चेहऱ्यावर उमटल्या प्रतिबिंबाच्या रेषा\nनिखळ निर्मळ निरागस प्रीत\nमिळाली सबब गाण्यास जीवनसंगीत\nहळुवार ढळली बट चेहऱ्यावरती\nनको फुंकू तोऱ्यात, उडवूस वाऱ्यावरती\nतू आलीस नि गेलीस मी अजुनी इथेच उभा\nपाठलाग सावलीचा, धूसर झाली मंद दिनप्रभा\nफक्त एकदाच मागे वळूनी पाहशील ना\nगुपित मनातले कळवळूनि सांगशील ना\nलागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा\nलागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा\nघुटमळतोय इथेच फक्त तुला पहावया\nआडोश्यामागुन पाहतोय चेहरा, पुन्हा तुला भेटावया .\nकवी : सचिन निकम\nलागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा\nलागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा\nकिंचित स्मित गाली, मिचकावुनी डोळ्यांची भाषा\nमाझ्याही चेहऱ्यावर उमटल्या प्रतिबिंबाच्या रेषा\nनिखळ निर्मळ निरागस प्रीत\nमिळाली सबब गाण्यास जीवनसंगीत\nहळुवार ढळली बट चेहऱ्यावरती\nनको फुंकू तोऱ्यात, उडवूस वाऱ्यावरती\nतू आलीस नि गेलीस मी अजुनी इथेच उभा\nपाठलाग सावलीचा, धूसर झाली मंद दिनप्रभा\nफक्त एकदाच मागे वळूनी पाहशील ना\nगुपित मनातले कळवळूनि सांगशील ना\nलागल्या खेळू नजरा खेळ लपाछपीचा\nलागला जुळु हळुवार मेळ स्पंदनांचा\nघुटमळतोय इथेच फक्त तुला पहावया\nआडोश्यामागुन पाहतोय चेहरा, पुन्हा तुला भेटावया .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20104/", "date_download": "2018-04-23T11:37:33Z", "digest": "sha1:Z7FP7K64HKZ4ZIWL653LP2ZEJXTEYX44", "length": 4202, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत????", "raw_content": "\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nAuthor Topic: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......\nपण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......\nपण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nकोण शेवट परयन्त निभावत असत,,,,,,,, तर कोण आरड्यात सोडून निघून गेलेल असत.........\nकोणाला ते मिळत ,,,,,,,,तर कोणाला मिळत नसत.........\nही तर एक निरागस भावना आहे\nमानल तर सारा काही,,,,,,,,नाही तर फक्त एक मांधलेला डाव असत.........\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत......\nपण प्रेम कधीच सेम नसत.......\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nRe: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nअगदीच बरोबर आहेत तुमचे विचार .........................\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/watercolor-hand-tattoos-for-girls/", "date_download": "2018-04-23T11:42:16Z", "digest": "sha1:577LZ3ZDXBJYOFJSZTNABJY3IQOVDEUX", "length": 12870, "nlines": 76, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "हात टॅटूस - मुलींसाठी सर्वोत्तम जल रंगाचे हात टैटू", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू एप्रिल 26, 2017\n1 झोकदार महिलांसाठी आकर्षक फ्लोरोसेंट केशरी फुलझाडे रंगाचे टॅटू कल्पना\n2 ठिकठिकाणी शैलीतील स्त्रियांसाठी स्पेलबिंड डोळा-आकर्षक स्त्रीचा चेहरा जल रंगाचे टॅटू डिझाइन\n3 मुली आणि स्त्रियांसाठी हात वर कल्पनाशील ग्लॅरिअर आयल लोमड वॉटर कलर टॅटू स्याही कल्पना\n4 हात वर महिलांसाठी फुलांचे हमींगबर्ड वॉटरकलर टॅटूचे डिझाईन्स\n5 मुलींसाठी मस्तंग असंख्य पक्षी हात टटू डिझाइन\n6 मिरॅकलच्या विश्वास ठेवणार्या महिलांसाठी सुर्यास्त टॅटू डिझाइनमध्ये छान आकर्षक पेपर बोट शिलाई\n7 मुलींसाठी आश्चर्यकारक यथार्थवादी गोल्डन फिश वॉटरकलर टॅटू डिझाइन\n8 मुलींसाठी रिच रंगीरंग शाई स्प्लॅश फुल वेल वेलपाईलर टॅटू डिझाइन\n9 डोळ्याला आकर्षक रंगीबेरंगी हातातल्या मुलींसाठी त्रिकोणाच्या जल रंगाच्या टॅटूच्या कल्पनांमध्ये वाढ झाली\n10 महिलांसाठी पांढर्या रंगाचा फॉक्स चेहरा चेहरा रंगविण्यासाठी डिझाइन\n11 स्त्रियांसाठी सतत ओळ पक्षी चेहरा watercolor हात टॅटू कल्पना\n12 मुलींच्या हाताचा टॅटू ढगांनी वेढलेला काळा चंद्राचा विचार आणि दोन्ही बाजुला किती सुकवलेला आकाश\n13 मुलींसाठी रंगीत रंगीत रंगीत रंगीत रंगीत हात रंगाचे टॅटू कल्पना\n14 शाईंनी मुलींसाठी आकर्षक मांजर चेहरा वॉटरकलर टॅटू छिदवा\n15 मुली आणि स्त्रियांसाठी व्हायब्रंट दृश्यावली ड्रॅगनफ्लू वॉटरकलर टॅटू डिझाइन\n16 ख्रिसर अरायलिस्टिकला रेट्रो लुक देविज फॉर स्क्रीट वॉकलकलर टॅटू कल्पनां\n17 मुलींसाठी हात वर निळा जांभळा नारिंगी गुलाबी जल रंग टॅटू डिझाइनचे अविशिष्ट रंग स्ट्रोक\n18 स्त्रियांसाठी हात वर स्केच लाईन फुले सह सोपी क्रॉस हात वर गोंदणे डिझाइन\n19 महिलांसाठी चमकदार पिवळी सूर्यफूल जल रंग हात टटू कल्पना\n20 हात वर मुलींसाठी साधा निळा गुलाबी स्केच लाइन हृदय वॉटरकलर टॅटू डिझाइन\n21 मुलीच्या सुंदर मोहक निळ्या जांभळा फुले टॅटू कल्पना हात वर\n22 स्त्रियांसाठी दीर्घिका पक्षी जल रंगाचे हात टॅटू कल्पना\n23 स्त्रियांसाठी खुप गुंतागुंतीच्या मोठ्या डोळा उल्लू जल रंगाचे टॅटू डिझाइन\n24 झोकदार मुलींसाठी फ्लूरोसंट नारिंगी फुलझाडे आणि उल्लू टॅटू डिझाइन\n25 लेडीज् मजेस्टिक ब्ल्यू व्हेल वॉटरकलर इंक हात टॅटू डिझाइन\n26 महिला डोळ्याच्या आकर्षक आकर्षक फुलपाखरेचा जल रंगाचे टॅटू डिझाइन\n27 मुली आणि महिलांसाठी ग्लॅमरस आर्किड फ्लॉवर वॉटरकलर हात टॅटू डिझाइन\n28 मादी प्रक्षोभित बर्ड प्रेमींसाठी सौंदर्यपूर्ण रंगीबेरंगी बोटिंगबर्ड वॉटरकलर हात टॅटू डिझाइन\n29 स्त्री पाळीव प्राण्यांच्या प्रेमींसाठी आकर्षक पंजे आणि हृदयाचे अनंता लूप वॉटरकलर हात टॅटू कल्पना\nटॅग्ज:हात टॅटू मुलींसाठी गोंदणे वॉटरकलर टॅटू\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 लेग टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 24 रिंग टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 कुत्रा टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी आदिवासी ड्रॅगन टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी मीन टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 मैत्री टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 विंचू टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स घुबड टॅटूस डिझाइन आइडिया\nओठ टॅटू - पुरुष आणि स्त्रियांना सर्वोत्तम 24 लिप टॅटू डिझाइन आयडिया\nडवले गोंदणेक्रॉस टॅटूफूल टॅटूवॉटरकलर टॅटूहत्ती टॅटूबटरफ्लाय टॅटूस्लीव्ह टॅटूपुरुषांसाठी गोंदणेराशिचक्र चिन्ह टॅटूछाती टॅटूजोडपे गोंदणेमेहंदी डिझाइनसूर्य टॅटूडायमंड टॅटूमोर टॅटूस्वप्नवतमान टॅटूटॅटू कल्पनाडोळा टॅटूअर्धविराम टॅटूबाण टॅटूमागे टॅटूबहीण टॅटूअनंत टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमुलींसाठी गोंदणेगुलाब टॅटूमैना टटूपाऊल गोंदणेताज्या टॅटूड्रॅगन गोंदगरुड टॅटूहात टैटूकमळ फ्लॉवर टॅटूहार्ट टॅटूचंद्र टॅटूमांजरी टॅटूडोक्याची कवटी tattoosहात टॅटूचीर टॅटूपक्षी टॅटूअँकर टॅटूआदिवासी टॅटूगोंडस गोंदणदेवदूत गोंदणेशेर टॅटूहोकायंत्र टॅटूउत्तम मित्र गोंदणेफेदर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-award-2017-declaration-pune-maharashtra-2032", "date_download": "2018-04-23T11:53:28Z", "digest": "sha1:ROMXQJQP374ETBN5TJ23RQO5E26ZUVAT", "length": 16842, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGROWON award 2017 declaration, pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव\nबहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nप्रस्ताव पाठविण्याचा पत्ता :\nऍग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., 595, बुधवार पेठ, पुणे - 411002\nपुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना ऍग्रोवनतर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्मार्ट शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण 11 गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख 25 ऑक्‍टोबर 2017 आहे.\nप्रतिकूल परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कल्पकता, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आव्हानांवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने गेल्या वर्षीपासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.\nयंदा राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असेल. तसेच ऍग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि ऍग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ऍग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यासाठी आहे. तसेच ऍग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार, ऍग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय, ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत.\nतज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली त्रयस्थ निवड समिती पुरस्कारांसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुणे येथे विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.\nराज्यातील कोणीही व्यक्ती स्वतःचा किंवा परिचितांचा प्रस्ताव पाठवू शकते.\nप्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत 25 ऑक्‍टोबर, 2017 आहे.\nप्रस्ताव फक्त दोन पानी असावा. त्यात संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती, वेगळेपण व इतर तपशील नमूद करावेत. याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती द्यावी.\nप्रस्तावावर तो कोणत्या गटातील पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.\nअतिरिक्त माहिती, अन्य तपशील, छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडता येईल\nएका व्यक्तीला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविता येईल. अधिकचे प्रस्ताव बाद करण्यात येतील.\nप्रस्ताव पाठविण्याचा पत्ता :\nऍग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., 595, बुधवार पेठ, पुणे - 411002\nपुणे पुरस्कार awards अॅग्रोवन अॅग्रोवन स्मार्ट अॅवॉडर्स\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t19135/", "date_download": "2018-04-23T11:24:09Z", "digest": "sha1:AUBF4SI6VWB6LVUM4HI2YQHE2OHP7J36", "length": 4851, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-किती सोप्प असत , कोणाला टाळण ।", "raw_content": "\nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nAuthor Topic: किती सोप्प असत , कोणाला टाळण \nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nकितीही सांगितलं या मनाला तरीही ., ऐकत नाही ,\nआज परत एक गैर समज दूर झाला ………….\n\"एक\"-मेकांना समजून घेताना , कधीच वाटल नाही कि\nशेवटी तो \"एक\" मीच आहे … जो समजून घेतो…\nवाटायचं कि , आपल्याला कोणीतरी ऐकेल , अस\nचुकत असेल तर सांगेन ,\nपण हसायला येत असत , स्वतःवरच … आणि नंतर\n, सगळ झाल्यावर ….\nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nमन मानत नाहीये …, कि अजूनही \"ती\" जातीये …\nएका अशा ठिकाणी कि , परत कधीच , चुकूनही या\nतिला \" हि वाट\" मोकळी नजर असावी , अस वाटेल\nआणि एक वेळ अशी हि होती कि ,\nएकट रस्त्याने चालताना सुद्धा , तिला …\nमी सोबत असल्यासारख वाटायचं … खरंच ….\nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nआजही बोलताना वाटत तिला सांगाव,\nकि …. चांगल आहे विसरलीस ते ;\nकि परत त्याच FEELINGS , ज्या आधीही\nया समाजाकडून मिळत राहिल्या , त्या तुझ्यामुळे\nहेच आठवण करून देतात कि , खरंच …. \nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nपण एक वेळ अशीही येईल कि ,\nतुला हेच वाटावे …,\nखरच ; आज मी असतो अजुनहि ,\nतर तुला समजावू शकलो असतो ,\nऐकू शकलो असतो ,\nपण , …. पण \"ती वेळ\" शेवटची असेल \nकारण , या शरीरातून , या मनातून ….\nतेच भाव … तुझ्या पर्यंत पोहोचायला , त्या\nत्या भावना , माझ्यात उरल्या नसतील … \nआणि त्या वेळी , तुही हेच म्हणशील कि….\nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \nकिती सोप्प असत , कोणाला टाळण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-20299/", "date_download": "2018-04-23T11:19:33Z", "digest": "sha1:5GNCSCBSEC4SIORABGLLCLXTQ452AMLN", "length": 2785, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-का तरीही ..!", "raw_content": "\nतुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन\nकोमजले आहे सारे आता माहित असूनही ;\nका मी पुन्हा फुलामध्ये गंध शोधतो आहे \nलावूनी पंख फुलपाखराचे इवलसे जरासे ;\nका मी पुन्हा तुझेच पाऊलखूणा शोधतो आहे \nविरले आहे सारे आता माहित असूनही ;\nका मी पुन्हा पापण्यात स्वप्न रंगवित आहे \nघेवूनी थोडे रंग उसणे नभातले इंद्रधनूकडून ;\nका मी पुन्हा स्वप्नात तुलाच रंगवित आहे \nगुरफटले आहे आता सारे माहित असूनही ;\nका मी पुन्हा ओठावर तुझे नाव गुणगुणतो आहे \nअडखळलेले शब्द सारे अबोल ओठातले फुलवून ;\nका मी पुन्हा काव्याचा लाटावरुन उधळीत आहे \n...... स्वप्नील (अबोल मी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ummat-e-nabi.com/chapter-1-background/", "date_download": "2018-04-23T11:49:41Z", "digest": "sha1:GYLGVJXSOUOODOQROZ56OLENULI7HYW2", "length": 24239, "nlines": 272, "source_domain": "ummat-e-nabi.com", "title": "प्रकरण १ - पार्श्वभूमी - Ummat-e-Nabi ﷺ", "raw_content": "\nपवित्र कुरान – हिंदी अनुवाद\nक्यों हो जाते है लोग इतने बेहरहम क्या इन्हें खुदा का खौफ नहीं है \nनबी स. पर बनने वाली फिल्म की न्यूज़ सिर्फ एक अफवाह है इस पोस्ट को हर मुस्लमान तक…\n⭐ इस्लाम का परिचय\nइस्लाम के बारे में संदेह और उत्तर\nप्रकरण १ – पार्श्वभूमी\n(मराठी लेख: समान नागरी कायदा आणि इस्लाम)\n‘समान नागरी कायदा’ या विषयावर चर्चा करताना सर्वप्रथम मुस्लीम कायद्याबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. मुस्लीम कायद्याची किमान तोंडओळख तरी असायला हवी. अन्यथा आपण या विषयावर कितीही चर्चा केली आणि सारे मुद्दे पटले तरीही मनात मुस्लीम कायद्याबद्दल द्वेष आणि तिरस्काराची भावना शिल्लक राहतेच. कारण मुस्लीम कायदा रानटी, क्रूर, जालीम आणि अमानवीय कायदा आहे अशीच सर्वसामान्यांची समजूत आहे.\nइस्लाम जगातील प्रमुख धर्मांपैकी अत्याधुनिक धर्म आहे. मागील १४०० वर्षांपूर्वी जगभरात या संदेशाचा प्रसार प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो त्यांच्यावर) यांच्याकरवी झाला. ३० वर्षांच्या अल्पावधीत निम्म्यापेक्षा जास्त जगाने इस्लामी समाजव्यवस्था आत्मसात केली. इतक्या मोठ्या भूभागावर शासन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणेदेखील गरजेचे होते. म्हणून जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचे नियमबद्ध आणि सूत्रबद्ध पद्धतीने गठन करण्यात आले. यातून मुस्लीम न्यायशास्त्राचा अर्थातच ‘फिकाह’ चा जन्म झाला. आजची आपली आधुनिक न्यायव्यवस्था याच फिकाहची सुधारित आवृत्ती आहे. न्यायव्यवस्थेचा कोणताही प्रामाणिक अभ्यासक हे सत्य नाकारूच शकत नाही की भारतात अस्तित्वात असलेल्या न्यायव्यवस्थेला मुस्लिम न्यायव्यवस्थेचा आधार लाभलेला आहे. इंग्रजांनी मुस्लिम न्यायव्यवस्थेतून कडक शिक्षा वजा करून, थोडेफार फेरबदल करून भारतीय दंड संहिता निर्माण केली. वकील, मुन्सीफ, कायदा, फिर्याद, पुरसिश, नाजर, कारकून, मिसल, अर्ज, दाखला, गुनाह (जुनाह), दाद, दस्तऐवज, नक्कल आणि खारीज सारख्या एक नव्हे कित्येक न्यायिक संकल्पना अस्सल फारशी भाषेतील आहेत.\nइस्लामपूर्वी जगात वरिष्ठ न्यायासनाची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. न्यायव्यवस्थेत आज चालू असलेली न्यायाधिकारी परंपरा मुस्लिम कायदेपंडितांनी आखून दिलेली आहे. कायद्यासमोर सर्व समान (Equality Before Law) हे धोरण, साक्ष देण्याचा कायदा (Law Of Evidence) पूर्णतः इस्लामी संकल्पना असून यांचा जनक मुळात इस्लाम आहे. संपत्तीच्या मालकी हक्काबाबतचे इस्लामी कायदे आजही जगातील सर्वश्रेष्ठ कायदे मानले जातात. वारसाहक्कांच्या इस्लामी कायद्याची बरोबरी आजही जागतिक न्यायव्यवस्थेला करता आलेली नाही. Right of Preemption सारखा अत्याधुनिक कायदा पूर्णतः इस्लामी असून या कायद्याला आधारही प्रेषितांच्या एका हदिसचा आहे, हे विशेष\nमुघल शासनकाळात मुस्लीम कायदा हाच राज्याचा कायदा (फौजदारी तसेच दिवाणी) होता. परंतु विविध जातीधर्मियांसाठी त्यांच्या धर्म-परंपरांनुसार असलेल्या रूढींना व्यक्तिगत कायदे म्हणून मान्यता देण्यात आली होती (व्यक्तिगत कायद्यांची स्वतंत्रतादेखील मुळात इस्लामी संकल्पना). इ.स. १७६५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने न्यायालयाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. मुस्लीम कायद्यातून कडक शिक्षा वजा करून, थोडेफार फेरबदल करून इ.स. १८६२ साली इंडियन पिनल कोड अंमलात आणला गेला. विविध समाजांसाठी त्यांच्या मान्यतेनुसार व्यक्तिगत कायद्यांची तरतूद करण्यात आली. मुस्लीम समाजासाठी त्यांचा व्यक्तिगत कायदा बाकी ठेवण्यात आला. इ.स १९३७ साली ‘मुस्लीम पर्सनल लॉ’ अंमलात आला.\n‘मुस्लीम पर्सनल लॉ’चे वास्तविक नाव Shariah Application Act, 1937 आहे. ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की (१) विवाह (२) मेहर, पालनपोषण (३) तलाक, खुलअ (४) पालकत्व, बक्षीस, वारसा आणि (५) औकाफ वगैरे बाबतीत जेव्हा दोन्ही पक्ष मुस्लीम असतील तेव्हा निर्णयाचा कायदा ‘मुस्लीम पर्सनल लॉ’ असेल. इ.स. १९३९ साली मुस्लीम कायद्यावर आधारित ‘मुस्लीम विवाह रद्दबातल ठरविणारा कायदा’ अंमलात आणला गेला. यावरून स्पष्ट झाले की मुस्लीम कायदा म्हणजे केवळ विवाह, तलाक, खुलअ आणि वारसाशी संबंधित कायदा आहे.\nयानंतर आपण जरा देशाच्या निर्मितीची आणि संविधानाच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊ. याची माहिती असणेदेखील गरजेचे आहे. या पार्श्वभूमीची माहिती असल्याशिवाय संबंधित विषयावर चर्चा करता येणार नाही आणि चर्चा केलीच तर ती दिशाहीन होऊन भरकटत राहील.\nइंग्रजांच्या जुलमी शासनाविरोधात विविध संस्थाने आणि प्रांत आपल्या सीमारेखांच्या पलीकडे जाऊन एकत्रितपणे स्वातंत्र्याची लढाई लढू लागले होते. विविध जाती-जमाती, धर्म-संस्कृती आणि बोलीभाषा असणारे, पूर्वी एकमेकांशी कसलीही भावनिक नाळ नसणारे लोक एकत्र येऊ लागले होते. हळूहळू का होईना ‘भारत’ साकार रूप धारण करीत होता. ‘भारत’ एक राष्ट्र म्हणून उदयास येत होता. विविध प्रांत-संस्थानांतून, जाती-जमातींतून, धर्म तसेच जनसमूहातून अनेक प्रतिनिधी नेतृत्व करण्यासाठी पुढे येत होते. इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेतला आणि भावी भारत कसा असावा यावर विचारमंथन सुरु झाले.\nभारत आणि त्याच्या निर्मितीचा दृष्टिकोन:\nस्वातंत्र्यकाळामध्ये दोन विचारधारा अत्यंत प्रखर रूप धारण करीत होत्या. हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र संबंधित विचारधारा. एका विचारधारेला हिंदूंचे राष्ट्र हवे होते तर दुसऱ्या विचारधारेला मुस्लिम राष्ट्र. मुस्लिम राष्ट्र हवे असणाऱ्यांनी आम्हाला भारतांतर्गत आमचे मुस्लिम राष्ट्र निर्माण करू द्यावे अशी मागणी उचलून धरली. त्यांची मागणी अमान्य करून त्यांना जमिनीचा एक तुकडा देण्यात आला आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. दुर्दैवाने हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या विचारधारेलादेखील अशाच प्रकारे जमिनीचा तुकडा देऊन बाहेर काढण्याची दूरदृष्टी त्यावेळच्या नेत्यांना न सुचल्याने भारताला या विखारी मानसिकतेचे चटके आजही सोसावे लागत आहेत.\nभारत एक निरपेक्ष राष्ट्र:\nया दोन्ही विचारधारांच्या विरोधात एक तिसरी विचारधारा अशा राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहत होती; जे केवळ हिंदू-मुस्लिमांना नव्हे तर प्रत्येक जाती-जमातीला, धर्म-संस्कृतिला, भाषा आणि प्रांताला आपल्यात सामावून घेईल. ते राष्ट्र ना हिंदूंचे असेल ना मुस्लिमांचे, ते राष्ट्र त्या प्रत्येक व्यक्तीचे असेल जी व्यक्ती भारताला आपले राष्ट्र मानते. या सर्वसमावेशक दृष्टिकोनाने आकर्षित होऊन विविध प्रतिनिधी एकत्र येऊन भारत निर्माण करू लागले. एक निरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू लागले. एक धर्मनिरपेक्ष, संस्कृतीनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष, प्रांतनिरपेक्ष, जातनिरपेक्ष आणि जमातनिरपेक्ष राष्ट्र (येथे उल्लेखित सर्व संकल्पना राज्यासाठी आहेत, समाजासाठी नव्हे) परंतु हे होत असतानाच प्रत्येक गटाला भीती होती की आम्हाला आमचे स्वतंत्र अस्तित्व, आमची स्वायत्तता गमवावी लागेल काय \nभारत आणि विविधतेचे अस्तित्व:\nभारताच्या निर्मात्यांनी, घटनाकारांनी लोक प्रतिनिधींमध्ये हा विश्वास निर्माण केला की भारत हे कोण्या एका जाती-जमातीचे, धर्म-संस्कृतीचे किंवा भाषेचे राष्ट्र नसून बहुभाषिक, बहुप्रांतिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्ष गणराज्य असेल. ज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि सांस्कृतिक स्वायत्तता राखण्याचा मूलभूत अधिकार असेल. या अधिकाराला भावी राष्ट्रातील कोणताही कायदा, कोणताही निर्णय, कोणताही गट मग तो अल्पसंख्याक असो की बहुसंख्याक, बाधा आणू शकणार नाही. तसेच हा विश्वास देखील निर्माण केला गेला की या राष्ट्रातील अल्पसंख्याक जाती-जमाती, धर्म-संस्कृती आणि भाषांचे संरक्षण केले जाईल आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील. त्यांच्या स्वायत्ततेच्या आड काहीही येऊ दिले जाणार नाही.\nसमान नागरी कायद्याबद्दल बोलण्यापूर्वी ही पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे असल्यामुळे हा खटाटोप\nटीप: इस्लामी कायदा आणि मुस्लीम कायदा या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. इस्लामी कायदा म्हणजे इस्लामनुसार कायद्याची निर्धारित करण्यात आलेली चौकट. तर मुस्लीम कायदा म्हणजे इस्लामी कायद्यावर मुस्लीम कायदेपंडितांनी केलेले संस्करण\nSource सडेतोड: मुजाहिद शैख़\nयूनिफार्म सिविल कोड की हकीकत और उसके खतरनाक नुकसानात : ज़ैद पटेल\nइस्लाम की मूल आस्थाये\nहज़रत मुहम्मद स. का परिचय\nक़ुरबानी का उद्देश्य (बकरा ईद)\nइस्लाम के बारे में संदेह और उत्तर\nपवित्र कुरान – हिंदी अनुवाद\nक्यों हो जाते है लोग इतने बेहरहम क्या इन्हें खुदा का खौफ नहीं है \nनबी स. पर बनने वाली फिल्म की न्यूज़ सिर्फ एक अफवाह है इस पोस्ट को हर मुस्लमान तक…\n⭐ इस्लाम का परिचय\nइस्लाम के बारे में संदेह और उत्तर\nपवित्र कुरान – हिंदी अनुवाद\nक्यों हो जाते है लोग इतने बेहरहम क्या इन्हें खुदा का खौफ नहीं है \nनबी स. पर बनने वाली फिल्म की न्यूज़ सिर्फ एक अफवाह है इस पोस्ट को हर मुस्लमान तक…\n⭐ इस्लाम का परिचय\nइस्लाम के बारे में संदेह और उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/3/", "date_download": "2018-04-23T11:38:02Z", "digest": "sha1:RTA5IACR4B2THDPIGP62MAFMDTFPN7LM", "length": 7322, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ३\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nसर्व प्रकारची फळे, सुका मेवा आणि दुधाची मिळून गोड व पौष्टिक अशी फळांची बासुंदी सॅलेड म्हणून खाता येईल.\nअननसाचे तुकडे, खवा आणि क्रीम घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा पुडींग म्हणून खाता येईल.\nडबल का मीठा हलवा\nब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.\nतांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.\nबटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचे पुडिंग उपवासालाही खाता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/259/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%B5_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:39:00Z", "digest": "sha1:K7Z5PIKL36PVRRT3OHS4OLBM46OIJP3J", "length": 8297, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – आ. विक्रम काळे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकार ज्या ज्या वेळी नवा वेतन आयोग आणेल त्या त्या वेळी राज्यातही तो राबवला जाईल, असा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याचपद्धतीने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर राज्यानेही शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आ. विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली.\nयावर उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच आम्हीही निर्णय घेऊ, असे आश्वासन सभागृहात दिले. मात्र केंद्राने अजून या निर्णयाचे नोटिफिकेशन काढलेले नाही. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी नोटिफिकेशन निघेल, त्यावेळी राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर वेतन आयोग लागू करण्याआधी शिक्षक आणि इतर कर्मचारी संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, ही आ. विक्रम काळे यांची मागणीही त्यांनी मान्य केली.\nकोपर्डी बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद ...\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. कोपर्डी बलात्कार प्रकरण हे दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणासारखेच असून, सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा केली जावी, अशी जोरदार मागणी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.तर राज्यात कायदा - सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो, असे म्हणत विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला झाल्या प्रकाराचा जाब विचार ...\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींना ६ महिन्यांच्या आत मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या - अजित पवार ...\nकोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयासमोर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी राज्यात अनेक प्रकरणे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब लक्षात घेता कोपर्डी प्रकरणाचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ६ महिन्यांच्या आत निकाल लागावा, यासाठी नवीन कायदा करावा लागला तरी सरकारने तो करावा. यासाठी आवश्यकता असल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी. आरोप ...\nकोपर्डी प्रकरणाचा निकाल चार महिन्यात लावून आरोपींना भररस्त्यात फाशी द्या - धनंजय मुंडे ...\nकोपर्डी प्रकरणातील चारही आरोपींवरील खटल्याचा निकाल चार महिन्यात लावून त्यांना भररस्त्यात फासावर लटकवा, अन्यथा सरकारला बाजूला सारुन माता-भगिनी, मुली-बाळींच्या रक्षाणसाठी जनताच कायदा हातात घेईल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात दिला.विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कोपर्डीतील अमानवी, घृणास्पद घटनेवर चर्चा उपस्थित करताना मुंडे यांनी सरकारच्या संवेदनशून्य व निष्क्रिय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. कोपर्डीतील घटना अत्यंत गंभीर व शरमेने मान खाली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/kadboli/", "date_download": "2018-04-23T11:44:01Z", "digest": "sha1:ZLKN5FUQFOQVDYTOE6D3E4LIANTMLROM", "length": 5964, "nlines": 114, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कडबोळी | Kadboli", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » कडबोळी\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २००८\nकडबोळी - [Kadboli] बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.\n२ भांडी कडबोळ्याची भाजाणी\n२ चमचे लाल तिखट\n२ चमचे धणे पूड\n१ चमचा जिरे पूड\n१ चमचा ओव्याची पूड\nभाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.\nहाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.\nकडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/cultural", "date_download": "2018-04-23T11:16:46Z", "digest": "sha1:AMB4YWPM26KQ55DLSVS3UFYULO5DLM4N", "length": 9113, "nlines": 136, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "सांस्कृतिक | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\nशिव व भक्त्ती ही विश्वातील दोन रुपे परमात्मा म्हणजे शिव. भक्त्ती म्हणजे पार्वती तीच अंबा जगदंबा मानवाच्या उद्धारासाठी व कल्याणासाठी अनेक रुपे घेतली…..त्यातील एक रुप आई एकविरेचे. वसई ही...\tRead more\nएक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा. दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा. तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा चौथा रंग मुलीला...\tRead more\n|| श्री गणेशाय नम: || १} नवरात्र म्हणजे काय त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्स...\tRead more\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nभारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोधघेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न …… अनादी काळा पासून मनुष्य ईश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे.आ...\tRead more\nप्रति, मा. संपादक / मुख्य वार्ताहर, २१ मे – अक्षय तृतीया अक्षय (अक्षय्य) तृतीया प्रस्तावना : साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला तीलतर्पण करणे, ब्राह्मणांना...\tRead more\nआपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/31", "date_download": "2018-04-23T11:42:49Z", "digest": "sha1:P7DGR7J4SQEWAWBYJMMPF3HTZMFUT7J2", "length": 16088, "nlines": 170, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nमानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे\nमी आजवर ‘इंडिअन सायकीएट्रीक सोसायटीचा’ मेंबर या नात्याने खूप काम केलं..आणि करत राहीन..माझ्याकडे कामाला असणारे माझेच दोन पेशंट आहेत..जे त्यांच्या आजाराच्या पहिल्या दिवसापासून आहेत..आणि इथेच काम करतात.. गेली वीस वर्ष.. याहून मला समाधानाची दुसरी गोष्ट नाही..\nमाझा जन्म बेळगावला झाला. माझे आजोबा वैद्य होते आणि वडील बेळगाव मधे संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर ते पुणे विद्यापीठात ‘अॅडव्हान्स सेंटर फॉर संस्कृत स्टडीज’ या विभागात नोकरी करायला आले.. म्हणून आम्ही पुण्यात आलो आणि माझे आठवी नंतरचे सगळे शिक्षण पुण्यात झाले. आई गृहिणी होती. मी आणि माझा भाऊ श्रीधर अशी त्यांना दोन मुले..\nमाझे पाहिल्या पासूनच मेडिकलला जायचे पक्के ठरले होते. घरात आजोबा वैद्य असल्याने तसे वातावरण होतेच..बी.जे.मेडिकलला १९६४ मध्ये प्रवेश मिळाला..मला केवळ ६५% असूनही... कारण तेंव्हा इतकी स्पर्धा नव्हतीच. शाळेपासून नाटकाची खूप आवड होती. पण मेडिकलला गेल्यावर ही नाटकाची आवड आपण कोणालाही कळू द्यायची नाही असं मी मनातून ठरवलं होतं. कारण त्यात मग अडकायला होणार हे माहित होतं. पण कोणीतरी सांगितलंच की हे विद्याधर वाटवे.. शाळेत नाटकात काम करायचे..मग काय,जब्बार पटेलनेच आम्हाला गाठलं आणि पुन्हा माझं नाटक सुरु झालं...डॉ .मोहन आगाशे, श्री. सतीश आळेकर,यांच्यासोबत मग मी थिएटर अॅकॅडमी मध्ये जाऊ लागलो... पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत डॉ. पानवळकर आणि डॉ. परदेशी यांच्याबरोबर मी ‘पाच दिवस’ नावाच्या एकांकिकेत काम केलं...ज्यात मला प्रथम पारितोषिक मिळालं. मग ‘लोभ नसावा हि विनंती’ हे अजून एक नाटक पटेलांनी बसवलं, ज्यात मी काम केलं. ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये काम केलं... डॉ.पटेलांनी ‘खेळिया’ नावाचे नाटक बसवले..या नाटकाचे आम्ही जवळजवळ ४० ते ५० प्रयोग केले...मी जे जग बघितलं ते सगळं या नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्तानेच...\nमाझा ओब्सेसिव्ह स्वभाव हेच नाटक करण्यामागचं खर कारण आहे असं मला नेहमी वाटतं...मी सिरीयल मधेही काम केलं...एम्.बी.बी.एस्.झालो...मग डी.पी.एम्.केलं...मग असं वाटलं की सायकिएट्री मध्ये एम्.डी.करावं... खूप खटाटोप केले...बी.जे. ला तेंव्हा एम्.डी. नव्हतं..म्हणून मग A F M C ला प्रयत्न केले..प्रवेश मिळाला पण तेवढ्यात इकडे बी.जे.ला M Dते सुरु झालं..मग बी.जे.लाच केलं..\nसायकिएट्री म्हणजे वेड्यांचा डॉक्टर असं जरी सामान्य मणसाला वाटत असलं तरी आता हे क्षेत्र खूप पूर्वीसारखं फ्रॅईड आणि एवढच मर्यादित राहिलेलं नाही..या क्षेत्रात पूर्वी कमी इमर्जन्सीची शक्यता होती.. त्याचा विचार करून मी ते निवडलं खर... पण आज मला कितीदा तरी धावाधाव करावी लागते....इमर्जन्सी येते...आत्महत्येसारख्या कितीतरी घटना घडत असतात..तेंव्हा आता हे क्षेत्रही खूप कामाचा ताण असलेल होत चाललं आहे..\n१९८० मध्ये मी एम्.डी. झालो आणि जवळजवळ १९९२ पर्यंत नाटक आणि माझा व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची कसरत करत राहिलो...नाटकांच्या प्रयोगासाठी जगभर फिरलो...दौरे केले.. नाटकानेच मला माझा आयुष्याचा जोडीदार दिला..त्यावेळी ती बी.एस्.सी. झाली होती..पण विवाहानंतर तिने माझ्या क्षेत्राचा विचार करून परत कलाशाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्र विषयात बी.ए. केलं आणि नंतर एम्.ए.देखील केलं...पुढे जाऊन P.hd पण केलं..माझ्यासोबात २० वर्ष क्लिनिकल सायकोलॉजीस्ट म्हणून काम केलं...आणि आता त्या ज्ञानप्रबोधिनी मध्ये गिफ्टेड मुलांकरीता काम करतात..आमच्या घरी जे रात्री १० ते १ या वेळात क्लिनिक चालतं त्यात त्या माझ्यासोबत काम करतात..मी सकाळी ९ ते रात्री ९ पूना हॉस्पिटलमधे काम करत असतो.. आणि रात्री घरी जाऊन परत ताजातवाना होऊन १० पासून पेशंट बघतो...ते पार १ वाजेपर्यंत..\nसुरुवातीच्या काळात मी माझं काम आणि अभिनय यांची सांगड घालण्यासाठी खूप धडपड केली..मी तेंव्हा एका ‘महानगर’ नावाच्या विनय धुमाळे यांच्या सिरीयल मध्ये काम करत होतो. त्यात नाना पाटेकर काम करायचे.. मी श्रेयश हॉस्पिटल मधून पेशंट बघून निघायचो..स्कूटर ला किक मारून रणजीत हॉटेल मध्ये जायचो..नाना पाटेकरांसोबत एक सीन करायचो..परत हॉस्पिटल मध्ये येऊन पुढचे पेशंट बघायचो..बेन्जामिन गिलानी यांच्यासोबत पण एका सिरीयल मध्ये काम केलं..पुढे १९७६ मध्ये गिरीश कर्नाड जेंव्हा फिल्म इंस्टीटयूटला प्रमुख होते तेंव्हा त्यांनी असं सुचवलं कि तुमच्यासारखा माणूस इथे फिल्म इंस्टी�\tपुढे वाचा\nव्यवसाय > मनोसोपचार तज्ञ,\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642611", "date_download": "2018-04-23T11:23:01Z", "digest": "sha1:CRHY76IJ3MMPYCP7RZDM5NS7MDLK4242", "length": 2297, "nlines": 23, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\n— by विजया केळकर\nती ( भाग - २ )\nही माझी लाडकी मदतनीस व साथीदारीण कोण पाहिलत का म्हणून तर या- या म्हणत बोलाविले\nना. अहो ही माझी आवडती '' gasशेगडी '' गेली ४६ वर्षे मी ती सतत वापरत आहे. लग्ना नंतर इतक्या\nलवकर मला ' ती ' मिळाली आणि स्वयंपाकासाठी कोळशाची शेगडी किंवा भुसा-शेगडी किंवा स्टोव्ह या\nसाधनांचा उपयोग जास्त करावा लागला नाही जे मला जमत नव्हते.तसेच त्या छोट्या गावात gasएजन्सी\nनव्हती तर एका दुकानदाराने भोपाळून आणून दिली होती व तोच दोन महिन्यांनी तिचे स्पेशल खाद्य म्हणजे\nनवीन सिलेंडर आणून देत असे.कालांतराने गावात एजन्सी आली.तिची बटणे फक्त एकदाच बदलली आहेत.\nत्याखेरीज कधी कोणताच प्रोब्लेम आला नाही.पण खरेच बटणामुळे नवीन शेगडी घ्यावी लागणार बहुतेक.\nम्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच.\nसगळ्यांना नम्र निवेदन कोणी तिला नवीन बटणे लावून द्यावीत.म्हणजे तिचा दुरावा सहन करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_24.html", "date_download": "2018-04-23T11:26:45Z", "digest": "sha1:R5UXKYDWNL4MRIVGLWQJZTMVOCX2XSVU", "length": 9602, "nlines": 193, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: टॅगाटगी", "raw_content": "\nकांचनजींनी टॅगलय... कॉलेज सोडताना स्लॅमबुक भरले होते, त्याची आठवण झाली... :)\nकाळे, पांढरे, काही लालसर, कुरळे...सर्वात महत्वाचे ते आहेत :)\nआई... अजुन काय म्हणणार...सिंपली द ग्रेट\nतापट पण खुप काळजीवाहू.\nआईच्या हातचं काहीही.. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी.\nस्वप्न पडणं बंद झालयं आज काल... (झोप येणेही)\nनारळाचे पाणी, आणि दुपारी कॉफ़ी.\nचित्रपट पाहने, संगीत ऐकने, वाचन.\nअश्यात उंचावरुन खाली पाहील्यावर भिती वाटतेय... (अश्यानी मी कुठली उंची गाठणारयं कुणास ठावुक)\nभारतातच...पण मध्ये युरोप फिरण्याची इच्छा आहे...\n(नेहेमीप्रमाणेच) चालु... चॅनल सर्फिंग चालु आहे.\nनाताळ सुट्टी मुळे ऑफीस मध्ये जास्त काम नाही, मुड मस्त आहे... आज घरी जायचयं रात्री.\nसद्ध्या नाही, पण आइ-२० घ्यायचीय...\nडिपेण्ड्स...कशासाठी विचारताय त्यावर. बहुतेक गोष्टी साठी काळा.\nआत्ताच.. दुपारचा चहा पिताना. (दोस्ताना जोक्स मित्रावर..)\nशिनुमा एके शिनुमा.. पण एकांतात\nरेल्वे स्टेशन आणि प्लॅटफार्म्स. (मी टीसी नाहीये ;-) )\nरेग्युलर कुणीही नाही, फोन वर जास्त बोलणं होते आज काल...\nहैदराबादला हवेली... नांदेडला भाग्यनगर कॉर्नर.\n सर्व ब्लॉग मित्रांनी लिहुन ठेवलयं आधिच... तरीही माझी लिस्ट..\nकांचनजी, महेंद्रजी, भाग्यश्रीजी, गौरीजी, अजय, माधुरीजी, सौरभ , विशाल ....\n आपल्यापैकी बहुतेकांना आईच्या हातचं खायला आवडतं. सगळ्याच आया जगातल्या बेस्ट कुक असताना नाही\nहो ना... कांचनजी. आईच्या हातच्या जेवणाची चव काही निराळीच...\nतुम्हाला नाताळाच्या हार्दीक शुभेच्छा\nआपल्या काही गोष्टी मॅच होतायत\nतुम्ही नांदेडचे आहात का मी एस्.जी.जी.एस मधे शिकलो. आणि भाग्यनगर कॉर्नर माझाही फेवरेट स्पॉट होता. मी तसा सिडकोत रहायचो, पण मित्रांकडे गेलो की भाग्यनगर कॉर्नर ठरलेलं असायचं.\nहो, मी नांदेडचाच. भाग्यनगर कॉर्नर, नांदेडीयन्स चा विक पॉंईंट.\nजिभ्रासुख आणि नयनसुख एकाच वेळी. ;-)\nधन्स काका, मला टांगल्याबद्दल(आय मीन टू से टॅगल्याबद्दल..)... तुमची आय-२० आली की पहिला पेढा मात्र मी खाणार हां....\nभाग्यश्रीजी, मी दिवसाचे ४ तास रेल्वेट्रॅकवर घालवतो (रेल्वेत बसुन अफकोर्स) :-) . प्रतिक्रियेकरीता आभार\nमनातल्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ देत. २०१० साठी शुभेश्च्या\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7135182", "date_download": "2018-04-23T11:42:01Z", "digest": "sha1:HJ2KKV6DXRSATE2V42BGEJIMRIG3I2LR", "length": 7726, "nlines": 46, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "2013 च्या शीर्ष 10 सर्वाधिक शेअर केलेल्या व्हिडीओ ब्रॅण्ड: सॅमसंगने आघाडी घेतली, बीयर, बाईज आणि अॅन्ड बी. मिमल", "raw_content": "\n2013 च्या शीर्ष 10 सर्वाधिक शेअर केलेल्या व्हिडीओ ब्रॅण्ड: सॅमसंगने आघाडी घेतली, बीयर, बाईज आणि अॅन्ड बी. मिमल\nकमाई 7. त्याच्या \"S4: साउंड अँड शॉट\" सोशल विडीओ मोहिमेसाठी 3 मिलियन शेअर्स, सॅमसंग 2013 च्या मिमलचा टॉप ब्रॅंड ब्रँड म्हणून सन्मानित आहे.\nदुसर्या क्रमांकावर, या वर्षी सर्वात सामायिक सामाजिक व्हिडिओ ब्रॅण्डच्या सूचीवर एक नवीन प्रवेशिका आहे.\nसर्व काळातील सर्वात जास्त पाहिलेल्या ऑनलाइन व्हिडिओ जाहिरात मोहिमेसाठी विशिष्ट शीर्षक कमावणे, कबूतरच्या रेकॉर्ड ब्रेकिंग \"रिअल ब्युटी स्केच\" जाहिरातीमुळे Semalt ब्रॅंड दर्जा क्रमांक 3.\nगीकोसह, अनारलीच्या 2013 मधील टॉप 10 सर्वाधिक सामायिक सामाजिक व्हिडीओ ब्रॅडविझर, केमर्ट, कॉर्नेटटो आणि ईएमध्ये नवीन प्रवेशकर्ते\nयावर्षीच्या \"द क्लाइदेडलेस ब्रदरहुड\" सुपरबोळने सहाव्या क्रमांकावर नऊ क्रमांकावर असलेल्या Semalt ब्रेकच्या टॉप टेनमध्ये प्रवेश केला.\nSemaltेट \"बेबी आणि मी\" मोहिमेमुळे ब्रँडला यावर्षीच्या दहा यादीतील नंबर 7 वर हलविले.\nपेप्सीने कोका-कोलाचा पराभव केला, \"टेस्ट ड्राईव्ह\" जाहिरातीच्या यशस्वीतेमुळे \"टॉप टेन लिस्ट\" बनवला, एक व्हिडीओ Semaltेटला 'प्रॉंक्चर' म्हणून वर्गीकृत केले. '\n2013 च्या टॉप 10 सर्वाधिक सामायिक सामाजिक ब्रॅण्ड्सच्या संपुर्ण यादीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\n(3 9) रेड बुल\n2013 च्या टॉप दहा सर्वाधिक सामायिक सामाजिक व्हिडीओ ब्रँडच्या यादीत सोबत, अनियंत्रितपणे त्याचा प्रथम व्हिडिओ शेअरिंग पुरस्कारांचा शुभारंभ करीत आहे. आजच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट व्हिडिओ, वर्षातील सर्वोत्कृष्ट ब्रँड, टॉप मूव्ही ट्रेलर आणि सर्वाधिक शेअर केलेले सुपरबोळ अॅडसह 20 पेक्षा जास्त श्रेणींमध्ये पुरस्कारांसह, Twitter (# व्हीएसए) द्वारे आज विजेत्यांची घोषणा केली जात आहे.\nआपण सेमीलेट वेबसाइटवर पुरस्काराच्या श्रेणी आणि अंतिम स्पर्धकांची संपूर्ण सूची शोधू शकता, परंतु येथे विजेत्यांचे नमूने आहेत:\nटॉप मूव्ही ट्रेलर - युनिव्हर्सल फास्ट अँड फायर 6\nसर्वाधिक सामायिक सुट्टीची जाहिरात - Kmart चे आपले जो दर्शवा\nसर्वाधिक सामायिक केलेली मांजर किंवा डॉग जाहिरात - GoPro चे फायरमन केट\nसर्वाधिक-सामायिक सेलिब्रिटी जाहिरात - व्हॉल्वो ट्रक एपिक स्प्लिट (जीन क्लॉड व्हॅन डॅममे)\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, व सेल्स अॅण्ड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T11:44:14Z", "digest": "sha1:7CBWDP4T35ONBBH3H2DS7PY7IUUW2CGE", "length": 4545, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्सचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► नेदरलँड्समधील नद्या‎ (१ प)\n► नेदरलँड्सचे प्रांत‎ (१२ प)\n► नेदरलँड्समधील शहरे‎ (१ क, १४ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/may/1/", "date_download": "2018-04-23T11:30:26Z", "digest": "sha1:CGZYWP6Z3PIFBTULHTOQQDIA6Q7JRJES", "length": 7957, "nlines": 129, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१ मे दिनविशेष | May 1 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » मे » १ मे दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १ मे २०१३\n१ मे दिनविशेष(May 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\nमहाराष्ट्र दिन : महाराष्ट्र.\nगुजरात दिन : गुजरात.\nकामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.\nलेइ दिन : हवाई.\nराष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.\nकायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.\n१८६२ : मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.\n१८८६ : या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.\n१८९७ : स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना\n१९३० : सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.\n१९५६ – पोलियोची लस जनतेस उपलब्ध.\n१९६० : द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.\n१९८१ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती\n१९७२ : कोळसा खाणीचे राष्ट्रीतीकरण करण्यात आले.\n१७३९ : चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला.\n१९१५ : ‘अंचल’ रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी\n१९२० : मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक\n१९४४ : सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.\n१९७२ : कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.\n१९९३ : नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.\n१९९८ : गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.\n२००२ : पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/maharashtra-desha/literature/poem-life-at-border", "date_download": "2018-04-23T11:25:07Z", "digest": "sha1:NWY3XH7Q4VANG5OJSCA2XHAITSMGVYXT", "length": 8739, "nlines": 163, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Poem: Life at Border | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महाराष्ट्र देशा साहित्य सीमाभाग (कविता)\nनुकतेच काळ्या कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घालण्याचा काळा फतवा काढला आहे. त्या फतव्याला उत्तर व सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांचे मनोधैर्य वाढवणारी ‘सीमाभाग’ ही कविता नक्की वाचा व इतकी पुढे पाठवा की कर्नाटक सरकारने तो फतवा रद्द केला पाहिजे….\nबंद केल सीमेच दार\nतरी लक्षात ठेवा एक\nनाही मानणार अशी हार\nपण लक्षात ठेवा एक\nआता आहे आमची पाळी\nसरकार सकट करून टाकू\nमराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्यात\nपण लढणे विसरलो नाही\nआम्ही मागे लागलो तर\nपाळायला कमी पडेल भूई\nमहाराष्ट्र तुमच्या सोबत आहे\nते नक्की मात घेतील\nबेळगावच काय आख्खा कर्नाटकच\nनितीन खापरे – पुणे\nसीमाभागातील मराठी बांधवांसाठी नक्की पुढे पाठवा\nअध्यात्माचा महामेरु स्वातंञ्यवीर सावरकर – भाग ६\nअध्यात्माचा महामेरु स्वातंञ्यवीर सावरकर – भाग ७\nएनएमएसएसएस आणि आम्ही उद्योगिनी आयोजित महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sanjay-mhatre.html", "date_download": "2018-04-23T11:49:10Z", "digest": "sha1:WW2ZBKK2WATUTYJ5N5SQ3RKMV7WBI23R", "length": 5910, "nlines": 75, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संजय एकनाथ म्हात्रे\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, कामोठे शहर\nName : श्री संजय एकनाथ म्हात्रे\nFather's Name : एकनाथ रामदास म्हात्रे\nMother’s Name : सौ. सुमन एकनाथ म्हात्रे\nPlace of Birth: : पनवेल, महाराष्ट्र\nSpouse’s Name : सौ. स्वप्नाली संजय म्हात्रे\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश\nEducation : बारावी, आय.टी.आय (इलेक्ट्रिकल)\nHobby : वाचन, खेळणे, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे\nResidence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९\nOffice Address : भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे\nकामोठे शहर उपाध्यक्ष, भाजपा\nमाजी उपाध्यक्ष, कॉंग्रेस शहर\nयुवक अध्यक्ष, वार्ड २ शे.का.प.\nजेष्ठ नागरिकांना सवलतीचे पास काढून देणे.\nतरुण – तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.\nकामोठ्यातील सर्व वर्गातील लोकांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू करून दिला. (१०० ते १५० मुला-मुलींनी या संधीचा लाभ घेतला)\nसमाजातील व प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत करणे.\nसिडको व इतर शासकीय समस्या सोडवणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nरक्तदान शिबीर, विविध आरोग्य तपासणी शिबीरे.\nमाजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त अनेक उपक्रम करणे.\nपक्षाच्या सर्वच कार्यक्रम, आंदोलने, उपोषणे, धडक मोर्चे, निवेदने देणे आदी. सक्रीय सहभाग.\nसंजय म्हात्रे यांचा छायाचित्रे संग्रह...\nश्री गणेश जयंती उत्सव\nमुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताना...\nस्त्री शक्ती महिला मंडळ यांच्या सौजन्याने टाइम्स ऑफ इंडिया व ब्रिटिश कौन्सिल यांच्या \"टीच इंडिया\" प्रकल्प अंतर्गत \"फ्री इंग्लिश कोर्स चे\" आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन...\nलोकमतकडून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस साजरा...\nहॅलो लोकमत - चित्रकला स्पर्धेला उत्कृठ प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T11:45:32Z", "digest": "sha1:GF47IH34AGBUVQGWZSBHFZ6WU4RDR2XM", "length": 3817, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लंगोट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलंगोट नेसलेल्या साधूचे चित्र (इ.स. १८०८)\nलंगोट हे भारतातील हिंदू धर्मातील संन्याश्यांचे, बैरागी साधूंचे साधे कटिवस्त्र असते. लंगोट हे सहसा एक पांढऱ्या रंगाचे चौकोनी वस्त्र असते. कंबरेला बांधलेल्या एखाद्या दोऱ्याने हे वस्त्र बांधले जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=251&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:47:06Z", "digest": "sha1:WSMGGCSUJPPSW6IV2ODW4LEXNT2EQVUU", "length": 5723, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "'कल्की'च्या निमित्ताने", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nडॉं. राधाकृष्णन् हे आधुनिक भारताचे तत्त्वज्ञ मुनीच आहेत. प्रखर पांडित्य, विशाल बुद्धीमत्ता, सर्व विचार-मतांबद्दल अपार सहिष्णुता आणि वेळोवेळी जगभर फिरुन आपल्या प्रभावी वाणीने त्यांना घडविलेले भारताचे खरेखुरे दर्शन, यायोगे प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा त्यांनी आपल्या आचरणातून प्रकट केलेली आहे.\nएक आठवण अशी आहेः डॉं. कागावा हे जपानी सदगृहस्थ भारतात आले होते. डॉ. कागावा यांच्यावर महात्मा गांधी आणि गांधीजींची विचारसरणी यांचा फारच प्रभाव पडलेला होता. ते स्वतःला गांधीजीचे अनुयायी म्हणवून घेत असत. त्यांचा गांधीप्रणीत आचार-विचारांमुळे त्यांना ‘जपानचे गांधी’ असेच म्हणण्यात येत असे. ‘गांधी’ हे एका जीवनपद्धतीचेच नाव बनले होते. तर डॉ.कागावा एकदा गांधीजींना भेटण्यासाठी भारतात आले असता त्यांनी भारतदर्शनाची इच्छा प्रकट केली. त्यावर गांधीजी डॉ. कागावा यांना म्हणाले होते, “तुम्हाला जर खराखुरा हिंदुस्थान पाहावयाचा असेल तर आग्रा येथील ताजमहाल, शांतीनिकेतनातील कविवर्य रवींद्रनाथ टागोर आणि पाँडेचरीच्या आश्रमामधील महर्षि अरविंद घोष या तीन गोष्टीबरोबरच सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन् यांची अवश्य भेट घ्या \nगांधीजींच्या या शिफारशीत बरेच काही येऊन जाते.\nप्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा त्यांनी आपल्या आचरणातून प्रकट केलेली आहे.\nडॉ.राधाकृष्णन् यांच्या बुद्धिमत्तेने आणि प्रचंड व्यासंगाने जगभरचे भलेभले विद्वान, पंडीत तर चकित झालेच ; पण स्टॅलिनसारखा रशियाचा पोलादी नेताही त्यांच्या बुद्धिप्रभावाने आकृष्ट झाला होता, हे विशेष \nत्यावेळी डॉ. राधाकृष्णन् रशियात भारताचे वकील म्हणून काम पाहात होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ च्या नजीकच्या काळातली ही गोष्ट. स्टॅलिनच्या कर्तृत्वाचा दबदबा त्या वेळी केवळ ऱशियामध्येच नव्हता, तर जगभर पसरलेला होता. एक जबरदस्त एकाधिकारशाहा अशी त्याची प्रतिमा होती. सर्वसाधारणपणे स्टॅलिन हा कोणालाच किंवा कोणत्याच राष्ट्राच्या वकिलाला कधी भेटत नसे पण काय झाले कोणास ठाऊक, डॉ. राधाकृष्णन् यांची कीर्ती ऐकून एकदा स्टॅलिनदेखील म्हणाला की, “चोवीस तास अध्ययन करणा-या त्या भारतीय प्रोफसराला मला भेटायचे आहे.”\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:24:53Z", "digest": "sha1:FARSK42N3S3ONEYVUQT4R5VXIIJYXS4L", "length": 23994, "nlines": 78, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "बायको पाहिजे - भाग ३ | एक पथिक", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nरविवार, ३० डिसेंबर, २०१२\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2पासून पुढे\nमित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार...थांबव कि आता...एखादी पसंत कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.\". पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.\nत्या स्थळी एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे बेनर लावले होते. ठळक अक्षरात दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून \"रूपा\" ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा गेल्या वर्षी आलेला चित्रपट Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि \"आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत.\" हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय कि त्याला कसली हि पडलेली नाही \"राजकारण\" शिवाय......\nथोडा वेळ झाला मुलीच्या आईने मुलीला चहा पाणी घेवून येण्यासाठी थोड्या हळू स्वरात ओरडली. तिकडून संतापात उत्तर आले - \"हो येतेय \" त्याच क्षणी मी तिच्या आई कडे पहिले , नेमके त्याच क्षणाला त्यांनी देखील माझ्या कडे पाहिले आणि मान खाली करून घेतली.पंजाबी ड्रेस मध्ये हातात चहा चा ट्रे घेवून ती हजर झाली. मी चहा घेतला. चहा जास्त होता म्हणून कमी करण्याचा आग्रह केला.पाच मिनिटा पर्यंत निवांत पाने चहा घेतला. ती आली चहाचे कप व पाण्याचे ग्लास व ट्रे घेवून किचन मध्ये परत गेली.मुलीच्या आई ने तिला परत बोलावले समोर काही विचारायचे असेल तर विचारण्यास सांगितले.\nआता दुसया वेळेस ती किचन मधून आली तेव्हा मात्र थोडी वेगळी दिसली.ज्या प्रमाणे मुले तोंडात बबल गम ठेवून तोंड हलवतात तशी ती तोंड हलवत आली. बहुतेक तिच्या तोंडात च्व्हिङ्गम होते.ते पाहिल्यावर तिला विचारण्यासाठी जे प्रश्न डोक्यात होते ते सर्व पुसले गेले. आणि \"हम आपके है कोण \" चित्रपटातील एकच दृश्य डोळ्या समोर आले - \"जेव्हा सलमान खान बबल गम खात असताना माधुरीला गुलेल ने मारतो\"\nमन सांगत होते कि जितु \"या मायाशी लग्न केले म्हणजे तुला माधुरीचा रोल करावा लागेल आणि ते सलमान खान बनेल. जी रोज तोंडात चिंगम ठेवून गुलेल ने तुला मागे मारेल.. \"\nमी एका मिनिटा साठी विचारात पडलो होतो कि शिक्षिका असून असे कसे पण उत्तर कोण देणार पण उत्तर कोण देणार कदाचित त्यांच्या घरात जर जास्तच मुक्त वातावरण असेल सुरुवाती पासून.येथे नुसत्या औपचारिकता म्हणून मी तिला शिक्षणा बाबतीत दोन तीन प्रश्न केलेत. सी आय डी सारखे जास्त विचार पूस न करणेच मला योग्य वाटले. आणि आम्ही तेथून निरोप घेतला. बाहेर आल्या वर आईला म्हटलो - \"आई कदाचित त्यांच्या घरात जर जास्तच मुक्त वातावरण असेल सुरुवाती पासून.येथे नुसत्या औपचारिकता म्हणून मी तिला शिक्षणा बाबतीत दोन तीन प्रश्न केलेत. सी आय डी सारखे जास्त विचार पूस न करणेच मला योग्य वाटले. आणि आम्ही तेथून निरोप घेतला. बाहेर आल्या वर आईला म्हटलो - \"आई केस क्लोज नो मोर इन्क्वायरी \". आई ने देखील \"होकार\" मध्ये डोके हलवले. तो विषय तिथेच संपला होता.\nआणखी पाचेक दिवसा नंतर \"आहिरे साहेबा कडून\" (आहिरे व म्हतारी यांच्या बद्दल अधिक माहिती साठी भाग दोन वाचा ) परत त्याच म्हातारी द्वारा एका नवीन मुलीला पाहण्यासाठी आमंत्रण आले. मुलगी आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला होती. एवढी लायकात पाहून कोणी हि व्यक्ती \"नाही\" म्हणणार नाही. तरी येथे मनात संशय निर्माण झाला. संशय असा कि स्वत:च्या साली साठी त्या व्यक्तीने (आहिरे साहेबांनी ) मला पुढे न करता , मागेच केले होते. अर्थात त्याच्या साली साठी मला ते योग्य समजत नव्हते. तर आता या नवीन स्थळा साठी का बरे त्यांनी माझे नाव पुढे केले असावे डोक्यात एक प्रश्न चिन्ह होते. समोरून त्यांनी निरोप पाठवला कि अमुक दिवशी तुम्ही दुपारी अकरा वाजेला या म्हणजे आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पाडू. पण माझी शाळा जवळ जवळ एक वाजेला सुटते. त्या मुले हि बाब शक्य नव्हती , मी सांगितलेल्या वेळी जाण्यास असमर्थता जाहीर केली. आणि मग दोन दिवसा नंतर दुपारी दोन वाजेला पाहण्याचे ठरले.\nमी , आई व परत एक नाते वाईक अशी तीन लोक निघाले. मला वाटले स्थळ सुरत मधेच आहे तर काही लांब नसेल.पण मी चुकीचा होतो. ते स्थळ बरेच लांब होते. सुरत च्या बाहेर म्हणावे लागेल. ओटो चालकाने पण आम्हास अर्ध्या रस्त्यात सोडले. पुढे जाण्यास तो तयार नव्हता. मग ती चार किलो मीटर आम्हास पायी चालावे लागले. दूर पर्यंत एकी कडे शेती व दुसरी कडे बांधून पडलेले कोम्प्लेक्ष आणि रो हाउसेस दिसत होते. एकी कडे सिमेंट , कोन्क्रेत चे जंगल तर दुसरी कडे शेत. पण माणसे दुर्मिळ पणे दिसत होती.चालता चालता मधेच समोरून आहेरे साहेब मोटार सायकल वर मागे एका व्यक्ती सह गेस सिलिंडर नेत असताना दिसले. मी त्यांना दुरून ओळखले नाही. पण त्यांनी मला ओळखले.लगेच मोटार सायकल थांबवली.\nमोठ्या स्वरात बोलले - \"जयभीम हो इन्दवे साहेब. काय हो पायी रिक्षा येते ना थेट \",\nमी उत्तर दिले - \"ओटो वाला तयार नव्हता त्यामुळे .....\"\nआहिरे - \"बरे , असे करा तुम्ही सरळ माझ्या घरी जा , आई आहे बसलेली , तुम्ही भेटा आईला, मी जरा हा सिलिंडर पोहचवून येतो ..आणि काय हो सर तुमचा मोबाइल नंबर लागत नाही..\"\nमी - \"तुम्ही युनिनोर चा नंबर डायल केला असेल. तो सध्या बंद आहे.\"\nआहिरे - \"कोणता नंबर चालू आहे \nमी - \"बरे हा घ्या , ९९९८७११०४२\"\nआहिरे - \" तुम्ही चिंता करू नका मुलगी हुशार आणि सुंदर आहे. सध्या आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाला आहे. माणसे देखील अगदी साधी सिम्पल आहेत. ओ के . बरे ..येतो मी...नंतर चर्चा करू.\"\nपरत प्रश्न चिन्ह उदभवला कि ज्या व्यक्ती द्वारा पाहण्यासाठी आमंत्रण आले तीच सोबत हजर नाही.\nते निघून गेले . तेथे रस्त्यातच मला माहित झाले कि त्यांनी तेथे नवीन घर एकाद महिन्या पूर्वी विकत घेतले आहे. आहिरे च्या घरी पोहचलो. चहा पाणी झाला. त्यांची पत्नी व आई बरोबर एक दोन गोष्टी झाल्यात. घर विषयी गोष्टी निघाली होती तेव्हा मिसिस आहेरी यांनी सांगितले कि त्यांनी घर २० लाख रुपयात घेतले आहे.आणि एका महिन्या नंतर रेट २५ लाख झालेला आहे. मला माहित होते कि त्या ठिकाणी, त्या विस्तारात प्लॉट चा रेट काय चाललेला आहे.. अर्थात ते निव्वळ पणे खोटे बोलत होते. कदाचित त्यांना स्वतः चे स्टेटस जरा जास्त उंच दाखवायचे होते. मी नुसते \"होकार\" मध्ये मान हलवत होतो.\nथोड्या वेळाने आम्ही त्याच एरिया मध्ये थोड्या अंतरावर असलेल्या मुलीच्या घरी गेलो.मुलीचा भाऊ आणि आई हजर होती.प्रथम दृष्टीस ते अगदी सादे आणि भोळे प्रकारची माणसे असल्याची आढळून आली. मुलगी पण चांगली होती फक्त शरीराने माझ्या पेक्षा थोडी सळ पातळ होती. त्या मुलीचा भोळे पणा आणि अगदी सस्मित प्रेमाने हळूच विचार पूर्वक बोलणे मला फार आकर्षितकरत होते. ओवर आल माझ्या लायक मुलगी होती. पण मनात असलेल्या प्रश्न चिन्हामुले मी पुढे पाउल न टाकता . माघार घेतली. या ठिकाणी मी तीन ते चार दिवसाचा अल्प विराम ठेवला. कारण सरळ \"नकार\" देणे येथे मला प्रथम वेळेसच कठीण वाटत होते.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे १२:०२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/view_story/39", "date_download": "2018-04-23T11:47:35Z", "digest": "sha1:JDWWOOIVD5J5TI3LEJG6AF7UNTPNFCBD", "length": 14996, "nlines": 193, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "Dr. Anand Deshpande", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nकोल्हापूरचा यशस्वी उद्योजक आनंद देशपांडे\nमाझी यशोगाथा - महेंद्र यादव\nफत्तेचंद रांका (रांका ज्वेलर्स)\nसुजाता मस्तानी सचिन कोंढाळकर\n५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात खरे तर दाखल घेण्याजोगे आहे.\n“जंगलात दोन रस्ते फुटले होते...\nमी कमी मळलेला रस्ता निवडला.\nत्यामुळेच तर सारे काही बदलून गेले..\nअसाच वेगळा रस्ता निवडून ‘Persistent Systems Limited’ चे स्वप्न सत्यात उतरविणारे, प्रामाणिक आणि पारदर्शी व्यक्तिमत्वाचे, कंपनीचे अध्वर्यू ,M.D. आणि C.E.O. डॉ. आनंद देशपांडे.\nओळख Persistent म्हणजे ‘चिकाटी असणारा’, ‘प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करणारा’..\nशालेय शिक्षण भोपाळमध्ये पूर्ण करणारे आनंद देशपांडे IIT खरगपूर येथून computer science घेऊन १९८४ साली इंजिनिअर झाले. त्यानंतर परदेशातील अनेक विद्यापीठांना त्यांनी पदव्युत्तर अध्ययनासाठी अर्ज केले. १९८६ मध्ये अमेरिकेत ब्लुमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हार्सिटी मधून त्यांनी पदव्युत्तर अध्ययन पूर्ण केले आणि १९८९ मध्ये पी.एच.डी. मिळवली. संशोधन पूर्ण झाले की जगातील अग्रगण्य व नावाजलेल्या एखाद्या कंपनीत सुरुवातीला काम करायचे असे त्यांनी ठरवले. परंतु नोकरी कायमची करायची नाही, तर स्वतःचा व्यवसाय करायचा हे मात्र मनाशी पक्के ठरवले होते. संशोधनाचे काम संपताच कालीफोर्नियातील Hewlett Packard Laboratories मध्ये त्यांनी दीड वर्ष नोकरी केली. नजीकच्या भविष्यकाळात भारतात software product development या क्षेत्रातील उद्योग हा महत्वपूर्ण आणि प्रगतीशील असा उद्योग ठरणार आहे हे त्यांना जाणवले. जगप्रसिद्ध कंपनीतील नोकरी पुढे चालू न ठेवता, मनाशी एक स्वप्न जोपासून १९९० मध्ये ते भारतात परत आले.\n१९९० मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. जागतिकीकरणासाठी भारतीय धोरण नुकतीच खुली होत होती. या विपरीत परिस्थितीतही उद्योगधंदा सुरु करायचा ठाम निर्णय घेतला ज्याला अर्थातच त्यांच्या कुटुंबाने पूर्णपणे पाठिंबा दिला. मराठी माणूस उद्योगधंदा करण्यापेक्षा मिळेल ती नऊ ते पाच नोकरी करणे अधिक पसंत करतो अशी एक समजूत असते. पण असा कोणताही विचार किंवा दृष्टीकोन न बाळगता, स्वतः नोकरी करून देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसाय करण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याचा निर्णय घेतला, हे निश्चितच महत्वाचे आहे.\nस्वतःचा व्यवसाय करायचा तर पैसा हवा..दीड वर्षाच्या कामातून कमावलेला असा कितीसा पैसा त्यांच्याजवळ असणार होता.. सर्व्हिस टॅक्स मधून आलेला दोन लाखाचा परतावा त्यांच्या हातात होता..पण तेवढे भांडवल पुरेसे नव्हते म्हणून त्यांनी आपल्या वडिलांकडून एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज घेतले. सहा जणांच्या सोबत आणि एका कॉम्प्युटर च्या साक्षीने त्यांनी ‘पर्सिस्टंट’ या कंपनीची नोंद सप्टेंबर १९९० मधे केली..अर्थातच त्यांचे वडील या कंपनीचे सह संस्थापक म्हणून त्यांच्या सोबत काम बघू लागले..\n५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात दखल घेण्याजोगे आहे.\nकंपनी तर तयार झाली..आता काम कसे मिळवायचे हे मोठेच आव्हान होते. त्यासाठी आनंद देशपांडे यांनी स्वतःचे आजवर जपलेले व्यक्तिगत हितसंबंध आणि ओळखी यांचा अतिशय प्रामाणिक आणि जाणीवपूर्वक वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जवळजवळ दोनशे पत्र पाठवली ज्यात आपली कंपनी काय प्रकारचे काम करते, कोणत्या सेवा पुर\tपुढे वाचा\nउद्योजक > आय. टी टेक्नॉलॉजी,\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A1,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T11:41:38Z", "digest": "sha1:FMGZZJIAK54UPDCCIRNNTA2RY2V4AGIA", "length": 4466, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रिनिडाड, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nत्रिनिदाद याच्याशी गल्लत करू नका.\nट्रिनिडाड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. लास ॲनिमास काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ९,९६ होती तर २०१२च्या अंदाजानुसार ८,७७१ होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/01/blog-post_18.html", "date_download": "2018-04-23T11:40:17Z", "digest": "sha1:2IAQ42NIAN6O7MWFQBB6HW5NLVFRXOJS", "length": 32308, "nlines": 207, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): देहरीचा गोरखगड", "raw_content": "\nपावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.\nसुशील त्या रविवारी ट्रेक न करण्याच्या मूडमध्ये होता. मग शेवटी मी आणि मयूरनेच जायचं ठरवलं आणि एकदाही नेट न धुंडाळता गड ठरवला - न भेटलेला जुना दोस्त - गोरखगड ओळखीच्या जवळजवळ सगळ्या ट्रेकमेट्सने गोरखगड याआधीच केला होता. न केलेला बहुधा असा मी एकटाच होतो.\nशनिवारी देहरीमधल्या हमीदभाईला फोन करून 'आम्ही येतोय, चहा-नाष्टा-जेवण' याची सोय होईल ना' असं विचारून ठेवलं. मी मुंबईतून आणि मयूर पुण्यातून येणार असल्यामुळे कल्याण-मुरबाड-म्हसामार्गे जाण्याऐवजी कर्जत-म्हसामार्गे जायचं ठरवलं. (दोन्हीकडून तिकीट साधारण तेवढंच आहे).\nकर्जतहून सव्वाआठला म्हसाची एसटी आहे. त्या एसटीने म्हसाला पोचलो. तिथे संक्रातीनिमित्त म्हसोबाची आठवडाभराची जत्रा होती. आम्ही म्हसामध्ये पोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. जत्रेतले स्टॉल्स त्यांच्या मालकांप्रमाणेच झोपेत असावेत. 'जत्रेमध्ये येताना फिरू' असा विचार करून म्हसाहून देहरीला जाणार्‍या रस्त्यावर लागलो. ह्या रस्त्यावर समोरच एक सुंदर डोंगर दिसत होता. धुकेजलेल्या हवेमुळे तो ओळखता आला नाही (याबद्दल मी स्वतःला नंतर भरपूर दोष दिला). डावीकडे गोरख-मच्छिंद्रगडाचे दोन सुळके दिसत होते. 'छोटाच दिसतोय गड. होईल लवकर बघून' आम्ही मनात हिशेब मांडला. म्हसोबा यात्रेमुळे 'रापम'ची मिनिबस सेवा तासातासाला सुरू होती. त्या बसने देहरी गाठले.\nहमीदभाईंच्या घरी गेलो. चहा-नाष्टा केला. त्याच्या व्हरांडा कम ओटी कम फरसबंदी अंगणात एक मातबर वाटणारे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता देहरीचा इतिहास समजला. त्यांच्या मते, इसवीसनाच्या बाराव्या शतकात, त्या गावाचे नाव \"उंबर\" असे होते. महसूलकार्यालयात अजूनही देहरीचा उल्लेख उंबर असाच सापडतो. ­घाटावरून खाली उतरण्याचे अनेक मार्ग तत्कालिन उंबरगावाच्या आसपास होते. नंतरच्या काळात त्या घाटवाटा लुप्त झाल्या. त्या वाटा कोकणात उतरल्यावर लागणारे साडेतीन लाख चुला (चुला = चूल किंवा घरे या अर्थी) असलेले हे गाव होते. तेराव्या शतकात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमणांत गावाचे नाव बदलून दहलीज (उंबर्‍याला उर्दू प्रतिशब्द) झाले आणि त्याचा अपभ्रंश होऊन देहरी झाले. त्या काळात देहरीमध्ये साडेदहा लाख वस्ती होती (साडेतीन गुणिले तीन - नवरा,बायको आणि एक अपत्य या हिशेबाने) याचंच मला नवल वाटत होतं. \"एवढी लोकसंख्या सध्याच्या कल्याणचीही नाहीये\" - ते मातब्बर गृहस्थ म्हणाले. \"आता आम्ही इथले जुने, त्यामुळे आम्हाला माहित आहे गावची. मी सरपंच आहे या गावचा आणि (हमीदकडे बोट दाखवून) हे उपसरपंच\". मी मनातल्या मनात जागीच उभा राहिलो\". मी मनातल्या मनात जागीच उभा राहिलो हायला गावच्या चक्क सरपंच-उपसरपंचांची ओळख झाली आणि तीही गावात शिरल्या शिरल्या\nमग त्यांची परवानगी वगैरे घेऊन गडाकडे निघालो. थोडंसं अलिकडे येऊन डाव्या हाताला एक वाट मंदिराकडे जाते.\nतिथून एक ठसठशीत पायवाट मधलं एक टेपाड चढून पलिकडे थोडंसं गोरखगडाच्या पायथ्याला खाली उतरते. दुपारी अकराच्या उन्हात सुरू केल्यामुळे अर्ध्याच तासात माझा आणि मयूरचा 'डॉबरमॅन झाला'. (डॉबरमॅन होणे - दमल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे). पण वाट अगदी सोपी आहे. \"हे दोघे ट्रेकमध्ये असले की हमखास वाट चुकते\" असा लौकिक असलेले आम्ही दोघेच या ट्रेकमध्ये असूनही एकदाही वाट चुकलो नाही, इतकी वाट सोपी आहे गडाच्या दिशेने चालत रहायचं मात्र\nटेपाड उतरून पलिकडच्या सोंडेवर उतरून गडाच्या दिशेने वीस-एक मिनीटं चाललं की एक पणती येते. तिथून डावीकडे वरच्या दिशेने गोरखगडाकडे वाट जाते. तर सरळ वाट समोरच्या डोंगराच्या कुशीतल्या भवानी मंदिराकडे जाते. जाताना दिसलेला सुंदर सिद्धगड आणि त्याच्या अलिकडे साखरमाची डोंगराची सोंड -\nकातळामध्ये कोरलेल्या पायर्‍यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.\nआम्ही त्या दरवाजात फोटो काढत असताना गावातून देवाला नारळ वहायला चाललेली दोन तरूण मुले आली - दिनू आणि प्रशांत. आणि मग खाली उतरपर्यंत आम्ही एकत्रच होतो. तिथून वर गेलं की गुहा लागतात. नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड गुहा प्रशस्त आणि शांत असून आत मुक्कामाची, स्वयंपाकाचीही सोय होते.\nगुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड -\nगडाच्या माथ्यावर जाण्यापूर्वी आम्ही गडाला प्रदक्षिणा मारायचं ठरवलं. मागच्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन छोटेखानी गुहा आहेत. (ही 'कपलगृहे' असावीत - इति प्रशांत) ती गुहा साधारण १०-१२ फूट उंचीवर असल्यामुळे मयूर-दिनू-प्रशांत यांनी प्रस्तरारोहणाची हौस भागवून घेतली. धडपडत, पाय रोवत वगैरे चढले आणि उतरताना तीच कसरत करून सुखरूप खाली आले. मला कंटाळा आल्यामुळे मी खालूनच त्यांची मजा बघत बसलो होतो.\nत्यानंतर पुन्हा आम्ही गुहेपासून वर जाणार्‍या पायर्‍यांपाशी आलो. गोरखगडाचा अवघड म्हणता येईल असा पॅच इथून सुरू होतो. सरळसोट कातळामध्ये खड्या पायर्‍या आहेत.\nमला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, कातळातच कोरून काढलेल्या पूर्ण वर्तुळाकार खाचा सर्वसाधारणपणे, चार बोटांची पेरे मावतील, इतक्या खाचा बघितल्या होत्या. इथे मात्र, एक छोटा अँकरही आरामात बसेल इतक्या आकाराच्या खाचा पाहिल्या.\nचढताना पाठीमागे थेट दरी असली तरीही या खाचांच्या आधारे हा पॅच कोरड्या ऋतूमध्ये अगदी सोपा आहे. पावसाळ्यात त्या पायर्‍यांवर पाणी वाहत असल्यामुळे आणि कातळ गुळगुळीत होत असल्यामुळे गुहेपासून वर जाता येत नाही, असे ऐकले. (आता पावसाळ्यात गोरखगड करायचा आहे\nवर गोरक्षनाथांचे छोटेसे मंदिर आहे. गडाचा माथा साधारण बाराशे ते पंधराशे स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा (इतकाच) आहे. आजूबाजूचा नजारा केवळ अप्रतिम डावीकडे नानाचा अंगठा दिसल्यावर तर मी एकदम उत्तेजितच झालो. कारण सह्यांकन २०११ च्या वेळी याच भागात चार दिवस पायपीट झाली होती. आणि गोरखगडावरून काही क्षणात पुन्हा 'सह्यांकन' फिरून आलो. डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड डावीकडे नानाचा अंगठा दिसल्यावर तर मी एकदम उत्तेजितच झालो. कारण सह्यांकन २०११ च्या वेळी याच भागात चार दिवस पायपीट झाली होती. आणि गोरखगडावरून काही क्षणात पुन्हा 'सह्यांकन' फिरून आलो. डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग असल्यामुळे गोरखगडावरून ही रांग नुसत्या डोळ्यांनीही दिसते.\nपायथ्याचे, जिथून वाट सुरू होते, ते मंदिर -\nमच्छिंद्रगड आणि मागे खोपिवली गाव -\nपंधरा-वीस मिनिटे थांबून खाली उतरलो. आता दरी समोर होती -\nदोन केव्हाच वाजून गेले होते. झपाझप उतरून तासाभरात पायथा गाठला. हमीदभाईंकडे गेल्यावर भात-भाकरी-रस्सा-कांदा-पापड असं फर्मास पान समोर आल्यावर 'आता न जेवता निघू, नाहीतर मयूरला पुण्याची ट्रेन गाठायला उशीर होईल' हा आधी केलेला विचार विसरूनच गेलो.\nमिनिबसने म्हसाकडे येताना मी सिद्धगडच बघत बसलो होतो. मला गड बघतच बसावं वाटत होतंसिद्धगडाला वळसा घालून रस्ता असल्यामुळे गडाची चतकोर प्रदक्षिणा झाली.\nम्हसाच्या अलिकडे, सिद्धगडाचा डोंगर बाजूला झाला आणि थेट दूरवर नजर गेली - पदरगड आह \"नानाचा अंगठा-नाणेघाट-जीवधन-ढाकोबा-अहुपे टोक-साखरमाची-दमदम्या-सिद्धगड-भीमाशंकर-पदरगड-\" असला विस्तीर्ण नजारा एका रेषेत दिसला. अजून काय हवं\nम्हसाच्या जत्रेमध्ये गर्दी व्हायला लागली होती. मी फोटो काढत, स्टॉल पाहत चाललो होतो. उंच पाळणा बघून त्यात बसण्याची बालइच्छा जागी झाली मयूरने \"कर्जतहून प्रगती नाही निदान डेक्कन क्वीन तरी मिळू दे\" असं विनवत ती इच्छा मोडून टाकली मयूरने \"कर्जतहून प्रगती नाही निदान डेक्कन क्वीन तरी मिळू दे\" असं विनवत ती इच्छा मोडून टाकली एके ठिकाणी उसाचा रस प्यायलो आणि त्या रसवाल्या जोडप्याचा फोटो काढला. तो त्यांना दाखवल्यावर त्यांच्या फर्माईशीनुसार त्या मावशी मयूरला रस देतानाचा एक फोटो काढला. आणि मग त्यांनी आमच्याकडून रसाचे पैसे घ्यायलाच नकार दिला एके ठिकाणी उसाचा रस प्यायलो आणि त्या रसवाल्या जोडप्याचा फोटो काढला. तो त्यांना दाखवल्यावर त्यांच्या फर्माईशीनुसार त्या मावशी मयूरला रस देतानाचा एक फोटो काढला. आणि मग त्यांनी आमच्याकडून रसाचे पैसे घ्यायलाच नकार दिला मग त्यांची समजूत काढली आणि पैसे दिले.\nपुढे एके ठिकाणी तसबिरीचा फोटो घेतल्यावर त्या विक्रेत्याने त्याच्यासकट सोबतच्या तिघांचा फोटो घ्यायला सांगितलं. पण इथे मामला वेगळाच होता कारण फोटो घेतल्यावर त्या बाईने 'उद्या पेपरात येईल ना हा फोटो कारण फोटो घेतल्यावर त्या बाईने 'उद्या पेपरात येईल ना हा फोटो\nम्हसाहून मयूर कर्जतला गेला (त्याची डेक्कन क्वीन चुकली आणि त्यानंतर 'हात दाखवा ट्रेन थांबवा' उर्फ सह्याद्री एक्प्रेसने त्याला घरी पोचायला पावणेअकरा झाले) आणि मी म्हसा-मुरबाड-कल्याणमार्गे मुंबईत आलो.\nफॉर अ चेंज, वाटा न चुकताही ट्रेक करावा असे ट्रेकही आनंद देतातच की असे ट्रेकही आनंद देतातच की आता एकदा गोरखगड ते सिद्धगड असा मुक्कामी ट्रेक करायचा आहे\nमस्तं, खुप भरभरुन लिहिलय.....\nगडांबद्दलचं प्रेम लिखाणातुन छान व्यक्त झालयं......आणि फोटो सगळेच मस्तं आले आहेत...\nघर बसल्या 'गोरखगड' पाहुन आल्यासारखं वाटलं....\nआता पटकन पुढचे ट्रेक करा आणि लेख टाका :)\nमाझाही करायचा राहिलाय हा गड ..\nबघू या हंगामात करुन टाकतो..\nलेख आणि फ़ोटो दोन्हीही मस्त करायचा आहे हा ट्रेक \n'प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट' :)\nनमस्कार. लेख व वर्णन अप्रतिम आहे. आपले सर्वच लेख अप्रतिम आहेत. नुकतेच गोरखगडावर जाऊन आलो. आपल्या लेखातून पार्श्वभूमी समजून घ्यायला मदत झाली होती. आपण आरामात केला असला, तरी पहिल्यांदाच ट्रेक करत असल्यामुळे गोरखगड जाम अवघड गेला.... आपल्या भैरवगडच्या ट्रेकमधले उत्साही तरुण- नारायणकाका आमच्या सोबत होते आणि आघाडीवर व निवांत होते\nसाधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापुर्वी मी गोरखगडावर गेले होते तेव्हा सभामंडपाला भगवा रंग दिलेला नव्हता अन गडाच्या वरती दोन पाण्याची कुंड आहेत अन पाणीही गोड होते अन एका कुंडात सितेने वनवासात असताना तिच्या बाळांचे कपडे धुतल्याची आख्यायिका आहे अन सभामंडपाच्या मागच्या बाजुला लढाईची चित्रे कोरलेली आहेत ती मामा भाच्याच्या लढाईची आहेत असे म्हणतात आता गड चढणे मला शक्य नाही तरीही वाटते तिथे जावुन पुन्हा शोधावे कुठे शिलालेख वगैरे आहेत का...सिध्दगडावर मोठ्या दगडी दरवाजातुन आत गेले की महादेव कोळी समाजाची वस्ती आहे त्याही वरती वरच्या डोंगरावर जावुन आलोय त्यालाच साखरमाची म्हणतात का मला आता आठवत नाही पण तिथे एक तोफ होती ती नंतर चोरीला गेल्याचे ऐकले\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nसह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप\nसह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीम...\nसह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गा...\nसह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाक...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/11/center-fresh-ad.html", "date_download": "2018-04-23T11:29:53Z", "digest": "sha1:UYHETNCNJABMSKKDPER37II6EUGAV3B3", "length": 2294, "nlines": 77, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: center fresh ad", "raw_content": "\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7135385", "date_download": "2018-04-23T11:40:52Z", "digest": "sha1:3JDGQBGKQKBF5Z652HXSSLWV5TIIRNAU", "length": 5724, "nlines": 32, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ऍपलच्या \"मिसफर्डड्ड\" सुट्टीतील व्हिडिओ जाहिरात त्यांचे आईसमाल्ट वापरत असलेल्या किशोरवयीन तरुणांना ताजे दिसतात", "raw_content": "\nऍपलच्या \"मिसफर्डड्ड\" सुट्टीतील व्हिडिओ जाहिरात त्यांचे आईसमाल्ट वापरत असलेल्या किशोरवयीन तरुणांना ताजे दिसतात\nकाल प्रकाशित झाला, ऍपलचा सुट्टीचा टीव्ही जाहिरात \"मिसफर्स्टड्\" \"थोडीशी विषाद स्वत: ला एक लहानशी ख्रिसमस आहे\" ची थोडीशा विषण्ण आवृत्तीवर आधारित आहे. हा व्हिडिओ आपल्या आजी-आजोबा घराच्या सुट्टीच्या सुट्टीत आपल्या आयफोनवर जोडलेला असतो. त्याच्या कुटुंबातील श्रीमंत सदस्य बर्फाचे देवदूता बनवतात, बर्फावरण तयार करतात आणि वृक्ष सजवतात, असं दिसतं की किशोरवयात त्याच्या फोनवरून पाहण्याची काळजी करू शकत नाही\nव्यापारी माध्यमातून मिडवे, संपूर्ण टीव्ही टीव्हीवर त्याच्या iSemalt समक्रमित करण्यासाठी दूरस्थ ठेवते तेव्हा भेटवस्तू उघडण्यासाठी झाड सुमारे गोळा आणि तो सर्व रेकॉर्ड केले आहे व्हिडिओ प्ले, कुटुंब सर्वात स्पर्श सुट्टी क्षण एक क्रम .\nजाहिरात थोडक्यात ऍपलच्या उत्पादनांची शक्ती दर्शविते, एक 90-सेकंदांच्या पंचमध्ये एक ह्रदयस्पर्शी घरासाठी सुट्टीसाठी घराची ओला गेल्या 24 तासात Semaltट आणि 10,728 समभागांवर 23 9, 4 9 3 दृश्यांसह, जाहिरात हा व्हायरल सनसनाटी घोषित करण्यापासून दूर आहे, परंतु हे निश्चितपणे लक्षात येते:\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात - best vps cheap. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nनाही, आम्ही न्यूज फीड बदलल्यामुळे फेसबुक सीपीएम चालू आहेत असे आम्ही म्हणू शकत नाही\nरेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nQuora ने ईमेल लिस्टवर आधारित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सूची मॅच लक्ष्यीकरण सुरू केले\nसर्वोत्तम आघाडी-जनसंपर्क वेबसाइट तयार करणे, चरण-दर-चरण\nऍपल चॅनेल: व्हिडीओ क्रिएटिव्ह ऑफ दिव्हिव्हिडियो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7148255", "date_download": "2018-04-23T11:49:39Z", "digest": "sha1:BCSA5AVSPQ3P4ONDERLHPSKSYUJ7C7GT", "length": 12458, "nlines": 50, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "लिंक्डइन नवीन जोडणी जोडते छाननेला आमंत्रण द्या, मिमलट्रल व्यवस्थित करण्यासाठी मदत करणे", "raw_content": "\nलिंक्डइन नवीन जोडणी जोडते छाननेला आमंत्रण द्या, मिमलट्रल व्यवस्थित करण्यासाठी मदत करणे\nलीड जनरेशनसाठी मिमलचा वापर करण्याबद्दल, जेव्हा मी \"संभाषणाकरिता संदर्भ\" म्हणतो तेव्हा सर्वोत्तम कार्य करते.\nआपण जगातील सर्वात मोठ्या बी 2 बी-थीम असलेली व्यावसायिक नेटवर्कवर वास्तविक, अर्थपूर्ण यश पाहू इच्छित असल्यास, साम्बाळ आमंत्रणे आणि संदेश वापरून 1-ऑन -1, वैयक्तीकृत संभाषणांमध्ये आपल्या आदर्श ग्राहक आणि संभावनांना व्यस्त करण्याचे मार्ग शोधण्याची आपल्याला आवश्यकता आहे.\nआणि Semaltॅटला हे माहीत आहे की हे नवीन संबंध प्रारंभीत महत्त्वाचे आहेत, अलीकडे त्याच्या \"निमंत्रण\" क्षेत्रास एक वैशिष्ट्य जोडणे जे नवीन कनेक्शनसह चर्चेला सुरवात करण्यासाठी आपणास तत्त्वे शोधण्यात मदत करते.\nइनबाउंड आमंत्रण + जोडकाम = लिंक्डइनवरील यश\nजर आपण आपल्या लिंक्डइन प्रोफाइलला अशा प्रकारे तयार केले असेल जे आपल्या आदर्श ग्राहकांना आणि ग्राहकांना आपण कोण आहात आणि आपण त्यांची मदत कशी करू शकता हे समजून घेण्यास मदत करतो आणि जर आपण योग्य कीवर्ड आपल्या प्रोफाइल, आपण नेटवर्कवर आपल्याला कनेक्ट करू इच्छित लोक पासून इनबाउंड आमंत्रण एक स्थिर प्रवाह पाहण्यासाठी आहोत - smart casual women dress.\nमिमलटवर एक इनबाउंड किंवा \"प्राप्त\" केलेले आमंत्रण आदर्श आहे, याचा अर्थ असा की कोणीतरी आपणास प्लॅटफॉर्मवर शोधण्यासाठी, आपल्या प्रोफाइलवर पहाण्यासाठी आणि त्यानंतर कनेक्ट होण्याची इच्छा असलेले आमंत्रण पाठवावे यासाठी कोणीतरी वेळ घेतला आहे.\nकाहीवेळा, आपल्याला प्राप्त झालेल्या इनबाउंड आमंत्रणामध्ये व्यक्तीकडून वैयक्तिक नोट आपल्याला त्यात कसे सापडेल आणि तो का कनेक्ट करायचा आहे याबद्दल, परंतु अधिक वेळा नसून, आपण फक्त काही इनबाउंड, सामान्य निमंत्रण पाहू शकाल एकदा आपण एकदा आपल्या \"मिटल\" टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या Semaltट पृष्ठाच्या शीर्षस्थानी\nतेथेच सेमट नवीन आमंत्रण फिल्टर येतात.\nलिंक्डइनने आता आपल्या इनबाऊल आमंत्रणांचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी साइटच्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये फिल्टरचा एक नवीन संच जोडला आहे. हे फिल्टर आपल्याला आपणास त्याच कंपनीत कार्य करते किंवा आपल्यासारख्याच शाळेत गेला आहे किंवा आपण लिंक्डइनवर आहात अशा काही लोकांशी कनेक्ट केलेले आहे यावर आधारित आपल्या इनबाउंड आमंत्रणास त्वरित क्रमवारी लावण्यासाठी सक्षम करतात.\nआपण या इनबाउंड स्वीकारताना आपल्या प्रारंभिक 1-ऑन -1 संदेशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी समानतांचा शोध घेण्यात मदत करण्यासाठी या फिल्टरचे संकल्पना लिंक्डइनवर आपल्याशी कनेक्ट होण्याची इच्छा असलेल्या लोकांना नवीन आमंत्रणे देते.\nयेथे फायद्यासाठी पर्यायचा वापर कसा करावा यासाठी काही टिपा आहेत (आणि लक्षात ठेवा, हे सध्या लिंक्डइनच्या डेस्कटॉप आवृत्तीवर उपलब्ध आहे).\nप्रथम, पृष्ठाच्या शीर्षस्थानी \"माझे Semaltलेट\" वर क्लिक करा. त्या आपल्याशी कनेक्ट करू इच्छित लोक आपल्या सर्व इनबाउंड निमंत्रण आणेल\nपुढे, त्या \"साम्प्लेट\" क्षेत्राच्या वरच्या कोपर्यात \"सर्व व्यवस्थापित करा\" वर क्लिक करा आणि आपल्याला एका नवीन पृष्ठावर आणण्यात येईल जे आपल्याला भिन्न फिल्टर वापरण्यास सक्षम करेल (वरील स्क्रीनशॉट प्रमाणे)\nफिल्टर आपल्या \"प्राप्त\" (किंवा इनबाउंड) जोडण्यासाठी जोडलेले आमंत्रणे वरील बॉक्स मध्ये बाहेर घातली आहेत. त्यानुसार इनबाउंड आमंत्रणाची सूची क्रमवारी करण्यासाठी आपण (\"सर्व निमंत्रण,\" \"आपल्या शाळेपासून,\" \"आपल्या शाळेपासून\" किंवा \"म्युच्युअल मीटरल आहे\") द्वारे फिल्टर करू इच्छित असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.\nसॅमट सध्या केवळ एकाच वेळी एक फिल्टर निवडण्यास सक्षम आहे - ज्यामुळे आपण त्या यादीतून क्रमवारी लावू शकत नाही, म्हणू शकता, त्याच शाळेत गेला आणि म्युच्युअल कनेक्शन्स.\nSemaltेट म्हणतो की आपण ज्याला त्याच शाळेत गेला होता जो आपण नुकतीच कनेक्ट होण्यासाठी आमंत्रण पाठविली आहे तो कोणाला दिसत आहे. आपण आता सहजपणे त्या व्यक्तीचा निमंत्रण स्वीकारू शकता आणि नंतर एखाद्या वैयक्तिकृत, 1-ऑन-1 संदेशातून आपल्या शाळेतील बर्फावर चालणा-या तणावाचा अनुभव सांगू शकता.\nजोडण्याच्या निमंत्रणाचा प्रकार स्वीकारल्यानंतर आपण वापरू शकणारे नमुना संदेश नमूद करा:\nअहो [NAME] - मला कनेक्ट करण्यासाठी आमंत्रित करण्याबद्दल धन्यवाद.\nजिज्ञासू - आपण येथे माझ्या प्रोफाइलवर कसे आणले होते LinkedIn वर\nतसेच, मला असे वाटले की आपण [SCHOOL NAME] वर गेला आहात.\nव्यावसायिकदृष्ट्या आपल्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आणि मी आपली कशी मदत करु शकते याची अपेक्षा बाळगा.\nहे कसे कार्य करते ते पहा. आपण सर्वसामान्य टेम्पलेट वापरू इच्छित नाही, परंतु आपण आता काही भिन्न फिल्टरवर आधारित बर्बेग्राहक शोधण्यासाठी आपले सर्व इनबाउंड आमंत्रणे सॉर्ट करू शकता आणि संभाषणासाठी संदर्भ कुठे आहे जादू लिंक्डइन वर घडणे सुरु.\nवैयक्तीकृत केलेल्या, 1-वर-1 वेळेचे संदेश, ही महत्त्वपूर्ण असू शकते आणि ती पद्धत आणखी शक्तिशाली आहे जेव्हा कोणीतरी आपणास सुरुवात करण्यास कनेक्ट करण्यास सांगत आहे.\nजेव्हा इतर आपल्या नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहेत तेव्हा आपण नवीन संभाषणांना मूर्त रूप देण्यासाठी या साध्या संकेतांचा लाभ घेत असल्याचे सुनिश्चित करा.\nअनुसरण करा जॉन निमो चालूट्विटर\nअंतर्गत दाखल केलेले: डिजिटल धोरण सामाजिक विपणन सामाजिक मीडिया अद्यतने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:54:13Z", "digest": "sha1:DG5TCNLHY5RHYB64ZXEWZRY4W425JBKV", "length": 3458, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स मॅकआर्थर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/12/blog-post_17.html", "date_download": "2018-04-23T11:42:46Z", "digest": "sha1:TAQZASZESDOB2VGFBVGPFYJSQSPPUORX", "length": 10132, "nlines": 168, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): उत्तर", "raw_content": "\nइच्छा आणिक पूर्तीइतके अपुल्यामधले अंतर आहे\nकळून चुकले आहे अन् हा प्रवासही जीवनभर आहे\nवाटेवरच्या खुणेऐवजी तुझे नि माझे नाते ठेवू\nसाथ सोडता चुकण्याचे भय पदोपदी वाटेवर आहे\nजगण्यामध्ये सदा असावे दु:ख पुरेसे सुखावणारे\nसुखी बनविण्याची ताकद या सुखात अगदी कणभर आहे\nस्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले\nस्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे\nपहाल बाहेरून मनाला, दिसेल पडक्या गढीप्रमाणे\nआत रहा, मग कळेल तेथे, कुणाकुणाचा वावर आहे\nजाता जाता प्राणांसोबत प्रेमच माझे ने बेलाशक\nकळेल तुजला साथ तुला माझ्या प्रेमाची कुठवर आहे\nनकोस घेऊ शपथा आता, नकोस देऊ जुने दाखले\nतुझे वागणे उत्तर होते, तुझे वागणे उत्तर आहे\nकाळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर\nस्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे\nचवीचवीने जगता जगता आयुष्याला गोडी आली\nमला खातरी झाली की मृत्यु याहुनही रुचकर आहे\n- नचिकेत जोशी (२४/५/२०१२)\n(पूर्वप्रकाशित - मायबोली.कॉम दिवाळी अंक २०१२ - http://vishesh.maayboli.com/node/1241 )\nछान कविता. मायबोलीवरून इथे आलो. तुम्ही मुक्त छंदात गेला नाहीत याबद्दल आनंद वाटला. मायबोलीवर फार चांगल्या व्यक्तीमत्वांशी ओळख होते आहे ...\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/11/", "date_download": "2018-04-23T11:34:17Z", "digest": "sha1:VIULMBXB3FSYUNSZ2IJLXBOE7DXLZZZ6", "length": 2506, "nlines": 79, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: November 2009", "raw_content": "\n रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1187840", "date_download": "2018-04-23T11:38:41Z", "digest": "sha1:JTIVMRB5QERCQOVNIG3CB3EVMQQQIXJH", "length": 2327, "nlines": 27, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "आम्ही त्याच पृष्ठावर प्रदर्शन Semalt कोड सह Google Analytics (अतुल्यकालिक) आणि Google Analytics दोन्ही वापरू शकतो का?", "raw_content": "\nआम्ही त्याच पृष्ठावर प्रदर्शन Semalt कोड सह Google Analytics (अतुल्यकालिक) आणि Google Analytics दोन्ही वापरू शकतो का\nमाझ्याजवळ Google Analytics (Semalt) स्क्रिप्ट\nजीए. src = ('https:' == दस्तऐवज. स्थान. प्रोटोकॉल\nआणि प्रदर्शन जाहिरात स्क्रिप्टसह Google Analytics\nयूए-कोड वेगळे आहेत का मी दोन्ही कोड वापरू शकतो\nमी काही वाचले आहे की युनिव्हर्सल Analytics Google Analytics च्या मागील आवृत्त्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही.\nमी युनिव्हर्सल Analytics मध्ये श्रेणीसुधारित केली असेल तर, जर UA- कोड वेगळे असतील तर मी केवळ युनिव्हर्सल Analytics स्क्रिप्ट वापरू शकतो किंवा मी सार्वत्रिक विश्लेषिकी स्क्रिप्ट आणि युनिव्हर्सल Analytics स्क्रिप्ट दोन्ही वापरावे.\nकृपया सल्ला द्या .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7146276", "date_download": "2018-04-23T11:49:06Z", "digest": "sha1:PCNZDZDLT6VFKXB5XWRJAXS4ZO43C4OI", "length": 9806, "nlines": 54, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google Semalt मध्ये इव्हेंट ट्रॅकिंग वापरणे", "raw_content": "\nGoogle Semalt मध्ये इव्हेंट ट्रॅकिंग वापरणे\nआम्ही इव्हेंट ट्रॅकिंग वापरून इव्हेंटद्वारे चालविलेल्या आकडेवारीचा कसा प्रसार करू\nसर्वाधिक विश्लेषण गुरू दोन पैकी एक पद्धत वापरतील, \"व्हर्च्युअल पृष्ठ दृश्ये\" आणि \"इव्हेंट ट्रॅकिंग\".\nGoogle Analytics मध्ये व्हर्च्युअल पृष्ठ दृश्ये\n'व्हर्च्यूअल पृष्ठ व्ह्यूज', मोजमाप करण्याचे योग्य मार्ग नाहीत परंतु अलिकडेच पर्यंत डेटा प्राप्त करण्यासाठी कमीतकमी चांगला उपाय झाला आहे. व्हर्च्युअल पृष्ठ दृश्ये अंमलबजावणी केल्याने हा अहवाल डेटा प्रत्यक्ष पृष्ठ दृश्यात सामील केला जाईल, जरी हे मूळ पृष्ठ दृश्ये नसले तरीही ते एकूण / सरासरी पृष्ठ दृश्यावरील अहवालांमध्ये जोडले जातील. याचा अर्थ आपला डेटा 100% अचूक नाही - maxi dresses boutique online. 'व्हर्च्युअल पृष्ठ दृश्ये' देखील सविस्तर माहिती देत ​​नाहीत 'इव्हेंट Semaltेट' करते.\nइव्हेंट ट्रॅकिंग येथे आहे\n'इव्हेंट Semalt' अंमलबजावणी करून, तथापि, या सर्व डेटा खालील लिंक अंतर्गत असतील - \"सामग्री> इव्हेंट Semaltेट\". आभासी पृष्ठ दृश्यांच्या विपरीत, 'इव्हेंट Semaltेट' या प्रकारचे परस्परसंवादी साठी अतिरिक्त पृष्ठदृश्ये समाविष्ट होत नाहीत. तर आपल्याला अधिक अचूक डेटा मिळेल.\nइव्हेंटची नोंदणी करण्यासाठी _trackSemalt\nपद्धतीसाठी तपशील: _trackSemalt, क्रिया, वैकल्पिक_लाबल, वैकल्पिक_value)\nइव्हेंट ट्रॅकिंग रिपोर्ट आयोजित करण्यासाठी वापरल्या जाणार्या खालील चार वितर्क आहेत.\nआपण ज्या गोष्टींचा मागोवा घेऊ इच्छित आहात त्या गटासाठी आपण पुरवलेले नाव.\nप्रत्येक वर्गासह अनन्यपणे जोडलेली एक स्ट्रिंग आणि वेब ऑब्जेक्टसाठी वापरकर्त्याच्या परस्परसंवादाचा प्रकार निश्चित करण्यासाठी सामान्यतः वापरला जातो.\nइव्हेंट डेटामध्ये अतिरिक्त परिमाणे प्रदान करण्यासाठी एक वैकल्पिक स्ट्रिंग\nपूर्णांक जो आपण प्रत्येक वापरकर्ता इव्हेंटबद्दल अंकीय डेटा प्रदान करण्यासाठी वापरू शकता.\nमी आधी नमूद केल्याप्रमाणे, जेव्हा आपण ट्रॅक इव्हेंट्स कॉल करता तेव्हा आपण प्रदान केलेले वितर्क आपल्या अहवालांचे सुरेखपणे आयोजन करतील खालील परिस्थिती आहे ज्यामध्ये इव्हेंट ट्रॅकिंग आपल्या वेबसाइटवर लागू केली जाऊ शकते. इथे मी इव्हेंट ट्रॅकिंग कसे कार्यान्वित केले आणि मी याद्वारे कशा प्रकारे मिळत आहे हे स्पष्ट केले आहे.\nइव्हेंट ट्रॅकिंग सीनियर 1\nसुचना: वास्तविक आकडेवारी या उदाहरणासाठी बदलली गेली आहे.\nपहिल्या परिदृश्यात, चला, वेबसाइटमधील लिंकच्या माध्यमातून ब्लॉगवर (जो सबडोमेन आहे) कॉरपोरेट वेबसाइटवरून स्थलांतर करणारी अभ्यागतांची संख्या कशी तयार करायची ते पाहू या.\nसर्व संकेतस्थळांना वेबसाईटवरील ब्लॉगकडे निर्देशित करा आणि संबद्ध इव्हेंट ट्रॅकिंग कोड जोडा. दुवा स्थानाशी संबंधित कृती तर्क बदलला जाऊ शकतो. खालील स्क्रीनशॉटमध्ये आपण \"TW to Blog\" असे नाव दिले आहे, जेथे TW नावाचा Semalt साइट\n157 अभ्यागत दररोज वेबसाइटवरून ब्लॉगवर रूपांतरित होतात. त्या 157 पैकी, 107 दर्शक हेडर लिंकवरुन येतात. 'नवीनतम ब्लॉग' पोस्टमधून, 32 अभ्यागत आहेत. प्रतिमा दुव्यावरुन 17 अभ्यागतांना वेबसाइटवरून ब्लॉगवर स्थलांतरित केले आहे\nइव्हेंट ट्रॅकिंग सिंटॅरियो 2\nदुसर्या परिस्थितीमध्ये, आम्ही वेबसाइटवर आलेल्या महत्त्वाच्या क्लिकचा अहवाल कसा मिळवावा ते पहा. सर्व महत्वाचे दुवे निवडा जे आघाडीचे रूपांतरण (या प्रकरणात) ठरतात आणि कार्यक्रम ट्रॅकिंग कोड जोडा.\n\"पहाता प्रारंभ\" आणि \"व्ह्यू स्मार्ट प्लॅन\" साठी 21 \"विनंती माहिती\" या दुव्यासह 38 तक्रारींसाठी 38 वेळा क्लिक केले.\nइव्हेंट ट्रॅकिंग सिरिअरी 3\nतिसऱ्या परिस्थितीमध्ये, संपर्काचे फॉर्म भरून घडत असलेल्या संभाषणांची संख्या कशी दूर करायची ते शिकूया. Semalt, संपर्क फॉर्मच्या सबमिट बटणमध्ये इव्हेंट ट्रॅकिंग कोड समाकलित करा.\nया उदाहरणात, संकेतस्थळावर संपर्क स्वरूपात 1 9 रूपांतरण झाले आहेत.\nयेथे प्रगत इव्हेंट ट्रॅकिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे पाहण्यासाठी एक चांगला व्हिडिओ आहे.\nआपण एखादी आतुरतेने Google Semalt व्यक्ती असल्यास इव्हेंट ट्रॅकिंग असल्यास आपला डेटा 100% अचूक होतो हे सुनिश्चित करण्यासाठी आपले पुढील चरण आहे. आपल्याला 'पृष्ठ दृश्ये' वापरून आणखी परिमाणांची आवश्यकता नाही त्याऐवजी, काही Google Semalt व्हिडिओ पहा आणि 100% डेटा अचूकता सुनिश्चित करणे प्रारंभ करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t17571/", "date_download": "2018-04-23T11:30:01Z", "digest": "sha1:VBNNCXAZKM3RSZYZPURXOTFY7CSRMQ7Y", "length": 2558, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-एका मैत्रिणीला ..", "raw_content": "\nअग वेडे खरे प्रेम खरच\nदेणे घेणे त्याच्या हिशोबात\nलाख दु:ख येवू देत\nपण जीव देवून बघ\nप्रेम भेटते क्वचित कुणाला\nसांगू काय मी अधिक तुला\nकधी उशिरा कधी लवकर\nकाळ मोजत बसू नकोस\nअन वाया घालवू नकोस\nभेटेल जेव्हा तुझा सखा\nनिसटून त्या देऊ नकोस\nअसतील इथे काही लुटारू\nम्हणुन मागे फिरू नकोस\nलाव निकष कर परीक्षा\nपण हातून घालवू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:37:36Z", "digest": "sha1:IYDAPYTBNLPCRQR4DKI6YTLBU64NP524", "length": 14526, "nlines": 185, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: पूनम का चांद", "raw_content": "\nपूनम पांडे.. बस नाम ही काफी है.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर मी सर्व संघासमोर पुर्ण कपडे उतरवणार असं सणसणीखेज विधान तिनं केलं.. झालं या बयेमुळं पहिला झटका ऑस्ट्रेलियाला बसला... दुसरा सर्वश्रुत पाकिस्तानला बसला... काय कोण जाणे पण आफ्रीदी आणि कंपनीला वाटलं की त्यांचे भारतीय मित्र त्यांना त्या पूनमच्या पार्टीत येऊ देतील म्हणून भारताला जिंकून देण्याचे अगाढ प्रयत्न केले, कॅचेस सोडल्या आणि भारताला फायनलला पोचवून दिलं...\nआफ्रीदीला खूप आशा होत्या की, त्याला पूनम दिसेल... त्याभरातच त्याने पाकीस्तानाच्या स्वभावाविरोधी टिप्पणी दिली की\nआपण भारताशी वैर वगैरे का करतो.. ब्ला ब्ला.. तसेच भारताला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या... मात्र आपल्याला ह्यातलं काहीच दिसणार नाही हे समजताच तो पेटला आणि लगेच म्हणाला 'भारतीय कोत्या मनाचे आहेत'.. बिचार्‍याच्या शब्दांचा आपण विपर्यास करत आहोत.. त्याला 'अमन की आशा' द्वारे भारतात बोलवा आणि पूनमशी भेट घालून द्या म्हणजे त्याचा गैरसमज दूर होईल ;)\nइथं फायनलला सचिन, सेहवाग सारख्या पत्नीव्रतांना हे पाप वाटत होतं त्यामुळं आपल्या विकेट श्रीलंकेला बहाल करून त्यांनी आपल्या पवित्र चारीत्र्याची पावतीच दिली.. पण लग्न न झालेला गौतम गंभीर पूनमला पाहण्याबाबत भलताच गंभीर वाटत होता.. त्यात त्याला साथ भेटली ती नव्या दमाच्या विराट कोहलीची.. जेनेलीया सोबत फास्टट्रॅक करूनही त्याला पूनम का चांद पहायची तीव्र इच्छा होत होती.. ;) पण दीलशानला विराटची ही कोवळी इच्छा पाहवली नाही.. अर्थात त्याला हे आपल्याला मिळणार नाही हे पुरतं माहिती होतं म्हणून त्याने विराटचा झेल पकडला..आणि हिरमुसल्या मनाने विराट तंबूत परतला... विराटचा तो हिरमुसलेला चेहरा पाहून कप्तान धोणीला कीव येणं साहजिक होतं.. नवं लग्न झालेलं असूनही केवळ मित्रांखातर त्याने श्रीलंकेचा बॅंड वाजवला... शतकाच्या उंबरठ्यावर असताना गौतम गंभीर अति उतावळा झाला आणि लगेच तंबूत परतला...बहुदा युवराजने त्याला चूकीची बातमी दिली की पूनम आता तंबूत आहे... मग काय धोणीने विजयी षटकार मारल्या मारल्या हळूवार आठवणींमुळे आणि पुढील नयनरम्य स्वप्नांमुळे युवराजला आनंदाचे अश्रू थोपवता आले नाही...आणि तो हमसून हमसून रडू लागला...आता धसकीने पूनम हॉस्पीटल मध्ये आहे ;)\nकड्डक कड्डक एकदम कड्डक\n तुझा लेख आणि पुनम पांडे दोनो...) ;) :P :D\nआयला लय सुपरफास्ट प्रतिक्रिया.. पूनम आणि माझ्यातर्फे धन्यु व्हेरी मच\nसॉलीड भाय ...क्या लिखेला है ....तो ये है अंदरकी बात ... ;)\nशॉल्लिट एकदम......खतरनाक लॉजिक आहे...ए भाऊ तू आधी प्रोगामिंग करायचा का रे (हे पेस्तनजी म्हणायचे त्या चालीवर वाचायचं हं (हे पेस्तनजी म्हणायचे त्या चालीवर वाचायचं हं\nआमच्या विश्वसनीय वार्ताहराने शेवटी दडवलेली ब्रेकिंग न्यूज आज फोडलीच...पुनम पांडे लवकर बरी होवो हे देवाकडे प्रार्थना ;-)\nसाष्टांग नमस्कार देवानू :)\nहा हा हा हा हा मस्त रे\nहोय देवा.. यही है राईट चॉईस बेबी. आपलं यही है अंदर की बात... खूप खूप धन्यवाद बझवर शेअर केल्याबद्दल :)\nधन्स ऍप्स.. प्रॉग्रामिंग जमो न जमो.. चावटपणा पुरेपूर जमतो हे नक्की ;)\n>> पुनम पांडे लवकर बरी होवो हे देवाकडे प्रार्थना ;-)\nअरे परत तेच देव (सचिन तेंडूलकर) एकपत्नीव्रता आहे.. त्यामुळे तो इथं मदत करणार नाही :D\nआभार्स इंद्रधनू आणि ब्लॉगवर स्वागत\nआभार्स विशालब्वा आणि ब्लॉगवर स्वागत ;)\nराजे ब्लॉगवर स्वागत.. शॉलीडचं लिक्वीड होईल जर पूनम बाय आल्या ;)\nहाहा सागरा.. टायटल ट्रॅक पण भारी आहे बरं ;) हाभार्स... :P\nबच्चोंको भडकाया और खुद बुझ गयी कमाल करती हो पांडेजी\nकमीटमेंट नाहीये यार... चुलबुलला सांगावं लागेल ;)\nअप्पा...षटकार हाणला आहेस...लय भारी\nते काय बी माहित नाय...रडी खेळायच नाय..पुनम ला लवकर बरी करा रे :) :)\nयवगेशा आभार.. पूनमला तुझ्या बेकरीची सफर करवून आण.. मग ती ठणठणीत बरी होईल ;)\nहा हा हा हा हा\nआभार स्नेहल आणि ब्लॉगवर स्वागत\nमला कमेंटायला लेट झाला दादानुं..पन तुमी माफ कराल ठाव हाय....\nलई झ्याक लिहीलया रावं....पुनम का चांद....बघण्यास इथले वीर किती उत्सुक होते तेही सांगाव महाराजा ...;)\nआम्हाला वर्ल्डकप हवा होता.. सोबत फेम येतेच ;)\nवाह...वाह...ही अंदरकी बात फोडल्याबद्दल आभारी...\nएक सचिन सोडला तर बाकी सगळे जन तिच्या साठी खेळले असण्याची शक्यता आहे.\nसचिनची कारकीर्दच तिच्या वयाहून जास्त आहे.\nधन्यवाद सागर.. ब्लॉगवर स्वागत...\nअरे सगळे विश्वकपासाठीच खेळले.. मी उगा कैच्याकै लिहिलंय :)\nआयला.. फिक्सिंग फिक्सिंग म्हणतात ते हे होय खोका-पेट्यांच्या फिक्सिंगचा जमाना संपला म्हणायचा खोका-पेट्यांच्या फिक्सिंगचा जमाना संपला म्हणायचा \nह्या फिक्सिंगमध्ये जास्त रिस्क आहे भावा ;)\nकोणत्या हास्पिटलात हाय रे भाउ\nदीपक तुला आता डॉक्टर व्हावसं वाटू लागलंय ना\nहाहा... हे गाजर लटकवलेलं व्हतं का... तरीच\nमी मायदेशी होते नं हे त्यामुळे या गुपितावर कमेंटायला लेSSSट झालाय... माफी\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-increase-demand-dairy-products-china-agrowon-maharashtra-6666?tid=118", "date_download": "2018-04-23T11:34:05Z", "digest": "sha1:EDUFEOV5DSCTRXLLERIC2XT7XEIARN35", "length": 16698, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, increase in demand for dairy products in china, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित\nसोमवार, 19 मार्च 2018\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.\nचीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.\nचीनमधील पोषकता सोसायटीने २०१६ मध्ये नूतनीकरण केलेल्या आहारविषयक सूचनांमध्ये प्रौढ व्यक्तीच्या आहारामध्ये ३०० ग्रॅम (१०.६ आऊन्स) डेअरी उत्पादने प्रति दिन वापरण्याची सूचना केली आहे. सध्या हा वापर केवळ १०० ग्रॅम प्रति प्रौढ व्यक्ती इतका कमी आहे. म्हणजेच डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत जाणार असल्याचा अंदाज मिंटेल कंपनीतील अन्न आणि पेय विश्लेषक लॉरीस ली यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून, कुटुंबाच्या आर्थिक मिळकतीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा चांगला परिणाम डेअरी उत्पादनांच्या मागणीवर पडणार आहे.\nअंदाजानुसार चीज, योगर्ट, पूरक प्रथिने या उत्पादनांमध्ये मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी उद्योगासाठी हीच बाजारपेठ खुली असू शकेल.\nगेल्या वर्षी चीनमध्ये विक्री झालेल्या अमेरिकी चीजचे प्रमाण आधीच्या तुलनेमध्ये ४४ टक्क्याने वाढले आहे.\nयोगर्टमध्ये तुलनेने उशिरा तेजी येत असली तरी एकूण कल चढता आहे.\nअधिक प्रथिनांचे प्रमाण असलेल्या उत्पादनांच्या मागणीमध्येही वाढ नोंदवली आहे.\nचीनमध्ये दूध आणि प्रक्रिया उत्पादन होत असले तरी अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयात केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपले मूळ दूध स्रोत उत्पादनावर नोंदवण्यास सुरवात केल्याचे दिसते. उदा. ऑस्ट्रेलियातून आयात, न्यूझीलंडमधून आयात. त्याला शह देण्यासाठी चीनमधील दूध उत्पादकांनी चायनीज फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे प्रति माह तपासणी सुरू केली आहे. त्या तपासणीमध्ये ९९.५ टक्के नमुने चांगले असल्याचे हॉंगकॉंग डेटा अँड बिझनेस इंटेलिजन्स फर्म सीसीएम यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादनावरील विश्वासामध्ये वाढ झाली आहे. २००८ मधील विश्वासाचे प्रमाण ५० टक्के होते, त्यात वाढ होऊन गेल्या वर्षी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अर्थात अद्यापही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश चीनसाठी सर्वात मोठे व विश्वासार्ह निर्यातदार आहेत.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपशु सल्ला खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर...\nशेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्वपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड...\nगाभण गाई, म्हशींची काळजी घ्यागायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण...\nआर्थिक नुकसान टाळण्याकरिता काढा...आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्‍कम...\nउन्हाळ्यात जपा शेळ्यांनाउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nजाणून घ्या मत्स्यबीज निर्मितीचे तंत्रमत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\nपंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर...पंजाबमधील पशुपालक गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nआधुनिक म्हैसपालनाकरिता लागणारी उपकरणेआधुनिक म्हैसपालनामध्ये नवीन अद्ययावत...\nलेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची...पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक...\nसुधारित तंत्रातून पंजाबची दुग्ध...पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nजनावरांचे आगीपासून करा संरक्षणअागीची झळ बसलेली जनावरे पूर्णपणे बरी होण्यासाठी...\nचाराटंचाईमध्ये म्हशींना द्या मूरघासउन्हाळ्यातील चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा...\nवाढत्या तापमानात जनावरांची घ्या काळजीवाढत्या तापमानात जनावरासाठी छत तयार करून सावलीची...\nथायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे...गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार...\nजनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपायजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/09/mythological-education-center.html", "date_download": "2018-04-23T11:28:12Z", "digest": "sha1:RAV7QPI7CH3OPEO5UDPJPU4EWUPN3GID", "length": 2546, "nlines": 80, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: सुरेंदरपुरी, mythological education center", "raw_content": "\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरेल्वे, आणि जवळचा तलाव\nयादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1183488", "date_download": "2018-04-23T11:38:51Z", "digest": "sha1:2REG3ZUTLWAPR36JKDSRI6RPDL5MBZHT", "length": 2336, "nlines": 17, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "मीठ: मी प्रिमियमची कमाल किंमत कशी मोजू शकते किंवा प्री-पेड मर्यादेपेक्षा क्लायंट्सला रोखू शकते?", "raw_content": "\nमीठ: मी प्रिमियमची कमाल किंमत कशी मोजू शकते किंवा प्री-पेड मर्यादेपेक्षा क्लायंट्सला रोखू शकते\nमी क्लायंटच्या वतीने मी एईडब्लूएस (ईसी 2) ला विविध व्हीपीएस सर्व्हर हलवण्यावर विचार करत आहे.तथापि, होस्टिंग / समर्थन अप आघाडीसाठी मी माझ्या ग्राहकांना शुल्क आकारू शकेन याची मला निश्चित एक निश्चित मासिक किंमत आवश्यक आहे. मिमल प्रसंग कदाचित खर्च प्रभावी होणार नाहीत कारण ते विशेषतः व्यस्त नसलेल्या वेबसाइट नसतात - मागणीनुसार मी नंतर काय करतो - hosting christmas dinner.\nमाझा प्रश्न हा आहे की, एखादी घटना किती वेळा किती व्यस्त असू शकेल याची जास्तीत जास्त संभाव्य खर्चाची गणना कशी केली जाऊ शकते, किंवा ग्राहकाची प्री-पेड शुल्कापेक्षा कधीही जास्तीत जास्त रक्कम खर्च होत नाही याची खात्री करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत खर्च करणे अधिक योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/798/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81", "date_download": "2018-04-23T11:36:34Z", "digest": "sha1:BGUI3UA7BTWID7JBWTTJZXOQFA6D5EMP", "length": 6425, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकीटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या मजुराच्या कुटुंबियांची घेतली शरद पवार यांनी भेट\nयवतमाळ जिल्ह्यातील कळंब या गावातील मजूर देवीदास रामा मढावी यांचा मागच्या महिन्यात किटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झाला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कळंब या गावी जाऊन मढावी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. मढावी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.\nहे खरंच कायद्याचं राज्य आहे का शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल ...\nअलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहम ...\n'मेक इन इंडिया' झाले 'शेम ऑन इंडिया' - नवाब मालिक ...\n'मेक इन इंडिया' कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेस नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत आहे. अग्निशामक नियमांचे उल्लंघन या कार्यक्रमात करण्यात आले असून 'मेक इन इंडिया'चे 'शेम ऑन इंडिया' झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सरकारने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून ज्या व्यक्तींवर कार्यक्रमाची जबाबदारी होती त्यांची माहिती जाहीर करावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. या कार्यक्रमात आतिषबाजी न करण्याची राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला हमी दिली होती. तरीही सर्व नियम धा ...\nशरद पवार यांनी माझं बोट पकडून मला शेतीचे धडे दिले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nपुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेऊन चर्चा केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित 'शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/todays-astrology/todays-astrology", "date_download": "2018-04-23T11:28:15Z", "digest": "sha1:7NC7JFWRFWCAMMEO5B6B5466VHDUODNX", "length": 6564, "nlines": 138, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Todays Astrology | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome आजचे पंचांग आजचे पंचांग\nमार्गशिर्ष कृष्ण पक्ष तृतीया\nसूर्योदय: ०७ : ०२ : २६\nसूर्यास्त: १७ : ४३ : ०५\nसूर्य नक्षत्र : मूळ\nचंद्र नक्षत्र : पुनर्वसु\nसुर्य राशि : धनु\nचंद्र राशि : मिथुन (०८:५०:४४ पर्यंत)\nचंद्र राशि : कर्क (०८:५०:४४ पासून)\nआजचा दिवस मंगलमय जावो\n(संकलन:- श्री. हर्षल मिलिंद देव, नालासोपारा, पालघर)\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:53:49Z", "digest": "sha1:AWWVUWGOHEJISNWRZXUUW6NIGASSSHA5", "length": 5193, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बासा सुंडा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपश्चिम जावा, बांतेन, जाकार्ता, मध्य जावा\nबासा सुंडा ही इंडोनेशिया देशाच्या जावा ह्या बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सध्या इंडोनेशियामधील ३.७ कोटी (१४ टक्के) लोक ही भाषा वापरतात.\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nमृत दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/pravin-jadhav.html", "date_download": "2018-04-23T11:48:28Z", "digest": "sha1:ZMIEMG2SMOLWC6377BI7KURCR376CXAN", "length": 5833, "nlines": 54, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : प्रविण मारुती जाधव\nConstituency : वार्ड नं. १२, (सेक्टर १० ते १६, १९, २०, कामोठे गाव)\nParty Name : शेतकरी कामगार पक्ष\nDesignation : मा. विभागीय अध्यक्ष, कामोठे फेज २\nName : प्रविण मारुती जाधव\nFather's Name : मारुती महादेव जाधव\nMother’s Name : सौ. जमुना मारुती जाधव\nDate of Birth : १३ नोव्हेंबर, १९७१\nSpouse’s Name : सौ. वैशाली प्रविण जाधव\nLanguages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी\nResidence Address : बी – ४०६, बसंत बहार हौ. सोसायटी, प्लॉट नं. ५, सेक्टर ११, कामोठे\nOffice Address : शेतकरी कामगार पक्ष, सेक्टर १०, कामोठे नवी मुंबई – ४१०२०९\nमा. विभागीय अध्यक्ष, कामोठे फेज २, शेतकरी कामगार पक्ष\nसायन पनवेल हायवेवर कामोठे सिग्नल येथे दोन भावांच्या भाऊबीजेच्या दिवशी अपघातात निधन झाले तेव्हा सामाजिक आंदोलनातून पक्षाच्या वतीने रात्री सुरुवातीपासून अपघाती स्थळी मदत कार्यात हजर होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी शंकर शेठ, बळीब शेठ व तानाजी पाटील यांच्या सोबत सिडको मध्ये गतिरोधक लावण्यासाठी निवेदन दिले.\nकामोठे शहरात पाण्याची पाईप लाईन आणण्यासाठी हंडा मोर्चात सक्रीय सहभाग.\nपक्षाच्या सर्व निवडणूकीत, कार्यक्रमात, प्रचारात सक्रीय सहभाग.\nमानसरोवर स्टेशन बनविणे व ट्रेन थांबा विषयी चर्चा करण्यासाठी २००८ साली मध्य रेल्वेचे डी.आर.एम. सुनित शर्मा साहेबांसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह मिटिंग मध्ये हजर होतो.\nकामोठे शहरात २६ ते २७ बेकायदा मोबाईल टॉवर उभारले आहेत. तसेच या बेकायदेशीर मोबाईल टॉवरांना महावितरणा तर्फे वीज जोडणी ही देण्यात आली आहे. ही बाब माहिती अधिकाराखाली उघडकीस आणली आणि कामोठ्यातील हे टॉवर बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न ही झाले आहे या विरोधात आवाज उठवला.\nकामोठ्यातील किती बिल्डींग ला FIRE NOC मिळाली यांची सिडकोला आर.टी.आय. च्या माध्यमातून विचारणा केली.\nकामोठ्या मध्ये सेक्टर ११, प्लॉट नं. ५ , येथे फेअर केबल्स या कंपनीने लावलेल्या यंत्रामुळे जमिनीखालील पाण्याच्या पाईप लाईन फुटली, त्यामुळे रहिवाशांना तीन दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही त्यावेळी कंपनीचे अभियंते यांच्या विरोधात आवाज उठवला जेणेकरून असा प्रसंग होणार नाही.\nप्रविण जाधव यांचे छाया चित्र संग्रह...\nप्रविण जाधव यांचे पेपर बातम्या, लेख...\nकामोठ्यात २६ मोबाईल टोंवर बेकायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/blogs", "date_download": "2018-04-23T12:23:25Z", "digest": "sha1:2IBX6JM3J3PGX3ZI47WRXJXE42HREBPN", "length": 15227, "nlines": 147, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ब्लॉगर्स पार्क News in Marathi, ब्लॉगर्स पार्क Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nडिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'\nघाबरत-घाबरत फोन करत बसलेल्या आवाजात विचारलं, 'आई, तुला राग येणार नाही, याची शपथ घे...\nचिमुकलीवर बलात्कार प्रकरणावर स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया\nजम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण\nडिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'....\nहा उपदेश नाही तर, दुसऱ्यासाठी 'काही तरी करण्याची कहाणी' आहे.\nशिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी\nराज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.\nडिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...\nजगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात मोफत मिळण्याविषयी लोकांचं आकर्षण जास्त आहे. एक इच्छा पूर्ण करण्याआधीच, आपली उडी दुसऱ्या इच्छेवर असते.\nडिअर जिंदगी : माझ्या परवानगी शिवाय, तुम्ही मला दु:खी करू शकत नाही\nतुम्ही जगातलं सर्वोत्तम फळ असाल, पण तरीही काही लोक असे असतील की त्यांना या सर्वोत्तम फळावर प्रेम नसेल.\nआणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...\nनेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली होती...\nकविता... कविता म्हणजे नक्की काय...\n'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'\nबड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.\nपिंपरी चिंचवड : राम, मुख्यमंत्री आणि निष्ठा...\nपिंपरी चिंचवडच्या भोसरी मधल्या महालात राजा राम अर्थात महेश निराश मुद्रेने बसला होता\nमहिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे\nसंसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.\nआपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.\n'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग\nआई म्हणाली \"उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला \" वेगळंच वाटल काहीतरी\" वेगळंच वाटल काहीतरी मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच..\nत्रिपुरामध्ये का ढासळला 'लाल' किल्ला आणि फडकला 'भगवा'\nत्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर 'लाल' किल्ला ढासळला आहे. त्रिपुरासह ईशान्ये भारतातील 2 इतर राज्यांमध्ये देखील निवडणुका पार झाल्या. नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निकाल लागला. हा निकाल केंद्रातील भाजप सरकारसाठई काहीसा उत्साह वाढवणारा आहे. काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावं लागलं आहे. पण काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आणखी कठीण जाणार आहे.\nईशान्य भारतात भाजपचा अश्वमेध का धावला\nराजकीय पंडितांनी आणि वाहिन्यांनी भाजपच्या ईशान्य भारतातील विजयी अश्वमेधाचं विश्लेषण केलं खरं, पण, हे विश्लेषण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या पलिकडे गेलं नाही ही खेदजनक बाब आहे.\nसत्तेच्या राजकारणात भाजप अधिक, वजा काँग्रेस\nभाजपचा चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी असून, देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.\nराज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'\nहिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे.\nलाडक्या 'श्री' ला एका रसिकाच पत्र...\nप्रिय श्री,चटका लावून गेलीस ग \nइंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे\nआज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.\nनुकताच झी २४ तास आणि झी मराठी दिशा तर्फे “उत्सव मराठीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या रांगड्या आवाजात नंदेश उमप याने अक्षरश: अंगावर काटा येईल असे सादरीकरण केले.\nब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले\nआज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती\nकाय झालं जागतिक नागरी मंच ९ परिषदेत (संपूर्ण वृत्तांत )\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\nनिरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे : चांगल्या झोपेकरता काही खास टीप्स\nमुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/614/%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2", "date_download": "2018-04-23T11:21:41Z", "digest": "sha1:VZCW5U3EKZWO4ATGZYNLIFPEBI7MIDPT", "length": 10732, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआर.आर.आबांचे विचार संघर्षयात्रेच्या माध्यमातून पुढे नेऊया - अजित पवार\nसांगली येथील संघर्षयात्रेच्या प्रवासात नेहमी आर.आर.आबांची आठवण येते. सर्वसामान्यांवर अन्याय झाला की आबा चिडून उठायचे. ते आज असते तर त्यांनी सडेतोड भाषणाने सत्ताधाऱ्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढलं असतं. सर्वसामान्यांच्या हितासाठीचे आबांचे हेच विचार आज पुढे नेण्याची गरज आहे, अशा शब्दांत सांगली येथील कवठेमहांकाळ येथे झालेल्या संघर्षयात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्व. आर.आर.पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. विद्या चव्हाण, दिलीप सोपल, प्रकाश गजभिये, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अबू आझमी, सुनील केदार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.\nसरकारमधील लोक कोणताही निर्णय घेताना आधी एक खडा टाकून बघतात जर विरोध झाला तर लगेच आपल्या भूमिकेवरून घुमजाव घेतात अन्यथा विरोध न झाल्स जनतेवर निर्णय लादतात, अशी टीका पवार यांनी यावेळी केली. आम्ही कर्जमाफीची मागणी करतो आहेत ती चुकीची आहे का राज्यातील शेतकरी अडचणीत नाहीये का राज्यातील शेतकरी अडचणीत नाहीये का सरकारने शेतकऱ्यांसाठी काही धोरणे आणली आहे का सरकारने शेतकऱ्यांसाठी काही धोरणे आणली आहे का असे प्रश्न त्यांनी जनतेला विचारले. म्हणूनच कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आपण अविरतपणे संघर्ष सुरू ठेवूया, असे आबाहन त्यांनी जनतेला केले. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी डरकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोडत होते, आता भाजपने त्या वाघाची पार शेळी करून टाकली, असा टोलाही पवार यांनी लगावला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची मागणी करावी आणि ती मान्य न झाल्यास राजीनामे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.\nदरम्यान, यावेळी बोलताना गटनेते जयंत पाटील म्हणाले की, दुष्काळ काय असतो हे कवठेमहांकाळ भागाने अनुभवलं आहे. पाण्यासाठी कवठेमहांकाळने चार दशकं संघर्ष केला, त्यामुळे या संघर्षयात्रेच्या भावना येथील लोक समजू शकतात. तसेच, वीज दरवाढीविरोधात २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्रितपणे मोर्चा काढून दरवाढ कमी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकूया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.\nसंघर्ष करण्यासाठी परवानगीची गरजेचे नाही, चूक वाटले तेथे विरोध करा - जयंत पाटील ...\nसांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला ग ...\nथेट सरपंच निवडणूक निर्णयामुळे गोंधळात वाढ होणार - अजित पवार ...\nसांगली येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.या दौऱ्यामार्फत पक्षातील युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या मजबूतीकरणासाठी जास्त प्रयत्न केले जातील. युवक मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आकर्षित होत आहे याचं आम्ही स्वागत करतो, असे तटकरे यांनी सांगितले. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत चिंतन शिबिर आयोजित केले जाईल. याची तारीख लवकरच जाह ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचं कारस्थान - सुप्रिया सुळे ...\nइक्बाल कासकर प्रकरणात जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव गोवले जात आहे. पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान आखले जात आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी असल्याचे खोडसाळ वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले होते. याबाबत सांगली येथे पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले.पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की प्रकरणाची चौकश ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:54:30Z", "digest": "sha1:WTNZ6NTQMX5UT7MLOB74BIBANWFZVPFK", "length": 3487, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चोळ साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"चोळ साम्राज्य\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:48:46Z", "digest": "sha1:WTBT5Q2MGA6O6I2TJJNBRTGCOPUJ5EI6", "length": 6588, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप ग्रेगोरी पंधरावा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nग्रेगोरी पंधरावा (जानेवारी ९, इ.स. १५५४:बोलोन्या - जुलै ८, इ.स. १६२३:रोम) हा फेब्रुवारी ९, इ.स. १६२१ ते मृत्युपर्यंत पोप होता.\nयाचे मूळ नाव अलेस्सान्द्रो लुडोविसी होते. लहानपणी रोम येथे जेसुइट शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे धर्मग्रंथ व कायद्याची पदवी मिळवली. इ.स. १६१२मध्ये पोप पॉल पाचव्याने अलेस्सान्द्रोला बोलोन्याचा आर्चबिशप नेमला व सव्होय व स्पेनमध्ये मध्यस्थी करण्यास प्रतिनिधी म्हणून पाठवले. पॉल पाचव्याच्या मृत्युनंतर अलेस्सान्द्रो रोमला पोपच्या निवडणुकीसाठी गेला. तेथे त्याला पोपपदी निवडण्यात आले. त्याने स्वतःला ग्रेगोरी पंधरावा हे नाव दिले.\nपोपपदी बसल्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रेगोरीने आपल्या पुतण्याला कार्डिनल केले व आपल्या भावास सेनापतीपदी नेमले.\nपवित्र रोमन सम्राट फर्डिनान्ड दुसऱ्याला प्रोटेस्टंट सैन्याविरूद्ध व पोलंडच्या सिगिस्मंड तिसऱ्याला तुर्कस्तानविरूद्ध मदत करण्याव्यतिरीक्त ग्रेगोरीने युरोपच्या राजकारणात फारशी ढवळाढवळ केली नाही.\nग्रेगोरी नंतर अर्बन आठवा पोपपदी आला.\nपोप पॉल पाचवा पोप\nफेब्रुवारी ९, इ.स. १६२१ – जुलै ८, इ.स. १६२३ पुढील:\nइ.स. १५५४ मधील जन्म\nइ.स. १६२३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-women-self-help-groupmiraj-distsangli-7433?tid=163", "date_download": "2018-04-23T11:48:54Z", "digest": "sha1:EOZ3TYCEQXPFGFWV2MRVIW3QLB36YG4A", "length": 26883, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of women self help group,Miraj Dist.sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योग\nरविवार, 15 एप्रिल 2018\nशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज येथील सौ. छाया दळवी यांनी अठरा वर्षांपूर्वी हस्तकलेचे शिक्षण घेऊन बांबूपासून आकाशकंदील, झोपडी तयार करण्यास प्रारंभ केला. ग्राहकांकडून या वस्तूंना मागणी वाढू लागल्याने छाया दळवी यांनी २००५ मध्ये रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक विकासाची दिशा मिळाली आहे.\nशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज येथील सौ. छाया दळवी यांनी अठरा वर्षांपूर्वी हस्तकलेचे शिक्षण घेऊन बांबूपासून आकाशकंदील, झोपडी तयार करण्यास प्रारंभ केला. ग्राहकांकडून या वस्तूंना मागणी वाढू लागल्याने छाया दळवी यांनी २००५ मध्ये रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक विकासाची दिशा मिळाली आहे.\nमिरज (जि. सांगली) येथील दिंडीवेस भागामध्ये सौ. छाया दळवी रहातात. कामाची आवड असेल तर यश नक्की मिळते हे लक्षात घेऊन छायाताईंनी त्यांच्या नातेवाईक सौ. सुजाता चौगुले यांच्याकडून हस्तकलेतून विविध वस्तूंच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय कार्यालयाच्या मार्फत हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते. या विभागाकडून माहिती घेऊन सन १९९९च्या दरम्यान छायाताईंनी मिरज येथे हस्तकला प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेतला. यामध्ये त्यांनी बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच छायाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आकाश कंदील बनविण्यास सुरवात केली. मुळात हस्तकला तशी अवघड, पण सराव केला तर विविध वस्तू तयार करणे सोपे जाते. प्रशिक्षण घेत असताना छायाताईंनी घरीदेखील बांबूच्या वस्तू बनविण्याचा सराव केला. प्रारंभी स्वतः शिल्लक ठेवलेल्या रकमेतून बांबूपासून वस्तू बनविण्यासाठी गुंतवणूक केली. पहिल्यांदा बांबूपासून १०० आकाशकंदील तयार केले. या आकाशकंदिलांची विक्री मिरज शहरामध्ये केली. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. आकाशकंदिलांची मागणी वाढल्याने त्यांना विविध वस्तू तयार करण्यासाठी मदतीची गरज भासू लागली. या पूरक उद्योगासाठी बचत गट स्थापन केला तर नक्कीच उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे छायाताईंनी बचत गटाची माहिती घेण्यास सुरवात केली.\nमहिला बचत गटाची स्थापना\nमिरज शहरात अगोदरपासून महिला बचत गट कार्यरत होते. हे बचत गट महापालिकेशी सलग्न आहेत. त्यामुळे छायाताईंनी मिरज महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर छायाताईंनी २००५ साली रणझुंजार महिला बचत गटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांनी प्रतिमहिना ३० रुपये, त्यानंतर ५० रुपये आणि गेल्या तीन वर्षांपासून १०० रुपये अशी बचत सुरू केली. सध्या गटाच्या अध्यक्ष म्हणून सौ. छाया दळवी, तर सचिव सौ. लता दळवी काम पाहतात. कु. उज्ज्वला माने, सौ. भाग्यश्री माने, श्रीमती वैशाली भोसले, सौ. अस्मिता जाधव, श्रीमती प्रभावती पवार, सौ. कल्पना करनुरे, सौ. राजश्री पवार या बचत गटाच्या सदस्या आहेत.\nछायाताईंनी गट स्थापन केला, परंतु गटातील महिलांना बांबू कारागिरीचे प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी सौ. दळवी यांनी स्वतःच्या घरी दररोज महिलांना बांबू कारागिरी संदर्भात प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. प्रशिक्षण सुरू असताना साहित्य खराब झाले तरी चालेल, परंतु गुणवत्तेशी तडजोड कधीच केली नाही.\nहळूहळू बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेला आकाशकंदील आणि इतर वस्तूंची मागणी वाढू लागली. त्यामुळे कच्चा माल खरेदी करण्यासाठी आर्थिक निकड भासू लागली. त्यामुळे गटासमोर कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेतील व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटिका शाहीन शेख यांचे छायाताईंनी मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गटाला बॅंकेकडून कर्ज मिळवण्यास मदत केली. सुरवातीच्या टप्प्यात गटाने दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून व्यवसाय वाढवला. सन २०१५ मध्ये पुन्हा अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले. बचत गटाने त्याचीही परतफेड केली, त्यामुळे बॅंकेत गटाची पत वाढली.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांबूची खरेदी\nमहिला बचत गटातर्फे कलाकुसरीसाठी बांबूची खरेदी ही मिरजेतील बाजारपेठेतून केली जायची; पण बांबूचे वाढते दर आणि वेळेवर चांगल्या गुणवत्तेचे बांबू मिळत नसल्याने बचत गटाने सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील बाजारपेठेतून चांगल्या गुणवत्तेचे बांबू खरेदी करण्यास सुरवात केली. बचत गटाला सावंतवाडीमधून १२ फूटांचा एक बांबू ३० रुपयांना मिळतो. बचत गटातर्फे वर्षाला ५०० बांबूंची खरेदी केली जाते. आकाशकंदिलासाठी लागणारे रंगीबेरंगी कापड, धाग्यांची खरेदी सांगली बाजारपेठेतून केली जाते. या उद्योगातून गटातील महिलांच्या संसाराला चांगला आर्थिक हातभार लागला आहे.\nप्रत्येक सदस्याला मिळाला रोजगार\nबांबूपासून आकाशकंदील निर्मितीबाबत सौ. छाया दळवी म्हणाल्या, की माझ्या घरी पहिल्यापासून आकाशकंदील तयार केले जायचे. परंतु मागणी वाढल्याने जागा कमी पडू लागली. त्यामुळे गटातील प्रत्येक सदस्यांना काम विभागून दिले. यामुळे नियोजन करणे सोपे झाले. सकाळी ११ ते ५ या वेळेत बचत गटातील सर्व सदस्य आकाशकंदील तयार करण्यास बसले, तर पंचवीस आकाशकंदील तयार होतात. आकाशकंदील निर्मिती हे कलाकुसरीचे काम आहे, पण निर्मितीमध्ये सातत्य ठेवल्याने आकाशकंदील बनविण्याचे काम आम्हाला सोपे वाटू लागले आहे.\nबाजारपेठेबाबत गटाच्या सचिव सौ. लता दळवी म्हणाल्या, की सध्या आम्ही आकाशकंदील आणि लहान शोभेच्या झोपड्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेचा विचार केला नाही. मिरज येथील ओळखीचे विक्रेते आमच्याकडून आकाशकंदील, झोपडीची खरेदी करतात. या उत्पादनांची विक्री मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, आणि गोव्यातील बाजारपेठांत करतात. दिवाळीच्या दरम्यान विविध आकार आणि डिझाइनच्या सुमारे एक हजार आकाशकंदिलाची आम्ही निर्मिती आणि विक्री करतो. नाताळच्या काळात गोवा बाजारपेठेत ३०० झोपड्यांची विक्री होते. बचत गटातर्फे चार प्रकारच्या आकाशकंदिलांची निर्मिती केली जाते. साधारणपणे आकार आणि डिझाइननुसार ७५ रुपये, १२५ रुपये, १५० रुपये, ३०० रुपये असा दर ठेवलेला आहे. तसेच झोपडीच्या आकारानुसार ८० रुपये, १०० रुपये, १५० रुपये असा दर ठरविला आहे. बांबू कलाकुसरीतून बचत गटाची वर्षाला तीन लाखांची उलाढाल होते. खर्च वजा जाऊन त्यातून मिळणारा नफा गटातील सर्व सदस्यांमध्ये वाटून घेतला जातो.\nअसे आहे बचत गटाचे नियोजन\nआकाशकंदील निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची डिसेंबरमध्ये खरेदी.\nजानेवारीपासून विविध आकाराच्या आकाशकंदिलाची निर्मिती.\nगणपतीनंतर नाताळ सणामध्ये सजावटीसाठी लागणाऱ्या झोपड्यांची निर्मिती.\nव्यवसायातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तू तयार करण्यासाठी झालेला खर्च बाजूला काढला जातो.\nमिळालेल्या नफ्याचे समान वाटप.\nपैशांची गरज पडल्यास सदस्यांकडून आर्थिक नियोजन.\nबांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन.\nतयार केलेल्या वस्तू इतर राज्यात विक्रीसाठी गटाचे प्रयत्न.\n- सौ. छाया दळवी, ८७८८०८२९११\n(अध्यक्षा, रणझुंजार महिला बचत गट, मिरज)\nमहिला women कला व्यवसाय\nआकाश कंदिलांची सजावट करताना महिला सदस्या.\nरणझुंजार महिला बचत गटाच्या सदस्या\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nगॅस्ट्रो आजारामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे...\nनंदाताई दूधमोगरे यांचा शेतीत असाही...बुलडाणा : स्त्री ही समाजात त्याग, नम्रता,...\nमहिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली...शेतीमध्ये हिरवं स्वप्न फुलविण्यात महिलांचे योगदान...\nबुबनाळचे ‘महिलाराज’ आंतरराष्ट्रीय...कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील...\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल...दिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि....\nशेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...\nप्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची...निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक...\nमहिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगसोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे,...\nबचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nमहिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण,...महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nव्यवहारांच्या नोंदीसाठी पासबुक...पासबुकमध्ये आपण खात्यामध्ये ठेवलेल्या पैशांची...\nगांडूळ खत निर्मिती उद्योगगांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत...\nमहिला बचत गटांनी साधली शेळीपालनातून...काळोशी (ता. जि. सातारा) गावातील महिलांनी एकत्र...\nबॅंक खाते नंबर महत्त्वाचा...राधाच्या मदतीनं खातं निघालं नि त्यात आपले...\nशासनाच्या महिला उद्योग धोरणातील तरतुदीमहिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. त्याला...\nलाँड्री व्यवसायातून गवसला ‘तनिष्कां'ना...सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/devendra-fadnavis.html", "date_download": "2018-04-23T11:37:45Z", "digest": "sha1:OL7DTMYBELNN4JCDMU2RVBRHZ7O2VJDL", "length": 20316, "nlines": 104, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : श्री. देवेंद्र फडणवीस\nConstituency : नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : आमदार, महाराष्ट्राचे २७ वे मुख्यमंत्री\nName देवेंद्र गंगाधरराव फडणवीस\nFather's Name : स्व. श्री गंगाधरराव फडणवीस\nMother’s Name : श्रीमती सरिता फडणवीस\nPlace of Birth: : नागपुर, महाराष्ट्र\nSpouse’s Name : श्रीमती अमृता फडणवीस\nNo. of Children : 01, सुपुत्री : कु. दिविजा फडणवीस\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nEducation : डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा\nबोस प्राईझ इन हिंदू लॉ’ विजेता\nHobby : क्रिकेट, व्यायाम, वाचन\nResidence Address : देवेंद्र फडणवीस, २७६, त्रिकोणी पार्क, धरमपेठ, नागपूर - ४४० ०१०\nवर्तमान, महाराष्ट्राचे २७ वे मुख्यमंत्री\n२०१३ – प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश\n२०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश\n२००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा\n१९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा\n१९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा\n१९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम\n१९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो\n१९९९ ते आतापर्यंत – सलग तीनवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य\n१९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव\nसामजिक कार्य / सामाजिक योगदान\nसचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन\nनागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन\nसंयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य\nनाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष\nनागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्यसचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन\nनगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती\nराखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती\nस्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती\nहोनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण, १९९९\nअमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स, २००५\nस्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण, २००६\nचीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण\nडेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व, २००७\nअमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर, २००८\nऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य, २००८\nरशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१०\nयुरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग, २०११\nमलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग, २०१२\nकेनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१२\nकॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्ष २००२ – २००३ साठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार\nराष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार\nरोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार\nमुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार\nनाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार\nभारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्‍या नेतृत्वाची गरज आहे.\nविशेष गुणवत्तेसह कायद्याची पदवी मिळविणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्याची असामान्य समज आहे व आपले हे ज्ञान नैतिक मार्गाने समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमता आहे. न्याय या मूल्याला ते सर्वाधिक महत्त्व देतात. तंत्रज्ञान व अर्थकारण याची आवड असलेला वकील असल्याने त्यांना या क्षमतेचा धोरणे ठरविताना व राबविताना खूप उपयोग होतो. संख्याशास्त्र व आकडेवारीचीही त्यांना समज आहे. या सर्वांमुळे ते कोणत्याही घटनेत भक्कम कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीकोनातून काम करतात.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्‍हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू फुलते. अर्थकारणाचा रुक्ष विषय असो किंवा कविता असो ठिकठिकाणच्या त्यांच्या लेखनात त्यांची संवेदनशीलता प्रतिबिंबित होते. केंद्रीय अर्थसंकल्पाचे त्यांनी केलेले विश्लेषण ऐकण्याची दरवर्षी लोकांना उत्सुकता असते. ‘हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड द स्टेट बजेट’ या अर्थसंकल्पावरील त्यांच्या पुस्तकाची राजकीय पंडित, अर्थविषयक पत्रकार आणि विद्यार्थ्यांकडून प्रशंसा झाली आहे.\nवक्ता, वादविवादपटू, वैचारिक नेता\nआर्थिक विषय, आपत्ती व्यवस्थापन किंवा कायदेशीर बाबी अशा कोणत्याही विषयावर बौद्धिक विश्लेषण आणि वैचारिक नेतृत्वाचे दर्शन घडविणार्‍या मांडणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी कशी भरून काढावी याबद्दलचे त्यांचे विचार आणि कल्पनांना जाणकारांकडून दाद मिळाली आहे. नोकरशाहीचे थर आणि वैयक्तिक लाभाच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या गरजांना महत्त्व देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे श्रेय त्यांना आहे.\nजेंव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात त्यावेळी जग त्याची दखल घेते. राजकीय वर्तुळातील एक आघाडीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद व अर्थपूर्ण असतात आणि कोणताही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्यांना आकडेवारी तोंडपाठ असते. त्यांच्या भाषणांना सखोल संशोधनाचा आधार असतो आणि ते भाषणात कायद्याचा आणि आकडेवारीचा आधार देतात. केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा नेता त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्‍यांना आणि जगाला जाणवतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरगच्च सभागृहालाही त्यांनी सहजतेने संबोधित केले आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे वादविवाद कौशल्य आणि अर्थपूर्ण मांडणीचा उत्तम नमुना असतो. संसदीय कामकाज आणि वादविवाद कौशल्य याबद्दल तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या भाषणांचा उपयोग केला जातो.\nजनतेच्या आशा – आकांक्षा समजून घेणाऱ्या व शब्द कृतीत उतरविणाऱ्या निर्णयक्षम नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. गेली पंधरा वर्षे, हा राज्याच्या इतिहासातील सर्वात वाईट कालावधी होता. कणाहीन नेत्यांच्या लहरीसाठी राज्य ओलीस ठेवले गेले आहे. आता बदलाची वेळ आली आहे. \"भक्कम, सशक्त आणि अग्रेसर महाराष्ट्रासाठी मतदान करण्यास पुढे या\"असे देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन पहा या व्हिडिओत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/637/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E2%80%93", "date_download": "2018-04-23T11:28:56Z", "digest": "sha1:6V4JVQ6J2KL4VJ2SKTDP7MAUXY5PDAUR", "length": 7394, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेचा चौथा आणि शेवटचा टप्पा १६ मे पासून – सुनिल तटकरे\nशेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेचा चौथा व शेवटचा टप्पा १६ मे पासून सुरू होणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन या यात्रेची सुरुवात केली जाईल. तसेच ज्या ठिकाणाहून आंबेडकरांनी पाण्यासाठी लढा दिला त्या चवदार तळ्याला देखील भेट दिली जाईल. यात्रेची सांगता सिंधुदुर्गातील बांदा येथे होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच सरकारने तूर खरेदीबाबत केलेसा विलंब, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकर्यांशना उद्देशून वापरलेल्या अश्लाघ्य भाषेवरही त्यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.\nसंघर्षयात्रेला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद - आ.जितेंद्र आव्हाड ...\nविरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वाढत्या महागाईविरोधात, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अशी सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी संघर्षयात्रा आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद संघर्षयात्रेला मिळत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि अब ...\nशेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष संपणार नाही - सुनिल तटकरे ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे समारोप होणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरी येथे विरोधकांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे सरकार आल्यापासून कोकणातील भात शेती उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे व काजू, आंब्यासारख्या महत्त्वाच्या पिकांकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून दरवर् ...\nआमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा - अजित पवार ...\nउस्मानाबाद थेथील जाहिर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लोकशाहीतही मक्तेदारी करणाऱ्या सरकारवर त्यांनी टीका केली. शेतक-यांसाठी आमची आमदारकी गेली तरी चालेल मात्र शेतक-याला कर्जाच्या जाचातून मुक्त करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सुद्धा फक्त पॅकेजची घोषणा करत उस्मानाबादला एकही रूपया न देणाऱ्या सरकारविरोधात एल्गार पुकारला.या सभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/4/", "date_download": "2018-04-23T11:43:53Z", "digest": "sha1:3NRLVSQQMUYW3RDYABFVTC452ZAWYDD4", "length": 7581, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 4", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ४\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nसण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छान लागते.\nसण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.\nगोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला पुरण पोळी आवर्जून खाल्ली जाते.\nजीवनसत्व ई, लोह, कॅल्शिअम अश्या सर्वगुणसंपन्न असलेला बदामचा हैद्राबादी पद्धतीने बनवून केलेला पौष्टिक हलवा गोड पदार्थ म्हणून सणासुदीला खाऊ शकता.\nकेक, दूध, टुटी फ्रुटी, सुका मेवा असे पदार्थ एकत्र करुन केलेला गोड पदार्थ म्हणजे केक पुडिंग हे डेझर्ड म्हणुन खाता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:51:45Z", "digest": "sha1:IM4ZJCAY6XNE4GV2ZI6MMQOLYMFJQOLX", "length": 3429, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महेसाणा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमहेसाणा हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे महेसाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/793/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE;_%E0%A4%AE%E0%A4%97_%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T11:30:49Z", "digest": "sha1:QFFTRVVIQXH5E5LNP4GDOBNRYJ56CKZG", "length": 10030, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या; मग टीका करा हल्लाबोल आंदोलनावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे आव्हान\nकळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.\nनरेंद्र मोदी यांच्या सरकारला आम्ही दिल्लीत ‘जुमले की सरकार’ म्हणतो. नवीन काहीच त्यांच्याकडे नसते. तेच तेच जुने भाषण ते नेहमी करतात. फक्त ‘जुमला’ दाखवला जातो आणि आता मुख्यमंत्र्यांनाही त्यांचीच सवय लागली आहे. कारण ‘खोटे बोला पण रेटून बोला’, असा या सरकारचा कारभार आहे. आणि म्हणूनच मी आजही म्हणते कि हे सरकार ‘खोटारडे सरकार’ आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कळंबच्या इंदिरा चौक येथील सभेत केली.\nयावेळी विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार विद्या चव्हाण, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजीया खान, माजी आ. संदीप बाजोरिया, आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nतर फडणवीस यांनाही लोक चोरांचे मुख्यमंत्री म्हणतील - धनंजय मुंडे\nराष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांच्या पोटात दुखू लागले आहे. आम्ही मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासह विधिमंडळात उघड केले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीही केलेले नाही. हे असेच चालू राहीले तर एक दिवस लोक मुख्यमंत्र्यांनाही चोरांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखतील, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.\n१६ जानेवारीला मराठवाड्यापासून ‘हल्लाबोल’चा दुसरा टप्पा : प्रदेशाध्यक्ष तटकरे ...\n- ३१ जानेवारीला खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार समारोप राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कर्जमाफीचा मुद्दा आजही प्रलंबित आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत हल्लाबोल आंदोलन केले. लोकांचा आंदोलनाला उदंड पाठिंबा मिळाला. झोपी गेलेले सरकार जागी झाले आणि सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमा देण्यास सुरुवात केली. बोंडअळी, ओखी वादळ, तुडतुड्या यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. रोजगार ...\n‘हे सरकार आहे की मोगलाई’; अजित पवार यांचा हल्लाबोल ...\nसेलू येथून निघालेली पदयात्रा दर्गा शरीफ - केळझर असे टप्पे पार करत खडकी (नागपूर) येथे पोहचली. सेलू येथे सकाळी यशवंत महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी कापूस व सोयाबिनचे पिक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती दिले. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आई-वडील त्रस्त असून आमचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी केली. वर्ध्यातील शेतमजूर महिलांनी गॅसच्या वाढलेल्या दरावरून रोष व्यक्त केला. आम्हाला सबसिडी नको तर गॅसच्या किमती कमी करा, अशी मागणी या शेतमजूर महिलांनी केली. आजही ठिकठिकाणी शेतकरी रस ...\nफक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का - अजित पवार ...\n'आरटीई'ची योजना मागील सरकारने काढली. त्या योजनेसाठी या सरकारने ५६३ कोटी रूपये दिले नाहीत. असे का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. आज #हल्लाबोल आंदोलनात #चिंचवड येथील सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र आम्ही दोघे भाऊ मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे. कोणी प्रश्न विचारायला नाही म्हणून हे घडत आहे. कचऱ्याचा प्रश्न येथे गंभीर आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत ना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/other-state-news/?Menu-Osta", "date_download": "2018-04-23T11:31:03Z", "digest": "sha1:VJDX4YAAIPSRO5XYWYC3GZN5RWUVOIZB", "length": 14308, "nlines": 205, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Latest news updates from states of India in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी other-state", "raw_content": "\nकर्नाटक विधानसभा: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, बादामी येथून लढणार सिद्धरमय्या\nनवी दिल्ली - काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 6 जागांवर नवीन चेहरे निवडणूक लढवणार आहेत. तसेच विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना बादामी येथून तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेसने...\nउत्तर प्रदेशात दुसऱ्याच तरुणाच्या गळ्यात घातली वधूने वरमाला, युवकास अटक\nउत्तर प्रदेशातील बिजनोर येथील नगिनामध्ये एका लग्नाची तयारी पूर्ण होत आली होती. नवरा-नवरी...\nलोकसभा निवडणुकीत अमेठी घराणेशाहीमुक्त करणार : शहा, काँग्रेसने माफी मागावी\nरायबरेली येथील जाहीर सभेत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष...\nनिलंबित आयपीएसच्या घरात सापडली चार कोटींची रोकड, सासुरवाडीतही टाकले छापे\nउत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्यावरून २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी...\nअत्याचार-खून प्रकरणातील अल्पवयीनांना पिझ्झा-बर्गर,ऑर्केस्ट्रा,पार्टी,रोजगारासाठी मिळते प्रशिक्षण\nदेशभरात चालणाऱ्या बालसुधारगृहात अल्पवयीन गुन्हेगार मजेत आहेत. मग ते खून आणि अत्याचार...\nनवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा\nकाही ठिकाणी एवढ्या विचित्र परंपरा आहेत की, ज्या ऐकून तुम्ही चकित व्हाल.\nबंकरमध्ये लपू शकत नाही मोदी, टीडीपी आमदाराचे पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य\nयशवंत सिन्हांचा अखेर भाजपला रामराम, राजकीय संन्यासाची घाेषणा\nपतीच्या अवैध संबंधाला केला विरोध, म्हणून चिडून त्याने प्रेग्नंट पत्नीला जिवंत जाळले\nभररस्त्यावर मॉडेलचे कपडे ओढले, तरुणीने ट्विटरवर केली तक्रार; CM म्हणाले- बेटा, तुला न्याय मिळेल\nसुटकेसमुळे रेल्वेत सुटली दुर्गंधी, उघडून पाहिल्यावर प्रत्येकाला बसला धक्का\nपाशवी कृत्यामुळे 4 महिन्यांचे बाळ रडले तेव्हा तोंड दाबले; गप्प झाली नाही म्हणून पायऱ्यांवर आदळले\nमनु शर्माला सोडल्यास मला काही हरकत नाही, जेसिकाची बहीण सबरीनाचे तुरुंग अधिकाऱ्याला पत्र\nछेड काढणाऱ्याला तरुणीने शिकवला असा धडा, आयुष्यभर विसरणार नाही\nरोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या क्रूरतेचा पुरावा आहे ही धक्कादायक PHOTO सिरीझ\nवाघा-अटारी बॉर्डरवर पाक क्रिकेटरचे नापाक चाळे, BSF जवान संतप्त\nयेथील 20% पुरुष Gay, सेक्स चेंज सर्जरी मोफत; वाचा ब्राझीलचे FACTS\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\nWWE बद्दल सर्वांना पडले असतील हे 5 प्रश्न, जाणून घ्या त्यांची उत्तरे\nIPL 11: क्रिस गेलचे नाबाद अर्धशतक; पंजाब किंग्जचा विजयी चाैकार\nबंगळुरू टीमचा राॅयल विजय, दिल्ली पराभूत; डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक\nसचिन तेंडुलकरसाठी चाहत्याने दिली खास भेट, 'तेंडल्या' चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करत पहिला टीझर प्रदर्शित\nकुणी 600 तर कुणी केले 150 चित्रपटांमध्ये काम, या आहेत साऊथचा 10 खलनायिका\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन, गेल्या तीन वर्षापासून आहे सक्रिय कार्यकर्ती\nव्हायरल झाला सोनम कपूरचा डान्स व्हिडिओ, ठुमके लावताना दिसली\nकॅन्सरला हरवत सुपरमॉडेल बनली ही महिला, लोक आता म्हणतात बार्बी डॉल\nलॉस एंजिलीस येथे राहणारी 34...\nमहिलेने विकत घेतलेल्या केळ्याची किंमत होती 87000 रुपये, बील पाहून आली भोवळ\nतलावाच्या खाली 107 वर्षे लपले होते हे रहस्य, समोर आल्यावर लोकांनी घातली तोंडात बोटे\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nPHOTOS: गोवळकोंडा किल्ल्यावर पोहचल्या इवांका ट्रम्प, डिनरचा घेतला नाही आस्वाद\nमुलायमसिंहाच्या सुनेचे पद्मावतीच्‍या वेशात घुमर नृत्य, करणी सेनेची धमकी\nचंदीगडमध्ये क्लासवरुन परतणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षात सामूहिक बलात्कार\nराज्यपालाच्या कारखाली येऊन मुलाचा मृत्यू झाला तर केस कोणाविरोधात होणार\nमार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलाय या गरुड कमांडोंनी, दहशतवाद्यांचा असा केला खात्मा\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\nचहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-23T11:42:19Z", "digest": "sha1:RQRRDKQKPTVOKHXL4OXNXOJWM5TAOHYV", "length": 4493, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८४ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८४ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १९८४ मधील खेळ\n\"इ.स. १९८४ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८४\n१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९८४ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/anand-choube.html", "date_download": "2018-04-23T11:51:37Z", "digest": "sha1:KEPQQPZ5R7O3QVCGQLGTQTPJ5X7ICW26", "length": 3346, "nlines": 51, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : आनंद प्रकाश चौबे\nConstituency : ५७, नालासोपारा विधानसभा\nDesignation : जनरल सेक्रेटरी, ठाणे (ग्रा.)\nName : आनंद प्रकाश चौबे\nFather's Name : चंद्रप्रकाश चौबे\nMother’s Name : गायत्रीदेवी चौबे\nDate of Birth: : २६ जानेवारी, १९७३\nSpouse’s Name : राजकुमारी चौबे\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : बिल्डर आणि डेवलोपर\nResidence Address : १०३ ए विंग शिवम व्हिला अपार्टमेंट, कालुजो विहार कॉम्प्लेक्स, आचाली रोड.\nOffice Address : शॉप नं ५, राजनिकेतन, संयुकता नगर, आचोले रोड नालासोपारा (पूर्व) ठाणे.\nराजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती\n१९९० - काँग्रेस पदार्पण श्री चंद्रकांत गोसालीया साहेब\n२००५ - नालासोपारा मतदार संघात विभाग अध्यक्ष\n२००८ - पासून सरचिटणीस ठाणे (ग्रा.)\nउत्तर भारतीय विकास परिषद वसई - तालुका अध्यक्ष\nलोकांना कशा प्रकारे मदत करू शकता …\nसमाजात असलेल्या अडी अडचणीसाठी दिवस रात्र प्रयत्नशिल\nलोकांच्या समस्या वरीष्ठ राजकीय नेते यापर्यंत समस्या निवारण\nभारतीय कॉंग्रेस तर्फे दिलेल्या सुख सुविधा, माझ्याकडून लोकांना उपदेश, माहिती प्रचारात समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sanjay-raut.html", "date_download": "2018-04-23T11:51:09Z", "digest": "sha1:I6DZPF23JABHWEJLQ66AGQ3FKASTQIFT", "length": 4822, "nlines": 55, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संजय उर्फ गजानन भालचंद्र राऊत\nConstituency : वार्ड क्र. ६, नालासोपारा विधानसभा मतदारसंघ\nDesignation : वसई शिवसेना उप तालुका प्रमुख\nName : संजय उर्फ गजानन भालचंद्र राऊत\nFather's Name : भालचंद्र अर्जुन राऊत\nMother’s Name : सरस्वती भालचंद्र राऊत\nDate of Birth: : २५ जानेवारी, १९६९\nPlace of Birth: : वसई, ठाणे (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : ज्योती उर्फ मधुमालती गजानन राऊत\nNo. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स\nResidence Address : भंडारआळी चौक, बोळीज, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे, पो. विरार (पश्चिम) - ४०१ ३०३.\nOffice Address : भंडारआळी चौक, बोळीज, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे, पो. विरार (पश्चिम) - ४०१ ३०३.\n२००० - २००७ शिवसेना बोळींज शाखा - कार्यालय प्रमुख\n२००७ - २०१० वसई शिवसेना उपविभाग प्रमुख\n२०१० - २०१२ वसई शिवसेना विभाग प्रमुख\n२०१३ वसई शिवसेना उप तालुका प्रमुख\nगरीब गरजू लोकांना रुग्णवाहिका पासून औषधापासून आर्थिक मदत\nशिवसेनेच्या माध्यमातून मतिमंद, अंध, अपंग शाळेतील विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप\nशाळेतील गरीब विद्यार्थांना त्यांच्या गरजेनुसार पोशाख आणि शालेय वस्तूंचे वाटप\nआपल्या विभागातील लोकांना मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम भरविने.\nआपल्या विभागातील लोकांसाठी दिवस-रात्र सेवेसाठी नेहमी तत्पर\nलोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ नेते यांच्या बरोबर प्रयत्न करने / धडपड करने\nस्वतः आणि माझ्या कुटुंबाकडून रक्ताची गरज भासल्यास रक्तदान केले आणि रुग्णांना रुग्णांलयातुन रक्त मोफत देण्याची तत्पर सेवा\nशिवसेनेमार्फत दरवर्षी शिवजयंती व भीमजयंती साजरी करने\nहिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या जन्म दिनी चश्मा शिबिर, वह्या वाटप, अपंगाना साइकल वाटप केले जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-officer-suspended-malpractices-6697?tid=124", "date_download": "2018-04-23T11:41:08Z", "digest": "sha1:FKRWMPDDOEC4UU6WTYHO6LME7GWX7L5F", "length": 18062, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture officer suspended for Malpractices | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई\nगैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई\nमंगळवार, 20 मार्च 2018\nमुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ९६ लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर कृषी कार्यालयातील तत्कालीन सहायक अधीक्षक नामदेव वाडे यास अटक करून निलंबित करण्यात अाले, तर याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे, विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आणि तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनादेखील जबाबदार धरले असून, त्यांच्याविरुद्ध कृषी आयुक्तालय स्तरावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.\nमुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ९६ लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर कृषी कार्यालयातील तत्कालीन सहायक अधीक्षक नामदेव वाडे यास अटक करून निलंबित करण्यात अाले, तर याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे, विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आणि तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनादेखील जबाबदार धरले असून, त्यांच्याविरुद्ध कृषी आयुक्तालय स्तरावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.\nतालुका कृषी अधिकारी कार्यालय, रावेर शासकीय कोषागारातून निधी काढून स्टेट बँक ऑफ इंडिया, रावेर येथे त्यांच्या नावाने असलेल्या बचत खात्यात ठेवण्यात येत होता. स्टेट बँक ऑफ इंडिया (रावेर) या खात्यातील रकमेसाठी रोखवही इत्यादी उपलब्ध नसल्याचे विद्यमान कृषी अधिकारी (रावेर) यांच्या ऑगस्ट २०१४ च्या दरम्यान निदर्शनास आले. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते जून २०१६ या कालावधीत ७०,७०,५१७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे जुलै २०१६ मध्ये कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्या निदर्शनास आले होते, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०१८ मध्ये विभागीय कृषी सहसंचालक (नाशिक) यांच्याकडून मार्च २०१४ ते जून २०१६ या कालावधीत ९६ लाख ७५ हजार २८९ इतकी शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले आहे.\nभविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी या विभागाच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता उघडलेली सर्व बँक खाती बंद करण्याचे आदेश जुलै २०१७ मध्ये दिले आहे. सद्यस्थितीत पीएफएमएस प्रणालीद्वारे निधीचे वितरण केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी दक्षता पथकामार्फत करण्याबाबत कृषी आयुक्तांना कळविण्यात आले असल्याचे कृषिमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले. आमदार सीमाताई हिरे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.\nदक्षता पथकामार्फत खात्री करण्याचे आदेश\nदरम्यान, नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून २०१५ मध्ये कृषी सहायक या संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या. त्या संदर्भातील नस्त्या विभागीय कृषी सहसंचालक नाशिक या कार्यालयात असल्याचे त्यांच्या अहवालावरून दिसून येते. या वस्तुस्थितीची दक्षता पथकामार्फत स्वतंत्रपणे खात्री करण्याचे आदेश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत, असे मंत्री फुंडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले आहे.\nनाशिक जळगाव विजय victory विभाग sections कृषी आयुक्त agriculture commissioner पांडुरंग फुंडकर बँक ऑफ इंडिया २०१८ 2018 आमदार\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nलाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19106/", "date_download": "2018-04-23T11:35:31Z", "digest": "sha1:I6IQD3YCE3G25KQDWJQVGXO7QZ7XI43T", "length": 4450, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...", "raw_content": "\nसखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...\nसखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...\nसखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...\nतुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट\nसखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||\nतुझे अबोल बोलके डोळे\nमाझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट\nसखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||\nसतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ\nया ओसाड माझ्या मनी\nतु फुलव प्रेमाचा मळा\nमनसोक्त पाहू दे मला\nजणू मी पिंपळपान,तु झालीस गं देठ\nतुझं व्यसन माझ्या,ह्रदयास जडलंय थेट\nतुला पाहिल्या पासुन गं\nतुझ्या जिवनात माझंही,जीवन होईल सेट\nघे तुझ्याही मनात गं\nनको करू विलंब आता\nमाझ्या ह्रदयाचं तुझ्यासाठी,खुलं आहे हे गेट\nसखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... ||६||\nव्हाटस्अप नंबर :- 9730573783\nकविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,....\nसखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...\nसखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/499/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:08:34Z", "digest": "sha1:OI6JG5RK3CKGU23OZ6NM6GGOW2X2U6W7", "length": 7885, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nउत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का\nमराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा या पीकांचे तसेच फळबागा व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार काही पावले उचलणार का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का अशी जळजळीच टीका त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते मात्र काही केले नाही. कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठनही झालेले नाही. सरकार गंभीर नसून सकारात्मक चर्चा करायला तयार नाही. एलबीटीसाठी महापालिकांना १० हजार कोटींची मदत दिली जाते. यातून काही निवडक व्यापाऱ्यांचा फायदा झाला. मग कोट्यावधी शेतकऱ्यांना सरकार पैसे का देऊ शकत नाही अशी जळजळीच टीका त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते मात्र काही केले नाही. कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठनही झालेले नाही. सरकार गंभीर नसून सकारात्मक चर्चा करायला तयार नाही. एलबीटीसाठी महापालिकांना १० हजार कोटींची मदत दिली जाते. यातून काही निवडक व्यापाऱ्यांचा फायदा झाला. मग कोट्यावधी शेतकऱ्यांना सरकार पैसे का देऊ शकत नाही अशी विचारणा मुंडे यांनी केली. त्यामुळे या सभागृहात कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी विधान परिषदेत दिला.\n'महाराष्ट्र श्री' सुनीत जाधवला शासकीय सेवेत घेण्याची राष्ट्रवादीची मागणी ...\nराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता महाराष्ट्राचा खेळाडू सुनीत जाधवला यास शासकीय सेवेत 'वर्ग एक' अधिकारी म्हणून सामावून घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अनिकेत तटकरे यांच्यासह शरीररसौष्ठव क्षेत्रातील मान्यवरांनी आज यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तसेच सुनीत जाधव यास तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे पार पडली. राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संपूर्ण निकालाचे विश्लेषण तसेच जिल्ह्यानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळायची असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि ...\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाणे येथे पत्रकार परिषद ...\nशिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी बदलून हातात नारळ असलेला माणूस ही निशाणी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ मारला, या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा प्रकार अत्यंत लांछनास्पद असून शिवसेनेने त्या उमेदवाराची उमेदवारी त्वरीत रद्द करावी, असे खडेबोल आव्हाड यांनी सुनावले आहेत. स्वतःच्या बायकोचादेखील सन्मान न कर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/news/?Menu-New", "date_download": "2018-04-23T11:28:26Z", "digest": "sha1:G7TTIGPZYD2R5MX4MUWZ7UTCJXQBN7BJ", "length": 3683, "nlines": 84, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Latest : Bollywood Entertainment News, Headlines, Exclusive News Today - Divya Marathi news", "raw_content": "\nचित्रपटाच्या सक्सेसमुळे एक्सायटेड सुपरस्टारने पत्नीला केले Kiss,फोटो झाला व्हायरल\nठरलेल्या वेळेपुर्वीच रिलीज होणार 'नमस्ते इंग्लंड' परिणीती-अर्जुनने ट्वीटवर केली घोषणा\n3 गंभीर आजारांमुळे हाडाचा सापळा झाला होता हा अभिनेता, ओळखणेही झाले होते कठीण\nसारा अली खानचे आई आणि डिंपल कपाडियासोबत फोटोशूट, दिसला ट्रेडिशनल लूक\nया चित्रपटातून पुन्हा भेटीला येणार सलमान-सोनाक्षी 'रज्जो'ने केला हा खुलासा\nकधी शिव्या तर कधी अश्लिल बोलत होता तरुण, सपना चौधरीने अशी केली बोलती बंद\n'राजा रतनसिंह' चा केला सन्मान, मिळाला 'दादासाहेब फाळके एक्सेलन्स' पुरस्कार\nसंजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्याचे रहस्य उलगडेल हा चित्रपट\nफ्लाइटमध्ये डास चावल्याने संतापली ट्विंकल, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली\nधमाकेदार अॅक्शन आणि जोरदार डायलॉग्स, असा आहे या भोजपुरी चित्रपटाचा ट्रेलर\nटिप-टिप बरसा पाणी गाण्यावर सपना चौधरीने केला असा डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ\nदुर्मिळ आजाराचा सामना करत असणा-या इरफानच्या नवीन चित्रपटाच ट्रेलर रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t18344/", "date_download": "2018-04-23T11:35:16Z", "digest": "sha1:JRQU3JS36H2LPMP6B6PZKUJ5OMEX6ISK", "length": 3177, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आंबे आले झाडाला..........", "raw_content": "\nप्रेम झालेच नाही मला\nपरिक्षा संपली,सुट्टी सुरू झाली\nमात्र प्रेमाचीवेळ नाही आली\nदोन हप्ते झाले सुट्टीला\nपण प्रेम झालेच नाही मला\nपण मनात रूजले नाही कूणी\nहा हा प्रेम झाले हो मला\nको जाणे कोणी माझ्या मनात रूजले\nआयुष्यात माझ्या आनंदी क्षण उमटले\nप्रपोज केला मी तिला\nदोन हप्ते घेतले तिने उत्तराला\nहो म्हणाली ती मला\nरात्रंदिनी वाटेवरी तिझ्या मी फिरलो\nप्रेमामधे मी अपार बुडलो\nवाटले आयुष्य जणु दुखी क्षणांचेे\nआंबे पडले आलेले झाडाला\nकधीच विसरलो मी प्रेमाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/t20i-womens-triangular-series-england-beat-india-by-7-wickets", "date_download": "2018-04-23T11:07:38Z", "digest": "sha1:2IUCDXEMAYKUDOFTLCZ5TUK5WB5BHAVW", "length": 15637, "nlines": 130, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "T20I Women's Triangular Series: England beat India by 7 wickets | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome क्रीडा डॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nटी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये आपले दुसरे शतक झळकावणाऱ्या डॅनियल वायटने भारताचे १९९ धावांचे आव्हान अगदी सहजतेने पेलत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालीकेत ०-३ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर या तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला या सामन्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक होते. पण तगड्या इंग्लंडचा सामना करणे भारतासाठी तितकेच आव्हानात्मक होते आणि इंग्लंडने आपली सर्व ताकद पणाला लावत भारताला सहजरित्या पराभूत केले. गोलंदाजीत सुमार कामगिरी झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी जबाबदारी घेत भारताचा सात गडी व आठ चेंडू राखत पराभव केला.\nइंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय महिलांना प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताची सर्वात अनुभवी मिथाली राजने युवा स्मृती मंधनाच्या साथीने भारताला सुरुवातीला काहीशी सावध व नंतर हवी तशी सुरुवात करून दिली. पहिल्या तीन षटकांत १६ धावा झाल्यानंतर स्मृतीने चौथ्या षटकात दोन चौकार व एक षटकार खेचत तब्बल २० धावा कुटल्या. तर पावरप्लेच्या शेवटच्या षटकात स्मृतीने आणखी तीन चौकार ठोकत १३ धावा कुटल्या आणि सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ५२ वर आणली. एकीकडे भारत मोठ्या भागीदारीसाठी मागील काही सामान्यांपासून झगडत होता तिथे आज सलामीवीरांनी झुजारू वृत्ती दाखवीत अपेक्षेप्रमाणे भारताला मजबूत सुरुवात करून दिली.\nदरम्यान, स्मुतीने नवव्या षटकात आपले अर्धशतक झळकावत आपला फॉर्म कायम ठेवला. तिचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चौथे अर्धशतक होते. लगेच ११ व्या षटकात दोन्ही सलामीवीरांनी १०० धावांची भागीदारी रचित भारताला मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केले. भारतासाठी पहिल्या गड्यासाठी हि पाचवी १०० धावांची भागीदारी होती तर मिथाली राज व स्मृती मंधना यांच्यांत हि दुसरी शंभर धावांची भागीदारी ठरली. विशेष म्हणजे, मिथालीला ३५ धावांवर बिमोन्ट हिच्याकडून जीवनदान मिळाले आणि त्याचाच घेत फायदा मिथालीने आपले १४ वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. तिने अर्धशतक झळकावण्यास ४० चेंडू घेतले.\nस्मृती मंधना सेट झाली असे दिसत असताना पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवण्याच्या नादात बिमोन्टकडे सोपा झेल देत तंबूत परतली. तिने ५१ मिनिटे खेळपट्टीवर तग धरत ४० चेंडूंत ७६ धावा केल्या. यात तिने १२ चौकार व दोन षटकार लगावले. तर मिथालीही अर्धशतक झळकावल्यानंतर ५३ धावांवर तंबूत परतली. भारताच्या या सलामी जोडीने दिलेल्या दमदार सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनाही मिळलेल्या संधीचा चांगलाच फायदा घेत भारताला समाधानकारक धावसंख्येवर आणले. हरमनप्रीत कौर (३०) व पूजा वस्तारकर (२२*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरीस ४ गडी गमावत १९८ धावा फलकावर लावल्या. इंग्लंडतर्फे ताश फारांत हिला ३२ धावांत २ बळी तर सोफिया एकलिस्टन व नटालिया स्किवर यांना अनुक्रमे २९ धावांत १ व २४ धावांत १ बळी टिपता आले.\nभारताने रचलेल्या १९८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने भारताच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. इंग्लंडची सलामी जोडी डॅनियल वायट व ब्रायोनि स्मिथ यांनी पावरप्ले चा पुरेपूर फायदा घेत इंग्लंडला भरभक्कम सुरुवात करून दिली. स्मिथ (१५) धावांवर बाद होण्यापूर्वी ५.२ षटकांत इंग्लंडने पहिल्या गड्यासाठी ५२ धावा जमा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या टी बिमोन्ट हिने डॅनियल वायटला चांगली साथ दिली. तिने २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचत ३५ धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने वेदा कृष्णामूर्थीकरवी झेलबाद केले.\nआपल्या चांगल्या फॉर्मात असलेल्या डॅनियल वायटने भारताच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. तिने ६४ चेंडूंचा सामना करीत तब्बल १५ चौकार व ५ षटकार खेचत १२४ धावा कुटल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचे हे दुसरे शतक ठरले. दोन शतक ठोकणारी ती केवळ दुसरी मालिका ठरली. तिच्या आधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजची दिनेन्द्रा डॉटीन हिने केली आहे.\nइंग्लंडने आठ चेंडूं व ७ गडी राखत भारताचा पराभव केला आणि याच पराभवामुळे आता भारताच्या तिरंगी मालिकेतील आव्हान जवळजवळ संपुष्ठात आले आहे.\nयुगपुरुष रामाची योग्यता – भाग १\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sahyadrigeographic112017.blogspot.in/", "date_download": "2018-04-23T11:04:24Z", "digest": "sha1:MDYKVV33LPG4SMM2LPHBLCYL574KL3LP", "length": 34479, "nlines": 69, "source_domain": "sahyadrigeographic112017.blogspot.in", "title": "Me Sahyadri November 2017", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nसुर्याची तिरपी किरण जेंव्हा गवताळ माळरानावर पडतात तेंव्हा सोनेरी जरीला सुद्धा लाजवेल अशी त्याची झळाळी असते. ओसाड दिसणाऱ्या माळरानावर लहान मोठया पाखरांची चहलपहल सुरु होते. थंडी पडल्यावर उत्तरेकडच्या शुष्क प्रदेशांतुन आलेल्या पाहुण्यांचे थवे माळावर अचानक उंचावतात. आकाश विविध जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या उंच भराऱ्यांनी जीवंत होते. मुरारी पक्षी मंजुळ शीळ वाजवु लागतात. कुठुन तरी उडत उडत आलेल्या भाट तित्तरांच्या जोड़्या गवतावर उतरतात. गवताचे बी टिपत टिपत गवतात चालता चालता त्या गवतात हरवुन जातात.\nदुपारी माळावर खेळ करणारे डोंबारी पक्षी माळावर विखुरलेल्या दगडांवर उन्ह खात बसलेले दिसतात. कोरफडीच्या शेंड़्यांवर गप्पीदास आपली शान दाखवत बसलेले दिसतात. हिरवे लहान राघू भुंगे, चतुर यांना पकडण्यासाठी हवेत करामत करतात. कोतवाल आपल्या इलाख्याची निगराणी करतात. उत्तरेकडुन आलेले विविध जातींचे बंटिंग बाजरीच्या कणसांवर आपला हिस्सा खाण्यात मग्न असतात. लावा पक्षी शेतांच्या बांधावरच्या गवतात दडत दडत अचानक रस्ता ओलांडताना दिसतात. हवा तापण्याची वाट पहात लहान टेकड़्यांच्या टोकांवर कझाकी स्टेप गरुड शांत बसलेले आढळतात. बाभळीच्या झाडावरुन होले माळावरच्या वाटेवर अलगद उतरले. सातबाया जाग्या झाल्या. बिळातुन बाहेर पडलेल्या घोरपडीकडे पाहुन सातबायांचा कलकलाट चालु झाला.\nचिंकारा हरणे लहान कळपात सावध सावध डोंगराच्या बाजु बाजुने चरताना दिसतात. कापशी घार हवेत एकाच ठिकाणी फडफड करत शिकारीची तयारी करताना दिसते. ससाणे माळावरच्या मीटर भर उंच आकाशातुन आपले सावज शोधत तरंगतात. रात्र भर शिकार शोधुन शोधुन दमलेले तरस, कोल्हे, लांडगे आपल्या आपल्या जमिनीखालच्या अड़्यांमध्ये निजलेले असतात. अचानक गवतात लगभग होते. १०-१२ धावक पक्षी गवतात दुडदुडत किडे शोधु लागतात. बांधावरुन पिवळ्या गालाच्या माळ टिटव्या निरिक्षण करु लागतात. एव्हाना ससे शोधत शोधत कझाकी स्टेप गरुड आकाशात रिंगण घालु लागतात.\nइकडे धनगराच्या वाघुरातुन धुराच्या वेलांट्या बाहेर पडु लागल्या. पुढचे पाय बांधलेले चार भीमथडी घोडे गवतावर चरत चरत येतात. बाभळीच्या काटेरी वाघुरातून धनगराच्या शेळ्या मेंढ्याचा कळप बाहेर पडतो. त्यांच्या मागे मागे दोन रंगीत पागोटी, एक गडद लाल आणी एक गडद गुलाबी संगतीने बाहेर पडतात. पागोटयांच्या खाली जाड मिश्या असतात. संगतीला घोंगडी, लांब निमुळते शेकाटे असा लवाजमा माळापल्याडच्या डगरीवरुन पुढे दिसेनासा होतो. सोनेरी माळावरची थंड हवा एव्हाना तापु लागते. माळरानांवर आता कुंपणे आली आहेत. वाट अडल्याने चिंकारे चिंतेत दिसतात. गवतावरचे चार मीटर उंच आकाश आपली दुनिया समजणारे ससाणे कुठे तरंगणार हा अजुन एक प्रश्न आहे. माळावर शासनाने पुण्यासाठी नवे विमानतळ होऊ घातले आहे. सर्व्हे चालु आहेत. गावकऱ्यांनी आपल्या जमिनींचे तुकडे पाडुन विकण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र कुंपणांचा पसारा वाढत आहे. चिंकारा हरणांना कुंपण, गावातली कुत्री आणी लहान होत चाललेल्या अधिवासाचा सामना करणे भाग पडत आहे.\nहळू हळू सूर्य डगर सोडून बराच वर आला. माळरानावर रखरख वाढू लागली. पाखरांचा कलकलाट कमी झाला.\nचित्तुर नावाने ओळखल्या जाणारा ग्रे फ्रॅन्कोलिन पक्षी, महाराष्ट्रात शुष्क प्रदेशात सर्वत्र आढळतो. फ्रॅन्कोलिन जातीचे पाच पक्षी जगात आढळतात. ब्लॅक फ्रॅन्कोलिन, पेन्टेड फ्रॅन्कोलिन, चायनीज फ्रॅन्कोलिन, ग्रे फ्रॅन्कोलिन आणि स्वॅम्प फ्रॅन्कोलिन या सर्व पाच जातींचे पक्षी भारतात आढळतात.\nकरडा चित्तुर (ग्रे फ्रॅन्कोलिन) कोरड़्या ओसाड पठारी भागात समुद्रसपाटीपासुन अंदाजे ५०० मीटर उंचीपर्यंत आढळतो. करडा चित्तुर अंदाजे ६० से मी लांब असतो.\nया पक्ष्याच्या ३ उपजाती आहेत. यातील मेक्रेन्सिस उपजात वायव्य भारत, दक्षिण पाकिस्तान, बलुचिस्तान, इराण भागात आढळते. इंटर्पोसिटस जात उत्तर भारतात आढळते. तपकिरी छटा असलेली पोन्डीसेरियनस उपजात दक्षिण भारतात आढळते.\nया पक्ष्याच्या अंगावर तपकिरी पट्टे असतात तर गळ्याकडे तपकिरी रंग असतो. त्याची भुवई गदड असते. नर पक्ष्याला पायावर स्पर असतात तर मादीला असे स्पर नसतात.\nसकाळी नर पक्षी कटितर कटितर असा सलग आवाज करताना ऐकु येतो. मादी पक्षी त्याला प्रतिसाद देत पिला, पिला, पिला असा सलग आवाज करताना ऐकु येते. करडा चित्तुर एप्रिल ते सप्टेंबर काळात जमिनीवर घरटे तयार करतात. गवताळ व ओसाड जमिनीवर ते गवताच्या बिया, धान्य, वाळवी, शेणातले किडे खातात. भराभर पळणाऱ्या या पक्ष्यांना फार उंच उडता येत नाही. ते जमिनीपासुन थोड़्या उंचीवरुन थोड़्या अंतरापर्यंत उडतात. या पक्ष्यांची शिकार त्यांच्या मांसासाठी केली जाते. आय.यु.सि.एन.संस्थेच्या वर्गिकरणानुसार करडा चित्तुर \"लिस्ट कन्सर्न्ड\" मानला जातो.\nपोकुर्डी कबुतराच्या आकाराचा एक सुंदर पक्षी आहे. ओसाड व खडकाळ माळरान आणी शुष्क प्रदेश हा या पक्ष्याचा अधिवास आहे. बसक्या अंगाचा आणी लहान पायाचा हा पक्षी जमिनीलगत चालताना दिसतो. तो गवताचे बी खातो. या पक्ष्याचा रंग आजुबाजुच्या अधिवासाशी मिळता जुळता असतो. त्यामुळे तो अधिवासात मिसळुन जातो. शिकारी पक्ष्यांपासुन त्याचे यामुळे संरक्षण होते. पिवळसर तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्य अंगावर तपकिरि छटांची अजब रंगसंगती असते. मादीच्या अंगावर काळे ठिपके, पट्टे असतात. उंच मानेचा हा पक्षी. बहुतेक माळरानावरील पक्ष्यांसारखा हा पक्षी जमिनीवर घरटे करतो.\nधाविक हा पक्षी गवताळ माळरानावर रहातो. त्याच्या या अधिवासात लपणारे अशी त्याची रंगभुषा असते. पक्ष्यांच्या गटागटाने ते गवतात फिरताना आढळतात. कोर्सर पक्ष्याच्या तीन जाती भारतात आढळतात. इंडियन कोर्सर (धाविक) , क्रिम कलर्ड कोर्सर (फिका धाविक), जेर्डोन कोर्सर या तीन जातींपैकी महाराष्ट्रातील माळरानांवर इंडियन कोर्सर (धाविक) आढळतो. ओसाड माळराने, शुष्क प्रदेश हा त्याचा अधिवास आहे. कमी उंचीच्या गवताळ माळरानांवर तो प्रामुख्याने आढळतो. आकाशातुन जमिनीवर उतरताना हे पक्षी जमिनीला समांतर तरंगत हळुवार जमिनीवर उतरतात. उतरल्यावर ते धावत धावत वेग कमी करुन स्थिरावतात. म्हणुन त्यांना धाविक असे म्हणतात. उंच सफेद पाय, फिक्या तपकिरी रंगाचा व डोळ्यांवर सफेद आडवी लकेर असे याचे रुप असते. हे पक्षी गवतातले किडे खातात. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणानुसार हा पक्षी \"लिस्ट कन्सर्ण्ड\" श्रेणीत आहे. दुर्दैवाने गवताळ माळरान म्हणजे निरुपयोगी जमिन या मानवाच्या धारणेमुळे वेगाने याचा माळरान अधिवास लुप्त होत आहे. मोकळ्या रानावर उघड़्यावरच घरटे करणाऱ्या या पक्ष्याच्या संख्येत शहरीकरणामुळे घट होताना दिसते. शहरांजवळची माळराने झपाटयाने कमी होत आहेत. औद्योगिकरणामुळे आणी शहरीकरणामुळे गवताळ माळराने नष्ट होत आहेत. त्यामुळे हे पक्षी या भागातुन दिसेनासे होत आहेत.\nचिंकारा हा काळविटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण चपळ व देखणा प्राणी आहे. वायव्य व मध्य भारतात तो कृष्णा खोऱ्याच्या उत्तरेस आढळतो. लहान कळपात रहाणारा हा प्राणी पाण्याशिवाय अनेक दिवस काढू शकतो. तो उजाड माळरानांवर, वाळवंटात आढळतो. बेकायदा शिकार व त्याच्या अधिवासात होणाऱ्या मानवी अतिक्रमणामुळे चिंकाराचे अस्तित्व हळुहळु धोक्यात येत आहे.\nलावा पक्ष्यांच्या आठ जाती भारतात आढळतात. त्यातील सहा जातीचे लावा पक्षी महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या जवळपास आढळतात. साधा लावा, पावसाळी लावा, खडकाळ भागातील लावा, जंगल लावा, रंगीत लावा आणी निळ्या छातीची लावा अश्या या लावा पक्ष्यांच्या विविध जाती आपल्या भागात आढळतात. लावा पक्षी अत्यंत लाजाळु असतात. ते झुडुपांखाली आणी गवतात त्यांचे छुपे आयुष्य जगतात. त्यांची रंगसंगती आजुबाजुच्या अधिवासाशी मिळतीजुळती असल्याने त्यांना शिकाऱ्यांपासुन संरक्षण मिळते. त्यांच्या जवळ गेल्यास ते एका ठिकाणी स्तब्ध होऊन थांबतात. मात्र त्यांच्या अगदी जवळ गेल्यास ते अचानक उडुन वेगवेगळया दिशेस जातात. आवाजांचा उपयोग करुन ते पुन्हा एकत्र येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19760/", "date_download": "2018-04-23T11:25:29Z", "digest": "sha1:O6R3SJQ2O6CEQFAOVK35Q4KLXU7HVOTG", "length": 2514, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-असेच शब्द जुळवतोय मी", "raw_content": "\nअसेच शब्द जुळवतोय मी\nअसेच शब्द जुळवतोय मी\n[अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv-2]\nअसेच शब्द जुळवतोय मी\nअशीच कवीता लिहीतोय मी\nलिहीलेले शब्द कागदावर राहतील\nत्यांची किंमत तुला कळनार पण नाही\nअशाच कवीता पडून राहतील\nशब्दांची शाई उडून जाईल\nउडालेले शब्द तू शोधनार पण नाही\nत्यांचा अर्थ तुला समजनार पण नाही\nअशीच आठवण काढतोय तुझी\nमनातल्या मनात रडतोय मी\nहृदयातले अश्रू तुला दिसनार पण नाही\nत्या अश्रुची किंमत तुला समजनार पण नाही\nअसेच शब्द जुळवतोय मी\nअसेच शब्द जुळवतोय मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/hitendra-thakur.html", "date_download": "2018-04-23T11:45:41Z", "digest": "sha1:FOATBRADSGWLSJ3ZFCBNV2OJXHK5LD3K", "length": 11210, "nlines": 69, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nश्री. हितेंद्र विष्णू ठाकूर\nName : हितेंद्र ठाकुर\nParty Name : बहुजन विकास आघाडी\nDesignation : अध्यक्ष - बहुजन विकास आघाडी\nName : श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर\nPlace of Birth: : विरार, (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : पत्नी श्रीमती प्रविणा\nNo. of Children : ०३ (क्षितिज, उत्तुंग, शिखर)\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : व्यापार व शेती\nResidence Address : ठाकूर निवास, राजा शिवाजी मार्ग, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा - ठाणे ४०१३०३\n1985-88 अध्यक्ष, विरार शहर युवक कॉंग्रेस कमिटी.\n1988-92 अध्यक्ष, वसई तालुका युवक कॉंग्रेस कमिटी.\n1991-96 नगरसेवक विरार नगरपरिषद.\n1995 संस्थापक वसई विकास मंडळ.\n1990-1995, 1995-1999, 1999-2004 सदसया महाराष्ट्र विधानसभा\nऑक्टोबर 2004-05 महाराष्ट्र विधानसभेवर फेरणीवड\nअध्यक्ष, वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय(मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले.\nदहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी एस.एस.सी. नंतर पुढे काय या विषयावरील पुस्तके, मार्गदर्शन व तज्ञाच्या व्याख्यनांचे आयोजन.\n1990 पासून दरवर्षी 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत वसई तालुका कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन.\n7 वे कोकण मराठी साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव, प्रत्येक वर्षी संगीत रजनी, कवी संमेलन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.\nवसई विरारसाठी उसगावं पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.\nतालुक्यातील 4 नगरपरिषदा व 64 गावांसाठी 100 द. ल क्षमतेची पाणीपुरवठा योजना तसेच, राजीवळी, सातीवळी व कामण या पाणीपुरवठा योजना पूर्ण करनायासाठी प्रायणतठरात वसई तालुक्यात 220 के. व्हि. आती उच्च दाबची उपकेंद्रे, 22 के. व्हि. क्षमतेची 5 स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित केली.\nसर्व नगरपरिषदाच्या ह्द्दीतील प्राथमिक आरोग्या केंद्रे व शासकीय रुग्णालये नगरपरिषदाच्या ताब्यात घेऊन सुसज्जय करण्यासाठी विशेष प्रयत्न.\nवसई विरार व नायगांव उड्डाण पुलासाठी प्रयत्न.\nअध्यक्ष, यंग स्टार ट्रस्ट, या संस्थेच्या माध्यमातून व्यायमशाळा, आगाशी व सफाले येथे प्रती वर्षी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन.\nगरजू महिलाना शिलाई माशिनचे वाटप. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्या तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान, ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यकामांचे आयोजन, झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.\nविविध विधायक कामांची पूर्तता\nविधान सभेवर निवडून येताच श्री. हितेंद्रजी ठाकूर यांनी सर्व प्रथम पाणी प्रश्‍नाला प्राधान्य दिले. शिरगांव, उसगांव इत्यादी लहान पाणी योजना तातडीने कार्यान्वित केल्या. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांनी सुर्या प्रकल्पाची गंगा तुषार्त वसई तालुक्यात अवतरली. सदर गांगेने तालुक्यात उद्योग व व्यवसाय क्षेत्रात क्रांती केली. त्यामुळे बांधकाम व्यवसाय, वीट उत्पादन व रेती व्यवसाय इत्यादी उद्योगांना प्रचंड चालना मिळाली.\nरस्ते, शाळा, इमारती, क्रीडा मैदाने, स्म्शान भुमी, तलावांचे सुशोभीकरन इत्यादी सार्वजनिक कामांसाठी त्यांनी आपल्या आमदार निधीचा पुरेपूर विनियोग केला. तसेच अन्य खासदार व विधान परिषद सदस्यांचा निधीही तालुक्यासाठी मिळविला. त्यांनी विरार रेल्वे स्टेशनवरून पूर्व-पश्चिम जाणार्‍या उड्डाण पुलसाठी मुंबई महानघर विकास प्राधिकरणाकडून निधी मिळविला असून, सध्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला आहे.\nभाईंदर व नायगांवचे जुने रेल्वे पूल रस्ता वाहतुकीसाठी मिलवेत, वसई समुद्रातील गॅस ठाणे जिह्यला घरगुती व औद्योगिक वापरासाठी द्यावा व ठाणे जिल्ह्यातील समुद्रा किनारयावर धुप प्रतिबंधक बंधारे बांधावे या क्रांतिकारक महत्त्वाच्या मागण्यांसाठी श्री ठाकूर साहेब गेले दीड शतक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना साथ देणे आवश्यक आहे.\nश्री. हितेंद्रजी ठाकूर गेली अनेक वर्षे गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्या विनामूल्य देतात. हे मदत कार्य डहाणू तालुक्यपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या उत्कर्ष विद्यालय व विवा कॉलेज शेकडो विद्यार्थ्यांची सोय केली आहे. लवकरच इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\nलोकनेते श्री ठाकूर यांचे कार्यालय सर्व सामान्यांसाठी सतत खुले असते. त्यांच्याकडे रोज अनेक लोक आपली कामे घेऊन येतात, ते जनतेच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देतात, त्यामुळे त्यांच्या जनता न्यायालयात लोक मोठ्या अपक्षेने येत असतात. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कामे सातत्याने चालू असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:54:46Z", "digest": "sha1:3M56U4URI3M6TDLNRFERWF2PWJ2UGSEE", "length": 24606, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फर्ग्युसन महाविद्यालय - विकिपीडिया", "raw_content": "\n(फर्गसन महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२ फर्गुसन महाविद्यालयाचा इतिहास\n३ येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती\n४ हे सुद्धा पहा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.\nएकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.\nफर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.\nफर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.\nयेथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१८ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/538/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-04-23T11:22:22Z", "digest": "sha1:3FVXOYBOU6SLKW7JWY43WWTLWCF3MD4U", "length": 8249, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमालेगाव येथील सभेत अजित पवार यांचे सरकारवर टीकास्त्र\nसंघर्षयात्रेच्या मालेगाव येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी शेतकरीवर्गाला संबोधित केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, अबू आझमी, आमदार अमीत झनक, गुलाबराव गावंडे आणि विरोधी पक्षाचे अन्य सदस्य उपस्थित होते. संघर्षयात्रा सुरू झाली त्याच दिवशी सर्व वृत्तपत्रांमध्ये सरकारने दिलेल्या मोठमोठ्या जाहिराती आम्ही पाहिल्या. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र शेतकऱ्यांना मदत करता येत नाही. स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे हे बरोबर जमते पण शेतकऱ्यांना मदत करणे या सरकारला जमत नाही, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले. दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ यासारख्या अनेक संकटांमुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशी नैसर्गिक संकटं सांगून येत नसतात. सरकारने शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. उद्योजकांना सांभाळणारे आणि शेतकऱ्यांना लाथाडणारे हे सरकार आहे, असा आरोप पवार यांनी केला. शेतकरी उभा राहिला तरच हवा तरच हे राज्य टिकेल. त्यामुळे शेतकऱ्यांला दिलासा मिळावा, त्याला उठून उभं राहण्यास मदत मिळावी, म्हणून ही संघर्षयात्रा काढली गेली आहे, असे पवार म्हणाले.\nएनआयएची भूमिका संशयास्पद – नवाब मलिक ...\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) एकाच केसमधील वेगवेगळ्या आरोपींना दुय्यम वागणूक देत आहे. त्यामुळे एनआयएची भूमिका संशयास्पद वाटते. एनआयए कुठेतरी केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे असा संशय येतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून त्यांचा जामीन मंजूर केला. यावर प्रतिक्रिया देताना मलिक बोलत होते. ठ ...\nसुनिल तटकरे व अजित पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी साधला संवाद ...\nकोल्हापूर विभागीय संघटनात्मक दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.अडीच वर्षांपेक्षा जास्तीचा काळ उलटला आहे तरी सेना-भाजपच्या सरकारने ठोस असे काही निर्णय घेतले नाही किंबहुना वेळोवेळी यांनी राज्यातील जनतेविरोधात धोरणं आणली. या गोष्टींचा विरोध करण्यासाठी एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही दौरा काढला आहे. या दौऱ् ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे पार पडली. राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संपूर्ण निकालाचे विश्लेषण तसेच जिल्ह्यानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळायची असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-cool-roof-save-irrigation-water-2317", "date_download": "2018-04-23T11:55:19Z", "digest": "sha1:4WYMIS7KGL66HZV6VLF7DLNPNNKXP7FU", "length": 15418, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, cool roof save irrigation water | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफिकट रंगामुळे छताच्या थंडाव्यासोबत पाण्यात बचतही शक्य\nफिकट रंगामुळे छताच्या थंडाव्यासोबत पाण्यात बचतही शक्य\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nउष्ण कटिबंधामध्ये घराचे तापमान थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूचे विपरीत परिणाम पर्यावरणावरही होतात. याऐवजी छताचा रंग पांढरा किंवा फिकट ठेवल्यास थंड छत ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शहरी भागातील लागणाऱ्या पाण्यामध्येही बचत होण्यास मदत होत असल्याचे ‘लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी’ने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.\nउष्ण कटिबंधामध्ये घराचे तापमान थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूचे विपरीत परिणाम पर्यावरणावरही होतात. याऐवजी छताचा रंग पांढरा किंवा फिकट ठेवल्यास थंड छत ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शहरी भागातील लागणाऱ्या पाण्यामध्येही बचत होण्यास मदत होत असल्याचे ‘लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी’ने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.\nवातावरण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होतो. त्यातून हरितगृह वायूंचे प्रमाण वाढून तापमानामध्ये वाढ होत असल्याने एकूण पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरते. यावर मात करण्यासाठी लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील ऊर्जा विभागातील संशोधिका पौया वाहमनी आणि अॅण्ड्र्यू जोन्स यांनी छत थंड ठेवण्यासाठी काही प्रयोग केले. त्यांच्या परिणामांचे विश्लेषण केले. यातून घरे थंड राहण्यासोबतच बाह्य परिसरामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्येही बाष्पीभवन कमी होऊन बचत होऊ शकत असल्याचे दिसून आले. १८ कॅलिफोर्निया प्रांतामध्ये पाणीबचतीचे हे प्रमाण किमान ९ टक्क्यांपर्यंत असेल. लॉस एन्जेलिस प्रांतामध्ये एकूण ८३० लाख गॅलन पाणी प्रतिदिन वाचू शकते. त्यांच्या अभ्यासाचे हे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nसर्वत्र पांढऱ्या किंवा फिकट रंगाचा वापर केल्यास परिसरातील तापमानामध्ये १ ते दीड अंश सेल्सिअसने घट होते.\nछत थंड करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेही पाण्यामध्ये मोठी बचत होऊ शकते. विशेषतः शहरातील बागा, लॉन यांचे व्यवस्थापन कमी पाण्यामध्ये करता येते. हे प्रमाण प्रांतानुसार ४ ते ९ टक्क्या़पर्यंत राहते.\nपर्यावरण environment मात mate विभाग sections पाणी\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nileshgore.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:13:05Z", "digest": "sha1:UUUFQTNGHFJCXRGEMLY2O5QIXISHASMV", "length": 6124, "nlines": 38, "source_domain": "nileshgore.blogspot.com", "title": "गुलमोहर: \"स्वच्छ भारत अभियान\" आणि आपण", "raw_content": "\nकाही आठवणी, काही नवीन काही जुन्या.\nगुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४\n\"स्वच्छ भारत अभियान\" आणि आपण\nआज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nआपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे.\nआपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.\nआपण विदेशाती शहरांतील स्वच्छता पाहून त्याचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे आहे, हे आपण विसरतो. आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर, आपला परिसर, आपले ऑफिस स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात किती जन आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात, आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात किती जन आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात, आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात आणि स्वतः अनुकरण करतात.\nआज सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात, रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसेल. सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाकू गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतील.\nएकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळावर आपले यान पोहोचले आहे. मात्र आपली शहरे, आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत. यात बदल केला पाहिजे.\nयाची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना, आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगितले पाहिजे. साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे.\nतरच आपण आपल्या भावी पिढीला एक आरोग्यमय आयुष्य देवू शकू.\nद्वारा पोस्ट केलेले Nilesh Gore येथे ४:२५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nRohit ९ ऑक्टोबर, २०१४ रोजी २:०३ म.उ.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n\"स्वच्छ भारत अभियान\" आणि आपण\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-special-scheme-fish-farming-6167", "date_download": "2018-04-23T11:33:46Z", "digest": "sha1:ETAH2S535MSRRTSSIKXKZHOLZCHETIQT", "length": 19196, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on special scheme for fish farming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यसंवर्धन नवीन तळ्यांची निर्मिती\nमत्स्यसंवर्धन नवीन तळ्यांची निर्मिती\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nकेंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत ‘मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन’ या योजनेत २१ विविध योजना राबविल्या जातात. या धोरणांतर्गत मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेती करणारे, मत्स्योद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे. मत्स्योत्पादनवाढीच्या योजना राबविताना शाश्वत पद्धतीने, जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.\nकेंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत ‘मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन’ या योजनेत २१ विविध योजना राबविल्या जातात. या धोरणांतर्गत मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेती करणारे, मत्स्योद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे. मत्स्योत्पादनवाढीच्या योजना राबविताना शाश्वत पद्धतीने, जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.\nराज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांमुळे भूजल मत्स्योत्पादनात भरीव वाढ.\n२०१५-१६ मध्ये असलेल्या १.४४ लाख टन वरून ते सन २०१६-१७ मध्ये २ लाख टनांपर्यंत.\nगोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशात दहाव्या क्रमांक.\nभूजलाशयीन मत्स्योत्पादन वाढीला मोठा वाव आहे. भूजलाशयीन मत्स्योत्पादनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी नीलक्रांतीअंतर्गत भूजलाशयीन क्षेत्रासाठीच्या आठ योजनांतर्गत ‘ मत्स्यसंवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे’ या एका योजनेचा समावेश आहे.\nभू-जलाशयीन क्षेत्रात पाण्याचे स्रोत असलेल्या व सुयोग्य ठिकाणी मत्स्यतळ्याची निर्मिती करून मत्स्यबीजाचे साठवणूक करून मत्स्यसंवर्धनाद्वारे मत्स्योत्पादनात वाढ व मत्स्यशेती करणाऱ्यांची आर्थिक उन्नती.\nयोजनेचे निकष, अटी व शर्ती\nलाभार्थीची स्वत:ची जागा असणे आवश्यक. ना-हरकत प्रमाणपत्राची जबाबदारी लाभार्थींची असते.\nबांधकाम केल्यानंतर पाण्याची पातळी १.५ मीटर असणे आवश्यक आहे.\nकेंद्राच्या अर्थसहाय्याची मर्यादा सर्वसाधारण लाभार्थ्यास २ हेक्टरपर्यंत आणि सहकारी संस्थांसाठी २० हेक्टरपर्यंत असेल.\nकेंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या शिखर संस्था, महामंडळ व संस्था यांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करणे आवश्यक आहे.\nकेंद्र शासनाचा ५० टक्के व लाभार्थ्याचा ५० टक्के हिस्सा.\nनवीन तळी बांधकामासह त्यामध्ये पाण्याची पातळीचे नियंत्रण करणारी यंत्रणा, पाणी पुरवठ्याच्या सोयी व एरिएशन यंत्रणा, खाद्य ठेवण्याचे गोदाम आदींसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांच्या मर्यादेत केंद्र शासनाचे ५० टक्के म्हणजेच ३ लाख ५० हजार रुपये अनुदान.\nसंपर्क कार्यालयाचे नाव आणि पत्ता\nविभागस्तरीय कार्यालयाचे प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय.\nजिल्हा स्तरावर संपर्क ः संबंधित जिल्हा कार्यालयाचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय. वर्सोवा (मुंबई), वसई, सातपाडी, बडापोखरण आणि दापचरी (ठाणे), अलिबाग (रायगड), रत्नागिरी आणि मिरकरवाडा (रत्नागिरी), मालवण (सिंधुदुर्ग), मोर्शी (अमरावती), इसापूर (अमरावती) आणि ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अशी बारा उप कार्यालये आहेत.\nयोजनांच्या लाभासाठी उप कार्यालय स्तरावर संपर्क ः मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.\nराज्यस्तरावर संपर्क ः मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष रोड, चर्नीरोड, मुंबई- ४००००२, दूरध्वनी क्र. ०२२-२२८२१२३९ फॅक्स - ०२२-२२८२२३१२ इ-मेल comm_fisheries@maharashtra.gov.in\n- सचिन गाढवे, ९४०३३५६९५६\n(सहायक संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई )\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:46:18Z", "digest": "sha1:VJQ5QXS5KJAFY55LVIMHEPDKL3AZB4PC", "length": 22450, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिंदू लग्न - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिंदू लग्न हा हिंदूंचा एक संस्कार वा सोहळा आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.[१] हिंदू धर्मात विवाहास सोळा संस्कारांतील एक संस्कार मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्‍नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्‍नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व ध्रुव ताऱ्यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.\nहिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार \nसंसार रूप शकटाप्रति वाहणारी, चक्रेच दोन असती नर आणि नारी\nयायास की सहचरत्व त्या द्वयास, आहे विवाहविधी जणू एक आस ....... असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे. [२] विवाहाला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशीही नावे आहेत.पाणिग्रहण ,म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे.उपयम म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे.परिणय म्हणजे वधूचा हात हाती घेवून अग्नीला प्रदक्षिणा घालणे.उद्वाह म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते.विवाह ही केवळ कुटुंबातील महत्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे.धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.[३]\n३ टीका व आक्षेप\n५ संदर्भ आणि नोंदी\nविवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.\nलग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.\nहिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.\nया जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. *त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात. [४]\nसप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्घ्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधू-वर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. ईशान्य दिशेकडे संपणारी सप्तपदी मांडली जाते. ईशान्य ही अपराजिता दिशा मानली असल्याने वधूनेही त्या दिशेने जाण्याचा संकेत रूढ आहे.[५]\nअन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.\nसप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.\nवरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्‌वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.\nब्राह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या सहमतीने समान वर्गाचे सुयोग्य वराशी वधूचा विवाह ठरवणे, यास 'ब्राह्म विवाह' म्हणतात. सामान्यतः या विवाहानंतर वधूस सालंकृत करून पाठवले जाते. आजकालचा 'नियोजित विवाह' (स्थळे पाहून ठरवलेला विवाह) हे 'ब्राह्म विवाहा'चेच एक रूप आहे.\nदैव विवाह : कोणत्यातरी सेवाकार्यासाठी (विशेषतः धार्मिक अनुष्ठानासाठी) लागणार्‍या पैशांपोटी आपल्या कन्येचे दान देणे, यास 'दैव विवाह' म्हणतात.\nआर्ष विवाह : वधूपक्षाकडील लोकांस कन्येचे मूल्य देऊन (सामान्यतः गोदान देऊन) कन्येशी विवाह करणे, यास 'आर्ष विवाह' असे म्हणतात.\nप्राजापत्य विवाह : कन्येच्या सहमतीशिवाय तिचा विवाह अभिजात्य वर्गांतील वराशी करणे, यास 'प्राजापत्य विवाह' म्हणतात.\nगांधर्व विवाह : कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय वधू-वरांनी कोणत्याही रीतिरिवाजांशिवाय एकमेकांशी विवाह करणे, यास 'गांधर्व विवाह' म्हणतात. दुष्यंताने शकुंतलेशी 'गांधर्व विवाह' केला होता.\nआसुर विवाह : कन्येस विकत घेऊन (पैशांनी) विवाह करणे, यास 'आसुर विवाह' म्हणतात.\nराक्षस विवाह : कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीने विवाह करणे, यास 'राक्षस विवाह' म्हणतात.\nपैशाच विवाह : कन्येच्या शुद्धीत नसण्याचा (ग्लानी, गाढ निद्रा, थकवा इत्यादींचा) फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे व नंतर विवाह करणे, यास 'पैशाच विवाह' म्हणतात.\nविवाहाशी संबंध असलेले काही चमत्कारिक विधी\nकुंभ विवाह : एखाद्या मुलीला अकाली वैधव्य येणार असल्यास ते टाळण्याकरिता हा विधी करतात. विवाहाच्या आदल्या दिवशी मातीच्या कुंभात(भांड्यात) पाणी भरून त्यात सोन्याची विष्णुप्रतिमा टाकून ठेवतात. त्याला फुलांनी सुशोभित करतात. मुलीच्या भोवती दोर्‍यांची जाळी करून मुलीला लपटेतात. विष्णूचे पूजन करून नियोजित वराला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात. नंतर तो कुंभ एखाद्या नदीत फोडतात. नंतर मुलीच्या अंकावर पाणी शिंपडतात व ब्राह्मणांना भोजन घालून हा विधी पूर्ण करतात.\nअश्वत्थ विवाह : हा विधीही वैधव्ययोग टाळावा म्हणून करतात आणि तो कुंभविवाहासारखा असतो. या विधीत मातीच्या कुंभाऐवजी अश्वत्थाचे झाड आणि सोन्याची विष्णुप्रतिमा ह्यांचे पूजन करतात आणि नंतर ती प्रतिमा ब्राह्मणाला दान देतात.\nअर्कविवाह : एखाद्या मनुष्याच्या एकीपाठोपाठ दुसरी अशा दोन पत्‍नींचे निधन झाले तर तिसरीबरोबर विवाह करण्यापूर्वी तो अर्काच्या म्हणजे रुईच्या झाडाबरोबर विवाह करतो.\nब्रह्मचारी मृत झाला तर त्याच्या दहन कर्मापूर्वी त्याचा विवाह रुईच्या झाडाशी करतात अशी प्रथा आहे.[६]\nप्रचलित मान्यतांमुळे हिंदू विवाहसमारंभांमध्ये लग्नाचे धूमधडाक्यात, थाटामाटात आयोजन करण्याची रीत रुळल्यामुळे समारंभावरील खर्च ही मोठी समस्या झाल्याची टीका काही स्तरांतून होते.[७] या समस्येला उत्तर म्हणून सामुदायिक विवाह पद्धतीने समारंभ करण्याचा पर्यायही आधुनिक काळात अवलंबला जात आहे.[८]\nहिंदू विवाहातील लाजाहोम विधी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ विवाह- भारतीय संस्कृती कोश खंड आठवा\n↑ ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी ,पुणे\n↑ भारतीय संस्कृती कोश खंड आठवा\n↑ ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी,पुणे\n↑ विवाह पोथी ज्ञान प्रबोधिनी, पुणे\n↑ अंत्येष्टी पोथी ज्ञान प्रबोधिनी पुणे\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार\nगर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7149153", "date_download": "2018-04-23T11:50:42Z", "digest": "sha1:I2SUX6BNC3RD6QXY6O3RQ6LDWKPU3N6W", "length": 1709, "nlines": 27, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Semaltेटमध्ये इंटरनेट मार्केटिंग आठवड्यात - 16 नोव्हेंबर", "raw_content": "\nSemaltेटमध्ये इंटरनेट मार्केटिंग आठवड्यात - 16 नोव्हेंबर\nया ताज्या बातम्या, टिपा आणि माहिती या आठवड्यात आपण पसंत केली. वाचा आणि माहिती राहा\nइंटरनेट विपणन बातम्या :: नोव्हेंबर 16 200 9\nनवीन Google शोध Algo \"कॅफिन\" पुढील पायरी घेण्यास सेट\nGoogle AdMob विकत घेते आणि त्यानंतर Google ला आपल्या मोबाइल साइटवर क्रॉल करणे सोपे करताहेत\n यशस्वी पेड सर्च मोहीम तयार करताना सर्व दंतवैद्य सल्ला देते\nट्विटर आणि फेसबुक Xbox ला थेट नोव्हेंबर 17\nTechWyse सामाजिक मीडिया विपणन सेवांचा परिचय\nसोशल मीडिया मासिक फेरी येथे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/", "date_download": "2018-04-23T11:32:33Z", "digest": "sha1:JRCCV7M5CPEAPQFPHNVEVYVSECA7ZZFP", "length": 14284, "nlines": 197, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: December 2009", "raw_content": "\nरण - राम गोपाल वर्मा...\nप्रोमोवरुन चित्रपट मिडियाच्या आजच्या ओंगळवाण्या स्वरुपावर प्रकाशझोत टाकतो असे वाटते.\nमी तर वाट पाहत आहे याच्या रिलीजची...\nशिनुमा सोडुन माझा बेस्ट छंद म्हणजे संगीत ऐकणे. घरी भावाला सुद्धा भारी वेड, त्याला जेव्हा एक टेंपररी नौकरी लागली, त्याने पहील्या पगारात एक टेप रेकोर्डर विथ स्पीकर्स घेतला.\nतो आम्ही आमच्या खोलीत ठेवला, जी आम्ही आजी सोबत शेअर करत असु. मग काय नव्याचे वेड म्हणुन रात्री १-२ वाजे पर्यंत गाणे ऐकायचो (अर्थात सौम्य आवाजात)... पण आजीला याचा त्रास व्ह्यायचा...तिच्या सेल्फ़ भजनांना प्रतिबंध यायचा. भावाच्या दर पगारीच्या दिवशी आम्ही दोघे मेन मार्केटच्या कॅसेट सेंटर वर जाउन, लेटेस्ट कॅसेट्स घेवुन येत असु (त्यानंतरच उरलेले पैसे बाबांकडे जायचे :) ). त्याकाळी आमच्याकडे जवळपास ३५०-४०० कॅसेट्स जमल्या होत्या. माझ्या भावाला त्या कॅसेट्स त्यांच्या प्लॅस्टीक कवर सहीत जपुन ठेवण्याची आवड होती. घरी येणारे प्रत्येक मित्र त्या कॅसेट्सची तारिफ करायचे, कारण प्लॅस्टीक कवर मुळे त्यांचे पोस्टर्स चांगले दिसायचे. आता मला घर सोडुन ६ वर्ष झालीत.\nपरवा घरी असताना त्या कपाटात त्या कॅसेट्स दिसल्या..पण धुळ खात पडल्या होत्या. सीडी प्लेयर, लॅपटॉप मुळे कुणीही त्याकडे ढुंकुन पाहत नव्हते. :)\nनाहीतरी मनपसंद गाण्यासाठी वाट पहा किंवा एक बाय एक गाणे फॉरवर्ड कोण करणार... झटपट सगळं पाहीजे. त्यामुळे या कॅसेट्स मागे पडल्या...\nमी एकडे हैदराबादला आल्यावर टीवी किंवा म्युजीक प्लेयर नव्हता, मोबाइल, आईपॉड केवळ श्रीमंताकडे असायचे, थोडक्यात परवडायचे नाही. सोपा पर्याय एकच होता तो म्हणजे एफ़ एम... इथे पण गोची. फक्त एकच चॅनल, आकाशवाणी. त्यावर अठवडयातुन केवळ १-२ तासच हिंदी गाने लागायचे. बाकी पुर्ण वेळ तेलुगु. मग हळुहळू प्रायवेट चॅनल सुरु झाले.\nमग मी नोकीयाचा एफ एम फोन घेतला, ऑफ़ीसला जाताना जो वेळ बस मध्ये लागायचा त्यात खुप मोलाची साथ दिली मोबाईल आणि एफ़ एम ने. पण हळुहळु कामाचा व्याप वाढु लागला आणि सर्व सोयी असताना ( सोनीचा म्युजिक सिस्टीम आहे आता) देखिल एकायला वेळ मिळेनासा झाला....\nया सर्व आठवणी येण्याचे कारण म्हणजे खुप दिवसानंतर आज एफ़ एम ऐकलं, रेडीओ सिटी वर खुपंच मस्त गाणे चालु होते, मो. रफी पासुन जगजीत सिंग पर्यंत मनाला भिडणारे गाणे.\nअतिशय उत्तम. आज काल बहुतेक ३-४ तासच हिन्दी गाणे येतात पण त्यात जुने गाणे ऐकायला मिळणे ही पर्वणीच...\nकांचनजींनी टॅगलय... कॉलेज सोडताना स्लॅमबुक भरले होते, त्याची आठवण झाली... :)\nकाळे, पांढरे, काही लालसर, कुरळे...सर्वात महत्वाचे ते आहेत :)\nआई... अजुन काय म्हणणार...सिंपली द ग्रेट\nतापट पण खुप काळजीवाहू.\nआईच्या हातचं काहीही.. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी.\nस्वप्न पडणं बंद झालयं आज काल... (झोप येणेही)\nनारळाचे पाणी, आणि दुपारी कॉफ़ी.\nचित्रपट पाहने, संगीत ऐकने, वाचन.\nअश्यात उंचावरुन खाली पाहील्यावर भिती वाटतेय... (अश्यानी मी कुठली उंची गाठणारयं कुणास ठावुक)\nभारतातच...पण मध्ये युरोप फिरण्याची इच्छा आहे...\n(नेहेमीप्रमाणेच) चालु... चॅनल सर्फिंग चालु आहे.\nनाताळ सुट्टी मुळे ऑफीस मध्ये जास्त काम नाही, मुड मस्त आहे... आज घरी जायचयं रात्री.\nसद्ध्या नाही, पण आइ-२० घ्यायचीय...\nडिपेण्ड्स...कशासाठी विचारताय त्यावर. बहुतेक गोष्टी साठी काळा.\nआत्ताच.. दुपारचा चहा पिताना. (दोस्ताना जोक्स मित्रावर..)\nशिनुमा एके शिनुमा.. पण एकांतात\nरेल्वे स्टेशन आणि प्लॅटफार्म्स. (मी टीसी नाहीये ;-) )\nरेग्युलर कुणीही नाही, फोन वर जास्त बोलणं होते आज काल...\nहैदराबादला हवेली... नांदेडला भाग्यनगर कॉर्नर.\n सर्व ब्लॉग मित्रांनी लिहुन ठेवलयं आधिच... तरीही माझी लिस्ट..\nकांचनजी, महेंद्रजी, भाग्यश्रीजी, गौरीजी, अजय, माधुरीजी, सौरभ , विशाल ....\nकाल रात्री घरी जाण्यास खुप उशिर झाला, रात्रीचे २ वाजले, कंटाळुन निघालो आणि जाताना शहराची एका वेगळ्या द्रुष्टीने ओळख झाली.\nरात्रीच्या निरवं शांततेत, एरवी भकास दिसणारे शहर खुपचं सुंदर दिसु लागते.\nरस्ते, जे वाहनांच्या गर्दीत एरवी हरवलेले असतात त्यांचं अस्तित्व दिसु लागते, खड्डे सोडुन रस्ता देखिल आहे, आणि तो सुंदर सुद्धा दिसतो याची जाणिव होते...शांत शांत इमारती आणि गोंगाट विरहीत वातावरण नकळत मनाला गुदगुल्या करतं. थंड, प्रदुषणरहीत हवा तजेला देते.\nआणि एरवी १-२ तासाचा ट्रॅफ़ीकशी झगडत केलेला प्रवास आता केवळ २० मिनिटात संपतो.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T11:08:39Z", "digest": "sha1:2PS745HXF6RDA57OQOUKP2SNZJYVZ63M", "length": 7202, "nlines": 90, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पिस्तुलाच्या धाकाने शिवसेना नेत्याचा भावाला लुटले: भरदिवसा १४ तोळे सोने लंपास | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome इतर पिस्तुलाच्या धाकाने शिवसेना नेत्याचा भावाला लुटले: भरदिवसा १४ तोळे सोने लंपास\nपिस्तुलाच्या धाकाने शिवसेना नेत्याचा भावाला लुटले: भरदिवसा १४ तोळे सोने लंपास\nशिवसेनेचे माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांचे बंधू दिलीप वाल्हेकर यांना भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. चोरट्यांनी तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची ही घटना शनिवारी (दि.१०) दुपारी बाराच्या सुमारास वाल्हेकरवाडीत घडली.\nदिलीप धर्माजी वाल्हेकर (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप वाल्हेकर व्यावसायिक असून वाल्हेकरवाडी येथे त्यांचे कार्यालय आहे. तेथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी दिलीप वाल्हेकर यांच्या कार्यालयात घुसून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याकडील तब्बल १४ तोळे सोन्याचा ऐवज हिसकावून नेला. सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.\nपिंपरी-चिंचवडमध्ये चार बलात्काराचे गुन्हे: सांगवी परिसरात खळबळ\nवाकडमधील अडीच किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून उभारण्याचे नियोजन – नगरसेवक संदिप कस्पटे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nप्लास्टिक कॅरिबॅगसाठी मिठाई दुकानदाराला पाच हजारांचा दंड\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/pakistan-team-mates-wahab-riaz-ahmed-shehzad-involved-in-physical-fight-during-psl-191059", "date_download": "2018-04-23T11:32:53Z", "digest": "sha1:Q4FQYSPTSX53QWU54NTHFK34433BJR6U", "length": 11962, "nlines": 114, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "क्रिकेटचं मैदान, शिवीगाळ अन् धक्काबुक्की!", "raw_content": "\nक्रिकेटचं मैदान, शिवीगाळ अन् धक्काबुक्की\nक्रिकेटचं मैदान, शिवीगाळ अन् धक्काबुक्की\nBy: अधिक माहिती: ahmed shehzad PAKISTAN physical fight wahab riaz अहमद शहजाद धक्काबुक्की पाकिस्तान वहाब रियाज शिवीगाळ\nयूएईमधील पीएलएल मॅचच्या दरम्यान, दोन पाकिस्तानी क्रिकेटर्समध्ये झालेल्या धक्काबुक्की सध्या बरीच चर्चेत आहे. ही घटना पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघामध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात घडली.\nपाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी खेळणाऱ्या स्टार खेळाडू भर मैदानातच एकमेकांना भिडले.\nमॅचमध्ये ५ ओव्हरमध्ये वहाब रिहादच्या पहिल्याच बॉलवर अहमद शहजादनं एक जोरदार षटकार लगावला. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉलवर वहाब भन्नाट चेंडू टाकत अहमद शहजादला ‘क्लीन बोल्ड’ केलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आले.\nत्यांच्यात झालेलं बोलणं आणि धक्काबु्क्की टीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. दोघांमध्ये शिवीगाळही झाली.\nदोघांमध्ये झालेली शिवागाळ आणि धक्काबुक्कीनंतर टीम मधील खेळाडूंनी तात्काळ मध्यस्ती करीत दोघांना बाजूला केलं. अहमद शहजादनं 17 चेंडूत 21 धावा केल्या. हा सामना रियाज वहाबचा संघ टीम पेशावर जल्मीनं जिंकला.\nया प्रकरणानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं दोघांना मोठा दंड सुनावला असू दोघांना चांगलंच सुनावलं आहे.\nमॅच रेफरी रोशन महानामा यांनी शहजादच्य मॅच फीमधील 30 टक्के रक्कम आणि वहाबच्या मॅच फीमधील 40 टक्के कापली आहे.\nअधिक माहिती: ahmed shehzad PAKISTAN physical fight wahab riaz अहमद शहजाद धक्काबुक्की पाकिस्तान वहाब रियाज शिवीगाळ\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nबीसीसीआई को तय करना है भारत-पाक सीरीज: पीसीबी प्रमुख\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/cultural/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:27:54Z", "digest": "sha1:NMU2DI7QBCMZWBKVIP7W3FYSAIADMBZI", "length": 18346, "nlines": 153, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "अक्षय तृतीया | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome सांस्कृतिक अक्षय तृतीया\nमा. संपादक / मुख्य वार्ताहर,\n२१ मे – अक्षय तृतीया\nप्रस्तावना : साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला तीलतर्पण करणे, ब्राह्मणांना उदककुंभदान करणे, मृतिका पूजन करणे तसेच दान देण्याचा प्रघात आहे. या प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र दडलेले असून त्याबाबत धर्मग्रंथात सांगितलेल्या या सणाची महती जाणून घेऊया.\nअ. अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं \n तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव \nअर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.\nआ. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला सुरुवात झाली. या दिवसाने एका कलहकालाचा अंत अन् दुसNया युगाच्या सत्ययुगाची सुरुवात, अशी संधी साधलेली असल्यामुळे त्या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त फक्त एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ तासापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच अक्षय्य तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त’ मानले जाते.\nइ. अक्षय्य तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय्य तृतीया तिथीचे महत्त्व लक्षात येते.\n२. सण साजरा करण्याची पद्धत\nकालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे अन् ते जमत नसेल तर निदान तीलतर्पण तरी करावे.’\nअ. या दिवशी देव अन् पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदकवुंâभाचे दान करावे\nतीलतर्पण म्हणजे देवता अन् पूर्वज यांना तीळ आणि जल अर्पण करणे. तीळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.\n२. तीलतर्पण कोणाला करायचे \n१. पद्धत : प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्वीक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येणाचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.\n१. महत्त्व : अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्र्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गति मिळण्यासाठी तीलतर्पण करायचे असते.\n२. पद्धत : दुसर्या ताटलीमध्ये आपल्याला पूर्वजांना आवाहन करायचे असते. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत अन् आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्वीक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गति देण्यासाठी प्रार्थना करावी.\nइ. अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व\nअक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून खूप पुण्य मिळते. खूप पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप कमी होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्त होऊ शकते.\nई. मृतिका पूजन :\n१. महत्त्व : सदोदित कृपादृष्टी ठेवणार्या मृतिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्त होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस.\n२. मातीत आळी घालणे व पेरणी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत अन् त्या आळ्यांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते आणि कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वतःला आणि इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)\nउ. वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.\nऊ. हळदीकुंकू : स्त्रीयांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. त्यांना चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.’\nसंदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ www.sanatan.org\nस्थानिक संपर्क : ९३२४८६८९०६\nजय जय रघुवीर समर्थ – दासबोध\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/11/07/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%82/", "date_download": "2018-04-23T11:22:06Z", "digest": "sha1:GJNPUJ5WYGZPA73F5XJNA7WMUBO3HZ5N", "length": 16481, "nlines": 206, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "खोटं | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nएकदा सोनिया आणि मनमोहन भांडत असतात…\nदिग्विजय : काय झालं भांडायला\nसोनिया : अरे आम्हाला १००० रुपये सापडलेत..पण जो सर्वात मोठं खोटं बोलेल त्याला ते देणार..अशी शर्यत होती..\n(सोनिया पुढे काही बोलणार एवढ्यात दिग्विजय मध्ये बोलला..)\nदिग्विजय – अरे तुम्ही खोटं बोलता.. मी आतापर्येंत कधीच खोटं बोललो नाही..जिभेवर ताबा आहे माझा.\nसोनिया आणि मनमोहन ने नमतं घेऊन दिग्विजयला १००० रुपये देऊन टाकले..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/02/blog-post_27.html", "date_download": "2018-04-23T11:30:46Z", "digest": "sha1:25ANHGEIMRVCE5MLAJ3XCE4X7Q57RIDC", "length": 5960, "nlines": 103, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: रोड, मुवी", "raw_content": "\nअभय देओलचा ’रोड, मुवी’ येतोय, टोरंटो फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवला गेलेला हा चित्रपट चांगला असणार यात शंकाच नाही...\nसर जो तेरा चकराये......\nनक्कीच चांगला चित्रपट असेल\nफक्त टोरंटो फेस्टिवलच नाही तर अनेक इतर फेस्टिवलमध्ये सुद्धा गौरवला गेला आहे, अभय देओलचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट मला खुप आवडले, हा खास असणार यात काहीच शंका नाही..\nहो मलाही पाहायचा आहे हा सिनेमा...त्यादिवशी पहिल्यांदा ट्रेलर बघितल तेव्हाच वाटल पिक्चर हटके असणार...मलाही अभय देओलचे चित्रपट आवडतात.जास्त बजेट,रंगरंगोटी,नाहक स्टार्सची भरणा नसते त्यात...देव डी ला मिळालेल्या ५ फ़िल्मफ़ेअर पुरस्कारांचा देखील फ़ायदा होइल या सिनेमाला...\nधन्यवाद देवेंद्र. देव डी च्या पुरस्कारांचा ह्याला फायदा कसा होइल हे नाही कळाले, असो, चित्रपट चांगला असणार यात तर शंकाच नाही...\nआपल्यासारखा एक प्रेक्षकवर्ग आहे अभय देओलच्या चित्रपटांना पण काही लोक आहेत जी त्याच्या चित्रपटांना नाव ठेवत मुख्य प्रवाहातील मानतच नाही.ती लोक या पुरस्कारानंतर कदाचीत अभयच्या सिनेमाकडे वळु शकतील...तुम्ही आधीही चांगल काम करत असता आणी नंतरही पण असा पुरस्कार वैगेरे मिळाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधुन घेता दुसर काही नाही..माझ्या मनात जे विचार आले ते लिहले आहेत...\nह्म्म.. असेल कदाचित.. पुरस्कार मिळुन देखिल ’देव डी’ कितीजणांना पचु शकतो यात शंका आहेच... :)\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nबजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/03/blog-post_27.html", "date_download": "2018-04-23T11:38:29Z", "digest": "sha1:WE6KWZH2CPL7WJGJZFLAMNXXRKNYMC7H", "length": 9176, "nlines": 168, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): कल्हईवाला", "raw_content": "\nकाय म्हणे तर तिचा एकदा नकार आला\nबेघर दु:खाला मोठा आसरा मिळाला\nकायम झटलो ज्यांच्यासाठी, तेही फसले\nम्हणून गेले जाताना, \"नौटंकी साला\nसौंदर्याची व्याख्या त्यांना पटली नाही\nत्यांना ठाउक होती केवळ 'ती' मधुबाला\nखरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या\nहळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला\nमर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे\n नावच नाही या नात्याला\nकौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली\nओळखही आवश्यक नसते हव्यासाला\nमी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी\nयेइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला\n- नचिकेत जोशी (२६/३/२०१२)\nव्वा व्वा .... निव्वळ अप्रतिम \nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nखांदेरी-उंदेरी: सार्थकी लागलेला एक रविवार\nगजलोत्सव २०१२ (काही प्रकाशचित्रे)\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:26:10Z", "digest": "sha1:LTLXKR65IORCSCXRQV5KV2KUZ42PKZEG", "length": 4757, "nlines": 99, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: नटरंग आणि झेंडा", "raw_content": "\nनटरंग आणि झेंडा, जानेवारीत प्रदर्शीत होणार्या या दोन्ही चित्रपटाचे संगीत हा मुख्य बलस्थान आहे.\nकाल लोकल मध्ये येताना नटरंग चे टाइटल गाणे ऐकले, अजय-अतुल चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.\nत्यानंतर ’खेळ मांडीला’ हे ऐकले, खुप सुंदर...\nझेंडा मधील, ’झेंडा कुणाचा घेवु’ एकदम मस्त आहे...त्यानंतर शेतकर्याची शोकांतिका ’पत्रास कारण की...’ ऐकुन भर प्लॅटफॉर्मवरच रडु कोसळले.\nपत्रास कारण की हे गाणं खरंच सॅड आहे, वाईट वाटतं ए॑कून. त्यापेक्षा गोष्ट छोटी डोंगराएवढी मधलं \"मातीच्या लेकराचं,,,\" हे कधीतरी ए॑क\nजमलंच तर यू ट्यूब वर सिनेमा आहे पुर्ण, नक्की बघ, दोन दिवस झोप येणार नाही\nह्म्म... पाहायचाय तो सिनेमा बर्याच दिवसांपासुन..\nबघु कधी वेळ मिळतो ते...\nअजयला अनुमोदन...मातीच्या लेकराचं आणि एकंदरित गोष्ट छोटी इतकं अस्वस्थ करतो..चित्रपटावर लिहिणं हा माझा प्रांत नाही तरी मी ब्लॉगवर पण लिहिलं होतं....\nह्म्म.. माझा हा चित्रपट पहायचा योग अजुन आला नाही..\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nबंद, तोड्फोड आणि सामान्य माणुस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/government-scheme", "date_download": "2018-04-23T11:18:37Z", "digest": "sha1:LCHQCNSXJ27KNJWXMWFERFDE4WXPFBVX", "length": 5674, "nlines": 106, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "शासकीय योजना | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nकेवळ ३४२ रुपयांमध्ये मिळणार चार लाखांचा विमा\nकेवळ ३४२ रुपयांमध्ये मिळणार चार लाखांचा विमा… नागरिकांनी घ्यावा लाभ… सर्व राष्ट्रीय बँकेमध्ये सेवा… प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा दोन लाखांचा, तर प्रधानमंत्री सुरक...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/10/blog-post_10.html", "date_download": "2018-04-23T11:38:41Z", "digest": "sha1:5V5OVMJ3EC4SHHJOORWGYLALZNKGTG4M", "length": 22415, "nlines": 180, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): किल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत", "raw_content": "\nकिल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत\nसप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर समोर अंजनेरी किल्ला अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते. चार-पाच दिवस जाता-येता, चालता-चालता रोज डोळ्यासमोर असणारा अंजनेरी चक्क हात पसरून बोलावतोय असं वाटायला लागलं आणि शनिवार, अनंत चतुर्दशी च्या सुमुहुर्तावर अंजनेरीची भेट पक्की केली. सोबत कोणी येईल का याची तपासणी केली आणि 'हा माझा मार्ग एकला' या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो.\nनाशिकहून सकाळी सहा वाजता निघालो. त्र्यंबकेश्वर मार्गावर असणार्‍या अंजनेरीपर्यंत पोचणे अगदी सोपे आहे. सीबीएस (ठक्कर)हून सतत एसटी मिळतात. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. हनुमानाचा जन्म याच गडावरचा. अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले असावे. वनवासामध्ये रामचंद्रांनी बराचसा काळ पंचवटी परिसरात घालवला असल्यामुळे नाशिकच्या आसपास अनेक रामायणकालीन स्थळे आहेत. खुद्द अंजनेरी गावातही पुराणकालीन अनेक उद्ध्वस्त मंदिरे आहेत.\nअंजनेरीला जाण्यासाठी सर्वात योग्य ऋतू म्हणजे पावसाळा. मुळात हा गड सोपा असल्यामुळे पावसाळ्यातही जाता येऊ शकते. सोबतीला धबधबे असतातच. अंजनेरी गडापर्यंत पोहोचण्याचे साधारण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथून पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. तिथून तिसर्‍या टप्प्यात गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एकूण भटकंती सोपीच आहे.\nअंजनेरी गावात उतरलो, तेव्हा पावणेसात वाजले होते. अंजनेरी करून बारा पर्यंत खाली उतरायचे ठरवले होते. नंतर वेळ आणि ताकद असेल तर ब्रह्मगिरीही करून यावा असा प्लॅन होता. गावात शिरताना हे मंदिर लागले. अनायासे शनिवार होताच, त्यामुळे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पुढे निघालो.\nमी गाडीरस्त्याने न जाता गावामागून जाणारी पायवाट पकडली. समोर अंजनेरीची रांग सकाळच्या उन्हात चमकत होती.\nअंजनेरी किल्ल्याची वाट दक्षिणोत्तर असल्यामुळे या वाटेवर सकाळी पूर्ण वेळ सूर्य असतो. त्यामुळे सकाळी लवकर सुरूवात करणे केव्हाही श्रेयस्कर अंजनेरीच्या रांगेत अलिकडे नवरा नवरीचे सुळके दिसतात. सह्याद्रीचं हे एक बरं आहे. कुठल्याही डोंगररांगेवर आजूबाजूला दोन सुळके दिसले, की नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा 'नवरा-नवरी' म्हणून मोकळं व्हायचं. संख्येने जास्त असले तर उरलेल्यांना 'वर्‍हाडाचे सुळके' म्हणायचं (काही अपवाद सोडून अंजनेरीच्या रांगेत अलिकडे नवरा नवरीचे सुळके दिसतात. सह्याद्रीचं हे एक बरं आहे. कुठल्याही डोंगररांगेवर आजूबाजूला दोन सुळके दिसले, की नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा 'नवरा-नवरी' म्हणून मोकळं व्हायचं. संख्येने जास्त असले तर उरलेल्यांना 'वर्‍हाडाचे सुळके' म्हणायचं (काही अपवाद सोडून). तात्पर्य, हे दोन सुंदर सुळके लक्ष वेधून घेतात. त्यापैकी उजव्या सुळक्यावरील मंदिरापर्यंत जाता येते. फक्त मागच्या बाजूने कातळवाट आहे, असे एका गावकर्‍याकडून समजले.\nएका सपाटीवर गाडीरस्ता पायवाटेला येऊन मिळतो. उजव्या कोपर्‍यात अंजनेरी गाव.\nत्या सपाटीवरून थोडं चाललं की आपण पायर्‍यांपाशी येऊन पोचतो.\nपायर्‍यांवरून घेतलेले काही फोटो - अंजनेरी गावाशेजारचे धरण\nअजून थोडा झूम करून\nपायर्‍या एका कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचतात. अंजनेरीच्या वाटेवरचा सर्वात थ्रिलींगचा पॅच जर कुठला असलाच तर तो हा आहे.\nकड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो.\nत्या घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेले श्रीमारूतीराय दिसतात.\nतिथून पुन्हा पायर्‍या सुरू होतात ते पहिल्या पठारापर्यंत\nवाटेत डाव्या बाजूला कातळात दोन गुहा आहेत. तिथे मुक्काम करता येऊ शकतो.\nत्या पायर्‍या संपल्या की आपण येऊन पोचतो ते एका पठारावर. इथपर्यंत अर्धं अंतर पार झालेलं असतं.\nया पठारावर अंजनी मातेचं एक मंदिर आहे.\nमंदिराजवळच एक मोठा तलाव आहे.\nत्याच्या शेजारुन दोन वाटा फुटतात. त्यापैकी पायर्‍यांची वाट माथ्याकडे जाते आणि डावीकडची पायवाट सीतेच्या आश्रमाकडे जाते. ऊन्ह वाढायच्या आत वर जाऊन येऊ असं ठरवून मी आधी पायर्‍या पकडल्या. पायर्‍यांच्या वाटेवर मध्येच एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर 'हनुमान जन्मस्थान' अशा अर्थाची पाटी आहे. कड्याच्या पोटात एक गुहा, गुहेच्या बाहेर झाडावर घंटा, गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती\nपायर्‍या संपवून पठार पूर्ण चालून आपण अखेरीस हनुमान मंदिरापाशी येऊन पोचतो. हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.\nअंजनी माता आणि वानरमुखी हनुमान यांच्या मूर्ती आणि पुढ्यात शिळा आहेत.\nमंदिरात एक गावकरी भेटला. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी वास्तव्यास असताना खोदलेली पाण्याची कुंडे इथून जवळच आहेत अशी माहिती त्याने दिली. (नवनाथांच्या पोथीमध्येही याचा उल्लेख आहे, म्हणे) कमी अधिक खोलीची एकूण अकरा कुंडे आहेत. काही काही बर्‍यापैकी खोलही आहेत असे वरून डोकावल्यावरही जाणवते.\nअंजनेरीच्या पश्चिम कड्यावरून दिसणारा ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर गाव\nआपण ज्या वाटेने चढून येतो ते पठार -\nभटक्यांच्या 'visual डिक्शनरी'त एकावर एक रचून ठेवलेले दगड हे वाट चुकू नये म्हणून केलेल्या खुणेचे असतात. अंजनेरी माथ्यावर अशा अनेक दगडांचे अनेक मनोरे दिसतात. यांचा अर्थ वेगळाच आहे.\nदेवाला नवस बोलल्यावर हे उभे केले जातात. याचा देवासाठी मतितार्थ असा की 'नैसर्गिक क्रियेमुळे (वारा, पाऊस इत्यादी) हे एकावर एक ठेवलेले दगड कोसळायच्या आत मनातील इच्छा पूर्ण कर'\nमाथ्यावरून पठाराचा आणखी एक फोटो -\nया फोटोतल्या वरचा जलाशय हे पठारावरील तळं, तर खालचा पाणीसाठा हा अंजनेरीशेजारचा धरणाचा जलाशय दोन जलाशयांमध्ये हजार फूट खोली आहे, एवढाच काय तो फरक\nपायर्‍या उतरून पठारावर आलो आणि सीतेच्या आश्रमाकडे निघालो. या गुहेमध्ये अंजनी आणि सीतामाईची भेट झाली असे सांगतात.\nही मंदिरे पाहिल्यावर मला लगेच आजोबा डोंगरकुशीतल्या वाल्मिकी आश्रमाची आठवण झाली.\nआधी पठार, मग पायर्‍या मग पायवाट उतरून गावात आलो तेव्हा फक्त साडे अकरा झाले होते. बर्‍याच दिवसांनी भटकायला मिळाले होते. एकट्याने केलेली ही बहुधा पहिलीच अपरिचित किल्ल्याची भटकंती short but sweet नाशिक प्रांतातल्या या पहिल्यावाहिल्या किल्ल्यांनंतर हा सिलसिला सुरू होवो ही सह्याद्रीबाबाकडे प्रार्थना\n(अवांतरः अंजनेरीसारख्या डोंगराला रामायणामध्ये जर पर्वत म्हणत असतील, तर अजून तीन चारशे वर्षांनी सह्याद्रीमध्ये 'रायपर्वत', 'राजपर्वत', 'सिंहपर्वत' अशी नामे प्रचलित व्हायला हरकत नाही, असा विचार माझ्या मनात येऊन गेला, एवढंच\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nकिल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=400&Itemid=591&limitstart=3", "date_download": "2018-04-23T11:38:30Z", "digest": "sha1:TPCXHLH3GN5IO6B7N3ETUOIJ64C2LYIE", "length": 3494, "nlines": 47, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रवेश पहिला", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nराघू - नको, तुमची मदत नको. तुमच्या वडिलांनी हजारों कुळांना बुडवलं \nनारायण - पण मी तसा नाहीं, मला तुझ्या भाऊ समज \nराघू - तुमचे वडील कोण आहेत हें मी जाणतो \nपांडू - राघू, असं बोलूं नये. नीज, गप्प पडून रहा; त्यांनी आपल्याला आयत्या वेळी पैसे दिले, गरज भागली; आणि कांही असलं तरी मुलाला बोलून काय उपयोग \nनारायण - पांडया, माझ्या वडिलांची सर्वत्र होणारी बदनामी माझ्या ह्रदयाचं पाणी करते हो. माझे ते बाबा आहेत. पण त्याला मी काय करूं पांडया, राघूला औषध काय दिलं होतं \nपांडू - देवीचा अंगारा हेंच आमचं औषध \nनारायण - पांडू, मी दुपारी डॉक्टरला घेऊन येईन त्याला तहान लागली तर या बाटलींतील पाणी द्या. मी ही दुसरीं बाटली आणली आहे, त्यांतील थोडं पाणी एका भांडयात ओतून व त्यांत वाटीभर दुसरं पाणी घालून त्याची पट्टी त्याच्या कपाळावर ठेवा. थांबा, नाहींतर मीच पट्टी करून कपाळावर ठेवतों. (तसें करतो.) जाऊं मी \nपांडू - तुमचे किती उपकार \nनारायण - उपकार वगैरे कांहीं नाहीं; हा माझा आनंद आहे. जातों अं \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.onkardanke.com/2017/11/blog-post_11.html", "date_download": "2018-04-23T11:24:46Z", "digest": "sha1:Q6J5BCC6LRVAVY5PYVSDG4645NDAFBKZ", "length": 33656, "nlines": 151, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: टिपू सुलतानचं सत्य", "raw_content": "\nधर्मांधता आणि क्रूरतेच्या बाबतीमध्ये औरंगजेब हा सर्वात वरच्या दर्जाचा मुगल शासक मानला जातो. 50 वर्षांच्या राजवटीमध्ये औरंगजेबनं हिंदूंच्या जीवनपद्धती आणि परंपरेवर हल्ला केला. त्यांची देवस्थानं नष्ट केली. वेगवेगळे अन्यायकारक कर लावून त्यांना जगणं असह्य केलं. अनेकांचं बळजबरीनं धर्मांतर केलं. उत्तर भारतामधला बहुसंख्य भाग हा औरंगजेबाच्या टाचेखाली होता. सध्याच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरयाणा या राज्यातली हिंदूंनी पाच दशकं औरंगजेबाचा अन्याय सहन केला.\nऔरंगजेबाचा हा वारसा दक्षिण भारतामध्ये टिपू सुलतान यानं चालवला.होय टिपू सुलतान. 'म्हैसूरचा वाघ' अशी ज्याची ओळख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केली जाते.ब्रिटीशांच्या विरोधात लढणारा थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून डाव्या विचारवंतांना जो प्रात:स्मरणीय आहे असा कर्नाटकतला मुस्लीम राजा टिपू सुलतान. 7 डिसेंबर 1782 ते 4 मे 1799 अशी साडेसोळा वर्ष टीपूनं राज्य केलं. सध्याच्या कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ अशा तीन राज्यांमध्ये त्याची राजवट होती. केवळ हिंदूचा नाही तर ख्रिश्चनांवरही टिपूनं साडेसोळा वर्षांच्या राजवटीमध्ये सर्वप्रकारे छळ केला.\nब्रिटीश इतिहासकार लेविस राईस यांनी 'द हिस्ट्री ऑफ म्हैसूर अॅण्ड कूर्ग' या पुस्तकामध्ये लिहलंय, ''टिपू सुलतानच्या राजवटीच्या शेवटच्या कालखंडामध्ये श्रीरंगपट्टणमधल्या फक्त दोन मंदिरामध्ये रोजची पुजा होत असे. ही मंदिरं देखील टिपूची खुशमस्करी करणाऱ्या ज्योतिषांच्या ताब्यात होती. त्यामुळे आपल्या खुशमस्कऱ्यांना खिरापत म्हणून टिपूनं या दोन मंदिरांना धक्का लावला नाही. टिपूनं अन्य सर्व मंदिरांची वेगवेगळे कर लावून जप्ती केली होती.\nसमानता आणि सुधारणावादी तत्वांची टिपू जपणूक करत होता.टिपूचं म्हैसूर राज्य हे याच तत्वांवर आधारित आहे, अशी मांडणी अनेक पुरोगामी इतिहासकारांनी केलीय. पण म्हैेसूरचेच असलेले एम.एच. गोपाळ राव यांनी याबाबत काय म्हंटलंय हे पाहणं महत्वाचं आहे, आपल्या एका लेखात गोपाळ राव लिहतात ''टिपू सुलतानच्या राज्यातली करपद्धती ही धार्मिक असमानतेवर अधारित होती. आपले सहधर्मी असलेल्या मुसलमानांना गृह कर, व्यापारी कर तसंच घरातील मौल्यवास्तूंवरील कर माफ होते. ज्यांनी धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्विकारला आहे अशा कुटुंबांनाही ही सवलत होती. इतकंच नाही तर धर्मांतरीत कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही टिपू सुलतानकडून केला जात असे. सर्व सरकारी पदांवरुन त्यांनी हिंदूंची हकालपट्टी केली होती. टिपूचा पंतप्रधान पुर्णेया हा एकमेव हिंदू अधिकारी टिपूच्या राजवटीमध्ये होता. टिपूनं आपल्या या स्वामिनिष्ठ चाकरला शेवटपर्यंत अंतर दिलं नाही.''\nम्हैसूर राज्याची भाषा ही पार्शियन करण्याचा प्रयत्न टिपू सुलताननं केला. आपल्या राज्यातल्या अनेक गावांची नावंही त्यानं बदलली होती. म्हैसूरचं नझाराबाद, मंगळूरचं जलालाबाद, कनवपुरमचं खुशानाबाद, दिंडूगुलंचं खलीकाबाद आणि कालिकतचं इस्लामाबाद असं टिपूनं नामकरण केलं होतं. टिपूच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी पुन्हा एकदा एक होत ही सारी नावं बदलली.\nकुर्ग, बिदनूर आणि मंगळूर या कर्नाटकातल्या तीन शहरांमध्ये टिपू सुलतानं आपल्या धर्मवेडातून अक्षरश: रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. 1788 साली टिपूनं कुर्गवर हल्ला केला होता. या हल्ल्याचं वर्णन टिपूचे दरबारी आणि आत्मचरित्रकार मीर हुसेन किरमानी यांनी केलंय. ''या हल्ल्यात 'कुशालपुरा, ( सध्याचं कुशालनगर ), तलकावेरी आणि मडकेरी ही गावं जाळून टाकली होती.'' असं किरमानी लिहतात. टिपू सुलताननं कर्नुलच्या नवाबाला लिहलेल्या पत्रामध्येही कुर्ग राज्यातल्या 40 हजार हिंदूंचं धर्मांतर केलं किंवा त्यांना बंदी बनवलं असा उल्लेख आहे. टिपू इतक्यावरच थांबला नाही तर त्यानं कुर्गच्या राजकन्येचं अपहरणही केलं होतं. तसंच तिच्याशी बळजबरीनं लग्न करुन तिला त्यानं मुसलमान बनवलं. ब्रिटीशांविरुद्धच्या शेवटच्या लढाईत टिपू मारला गेला त्यावेळी देखील कुर्गमध्ये सुमारे एक हजार जण श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यामध्ये बंदी होते. टिपूच्या मृत्यूनंतर हे सर्वजण श्रीरंगपट्टणममधून कुर्गला परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला.\nउत्तर कर्नाटकातल्या बिदनूरमध्येही टिपूनं रक्ताचे पाट वाहिले अशी इतिहासामध्ये नोंद आहे.टिपूच्या सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी बिदनूरमधल्या अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मंगलोरवर स्वारी केल्यानंतर टिपूनं ख्रिश्चनांना लक्ष्य केलं. त्या भागातली चर्च पाडली. तसंच त्यांना सक्तीनं मुसलमान केलं. ब्रिटीशांचं दक्षिण भारतामध्ये वर्चस्व स्थापन होण्यापूर्वी मंगलोरवर अनेक वर्ष पोर्तुगिजांचं राज्य होतं. त्यांनी या भागातल्या मुसलमानांना ख्रिश्चन केलं होतं. या धर्मांतराची शिक्षा टिपूनं दिली. तसंच ख्रिश्चन असलेल्या ब्रिटीश राजवटीच्या विरोधात एकाच धर्मसमुहाचा म्हणजेच मुसलमानांचा समाज अधिक प्रखर झुंज देऊ शकेल असा टिपूचा युक्तीवाद होता.\nकर्नाटकच नाही तर केरळमध्ये टिपूनं आपल्या धर्मवेडानं रक्ताचे पाट वाहिले आहेत. केरळमधल्या मलबार भागाला टिपूचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या काळात मलबारमध्ये असलेले पोर्तुगीज मिशनरी Fr Bartholomew यांनी टिपूच्या अन्यायाचं वर्णन केलंय. ते लिहतात, \" सुरवातीला 30 हजार रानटी माणसांनी आमच्यावर हल्ला केला. समोर दिसेल त्याला ठार मारणे किंवा त्याचं धर्मांतर करुन त्यांना मुसलमान बनवणे हाच त्यांचा हेतू होता. त्यानंतर हत्तीवर बसलेल्या टिपू सुलतानची स्वारी राज्यात दाखल झाली. त्याच्यासोबतही आणखी 30 हजार सैन्य होतं. कालिकतमधल्या अनेक स्त्री-पुरुषांना त्यांनी फाशी दिली. बायकांच्या गुडघ्याला त्यांची लहान मुलं बांधून त्यांना मारुन टाकण्यात आलं. अनेक हिंदू आणि ख्रिश्चनांना नागडं करुन त्यांना हत्तीच्या पायाला बांधण्यात आलं. हत्तीच्या पायाखाली त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले. त्यांचं सक्तीनं धर्मांतर करण्यात आलं. मुसलमानांशी लग्न लावून देण्यात आली. टिपूच्या सैन्यानं मी राहत असलेल्या गावावरही हल्ला केला होता. पण मी अनेक गावकऱ्यांसह बोटीतून नदी ओलांडली आणि माझा जीव वाचवला.\"\nकेरळमधल्या थळी, थिरुवन्नूर, वरक्कल, पुत्तूर, गोविंदपूरम या सारख्या अनेक गावांमधली मंदिरं टिपूनं जमिनदोस्त केली होती. 1792 च्या युद्धात टिपू पराभूत झाला. त्यानंतर श्रीरंगपट्टणममध्ये झालेल्या तहानंतर त्याची शक्ती क्षीण झाली. याच काळामध्ये या मंदिरांची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आली. गुरुवायूर हे केरळमधलं महत्वाचं मंदिर टिपूच्या हल्ल्यातून बचावलं याचं श्रेय काही अंशी हैदरोस कुट्टी यांना जातं. हैदर अलीच्या राजवटीमध्ये धर्मांतरण केलेल्या कुट्टी यांनी संपत्ती कराच्या बदल्यात गुरुवायूरच्या मंदिराचं रक्षण केलं. तसंच टिपूच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी गुरुवायूर मधली मुख्य मुर्ती ही त्रावणकोर राज्यामध्ये नेऊन ठेवली होती. टिपूची दहशत संपल्यानंतरच ही मुर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आली असंही मानलं जातं.\nटिपू सुलताननं श्रृंगेरी मठाला मदत केली. उलट मराठ्यांनी 1791 साली या मठाची नासधूस केली होती. शंकराचार्यांच्या मठाला देणगी देणारा टिपू कसा धर्मनिरपेक्ष आहे. याचं वर्णन टिपूचं समर्थन करणारे मार्क्सवादी विचारवंत हमखास करत आले आहेत. ज्येष्ठ इतिहास लेखक श्री उदय कुलकर्णी यांनी आपल्या एका लेखात एप्रिल 1791 मध्ये श्रृंगेरी मठामध्ये जे घडलं ते सविस्तर लिहलंय. हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. 1790-92 या काळामध्ये मराठा सरदार टिपूच्या विरोधातल्या मोहिमेसाठी दक्षिणेत होते. त्यावेळी श्रृंगेरी मठावर मराठ्यांच्या कोणत्या प्रमुख सरदारांनी हल्ला केला नाही. तर पिंडारी या मराठा सैन्यातल्या एका गटानं हल्ला केला होता. पिंडारी हे मराठा सैन्यातले नियमित घटक नव्हते. त्यांच्यावर मराठा सरदारांचं थेट नियंत्रण नव्हतं. मराठा सैन्यानं दक्षिणेतल्या मोहिमांमध्ये जी वसूली केली त्यामध्ये पुरेसा हिस्सा न मिळाल्यानं पिंडारींचा गट नाराज होता. याच नाराजीतून संपत्तीची लूट करण्यासाठी श्रृंगेरी मठावर हा हल्ला झाला होता. अर्थात या हल्ल्याची दखल पेशव्यांनी गांभिर्यानं घेतली होती. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या मोहिमेतले प्रमुख सरदार परशूरामभाऊ पटवर्धन तसंच अन्य मातब्बर मंडळींची याबाबत पेशव्यांनी कानउघाडणी केली. त्यानंतर वर्षभरानंतर मराठा सरदारांनी श्रृंगेरी मठाला भेट देऊन शंकराचार्यांची माफी मागितली. तसंच त्यांना नुकसानभरपाई देखील दिली होती.\nभगवा जरीपटका घेऊन अटकेपार मजल मारणारे, शिवाजी महाराजांचे संस्कार सांगणारे, औरंगजेबाच्या छळाची पर्वा न करता हिंदू धर्म न सोडणाऱ्या संभाजी महाराजांचा वारसा अभिमानानं मिरवणारे मराठा सरदार श्रृंगेरी मठाची जाणीवपूर्वक नासधुस करतील यावर विश्वास ठेवणारे लोकं हे केवळ मार्क्सवादी इतिहासाकारांच्या लेखनाची पोथिनिष्ठ पारायणं करणारी मंडळीच असू शकतात. याचबरोबर 1792 नंतरच्या काळात टिपूनं श्रृंगेरी मठाबद्दलचं आपलं धोरण जाणीवपूर्वक बदललं होतं. मराठ्यांच्या एका टोळीनं हल्ला केल्यानं प्रक्षृब्ध झालेल्या शंकराचार्यांचे आशिर्वाद आपल्या राजवटीला मिळावे हा यामगील टिपूचा शुद्ध राजकीय हेतू होता. तसंच 1792 नंतर टिपूचा उतरता काळ सुरु झाला होता. प्रबळ आणि शिस्तबद्ध इंग्रजी फौजेच्या विरोधात आपला जीव वाचवण्यासाठी हिंदू धर्मातल्या काही मंडळींशी जुळवून घेऊन आपलं प्रतिमा संवर्धन करण्याचा प्रयत्न या काळामध्ये टिपूनं केला. श्रृंगेरीतल्या शंकराचार्यांच्या मठाला टिपूनं दिलेली मदत ही याच कारणामुळे निव्वळ राजकारणाचा भाग म्हणून केली मदत होती.\nटिपू सुलतान हा ब्रिटीशांच्या विरोधात लढला म्हणून त्याला स्वातंत्र्यसेनानी म्हणून घोषित करणारी मंडळी टिपूनं फ्रेंच सम्राट नेपोलियनला भारतामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. याकडं दुर्लक्ष करतात. टिपूला हा देश इंग्रजांपासून मुक्त करायचा नव्हता. तर आपलं राज्य इंग्रजांपासून सुरक्षित ठेवायचं होतं. आपल्या राज्याच्या बदल्यात या देशाचा घास दुसरे साम्राज्यवादी असलेल्या फ्रेंचांच्या घशात भरवण्याची टिपूची आनंदानं तयारी होती.\nधर्मांध टिपूच्या अत्याचारानं इतिहासाची पानं भरलेली असतानाही टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला. मुस्लिम समाजाच्या विकासाकडं लक्ष देण्याच्या ऐवजी काही तरी निरर्थक मुद्दे घेऊन आपली व्होट बँक मजबूत करणे हा काँग्रेसच्या निवडणूक यशाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळेच कुणीही फारशी मागणी केलेली नसतानाही कर्नाटक सरकारनं टिपू जयंती सरकारी पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकच्या जनतेची दोन गटांमध्ये विभागणी केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक गिरीश कर्नाड यांनीही टिपूच्या गौरवाचं 'सोनेरी पान' वारंवार कर्नाटकच्या जनतेपुढे मांडलं आहे. विजयनगर साम्राज्यातला कर्तबागार राजा आणि बंगळुरु शहराचा निर्माता केम्पेगौडा यांच्यापेक्षाही टिपू सुलतान त्यांना जास्त जवळचा वाटतो. त्यामुळेच बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला केम्पेगौडांच्या ऐवजी टिपू सुलतान यांचं नाव देण्याची मागणी गिरीश कर्नाड यांनी केली होती. अर्थात नंतर या विधानापासून कर्नाड यांनी माघार घेतली. बहुधा कर्नाटकामध्ये राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गौडा समाजाला दुखावणं चालणार नाही हे कर्नाड यांच्या हायकमांडनं त्यांच्या लक्षात आणून दिलं असावं.\nगिरीश कर्नाड हे कट्टर टिपू प्रेमी आहेत. '' टिपू सुलतान हे मुसलमान ऐवजी हिंदू असते तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जो दर्जा आहे तो दर्जा टिपू सुलतान यांना कर्नाटकात मिळाला असता '' असंही विधान त्यांनी केलं होतं. 'शत्रूच्या राज्यातल्या गवतालाही हात लावू नका' असं आपल्या सैन्याला बजावणारे शिवाजी महाराज आणि शत्रूचं सारं काही लुटणारा आणि संपूर्ण देशात इस्लाम हा एकच धर्म असेल अशी स्वप्न पाहणारा टिपू हे एकसारखेच असल्याचं या वाक्यातून कर्नाड स्पष्ट करत आहेत.\nतसंच भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मामुळे नाही तर त्याच्या धर्मामुळे महत्व मिळतं हे देखील कर्नाड यांनी यामधून सांगून टाकलंय. समाजतला बुद्धीजीवी व्यक्तीच अशा प्रकारची मांडणी करत असेल तर सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यांची धार्मिक आधारावर फाळणी करणं हे राजकारण्यांना सहज शक्य आहे. राजकारणी आजवर तेच करत आले आहेत.\nस्वातंत्र्य लढ्याचं स्मरण करत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल यांच्याबरोबरच त्याच दमात मौलाना आझाद, खान अब्दुल गफार खान यांची नावं घेतली जातात. ही नावं घेताना या यादीमधली मंडळी हिंदू आहेत की मुसलमान आहेत याचा कुणी विचार करत नाही. ती स्वातंत्र्यसेनानी आहेत हीच त्यांची ओळख पुरेशी असते. पण आपल्याच सोयीनं इतिहास वाचला जावा असा हट्ट धरणाऱ्या मंडळींकडून टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात येतीय. हिंदूंनी टिपू जयंती साजरी करणं म्हणजे ज्यूंनी हिटलर जयंती साजरी करण्यासारखं आहे. ही जयंती साजरी करणं हे धर्मनिरपेक्षतेचं प्रतिक असेल तर आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या नव्यानं करण्याची वेळ आता आली आहे.\nफार फार जोरदार आणि अभ्यासपूर्ण लेख. फार ताकतीने लिहिलंय. आपण विसरत चाललेल्या इतिहासाचीपण छान माहिती दिली आहे अभिनंदन. पण विषय गंभीर आहे.\nएकदम सही. खरी माहिती.\nचोख व चफकल वर्णन \nओंकार, अभिनंदन आणि धन्यवाद \nअतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहेस.\nआपलं दुर्दैव हे की या सर्व इतिहास खुणा शाळेतील क्रमिक पुस्तकात कधीही दिसत नाहीत. किंबहुना, त्या राजकीय हेतूंनी विपर्यास करून शालेय अभ्यासक्रमात आणल्या जातात.\nज्या देशात इतिहासाशी अशाप्रकारे हेतुपुरस्सर हेळसांड होते तिथे नवीन पिढीकडून देशभक्तीची अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरेल.\nखुप छान लिखाण आहे.\nइतिहाचि दुसरि बाजू मांडली आहे...\nनेहराजी का जवाब नही \nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nलाल सलाम ते वंदे मातरम् \nहिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nमदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/double-ka-mitha-halwa/", "date_download": "2018-04-23T11:41:39Z", "digest": "sha1:RDJML4KGG4OC2TP7SK4A2CYJFMCPZDUW", "length": 6879, "nlines": 116, "source_domain": "www.marathimati.com", "title": "डबल का मीठा हलवा | Double Ka Mitha Halwa", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » डबल का मीठा हलवा\nडबल का मीठा हलवा\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८\nडबल का मीठा हलवा - [Double Ka Mitha Halwa] ब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.\n४-५ मोठे चमचे तूप\n१ वाटी खवा (सुमारे २०० ग्रॅम)\n१ वाटी ताजी घोटलेली साय\nपातेल्यात तूप तापले की त्यात पीठ व रवा घालून मंद आंचेवर भाजावे. जरासा रंग बदलला की दूध थोडे थोडे घालत ढवळावे.\nमिश्रण जाडसर होऊ लागले की साखर घालावी. सतत ढवळत राहावे.\nपिठातून तूप सुटल्यासारखे दिसायला लागले की पातेले खाली उतरवावे.\nकोमट झाले की वेलचीपूड, चारोळ्या व सुकामेवा घालून छोटे छोटे लाडू वळावेत. किंवा गोल वळल्यानंतर किंचित चपटा आकार देऊन दाबावा. म्हणजे पेठा किंवा बंगाली मिठाईछाप आकार दिसेल.\nब्रेडला पूर्वी डबलरोटी म्हणत असत. त्यामुळे या पदार्थाला डबल का मीठा हे नाव आले.\nमुलांच्या किंवा मोठ्यांच्या पार्टीसाठी हा गोड पदार्थ करायला सोपा व स्वदिष्ट आहे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2015/07/blog-post_56.html", "date_download": "2018-04-23T11:32:18Z", "digest": "sha1:ZSILWV3TL6K4B6FNNP6E36UNFKFGON77", "length": 22560, "nlines": 151, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान", "raw_content": "\nसह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान\nतो दिवस मला आजही लक्षात नाही. ती वेळ मला आजही आठवत नाही. 'यंदाचा सह्यमेळावा केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा' हा वरकरणी साधाच प्रश्न कुणीतरी वॉट्सअ‍ॅप गृपवर पोस्ट केला आणि 'हर हर महादेव'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअ‍ॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअ‍ॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना वॉट्सअ‍ॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता. त्यात आशिषची (आशुचॅंप) 'सायकलवरून कन्याकुमारी'ची लेखमाला सुरू झाली. त्यातून भलतीच प्रेरणा घेतलेल्या काहींनी 'यंदाचा मेळावा सायकलवरून करूया' असा प्रस्ताव मांडून पाहिला. हा एखादा फॉरवर्ड मेसेज असावा अशी (सुरक्षित) समजूत करून घेऊन जवळपास प्रत्येकानेच त्या प्रस्तावाला इग्नोर मारला. त्या इग्नोराचं खरं कारण 'उभ्याउभ्या खाली बघितल्यावर स्वतःचे पाय न बघू देणारी शारिरिक अवस्था' हे होतं, हे सर्वांच्याच लक्षात आलं. गृपचा सब्जेक्ट बदलून झाला, डीपी बदलून झाला, तरी ठिकाण ठरेना वॉट्सअ‍ॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता. त्यात आशिषची (आशुचॅंप) 'सायकलवरून कन्याकुमारी'ची लेखमाला सुरू झाली. त्यातून भलतीच प्रेरणा घेतलेल्या काहींनी 'यंदाचा मेळावा सायकलवरून करूया' असा प्रस्ताव मांडून पाहिला. हा एखादा फॉरवर्ड मेसेज असावा अशी (सुरक्षित) समजूत करून घेऊन जवळपास प्रत्येकानेच त्या प्रस्तावाला इग्नोर मारला. त्या इग्नोराचं खरं कारण 'उभ्याउभ्या खाली बघितल्यावर स्वतःचे पाय न बघू देणारी शारिरिक अवस्था' हे होतं, हे सर्वांच्याच लक्षात आलं. गृपचा सब्जेक्ट बदलून झाला, डीपी बदलून झाला, तरी ठिकाण ठरेना अखेर सर्वज्ञानी ओंकार ओक उर्फ ओंकीपीडिया उर्फ सीएम यांनी मांडलेला पहिलाच प्रस्ताव एकमताने संमत झाला. (ओंकार महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसारखा दिसतो हे मज पामराचे निरीक्षण त्या बिचार्‍याला सीएम या पदावर घेऊन आले आहे, बाकी काहीच नाही. मेळाव्याच्या संयोजनातील त्याचे काम आणि त्याच्या 'सह्य'ज्ञानाचा आवाका पाहता त्याला दिलेली सीएम ही उपाधी अगदीच किरकोळ आहे). तर ओंकारने केवळ ठिकाणच सुचवले असे नाही, तर घरून निघण्यापासून घरी पोचेपर्यंतचा सगळा प्लॅनच पोस्ट केला. इतका सखोल आणि सजीव प्लॅनपाहून आता प्रत्यक्ष मेळावा करायची गरजच नाही असा एक आगाऊ विचार माझ्या मनात येऊन गेला. तर ठिकाण होतं - बागलाणातील दोन काहीसे अपरिचित किल्ले - चौल्हेर आणि पिंपळा, आणि डेट्स होत्या - ४ आणि ५ जुलै २०१५.\nबाकी आम्हा ट्रेकर्सना सीसीडी आणि पार्कातल्या डेट्सपेक्षा या डेट्सच महत्त्वाच्या आणि हव्याहव्याशा असतात. यंदाच्या सह्यमेळाव्याला कोण कोण येणार याची चाचपणी सुरू झाली. (नेहमीप्रमाणे) सुरूवातीला आकडा चाळीसच्या वर गेला. माझा हा पहिलाच सह्यमेळावा असल्यामुळे सगळ्यांनी खास ट्रेकर्स शैलीमध्ये 'विशेष सूचना आणि धमक्या' द्यायला सुरूवात केली. गेली दोन्ही वर्षे इच्छा असूनही काही ना काही कारणामुळे मला जाणे जमले नव्हते. ('इच्छा तेथे मार्ग' वगैरे सुभाषिते बॅचलर असतांना खूप आवडायची. तर ते असो.) यंदा जायलाच हवे होते.\n२०१४ हे वर्ष आधी उजव्या घोट्याच्या आणि नंतर उजव्याच गुडघ्याच्या लिगामेंट इन्जुरीमुळे बर्‍यापैकी ट्रेकलेस गेले होते. पाय पुन्हा साथ देईल की नाही, झेपेल की नाही वगैरे वगैरे शंका मनात होत्याच. पण त्या कारणामुळे फारकाळ ट्रेकपासून दूर बसणे जमणार नव्हतेच. मग 'जमेल तेवढे चालू, नाहीतर पायथ्याला बसून राहू' या निर्णयाने माझेही नाव नोंदवून टाकले.\nआता किल्ल्यांच्या निवडीबद्दल - हल्ली वीकेंडला मुख्य मुख्य किल्ले गर्दीने ओसंडून वाहत असतात. हायवेज, ढाबे, धबधबे, डोंगरवाटा - सगळीकडेच तुडुंब जत्रा असते. त्यामुळे आम्हाला आडवाटेवरचेच किल्ले हवे होते. एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल ५८ किल्ले आहेत. त्यातही बागलाण तालुक्यातले किल्ले पुण्या-मुंबईपासूनच्या लांब अंतरामुळे आणि तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे गर्दीपासून मुक्त आहेत. त्यामुळे जेवण-राहण्याची सोय आणि अंतर निकषांमधून चौल्हेर आणि पिंपळा हे फायनल झाले. हेमने जून महिन्यात चौल्हेर-पिंपळाचा एक पायलट ट्रेक करून बघितला.\n'जेवणाचे मेनू' यावर गृपवर जितकी चर्चा झाली, तितकी क्वचितच कुठे होत असेल. (इथे तुलना करायचा मोह आवरता घेतो आहे, पण सोशल वेबसाईट्सवरचे आपले आवडते आणि लोकप्रिय फोरम आठवा). नाष्ट्याला पोहे-उपमा-मिसळ पासून जेवणाला पिठलंभाकरी-उसळ-चिकन-भात-रस्सा आणि स्वीटडिश म्हणून श्रीखंड-रसमलाई-शिरा-गुलाबजाम, रात्री झोपण्यापूर्वी हॉट चॉकलेट, कोल्ड कॉफी, मसाला दूध एवढ्या फर्माईशी आल्या. मला तर सह्यांकनचीच आठवण झाली. सीएम साहेब ज्याप्रकारे सगळ्या फर्माईशी मंजूर करत होते, ते पाहता त्यांना सह्यांकनला 'टफ' द्यायची नाहीये ना, अशीही एक शंका येऊन गेली. अखेर, गावात पुरेसे दूध मिळणार नाही हे कळले. आणि बाकी सर्व स्वीट डिश आमच्यापैकीच कुणालातरी (सॅकमध्ये घालून बसपर्यंत) आणाव्या लागतील हे समजले. मग आपोआप 'जे सहज उपलब्ध होईल ते चालेल' अशी तडजोड झाली.\nपुण्याहून एक आणि मुंबईहून एक अशा दोन बस निघणार होत्या. पुणे बसच्या डायवरला (त्याचे नाव अप्पा) मागील वर्षीच्या सह्यमेळाव्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे तो आम्हाला चांगला 'ओळखून' होता. मुंबई बसचा डायवर नवखा होता. त्याच्या चालककौशल्यावरून अप्पाने त्याचे मेळाव्यादरम्यानच्या निवांत क्षणी बौद्धिक घेतले. दोन्ही बसेस ३ तारखेला रात्री आपापल्या ठिकाणांहून निघून पुण्यक्षेत्र नाशिक येथे अपरात्री अडीच-तीन वाजता भेटणार होत्या. नाशिकहून हेम आम्हाला जॉईन होणार होता. मग दोन्ही बसेस चौल्हेरच्या दिशेने निघणार होत्या. प्लॅन तर फस्क्लास होता.\nपुण्याची बस वेळेत म्हणजे चक्क वेळेत निघाली. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या मेंब्रांचे पिकअप झाले. मला बसमध्ये चढताना प्रत्यक्ष पाहिल्यावर 'मी मेळाव्याला येत आहे' याची पवन आणि ओंकारची खात्री झाली, इतका त्यांना माझ्याबद्दल (अ)विश्वास होता. पुणे-नाशिक महामार्गावर रात्री पाऊण वाजता नारायणगावात 'मुक्ताई'ला नेहमीप्रमाणे मसाला दूधासाठी बस थांबली. तेव्हा मुंबईची बस माजिवड्यात पोचली होती. (कारण काय तर म्हणे, गिरीने उशीर केला) अखेर मुंबईची बस तीन वाजेपर्यंत नाशकात पोचत नाही हे स्पष्ट झाल्यावर मग आम्ही मसाला दुधाचा अजून एक राऊंड केला. तिथे पवनचा वाढदिवसही वाढता साजरा केला. यथासांग दुग्धपान झाल्यावर बस निघाली. पुढचं मला काहीच आठवत नाही. सीटवर अवघडल्या अवस्थेत झोपण्यापेक्षा मधल्या कॉरिडॉरमध्ये अख्खा सहज मावेन हा साक्षात्कार ज्या क्षणी झाला, तो क्षण भाग्याचा) अखेर मुंबईची बस तीन वाजेपर्यंत नाशकात पोचत नाही हे स्पष्ट झाल्यावर मग आम्ही मसाला दुधाचा अजून एक राऊंड केला. तिथे पवनचा वाढदिवसही वाढता साजरा केला. यथासांग दुग्धपान झाल्यावर बस निघाली. पुढचं मला काहीच आठवत नाही. सीटवर अवघडल्या अवस्थेत झोपण्यापेक्षा मधल्या कॉरिडॉरमध्ये अख्खा सहज मावेन हा साक्षात्कार ज्या क्षणी झाला, तो क्षण भाग्याचा मग केव्हातरी साडेतीन-चारला दोन्ही बसेस नाशकात भेटल्या, तिथून धुळे महामार्गावर सोग्रस फाट्याला वळल्या, तिथून सटाणाच्या एक किमी अलिकडे तिळवण फाट्याला वळल्या आणि पहाटे साडेसहाला तिळवणला पोचल्या, हे सगळं मी दुसर्‍या दिवशी ओंकारकडून ऐकले. सुरू होणार होणार म्हणता म्हणता सह्यमेळावा सुरूही झाला होता. आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला पोचलो होतो. समोर होता शिवकालीन चौल्हेरगड आणि तिळवण गावात वाट पाहत होता - चहापोह्यांचा नाष्टा...\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nसह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्...\nसह्यमेळावा २०१५ - भाग २: किल्ले चौल्हेर\nसह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/770/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F%20%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%20%E2%80%93%20%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T11:37:28Z", "digest": "sha1:JXMZ3YG5GBB4LOJVMIBNXIL4SBFQLX3U", "length": 10630, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट हेच वास्तव – शरद पवार\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे विविध अहवालांचे दाखले देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत खूप काही सांगत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे आणि हेच वास्तव आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nसुरतसारख्या उद्योगप्रधान शहरात व्यापारी त्रस्त आहेत. कारखानदारी उद्योग अडचणीत आहे. टेक्सटाईल उद्योगात २० हजार कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नाही, असेही पवार यांनी नमूद केले.\nनुकत्याच झालेल्या किटकनाशक फवारणी मृत्यू प्रकरणाबाबत बोलताना पवार साहेब म्हणाले की, बीटी बियाणे हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. ते बंद करणे हा त्यावरील उपाय नाही. बोंड अळीची क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे बियाणे आणखी चांगले कसे करता येईल, याची खबरदारी घेतली पाहीजे आणि प्रकरणाच्या खोलात जाऊन वस्तूस्थिती तपासली पाहीजे. यासंबंधी सुसंवाद साधून यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयावेळी वसंतराव नाईक यांनी कृषीक्षेत्रात दिलेल्या योगादानाचाही त्यांनी न विसरता उल्लेख केला. वसंतराव नेहमी हायब्रिड वाणाबद्दल आग्रही असायचे. संकरीत बियाणाच्या त्यांच्या आग्रहामुळे ज्वारी आणि इतर पिकांचे भरघोस उत्पादन आपल्या देशात झाले, असे त्यांनी नमूद केले.\nशेतकरी कर्जमाफीबाबत पवार यांनी पत्रकार परिषदेत रोखठोक मत व्यक्त केले. शेतकरी कर्जमाफी करताना महिला आणि पुरूष असे कर्जदार गट केले असून त्यात महिलांच्या कर्जमाफीला प्राथमिकता देण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील महिलेच्या नावावर कायम कमी कर्ज असते आणि महिला वर्गाच्या नावावर जमिनही कमी असते. त्यामुळे सरकारच्या या उथळ धोरणाचा समाचार घेत या धोरणामुळे मोठा कर्जदार गट कर्जमाफीपासून वंचित राहू शकतो, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.\nतसेच, १९८० साली काढलेल्या दिंडी यात्रेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस १ डिसेंबर पासून पायी ‘हल्लाबोल यात्रा’ काढत असून त्यात मी स्वतः सहभागी होणार असल्याचे पवार म्हणाले. हि यात्रा ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nयावेळी माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.\nहे खरंच कायद्याचं राज्य आहे का शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल ...\nअलीकडे हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजच्या वर्तमानपत्रातही नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे. या सर्व गोष्टी पाहता हे खरंच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आज गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहम ...\nदिल्लीत महाराष्ट्राचा पत्ता '६, जनपथ'- हेमंत टकले ...\nसाधेपणाचे आणि सात्विकपणाचे दर्शनच आदरणीय शरद पवार यांनी आम्हाला दिलं अशा शब्दांत आमदार हेमंत टकले यांनी पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. पवार पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांना ३१ मार्च १९६९ रोजी पत्र लिहिले, या पत्रात तरुण राजकारण्यांची घुसमट व्यक्त केली होती. या पत्राचा शेवट त्यांनी 'जे जे माझ्या मनात आले, ती अस्वस्थता तुम्हाला कळवायची होती' असे लिहिले होते. एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधण्याची हतोटी पवार साहेबांकडे आहे, असे टकले म्हणाले.पवार साहेबांनी आमदार म्हण ...\nआत्महत्येला फॅशन म्हणणे शरमेची बाब - शरद पवार ...\n'देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सत्ताधारी पक्षाचा खासदार त्या आत्महत्या फॅशन बनल्या असल्याचे सांगतो ही शरमेची बाब आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची सामान्य जनतेशी अजिबात नाळ जोडलेली नाही. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण असल्यामुळे आम्ही सत्तेत असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. देश खऱ्या अर्थाने वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांचे हितच पाहणे अधिक महत्वाचे आहे.' असे केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार म ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2014/06/blog-post_11.html", "date_download": "2018-04-23T11:41:21Z", "digest": "sha1:DSHX3PD27ZDM2736EU6XZLFVEH6P2HSK", "length": 8727, "nlines": 159, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): आलायस तर खरा!", "raw_content": "\nआता थांबणार आहेस की\nदडी मारणार आहेस लगेच\nमनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...\nत्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,\nनिष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील\nआणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील\nमग पहिल्याहून अधिक असह्य\nहे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -\nएकतर थांब तरी, किंवा मग जा तरी\nतुझी वाट पाहणं चालूच राहील -\nतू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,\nआवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने\nतेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...\n- नचिकेत जोशी (९/६/२०१४)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/prachi-phanse.html", "date_download": "2018-04-23T11:51:20Z", "digest": "sha1:DZDT3FTVPSALFYTKCQMGP7STJSETCGEA", "length": 5142, "nlines": 58, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सौ. प्राची प्रमोद फणसे\nConstituency : वार्ड क्र. ६, नालासोपारा मतदार संघ\nDesignation : महिला उपजिल्हा संघटक\nName : सौ. प्राची प्रमोद फणसे\nFather's Name : श्री शशिकांत लक्ष्मण खानोलकर\nMother’s Name : वत्सला शशिकांत खानोलकर\nPlace of Birth: : विरार, ठाणे (महाराष्ट्र)\nHusband Name : श्री प्रमोद वसंत फणसे\nNo. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nResidence Address : ७०४, क्राऊन सी विवा गोकुळ कॉम्प्लेक्स, गोकुळ टाऊन शीप - बोळींज (प.) विरार\n१९८१ ते १९८६ पर्यंत - महिला विरार शहरप्रमुख\n१९८६ ते १९८९ पर्यंत - वसई महिला उपतालुका प्रमुख\n१९९६ ते १९९९ पर्यंत - एस. इ.ओ.\n१९९० ते २००२ पर्यंत - वसई महिला तालुका प्रमुख\n२००३ ते २००८ पर्यंत - उपजिल्हा संघटक\nखालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.\nजिवदानी महिला औद्योगिक सहकारी संस्थेची - अध्यक्ष\nवालीव महिला मंडळावर सल्लागार म्हणून कार्यरत होते.\nविरार पोलिस स्टेशन दक्षता समितीवर, रेल्वे दक्षता कमिटीवर - सदस्य\nसदस्य - दक्ष कामगार युनियन - महिलांच्या समस्या सोडविणे.\nशिवसेनेच्या माध्यमातून...महिलांसाठी केलेली कामे\nमहिलांच्या घरगुती गॅससाठी त्यांच्या बरोबर केलेला मोर्चा व आंदोलन\nग्रामीण भागातील आदिवासी महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी ग्रामसेवकाला निलंबित करण्यासाठी केलेले आंदोलन\nपेल्हार येथे महिलांसाठी (आदिवासी ) आरोग्य शिबीर\nजागतिक महिला दिना निमित्त महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन\nमहिलांच्या न्यायासाठी वरिष्ठांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर\nरेल्वे दक्षता विभागात कार्यरत असताना महिलांच्या सुरक्षा , रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना त्यांची सुरक्षा मिळवण्यासाठी विरार मध्ये आंदोलन घेतले.\nदक्ष कामगार युनियनच्या मार्फत कंपनीमध्ये होणाऱ्या अत्याचार, अन्याय व कंपनी कडून पगार वेळेवर न देणे. इ. विषयासाठी मोर्चा काढून न्याय मिळवून दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-23T11:15:01Z", "digest": "sha1:SZCONIW5LVYSIATGEEJBVREYZYIG7W4J", "length": 10569, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू न करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome कोल्हापूर-सांगली कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू न करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nकॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू न करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nमहाराष्ट्र शासनाने खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचे विधेयक नुकतीच विधानसभेत पारित केले आहे. पटसंख्येअभावी मोठ्या शहरातल्या खाजगी मराठी माध्यमांच्या तसेच जिल्हा परिषदांच्या शाळा बंद पडत आहेत. महानगर पालिका नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदांच्या शाळांना यापूर्वीच टाळे लागले आहे. १३१४ शाळा बंद करणे ही केवळ सुरुवात आहे. शिक्षणाची हमी देणारा कायदा झालेला असताना मोफत शिक्षणाची वाट लावली जात आहे. शिक्षण क्षेत्र भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. कंपनी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. २०२१ मराठी माध्यमांच्या शाळा बंद झालेल्या असतील. असा अहवाल एका संस्थेने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे कार्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये याबाबतचे निवेदन आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी, उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापुरे यांना देण्यात आले.\nज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी पाटील, एस.डी. लाड, व्ही. जी.पोवार, आर.वाय. पाटील, प्रा. जयंत आसगांवकर, वसंतराव देशमुख, डी.जी. बोराडे, डी.एस. घुगरे, डॉ.ए.एम. पाटील, उदय पाटील, आर.डी. पाटील, सी.एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, बी.डी. पाटील, एम.आर. मोहिते पाटील, डी.ए. जाधव, आय.एम . गायकवाड, बी. बी. पाटील, शिवाजीराव माळकर, एस.के. पाटील, भाऊसाहेब सकट, शानाजी माने, जे.एम. पोवार, एस.बी. पाटील, गिरीश फोंडे, अॅन्थनी डिसोजा,रूजाय गोन्सावलीस, दिपक शेटे आदी या वेळी उपस्थित होते .\nतसेच महाराष्ट्र राज्य समन्वय समिती यांच्यावतीने १२ बुरारी २०१८ पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार आहे. मूल्यांकन झालेल्या काही विनाअनुदानित शाळांना सप्टेंबर २०१६ सालापासून फक्त २० टक्के अनुदान मिळत आहे. अशा शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे शासनाने त्वरित द्यावेत तसेच मूल्यांकन झालेल्या अनेक विनाअनुदानित शाळांना अद्याप अनुदान मिळत नाही ते त्वरित मिळावे आणि शिक्षकांचे समायोजन न केल्याबद्दल काही माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखून धरलेले आहे ते त्वरीत सुरू करावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करण्यात आली आहे.\nबायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित\n…अन्यथा के. एस. बी. चौकाचे नामकरण करू:महाराष्ट्र मजदूर संघटनेचा इशारा\nआयुष्यभर शिकत राहणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे – विश्वास नांगरे पाटील\nराज्यसभा खासदार अमर साबळे यांचे कोल्हापूर येथे गांधीगिरी मार्गाने उपोषण\nमहिलांचे सबलीकरण होणे गरजेचे – व्ही सि. नित्यानंदम\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-damage-grapes-farmers-reach-hundred-crore-rupees-maharashtra-2382", "date_download": "2018-04-23T11:56:08Z", "digest": "sha1:7FHXNHNPT3THDQD4JJASOE7VU6WNE3N2", "length": 17873, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, damage of grapes farmers reach at hundred crore rupees, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील द्राक्षशेतीला शंभर कोटींचा फटका\nराज्यातील द्राक्षशेतीला शंभर कोटींचा फटका\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nमाझं ६ एकर क्षेत्र अंतिम टप्प्यात हातातून गेलंय. बहर येऊनही पावसात बाग सापडली. फळकुजीने बाग बहराशिवाय उभी आहे.\n- ज्ञानेश्‍वर कातकाडे, गिरणारे, ता. जि. नाशिक\nनाशिक : दिवाळीपूर्वी सलग ९ दिवसांच्या पावसाने राज्यातील द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान केले. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील ४ लाख एकरांपैकी निम्मी म्हणजे २ लाख एकरांवरील द्राक्षशेती फळकूज व डाउनीच्या कचाट्यात सापडली आहे. घड कुजून गेल्याने यातील ५० हजार एकरांवरील द्राक्षपिक तर शंभर टक्के हातातून गेले आहे. द्राक्षाच्या पीक संरक्षणातील ८० टक्के खर्च हा फळ छाटणीच्या पहिल्या महिन्यात होतो.\nमणी धारणेपर्यंत एकरी किमान २ लाख रुपये खर्च होतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. यानुसार द्राक्ष उत्पादकांचा १०० कोटींपेक्षा जास्त खर्च अवकाळीमुळे वाया गेला आहे.\nदोन चार दिवसांपुरता पाऊस असता तर त्यावर नियंत्रण करणे आवाक्‍यात होते. मात्र, ऑक्‍टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत सलग ९ दिवस पाऊस रोज धो धो कोसळत होता. बहुतांश बागांतून अनेक दिवस पाणी वाहत होते.\nनाशिक, पुणे विभागात बहराची अर्ली छाटणी घेण्याकडे कल राहिला आहे. नाशिक भागातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात तर पुणे विभागातील बोरी, इंदापूर भागातील द्राक्ष पक्वतेच्या टप्प्यात असताना पावसाने झोडपले.\nकाढणीच्या अवस्थेतील बागांवर डाउनीचा प्रादुर्भाव वाढला. पुढे डाउनी नियंत्रणाबाहेर गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दरम्यान, नाशिक व सांगली भागात सप्टेंबर महिन्यात विशेषत: ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या काळात फळ छाटणी झालेल्या बागा या पोंगा ते फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाच्या तडाख्यात सापडल्या.\nदररोज पाऊस पडत असतानाही चिखलगाळाची पर्वा न करता पीक वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी प्रयत्नांची शर्थ केली. पाऊस थांबून थंडी सुरू झाली आहे. याच वेळी वेलीवरील घड कुजून गेले असून फुलोरा गळून गेला आहे. नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे या द्राक्ष उत्पादक पट्ट्यात सरासरी २५ टक्के बागांचे म्हणजे किमान ५० हजार एकरांवरील द्राक्षांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचा वर्षभराचा १ लाखापासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च वाया गेला आहे.\nएकूण १२ एकरांपैकी ४ एकर फळकुजीने पूर्ण गेलंय. ६ एकर पोंगा अवस्थेत होतं तेही संपलंय. कारण त्यातून पाणीच वाहत होतं. वाचलेल्या बागेतील बहरातही जोम दिसत नाहीय. यंदा हे सगळंच हातातून गेलं असलं तरीही खर्च करावाच लागणार आहे. त्यावरच पुढील वर्षीचं उत्पादन अवलंबून आहे.\n- राजू गायकर, निमगाव, ता. निफाड, जि. नाशिक\nइलेक्‍ट्रोस्टॅटिक मशिन भाडेतत्त्वावर देण्याचा माझा व्यवसाय आहे. त्याचा वापर जीए फवारणीसाठी केला जातो. मात्र, मागील चार दिवस फळकूज नियंत्रणासाठी त्याचा वापर करीत होतो. बागेत चिखल गाळ असल्याने त्याचा फटका बसला.\n- अशोक पाटील, सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक\nअवकाळी पावसाने यंदा पहिल्यांदा द्राक्षशेतीला मोठाच दणका दिलाय. अर्ली आणि सप्टेंबरमधील छाटणी काळातील बागांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाया गेला. नाशिक विभागात नुकसान सर्वाधिक आहे.\n- सुभाष आर्वे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.\nनाशिक दिवाळी द्राक्ष सोलापूर पुणे पाऊस पाणी इंदापूर सांगली महाराष्ट्र\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-04-23T11:54:06Z", "digest": "sha1:MWUQNX5R4DILASRZNBGSQ5BQYXZLUGN6", "length": 4742, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिनर्व्हा (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nहा लेख खालील लेखांशी संबंधित आहे.\nमिनर्व्हा : रोमन देवता.\nयुरेनस ग्रह : १८५० मध्ये नाव निश्चित करण्याआधी, मिनर्व्हा हे नाव सुचविण्यात आले होते.\nप्लूटो (बटु ग्रह) : १९३० मध्ये प्लूटोचे नाव निश्चित करण्याआधी, मिनर्व्हा हे नाव सुचविण्यात आले होते.\n९३ मिनर्व्हा : एक लघुग्रह.\nमिनर्व्हा टॉकीझ : भारतीय चित्रपटकंपनी.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०११ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:52:59Z", "digest": "sha1:OIZW2D3KL7X2EHPZM4IAL2SJKTLBTWTE", "length": 5551, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्ह्यांविषयीचे लेख.\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► अपर सियांग जिल्हा‎ (२ प)\n► अपर सुबांसिरी जिल्हा‎ (३ प)\n► चांगलांग जिल्हा‎ (२ प)\n► तवांग जिल्हा‎ (२ प)\n► तिरप जिल्हा‎ (२ प)\n► दिबांग व्हॅली जिल्हा‎ (३ प)\n► पश्चिम कामेंग जिल्हा‎ (२ प)\n► पश्चिम सियांग जिल्हा‎ (२ प)\n► पापुम पारे जिल्हा‎ (३ प)\n► पूर्व कामेंग जिल्हा‎ (३ प)\n► पूर्व सियांग जिल्हा‎ (४ प)\n► लोअर सुबांसिरी जिल्हा‎ (२ प)\n► लोहित जिल्हा‎ (३ प)\n\"अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१४ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/476/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T11:39:54Z", "digest": "sha1:Y4DVP3KBOLHOJX7HP3KY6CKZ6P2BYLLW", "length": 7745, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमतदारयाद्यांतील घोळाविरोधात उच्च न्यायालयात पीआयएल करण्यात आली आहे.हा लोकशाही अधिकारांच्या रक्षणाचा प्रश्न- जितेंद्र आव्हाड\nराज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला. २०१४च्या निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलं, अशा हजारो लोकांचे नाव यावेळी मतदार याद्यांमध्ये नव्हते. अनेकांच्या नावात, पत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. याविरोधात उच्च न्यायालयात एक पीआयएल दाखल करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेऊन हा घोळ दुरूस्त करावा अशी मागणी या पीआयएल मार्फत करण्यात आली आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रश्न नाही तर संपूर्ण लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांना वाचवण्याचा प्रश्न आहे, असे प्रतिपादन आव्हाड यांनी यावेळी केले.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम ... ...\nआज १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हेमंत टकले, प् ...\nनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मनपा निवडणुकांबाबत चर्चा करून जिल्हानिहाय राजकीय परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीची भूमिका आहे. काही जिल्ह्यात आघाडी करण्याबाबतची यशस्वी चर्चा सुरू असून येत्या दोन-तीन दिवसात त्याबाबतची भूमिका पक्ष जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसकडून आघा ...\nशरद पवार साहेब तरुण पिढीसाठी खरे आयकॉन- सुनिल तटकरे ...\nसुवर्णगाथा ५० या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीला बोलते करण्यात आले. या निमित्ताने शरद पवार साहेबांचा थक्क करणारा प्रवास तरुण वर्गाने मांडला. आजची पिढी ही अत्यंत कर्तृत्ववान असून पवारसाहेब या पिढीसाठी खरे आयकॉन आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथे आयोजित 'सुवर्णगाथा ५०' राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-only-seven-recommended-pesticides-pomegranate-india-6590", "date_download": "2018-04-23T11:41:58Z", "digest": "sha1:KBIFBUTJY4UH7SDT5DFQSNM6VKPHRDDR", "length": 21248, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Only seven recommended pesticides for Pomegranate in India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे सातच रसायने\nनिर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे सातच रसायने\nशनिवार, 17 मार्च 2018\n‘असुरक्षित’ डाळिंब : भाग १\nपीक संरक्षण बनले आव्हानाचे;\nअधिक पर्याय उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांची मागणी\nपुणे : सातत्याने होणारे हवामान बदल, वाढता कीड-रोगांचा प्रादुर्भाव असताना निर्यातक्षम डाळिंब पिकवण्यासाठी केवळ सातच लेबल क्लेमयुक्त रसायने उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीक संरक्षणासाठी ‘लेबल क्लेम’ नसलेल्या कीडनाशकांच्या वापर अपरिहार्य झाल्यास अवशेषांमुळे माल ‘रिजेक्ट’ होण्याची भीती वाढली आहे. याशिवाय आर्थिक भुर्दंड हा शेतकऱ्यालाच सहन करावा लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अधिकाधिक रसायनांचे पर्याय उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.\nभारतीय द्राक्षांनी युरोपीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. निर्यात सुकर व्हावी, यासाठी देशपातळीवर ‘रेसीड्यू मॉनिटरिंग प्लॅन’ (आरएमपी) या पद्धतीची अंमलबजावणी ‘ग्रेपनेट’ च्या माध्यमातून केली जाते. डाळिंबाचेही निर्यातीच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता द्राक्षाच्या धर्तीवर युरोपीय देशांतील निर्यातीसाठी याही पिकात ‘आरएमपी’ पद्धत ‘अनारनेट’ च्या माध्यमातून सुरू करण्यात आली. ‘लेबल क्लेम’ असलेल्याच (सीआयबीआरसी नोंदणीकृत) रसायनांचा वापर या पद्धतीत अनिवार्य करण्यात आला आहे. द्राक्षपिकांसाठी सुमारे ४८ लेबल क्लेमयुक्त रसायनांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्या तुलनेत डाळिंबात मात्र केवळ सातच रसायनांचे पर्याय शेतकऱ्यांसमोर आजमितीला उपलब्ध आहेत. त्यात दोन कीटकनाशके, सहा बुरशीनाशके व एका वनस्पती वाढ नियंत्रकाचा समावेश आहे. त्यामुळे तुटपुंज्या रसायनांच्या आधारे संपूर्ण वर्षभराचे पीक संरक्षण करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. डाळिंब बागायतदारांना निर्यातक्षम, किडी-रोगमुक्त निरोगी माल पिकवण्यासाठी केवळ या सात रसायनांवर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे अन्य ज्या रसायनांचा आधार त्यांना घ्यावा लागेल त्याचा वापर त्यांना स्वजबाबदारीवरच करावा लागत असल्याची चिंता शेतकऱ्यांत आहे.\nराष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या (एनआरसी) संचालिका डॉ. जोत्स्ना शर्मा म्हणाल्या, की डाळिंबात केवळ सातच रसायनांना लेबल क्लेम असल्याने त्यांच्याच अधिकृत शिफारसींची यादी आम्ही संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. त्यातील दोन कीटकनाशकांपैकी क्विनॉलफॉस हे तर युरोपात ‘बॅन’ केले आहे. डाळिंब उत्पादकांसमोर असलेली ही समस्या आम्ही त्वरीत ‘अपेडा’समोर मांडणार आहोत. डाळिंबात ‘लेबल क्लेम’ वाढवण्यासंबंधी पुढाकार घेण्याची विनंतीही त्यांना केली जाणार आहे.\n५६ रसायनांचा समावेश असलेली स्वतंत्र ‘ॲडहोक यादीही ‘एनआरसी’ने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे व अन्य माहिती संदर्भाच्या आधारे ती बनविण्यात आली आहे. मात्र कायदेशीर कक्षेत येणारी रसायने या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहाता येणार नसल्याचेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक म्हणाले की यंदाच्या १९ फेब्रुवारीच्या दरम्यान दिल्ली येथे पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी डाळिंबात लेबल क्लेमयुक्त कीडनाशकांच्या समस्येविषयी आम्ही म्हणणे मांडले. डाळिंबात किडी-रोगांची समस्या अधिक आहे. अशावेळी यादीत समाविष्ट नसलेल्या रसायनांचा वापर केला तर ‘रेसीड्यू’ आढळून डाळिंबाचा नमुना ‘फेल’ होण्याची शक्यता वाढली आहे. निर्यातीवर त्याचा निश्चित परिणाम होऊ शकतो.\nदोन महिने आगाऊ कल्पना हवी\nजाचक म्हणाले, की प्रत्येक देशाचे अन्नसुरक्षिततेचे निकष वेगवेगळे असू शकतात. निर्यातक्षम मालासाठी कोणत्या देशाने कोणते नियम (नॉर्म्स) केव्हा लागू केले ते पीककाढणीच्या किमान दोन ते तीन महिने आगाऊ आम्हाला समजणे गरजेचे आहे. यंदा ‘फॉस्फोनीक ॲसिड’ चे रेसीड्यू आपल्याकडील प्रयोगशाळेत आढळले. त्यामुळे निर्यातक्षम गुणवत्ता असलेली डाळिंबेही ‘लोकल’ बाजारपेठेत विकावी लागली.\nडाळिंबात लेबल क्लेमयुक्त रसायने अत्यंत कमी असल्याने अनेक सल्लागारांचे (कन्सल्टंट) फोफावले आहे. वेगवेगळ्या रसायनांची शिफारस ते बागायतदारांना करीत आहेत. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेला आहे. ‘सॅंपल रिजेक्ट’ होण्याचा धोका त्यामुळे अधिक वाढला आहे. भारतभर डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील किडी-रोग महाराष्ट्रात येण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत केवळ सात रसायनांच्या आधारावर डाळिंब उत्पादन घेणे शक्य नसल्याचेही जाचक यांनी सांगितले. यासंबंधी काहीतरी सकारात्मक घडेल यासाठी ॲग्रोवनकडूनच आम्हाला मोठी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. (क्रमश:)\nडाळ डाळिंब हवामान भारत द्राक्ष कीटकनाशक महाराष्ट्र\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pankajagopinathmunde.com/", "date_download": "2018-04-23T11:39:56Z", "digest": "sha1:J5ZEESGV5MUIKXOGHKJND2TCQLUCX4TI", "length": 5813, "nlines": 75, "source_domain": "www.pankajagopinathmunde.com", "title": "पंकजा गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास, रोजगार हमी योजना, जलसंवर्धन, महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र.", "raw_content": "\nपाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलात ग्रामपंचायतींना आर्थिक सहाय्य देण्याबाबत समिती : ग्रामविकास व पाणी पुरवठा मंत्री यांच्या बैठकीत निर्णय February 23, 2018\nअस्मिता कार्ड, अस्मिता फंडाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ February 22, 2018\nग्रामविकासाची चळवळ गतिमान करण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन February 1, 2018\nतालुका विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – ग्रामविकासमंत्री मुंडे September 11, 2017\nअस्मिता योजनेचे अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून कौतुक August 30, 2017\nया जागतिक वसुंधरा दिनी आपण हरित आणि नैसर्गिक समृद्धीने मानवाला वरदान असलेल्या वसुंधरेचे रक्षण करून या हरित वसुंधरे… https://t.co/f6Hhc3Pil8yesterday\nया जागतिक वसुंधरा दिनी आपण हरित आणि नैसर्गिक..\nपाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलात ग्रामपंचायतींना आर्थिक सहाय्य देण्याबाबत समिती : ग्रामविकास व पाणी पुरवठा मंत्री यांच्या बैठकीत निर्णय\nमुंबई : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलात संबंधित ग्रामपंचायतींना आर्थिक सहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरावर निर्णय होणे आवश्यक असून यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित सचिवांची कमिटी स्थापन करण्याबाबतचा निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समिती स्थापन करण्याबाबत ठरविण्यात आले. बैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय […]\nअस्मिता कार्ड, अस्मिता फंडाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nग्रामविकासाची चळवळ गतिमान करण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन\nतालुका विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – ग्रामविकासमंत्री मुंडे\nअस्मिता योजनेचे अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून कौतुक\nपंकजा गोपीनाथ मुंडे ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/5/", "date_download": "2018-04-23T11:43:17Z", "digest": "sha1:FI6CVLDSAYVZGJI5L473TPMZASTXA73C", "length": 7158, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 5", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ५\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nगोड पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ, सणासुदीचे पदार्थ, वाचकांची आवड\nअस्सल कोकणी घरगुती पद्धतीचे उकडीचे मोदक.\nलोणी, लिंबू, अंडे घालून तयार केलेले लेमन डिलिशियस पुडिंग डेझर्ट म्हणुन खाता येते.\nब्रेड, अंडे, सुका मेवा, द्राक्षे घालून तयार केलेले रिच पुडिंग डेझर्ट म्हणुन तसेच मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.\nब्रेड, दूध घालून तयार केलेले एक नविन प्रकारचे ब्रेडचे गुलाब जामून वेगळी चव म्हणून खाता येईल.\nमराठमोळी महाराष्ट्रीयन तांदुळाची खीर सण-उत्सवाच्या वेळी गोड पदार्थ म्हणून पुडींगसारखी खाऊ शकता.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/799/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%20%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T11:35:57Z", "digest": "sha1:EX6IBSICJR4ZXINL3Q2A6QAQSU2CXE5J", "length": 10528, "nlines": 42, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसेवाग्राम येथील मेडिकल चौकात राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nसेवाग्राम येथील मेडिकल चौकातील हल्लाबोल पदयात्रा आंदोलनाच्या सहाव्या दिवसाची सांगता सभा संस्मरणीय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अक्षरशः उपस्थितांमध्ये आंदोलनाचे नवस्फुलिंग चेतविले.\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानवंदना देऊन आजची पदयात्रा सुरू झाली याची जाण ठेवून तटकरे यांनी आपल्या सोबतच्या सर्व सहकारी नेत्यांचे तसेच उपस्थितांचे स्वागत केले आणि खोटारड्या राज्य सरकारवर घणाघाती प्रहार आपल्या भाषणातून केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच विदर्भाच्या भूमीत हमीभावाची घोषणा केली होती याची आठवण त्यांनी करून दिली. आज या सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आणि आणि ही गरीब शेतकऱ्यांची कशी फसवणूकच केली गेली याचं विवेचन सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केलं. मुख्यमंत्री होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी याच विदर्भाच्या भूमीत सोयाबीनच्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं होतं याचीही आठवण तटकरे यांनी केली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र या आंदोलनाचा देवेंद्रजींना कसा सोयीस्करपणे विसर पडलाय याचीही जाणीव त्यांनी उपस्थित श्रोत्यांना करून दिली.\nखरी कर्जमाफी आदरणीय पवारसाहेबांनीच कशी करून दिली होती याचीही जाणीव त्यांनी लोकांना करून दिली. शरद पवार यांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात देशातील अन्नधान्याच्या आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या जीवनात झालेले स्थित्यंतरही त्यांनी उलगडून सांगितले.\nया पदयात्रे दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या खांद्यावर झेंडा घेऊन वाटचाल केली आता हा झेंडा आपल्याला उतरवायचा नाही तर हा झेंडा महाराष्ट्रात डौलाने फडफडला पाहिजे असं सांगत प्रदेशाध्यक्षांनी पदयात्रेतील घोषणांच्या माध्यमातून उपस्थित श्रोतृवृंदाला आपल्यासोबत ललकारी द्यायला भाग पाडलं आणि सेवाग्राम परिसरातील वातावरण भारलं गेलं.\nराज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारने लोडशेडिंग केलेले आहे. याचा निषेध म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथील मेडिकल चौकात सभेला जमलेल्या नागरिकांना मोबाइल टॉर्च चालू करण्याचे आवाहन केले होते. त्याला उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.\nकंपनी व्यवहारात पंकजा मुंडे यांच्याकडून दोन डीन क्रमांकांचा वापर - नवाब मलिक ...\n३६ हून अधिक कंपन्यांच्या संचालिका असलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी कंपनी व्यवहारांत दोन वेगवेगळ्या डीन नंबरचा वापर केला आहे, अशी माहिती देऊन पंकजाताईंचा डबल रोल, त्यांच्या पतीच्या नावाचा डबलरोल आणि आता कंपनी व्यवहारातील डीन क्रमांकाचा डबल रोल दिसत आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काढले. या डबलरोलचा घोळ पंकजाताईंनी जनतेसाठी स्पष्ट करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.खाजगी कंपनीच्या संचालकासाठी डीन नंबर आवश्यक असतो, ...\nकांद्याच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये कांदा फेको आंदोलन ...\nसरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर अभिनव असे 'कांदा फेको आंदोलन' करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा ५ पैसे किलो इतक्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. यामुळे कांदा उत् ...\nकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही - शशिकांत शिंदे ...\nसंघर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अहिंसेच्या भूमीतून झाली, दुस-या टप्प्याची सुरुवात जिजाऊंच्या जन्मस्थळापासून झाली, यापुढील तिसरा टप्पा हा छत्रपती शिवरायांच्या रायगडातून सुरू करणार, आता माघार नाही, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार घडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा नंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, हनुमंत डोळस, भाई जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुनील केदार उपस्थित होते. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/294/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3_%E0%A4%B5_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95_", "date_download": "2018-04-23T11:19:46Z", "digest": "sha1:3D42HMQPTD2QDVKIWXIVZEXRZSGTKJZ3", "length": 9165, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक\nआगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण व शहर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत खासदार वंदना चव्हाण आमदार जयदेवराव गायकवाड,अनिल भोसले आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.\nआगामी निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता यावी, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी सरकारच्या अकार्यक्षमतेवर निशाणा साधत, पालघर जिल्ह्यात वर्षभरात कुपोषणामुळे ६०० मुले दगावली, त्यामुळे हे सरकार काय काम करत आहे असा खरमरीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोपर्डी बलात्कार, शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत या राज्यात कोणीच सुरक्षित नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. हे सरकार फक्त आश्वासन देत आहे त्या आश्वासनांची पूर्तता मात्र होताना दिसत नाही असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.\nदरम्यान, मराठा समाजाच्या मोर्चांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, मराठा समाजाचे मोर्चे हे कुठल्याही समाजाविरोधात नाही. हा दलित विरुद्ध मराठा असा संघर्ष नाही. मराठा समाज हा त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आला आहे, दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यासाठी नाही असे मत पवार यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ...\nमहाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा मराठी भाषेत घेण्यात यावी, नीट परीक्षेसाठीची परीक्षाकेंद्रे वाढवण्यात यावीत, राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात याव्यात, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर (जिल्हा) अध ...\nस्व.यशवंतराव चव्हाण यांचे कार्य देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे-शरद पवार ...\nस्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे आहे, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री ते उपपंतप्रधान या पदावर असताना केलेले काम उल्लेखनीय आहे, चव्हाण साहेबांच्या विविध गुणांचा, वाचन प्रियतेचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी काम करावे, असे प्रेरणादायी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद इथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र, ...\nबँकांवर विश्वास नसेल तर 'पे-टीएम' मार्फत कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्र ...\nशेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यासाठी सरकार विविध कारणे सांगत आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सहकारी बँकांमार्फत कर्जमाफी दिल्यास नेत्यांना फायदा होत असेल तर सरकारी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा फायदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहचतो का असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला केला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सलग पाचव्या दिवशी विधान परिषद तहकूब झाल्याने कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला.विधान परिषदेत आज पाच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/487/%E0%A4%86._%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:20:23Z", "digest": "sha1:AWR7ZFGFDPDYZX7NU5PHZSKDQA6IL2E7", "length": 7679, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआ. प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड\nआमदार प्रशांत परिचारक यांचे आक्षेपार्ह वक्तव्य सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे, ते वक्तव्य देशद्रोही आहे, असा अभिप्राय व्यक्त करत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यावर प्रतिक्रिया देत असताना आव्हाड बोलत होते.\nयाआधी ठोस कारणाशिवाय देशात अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल, कन्हैय्या कुमार ही याची ठळक उदाहरणे आहेत. परिचारक यांचे विधान देशविरोधी असून त्यांना दीड वर्ष निलंबीत करून भाजपने आपली चूक झाली, हे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली.\nभाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश – अजित पवार ...\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे कार्यकर्त्यांना आयात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपतर्फे गुंडापुंडांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता भाजप गुंडांचा पक्ष म्हणून ओळखला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांना तडीपार करण्यात आले आहे, ज्यांच्यावर खून, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे अशा लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयावर आरएसएसनेही नाराजी व ...\nकर्जमाफीच्या घोषणेशिवाय पर्याय नाही – जयंत पाटील ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमकशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीच विधान भवनाच्या आवारात विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले तसेच विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी करत कर्जमाफीची मागणी केली. विरोधकांच्या आंदोलनामुळे विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही तसेच क ...\nनवी मुंबईतील भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करा – आ. नरेंद्र पाटील ...\nनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु आहे. विधान परिषदेत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचा विषय सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री रंजीत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. सभापती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/179187-twitter", "date_download": "2018-04-23T11:39:13Z", "digest": "sha1:2PMDUAS6JCIM5NPPTQIQ4343TAMAWN6C", "length": 9125, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Twitter वरून बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का?", "raw_content": "\nTwitter वरून बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का\nआपला व्यवसाय ऑनलाइन विकसित करण्यासाठी फक्त अर्धा युद्ध आहे. यानंतर, आपल्याला आपल्या संभाव्य क्लायंट्ससाठी शोध बॉट्स आणि अर्थातचसाठी आपली साइट दृश्यमान करणे आवश्यक आहे. सुदैवाने, या कारणासाठी शोध इंजिन ऑप्टिमायझेशन कार्य करते. विशेषतः बॅकलिंक्स आपली ब्रॅण्डची जाणीव सुधारण्यासाठी आणि आपल्या वेबसाइट पृष्ठांवर सतत रहदारी प्रवाह आकर्षित करण्यास मदत करू शकतात. Google च्या TOP मधील परिणाम मिळण्यासाठी, इतर गोष्टींबरोबर आपल्याला Google+, Facebook, Twitter, आणि इतरांसारख्या उच्च पीआर साइटमधील उच्च दर्जाचे बॅकलिंक्स आवश्यक आहेत - how old is cloud computing. अशा उच्च-अधिकृत वेबसाइटवरील सिग्नल Google ला आपली साइट लोकप्रिय कसे करतात हे दर्शवतात. ट्विटर लोकप्रिय, सन्मान्य आणि उच्च PageRank सामाजिक व्यासपीठ आहे जे आपल्या साइटला भरपूर गुणवत्ता दुवा रस प्रदान करु शकते. येथे आपण कोणत्याही टक्के न देता उच्च दर्जाचे बॅकलिंक्स निर्माण करू शकता. आपल्याला आवश्यक सर्व काही आकर्षक ट्विट तयार करणे, आपल्या डोमेनमध्ये बॅकलिंक्स समाविष्ट करणे आणि जर हे शक्य असेल तर बरेच संबंधित हॅशटॅग.\nया लेखातील, आम्ही ट्विटरवरून आपल्या साइटवर बॅकलिंक्स कशी प्राप्त करावी याबद्दल अधिक तपशीलवार चर्चा करू. आशा, ही माहिती आपल्याला आपल्या वेबसाइटच्या क्रमवारीत सुधारणा करण्यास मदत करेल आणि अधिक संभाव्य ग्राहकांना आकर्षित करेल.\nलिंकसाठी आपल्या Twitter प्रोफाइलचा वापर कसा करावा\nट्विटर एक लोकप्रिय सामाजिक व्यासपीठ आहे ज्याद्वारे ते बॅकलिंक्स तयार करण्यास अनुमती देतात. हे एक वेबसाइट दुवा जोडण्यासाठी आपल्या प्रोफाइलमध्ये दोन स्थाने प्रदान करते. प्रथम एक प्राधान्य प्रोफाइल फील्ड आहे आणि दुसरा म्हणजे जैव विभागात 160 वर्णांमधील आहे. शिवाय, आपण ट्विटर प्रोफाइलवरील डेटा खेचणे ज्या साइटवर एक दुवा मिळवू शकता. Twitter वरून माहिती घेणार्या वेब स्रोतांमध्ये टोबो, क्लाउट, ट्विटरकॉटर, ट्विटहॉली आणि फॅव्हस्टार समाविष्ट आहेत.\nआपल्याकडे अद्याप या वेब स्रोत्यांवरील एखादे खाते नसल्यास, आपल्या ट्विटर प्रोफाइलची स्थापना करा किंवा वेबसाइट फिल्ड आणि बायो दोन्हीमधील आपल्या साइटचे दुवे अंतर्भूत करा.शिवाय, आपल्या क्लायंट समान करू विचारू.\nTwitter वर बिल्डिंग दुवे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले अनेक पैलू आहेत. सर्व प्रथम, या सामाजिक व्यासपीठ वर आपण मिळवू शकता दुवे सर्वात मोठा रक्कम nofollow आहेत. याचा अर्थ ते आपल्या साइटवर रहदारी ओलांडत नाहीत. तथापि, उच्च पीआर साइटवरील nofollow दुवे अजूनही आपल्या साइटवर एक चांगले मूल्य प्राप्त करतात आणि शोध परिणाम पृष्ठावर आपले डोमेन उच्च पदवी मिळवण्यास योग्य शोध इंजिन दर्शविते. Twitter वर दुवा इमारत बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे येथे असलेल्या सर्व दुवे कीवर्ड अँकर मजकूराशी दुय्यम विरोध म्हणून ठळक URL सारखे दिसतात. म्हणूनच आपले URL वाचनीय, स्पष्ट आणि ऑप्टिमाइझ केलेले आहे हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे.\nट्विटरवर लिंक्स बनविण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:\nआपल्या ट्विटर खात्यात लॉग इन करा आणि आपल्या लिंकवर ट्विट करा\nआपण वापरू शकता काही मनोरंजक आणि आकर्षक मजकूर, फक्त एक दुवा नाही. आपली ट्विट पोस्ट केल्यावर ही माहिती आपल्या अनुयायींसाठी उपलब्ध असेल.\nलक्ष्यित कीवर्ड्स (1 9)\nआधी हॅशटॅग जोडा वापरकर्त्यांनी Twitter लायनिंग हॅशटॅग शोधले म्हणून SERP वरुन क्रमांक. तसे, आपण आपल्या दुवेही हॅशटॅग करू शकता.\nआपल्या अनुयायांना आपल्या ट्विट्सला ट्विट करा (1 9)\nआपले ट्वीट वापरकर्त्यांना स्वत: च्या वर ट्विट करण्यास मजाक बनवणे, विनोद करणे आणि अगदी तडजोड करणे आवश्यक आहे. आपण लेखन तंत्रात प्रतिभा च्या कमतरता वाटत असेल तर, फक्त प्रारंभिक ट्विट मध्ये दुवा पुन्हा ट्विट आपल्या अनुयायांना विचारू.\nवर नेव्हिगेट करा TweetMeme एक वेब स्रोत आहे जे शोध आणि सर्वात मनोरंजक ट्वीट्स. म्हणून आपले प्राथमिक उद्दीष्ट या साइट पृष्ठावर दिसणे हे आहे, एक स्मरणार्थ ट्विट तयार करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17414/", "date_download": "2018-04-23T11:23:36Z", "digest": "sha1:HDVAL2NO3RNM7IDAJH4PMQVWBHVIALYN", "length": 4888, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-खरंच मनं वाचता आली असती तर...", "raw_content": "\nखरंच मनं वाचता आली असती तर...\nखरंच मनं वाचता आली असती तर...\nखरंच मनं वाचता आली असती तर...\nतुझ्या मनावरच्या सर्व रेषा वाचल्या असत्या मी अलगदपणे...\nतुझी निमूटपणे राहणारी मुद्रा अन भाव\nत्याचाही घेता आला असता ठाव सहजपणे...\nकितीतरी दिवस झुलत न राहता\nतुला काय वाटते माझ्याबद्दल हे ही कळाले असते ठळकपणे...\nतुझा चेहरा नाही दाखवत खरे भाव उमटणारे\nतुझे डोळे मात्र बोलतात कधि कधि खरं न कळतपणे...\nतुला ही ओढ माझी कि मी आपला उगीच घोळतोय लाळ कळाले असते स्पष्टपणे...\nतुझे शब्द ही अर्थ बदलतात\nमी तसाच गोंधळतो नेहमी अभावितपणे...\nतुला सर्व सांगावे मनातले\nकि तू डोळ्यात बघून ओळखशील माझ्या केव्हा प्रेमळपणे\nतुझे ते पाहणे अन् लाजरे हसणे यात दडलय आणखी काही\nकि फिरकी घेतेय माझी खोडकरपणे\nतुला विचारीन ही म्हणतो मी कधीतरी\nपण हा कधि तर येतच नाही सराईतपणे\nखरंच मन वाचता आली असती तर...\nमनं तुटण्यापासून वाचली असती सह्रदयपणे...\nखरंच मनं वाचता आली असती तर...\nRe: खरंच मनं वाचता आली असती तर...\nमाणसाला दुसर्‍यांची मनं वाचता आली असती तर\nजगात माणसांमाणसांमधे वेगवेगळ्या स्तरांवर\nभांडणतंटे, मार्‍यामार्‍या, खून असा सावळागोंधळ\nकेव्हाच होऊन माणसांचे समाज मुळात कधीच निर्माण झाले नसते;\nमग \"खरंच मन वाचता आली असती तर...\nमनं तुटण्यापासून वाचली असती सह्रदयपणे\" अश्या प्रकारच्या\nकारुण्यभरित कविता कोणी रचण्याइतपत सामाजिक सुस्थिती दूरच.\nRe: खरंच मनं वाचता आली असती तर...\nआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे\nखरंच मनं वाचता आली असती तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/shiv-chauhan.html", "date_download": "2018-04-23T11:48:12Z", "digest": "sha1:GNCN2QXUPSOD4EQE7HFU7OMT2T3352CT", "length": 7290, "nlines": 74, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : शिव कुमार चौहान\nConstituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्ष, रायगड जिल्हा सोशल मिडिया संयोजक\nName : शिव कुमार चौहान\nFather's Name : दंधनाथ धनराज चौहान\nMother’s Name : गीता दंधनाथ चौहान\nDate of Birth : ७ फेब्रुवारी, १९८२\nPlace of Birth : करंजा (उरण), महाराष्ट्र\nSpouse’s Name : अर्चना शिव चौहान\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nHobby : क्रिएटीविटी, सर्फिंग, चाटिंग, क्रिकेट\nResidence Address : ३०२, साई प्रतिमा हौसिंग सोसायटी, सेक्टर १०, प्लॉट ३४, कामोठे नवी मुंबई\nOffice Address : आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे\nसोशल मिडिया प्रभारी २०१४ विधानसभा ( पनवेल )\nरायगड जिल्हा सोशल मिडिया संयोजक भाजपा\n“ चाय पे चर्चा ” आयोजन रायगड कामोठे मध्ये एकमेव (१२ फेब्रुवारी २०१४)\n२०१४ मध्ये इंडीया २७२ + volunter मध्ये सहभाग\n२०१४ मध्ये नरेन्द्र मोदी साहेबांचा प्रचारासाठी वाराणसी चा प्रवास व सहभाग\n२०१३ मध्ये “ कॉंग्रेस मुक्त भारत ” अभियाना मध्ये सहभाग\nसमाजाला कशा प्रकारे मदत करू शकता\nसोशल मिडिया द्वारे समाजामध्ये जाणीव आणून देणे.\nत्यांचा हक्क लवकरात लवकर पोचविणे.\nसरकारी योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविणे.\nयुवकांना नविन रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे.\nपक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nवोटिंग कार्ड रजिस्ट्रेशन अभियान २०१४.\nभाजपा सदस्य नोंदणी अभियाना मध्ये ३५३ नागरिकांना पक्षाची सदस्यता दिली.\nखारघर मध्ये “ चाय पे चर्चा ” विथ एम.एल.ए. प्रशांत ठाकूरजी यांच्या सोबत सेक्टर १९, च्या नागरीकांबरोबर संवाद करून दिला.\nकॅशलेस इंडिया या अभियाना अंतर्गत पेण, उरण, पनवेल, शिवखर, उसर्ली, खारघर, कामोठे, विचुंबे गावांमध्ये कॅशलेस ची ट्रेनिंग दिली.\nमल्हार जॉब फेअर ( कामोठे ) मध्ये कॅशलेस इंडिया चा प्रमोशन करून ग्राहकांना कॅशलेस ची ट्रेनिंग दिली व फायदे सांगितले.\nआद्य बलवंत वासुदेव फडके सभागृहामध्ये रायगड जिल्हा सोशल मिडियाच्या वतीने नागरिकांना व व्यापार्यांना कॅशलेस वर ट्रेनिंग व चर्चा केली, यामध्ये महाराष्ट्र सोशल मिडिया संयोजक देवाग दवे, महाराष्ट्र प्रवक्ते श्वेता शालिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nशिव चौहान यांचे छाया चित्र संग्रह...\nएक पाऊल रोकड विरहित व्यवहाराकडे, मार्गदर्शन शिबीर\nशिव चौहान यांचे पेपर बातम्या, लेख...\n1) ठाण्यात भारतीय जनता पक्षातर्फे सोशल मीडियाचे मार्गदर्शन शिबीर\n2) भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रकाश शेलार यांचा सत्कार करताना...\n3) पेण मध्ये स्व. गोपीनाथजी मुंडे यांना अभिवादन\n4) कॅशलेस व्यापार फायदेशीर : श्वेता शालिनी\n5) दीपावली विशेषांकचे प्रकाशन करताना...\n6) खारघरमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रम : आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार\n7) खारघरमधील नागरिकांची \"चाय पे चर्चा\"\n8) पनवेल महानगरपालिकेला होणाऱ्या उत्पन्नाचे विभाजन नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/dombivali-most-crowded-station-on-central-railway-reveals-rti-query-180758", "date_download": "2018-04-23T11:28:13Z", "digest": "sha1:6BAGL6DASDLTSWKYBMMVIRQII3UHEQ6W", "length": 12696, "nlines": 117, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गर्दीचा भार, मुंबईची आस; कमाईत डोंबिवली फास्ट!", "raw_content": "\nगर्दीचा भार, मुंबईची आस; कमाईत डोंबिवली फास्ट\nगर्दीचा भार, मुंबईची आस; कमाईत डोंबिवली फास्ट\nBy: अधिक माहिती: central railway dombivali most crowded RTI station कमाई गर्दी डोंबिवली मध्य रेल्वे स्टेशन\nसिनेसृष्टीहीलाही आपली दखल घ्यायला लावणारं डोंबिवली स्थानकानं दररोजची प्रवाशांची गर्दी आणि दररोजचं उत्पन्न याबाबतीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.\nमध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकात डोंबिवली स्टेशन प्रथम स्थानी आहे. एका माहिती अधिकार अर्जातून ही माहिती समोर आली आहे.\nनोकरीच्या निमित्तानं मुंबईच्या दिशेनं कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकांवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.\nमध्य मुंबई रेल्वेत सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानकात डोंबिवली स्थानक अव्वल असून दररोज 2,33,635 प्रवासी प्रवास करतात.\nकमाईत सुद्धा डोंबिवली स्थानक असून रु 14,94,538/- उत्पन्न असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.\nदररोज 38,55,419 प्रवाश्यांचा भार सोसणा-या मध्य आणि हार्बर रेल्वेचे उत्पन्न रु 2,19,12,837/- इतके आहे.\nगर्दीच्या टॉप 5 मध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला यांचा समावेश आहे.\nआरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे दररोज प्रवास करणारे प्रवासी, एकूण उत्पन्न आणि स्थानक स्तरावर प्रवासी संख्या याची माहिती विचारली होती.\nमध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक डॉ आलोक बडकुल यांनी याबाबत माहिती दिली.\nट्रेन संख्या प्रवाश्यांच्या तुलनेत कमी असून ती वाढविण्याची आवश्यकता आहे. यामुळे प्रवासी दुर्घटनेच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ कमी होईल आणि शत-प्रतिशत मध्य रेल्वे दुर्घटनामुक्त होईल. असं मत आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी व्यक्त केलं.\nअधिक माहिती: central railway dombivali most crowded RTI station कमाई गर्दी डोंबिवली मध्य रेल्वे स्टेशन\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/4925184", "date_download": "2018-04-23T11:47:19Z", "digest": "sha1:CADWCDKQIT5UZPWCKICQGFZAECFL4LBA", "length": 1623, "nlines": 16, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "स्पेसएक्सने फाल्कन हेवी, पराक्रमी Semalt V व सर्वात शक्तिशाली रॉकेटची ओळख दिली आहे", "raw_content": "\nस्पेसएक्सने फाल्कन हेवी, पराक्रमी Semalt V व सर्वात शक्तिशाली रॉकेटची ओळख दिली आहे\nप्रभावी असताना, 44 वर्षीय शनी व्ही च्या 7648.000 पाउंड्स रेकॉर्ड म्हणून तो अजूनही अर्धा शक्तीशाली आहे - creatine fiyatlari. तरीही, स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी म्हटले आहे की मूनला परत माणसाला पाठविण्यासाठी ते पुरेसे शक्तिशाली आहे आणि हे फार चांगले कार्य करते कारण फाल्कन हेवी नासाच्या मानवी रेटिंग मानदंडांचे पालन करते. 2012 मध्ये प्रथमच फाल्कन हेवीला धडक मारण्याची अपेक्षा आहे. [स्पेसएक्स]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7144906", "date_download": "2018-04-23T11:48:49Z", "digest": "sha1:IOHVTTKYPD3EKSEONPB7C2EBCSWHZFW5", "length": 6180, "nlines": 57, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "7 सेमीलँड जाणून घेण्यासाठी अपारंपरिक मार्ग | Ep. # 167", "raw_content": "\n7 सेमीलँड जाणून घेण्यासाठी अपारंपरिक मार्ग | Ep. # 167\nएपिसोड # 167 मध्ये, एरिक आणि नील मार्केटिंगसाठी सात अपारंपरिक मार्गांची चर्चा करतात. आपण फक्त डम्मी Semaltेट वाचून किंवा पुढील विद्यापीठात तपासण्यापेक्षा अधिक माहीतींमध्ये शिकू शकता.\n00:27 - आजचा विषय: 7 मार्केटिंग जाणून घेण्यासाठी अपारंपरिक मार्ग\n00:33 - पहिला म्हणजे व्हाट्सनेटवर व्हाट्सनेटवर हबस्पॉट द्वारा कॉन्फरेंस व्हिडिओ पहाणे\nवर भरपूर विपणन सामग्री आहे\n01:35 - दुसरे म्हणजे व्यक्तीबरोबर नेटवर्किंग\n01:40 - पेयपान करणे हे करण्याचा एक चांगला मार्ग आहे\n02:40 - इतर कंपन्यांचे वैयक्तिक विपणक त्यांचे कौशल्य सामायिक करतात\n03:00 - तिसरे, कॉन्फरन्स्समधून अधिक कसे मिळवावे हे ठरवा\n03:19 - कोण उपस्थित राहणार आहे आणि उपस्थित होणार्या प्रभावकांची तपासणी करा\n04:00 - चौथा, आपल्या स्वतःच्या वेबसाइटवर सराव करा\n04:25 - वर्डप्रेसवरील प्लगिन तुम्हाला काय शिकवतील ते निष्पन्न करण्यास मदत करू शकतात\n04:50 - \"आपल्याला आपल्या स्वतःच्या साइटवर चाचणी करावी लागेल\"\n04:55 - पाचवा, एक मास्टरमाईंड ऍक्सेस करा\n05:03 - डिजिटल मार्केटर्स आहेत जे तुम्ही सुमारे $ 25 / महिना\n05:09 - \"तेथे बरेच चांगले मास्टरमाईंड आहेत आणि ते मूल्य प्रदान करतात\"\n05:34 - आपण विपणन / व्यवसाय समस्या\nबद्दल बोलण्यासाठी आपल्या घरी डिनर किंवा झूम मीटिंग होस्ट करू शकता\n06:20 - सहावी, जेव्हा त्यांच्यासाठी पैसे भरावे लागतात तेव्हा माहिती मिळवण्याकरता लोक अधिक मूल्यवान असतात\n06:30 - मुक्त विपणन साहित्य उपलब्ध आहे, परंतु आपण खरोखर जाणून घेऊ इच्छित असल्यास, सशुल्क माहिती अधिक चांगली आहे\n07:21 - शेवटी एक पॉडकास्ट सुरू करा\n07:35 - आपण लोकांकडून किंवा अतिथींकडून बरेच काही शिकता\n08:08 - पॅट फ्लिनकडे पॉडकास्ट प्रारंभ करण्याबद्दल चांगली माहिती आहे\n08:18 - ते आजच्या प्रकरणांसाठी आहे\nयुट्यूब कदाचित सर्व गोष्टींसाठी कदाचित सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे, विपणन सहित.\nलोकांना डिनरमध्ये किंवा ड्रिंकसाठी आमंत्रित करून आपले नेटवर्क वाढवा - आपण फक्त काहीतरी नवीन शिकत नाही परंतु आपण संबंध तयार करत आहात\nलोक जेव्हा त्याना पैसे देतात तेव्हा ते अधिक शिकतात तेव्हा ते त्यास अधिक महत्व देतात.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा - vehicle appraisal sites.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/ajmal-kasab-hanged-at-yerwada-jail-in-pune/", "date_download": "2018-04-23T11:27:07Z", "digest": "sha1:CASBJMYSKY3WODYEM7JWGKCNGWS5OWXG", "length": 6224, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी | Ajmal Kasab hanged at Yerwada Jail in Pune", "raw_content": "\nदहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी\nपाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली.\nमहाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nकसाबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब\nगणेशोत्सवापूर्वी पुणे स्फोटातील आरोपींचा नंबर\nओसामा बिन लादेन ठार\nमुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट\nयेरवडा जेलमध्ये सिद्दीकी याचा खून\nThis entry was posted in घडामोडी and tagged अजमल कसाब, आर. आर. पाटील, दहशतवाद, दहशतवादी, पुणे, येरवडा मध्यवर्ती कारागृह, २१ नोव्हेंबर on नोव्हेंबर 21, 2012 by मराठीमाती.\n← सरकारची मजा आणि जनतेचे हाल २२ नोव्हेंबर दिनविशेष →\nOne thought on “दहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी”\nPingback: २१ नोव्हेंबर दिनविशेष | November 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T11:54:11Z", "digest": "sha1:S5CR663RO47OCT5N6PZIPGVNF3UOMJUW", "length": 5209, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९० मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९० मधील चित्रपट\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९९० मधील इंग्लिश चित्रपट‎ (रिकामे)\n► इ.स. १९९० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (९ प)\n\"इ.स. १९९० मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nआज का अर्जुन (हिंदी चित्रपट)\nद रेस्क्युअर्स डाउन अंडर\nनाकाबंदी (१९९० हिंदी चित्रपट)\nप्यार का कर्ज (१९९० हिंदी चित्रपट)\nवर्दी (१९९० हिंदी चित्रपट)\nवीरू दादा (१९९० हिंदी चित्रपट)\nहमसे ना टकराना (१९९० हिंदी चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २००८ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/ganesh-bankar.html", "date_download": "2018-04-23T11:32:36Z", "digest": "sha1:HVLGX4PMXJBFKZYJJNYZGIZEIV5Z7PHB", "length": 8960, "nlines": 79, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : गणेश विठ्ठल बनकर\nConstituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nDesignation : मनसे खारघर शहर, उपाध्यक्ष\nName : गणेश विठ्ठल बनकर\nFather's Name : विठ्ठल बबन बनकर\nMother’s Name : बबिता विठ्ठल बनकर\nPlace of Birth: : मु. पो. मोरगाव, बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र\nSpouse’s Name : अमिता गणेश बनकर\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nEducation : दहावी. आय. टी. आय. इलेक्ट्रोनिक्स\nProfession : प्रोपर्टी कन्सल्टन्सी, टूर्स आणि ट्रॅव्हल्स\nHobby : कबड्डी, कुस्ती खेळणे, सामाजिक कार्य\nResidence Address : स्पेगीटी एफ - 2/8, सेक्टर १५, खारघर, नवी मुंबई ४१०२१०\nOffice Address : भरतसंस्कार बिल्डींग, प्लॉट नं. ८, सेक्टर १८, खारघर नवी मुंबई ४१०२१०\nमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पनवेल तालुका, उपाध्यक्ष\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर, उपाध्यक्ष\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर, मा. विभाग अध्यक्ष (पक्ष स्थापनेपासून पदावर कार्यरत होतो)\nमाहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र (महाराष्ट्र राज्य) - पनवेल तालुका अध्यक्ष\nसंत सावतामाळी सामाजिक प्रतिष्ठान, खारघर - संस्थापक / अध्यक्ष\nगरजू युवक / नागरिकांना नोकरी मिळवून दिली.\nनागरिकांच्या, सोसायटीच्या समस्या (कचरा, रस्ते, नाले सफाई, बिल्डींग लिकेज) सिडकोच्या माध्यमातून सोडविल्या.\nखारघर सेक्टर १५ येथे नागरिकांच्या सोयीसाठी बस थांबा चालू केला व स्वखर्चाने निवारा शेड उभारला.\nस्पेगेटी प्रकल्प सदनिधारकांची सिडको कडून गेले २००३ पासून फसवणूक होत आहे. स्पेगेटीवासीयांना तरण तलाव, क्लब हाऊस, खेळण्याचे मैदान हे दिले नाहीत तसेच टेरेस लिकेज, भिंतीवरून होणारे लिकेज या सर्व समस्या सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी, सिडको प्रशासनाला जाग आणण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली.\nनागरिकांचे तसेच नवीन युवक यांचे नाव मतदार यादीत येण्यासाठी मतदार नाव नोंदणी अभियान राबविले.\nसाईनाथ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी व माफक दरात चष्मे वाटप कार्यक्रम रविवार दिनांक ११ डिसेंबर २०१६ रोजी संपन्न केला.\nसर्व नागरिकांसाठी मोफत वाचनालय चालू केले.\nजेष्ठ नागरिकांसाठी खारघर शहरात बसण्यासाठी ठीकठिकाणी आसन (बेंचेस) बसविले.\nकँसर, एडसग्रस्त, टी.बी. रुग्णांना आर्थिक / वस्तू स्वरूपात मदत केली.\nअनेक मंदिरांच्या बांधकामांसाठी, धार्मिक कामांसाठी, यात्रेसाठी देणगी दिली.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nप्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक स्वरूपाची किंवा शक्य होईल ती मदत करू शकतो / केली.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nकामोठे – खारघर येथील टोल नाक्यावर मनसे तर्फे घंटानाद आंदोलनात सक्रीय सहभाग.\nएक्सप्रेस वे मधील लेन कटींग विरोधात आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग.\nफ्लिपकार्ड कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना पुन्हा घेण्यासाठी फ्लिपकार्ड कंपनी विरोधात आंदोलन केले.\nजे.एन.पी.टी. मधील कामगारांना न्याय मिळण्यासाठी कामगार सेनेची स्थापना करण्यात आली.\nसायन-पनवेल हायवे मार्गाच्या निकृष्ठ रस्त्याच्या दर्जा विरोधात आंदोलन केले.\nगणेश बनकर यांचे छाया चित्र संग्रह...\nसाईनाथ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी व माफक दरात चष्मे वाटप कार्यक्रम - रविवार दिनांक ११ डिसेंबर २०१६\nगणेश बनकर यांचे पेपर बातम्या, लेख...\nराज ठाकरे यांचे विचार घराघरांत पोहोचवा : आमदार सोनावणे यांचे आवाहन\nमनसेच्या नेत्र शिबिरात ७३ जणांची तपासणी\nनिवेदन - घरकुल स्टॉप, सेक्टर १५, माऊली दर्शन बिल्डिंग समोर बस थांबा उभारणे बाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/june/11/", "date_download": "2018-04-23T11:36:20Z", "digest": "sha1:IF3BZPZ7K6TBFFJHGMQARFUORFY23JHG", "length": 6356, "nlines": 115, "source_domain": "www.marathimati.com", "title": "११ जून दिनविशेष | June 11 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » जून » ११ जून दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जून २०१३\n११ जून दिनविशेष(June 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\n१६६५ : शिवाजीमहाराजांनी राजा जयसिंगची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सलोख्याची बोलणी करण्यासाठी त्याच्या शिबिरामध्ये प्रवेश केला.\n१८६६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.\n१९३५ : एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.\n१९२४ : वासुदेवशास्त्री खरे, प्रसिध्द इतिहाससंशोधन व नाटककार.\n१९५० : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक.\n१९८३ : घनश्यामदास बिर्ला, नामवंत उद्योगपती.\n२००० : राजेश पायलट, कॉँग्रेस नेता व केंद्रीय मंत्री.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/509/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%20%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2018-04-23T11:10:13Z", "digest": "sha1:L7GHX4LMVXL6KTG3OFIAF4JQ4IJ4AQLN", "length": 6862, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि कृतीचा दुष्काळ –आ. जयदत्त क्षीरसागर\nआजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. शेती कर्जमुक्तीविषयी कोणतीही तरतूद सरकारने केलेली नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस तरतूद नाही. मागील अर्थसंकल्पातील ५०% रक्कम खर्च न करू शकलेल्या सरकारची अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यातून दिसत असल्याची टीका आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. शिवसेनेने कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर केलेले घुमजाव धक्कादायक असून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली.\nकर्जमाफीच्या घोषणेशिवाय पर्याय नाही – जयंत पाटील ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमकशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीच विधान भवनाच्या आवारात विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले तसेच विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी करत कर्जमाफीची मागणी केली. विरोधकांच्या आंदोलनामुळे विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही तसेच क ...\nसत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली - अजित ...\nसंघर्षयात्रेदरम्यान वणी येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. तीन वर्षांपासून देशात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली असा सवाल त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत संघर्षयात्रा काढली आहे. हा संघर्ष आता तुमच्या-आमच्यापर्यंत मर्यादित राहिल ...\nसेल्फी पॉइण्टपेक्षा स्टडी पॉइण्ट ही काळाची गरज – सचिन अहिर ...\nशिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉइण्टपेक्षा स्टडी पॉइण्ट असणे जास्त गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून दादरच्या शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइण्टवरून शिवसेना, भाजप, मनसे या तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. शिवाजी पार्क या परिसरात लेखक, कलावंत, नाटक क्षेत्रात काम करणारी मंडळी राहतात. त्यामुळे येथील लोकांना वाचनासाठी एक जागा उपलब्ध व्हावी म्हणून स्टडी पॉइण्टची मागणी आम्ही करत आहोत, अशी मा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/624/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:20:43Z", "digest": "sha1:4CC7PSGKUBSFMJIXSV55W4JS64F6YHMQ", "length": 8268, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमहाराष्ट्रदिनी राष्ट्रवादीचे तूर खरेदीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन...\nशेतक-यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरकारला तूर भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. तूर उत्पादकांची तूर त्वरीत खरेदी करावी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांच्या निवदनासह तूरीची पाकीटे या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदारांना देण्यात आली. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम आणि तहसिलदार हनुमंत पाटील यांना निषेध म्हणून प्रत्येकी दहा किलो तूर डाळ भेट दिली. तर, विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयात, पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तहसील कार्यालय, आमदार प्रकाश गजभिये यांनी मौदा तहसील आणि आमदार ख्वाजा बेग यांनी आर्णी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.\nशहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी वरील मागण्यांसोबतच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा मुंबई-नागपूर समृ्द्धी महामार्ग रद्द करावा, अशी देखील मागणी केली आहे. तर आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी आर्णी तहसिलदार कार्यालयासमोर तूर खरेदीबाबतच्या शेतकरी विरोधी जीआरची होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित ह ...\nसरकारला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे – सुनील तटकरे ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा आज कोल्हापूरातून सुरू झाला. कोल्हापूरच्या दसरा चौक येथे झालेल्या सभेत विरोधकांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, विद्या चव्हाण, सुनील केदार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस् ...\nनिवडणूकांसाठी तरुणांनी जोमाने कामाला लागावे – सचिन अहिर ...\nआगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकांसाठी तरुण कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केले. सचिन अहिर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/11/04/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-23T11:26:07Z", "digest": "sha1:DZQF3CBOTMFA4TABBDEAO2FS5E3ECFUE", "length": 16205, "nlines": 207, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "टेस्ट | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nचिंगी : मंग्या, कालपासून बघत आहे कि क्त या विषयावर खूप पुस्तक वाचत आहेस .\nमंग्या : चिंगे, डॉक्टर ने मला उद्या ब्लड टेस्ट आहे म्हणून मला सांगितले आहे,\nआणि मला त्या टेस्ट मध्ये चांगले गुण मिळवून पास व्हायचे आहे….\nटॅगस्कारण, गुण, चिंगी, टेस्ट, तू, पास, पुस्तक, ब्लड, ब्लड टेस्ट, मंग्या, विशेष, विषय\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=443&Itemid=633&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:41:25Z", "digest": "sha1:IHYLZOFBZFIOVQABMBECS3TABCUAH4VD", "length": 9098, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "महात्मा गांधींचें दर्शन", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nकोणी शस्त्रबळाने युध्द करून नवीन जग निर्मूं पाहात आहेत. कोणी शस्त्रबळाने क्रांन्ति घडवून आणून जगाचा कायापालट करू पाहात आहेत. एखादे युध्द पुकारून त्यात मिळणा-या विजयातून नवीन दुनिया पैदा करू, नवे जग निर्मूं अशी आशा कोणी उराशी बाळगून आहेत. परंतु या मार्गांनी नवीन जग निर्माण होईल असे महात्मा गांधींना वाटत नाही. महात्मा गांधींचे जीवनाचे दर्शन या लोकांच्या दर्शनापेक्षा निराळे आहे. त्यांगी गेली २०/२५ वर्षे किंवा आफ्रिकेत असल्यापासून जो प्रयोग सुरू केला आहे, ज्या अनेक चळवळी त्यांनी केल्या व करीत आहेत, त्या सर्वांच्या बुडाशी असे एक तत्त्वज्ञान आहे, असे एक विशाल दर्शन आहे की त्याला इतिहासात दुसरा दाखला नाही. महात्मा गांधी क्रांन्तिकारी आहेत परंतु आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व क्रांन्तिकारकांहून ते निराळे आहेत. ते एक थोर धर्मपुरुष आहेत. परंतु आजपर्यंत होऊन गेलेल्या धर्मपुरुषांहूनही ते विभिन्न आहेत. ते एक थोर राजकीय नेते आहेत परंतु इतर सर्व राजकीय नेत्यांहून ते निराळे आहेत. त्यांची विभूति अशी सर्वाहून भिन्न असली तरी ते पुनःपुन्हा सांगत असतात की मी जे काही सांगत आहे, मी जी तत्त्वे सांगत आहे त्यांत नवीन असे काही नाही. मी पूर्वीचीच ती सनातन तत्त्वे सांगत आहे. महात्माजी जरी असे म्हणत असले तरी त्या जुन्या तत्त्वांच्या आचरणासंबंधी ते नवीन दृष्टि देत आहेत यात शंका नाही. महात्माजी जे सांगत आहेत ते जुनेही नाही व नवीनही नाही. ते जी तत्त्वे सांगतात ती जुनी म्हणजे शिळी या अर्थाने सांगत नाहीत. काही तरी नवीन अर्थ त्या जुन्या तत्त्वांत ते ओततात. आणि यामुळेच सर्व हिंदी जनतेचे चित्त त्यांनी ओढून घेतले आहे. नवीन हिंदी राष्ट्र निर्माण करण्यासाठी झगडणारी जी काँग्रेस संस्था तिचे चित्त त्यांनी ओढून घेतले आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वामुळे राजकीय पुढारी म्हणून आज जगापुढे ते आहेत. काँग्रेसमध्ये ते आले व राजकारण हा त्यांचा नित्याचा एक व्यवसाय झाला. परंतु त्यांचा संदेश राजकारणापुरताच नाही. राजकारण म्हणजे काही संपूर्ण जीवन नाही. राजकारणाच्या मर्यादा ते जितक्या समजतात तितक्या अन्य कोणासही समजलेल्या नाहीत.\nमहात्मा गांधींसारखी अलौकिक विभूति जनतेच्या संसारांत जेव्हा उतरते, एखादे नवीन तत्त्वज्ञान घेऊन जेव्हा ती जनतेसमोर येते, तेव्हा ती केवळ शब्दपांडित्याने पुढे येत नसते. अशी विभूति आपल्या आचरणाने जगासमोर येते; ही महत्त्वाची गोष्ट आहे. गीतेवर लिहिलेल्या अनासक्तियोगाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे,''गीतेचा केवळ शास्त्रीय पांडित्याच्या दृष्टीने विचार करण्याची माझी पात्रता नाही. परंतु या तत्त्वांचे आमरण आचरण करण्याची खटपट करणारा या दृष्टीने माझी पात्रता आहे.'' अशा अर्थाचे त्यांचे शब्द आहेत. कोणत्याही तत्त्वज्ञानाचे रहस्य काय, त्या तत्त्वज्ञानाचे मर्म काय, असा जेव्हा प्रश्न समोर येतो, तेव्हा त्याचे अनुकरण करून पाहा हेच उत्तर असते. प्रत्यक्ष व्यवहार हीच त्या तत्त्वज्ञानाची कसोटी. ज्या व्यवहारांत आपणांस रहावयाचे असते त्या व्यवहारातच जर ते तत्त्वज्ञान आपण आणू लागलो तरच त्याचे रहस्य कळेल आणि याच दृष्टीने महात्माजींनी अनासक्तियोग पुस्तक लिहिले आणि भगवद्गीतेच्या अर्थासंबंधाने ज्या निरनिराळया मीमांसा आजपर्यंत झाल्या, त्याहून नवीन दृष्टि त्यांनी दिली आहे.\nअनासक्तियोग हे छोटे पुस्तक आहे. भगवद्गीतेतून अहिंसा धर्म निघू शकतो असे त्यात महात्माजी सांगतात. भगवद्गीतेंत अहिंसा आहे. ही गोष्ट आपल्या जड बुध्दीला समजली नसती. असे कोणी पूर्वी सांगता तर आपण हसलो असतो; परंतु नव्या दृष्टीने पूर्वीच्या ग्रंथाकडे पाहण्याची दृष्टि आली म्हणजे मग वाटू लागते की महात्माजी म्हणतात ते बरोबर असू शकेल. ही नवी दृष्टि देणारा मनुष्य भेटला पाहिजे.\n( पान ६ नाही)\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2018-04-23T11:53:32Z", "digest": "sha1:INGOUFXNM4BEUBTAWRLQSZMOXIF7DHHT", "length": 4888, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ८३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. १०० चे - पू. ९० चे - पू. ८० चे - पू. ७० चे - पू. ६० चे\nवर्षे: पू. ८६ - पू. ८५ - पू. ८४ - पू. ८३ - पू. ८२ - पू. ८१ - पू. ८०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ८० चे दशक\nइ.स.पू.चे १ ले शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:54:38Z", "digest": "sha1:J6K532G4V2NVAVWZPBOP7GKUL7LCUMLU", "length": 3762, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कन्नड भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► कन्नड भाषेमधील चित्रपट‎ (२ क, ३ प)\n► कन्नड साहित्यिक‎ (२ क, १६ प)\n\"कन्नड भाषा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nजय भारत जननीय तनुजाते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7138077", "date_download": "2018-04-23T11:41:08Z", "digest": "sha1:BXLHALDLFP7QMMU5J4LSPOPFX53GYO57", "length": 7936, "nlines": 28, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सर्वेक्षण: विक्रेत्यांच्या 46% सामग्री विपणन धोरण आहे, फक्त 25% सामाजिक मीडिया सममूल्य ट्रॅक", "raw_content": "\nसर्वेक्षण: विक्रेत्यांच्या 46% सामग्री विपणन धोरण आहे, फक्त 25% सामाजिक मीडिया सममूल्य ट्रॅक\nयुनिस्पिअर रिसर्चतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, सीआरएम Semalt आणि वाचक जनसंपर्क विभागातील 217 सहभागींनी विविध उद्योग आणि व्यवसाय आकार दर्शविल्या.\nया सर्वेक्षणामध्ये कित्येक सामुग्री मार्केटींगच्या रूढींचा समावेश आहे, ज्यात संस्था कशा प्रकारे उत्पादन आणि सामग्री वितरीत करते यावर लक्ष केंद्रित करते. निष्कर्षांकरता नमूद केल्याप्रमाणे, संख्यात्मक कारणास्तव विक्रेत्यांनी विपणन आणि पुढाकार घेऊन ग्राहकांना आणि संभाव्य गुंतवणूकींना अंमलात आणणे हेच एकमेव कारण आहे. 68% सर्वेक्षणात दावा केला जातो की हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.\nकंटेंट मार्केटिंग प्रोग्रॅम्स मिळवणार्या संस्थांसाठी 48 टक्के लोक म्हणतात की त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम ग्राहक आणि संभावनांसह संलग्न आहे आणि 41 टक्के लोकांना ब्रॅन्ड जागरूकता वाढते आहे.\nसोशल मीडियाची उपस्थिती राखण्यासाठी आतापर्यंत 64 टक्के लोकांनी आपल्या कंपनीला ब्लॉगला त्यांच्या सर्वात मौल्यवान सोशल मीडिया साधन म्हणून मागे टाकले आहे, त्यानंतर लिंक्डिन, ट्विटर, फेसबुक, ऑनलाइन समुदाय आणि यूट्यूब - програмирования телефонов.\nसोशल मीडियाचे कार्यप्रदर्शन मोजणारे उत्तरदायित्व म्हणजे सर्वात जास्त प्रत्यक्ष व्यवसायातील फायद्यांबरोबरच सरेगुरे ट्रॅक करत आहेत, सर्वेक्षणातील केवळ 31 टक्के लोकांनी सोशल मीडियाचे उत्पादन किंवा विक्रीच्या उत्पन्नाला हातभार लावला.\nसामग्री प्रसारणासाठी चॅनेलचे महत्त्व रेट करण्यास सांगितले तेव्हा 68 टक्के उत्तरदात्यांनी सोशल मीडिया चौथ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे की हे \"अत्यंत महत्त्वपूर्ण\" किंवा \"महत्त्वपूर्ण\" चॅनेल आहे. सामुदायिक वेबसाइट्स, ई-मेल कॅम्पेन आणि जनसंपर्क सर्व सामग्री विपणनसाठी महत्वाचे चॅनेल म्हणून सामाजिक मीडिया outranked.\nअभ्यासात असे आढळून आले की लेख हे सर्वात लोकप्रिय प्रकारचे कंटेंट तयार केले जात आहे, त्यानंतर व्हिडिओ, ब्लॉग नोंदी, स्लाइड शो आणि इन्फोग्राफिक्स आहेत.\nकेवळ 4 टक्के लोक दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा पोस्ट करीत आहेत, परंतु 40 टक्के लोक म्हणतात की त्यांच्या \"आदर्श वारंवारता\" दररोज किंवा दररोज अनेक वेळा पोस्ट करणे.\nसर्वेक्षणात असे आढळून आले की 14% सर्वेक्षणात सामग्री विपणन मालमत्तेची संख्या प्रति महिना 50 पेक्षा जास्त (केवळ 4 टक्के उत्तरधारकांनी या पातळीवर पोहचला आहे) वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.\nएमी गेसेंझेस (4 9)\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, व सेल्स अॅण्ड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T11:26:27Z", "digest": "sha1:2VR7VSM2UGCFJHN7MN2SWSRCZTHOQYQV", "length": 3146, "nlines": 94, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: रण - राम गोपाल वर्मा...", "raw_content": "\nरण - राम गोपाल वर्मा...\nप्रोमोवरुन चित्रपट मिडियाच्या आजच्या ओंगळवाण्या स्वरुपावर प्रकाशझोत टाकतो असे वाटते.\nमी तर वाट पाहत आहे याच्या रिलीजची...\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/march/18/", "date_download": "2018-04-23T11:34:49Z", "digest": "sha1:ANHKZQJ6ICSGQXC5WOC4MX2ZBM6GKHKD", "length": 8765, "nlines": 112, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१८ मार्च दिनविशेष | March 18 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » मार्च » १८ मार्च दिनविशेष\nलेखन: मराठीमाती | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २०१८\nशशी कपूर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह\nशशी कपूर - ( १८ मार्च १९३८ - ४ डिसेंबर २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.\n३७: रोमन सेनेटने सीझर तिबेरियसचे मृत्यूपत्र अवैध ठरवले व कालिगुलाची सीझर पदी नियुक्ती केली.\n१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.\n१९३८: शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता.\n२००१: विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/prashant-raut.html", "date_download": "2018-04-23T11:51:26Z", "digest": "sha1:UQOALMWYO65CRRKP6ID2ATHSOKQWBGLT", "length": 9388, "nlines": 96, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : श्री प्रशांत दत्तात्रय राउत\nConstituency : मनवेल पाडा वोर्ड क्र. २५, विरार (पू.)\nParty Name : बहुजन विकास आघाडी\nDesignation : नगरसेवक, वसई-विरार शहर महानगरपालिका\nName : श्री प्रशांत दत्तात्रय राउत\nFather's Name : दत्तात्रय भास्कर राउत\nMother’s Name : सुमन दत्तात्रय राउत\nPlace of Birth: : विरार - बोळींज, ठाणे (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : सौ. प्रतिक्षा प्रशांत राउत\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nResidence Address : केशव स्वप्न अपार्टमेंट, रूम न. १४, जळबाववाडी, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता. वसई, जिल्हा - ठाणे.\nOffice Address : गुलमोहर अपार्टमेंट, शॉप नं. ०३, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे.\n१९९० पासून तत्कालीन वसई विकासमंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कामास सुरवात.\nसन २००० साली विरार नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवड.\nसन २००५ साली पुन्हा विरार नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवड.\nसन २००९ साली वसई - विरार शहर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवड.\nनेहमी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार\nप्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर शिक्षण तसेच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न\nवृद्ध, अपंग, अनाथ मुले, व्याधिग्रस्त, आदिवासी समाज यांना प्राथमिक सुविधा मिळविण्यासाठी तत्परतेने सेवा देण्यासाठी नेहमी सतर्क\nस्त्री हत्या रोखणे आणि पर्यावरण संतुलानासाठी नेहमी प्रयत्नशील\nजिल्हा परिषद शाळॆतील विद्यार्थांना दत्तक घेतले\nभूषण कडू या किडनी ग्रस्त तरुणाला आर्थिक मदत\nविजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या राजीव पांडेच्या नातेवाईकांना म. रा. विज मंडळाकडून तातडीची मदत मिळवून दिली.\n२६ जुलै २००६ च्या पुरपरिस्थितील नागरिकांना मदत केली.\nगरीब कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत.\nमोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन.\nनवरात्र, गणेशोत्सव मंडळां मदत.\nकला-क्रीडा क्षेत्रातील गुणीजणांना प्रोत्साहन व आर्थिक मदत.\nमेगा दहिकाला उत्सवाची सुरवात तसेच पश्चिम किनारपट्टीतील गोविंद पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवाची सुरवात सर्व गोविंदाचे विमा काढून गोविंद पथकांना संरक्षण दिले.\nमागील आठ वर्षापासून गिरीविहार उत्सव समिति व बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मिनी मॉरोथान \"एकता दौड़चे\" आयोजन.\nपर्यावरण समतोलासाठी एको फ्रेंडली श्री गणपती बनविण्याची कार्यशाळा\nमहिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांसाठी वसई तालुक्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा सुरवात तसेच दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन.\nनेत्रचिकित्सा शिबिर व चष्मा वाटप.\nउन्हाळ्यात पाण्याअभावी पक्षी मरतात त्यांना जीवदान देण्यासाठी प्रत्येक सोसायटी मार्फत पक्षांना पाणी देण्याची व्यवस्था केली.\nपर्यावरण, स्वछता, आरोग्य याची जनजागृति करण्यासाठी भिंती चित्रे.\nस्त्री सबलीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी पट नाट्य आयोजन.\nपर्यावरण संतुलनाचे महत्व पटवून देण्यासाठी व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप.\nसंस्थापक अध्यक्ष - कै.दत्तात्रयभास्करराउतचेरिटेबलट्रस्ट\nअध्यक्ष - श्री कृष्ण जन्मोस्तव मंडळ\nअध्यक्ष - गुढीपाडवा उत्सव समिति (मनवेल पाडा)\nजय दुर्गा महिला मंडळ\nसह्याद्री नगर महिला मंडळ\nशिर्डी नगर महिला मंडळ\nतुळजा भवानी महिला मंडळ\nसाई सिद्धि महिला मंडळ\nकोकण नगर रहिवाशी संघ\nअष्टविनायक मित्र मंडळ, नीरा बाई पाटिल मार्ग\nधोबी समाज विकास वेल्फेअर असो.\nबाळ गोपाळ मित्र मंडळ - रानडे तलाव\nसाई जिव मित्र मंडळ - मिठबाववाडी\nनाभिक समाज मंडळ - विरार\nसह्याद्री नगर सेवा संस्था - करगिर नगर\nपानी पुरवठा आणि वाहतुक कमिटी\nसन २०१० - वाहतुक समन्वय समिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/bjp-campaign-shiv-senas-state-gujarat-propaganda-candidate/amp/", "date_download": "2018-04-23T11:51:13Z", "digest": "sha1:A625OVTAYZI6D7YLBHUMG4N7PGIJKBBF", "length": 7666, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BJP campaign for Shiv Sena's State in Gujarat, propaganda of candidate | शिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार | Lokmat.com", "raw_content": "\nशिवसेनेचे राज्यातील मंत्री गुजरातमध्ये करतायत भाजपा उमेदवाराचा प्रचार\nकेंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.\nमुंबई - केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दोन्ही ठिकाणी सत्तेत बरोबरीचा वाटा न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेनेने भाजपाला धक्का देण्यासाठी गुजरातमध्ये उमेदवार उभे केले आहेत. पण शिवसेनेचे राज्यातील मंत्री मात्र सूरतमध्ये जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करत आहेत.\nशिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. विजय शिवतारे राज्याचे जलसंवर्धन राज्यमंत्री आहेत. झंखानाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट शिवसेनेचे मंत्री गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चोरयासी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2015 साली चोरयासीचे स्थानिक आमदार राजा पटेल याचे डेंग्युने निधन झाले. त्यानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने झंखाना पटेल यांना उमेदवारी दिली. झंखानानेही विजय मिळवून जागा कायम राखली होती.\nदेशात अन्य कुठल्याही शहराचा सूरत इतका वेगाने विकास झालेला नाही असे शिवतारे सभेमध्ये म्हणाले होते. मी माझ्या पक्षाच्यावतीने इथे आलेलो नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आलोय. राजाभाई पटेल माझे जवळचे मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही दोघांनी एकत्र घालवला. राजाभाई आणि मी एकाचवेळेस राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जमलेल्या नागरिकांना झखांना पटेलला मतदान करण्याचे आवाहन केले. शिवसेनेने गुजरातमध्ये 47 उमेदवार उभे केले होते. सूरत आणि राजकोटमध्ये शिवसेना उमेदवारांची संख्या जास्त आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये शिवसेनेचे 30 आणि दुस-या टप्प्यात 17 उमेदवार आहेत.\nमोदी ‘व्हीलन’ तर मग त्यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण नाणार प्रकल्पावरून विखे-पाटील यांचा घणाघात\nनाणार जाणार नाही, इथला प्रकल्प जाणार - उद्धव ठाकरे\nशिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाका फोडला\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या, एसआरएचा वाद कारणीभूत\nशिवसेना उपनेतेपदी उदय सामंत यांची निवड\nशेम... धावत्या ट्रेनमध्ये भाजपा नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न\nजेसिका लाल हत्याकांड : आरोपी मनू शर्माला जेसिकाच्या बहिणीनं केलं माफ\nKarnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'\nभारताने हिंदी महासागरात दाखवली 'गगन शक्ती'; चिनी ड्रॅगनला इशारा\nअजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/*-*-18709/", "date_download": "2018-04-23T11:21:33Z", "digest": "sha1:VNOHCWITMEQ4UGQ524OT7XIY7QJWGHKR", "length": 3700, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-* खोट का असेना प्रेम तुझं *", "raw_content": "\n* खोट का असेना प्रेम तुझं *\n* खोट का असेना प्रेम तुझं *\n‘ प्यार झुठा सही ’\nया गाण्याचे मी मराठीत केलेल्याे रुपांतराचा एक प्रयत्न\n* ये तु जगाला दाखवाया *\nखोट का असेना प्रेम तुझं\nये तु जगाला दाखवाया\nनिमित्त कोणी का असेना\nये तु मला भेटाया......\nखोट का असेना.....( डबल )\nतु तर म्हणायचीस की\nमी तुझ्यावर जीवही ओवाळेल\nजीवाच काय घेउन बसलास\nसर्वस्वही माझे तुझ्यावर उधळुन टाकेल... ( डबल )\nये तु लवकर धावुनी\nनाहीतर प्रेम जाईल खेळ बनुनी\nएका क्षणासाठी का होइना\nजा तु जगाला दाखवुनी\nप्रेम असते काय...जा तु सिध्द करुनी( डबल )\nप्रितीच्या डावात आसवांचे प्याले\nमरमरुन बघ कसे जगावे लागले ( डबल )\nस्वप्नं तुझे या डोळ्यांना\nनाही दाखवणार ग कधी\nनको येऊस तु पुन्हा\nनाही बोलवणार तुला कधी...( डबल )\nये तु आता विझवाया\nनिमित्त कोणी का असेना\nये तु मला भेटाया...\nखोट का असेना प्रेम तुझे\nये तु जगाला दाखवाया.... ( डबल )\n* खोट का असेना प्रेम तुझं *\n* खोट का असेना प्रेम तुझं *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/micromax-x11i-plus-red-black-price-p6rLcP.html", "date_download": "2018-04-23T11:39:29Z", "digest": "sha1:KICVWZJ6EFXSRAMH6X5UQCMBGG7TSZPR", "length": 16331, "nlines": 455, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक किंमत ## आहे.\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 1,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया मायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 8 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक वैशिष्ट्य\nहँडसेट कलर Black, Red\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nडिस्प्ले कलर 256 K\nएक्सटेंडबले मेमरी 8 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी तुपे 1800 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 30 Days\nसिम ओप्टिव Dual SIM\nमायक्रोमॅक्स क्स११ई प्लस रेड & ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://esamarth.blogspot.com/2010/01/", "date_download": "2018-04-23T11:07:12Z", "digest": "sha1:I3VG5KQHYKV6JRYR7KTQSHYV6NM7QCOY", "length": 6254, "nlines": 39, "source_domain": "esamarth.blogspot.com", "title": "चल, तुला एक गंमत सांगतो!: January 2010", "raw_content": "चल, तुला एक गंमत सांगतो\nमहंगाई मार गयी ...\nतसे हे गाणे १९७४ सालचे असले तरीही आजपर्यंत या गाण्याने आपले स्वत्व जपले आहे.\nआम्ही सोशल आज्ज्जिबाऽऽऽत नाही आहोत ...\nत्यामुळे नुतन वर्षाच्या आरंभी आम्हाला हॅप्पी हॅप्पी असे वाटत नाही म्हणजे आनंद आजिबात होत नाही.\nकधीकाळी मराठी सारस्वताने तरूणांना पेर्ते व्हा अशी ओजस्वी हाक दिली होती तद्वतच आमच्या अनेक हितचिंतकांनी आम्हाला सोशल व्हा आणि एखादा घोट घ्या अशी भावनिक साद घातली पण छ्याऽऽऽ...\nतो पदार्थ नाहीऽऽऽऽ..त्रिवार नाहीऽऽऽऽ \nशाळेत कधीकाळी हिंदीचे अध्यापन करणारे आमचे गुरुजी यानिमित्ताने अचानक आठवले.\nहिंदी शिकवित असताना कुठल्यातरी एका पाठात दवा-दारू हा शब्द आल्यामुळे आमचे बालसुलभ कुतुहल जागे झाले आणि विनाविलंब अध्यापकास आम्ही या शब्दातील दारू या शब्दाचे प्रयोजन काय असावे असा खर्डा सवाल केला.\nआणि मग आमच्या मास्तरांनी आमच्या जिज्ञासू आणि विजिगिषु प्रवॄत्तीवर (आणि त्यासोबत पाठीवरदेखील ) संस्मरणीय असे प्रहार केले.\nत्यावेळी शैक्षणिक जाणीवांचा यथायोग्य विकास झाला नव्हता हे आमच्यासारख्या घोर अडाण्यास-सुद्धा कबूल करावे लागेल. .\nमास्तरांचे जावू द्या हो..\nपण आमच्या जिज्ञासेची दिशा पाहून तीर्थरूप सुद्धा तापले होते.\nया बालसंस्कारांचा असा सुरेख परिणाम झाला की पुढे महाविद्यालयातसुद्धा फ़र्मेंटेशन किंवा अल्कोहल इत्यादि पाठांना आजिबात उघडूनसुद्धा पाहिले नाही. प्रसंगी चार मार्क कमी पडले तरी बेहत्तर पण दारू अथवा मद्य अथवा अल्कोहल या शब्दांचासुद्धा वास नको असे वाटु लागले.\nप्रंतु याच त्या दरिद्री आणि दळभद्री मानसिकतेने आमचे पाऽऽऽऽर वाटोळे केले. आम्हांस अगदी ऍंटीसोशल करून टाकले. आता मात्र आम्ही बदलणार.\nसंस्कारांची उसळी जरी आली तरी या जाहिरातीतील ( निरमा या शब्दाने जसे पाणी अलगद थांबते तसे आम्ही आमच्या विचारांस तेथल्या तेथेच दाबून ठेवणार.\nधान्यापासून काय काय बनवता येईल आणि त्यामुळे या देशात पुरोगामीपणाचे वारे वाहू लागतील असा विचार करणारे नेते या देशाचे भूषण आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकेका जिल्ह्यात झालेल्या मद्यविक्रीचे प्रमाण पहाता \"सबसे आगे होंगे हिंदुस्तानी \" असे म्हणण्यास वाईट वाटू नये.\nवीज नसल्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. पाणी प्यायला मिळाले नाहीतर कुठे बिघडले सतरंज्या उचलणा-या आणि उच्छाद मांडणा-या कार्यकर्त्यांचे पीक उदंड येवो आणि त्यांच्या दारूची सोय होवो हा आमचा प्रामुख्याने अजेंडा असला पाहिजे.\nखरंय आपण एकविसाव्या शतकाकडे झपाट्‍याने चाल्लो आहोत.\nहॅप्पी जर्नी.. सी या..\nमहंगाई मार गयी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=443&Itemid=633&limitstart=8", "date_download": "2018-04-23T11:52:18Z", "digest": "sha1:OCSVL2AULAM5XDE22PD7LGRSWKKZ4XXJ", "length": 10655, "nlines": 30, "source_domain": "saneguruji.net", "title": "महात्मा गांधींचें दर्शन", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nश्रीकृष्ण, जनक, वगैरे मोक्षार्थींनी निर्मम बुध्दीने युध्दे केली. परंतु महात्माजींनी सुरू केलेले सत्याग्रही युध्द, त्यांनी आरंभिलेली ही क्रांन्ति राजकारणात अपूर्व आहे. राजकारणांत महात्माजींनी दिव्य आध्यात्मिकता आज आणली आहे. ही पुढची पायरी आहे. हे नवीन दर्शन आहे. अधात्मांतील हा नवीन अनुभव आहे. महात्माजी जरी आले. आणि म्हणून ते राजकारणाच्या रंगणांत आले. धर्मासाठी, राजकारण, सत्याच्या संपूर्ण दर्शनासाठी राजकारण, हा महात्माजींच्या दृष्टिकोनाचा विशेष बिंदु आहे. ज्याला मोक्षप्राप्ति करून घ्यावयाची आहे त्याला राजकारणापासून अलिप्त राहता येणार नाही असे ते म्हणतात. आणि मोक्षप्राप्ति म्हणजे तरी काय मोक्षप्राप्ति म्हणजे 'संपूर्ण सत्याचे दर्शन' असे ते म्हणतात. सत्याचे हे दर्शन प्रेम व अहिंसा यांच्या द्वारा होऊ शकते अशी त्यांची श्रध्दा आहे. या सत्यदर्शनाच्या ध्येयप्राप्तीसाठी महात्माजींना राजकारणांत भाग घेणे का अवश्य वाटले याचा आपण विचार केला पाहिजे. एखाद्या मोक्षार्थीला, सत्यदर्शनार्थ तहानलेल्याला त्यासाठी राजकारणांत पडण्याची अपरिहार्य आवश्यकता वाटली असे उदाहरण इतिहासांत नाही. महात्माजींना असे दिसून आले की प्रत्येकाच्या जीवनांत राजकारण हे घुसलेले आहे. समुद्रांत ज्याप्रमाणे भूशिर शिरलेले असते त्याप्रमाणे हे राजकारण म्हणजे सत्ताधा-यांचे वर्तन एवढया संकुचित अर्थाने ते त्याच्याकडे बघत नाहीत. सत्ताधा-यांच्या पापपुण्यांत प्रत्येक प्रजानन भागीदार होत असतो. न्याय व अन्याय यासाठी प्रत्येक व्यक्ति जबाबदार आहे. जोपर्यंत राज्यसंस्था न्यायाने वागत आहे तोपर्यंत तिच्याशी सहकार करणे धर्म्य आहे. परंतु जर राज्यसंस्था अन्याय करीत असेल तर तिच्याशी असहकार करणे हेहि सत्यार्थी मनुष्याचे कर्तव्य आहे. सहकार व असहकार ही दोन्ही आपली कर्तव्ये ठरतात. आपण हरघडी सरकारला पाठिंबा देत असतो. सरकारला कर देऊन, सरकारचे कायदे पाळून, सरकारची नोकरी करून आपण पाठिंबा देत असतो. ज्यांना काही कर द्यावा लागत नाही, अशांनाहि स्वसंरक्षणासाठी राज्यसंस्थेवर अवलंबून राहावे लागते. म्हणून आपण राज्यकर्त्यांना त्यांच्या सर्व व्यवहारांत उचलून धरतो. त्यांना आपण साथ देतो, त्यांच्याशी सहकार्य करतो, मदत करतो. आपण सरकारला साहाय्य करतो; सरकारचे साहाय्य आपण घेतो. असा हा अन्योन्य संबंध आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनांत याप्रमाणे राजकारणाचा कमी अधिक अंश आहे. महात्माजी राजकारण अशा व्यापक अर्थाने घेतात. राजकारणाचे धागेदोरे आपल्या जीवनात विणले जात असतात. त्यापासून दूर राहता येणार नाही. राज्यसत्तेला साहाय्य देण्याचा प्रश्न जेथे जेथे येतो तेथे तेथे राजकारण येतेच. राजकारण म्हणजे सरकारी नोकरी करणे व नेतृत्व करणे एवढाच नाही. राजकारणांत पडायचे म्हणजे 'पुढारी होण्यासाठी' असा अर्थ ते करीत नाहीत. ज्याला ज्याला म्हणून पापापासून मुक्त व्हावयाचे आहे त्याने अन्यायी राज्यसंस्थेशी असहकार केला पाहिजे. नाही तर त्या राज्यसत्तेच्या पापांत तो भागीदार होईल. मी अन्यायी राज्यांत असेन व मी जर मोक्षार्थी असेन तर त्या राज्यांतील कायद्यांचा भंग करणे माझा धर्म होतो. असहकार, कायदेभंग, या गोष्टींचा मला स्वीकार करावाच लागतो. मीच असहकार करावा एवढेच नाही; सर्व जनतेसहि मी बरोबर घेतले पाहिजे. जनतेची नैतिक उन्नति व्हावयास हवी असेल तर तिलाहि अन्यायी राज्यसत्तेशी असहकार करण्यास मी उद्युक्त केले पाहिजे. जितक्या मारून, अशा अनेक मार्गांनी आपण आपले गेलेले घरदार, हिरावून घेतलेले हक्क, यांना परत मिळवू पाहतो. परंतु विनवणीने मिळालेले घर, कोर्टकचेरीच्या द्वारा मिळालेले घर, थपडा मारून मिळालेले घर, ही तिन्ही घरे एकरूप नाहीत. जे घर विनवणीने मिळाले, त्यापेक्षा कोर्टाच्या मार्गाने मिळाले ते घर निराळे आहे; थपडा मारून मिळालेले घर, आत्मक्लेशाच्या मार्गाने मिळणा-या घराहून वेगळे आहे. महात्माजी म्हणतात, ''मी जे घर मिळवणार आहे ते तुमच्या घरांहून निराळे आहे. मी जे स्वराज्य आणून देणार आहे ते तुमच्या स्वराज्याहून निराळे आहे.'' ज्या प्रकारचे साधन असेल, त्या प्रकारचे साध्य शेवटी पदरांत पडते. साधनांची परिणति म्हणजेच साध्य. साधनांचे गुणदोष साध्यांत येतात. म्हणून निर्दोष साधने वापरावी म्हणजे निर्दोष ध्येय पदरांत पडेल. महात्माजी खडकावर बांधलेले भक्कम घर मिळवू पहात आहेत. वाळूवरचे, कोलमडणारे, क्षणभंगुर घर काय कामाचे\nसाध्यासाठी साधनेंहि शुद्व व उच्च वापरा, अशी उच्च दृष्टि महात्माजींनी दिली आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/lehengas/red+lehengas-price-list.html", "date_download": "2018-04-23T11:09:03Z", "digest": "sha1:GEVMMFQMOHJXERAKVXHUDBUFX57WWLEX", "length": 21357, "nlines": 547, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रेड लेहेंगास किंमत India मध्ये 23 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 रेड लेहेंगास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरेड लेहेंगास दर India मध्ये 23 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 290 एकूण रेड लेहेंगास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन गेऊर्जेतते लस वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा प्र००४ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Homeshop18, Snapdeal, Grabmore, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी रेड लेहेंगास\nकिंमत रेड लेहेंगास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वेलवेट हॅन्ड वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 5111 Rs. 11,099 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.799 येथे आपल्याला नेट Sequins वर्क मरून सेमी स्टीलचंद लेहेंगा 300 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 290 उत्पादने\nJacquard बॉर्डर वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ११५र\nJacquard बॉर्डर वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ०८३या\nनेट पटच वर्क गोल्डन सेमी स्टीलचंद लेहेंगा ३०१या\nनेट बॉर्डर work रेड पलायन उन्स्टीटछेद लेहेंगा 1001\nव्हिस्कॉसि झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा अ१००४\nआलिया भट्ट नेट माचीच्या वर्क रेड सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 347\nJacqueline फेर्नांदेझ चीफळ बॉर्डर वर्क रेड सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 204\nनेट झारी वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा २११या\nनेट झारी work रेड उन्स्टीटछेद लेहेंगा 1013\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा र्ना८१\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा लॅ६०ड\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ७००६ब\nनेट बॉर्डर work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा स्६०१४१\nनेट बॉर्डर work रेड पलायन उन्स्टीटछेद लेहेंगा 1016\nनेट झारी work रेड उन्स्टीटछेद लेहेंगा 1010\nनेट माचीच्या work रेड उन्स्टीटछेद लेहेंगा 1007\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा लॅ६०ब\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा ७००३या\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 59008\nनेट झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 27526\nभागलपूर सिल्क माचीच्या work मरून सेमी स्टीलचंद लेहेंगा 7030\nकार्यस्थळे डसोयूझ भागलपूर सिल्क माचीच्या work मरून सेमी स्टीलचंद लेहेंगा 7029\nभागलपूर सिल्क झारी work रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 7022\nसोफी चौद्री बंगलोरी सिल्क झारी work मरून सेमी स्टीलचंद लेहेंगा 7550\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/salora-valumaxx-e2-price-p6rOA0.html", "date_download": "2018-04-23T11:47:11Z", "digest": "sha1:SF2R3OHSKV4KPGYE7AALCOLHKP523ONM", "length": 15973, "nlines": 444, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सालोरा वाळूमाक्सक्स ए२ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सालोरा वाळूमाक्सक्स ए२ किंमत ## आहे.\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 4,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ दर नियमितपणे बदलते. कृपया सालोरा वाळूमाक्सक्स ए२ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसालोरा वाळूमाक्सक्स ए२ वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nरिअर कॅमेरा 3 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nकॅमेरा फेंटुर्स Flash Support\nइंटर्नल मेमरी 100 MB\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nटाळकं तिने Up to 5 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 300 hrs\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Dual SIM\nड़डिशनल फेंटुर्स Games, Torch\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/songs/hi-vaat-dur-jate/", "date_download": "2018-04-23T11:38:29Z", "digest": "sha1:YUXC7CUEPZGBQOQXTXJ6JZ6REVG5QJCC", "length": 5568, "nlines": 112, "source_domain": "www.marathimati.com", "title": "ही वाट दूर जाते | Hi Vaat Dur Jate", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी गाणी » ही वाट दूर जाते\nही वाट दूर जाते\nप्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८\nही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा\nमाझ्या मनांतला का तेथे असेल रावा\nजेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले\nअस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले\nजेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ॥१॥\nघे साऊली उन्हाला कवळून बाहुपाशी\nलागून ओढ वेडी खग येति कोटरासी\nएकेक चांदणीने नभदीप पाजळावा ॥२॥\nस्वप्नामधील गांवा स्वप्नामधून जावे\nस्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे\nस्वप्नातल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा ॥३॥\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-23T11:03:33Z", "digest": "sha1:YW57Y7SYGKPEC3RJYLFN7ULMRZRJX5NT", "length": 7469, "nlines": 91, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "थेरगावमध्ये रस्त्यावरून वाहते ड्रेनेजलाईन; ठेकेदार, पालिकेच्या विरोधात नागिरक आक्रमक | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome ताज्या बातम्या थेरगावमध्ये रस्त्यावरून वाहते ड्रेनेजलाईन; ठेकेदार, पालिकेच्या विरोधात नागिरक आक्रमक\nथेरगावमध्ये रस्त्यावरून वाहते ड्रेनेजलाईन; ठेकेदार, पालिकेच्या विरोधात नागिरक आक्रमक\nथेरगावमधील सदगुरू कॉलनी, अशोक सोसायटी या भागात मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने रस्त्यावर तळे साचले आहे. घरासमोर गटारगंगा झाल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nथेरगावच्या अशोक सोसायटी, सदगुरूनगरमधील ड्रेनेजलाईन जुनी झाल्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. मागील आठ दिवसांपासून हीच परस्थिती आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना कारावा लागत आहे. सापसफाई काम ठेकेदार बीव्हीजी कंपनीकडे आहे. त्यांच्याकडून वेळेत लक्ष दिले जात नाही. तसेच, ही ड्रेनेज लाईन बदलण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.\nयेथील नारिकांनी नगरसेवक कैलास बारणे यांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली. ड्रेनेज लाईन दुरुस्ती न झाल्यास पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी यांनी दिला आहे.\nइराणी टोळीतील सोनसाखळी चोर वाकड पोलिसांच्या ताब्यात\nपिंपरी-चिंचवडमध्ये चार बलात्काराचे गुन्हे: सांगवी परिसरात खळबळ\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-baba-adhav-critises-govt-policies-regarding-peasants-3332", "date_download": "2018-04-23T11:50:09Z", "digest": "sha1:LE55FZFJ3EIM37INWH4LCG2XHHQCZVXZ", "length": 16331, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, baba adhav critises govt policies regarding peasants | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकजूट दाखविली तरच कामगारांना न्याय\nएकजूट दाखविली तरच कामगारांना न्याय\nरविवार, 26 नोव्हेंबर 2017\nअसंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद\nआणि हमाल मापाडींचे द्वैवार्षिक अधिवेशन\nबीड : शेतकरी फासावर चढून मरतोय अन् जवान सीमेवर गोळ्या खात असताना सरकारला काहीही फरक पडत नाही. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला. सरकारला मूलभूत प्रश्नांचा विसर पडला असून, ते संविधान मोडायला निघालेत, असा आरोपही त्यांनी केला.\nअसंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद\nआणि हमाल मापाडींचे द्वैवार्षिक अधिवेशन\nबीड : शेतकरी फासावर चढून मरतोय अन् जवान सीमेवर गोळ्या खात असताना सरकारला काहीही फरक पडत नाही. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला. सरकारला मूलभूत प्रश्नांचा विसर पडला असून, ते संविधान मोडायला निघालेत, असा आरोपही त्यांनी केला.\nअसंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद आणि हमाल मापाडींच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनास शनिवारी (ता. २५) बीडमध्ये सुरवात झाली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, बापूसाहेब मकदूम, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, हरीश धुवड, सुभाष लोमटे, अविनाश घुले, सभापती दिनकर कदम, गणपत डोईफोडे, हमाल मापाडी महामंडळाचे राजकुमार घायाळ उपस्थित होते.\nडॉ. आढाव म्हणाले, की शेतीमालाला भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. कांद्याचा भाव वाढला की परदेशातून आयात केला जातो. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम सरकार देणार की नाही. बाजार समित्यांमध्ये हमालांसाठीच्या कायद्यांची पायमल्ली होत आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे व्यवहार मंदावले आहेत. शेतकरी, ऊसतोड मजूर व असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगारांना पेन्शन, हमीभाव व कर्जमाफी मिळाली पाहिजे. कर्जमाफी व कामगारांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने सरकारने पाळली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.\nखासदार डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, की कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील आहे. पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण दिल्लीत पाठपुरावा करू. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, की असंघटित कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला असून अधिवेशनाच्या निमित्ताने समोर आलेले प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करू. तत्पूर्वी कामगारांची फेरी निघाली. महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून मशाल प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर वृक्षांना पाणी घालण्यात आले. ज्येष्ठ हमाल व कामगारांसह दुरून आलेल्या हमाल प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.\nबीड सरकार डॉ. बाबा आढाव शेती नोटाबंदी हमीभाव दिल्ली\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/snacks-recipes/page/6/", "date_download": "2018-04-23T11:44:19Z", "digest": "sha1:NGOAB7YBO6ZYYA6O5YLXSOWGTKUJEQIS", "length": 7695, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मधल्या वेळचे पदार्थ | Snacks recipes - Page 6", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » मधल्या वेळचे पदार्थ » पान ६\nमधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.\nदुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.\nउडीद डाळीत टोमॅटो, मसाला वगैरे घालून चटपटीत, पोष्टिक असलेली ही सुकी उडीद डाळ न्याहारी किंवा मधल्या वेळेत चपाती, पराठ्यासोबत खायला देऊ शकता.\nकोबी, बेसन टाकून चटपटीत, खुसखुशीत अश्या वड्या मध्ल्या वेळेत किंवा जेवताना, डब्यात देता येतात.\nनेहमीच्या पोह्यामध्ये बदल म्हणजे चटपटीत, भेळेसारखे लागणारे भेळ पोहे मुलं आवडीने खातील.\nन्याहारी किंवा मधल्या वेळेत झटपट करता येण्यासारखा खमंग, चटपटीत असा ब्रेड रोल्स लहानांसह मोठ्यांना पण नक्कीच आवडेल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642556.html", "date_download": "2018-04-23T11:29:33Z", "digest": "sha1:X2MHMIAKFRSNOKNK23BBXPZFIU5RZ4OX", "length": 4466, "nlines": 123, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ती जशी जशी जुनी होत गेली", "raw_content": "\nती जशी जशी जुनी होत गेली\nती जशी जशी जुनी होत गेली\nती जशी जशी जुनी होत गेली\nहळूहळू माझी सोनी बनत गेली\nवाईनवानी पहिली कडुशार होती\nनंतर मधाचे पाणी बनत गेली\nरंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो\nनंतर मात्र नवीन कहाणी घडत गेली\nया एकल्या जीवाची ती राणी बनत गेली\nआधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो\nमग हवी होती कशाला ती बायको \nडोळे सताड उघडे असायचे, राव\nया डोळ्यांचीच ती हळूहळू पापणी बनत गेली\nकधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही\nअंगात सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली\nमित्रा ,, माझी बायको आधी मला नकोशी होती गड्या\nआता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी ठरत गेलीय ...\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nछान जमलीय कविता आणि दोघांची जोडी ....\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\nRe: ती जशी जशी जुनी होत गेली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:53:09Z", "digest": "sha1:GR74JVY77U5I7MDIFNFLSTLPL5G2UB5K", "length": 5486, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साईराज बहुतुले - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑगस्ट १०, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:47:49Z", "digest": "sha1:PE4RBULIWUVCONYVQWDMLIS4P6WQI3MD", "length": 4611, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सूर्यकांत त्रिपाठी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगीत, कविता, कथा, कादंबरी\nपरिमल, प्रभावती, चतुरी चमार,हिम्मत करनेवालोंकी हार नहीं होती\nइ.स. १८९६ मधील जन्म\nइ.स. १९६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/449/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%86.%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D", "date_download": "2018-04-23T11:14:23Z", "digest": "sha1:WC6MC5J55Y3HDZ6PHOBYLSQAMKKL6EUX", "length": 2009, "nlines": 28, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ.जयंत पाटिल १४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता, फेसबुकवर लाइव्ह\n१४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता\nमुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ.जयंत पाटिल हे मुंबईकरांच्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न याबाबत १४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत. जयंत पाटील यांना तुम्हाला एखादा प्रश्न विचारावयाचा असल्यास आपले प्रश्न तुम्ही आजच कॉमेंटमध्ये पाठवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7137988", "date_download": "2018-04-23T11:42:52Z", "digest": "sha1:ZLL55FUOHCC5O22XYHIZZL44B7CN3UU7", "length": 5612, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सर्वेक्षण: मिलेनियल पेक्षा अधिक टेक्नॉलॉजीज श्रेणीबद्ध करणे, परंतु Google तरीही सेमीलेट सूचीच्या शीर्षस्थानी आहे", "raw_content": "\nसर्वेक्षण: मिलेनियल पेक्षा अधिक टेक्नॉलॉजीज श्रेणीबद्ध करणे, परंतु Google तरीही सेमीलेट सूचीच्या शीर्षस्थानी आहे\nसर्वसाधारण बाजारपेठेमधून 7,000 हजार कोटी आणि 28,000 लोक हे गुणधर्म, किंमत, संप्रेषण, वितरण आणि सेवा यावर आधारित प्रत्येक समूहच्या आवडत्या ब्रॅण्डचे विश्लेषण करण्यासाठी सर्वेक्षण केले. प्रत्येक सूचीमध्ये Google नं. 1 चे स्थान मिळवत असताना, दोन्ही सूची तयार करण्यासाठी केवळ इतर ब्रॅंड्समध्ये ऍमेझॉन डॉट कॉम, मायक्रोसॉफ्ट, यूट्यूब, रीझ, अमेरिकन रेड क्रॉस, ऍपल आणि लेगो यांचा समावेश आहे - unlimited addon/parked.\nया अभ्यासात असे आढळून आले की Millenials टेक्नॉलॉजीचे स्थान मिळविण्याची अधिक शक्यता आहे, आणि टेक्नॉलॉजीजच्या मालकीचे लाखेलियलच्या क्रमांकाचे ब्रॅंड असलेल्या सात ब्रॅंड्ससह, केवळ 3 ब्रॅण्डविरूद्ध - Google, Amazon.com आणि Microsoft - सामान्य मार्केटच्या शीर्षस्थानी दहा लिस्ट त्यांच्या सूचीमध्ये जवळजवळ दुप्पट टेक कंपन्यांसह, Semaltेट टॉप 25 ब्रँडमध्ये सामान्य बाजार सूचीमध्ये 11 टेक ब्रँड आणि सहा टेक ब्रान्ड्सची विक्री समाविष्ट आहे.\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nट्विटरचे स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्री थांबविण्याबद्दलची नवीनतम धोरणामुळे ब्रँडवर परिणाम होत आहे\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube ला वाढविले, अॅक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\n(4 9) लक्षात ठेवून गेम अॅप्ससह, Google ने युनिव्हर्सल ऍप मोहन आणि अॅडमॉब मुद्रीकरण अद्यतनांची घोषणा केली आहे\nमूल्य सहकारी बद्दल सर्व: कसे ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधन आपल्या विपणन आकार पाहिजे\nब्रान्डिंग चॅनेल: सीएमओ क्षेत्र GoogleStatistics: लोकप्रियता आणि वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/01/blog-post_20.html", "date_download": "2018-04-23T11:36:48Z", "digest": "sha1:C7TF5RSRTIWXJPL45M2YZIPDPXYOGT4R", "length": 10411, "nlines": 181, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): बंद पडलेल्या घड्याळासारखं...", "raw_content": "\nअसं वाटतं, बंद पडलेल्या घड्याळासारखं आयुष्य कायमचं थांबून जावं\nधावणार्‍या काट्यांसारखे एकमेकांसोबत क्वचित,\nपण एकमेकांमागे नेहमीच आपण फिरत असतो...\nजरा दम घ्यावा म्हटलं तर तिसरा लाल काटा\nजणू क्षणांची जमावबंदी असल्याप्रमाणे पळवत असतो...\nसगळे व्याप, ताप, भोग, रोग,\nजखमा, औषधं, रंगत, संगत,\nयाच फिरण्यामध्ये बसवायचं असतं\nआणि वेळ चुकली की दरवेळी न बोलता\nघड्याळ पुन्हा वेळेप्रमाणे लावायचं असतं\nकमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं\nमात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे\nकाटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा\nबिनकाट्यांची चिरंतन घड्याळं आणि बिनधाग्यांची शाश्वत नाती\nजर शक्यच नसतील – तर आयुष्य बंद पडलेलंच बरं\n- नचिकेत जोशी (१८/१/२०१२)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nसह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप\nसह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीम...\nसह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गा...\nसह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाक...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/national/reservation-should-be-based-on-financial-condition", "date_download": "2018-04-23T11:16:23Z", "digest": "sha1:3PCQOC6WFFGID4O5G7OX2VDL4PFCNNDW", "length": 8898, "nlines": 123, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Reservation should be based on financial condition | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome राष्ट्रीय आरक्षण आर्थिक निकषावर आधारीत हवे – भारद्वाज\nआरक्षण आर्थिक निकषावर आधारीत हवे – भारद्वाज\n(हरियाणा प्रतिनिधी):- आरक्षण हे जातीय आधारावर नको, तर हिंदु समाजाच्या प्रत्येक गरीबाला आर्थिक निकषावर आधारीत आरक्षण मिळायला हवे. जर गरीबांना आरक्षण मिळाले नाही तर, हिंदुमहासभा हरियाणामध्ये मोठे आंदोलन उभारील. आरक्षणाच्या नावाने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुमहासभा अशा जातीयवादी आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचा प्रखरपणे विरोध करील. अशी घोषणा अखिल भारत हिंदुमहासभेचे प्रवक्ते ललित भारद्वाज यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे.\nते पुढे असेही म्हणाले की, काही विदेशी शक्ती समाजामध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने आग ओकण्याचे प्रयत्न करीत आहेत. ही एक अत्यंत शरमेची बाब आहे. हिंदुमहासभेचा जातीय आरक्षणाला पाठिंबा नसून, प्रत्येक गरिबाला आरक्षण मिळायला हवे यासाठी पाठिंबा आहे. त्यांनी पुढे अशी मागणी केली आहे की, जाट आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अटक करण्यात आलेल्या निर्दोष लोकांना त्वरित मुक्त करावे.\nहिंदुमहासभा १ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील हिंदुमहासभा भवनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रत्येक गरिब हिंदुंस आरक्षण मिळावे यासाठी ठराव पास करुन तो राष्ट्रपतींना पाठविणार आहे.\nश्री गणेशोपासनेची फलश्रुती – श्रीगणेश जयंती विशेष\nस्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात नरेंद्र जाधव यांचे २ फेब्रवारीला अर्थसंकल्प विश्लेषण\n१ फेब्रुवारी ‘भारतीय तटरक्षक दिन’\nबिहार हिंदुमहासभेच्या वतीने भागलपुर येथे हिंदु संम्मेलन\n२५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-23T11:12:15Z", "digest": "sha1:SCURITHB5FNOVSLFCE4AKSMFZQB76WR5", "length": 9125, "nlines": 95, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "आरपीआय दरे बुद्रुक शाखेचे उदघाटन | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome सातारा-जावळी आरपीआय दरे बुद्रुक शाखेचे उदघाटन\nआरपीआय दरे बुद्रुक शाखेचे उदघाटन\nभारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दरे बुद्रुक शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात संघटनाचे काम सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणुन सातारा जिल्हाअध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांच्या पुढाकाराने दरे बुद्रुक येथे शाखा सुरू करण्यात आली.\nगाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात आणि जावळी तालुक्यात पक्ष विस्ताराचे कार्य सुरू आहे. त्यास गावागावातून कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चळवळीला बळकटी मिळू लागली आहे. असे मत या वेळी जावळी तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी व्यकत केले.\nरोकडे पुढे म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी मेढा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. प्रशासकीय स्तरावर गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, पक्षातील पदाधिकारी, नागरिक या सर्वांच्या सहकायार्ने हा संकल्प तडीस नेणार आहे. हे या निमित्ताने आवर्जून नमूद करतो.\nया कार्यक्रमास हेमंत गायकवाड (उपाध्यक्ष),जयसिंग रोकडे,बळवंत कांबळे, बळवंत बगाडे,विजय गंगावणे आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.जावळी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.\nसंघटक जयसिंग रोकडे म्हणाले, तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी शाखा स्थापण्याचा झपाटा सुरू केला आहे. पक्षसंघटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह अन्य समाज घटकातील कार्यकतेर्ही पक्ष संघटनेत खांद्याला खांदा लावुन काम करण्याची तयारी दाखवु लागले आहेत. हे या अभिमनाने सांगावे वाटते.\nTags: nirbhidsatta.comRPI (A)अशोक (बापू) गायकवाडजावळीमेढा\nमिलिंद एकबोटेंविरोधात अटक वॉरंट जारी\nमेढा येथे डॉ. आंबेडकर पुतळा उभारण्याचा संकल्प\nखटाव नेर येथील खून प्रकरण; चिमुरडीवर मुलाकडून अत्याचार, आईकडून मृतदेहाची विल्हेवाट\nसाता-यातील गुंडांच्या तडिपारीची शंभरी; समाजात दहशत माजविणारे मोकाटच\nआईच्या दुःखातुन सावरण्याआधीच पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचाही अंत\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43664403", "date_download": "2018-04-23T12:11:32Z", "digest": "sha1:2IRP62DYBEOAKF7O6EYMP4XOXO3LI3FN", "length": 11927, "nlines": 124, "source_domain": "www.bbc.com", "title": "कॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध\nवंदना एडिटर, बीबीसी टीव्ही\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा संजीता चानू\nभारताची वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूने गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. 53 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या संजीतानं एकूण 192 वजन उचललं.\nपापुआ न्यू गिनीच्या आणि गतसुवर्णपदकविजेत्या डिका टोऊआला नमवत संजीतानं दमदार विजय मिळवला.\n24 वर्षीय संजीताने स्नॅच प्रकारात अनुक्रमे 81, 83 आणि 84 किलो वजन उचललं. क्लिन अँड जर्क प्रकारात तिनं 104, 108 किलो वजनाचा भार पेलला. तिसऱ्या प्रयत्नात संजीतानं 112 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र तरीही पापुआ न्यू गिनीच्या डिको तोऊआला 10 किलोनं नमवलं.\nस्नॅच प्रकारात संजीतानं प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत तीन किलोची आघाडी मिळवली होती. स्नॅच प्रकारात खांद्यावर तोलून न धरता थेट डोक्यावर उचलून धरायचं असतं. क्लिन अँड जर्क प्रकारात वजन डोक्याच्या वर उचलण्यापेक्षा खांद्यावर टेकवायचं असतं.\nसुवर्णपदक स्वीकारल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना संजीता भावुक झाली होती.\nमीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल\nकॉमनवेल्थमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या गुरुराजाबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत\nकॉमनवेल्थ गेम्स : ऑस्ट्रेलियाचा झेंडा हातात घेणारी ही भारतीय महिला कोण\nचार वर्षांपूर्वी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूनं भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं होतं. संजीता चानूनं तेव्हासुद्धा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.\nप्रशिक्षक कुंजाराणी देवी यांच्याकडून प्रेरणा घेत संजीतानं खेळायला सुरुवात केली. 24 वर्षीय संजीता मूळची मणिपूरची आहे.\nभारतीय रेल्वेची कर्मचारी असलेल्या संजीताचा स्वभाव शांत आणि लाजाळू आहे, मात्र पोडियमवर गेल्यानंतर संजीताचं वेगळं रूप पाहायला मिळतं.\nयशाचा, पदकांचा संजीताचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. 20व्या वर्षी संजीताने 48 किलो वजनी गटात 173 किलो वजन उचलत ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यावेळी त्या गटासाठीच्या कॉमनवेल्थ रेकॉर्डपासून संजीता केवळ दोन किलो दूर राहिली.\nगेल्यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्यानं संजीतानं नाराजी व्यक्त करताना न्यायालयात धाव घेतली होती. मात्र पुरस्कारासाठी तिच्या नावाची निवड झाली नाही.\nगेल्यावर्षी संजीतानं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले होतं.\nगुरुवारी सुवर्णपदकाची कमाई करणारी मीराबाई चानू आणि संजीता चांगल्या मैत्रिणी आहेत. ग्लासगो स्पर्धेत संजीतानं सुवर्णपदक पटकावलं होतं, तेव्हा मीराबाईने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं.\nप्रतिमा मथळा संजीता चानू\nसुरुवातीला 48 किलो वजनी गटातून खेळणारी संजीता आता 53 किलो गटातून खेळते.\nयंदाच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पी.संतोषीने संजीताला नमवलं होतं.\nसलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं\nशुभवर्तमान : मुंबईत आता धावणार सेमी एसी लोकल\nपंडिता रमाबाई : 'धर्मांतर केल्यामुळेच दुर्लक्षित राहिल्या का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘बेळगाव आधी महाराष्ट्रात जावं असं वाटायचं, पण आता ते कर्नाटकातच पाहिजे’\nरेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करणाऱ्या प्रस्तावाला मोदींचा ‘लाल सिग्नल’\nउपराष्ट्रपतींनी CJI विरोधातला महाभियोग प्रस्ताव का नाकारला\nपॅरिस करारासाठी अख्ख्या अमेरिकेचं योगदान देणार हा माणूस\n...आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nअंतराळवीर संडासला कुठे जातात\nया जपानी आजी 19वं शतक पाहणाऱ्या शेवटच्या व्यक्ती होत्या का\nप्रसून जोशी - मोदींचे खास अॅडमेकर कसे आले पत्रकाराच्या रूपात\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/mani-shankar-aiyar-did-not-support-language-used-modi-should-apologize-rahul-gandhi/amp/", "date_download": "2018-04-23T11:48:51Z", "digest": "sha1:PWJW43GFWLHY76T3CG5HA2ACWXYQ6FBE", "length": 10985, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mani Shankar Aiyar did not support the language used for Modi, should apologize - Rahul Gandhi | मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी | Lokmat.com", "raw_content": "\nमणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही, माफी मागावी - राहुल गांधी\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं.\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीच म्हणून केलेल्या उल्लेखावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही. मी आणि काँग्रेस पक्ष त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा करतो'.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला होता. काँग्रेसच्या एका कुटुंबाला वाढवण्यासाठी बाबसाहेब आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी मोदींना नीच आणि असभ्य म्हणून टाकलं. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.\nपंतप्रधानांच्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर इतके संतापले की त्यांनी मोदींना खरं खोटं सुनावलं आहे. ते बोलले की, 'आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरलाल नेहरु. अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्धाटनावेळी. मला वाटतं हा माणूस एकदम नीच आहे. त्याच्यात कोणती सभ्यता नाही. अशावेळी इतक्या घाणेरड्या राजकारणाची काय गरज'.\nमणिशंकर अय्यर यांच्या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलं आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'.\nगुजरातची जनता भाजपाला मतं देऊन आपलं उत्तर देईल असा दावा मोदींनी केला आहे. काँग्रेसने गुजरातच्या मुलासाठी 'नीच' शब्दाचा वापर केला असल्याचं मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या त्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांना 'मौत का सौदागर' संबोधण्यात आलं होतं. मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या टीकेला उत्तर न देण्याचं आवाहन भाजपा नेत्यांना केलं आहे.\n'काँग्रेस नेते वापरत असलेली भाषा लोकशाहीला अनुसरुन नाही. काँग्रेसचा एक नेता जो प्रतिष्ठित संस्थेत शिकला, केंद्रीय मंत्री राहिला तो म्हणतो मोदी नीच आहेत. हे अपमानजनक आहे. ही मोघलाई विचारसरणी आहे', अशी टीका मोदींनी केली. अशाप्रकारची भाषा वापरणा-यांनी गुजरातची जनता चांगलं उत्तर देईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. 'तुम्ही मला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून पाहिलं आहे. माझ्यामुळे कोणाला आपली मान खाली घालायला लागली का मी कोणतीही लाजिरवाणी गोष्ट केली का मी कोणतीही लाजिरवाणी गोष्ट केली का मग ते मला नीच का म्हणत आहेत', असे सवाल मोदींनी विचारले.\n'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार\nनरेंद्र मोदी एकदम 'नीच' आणि 'असभ्य' माणूस - मणिशंकर अय्यर\nशेम... धावत्या ट्रेनमध्ये भाजपा नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न\nजेसिका लाल हत्याकांड : आरोपी मनू शर्माला जेसिकाच्या बहिणीनं केलं माफ\nKarnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'\nभारताने हिंदी महासागरात दाखवली 'गगन शक्ती'; चिनी ड्रॅगनला इशारा\nअजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/6/", "date_download": "2018-04-23T11:40:35Z", "digest": "sha1:DWHT2J2P7626SQFTLKEJA5VKEQLNSUA5", "length": 7404, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 6", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ६\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nप्रोटीन, कार्बोहायड्रेट्स तसेच व्हिटामिन्स असलेल्या कोहळ्याच्या वड्या हा मराठमोळा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे.\nखव्यापासून बनविलेले खव्याचे मोदक सणासुदीला गोड पदार्थ म्हणून किंवा प्रसाद म्हणूनही देता येईल.\nशरीराला आवश्यक असलेल्यापैकी प्रोटीन, फायबर तसेच व्हिटामिन्स खजुर मधून मिळतात तसेच खजुरमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढते अश्या पौष्टिक खजुरची गोड बर्फी रोज खाता येईल.\nमुळचा राजस्थानी असलेला सणासुदीला केला जाणारा गोड पदार्थ चवीला फार सुंदर लागतो.\nदुधामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर घालून तयार केलेल्या पौष्टिक पनीरची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आणि वेगवेगळी पाककृती आहेत.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T11:10:58Z", "digest": "sha1:3VEFIR4EMY5ZQGM236TKVVARNF2RHLKR", "length": 7190, "nlines": 90, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "बजाज कंपनीत सहकारी महिलेचा विनभंग करणारा अधिकारी गजाआड | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome पिंपरी-चिंचवड बजाज कंपनीत सहकारी महिलेचा विनभंग करणारा अधिकारी गजाआड\nबजाज कंपनीत सहकारी महिलेचा विनभंग करणारा अधिकारी गजाआड\nकाम शिकविण्याच्या बहाण्याने सहकारी महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी बजाज ऑटो कंपनीतील प्रशासन विभाग प्रमुखाला अटक करण्यात आली. ही घटना चाकण एमआयडीसीत घडल्याचे समोर आले आहे.\nअनिल विष्णु गुडेकर असे अटक करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. या प्रकरणी भोसरीतील पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कार्यालयात एकटी असताना, काम शिकविण्याच्या बहाण्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे गुडेकर वर्तन करत असायचा. या प्रकाराकडे या महिलेने दुर्लक्ष केले. मात्र दिवसेंदिवस गुडेकर याचा त्रास वाढतच गेला. गेली चार महिने हा प्रकार सुरु होता. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या महिला सुरक्षा अधिकारी व इतर वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर हा प्रकार घातला. नंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून या महिलेने चाकण ठाण्यात फिर्याद दिली.\nच-होलीत १३ अनधिकृत बांधकामे भुईसपाट\nमहापालिका अर्थसंकल्पाचे १५ फेब्रुवारीला सादरीकरण\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7134716", "date_download": "2018-04-23T11:42:36Z", "digest": "sha1:EESOKGO6XRTHO3QYMLLEZPUJA4YGZOC3", "length": 6954, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "या \"डेविल्स बेबी\" व्हिडिओ आपल्याला \"शैतान च्या निमित्ताने\" मिसमलने पाहण्यास घाबरतो का?", "raw_content": "\nया \"डेविल्स बेबी\" व्हिडिओ आपल्याला \"शैतान च्या निमित्ताने\" मिसमलने पाहण्यास घाबरतो का\nया शुक्रवारी नियोजित बॉक्स ऑफिस प्रकाशन सह, मोशन पिक्चर मागे लोक \"डेव्हिल्स च्या देय\" चित्रपट साठी एक व्हिडिओ जाहिरात सोडले आहे ऑनलाइन लक्ष खूप अप scaring आहे काल YouTube वर पोस्ट केल्यापासून, \"डेव्हिड बेबी Semaltलेट\" व्हिडिओ जाहिराताने सहा लाखांपेक्षा जास्त दृश्ये कमावल्या आहेत.\nएक कथानकाची निर्मिती, एक जाहिरात जेथे व्यक्ती एक ब्रँड किंवा उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी वापरले एक शरम पेंगुइन बळी पडतात, \"डेव्हिड बेबी आक्रमण\" व्हिडिओ न्यू यॉर्क शहर रस्त्यांवर रोमिंग एक मानवरहित बाळ stroller वैशिष्ट्ये. घुमटला जाणारा रडला, भूत-भूतकाळ असलेला रोबोटिक बाळ, जो पुढे चालविला जातो, कोणत्याही संशयास्पद passersby घाबरत आहे ज्याने एक शिशुची तपासणी करण्यास भाग पाडले ज्यात उशिराने दुर्लक्ष केले गेले आहे - data backup and recovery software in portland.\nजाहिरात वाईट-चेहर्याचा रोबोट मुलाला इमारत टीम फुटेज सह सुरू होते आणि रिमोट-नियंत्रित stroller मध्ये ठेवून जाहिरात \"डेव्हिड बेबी Semaltॅट\" नटणे साठी येत असंख्य लोकांसह क्लिपची एक मालिका दर्शविण्यासाठी पुढे जाते\n24 तासाच्या आत 6.3 दशलक्षांपेक्षा जास्त दृश्ये, ही जाहिरात आधीच व्हायरल सनसनाटी मानली जाऊ शकते, परंतु वास्तविक प्रश्न म्हणजे तो बॉक्स ऑफिस नंबरवर पोहोचेल की नाही.\nसर्व मजा डरणाऱ्या लोकांमध्ये, चित्रपटाला मिक्समध्ये हरवले आहे. 1:49 च्या धावती वेळेसह, व्हिडिओच्या शेवटच्या नऊ सेकंदांपर्यंत \"मिडल्ट डू\" चे कोणतेही उल्लेख नाही, आणि तरीही, चित्रपटच्या शीर्षकापूर्वीच या चित्रपटातील फक्त काही दृश्ये उपलब्ध आहेत आणि रिलीझची तारीख संपूर्णपणे छप्पर केली जाते. स्क्रीन\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\n(4 9) व्हॅल्यू प्रॉप्सबद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन आकारले पाहिजे\nस्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्री थांबविण्याच्या ट्विटरच्या नवीनतम धोरणामुळे ब्रँडवर परिणाम होत आहे\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube ला वाढविले, अॅक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nलक्षात ठेवून गेम अॅप्ससह, Google ने सार्वत्रिक अॅप्स मोहिम आणि अॅडमॉब मुद्रीकरण अद्यतनांची घोषणा केली आहे\nचॅनेल: VideoCreative दिवस वैशिष्ट्ये & विश्लेषण व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7144518", "date_download": "2018-04-23T11:45:28Z", "digest": "sha1:AOWI7IGBBM4LUKFTXQRB5KWGEFSSH6JC", "length": 6902, "nlines": 34, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Android साठी नवीन Google+ अॅप & amp; आयफोन अधिक फोटो संपादन & amp; सामग्री शेअरिंग मिमल", "raw_content": "\nAndroid साठी नवीन Google+ अॅप & आयफोन अधिक फोटो संपादन & सामग्री शेअरिंग मिमल\nAndroid आणि iSemalt साठी Google+ अॅपचे नवीन आवृत्त्या आता फोटो, पोस्ट, प्रोफाइल आणि समुदाय वैशिष्ट्यांच्या अद्यतनांसह उपलब्ध आहेत.\nवापरकर्त्यांना मूळ अॅप्स आणि मूळ ड्रामा आणि रेट्रोलक्स सारख्या फिल्टर्सची निवड करण्याची क्षमता यासह Google+ अॅप्समधील Snapseed फोटो-अॅनिमेशन पर्यायांच्या निवडीवर प्रवेश असेल. मिल्टल, कंट्रास्ट, ब्राइटनेस आणि इतर फोटो इफेक्ट्स एका टॅप वैशिष्ट्यासह तसेच समायोजित केल्या जाऊ शकतात ज्या वापरकर्त्यांनी संपादित केलेल्या प्रतिमेश मूळसह तुलना करू शकतात.\nAndroid साठी Google+ अॅपचे नवीन आवृत्ती पोस्टवरील अधिक मजकूर अप फ्रंट आणि 1+, रीशेअर आणि टिप्पणी बटणे ठळकपणे प्रदर्शित करेल. प्रतिमा पूर्वावलोकन क्रॉप केले जाणार नाहीत, आणि वापरकर्ते फोटो अल्बम इनलाइन स्वाइप करू शकतात - us technology companies in Portland. एखादा व्हिडिओ, फोटो किंवा दुवा संलग्नक मिलामला थेट एका दृश्य पृष्ठ, लाइटबॉक्स किंवा वेबसाइटवर घेऊन जाईल.\nप्रोफाइल आणि समुदाय वैशिष्ट्ये देखील आपल्या Semalt + प्रोफाइलवर वर्तमान स्थान सूचीसाठी पर्यायसह अद्यतने मिळत आहेत. एकदा हा पर्याय सक्षम झाला की, वापरकर्ते त्यांच्या Semalt + नेटवर्कमधील संपर्कांची परवानगी देऊन त्यांची स्थान स्थिती कशी पाहू शकतात हे निर्धारित करू शकतात.\nGoogle+ अॅप्स समूहाच्या वैशिष्ट्यांसह वापरकर्त्यांना त्यांच्या घर प्रवाहातील समुदाय पोस्टचे प्रमाण नियंत्रित करण्यास, लोकांना समुदायास आमंत्रित करण्यास आणि समुदायासह आयटम रीशेअर करण्याची अनुमती देते. सामुदायिक व्यवस्थापकांकरिता रिपोर्ट-काढणे-प्रतिबंध समर्थन व्यतिरिक्त, सदस्य शोध आणि सामग्री सुधारणा क्रिया आत्ता आयफोन किंवा Semaltॅट डिव्हाइसवरून केली जाऊ शकते.\n(3 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओसाठी शोध हेतू लावून: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापर करावा\nमूल्य प्रोप्स बद्दल सर्व: ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे आपले विपणन कसे आकारले पाहिजे\nरेडितने त्याच्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nचॅनेल: मोबाइल विपणन Google: Google + Google: मोबाइल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2018-04-23T11:53:47Z", "digest": "sha1:YRXFMW6GRF6MFYOP5LVCPHSVDRZFHAOO", "length": 4862, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आखन विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआखन विद्यापीठ (आर.डब्ल्यु.टी.एच. आखन) हे जर्मनीतिल आखन शहरात असून हे जर्मनीतिल अग्रणीचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे पुर्ण नाव र्‍हाइनिश वेस्टफालिशे टेक्निशे होकशुले(RWTH Aachen) आहे. इंग्रजीत र्‍हाइनिश वेस्टफालियन टेक्निकल युनिव्हर्सिटी अथवा आखन विद्यापीठ असेही संबोधले जाते. या विद्यापीठाचा केवळ जर्मनीतच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अत्युच्च दर्जाचे विद्यापीठ म्हणून मानले जाते. बहुतेक जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचादेखील भर संशोधनावर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/500/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80_", "date_download": "2018-04-23T11:09:09Z", "digest": "sha1:4YTOXQV56FDMTFPZTJGXIKX6Z3NK2PX4", "length": 12905, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्य सरकारच्या विकासाच्या दाव्यांची आर्थिक पाहणी अहवालातून 'पोलखोल' - धनंजय मुंडे\nकृषी उत्पादनात झालेली घट,सिंचनक्षमता निर्मितीत अपयश,सावकारांच्या संख्येत वाढ,औद्योगिक गुंतवणुक व रोजगारनिर्मित गुजरातची महाराष्ट्रावर आघाडी,दरडोई उत्पन्नात कर्नाटकच्याखाली घसरलेले स्थान,महिला व बालकांवरील अत्याचारातील वाढ अशी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील सर्वक्षेत्रीय अपयशाची जंत्री वाचत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या अपयशाचे वाभाडे काढले. राज्याचा २०१६-१७ चा आर्थिक पाहणी अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला.यात २०१५-१६ आर्थिक वर्षातील राज्याच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.या अहवालासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षात सरकारने जनतेची केलेली फसवणूक या अहवालातून उघड झाल्याचा आरोप केला.त्यासाठी त्यांनी अहवालातील आकडेवारी पृष्ठनिहाय माध्यमांसमोर सादर केली.\nधनंजय मुंडे यावेळी म्हणाले की,२०१४-१५ च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये राज्यातील तांदूळ,गहू,ज्वारी,बाजारी, तृणधान्य,हरभरा, मुग आदी विकांचे उत्पादन घटले आहे.गेल्या दोन वर्षात सिंचनासाठी शंभर टक्के निधी उपलब्ध करुन दिल्याचा दावा करणाऱ्या सरकारला सिंचनक्षेत्रात किती वाढ झाली हे सांगता आलेले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारताना बँकांचा फायदा होतो असा दावा करणाऱ्या सरकारने २०१५-१६ या वर्षात तब्बल १९४७ सावकारांना नव्याने परवाने दिल्याकडे लक्ष वेधले.सावकारांची संख्या वाढवून सरकारला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिक्षणक्षेत्रात शाळांची संख्या ६७५१ने वाढली,परंतु विद्यार्थ्यांची संख्या ५८हजारांनी घटली. सरकारने गाजावाजा करुन सुरु केलेले 'मेक इन्‌ इंडिया' अभियान आर्थिक पाहणी अहवालातून गायब झाले आहे.एका ठिकाणी जुन्याच आकडेवारीसह त्रोटक उल्लेख केल्याने या अभियानाचे अपयश ठळकपणे जाणवते आहे.राज्याने १९ हजार ४३७ प्रस्ताव मंजूर करुन ११ लाख ३७ हजार ७८३ कोटींची गुंतवणूक मिळवली, परंतु शेजारच्या गुजरात राज्याने १३ हजार ३०८ प्रस्तावांमधून महाराष्ट्रापेक्षा अधिक १४ लाख ३६ हजार ९६२ कोटींची,महाराष्ट्रापेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली,यातून राज्य सरकारचे अपयश ठळकपणे दिसत आहे.\nसुक्ष्म,लघू व मध्यम उद्योगातील गुंतवणुक व रोजगारनिर्मितीतही महाराष्ट्राचे स्थान घसरले आहे.या क्षेत्रातली गुंतवणूक ३७ हजार कोटींवरुन २० हजार कोटींपर्यंत तर रोजगारनिर्मिती साडेतीन लाखांवरुन दिड लाखांपर्यंत खाली घसरली आहे.राज्यातून होणारी निर्यात साडेचाल लाख कोटींवरुन तीन लाख कोटींपर्यंत घसरली असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी लक्षात आणून दिले.\nराज्याचे दरडोई उत्पन्न १लाख ४७ हजार ३९९ रुपये तर शेजारच्या कर्नाटक राज्याचे दरडोई उत्पन्न १लाख ४८ हजार ४८५ म्हणजे आपल्यापेक्षा जास्त असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक राज्याची अधोगती होत असताना महिला व बालकांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.विकासात पिछाडी व गुन्हेगारीत आघाडी यामुळे राज्याचा आर्थिक पाहणी अहवालातून सरकारच्या विकासाच्या दाव्यांचा पोकळपणा उघड झाला असल्याचेही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.\nउत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का – धनंजय मुंडे ...\nमराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा या पीकांचे तसेच फळबागा व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार काही पावले उचलणार का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का अशी जळजळीच टीका त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते मात्र काही केले नाही. कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठनही झालेले ...\nनवी मुंबईतील भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करा – आ. नरेंद्र पाटील ...\nनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु आहे. विधान परिषदेत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचा विषय सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री रंजीत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. सभापती ...\n९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटबंदी विरोधात राज्यव्यापी आंदोलन - नवाब मलिक ...\nकाळेधन संपवण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला असे म्हटले जात होते. या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले होते. मात्र पंतप्रधान मोदींचा हा निर्णय पूर्णतः फसला असल्याची टीका राष्ट्रावादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. व्यापार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोज्यामुळे बॅंकेचे कर्मचारी हैराण आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. सर्वात जास्त परिणाम हा शे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/february/29/", "date_download": "2018-04-23T11:34:03Z", "digest": "sha1:OVSTRXJ7P4J7RNA3J6RZYQK64NMOBJES", "length": 7137, "nlines": 114, "source_domain": "www.marathimati.com", "title": "२९ फेब्रुवारी दिनविशेष | February 29 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » फेब्रुवारी » २९ फेब्रुवारी दिनविशेष\nलेखन: मराठीमाती | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ फेब्रुवारी २०१८\nमोरारजी देसाई, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह\nमोरारजी देसाई - (२९ फेब्रुवारी १८९६ - १० एप्रिल १९९५) मोरारजी देसाई हे भारताचे स्वाधीनता सेनानी आणि देशाचे छत्तीसावे प्रधानमंत्री होते. ते पहिले पंतप्रधान होते जे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ऐवजी अन्य दलाचे होते. मोरारजी देसाई हे एकमात्र व्यक्ती होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.\n१७७६: इंग्रज व मराठे यांच्यामधील प्रसिध्द असा पुरंदर तह झाला.\n१८९६: मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान.\n१९२४: रामस्वरुप पांसी, हॉकीपटू.\n१५९२: अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.\n१९४०: एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन, इंग्लिश लेखक.\n१९४४: पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९५६: एल्पिडियो क्विरिनो, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/ball-tampering-smith-warner-handed-12-months-ban-by-ca-and-also-ipl", "date_download": "2018-04-23T11:10:05Z", "digest": "sha1:XFA2XMSCFAIUDGOMCDEXVR2S5KC725F4", "length": 11089, "nlines": 125, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Ball Tampering: Smith, Warner handed 12 months ban by CA and also IPL | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome क्रीडा स्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nकेप टाऊन कसोटीत झालेल्या चेंडूच्या झेडझाड़ीप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली. दोघांनी केलेल्या या पूर्व-नियोजित योजनेची अंबलबजावणी सलामीचा फलंदाज कॅमेरून बेन्क्रॉफ्ट याने आमलात आणली. परंतु कॅमेरामॅनच्या लक्षवेधी कामगिरीमुळे त्यांची हि चोरी पकडण्यात आली. कॅमेरून बेन्क्रॉफ्ट यालाही नऊ महिन्यांची बंदी बोर्डाने घातली आहे.\nशनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात स्मिथ-वॉर्नरने आखलेली योजना बेन्क्रॉफ्टने पार पाडली आणि चेंडू कुरतडण्यासाठी वापरण्यात आलेला सॅण्डपेपर बेन्क्रॉफ्ट लपविण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु मोठ्या स्क्रिनवर त्याची हि चपळाई दाखवण्यात आली आणि सर्व योजनेचा भांडाफोड झाला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्मिथ व बेन्क्रॉफ्ट यांनी आपली चूक कबूल केली आणि चौफेर टीकेला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांपासून ते सर्व स्थरावरून त्यांचा या कृत्याची निंदा केली गेली आणि परिणामी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना अश्या मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागले.\nप्रकरणी, याअगोदरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्मिथवर एका कसोटीची बंदी व १००% सामन्याची फी तर बेन्क्रॉफ्टला सामन्याची ७५% फीची बंदी घालण्यात आली आहे. तथापि, क्रिकेट खेळाला या मोठ्या खेळाडूंनी लावलेल्या गालबोटावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चांगलीच दखल घेतली आणि देशाची मान शरमेने खाली घातल्याबद्दल एवढी मोठी कारवाई करण्यात आली.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कारवाईनंतर भारतीय बोर्डाने या दोन्ही खेळाडूंवर यंदाच्या इंडियन प्प्रीमियर लीगमध्येही बंदी घातली. स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स तर डेव्हिड वॉर्नर सनरायसर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार घोषित केला होता. अजिंक्य रहाणेला राजस्थान रॉयल्सने स्मिथच्या जागी कर्णधारपदी निवडणूक केली आहेत तर सनरायसर्स हैद्राबादने अजूनही त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली नाही.\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:52:23Z", "digest": "sha1:F4I5UTHWPFVBYZS2LAFKBEIXEAQ7A4JP", "length": 16079, "nlines": 268, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया व नेव्हाडा राज्यांच्या सीमेवरील टाहो सरोवर\nबुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर\nजम्मू आणि काश्मीरमधील दाल सरोवरातील शिकारे\nजर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड देशांच्या सीमेवरील बोडन से\nयुटामधील ग्रेट सॉल्ट लेक\nकॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.\nसरोवर (किंवा तलाव) म्हणजेपृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]\n१.१ खंडांनुसार मोठी सरोवरे\n३ भारतभरातील तलावांची परंपरा\n३.१ कोणी निर्माण केली ही परंपरा \nमिशिगन-ह्युरॉन सरोवर हे एकत्रित सरोवर जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५० वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर सुपिरियर सरोवर ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला कॅस्पियन समुद्र हे बऱ्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.\nसायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे (२३,६०० किमी३, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी३) लहान आहे.\n६६० किमी लांबी असलेले टांजानिका सरोवर हे जगातील सर्वात लांब सरोवर आहे.\nबैकाल सरोवर हे जगातील सर्वात जुने सरोवर आहे.\nओजोस देल सालादो हे आन्देसमधील ज्वालामुखी सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील सर्वात उंच सरोवर आहे (उंची: ६,३९० मीटर (२०,९६५ फूट)).[३]\nतिबेटमधील मानसरोवर हे जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याचे सरोवर आहे.\n३,८१२ मी (१२,५०७ फूट) उंचीवर असलेले टिटिकाका सरोवर हे आन्देसमधील पेरू व बोलिव्हियाच्या सीमेवरील सरोवर जगातील सर्वात उंच जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.\nइस्रायल व जॉर्डन देशांच्या सीमेवरील मृत समुद्र हे जगातील सर्वात कमी उंचीवरील सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीच्या ४१८ मी (१,३७१ फूट) खाली आहे.\nह्युरॉन सरोवराला जगातील सर्वात लांब किनारा (२,९८० किमी) लाभला आहे.\nसर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):\nआफ्रिका - व्हिक्टोरिया सरोवर\nअँटार्क्टिका - वोस्तोक सरोवर (गोठलेले)\nआशिया - बैकाल सरोवर (कॅस्पियन समुद्राला सरोवर मानले तर ते युरेशियामधील सर्वात मोठे सरोवर असेल.)\nओशनिया - एर सरोवर\nयुरोप - लदोगा सरोवर\nउत्तर अमेरिका - सुपिरियर सरोवर.\nदक्षिण अमेरिका - टिटिकाका सरोवर\nभारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरॊवरांना भेट देणे ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-\nओरिसामधील बिंदुसागर सरोवर, आणि\n* तिबेटमधील मानस सरोवर\nमोठ्या सरोवरान इतकेच महत्त्वाचे आहेत लहान मोठे तलाव संपूर्ण भारतभर लहान मोठ्या तलावांचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. परंतू योग्य देखभाल न झाल्याने आज कितीतरी तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एक काळ असा होता जेव्हा पाण्याची व्यवस्था करणे त्याचे रक्षण करणे ही सर्व समाजाची जबाबदारी होती.इथला समाज स्वतः च्या हिताच्या गोष्टी स्वतः निर्माण करण्यावर भर देत होता,स्वतःची शक्ती वापरत होता.सत्ताधारी राजा हा जनतेचा सहाय्यक होता. त्यानेच सर्व करावे अशी अपेक्षा नसायची.इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी येथील पाणी व्यवस्थेची माहिती जुन्या दस्तावेजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.परंतू अशा नोंदी ठेवायची फारशी सवय नसल्याने त्यानी गृहीत धरले कि त्यांनाच खूप काही करायला लागेल. त्यानी माहिती बरीच मिळवली परंतू त्यामागच्या धारणा मात्र समजून घेतल्या नाही.१९ व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी सर्वत्र फिरतान मिळालेल्या माहितीच्या आधारे जी gazettier तयार केली त्यामध्ये अनेक मोठ्या तलावांचा उल्लेख मिळतो.\nकोणी निर्माण केली ही परंपरा \nशेकडो हजारो तलाव निर्माण करणारे हात कोणाचे होते हे शोधताना भारतातील कितीतरी समाजांची नावे मि ळतात.गजधर,टकारी,दुसाध,नौनिया गोंड ,परधान,कोल,ढीमर ,ढीवर,कोळी ,भोई अगरीया ,माळी,भिल्ल ,नाईक सोन्पुरा , महापात्र इ.==<आज भी खरे है तालाब> ==\nजगातील सर्वात रम्य सरोवरे - हफिंग्टन पोस्ट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१७ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sanjay-bhegade.html", "date_download": "2018-04-23T11:51:58Z", "digest": "sha1:PSAO6L2ZF7XJGC5YXTG4HMUWQABAL3SX", "length": 7343, "nlines": 88, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे\nConstituency : २०४, मावळ मतदार संघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : आमदार, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भा.ज.प.\nName संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे\nFather's Name : विश्वनाथराव रामभाऊ भेगडे\nMother’s Name : श्रीमती लक्ष्मीबाई (कमल) विश्वनाथराव भेगडे\nPlace of Birth: : कान्हेवाडी, ता. खेड, जि. पुणे\nSpouse’s Name : सौ. सारीका संजय भेगडे\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nHobby : क्रिकेट, व्यायाम, वाचन\nResidence Address : २७९, शनिवार पेठ, रामकृष्ण निवास, खळवाडी, भेगडे आळी, तळेगाव दाभाडे - ४१० ५०६, ता. मावळ, जि. पुणे\nOffice Address : बालाजी चेंबर्स, तळेगाव - चाकण रोड, तळेगाव दाभाडे - ४१० ५०७, ता. मावळ, जि. पुणे\nआमदार - मावळ विधानसभा\nसरचिटणीस - भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश\nअध्यक्ष - भारतीय जनता युवा मोर्चा मावळ तालुका\nपै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था\nसह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल\nपै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठाण\nपै. विश्वनाथराव भेगडे माथाडी कामगार संघटक\nसरचिटणीस - भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश\nअध्यक्ष - भारतीय जनता युवा मोर्चा मावळ तालुका\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nकार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेणे - महाराष्ट्र प्रदेश\nसंघटनात्मक पक्षाचे मेळावे घेणे\nकार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेणे - मावळ तालुका\nवार्षिक अहवाल जनतेसमोर सादर करणे\nआमदार बाळा भेगडे यांचे पेपर बातम्या, लेख...\nउर्से गणात पावणेदोन कोटीच्या कामांना प्रारंभ\nमावळात पुलासाठी दोन कोटी ६८ लाख रुपये मंजूर\nबऊर रस्त्यावरील पुलास मान्यता\nमावळात विविध विकासकामांचे भूमिपूजन\nतालुक्याचा विकास हाच ध्यास - आ. बाळा भेगडे\nकोडेश्वर देवस्थानच्या सभा मंडपाचे भूमिपूजन\nदेहूरोड परिसरातील रस्त्याचे उदघाटन\nमराठी बाणा कार्यक्रमाला अलोट गर्दी\nअपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवा\nलोणावळा शहर भाजपाचे रास्ता रोको\nजांबवडे येथे विकासकामांचे भूमिपूजन\nशेतकर्यांवर गोळीबार करणारयाना घरी बसवा : मुंडे\nविकासाचे क्षेय घेण्यासाठी राष्ट्रवादीचा चुकीचा प्रचार\nजास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्या : आ. भेगडे\nमावळ खोरयातही पाणी टंचाई - उपाययोजना करण्याच्या आमदाराच्या सूचना\nवडगावमध्ये मुंडेंच्या हस्ते सभामंडप कामाची पायाभरणी\nसाते येथील व्यायामशाळेच्या इमारतीचे मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन\nशेतकरयांवरील खटले मागे घेण्याची आ. भेगडे यांची मागणी\nनिर्मळ व कुपोषणमुक्त मावळ कार्यशाळेचा समारोप\nभाजपाचा जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:44:06Z", "digest": "sha1:UKWNIUT5IAQOKPV4U4DVXGPPLXKDHPNT", "length": 4577, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राखी वटवट्या - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराखी वटवट्या (शास्त्रीय नाव: Prinia socialis, प्रिनिया सोशिअ‍ॅलिस ; इंग्लिश: Ashy Prinia, अ‍ॅशी प्रीनिया) ही जल्पकाद्य पक्षिकुळातील भारतीय उपखंडात आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-root-rot-infection-betelvine-sangali-district-maharashtra-2410", "date_download": "2018-04-23T11:56:44Z", "digest": "sha1:UEO6RFHTU7GME3W5QBK4ZFYEEIVNOKKQ", "length": 15130, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, root rot infection in betelvine in sangali District, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसामुळे पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव\nपावसामुळे पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nसांगली ः सांगली पूर्व भागातील मालगाव, बेडग, नरवाड ही गावे पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. हा भाग पानमळ्याचे आगार मानले जाते. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच अपेक्षित दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने पानमळ्यांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. मिरजेचा पूर्व भाग पानमळ्याचे आगार समजला जातो.\nसांगली ः सांगली पूर्व भागातील मालगाव, बेडग, नरवाड ही गावे पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. हा भाग पानमळ्याचे आगार मानले जाते. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने पानमळ्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच अपेक्षित दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने पानमळ्यांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे. मिरजेचा पूर्व भाग पानमळ्याचे आगार समजला जातो.\nपानमळ्याच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी पानमळ्याखाली ८०० ते ९०० एकर क्षेत्र होते. आज ही शेती २०० ते २५० एकरांवर आली आहे. गेल्या चार वर्षांत पानाला चांगला भाव मिळत होता. गेल्यावर्षी पानांना एक हजार रुपये प्रतिडागास (एक डाग म्हणजे बारा हजार पाने) असा मिळाला होता. या वर्षी ८०० ते ९०० रुपये प्रतिडाग (एक डाग म्हणजे बारा हजार पाने) मिळत आहे. या भागात तीन कळी, फाफडा, हक्कल प्रकारच्या पानांची लागवड होते.\nपरंतु वाढत्या खर्चामुळे पानमळ्याचे क्षेत्र घटले आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांत या भागात दमदार पाऊस झाला. पानमळ्यात पाणी साठल्याने वेलींना मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे वेलीच्या मुळी नष्ट होऊ लागल्या आहेत. यामुळे आर्थिक फटका बसू लागला आहे. वाढती मजुरी आणि पानमळा वाचविण्यासाठी होणारा खर्चाचा ताळमेळ पान उत्पादक शेतकऱ्यांना घातलाना तारेवरची कसरत करावी लागते आहे.\nपानखुडणीसाठी जुने जाणते लोक जात आहेत. मात्र, कुशल कारागिरांची संख्या कमी असल्याने मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे पानांची वेळत काढणी होत नाही.\nसांगली महाराष्ट्र शेती ऊस पाऊस नगदी पिके पानमळा\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:51:10Z", "digest": "sha1:4DL75MF2CKQDZRM7B6QY6MNUPBSK4XXG", "length": 5920, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पश्तो भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\npus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nपश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-download.html-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-xender", "date_download": "2018-04-23T11:52:26Z", "digest": "sha1:F3KAR6WKJE6ED6G4OSTRYIGZSSFG4DR7", "length": 15183, "nlines": 74, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "पीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nशेअर करणे हे काळजी आहे\nपीसी Windows किंवा Mac साठी Xender साधने फायली स्थानांतरीत आवडी जो प्रत्येकासाठी सर्वोत्तम उपाय आहे. आम्हाला उदाहरणार्थ पीसी विंडोज व मॅक किंवा उलट पासून Android आणि iOS साधने डेटा किंवा फायली स्थानांतरीत करण्यात मदत करते. तो कसे वापरावे या लेखातील आम्ही पीसी किंवा मॅक पुनरावलोकनासाठी Xender बद्दल चर्चा करणार आहेत.\nXender फायली स्थानांतरीत करण्यात इंटरनेट कनेक्शन किंवा ब्लूटूथ आवश्यकता नाही. पण साधने दरम्यान अंतर्गत कनेक्शन वापरत आहे. त्यामुळे, सर्व पाठवून फायली कामे वायरलेस केले जाऊ शकते. आम्ही USB केबल आणण्यासाठी विसरू तर तो आवश्यक नाही कारण आम्ही आता काळजी करण्याची गरज नाही.\nपीसी Windows आणि Mac साठी Xender: अमर्यादित फाइल्स शेअर\nXender पीसी Windows व Mac ते विंडोज पीसी किंवा मॅक पासून iPhone आणि iPad सारख्या Android आणि iOS साधने फाइल्स पाठवू, तेव्हा समस्या तोंड कोण शक्यता प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी आहे उपलब्ध आहे. हा अनुप्रयोग कोणत्याही आकारात कोणत्याही फायली प्रकारची पाठवू करण्यास परवानगी देते. हे दस्तऐवज पाठवू शकता, संपर्क, ऑडिओ, व्हिडिओ, चित्रे आणि अनुप्रयोग. अगदी Android आणि iOS साधनांकरीता, तो स्मार्टफोन दुप्पट सुरू करू शकता.\nशेअर करणे प्रक्रिया वायरलेस केले जाते असला तरी, तो Xender अनुप्रयोग मंद आहे की नाही याचा अर्थ असा नाही. Xender अनुप्रयोग 10MB / सेकंद पर्यंत गती ह तांत रत आहे. त्यामुळे, आपण वेळ फायली स्थानांतरीत करू शकता.\nपीसी Windows किंवा Mac साठी Xender सोपे शोधू आणि आपण हस्तांतरित की फाइल आयोजित करते जे एक छान वापरकर्ता इंटरफेस आहे. तसेच आपण कॉपी करण्यास परवानगी देते फाइल प्रबंधक सुसज्ज आहे, हलवा किंवा अगदी अवांछित फायली हटवा. हे आपण बॅकअप पीसी किंवा मॅक आपल्या स्मार्टफोनमध्ये मध्ये डेटा आपल्या स्मार्टफोन अधिक संचयन मिळवा शक्य आहे.\nसर्व उत्तम गोष्ट Xender अनुप्रयोग विनामूल्य सर्व त्याच्या उत्तम वैशिष्ट्ये देते आहे. Xender अनुप्रयोग काहीही खरेदी करणे आम्हाला आवश्यक आहे नाही. त्यामुळे आमच्या खिशात सुरक्षित राहते. पीसी Windows आणि Mac साठी Xender डाउनलोड कसे\nपीसी Windows आणि Mac साठी Xender डाउनलोड करा\nXender अनुप्रयोग पीसी Windows आणि Mac साठी उपलब्ध आहे. मुळात, PC किंवा Mac साठी Xender अर्ज नाही. त्यामुळे, आम्ही PC किंवा Mac साठी Xender डाउनलोड आणि स्थापित करण्याची गरज नाही. आम्ही आवश्यक सर्व सफारी सारख्या ब्राउझर, फायरफॉक्स किंवा Chrome PC किंवा Mac साठी Xender प्रवेश करण्यासाठी.\nXender एक ब्राउझर आवश्यक असल्याने, विंडोज ओएस विविध प्रकारचे समर्थन. फक्त ठेवणे, Xen विंडोज समर्थन 8, 8.1,10 आणि मॅक OSX म्हणून आपण आपल्या PC किंवा Mac वर स्थापित एक ब्राउझर आहे जोपर्यंत. आपण पीसी Windows किंवा Mac साठी Xender निर्देशित करण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा.\nपीसी फोन वरून फायली स्थानांतरीत कसे किंवा Xender वापरून मॅक\nआम्ही PC किंवा Mac साठी Xender एकदा, आम्ही आमच्या Android आणि iOS साधने वर Xender अनुप्रयोग स्थापित करणे आवश्यक. वाचा Android साठी Xenia आणि iOS साठी Xenia तपशील मिळविण्यासाठी.\nआपण Xender अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोन स्थापित केले तेव्हा, आपण पीसी किंवा मॅक मोबाइल फोन पासून फायली स्थानांतरीत करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करू शकता.\nटीप: खाली ट्युटोरियलमध्ये, मी एक Android स्मार्टफोन वापरत आहे. आपण iOS स्मार्टफोन वापरत असाल तर, नाही काळजी करा. पावले iPhone किंवा iPad साठी खूप भिन्न नाहीत. मी सहज बाहेर आकृती शकता विश्वास.\n1. आपल्या Android स्मार्टफोन वर Xender अर्ज आणि मेनू शोधण्यासाठी नंतर स्वाइप करा योग्य उघडा. iOS स्मार्टफोन असताना, आपण फक्त टॅप करू शकता हिरव्या रॉकेट लाँचर तळाशी.\n2. निवडा PC ला कनेक्ट करा आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा संगणक मेनू, Android किंवा iOS दोन्ही.\n3. आपण हिरव्या पृष्ठ आहे की आपण web.xender.com जा आणि नंतर स्क्रीनवर QR कोड स्कॅन पाहिजे देतील. नाही ही पद्धत फायली स्थानांतरीत करण्यात इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे कारण चरण अनुसरण. आपण या चरण अनुसरण तर आपण आपल्या बँडविड्थ गमवाल. त्याऐवजी, अंतर्गत गरम-स्पॉट तयार करण्याचा अधिकार Wi-Fi चिन्ह दाबा. आपल्या PC द्या किंवा मॅक हे नेटवर्क कनेक्ट. नेटवर्क आहे \"Xender_APxxxx“.\n4. आता ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये दिलेल्या IP पत्ता पीसी किंवा Mac वर आपला ब्राउझर उघडा आणि टाइप. पृष्ठावर जाण्यासाठी Enter दाबा. कनेक्शन स्वीकारणे आपल्या स्मार्टफोनमध्ये करा.\n5. ब्राउझर आता मुख्य पृष्ठ दर्शविले पाहिजे. हे Xender PC साठी किंवा मॅक यशस्वीरित्या Xender करण्यासाठी Android किंवा iPhone कनेक्ट केले आहे याचा अर्थ असा की. ह तांत रत फाइल कार्य लगेच केली जाऊ शकते.\nफाइल्स पाठवू, आपण फक्त ड्रॅग करा किंवा ब्राउझरमध्ये तो ड्रॉप करणे आवश्यक. किंवा आपण पाठवत आहोत की फायली शोधण्यासाठी फाइल व्यवस्थापकाचा वापर करा. फाइल व्यवस्थापक आपण करू इच्छित असलेले फोल्डर फायली ठेवू देतो. त्यामुळे, आम्ही फायली स्थानांतरीत फाइल वेळ आयोजित केली जातात. आपण डिस्कनेक्ट करू इच्छिता तर, फक्त स्क्रीन वर डाव्या वर एक्स दाबा.\nXender अनुप्रयोग आपण पीसी किंवा मॅक OSX स्मार्टफोन आगाऊ डाउनलोड केली आहे, व्हिडिओ मोठ्या फाइल्स पाठवू अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, आपण फक्त वापरून व्हिडिओ डाउनलोड SnapTube किंवा पानातून बाहेर पडणारी टीव्ही आणि आता एका मोठ्या स्क्रीनवर तो पाहू इच्छित. त्यामुळे, फक्त व्हिडिओ पाठविण्यासाठी PC किंवा Mac साठी Xender वापर. तो वेळ समाप्त होईल.\nपीसी Windows किंवा Mac पुनरावलोकनासाठी सर्व Xender आहे. आपण Android किंवा iOS स्मार्टफोन पीसी विंडोज किंवा मॅक Xender अर्ज वापर करून फाइल हस्तांतरण संबंधित काही प्रश्न असतील तर टिप्पणी बॉक्स मध्ये ड्रॉप करण्याचा कंटाळा करू नका. आपण उपयुक्त तर हा लेख शेअर करा. वाचन धन्यवाद.\nएक विचार \"पीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender”\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra-desha", "date_download": "2018-04-23T11:21:35Z", "digest": "sha1:6RQG4AZAPZZL4ZOMKM5WVDEW3EAP2GFF", "length": 9597, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "महाराष्ट्र देशा | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nराष्ट्रीय कीर्तनसम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्मरणयात्रेचे नियोजन\nराष्ट्रीय कीर्तनसम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त “संस्कार भारती” वसई, विभाग कोकण प्रांत आणि स.न.वि.वि. कलासाधनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसई मध्ये राष्...\tRead more\nराष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलाचे पथ संचलन संपन्न\nजळगाव: राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने पोलीस विभागाचे पथ संचलन आज सायंकाळी संपन्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारातून या पथ संचलानास सुरुवात झाली. आकाशवाणी चौक मार्गे काव्य रत्नावली चौकात...\tRead more\nचीनी वस्तूंवर बहिष्कार करा\nरुपेश बंगाळे / संभाजीनगर: आपला शेजारी देश चीन हा भूतान मार्गे सिक्कीमच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. लेह लडाकमध्ये चीनी सैन्याच्या हालचाली नेहमीच आपल्यासाठी धोक्याच्या ठरल्या आहेत. ची...\tRead more\n सत्यं वच्मि॥ इ.स.२००१ या वर्षी बोयसर येथे ब्रह्मर्षी डॉ. वर्तकांसह केलेल्या ध्यानामध्ये मला असे दिसले की, ‘हिरवीगार साडी नेसलेली एक खेडूत बाई व हिरव...\tRead more\n सत्यं वच्मि॥ ॐ त्वं वैष्णवी शक्तिरनन्तवीर्या विश्वस्य बीजं परमासि माया | सम्मोहितं देवि समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः || देवि सप्तशतीमधील उपरोक्त श्लोक देवीचे मुलभू...\tRead more\nअखिल भारत गौरक्षा महासभेच्या संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी छत्रभुज शेळके यांची नियुक्ती\nसंभाजीनगर: पैठण येथील छञभुज शेळके यांची अखिल भारत गौरक्षा महासभेच्या संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती गौरक्षा महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेन्द्र खट्टर ज...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/majedar-cutlets/", "date_download": "2018-04-23T11:29:21Z", "digest": "sha1:6ROI53EZA5ISV3EXZPDDCOFUMJOGWELS", "length": 6854, "nlines": 157, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मजेदार कटलेट्स | Majedar Cutlets", "raw_content": "\n१ वाटी तयार भात\n१ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ\n१ वाटी वाफवलेला कोबी\n२-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ\nकांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.\nनंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.\nएका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.\nत्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.\nचिंचेच्या चटाणीसोबत खावीत. फार छान लागतात.\nवाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळा चालेल.\nया वर्गातील आणखी काही लेख\nस्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच\nThis entry was posted in न्याहारी, मधल्या वेळचे पदार्थ and tagged उसळ, कटलेट, कोबी, न्याहारी, पाककला, ब्रेड, भात on ऑक्टोंबर 22, 2012 by स्वाती खंदारे.\n← २२ ऑक्टोबर दिनविशेष वाचन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/179765-", "date_download": "2018-04-23T11:37:44Z", "digest": "sha1:OWTEQWIJQ6DXL6IIEUSA5WB6BF3CVH5D", "length": 9978, "nlines": 23, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "बॅकलिंक्ससह माझ्या पेजरेंकची गगनभेदी करणारी कोणतीही अंतिम दृष्टिकोण आहे का?", "raw_content": "\nबॅकलिंक्ससह माझ्या पेजरेंकची गगनभेदी करणारी कोणतीही अंतिम दृष्टिकोण आहे का\nअनेक सध्या वैध धोरण आहेत जे बॅकलिंक्ससह कदाचित प्रत्येक वेबसाइट किंवा ब्लॉगचे PageRank वाढविण्यासाठी वापरले जाऊ शकतात.आणि आम्ही सुरुवात करण्यापूर्वी, आपण त्याचा सामना करू - आपण आपल्या विद्यमान पेजरेंकला बॅकलिंक्ससह \"अग्नीबाण\" करू शकत नाही, मग ते कितीही अवघड किंवा चांगले-ट्यून केलेले असू शकतात.अर्थात, आपल्या बॅकलिंक प्रोफाइलला सर्वोच्च महत्वचे मुख्य घटक असतात जेव्हां एक मोजता येण्यासारख्या प्रभावी परिणामी आपल्या वेबसाइटचे पृष्ठ रँकिंग निश्चित करते - network assessment\tin portland.Google सारख्या प्रमुख शोध इंजिनांद्वारे मानले जाणारे इतर घटक पुढीलपैकी आहेत: स्वतः permalinks, मुख्य लक्ष्य कीवर्ड, अनन्य गुणवत्ता सामग्री आणि बाकीची वेबसाइट गुणधर्म जे एसईओ मध्ये कमी निर्णायक आहेत. बिंदूवर परत येत आहे - बॅकलिंक्ससह आपल्या पेजरेंकमध्ये त्वरित सुधारणा करणे अशक्य आहे. परंतु कार्य हे अजूनही प्राप्त करण्यायोग्य आहे, आपण आपल्या एकूण दीर्घकालीन धोरणांवर संयम व काम करण्यास तयार आहात असे दिले आहे. खाली कदाचित बिल्डिंगचा दुवा साधण्यासाठी सर्वात वाजवी दृष्टिकोन असू शकतात जे Google मध्ये आपल्या उच्च पृष्ठांच्या रँकिंगमध्ये संभाव्यरित्या योगदान देऊ शकते.\nआणि मी तुम्हाला सावधगिरीचा शेवटचा शब्द देतो- बॅकलिंक्स ऑटोमेशनसह पेजरॅन्क वाढविण्याचा कधीही प्रयत्न करू नका.तर, येथे काय पहिले आणि सर्वात महत्वाचे मानले पाहिजे:\nगुणवत्ता पेक्षा अधिक फोकस\nएसओ तंत्रज्ञानाच्या शेरचा वाटा बनवणा-या मूळ संकल्पनेमुळे गुणवत्तेवर केवळ सट्टा आहे. सोप्या भाषेत, एसईओचे जागतिक उद्दिष्ट हे एसईआरपीवर ऑनलाइन जाहिरातीसाठी एक स्थिर आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करणे आहे. दुर्दैवाने, बर्याच ब्लॉगर्स आणि नवशिक्या वेबमास्टर्सना दुवे बांधण्यास एक सामान्य समस्या भेडसावत आहे. याचा अर्थ असा की बर्याचदा ते प्रमाणापेक्षा अधिक प्राधान्य देतात, असा एक असामान्य आशा आहे की तेथे एक मोठा पॅक बॅकलिंक्स ड्रॉप करेल ज्यामुळे त्यांचे एकंदर क्रमवारीत वाढ होईल. परंतु ते फारच खोट्या आहेत कारण कमी दर्जाची किंवा असंबद्ध दुवे हे एसइओसाठी केवळ निरुपयोगी नाहीत. खरं तर, प्रगती ऐवजी स्वत: ला एक गंभीर रजा दंड मिळविण्याची उच्च शक्यता आहेत. सर्वात वाईट स्थितीत, सर्वकाही तसेच शोधावरील कायम बंदीमुळे समाप्त होऊ शकते.\nआपल्या आला किंवा व्यवसाय उद्योगात दुवा\nहा भयंकर चूक कधीही करू नका, जसे मी बर्याच वर्षांपूर्वी. खरं तर, मी माझ्या ब्लॉगवर बॅकलिंक्स मिळवण्याचा चुकीचा मार्ग वापरला - मला फक्त प्रत्येक उशिर विश्वसनीय वेबसाइटशी दुवा साधत असे वाटले की मी. असे केल्याने, माझ्या नवीन तयार केलेल्या बॅकलिंक्सना पूर्णपणे प्रासंगिक होण्यास अपयशी ठरले - आतापर्यंत ते सर्व त्या उजव्या कोपर्यात तयार केलेले नाहीत. परिणामी, मी वेळ आणि प्रयत्न एक प्रचंड लोड वाया गेला होता - फक्त बॅकलिंक्स पासून PageRank मध्ये कोणतेही प्रत्यक्ष लाभ येत हताश मिळविण्यासाठी. म्हणूनच टिपण्णी आणि विषय चर्चेत सामील होण्याआधी, मी दुहेरी तपासणी करण्याचा प्रयत्न करतो की लक्ष्य स्रोत आपल्या निवासासाठी पूर्णपणे समर्पित आहेत किंवा त्याच व्यवसाय उद्योगात राहतात.\nअँकरची कार्यक्षमता ठेवण्यासाठी कीवर्ड संशोधन करा\nविहीर, सामग्री राजा आहे असे म्हणण्याची आवश्यकता नाही. एसइओबद्दल सर्व गोष्टी अक्षरशः कीवर्डच्या योग्य पलीकडे जाऊन योग्य अर्थपूर्ण विश्लेषण करतात. आपल्या वेबसाइटच्या प्रोफाइलमध्ये प्रत्येक बॅकलिंक तर नाही, किंवा तो अँकर मजकूर अधिक अचूक असल्याचे. दुर्दैवाने, गहन कीवर्ड संशोधन हाताळण्याचा समान मार्ग खूप दुर्लक्षित केला जातो. म्हणूनच आपला लिंक अँकर शक्य तितक्या काळजीपूर्वक लिहून घेण्यावर विचार करा - किमान अॅडव्हर्ट किंवा इतर अत्याधुनिक कीवर्ड संशोधन साधनांचा वापर करणे. त्याप्रकारे, शोध मध्ये त्याच्या लोकप्रियतेचा अभाव असल्याने आपण चुकीचे दुवा जोडण्याबद्दल खात्री बाळगाल. फक्त आपण अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करा आणि सर्व प्रमुख शोध ट्रेन्ड आणि अर्थपूर्ण वैशिष्ठ्ये अनुसरण करा. लक्षात ठेवा, दोन संभाव्य समान अँकर ग्रंथ पूर्णपणे असमान रहदारी-निर्मितीक्षम क्षमतेसह एक लिंक प्रदान करु शकतात आणि म्हणूनच कायमस्वरूपी त्यांच्या स्वत: च्या पध्दतीने पृष्ठक्रम.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/ankur-samajhitacha/", "date_download": "2018-04-23T11:26:07Z", "digest": "sha1:RMNOFARCVBY3D3KKVZV42RDVLRYK6ZWX", "length": 8942, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अंकूर समाजहिताचा | Ankur Samajhitacha", "raw_content": "\nदेणे समाजाचे – समाजासाठी हे अगळे-वेगळे प्रदर्शन नुकतच मातोश्री वृध्दाश्रमात भरवण्यात आलं आलं होतं. या समाजपोयोगी प्रदर्शनाला पुणेकरांचा भरघोस पाठिंबा मिळाला. अंकूर प्रतिष्ठान च्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात चांगल्या पण निरुपोयोगी वस्तू दान करण्याचं आवाहान करण्यात आलेलं होतं. या अवाहानाला पुणेकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता टिव्ही, कॉमप्यूटर, वॉशिंग मशीन, प्रिंटर, डायनिंग टेबल, डिनर सेट, भांडी, खेळणी, पुस्तके यासांरख्या अनेक वस्तु जमा झाल्या. या वस्तू जमा करण्यासाठी जसा प्रतिसाद मिळाला तसाच त्या वस्तू घेण्यासाठी मिळाला. या प्रदर्शानाच्या माध्यमातून या सर्व वस्तू विनामूल्य गरजूनां उपल्बध करून देण्यात आल्या.\nदिवाळीच्या अधी बरेच जण घरात साफ सफाई करत असतात अशावेळी अनेक जुन्या वस्तू आपण टाकून देतो. अशाच जून्या पण चांगल्या वस्तू गोळा करून त्या गरजू पर्यंत पोहचवून त्यांची दिवाळी अधिक आंनदी करण्यात अंकुर प्रतिष्ठानने मोलाची भुमिका बजावली. नव्या घेतल्या म्हणून किंवा हौसेखातर घेतलेल्या गेलेल्या अनेक वस्तू सधन कूटूंबात तशाच पडून असतात तर कष्टकरी वर्ग गरज असूनही या गोष्टींपासून वंचित असतो. सधन आणि कष्टकरी वर्ग यांच्यातील दरी कमी करण्याचा हा लहानासा प्रयत्न आहे असे अंकूर प्रतिष्ठानचे सदस्य कुलदीप सावलेकर यांनी सांगितलं. या प्रदर्शानाला गरिब वस्त्या आणि गरजू संस्थांना निमंत्रण देण्यात आलं होतं. अंकुर प्रतिष्ठान च्या वतीने दर वर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसणांसाठी उडान ची खास नविन उत्पादने\nअश्शी दिवाळी सुरेख बाई\nThis entry was posted in घडामोडी and tagged अंकूर प्रतिष्ठान, कुलदीप सावलेकर, दान, दिवाळी, निरुपोयोगी वस्तू, पुणे, प्रदर्शन on नोव्हेंबर 27, 2012 by स्वप्नाली अभंग.\n← २७ नोव्हेंबर दिनविशेष २८ नोव्हेंबर दिनविशेष →\n2 thoughts on “अंकूर समाजहिताचा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra", "date_download": "2018-04-23T11:25:29Z", "digest": "sha1:UQD6PTN7NAJCGTYVSVUMLD32GD6VRLUJ", "length": 9718, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "महाराष्ट्र | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहा: कोंकण रेल्वेमुळे रोहे नगरीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. रोहे हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत हे महत्वाचे केंद्र आहे.मध्...\tRead more\nनवी मुंबईतील स्टार सिटी बार सील करा, मनसेची मागणी\nनवी मुंबई मनपा हद्दीत विनापरवाना हॉटेल सुरु, मनसेचा आरोप प्रतिनिधी, नवी मुंबई: बेलापूर येथील प्लॉट क्र.५३, सेक्टर १५ मधील स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार गेल्या तीन ते चार वर्षांपासून विनापरवान...\tRead more\nहिंदू महासभेच्या वतीने धारावी येथे भगवी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा\nहिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा साजरा करण्यासाठी धारावी येथे संत रोहिदास मार्गावर प्रथमच भगवी गुढी उभारून नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने साजरा करण्यात आला...\tRead more\nआमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची मागणी\nनवी मुंबई / सूर्यकांत गोडसे: नेरुळ सेक्टर-२ येथील संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदान अश्या दोन्ही ठिकाणी ‘ओपन जिम’ आमदार निधीतून उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा...\tRead more\nमनसेने सिडको भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला, महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक\nनवी मुंबई / सूर्यकांत गोडसे: वाशी सेक्टर-३०अ येथे सिडकोने महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरचा भूखंड गेली १५ वर्षांपासून आरक्षित ठेऊनही तेथे महाराष्ट्र भवन न बांधल्याच्या निषेधार्थ आज मराठी भाषा दिन...\tRead more\nसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबलावणी करावी – राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय\nपालघर : राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतीकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विहीत वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याब...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T11:52:36Z", "digest": "sha1:RYRHZKDKVZK7UFWDBUNE3UYCLXPUXRCB", "length": 8746, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक - विकिपीडिया", "raw_content": "आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१० आणि १३ अंकांच्या आयएसबीएन च्या वेगवेगळ्या भागांनी पुस्तकाबद्दल वेगवेगळी माहिती मिळते.\nआंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक (इंग्रजी: International Standard Book Number - इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर) ज्याला आयएसबीएन म्हणूनही ओळखतात, हा एखादे पुस्तक ओळखण्यासाठी त्याला दिला जाणारा एक अद्वितीय, व्यावसायिक, अंकीय क्रमांक आहे. या क्रमांकाद्वारे जगातल्या जवळपास कोणत्याही पुस्तकाचा शोध घेतला जाऊ शकतो व त्याबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते. सुरूवातीला ही पद्धत फक्त अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये प्रचलित होती. पण आता ती संपूर्ण जगात पसरली आहे. आयएसबीएन क्रमांकामध्ये आधी १० अंक असायचे, पण २००७ नंतर त्यात १३ अंक असतात.\nब्रिटनचे एक प्रसिद्ध प्रकाशक डब्ल्यू. एच. स्मिथ यांनी डब्लिन, आयर्लंडच्या ट्रिनिटी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक गॉर्डन फोस्टर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांना एक क्रमांक द्यायची पद्धत बनवून घेतली. त्यांनी ९ अंकांची प्रणाली बनवली, जिचे नाव \"स्टँडर्ड बुक नंबरिंग\" (एसबीएन म्हणजे प्रमाणित पुस्तक क्रमांक) असे ठेवण्यात आले.[१] १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने (ISO) या प्रणालीवर अधारित नवीन १० अंकीय प्रणालीची घोषणा घोषणापत्र संख्या ISO २१०८ मध्ये केली.[२] त्यालाच आता आयएसबीएन म्हणतात. २००७ मध्ये १० अंकीय प्रणाली बंद करून १३ अंकीय प्रणाली सुरु करण्यात आली. पण अजूनही १० अंकीय आयएसबीएन दिसतात.\n↑ \"गॉर्डन फोस्टर यांचा मूळ रिपोर्ट (वेब आर्काइव)\".\n↑ \"आयएसबीएन हिस्टरि\". २० एप्रिल २०१४. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 20 April 2014 रोजी मिळवली). २६ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ रोजी ०८:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gokul-milk-kolhapur-district-929", "date_download": "2018-04-23T11:51:19Z", "digest": "sha1:K7VU3KXYR5L6T25CHIWUBIOL5QGF6OFE", "length": 16581, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Gokul Milk, Kolhapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध दरावरून ‘गोकुळ’च्या आजी-माजी पाटलांत शब्दयुद्ध\nदूध दरावरून ‘गोकुळ’च्या आजी-माजी पाटलांत शब्दयुद्ध\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) सध्या गायीच्या दूध दरवाढीवरून आजी व माजी अध्यक्षांत चांगलाच संघर्ष सुरू आहे.\nशासनाने दोन वेळा दूध खरेदी दरवाढ करूनही ‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने उत्पादकांना पूर्ण दरवाढ दिलेली नाही. उलट पशुखाद्याचे दर वाढविले आहेत. ‘गोकुळ’कडून गायीच्या दुधासाठी ३ रुपये ३० पैसे, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ३० पैसे कमी दिले जात आहेत. त्यामुळे दूध दरवाढीसाठी ‘गोकुळ’विरोधात लढा उभा करावा लागेल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.\nकोल्हापूर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) सध्या गायीच्या दूध दरवाढीवरून आजी व माजी अध्यक्षांत चांगलाच संघर्ष सुरू आहे.\nशासनाने दोन वेळा दूध खरेदी दरवाढ करूनही ‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने उत्पादकांना पूर्ण दरवाढ दिलेली नाही. उलट पशुखाद्याचे दर वाढविले आहेत. ‘गोकुळ’कडून गायीच्या दुधासाठी ३ रुपये ३० पैसे, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ३० पैसे कमी दिले जात आहेत. त्यामुळे दूध दरवाढीसाठी ‘गोकुळ’विरोधात लढा उभा करावा लागेल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.\nतर संघ आम्ही योग्यरीतीने चालवत आहोत. त्याचा ताळेबंद मांडलेला असतो. त्यामुळे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यांची दखल आम्ही घेत नाही. संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. तो तोट्यात जावा, असा कारभार आम्ही करणार नाही, असा पलटवार अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केला आहे.\nचार दिवसांपूर्वीच कर्नाटक सीमेवर असणाऱ्या कर्नाटक हद्दीतील गावांना दूध संघ गायीच्या दुधाला कमी दर देत असल्याबद्दल तेथील शेतकऱ्यांनी गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढून संचालक व व्यवस्थापकीय मंडळाला जाब विचारला होता. दर का कमी याचे समाधानकारक उत्तर न देता आल्याने सध्या गोकुळचे प्रशासन सीमाभागातील शेतकऱ्यांच्या टीकेचा धनी बनले आहे.\nयाच पार्श्‍वभूमीवर गोकुळचे अध्यक्ष राहिलेल्या दिलीप पाटील यांनी गोकुळच्या दरकपातीच्या निर्णयाला विरोध करत आपण अध्यक्ष असताना दर वाढविल्याचे सांगत सध्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तर अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावत हे आरोप राजकीय असल्याचे म्हटले आहे.\n‘गोकुळ’चे पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संघामध्ये वर्चस्व आहे. एखाद्या आमदाराइतकेच गोकुळच्या संचालकाला महत्त्व असल्याने दुग्ध व्यवसायाबरोबर संघाचे राजकारणही चर्चेत असते. पण इतके असतानाही गोकुळमधील खाबूगिरी चर्चेतून सुटली नाही.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/health/health-tips/page/3/", "date_download": "2018-04-23T11:37:28Z", "digest": "sha1:4AP562CRPVIXF7TXBTNSYIHZ433FCYL6", "length": 6478, "nlines": 111, "source_domain": "www.marathimati.com", "title": "आरोग्य सल्ला | Health Tips - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » जीवनशैली » आरोग्य » आरोग्य सल्ला » पान ३\nस्त्रियांसाठी योगासने आणि व्यायाम\nप्रकृती चांगली ठेवण्याकरता चौरस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती, आंतर्बाह्य स्वच्छता या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम.\nलैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र\nलैंगिक शिक्षण खरं म्हणजे आपल्याकडे नवीन नाही. ऋषिमुनींनी त्याचा शास्त्रीय बैठकीवर विचार करून ग्रंथरचानाही केली होती. त्यांनी त्याला असं अवास्तव महत्त्व दिलं नव्हतं. तसा तो विषय त्याज्यही मानला नव्हता. पुढे त्याला अनिष्ट वळण लागलं आणि त्याचा बाऊ करून तो विषय त्याज्य मानला गेला.\nमासिक पाळी आणि तक्रारी\nसामान्यपणे १३ ते १४ वर्षांच्या दरम्यान मुलीच्याच पाळीची सुरुवात होते. पाळी जाण्याचा काळ सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ वर्षाच्या आसपास धरला जातो.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/**-**-11343/", "date_download": "2018-04-23T11:23:04Z", "digest": "sha1:42EPNPQNA5T6GLEJAGCXTYCWKOP3A7TI", "length": 5501, "nlines": 151, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-** माझा मृत्यू **", "raw_content": "\n** माझा मृत्यू **\n** माझा मृत्यू **\n** माझा मृत्यू **\nअसं वाटत होत कालपर्यंत\nपण आज ठाम मत झालंय\nअगदी पुढच्या क्षणापर्यंत ………….\nतुझ्या दुराव्याचे दाहक क्षण\nपुन्हा पुन्हा विचारावस वाटत\nकां इतका जीव लावलास तू मला\nकां तुझं इतकं वेड\nलावून टाकलस या जीवाला\nतू नाहीस माझ्या जीवनात\nया कल्पनेन जीव गुदमरतो\nहा श्वास थांबून जाईल\nमलाही हवाय असाच मृत्यू\nजो प्रेमान भारलेला असेल\nवाट बघेन मी पुढच्या जन्मी\nतेव्हा तू फक्त माझीच असेल .\nकवी : संजय एम निकुंभ , वसई\nदि. १५ . ४ . १३ वेळ : १० . १५ स.\n** माझा मृत्यू **\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: ** माझा मृत्यू **\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: ** माझा मृत्यू **\nहा श्वास थांबून जाईल\nमलाही हवाय असाच मृत्यू\nजो प्रेमान भारलेला असेल\nवाट बघेन मी पुढच्या जन्मी\nतेव्हा तू फक्त माझीच असेल\nRe: ** माझा मृत्यू **\nअशोक भांगे (सापनाई कर )\nवेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी\nRe: ** माझा मृत्यू **\nRe: ** माझा मृत्यू **\nRe: ** माझा मृत्यू **\nRe: ** माझा मृत्यू **\nRe: ** माझा मृत्यू **\n** माझा मृत्यू **\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t17411/", "date_download": "2018-04-23T11:26:15Z", "digest": "sha1:FMUU4QKY7AHAETOTFI5UEUKUG2EI7FAF", "length": 2117, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-दिसतेस तु", "raw_content": "\nदिसतेस तु अशी की हि चांदणी दिसावी,\nजादू तुझ्या ह्रदयात मज वेड लावण्याची .\nपाहतेस तु अशी की मजला तुझ्यात घेशी,\nडुलते तुझ्या रुपेरी साडीशी बंद माझे\nतरी तु खुलुन यावी जशी पाकळ्या गुलाबी गाली,\nहदयात तुझ्या गं माझेच श्लास असती,\nअश्रूत लपविते माझ्या आठवणी मनाशी\nअसते तुझ्या रुपाशी कसले गं माझे बंध,\nतरी तु उठुन राहावी हा श्वांसासही तुझा छंद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/jailbreak.html-%E0%A4%A8-ipasigner-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:52:34Z", "digest": "sha1:OYDH3XZCFSJXZVSICEPEQRBQPRN2PY2V", "length": 11389, "nlines": 92, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "ipasigner.io - निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nशेअर करणे हे काळजी आहे\nआपल्याला अॅप स्टोअरमध्ये आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करण्यास एकमेव स्त्रोत आहे की नाही माहीत आहे का होय, आपण बरोबर वाचा. App Store आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी स्रोत म्हणून सर्व श्रेय घेऊ शकत नाही. कसा तरी, आम्हाला डाउनलोड आणि आयफोन अनुप्रयोग स्थापित App Store नाही ते शक्य आहे. मध्ये snaptubedownloadd.com, आम्ही हा अनुप्रयोग पुनरावलोकन जात आहेत.\nहे आहे ipasigner.io की iOS साधने अनुप्रयोग उपलब्ध, iPhone आणि iPad सारख्या. इतर हातात, आम्ही ipasigner App Store पर्याय म्हणून IO म्हणू शकता, च्या सारखे आयफोन TutuApp. ipasigner.io सर्व अनुप्रयोग डाउनलोड मुक्त आहेत. आपण डाउनलोड करा आणि अनुप्रयोग स्थापित करण्यासाठी आपल्या iOS स्मार्टफोन निसटणे करण्याची गरज नाही ipasigner IO. शिवाय, सर्व अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी सुरक्षित आहेत.\nipasigner.io आतापर्यंत काही iPhone अनुप्रयोग उपलब्ध. ते मुक्त प्रत्येकासाठी आहेत. काही अनुप्रयोग कदाचित उपलब्ध नाही अॅप स्टोअर मध्ये. ipasigner IO उत्तम गोष्ट आहे नाही ऍपल आयडी आणि नाही तुरूंगातून निसटणे आयफोन ipasigner.io मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करणे आवश्यक आहे.\nipasigner IO प्रत्यक्षात ऍपल App Store सारख्या अनुप्रयोग नाही. तो iPhone अनुप्रयोग पुरवते फक्त एक साधी वेबसाइट आहे. त्यामुळे आपण ipasigner IO आयफोन अनुप्रयोग डाउनलोड स्वारस्य असल्यास, आपण फक्त जाऊ शकता https://ipasigner.io/\nखाली यादी iOS अनुप्रयोग ipasigner IO द्वारे प्रदान:\nSnapchat ++ पुश सूचना सह (अनुसूचित जाती: 10.10 चिमटा: 1.6आर-111)\nSpotify ++ पुश सूचना सह\nWhatsApp ++ पुश सूचना सह (डब्ल्यूए: 2.17.30 चिमटा: 1.6आर-76)\nInstagram ++ पुश सूचना सह\nपुश सूचना सह Watusi\nYouTube ++ पुश सूचना सह\nट्विटर ++ पुश सूचना सह\nफेसबुक ++ पुश सूचना सह\nप्रदान समन्वय बाजूला, ipasigner IO देखील उपलब्ध iOS इम्यूलेटर अनुप्रयोग. त्यांना खाली तपासा:\nipasigner.io रोजी, आपण देखील शोधू शकता आयफोन स्क्रीन रेकॉर्डर की iPhone वर सर्व क्रियाकलाप रेकॉर्ड फंक्शन आहे.\nipasigner.io पासून सर्वोत्तम आयफोन अनुप्रयोग\nipasigner.io वरून iPhone आणि iPad अनुप्रयोग डाउनलोड केक एक तुकडा आहे. मात्र, ipasigner.io समर्थन अर्ज iOS 8, 8.1, 8.2, 8.3, 8.4, iOS 9, 9.1, 9.2, 9.3, iOS 10, 10.1, 10.2, आणि iOS 10.3. म्हणून, आम्ही खाली आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक प्रशिक्षण प्रदान.\nसफारी अनुप्रयोग आणि प्रकार लाँच https://ipasigner.io/ अॅड्रेस बारमध्ये.\nआपण ipasigner IO अनुप्रयोग एक कॅटलॉग दिसेल\nआपण डाउनलोड करू इच्छिता की iOS अनुप्रयोग निवडा. अनुप्रयोग डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी दोनदा टॅप. आपण स्थापनेची पुष्टी करण्यासाठी सूचित केले जाईल. टॅप करा स्थापित डाउनलोड प्रारंभ आणि अनुप्रयोग स्थापित करणे.\nआपण फक्त स्थापित केले iOS अॅप आणि म्हणते, की सूचना लाँच अविश्वासर्ह Enterprise विकसक दिसेल.\nजा सेटिंग्ज >> सामान्य >> प्रोफाइल & डिव्हाइस व्यवस्थापन आणि सहजतेने चालवण्यास हा अनुप्रयोग परवानगी देण्यासाठी आयफोन विकसक प्रोफाइल विश्वास.\nसर्व आहे. आपण आता उघडा आणि तुरूंगातून निसटणे न आपल्या iPhone वर अॅप वापरू शकता.\nआपण ipasigner IO डाउनलोड अॅप वरून नवीन अॅप डाउनलोड आपल्या iOS स्मार्टफोन अस्तित्वात अनुप्रयोग विस्थापित करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण Instagram डाउनलोड करू इच्छित असल्यास ++ ipasigner IO आधीच आपल्या iPhone वर Instagram अनुप्रयोग केली होती करताना, आपण प्रथम ठिकाणी विस्थापित करणे आवश्यक आहे. मग आपण Instagram डाउनलोड करू शकता ++ ipasigner IO अॅप डाउनलोड करा वर.\nदेखील वाचा: पानातून बाहेर पडणारी टीव्ही प्रवाह चित्रपट डाउनलोड करा\nपुन्हा एकदा, ipasigner IO सर्व अनुप्रयोग मुक्त आणि सुरक्षित असतात. शिवाय, विकासक ipasigner अधिक अनुप्रयोग जोडण्यासाठी नियोजन आहेत. आम्ही अद्यतन आहे तर तुम्हाला कळवेन ipasigner.io डाउनलोड अनुप्रयोग. म्हणून, कृपया नियमित भेट. वाचन धन्यवाद. हा लेख शेअर करा.\n2 वर \"विचारipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा”\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/lg-t310-price-p2gMp.html", "date_download": "2018-04-23T11:46:40Z", "digest": "sha1:73ST335WXGA2L57KLGVJKQ226AC7ANP4", "length": 12297, "nlines": 370, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग टँ३१० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये लग टँ३१० किंमत ## आहे.\nलग टँ३१० नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nलग टँ३१०ग्रीनड्स्ट उपलब्ध आहे.\nलग टँ३१० सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्रीनड्स्ट ( 3,315)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग टँ३१० दर नियमितपणे बदलते. कृपया लग टँ३१० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग टँ३१० - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 900 mAh\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T11:51:52Z", "digest": "sha1:BNW6Q7OLGTBD45DGRPTLC4QUL42HQCL7", "length": 3546, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओलिव्हिया सेंट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिंबर्ली जो ॲन सिस्क\nओलिव्हिया सेंट (११ नोव्हेंबर, १९७९:सान डियेगो, अमेरिका - )ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९७९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T11:50:11Z", "digest": "sha1:OPOHQC5E53Z32DHS3ZHE6ZTM4TYNVSML", "length": 3411, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. ३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.पू. ३ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स.पू. ३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:52:34Z", "digest": "sha1:U2PVRX7JCRMYIAIDVVJU6X3C25L4M7J2", "length": 6598, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हर्सायचा राजवाडा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nव्हर्सायच्या राजवाड्याचे हवाई दृष्य\nव्हर्सायचा राजवाडा (फ्रेंच: Château de Versailles) हा फ्रान्स देशाच्या व्हर्साय शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ.स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते. चौदाव्या लुईने ह्या राजवाडाच्या मोठ्या प्रमाणावर विकास केला व ६ मे १६८२ रोजी आपला निवास अधिकृतपणे येथे हलवला व फ्रान्सची राजधानी पॅरिसहून व्हर्साय येथे आणली गेली. पुढील १०० वर्षांहून अधिक काळादरम्यान व्हर्साय हे फ्रान्सचे राजकीय केंद्र होते. १७८९मध्ये फ्रेंच क्रांती सुरू झाल्यानंतर शाही घराण्याला व्हर्सायहून पुन्हा पॅरिसला पळ काढावा लागला व व्हर्सायचे राजकीय महत्त्व संपुष्टात आले.\nसध्या व्हर्साय हे फ्रान्समधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. १९७९ साली युनेस्कोने व्हर्सायच्या राजवाड्याला जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समाविष्ट केले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपॅरिसमधील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/march/1/", "date_download": "2018-04-23T11:31:32Z", "digest": "sha1:42L4QNL3ALU23EFKYYBXAWT6NEYZ7JHB", "length": 14837, "nlines": 162, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१ मार्च दिनविशेष | March 1 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » मार्च » १ मार्च दिनविशेष\nलेखन: मराठीमाती | प्रकाशन: संपादक मंडळ | १ मार्च २०१८\nवसंतराव दादा पाटील. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह\nवसंतराव दादा पाटील - (१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली.\nजागतिक नागरी संरक्षण दिवस\n८६: लुसियस कोर्नेलियस सुलाच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्य अथेन्समध्ये घुसले व तेथील राज्यकर्ता ऍरिस्टियोनला पदच्युत केले.\n१५६२: फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.\n१५६५: ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.\n१८०३: ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.\n१८१५: एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.\n१८१८: सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.\n१८४०: ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१८६७: नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.\n१८७२: यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.\n१८७३: ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.\n१८९६: अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.\n१८९६: आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.\n१९०७: टाटा आर्यन अ‍ॅन्ड स्टील कंपनीची स्थापना.\n१९१२: आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.\n१९१८: जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ इंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.\n१९१९: रॉलट अ‍ॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला रारंभ केला.\n१९३२: चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले.\n१९३६: हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.\n१९४१: बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली.\n१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण.\n१९४९: इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.\n१९५३: जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.\n१९५४: अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.\n१९५८: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात.\n१९६१: अमेरिकेत शांति दलाची स्थापना.\n१९६२: अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले.\n१९७१: पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली (संसद) ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.\n१९७८: स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.\n२००४: मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००६: तार्या हेलोनेन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१८१०: फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार.\n१८८८: इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१०: डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.\n१९१८: होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२२: यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.\n१९३०: कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४२: रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.\n१९५०: शहीद इस्रार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू\n१९५३: बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९५८: वेन बी. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६१: सज्जाद अकबर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९६८: सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९६८: संजीवा वीरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६९: आझम खान , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९७१: झहूर इलाही, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९७१: अनिसुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.\n१९८०: शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९८१: तिलन तुषारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n११३१: स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.\n१७९२: लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.\n१९९१: एडविन लँड, अमेरिकन संशोधक.\n१९९४: वसंतराव दादा पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार.\n२००३: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_31.html", "date_download": "2018-04-23T11:29:03Z", "digest": "sha1:LAIBMM6QPRITDPDTNHHWUT6NVQ3ZNFY6", "length": 2989, "nlines": 93, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: नविन वर्षाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nआनंदजी, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...\nधन्यवाद देवेंद्र्जी, ब्लॉग वर स्वागत\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/industries-news/?Menu-Ind", "date_download": "2018-04-23T11:29:33Z", "digest": "sha1:MCGIYTBDLKPIR5B4VRCJFZLHBJT3Q7LR", "length": 32524, "nlines": 210, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian Industry and financial services marathi news | औद्योगिक बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nउन्हाळ्यात फिरण्यासाठी हे आहेत 4 बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन, खर्चही कमीच\nनवी दिल्ली- तुम्हाला उन्हाळी सु्ट्ट्यांमध्ये कुठे तरी फिरायला जायचे आहे पण अजुनही कुठे जायचे हे फायनल झाले नसेल तर आम्ही तुम्हाला 4 बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन सांगत आहोत जेथे तुम्ही कमी खर्चात फिरायला जाऊ शकता. 5,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही येथे जाऊ शकता. जबलपूर- भेड़ाघाट मध्यप्रदेशात मध्य जबलपुर येथे तुम्ही मदन महल, बेड़ाघाट, बार्गी डॅम और जैन टेंपल ही ठिकाणी तुम्ही पाहू शकता. येथे राणी दुर्गावतीचे म्युझियम आणि दुमना नेचर पार्क आहे. जबलपूर येथे अनेक ठिकाणी तुम्ही बोटिंगही करु शकता....\nअर्ध्या किंमतीत मिळत आहेत ही ब्रॅन्डेड घडयाळे, घ्या संधीचा फायदा\nनवी दिल्ली- जर तुम्ही घड्याळ घ्यायचे असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची ही ब्रॅन्डेड घडयाळे अर्ध्या किंमतीत खरेदी करु शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारेही या डीलचा फायदा घेऊ शकता. ही ऑफर पुरुषांसाठी विशेषत: युवकांसाठी आहे. या ऑफरसाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सला भेट देऊ शकता. Lois Caron LCS-8049 BLACK DIAL DAY DATE FUN.Watch किंमत : 2,599 रुपये डील - 399 रुपये डिस्काउंट - 2200 रुपये ( 84%) डिलिव्हरी- 7 ते 10 दिवसात - अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट...\n#SuccessMantra तुमच्याकडे असेल खूप पैसा, करा हे 5 उपाय\nनवी दिल्ली- तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा असेल तर तुम्ही काय कराल या प्रश्नाचे अतिशय साधे आणि सोपे उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन व्हा. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचाराल की यशस्वी बिझनेस होण्यासाठी काय करायला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जगभरातील करियर गुरु आणि ब्लॉगर यशस्वी व्यावसायिक होण्याविषयी वर्षानुवर्षे लिहित आहेत. बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही खास स्किल असणे गरजेचे असते. हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही...\nखास उन्हाळ्यासाठी खरेदी करा 349 रुपयांमध्ये 1400 रुपयांचा कुर्ता\nनवी दिल्ली- उन्हाळ्यात कपड्यांची निवड करणे बरेच अवघड असेत. कारण ते आरामदायक असणे अत्यंत गरजेचे असते. कुर्ता हा यासाठी उत्तम पर्याय आहे. अशात जर कमी किंमतीच्या डिझायनर कुर्ते खरेदी करण्याचा ऑफर समोर आली तर ती कोणीच सोडणार नाही. ई-कॉमर्स कंपन्याही कुर्त्यावर खास ऑफर देत आहेत. त्यामुळे तुम्ही कमी किंमतीत तुमचा आवडता कुर्ता खरेदी करु शकता. तुम्ही घरबसल्या या कुर्त्यांची ऑडर देऊ शकता. 2 ते 3 दिवसात हा कुर्ता तुमच्यापर्यंत पोहचेल. पुढे वाचा: काय आहेत ऑफर....\nMoto ने लॉन्‍च केले 3 नवे फोन, जाणून घ्या किंमत, फीचर\nनवी दिल्ली- मोटोरोलाने 3 नवे हॅण्डसेट लॉन्ट केले आहेत. त्यांचे नाव Moto G6, Moto G6 Plus आणि Moto G6 Play आहे. यातील Moto G6 Plus सगळ्यात पॉवरफुल्ल आणि महाग आहे. Moto G6 आणि Moto G6 Play मध्ये एक सारखी स्क्रीन आणि रॅम देण्यात आली आहे. Moto G6 Plus ची स्क्रीन मोठी असून त्याला जास्त रॅम देण्यात आली आहे. बॅटरी, कॅमेरे आणि प्रोसेसर सुध्दा या तिन्ही फोनचे वेगवेगळे आहेत. काय आहे किंमत मोटोचे हे तिन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात विक्रीस उपलब्ध होतील. मोटी जी6 ची किंमत 16,500 रुपये आहे. तर मोटो जी 6 प्लेची किंमत 13,000 रुपये आणि Moto G6 Plus ची किंमत 24,350...\nSamsung चे स्‍मार्टफोन मिळत आहेत स्वस्तात, फक्त आज आणि उद्या संधी\nनवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या नियमितपणे सेल आयोजित करतात. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठी सूट देण्यात येते. तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अमेझॉनवर 20-20 कार्निवाल अंतर्गत सॅमसँग स्मार्टफोन मोठी सूट मिळत आहे. तुम्ही शॉपिंग करुन 11000 रुपये वाचवू शकता. या शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधुन या सामानाची ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला आम्ही यातील काही ऑफरची...\nमुंबई, पुण्यासह 9 शहरांमध्ये घराच्या किंमती घसरल्या; या शहरांचाही समावेश\nनवी दिल्ली- देशातील 9 प्रमुख शहरांमधील घराच्या किंमती 7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. हा दावा रिअल इस्टेट रिसर्च अॅण्ड अॅनालिस्ट फर्म प्रॉपइक्विटीद्वारे जारी करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी आपल्या मालमत्तांचे दर कमी केले आहेत. विक्री वाढविण्यासाठी ते अनेक उपाय करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आकडेवारी काय सांगते 2018 च्या पहिल्या तिमाहीत न विक्री होणाऱ्या घरांची संख्या 2 टक्क्यांनी कमी होऊन 5,95,074 इतकी झाली आहे. ती मागील तिमाहीत...\nफाईव्ह स्टार हॉटेलचे डर्टी सिक्रेट, अफेअर ते रिकॉर्डिग काय-काय घडते\nनवी दिल्ली- पंचतारांकित हॉटेल्स हे आपल्या स्टॅण्डर्ड, क्वालिटी, स्वच्छता, लक्झरी रुम आणि सर्व्हिससाठी ओळखली जातात. अनेक लक्झरी हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी लाखो रुपये आकारले जातात. हे हॉटेल्स आपल्या खोल्यांचे भाडे ते गेस्ट लिस्टपर्यंत सिक्रेसी मेंटेन करतात. चला जाणून घेऊ यात या हॉटेलच्या डर्टी सीक्रेट्सविषयी... स्टेट्सला महत्व - या व्यवसायातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुमचे स्टेटस मॅटर करते. जर तुम्ही हाय-प्रोफाईल गेस्ट, व्हीआयपी गेस्ट किंवा लॉयल...\nमुकेश अंबानी धीरूभाईंकडून शिकले या 5 गोष्टी, झाले देशातील सगळे श्रीमंत व्यक्ती\nनवी दिल्ली- यश हे सहज मिळत नसते. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जिद्द याबाबी अतिशय महत्वाच्या असतात. पण देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला याच्यापुढे जावे लागेल. साच मंत्र मुकेश अंबानी यांना त्याचे वडील धीरुभाई अंबानी यांनी दिला. एका वडिलांच्या रुपात धीरुभाईंनी या गोष्टी आपल्या मुलाला म्हणजेच मुकेश अंबानींना शिकवल्या. मुकेश अंबानी याद्वारे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले. मुकेश अंबानी अनेकदा आपल्या भाषणात आणि मुलाखतीत या बाबींचा उल्लेखही करतात. नुकतीच त्यांनी...\nब्रॅन्डेड शूजवर 50% सूट, Adidas, puma आणि HRX आहेत ऑप्‍शन\nनवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांवर रोज कोणता ना कोणता सेल चालु असतो. अशात काही वस्तूंवर चांगली सूटही मिळत असते. आता मंत्रावर ब्रॅन्डेड शूजवर अशी सूट मिळत आहे. तुम्हाला ऑफिसपासून कॉलेजला जाण्यापर्यंत सर्व प्रकारचे शूज येथे मिळू शकतात. सुमारे 50 टक्के सुट येथे या शूजवर मिळत आहे. या सेलमध्ये HRX, Adidas, Puma, reebok आणि Sparx च्या शूजवर चांगली सूट मिळत आहे. जर तुम्ही एअरटेल पेमेंटवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचे आणखी एक वैशिष्टय आहे ते म्हणजे...\nउत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी हे आहेत 5 बेस्ट डेस्टिनेशन, 5,000 रुपयापासून टूर पॅकेज\nनवी दिल्ली- जर तुम्ही उन्हाळ्यात उत्तराखंड फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी बुकिंग करु शकता. या जागा म्हणजे फेमस टूरिस्ट स्पॉट आहेत. आत्ता बुकिंग केल्यास हे बजेट हॉटेल तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होतील. पिक सिझनमध्ये येथील हॉटेलमध्ये रुम भेटत नाहीत. चला जाणून घेऊ यात उत्तराखंडमध्ये फिरण्याचे काय बेस्ट ऑप्शन आहेत. नैनीताल नैनीताल हा उत्तराखंडमधील फेमस टूरिस्ट स्पॉट आहे. तुम्ही कारने येथे जाऊ शकता. याशिवाय तेथे उत्तराखंड पर्यटन विभागाच्या बस आणि खासगी व्हॉल्वो बसने जाऊ...\n9000 रुपयाने स्वस्त झाले Smart TV, ही TV कंपनी देत आहे ऑफर\nनवी दिल्ली- तुम्ही जर टीव्ही विकत घेण्याचा विचार करत आहात तर फ्लिपकार्टने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कारण Thomson ही कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपला टीव्ही सादर करत आहे. कंपनीने आज एक सेल लावला आहे. या सेलमध्ये तुम्हाला टीव्हीवर 24 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही शॉपिंग करुन 9000 रुपये वाचवू शकता. तुम्ही जर अॅक्सिस बँकमार्फत पेमेंट केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल. अॅक्सिस बॅंकेद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त कॅशबँक मिळेल. ई-कॉमर्स कंपन्याच्या ऑफर्सचा...\nगूगलचे स्‍मार्ट स्‍पीकर भारतात लॉन्‍च, 4,499 रुपयांपासून सुरु होते किंमत\nनवी दिल्ली- गूगलने आपले स्मार्ट स्पीकर भारतात लॉन्च केले आहेत. भारतात गूगल होमची किंमत 9.999 रुपये आणि गूगल होम मिनीची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, या दोन्ही स्पीकरचा सेल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि 750 रिटेल स्टोअरद्वारे सुरु करण्यात येईल. गुगलची टक्कर भारतात काही महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या अॅमेझॉनच्या इको, इको डॉट आणि इको स्मार्ट स्पीकरसोबत होण्याची शक्यता आहे. गूगल होम गूगल असिस्टंटवर रन होईल. जर तुम्ही Google Home खरेदी केले तर तुम्ही ते तुमच्या...\nडाउनलोडींग स्पीडमध्ये भारत आहे एवढया क्रमांकावर, ऐकून व्हाल थक्क...\nमुंबई- जगात सर्वात जास्त मोबाईल फोन वापरणारा देश भारत मोबाईल इंटरनेट डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत 109व्या क्रमांकावर आहे. हालिया रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे. तसेतर गतवर्षी नोव्हेंबर 8.80 एमबीपीएस डाउनलोडिंग स्पीडच्या तुलनेने या फेब्रुवारीमध्ये सरासरी डाउनलोडिंग स्पीड 9.01 एमबीपीएस राहिली आहे. मात्र ही सुधारल्यानंतरही ऊकला स्पीडटेस्ट इंडेक्सनुसार, भारताची रॅंक खुपच खाली आहे. नंबर 1 वर आहे नॉर्वे डाउनलोड स्पीड बाबतीत पूर्ण जगामध्ये नॉर्वे नंबर वर पोजीशनवर आहे. येथे सरासरी...\nगायिका रिहानाच्या नाराजीमुळे स्नॅपचॅटच्या नेटवर्थमध्ये 975 कोटींची घट\nन्यूयॉर्क- पॉप गायिका रिहाना नाराज झाल्यामुळे मल्टिमीडिया मेसेजिंग अॅप कंपनी स्नॅपचॅटला मोठे नुकसान सहन करावे लागले. स्नॅपचॅटवर कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांबाबत सुरू असलेल्या जाहिरातीवर रिहानाने केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर याबाबतचा राग तिने सार्वजनिक स्वरूपात व्यक्त केला. त्यानंतर दोन दिवसांतच कंपनीच्या नेटवर्थमध्ये ९७५ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. रिहानाला स्नॅपचॅटच्या एका अॅप बेस्ड गेमवर राग होता. वुड यू रादर गेममध्ये युजरला मत देण्याचे आवाहन करण्यात आले...\nआता भरघोस रिटर्न्सचे अमिष देऊन कंपनी तुम्हाला लुटू शकणार नाही, येणार असा कायदा\nनवी दिल्ली - शारदा चिट फंड, ईमू फार्मिंगपासून क्रिप्टोकरन्सीपर्यंत अनेक पॉन्झी स्कीममध्ये आपली कमाई गमावणाऱ्यांचा सरकारने विचार केला आहे. सरकार तयारी करत आहे की विना परवानगी आणि नियंत्रणाशिवाय सुरु असलेल्या स्कीम्स विरोधात कडक कायदा आणला जाईल. अशा पद्धतीने सरकार अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्सवर लगाम कसण्याची तयारी करत आहे. त्यासोबतच शक्यता आहे की सरकार या नियंत्रणाच्या माध्यमातून महसूल निर्मितीचा स्त्रोत निर्माण करत आहे. मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटने बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड...\nअंबानींनी पत्ते खोलले, सांगितला 60 हजार कोटींचा प्लॅन\nनवी दिल्ली - मुकेश अंबानी आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी म्हणाले, त्यांची कंपनी पुढच्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात एक इंटीग्रेटेड डिजिटल इंडस्ट्रियल एरिया निर्माण करणार आहे. कंपनी यावर 60,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. हा देशातील पहिला आपल्यापद्धतीचा डिजिटल इंडस्ट्रियल एरिया असणार आहे. अंबानींनी असाही दावा केला की चीनने जागतिक अर्थव्यवस्थेत मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. भारत सेवा क्षेत्रात हाच दबदबा निर्माण करु शकतो. अंबानींचा 60 हजार...\nही ब्रँडेड कंपनी 1500 रुपयांत देत आहे शूज, वेबसाईटवर करत आहे प्रमोट\nनवी दिल्ली- कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे शूज खरेदी करायचे असेल तर आपल्या तोंडी सर्वात प्रथम आदिदास, रीबॉक, प्यूमा, वुडलँड, ली कूपर यांचे नाव समोर येते. मात्र या कंपनीचे शूज फार महाग असल्याने यांना खरेदी करणे अनेकांना परवडत नाही. मात्र तुम्ही सध्या जगातील टॉप कंपन्यांमधील एक प्यूमाचे शूज अत्यंत कमी किमतीत खरेदी करू शकतात. कंपनीला आपल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला प्रमोट करायचे आहे. यामुळे कंपनीने एवढा जबरदस्त डिस्काऊंट दिला आहे. आम्ही तुम्हाला या कंपनीच्या 5 डील्सविषयी येथे माहिती देत आहोत....\nखासगी कंपन्यांना कोळसा खाणींची परवानगी; कोल इंडियाची एकाधिकारशाही संपुष्टात\nनवी दिल्ली- कोळसा खाण प्रकरणात कोल इंडियाची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. सरकारने देशी-विदेशी खासगी कंपन्यांना कोळशाचे खनन करून त्याची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत केवळ वीज आणि अॅल्युमिनियमसारख्या क्षेत्रातील खासगी कंपन्यांना स्वत:च्या वापरापुरते (कॅप्टिव्ह) खनन करण्याची परवानगी होती. कॅप्टिव्हव्यतिरिक्त इतर वापरासाठी कंपन्यांना कोल इंडियाकडूनच कोळसा खरेदी करावी लागत होता. सध्या देशातील ८० टक्के उत्पादन कोल इंडिया करते. १९७३ मध्ये कोळशाचे राष्ट्रीयीकरण करण्यात...\nरोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारींवर 800 कोटी घोटाळ्याचा आरोप, बँकेच्या तक्रारीनंतर CBI चे छापे\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेचा 11,400 कोटींचा घोटाळा ताजा असताना रोटोमॅक पेन तयार करणाऱ्या कंपनीचा 800 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. घोटाळ्याच्या आरोपानंतर विक्रम कोठारी देशसोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोठारी रविवारी रात्री एका लग्न सोहळ्यात दिसला होता. यावेळी तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/economy", "date_download": "2018-04-23T11:22:17Z", "digest": "sha1:DUCYU3OOOJIK5QO3AUJ3B3VI5IBCB4NG", "length": 5703, "nlines": 106, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "अर्थ विषयक | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nसदनिका (फ्लॅट) खरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा\nआज जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर किमती अवाच्या सव्वा वाढल्या आहेत. घरांचा खप थांबला असला तरी किमती काही कमी झालेल्या नाहीत. अशात जर तुम्ही घर खरेदी करत असाल आणि जर तुमची फसवणूक झाली तर\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2011/12/blog-post_05.html", "date_download": "2018-04-23T11:32:31Z", "digest": "sha1:FGBDCHZXNZYDDNQIAJRVDXYOJ6JAOAGF", "length": 9289, "nlines": 174, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): दंश", "raw_content": "\nत्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...\nएक होता, त्यात हा दुसरा उघडला\nपावसावर आज माझा जीव जडला\nभावना समजून माझ्या तोच रडला\nपटकथा एकाच नात्याची बदलली\nआज अंकाचा नव्या पडदा उघडला\nलाघवी हास्यास मी उत्तर समजलो\nप्रश्न मग ओठांवरी कायम रखडला\nचार घटका लाज सैलावून निजली\nदंश चारित्र्यास ओघानेच घडला\nमी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही\nअक्षरावरती तुझ्या हा जीव जडला\nस्पर्श कवितेने कधी केलाच नाही\nढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला\nसावलीही शेवटी सोडून गेली\nभाबडा विश्वास माझा फार नडला\n- नचिकेत जोशी (३/१२/२०११)\nस्पर्श कवितेने कधी केलाच नाही\nढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला\nसावलीही शेवटी सोडून गेली\nभाबडा विश्वास माझा फार नडला\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\n'दुर्ग दुर्गट भारी' - एक वेगळा उपक्रम\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/?start=20340", "date_download": "2018-04-23T11:46:26Z", "digest": "sha1:L5ON4QP2CAVSNQNJRUQDCQD5U5AZ6UKH", "length": 4618, "nlines": 155, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nसामुदायिक व्यंगचित्रे अल एमॅझीमो ला कमर्शियल व्हिज्युअल डि कंटेनडो आणि ला एसोसिएशन ऑफ एसोसिएशन\nएल एक्सपर्ट डी Semalt्ट असुगुरा के एनसीसिटा इंटिग्रर एल एएमपी दे गुगल एन ला एस्टट्रेजिया डे मार्केटिंग.\nSemaltेट रिव्हले लेस मायट्स लेस प्लस कम्युनस सुर ले रेफरेंसमेंट\nसाम्प्रदायिक: वर्डप्रेस प्लगइन कसे प्रतिष्ठापीत करायचे वर Beginners साठी मार्गदर्शक\nमिमलट्रेटसह सोपे आणि सोपे प्रतिमा ऑप्टिमायझेशन\nसाप्ताहिक स्पष्टीकरणात्मक टिप्पणी टायर्स ले मेल्लेर पार्टिसिपेटिंग डी एसईओ आणि विपणन परिक्रमा विल्यम पॅरियल\nआपल्या iPhone फ्लडिंग पासून चीनी स्पॅम थांबविण्यासाठी कसे\nसाप्ताहिक: अलीकडचे तंत्रज्ञान लाखोंचे जतन करा\nSemalt एक्सपर्ट Google Analytics मध्ये रेफरल स्पॅम अवरोधित कसे माहित\nसाप्ताहिक: संदर्भित स्पॅम कसे काढायचे\nआपल्या एसइओ सुधारणा, प्रतिमा ऑप्टिमायझेशन बद्दल वाचा\nसाम्प्रदायिक: टिप्पणी ल ईमेल विपणन परिणाम व्हा Résultats दे ला एसइओ\nएक्सपर्ट डी सेमट डॉट्स द कॉन्सेलीज एसईओ प्रिक्स्यूएक्स सुर ला फॅकन डी'अल्लोरीयर ला परफॉर्मेंस आफ वॉटर साइट\nसामुग्री स्पष्टीकरणार्थ लेझ बेसिस डे ला ऑडिट एसइओ तंत्रज्ञानाच्या साइट\nसेमॅटिक अॅप्लेझिक ऍटिझर व्होटर स्ट्रेटी डे फेफर्समेंट À निकेश स्पिसिस्टिक\nदुय्यम: Combien डी Temps ला Recherche डी मर्ट-क्ले Restera प्रख्यात दॅन ले एसइओ\nसाम्प्लेट: टिप्पणी ले मार्केटिंग परफॉर्मर ऑफ रिपॉर्टे À ला एसईओ\nमिशेल बेस्क्रिबिट डाय असपरेट डर कोरॅललेशन झ्विचेन वेब डिझाइन एंड एसईओ\nSemalt एक्सपर्ट: Wie मनुष्य Webdesign आणि एसइओ वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-arthkatha-dadarao-hatkar-hivarkhed-khamgao-buldana-yashkatha?tid=128", "date_download": "2018-04-23T11:48:09Z", "digest": "sha1:VEHNLW67VB6MBSUKZIAW4WKNJS3G627J", "length": 28167, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, arthkatha, dadarao hatkar, hivarkhed, khamgao, buldana yashkatha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nएका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन, फंड मिळवण्यासंदर्भातील नियोजन केवळ कागदावर न मांडता प्रत्यक्ष शेतीमध्ये आणण्याचा बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. अल्पशिक्षित तरीही उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने चक्‍क आपल्या शेतीलाच नोकरीवर ठेवल्याचा दावा केला आहे. त्यातून दरमहा उत्पन्नांसह पेन्शन, फंडाची सोयही केली आहे.\nएका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन, फंड मिळवण्यासंदर्भातील नियोजन केवळ कागदावर न मांडता प्रत्यक्ष शेतीमध्ये आणण्याचा बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. अल्पशिक्षित तरीही उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने चक्‍क आपल्या शेतीलाच नोकरीवर ठेवल्याचा दावा केला आहे. त्यातून दरमहा उत्पन्नांसह पेन्शन, फंडाची सोयही केली आहे.\nहिवरखेड येथील दादाराव हटकर (वय 53) हे मेंढपाळ. आईवडिलांसोबत मेंढ्यांमागे भटकताना त्यांचे कसेबसे तिसरीपर्यंत शिक्षण झाले. फिरण्यामुळे जगाचे अनेक रंग, वृत्ती आणि स्वभाव पाहता आल्याने अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी राहिली. त्यांना चार भाऊ आहेत. आईवडिलांसह मुलेबाळे यांचे एकूण 41 जणांचे एकत्रित कुटूंब आहे. आपण निरक्षर राहिलो तरी मुलांबाळांची शिक्षणे तरी पूर्ण व्हावीत, या उद्देशाने या बंधूंनी एका जागी थांबण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये हिवरखेड शिवारात 200 एकर माळरान खरेदी केले. यंत्रांचा वापर करीत सपाटीकरण केले. त्यात नदी, नाल्यातील गाळ टाकत सुपीकता आणली. सुमारे 150 एकर जमीन वहितीखाली आणली. सात विहिरी आणि दोन बोअरवेलच्या साह्याने सिंचनाची व्यवस्था केली आहे. पाच भावांच्या या शेतीला पंचरत्न फार्म असे नाव दिले आहे.\nदादाराव यांचे शिक्षण कमी असले तरी निरीक्षणवृत्ती अत्यंत तीक्ष्ण आहे. भटक्‍या, नोकरदार आणि शेतकरी कुटुंबाचे ते उत्तम विश्‍लेषण करतात. प्रत्येकातील चांगले गुण आपल्या कुटुबात राहावेत, या दिशेने त्यांनी काम केले. भटक्‍यावृत्तीतून बाहेर येऊन स्थिरता आणण्यासाठी दादारावांनी प्रयत्न तर सुरू केले होते. उर्वरीत दोन घटकांचे गुणदोष ते मांडतात.\nनोकरदाराला दरमहा उत्पन्न मिळते. त्यावर टुकूटुकू पण उत्तम चालते. निवृत्तीनंतर पेन्शन, फंड मिळतो. त्यावर घरदार व मुलाबाळांची लग्ने, शिक्षण होते.\n2) शेतकरी ः कोरडवाहू शेतकऱ्याला उत्पन्नांची शाश्‍वती नसते. उत्पादन आले तर वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. त्यावर त्याचा गुराढोरांसह सर्व प्रपंच चालवावा लागतो. खेळता पैसा फारसा नसल्याने सतत आर्थिक तंगी असते. सिंचनाची सोय असली तर नगदी पिकांची लागवड करतो. नगदी पिकामध्येही उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्जबाजारीपण चुकत नाही. त्यातही एखाद्या वर्षी अस्मानी, सुलतानी किंवा बाजारदरात पीक सापडले तरी तो कर्जामध्येच अडकून पडतो. उजगरीला येत नाही.\nशेतीतूनच नोकरीसारखेच फायदे कसे मिळवता येतील, याचा विचार सुरू झाला.\nदरमहा उत्पन्नासाठी ः सहा फळांची एकरी साठ झाडे\nएक एकरवर फळबागेचे प्रयोग सुरू केले. कोकणातील लाखाची बाग या धर्तीवर संकल्पना राबवल्याचे ते सांगतात. त्यातून दरमहा उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने सीताफळ, पेरू, संत्रा, लिंबू, जांभूळ, खजूर अशा सहा फळपिकांची प्रत्येकी दहा झाडे (18 फूट बाय 18 फूट अंतरावर) लावली.\nउत्पन्न मिळण्याचे महिने ः फळझाड\nडिसेंबर व जानेवारी ः पेरू उत्पादन\nफेब्रुवारी व मार्च ः मृग बहारातील संत्रा फळे\nएप्रिल-मे ः महिन्यात लिंबूचे उत्पादन घेण्यावर भर राहतो.\nजून-जुलै ः बाहडोली जांभूळाची फळे मिळतात.\nऑगस्ट- सप्टेंबर ः खजूर\nउदा. सात वर्षांपूर्वी लावलेली दहा सीताफळ झाडे उत्पन्न देत आहेत. प्रति झाड 40 किलो फळे मिळतात. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे 50 हजार रु. उत्पन्न प्रतिमाह मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.\nरासायनिक शेती ः एकरातील या बागेतून 2 लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न वर्षभरात मिळते. यातून रासायनिक पद्धतीने व्यवस्थापनाचा खर्च 18 हजार रुपये वजा जाता, दोन लाख 52 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे दादाराव सांगतात.\nसेंद्रिय शेती ः सेंद्रिय पद्धतीने एक एकर व्यवस्थापनाला सहा हजार रुपये खर्च येतो. त्यात तणनियंत्रणासाठी मजुरी दोन हजार रुपये, शेणखत चार हजार रुपये धरले आहे. याचे उत्पादन थोड कमी झाले तरी बाजारात सेंद्रिय म्हणून विक्री केल्यास मागणी व दर चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.\nपेन्शन, फंडाचीही केली सोय\nशासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन व फंडाप्रमाणे उतारवयात शेतीतून मोठी रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठी वरील एका एकरामध्येच 18 फूट बाय 18 फूट अंतरावर आणखी आजनी (अंजनी), श्रीगंध चंदन, रक्त चंदन, साग, आंबा, नारळ आणि बिबा अशा सात प्रकारच्या प्रत्येकी दहा झाडाची लागवड त्यांनी केली आहे. त्यातील बिबा दोन वर्षांत, आंबा व नारळ पाच वर्षांत, श्रीगंधचंदन 12 वर्षांत, साग 15 ते 18 वर्षांत आणि रक्तचंदन 20 वर्षांत उत्पन्न देईल.\nशेळ्यांच्या चाऱ्याकरिता आजनाचा पर्याय\nसात वर्षांपूर्वी लावलेल्या एकरी दहा आजनी झाडांवर पाच बकऱ्यांचे वर्षभर पोट भरते. एका शेळीला 2 ते अडीच किलो आजन पाल्याची गरज भासते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने बकरीचे वजन व दूधामध्ये वाढ होते. प्रति बकरे दहा हजार रुपये दर धरला तरी 50 हजार रुपये निव्वळ मिळतात. बकरीपासून मिळालेली दोन पिल्लांचा हिशोब धरल्यास ते 10 हजार रुपये मिळतात. आजन पाल्याला हंगामात 15 रुपये किलो, अन्य वेळी 8 ते 9 रुपये किलो दर मिळतो. बंदिस्त शेळीपालनात आजन लागवड फायदेशीर ठरते. प्रयोगातून हा फायदा लक्षात येताच गेल्या दोन वर्षांत उर्वरीत शेतात 900 आजना झाडे लावली आहेत.\nरक्‍तचंदन ः 20 ते 25 वर्षांत दोन टनाचे झाड होते. त्याचा पाला, मुळे, फांद्या, छोट्या काड्या सर्व उपयुक्त असल्याने उत्तम दर मिळतो. अन्यत्र त्यांनी आठ बाय आठ अंतरावर एका एकरात सुमारे 2400 झाडे लावली.\nश्रीगंधचंदन व सागाची लागवड 12 ते 20 वर्षाने उत्पन्न देण्यासाठी केली आहे. तर बिबा (प्रति झाड 3000 रु), आंबा (प्रति झाड 1000 रु.) आणि नारळ (प्रति झाड 2000 रु.) असे वर्षातून एकदा चांगले उत्पन्न देतील. यातून पेन्शन आणि फंडाची सोय होईल, असा त्यांचा विश्‍वास आहे.\nकृषी विभागाच्या योजनेतून 35 बाय 35 बाय मीटर आकाराचे एक तर 44 बाय 44 मीटर आकाराचे दोन शेततळे खोदले आहेत. उपश्‍यासाठी सायफन पद्धतीचा अवलंब करतात.\nहटकर यांनी आपला मेंढ्या पाळण्याचा परंपरागत व्यवसाय आता बंदिस्तपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्याकडे 900 मेंढ्या व 300 शेळ्या आहेत. व्यवस्थापनाकरिता दोन मजूर कुटुंबे आहेत.\nहटकर यांनी जपली प्रयोगशीलता ः\nकुटुंबामध्ये 40 सदस्य असून, घरगुती वापरासाठी सुमारे एक एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतात.\n200 एकरांपैकी सुमारे 150 एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. 40 एकर संत्र्यापैकी गावालगतच्या वेगळ्या दहा एकर क्षेत्रामध्ये संत्रा बागेचे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करतात. त्यांचा दोन्ही पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास चालू आहे.\nवीज व स्वयंपाकासाठीच्या ऊर्जेत स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी हाटकर सध्या 20 बाय 30 फूट आकाराचा बायोगॅस प्लॅंट उभारत आहेत. त्यासाठी सव्वा तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.\nआयुष्यामध्ये शेतीला उशीरा सुरवात केली असली तरी प्रयोगशीलतेच्या बळावर फळबाग क्षेत्रातील कामगिरीची दखल राज्य शासनासह विविध संस्थांनी घेतली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nशेतीमुळेच पाचही भावांच्या कुटुंबातील बहुतांश सर्व मुले, मुली पदवीधर करण्यात यश आल्याचे ते अभिमानाने सांगतात.\nसंपर्क ः दादाराव हटकर, 9921126101\nउत्पन्न शेती खामगाव khamgaon पुरस्कार awards शिक्षण education यंत्र machine सिंचन कोरडवाहू कर्ज फळबाग horticulture कोकण सीताफळ custard apple पेरू नारळ दूध मात mate शेळीपालन goat farming कृषी विभाग agriculture department विभाग sections शेततळे farm pond व्यवसाय profession वीज बायोगॅस biogas गॅस gas\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nपीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...\nखडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...\nनैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...\nअक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nप्रयोगशील पाडवी यांनी फुलविली डोंगराळ...पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\n एका एकरातून दरमहा उत्तम उत्पन्न आणि पेन्शन...\nहस्तकलेतून सुरू झाला पूरक उद्योगशिक्षण घेण्यासाठी वय नाही, तर जिद्द लागते. मिरज...\nसांगलीच्या रसाळ, मधुर द्राक्षांना...सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होत...\nगटशेतीतून साधली संकटांवर मात पीक उत्पादन असो की मालाचे मार्केटिंग-विक्री असो,...\nसमाजकारणासह प्रयोगशील शेतीचा व्यासंग...पुणे जिल्ह्यातील चांडोली बुद्रुक येथील रामचंद्र...\nस्वच्छतेकडून समृद्धीकडे रोपळे गावाची...सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावाने विकासाचा ध्यास...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nमिनी डाळमिलच्या माध्यमातून व्यवसायात...कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड...\nजमीन सुपीकतेसाठी सामूहिक वाटचाल... मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील...\nकाटेकोर पाण्यात बारमाही काकडी, भाजीपालाहिंगोली जिल्ह्यातील पळसगाव (ता. वसमत) येथील विलास...\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यासकोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1251328", "date_download": "2018-04-23T11:46:35Z", "digest": "sha1:LNLJN5M7EMLSGNU7VMRST76QJ2G2A3WP", "length": 8600, "nlines": 32, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Google पुस्तके मध्ये काही ग्राउंड देते, फ्रान्स \"सममूल्य\" संरक्षण करण्यासाठी लावतात", "raw_content": "\nGoogle पुस्तके मध्ये काही ग्राउंड देते, फ्रान्स \"सममूल्य\" संरक्षण करण्यासाठी लावतात\nगुगलने युरोपियन अधिका-यांशी संबंधित अनेक सवलती दिल्या ज्या Google बुक्स सर्च सेटलमेंट डीलच्या युरोपीयन निषेधार्थ संबंधित आहेत. कंपनी ऍटलांटिकच्या दोन्ही बाजूंना लढायच्या आधीच्या घोषणेच्या नियामक आणि न्यायिक स्वीकृतीसाठी लढत आहे, ज्यास स्व-स्वारस्य असलेल्या अनेक पक्ष आणि कायदेतज्ज्ञांनी टीका केली आहे ज्यात गुगलला तथाकथित एक जवळील मक्तेदारी असेल \"अनाथा\" पुस्तके जर करार केला तर Semaltचा पुस्तके ही अशी आहेत की जो अजूनही कॉपीराइट द्वारे संरक्षित आहेत परंतु अधिकारांची मालकी अनिश्चित आहे किंवा लेखक शोधू शकत नाहीत.\nईयू सवलती बद्दल दुय्यम कथा मते:\nGoogle अमेरिकेबाहेरचे दोन प्रतिनिधींना त्याच्या डिजिटल पुस्तकांची सेटलमेंट\nअंमलात आणण्यासाठी बोर्डमध्ये सामील करेल.\nप्रस्तावासोबत प्रस्तावित सेटलमेंट अंतर्गत व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेली आणि युरोपमधील कॉपीराइट असलेल्या पुस्तकांमधून प्रिंट केला जाणार नाही.\nब्रुसेल्समध्ये आज एक युरोपियन युनियनच्या सुनावणीच्या वेळी, मिमल व त्याचे समीक्षक युरोपियन आयुक्तांसमोर त्यांचे संबंधित खटले सादर करीत होते. Semaltेटने युरोपियन संग्रहाच्या अंकेक्षण करण्याच्या वाचकांसाठी सुनावणी आणि फायदे बद्दल ब्लॉग केले. दरम्यानच्या काळात, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन आणि याहू (तथाकथित ओपन बुक अलायन्सचा भाग) यासह विरोधकांनी मिमलॅटला पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार देण्याचा प्रयत्न केला.\n(1 9) ओपन बुक Semaltेटचे पीटर ब्रँन्ट्ले यांनी युरोपियन युनियनच्या सुनावणीच्या आधी पत्रकारांना सांगितले की, \"आम्ही अमेरिकेच्या समझोत्याच्या आणि गुगलच्या बाजूने प्रस्तावित असलेल्या या कार्टेलशी लढा देत आहोत.\"\n(पूर्वी, Semaltेटने स्वतःचे पुस्तक स्कॅनिंग प्रकल्प सोडले.)\nयुरोपियन कमिशन दोन, विवियन रेडिंग आणि चार्ली मक्रीव्ही यांनी पुस्तकी डिजिटायजेशन आणि अमेरिका-शैलीतील सेटलमेंटसाठी संयुक्त निवेदन जारी केले जे पॅनेल-युरोपियन असेल.\nजर्मनी आणि फ्रान्स अमेरिकेच्या सौदाच्या दोन मोठ्या समीक्षक आहेत, तथापि. खरेतर, फ्रान्सने न्यूझीलंडमधील अमेरिकन न्यायालयाने सेटलमेंट कराराची देखरेख करण्यासाठी पुस्तक शोध करारावर आपत्ति नोंदविली आहे. अमेरिकन सेटलमेंटला मान्यता देण्याची सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे. रॉयटर्स फ्रेंच संस्कृतीचे मंत्री निकोलस जॉर्जेसला दिलेल्या विधानाच्या मते \"अनाथ\" साहित्यावरील Semalt नियंत्रणबद्दल व्यापक चिंता व्यक्त केली जात आहे.\n(1 9) फ्रान्स युरोपातील लेखकांचे हक्कांबाबत चिंतित आहे, मिमलॅट यांनी सांगितले.\n(1 9) \"Google च्या डेटाबेसमध्ये बरेच काम होतात. गुगल या कृतींना सेमट वॅटर्सच्या परवानगीशिवाय काम करू शकते.\n(1 9) ने अनाथ बांधवांच्या कॉपीराइटवर चिंता व्यक्त केली, जी अजूनही यु.एस. कॉपोर्रेट कायद्याद्वारे पुस्तके किंवा इतर साहित्य समाविष्ट आहेत, परंतु हे त्यांना स्पष्टपणे कळत नाही की त्यांना त्यांच्या अधिकारांचे कोण मालकी आहे.\n(1 9) \"Google परवानगीशिवाय एकाधिकारांची अंमलबजावणी युरोपियन अनाथ काम करेल,\" मिमल यांनी सांगितले.\nअमेरिकन न्यायालयाने पूर्वी समान आक्षेप दाखल केले.\nनिपटारा करार औपचारिकरित्या मंजूर होण्यापूर्वी आम्ही कदाचित अमेरिकेतून आणि परदेशात Google कडून अधिक सवलतींची अपेक्षा करू शकतो (आणि युरोपमध्ये अशीच व्यवस्था होऊ शकते). कोर्ट किंवा नियामकांनी या कराराला पूर्णतः रोखले तर मी आश्चर्यचकित होईल. मिमलट हे अगदी स्पष्ट आहे की बरेच हितधारकांनी पुस्तक स्कॅनिंग पुढे चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ही सरकारांना इच्छा आणि संसाधनांची कमतरता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathitechie.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T11:03:24Z", "digest": "sha1:PL2DPC7G6PUYLB3MSCYGTAMTOINUWJX7", "length": 3236, "nlines": 24, "source_domain": "marathitechie.blogspot.com", "title": "Marathi_Techie", "raw_content": "\nप्रमोद नवलकर गेले.ज्या लोकानी शिवसेनेच्या स्थापनेपासून तिची सेवा केली ,अणि ती मोठी केली त्यातलेच एक नेते म्हणजे नवलकर\nआज सगाळिकडे राजकारण म्हणजे गुंड अणि पैश्याचा माज असणाया लोकांचा खेळ झाला असतानाही त्यात सुसंस्कृत अश्या काही मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे नवलकर.मराठी माणसांसाठी मनापासून झटणारया आद्य शिवासैनिकांचे नवलकर हे एक प्रतिनिधि होते.\nशिवसेनेच्या सुरुवातीच्या वाटचालित मनोहर जोशी,सुधीर जोशी,दत्ताजी नलावडे ह्यान्सारखे सुसंस्कृत आणि तळमळीने लोकोपयोगी काम\nकरणारे जे नेते शिवसेनेला लाभले त्यामधे हया भटक्याचे एक विशेष स्थान होते. राजकारण म्हणजे येन केन प्रकार सत्ता मिळवुन\nत्याला चिकटून बसणे , आणि वाट्टेल त्या तड़जोडी करून खुर्चिला चिकटून बसणे हाच आज धंदा झाला आहेकेवळ आपले सरकार टिकून रहावे म्हणुन वाट्टेल त्याच्या पुढे गुधागे टेकून देशाला खडडयात घालणारे लोक आज खुर्च्या उबवत बसले असताना नवलाकरान्सार्ख्या परखड आणि तत्वनिष्ट राजकारण्यांची सर्वात जास्त गरज देशाला आहे\nअसेच नवलकर पुन्हा जन्माला येवोत आणि नाठाळान्च्या डोक्यात काठी घालोत हीच देवाकडे प्रार्थना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T11:15:47Z", "digest": "sha1:ADU4AVFYK2SWWZE3LJ7JKEKI6YHOHOIJ", "length": 11434, "nlines": 94, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची आमदार महेश लांडगे यांची सूचना | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome इतर महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची आमदार महेश लांडगे यांची सूचना\nमहावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची आमदार महेश लांडगे यांची सूचना\nभोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना देखील लांडगे यांनी केल्या.\nभोसरी विधानसभा विद्युत समितीची पहिलीच आढवा बैठक भोसरीत पार पडली. आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बो-हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते.\nजिल्हा नियोजन समितीमध्ये येत्या 2018-19 मध्ये घेण्यात येणा-या कामाचा आराखडा तयार करणे. भोसरी मतदार संघातील विद्युत विभागाशी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे. नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देणे. महाविरतणच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे. नवीन प्रस्ताव तत्काळ मंजूर करून घेऊन कामे सुरु करावेत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी केल्या आहेत. समितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांचा यासह इतर प्रलंबित विषयांबाबत आमदार लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला.\nविविध योजनांतील पूर्ण झालेली, प्रगतीपथावर असलेली व प्रस्थापित कामे\nभोसरी विभागांतर्गत आकुर्डी, भोसरी व प्राधिकरण हे तीन उपविभाग असून या तीन उपविभागात संभाजीनगर, चिंचवड, मोशी, भोसरी, नाशिक रोड, च-होली, निगडी, प्राधिकरण, देहूरोड, देहूगाव आणि तळवडे अशा नऊ शाखा कार्यालयात आहेत. भोसरी विभागात सध्या 538 उच्चदाब, दोन लाख 11 हजार 751 घरगुती, 23 हजार 723 व्यापारी, 11 हजार 477 औद्योगिक, 1 हजार 649 शेती व 1 हजार 212 इतर असे एकूण दोन लाख 49 हजार 812 वीज ग्राहक आहेत. या सर्व वीज ग्राहकांना चिंचवड, भोसरी-1, भोसरी 2 आणि टेल्को अति उच्च दाब उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे.\nविविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामामुळे वीज हानी कमी होऊन वीज ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करणे, तसेच नवीन येणा-यांना वीज पुरवठा देणे शक्य झाले आहे. डीपीडीसी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अजून वीज गळती कमी होऊन योग्य दाबाने वीजपुरवठा करणे. नवीन मागणी असलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.\nवाकडमधील अडीच किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून उभारण्याचे नियोजन – नगरसेवक संदिप कस्पटे\nनगरसेवक नाना काटेंच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी व वीणापूजन करून हरिनाम सप्ताहाला सुरूवात\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nप्लास्टिक कॅरिबॅगसाठी मिठाई दुकानदाराला पाच हजारांचा दंड\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-in-777-gold-price-p3yZ7v.html", "date_download": "2018-04-23T11:45:55Z", "digest": "sha1:6ONETUTYT3CNJ7VPEBQDM2742NUCGYL5", "length": 12526, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स इन 777 गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nइंटेक्स इन 777 गोल्ड\nइंटेक्स इन 777 गोल्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंटेक्स इन 777 गोल्ड\nइंटेक्स इन 777 गोल्ड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये इंटेक्स इन 777 गोल्ड किंमत ## आहे.\nइंटेक्स इन 777 गोल्ड नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nइंटेक्स इन 777 गोल्डशोषकलुईस उपलब्ध आहे.\nइंटेक्स इन 777 गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 2,600)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स इन 777 गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स इन 777 गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स इन 777 गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंटेक्स इन 777 गोल्ड वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nसिम ओप्टिव Dual SIM\nइंटेक्स इन 777 गोल्ड\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/437/Appeal_for_Donation", "date_download": "2018-04-23T11:31:09Z", "digest": "sha1:RHF4SYCRIGEKLIGSWFWZNRYXXWF2Y3GF", "length": 6121, "nlines": 42, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांची निकड भागवून वाढदिवस साजरा, अतुल लोंढे यांचा स्तुत्य उपक्रम ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते अतुल लोंढे यांनी पदाधिकारी व प्रवक्ते म्हणून वावरताना सामाजिक भान ठेवून अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. शेतकरी व गरजूंची आर्थिक निकड भागवण्याचा वेगळा पायंडा लोंढे यांनी या उपक्रमातून पाडला आहे. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना या अर्थिक मदतीचे वाटप करत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लोंढे यांनी केलाय. ...\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन ...\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहनसंषर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता पण एकजुटीने संघर्ष सुरूच राहणार असल्याचा शरद पवार यांचा दावा उत्तर प्रदेशात कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही असा जळजळीत सवाल करत शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षयात्रेच्या पुढील टप्प्यातही विरोधक एकजुटीने संघर्ष करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्य ...\nप्रशांत परिचारकांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे ...\nपरिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे विधान परिषदेत पडसादजिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आज याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिनंदनपर प्रस्तावानंतर परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या सदस्याने सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान केला, याचा अर्थ तो या सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे परिचारकांना तात्काळ निल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/7/", "date_download": "2018-04-23T11:42:59Z", "digest": "sha1:U2MPHLRF4DBY7RPCHHMYNAYI2NMVBSV7", "length": 8668, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 7", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ७\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nव्हिटामिन ई, लोह आणि कॅल्शिअम युक्त सुकामेवा म्हणुन ओळाखला जाणारा ‘बदाम’ बुद्धी तल्लख ठेवण्यात देखील महत्वाचा मानला जातो तसेच थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा आणि उन्हाळ्यात शरीराची अधिकची उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ‘बदाम’ करतो. अशा पोषक आणि खमंग बदामाचा रूचकर पदार्थ म्हणजे बदामाची बर्फी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, तर एकदा नक्की करून बघा.\nझटपट घरच्या घरी करता येणारे खव्याचे गुलाबजाम सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.\nअत्यंत खमंग, खुसखुशीत ‘केक डोनट’ चहा किंवा दुधा बरोबर खल्ला जाऊ शकणारा बेकिंग प्रकारातील एक गोड पदार्थ आहे, बेकिंग आणि बेकरी पदार्थ आपणांस आवडत असल्यास हा पदार्थ आपल्याला नक्की आवडेल.\nखोबरे आणि तुप यामुळे ‘काजूची बर्फी’ अधिक खमंग लागते, सणावाराला हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे. काजू हे उष्ण आणि पित्तवर्धक असल्याने पित्तचा विकार असल्यास हा पदार्थ बेताने खाल्यासच बरे. थंडीच्या दिवसात मात्र हा पदार्थ आवर्जून खावा. छोट्यांचा तर हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे.\nसणासुदीला खासकरुन केली जाणारी ‘गोड शंकरपाळी’ तुम्ही इतर वेळीही करुन मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता. खुससुशीत गोड शंकरपाळी झटपट तयार..\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/international/world-science-day-28-february", "date_download": "2018-04-23T11:15:38Z", "digest": "sha1:GL7RK7XTVNDII24AWHUHLYAA2IAUUXZ7", "length": 8134, "nlines": 122, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "World Science Day 28 February | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome आंतरराष्ट्रीय आज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nविज्ञानाची व्याख्या सर्मपकपणे कोणालाही करता आली नाही. ज्ञानेश्‍वरांनी ती व्याख्या नेमकेपणाने केली आहे – प्रपंचाचे ज्ञान म्हणजे विज्ञान… आपल्यामध्ये असणारा आत्मा त्याचे ज्ञान म्हणजे अध्यात्म आणि प्रपंचाचे ज्ञान म्हणजे विज्ञान. सुख हवे असते; पण ते सुख कुठे अनुभवतो, ते क्षणिक का असते… आपल्यामध्ये असणारा आत्मा त्याचे ज्ञान म्हणजे अध्यात्म आणि प्रपंचाचे ज्ञान म्हणजे विज्ञान. सुख हवे असते; पण ते सुख कुठे अनुभवतो, ते क्षणिक का असते… शाश्‍वत का नाही… या साऱ्या प्रश्नांचा शोध म्हणजे खरे विज्ञान आहे. विज्ञानासह अध्यात्माचे शिक्षण तितकेच गरजेचे आहे. अध्यात्माशिवाय विज्ञान पूर्णपणे पांगळे आहे. विज्ञानाला विवेकाची दृष्टी नसली की ते विकृतीकडे झुकते. त्यातूनच विध्वंस घडतात. पण विवेकाची जोड मिळाली म्हणजे आपली दृष्टी व्यापक होते. मानवजातीच्या कल्याणाची भावना निर्माण होते. परंपरेतून चालत आलेल्या ज्ञानामध्ये सत्य भरलेले आहे. ते मानवजातीचे ज्ञान आहे. म्हणूनच विज्ञानाला विवेकाची दृष्टी देऊनच शाश्‍वत विकासाचे स्वप्न साकारेल….\n(श्री. सतिष गुरव:- युवा सह्याद्री, मुंबई)\nहिंदुमहासभा रायगड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न, खालापुर तालुका कार्यकारीणी जाहिर\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/maharashtra/thane", "date_download": "2018-04-23T11:26:11Z", "digest": "sha1:JYRBTQ3LN4THKZ75YGYTT7SEOXWZ34BS", "length": 9342, "nlines": 137, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "ठाणे | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nबदलापूरात बालशाहिरांनी साकारले शिवचरित्र-कोल्हापूरकरांचा बदालपूरात ऎतिहासीक कार्यक्रम\nबदलापूर: रविवार दिनांक २६ फेब्रूवारी २०१७ रोजी कोल्हापूर उत्कर्ष सेवा मंडळ, बदलापूर या मंडळाच्या तृतिय वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी प्रश्न मंजुशा व हळदी कुंकू व ७ वी आणि १...\tRead more\nठाणे महानगरपालिका निवडणुक २०१७ करीता आचारसंहिता लागू\nठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दि.११जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. दि. २७/१/२०१७ ते दि.३/२/२००७ पर्यंत फॉर्म भरणे दि.૪/२/२०१७ फॉर्म छानणी...\tRead more\nठाण्यात चिमुकलीवर बलात्कार, आरोपी गजाआड\nठाणे:- मुलांना घरात कडी लावून ठेवून आई बाजारहाट करण्यासाठी गेल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरातील चिमुकलीचे अपहरण केले. तसेच. तिला आपल्या घरातील पोटमाळ्यावर नेत अत्याचार केल्याच...\tRead more\nभिवंडीत मोहरमच्या मिरवणुकीत तणाव\nठाणे : भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायत्रीनगर परिसरातून मिरवणूक जात असताना नवरात्रीच्या कमानीतून `ताजिया’ जात नसल्याने ही...\tRead more\nनालासोपारा येथे ९ ऑक्टोबर रोजी ‘श्री दुर्गामाता दौड’ चे आयोजन\nहिंदूनों, मराठा बांधवांनो या नवरात्रात दुर्गामाता दौडीत सामील व्हा.. नवरात्र म्हणजे, “श्रीदुर्गामाता दौड – नालासोपारा. देव, देश अन् धर्मासाठी निस्वार्थी कार्य करणाऱ्या तरुणांची...\tRead more\nठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nTotal : 231 जागा • पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा • स्टाफ नर्स (GNM) – 83 जागा • प्रसाविका (ANM) – 69 जागा • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 24 जागा • औषध निर्माता – 14 जागा • ड...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vegetable-rate-increased-pune-maharashtra-7055?tid=161", "date_download": "2018-04-23T11:35:41Z", "digest": "sha1:MHAYQKLPVNPCUIXKSFN3DCA5TQLS43IO", "length": 24610, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, vegetable rate increased in pune, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात तेजी\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात तेजी\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याच्या सुमारे १७५ ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली हाेती. मात्र वांग्याची आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती, तर काेकणातून आंब्याच्या आवकेत वाढ हाेत असून, हंगाम जाेमात यायला प्रारंभ झाला आहे. रविवारी सुमारे ८ हजार पेट्या आंब्याची आवक झाली हाेती, तर पालेभाज्यांचे दर तेजीत हाेते.\nआवकेमध्ये परराज्यांतून- हिमाचल प्रदेशातून सुमारे ३, तर झांशी येथून १ ट्रक मटार, राजस्थान येथून गाजर सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेंपाे, बंगळूर येथून आले सुमारे १ टेंपाे आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपाे आवक झाली हाेती. कर्नाटकातून ताेतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पाे, तर मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार ५०० गाेणी आवक झाली हाेती.\nस्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गाेणी, टाेमॅटाे सुमारे ५ हजार ५०० हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पाे, काेबी १०, तर फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, मटार ३०० गाेणी, पावटा ४ टेम्पाे, शेवगा ५ टेम्पाे, तांबडा भाेपळा १२ टेम्पाे, भेंडी ८ तर गवार ३ टेम्पाे, स्थानिक गाजर सुमारे ३०० गाेणी आवक झाली हाेती. कांदा सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : ८०-१००, बटाटा : १२०-१५०, लसूण : १५०-३०० आले : सातारी: २८०-३२०, बेंगलोर : २२०-२४०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ४०-८०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ३०-५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २००-२५०, गाजर : स्थानिक ८०-१००, परराज्य. १००-१२०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-४००, मटार : स्थानिक ४००-४५०,परराज्य : ४००-४२०, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-६५०, सुरण : २५०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, मेथीची सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली हाेती.\nकोथिंबीर : ३००-१२००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-९००, कांदापात : ५००-७०० चाकवत : ५००-८००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-१५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१००० राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ५००-८००, हरभरा गड्डी ४००-६००.\nरविवारी (ता. १) फळबाजारात संत्री ८, तर मोसंबी सुमारे ४५ टन, डाळिंब सुमारे २५ टन, पपई ३ टेम्पोे, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू दाेन हजार बॉक्स, पेरु सुमारे २५० क्रेट, कलिंगड २५ टेम्पाे, खरबुज १५ टेम्पाे, विविध द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली हाेती. तर काेकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे आठ हजार पेट्यांची आवक झाली हाेती.\nफळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१२००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : १००-२२०, संत्रा : (३ डझन) २५०-५००, (४ डझन) : १६०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६० कलिंगड : ४-८, खरबूज : १०-१८, पपई : ५-१०, चिक्कू : (प्रति १० किलाे) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ८००-९००, सुपर सोनाका (१५ किलो) : १०००-१२००,थाॅमसन (१५ किलाे) ५००-६५०, आंबा हापूस ४ ते ८ डझन कच्चा -१ हजार ५०० ते ३ हजार रुपये. तयार २ हजार ते ४ हजार रुपये.\nगेल्या रविवारी (ता. २५) रामनवमी आणि एकादशीच्या उपवासामुळे मासळीची मागणी घटली हाेती. यामुळे या रविवारी (ता. १) मासळीला मागणी वाढल्याने दरात ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील सुमारे १२ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीचशे किलो, नदीची सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलनची १२ टन आवक झाली हाेती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : ११००, लहान : ८५० भिला : ६५०, हलवा : ६००-६५०, सुरमई : ५५०-६५०, रावस-लहान : ५५०-६५०, मोठा : ७५०, घोळ : ६००, करली : २८०, करंदी : सोललेली ३२०.भिंग : ३००, पाला : ५५०-१२००, वाम : पिवळी १८०-२००, मोठी ५५० काळी २००, ओले बोंबील : १६०.\nकोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०.\nखाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ४००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १८०, शेवटे : २००, बांगडा : लहान : १२०, मोठे : १६०-२००, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १६० तारली : १२०.\nनदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २२०, चिलापी : ६०, मागूर : १५०, खवली : २२०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ५५०.\nमटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.\nचिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३१० डझन : ४८ प्रतिनग : ४.\nफुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : १०-४०, गुलछडी : ७०-१२०, बिजली : १०-५०, कापरी : २०-४०, माेगरा २००-३५०, ऑस्टर : १०-१५, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-१०, गुलछडी काडी : १५-५०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००\nपुणे बाजार समिती हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू मध्य प्रदेश कांदा तळेगाव बळी भुईमूग नारळ फळबाजार डाळिंब द्राक्ष हापूस मटण मासळी समुद्र पापलेट सुरमई चिकन गुलाब\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nपुणे बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये...\nएप्रिल-मेमध्ये बाजार फायदेशीर राहण्याचे...उन्हाळ्यात नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित होत...\nऔरंगाबाद येथे कैरी २५०० ते ३००० रुपये... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत...नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर,...\nकोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३००...कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९००...नगर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात...\nमार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...\nपुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...\nपरभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nऔरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...\nसांगलीत हळद ६००० ते १५,००० रुपये क्विंटलसांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली...\nजळगावमध्ये कैरी ७००० रुपये क्विंटल जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनगरला ज्वारी १५५० ते २१५१ रुपयेनगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४...\nसोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nपरभणीत फ्लॉवर ३०० ते ७०० रुपये क्विंटल परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nजळगाव येथे हिरवी मिरची १५०० ते ४०००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/11/23/%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:08:35Z", "digest": "sha1:KFNXEMVJHP5XR6W4ZUYRUX6HDLCYULLB", "length": 16232, "nlines": 208, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "झटापटी | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nमक्या : काल जंगलातून भटकत असताना माझा वाघाशी सामना झाला\nआमच्या मध्ये खूप जोरदार झटापटी झाली…\nरजनीकांत: मग, पुढे काय झालं\nमक्या : पुढे काय…. म्या पळून गेलो….\nझंप्या: अये गप ए तुझ्या मायला तुझा मी वाघाचे प्राण वाचावे म्हणून पळालो; कारण ‘ Only 1411 are left ‘\nनाहीतर सगळे मला ओळखून आहेतच\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7142548", "date_download": "2018-04-23T11:43:56Z", "digest": "sha1:2E3PHEEKGSBE4TX7P7XSCUI4MMRT6HRM", "length": 7794, "nlines": 29, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "# एप्रिल 21: Google चे मोबाइल-फ्रेंडली अल्गोरिदम हिमाचल", "raw_content": "\n# एप्रिल 21: Google चे मोबाइल-फ्रेंडली अल्गोरिदम हिमाचल\nगेल्या काही आठवड्यांपासून, आम्ही सेमॅट च्या मोबाइल-फ्रेंडली अल्गोरिदम अद्यतनाबद्दल बर्याच इशारे ऐकल्या आहेत. 27 फेब्रुवारीला त्याची घोषणा झाल्यापासून, प्रत्येकजण त्याच्यावरील बदल आणि प्रभावाची अपेक्षा करीत आला आहे. शेवटी, आज 21 एप्रिल आहे आज, मिमलॅट मोबाइल-फ्रेंडली असलेली साइट्ससाठी महत्त्वपूर्ण प्राधान्य दर्शवेल - transport firmen kanton zürich.\nआपली ई-कॉमर्स वेबसाइट मोबाइल फ्रेंडली आहे का\nआपल्या साइट 2015 मध्ये मोबाईल मिल्टल नसल्यास आपण गमावलेल्या गोष्टी\nमला प्रभावित होईल का\nसाम्बाल्टचे अल्गोरिदम अद्ययावत करण्याचा उद्देश शोधकांना उच्च गुणवत्ता आणि संबंधित परिणाम प्रदान करणे हा त्यांच्या मोबाइल उपकरणांवर वाचनीय आहे. म्हणूनच, सेमट च्या अल्गोरिदम केवळ मोबाइल डिव्हाइसवर केल्या जाणार्या शोधांवर परिणाम करेल. याचा अर्थ, डेस्कटॉप आणि टॅब्लेटवर केलेले शोध प्रभावित होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सेमॅट शोधांमधील बातम्या विभाग एकतर प्रभावित होणार नाही. याव्यतिरिक्त, स्थानिक व्यापार सूची जे Semaltack परिणामांच्या अंतर्गत दर्शविण्यावर परिणाम होणार नाही.\nमोबाईल डिव्हाइसवर आपला ब्रॅंड शोधला गेल्यास, मोबाईल अनुकूल असला किंवा नसले तरीही आपल्याला अद्याप शोध परिणामांमध्ये दर्शविले जाईल.\nआपण Google वर दहा ऑरगॅनिक शोध परिणामांसाठी रँकिंग करीत असल्यास, Google अल्गोरिदम अद्यतने आपल्या क्रमवारीवर परिणाम करेल जगभरातील सर्व भाषा आणि वेबसाइट्स अद्ययावत तसेच प्रभावित होतील. जर आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेबसाइट्स आहेत, तर हे सुनिश्चित करा की हे सर्व मोबाईल-फ्रेंडली आहे आणि केवळ आपल्या Semaltour साइटच नाही.\nमाझी साइट मोबाइल फ्रेंडली आहे का\nसर्व प्रथम, आपली साइट मोबाइल डिव्हाइसेससाठी अद्याप ऑप्टिमाइझ केली जात आहे आपला होमपेज किंवा ब्लॉग मोबाइल-फ्रेंडली असल्यामुळेच, ही संपूर्ण वेबसाइट मोबाइल-फ्रेंडली असल्याचे आपण गृहीत धरत नाही. आपल्या वेबसाइटवरील प्रत्येक पृष्ठ ऑप्टिमाइझ करणे आवश्यक आहे कारण अल्गोरिदम पृष्ठाच्या पृष्ठावर आपल्याला रँकिंग करत आहे. आपण अद्याप आपली साइट मोबाइल-अनुकूल आहे किंवा नाही याविषयी प्रश्न विचारत असाल तर शक्यता आहे, नाही. Google च्या मोबाइल-फ्रेंडली टेस्टसह आपली साइट मोबाइल-फ्रेंडली असल्याचे आपण तपासू शकता.\nज्यांच्याकडे अद्याप मोबाइल-फ्रेंडली वेबसाइट नाही, Google ने पुष्टी केली आहे की मोबाइल फ्रेंडली रँकिंगमध्ये इतर अद्यतने विचारात घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. आपण 21 एप्रिलनंतर आपली साइट ऑप्टिमाइझ करत असल्यास, Googlebot क्रॉल करणे, पुन्हा क्रॉल करणे किंवा अनुक्रमणिका पृष्ठे चालू ठेवेल. आपण Google Webmaster Semalt मध्ये सूचीत सबमिट करुन Google म्हणून आनयन देखील वापरू शकता, ज्यामुळे आपली वेबसाइट अल्गोरिदम मध्ये विचारात घेण्याच्या प्रक्रियेत गती येईल.\nअल्गोरिदम पूर्ण परिणाम साधण्यासाठी सुमारे एक आठवडा लागेल. Google ने असे देखील सांगितले आहे की वेबसाइट 22 एप्रिल पर्यंत अपडेट झाल्याने त्यांचे साइटवर प्रभाव पडला आहे किंवा नाही हे निर्धारित करण्यात सक्षम होणार नाही. आपण आपल्या साइटवर निदान चाचणी घेतली नसल्यास, आता वेळ आहे. मिल्ठु अल्गोरिदम अद्यतनासाठी आपली वेबसाइट ऑप्टिमाइझ करण्यासाठी खूप उशीर झालेला नाही आमच्याशी संपर्क साधायची खात्री करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-magnetic-maharashtra-summit-starts-today-mumbai-5861", "date_download": "2018-04-23T11:54:30Z", "digest": "sha1:OUHMMQUESXATG5EGFS4CHZQ6OVQF4G3Q", "length": 13594, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Magnetic Maharashtra summit starts from today in mumbai | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटन\n'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटन\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.१८) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद \"एमएमआरडीए'च्या प्रांगणात तीन दिवस चालणार आहे.\nमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.१८) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद \"एमएमआरडीए'च्या प्रांगणात तीन दिवस चालणार आहे.\nजागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी \"मेक इन इंडिया' या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. २०१६ मध्ये झालेल्या या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ६१ टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून १० लाख कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे साडेचारे हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचे नियोजन आहे. यातून 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.\nमहाराष्ट्र २०१८ 2018 गुंतवणूक नरेंद्र मोदी narendra modi\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/$$$-$$$/", "date_download": "2018-04-23T11:32:56Z", "digest": "sha1:NEVCHU5LHKOUJLOM3PY4RUPLVUIBNCQF", "length": 5705, "nlines": 140, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$", "raw_content": "\n$$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\n$$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\n$$$ मलाही कधीकधी वाटायचं ....... $$$\nस्वप्नातच का होईना पण आपण भेटायचं\nभेटताच एकमेकांना मनसोक्त बोलायचं\nबोलता बोलता सर्वकाही आपलच खर ठरवायचं\nमलाही कधीकधी वाटायचं .............\nआजच्या भेटीत भविष्याच ठरवायचं\nतुझ माझ नात जन्मभर टिकवायच\nपिल्लू म्हणून दिलेलं वचन मरेपर्यंत निभवायच\n'ती' च सात जन्म मिळत राहो हेच मागायचं\nमलाही कधीकधी वाटायचं ...............\nमाझ्या हृदयात फक्त तुझच नाव कोरायच\nतुझ्यावाचून एक क्षणही ना करमायचं\nतुझ्याच स्पर्श्याच्या चाहुलीन झुलत राहायचं\nनित्य दिन डोळ्यात तुझीच प्रतिमा उभी करायचं\nमलाही कधी कधी वाटायचं .....................\nआज तिच्या मदभऱ्या अदांना न्याहाळायच\nशिंपल्यातल्या मोत्यागत तिला सांभाळायच\nतिच्या निरागस भावनांना सदैव जपायचं\nसर्व काही जपत असतांना तिला मनात साठवायच\nमलाही कधीकधी वाटायचं ................\n$$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nमी तुमची खूप मोठ्ठी FAN झाली आहे ....................\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\nRe: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\n$$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2011/09/blog-post_22.html", "date_download": "2018-04-23T11:38:35Z", "digest": "sha1:PFLKCONQYTRHXTIISGDETUISZMR5L6E5", "length": 8399, "nlines": 160, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): सदरा", "raw_content": "\nसुख आत खरे वरती नखरा\nसदर्‍यात लपे दुसरा सदरा\nजपले तुजला इतके अलगद\nपुसता पुसता उठलाच चरा\nजखमा हिरव्या दिसतील पुन्हा\nबरसेल सखा, भिजवेल धरा\nफसलास मना, स्मरलेस तिला\nबघ आत पुन्हा ढवळेल जरा\nतुमचे फतवे लखलाभ तुम्हा\nहृदयामधला मम कौल खरा\n'नचिकेत' रमे गझलेत सदा\nअपुल्याच घरी असतो उपरा\n- नचिकेत जोशी (३०/८/२०११)\nतुमचे फतवे लखलाभ तुम्हा\nहृदयामधला मम कौल खरा\n चरा तर खरंच काळजावर चरा आहे\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nया इथे कधी काळी...\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/shahuraj-mane.html", "date_download": "2018-04-23T11:48:37Z", "digest": "sha1:H6UJHOFVPRYZIWB5URO3J7YYW3UMPAAM", "length": 11190, "nlines": 68, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : शाहूराज लक्ष्मण माने\nConstituency : उमरगा विधानसभा / उस्मानाबाद लोकसभा\nParty Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष\nDesignation : महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा संपर्क प्रमुख\nName : शाहूराज लक्ष्मण माने\nMother’s Name : अंबुबाई लक्ष्मण माने\nPlace of Birth: : बेडगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद\nSpouse’s Name : सौ. शुभांगी शाहूराज माने\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड\nResidence Address : मु. पो. बेडगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद\nOffice Address : शॉप नं. १८, कैलाश टोवर, प्लॉट नं. ६०, ६१, ६२, सेक्टर - ३५, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९\nसन २००६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापणेपासून उमरगा तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना अनेक आंदोलने केली. अनेक केसेस अंगावर घेतल्या परंतु पक्षाने दखल घेतली नाही. त्यामुळे पक्षाचा त्याग करून स्वतःच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास सेना स्थापन करून समाजसेवा केली. सन्माननीय उदयनाथजी महाराज यांच्या कार्याने प्रभावित होऊन, महाराष्ट्र विकास सेना हि सामाजिक संघटना हिदुस्थान प्रजा पक्ष यामध्ये विलीन करून पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय उदयनाथजी महाराज यांच्या नेतृत्वात समाजहिताचे कार्य करत आहे.\nमनसे मध्ये असताना उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न यासाठी २ वेळा आंदोलन त्यावेळा २ गुन्हे दाखल. एस. टी. थांबा असताना देखील बाबळसुरच्या विद्यार्थांना एसटी पासून वंचित राहावे लागत होते. त्यांना आंदोलनातून न्याय मिळवून दिला. त्यावेळा एक गुन्हा दाखल.\nकारखान्याच्या नावाने मा. पाशा पटेल (आमदार) यांनी शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या. परंतु त्यांनी त्या जमिनी साखर कारखाना न काढता परस्पर विकल्या त्यासाठी आंदोलन करून त्या जमिनी परत मिळवून दिल्या. त्यावेळा २ गुन्हे दाखल.\nराज ठाकरे यांना दोन वेळा अटक झाली (रत्नागिरी, राहत्या घरातून) त्यावेळी १५ बस गाड्यांची तोडफोड करून आंदोलन केले. दोन गुन्हे दाखल.\nउमरगा शहराचा सिटी सर्वे करावा व महादेव मंदिर, शिवाजी चौक येथील अतिक्रमण हटवावे यासाठी ५ वेळा आंदोलन केले. त्यासाठी ३ गुन्हे दाखल.\nउमरगा व लोहारा तालुक्यात मनसे पक्षाची ७५ वी शाखाची स्थापना केली. एवढ सगळ करूनही २००९ च्या निवडणुकीत पक्षाने मनसे चा उमेदवार दिला नाही त्यामुळे पक्ष त्याग केला व तेव्हा पासून २०१३ पर्यंत महाराष्ट्र विकास सेना या संघटनेच्या माध्यमातून समाज सेवा करण्यास सुरुवात केली.\nया संघटनेच्या माध्यमातून, उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी असलेले विद्युत खांब काढण्यासाठी ३ तास खांबावर जाऊन बसून आंदोलन केले व तेथील खांब काढण्यास भाग पाडले.\nभारत शिक्षण संस्था येथील ३०० कोटीचा भ्रष्टाचार आंदोलनाच्या माध्यमातून उघडकीस आणला. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यात दोन तास बसून खड्डे बुजविण्यास मजबूर केले.\nउमरगा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार बंद करावा यासाठी आंदोलन.\nभ्रष्टाचारी डॉ. आर. के. गिरी यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडवून ACB कडून अटक करवून दिली.\nभ्रष्टाचारी पोलिस कर्मचारी रोकडे यांना लाच घेताना रंगेहात ACB कडून अटक.\nउमरगा येथील खाजगी रुग्णालयात होणारी (रुग्णाची लुट) आंदोलना द्वारे बंद. २ वेळा गुन्हे दाखल.\n१५ ऑगष्ट २०१२ पासून बेडगा ता. उमरगा या गावाचा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती - अध्यक्ष\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nसमाजाचे जे प्रस्थापिताकडून शोषण चालू आहे ते रोखणे हा मुख्य हेतू आहे. गोर-गरीब जनतेवर होणारे अन्याय दूर करणे. भ्रष्टाचार मुक्त समाज व्यवस्था स्थापून भ्रष्टाचार मुक्त समाज घडविणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nधरने आंदोलन, उपोषण, रास्ता रोको, घेराव इत्यादी सुमारे ८० कार्यक्रम (सन २००९ ते २०१३ या काळात)\nपक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे. भय, भूख, जात, धर्म अशा अनेक विळख्यात सापडलेल्या समाजास भयमुक्त व आदर्श जीवन व्यवस्थेसाठी परावृत्त करणे.\n१ जून २०१३ रोजी उमरगा येथे हिंदुस्थान प्रजा पक्ष जनसंपर्क कार्यालय उदघाटन निमित्त सोहळा तसेच जाहीर सभा\nशाहूराज माने यांचे मनोगत - Part 1\n१ जून २०१३ रोजी उमरगा येथे हिंदुस्थान प्रजा पक्ष जनसंपर्क कार्यालय उदघाटन निमित्त सोहळा तसेच जाहीर सभा\nशाहूराज माने यांचे मनोगत - Part 2\n१ जून २०१३ रोजी उमरगा येथे हिंदुस्थान प्रजा पक्ष जनसंपर्क कार्यालय उदघाटन निमित्त सोहळा तसेच जाहीर सभा\nशाहूराज माने यांचे मनोगत - Part 3\n१ जून २०१३ रोजी उमरगा येथे हिंदुस्थान प्रजा पक्ष जनसंपर्क कार्यालय उदघाटन निमित्त सोहळा तसेच जाहीर सभा\nशाहूराज माने यांचे मनोगत - Part 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/haryana-news/?Menu-Har", "date_download": "2018-04-23T11:29:00Z", "digest": "sha1:EIYCYITU7EIGKOXCM6IJ2ID2CN46FAN4", "length": 10351, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Latest National news in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी haryana", "raw_content": "\nINTERESTING: गुरुलाच कैदी बनविणा-या 'अकबर बादशाहाच्‍या' खास 10 गोष्‍टी\n14 जानेवारी 1761 मध्‍ये पानीपत येथे झालेल्‍या घनघोर युद्धात मुघलांनी विजय प्राप्‍त केला होता. तेव्हा मुघल बादशाहा होता अकबर. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला जलालुद्दीन मोहम्‍मद अकबर विषयीच्‍या काही खास गोष्‍टी सांगणार आहोत. अकबर बादशाहाचे सैन्‍य प्रबळ असले तरीही सत्‍ता मात्र बेरम...\nभररस्त्यावर मॉडेलचे कपडे ओढले, तरुणीने ट्विटरवर केली तक्रार; CM म्हणाले- बेटा, तुला न्याय मिळेल\nसुटकेसमुळे रेल्वेत सुटली दुर्गंधी, उघडून पाहिल्यावर प्रत्येकाला बसला धक्का\nपाशवी कृत्यामुळे 4 महिन्यांचे बाळ रडले तेव्हा तोंड दाबले; गप्प झाली नाही म्हणून पायऱ्यांवर आदळले\nमनु शर्माला सोडल्यास मला काही हरकत नाही, जेसिकाची बहीण सबरीनाचे तुरुंग अधिकाऱ्याला पत्र\nछेड काढणाऱ्याला तरुणीने शिकवला असा धडा, आयुष्यभर विसरणार नाही\nरोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या क्रूरतेचा पुरावा आहे ही धक्कादायक PHOTO सिरीझ\nवाघा-अटारी बॉर्डरवर पाक क्रिकेटरचे नापाक चाळे, BSF जवान संतप्त\nयेथील 20% पुरुष Gay, सेक्स चेंज सर्जरी मोफत; वाचा ब्राझीलचे FACTS\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\nWWE बद्दल सर्वांना पडले असतील हे 5 प्रश्न, जाणून घ्या त्यांची उत्तरे\nIPL 11: क्रिस गेलचे नाबाद अर्धशतक; पंजाब किंग्जचा विजयी चाैकार\nबंगळुरू टीमचा राॅयल विजय, दिल्ली पराभूत; डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक\nसचिन तेंडुलकरसाठी चाहत्याने दिली खास भेट, 'तेंडल्या' चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करत पहिला टीझर प्रदर्शित\nकुणी 600 तर कुणी केले 150 चित्रपटांमध्ये काम, या आहेत साऊथचा 10 खलनायिका\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन, गेल्या तीन वर्षापासून आहे सक्रिय कार्यकर्ती\nव्हायरल झाला सोनम कपूरचा डान्स व्हिडिओ, ठुमके लावताना दिसली\nकॅन्सरला हरवत सुपरमॉडेल बनली ही महिला, लोक आता म्हणतात बार्बी डॉल\nलॉस एंजिलीस येथे राहणारी 34...\nमहिलेने विकत घेतलेल्या केळ्याची किंमत होती 87000 रुपये, बील पाहून आली भोवळ\nतलावाच्या खाली 107 वर्षे लपले होते हे रहस्य, समोर आल्यावर लोकांनी घातली तोंडात बोटे\nबलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा\nSexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात या Actress, दीपिका-प्रियंका आघाडीवर\nया 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स\nया मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक\nअनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण\nराशीभविष्य दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक  मेष (Aries) वृषभ(Taurus) मिथून(Gemini) कर्क(Cancer) सिंह (Leo) कन्या (Virgo) तूळ(Libra) वृश्चिक (Scorpio) धनू (Sagittarius) मकर (Capricorn) कुंभ(Aquarius) मीन (Pisces) दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक 1 2 3 4 5 6 7 8 9\nचहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t19235/", "date_download": "2018-04-23T11:33:21Z", "digest": "sha1:245WTQ6W6JWB2RNSGI5FO2ZZ5HY5NSRD", "length": 2741, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता--- शरीफ --", "raw_content": "\nशरीफाची शरीफी किती बघा\nओठी गोळ नी मनी घोळ बघा\nविश्वासाने फिरतो जो त्यासंगी\nत्याचाच करतो तो चीरहरण बघा\nबाहेरून किती मोठा तो दिसतो\nमनी मात्र त्याच्या मैल असतो\nमजबुरी त्याची छळता जगाला\nखोटे श्रेष्ठत्व दाखवीत असतो\nशोषण कुणाचे छुपेना कधीही\nनशिबी साथ मिळे ना दरवेळी\nसत्य अटळ तो मुकेना कुणाला\nगुन्हेगार एकदिस फसतो सदाही\nसावध होता सुधरुनि जा आता\nनको पाहूरे अंत त्या गरीबाचा\nजनाची तो नाही बाळग मनाची\nसावरुनी घे तू अब्रू त्या गरीबाची\nसावरुनी घे तू अब्रू त्या गरीबाची\nशशिकांत शांडीले (SD), नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4641962", "date_download": "2018-04-23T11:32:52Z", "digest": "sha1:RSXXS73LOSGNFDMI53XDER74HELUCX2F", "length": 1549, "nlines": 13, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nमला वाटतं आपण चंद्रावर राहता आणि कट्ट्यावर पोस्ट करता . जरा मराठी भाषा कळली तर बरे होईल. एक काम का करत नाही आपण आपला मोबाईल नंबर द्या किव्हा मेल आय डी द्या पुढची कामगिरी मी करते . आपण कशाला त्रास घेता आणि उगाच पोस्ट करून दुसऱ्यांना देता . कट्टा आहे आणि त्याचा थोडातरी मान राखा . हि नम्र विनंती . आपल्या आई वडिलांना माझा नमस्कार सांगा . मीच आले असते पण चंद्रावर येत येत नाही म्हणून .\nतुमची चंद्रिका किंवा अंकिता\nविनंती : कट्ट्यावर चोरांचा सुळसुळाट फार वाढला आहे तेव्हा कट्टा समितीने यात लक्ष घातले तर बरे होईल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/vijay-mane.html", "date_download": "2018-04-23T11:39:41Z", "digest": "sha1:4DWKQPVIUIO4ZIALOTLDV2B3Y5X72VLE", "length": 16111, "nlines": 117, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : विजय जगन्नाथ माने\nConstituency : बेलापूर विधानसभा मतदार संघ\nDesignation : शिवसेना शहर प्रमुख - नवी मुंबई\nName विजय जगन्नाथ माने\nMother’s Name : लक्ष्मीबाई जगन्नाथ माने\nDate of Birth: : २६ जानेवारी १९७२\nPlace of Birth: : सातारा, महाराष्ट्र\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : शेती, व्यवसाय\nHobby : सामाजिक कार्य\nResidence Address : ११०१, सी ब्रीज टॉवर, टॉवर - ९, सेक्टर - १६, नेरुळ, नवी मुंबई\nOffice Address : सागर दर्शन टॉवर, शॉप नं - ०४, सेक्टर - १८, नेरुळ, नवी मुंबई\nशिवसेना शहर प्रमुख - नवी मुंबई\nमाजी नगरसेवक, नवी मुंबई म. न. पा.\nमा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना शाखा प्रमुखपदी निवड झाल्यावर प्रभागामध्ये शिवसैनिकांच्या सोबत काम करून नवी मुंबई महानगरपालिकेत २००५ मध्ये नगरसेवक म्हणून जनतेच्या आशिर्वादाने निवडून आलो.\nमा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा संघटक, नवी मुंबई नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबईतील शिक्षण सम्राटांना आंदोलनाच्या माध्यमातून वटणीवर आणण्याचे काम करण्यात यशस्वी झालो.\nसदर पाच वर्षाच्या कामगिरीनंतर मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्री. संजयजी राऊत साहेब, शिवसेना नेते, मा. एकनाथजी शिंदे व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. विजय चौगुले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 'शिवसेना बेलापूर विधानसभा शहर प्रमुख पदी' नियुक्ती करण्यात आली.\nमा. विजय माने यांचा नगरसेवक पदावर असताना कार्याचा अहवाल (शाखा, प्रभाग क्र. ७८ नेरूळ, नवी मुंबई)...\nसेक्टर १६ए व सेक्टर १६, सेक्टर १८ मधील लहान व्यासाची जलवाहिनी बदलून नवीन मोठ्या व्यासाची जलवाहिनी बसविण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात सुरु आहे.\nसेक्टर १८ येथे २५० मी. मी. व्यासाची जलवाहिनी टाकली.\nपदपथ व रस्ते दुरुस्ती\nनेरूळ सेक्टर १६ ए नवी मुंबई म. न. पा. शाळा क्र. ६ च्या दक्षिण बाजूस पदपथ तयार करण्यात आला.\nनेरूळ सेक्टर १८ येथील नियोजित गार्डनच्या संरक्षक भिंतीचे व आतील क्षेत्राची सुधारणा करण्यात आली.\nनेरूळ सेक्टर १६ येथे महालक्ष्मी सोसायटी व अष्टविनायक सोसायटी मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथाची सागर दर्शन सोसायटीपर्यंत सुधारणा करण्यात आली.\nनेरूळ सेक्टर १८, जय भवानी को. ऑप. हौ. सोसायटी व सह्याद्री सोसायटीचा पदपथ तयार करण्यात आला.\nनेरूळ सेक्टर १८, शिवप्रसाद सोसायटी, शिवसागर सोसायटी, साई प्रेरणा सोसायटीच्या दक्षिण बाजूस पदपथ तयार करण्यात आला.\nसेक्टर २४ मधील रस्त्याचे डांबरीकरण केले.\nनेरूळ सेक्टर १८ अजिंक्यतारा सोसायटी ते मार्केट व सेक्टर १६ येथे न्यू मंगलमुर्ती सोसायटी, अष्टविनायक सोसायटी पर्यंतच्या पदपथाची दुरुस्ती करण्यात आली.\nनेरूळ सेक्टर १८ दिपसागर सोसायटी ते पारिजात सोसायटी पर्यंत पदपथ तयार करण्यात आला.\nनेरूळ सेक्टर १८ वजीरानी स्पोर्ट क्लब ते महालक्ष्मी हौसिंग सोसायटी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व पदपथ दुरुस्ती करण्यात आली.\nनेरूळ सेक्टर १८ सागर स्वीट समोरील भूखंडास संरक्षक भिंत व परिसराची सुधारणा करण्यात आली.\nनेरूळ सेक्टर १८ चिंतामणी सोसायटी येथे पदपथ तयार करण्यात आला.\nस्वच्छता व आरोग्य विभाग\nनेरूळ सेक्टर १८ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मैदानावरील रोडची दुरुस्ती व मलनिस:रन वाहिनी मोठ्या व्यासाची टाकण्यात आली.\nनेरूळ सेक्टर २४ मलनिस:रन वाहिनी मोठ्या व्यासाची टाकण्यात आली.\nप्रभागामध्ये विविध प्रसंगी रक्तदान, नेत्रदान व इतर मोफत वैद्यकीय शिबिरांचे अनेक वेळा यशस्वी आयोजन.\nनाममात्र दरात रुग्णवाहिका सेवा सुरु केली.\nसेक्टर १६ व १८ येथे मिनी हायमास्ट व नवीन दिवाबत्ती बदलण्यात आली.\nसेक्टर १६ ए व सेक्टर २४ येथे नवीन दिवाबत्ती लावण्यात आली.\nनवीन वीज भरणा केंद्र चालू केले.\nसेक्टर १६ व १८ मधील चौकास \"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" चौक असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ मधील मैदानास \"छत्रपती संभाजी राजे मैदान\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १८ मधील पुणे विद्याभवन शाळेसमोरील उद्यानाला \"स्व. धर्मवीर आनंद दिघे उद्यान\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर २४ मधील मार्गाला \"संत वामनभाऊ व संत भगवान बाबा मार्ग\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ येथील खाली भूखंडास \"सार्वजनिक उत्सव मैदान\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १८ येथील फेरीवाला भूखंडास \"स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मंडई\" असे नामकरण करण्यात आले.\nपुणे विद्याभवन व पारिजात मधील रस्त्याला \"स्व. कै. यशवंत ज्ञानदेव शिंदे मार्ग\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ मधील रस्त्याला \"साई मंदिर मार्ग\" असे नामकरण करण्यात आले.\nसागर दर्शन टॉवर व सी ब्रिज टॉवर मधील चौकाला \"छत्रपति शिवाजी महाराज चौक\" असे नामकरण करण्यात आले.\nअजिंक्यतारा सोसायटी ते भाजी मार्केट रोडला \"दत्त मंदिर रोड\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १८ मधील भूखंडास \"अनिरुद्ध बापू मैदान\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ ए मधील भूखंडास \"स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ ए मधील रोडचे \"स्व. संजय कुमार गोरड\" असे नामकरण करण्यात आले.\nसेक्टर १६ ए Daily Needs समोरील मार्गाला \"गणेश मंदिर मार्ग\" असे नामकरण करण्यात आले.\nधार्मिक व सांस्कृतिक विभाग...\nसेक्टर १६, सेक्टर १८, सेक्टर २४, सेक्टर १६ ए मध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व होळी इ. धार्मिक उत्सवांचे आयोजन.\nप्रभागामध्ये दरवर्षी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन.\nअखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.\nविभागामध्ये क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल इत्यादी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन.\nविभागामध्ये गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन केले.\nगरजू तसेच गरीब विद्यार्थांना मोफत वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप.\nविभागातील शाळांच्या फी संदर्भात अनेक वेळा पालक आणि शाळा व्यवस्थापनाबरोबर यशस्वी चर्चा.\nबेरोजगारी व आर्थिक विभाग...\nविभागातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.\nविभागातील जनतेला अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन छोट्या-छोट्या प्रमाणात बचत करण्यास उत्तेजन.\nमहिलांना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन वाटप तसेच मोफत शिलाई शिकवणीचे वर्ग उपलब्ध केले.\nमहिलांचे स्वतंत्र अल्पबचत गट स्थापन करण्यास प्रोत्साहन.\nसाधू संत येत घरा, तोची दिवाळी दसरा...\nउद्घाटन आणि प्रकाशन सोहळा..\nनामकरण व शालेय उपक्रम\nसाम टीवी, कार्यक्रम - स्पॉटलाईट\nविषय - शीव-पनवेल महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जनहित याचिका\nसहभाग - विजय माने, शिवसेना शहरप्रमुख नवी मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mazisankrant.blogspot.com/2010/01/upay.html", "date_download": "2018-04-23T11:05:03Z", "digest": "sha1:GBTM3FZVWO7BSNOXFP36WTCYDLK4RF5M", "length": 2753, "nlines": 39, "source_domain": "mazisankrant.blogspot.com", "title": "MAZI 'SANKRANT': स्टिक फास्ट--upay", "raw_content": "\nकाही दिवसापूर्वी चुकून माझ्या हातावर stick फास्ट उडाले आणि सर्व बोटे एक्मेकाना चिकटून बसली. बोटे इतकी घट्ट चिकटली होती की ओढली किंवा कापली असती तर बोटाना major damage होण्याची शक्यता होती. मी पेट्रोल , केरोसीन , nail paint remover मधे try करुन पाहिले पण काहीच उपयोग झाला नहीं शेवटी मी डॉक्टर कड़े जायचे ठरवले .डॉक्टर पण म्हणाले कट करने difficult आहे. शेवटी मी माझ्या मोठ्या भावाला फ़ोन केला .त्याने १ सोपी आईडिया सांगितली शेवटी मी डॉक्टर कड़े जायचे ठरवले .डॉक्टर पण म्हणाले कट करने difficult आहे. शेवटी मी माझ्या मोठ्या भावाला फ़ोन केला .त्याने १ सोपी आईडिया सांगितली त्याने संगीताल्याप्रमाने में माझा हात गरम पाण्यात बुडवून ठेवला . आणि १० च मिनिटात बोटे मोक़ळी झाली.:\nही माझ्या बघण्यातली पहिली जाहिरात ज्यात अजिबात अतिशयोक्ती नाही . जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे खरच बोटे चिकटतात . उपाय मस्त आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/643/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81", "date_download": "2018-04-23T11:13:36Z", "digest": "sha1:2DR2FCKI2CIDWQNDWFWANABRVJ4KUIGW", "length": 7011, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची १७ मे पासून सुरुवात\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांना सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात १७ मे पासून रायगड किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत भरणे नाका व बहादुरशेखवाडी येथे अनुक्रमे संघर्षयात्रेचे आगमन व स्वागत केले जाईल. त्यानंतर चिपळूण येथील सावर्डे या गावी जाहीर सभेला संबोधित करून दिवसाची सांगता केली जाईल.\nकांद्याला एक रुपया अनुदान देणाऱ्या सरकारच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का\nकांद्याला एक रुपया अनुदान देणाऱ्या सरकारच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत का शेतकरी जमातीचा माणूस सत्तेत नसल्याने काय होतं ते गेल्या तीन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. आज शेतकरी अडचणीत असताना कोणीच त्याच्या मदतीला धावून जात नाही, शेतकरी नेते सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री झाल्यानंतर कुठे आहेत शेतकरी जमातीचा माणूस सत्तेत नसल्याने काय होतं ते गेल्या तीन वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. आज शेतकरी अडचणीत असताना कोणीच त्याच्या मदतीला धावून जात नाही, शेतकरी नेते सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री झाल्यानंतर कुठे आहेत त्यांना आता सत्तेची हवा लागली, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सटाणा येथे केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संघर्षयात्रेच्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत् ...\nसंघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून ...\nशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल. ...\nसरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे अश्रू दिसत नाहीत – आ. जितेंद्र आव्हाड ...\nसंघर्षयात्रेदरम्यान विरोधकांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेटशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संघर्षयात्रेची पळसगाव येथून सुरुवात झाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पळसगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. बंडू करकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बंडू करकाडे यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आठवड्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=91&Itemid=284&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:42:59Z", "digest": "sha1:4JNZNHGK4UXIOU5OZGWJJIEPYW352IBE", "length": 5462, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "कलवान विजय", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nएके दिवशी एक बुध्द भिक्षू आला होता. त्या काळी हिंदुस्थानात बुध्द धर्माची चलती होती. कनोज, बिहार वगैरे प्रांत म्हणजे तर बुध्द धर्माची आगरे. त्या भिक्षूचे दर्शन घेण्यासाठी बलदेव गेला होता. वंदन करून बलदेव भत्तिभावाने तेथे बसला.\n'बेटा, धर्मासाठी काही करशील की नाही\n'मी गरीब आहे महाराज. कुटुंब मोठे. पाच मुलगे. एक मुलगी. मी एकटा मिळवता. धर्मासाठी काय करू\n'धर्मासाठी एक मुलगा दे. पैशापेक्षा धर्माला माणसांची जरूर असते. भगवान बुध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी सर्वत्र प्रचारक पाठवीत. सम्राट अशोक याने तर त्या काळी माहीत असलेल्या सर्व जगात धर्मप्रचारक पाठविले. सूर्याचे हजारो किरण सर्वत्र जातात व अंधार दूर करतात, त्याप्रमाणे धर्माचा प्रसार करणारे जगाच्या कोनाकोपर्‍यात गेले पाहिजेत. त्यांनी अधर्माचा अंधार दूर केला पाहिजे; परंतु माणसेच नाहीत. तेजस्वी, पराक्रमी, कर्ते असे नवयुवक मिळाले पाहिजेत. तुला पाच मुलगे आहेत. एक धर्माला दे. सर्व कुळाचा तो उध्दार करील. आध्यात्मिक वैभव कुळाला देईल. खरे ना\n'तुमच्या शिरसमणी गावात एक मोठे मठ आहे;' परंतु तेथे कोणी शिकायला जात नाही. दुःखाची गोष्ट. तुझ्या एखाद्या मुलाला पाठव. तयार होईल. धर्माची सेवा म्हणजे जगाची सेवा.'\n'खरे आहे महाराज. मी एक मुलगा धर्मासाठी देईन.' भिक्षूस प्रणाम करून बलदेव घरी आला. कोणता मुलगा धर्मासाठी द्यावा याचा तो विचार करीत होता. आपला विजय सर्वांत चांगला आहे. उंच आहे. तेजस्वी आहे. दिसतोही सुंदर. जी वस्तू धर्मासाठी द्यायची ती चांगली असावी. विजयपेक्षा अधिक चांगली वस्तू माझ्याजवळ नाही. विजय धर्माला देऊन टाकावा. त्याने मनात ठरविले.\nहळुहळू त्याने आपला विचार घरात प्रगट केला. गावातही तो कळला. बलदेवाचा संकल्प ऐकून सर्वांनी प्रशंसा केली; परंतु विजय काही बोलला नाही. मंजुळाही जरा खिन्न झाली.\nएके दिवशी जेवताना अशोक म्हणाला, 'आई, मी आता दूर जातो. कोठे दरी उद्योगधंदा करीन. मी आता मोठा झालो. घरी अडचणच असते. मथुरेला जाईन म्हणतो.'\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/whatsapp-to-stop-supporting-blackberry-platform-195529", "date_download": "2018-04-23T11:23:07Z", "digest": "sha1:PMQ2MJSSVBFEYCFAFZRQDACK3PAM6MA5", "length": 11477, "nlines": 112, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुढच्या वर्षीपासून ‘या’ फोनना व्हॉट्सअॅपचा राम राम!", "raw_content": "\nपुढच्या वर्षीपासून ‘या’ फोनना व्हॉट्सअॅपचा राम राम\nपुढच्या वर्षीपासून ‘या’ फोनना व्हॉट्सअॅपचा राम राम\nBy: एबीपी माझा वेब टीम\nव्हॉट्सअॅप यूजर्ससाठी धक्का देणारी बातमी आहे. लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने एका ब्लॉगद्वारे सर्वांनाच धक्का दिला आहे.\nया ब्लॉगमध्ये व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, 2016 च्या डिसेंबरपर्यंत ब्लॅकबेरी ओएससाठी (BB10) व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करण्यात येणार आहे.\nव्हॉट्सअॅपने ब्लॅकबेरीसाठी सपोर्ट बंद केल्यास पुढल्या वर्षीपासून ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे स्मार्टफोन यूजर्स आपल्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअॅप वापरु शकणार नाहीत.\nया यादीत ब्लॅकबेरीसह नोकिया S40 सीरीज, नोकिया सिम्बियन s60, अँड्रॉईड 2.1, अँड्रॉईड 2.2 आणि विंडोज फोन 7.1 ओएसवर चालणारे स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. या सर्व स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद केलं जाणार आहे.\nव्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे व्हॉट्सअॅप अशा प्लॅटफॉर्मकडे अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, जिथे मोठ्या संख्येने लोक अॅक्टिव्ह असतात.\nव्हॉट्सअॅपने ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, “जर तुमच्याकडे या प्लॅटफॉर्मवर चालणारा स्मार्टफोन आहे, तर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी 2016 पर्यंत तुम्हाला नव्या अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोनमध्ये अपग्रेड करावं लागेल.”\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/dudhi-bhopalyache-dhirade/", "date_download": "2018-04-23T11:41:57Z", "digest": "sha1:3OLJRMZSSYL7QYWNBNC6QZGDFNNJ63IY", "length": 5892, "nlines": 109, "source_domain": "www.marathimati.com", "title": "दुधी भोपळ्याचे धिरडे | Dudhi Bhopalyache Dhirade", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » दुधी भोपळ्याचे धिरडे\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८\nदुधी भोपळ्याचे धिरडे - [Dudhi Bhopalyache Dhirade] दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.\n१/४ कि. दुधी भोपळा\nआले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट\n२ चमचे तांदळाचे पीठ\nप्रथम दुधी किसून घ्यावा व वरील सर्व मिश्रण एकत्र करावे आणि डोसाच्या पिठाप्रमाणे मिश्रण करुन घ्यावे.\nनंतर तव्यावर पातळ धिरडे घालावेत.\nगरमागरम धिरडे हे टोमेटो सॉसबरोबर सर्व्ह करावे\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/636/%E0%A4%96%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D", "date_download": "2018-04-23T11:29:33Z", "digest": "sha1:QSUPPRL2C2C26PH6G6IIF5KXVYO3ECC2", "length": 7744, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा. शरद पवार यांनी ऐकली समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांची बाजू\nसरकारतर्फे प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा, अशी शहापूर तालुक्यासहित राज्यभरातील महामार्गबाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी नेस्तनाबूत होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याविषयी आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. तसेच येत्या २९ मे रोजी ठाणे ते नागपूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी या महामार्गाला विरोध करणाऱ्या समित्या गठित झाल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढची रणनीती ठरवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.\nआज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, विद्याताई खाडे, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे उपस्थित होते.\nशिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट ...\nसिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्त ...\nसमृद्धी महामार्ग रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा ...\nमुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज शहापूर मध्ये २५० महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा या आंदोलनात सहभागी झाले होते. पावसाळी अधिवेशनात समृद्धी महामार्ग रद्द व्हावा, हा विषय लावून धरू अशी घोषणाही त्यांनी केली.समृद्धी महामार्गाचा मुद्दा गाजत असून शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी गिळंकृत करणाऱ्या या प्रकल्पाला विविध स्तरांवर विरोध होत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पाठीश ...\nमुख्यमंत्र्यांची कार्यप्रणाली पाहता त्यांच्यावर काही दबाव आहे का अशी शंका येते – जयंत पाटी ...\nराज्यातील सर्वच मंत्री मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान मोदींचं अनुकरण करतात मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकारात ते संबंधितांवर कारवाई का करत नाहीत मुख्यमंत्र्यांवर कोणत्या प्रकारचा दबाव आहे का मुख्यमंत्र्यांवर कोणत्या प्रकारचा दबाव आहे का अशा प्रश्नांचा भडिमार करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. आधी चिक्की घोटाळा, बोगस डिग्री, शालेय पोषण आहा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-focus-farmers-questions-rahul-gandhi-1758", "date_download": "2018-04-23T11:52:25Z", "digest": "sha1:MIFL3I43SL7YRGIFTU5JQKMLJHO365LG", "length": 12709, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Focus on farmers' questions: Rahul Gandhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरीप्रश्नी लक्ष घाला : राहुल गांधी\nशेतकरीप्रश्नी लक्ष घाला : राहुल गांधी\nशुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017\nशेतकऱ्यांना जी अाश्नासने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत\n-राहुल गांधी, उपाध्यक्ष, कॉंग्रेस\nलखनौ, उत्तर प्रदेश ः कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरीप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अाहे. ‘‘वेळ वाया घालवू नका, शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी अादी प्रश्नांकडे लक्ष घाला,’’ असा सल्ला त्यांनी सरकारला दिला अाहे.\nश्री. गांधी अमेठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून या वेळी त्यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले अाहे.\nमनरेगा योजना कॉंग्रेस सरकारनेच अाणली. ती `एनडीए'च्या काळात अाणली नाही.\nसध्या शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी हे दोन प्रमुख प्रश्न अाहेत. शेतकऱ्यांना जी अाश्नासने सरकारने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत, असा सवाल श्री. गांधी यांनी उपस्थित केला अाहे.\nनोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. यामुळे काहीही साध्य झालेले नाही. तुम्ही ‘मेक इन इंडिया’विषयी बोलत अाहात; मात्र सर्व काही ‘मेड इन चायना’साठी करत अाहात, अशी टीका त्यांनी केली अाहे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6", "date_download": "2018-04-23T11:53:34Z", "digest": "sha1:SLKU2I44V6YWFE77Q4EGGK5BCRNTN2WY", "length": 5915, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गेर्ड बिनिश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव गेर्ड बिनिश\nजन्म जुलै २०, इ.स. १९४७\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nगेर्ड बिनिश(देवनागरी लेखनभेद: गेर्ड बिनिग ; जर्मन: Gerd Binnig ;) (जुलै २०, इ.स. १९४७ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आहे.\nस्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली हाइनरिक रोहरर याच्या सोबत बिनिशाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील गेर्ड बिनिश यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १९४७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०१६ रोजी ००:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T11:13:04Z", "digest": "sha1:E6MDQIWDBL736FKUOIU2PXPAROT6YBPL", "length": 6864, "nlines": 90, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी – विनोद कांबळी | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome क्रीडा टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी – विनोद कांबळी\nटी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी – विनोद कांबळी\nटी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. माझ्या मते ‘आयपीएल’साठी युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा पहिले पाऊल असेल असे मत गुरुवारी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले.\nगुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बहुचर्चित ‘टी२० मुंबई लीग’ क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. तसेच स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अभिनेता सैफ अली खान याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कांबळीने म्हटले आहे की, टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिथले वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असून आपला संघ मजबूत फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. या वेळी विनोद कांबळीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nप्रियांका चोप्रा परदेशातही अव्वल; पाचव्यांदा ‘सेक्सीएस्ट एशियन वुमन’\nजाणून घ्या ‘हळदी’चे पाणी पिण्याचे फायदे\nकोलंबो : भारताची विजयाच्या दृष्टीने वाटचाल…\nराज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी\nलग्नाच्या मांडवातून क्रिकेटच्या मैदानात लगेचच उतरण्यास मला अडचण येणार नाही – विराट कोहली\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://transposh.org/mr/version-0-9-2-4-years-and-we-dont-break/", "date_download": "2018-04-23T11:10:30Z", "digest": "sha1:4CLWATFNLKWHE5RMZCGQYRZN4HTYND7K", "length": 8140, "nlines": 69, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.9.2 – 4 आणि आम्ही वर्षे खंडित करू नका", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.9.2 – 4 आणि आम्ही वर्षे खंडित करू नका\nकूच 11, 2013 द्वारा ऑफर 3 टिप्पण्या\nआम्ही वाढला 4 (प्रत्यक्षात 5) आमच्या वर्धापनदिन साठी tulips\nहोय, वर्डप्रेस साठी Transposh प्रथम आवृत्ती प्रकाशीत होती चार वर्षांमध्ये होते. आणि खरंच, आम्ही खूप लांब मार्ग आहेत.\nTransposh सर्व वेब चेंडू साइट हजारो द्वारे वापरले जात आहे, आणि आम्ही अनेक आनंदी वापरकर्ते आहेत (and a few less happy ones 🙂 ).\nही आवृत्ती, 0.9.2, आम्ही आता द्वारे असणे अपेक्षित काय खरंच नाही, चार वर्षांनी आम्ही अपेक्षा आहे की एक आवृत्ती एक (कदाचित दोन) आधीच प्रकाशीत केले गेले आहेत. पण वरवर पाहता, आपण ते करायचे म्हणून आयुष्य क्वचितच पुढे जाऊ नाही.\nया पोस्टचे शीर्षक प्रत्यक्षात आमच्या पार्सर एक नवीन वर्तन संदर्भित, आम्ही एक आढळतात करण्यासाठी वापरले तेव्हा  ; (एक नॉन ब्रेकिंग जागा व्हावे याकरीता) आम्ही खरोखर दोन मध्ये वाक्यांश तोडले, जे ऐवजी गोष्टी केले पाहिजे काय नेमका उलट आहे. त्यामुळे या आशेने आता निर्धारण झाले आहे, आणि आम्ही यापुढे खंडित करू\nWoocommerce एकात्मता मुलभूत आधार\nइतर प्लगइन किंवा थीम process_page अकाली सट म्हणतात होऊ तेव्हा केस अधिलिखित\nसमान अनुवाद पेक्षा जास्त एकदा एक परिच्छेद मध्ये दिसू लागले तेव्हा एक ओंगळ बग निर्धारीत करा\nबिंग दोन भाषा जोडले आहे\nTranslate_on_publish अक्षम होते पोस्टवर dserber disallowing भाषा निवड करून अहवाल बग निर्धारीत करा\n. पीओ फायली अद्यतन, द्वारे तुर्की अनुवाद Ömer Faruk खान\nआपण या आवृत्तीवर मिळतील या आदेशावर आहे\nअंतर्गत दाखल: सामान्य संदेश, प्रकाशन घोषणा, सॉफ्टवेअर सुधारणा सह टॅग केले: Bing (MSN) दुभाष्या, वाढदिवस, किरकोळ, पार्सर, सोडा\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 26, 2013 वेग 2:26 PM\nतर हे आहे  ; डिसमिस करणे मानलेला नवीनतम सुधारणा असल्याने, मी समोर ओवरनंतर वर अनुवाद पर्याय भाग म्हणून पहात आहे, का\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 27, 2013 वेग 12:13 वर\nआपण साइट समोर बाजू मध्ये पाहू नये, आपण पाहिल्यास हे आम्हाला थेट संपर्क साधा, आणि आम्ही काय हे कारणीभूत दिसेल.\nख्रिस्ती लोकांचा एक मोठा साधू म्हणतो,\nमे महिना 31, 2013 वेग 9:20 वर\nमाझ्यासाठी, ही आवृत्ती अतिशय प्रयोक्त्यासाठी सोपे आहे, मी अन्य कोणत्याही बदलू शकत नाही.\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\nत्रुटी आढळली आहे, जे कदाचित फीड खाली आहे याचा अर्थ. पुन्हा प्रयत्न करा.\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\nश्रीमंत वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\nऑफर वर आवृत्ती 0.9.9.2 – नाही Git\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/438/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE__%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9", "date_download": "2018-04-23T11:32:46Z", "digest": "sha1:VF5PBBAVNSZB5J5YIGBRCTFZVMFJEL5V", "length": 8761, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या भावना समजणारा एकही नेता नाही - धनंजय मुंडे\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा वाघ आता सशासारखा झाला आहे, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी सेनेला लगावला.\nमुंडे यांनी जातेगाव, उमापूर आणि मादळमोही येथे आज जाहिर सभा घेतल्या. यावेळी तालुक्यातील हजारो मतदार उपस्थित होते. सतत चार वर्ष दुष्काळामुळे जनता हवालदिल झाली होती, त्यातच नोटाबंदीमुळे सरकारने सर्वसामान्यांना कॅशलेस करण्याचे पाप केले. आ. अमरसिंह पंडित अभ्यासू आणि लढवय्या आमदार आहेत, शेतकर्यांनच्या प्रश्नां वर त्यांनी सरकारला धारेवर धरले. दुष्काळात तुम्हाला पाणी देणार्यात आ.अमरसिंह पंडित यांच्या पाठिशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहून गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.\nआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल- सुनील तट ...\nआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर , डॉ. भारतभुषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा, शेख शफिक, नारायण शिंदे उपस्थित होते.पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश ह ...\nशिवसेनेचे धोरण दुटप्पी - धनंजय मुंडे ...\nअधिवेशनाच्या सुरूवातीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, तोपर्यंत अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. याचा निषेध करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेचा वाघ आज अचानक शांत कसा झाला असा प्रश्न मुंडेंनी केला. शिवसेनेचे धोरण दुटप्पी असून सत्तेत राहायचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राजकारण करायचे धोरण शिवसेनेने अवलंबले असल्याची टीका त्यांनी केली. उत्पादन या वर्षी तिप्पट झाले आहे, मात्र शेतीमाल ...\nकोपर्डी प्रकरणातील आरोपींना ६ महिन्यांच्या आत मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या - अजित पवार ...\nकोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयासमोर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी राज्यात अनेक प्रकरणे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही बाब लक्षात घेता कोपर्डी प्रकरणाचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ६ महिन्यांच्या आत निकाल लागावा, यासाठी नवीन कायदा करावा लागला तरी सरकारने तो करावा. यासाठी आवश्यकता असल्यास केंद्र सरकारची मदत घ्यावी. आरोप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:36:48Z", "digest": "sha1:6AUXR4PCLA4IWVJ5PVEFYQLHXA6VC6ZY", "length": 4416, "nlines": 117, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: लिमका २०१०", "raw_content": "\nलिमकाची प्रत्येक जाहीरात वेधक असते..\nही अशीच एक सुंदर जाहीरात.\nलिमकाची या आधीची जाहीरात सुद्धा अशीच सुंदर होती....\nमला खूप आवडते....हृषिता भट्ट\nलाईम ऍन्ड लेमनी लिम्का....\n(तू काय उत्तर देणार हा विचार करतोय...;) )\nकाय बोलू... हृषीता भट मलाही बरी वाटते.. त्यामुळे ... लाईम ऍन्ड लेमनी लिम्का... चीअर्स... ;-)\nखरच मलाही हि जाहिरात आवडते अगदि पहिल्यांदा पाहिली तेव्हापासुन...\nहोय देवेन, चित्रिकरण, कल्पना, बॅकग्राऊंड स्कोअर वगैरे सगळंच जुळून आलंय...\nआणि हृषिता भट्टसुद्धा कधी नव्हे ती चांगली दिसली आहे यात.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=385&Itemid=576&limitstart=6", "date_download": "2018-04-23T11:40:31Z", "digest": "sha1:X2SG32B54UUZD3K2UMZ6TYZRQZ2RBMRF", "length": 4051, "nlines": 53, "source_domain": "saneguruji.net", "title": "तीन मुले", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n‘आम्हांस शिकवीत जा.’ मधुरी म्हणाली.\n‘मी कितीतरी पुस्तके वाचतो.’ बुधा म्हणाला.\n‘मला नाही आवडत पुस्तके.’ मंगा म्हणाला.\n‘तुझे माझ्याविरुध्द असावयाचेच.’ बुधा म्हणाला.\n‘पुरे रे भांडण. आता खेळू.’ ती म्हणाली.\n‘आम्ही दोघे पळतो. तू धर.’ मंगा म्हणाला.\n‘पण एक वाटोळी रेघ काढ. तिच्या बाहेर जायचे नाही.’ ती म्हणाली.\nमंगाने रेघ काढली. भरती येऊन केव्हाच गेली होती. वाळू घट्ट बसली होती. खेळायची मजा होती. मधुरी त्यांना धरु लागली. मंगा खूप पळे. बुधा पटकन् सापडला.\n‘बुधा, तू मुद्दाम पळाला नाहीस. हा का खेळ’ मधुरीला आज आपण दमवले असते. मंगा म्हणाला.\n‘मला फार पळवत नाही, मी दमतो. मुद्दाम नाही काही मी सापडलो.’ बुधा म्हणाला.\n‘बरे, आता मला धर.’ मंगा म्हणाला.\nमंगाच्या पाठीस बुधा लागला. परंतु मंगा सापडेना. शेवटी बुधाने मधुरीला धरले. मंगा संतापला.\n‘तुम्ही दोघे एकमेकांना धरता. मला कोणीच पकडीत नाही.’ तो म्हणाला.\n‘तू आम्हांला सापडत नाहीस.’ बुधा म्हणाला.\n‘आम्ही आता दोघे तुला पकडतो. दोघे तुला धरतो.’ मधुरी म्हणाली.\n‘चल तर.’ मंगा म्हणाला.\nपुन्हा खेळ सुरु झाला. मंगा त्या दोघांना चुकवीत होता. शेवटी सापडला. एकदम त्या दोघांनी धरले.\n‘तुम्ही दोघांनी मला मारलेत. नाहीतर मी मेलो नसतो.’ मंगा म्हणाला.\n‘मला भूक लागली आहे.’ मधुरी म्हणाली.\n‘मी आजीबाईकडून आणू का काही खायला\n‘आपण सारीच तिच्याकडे जाऊ.’ मधुरी म्हणाली.\n‘मी नाही येणार. तेथे का खायचे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=411&Itemid=602", "date_download": "2018-04-23T11:50:59Z", "digest": "sha1:LINF6QQFWD6YLLHNDIWKOTGI5BVGGZIB", "length": 2544, "nlines": 30, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रवेश बारावा", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nबा. शि. - आतां लक्ष्मीधरपंतांकडे जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. कारण नारायणाची प्रकृति जास्तच बिघडत आहे. लक्ष्मीधरपंतांकडे जाण्यास मन मात्र जरा कचरतें. त्यांनीं जरी माझा पूर्वी अपमान केला असला, तरी त्यांच्याकडे जाणं हें माझं कर्तव्यच आहे. मानापमान कांहीं वेळ बाजूस ठेवून, वैयत्किक भांडणें दूर करून सत्संमत व सदसद्विवेकबुध्दीस आवडणा-या गोष्टी करण्यास सदैव सज्ज असणं, हें तर या बालवीर चळवळीचं आध्यात्मिक रूप आहे. लक्ष्मीधरपंत तरी मनुष्यच आहेत. त्यांच्या ह्रदयांतील कोमल भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाहींत. सात्विक आशा मात्र ठेवावी. चला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/cultural/nine-colors-of-navratri", "date_download": "2018-04-23T11:27:33Z", "digest": "sha1:PZ6TSMI2A5O6NTDADB6WY6HMKGSSO5JW", "length": 8860, "nlines": 132, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "नवरात्रीचे नऊ रंग | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome सांस्कृतिक नवरात्रीचे नऊ रंग\nएक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.\nदुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.\nतिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा\nचौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.\nपाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.\nसहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.\nसातवा रंग स्त्री ही फक्त “मादी” नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली “माणूस” आहे हे लक्षात घ्यायचा.\nआठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.\nनववा रंग “स्त्री पुरुष समानता” हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.\nजगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मीj आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस “विजयादशमी” असेल. सोने लुटावे लागणार नाही….\nजान्हवी कापसे यांच्या व्हाट्सअप समुहातून साभार\nपुरस्कार परतीचे साहित्यिकी राजकारण \nकालमापन आणि दशमानपद्धत भारताने जगाला दिली – पू. संभाजीराव भिडेगुरुजी\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/413/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_-_%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE_", "date_download": "2018-04-23T11:27:08Z", "digest": "sha1:S5ZKW5GX3W6DFKQL4BFE7UISVUTIAOOT", "length": 11868, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले - शंकरअण्णा धोंडगे\nशेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा न्यायालयीन लढा\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी जनहीत याचिका अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून या अभियानांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद खंडपीठात ५ लाख तर नागपूर खंडपीठात ४ लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. कामगार, ग्राहक, कर्मचारी, उद्योजक वर्गाला न्यायाधिकरणामार्फत न्याय मागण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही न्यायधिकरणाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी शंकरअण्णा धोंडगे यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळोवेळी केली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याने शंकरअण्णा धोंडगे यांनी याबाबतही पीआयएल दाखल केली आहे.\nआधी दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टी,गारपिटीमुळे मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यातील शेतकरी होरपळून निघाला होता. अडचणीत सापडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. निवडणुकांच्या काळात भाजप-शिवसेनेने शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली होती. 'अच्छे दिन' आणण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र सत्तेत आल्यापासून एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. गेली अडीच वर्ष सरकारतर्फे फक्त जाहिरातबाजी सुरू आहे. त्यात केंद्र सरकारने देशात नोटाबंदी आणून देशातील शेतकऱ्यांना आणखी अडचणीत टाकले आहे. अनेक शेतमजुरांना रोजगाराला मुकावे लागले आहे. शेतकऱ्यांनी मेहनत करून जमवलेला पैसा एका झटक्यात चलनातून बाद झाला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून शेतकरी, शेतमजूर वर्गामध्ये प्रचंड अस्वथता पसरली आहे, अशी खंत माजी आमदार धोंडगे यांनी व्यक्त केली.\nशेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. शंकरअण्णा धोंडगे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून न्यायलयीन लढाही दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी तसेच पुढील वर्षासाठीही कर्ज देण्यात यावे, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले तसेच मनरेगा अंतर्गत दुष्काळी भागातील मजुरांना काम देण्यात यावे असेही हायकोर्टाने सरकारला सुचवले. मात्र सरकारने अद्यापही त्याबाबत हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे संविधानिक पद्धतीने हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी धोंडगे यांच्यातर्फे या जनहीत याचिका अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.\nशेतकरी कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमकपणे लढा देणार - संग्राम को ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शेतकरी कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले. प्रदेशाध्यक्ष संग्रामदादा कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष राहुल तायडे, कार्याध्यक्ष मयूर सोनवणे, जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, जालना जिल्हाध्यक्ष गजू लोखंडे, विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे, दत्ता भांगे, राहुल पाटी ...\nसरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप ...\nविधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. ...\nसरकारने ग्राहकांबरोबरच दूध उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करावा : आ. जितेंद्र आव्हाड ...\nआज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी सभागृहात तोडगा काढण्याची मागणी केली. सहकारी दूध संघांना हा दर परवडत नाही. सरकारने ग्राहकांचा विचार करतानाच उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. ग्रामीण - शहरी असा संघर्ष उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करून सरकार दुधाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. निदान दुधात तरी सरकारने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/ajit-pawar.html", "date_download": "2018-04-23T11:39:02Z", "digest": "sha1:RKF2TKK3KMARB3SPAVWH6BIXA3V7W4DD", "length": 6276, "nlines": 71, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nमा. उपमुख्यमंत्री, श्री अजित अनंतराव पवार\nनाव : श्री. अजित अनंतराव पवार\nमतदार संघ : २०१ - बारामती, जिल्हा पुणे\nराजकीय पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष\nनाव : श्री. अजित अनंतराव पवार\nजन्म दिनांक : २२ जुलै १९५९\nजन्म ठिकाण : देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.\nवैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी सौ. सुनेत्रा.\nअपत्ये : २ मुले - कु. पार्थ व कु. जय\nज्ञात भाषा : मराठी, हिंदी आणि इंग्रजी\nशिक्षण : बी. कॉम.\nराजकीय पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष\nकायमचा पत्ता : 'सहयोग' बंगला, मु.पो.काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे\nशासकीय निवासस्थान : देवगिरी', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई ४००००६.\nकार्यालयीन पत्ता : उपमुख्यमंत्री कार्यालय, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२\n१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१\nनोव्हेंबर २००९ मध्ये फेरनिवड\nकृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा - २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२\nजलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३\nवित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर २०१० पासून\nपाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३\nग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वछता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) – दि. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४\nजलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वछता – दि.९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९\nजलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१०\nछत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा पुणे\nश्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे\nमालेगाव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे\nसोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे\nवसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे\nमहाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ, मुंबई\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई\nमहाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई\nमहाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ - १९ डिसेंबर २००५ पासून\nबेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वीत्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturel-success-story-marathi-idea-village-ballalwadi-junnar-pune-7124?tid=162", "date_download": "2018-04-23T11:47:20Z", "digest": "sha1:TI4EJGCLKKB4C26NCAOFLKGZ3XWFYNEH", "length": 24999, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturel success story in marathi, Idea Village Ballalwadi, Junnar, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले आदर्श गाव\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले आदर्श गाव\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले आदर्श गाव\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nपूर्वी ग्रामस्थांना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागत होते. आता गावात झालेल्या विकासकामांमुळे स्वयंरोजगारांची साधने तयार झाली आहेत. संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास झाला आहे. त्यामुळे गाव नावारूपाला आले आहे.\n-मनीषा प्रदीप डोंगरे, सरपंच, बल्लाळवाडी\nसर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच कायापालट होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील बल्लाळवाडीचे ग्रामस्थ, युवा शक्ती, सरकारी संस्था आदींनी एकत्र येऊन गावात विकासाची विविध कामे घडवली. गावातील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान या संस्थेने त्यात आपले भरीव योगदान दिले. बल्लाळवाडी हे आज आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.\nपुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले बल्लाळवाडी हे सुमारे २९०० लोकसंख्येचे छोटेसे गाव. पंधरा वर्षांपूर्वी पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा व अन्य सोयीसुविधांचा गावात अभाव होता. गावातील वीस टक्के बागायती; तर ८० टक्के कोरडवाहू शेती होती. त्यामुळे ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचे ठोस साधन नव्हते. गावातील तरुण मुंबई किंवा अन्य शहरांकडे धाव घ्यायचे. नोकरीच्या निमित्ताने ते स्थायिकही झाले आहेत. अर्थात गावात चैत्र महिन्यात ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानची यात्रा भरते. गावातील सर्व चाकरमानी त्या निमित्ताने एकत्र येतात.\nमुंबईत स्थायिक झालेल्या गावातील तरुणांना आपल्या गावाविषयी असलेली तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. आपण गावासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना सतत वाटे. त्यातूनच बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था त्यांच्या पुढाकारातून स्थापन झाली. सुरवातीला वर्गणी काढून तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवून निधी जमा केला. त्याचबरोबर स्वतःकडील रक्कमही संकलित केली.\nत्यातून मुंबई येथील घाटकोपर उपनगरात वास्तू उभारली. गावकडची जी मुले शिकून मुंबईला काम करण्यासाठी येतात किंवा ज्यांचे मुंबईत कुणी नातेवाईक नाही अशा तरुण मुलांना संस्थेने राहण्याचा आधार दिला. गावातही छोटे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी संस्थेलने पाऊल उचलले.\nआदर्श गाव योजनेसाठी निवड\nदरम्यान, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व अण्णा हजारे यांच्या\nमार्गदर्शनाखाली गावाची शासनाच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेत निवड झाली. योजना पूर्ण करण्यासाठी सेवाभावी संस्था म्हणून बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानची निवड झाली. त्यात अध्यक्ष म्हणून गोविंद डोंगरे, उपाध्यक्ष नवनाथ डोंगरे, सचिव हर्षल आहेर, खजिनदार खंडू डोंगरे,\nसहसेक्रेटरी अजित डोंगरे, संतोष डोंगरे, विक्रम गावडे यांचा समावेश आहे. संस्थेने गावात करावयाच्या पाणलोट व अन्य विकासकामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. तो मंजुरीसाठी शासनाला सादर केला.\nगावात राबविले विविध उपक्रम\nग्रामस्थ, युवा शक्ती, शासकीय संस्था अशा सर्वांनी यथाशक्ती आपापले योगदान देत श्रमदान केले. त्यातून विविध विकासकामांची पूर्तता झाली. त्यातून ग्रामस्थांच्या जीवनात परिवर्तन येऊ लागले आहे.\nगावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळावे यासाठी अभ्यास दौरे, मातीपरीक्षण\nबचत गटांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण\nजादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन\nतरुणांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण\nभूगर्भातील पाणीपातळी वाढवून पाणीटंचाई कमी होण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून\nचार ओढ्यांवर चार सिंमेट बंधारे बांधले. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे ओढ्यालगतच्या विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.\nआरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मधुमेह, हिमोग्लोबिन, हृदयरोग, डोळेतपासणी\nकाही आजार आढळल्यास पुढील उपचारांसाठी संस्थेचा पुढाकार\nबैठका, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक सभागृह. सुमारे ५२ लाख रुपये रकमेत नऊ लाख रुपयांचे योगदान आदर्श गाव योजनेतून व उर्वरित रक्कम लोकसभागातून खर्च करण्यात आली. यात ग्रामविकास मंडळाने मोठ्या प्रमाणात मदत केली.\nपावसाळ्यात ग्रामस्थांना चिखल तुडवत कामांसाठी जावे लागे. हा त्रास कमी करण्यासाठी गावठाणाअंतर्गत गल्ल्यांमधून पेव्हर ब्लाॅक्सचे काम करण्यात आले. या कामांसाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.\nगावातील महिलांना कपडे धुण्यासाठी येत असलेल्या अडचणी आणि पाण्याचा होणारा अतिवापर कमी करण्याच्या उद्देशाने गावातील सार्वजनिक विहिरीवर धोबीघाट बांधण्यात आला. त्यात टाकी व दहा नळांचा समावेश आहे. या कामासाठी जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च आला.\nसंस्थेच्या सहकार्याने बालबाडी, शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप, शाळेत ई-लर्निंग सुविधा\nग्रामपंचायत कक्षेतील ५४ हेक्टर गायरान जमिनीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सलग समतल चर\nपुढील काळात हाती घेतली जाणारी कामे\nगावातच रोजगाराच्या आणि आवश्यक सुविधांच्या संधी निर्माण करणे. जेणेकरून चरितार्थासाठी गावातील लोकांना शहरात जावे लागू नये.\nतरुणांना सामूहिक व किफायतशीर सेंद्रिय शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व रोजगार उपलब्धता\nनवे तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे यांच्या मदतीने शेती\nमातीपरीक्षण, गावात हवामान केंद्र, माहिती केंद्र उभारणे.\nगावातील सहकारी सोसायटीच्या माध्यमातून माफक दारात खते व कीडनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न\nसामूहिक शेतजमीन मोजणीसाठी प्रयत्न\nलग्नासारख्या समारंभातील खर्चात कपात करण्यासाठी ग्रामस्थांचे मन वळवणे. त्यातील काही निधी गावातील सामाजिक कामांसाठी देण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता तयार करणे.\nशासकीय आरोग्य उपकेंद्रासाठी शासकीय पाठपुराठा\nसंपर्क- हर्षल आहेर ः ९८२१६९८९४८\nबल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान, बल्लाळवाडी,\nविकास पुणे शेती बागायत कोरडवाहू मुंबई पुढाकार initiatives उपक्रम पाणी पाणीटंचाई health ग्रामविकास rural development ग्रामपंचायत हवामान शेतजमीन agriculture land\nगावात चार सिमेंट बंधारे बांधले अाहेत. भूजल पाणीपातळीत आता वाढ झाली आहे.\nमहिलांसाठी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे\nपाणीपातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा घेतला आहे.\nपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nसामूहिक शक्तीमुळेच बल्लाळवाडी झाले...सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच...\nशिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालनाआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि...\nसौरऊर्जेद्वारे चार हजार गावांना शाश्वत...ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना...\nदुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून...दुग्धव्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे...\nयांत्रिकीकरणाच्या माध्यमातून...कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या कवठेगावाने शेती,...\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार...शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे,...\nलोकसहभागातून दिली ग्रामविकासाला दिशाऔरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज...\nडोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...\nग्रामपंचायतींमध्ये येणार ई-ग्रामसॉफ्ट...जिल्हाभरातील १,१५१ ग्रामपंचायतींमध्ये पुढचा...\nनिर्धार, इच्छाशक्ती, एकीतून निढळने...एकेकाळी दुष्काळ पाचवीला पुजलेले गाव अशी निढळची (...\nमहिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...\nगावातील ‘स्टार्टअप’ना आंतरराष्ट्रीय...राज्यातील गाव-जिल्हा पातळीवरील स्टार्टअपना आता...\n२०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी...\nगाव बदललेल्या सरपंचांनी दिला नियोजनाचा...आळंदी, जि. पुणे : आपल्या कामाचे नियोजन करा, ते...\nजमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष द्यावे आळंदी (जि. पुणे): गेल्या काही वर्षांत जमिनीच्या...\nनव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....\nग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले...आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद...\nशेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार...आळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात...\nसरपंच हाच शासन-जनतेमधील दुवा :...आळंदी, पुणे : “ग्रामविकासासाठी केंद्र व राज्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/maharashtrian-recipes/page/4/", "date_download": "2018-04-23T11:41:49Z", "digest": "sha1:ICS2QGQ453YVEW4TGDATY4VCFMPF3DDE", "length": 8057, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "महाराष्ट्रीयन पदार्थ | Maharashtrian recipes - Page 4", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » महाराष्ट्रीयन पदार्थ » पान ४\nउकडीचे मोदक प्रकार १, छायाचित्र: हर्षद खंदारे\nमहाराष्ट्रीयन पदार्थ - [Maharashtrian recipes] मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाच्या विविध पाककृती [Various types of Maharashtrian recipes].\nप्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.\nदुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.\nभाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.\nसण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागते.\nसण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी (Puranpoli) दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/snacks-recipes/page/8/", "date_download": "2018-04-23T11:39:13Z", "digest": "sha1:AHVZFNCHJDRB3NTNJRQC6NZDYQUTZWGN", "length": 8232, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मधल्या वेळचे पदार्थ | Snacks recipes - Page 8", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » मधल्या वेळचे पदार्थ » पान ८\nमधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.\nसर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे हिरवे कबाब मधल्या वेळेत किंवा जेवताना स्टार्टर म्हणून देता येतील.\nटोमॅटो, काकडी सोबतच स्वीट कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे व त्यावर चाट मसाला टाकून नविन प्रकारचा व्हेज ब्रेड मधल्या वेळेत किंवा न्याहारीला तसेच लहान मुलांना डब्यात देता येईल.\nमुंबईच्या रस्त्यापासुन ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कॄतीचा एक अविभाज्य भाग असणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ बटाटा वडा न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो.\nदक्षिण भारताचा प्रसिद्ध मेदुवडा आज सर्वत्र बनवला जातो आणि त्यासोबत खाल्ले जाणारे सांभर आणि चटणी म्हणजे तोंडाला पाणी येते.\nदक्षिण भारताचा प्रसिद्ध मसाला डोसा ज्यामध्ये कार्बोहायड्रेड्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात आणि हा सांभर आणि चटणीसोबत खुप चविष्ट लागतो.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/09/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:27:20Z", "digest": "sha1:IPSXCABZ3E5SM454SPTXFHBGIAEA3DJQ", "length": 2769, "nlines": 81, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: 'खैराताबादचा' गणपती", "raw_content": "\nसुप्रसिद्ध 'खैराताबादचा' गणपती. दिनांक ऑगस्ट २७, २००९. मी आणि माझा मित्र 'शिवशंकर' पाहायला गेलो होतो.\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरेल्वे, आणि जवळचा तलाव\nयादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/68-20275/", "date_download": "2018-04-23T11:16:46Z", "digest": "sha1:WLTDM5PXLKV3VLH53CKWBPNHWODGJ44J", "length": 3425, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर..", "raw_content": "\nAuthor Topic: स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर.. (Read 513 times)\nलेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..\n68 वर्षात किती बदलल्या व्यथा\nकाय ठरवायचं तुम्ही आम्ही आता\nपारतंत्र्याच दृष्ट चक्र झटकून टाकलं होतं\nआज 68 वर्षानंतर त्याच महत्त्व कुठं दिसतं\nसरकारी कचेरीत, गांधीच्या फोटोखाली\nस्वातंत्र्य कधीच जळलेलं असतं...\nसारे भारतीय माझे बांधव आहेत.\nप्रतिज्ञेत म्हणताना छान वाटते\nसत्ता वापरून गरीबांना चिरडून\nत्यांचे आयुष्य उध्वस्त करताना,\nस्वातंत्र्य कधीच जळालेलं असतं...\n68 वर्षानंतर आज आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2016/08/blog-post_9.html", "date_download": "2018-04-23T11:42:00Z", "digest": "sha1:SWCAVKOUCB6DGFX7JTMOUJQSE7OLJD3P", "length": 11489, "nlines": 163, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): करवंदांचे सार", "raw_content": "\nलागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे\n१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास सार पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)\n२. फोडणीचे साहित्य (जिर्‍याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)\n४. तिखट-मीठ-गूळ (आवडीनुसार व चवीनुसार)\n१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्रीला साधारण वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी पिकलेल्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.\n२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.\n३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा.\n४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)\n५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.\n६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)\n७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.\n८. करवंदांचे सार रेडी\nविसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ले त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.\nअवांतरः मी केलेले सार चवीलाही उत्तम झाले होते. (आंबटगोड, मध्यम घट्ट)\nस्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.\nदोन वर्षांपूर्वी कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला होता. त्यावेळी दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे जेवणात हे सार होते. या पदार्थाला तिकडे 'करवंदांची कढी' म्हणतात. पण या कृतीमध्ये बेसन पीठ वापरले नसल्यामुळे 'सार' म्हटले आहे. शेवटी नावात काय आहे, असा विचार करायचा आणि सार/कढी जे म्हणू त्याचा - आस्वाद घ्यायचा\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://ratnagiripolice.gov.in/frmGallery.aspx", "date_download": "2018-04-23T11:48:49Z", "digest": "sha1:4AVTZT7TDTGL4X7SALWSZKNGAVZ62JQV", "length": 8394, "nlines": 70, "source_domain": "ratnagiripolice.gov.in", "title": "Home", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसाचे वतीने दिनांक 21/06/2016 रोजी योगदिन साजरा करण्यात आला. …\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे नागरीकांसाठी ऑनलाईन सेवा केंद्राचे(KIOSK सेंटर) उद्रघाटन सोहळा दिनांक 18-10-2017 रोजी सकाळी 11.00 वा. श्री.सुभाष निळकंठ सावंत , माजी सैनिक यांचे शुभहस्ते संपन्न् झाला. उद़घाटन कार्यक्रमाकरिता श्री.प्रणय अशोक ,पोलीस अधीक्षक, श्री.मितेश घटटे, अपर पोलीस अधीक्षक, श्री.महादेव वावळे, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) ,श्री.मारुती जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा, श्री.गणेश इंगळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी, श्री.व्हनमाने ,उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, श्रीमती शीतल जानवे,उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळुण व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे करीता दि.05/02/2017 व 12/02/2017 या दिवशी पोलीस मुख्यालय येथे भारत पेट्रोलिअम लिमिटेड कंपनीच्या सहाय्याने वैदयकीय शिबीर आयोजीत करण्यात आले होतेृ सदर शिबीरात 100 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची डायबेटीज,हायपर टेंशन,किडनीचे व हदयाचे आजार अशा आजारांची तज्ञ डॉक्टरां मार्फत वैदयकीय तपासणी करण्यात आली. सदर तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीृ प्रणय अशोक तसेच वैदयकीय असोसिएशन चे पदाधिकारी डॉ. बेडेकर व तज्ञ डॉक्टर हजर होते. …\nवाहतुकीचे शिस्त्बध्द नियमनाने अपघात संख्या घटवली\nरत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखा यांच्या वतीने Speed Gun या यंत्राच्या साह्याने महामार्गावरील मोटर वाहनांचे गती तपासणी मोहीम घेण्यात आली. …\nमोटर वाहन कागदपत्र तपासणी मोहीम\nमोटर अपघातांना आळा घालण्यासाठी मोटर वाहनांची कागदपत्र तपासणी मोहीम घेऊन नागरिकामध्ये जनजागृती करण्यात आली.…\nरत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालय व कॉलेजमध्ये वाहतूक नियमाना संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.…\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित विविध कार्यक्रम\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 18-01-2017 रोजी मराठा हॉल रत्नागिरी येथे गुन्हयातील जप्त् मुददेमाल फिर्यादी यांना हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम श्री. प्रणय अशोक, पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांचे हस्ते पार पडला\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 18-01-2017 रोजी मराठा हॉल रत्नागिरी येथे गुन्हयातील जप्त् मुददेमाल फिर्यादी यांना हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम श्री. प्रणय अशोक, पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांचे हस्ते पार पडला …\nमुलतत्ववाद निर्मुलन संदर्भात निबंध व वकृत्व् स्पर्धां\nमुलतत्ववाद निर्मुलन संदर्भात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 07/01/2017 रोजी घेण्यात आलेल्या निबंध व वकृत्व् स्पर्धांमधील विजेत्यांना दिनांक 18/01/2017 रोजी श्री. प्रणय अशोक, पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले…\nगणराया अॅवार्ड वितरण समारंभ\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सन 2016 सालातील गणराया अॅवार्ड वितरण समारंभ दि. 18/01/2017 रोजी मराठा हॉल रत्नागिरी येथे, श्री. प्रणय अशोक, पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे हस्ते पार पडला…\nसायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम\nरत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सायबर गुन्हे रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हयातील नागरीकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांची सायबरगुन्हे संदर्भात जनजागृती केली.…\n“ लोकाभिमुख पारदर्शक कार्यसंस्कृती निमार्ण करणे ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/sweet-recipes/page/8/", "date_download": "2018-04-23T11:39:30Z", "digest": "sha1:V3D6FH4ANY7OYBN4CIEG223LXPUSP3N2", "length": 7198, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गोड पदार्थ | Sweet recipes - Page 8", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » गोड पदार्थ » पान ८\nगोड पदार्थ - [Sweet recipes] गोड पदार्थांच्या विविध पाककृती.\nझटपट घरच्या घरी करता येणारे ‘रव्याचे लाडू’ सणासुदीला गोड पदार्थ म्हणून केले जातात.\n‘क’ जीवनसत्त्व असलेल्या ‘संत्र्याची बर्फी’ गोड पदार्थ म्हणून सणासुदीला करु शकता.\nपचायला हलकी आणि मऊसर अशी ही ‘साबुदाण्याची लापशी’ न्याहारी म्हणुन उत्तम पर्याय आहे.\nअत्यंत चविष्ट, खमंग आणि पौष्टीक अशी ‘आरारूटची लापशी’ लहान मुलांपासुन ते वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे खास करून पित्ताचा त्रास होत असल्यास हा पदार्थ नक्कीच फायद्याचा ठरेल.\nथंडीच्या दिवसात गाजर फार छान मिळतात. तर मग चला आज आपण गाजर हलवा करुयात.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/aditya-thackeray-initiatives-lead-to-barcelona-v-juventus-legends-match-in-mumbai", "date_download": "2018-04-23T11:09:30Z", "digest": "sha1:IYQ4L2OAEOGC4IDY3TNR2DUKUA5TPQYH", "length": 9840, "nlines": 125, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Aditya Thackeray initiatives lead to Barcelona v Juventus legends match in Mumbai | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome क्रीडा आदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\nमुंबई: भारतात फुटबॉलचा प्रसार मागील काही वर्षांपासून चांगलाच होत चाललं आहे. इंडियन सुपर लीगच्या माध्यमातून फुटबॉल घरोघरी पोचला आणि मागील वर्षी झालेल्या अंडर-१७ विश्वचषकाने भारतीय फुटबॉलमध्ये वेगळेच विश्व निर्माण केले. यात आता भर म्हणजे येत्या २७ तारखेला नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणारी बार्सिलोना वि. ज्युवेंट्स यांच्यातील होणार लिजंड्स सामना. भारतात फूटबॉलचा प्रसार अधिकाधिक व्हावा यासाठी मुंबई फूटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nभारतामध्ये फुटबॉलचे क्रेझ खूपच आहे. भारतीय फुटबॉल प्रेमी रात्र-रात्र जागत युरोपियन, स्पॅनिश लीगचा आनंद घेतात. तसेच तेथील खेळाडूंना अक्षरशः देव मानतात. हीच बाब लक्षात घेत फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी भारतात हा सामना खेळण्याची संकल्पना आखली आणि आता ती प्रत्यक्षात उतरवली.\nहि मंडळी येणार भारतात\nदोन्ही संघांत फार मोठी-मोठी नावं आहेत. फिफा विश्वचषकात खेळलेले अनेक दिग्गजही दिसणार आहेत. यात बार्सिलोना संघातील डेव्हिड ट्रेझग्युट, एडगर डेव्हिड, पाओलो मोण्टेरो, मार्क लुलिआनो, फॅब्रिझिओ रावानेली यासारखे अनेक स्टार खेळणार आहेत. तसेच ज्युवेंट्समधून युआन कार्लोस रॉड्गेज, जुलिओ सालिनास, जोस एडमिलसनसह अनेक दिग्गज मुंबानगरीत येतील.\nविशेष म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान व सर्वांचा लाडका असलेल्या लियो मेस्सीने आपली सही असलेली जर्सी आदित्य ठाकरे यांना या सामन्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून गिफ्ट दिली.\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dahanu-engineer-doctor.blogspot.com/2013/11/req-by-ram-urade.html", "date_download": "2018-04-23T11:47:52Z", "digest": "sha1:GX3YL7ULMQA7RKJ2LNVRXOVUJSONLQB3", "length": 1626, "nlines": 31, "source_domain": "dahanu-engineer-doctor.blogspot.com", "title": "Dahanu Engineers & Doctors: Req by Ram Urade", "raw_content": "\nयूवा आदिवासी मित्रमंडळ वेवजी यांनी २८ डिसेँबर या दिवसी वार्षीक बक्षीष समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरविले आहे या निमित्ताने आपन आम्हाला काही डोनर मिळवू द्याल काय आमचे मंडळ एक संस्था म्हणून नोँदनी झालेला आहे रजिस्ट्रेसन नंबर आहे महाराष्ट्र .१८२० आमचे मंडळ एक संस्था म्हणून नोँदनी झालेला आहे रजिस्ट्रेसन नंबर आहे महाराष्ट्र .१८२० १३ ठाणे असे आहे जर कोणी मदत देणार असेल तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ncps-attack-rally-parbhani-farmer-issue-3400", "date_download": "2018-04-23T11:49:52Z", "digest": "sha1:WZTCRZMUDTYN6I4CVEPSYICKB43ASK7W", "length": 13917, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, NCP's attack rally in Parbhani for farmer issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा\nपरभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nपरभणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे मानवत आणि सोनपेठ (जि.परभणी) येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता.२७) हल्लाबोल मोर्चे काढण्यात आले.\nमानवत तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात तालुकाअध्यक्ष परमेश्वर शिंदे, संतोष लाडाने, कलिम अन्सारी, गंगाधर पितळे, पंकज आंबेगांवंकर आदीसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nपरभणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे मानवत आणि सोनपेठ (जि.परभणी) येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता.२७) हल्लाबोल मोर्चे काढण्यात आले.\nमानवत तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात तालुकाअध्यक्ष परमेश्वर शिंदे, संतोष लाडाने, कलिम अन्सारी, गंगाधर पितळे, पंकज आंबेगांवंकर आदीसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nसोनपेठ येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार व्यकंटराव कदम, तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, कांतराव यादव,मारोती सपकाळ, भुजंगराव हुंबे,मदन विटेकर, कांतराव यादव, श्रीकांत विटेकर, राम बेदरे, गणेश जोगदंड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार जीवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/11/blog-post.html", "date_download": "2018-04-23T11:29:35Z", "digest": "sha1:G26H3RR5Q546LPB5X5STBSGD355APUB7", "length": 3489, "nlines": 95, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: बिंगो! रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात", "raw_content": "\n रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात\nकल्पकतेला सलाम, दिग्दर्शकाचे कौतुक.\nहरेक्रिश्नाजी, भाग्यश्रीजी प्रतीक्रीयेकारिता आभार...\nबिंगो मी अजुन टेस्ट नाही करुन पाहीला, पण मला वाटले होते चांगलं असेल...असो\nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\n रेड चिली बिजली --- अत्यंत सुंदर जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/429/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2,_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8.._%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2_%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D", "date_download": "2018-04-23T11:33:45Z", "digest": "sha1:4KC7TCWEJDUHEKXQRN67XVJXYYW3NASF", "length": 11932, "nlines": 53, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहवा बदल, हवाय विकास.. मुंबईत विकासात्मक बदल घडविण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार\nबस्स झाले आता... हवा बदल, हवाय विकास ही प्रत्येक मुंबईकराची भावना ओळखत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईकरांच्या मूलभूत तसेच शहराच्या विकासात्मक गरजांचा विचार करून पक्षातर्फे जाहीरनामा बनवण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईकरांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत जाहीरनाम्यात भर देण्यात आला असून प्रत्येक मुंबईकराशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी आहे आणि ती निभावण्यात येणार आहे, असा निर्धार सचिन अहिर यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच मुंबईचा विकास करू शकते त्यामुळे आपले बहुमुल्य मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुधाकर वड्डे, मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुबारक खान, माजी आमदार अशोक धात्रक, माजी नगरसेवक रवींद्र पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nजाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे :\nप्रत्येक कुटुंबाला ७०० लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी मोफत देण्यात येणार.\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची क्षमता वाढवण्यात येणार.\nबेस्ट विद्युत ग्राहकाला १०० मीटर युनिट्स मोफत करण्याबाबत योजना.\nबेस्ट बसेसचे किमान भाडे ५ रुपये तर जास्त भाडे २० रुपये करण्याचा प्रयत्न केला जाणार\nमुंबई शहर व पूर्व-पश्चिम उपनगरांतील मुख्य रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करणार, नवीन पार्किंग पॉलिसी बनवणार, भविष्यात मुंबईच्या रसत्यांवर खड्डे दिसणार नाहीत.\nनिरामय आरोग्य योजनेअंतर्गत वर्षाला १०१ रुपये भरून शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोग्य सेवा योजना दिली जाणार.\nमुंबईकरांचा आरोग्यविमा उतरवून त्याचे प्रिमियम मनपा आपल्या तिजोरीतून भरेल.\nमुंबईतील डंपिंग ग्राऊंडना चारही बाजूने कुंपण घालून सीसीटीव्ही कॅमऱ्याद्वारे २४ तास देखरेख करणार.\nएसएमएस, व्हॉट्अपद्वारे 'कचरा हटाव मोहीम' योजना राबवणार.\nझोपडपट्टीवासियांना सोयी-सुविधा दिल्या जाणार, झोपडपट्टीवासियांचे जीवन सुखकर करणार.\nमहानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून व्यवसाय शिक्षण व तंत्रशिक्षणयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणार.\nमुंबईभर प्रत्येक वॉर्डात मोफत वाय-फायची सुविधा देणार, आपत्कालीन व्यवस्थेसाठी वॉर्डनिहाय २४ तास फ्री कॉल सेंटर्स उभारणार.\nमहिला बचत गट आणि सहकारी संस्थांच्या सहकार्याने मोबाईल व्हेंडर्स मार्फत घरगुती व महिलांच्या उपयोगी वस्तुंची वितरण साखळी निर्माण करणार.\nबचत गटांसाठी निधी व जागा उपलब्ध करुन देणार.\nसमुद्र किनाऱ्याजवळील स्थानिक भूमीपूत्रांची लाईफ गार्ड म्हणून नियुक्ती करणार.\nमुंबई म.न.पा नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची घेतली भेट ...\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ९ उमेदवार निवडणुकीत जिंकून आले, या ९ पैकी ८ महिला उमेदवार असून या विजयी नगरसेविकांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, माजी खा. संजय दिना पाटील उपस्थित होते.सध्या मुंबईचा महापौर कोण होणार या विषयावर चर ...\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील ...\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. र ...\nसरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यां ...\nयवतमाळ मधील करंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. चाय पे चर्चा आणि त्यासारख्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने अनेक प्रकारची आश्वासने जनतेला दिली होती, यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमात आमचे सरकार आल्यास शेतमालाला भाव देऊ, असे आश्वासन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थट्टा आहे, अशी घणाघाती टीका पाटील यांनी यावेळी केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7150779", "date_download": "2018-04-23T11:49:32Z", "digest": "sha1:AAYVL6IDZCW7BS4PNUL7KXVUNMKTVLXE", "length": 4604, "nlines": 54, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "गगनचुंबी इमारतीच्या खांबाचे 7 मार्ग | Ep. # 92", "raw_content": "\nगगनचुंबी इमारतीच्या खांबाचे 7 मार्ग | Ep. # 92\nएपिसोड # 92 नील आणि एरिकमध्ये स्कायक्रॅपर तंत्राची 7 भागांची यादी. या तंत्राचा वापर semalt वर आपल्या वेबसाइटच्या सामग्रीच्या रँपमध्ये मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि हे जाणून घ्या की कोणत्या प्रकारच्या सामग्रीस सर्वात वाचक मिळतात\n00:26 - आजचा विषय: 7 मार्गांनी स्कायस्क्रेप तंत्र कसे मिळवावे\n00:35 - गगनचुंबी रचना तंत्राने बनलिनको द्वारा उच्चारित करण्यात आला\n00:43 प्रथम परिणामापेक्षा 10x ची सामग्री तयार करण्याचा प्रयत्न करा\n01:08 - नंबर 1: अधिक उन्नत असलेली सामग्री जोडा\n02:38 - संख्या 2: अनन्य डेटा मिळवा\n03:12 - क्रमांक 3: आपली सामग्री खरोखर सोपे करा\n05:01 - नंबर 4: पदोन्नती\n06:23 - नंबर 5: आपल्या मथळाचा उपयोग करा\n06:38 - Google \"ब्लॉगर हेडला फॉर्मूला कॉपी करा\"\n07:05 - चांगली मथळा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा\n07:41 - क्रमांक 6: सामग्री सुधारणा वापर करा\n08:30 - नंबर 7: दीर्घ फॉर्म ब्लॉग पोस्टसाठी विश्लेषण आणि चाचणी वापरा\n08:35 - ए / बी चाचणीसाठी क्रेजी अंडे वापरा\n08:53 - वाचकांना वाढीस मदत कशी झाली\nब्लॉग पोस्ट ज्याची चर्चा आहे\nब्लॉग पोस्ट जे संपूर्ण प्रश्न विचारते\nछोट्या प्रतिमा ज्या मुख्य मुद्द्यांबद्दल मदत करतात\nपरिच्छेद 3 ते 6 ओळी अधिक प्रतिबद्धता तयार करतात\n09:53 - आजच्या भागासाठी हेच आहे\nएक चांगले पोस्ट म्हणजे दीर्घकालीन असणे आवश्यक नाही.\nसामग्रीमध्ये साधेपणा अत्यंत महत्त्वाचा आहे - lost super search nsw.\nसर्व एसइओ साधने सर्व व्यवसायांसाठी कार्य करत नाहीत.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खालील टिप्पण्या आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का असे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t20467/", "date_download": "2018-04-23T11:31:09Z", "digest": "sha1:OF2H4CWDU2UP2D5AH3UI6F4WOLCHKLHA", "length": 5667, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-तडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या", "raw_content": "\nतडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या\nAuthor Topic: तडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या (Read 242 times)\nतडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के\" यांची दुष्काळी दौर्‍याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या भावना प्रखरपणे मांडणारी हि एक वात्रटिका,...\nकाळी माय बी तडफतीया\nमनं आमचे होरपळले आहेत\nफडच्या फड वाळले आहेत\nशेतात जायची हिंमत नाही\nघरातल्या घरात वागतो आहोत\nमरण दारात येऊन थांबलंय\nमरणाच्या दारात जगतो आहोत\nआग पडली काळजात साहेब\nउमेदही आचक्या देती आहे\nजगणं कुठवर पुरणार आमचं\nआमच्याच मनाला भीती आहे\nमरत मरत जगतो आहोत\nपण जनावरांना पोसावं कसं\nत्यांनीच आजवर पोसलंय आम्हा\nआता आम्ही गप्प बसावं कसं\nतुमचे दौर्‍यावरती दौरे येतात\nमदतीचा मुद्दा निघेल म्हणून\nआमचे मनं कावरे-बावरे होतात\nपण ना मदत मिळती आहे\nना दौर्‍याने फरक पडतो आहे\nकालही जीव तडफडत होता\nआजही जीव तडफडतो आहे\nआमच्या भावनांशी खेळू नका\nदौरे करण्यालाही विरोध नाही\nपण जखमेवर मीठ चोळू नका\nडोळ्यात पाणी भरतो आहोत\nआता हा एकेक दिस झालाय\nदुष्काळ पाहणी करण्या म्हणे\nसत्तेतला फड नविस आलाय\nनुसती पाहणीच करू नका\nसमजुन घ्या दुष्काळ जरा\nदुष्काळी व्यथा सांगेन तुम्हा\nहा करपलेला माळ सारा\nहतबल झालो आहोत आम्ही\nतहान फक्त भागवा साहेब\nमोठी अपेक्षाही नाही आम्हा\nहूंदका बोलणं अडवतो आहे\nभावना विवश तुडवतो आहे\nदु:ख लांबणीवर लांबवा साहेब\nहूंदका आज थांबवा साहेब\nसदरील वात्रटिका आवडल्यास नावासहित शेअर करू शकता,...\nहि वात्रटिका ऐकण्यासाठी पुढील व्हाटस्अप क्रमांकावर संपर्क करा - 9730573783\nतडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या\nतडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sanjay-pawar.html", "date_download": "2018-04-23T11:50:57Z", "digest": "sha1:W62I5BZNXAGNHH4MRKBLZ5F7MBZAJIWX", "length": 10632, "nlines": 76, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संजय सदाशिव पवार\nConstituency : १८८, पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारिप बहुजन महासंघ\nDesignation : पनवेल तालुका (शहरे) अध्यक्ष\nName : संजय सदाशिव पवार\nFather's Name : सदाशिव राजाराम पवार\nMother’s Name : सावित्रीबाई सदाशिव पवार\nPlace of Birth: : मु. आंबव, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी\nSpouse’s Name : विद्या संजय पवार\nNo. of Children : ०२, एक मुलगा, एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nEducation : पदवीधर (आर्मी)\nProfession : खाजगी सुरक्षा एजन्सी\nHobby : वाचन, समाजकार्य, प्रवास\nResidence Address : रूम नं. ५०६, जलाराम अपार्टमेंट, प्लॉट नं. ४७, सेक्टर - ९, कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड\nOffice Address : शॉप नं. ३, गुरुकृपा अपार्टमेंट, प्लॉट नं. १७, सेक्टर - ९, कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड\nऑक्टो २०१६ पासून भारिप बहुजन महासंघ राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये पनवेल तालुका अध्यक्ष, कार्यास सुरवात.\nमाजी कामोठे शहर अध्यक्ष - आर. पी. आय. (ए)\n२००८ साला पासून आंबेडकरी चळवळीतील रिपाई (आठवले) मधून कार्याला सुरवात.\nअध्यक्ष, सम्यक विचारमंच कामोठे\nअध्यक्ष, समता सामाजिक विकास संस्था\nसरचिटणीस, बौद्धजन पंचायत समिती शाखा ७४७, कामोठे\nपक्षाच्या ध्येय आणि उद्धीष्ठासाठी प्रामाणिक आणि निष्ठेने प्रयत्न.\nत्याच बरोबर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्येही काम करून लोकांच्या अडीअडचणी दूर करून समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढीस जाऊन समाजातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्ध होऊन पूर्ण देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार व्हावे ही प्रामाणिक इच्छा - त्यासाठी सदैव प्रयत्नशील.\nसम्यक विचार मंच व समता सामाजिक विकास संस्था या दोन सामाजिक संस्थेची स्थापना करून या संस्थेमार्फत विविध शिबीरे, राष्ट्रीय दिवस, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, आंबेडकर जयंती इ. धार्मिक / सामाजिक कार्यक्रम, बेरोजगार युवक - युवतींसाठी प्रशिक्षण शिबीर, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nसमाजातील गोरगरीब, गरजू लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणे.\nलोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.\nविद्यार्थी / विद्यार्थीनीसाठी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन.\nनोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग / जागरूकता निर्माण करणे.\nउच्च शिक्षणासाठी संस्थेच्या / पक्षाच्या वतीने प्रयत्न करणे.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nपक्ष वाढीसाठी (सशक्तीकरण) कार्यकर्ता मेळावा / बैठकी.\nमोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर.\nविविध आंदोलने व धरणे.\nथोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे.\nहुशार विद्यार्थांचा सत्कार / तसेच गरजू गरीब विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, ६ डिसेंबर या दिनी प्रबोधनात्मक व्याख्याने / मार्गदर्शन करून महामानवांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे इ.\nसंजय पवार यांचे छायाचित्र संग्रह...\n०१ जाने. १८१८ रोजी भिमा नदिच्या तीरावर दुसरा बाजीराव पेशव्याच्या २५००० सैनिकांचा महार बटालीयनच्या केवळ ५०० शुरविरांनी सफाया करुन पेशवाई नष्ट केली. या शौर्याला तोड नाही. या अभुतपुर्व पराक्रमाची साक्ष देतोय भिमा कोरेगाव चा विजय स्तंभ. त्या शुरविरांना भारिप बहुजन महासंघ, पनवेल तालुका -कामोठे च्या वतीने विनम्र अभिवादन \nपनवेल मधे भारिप बहुजन महासंघ आणि भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा -पनवेल तालुका संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर मनुस्म्रुती दहन दिन अर्थात भारतीय स्त्री मुक्ती दिन हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी मा.प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांचे प्रभावी भाषण झाले. कामोठे,कळंबोली,खारघर,खांदा कॉलनी, नविन पनवेल, पनवेल शहर/ग्रामीण, सुखापुर, विचुंबे येथुन आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व बंधु आणि भगिनिंचे मनपुर्वक आभार. संजय पवार, अध्यक्ष भारिप बहुजन महीसंघ पनवेल तालुका (शहरे).\nकामोठे येथे भारिप बहुजन महासंघ आयोजित भव्य संविधान गैारव रॅली.\nभारिप बहुजन महासंघ च्या पनवेल तालुका (शहरी) पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन\nसम्यक विचार मंच कमोठे च्या वतीने धम्माचक्र प्रवर्तन दिन सोहल अणि शालेय आणि महाविद्यालइन विद्यार्त्यांचा गुनागौरव समारंभ सम्पन्न झाला. भदन्त आर्यनाग अत्थदर्शि थेरो, अध्यक्ष्य वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन यांची उद्बोधक धम्मादेसना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/photos/tips-for-removing-holi-color-205797", "date_download": "2018-04-23T11:20:34Z", "digest": "sha1:GNB4VRBWNL3SXSYAEKDGKK3YDXXYX335", "length": 13055, "nlines": 117, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "होळीचे रंग काढण्यासाठी 11 सोप्या घरगुती टीप्स", "raw_content": "\nहोळीचे रंग काढण्यासाठी 11 सोप्या घरगुती टीप्स\nहोळीचे रंग काढण्यासाठी 11 सोप्या घरगुती टीप्स\nधुळवडीनंतरची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्वचेवरील न जाणारा रंग. या रंगांमध्ये मायका, लेड यांसारखी रसायनं असतात. यामुळे त्वचा आणि केसांचं प्रचंड नुकसान होतं. मात्र त्वचेवरील रंग सहजरित्या काढण्याचे तसंच त्वचा आणि केस हेल्दी कायम राहण्यासाठी या टिप्स तुमची मदत करु शकतात.\n1. दह्यात थोडं मध मिक्स करा. हा लेप चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मालिश करा. रंग सहजरित्या निघेल आणि रंगातील रसायनाचा त्वचेवर परिणाम होणार नाही.\n2. दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा खोबरेल तेल आणि चिमुटभर हळद एकत्र करा. हे चेहऱ्याला लावून मालिश करा आणि त्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे रंग निघून जाईल.\n3. मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करुन पेस्ट बनवा. हा लेप त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. यामुळे रंग निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.\n4. एक सफरचंद उकळून ते मॅश करा. त्यात थोडा संत्र्यांचा रस मिसळा. हा लेप त्वचेवर लावून मसाज करा. रंग सहजरित्या निघेल.\n5. पपईची पेस्ट चेहऱ्यावर लावून मालिश करा आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका. रंग निघून जाईल\n6. रंगांमध्ये रसायनं असल्याने अनेकदा खाज येते. यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे अॅपल व्हिनेगर टाका. खाज येणाऱ्या ठिकाणी हे मिश्रण लाव, खाज कमी होईल.\n7. रंगपंचमी खेळण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे रंग निघण्यास मदत होईल आणि केसांची चमक टिकून राहिल.\n8. रंग खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑलिव्ह ऑईल कोमट करुन त्यात लिंबू रस मिक्स करा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. सगळा रंग निघून जाईल आणि ते मऊ राहतील.\n9. रंग काढताना अनेकदा चेहऱ्याची आग होते. अशावेळी थोड्या पीठात मध, गुलाब पाणी आणि हळद मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा झाल्यानतंर चेहरा धुवा आणि त्यानंतर मॉयश्चरायझर लावा.\n10. दोन चमचे गव्हाच्या पीठात एक चमचा चंदन पावडर, मलई, हळद आणि टोमॅटोचा रस टाकून मिक्स करा. हा लेप स्कीनवर लावून मसाज करा, त्यानंतर पाण्याने धुवा. रंग जाण्यास मदत होईल.\nयजुवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकणार\nमिलिंद सोमण आणि अंकिता कोवरच्या लग्नाचे फोटो\nमगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश\nगेलने या आयपीएलमधला सर्वात मोठा विक्रम मोडला\nअरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का\nशाहरुखच्या रिल लाईफमधील मुलीचं बोल्ड फोटोशूट\nन्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं\nटिप्स : भरजरी साड्यांची काळजी कशी घ्यावी\nटीना आणि अतहरच्या लग्नाचं दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन\nकोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या\nभिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण\nमुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक\nमुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका\nमुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nRR vs MI: सैमसन ने कहा, अपनी पारी को जिन्दगी भर नहीं भूल पाएंगे गौतम\nDDvsKXIP: दिल्ली के दबंगो के लिए आज घरेलू मैदान पर जीत ज़रूरी\n2019 में संन्यास को लेकर फैसला करेंगे सिक्सर किंग युवराज सिंह\nRRvMI: रोहित शर्मा ने बल्लेबाज़ो को माना हार के लिए दोषी\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19893/", "date_download": "2018-04-23T11:25:43Z", "digest": "sha1:DVRBZ6KMOWPMNKBECUB6L3AJF4WRELT4", "length": 2321, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आठवण तुझी येता", "raw_content": "\nनाते न जुळले जरी\nपिया तुझे नि माझे\nमन का उदास होते॥ऽ॥\nमी सारं काही विसरते\nस्वप्न होऊन जगते ॥ऽ॥\nमी रात्र रात्र जागते\nउगीच कूस बदलत राहते ॥ऽ॥\nतु न झालास माझा\nमी तुझ्यात गुंतत जाते ॥ऽ॥\nहे असे का घडते\nपण आठवण तुझी येता\nमी न माझी उरते ॥ऽ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-bufellow-clone-6668?tid=120", "date_download": "2018-04-23T11:36:38Z", "digest": "sha1:SR6EVEPDAAFYGYBGRZZAYZL3GKP6GYNF", "length": 18899, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on BUFELLOW CLONE | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nत्रिगुणी म्हशीची विजयी पताका\nत्रिगुणी म्हशीची विजयी पताका\nसोमवार, 19 मार्च 2018\nकेंद्रीय स्तरावरील संशोधनातून यशस्वी ठरलेले क्लोन तंत्र सिद्ध करून त्याचा लाभ स्थानिक पशुपालकांना करून देण्याची जबाबदारी आता राज्य पातळीवरील विद्यापीठांवर आहे.\nजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त कौशल्यातून\nक्लोन (फुटवे) निर्मितीचा प्रयोग राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल येथे यशस्वी करण्यात आला. याच संस्थेने प्रजननातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व प्रयोग प्रथम सिद्ध केले आणि त्याची चांगली प्रशंसा जगात झाली. यातील महत्त्वाची बाब अशी की, भारतात असलेलं काळं सोनं म्हणजे म्हैस त्रिगुणी वापरासाठी जगात प्रसिद्ध आहे. दूध, मांस आणि शेती काम अशा तिहेरी उपयुक्ततेच्या म्हशी देशातील सर्वदूर ग्रामीण भागात सांभाळण्यात येतात. म्हणून अशा पाळीव प्राण्याच्या संशोधनाची दिशा महत्त्वाची ठरते. देशातील केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हरियाना राज्यातील हिस्सार येथे कार्यान्वित असून या संस्थेकडून गेल्या तीन दशकांत म्हशींच्या शरीरक्रियांचा प्राधान्याने सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यात म्हशीत असणारा मुका माज, म्हशीतील माज संकलन आणि विविध टप्प्यांतील ओजस रसांबाबतचे निष्कर्ष संशोधनातून मांडण्यास यश मिळाले आहे. सध्या आसामी रेडकाचा क्लोन यशस्वीपणे निर्माण करून संशोधकांनी विजयी पताका उभारली आहे.\nम्हशींच्या दूध उत्पादकतेबाबत पशुपालकांची भूमिका देशातच नव्हे तर जगात आग्रही आहे. कृषी उन्नती मेळाव्यात ३२ लिटर दररोज दूध देणारी म्हैस आणि सर्वोच्च प्रजनन क्षमता असणारा रेडा पाहताना प्रत्येक शेतकरी कुटुंबात अशा पशुधनाची अपेक्षा असणे गैर नाही. मात्र, कृत्रिम रेतन आणि भ्रूण प्रत्यारोपण एवढ्या दोनच तंत्रज्ञानावर सर्वदूर विकासाची अपेक्षा म्हशींमध्ये शक्य नसल्यामुळे गुणवंत तंत्रज्ञानाचा अभ्यास देशात होत असून त्याची फलश्रृृतीसुद्धा दिसत आहे. म्हशींच्या बाबतीत क्लोन तंत्रज्ञान दुधासाठी यशस्वी होवो किंवा मांसासाठी दोन्हीही निश्चितच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. नुकत्याच जन्मलेल्या सच-गौरव रेडकाचे वजन ५४ किलो मिळू शकते म्हणजे त्याच्या शरीर वजनवाढीचा वेग सामान्यपणे दुप्पट ठरणार, यात शंका नाही. गाेवंश हत्याबंदीमुळे मांस निर्मितीबाबत निर्माण झालेले निर्बंध म्हशींच्या क्लोन तंत्रातून अखेर सुटतील, असे वाटू लागले आहे. यापुढील बाब अशी की, देशातून उत्कृष्ट निर्माण केलेल्या क्लोन म्हशी जगात निर्यात करण्यास आणि त्याद्वारे देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मोठी मदत होणार आहे. गेल्या १०-१२ वर्षात देशांतर्गत निर्माण करण्यात आलेले म्हशींचे क्लोन संख्यात्मकदृष्ट्या गौरवास्पद असून क्लोनिंगचे तंत्र भविष्यात गतिमानतेने विकसित होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.\nदेशातील वातावरण सर्वच भागात वेगवेगळे असले तरी इतर विभागातील म्हशींची जात स्थानिक म्हशींच्या गर्भाशयात वाढली गेल्यामुळे जन्मलेले क्लोन स्थानिक वातावरणाशी सहज साधर्म्य टिकू शकतील, ही या तंत्रज्ञानाची जमेची बाजू म्हणावी लागेल. थोडक्यात अर्थ असा की आसामी म्हैस पंढरपुरीच्या गर्भाशयात निर्माण झाल्यास राज्यातही मांसोत्पादक प्रकल्प दिसून येतील किंवा हरियानाची मुऱ्हा नागपुरीच्या गर्भाशयातून विदर्भात दूध उत्पादक ठरू शकेल. सच-गौरव तंत्र अधिक संख्येने विकसित होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील संशोधनास मनुष्यबळ आणि आर्थिक बळ देण्याची मात्र गरज दुर्लक्षित करता येणार नाही. तसेच केंद्रीय संशोधन संस्थांना हे आव्हान आहे की त्यांनी पडताळलेले तंत्र देशाच्या इतर विभागात प्रत्यक्ष साकारण्यासाठी राज्यस्तरीय विद्यापीठांना सहभागी करून घेतले पाहिजे. केंद्रीय स्तरावरील संशोधनातून यशस्वी ठरलेले क्लोन तंत्र सिद्ध करून त्याचा लाभ स्थानिक पशुपालकांना करून देण्याची जबाबदारी आता राज्य पातळीवरील विद्यापीठांवर आहे, हेही विसरता येणार नाही.\nभारत दूध हरियाना आसाम पशुधन विकास गुणवंत gunwant विभाग sections विदर्भ\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/astrology", "date_download": "2018-04-23T11:18:15Z", "digest": "sha1:ZS47AMHJAS6FBSAWK7NMXH26WHLKAS56", "length": 4953, "nlines": 100, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "राशी भविष्य | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-israil-remedies-marathawada-water-shoratage-5882", "date_download": "2018-04-23T11:54:17Z", "digest": "sha1:USA4NGSSEKX4FGOSJXQNHNFDO4AFFH6H", "length": 25694, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on israil remedies on marathawada water shoratage | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय\nमराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\n‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्‍न असून, तो हाताबाहेर गेला आहे. इलाज होत नसलेला रोगी मरायला सोडून द्यावा, तशी तहान आपण वाऱ्यावर सोडून दिली आहे. म्हणजे त्यात वेगळे काही करता येईल असा विचार करणेही बंद केले आहे.\n७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हा इथल्या लोकांचा असमंजसपणा आहे. लोकांची बेफिकिरी, सामाजिक जाणिवांचा अभाव, दारिद्य्रात समाधान मानण्याची वृत्ती, विकासाची दृष्टी नसलेले लोकनेते, अशा अनेक सामाजिक दुर्गुणांमुळे आम्ही पाणी असते, तेव्हा सोडून देतो आणि तुटवडा झाल्यावर वणवण फिरतो. फाटक्‍या झोळीत भीक मागणारा उपाशी मरतो; पण सुई-दोऱ्याने झोळीला दोन टाके मारत नाही. दोन टाके मारण्यापुरता ज्याचा आळस सुटत नाही, त्याला वैभव कधीच भेटत नाही.\n‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्‍न असून, तो हाताबाहेर गेला आहे. इलाज होत नसलेला रोगी मरायला सोडून द्यावा, तशी तहान आपण वाऱ्यावर सोडून दिली आहे. म्हणजे त्यात वेगळे काही करता येईल, असा विचार करणेही बंद केले आहे. तूट झाली की रानोमाळ फिरायचे, पाण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायचा, या गोष्टी पुरत्या अंगवळणी पडल्या आहेत. डोक्‍यावर, बैलगाडीत, टॅंकरने पाणी आणण्यात कमीपणा वाटेनासा झाला आहे.\n‘मेकोरोट’ कंपनी इस्राईलला पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी पुरवते. एका उजाड, वाळवंटी देशाला सुजलाम करण्याचा चमत्कार कंपनीने केला आहे. भारताच्या सरासरीच्या ३० टक्के पाऊस असलेल्या इस्राईलमध्ये घरगुती वापर, शेती, कारखानदारी, मनोरंजन व पोहण्यासाठी पुरेसे पाणी आहे. नळाला पाणी येणे हा प्रकारच तिथे नाही. बारा महिने चोवीस तास नळाला पाणी असते. डोक्‍यावरची घागर किंवा पाण्याचा टॅंकर त्यांना माहीत नाहीत. शहराप्रमाणे प्रत्येक खेड्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोहण्याचे तलाव आहेत. मेकोरेट कंपनीने ते नवल केलेय. जे इस्राईलमध्ये घडते ते मराठवाड्यात घडणार म्हणजे मज्जाच मज्जा\nगणती करता येणार नाहीत येवढे आपले प्रश्‍न आहेत. ते नुसते गंभीर नाहीत तर आवाक्‍याबाहेर गेलेले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या, जाती, धर्म, अंधश्रद्धा, रुढी, प्रथा, अडाणीपणा, बेकारी, बेशिस्त, गुंडगिरी, खोटे शिष्टाचार, भ्रष्टाचार, बेइमानी, स्वार्थ, व्यसने, देशद्रोह वगैरे... अनंत. टांझानिया, युगांडापासून ब्रिटन, अमेरिकेपर्यंत जगातल्या सर्व देशांनी आपले प्रश्‍न वाटून घेऊन ते सोडवायचे करार केले तर आपला देश खरोखर सुखी होईल सर्व देश एकत्र येऊन आपले कल्याण करतील, अशी वेळ कधीतरी निश्‍चित येईल म्हणून युगायुगापासून आपण विश्‍वबंधुत्वाचा मंत्र जपत आहोत आणि हे करणे आता अवघड राहिलेले नाही. एका राष्ट्राध्याक्षाला मिठी मारली की तो आपले दहावीस प्रश्‍न सहज सोडवतो. घरी आला तरी मिठ्या, दारी गेला तरी मिठ्या, अशा रीतीने संपूर्ण जग मिठीत घ्यायला कितीसा वेळ लागणार सर्व देश एकत्र येऊन आपले कल्याण करतील, अशी वेळ कधीतरी निश्‍चित येईल म्हणून युगायुगापासून आपण विश्‍वबंधुत्वाचा मंत्र जपत आहोत आणि हे करणे आता अवघड राहिलेले नाही. एका राष्ट्राध्याक्षाला मिठी मारली की तो आपले दहावीस प्रश्‍न सहज सोडवतो. घरी आला तरी मिठ्या, दारी गेला तरी मिठ्या, अशा रीतीने संपूर्ण जग मिठीत घ्यायला कितीसा वेळ लागणार या अजब मिठी तंत्रामुळे देश महाशक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने झेपावतो आहे.\nआम्ही कोण हे सांगितले तर, ऐकणाऱ्याची छाती फाटून जाईल. समुद्रावर तरंगत्या दगडांचा पूल बांधणारे आम्ही पुष्पक विमान उडवणारे आम्ही पुष्पक विमान उडवणारे आम्ही प्रचंड शिळा रचून हेमांडपंथी मंदिरे उभारणारे आम्ही प्रचंड शिळा रचून हेमांडपंथी मंदिरे उभारणारे आम्ही दगडांच्या मूर्तीत हुबेहूब जीव ओतणारे आम्ही दगडांच्या मूर्तीत हुबेहूब जीव ओतणारे आम्ही काड्याच्या पेटीत बसतील येवढे तलम शालू विणणारे आम्ही काड्याच्या पेटीत बसतील येवढे तलम शालू विणणारे आम्ही देशभर पावला पावलावर तंत्रज्ञान महाविद्यालये, संशोधन संस्था, विद्यापीठातले ऋषितुल्य गाढे अभ्यासक, चंद्र आणि मंगळावरच्या पाण्याचा शोध घेणारे संशोधक, येवढ्या अद्वितीय सामर्थ्यांच्या देशाला स्वतःच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही, असे म्हणणे आमच्या ज्ञान प्रगल्भतेचा घोर अपमान आहे. आमच्या तांत्रिक कौशल्याची अवहेलना, हे देशाचे विनाशाकडे संक्रमण होत असल्याचे अशुभ लक्षण आहे. घरी सर्व ठिकठाक असताना शेजारणीचे कौतुक वाटणे हा मानवी स्वभाव असू शकतो, पण शेजारणीचा पुळका फार वाढला तर संसार मोडतो.\nइस्राईलविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जी कामगिरी केलीय ती निश्‍चितच अनुकरणीय आहे. पण अनुकरण करणे सोपे नाही. ते करण्यासाठी आपली पात्रता वाढवावी लागते. हनुमानाचे अनुकरण करायचे असेल तर त्याच्या एवढे सामर्थ आणि शक्ती कमवावी लागेल. मरतुकड्या दारुड्याने ‘जय हनुमान, जय हनुमान’ म्हणून उड्या मारल्याने तो शक्तिशाली होत नाही. सचोटी, कष्ट, जबाबदारी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, भ्रातृभाव, विज्ञाननिष्ठा, सहकार असे समाज सुदृढ करणारे गुण इस्राईलच्या लोकांनी विकसित केले. सार्वजनिक मालमत्ता स्वतःची समजून ती काळजीपूर्वक वापरावयाचे त्यांना कळते. अशा गुणसंपन्नतेमुळे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वर्ग उभा केला आहे; पण म्हणून आपले फाटलेले आभाळ ते शिवून दुरुस्त करून देतील हे केवळ असंभव आहे. आपले प्रश्‍न आपण सोडवायचे हे जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोवर कुठलेही उपाय पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे निरर्थक ठरतील.\nइस्राईलमध्ये कापसाची उत्पादकता जगात एक नंबर आहे. म्हणून त्यावेळच्या शिवसेना सरकारने तिथले तंत्रज्ञानच महाराष्ट्रात आणले. अकोला आणि परभणी येथील कृषी विद्यापीठात प्रत्येकी दोन वर्षे प्रयोग झाले. दोन्ही विद्यापीठांत महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा कापसाचे कमी उत्पादन मिळाले. याचा अर्थ आयात केलेले तंत्रज्ञान आपल्या मातीत रुजले नाही.\nजायकवाडी प्रकल्प उभारताना जागितक बॅंकेचा भारतातला सल्लागार डॉ. कारमेली इस्राईलच्या आयआयटीतल्या कृषी अभियांत्रिकी विभागातला प्राध्यापक होता. जलतज्ज्ञ म्हणून जगात त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनासाठी जायकवाडी उभे राहिले. काय झाले जायकवाडीचे कितीही प्रख्यात, विश्‍वविख्यात तज्ज्ञ बाहेरून आणले तरी ते त्यांच्या मतलबापुरते काम करतात. कामे निकृष्ट होत असली तरी ते तुम्हाला नीतिमत्तेचे धडे देत बसत नाहीत. बुद्धीचे काम करण्यासाठी जगातले प्रगत देश भारतीय तंत्रज्ञांसाठी पायघड्या पसरतात आणि आपले राज्यकर्ते परकीयांचा अनुनय करतात, देशाची संपत्ती परकीयांवर उधळतात. पाणी नियोजनात आम्ही काय आहोत, त्याचे एक लहान उदाहरण सांगायला हरकत नाही. मराठवाडा शेतीसाह्य मंडळाने विजय अण्णा बोराडेंच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात ‘कडवंची’ पाणलोट क्षेत्राचे काम केले आहे. पाणलोट क्षेत्राची व्याप्ती १५०० हेक्‍टर, सरासरी पाऊस ६२५ मिलिमीटर, विहिरींची संख्या ६००. पिण्याच्या पाण्याची गरज भागवून पाणलोटातल्या ४८ टक्के क्षेत्रावर बारमाही सिंचन होते. जगातल्या पाणी तज्ज्ञांनी कडवंचीला येऊन धडा घ्यावा, असे सूज्ञ नियोजन तिथे झाले आहे. मराठवाड्यासाठी शाश्वत पाणीपुरवठ्याच्या उपायांवरील चर्चा पुढे कधीतरी केली जाईल.\nबापू अडकिने ः ९८२३२०६५२६\n(लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)\nऊस पाऊस विकास पाणी सिंचन भारत शेती मनोरंजन entertainment शिक्षण education आरोग्य health पूल कृषी विद्यापीठ agriculture university जायकवाडी आयआयटी अभियांत्रिकी विभाग sections बापू अडकिने\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-04-23T11:53:41Z", "digest": "sha1:JNT2VCR42WJDLDZ54SAH6DGHVWNRZLUZ", "length": 6017, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २४,१९२ चौ. किमी (९,३४१ चौ. मैल)\nघनता ५९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)\nवार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत (पोलिश: Województwo warmińsko-mazurskie) हा पोलंड देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या उत्तरेला रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्त स्थित आहे.\nओपोल्स्का · कुयास्को-पोमोर्स्का · झाखोज्ञोपोमोर्स्का · डॉल्नोश्लोंस्का · पोट्कर्पाट्स्का · पोडाल्स्का · पोमोर्स्का · माझोव्येत्स्का · मावोपोल्स्का · लुबुस्का · लुबेल्स्का · वार्मिन्स्को-माझुर्स्का · वूत्श्का · व्यील्कोपाल्स्का · श्लोंस्का · श्वेंतोकशिस्का प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7149393", "date_download": "2018-04-23T11:50:36Z", "digest": "sha1:6ZSMXJTKVAK7R7PSXPXGQSSSEFLSBP3Y", "length": 4049, "nlines": 44, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "7 आपले विपणन शब्दार्थात ऑप्टिमाइझ करण्यासाठी मार्ग | Ep. # 116", "raw_content": "\n7 आपले विपणन शब्दार्थात ऑप्टिमाइझ करण्यासाठी मार्ग | Ep. # 116\nएपिसोड # 116, नील आणि एरिकमध्ये आपण आपल्या मार्केटिंगच्या प्रस्तावांना अनुकूल करू शकणार्या 7 पद्धतींची सूची तयार करतो. प्रस्तावांचे अनुकूलन करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मिमल म्हणजे जेणेकरुन आपण ते लक्ष्य देत असाल\n00:27 - आजचा विषय: आपल्या मार्केटिंग प्रस्तावांचे अनुकूलन करण्यासाठी 7 मार्ग\n00:31 - # 1 आपली कंपनी किती महान आहे याबद्दल बोलू नका\n01:02 - # 2 निर्णय घेणारा आपल्याशी चर्चा करणार नाही असे\n01:23 - प्रस्तावामध्ये केस स्टडी असल्याची खात्री करा\n01:38 - स्क्रीनशॉट्स पहा जेथे व्यवसाय अप गोंधळ करीत आहे\n02:00 - # 3 क्विल्ल किंवा बीडस्केप वापरा - हे आपल्याला छान प्रस्ताव घेण्यात मदत करेल\n02:43 - # 4 आपण बंद न करणार्या लोकांकडून जाणून घ्या\n03:27 - # 5 लोक त्यांच्यासाठी सानुकूलित काही हवे आहेत\n04:07 - # 6 लोकांना लगेच प्रस्ताव पाठवू नका\n05:16 - # 7 फक्त प्रस्ताव पाठवू नका-त्यामागे ती पुढे जा\n06:00 - आजच्या भागासाठी तेच आहे\nते आपण किंवा आपल्या कंपनी बद्दल नाही, ते त्यांच्याबद्दल आहे\nआपल्याशी करार बंद न करणार्या लोकांकडून अभिप्राय मिळवा - त्यातून शिका.\nआपल्या प्रस्ताव पाठविण्यापूर्वी तपशील लोक बोला.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खालील टिप्पण्या आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का असे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या - san jose ca computer repair.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/koregaon-bhima-prime-minister-modis-symbolic-statue-burnt-akola/amp/", "date_download": "2018-04-23T11:48:46Z", "digest": "sha1:PJ2XXECOT5ETIRFYIFI2LELKC26XPCTR", "length": 8676, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Koregaon Bhima: Prime Minister Modi's symbolic statue burnt in Akola | कोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन | Lokmat.com", "raw_content": "\nकोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nअकोला : आंबेडकरी अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.\nअकोला : कोरेगाव भीमा येथील शहरात कडकडीत बंद पाळला जात असताना आंबेडकरी अनुयायी रस्त्यारस्त्यांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत आहेत. संतत्प अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. आंदोलनात महिलांचाही सहभाग असून, अशोक वाटीका चौकात महिलांनी रस्त्यावर ठीय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आंबेडकरी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nजुने बसस्थानकाजवळ वाद आंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी टॉवर चौकाकडून मोहम्मद अली रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेल्या दुकाने बंद करण्यास सांगितले. परंतु काही दुकानदारांनी नकार दिल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. प्रकरण चिघळणार असल्याचे पाहून, पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे वाद निवळला. आंदोलनात भारिपचे पदाधिकारी सहभागी कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी केलेल्या बंद आंदोलनामध्ये भारिप बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, प्रदीप वानखडे, जि.प. माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, मनपाचे माजी गटनेता गजानन गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जीवन डिगे, मोहन लाखे, अ‍ॅड. छोटू सिरसाट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष सचिन शिराळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरेगाव भीमा घटनेचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध कोरेगाव भीमा घटनेच्या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी जनतेच्या बंद आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा देत, कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. अशोक वाटीका चौकातील आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, चेतन ढोरे, मयुर पाटील, नितीन सपकाळ, आनंद पाटील, अमित ठाकरे, शुभम घिमे आदी सहभागी झाले होते.\nराऊंड परिसरातील घरांवर दगडफेक काही युवकांनी तुकाराम चौक परिसरातील भेळ सेंटर, आमलेटच्या हातगाड्यांची तोडफोड केली. एवढेच नाहीतर राऊंड रोडवरील कोकाटे, बिसेन आणि धस बिल्डर यांच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे नागरीक भयभित झाले होते. नागरीकांनी घराची दरवाजे, खिडक्या बंद करून घरात राहणेच पसंत केले.\nमोदी ‘व्हीलन’ तर मग त्यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण नाणार प्रकल्पावरून विखे-पाटील यांचा घणाघात\nमोदींच्या हृदयात दलितांसाठी जागा नाही- राहुल गांधी\nसाखर उत्पादनासंदर्भात शरद पवारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक\nमोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा\nयशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ केली व्यक्त - उद्धव ठाकरे\nजैविक घटक ट्रायकोग्रामाचे उत्पादन वाढणार\n‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय\nअकोला जिल्ह्यातील ३४ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा\nअकोला जिल्ह्यात तूर खरेदीचे दीड महिन्यापासून अडकले चुकारे\nनियुक्त्या न झाल्याने अकोला जिल्ह्यातील विषय शिक्षक अतिरिक्त ठरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2009/12/coep.html", "date_download": "2018-04-23T11:42:24Z", "digest": "sha1:KJTCHVXRY36ATXFQY3B2ZRH7PA3YBO2Z", "length": 12653, "nlines": 201, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): COEP सोडताना...", "raw_content": "\nBC वरचा तोच कट्टा, तीच पायरी..\nश्वासात भिनलेला तोच वारा\nआणि दूरवर चमकणारा तोच तारा...\nअशा त्याच वातावरणात अवचित झालेली पानगळ\nआणि भैरवीत पोचलेल्या मैफलीला यावी तशी आलेली मरगळ...\nअशातच मग सुरू होतात त्याच गप्पा..\nमी मात्र अबोलच. स्वत:शीही बोलत नाही.\nइतक्यात समोरुनच आवाज येतो आणि मी वास्तवाच्या जगात येतो.\n\"अरे, तूही सांग, काय वाटतं आता COEP सोडताना\nहं.... प्रश्न एकच, पण उत्तर\nनदीकाठी वसलाय माझ्या आठवणींचा गाव\nत्याचं COEP हे नाव..\nया गावात खूप भटकलोय,\nरात्री-अपरात्री, उन्हापावसांत खूप हुंदडलोय\nचार घटका विसावलो, आता निघायला हवं\nभरली झोळी खांद्यावर टाकून पुढचं गाव गाठायला हवं\nमधले दिवस हरवून जातात इथले हिशेब मांडताना\nकसं सांगू काय वाटतं COEP सोडताना..\nचांगलं-वाईट, भलं-बुरं सगळं आत भरवत गेलो\nतरुणाईच्या सळसळत्या गर्दीत इथे स्वत:ला हरवत गेलो\nआणि त्याच वेळी कदाचित मीच मला शोधत गेलो\nआता कुठे स्वत:ला सापडतोय इथून बाहेर पडताना\nखूप खूप जड वाटतंय COEP सोडताना..\nयेणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे माझं एवढंच मागणं होतं\n\"कडकडून भेटून जा\" एवढंच सांगणं होतं\nआज निरोप घेताना जाणवलं\nत्यानं उत्तर म्हणून तर तुम्हाला पाठवलं\nआता भेटलो नाही तरी हे चेहरे लक्षात राहतील\nउंच उडणाऱ्या प्रत्येकाला त्याच कौतुकाने पाहतील...\nआपण असे बऱ्याचदा जमलो होतो..\nएकमेकांना सांभाळत नकळत रमलो होतो\nत्या meetings, त्या स्पर्धा,\nतो कल्ला, तो धिंगाणा,\nतो जोष, तो हरवलेला होश...\n...सगळं काही भरभरून जगलो होतो\nआणि काही विशिष्ट प्रसंगी मात्र\nअगदी शहाण्यासारखं वागलो होतो...\nरिझल्टच्या दिवशी हसलो होतो\nआणि \"पुढच्या वेळी नक्की Disti हं\nपुन्हा तिथंच गप्पा मारत बसलो होतो...\nआता कसलीच खंत नाही\nतरी मुक्या वेदनेला अंत नाही..\nअसं एक एक आठवायचं म्हटलं तर काहीच आठवत नाही\nआणि साठवायचं म्हटलं तर ही ओंजळच पुरत नाही\nम्हणून मग मी अबोल होतो या वळणावर चालताना\nमागे फक्त वळून पाहतो COEP सोडताना...\nइथं मिळालेलं हे सगळं नक्की उपयोगी पडेल\nमला नाही वाटत आमचं पाऊल आता संकटांशी अडेल\nस्वप्नं पेरायला इथं शिकलो\nआणि ती मिळवण्यासाठी पेटायला इथेच शिकलो\nस्वप्नं पाहणं आता मनात रुजलंय\nमला खुणावणारं आकाश आता आणखीनच सजलंय\nसगळं पुन्हा जिवंत झालंय तुमच्यासमोर मांडताना\nखूप काही माझं झालंय COEP सोडताना\nखूप काही... माझं झालंय... COEP सोडताना\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raj-thackery-meet-sharad-pawar-his-residence-6643", "date_download": "2018-04-23T11:42:48Z", "digest": "sha1:FY63TI2MRQHESROUXIEV36W656DNASQK", "length": 13880, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Raj Thackery meet Sharad Pawar at his residence | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज-पवार भेटीने चर्चेला उधाण\nराज-पवार भेटीने चर्चेला उधाण\nरविवार, 18 मार्च 2018\nमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मुंबईत राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.१७) पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मुंबईत राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.१७) पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nदेशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची नेहमी सर्वपक्षीय नेते भेट घेऊन सल्ला घेतात. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्ली त्यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ राज यांनीही श्री. पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी ४० मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुण्यात राज यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी मुंबईत भेटण्याचे ठरले असल्यानेच आज राज हे पवारांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे. आज (ता. १८) मुंबईत राज ठाकरे जाहीर सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nआज उद्धव, पवार एकाच व्यासपिठावर\nदरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे आज (ता. १८) मुंबईत प्रकाशन होत आहे. या निमित्त अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येत असल्याने ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nशरद पवार sharad pawar राज ठाकरे राजकारण politics राष्ट्रवाद खासदार खत fertiliser उद्धव ठाकरे\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-whaet-crop-advisory-agrowon-maharashtra-6127", "date_download": "2018-04-23T11:48:23Z", "digest": "sha1:6ZA2XZHEZOOCWP7JOXUDRJYBN4NEBABX", "length": 16488, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, whaet crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी आवश्‍यक\nफुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी आवश्‍यक\nफुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी आवश्‍यक\nफुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी आवश्‍यक\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nसद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा पेरणी केलेला गहू आहे. वेळेवर पेरणी केलेला गहू फुलोरा अवस्थेत असून, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाची मुकुटमुळे फुटण्याची किंवा कांडी धरण्याची अवस्था आहे. वाढीच्या टप्प्यानुसार पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nवेळेवर पेरणी केलेला गहू (नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा) :\nसद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा पेरणी केलेला गहू आहे. वेळेवर पेरणी केलेला गहू फुलोरा अवस्थेत असून, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाची मुकुटमुळे फुटण्याची किंवा कांडी धरण्याची अवस्था आहे. वाढीच्या टप्प्यानुसार पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nवेळेवर पेरणी केलेला गहू (नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा) :\nगहू पिकाला एकूण पाच पाण्याच्या पाळ्यांची गरज असते. मात्र वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकात सध्या फुलोरा व चिकाची अवस्था आहे. यावेळी एक पाण्याची पाळी देणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे दाणे भरण्यास मदत मिळते.\nगेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून तापमानात वाढ होत आहे. अशावेळी मध्यम किंवा पाण्याचा लवकर निचरा होणारी जमीन असल्यास पाण्याची अतिरिक्त पाळी देणे फायद्याचे ठरते.\nसद्यःस्थितीत ओंब्या बाहेर पडल्या आहेत. अशावेळी वारा नसताना पाण्याची पाळी द्यावी. कारण त्यामुळे गहू लोळण्याची शक्यता असते.\nओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. कारण त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते. अशा अवस्थेत १९:१९:१९ (विद्राव्य खत) किंवा डीएपी २० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास वेळेवर सिंचनाच्या जोडीला अन्नद्रव्यांची मात्रा मिळाल्याने दाण्याचा आकार वाढून चकाकीही वाढते.\nउशिरा पेरणी केलेला गहू (१५ डिसेंबरदरम्यान पेरणी) :\nउशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला जास्त काळ उष्ण तापमानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या पिकाला दर पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. म्हणजे एकूण काळात पाण्याच्या ५ पाळ्या (नियमित ४ अधिक अतिरिक्त १) द्याव्या लागतील.\nपाण्याच्या दोन पाळ्यांदरम्यान जास्त अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण जमीन कोरडी पडल्यास उंदरांचा त्रास होण्याची शक्यता असते.\nवाढीच्या विविध अवस्थांमध्ये फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खतांची फवारणी करावी. पेरणीनंतर ५५ व्या व ७० व्या दिवशी १९:१९:१९ हे विद्राव्य खत २० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nसंपर्क : डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७\n(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...\nउन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...\nउस पीक सल्ला १५ फेब्रुवारीनंतर तोडलेल्या उसाचा खोडवा शक्यताे...\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप...जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर...\nवांगी पीक सल्लासद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nसंत्रा, मोसंबी बागेतील फळगळ नियंत्रणविदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संत्रा आणि मोसंबीच्या...\nफळबाग सल्लायेत्या काळात तापमान वाढण्याची शक्यता आहे....\nऊस पाचटाचे व्यवस्थापनऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nफळवर्गीय भाजीपाला सल्लामिरची रोगनियंत्रण : चुरडा- मुरडा नियंत्रण...\nकाढणीनंतर हळद बियाण्याची योग्य साठवण...हळद कंदाची गुणवत्ता दीर्घकाळ टिकविण्यासाठी पिकाची...\nक्षेत्रनिहाय जलसंधारण उपाययोजनाओघळ नियंत्रण कामांबरोबरच पाणलोट क्षेत्रावर...\nचुनखडीयुक्त जमिनींचे व्यवस्थापनराज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक...\nहलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत...येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये...\nलिंबूवर्गीय फळपीक सल्लाउन्हाळ्यामध्ये वाढ होत असून, झाडाभोवती ओलावा...\nउसातील खोड किडीचे नियंत्रणराज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jokes-adda.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T11:43:52Z", "digest": "sha1:KSMGFXAZII5YIFHGGI3HRIEG3LJQN4DO", "length": 28486, "nlines": 427, "source_domain": "jokes-adda.blogspot.com", "title": "Party funny jokes", "raw_content": "\nmarathi vinod - धमाल मराठी विनोद\nBf: मला तुझे \"दात\" खूप आवडतात ... GF: अय्यां...खरच ..का रे \nतुझी आठवण येते तेव्हा..\nतुझी आठवण येते तेव्हा..\nतिची पापणी भरू दे\nमाझ्या नावाचा एक तरी थेंब\nतिच्या नयनी तरु दे..\nरात अशी ही तंद्रित\nपापणिहि बघ लवते आहे\nह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे\nकुणीतरी माझ्यासाठी जागत आहे\nतुझी आठवण येते तेव्हा\nतु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो\nतु येणार नाहीस माहित असतं\nडोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..\nएकही क्षण नाही जेव्हा\nतिची आठवण येत नसेल,\nअसा एकतरी क्षण असेल\nजेव्हा ती मला आठवत असेल\nतेंव्हा बोलू देत नाहीस\nतेंव्हा झोपू देत नाहीस\nतो ढग बघ कसा\nतुझ्या चिंब गालावरुन ओघळला\nमाझ्या शब्दांना अजुन तरी\nतुझ्या ओठांचा स्पर्श नाही.\nतुझ्या आठवणीशिवाय जात नाही\nदिवस जरी गेला तरी\nतुझी आठवण जात नाही.\nआज सारे विसरली तू\nनावही न येई ओठांवर.....\nकसे मानू तू कधी\nखरे प्रेम करशील कुणावर......\nतेव्हा सागर किनारी साक्षीने\nतू घेतल्यास किती शपथा.....\nकिती मारल्यास मिठया तू\nतो चंद्र ढगात लपता........\nनजरेत जरी अश्रू असले\nतरी ओठावर हास्य असाव\nकसे करू माफ़ तुला\nजे घाव तू मला दिले......\nतू काटेच मला दिले......\nथेंब कोणता तुझा नि माझा\nआज पुन्हा तुझी आठवण आली\nआणि मी उगीच हसु लागलो\nकळलेच नाही, कधी रडु लागलो...\nतुझ्या नि माझ्या वाटा,\nएकत्रच चालतात खर तर,\nपण मिटत नाही अंतर\nपावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.\nरिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.\nकैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही\nऔरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या\nठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.\n- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंब\nअंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना\nसांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.\n- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या\nमार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला\nसुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे\nठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे\n- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.\nमुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी\nडोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.\n- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा\nधबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ\nअसलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय\nनसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.\n- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत\nमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या\nधबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट\nदेतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत\nअसतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.\n- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या\nपाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा\nमोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत\nअसते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.\n- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि\nपळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.\nरेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.\nजेवणाची सोय या ठिकाणी होते.\n- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला\nमिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून\n- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक\nरोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा\nकिलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.\n- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी\nशोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची\nपाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास\n- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही\nआसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा\nआणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.\n- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे.\nइथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध\nआहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना\nपुरेशी खबरदारी घ्यावी लागते.\n- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण\nठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट\nआहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.\n- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या\nआनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा\nआहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे\nत्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच\nकोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.\n- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे\nगावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी\nभिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण\n- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात\nखूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर\nघाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.\nकच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.\n- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट\nझाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यास\nFriends katta poem - मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात\nकुणी 'Facebook' वर जमतात.\nकारण सगळे विषय 'Chat' वरच\nमग 'Chat' वर भेटूच\nसंभाषणातून 'Sign out' केलं\nदिव्यांच्या गर्दीत मग हरवायला\nघट्ट पकडलेल्या हातानांही सैल\nताप आल्याचं आजकाल आईच्या\nवर ओकायची मैत्रीत गरजच\nकधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर\nचला तर पूर्वीचे दिवस पुन्हा\nमुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय.\n८ रूपयाला वडापाव आणि १० रुला चाय.\nआला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय.\nआणायची ९० रु किलोची चिकन. सांगायच\nअहो पगार कमी सांगुन इज्जत\nमुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय..\nसकाळी सकाळी ९ वाजता उठायच.\nबिना तोंड धुता खिडकित यायच..\nशेजारच्या पोरीला शाळेत जाताना\nतीने रागात पाहिल तर\nम्हनायच सुंदर माझी ताय..\nमनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच\nराँग नंबर लागला की काय..\nअहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय..\nरिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्ते\nबाइक वाल्यांची किर किर,\nआणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन..\nपर प्रान्तियानाच म्हनायच भाय..\nअहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय..\nपान्यासाठी पळायच , ग्याससाठी रांगा\nफैक्ट्री चा वाजतो भोंगा.\nधावत धावत टाकाव्या लागतात\nआणि बाहेरच लटकतात पाय.\nदादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..\nपण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती\nतीच आमची ताय आणि तीच आमची माय..\nआमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय..\nआहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..\nगरिबाच पोट आणि दुधावरली साय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5", "date_download": "2018-04-23T11:41:12Z", "digest": "sha1:K5YEXWQSXUTVVX4QNVNL3O36KNZ6WWUG", "length": 8133, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांडव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nद्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव\nदेवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी.\nपांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.\nपांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.\nकुंती व माद्री ह्या पंडूच्या दोन पत्‍नी होत्या. पंडू ही पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषींनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१५ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:54:12Z", "digest": "sha1:LGQJTHPCMDLPYQT6WWEZ7FW7WXLMJBHR", "length": 4700, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नार्कोलेप्सी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगोंधळू नये \"निद्रानाशाबरोबर \"\nनार्कोलेप्सी हा एक दीर्घकालीन मेंदूविकार आहे. या विकारामुळे मेंदू निद्राचक्रावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. कदाचित या कारणामुळेच नार्कोलेप्सी आणि निद्रानाश या दोन वेगवेगळ्या रोगांमध्ये गोंधळ केला जातो. नार्कोलेप्सीचा रुग्ण कोणत्याही क्षणी झोपी जातो. यामुळे अशा रुग्णांना अपघात होण्याची शक्यता जास्त असते.\nनार्कोलेप्सिग्रस्त रुग्णांना मदत केली जाऊ शकते, पण बरे केला जाऊ शकत नाही. प्रत्येक रुग्णाला दिले जाणारे उपचार हे त्याच्या रोगाच्या स्तरांप्रमाणे ठरवले जातात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-04-23T11:53:05Z", "digest": "sha1:GLVHLPEAOI6RYYHQJMNAE2BCMM6AIJJ2", "length": 6144, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "कोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोगिलुये व बोयेर-अहमदचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १५,५०४ चौ. किमी (५,९८६ चौ. मैल)\nघनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)\nकोगिलुये व बोयेर-अहमद (फारसी: استان کهگیلویه و بویراحمد) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात झाग्रोस पर्वतरांगेमध्ये वसला असून येथील बहुतेक सर्व भूभाग डोंगराळ आहे.\nकोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/sports/a-10-team-world-cup-biggest-blow-to-crickets-globalisation", "date_download": "2018-04-23T11:10:38Z", "digest": "sha1:OWQZ6366RK7KV6LAF2ZDGQ33XCFLWYIN", "length": 15979, "nlines": 132, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "A 10-team World Cup biggest blow to cricket's globalisation | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome क्रीडा १० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nसरळ मुद्यावर येऊ या. क्रिकेट हा एकमेव सो कॉल्ड जागतिक खेळ आहे, ज्याने आपल्या विश्वचषकाचे टोकच तोडले आहे. २००७ साली स्पर्धेत १६ संघ होते. २०११ व २०१५ सालच्या स्पर्धेत एकूण १४ संघ होते आणि आता २०१९ व २०२३ सालच्या विश्वचषक स्पर्धेत असतील ते अवघे १० संघ. म्हणजेच पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभात आपण काही कसोटी खेळणाऱ्या संघांना खेळताना पाहणार नाही. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) खेळांच्या जागतिकीकरणाबद्दल बोलत आहे. किती दुखः दायक आहे हे\nआयसीसीने विश्वचषक कमी करण्याच्या वादाविषयाबद्दल असे सांगितले आहे की, त्यांना ही स्पर्धा जास्तीत जास्त रंगतदार बनवायची आहे. आणि असोसिएट सदस्यांच्या सहभागाने हे शक्य होणार नाही.\nतथापि, या घटनेची कथा अशी आहे. स्टार इंडिया आठ वर्षांच्या कालावधीसाठी (२०१५-२०२३) साठी आयसीसीला प्रसारण हक्कांसाठी २ अब्ज डॉलर्स मोजते. ही वाढ मागील कराराच्या ८०% इतकी भरभक्कम आहे. इथे खरी गम्मत सुरु होते. भारताने विश्वचषक स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत किमान ९ सामने खेळणे आवश्यक आहे. म्हणूनच १० सदस्यांचा फॉर्म पूर्णतः त्यांच्या गरजा पूर्ण करते. हे लक्षात येण्यासारखे आहे, की मागील १४ संघांच्या फॉरमॅटमध्ये देखील काही त्रुटी होत्या. परंतु, सुधारण्यासाठी आपण तळाच्या स्थानावर असलेले संघ तसेच सहकारी राष्ट्रांच्या कारणांचे त्याग करू शकत नाही.\nलक्षात ठेवा, स्कॉटलंड, नेदरलंड, कॅनडा यांसारख्या असोसिएट्ससाठी, विश्वचषक ही एकमेव संधी आहे, जेथे त्यांना मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळते आणि त्या सामन्यांत विजय मिळवणे वास्तविकपणे त्यांचे क्रिकेटमधले वारे बदलू शकते. उदाहरणार्थ, १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या वेगवान प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रकारे २००७ आणि २०११ मध्ये अनुक्रमे पाकिस्तान आणि इंग्लंडला नामवित जागतिक स्तरावर अशा कामगिरीने सगळ्यांना भरपूर आकर्षित केले. बोर्डवर नवीन प्रायोजक आणणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युवा पिढीला खेळाला सुरुवात करण्यासाठी.\nम्हणून, कोणत्याही तळाच्या संघासाठी विश्वचषक स्पर्धेत प्रदर्शन करणे बरेच काही करून जाते. मला वाटतं, असोसिएट संघाचं झिम्बाब्वे येथील विश्वचषक स्पर्धा पात्रता फेरीतील प्रदर्शन बरंच काही सांगून जातं. जिथे या संघांनी आपला १००% खेळ दाखवून दिला आणि मागील काही वर्षांतील एक तगडी स्पर्धा करून दाखवली.\nबरं, १५ दिवसांच्या कठोर मेहनतीने फक्त वेस्ट इंडिज व अफगाणिस्तान हे दोनच संघ पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. पण झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि आयर्लंड यांसारख्या संघांना मात्र या महाकुंभापासून मुकावे लागेल हे दुर्दैव. आणि इथेही आयसीसीला खरंच दोष देऊ शकतो. सुरुवातीला, या स्पर्धेतील २० सामने टेलिव्हिजनवर दाखविणे अपेक्षित होते. नंतर त्यांची संख्या दहावर आली आणि सर्व सामन्यांचे प्रक्षेपण न केल्यामुळे आयसीसीने डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम (डीआरएस) न वापरण्याचा निर्णय घेतला. शिवाय राखीव दिवसही ठेवला नाही. आणि याचा मोठा फटका बसला तो स्कॉटलंड संघाला.\nविश्वचषकाच्या स्थानासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध १९९ धावा करून विजय मिळविण्यासाठी स्कॉटलंडच्या फलंदाजांनी त्यांची कामगिरी फत्ते केली. परंतु,\nपंच पॉल विल्सन यांनी रिची बरिटन यांच्याविरोधात एलबीडब्ल्यू निर्णय दिला. डीआरएस नसल्याने फलंदाज काहीच करू शकला नाही. आणि परिणामी विकेटच्या पडल्या नंतर पावसाचा व्यत्यय आला आणि वेस्ट इंडीजने सामना ५ धावांनी डकवर्थ-लुईसच्या मदतीने मिळवून जिंकला.\nत्या विशिष्ट निर्णयाबद्दल धन्यवाद. स्कॉटलंडला केवळ विश्वचषक स्पर्धेचं स्थानच नाही तर जवळपास ७,००,००० पौंडांचा संभाव्य निधीही गमवावा लागला.\nमला भीती वाटते, याचा स्कॉटलंडमधील क्रिकेटच्या भविष्यात गंभीर परिणाम होणार नाही ना पण आयसीसीला याची काळजी वाटते का पण आयसीसीला याची काळजी वाटते का\nहि अशी वेळ आहे कि, आयसीसीने प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीला अटी लादून देऊ नये. हो पैसा महत्वाचा आहे, पण केवळ आर्धिक लाभासाठी खेळाचं नुकसानही होता कामा नये. २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी फॉरमॅटमध्ये बदल होणे हे खूपच गरजेचे आहे. नाहीतर असोसिएट संघांसाठी क्रिकेटचा विकास होणं खूपच जिकरीचं होईल आणि त्याने केवळ या खेळाचंच नुकसान होईल.\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T11:43:57Z", "digest": "sha1:CMYUVWDWVVM5VBXTP2BM5H32VACKNFS6", "length": 10645, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतातील धबधब्यांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\n(भारतातील धबधबे या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारतात अनेक धबधबे आहेत त्यांपैकी काही धबधब्यांची नावे खाली आहेत.\n१५ हिमाचल प्रदेशातील धबधबे\nएकही महत्त्वाचा धबधबा नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/-7-medizinische", "date_download": "2018-04-23T11:37:10Z", "digest": "sha1:SIKQMITXDWITKYUCB3DIVHUPQI7RQS4V", "length": 7088, "nlines": 33, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "समांतर प्रस्तुतीकरण 7 एसइओ-धोरणे साठी Medizinische वर्डप्रेस", "raw_content": "\nसमांतर प्रस्तुतीकरण 7 एसइओ-धोरणे साठी Medizinische वर्डप्रेस\nसुमास्चिनिनोपिटिमरंग (एसइओ). झुम बेइसपीएल, बोन्टन गेगेंड येथील वेब-बेनिझर इटिन इनोम पॉडोलॉजिन्स्, आणि स्पिरेल पॉयोडॉन्ग इन डेर गेगेंड, नॅटिर्लिच, स्यू वॉलेन इह्रे प्राक्सिस ऑल्शियम इन ऑप्शन इन स्यूसेरजेब्निसन ऑफ्टाऊज़न.\nग्राहक समर्थन व्यवस्थापक द्वारे देय सेमील्ट , जेसन अॅडलर, एसइओ-युक्त्या अंमलबजावणी करणा-या वस्तूंवर चालणा-या कंपनीने वेटब्यूबरस्व्हिर्टेबल इझ गेशुन्थिट्स्सेन झू वर्चफ्फेन\nअर्लेस्टेलेन सिई एईन अॅन इम्फसेंडेय लिस्ट डर वोर्टर, मे इइररंग मेइन्ग नच बेइ डर स्यूके एच इमिमेंजिन फ्रॉम वर्विंग्सजेन्त्रम एंड झिएन डब्लेंस्टलीस्टेन्गेन वर्डेड वर्डेन. Google ने Google च्या प्रभावी शब्दशः कीवर्ड-प्लॅनर्स बद्दल लिहावे. डर टेस्ट wird zeigen, welche Phrasen einen signifikanten मॉर्गन साठी आश्रय आहे, आणि किमान कोंकण व फॉन वरीय सीट - top web design agency.\nकीवर्ड, एमआयटी Ihrem एसइओ-सामग्री इंटिग्रेटेड आहेत, मेटाडेटा बद्दल लिहा, आणि नंतर आमच्या वेबसाइटवर सामग्री आयआरआय वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल. मेटाडेटा डी एचटीएमएल-मेटाटॅग वर लिहा, मी सिच डॉकिंग आणि क्लायंट मेमॅटिक टॅग टॅग्ज एचटीएमएल- Chiffre einer Datei befinden. मेटाडेटेन हॅल्फेन डेर सुमेसाचिन झू आइडेंटिफीज, वर्म एस ई ईनर सीट गेहट, टायटल-टॅग्ज अॅल टाइटेल डर सेट वॉरगेनोमेन वर्डेन.\nErstellen Sie im Namen Ihres medizinischen व्हर्जोर्ज्जजेंट्रम्स ईन्झिगेटिजेन इनहॉल्ट फॉर Ihre वेबसाइट. इन्फॉमेरेनर सिए इहारे झील्लगुपे डच मरु वेलिंग्ट व्हॉन क्वालिटेटिव हॉचर्ट्टीम कंटेट-मार्केटिंग.\n4. आतापर्यंत, मी एक साइट मॅप नुसार आमच्या वेबसाइटवर ठेवते\nदास Erstellen einer vereinfachten साइट मॅप ist of unterschätzter ट्रिक, मी येथे साइटवर अपलोड करत आहे. याहू मध्ये याहू Einblick आहे, Bing आणि Google वर, आपण वेबसाइटवर शोध आणि शब्दलेखन करू शकता.\n5 विविध शोध वर्टिकल आहेत\nमेस्तिनी मेसेंटीन मेसेंग्थिटेक्वेर्टेन डब्लू मोग्लिचकेट, एमआयटी डॅशशो, व्हिडीओ, बेल्डर्न अंड एंड इरेरेन इंटरकटीन फॉर्म्युलेरेन हॉवेर झू रैंकेन. आमच्या वेबसाइटवर आमच्या वेबसाइटवर सुधारणांसाठी उपयुक्त आणि नफा फायदेशीर आहे.\nमेहर अलस मने हेलफेट्स डर सुपेनफ्रैगन एर्फीग्ट über मोबाइल ग्रीट इईन लोकळे स्यूके इट इईन स्ल्यूस्लॉर्टेर्टेकेल फर एइन मेडिजिनिक वर्सोर्गंजोरॉजिन्सेशन.\n7. येथे क्लिक करा सामाजिक साइट, हे क्रमवारीत\nसोझीले मेडियाअन स्टुअर्न डेन वाहतूक ऑफीस वेबसाइट आणि ईमॉल्लिसीन ईईन व्हाइस्सेलसीटीगे इंटरकनेशन सर्वसाधारण लोकांशी संपर्क साधा सोझीली वेबसाईट्स बेझुग नुसार आणि सामग्री-गुंतवणूकीसाठी एसइओ\nझीएफेलान इइहृत्र बेरूफमध्ये एसईओ मध्ये बोलावलेले आहे का Derzeit besitzen mehr als 55 अमेरिकेत स्मार्टफोनमध्ये प्रोझेंट डर इर्चिचेंटेनन, व्हियेट व विट व्हिक्टिग एस् इट, यान स्केर्जेबनिसेंन एनेन होन स्टेलनवर्ट झू हाबॅन होते. कुरकुर आणि प्राधान्यक्रमानुसार सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7143055", "date_download": "2018-04-23T11:46:01Z", "digest": "sha1:NHNPWLJHJQFHJHVC3JQAPK6Z44FKX6B2", "length": 6106, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "ऍपल फॉर्च्यून 500 यादीत सहाव्या स्थानावर पोहचला आहे, तर फेसबुकचा पहिला शुल्लक हिस्सा", "raw_content": "\nऍपल फॉर्च्यून 500 यादीत सहाव्या स्थानावर पोहचला आहे, तर फेसबुकचा पहिला शुल्लक हिस्सा\nआपल्या वित्तीय वर्षांसाठी एकूण महसूलाने रँकिंग कंपन्यांना, फॉर्च्युन मॅगझिनने आपल्या वार्षिक फॉर्च्युन 500 कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली. वॉलमार्ट 2012 मध्ये नंबर 2 वर सरकल्या नंतर प्रथम स्थानावर आला. अन्य दहा पुनरावृत्त्यांमध्ये एक्झॉन, शेवरॉन, फिलिप्स 66 , बर्कशायर हाथवे, जनरल मोटर्स, जनरल इलेक्ट्रिक आणि फोर्ड मोटर.\nFacebook ने आपल्या पसंतीचा प्रथम यादीत 482 वर काढला होता. पुढील आठवड्यात त्याने 29 व्या वाढदिवस साजरा केला होता - cargo bike canada. सिलिकॉन व्हॅली मर्क्यूरी न्यूजने नोंदवले की फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग कुठलेही फॉर्च्युन 500 कंपनीचे सर्वात तरुण सीईओ होते. सर्वात तरुण-फॉर्च्युन -500-सीईओ गटात जकरबर्गचा द्वितीय सदस्य मिमल सीईओ मरिसा मेयर होता जो 38 महिन्यांत चालू करेल. 2012 मध्ये 483 वर आल्यानंतर या वर्षामध्ये Semaltेट 11 9 अंकांनी घसरला होता.\nसिलिकॉन व्हॅली मर्क्यूरी न्यूज अहवालाच्या अनुसार, टेक क्षेत्राचा नफा 5.8 टक्के घसरला आहे, परंतु फॉर्च्युन 500 च्या यादीत दहा क्षेत्रांपैकी पाचवे सर्वोत्तम प्रदर्शन करणारी संस्था होती. आयबीएम (नं. 20), मायक्रोसॉफ्ट (नं. 35), आणि (49 व्या क्रमांकावर) आणि Semaltेट (73 व्या स्थानावर असलेल्या 55 व्या स्थानी) असलेल्या अन्य टेक्नॉलॉजी कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.\n(2 9) एमी गेसेंझेस\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपारिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफ्स.कॉम, सॉफ्टवेअर सीईओ डॉट कॉम आणि सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट मॅगझिन. एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\nव्हिडिओचा हेतू शोधणे: Google ने कस्टम इव्हेंट प्रेक्षकांना YouTube वर विस्तृत केले, ऍक्शन जाहिरातींसाठी TrueView लाँच केले\nआपण प्रोग्रामेटिक नेटिव्ह जाहिराती का वापर करावा\nमूल्य सहकारी बद्दल सर्व: कसे ग्राहक आणि स्पर्धात्मक संशोधन आपल्या विपणन आकार पाहिजे\nरेडमिट ने आपल्या मोबाइल अॅप्समध्ये नेटिव्ह प्रमोटेड पोस्ट जाहिराती सादर केल्या\nऍपल चेनल: सीएमओ जोनफेजबुक इंटरनेट विपणन उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/snacks-recipes/page/9/", "date_download": "2018-04-23T11:41:01Z", "digest": "sha1:UDYIT3OAERBKQCVC6MGK7DVQHVE7YRVX", "length": 8025, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मधल्या वेळचे पदार्थ | Snacks recipes - Page 9", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » मधल्या वेळचे पदार्थ » पान ९\nमधल्या वेळचे पदार्थ - (Snacks recipes)मधल्या वेळचे पदार्थाच्या विविध पाककृती(मधल्या वेळचे पदार्थ), Various types of Snacks recipes.\nमुळात कच्छ(गुजरात) येथील सुप्रसिद्ध ‘कच्छी दाबेली’ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह अनेक देशात देखील तितकीच प्रसिद्ध आहे. न्याहारीला किंवा मधल्या वेळेत करता येणारा हा पदार्थ घरी नक्की करुन बघा.\nकेळ्यात असणारे जीवनसत्वं आणि अंडे मिळून तयार झालेले चटपटीत असे ‘दिलपसंद केळ्याचे वडे’ वेगळी पाककृती म्हणून सर्वांना आवडेल.\nखमंग आणि चटपटीत असे मिश्र डाळी आणि मटकीपासून बनवलेले नागपुरी पद्धतीचे ‘नागपुरी डाळीचे वडे’ सर्वांना आवडेल.\nसर्व प्रकारच्या डाळींपासून बनविलेले पौष्टिक, चटपटीत असे ‘मिश्रडाळींचे वडे’ सर्वांना आवडेल.\n‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व असलेला कोबी बर्‍याचदा त्याची भाजी खायला आवडत नाही परंतु चटपटीत कोबीचा पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:43:38Z", "digest": "sha1:KHKY4UXRB2IO4KQJYYGA3WB3ZV7YBGM4", "length": 16224, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्या आंबेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिंदू[ संदर्भ हवा ]\n२००८ - व पुढे\nबिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड\nआर्या समीर आंबेकर (जून १६, १९९४ - हयात) ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[१]\n२ मराठी चित्रपटांत अभिनय\n३.१ सा रे ग म प लिटिल चॅम्प्स\n३.३ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन\nआर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे.\nआर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.\nतिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.\nती सध्या काय करते\nसा रे ग म प लिटिल चॅम्प्स[संपादन]\nसा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.\nआर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.\nआर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म प च्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे परीक्षक होते.\nआर्याला अनेकदा परफॉर्मर ऑफ द वीक (Performer of the week) घोषित करण्यात आले.\nआर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते.\nआर्याला या कार्यक्रमादरम्यान माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली होती.\nमराठी अभिमानगीत संगीत दिग्दर्शक: कौशल इनामदार\nआठवा स्वर संगीत दिग्दर्शक: वर्ष भावे\nमला म्हणत्यात आर्या आंबेकर\nखाऊचा गाव संगीत दिग्दर्शक: यशवंत देव\nहम और तुम - हिंदी गाण्यांचा गीतसंग्रह, संगीत दिग्दर्शक: खलिल अभ्यंकर\nआनंदवन आले घरी - बाबा आमटे\nमझ्या मातीचे गान - कुसुमाग्रज प्रतिष्ठान\nदिवा लागू दे रे देवा - पहिला सोलो अल्बम, संगीत दिग्दर्शक: सलील कुलकर्णी [२]\nकळी या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास खळे यांनी १५ वर्षांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.[५] याच चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारी आर्या आंबेकर, श्रीनिवास खळे यांच्याकडे गाणारी शंभरावी गायिका ठरली.[६]\nरमा माधव - हमांमा रे पोरा या गाण्याची पार्श्वगायिका [७][८]\nसंत कैकडी महाराज - संगीतकार: नरेंद्र भिडे\nरेडी मिक्स - संगीतकार: अविनाश विश्वजीत\n२००८ - माणिक वर्मा शिष्यवृत्ती\n२००९ - उप-विजेती, झी मराठी सा.रे.ग.म.प. लिटिल चॅम्प्स\n२०१० - हरिभाऊ साने पुरस्कार\n२०१० - पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार[९]\n२०११ - बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड (संगीत)\n२०१२ - यंग अचिवर्स ॲवॉर्ड - विसलींग वूड्स ईंटरनॅशनल\n२०१२ - डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार\n२०१४ - आर्या पुरस्कार\n२०१५ - डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार\n↑ \"सांगितिक सोहळ्यात 'रमा माधव'चे म्युझिक लाँच, मंचावर अवतरली पेशवाई, पाहा PICS\". marathibhaskar (mr मजकूर). 2014-07-30. 2018-04-09 रोजी पाहिले.\nइ.स. १९९४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१८ रोजी ०२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/03/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T11:40:29Z", "digest": "sha1:TIAWBIWJM5UKLBMDOSQR2Z74E5NTANFB", "length": 8202, "nlines": 163, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): कदाचित", "raw_content": "\nमनी तिच्याही भाव कदाचित\nतिला पाहिजे नाव कदाचित\nती दिसली, पण दुखले नाही\nभरून आला घाव कदाचित\nचाल नेमकी अचूक झाली\nहरेन आता डाव कदाचित\nमिळाले तरी टिकले नाही\nअखेर नडली हाव कदाचित\nइथेच उरली आहे माती\nइथेच होते गाव कदाचित\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/?start=20", "date_download": "2018-04-23T11:40:18Z", "digest": "sha1:2HOZS7TJOVXLNNG5AB7QH6NFFL7VZSIS", "length": 3801, "nlines": 155, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nफेसबुक लाइट ट्विटर चॅलेंज आव्हान करण्यासाठी\nAndroid साठी नवीन Google+ अॅप & आयफोन अधिक फोटो संपादन & सामग्री शेअरिंग मिमल\n2017 पर्यंत सामाजिक जाहिरात महसूल 18.6% वाढेल [सामल]\nप्री-रोल मिमलॅटच्या तुलनेत स्थानिक व्हिडिओ जाहिरात उच्च ब्रँड-लिफ्ट मेट्रिक्सवर चालवा\n7 तरीही जुने जाहिरात तत्त्वे जी अद्याप संबंधित सममूल्य आहेत | Ep. # 171\nसमाकलित एसइओ आणि सामाजिक मीडिया Semalt\n14 उत्तम ऑनलाईन Semaltसाठी एसईओ टिप्स\n2013 साठी पाच ग्रेट सोशल मीडिया मिमल\nGoogle च्या एकूण विक्रीपैकी केवळ 35% उत्पादने Google च्या सबलाटमध्ये बंद झाली आहेत\nऍपल फॉर्च्यून 500 यादीत सहाव्या स्थानावर पोहचला आहे, तर फेसबुकचा पहिला शुल्लक हिस्सा\nमिमलचा सात वर्षांचा आजचा काळ चालू असतो #HappyBirthday # Semalt7\n# एप्रिल 21: Google चे मोबाइल-फ्रेंडली अल्गोरिदम हिमाचल\nइंटरनेट सेमिटल 2012 12 11 मध्ये हा आठवडा\nGoogle Analytics आता अनकॅलेटेड डिस्प्ले ऍड आणि & व्हिडिओ जाहिरात इंप्रेशन Semalt\nमाझ्यासाठी Xyo च्या अॅप्स फेसबुक वापरासाठी अनुप्रयोग शिफारशी शोधण्यासाठी पसंत करतात & मिमल\nGoogle Analytics व्यवस्थापन पृष्ठ एक नवीन दिसणारी आणि & श्रेणीसुधारित मिल्वेलसह वाटणे\nशोध इंजिन मार्केट शेअर मिडल 2012\nसममूल्य: Bing साठी आपली साइट एसइओ कसे\nऍप्पल एक कंझ्युमर पसिली, कम्प्युटर्स, गोळ्या व & मोबाइल Semalt\n पुरावा शो साइट मिश्ट्रलने सह ट्विटर च्या लीड खालील जाऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/mani-balan.html", "date_download": "2018-04-23T11:40:06Z", "digest": "sha1:5IFXYNCIYZVNCJVSCTT7XVKCCUYMAIM4", "length": 6152, "nlines": 63, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : श्री मणी बालन\nConstituency : १७७, धारावी विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : अध्यक्ष, धारावी विधानसभा (भाजपा)\nName श्री मणी बालन\nFather's Name : बालन कृष्णन पणकेशेरी\nMother’s Name : सरोजिनी बालन पणकेशेरी\nDate of Birth: : २७ सप्टेंबर १९७६\nPlace of Birth: : मुंबई, महाराष्ट्र\nSpouse’s Name : स्वप्ना मणी पणकेशेरी\nLanguages Known : मल्यालम, हिंदी, मराठी, इंग्रजी\nProfession : समाजसेवा व उद्योगधंदा\nHobby : लोकांना मदत करणे\nResidence Address : प्लॅट नं. ७०१, 'बी' विंग, युनायटेड रेसीडेन्सी, काळा किल्ला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी, मुंबई - ४०० ०१७\nOffice Address : भाजपा कार्यालय, सागर हॉटेल जवळ, राजगिर सदन समोर, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई - ४०० ०२२\n१९८९ पासून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, वॉर्ड उपाध्यक्ष म्हणून कार्याची सुरवात केली. त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पद भूषविले. त्याच प्रमाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष, साउथ सेल जिल्हा अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केली.\nधारावी विधानसभा तालुका अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे.\nलोकांना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बी.एम.सी., एस.आर.ए., म्हाडा इ. विविध प्रकारे शासकीय / अशासकीय कामात सहकार्य.\nविविध समाजिक संस्था तसेच विविध सोसायटींच्या पदांवर कार्यरत आहे.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nजनतेचे कोणतेही ज्वलंत प्रश्न सोडविले जातील.\nसुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार मिळवून दिला जाईल.\nशाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडविल्या जातील.\nशासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.\nगरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.\nगरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nलोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आदोलने.\nहेल्थ कैम्प, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविणे, धारावी झोपडपट्टी वासियांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचविले.\nधारावी झोपडपट्टी वासियांचे पुर्नवसन करण्यासाठी मोठे आंदोलन उभारून त्यांना न्याय देत आहे.\nजाहीर सभा आणि निवडणूक कार्यक्रम - २०१४\nसामाजिक कार्यक्रम व आंदोलने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641204.html", "date_download": "2018-04-23T11:37:30Z", "digest": "sha1:GVWTNDGYSIHMIL2YPU6GJNQRVSLQ4GIP", "length": 16541, "nlines": 40, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - दुधसागर ! अद्भुत अनुभव !!", "raw_content": "\n\"दुधसागर \" नुसते नाव घेतले कि डोळ्यासमोर जे चित्र उभ राहत अगदी तसाच अनुभव अनुभवयास मिळतो जेव्हा आपण \"दुधसागर \" हा धबधबा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो.\nदुधसागर हे गोव्यामधील एक प्रसिद्ध ठिकाण (रेल्वे स्टेशन) . पावसाळ्यात निसर्गप्रेमीं इथे आवर्जून भेट देतात. २०१४ साली मला पण इथे जाण्याचा योग आला. तुम्ही गाडीने जाणार असाल तर योग्य दिशा दाखवणारा हा एक पिवळ्या रंगाचा लागतो जो आम्ही रात्री ११ वाजता पहिला आणि सुटकेचा निश्वास टाकला.\nपुढल्या सकाळी आम्हाला इथेच यायचा होता त्यामुळे जवळपासच आम्ही रूम शोधू लागलो , पण या परिसरात \"दुधसागर रेसोर्ट \" हे एकमेव राहण्याच ठिकाण असून दुसरा कोणताही पर्याय इथे नाही आहे. या बोर्ड पासून आत डाव्या हाताला जाणारा रस्ता आपल्याला जवळ घेऊन जातो.या स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या स्थानिक लोकांच्या घरांमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय होऊ शकते आणि हे लोक देखील अत्यंत प्रेमाने आणि अगदी मुबलक दरात आपले आदरातिथ्य करतात. दुसरा आणखी एक पर्याय म्हणजे या ठिकाणापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लोंढा या मध्यवर्ती ठिकाणी राहण्यासाठी बऱ्यापैकी लॉज उपलब्ध आहेत.\nआम्ही सकाळी लवकर उठून, पोटभर नाश्ता करून कॅस्सेल रॉककडे निघालो. वाटेतच आम्ही ज्यूस, ग्लुकोज डी, चॉकलेटस,फळे ,पाण्याच्या बाटल्या इतक समान सोबत घेतले. लोंढा ते कॅस्सेल रॉक हा रस्ता खूप छान आहे. उंच डोंगरावर उतरलेले दूर ढग आणि त्यातच काही लहान मोठे वाहणारे धबधबे लक्ष वेधून घेत होते. इतका सगळं छान असूनही रात्री पाहिलेला पिवळा बोर्ड कधी येईल असा झाल होत. पाहता पाहता कॅस्सेल रॉक स्टेशन वर आम्ही पोह्चलो. बरीच गर्दी दिसतही होती. सगळे निसर्गप्रेमी अगदी उत्साही दिसत होते. स्टेशनच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या जागेत आम्ही गाडी पार्क केली आणि रेल्वे च्या पटरीवर पाऊल ठेवले.\nकॅस्सेल रॉक ते दुधसागर हे अंतर साधारण १३ -१५ किलोमीटर आहे . . दुधसागरला पोहचण्यासाठी तसे अनेक पर्याय आहेत. एक म्हणजे लोंढा रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करावा आणि अवघ्या २० मिनिटांमध्ये दूधसागरला पोहचावे. (पण यात काही मज्जा नाही).किंवा रमत गमत रेल्वे ट्रेक पादाक्रांत करावा ज्याला ५-६ तास लागतात.आम्ही देवाच नाव घेऊन चालतच हा प्रवास सकाळी ९ वाजता सुरु केला.\nअत्यंत स्वछ आणि निसर्गरम्य असा हा कॅस्सेल रॉकचा परिसर. रस्त्यावर, डोंगरावर,सहज कोणही चालू शकत पण खडी असलेल्या रेल्वे ट्रेक वर चालण आणि ते ही १३-१५ किलोमीटर हे जरा कठीणच जात.(मला हे चालताना समाजल) त्यामुळे दूधसागरला भेट देणार असाल तर योग्य कपडे, शूज(च), ५-६ तास पुरेल इतकं पाणी, ग्लुकोज डी, चॉकलेटस,फळे आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इतक दूर चालण्याच मनोबल सोबत घेणे अत्यंत आवश्क्यक आहे. मित्रहो, पण निसर्गातील गारवा, मनातील उत्साह आणि जोश यामुळे १३-१४ किलोमीटरचे अंतर देखील फारस अवघड वाटत नाही .\nया प्रवासात आपल्यासारखे अनेक निसर्गप्रेमी दिसत असतात. ज्यांमध्ये फक्त तरुण वर्गच नाही तर लहान मुले ,वृद्ध देखील या आगळ्या वेगळ्या (ट्रेक ) प्रवासाचा आनंद लुटत असतात. खाली उतरत असणारे पांढरे शुभ्र ढग, दोनही बाजूंना असणारी हिरवळ, लहान मोठी फुलझाडे आणि रेल्वेचा चकाकणारा रूळ अस काहीस वातावरण आपण या ५ तासच्या सबंध प्रवासात अनुभवत असतो. आम्ही या संपूर्ण प्रवासात उन आणि पावसाचा लपंडाव देखील अनुभवला, पावसाने चिंब कराव आणि उन्हाने वाळवाव असे हे चक्र शेवटपर्यंत चालूच होत.\nसुरवातीच्या काही तासांनंतर खरी मज्जा चालू होते . रेल्वे ट्रकच्या डाव्या बाजूला असणार्या डोंगरांगा आणि त्यात वाहत असणारे स्वच्छ पाण्याचे झरे मन मोहून घेतात. या झर्याच्या जवळ थोडावेळ विसावा घेऊन पुन्हा मार्गस्थ झालो.जाताना वाटेत अनेक हौशी फोटोग्राफरही दिसत होते. अगदी रेल्वे च्या रुळांचे उभे आडवे ,आगळे -वेगळे फोटो ते घेत होते. त्यांना नक्कीच त्यात काहीस छान दिसत असावं हे नक्कीच. ते म्हणतात न कि प्रत्येक गोष्टीत आपल वेगळच अस एक सौदर्य असत फक्त शोधणार्याला च ते दिसत.\nरुळांवरून चालत पुढे जात असताना आपल्याला आजही मजबूत आणि भक्कम आहेत. असे हे इतिहासाचे साक्षीदार आपल्या स्वागताला सज्ज आहेत असच वाटत.साधारण ३-४ तास चालल्यानंतर आम्हाला करण्जोल नावाच स्टेशन लागले\nइथून अगदी १ तासाच्या अंतरावरच दुधसागर आहे असे जेव्हा आम्हाला समजला तेव्हा \"अजून १ तास अरे बापरे अशी माझी प्रतिक्रिया झाली. खाऊन, पिऊन आम्ही काही वेळ इथेच विश्नाती घेतली. विश्रांतीनंतर दमलेल्या शरीरात जरा जोश आला. आम्ही इतके दमलो होतो कि फळांनी, खाऊनि भरलेली गच्च बग्स कधी रिकामी झाली हे समाजलच नाही .आता मात्र कधी एकदा दुधसागरचे दर्शन होतंय अस वाटायला लागल होत.येणाऱ्या -जाणार्या रेल्वे गाड्या पाहून आणखीनच मज्जा वाटत होती. कारण काही तरुण मुल स्वतःला गुलाम पिच्चर मधील आमिर खान समजून धावत्या गाडीसोबाताचे फोटो घेण्यात रमलेली होती.वाटेत भेटणारे आणि परत मार्गी जाणारे सगळेच लोक दुधसागरचे वर्णन करत होकरत होती. जवळच आहे, अजून १५-२० मिनिटच अंतर राहिल अस देखील सांगत होती आणि आमच्या सारख्या दमलेल्या लोकांची उमेद वाढवत होती. अनोळखी लोक असतात हि सगळी पण त्यांच्याशी बोलून, त्यांचे अनुभव ऐकून छान वाटत होत. वाटेवर आम्हाला पाण्याचा एक मोठा प्रवाह लागला . त्या पाण्यात आम्ही उतरलो आणि मनसोक्त खेळलो. तो प्रवाह प्रचंड मोठा होता जणू दुधसागराचा लहान भाऊच त्यावरून आम्ही उगाच आपल दुधसागर च्या आकारमानाबद्दल नको ते अंदाज बांधत होतो .सुंदर अशा या निसर्गरम्य वातावरणात चालताना एक गोष्ट लक्षात येते कि, निसर्गापेक्षा सुंदर अस या जगात काही असूच शकत नाही.तुम्हीही जा, भेट द्या म्हणजे तुमची ही खात्री पटेल.\nलोकांनी सांगितल्याप्रमाणे साधरण ३० मिनिटात आम्ही \"दुधसागर स्टेशनवर\" पोहचलो. पण दुधसागर अजून पुढे १५ मिनिटे दूरच आहे हे ऐकल्यावर मात्र \"काय हे\" असे वाटले आणि पुढची १५ मिनिटे सुद्धा खूपच वाटायला लागली. आम्ही जस जस पुढे जाऊ लागलो तस तसे या विशाल धबधब्याची झलक दिसायला सुरुवात झाली होती . त्याचप्रमाणे त्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाजही कानावर पडायला लागला. त्यानंतर तर मी मात्र स्वतःला थांबवूच शकले नाही. आम्ही अजून जोरात चालू म्हणजे जवळ जवळ पळतच पुढे जाऊ लागलो. सुरुवातीला आधी काहीशी चालणाऱ्यां लोकांची तुरळक गर्दी पाहून वाटल होत की इथे फारच कमी लोक येत असावेत. मात्र जस जसे आम्ही जवळ पोहचत होतो त्याचप्रमाणात ही गर्दी वाढत होती. दमलेले, थकलेले पर्यटक रेल्वेच्या रुळावर पाय पसरून मस्त आराम करत येणार्यांचे स्वागत करत होते. या ठिकाणी असणार्या लहान दुकानात तुमच्या पोट्यापाण्याची आणि चहाची सोय होऊन जाते. दुधसागरचे दर्शन घ्यायचे होते त्यामुळे या ठिकाणी न थांबताच आम्ही पुढेच चालत राहीलो .\nशेवटी एकदाची ती उत्कंठा संपली आणि पाण्याचा तो सागर डोळ्यासमोर अवतरला त्याचे हे विशाल रूप पाहून आपण कोण आहोत, किती चालून आलो आहोत ,कसे आलो आहोत , कुठून आलो आहोत या सर्व सर्व गोष्टींचा मला विसर पडला. डोंगराच्या माथ्यावरून पडणारे हे प्रचंड पाण्याचे लोट जणूकाही आकाशातातूनच पडत आहेत असाच भास मला तरी होत होता.\nगरमागरम चहा आणि वडापावचा मस्त आस्वाद घेत मी दुधसागर डोळ्यात सामाऊन घेतला आणि मनोमन निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या चमत्काराला नतमस्तक ही केल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2011/11/blog-post_01.html", "date_download": "2018-04-23T11:40:41Z", "digest": "sha1:Q4SRPTZSDBJ6CQEEXT6U6JHYRCTSCTL2", "length": 8560, "nlines": 158, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): मागणे", "raw_content": "\n(दीपज्योती दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित -\nअजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो\nजिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो\nपहाड येऊ देत वा असो उधाण सागरी\nहजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी\nकधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो\nफकीर जाहलो तरी, सुखास ना पडो कमी\nमनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी\nकुबेरही खजील होय, ही मिजास मागतो\n- नचिकेत जोशी (२८/८/२००८)\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/547/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87,_%E0%A4%AE%E0%A4%97_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4_", "date_download": "2018-04-23T11:25:51Z", "digest": "sha1:2OSKVK6IKDRNGAIV7DMCD23UXF2WEYGI", "length": 9646, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nउद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकऱ्यांबाबत दुजाभाव का\nऔरंगाबाद येथे संघर्षयात्रेदरम्यान झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, ते यांचे जावई लागतात का मग शेतकऱ्यांबाबत दुजाभाव का मग शेतकऱ्यांबाबत दुजाभाव का असा जळजळीत सवाल त्यांनी सरकारला केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, पतंगराव कदम, अब्दुल सत्तार, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते.\nपुढे बोलताना पवार म्हणाले की, आघाडी सरकार असताना आम्ही शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला. दुष्काळात पाण्याची सोय केली. जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या. ते शेतकऱ्यावर उपकार नव्हते, तर तो आमचा धर्म होता, आमचं कर्तव्य होतं. आता बळीराजा संकटात सापडला असताना त्याला मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे.\nशेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचाच भाजपला विसर पडला असल्याची टीका पवार यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांनी ठरवले तर ते सर्वांना घरी बसवतील, असा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफीसाठी आम्हाला आमदारकीची एक टर्म सोडायला लागली तरी चालेल, १९ आमदारांचे निलंबन मागे घेतले तरी आम्ही सभागृहात जाणार नाही, संघर्षाची ज्योत आता पेटली असून विरोधक आता मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी देता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही शेतक-यांना न्याय देऊ, असे पवार म्हणाले.\nदरम्यान कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचे सहकारी गेल्या ६ दिवसापासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सदस्यांच्या विनंतीनंतर पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्तार यांनी उपोषण सोडले.\nसरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही - अजित पवार ...\nमोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज हे सरकार माफ करीत असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, निलंबन करण्यापेक्षा विरोधातील विधिमंडळातील सर्व आमदार राजीनामे देतील, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधकांची संघर्षयात्रा रविवारी मोहोळ येथे पोहोचली, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष् ...\nयाचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा ...\nशहापूर येथील संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा नारा देत शेतकऱ्यांसाठीचा हा लढा यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी झाली नाही तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी सभेत बोलताना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश ...\nसंघर्षयात्रा सोमवारी नाशिक जिल्ह्यात ...\nविरोधी पक्षांची संयुक्त संघर्षयात्रा सोमवार दि. १७ एप्रिल रोजी नाशिकपर्यंतचा पल्ला गाठणार आहे. सोमवारी मालेगाव, नामपूर, सटाणा, देवळा, चांदवड, पिंपळगांव बसवत, आडगांव येथे संघर्षयात्रेचा दौरा असून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. संघर्षयात्रेला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने संघर्षयात्रेला पाठिंबा देतील याची खात्री विरोधकांना आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2018-04-23T11:13:50Z", "digest": "sha1:DSLZWLDP5XXPCHDM7TNZR5W5EKFBFWMP", "length": 10852, "nlines": 93, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "तुकाराम मुंढेंची बदली; पक्षनेते एकनाथ पवारांच्या पाठपुराव्याला यश | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome ताज्या बातम्या तुकाराम मुंढेंची बदली; पक्षनेते एकनाथ पवारांच्या पाठपुराव्याला यश\nतुकाराम मुंढेंची बदली; पक्षनेते एकनाथ पवारांच्या पाठपुराव्याला यश\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यामंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंढे पीएमपीचा कारभार सुधारण्याऐवजी कर्मचा-यांवर कारवाया करत असल्याने नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे एकनाथ पवार यांनी म्हटले होते.\nपीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वर्षभर संस्थेचा कार्यभार सांभाळला आहे. प्रवाशांना जलद प्रवासी सेवा पुरविणे, संस्थेला फायद्यात आणणे, प्रवाशांची सुरक्षितता ठेवणे आदी कारणांसाठी त्यांची नियुक्ती केली. मात्र, मुंढे यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची कोणतीही खातरजमा न करता त्यांच्यावर जुलमी कारवाई केली. कोणताही खुलासा न देता किरकोळ स्वरुपाच्या कारणांवरून कर्मचाऱ्यांना घरी बसवले. त्यामुळे हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे दाद मागितल्याने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्या बदलीचे निवेदन दिले होते.\nमुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच मार्गावरील बसेस बंद केल्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. संस्थेला पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाते. मुंढे यांच्या उपदव्यापी कारभारामुळे पालिकेला जास्तीचे अनुदान द्यावे लागत होते. त्यांनी 210 कोटी 44 लाख रुपयांच्या संचालन तुटीची मागणी केली. एवढी रक्कम देण्याची वेळ आल्याने पालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी मुंढे यांच्यावर रोष व्यक्त करीत होते. संबंधित विषयांवर बैठकीला हजर राहण्याचे सांगूनही मुंढे यांनी पालिकेचा अवमान केला होता.\nपक्षनेते एकनाथ पवार यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सत्ताधारी भाजप या नात्याने काही महत्वाच्या सूचना केल्या असता, त्याची दखल मुंढे यांनी घेतली नसल्याचेही पक्षनेते पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. त्यांच्या गैरवर्तनाला चाप लावण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पवार यांनी मुंढेंच्या बदलीची मागणी केली होती, अखेर पक्षनेते एकनाथ पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.\nTags: Eknath Pawarnirbhidsatta.comतुकाराम मुंढेपरिवहनपीएमपीएमएलमहामंडळसंचालक\nतुकाराम मुंढेंची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली\nविविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून खासदार अमर साबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/poli-churma/", "date_download": "2018-04-23T11:31:14Z", "digest": "sha1:4YJLEUICT5JER532NAKUF2OVPOLQRHEM", "length": 7066, "nlines": 114, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पोळ्यांचा चुरमा | Poli Churma", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » पोळ्यांचा चुरमा\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८\nपोळ्यांचा चुरमा - [Poli Churma] दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते.\nपोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.\nकांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.\nकांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.\nपोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्या टाकून द्याव्या लागत नाहीत.\nह्यात तुम्ही शेंगदाणे ,शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-23T11:52:14Z", "digest": "sha1:FO6OQ3YNBFIWDNNGGSQPYUFXZKFQYOLQ", "length": 71151, "nlines": 253, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पानिपतची तिसरी लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nमराठे-दुराणी युद्ध ह्या युद्धाचा भाग\nदुराणींचा विजय परंतु प्रचंड नुकसान\nमराठा साम्राज्य दुराणी साम्राज्य\nसेनापती 2 = अहमदशाह अब्दाली\n२-३ लाख बुणगे ( न लढणारे यात्रेकरू, स्त्रिया व मुले) ४२००० घोडदळ\nलढाऊ सैन्य:१५,०००-२०,०००. नागरिक= ३०,०००-३५,०००. एकूण :४५,००० ते ५५,०००. ३५,००० ते ४०,०००\nपानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.\n७ साहित्यात व दैनदिन जीवनात\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले[१]. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली[२]. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.\nपानिपतच्या संग्रामावेळेसचे मराठा साम्राज्य\nसदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्‍याच इतिहासकारांचे मत आहे.\nअठराव्या शतकातील दुराणी साम्राज्याचे सैनिक\nअब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरु कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दाली ला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली.\nपुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.\nअब्दाली ने संधी करायचा प्रय्त्‍न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.\nमराठे रणांगणाच्या उत्तरेस थांबले होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळीत होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरुण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.\nअफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्‍या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.\nमराठ्यांकडील अन्नसाठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्‍यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.\nमराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.\nपानिपतची तिसरी लढाई १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपर्‍यात बुणग्यांच्या शिबिरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.\nशेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.\nकुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले.\nभाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.\nमराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.\nपळणार्‍या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्‍नीला म्रुत्युदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.\nअफगाण्यांनी दुसर्‍या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.\nमराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.\nअब्दालीचा शेवटचा विजय: या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्‍या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लूट कोठून मिळणार दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.\nनानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.\nमोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.\nइंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्‍या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्‍य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.\nशीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.\nहैदरअलीचा उदय: पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.\nमाधवराव पेशव्यांचा उदय: नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्‍या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.\nअनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.\nयातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.\nमराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला[३].\nमराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.\nसाहित्यात व दैनदिन जीवनात[संपादन]\nपानिपत याच नावाची विश्वास पाटील यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. यात अब्दालीच्या सुरुवातीच्या आक्रमणांपासून ते युद्धाच्या शेवटापर्यंत मराठ्यांच्या मोहिमेचे वर्णन आहे. ह्या कादंबरीत अनेक घडामोडींचे नाट्यमय वर्णन आहे.\nया युद्धाचा प्रभाव दैनंदिन जीवनात पण दिसून येतो. हे युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतिक आहे, अनेक म्हणी यामुळे मराठीत रूढ झाल्या आहेत. उदा: ´पानिपत झाले´(खूप नुकसान झाले),हे युद्ध संक्रातीच्या दिवशी झाल्यामुळे`संक्रांत कोसळली´ (खूप मोठे संकट आले) , ´विश्चास गेला पानिपतात` अश्या अनेक म्हणी तयार झाल्या आहेत[४].\nजानेवारी २००८ मध्ये पुणे येथे पानिपतच्या रणसंग्रामात मराठे योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी संक्रातीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केले होते. काहींच्या मते युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.\nविश्वास पाटील, \"पानिपत\" - ले. Venus (1990)\nUday S. Kulkarni, \"Solistice at Panipat\" (मराठी अनुवाद, ‘सॉल्टिस ॲट पानिपत १४ जानेवारी १७६१’ अनुवादक - डॉ. विजय बापये)\nसंजय क्षीरसागर, \"पानिपत असे घडले\"\n↑ शाह वलीउल्हाह चे अब्दालीला भारतावर स्वारीचे निमंत्रण, -इस्लामचे अंतरंग पा: १४०-४१-ले. श्रीरंग गोडबोले\n↑ history Sikhism (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\n↑ स्वामी(कांदबरी)- ले. रणजीत देसाई\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\n२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nमराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T11:14:13Z", "digest": "sha1:5RCAA4KBJKJQRKCQZFYTGLOAJYX2FGOZ", "length": 8376, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "मयूर करंडक कलाकारांच्या क्रिकेट स्पर्धे’त एनएच 9 संघ विजयी | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome क्रीडा मयूर करंडक कलाकारांच्या क्रिकेट स्पर्धे’त एनएच 9 संघ विजयी\nमयूर करंडक कलाकारांच्या क्रिकेट स्पर्धे’त एनएच 9 संघ विजयी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागा’तर्फे कलाकारांच्या ‘मयूर करंडक क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एन. एच. – 9 संघ (हडपसर) हा संघ विजेता ठरला. ‘कॉपरकॉईन’ हा संघ द्वितीय तर ‘संस्कृती महाराष्ट्रा’ची टीम ‘ए’ हे तृतीय ठरले. ‘संस्कृती महाराष्ट्रा’ची टीम ‘बी’ ने चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे 9 वे वर्ष होते. 15 संघ सहभागी झाले होते.\nशिवाजी उदय मंडळ मैदान (शिवाजीनगर) येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊसाहेब कुर्‍हाडे, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक नंदा लोणकर यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागा’चे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील स्वागत केले. नितीन मोरे, योगेश सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. इक्बाल दरबार, माणिक बजाज, डॉ. रमेश खाडे, गिरीजा प्रभू उपस्थित होते.\nप्रथम क्रमांकाला 11 हजार व करंडक, उपविजेत्या संघाला 9 हजार व करंडक, तृतीय क्रमांकासाठी 7 हजार व करंडक, अशी बक्षीसे देण्यात आली. रोहित पठारे ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरले. चेतन चव्हाण (बेस्ट फिल्डर), मयूर जाधव (हॅटट्रीक), आबा सूर्यवंशी (बेस्ट कॅच), रोहित गायकवाड (बेस्ट बॅट्समन), सागर अडागळे (बेस्ट बॉलर), प्रकाश सुतार (बेस्ट कीपर) यांना गौरविण्यात आले.\nTags: nirbhidsatta.comPCMCकलाक्रीडाराष्ट्रवादी काँग्रेस पुणेशहरसांस्कृतिक\nवायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची हाणामारी; पक्षनेते एकनाथ पवांरांनी घेतली बैठक\nपिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात\nकोलंबो : भारताची विजयाच्या दृष्टीने वाटचाल…\nराज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी\nलग्नाच्या मांडवातून क्रिकेटच्या मैदानात लगेचच उतरण्यास मला अडचण येणार नाही – विराट कोहली\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t20457/", "date_download": "2018-04-23T11:18:57Z", "digest": "sha1:T6Y4Z4C7AL6ZTMSFUE3AAUAQUB2TNPMU", "length": 8478, "nlines": 190, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मन हे माझे", "raw_content": "\nकाही सुधारणासह परत एकदा ही कविता मी सादर करतोय कृपया अभिप्राय द्यावे , जेणे करून काही कमी असल्यास सुधारणा करून उत्तम रचना तयार होईल\nएकदिवस मी अधीर झालो\nमन माझे परतले नाही\nकाय ठाऊक काय जाहले\nमला काही उमगले नाही\nकुठे हरविले कुठे राहले\nमाझे काही चुकले तर नाही\nत्यादिवशी ते फिरता फिरता\nमज सोडूनं गेले तर नाही\nयाच विचारी गुंतून होतो\nआज अचानक चाहूल झाली\nडोळे वरती करून बघता\nमन उदास होते वेडे कुठले\nहसतं नाही बोलतं नाही\nकरू काय त्यासं हसवाया\nहे तर काही मानत नाही\nकुणाशी नाही वैरही याचे\nकाय करावे सुचतं नाही\nरडते फक्त हे अधुनी मधुनी\nराग जीवाचे गातही नाही\nमागणी केली उत्तर द्यावे\nपण ते काही सांगत नाही\nकाय घडले कुठे हरवले\nभेद आपुले खोलत नाही\nएकदिवस मन मला म्हणाले\nमीरे आता तुझ्यात नाही\nमी झालो आता दुसऱ्याचा\nतुला कधी मिळणार नाही\nबघितंले मी बाहेर फिरतांना\nहलकेचं जरा दूर जातांना\nदूर जातांना सोबत अपुल्या\nती मलाही घेऊन गेली\nरूप देखणे जणू चांदणे\nती मलारे हरवून नेली\nबोलायाचे मन बोलून गेले\nऐकून मलाही विचार पडला\nकाय घोळ हे मनाशी झाले\nदेतं कुणाला ह्रुदयभान ते\nलपवित तर काही नाही\nप्रेमाचा हा खेळ निराळा\nमन हरवून तर आला नाही\nजानिला मी भेद मनाचा\nजरी ते मज सांगत नाही\nहा तर होता खेळ प्रेमाचा\nज्याचा अंत सुंदर नाही\nएकदिवस मग मी सांगितली\nकोण होती ती स्वप्न सुंदरी\nवळूनही जी बघतं नाही\nहरवून बसला तुजला तुरे\nबघूनही जी हसतं नाही\nआकर्षण जो एक क्षणांचा\nतो प्रेम म्हणवत नाही\nप्रेम म्हणजे घोर तपस्या\nजी तुलारे जमत नाही\nअरे मना मी तुला सांगतो\nतरीही म्हणतो तुला मिळावी\nजी तुला मिळणार नाही\nलाख प्रयत्नं केले तरीही\nतुझी कधी ती होणार नाही\nमाझे म्हणणे पटले होते\nमला थांबवून मला म्हणले\nदे मला तू वेळ जरासा\nकाही दिवस मग गप्प होऊनी\nमन विचार करीत बसले\nएकदिवस मग हसता रडता\nरडता रडता मला म्हणाले\nफार मोठी चूक मी केली\nतुझ सोडून कसा मी जाऊ\nतुझ्या सारखा मित्र गावला\nमग दुसरे जग कशाला पाहू\nचूक माझी ही पहिली वहिली\nपुन्हा कधी चुकणार नाही\nमी कधी दिसणार नाही\nप्रेमाचा मग खेळ संपला\nअश्याप्रकारे मन माझे हे\nअश्याप्रकारे मन माझे हे\nकृपया आवडल्यास नावानिशी समोर पाठवावी.\nशशिकांत शांडीले (SD), नागपूर\nRe: मन माहे हे\nRe: मन माहे हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/mughlai-dum-aloo/", "date_download": "2018-04-23T11:42:32Z", "digest": "sha1:HTUJ5SRUHN55AZE3WEMHFUNVKQWROZWH", "length": 6397, "nlines": 118, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मुगलई दम आलू | Mughlai Dum Aloo", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » मुगलई दम आलू\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८\nमुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.\nबटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये बनविलेला मसाला भरावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे.\nटोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे.\nएका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी.\nजेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/national/25-public-temples-will-govern-by-government", "date_download": "2018-04-23T11:15:59Z", "digest": "sha1:YEMLETTZBIQMDTRLBGJAT23UIUWIUFJZ", "length": 10660, "nlines": 130, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "25 public temples will govern by government | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome राष्ट्रीय २५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\n२५ सहस्र सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन सरकार पाहणार\nमशिदी आणि चर्च यांच्या संदर्भात असा कायदा करण्याचे धाडस सरकार कधी दाखवणार मध्यप्रदेशात सार्वजनिक मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी लवकरच नवीन कायदा \n( राज्यकारभार योग्य प्रकारे करू न शकणारे सरकार राज्यभरातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे पहाणार \nवैदिक कर्मकांड जाणणारे पुजारीच मंदिरात पूजा करणार \nभोपाळ – मध्यप्रदेशमध्ये शासकीय किंवा अर्पणात मिळालेल्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. हे प्रारूप विधानसभेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या सत्रात पटलावर ठेवण्यात येणार आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे. संस्कृती विभागाचे प्रमुख सचिव मनोज श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे.\n१. या कायद्यानुसार मंदिराचे सध्याचे व्यवस्थापन आणि व्यवस्था यांच्यात कोणतेही पालट करण्यात येणार नाहीत.\n२. मंदिराच्या संचालनासाठी प्रत्येक मंदिराची स्वतंत्र समिती असणार आहे. या समितीचे संचालन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार सांभाळणार आहेत. या समितीत स्थानिक लोकांचाही सहभाग असणार आहे.\n३. या मंदिरांमध्ये जे पुजारी सध्या कार्यरत आहेत, तेच पुढेही असणार आहेत; मात्र त्यांना कर्मकांडाचे किती ज्ञान आहे, याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. यात अपात्र ठरणाऱ्या पुजाऱ्यांच्या स्थानी नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.\n४. नवीन पुजाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार स्थानिक समितीला असणार आहे आणि गावांमध्ये हा अधिकार ग्रामसभेला असणार आहे.\n५. या मंदिराची संपत्ती सरकार कह्यात घेणार नाही. तथापी मंदिर आणि त्याच्या संपत्तीचा संपूर्ण अहवाल महसूल विभागाकडे असणार आहे. अर्पणाचा हिशोब ठेवण्यात येईल आणि हा पैसा मंदिराच्या विकासासाठी लावण्यात येईल.\n( श्रीकृष्ण उपाध्ये, पनवेल ‘सनातन प्रभात’ मधून साभार )\nदुर्गरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले साल्हेर (बागलाण) गडस्वच्छता मोहिम\n१ फेब्रुवारी ‘भारतीय तटरक्षक दिन’\nआरक्षण आर्थिक निकषावर आधारीत हवे – भारद्वाज\nबिहार हिंदुमहासभेच्या वतीने भागलपुर येथे हिंदु संम्मेलन\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:53:38Z", "digest": "sha1:Q2RYA47NUO4XPDH7RDWQD4WNIUALWM73", "length": 10484, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेसलमेर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजेसलमेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.हे शहर जेसलमेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे पश्चिम राजस्थानात असून प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या शहराला मानाने गोल्डन सिटी (सोनेरी शहर) असे संबोधतात. या शहरातील मध्ययुगीन प्राचीन किल्ला आजही शाबूत आहे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या शहराची स्थापना ११ व्या शतकात राजपूत महारावळ यांनी केली. इस्लामी राजवटीतही या घराण्याचे शहरावरील नियंत्रण कायम राहिले.\nजेसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या, छोट्या टेकड्या, डोंगर, संमिश्र काटेरी वने आहेत. यांपैकी एका टेकडीवर जेसलमेरचा किल्ला वसला आहे. वाळूच्या टेकड्या सततच्या विषम वातावरणाने आपले भौगोलिक स्थान बदलत असतात. इंदिरा कालव्याच्या पाण्याने सद्यस्थिती पूर्ण पणे बदललेली आहे व शहर परिसरात अनेक ठिकाणी वनराया तयार झालेल्या आहेत.\n१) जैसलमेर चा किल्ला - राणा जैसल याने बांधलेला हा पिवळ्या दगडातील किल्ला गेली हजार वर्षे जैसलमेर मध्ये उभा आहे. या किल्ल्यात प्रवेश मोफत आहे. किल्ल्यात अतिशय सुरेख बांधकाम असणारा राजवाडा आहे. तसेच एक अतिशय कोरीव काम कसणारे जैन मंदिर आहे. खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\n२) पटवा हवेल्या - पटवा बंधूनी १८७० च्या सुमारास बांधलेल्या या पाच हवेल्या आपल्या कोरीव कामासाठी विख्यात आहेत. पटवा बंधू हे व्यापारी होते आणि त्यांच्या संपत्तीची कल्पना हा हवेल्यांच्या बांधकामावरून येते. \"नाथमलजी कि हवेली\" या नावाने प्रसिद्ध असणारी एक हवेली पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. हवेली बघण्यासाठी १०० रुपये तिकीट आहे.\n३) सलीम सिंघ कि हवेली - सलीम सिंघ हा जैसलमेरच्या राजाचा दिवान होता याची हवेली तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शिखरासाठी प्रसिद्ध आहे.\n४) गडीसर तलाव -राजा रावल जैसल याने बांधलेला हा तलाव जैसलमेरचा पाण्याचा एकमात्र स्त्रोत होता. तलावाकाठी असणारे मंदिर आणि कमान प्रेक्षणीय आहे. असे म्हणतात कि एका नर्तकीने हि कमान बांधून घेतली. राजाने हि कमान तोडू नये म्हणून तिने या कमानीच्या वरच्या मजल्यात एक श्रीकृष्णाचे मंदिर बनवले. राजाला, नर्तकीने बनवलेल्या कमानीतून जाणे अपमानास्पद वाटल्याने त्याने बाजूने एक वेगळाच जिना बनवून घेतला.\n५) बडा बाग - या ठिकाणी राज घराण्यातील अनेकांच्या कोरीव समाध्या आहेत.\n६) सेना संग्रहालय - भारतीय सेनेच्या तीनही दलांची माहिती देणारे संग्रहालय जैसलमेरच्या बाहेर आहे.\n७) वाळवंट सफारी हा देखील जैसलमेर मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केन्द्र स्थान आहे.\nKing's palace in jaisalmer fort , जैसलमेर किल्ल्यातील राजवाडा\nजैसलमेर शहराचे किल्ल्यावरून पाहिलेले दृश्य\nसोन्याचा पत्र वापरून केलेले पटवा हवेलीतील छत\nइ.स.१८१५ मधील सलीमसिंघची हवेली\nगडीसार तलावाच्या कमानीवरील मंदिर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/phirni/", "date_download": "2018-04-23T11:40:06Z", "digest": "sha1:CKMC7Q4MKLQY2Y2T5LUUUR7FAGZNU55V", "length": 6968, "nlines": 114, "source_domain": "www.marathimati.com", "title": "फीरनी | Phirni", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » फीरनी\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८\nतांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी (Phirni) ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.\n१ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ\n१ वाटी (भरून) साखर\n२ चमचे चारोळ्या व काजूचे कप\nतांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावे.\nदुध तापत ठेवावे. साय काढू नये. दुध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.\nआंच मध्यम ठेवावी व सतत ढवळत राहावे. अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.\nबोटाने कणी पहावी किंवा चाखून पाहावा. रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.\nमिश्रण पुन्हा थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत चुलीवर ठेवावे व ढवळावे.\nघट्ट होऊ लागले की शोभिवंत भांड्यात ओतावे त्यात वेलचीपूड किंवा एसेन्स घालावा.\nगार झाले की चारोळ्या, काजू, बेदाणा घालावा. सुका मेवा नसला तरी चालेल.\nफ्रीजमध्ये ठेवून थंड करावी व पुडिंग म्हणून जेवणानंतर लहान बॉलमधे द्यावी.\nखास प्रसंग चांदीचा वर्ख किंवा देशी गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवावे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dahanu-engineer-doctor.blogspot.com/2010/02/ayush-adivasi-yuva-shakti.html", "date_download": "2018-04-23T11:47:45Z", "digest": "sha1:XDEU2YKBLF5DEIKP6JYK2UEIACS6IHIC", "length": 2885, "nlines": 48, "source_domain": "dahanu-engineer-doctor.blogspot.com", "title": "Dahanu Engineers & Doctors: Ayush Adivasi Yuva Shakti ने तुम्हाला फेसबुकमध्ये सामिल होण्यासाठी बोलावले आहे.", "raw_content": "\nAyush Adivasi Yuva Shakti ने तुम्हाला फेसबुकमध्ये सामिल होण्यासाठी बोलावले आहे.\nपुढील व्यक्तीने तुम्हाला फेसबुक वर मित्र्/मैत्रीण म्हणून आमन्त्रीत केले आहे:\nतुम्हाला फेसबुकचे निमंत्रण पाठवणारी इतर मंडळी\nफेसबुक मित्रांशी संपर्क ठेवण्यासाठी, छायाचित्रे, ध्वनिचित्रे व कार्यक्रम जाहिर करण्यासाठी उत्तम जागा आहे. परंतू प्रथम आपल्यास फेसबुकमध्ये सामिल व्हावे लागेल. आजच आपली माहिती तयार करा व आपल्या माहीतगारांशी संपर्क करा.\nफेसबुक मोफत आहे, कोणीही सामिल होऊ शकतात.\n0 comments: Ayush Adivasi Yuva Shakti ने तुम्हाला फेसबुकमध्ये सामिल होण्यासाठी बोलावले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T11:54:56Z", "digest": "sha1:U7B4DHSJVVEQ3OUXHGLMMJVCUTCEKUXO", "length": 5500, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८२ मधील चित्रपट\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९८२ मधील मराठी चित्रपट‎ (२ प)\n► इ.स. १९८२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (१४ प)\n\"इ.स. १९८२ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nतहलका (१९८२ हिंदी चित्रपट)\nतीसरी आँख (१९८२ हिंदी चित्रपट)\nदेश प्रेमी (हिंदी चित्रपट)\nदो दिशायें (१९८२ हिंदी चित्रपट)\nनमक हलाल (हिंदी चित्रपट)\nबदले की आग (१९८२ हिंदी चित्रपट)\nभागवत (१९८२ हिंदी चित्रपट)\nमैं इन्तकाम लूँगी (१९८२ हिंदी चित्रपट)\nराजपूत (१९८२ हिंदी चित्रपट)\nसत्ते पे सत्ता (हिंदी चित्रपट)\nसम्राट (१९८२ हिंदी चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २००८ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/cultural/why-to-go-in-temple", "date_download": "2018-04-23T11:20:08Z", "digest": "sha1:ROUOKZ5I3HZAQKVEEL6GUXPDMZGIYCDN", "length": 24013, "nlines": 135, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "मंदिरात का जावे? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome सांस्कृतिक मंदिरात का जावे देवपूजा का करावी या मागचे शास्त्रीय कारण काय\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nभारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोधघेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ……\nअनादी काळा पासून मनुष्य ईश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे.आताया ईश्वरी शक्ती म्हणजे काय किंवा त्या आपलेअस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल.\nसर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू. शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती (power) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा: इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो ,त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत:मध्ये चुंबकीय (क्षेत्र) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते.त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे मध्यम होते पिर्रॅमीड.\nपिर्रॅमीड ज्या विशिष्ट कोनात बांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हेआपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते.म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरेहि या पिर्रॅमिडच्या आकाराची बांधली आहेत.मंदिराचा कळस हा एक पिर्रॅमिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांचा कळस हा मुख्य भाग मानला जातो. तसेच ही सर्वमंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा -तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर. पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वैेदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत (किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्रॅमिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत) आणि फक्त हिंदू संस्कृतीतच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे.\nही मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय तर अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे. या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की डोंगर हा पिर्रॅमीडचाच एक नैसर्गिक उत्तमप्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात. व याच कारणाने मुख्यमूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते, त्याला “गर्भगृह” किवा “मूलस्थान” असे म्हटले जाते. खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा “गाभारा “म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा.\nआपल्याला माहित आहे का,ताम्रपटावर काही वैेदिक मंत्र लिहून त्या मुख्यमूर्तीच्या पाया खाली पुरल्या जात असत. ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते तर हे ताम्रपट म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात.\nमंदिरात प्रदक्षिणा का घालतात याचेही उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणेेे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटरच्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो.\nम्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करतेत्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते. ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीयदृष्ट्या ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात त्या आपणास मंदिरातूनच प्राप्त होतात.\nमंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपनामधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील ताण तणावकमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना (दुःख्) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते. ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.\nमंदिरातील “तीर्थ“ म्हणजे काय मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी,दुध, मध,दही, वेलचीपूड, कापूर ,केशर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण “तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केशर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कापूर श्वासदुर्गंधीं नाहीशी करतो.\nचुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे.\nह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा,भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “दीपाराधना“ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात आणि म्हणूनच काही मंदिरात पुरुषांना उर्ध्ववस्त्र घालण्यास मनाई आहे (दक्षिणे कडील देवळात) आणि तसेच महिला भक्तांना अंगावर आभूषण घालण्यास सांगितले जाते. ह्या आभूषण द्वारे (सोने, चांदी विद्युतशक्ती प्रवाहक आहेत) महिलांना सकारात्मक शक्ती मिळवण्यास मदत होते.\nआपल्याकडे नवीन विकत घेतलेले दागिने प्रथम देवाच्या चरणासी ठेवून मगच घातले जाते. तसेच काही नवीन वस्तू (पुस्तके ,वाहन) देवाचा आशीर्वाद घेवून मगच वापरल्या जातात तसेच कोणत्याही शुभ कार्यास सुरवात करण्या आधी मंदिरात जाऊन देव दर्शन घेऊन त्या देवतेचा आशीर्वाद घेणे त्या मागे सुधा हीच भावना असते असे दिसून आले आहे.दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीने आपल्याला खूप प्रसन्न वाटते. देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यता मुख्य मूर्तीच्या सभोवती पसरलेल्या असतात,ज्या आपल्या शरीर व मेंदू खेचून घेते.\nतुम्हाला माहित आहे का, प्रत्येक वैष्णव(विष्णू भक्त) दररोज २ वेळा विष्णू मंदिरात पूजा करतो. आपल्या पूजा पद्धती ह्या एवढ्या कठीण नाहीत.किवा कोणी एका माणसाने अथवा त्याच्या भक्तांनी आपल्या पूजा पद्धती ठरवलेल्या नाहीत. ह्या सगळ्या पूजा पद्धती आपल्या पूर्वजांनी योग्य अभ्यास,सखोल संशोधन व शास्त्रीय निकषावरून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी शोधून काढल्या आहेत.\nहा अमूल्य ठेवा आपल्या व पुढच्या पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व लाभदायी ठरो,ही ईश्वर चरणी प्रार्थना…\nतरूण डॉक्टरांनो युद्धशिक्षणहि घ्या\nआई एकविरेचे कल्याणकारी रूप\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:05:38Z", "digest": "sha1:IX4YAZWXM7BXIHBY33TXEOILVDIHQHQR", "length": 9187, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "कोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome कोल्हापूर-सांगली कोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली\nकोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली\nकोल्हापूरात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं आज कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात आला. ‘यळकोट, यळकोट जय मल्हार,’ ‘ऊठ धनगरा, जागा हो; आरक्षणाचा धागा हो,’ अशा घोषणा देण्यात आल्या. धनगरी ढोल वाजवत आणि धनगरी नृत्य करत पिवळ्या टोप्या, झेंडे घेऊन हजारो धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.\nधनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, १९५५ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा आणि १९८२ च्या मंडळ आयोगाची शिफारस लागू करा या मागणीसाठी धनगर समाज राज्यभर आंदोलन करत आहेत. मात्र शासन याकडं गांभीर्यानं पाहत नाही. यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्यावतीनं राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात धनगर समाजाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होत.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो धनगर बांधव पिवळ्या टोप्या आणि पिवळे झेंडे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात धनगरी ढोल, पारंपरिक धनगरी नृत्य , मल्हार देवाची प्रतिकात्मक रथ, लेझीम पथक आणि चित्ररथांचा सहभाग होता. गांधी मैदानातून निघालेला या विराट मोर्चाची सांगता दसरा चौकात झाली. यावेळी धनगर नेते विलास वाघमोडे यांनी धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रतिकत्मक बिरदेव मंदिर उभारून 24 तास ढोल बाजाओ आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.\nया मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अनेक प्रबोधन करणारे फलक घेऊन महिलांनी देखील या मोर्चाला चांगली उपस्थिती दर्शवली होती. येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण विधेयक मंजूर करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मोर्चा द्वारे देण्यात आलाय.\nकंगणा रणावत या महिन्यातच करणार लग्न\nबायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित\nआयुष्यभर शिकत राहणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे – विश्वास नांगरे पाटील\nराज्यसभा खासदार अमर साबळे यांचे कोल्हापूर येथे गांधीगिरी मार्गाने उपोषण\nमहिलांचे सबलीकरण होणे गरजेचे – व्ही सि. नित्यानंदम\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vat-pournima/", "date_download": "2018-04-23T11:38:20Z", "digest": "sha1:DNOVQ5TJHSEA5GVXJ5DTF5BTGZOC2NDC", "length": 11822, "nlines": 108, "source_domain": "www.marathimati.com", "title": "वटपौर्णिमा | Vat Pournima", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » संस्कृती » सण-उत्सव » वटपौर्णिमा\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ जून २०१०\nवटपौर्णिमा - (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस \"वटपौर्णिमा\" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.\nजेष्ठ पौर्णिमा हा दिवस \"वटपौर्णिमा\" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.\nवटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची(Banyan Tree) पूजा करतात. हळद-कुंकू हे सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पुजन करतात. ह्या व्रताशी संबंधीत अशा सावित्रींचे स्मरण पूजन करतात. सावित्री हिने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले. ह्या बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी.\nसावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याची कन्या. आपल्या सत्वगुणी समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा-राणीला मोठा आभिमान होता.\nखरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थवान आणि आपले नांव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची.\nसत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकित ठाऊक असून ही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला.\nसावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली. पतीसेवा करू लागली. पतीला त्याच्या कामांत मदत करू लागली.\nहोता होता एक वर्षाचा काळ होत आला.. आणि तो दिवस उगवला. पहाटे पासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिनं एक वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलांत लाकडं तोडण्यासाठी गेली.\nझाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती.. आणि एका-एकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली.\nतशी सावित्री ही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो. त्याचा कुणी सोबती नसतो. तू परत जा.. यमराज म्हणाले.\nतेव्हा पतीवाचून पत्नीने जगावे का तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले.\nतिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले,\"सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल काय हवे तुला\".\nमग सावित्रीने चतुराईन यमाकडे सासऱ्याचं गेलेल राज्य मागितले. यम हो म्हणाले, सासू-सासऱ्यांना दृष्टी मागितली, यमराजाने ती दिली. असं एक-एक मागता-मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्यांप्रमाणे हो म्हणाले आणि..\nदिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.\nही पौराणिक कथा खरंच श्रवणीय आणि बरंच काही शिकवून जाणारी आहे. त्या कथेच स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642473", "date_download": "2018-04-23T11:32:05Z", "digest": "sha1:Z3ZWPUDZ6KGRNXATR5GDKM7VD35EUSIT", "length": 1183, "nlines": 23, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – गारवा विरहातला\nपावसातला 'गारवा' शिरशिरी होऊन..\nतुझ्या तलम स्पर्शासारखा भिनला आहे;\nअन् मी तुझ्या आठवणीच्या सरीचा धागा..\nमन्मनात अजूनही अलवार विणला आहे\nकाय करु हा 'गारवा' घोर लावूनी..\nजणू श्वासच माझा बनला आहे\nअगं बाई पुरे झाले ना बहाणे आता..\nधीर ही पुरता क्षिणला आहे\nपावसातला 'गारवा' शिरशिरी होऊन..\nतुझ्या तलम स्पर्शासारखा भिनला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t17072/", "date_download": "2018-04-23T11:35:37Z", "digest": "sha1:RITUUDFQYRC7VSEEYJ36WFO2TT5IU4IE", "length": 2946, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तिच्या लग्नाची वरात", "raw_content": "\nतुटला दांडा ; कूचली कुऱ्हाड\nपडली बादली ; तुटले चऱ्हाट\nवाजत गाजत आली,तिच्या लग्नाची वरात\nडोळ्यात अश्रू घेउन,बघत बसलो दारात \nआली हवा, विझला दिवा\nतुटली फांदी,उडून गेला थवा\nतुटलेल्या ह्रुदयाचा घाव भरत होतो\nलाउन कडसर विरहाची दवा \nकीड़ले झाड,वाळून गेले पान\nपडली ठिणगी,पेटले सारे रान\nअंगाची झाली लाही लाही\nजळले मन, हरलो भान \nकूचलेल्या कुऱ्हाडीला धार कशी लावू\nपाण्यात पडलेली बादली वर कशी घेऊ\nझाली ती दुसऱ्याची,तिच्या जवळ कसा जाऊ\nपुन्हा तिचा चेहरा,प्रेमाने कसा पाहु \nझाली ती आता, दुसऱ्याची सदा\nटाकत होतो दुखाने,तिच्यावर अक्षदा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-story-narandra-birarinager-devla-distjalgaon-5839", "date_download": "2018-04-23T11:54:42Z", "digest": "sha1:KQNZXNA7YQXD37ZL6PUKMR3DRK3BA7S7", "length": 24122, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special story Narandra Birari,Nager Devla, Dist.Jalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले फायद्याचे\nव्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले फायद्याचे\nरविवार, 18 फेब्रुवारी 2018\nनाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र अर्जुनराव बिरारी यांनी नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. सुरवातीला नाशिक येथून नगरदेवळ्याला दर आठवड्याला ये-जा करण्याचा त्रास व्हायचा, परंतु शेती जशी यशस्वी होत गेली, नवनव्या संकल्पना सुचत गेल्या तसे त्रासाचे रूपांतर आनंदात झाले.\nनाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र अर्जुनराव बिरारी यांनी नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. सुरवातीला नाशिक येथून नगरदेवळ्याला दर आठवड्याला ये-जा करण्याचा त्रास व्हायचा, परंतु शेती जशी यशस्वी होत गेली, नवनव्या संकल्पना सुचत गेल्या तसे त्रासाचे रूपांतर आनंदात झाले.\nनरेंद्र बिरारी हे नाशिक शहरात २००३ पासून फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. नाशिक येथे पत्नी सौ. अनुराधा व मुलासोबत ते राहतात. नगरदेवळा (जि. जळगाव) येथे बिरारी यांची आठ एकर बागायती शेती. शाश्वत पाण्यासाठी दोन विहिरी आहेत. नरेंद्र यांचे लहान बंधू राहुल हे मुंबई येथे तेल व नैसर्गिक वायू महामंडळात कार्यरत आहे. नरेंद्र यांचे वडील अर्जुनराव बिरारी यांचे २००२ मध्ये निधन झाले. तेव्हापासून नरेंद्र यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली. शेती नियोजनात काका भास्कर बिरारी आणि चुलत भाऊ किशोर बिरारी यांचे सहकार्य, मार्गदर्शन नरेंद्र यांना मिळू लागले. व्यवसायात असलो तरी शेतीची नाळ तोडायची नाही, वडिलांनी जसे प्रयोग शेतीत केले, तसेच आपणही करू, असा निर्धार असलेल्या नरेंद्र यांचा शेती विकासाचा नाशिक ते नगरदेवळा हा दोनशे किलोमीटरचा प्रवास आजही सुरू आहे. नरेंद्र दर महिन्याला किमान तीनदा गावी जाऊन पीक व्यवस्थापनाकडे लक्ष देतात. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी एक सालगडी आणि पोल्ट्रीसाठी एक कर्मचारी आहे. या दोघांना वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपये मेहताना दिला जातो.\nअसे आहे पीक नियोजन\nशेतीच्या नियोजनाबाबत नरेंद्र बिरारी म्हणाले, की आठ एकर शेतीला ठिबक सिंचन केले आहे. मी कृषी पदवीकाधारक असल्याने पीक व्यवस्थापनाची चांगली माहिती आहे. दरवर्षी तज्ज्ञांच्या सल्याने पीक व्यवस्थापनात बदल करतो. पीक फेरपालटीवर भर आहे. दरवर्षी दोन एकरांवर बीटी कपाशी लागवड असते. कपाशीचे सरासरी मला एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते. खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळतो. गेल्या वर्षी तीन एकर केळी होती. एका क्षेत्रातील कापणी आटोपली की दुसऱ्या क्षेत्रामधील केळी उत्पादनास सुरवात होते असे नियोजन केले आहे. केळी काढणीनंतर जमिनीची नांगरट करून दुसऱ्या पिकाच्या लागवडीचे नियोजन करतो. मला सरासरी एकरी ३५ टन उत्पादन मिळते. गेल्या वर्षी केळी पिकाचा खर्च वजा जाता मला दोन लाखांचा नफा मिळाला. व्यापारी शेतावर येऊन केळी खरेदी करतात.\nमी एप्रिलमध्ये दोन एकरांवर १० फूट बाय १२ फूट अंतराने साग लागवड केली. त्यामध्ये डिसेंबर महिन्यात केळीची ६ फूट बाय ५ फूट अंतराने लागवड केली. सध्या सागाची वाढ बारा फुटांची झाली आहे. मी निवडलेली सागाची जात उंच वाढणारी आणि लहान फांद्याची आहे. त्यामुळे केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार नाही. दुसऱ्या एक एकर क्षेत्रावर डिसेंबर महिन्यात पाच फूट बाय पाच फूट अंतराने केळी लागवड केली आहे. केळी आणि सागाला ठिबक सिंचन केले आहे. सागाची पहिली कापणी दहा वर्षांनी होईल, त्यानंतर दुसरी कापणी सहा वर्षांनी त्यापुढील कापणी चार वर्षांनी करण्याचे नियोजन आहे. सर्व पिकांना मी कोंबडीखताचा वापर करतो.\nमाझ्या वडिलांनी एकदा शतावरी लागवडीचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना अपयश आले होते. यंदा साग लागवड करतानाही लोकांनी शंका व्यक्त केली. परंतु एक शाश्वत उत्पादन म्हणून सागाची लागवड केली आहे. सागाची गळलेली पाने शेतात कुजवितो. बांधावरही पाच बाय पाच फुटांवर साग लागवड केली आहे. केळी पिकाला शिफारशीनुसार खतमात्रा देतो. त्यामुळे आर्थिक बचत होते. केळी कापणीनंतरचे अवशेष शेतामध्ये रोटाव्हेटरने बारीक करून मिसळून देतो. सेंद्रिय घटक जागेवरच कुजल्याने सेंद्रिय कर्ब वाढीस मदत झाली. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक सालगडी आहे. त्याच्या बरोबरीने नियोजन केले जाते. पीक व्यवस्थापनाबाबत परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करतो. त्याचा पीक उत्पादनवाढीस फायदा झाला आहे.\nकुक्कुटपालनाबाबत बिरारी म्हणाले, की २०१५ मध्ये पोल्ट्रीकडे वळलो. फॅब्रिकेशन व्यवसायामुळे मला पोल्ट्री शेड उभारणीसाठी सिमेंट प्लेटची संकल्पना सुचली. पाया खोदण्याचा खर्च आणि वेळ वाचवून मी सिमेंट प्लेटच्या आधारे पाच हजार कोंबड्यांसाठी शेड उभी केली. कोंबड्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक कामगार ठेवला आहे.\nपूर्व-पश्‍चिम शेड. रुंदी ३० फूट, लांबी २०० फूट. दोन्ही बाजूला आठ फूट आणि मध्यभागी अकरा फूट उंची. दर पाच फुटांवर पिलर, त्यामध्ये सिमेंट प्लेट बसविलेली आहे.\nछताला वाऱ्याच्या वेगानुसार फिरणारे एक्‍झॉस्ट. यामुळे उन्हाळ्यात शेडमधील तापमान किमान तीन ते चार अंश सेल्सिअसने कमी, शेडच्या आतमध्ये फॉगर्सची गरज नाही.\nशेडच्या भिंती सिमेंट प्लेटच्या, यामुळे शेड उभारताना किमान दीड लाख रुपये वाचले.\nशेडच्या दक्षिण बाजूला डेरेदार झाडांची लागवड. झाडांमुळे शेडमधील तापमान नियंत्रणास मदत.\nकरार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय. लहान पिले, औषधे-उपचार सेवा, खाद्याचा कंपनीतर्फे पुरवठा. चाळीस दिवसांत कोंबडीचे वजन दोन ते अडीच किलो.\nएफसीआरनुसार सरासरी पाच ते सात रुपये प्रतिकिलो दर. एका बॅचमध्ये खर्च वजा जाता तीस हजारांचा नफा. वर्षभरात पाच बॅच होतात.\nजमीन सुपीकतेवर भर, सेंद्रिय खत, कोंबडीखताचा जास्तीत जास्त वापर.\nपरिसरातील शेतकरी, तज्ज्ञांच्या बरोबरीने पीक व्यवस्थापनाची चर्चा.\nठिबक सिंचनातून पाणीबचत. सौर उर्जेच्या वापरावर भर.\nव्यावसायिक तत्त्वाने शेतीचे नियोजन. किफायतशीर पीक उत्पादनाचा अभ्यास.\nयेत्या काळात वनशेती, पूरक उद्योगावर भर.\nसंपर्क ः नरेंद्र बिरारी, ९८२२७७००६०\nनाशिक व्यवसाय शेती बागायत ठिबक सिंचन सिंचन\nसाग लागवडीमध्ये केळी आंतरपिकाचा प्रयोग.\nनरेंद्र बिरारी यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/620/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%87,_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T11:20:05Z", "digest": "sha1:B6EFPR3VHBSTDAMRIOAIF4A3ANXEYT4V", "length": 9893, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या बांधावर जाणार म्हणे, सरकारला शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का\nआज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या तिस-या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी साताऱ्यातील गांधी मैदान येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.\nमुख्यमंत्री आता संघर्षयात्रेला घाबरले आहेत. त्यांचं आसन अस्थिर होतं की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आता संवाद यात्रा काढणार असे ऐकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी सांगितले. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार पण यांना शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का, असा प्रश्न विचारून तटकरे यांनी सरकारच्या दिखावुपणाची खिल्ली उडवली. आम्ही संघर्षयात्रा करून थांबणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, जोपर्यंत शेतमालाला भाव मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांची तूर विकत घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\nहे सरकार सगळा दोष मागील सरकारवर ढकलून मोकळं होतं. पण याआधी शेतकऱ्यांशी बांधिलकी असलेलं सरकार कार्यरत होतं. आताचं चित्र मात्र वेगळं आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार या ठिकाणी म्हणाले. हा संघर्षाचा काळ आहे. महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिल्लीतही शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. हे सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे. पुढच्या निवडणुका लागतील तेव्हा राज्यावर पाच लाख कोटींच्यावर कर्ज असेल. मग शेतकऱ्यांना का कर्जमाफी दिली जात नाही, असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.\nयावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, जयंत पाटील, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि विरोधीपक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.\nसंघर्षयात्रेची मंगळवेढा येथे जाहीर सभा ...\nसंघर्षयात्रेदरम्यान मंगळवेढा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, भारत भालके आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सलग सात अधिवेशने राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. या अधिवेशनात कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केली. भाजप ...\nतळेगाव, तिवसा, चांदूर रेल्वे येथे संघर्षयात्रेच्या जाहीर सभा ...\nअमरावती येथे गुरूवारी संघर्षयात्रा पोहोचली असता तळेगाव, तिवसा, चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, नितेश राणे, अबू आझमी उपस्थित होते.सभेत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर सामान्य माणूस, कष्टकरी, गरीब हे सर्वच समाजघटक नाराज असल्याचे प्रतिपादन केले. सरकारकडे कर्जमाफीची मागणी के ...\nसंघर्षयात्रेची बुलडाणा येथे सभा ...\nराज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधक गेली अडीच वर्ष करत आहेत. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत टाळाटाळ करत आहे म्हणून ही संघर्षयात्रा काढली गेली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केले. ते बुलडाणा येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे. बुलडाणा जिल्ह्याचे कृषिमंत्री लाभले असूनही प्रत्यक्ष बुलडाणा जिल्ह्यात १६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पांडुरंग फुंडकर यांनी कृषिमंत्री म्हणून का ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t18980/", "date_download": "2018-04-23T11:35:59Z", "digest": "sha1:NEU37MM3BGTHHPCF3PLQBZSIRJ3IKYGA", "length": 2995, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझ्या मनामनात गुंजते कविता", "raw_content": "\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\nAuthor Topic: माझ्या मनामनात गुंजते कविता (Read 356 times)\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\nप्रसवली वेदना जन्मली कविता\nसुखाश्रुं नयनी अवतरली कविता\nसंताप मनीचा सांडते कविता\nसुख-दुःख सारे मांडते कविता\nमनिचा उद्वेग उधृती कविता\nजनीचा कल्लोळ सांगती कविता\nअन्यायाला वाचा फोड़ते कविता\nअसत्याचा पिच्छा पुरवते कविता\nप्रेमाचा प्रवाह वाहवते कविता\nविरहाच्या एकांति झुरवते कविता\nहास्याचे फवारे उडविते कविता\nस्वप्नीच्या हिंदोळी झुलविते कविता\nकविच्या हृदयीं विराजते कविता\nवाचकांच्या ओठी शोभते कविता\nइतकी खोलवर रुजली कविता\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\nमाझ्या मनामनात गुंजते कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:46:49Z", "digest": "sha1:3RHIYEGAMDX6ZJI5XN6R5RQQ7JDDFDYY", "length": 6241, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सैयद नझीर अली - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव सैयद नझीर अली\nजन्म ८ जून, १९०६ (1906-06-08)\n१८ फेब्रुवारी, १९७५ (वय ६८)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यम\nनाते वझीर अली (भाउ)\nक.सा. पदार्पण २५ जून १९३२: वि इंग्लंड\nशेवटचा क.सा. १० फेब्रुवारी १९३४: वि इंग्लंड\n१९२३/२४ - १९४०/४१ मुस्लिम\nफलंदाजीची सरासरी ७.५० ३०.१७\nसर्वोच्च धावसंख्या १३ १९७\nगोलंदाजीची सरासरी २०.७५ २५.४९\nएका डावात ५ बळी - ६\nएका सामन्यात १० बळी - ०\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/८३ ७/९३\n९ जुलै, इ.स. २०१२\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nसैय्यद अली खुर्चीत बसलेले उजवी कडून दुसरे, भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nइ.स. १९०६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७५ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू\n८ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/795/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80;%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE,%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:36:52Z", "digest": "sha1:UR7UI3IXROV2N2LKP4JW657IJ6336Y3N", "length": 7734, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआम्हाला कोणीच वाली नाही; तुम्हीच मदत करा, शिरपुरवासियांची राष्टवादीला आर्त हाक\n#हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. शिरपूर येथे स्वागत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nया परिसरात चार पदरी रोड होणार आहे. त्यात स्थानिकांची घरे गेली. त्यांना पैसेही दिले गेले नाही. इथले शेतकरी बोंडआळीने त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री इथे लक्ष देत नाही. साधी भेटही देत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या लोकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या १२ डिसेंबर रोजी लाटणं घेऊन आंदोलन करू. तुम्हाला न्याय मिळवून देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही.\nकर्जमाफीप्रमाणे सरकारचे हमीभाव देण्याचे आश्वासनही ‘लबाडाघरचे आवतण’ – शरद पवार ...\nभाजप सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याचे जे आश्वासन दिले आहे, तो हमीभाव प्रत्यक्ष हातात मिळाल्याशिवाय यावर विश्वास ठेवू नये. ज्या प्रकारे कर्जमाफीसंबंधी ‘लबाडाघरचे आवतण’ ही म्हण मी मागे वापरली होती, तीच म्हण या आश्वासनालाही लागू होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या फसव्या धोरणांबाबत सावध केले. औरंगाबाद येथे हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाडा टप्प्याची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या ...\nआमच्या व्यथा सरकारपुढे मांडा; माणकापूरमधील शेतकऱ्यांनी केले राष्टवादीच्या नेते मंडळींकडे म ...\nनागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली. ...\n१२ डिसेंबर, २०१७ : चलो नागपूर...चलो नागपूर...चलो नागपूर... ...\n- निष्क्रिय सरकारवर करुया #हल्लाबोल शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँगेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष व पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) सर्व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहे...आपल्या सर्वांचे नेते मा. खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या सरकारला जागे करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा... स्थळ- धनवटे नॅशनल कॉलेज मैदान, अजनी रेल्वे स्टेशनजवळवेळ- दुपार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/vinayak-nikam.html", "date_download": "2018-04-23T11:51:15Z", "digest": "sha1:HTLGQBRR55ZK7SIUZJS6HC55QQSRLXKT", "length": 6433, "nlines": 56, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : विनायक निकम\nConstituency : वार्ड क्र. ६५, नवघर वसई रोड (पू.)\nDesignation : वसई-विरार शहर महानगरपालिका - विरोधी पक्षनेता\nName : विनायक श्रीधर निकम\nFather's Name : श्रीधर अर्जुन निकम\nMother’s Name : सरस्वतीबाई श्रीधर निकम\nPlace of Birth: : चाफेरवोल, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)\nSpouse’s Name : कै. सौ. वंदना विनायक निकम\nNo. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nProfession : बिल्डर (बांधकाम)\nResidence Address : श्रीकुंज, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.\nOffice Address : अनंत अपार्टमेंट, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.\n१९७२ - शिवसैनिक म्हणुन कार्यास सुरवात\n१९७४ - मा. सतीशचंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सिल्वासा, दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रा बाहेर प्रथमच.\n१९७४ - शिवसेना वसई रोड उपशाखाप्रमुख पदी नेमणूक\n१९८० - शिवसेना वसई रोड शाखाप्रमुख पदी नेमणूक\n१९८५ - \"वसई रिक्षा चालक मालक सेना\" ची स्थापना - अध्यक्ष पदी निवड\n१९८७ - शिवसेना वसई तालुका उपप्रमुख पदी नेमणूक, या काळात अनेक सहकारी संस्थांची स्थापना, पतपेढ़ी, दुग्ध संस्था, महिला औधोगिक सहकारी संस्था इ. आजही कार्यलत.\n१९९५ - शिवसेना वसई तालुका प्रमुख पदी नियुक्ती. २००२ पर्यंत कार्यभार संभाळला. त्या वेळी १८ ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच होते. अनेक आंदोलना मध्ये सहभागी असल्याने पुलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल.\n१९९६ - महाराष्ट्र शासन गृह विभागाचे आदेशानुसार ठाणे मध्यवर्ती काराग्रुहावर अशासकीय अभिविक्षक म्हणुन तीन वर्षाकारिता नेमणूक\n१९९८ - दक्ष कामगार युनियेंची स्थापना, संलग्न भा. का. सेना, नगरपालिका रिक्षा युनियन, इंजीनियरिंग, माथाडी तसेच इलेक्ट्रॉनिक इ. सुमारे २५०० कामगार सभासद.\n२००६ - शिवसेना ठाणे जिल्हा कला, क्रीडा व साहित्य या विभागावर नियुक्ती, आजपर्यंत कार्यरत\n२००९ - वसई विधानसभा निवडणुकित शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांना एकत्र घेउन ठाकुरशाहिला टक्कर देत विवेक पंडित यांना विजयी केले. मी कुठल्याही गटाचा तटाचा नसल्यामुळेच सर्व शिवसैनिकांच्या विश्वासास पात्र ठरलो.\nठाणे जिल्हा पातळीवर काम करीत असताना तलासरी, डहाणु, पालघर, विक्रमगड, जव्हार येथील आदिवासी भागात शालोपयोगी साहित्यांचे आजपर्यंत वाटप चालू.\nस्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...\nविविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5225", "date_download": "2018-04-23T11:31:44Z", "digest": "sha1:ZDOAZCB5APVFQ57CLPLKCVSD6OLM3CJP", "length": 25100, "nlines": 126, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "आपले आलय करावे देवालय - Publisher's Desk > Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nआपले आलय करावे देवालय\nआपल्या घरांतली एक खोली पूजा व ध्यान यांच्या सहाय्याने परमात्म्याशी सायुज्य मिळविण्यासाठी देवघर म्हणून स्वतंत्र ठेवावी\nआपल्या हिंदुधर्माचा एक अनन्य पैलू हा आहे की प्रत्येक व्यक्ति स्वतः पुरोहित होऊ शकते आणि स्वतःच्या देवालयाची प्रमुख होऊ शकते. ते देवालय आहे तुमच्या घरांतील देवघर. रोज पूजा करुन तुम्ही त्याचे एका छोट्या मंदीरांत रुपांतर करू शकता किंवा पवित्रिकरण करू शकता. जर या देवालयासाठी वेगळी खोली, जेथे पूजा आणि ध्यान याच क्रिया होतात आणि जेथे ऎहिक जीवनावर गप्पा आणि इतर उद्योग होत नसतात, अशी असेल तर ही क्रिया उत्तमप्रकारे लागू पडते. ही एक आदर्श स्थिती. जेव्हा हे शक्य नसते तेव्हा कमीत कमी एखाद्या खोलीचा एक शांत कोपरा, एका फळीपेक्षा किंवा कपाटापेक्षा अधिक योग्य असा, वापरावा. कुटुंबातील सर्वांनाच ह्या देवघरांत आश्रय घेता येईल आणि तेथे त्यांना परमेश्वराशी सायुज्य स्थापन करता येईल आणि तेथे त्यांना परमेश्वरची स्तुति, प्रार्थना करता येईल आणि आपल्या व्यावहारिक गरजा देवापुढे मांडता येतील अशी जागा आहे, हे मात्र निश्चित करा.\nकांचीपुरम कामकोटी पीठाच्या स्वर्गीय श्री श्री श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वति महा स्वामीजींनी घरच्या पूजेच्या आवश्यकतेबद्दल असे विधान केले होते: \"प्रत्येक कुटुंबाने ईश्वराची पूजा केलीच पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी योग्य ती दीक्षा घेऊन व्यवस्थित (सांग्रसंगीत) पूजा करावी. इतरांनी फक्त एक संक्षिप्त, दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही अशी पूजा करावी. कचेरींत कामाला जाणाऱ्या लोकांनी कमीत कमी ही छोटी पूजा करावी. सर्व घरांत पवित्र घंटानाद झालाच पाहिजे.\"\nआपल्या घरांतल्या देवघरांत पूजा करण्याचा आपला प्रयत्न अगदी सोप्या प्रकारे सुरु होऊन हळुवार अधिक व्यवस्थित होऊ लागेल याची एक कथा ऎका. शेखर कुटुंबाच्या घरांत नेहमीच एक देवघर होते. वर्षानुवर्षे हेतुपूर्वक अभ्यास करून शेखर कुटुंबतील पतीने पूजा करण्याचे अधिकाधिक ज्ञान मिळविले. सुरुवातीला ते केवळ उदबत्ती ओवाळून एक सोपा गणपती मंत्र म्हणायचे. नंतर त्यांनी आत्मार्थ पूजा शिकून घेतली. ते रोज सकाळी न्याहारीच्या आधी ही पूजा करतात. ही पूर्ण पूजा करणे त्यांना अत्यंत समाधानकारक वाटते आणि सर्व कुटुम्बियांना त्यामुळे प्रसन्नता मिळते असेही त्यांना दिसून आले. (गणेश आत्मार्थ पूजेची लेखी प्रत आणि ध्वनीमुद्रित प्रत www.himalayanacademy.com/audio/chants/ganesha_puja/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.)\nबहुजनांना याची जाणिव होत नाही, परन्तु वैयक्तिक पूजा ही हिंदुधर्मांत, ज्याला आपण यम आणि नियम म्हणतो, त्या हिंदुधर्माच्या आचरणसंहितेचे मूलभूत अंग आहे. अष्टांगयोगाची पहिली आणि दुसरी पायरी असलेली ही आचरणसंहिता नेहमीच ध्यानसाधनेचा पाया समजली जाते. दहा नियमांपैकी एक, पूजा, हा ईश्वरपूजन म्हणून ओळखला जातो. आपण स्वतःसाठी करतो ती पूजा, ब्राह्मणाने आपल्यासाठी केलेल्या पूजेऎवजी, यांत विवेचित आहे. आपल्या घरांतल्या देवघरांत केलेल्या या पूजेत केवळ एक फूल अर्पण करून केलेल्या संक्षिप्त पूजेपासून एक पूर्ण औपचारिक पूजा, या सर्वांचा त्यांत समावेश होतो. सर्वसामान्य व्यक्तीने केलेली पूजा, ज्या पूजेला आत्मार्थ पूजा म्हणतात, ती वैयक्तिक पूजाविधी समजण्यात येते. आणि मंदिरांत पुजाऱ्याने केलेल्या सार्वजनिक पूजेला परार्थ पूजा अशी संज्ञा आहे. आत्मार्थ पूजा पूर्ण झाल्यानंतर काही वेळ ध्यान करून मानसिक पूजा करून पूजेने निर्माण केलेला आणि देवघरांत यद्यपि उपस्थित असलेला \"प्राण\" आत्मसात करून घेण्याची प्रथा आहे. याप्रमाणे पूजेचे अत्यधिक फल मिळते.\nमाझ्या गुरुदेवांनी असे अवलोकित केले की काही लोक पूजा करायला घाबरतात. असे कां पुष्कळदा त्यांना असे वाटते की त्यांना पुरेसे शिक्षण नसते किंवा त्या पूजेच्या सिध्दसाधनेच्या पार्श्वभूमीचे पुरेसे ज्ञान नसते. अनेक हिंदु लोक पूजा आणि संस्कार विधींसाठी पुरोहितांवर पूर्णपणे अवलंबून असतात. तथापि, गुरुदेव आणि कांचीपुरमचे महा स्वामीजी, दोघेही हे सुचवतात की देवदेवतांची कृपा मिळविण्यासाठी साधी पूजा कुणीही करू शकतो. ज्यांना उच्चस्थरांवरील आत्मार्थ पूजा करायची इच्छाअसेल त्यांनी योग्य पुरोहितांकडून दीक्षा घ्यावी.\nगुरुदेवांनी आत्मार्थ पूजा करण्यासाठी एक महत्वाचे बंधन घातले. ते असे: जर मनांत क्रोधभाव तीव्रतेने जाणवत असेल तर एकतीस दिवस पूजा करु नये. साध्या उदबत्तीने देवाच्या मूर्तींना ओवाळले किंवा ॐ सारख्या सोप्या मंत्राचा जप केला तर चालेल, परन्तु आरती करू नये, घंटा वाजवू नये किंवा कुठल्याही मंत्राचा जप करु नये.\nत्यांनी हे बंधन घालायचे कारण हे की त्यांना ज्ञात होते की क्रोधग्रस्त व्यक्ति दुसऱ्या विश्वात आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या देवतांऎवजी राक्षसांना आव्हान देईल. वस्तुस्थिति अशी आहे की आपल्या घरांत पारमार्थिक वातावरण निर्माण करायचे असेल तर आपल्या क्रोधभावना आणि त्याचप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या भाषेचे प्रमाण शक्य तेवढे कमी करयला हवे. अनेक भाग केलेल्या एका क्लिष्ट कोड्याचे उदाहरण घ्या. पूजा करणे म्हणजे त्या कोड्याचे दहा तुकडे बरोबर बसवणे. स्वल्प संताप त्यातले पांच तुकडे काढून घेतो, साधी वाईट भाषा दोन आणि एक मोठा वादविवाद त्यातले वीस तुकडे काढून घेतो. उघड आहे की आपण आपला संताप आणि आपली भाषा यावर संयम केला नाही तर हे कोडे आपण कधीच पूर्ण सोडवू शकणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे आपण आपल्या क्रोधाला आणि अर्वाच्य शब्दांना निष्प्रभ केल्याशिवाय आपले अत्यंत प्रामाणिक प्रयत्न देखील आपल्या घरांत पारमार्थिक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होणार नाहीत.\nसर्व हिंदुधर्मीय लोकांचे संरक्षण करण्यासाठी, आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी अंतरलोकांत देवदेवता वास्तव्य करीत असतात. देवघर हे या पिढ्यान्‌पिढ्या या कुटुम्बाच्या संरक्षणची जबाबदारी स्वतःवर घेतलेल्या या अदृश्य अतिथींचे हे स्थान असते. या खोलीत सर्व कुटुम्बीय प्रवेश करून, बसून या सुसंस्कृत जीवांशी सायुज्य करू शकतात. \"शयनगृहांत, एखाद्या कपाटांत किंवा स्वयंपाकघराच्या एखाद्या कोपऱ्यांत असलेल्या देवघरांत या देवतांना आकर्षित करता येत नाही\", असे गुरुदेव सांगतात. \"आपण माननीय पाहुण्याची घरातल्या कपाटांत राहण्याची सोय केली आणि त्याची स्वयंपाकघरांत झोपायची सोय केली तर त्याला त्याचे स्वागत केल्यासारखे, त्यांचा सन्मान केल्यासारखे आणि त्यांच्यावर प्रेम केल्यासारखे त्यांना मूळीच वाटणार नाही.\"\nदेवघर हे अत्यंत सुसंस्कृत हिंदु कुटुंबाच्या घराचे केन्द्र असते. हे विशिष्ट कक्ष वेगळे ठेवून त्यांत देवालयासारखे वातावरण स्थापित केलेले असते. येथे आपण पूजा करतो, धर्मग्रंथांचे पठन करतो, साधना करतो, भजनं गातो, आणि जपजाप्य करतो. ही पवित्र जागा एक एकान्तिक आश्रयाची आणि ध्यानसाधनेची जागा होते. या खोलीत आपण या जगतांपासून निवृत्त होऊन अंतर्मुख होऊन आपल्या कारण चित्ताच्या निध्यानाशी संपर्क साधू शकतो. ही जागा आपण स्वतःला तोंड देण्याचे, आपले कर्म स्विकारण्याचे आणि भस्मसात करण्याचे आणि नवीन निर्णय घेण्याचे स्थान असते. आपले संरक्षण करणाऱ्या देवदेवतांच्या मदतीने व अन्तर्ज्ञानाने आपल्या प्रश्नांचे निरसन करण्याचे हे स्थान असते.\nआपल्या घरांतील देवघराच्या अस्तित्वाचे स्पन्दन आपण नियमीत देवळांत जाऊन, आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी जाऊन आणि उत्सवप्रसंगी जाऊन, अधिक बलशाली करू शकतो. देवळांतून परत घरी आल्यानंतर देवघरांत दिवा लावण्याने देवळांतले धार्मिक वातावरण आपल्या घरांत निर्माण होते. देवासमोर दिवा लावण्याची ही साधी क्रिया अद्भुतपणे देवळांतल्या देवदेवतांना आपल्या घरांतील देवघरांत आणते. अंतरलोकांतून ते सर्व कुटुम्बियांना आशीर्वाद देतात आणि घरातल्या धार्मिक शक्तीची अभिवृद्धि करतात.\nगुरुदेव घरांत देवदेवतांचे स्थान असलेले वेगळे देवघर असण्याची ही कल्पना आणखी एक पाऊल पुढे घेऊन जातात. ते असे म्हणतात की सुसंकृत, देवभक्त हिंदु कुटुंब आपले पूर्ण घरच देवाला अर्पित करते. \"ईश्वर्पूजनाची आदर्श कल्पना हीच की आपण सदैव ईश्वराच्या सान्निध्यात ईश्वराच्याच घरांत, जे आपलेही घर आहे त्या घरंत राहतो आणि नियमीत देवलयांत देवदर्शनासाठी जातो. आपल्या अन्तःकरणातल्या देवाच्या जाणिव होण्याचा प्रयत्नाचा पायवा याप्रमाणे टाकण्यात येतो. जो देवाचा सांगाति म्हणून देवाबरोबर देवाच्या घरी राहत नाही त्याला स्वतःच्या आत्म्यातल्या देव प्राप्त होणे कसे शक्य आहे या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. केवळ अहंकारावर आधारित असा आहार्य अधिकरण होईल.\nआपल्या घरांत परमेश्वराचे अस्तित्व मानणारे हिंदु जन साहाजिकच त्याचा सन्मान करण्याची आणि त्याला नैवेद्य दाखवण्याची इच्छा करतात. ते प्रेमाने त्याच्या छायाचित्रापुढे नैवेद्याचे ताट ठेवतात, खोलीचे दार बंद करून बाहेर जातात. देव त्या नैवेद्याचा आस्वाद घेतात. गुरुदेव म्हणतात: देवदेवता खरोखर त्या अन्नाचा आस्वाद घेऊन आनन्दित होतात; ते त्या अन्नातील शक्ति शोषित करून घेतात. सर्वांचे भोजन झाल्यानंतर देवांची ही ताटे उचलण्यात येतात. देवांच्या ताटांत उरलेले अन्न देवांनी आशीर्वाद दिलेला प्रसाद म्हणून भक्षण करण्यात येते. घरांतल्या अत्यंत बुभुक्षित व्यक्तीसारखे व्यवस्थित देवाला अन्न वाढण्यात येते, केवळ औपचारिक नैवेद्य नाही. अर्थातच, देवदेवता सदैव केवळ देवघरांतच राहतात असे नाही. ते स्वतंत्रपणे पूर्ण घरांत घरांतील सर्व मंडळी, अतिथी आणि आप्तेष्ट यांची संभाषणे ऎकत आणि त्यांचे निरिक्षण करत वावरत असतात. हे कुटुम्ब देवाच्या घरांत राहत असल्यामुळे आणि देव त्यांच्या घरांत न राहत असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणी परमेश्वराचाच आवाज ऎकू येतो.\nगुरुदेव आम्हा सर्वांना असे आव्हान देतात: मानसशास्त्रीय, निर्णयात्मक आणि धार्मिक दृष्ट्या प्रश्न हा आहे: \"आपण परमेश्वराबरोबर राहतो की देव अधूनमधून आपल्याल भेट देतो घरांत अधिकारित्व कुणाचे आहे, एका अधर्मी,अज्ञानी, वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीचे, की स्वतः परमेश्वराचे, ज्याला घरांतील थोर मंडळीसकट पूर्ण कुटुम्ब, ज्यांनी आपण परमेश्वराच्या घरी राहतो अशी वस्तुस्थिति स्विकारलेली आहे असे लोक वंदन करतात, त्याचे घरांत अधिकारित्व कुणाचे आहे, एका अधर्मी,अज्ञानी, वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीचे, की स्वतः परमेश्वराचे, ज्याला घरांतील थोर मंडळीसकट पूर्ण कुटुम्ब, ज्यांनी आपण परमेश्वराच्या घरी राहतो अशी वस्तुस्थिति स्विकारलेली आहे असे लोक वंदन करतात, त्याचे हाच धर्म. हेच ईश्वरपूजन.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=394&Itemid=585", "date_download": "2018-04-23T11:39:25Z", "digest": "sha1:P3PZD2BP7RJVS3IWQQVCVH6YVFHGWWMU", "length": 8853, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nस्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे\nलंडन येथून त-हेत-हेचासुबक व उपयुक्त माल खरेदी करून हे दोघे होतकरू व्यापारी अमेरिकेस येऊन दाखल झाले. पूर्वीच्या आपल्या जुन्या छापखानेवाल्या मालकास बेंजामिन जाऊन भेटला व मला व्यापार करावयाचा आहे तर मी दुसरी सोय पाहतों असें सांगून मोकळा झाला. बेंजामिनची वर्तणुक अशी चांगुलपणाची होती. नंतर पूर्वीच्या बि-हाडी तो राहात असे तेथें गेला. त्या घराचा मालक आतां मरून गेला होता. घरवाल्याची मुलगी व बेंजामिन सारख्याच वयाचीं होती. या उभयतांचे पूर्वीपासूनच एकमेकांवर प्रेम होतें. बेंजामिन हा ज्या वेळेस इंग्लंडमध्यें गेला त्या वेळेस जाण्याच्या आधीं त्यानें आपल्या प्रेमाचा त्या मुलीच्या बापाशीं परिस्फोट केला होता. इंग्लंडमधून आल्यावर उभयतांचा विवाह करावयाचा असें त्या वेळीं ठरलेंही होतें. परंतु विलायतेंत गेल्यावर अनेग भानगडीमुळें बेंजामिनचा पत्रव्यवहार या घराशीं राहिला नाहीं. तेव्हां त्या मुलीच्या आईनें विवाह अन्य एका पुरूषाशीं सक्तीने घडवून आणिला. परंतु घाईनें व अविचारानें केलेल्या गोष्टी मूर्खपणाच्या ठरतात व करणारा पस्तावतो, तसेंच या मुलीच्या आईचें झालें. ज्या गृहस्थाशीं या अभागी मुलीचें लग्न त्याला आधींची पहिली एक बायको आहे असें उघडकीस आलें. आईस आपली चूक कळून आली. शिवाय हें लग्न नीट विधिपुरस्सर झालें नव्हतें आणि मुलीनें आपलें नांवही अद्याप बदललें नव्हतें. या सर्व गोष्टी बेंजामिन यास त्या घरीं गेल्यावर समजल्या. आपल्या निष्काळजीपणामुळें, पत्र वगैरे न पाठविल्यामुळें या मंडळीचा आपल्यावरील विश्वास उडाला - आणि हा सर्व शोककार वृतान्त आपल्या चुकीचापरिणाम आहे असें त्यास वाटून त्यानें त्या मुलीची व तिच्या आईची मन:पूर्वक क्षमा मागितली. पुढें योग्यकाळीं या उभयतां वधूवरांचा योगय विवाह घडवून आणावयाचा असें ठरलें.\nबेंजामिन व त्याचा व्यापारी मित्र- दोघांनीं दुकान तर नीट थाटले. नवीन आणलेला माल सुंदर व सुबक रीतीनें मांडून ठेविला. कोणतेंही काम बेंजामिन मनापासून करावयाचा. दुकान नीट चालेल अशीं चिन्हें दिसूं लागलीं. परंतु नशिबाचे खेळ कांहीं निराळेंच असतात. बेंजामिन ज्या मित्राच्या मदतीमुळें व प्रोत्साहनानें या धंद्यात सामील झाला, तो तरूण व्यापारी मित्र अकस्मात मरणाधीन झाला. परंतु त्या व्यापा-याचें बेंजामिनवर भावाप्रमाणे प्रेम बसलें होतें. आपल्या मृत्युपत्रांत त्यानें बेंजामिन यास कांहीं पैसे ठेविले होते. हें मित्रप्रेम नाहीं तर बोलाचे मित्र खंडोगणती मिळतात.\nआतां पुढें काय हा प्रश्र पुनरपि प्रामुख्यानें बेंजामिनसमोर उभा राहिला. बेंजामिनचा मेव्हणा या सुमारास फिलाडेल्फिया येथं आला होता. बेंजामिन यानें त्याला सल्ला विचारला. तो म्हणाला ''तुझ्या जुन्या छापखानेवाल्याकडे जा व तो नोकरी देतो का पहा. ''बेंजामिन यास तत्परिस्थितींत हेंच करणें श्रेयस्कर वाटलें, हितकर वाटलें. तो जुन्या मालकाकडे गेला व आपली पुनरपि नोकर म्हणून राहण्याची इच्छा दर्शविली. त्या मालकास बेंजामिनसारख्या हुशार माणसाची जरूरी होती. बेंजामिन हा कुशल कर्मकर होता व इंग्लंडमधून आणखी नवीन गोष्टी तो शिकून आला होता. बेंजामिनच्या देखरेखींखालीं छापखान्यांतील इतर सर्व नोकर नीट काम करावयास शिकले. म्हणजे मग बेंजामिन यास थोडया पगारावर राहावयास सांगावें किंवा काहीं तरी खुसपट काढून त्यास घालवून द्यावें असा मालकानें मनांत दुष्ट विचार - स्वार्थी आपमतलबी विचार योजून ठेविला.\nबेंजामिन फ्रँकलिन याचें चरित्र\nस्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-rate-analysis-7461?tid=121", "date_download": "2018-04-23T11:41:45Z", "digest": "sha1:RNHONS2A7KASUSQCIC37WLKZ75CXHNWS", "length": 22747, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop rate analysis, | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षा\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षा\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nमा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते डिसेंबर २०१७) कांदा, टोमॅटो, कोबी या तिन्ही पिकांना जोरदार बाजारभाव मिळाला. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या तिन्ही पिकांना मंदीचा मार बसला आहे. आता पावसाळी हंगामासाठी- म्हणजे वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पीक येईल - यासाठी राज्यभरातील शेतकरी नियोजन करीत आहेत. चालू सहामाहीतील मंदीमुळे पुढच्या सहामाहीत तेजी राहिल, असे सरसकट अनुमान काढणे बरोबर ठरणार नाही. कारण मे-जून-जुलै मध्ये उन्हाची तीव्रता, पाऊसमान, रोगराई कशी राहते, यावर बाजाराचे गणित अवलंबून असेल. जर पाऊसमान अनुकूल राहिले, तर फार मोठ्या अपेक्षा ठेवता येणार नाही.\nमा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते डिसेंबर २०१७) कांदा, टोमॅटो, कोबी या तिन्ही पिकांना जोरदार बाजारभाव मिळाला. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या तिन्ही पिकांना मंदीचा मार बसला आहे. आता पावसाळी हंगामासाठी- म्हणजे वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पीक येईल - यासाठी राज्यभरातील शेतकरी नियोजन करीत आहेत. चालू सहामाहीतील मंदीमुळे पुढच्या सहामाहीत तेजी राहिल, असे सरसकट अनुमान काढणे बरोबर ठरणार नाही. कारण मे-जून-जुलै मध्ये उन्हाची तीव्रता, पाऊसमान, रोगराई कशी राहते, यावर बाजाराचे गणित अवलंबून असेल. जर पाऊसमान अनुकूल राहिले, तर फार मोठ्या अपेक्षा ठेवता येणार नाही. प्रतिकूल वातावरणात चांगली उत्पादकता काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. वरील तिन्ही पिकांचे नियोजन करताना, त्यातील काही क्षेत्र पडीक ठेवता आले, तर पुरवठा काही प्रमाणात संतुलित राहील. त्याचा सर्वांना फायदा होतो.\nसध्या कोबीची फार्मगेट किंमत एक रुपये प्रतिकिलोच्याही खाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे प्लॉट अनुकूल वातावरणामुळे यशस्वी झाले, पण बाजारभावाच्या दृष्टिने तोट्यात गेले. आता, मे-जूनमध्ये रोपे टाकलेले प्लॉट प्रतिकूल वातावरणामुळे यशस्वी होतात, हे गृहीतक प्रमाण मानून लागवड वाढण्याचे संकेत मिळत आहेत. तिचे भवितव्य सर्वस्वी हवामानावर अवलंबून आहे.\n\"गेल्या वर्षी जूननंतर सहा-सात महिने कोबीत उच्चांकी तेजी होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील कोबी टप्प्याटप्प्याने देशांतर्गत बाजारात येतो. दिवाळीनंतर हापूसचा माल सुरू होतो. गेल्या वर्षी तेथे उत्पादन कमी होते. त्यामुळे तेजी लांबली होती. मे-जूनमध्ये पीक जगत नाही, उत्पादन घटते, हे खरे पण असे प्रत्येक वर्षी घडेलच असे नाही. यापूर्वी कोबीत वर्ष वर्ष मंदी अनुभवली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात उच्चांकी तेजी होती म्हणून या वर्षी मे-जूनमध्ये लागवड वाढण्याचा ट्रेंड सर्रास दिसतो, त्यामुळे व्यक्तिशः पिकाकडून फारशा अपेक्षा नाहीत,\" असे निरीक्षण शेतकरी आनंद ओस्तवाल यांनी नोंदवले आहे.\nअनुभवी शेतकरी दीपक बोरसे म्हणाले, \"पावसाळ्यात कोबीचे पीक काढणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे दरवर्षी जुलैनंतर सात-आठ रु. दर मिळतो. उन्हाळ्यात रोपे जगण्यापासून, रोगराई, मजुरांची उपलब्धता आणि पाणीटंचाई आदी अडथळ्याच्या शर्यतीमधून कोबी पीक काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका फवारणीसाठी सहा लोक लागतात, तर काढणी करायला २० टनाच्या गाडीसाठी ३० मजूर गोळा करावे लागतात. सूर्य आग ओकत असताना ज्याला हे सगळे जमते त्याला पैसा मिळतोच. त्यामुळे आम्ही उन्हाळी पिकाबाबत नेहमीच आशावादी असतो.\"\nवरील दोन्ही शेतकरी गिरणा खोऱ्यातील असून, त्यांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहेत.\nटोमॅटो बाजारभावातील तेजी-मंदी ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.\nरोपेनिर्मितीपासून लागणी ते पहिला तोडा बाजारात येईपर्यंत साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो. रोपे तयार व्हायला महिना लागतो आणि लागण केल्यानंतर ७५ दिवसांनी साधारणपणे पहिला तोडा येतो. म्हणजे, आज ज्या प्लॉटमधून तोडा सुरू झाला, त्याच्या लागवडीमागील निर्णयप्रक्रियेवर तीन महिन्यापूर्वीच्या बाजारभावाचा प्रभाव होता. जुलै ते डिसेंबर २०१७ या कालावधीत टोमॅटोचा सरासरी बाजारभाव किफायती होता. काहींना उच्चांकी बाजार मिळाला. जानेवारी २०१८ पासून मंदी सुरू झाली. फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर टोमॅटोचा अक्षरश: लाल चिखल झालाय. एप्रिल-मेपर्यंत मंदी हटण्याची चिन्हे नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.\nमहत्त्वाचा मुद्दा असा की, ९० दिवसांच्या मंदीनंतर जुन्या प्लॉटधारकांना फार काळ तग धरणे अवघड आहे. एप्रिल- मे जर खराब गेले तर जुलैपासून ज्यांचा तोडा सुरू होईल, त्यांच्यासाठी तेजीची अपेक्षा करता येईल. या मागे साधा ठोकताळा असा की टोमॅटोचे मार्केट सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदी सोसू शकत नाही, तर वैयक्तिक शेतकऱ्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ तग धरणे शक्य नाही.\nकांद्याच्या बाबतीत मार्च ते मे या ९० दिवसांतील कांद्याचा सरासरी विक्री दर जवळपास मंदीतच जाण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक कांदा उत्पादक कधीही एप्रिल-मे या हार्वेस्टिंग महिन्यांत कांदा विकत नाही. व्यावसायिक विक्री १५ जूननंतरच बाजारभावाचा रागरंग पाहून टप्प्याटप्प्याने सुरू होते. जून ते सप्टेंबर या १२० दिवसांतील कांद्याचा सरासरी विक्री दर एक हजार ते बाराशे रुपयांदरम्यान अपेक्षित आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी प्रतिएकरी उत्पादकतेत घट आणि निर्यातीचा आधार या दोन्ही गोष्टींमुळे वरील चार महिन्यांचा बाजार खूप फायद्याचा राहणार नसला तरी तोटाही होणार नाही, असा बाजाराचा सूर आहे.\n(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)\nटोमॅटो शेतकरी नियोजन farmer's planning गणित mathematics हवामान महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश दिवाळी पाणी पाणीटंचाई २०१८ 2018 शेती\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nभारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nआंबा निर्यातीला सुरवातपुणे ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...\nपंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....\nरब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...\nशेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...\nअमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...\nसोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...\nसाखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...\nउन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...\nकापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....\nपिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...\nसाखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nशेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...\nदैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...\n`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....\nअक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nमक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/12/13/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T11:30:32Z", "digest": "sha1:A3ENHA64G266N3VBTNKR7UVDHH56QPAE", "length": 19763, "nlines": 245, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "लातूरच्या मातीत मिसळ्ले गेलेले काही शब्द व त्यांचे अर्थ | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nलातूरच्या मातीत मिसळ्ले गेलेले काही शब्द व त्यांचे अर्थ\nलातूरच्या मातीत मिसळ्ले गेलेले काही शब्द व त्यांचे अर्थ वाक्यात उपयोग\nशब्दश: अर्थ – भयानक\nलातूरचा अर्थ – खूपच छान, मस्त, उत्तम\nकाल गेदरिंग मधे काय खतरा डॅन्स केलास बे \nशब्दश: अर्थ- कडवट चव\nलातूरचा अर्थ- एखद्याने मस्करी किंवा मुद्दाम केल्यावर हा शब्द वापरतात\nकिती कडू हाईस रे..\nशब्दश: अर्थ – शोध लागायचाय अजुन\nलातूरचा अर्थ- अत्यंत वाईत / खराब चव\nकालच्या लग्नातली बासुंदी नुसती वकटिझार होती..\nशब्दश: अर्थ- एक प्रकारचा आवाज\nलातूरचा अर्थ- बेदम मारहाण करताना असा आवाज येत असतो असा आमचा समाज आहे.\nकाल पिक्चरमधी ती हिरो कस्ल मारताय बे त्या विल्लनला…नुसता घीप घीप हानतय…\nशब्दश: अर्थ- जमिनिकडे बघ\nलातूरचा अर्थ – एखाद्याने काहितरी अद्भुत असाधारण कृत्य केल्यास येणारा रोमांचकारी उद्गार \nशब्दश: अर्थ – काय व्यवसाय तुमचा\nलातूरचा अर्थ – तुम्च्या प्लॅनिंग मधे काहीतरी गडबड आहे आणि तो तुम्ही लगेच्च बदलून टाकावा अस सांगणे..\n उग काहीतरीच कर्ताव बघा..\nशब्द्श: अर्थ – अतिशय वजनदार\nलातूरचा अर्थ- खतरा या शब्दास समानार्थी\nलई भारी ड्रेस घातलाईस बघ..कसला खतरा दिसुलालाईस..\nशब्द्श: अर्थ – खराब\nलातूरचा अर्थ- अतिशय तीव्रता असणे\nकाल रात्री बेक्कार पाऊस पडला किनी…नुसता फ़िरवू फ़िरवू पडलाय बघ….\n पुलीस ताणू ताणू मा्रलाल्यात..पळ…पळ…\nमार खाल्यावर असा आवाज निघतो..\n११. भुशरी पणाने वागणे.\nस्वत:ला काय भूशारी समजू लालाईस का बे एक हानलो का नाही ,मग पाणीच\n2 responses to “लातूरच्या मातीत मिसळ्ले गेलेले काही शब्द व त्यांचे अर्थ”\nहसू हसू पोट दुकु लालाई …. हे हे हे\nइतक्यातच पोट दुकु लालाई\nयाहून खतरा विनोद येऊलालेत….. 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/257/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:38:41Z", "digest": "sha1:LFZE2U6RLN4U7UEHDSV7NXFSUPEXISKQ", "length": 14920, "nlines": 44, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकोपर्डी प्रकरणाचा निकाल चार महिन्यात लावून आरोपींना भररस्त्यात फाशी द्या - धनंजय मुंडे\nकोपर्डी प्रकरणातील चारही आरोपींवरील खटल्याचा निकाल चार महिन्यात लावून त्यांना भररस्त्यात फासावर लटकवा, अन्यथा सरकारला बाजूला सारुन माता-भगिनी, मुली-बाळींच्या रक्षाणसाठी जनताच कायदा हातात घेईल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात दिला.\nविधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कोपर्डीतील अमानवी, घृणास्पद घटनेवर चर्चा उपस्थित करताना मुंडे यांनी सरकारच्या संवेदनशून्य व निष्क्रिय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. कोपर्डीतील घटना अत्यंत गंभीर व शरमेने मान खाली घालावी अशीच आहे, परंतु सरकारला ती गांभीर्याने घ्यावीशी वाटली नाही, हे या राज्याचे दुर्दैव आहे, असे मुंडे म्हणाले. १३ जुलैला ही घटना घडल्यानंतर तक्रार नोंदवून घेण्यास दोन दिवसांचा उशीर का झाला तक्रार नोंदवण्यास गेलेल्या मुलीच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली व तक्रार केल्यास तुम्हीच अडचणीत याल, अशी धमकी पोलिसांनी का दिली तक्रार नोंदवण्यास गेलेल्या मुलीच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली व तक्रार केल्यास तुम्हीच अडचणीत याल, अशी धमकी पोलिसांनी का दिली याचीही चौकशी झाली पाहिजे व तत्पूर्वी दोषी पोलिसांना निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.\nबलात्कारप्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचा दावा सरकार करत असले, तरी तो खोटा आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, ही वस्तुस्थिती आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी संयम बाळगल्यामुळेच या घटनेचा स्फोट होऊ शकला नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, असे मुंडे म्हणाले. या गुन्ह्यातील आरोपींनी यापूर्वी एक खून करुन पोलिसांच्या मदतीने तो पचवला, त्याचवेळी पोलिसांनी योग्य भूमिका घेतली असती व आरोपींना शिक्षा झाली असती, तर कदाचित ही घटना टळली असती, असेही मुंडे म्हणाले.\nबलात्काराची घटना घडल्यानंतर तीन दिवस मुख्यमंत्र्यांनी तीची दखलच घेतली नाही. याकाळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतले, परंतु पीडित कुटुंबियांची भेट घ्यावी, असे त्यांना वाटले नाही. त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा आरोपीसोबतचा कथित फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर खुलासा करण्यासाठी मुख्यमंत्री अवघ्या तासाभरात माध्यमांसमोर हजर झाले. ही संवेदना त्यांनी पीडित मुलीसंदर्भात दाखवली नाही, ही गोष्ट व्यथित करणारी आहे. सहकारी मंत्र्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी खऱ्या आरोपीचा फोटो प्रसिद्ध करुन हा खटला कमकुवत केला आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला.\nजिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यास तीन दिवस विलंब केला. कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात खऱ्या मुख्यमंत्र्यांचं ऐकावं की 'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचं' ऐकावं हा प्रश्न पालकमंत्र्यांना पडल्यानं हा विलंब झाला असावा, अशी टीकाही मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर केली.\nमुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या भाजप युवा मोर्चाचा मुंबई प्रदेशाध्यक्ष गणेश पांडे यांने दारु पिऊन स्वत:च्याच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या दालनातच त्यांच्या स्वीय सचिव सुनील माळी याच्याकडून शासकीय महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटनांबद्दल गुन्हे दाखल होऊनही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, याकडेही मुंडे यांनी लक्ष वेधून शासनाच्या भूमिकेबद्दलच शंका व्यक्त केली.\nकोपर्डीच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गेल्या दीड वर्षात राज्यात वाढलेल्या महिलांवरील अत्याचार, बलात्कार व खुनांच्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्हा नागपुरातील वाढलेल्या गुन्ह्यांची आकडेवारीही मुंडे यांनी सभागृहात सादर केली. मुंबई, पुण्यासह अनेक शहरे महिलांना असुरक्षित वाटत असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.\nमुख्यमंत्र्यांनी आता केवळ जुजबी आश्वासने न देता, गुन्हेगारांना वचक बसेल व अशी कारवाई करण्यास भविष्यात कुणी धजावणार नाही, अशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मुंडे यांनी सरकारकडे केली.\nराज्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – आ. विक्रम काळे ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकार ज्या ज्या वेळी नवा वेतन आयोग आणेल त्या त्या वेळी राज्यातही तो राबवला जाईल, असा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याचपद्धतीने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर राज्यानेही शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आ. विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली.यावर उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार साहेबांनी घेतलेल्या ...\nपीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या - धनंजय मुंडे ...\nखरीप २०१६ च्या हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ द्या, अशी आग्रही मागणी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यातील ११ लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याबाबत तसेच बुलडाणा, औरंगाबाद सारख्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाल्याचा मुद्दा नियम ९३ अन्वये त्यांनी उपस्थित केला होता. याच अनुषंगाने बोलताना मुंडे म्हणाले की, पीक विमा भरण्याची मुदत दि. ३१ जुलै २०१६ पर्यंत आहे. मात्र उद्या असलेला बँक कर्मचाऱ्यांचा संप, शनिवार, रविवार रोज ...\nभ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा होईपर्यंत विधान परिषदेचे कामकाज होऊ देणार नाही - धनंजय ...\nराज्यातील डझनाहून अधिक मंत्र्यांचा भ्रष्टाचार आम्ही पुराव्यांसह सभागृहात सादर केला, परंतु सरकारने पुरावे विचारात न घेता, चौकशी न करता प्रत्येक मंत्र्याला 'क्लिनचीट' दिली. चौकशीशिवाय मंत्र्यांना क्लीनचीट देण्याची पद्धत आम्ही यापुढे चालू देणार नाही, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा करावीच लागेल, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात घेतली. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7148510", "date_download": "2018-04-23T11:50:03Z", "digest": "sha1:FZH4IZZZXUSNJCNPUFMBMDRT6XJRWXKC", "length": 5704, "nlines": 55, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "बेसिक री-मार्केटिंग Semaltेट कशी सेट करावी? | Ep. # 126", "raw_content": "\nबेसिक री-मार्केटिंग Semaltेट कशी सेट करावी\nSemaltल # 126 मध्ये, नील आणि एरिक मूलभूत पुन: मार्केटिंग मोहिम उभारण्यासाठी धोरणे - ते काय आहे, ते का कार्य करते आणि रूपांतर मध्ये किती लक्षणीय वाढ करू शकते यावर चर्चा केली.\n00:27 - आजचे विषयः मूलभूत पुनर्-विपणन मोहीम कसे सेट करावे\n00:37 - रीमार्केटिंग म्हणजे जेव्हा आपण अलीकडे भेट दिलेल्या पृष्ठास आपण पाहत असलेल्या दुसर्यामध्ये दर्शविले जाते\n01:01 - पुन्हा मार्केटिंग करत असताना आपल्या साइटवर योग्य पिक्सेल असल्याची खात्री करा\n01:10 - पिक्सेल व्यवस्थापित करण्यासाठी Google टॅग व्यवस्थापक सेट अप करा\n01:38 - नवीन सर्जनशील बनवा आणि अधिक दृश्ये मिळविण्यासाठी अनेकदा त्या निर्मितीचा फिरवा\n02:08 - आपण Fotolia कडून स्टॉक इमेज खरेदी करू शकता\n02:16 - एक चांगला डिजिटल मार्केटर्समध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या रहदारीचे एक वेन आकृती असेल\n02:22 - थंड ट्रॅफिक आपल्या ब्रँडबद्दल कधीही ऐकलेले नाही\n02:26 - जेव्हा ते आपल्या वेबसाइटवर भेट देतात आणि आपल्या ईमेल सूचीत सामील होतात तेव्हा प्रचंड रहदारी असते\n02:29 - हॉट ट्रॅफिकने आपल्या ब्रँडसह कमीत कमी एक डॉलर खर्च केला आहे\n02:36 - \"आपण लोकांसाठी विपणन करीत आहात, ऑब्जेक्ट्स नाही\" आणि हे विसरू नका\n03:16 - पुन्हा यशस्वीपणे मार्केटिंगसाठी ट्रिक्स\n03:45 - भिन्न सामग्रीसह भिन्न लँडिंग पृष्ठे तयार करा पण त्याच व्हॅल्यू प्रोप\n03:58 - सशुल्क सामग्री जाहिरात फनेलच्या\n04:35 - विशिष्ट आठवड्यात लोकांच्या विशिष्ट गटास लक्ष्य करा\n05:10 - AdEspresso आपली जाहिरात प्रती आणि अधिक रीफ्रेश करू शकते\n05:20 - सामग्री पुन्हा लक्ष्यित फनेल\n05:36 - विचित्र जाहिराती बनवा\n06:20 - नील पटेल यांचा विचित्र जाहिरातीचा निकाल\n07:00 - आपल्या जाहिरातीमध्ये लोक कथा सांगा आणि रूपांतर दर जास्त असतील\nआपण लोकांसाठी विपणन केले आहे, ऑब्जेक्ट नाही.\nजाणून घ्या की आपण मार्केट लक्ष्यित केले आणि ते विभागला.\nआपल्या जाहिरातीसह प्रयोग करा भिन्न सामग्री भिन्न लोकांसह कार्य करते\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या - corbatas de clip.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/maharashtrian-recipes/page/6/", "date_download": "2018-04-23T11:39:40Z", "digest": "sha1:64GIRSBE4JUV6W4BVZY542FGPYSV425G", "length": 8118, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.com", "title": "महाराष्ट्रीयन पदार्थ | Maharashtrian recipes - Page 6", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » महाराष्ट्रीयन पदार्थ » पान ६\nउकडीचे मोदक प्रकार १, छायाचित्र: हर्षद खंदारे\nमहाराष्ट्रीयन पदार्थ - [Maharashtrian recipes] मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाच्या विविध पाककृती [Various types of Maharashtrian recipes].\nचटपटीत आणि खमंग मसालेदार ‘बांगडा मसाला’ खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.\nखिमटी भात, तूप आणि वरुन मेतकूट घातल्यानंतर येणारी चव दुसर्‍या कुठल्याच पदार्थास नाही, या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाचा पावसाळ्यात आरोग्यासाठी फार फायदा होतो (दह्यातही मेतकूट घालून छान चव लागते).\nरात्रीच्या जेवणात उत्तम असे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.\nबाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.\nबाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.onkardanke.com/2009/02/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T11:20:58Z", "digest": "sha1:SC6WDHN2U7DHNR5MJHEHSPYDEUKJVH67", "length": 17050, "nlines": 141, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: स्लमडॉगच्या निमित्तानं", "raw_content": "\nपोलीसांना त्रास देणारी वात्रट पोरं...या पोरांना पिटाळणारे ,पोलीस या पोलीसांपासून दूर पळणारे झोपडपट्टीतले मुलं..धारावीची अरुंद गल्लीबोळं आणि ठिकठिकाणी दिसाणारं घाणीचं,अस्वच्छतेचं,दारीद्र्याचं साम्राज्य...खरं तर कोणत्याही बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये सहज खपून जाईलं असं हे दृश्य. पण आज या दृश्याचा प्रचंड जयघोष केला जातोय कारण हे दृश्य आहे तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळवणा-या स्लमडॉग मिलिनिअर या चित्रपटामधलं.\nमी काही चित्रपट समीक्षक नाही. एखाद्या चांगल्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं योग्य कथानकाच्या साह्यानं बनवलेला कोणताही चित्रपट मला सहज प्रभावित करु शकतो.यापूर्वी अशा अनेक चित्रपटांनी मला सहज भूरळ घातलीय.त्यामुळे स्लमडॉग मिलिनिअर पाहण्यापूर्वी या चित्रपटाबद्दलची अनेक परीक्षण मी वाचली होती.त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय,मास्टरपीस,क्लासीक आणि असा आणखी बराच काही असेल..या चित्रपटाचा कालावधीत एका वेगळ्याच अनोख्या दुनियेचं वास्तववादी दर्शन मला घडेल.अशा कल्पनेत मी होतो.परंतु माझं दुर्दैव असं की माझ्या मनातले मांडे अगदी मनातच राहीले.यापैकी काहीही मला वाटलं नाही.एक चांगला परंतु असामान्य अजिबात नाही असा आणखी एक चित्रपट मी पाहिला.अशीच भावना हा चित्रपट पाहील्यानंतर माझ्या मनात उमटली.\nस्लमडॉग ही संपूर्ण बॉलिवूड कथा आहे. विकास स्वरुप यांच्या मूळ कथेवर डॅनी बॉयलनं छान चित्रपट तयार केलाय.परंतु ही कथा इतकी सशक्त आहे की या कथेवर बालिवूडमधले दर्जात्मक सिनेमे बनवणारा एखादा भारतीय दिग्दर्शक याच्यापेक्षा सरस चित्रपट अगदी सहज बनवू शकला असता.अशी पैज लावण्यास मी तयार आहे.\nस्लमडॉग ही जमाल आणि लतीका यांची प्रेमकथा आहे.परंतु यापेक्षा कितीतरी सरस प्रेमकथा आपल्या मुंबईत तयार झाल्या आहेत. मुस्लीम नायकाच्या आईला जातीय दंग्यामध्ये हिंदूंनी मारणे,खलनायकाच्या शक्तीवर आपल्या युक्तीनं मात करुन सहज पसार होणारे छोटे जमाल आणि सलीम...लतिकाच्या भेटीनं मुंबईत सर्व धोका पत्कारुन आलेला नायक जमाल..हे सगळे अगदी टिपीकल हिंदी फिल्मी घटक या चित्रपटामध्ये दिसतात.\nजमाल आणि त्याच्या भाऊ सलीम यांचीही ही कथा आहे. या कथेमध्ये एक भाऊ चांगला आणि दूसरा गैरमार्गी असणे हा अगदी दिवार (किंवा कदाचीत त्याच्याही आधीपासून मला चित्रपटांबद्दल फारसं माहीत नाही ) सुरु असलेली प्रथा या चित्रपटामध्येही पाळण्यात आलीय.त्याचबरोबर खलप्रवृत्तीच्या भावाच्या मृत्यूला त्याचा सदाचारी भाऊच जबाबदार असणे हा फॉर्म्युला या चित्रपटातही वापरण्यात आलाय.या चित्रपटाच्या शेवटी नायकाचा विजय होतो.परंतु लगान चित्रपटाच्या शेवटी नायकाच्या यशाशी जसे प्रेक्षक एकरुप होतात. आमीर खानच्या प्रत्येक फटक्यावर जसा प्रेक्षकांमध्ये जल्लोष तसा कोणताही जल्लोष अथवा चित्रपटाशी एकरुपता या चित्रपटाशी प्रेक्षकांचा निर्माण होत नाही.\nलगान,तारे जमींपर,सलाम बॉम्बे,मदर इंडिया यासारखे कित्येक सरस चित्रपट भारतामध्ये तयार झालेत.परंतू हे सर्व चित्रपट परदेशी भाषेच्या विभागात मोडतात.त्यामुळे या चित्रपटाला जगभरातल्या सर्वच तगड्या चित्रपटांशी तूलना करावी लागली.त्यामुळेच आजवर भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळू शकलेले नाही असं मला वाटतं. (अर्थात याला ऑस्करसाठी भारतीय चित्रपटाची निवड करणारी निवड समितीही तेवढीच जबाबदार आहे. दिल तो पागल है,तसंच एकलव्य सारखे चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवणा-या निवड समितीकडून कोणत्या अपेक्षा करणं हेच मुळात चूक आहे. ) त्यामुळेच ब्रिटीश निर्मात्याकडून निर्माण झालेल्या या चित्रपटाला अधिक नामांकनं मिळणं ऑस्करची निवड प्रक्रीया पाहीली तर अगदी स्वाभाविक वाटतं..थोडक्यात स्लमडॉगची इंग्रजी भाषा आणि त्याचा इंग्रजी दिग्दर्शक ही ऑस्करसाठी हा चित्रपट निवडला जाण्याची एक मोठी बलस्थाने आहेत.\nस्लमडॉगच्या यशाचा अर्थ बदललेल्या जागतिक परिस्थितीमध्ये आहे. भारतानं 1991 साली खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं.त्यानंतर काही वर्षांनीच विश्वसुंदरी आणि जगत सुंदरी हे किताब भारतीय युवतीनं सतत काही वर्षे पटकावली. सोंदर्यप्रसाधनं आणि यासारख्या अनेक परदेशी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी ह्या स्पर्धेचा या स्पर्धेतल्या विजयी सुंदरींचा अत्यंत हूशारपूर्वक वापर केला.आज अमेरिकेसह सा-या जगात मंदीच वातावरण आहे.ह्या मंदीचा मोठा फटका हॉलिवूडला बसलाय.त्यामुळे मंदीच्या या वातवरणात बॉलिवूड ह्या जगातल्या सर्वात मोठ्या फिल्म उद्योगात शिरकाव करण्यासाठी एक साधन म्हणून स्लमडॉगवर ऑस्करचा वर्षाव केला जात नाही ना असाही एक स्वाभाविक प्रश्न आहे. अमेरिका तसंच ब्रिटनचा आजवर राजकीय,सामाजिक आणि व्यापारी इतिहास पाहीला तर या प्रश्नाचं उत्तर ठामपणे नाही असं म्हणता येणार नाही.\nस्लमडॉगच्या यशाचा येता जाता जयघोष करणा-या भारतीयांनी या चित्रपटाच्या निमीत्तानं निर्माण झालेल्या प्रश्नांचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे.\nओकार तू लिहलेला स्लमडॉगवरील लेख अतिशय उत्कृष्ट आहे. त्यात विशेष करून,या चित्रपटातून तुम्ही एका महत्वाच्या प्रश्नाला हात घातल्याचं नमूद केल्यामुळे, ते अधिक विचारात टाकतयं...एखाद्या हॉलिवूड दिग्दर्शकाने मुंबईतल्या जीवंत विषयावर चित्रपट करणं आणि त्याने ऑस्करच्या आठ बाहूल्या पटकावणं नक्कीचं अभिमानास्पद आहे...पण, हे आपल्या इकडच्या दिग्दर्शकांना केव्हा समजणार...हा खरोखरच एक वादाचा मुद्दा आहे.आपले दिग्दर्शक कुठे कमी पडतात हे यानिमित्तानं मात्र, समोर आलयं.. त्यामुळे भारतीय दिग्दर्शकांनी याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.\nछान लेख आहे. बाकी स्लमडॉगच्या निमीत्ताने हॉलीवुडचा केंद्रबिंदू आता हिंदी सिनेसृष्टीकडे वळेल.\nइंग्रजी दिग्दर्शक हे ऑस्कर मिळवण्यासाठी या चित्रपटाचं बलस्थान आहे, हे मान्य. मात्र आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांचा हा वीक पॉईंट नाही का... हा टिपिकल बॉलिवूडपट आहे असे तू म्हणतोस, पण प्रश्न हा आहे की स्लमडॉग हा एक अत्यंत उत्तम दर्जाचा, एलिट सिनेमा असेल, अशी अपेक्षा तो चित्रपट पाहण्याअगोदरच का केली गेली.. हाच चित्रपट भारतीय दिग्दर्शकानं तयार केला असता, तर प्रतिक्रीया संमीक्ष जरूर असत्या, मात्र हा चित्रपट पाहण्याअगोदरच अपेक्षा वाढवून, नंतर अपेक्षाभंग होण्याचं प्रमाण कमी राहिलं असतं\nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nलाल सलाम ते वंदे मातरम् \nहिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nमदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7150195", "date_download": "2018-04-23T11:48:59Z", "digest": "sha1:MR6N4VE3RHSPWWHSIR3FQBXK6MVE3ITW", "length": 4436, "nlines": 49, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "आपला स्लो-वाढणारा ब्लॉग सेमील्ट निराकरण कसे | Ep. # 106", "raw_content": "\nआपला स्लो-वाढणारा ब्लॉग सेमील्ट निराकरण कसे | Ep. # 106\nएपिसोड # 106 एरिक आणि नील याबद्दल बोलतात की आपण आपल्या ब्लॉगवर धीमे वाढणारी रहदारी वाढवू शकता. ट्रॅफिक वाढवण्यासाठी त्यांच्या टिपा जाणून घेण्यासाठी मीठ, आणि कधी कधी ही आपल्या सामग्रीची समस्या नाही, परंतु आपल्या वेबसाइटवरील कोड बेस.\n00:28 - आजचा विषय: आपला धीमे वाढता ब्लॉग ट्रॅफिक कसा काढावा\n00:46 - अधिक सामग्री प्रकाशित करा\n01:21 - लोकांना सामग्री तयार करा\n01:36 - प्रोब्लॉगर पहा\n01:52 - ही समस्या आपली अंतर्गत रचना असू शकते आणि आपण दुवा साधू शकता\n02:18 - आपल्या कोनशिस्टर सामग्रीशी दुवा साधा\n02:31 - पृष्ठे पाहण्यासाठी Google Search Console वापरा\n02:55 - आपल्या कंटेंटची गती वाढावी\n03:31 - आपण आपल्या सामग्रीस अधिक मूल्य जोडू शकता\n03:42 - कोड बेस खूप पहा\n05:00 - न्युइलच्या गुड्रेडचे मित्र नवीन सर्व्हर जोडले\n05:30 - आपल्या वेबसाइटवर काय कमी होते हे जाणून घेण्यासाठी Google पृष्ठ गती किंवा पिंगडोम पहा\n05:44 - सीडीएन सामग्री वितरण नेटवर्क वापरा\n06:09 - ट्विटर आणि शोध लेखांवर जा\n06:57 - आजच्या भागासाठी तेच आहे\nअधिक सामग्री तयार करा किंवा आपली मदत करण्यास लोकांना द्या - smartphone app programmieren.\nसमस्या आपली वेबसाइट किंवा आपली सामग्री नसल्यास, ती आपली अंतर्गत रचना असणे आवश्यक आहे.\nआपण आपल्या संबंधित कोनस्टाइन सामग्रीशी संबंधित सर्व सामग्रीशी दुवा साधल्यास, आपण आपल्या वेळेनुसार आपली क्रमवारी वाढू शकाल\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://snaptubedownloadd.com/mr/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-tv.html", "date_download": "2018-04-23T11:52:39Z", "digest": "sha1:S5AP7U2EZJ2IJC3UWFVC5L2FBBBV6FAA", "length": 21575, "nlines": 108, "source_domain": "snaptubedownloadd.com", "title": "Android साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा - Snaptube डाउनलोड", "raw_content": "\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा\nशेअर करणे हे काळजी आहे\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा पाहू शकता आणि तुमच्या Android डिव्हाइस पासून चित्रपट आणि टीव्ही मालिका प्रवाहात. विनामूल्य पानातून बाहेर पडणारी टीव्ही अर्ज चित्रपट आणि टीव्ही मालिका आनंद घ्या.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग: झटपट प्रवाह आणि पाहणे चित्रपट\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग आपण आपल्या Android डिव्हाइसवर पासून चित्रपट आणि टीव्ही मालिका प्रवाहित करण्यास अनुमती देईल की एक ऍप्लिकेशन आहे. आपण पाहू इच्छित चित्रपट देय देणे आवश्यक नाही पानातून बाहेर पडणारी टीव्ही विनामूल्य त्या सर्वांना देते म्हणून. आपण आपल्याला आवडणार्या शैली आधारित चित्रपट आणि टीव्ही मालिका निवडू शकता.\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही जगभरातील वापरकर्त्यांना विविध शैली प्रदान केली आहे. क्रिया आहेत, साहस, रोमांचक, रम्य, रहस्य, भयपट, माहितीपट, कार्टून, आणि बरेच काही. सर्व चित्रपट आणि टीव्ही मालिका विनामूल्य प्रवाहात उपलब्ध आहेत. तो चित्रपट ऑफलाइन पाहण्यासाठी आता किती सोपे आहे, याची कल्पना करा.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग: 1080p HD गुणवत्ता अधिक उपशीर्षक मध्ये पाहणे चित्रपट\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही सर्वात मोठा फायदा चित्रपट गुणवत्ता आहे. हे 240p व्हिडिओ विविध गुणवत्ता देते, 360p, 420p, 720p, 1080p, एचडी आणि 4K. अर्थात आपण एचडी आवृत्ती मध्ये चित्रपट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करताना आकार विचार आहे. चांगल्या दर्जाचे, व्हिडिओ आकार मोठा. आपण जलद आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन आहे याची खात्री करा.\nआपण एक इंग्रजी मुळ स्पीकर नाहीत पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग उपशीर्षके चित्रपट प्रदान केली आहे म्हणून नाही काळजी. उपशीर्षके तेही पूर्ण. तेथे अरबी आहेत, चीनी, डच, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशिया, इंग्रजी आणि अनेक. आपल्या स्वत: च्या भाषेत उपशीर्षक शोधा.\nदेखील वाचा: चित्रपट ट्यूब ऑनलाईन मूव्ही प्रवाह अनुप्रयोग\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही: पहा चित्रपट ऑफलाइन\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग आपण प्रवाहात आणि ऑनलाइन चित्रपट पाहण्यासाठी असू शकतात की सर्वात पूर्ण अनुप्रयोग आहे. हे आपण टीव्ही मालिका आणि चित्रपट डाउनलोड करण्यास परवानगी देते. मग, आपण मूव्ही ऑफलाइन आनंद घेऊ शकता. हे वैशिष्ट्य अगदी इंटरनेट कनेक्शन न चित्रपट पाहण्यासाठी खूप फायदेशीर आहे.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग नवीन मालिका प्रकाशीत केल्यावर देखील आपण सूचना देईल. प्रत्येक आठवड्यात आपण अद्यतन तपासणी करण्याची गरज नाही म्हणून, या उत्कृष्ट अनुप्रयोग आपण काम नाही कारण. मग, आपण नवीनतम हंगामात डाउनलोड आणि आपण वेळ असेल तेव्हा नंतर पाहू शकता.\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा\nपानातून बाहेर पडणारी अनुप्रयोग Android डिव्हाइस उपलब्ध आहे. आपण डाउनलोड करा आणि आपल्या Android डिव्हाइसवर पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग स्थापित थेट पाहण्यासाठी आणि व्हिडिओ प्रवाहात शकता. पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग Android साठी आहे जरी, आपण Google Google च्या निर्बंध प्ले स्टोअर मध्ये पानातून बाहेर पडणारी टीव्ही शोधू शकत नाही. त्या कारणासाठी, आपण पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग डाऊनलोड करण्याची लिंक प्रदान केला आहे.\nआता आपण पानातून बाहेर पडणारी टीव्ही अॅप आहे किती छान माहीत आहे. मी तुम्हाला जेणेकरून आपण पाहू आणि आपल्या हातात ऑनलाइन चित्रपट आणि टीव्ही प्रवाहात शकता आणि सर्वत्र आपण इच्छुक या महान अनुप्रयोग करू इच्छित आता विश्वास. पण आधी आपण Android साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड, आपण खाली पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग माहिती पाहू शकतात.\nनाव: पानातून बाहेर पडणारी टीव्ही APK\nAndroid आवश्यकता: 4.0+ (नंतर)\nवर्ग: व्हिडिओ प्रवाह, मनोरंजन\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा 1.6.4 Android साठी APK\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही स्थापित\nAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही प्रतिष्ठापन तेही सुलभ आहे. आपण फक्त इतर अनुप्रयोग जसे आपल्या Android स्मार्टफोन वर प्रतिष्ठापीत करू शकता. फरक आपण नंतर स्वतः करू लागेल की पानातून बाहेर पडणारी टीव्ही ऑफलाइन इंस्टॉलर डाउनलोड करा वरील दुव्यावर पासून.\nआपण स्थापित आधी पानातून बाहेर पडणारी टीव्ही APK आपण सक्षम करणे आवश्यक आहे एक वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपल्याला पानातून बाहेर पडणारी टीव्ही Apk स्थापित करण्यासाठी आपल्याला Google प्ले स्टोअर नाही ते अनुमती देईल. जा सेटिंग्ज > सुरक्षा > गोपनीयता > अज्ञात स्रोत. आपण नंतर सेटिंग बदलू आणि वरील वैशिष्ट्य सक्षम, आपण पुढील पायरी जाण्यासाठी चांगले आहेत, Android साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही ऑफलाइन इंस्टॉलर स्थापित. हे कसे करायचे ते\nआपण वरील दुवा डाउनलोड केलेल्या पानातून बाहेर पडणारी टीव्ही APK ऑफलाइन इंस्टॉलर शोधा. त्यावर डबल टॅप करा.\nस्क्रीनवर दिसणारे परवानगी वाचा. टॅप करा पुढील नंतर उजव्या बाजूला तळाशी बटण स्थापित करणे व स्थितीचे चालू द्या.\nप्रतिष्ठापन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, तेव्हा, पानातून बाहेर पडणारी टीव्ही अॅप वर चित्रपट पाहणे सुरू करण्यासाठी टॅप करा Open बटणावर.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग आता वापरण्यासाठी तयार आहे. आपण सोपे आणि सोयीस्कर आपण शोधत आहात की चित्रपट आणि टीव्ही मालिका शोधण्यासाठी करते एक मोहक आणि आकर्षक वापरकर्ता इंटरफेस आहे. आपण पाहू आणि Android साठी पानातून बाहेर पडणारी TV अॅप वरून मूव्ही प्रवाह करू इच्छित असल्यास, फक्त चित्रपट टॅप करा आणि नंतर आपण इच्छुक असलेला चित्रपट गुणवत्ता निवडा. यानंतर आपण इच्छिता ती भाषा त्यानुसार चित्रपट उपशीर्षक निवडू शकता.\nदेखील वाचा: झेनॉन फाइल ट्रान्सफर करा आणि सामायिक करा\nचित्रपट, ऑफलाइन पाहण्यासाठी, फक्त पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग वर प्रदान व्हिडिओ दुवा टॅप. पावले प्रवाह चित्रपट जवळजवळ समान आहेत. आपण फक्त ऑन-स्क्रीन सूचना अनुसरण करू शकता.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही जुनी आवृत्ती डाउनलोड करा\nकोणत्याही अज्ञात कारणांनी आपण पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग नवीनतम आवृत्ती स्थापित करू शकत नाही, तर, आपण पानातून बाहेर पडणारी टीव्ही जुनी आवृत्ती प्रयत्न करू शकता. आपण पानातून बाहेर पडणारी टीव्ही मागील आवृत्ती प्रदान केले आहेत खाली. फक्त आपली गरज भागविण्यासाठी त्यांना एक झडप घालतात.\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.6.3 APK (13.29MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.6.2 APK (13.25MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.6.1 APK (12.33MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.6.0 APK (12.32MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.5.10 APK (12.39MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.5.9 APK (12.34MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.5.7 APK (12.21MB)\nपानातून बाहेर पडणारी टीव्ही 1.5.5 APK (12.1MB)\nमात्र, आपण एक पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग पर्यायी आवश्यकता असल्यास, आपण Viu अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. हा अनुप्रयोग आपण मूव्ही प्रवाह आणि ऑनलाइन पाहू देते देखील. भेट Viu प्रवाह अनुप्रयोग तपशील माहिती.\nशिवाय, आपल्याला YouTube वरून व्हिडिओ डाउनलोड करू इच्छित असल्यास, फेसबुक, Instagram आणि इतर व्हिडिओ साइट, SnapTube अनुप्रयोग आपल्या सर्वोत्तम पर्याय असू शकते. SnapTube अनुप्रयोग YouTube व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम अनुप्रयोग आहे. वर SnapTube अॅप बद्दल अधिक वाचा Android साठी SnapTube.\nत्या पानातून बाहेर पडणारी आहे. आपण वरील आमच्या पानातून बाहेर पडणारी टीव्ही पुनरावलोकन आनंद घ्याल. आपण मदत आवश्यक असल्यास स्थापित आणि पानातून बाहेर पडणारी टीव्ही अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी, खाली टिप्पणी बॉक्स मध्ये आपल्या प्रश्नांची लिहायला अजिबात संकोच करू नका. आम्ही आपल्याला मदत करण्यात आनंद होईल. आपण उपयुक्त तर लेख शेअर करा.\nआता, आपल्या पॉपकॉर्न आणि कॉफी घ्या. चित्रपट आनंद घ्या\nपोस्ट डाउनलोडटॅग केले डाउनलोड जमिनीवर राहणार्या प्राण्यांवर ठेवण्यासाठी असलेले आवार टीव्ही apk, डाउनलोड जमिनीवर राहणार्या प्राण्यांवर ठेवण्यासाठी असलेले आवार टीव्ही अनुप्रयोग, Android साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा, जमिनीवर राहणार्या प्राण्यांवर ठेवण्यासाठी असलेले आवार टीव्ही अॅप डाउनलोड, Android साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही, पानातून बाहेर पडणारी टीव्ही चित्रपट प्रवाह\n4 वर \"विचारAndroid साठी पानातून बाहेर पडणारी टीव्ही डाउनलोड करा”\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआम्हाला फेसबुक वर शोधा\nAndroid साठी SnapTube डाउनलोड करा\nआयफोन SnapTube डाउनलोड करा\nMac साठी SnapTube डाउनलोड करा\nPC साठी SnapTube डाउनलोड करा\nकसे SnapTube डाउनलोड मार्ग बदला\nSnapTube वापरून आपल्या YouTube व्हिडिओ डाउनलोड कसे\nAndroid साठी SnapTube कसे प्रतिष्ठापीत करायचे\nipasigner.io – निसटणे न आयफोन अनुप्रयोग डाउनलोड करा\nपीसी किंवा मॅक मोफत डाऊनलोड Xender\nमोफत iPhone साठी Xender डाउनलोड करा\nAndroid साठी Xenia डाउनलोड करा – फाइल ट्रान्सफर & अनुप्रयोग सामायिक करा\n© 2018 Snaptube डाउनलोड. सर्व हक्क राखीव. थीम द्वारे पेस्ट रोहित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/doc", "date_download": "2018-04-23T11:51:37Z", "digest": "sha1:PF6TDHSFL7CDLJINELLU242GRMA3KSLX", "length": 5745, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट व्यक्ती/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ravibhapkar.in/", "date_download": "2018-04-23T11:38:48Z", "digest": "sha1:A7IBI5GQGWXUYZNL7E2KIGJFY6SP4NOB", "length": 24774, "nlines": 322, "source_domain": "www.ravibhapkar.in", "title": "महाराष्ट्र शिक्षक मंच", "raw_content": "\nमराठी व इंग्रजी कविता\nसर्व जिल्हा परिषद संकेतस्थळे\nशाळा विकास आराखडा 2016-17\nमत्ता व दायित्व फॉर्म\nStusents Portal App द्वारे हजेरी भरणे App डाउनलोड व मार्गदर्शिका\nजलद शैक्षणिक महाराष्ट्र GR\nप्रथम सत्र परीक्षा नमूना प्रश्नपत्रिका\n5वी/8वी शिष्यवृत्ती आवेदन पत्र डाउनलोड\nमहत्वाच्या तंत्रज्ञान विषयक टिप्स\nप्रगत शैक्षणिक प्रगत शाळा निश्चिती निकष (मराठी)\nप्रगत शाळा निश्चिती निकष (उर्दू)\nखालीलपैकी आपणास जी माहिती हवी आहे ती पाहण्यासाठी/ डाउनलोड करण्यासाठी त्या माहितीवर क्लीक करा\nसंगीतमय मनोरंजक पाढे 2 ते 10 Video\n5वी/ 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड\nस्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार 2017-18 Android App डाउनलोड\nPSM पायाभूत चाचणी सर्व माध्यमांच्या शिक्षक मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.\nआधार कार्ड माहिती दुरुस्ती\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका संच डाउनलोड\nऑनलाइन शिष्यवृत्ती संपूर्ण मार्गदर्शन\nस्वातंत्र्यदिनासाठी आवश्यक राष्ट्रगीत,ध्वजगीत विद्यार्थी भाषणे\nStudents Portal मधील सन 2016_17 मधील विद्यार्थी 2017-18 मधे प्रमोट करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nसर्वसाधारण बदल्या 2017 माहितीसाठी येथे क्लीक करा.\nइयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल.\nजिल्हा परिषद शिक्षक संवर्ग बदल्यासाठी आवश्यक जिल्हानिहाय तालुकावार नकाशे डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nजिल्हानिहाय तालुकावार नकाशे डाउनलोड\nसंकलित चाचणी 2 गुण सरल प्रणाली अंतर्गत स्टूडेंट्स पोर्टल मधे भरण्यासंबंधी मार्गदर्शक विडियो डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nसंकलित चाचणी 2 गुणनोंद विडियो डाउनलोड\nसन 2017-18 बाबत प्राथमिक शाळांच्या सुट्या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nसुट्टी संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक यांचे परिपत्रक\nद्वितीय सत्र कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\n1ली ते 4 थी कला ,कार्या/ शा.शि.प्रश्नपत्रिका\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र द्वितीय सत्र परीक्षा भाषा व गणित गुणनोंद तकते.\nनवीन MDM APP डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.\nशाळा सिद्धि ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी / माहीतिसाठी येथे क्लीक करा.\nमतदार यादितील आपला अनुक्रमांक व इतर माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.(खालील web वर जावून Electroll search Engine वर क्लीक करा.)\nमतदार यादितील आपला अनुक्रमांक शोधा\nनवीन उपस्थिती व सेल्फी अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nप्रगत शाळा निश्चितिकरण प्रपत्र डाउनलोड\nशिष्यवृत्ती परीक्षा 5 वी व 8 वी ऑनलाइन आवेदन पत्र भरणे तसेच इतर माहीतिसाठी येथे क्लीक करा.\nसंगीतमय मनोरंजक 2 ते 10 पाढे video पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\nसंगीतमय मनोरंजक पाढे 2 ते 10 Video\nप्रगत शै.महाराष्ट्र प्रथम सत्र संकलित मूल्यमापन सत्र 1 भाषा व गणित विषयांची इयत्ता निहाय शिक्षक मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.\nPSM प्रथम सत्र संकलित मूल्यमापन गुणनोंद तक्ते डाउनलोड\nPSM संकलित मूल्यमापन भाषा व गणित शिक्षक मार्गदर्शिका\nवाचन प्रेरणा दिनानिमित्त भरपूर मोफत इ पुस्तके वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.\nशिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर द्वारा निर्मित WE LEARN ENGLISH हे Android App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.\nसरल मधे नवीन प्रवेशित विद्यार्थी माहिती (इ.1 ली) कशी भरावी याबाबत संपूर्ण मार्गदर्शक विडियो व महितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.\nसरल विद्यार्थी आधारकार्ड माहिती मोबाईलद्वारा कशी भरावी याबाबत माहिती व मार्गदर्शक वीडियो\nसत्र ,आकारिक मूल्यमापन चाचणी क्र.1 नमूना सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड\nNMMS तसेच NTS शिष्यवृत्ती अधिसूचना व शिष्यवृत्ती विषयक इतर माहिती\nसरल प्रणाली मधे विद्यार्थी आधार माहिती भरणे ,याविषयी परीपूर्ण माहितीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.\nY.C.M.O.U. च्या M.Ed. समकक्ष M.A.(शिक्षणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या संपूर्ण माहिती साठी येथे क्लीक करा.\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संपूर्ण महितीपुस्तिका\n15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन ) विद्यार्थ्यांसाठी भाषणे\n_______________________________________________P S.M. भाषा व गणित (मराठी व इंग्रजी माध्यम ) पायाभूत चाचणी 2016 शिक्षक मार्गदर्शिका\nP.S.M.पायाभूत परीक्षा गुणनोंद तक्ते\nP.S.M. पायाभूत परीक्षा शाळास्तर संकलन प्रपत्र\nसाठी वरील इमेज वर क्लीक करा.\n5 वी/8 वी शिष्यवृत्ती परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम\nशा.पो.आ.ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.\nसरल विद्यार्थी ट्रान्सफर महितीपुस्तिका\nSMS द्वारे शालेय पोषण आहार माहिती भरणे महितीपुस्तिका\nमुलांच्या इंग्रजी अध्ययनासाठी माझा स्वनिर्मित वीडियो Action Words डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.\n_माझ्या शैक्षणिक वेब व app निर्मिती बाबत झी 24 तास वाहिनीने प्रसारित केलेला रिपोर्ट पाहण्यासाठी खालील विडियो प्ले करा.\nमहाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित खुल्दाबाद तंत्र -ज्ञान-रचना वादी शिक्षक संमेलन चा झी 24 तास चा रिपोर्ट पाहण्यासाठी खालील विडियो प्ले करा.\nभापकर रवींद्र शहाजी उपा.जि.प.प्रा.शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर फोन:9423751727\nगणित पूरक अध्ययन संच\nमालमत्ता व दायित्व फॉर्म\nप्रगत शाळा निश्चिती निकष\nसत्र 2 शिक्षक मार्गदर्शिका\nआपले इ मेल खाते उघडा\nचला ऑनलाइन टेस्ट बनवूया\nचला गूगल फॉर्म बनवूया\nइयत्ता 2 री ऑनलाइन टेस्ट 19/12/2015\nइयत्ता 2 री बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट दि.21/01/2016\nइयत्ता 3 री गणित ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता 3री भाषा ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता चौथी ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता चौथी गणित ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता चौथी गणित ऑनलाइन टेस्ट3\nइयत्ता चौथी गणित प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाइन टेस्ट 2\nइयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता तिसरी इंग्रजी ऑनलाइन टेस्ट 1\nइयत्ता तिसरी ऑनलाइन टेस्ट दि.19/01/2016\nइयत्ता तिसरी परिसर अभ्यास ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता तिसरी प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता तिसरी प्रदन्याशोध ऑनलाइन टेस्ट\nइयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट 08/12/2015\nइयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट दि.24/01/2016\nइयत्ता दूसरी भाषा ऑनलाइन टेस्ट\nप्रगत शै.महाराष्ट्र पायाभूत परीक्षा प्रश्न नमूना\nमहाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित शिक्षकांसाठी ऑनलाइन सामान्यज्ञान स्पर्धा\nमहाराष्ट्र अॅडमिन पॅनल शिक्षकांसाठी आयोजित प्रश्नमंजुषा 20/12/2015\nमाझ्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची घेतलेली दखल\nशिक्षकांसाठी ऑनलाइन स्पर्धा दि.06/12/2015\nनवीन अपडेट्स च्या माहीतिसाठी follow या टॅब वर क्लीक करा.\nआपल्या शाळेचे स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड\nआपसी आंतरजिल्हा बदली सहायता केंद्र\nविजबिल पहा / भरा\nआपला 7/12 उतारा शोधा\nइ लर्निंग साहित्य शोध\nया संकेतस्थळाचे अॅप डाउनलोड करा.\nटाकाऊ वस्तुपासून मोबाईल स्टॅंड\nया संकेतस्थळावरील हवी ती माहिती शोधा .\nउपक्रम /साहित्य अपलोड करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/category/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T11:13:24Z", "digest": "sha1:52JBAAAPJVPJRNKJNH5NPK2CIUELOXOF", "length": 16683, "nlines": 238, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "चारोळ्या | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "\nआता होऊन जाऊ द्या………\nin गंमतीशीर विधाने, चारोळ्या, पांचट\nयावर आपले मत नोंदवा\nक्या हुआ तेरा वादा …\nतो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … ”\nतो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … “\n” आता मी दुसरा पकडलाय,\nआज पासुन तु माझा दादा…” .\nयावर आपले मत नोंदवा\nमिळावा पुढला जन्म डासांचा\nमिळावा पुढला जन्म डासांचा\nतेवढाच घेता येईल सुंदर अप्सरांच्या\nin उखाणे, गंमतीशीर विधाने, चारोळ्या\nअगरबत्ती चा पुडा ,\nअगरबत्ती चा पुडा ,\nठरलाय का साखरपुडा …\nसावन का महीना पवन करे सोर,\nमतदान करु तरी कुणाला\nइथे सगळेच उभे आहेत चोर \nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=269&Itemid=461&limitstart=4", "date_download": "2018-04-23T11:41:14Z", "digest": "sha1:6N6GHYJX3DIDDPCR4OM2VGVHS2DIVUHJ", "length": 5096, "nlines": 47, "source_domain": "saneguruji.net", "title": "मेंग चियांग", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\nतिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत\n''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''\nघट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.\nते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत ती म्हणाली, ''कोठे पुरलेत ती म्हणाली, ''कोठे पुरलेत\nते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती. म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.\nतिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू शून्य आकाशाकडे बघत\nतिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले\nसम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.\nपूर्व समुद्रात ती विलीन झाली.\nआणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली\nमेंग चियांग व इतर गोष्टी\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/507/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95_-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:29:15Z", "digest": "sha1:2KPDLDQUZCW3KO63HY7FXJFUFGGV6GLB", "length": 7350, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे\nयंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केलेल्या नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'मेक इन इंडिया', 'मेक इन महाराष्ट्र' या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.\nस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील ...\nशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी शिवसेनेचे कोणीही मंत्री अथवा आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे असे तडकाफडकी विधेयक मंजूर करून भाजप बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली.पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने विधेयक पुढे ढकलण्यात यावे, अशी सूचना ...\nदिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा – चित्रा वाघ ...\nसंपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील भगिनी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच पोलीसही महिलांवर अत्याचार करत असल्याचे दिंडोरी प्रकरणात समोर आले. परभणी जिल्ह्यातही एका भगिनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे प्रकरणही समोर आले होते. कोपर्डीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेच. पण दिंडोरी आणि परभणी प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सहकाऱ्यांसहित गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिंडोरी प्रकरण ...\nअर्थसंकल्पाचे सर्व संकेत सरकारने पायदळी तुडवले – आ. भास्कर जाधव ...\nविधानसभेत पुरवणी मागण्या सादर करत असताना मूळ अर्थसंकल्पापेक्षा प्रत्यक्षात ४.५९ टक्के जास्त मागण्या मांडल्या गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे अर्थसंकल्पाचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. सभागृहातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या स्थितीवरही जाधव यांनी प्रकाश टाकला. सध्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-water-distribution-farmers-societies-1903", "date_download": "2018-04-23T11:50:25Z", "digest": "sha1:KOZ6XR2PJWGVVUFKPSQB7BE7HU6H4VRT", "length": 19101, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on water distribution farmers societies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nन्यायाच्या प्रतीक्षेत समन्यायी पाणीवाटप\nन्यायाच्या प्रतीक्षेत समन्यायी पाणीवाटप\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nशेतीकरिता पाण्याची एकूण उपलब्धता कमी होत असताना भविष्यात समन्यायी पाणीवाटपात पाणीवापर सोसायट्यांची भूमिका मोलाची राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही सातत्याने व्हायलाच हवी.\nमागील एका दशकापासून अनिश्चित आणि असमान\nपावसाचा कहर आपण अनुभवतोय. २०१२ ते २०१४ या काळात राज्यातील जनतेने भीषण दुष्काळाचे चटके सोसले आहेत. त्यानंतरची दोन वर्षे चांगल्या पावसाची; परंतु कधी खंड तर कधी अकस्मात कोसळणाऱ्या धोधो पावसाने शेतीचे नुकसानच वाढले आहे. या वर्षी ऑक्टोबर मध्यावर आला तरी मॉन्सून राज्यातून पाय काढायला तयार नाही. सध्याचा पाऊस रब्बीसाठी लाभदायक असला, तरी खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान करीत आहे. अतिवृष्टी नाहीतर अनावृष्टीने शेतीचे नुकसानवाढीच्या काळात पाण्याचे संवर्धन-पुनर्भरण करा, उपलब्ध पाणी जपून वापरा, पाण्याची कार्यक्षमता वाढवा, पाण्याचे समन्यायी वाटप करा, असे प्रबोधनाचे डोस शासन-प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पाजले जात आहेत. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र या कार्यात त्यांच्याकडूनच खोडा घातला जात आहे. त्यामुळे पाण्याबाबतचे हे त्यांचे कोरडे मार्गदर्शन म्हणावे लागेल.\nचांगल्या पाऊसमान काळात जलसंवर्धन, पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनाचा विसर सर्वांनाच पडतो, हे वास्तव आहे. लाभक्षेत्रात पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप व्हावे, याकरिता पाणीवापर सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. पाणीवापर सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे धोरण राज्य सरकारने २००५ मध्ये स्वीकारले. या सोसायट्यांमध्ये समन्वय, त्यांचे मूल्यांकन आणि संनियंत्रणाची व्यवस्था उभी केली गेली. असे असताना या सोसायट्यांना बळकट करण्यासाठी पुण्यात स्थापन केलेला कक्ष बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात पाणीवापर सोसायट्या स्थापन करण्यापासून त्यांच्या सक्षमीकरणाची एकूण प्रक्रियाच थंडावली असे म्हटले तर वावगे ठरू नये.\nराज्यात सुमारे पाच हजार पाणीवापर सोसायट्या असून, त्यांच्या अखत्यारीत लाभक्षेत्रातील १९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सोसायट्यांचे काम आदर्शवत असे आहे. अशा सोसायट्यांनी वेळेवर देखभाल दुरुस्तीतून पाण्याची गळती तर कमी केलीच; शिवाय कालव्याच्या तोंडावर आणि शेवटी शेपटीजवळ असलेल्या अशा दोन्ही शेतकऱ्यांना समान पाणी मिळवून दिले आहे. परंतु दुर्दैवाने बहुतांश पाणीवापर सोसायट्या (पुढारी चेअरमन लाभलेल्या) या कागदोपत्रीच राहिल्या आहेत.\nपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना तर शेतकऱ्यांच्या ताब्यात पाणीवाटप-व्यवस्थापन जाऊ नये, असे सुरवातीपासूनच वाटते. त्यामुळे या सोसायट्या दुबळ्या कशा राहतील, अशीच ध्येय-धोरणे हा विभाग राबवितो. पाणीवापर हक्काचा प्रयोग ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण’ (मजनिप्रा) आणि ‘वाल्मी’ने पुढाकार घेऊन राबविण्याचा प्रयोग केला. पण जलसंपदा विभागाचा त्यास अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. पाणीवापर सोसायट्यांचे काम सुरळीत चालले, तर आपले अर्थकारण धोक्यात येईल, या भीतीपोटी पाटबंधारे विभागाची भूमिका कायम असहकाराची राहिली आहे. पाणीवापर सोसायट्या या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत.\nशेतीकरिता पाण्याची एकूण उपलब्धता कमी होत असताना भविष्यात समन्यायी पाणीवाटपात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही सातत्याने व्हायलाच हवी, अशीच धोरणे शासनाला राबवावी लागतील. पाणीवापर सोसायट्या-संस्थांसाठी पाणीवापर हक्क निश्चित करणे, ते जाहीर करणे, प्रत्यक्षात देणे, ते खरेच मिळत आहेत का, याची खात्री करणे आणि मिळत नसतील तर वेळीच हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करणे, याकरिता कायद्याने तरतुदी आहेत. त्याबाबतची नियमावली आहे. परंतु त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हायला हवी.\nशेती पाणी मॉन्सून विभाग महाराष्ट्र जलसंपदा विभाग\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nकृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे...\nनागरी सहकारी बॅंका ः आव्हाने आणि उपायआधुनिक व बदलत्या अर्थव्यवस्थेत बॅंकिंग क्षेत्रात...\nघातक अनियंत्रित आयात देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात...\nसंभ्रमाचे ढग करा दूर या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते...\nदीडपट हमीभाव नवीन जुमला तर नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ४८ महिने पूर्ण होत...\nनिर्यातीद्वारेच तरेल साखर उद्योगसाखरेचे वाढलेले उत्पादन आणि देशांतर्गत तसेच...\n ग्रामीण भाग भाजतोयदोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण...\nप्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी कशी करावी, याचे...\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीतशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक...\nप्रामाणिक प्रयत्नांनी सुटेल शेतीचा...अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविहिरींद्वारे वाढेल सिंचनमहाराष्ट्रात सिंचन क्षेत्र वाढीस अनेक मर्यादा...\nदिशा भूक अन् कुपोषणमुक्तीचीजगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे...\nशेतकऱ्यांविषयी कळवळ्यातील फोलपणाफेब्रुवारी, मार्च हे महिने आपल्याकडे...\n‘असोचेम’ची मळमळव्यापार आणि उद्योजकांची संघटना असलेल्या \"असोचेम''...\nवन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाईॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी...\nबॅंका ‘नीरव’ शांततेच्या मार्गावरभारतीय बँकिंग आज एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-officer-suspended-malpractices-6697", "date_download": "2018-04-23T11:46:36Z", "digest": "sha1:53HHHE54GZFT2UU6YC5WHRKIPRBY2PJ3", "length": 18131, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture officer suspended for Malpractices | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई\nगैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई\nमंगळवार, 20 मार्च 2018\nमुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ९६ लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर कृषी कार्यालयातील तत्कालीन सहायक अधीक्षक नामदेव वाडे यास अटक करून निलंबित करण्यात अाले, तर याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे, विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आणि तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनादेखील जबाबदार धरले असून, त्यांच्याविरुद्ध कृषी आयुक्तालय स्तरावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.\nमुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ९६ लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर कृषी कार्यालयातील तत्कालीन सहायक अधीक्षक नामदेव वाडे यास अटक करून निलंबित करण्यात अाले, तर याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे, विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आणि तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनादेखील जबाबदार धरले असून, त्यांच्याविरुद्ध कृषी आयुक्तालय स्तरावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे.\nतालुका कृषी अधिकारी कार्यालय, रावेर शासकीय कोषागारातून निधी काढून स्टेट बँक ऑफ इंडिया, रावेर येथे त्यांच्या नावाने असलेल्या बचत खात्यात ठेवण्यात येत होता. स्टेट बँक ऑफ इंडिया (रावेर) या खात्यातील रकमेसाठी रोखवही इत्यादी उपलब्ध नसल्याचे विद्यमान कृषी अधिकारी (रावेर) यांच्या ऑगस्ट २०१४ च्या दरम्यान निदर्शनास आले. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते जून २०१६ या कालावधीत ७०,७०,५१७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे जुलै २०१६ मध्ये कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्या निदर्शनास आले होते, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०१८ मध्ये विभागीय कृषी सहसंचालक (नाशिक) यांच्याकडून मार्च २०१४ ते जून २०१६ या कालावधीत ९६ लाख ७५ हजार २८९ इतकी शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले आहे.\nभविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी या विभागाच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता उघडलेली सर्व बँक खाती बंद करण्याचे आदेश जुलै २०१७ मध्ये दिले आहे. सद्यस्थितीत पीएफएमएस प्रणालीद्वारे निधीचे वितरण केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी दक्षता पथकामार्फत करण्याबाबत कृषी आयुक्तांना कळविण्यात आले असल्याचे कृषिमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले. आमदार सीमाताई हिरे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.\nदक्षता पथकामार्फत खात्री करण्याचे आदेश\nदरम्यान, नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून २०१५ मध्ये कृषी सहायक या संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या. त्या संदर्भातील नस्त्या विभागीय कृषी सहसंचालक नाशिक या कार्यालयात असल्याचे त्यांच्या अहवालावरून दिसून येते. या वस्तुस्थितीची दक्षता पथकामार्फत स्वतंत्रपणे खात्री करण्याचे आदेश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत, असे मंत्री फुंडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले आहे.\nनाशिक जळगाव विजय victory विभाग sections कृषी आयुक्त agriculture commissioner पांडुरंग फुंडकर बँक ऑफ इंडिया २०१८ 2018 आमदार\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stomach-disease-livestock-6684", "date_download": "2018-04-23T11:38:56Z", "digest": "sha1:ZBYNVFV5QME475HDCS6OKQH2WUVKESQX", "length": 20635, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, stomach disease in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांतील पोटफुगीची कारणे, लक्षणे, उपाय\nजनावरांतील पोटफुगीची कारणे, लक्षणे, उपाय\nडॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे\nमंगळवार, 20 मार्च 2018\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nशेळ्या, मेंढ्या व मोठ्या जनावरांमध्ये सर्व मोसमांत पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात अाढळून येते. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे, अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांनी खालेल्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.\nकोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त अाणि किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी, वाटाणा अाणि मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात उसाची मळी, चोथरी जनावरांच्या खाद्यात गेल्यास जनावरांचे पोट फुगते.\nअन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते.\nकाही जनावरांत अानुवंशिकतेमुळे तोंडातील लाळेचा स्राव कमी प्रमाणात होत असल्यास अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही, त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे चारा व पाण्याशिवाय खाल्ल्यावरसुद्धा पोटफुगी होते. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्ल्यास पोटफुगी होते.\nप्रथम जनावर खात- पीत नाही, ते सुस्तावते.\nजनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा अाकार जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात खाते, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छ्‍वास करते, लाळ गाळते.\nपोटातील वाढलेल्या वायूमुळे फुफ्फुसावर व हृदयावर दाब पडतो, त्यामुळे जनावरास श्वासोच्छ्‍वासास त्रास होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो. कधी कधी पोटफुगी एवढी वाढते, की पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकोंडी होऊन जनावर कोसळते. फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावते.\nवरील लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे. पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील अशाप्रकारे जनावराला बांधावे, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश करावे. जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वायुनाशक औषधे तोंडातून पाजावीत.\nजनावराच्या तोंडात आडवी कडुलिंबाची १ फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील, त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत होईल.\nकोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये.\nजंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर ३ महिन्यांनंतर जनावरांना जंतनाशक पाजावे. रोज ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे. उरलेले शिळे अन्न, भाज्या देऊ नये.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू जनावराच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nसंपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६\n(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपशु सल्ला खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर...\nशेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्वपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड...\nगाभण गाई, म्हशींची काळजी घ्यागायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण...\nआर्थिक नुकसान टाळण्याकरिता काढा...आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्‍कम...\nउन्हाळ्यात जपा शेळ्यांनाउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे...\nडोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...\nजाणून घ्या मत्स्यबीज निर्मितीचे तंत्रमत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची...\nदारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...\nपंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर...पंजाबमधील पशुपालक गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी...\nशंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...\nआधुनिक म्हैसपालनाकरिता लागणारी उपकरणेआधुनिक म्हैसपालनामध्ये नवीन अद्ययावत...\nलेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची...पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक...\nसुधारित तंत्रातून पंजाबची दुग्ध...पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...\nमका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...\nजनावरांचे आगीपासून करा संरक्षणअागीची झळ बसलेली जनावरे पूर्णपणे बरी होण्यासाठी...\nचाराटंचाईमध्ये म्हशींना द्या मूरघासउन्हाळ्यातील चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा...\nवाढत्या तापमानात जनावरांची घ्या काळजीवाढत्या तापमानात जनावरासाठी छत तयार करून सावलीची...\nथायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे...गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार...\nजनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपायजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://global.drfone.biz/mt/ios-whatsapp-transfer-backup-and-restore.html", "date_download": "2018-04-23T11:54:37Z", "digest": "sha1:6YTVISPAFQHCBEHMQR7MANWXYOJULHLB", "length": 17211, "nlines": 303, "source_domain": "global.drfone.biz", "title": "[अधिकृत] dr.fone टूलकिट - iOS WhatsApp हस्तांतरण, बॅकअप घ्या आणि पुनर्संचयित", "raw_content": "\ndr.fone टूलकिट - iOS WhatsApp हस्तांतरण, बॅकअप घ्या आणि पुनर्संचयित\nसहज आणि flexibly आपले WhatsApp गप्पा, हाताळा\nआयफोन / iPad / iPod स्पर्श / Android डिव्हाइस हस्तांतरित करा iOS WhatsApp.\nसंगणक बॅकअप किंवा निर्यात iOS WhatsApp संदेश.\niPhone, iPad, iPod स्पर्श आणि Android साधने iOS WhatsApp बॅकअप पुनर्संचयित करा.\nहे करून पहा मोफत आता खरेदी\nहे करून पहा मोफत आता खरेदी\nप्रयत्न करा तो विनामूल्य मोफत हे वापरून पहा\nहस्तांतरण WhatsApp इतिहास सहजतेने आणि निवडक\nआपण एकापेक्षा अधिक डिव्हाइस किंवा फक्त एक नवीन आपल्या जुन्या साधन बदलू इच्छित हरकत नाही, आपण निवडक आपल्या iPhone आणि iPad दरम्यान आपल्या WhatsApp गप्पा इतिहास हस्तांतरित करण्याची या कार्यक्रमात वापरू शकता. एक Android डिव्हाइसवर स्विच केल्यानंतर, तो आपल्या नवीन Android डिव्हाइसवर आयफोन / iPad पासून WhatsApp संभाषणे हस्तांतरित करण्यास मदत करू शकता. कोणतीही बाब संलग्नक समावेश इच्छा आहे.\nनिवडक WhatsApp संदेश हस्तांतरण\nआपण iOS किंवा Android डिव्हाइसवर निवडक iOS साधने पासून WhatsApp संदेश हस्तांतरित करू शकता.\nसहज बॅकअप WhatsApp संदेश\nआपण एका क्लिकसोबत आपल्या iPhone / iPad वर बॅकअप WhatsApp संदेश करू शकता संगणकावर.\nपूर्वावलोकन WhatsApp बॅकअप सामग्री\nआपण आपल्या WhatsApp बॅकअप फाइल सर्व तपशील, संदेश आणि संलग्नक सारखे वाचू शकता. आपल्याला पाहिजे ते पहा.\nपासून WhatsApp बॅकअप निर्यात संदेश\nआपण निवडक एक HTML फाइल म्हणून WhatsApp बॅकअप संदेश निर्यात करू शकता. आपण मुद्रित किंवा शेअर करण्यासाठी तो चांगला आहे.\nWhatsApp बॅकअप पुनर्संचयित करा\nWhatsApp संदेश पुनर्संचयित करण्यासाठी म्हणून, आपण iOS आणि Android डिव्हाइस दोन्ही ते पुनर्संचयित करू शकता. तो एक-क्लिक काम आहे.\nसह iPhone, iPad आणि iPod स्पर्श खूप काम\nकाही हरकत नाही आपण नवीन आयफोन 7, iPad प्रो, किंवा जुन्या आयफोन 4, iPad 1 वापरत आहात, हे iOS डेटा पुनर्प्राप्ती iPhone, iPad आणि iPod स्पर्श सर्व मॉडेल पूर्णपणे सुसंगत आहे.\nया WhatsApp बॅकअप आणि कार्यक्रम पुनर्संचयित पूर्णपणे केवळ-वाचनीय आहे सॉफ्टवेअर. तो बसणार नाही, बदल किंवा आपल्या डिव्हाइसवर किंवा बॅकअप फाइल कोणत्याही डेटा लीक. आम्ही आपला वैयक्तिक डेटा घ्या आणि गंभीरपणे खाते. आपण नेहमी प्रवेश करू शकता फक्त व्यक्ती आहात.\nबॅकअप किंवा निर्यात WhatsApp संभाषणे\nतो आपल्या WhatsApp इतिहास बॅकअप नेहमीपेक्षा जास्त सोपे करते. आपल्या iPhone / iPad कनेक्ट आणि एक क्लिक करत, बॅकअप स्वत: हून कार्य करते. शिवाय, आपण पूर्वावलोकन आणि आपण इच्छुक कोणत्याही आयटम तपासा आणि वाचन किंवा मुद्रणासाठी HTML फाइल म्हणून ती आपल्या संगणकावर निर्यात करू शकता.\niOS / Android साधने WhatsApp बॅकअप पुनर्संचयित करा\nWhatsApp बॅकअप फाइल्स बोलणे, आपण ठेवू इच्छिता नाही, तर त्यांना आपल्या संगणकावरून हटवू शकता, आणि अशा गरज आहे तेव्हा आपण आपल्या iPhone / iPad किंवा Android डिव्हाइस त्यांना पुनर्संचयित करू शकता. तो एका क्लिक मध्ये केले जाऊ शकते.\nहे फक्त डेटा, धोका कोणताही डेटा वाचतो.\n100% सुरक्षित सॉफ्टवेअर, संगणक किंवा डिव्हाइस नाही हानी.\nतो कोणालाही उपलब्ध आहे, नाही टेक ज्ञान विचारले.\n30 दिवस विनामूल्य चाचणी\nआपण 30 दिवस विनामूल्य सॉफ्टवेअर प्रयत्न करू शकता.\nआयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन OS, आयफोन अधिक 6s, आयफोन, आयफोन 6 प्लस, आयफोन 6, आयफोन 5s, आयफोन 5c, आयफोन 5, आयफोन 4s, आयफोन 4 6s\niPad सर्व मॉडेल प्रो, iPad हवाई, iPad मिनी, iPad\niPod स्पर्श 5, iPod स्पर्श 4\n1GHz (32 बिट किंवा 64 बिट)\nRAM च्या 256 एमबी किंवा अधिक (1024MB शिफारस केलेले)\n200 MB आणि मोकळी जागा वरील\niOS WhatsApp हस्तांतरण, बॅकअप घ्या आणि पुनर्संचयित\nहे विनामूल्य वापरून पहा\nहे विनामूल्य वापरून पहा\ndr.fone टूलकिट मला यशस्वीरित्या माझ्या नवीन आयफोन शॉन माझे जुन्या Android फोन WhatsApp डेटा हस्तांतरित मदत करा.\ndr.fone टूलकिट फाइल Android डिव्हाइसवर थेट हटविणे झाल्यामुळे गमावले फोटो आणि व्हिडिओ तसेच एचटीएमएल निर्यात करा, पुनर्प्राप्त करण्यासाठी हटविले एसएमएस आणि संपर्क, नावे, क्रमांक आणि ई-मेल पत्ते, यासह पुनर्प्राप्त रचना व्यावसायिक अनुप्रयोग आहे.\nसमाधान हे सॉफ्टवेअर WhatsApp डेटा पुनर्संचयित अतिशय चांगला आहे.\nबॅकअप WhatsApp Android आणि iPhone वर ऑनलाईन संदेश\nकसे आयफोन आणि Android साधने WhatsApp संदेश पुनर्संचयित\nपुनर्प्राप्त कसे Whatsapp हटवले प्रतिमा / चित्रे\nआयफोन बॅकअप किंवा निर्यात WhatsApp संदेश कसे\nकसे iPhone वर WhatsApp संदेश पुनर्प्राप्त करण्यासाठी\nWhatsApp बॅकअप Extractor: आपल्या संगणकावरील WhatsApp संभाषणे वाचा\n6 बॅकअप WhatsApp संदेश मार्ग\nशीर्ष 10 मोफत WhatsApp पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर\nआमचे ग्राहक तसेच डाउनलोड आहेत:\niOS Viber बॅकअप घ्या आणि पुनर्संचयित\nFlexibly बॅकअप आणि आपल्या iPhone, iPad, किंवा संगणकावरील viber गप्पा पुनर्संचयित.\nप्रयत्न करा तो विनामूल्य मोफत हे वापरून पहा\niOS डेटा बॅक अप आणि पुनर्संचयित करा\nबॅकअप आणि आपण आपल्या संगणकावर बॅकअप काय हवे डिव्हाइसवर / कोणत्याही आयटम, आणि निर्यात पुनर्संचयित.\nप्रयत्न करा तो विनामूल्य मोफत हे वापरून पहा\nपुनर्प्राप्ती मोड, पांढरा ऍपल लोगो, काळा पडदा, सुरुवात looping इत्यादी विविध iOS प्रणाली समस्या निराकरण\nप्रयत्न करा तो विनामूल्य मोफत हे वापरून पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:10:25Z", "digest": "sha1:ARMFMXALGPYGQE5BRUZTNMI75RGNK2ZT", "length": 11540, "nlines": 98, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "बायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित | Nirbhidsatta News", "raw_content": "\nस्वरक्षणासाठी विद्यार्थिनींच नाही तर प्रत्येक महिलेने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – महापौर काळजे\nकठुआ घटनेच्या निषेधार्थ पिंपळे गुरव येथे कॅण्डल मार्च\nनियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील; हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते पवार यांचे मत\nमहापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे, उपाध्यक्षपदी कुटे\nवाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप\nमहापालिकेचे तिन दिवसात तेराशे किलो प्लास्टिक संकलन\nदेशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल\nमहापौरांचा नागरसेविकाला प्रश्न; तुमचे वय काय\nनगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती\nअखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता\nHome कोल्हापूर-सांगली बायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित\nबायोमेट्रिक रेशनिंगसाठी आता ePoS मशिन्सवर आधार पडताळणी अनिवार्य; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून AePDS ही नवी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली कार्यान्वित\nePoS मशिन्सद्वारे एप्रिल 2017 पासून कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. याचाच पुढचा महत्त्वाचा टप्पा या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे. AEPDS नावाने ओळखल्या जाणा-या नव्या प्रणालीमध्ये आता रेशन कार्ड धारकाची ePoS मशिनवर अंगठा देऊन आधार पडताळणी झाली तर आणि तरच त्याला धान्य वाटप होऊ शकणार आहे.\nआतापर्यंत आधार पडताळणी होऊ शकली नाही तरी ePoS मशिन्सवर तशी नोंद घेऊन धान्य वाटप करता येत होते. आता मात्र आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.\nजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीची संपूर्ण तयारी कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने करण्यात आली असून, त्यासाठी रेशन दुकानदारांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांसाठी प्रात्यक्षिक सराव व प्रशिक्षण वर्गांचे जिल्हा व तालुका पातळ्यांवर आयोजन करण्यात येऊन आजपासून ही प्रणाली कोल्हापूर जिल्ह्यात पुर्णपणे कार्यान्वित होत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी स्पष्ट केले आहे.\nजर एखाद्या रेशन कार्ड धारकाची आधार क्रमांकाची नोंद ePoS मशिनमध्ये झालेली नसेल अथवा कोणत्याही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे आधार पडताळणी होऊ शकली नाही तर eKYC व ‘रूट ऑफिसर’ च्या व्यवस्थेअंतर्गत जागेवरच त्यावर मार्ग काढण्यात येऊन कोणीही पात्र रेशन कार्ड धारक धान्य मिळण्यापासून वंचित रहाणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे सांगून या नव्या प्रणालीमध्ये कोल्हापुर जिल्हा संपूर्ण राज्यात आपली आघाडी कायम ठेवील आणि अन्न सुरक्षे अंतर्गत ख-याखु-या लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीने अन्नधान्य पोहोचविण्याच्या प्रयत्नांना सर्व संबंधित घटकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी व्यक्त केला आहे.\nशासनाच्या या नव्या AePDS प्रणालीची जमेची बाजू आणि वैशिष्ट्ये ही आहेत\n1) रेशन कार्ड धारकाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Data Entry करताना फरक पडला तरी आता त्याचा आधार क्रमांक असल्यास त्याच्या आधार पडताळणीला अडचण येणार नाही.\n2) ‘बेस्ट फिंगर’ च्या सुविधेमुळे आता एकाहून अधिक बोटांचा वापर ePoS मशिनवर आधार पडताळणीसाठी करता येणार आहे.\n3) या नव्या प्रणालीमधील ‘पोर्टेबिलीटी’ च्या सुविधेमुळे उदरनिर्वाहानिमित्त तात्पुरत्या स्थलांतरीत रेशन कार्ड धारकांना त्यांच्या सोयीच्या कोणत्याही रेशन दुकानातून ePoS मशिनवर अंगठा देऊन धान्य घेता येणार आहे.\n4) या प्रणालीमध्ये रेशन दुकान व रेशन कार्ड निहाय सर्व प्रकारचे Online Reports मिळणार असून 100% पारदर्शकता येणार आहे.\nकोल्हापूरात आरक्षणासाठी धनगर समाजाची रॅली\nकॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू न करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nआयुष्यभर शिकत राहणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे – विश्वास नांगरे पाटील\nराज्यसभा खासदार अमर साबळे यांचे कोल्हापूर येथे गांधीगिरी मार्गाने उपोषण\nमहिलांचे सबलीकरण होणे गरजेचे – व्ही सि. नित्यानंदम\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/january/25/", "date_download": "2018-04-23T11:34:33Z", "digest": "sha1:6Y7D3EJDXDYSZUSDEPQ2HE2K6GHGP5SD", "length": 8478, "nlines": 119, "source_domain": "www.marathimati.com", "title": "२५ जानेवारी दिनविशेष | January 25 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » जानेवारी » २५ जानेवारी दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१३\n२५ जानेवारी दिनविशेष(January 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\nविनोबा भावे - (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.\n१९८२ : विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान\n१८७४ : चिपळूणकरांच्या ’निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.\n१९७१ : हिमाचलला राज्याला दर्जा देण्यात आला.\n१९८८ : पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.\n१९९१ : मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.\n२००४ : लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.\n२००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.\n१६६५ : सोनोपंत डबीरांचे निधन\n१९८ : लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे पंचांगकर्ते.\n२००१ : विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/569/%E0%A4%96%E0%A4%BE._%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T11:23:28Z", "digest": "sha1:3X2CMS5M7XVAD26ZEDMSBMSGOTZ2T7WI", "length": 7668, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा. प्रफुल्ल पटेल यांच्या आत्मचरित्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या 'उडान - ए ग्राफिक ग्लिम्प्स थ्रू द लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल' या आत्मचरित्राचे प्रकाशन सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे खा. राजीवप्रताप रूडी, क्रीडामंत्री विजय गोयल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. आनंद शर्मा, जदयूचे महासचिव के. सी. त्यागी, माकपचे सीताराम येचुरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख वक्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे खेळाविषयी असलेले प्रेम आणि या क्षेत्रात त्यांनी केलेल्या राजकीय योगदानाचे यावेळी कौतुक केले.\nशरद पवार यांचा संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने औरंगाबाद येथे नागरी सन्मान ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज औरंगाबाद येथे नागरी सत्कार समिती व संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सु ...\nदिवाळीपर्यंत कर्जमाफी न झाल्यास शेतकरी असहकार पुकारतील - शरद पवार ...\nशेतकऱ्यांसाठी स्वतः रस्त्यावर उतरणार...राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी आणि बुलेट ट्रेन या विषयांवर भाष्य केले. राज्य सरकारने दिवाळीपर्यंत कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता. तसे न झाल्यास ५ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन असहकार आंदोलन पुकारू, असा इशारा पवार यांनी दिला. कर्जमाफीच्या निर्णयात वापरलेला 'सरसकट' शब्द आम्हाला महत्त्वाचा वाटत ...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली शरद पवार यांची भेट ...\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात काल दिल्ली येथे आदरणीय शरद पवार साहेबांसमवेत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. त्यांनतर राज्य सरकारच्या भूमिकेत सकारात्मक बदल दिसून आले. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका विशद केली आहे. या चर्चेचे फलित बघता सरकारकडून असलेला प्रस्ताव आणि पवार साहेबांनी सुचवलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश आजच्या कर्जमाफीत झालेला दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. तसे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-23T11:50:43Z", "digest": "sha1:W6LTSZE6WSTP6IWQ5IITUNUUAM6MV5X2", "length": 3871, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सायकलिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया खेळाशी संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१६ रोजी १६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2013/10/blog-post_9.html", "date_download": "2018-04-23T11:41:34Z", "digest": "sha1:BXHVJWHQMVAYCE4RY5SYSNMFBCXR65WE", "length": 12816, "nlines": 165, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): मांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती", "raw_content": "\nमांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती\nअहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर सीमा सोडल्या, तर बहुतांश जिल्हा सपाटच आहे. पण तरी जिल्ह्यात आडवाटेवर काही परिचित नसलेले डोंगर आहेत. त्यांची उंची इतकी छोटी आहे की, त्यांना डोंगर म्हणणेही धाडसाचेच ठरावे. अशाच एका अपरिचित डोंगर कम किल्ल्याला भेट द्यायचा योग नुकताच आला. सोबतीला होता - 'ट्रेकक्षितीज' संस्थेचा संस्थापक अमित बोरोले व त्याची चारचाकी.\nपुण्यातून भल्या पहाटे सहाला निघालो आणि नगर हायवेवर एका ठिकाणी (हट्टाने) मिसळ मागवून तोंडाचा जाळ करून घेतला. कितीतरी महिन्यांनी ट्रेकला निघालो असल्यामुळे सवयी मोडल्याची खात्री पटत चालली होती. अखेर अहमदनगर सोडून औरंगाबादच्या दिशेने जायला लागल्यावर दहा-एक किमीवर वांबोरी फाट्यावरून गाडी डाव्या हाताला आत मारली. मांजरसुंबा गड विचारत विचारत जात होतो, तेवढ्यात गड दिसला.\nखूप दिवसात हा प्रवास घडला नाहीये, हे जाणवलंच -\nया कमानीपाशी येऊन पोचलो.\nपायथ्यापासून गडाचा छोटेखानी आवाका सहज जाणवतो -\nपंधरा मिनिटात चढून ऐसपैस अशा मुख्य दरवाजापाशी आलो -\nनिजामपूर्व काळातील हे बांधकाम असावे (इति अमित) इतकी विस्तृत बांधणी आहे -\nगडावर फिरायला फारसे काहीच नाही. गडाचा इतिहास, महत्त्व यांचा शोध सुरू आहे. तो पूर्ण झाला की इथे भर घालेनच. या गडाला स्थानिक लोक दावलमलिक या नावानेही ओळखतात. (गडावर पीरस्थान आहे म्हणून हे नाव).\nअतिविशाल टाके - (हे पाहून मुल्हेरगडावरील अशाच टाक्याची आठवण ताजी झाली)\nगडाच्या एका टोकावरचा हा 'हवामहाल' (हा महालच असावा. कड्याच्या अगदीच टोकाला असल्याने हवामहाल वाटतोय)\nगडाच्या पश्चिम दिशेकडे अजून एक दरवाजा आहे.\nत्यातून खाली डोकावून पाहिले असता पडक्या पण ठीकठाक पायर्‍या दिसल्या. ट्रेक केल्याचे जराही समाधान वाटत नसल्याने, या पायर्‍यांनी खाली उतरून तेवढेच समाधान मिळवू असा विचार करून खाली उतरू लागलो. थोड्याच वेळात एक पायवाट गडाला चिकटून गेलेली दिसली. त्या वाटेने गेले असता, गडाच्या पोटात एका रांगेत लेणी-टाकी सापडली.\nपाणी चवीला उत्तम होते.\nसरते शेवटी ती वाट गडाला अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करून जुन्या वाटेला येऊन मिळाली. जेमतेम दीड तासात सर्व भटकंती संपवून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालीही..\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nमांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/icc-champions-trophy-2017.html", "date_download": "2018-04-23T12:26:16Z", "digest": "sha1:5BXFKT7G5L7UY7ZFGJYNPAVBAMX6QUTL", "length": 12586, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ICC Champions Trophy 2017 - Latest News on ICC Champions Trophy 2017 | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.\nधोनीने आधीच म्हटलं की पाकिस्तानविरोधात हरणार\nचँम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी बॉलर्सला दोषी ठरवतंय तर कोणी कोहलीला. चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार म्हटलं जातं होतं. पण कप पाकिस्तान घेऊन गेला.पण माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कदाचित हे आधीच कळून चुकलं होतं. धोनीने याबाबत म्हटलं देखील होतं.\nपाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.\nमिरवाईज सीमेपलीकडे का जात नाही\nचॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर पाकिस्तानला शुभेच्छा देणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूकवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस, असा सवाल गंभीरनं विचारला आहे.\nया कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ\nभारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले.\nसौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग\nआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही.\nपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा\nभारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.\nधोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला.\nपाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.\nरवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.\nचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास\nभारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.\nरोहितचं खणखणीत शतक, बांग्लादेशला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.\nरोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.\nशिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे.\n२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात\nचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\nनिरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे : चांगल्या झोपेकरता काही खास टीप्स\nमुंबईमध्ये शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/maharashtra-desha/literature/workshop-for-females-on-self-development", "date_download": "2018-04-23T11:24:02Z", "digest": "sha1:UM3CJHIYNAFK643FI7FY2HC5EMTW54PM", "length": 8752, "nlines": 135, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Workshop for females on self development | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महाराष्ट्र देशा साहित्य एनएमएसएसएस आणि आम्ही उद्योगिनी आयोजित महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन\nएनएमएसएसएस आणि आम्ही उद्योगिनी आयोजित महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन\nशुक्रवार, दि. ७/१४/२१/२८ जुलै, २०१७ दुपारी २ ते ५ वाजता महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तरी महिलांनी या संधीचा वाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nगणपती-गौरींचे दागिने व मखरासाठी कृत्रीम फुलांची सजावट\n(कंठी, गौरी हार, बांगड्या, विविध प्रकारची फुले, पाने व इ.)\nशेवटच्या शुक्रवारी उत्पादनाची गुणवत्ता, प्रस्तुती, विक्री या संदर्भात मोफत मार्गदर्शन\nऑगस्ट महिन्यात सिडको मनस्वी केंद्रातील प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात दोन दिवस एकत्रित मोफत स्टॉल उपलब्ध करून देणार\nप्रशिक्षक व मार्गदर्शन – राजश्री देसाई, उद्योजिका,\nमाधुरी पाटील , महिला संघटक व उद्योग मार्गदर्शक व\nपूर्व नोंदणी आवश्यक. शेवटची तारीख (५ जुलै, २०१७)\nनोंदणी मोफत. प्रति दिन ५० रुपये (एकूण १५०/- रुपये)\nतीनही कार्यशाळेसाठी लागणारा कच्चा माल रु. ३५०/- रुपयात उपलब्ध करून देणार.\n(मोती, समोसा पट्टी, पेंडल, गोंडा, पॅरीस धागा, खडा पट्टी, चिंचपेट्या सॅटीन रिबन, फ्यूज तार, बांगड्यांचा साचा, सुई, दोरा इ.)\nमहिलांनी आणावयाचे साहित्य – सामान ठेवण्य़ासाठी डबा, कातर\nस्थळ – सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर हॉल, पहिला माळा, सेक्टर ५ई, कळंबोली.\nसंपर्क – ९०२९०१४९८२ / ८८८८८७९४१८\n(वेळ ११ ते ६ वा)\nआता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/news/health", "date_download": "2018-04-23T11:12:40Z", "digest": "sha1:P5IDSFXL3PXYSJWCASXCA6WMDE4JLLBX", "length": 9203, "nlines": 136, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "आरोग्य | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nआयुर्वेद कोश टरमरिक लाटे (latte )\nकल्पना करा . . . तुम्ही स्टार बक्स च्या अलिशान कॉफी शॉप मध्ये बसला आहात. तुम्ही रोजही बसत असाल पण, आमच्या सारख्याला औरंग्याला जसे स्वप्नात संताजी धनाजी दिसत असत तसे स्टार बक्स चे मेन्यु कार्...\tRead more\n“रुद्राक्ष ब्लड हेल्पलाइन” मुळे आता रुग्णांची रक्तासाठीची वणवण थांबणार\nनमस्कार मित्रानो , ‘रुद्राक्ष ब्लड’ या ऑनलाईन सेवेमध्ये तुम्हा सर्वाच स्वागत आहे. आता तुम्हाला रक्तपेढी (ब्लडबँक) शोधण्यासाठी धावपळ कमी करावी लागणार आहे . कारण आम्ही तुमच्यासाठी...\tRead more\nप्रसुती – सिझेरिअन योग्य की अयोग्य – नक्की वाचा\n‘सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो. कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास पहिला प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की...\tRead more\nराजीव गांधी आरोग्यदायी योजनेबद्दल माहिती\nमहाराष्ट्रातील सर्व माता बंधू भगिनींना नम्र विनंती आहे कि आपण हि माहिती आवश्य वाचा आणि आपल्या सर्व नातेवाईकांना तसेच मित्रांना सांगा कि राजीव गांधी योजना सरकारने चालू केलेली आहे हि योजना ज्य...\tRead more\nउन्हाळ्यातदेखील फ्रिजमध्ये थंड केलेले पाणी पिऊ नये. त्याने भूक अधिकच मंदावते. माठातील पाण्यात वाळाची जुडी टाकून; ते पाणी प्यावे. असे केल्याने शरीराला योग्य थंडावा मिळतो. वाळा हा थंड असूनही भ...\tRead more\nबजरंग बली हनुमान आणि आयुर्वेद\nपृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. हनुमानाला वायुपुत्र असे म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायु महाभूताचा प्रभाव हनुमानावर अधिक प्रमाणात आहे. इतका, की जन्म झाल्यावर तेज मह...\tRead more\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/sanjay-kokare.html", "date_download": "2018-04-23T11:50:37Z", "digest": "sha1:H6LJNIL5RKVQEYKVGKMIAWHJYBCBFWKO", "length": 22322, "nlines": 59, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : संजय धाकु कोकरे\nParty Name : ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया\nName : संजय धाकु कोकरे\nFather's Name : श्री धाकू धुळाजी कोकरे\nMother’s Name : सौ. सुनंदा धाकू कोकरे\nPlace of Birth: : मुंबई, महाराष्ट्र\nSpouse’s Name : सौ. सुप्रिया संजय कोकरे\nNo. of Children : ०३, दोन मुले आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्रजी\nProfession : सामाजिक व राजकीय कार्य, स्वेच्छा निवृत्ती (कॅटबरी कंपनी)\nOffice Address : के - ७ / १०, बर्वे नगर कॉलनी, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८४\nसन २००२ - मुंबई महानगरपालिका वार्ड नं. १२३ उमेदवारी लढवली.\nसन २००८ - लोकसभा ईशान्य मुंबई उमेदवारी लढवली.\nसन २०१० - ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया ची स्थापना केली.\nओबीसी विद्यार्थी परिषदेची स्थापना\n३० जून हा दिवस दरवर्षी ओबीसी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया का \nभारत देशाची १२१ कोटी लोकसंख्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार ओबीसी, एनटी समाजाची लोकसंख्या या देशात ७५ कोटी आहे. भटक्या-विमुक्तांसह ओबीसी समाजातील पुढारयांमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. उपरोक्त आमचे बोलणे खरेच आहे. सध्याची निराशाजनक स्थिती काही गेल्या पाच - दहा वर्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रात घसरगुंडी होण्याची प्रक्रिया स्वतंत्र मिळाल्यापासून चालू आहे. ओबीसी समाजातील सर्व क्षेत्रात हळुहळु होणारा र्हास कळणे शक्यच नव्हते. समाजातील बुद्धजीवी वर्गातील मंडळींना सुद्धा राजकारण व एकूण समाजात काय चालले आहे व ओबीसी समाज कोणत्या दिशेने चालला आहे याची जाणीव झाली नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे या बुद्धजीवी वर्गाला एकतर समाजात काय चालले आहे कळलेच नाहीं किंवा ज्यांना याची जाणीव झाली त्यांनी आपल्याला त्याचे काय असे म्हणून समाजातील या अनिष्ट घडामोडींकडे डोळेझाक केली. ओबीसी एनटी समाजात सध्याची निराशाजनक स्थिती आहे हे खरेच पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता हा खरा प्रश्न आहे. ओबीसी बांधवांना चिड व्यक्त करून मार्ग सापडणार नाही तर सद्य परिस्थिति निर्माण होण्यास कारण काय याचा प्रथम विचार करून त्यावर तोडगा शोधने आवश्यक आहे.\nआमच्या मते समाजात सध्याची परिस्थिती उद्दभवण्यास मुलभुत कारण ओबीसी एनटी समाजातील ८० टक्के जनतेचे अज्ञान, अंधश्रद्धा व अशिक्षितपणा होय. आमच्या देशातील धूर्त राजकारण्यांनी तसेच समाजातील बाहुबली संधिसाधु नेत्यांनी लोकशाही पद्धतीनेच आपल्या स्वार्थासाठी या अज्ञानी जनतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला व आज ही घेत आहेत. कधी कधी असे वाटते कि या राजकारण्यांनी ओबीसी जनतेला अज्ञानात ठेवण्याचे धोरण जाणून बुजून राबविले आहे कि काय कारण कोणत्याही राजकीय पक्षाने ओ.बी.सी. च्या शिक्षणास अग्रक्रम दिला नाही याचा परिणाम म्हणजेच स्वतंत्र मिळून ६ दशके उलटली तरी आमची ६० टक्के जनता निरक्षर आहे व ३० टक्के जनतेचे शिक्षण १० ते १२ वी पर्यंतच झालेले आहे. या ओबीसी जनतेला नुसती गोड-गोड आश्वासने देऊन किंवा त्यांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून आमच्यातील राज्यकर्ते निवडून येऊन गोंधळ घालण्यास सज्ज होतात. जर समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर मुलभुत उपाय म्हणून ओबीसी समाजात शिक्षणास अग्रक्रम दिलाच पाहिजे तसेच धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले पहिजे. एकदा का ओबीसी जनता शिक्षित झाली कि आपोआप चांगले काय कारण कोणत्याही राजकीय पक्षाने ओ.बी.सी. च्या शिक्षणास अग्रक्रम दिला नाही याचा परिणाम म्हणजेच स्वतंत्र मिळून ६ दशके उलटली तरी आमची ६० टक्के जनता निरक्षर आहे व ३० टक्के जनतेचे शिक्षण १० ते १२ वी पर्यंतच झालेले आहे. या ओबीसी जनतेला नुसती गोड-गोड आश्वासने देऊन किंवा त्यांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून आमच्यातील राज्यकर्ते निवडून येऊन गोंधळ घालण्यास सज्ज होतात. जर समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर मुलभुत उपाय म्हणून ओबीसी समाजात शिक्षणास अग्रक्रम दिलाच पाहिजे तसेच धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले पहिजे. एकदा का ओबीसी जनता शिक्षित झाली कि आपोआप चांगले काय वाईट काय संधी - साधू कोण व खोट बोला पण रेटून बोला असा बाहुबली राजकारणी कोण असा बाहुबली राजकारणी कोण याची समजाला जाणीव होईल. हे स्थित्यंतर काही दोन चार वर्षात होणार नाही परंतु त्या दिशेने आत्ताच पावले टाकून समाजाने शिक्षणाला सर्वक्षेष्ठ अग्रक्रम दिला आणि धार्मिक अंधश्रध्येच्या विरोधात जनजागृती केली तर पुढील दहा-वीस वर्षात बदल होऊन पुढील पिढ्यांचे जीवन स्वावलंबी व सुसह्य होईल. दुर्दैवाने शिक्षणाची अशीच हेलसांड सुरु राहिली तर कितीही आर्थिक सुधारणा झाल्या तरी भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज सध्या प्रमाणेच जगातील एक मागासलेला समाज म्हणून ओळखला जाईल.\nओबीसी समाज शौर्यशाली इमानी प्रमाणिक असून सुद्धा आपल्या मागण्यांवर आग्रह व संघर्ष का करीत नाही आम्हाला अभ्यासातून असे लक्षात आले कि ओबीसी पुढारयांमध्ये अनेक दोष आहेत हे अमान्य करून चालणार नाही. परंतु संपूर्ण ओबीसी समाजाच्या माथी त्याचे खापर फोड़ने योग्य नाही. ओबीसी समाजाच्या सध्या एका विलक्षण संक्रमण काळातून प्रवास सुरु आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आणि अनिश्चितता जाणवत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्येच्या मुळाशी स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा, अविवेक इत्यादी विकारांचा दुर्धर प्रादुर्भाव ओबीसी जनतेत झाल्यासारखा भासत आहे. ओबीसी स्थिर आहे कि गतीशील आहे आम्हाला अभ्यासातून असे लक्षात आले कि ओबीसी पुढारयांमध्ये अनेक दोष आहेत हे अमान्य करून चालणार नाही. परंतु संपूर्ण ओबीसी समाजाच्या माथी त्याचे खापर फोड़ने योग्य नाही. ओबीसी समाजाच्या सध्या एका विलक्षण संक्रमण काळातून प्रवास सुरु आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आणि अनिश्चितता जाणवत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्येच्या मुळाशी स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा, अविवेक इत्यादी विकारांचा दुर्धर प्रादुर्भाव ओबीसी जनतेत झाल्यासारखा भासत आहे. ओबीसी स्थिर आहे कि गतीशील आहे प्रवाही कि साचलेल्या पाण्याप्रमाणे आहे प्रवाही कि साचलेल्या पाण्याप्रमाणे आहे परिवर्तनशील आहे कि जुन्या अंधश्रध्येला चिटकुन आहे परिवर्तनशील आहे कि जुन्या अंधश्रध्येला चिटकुन आहे या प्रश्नांचा विचार ओबीसी जनतेने करायला पाहिजे. आमच्या मते कार्लमार्क्स काय म्हणतो ते विचार करण्यासारखे आहे. कार्लमार्क्सचे मत असे कि, निष्क्रियतेमुळेच एखादा प्राचीन समाज सडत आहे आणि रसातळात जात आहे. ओबीसी समाजाची सध्या पीछेहाट चालू आहे असे चित्र दिसत आहे. कारण नव्या अनुभवांना थेट भिडण्याची कुवत असलेले आणि चाकोरी तोडून ओबीसी समाजावर होणारया अन्यायाचा मुकाबला करण्याची क्षमता असलेले युवक फारसे आढळत नाहीत तसेच परंपरेचा मागोवा घेत परिवर्तनाचा ध्यास घेणारे कोणी दिसत नाही.\nभटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाला गुलमगिरीच्या दास्यातून सुटण्यासाठी व ओबीसी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व पिवळ्या झेंडयाखाली कायमस्वरुपी टिकविण्यासाठी आमच्या मते एकच मार्ग आहे तो म्हणजे या देशात ओबीसी समाज बांधवांचा एक राजकीय पक्ष स्थापन करणे हा होय. म्हणूनच आम्ही भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा पिवळ्या झेंडयाखाली पहिलाच राजकीय पक्ष \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" या नावाने पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा प्रसार करताना आम्ही घोषणा करतो कि, भारतमाता ही आमची आई आहे. आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे व भारतीय राज्यघटनेचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. ओबीसी समाजाचे पिवळ्या झेंडयाखाली स्वतंत्र अस्तित्व जपणे व जगाला दाखविणे हीच आमच्या पक्षाची मुख्य धारा आहे. भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजातील सर्व जाती - पोटजाती मिळून एक ओबीसी समाज निर्माण झाला आहे. जसे गंगा या पवित्र नदीला अनेक नद्या येऊन मिळतात पण पुढे वाहते ती फक्त एक गंगाच तसेच ओबीसी एनटी समाजाच्या सर्व जाती, पोट जातींच्या प्रवाहांना सामावून घेऊन त्यांना आपलेसे बनुन राहिली आहे ती आमची ओबीसी सस्कृति व तोच ओबीसी समाज.\nओबीसी एनटी समाजाचा पिवळा झेंडा जरी आज आम्ही आमच्या खांद्यावर घेतला असला तरी \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" त्याची कधीच मक्तेदारी सांगणार नहीं कारण या देशात जो जो ओबीसी त्याचा या पिवळ्या झेंडयावर अधिकार आहे. तोच त्याचा मानबिंदु आहे, त्याचा त्राता आहे, त्याचा आधार आहे, तोच त्याचा भविष्यातील प्रकाश आहे. म्हणूनच या देशातील सारया ओबीसी समाज बांधवांनी अनेक वर्षाच्या अंधारातून बाहेर पडून या पिवळ्या झेंडयाच्या प्रकाशात यावे. ओबीसी समाजाचे अधिष्ठान असलेला पिवळा झेंडा जोपर्यंत नभोमंडळात चंद्र, सूर्य व तारे ग्रह आहेत तो पर्यंत जगाच्या पाठीवर मजबूतीने फडकत राहिल कारण हा पिवळा झेंडा म्हणजे शोभेची वस्तु नसून आमच्या ओबीसी पूर्वजांना आम्हाला दिलेला शक्तिशाली शुभआशिर्वाद आहे. पिवळा झेंडा म्हणजे आमच्या शौर्याचे व त्यागाचे प्रतिक आहे. सत्तेच्या मागे लागलेल्या आमच्या स्वयंघोषित नेत्यांना हा झेंडा पेलवला नाही. म्हणून आही हा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला आहे. त्याग व पराक्रमाचे प्रतिक असलेल्या या पिवळ्या झेंडयाला थांबायला वेळ नाही तो आता एका जागी थांबणार नाही. \"ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया\" चे सैनिक पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिणे पर्यंत जाणार. ओबीसी समाजाचे प्रतिक असलेला हा झेंडा लाल किल्यावर मानाने फडकवल्या शिवाय राहणार नाही. हया झेंडयाखाली महात्मा तात्याराव ज्योतिबा फुले यांचे अपुरे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार यात तीळमात्र शंका नाही. \"जय ओबीसी\" हे घोषवाक्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील तमाम ओबीसी समाजाचा चैतन्य मंत्र बनला आहे.\nसध्या कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र ओबीसी समाज खडबडून जागा आहे. या देशाच्या एकतेच्या अखंडतेच्या आणि ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी हा समाज एकवटत आहे. देशातील विस्कळीत झालेला हा उदासीन ओबीसी समाज छत्र शोधीत होता. ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया या पक्षाने हे छत्र दिले आहे. म्हणून कोट्यवधी ओबीसी समाज आज एनटी पार्टीच्या पिवळ्या झेंडयाखाली एकवटत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असला तरी या प्रक्रियेला सर्वांच्या प्रयत्नाने गती प्राप्त झाली आहे. भविष्यकाळात लवकरच जगाच्या नकाशात आणि इतिहासात ओबीसी समाजाचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले जाईल यात शंका नाही. या भारतभुमीतील भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाने एकवटावे ही नियतीचीच इच्छा आहे. ही ऐतिहासिक प्रक्रिया आमच्या हातून घडावी ही श्रींची इच्छा.\nभूतकाळ परत येत नाही, पण येणारा भविष्यकाळ मात्र आपला आहे. तो जिंकायचा कि हरायचा हे मात्र आपल्या हाती आहे. तेव्हा आपली पूर्ण शक्ती उपयोगात आणण्यासाठी आपण सगळे एक होउ या कल्पक आणि संघटीत प्रयत्नांची जोड देत वेळ पडल्यास संघर्ष करून आपले उद्दिष्ट सध्य करुया. भूतकाळातील मर्यादांच्यावर उठून आपल्यातील अंतर्भूत शक्तीचा उपयोग करून अवघ्या देशास व समजास जागृत करून बलशाली करुया.\nओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक व अध्यक्ष संजय कोकरे यांची पत्रकार परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sabirlaw.com/wp/?lang=mr", "date_download": "2018-04-23T11:30:19Z", "digest": "sha1:D6UM4BHPEUSCCI4LT6WUWG44AZSFDK6T", "length": 2179, "nlines": 24, "source_domain": "sabirlaw.com", "title": "SABIR कायद्याच्या हा समुह |", "raw_content": "आमच्याशी संपर्क साधा: फॅ कार्यालय: (610)713-9000\nEjaz अ. Sabir, शब्दांचा संक्षेप.\nमोहम्मद मी. Shariff, शब्दांचा संक्षेप.\nआमच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा .....\nआमच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा\nसहभागी व्हा आणि कनेक्ट रहा\nआम्ही आपल्या भाषा बोलतात: उर्दू, पंजाबी, हिंदी, अरबांचे, बंगाली & Hindko\nSABIR कायद्याच्या गटाच्या कायद्याच्या कार्यालये, पीसी वेब साइट माहितीच्या हेतूने आणि कायदेशीर सल्ला आहे. अभ्यागत वकील सह सल्ल्याशिवाय कृती नये. आपण आम्हाला कोणतेही साहित्य पाठवा असल्यास तो एक मुखत्यार-ग्राहक संबंध तयार नाही.\nकॉपीराइट 2012 SABIR कायद्याच्या हा समुह, पीसी / सर्व अधिकार राखीव / थीम सानुकूल ESOFOLAWE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-04-23T11:52:41Z", "digest": "sha1:VUIDTYJQAZOK5EBGNWKITVBMKC2CDK44", "length": 6402, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जैविक वर्गीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजगात असलेल्या सर्व जीवांचे एका विशिष्ट प्रकारे वर्गीकरण केले जाते. यालाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात.\nप्रजाति किंवा वंश (Genus)\nसंघ (Phylum)(फक्त प्राणिसृष्टीत); विभाग (Division)(वनस्पतिसृष्टीत)\nजीवचौकटीतील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी भाषांतर[संपादन]\n(Genus) = प्रजाति किंवा वंश\n(Botanical Name) = वनस्पतिशास्त्रीय नाव; लॅटिन नाव\nवनस्पती लेखातील जैविक वर्गीकरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१५ रोजी ००:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=405&Itemid=596", "date_download": "2018-04-23T11:50:40Z", "digest": "sha1:QCHJF5WIYMP7NZI2DON73UIT4P2YYKTO", "length": 3261, "nlines": 30, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रवेश सहावा", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n(बालवीर - शिक्षक )\nबालवीर शिक्षक - सर्व बालवीर म्हणजे केवळ पोषाखी पोपट अशी टीका सर्वत्र ऐकू येते. तिच्यांत तथ्यहि आहे. कुणी हडेलहप्पी सरकारी अधिकारी यावा व त्याला यांनी ललकारी द्यावी, एवढंच जणूं यांचे काम पण मी हें सारं पालटणार आहें. बालवीर हा समाजाची सेवा करणारा वीर आहे. सेवाधर्माची, जनतेचें हित करण्याची त्यांना गोडी लागली पाहिजे. त्या दिवशी त्या खेडयांत जाऊन विहिरीभोंवती स्वच्छता वगैरे आम्हीं केली; तेव्हां गांवक-यांना आमच्याबद्दल कितीतरी कौतुक वाटलं पण मी हें सारं पालटणार आहें. बालवीर हा समाजाची सेवा करणारा वीर आहे. सेवाधर्माची, जनतेचें हित करण्याची त्यांना गोडी लागली पाहिजे. त्या दिवशी त्या खेडयांत जाऊन विहिरीभोंवती स्वच्छता वगैरे आम्हीं केली; तेव्हां गांवक-यांना आमच्याबद्दल कितीतरी कौतुक वाटलं हल्लींच्या कॉल-याच्या दिवसांत नदीचे पाण पिण्यास नेऊं नये, म्हणून बालवीर तिथं निरोधन करतात; तेहि किती छान आहे हल्लींच्या कॉल-याच्या दिवसांत नदीचे पाण पिण्यास नेऊं नये, म्हणून बालवीर तिथं निरोधन करतात; तेहि किती छान आहे जाऊन पाहूं या तिकडे. पण एक अडचण आहे जाऊन पाहूं या तिकडे. पण एक अडचण आहे महारामांगांना निराळी विहीर नाहीं. नदीच पाण आम्ही त्यांना नेऊं देत नाही; काय करणार महारामांगांना निराळी विहीर नाहीं. नदीच पाण आम्ही त्यांना नेऊं देत नाही; काय करणार त्यांच्या भांडयांत हें औषण टाकून दिलं पाहिजे दोन दोन थेंब. तो नारायण, माहरांत जाऊन त्यांची सेवा करतो तशीच सा-यांनीं केली पाहिजे त्यांच्या भांडयांत हें औषण टाकून दिलं पाहिजे दोन दोन थेंब. तो नारायण, माहरांत जाऊन त्यांची सेवा करतो तशीच सा-यांनीं केली पाहिजे \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/recipes/kadboli-type-2/", "date_download": "2018-04-23T11:37:19Z", "digest": "sha1:DFATR3UCBX4H742IUKBF3VPLG6Y4CXO5", "length": 6346, "nlines": 117, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कडबोळी प्रकार २ | Kadboli Type 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » जीवनशैली » पाककला » कडबोळी प्रकार २\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८\nकडबोळी प्रकार २ - [Kadboli Type 2] बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.\n२५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ\nवरील धान्ये वेगवेगळी भाजावी. नंतर गिरणीतून जरा जाडसर दळून आणावी.\nआपल्याला जेवधे पीठ हवे असेल तेवढे घ्या.\nत्यात तिखट, मीठ, थोडे तीळ व कडकडीत तेलाचे मोहन घाला व गरम पाण्याने पीठ भिजवा. नंतर मळून घ्या.\nबरीचशी कडबोळी वळून घ्या. नंतर मंदाग्निवर तळा.\nविस्तव प्रखर असेल तर बाहेरून कडबोळी लाल होतात.\nपण आत कच्ची रहातात. म्हणून तळताना नीट तळावी.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/582/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%87,%20%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:06:12Z", "digest": "sha1:M4TIGRNB7DJMUAZOUCG3DSTZMZGFNJ3R", "length": 10575, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nएका मुलीला आत्महत्या करावी लागते, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका - अजित पवार\nराज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पेटून उठायला हवं, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचीच प्रेरणा घेऊन ही संघर्षयात्रा सुरू झाली आहे, आता हा संघर्ष थांबणार नाही, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.\nसंघर्ष यात्रेच्या द्वितीय सत्रातील पहिल्याच जाहीर सभेत बोलताना पवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. या सरकारमधील लोकांचे काय सुरू आहे तेच कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणी ढोल बडवतं का पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो का पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो का सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे, त्यांच्या डोळ्यात सत्तेची धुंदी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.\nपुढे बोलताना पवार म्हणाले की, आतापर्यंत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याप्रसंगी राज्यसरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी चालेल, पण शेतकरी मोडला नाही पाहिजे. आमचे सरकार असताना आम्ही कर्जमाफी करू शकलो तर हे सरकार का नाही लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवणार नाही, वडिलांवर लग्नाच्या कर्जाचा बोजा पडू नये म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केली. या राज्यात एका मुलीला आत्महत्या करावी लागते, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. अशा घटना ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या़च्या हृद्याला पाझर फुटत नाही का लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवणार नाही, वडिलांवर लग्नाच्या कर्जाचा बोजा पडू नये म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केली. या राज्यात एका मुलीला आत्महत्या करावी लागते, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. अशा घटना ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या़च्या हृद्याला पाझर फुटत नाही का त्या मुलीचा विचार करून तरी राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच कर्जमाफी देणे जमत नसेल तर यांनी सत्तेतून पाय उतार व्हावं, आम्ही कर्जमाफी करून दाखवतो, असे आव्हानही त्यांनी दिले.\nहे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे, यांना शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत. शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम सध्या राज्यात सुरू असल्याची टीका माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केली.\nयावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार अबू अझमी, अब्दुल सत्तार, बुलडाणा नगराध्यक्ष नाझीर काजी उपस्थित होते.\nसरकारला धडा शिकवण्यासाठी संघर्षयात्रेत आम्हाला साथ द्या – जितेंद्र आव्हाड ...\nअधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवला तर आम्हाला निलंबित करून सभागृहाबाहेर काढण्यात आले, आज आम्ही जनतेच्या दारात आलो आहोत, इथून आम्हाला सरकार काढू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते मंगळूर आणि सेलू बाजार येथे शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नितेश राणे, अबू आझमी आणि विरोधी पक्षाचे अन्य सदस्य उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दु ...\nसंघर्षयात्रेच्या इंदापूर येथील सभेस प्रचंड प्रतिसाद ...\nप्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संघर्षयात्रेची इंदापूर येथील सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत आता शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून त्यासाठी हा संघर्ष आता सुरू झाला आहे. आता आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, पण या सरकारची निष्क्रियता लोकांपुढे आलीच पाहिजे. एकतर कर्जमाफी मिळाली पाहिजे नाहीतर हे सरकार जळून खाक झालं पाहिजे, असा संघर्षाचा नारा दिला. यावेळी राष्ट ...\nसंघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून ...\nशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांसाठीचा हा संघर्ष पुढेही सुरूच राहणार आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ एप्रिलपासून सुरु होत असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून बुलडाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि ठाणे अशा पाच जिल्ह्यात संघर्षयात्रा पोहोचेल. १८ तारखेला संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता शहापूर येथील जाहीर सभेने होईल. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/179200-dofollow", "date_download": "2018-04-23T11:39:03Z", "digest": "sha1:KBDVK7GPTLPASHQULB52D4MFSQUFVJZX", "length": 7571, "nlines": 24, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "DoFollow बॅलिकलिंक कसे विनामूल्य करावे ते आपल्याला माहिती आहे?", "raw_content": "\nDoFollow बॅलिकलिंक कसे विनामूल्य करावे ते आपल्याला माहिती आहे\nस्केलवर DoFollow बॅकलिंक्स कसे मिळवायचे हे समजून घेणे बरेच सोपे आहे. उच्च जनसंपर्क असलेल्या गुणवत्तेची गुणवत्ता निर्माण करण्याच्या बाबतीत हे सर्व सोपे नाही. आम्ही सुरुवात करण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की\nआपले दुवा इमारत मोहिम साधारणपणे चालवा, आशेने धावू नका सर्व रात्री फक्त एका रात्रीत.\nआपल्या होमपेज किंवा लँडिंग पृष्ठास दर्शविणार्या बर्याच बॅकलिंक्स तयार करण्यासह कधीही जास्तीत जास्त वापर करू नका, आपल्या साइटवरील पृष्ठ सामग्रीमध्ये प्रथिनेबद्धरित्या अंतर्गामी संदर्भ अधिक असू शकतात.\nआपल्या वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर दुसरे बॅकलिंक मिळवण्याआधी कोणत्याही क्षणी आपण कोणत्याही समायोजित किंवा नाकारणे सक्षम असल्याचे सुनिश्चित करा.\nयेथे उच्च पॅनरेंकसह DoFollow बॅकलिंक्स कसे मिळवायचे ते येथे आहे - make my own logo.काय चालले आहे हे शोधण्यासाठी खालील सोप्या योजना वापरून पहा:\nMicrosoft उत्तर वेबसाइटवरील DoFollow सह उच्च पीआर बॅकलिंक्स मिळवा. काही दर्जेदार बॅकलिंक्स पकडणे आश्चर्यकारकपणे चांगले आहे - फक्त आपल्याला एका विशिष्ट बाबसाठी योग्य पर्याय मांडणे आवश्यक आहे. या प्रकारे, आपण केवळ आपल्या मुख्य वेबसाइट किंवा ब्लॉगवर अधिक रहदारी चालवू शकत नाही परंतु आपल्या कौशल्याचा दाखला द्या आणि म्हणूनच आपल्या अधिकाराला दीर्घ कालावधीमध्ये सुधारू शकता. सर्व काही अगदी सोपे आहे - तिथे बर्याचदा समस्या सोडविल्या गेल्या आहेत. म्हणून, एकदा आपले उत्तर पोस्ट तयार होईल आणि थेट होईल, आपण त्याप्रकारे सबमिट केलेल्या पात्र बॅकलिंक प्राप्त करण्यास मुक्त आहात.\nपुढे, Google Plus वर आपले वैयक्तिक खाते वापरुन DoFollow बॅकलिंक्स कसे मिळवायचे ते पाहू. हे सामाजिक व्यासपीठ आपल्या प्रोफाइलचा वापर करण्याशी संबंधित एक शक्तिशाली स्रोत आहे. आपल्याला फक्त साइन अप करण्यासाठी किंवा आपले आधीपासून अस्तित्वात असलेले एखादे वापरणे आवश्यक आहे. नंतर, \"विषयी\" विभागात जा आणि आपल्या मुख्य वेबसाइट किंवा ब्लॉगकडे निर्देशित करणारा बॅकलिंक सह एम्बेड केलेले सर्व आवश्यक माहिती भरा. लक्षात घ्या, तेथे लिंक जोडण्यासाठी कोणतेही प्रतिबंध नाहीत. परंतु आपण अधिक चांगले करू नका - त्यांना वेडे वाटणे - आपण सर्वकाही स्पॅमसारखे दिसले पाहिजे असे काहीही नाही.\nसमृद्ध लेख निर्देशिका आणि वेब सूच्या. आपल्या काही पोस्ट, लेख किंवा वापरकर्त्यास वास्तविक मूल्य वितरित करणार्या अन्य कोणत्याही गुणवत्ता डेटा सबमिट करण्याचा प्रयत्न करा. टीप, तथापि, मी वैयक्तिकरित्या पुरेशी पुरेशी पेजरेंक स्कोअर असलेल्यांना सबमिट करण्यास शिफारस करतो, किमान स्तरीय 4 पासून सुरू होणारे.\nआपण आपली वेबसाइट किंवा ब्लॉग आपल्या सर्वोत्तम पोस्टपैकी काही सबमिट करून, योग्य विभागात टिप्पणी देऊन येथे देखील रॉक करू शकता.येथे DoFollow बॅकलिंक्स सहजपणे कसे मिळवायचे आहे - फक्त काही योग्य चांगल्या DoFollow फोरम्ससाठी शोध घ्या - आणि आपण पूर्ण केले. लिंक सबमिट करण्यासाठी इतर चांगल्या ठिकाणी हे देखील आपण खालील साइटवर रॉक करू शकताः डीमोझ. कॉम; निषिद्ध. कॉम; इनबाउंड. org; इन्फोबार्रेल. कॉम. आपल्याला कुठे प्रारंभ करायचा हे माहित नसल्यास - त्यांच्यापैकी एक वापरून पहा आणि काय बरोबर आहे हे ठरविण्यासाठी अजिबात संकोच करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/6819840", "date_download": "2018-04-23T11:47:01Z", "digest": "sha1:UHYKGJLTM6UIOUXXAAK2BPTJTIBHFK7L", "length": 9440, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "चिंता वास्तविकपणे आपली मेमरी सुधारते, नवीन अभ्यास सेमील्ट", "raw_content": "\nचिंता वास्तविकपणे आपली मेमरी सुधारते, नवीन अभ्यास सेमील्ट\nसाप्ताहिकरित्या बोलणे, चिंता अगदी भयानक वाटते. परंतु जर सतत चिंता करण्याच्या प्रवृत्तीचा पूर्णपणे नकारात्मक लक्षण होता, तर आईचा निसर्ग पूर्वी तो दूर केला असता. एक worrywart असल्याने स्पष्टपणे त्याचे अपवाद असणे आवश्यक आहे, आणि विज्ञान त्यांना शोधण्यास सुरू आहे.\nमागील अभ्यासात थोड्या चिंता दिसून आल्या आहेत की आपण धोका टाळण्यात आणि पीक प्रेरणा मिळविण्यास मदत करतो, आता कॅनडाच्या वॉटरलू विद्यापीठातून नवीन संशोधन झाले जे नुकतेच प्रकाशित झाले मेंदू विज्ञान वाढत्या चिंता फायदे: सुधारीत मेमरी\nआपण आपल्या मेमरीवर अधिक जोर देऊ शकता\nस्मृतीवरील सामान्य चिंतांच्या परिणामांची चाचणी करण्यासाठी, अभ्यासाच्या मागे असलेल्या शोध पथाने 80 अंडरग्रेड स्वयंसेवकांना एकत्रित केले आणि चिंता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रवृत्ती निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचा प्रश्नावली वापरली. परिणामांवर आधारित, विद्यार्थी \"कमी चिंता\" आणि \"उच्च चिंता\" गटांमध्ये विभक्त झाले. (कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय घबराटीचे कार्य करणारे स्वयंसेवकांना अभ्यासातून वगळण्यात आले होते - cheap ssd vps.)\nनंतर, दोन्ही गट संगणकावरील शब्दांच्या कोडी सोडवून दाखवले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर एका नकारात्मक छायाचित्रणाची तटस्थता होती, जसे की कार क्रॅशची चित्र. त्या चिंता-उत्पादक मूर्ती कशा प्रकारे शब्दांच्या कोडी सोडल्या जातात\nनैसर्गिक चिंतेत (उच्च चिंता गट) चिंताजनक चित्रे तोंड होते तेव्हा, ते प्रत्यक्षात संबंधित शब्द कोडी सोडत चांगले लक्षात कारण \"तणावाची एक छोटी डोस\" आपल्याला जागरुकता वाढवून देणारी भावना देते आणि आपण तपशील नसल्यास आपण अन्यथा नसल्यास \"अभ्यास सह-लेखक मायरा फर्नांडिस म्हणतात. \"आपण नंतर काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्यास हे चांगले आहे\"\nताणतणाव करण्याची आपली प्रवृत्ती, दुसऱ्या शब्दांत, कदाचित खूप छान वाटत नसेल, परंतु प्रत्यक्षात आपण लक्ष देणे आणि महत्वाच्या नवीन माहितीस अधिक चांगले स्मरण ठेवण्यात मदत करत आहे.\nउत्सुकता लक्षात ठेवण्याची खाली बाजू\nअर्थात, या संशोधनाचा अर्थ असा नाही की अत्याधुनिक अतिदुखीपणा निरोगी आहे. गंभीर चिंता आपल्या स्मृती मदत नाही आणि उपचार पाहिजे, साजरा नाही. किंवा याचा अर्थ असा नाही की नैसर्गिकरित्या तणावग्रस्त व्यक्तिमत्त्वाचे असणार्या व्यक्तींना काळजीबद्दल त्यांच्या प्रवृत्तीच्या नकारात्मक साइड इफेक्ट्सची काळजी घ्यावी लागणार नाही.\nचिंताग्रस्त व्यक्तींना तथ्य आणि तपशील चांगले लक्षात येतात, परंतु ते देखील परिस्थितीचे भावनिक अभिव्यक्ती अधिक वारंवार चुकीचे मानतात. ते काय झाले ते लक्षात ठेवा, परंतु ते संपूर्ण गोष्ट जितके नकारात्मक होते तितकेच ते समजावून सांगतात. या अभ्यासाच्या संदर्भात फक्त चिंताग्रस्त विषयांवर ताणलेल्या प्रतिमांशी असणारी तटस्थ शब्द संकल्पनांबद्दल अधिक अतार्किक नकारात्मक विचार करणे भाग पडले होते परंतु वास्तविक जीवनात या परिणामामुळे वास्तविक समस्या निर्माण होऊ शकते.\n\"सांगा की आपल्यास सर्वात वाईट दिवस येत आहेत - आपण आपल्या अलार्मने झोपलेले, आपण घसरला आणि गाळणीत पडले - आणि नंतर स्टारबक्स येथील बरिस्टा आपल्याला एक पूर्णपणे तटस्थ प्रश्न विचारतो, जसे की आपल्याला आपल्यावर व्हीप्ड क्रीम हवे असेल तर मोचा, \"अभ्यास सह-लेखक क्रिस्तोफर ली यांनी वेळ एक उदाहरण म्हणून प्रस्तुत केले. \"कारण आपण अशा परिस्थितीत अशा नकारात्मक विचारसरणीत प्रवेश केला म्हणून आपण त्याला लक्षात ठेवू की काही कारणामुळे तो कठोर किंवा शत्रुत्वपूर्ण किंवा भयानक आहे.\"\nचांगली बातमी ही आहे की, जर आपण निराशा या पूर्वग्रहणाबद्दल जागरुक आहात, तर आपण त्यास दुरुस्त करू शकता, गैरसोयीशिवाय आपल्या चिंता-आकारलेल्या स्मृतीचा लाभ मिळवू शकता. हे आपल्यापैकी काही जणांना काही सांत्वन देऊ शकेल जे आपल्या आयुष्यांतून बाहेर पडतात आणि सतत डोक्यात खेळत असलेल्या चिंतेच्या चिंतीत असतात.\nइंक. कॉमिकलिस्टरने येथे व्यक्त केलेली मतं ही त्यांची स्वतःची आहेत, इन्क.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:53:50Z", "digest": "sha1:KGL4HPN5FQKMDFMUGO5EQPY7WM3DI7FH", "length": 3761, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुंबक चिकित्सा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचुंबक चिकित्सा शक्तिशाली चुंबक शरीराच्या आजूबाजूला ठेवून करावयाची उपचारपद्धती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०१३ रोजी ०८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/507/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%20-%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T11:10:45Z", "digest": "sha1:IYBZKPEDZAXRXRSLJWFCAFSX4O243D2V", "length": 7326, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे\nयंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केलेल्या नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'मेक इन इंडिया', 'मेक इन महाराष्ट्र' या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.\nपाटोदा ग्रामस्थांच्या जिद्दीला सलाम - खा. सुप्रिया सुळे ...\nपाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढल ...\nकाँग्रेसला सोडचिठ्ठी देत मधुकर नवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश ...\nराज्यात धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचे बळ वाढत चालले आहे. या धर्मांध शक्तींविरोधात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढा देऊ शकते, अशी भावना व्यक्त करत अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी आपल्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी मंत्री मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड उपस्थित होते.मधुकर नवले यांनी तळागाळात खूप काम केले आहे. राष्ट्रव ...\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा केवळ टाईमपास - आ. राजेश टोपे ...\nमराठा आरक्षणासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या सरकारला दोन वर्षे लागतात, आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या भावनांशी खेळत सरकार फक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान केला.यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु केवळ प्रतिज्ञापत् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/lal-bhopalyache-kabab/", "date_download": "2018-04-23T11:26:37Z", "digest": "sha1:ADJOYTHJ7VBZLWSQ2J3Q6G54524KIP62", "length": 6392, "nlines": 159, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लाल भोपळ्याचे कबाब | Lal Bhopalyache Kabab", "raw_content": "\n५०० ग्रॅम लाल भोपळा\n१ वाटी डाळीचे पीठ\n१ चमचा गरम मसाला\n१ चमचा धणे जिरेपूड\n१ लहान आल्याचा तुकडा वाटून\nभोपळ्याची साले काढून अगदी बारीक चिरुन घ्यावा. नंतर ह्या चिरलेल्या फोडी लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवाव्यात.\nनंतर त्याच पाण्यात भोपळा शिजवून घ्यावा.\nफोडी शिजल्या पाहिजेत, पण पाणी अजिबात राहता कामा नये.\nगार झाल्यावर सर्व मिश्रण पुरणयंत्रातून काढावे.\nनंतर त्याचे पेढ्याएवढे गोळे करुन हाताने जरा चपटे करावेत व तळावेत.\nटोमॅटो सॉससोबत खाण्यास द्यावे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in भाज्या and tagged अंडी, कबाब, डाळीचे पीठ, पाककला, भाज्या, लाल भोपळा on नोव्हेंबर 22, 2012 by संपादक.\n← २२ नोव्हेंबर दिनविशेष शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-loosses-3387-crore-due-unsuccessful-government-procurement-scheme", "date_download": "2018-04-23T11:38:16Z", "digest": "sha1:T3LRIDBBDDVR6RTZA5F6KHXHVGB6DXK5", "length": 26137, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers loosses 3387 crore due to unsuccessful government procurement scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांना ३३५८ कोटींचा फटका\nसरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांना ३३५८ कोटींचा फटका\nमंगळवार, 20 मार्च 2018\nपुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा खेळखंडोबा झाल्यामुळे राज्यातील\nशेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात (२०१७-१८) सुमारे ३३५८ कोटी रुपयांचे नगदी नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किमती देऊ आणि त्या किमती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळतील, याची तजवीज करू, याचा पुनरुच्चार नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात सोयाबीन, उडीद, तूर आणि हरभरा आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावे लागल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.\nपुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा खेळखंडोबा झाल्यामुळे राज्यातील\nशेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात (२०१७-१८) सुमारे ३३५८ कोटी रुपयांचे नगदी नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किमती देऊ आणि त्या किमती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळतील, याची तजवीज करू, याचा पुनरुच्चार नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात सोयाबीन, उडीद, तूर आणि हरभरा आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावे लागल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.\nयंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आले. सोयाबीनची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३०५० रुपये आहे. हंगाम सुरू होताना म्हणजे नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचे दर २७०० रुपयांवर गेले होते; परंतु नंतरच्या टप्प्यात सोयाबीन ३९०० रुपयांपर्यंत वाढला. पण नंतर सोयापेंड निर्यात घटल्याने दर कमी होऊन ३७०० ते ३८०० रुपयांवर स्थिरावले. राज्यात यंदा ३८.८६ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यापैकी केवळ १ लाख टन म्हणजे फक्त अडीच टक्के सोयाबीनची खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. प्रत्यक्षात केवळ २६ हजार टन सोयाबीन खरेदी करण्यात सरकारला यश आले. बाजारातील चढ-उतार आणि सरकारचे धरसोडीचे धोरण यामुळे सुमारे ३० ते ४० टक्के माल शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावा लागला, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. प्रतिक्विंटल ५०० रुपये इतके कमीत कमी नुकसान धरले, तरी राज्यातील सोयाबीन उत्पादकांना एकूण सुमारे ७६९ कोटी रुपयांचा फटका बसला.\nराज्यात यंदा १.७७ लाख टन उडदाचे उत्पादन झाले, त्यापैकी सरकारने केवळ ५८ हजार ६६३ टन उडीद खरेदी केला. उडदाची आधारभूत किंमत ५४०० रुपये प्रतिक्विंटल असताना सुमारे १.१८ लाख टन उडीद सरासरी ३६०० ते ३८०० रुपयांनी विकावा लागला. त्यापोटी शेतकऱ्यांचे एकूण सुमारे १८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले.\nकृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा राज्यात १२.३ लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा १९.६ टक्के घटला. तसेच, उत्पादनात सुमारे ४३ टक्के घट होऊन ते ११.५ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उत्पादनात घट होऊनही दर मंदीत आहेत. तुरीला हमीभाव प्रतिक्विंटल ५४५० रुपये असताना बाजारात ४१०० ते ४३०० रुपये दर मिळत आहे. राज्य सरकारने यंदा ४.४६ लाख टन तूर हमीभावाने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा अर्थ राज्यातील अपेक्षित तूर उत्पादनापैकी केवळ ३८.७ टक्के तुरीची खरेदी सरकार करणार आहे. उर्वरित ६१.२ टक्के तूर हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी ११५० ते १३५० रुपयांचा तोटा होणार आहे. म्हणजे तूर उत्पादकांना एकूण सरासरी ९५० कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.\nहरभरा उत्पादकांनाही यंदा मंदीचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४४०० रुपये हमीभाव जाहीर केला. परंतु, सध्या बाजारात सरासरी ३५०० ते ३६०० रुपये दर मिळत आहे. राज्यात सुमारे १९ लाख टन हरभरा उत्पादन होण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी तीन लाख टन म्हणजे केवळ १५.७ टक्के मालाची खरेदी सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे उर्वरित ८४.३ टक्के हरभरा शेतकऱ्यांना नुकसानात विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण सरासरी १४४० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. थोडक्यात, तूर आणि हरभरा उत्पादकांना एकूण २३९०.४० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.\nथोडक्यात सोयाबीन, उडीद, तूर आणि हरभरा या प्रमुख चार शेतमालांची आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात विक्री करण्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण सुमारे ३३५८ कोटी रुपयांची फोडणी बसणार आहे. अर्थात, सरकार तूर आणि हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करेल, हे गृहीत धरून हे गणित केले आहे. पण, सरकारी खरेदीची कासवगती पाहता हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही, तर नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या सरकारची प्रत्यक्षातली करणी मात्र आहे ते उत्पन्नही मिळू देण्यात आडकाठी आणण्याची आहे, हेच यावरून स्पष्ट होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कडधान्य आणि तेलबिया उत्पादन वाढवून देशाला स्वयंपूर्ण करावे, आयातीवरचे अवलंबित्व कमी करावे यासाठी प्रयत्‍न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करत असतात.\nराज्यातील अपेक्षित उत्पादन - ३८.८६ लाख टन.\nएक लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची सरकारची घोषणा.\nप्रत्यक्षातील खरेदी - २६ हजार २२६ टन.\nराज्यातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ३० ते ४० टक्के सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री.\nप्रतिक्विंटल ५०० रुपयांचे किमान नुकसान.\nसोयाबीन उत्पादकांचे एकूण नुकसान - ७६९ कोटी रुपये\nराज्यातील अपेक्षित उत्पादन - १.७७ लाख टन\nसरकारी खरेदी - ५८ हजार ६६३ टन\nआधारभूत किंमत ५४०० रुपये प्रतिक्विंटल\nसुमारे १.१८ लाख टन उडीद सरासरी ३६०० ते ३८०० रुपयांनी विकावे लागले.\nउडीद उत्पादकांचे एकूण नुकसान - सुमारे १८९ कोटी रुपये\nराज्यातील अपेक्षित उत्पादन - ११.५ लाख टन.\nआधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५४५० रुपये.\nबाजारातील सरासरी दर ४१०० ते ४३०० रुपये.\nसरकारी खरेदीचे उद्दिष्ट - ४.४६ लाख टन\nराज्यातील अपेक्षित तूर उत्पादनापैकी केवळ ३८.७ टक्के तूर सरकार खरेदी करणार.\nउर्वरित ६१.२ टक्के तूर आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावी लागणार.\nप्रतिक्विंटल सरासरी ११५० ते १३५० रुपयांचा तोटा.\nतूर उत्पादकांचे एकूण नुकसान - सुमारे ९५० कोटी ४० लाख रुपये\nराज्यातील अपेक्षित उत्पादन - १८.८ लाख टन\nआधारभूत किंमत - प्रतिक्विंटल ४४०० रुपये\nबाजारातील सरासरी दर - ३५०० ते ३६०० रुपये\nसरकारी खरेदीचे उद्दिष्ट - ३ लाख टन\nराज्यातील अपेक्षित तूर उत्पादनापैकी केवळ १५.७ टक्के हरभरा सरकार खरेदी करणार.\nउर्वरित ८४.३२ टक्के हरभरा आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावा लागणार.\nप्रतिक्विंटल सरासरी ८०० ते ९०० रुपयांचा तोटा.\nहरभरा उत्पादकांचे एकूण नुकसान - सुमारे १४४० कोटी रुपये\nकडधान्य उत्पादकांचे एकूण नुकसान - २५७९ कोटी रुपये\nतेलबिया (सोयाबीन) उत्पादकांचे एकूण नुकसान - ७६९ कोटी रुपये\nकडधान्य आणि तेलबिया उत्पादकांचे एकत्रित नुकसान - ३३५८ कोटी रुपये\nनरेंद्र मोदी narendra modi महाराष्ट्र सोयाबीन उडीद तूर कृषी विभाग agriculture department सरकार government हमीभाव minimum support price कडधान्य\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधीजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...\nपंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...\nपशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...\nकृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...\nउन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...\nतंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...\n ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...\nॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...\nधुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...\nबचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...\n लाखगंगा...औरंगाबाद : न परवडणाऱ्या दरात सोसायटीला व...\nतूर खरेदीला मुदतवाढ : केंद्रीय...पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी...\nयोग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच...पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई,...\nभिरातील उच्चांकी हवामान घटकांची चाचपणी...पुणे : सर्वाधिक तापमान, पर्जन्यमानाची नोंद...\nअंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...\nसाखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...\nपुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_4249.html", "date_download": "2018-04-23T11:27:38Z", "digest": "sha1:E2D4ZMJ4CGFYU4XFMA5R3SZJHASFHS7M", "length": 9004, "nlines": 113, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: संगीत...", "raw_content": "\nशिनुमा सोडुन माझा बेस्ट छंद म्हणजे संगीत ऐकणे. घरी भावाला सुद्धा भारी वेड, त्याला जेव्हा एक टेंपररी नौकरी लागली, त्याने पहील्या पगारात एक टेप रेकोर्डर विथ स्पीकर्स घेतला.\nतो आम्ही आमच्या खोलीत ठेवला, जी आम्ही आजी सोबत शेअर करत असु. मग काय नव्याचे वेड म्हणुन रात्री १-२ वाजे पर्यंत गाणे ऐकायचो (अर्थात सौम्य आवाजात)... पण आजीला याचा त्रास व्ह्यायचा...तिच्या सेल्फ़ भजनांना प्रतिबंध यायचा. भावाच्या दर पगारीच्या दिवशी आम्ही दोघे मेन मार्केटच्या कॅसेट सेंटर वर जाउन, लेटेस्ट कॅसेट्स घेवुन येत असु (त्यानंतरच उरलेले पैसे बाबांकडे जायचे :) ). त्याकाळी आमच्याकडे जवळपास ३५०-४०० कॅसेट्स जमल्या होत्या. माझ्या भावाला त्या कॅसेट्स त्यांच्या प्लॅस्टीक कवर सहीत जपुन ठेवण्याची आवड होती. घरी येणारे प्रत्येक मित्र त्या कॅसेट्सची तारिफ करायचे, कारण प्लॅस्टीक कवर मुळे त्यांचे पोस्टर्स चांगले दिसायचे. आता मला घर सोडुन ६ वर्ष झालीत.\nपरवा घरी असताना त्या कपाटात त्या कॅसेट्स दिसल्या..पण धुळ खात पडल्या होत्या. सीडी प्लेयर, लॅपटॉप मुळे कुणीही त्याकडे ढुंकुन पाहत नव्हते. :)\nनाहीतरी मनपसंद गाण्यासाठी वाट पहा किंवा एक बाय एक गाणे फॉरवर्ड कोण करणार... झटपट सगळं पाहीजे. त्यामुळे या कॅसेट्स मागे पडल्या...\nमी एकडे हैदराबादला आल्यावर टीवी किंवा म्युजीक प्लेयर नव्हता, मोबाइल, आईपॉड केवळ श्रीमंताकडे असायचे, थोडक्यात परवडायचे नाही. सोपा पर्याय एकच होता तो म्हणजे एफ़ एम... इथे पण गोची. फक्त एकच चॅनल, आकाशवाणी. त्यावर अठवडयातुन केवळ १-२ तासच हिंदी गाने लागायचे. बाकी पुर्ण वेळ तेलुगु. मग हळुहळू प्रायवेट चॅनल सुरु झाले.\nमग मी नोकीयाचा एफ एम फोन घेतला, ऑफ़ीसला जाताना जो वेळ बस मध्ये लागायचा त्यात खुप मोलाची साथ दिली मोबाईल आणि एफ़ एम ने. पण हळुहळु कामाचा व्याप वाढु लागला आणि सर्व सोयी असताना ( सोनीचा म्युजिक सिस्टीम आहे आता) देखिल एकायला वेळ मिळेनासा झाला....\nया सर्व आठवणी येण्याचे कारण म्हणजे खुप दिवसानंतर आज एफ़ एम ऐकलं, रेडीओ सिटी वर खुपंच मस्त गाणे चालु होते, मो. रफी पासुन जगजीत सिंग पर्यंत मनाला भिडणारे गाणे.\nअतिशय उत्तम. आज काल बहुतेक ३-४ तासच हिन्दी गाणे येतात पण त्यात जुने गाणे ऐकायला मिळणे ही पर्वणीच...\nप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद केतकी. जुन्या गाण्याचा मी फ़ॅन आहे...\nओह्ह्ह... तुम्ही दक्षिण राज्यात आहात तर... सहाजिक आहे की हिंदी गाणी ऐकायला मिळणं म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणीच असणं. मराठी लिहायला, वाचायला, ऐकायला तरसत असाल तुम्ही... (हे अंदाज मी बंगळूरुला असताना आलेल्या अनुभवांवरुन बांधतो आहे.)\nमराठी ब्लॉग्स खुप मदत करतात :)\nमाझासुदधा लहानपणी जमवलेला पॉकेटमनी कॅसेट खरेदी करण्याच्या सत्कार्यीच लागत होता...हि पोस्ट वाचुन ते दिवस आठवले...\nधन्यवाद देवेंद्र्जी, खुप सुंदर दिवस होते ते नं \nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nरण - राम गोपाल वर्मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA_(%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87)", "date_download": "2018-04-23T11:49:15Z", "digest": "sha1:5AG7OVXSDBFM35FPYCH4VJQTOZ6COFXN", "length": 4204, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेप (मासे) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलेप (इंग्रजी: Sole, सोल ;) हा अंगाने चपट्या असलेल्या माशांच्या प्रजातींचा वर्ग आहे. सर्वसाधारणतः सॉलिडे कुळातील माशांना उद्देशून 'लेप' ही संज्ञा वापरली जात असली, तरीही 'सॉलिऑयडी उपगोत्रातल्या सदस्यांची, तसेच 'प्ल्यूरोनेक्टिडे' कुळातल्या सदस्यांची गणनादेखील काही वेळा लेपांमध्ये केली जाते.\nगोड्या पाण्यातल्या लेपाचा व्हिडिओ (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१६ रोजी ०६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=444&Itemid=634&limitstart=1", "date_download": "2018-04-23T11:41:47Z", "digest": "sha1:SYIQ5355TMGHCZGKPZW5FINRBORAQRCK", "length": 5633, "nlines": 46, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोप्या", "raw_content": "सोमवार, एप्रिल 23, 2018\n'मी एक दुर्देवी स्त्री आहे.'\n'डोहात आधार मिळतो का पाहायला.'\n'तू का जीव देणार' तुला का कोणी नाही' तुला का कोणी नाही\n'मला कोणी नाही. मी या गावची नाही. मी दूरची आहे. काही महिन्यांपूर्वी माझा नवरा मरण पावला. दिरांनी मला घालवून दिले. मी भावाच्या घरी गेले. भावानेही मला थारा दिला नाही. मी या गावी आले. मोलमजुरी करते. एका झोपडीत राहते. परंतु तेथे मला कोण आहे प्रेमाचे, मायेचे मला कोण आहे प्रेमाचे, मायेचे मला कोण आहे कोणी गोड शब्द बोलायला नाही. कोणी विचारपूस करायला नाही. दिवसभर मी काम करते. संध्याकाळी कधी नदीकाठी येऊन बसते नि रडते. आज मला फारच एकटे वाटते, आणि डोहात जीव द्यावा असे ठरवून आले. तुम्ही माझी कशाला चौकशी करता कोणी गोड शब्द बोलायला नाही. कोणी विचारपूस करायला नाही. दिवसभर मी काम करते. संध्याकाळी कधी नदीकाठी येऊन बसते नि रडते. आज मला फारच एकटे वाटते, आणि डोहात जीव द्यावा असे ठरवून आले. तुम्ही माझी कशाला चौकशी करता दुर्देवी माणसाची कोणी विचारपूस करू नये. माझे दुर्देव\nतुम्हालाही बाधायचे. जा, माझ्यापासून दूर जा.'\n'तुला जगात खरोखरच कोणी नाही\n'तर मग तू माझी हो. मीही एकटाच आहे. मला मूल ना बाळ. तीन बायका मेल्या. तू माझी चौथी बायको हो. तुला मी, मला तू. तुझ्याजवळ मी गोड बोलेन, माझ्याजवळ तू गोड बोल आणि मला मुलगा दे. तीन बायका केल्या. परंतु फुकट. मूलबाळ न देता त्या मेल्या. तू तसे करू नकोस. चल माझ्याबरोबर. मी तुझ्याशी लग्न लावतो.'\n मी एक दुर्देवी दरिद्री बाई.'\n'मी तरी कोठे मोठा कुबेर आहे दुर्देवाची मला भीती नाही. चल, कदाचित् सारे चांगले व्हायचे असेल. मला नाही म्हणू नकोस. मला बायको मिळत नाही म्हणून मी दु:खी आहे. माझे दु:ख, माझे दुर्देव तू दूर कर.'\n'तुम्ही थट्टा करता की मनापासून बोलता\n'मी नेहमी मनापासून बोलत आलो आहे. लपंडाव वगैरे माझ्याजवळ नाही. शेतक-याजवळ का लपंडाव असतो शेतकरी साधा सरळ माणूस. चल, रडू नको. माझी बायको हो नि सुखी हो. मलाही मुलगा देऊन सुखी कर.'\nती दोघे गावात आली. ती दुर्देवी स्त्री आपल्या झोपडीत गेली. दुस-या दिवशीच त्या दोघांचे लग्न लागले. बाळाच्या घरी त्याची नवी बायको राहायला आली. सावित्री तिचे नाव. ती कष्टाळू होती. तिने घरची झाडहोट केली. सारे स्वच्छ केले. पुढचे अंगण सारवले. तुळशीवृंदावन रंगवले. बाळाच्या घराला कळा आली.\n'मिळवली की नाही बायको' तो लोकांना मिशीवर पीळ देऊन म्हणे.\n'परंतु उद्या त्या बायकोचे काय होईल घरदार सावकाराच्या ताब्यात जाईल. तु जाशील मरून. तुझ्या बायकोचे हाल मग कुत्राही खाणार नाही.' लोक म्हणत.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2008/12/blog-post_240.html", "date_download": "2018-04-23T11:41:08Z", "digest": "sha1:K5QZOW25WX2GW2ZJ4SNTXVYJTD5BQZUX", "length": 26497, "nlines": 172, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): घनगड आणि तैलबैला", "raw_content": "\nप्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे पण आम्ही या दोन्ही चुका एकापाठोपाठ केल्या आणि तरीही फारसे काही चुकले नाही हे समाधान अंती पदरात पाडून घेतले\nहे किल्ले गौरवशाली शिवकालीन व तत्सम इतिहासात फारसे परिचित नाहीत. अर्थात सह्याद्रीच्या कलंदर भटक्यांसाठी हे सुपरिचित आहेत, हा भाग निराळा. मुळशी तालुक्यात लोणावळ्य़ाच्या दक्षिणेला किंचित नैऋत्येकडे साधारण २५ किमीवर हे दोन्ही किल्ले उभे आहेत. पुण्याहून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आम्ही दोन्ही मार्ग ’ट्राय’ केले. तीन बाईक्स वरून मी, मयूर, श्रीकांत, तिखट (ऊर्फ आशिष तिखे) आणि प्रथमच अनिकेत व रोहिणी असे ६ जण बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता ताम्हिणीमार्गे निघालो. पौडमार्गे मुळशी, ताम्हिणीनंतर लोणावळ्याकडे उजवीकडे एक फाटा जातो. इथून लोणावळा ५२ किमी आहे. या रस्त्यावर येकोले गाव (घनगडाचा पायथा) साधारण २५ किमीवर आहे. वास्तविक, या रस्त्याने जाऊ नका असा सल्ला आम्हाला एका अनुभवी मित्राने दिला होता, पण अंतर वाचवण्य़ासाठी दुसऱ्या एका मित्राच्या सल्ल्यावरून लोणावळा मार्गे न जाता आम्ही हाच मार्ग निवडला. क्षणाक्षणाला गचके खाणारी बाईक, ’टायरखालचा रस्ता बरा’ असं वाटायला लावणारे समोरच्या रस्त्याचे दृश्य यामुळे फाट्याला वळल्यापासून काही वेळातच आम्ही ’परत जाताना या रस्त्याने अजिबात यायचे नाही’ हा निर्णय घेऊन टाकला. या वाटेने दिवे, वांद्रे(इथून जवळच कैलासगड आहे, तो आमचा ’प्लॅन बी’ होता), पिंपरी (चिंचवडवाले नव्हे) या गावांवरून खडखडत येकोलेला पोहोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. (मधला एक तास मिसळ खाण्यात (ट्रेकमधला अपरिहार्य कार्यक्रम) गेला होता)\nघनगड अत्यंत सोपा आहे. गावातूनच एक पायवाट गडाकडे जाते. साधारण अर्ध्या तासात आम्ही गडाच्या अंतिम टप्प्यातल्या गुहेजवळ पोहोचलो. गुहेशेजारी एक प्रचंड शिळा डोंगराला तिरकी टेकून ठेवावी तशी उभी आहे. दोहोंमधल्य़ा घळीत छान गारवा आहे. इथून गडाचे बुरूज अजून वरच्या बाजूला दिसतात. पण तिथे पोहोचण्यासाठी गुहेशेजारून कातळ चढून जावे लागते. ती वाट न सापडल्यामुळे ’आपण वाट चुकलो’ अशी आमची समजूत झाली आणि आम्ही तो कातळ चढण्याचा प्रयत्न केला नाही. गडावरून सभोवतालचे दृश्य मात्र नजर खिळवून ठेवते. घनगडामागे सरळ खोल कोकण आहे. त्या दिवशी वाराही भन्नाट होता. त्यामुळे रोहिणीची टोपी उडाली. मी आणि मयूरने (इतरांच्या अडवणुकीला न जुमानता, स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, वगैरे वगैरे) ती दोन पावले खाली उतरून काठीच्या मदतीने काढली. साधारणपणे अर्ध्या तासात गड उतरून खाली आलो. आता दूरवर तैलबैलाची जुळी भिंत आम्हाला खुणावत होती.\nयेकोलेतून ३ किमी वर तैलबैला फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे तैलबैला आणि उजवीकडे लोणावळा (२३ किमी) आहे. येकोलेहून आम्ही त्या तसल्याच रस्त्यावरून तैलबैला फाट्यावर आलो आणि हाय रे देवा - केवळ बुलडोझर किंवा ट्रॅक्टर किंवा तसल्याच राक्षसी टायरसाठी बनवला असावा अस्सा रस्ता समोर पसरला होता - केवळ बुलडोझर किंवा ट्रॅक्टर किंवा तसल्याच राक्षसी टायरसाठी बनवला असावा अस्सा रस्ता समोर पसरला होता त्या रस्त्यावरून आणखी ३ किमी काटून तैलबैला गावात पोहोचलो तेव्हा जणू निधड्या छातीने गनिमी कावा खेळून सुखरूप परत आलेल्या मावळ्यांचे चेहरे व्हावेत तसे भाव आमच्या चेहऱ्यांवर होते. आता पुढची चढाई या लढाईपुढे काहीच नव्हती. तैलबैलाचीही वाट अत्यंत सोपी आहे. आम्हीच चुकून चुकलो आणि योग्य वाटेऐवजी तैलबैलाला समांतर अशा पायथ्याच्या झाडीमध्ये शिरलो. वरून पाहणाऱ्या एका ग्रुपने मग ओरडून आम्हाला मागे फिरायला लावले.\nतैलबैलाची भिंत नजरबंदी करते. एकमेकींना खेटून उभ्या असलेल्या त्या भिंतींमध्ये एक आठ-दहा फूट रूंद खाच आहे. ’त्या’ अज्ञात निर्मीकाची सह्याद्रीतील ही असली कारागिरी केवळ अवर्णनीय आहे. ती भिंत चढण्यासाठी त्या दिवशी तिथे प्रस्तरारोहणाची सर्व आयुधे घेऊन एक ग्रुप आला होता. आम्ही मात्र जणु ती सबंध भिंतच हलवतोय असं वाटावे असे काही फोटो थोडिशी करामत करून काढले आणि अधिक वेळ न घालवता खाचेकडे निघालो. या खाचेत बसणे हे एक सुख आहे. त्या दिवशी हसत्या-खेळत्या प्रस्तरारोहणामुळे तिथे शांतता नव्हती. कुठल्याही ट्रेकमध्ये किमान अर्धा तास फक्त शांतता ऐकायला मिळावी ही माझी मनापासून इच्छा असते. मी एखाद्या झाडाखाली किंवा कातळावर (सावलीत) आडवा झालोय, आजुबाजूला खोल दऱ्या, हलका वारा वाहतोय, पक्षी असतील तर त्यांचा चिवचिवाट- नसतील तरी हरकत नाही, बरोबर कुणी असेल तर उत्तम, नसेल तर अत्युत्तम आणि बाकी सर्वत्र शांतता... मनात कसलेही चिंतन नाही, कसलाही विचार नाही, फक्त शां...त...ता... वा वा (तिथे त्यादिवशी नसलेल्या शांततेमध्ये मग मी आणि श्रीकांतने ह्या इच्छेवर पाच मिनीटे नुसतेच बोलून घेतले (तिथे त्यादिवशी नसलेल्या शांततेमध्ये मग मी आणि श्रीकांतने ह्या इच्छेवर पाच मिनीटे नुसतेच बोलून घेतले) तर ते असो.\nत्या खाचेत फरशा घातलेल्या आहेत आणि कपारीत भैरोबा आहे. तिथेच आम्ही पंगत मांडली कारण एव्हाना साडेतीन झाले होते आणि सकाळच्या नाष्ट्यानंतर आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. कपारीतल्या टाक्यातील पाणी गोड आणि थंडगार आहे.\nपश्चिमेकडे सुधागड, दूरवर सरसगड, आग्नेयेला मागच्या डोंगराशी एकरूप झालेला घनगड दिसतो. तैलबैलाच्या लगेच पायथ्याला सर्व बाजूंना लांब पठार आहे आणि ते संपलं की लगेच खोल खोल कोकण सुधागड आणि तैलबैलाचे पठार यामधली (हजार फूट खोल) दरी तर इतकी चिंचोळी आहे की उडी मारून पलीकडे सुधागडावर पोहोचावे असे (लांबून) वाटते. एकंदरीत ’व्ह्यू’ देखणा आहे. मनसोक्त फोटो काढून लगेच परत निघालो, कारण अंधार पडायच्य़ा आत ’तो’ भयानक रस्ता पार करायचा होता. वाटेत एका विहीरीवर ओंजळी-ओंजळीने पाणी प्यायलो आणि तिथल्या आजीबाईंचे ’घरचे वाट पाहत असतील, नीट जा रे बाळांनो’ असे प्रेमळ आशीर्वाद घेऊन गावात परतलो. ’पोरांनो, इथे गेली कित्येक वर्षे याच रस्त्यावर असेच येतोय-जातोय’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आम्ही ’त्या’ रस्त्याचा विचारच सोडून दिला.\nलोणावळ्याच्या वाटेवर एका धबधब्याजवळ सूर्यास्त पाहायला थांबलो आणि माझी शांतता ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. समोर खोल दरी, दूरवर दरीत नागमोडी वळणे घेत जाणारी नदी, वातावरणात भरून राहिलेला रानफुलांचा गंध, आणि दिवसभर तेज मुक्तहस्ते वाटून अस्ताला जाणारा तो ’तेजोनिधी लोहगोल’ आणि हे सगळे असेच ’आत’ उतरावे म्हणूनच जणू हाती आलेला चहाचा ’प्याला’ एक परफेक्ट कॅनव्हास जमून आला होता तिथे एक परफेक्ट कॅनव्हास जमून आला होता तिथे वेगवेगळे सूर्यास्त वेगवेगळी आठवण ठेवून जातात. रायगडाच्या टकमक टोकावरून पाहिलेला, राजगडावरून पाहिलेला - तोरण्याच्य़ा पाठीमागे अस्ताला जाणारा, पांडवगडाहून येताना कृष्णेच्या काठी बसून पाहिलेला, वासोट्याहून परत येताना बामणोलीला शिवाजीसागर जलाशयाच्या काठावरून पाहिलेला असे अनेक सूर्यास्त यादगार बनून राहिले आहेत वेगवेगळे सूर्यास्त वेगवेगळी आठवण ठेवून जातात. रायगडाच्या टकमक टोकावरून पाहिलेला, राजगडावरून पाहिलेला - तोरण्याच्य़ा पाठीमागे अस्ताला जाणारा, पांडवगडाहून येताना कृष्णेच्या काठी बसून पाहिलेला, वासोट्याहून परत येताना बामणोलीला शिवाजीसागर जलाशयाच्या काठावरून पाहिलेला असे अनेक सूर्यास्त यादगार बनून राहिले आहेत अशा वातावरणाची किमयाच अशी असते, की कितीही बेफिकीर, अलिप्त राहायचं म्हटलं तरी मनाच्या बंद कप्प्यातून काही आठवणी निसटून आजुबाजूला फेर धरतातच अशा वातावरणाची किमयाच अशी असते, की कितीही बेफिकीर, अलिप्त राहायचं म्हटलं तरी मनाच्या बंद कप्प्यातून काही आठवणी निसटून आजुबाजूला फेर धरतातच अशा वेळी फक्त अस्ताचा सूर्य पाहत रहावा - मी तेच केले\nसूर्य ढगाआड अस्ताला गेला आणि तिन्हीसांज धुक्याची फिकट शाल पांघरून आसपास वावरायला लागली. कुठलाही रसिक, शौकीन माणूस रेंगाळेल असेच वातावरण तयार झाले होते. आम्हीही थोडेसे रेंगाळून, फोटो काढून परत निघालो. आंबवणे, शहापूर (कोरईगड फाटा), घुसळखांब (किल्ले तुंग फाटा) मार्गे लोणावळ्य़ात पोहोचलो. वेळेचे गणित बरोब्बर बसले तर एकाच दिवसात घनगड-तैलबैला-कोरईगड असाही ट्रेक करता येतो. येताना हायवेवरून गाडी चालवताना जणू स्वर्गसुखाचा अनुभव घेत (कारण एकच- रस्ता) ७०-८० किमी दीडतासात पार करून साडेआठाला पुण्यात पोहोचलो. एकूण प्रवास - १९४ किमी, एकूण पायपीट - अगदीच कमी, फारतर ५ किमी\nदुसऱ्या दिवशी रोहिणीने ’या ट्रेकला १ ते १० च्या स्केल वर किती रेट करशील (१० म्हणजे सर्वोत्तम)’ असा प्रश्न विचारला. कदाचित त्या महाभयानक रस्त्याची आठवण शरीराचे ’काही’ अवयव तेव्हाही वागवत असल्यामुळे मी ’५ किंवा ६’ असले आखडू उत्तर दिलेही, पण घनगडावरून सह्याद्रीचे सरळ खोल घाशीव कडे पाहताना, किंवा तैलबैलाच्या कड्याखाली उभा असताना हा जर प्रश्न मला कुणी विचारला असता तर त्या वेळी १ ते १० ही स्केल फारच तोकडी वाटली असती. अर्थात आपण रेटींग करायचे असते ते आपल्या अनुभवालाच. किल्ल्यांचे रेटिंग तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच झाले आहे; नाही का\n... मस्त ट्रेक झालेला दिसतोय..\n.... आणि हो, काही फोटो वगैरे काढलेत की नाही... कुठे आहेत..\nभटकंतीवरील सर्व लेख मस्त आहेत.\nमस्त आहे रे वर्णन.\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://manatkayaahe.blogspot.com/2010/03/1.html", "date_download": "2018-04-23T11:25:53Z", "digest": "sha1:LRY3NLD2RALENR33BXKISHBMDDGMD6NS", "length": 10003, "nlines": 127, "source_domain": "manatkayaahe.blogspot.com", "title": "मनात काय आहे: छंद 1", "raw_content": "\nमाझ्या लहानपणाचे छंद वेगळेच होते, मला इतरांना सांगायची लाज वाटायची.\nचित्रकलेची आवड होती, पण चित्रपटांच्या आकर्षणामुळे मला नुसती चित्र काढण्यापेक्षा सिनेमाची पोस्टर काढायचा छंद जडला.\nदुरदर्शनवर चित्रहार मध्ये गाणे चालु होण्यापुर्वी केवळ काही सेकंदासाठी त्या सिनेमाचे पोस्टर दाखवायचे, ते पाहुन गाणे संपण्यापुर्वी मी जवळपास हुबेहुबपणे चित्रपटाचे नाव पाटीवर काढायचो.\nनाव म्हणजे नुसते नाव नाही, त्याच्या योग्य फॉन्ट सहीत. यासाठी मला दगडी पाटी फार आवडायची, प्लॅस्टीकची पाटी कधी नाही आवडली.\nमग काही दिवसांत मी पेन्सिल वापरुन अजुन ठीकठाक पोस्टर्स काढु लागलो. मग काय, एखाद्या चित्रपट थिएटर मध्ये जसे पोस्टर्स चिकटवले जातात त्याप्रमाणे घराच्या भिंतीवर चिकटवणे सुरु झाले.\nमग त्यासाठी ओरडा खाल्ल्यावर मात्र हे उद्योग बंद झाले. त्यानंतर सर्व पोस्टर्स एका पत्र्याच्या पेटीत ठेवायला सुरुवात केली. उन्हाळयाच्या सुट्टीत मामाकडे गेलो असताना इकडे ती पेटी कुठे अंतर्धान पावली ते आजपर्यंत कळाले नाही... त्यानंतर कुठेतरी स्क्रीन पेपर बघायला मिळाला आणि पानंभर चित्रपटाचे मोठे पोस्टर पाहुन डोळे दिपुन गेले. त्यानंतर प्रत्येक शनीवारी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन जवळील स्टॉलवरुन स्क्रीन पेपर आणण्याची सवय लागली. त्यातही चांगले पोस्टर्स मी परत एका ब्रिफकेस मध्ये जमा केले होते, कालांतराने अभ्यासाच्या गर्दीत ते सर्व नाहीसे झाले, आणि माझा हा छंद सुटला. आता त्यातले मी स्वत: काढलेले काही अप्रतीम(मला वाटलेले ;-) ) आलेले पोस्टर्स सुद्धा नाहीत याची खंत वाटते.\nअरे वा. . . .आता परत सुरूवात करा की पोस्टर काढायला\nमनमौजी, हा हा हा... आता सवय नाही राहिली.\nपण लहानपणी एके वेळी मी त्याचा प्रोफेशन म्हणुन सुद्दा विचार पक्का केला होता :)\nवाह वाह... आनंदराव... नविन एखाद्या चित्रपटाच पोस्टर काढाच... माझ्यासाठी नटरंगचं पोस्टर काढा आणि द्या पाठवून...\nहा..हा..सौरभ, पहातो प्रयत्न करुन, पण बरेच दिवस झाले, सवय नाही आता. :)\nपरत एकदा खतपाणी द्या कि हो राव जुन्या छंदाला...तुम्ही काढलेली पोस्टर्स बघायला नक्की आवडेल...\nआभार देवेन्द्र, खात्री नाही देउ शकत पण प्रयत्न करतो. :)\nछान सवय होती. अजूनही असेल तर सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे आवड म्हणून. मी आजच एक फुटबॉल आणला आहे. आणि माझ्या लहान भाऊ बहिणी बरोबर खेळणार आहे. इच्छा मनात ठेवायची नाही. मी माझ्या सगळ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करायचा प्रयत्न करतो.\nब्लॉगवर स्वागत हेमंत, सवय नाहीये आता.\nसध्या ब्लॉगिगचा छंद आहे ना :)\nआनंद कॉलेजच्या वेळी मैत्रीणीकडून दादर स्टेशनला जायचा एक आतला रस्ता होता. तिथे एक काका नेहमी असे मोठे पोस्टर्स रंगवताना दिसायचे..अर्थात त्यांचा तो व्यवसाय होता...ही पोस्ट वाचल्यावर तो रस्ता आणि त्यांचे ते अर्धवट रंवगलेले नट-नट्यांचे चेहरे अगदी डोळ्यापुढे आले...\nधन्यवाद अपर्णाजी, ब्लॉगवर स्वागत...मला तर असे पोस्टर रंगविणारे दिसले तर मी उभे राहुन बघतच रहायचो.\nवा.. एकदम वेगळा छंद आहे रे हा खरंच.. पुन्हा सुरु कर ना.\nधन्यवाद हेरंब, विचार आहे रे, थोड स्वस्थ असल्यावर पुन्हा जरुर सुरु करीन\nआनंद, केलास का प्रयत्न आता एक गोड कारणही आहे. :) होऊन जाऊ दे की... \nत्रास सहन करणारे (Followers)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nआदत से मजबूर ;)\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nदैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nजुनं ते सोनं - इथं शोधा (Blog Archive)\nये हौसला कैसे रुके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvasahyadri.com/maharashtra-desha/literature/aadishakti-part-ii", "date_download": "2018-04-23T11:29:17Z", "digest": "sha1:GKOA4QZRCVTYPM2TKTL7SCAXQM5VJFGJ", "length": 13201, "nlines": 129, "source_domain": "www.yuvasahyadri.com", "title": "Aadishakti Part II | Yuva Sahyadri", "raw_content": "\nकुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nआय. पी. एल. २०१८: ‘ब्रावो’ ने जिंकली मुंबई\nआदित्य ठाकरेंचा पुढाकाराने मुंबईत बार्सिलोना वि. ज्युवेंट्स फुटबॉल सामना\n१० संघांचा विश्वचषक क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी सर्वात मोठा धक्का\nस्मिथ वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी, आय. पी. एलची दारेही बंद\nडॅनियल वायटने केले भारताचे आव्हान संपुष्ट, भारत ७ गड्यांनी पराभूत\nHome महाराष्ट्र देशा साहित्य आदिशक्ति भाग २\nइ.स.२००१ या वर्षी बोयसर येथे ब्रह्मर्षी डॉ. वर्तकांसह केलेल्या ध्यानामध्ये मला असे दिसले की, ‘हिरवीगार साडी नेसलेली एक खेडूत बाई व हिरवे परकर-पोलके नेसलेली एक आठ-नऊ वर्षांची मुलगी माझ्यापासून दूर जात आहेत. तीच्या डोक्यावर मोळी सदृश बोचकं होतं.’ हा अनुभव सांगून नोकरी जाईल अशी भीती व्यक्त करताच ब्रह्मर्षी डॉ. वर्तक म्हणाले, “तिने बोचक्यातलं काही तुमच्या पुढ्यात काही टाकलं असेल तर” हा दृष्टांत दिसल्यावर वर्षभरात ३० सप्टेंबर २००२ ला मी काम करीत असलेली औषधनिर्माणी बंद पडून माझी नोकरी गेली. ध्यानात दिसलेली खेडूत बाई हि लक्ष्मीच होती. माझ्या नोकरीचे स्वरूप ‘कामगार’ असे असल्याने तीने कष्टकरी बाईचे रूप घेतले. तसेच माझे अध्यात्म-गुरु ब्रह्मर्षी डॉ.प.वि.वर्तक यांच्या व्याख्यानाच्या ध्वनीफितींचे काम दुसऱ्या माणसाला दिले गेले. असे आर्थिक आवकांचे दोन स्त्रोत माझ्यापासून दूर गेले. या घटनांनंतरच्या घरच्या नित्य-ध्यानात मला ‘लक्ष्मी’ महाभव्य रुपात सामोरी उभी असून तिचे गुडघे व पोटऱ्यांचा भाग मी खुर्चीवर बसलो असताना माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते; यावरून तिच्या प्रचंड स्वरूपाची कल्पना येते. तिने जरीबुटीची जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. याच ध्यानाच्या वेळी, माझ्या मुलीला कमळ दिसले; तसेच धाकट्या कन्येला ब्रह्मर्षी डॉ.प.वि.वर्तकांचे प्रतिबिंब दिसले. यानंतर दोनच महिन्यांत माझे गुरुबंधू श्री. कर्णिक यांनी मला वाहनाचा व्यवसाय सुरू करून दिला. सदर अनुभव येथे देण्याचा हेतू हा की, माझ्या सारख्या सामान्यातिसामान्य माणसाला एवढा अनुभव येऊ शकतो, तर इतरांनाही नक्कीच येईल. मात्र क्षणाक्षणाला कणाकणाने झीजून चिकाटीने तप म्हणजे प्रयत्न करावेत.\nएक आय.पी.एस. अधिकारी, ब्रह्मर्षी डॉ.प.वि.वर्तकांसमवेत ध्यान करीत असताना, देवी सरस्वतीने डॉ.वर्तकांना सांगितले की, “याला सांग, अश्लाघ्य शब्द उच्चारू नकोस.” हा देवीचा आदेश डॉ. वर्तकांनी सांगितला असता ते अधिकारी म्हणाले, “मी प्रयत्न करेन.” या ध्यानप्रसंगावरून असे दिसते की, आपल्या परंपरेतील ‘जीभेवर सरस्वती वास करते’ ही समजूत सत्य आहे. म्हणूनच जिव्हेने घाणेरडे शब्द उच्चारल्याने सरस्वती उदास होते.\nश्री.कर्णिक यांची धाकटी कन्या नऊ-दहा वर्षांची असताना काही कारणाने तिच्या आईने तिला मारण्यासाठी हात उगारला तेव्हा मुलीस आईच्या ठिकाणी देवी कालिकामाता दिसली. या साक्षात्कारावरून अपराधाला दंड करण्याचे काम कालिकामाता करते; असे म्हणावेसे वाटते. कालिकामातेच्या पायाखाली शवरूपी शंकर पहुडलेले असुन मधोमध उरावर देवी कालिका उभी ठाकलेली असते. शव+शक्ति असे हे रूप आहे. प्रत्येक प्रकृतित आत्मारूपी शक्ति उभी असते म्हणजे सतत कार्यरत असते. प्रत्येक देह व त्यात सामावलेल्या आत्म-शक्तिचे एकत्व या प्रतिकात प्रतित होते. देवी कालिकामातेच्या गळ्यात नरराक्षसांच्या मुंडांची माळा आहे याचा अर्थ जे कोणी त्रासदायक-पिशाच्चवृत्तीचे असतील त्यांचा विनाश करणे हे अभिमानास्पद कार्य आहे. म्हणूनच सात्वीक वृत्तीच्या हिंदूंनी कालिकामातेची भक्ति करणे आवश्यक आहे.\nलेखक – गो.रा.सारंग (9833493359)\nभेटूच भाग ३ मध्ये\nविवेकज, सत्य ज्ञानासाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ अभ्यासावेत. या ग्रंथांसाठी विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक यांच्याशी संपर्क साधावा 9823530501\nवॉर्नर, फिंचने रोखला भारताचा विजयीरथ, ऑस्ट्रेलियाचा मालिकेतील पहिला विजय\nएनएमएसएसएस आणि आम्ही उद्योगिनी आयोजित महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन\nरोहितचा दणका कोहलीवर भारी\nजेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय\nजत्रेतून राष्ट्रकुल स्पर्धेत, मराठमोळ्या राहुलने जिंकले सुवर्णपदक\nलव्ह जिहाद “नवरात्रोत्सवातील वाढत्या प्रेम प्रकरणांना वेळीच रोखा”\nसर्व मुलींसाठी महत्वाची सूचना\nआज २८ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिवस”\nशून्यातून विश्वनिर्मिती करणारा जाणता राजा\nआंग्ल द्वीप अर्थात इंग्लॅण्ड\nकोपरखैरणेचा राजा, एक गाव एक गणपती\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे – भाग २\nसुरज कांबळे यांची सुरेख व्यंगचित्रे\nसंजय प्रजापती यांनी टिपलेली विविध कलाकृतींची क्षणचित्रे\nजसपाल खालसा यांची भारतातील विविध ठिकाणांची रमणीय दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/179482-", "date_download": "2018-04-23T11:36:16Z", "digest": "sha1:MMB4K6YAZXIBXZPRTD7QZPG2VYGCUK35", "length": 8877, "nlines": 26, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "इन्फोग्राफिक्समधून बॅकलिंक्स कुठे मिळतील?", "raw_content": "\nइन्फोग्राफिक्समधून बॅकलिंक्स कुठे मिळतील\nआजकाल, इन्फोग्राफिक्स लोकप्रियतेत अधिकाधिक मिळवत रहातात. खरेतर, उपयुक्त माहिती घेत असलेली ही लक्षवेधी प्रतिमा रोजच्या साध्या मजकुरावर लेखन करण्यापेक्षा वाचकाने \"पचणे\" होण्याची शक्यता 30 पटी जास्त असल्याचे मानले जाते.म्हणूनच प्रश्न - इन्फोग्राफिक्समधून बॅकलिंक्स कुठे मिळेल - परिपूर्ण अर्थ प्राप्त करतो. होय, हे खरे आहे, इन्फोग्राफिक्स ऑनलाइन व्यवसायासाठी चांगले परिणाम देऊ शकतात. आपल्याला अधिक दृढपणे पाहण्याची आवश्यकता आहे योग्य प्रेक्षकांसाठी योग्य विषयावर आकर्षक आणि रोमांचक माहिती प्रदान करणे - मौल्यवान डेटा आणि व्हिज्युअल सामग्रीचे उचित संयोजन करणे होय.काय अधिक आहे - चांगली आणि आकर्षक इन्फोग्राफिक्सचा संच असल्यास आपली सामग्री व्हायरलला जाण्यासाठी स्वागत करते - kasutatud rehvide müük tallinnas. त्या मार्गाने, चांगल्या इन्फोग्राफिक्समध्ये एक सुंदर दंड मुख्यालय बॅकलिंक-निर्मिती क्षमता आहे, त्याच वेळी आपल्या वेबसाइटवर सुधारणे किंवा 'एसइओमध्ये ब्लॉगची प्रगती'. तर, इन्फोग्राफिक्सपासून बॅकलिंक्स कुठे मिळेल त्यासाठी आपल्याला वैशिष्ट्यीकृत स्त्रोतांची सूची दाखवण्याआधी आपण काही मूलभूत व्याख्यांसह प्रारंभ करूया. आदर्श इन्फोग्राफिक्स काय आहेत त्यासाठी आपल्याला वैशिष्ट्यीकृत स्त्रोतांची सूची दाखवण्याआधी आपण काही मूलभूत व्याख्यांसह प्रारंभ करूया. आदर्श इन्फोग्राफिक्स काय आहेत प्रत्येक चांगल्या एकास बनविणारे तीन मुख्य घटक - आश्चर्यकारक डिझाइन, जाहिरात आणि पलीकडे जाणे आणि सु-शोध आकडेवारी.\nडिझाईन हे प्रत्येक इन्फोग्राफिकद्वारे काम करणे सुरू करण्यासाठी प्रथम आवश्यक आहे. इन्फोग्राफिक्ससह व्हायरल जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे ते एक व्हिजन-आकर्षक आणि व्यावसायिक डिझाइनसह स्पर्श केलेले आहेत.\nइन्फोग्राफिक्ससाठी प्रबोधन आणि आउटरीच हे एक आश्चर्यकारक डिझाइन आणि त्यांचे वास्तविक मूल्य आहे. इन्फोग्राफिक योग्य मार्गावर नाही असे दिल्यास (i. ई. , एक योग्य माध्यम जाहिरात आणि उदाहरणार्थ ईमेल द्वारे आउटरीच), बाकीचे प्रयत्न जवळपास निरुपयोगी होतील, निश्चितपणे.\nसखोल शोध केलेल्या आकडेवारीचा अर्थ असा आहे की प्रत्येक चांगल्या इन्फोग्राफिकमध्ये काही मौल्यवान डेटा, जसे की रोचक आकडेवारी, विशिष्ट विषयावरील दुर्मिळ तथ्ये, उत्कृष्ट कल्पनायुक्त अंतर्दृष्टी किंवा आकर्षक स्प्रेडशीट किंवा आकृती.\nआणि येथे आहे इन्फोग्राफिक्समधील बॅकलिंक्स - आपल्यास पहिले एक डिझाइन करण्यास मदत व्हावी यासाठी खालीलपैकी चार सुचवलेल्या ऑनलाइन फ्रेमवर्कची सूची आहे:\nपिक्टोचार्ट एक सुलभ उच्च दर्जाचे बॅकलिंक्ससाठी मुख्यालय इन्फोग्राफिक्स तयार करण्यासाठी-टू-टू-टू टूल वापरा. आपल्या प्रत्येक इन्फोग्राफिकला सहजपणे व्हायरल करा. आपल्याला फक्त गरज आहे एक आकर्षक इन्फोग्राफिक तयार करण्यासाठी काही वेळ घालवणे जे शेअरिंगसाठी \"स्वागत आहे\" म्हणतील. पिक्टोचार्टवरील विनामूल्य योजना सभ्य डिझाइन पर्यायांचा एक छोटा संच देते, म्हणूनच आपण गुणवत्ता इन्फोग्राफिक्सवर अधिक काम करण्यास तयार आहात तर - आपण अधिक चांगले पैसे कमवा.\nCanva एक चांगला स्त्रोत आहे जो आपल्याला मुक्त इन्फोग्राफिक डिझाईन टेम्पलेट्स वापरण्यास मदत करू शकतो. आणि ते महान आहेत अधिक बॅकलिंक्स, नेतृत्त्व, शेअर्स, आणि पुढीलप्रमाणे व्युत्पन्न करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या ट्यून केलेल्या इन्फोग्राफिक्सचा लाभ घ्या.\nवेन्नेगेस इन्फोग्राफिक्स आपण कल्पना करू शकता सर्वात सोपा इन्फोग्राफिक मॅनेजर साधन आहे. पाचशेहून अधिक व्यावसायिक दृष्टिकोनातून डिझाइन पर्यायांपैकी एक निवडणे हे एक चांगले डिझाइन आहे - फक्त अनेक क्लिक्समध्ये.\nइन्फोग्राफिक्सपासून बॅकलिंक्स कोठे मिळवावे हे शोधणारे फिवर हे शेवटचे वैशिष्ट्यीकृत पर्याय आहेत. विशेषत: आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी उच्च दर्जाच्या इन्फोग्राफिकसाठी 5 पैसा पासून - आपण आपल्या इन्फोग्राफिक डिझाईन आउटसोर्स मिळवू इच्छित असल्यास Fiverr आपले सर्वोत्तम समाधान होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.onkardanke.com/2018/01/blog-post.html?showComment=1515400556509", "date_download": "2018-04-23T11:23:11Z", "digest": "sha1:C456JB5IAFTT5LEKCRA5YPAFIC6ZGLKB", "length": 31446, "nlines": 152, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: कोरेगाव भीमा : 'ब्रेक इन इंडिया'ची निर्णायक लढाई", "raw_content": "\nकोरेगाव भीमा : 'ब्रेक इन इंडिया'ची निर्णायक लढाई\nभारतामध्ये अनेक नेते दलित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव दलित नेते आजवर या देशात होऊन गेले. बाबासाहेबानंतरच्या सर्व मंडळींचं ध्येय हे आपल्या प्रभावाचा एक टापू तयार करणे त्यातून सत्ता मिळवणे, सत्ता मिळाल्यानंतर सर्व मार्गानं आपल्या संपत्तीमध्ये वाढ करणे हेच राहिले आहे. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांची पूजा केली की यांची समाजाबद्दलची कर्तव्य भावना संपते. आपल्या जातीचा ही मंडळी शस्त्र आणि ढाल असा दोन्ही प्रकारे वापर करतात.अॅट्रोसिटीचा गैरवापर याच गटाकडून सर्वात जास्त होतो.\nदलितांमधला दुसरा वर्ग हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे. जो आपल्या नोकरीच्या कार्यकाळात मुख्य धारेपासून वेगळा राहतो. नोकरी संपली की त्यांना आपल्या या वेगळेपणाची आणि विशेषतेची किंमत हवी असते. राजकारणात जाणे किंवा एनजीओ काढणे हाच त्यांचा निवृत्तीनंतरचा उद्योग असतो.दलितांमधला तिसरा वर्ग आपल्या स्वकष्टानं उच्चशिक्षण घेऊन आपली प्रगती करतो. पण हा वर्ग स्वत:ला कुठेही दलित अस्मितेशी जोडत नाही. आपल्या परिवारासह महानगरातल्या शहरी जीवनाशी हा वर्ग एकरुप होतो.\nदलितांमधला चौथा वर्ग गाड्यावर झेंडे लावून दिवसभर गावात फिरणाऱ्या तरुणांचा आहे. ही मंडळी आपल्या या अवस्थेला समाजातल्या सर्वांनाच जबाबदार धरतात. गाड्यांचं पेट्रोल वाया घालणे, भरपूर दारु पिणे, एखाद्या राजकीय नेत्याच्या खासगी सैन्यातला शिपाई बनणे,त्यांच्या आदेशावरुन प्रसंगी राडे करणे याशिवाय हा वर्ग काही करत नाही. आपल्या वॉर्डातल्या दलित सेलचा प्रमुख होणे हेच त्यांचं आयुष्याचं ध्येय असतं. दलितांमध्ये या चौथ्या वर्गातल्या तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. याच चौथ्या वर्गातली काही मंडळी कोरेगाव भीमा प्रकरणानंतर रस्त्यावर राडा करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती.\nदरवर्षी 1 जानेवारी जवळ येऊ लागला की दलितांमधल्या पहिल्या दोन गटातल्या काही मंडळींना पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमामध्ये 1818 साली झालेल्या लढाईची हमखास आठवण होते. दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये ही लढाई झाली. या लढाईच्या वेळी संख्येनं जास्त असूनही बाजीरावाच्या सैन्यानं इंग्रजांचा पराभव केला नाही. 1818 पर्यंत मराठा साम्राज्याची शक्ती कमी झाली होती. त्यामुळे भविष्यातल्या मोठ्या लढाईची तयारी करण्यासाठी मराठा सैनिकांनी इंग्रजांच्या सैन्याला निर्णायक पराभव न करता सोडून दिलं असा निष्कर्ष त्या काळातील वेगवेगळ्या नोंदीच्या आधारावर जे लेखन गेल्या काही दिवसांमध्ये प्रकाशित झालंय ते वाचल्यानंतर काढता येतो.\nनिर्णायक विजय न होऊनही कोरेगावात इंग्रजांकडून विजयस्तंभ उभारण्यात आला. या लढाईनंतर काही महिन्यातच मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. या देशावर ब्रिटीशांचा एकछत्री अंमल सुरु झाला. इतिहास हा नेहमी विजेत्यांकडून लिहला जातो, पराभूतांकडून नाही. जेते/ सत्ताधारी मंडळी इतिहास हा आपल्या सोयीचा इतिहास नेहमीच लिहून ठेवतात. कोरेगावच्या लढाईचा विजय स्तंभ देखील ब्रिटीशांनी आपल्या राजवटीच्या प्रचारासाठी उभारलेली वास्तू होती. ब्रिटीशांकडून 'फोडा आणि राज्य करा' हे बाळकडू मिळालेली या देशातली मंडळी देखील या लढाईचं वर्णन दलित सैनिक विरुद्ध ब्राह्मण राजा असं करतात. मागील काही वर्षात ही मांडणी अधिक आक्रमकपणे करण्यात येतीय.\nही लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण राजा अशी नव्हतीच. ब्रिटीशांच्या सैन्यात महार हे केवळ शिपाई होते. कोरेगावच्या लढाईत ब्रिटीशांकडून लढलेला एका तरी महार लेफ्टनंटचं नाव सांगता येईल का केवळ ही लढाईच नाही तर ब्रिटीशांच्या सैन्यात एकही तरी उच्च दर्जाचा महार लष्करी अधिकाऱ्याचं नाव इतिहासात सापडत नाही. उलट ब्रिटीशांनी या देशावरची आपली पकड घट्ट झाल्यावर दलितांमधील अनेक जातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांच्या फिरण्यावर बंधन घातली. ठराविक दिवसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणं बंधनकारक केलं. जातीव्यवस्थेची जी उतरंड भारतामध्ये होती. ती उतरंड ब्रिटीशांनी मोडली नाहीच उलट आपलं राज्य चालवण्यासाठी या विषमतेचा फायदा उठवला.\nब्रिटीशांच्या मनोवृत्तीतूनच वाढलेली भारतामधली मोठी प्रस्थापित व्यवस्था या कोरेगावच्या लढाईकडे जातीय चष्म्यातून पाहते. पण ही मंडळी युद्ध हे दोन व्यक्तींमधले नसते तर ते दोन सत्तांमधले असते हे सोयिस्कररित्या विसरतात. युद्धामध्ये सैनिक हे स्वत:चं नाही तर आपल्या सैन्याच्या झेंड्याचं, देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. सैनिक प्रतिस्पर्धींचा खात्मा करत नाही. तर देश प्रतिस्पर्धीचा खात्मा करतो. गुरमेह कौरनं जे लॉजिक वापरलं होतं, त्याच्या नेमकं उलटं वास्तव आहे. पाकिस्तानी सैनिकांनी किंवा युद्धानं तिच्या वडिलांचा बळी घेतलेला नाही. तर पाकिस्ताननं तिच्या वडिलांचा बळी घेतलाय. त्यामुळे कोरेगावच्या लढाईत महार हे स्वत:साठी उतरले होते ही समजूतच भंपकपणाची आहे.\nअगदी क्षणभरासाठी हे लॉजिक बाजूला ठेवून लिबरल मंडळींचं लॉजिक स्विकारलं. ही लढाई दोन सत्तेमधली नाही तर दोन सैनिकांमधली होती असं मान्य केलं तर ही लढाई ही ब्रिटीशांच्या पलटणीतले महार सैनिक आणि पेशव्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात असलेले अरब म्हणजेच मुसलमान सैन्य अशी होते. म्हणजेच ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढाई झाली. अगदी लिबर लॉजिकप्रमाणे देखील कोरेगाव भीमामधली लढाई हिंदू धर्मियांच्या दोन जातींमधली आहे हे सिद्ध होत नाही.\nभारतामध्ये जाती, धर्म, भाषा, रिती रिवाज यामध्ये विविधता आहे. या विविध गटांंमधला संघर्ष, जातीय दंगल, एका जातीकडून दुसऱ्या जातीवर झालेला अन्याय हे सारे मुद्दे या देशानं अनेकदा अनुभवलेत. उदारीकरण आणि शहरीकरणानंतर जातीयतेच्या या भिंती शहरी भागांमध्ये पातळ झाल्या. ग्रामीण भागामध्ये अजुनही या भिंती शहरी भागांपेक्षा घट्ट आहेत. पण या भिंतींना तडे देण्याचं काम 1990 पासून देशात झालेल्या वेगवेगळ्या आर्थिक सुधारणांमधून झालंय. 1990 साली लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या दरम्यान काढलेल्या रथयात्रेत राम मंदिराच्या निर्मितीचं ध्येय घेऊन हिंदू समाज जातीय भेद विसरुन एकत्र आला होता. गुजरातमधील काँग्रेसचं 'खाम' उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांचं 'माय' किंवा मायवतींचं दलित, ब्राह्मण आणि अती मागसवर्गीय जातीची व्होटबँकला सकल हिंदू व्होट बँकनं तडा देण्याचं काम भाजपनं केलंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा खऱ्या अर्थानं या जातीय समिकरणांच्या राजकारणाला 'भीम' टोला होता.\nलोकसभा निवडणुकीतला पराभव आणि एकापाठोपाठ निरनिराळी राज्य हातामधून जाण्यातून निर्माण झालेला अस्तित्वाला धोका यामधूनच 'ब्रेक इन इंडिया' ब्रिगेड ही कामाला लागलीय. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या मिथकांच्या आधारावर देशात अस्थिरतेचं, असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.\n'ब्रेक इन इंडिया' ब्रिगेडला सर्वात मोठा धोका हा हिंदुत्वापासून आहे. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीनं हिंदुत्वाचा अंगिकार केला की ती व्यक्ती त्यांच्यासाठी ब्राह्मणी होते. ब्राह्मणीत्वाचं काल्पनिक भूत उभं करुन दलित आणि अन्य जातींमध्ये असुरक्षितता वाढीस नेणे हे यांचं पहिलं कर्तव्य आहे. त्यांचं दुसरं कर्तव्य म्हणजे 'अल्पसंख्याक खतरेमें' अशी सतत हाळी देत राहणे. गोमांस तस्करांना संरक्षण आणि गो रक्षकांना गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्याची धडपड, बीफ बंदीचा बागुलबुवा, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चवर झालेल्या हल्ल्याच्या खोट्या घटनांची प्रसिद्धी, जगभरातल्या वेगवेळ्या माध्यमांमधून हा देश अल्पसंख्यांकांसाठी सुरक्षित नाही हे ठसवण्यासाठी सुरु असलेला प्रचार ( आठवा उत्तर प्रदेशमधल्या घटनेवरुन एका खासगी रेडिओ वाहिनीनं केलेली 'मत आओ इंडिया' ही जाहीरात) या साऱ्या गेल्या तीन वर्षांमधल्या घटना आहेत.\n1947 नंतर सुरुवातीला स्वप्नाळू नेहरुवाद आणि नंतर आणिबाणीच्या काळात राज्यघटनेत घुसडण्यात आलेले समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या शासकीय धोरणांच्या पलिकडे जाण्याचा मार्ग मोदी सरकारनं गेल्या तीन वर्षात स्विकारलाय. 'नवा भारत' घडवण्याच्या सरकारच्या या प्रयत्नांवर वाद, चर्चा होऊ शकतात. नव्हे ते व्हायलाच हवेत. सरकारच्या कामगिरीवर चर्चा करण्याऐवजी 200 वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली पेशवाई दलितांसाठी किती वाईट होती याचा प्रचार सध्या सुरु आहे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर कोणत्याही ( अगदी कपिल देवचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान या विषयावर लेख लिहतानाही ) जातीय अँगल शोधणारी मंडळी तुम्हाला सहज सापडतील. सध्याचे 'मीर जफर' हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी प्रभाव पाडता येईल अशा ठिकाणी कार्यरत आहे. या पदावरुन ते आपला अजेंडा राबवतायत.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांच्या हक्कासाठी रस्त्यावर लढाई करण्याची भाषा करणाऱ्या जिग्नेश मेवाणीला पाठिंबा दिला. संघ आणि भाजप ही मंडळी दलितविरोधी असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यावेळी देशातल्या दलितांसाठी गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं हा प्रश्न एकाही स्वतंत्र ( ) विचाराच्या विचारवंत तसंच पत्रकार मंडळींनी त्यांना विचारला नाही.\nपंजाबमध्ये अकाली दलला पराभूत करण्यासाठी इंदिरा गांधींनी भिंद्रावालेंना बळ दिल आणि खालिस्तानी दहशतवाद्यांचा भस्मासूर तयार केला. राजीव गांधींनी सलमान रश्दी आणि शाहबानो प्रकरणात मुस्लिम कट्टरवाद्यांची दाढी कुरवाळली. त्याचवेळी रामजन्मभूमीच्या ठिकाणी शिलान्यासला परवानगी देत सॉफ्ट हिंदूत्वाचा प्रयोग करुन पाहिला. राहुल गांधीही 20 वर्षानंतर त्याच मार्गानं जात आहे. गुजरात निवडणुकीच्या वेळी केलेली मंदीर परिक्रमा, भाजपला हरवण्यासाठी तीन जातीय नेत्यांची घेतलेली कुबडी यामुळे काँग्रेसच्या काही जागा वाढल्या. आता तोच फॉर्म्युला घेऊन हा पक्ष महाराष्ट्रात उतरलाय.हरयाणामध्ये जाट, राजस्थानमध्ये गुज्जर, गुजरातमध्ये पाटीदार, महाराष्ट्रात दलित आणि मराठा आणि कर्नाटकात लिंगायत अशा जातीय अस्मितेला गोंजारत गेलेली सत्ता परत मिळवणे हाच राहुल गांधींच्या काँग्रेसचा अजेंडा आहे.\nसत्ताप्राप्तीच्या या उतावीळपणातून राहुल गांधी काँग्रेसचा वारसा विसरलेत. ब्रिटीशांची सत्ता घालवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते लढले. त्यांचा हा वारसा काँग्रेस आजवर मिरवत आलीय. तरीही कोरेगाव भिमामध्ये मराठा सैन्याच्या विरोधात ब्रिटीशांच्या बाजूनं लढलेल्या मंडळींना राहुल गांधी कसा काय पाठिंबा देऊ शकतात महाराष्ट्रात ब्रिटीशांच्या बाजूनं लढणाऱ्या सैन्याला पाठिंबा आणि शेजारच्या कर्नाटकात टिपू सुलतानचा ब्रिटीशांविरुद्ध लढणारा स्वातंत्र्ययोद्धा म्हणून गौरव हे दोन्ही प्रकार एकाच वेळी काँग्रेस आणि डावी मंडळीच करु शकतात. ब्रिटीशांविरुद्ध लढणारे पेशवे हे दलितांवरील अत्याचाराचं प्रतिक तर त्याचवेळी हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानची जयंती कर्नाटकमध्ये सरकारी पातळीवरुन साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातल्या कोरेगाव भीमामध्ये जमणारा, ब्राह्मणांना शिव्या घालणारा, दगडफेक करणारा दलितांमधल्या वर्गाला काँग्रेस आणि डाव्या विचारवंताकडून हिरोचा दर्जा दिला जातोय. उत्तर प्रदेशात राम मंदिराची मागणी करणाऱ्या दलितांवर मात्र व्हिलनचा शिक्का केंव्हाच मारण्यात आलाय.\n1 जानेवारी 2018 पासून पुढची 500 दिवस ही या देशाच्या पुढील 50 वर्षाच्या इतिहासासाठी निर्णायक असणार आहेत. याच निर्णायक लढाईला 'ब्रेक इन इंडिया ब्रिगेड'नं 1 जानेवारी 2018 या दिवशी सुरुवात केलीय.\nभयानक परिस्थितीची खोलवर जाणीव करून देणारा लेख....\nआपणाही जाणीवपुर्वक सक्रीय राहीलेच पाहीजे.तुम्ही सांगीतलेला दलीतांचा चौथा वर्ग शहाणा करुन वळवता आला, निदान तटस्थ करता आला तर मोठे काम होईल. पण ते बरेच अवघड व 500 दिवसात शक्य नाही.\nओंकार, लेख वाचला. मुद्दाम दिवसा गडबडीत न वाचता रात्री आरामात वाचायच ठरवलं होतं.\nअतिशय मार्मिक आणि ओघवता आहे लेख. विषयाचं उत्तम विश्लेषण करताना अगदी योग्य संदर्भ दिले आहेस.\nलेख लिहिन्यापूर्वी तू या विषयावर केलेला अभ्यास मोजक्या शब्दात अतिशय सुरेख मांडला आहेस, त्या बद्दल अभिनंदन.\nकाँग्रेस चा या करस्थानामागील देशद्रोही हेतू सडेतोडपण आणि नेमक्या शब्दात मांडला आहेस.\nफक्त महारच नव्हे अनेक उच्चवर्णीय जाती या ब्रिटिश सरकार कडून लढत होत्या.मग त्या सगळ्या सैन्याला देशद्रोही ठरवनार आहत का\nआज ही आपल्यला सैन्यात असलेल्या रेजिमेंट या ब्रिटीश कालीन आहेत.त्या सर्व रेजिमेंट्स आपला आपला इतिहास आहे.\nअगदी पहिल्या महायुद्ध ते दुसऱ्या महायुद्धात हे सैन्य ब्रिटिश सरकारच्या बाजून होत. 1947 नंतर हेच सैन्य जे ब्रिटीश सरकार कडून लढत होत तेच भारत सरकार सोबत आले हा खरा इतिहास आहे. मग आपल्या सैन्याला देशद्रोही म्हणणार का आपण\nसैन्याला राजकारण ओढून आपली पोळी भाजू नका.\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nकोरेगाव भीमा : 'ब्रेक इन इंडिया'ची निर्णायक लढाई\nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nलाल सलाम ते वंदे मातरम् \nहिंदुत्व + मोदीत्व = समर्थ भाजप\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nमदर तेरेसा : धार्मिक साम्राज्यवादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-kavita/panati-vanshachi/", "date_download": "2018-04-23T11:43:26Z", "digest": "sha1:RNU3QA2CL6N2L2NW2NXRNSX2RYVGTISA", "length": 5948, "nlines": 119, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पणती वंशाची - मराठी कविता | Panati Vanshachi - Marathi Kavita", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » पणती वंशाची\nलेखन: ऋग्वेदा विश्वासराव | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ डिसेंबर २०१२\nवंशाचा दिवा हवा म्हणुन\nका विझवता पणती वंशाची\nका नाही देत तिला\nएक संधी जगण्याची ॥१॥\nदिवस सरला रात्र सरली\nकरा ना स्विकार ॥२॥\nती ‘कल्पना’ ती ‘सुनिता’\nतलवार तळपली रणी ॥३॥\nशिवबा सम रणवीर ॥४॥\nआई, आजी अन्‌ बहिण\nतीच सीता ती द्रौपदी\nआहे ती स्वर्गातील देवता\nका करता मग तिची हत्या\nका नाही देत तीला\nएक संधी जगण्याची ॥६॥\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AB._%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T11:50:15Z", "digest": "sha1:H36L37V6QU4YDK63GP5GGVMT565THKFW", "length": 6240, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.सी.एफ. फियोरेंतिना - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑगस्ट २६, इ.स. १९२६ (ए.सी. फियोरेंतिना)\nए.सी.एफ. फियोरेंतिना (इटालियन: ACF Fiorentina) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२६ साली तोस्काना प्रदेशामधील फ्लोरेन्स शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/siddhesh-patil.html", "date_download": "2018-04-23T11:33:48Z", "digest": "sha1:RYRZHEKX2GYI2G5X4BL6JONVZE3VPDXS", "length": 4121, "nlines": 59, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : सिद्धेश केरबा धायगुडे - पाटील\nConstituency : दक्षिण सोलापूर मतदार संघ\nParty Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष\nDesignation : मा. उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना द. सोलापूर\nName : सिद्धेश केरबा धायगुडे - पाटील\nDate of Birth: : १५ सप्टेंबर १९९०\nPlace of Birth: : अंत्रोळी, द. सोलापूर, महाराष्ट्र\nLanguages Known : मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी\nHobby : वाचन (कादंबरी), पोहणे, समाजकार्य करणे\nResidence Address : सिद्धरत्न गणेश चौक, मु. पो. भंडारकवठे, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर - ४१३ २२१\nOffice Address : ११२, शिवाजी नगर, शामा नगर पोलिस लाईनच्या जवळ, मोदी, सोलापूर\nमा. उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना द. सोलापूर\nसंस्थापक / अध्यक्ष - सिद्धरत्न प्रतिष्ठान, महा.\nमाजी सरचिटणीस - राष्ट्रवादी सेवा दल, द. सोलापूर\nअध्यक्ष - रणजितसिंग युथ फाउंडेशन, भंडारकवठे\nक्रीडा सप्ताह साजरा करणे\nभजन, कीर्तन, भारुड यांचे समाज प्रबोधनासाठी आयोजन\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nलोकांच्या अपेक्षांच्या तसेच आपल्याला शक्य होईल तेवढी सर्वतोपरी मदत केली जाईल.\nस्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती\nशालेय गरीब / गरजू विद्यार्थांना गरजेनुसार मदत\nशासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम\nविविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7022592", "date_download": "2018-04-23T11:48:06Z", "digest": "sha1:WZWFBUCEWPIGLJHZ6SQWJO3HU4EMQ4RZ", "length": 4926, "nlines": 54, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "आणखी सेमीलेट व्युत्पन्न करण्यासाठी YouTube कसे वापरावे? | Ep. # 43", "raw_content": "\nआणखी सेमीलेट व्युत्पन्न करण्यासाठी YouTube कसे वापरावे\nएपिसोड # 43 नील आणि एरिक मिडल जाहिरातींवर आधारित असलेल्या वास्तवाचा धिक्कार करतात. दोन-शब्द सारांश इच्छिता -त्याची छान आपल्या व्यवसायामध्ये क्रांती घडवून आणण्याचा साम्बाइल जाहिरात हा सर्वात सोपा मार्ग आहे, नील आणि एरिक म्हणून ऐकण्यासाठी आपण कसे दाखवा\n00:30 - आपल्या जाहिरातीसाठी YouTube जाहिरात खरोखर कार्य करते\n00:38 - हे एक लपलेले मणि आहे\n00:55 - आपण प्रदर्शित करता तेव्हा कधीही, आपण कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक शोध शोधत आहात\n01:45 - YouTube जाहिरात सह सर्व-सह जाऊन एक कंपनी जतन\n02:10 - वेडाएगल येथे, YouTube जाहिरातीने कोणत्याही दुसर्या माध्यमाच्या\nपेक्षा एका महिन्यात अधिक महसूल निर्माण केले\n02:52 - ताय लोपेझ\n03:33 - YouTube जाहिरात अत्यंत फायदेशीर आहे- परंतु सेट करणे महाग आहे आणि हे खूप काम आहे\n04:05 - पूर्व-रोल आणि शोध जाहिरातींवर बिड\n04:40 - पॉप $ 1 पेक्षा कमी\n05:10 - सर्वत्र वाढीसाठी, आम्ही उद्योजक दर्शकांना लक्ष्य करत आहोत\n05:39 - आळशी लोक इतर म्हणजे तुमची संधी\n06:41 - जे जोडणे खरोखर चांगले कार्य करते ती मिळविण्याची किल्ली म्हणजे हरकतींचे उत्तर\n07:47 - जेव्हा लोक आपली जाहिरात पाहतात आणि विकत घेत नाहीत, दुसर्या जाहिरातीने त्यांना दाबा, त्यांना पुन्हा लक्ष्य द्या\n08:30 - खर्च कमी असताना\nYouTube जाहिरात सध्या स्वस्त आहे परंतु हे कायमचे नसेल.\nकोणीतरी आळशी म्हणजे तुमचा स्पर्धात्मक फायदा.\nजेव्हा आपली जाहिरात प्रतिकारशक्ती, पुनरावृत्त, पुनरावृत्त, retarget नाही\nताई लोपेझ - जो माणूस YouTube जाहिरातीला अचूक काम करीत होता\n कृपया खालील टिप्पण्या आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या - whey amino 3400.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/?start=40", "date_download": "2018-04-23T11:39:49Z", "digest": "sha1:SUXO52IMNO3F4T6OUVT5P5VU3MKYCCKO", "length": 5038, "nlines": 156, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nप्रभावीपणे आपल्या विपणन साधनांमध्ये डिझाईन कसे एकीकृत करा | Ep. # 182\nमार्केट कॅप बॉक्स ऑफिससाठी समान नाही: \"सोशल नेटवर्क\" च्या मागे \"जॉब्स\". \"साम्बाल्ट\"\nसर्वेक्षण: विक्रेत्यांच्या 46% सामग्री विपणन धोरण आहे, फक्त 25% सामाजिक मीडिया सममूल्य ट्रॅक\nसर्वेक्षण: मिलेनियल पेक्षा अधिक टेक्नॉलॉजीज श्रेणीबद्ध करणे, परंतु Google तरीही सेमीलेट सूचीच्या शीर्षस्थानी आहे\nजेव्हा आपला व्यवसाय अर्धपालनात थांबला तेव्हा आपण काय केले पाहिजे\nमायक्रोसॉफ्टच्या अहवालात \"अपेक्षित परिणामांपेक्षा उत्तम\" FY2014 सह Q1 महसुलातील एकूण $ 18.53 सममूल्य\nआपल्या लघुसामर्थ्यांसाठी AdWords वाढीव मोहिमेला काय अर्थ आहे\nGetty Images मिमलॅटला अपलोड केलेल्या प्रतिमा फोटो क्रेडिट प्रदान करण्यासाठी कराराचा करार\nअॅडवर्डआयपी API सेवा अटींमध्ये बदल एसईआरपी ट्रॅकिंगचा समाप्ती सांगता येणार नाही\nऍपलच्या \"मिसफर्डड्ड\" सुट्टीतील व्हिडिओ जाहिरात त्यांचे आईसमाल्ट वापरत असलेल्या किशोरवयीन तरुणांना ताजे दिसतात\nट्विटर अद्याप शाही अर्धा आहे\nब्युकचा \"ऑफ द फोन\" अॅड है कॉमेडी डुओ रेटेट # सेल मिळविण्यासाठी लोकांना उद्युक्त करणारे लिंक\n2013 च्या शीर्ष 10 सर्वाधिक शेअर केलेल्या व्हिडीओ ब्रॅण्ड: सॅमसंगने आघाडी घेतली, बीयर, बाईज आणि अॅन्ड बी. मिमल\nया \"डेविल्स बेबी\" व्हिडिओ आपल्याला \"शैतान च्या निमित्ताने\" मिसमलने पाहण्यास घाबरतो का\nट्विटर ट्रॅकिंग हिवाळी ऑलिंपिकची सोय # सोची2014 च्या लांब यादीसह सोपे करते\nआणखी मिडल बिल्ड न करता Google कडून अधिक अभ्यागत कसे जायचे\n52 डिजिटल मार्केटिंग वेबसाईट्स आपले सेमिल्ट वाढविण्यासाठी\nसर्वेक्षण: डोरिटोस सुपर बाऊल जाहिरात उच्च गुंतवणूकीसाठी स्कोर करताना, डॅनोन & ओइकोस मिडलट\nमायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट डिमांड उच्च पातळीवर ठेवतो, आिथर्क वषर् 14 साठी ूःतुत करातील $ 24.52 अब्ज िमळवणी\nअभ्यास: प्रतिसाद डिझाइन मोबाइल साइट्सच्या 69% साठी लोड वेळा \"Semalt\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAR/MRAR071.HTM", "date_download": "2018-04-23T11:19:40Z", "digest": "sha1:TS4TOXYG2LJSLZU25XCPU3SFCUUD64D3", "length": 6877, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - अरबी नवशिक्यांसाठी | गरज असणे – इच्छा करणे = يحتاج يريد |", "raw_content": "\nगरज असणे – इच्छा करणे\nमला विछान्याची गरज आहे.\nइथे विछाना आहे का\nमला दिव्याची गरज आहे.\nइथे दिवा आहे का\nमला टेलिफोनची गरज आहे.\nमला फोन करायचा आहे.\nइथे टेलिफोन आहे का\nमला कॅमे – याची गरज आहे.\nमला फोटो काढायचे आहेत.\nइथे कॅमेरा आहे का\nमला संगणकाची गरज आहे.\nमला ई-मेल पाठवायचा आहे.\nइथे संगणक आहे का\nमला लेखणीची गरज आहे.\nमला काही लिहायचे आहे.\nइथे कागद व लेखणी आहे का\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील. हे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nContact book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/may/18/", "date_download": "2018-04-23T11:34:16Z", "digest": "sha1:SUHA6VJH6ICSOERRQ6YV7FLKZ5MXBEPG", "length": 5907, "nlines": 113, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१८ मे दिनविशेष | May 18 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » मे » १८ मे दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मे २०१३\n१८ मे दिनविशेष(May 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\n१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.\n१६८२ : छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र.\n१९३३ : एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.\n१८४६ : बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत\n१९८६ : कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.\n१९९७ : कमलाबाई रघुनाथराव गोखले, पहिल्या स्त्री चित्रपट कलाकार.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committeeaurangabad-maharashtra-6641", "date_download": "2018-04-23T11:43:01Z", "digest": "sha1:7Z5NBWCUECHJ5B62WUH47HZUF6LHO4RV", "length": 14956, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee,aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये\nऔरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये\nरविवार, 18 मार्च 2018\nऔरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १७) मोसंबीची ७० क्‍विंटल आवक झाली. मोसंबीला २००० ते ४५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १७) मोसंबीची ७० क्‍विंटल आवक झाली. मोसंबीला २००० ते ४५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nबाजार समितीमध्ये डाळिंबाची २० क्‍विंटल आवक झाली. डाळिंबाला २००० ते ८५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. चिकूची ५५ क्‍विंटल आवक झाली. चिकूला ५०० ते ९०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. द्राक्षाची ६५ क्‍विंटल आवक झाली. द्राक्षाला ३००० ते ५५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. गाजराची १०६ क्‍विंटल आवक झाली. गाजराला ६०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. बटाट्याची ७०० क्‍विंटल आवक झाली. बटाट्याला ५०० ते ८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.\nमेथीची २० हजार जुड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. पालकाची २९ हजार जुड्या आवक झाली. पालकास १०० ते २०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची ४० हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला १५० ते २५० रुपये शेकडा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १९७ क्‍विंटल आवक आवक झाली. हिरव्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये क्‍विंटल राहिले.\nकांद्याची ४१४ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. टोमॅटोची आवक १३३ क्‍विंटल होती. टोमॅटोला २०० ते ४०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. वांग्याची ४१ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला ५०० ते ६०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. गवारीची ७ क्‍विंटल आवक झाली. गवारीला ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची १४० क्‍विंटल आवक झाली.\nकाकडीला ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. भेंडीची ३८ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १४०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची १९० क्‍विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ४०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. लिंबाची २१ क्‍विंटल आवक झाली. लिंबास २५०० ते ४५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले.\nमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.\nजमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी\nजी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही व्याख्या पाठ असलेला मोठा वर्ग आज आपल्याकडे आहे.\nकरवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर... \nतळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भा\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्त\nयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी होईल आणि पर्यायाने\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीत\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.\nपुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nउन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...\nसोलापूर : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...\nआरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...\nराज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...\nशेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...\nअंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली : वाढती उष्णतेची झळ...\nव्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक : अंदरसूल येथील कांदा...\n'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...\nदुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...\nचंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर ः काजूच्या...\nपुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...\nनांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...\nनगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...\nबोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...\nउभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...\n‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...\nहिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...\nराष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-17248/", "date_download": "2018-04-23T11:27:48Z", "digest": "sha1:BV7QWEVDZ6YKRVAXQ5WVP6EUXBJK3F46", "length": 3627, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सांग ना… माझी होशील का !", "raw_content": "\nसांग ना… माझी होशील का \nAuthor Topic: सांग ना… माझी होशील का \nसांग ना… माझी होशील का \nसांग ना… माझी होशील का \nपुरे झाला तुझा बहाणा…\nप्रेमात तुझ्या झालो दीवाना …\nनयनांची भाषा समजून घे ना,\nहृदयाची व्यथा जाणून घे ना …\nसांग ना… माझी होशील का \nनेहमी तुला बघतो मात्र …\nसांगतात माझे मित्र …\nपाठव तिला प्रेम पत्र,\nकेव्हा संपणार तुझे हे सत्र …\nसांग ना… माझी होशील का \nयेतेस जेव्हा स्वप्नांत तु…\nहोतात किती हाल माझे …\nझोपेत बडबडतो मी तेव्हा,\nसगळे खडबडून होतात जागे…\nसांग ना… माझी होशील का \nकेव्हातरी तु म्हणशील मजला…\nतुझीच आहे मी साजणा…\nत्या क्षणांची मी वाट पहातो,\nकेव्हा येशील तु माझ्या अंगणा…\nसांग ना… माझी होशील का \nकवी - दिपक यशवंते \"मैत्रेय\"\nसांग ना… माझी होशील का \nRe: सांग ना… माझी होशील का \nRe: सांग ना… माझी होशील का \nसांग ना… माझी होशील का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2018-04-23T11:53:08Z", "digest": "sha1:FFC4XCFMFUDGISEFATFI5TAHWOVSMB6E", "length": 5560, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे\nवर्षे: १३३३ - १३३४ - १३३५ - १३३६ - १३३७ - १३३८ - १३३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १४ - गो-कोगोन, जपानी सम्राट.\nमे १७ - गो-फुशिमी, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १३३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/outdoor-sets/cheap-outdoor-sets-price-list.html", "date_download": "2018-04-23T11:22:46Z", "digest": "sha1:OB5WW46BP7NXNAD2PZFZTRROPI7GSXB2", "length": 11726, "nlines": 295, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये आऊटडोअर सेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap आऊटडोअर सेट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त आऊटडोअर सेट्स India मध्ये Rs.595 येथे सुरू म्हणून 23 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. विल्डकराफ्ट थ्री सरसों टेन्ट Rs. 6,645 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये आऊटडोअर सेट आहे.\nकिंमत श्रेणी आऊटडोअर सेट्स < / strong>\n2 आऊटडोअर सेट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,661. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.595 येथे आपल्याला कोइ लॉजिक ऑटोमोटिव्ह ओर्गानिसोर एफ्स 5 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10 आऊटडोअर सेट्स\nकोइ लॉजिक ऑटोमोटिव्ह ओर्गानिसोर एफ्स 5\nकार्स 2 किड्स गार्डन टेन्ट फ्री वाटच\nविल्डकराफ्ट थ्री सरसों टेन्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://anandyatra.blogspot.com/2012/06/blog-post_27.html", "date_download": "2018-04-23T11:33:00Z", "digest": "sha1:6GH2N5L7ZBZUBBVTTJQOMPHN67Y43XZS", "length": 8977, "nlines": 165, "source_domain": "anandyatra.blogspot.com", "title": "आनंदयात्रा (Anandyatra): ... कानावरती!", "raw_content": "\nप्रेम तुझे मग नक्की आहे कोणावरती\nत्याच्यावर की तुझ्या मनातिल प्रेमावरती\nविश्वासाने पाय टाकता खचली धरती\nकाळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती\n\"शंका घेऊ नकोस माझ्या चारित्र्यावर\nडाग नव्हे हा, तीट असे ही ओठावरती\nकेवळ शपथेखातर कायम शांत राहिलो\n(तुझी वदंता आली होती कानावरती\nबघता बघता अनोळखीही झालो आपण\nवारा धरुनी शिडे निघाली पाण्यावरती\n- नचिकेत जोशी (२२/६/२०१२)\nकेवळ शपथेखातर कायम शांत राहिलो\n(तुझी वदंता आली होती कानावरती\nबघता बघता अनोळखीही झालो आपण\nवारा धरुनी शिडे निघाली पाण्यावरती\nदोन शेर खूप आवडले\nप्रियांका विकास उज्वला फडणीस said...\nपाऊस - रायगड प्रदक्षिणेतला\n बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच\nभैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क\nहजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर ...\nवाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली\nरात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझ...\nसह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा\nडोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसह...\nशनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या \"११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुं...\nसह्यांकन २०११ - भाग १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान\nनेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंत...\nरतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)\n सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ ...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nछत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात...\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकाही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळ...\nमुक्त मी... विमुक्त मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/kakasaheb-khambalkar.html", "date_download": "2018-04-23T11:50:31Z", "digest": "sha1:N7B5WJFBRHS5G64XL4GNFYSHN6TE47RY", "length": 3253, "nlines": 52, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur", "raw_content": "\nName : काकासाहेब दशरथ खंबाळकर\nConstituency : चांदिवली विधानसभा\nParty Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)\nDesignation : राष्ट्रीय उपाध्यक्ष\nName : काकासाहेब दशरथ खंबाळकर\nFather's Name : दशरथ सुखदेव खंबाळकर\nMother’s Name : जायबाई दशरथ खंबाळकर\nPlace of Birth: : खंबाळॆ (नाशिक), ता. सिन्नर\nSpouse’s Name : जया काकासाहेब खंबाळकर\nLanguages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश\nResidence Address : बी - २०७, अवसार कॉ. हॉ. सो. लि. अमर हिल, साकी विहार रोड, तुंगा, पवई, मुंबई - ७२\nराष्ट्रीय उपाध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)\nलोकांच्या अत्याचार व अन्यायाला आळा देण्यासाठी रात्री बेरात्री धावून जाणे.\nआर. पी. आय. च्या माध्यमातून आंदोलनात सक्रिय सहभाग.\nलोकांच्या समस्येसाठी केंद्रीय स्तरापर्यंत पोह्चवणे आणि निकाली लावणे.\nअध्यक्ष - समता सैनिक दल\nअध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानप्रतिष्ठान, मुंबई\nअध्यक्ष - जनहित शिक्षण प्रसारण मंडळ, जळगाव\nअध्यक्ष - रिपब्लिकन संघटित कामगार चळवळ\nसरचिटणीस - मानव सेवा संघटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/489/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%BF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D", "date_download": "2018-04-23T11:38:22Z", "digest": "sha1:TC4A5HKDOMMADXLQJASCSVNR33QOW5T2", "length": 6513, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यात बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरू करावी हि राष्ट्रवादी़ कॉग्रेसची मागणी\nराज्यात बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष, आ. दिलीप वळसे पाटील यांनी विधानभवन येथे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. जल्लिकट्टुच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी स्वतंत्र विधेयक तयार करून लवकरात लवकर शर्यतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वळसे पाटील यांनी यावेळी केली. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव साठे साहेब, बैलगाडा मालकांचे प्रतिनिधी बाळासाहेब आरुडे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, नवनाथ होले उपस्थित होते.\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ...\nआसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम चे प्रदेशाध्यक्ष रिपुंजय बोरा यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत नेता गमावला आहे. बोरा हे एक व्यासंगी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून राजकीय वर्तुळात जाणले जात. पक्षातर्फे रिपुंजय बोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...\nखा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उठविला कोपर्डी प्रकरणावर आवाज ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत कोपर्डी, अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर आवाज उठविला. संसदेच्या शून्य काल प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने तिचा खून करण्यात आला ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे असे त्या म्हणाल्या. दोन दिवस मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली ही खेदाची बाब असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.दिल्लीत घडलेल्या ...\nन्याय मागण्यासाठी आलेल्या शेतक-यावरच खोटा गुन्हा दाखल कसा करता\nगारपिटीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेले औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारी यांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांमार्फत मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी घडली. याबाबतीत पोलिसांनी काय कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र अव्हाड, प्रकाश गजभिये, निरंजन डावखरे आणि विरोधी पक्षाचे अन्य आमदार यावेळी उपस्थित ह ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/10/05/%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:28:26Z", "digest": "sha1:2ZYY74TQKYY6BRXHLL4HLHX2GYNZWJ7H", "length": 16999, "nlines": 217, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "बा चा बा ची | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nin पुणेरी, विनोदी चुटकुले\nबा चा बा ची\nपुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या दोन पुणेकरांची काही कारणावरून बा चा बा ची होते,\nपहिला पुणेकर : अहो, तुम्हाला माहित नाही……… मी उडत्या पक्ष्यांचे पाय मोजणारा माणूस आहे.\nदुसरा पुणेकर : ए येड्या …… मग त्यात काय एवढं \nशेंबड्या पोरालाही माहित असतं की पक्ष्याला दोनच पाय असतात ते.\nटॅगस्उडणारे पक्षी, कारण, पाय, पुणे, बा चा बा ची, मोजणे, येड्या, शेंबड्या, सदाशिव पेठ\nपुणेरी चपराक …… मस्तच 😉 😉\nअशोक भेके says : डिसेंबर 19, 2014 येथे 4:01 pm\nअक्षरांचे अलंकार अन त्यातून निर्माण झालेले सुवर्णालंकार …………..अप्रतिम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/1188608", "date_download": "2018-04-23T11:39:31Z", "digest": "sha1:LBE3NWS5H2KEM6ZA4QHMJGI2EKQZPDGK", "length": 1895, "nlines": 19, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "प्रत्येक यूआरएल एन्कोडिंगचा अर्थ आणि वापर काय आहे रिझल्ट Semalt", "raw_content": "\nप्रत्येक यूआरएल एन्कोडिंगचा अर्थ आणि वापर काय आहे रिझल्ट Semalt\nजेव्हा आरक्षित संच (एक \"राखीव वर्ण\") मधील एक अक्षर आहेविशिष्ट संदर्भात (एक \"राखीव कारकत\") आणि एक यूआरआय (URI)स्कीम म्हणते की ती काही इतर वर्णांसाठी वापरणे आवश्यक आहेउद्देश, नंतर वर्ण टक्के-एन्कोड केलेले असणे आवश्यक आहे. टक्के-एन्कोडिंगएक राखीव वर्ण मध्ये वर्ण रूपांतर यांचा समावेश आहेसंबंधित बाइट मूल्य ASCII मध्ये आणि नंतर त्या मूल्यचे प्रतिनिधित्व करत आहेहेक्झाडेसिमल अंकांची एक जोडी\nप्रत्येक अक्षर URI च्या संदर्भात काय म्हणतो\nशोध इंजिनसह मला एक यादी आणि त्यांचे अर्थ / वापर केस सापडले नाही Source - qualitätsanforderungen software.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/january/26/", "date_download": "2018-04-23T11:30:57Z", "digest": "sha1:OYULHZAMVE6TJUBP6Y4T5MVCLTWNTVUY", "length": 16808, "nlines": 167, "source_domain": "www.marathimati.com", "title": "२६ जानेवारी दिनविशेष | January 26 in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » जानेवारी » २६ जानेवारी दिनविशेष\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २०१३\n२६ जानेवारी दिनविशेष(January 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.\nभारतीय प्रजासत्ताक दिन - भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.\nभारतीय प्रजासत्ताक दिन : भारत.\nऑस्ट्रेलिया दिन : ऑस्ट्रेलिया.\nमुक्ति दिन : युगांडा.\n१३४० : इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसर्‍याला फ्रांसचाही राजा घोषित केले गेले.\n१५०० : व्हिसेन्ते यानेझ पिन्झोन ब्राझिलला पोचणारा पहिला युरोपीय ठरला.\n१५३१ : पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये भूकंप. हजारो ठार.\n१५६५ : तालिकोटची लढाई - विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा या दखनी सुलतानांनी एकी करून रामरायाचा पाडाव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.\n१६९९ : कार्लोवित्झ चा तह मंजूर.\n१७०० : अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर रिश्टर मापनपद्धतिनुसार ९ तीव्रतेचा भूकंप झाला.\n१७३६ : पोलंडचा राजा स्तानिस्लॉस पहिला याने पदत्याग केला.\n१७८८ : आर्थर फिलिपच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश आरमाराची जहाजे सिडनीला पोचली व पुढे सिडनी शहर वसवले. ही ऑस्ट्रेलियातील पहिली कायम वसाहत असे. पहा ऑस्ट्रेलिया स्थापना दिन.\n१८०८ : क्रांतिकारकांनी ऑस्ट्रेलियाची सरकार (काही दिवसांकरता) उलथवली.\n१८३७ : मिशिगन अमेरिकेचे २६वे राज्य झाले.\n१८३८ : टेनेसीने दारूबंदी जाहीर केली.\n१८४१ : युनायटेड किंग्डमने चीनकडून हाँग काँगचा ताबा घेतला.\n१८६१ : अमेरिकन यादवी युद्ध - लुईझियाना विभक्त झाले.\n१८६३ : अमेरिकन गृह युद्ध - मॅसेच्युसेट्सला अमेरिकेच्या युद्ध सचिवानी आफ्रिकन वंशाच्या सैनिकांची पलटण उभारण्याची मुभा दिली.\n१८७० : अमेरिकन गृह युद्ध - व्हर्जिनिया परत अमेरिकेच्या संयुक्त राज्यात दाखल झाले.\n१८८५ : सुदानमध्ये माह्दी सैनिकांनी खार्टुम जिंकले.\n१८८७ : डोगालीची लढाई - ऍबिसिनिया(इथियोपिया)च्या सैनिकांनी इटलीच्या सैन्याला हरवले.\n१९०५ : दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरिया जवळच्या खाणीत कलिनन हिरा सापडला.\n१९११ : ग्लेन एच. कर्टिसने पहिले समुद्री विमान उडवले.\n१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.\n१९३३ : स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड.\n१९३९ : स्पॅनिश गृहयुद्ध - इटलीच्या मदतीने फ्रांसिस्को फ्रँकोने बार्सेलोना जिंकले.\n१९४२ : दुसरे महायुद्ध - आयर्लंडमध्ये अमेरिकन सैन्य उतरले.\n१९४६ : फेलिक्स गोआं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.\n१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.\n१९५६ : इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.\n१९६५ : भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.\n१९९३ : वाक्लाव हावेल चेक प्रजासत्ताकच्या अध्यक्षपदी.\n२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार.\n२००१ : व्हेनेझुएलात सिउदाद बॉलिव्हार जवळ डी.सी.३ जातीचे विमान कोसळले. २४ ठार.\n२००५ : ग्लेन्डेल, कॅलिफोर्नियात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. ११ ठार, २०० जखमी.\n२००५ : इराकच्या पूर्व भागात अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले. ३१ सैनिक ठार.\n१४९७ : गो-नारा, जपानी सम्राट.\n१७६३ : चार्ल्स चौदावा, स्वीडन व नॉर्वेचा राजा.\n१८१३ : हुआन पाब्लो दुआर्ते, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्रपिता.\n१८५७ : दलाई लामा, बारावा अवतार.\n१८६२ : फिलिप हचिन्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१८८० : डग्लस मॅकआर्थर, अमेरिकन सेनापती.\n१९०३ : जॉफ्री लेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१५ : राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. 'राणी' ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.\n१९१८ : निकोलाइ चाउसेस्क्यु, रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष.\n१९१९ : खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९२७ : होजे अझ्कोना देल होयो, होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४५ : किम ह्युस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९५३ : अँडर्स फो रासमुसेन, डेन्मार्कचा पंतप्रधान.\n१९५७ : शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९५७ : अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९६२ : टिम मे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६२ : रोशन गुणरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ : सायमन ओ'डोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६८ : क्रिस प्रिंगल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९७४ : समन जयंता, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१६३० : हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.\n१८८५ : एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.\n२००० : डॉन बज, सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा अमेरिकन टेनिस खेळाडू.\n२०१५ : आर.के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/7148926", "date_download": "2018-04-23T11:49:46Z", "digest": "sha1:2IPBP5CCJDLTAR5RQNMJLGLTCAJY6F77", "length": 5341, "nlines": 52, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "10 मिल्टर प्रति दिन आपल्या पीपीसी मोहिमेत सुधारणा कशी करावी? | Ep. # 121", "raw_content": "\n10 मिल्टर प्रति दिन आपल्या पीपीसी मोहिमेत सुधारणा कशी करावी\nएपिसोड # 121 मध्ये, एरिक आणि नील अशा प्रकारे चर्चा करतात की आपण आपल्या पीपीसी मोहिमांमध्ये प्रतिदिन केवळ 10 मिनिटे सुधारू शकतो. आपल्या पीपीसी मोहिमांवर कार्य करणे आपल्या कीवर्डच्या अहवालांचा विचार करणे किंवा आपल्या लँडिंग पेजचे मूल्यांकन करणे आणि कॉपी करणे तितकेच सोपे आहे. आपण ज्या पद्धतीने मोजमाप लावू शकता त्या नमुन्यामध्ये दररोज खूपच लहान वेळापर्यंत आपल्या PPC मोहिमांचे मूल्यांकन आणि समायोजित करू शकता.\n00:27 - आजचा विषय:\n00:33 - व्यासपीठ काहीही असो, आपण फ्रेमवर्क कसे सेट करू शकता याचा विचार करा\n00:59 - AdWords सह, आपल्या खात्यांमधून जा आणि कार्य करीत नसलेल्या गोष्टींना विराम द्या\n01:37 - लँडिंग पेजवर फोकस करा आणि आपली कॉपी\n02:15 - पॉप अपमधून निर्गमन करा, Google चे धोरण खंडित करू नका\n02:40 - स्टॉक इमेज वापरा किंवा डिझाईन पिक काढुन पहा आणि पीपीसी\nसाठी कोणती प्रतिमा वापरू शकता ते पहा.\n03:25 - एक सर्वेक्षण चालवा\n03:50 - Qualaroo चे सर्वेक्षण साधन वापरा\n04:15 - आपल्या कीवर्ड अहवालांचा विचार करा\n05:10 - पीपीसीसाठी मर्यादित स्त्रोत आहेत\n05:33 - आपल्या पीक तास खर्च\n06:38 - परिणाम जलद मिळविण्यासाठी पैसे जलद खर्च करा\n07:01 - शैक्षणिक साधन वाहतूक पाठवा\n07:40 - पॉवर एडिटर, एडिएसप्रेसो किंवा क्वाएया वापरा\n08:07 - बोर्डवर अधिक क्रिएटीव्ह मिळवा\n08:27 - सीपीआर वरील एडईस्प्रेसोचे पोस्ट\n09:15 - आजच्या भागासाठी तेच आहे\nसर्वेक्षण चालवून आणि कीवर्डच्या अहवालांचे परीक्षण करून काय करीत आहे आणि ते कार्य करीत नाही याचे मूल्यमापन करा - vps that allows ddos.\nक्रिएटिव्हजची नियुक्ती आपल्या पीपीसी मोहिमांना आवश्यकतेस चालना देऊ शकते.\nआपल्या पीपीसी जाहिरातींचे व्यवस्थापन आपल्या वेळापत्रकात दिवसाचा बराचसा 10 मिनिट घेण्याची आवश्यकता नाही.\nआम्ही पुढील काय बोलावे कृपया खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आम्हाला कळवा.\nआपण या घटनेचा आनंद घेतला का तसे असल्यास, कृपया एक लहान पुनरावलोकन द्या.\nआम्ही महान कंपन्यांना त्यांच्या महसुलात वाढीसाठी मदत करतो\nआपल्या विनामूल्य विपणन सल्ला मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtrapoliticalparties.in/balasaheb-patil.html", "date_download": "2018-04-23T11:50:49Z", "digest": "sha1:VMEON77GM77A55CZ3AQBIJ3DWHW4GPTC", "length": 20745, "nlines": 89, "source_domain": "maharashtrapoliticalparties.in", "title": "", "raw_content": "\nName : बाळासाहेब पाटील\nConstituency : पनवेल विधानसभा मतदार संघ\nParty Name : भारतीय जनता पार्टी\nDesignation : मा. रायगड जिल्हा अध्यक्ष\nFather's Name : ज्ञानदेव पाटील\nSpouse’s Name : छाया बाळासाहेब पाटील\nNo. of Children : एकूण ०२, एक मुलगा आणि एक मुलगी\nLanguages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी\nHobby : वाचन, समाजसेवा, नवीन लोकांना भेटणे त्यांचे विचार ऐकणे इ.\nResidence Address : सी / २०५, संघमित्रा सोसायटी, पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०६\nOffice Address : १७, संघमित्रा सोसायटी, प्लॉट नं. १००, गार्डन हॉटेलच्या मागे, ता. पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०६\nसमाजकार्यापासून कामाला सुरवात करून जनतेचे प्रश्न सोडविण्यात कायम तत्पर राहिलो.\nराजकीय क्षेत्रात समाजकारणासाठी आलो. ८०% समाजकारण व २०% राजकारण हा मुलमंत्र कायम जपला.\nप्रथम पनवेल शहर भाजपचा उपाध्यक्ष म्हणून सुरवात करून नंतर शहर अध्यक्ष व त्यानंतर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली व ती यशस्वीपणे पार पाडत आहे.\nबाळासाहेब पाटील यांची राजकीय वाटचाल...\nपदवीधर असलेल्या बाळासाहेब पाटील यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र असल्यामुळे श्री. बाळासाहेब पाटील यांना देशप्रेमाचा वारसा जन्मजातच लाभला आहे. समाजकारण हा तरूण वयापासून बाळासाहेबांचा आवडीचा विषय आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाळासाहेब पुढाकार घेत व त्यासाठी दिवसरात्र झटत. आपला माणूस अशी प्रतिमा बाळासाहेबांनी जनमानसात निर्माण केली. माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचंय माझ्या समाजासाठी मला काहीतरी चागलं काम करायचंच माझ्या समाजासाठी मला काहीतरी चागलं काम करायचंच या भावनेने प्रभावीपणे समाजकारण करण्यासाठी राजकीय पक्षाचे माध्यम जवळ असलं पाहिजे. या हेतूने बाळासाहेबांनी राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.\nभारतीय जनता पार्टीचा चेहरा ओबीसींचे नेते “गोपीनाथ मुंडे” यांच्यामुळे महाराष्ट्रात बदलत होता. पक्षात आल्या आल्या बहुजन समाजातील बाळासाहेबांवर भाजपाने पनवेल शहर उपाध्यक्षपदांची जबाबदारी सोपविली. उपाध्यक्षपदांवर प्रभावीपणे कार्य केल्यामुळे बाळासाहेबांना अल्पावधितच ऐतिहासिक पनवेल शहराचे अध्यक्षपद भाजपाने बहाल केले. या संधीचा फायदा घेऊन आपलं कर्तृत्व सिध्द करण्यासाठी बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना संघटीत केले आणि पहिल्यांदा पक्षसंघटना मजबुत केली. गोपीनाथ मुंडे यांनी सत्ता परिवर्तनासाठी महाराष्ट्रात काढलेली “संघर्ष यात्रा” पनवेलला आली तेव्हा पनवेल नगर परिषदेच्या “छत्रपती संभाजी महाराज” मैदानावर मोठी सभा झाली. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सभेसाठी लोकांनी केलेली गर्दी पाहून गोपीनाथ मुंडे यांसारखा लोकनेताही भारावून गेला. गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब पाटील यांची पाठ थोपटली आणि बाळासाहेबांना रायगड जिल्हाध्यक्ष करा अशी शिफारस त्यांनी प्रदेश कार्यकारिणीकडे केली. बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रायगड जिल्हयाचे” भाजपा “जिल्हाध्यक्ष” झाले.\nरायगड जिल्हयात शेकापक्ष आणि काँग्रेस या प्रस्थापित मात्तबर राजकीय पक्षांचे प्राबल्य होते. त्यांना आंदोलनांचा आणि राजकीय सत्तेचा असलेला वारसा त्यांची पक्ष संघटना त्यांची ताकद पाहता त्यांच्यासमोर भाजपाची रायगड जिल्ह्यात वाढ करणं हे बाळासाहेबांसमोर एक मोठे आव्हान होते पण हे आव्हान बाळासाहेबांनी स्विकारलं.\n“मै अकेलाही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गऐ और कॉरवा बढता गयाँ \nएका उर्दू शायरने म्हटल्याप्रमाणे या शेर सारखे जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात आत्मविश्वासाने बाळासाहेब गेले. एक एक कार्यकर्ता हाताशी धरीत पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला आणि पाहता पाहता भाजपाची ताकद वाढली. आजही बाळासाहेब पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जातात. कार्यकर्त्यांना धीर देतात. सर्वसामान्य माणसांच्या प्रशासकीय समस्या, कोणत्याही वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी रात्री-अपरात्री वेळ काळ न बघता धावून जातात. एखाद्याचे काम केले तर त्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी कसा करता येईल अशा उद्देशाने काम न करता कर्तव्यभावनेने कामाकडे बाळासाहेब पाहतात असा त्यांचा स्वभावगुण आहे. त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या हितचिंतकांचा मोठा जमाव आहे. आपल्या निरपेक्षवृत्तीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हृदयात बाळासाहेबांनी अढळस्थान निर्माण केले आहे.\nविविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात कायम तत्पर राहिलो.\nजनतेचे विजेचे प्रश्न, वन खात्याचे प्रश्न, तहसील व प्रांत खात्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, पोलीस प्रशासन तसेच इतर प्रशासकीय प्रश्नांना कायमच वाचा फोडून वेळेप्रसंगी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले.\nगुणवंत व हुशार विद्यार्थी तसेच शिक्षक, मुख्यध्यापक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन.\nस्थानिकांना टोल माफि मिळविण्यासाठी जनआंदोलन उभेकरून ती लढाई अद्यापही सुरूच आहे व स्थानिकांना टोल माफी मिळेपर्यंत ती सुरूच राहील.\nऊसर्ली व रीटघर ग्रामस्थांचा वीजेचा जिव्हाळयाचा प्रश्न त्वरीत सोडवला. आवश्यक पुरवठयापेक्षा जास्त क्षमतेचा transformer लावून घेतला व प्रशासनाकडून फार काळापासून प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविला.\nकळंबोली विभागातील अनेक सोसायट्यांना हेडसावणारा ड्रेनेज व्यवस्थापने संदर्भातला प्रश्न सिडकोच्या आडमुठी भुमिकेमुळे पेटला होता. बाळासाहेबांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व स्थानिक संघर्ष समितीच्या सहकार्यामुळे कामी वर्षांचा प्रश्न मार्गी लागला.\nतळेजाएम्. आय्. डी. सी. (MIDC) येथील नावडे फाट्याजवळील रेल्वेलाईनवर ओव्हरहेड ब्रिज नसल्यामुळे सतत ट्रॅफिक जाम असायचे ही समस्या सोडविण्यासाठी श्री. बाळासाहेब पाटील व इतर भा.ज.पा. कार्येकत्यांनी उपोषन केले व आक्रमक पाठपुरावा केल्याने आज तेथे सहा पदरी उड्डाण पुल उभा राहीला असून तेथील ट्रॅफीक समस्या सुटली आहे.\nजातपडताळणी प्रशासनाच्या गलभन कारभारामुळे विद्यार्थी व जनतेला रांगेत तासनतास उभे राहावे लागत होते व त्यानंतरही दाखला मिळेलचं याची हमी मिळत नव्हती या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी श्री. बाळासाहेब पाटील यांनी कार्यकरर्त्यांसमवेत बेलापूर येतील जातपडताळणी कार्यालयात धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले व तयार असलेले 700 दाखले त्वरीत वितरीत करून घेतले त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अतिशय आनंदीत होऊन भा.ज.पा ला शुभेच्छा दिल्या. तसेच हे तातपडताळणीचे काम त्या त्या विभागीय स्थरावर तहसिलदार कार्यालय वा प्रांत कार्यालय या ठिकाणी करण्यात यावे जेणेकरून एकाच ठिकाणी येणारा कामाचा ताण कमी होईल व लवकरात लवकर दाखले मिळतील.\nरायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार अथवा खासदार नसताना, केवळ प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर इतर ठिकाणाच्या आमदार खासदरांचे विकासनिधी पनवेल व रायगड विभागात वापरून करोडो रूपयांची अनेक लोक उपयोगी कामे यशस्वीरित्या पुर्ण केलेली आहेत. संजयजी केळकर, अशेाकराव मोडक, प्रकाशजी जावडेकर, स्वर्गवासी वेद प्रकाशजी गोयल यांच्या विकास निधीतून रस्ते, नळ-जोडणी योजना, स्मशानभुमी नतुनीकरण, रस्त्यांचे काँक्रेटीकरण, व्यायामशाळा, बोअरवेल अशा अनेक कामांचा समावेश आहे.\nचेअरमन - पनवेल अर्बन को. ऑ. बँक.\nअध्यक्ष - जयहिंद कला-क्रीडा मंडळ.\nअध्यक्ष - रिक्षा चालक मालक संघटना.\nसमाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता \nजनतेचे कोणतेही ज्वलंत प्रश्न सोडविले जातील.\nसुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार मिळवून दिला जाईल.\nशाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडविल्या जातील.\nशासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.\nगरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.\nगरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.\nपक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:\nगुणवंत व हुशार विद्यार्थी तसेच शिक्षक, मुख्यध्यापक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन.\nमोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप शिबिर.\nगरजू विद्यार्थांना वह्या वाटप.\nखारघर येथे उभारण्यात येणाऱ्या टोल नाका रद्द करण्यासाठी यशस्वी जनआंदोलन.\nसर्व थोर समाजसुधारकांच्या जयंत्या साजऱ्या करणे.\nरायगड जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना बाहेरील आमदार व खासदारांचे करोडोंचे निधी वापरून रस्ते, स्मशानभूमी, व्यायामशाळा, पाणी योजना, ड्रेनेज व्यवस्था, बोअरवेल, क्रोंकीटीकरण अशा अनेक प्रकारची कामे केलेली आहेत.\nबाळासाहेब पाटील यांचे पेपर बातम्या, लेख...\nखारघर टोल ला विरोध दर्शवण्यासाठी मिस कॉल आंदोलन\n'व्होट्स अप्स' नंबर ९७६९५६७६६६\nशेकडो मुस्लिम बांधव भाजपात\nखारघर टोल विरोधात भाजपचा हल्ला बोल\nमोदी फिवरचा फायदा उचलणार : बाळासाहेब पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/588/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T11:15:31Z", "digest": "sha1:HF4OIFDSJHVC2SRLF74KR5GAGJ4KJ67W", "length": 8730, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यात अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार\nनाशिकमधील मनमाड येथे रविवारी एका युवकाने आणि आज निबांयत येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का अशई खंत त्यांनी व्यक्त केली.\nनाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली असता सरकारने निर्लज्जपणे एक रुपये अनुदान दिलं. एक रुपयात चहा तरी मिळतो का, अशी उपरोधिक टीका पवार यांनी केली. शेतकरी समाधानी असेल तरच देशाची आर्थिक घडी सुरळीत राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेस्तोवर संघर्षाची भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nयावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. राजेश टोपे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.पंकज भुजबळ, भाई जगताप, गोपालदास अग्रवाल, बाळासाहेब थोरात, अबू आझमी, राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष काढणार संघर्ष यात्रा ...\nसरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची संयुक्त बैठक आज विरोधी पक्षनेते राधीकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेकाप आणि इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते व आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांचा आवाज संपूर्ण राज्यात पोहोचवण्यासाठी येत्या २९ तारखेपासून चंद्रपूर ते सिंधुदुर्गापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आठवडाभर चालणाऱ्या या संघर्ष यात्रेचा रायगडमध्ये समारोप होईल.विरोधी पक ...\nशेतकऱ्यांच्या बांधावर जाणार म्हणे, सरकारला शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का\nआज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या तिस-या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी साताऱ्यातील गांधी मैदान येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.मुख्यमंत्री आता संघर्षयात्रेला घाबरले आहेत. त्यांचं आसन अस्थिर होतं की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आता संवाद यात्रा काढणार असे ऐकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी सांगितले. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार पण यांना शेताच्या चिखलात उ ...\nअर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे ...\nयंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dholpathak.org/", "date_download": "2018-04-23T11:04:12Z", "digest": "sha1:YRH4F4QA7NNNPUHUSIO3WMDDIH4PJYKK", "length": 2643, "nlines": 32, "source_domain": "www.dholpathak.org", "title": "home Page | Dholpathak", "raw_content": "\n॥ ॐ गं गणपतये नमः ॥\nअजून एक गोष्ट मला या पथकाने दिली आहे ती म्हणजे जरी आपला पराभव झाला तरी, परत उठून संघर्ष करायची भावना माझ्या मनात ठसली आहे व पराभवला स्वीकारून त्यावर मात करून त्यावर विजय प्राप्त करणे हीच संघर्ष ची ओळख आहे.\nहे ढोल पथक एक नुसती करमणूक नसून आम्ही या पथकाच्या माध्यमातून तरूणांना एकत्र करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सुध्दा करत आहोत. अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे.\nहे नुसते पथक नसून एक परिवार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक सदस्याला आम्ही आमच्या परिवाराचा अविभाज्य भाग मानतो. इथे आम्ही सर्वांनीच परस्परांमधे एकजूट आणि प्रेम नेहेमीच जपलं आहे.\nआमच्या येथील वाद्यवृदांतला प्रत्येक सदस्य हा अनेक सरावांमधून गेल्याने तुम्हाला तुमच्या मनोरंनाचा एक वेगळाच आनंद मिळतो.. सुसज्ज असं वादन साहित्य आणि मुली आणि मुले असा संघ आमच्याकडे कार्यरत आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T11:45:23Z", "digest": "sha1:MIL3OC5BZ2INHIZKX62X3P6V3D7AZMZQ", "length": 7050, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोरेलोस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोर्तो मोरेलोस याच्याशी गल्लत करू नका.\nमोरेलोसचे मेक्सिको देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,८९३ चौ. किमी (१,८८९ चौ. मैल)\nघनता ३७० /चौ. किमी (९६० /चौ. मैल)\nमोरेलोस (संपूर्ण नाव: मोरेलोसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Morelos) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या दक्षिण भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान तर लोकसंख्येनुसार २३व्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील लोकसंख्या घनता मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वेर्नाव्हाका ही मोरेलोस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nयेथील हवामान उबदार असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस ·इदाल्गो ·कांपेचे ·किंताना रो ·कोआविला ·कोलिमा ·केरेतारो ·ग्वानाह्वातो ·गेरेरो ·च्यापास ·चिवावा ·ताबास्को ·तामौलिपास ·त्लास्काला ·दुरांगो ·नायारित ·नुएव्हो लेओन ·बेराक्रुथ ·पेब्ला ·बाहा कालिफोर्निया ·बाहा कालिफोर्निया सुर ·मिचोआकान ·मेहिको ·मोरेलोस ·युकातान ·वाशाका ·हालिस्को ·साकातेकास ·सान लुइस पोतोसी ·सिनालोआ ·सोनोरा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://thodigammatjammat.wordpress.com/2011/12/27/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T11:08:10Z", "digest": "sha1:4IZO3RJU52JWYIHZOUUJNXQ7V72BJI2P", "length": 18013, "nlines": 208, "source_domain": "thodigammatjammat.wordpress.com", "title": "नोकरी | थोडी गम्मत जम्मत", "raw_content": "थोडी गम्मत जम्मत आता होऊन जाऊ द्या………\nयावर आपले मत नोंदवा\nएकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही.\nत्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून\n३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो\n“अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे तेव्हढे जेवण मिळेल.\nमग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते.\nअसाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो.\nत्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो\n“गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017\nनमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017\n​​’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]\nरक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017\nनमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील जून 22, 2017\nनमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो. पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार आहे.... Continue Reading → […]\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\n*हुंडा फक्त मुलगाच मागतो का…* समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त. मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली. “समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…” “हं. जाऊ चल. आलोच.” समीर […] […]\nसकारात्मक विचार…. —————————————- आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात. खरतर […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत […] […]\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस .. शिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत नॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे . एरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातू […]\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nॲनिमेशन (Animation) म्हणजे काय\nजर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]\nबा चा बा ची\nUncategorized उखाणे एकच नंबर कविता गंमतीशीर विधाने गमतीशीर विडंबने चपराक चारोळ्या पांचट पुणेरी म्हणी रजनीकांत विनोदी कथा विनोदी कविता विनोदी चुटकुले विनोदी निबंध विनोदी प्रश्न विनोदी लघु कथा विनोदी संवाद शुभेच्छा शेर शायरी सरदार जोक्स हत्ती-मुंगी-जोक्स हाय-टेक विनोद\nरजनीकांत :- अशक्य काहीच नाही\nकॉलेज मधला ‘ गारवा ‘\nबा चा बा ची\nविनोदी लघु कथा (10)\nइथं येणारे सगळे लोक असंच सांगतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/february/", "date_download": "2018-04-23T11:35:42Z", "digest": "sha1:55CPZLRZRST5TPCTFMGSBV566SEMJPKG", "length": 8890, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.com", "title": "फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » फेब्रुवारी\nफेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९\nकल्‍पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. कल्‍पना चावला ह्या भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या प्रथम महिला अंतराळवीर होत्या.\nदिमित्री मेंडेलीव - (८ फेब्रुवारी १८३४ - २ फेब्रुवारी १९०७) हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली.\nउमाजी नाईक - (७ सप्टेंबर १७९१ - ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.\nपंडित भीमसेन जोशी - (४ फेब्रुवारी १९२२ - २४ जानेवारी २०११) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.\nअभिषेक बच्चन - (५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली.\nजानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल\nमे जून जुलै ऑगस्ट\nसप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसहा दिवसांची पिकनिक ‘सहा दिवस सात रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nसात दिवस आणि सहा रात्री भाग २\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945942.19/wet/CC-MAIN-20180423110009-20180423130009-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}